मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

पगला गजोधर ·

फुंटी Fri, 09/19/2014 - 13:03
त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन सांगा रे ..बाबा हा महाराष्ट्र आहे.यु.पी. नाही...युती तुटण्यात गुजराती मराठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.महाराष्ट्र विकत घ्यायचं मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेला दूत अमित शहा याची कालच्या सभेतली वक्तव्य अतिशय माजोरडी होती.शिवसेनेला अनुल्लेखाने मारण्यात आलं...त्यामुळे युती तुटली तर त्यात नवल काही नाही.केंद्रातील कॉंग्रेस सरकारपेक्षा राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच सरकार दोन -चार अपवाद(आव्हाड-छोटेपवार ,राणे) वगळता चांगल आहे.मोदींचा अतिप्रभाव आणि त्यातून साधली जाणारी व्यावसाईक गणित चुकवण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे.

In reply to by फुंटी

विटेकर Fri, 09/19/2014 - 14:40
बिल्कुल नाही ! आता जर ते परत सत्तेत आले तर ..? राष्ट्रपती राजवट परवडली. मला कल्पना देखील करवत नाही !

In reply to by विटेकर

बिल्कुल नाही ! आता जर ते परत सत्तेत आले तर ..? राष्ट्रपती राजवट परवडली. मला कल्पना देखील करवत नाही>>>> खरंय ,मी सुद्धा रामराज्य यायची वाट बघतोय.

In reply to by फुंटी

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 15:30
बास हो! उगीच गुजराती, मराठी, शेठजी-भटजी, महाराष्ट्र विकत घेणे आणि यंव आणि त्यंव. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एकूणच त्यांचे मतदार हे अतिशय जातीयवादी, जुन्या ९६ कुळी टाईप विचारांचे आणि अतिशय माजोरडे आहेत. बाकी महाराष्ट्र जर अमित शहा विकत घेणार असेल तर आत्तापर्यंत पवार, चव्हाण, देशमुख आणि तत्सम प्रभृती काय करत होत्या? महाराष्ट्र तुकडे पाडून विकायचंच काम चाललं होतं ना? राणे दर थोड्या दिवसांनी दिल्ली ला जायचे ना लोटांगण घालायला? चव्हाण आणि थोरले पवार दिल्लीत जावून पॉलीश करून येतातच ना दर थोड्या दिवसांनी? आणि न विकायला असं काय सोन्याचा करून ठेवलाय महाराष्ट्र या आघाडीने? सगळीकडे रस्ते उकरून ठेवलेत, रस्ते धुळीचे, खड्डे, पाणी शेतीच्या नावाखाली पळवणे..

In reply to by काळा पहाड

पवारांनी लवासा आणलं, त्याआधी ठाकरेँनी अँम्बी व्हॅली आणलं काँराकाँ ने टोल वाढवला ,त्याआधी माठकरीने एक्स्प्रेस वे ला टोल लावून, टोल कल्चर सुरु केले. खाउजा धोरण भाजपाने सुरु केले. राज्य विकायला काढले सेनाबीजेपीने ते आधी कबुल करा.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 16:14
जसे त्याच्या आधी स्वर्गच होता...ते ५५ उड्डाणपुल व्हायलाच ५५ वर्षे लागली...ते झाले त्यामुळेच वाहतुकीचा ताण थोडासा का होइना पण कमी झाला हे साले हरा*** काँ.रा.काँ. वाले..त्यांनी टोलची मुदत वाढवायला सुरु केली

In reply to by टवाळ कार्टा

बीजेपी टोलमुक्ती गोष्ट करत आहे ,पण तो बनावच .गॅस सिलेंडरवर कॅप बसल्यावर बेंबीच्या देठापासुन कोकलणारे मोदी जेटली स्वराज आता गप्प का आहेत ?सत्ता आहे ना ,काढा कॅप, करा चालू अनुदान परत प्रत्येक सिलेंडरवर, नाहीतर जाहिर कबुली द्या कि सिलेंडरच्या बाबतीत काँग्रेसवर केलेली टीका चूकीची होती.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:37
अडाण्यासारखं बोलणं बंद करा. रोड बनवायची मराठी लोकांना जनतेला अक्कल नाही आणि पैसा नाही. टोलवाल्या कंपन्या फुकट तुमचे रोड बनवून तुमचा प्रवास सांभाळतील का? तुम्ही स्वतःला काय देशाचे राजे वगैरे समजता की काय की तुम्हाला त्यांनी फुकट गोष्टी बनवून द्याव्यात? काय स्थिती होती बीजेपी ने पुणे मुंबई एक्स्प्रेस वे बनवण्या अगोदर? पीपीपी ला बिझनेस मॉडेल म्हणतात. टोल ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे प्रगती हवी असेल तर. नाही तर मग सरकार करूदे रोड. पण साठ वर्ष खा खा करून खजिना रिकामा केल्यावर त्यात पैसे नको का रस्ते बांधायला? का लोकांनी तसाच प्रवास करूदे खड्ड्याच्या रस्त्यात? बाकी बिझनेस वगैरे गोष्टी मराठी लोकांना कळत नसल्याने त्यांनी यात गुढगेगिरीचं प्रदर्शन करू नये हे उत्तम.

In reply to by काळा पहाड

रोड टॅक्स राज्यातली जनता देतच होती, तो घेऊन परत टोल कल्चर बीजेपीने राज्यात का आणले? एकिकडे पीडब्ल्युडीचे पंख छाटून बीओटी तत्वावर टोल कल्चर सुरु केले, आघाडीच्या नावाने बोंब कोणत्या नैतिक अधिकारावर मारणार? एन्रॉन खड्ड्यात घालुन राज्याला पंधरा वर्ष भारनियमनाचा खाईत लोटणारे बिजेपीचे लोक आज विकासाच्या बाता करत आहेत, २००२ला दुष्काळ पडलेला असताना आघाडीच्या राज्य सरकारने पाच हजार कोटींची मागणी वाजपेयी सरकारकडे केली, परंतु वाचपेयींनी फक्त पन्नास कोटी देऊ केले. तेव्हा भरीव मदत दिली असती तर राज्यातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्या नसत्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 20:07
एन्रॉन खड्ड्यात घालुन राज्याला पंधरा वर्ष भारनियमनाचा खाईत लोटणारे बिजेपीचे लोक आज विकासाच्या बाता करत आहेत,
बीजेपी केंद्रात आली आहे...ते सुध्धा उणेपुरे १०० दिवसच झालेत काँ.रा.काँ. गेली १० वर्षे महाराष्ट्रात काय झोपा काढते आहे मंत्रालयात? इतकीच जर भारनियमाची चिंता होती तर आणायचे होते परत एन्रॉनला...एन्रॉन नसेल येत तर दुसर्या कोणाला तरी बोलवायचे आणि माझे प्रतिसाद वाचुन जर मी काँ.रा.काँ. विरोधक किंवा युतीसमर्थक आहे असा समज झाला असेल तर जरा अभ्यास वाढवा

श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 13:35
युती तुटेल असं वाटलं नव्हतं. पण शिवसेनेने आपल्या अवास्तव ताकदीचा भ्रम अखेरपर्यंत दूर केला नाही. आपण भाजपपेक्षा ताकदवान आहोत आणि भाजप केवळ आपल्या दयेवर अवलंबून आहे असा शिवसेनेचा गैरसमज खूप पूर्वीपासून होता. भाजपला शिवसेनेचे ओढणे कधी ना कधी तरी दूर करावे लागणारच होते. आता ती वेळ आली आहे. आपण भाजपपेक्षा खूप ताकदवान आहोत असा शिवसेनेचा भ्रम १९८६ पासून होता आणि तो पूर्ण खोटा होता. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेला लोकसभेत एकही उमेदवार निवडून आणला नव्हता (त्यावेळच्या इंदिरा लाटेत इंदिरा काँग्रेसने ४८ पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. पण इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेच्या हाती भोपळाच आला होता.) त्यानंतर एप्रिल १९८० मध्ये भाजप स्थापन झाल्यावर लगेचच मे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागात १२ जागा मिळविल्या होत्या (कोकण, पुणे, ठाणे, मुंबई, मराठवाड, विदर्भ इ. सर्व भागात भाजपने १-२ आमदार निवडून आणले होते). पण तिथेही शिवसेनेच्या हाती भोपळाच लागला. त्यावेळी शिवसेना मुंबई व ठाण्याच्या बाहेर कोणालाही माहिती नव्हती तर भाजपचे अस्तित्व तुरळक प्रमाणात का असेना पण महाराष्ट्राच्या सर्व भागात होते. १९८५ मध्ये सुद्धा विधानसभेत भाजपचे १६ आमदार निवडून आले तर शिवसेनेचा फक्त १ निवडून आला होता. १९८५ च्या सुमाराला अडवाणींनी पक्षसूत्रे हाती घेतल्यावर पक्षवाढीसाठी इतर पक्षांशी आघाडी करण्याची योजना आखली व त्यामुळेच सेना-भाजप युती जन्माला आली. पक्षवाढीसाठी भाजपने पडती भूमिका घेतल्याने शिवसेनेचा आपल्या ताकदीविषयी अवास्तव गैरसमज झाला. २००५ मध्ये राज ठाकरे व राणे सोडून गेल्यावर आपला पक्ष अत्यंत दुर्बल झाला आहे हे शिवसेना मान्यच करायला तयार नाही. २००९ मध्ये १६९ जागा लढवून सेनेला फक्त ४४ जागा मिळाल्या तर ११९ लढवून भाजपने ४६ जागा जिंकल्या होत्या. २०१२ मध्ये बाळासाहेब गेल्यावर तर शिवसेना अजून दुर्बल झाली आहे. आता १८ खासदार निवडून आले ते स्वतःच्या ताकदीने आले नसून मोदींच्या प्रभावामुळे आले आहेत हे कबूल करायची सेनेची तयारीच नाही. शिवसेनेत तसे विचारी नेते अगदी थोडे होते. सुधीर जोशी, मनोहर जोशी, सुरेश प्रभू इ. मोजकेच नेते विचारी म्हणता येतील. यापैकी सुधीर जोशी आता नाहीत व इतर दोघेजण निष्प्रभ आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत, रामदास कदम इ. वाचाळ नेते आगीत तेल ओतत आहेत. हे दोघे अनुक्रमे राज्यसभा व विधानपरिषदेवर असल्याने त्यांना आपली चिंता नाही. भाजपला केंद्रात सेनेची गरज नाही. याउलट सेनेला आता व भविष्यात भाजपची कायम गरज लागणार आहे. तरी सेनेचा ताठा कायम आहे. शिवसेनेने आपल्या ताकदीवर आता लढावे म्हणजे स्वत:चा आवाका लक्षात येईल. शिवसेनेत इनकमिंग जवळपास नाहीच. एकट्याच्या ताकदीवर शिवसेना ३०-४० जागा सुद्धा मिळवू शकणार नाही. शिवसेनेने आपला हट्ट पुढे रेटला तर शिवसेनेच्या शेवटाची ही सुरूवात असेल.

In reply to by श्रीगुरुजी

चांगलं विश्लेषण केले गुरुजी तुम्ही. 169 जागा लढून बेचाळीस मिळाल्या तेही थोरले ठाकरे असताना ,आता स्वबळावर तीस जागाही भेटायच्या नाहीत .एकतर मोदीच्या जीवावर अठरा जागा लोकसभेत आल्यात हे उद्धव ठाकरेलाही ठाऊक आहे, तरीही सेनेचा अडेलटट्टूपणा जात नाही .उद्या सत्तेवर आल्यास राज्याचे हित न बघता भांडतच बसणार. माझे मत आघाडीला द्यायचे नक्की केलेय, कारण मोदी केँद्रात फक्त पाट्या टाकायचं काम करत आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

माझे मत आघाडीला द्यायचे नक्की केलेय, कारण मोदी केँद्रात फक्त पाट्या टाकायचं काम करत आहेत.
एरव्ही काय तुम्ही शिवसेना भाजप युतीला मत द्यायच्या विचारात होता की काय ? *biggrin* बाय द वे , तुमच्या मतदारसंघात पाण्याची सोय कशी आहे हो =))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व चांगल्या उमेदवाराला मत देतो. मोदी केंद्रात पाट्या टाकतोय त्यामुळे त्याच्याकडून राज्याचा विकासाची अपेक्षा फोल ठरेल, राज्यात सक्षम व विचारी पक्षाच्या यादीत आघाडी योग्य वाटत आहे .भाजप व सेनेची पोरंटोरं त्या मोदीसमोर माना टाकणार ,गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक असल्याने मोदी महाराष्ट्राच्या वाट्याचं सगळं गुजरातकडे नेणार,( अदाणीला खुश करायला )व महाराष्ट्र मागे कसा राहील हेच मोदी पाहणार, त्यामुळे आघाडीला मत देणे योग्य ठरेल. नुकतेच चीनचे पंप्र येऊन गेले ,सगळी इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये, कोस्टल पोलिस ट्रेनिंग संस्था महाराष्ट्राला मिळाली ,ती मोदीने गुजरातला पळवली, इतका हा धुर्त व चालू माणुस आहे. आघाडी फार चांगली आहे असे नव्हे ,पण या मोदीला आवरायला हवे कुठेतरी, सगळंच याच्या ताब्यात गेले तर राज्याच्या जन्तेच्या हातात मोदी धत्तुरा देईल. आमच्या गावात पिण्याचे पाणी भरपुर येते.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:28
गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक असल्याने
फालतू समजूत करून घेवू नका स्वतःची. काय लायकी आहे मराठी लोकांची देशात ते जरा पहा. साठ वर्ष झाली सत्तेत येवून आणि इथल्या एका सत्तेवर असणार्‍या जातीला आरक्षण हवंय कारण त्यांना नोकर्‍या तयार करणं तर सोडाच, नोकरी करणं सुद्धा जमत नाहीय. ग्रॅज्युएट मराठी मुलांना साधा बँकेचा फॉर्म भरता येत नाही कारण कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी तो पर्यंत ग्रामपंचायतीची निवडणुक, या नेत्याचा प्रचार करणं, त्या नेत्याचा प्रचार करणं, मोर्चे काढणं, धरणे धरणं, प्राध्यापकांना काळं फासणं एवढच केलेलं असतं. मराठी मुलांना ना धड नीट इंग्रजीत बोलता येतं ना एखादा मुद्दा मांडता येतो. मराठी इंडस्ट्री म्हणजे (काही सन्माननीय अपवाद वगळता) एजंटगिरी. मराठीतल्याच आरटीओ, महसूल वगैरे ऑफिसर ना पैसे खावू घाला व लोकांची कामं करून द्या. याला ना डोकं लागतं ना प्रयत्न. मराठी दुकानं अकरा ते एक आणि चार ते साडे आठ चालतात. महाराष्ट्र प्रगत आहे कारण मुंबई प्रगत आहे आणि ती मराठी माणसांमुळे नक्कीच प्रगत नाही. कुणाला गमजा सांगताय स्पर्धक असल्याच्या?

In reply to by बॅटमॅन

विटेकर Fri, 09/19/2014 - 17:26
आमची उद्योग सोडा दुकान चालविण्याची लायकी नाही ! परवा औन्ध्या ( यमाई ) वरुन विट्याला येत होतो, वाटेत पुसेसावळी नावाचे गाव लागते . बाजाराचे गाव आहे , तालुक्याचे देखील ठिकाण नव्हे , तिथल्या मुख्य चौकातल्या कोपर्‍यावर मारवाड्याचे मिठाई चे दुकान होत ! सगळ्या पेठेत उठून दिसणारे ! इतर मिठाईबरोबर , कचोर्‍या आणि सामोसे ! दुकानावर फुल्ल टू गर्दी ! त्याच्या बरोबर समोर एक कळकट हात-गाडी वडापाव विकणारी ! ही खूप जूनी , किमान ३० वर्षांपासून आहे , मी औन्धाला जातोय तेव्हापासूनची ! माणसे बदलली , गाडी तीच ! गाडीवर मात्र शुकशुकाट ! गावाला त्याचे काही नाही , मारवाडी मस्त गबर झालाय ! टाळकंच हाललं ! पुसे सावळी गाव केव्ढ? पण मारवाडी बाहेरुन येउन गबर झालाय !

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 13:00
>>> आमच्या गावात पिण्याचे पाणी भरपुर येते. ते कसे काय? गावात/गावाजवळ एखादे धरण/बंधारा/तलाव आहे का?

In reply to by नानासाहेब नेफळे

उगा काहितरीच Sat, 09/20/2014 - 13:50
ओ साहेब , तुमचा कितीही विरोध असला तरी पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीचा एकेरी उल्लेख टाळा.

In reply to by काळा पहाड

महागाई कमी करतो असे आश्वासन देऊन चार महीन्यात काय विशेष उपाय योजना केल्या मोदीने? एकही नाही.याला पाट्या टाकत बसणे म्हणतात. ब्राझील जपान भूटान व आता अमेरिकेचे दौरे तेवढे करतोय व यातुन देशाला कमी व गुजरातलाच जास्त मिळतंय. सातत्यानं गुजरातला मात देऊन महाराष्ट्र नंबर एकचे राज्य राहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर कसा राहिल याचेच आराखडे मोदी आखत असेल ,त्याच्यासमोर अडवाणी गप्प बसले तर देवेंद्र तावडे पंकजा वगैरे पोरंटोरं त्याला काय जाब विचारणार.ती पण गप्प बसणार व राज्य खड्ड्यात जाणार. त्यापेक्षा आघाडी काय वाईट आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:14
अ) १.२५ बिलीयन लोक्स असलेल्या देशाची महागाई कमी करण्याबद्दल टीका करणे म्हणजे सचिन तेंडुलकर ने स्वीपचा फटका कसा नीट मारला नाही त्या बद्दल टीका करणे. ते ही ४ महिन्यात? अर्थकारणाबद्दल, त्यातल्या विविध घटकांच्या आंतर संबंधाबाबत काही माहिती आहे का? बाकी मोदींनी कांद्याचे भाव कमी केले तर शेतकरी मरतोय म्हणून तुमच्यासारखे लोकाच शंख करत होते ना? ते असू दे. पेपर वाचता का? हा खालील लेख रॉयटर्स चा जून चा रिपोर्ट: http://in.reuters.com/article/2014/06/18/india-inflation-idINKBN0ES2KS20140618 (ते रॉयटर्सवाले आहेत. जिल्हा बँकेचे किंवा दूध संघाचे अहवाल लिहिणारे नाहीत एवढं लक्षात ठेवा). आणि हा त्याचा परिणामः http://ibnlive.in.com/news/inflation-dips-to-5year-low-of-37-per-cent/499212-7.html इन्फ्लेशन ३.७४% टक्केवर आलं आहे. हे पप्पू आणि मौनी ला गेली ५ वर्ष जमलं नाही. तेव्हा तुम्ही पाट्या टाकायचं सोडा आणि अभ्यास करा. ब)
'ब्राझील जपान भूटान व आता अमेरिकेचे दौरे तेवढे करतोय व यातुन देशाला कमी व गुजरातलाच जास्त मिळतंय. सातत्यानं गुजरातला मात देऊन महाराष्ट्र नंबर एकचे राज्य राहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर कसा राहिल याचेच आराखडे मोदी आखत असेल ,त्याच्यासमोर अडवाणी गप्प बसले तर देवेंद्र तावडे पंकजा वगैरे पोरंटोरं त्याला काय जाब विचारणार.ती पण गप्प बसणार व राज्य खड्ड्यात जाणार. त्यापेक्षा आघाडी काय वाईट आहे?
तसं असतं तर पुण्याला ऑटो टेक्नॉलोजी पार्क मिळालं असतं का? बाकी तुम्ही कालचे चायना बरोबरचे एमओयू पाहिले असतीलच. त्यातल्या गोष्टी गुजरात साठी होत्या काय? राज्य खड्ड्यात जाणार म्हणजे अजून जायचं राहिलंय असं वाटतंय का तुम्हाला? की आपण फार प्रगत राज्यात रहातोय असा भ्रम आहे तुम्हाला? महाराष्ट्र पिछाडीवर आहे तो आघाडीमुळे, मोदी मुळे नव्हे. किती जमीन सिंचनाखाली आणली दादांनी? महाराष्ट्रातले उद्योग गुजरात व कर्नाटकात पलायन का करतायत? चोवीस तास विजेचं काय झालं? विदर्भ आणि मराठवाड्याची काय हालत करून ठेवलीय? पाणी पळवायचे उद्द्योग कुणाच्या आशिर्वादाखाली झाले? जातिय तेढी आणि आरक्षणातून होणारी भांडणं कोणी लावल्या? आणि जमीनी पळवणारे (आणि वर दुसर्‍याला जातियवादी पक्ष ठरवणारे) पवार व तत्सम बरे की पुण्याला ४ महिन्यात ईंडस्ट्रीयल पार्क देणारं, मुंबईच्या विकासाच्या आराखड्याला मुंबई-शांघाई अ‍ॅग्रीमेंट द्वारे हात घालणारं मोदींचं सरकार बरं हे लोक ठरवतीलच. आपल्या कर्मा बद्दल दुसर्‍याला दोष द्यायचे प्रकार तुम्ही अशिक्षित जनते समोर (आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या "दादा तुमच्यासाठी काय पण" छाप दूधा आणि साखर कारखान्याचे अहवालच फक्त वाचू शकणार्‍या लोकांसमोर) चालू ठेवा पण मिपावर लोक सुशिक्षित आहेत! इथं फालतू बोललं तर लोक पप्पू करतात हे जरा लक्षात ठेवून असा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 21:15
आदरणीय श्री. रा. रा. नानासाहेब, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा उल्लेख एकेरी न करता आदरार्थी करावा ही नम्र विनंती. मोदींचा एकेरी उल्लेख करायला ते आपल्या घरचे घरगडी किंवा शाळेतले सवंगडी नसून देशाचे पंतप्रधान आहेत याचे भान असू द्या. >>> महागाई कमी करतो असे आश्वासन देऊन चार महीन्यात काय विशेष उपाय योजना केल्या मोदीने? एकही नाही.याला पाट्या टाकत बसणे म्हणतात. १६ मे २०१४ या दिवशी आपल्या गावात पेट्रोलचे दर प्रति लिटर किती होता? आणि आज किती आहे? १६ मे २०१४ या दिवशी महागाई निर्देशांक किती होता आणि आज किती आहे?

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Fri, 09/19/2014 - 21:41
आपल्या घरचे घरगडी किंवा शाळेतले सवंगडी नसून देशाचे पंतप्रधान आहेत याचे भान असू द्या.
हा हा हा. हे पटलं. आवडलं. हे सर्वच पंतप्रधानांना लागू आहे की फक्त मोदीमजकुरांना?

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Tue, 09/23/2014 - 15:22
हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा पाटील-शेखावत या राष्ट्रपती होत्या हो.. नै म्हंजे म्हैत असावं म्हणोन.

In reply to by हाडक्या

काळा पहाड Tue, 09/23/2014 - 15:51
हो. ते पेपरमधून वाचल्यावर कळलं खरं. बंगला बांधायची बातमी, वस्तू घरी नेल्याची बातमी, त्यांच्या नवर्‍याबद्दल बातमी. काँग्रेसच्या अतिशय प्रतिभावंत कार्यकर्त्या खरंच. किती स्वच्छ प्रतिमा. तुमच्यासारखे चाहते त्यांच्या पाठीशी असल्यावर नवल नाही की त्यांनी इतका मोठा ठसा राष्ट्रपतीभवनावर उमटवला.

In reply to by काळा पहाड

हाडक्या Tue, 09/23/2014 - 16:48
अहो. तो नानासाहेबांच्या प्रतिसादाला उपरोध म्हणून होता. पण जाऊ द्या (आमचाच पोपट झाला म्हणायचा ;) )..

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Tue, 09/23/2014 - 15:43
तर काय! तुम्ही आडवाणींना पंतप्रधान समजत होता कि काय??? ROFL
नै ब्वा. पण आम्माला तर गेली पाच वर्ष प.पू.सोनियाजी पंतप्रधान आहेत काय असंच वाटत होतं. प.पू.राहुलजी उपपंतप्रधान आहेत हे तर आम्हाला माहीतच होतं.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी Tue, 09/23/2014 - 20:40
सोनिया निव्वळ पंतप्रधान नव्हत्या, तर त्या पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री इ. सगळे काही होत्या.

In reply to by बॅटमॅन

फुंटी Tue, 09/23/2014 - 15:46
मनमोहन सोनियांची एडिट केलेली छायाचित्रे नाही दिसली का ? तेव्हा कुठे गेला होता हो आदरभाव वगैर...???? एकतर्फी का ठोकताय राव ??

In reply to by फुंटी

हाडक्या Tue, 09/23/2014 - 16:55
या आदरभावाबद्दल मात्र सहमत.. हे मोदी फ्यान फार पक्षपाती पणा करतायत राव. हे काही बरोबर नाही. जसा आर्मीमध्ये रँकला सलाम असतो. तसाच इथे पदाला मान असतो ना. मग भले कठपुतळी का असेना. त्यावेळेस तुम्ही आदर दाखवायलाच हवा कारण तो पदाला काढलेआपला विरोध आपण मतपेटीतून दाखवलाच की.. अगदी कपडे काढले पार. पण म्हणून दोन्ही बाजूनी सभ्यपणा सोडणे ही चूक. थोडक्यात पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री इत्यादी पदांना तो आदर आहे तो त्यावेळी दिलाच पाहिजे. तुम्हाला तिथे बसलेली व्यक्ती पटो वा ना पटो.

In reply to by श्रीगुरुजी

हाडक्या Tue, 09/23/2014 - 23:54
औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही 'हो' अर्थातच.. कारण मोदींबद्दलदेखील काही लोकांची अशीच भावना असेल त्यांनादेखील हाच सल्ला राहील. आपली व्यवस्था तेवढी परिपक्व होत आहे हे कोणते 'नग' त्या पदांपर्यंत पोचू शकतील ही बाब दर्शवते. बाकी तुम्हाला हवा तो पंतप्रधान झाला तर तुम्ही त्याचा आदर करणार आणि इतरांना त्याचा आदर करायचा (शहाजोग) सल्ला (नव्हे ऑर्डरच) देणार, हा तर निव्वळ दांभिकपणा झाला. पंतप्रधान नाकर्ता असेल तर टिका करु शकता, नक्कीच, पण पदाचा आदर राखून. हे दोन्ही बाजूनी सत्तेत असताना होत असले पाहिजे, असे वाटते. (तटस्थ) हाडक्या

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोलचे दर उतरले ,त्यात मोदींचे कतृत्व शून्य आहे. पेट्रोलच्या दरात कपात झाली पण डीझेलचे दर वाढले हे सांगायला भाजपचे लोक का तयार नाहीत?...

In reply to by नानासाहेब नेफळे

आजानुकर्ण Fri, 09/19/2014 - 21:55
मोदींना घाबरुन ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन वाढवले आणि मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ झाल्याने तेलाचे भाव कमी झाले असे व्हॉट्सअॅपवर ऐकले होते बॉ.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 11:15
पाऊस उशीरा सुरू झाल्याने पाहिजे तितक्या प्रमाणात भाव कमी झाले नाहीत. यात मोदींचा दोष शून्य आहे. युपीएच्या काळातच ४-५ वर्षांपासून डिझेल दराचे नवीन धोरण सुरू आहे. त्या धोरणानुसार दर महिन्याला डिझेलचे दर प्रति लिटर ५० पैशांनी वाढविले जातात. यात मोदींचा दोष शून्य आहे. किंबहुना पुढील महिन्यापासून डिझेलचे दर स्थिर राहतील किंओवा काही प्रमाणात कमी होतील. पेट्रोलचे दर देखील अजून कमी होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेमुळे हे दर १ नोव्हेंबर नंतरच कमी होतील. बादवे, १६ मे रोजी महागाई निर्देशांक किती होता आणि आज किती आहे?

In reply to by श्रीगुरुजी

पोटे Sat, 09/20/2014 - 10:53
रिक्षाचे दर दोन रु वाढले. टोम्याटो ८० रु किलो झाले. रेल्वेचे दर वाढले. नेमकं काय स्वस्त झालं ?

In reply to by पोटे

काळा पहाड Sat, 09/20/2014 - 13:45
हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची समजून अशी की ही कामे सरकारची आहेत. सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. त्यामुळे हे दर वाढले, ते दर वाढले असं बोलणे म्हणजे राष्ट्रवादीपद्धतीप्रमाणे (म्हणजे अडाणी, उद्धटपणे, गुढघ्यात मेंदू टाईप) विचार करणे होय. याला रिझर्वेशन द्या, त्याला रिझर्वेशन द्या, पैसे आणि दारू वाटा, नको असताना कांदा एक्स्पोर्ट करा, नको असताना साखर इंपोर्ट करा या गोष्टी पवार व तत्सम लोकांनी (ज्यांना मेंदू असण्याबाबतच शंका आहेत) करायच्या गोष्टी आहेत.

In reply to by काळा पहाड

सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. +१०० सबसिडी, राखीव हे, राखीव ते, अर्ध्या दरात वीज, कर्ज माफ अशी भीक देऊन जनतेला इतके लाचार बनवले जाते आहे की त्यामुळे अगदी शिकलेसवरलेले लोक अभिमान विसरून कोण काय फुकट देतोय इकडेच लक्ष ठेवताना दिसतात. सरकार हे पैसे छापून फुकट खिरापत वाटणारी संस्था नाही. तर लोकांना सक्षम होण्यासाठी पोषक वातावरण आणि समान संधीचे वातावरण तयार करणारी संस्था आहे. लोकांचेच पैसे (कराचे किंवा राष्ट्रिय कर्ज काढून) लोकांनाच सबसिडी म्हणून द्यायचे आणि वर ते आम्ही दिले असे सांगून शेंडी लावणे याला चलाखीला सुशिक्षित लोकही फसतात ही मोठी शोकांतिका आहे. भीक देऊन / किंमती बळजबरीने खाली ठेऊन परिस्थिती सुधारत नाही तर नागरिकांची आर्थिक क्षमता वाढवून सुधारते. किंमती बळजबरीने खाली ठेवण्याने एकतर उत्पादकाचे नुकसान होते किंवा नागरिकांच्या कराचा सबसिडीच्या स्वरूपात अक्षम्य व्यय होतो. दोन्हीत नेत्यांना मोठेपना मिरवता आला तरी एकूण नागरिकांचेच नुकसान होते. म्हणूनच सबसिडी नाईलाजाने थोड्या कालाकरिता केलेला उपाय म्हणून ठीक आहे, मुख्य तंत्र म्हणून नाही. सरकारकडून आम्हाला सबसिडीचा मिंधेपणा नको आहे; तर सरकारने शिक्षण, पाणी-सांडपाणी, रस्ते-रेल्वे, इ ची व्यवस्था करावी आणि समान संधीची व्यवस्था निर्माण करावी, मग आम्ही आमचे उत्पन्न वाढवून सबल होऊन चढाओढीत भाग घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करू; असे म्हणणार्‍या नागरिकांचा देशच पुढे जाऊ शकतो. नाहीतर १००० ची नोट घेऊन मतदान करणार्‍या आणि तोच नेता निवडून आल्यावर त्याला ५०,००० रुपये देऊन माझ्या मुलाला नोकरी दे असे सांगणारे काय कमी नाहीत... त्यांना हेच कळत नाही की त्यांना मताचे १००० मिळाले नाहीत तर ४९००० चा तोटाच झाला आहे. कारण नोकर्‍या निर्माण होतील असे वातावरण निर्माण करणे शासनाचे काम असते... नोकर्‍या विकणे नाही !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पोटे Sat, 09/20/2014 - 19:22
ग्यास कोणत्या दराने घेता? स्वस्त की सबसिडीविरहीत ? मोदी येण्यापुर्वी फेसबुकावर अशा ढीगभर पोस्ट फिरत होत्या. स्वस्ताईम्नसली तरी चालेल. सबसिडी मिंधेपणा नको. त्याला लाखो लाइक मिळाले होते. मोदीनी घोषणा केली. ज्याना परवडते त्यानी महाग दराने ग्यास घ्या. त्यासाठी फक्त तीन हजार लोकांनीच नोंदणी केली आहे म्हणे. ते लाखो लाइक देणारे कुठे गायबले ?

In reply to by पोटे

फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३००० लोकांनी केलेली सुरुवात फार वाईट नाही... इतका काळ असलेली सवय सोडायला कठीण जाणारच आहे म्हणा ! शिवाय आम्ही हे फुकट देऊ / ते फुकट देऊ (आणि मनातल्या मनात "तुम्हाला आमचे मिंधे बनऊ") असे म्हणणार्‍या हितसंबंधींची फौज तयार आहेच ना ? तेव्हा ते सर्वसामान्य माणसाला जरा कठीण जाणं सहाजीकच आहे. पण आता केवळ तुम्ही विचारलंत म्ह्णून सांगतो की, पहिल्यापासूनच कोणतीही फुकट मदत घेताना खूप अवघड वाटत असल्याने वैध मार्गांनी स्वत:ची कमाई वाढवण्यावर भर आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर नव्हती तेव्हापासून "अंथरूण पाहून पाय पसरा" हा वडीलधार्‍यांनी दिलेला मंत्र पाळतो आहे. मात्र त्यात स्वतःची एक भर जरूर टाकलेली आहे :"अंथरूणाचा आकार वाढविण्यासाठी वैध मार्गांनी घडपड करण्यात काहीही वाईट अथवा कमीपणा नाही."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि हो, मी जनतेसाठी आणि देशासाठी काय भले आहे ते व्यवस्थापनाच्या भाषेत सांगितले होते... राजकारणाच्या भाषेत नाही. कोणत्याही नावाच्या पक्षाने प्रामाणिकपणे चांगली कृती केली तर देशाचं भलेच होईल ! "क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी" हा खेळ खेळण्यात आम्हाला रस नाही. पण मिपावर इतरांनी तो खेळायला अजिबात ना नाही :) (आम्ही कोण लागून गेलोय नको म्हणणारे ?! :) ) चलने दो... केव्हापासून पॉपकॉर्न घेऊन पुढच्या सीटमध्ये बसलो आहे ;)

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 21:23
>>> हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची ........ संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. मोदी याच भूमिकेतून पुढे जात आहेत. तात्कालिक लालूच दाखविण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांवर त्यांचा भर दिसतोय. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची मर्यादा वार्षिक रू. १ लाख ऐवजी रू. १,५०,००० करणे, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविणे, पेट्रोलचे दर गेल्या ४ महिन्यात रू. ६ प्रति लिटर कमी करणे इ. निर्णयातून जनतेच्या खिशात जास्त उत्पन्न जाण्याचे मार्ग सुरू झाले आहेत. त्याच बरोबरीने काश्मिर मधील भयंकर पूरस्थितीत तिथे जाऊन नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबविले गेले. गेल्या वर्षी उत्तराखंड मध्ये देखील आपल्या प्रशासकीय कार्यक्षमतेची अशीच चुणूक दाखविली होती. परराष्ट्र धोरणात चीन व पाकिस्तान विरूद्ध बर्‍याच काळानंतर एक खंबीर भूमिका भारताने घेतली. एकंदरीत मोदी योग्य दिशेने जात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पोटे Sun, 09/21/2014 - 02:45
पेट्रोल कमी केले की वैयक्तिक गाडीवाल्याला फायदा होतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट / वस्तु वाहतुक डिझेलवर जास्त कrun चालते ना ? आणि डिझेल महागच झाले आह ना ?

In reply to by पोटे

पोटे Sun, 09/21/2014 - 02:56
गेल्या तीन महिन्यात डिझेलच्या किमती तीनदा वाढल्या ना? पेट्रोलच्या किमती कमी करुन व डिझेलच्य वाढवुन स्वस्ताई येते का ?

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 14:47
चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत..? हे मी काय पाहतोय ? आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार..!!

In reply to by हाडक्या

गुरुजींनी योग्य विश्लेषण केले, त्याला योग्य म्हण्टले तर कुठे बिघडले? विरोधासाठी विरोध करायला आम्ही भाजपेयी नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 15:11
तुम्ही कोण आहात ते आम्ही कोण सांगणार..! गुरुजीच ते 'व्यवस्थित' सांगु शकतील हो.. ;) बाकी तुम्ही फार म्हणजे फारच शांत झाला आहात आणि खूपच मुद्देसूद बोलत आहात असे निरिक्षण नमूद करतो.. (ह्ये वागनं बरं नव्हं..!) (अवांतरः माई दिसल्या नाहीत त्या बरेच दिवस ? काय आचार संहिता लागु व्हायची वाट बघतायत का त्या ? ;) )

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/19/2014 - 14:48
माझे मत तर बाबा भाजपालाच असेल (सेना बरोबर असेल तर सेना भाजपा युतीला). मोदी उत्तम काम करताहेत. देशाची प्रतिमा निर्माण करणे, परराष्ट्र संबंध इत्यादींबाबत १०० दिवसात योग्य पावले उचलली आहेत. अगदीच पाट्या टाकताहेत असे म्हणले तरीही काहिच न करणार्‍यांपेक्षा किंवा धरणात मुतु इच्छिणार्‍यांपेक्षा सुसंस्कृत भाजप नक्कीच चांगला.

In reply to by नानासाहेब नेफळे

होकाका Fri, 09/19/2014 - 17:22
नेफळेसाहेब, आपण कोणाला मत द्यावंत हा फक्त आपलाच प्रश्ण आहे. फक्त एवढीच एक विनंती आहे की असे महाराष्ट्र विरुद्ध गुजराथ हे स्वरुप ह्या चर्चेला देऊ नका. अगदी एक नजीकच्या वर्तमानातलं उदाहरण द्यायचं तर केंद्रसरकारने भारतात आठ ठिकाणी electronics manufacturing hubs करण्याचं ठरवलं आहे, त्यात निवडलेली चार स्थळं महाराष्ट्रातली आहेत आणि तीन गुजराथमधील. महाराष्ट्रातली शहरं आहेतः ठाणे, औरंगाबाद, नागपूर, आणि नाशिक. देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला सर्व बाबींचा विचार करावा लागतो, त्यात फक्त एकाच प्रांताचा विचार करणं हे ते करूच शकणार नाहीत. मोदींनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की त्यांचा भर त्या त्या राज्यांच्या शक्तीस्थळांना अजूनच मजबूत करण्यावर राहील. मला सांगा, जर त्यांना फक्त गुजराथचेच हीत बघायचे असते, तर त्यांच्या सरकारने इराकमध्ये अडकलेल्या केरळी परिचारीकांना सुखरूपपणे परत आणण्याचे प्रयत्न केले असते का? तसंच, श्रीलंकेत आणि पाकिस्तानात अटक होऊन पडलेल्या मच्छिमार बांधवांना सोडवून आणण्याची तसदी घेतली असती का?

In reply to by होकाका

काळा पहाड Sat, 09/20/2014 - 13:49
अहो तसं त्यांनी केलं नाही तर त्यांच्या पक्षाची युएसपी (http://en.wikipedia.org/wiki/Unique_selling_proposition) काय? एकतर त्यांना काम करावं लागेल नाहीतर भुकं मरावं लागेल. लोक दगडं मारतील ते वेगळंच.

In reply to by श्रीगुरुजी

फुंटी Fri, 09/19/2014 - 14:08
राजकारणात आपल कोण याबाबत अनेक वर्तुळ असतात.राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्त्व हे आपल असू शकत .भाजपची हिंदुत्त्ववादी भूमिका महाराष्ट्रात झिरपण कठीण आहे.हे लक्षात घेऊन मराठी माणसाच्या आणि खासकरून मुंबईच्या हितासाठी शिवसेना स्थापन झाली.मोदींचा कार्पोरेट चेहरा युवकांना भावला आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लाट देशभर उसळली .परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे .त्यामुळेच शरद पवार ते वसंतराव नाईक सगळ्यांनीच मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहील याला प्राधान्य दिले.जरी नेतृत्व विचारी नसलं तरी मुंबईतला सुशिक्षित मराठी समाज नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे .शिवसेनेचा आवाका आणि गरज ही मुंबईपुरता आहे हे ठाकरे पवार दोघही जाणून होते...त्यामुळे युती तुटली तरीही आश्चर्यकारक राजकीय समीकरणे महाराष्ट्रात अस्तित्वात येऊ शकतात...आगामी काळात सेना राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांची भाजप कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षातील लढत होताना दिसेल..

In reply to by फुंटी

चौकटराजा Sun, 09/21/2014 - 18:39
.परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत. 'शिववडा'चा टर्नओव्हर इतका वाढला काय ? शिवसेना काय पक्ष आहे?

In reply to by चौकटराजा

फुंटी Tue, 09/23/2014 - 15:49
खायचे वडे वेगळे असतात हो...दाखवायचे वेगळे....आता शिवसेना हा पक्ष नाहीये ? अमित शहा चावला कि काय तुम्हाला पुण्यात???

युती तुटली हे एका अर्थाने चांगलेच झाले . आता शिवसेना भाजप दोघांनाही आपापली औकात कळेल निवडणुक हरल्यावर दोघेही होश मधे येतील ! शिवाय निवडणुक जिंकल्यावर आपल्या त्या निमित्तने का होईना पण राहुल बाबा चे दर्शन होईल , बरेच दिवस काही ओरीजीनल कॉमेडी ऐकली नाही राव ! बाकी आता पवार साहेब अन राजसाहेब ह्या दुफळीचा फायदा कसा उठराजसाहेब्पाहणे औत्सुक्याचे ठरेल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

सौंदाळा Fri, 09/19/2014 - 14:20
आता राष्ट्र्वादीचे आमदार निवडणुकीनंतर लाली, लिपस्टीक लावुन उभे राहणार आणि जो जास्त पैसे देइल त्याच्याबरोबर जाणार काँग्रेस असो, भाजपा असो नाहीतर सेना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पोटे Fri, 09/19/2014 - 16:56
शिवसेना आणि इंदिरा काँग्रेस युती होती १९७९ साली ! तेंव्हा सेनावाले ओठाला काय लावुन बसले होते?

पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 14:21
मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 14:21
मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

चौकटराजा Fri, 09/19/2014 - 14:58
मिपावर आम्ही नेहमीच एक पालूपद लावत असतो. आपली लोकशाही ही एक भंपक प्रक्रिया आहे. आतापर्यंत १२० कोटी लोकांपकी एकानेही आम्हाला " पक्ष" या शब्दाची व्याख्या नेमकी कोणत्या कायद्यात वा कोणत्या घटनेत सांगितलेली आहे हे इसकटून सांगितलेले नाही. लोकांचे मत हे आपल्या निवडणूक प्रक्रियेत फार फसवे आहे. त्याचे नीट प्रतिबिंब ना कायदा बनविताना होते ना सरकार बनविताना. कोण्त्याही विषयावर सार्वमत घेण्याची तर भारतात पद्धतच नाही. ते घेतले तर अल्पसंख्याकांचे राजकारण कसे खेळता येणार अशी अडचण असू शकेल. म्हणून कार्यकर्ता व राजकारणी यांची एक लुटारू जमात आपण १९५० साली जन्माला घातली आहे. पाच वर्षातून फक्त एकदा मत द्यायचे ते ही प्रमाणशीर महत्व नसलेले. यापलिकडे भारतीय जनतेच्या हातात आहे काय ? सत्तेच्या व्यापाराचा हा नंगा नाच वी द पीपल ऑफ इंडियाने सुरू केला आहे आणि त्याचे परिणाम आपणच भोगणार आहोत.

सुहास झेले Fri, 09/19/2014 - 14:59
युती तुटेल असे वाटत नाही..... तुटलीच तर सेनेला जास्त फायदा होऊ शकतो. भाजपाकडे महाराष्ट्रासाठी कोणताही चेहरा नाही. गोपीनाथ मुंडेंची कमतरता तर भासणार...

सुहास.. Fri, 09/19/2014 - 15:14
युती तुटली ? ती होणार ....निवडणुकांच्या आधी असो वा नंतर ....महाराष्ट्र कुणा ही एका पक्षाला मिळणार नाही हे धाग्यातला प्रतिसादातुनच दिसतय ...प्रश्न आहे की किंगमेकर कोण होणार :)

बाळ सप्रे Fri, 09/19/2014 - 15:14
अजुनही प्रश्नचिन्ह आहे!! पक्की बातमी नाही. पण मोदीलाटेच्या जोरावर मिळालेल्या यशाबद्दल सेनेने कृतज्ञता दाखवायला हवी. कमी जागा आल्या तरी मीच मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा पवित्रा योग्य नाही.

सुहास.. Fri, 09/19/2014 - 15:17
मान्य पण पण भाजपाकडे तरी कुठे आहे मुख्यमंत्र्यासाठी योग्य उमेदवार ?? तावडे अभ्यासु आहेत ..आणि फडविसांना विदर्भाच्या पलीकडे जग आहे की नाही ते माहीत नाही ..बाकी तर पोर टोरंच आहे ...

कंजूस Fri, 09/19/2014 - 16:01
तोफा डागायला एकेक बुरुज वाढला प्रत्येक पक्षाकडे पण सामान्य माणसाकडे कांदे बटाटे तुरडाळ ठेवायला साधे कपाट नाही तिजोरी कुठून आणणार?

मुंबईची ताकद काय ? इंग्रज काळापासून मुंबई बेट आणि आताची मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिला हे रूप द्यायला हजारो उद्यमशील लोकांचा हातभार आहे. हि मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी म्हणून संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनात अनेक लोक हुतात्मा झालेत हि मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहावी ह्यासाठी आणि आपल दिल्लीदरबारी राजकारण अबाधित राहावं म्हणून वसंतराव नाईक , वसंतदादा पाटील ते शरद पवार सर्वांनी हस्ते परहस्ते मदत केलेली आहे हा सगळा इतिहास झाला आता मुंबईच भविष्य काय आहे ? लोकांना वाटतंय कि मुंबईवर भाजपला सत्ता हवीय , पण कोणत्या भाजपला ? फडणवीस ,तावडे, खडसेंच्या भाजपला कि मोदी शहांच्या भाजपला ? मोदींना शहाना मुंबई मुळात नकोच आहे , त्यांना शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत. मित्र पक्ष असला तरी त्याच खच्चीकरण करून आपली ताकत वाढवण हे प्रत्येकच धोरण असतच आणि त्यालाच राजकारण म्हणतात . कालपरवाची मोदींची पावलं त्याच दिशेने पडतात आहेत. चीनचे प्रधानमंत्री दिल्ली मुंबई सोडून आधी अहमदाबादमध्ये येतात , सामंजस्य करार करतात तोही गुजरात सरकारबरोबर ? चीन बरोबर गुजरातच्या प्रधानमंत्र्यांनी जे करार केलेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या योजना गुजरातमध्ये नेल्या जात आहेत ते पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. मुंबईत असणारे गुजराती फक्त पैशाशी बांधील आहेत त्यांना बाकी काही घेण देण नाही मराठी अस्मिता आणि मुंबईशी असणारी भावनिक बांधिलकी ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसाच्या आहेत गुज्जुना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. उद्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही मुंबई शेअर बाजारचा आत्मा पैसा आहे , जर तिकड तितक्याच ताकदीचा शेअर बाजार उभा राहिला तर मग तो हि प्रश्न सुटेल व्यापारी लोकांना काय कुठेही धंदा करायचा आहेच आणि जागतिकीकरणाच्या जमान्यात कुठेही बसून तुम्ही जगात व्यवहार करू शकता आणि एकदा मुंबईच आर्थिक महत्व कमी झाल कि शिवसेनेचं कंबरडे मोडलच म्हणून समजा कारण शिवसेनेच्या राजकारणच आर्थिक स्त्रोत मुंबई आहे हे उघड आहे मग खुशाल शिवसेना मुंबई आमची म्हणून बोंब मारू देत , आर्थिकदृष्ट्या महत्व कमी झालेलं आणि पायाभूत सुविधांवर पडणारा जास्तीचा ताण सहन करताना मरायला टेकलेल हे शहर शिवसेनेच्या ताब्यात असण म्हणजे ओसाड गावची पाटीलकी दिल्यासारखं आहे. एकदा आर्थिक नाड्या आवळल्या कि शिवसेना खच्ची करण अजून सोप होईल तेव्हा मुंबई गुजरातमध्ये जाणार म्हणून आवई उठवण्यात काही अर्थ नाही आणि शहा मोदींना त्यात रसही नाही मराठी माणसाचा विरोध पत्करून हा उद्योग करण्यापेक्षा गुजरातमध्ये प्रतीमुंबई उभी करून आर्थिक राजधानी म्हणून अहमदाबाद किंवा एखाद नाव शहर पुढे आणायला त्यांना जास्त सोप जाईल मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे . श्रेय- आनन्द शितोळे (फेबु वरुन साभार) एक वेगळा मुद्दा. आप आपलि मत ताडुन बघा

In reply to by पिंपातला उंदीर

प्रतिसादातिल सगळं काही वादासाठी खरं मानलं तरी... मुंबईची अशीच किंबहुना यापेक्षा जास्त प्रगती (कारण मुंबई शतकभर अगोदरपासून व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे) करायला कोणी आपले हात धरले होते/आहेत काय? "मुंबईची ताकद" म्हणून सुरुवात करायची आणि त्याच श्वासात "कोणी मुंबईचा गळा घोटतोय" असे म्हणायचे म्हणजे जरा जास्तच होतेय, नाही का ?! बलवानाने "दुसर्‍या कोणी मला अजून बलवान व्हायला मदत करायला पाहिजे" असे म्हणुन दुसर्‍याचे मिंधे राहण्यापेक्षा आपल्या प्रगतीचे प्रयत्न स्वतः करावे. म्हणजे असे दुसर्‍याच्या नावाने गळे काढायची गरज राहत नाही. निदान गेले काही दशके भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून शेखी मिरवणणार्‍या राज्यातिल नागरिकाच्या तोंडी वरचा सर्वच प्रतिसाद दवणिय (हा शब्द मिपाच्या सौजन्याने :) ) आणि अगतिक वाटतो आहे. एक अभिमानी मराठी माणूस म्हणून मला हे वाचून खरंच अत्यंत शरमेचे वाटले ! महाराष्ट्र आणि मराठी माणूस काही इतका रस्त्यावर पडलेला नाही. जरा बरे सुजाण आणि सत्शिल नेते फार मोठा फरक घडवून आणू शकतील. मात्र ते सुजाणपणे निवडणे मराठी माणसाच्याच हातात आहे. सरळ सरळ इतका कांगावा करण्याने बहुतेक हसेच होते... कारण इतरांना डोळे, कान व बुद्धी असते (हे कांगावा करण्याच्या भरात बहुतेक विसरले जाते :) ) ज्या देशांत "देशांतर्गत चढाओढ" आहे तेच देश इतर देशांशी चढाओढ करून जगात पुढे आलेले आहेत.

In reply to by पिंपातला उंदीर

बरय की मग. तेवढेच ते यु.पी. बिहारी भैय्ये तिकडे जातील. महराष्ट्रावरचा ताण कमी होईल. आणि एक पुणेकर असुनही मुंबईचं कौतुक करतोय आता. कुणीही कितीही काहीही केलं तरी मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. प्रती मुंबई गुजरातमधे उभी राहु शकेल पण तरीही मुंबई ती मुंबईच. एक म्हणजे मुंबईच्या अर्थकारणाचा आवाका लक्षात घेतला तर मुंबईमधला सेट व्यवसाय सोडुन गुजरातमधे नव्यानी व्यवसाय सुरु करण्याएवढे लोकं मुर्ख नाहीत. फार तर तिकडे शाखा सुरु करतील, तिकडुन कारभार चालवतील. पण आहे ती गुंतवणुक राहाणारच. हा अपप्रचार फक्त आणि फक्त द्वेशापोटी चालु आहे. (न.मो. फॅण)

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 16:23
द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही
हे इकडे करायला कोणी थांबवलंय? मुम्बै सोडा साधा सातार्‍यातही एखादा उद्योग उभा करायचा झाला तर तेथले नेते उद्योजकांकडे बर्‍याच मागण्या करतात. इथे असलेले उद्योग दुसर्‍या प्रान्तात जातात त्याबद्दल कोणी जराही वाटून घेत नाही. प्रत्येक गावात एमआयडीसी ओसाड पडलेली दिसते. बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू करायला महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधलेले होते? अहमद नगरची कायनेटीक इंजीनियरिंग , सातार्‍याची महाराष्ट्र स्कूटर्स , हे कारखाने कित्येक वर्षे बंदच आहेत. क्षमता असूनही कोणतेच उत्पादन होत नाही. ही उदाहरणे बोलकी आहेत. कॉम्ग्रेस असो की इतर कोणी. नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. दिल्लीत भाजप मधे महाराष्ट्राचे खासदार आहेत की ते असे प्रयत्न का करीत नाहीत महाराष्ट्रात केवळ शिवसेनाच उद्योग आणते असा भ्रम जोपासला आहे. सेनेने इथे असे कोणते नवे उद्योग आणले यांची कोणी यादी देईल का?

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 20:39
आम्ही त्यांना फाट्यावर मारतो.. तरीही मुजरे घालणारे भरपूर आहेत आणि आमच्या नशीबी जी शिवाजी महाराजांच्या नावे (त्यांच्या नावाला न शोभणारी) राजेशाही आलेली आहे त्याला काहीही उपाय नाही म्हणून जास्तच हळहळ, बाकी काही नाही. तुम्ही परत तुमच्या वळणावर आलेले पाहून आनंद वाटला.. ;)

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:43
मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही. हे लोक मजूर म्हणून सुद्धा काम करू शकत नाहीत. जिथे तिथे जातीयवादी आणि कंपूबाज गोष्टी करत असत्तात. जास्तीत जास्त हे लोक चहाची टपरी, वडापावची गाडी, लोकांना अडवणारे रिक्षावाले असली कामं करत फिरतात. आणि मग हा कसा बाहेरचा आहे, तो कसा भटजी-शेटजी पैकी आहे, तो कसा महाराष्ट्राला विकायला चाललाय आणि माझा जातिय्वादीपणा कसा चांगला आहे असल्या चर्चा करत बसतात. एक गंमत सांगतो. ईंटरव्ह्यू घेताना मुसलमान सुद्धा मराठी लोकांपेक्षा चांगली चमक दाखवतात.

In reply to by काळा पहाड

हाडक्या Fri, 09/19/2014 - 16:53
धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा प्रयत्न आणि मराठी लोकांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचं जनरलायजेशन पाहून अंमळ गम्मत वाटली.. नक्की तुम्ही मराठी आहात का ? असल्यास आणि नसल्यास या तुम्हीच दर्शवलेल्या स्थितीपेक्षा वेगळे काही घडावे यासाठी आपला छोटासा का होईना पण प्रयत्न जाणून घ्यायची इच्छा आहे. अन्यथा मराठी माणूस नुसता तोंडाची हवा दवडण्यात कुठेही कमी पडत नाही असेही म्हणू शकाल मग तुम्ही.

In reply to by हाडक्या

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 17:08
१. मी मराठीतच लिहितोय नाही का? पण मी पर्फॉर्मन्स ला प्राधान्य देतो आणि तिथं मराठी लोक बरेच कमी पडतात. मी गुप्ता बरोबर काम करतोय की पटेल बरोबर की सुब्रमण्यम बरोबर यात मला फरक पडत नाही. पण मराठी लोक कंपूबाजी करून काम न करण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. अर्थात हा महाराष्ट्रातला अनुभव आहे. तामिळ्नाडू मधे कदाचित तामिळ लोक्स ही तसंच करू शकत असावेत पण त्याच्याशी माझा संबंध नाही. २. मला या गोष्टीत कसलाही प्रयत्न करावा अशी माझी इच्छा नाही कारण त्यात माझा वेळ फुकट जातो. मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय.

In reply to by काळा पहाड

मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय नका हो एवढा त्रास घेऊ . महाराष्ट्र / मराठी माणस दबून जातील उपकाराच्या 'पहाड ' खाली

In reply to by पिंपातला उंदीर

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 17:31
दबणे, उपकार, त्रास घेणे, मोडेन पण वाकणार नाही, अस्मिता, सहन करणार नाही, रक्त उसळणे, प्रेमात 'पडणे'.. मराठी माणसांची शब्दावली टिपीकल असते ना?

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 10:41
नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. सहमत. मराठी माणसाची निष्क्रियता, शेरेबाजी आणि आळस माझ्या सारख्या लहानातलहान व्यावसायिकालाही जाणवतो.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 11:53
पुण्याच्या आसपास च्या उद्योग वसाहतीत कॉ आणि रा़काँ च्या लोकांची खंडणीखोरी इतकी वाढली आहे की छोट्या उद्योजकाला धंदा करणे शक्यच नाही. मोठे उद्योजक थेट वरच पैसे पुरवतात आणि निभावुन नेतात, छोटे आणि मध्यम उद्योजक पार मेले आहेत ह्या गुंडगीरीने.

@विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाशी सहमत . . वरचा मी दिलेला प्रतिसाद हा एक नवीन perception म्हणून फेबु वरून शेयर केला . पण त्या प्रतिसादातल्या bottomline शी मात्र मी सहमत आहे . मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे आमच परभणी शिवसेनेचा औरंगाबाद आणि मुंबई पेक्षा मोठा बालेकिल्ला . वर्षानु वर्ष सेनेचे आमदार आणि खासदार इथून सतत निवडून जात आहेत . पण शहराला ओरबाडून खाण्याशिवाय आणि लोकांना भडकावून दंगे करण्याशिवाय त्यांनी काहीही केल नाही . परभणी पुरत (आणि महाराष्टात अशी अनेक शहर आहेत ) बोलायचं झाल तर सेना निवडून नाही आली तर परभणी साठी चांगलाच होईल . Fingers crossed

विटेकर Fri, 09/19/2014 - 16:56
पन मुंबईच्या श्रीमंतीचा मराठी माणसाला काय उपयोग झाला ? मराठी माणूस कष्टकरी तो कष्ट्करीच राहीला, पूर्वीही म्हणजे शिवसेनेच्या बहारीच्या काळात आणि त्यापूर्वी ही मुंबईवर अर्थिक वर्चस्व पारसी - गुजराती लोकांचेच होते आणि आहे. दक्षिण मुंबई परिसरात पूर्वी ही आणि आता किती मराठी माणसे आहेत ? दादर - गिरगावातील मराठी माणूस केव्हाच उपनगरात चालता झाला. गिरण्यांबरोबर मुंबईतला मराठी टक्का ही घसरला. मग आज ज्या स्वरुपात मुंबई आहे , ती नेमकी कुणाची आहे ? की मराठी राज्यकर्ते असले म्हणजे मुंबई मराठी होते ? आणि या मराठी राज्यकर्त्यांनी मुंबईचे मराठीपण ... मराठीपण जाऊ द्या , मुंबईपण टिकावे म्हणून काय केले? तुम्ही म्हणता तशी , मोदी - शहा अशी गुजराती जोड-गोळी काम करत असेल तर ती गुजरातच्या उत्कर्षासाठी करते आहे मुंबईच्या खच्चीकरणासाठी नाही . मुंबईचे शांघाय करण्यापासून मराठी राज्यकर्त्यांचे हात कोणी बांधले होते? दोन्हीकडे तर कॉन्ग्रेसचीच सत्ता होती. दुसर्‍याची पुसण्यापेक्षा , तुम्ही तुमची रेष मोठी ओढा ना ! आणि व्यक्तिश: मला आता गुजरात मध्ये मोदिना काही इन्ट्रेस्ट असेल असे वाटत नाही. तसे असते तर त्यांनी बडोड्याची जागा सोडून दिली नसती. ते आता वरच्या पातळीवर आहेत. चीन चे करार अहमदाबाद मध्ये झाले असतील तर त्यांचा गुजरात हा कंफर्ट झोन आहे इत्काच अर्थ आहे. मोदी काय आणि शहा काय , दोघे ही आता राष्ट्रिय पातळीवरचे नेते आहेत. युती बाबत - बाळासाहेब काय आणि प्रमोद महाजन काय ( विथ ड्यु रिस्पेक्ट टू बोथ ) , पक्के सत्तापिपासू होते आणि सत्तेसाठी वाट्टेल ते .. करायला तयार होते अश्यातून या कृत्रिम युतीचा जन्म झाला. या शिवसेनेच्या हट्टापायी नारायण राणे सारख्या नामचीन गुण्डाला मुख्यमंत्री मह्णून स्वीकारावे लागले ! दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत / होते. कितीदिवस मारुन - मुटकुन एकत्र राहणार ? अपयशाचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्यापलिकडे तसेही युतीत फार सख्य राहीले नव्हते. बाळासाहेब - उद्धव - आदित्य ही वारसदारी भाजपच्या लोकांनी पसंद पडणारी नव्हतीच. मोदी- शहांनी ७५ वर्षावरील आप्ल्याच नेत्यांना घरी बसविले , ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल ) शिवाय भाजपच्या मातृसंघटनेला शिवसेनेचे अजिबात प्रेम नव्हते / नाही. संघाची ताकद हवी असेल तर शिवसेनेला बाजूला सारायला हवे हा धोरणीपणा मोदी - शहा आणि तावडे - फडणवीस यांच्याकडे आहे. प्रमोद महाजन ष्टाईल, सेना-राष्ट्रवादी संस्कृतीने राजकारण करण्याकडे आता भाजपचा कल नाही असे दिसते.

In reply to by विटेकर

आजानुकर्ण Fri, 09/19/2014 - 17:28
ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल
प्रतिसादाशी सहमत. मुंबईची वाट लावण्याचे संपूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. निव्वळ राडासंस्कृती आणि भावनिक ब्लॅकमेलिंग या आधारावर इतकी वर्षे हा पक्ष टिकून आहे. पुढेही टिकेल. मात्र महाराष्ट्रापुरत्या भाजपामध्ये घराणेशाहीचा एखादा अपवाद नसून रक्षा खडसे, पूनम महाजन, पंकजा मुंडे, असे किमान तीन अपवाद माहिती आहेत. मागील निवडणुकीत हीना गावित हाही एक नवा अपवाद त्यांनी अंतर्भूत केला आहे असे दिसते.

In reply to by हाडक्या

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 19:18
हाडक्या काका एकदम बरोबर. तो पक्ष म्हणजे "पार्टी विथ डिफरन्स" आणि स्वयंसेवकांचा पक्ष आहे. ज्या सेनेचा घराणेशाहीला कडाडून विरोध होता त्या सेनेची सुरवातच घराणेशाहीतुन झाली आहे. प्रबोधनकार नसते तर सेनेला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. काँग्रेसला वरवर विरोध करताना मुम्बैतील कामगार चळवळ कोणी सम्पवली ते सगळेच जाणतात. उगाच नव्हे सेनेला त्यावेळेस "वसंतसेना" म्हणायचे. सेनेने इंदिरा गांधीना विरोध करतानाच आणिबाणीत काय वर्तन केले होते तो इतिहास काही पुसला गेलेला नाहिय्ये. राजीवगाम्धीना घराणेशाही मुळे नावे ठेवताना सेनेने अगोदर मुलगा आणि नंतर नातू असा प्रवास चालू ठेवलाय. वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते. सेनाप्रमुखाना त्यानी नम्तर स्पष्टीकरण दिले होते. त्या खासदारावर सेनेकडून कोणतीच कारवाई झाली नाही. एन्रॉन समुद्रात बुडवायची गर्जना रीबेका मार्कंच्या भेटीनंतर कुठे आणि कशी बुडाली हे जनतेच्या विस्मरणात गेले असेल. पण त्यातले व्यवहार सर्वसामान्यानाही ओळखता येतील.

In reply to by विजुभाऊ

श्रीरंग_जोशी Fri, 09/19/2014 - 20:01
वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते.
स्व. नरसिहरावांचे सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात असताना सेनेचे तत्कालीन खासदार मोहन रावले अनुपस्थित राहीले होते हे वाचले होते.

In reply to by विजुभाऊ

दुश्यन्त Fri, 09/19/2014 - 23:18
बरोबर माहिती देत येत नसेल तर किमान चुकीची माहिती पसरवू नका. मोहन रावले हे नरसिम्हा राव सरकारच्या अविश्वासमता वेळी गैरहजर होते. वाजपेयी सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच साथ दिली होती. वाजपेयी समता - ममता-जयललिता वगैरे मुले बेजार झाले होते तेव्हा आपल्या कोट्यातील मंत्रिपद कमी करून यांना द्या असे बाळासाहेबांनी वाजपेयींना सांगितले होते. १९९९ ला एक मताने सरकार पडले कारण ऐनवेळी जयललिता पलटल्या. शिवसेना आणि अकाली दल या दोघांनीच केंद्रात कायम भाजपला साथ दिली आहे.

पोटे Fri, 09/19/2014 - 17:05
ती पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक बेडुक इतर बेडकाना संपवायला साप आणतो. शिवसेनेने साप आणला. आता साप त्यानाच खातोय

सुधीर Fri, 09/19/2014 - 17:10
१ महिन्यापूर्वी वाचलेला हा लेख आठवला. http://www.loksatta.com/sampadkiya-news/transits-to-modi-shah-era-may-crush-nda-761587/?nopagi=1

पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 17:32
मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आणि राष्ट्रवादी जर एकत्र आले (छुप्या वा उघड) रीतीने, तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा भा ज प आणि मनसे जर उघड रीतीने एकत्र आले, (सोबत राष्ट्रवादी छुप्या रीतीने), तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा शिवसेना व कॉंग्रेस (छुप्या रीतीने) एकत्र आले, तर राजकीय समीकरण काय असेल ?

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय Fri, 09/19/2014 - 17:42
भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र आले (म्हणजे राकॉला सत्तेत स्थान मिळाणार असेल तर) तर मी एकवेळ आयसिसला मत देइन पण या दोघांपैकी एकाला देणार नाही. असला भडभुंजेपणा भाजपा करणार असेल तर मी आजन्म काँग्रेस बरोबर जाइन. भाजपा आणि मनसेने युती केली तर भाजपा मनातुन उतरेल पण तरीही त्यालाच मत देइन. भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. शिवसेनेने काहिही केल्यास मला फरक पडत नाही पण त्यांनी राष्ट्रवादीशी युती केल्यास त्यांच्यासारखे मुर्ख तेच असतील. असो. १३० जागांवर समाधान मानुन भाजपा युती पुढे चालु ठेविल याबाबत सध्या तरी शंका नाही आहे. थोड्या वेळापुर्वी ही बातमी खरी वाटली होती. पण आत्ता त्यात दम नाही. भाजपाला सेनेबरोबरची युती तोडणे महागात पडेल कारण अजुन राज्यसभेत ते संख्याबळात कमी आहेत. सद्यपरिस्थितीत किमान जॉईंट सेशनमध्ये तरी त्यांना आघाडी आहे. सेना बाहेर पडल्यास ते ही अवघडच जाइल.

In reply to by मृत्युन्जय

भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. आवडलं... फक्त जराशी कंजूशी झालीय... "१०००००००१ वेळा" असं लिहायला पाहिजे होतं, जास्त भारी वाटलं असतं. या निवडणूकीपुरते तरी तुम्ही सुरक्षित आहात ;)

तिमा Fri, 09/19/2014 - 19:23
कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ दे, मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.

In reply to by तिमा

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 19:36
मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.
हो ना. केंद्रात पंतप्रधान ठरवायच्या अगोदर सुद्धा अश्शीच गोग्गोड चर्चा चालू होती. काय झाले हे सर्वाना ज्ञातच आहे. भिगवण चौकाच्या वार्डात कोणता उमेदवार उभा करायचे ठरवायचे कोणी याची देखील अश्शीच चर्चा होईल काही दिवसानी.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 21:07
>>> इतका काँन्फीडन्स बरा नव्हे ,पोट निवडुकात काय झाले ठाऊक आहे ना? पोटनिवडणुकांच्या निकालाविषयी देशात प्रथमच इतकी गंभीर चर्चा सुरू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. १९४७ नंतरच्या कोणत्याही पोटनिवडणुकीच्या निकालाची इतकी चर्चा झाली नसेल किंवा त्या निकालाच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठला नसेल. असो. जरा सविस्तर निकाल पाहू. मे २०१४ नंतर १०-१२ राज्यांमधील एकूण ४७-४८ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक झाली. ३ लोकसभा मतदारसंघामध्ये पण पोटनिवडणुक झाली. काही राज्यात फक्त १-२ मतदारसंघात पोटनिवडणुक झाली तर ३ राज्यात ९-११ जागांवर पोटनिवडणुक झाली. त्यात म.प्र.मध्ये भाजपने ३ पैकी २ व काँग्रेसने १ जागा जिंकली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने २ व भाजपने १ जिंकली. पंजाबमध्ये काँग्रेस १ आणि अकाली द्ल १, उत्तराखंडमध्ये काँग्रेस ३, प. बंगालमध्ये तृणमूल १, भाजप १ , आसाममध्ये काँग्रेस, भाजप व तिसरा पक्ष प्रत्येकी १, उ.प्र.मध्ये सप ८/भाजप ३, गुजरातमध्ये भाजप ६/काँग्रेस ३, बिहारमध्ये भाजप ४/राजद्+संजद्+काँग्रेस ६ अशी साधारण परिस्थिती होती. या निकालांवरून मोदी लाट ओसरली, मोदींविषयी जनतेचा भ्रमनिरास झाला, जनतेने मोदींना धडा शिकविला, काँग्रेस परत येत आहे, भाजप बॅकफूटवर, इ. मांडे खाणे सुरू झाले. लोकसभेच्या ३ जागांवर जैसे थे स्थिती राहिली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर मे २०१४ प्रमाणेच मतदान झाले हे दिसून आले. जर मोदी लाट ओसरली असती तर भाजपला बडोद्याची जागा का मिळाली असती? तसेच काँग्रेसला तेलंगणातील जागा का मिळाली नाही? गंमत म्हणजे काँग्रेसने दिल्लीसकट अनेक शहरांमध्ये पोटनिवडणुकीतील निकालांचा विजयोत्सव साजरा केला. पोटनिवडणुकीत मिळालेल्या २-४ जागांचा देशभर जल्लोष करावा इतकी वाईट वेळ कॉंग्रेसवर आली आहे. बिहार विधानसभेत मे २०१४ मध्ये एकमेकांविरूद्ध लढलेल्या राजद, संजद व काँग्रेसने एकत्र निवडणुक लढल्याने भाजपविरोधातील मतविभागणी टळल्याने त्यांना १० पैकी ६ जागा मिळाल्या हे उघड आहे. या परिस्थितीतसुद्धा भाजपला ४ जागा मिळाल्या. सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे व मतविभागणी टाळणे हा मोदींविरूद्ध कौल कसा होऊ शकतो? डिसेंबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हे संधीसाधू पक्ष एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण एकूण २४३ पैकी राजद व जदयु काँग्रेसबरोबर युती करून प्रत्येकी फक्त १०० च्या आसपास जागा लढविणे व काँग्रेसला ४३ जागा सोडणे अशक्य आहे. दोन्ही पक्ष किमान १५० जागांचा आग्रह धरतील. त्यामुळे ही संधीसाधू युती फक्त या पोटनिवडणुकीसाठी होती. या निकालांचा व मोदींच्या कारभाराचा काहीही संबंध नाही. उ.प्र.मध्ये सप ने ११ पैकी ८ जागा जिंकल्या. काँग्रेसला भोपळा मिळाला. पण काँग्रेसवालेच जास्त उड्या मारताहेत. प्रत्यक्षात बसप आणि सप यांच्या छुपा समझोता होऊन बसपने आपले उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे बसपला मिळणारी सर्व मुस्लिम मते व काही दलित मते सप कडे गेली व त्यातूनच सप ला ८ जागा मिळाल्या. मोदी कारभाराचा व या विजयाचा काहीही संबंध नाही. २०१७ मध्ये उ.प्र. च्या विधानसभा निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व जागा लढवेल व त्यामुळे या पोटनिवडणुकींच्या निकालाची पुनरावृत्ती होणार नाही. गुजरातमध्ये ९ पैकी ३ जागा गमाविल्या तरी ६ जिंकल्या आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली या विधानात तथ्य नाही. इतर राज्यात १-२ जागाच असल्याने निवडणुक फक्त स्थानिक प्रश्नावरच लढली गेली. तिथेही मोदी लाटेचा काहीही संबंध नाही. एकंदरीत काही राज्यातील २-४ पोटनिवडणुकीच्या निकालावरून मोदींच्या जेमतेम १०० दिवसांच्या राजवटीविषयी भाकीत करणे हा मूर्खपणाचा कळस आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुजरातमध्ये ९ पैकी ३, राजस्थानात ४ पैकी ३ जागा काँग्रेसला मिळाल्यात, यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते.युपीत ७२ लोकसभा सीट जिंकणारे बीजेपी १०० दिवसात ११ विधानसभेपैकी फक्त २ जागा जिंकतात, यावरुन मोदी लाट संपुष्टात येत आहे हे स्पस्ट आहे. बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 13:07
>>> यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते. हो का? उ.प्र. मधील विधानसभेच्या ११ जागांपैकी किती जागा काँग्रेसला मिळाल्या हो? आणि लोकसभेच्या ३ जागांवरील पोटनिवडणुकांमध्ये किती जागा काँग्रेसने पटकावल्या? काँग्रेस होतेय असा तुमचा भ्रम झालाय म्हणून विचारतोय. >>> बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे. मुळात तो व्होटर बेस मे २०१४ मध्ये भाजपाकडे नव्हताच. त्यामुळे तो भाजपा ऐवजी सपाकडे वळला हे विधान असत्य आहे. सपा ला स्वतःची व बसपची अशी दुप्पट मते मिळाल्याने पोटनिवडणुकीत ८ जागा मिळाल्या हे लक्षात घ्या. त्याचबरोबर हेही लक्षात घ्या २०१७ मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व ४०३ जागा लढवेल व त्यावेळी पुन्हा एकदा ही मते सप कडून बसप कडे येतील व भाजपविरोधी मतांचे पुन्हा एकदा विभाजन होईल. त्यामुळे मोदी लाट ओसरली, काँग्रेस रिव्हाईव्ह होतेय अशा गैरसमजूतीतून दूर व्हा.

In reply to by श्रीगुरुजी

बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मे मध्ये ती मते भाजपकडे गेली नाहीत हा दावा आपण कोणत्या आकडेवारीतून करत आहात? जरी मान्य केले तरी १०० दिवसाच्या प्रचंड यशस्वी मोदीसरकारचा तिथल्या सपा बसपाच्या वोटरवर काहीच परिणाम झाला नाही का ? याचे दोनच अर्थ आहेत, पोटनिवडणुकित मत देणारे एक दोन कोटी मतदार मुर्ख आहेत किंवा मोदी लोकांना विकासाच्या नावाखाली फसवत आहेत व लोकांच्या लक्षात ही फसवणुक आली आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 21:01
>>> बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मुळात बसपचे (आणि सप चे सुद्धा) मतदार विकास, सुशासन, योग्य प्रशासन या मुद्द्यांवर मतदान करतच नाहीत. जात आणि धर्म यांवरच ते मतदान करतात. त्यामुळे मोदी विकासपुरूष असले किंवा नसले, मोदींनी महागाई कमी केली का नाही या मुद्द्यांवर मतदान न करता ते आपल्या जात/धर्म विचारांवर आधारीत जो पक्ष योग्य वाटतो त्यालाच मतदान करतात. बसपच्या अनुपस्थितीत त्यांना सप आपलासा वाटला यात काहीच नवल नाही. मे २०१४ मध्ये त्यांची मते बसप आणि सप या दोघात विभागली गेली होती. बसपच्या अनुपस्थितीत ती सप कडे गेली आणि म्हणून सप ला जास्त जागा मिळाल्या.

In reply to by श्रीगुरुजी

बसपाचे मतदार जात बघून मतदान करतात याची काही आकडेवारी द्याल का? बसपाची एकही लोकसभा सीट लागली नाही याचा अर्थ सपा बसपा यांचा वोटर मोदींकडे वळला होता, परंतु १०० दिवसाच्या गुजरातधार्जिण्या मोदींचा कारभार बघुन पुन्हा माहेरी परतला,हे पोटनिवडणुकीत स्पष्ट होते. राज्यातही काँ राकाँच्या पारंपारिक मतदाराने भाजपला वोट दिले, परंतु आता त्यांनाही मोदीच्या फक्त तोंडाच्या वाफा दवडण्याच्या सवयीचा साक्षात्कार झाल्याने राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो .देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही .

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 21:15
>>> युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो . या निवडणुका रा़ज्यात झाल्या. केंद्रात नव्हे. त्यामुळे मोदींचा इथे संबंधच नाही. मोदी तिकडे प्रचाराला फिरकले पण नव्हते. लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सर्व पक्षांनी आपापल्या जागा राखलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मे २०१४ मध्ये जो कल होता तोच आज कायम आहे. प. बंगालमध्ये २ पैकी १ जागा भाजपने मिळविली. तुमच्या विचित्र तर्कशास्त्रानुसार याचा अर्थ तिथे मोदींची लाट आली आहे असा घ्यावा लागेल. >>> देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. शिवसेना नेते काय बडबडतात यावर तुम्हीच विश्वास ठेवा. बर. खालीच बातमी वाचा आणि मोदी लाट परत आल्याचे कबूल करा. छत्तीसगड >>> ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही . कशावरून? सध्या मे २०१४ सारखीच जैसे थे परिस्थिती आहे. कोणाचेही रिव्हाईव्हल होत नाहीय्ये आणि कोणीही डीप्राईव्ह होत नाहीय्ये.

रोचक चर्चा ! @ नानासाहेब नेफळे : धाग्याचा ट्यार्पी वाढवायचा सद्या काय रेट आहे ?! ;) (प्रामाणिकपणे केलेली विचारणा जमल्यास हघ्या :) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 21:52
एक्का साहेब.. तुमचे धागे असे पण पापुलर असतेत.. कशाला नानासाहेबांना सुपारी देताय.. तुमच्या धाग्यांवर आले म्हन्जे २००-३०० शिवाय थांबायचे नाहीत ते. बादवे, असे पण ते फक्त राजकारणाच्या धाग्यांचे स्पेशालिष्ट आहेत.. तुमी तसला धागा काडला म्हनजे त्यांना 'विसरु' नका म्हणजे झालं. ;)

लोटीया_पठाण Sat, 09/20/2014 - 19:23
मी तरी भाजपालाच मत देईन. हे काँग्रेसी दर दोन वाक्यांमागे पुरोगामी महाराष्ट्राची टेप लावण्या पलीकडे काहीही करत नाहीत. सेना नेतृत्व अन इतर रडत राऊत यांच्याकडून काहीही होप्स नाहीत, यांच्या हातात सत्तासूत्रे गेली तर महाराष्ट्राची मुंबई महानगर पालिका करून टाकतील. * नेव्हिल maxwell / ब्रूक्स हेंडरसन अहवालावरून भाजपा ने केलेलं घुमजाव मात्र पटलं नाही. कॉंग्रेसवर बरेच आरोप केले अन जेव्हा वेळ आली तेव्हा काँग्रेसी कारणेच पुढे केली.

खरंच युती मोडली का उगाच चर्चा सुरू आहेत? मटात ही बातमी दिसत्ये - जागांवरून बाणराव टेचात, कमळाबाई पेचात! आणि एक - मराठी मुस्लिमही असतात आणि ते मराठीच असतात. मराठी म्हणजे बाय डीफॉल्ट मुस्लिमेतर नव्हेत.

मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही.
"महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते.चेन्नई,हैद्राबादचे ह्यांचे एक दिवंगत मित्रही 'मराठी माणसे गटबाजी करतात्' ह्या मताचे होते.काही प्रमाणात तामिळ लोकही हा प्रकार करतात पण राज्याबाहेर 'आपण व आपले काम' हेच धोरण असते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या Tue, 09/23/2014 - 10:33
>> पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." ज्याअर्थी तुम्ही मिपावर आहात त्याअर्थी तुमचं हे सारं झालंय असं गृहीत धरायला हरकत नसावी. :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Tue, 09/23/2014 - 12:50
>>> "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते. याच धर्तीवर - "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भरमसाठ डू आय काढण्याच्या भानगडीत पडू नका." असे म्हणता येईल. हो की नाही हो नानासाहेब?

In reply to by श्रीगुरुजी

@संपादक मंडळ,माईसाहेब ह्या मिपाच्या एक सन्मानिय स्त्री सदस्या आहेत ,त्यांच्याशी माझे नाव वारंवार जोडून माझे व त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न अनेकदा श्रीगुरुजी या आयडीने केला आहे. कृपया आपण त्यांना योग्य ती समज द्यावी.

फुंटी Fri, 09/19/2014 - 13:03
त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन सांगा रे ..बाबा हा महाराष्ट्र आहे.यु.पी. नाही...युती तुटण्यात गुजराती मराठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.महाराष्ट्र विकत घ्यायचं मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेला दूत अमित शहा याची कालच्या सभेतली वक्तव्य अतिशय माजोरडी होती.शिवसेनेला अनुल्लेखाने मारण्यात आलं...त्यामुळे युती तुटली तर त्यात नवल काही नाही.केंद्रातील कॉंग्रेस सरकारपेक्षा राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच सरकार दोन -चार अपवाद(आव्हाड-छोटेपवार ,राणे) वगळता चांगल आहे.मोदींचा अतिप्रभाव आणि त्यातून साधली जाणारी व्यावसाईक गणित चुकवण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे.

In reply to by फुंटी

विटेकर Fri, 09/19/2014 - 14:40
बिल्कुल नाही ! आता जर ते परत सत्तेत आले तर ..? राष्ट्रपती राजवट परवडली. मला कल्पना देखील करवत नाही !

In reply to by विटेकर

बिल्कुल नाही ! आता जर ते परत सत्तेत आले तर ..? राष्ट्रपती राजवट परवडली. मला कल्पना देखील करवत नाही>>>> खरंय ,मी सुद्धा रामराज्य यायची वाट बघतोय.

In reply to by फुंटी

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 15:30
बास हो! उगीच गुजराती, मराठी, शेठजी-भटजी, महाराष्ट्र विकत घेणे आणि यंव आणि त्यंव. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एकूणच त्यांचे मतदार हे अतिशय जातीयवादी, जुन्या ९६ कुळी टाईप विचारांचे आणि अतिशय माजोरडे आहेत. बाकी महाराष्ट्र जर अमित शहा विकत घेणार असेल तर आत्तापर्यंत पवार, चव्हाण, देशमुख आणि तत्सम प्रभृती काय करत होत्या? महाराष्ट्र तुकडे पाडून विकायचंच काम चाललं होतं ना? राणे दर थोड्या दिवसांनी दिल्ली ला जायचे ना लोटांगण घालायला? चव्हाण आणि थोरले पवार दिल्लीत जावून पॉलीश करून येतातच ना दर थोड्या दिवसांनी? आणि न विकायला असं काय सोन्याचा करून ठेवलाय महाराष्ट्र या आघाडीने? सगळीकडे रस्ते उकरून ठेवलेत, रस्ते धुळीचे, खड्डे, पाणी शेतीच्या नावाखाली पळवणे..

In reply to by काळा पहाड

पवारांनी लवासा आणलं, त्याआधी ठाकरेँनी अँम्बी व्हॅली आणलं काँराकाँ ने टोल वाढवला ,त्याआधी माठकरीने एक्स्प्रेस वे ला टोल लावून, टोल कल्चर सुरु केले. खाउजा धोरण भाजपाने सुरु केले. राज्य विकायला काढले सेनाबीजेपीने ते आधी कबुल करा.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 16:14
जसे त्याच्या आधी स्वर्गच होता...ते ५५ उड्डाणपुल व्हायलाच ५५ वर्षे लागली...ते झाले त्यामुळेच वाहतुकीचा ताण थोडासा का होइना पण कमी झाला हे साले हरा*** काँ.रा.काँ. वाले..त्यांनी टोलची मुदत वाढवायला सुरु केली

In reply to by टवाळ कार्टा

बीजेपी टोलमुक्ती गोष्ट करत आहे ,पण तो बनावच .गॅस सिलेंडरवर कॅप बसल्यावर बेंबीच्या देठापासुन कोकलणारे मोदी जेटली स्वराज आता गप्प का आहेत ?सत्ता आहे ना ,काढा कॅप, करा चालू अनुदान परत प्रत्येक सिलेंडरवर, नाहीतर जाहिर कबुली द्या कि सिलेंडरच्या बाबतीत काँग्रेसवर केलेली टीका चूकीची होती.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:37
अडाण्यासारखं बोलणं बंद करा. रोड बनवायची मराठी लोकांना जनतेला अक्कल नाही आणि पैसा नाही. टोलवाल्या कंपन्या फुकट तुमचे रोड बनवून तुमचा प्रवास सांभाळतील का? तुम्ही स्वतःला काय देशाचे राजे वगैरे समजता की काय की तुम्हाला त्यांनी फुकट गोष्टी बनवून द्याव्यात? काय स्थिती होती बीजेपी ने पुणे मुंबई एक्स्प्रेस वे बनवण्या अगोदर? पीपीपी ला बिझनेस मॉडेल म्हणतात. टोल ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे प्रगती हवी असेल तर. नाही तर मग सरकार करूदे रोड. पण साठ वर्ष खा खा करून खजिना रिकामा केल्यावर त्यात पैसे नको का रस्ते बांधायला? का लोकांनी तसाच प्रवास करूदे खड्ड्याच्या रस्त्यात? बाकी बिझनेस वगैरे गोष्टी मराठी लोकांना कळत नसल्याने त्यांनी यात गुढगेगिरीचं प्रदर्शन करू नये हे उत्तम.

In reply to by काळा पहाड

रोड टॅक्स राज्यातली जनता देतच होती, तो घेऊन परत टोल कल्चर बीजेपीने राज्यात का आणले? एकिकडे पीडब्ल्युडीचे पंख छाटून बीओटी तत्वावर टोल कल्चर सुरु केले, आघाडीच्या नावाने बोंब कोणत्या नैतिक अधिकारावर मारणार? एन्रॉन खड्ड्यात घालुन राज्याला पंधरा वर्ष भारनियमनाचा खाईत लोटणारे बिजेपीचे लोक आज विकासाच्या बाता करत आहेत, २००२ला दुष्काळ पडलेला असताना आघाडीच्या राज्य सरकारने पाच हजार कोटींची मागणी वाजपेयी सरकारकडे केली, परंतु वाचपेयींनी फक्त पन्नास कोटी देऊ केले. तेव्हा भरीव मदत दिली असती तर राज्यातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्या नसत्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 20:07
एन्रॉन खड्ड्यात घालुन राज्याला पंधरा वर्ष भारनियमनाचा खाईत लोटणारे बिजेपीचे लोक आज विकासाच्या बाता करत आहेत,
बीजेपी केंद्रात आली आहे...ते सुध्धा उणेपुरे १०० दिवसच झालेत काँ.रा.काँ. गेली १० वर्षे महाराष्ट्रात काय झोपा काढते आहे मंत्रालयात? इतकीच जर भारनियमाची चिंता होती तर आणायचे होते परत एन्रॉनला...एन्रॉन नसेल येत तर दुसर्या कोणाला तरी बोलवायचे आणि माझे प्रतिसाद वाचुन जर मी काँ.रा.काँ. विरोधक किंवा युतीसमर्थक आहे असा समज झाला असेल तर जरा अभ्यास वाढवा

श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 13:35
युती तुटेल असं वाटलं नव्हतं. पण शिवसेनेने आपल्या अवास्तव ताकदीचा भ्रम अखेरपर्यंत दूर केला नाही. आपण भाजपपेक्षा ताकदवान आहोत आणि भाजप केवळ आपल्या दयेवर अवलंबून आहे असा शिवसेनेचा गैरसमज खूप पूर्वीपासून होता. भाजपला शिवसेनेचे ओढणे कधी ना कधी तरी दूर करावे लागणारच होते. आता ती वेळ आली आहे. आपण भाजपपेक्षा खूप ताकदवान आहोत असा शिवसेनेचा भ्रम १९८६ पासून होता आणि तो पूर्ण खोटा होता. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेला लोकसभेत एकही उमेदवार निवडून आणला नव्हता (त्यावेळच्या इंदिरा लाटेत इंदिरा काँग्रेसने ४८ पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. पण इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेच्या हाती भोपळाच आला होता.) त्यानंतर एप्रिल १९८० मध्ये भाजप स्थापन झाल्यावर लगेचच मे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागात १२ जागा मिळविल्या होत्या (कोकण, पुणे, ठाणे, मुंबई, मराठवाड, विदर्भ इ. सर्व भागात भाजपने १-२ आमदार निवडून आणले होते). पण तिथेही शिवसेनेच्या हाती भोपळाच लागला. त्यावेळी शिवसेना मुंबई व ठाण्याच्या बाहेर कोणालाही माहिती नव्हती तर भाजपचे अस्तित्व तुरळक प्रमाणात का असेना पण महाराष्ट्राच्या सर्व भागात होते. १९८५ मध्ये सुद्धा विधानसभेत भाजपचे १६ आमदार निवडून आले तर शिवसेनेचा फक्त १ निवडून आला होता. १९८५ च्या सुमाराला अडवाणींनी पक्षसूत्रे हाती घेतल्यावर पक्षवाढीसाठी इतर पक्षांशी आघाडी करण्याची योजना आखली व त्यामुळेच सेना-भाजप युती जन्माला आली. पक्षवाढीसाठी भाजपने पडती भूमिका घेतल्याने शिवसेनेचा आपल्या ताकदीविषयी अवास्तव गैरसमज झाला. २००५ मध्ये राज ठाकरे व राणे सोडून गेल्यावर आपला पक्ष अत्यंत दुर्बल झाला आहे हे शिवसेना मान्यच करायला तयार नाही. २००९ मध्ये १६९ जागा लढवून सेनेला फक्त ४४ जागा मिळाल्या तर ११९ लढवून भाजपने ४६ जागा जिंकल्या होत्या. २०१२ मध्ये बाळासाहेब गेल्यावर तर शिवसेना अजून दुर्बल झाली आहे. आता १८ खासदार निवडून आले ते स्वतःच्या ताकदीने आले नसून मोदींच्या प्रभावामुळे आले आहेत हे कबूल करायची सेनेची तयारीच नाही. शिवसेनेत तसे विचारी नेते अगदी थोडे होते. सुधीर जोशी, मनोहर जोशी, सुरेश प्रभू इ. मोजकेच नेते विचारी म्हणता येतील. यापैकी सुधीर जोशी आता नाहीत व इतर दोघेजण निष्प्रभ आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत, रामदास कदम इ. वाचाळ नेते आगीत तेल ओतत आहेत. हे दोघे अनुक्रमे राज्यसभा व विधानपरिषदेवर असल्याने त्यांना आपली चिंता नाही. भाजपला केंद्रात सेनेची गरज नाही. याउलट सेनेला आता व भविष्यात भाजपची कायम गरज लागणार आहे. तरी सेनेचा ताठा कायम आहे. शिवसेनेने आपल्या ताकदीवर आता लढावे म्हणजे स्वत:चा आवाका लक्षात येईल. शिवसेनेत इनकमिंग जवळपास नाहीच. एकट्याच्या ताकदीवर शिवसेना ३०-४० जागा सुद्धा मिळवू शकणार नाही. शिवसेनेने आपला हट्ट पुढे रेटला तर शिवसेनेच्या शेवटाची ही सुरूवात असेल.

In reply to by श्रीगुरुजी

चांगलं विश्लेषण केले गुरुजी तुम्ही. 169 जागा लढून बेचाळीस मिळाल्या तेही थोरले ठाकरे असताना ,आता स्वबळावर तीस जागाही भेटायच्या नाहीत .एकतर मोदीच्या जीवावर अठरा जागा लोकसभेत आल्यात हे उद्धव ठाकरेलाही ठाऊक आहे, तरीही सेनेचा अडेलटट्टूपणा जात नाही .उद्या सत्तेवर आल्यास राज्याचे हित न बघता भांडतच बसणार. माझे मत आघाडीला द्यायचे नक्की केलेय, कारण मोदी केँद्रात फक्त पाट्या टाकायचं काम करत आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

माझे मत आघाडीला द्यायचे नक्की केलेय, कारण मोदी केँद्रात फक्त पाट्या टाकायचं काम करत आहेत.
एरव्ही काय तुम्ही शिवसेना भाजप युतीला मत द्यायच्या विचारात होता की काय ? *biggrin* बाय द वे , तुमच्या मतदारसंघात पाण्याची सोय कशी आहे हो =))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व चांगल्या उमेदवाराला मत देतो. मोदी केंद्रात पाट्या टाकतोय त्यामुळे त्याच्याकडून राज्याचा विकासाची अपेक्षा फोल ठरेल, राज्यात सक्षम व विचारी पक्षाच्या यादीत आघाडी योग्य वाटत आहे .भाजप व सेनेची पोरंटोरं त्या मोदीसमोर माना टाकणार ,गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक असल्याने मोदी महाराष्ट्राच्या वाट्याचं सगळं गुजरातकडे नेणार,( अदाणीला खुश करायला )व महाराष्ट्र मागे कसा राहील हेच मोदी पाहणार, त्यामुळे आघाडीला मत देणे योग्य ठरेल. नुकतेच चीनचे पंप्र येऊन गेले ,सगळी इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये, कोस्टल पोलिस ट्रेनिंग संस्था महाराष्ट्राला मिळाली ,ती मोदीने गुजरातला पळवली, इतका हा धुर्त व चालू माणुस आहे. आघाडी फार चांगली आहे असे नव्हे ,पण या मोदीला आवरायला हवे कुठेतरी, सगळंच याच्या ताब्यात गेले तर राज्याच्या जन्तेच्या हातात मोदी धत्तुरा देईल. आमच्या गावात पिण्याचे पाणी भरपुर येते.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:28
गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक असल्याने
फालतू समजूत करून घेवू नका स्वतःची. काय लायकी आहे मराठी लोकांची देशात ते जरा पहा. साठ वर्ष झाली सत्तेत येवून आणि इथल्या एका सत्तेवर असणार्‍या जातीला आरक्षण हवंय कारण त्यांना नोकर्‍या तयार करणं तर सोडाच, नोकरी करणं सुद्धा जमत नाहीय. ग्रॅज्युएट मराठी मुलांना साधा बँकेचा फॉर्म भरता येत नाही कारण कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी तो पर्यंत ग्रामपंचायतीची निवडणुक, या नेत्याचा प्रचार करणं, त्या नेत्याचा प्रचार करणं, मोर्चे काढणं, धरणे धरणं, प्राध्यापकांना काळं फासणं एवढच केलेलं असतं. मराठी मुलांना ना धड नीट इंग्रजीत बोलता येतं ना एखादा मुद्दा मांडता येतो. मराठी इंडस्ट्री म्हणजे (काही सन्माननीय अपवाद वगळता) एजंटगिरी. मराठीतल्याच आरटीओ, महसूल वगैरे ऑफिसर ना पैसे खावू घाला व लोकांची कामं करून द्या. याला ना डोकं लागतं ना प्रयत्न. मराठी दुकानं अकरा ते एक आणि चार ते साडे आठ चालतात. महाराष्ट्र प्रगत आहे कारण मुंबई प्रगत आहे आणि ती मराठी माणसांमुळे नक्कीच प्रगत नाही. कुणाला गमजा सांगताय स्पर्धक असल्याच्या?

In reply to by बॅटमॅन

विटेकर Fri, 09/19/2014 - 17:26
आमची उद्योग सोडा दुकान चालविण्याची लायकी नाही ! परवा औन्ध्या ( यमाई ) वरुन विट्याला येत होतो, वाटेत पुसेसावळी नावाचे गाव लागते . बाजाराचे गाव आहे , तालुक्याचे देखील ठिकाण नव्हे , तिथल्या मुख्य चौकातल्या कोपर्‍यावर मारवाड्याचे मिठाई चे दुकान होत ! सगळ्या पेठेत उठून दिसणारे ! इतर मिठाईबरोबर , कचोर्‍या आणि सामोसे ! दुकानावर फुल्ल टू गर्दी ! त्याच्या बरोबर समोर एक कळकट हात-गाडी वडापाव विकणारी ! ही खूप जूनी , किमान ३० वर्षांपासून आहे , मी औन्धाला जातोय तेव्हापासूनची ! माणसे बदलली , गाडी तीच ! गाडीवर मात्र शुकशुकाट ! गावाला त्याचे काही नाही , मारवाडी मस्त गबर झालाय ! टाळकंच हाललं ! पुसे सावळी गाव केव्ढ? पण मारवाडी बाहेरुन येउन गबर झालाय !

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 13:00
>>> आमच्या गावात पिण्याचे पाणी भरपुर येते. ते कसे काय? गावात/गावाजवळ एखादे धरण/बंधारा/तलाव आहे का?

In reply to by नानासाहेब नेफळे

उगा काहितरीच Sat, 09/20/2014 - 13:50
ओ साहेब , तुमचा कितीही विरोध असला तरी पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीचा एकेरी उल्लेख टाळा.

In reply to by काळा पहाड

महागाई कमी करतो असे आश्वासन देऊन चार महीन्यात काय विशेष उपाय योजना केल्या मोदीने? एकही नाही.याला पाट्या टाकत बसणे म्हणतात. ब्राझील जपान भूटान व आता अमेरिकेचे दौरे तेवढे करतोय व यातुन देशाला कमी व गुजरातलाच जास्त मिळतंय. सातत्यानं गुजरातला मात देऊन महाराष्ट्र नंबर एकचे राज्य राहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर कसा राहिल याचेच आराखडे मोदी आखत असेल ,त्याच्यासमोर अडवाणी गप्प बसले तर देवेंद्र तावडे पंकजा वगैरे पोरंटोरं त्याला काय जाब विचारणार.ती पण गप्प बसणार व राज्य खड्ड्यात जाणार. त्यापेक्षा आघाडी काय वाईट आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:14
अ) १.२५ बिलीयन लोक्स असलेल्या देशाची महागाई कमी करण्याबद्दल टीका करणे म्हणजे सचिन तेंडुलकर ने स्वीपचा फटका कसा नीट मारला नाही त्या बद्दल टीका करणे. ते ही ४ महिन्यात? अर्थकारणाबद्दल, त्यातल्या विविध घटकांच्या आंतर संबंधाबाबत काही माहिती आहे का? बाकी मोदींनी कांद्याचे भाव कमी केले तर शेतकरी मरतोय म्हणून तुमच्यासारखे लोकाच शंख करत होते ना? ते असू दे. पेपर वाचता का? हा खालील लेख रॉयटर्स चा जून चा रिपोर्ट: http://in.reuters.com/article/2014/06/18/india-inflation-idINKBN0ES2KS20140618 (ते रॉयटर्सवाले आहेत. जिल्हा बँकेचे किंवा दूध संघाचे अहवाल लिहिणारे नाहीत एवढं लक्षात ठेवा). आणि हा त्याचा परिणामः http://ibnlive.in.com/news/inflation-dips-to-5year-low-of-37-per-cent/499212-7.html इन्फ्लेशन ३.७४% टक्केवर आलं आहे. हे पप्पू आणि मौनी ला गेली ५ वर्ष जमलं नाही. तेव्हा तुम्ही पाट्या टाकायचं सोडा आणि अभ्यास करा. ब)
'ब्राझील जपान भूटान व आता अमेरिकेचे दौरे तेवढे करतोय व यातुन देशाला कमी व गुजरातलाच जास्त मिळतंय. सातत्यानं गुजरातला मात देऊन महाराष्ट्र नंबर एकचे राज्य राहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर कसा राहिल याचेच आराखडे मोदी आखत असेल ,त्याच्यासमोर अडवाणी गप्प बसले तर देवेंद्र तावडे पंकजा वगैरे पोरंटोरं त्याला काय जाब विचारणार.ती पण गप्प बसणार व राज्य खड्ड्यात जाणार. त्यापेक्षा आघाडी काय वाईट आहे?
तसं असतं तर पुण्याला ऑटो टेक्नॉलोजी पार्क मिळालं असतं का? बाकी तुम्ही कालचे चायना बरोबरचे एमओयू पाहिले असतीलच. त्यातल्या गोष्टी गुजरात साठी होत्या काय? राज्य खड्ड्यात जाणार म्हणजे अजून जायचं राहिलंय असं वाटतंय का तुम्हाला? की आपण फार प्रगत राज्यात रहातोय असा भ्रम आहे तुम्हाला? महाराष्ट्र पिछाडीवर आहे तो आघाडीमुळे, मोदी मुळे नव्हे. किती जमीन सिंचनाखाली आणली दादांनी? महाराष्ट्रातले उद्योग गुजरात व कर्नाटकात पलायन का करतायत? चोवीस तास विजेचं काय झालं? विदर्भ आणि मराठवाड्याची काय हालत करून ठेवलीय? पाणी पळवायचे उद्द्योग कुणाच्या आशिर्वादाखाली झाले? जातिय तेढी आणि आरक्षणातून होणारी भांडणं कोणी लावल्या? आणि जमीनी पळवणारे (आणि वर दुसर्‍याला जातियवादी पक्ष ठरवणारे) पवार व तत्सम बरे की पुण्याला ४ महिन्यात ईंडस्ट्रीयल पार्क देणारं, मुंबईच्या विकासाच्या आराखड्याला मुंबई-शांघाई अ‍ॅग्रीमेंट द्वारे हात घालणारं मोदींचं सरकार बरं हे लोक ठरवतीलच. आपल्या कर्मा बद्दल दुसर्‍याला दोष द्यायचे प्रकार तुम्ही अशिक्षित जनते समोर (आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या "दादा तुमच्यासाठी काय पण" छाप दूधा आणि साखर कारखान्याचे अहवालच फक्त वाचू शकणार्‍या लोकांसमोर) चालू ठेवा पण मिपावर लोक सुशिक्षित आहेत! इथं फालतू बोललं तर लोक पप्पू करतात हे जरा लक्षात ठेवून असा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 21:15
आदरणीय श्री. रा. रा. नानासाहेब, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा उल्लेख एकेरी न करता आदरार्थी करावा ही नम्र विनंती. मोदींचा एकेरी उल्लेख करायला ते आपल्या घरचे घरगडी किंवा शाळेतले सवंगडी नसून देशाचे पंतप्रधान आहेत याचे भान असू द्या. >>> महागाई कमी करतो असे आश्वासन देऊन चार महीन्यात काय विशेष उपाय योजना केल्या मोदीने? एकही नाही.याला पाट्या टाकत बसणे म्हणतात. १६ मे २०१४ या दिवशी आपल्या गावात पेट्रोलचे दर प्रति लिटर किती होता? आणि आज किती आहे? १६ मे २०१४ या दिवशी महागाई निर्देशांक किती होता आणि आज किती आहे?

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Fri, 09/19/2014 - 21:41
आपल्या घरचे घरगडी किंवा शाळेतले सवंगडी नसून देशाचे पंतप्रधान आहेत याचे भान असू द्या.
हा हा हा. हे पटलं. आवडलं. हे सर्वच पंतप्रधानांना लागू आहे की फक्त मोदीमजकुरांना?

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Tue, 09/23/2014 - 15:22
हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा पाटील-शेखावत या राष्ट्रपती होत्या हो.. नै म्हंजे म्हैत असावं म्हणोन.

In reply to by हाडक्या

काळा पहाड Tue, 09/23/2014 - 15:51
हो. ते पेपरमधून वाचल्यावर कळलं खरं. बंगला बांधायची बातमी, वस्तू घरी नेल्याची बातमी, त्यांच्या नवर्‍याबद्दल बातमी. काँग्रेसच्या अतिशय प्रतिभावंत कार्यकर्त्या खरंच. किती स्वच्छ प्रतिमा. तुमच्यासारखे चाहते त्यांच्या पाठीशी असल्यावर नवल नाही की त्यांनी इतका मोठा ठसा राष्ट्रपतीभवनावर उमटवला.

In reply to by काळा पहाड

हाडक्या Tue, 09/23/2014 - 16:48
अहो. तो नानासाहेबांच्या प्रतिसादाला उपरोध म्हणून होता. पण जाऊ द्या (आमचाच पोपट झाला म्हणायचा ;) )..

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Tue, 09/23/2014 - 15:43
तर काय! तुम्ही आडवाणींना पंतप्रधान समजत होता कि काय??? ROFL
नै ब्वा. पण आम्माला तर गेली पाच वर्ष प.पू.सोनियाजी पंतप्रधान आहेत काय असंच वाटत होतं. प.पू.राहुलजी उपपंतप्रधान आहेत हे तर आम्हाला माहीतच होतं.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी Tue, 09/23/2014 - 20:40
सोनिया निव्वळ पंतप्रधान नव्हत्या, तर त्या पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री इ. सगळे काही होत्या.

In reply to by बॅटमॅन

फुंटी Tue, 09/23/2014 - 15:46
मनमोहन सोनियांची एडिट केलेली छायाचित्रे नाही दिसली का ? तेव्हा कुठे गेला होता हो आदरभाव वगैर...???? एकतर्फी का ठोकताय राव ??

In reply to by फुंटी

हाडक्या Tue, 09/23/2014 - 16:55
या आदरभावाबद्दल मात्र सहमत.. हे मोदी फ्यान फार पक्षपाती पणा करतायत राव. हे काही बरोबर नाही. जसा आर्मीमध्ये रँकला सलाम असतो. तसाच इथे पदाला मान असतो ना. मग भले कठपुतळी का असेना. त्यावेळेस तुम्ही आदर दाखवायलाच हवा कारण तो पदाला काढलेआपला विरोध आपण मतपेटीतून दाखवलाच की.. अगदी कपडे काढले पार. पण म्हणून दोन्ही बाजूनी सभ्यपणा सोडणे ही चूक. थोडक्यात पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री इत्यादी पदांना तो आदर आहे तो त्यावेळी दिलाच पाहिजे. तुम्हाला तिथे बसलेली व्यक्ती पटो वा ना पटो.

In reply to by श्रीगुरुजी

हाडक्या Tue, 09/23/2014 - 23:54
औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही 'हो' अर्थातच.. कारण मोदींबद्दलदेखील काही लोकांची अशीच भावना असेल त्यांनादेखील हाच सल्ला राहील. आपली व्यवस्था तेवढी परिपक्व होत आहे हे कोणते 'नग' त्या पदांपर्यंत पोचू शकतील ही बाब दर्शवते. बाकी तुम्हाला हवा तो पंतप्रधान झाला तर तुम्ही त्याचा आदर करणार आणि इतरांना त्याचा आदर करायचा (शहाजोग) सल्ला (नव्हे ऑर्डरच) देणार, हा तर निव्वळ दांभिकपणा झाला. पंतप्रधान नाकर्ता असेल तर टिका करु शकता, नक्कीच, पण पदाचा आदर राखून. हे दोन्ही बाजूनी सत्तेत असताना होत असले पाहिजे, असे वाटते. (तटस्थ) हाडक्या

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोलचे दर उतरले ,त्यात मोदींचे कतृत्व शून्य आहे. पेट्रोलच्या दरात कपात झाली पण डीझेलचे दर वाढले हे सांगायला भाजपचे लोक का तयार नाहीत?...

In reply to by नानासाहेब नेफळे

आजानुकर्ण Fri, 09/19/2014 - 21:55
मोदींना घाबरुन ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन वाढवले आणि मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ झाल्याने तेलाचे भाव कमी झाले असे व्हॉट्सअॅपवर ऐकले होते बॉ.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 11:15
पाऊस उशीरा सुरू झाल्याने पाहिजे तितक्या प्रमाणात भाव कमी झाले नाहीत. यात मोदींचा दोष शून्य आहे. युपीएच्या काळातच ४-५ वर्षांपासून डिझेल दराचे नवीन धोरण सुरू आहे. त्या धोरणानुसार दर महिन्याला डिझेलचे दर प्रति लिटर ५० पैशांनी वाढविले जातात. यात मोदींचा दोष शून्य आहे. किंबहुना पुढील महिन्यापासून डिझेलचे दर स्थिर राहतील किंओवा काही प्रमाणात कमी होतील. पेट्रोलचे दर देखील अजून कमी होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेमुळे हे दर १ नोव्हेंबर नंतरच कमी होतील. बादवे, १६ मे रोजी महागाई निर्देशांक किती होता आणि आज किती आहे?

In reply to by श्रीगुरुजी

पोटे Sat, 09/20/2014 - 10:53
रिक्षाचे दर दोन रु वाढले. टोम्याटो ८० रु किलो झाले. रेल्वेचे दर वाढले. नेमकं काय स्वस्त झालं ?

In reply to by पोटे

काळा पहाड Sat, 09/20/2014 - 13:45
हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची समजून अशी की ही कामे सरकारची आहेत. सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. त्यामुळे हे दर वाढले, ते दर वाढले असं बोलणे म्हणजे राष्ट्रवादीपद्धतीप्रमाणे (म्हणजे अडाणी, उद्धटपणे, गुढघ्यात मेंदू टाईप) विचार करणे होय. याला रिझर्वेशन द्या, त्याला रिझर्वेशन द्या, पैसे आणि दारू वाटा, नको असताना कांदा एक्स्पोर्ट करा, नको असताना साखर इंपोर्ट करा या गोष्टी पवार व तत्सम लोकांनी (ज्यांना मेंदू असण्याबाबतच शंका आहेत) करायच्या गोष्टी आहेत.

In reply to by काळा पहाड

सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. +१०० सबसिडी, राखीव हे, राखीव ते, अर्ध्या दरात वीज, कर्ज माफ अशी भीक देऊन जनतेला इतके लाचार बनवले जाते आहे की त्यामुळे अगदी शिकलेसवरलेले लोक अभिमान विसरून कोण काय फुकट देतोय इकडेच लक्ष ठेवताना दिसतात. सरकार हे पैसे छापून फुकट खिरापत वाटणारी संस्था नाही. तर लोकांना सक्षम होण्यासाठी पोषक वातावरण आणि समान संधीचे वातावरण तयार करणारी संस्था आहे. लोकांचेच पैसे (कराचे किंवा राष्ट्रिय कर्ज काढून) लोकांनाच सबसिडी म्हणून द्यायचे आणि वर ते आम्ही दिले असे सांगून शेंडी लावणे याला चलाखीला सुशिक्षित लोकही फसतात ही मोठी शोकांतिका आहे. भीक देऊन / किंमती बळजबरीने खाली ठेऊन परिस्थिती सुधारत नाही तर नागरिकांची आर्थिक क्षमता वाढवून सुधारते. किंमती बळजबरीने खाली ठेवण्याने एकतर उत्पादकाचे नुकसान होते किंवा नागरिकांच्या कराचा सबसिडीच्या स्वरूपात अक्षम्य व्यय होतो. दोन्हीत नेत्यांना मोठेपना मिरवता आला तरी एकूण नागरिकांचेच नुकसान होते. म्हणूनच सबसिडी नाईलाजाने थोड्या कालाकरिता केलेला उपाय म्हणून ठीक आहे, मुख्य तंत्र म्हणून नाही. सरकारकडून आम्हाला सबसिडीचा मिंधेपणा नको आहे; तर सरकारने शिक्षण, पाणी-सांडपाणी, रस्ते-रेल्वे, इ ची व्यवस्था करावी आणि समान संधीची व्यवस्था निर्माण करावी, मग आम्ही आमचे उत्पन्न वाढवून सबल होऊन चढाओढीत भाग घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करू; असे म्हणणार्‍या नागरिकांचा देशच पुढे जाऊ शकतो. नाहीतर १००० ची नोट घेऊन मतदान करणार्‍या आणि तोच नेता निवडून आल्यावर त्याला ५०,००० रुपये देऊन माझ्या मुलाला नोकरी दे असे सांगणारे काय कमी नाहीत... त्यांना हेच कळत नाही की त्यांना मताचे १००० मिळाले नाहीत तर ४९००० चा तोटाच झाला आहे. कारण नोकर्‍या निर्माण होतील असे वातावरण निर्माण करणे शासनाचे काम असते... नोकर्‍या विकणे नाही !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पोटे Sat, 09/20/2014 - 19:22
ग्यास कोणत्या दराने घेता? स्वस्त की सबसिडीविरहीत ? मोदी येण्यापुर्वी फेसबुकावर अशा ढीगभर पोस्ट फिरत होत्या. स्वस्ताईम्नसली तरी चालेल. सबसिडी मिंधेपणा नको. त्याला लाखो लाइक मिळाले होते. मोदीनी घोषणा केली. ज्याना परवडते त्यानी महाग दराने ग्यास घ्या. त्यासाठी फक्त तीन हजार लोकांनीच नोंदणी केली आहे म्हणे. ते लाखो लाइक देणारे कुठे गायबले ?

In reply to by पोटे

फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३००० लोकांनी केलेली सुरुवात फार वाईट नाही... इतका काळ असलेली सवय सोडायला कठीण जाणारच आहे म्हणा ! शिवाय आम्ही हे फुकट देऊ / ते फुकट देऊ (आणि मनातल्या मनात "तुम्हाला आमचे मिंधे बनऊ") असे म्हणणार्‍या हितसंबंधींची फौज तयार आहेच ना ? तेव्हा ते सर्वसामान्य माणसाला जरा कठीण जाणं सहाजीकच आहे. पण आता केवळ तुम्ही विचारलंत म्ह्णून सांगतो की, पहिल्यापासूनच कोणतीही फुकट मदत घेताना खूप अवघड वाटत असल्याने वैध मार्गांनी स्वत:ची कमाई वाढवण्यावर भर आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर नव्हती तेव्हापासून "अंथरूण पाहून पाय पसरा" हा वडीलधार्‍यांनी दिलेला मंत्र पाळतो आहे. मात्र त्यात स्वतःची एक भर जरूर टाकलेली आहे :"अंथरूणाचा आकार वाढविण्यासाठी वैध मार्गांनी घडपड करण्यात काहीही वाईट अथवा कमीपणा नाही."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि हो, मी जनतेसाठी आणि देशासाठी काय भले आहे ते व्यवस्थापनाच्या भाषेत सांगितले होते... राजकारणाच्या भाषेत नाही. कोणत्याही नावाच्या पक्षाने प्रामाणिकपणे चांगली कृती केली तर देशाचं भलेच होईल ! "क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी" हा खेळ खेळण्यात आम्हाला रस नाही. पण मिपावर इतरांनी तो खेळायला अजिबात ना नाही :) (आम्ही कोण लागून गेलोय नको म्हणणारे ?! :) ) चलने दो... केव्हापासून पॉपकॉर्न घेऊन पुढच्या सीटमध्ये बसलो आहे ;)

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 21:23
>>> हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची ........ संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. मोदी याच भूमिकेतून पुढे जात आहेत. तात्कालिक लालूच दाखविण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांवर त्यांचा भर दिसतोय. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची मर्यादा वार्षिक रू. १ लाख ऐवजी रू. १,५०,००० करणे, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविणे, पेट्रोलचे दर गेल्या ४ महिन्यात रू. ६ प्रति लिटर कमी करणे इ. निर्णयातून जनतेच्या खिशात जास्त उत्पन्न जाण्याचे मार्ग सुरू झाले आहेत. त्याच बरोबरीने काश्मिर मधील भयंकर पूरस्थितीत तिथे जाऊन नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबविले गेले. गेल्या वर्षी उत्तराखंड मध्ये देखील आपल्या प्रशासकीय कार्यक्षमतेची अशीच चुणूक दाखविली होती. परराष्ट्र धोरणात चीन व पाकिस्तान विरूद्ध बर्‍याच काळानंतर एक खंबीर भूमिका भारताने घेतली. एकंदरीत मोदी योग्य दिशेने जात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पोटे Sun, 09/21/2014 - 02:45
पेट्रोल कमी केले की वैयक्तिक गाडीवाल्याला फायदा होतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट / वस्तु वाहतुक डिझेलवर जास्त कrun चालते ना ? आणि डिझेल महागच झाले आह ना ?

In reply to by पोटे

पोटे Sun, 09/21/2014 - 02:56
गेल्या तीन महिन्यात डिझेलच्या किमती तीनदा वाढल्या ना? पेट्रोलच्या किमती कमी करुन व डिझेलच्य वाढवुन स्वस्ताई येते का ?

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 14:47
चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत..? हे मी काय पाहतोय ? आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार..!!

In reply to by हाडक्या

गुरुजींनी योग्य विश्लेषण केले, त्याला योग्य म्हण्टले तर कुठे बिघडले? विरोधासाठी विरोध करायला आम्ही भाजपेयी नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 15:11
तुम्ही कोण आहात ते आम्ही कोण सांगणार..! गुरुजीच ते 'व्यवस्थित' सांगु शकतील हो.. ;) बाकी तुम्ही फार म्हणजे फारच शांत झाला आहात आणि खूपच मुद्देसूद बोलत आहात असे निरिक्षण नमूद करतो.. (ह्ये वागनं बरं नव्हं..!) (अवांतरः माई दिसल्या नाहीत त्या बरेच दिवस ? काय आचार संहिता लागु व्हायची वाट बघतायत का त्या ? ;) )

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/19/2014 - 14:48
माझे मत तर बाबा भाजपालाच असेल (सेना बरोबर असेल तर सेना भाजपा युतीला). मोदी उत्तम काम करताहेत. देशाची प्रतिमा निर्माण करणे, परराष्ट्र संबंध इत्यादींबाबत १०० दिवसात योग्य पावले उचलली आहेत. अगदीच पाट्या टाकताहेत असे म्हणले तरीही काहिच न करणार्‍यांपेक्षा किंवा धरणात मुतु इच्छिणार्‍यांपेक्षा सुसंस्कृत भाजप नक्कीच चांगला.

In reply to by नानासाहेब नेफळे

होकाका Fri, 09/19/2014 - 17:22
नेफळेसाहेब, आपण कोणाला मत द्यावंत हा फक्त आपलाच प्रश्ण आहे. फक्त एवढीच एक विनंती आहे की असे महाराष्ट्र विरुद्ध गुजराथ हे स्वरुप ह्या चर्चेला देऊ नका. अगदी एक नजीकच्या वर्तमानातलं उदाहरण द्यायचं तर केंद्रसरकारने भारतात आठ ठिकाणी electronics manufacturing hubs करण्याचं ठरवलं आहे, त्यात निवडलेली चार स्थळं महाराष्ट्रातली आहेत आणि तीन गुजराथमधील. महाराष्ट्रातली शहरं आहेतः ठाणे, औरंगाबाद, नागपूर, आणि नाशिक. देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला सर्व बाबींचा विचार करावा लागतो, त्यात फक्त एकाच प्रांताचा विचार करणं हे ते करूच शकणार नाहीत. मोदींनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की त्यांचा भर त्या त्या राज्यांच्या शक्तीस्थळांना अजूनच मजबूत करण्यावर राहील. मला सांगा, जर त्यांना फक्त गुजराथचेच हीत बघायचे असते, तर त्यांच्या सरकारने इराकमध्ये अडकलेल्या केरळी परिचारीकांना सुखरूपपणे परत आणण्याचे प्रयत्न केले असते का? तसंच, श्रीलंकेत आणि पाकिस्तानात अटक होऊन पडलेल्या मच्छिमार बांधवांना सोडवून आणण्याची तसदी घेतली असती का?

In reply to by होकाका

काळा पहाड Sat, 09/20/2014 - 13:49
अहो तसं त्यांनी केलं नाही तर त्यांच्या पक्षाची युएसपी (http://en.wikipedia.org/wiki/Unique_selling_proposition) काय? एकतर त्यांना काम करावं लागेल नाहीतर भुकं मरावं लागेल. लोक दगडं मारतील ते वेगळंच.

In reply to by श्रीगुरुजी

फुंटी Fri, 09/19/2014 - 14:08
राजकारणात आपल कोण याबाबत अनेक वर्तुळ असतात.राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्त्व हे आपल असू शकत .भाजपची हिंदुत्त्ववादी भूमिका महाराष्ट्रात झिरपण कठीण आहे.हे लक्षात घेऊन मराठी माणसाच्या आणि खासकरून मुंबईच्या हितासाठी शिवसेना स्थापन झाली.मोदींचा कार्पोरेट चेहरा युवकांना भावला आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लाट देशभर उसळली .परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे .त्यामुळेच शरद पवार ते वसंतराव नाईक सगळ्यांनीच मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहील याला प्राधान्य दिले.जरी नेतृत्व विचारी नसलं तरी मुंबईतला सुशिक्षित मराठी समाज नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे .शिवसेनेचा आवाका आणि गरज ही मुंबईपुरता आहे हे ठाकरे पवार दोघही जाणून होते...त्यामुळे युती तुटली तरीही आश्चर्यकारक राजकीय समीकरणे महाराष्ट्रात अस्तित्वात येऊ शकतात...आगामी काळात सेना राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांची भाजप कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षातील लढत होताना दिसेल..

In reply to by फुंटी

चौकटराजा Sun, 09/21/2014 - 18:39
.परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत. 'शिववडा'चा टर्नओव्हर इतका वाढला काय ? शिवसेना काय पक्ष आहे?

In reply to by चौकटराजा

फुंटी Tue, 09/23/2014 - 15:49
खायचे वडे वेगळे असतात हो...दाखवायचे वेगळे....आता शिवसेना हा पक्ष नाहीये ? अमित शहा चावला कि काय तुम्हाला पुण्यात???

युती तुटली हे एका अर्थाने चांगलेच झाले . आता शिवसेना भाजप दोघांनाही आपापली औकात कळेल निवडणुक हरल्यावर दोघेही होश मधे येतील ! शिवाय निवडणुक जिंकल्यावर आपल्या त्या निमित्तने का होईना पण राहुल बाबा चे दर्शन होईल , बरेच दिवस काही ओरीजीनल कॉमेडी ऐकली नाही राव ! बाकी आता पवार साहेब अन राजसाहेब ह्या दुफळीचा फायदा कसा उठराजसाहेब्पाहणे औत्सुक्याचे ठरेल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

सौंदाळा Fri, 09/19/2014 - 14:20
आता राष्ट्र्वादीचे आमदार निवडणुकीनंतर लाली, लिपस्टीक लावुन उभे राहणार आणि जो जास्त पैसे देइल त्याच्याबरोबर जाणार काँग्रेस असो, भाजपा असो नाहीतर सेना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पोटे Fri, 09/19/2014 - 16:56
शिवसेना आणि इंदिरा काँग्रेस युती होती १९७९ साली ! तेंव्हा सेनावाले ओठाला काय लावुन बसले होते?

पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 14:21
मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 14:21
मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

चौकटराजा Fri, 09/19/2014 - 14:58
मिपावर आम्ही नेहमीच एक पालूपद लावत असतो. आपली लोकशाही ही एक भंपक प्रक्रिया आहे. आतापर्यंत १२० कोटी लोकांपकी एकानेही आम्हाला " पक्ष" या शब्दाची व्याख्या नेमकी कोणत्या कायद्यात वा कोणत्या घटनेत सांगितलेली आहे हे इसकटून सांगितलेले नाही. लोकांचे मत हे आपल्या निवडणूक प्रक्रियेत फार फसवे आहे. त्याचे नीट प्रतिबिंब ना कायदा बनविताना होते ना सरकार बनविताना. कोण्त्याही विषयावर सार्वमत घेण्याची तर भारतात पद्धतच नाही. ते घेतले तर अल्पसंख्याकांचे राजकारण कसे खेळता येणार अशी अडचण असू शकेल. म्हणून कार्यकर्ता व राजकारणी यांची एक लुटारू जमात आपण १९५० साली जन्माला घातली आहे. पाच वर्षातून फक्त एकदा मत द्यायचे ते ही प्रमाणशीर महत्व नसलेले. यापलिकडे भारतीय जनतेच्या हातात आहे काय ? सत्तेच्या व्यापाराचा हा नंगा नाच वी द पीपल ऑफ इंडियाने सुरू केला आहे आणि त्याचे परिणाम आपणच भोगणार आहोत.

सुहास झेले Fri, 09/19/2014 - 14:59
युती तुटेल असे वाटत नाही..... तुटलीच तर सेनेला जास्त फायदा होऊ शकतो. भाजपाकडे महाराष्ट्रासाठी कोणताही चेहरा नाही. गोपीनाथ मुंडेंची कमतरता तर भासणार...

सुहास.. Fri, 09/19/2014 - 15:14
युती तुटली ? ती होणार ....निवडणुकांच्या आधी असो वा नंतर ....महाराष्ट्र कुणा ही एका पक्षाला मिळणार नाही हे धाग्यातला प्रतिसादातुनच दिसतय ...प्रश्न आहे की किंगमेकर कोण होणार :)

बाळ सप्रे Fri, 09/19/2014 - 15:14
अजुनही प्रश्नचिन्ह आहे!! पक्की बातमी नाही. पण मोदीलाटेच्या जोरावर मिळालेल्या यशाबद्दल सेनेने कृतज्ञता दाखवायला हवी. कमी जागा आल्या तरी मीच मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा पवित्रा योग्य नाही.

सुहास.. Fri, 09/19/2014 - 15:17
मान्य पण पण भाजपाकडे तरी कुठे आहे मुख्यमंत्र्यासाठी योग्य उमेदवार ?? तावडे अभ्यासु आहेत ..आणि फडविसांना विदर्भाच्या पलीकडे जग आहे की नाही ते माहीत नाही ..बाकी तर पोर टोरंच आहे ...

कंजूस Fri, 09/19/2014 - 16:01
तोफा डागायला एकेक बुरुज वाढला प्रत्येक पक्षाकडे पण सामान्य माणसाकडे कांदे बटाटे तुरडाळ ठेवायला साधे कपाट नाही तिजोरी कुठून आणणार?

मुंबईची ताकद काय ? इंग्रज काळापासून मुंबई बेट आणि आताची मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिला हे रूप द्यायला हजारो उद्यमशील लोकांचा हातभार आहे. हि मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी म्हणून संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनात अनेक लोक हुतात्मा झालेत हि मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहावी ह्यासाठी आणि आपल दिल्लीदरबारी राजकारण अबाधित राहावं म्हणून वसंतराव नाईक , वसंतदादा पाटील ते शरद पवार सर्वांनी हस्ते परहस्ते मदत केलेली आहे हा सगळा इतिहास झाला आता मुंबईच भविष्य काय आहे ? लोकांना वाटतंय कि मुंबईवर भाजपला सत्ता हवीय , पण कोणत्या भाजपला ? फडणवीस ,तावडे, खडसेंच्या भाजपला कि मोदी शहांच्या भाजपला ? मोदींना शहाना मुंबई मुळात नकोच आहे , त्यांना शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत. मित्र पक्ष असला तरी त्याच खच्चीकरण करून आपली ताकत वाढवण हे प्रत्येकच धोरण असतच आणि त्यालाच राजकारण म्हणतात . कालपरवाची मोदींची पावलं त्याच दिशेने पडतात आहेत. चीनचे प्रधानमंत्री दिल्ली मुंबई सोडून आधी अहमदाबादमध्ये येतात , सामंजस्य करार करतात तोही गुजरात सरकारबरोबर ? चीन बरोबर गुजरातच्या प्रधानमंत्र्यांनी जे करार केलेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या योजना गुजरातमध्ये नेल्या जात आहेत ते पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. मुंबईत असणारे गुजराती फक्त पैशाशी बांधील आहेत त्यांना बाकी काही घेण देण नाही मराठी अस्मिता आणि मुंबईशी असणारी भावनिक बांधिलकी ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसाच्या आहेत गुज्जुना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. उद्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही मुंबई शेअर बाजारचा आत्मा पैसा आहे , जर तिकड तितक्याच ताकदीचा शेअर बाजार उभा राहिला तर मग तो हि प्रश्न सुटेल व्यापारी लोकांना काय कुठेही धंदा करायचा आहेच आणि जागतिकीकरणाच्या जमान्यात कुठेही बसून तुम्ही जगात व्यवहार करू शकता आणि एकदा मुंबईच आर्थिक महत्व कमी झाल कि शिवसेनेचं कंबरडे मोडलच म्हणून समजा कारण शिवसेनेच्या राजकारणच आर्थिक स्त्रोत मुंबई आहे हे उघड आहे मग खुशाल शिवसेना मुंबई आमची म्हणून बोंब मारू देत , आर्थिकदृष्ट्या महत्व कमी झालेलं आणि पायाभूत सुविधांवर पडणारा जास्तीचा ताण सहन करताना मरायला टेकलेल हे शहर शिवसेनेच्या ताब्यात असण म्हणजे ओसाड गावची पाटीलकी दिल्यासारखं आहे. एकदा आर्थिक नाड्या आवळल्या कि शिवसेना खच्ची करण अजून सोप होईल तेव्हा मुंबई गुजरातमध्ये जाणार म्हणून आवई उठवण्यात काही अर्थ नाही आणि शहा मोदींना त्यात रसही नाही मराठी माणसाचा विरोध पत्करून हा उद्योग करण्यापेक्षा गुजरातमध्ये प्रतीमुंबई उभी करून आर्थिक राजधानी म्हणून अहमदाबाद किंवा एखाद नाव शहर पुढे आणायला त्यांना जास्त सोप जाईल मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे . श्रेय- आनन्द शितोळे (फेबु वरुन साभार) एक वेगळा मुद्दा. आप आपलि मत ताडुन बघा

In reply to by पिंपातला उंदीर

प्रतिसादातिल सगळं काही वादासाठी खरं मानलं तरी... मुंबईची अशीच किंबहुना यापेक्षा जास्त प्रगती (कारण मुंबई शतकभर अगोदरपासून व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे) करायला कोणी आपले हात धरले होते/आहेत काय? "मुंबईची ताकद" म्हणून सुरुवात करायची आणि त्याच श्वासात "कोणी मुंबईचा गळा घोटतोय" असे म्हणायचे म्हणजे जरा जास्तच होतेय, नाही का ?! बलवानाने "दुसर्‍या कोणी मला अजून बलवान व्हायला मदत करायला पाहिजे" असे म्हणुन दुसर्‍याचे मिंधे राहण्यापेक्षा आपल्या प्रगतीचे प्रयत्न स्वतः करावे. म्हणजे असे दुसर्‍याच्या नावाने गळे काढायची गरज राहत नाही. निदान गेले काही दशके भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून शेखी मिरवणणार्‍या राज्यातिल नागरिकाच्या तोंडी वरचा सर्वच प्रतिसाद दवणिय (हा शब्द मिपाच्या सौजन्याने :) ) आणि अगतिक वाटतो आहे. एक अभिमानी मराठी माणूस म्हणून मला हे वाचून खरंच अत्यंत शरमेचे वाटले ! महाराष्ट्र आणि मराठी माणूस काही इतका रस्त्यावर पडलेला नाही. जरा बरे सुजाण आणि सत्शिल नेते फार मोठा फरक घडवून आणू शकतील. मात्र ते सुजाणपणे निवडणे मराठी माणसाच्याच हातात आहे. सरळ सरळ इतका कांगावा करण्याने बहुतेक हसेच होते... कारण इतरांना डोळे, कान व बुद्धी असते (हे कांगावा करण्याच्या भरात बहुतेक विसरले जाते :) ) ज्या देशांत "देशांतर्गत चढाओढ" आहे तेच देश इतर देशांशी चढाओढ करून जगात पुढे आलेले आहेत.

In reply to by पिंपातला उंदीर

बरय की मग. तेवढेच ते यु.पी. बिहारी भैय्ये तिकडे जातील. महराष्ट्रावरचा ताण कमी होईल. आणि एक पुणेकर असुनही मुंबईचं कौतुक करतोय आता. कुणीही कितीही काहीही केलं तरी मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. प्रती मुंबई गुजरातमधे उभी राहु शकेल पण तरीही मुंबई ती मुंबईच. एक म्हणजे मुंबईच्या अर्थकारणाचा आवाका लक्षात घेतला तर मुंबईमधला सेट व्यवसाय सोडुन गुजरातमधे नव्यानी व्यवसाय सुरु करण्याएवढे लोकं मुर्ख नाहीत. फार तर तिकडे शाखा सुरु करतील, तिकडुन कारभार चालवतील. पण आहे ती गुंतवणुक राहाणारच. हा अपप्रचार फक्त आणि फक्त द्वेशापोटी चालु आहे. (न.मो. फॅण)

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 16:23
द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही
हे इकडे करायला कोणी थांबवलंय? मुम्बै सोडा साधा सातार्‍यातही एखादा उद्योग उभा करायचा झाला तर तेथले नेते उद्योजकांकडे बर्‍याच मागण्या करतात. इथे असलेले उद्योग दुसर्‍या प्रान्तात जातात त्याबद्दल कोणी जराही वाटून घेत नाही. प्रत्येक गावात एमआयडीसी ओसाड पडलेली दिसते. बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू करायला महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधलेले होते? अहमद नगरची कायनेटीक इंजीनियरिंग , सातार्‍याची महाराष्ट्र स्कूटर्स , हे कारखाने कित्येक वर्षे बंदच आहेत. क्षमता असूनही कोणतेच उत्पादन होत नाही. ही उदाहरणे बोलकी आहेत. कॉम्ग्रेस असो की इतर कोणी. नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. दिल्लीत भाजप मधे महाराष्ट्राचे खासदार आहेत की ते असे प्रयत्न का करीत नाहीत महाराष्ट्रात केवळ शिवसेनाच उद्योग आणते असा भ्रम जोपासला आहे. सेनेने इथे असे कोणते नवे उद्योग आणले यांची कोणी यादी देईल का?

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 20:39
आम्ही त्यांना फाट्यावर मारतो.. तरीही मुजरे घालणारे भरपूर आहेत आणि आमच्या नशीबी जी शिवाजी महाराजांच्या नावे (त्यांच्या नावाला न शोभणारी) राजेशाही आलेली आहे त्याला काहीही उपाय नाही म्हणून जास्तच हळहळ, बाकी काही नाही. तुम्ही परत तुमच्या वळणावर आलेले पाहून आनंद वाटला.. ;)

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 16:43
मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही. हे लोक मजूर म्हणून सुद्धा काम करू शकत नाहीत. जिथे तिथे जातीयवादी आणि कंपूबाज गोष्टी करत असत्तात. जास्तीत जास्त हे लोक चहाची टपरी, वडापावची गाडी, लोकांना अडवणारे रिक्षावाले असली कामं करत फिरतात. आणि मग हा कसा बाहेरचा आहे, तो कसा भटजी-शेटजी पैकी आहे, तो कसा महाराष्ट्राला विकायला चाललाय आणि माझा जातिय्वादीपणा कसा चांगला आहे असल्या चर्चा करत बसतात. एक गंमत सांगतो. ईंटरव्ह्यू घेताना मुसलमान सुद्धा मराठी लोकांपेक्षा चांगली चमक दाखवतात.

In reply to by काळा पहाड

हाडक्या Fri, 09/19/2014 - 16:53
धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा प्रयत्न आणि मराठी लोकांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचं जनरलायजेशन पाहून अंमळ गम्मत वाटली.. नक्की तुम्ही मराठी आहात का ? असल्यास आणि नसल्यास या तुम्हीच दर्शवलेल्या स्थितीपेक्षा वेगळे काही घडावे यासाठी आपला छोटासा का होईना पण प्रयत्न जाणून घ्यायची इच्छा आहे. अन्यथा मराठी माणूस नुसता तोंडाची हवा दवडण्यात कुठेही कमी पडत नाही असेही म्हणू शकाल मग तुम्ही.

In reply to by हाडक्या

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 17:08
१. मी मराठीतच लिहितोय नाही का? पण मी पर्फॉर्मन्स ला प्राधान्य देतो आणि तिथं मराठी लोक बरेच कमी पडतात. मी गुप्ता बरोबर काम करतोय की पटेल बरोबर की सुब्रमण्यम बरोबर यात मला फरक पडत नाही. पण मराठी लोक कंपूबाजी करून काम न करण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. अर्थात हा महाराष्ट्रातला अनुभव आहे. तामिळ्नाडू मधे कदाचित तामिळ लोक्स ही तसंच करू शकत असावेत पण त्याच्याशी माझा संबंध नाही. २. मला या गोष्टीत कसलाही प्रयत्न करावा अशी माझी इच्छा नाही कारण त्यात माझा वेळ फुकट जातो. मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय.

In reply to by काळा पहाड

मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय नका हो एवढा त्रास घेऊ . महाराष्ट्र / मराठी माणस दबून जातील उपकाराच्या 'पहाड ' खाली

In reply to by पिंपातला उंदीर

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 17:31
दबणे, उपकार, त्रास घेणे, मोडेन पण वाकणार नाही, अस्मिता, सहन करणार नाही, रक्त उसळणे, प्रेमात 'पडणे'.. मराठी माणसांची शब्दावली टिपीकल असते ना?

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 10:41
नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. सहमत. मराठी माणसाची निष्क्रियता, शेरेबाजी आणि आळस माझ्या सारख्या लहानातलहान व्यावसायिकालाही जाणवतो.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 11:53
पुण्याच्या आसपास च्या उद्योग वसाहतीत कॉ आणि रा़काँ च्या लोकांची खंडणीखोरी इतकी वाढली आहे की छोट्या उद्योजकाला धंदा करणे शक्यच नाही. मोठे उद्योजक थेट वरच पैसे पुरवतात आणि निभावुन नेतात, छोटे आणि मध्यम उद्योजक पार मेले आहेत ह्या गुंडगीरीने.

@विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाशी सहमत . . वरचा मी दिलेला प्रतिसाद हा एक नवीन perception म्हणून फेबु वरून शेयर केला . पण त्या प्रतिसादातल्या bottomline शी मात्र मी सहमत आहे . मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे आमच परभणी शिवसेनेचा औरंगाबाद आणि मुंबई पेक्षा मोठा बालेकिल्ला . वर्षानु वर्ष सेनेचे आमदार आणि खासदार इथून सतत निवडून जात आहेत . पण शहराला ओरबाडून खाण्याशिवाय आणि लोकांना भडकावून दंगे करण्याशिवाय त्यांनी काहीही केल नाही . परभणी पुरत (आणि महाराष्टात अशी अनेक शहर आहेत ) बोलायचं झाल तर सेना निवडून नाही आली तर परभणी साठी चांगलाच होईल . Fingers crossed

विटेकर Fri, 09/19/2014 - 16:56
पन मुंबईच्या श्रीमंतीचा मराठी माणसाला काय उपयोग झाला ? मराठी माणूस कष्टकरी तो कष्ट्करीच राहीला, पूर्वीही म्हणजे शिवसेनेच्या बहारीच्या काळात आणि त्यापूर्वी ही मुंबईवर अर्थिक वर्चस्व पारसी - गुजराती लोकांचेच होते आणि आहे. दक्षिण मुंबई परिसरात पूर्वी ही आणि आता किती मराठी माणसे आहेत ? दादर - गिरगावातील मराठी माणूस केव्हाच उपनगरात चालता झाला. गिरण्यांबरोबर मुंबईतला मराठी टक्का ही घसरला. मग आज ज्या स्वरुपात मुंबई आहे , ती नेमकी कुणाची आहे ? की मराठी राज्यकर्ते असले म्हणजे मुंबई मराठी होते ? आणि या मराठी राज्यकर्त्यांनी मुंबईचे मराठीपण ... मराठीपण जाऊ द्या , मुंबईपण टिकावे म्हणून काय केले? तुम्ही म्हणता तशी , मोदी - शहा अशी गुजराती जोड-गोळी काम करत असेल तर ती गुजरातच्या उत्कर्षासाठी करते आहे मुंबईच्या खच्चीकरणासाठी नाही . मुंबईचे शांघाय करण्यापासून मराठी राज्यकर्त्यांचे हात कोणी बांधले होते? दोन्हीकडे तर कॉन्ग्रेसचीच सत्ता होती. दुसर्‍याची पुसण्यापेक्षा , तुम्ही तुमची रेष मोठी ओढा ना ! आणि व्यक्तिश: मला आता गुजरात मध्ये मोदिना काही इन्ट्रेस्ट असेल असे वाटत नाही. तसे असते तर त्यांनी बडोड्याची जागा सोडून दिली नसती. ते आता वरच्या पातळीवर आहेत. चीन चे करार अहमदाबाद मध्ये झाले असतील तर त्यांचा गुजरात हा कंफर्ट झोन आहे इत्काच अर्थ आहे. मोदी काय आणि शहा काय , दोघे ही आता राष्ट्रिय पातळीवरचे नेते आहेत. युती बाबत - बाळासाहेब काय आणि प्रमोद महाजन काय ( विथ ड्यु रिस्पेक्ट टू बोथ ) , पक्के सत्तापिपासू होते आणि सत्तेसाठी वाट्टेल ते .. करायला तयार होते अश्यातून या कृत्रिम युतीचा जन्म झाला. या शिवसेनेच्या हट्टापायी नारायण राणे सारख्या नामचीन गुण्डाला मुख्यमंत्री मह्णून स्वीकारावे लागले ! दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत / होते. कितीदिवस मारुन - मुटकुन एकत्र राहणार ? अपयशाचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्यापलिकडे तसेही युतीत फार सख्य राहीले नव्हते. बाळासाहेब - उद्धव - आदित्य ही वारसदारी भाजपच्या लोकांनी पसंद पडणारी नव्हतीच. मोदी- शहांनी ७५ वर्षावरील आप्ल्याच नेत्यांना घरी बसविले , ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल ) शिवाय भाजपच्या मातृसंघटनेला शिवसेनेचे अजिबात प्रेम नव्हते / नाही. संघाची ताकद हवी असेल तर शिवसेनेला बाजूला सारायला हवे हा धोरणीपणा मोदी - शहा आणि तावडे - फडणवीस यांच्याकडे आहे. प्रमोद महाजन ष्टाईल, सेना-राष्ट्रवादी संस्कृतीने राजकारण करण्याकडे आता भाजपचा कल नाही असे दिसते.

In reply to by विटेकर

आजानुकर्ण Fri, 09/19/2014 - 17:28
ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल
प्रतिसादाशी सहमत. मुंबईची वाट लावण्याचे संपूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. निव्वळ राडासंस्कृती आणि भावनिक ब्लॅकमेलिंग या आधारावर इतकी वर्षे हा पक्ष टिकून आहे. पुढेही टिकेल. मात्र महाराष्ट्रापुरत्या भाजपामध्ये घराणेशाहीचा एखादा अपवाद नसून रक्षा खडसे, पूनम महाजन, पंकजा मुंडे, असे किमान तीन अपवाद माहिती आहेत. मागील निवडणुकीत हीना गावित हाही एक नवा अपवाद त्यांनी अंतर्भूत केला आहे असे दिसते.

In reply to by हाडक्या

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 19:18
हाडक्या काका एकदम बरोबर. तो पक्ष म्हणजे "पार्टी विथ डिफरन्स" आणि स्वयंसेवकांचा पक्ष आहे. ज्या सेनेचा घराणेशाहीला कडाडून विरोध होता त्या सेनेची सुरवातच घराणेशाहीतुन झाली आहे. प्रबोधनकार नसते तर सेनेला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. काँग्रेसला वरवर विरोध करताना मुम्बैतील कामगार चळवळ कोणी सम्पवली ते सगळेच जाणतात. उगाच नव्हे सेनेला त्यावेळेस "वसंतसेना" म्हणायचे. सेनेने इंदिरा गांधीना विरोध करतानाच आणिबाणीत काय वर्तन केले होते तो इतिहास काही पुसला गेलेला नाहिय्ये. राजीवगाम्धीना घराणेशाही मुळे नावे ठेवताना सेनेने अगोदर मुलगा आणि नंतर नातू असा प्रवास चालू ठेवलाय. वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते. सेनाप्रमुखाना त्यानी नम्तर स्पष्टीकरण दिले होते. त्या खासदारावर सेनेकडून कोणतीच कारवाई झाली नाही. एन्रॉन समुद्रात बुडवायची गर्जना रीबेका मार्कंच्या भेटीनंतर कुठे आणि कशी बुडाली हे जनतेच्या विस्मरणात गेले असेल. पण त्यातले व्यवहार सर्वसामान्यानाही ओळखता येतील.

In reply to by विजुभाऊ

श्रीरंग_जोशी Fri, 09/19/2014 - 20:01
वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते.
स्व. नरसिहरावांचे सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात असताना सेनेचे तत्कालीन खासदार मोहन रावले अनुपस्थित राहीले होते हे वाचले होते.

In reply to by विजुभाऊ

दुश्यन्त Fri, 09/19/2014 - 23:18
बरोबर माहिती देत येत नसेल तर किमान चुकीची माहिती पसरवू नका. मोहन रावले हे नरसिम्हा राव सरकारच्या अविश्वासमता वेळी गैरहजर होते. वाजपेयी सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच साथ दिली होती. वाजपेयी समता - ममता-जयललिता वगैरे मुले बेजार झाले होते तेव्हा आपल्या कोट्यातील मंत्रिपद कमी करून यांना द्या असे बाळासाहेबांनी वाजपेयींना सांगितले होते. १९९९ ला एक मताने सरकार पडले कारण ऐनवेळी जयललिता पलटल्या. शिवसेना आणि अकाली दल या दोघांनीच केंद्रात कायम भाजपला साथ दिली आहे.

पोटे Fri, 09/19/2014 - 17:05
ती पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक बेडुक इतर बेडकाना संपवायला साप आणतो. शिवसेनेने साप आणला. आता साप त्यानाच खातोय

सुधीर Fri, 09/19/2014 - 17:10
१ महिन्यापूर्वी वाचलेला हा लेख आठवला. http://www.loksatta.com/sampadkiya-news/transits-to-modi-shah-era-may-crush-nda-761587/?nopagi=1

पगला गजोधर Fri, 09/19/2014 - 17:32
मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आणि राष्ट्रवादी जर एकत्र आले (छुप्या वा उघड) रीतीने, तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा भा ज प आणि मनसे जर उघड रीतीने एकत्र आले, (सोबत राष्ट्रवादी छुप्या रीतीने), तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा शिवसेना व कॉंग्रेस (छुप्या रीतीने) एकत्र आले, तर राजकीय समीकरण काय असेल ?

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय Fri, 09/19/2014 - 17:42
भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र आले (म्हणजे राकॉला सत्तेत स्थान मिळाणार असेल तर) तर मी एकवेळ आयसिसला मत देइन पण या दोघांपैकी एकाला देणार नाही. असला भडभुंजेपणा भाजपा करणार असेल तर मी आजन्म काँग्रेस बरोबर जाइन. भाजपा आणि मनसेने युती केली तर भाजपा मनातुन उतरेल पण तरीही त्यालाच मत देइन. भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. शिवसेनेने काहिही केल्यास मला फरक पडत नाही पण त्यांनी राष्ट्रवादीशी युती केल्यास त्यांच्यासारखे मुर्ख तेच असतील. असो. १३० जागांवर समाधान मानुन भाजपा युती पुढे चालु ठेविल याबाबत सध्या तरी शंका नाही आहे. थोड्या वेळापुर्वी ही बातमी खरी वाटली होती. पण आत्ता त्यात दम नाही. भाजपाला सेनेबरोबरची युती तोडणे महागात पडेल कारण अजुन राज्यसभेत ते संख्याबळात कमी आहेत. सद्यपरिस्थितीत किमान जॉईंट सेशनमध्ये तरी त्यांना आघाडी आहे. सेना बाहेर पडल्यास ते ही अवघडच जाइल.

In reply to by मृत्युन्जय

भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. आवडलं... फक्त जराशी कंजूशी झालीय... "१०००००००१ वेळा" असं लिहायला पाहिजे होतं, जास्त भारी वाटलं असतं. या निवडणूकीपुरते तरी तुम्ही सुरक्षित आहात ;)

तिमा Fri, 09/19/2014 - 19:23
कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ दे, मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.

In reply to by तिमा

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 19:36
मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.
हो ना. केंद्रात पंतप्रधान ठरवायच्या अगोदर सुद्धा अश्शीच गोग्गोड चर्चा चालू होती. काय झाले हे सर्वाना ज्ञातच आहे. भिगवण चौकाच्या वार्डात कोणता उमेदवार उभा करायचे ठरवायचे कोणी याची देखील अश्शीच चर्चा होईल काही दिवसानी.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 21:07
>>> इतका काँन्फीडन्स बरा नव्हे ,पोट निवडुकात काय झाले ठाऊक आहे ना? पोटनिवडणुकांच्या निकालाविषयी देशात प्रथमच इतकी गंभीर चर्चा सुरू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. १९४७ नंतरच्या कोणत्याही पोटनिवडणुकीच्या निकालाची इतकी चर्चा झाली नसेल किंवा त्या निकालाच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठला नसेल. असो. जरा सविस्तर निकाल पाहू. मे २०१४ नंतर १०-१२ राज्यांमधील एकूण ४७-४८ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक झाली. ३ लोकसभा मतदारसंघामध्ये पण पोटनिवडणुक झाली. काही राज्यात फक्त १-२ मतदारसंघात पोटनिवडणुक झाली तर ३ राज्यात ९-११ जागांवर पोटनिवडणुक झाली. त्यात म.प्र.मध्ये भाजपने ३ पैकी २ व काँग्रेसने १ जागा जिंकली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने २ व भाजपने १ जिंकली. पंजाबमध्ये काँग्रेस १ आणि अकाली द्ल १, उत्तराखंडमध्ये काँग्रेस ३, प. बंगालमध्ये तृणमूल १, भाजप १ , आसाममध्ये काँग्रेस, भाजप व तिसरा पक्ष प्रत्येकी १, उ.प्र.मध्ये सप ८/भाजप ३, गुजरातमध्ये भाजप ६/काँग्रेस ३, बिहारमध्ये भाजप ४/राजद्+संजद्+काँग्रेस ६ अशी साधारण परिस्थिती होती. या निकालांवरून मोदी लाट ओसरली, मोदींविषयी जनतेचा भ्रमनिरास झाला, जनतेने मोदींना धडा शिकविला, काँग्रेस परत येत आहे, भाजप बॅकफूटवर, इ. मांडे खाणे सुरू झाले. लोकसभेच्या ३ जागांवर जैसे थे स्थिती राहिली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर मे २०१४ प्रमाणेच मतदान झाले हे दिसून आले. जर मोदी लाट ओसरली असती तर भाजपला बडोद्याची जागा का मिळाली असती? तसेच काँग्रेसला तेलंगणातील जागा का मिळाली नाही? गंमत म्हणजे काँग्रेसने दिल्लीसकट अनेक शहरांमध्ये पोटनिवडणुकीतील निकालांचा विजयोत्सव साजरा केला. पोटनिवडणुकीत मिळालेल्या २-४ जागांचा देशभर जल्लोष करावा इतकी वाईट वेळ कॉंग्रेसवर आली आहे. बिहार विधानसभेत मे २०१४ मध्ये एकमेकांविरूद्ध लढलेल्या राजद, संजद व काँग्रेसने एकत्र निवडणुक लढल्याने भाजपविरोधातील मतविभागणी टळल्याने त्यांना १० पैकी ६ जागा मिळाल्या हे उघड आहे. या परिस्थितीतसुद्धा भाजपला ४ जागा मिळाल्या. सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे व मतविभागणी टाळणे हा मोदींविरूद्ध कौल कसा होऊ शकतो? डिसेंबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हे संधीसाधू पक्ष एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण एकूण २४३ पैकी राजद व जदयु काँग्रेसबरोबर युती करून प्रत्येकी फक्त १०० च्या आसपास जागा लढविणे व काँग्रेसला ४३ जागा सोडणे अशक्य आहे. दोन्ही पक्ष किमान १५० जागांचा आग्रह धरतील. त्यामुळे ही संधीसाधू युती फक्त या पोटनिवडणुकीसाठी होती. या निकालांचा व मोदींच्या कारभाराचा काहीही संबंध नाही. उ.प्र.मध्ये सप ने ११ पैकी ८ जागा जिंकल्या. काँग्रेसला भोपळा मिळाला. पण काँग्रेसवालेच जास्त उड्या मारताहेत. प्रत्यक्षात बसप आणि सप यांच्या छुपा समझोता होऊन बसपने आपले उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे बसपला मिळणारी सर्व मुस्लिम मते व काही दलित मते सप कडे गेली व त्यातूनच सप ला ८ जागा मिळाल्या. मोदी कारभाराचा व या विजयाचा काहीही संबंध नाही. २०१७ मध्ये उ.प्र. च्या विधानसभा निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व जागा लढवेल व त्यामुळे या पोटनिवडणुकींच्या निकालाची पुनरावृत्ती होणार नाही. गुजरातमध्ये ९ पैकी ३ जागा गमाविल्या तरी ६ जिंकल्या आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली या विधानात तथ्य नाही. इतर राज्यात १-२ जागाच असल्याने निवडणुक फक्त स्थानिक प्रश्नावरच लढली गेली. तिथेही मोदी लाटेचा काहीही संबंध नाही. एकंदरीत काही राज्यातील २-४ पोटनिवडणुकीच्या निकालावरून मोदींच्या जेमतेम १०० दिवसांच्या राजवटीविषयी भाकीत करणे हा मूर्खपणाचा कळस आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुजरातमध्ये ९ पैकी ३, राजस्थानात ४ पैकी ३ जागा काँग्रेसला मिळाल्यात, यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते.युपीत ७२ लोकसभा सीट जिंकणारे बीजेपी १०० दिवसात ११ विधानसभेपैकी फक्त २ जागा जिंकतात, यावरुन मोदी लाट संपुष्टात येत आहे हे स्पस्ट आहे. बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 13:07
>>> यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते. हो का? उ.प्र. मधील विधानसभेच्या ११ जागांपैकी किती जागा काँग्रेसला मिळाल्या हो? आणि लोकसभेच्या ३ जागांवरील पोटनिवडणुकांमध्ये किती जागा काँग्रेसने पटकावल्या? काँग्रेस होतेय असा तुमचा भ्रम झालाय म्हणून विचारतोय. >>> बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे. मुळात तो व्होटर बेस मे २०१४ मध्ये भाजपाकडे नव्हताच. त्यामुळे तो भाजपा ऐवजी सपाकडे वळला हे विधान असत्य आहे. सपा ला स्वतःची व बसपची अशी दुप्पट मते मिळाल्याने पोटनिवडणुकीत ८ जागा मिळाल्या हे लक्षात घ्या. त्याचबरोबर हेही लक्षात घ्या २०१७ मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व ४०३ जागा लढवेल व त्यावेळी पुन्हा एकदा ही मते सप कडून बसप कडे येतील व भाजपविरोधी मतांचे पुन्हा एकदा विभाजन होईल. त्यामुळे मोदी लाट ओसरली, काँग्रेस रिव्हाईव्ह होतेय अशा गैरसमजूतीतून दूर व्हा.

In reply to by श्रीगुरुजी

बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मे मध्ये ती मते भाजपकडे गेली नाहीत हा दावा आपण कोणत्या आकडेवारीतून करत आहात? जरी मान्य केले तरी १०० दिवसाच्या प्रचंड यशस्वी मोदीसरकारचा तिथल्या सपा बसपाच्या वोटरवर काहीच परिणाम झाला नाही का ? याचे दोनच अर्थ आहेत, पोटनिवडणुकित मत देणारे एक दोन कोटी मतदार मुर्ख आहेत किंवा मोदी लोकांना विकासाच्या नावाखाली फसवत आहेत व लोकांच्या लक्षात ही फसवणुक आली आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 21:01
>>> बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मुळात बसपचे (आणि सप चे सुद्धा) मतदार विकास, सुशासन, योग्य प्रशासन या मुद्द्यांवर मतदान करतच नाहीत. जात आणि धर्म यांवरच ते मतदान करतात. त्यामुळे मोदी विकासपुरूष असले किंवा नसले, मोदींनी महागाई कमी केली का नाही या मुद्द्यांवर मतदान न करता ते आपल्या जात/धर्म विचारांवर आधारीत जो पक्ष योग्य वाटतो त्यालाच मतदान करतात. बसपच्या अनुपस्थितीत त्यांना सप आपलासा वाटला यात काहीच नवल नाही. मे २०१४ मध्ये त्यांची मते बसप आणि सप या दोघात विभागली गेली होती. बसपच्या अनुपस्थितीत ती सप कडे गेली आणि म्हणून सप ला जास्त जागा मिळाल्या.

In reply to by श्रीगुरुजी

बसपाचे मतदार जात बघून मतदान करतात याची काही आकडेवारी द्याल का? बसपाची एकही लोकसभा सीट लागली नाही याचा अर्थ सपा बसपा यांचा वोटर मोदींकडे वळला होता, परंतु १०० दिवसाच्या गुजरातधार्जिण्या मोदींचा कारभार बघुन पुन्हा माहेरी परतला,हे पोटनिवडणुकीत स्पष्ट होते. राज्यातही काँ राकाँच्या पारंपारिक मतदाराने भाजपला वोट दिले, परंतु आता त्यांनाही मोदीच्या फक्त तोंडाच्या वाफा दवडण्याच्या सवयीचा साक्षात्कार झाल्याने राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो .देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही .

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 09/20/2014 - 21:15
>>> युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो . या निवडणुका रा़ज्यात झाल्या. केंद्रात नव्हे. त्यामुळे मोदींचा इथे संबंधच नाही. मोदी तिकडे प्रचाराला फिरकले पण नव्हते. लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सर्व पक्षांनी आपापल्या जागा राखलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मे २०१४ मध्ये जो कल होता तोच आज कायम आहे. प. बंगालमध्ये २ पैकी १ जागा भाजपने मिळविली. तुमच्या विचित्र तर्कशास्त्रानुसार याचा अर्थ तिथे मोदींची लाट आली आहे असा घ्यावा लागेल. >>> देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. शिवसेना नेते काय बडबडतात यावर तुम्हीच विश्वास ठेवा. बर. खालीच बातमी वाचा आणि मोदी लाट परत आल्याचे कबूल करा. छत्तीसगड >>> ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही . कशावरून? सध्या मे २०१४ सारखीच जैसे थे परिस्थिती आहे. कोणाचेही रिव्हाईव्हल होत नाहीय्ये आणि कोणीही डीप्राईव्ह होत नाहीय्ये.

रोचक चर्चा ! @ नानासाहेब नेफळे : धाग्याचा ट्यार्पी वाढवायचा सद्या काय रेट आहे ?! ;) (प्रामाणिकपणे केलेली विचारणा जमल्यास हघ्या :) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या Fri, 09/19/2014 - 21:52
एक्का साहेब.. तुमचे धागे असे पण पापुलर असतेत.. कशाला नानासाहेबांना सुपारी देताय.. तुमच्या धाग्यांवर आले म्हन्जे २००-३०० शिवाय थांबायचे नाहीत ते. बादवे, असे पण ते फक्त राजकारणाच्या धाग्यांचे स्पेशालिष्ट आहेत.. तुमी तसला धागा काडला म्हनजे त्यांना 'विसरु' नका म्हणजे झालं. ;)

लोटीया_पठाण Sat, 09/20/2014 - 19:23
मी तरी भाजपालाच मत देईन. हे काँग्रेसी दर दोन वाक्यांमागे पुरोगामी महाराष्ट्राची टेप लावण्या पलीकडे काहीही करत नाहीत. सेना नेतृत्व अन इतर रडत राऊत यांच्याकडून काहीही होप्स नाहीत, यांच्या हातात सत्तासूत्रे गेली तर महाराष्ट्राची मुंबई महानगर पालिका करून टाकतील. * नेव्हिल maxwell / ब्रूक्स हेंडरसन अहवालावरून भाजपा ने केलेलं घुमजाव मात्र पटलं नाही. कॉंग्रेसवर बरेच आरोप केले अन जेव्हा वेळ आली तेव्हा काँग्रेसी कारणेच पुढे केली.

खरंच युती मोडली का उगाच चर्चा सुरू आहेत? मटात ही बातमी दिसत्ये - जागांवरून बाणराव टेचात, कमळाबाई पेचात! आणि एक - मराठी मुस्लिमही असतात आणि ते मराठीच असतात. मराठी म्हणजे बाय डीफॉल्ट मुस्लिमेतर नव्हेत.

मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही.
"महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते.चेन्नई,हैद्राबादचे ह्यांचे एक दिवंगत मित्रही 'मराठी माणसे गटबाजी करतात्' ह्या मताचे होते.काही प्रमाणात तामिळ लोकही हा प्रकार करतात पण राज्याबाहेर 'आपण व आपले काम' हेच धोरण असते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या Tue, 09/23/2014 - 10:33
>> पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." ज्याअर्थी तुम्ही मिपावर आहात त्याअर्थी तुमचं हे सारं झालंय असं गृहीत धरायला हरकत नसावी. :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Tue, 09/23/2014 - 12:50
>>> "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते. याच धर्तीवर - "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भरमसाठ डू आय काढण्याच्या भानगडीत पडू नका." असे म्हणता येईल. हो की नाही हो नानासाहेब?

In reply to by श्रीगुरुजी

@संपादक मंडळ,माईसाहेब ह्या मिपाच्या एक सन्मानिय स्त्री सदस्या आहेत ,त्यांच्याशी माझे नाव वारंवार जोडून माझे व त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न अनेकदा श्रीगुरुजी या आयडीने केला आहे. कृपया आपण त्यांना योग्य ती समज द्यावी.
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत.

......आणि आमची पितरं जेवली.

भिंगरी ·

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 10:58
वाचता वाचता डोळे भरुन आले. तुमचे पितर नक्कीच समाधान पावले असतील. दरवर्षी भटाब्राह्मणांना बोलावून दक्षिणा देण्यापेक्षा असे कांही करा.

भिंगरी Fri, 09/19/2014 - 11:05
बर्‍याच वेळा पाणी आले,पण शक्य तेव्हढ्या रुग्णाना घरी पाठवून दिले जात असे त्यामुळे २ ते ३ रुग्णच सांभाळावे लागले.उपकरणे मात्र प्रत्येक वेळी येत असत.आता त्यांनी ६ वर्षापुर्वी इस्पितळाची जागा बदलली आहे.

विटेकर Fri, 09/19/2014 - 11:34
छान केलेत ! खरेतरं श्राद्ध -पक्ष न करता ( किंवा फारसे अवडंबर न करता ) सामाजिक संस्थाना मदत करावी , हे खरे पुण्याचे काम ! समर्थांनी म्हंटले आहे ... मेले माणूस भोजना येते | या नांव भ्रम !

In reply to by विटेकर

एस Fri, 09/19/2014 - 11:43
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः|| खूपच छान कार्य घडले तुमच्या हातून.

पैसा Fri, 09/19/2014 - 11:46
ग्रेट अनुभव! मी विचार करतेय, इतक्या लोकांना एकवेळ घरात बसू देईन, पण जेवण तयार करून वाढणे शक्य होईल का मला? त्यात ती लहान नवजात बाळं म्हणजे घर स्वच्छ तर ठेवलेच पाहिजे!

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 14:52
नकीच गल्ली चुकली आहे त्यांची. ज्याला ते चुक म्हणताहेत तो शहाणपणा आम्ही तीस वर्षांपूर्वी केला होता. (असं लिहावं लागतं. ह्यांचा कांही भरवसा नाही. दाखवतीलही ही पोस्ट काकूंना.)

खरंच उत्तम काम केलेत ! जर तुमचे पूर्वज हे जाणू शकत असतील तर पितृपक्षातल्या जेवणाच्या ताटापेक्षा तुम्ही केलेल्या या कृतीमुळे त्यांना तुमच्याबद्दल अधिक प्रेम आणि सार्थ अभिमान वाटला असणार !

प्यारे१ Fri, 09/19/2014 - 16:15
खूपच छान. परंपरा नुसत्याच पाळण्यापेक्षा त्या मागचा हेतू समजून घेऊन कालानुरुप बदल करत चांगले बदल हळू हळू घडवता येतात ह्याचं प्रात्यक्षिक म्हणावं असं उदाहरण!

सविता००१ Fri, 09/19/2014 - 17:03
इतक्या लोकांची आयत्यावेळी उत्तम सोय करणे, त्यात बाळं, बाळंतिणी, खरच फारच सुरेख काम केलंत. खरा धर्म हाच की.

भिंगरी Fri, 09/19/2014 - 19:04
हे सर्व करण्यासाठी माझ्या पतीनेही परवनगी दिली माझा मोठा मुलगा त्यावेळेस मलेरियाने आजारी होता.मी रुग्णांचे करत असताना त्यांनी मुलाची व्यवस्थित काळजी घेतली. आणि आजही त्यांच्या नंतर मुलेही मला अशा कामांना सहयोग देतात म्हणुनच हे शक्य होतं.

फुंटी Fri, 09/19/2014 - 22:38
सम्द्यांचे प्रतिसाद वाचून बिन्गरीताय लय खुश झालीय ...आभार कसे मानावेत हेच तिला कळना..एक शब्दही तिच्यान टंकवेना बघा....तवा बिन्गरीताय्च्या पिर्माच पर्तिक म्हणून समद्यांना जेवाय बोलवील हाय...कवा ते बिन्गारीताय डिक्लेअर करतीलच...

खरोखर कौतुकास्पद काम केलेत तुम्ही. तुमच्या घरच्यांना आणि तुम्हालाही साष्टांग दंडवत. (अशा प्रसंगी आपण कसे वागु याचा विचार करणारा) पैजारबुवा,

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 10:58
वाचता वाचता डोळे भरुन आले. तुमचे पितर नक्कीच समाधान पावले असतील. दरवर्षी भटाब्राह्मणांना बोलावून दक्षिणा देण्यापेक्षा असे कांही करा.

भिंगरी Fri, 09/19/2014 - 11:05
बर्‍याच वेळा पाणी आले,पण शक्य तेव्हढ्या रुग्णाना घरी पाठवून दिले जात असे त्यामुळे २ ते ३ रुग्णच सांभाळावे लागले.उपकरणे मात्र प्रत्येक वेळी येत असत.आता त्यांनी ६ वर्षापुर्वी इस्पितळाची जागा बदलली आहे.

विटेकर Fri, 09/19/2014 - 11:34
छान केलेत ! खरेतरं श्राद्ध -पक्ष न करता ( किंवा फारसे अवडंबर न करता ) सामाजिक संस्थाना मदत करावी , हे खरे पुण्याचे काम ! समर्थांनी म्हंटले आहे ... मेले माणूस भोजना येते | या नांव भ्रम !

In reply to by विटेकर

एस Fri, 09/19/2014 - 11:43
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः|| खूपच छान कार्य घडले तुमच्या हातून.

पैसा Fri, 09/19/2014 - 11:46
ग्रेट अनुभव! मी विचार करतेय, इतक्या लोकांना एकवेळ घरात बसू देईन, पण जेवण तयार करून वाढणे शक्य होईल का मला? त्यात ती लहान नवजात बाळं म्हणजे घर स्वच्छ तर ठेवलेच पाहिजे!

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 14:52
नकीच गल्ली चुकली आहे त्यांची. ज्याला ते चुक म्हणताहेत तो शहाणपणा आम्ही तीस वर्षांपूर्वी केला होता. (असं लिहावं लागतं. ह्यांचा कांही भरवसा नाही. दाखवतीलही ही पोस्ट काकूंना.)

खरंच उत्तम काम केलेत ! जर तुमचे पूर्वज हे जाणू शकत असतील तर पितृपक्षातल्या जेवणाच्या ताटापेक्षा तुम्ही केलेल्या या कृतीमुळे त्यांना तुमच्याबद्दल अधिक प्रेम आणि सार्थ अभिमान वाटला असणार !

प्यारे१ Fri, 09/19/2014 - 16:15
खूपच छान. परंपरा नुसत्याच पाळण्यापेक्षा त्या मागचा हेतू समजून घेऊन कालानुरुप बदल करत चांगले बदल हळू हळू घडवता येतात ह्याचं प्रात्यक्षिक म्हणावं असं उदाहरण!

सविता००१ Fri, 09/19/2014 - 17:03
इतक्या लोकांची आयत्यावेळी उत्तम सोय करणे, त्यात बाळं, बाळंतिणी, खरच फारच सुरेख काम केलंत. खरा धर्म हाच की.

भिंगरी Fri, 09/19/2014 - 19:04
हे सर्व करण्यासाठी माझ्या पतीनेही परवनगी दिली माझा मोठा मुलगा त्यावेळेस मलेरियाने आजारी होता.मी रुग्णांचे करत असताना त्यांनी मुलाची व्यवस्थित काळजी घेतली. आणि आजही त्यांच्या नंतर मुलेही मला अशा कामांना सहयोग देतात म्हणुनच हे शक्य होतं.

फुंटी Fri, 09/19/2014 - 22:38
सम्द्यांचे प्रतिसाद वाचून बिन्गरीताय लय खुश झालीय ...आभार कसे मानावेत हेच तिला कळना..एक शब्दही तिच्यान टंकवेना बघा....तवा बिन्गरीताय्च्या पिर्माच पर्तिक म्हणून समद्यांना जेवाय बोलवील हाय...कवा ते बिन्गारीताय डिक्लेअर करतीलच...

खरोखर कौतुकास्पद काम केलेत तुम्ही. तुमच्या घरच्यांना आणि तुम्हालाही साष्टांग दंडवत. (अशा प्रसंगी आपण कसे वागु याचा विचार करणारा) पैजारबुवा,
लेखनविषय:
लेखनप्रकार
. पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर...... माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत. ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले .त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १

स्पार्टाकस ·

अजया Fri, 09/19/2014 - 10:59
मीही गुगल अर्थ बघत बघत वाचला लेख.सलग बघताना संदर्भ लागतात बरोबर.नुसते वाचुन कळत नाही. रच्याकने :सतत नविन नविन विषय सुचतात कसे?वाचता कधी,लिहिता कधी?

In reply to by स्पार्टाकस

मुक्त विहारि Sat, 09/20/2014 - 08:26
भारतात आलात की, आमच्या डोंबोलीला नक्की या... एक जोरदार कट्टा करू या. (आम्ही काय, कट्ट्याला निमित्तच शोधत असतो, आणि त्यातून तुमच्या सारखी उत्तम माणसे हजर असतील तर अजूनच बहार येईल.)

अजया Fri, 09/19/2014 - 10:59
मीही गुगल अर्थ बघत बघत वाचला लेख.सलग बघताना संदर्भ लागतात बरोबर.नुसते वाचुन कळत नाही. रच्याकने :सतत नविन नविन विषय सुचतात कसे?वाचता कधी,लिहिता कधी?

In reply to by स्पार्टाकस

मुक्त विहारि Sat, 09/20/2014 - 08:26
भारतात आलात की, आमच्या डोंबोलीला नक्की या... एक जोरदार कट्टा करू या. (आम्ही काय, कट्ट्याला निमित्तच शोधत असतो, आणि त्यातून तुमच्या सारखी उत्तम माणसे हजर असतील तर अजूनच बहार येईल.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी. पूर्णत्वास गेलेल्या संस्कृतींनी नित्यनवीन प्रदेशाची आस बाळगली होती.

गाढव ऐकेना, गाढव समजेना

संजय क्षीरसागर ·

सुहास.. गुरुवार, 09/18/2014 - 23:02
=)) =)) ही मस्त काव्य-जुगलबंदी चालु आहे ...

In reply to by किसन शिंदे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/18/2014 - 23:36
जो आयडी गेला तरी `ना खंत ना खेद' इतकी फालतू स्टेक आहे, त्यामागच्या व्यक्तीला कसा जोडा हाणावा अशी अपेक्षा आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

किसन शिंदे गुरुवार, 09/18/2014 - 23:55
मुळात जोडा हाणावाच कशाला हा प्रश्न पडतोय मला संक्षी साहेब. समोरच्याने पातळी सोडली तरी आपण सोडू नये असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यासारख्या सूज्ञ माणसाने एका गाढवाच्या नादी लागून असलं काही लिहिणे माझ्यासारख्याला पटले नाही. साॅरी!! आणि हे लिहिताना मला तुमचे जुुने चांगले लेख आठवताहेत.

In reply to by किसन शिंदे

आणि जे पोस्टवर जमत नाही म्हणून तिथे जाऊन स्कोर सेटल असतील तर माझी बाजू मांडायला लेखनाशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. तुम्हाला माझं चांगलं लेखन स्मरतंय याचा आनंद आहे पण तशा लेखनाची अपेक्षा करतांना सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.

In reply to by संजय क्षीरसागर

सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.
ही अपेक्षा इतरांकडून करण्यापूर्वी त्याच्या १% विचार तुम्ही स्वतः केलात तर असे का होते हे समजून यायला हवे. मिसळपाववर इतके सदस्य आहेत पण दरवेळा तुम्हीच का टार्गेट होतात? कारण इतर कोणीही सदस्य अन्य सभासदांच्या बुध्दीवर/ विचारशक्तीवर/ आकलनशक्तीवर कमेन्ट करत नाही.बाकी काहीही माणूस एकवेळ सहन करेल पण सतत आपली अक्कल काढली गेल्यास ते मात्र कोणीच सहन करणार नाही. अर्थात तुमच्यासारख्या महान विद्वान तत्ववेत्त्याला काय बोला?असे लोक समाजात असतात आणि मिसळपावही त्याच समाजाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे असे लोक तिथेही अ॑सणारच ही बेशर्त स्विकृती मात्र कधीच केली आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तो कृपया दूर करा. आता याच पोस्टचं उदाहरण पाहा. मी आपणहून कधीही कुणाची कुरापत काढत नाही. या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!) वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा. म्हणजे बाकी सर्वांनी मला कॉर्नर करा आणि मी मात्र मोठेपणा घ्या. आता यांच्या गर्दभलीलांना टाळ्या पिटणारे कोण तर ज्यांना स्वतःच्या पोस्टवर (माझा) प्रतिवाद करता आलेला नाही ते सगळे! मग मी जर म्हटलं `गाढवावर बसून युद्ध जिंकता येत नाही, थोडा तरी प्रामाणिकपणा ठेवा', तर पुन्हा अपमान केल्याचा रुसवा. तर सारांश काय? मी कधी कुणाच्या वाटेला जात नाही पण संगनमत आणि कंपूबाजीनं कुणी मला घेरण्याचा प्रयत्न केला तर, मी एकटा पुरेसा आहे. अर्थात, माझा आयडी परावलंबी असला तरी अपमानापुढे त्याची मला किंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बाळ सप्रे Fri, 09/19/2014 - 13:26
वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा.
मलाही तोच सल्ला योग्य वाटतो.. आपल्या हिरिरीने एखाद्या मुद्द्याच्या प्रतिवाद करण्याच्या गुणाचं कौतुक वाटतं. वैयक्तिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष हाच उपाय सर्वोत्तम वाटतो. शेवटी अशा वादात जय पराजय नसतो. काथ्याकूटात काय घ्यायचय काय सोडायच ते प्रत्येक जण आपापलच ठरवणार .

In reply to by संजय क्षीरसागर

सूड Fri, 09/19/2014 - 14:38
तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे. तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही सवाई आहात, पुरुन उरणारे आहात तर मग येवढा काव्यप्रपंच कशासाठी? तुम्ही चिडावेच अशासाठी जर सगळं चाललंय हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिडलायेत हे दाखवून त्यांचे प्रयत्न यशस्वी केलेत. हल्लीच वाचण्यात आलेलं वाक्य: Keep smiling - it makes people wonder what you've been up to..

In reply to by संजय क्षीरसागर

होकाका Sat, 09/20/2014 - 01:05
हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,
का हो पण, सगळेच जण का हो तुमच्याच बद्दल हे असे गैरसमज पसरवतायत?

In reply to by संजय क्षीरसागर

जेनी... Fri, 09/19/2014 - 00:38
संजु काका किसन काका म्हणताय्त ते मलाहि पटतय ... वर आणखी एक गोष्ट ... कि तुम्ही हाणलेला जोडा गाडवाने पळ्वुन नेला तं तुम्ही दुसर्या जोड्याचे काय बरे कर्णार ?? हाणायचेच आहे तर जोडे हाणा ... फक्त जोडा नको ... :-/

धन्या गुरुवार, 09/18/2014 - 23:16
गाढवावर सलग दुसरा धागा :( शेवटी व पू काळेंनी लिहीलंय तेच खरं. "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणे सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणे सांगता येत नाही. "

In reply to by धन्या

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 23:57
मग गाढवाला वाटले की ते कवी झाले मग त्याने कविता लिहली का अथवा त्याकवितेवर कोणी कोणी हजेरी लावली यावर नो कमेंट्स.

In reply to by गवि

सूड गुरुवार, 09/18/2014 - 23:38
मी तर जीवलगा राहिले दूर घर माझे, शिट्टी वाजली आणि डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवला अशा तीन चालीवर म्हणून पाह्यलं !!

In reply to by सूड

गवि गुरुवार, 09/18/2014 - 23:45
__/\__ मी हाय कोली , एकविराआई तू डोंगरावरी आणि दिवस तुझे हे फुलायचे .. हे नाही केलेस वाट्टे.. ;-)

In reply to by विजुभाऊ

धन्या Sat, 09/20/2014 - 16:24
पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा..
ही नेमकी काय भानगड आहे? अमच्या सोसायटीत दिवाळीनंतर जवळपास महिनाभर रोज सकाळी प्रदक्षिणा धन्य होत असते. झोपेचे खोबरे होते पार.

In reply to by पैसा

गाढव खिंकाळले का हो? स्वतःची बसली, स्वतःला हो | आयडीची वाट लागली हो आता लागा कामाला हो | झक अशी मारली का हो? बावळ्या लपूनी पाहातो हो | फुंकले किती तू उकिरडे बहुविध उपद्व्याप केले जनाचे खाऊन उष्टे-माष्टे शेपूट हलते का पाहे पुढचा कुठला आयडी रे? पुरता पोपट झाला हो |

In reply to by जेनी...

याला कामकाज बहुत ओझी वाहातो कुठ पर्यंत आयडी जौंदे नाही खंत गाढवा नांवे अनंत आता याची करुणा येऊ द्या हो याला बाहेर जाऊं द्या हो |

In reply to by यशोधरा

पेटला प्रतिसाद वणवा गाढवा कैसा सोसावा वेड लागेल नैतर काय लॉगीन नको करायाला आयच्या गावात गेला हो स्वामी याला वाचवा हो बावळ्या कुठे खेटतो हो डाँकी फंकी झाला हो झाला दिगंबर पाहा हो स्वामी याला वाचवा हो |

धन्या Fri, 09/19/2014 - 08:31
शहाण्याच्या शहाणपणाला शहाण्याच्या शहाणपणाला गाव हे सारं हासतंय गाव हे सारं हासतंय हॉ आ हॉ आ हॉ आ हॉ आ बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय * कुठल्या गाण्याच्या चालीत म्हणावे हे माहीती करुन घेण्यासाठी व्यनि करावा.

कंजूस Fri, 09/19/2014 - 09:21
एका कोपऱ्यात पडलेल्या डबड्याने उधळलेलं गाढव पाहिलं. मी इकडे पडून आहे असं उधळायला आणि खिंकाळायला मिळालं तर किती मजा येईल? पुढे ---

जेपी Fri, 09/19/2014 - 09:46
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

सौंदाळा Fri, 09/19/2014 - 11:05
संक्षींचा स्ट्राईक रेट निराकार गाढवापेक्षा जास्त आहे. निराकार गाढव : २८ संक्षी : नॉट आउट ४०

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

काउबॉय Fri, 09/19/2014 - 12:41
संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत नाहीयेत हो. :( किसनद्येव सुधा संजय अंकलना हेच हेच सामजावु पहात आहेत. पण...

दिनेश सायगल Fri, 09/19/2014 - 12:02
निराकार गाढव नावाच्या आयडीनं आपले गुर्जी कोण ते आजपर्यंत कवाच सांगितलं नाही. कोण बेचारा एकलव्य आहे कोणजाणे! पण तुम्ही कशाला कोणा गाढवाच्या पाठी काठी घेऊन लागताय! शहाण्यासुरत्या माणसाला हे बरं दिसत नाही. हे सगळं वाचून तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली!

In reply to by हाडक्या

पैसा Sat, 09/20/2014 - 01:31
मला तरी बिरबल आणि पंडिताची गोष्ट माहिती आहे. ही तीच का ते माहिती नाही. एका ब्राह्मणाला काही विद्या नव्हती पण आपल्याला सर्वांनी पंडित म्हणावे असे त्याला वाटे. मग तो बिरबलाला भेटला आणि म्हणाला की मला लोकानी पंडित म्हणावेसे वाटते. मग बिरबल म्हणाला की तुला जे पंडित म्हणून हाक मारतील त्याना तू दगड मार. मग बघ काय होते ते. तो ब्राह्मण बाहेर गेल्यावर बिरबलाने त्याच्या गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून सांगितले की अमूक एक ब्राह्मण आहे त्याच्या मागे पंडित म्हणत धावा आणि मजा बघा. याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

चला तुमची पण हौस पुरी करतो : एका गावात होती, टोपणे-बुचे अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |

In reply to by संजय क्षीरसागर

टग्या , भूत , विनम्र , प्रगो , पंत , गिरीजा , मोहीनी , काका इत्यादी माझे ड्यु आयडी आहेत . नोट करुन ठेवा म्हणजे सारखी सारखी गिरीजा ह्या एकाच आयडी वर ठेच लागणार नाही =))

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Fri, 09/19/2014 - 13:37
दोघांना आणि त्या निमित्ताने गाढव आदि सर्वच जणांना मनापासून प्रश्न: असे ओरबाडाओरबाडी करण्यात खुद्द स्वत:ला आनंद सुख मिळते का? मनाला लागले म्हणून प्रतिहल्ले होतात ना? स्वत:ला त्रास सोसून इतरांना मजा पाहू देणे यात आनंद आहे का? धागे अप्रकाशित करण्याच्या कामात संपादकांना आनंद वा इंसेंटिव्ह आहे का ? सगळी उत्तरे "नाही" अशी असावीत.. मग हे धागे आणि हिशोब टाळता येणार नाहीत का? बाकी काय बोलणार ?

In reply to by गवि

गणपा Fri, 09/19/2014 - 13:44
लोकांच्या 'मनोरंजना'चं व्रत घेतलेल्यांना काय सांगायचं गवि? शब्दाचा मार शहाण्या लोकांसाठी असतो. यातुन कुणी शहाणं झालं तर आनंदच आहे.

In reply to by गवि

नमस्कार गवि काका ! इथे माझं , रादर कोणाचंच संक्षींशी वैयक्तिक भांडण नाहीये . (एक्वेळ तर अशी होती की मी संक्षींच्या लिखाणाचे फॅन होतो , परवा मेल चाळताना माझ्या लक्षात आले ... २००९ मध्ये माझ्या मित्राने मला लिहिलेल्या एका मेल मधे "संक्षी उत्तम लेखन करतात ते आवर्जुन वाच" असा उल्लेख आहे ) पण सध्या संक्षींचा मी एक्की मी , मी दुणे आम्ही , मी त्रिक भास , मी चोक निराकार , मी पंचे सर्वज्ञ हा पाढा लक्षात आल्याने फार हसु येते , मग कोणीतरी निराकार गाढव त्यांना डिवचते अन संक्षी दुर्लक्ष करायचे सोडुन परत मी चा पाढा सुरु करतात , हे सारे पहायला लय मजा येते राव . मग आम्ही कधी कधी त्याला हातभार लावतो =)) तुम्हीही कधीतरी ट्राय करुन पहा , मी चा पाढा लय भारी आघे राव ... आधीचे पाढे वाचयचे असल्यास सांगा लिंका पाठवतो ;) हा प्रतिसाद भास आहे . प्रतिसाद असे काहीच नसते . मी कधीच चुकत नसतो अन आजपर्यंत कोणीच माझ्या मताचे खंडन करु शकले नाहीये . =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 14:25
प्रगोशी सहमत!!!! मीच काय तो सर्वज्ञ असे अ‍ॅटिट्यूड घेतल्यानेच लोकं चेकाळली. एकट्या संक्षीला का टार्गेट करता म्हणण्यापेक्षा तो पाढा बघा म्हणावं अगोदर नीट.

In reply to by गवि

मूळ धागा प्रकाशित होऊन कायम राहणं याचा अर्थ तो धोरणात बसतो असा होतो. थोडक्यात, त्यात काहीही व्यक्तिगत नाही असा निर्वाळा दिला जातो. मग त्यावर प्रत्युत्तर आल्यावर मान्यवरांना झळ पोहोचली की दोन्ही धागे डिलीट होतात (असा मागच्या पोस्टचा अनुभव आहे). तुम्ही सदस्यात डिस्क्रीमिनेट करा असं म्हणणार नाही पण लेट ऑल हॅव अ‍ॅन इक्वल चान्स. जर मूळ धागा `ओरबाडी' वाटत असेल तर तो प्रकाशित व्ह्यायला नको होता. आणि उत्तर देण्यात मला काय आनंद मिळणार? मी फक्त उत्तर देऊ शकतो इतकंच दाखवून दिलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि Fri, 09/19/2014 - 14:11
म्हणूनच तर माझ्या प्रश्नात गाढवालाही इन्क्लूड केलंय ना. नुसते नियमात बसणे आणि राहणे हा भाग पूर्ण वेगळा आहे. आणि अप्रकाशित होणे हाही भाग एकाच एका फॅक्टरवर अवलंबून नसतो. ते जाऊ दे. मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता.

In reply to by गवि

म्हणजे तुम्ही हाणा आणि मी ऐकून घेऊ? अरे मूळ पोस्ट जर प्रकाशित झाली तर उत्तर येणारच. आणि हे बर्‍याच पूर्वीपासून चालू आहे. मी वर म्हटलंय :
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)
जर अ‍ॅक्शन घ्यायची असती तर केव्हाच घेतली असती असा कुणाचाही निष्कर्श निघणार नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Fri, 09/19/2014 - 14:31
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला ,
हे जरा विस्कटून सांगता का ? निराकार गाढव हे जे काही आहे त्याने आपली खिल्ली कशी काय उड़ते ?

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:37
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो. .

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:38
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

एका गावात होती, टोपणे-बुचे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक ...............http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif आहे असाच पपलू, हा आमच्यात एक | =========== http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 12:48
बेशर्त स्वीकृती कुठल्या ***च्या **त गेली???????? सॉरी हं निराकारभौ. भाषेतला प्रचलित वाक्प्रचार म्हणून वापरलं, नायतर आम्ही तुमचे लय मोठ्ठे (५ वर फिरणारे) फॅन हाओत. पण निव्वळ काव्यमूल्य पाहिलं तर ठीक आहे =))

In reply to by रामपुरी

प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे. "तो मीच"
+१. याच कारणामुळे तर आपल्या गुरूजींना सगळे टार्गेट करत असतात.पण मीपणाचा चष्मा सतत लावल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही. ठिक आहे. आपले काय जाते निराकार गाढव आणि गुरूजींमधली जुगलबंदी बघायला? :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तरी म्हटलं बोथट सुरी अजून कसे उगवले नाहीत! कारण माझ्याविरोधात काही लिहीलं गेलंय आणि वेळात वेळ काढून हे आले नाहीत असं अद्यापी कधी झालेलं नाही. बाकी कुठे न का देईना, अशा वेळी ते प्रतिसादाचा हक्क हमखास बजावणार! बाय द वे, `मी' हे मराठीतलं सर्वनाम आहे. तुम्हाला कंटेंटपेक्षा `मी' आला की पुढचं दिसेनासं होतंय बहुदा. तुमच्या प्रश्नाला पहिला प्रतिसाद यथोचित दिला होता (तो सोईस्करपणे सोडून दिलायं). काही हरकत नाही, आता स्वतःबद्दल लिहीतांना, कोणतं सर्वनाम वापरतात ते सांगा. आणि मला एक कळत नाही, एका उपद्रवी आयडीला पाचर बसल्यावर इतरांना इतकी व्याकूळता का येतेयं?

जयंत कुलकर्णी Fri, 09/19/2014 - 22:34
प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन एकमेकांस घायाळ करणारे प्रतिसाद लिहिणे यात किती वेळ जात असेल याची कल्पना केलेली बरी......यातून कोणाला काय आनंद मिळतो हा एक संशोधनाचा विषय ठरावा....सगळ्यांना नम्र विनंती की यात वेळ व बुद्धी वाय घालवू नये..........बघा पटले तर !

In reply to by संजय क्षीरसागर

जयंत कुलकर्णी Sat, 09/20/2014 - 21:50
घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात. त्यातून काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने शोधायचे असते. बर्^याच वेळा हे असे घडू नये यासाठीही तपशिलात जाऊन लिखाण करावे लागते. पण जाऊदेत.......क्रौर्याबद्दल कोणाला आकर्षण असेल असे मला वाटत नाही....आता मला पटले की चांगल्या भावनेने काहीही लिहा, तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे....त्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो हे स्पष्ट आहे... हा प्रतिसाद शेवटचा........

सुहास.. गुरुवार, 09/18/2014 - 23:02
=)) =)) ही मस्त काव्य-जुगलबंदी चालु आहे ...

In reply to by किसन शिंदे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/18/2014 - 23:36
जो आयडी गेला तरी `ना खंत ना खेद' इतकी फालतू स्टेक आहे, त्यामागच्या व्यक्तीला कसा जोडा हाणावा अशी अपेक्षा आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

किसन शिंदे गुरुवार, 09/18/2014 - 23:55
मुळात जोडा हाणावाच कशाला हा प्रश्न पडतोय मला संक्षी साहेब. समोरच्याने पातळी सोडली तरी आपण सोडू नये असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यासारख्या सूज्ञ माणसाने एका गाढवाच्या नादी लागून असलं काही लिहिणे माझ्यासारख्याला पटले नाही. साॅरी!! आणि हे लिहिताना मला तुमचे जुुने चांगले लेख आठवताहेत.

In reply to by किसन शिंदे

आणि जे पोस्टवर जमत नाही म्हणून तिथे जाऊन स्कोर सेटल असतील तर माझी बाजू मांडायला लेखनाशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. तुम्हाला माझं चांगलं लेखन स्मरतंय याचा आनंद आहे पण तशा लेखनाची अपेक्षा करतांना सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.

In reply to by संजय क्षीरसागर

सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.
ही अपेक्षा इतरांकडून करण्यापूर्वी त्याच्या १% विचार तुम्ही स्वतः केलात तर असे का होते हे समजून यायला हवे. मिसळपाववर इतके सदस्य आहेत पण दरवेळा तुम्हीच का टार्गेट होतात? कारण इतर कोणीही सदस्य अन्य सभासदांच्या बुध्दीवर/ विचारशक्तीवर/ आकलनशक्तीवर कमेन्ट करत नाही.बाकी काहीही माणूस एकवेळ सहन करेल पण सतत आपली अक्कल काढली गेल्यास ते मात्र कोणीच सहन करणार नाही. अर्थात तुमच्यासारख्या महान विद्वान तत्ववेत्त्याला काय बोला?असे लोक समाजात असतात आणि मिसळपावही त्याच समाजाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे असे लोक तिथेही अ॑सणारच ही बेशर्त स्विकृती मात्र कधीच केली आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तो कृपया दूर करा. आता याच पोस्टचं उदाहरण पाहा. मी आपणहून कधीही कुणाची कुरापत काढत नाही. या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!) वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा. म्हणजे बाकी सर्वांनी मला कॉर्नर करा आणि मी मात्र मोठेपणा घ्या. आता यांच्या गर्दभलीलांना टाळ्या पिटणारे कोण तर ज्यांना स्वतःच्या पोस्टवर (माझा) प्रतिवाद करता आलेला नाही ते सगळे! मग मी जर म्हटलं `गाढवावर बसून युद्ध जिंकता येत नाही, थोडा तरी प्रामाणिकपणा ठेवा', तर पुन्हा अपमान केल्याचा रुसवा. तर सारांश काय? मी कधी कुणाच्या वाटेला जात नाही पण संगनमत आणि कंपूबाजीनं कुणी मला घेरण्याचा प्रयत्न केला तर, मी एकटा पुरेसा आहे. अर्थात, माझा आयडी परावलंबी असला तरी अपमानापुढे त्याची मला किंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बाळ सप्रे Fri, 09/19/2014 - 13:26
वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा.
मलाही तोच सल्ला योग्य वाटतो.. आपल्या हिरिरीने एखाद्या मुद्द्याच्या प्रतिवाद करण्याच्या गुणाचं कौतुक वाटतं. वैयक्तिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष हाच उपाय सर्वोत्तम वाटतो. शेवटी अशा वादात जय पराजय नसतो. काथ्याकूटात काय घ्यायचय काय सोडायच ते प्रत्येक जण आपापलच ठरवणार .

In reply to by संजय क्षीरसागर

सूड Fri, 09/19/2014 - 14:38
तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे. तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही सवाई आहात, पुरुन उरणारे आहात तर मग येवढा काव्यप्रपंच कशासाठी? तुम्ही चिडावेच अशासाठी जर सगळं चाललंय हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिडलायेत हे दाखवून त्यांचे प्रयत्न यशस्वी केलेत. हल्लीच वाचण्यात आलेलं वाक्य: Keep smiling - it makes people wonder what you've been up to..

In reply to by संजय क्षीरसागर

होकाका Sat, 09/20/2014 - 01:05
हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,
का हो पण, सगळेच जण का हो तुमच्याच बद्दल हे असे गैरसमज पसरवतायत?

In reply to by संजय क्षीरसागर

जेनी... Fri, 09/19/2014 - 00:38
संजु काका किसन काका म्हणताय्त ते मलाहि पटतय ... वर आणखी एक गोष्ट ... कि तुम्ही हाणलेला जोडा गाडवाने पळ्वुन नेला तं तुम्ही दुसर्या जोड्याचे काय बरे कर्णार ?? हाणायचेच आहे तर जोडे हाणा ... फक्त जोडा नको ... :-/

धन्या गुरुवार, 09/18/2014 - 23:16
गाढवावर सलग दुसरा धागा :( शेवटी व पू काळेंनी लिहीलंय तेच खरं. "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणे सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणे सांगता येत नाही. "

In reply to by धन्या

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 23:57
मग गाढवाला वाटले की ते कवी झाले मग त्याने कविता लिहली का अथवा त्याकवितेवर कोणी कोणी हजेरी लावली यावर नो कमेंट्स.

In reply to by गवि

सूड गुरुवार, 09/18/2014 - 23:38
मी तर जीवलगा राहिले दूर घर माझे, शिट्टी वाजली आणि डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवला अशा तीन चालीवर म्हणून पाह्यलं !!

In reply to by सूड

गवि गुरुवार, 09/18/2014 - 23:45
__/\__ मी हाय कोली , एकविराआई तू डोंगरावरी आणि दिवस तुझे हे फुलायचे .. हे नाही केलेस वाट्टे.. ;-)

In reply to by विजुभाऊ

धन्या Sat, 09/20/2014 - 16:24
पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा..
ही नेमकी काय भानगड आहे? अमच्या सोसायटीत दिवाळीनंतर जवळपास महिनाभर रोज सकाळी प्रदक्षिणा धन्य होत असते. झोपेचे खोबरे होते पार.

In reply to by पैसा

गाढव खिंकाळले का हो? स्वतःची बसली, स्वतःला हो | आयडीची वाट लागली हो आता लागा कामाला हो | झक अशी मारली का हो? बावळ्या लपूनी पाहातो हो | फुंकले किती तू उकिरडे बहुविध उपद्व्याप केले जनाचे खाऊन उष्टे-माष्टे शेपूट हलते का पाहे पुढचा कुठला आयडी रे? पुरता पोपट झाला हो |

In reply to by जेनी...

याला कामकाज बहुत ओझी वाहातो कुठ पर्यंत आयडी जौंदे नाही खंत गाढवा नांवे अनंत आता याची करुणा येऊ द्या हो याला बाहेर जाऊं द्या हो |

In reply to by यशोधरा

पेटला प्रतिसाद वणवा गाढवा कैसा सोसावा वेड लागेल नैतर काय लॉगीन नको करायाला आयच्या गावात गेला हो स्वामी याला वाचवा हो बावळ्या कुठे खेटतो हो डाँकी फंकी झाला हो झाला दिगंबर पाहा हो स्वामी याला वाचवा हो |

धन्या Fri, 09/19/2014 - 08:31
शहाण्याच्या शहाणपणाला शहाण्याच्या शहाणपणाला गाव हे सारं हासतंय गाव हे सारं हासतंय हॉ आ हॉ आ हॉ आ हॉ आ बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय * कुठल्या गाण्याच्या चालीत म्हणावे हे माहीती करुन घेण्यासाठी व्यनि करावा.

कंजूस Fri, 09/19/2014 - 09:21
एका कोपऱ्यात पडलेल्या डबड्याने उधळलेलं गाढव पाहिलं. मी इकडे पडून आहे असं उधळायला आणि खिंकाळायला मिळालं तर किती मजा येईल? पुढे ---

जेपी Fri, 09/19/2014 - 09:46
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

सौंदाळा Fri, 09/19/2014 - 11:05
संक्षींचा स्ट्राईक रेट निराकार गाढवापेक्षा जास्त आहे. निराकार गाढव : २८ संक्षी : नॉट आउट ४०

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

काउबॉय Fri, 09/19/2014 - 12:41
संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत नाहीयेत हो. :( किसनद्येव सुधा संजय अंकलना हेच हेच सामजावु पहात आहेत. पण...

दिनेश सायगल Fri, 09/19/2014 - 12:02
निराकार गाढव नावाच्या आयडीनं आपले गुर्जी कोण ते आजपर्यंत कवाच सांगितलं नाही. कोण बेचारा एकलव्य आहे कोणजाणे! पण तुम्ही कशाला कोणा गाढवाच्या पाठी काठी घेऊन लागताय! शहाण्यासुरत्या माणसाला हे बरं दिसत नाही. हे सगळं वाचून तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली!

In reply to by हाडक्या

पैसा Sat, 09/20/2014 - 01:31
मला तरी बिरबल आणि पंडिताची गोष्ट माहिती आहे. ही तीच का ते माहिती नाही. एका ब्राह्मणाला काही विद्या नव्हती पण आपल्याला सर्वांनी पंडित म्हणावे असे त्याला वाटे. मग तो बिरबलाला भेटला आणि म्हणाला की मला लोकानी पंडित म्हणावेसे वाटते. मग बिरबल म्हणाला की तुला जे पंडित म्हणून हाक मारतील त्याना तू दगड मार. मग बघ काय होते ते. तो ब्राह्मण बाहेर गेल्यावर बिरबलाने त्याच्या गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून सांगितले की अमूक एक ब्राह्मण आहे त्याच्या मागे पंडित म्हणत धावा आणि मजा बघा. याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

चला तुमची पण हौस पुरी करतो : एका गावात होती, टोपणे-बुचे अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |

In reply to by संजय क्षीरसागर

टग्या , भूत , विनम्र , प्रगो , पंत , गिरीजा , मोहीनी , काका इत्यादी माझे ड्यु आयडी आहेत . नोट करुन ठेवा म्हणजे सारखी सारखी गिरीजा ह्या एकाच आयडी वर ठेच लागणार नाही =))

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Fri, 09/19/2014 - 13:37
दोघांना आणि त्या निमित्ताने गाढव आदि सर्वच जणांना मनापासून प्रश्न: असे ओरबाडाओरबाडी करण्यात खुद्द स्वत:ला आनंद सुख मिळते का? मनाला लागले म्हणून प्रतिहल्ले होतात ना? स्वत:ला त्रास सोसून इतरांना मजा पाहू देणे यात आनंद आहे का? धागे अप्रकाशित करण्याच्या कामात संपादकांना आनंद वा इंसेंटिव्ह आहे का ? सगळी उत्तरे "नाही" अशी असावीत.. मग हे धागे आणि हिशोब टाळता येणार नाहीत का? बाकी काय बोलणार ?

In reply to by गवि

गणपा Fri, 09/19/2014 - 13:44
लोकांच्या 'मनोरंजना'चं व्रत घेतलेल्यांना काय सांगायचं गवि? शब्दाचा मार शहाण्या लोकांसाठी असतो. यातुन कुणी शहाणं झालं तर आनंदच आहे.

In reply to by गवि

नमस्कार गवि काका ! इथे माझं , रादर कोणाचंच संक्षींशी वैयक्तिक भांडण नाहीये . (एक्वेळ तर अशी होती की मी संक्षींच्या लिखाणाचे फॅन होतो , परवा मेल चाळताना माझ्या लक्षात आले ... २००९ मध्ये माझ्या मित्राने मला लिहिलेल्या एका मेल मधे "संक्षी उत्तम लेखन करतात ते आवर्जुन वाच" असा उल्लेख आहे ) पण सध्या संक्षींचा मी एक्की मी , मी दुणे आम्ही , मी त्रिक भास , मी चोक निराकार , मी पंचे सर्वज्ञ हा पाढा लक्षात आल्याने फार हसु येते , मग कोणीतरी निराकार गाढव त्यांना डिवचते अन संक्षी दुर्लक्ष करायचे सोडुन परत मी चा पाढा सुरु करतात , हे सारे पहायला लय मजा येते राव . मग आम्ही कधी कधी त्याला हातभार लावतो =)) तुम्हीही कधीतरी ट्राय करुन पहा , मी चा पाढा लय भारी आघे राव ... आधीचे पाढे वाचयचे असल्यास सांगा लिंका पाठवतो ;) हा प्रतिसाद भास आहे . प्रतिसाद असे काहीच नसते . मी कधीच चुकत नसतो अन आजपर्यंत कोणीच माझ्या मताचे खंडन करु शकले नाहीये . =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 14:25
प्रगोशी सहमत!!!! मीच काय तो सर्वज्ञ असे अ‍ॅटिट्यूड घेतल्यानेच लोकं चेकाळली. एकट्या संक्षीला का टार्गेट करता म्हणण्यापेक्षा तो पाढा बघा म्हणावं अगोदर नीट.

In reply to by गवि

मूळ धागा प्रकाशित होऊन कायम राहणं याचा अर्थ तो धोरणात बसतो असा होतो. थोडक्यात, त्यात काहीही व्यक्तिगत नाही असा निर्वाळा दिला जातो. मग त्यावर प्रत्युत्तर आल्यावर मान्यवरांना झळ पोहोचली की दोन्ही धागे डिलीट होतात (असा मागच्या पोस्टचा अनुभव आहे). तुम्ही सदस्यात डिस्क्रीमिनेट करा असं म्हणणार नाही पण लेट ऑल हॅव अ‍ॅन इक्वल चान्स. जर मूळ धागा `ओरबाडी' वाटत असेल तर तो प्रकाशित व्ह्यायला नको होता. आणि उत्तर देण्यात मला काय आनंद मिळणार? मी फक्त उत्तर देऊ शकतो इतकंच दाखवून दिलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि Fri, 09/19/2014 - 14:11
म्हणूनच तर माझ्या प्रश्नात गाढवालाही इन्क्लूड केलंय ना. नुसते नियमात बसणे आणि राहणे हा भाग पूर्ण वेगळा आहे. आणि अप्रकाशित होणे हाही भाग एकाच एका फॅक्टरवर अवलंबून नसतो. ते जाऊ दे. मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता.

In reply to by गवि

म्हणजे तुम्ही हाणा आणि मी ऐकून घेऊ? अरे मूळ पोस्ट जर प्रकाशित झाली तर उत्तर येणारच. आणि हे बर्‍याच पूर्वीपासून चालू आहे. मी वर म्हटलंय :
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)
जर अ‍ॅक्शन घ्यायची असती तर केव्हाच घेतली असती असा कुणाचाही निष्कर्श निघणार नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Fri, 09/19/2014 - 14:31
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला ,
हे जरा विस्कटून सांगता का ? निराकार गाढव हे जे काही आहे त्याने आपली खिल्ली कशी काय उड़ते ?

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:37
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो. .

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:38
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

एका गावात होती, टोपणे-बुचे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक ...............http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif आहे असाच पपलू, हा आमच्यात एक | =========== http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 12:48
बेशर्त स्वीकृती कुठल्या ***च्या **त गेली???????? सॉरी हं निराकारभौ. भाषेतला प्रचलित वाक्प्रचार म्हणून वापरलं, नायतर आम्ही तुमचे लय मोठ्ठे (५ वर फिरणारे) फॅन हाओत. पण निव्वळ काव्यमूल्य पाहिलं तर ठीक आहे =))

In reply to by रामपुरी

प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे. "तो मीच"
+१. याच कारणामुळे तर आपल्या गुरूजींना सगळे टार्गेट करत असतात.पण मीपणाचा चष्मा सतत लावल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही. ठिक आहे. आपले काय जाते निराकार गाढव आणि गुरूजींमधली जुगलबंदी बघायला? :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तरी म्हटलं बोथट सुरी अजून कसे उगवले नाहीत! कारण माझ्याविरोधात काही लिहीलं गेलंय आणि वेळात वेळ काढून हे आले नाहीत असं अद्यापी कधी झालेलं नाही. बाकी कुठे न का देईना, अशा वेळी ते प्रतिसादाचा हक्क हमखास बजावणार! बाय द वे, `मी' हे मराठीतलं सर्वनाम आहे. तुम्हाला कंटेंटपेक्षा `मी' आला की पुढचं दिसेनासं होतंय बहुदा. तुमच्या प्रश्नाला पहिला प्रतिसाद यथोचित दिला होता (तो सोईस्करपणे सोडून दिलायं). काही हरकत नाही, आता स्वतःबद्दल लिहीतांना, कोणतं सर्वनाम वापरतात ते सांगा. आणि मला एक कळत नाही, एका उपद्रवी आयडीला पाचर बसल्यावर इतरांना इतकी व्याकूळता का येतेयं?

जयंत कुलकर्णी Fri, 09/19/2014 - 22:34
प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन एकमेकांस घायाळ करणारे प्रतिसाद लिहिणे यात किती वेळ जात असेल याची कल्पना केलेली बरी......यातून कोणाला काय आनंद मिळतो हा एक संशोधनाचा विषय ठरावा....सगळ्यांना नम्र विनंती की यात वेळ व बुद्धी वाय घालवू नये..........बघा पटले तर !

In reply to by संजय क्षीरसागर

जयंत कुलकर्णी Sat, 09/20/2014 - 21:50
घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात. त्यातून काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने शोधायचे असते. बर्^याच वेळा हे असे घडू नये यासाठीही तपशिलात जाऊन लिखाण करावे लागते. पण जाऊदेत.......क्रौर्याबद्दल कोणाला आकर्षण असेल असे मला वाटत नाही....आता मला पटले की चांगल्या भावनेने काहीही लिहा, तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे....त्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो हे स्पष्ट आहे... हा प्रतिसाद शेवटचा........
लेखनविषय:
काव्यरस
गाढव ऐकेना, गाढव समजेना गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना. गाढव ऐकेना ऽऽ । _______________________ डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई फुकटचा घेतला कुणी गावात रे? काय गाढवाला नै ऐडिया? आयडी जाईल नको गमजा. होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग, ढिंगटांग-ढिंगटांग ढींग । गाढव ऐकेना ऽऽ । ________________________ हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे नको पडू उताणा इथे-तिथे रे हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे. आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून, कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे. आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

अजय जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

संदीप डांगे ·

In reply to by सुहास..

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 12:39
माझ्या एका मित्राने त्याच्या सर्व देणेकर्‍याना बोलावून सांगितले की मी तुमच्या सर्वाम्कडून पैसे घेतले. तुमच्या मदतीबद्दल मी ऋणी आअहे मात्र तुमच्या त्रासामुळे आत्महत्या करायला चाललो आहे. तुमचे पैसे फेडण्यासाठी माझ्या कडे आत्ता एकही पैसा नाही. मी मेल्यावर मिळालेल्या इन्शुरन्सच्या पैशामधून तुमची काय ती देणी दिली जातील मात्र मी आत्महत्ये अगोदर जे पत्र लिहीन त्यात तुमच्या सर्वांची नावे लिहून यानी माझा मानसीक छाळ केला म्हणून मी आत्महत्या करीत आहे असे लिहीन. अन्यतः मला वेळ द्या एक सहा महिने मी तुमचे पैसे फेडेन हे नक्की. " हे सर्व घडलेले आहे....... तो मित्र त्याची सर्व देणी फेडून तोट्यात गेलेले सर्व उद्योग बंद करून सध्या भिक्षुकी करत बिनघोर जगतोय."

In reply to by विजुभाऊ

गवि Fri, 09/19/2014 - 12:45
थोडेसे अवांतर होतेय, पण अशा केसमधे इंशुरन्स कंपनी कोणतेही पैसे देईल असे वाटत नाही. जाणकार नसलो तरी तर्काने असे वाटते.

In reply to by गवि

धर्मराजमुटके Fri, 09/19/2014 - 12:47
बरोबर आहे तुमचे. आत्महत्येच्या प्रयत्नात विमा मिळत नाही पण सुसाईड चीटमधे आपले नाव आले तर नसता मनस्ताप होईल या कल्पनेने लोक पैशासाठी थांबायला तयार असतात.

In reply to by धर्मराजमुटके

होकाका Fri, 09/19/2014 - 20:29
बापरे, म्हणजे त्या मित्राने त्या सर्व देणेकर्‍यांना डबल धमकी दिली तरः मला विम्याचे पैसे मिळणार नाहीतच पण तुंम्हाला सुद्धा मनस्ताप होईल अशी तजवीज केली जाईल.

In reply to by होकाका

इरसाल Sat, 09/20/2014 - 09:37
विजुभौ चुपचुपके च्या शाहिद कपुरची इस्टोरी सांगत आहेत. तो नाय का उडी मारत समुद्रात नी मग परेश रावलला सापडतो. अवांतर- त्याच पिच्चरात गुज्जु फॅमिली रहाते पश्चिम बंगालात आणी घरात गाणी गातात पंजाबी (इसको जिला क्यु नही घोषीत कर देते वाला ) असो चोरी करु नका - आपल्याला पचत नाय आत्महत्या नको- आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय कधी शांत बसुन विचार करा (इमॅजिन करुन बघा). निर्लज्ज व्हा/नका होवु - पण ते पॉझिटिव्हली, वर लोकांनी लिहिल्या प्रमाणे देणेकर्‍यांना विश्वास द्या की तुम्ही काहीही झाले तरी त्यांचे पैसे बुडु देणार नाही आहात.

In reply to by विजुभाऊ

कवितानागेश Fri, 09/19/2014 - 14:12
हे असं उगाच नाही तिथे इमोशनल ब्लॅकमेलिन्ग करायची गरज नाही. ज्या विश्वासानी पैसे दिलेत, त्याच विश्वासानी लोकही थांबतील. थोडे थोडे जरे देत राहिले, तरी घेनेकर्‍याला धीर येतो. माझ्या एका मैत्रिणीनी एका ओळखीच्यांचे ५०००० रुपये, दर महिन्याला २-२ करत फेडले होते. आणि पोस्ट डेटेड २५ चेक्स देउन ठेवले. तिला नोकरी लागल्यानी हे सगळे येतिल, हे देणार्‍यालाही नक्की माहित होते.

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/18/2014 - 18:12
काळजी करु नका..मी पण या परिस्थितुन गेलेलो आहे...आत्महत्या करु नका..वेळ खराब असते..अश्या वेळी शांत रहा..देणेक-याना तोंड देत रहा..तोंड चुकवु नका.. दिवस बसुन रहात नाहि..चुल पेटति रहाण्या साठी मार्ग शोधा..ते महत्वाचे..कारण चुल बंद कि अक्कल पण बंद होते.. ८०८७९५८९२२ हा माझा नंबर आहे....काहि नाहि तरी सल्ला देवु शकेल..मी पुण्यास रहातो.. धिर सोडु नका...

In reply to by अविनाशकुलकर्णी

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 18:31
हिम्मत खूप धरून आहे दादा, म्हणून अजून ताळ्यावर आहे. चूल पेटती आहे. त्याचा तरी अजून प्रश्न नाही. काम करतो आहेच. अविश्रांत. पोटापुरता पैसा येतो पण आता दुसराच प्रश्न उभा राहिला आहे. रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय? गरिबी फार जवळून भोगली आहे. त्यामुळे त्याची लाज आणि भीती वाटत नाही. कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चालना जी असे म्हणून लढतो आहे. पण मर्यादा दिसत आहेत म्हणून गोंधळलो आहे. पाठीशी उभे आहात. बरे वाटते. मित्र-नातेवाईकांशी नाही बोलू शकत. म्हणून मिपा वापरत आहे. क्षमा असावी

सौंदाळा गुरुवार, 09/18/2014 - 18:18
आत्महत्येचा विचारही करु नका. बायको आणि मुलांना शक्य असेल तर तात्पुरते माहेरी पाठवा. स्वतःचे घर, जमीन, दागिने असतील तर mortgage लोन मिळतय का बघा. शक्य तेवढे खर्च कमी करा. बायको नोकरी करु शकते का? (जर करत नसेल तर) जे पैसे येणार आहेत त्याचा पाठ्पुरावा करा. आणि राग येईल तरी सांगतो मारामारी / शिवीगाळी वगैरे ऐकायच्या तयारीनेच र्‍हावा.

विलासराव गुरुवार, 09/18/2014 - 18:24
मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , पण आत्महत्येचा विचार ही करु नकोस बरोबर. मी २००३ ला ४ लाखाला डुबलो होतो. पगार होता ७००० हजार. घर भाड्याचे. घरात एकटा कमावता. तुमच्यासारखीच परीस्थीती. पण आत्महत्या कारावी असा विचारसुद्धा मनात आला नाही. निर्लज्जपणा स्विकारला. सगळ्यांना सांगीतले कर्जबाजारी झालोय. भिकारी नाही. पै न पै चुकती करेल पण आज वेळ देउ शकत नाही. बरेचजण तयार झाले. एक-दोन जण खळीला आहे. त्यांना सरळ सांगीतले आता तर पैसे आले तरी तुम्हाला सगळ्यात शेवटी देणार, आणी आता जास्त आवाज केला तर देणारच नाही. मग आणखी ५०००० उसने मिळवले १ वर्षे तब्बेतीत खाण्यापिण्यासाठी. शांतचित्ताने काम करत करत व्यवसाय वाढवला. ३ वर्षात सर्व देणे देउन ५००-१००० रोज खर्च करायचो बार मधे. आनी एका वर्शाने काम करायचे सोडुन भारतभर फिरलो, मग परदेशात फिरलो.सगळं झाल्यावर विपश्यना करुन ध्यानमार्गावर स्थिर झालो. आणी आता उपदेश करत फिरत असतो. काय जमेल तसा बोध घ्या यातुन. कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा समजु नये.

In reply to by विलासराव

विलासराव Fri, 09/19/2014 - 17:16
डांगे साहेब हे माझे मित्र आहेत दादाभाउ कुटे: हे महाराष्ट्र क्रिक्रेट टीमचे कर्णधार होते: बुद्दीबळ खेळले आहेत राज्यापातळीवर. दोन मुले आहेत. पोटासाठी डोंबीवलीवरुन फोर्ट्ला येतात गेली २० वर्षे, तिथे त्यांचा टेलीफोन बुथ आहे. कायम आर्थिक अडचण असते कारण मोबाईलमुळे आजकाल फोन कमी वापर होतो. आजच त्यांचा फोन आला होता सामनात बातमी आली १५ तारखेला म्हनुन. http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=23644&boxid=12913375

सुहास पाटील गुरुवार, 09/18/2014 - 18:31
आत्माहत्या अजिबात करू नका. वेळ निघून जांइल. घरच्यांचा विचार करा. वर सांगितल्या प्रमाणे घरच्यांची काही दिवस माहेरी सोय कर. आणि हो पडेल ते काम करा त्यातून पैसे मिळावा. तुम्ही मेहनत करताय असे चित्र निर्माण झाले कि देणेकरी तुमच्यावर विश्वास ठेवतील

मृत्युन्जय गुरुवार, 09/18/2014 - 18:37
देणेकर्‍यांना आज उद्या करु नका. एकदा धीर धरुन स्पष्ट सांगा की ४ वर्षे लागतील. नंगे से खुदा भी डरता है. त्यांना सांगा की मला मारुन किंवा त्रास देउन तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहित. पैसे परत हवे असतील तर याकाळात तुम्हाला त्यांचे पैसे परत करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी मोकळीक द्या. डोक्यात अक्कलेचा भाग असलेले लोक ऐकतील. एवढे सांगुनही जे मुर्ख महाभाग ऐकणार नाहित त्यांच्या तगाद्याखातर आत्महत्या करणे मुर्खपणा आहे. ही परिस्थिती आहे ती हाताळावीच लागेल. स्वतःशी प्रामाणिक रहा. तो प्रामाणिकपण तुमच्या बोलण्यातुन जाणवु द्या. तुमच्या गरजा कमी करा आणि थोडे थोडे करत सगळ्यांना परतफेड करत रहा. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटल्यास तगादा कमी होइल. एखाद्याचे १००० देणे असेल तर ते १० रुपयांनी जरी कमी करता आले तरी बघा. अगदीच पैसे मिळत नाहित म्हटल्यावर ओक वैतागतात, थोडे थोडे मिळताहेत म्हटल्यावर आशेने दम धरतात

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 18:50
तुमचे म्हणणे पटले. तुम्ही सांगितलेला मार्ग बरोबरच आहे. ज्यांचे कडून येणे आहेत त्यांच्या शब्दावर ज्यांना द्यायचे त्यांना शब्द दिला. आता पंचाईत झाली कि देणारे देत नाहीत आणि मी खोटा ठरलो. ज्यांचे ६ लाख द्यायचे त्यांना ३ लाख दिले, तरी उरलेल्या तीन लाखासाठी ते जीव घेऊन मागे लागले आहेत. ते नातेवाईक आहेत आणि त्यांची अडचण पण १००% खरी आहे. अशी मेख बसली आहे कि बस. एका मित्राचे दीड लाख द्यायचे त्याला १५ हजार दिले. आणि म्हटले बाबा जर कळ काढ जसे येतील तसे तुला देतो, तर त्याच्या वडिलांचे दिवसाला १० फोन.

पिंगू गुरुवार, 09/18/2014 - 18:37
ही पण वेळ जाईल, पण केव्हा. जेव्हा तुम्ही हातपाय माराल तेव्हाच. तेव्हा हात पाय मारणे चालुच ठेवा, नक्कीच तुम्ही वाईट परिस्थितीतून वर याल.

In reply to by पिंगू

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 18:51
रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय?

In reply to by संदीप डांगे

पिंगू गुरुवार, 09/18/2014 - 20:37
धंद्यामध्ये कधीसुद्धा वेळेवर पैसा येईलच याची खात्री नसते. त्यामुळे गाठीशी थोडाफार पैसा बांधून पुढे जावे लागते. केलेल्या कामाचे पैसे मिळतीलच, पण ते अमुक वेळेवर मिळतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आशा सोडून देऊ नका, एवढेच सांगू शकतो. कारण त्याच्यावरच आपण सारे जिवंत आहोत.

सूड गुरुवार, 09/18/2014 - 18:40
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही..बाकी सल्ले देण्यास अपात्र आहे. लवकरात लवकर आपल्या प्रयत्नांना यश येऊन सर्व सुरळीत होवो.

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/18/2014 - 18:51
निर्लज्ज व्हा हा तर सल्ला आहेच पण त्या आधी १. बायको मुलांना बायकोच्या माहेरी पाठवा. तिच्या माहेरच्यांना स्पष्ट कल्पना देवुन. २. जे काही दागिने असतील ते विचार न करता विका आणि जमेल तेव्हडे कर्ज फेडा. ३. अजुन ही काही विकण्यासारखे असेल ( जसे की ४ चाकी वगैरे ) ती वीका आणि कर्ज फेडा. ४. घर भाड्याचे असेल तर ते बदलुन कमी भाड्याच्या घरात जा. ५. घर स्वताचे असेल तर बरेच सोप्पे होइल. सरळ विकुन टाका, घरावर लोन असेल तर ते फेडा आणि छोट्या भाड्याच्या घरात रहायला जा. मुख्य म्हणजे तुमच्या जीवनशैलीतुन हे दाखवून द्या की तुम्ही मुद्दाम लोकांचे पैसे अडवून ठेवले नाहीयेत. ( मी माझ्या मित्राला पूर्वी ५०००० दिले होते, तो ते परत करत नव्हता पण गोव्याला बायको मुलांबरोबर गेला होता. त्याने पैसे परत न करण्यापेक्षा त्याच्या ह्या वागण्याने जास्त दुख झाले )

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 09:20
५. घर स्वताचे असेल तर बरेच सोप्पे होइल. सरळ विकुन टाका, घरावर लोन असेल तर ते फेडा आणि छोट्या भाड्याच्या घरात रहायला जा.
हे मात्र करु नका...ते घर तुमच्या नावावर असले तरी अख्खे कुटुंब त्यात रहाते...आणि घर एकदा विकले की परत घेताना जास्त पैसे देउनच घ्यावे लागते

In reply to by टवाळ कार्टा

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 10:13
७-८ लाखांचेच कर्ज असल्याकारणाने घर विकण्याची नक्कीच गरज नाही. बँकेकडे तारण ठेवून किंवा तारण न ठेवताही घर दुरुस्तीसाठी एव्हढे कर्ज बँकेकडून अथवा HDFC कडून मिळू शकेल. दुरुस्ती किंवा गृहसजावटीसाठी (फर्निचर) बँका, HDFC वाले कर्ज देतात. तुमच्याकडे ३ वर्षाचे ऑडीटेड रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स भरल्याच्या पावत्या असतील तर इतरही अनेक कारणासाठी कर्ज मिळू शकेल. असे मिळाल्यावर तातडीने व्यक्तीगत नात्यातून घेतलेली कर्जे फेडून बँक/ HDFC चे कर्ज सुलभ हप्त्यात फेडता येईल. नोकरीच्या पर्यायाचा विचार करावाच. एकदा दगडाखालचा हात पूर्णपणे निघाला की नव्या जोमाने स्वतःच्या व्यवसायाच्या मार्गाने जाता येईल. आमच्या शुभेच्छा आहेतच.

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 18:54
नक्की काय व्यवसाय आहे आणि काय शिक्षण आहे हे समजल्यास मार्ग सुचवणं बरं पडेल. विलासरावांनी सांगितल्याप्रमाणं सग ळ्यांना एकत्र बोलावून परिस्थिती समजावून सांगितल्यास काही मार्ग निघू शकेल. (मसाला चित्रपटासारखा) ह्यानंतर जमल्यास एखादी नोकरी स्विकारावी. ७-८ हजार जरी मिळाले तरी महिन्याचं पक्कं उत्पन्न असेल. घरखर्च किमान निभणं शक्य होईल. उरलेल्या वेळात व्यवसाय सांभाळता आल्यास उत्तम. बाकी 'हेही दिवस जातील' हे कायम नि पक्कं लक्षात ठेवणं हा अत्यंत चांगला मार्ग आहे. आत्महत्या हे तात्कालिक समस्यांचं तथाकथित कायमचं निराकरण आहे. देणेकरी आपल्या कुटुंबाला त्रास कशावरुन देणार नाहीत?

In reply to by प्यारे१

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 21:28
प्रतिसाद संपादित झालेला असला तरी माझं मत तेच राहील. आयुष्य अकारण अथवा सकारण सुद्धा संपवण्यासाठी नाही. जन्म आपल्या हातात नाही तसाच मृत्यू देखील नसावा.

संपादित

दिपक.कुवेत गुरुवार, 09/18/2014 - 18:56
आत्महत्या तर मूळीच करू नका. ती नक्किच पळवाट नाहि. आपल्या प्रयत्नांना लवकारात लवकर यश मिळो हिच सदिच्छा. तुमच्या कामाचं / व्यवसायाचं स्वरुप काय आहे ते ईथे सांगीतलत तर कदाचीत तुम्हाला जास्त काम मिळण्यास मिपाकर नक्किच हातभार लावतील.

विवेकपटाईत गुरुवार, 09/18/2014 - 19:02
सल्ला देणे सौपे असते, परिस्थितीशी सामना करणे कठीण असते. तरी ही संसारात परिस्थितीला समोर जावेच लागते. त्या शिवाय गत्यंतर नाही. राजा हरिश्चंद्रला चांडाळराज चा सेवक बनण्याची पाळी आली होती. पण त्यांनी आत्महत्या नाही केली. परिस्थिती स्वीकार केली. रात्री नंतर दिवस हा येतोच याच आशेवर संघर्ष करीत राहा. बाकी चोरी करणे आणि आत्महत्या करणे दोन्ही गैर आहे.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 19:19
आत्महत्या हा पर्याय कदापी योग्य नाही... ती पळवाट होईल आणि कुटुंबावर अन्यायकारक होईल. कुटूंबातल्या कोणाचाही जीव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही... आणि तो गुन्हाही होईल. पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका. चोरी करणे हे नैतीकदृष्ट्या तर अयोग्य आहेच पण अगदी व्यावहारीकदृष्टीने विचार केला तरी अत्यंत धोकादायकही आहे... पकडला गेलात तर परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट होईल हे नक्की. इथेही हाच सल्ल की, पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका. तुमच्या परिस्थितीत सर्वात उत्तम मार्ग म्हणजे देणेकर्‍यांना विनयाने पण स्पष्ट्पणे सांगा की, "आता पैसे देणे शक्य नाही. पण ते बुडवण्याची इच्छाही नाही. तेव्हा आता काही दिवसांची मुदत हाच एक मार्ग बाकी आहे." तसे केल्यास त्यांचे पैसे मिळतील. पैसे कमावणाच्या मार्गात कोणतीही समस्या उभी करणार्‍या त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांचे पैसे परत होण्याला अजून उशीर होण्यात किंवा ते पूर्ण बुडण्यात होउ शकतो... हे तुम्हालाही नको आहे आणि त्यांनाही नको आहे, हे तुम्हाला त्यांना पटवून द्यावेच लागेल. याचे खालील परिणाम होऊ शकतातः अ) देणेकर्‍याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला नसेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा असला तर ('वाईट' आणि 'अती वाईट' असे दोनच पर्याय असताना 'वाईट' हा पर्याय निवडावा असा विचार करून) तुम्हाला परतफेडीची मुदत वाढवून देण्यास तयार होईल. आ) देणेकर्‍याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला असेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा नसला तरीही (अगोदरच चोखाळला असला तरी) सौजन्याने वरचाच प्रयत्न परत परत करावा (तुमच्या हाती अजून काहीच नाही असे तुमच्याच लेखतून कलते आहे)... कोण जाणे पुढच्या एखाद्या प्रयत्नात ते पूर्ण पैसे बुडीत खात्यात जाण्याच्या (अती वाईट) पर्यायाऐवजी अजून थोडा वेळ कळ काढण्याचा (वाईट पर्याय) देणेकरी स्विकारेल. आता राहीले तुमच्या मनःस्थितीबद्दल : ही परिस्थिती तुमच्या चुकीने झाली की योगायोगाने झाली हा प्रश्न आताच्या घडीला गौण आहे. वस्तूस्थिती खालिलप्रमाणे आहे : क) परिस्थिती वाईट आहे, यात वाद नाही. पण तिच्यामुळे अधिकाधीक निराश होण्याने किंवा नकारात्मक विचार करण्याने (उदा. आत्महत्या, चोरी, इ) ती सुधारणार नाही, किंबहुना ती अजूनच बिघडेल. तेव्हा ते सोडा. हे कठीण आहे पण अश्यक्य नाही. किंबहुना, समस्येतून बाहेर पडेपर्यंत तुमची सगळी ताकद आणि सगळे विचार समस्या सोडविण्याकरीता वापरणे हेच तुमचे एकमेव कर्तव्य आहे. याबाबत मनात शंका आल्यास कुटुंबाचा विचार मनात आणा. ख) कोणत्या चुकीने ही परिस्थिती उद्भवली ह्याचा नीट खडतर प्रामाणिकपणे (ब्रुटल ऑनेस्टी) विचार करा. खरी कारणे शोधा. दुसर्‍यावर दोष ढकलण्याअगोदर स्वतःच्या चूका शोधा आणि त्या चूका भविष्यात तुमच्या हातून परत होऊ नयेत यासाठी उपाय शोधा. यात होणारे बोध तुम्हाला भविष्यात योग्य निर्णय घ्यायला आणि जीवन सुरळीत करण्यच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्यायला उपयोगी पडतील. कारण, तुमच्या विचारांवर आणि कृतीवर तुम्ही १००% ताबा ठेवू शकता... इतरांच्या विचारां- किंवा कृतीं- बाबत असे असू शकत नाही. ग) पैसे कमावण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे ते तुमच्या शिक्षण, कौशल्य आणि कर्तबगारीवर अवलंबून आहे. तेव्हा तो निर्णय घ्यायला तुमच्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती अजून कोणी नाही. फारतर त्या क्षेत्रातल्या जाणकारांचा सल्ला व मदत जरूर घ्या. घ) तुम्ही समस्येत अडकलेली जगातली पहिली व्यक्ती नक्कीच नाही. यापूर्वी अनेकजण अनेक समस्यात गुंतलेले आहेत आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर आलेले आहेत... तेव्हा तुम्ही तेच केलेत तर फार मोठे दिव्य काम केले असे होणार नाही... हे नक्कीच लक्षात ठेवा. हे सर्व तुमच्या आणि इतरांच्या बाबतीत भविष्यातही खरे आहे हे नीट ध्यानात ठेवा. 'यशस्वी होणे' म्हणजे कधीच 'कधीच अयशस्वी न होणे' असे अजिबात नाही... तर अपयशांना समर्थपणे तोंड देऊन, अंग झटकून त्यांच्यावर मात करणे होय ! (बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) इए

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 19:29
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: मी एक B F A कमर्शिअल आर्टीस्ट असून १२ वर्षे कामाचा अनुभव आहे. क्रियेटीव डायरेक्टर म्हणून ग्राफिक आणि वेब मध्ये भरपूर काम केले आहे. २०११ पासून स्वत: फ़्रिलान्सर म्हणून काम सुरु केले. नंतर मुंबईहून नाशिक ला शिफ्ट झालो कारण आंतरजालीय संबंधामुळे तसा काही परिणाम होत नव्हता. माझे मुंबई, नाशिक, UK, दुबई ला बरेच ग्राहक आहेत. नाशिक ला ऑफिस सुरु करणे महागात पडले. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. ज्यांनी मदत करायची काबुल केली ते सपशेल फिरले. २-३ ग्राहकांची कामे केली त्यात बरेच नुकसान झाले. सद्य स्थिती मध्ये ऑफिस बंद आहे. घरून काम करत आहे. ग्राहकांना अजून माझ्यावर विश्वास आहे कारण माझ्या कामाच्या दर्जामध्ये मी तडजोड करत नाही. अचानक उलथापालथ झाल्याने जाम बावरलो आहे. फसवणारी माणसे आतापर्यंत भेटली नव्हती ती आताच भेटली सर्व अनावश्यक खर्च बंद केले आहेत.

In reply to by संदीप डांगे

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 19:49
रिकामटेकड स्मजल्यास हरकत नाही पण 4 पोरं 9 महीने काम करतील इतपत काम आणि पैसा हातात नसल्यास ऑफिस टाकू नयेच. बाकी प्रोफाइल बघता प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत टाका कदाचित बैंक कर्ज देइल ? ताबडतोप मुंबई त नोकरी धरा तुम्हास अवघड जाऊ नये आणि यामुळे देणेकर्यांची खात्रिही पटेल ? जमलेच तर नंतर महानगर सोडू नका 100 मार्ग पैसा मिळवायचे इथेच कायम उपलब्ध असतात.

In reply to by संदीप डांगे

बाबा पाटील गुरुवार, 09/18/2014 - 20:06
मी तर बर्‍याच वेळा असा काळ आणलाय,(अंगात वाईट्ट किडे आहेत हो).पण त्यातुन बाहेर पडता येत.सगळ्यात पहिल अनावश्यक खर्चांना कात्री लावायची.बहुतेक सर्व कामे स्वतःच करायची, वर्क ऑर्डर पासुन ते फायनल बिल पेमेंट पर्यंत स्वतःच राबायच,दररोज कुठल्याही परिस्थीतीत डेली अकाउंट मध्ये ५००-१००० बाजुलाच ठेवायचे.बाहेरचा चहादेखिल स्वतःच्याच पैश्याने प्यायचा नाही.सगळ्या गोष्टी बंद्,व्यसनाच्या पासुन मैलभर तरी लांब रहायच, तुम्ही देत असलेल्या सर्विसचे दर कमी करायचे,ग्राहकांशी बायकोशी पहिल्या रात्री बोलला नसाल इतके गोड बोलायचे. डोक्यावर बर्फ आणी जिभेवर साखर अशा मार्गाने व्यवसाय करायचा. त्यात आपण नविन नविन काय देवु शकतो हे सतत विचार करुन सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचा,पडेल ती काम स्विकारायची.कष्ट करायचे आणी घरी आले की छोट्या बाळांशी मजेत खेळायच. सहा एक महिन्यात यातुन बाहेर पडाल. शहाणपणा सांगायच कारण मी स्वतः तीन वर्षापुर्वी दिड ते दोन लाखाची मासिक कमाई सोडुन राज्यसेवेच्या परिक्षेच्या मागे लागलो,खर्च चालुच होते व्याज काही थांबत नाहित्,शेवटची परिक्षा २ फेब.२०१४ ला दिली वैतागलो सगळे मिळुन कर्जाची रक्कम १५ लाखापर्यंत पोहचली, क्लिनिकचा दर महिन्याचा सरासरी खर्च ५० ते ६० हजार, वेड लागायची पाळी आली होती,१५ फेब नंतर दिड लाखाचे पर्सनल लोन घेतले,बायकोकडुन ५० हजार घेतले,परत सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ओपिडी चालु केली. दोन तीन जणांना तात्पुर्ते कामावरुन कमी केले, ३ ते ४ महिन्यात बर्‍यापैकी घडी व्यवस्तीत बसली.आता सहाच महिन्यात पुण्यातले पॅरालिसकरीताचे संयुक्त उपचार पद्धतीवरीत आधारित एकमेव रुग्नालय चालु करेल. होता है बॉस थोडा थंडे दिमागसे सोचो.

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 19:31
स्वत: च्या पैसा कमवायच्या क्षमतेवर काही कारणाने दीर्घकाल रूपी भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेली च व्यक्तिच आत्महत्येचा मार्ग पत्करेल. तसेच चोरी मधे रिस्क फैक्टर्स हाय आहेत. त्यापेक्षा व्यावसायिक जोखिम पत्करणे योग्य.(उत्कृष्टच) पैसा कमवायची जिद्द (व व्यावसायिक अक्कल) नष्ट झाली नसल्यास तात्पुरते निर्लज्य बनुन वेळ मारून न्या. बाकी रोज प्राणायाम न चुकता कराच. उल्हासित वाटणार असेल तर आरत्या करा. निराश मन ध्यान करू शकत नाही तेंव्हा सर्व आलबेल होई पर्यन्त यात पडू नका. अर्थात शेवटी लिहलेले हे सर्व मनाच्या उभारीसाठी आहे पैसा मिळायला याचा प्रत्यक्ष संबंध नाही.

arunjoshi123 गुरुवार, 09/18/2014 - 19:48
७-८ लाख बिना तारणाचे तुम्हाला देणारे लोक असतील, तर माझ्या मते ते अंततः ते तुमचे हितचिंतकच आहेत/होते. समस्या सुटल्यावर (बाळ एकदा जगात आले, सेक्यूअर झाले) कि लोकांना पैसे पटकन परत पाहिजे असतात. त्यात फार काही चूक वाटत नाही. त्यातले काही बँकेचे तारणाचे लोन असेल तर बँकेने तितक्याचा कब्जा आतापर्यंत घेतला असेल. जर बिनातारणाचे लोन असेल माझे मते ते बँकेचा हळूहळू एन पी ए होईल. मंजे बँक तुम्हाला त्रास देईल, पण सभ्यपणे आणि नंतर विसरून जाईल. बिझनेस बुडणे आणि त्याच वेळी घरात मोठा खर्च होणे हे बॅडलक आहे, पण नाईलाज आहे. आता: १. तुमचे सगळे पैसे मित्रांचे असले तर ते बँक लोन मधे बदला. मित्रांना एकगठ्ठा पैसे परत पाहिजे असतात. त्यामानाने इएमआय सोपी पडते. आणि फालतू बँकेकडे जा, त्यांचा व्याजदर जास्त असतो पण ते एस बी आय सारखे कागदांसाठी छळत नाहीत. २. जास्त मानसिक ताण असेल तर शेत वैगेरे असल्यास विकून टाका. एखादा असेट विका. बिझनेस विका. घराचे तारण करा. ओवरटाईम करा. जास्तीची नोकरी करा. कमी भांड्वलावर अजून काही चालू करता येतं का ते पहा. पत्नीदेखिल काय काय करू शकेल ते पहा. ३. काही काळ घरखर्च खूप कमी करा. त्यानं थोडं प्रयत्न केल्याचं समाधान वाढतं. ४. काउंसेलर वा मानसोपचार तज्ञाला एक भेट अवश्य द्या. -------------------------------------------------------------------------------- वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्‍या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्‍याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन. ------------------------------ पैसे असून परत न देण्याच्या इच्छेला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही त्यापुढे अजून काय काय विचार करत आहात ते किती चूक आहे हे जाऊच द्या, पण असं स्वतःला निष्कारण निर्लज्ज म्हणणंदेखिल चूक आहे. लोक कितीही वाइट असले तरी अंगावरचे कपडे आणि तोंडचा घास काढून नेत नाहीत. ------------------------------ तुम्ही जितक्या मनस्वीपणे समस्या मांडली आहे, तितक्याच मनस्वीपणे मी प्रतिसाद देत आहे. शिवाय अशी परिस्थिती हाताळण्याचा मला लंबाचौडा अनुभव राहिला आहे. माझ्या प्रतिसादातलं प्रत्येक विधान योग्य आणि उचित असेल असं नाही, पण स्वतःला टेलर मेड करून वाचा.

In reply to by arunjoshi123

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 20:04
वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्‍या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्‍याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन. +१००. सरळ सोपे पण पूर्णपणे वास्तववादी आर्थिक समिकरण फार आवडले.

शिद गुरुवार, 09/18/2014 - 20:13
वरील सर्वांशी सहमत. उगाच काही अनाहूत सल्ला देत बसत नाही कारण ज्याची जळते त्यालाच कळते. तुमच्या खडतर परीस्थितीमधून लवकरच तुम्हाला बाहेर पडण्याची शक्ती व संधी मिळो आणि मनोजोगं यश पदरात पडो हि "श्री" चरणी प्रार्थना.

In reply to by शिद

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 20:41
उमेदीच्या काळात पहिले शैक्षणिक अडचणी व नंतर आर्थिक अडचणींचा बराच सामना मी केलेला आहे. संकटातून मिळालेला धडा माणूस कधीच विसरत नाही. बरीच वर्षे अवघड आर्थिक परिस्थिती अनुभवली असल्याने आजही अनुत्पादक छंदांवर रुपयाही खर्च करत नाही. या अनुभवांसाठी मी नशिबाचे आभारच मानतो. वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत. तुम्ही या अवघड परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढाल असा विश्वास वाटतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 21:42
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
कृपया हे वाक्य खालीलप्रमाणे वाचावे. वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.

एस गुरुवार, 09/18/2014 - 21:20
सर्वांनी योग्य सल्ले दिले आहेतच. पण नकारात्मक मनःस्थितीतून बाहेर येण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कुणालातरी अतिशय निरपेक्षपणे, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करा. भलेही ती मदत अतिशय क्षुल्लक का असेना. बघा, स्वतःबद्दल खूप छान वाटू लागेल आणि गमावलेला आत्मविश्वासही परत येईल. बर्‍याच केसेसमध्ये मी हा मार्ग यशस्वीपणे वापरला आहे. शुभेच्छा. कसलीही मदत हवी असेल तर जरूर संपर्क करा.

बहुगुणी गुरुवार, 09/18/2014 - 21:24
संपूर्ण धागाच 'वाचनखूण' ठेवण्याच्या लायकीचा आहे! मिपा संस्थळ हे केवळ टाईमपास कराण्याची जागा नसून सभासदांना अगदी वैयक्तिक अवघड समस्याही सोडवणारं 'सुहृद' वाटावं यातच सगळं आलं. संदीप: व्य नि केला आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 21:27
धंद्यात आर्थिक नुकसान आणि देणेकर्‍यांचे तगादे, अपमानास्पद वागणूक आणि समोर पसरलेला अंधःकार हे मी सुद्धा इथे परदेशात अनुभवले आहे. इथे तर कोणी कोणाला आर्थिक मदत करीत नाहित. (४-५ मित्रांनी तरीही केली) बँक कर्ज मिळत नाही आणि धंद्याचे ओव्हरहेड्स मुळे कर्जाचा आकडा भरमसाठ वेगाने वाढत जातो. हां हां म्हणता डोक्यावरून पाणी जातं. तुमची इच्छा असेल तर परदेशात नोकरी शोधा. दुबईत तुमचे क्लायंट आहेत म्हणजे तुमच्या ओळखी आहेतच. पेपरातून जाहिराती शोधून गल्फात नोकरी शोधा पासपोर्ट नसेल तर तो आधी बनवा). महिन्याला ५०-६० हजारापर्यंत आमदनी होईल. त्यातील ८० टक्के तरी बचत करू शकाल. (तिन वर्षाच्या ठिकाणी वर्षभरात कर्जाची परतफेड होईल.) देणी लवकर फिटतील. जरा जमापुंजी नीट जमली की परत जाऊन पुन्हा व्यवसाय प्रयत्न करा, पण ह्या वेळी जास्त सावधतेने. फॅन्सी आयडियाजच्या मागे न धावता कठोर वस्तूस्थितीशी सामना करत धंद्यात जम बसवा. जमेल सर्व काही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 21:36
+१११. अवांतरः व्यवसायाबाबत पेठकर काकांनी (किंवा अनुभवी कुणीही) काही सल्ले द्यावेत. मुलभूत गोष्टी सगळीकडं त्याच असायला हव्यात असं वाटतंय. व्यवसायाच्या सुरुवातीपासून घ्यायची काळजी ते पुढचे 'टप्पे' पायरीप्रमाणंच व्हर्टीकल ग्राफ आणि काही काळानं स्टॅबिलिटी पुन्हा प्रगती पुन्हा आडवी रेघ असं काही असणं कसं आवश्यक असतं इ.इ.इ.

भिंगरी गुरुवार, 09/18/2014 - 21:54
मी स्वत। या समस्येतून गेलेली आहे आणि आत्ताही याच समस्येत आहे,पण सगळ्यांना स्पष्ट सांगितले आहे की पैसे नक्की देईन.त्यांनाही विश्वास आहे.पण माझे ज्यांच्याकडून यायचे आहेत तेही असेच सांगत आहे.त्यामुळे गुंता वाढला आहे.३/३ कामवाल्या ठेवणारी मी सर्व कामं हाताने करते पण इतरांना मदत करुन मानसिक समाधान मात्र मिळवते.

धर्मराजमुटके गुरुवार, 09/18/2014 - 22:34
माणसाने आपल्या करीयरची सुरुवात कमीतकमी २-३ वर्षे तरी नोकरी करावी. जरी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरी. शक्यतो छोट्या कंपनीमधे सुरुवात करावी म्हणजे सर्व प्रकारची कामे करण्याचा अनुभव येतो. स्वतःचा अनुभव सांगतो. ही साधारण १९९८-२००० सालची गोष्ट आहे. मी कॉलेज सोडल्यानंतर ग्राफीक्स डिजाईनिंग आणि डीटीपी, प्रिंटींगचा व्यवसाय सुरु केला. त्याअगोदर अनुभवासाठी नोकरी केलेली नव्हती. एक जुना ४८६ पीसी घेऊन सुरुवात केली आणी २ वर्षात २-३ संगणक, प्रिंटर असा चांगला सेटअप बनवला. मुळातच कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची आवड असल्यामुळे नवनवीन कला पटकन शिकत गेलो. पैसा फार चांगला मिळत होता अशातला भाग नाही पण भागात नाव कमविले. दुपारी दुकान बंद करुन घरी गेलो तरी गिर्‍हाईके दुकानासमोर लाईन लाऊन उभी असायची. कुणी पैसे नाही दिले तरी काम करुन द्यायचो कारण घरची जबाबदारी नव्हती. ३ वर्षानंतर दुकान बदलले आणि ग्रह फिरले. गिर्‍हाईक येईनासे झाले. पैसे थकले. १ लाख कर्ज झाले तरी लाजेस्तव दुकानात जाऊन बसायचो. नंतर देणेकरी छळायला लागल्यावर दुकानातून आणि घरुन गायब व्हायला लागलो. पुस्तक घेऊन सार्वजनिक उद्यानात दिवसेंदिवस वाचत बसायचे आणि रात्री घरी जायचो. ज्योतीषांच्या नादी लागलो. हात / चेहरा बघून भविष्य सांगणारा ते कुंडली वरुन भविष्य सांगणारा असे सर्व प्राणी बघीतले. मुंबईपासून पुण्यापर्यंत त्यांच्या मागे हिंडलो. कोणी आशा दाखविली तर कोणी तुला धंदयात यश नाही, तु नोकरीच कर असे सांगीतले. मात्र हे सर्व करत असतांना परमेश्वरावरील भाव कमी झाला नाही की व्यसने लागली नाहित. शेवटी वडीलांनी माझ्या अनुपस्थीत दुकानाला टाळे ठोकले. नसते उद्योग करण्यापेक्षा घरी बस. मी तुला पोसतो असे म्हणाले. त्या दरम्यान दुकानात एक मुलगी फोन करण्यासाठी यायची. तिच्या कंपनीत हार्डवेअर इंजीनिअरचा जॉब आहे, कोणी आहे का कामासाठी म्हणून विचारायची. मित्रांनी माझे नाव सुचविले. मी व्यवसाय करण्याआधी संगणक जुळणीचा चार दिवसांचा एक हॉबी कोर्स केला होता. व्यवसायासाठी जुना पीसी घेतल्यामुळे तो वारंवार बिघडायचा तेव्हा तो खोलायचा, जोडायचा, फॉर्म्याट करायचा आणि आवश्यक सॉफ्टवेअर टाकायची एवढेच माहित होते. एवढ्या अपुर्‍या शिदोरीवर उडी मारायचे ठरविले कारण दुसरा उपायच नव्हता. मुलाखतीसाठी चार पाच चकरा मारल्या पण दरवेळी म्यानेजर कामानिमित्ताने कुठेतरी गेलेला असायचा. शेवटी आपल्या नशीबात नोकरीदेखील नाही असे समजून निराश झालो. मग साधारण १०-१५ दिवसांनंतर त्याच कंपनीला तातडीची गरज पडल्यावर ती मुलगी मला शोधत शोधत आली आणी कसेही करुन आज मुलाखतीला चल म्हणाली. तसेच दाढी न करता, शर्ट इन न करता मुलाखतीला गेलो पण कंपनीला फारच गरज असल्यामुळे तातडीने सिलेक्शन झाले. पगार होता १८०० रुपये. नोकरीचे फिक्स झाल्यावर सगळ्या देणेकर्‍यांना भेटलो. खरी खरी परिस्थीती सांगीतली आणि तुमचा एक पण रुपया बुडणार नाही पण सगळे पैसे एकदम पण देता येणार नाहीत हे स्पष्ट केले. सगळ्यांनी सहकार्य केले आणि ४ वर्षात सगळे देणेकरी मिटवले. दरम्यान घरच्यांनी मला जवळजवळ फुकटच पोसले. नंतर लग्न केले, एक मुल झाले. मासीक रु. १८०० वरुन सुरुवात करुन रु. ५०,०००० पर्यंत पोहोचलो पण नोकरीत मन रमत नव्हते म्हणून परत २०११ ला नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. बायकोला पहिलेच सांगून ठेवले की नोकरी सोडतोय. धंदा चालेल न चालेल पण मला तेच करायचयं. घरी देणेकरी येऊ शकतील तर त्यांना सहन करावे लागेल. सुदैवाने तिने होकार दिला, त्रास सहन केला. अजूनही मधून मधून अतिशय वाईट दिवस येतात (कारण एकदा पैसे गुंतविले की २-३ महिन्यांनीच पैसे येतात.) पण आता सवय झालीय. आता नवे देणेकरी आहेत पण त्रास नाहीये. सध्या बर चाललयं. मात्र या सर्व दिवसांत एक गोष्ट शिकलो. लहानथोर सगळ्यांशी नम्रपणे वागलो. कोणालाही कठोर बोललो नाही. ज्याच्याकडून पैसे घ्यायचे त्यालाही नाही आणि द्यायचे त्यालाही नाही. शेवटी माणसे जोडणे हेच कामाला येते. पैसा दरवेळी कामाला येतोच असे नाही. हे सगळे सांगण्यामागे स्वतःची लाल करणे हा हेतू नाही. ती ऑलरेडी बर्‍याच कारणांमुळे लाल झालेली आहे. :) पण धीर सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तोंड चुकवू नका. प्रामाणिकपणाची कदर करणारे या जगात अजून पुष्कळ आहेत. मी तुमचा एक रुपया बुडविणार नाही असे सांगत चला. जर कबूल केलेल्या वेळेस पैसे नाहि देता आले तर त्यांना प्रत्यक्ष भेटा, फोन करा आणि कल्पना द्या. १०० च्या ऐवजी १० रु. देता आले तरी ते द्या. दिस जातील, दिस येतील भोग सरलं, सुख येईल ! आत्महत्या आणी चोरीचा विचार करु नका. आपल्यामागे आपल्या कुटुंबाचे काय हाल होतील याचा विचार करा. अशा निर्णयाने आपण त्यातून कदाचित सुटून जाऊ पण आपल्या माणसांच्या नजरेतून कायमचे उतरु हे लक्षात ठेवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वैभव जाधव Fri, 09/19/2014 - 16:05
मुटके साहेबान्चा सांगणे अगदी परफेक्ट आहे. स्वता परिस्थितीतुन पार पडल्यामुळे त्यांच्या बोलण्याची खरी किंम्मत कळते. संदीपसाहेब बिल्कुल धीर सोडू नका. १००० माणसात एखादा आर्टिस्ट असतो. तुम्ही तर त्या कलेत एवढे शिकलेले अणि अनुभवि आहात. सगळे चांगले होईल बघा. त्यात इतक्या मिपाकरानि एवढा मनापासुन धिर दिलाय. त्यांचे सगळ्यांचे आभार माना. मिपाकर वेळेला धावून येतातच हे दिसले. जिओ मिपा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी Sat, 09/20/2014 - 00:48
असेच म्हणते. मुटके आणि इ.एक्काकाकांचेही प्रतिसाद अतिशय आवडले. चांगले आणि वाईट दोन्ही दिवस खरचं कायम रहात नाहीत. तुम्ही नक्की यातुन बाहेर पडाल.

आजानुकर्ण गुरुवार, 09/18/2014 - 23:10
आत्महत्येचा विचारही करु नका. तुमच्या बायकामुलांसाठी तेवढे धैर्य गोळा करुन ठेवा. आर्थिक अडचणींचा सामना केलेल्या सर्वांनाच पैशाचे सोंग आणता येत नाही याची जाणीव असते. पण खर्च कमी करुन टिकून राहण्याचे विविध मार्ग शोधा. गावी असताना बांधकाममजूर कम शेतमजूर असा माझा एक शेजारी तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जात होता. कर्जदार दर आठवड्याला त्याच्या घरी येत. आम्हाला आमच्या घरातही शिवीगाळ व भांडणे नेहमी ऐकू येत असत. दुर्दैवाने त्याच्यावर चोरी करण्याइतकी वाईट परिस्थिती आली होती. अगदी कमी शिक्षण आणि मर्यादित स्किलसेटमुळे त्याला इतर काहीही करणे अशक्य होते. एका दिवाळीत त्याने आमच्या घरातही चोरीचा यशस्वी प्रयत्न केला होता. आज त्याचा थोरला मुलगा टीसीएसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे, धाकटा मुलगा गावात स्वतःचे क्लासेस घेतो. दोन्ही मुलांची स्वतःची घरे आहेत. चांगले दिवस नक्की येतील या आशेवर हे दिवस निभावून न्या. प्रामाणिकपणाने नंतर कर्जदारांचे पैसे चुकवा.
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठीच नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
याच्याशी सहमत.

कवितानागेश गुरुवार, 09/18/2014 - 23:38
वर सगळ्यांनी लिहिलं आहे तसंच सांगते... बहुतेक सगळेच अशा परिस्थितीतून गेले आहेत. कर्ज फेडण्यासाठी आधी दर महिन्याचा खर्च ठरवून तेवढे बाजूला काढायचे. उरलेले, भले ते १००० ते १०००० कितीही असुदेत, आधी महत्त्वचे कर्ज फेडायला वापरायचे. आम्ही दोनेक वर्षे याच पद्धतीनी वागून पुष्कळ कर्ज उतरवलेलं होतं. हातात नेमकेच पैसे शिल्लक असले की आपोआपच खर्चावर नियंत्रण येतं. शिवाय शक्य असेल तर सोने वगरै विकून बरचसं कर्ज उतरवता येइल. मात्र अगदी सिनेमात दाखवलय तसं दादासाहेब फाळकेंसारखं घरातल्या चीजवस्तू, भांडी पण विका असा सल्ला निश्चित देणार नाही. त्याची गरजही पडणार नाही. आताच्या काळात नोकरी लागली की झालं असं होत नाही. आणि स्वतंत्र व्यवसायात तर क्लायंट्कडून पैसे मिळ्णं फार कठीण जातं..... त्याचा नियम असा की ५०% अ‍ॅड्वान्स घेतल्याशिवाय कामाला हात लावायचा नाही. (मग निदान २५-३० % तरी हातात येतात) सुरुवातीला कठीण जाईल. पण जे जेन्युअन कस्टमर्स असतील, तेच येतिल आणि तुम्हाला पैसे बुडण्याचं फ्रस्ट्रेशन येणार नाही.

चिगो Fri, 09/19/2014 - 00:52
सल्ला देण्यास मी अपात्र आहे. पण तरीही.. वर बर्‍याच जणांनी मनःपुर्वक आणि काहींनी अनुभवसिद्ध + मनःपुर्वक असे सल्ले दिलेयत, त्यांबद्दल विचार करा. आत्महत्या हा तर मार्ग असूच शकत नाही, कारण तुम्ही मार्ग बंद करण्याबद्दल / थांबण्याबद्दल विचार करताय. तेव्हा तो विचारही मनातून काढून टाका. चोरी करणे, हापण मार्ग अत्यंत अयोग्य आहे, कारण की तुम्ही कायद्यात तावडीत सापडाल. मला वाटतं की तुम्हाला मदत करणार्‍या बहुतांश लोकांचा तुमच्या चांगुलपणावर विश्वास असेल कींवा प्रयत्न केल्यास बसेलही. (काही लोक तुमच्या वाईट परीस्थितीमुळे जरा "जिटरी" झाले असतील. ते होणारच थोडंफार) पण जर तुम्ही गुन्हेगार ठरलात, तर तुमची सगळी गुडवील संपेल आणि ती परत कमावणं जवळपास अशक्य होईल.. आयुष्यात कधीच कुठलाच प्रॉब्लेम न होता यशस्वी होणारे खुप कमी लोक असतात. "ये भी दिन बदलेंगे" म्हणत जरा धीर धरा, कळ सोसा.. हाच कठीण काळ उद्या यशस्वी झाल्यावर तुमच्या अभिमानाची बाब असेल. आजचे धडपडीचे, संघर्षाचे दिवस तुमच्या आठवणींचा ठेवा होईल. फार नाही बोलत.. माझ्या आवडत्या ओळी आहेत, सुरेश भटांच्या.. त्या सांगतो. "आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही !!" वाटलं, तर व्यनि करा. काळजी घ्या..

मुक्त विहारि Fri, 09/19/2014 - 03:07
तरी पण इतकेच सांगू शकतो की, आत्महत्या करायचा विचार पण मनांत आणू नका. दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सूख येईल. माझे सल्ले. १. भरपूर वाचन करा. २. सवंगडी जोडा. हसा-खिदळा. ३. व्यायाम करा. ४. बायको-बरोबर मनसोक्त गप्पा मारा. ५. मुलांच्या बरोबर सिनेमा बघा. ६. बिंधास्त रहा.(मला कल्पना आहे, की ६व्वा सल्ला तुम्हाला आवडणार नाही, पण बिंधास्त रहा, म्हणजे तुम्ही कर्ज घेतले आहे.चोरी नाही केलेली किंवा फसवणूक पण केलेली नाही.धंद्यात खोट येणे हा गुन्हा नाही.ती एक शिकवण आहे,त्याचे तुम्ही पैसे मोजलेत, इतकाच फरक.पण ह्या तुमच्या शिक्षणाचा फायदा तुमच्या मुलांनाच होईल.) आणि ७. व्यसनांपासून दूर रहा. विशेषतः दारू पासून. लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल क्षमस्व. बादवे, पुण्यात रहात असाल तर आणि गुरुंवर विश्र्वास असेल तर, शंकर महाराजांच्या मठात जावून या.एक मानसिक समाधान मिळते. थोडी भर घालतो. तुमच्या पाशी काय आहे ते बघा आणि त्यातून काय उत्तम मार्ग काढता येईल ते बघा. आपल्या पेक्षा निर्लज्ज माणसे पण ह्या जगांत आहेत.आपण मध्यमवर्गीय आणि पापभीरू माणसे असल्याने, कर्जामुळे घाबरतो.

स्पंदना Fri, 09/19/2014 - 06:27
मन मोकळ करण्याकरिता मिपावर यावं इतक मिपा आश्वस्त वाटलं हे खरच वाखाणण्याजोगं आहे. अन मिपाकर तुमच्या या विश्वासाला जागले देखील. वरील प्रतिसाद वाचुन जाणवले असेलच तुम्हाला की तुम्ही एकटेच नाही आहात अश्या परिस्थीतीतुन जाणारे. अन मदतीचे हात देखील आले आहेत समोर. अर्थात मदत घेताना ती तुम्हाला दुबळी वा पंगु बनवणार नाही हे सुद्धा पहा. स्वबळावर उभे करायला जे हात समोर येतील ते कणखर असतील. तुम्ही उल्लेख केला आहे म्हणुन विचारते काय कॉम्प्लिकेशन्स झाली होती बाळाच्या जन्माला? आता सगळ ठिक आहे ना? तुमची स्वतःची मनस्थीती इतकी ढासळलेली तर तुमच्या पत्निला ज्या दिव्यातुन शारिरीक्दृष्ट्या सुद्धा जावं लागल असेल त्यांची काय अवस्था असेल? तुम्हाला धिर हवाय ना? पहिला तिला धिर द्या. दोघे ,मिळुन खंबीर व्हा. पुढे हे वळण संपल कीया वेळी आपण दोघे एकत्र उभे राहिलो याचा अभिमान अन सार्थकता वाटेल. जाणार आहेत हे ही दिवस.

मिपाकरांचे इतके उत्तम प्रतिसाद आले आहेत की आता काही सांगण्यासारखे नाही.खंबीरपणे परिस्थितीचा मुकाबला करा दिवस निघून जातील,आपल्याकडे स्किल आहे यशस्वीच व्हाल. शुभेच्छा. मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. जियो मिपाकर जियो. -दिलीप बिरुटे

आत्महत्त्या किंवा चोरी करणं हा पर्याय होऊ शकत नाही. आशावादी राहा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. १. सगळे अनावश्यक खर्च बंद करा. २. देणेकर्‍यांचे जसे पैसे देता येतील तसे देत चला. तुमची पैसे परत करायची ईच्छा आहे हे त्यांना दिसु देत. ३. व्य.नि. करतोय त्याला उत्तर नक्की द्या.

vikramaditya Fri, 09/19/2014 - 08:08
सगळेच मुद्दे कव्हर केले की मिपाकरांनी. ज्या उद्देशाने लेखकाने हा विषय मांडला त्याला न्याय मिळाला असे वाटते. वरील प्रतिसादांतील शब्दनशब्द लाख मोलाचा आहे. अनेक उत्तम विचार मांडले आहेत. शांतपणे ते वाचा. आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल. अरे हो, आणि अश्या प्रसंगात आपले कोण आणि परके कोण ह्याची पण ओळख होते नाही का? आपल्या पाठीशी उभे राहिलेल्यांना विसरु नका. इतरांना ह्या पुढे थोडे लांबच ठेवा. "राह पकड तु एक चला चल, पा जायेगा मधुशाला." (अर्थात मधुशाले पासुन दूर राहण्याचा सल्ला पण वर आलाच आहे.) शुभेच्छा.

नितिन थत्ते Fri, 09/19/2014 - 08:14
आणि हो.... नोकरी करणे शक्य असेल तर कराच. "छ्या.... नोकरी कसली करायची?" किंवा "नोकरी म्हणजे गुलामी" असल्या विचारांच्या आहारी जाऊ नका.

vikramaditya Fri, 09/19/2014 - 08:31
विषयांतर करुन एक निरिक्षण नोंदवतो. काही समाजांमध्ये (प्रत्यक्ष माहिती आहे), अश्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदती साठी समाजातील धनवान लोक पुढे येतात. प्रथम देणेक-यांना पेमेंट करुन टाकतात. त्यामुळे कर्जदार थोडा सेटल होतो. मग त्याला आपल्याच सर्कल मध्ये चार कामे मिळवुन देतात, आपली एखादी रिकामी जागा थोडा काळ वापरायला देतात. आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो. पुढे त्याने पैसे कमवले तर इतर अश्या अडचणीत सापडलेल्यांना (पण त्याच समाजातील) तोही मदत करतो. असे एक आर्थिक सेफ्टी नेट 'बरेचदा' त्यांना उपलब्ध असते. असो.

In reply to by vikramaditya

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 08:41
>>>>आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो. हे सगळ्यात महत्त्वाचे. पण आपल्याला अनुभव विपरित येतात. शिवाय पुन्हा त्याचा धंदा चालला पाहिजे. स्वतःची गुंतवणूक असताना जर एखादा नुकसान करून घेत असेल (जनरल बोलतो आहे. धागाकर्त्या बद्दल नाही) तर दुसर्‍याच्या पैशांची तो काळजी घेईलच असे नाही. असेही उदाहरण मी अगदी जवळून पाहिले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

vikramaditya Fri, 09/19/2014 - 09:01
समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो. नाती गोती फार जपली जातात. आर्थिक व्यवहारांवर बारकाइने लक्ष ठेवतात. दुस-याने पैसे फेडले म्हणुन मूळ कर्जदार उंडारायला मोकळा, हा प्रकार न होवु देता , ते त्याला "लाइनी'वर ठेवतात आणि आपले पैसे परत येतील ह्यासाठी लक्ष ठेवुन असतात. शेवटी बिसिनेस आणि पैसा त्यांच्या रक्तात आहे. मदत वगैरे ठीक आहे, पण पैसा त्यांचा देव आहे.

In reply to by vikramaditya

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 09:18
त्या समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो. मला वाटतं हे 'समाजसापेक्ष' नसून 'व्यक्तीसापेक्ष' असतं. मलाही धंद्यात नुकसान होऊन मित्रांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं. त्याकाळात बायको-मुलासह माझ्या कर्मचार्‍यांच्या सदनिकेतच एका खोलीत संसार करत होतो. पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद केलं होतं आणि ज्याच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्या सर्वांची पै आणि पै फेडून टाकली नंतर वेगळं घर घेऊन कुटुंबासह तिथे राहावयास गेलो.

In reply to by काळा पहाड

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 14:18
का बरं वाईट? दुसर्‍याच्या पैशात नाही करत. स्वतः दिवसाला १४ तास काम करून, स्वकमाईत, सर्व संसारीक जबाबदार्‍या पार पाडून करतो.

नाखु Fri, 09/19/2014 - 08:59
परिस्थीतीतून सुयोग्य मार्ग मिळण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. चाकरमानी ना.खु.

नाव आडनाव Fri, 09/19/2014 - 09:45
milton@sidefx.co.in mitoons@gmail.com jjsophi@gmail.com माझी एक सहकारी आहे जेसी. तिच्या नवर्‍याची पुण्यात एक कंपनी आहे. जर तुम्हाला नोकरी करायला हरकत नसेल तर या एमेल आय डी वर तुमचा रेझुमे पाठवा. तुमच्या स्कीलचं / त्यासारखं काम तिथे आहे. मी तिच्या बरोबर बोललो आहे आणि तिला सरं सांगितलं आहे. तिच्या कंपनीत नसेल आता ओपनिन्ग तर तिचा नवरा त्याच्या ओळखिच्या बाकिच्या लोकांना फोरवर्ड करू शकतो. आणि शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम साठि सुध्दा बघु शकतो. साहेब, मी बुजुर्ग नाहि. तुम्हि तुमच्या बद्दल लिहिलंय त्या वरून वाट्तय कि तुम्हि आणि मी थोड्याफार फरकाने एकाच वयाचे असु. मी दोन मुलिंचा बाप आहे. तुमचि मुलं रोज सन्ध्याकाळि तुमचि वाट बघत असतील. त्याना काय फरक पडतो तुमच्या कडे पैसा आहे कि नाहि. पण त्याना तुम्हि नसला तर मात्र मोठा फरक पडेल. तुमचा अनुभव बघता, तुम्हाला हे कर्ज फेडायला वर्स्ट केस मधे २-३ वर्षां पेक्षा जास्त लागणार नाहित. तुमच्या मुलांना (आणि तुमच्या घरी सगळ्यांना ) तुमचि गरज आहे. तुम्हि हा विचार केला नाहि असं नाहि. पण तो परत परत करा, म्हणजे दुसरं काहि डोक्यात येणार नाहि. जर शक्य असेल तर रेझुमे लगेच पाठवा.

In reply to by नाव आडनाव

arunjoshi123 Fri, 09/19/2014 - 11:13
थेट कामाचा सल्ला. तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यातले लोक नशीबवान असणार. (मला हाच अभिमान व्यनिंतून अशीच मदत करणारांचा देखिल आहे.)

In reply to by नाव आडनाव

आसुड Sat, 09/20/2014 - 15:33
वर नमुदलेल्या पैकी साईड एफएक्सला थोडी ओळख आहे जमल्यास व्यनि धाडा. काम करुनच देईल.

In reply to by उगा काहितरीच

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 10:13
आवो वर लिवलंय तर त्यान्नी.
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: मी एक B F A कमर्शिअल आर्टीस्ट असून १२ वर्षे कामाचा अनुभव आहे. क्रियेटीव डायरेक्टर म्हणून ग्राफिक आणि वेब मध्ये भरपूर काम केले आहे. २०११ पासून स्वत: फ़्रिलान्सर म्हणून काम सुरु केले. नंतर मुंबईहून नाशिक ला शिफ्ट झालो कारण आंतरजालीय संबंधामुळे तसा काही परिणाम होत नव्हता. माझे मुंबई, नाशिक, UK, दुबई ला बरेच ग्राहक आहेत.
उगा काहितरीच!

संदीप डांगे Fri, 09/19/2014 - 10:22
मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो. खरच काहीही ओळखपाळख नसताना अनपेक्षितपणे आपण सगळ्यांनी ज्या आपुलकीने सल्ले दिले, मदतीचा हात पुढे केला ते बघून डोळ्यात पाणी आले. तुमचे प्रयत्न वय जाऊ देणार नाही. अशी परिस्थिती पूर्वी कधी न आल्यामुळे खूपच वैतागलो होतो. कुणाशी बोलत पण येत नवते. पुढे काय करता येईल याबद्दल काहीच कळत नव्हते. आता काही गोष्टी मी ठरवल्या आहेत. माझ्यावर हि स्थिती का आली आणि आताची नक्की आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक परिस्थिती काय आहे, मिपावरच का मांडले ह्याबद्दल सविस्तर लिहिणारच अहे. सगळ्यांचे व्यक्तिश: धन्यवाद पण द्यायचे आहेत. आपण सर्वानी गंभीरपणे हा विषय हाताळला ह्याबद्दल मनापासून धन्यवाद.

In reply to by संदीप डांगे

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 10:24
काय निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात ह्याचे तपशिलवार विवेचन मिपावर दिल्यास भविष्यात इतरसद्सयांनाही फायदा होऊ शकेल. धन्यवाद.

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 Fri, 09/19/2014 - 11:26
मिपाकरांनी आपुलकिने सल्ले दिले हे कौतुकास्पद आहेच, पण आपण देखिल मिपाकरांशी आपले मनोगत शेअर केले हे कमी प्रांजळ नाही. तुमच्या अप्रोचमुळे या संस्थळाला एक नविन डायमेंशन मिळालं आहे. इथे असंही वातावरण आहे असं (एरवी बहुधा(केवळ तात्विक) वाद घालणार्‍या) सदस्यांना प्रथमच जाणवलं आहे.

In reply to by arunjoshi123

इनिगोय Fri, 09/19/2014 - 22:53
+१ लाखमोलाची मनं आहेत इथे. सरळ मनाने मागितलेल्या मदतीला असे इतके हात निरपेक्षपणे पुढे होतात, हा अनुभव मिपाकर नेहमीच देतात. या धाग्यावरचे प्रतिसाद पाहून खरंच मिपावरचं प्रेम द्विगुणित झालं. संदीप, ही श्रीमंतीही आहेच की तुमच्याकडे. लवकरात लवकर या स्थितीतून बाहेर पडून असाच आणखी कोणालातरी आधार देण्याइतके सक्षम व्हा.. ही सदिच्छा.

In reply to by संदीप डांगे

या बदललेल्या तुमच्या मनस्थितीने तुम्ही अर्धे काम फत्ते केले आहे ! नेट लावून धरा, उरलेले अर्धे नक्की पुरे कराल... आणि त्याने आलेला आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यभर साथ देईल !! यशस्वी होण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!

In reply to by टवाळ कार्टा

बबन ताम्बे Fri, 09/19/2014 - 11:35
माझा एक चुलत भाऊ पोटाची खळगी भरण्यासाठी २५ वर्षांपूर्वी एका ठिकाणी १०० रुपये पगारावर झेरॉक्स काढण्याचे काम करत होता. परिस्थितीशी प्रचंड झुंज घेत त्याने त्यावेळी M.Com.पुर्ण केले. आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. थोड्क्यात परीस्थिती माणसाला जिद्दी बनवते.

अजया Fri, 09/19/2014 - 10:51
सहमत.एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला हे सर्व प्रतिसाद वाचुन .अभिमान वाटला हे लिहायला मिळाल्याचा आनंदही. संदीपभाऊ,आगे बढो मिपा आपके साथ हैै।

अंतरा आनंद Fri, 09/19/2014 - 10:52
वर सगळ्यांनी अनुभवाचे सल्ले दिले आहेत. त्यात दोनच add करते. (१) दिवसाकाठी तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ तरी आवर्जून खेळा. त्यावेळी समस्यांचा विचार करू नका. (२) तुमच्याकडे कला आहे. वेळ असला तर आठवड्याकाठी थोडा वेळ मुलांना शिकवण्यासाठी द्या . हल्ली पालक मुलांनी कुठल्या ना कुठल्या कलेशी तोंडोळख तरी करून घ्यावी या विचारांचे असतात. तुम्हाला ठराविक उत्पन्न मिळेलच आणि मुलं ही stress buster असतात. त्यांच्यात सकारात्मक उर्जा असते. त्यामुळे समस्या सोडवण्याचा मार्ग सापडेल. आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल. हे ही. तुम्हाला तुमच्या सोनेरी भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा.

पैसा Fri, 09/19/2014 - 13:00
फुकटचे देण्यासाठी आमच्याकडे बरेच सल्ले असतात, पण अशा प्रसंगात अक्षरशः काट्याच्या टोकावर तोललेला बॅलन्स असताना सल्ला देणे सोपे काम नाही. सगळ्या मिपाकरांनी हे कठीण काम ज्या प्रकारे केलंय, आणि नुसते सल्ले देऊन थांबले नाहीत तर काम मिळवून देण्यासाठी मदतीचे हात पुढे झाले आहेत ते पाहून आज खरेच मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला! संदीपभाऊ, जास्त काही सांगणार नाही, मात्र जे आयुष्य आपल्या इच्छेने या जगात आलं नाही ते संपवायचा काही अधिकार आपल्याला नसतो. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच. मात्र तुमची लढाई तुम्हाला लढावी लागेल. कधी थकल्यासारखं वाटलं, तर जरूर इथे येऊन मन हलकं करा. मनापासून शुभेच्छा!

बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 13:00
सल्ला देण्यास प्रचंड अपात्र आहे, त्यामुळे फक्त हा धागा अन प्रतिसाद वाचला हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. आज मिपाकर असल्याचा प्रचंड अभिमान वाटला.

अहो साहेब वरिल सर्वांनी खुप चांगले अनुभवाचे मार्गदर्शन देणारे प्रतिसाद लिहले आहेत. आता एक वही घेवुन हे सगळे सल्ले एकत्र करा किंवा याची प्रिन्ट घ्या आणि मला आता काय करायचे आहे त्याची एक यादी करा. पण कोणत्या ही परिस्थित अजिबात आत्महत्येचा विचार करुच नका. सकारात्मक जगा. तुमच्या पिल्लांना पोरकं करुन तुम्ही जाणार? त्यात त्यांचा काय हो दोष? आता सर्व मि.पा. करांना विनंती:- कितीही झालं तरी वरिल मार्गदर्शन हे आभासी आहे. म्हणुन जमल्यास त्या साहेबांना प्रत्यक्ष भेटुन त्यांना आत्महत्या करण्याचावाचुन परावृत्त करणासाठी एक अचानक कट्टा त्यांना मुंबई / पुणे येथे कुठे जमत असेल तर करुया का? मला वाटते कि प्रत्यक्ष भेटीगाठीने त्यांना खुप फायदा होईल. संदिपभावु तुमच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
!होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 14:47
होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!
यात असलेला " गर्व" हा शब्द मराठीत वेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदा: गर्वाचे घर खाली......

माधुरी विनायक Fri, 09/19/2014 - 13:08
मिपा करांनी खूप मोलाचे सल्ले दिले आहेत. आपल्यातल्या बहुतेकांना कधी ना कधी अशा अनुभवातून जावंच लागतं. स्वत:वरचा विश्वास कायम ठेवा. आत्महत्या आणि चोरी या दोन्ही प्रकारांचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. बायको आणि मुलांबरोबरचा संवाद जपा. हे दिवस नक्की बदलतील. ईश्वर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप बळ देवो... सर्वच प्रतिक्रिया वाचल्यानंतर, मन मोकळं करण्यासाठी तुम्ही अगदी योग्य मार्ग चोखाळला आहे, हे जाणवलं आणि आवर्जून नमूद करावंसं वाटलं. शुभेच्छा!!!

पोटे Fri, 09/19/2014 - 14:09
फ्रीलान्सर काम घरी बसुनच होते ना? मग त्यासाठी नोकरी का सोडली ? आधी पटकन नोकरी बघा. मुंबई किंवा कुठेही

भावना कल्लोळ Fri, 09/19/2014 - 14:13
संदीप साहेब, समदुखी म्हणायला हरकत नाही, आता ज्या परिस्थितुन जात आहात त्या पेक्षा काही वेगळी नाही माझी परिस्थिती. तरी पण आत्महत्या करणे हा मार्ग नाही. एवढी मेहनत करून हि जेव्हा गणिताचे उत्तर वजाबाकी मध्ये येते तेव्हा मनात असे विचार येतातच. चिडचिड, नैराश्य आणि खूप काही. आयुष्याचे समीकरण खुप वेगळे होऊन जाते. एरवी ठीक पण एकटे असल्यावर हे समीकरण डोळ्यासमोर नाचत बसते अन मग असे विचार येतात. पण अश्या वेळी हे असले विचार न करता काय नक्की केले तर हा प्रोब्लेम सुटेल, आयुष्याची घडी नीट बसेल याचा आराखडा घेत रहावा. कित्येक वेळेला ठरवुन, हातपाय मारून हि नाही सुटत कोडे उलटे गुंता वाढतो अश्यावेळी शांत राहावे. वेळेवर सगळे सोडुन द्यावे. जे करून मनाला आनंद मिळेल ते करावे. व्यसनापासुन कटाक्षाने दुर राहा त्याने समस्या अजून वाढतील. कुटुंबांबरोबर जास्त वेळ घालवा. या घडीला फक्त एवढेच बोलू शकते बाकी तो शिवशंकर तुमच्या समस्या लवकर सोडवो हीच प्राथर्ना आणि कठीण प्रसंगी, द्विधा अवस्था मध्ये मिपा मध्ये मारलेल्या हाकेला मिपाकर तेवढ्याच आपुलकीने साद देतात हा अनुभव मी अनाहिता मध्ये घेतला आहे म्हणून तर एक दुसरे हक्काचे माहेरघर आहे हे आमचे.

आदिजोशी Fri, 09/19/2014 - 18:12
मुळात आज जरी तुझ्या कडे १ पैसाही नसला तरी शांतपणे विचार केलास तर ७-८ लाख ही काही फार मोठी रक्कम नव्हे. १. सगळ्यात पहिलं म्हणजे तुझ्या व्यवसायासाठी नाशीक हे कितपत योग्य ठिकाण आहे हे ठरव. २. मुंबई अथवा पुण्याला शिफ्ट हो, तिथे ह्या लाईनमधे नक्कीच जास्त संधी आहेत. ३. बहुसंख्य लोकांनी आधी सांगितल्या प्रमाणे लोकांना तू पैसे परत करणार आहेस ह्याची खात्री पटव. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ४. जसा ह्या लोकांनी तुझ्या कडे तगादा लावला आहे तसाच तू सुद्धा तुझे पैसे येणे असणार्‍यांकडे लाव. वाटल्यास एक पत्र आणि त्याची प्रत सगळ्यांना पाठव. कुणा कुणाला पाठवतो आहेस ते सुद्धा पत्रात नमूद कर. ढोबळ मायना: मी xxxxxx हे पत्र ह्यासाठी लिहित आहे की श्री xxxxxx, श्री xxxxxx ह्यांना मी xxxxxx रुपये देणं लागतो. सद्ध्याच्या घडीला मला श्री xxxxxx आणि श्री xxxxxx ह्यांच्याकडून xxxxxx रुपये येणं आहे. माझे पैसे ह्या लोकांनी वेळेवर न दिल्याने मला देणेकर्‍यांना पैसे देणं कठीण जात आहे, वगैरे वगैरे सदर पत्राची पत एखाद्या सन्माननीय व्यक्तीलाही पाठव.

चतुरंग Fri, 09/19/2014 - 20:12
तुमच्यावर आलेली परिस्थिती नक्कीच कठिण आहे परंतु अशक्यप्राय नाही याची खात्री बाळगा. बर्‍याचवेळा आपण धंदा सुरु केला की आता नोकरीत पुन्हा कसे जायचे या विचाराने कमीपणा वाटू शकतो तसे काही वाटत असल्यास आधी ते बाजूला ठेवा. घर चालण्यापुरता पैसा दरमहा यायलाच हवा हे नक्की, तो कसा येतो धंद्यातून का नोकरीतून हे गौण आहे. कॉमेंट्स करणारे 'मित्र', नातेवाईक यांना कटाक्षाने दुर्लक्षित ठेवा, दूर ठेवा. ते फक्त कॉमेंट्स करणार असतात घर तुम्हाला चालवायचं असतं! चार वर्षाच्या मुलाला जवळ बसवून समजावून सांगा की सध्या परिस्थिती अवघड आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मिळून यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले प्रचंड हुषार आणि समजूतदार असतात, त्यालाही आयुष्यभरासाठी शिकायला मिळेल की आपण आई-बाबांबरोबर अवघड स्थितीतून कसा मार्ग काढला. तो तुम्हाला त्याच्यापरीने कशी साथ देतो ते बघण्यासारखे असेल याचा विश्वास बाळगा! थोडा स्वानुभव - काही काळ असा होता की खिशात फक्त ५०० रुपये आहेत संपूर्ण महिना रेटायचा आहे. त्यातच लग्न, मुंजी, बारशी असले आहेर, किराणा, भाज्या, दूध, फोनची बिले, विजेची बिले, धंद्यासाठी लागणारे भांडवल कसं आणि किती बसवायचं. काय टाळायचं, काय नाही? पत्नीने अशक्य साथ दिली. माझ्या जिवाभावाच्या मित्रानेही मला कामं देऊन मोलाची मदत केली. पुण्यात मी रोज २५-२५ किलोमीटर सायकलवर हिंडून कंसल्टिंगची कामं केलीत. धंदाच करत होतो. परंतु अपेक्षेप्रमाणे यश येत नव्हते. शेवटी मोठी नोकरी मिळवण्यासाठी एक कोर्स करत होतो. अतिताणामुळे भयंकर आजारी पडलो. कोर्सला स्वतः वाहनावरुन जाणे शक्य नव्हते. पत्नी रोज तिच्या चुलत बहिणीच्या लूनावरुन घेऊन जाई आणि परत घेऊन येई. तशाच आजारी अवस्थेत कोर्स पूर्ण केला, आमची टीम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली! अर्धग्लानी अवस्थेत तो प्रवास मी रोज कसा करायचो हे मला आज आठवत नाही! अतिशय जवळच्या डॉक्टरकाकांकडून उपचार घेतले कारण खर्चाला पैसेच नव्हते. पण जिद्द सोडली नाही. वेळ निभावली. शक्यतो फार कर्जे होऊ दिली नाहीत. नोकरी लागताच देणी फेडून टाकली. परिस्थितीने खूप काही शिकवले, खरेखरे आपले, परके समजले! पत्नी आणि मी मनाने फार जवळ आलो. आज सगळे व्यवस्थित आहे. कोणत्याही परिस्थितीत यश डोक्यात जात नाही कारण कठिण दिवस कसे असतात ते अनुभवले आहे. मिपाकरांनी वरती तुम्हाला मोलाची मदत देऊ केलीच आहे त्यामुळे आणखी लिहीत नाही. तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा! :) चतुरंग

दशानन Fri, 09/19/2014 - 20:39
भरपूर मित्रांनी आधीच सल्ले दिले आहेत. अश्या परिस्थितीतून मी स्वतः गेलो आहे, अनेक मिपाकरांनी मला वेळोवेळी आर्थिक - मानसिक मदत केली आहे, त्याची अजून मी परतफेड करतो आहे ही गोष्ट वेगळी पण खचू नका.. धीर सोडू नका! प्रत्येक दिवस तसाच राहत नाही. आम्ही नवरा-बायको दोघे दिवसभर जवळ पास १५-१६ तास सतत काम करत आहोत, मिळेल ते काम घेणे, पुस्तक विक्रीची जाहिरात करणे, डिटीपी पासून कव्हर डीझाईन पर्यत सर्व कामे आम्ही स्वत: करत आहोत. तुम्ही सुध्दा प्रयत्न सोडू नका, धीर धरा फक्त व घरी तुमची पत्नी काही व्यवसाय करु शकते का याचा देखील विचार करा. सध्या तरी हाच मार्ग योग्य आहे.

अनन्या वर्तक Fri, 09/19/2014 - 20:51
मी सल्ला नाही देवू शकत. पण तरीही.. काल सहज मिसळपाव वाचत होते तेव्हा तुमचा धागा वाचनात आला. काल पर्यंत अवघे दहा बारा प्रतिसाद असणारया ह्या धाग्यावर आज एक उत्सुकता म्हणून पुन्हा पहिला तुमचा धागा आणि पहिले तर खूप चांगले प्रतिसाद दिले आहेत सगळ्यांनी मिळून. प्रत्येक प्रतिसाद अगदी नीट वाचवा आणि मनात साठवून ठेवावा असा आहे. सगळ्यांनी कित्ती मनापासून आणि योग्य सल्ला दिला आहे. इस्पीकचा एक्का ह्यांचा प्रतिसाद आणि त्यांचे शेवटचे वाक्य (बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) हे जास्त महत्वाचे आहे. arunjoshi123 ह्यांचा प्रतिसाद सुद्धा खूप वास्तववादी आहे. मला सुद्धा वाटत होते Financial & Managerial Accounting च्या knowledge चा उपयोग करून तुम्हाला प्रतिसाद द्यावा पण arunjoshi123 ह्यांनी अगदी सोप्प्या आणि सरळ शब्दात खूप चांगले मार्गदर्शन केले आहे जे मला जमले नसते. मला वाटते मिसळपाव इथे एका सायकॅट्रीस्ट ची भूमिका पार पडते आहे. फरक इतकाच आहे हे सगळे virtual communication आहे पण सगळ्यांच्या भावना आणि विचार एकदम प्रामाणिक आहेत. इथे येणारा प्रत्येक जन तुमची मदत करू पाहत आहे. कुणी तुम्हाला इतरांना मदत करुन मानसिक समाधान मिळविण्याचा मार्ग दाखवत आहे, कुणी तुम्हाला नोकरी मिळविण्यासाठी मदत करू पाहतो आहे, तर कित्तेक जणांनी स्वतःचे त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांचे अनुभव तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा अगदी मनापासून यत्न केला आहे. प्रभाकर पेठकर, धर्मराजमुटके, श्रीरंग_जोशी, बाबा पाटील, विजुभाऊ, लीमाउजेट, अविनाशकुलकर्णी, विलासराव, प्यारे१, आजानुकर्ण, मुक्त विहारि, नाव आडनाव, चतुरंग....... कित्ती नावे घ्यावी आदराने. कित्तीतरी महत्वाचा, अनुभवाचा, विश्वासाचा सल्ला देणारे मिपाकर. आज मिसळपावची सदस्या असल्याबद्दल मनपासून आनंद झाला. दुसर्यांच्या अनुभवावरून आपण सुद्धा काही चांगले शिकता आले तर शिकावे ह्याचे अतिशय चांगले उदाहरण आहे हा धागा. संदीप तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतून खूप मेहनतीने आणि आत्मविश्वासाने बाहेर याल (जो विश्वास मिसळपाव वर तुम्हाला सल्ला देणार्या प्रत्येकालाच वाटतो आहे) तेव्हा तुमच्या सारख्या कठीण परिस्थितीत असलेल्यांना मिपाकारासारखे मार्गदशन करायला आणि तुमचे यशःस्वी आयुष्याचे अनुभव मिसळपाववर सांगायला विसरू नका. तुमच्या पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेछा.

धर्मराजमुटके Fri, 09/19/2014 - 21:19
धाग्यावर अवांतर होईल पण सांगण्याचा मोह आवरत नाही. पडत्या काळात मला दोन वाक्यांनी प्रेरणा दिली. ही वाक्ये माझ्या अडचणींच्या दिवसात वारंवार म्हणत असे. १. कोणीही विचारले की अरे बाबा एवढे कर्ज झाले, आता नोकरी करतोयस. परत धंदा करु नकोस. तेव्हा मी दत्ताजी शिंदेंचे पानीपतावरील वाक्य त्यांना सांगत असे " बचेंगे तो और भी लडेंगे !" २. जेव्हा जवळचा मित्र / देणेकरी पैसे देणे मागायचा तेव्हा मी त्याला नेहमी म्हणायचो, "काय राव पैसे पैसे करता ? मी कुणाचे बुडविलेत तेव्हा तुमचे देणारय ?" वरील वाक्यांनी मला लढायची आणि कठीण प्रसंग हसत हसत झेलायची प्रेरणा दिली.

In reply to by धर्मराजमुटके

दशानन Fri, 09/19/2014 - 21:38
व्यवसाय करु नको, नोकरी कर! असे म्हणाले कोणी मला तर त्या व्यक्तीची मला किव येते! " बचेंगे तो और भी लडेंगे !" यातील जिद्द समजून घेण्यासाठी तेवढेच कष्ट उपसावे लागतात :)

संदिपजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धीर सोडू नका, परिस्थिती नक्की बदलेल व चांगले दिवस लवकरच येतील. सर्व मिपाकरांचे प्रतिसाद व अश्या कठिण वेळी मिपाकरांनी दिलेला मदतीचा / मैत्रीचा हात बघून मिपाकर म्हणून खूप अभिमान वाटत आहे.

दशानन Fri, 09/19/2014 - 23:01
आत्मघात खूप त्रासदायक प्रकार असतो, आपल्याला वाटतं तेवढे सोपं काम हे नक्की नाही आहे. आणि चुकून जगला-वाचला, नशिबाने पोलीस केस इत्यादी झाली नाही तरी... मानसिक त्रास जो होतो त्यानंतर.. तो पाहता ८-९ लाख कर्जाचा आकडा फार मोठा नाही आहे. *माझा आयडी दशानन का? असे मध्यंतरी कोणीतरी विचारले होते.. त्याचे उत्तर आज हा धागा समोर आला आहे म्हणून देतो आहे. मी जवळपास मृत्यूचे दार १० वेळापेक्षा जास्तवेळा ठोठावले आहे.. यातील तीन अपघात होते व बाकीचे माझे त्या क्षणी परिस्थितीजन्य अवस्थेमुळे घेतलेले निर्णय! म्हणून नाव दशानन. यातील २ घटना येथे मिपावर मी खूप आधी लिहिल्या आहेतच. माझ्या जुन्या मिपा मित्रांना ते माहिती देखील आहे. त्यामुळे स्व: अनुभव म्हणून सांगतो, प्रयत्न करत रहा, आपल्यात फरक एवढाच आहे, कि तुम्ही त्या तीरावर आहात व मी दुसऱ्या तीरावर पोचण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आहे. तेथेच अडकून राहायचे की प्रयत्न करायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय. (अनुभवी)

अर्धवटराव Sat, 09/20/2014 - 03:50
एकदा आपलं म्हटलं कि हा मिपा दोस्त अगदी जय-विरु ला पण मागे टाकतो :) भाऊ... इतकं उत्तम दिमाग कि बात दिल से केली आहे मिपा ने.. आणखी काय सांगावं... पण एक सांगतो. अगदी तुमच्या सारखी नाहि पण टोकाची आर्थीक तंगी, प्रेमभंग, कौटुंबीक आणि इतर समस्यांनी अतिप्रचंड हैराण झालेली मंडळी आयुष्यात आलि माझ्या (तशी सर्वांच्याच येतात) मी सुद्धा इतरांप्रमाणे अत्यंत बिकट पर्सिस्थितीतुन गेलो आहे बरेचदा, त्यामुळे तुमची मनस्थिती समजु शकतो. अशा सगळ्या प्रसंगी प्रत्येकाने आपापला मार्ग काढलाच. पण एक गोष्ट कॉमन होती सर्वांच्यात. शेवटी अशी परिस्थिती मनात का उद्भवते? तर मनाची उमेद, इच्छाशक्ती कुंठीत होते म्हणुन. पण आपल्या सर्वांकडे एक एखादी अशी गोष्ट असते कि ज्यामुळे काहि काळापुरतं तरी मन निवळतं. माझ्या पहाण्यातल्या प्रत्येक समदु:खी व्यक्तीने हा उपाय जाणते-अजाणतेपणी अवष्य केला होता. एक देवदास मित्र पार म्हणजे पारच कोलमडला होता. पण त्याला मासळीचं जेवण आणि त्यानंतर दोन सिग्रेट असा खुराक घ्यायचा भयंकर शौक होता. इतर वेळी ते बेणं पार हताश दिसायचं, पण मासळी चेपताना हळुहळु नॉर्मल व्हायचं आणि त्यानंतर सिग्रेट पिताना एकदम फ्रेश-कॉन्फीडंट वाटायचं. या एका धाग्यावरुन त्याने स्वतःला सावरलं. नियमाने मासळी जेवण आणि सिग्रेट घेत राहिला व त्यानंतरचे काहि मिनीट आयुष्याचा सिरीयसली प्रॅक्टीकल विचार करायला लागला. शेवटी तो त्यातनं बाहेर आलाच. वारंवार इंजीनीयरींगमधे गचके खाणार्‍या दोन मित्रांना अनुक्रमे गोविंदाचे पडिक सिनीमे आणि बॅचलर लाईफमधे फुकट उपलब्ध अशा शरीर-सुखाच्या ऑप्शनने साथ दिली व त्यांना कमालीच्या नैराश्यातुन वाचवलं. असे बरेच अनुभव आहेत. थोडक्यात काय, तर तुम्हाला समस्या सोडवायला जी मनाची निवांत अवस्था हवी आहे ति तुमच्याच एखाद्या सवयीने म्हणा आवडीने म्हणा तुम्हाला मिळवता येईल. ति सवय प्रयत्नपुर्वक नियमाने अमलात आणा. काहि काळानंतर तुमचं शरीर पाण्याबाहेर आलं नाहि तरी तुमचं नाक-तोंड नक्की येईल व तुम्हालाच तुमचा मार्ग दिसेल. मिपा आहेच सोबतीला :)

तुषार काळभोर Sat, 09/20/2014 - 08:33
इथे कदाचित अनावधानाने राहून गेलेला एक मुद्दा.. Pleeeeaaase!!!! एक कुटुंबाचा आरोग्यविमा व एक तुमचा आयुर्विमा लगेच काढा. मुलाच्या आजारपणात झालेल्या खर्चाने आर्थिक परिस्थिती आणखी नाजूक झाली, असं तुम्ही लिहिलंय. शक्यता कितीही कमी असली, तरी मोठे आजारपण व अकाली मृत्यूमुळे एखाद्या घराचा आर्थिक डोलारा डगमगु शकतो. त्यामुळे कदाचित आताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये १०-१५ हजाराचे २ विमे खूप जास्त वा चैनीचे वा अनावश्यक वाटू शकतात. किंवा कदाचित आता तुम्हाला ते शक्यही होणार नाही. पण as soon as possible, थोडा मोकळा श्वास घेता आला की लगेच विमा काढा. (@संपादकः हा प्रतिसाद अवांतर/अनावश्यक असल्यास कृपया काढून टाकावा)

सुबोध खरे Sat, 09/20/2014 - 10:46
डांगे साहेब, मिपावरील लोकांचे एक एक अनुभव वाचून आला आश्चर्य वाटते आहे. लोक किती गंभीर प्रसंगातून जात असतात. त्यांच्या मानाने माझे आयुष्य फार सुखात आणि सुरळीत गेले असे वाटते. त्यामुळे आपल्याला सल्ला द्यायचा मला कोणताही अधिकार नाही. परंतु एक नौदलातील वैद्यकीय अधिकारी म्हणून मी काही आत्महत्येच्या प्रकरणा मध्ये चौकशी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. आत्महत्या करणारा माणूस सुटून जातो पण मागे राहणाऱ्या कुटुंबाची अक्षरशः वाताहत होते. त्यांना आयुर्विम्याचे पैसे मिळत नाहीत.( नैराश्यातून केलेली आत्महत्या हा मानसिक रोग आहे म्हणून त्या रुग्णाच्या कुटुंबाला सर्व फायदे, विमा, इ इ मिळावेत म्हणून मी केलेले सर्व प्रयत्न सरकार दरबारी निष्फळ ठरले आहेत). जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते. बाकी बर्याच लोकांनी स्वानुभवाने बरेच काही लिहिले आहे. त्या ताज महालाला माझी वीट लावण्यात काहीच अर्थ नाही.अशा लढाऊ लोकांना साष्टांग प्रणाम. आणि त्यांच्या अशा लढ्यातून स्फूर्ती घेऊन आपणही अशा कठीण परिस्थितीतून लवकरच बाहेर पडाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

In reply to by सुबोध खरे

विलासराव Sat, 09/20/2014 - 11:12
जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते. बरीचशी भरलीत, काही अजुनही भरतोय. बाकी जाता जाता अजुन एकः मी या परिस्थितीतुन पार झाल्यावर मला तशाच परिस्थीतीतुन जाणार्याची भलतीच कणव यायला लागली. मग मी जमेल तशी मदतही करायला लागलो. बरेचसे लोक बरेच बरे निघाले. पण माझ्या अगदी जवळच्या काही लोकांनी धुर्तपणे माझ्याकडुन पैसे घेतले आनी मला कायमची शेंडी लावली. परीणाम आणखी दोनेक लाखाला चुना लागला. दान्/मदत सत्पात्री करावं ते यासाठीच!!!!!!!!!

मदनबाण Sat, 09/20/2014 - 11:12
suicide is not a choice... रणांगणातुन पळायचे की लढायचे हे सर्वस्वी आपल्या हाती असते... लढणार्‍यांना विजय देखील प्राप्त करता येतो, पळणार्‍यांना ? Be Brave !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }

आयुर्हित Sat, 09/20/2014 - 12:33
आपल्या आयुष्यावरच्या या मोठ्ठ्या वळणावर मिपावर आपले मन मो़कळे केल्याबद्दल धन्यवाद. याचाच अर्थ आपल्याला समस्येचे पूर्ण समाधान हवे आहे. व यावरुनच आपला जगण्याचा व त्यासाठी संघर्ष करण्याचाच विचार प्रकट झाला आहे. बर्‍याच वेळेला मनुष्याची गत "कस्तुरीमॄगा"सारखीच झालेली असते. आपल्या आत असणारे सद्गुण हे आपल्याला कधिच दिसत नाही. ते जाणण्यासाठी एक जोहरी किंवा सद्गुरु भेटावाच लागतो. तद्नंतरच आपले कल्याण होत असते. असो! कठीण प्रसंग कोणाच्या आयुष्यात आला नाही? प्रभुरामांना देखिल १४ वर्षे वनवास भोगावा लागला होताच की! भगवान कृष्णावर ही न केलेल्या चोरिचा आळ आला होता. सोन्याला सुद्दा आपले शुध्दत्व प्रमाणित करण्यासाठी आगीतुन जावेच लागते. तशीच आता ही सुध्दा आपली सत्वपरिक्षा आहे असे समजुन प्रत्येक पाऊल समजून उमजुन व जपूनच उचलाल अशी अपेक्षा आहे. भगवान श्रीकॄष्णाने गीतेत सांगितले आहेच अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनां पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ स्थूल रूपात याचा अर्थ आहे- ‘माझ्या भक्तांची सर्व प्रकारची काळजी मी घेतो. त्यांच्या सर्व गरजा-अपेक्षा मी स्वतः वाहून नेतो. त्यांच्या सर्व चिंतांची जबाबदारी मी आपल्या खांद्यांवर घेतो’. किंवा साध्या मराठीत श्री स्वामी समर्थ सांगतात "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे!" तेव्हा देवावर व देवाने दाखविलेल्या मार्गावर म्हणजेच "आपल्या स्वतःच्या कर्मयोगावर" श्रद्धा ठेवावी, हि विनंती. इतर कोणतेही प्रश्न असतील तर बिनधास्त व्यनी करावा. आम्ही सदैव आपली मदतच करू.

लव उ Sat, 09/20/2014 - 16:06
काहीही विचार करताना जरा बायको (बाळंतीण) आणी २ सोनुल्यांना आठवा. बाकि व्य. नि. केलाय. काळजी घ्या. तुमची आणि कुटुंबाचिही.

सखी Sun, 09/21/2014 - 08:51
ही कविता काल प्रतिसाद देताना सापडत नव्हती तुम्हाला किंवा कोणीही निराश झालेल्या व्यक्तीला बळ देण्यासाठी इथे देत आहे. (मला आणि परिचितांना याचा खूप उपयोग झाला.) मुठभर हृदया पांढरे निशाण उभारण्याची घाई करू नकोस, मुठभर हृदया, प्रयत्न कर, तगण्याचा, तरण्याचा, अवकाश भोवंडून टाकणार्‍या, या प्रलयंकारी वादळाचाही, एक अंत आहे. काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत लढत रहा, तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी. वादळे यासाठीच वापरायची असतात आपण काय आहोत हे तपासण्यासाठी नव्हे, आपण काय होऊ शकतो, हे आजमावण्यासाठी.. - पद्मा गोळे

पियू परी Mon, 09/22/2014 - 14:18
तुम्ही सुद्धा घेणेकरी आहात हे विसरु नका. :शक्य त्या सर्व प्रकारे तुम्हीही ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे येणे आहे त्यांच्यामागे तगादा लावा. :कागदोपत्री व्यवहार झाला असल्यास कायद्याचा बडगा दाखवा. :स्वस्तात एखादा वकील मिळाला तर नोटिस वै. पाठवा. :पोलिस कंप्लेंट करायची धमकी द्या. :शक्यतो हा तगादा लिखित स्वरुपात करा. इमेल सुद्धा लिखित पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. :क्लाएंट्सना मेल पाठवतांना रिमाइंडर १, रिमाइंडर २ असं लिहित चला म्हणजे त्यांनाही गांभिर्य येईल. :एखाद्या कंपनीत अकाउंट्स डिपार्टमेंट दाद देत नसेल तर त्यांच्या वरिष्ठांना किंवा वेळ पडल्यास डायरेक्टर्स ना भेटून तुमची परीस्थिती विषद करा. आणि पेमेंट लवकर देण्याची विनंती करा. :जे जे क्लाएंट कामाचे पैसे देत नाहीत त्यांची काही ओरिजनल कागदपत्रे/ कामांच्या सॉफ्ट कॉपीज इ. जे काही तुमच्याकडे आहे ते पैसे मिळाल्याशिवाय परत देऊ नका. अगदी सॉफ्ट कॉपी सुद्धा नाही. :तशीच वेळ आली तर क्लाएंट्साठी केलेले काम (डिझाईन/ लोगो वै.) दुसर्‍या कोणाला विकुन टाकायची धमकी द्या. : एखाद्या नालायक माणसाने पैसे न दिल्यास "तुझे नाव लिहुन आत्महत्या करीन" अशी धमकी द्या. यापुढे जे काम घ्याल त्यात सगळे व्यवहार कागदोपत्री तर कराच पण निदान ५०-७५% आधी घ्या. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. तुमचे पैसे अडकवुन/ हडपुन/ न देऊन लोकांनी तंगड्या पसरून आयुष्य एंजॉय करायचे आणि तुम्ही बायको आणि बाळाला वार्‍यावर सोडून जीव द्यायचा हा कोणता न्याय?

In reply to by पियू परी

माहितगार Mon, 09/22/2014 - 14:58
एखाद्या नालायक माणसाने पैसे न दिल्यास "तुझे नाव लिहुन आत्महत्या करीन" अशी धमकी द्या.
आपले पैसे मिळवण्याची टेक्निक म्हणून या सल्ल्याच्या सुयोग्यते बद्दल साशंक आहे. मला वाटते टाळलेले बरे. पैसे अगदी दोन तीन वर्षापेक्षा अधिक थकले आणि बाकी सर्व मार्ग संपले तर वकिला मार्फत नोटीस काही वेळा चांगले काम करून जाते. पैसे मागण्याच्या टेक्निक्स बद्दल स्वडीने कधीतरी सविस्तर लेख लिहावा असा जुना मानस आहे.

In reply to by सुहास..

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 12:39
माझ्या एका मित्राने त्याच्या सर्व देणेकर्‍याना बोलावून सांगितले की मी तुमच्या सर्वाम्कडून पैसे घेतले. तुमच्या मदतीबद्दल मी ऋणी आअहे मात्र तुमच्या त्रासामुळे आत्महत्या करायला चाललो आहे. तुमचे पैसे फेडण्यासाठी माझ्या कडे आत्ता एकही पैसा नाही. मी मेल्यावर मिळालेल्या इन्शुरन्सच्या पैशामधून तुमची काय ती देणी दिली जातील मात्र मी आत्महत्ये अगोदर जे पत्र लिहीन त्यात तुमच्या सर्वांची नावे लिहून यानी माझा मानसीक छाळ केला म्हणून मी आत्महत्या करीत आहे असे लिहीन. अन्यतः मला वेळ द्या एक सहा महिने मी तुमचे पैसे फेडेन हे नक्की. " हे सर्व घडलेले आहे....... तो मित्र त्याची सर्व देणी फेडून तोट्यात गेलेले सर्व उद्योग बंद करून सध्या भिक्षुकी करत बिनघोर जगतोय."

In reply to by विजुभाऊ

गवि Fri, 09/19/2014 - 12:45
थोडेसे अवांतर होतेय, पण अशा केसमधे इंशुरन्स कंपनी कोणतेही पैसे देईल असे वाटत नाही. जाणकार नसलो तरी तर्काने असे वाटते.

In reply to by गवि

धर्मराजमुटके Fri, 09/19/2014 - 12:47
बरोबर आहे तुमचे. आत्महत्येच्या प्रयत्नात विमा मिळत नाही पण सुसाईड चीटमधे आपले नाव आले तर नसता मनस्ताप होईल या कल्पनेने लोक पैशासाठी थांबायला तयार असतात.

In reply to by धर्मराजमुटके

होकाका Fri, 09/19/2014 - 20:29
बापरे, म्हणजे त्या मित्राने त्या सर्व देणेकर्‍यांना डबल धमकी दिली तरः मला विम्याचे पैसे मिळणार नाहीतच पण तुंम्हाला सुद्धा मनस्ताप होईल अशी तजवीज केली जाईल.

In reply to by होकाका

इरसाल Sat, 09/20/2014 - 09:37
विजुभौ चुपचुपके च्या शाहिद कपुरची इस्टोरी सांगत आहेत. तो नाय का उडी मारत समुद्रात नी मग परेश रावलला सापडतो. अवांतर- त्याच पिच्चरात गुज्जु फॅमिली रहाते पश्चिम बंगालात आणी घरात गाणी गातात पंजाबी (इसको जिला क्यु नही घोषीत कर देते वाला ) असो चोरी करु नका - आपल्याला पचत नाय आत्महत्या नको- आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय कधी शांत बसुन विचार करा (इमॅजिन करुन बघा). निर्लज्ज व्हा/नका होवु - पण ते पॉझिटिव्हली, वर लोकांनी लिहिल्या प्रमाणे देणेकर्‍यांना विश्वास द्या की तुम्ही काहीही झाले तरी त्यांचे पैसे बुडु देणार नाही आहात.

In reply to by विजुभाऊ

कवितानागेश Fri, 09/19/2014 - 14:12
हे असं उगाच नाही तिथे इमोशनल ब्लॅकमेलिन्ग करायची गरज नाही. ज्या विश्वासानी पैसे दिलेत, त्याच विश्वासानी लोकही थांबतील. थोडे थोडे जरे देत राहिले, तरी घेनेकर्‍याला धीर येतो. माझ्या एका मैत्रिणीनी एका ओळखीच्यांचे ५०००० रुपये, दर महिन्याला २-२ करत फेडले होते. आणि पोस्ट डेटेड २५ चेक्स देउन ठेवले. तिला नोकरी लागल्यानी हे सगळे येतिल, हे देणार्‍यालाही नक्की माहित होते.

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/18/2014 - 18:12
काळजी करु नका..मी पण या परिस्थितुन गेलेलो आहे...आत्महत्या करु नका..वेळ खराब असते..अश्या वेळी शांत रहा..देणेक-याना तोंड देत रहा..तोंड चुकवु नका.. दिवस बसुन रहात नाहि..चुल पेटति रहाण्या साठी मार्ग शोधा..ते महत्वाचे..कारण चुल बंद कि अक्कल पण बंद होते.. ८०८७९५८९२२ हा माझा नंबर आहे....काहि नाहि तरी सल्ला देवु शकेल..मी पुण्यास रहातो.. धिर सोडु नका...

In reply to by अविनाशकुलकर्णी

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 18:31
हिम्मत खूप धरून आहे दादा, म्हणून अजून ताळ्यावर आहे. चूल पेटती आहे. त्याचा तरी अजून प्रश्न नाही. काम करतो आहेच. अविश्रांत. पोटापुरता पैसा येतो पण आता दुसराच प्रश्न उभा राहिला आहे. रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय? गरिबी फार जवळून भोगली आहे. त्यामुळे त्याची लाज आणि भीती वाटत नाही. कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चालना जी असे म्हणून लढतो आहे. पण मर्यादा दिसत आहेत म्हणून गोंधळलो आहे. पाठीशी उभे आहात. बरे वाटते. मित्र-नातेवाईकांशी नाही बोलू शकत. म्हणून मिपा वापरत आहे. क्षमा असावी

सौंदाळा गुरुवार, 09/18/2014 - 18:18
आत्महत्येचा विचारही करु नका. बायको आणि मुलांना शक्य असेल तर तात्पुरते माहेरी पाठवा. स्वतःचे घर, जमीन, दागिने असतील तर mortgage लोन मिळतय का बघा. शक्य तेवढे खर्च कमी करा. बायको नोकरी करु शकते का? (जर करत नसेल तर) जे पैसे येणार आहेत त्याचा पाठ्पुरावा करा. आणि राग येईल तरी सांगतो मारामारी / शिवीगाळी वगैरे ऐकायच्या तयारीनेच र्‍हावा.

विलासराव गुरुवार, 09/18/2014 - 18:24
मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , पण आत्महत्येचा विचार ही करु नकोस बरोबर. मी २००३ ला ४ लाखाला डुबलो होतो. पगार होता ७००० हजार. घर भाड्याचे. घरात एकटा कमावता. तुमच्यासारखीच परीस्थीती. पण आत्महत्या कारावी असा विचारसुद्धा मनात आला नाही. निर्लज्जपणा स्विकारला. सगळ्यांना सांगीतले कर्जबाजारी झालोय. भिकारी नाही. पै न पै चुकती करेल पण आज वेळ देउ शकत नाही. बरेचजण तयार झाले. एक-दोन जण खळीला आहे. त्यांना सरळ सांगीतले आता तर पैसे आले तरी तुम्हाला सगळ्यात शेवटी देणार, आणी आता जास्त आवाज केला तर देणारच नाही. मग आणखी ५०००० उसने मिळवले १ वर्षे तब्बेतीत खाण्यापिण्यासाठी. शांतचित्ताने काम करत करत व्यवसाय वाढवला. ३ वर्षात सर्व देणे देउन ५००-१००० रोज खर्च करायचो बार मधे. आनी एका वर्शाने काम करायचे सोडुन भारतभर फिरलो, मग परदेशात फिरलो.सगळं झाल्यावर विपश्यना करुन ध्यानमार्गावर स्थिर झालो. आणी आता उपदेश करत फिरत असतो. काय जमेल तसा बोध घ्या यातुन. कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा समजु नये.

In reply to by विलासराव

विलासराव Fri, 09/19/2014 - 17:16
डांगे साहेब हे माझे मित्र आहेत दादाभाउ कुटे: हे महाराष्ट्र क्रिक्रेट टीमचे कर्णधार होते: बुद्दीबळ खेळले आहेत राज्यापातळीवर. दोन मुले आहेत. पोटासाठी डोंबीवलीवरुन फोर्ट्ला येतात गेली २० वर्षे, तिथे त्यांचा टेलीफोन बुथ आहे. कायम आर्थिक अडचण असते कारण मोबाईलमुळे आजकाल फोन कमी वापर होतो. आजच त्यांचा फोन आला होता सामनात बातमी आली १५ तारखेला म्हनुन. http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=23644&boxid=12913375

सुहास पाटील गुरुवार, 09/18/2014 - 18:31
आत्माहत्या अजिबात करू नका. वेळ निघून जांइल. घरच्यांचा विचार करा. वर सांगितल्या प्रमाणे घरच्यांची काही दिवस माहेरी सोय कर. आणि हो पडेल ते काम करा त्यातून पैसे मिळावा. तुम्ही मेहनत करताय असे चित्र निर्माण झाले कि देणेकरी तुमच्यावर विश्वास ठेवतील

मृत्युन्जय गुरुवार, 09/18/2014 - 18:37
देणेकर्‍यांना आज उद्या करु नका. एकदा धीर धरुन स्पष्ट सांगा की ४ वर्षे लागतील. नंगे से खुदा भी डरता है. त्यांना सांगा की मला मारुन किंवा त्रास देउन तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहित. पैसे परत हवे असतील तर याकाळात तुम्हाला त्यांचे पैसे परत करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी मोकळीक द्या. डोक्यात अक्कलेचा भाग असलेले लोक ऐकतील. एवढे सांगुनही जे मुर्ख महाभाग ऐकणार नाहित त्यांच्या तगाद्याखातर आत्महत्या करणे मुर्खपणा आहे. ही परिस्थिती आहे ती हाताळावीच लागेल. स्वतःशी प्रामाणिक रहा. तो प्रामाणिकपण तुमच्या बोलण्यातुन जाणवु द्या. तुमच्या गरजा कमी करा आणि थोडे थोडे करत सगळ्यांना परतफेड करत रहा. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटल्यास तगादा कमी होइल. एखाद्याचे १००० देणे असेल तर ते १० रुपयांनी जरी कमी करता आले तरी बघा. अगदीच पैसे मिळत नाहित म्हटल्यावर ओक वैतागतात, थोडे थोडे मिळताहेत म्हटल्यावर आशेने दम धरतात

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 18:50
तुमचे म्हणणे पटले. तुम्ही सांगितलेला मार्ग बरोबरच आहे. ज्यांचे कडून येणे आहेत त्यांच्या शब्दावर ज्यांना द्यायचे त्यांना शब्द दिला. आता पंचाईत झाली कि देणारे देत नाहीत आणि मी खोटा ठरलो. ज्यांचे ६ लाख द्यायचे त्यांना ३ लाख दिले, तरी उरलेल्या तीन लाखासाठी ते जीव घेऊन मागे लागले आहेत. ते नातेवाईक आहेत आणि त्यांची अडचण पण १००% खरी आहे. अशी मेख बसली आहे कि बस. एका मित्राचे दीड लाख द्यायचे त्याला १५ हजार दिले. आणि म्हटले बाबा जर कळ काढ जसे येतील तसे तुला देतो, तर त्याच्या वडिलांचे दिवसाला १० फोन.

पिंगू गुरुवार, 09/18/2014 - 18:37
ही पण वेळ जाईल, पण केव्हा. जेव्हा तुम्ही हातपाय माराल तेव्हाच. तेव्हा हात पाय मारणे चालुच ठेवा, नक्कीच तुम्ही वाईट परिस्थितीतून वर याल.

In reply to by पिंगू

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 18:51
रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय?

In reply to by संदीप डांगे

पिंगू गुरुवार, 09/18/2014 - 20:37
धंद्यामध्ये कधीसुद्धा वेळेवर पैसा येईलच याची खात्री नसते. त्यामुळे गाठीशी थोडाफार पैसा बांधून पुढे जावे लागते. केलेल्या कामाचे पैसे मिळतीलच, पण ते अमुक वेळेवर मिळतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आशा सोडून देऊ नका, एवढेच सांगू शकतो. कारण त्याच्यावरच आपण सारे जिवंत आहोत.

सूड गुरुवार, 09/18/2014 - 18:40
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही..बाकी सल्ले देण्यास अपात्र आहे. लवकरात लवकर आपल्या प्रयत्नांना यश येऊन सर्व सुरळीत होवो.

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/18/2014 - 18:51
निर्लज्ज व्हा हा तर सल्ला आहेच पण त्या आधी १. बायको मुलांना बायकोच्या माहेरी पाठवा. तिच्या माहेरच्यांना स्पष्ट कल्पना देवुन. २. जे काही दागिने असतील ते विचार न करता विका आणि जमेल तेव्हडे कर्ज फेडा. ३. अजुन ही काही विकण्यासारखे असेल ( जसे की ४ चाकी वगैरे ) ती वीका आणि कर्ज फेडा. ४. घर भाड्याचे असेल तर ते बदलुन कमी भाड्याच्या घरात जा. ५. घर स्वताचे असेल तर बरेच सोप्पे होइल. सरळ विकुन टाका, घरावर लोन असेल तर ते फेडा आणि छोट्या भाड्याच्या घरात रहायला जा. मुख्य म्हणजे तुमच्या जीवनशैलीतुन हे दाखवून द्या की तुम्ही मुद्दाम लोकांचे पैसे अडवून ठेवले नाहीयेत. ( मी माझ्या मित्राला पूर्वी ५०००० दिले होते, तो ते परत करत नव्हता पण गोव्याला बायको मुलांबरोबर गेला होता. त्याने पैसे परत न करण्यापेक्षा त्याच्या ह्या वागण्याने जास्त दुख झाले )

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 09/19/2014 - 09:20
५. घर स्वताचे असेल तर बरेच सोप्पे होइल. सरळ विकुन टाका, घरावर लोन असेल तर ते फेडा आणि छोट्या भाड्याच्या घरात रहायला जा.
हे मात्र करु नका...ते घर तुमच्या नावावर असले तरी अख्खे कुटुंब त्यात रहाते...आणि घर एकदा विकले की परत घेताना जास्त पैसे देउनच घ्यावे लागते

In reply to by टवाळ कार्टा

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 10:13
७-८ लाखांचेच कर्ज असल्याकारणाने घर विकण्याची नक्कीच गरज नाही. बँकेकडे तारण ठेवून किंवा तारण न ठेवताही घर दुरुस्तीसाठी एव्हढे कर्ज बँकेकडून अथवा HDFC कडून मिळू शकेल. दुरुस्ती किंवा गृहसजावटीसाठी (फर्निचर) बँका, HDFC वाले कर्ज देतात. तुमच्याकडे ३ वर्षाचे ऑडीटेड रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स भरल्याच्या पावत्या असतील तर इतरही अनेक कारणासाठी कर्ज मिळू शकेल. असे मिळाल्यावर तातडीने व्यक्तीगत नात्यातून घेतलेली कर्जे फेडून बँक/ HDFC चे कर्ज सुलभ हप्त्यात फेडता येईल. नोकरीच्या पर्यायाचा विचार करावाच. एकदा दगडाखालचा हात पूर्णपणे निघाला की नव्या जोमाने स्वतःच्या व्यवसायाच्या मार्गाने जाता येईल. आमच्या शुभेच्छा आहेतच.

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 18:54
नक्की काय व्यवसाय आहे आणि काय शिक्षण आहे हे समजल्यास मार्ग सुचवणं बरं पडेल. विलासरावांनी सांगितल्याप्रमाणं सग ळ्यांना एकत्र बोलावून परिस्थिती समजावून सांगितल्यास काही मार्ग निघू शकेल. (मसाला चित्रपटासारखा) ह्यानंतर जमल्यास एखादी नोकरी स्विकारावी. ७-८ हजार जरी मिळाले तरी महिन्याचं पक्कं उत्पन्न असेल. घरखर्च किमान निभणं शक्य होईल. उरलेल्या वेळात व्यवसाय सांभाळता आल्यास उत्तम. बाकी 'हेही दिवस जातील' हे कायम नि पक्कं लक्षात ठेवणं हा अत्यंत चांगला मार्ग आहे. आत्महत्या हे तात्कालिक समस्यांचं तथाकथित कायमचं निराकरण आहे. देणेकरी आपल्या कुटुंबाला त्रास कशावरुन देणार नाहीत?

In reply to by प्यारे१

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 21:28
प्रतिसाद संपादित झालेला असला तरी माझं मत तेच राहील. आयुष्य अकारण अथवा सकारण सुद्धा संपवण्यासाठी नाही. जन्म आपल्या हातात नाही तसाच मृत्यू देखील नसावा.

संपादित

दिपक.कुवेत गुरुवार, 09/18/2014 - 18:56
आत्महत्या तर मूळीच करू नका. ती नक्किच पळवाट नाहि. आपल्या प्रयत्नांना लवकारात लवकर यश मिळो हिच सदिच्छा. तुमच्या कामाचं / व्यवसायाचं स्वरुप काय आहे ते ईथे सांगीतलत तर कदाचीत तुम्हाला जास्त काम मिळण्यास मिपाकर नक्किच हातभार लावतील.

विवेकपटाईत गुरुवार, 09/18/2014 - 19:02
सल्ला देणे सौपे असते, परिस्थितीशी सामना करणे कठीण असते. तरी ही संसारात परिस्थितीला समोर जावेच लागते. त्या शिवाय गत्यंतर नाही. राजा हरिश्चंद्रला चांडाळराज चा सेवक बनण्याची पाळी आली होती. पण त्यांनी आत्महत्या नाही केली. परिस्थिती स्वीकार केली. रात्री नंतर दिवस हा येतोच याच आशेवर संघर्ष करीत राहा. बाकी चोरी करणे आणि आत्महत्या करणे दोन्ही गैर आहे.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 19:19
आत्महत्या हा पर्याय कदापी योग्य नाही... ती पळवाट होईल आणि कुटुंबावर अन्यायकारक होईल. कुटूंबातल्या कोणाचाही जीव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही... आणि तो गुन्हाही होईल. पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका. चोरी करणे हे नैतीकदृष्ट्या तर अयोग्य आहेच पण अगदी व्यावहारीकदृष्टीने विचार केला तरी अत्यंत धोकादायकही आहे... पकडला गेलात तर परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट होईल हे नक्की. इथेही हाच सल्ल की, पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका. तुमच्या परिस्थितीत सर्वात उत्तम मार्ग म्हणजे देणेकर्‍यांना विनयाने पण स्पष्ट्पणे सांगा की, "आता पैसे देणे शक्य नाही. पण ते बुडवण्याची इच्छाही नाही. तेव्हा आता काही दिवसांची मुदत हाच एक मार्ग बाकी आहे." तसे केल्यास त्यांचे पैसे मिळतील. पैसे कमावणाच्या मार्गात कोणतीही समस्या उभी करणार्‍या त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांचे पैसे परत होण्याला अजून उशीर होण्यात किंवा ते पूर्ण बुडण्यात होउ शकतो... हे तुम्हालाही नको आहे आणि त्यांनाही नको आहे, हे तुम्हाला त्यांना पटवून द्यावेच लागेल. याचे खालील परिणाम होऊ शकतातः अ) देणेकर्‍याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला नसेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा असला तर ('वाईट' आणि 'अती वाईट' असे दोनच पर्याय असताना 'वाईट' हा पर्याय निवडावा असा विचार करून) तुम्हाला परतफेडीची मुदत वाढवून देण्यास तयार होईल. आ) देणेकर्‍याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला असेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा नसला तरीही (अगोदरच चोखाळला असला तरी) सौजन्याने वरचाच प्रयत्न परत परत करावा (तुमच्या हाती अजून काहीच नाही असे तुमच्याच लेखतून कलते आहे)... कोण जाणे पुढच्या एखाद्या प्रयत्नात ते पूर्ण पैसे बुडीत खात्यात जाण्याच्या (अती वाईट) पर्यायाऐवजी अजून थोडा वेळ कळ काढण्याचा (वाईट पर्याय) देणेकरी स्विकारेल. आता राहीले तुमच्या मनःस्थितीबद्दल : ही परिस्थिती तुमच्या चुकीने झाली की योगायोगाने झाली हा प्रश्न आताच्या घडीला गौण आहे. वस्तूस्थिती खालिलप्रमाणे आहे : क) परिस्थिती वाईट आहे, यात वाद नाही. पण तिच्यामुळे अधिकाधीक निराश होण्याने किंवा नकारात्मक विचार करण्याने (उदा. आत्महत्या, चोरी, इ) ती सुधारणार नाही, किंबहुना ती अजूनच बिघडेल. तेव्हा ते सोडा. हे कठीण आहे पण अश्यक्य नाही. किंबहुना, समस्येतून बाहेर पडेपर्यंत तुमची सगळी ताकद आणि सगळे विचार समस्या सोडविण्याकरीता वापरणे हेच तुमचे एकमेव कर्तव्य आहे. याबाबत मनात शंका आल्यास कुटुंबाचा विचार मनात आणा. ख) कोणत्या चुकीने ही परिस्थिती उद्भवली ह्याचा नीट खडतर प्रामाणिकपणे (ब्रुटल ऑनेस्टी) विचार करा. खरी कारणे शोधा. दुसर्‍यावर दोष ढकलण्याअगोदर स्वतःच्या चूका शोधा आणि त्या चूका भविष्यात तुमच्या हातून परत होऊ नयेत यासाठी उपाय शोधा. यात होणारे बोध तुम्हाला भविष्यात योग्य निर्णय घ्यायला आणि जीवन सुरळीत करण्यच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्यायला उपयोगी पडतील. कारण, तुमच्या विचारांवर आणि कृतीवर तुम्ही १००% ताबा ठेवू शकता... इतरांच्या विचारां- किंवा कृतीं- बाबत असे असू शकत नाही. ग) पैसे कमावण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे ते तुमच्या शिक्षण, कौशल्य आणि कर्तबगारीवर अवलंबून आहे. तेव्हा तो निर्णय घ्यायला तुमच्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती अजून कोणी नाही. फारतर त्या क्षेत्रातल्या जाणकारांचा सल्ला व मदत जरूर घ्या. घ) तुम्ही समस्येत अडकलेली जगातली पहिली व्यक्ती नक्कीच नाही. यापूर्वी अनेकजण अनेक समस्यात गुंतलेले आहेत आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर आलेले आहेत... तेव्हा तुम्ही तेच केलेत तर फार मोठे दिव्य काम केले असे होणार नाही... हे नक्कीच लक्षात ठेवा. हे सर्व तुमच्या आणि इतरांच्या बाबतीत भविष्यातही खरे आहे हे नीट ध्यानात ठेवा. 'यशस्वी होणे' म्हणजे कधीच 'कधीच अयशस्वी न होणे' असे अजिबात नाही... तर अपयशांना समर्थपणे तोंड देऊन, अंग झटकून त्यांच्यावर मात करणे होय ! (बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) इए

संदीप डांगे गुरुवार, 09/18/2014 - 19:29
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: मी एक B F A कमर्शिअल आर्टीस्ट असून १२ वर्षे कामाचा अनुभव आहे. क्रियेटीव डायरेक्टर म्हणून ग्राफिक आणि वेब मध्ये भरपूर काम केले आहे. २०११ पासून स्वत: फ़्रिलान्सर म्हणून काम सुरु केले. नंतर मुंबईहून नाशिक ला शिफ्ट झालो कारण आंतरजालीय संबंधामुळे तसा काही परिणाम होत नव्हता. माझे मुंबई, नाशिक, UK, दुबई ला बरेच ग्राहक आहेत. नाशिक ला ऑफिस सुरु करणे महागात पडले. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. ज्यांनी मदत करायची काबुल केली ते सपशेल फिरले. २-३ ग्राहकांची कामे केली त्यात बरेच नुकसान झाले. सद्य स्थिती मध्ये ऑफिस बंद आहे. घरून काम करत आहे. ग्राहकांना अजून माझ्यावर विश्वास आहे कारण माझ्या कामाच्या दर्जामध्ये मी तडजोड करत नाही. अचानक उलथापालथ झाल्याने जाम बावरलो आहे. फसवणारी माणसे आतापर्यंत भेटली नव्हती ती आताच भेटली सर्व अनावश्यक खर्च बंद केले आहेत.

In reply to by संदीप डांगे

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 19:49
रिकामटेकड स्मजल्यास हरकत नाही पण 4 पोरं 9 महीने काम करतील इतपत काम आणि पैसा हातात नसल्यास ऑफिस टाकू नयेच. बाकी प्रोफाइल बघता प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत टाका कदाचित बैंक कर्ज देइल ? ताबडतोप मुंबई त नोकरी धरा तुम्हास अवघड जाऊ नये आणि यामुळे देणेकर्यांची खात्रिही पटेल ? जमलेच तर नंतर महानगर सोडू नका 100 मार्ग पैसा मिळवायचे इथेच कायम उपलब्ध असतात.

In reply to by संदीप डांगे

बाबा पाटील गुरुवार, 09/18/2014 - 20:06
मी तर बर्‍याच वेळा असा काळ आणलाय,(अंगात वाईट्ट किडे आहेत हो).पण त्यातुन बाहेर पडता येत.सगळ्यात पहिल अनावश्यक खर्चांना कात्री लावायची.बहुतेक सर्व कामे स्वतःच करायची, वर्क ऑर्डर पासुन ते फायनल बिल पेमेंट पर्यंत स्वतःच राबायच,दररोज कुठल्याही परिस्थीतीत डेली अकाउंट मध्ये ५००-१००० बाजुलाच ठेवायचे.बाहेरचा चहादेखिल स्वतःच्याच पैश्याने प्यायचा नाही.सगळ्या गोष्टी बंद्,व्यसनाच्या पासुन मैलभर तरी लांब रहायच, तुम्ही देत असलेल्या सर्विसचे दर कमी करायचे,ग्राहकांशी बायकोशी पहिल्या रात्री बोलला नसाल इतके गोड बोलायचे. डोक्यावर बर्फ आणी जिभेवर साखर अशा मार्गाने व्यवसाय करायचा. त्यात आपण नविन नविन काय देवु शकतो हे सतत विचार करुन सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचा,पडेल ती काम स्विकारायची.कष्ट करायचे आणी घरी आले की छोट्या बाळांशी मजेत खेळायच. सहा एक महिन्यात यातुन बाहेर पडाल. शहाणपणा सांगायच कारण मी स्वतः तीन वर्षापुर्वी दिड ते दोन लाखाची मासिक कमाई सोडुन राज्यसेवेच्या परिक्षेच्या मागे लागलो,खर्च चालुच होते व्याज काही थांबत नाहित्,शेवटची परिक्षा २ फेब.२०१४ ला दिली वैतागलो सगळे मिळुन कर्जाची रक्कम १५ लाखापर्यंत पोहचली, क्लिनिकचा दर महिन्याचा सरासरी खर्च ५० ते ६० हजार, वेड लागायची पाळी आली होती,१५ फेब नंतर दिड लाखाचे पर्सनल लोन घेतले,बायकोकडुन ५० हजार घेतले,परत सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ओपिडी चालु केली. दोन तीन जणांना तात्पुर्ते कामावरुन कमी केले, ३ ते ४ महिन्यात बर्‍यापैकी घडी व्यवस्तीत बसली.आता सहाच महिन्यात पुण्यातले पॅरालिसकरीताचे संयुक्त उपचार पद्धतीवरीत आधारित एकमेव रुग्नालय चालु करेल. होता है बॉस थोडा थंडे दिमागसे सोचो.

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 19:31
स्वत: च्या पैसा कमवायच्या क्षमतेवर काही कारणाने दीर्घकाल रूपी भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेली च व्यक्तिच आत्महत्येचा मार्ग पत्करेल. तसेच चोरी मधे रिस्क फैक्टर्स हाय आहेत. त्यापेक्षा व्यावसायिक जोखिम पत्करणे योग्य.(उत्कृष्टच) पैसा कमवायची जिद्द (व व्यावसायिक अक्कल) नष्ट झाली नसल्यास तात्पुरते निर्लज्य बनुन वेळ मारून न्या. बाकी रोज प्राणायाम न चुकता कराच. उल्हासित वाटणार असेल तर आरत्या करा. निराश मन ध्यान करू शकत नाही तेंव्हा सर्व आलबेल होई पर्यन्त यात पडू नका. अर्थात शेवटी लिहलेले हे सर्व मनाच्या उभारीसाठी आहे पैसा मिळायला याचा प्रत्यक्ष संबंध नाही.

arunjoshi123 गुरुवार, 09/18/2014 - 19:48
७-८ लाख बिना तारणाचे तुम्हाला देणारे लोक असतील, तर माझ्या मते ते अंततः ते तुमचे हितचिंतकच आहेत/होते. समस्या सुटल्यावर (बाळ एकदा जगात आले, सेक्यूअर झाले) कि लोकांना पैसे पटकन परत पाहिजे असतात. त्यात फार काही चूक वाटत नाही. त्यातले काही बँकेचे तारणाचे लोन असेल तर बँकेने तितक्याचा कब्जा आतापर्यंत घेतला असेल. जर बिनातारणाचे लोन असेल माझे मते ते बँकेचा हळूहळू एन पी ए होईल. मंजे बँक तुम्हाला त्रास देईल, पण सभ्यपणे आणि नंतर विसरून जाईल. बिझनेस बुडणे आणि त्याच वेळी घरात मोठा खर्च होणे हे बॅडलक आहे, पण नाईलाज आहे. आता: १. तुमचे सगळे पैसे मित्रांचे असले तर ते बँक लोन मधे बदला. मित्रांना एकगठ्ठा पैसे परत पाहिजे असतात. त्यामानाने इएमआय सोपी पडते. आणि फालतू बँकेकडे जा, त्यांचा व्याजदर जास्त असतो पण ते एस बी आय सारखे कागदांसाठी छळत नाहीत. २. जास्त मानसिक ताण असेल तर शेत वैगेरे असल्यास विकून टाका. एखादा असेट विका. बिझनेस विका. घराचे तारण करा. ओवरटाईम करा. जास्तीची नोकरी करा. कमी भांड्वलावर अजून काही चालू करता येतं का ते पहा. पत्नीदेखिल काय काय करू शकेल ते पहा. ३. काही काळ घरखर्च खूप कमी करा. त्यानं थोडं प्रयत्न केल्याचं समाधान वाढतं. ४. काउंसेलर वा मानसोपचार तज्ञाला एक भेट अवश्य द्या. -------------------------------------------------------------------------------- वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्‍या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्‍याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन. ------------------------------ पैसे असून परत न देण्याच्या इच्छेला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही त्यापुढे अजून काय काय विचार करत आहात ते किती चूक आहे हे जाऊच द्या, पण असं स्वतःला निष्कारण निर्लज्ज म्हणणंदेखिल चूक आहे. लोक कितीही वाइट असले तरी अंगावरचे कपडे आणि तोंडचा घास काढून नेत नाहीत. ------------------------------ तुम्ही जितक्या मनस्वीपणे समस्या मांडली आहे, तितक्याच मनस्वीपणे मी प्रतिसाद देत आहे. शिवाय अशी परिस्थिती हाताळण्याचा मला लंबाचौडा अनुभव राहिला आहे. माझ्या प्रतिसादातलं प्रत्येक विधान योग्य आणि उचित असेल असं नाही, पण स्वतःला टेलर मेड करून वाचा.

In reply to by arunjoshi123

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 20:04
वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्‍या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्‍याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन. +१००. सरळ सोपे पण पूर्णपणे वास्तववादी आर्थिक समिकरण फार आवडले.

शिद गुरुवार, 09/18/2014 - 20:13
वरील सर्वांशी सहमत. उगाच काही अनाहूत सल्ला देत बसत नाही कारण ज्याची जळते त्यालाच कळते. तुमच्या खडतर परीस्थितीमधून लवकरच तुम्हाला बाहेर पडण्याची शक्ती व संधी मिळो आणि मनोजोगं यश पदरात पडो हि "श्री" चरणी प्रार्थना.

In reply to by शिद

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 20:41
उमेदीच्या काळात पहिले शैक्षणिक अडचणी व नंतर आर्थिक अडचणींचा बराच सामना मी केलेला आहे. संकटातून मिळालेला धडा माणूस कधीच विसरत नाही. बरीच वर्षे अवघड आर्थिक परिस्थिती अनुभवली असल्याने आजही अनुत्पादक छंदांवर रुपयाही खर्च करत नाही. या अनुभवांसाठी मी नशिबाचे आभारच मानतो. वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत. तुम्ही या अवघड परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढाल असा विश्वास वाटतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 21:42
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
कृपया हे वाक्य खालीलप्रमाणे वाचावे. वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.

एस गुरुवार, 09/18/2014 - 21:20
सर्वांनी योग्य सल्ले दिले आहेतच. पण नकारात्मक मनःस्थितीतून बाहेर येण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कुणालातरी अतिशय निरपेक्षपणे, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करा. भलेही ती मदत अतिशय क्षुल्लक का असेना. बघा, स्वतःबद्दल खूप छान वाटू लागेल आणि गमावलेला आत्मविश्वासही परत येईल. बर्‍याच केसेसमध्ये मी हा मार्ग यशस्वीपणे वापरला आहे. शुभेच्छा. कसलीही मदत हवी असेल तर जरूर संपर्क करा.

बहुगुणी गुरुवार, 09/18/2014 - 21:24
संपूर्ण धागाच 'वाचनखूण' ठेवण्याच्या लायकीचा आहे! मिपा संस्थळ हे केवळ टाईमपास कराण्याची जागा नसून सभासदांना अगदी वैयक्तिक अवघड समस्याही सोडवणारं 'सुहृद' वाटावं यातच सगळं आलं. संदीप: व्य नि केला आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 21:27
धंद्यात आर्थिक नुकसान आणि देणेकर्‍यांचे तगादे, अपमानास्पद वागणूक आणि समोर पसरलेला अंधःकार हे मी सुद्धा इथे परदेशात अनुभवले आहे. इथे तर कोणी कोणाला आर्थिक मदत करीत नाहित. (४-५ मित्रांनी तरीही केली) बँक कर्ज मिळत नाही आणि धंद्याचे ओव्हरहेड्स मुळे कर्जाचा आकडा भरमसाठ वेगाने वाढत जातो. हां हां म्हणता डोक्यावरून पाणी जातं. तुमची इच्छा असेल तर परदेशात नोकरी शोधा. दुबईत तुमचे क्लायंट आहेत म्हणजे तुमच्या ओळखी आहेतच. पेपरातून जाहिराती शोधून गल्फात नोकरी शोधा पासपोर्ट नसेल तर तो आधी बनवा). महिन्याला ५०-६० हजारापर्यंत आमदनी होईल. त्यातील ८० टक्के तरी बचत करू शकाल. (तिन वर्षाच्या ठिकाणी वर्षभरात कर्जाची परतफेड होईल.) देणी लवकर फिटतील. जरा जमापुंजी नीट जमली की परत जाऊन पुन्हा व्यवसाय प्रयत्न करा, पण ह्या वेळी जास्त सावधतेने. फॅन्सी आयडियाजच्या मागे न धावता कठोर वस्तूस्थितीशी सामना करत धंद्यात जम बसवा. जमेल सर्व काही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 21:36
+१११. अवांतरः व्यवसायाबाबत पेठकर काकांनी (किंवा अनुभवी कुणीही) काही सल्ले द्यावेत. मुलभूत गोष्टी सगळीकडं त्याच असायला हव्यात असं वाटतंय. व्यवसायाच्या सुरुवातीपासून घ्यायची काळजी ते पुढचे 'टप्पे' पायरीप्रमाणंच व्हर्टीकल ग्राफ आणि काही काळानं स्टॅबिलिटी पुन्हा प्रगती पुन्हा आडवी रेघ असं काही असणं कसं आवश्यक असतं इ.इ.इ.

भिंगरी गुरुवार, 09/18/2014 - 21:54
मी स्वत। या समस्येतून गेलेली आहे आणि आत्ताही याच समस्येत आहे,पण सगळ्यांना स्पष्ट सांगितले आहे की पैसे नक्की देईन.त्यांनाही विश्वास आहे.पण माझे ज्यांच्याकडून यायचे आहेत तेही असेच सांगत आहे.त्यामुळे गुंता वाढला आहे.३/३ कामवाल्या ठेवणारी मी सर्व कामं हाताने करते पण इतरांना मदत करुन मानसिक समाधान मात्र मिळवते.

धर्मराजमुटके गुरुवार, 09/18/2014 - 22:34
माणसाने आपल्या करीयरची सुरुवात कमीतकमी २-३ वर्षे तरी नोकरी करावी. जरी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरी. शक्यतो छोट्या कंपनीमधे सुरुवात करावी म्हणजे सर्व प्रकारची कामे करण्याचा अनुभव येतो. स्वतःचा अनुभव सांगतो. ही साधारण १९९८-२००० सालची गोष्ट आहे. मी कॉलेज सोडल्यानंतर ग्राफीक्स डिजाईनिंग आणि डीटीपी, प्रिंटींगचा व्यवसाय सुरु केला. त्याअगोदर अनुभवासाठी नोकरी केलेली नव्हती. एक जुना ४८६ पीसी घेऊन सुरुवात केली आणी २ वर्षात २-३ संगणक, प्रिंटर असा चांगला सेटअप बनवला. मुळातच कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची आवड असल्यामुळे नवनवीन कला पटकन शिकत गेलो. पैसा फार चांगला मिळत होता अशातला भाग नाही पण भागात नाव कमविले. दुपारी दुकान बंद करुन घरी गेलो तरी गिर्‍हाईके दुकानासमोर लाईन लाऊन उभी असायची. कुणी पैसे नाही दिले तरी काम करुन द्यायचो कारण घरची जबाबदारी नव्हती. ३ वर्षानंतर दुकान बदलले आणि ग्रह फिरले. गिर्‍हाईक येईनासे झाले. पैसे थकले. १ लाख कर्ज झाले तरी लाजेस्तव दुकानात जाऊन बसायचो. नंतर देणेकरी छळायला लागल्यावर दुकानातून आणि घरुन गायब व्हायला लागलो. पुस्तक घेऊन सार्वजनिक उद्यानात दिवसेंदिवस वाचत बसायचे आणि रात्री घरी जायचो. ज्योतीषांच्या नादी लागलो. हात / चेहरा बघून भविष्य सांगणारा ते कुंडली वरुन भविष्य सांगणारा असे सर्व प्राणी बघीतले. मुंबईपासून पुण्यापर्यंत त्यांच्या मागे हिंडलो. कोणी आशा दाखविली तर कोणी तुला धंदयात यश नाही, तु नोकरीच कर असे सांगीतले. मात्र हे सर्व करत असतांना परमेश्वरावरील भाव कमी झाला नाही की व्यसने लागली नाहित. शेवटी वडीलांनी माझ्या अनुपस्थीत दुकानाला टाळे ठोकले. नसते उद्योग करण्यापेक्षा घरी बस. मी तुला पोसतो असे म्हणाले. त्या दरम्यान दुकानात एक मुलगी फोन करण्यासाठी यायची. तिच्या कंपनीत हार्डवेअर इंजीनिअरचा जॉब आहे, कोणी आहे का कामासाठी म्हणून विचारायची. मित्रांनी माझे नाव सुचविले. मी व्यवसाय करण्याआधी संगणक जुळणीचा चार दिवसांचा एक हॉबी कोर्स केला होता. व्यवसायासाठी जुना पीसी घेतल्यामुळे तो वारंवार बिघडायचा तेव्हा तो खोलायचा, जोडायचा, फॉर्म्याट करायचा आणि आवश्यक सॉफ्टवेअर टाकायची एवढेच माहित होते. एवढ्या अपुर्‍या शिदोरीवर उडी मारायचे ठरविले कारण दुसरा उपायच नव्हता. मुलाखतीसाठी चार पाच चकरा मारल्या पण दरवेळी म्यानेजर कामानिमित्ताने कुठेतरी गेलेला असायचा. शेवटी आपल्या नशीबात नोकरीदेखील नाही असे समजून निराश झालो. मग साधारण १०-१५ दिवसांनंतर त्याच कंपनीला तातडीची गरज पडल्यावर ती मुलगी मला शोधत शोधत आली आणी कसेही करुन आज मुलाखतीला चल म्हणाली. तसेच दाढी न करता, शर्ट इन न करता मुलाखतीला गेलो पण कंपनीला फारच गरज असल्यामुळे तातडीने सिलेक्शन झाले. पगार होता १८०० रुपये. नोकरीचे फिक्स झाल्यावर सगळ्या देणेकर्‍यांना भेटलो. खरी खरी परिस्थीती सांगीतली आणि तुमचा एक पण रुपया बुडणार नाही पण सगळे पैसे एकदम पण देता येणार नाहीत हे स्पष्ट केले. सगळ्यांनी सहकार्य केले आणि ४ वर्षात सगळे देणेकरी मिटवले. दरम्यान घरच्यांनी मला जवळजवळ फुकटच पोसले. नंतर लग्न केले, एक मुल झाले. मासीक रु. १८०० वरुन सुरुवात करुन रु. ५०,०००० पर्यंत पोहोचलो पण नोकरीत मन रमत नव्हते म्हणून परत २०११ ला नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. बायकोला पहिलेच सांगून ठेवले की नोकरी सोडतोय. धंदा चालेल न चालेल पण मला तेच करायचयं. घरी देणेकरी येऊ शकतील तर त्यांना सहन करावे लागेल. सुदैवाने तिने होकार दिला, त्रास सहन केला. अजूनही मधून मधून अतिशय वाईट दिवस येतात (कारण एकदा पैसे गुंतविले की २-३ महिन्यांनीच पैसे येतात.) पण आता सवय झालीय. आता नवे देणेकरी आहेत पण त्रास नाहीये. सध्या बर चाललयं. मात्र या सर्व दिवसांत एक गोष्ट शिकलो. लहानथोर सगळ्यांशी नम्रपणे वागलो. कोणालाही कठोर बोललो नाही. ज्याच्याकडून पैसे घ्यायचे त्यालाही नाही आणि द्यायचे त्यालाही नाही. शेवटी माणसे जोडणे हेच कामाला येते. पैसा दरवेळी कामाला येतोच असे नाही. हे सगळे सांगण्यामागे स्वतःची लाल करणे हा हेतू नाही. ती ऑलरेडी बर्‍याच कारणांमुळे लाल झालेली आहे. :) पण धीर सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तोंड चुकवू नका. प्रामाणिकपणाची कदर करणारे या जगात अजून पुष्कळ आहेत. मी तुमचा एक रुपया बुडविणार नाही असे सांगत चला. जर कबूल केलेल्या वेळेस पैसे नाहि देता आले तर त्यांना प्रत्यक्ष भेटा, फोन करा आणि कल्पना द्या. १०० च्या ऐवजी १० रु. देता आले तरी ते द्या. दिस जातील, दिस येतील भोग सरलं, सुख येईल ! आत्महत्या आणी चोरीचा विचार करु नका. आपल्यामागे आपल्या कुटुंबाचे काय हाल होतील याचा विचार करा. अशा निर्णयाने आपण त्यातून कदाचित सुटून जाऊ पण आपल्या माणसांच्या नजरेतून कायमचे उतरु हे लक्षात ठेवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वैभव जाधव Fri, 09/19/2014 - 16:05
मुटके साहेबान्चा सांगणे अगदी परफेक्ट आहे. स्वता परिस्थितीतुन पार पडल्यामुळे त्यांच्या बोलण्याची खरी किंम्मत कळते. संदीपसाहेब बिल्कुल धीर सोडू नका. १००० माणसात एखादा आर्टिस्ट असतो. तुम्ही तर त्या कलेत एवढे शिकलेले अणि अनुभवि आहात. सगळे चांगले होईल बघा. त्यात इतक्या मिपाकरानि एवढा मनापासुन धिर दिलाय. त्यांचे सगळ्यांचे आभार माना. मिपाकर वेळेला धावून येतातच हे दिसले. जिओ मिपा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी Sat, 09/20/2014 - 00:48
असेच म्हणते. मुटके आणि इ.एक्काकाकांचेही प्रतिसाद अतिशय आवडले. चांगले आणि वाईट दोन्ही दिवस खरचं कायम रहात नाहीत. तुम्ही नक्की यातुन बाहेर पडाल.

आजानुकर्ण गुरुवार, 09/18/2014 - 23:10
आत्महत्येचा विचारही करु नका. तुमच्या बायकामुलांसाठी तेवढे धैर्य गोळा करुन ठेवा. आर्थिक अडचणींचा सामना केलेल्या सर्वांनाच पैशाचे सोंग आणता येत नाही याची जाणीव असते. पण खर्च कमी करुन टिकून राहण्याचे विविध मार्ग शोधा. गावी असताना बांधकाममजूर कम शेतमजूर असा माझा एक शेजारी तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जात होता. कर्जदार दर आठवड्याला त्याच्या घरी येत. आम्हाला आमच्या घरातही शिवीगाळ व भांडणे नेहमी ऐकू येत असत. दुर्दैवाने त्याच्यावर चोरी करण्याइतकी वाईट परिस्थिती आली होती. अगदी कमी शिक्षण आणि मर्यादित स्किलसेटमुळे त्याला इतर काहीही करणे अशक्य होते. एका दिवाळीत त्याने आमच्या घरातही चोरीचा यशस्वी प्रयत्न केला होता. आज त्याचा थोरला मुलगा टीसीएसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे, धाकटा मुलगा गावात स्वतःचे क्लासेस घेतो. दोन्ही मुलांची स्वतःची घरे आहेत. चांगले दिवस नक्की येतील या आशेवर हे दिवस निभावून न्या. प्रामाणिकपणाने नंतर कर्जदारांचे पैसे चुकवा.
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठीच नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
याच्याशी सहमत.

कवितानागेश गुरुवार, 09/18/2014 - 23:38
वर सगळ्यांनी लिहिलं आहे तसंच सांगते... बहुतेक सगळेच अशा परिस्थितीतून गेले आहेत. कर्ज फेडण्यासाठी आधी दर महिन्याचा खर्च ठरवून तेवढे बाजूला काढायचे. उरलेले, भले ते १००० ते १०००० कितीही असुदेत, आधी महत्त्वचे कर्ज फेडायला वापरायचे. आम्ही दोनेक वर्षे याच पद्धतीनी वागून पुष्कळ कर्ज उतरवलेलं होतं. हातात नेमकेच पैसे शिल्लक असले की आपोआपच खर्चावर नियंत्रण येतं. शिवाय शक्य असेल तर सोने वगरै विकून बरचसं कर्ज उतरवता येइल. मात्र अगदी सिनेमात दाखवलय तसं दादासाहेब फाळकेंसारखं घरातल्या चीजवस्तू, भांडी पण विका असा सल्ला निश्चित देणार नाही. त्याची गरजही पडणार नाही. आताच्या काळात नोकरी लागली की झालं असं होत नाही. आणि स्वतंत्र व्यवसायात तर क्लायंट्कडून पैसे मिळ्णं फार कठीण जातं..... त्याचा नियम असा की ५०% अ‍ॅड्वान्स घेतल्याशिवाय कामाला हात लावायचा नाही. (मग निदान २५-३० % तरी हातात येतात) सुरुवातीला कठीण जाईल. पण जे जेन्युअन कस्टमर्स असतील, तेच येतिल आणि तुम्हाला पैसे बुडण्याचं फ्रस्ट्रेशन येणार नाही.

चिगो Fri, 09/19/2014 - 00:52
सल्ला देण्यास मी अपात्र आहे. पण तरीही.. वर बर्‍याच जणांनी मनःपुर्वक आणि काहींनी अनुभवसिद्ध + मनःपुर्वक असे सल्ले दिलेयत, त्यांबद्दल विचार करा. आत्महत्या हा तर मार्ग असूच शकत नाही, कारण तुम्ही मार्ग बंद करण्याबद्दल / थांबण्याबद्दल विचार करताय. तेव्हा तो विचारही मनातून काढून टाका. चोरी करणे, हापण मार्ग अत्यंत अयोग्य आहे, कारण की तुम्ही कायद्यात तावडीत सापडाल. मला वाटतं की तुम्हाला मदत करणार्‍या बहुतांश लोकांचा तुमच्या चांगुलपणावर विश्वास असेल कींवा प्रयत्न केल्यास बसेलही. (काही लोक तुमच्या वाईट परीस्थितीमुळे जरा "जिटरी" झाले असतील. ते होणारच थोडंफार) पण जर तुम्ही गुन्हेगार ठरलात, तर तुमची सगळी गुडवील संपेल आणि ती परत कमावणं जवळपास अशक्य होईल.. आयुष्यात कधीच कुठलाच प्रॉब्लेम न होता यशस्वी होणारे खुप कमी लोक असतात. "ये भी दिन बदलेंगे" म्हणत जरा धीर धरा, कळ सोसा.. हाच कठीण काळ उद्या यशस्वी झाल्यावर तुमच्या अभिमानाची बाब असेल. आजचे धडपडीचे, संघर्षाचे दिवस तुमच्या आठवणींचा ठेवा होईल. फार नाही बोलत.. माझ्या आवडत्या ओळी आहेत, सुरेश भटांच्या.. त्या सांगतो. "आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही !!" वाटलं, तर व्यनि करा. काळजी घ्या..

मुक्त विहारि Fri, 09/19/2014 - 03:07
तरी पण इतकेच सांगू शकतो की, आत्महत्या करायचा विचार पण मनांत आणू नका. दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सूख येईल. माझे सल्ले. १. भरपूर वाचन करा. २. सवंगडी जोडा. हसा-खिदळा. ३. व्यायाम करा. ४. बायको-बरोबर मनसोक्त गप्पा मारा. ५. मुलांच्या बरोबर सिनेमा बघा. ६. बिंधास्त रहा.(मला कल्पना आहे, की ६व्वा सल्ला तुम्हाला आवडणार नाही, पण बिंधास्त रहा, म्हणजे तुम्ही कर्ज घेतले आहे.चोरी नाही केलेली किंवा फसवणूक पण केलेली नाही.धंद्यात खोट येणे हा गुन्हा नाही.ती एक शिकवण आहे,त्याचे तुम्ही पैसे मोजलेत, इतकाच फरक.पण ह्या तुमच्या शिक्षणाचा फायदा तुमच्या मुलांनाच होईल.) आणि ७. व्यसनांपासून दूर रहा. विशेषतः दारू पासून. लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल क्षमस्व. बादवे, पुण्यात रहात असाल तर आणि गुरुंवर विश्र्वास असेल तर, शंकर महाराजांच्या मठात जावून या.एक मानसिक समाधान मिळते. थोडी भर घालतो. तुमच्या पाशी काय आहे ते बघा आणि त्यातून काय उत्तम मार्ग काढता येईल ते बघा. आपल्या पेक्षा निर्लज्ज माणसे पण ह्या जगांत आहेत.आपण मध्यमवर्गीय आणि पापभीरू माणसे असल्याने, कर्जामुळे घाबरतो.

स्पंदना Fri, 09/19/2014 - 06:27
मन मोकळ करण्याकरिता मिपावर यावं इतक मिपा आश्वस्त वाटलं हे खरच वाखाणण्याजोगं आहे. अन मिपाकर तुमच्या या विश्वासाला जागले देखील. वरील प्रतिसाद वाचुन जाणवले असेलच तुम्हाला की तुम्ही एकटेच नाही आहात अश्या परिस्थीतीतुन जाणारे. अन मदतीचे हात देखील आले आहेत समोर. अर्थात मदत घेताना ती तुम्हाला दुबळी वा पंगु बनवणार नाही हे सुद्धा पहा. स्वबळावर उभे करायला जे हात समोर येतील ते कणखर असतील. तुम्ही उल्लेख केला आहे म्हणुन विचारते काय कॉम्प्लिकेशन्स झाली होती बाळाच्या जन्माला? आता सगळ ठिक आहे ना? तुमची स्वतःची मनस्थीती इतकी ढासळलेली तर तुमच्या पत्निला ज्या दिव्यातुन शारिरीक्दृष्ट्या सुद्धा जावं लागल असेल त्यांची काय अवस्था असेल? तुम्हाला धिर हवाय ना? पहिला तिला धिर द्या. दोघे ,मिळुन खंबीर व्हा. पुढे हे वळण संपल कीया वेळी आपण दोघे एकत्र उभे राहिलो याचा अभिमान अन सार्थकता वाटेल. जाणार आहेत हे ही दिवस.

मिपाकरांचे इतके उत्तम प्रतिसाद आले आहेत की आता काही सांगण्यासारखे नाही.खंबीरपणे परिस्थितीचा मुकाबला करा दिवस निघून जातील,आपल्याकडे स्किल आहे यशस्वीच व्हाल. शुभेच्छा. मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. जियो मिपाकर जियो. -दिलीप बिरुटे

आत्महत्त्या किंवा चोरी करणं हा पर्याय होऊ शकत नाही. आशावादी राहा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. १. सगळे अनावश्यक खर्च बंद करा. २. देणेकर्‍यांचे जसे पैसे देता येतील तसे देत चला. तुमची पैसे परत करायची ईच्छा आहे हे त्यांना दिसु देत. ३. व्य.नि. करतोय त्याला उत्तर नक्की द्या.

vikramaditya Fri, 09/19/2014 - 08:08
सगळेच मुद्दे कव्हर केले की मिपाकरांनी. ज्या उद्देशाने लेखकाने हा विषय मांडला त्याला न्याय मिळाला असे वाटते. वरील प्रतिसादांतील शब्दनशब्द लाख मोलाचा आहे. अनेक उत्तम विचार मांडले आहेत. शांतपणे ते वाचा. आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल. अरे हो, आणि अश्या प्रसंगात आपले कोण आणि परके कोण ह्याची पण ओळख होते नाही का? आपल्या पाठीशी उभे राहिलेल्यांना विसरु नका. इतरांना ह्या पुढे थोडे लांबच ठेवा. "राह पकड तु एक चला चल, पा जायेगा मधुशाला." (अर्थात मधुशाले पासुन दूर राहण्याचा सल्ला पण वर आलाच आहे.) शुभेच्छा.

नितिन थत्ते Fri, 09/19/2014 - 08:14
आणि हो.... नोकरी करणे शक्य असेल तर कराच. "छ्या.... नोकरी कसली करायची?" किंवा "नोकरी म्हणजे गुलामी" असल्या विचारांच्या आहारी जाऊ नका.

vikramaditya Fri, 09/19/2014 - 08:31
विषयांतर करुन एक निरिक्षण नोंदवतो. काही समाजांमध्ये (प्रत्यक्ष माहिती आहे), अश्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदती साठी समाजातील धनवान लोक पुढे येतात. प्रथम देणेक-यांना पेमेंट करुन टाकतात. त्यामुळे कर्जदार थोडा सेटल होतो. मग त्याला आपल्याच सर्कल मध्ये चार कामे मिळवुन देतात, आपली एखादी रिकामी जागा थोडा काळ वापरायला देतात. आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो. पुढे त्याने पैसे कमवले तर इतर अश्या अडचणीत सापडलेल्यांना (पण त्याच समाजातील) तोही मदत करतो. असे एक आर्थिक सेफ्टी नेट 'बरेचदा' त्यांना उपलब्ध असते. असो.

In reply to by vikramaditya

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 08:41
>>>>आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो. हे सगळ्यात महत्त्वाचे. पण आपल्याला अनुभव विपरित येतात. शिवाय पुन्हा त्याचा धंदा चालला पाहिजे. स्वतःची गुंतवणूक असताना जर एखादा नुकसान करून घेत असेल (जनरल बोलतो आहे. धागाकर्त्या बद्दल नाही) तर दुसर्‍याच्या पैशांची तो काळजी घेईलच असे नाही. असेही उदाहरण मी अगदी जवळून पाहिले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

vikramaditya Fri, 09/19/2014 - 09:01
समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो. नाती गोती फार जपली जातात. आर्थिक व्यवहारांवर बारकाइने लक्ष ठेवतात. दुस-याने पैसे फेडले म्हणुन मूळ कर्जदार उंडारायला मोकळा, हा प्रकार न होवु देता , ते त्याला "लाइनी'वर ठेवतात आणि आपले पैसे परत येतील ह्यासाठी लक्ष ठेवुन असतात. शेवटी बिसिनेस आणि पैसा त्यांच्या रक्तात आहे. मदत वगैरे ठीक आहे, पण पैसा त्यांचा देव आहे.

In reply to by vikramaditya

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 09:18
त्या समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो. मला वाटतं हे 'समाजसापेक्ष' नसून 'व्यक्तीसापेक्ष' असतं. मलाही धंद्यात नुकसान होऊन मित्रांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं. त्याकाळात बायको-मुलासह माझ्या कर्मचार्‍यांच्या सदनिकेतच एका खोलीत संसार करत होतो. पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद केलं होतं आणि ज्याच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्या सर्वांची पै आणि पै फेडून टाकली नंतर वेगळं घर घेऊन कुटुंबासह तिथे राहावयास गेलो.

In reply to by काळा पहाड

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 14:18
का बरं वाईट? दुसर्‍याच्या पैशात नाही करत. स्वतः दिवसाला १४ तास काम करून, स्वकमाईत, सर्व संसारीक जबाबदार्‍या पार पाडून करतो.

नाखु Fri, 09/19/2014 - 08:59
परिस्थीतीतून सुयोग्य मार्ग मिळण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. चाकरमानी ना.खु.

नाव आडनाव Fri, 09/19/2014 - 09:45
milton@sidefx.co.in mitoons@gmail.com jjsophi@gmail.com माझी एक सहकारी आहे जेसी. तिच्या नवर्‍याची पुण्यात एक कंपनी आहे. जर तुम्हाला नोकरी करायला हरकत नसेल तर या एमेल आय डी वर तुमचा रेझुमे पाठवा. तुमच्या स्कीलचं / त्यासारखं काम तिथे आहे. मी तिच्या बरोबर बोललो आहे आणि तिला सरं सांगितलं आहे. तिच्या कंपनीत नसेल आता ओपनिन्ग तर तिचा नवरा त्याच्या ओळखिच्या बाकिच्या लोकांना फोरवर्ड करू शकतो. आणि शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम साठि सुध्दा बघु शकतो. साहेब, मी बुजुर्ग नाहि. तुम्हि तुमच्या बद्दल लिहिलंय त्या वरून वाट्तय कि तुम्हि आणि मी थोड्याफार फरकाने एकाच वयाचे असु. मी दोन मुलिंचा बाप आहे. तुमचि मुलं रोज सन्ध्याकाळि तुमचि वाट बघत असतील. त्याना काय फरक पडतो तुमच्या कडे पैसा आहे कि नाहि. पण त्याना तुम्हि नसला तर मात्र मोठा फरक पडेल. तुमचा अनुभव बघता, तुम्हाला हे कर्ज फेडायला वर्स्ट केस मधे २-३ वर्षां पेक्षा जास्त लागणार नाहित. तुमच्या मुलांना (आणि तुमच्या घरी सगळ्यांना ) तुमचि गरज आहे. तुम्हि हा विचार केला नाहि असं नाहि. पण तो परत परत करा, म्हणजे दुसरं काहि डोक्यात येणार नाहि. जर शक्य असेल तर रेझुमे लगेच पाठवा.

In reply to by नाव आडनाव

arunjoshi123 Fri, 09/19/2014 - 11:13
थेट कामाचा सल्ला. तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यातले लोक नशीबवान असणार. (मला हाच अभिमान व्यनिंतून अशीच मदत करणारांचा देखिल आहे.)

In reply to by नाव आडनाव

आसुड Sat, 09/20/2014 - 15:33
वर नमुदलेल्या पैकी साईड एफएक्सला थोडी ओळख आहे जमल्यास व्यनि धाडा. काम करुनच देईल.

In reply to by उगा काहितरीच

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 10:13
आवो वर लिवलंय तर त्यान्नी.
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: मी एक B F A कमर्शिअल आर्टीस्ट असून १२ वर्षे कामाचा अनुभव आहे. क्रियेटीव डायरेक्टर म्हणून ग्राफिक आणि वेब मध्ये भरपूर काम केले आहे. २०११ पासून स्वत: फ़्रिलान्सर म्हणून काम सुरु केले. नंतर मुंबईहून नाशिक ला शिफ्ट झालो कारण आंतरजालीय संबंधामुळे तसा काही परिणाम होत नव्हता. माझे मुंबई, नाशिक, UK, दुबई ला बरेच ग्राहक आहेत.
उगा काहितरीच!

संदीप डांगे Fri, 09/19/2014 - 10:22
मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो. खरच काहीही ओळखपाळख नसताना अनपेक्षितपणे आपण सगळ्यांनी ज्या आपुलकीने सल्ले दिले, मदतीचा हात पुढे केला ते बघून डोळ्यात पाणी आले. तुमचे प्रयत्न वय जाऊ देणार नाही. अशी परिस्थिती पूर्वी कधी न आल्यामुळे खूपच वैतागलो होतो. कुणाशी बोलत पण येत नवते. पुढे काय करता येईल याबद्दल काहीच कळत नव्हते. आता काही गोष्टी मी ठरवल्या आहेत. माझ्यावर हि स्थिती का आली आणि आताची नक्की आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक परिस्थिती काय आहे, मिपावरच का मांडले ह्याबद्दल सविस्तर लिहिणारच अहे. सगळ्यांचे व्यक्तिश: धन्यवाद पण द्यायचे आहेत. आपण सर्वानी गंभीरपणे हा विषय हाताळला ह्याबद्दल मनापासून धन्यवाद.

In reply to by संदीप डांगे

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 10:24
काय निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात ह्याचे तपशिलवार विवेचन मिपावर दिल्यास भविष्यात इतरसद्सयांनाही फायदा होऊ शकेल. धन्यवाद.

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 Fri, 09/19/2014 - 11:26
मिपाकरांनी आपुलकिने सल्ले दिले हे कौतुकास्पद आहेच, पण आपण देखिल मिपाकरांशी आपले मनोगत शेअर केले हे कमी प्रांजळ नाही. तुमच्या अप्रोचमुळे या संस्थळाला एक नविन डायमेंशन मिळालं आहे. इथे असंही वातावरण आहे असं (एरवी बहुधा(केवळ तात्विक) वाद घालणार्‍या) सदस्यांना प्रथमच जाणवलं आहे.

In reply to by arunjoshi123

इनिगोय Fri, 09/19/2014 - 22:53
+१ लाखमोलाची मनं आहेत इथे. सरळ मनाने मागितलेल्या मदतीला असे इतके हात निरपेक्षपणे पुढे होतात, हा अनुभव मिपाकर नेहमीच देतात. या धाग्यावरचे प्रतिसाद पाहून खरंच मिपावरचं प्रेम द्विगुणित झालं. संदीप, ही श्रीमंतीही आहेच की तुमच्याकडे. लवकरात लवकर या स्थितीतून बाहेर पडून असाच आणखी कोणालातरी आधार देण्याइतके सक्षम व्हा.. ही सदिच्छा.

In reply to by संदीप डांगे

या बदललेल्या तुमच्या मनस्थितीने तुम्ही अर्धे काम फत्ते केले आहे ! नेट लावून धरा, उरलेले अर्धे नक्की पुरे कराल... आणि त्याने आलेला आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यभर साथ देईल !! यशस्वी होण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!

In reply to by टवाळ कार्टा

बबन ताम्बे Fri, 09/19/2014 - 11:35
माझा एक चुलत भाऊ पोटाची खळगी भरण्यासाठी २५ वर्षांपूर्वी एका ठिकाणी १०० रुपये पगारावर झेरॉक्स काढण्याचे काम करत होता. परिस्थितीशी प्रचंड झुंज घेत त्याने त्यावेळी M.Com.पुर्ण केले. आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. थोड्क्यात परीस्थिती माणसाला जिद्दी बनवते.

अजया Fri, 09/19/2014 - 10:51
सहमत.एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला हे सर्व प्रतिसाद वाचुन .अभिमान वाटला हे लिहायला मिळाल्याचा आनंदही. संदीपभाऊ,आगे बढो मिपा आपके साथ हैै।

अंतरा आनंद Fri, 09/19/2014 - 10:52
वर सगळ्यांनी अनुभवाचे सल्ले दिले आहेत. त्यात दोनच add करते. (१) दिवसाकाठी तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ तरी आवर्जून खेळा. त्यावेळी समस्यांचा विचार करू नका. (२) तुमच्याकडे कला आहे. वेळ असला तर आठवड्याकाठी थोडा वेळ मुलांना शिकवण्यासाठी द्या . हल्ली पालक मुलांनी कुठल्या ना कुठल्या कलेशी तोंडोळख तरी करून घ्यावी या विचारांचे असतात. तुम्हाला ठराविक उत्पन्न मिळेलच आणि मुलं ही stress buster असतात. त्यांच्यात सकारात्मक उर्जा असते. त्यामुळे समस्या सोडवण्याचा मार्ग सापडेल. आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल. हे ही. तुम्हाला तुमच्या सोनेरी भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा.

पैसा Fri, 09/19/2014 - 13:00
फुकटचे देण्यासाठी आमच्याकडे बरेच सल्ले असतात, पण अशा प्रसंगात अक्षरशः काट्याच्या टोकावर तोललेला बॅलन्स असताना सल्ला देणे सोपे काम नाही. सगळ्या मिपाकरांनी हे कठीण काम ज्या प्रकारे केलंय, आणि नुसते सल्ले देऊन थांबले नाहीत तर काम मिळवून देण्यासाठी मदतीचे हात पुढे झाले आहेत ते पाहून आज खरेच मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला! संदीपभाऊ, जास्त काही सांगणार नाही, मात्र जे आयुष्य आपल्या इच्छेने या जगात आलं नाही ते संपवायचा काही अधिकार आपल्याला नसतो. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच. मात्र तुमची लढाई तुम्हाला लढावी लागेल. कधी थकल्यासारखं वाटलं, तर जरूर इथे येऊन मन हलकं करा. मनापासून शुभेच्छा!

बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 13:00
सल्ला देण्यास प्रचंड अपात्र आहे, त्यामुळे फक्त हा धागा अन प्रतिसाद वाचला हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. आज मिपाकर असल्याचा प्रचंड अभिमान वाटला.

अहो साहेब वरिल सर्वांनी खुप चांगले अनुभवाचे मार्गदर्शन देणारे प्रतिसाद लिहले आहेत. आता एक वही घेवुन हे सगळे सल्ले एकत्र करा किंवा याची प्रिन्ट घ्या आणि मला आता काय करायचे आहे त्याची एक यादी करा. पण कोणत्या ही परिस्थित अजिबात आत्महत्येचा विचार करुच नका. सकारात्मक जगा. तुमच्या पिल्लांना पोरकं करुन तुम्ही जाणार? त्यात त्यांचा काय हो दोष? आता सर्व मि.पा. करांना विनंती:- कितीही झालं तरी वरिल मार्गदर्शन हे आभासी आहे. म्हणुन जमल्यास त्या साहेबांना प्रत्यक्ष भेटुन त्यांना आत्महत्या करण्याचावाचुन परावृत्त करणासाठी एक अचानक कट्टा त्यांना मुंबई / पुणे येथे कुठे जमत असेल तर करुया का? मला वाटते कि प्रत्यक्ष भेटीगाठीने त्यांना खुप फायदा होईल. संदिपभावु तुमच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
!होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 14:47
होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!
यात असलेला " गर्व" हा शब्द मराठीत वेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदा: गर्वाचे घर खाली......

माधुरी विनायक Fri, 09/19/2014 - 13:08
मिपा करांनी खूप मोलाचे सल्ले दिले आहेत. आपल्यातल्या बहुतेकांना कधी ना कधी अशा अनुभवातून जावंच लागतं. स्वत:वरचा विश्वास कायम ठेवा. आत्महत्या आणि चोरी या दोन्ही प्रकारांचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. बायको आणि मुलांबरोबरचा संवाद जपा. हे दिवस नक्की बदलतील. ईश्वर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप बळ देवो... सर्वच प्रतिक्रिया वाचल्यानंतर, मन मोकळं करण्यासाठी तुम्ही अगदी योग्य मार्ग चोखाळला आहे, हे जाणवलं आणि आवर्जून नमूद करावंसं वाटलं. शुभेच्छा!!!

पोटे Fri, 09/19/2014 - 14:09
फ्रीलान्सर काम घरी बसुनच होते ना? मग त्यासाठी नोकरी का सोडली ? आधी पटकन नोकरी बघा. मुंबई किंवा कुठेही

भावना कल्लोळ Fri, 09/19/2014 - 14:13
संदीप साहेब, समदुखी म्हणायला हरकत नाही, आता ज्या परिस्थितुन जात आहात त्या पेक्षा काही वेगळी नाही माझी परिस्थिती. तरी पण आत्महत्या करणे हा मार्ग नाही. एवढी मेहनत करून हि जेव्हा गणिताचे उत्तर वजाबाकी मध्ये येते तेव्हा मनात असे विचार येतातच. चिडचिड, नैराश्य आणि खूप काही. आयुष्याचे समीकरण खुप वेगळे होऊन जाते. एरवी ठीक पण एकटे असल्यावर हे समीकरण डोळ्यासमोर नाचत बसते अन मग असे विचार येतात. पण अश्या वेळी हे असले विचार न करता काय नक्की केले तर हा प्रोब्लेम सुटेल, आयुष्याची घडी नीट बसेल याचा आराखडा घेत रहावा. कित्येक वेळेला ठरवुन, हातपाय मारून हि नाही सुटत कोडे उलटे गुंता वाढतो अश्यावेळी शांत राहावे. वेळेवर सगळे सोडुन द्यावे. जे करून मनाला आनंद मिळेल ते करावे. व्यसनापासुन कटाक्षाने दुर राहा त्याने समस्या अजून वाढतील. कुटुंबांबरोबर जास्त वेळ घालवा. या घडीला फक्त एवढेच बोलू शकते बाकी तो शिवशंकर तुमच्या समस्या लवकर सोडवो हीच प्राथर्ना आणि कठीण प्रसंगी, द्विधा अवस्था मध्ये मिपा मध्ये मारलेल्या हाकेला मिपाकर तेवढ्याच आपुलकीने साद देतात हा अनुभव मी अनाहिता मध्ये घेतला आहे म्हणून तर एक दुसरे हक्काचे माहेरघर आहे हे आमचे.

आदिजोशी Fri, 09/19/2014 - 18:12
मुळात आज जरी तुझ्या कडे १ पैसाही नसला तरी शांतपणे विचार केलास तर ७-८ लाख ही काही फार मोठी रक्कम नव्हे. १. सगळ्यात पहिलं म्हणजे तुझ्या व्यवसायासाठी नाशीक हे कितपत योग्य ठिकाण आहे हे ठरव. २. मुंबई अथवा पुण्याला शिफ्ट हो, तिथे ह्या लाईनमधे नक्कीच जास्त संधी आहेत. ३. बहुसंख्य लोकांनी आधी सांगितल्या प्रमाणे लोकांना तू पैसे परत करणार आहेस ह्याची खात्री पटव. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ४. जसा ह्या लोकांनी तुझ्या कडे तगादा लावला आहे तसाच तू सुद्धा तुझे पैसे येणे असणार्‍यांकडे लाव. वाटल्यास एक पत्र आणि त्याची प्रत सगळ्यांना पाठव. कुणा कुणाला पाठवतो आहेस ते सुद्धा पत्रात नमूद कर. ढोबळ मायना: मी xxxxxx हे पत्र ह्यासाठी लिहित आहे की श्री xxxxxx, श्री xxxxxx ह्यांना मी xxxxxx रुपये देणं लागतो. सद्ध्याच्या घडीला मला श्री xxxxxx आणि श्री xxxxxx ह्यांच्याकडून xxxxxx रुपये येणं आहे. माझे पैसे ह्या लोकांनी वेळेवर न दिल्याने मला देणेकर्‍यांना पैसे देणं कठीण जात आहे, वगैरे वगैरे सदर पत्राची पत एखाद्या सन्माननीय व्यक्तीलाही पाठव.

चतुरंग Fri, 09/19/2014 - 20:12
तुमच्यावर आलेली परिस्थिती नक्कीच कठिण आहे परंतु अशक्यप्राय नाही याची खात्री बाळगा. बर्‍याचवेळा आपण धंदा सुरु केला की आता नोकरीत पुन्हा कसे जायचे या विचाराने कमीपणा वाटू शकतो तसे काही वाटत असल्यास आधी ते बाजूला ठेवा. घर चालण्यापुरता पैसा दरमहा यायलाच हवा हे नक्की, तो कसा येतो धंद्यातून का नोकरीतून हे गौण आहे. कॉमेंट्स करणारे 'मित्र', नातेवाईक यांना कटाक्षाने दुर्लक्षित ठेवा, दूर ठेवा. ते फक्त कॉमेंट्स करणार असतात घर तुम्हाला चालवायचं असतं! चार वर्षाच्या मुलाला जवळ बसवून समजावून सांगा की सध्या परिस्थिती अवघड आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मिळून यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले प्रचंड हुषार आणि समजूतदार असतात, त्यालाही आयुष्यभरासाठी शिकायला मिळेल की आपण आई-बाबांबरोबर अवघड स्थितीतून कसा मार्ग काढला. तो तुम्हाला त्याच्यापरीने कशी साथ देतो ते बघण्यासारखे असेल याचा विश्वास बाळगा! थोडा स्वानुभव - काही काळ असा होता की खिशात फक्त ५०० रुपये आहेत संपूर्ण महिना रेटायचा आहे. त्यातच लग्न, मुंजी, बारशी असले आहेर, किराणा, भाज्या, दूध, फोनची बिले, विजेची बिले, धंद्यासाठी लागणारे भांडवल कसं आणि किती बसवायचं. काय टाळायचं, काय नाही? पत्नीने अशक्य साथ दिली. माझ्या जिवाभावाच्या मित्रानेही मला कामं देऊन मोलाची मदत केली. पुण्यात मी रोज २५-२५ किलोमीटर सायकलवर हिंडून कंसल्टिंगची कामं केलीत. धंदाच करत होतो. परंतु अपेक्षेप्रमाणे यश येत नव्हते. शेवटी मोठी नोकरी मिळवण्यासाठी एक कोर्स करत होतो. अतिताणामुळे भयंकर आजारी पडलो. कोर्सला स्वतः वाहनावरुन जाणे शक्य नव्हते. पत्नी रोज तिच्या चुलत बहिणीच्या लूनावरुन घेऊन जाई आणि परत घेऊन येई. तशाच आजारी अवस्थेत कोर्स पूर्ण केला, आमची टीम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली! अर्धग्लानी अवस्थेत तो प्रवास मी रोज कसा करायचो हे मला आज आठवत नाही! अतिशय जवळच्या डॉक्टरकाकांकडून उपचार घेतले कारण खर्चाला पैसेच नव्हते. पण जिद्द सोडली नाही. वेळ निभावली. शक्यतो फार कर्जे होऊ दिली नाहीत. नोकरी लागताच देणी फेडून टाकली. परिस्थितीने खूप काही शिकवले, खरेखरे आपले, परके समजले! पत्नी आणि मी मनाने फार जवळ आलो. आज सगळे व्यवस्थित आहे. कोणत्याही परिस्थितीत यश डोक्यात जात नाही कारण कठिण दिवस कसे असतात ते अनुभवले आहे. मिपाकरांनी वरती तुम्हाला मोलाची मदत देऊ केलीच आहे त्यामुळे आणखी लिहीत नाही. तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा! :) चतुरंग

दशानन Fri, 09/19/2014 - 20:39
भरपूर मित्रांनी आधीच सल्ले दिले आहेत. अश्या परिस्थितीतून मी स्वतः गेलो आहे, अनेक मिपाकरांनी मला वेळोवेळी आर्थिक - मानसिक मदत केली आहे, त्याची अजून मी परतफेड करतो आहे ही गोष्ट वेगळी पण खचू नका.. धीर सोडू नका! प्रत्येक दिवस तसाच राहत नाही. आम्ही नवरा-बायको दोघे दिवसभर जवळ पास १५-१६ तास सतत काम करत आहोत, मिळेल ते काम घेणे, पुस्तक विक्रीची जाहिरात करणे, डिटीपी पासून कव्हर डीझाईन पर्यत सर्व कामे आम्ही स्वत: करत आहोत. तुम्ही सुध्दा प्रयत्न सोडू नका, धीर धरा फक्त व घरी तुमची पत्नी काही व्यवसाय करु शकते का याचा देखील विचार करा. सध्या तरी हाच मार्ग योग्य आहे.

अनन्या वर्तक Fri, 09/19/2014 - 20:51
मी सल्ला नाही देवू शकत. पण तरीही.. काल सहज मिसळपाव वाचत होते तेव्हा तुमचा धागा वाचनात आला. काल पर्यंत अवघे दहा बारा प्रतिसाद असणारया ह्या धाग्यावर आज एक उत्सुकता म्हणून पुन्हा पहिला तुमचा धागा आणि पहिले तर खूप चांगले प्रतिसाद दिले आहेत सगळ्यांनी मिळून. प्रत्येक प्रतिसाद अगदी नीट वाचवा आणि मनात साठवून ठेवावा असा आहे. सगळ्यांनी कित्ती मनापासून आणि योग्य सल्ला दिला आहे. इस्पीकचा एक्का ह्यांचा प्रतिसाद आणि त्यांचे शेवटचे वाक्य (बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) हे जास्त महत्वाचे आहे. arunjoshi123 ह्यांचा प्रतिसाद सुद्धा खूप वास्तववादी आहे. मला सुद्धा वाटत होते Financial & Managerial Accounting च्या knowledge चा उपयोग करून तुम्हाला प्रतिसाद द्यावा पण arunjoshi123 ह्यांनी अगदी सोप्प्या आणि सरळ शब्दात खूप चांगले मार्गदर्शन केले आहे जे मला जमले नसते. मला वाटते मिसळपाव इथे एका सायकॅट्रीस्ट ची भूमिका पार पडते आहे. फरक इतकाच आहे हे सगळे virtual communication आहे पण सगळ्यांच्या भावना आणि विचार एकदम प्रामाणिक आहेत. इथे येणारा प्रत्येक जन तुमची मदत करू पाहत आहे. कुणी तुम्हाला इतरांना मदत करुन मानसिक समाधान मिळविण्याचा मार्ग दाखवत आहे, कुणी तुम्हाला नोकरी मिळविण्यासाठी मदत करू पाहतो आहे, तर कित्तेक जणांनी स्वतःचे त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांचे अनुभव तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा अगदी मनापासून यत्न केला आहे. प्रभाकर पेठकर, धर्मराजमुटके, श्रीरंग_जोशी, बाबा पाटील, विजुभाऊ, लीमाउजेट, अविनाशकुलकर्णी, विलासराव, प्यारे१, आजानुकर्ण, मुक्त विहारि, नाव आडनाव, चतुरंग....... कित्ती नावे घ्यावी आदराने. कित्तीतरी महत्वाचा, अनुभवाचा, विश्वासाचा सल्ला देणारे मिपाकर. आज मिसळपावची सदस्या असल्याबद्दल मनपासून आनंद झाला. दुसर्यांच्या अनुभवावरून आपण सुद्धा काही चांगले शिकता आले तर शिकावे ह्याचे अतिशय चांगले उदाहरण आहे हा धागा. संदीप तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतून खूप मेहनतीने आणि आत्मविश्वासाने बाहेर याल (जो विश्वास मिसळपाव वर तुम्हाला सल्ला देणार्या प्रत्येकालाच वाटतो आहे) तेव्हा तुमच्या सारख्या कठीण परिस्थितीत असलेल्यांना मिपाकारासारखे मार्गदशन करायला आणि तुमचे यशःस्वी आयुष्याचे अनुभव मिसळपाववर सांगायला विसरू नका. तुमच्या पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेछा.

धर्मराजमुटके Fri, 09/19/2014 - 21:19
धाग्यावर अवांतर होईल पण सांगण्याचा मोह आवरत नाही. पडत्या काळात मला दोन वाक्यांनी प्रेरणा दिली. ही वाक्ये माझ्या अडचणींच्या दिवसात वारंवार म्हणत असे. १. कोणीही विचारले की अरे बाबा एवढे कर्ज झाले, आता नोकरी करतोयस. परत धंदा करु नकोस. तेव्हा मी दत्ताजी शिंदेंचे पानीपतावरील वाक्य त्यांना सांगत असे " बचेंगे तो और भी लडेंगे !" २. जेव्हा जवळचा मित्र / देणेकरी पैसे देणे मागायचा तेव्हा मी त्याला नेहमी म्हणायचो, "काय राव पैसे पैसे करता ? मी कुणाचे बुडविलेत तेव्हा तुमचे देणारय ?" वरील वाक्यांनी मला लढायची आणि कठीण प्रसंग हसत हसत झेलायची प्रेरणा दिली.

In reply to by धर्मराजमुटके

दशानन Fri, 09/19/2014 - 21:38
व्यवसाय करु नको, नोकरी कर! असे म्हणाले कोणी मला तर त्या व्यक्तीची मला किव येते! " बचेंगे तो और भी लडेंगे !" यातील जिद्द समजून घेण्यासाठी तेवढेच कष्ट उपसावे लागतात :)

संदिपजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धीर सोडू नका, परिस्थिती नक्की बदलेल व चांगले दिवस लवकरच येतील. सर्व मिपाकरांचे प्रतिसाद व अश्या कठिण वेळी मिपाकरांनी दिलेला मदतीचा / मैत्रीचा हात बघून मिपाकर म्हणून खूप अभिमान वाटत आहे.

दशानन Fri, 09/19/2014 - 23:01
आत्मघात खूप त्रासदायक प्रकार असतो, आपल्याला वाटतं तेवढे सोपं काम हे नक्की नाही आहे. आणि चुकून जगला-वाचला, नशिबाने पोलीस केस इत्यादी झाली नाही तरी... मानसिक त्रास जो होतो त्यानंतर.. तो पाहता ८-९ लाख कर्जाचा आकडा फार मोठा नाही आहे. *माझा आयडी दशानन का? असे मध्यंतरी कोणीतरी विचारले होते.. त्याचे उत्तर आज हा धागा समोर आला आहे म्हणून देतो आहे. मी जवळपास मृत्यूचे दार १० वेळापेक्षा जास्तवेळा ठोठावले आहे.. यातील तीन अपघात होते व बाकीचे माझे त्या क्षणी परिस्थितीजन्य अवस्थेमुळे घेतलेले निर्णय! म्हणून नाव दशानन. यातील २ घटना येथे मिपावर मी खूप आधी लिहिल्या आहेतच. माझ्या जुन्या मिपा मित्रांना ते माहिती देखील आहे. त्यामुळे स्व: अनुभव म्हणून सांगतो, प्रयत्न करत रहा, आपल्यात फरक एवढाच आहे, कि तुम्ही त्या तीरावर आहात व मी दुसऱ्या तीरावर पोचण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आहे. तेथेच अडकून राहायचे की प्रयत्न करायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय. (अनुभवी)

अर्धवटराव Sat, 09/20/2014 - 03:50
एकदा आपलं म्हटलं कि हा मिपा दोस्त अगदी जय-विरु ला पण मागे टाकतो :) भाऊ... इतकं उत्तम दिमाग कि बात दिल से केली आहे मिपा ने.. आणखी काय सांगावं... पण एक सांगतो. अगदी तुमच्या सारखी नाहि पण टोकाची आर्थीक तंगी, प्रेमभंग, कौटुंबीक आणि इतर समस्यांनी अतिप्रचंड हैराण झालेली मंडळी आयुष्यात आलि माझ्या (तशी सर्वांच्याच येतात) मी सुद्धा इतरांप्रमाणे अत्यंत बिकट पर्सिस्थितीतुन गेलो आहे बरेचदा, त्यामुळे तुमची मनस्थिती समजु शकतो. अशा सगळ्या प्रसंगी प्रत्येकाने आपापला मार्ग काढलाच. पण एक गोष्ट कॉमन होती सर्वांच्यात. शेवटी अशी परिस्थिती मनात का उद्भवते? तर मनाची उमेद, इच्छाशक्ती कुंठीत होते म्हणुन. पण आपल्या सर्वांकडे एक एखादी अशी गोष्ट असते कि ज्यामुळे काहि काळापुरतं तरी मन निवळतं. माझ्या पहाण्यातल्या प्रत्येक समदु:खी व्यक्तीने हा उपाय जाणते-अजाणतेपणी अवष्य केला होता. एक देवदास मित्र पार म्हणजे पारच कोलमडला होता. पण त्याला मासळीचं जेवण आणि त्यानंतर दोन सिग्रेट असा खुराक घ्यायचा भयंकर शौक होता. इतर वेळी ते बेणं पार हताश दिसायचं, पण मासळी चेपताना हळुहळु नॉर्मल व्हायचं आणि त्यानंतर सिग्रेट पिताना एकदम फ्रेश-कॉन्फीडंट वाटायचं. या एका धाग्यावरुन त्याने स्वतःला सावरलं. नियमाने मासळी जेवण आणि सिग्रेट घेत राहिला व त्यानंतरचे काहि मिनीट आयुष्याचा सिरीयसली प्रॅक्टीकल विचार करायला लागला. शेवटी तो त्यातनं बाहेर आलाच. वारंवार इंजीनीयरींगमधे गचके खाणार्‍या दोन मित्रांना अनुक्रमे गोविंदाचे पडिक सिनीमे आणि बॅचलर लाईफमधे फुकट उपलब्ध अशा शरीर-सुखाच्या ऑप्शनने साथ दिली व त्यांना कमालीच्या नैराश्यातुन वाचवलं. असे बरेच अनुभव आहेत. थोडक्यात काय, तर तुम्हाला समस्या सोडवायला जी मनाची निवांत अवस्था हवी आहे ति तुमच्याच एखाद्या सवयीने म्हणा आवडीने म्हणा तुम्हाला मिळवता येईल. ति सवय प्रयत्नपुर्वक नियमाने अमलात आणा. काहि काळानंतर तुमचं शरीर पाण्याबाहेर आलं नाहि तरी तुमचं नाक-तोंड नक्की येईल व तुम्हालाच तुमचा मार्ग दिसेल. मिपा आहेच सोबतीला :)

तुषार काळभोर Sat, 09/20/2014 - 08:33
इथे कदाचित अनावधानाने राहून गेलेला एक मुद्दा.. Pleeeeaaase!!!! एक कुटुंबाचा आरोग्यविमा व एक तुमचा आयुर्विमा लगेच काढा. मुलाच्या आजारपणात झालेल्या खर्चाने आर्थिक परिस्थिती आणखी नाजूक झाली, असं तुम्ही लिहिलंय. शक्यता कितीही कमी असली, तरी मोठे आजारपण व अकाली मृत्यूमुळे एखाद्या घराचा आर्थिक डोलारा डगमगु शकतो. त्यामुळे कदाचित आताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये १०-१५ हजाराचे २ विमे खूप जास्त वा चैनीचे वा अनावश्यक वाटू शकतात. किंवा कदाचित आता तुम्हाला ते शक्यही होणार नाही. पण as soon as possible, थोडा मोकळा श्वास घेता आला की लगेच विमा काढा. (@संपादकः हा प्रतिसाद अवांतर/अनावश्यक असल्यास कृपया काढून टाकावा)

सुबोध खरे Sat, 09/20/2014 - 10:46
डांगे साहेब, मिपावरील लोकांचे एक एक अनुभव वाचून आला आश्चर्य वाटते आहे. लोक किती गंभीर प्रसंगातून जात असतात. त्यांच्या मानाने माझे आयुष्य फार सुखात आणि सुरळीत गेले असे वाटते. त्यामुळे आपल्याला सल्ला द्यायचा मला कोणताही अधिकार नाही. परंतु एक नौदलातील वैद्यकीय अधिकारी म्हणून मी काही आत्महत्येच्या प्रकरणा मध्ये चौकशी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. आत्महत्या करणारा माणूस सुटून जातो पण मागे राहणाऱ्या कुटुंबाची अक्षरशः वाताहत होते. त्यांना आयुर्विम्याचे पैसे मिळत नाहीत.( नैराश्यातून केलेली आत्महत्या हा मानसिक रोग आहे म्हणून त्या रुग्णाच्या कुटुंबाला सर्व फायदे, विमा, इ इ मिळावेत म्हणून मी केलेले सर्व प्रयत्न सरकार दरबारी निष्फळ ठरले आहेत). जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते. बाकी बर्याच लोकांनी स्वानुभवाने बरेच काही लिहिले आहे. त्या ताज महालाला माझी वीट लावण्यात काहीच अर्थ नाही.अशा लढाऊ लोकांना साष्टांग प्रणाम. आणि त्यांच्या अशा लढ्यातून स्फूर्ती घेऊन आपणही अशा कठीण परिस्थितीतून लवकरच बाहेर पडाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

In reply to by सुबोध खरे

विलासराव Sat, 09/20/2014 - 11:12
जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते. बरीचशी भरलीत, काही अजुनही भरतोय. बाकी जाता जाता अजुन एकः मी या परिस्थितीतुन पार झाल्यावर मला तशाच परिस्थीतीतुन जाणार्याची भलतीच कणव यायला लागली. मग मी जमेल तशी मदतही करायला लागलो. बरेचसे लोक बरेच बरे निघाले. पण माझ्या अगदी जवळच्या काही लोकांनी धुर्तपणे माझ्याकडुन पैसे घेतले आनी मला कायमची शेंडी लावली. परीणाम आणखी दोनेक लाखाला चुना लागला. दान्/मदत सत्पात्री करावं ते यासाठीच!!!!!!!!!

मदनबाण Sat, 09/20/2014 - 11:12
suicide is not a choice... रणांगणातुन पळायचे की लढायचे हे सर्वस्वी आपल्या हाती असते... लढणार्‍यांना विजय देखील प्राप्त करता येतो, पळणार्‍यांना ? Be Brave !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }

आयुर्हित Sat, 09/20/2014 - 12:33
आपल्या आयुष्यावरच्या या मोठ्ठ्या वळणावर मिपावर आपले मन मो़कळे केल्याबद्दल धन्यवाद. याचाच अर्थ आपल्याला समस्येचे पूर्ण समाधान हवे आहे. व यावरुनच आपला जगण्याचा व त्यासाठी संघर्ष करण्याचाच विचार प्रकट झाला आहे. बर्‍याच वेळेला मनुष्याची गत "कस्तुरीमॄगा"सारखीच झालेली असते. आपल्या आत असणारे सद्गुण हे आपल्याला कधिच दिसत नाही. ते जाणण्यासाठी एक जोहरी किंवा सद्गुरु भेटावाच लागतो. तद्नंतरच आपले कल्याण होत असते. असो! कठीण प्रसंग कोणाच्या आयुष्यात आला नाही? प्रभुरामांना देखिल १४ वर्षे वनवास भोगावा लागला होताच की! भगवान कृष्णावर ही न केलेल्या चोरिचा आळ आला होता. सोन्याला सुद्दा आपले शुध्दत्व प्रमाणित करण्यासाठी आगीतुन जावेच लागते. तशीच आता ही सुध्दा आपली सत्वपरिक्षा आहे असे समजुन प्रत्येक पाऊल समजून उमजुन व जपूनच उचलाल अशी अपेक्षा आहे. भगवान श्रीकॄष्णाने गीतेत सांगितले आहेच अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनां पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ स्थूल रूपात याचा अर्थ आहे- ‘माझ्या भक्तांची सर्व प्रकारची काळजी मी घेतो. त्यांच्या सर्व गरजा-अपेक्षा मी स्वतः वाहून नेतो. त्यांच्या सर्व चिंतांची जबाबदारी मी आपल्या खांद्यांवर घेतो’. किंवा साध्या मराठीत श्री स्वामी समर्थ सांगतात "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे!" तेव्हा देवावर व देवाने दाखविलेल्या मार्गावर म्हणजेच "आपल्या स्वतःच्या कर्मयोगावर" श्रद्धा ठेवावी, हि विनंती. इतर कोणतेही प्रश्न असतील तर बिनधास्त व्यनी करावा. आम्ही सदैव आपली मदतच करू.

लव उ Sat, 09/20/2014 - 16:06
काहीही विचार करताना जरा बायको (बाळंतीण) आणी २ सोनुल्यांना आठवा. बाकि व्य. नि. केलाय. काळजी घ्या. तुमची आणि कुटुंबाचिही.

सखी Sun, 09/21/2014 - 08:51
ही कविता काल प्रतिसाद देताना सापडत नव्हती तुम्हाला किंवा कोणीही निराश झालेल्या व्यक्तीला बळ देण्यासाठी इथे देत आहे. (मला आणि परिचितांना याचा खूप उपयोग झाला.) मुठभर हृदया पांढरे निशाण उभारण्याची घाई करू नकोस, मुठभर हृदया, प्रयत्न कर, तगण्याचा, तरण्याचा, अवकाश भोवंडून टाकणार्‍या, या प्रलयंकारी वादळाचाही, एक अंत आहे. काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत लढत रहा, तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी. वादळे यासाठीच वापरायची असतात आपण काय आहोत हे तपासण्यासाठी नव्हे, आपण काय होऊ शकतो, हे आजमावण्यासाठी.. - पद्मा गोळे

पियू परी Mon, 09/22/2014 - 14:18
तुम्ही सुद्धा घेणेकरी आहात हे विसरु नका. :शक्य त्या सर्व प्रकारे तुम्हीही ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे येणे आहे त्यांच्यामागे तगादा लावा. :कागदोपत्री व्यवहार झाला असल्यास कायद्याचा बडगा दाखवा. :स्वस्तात एखादा वकील मिळाला तर नोटिस वै. पाठवा. :पोलिस कंप्लेंट करायची धमकी द्या. :शक्यतो हा तगादा लिखित स्वरुपात करा. इमेल सुद्धा लिखित पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. :क्लाएंट्सना मेल पाठवतांना रिमाइंडर १, रिमाइंडर २ असं लिहित चला म्हणजे त्यांनाही गांभिर्य येईल. :एखाद्या कंपनीत अकाउंट्स डिपार्टमेंट दाद देत नसेल तर त्यांच्या वरिष्ठांना किंवा वेळ पडल्यास डायरेक्टर्स ना भेटून तुमची परीस्थिती विषद करा. आणि पेमेंट लवकर देण्याची विनंती करा. :जे जे क्लाएंट कामाचे पैसे देत नाहीत त्यांची काही ओरिजनल कागदपत्रे/ कामांच्या सॉफ्ट कॉपीज इ. जे काही तुमच्याकडे आहे ते पैसे मिळाल्याशिवाय परत देऊ नका. अगदी सॉफ्ट कॉपी सुद्धा नाही. :तशीच वेळ आली तर क्लाएंट्साठी केलेले काम (डिझाईन/ लोगो वै.) दुसर्‍या कोणाला विकुन टाकायची धमकी द्या. : एखाद्या नालायक माणसाने पैसे न दिल्यास "तुझे नाव लिहुन आत्महत्या करीन" अशी धमकी द्या. यापुढे जे काम घ्याल त्यात सगळे व्यवहार कागदोपत्री तर कराच पण निदान ५०-७५% आधी घ्या. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. तुमचे पैसे अडकवुन/ हडपुन/ न देऊन लोकांनी तंगड्या पसरून आयुष्य एंजॉय करायचे आणि तुम्ही बायको आणि बाळाला वार्‍यावर सोडून जीव द्यायचा हा कोणता न्याय?

In reply to by पियू परी

माहितगार Mon, 09/22/2014 - 14:58
एखाद्या नालायक माणसाने पैसे न दिल्यास "तुझे नाव लिहुन आत्महत्या करीन" अशी धमकी द्या.
आपले पैसे मिळवण्याची टेक्निक म्हणून या सल्ल्याच्या सुयोग्यते बद्दल साशंक आहे. मला वाटते टाळलेले बरे. पैसे अगदी दोन तीन वर्षापेक्षा अधिक थकले आणि बाकी सर्व मार्ग संपले तर वकिला मार्फत नोटीस काही वेळा चांगले काम करून जाते. पैसे मागण्याच्या टेक्निक्स बद्दल स्वडीने कधीतरी सविस्तर लेख लिहावा असा जुना मानस आहे.
मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत. नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच. आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही.

तंत्रदर्शन-३

शरद ·

बॅटमॅन गुरुवार, 09/18/2014 - 18:22
मस्त लेख. कम्युनिस्ट लोकांना ओढूनताणून विशिष्ट मांडणी करायची असते, त्यासाठी ते कुठल्याही थराला जातात. त्याचा पर्दाफाष आवडला.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/18/2014 - 21:00
कम्युनिस्ट लोकांना ओढूनताणून विशिष्ट मांडणी करायची असते, त्यासाठी ते कुठल्याही थराला जातात.
हे शतप्रतिशत सत्य आहे ! बाकी लेख आवडला ... तंत्र हे लोकायता पेक्षा वैदिकांनाच जास्त जवळचे आपलेसे आहे हे पाहुन आनंद वाटला )

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 21:56
तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित आहे.
पहिले दोन भाग कमकुवत होते. हां भाग कुतुहल शांत होण्याइतपत रेफ़रन्स देत असल्याने वाचनीय झाला आहे.

पैठणकर गुरुवार, 09/18/2014 - 22:47
पाश्चात्य पाणपोईचे पाणी पिऊन तयार झालेल्या तथाकथीत विद्वानांची पुस्तके वाचुन आपण आपल्या विचारांना साशंकीत करण्या पेक्षा त्यांना तीन हात दुरुन नमस्कार केलेले बरे. आपण जर ह्या जन्मात आपले वैदिक वाङ्ग्मय वाचायला घेतलीत ती मरे पर्यंत संपणार नाहीत, पुर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, भामती, खण्डनखण्डखाद्यम् इत्यादी. थोडक्यात तो चुकीचा आहे हे ठरवण्यात वेळ घालवण्या ऐवजी तो वेळ ज्ञानार्जनात उपयोगी आणावा असे माझे वैयक्तीक मत आहे.

कवितानागेश Fri, 09/19/2014 - 00:45
वाचतेय... पण जर उपनिषदे वेदाला "फुटकी नौका " म्हणत असतील > हे नवीनच आहे. असं कोण म्हणतं?

In reply to by कवितानागेश

शरद Sat, 09/20/2014 - 20:27
प्लवा हये ते अदृढायज्ञरुपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म ! एतच्छ्रेयो ये भिनन्दन्ति मुढा जरामृत्यु ते पुनरेवापि यान्ति !! मुण्डक उपनिषद अठरा प्रकारची साधने असलेले (सोळा ऋत्विज,यजमान व यजमान पत्नी ही अठरा साधने आहेत) यज्ञकर्म हे फुटक्या (चंचल) नौकेसारखे अस्थिर व नाशवंत आहे. असे हे यज्ञकर्म श्रेयस्कर मानणारा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात सापडतो. यज्ञ, त्यामुळे मिळणारा स्वर्ग ह्या कल्पना त्या वेळच्या विचारवंतांना पटत नव्हत्या. त्यातूनच उपनिषदे जन्माला आली. इतरांनी वरील इतक्या शब्दात वेदांचा निषेध केला नसला तरी उपनिषदांचा मार्ग वेगळा. खरे म्हणजे यावर एक निराळाच लेख लिहला पाहिजे, पण इथे फार लोकांना वाचनीय होणार नाही हे खरेच शरद

पोटे Sat, 09/20/2014 - 17:51
त्रयो वेदश्च कर्तारो धूर्त भंड निशाचरो. तीन वेदांचे कर्ते घूर्त लबाड व चोर होते

बॅटमॅन गुरुवार, 09/18/2014 - 18:22
मस्त लेख. कम्युनिस्ट लोकांना ओढूनताणून विशिष्ट मांडणी करायची असते, त्यासाठी ते कुठल्याही थराला जातात. त्याचा पर्दाफाष आवडला.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/18/2014 - 21:00
कम्युनिस्ट लोकांना ओढूनताणून विशिष्ट मांडणी करायची असते, त्यासाठी ते कुठल्याही थराला जातात.
हे शतप्रतिशत सत्य आहे ! बाकी लेख आवडला ... तंत्र हे लोकायता पेक्षा वैदिकांनाच जास्त जवळचे आपलेसे आहे हे पाहुन आनंद वाटला )

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 21:56
तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित आहे.
पहिले दोन भाग कमकुवत होते. हां भाग कुतुहल शांत होण्याइतपत रेफ़रन्स देत असल्याने वाचनीय झाला आहे.

पैठणकर गुरुवार, 09/18/2014 - 22:47
पाश्चात्य पाणपोईचे पाणी पिऊन तयार झालेल्या तथाकथीत विद्वानांची पुस्तके वाचुन आपण आपल्या विचारांना साशंकीत करण्या पेक्षा त्यांना तीन हात दुरुन नमस्कार केलेले बरे. आपण जर ह्या जन्मात आपले वैदिक वाङ्ग्मय वाचायला घेतलीत ती मरे पर्यंत संपणार नाहीत, पुर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, भामती, खण्डनखण्डखाद्यम् इत्यादी. थोडक्यात तो चुकीचा आहे हे ठरवण्यात वेळ घालवण्या ऐवजी तो वेळ ज्ञानार्जनात उपयोगी आणावा असे माझे वैयक्तीक मत आहे.

कवितानागेश Fri, 09/19/2014 - 00:45
वाचतेय... पण जर उपनिषदे वेदाला "फुटकी नौका " म्हणत असतील > हे नवीनच आहे. असं कोण म्हणतं?

In reply to by कवितानागेश

शरद Sat, 09/20/2014 - 20:27
प्लवा हये ते अदृढायज्ञरुपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म ! एतच्छ्रेयो ये भिनन्दन्ति मुढा जरामृत्यु ते पुनरेवापि यान्ति !! मुण्डक उपनिषद अठरा प्रकारची साधने असलेले (सोळा ऋत्विज,यजमान व यजमान पत्नी ही अठरा साधने आहेत) यज्ञकर्म हे फुटक्या (चंचल) नौकेसारखे अस्थिर व नाशवंत आहे. असे हे यज्ञकर्म श्रेयस्कर मानणारा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात सापडतो. यज्ञ, त्यामुळे मिळणारा स्वर्ग ह्या कल्पना त्या वेळच्या विचारवंतांना पटत नव्हत्या. त्यातूनच उपनिषदे जन्माला आली. इतरांनी वरील इतक्या शब्दात वेदांचा निषेध केला नसला तरी उपनिषदांचा मार्ग वेगळा. खरे म्हणजे यावर एक निराळाच लेख लिहला पाहिजे, पण इथे फार लोकांना वाचनीय होणार नाही हे खरेच शरद

पोटे Sat, 09/20/2014 - 17:51
त्रयो वेदश्च कर्तारो धूर्त भंड निशाचरो. तीन वेदांचे कर्ते घूर्त लबाड व चोर होते
लेखनविषय:
लेखनप्रकार
तंत्र आणि लोकायत तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित आहे. खरे म्हणजे लोकायत या आपल्या ग्रंथांत श्री देविप्रसाद यांनी या दोघांमधील जो संबंध दाखवला आहे त्यावरचे माझे मत येथे मांडले आहे. प्रथम श्री. देविप्रसाद काय म्हणतात ते बघू; तंत्राचे साध्य बघू व नंतर मला श्री. देविप्रसाद यांचे मत का पटत नाही ते बघू. श्री. देविप्रसाद हे कम्युनिस्ट विचारसरणीचे विचारवंत. त्यामुळे त्यांचा वर्गविद्रोह हा आवडीचा विषय. त्यांना लोकायत दर्शन हे भारतातील आदी जमातीचे व तंत्रही त्यांचेच अशी मांडणी करावयाची आहे.

पाबे घाट

नांदेडीअन ·




जीवन आणि मृत्यू

In reply to by सुहास..

नांदेडीअन गुरुवार, 09/18/2014 - 22:33
धन्यवाद. :) अहो सांगितले ना ! पाबे घाटातल्या फोटो आहेत सगळ्या. तो तिसर्‍या क्रमांकाचा फोटो घाटाच्या मध्यावरून काढलाय. तिथे एक छोटेसे मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला फलक आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 15:58
सुंदर छायाचित्रं. जुन्या आठवणी जागवल्या. पाबे घाटाबद्दल माझी एक आठवण आहे. नविनच गाडी घेतली होती. मी सपत्नीक रायगडला निघालो होतो. मस्त पाऊस पडत होता. रस्त्यात एक बाई झाडाच्या आडोशाला उभी होती. पत्नीच्या परवानगीनेच तिला विचारलं 'कुठे जायचंय? कुठे सोडू का?' तिला घाट उतरून खाली कुठल्याशा गावात जायचं होतं. 'बसा गाडीत' म्हणालो. बसल्यावर धन्यवाद वगैरे देऊन झाले. आणि मी घाटाची वळणे गिरवायला सुरुवात केली. इथे तिची टकळी सुरू झाली. 'लय डेंजर घाट आहे. गेल्याच आठवड्यात एक बाबा, चांगला पट्टीचा चालवणारा बरं का! असाच पाऊस होता. गेला नं खाली गडगडत. नवरा, बायकू आनी पोरगं तिघंही मेले त्या अपघातात.' मला हसू आलं. मनात आलं आपणही तिघेच आहोत. बायको घाबरली. नेहमीचीच सवय. 'हळू चालवा हो' दम मारत होती. मला जास्तच हसू आलं. 'हसू नका भाऊ! खोटं न्हाई सांगत. दरवर्षी हिते अपघात होत्यात, मानसं मरत्यात. लई वंगाळ हाए हा घाट.' तो पर्यंत आम्ही घाट उतरून खाली आलो होतो. 'कुठ सोडायचं तुम्हाला.' 'आँ! संपला का घाट. हितंच फुडं सोडा देवळा जवळ.' तिला त्या देवळाजवळ सोडल्यावर ती आधी देवळात गेली. देवाला नमस्कार वगैरे केला असणार सुखरूप पोहोचविल्याबद्दल.

In reply to by टवाळ कार्टा

नांदेडीअन Fri, 09/19/2014 - 23:09
ती सोबत आलेल्या मित्राची आहे. तिकडून आल्यापासून बंद पडलीये त्याची गाडी.:P माझी बापडी पॅशन प्लस होती.

In reply to by प्रभाकर पेठकर

सह्यमित्र Fri, 09/19/2014 - 15:56
रायगड ला जायला पाबे घाटात कसे गेलात? तुम्हाला राजगड म्हण्याचे आहे का? पाबे घाट पुण्याहून खानापूर मार्गे वेल्हे, राजगड, तोरणा इकडे जाताना लागतो

In reply to by सह्यमित्र

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 17:38
होय तसाच गेलो होतो, नकाशावर रस्ता शोधत शोधत. मस्त धुवाँधार पाऊस. सोबत बायको. कोथरूडहून रायगडला पोहोचायला ७ तास लागले होते. बट, फिकीर नॉट. रस्ता एन्जॉय करत करत गेलो होतो. वेल्ह्याहून भोरकडे वळून तिथून रायगड गाठला होता. येताना, मुळशी मार्गे रात्री उशीराने कोथरुडास परतलो. होतो. संपूर्ण वृत्तांत रायगड -१, रायगड - २ आणि रायगड - ३ इथे वाचायला मिळेल.

कंजूस गुरुवार, 09/18/2014 - 16:29
पाबे घाटात देव भेटला त्या बाईला. नांदेडीअन, या सर्व फोटोत हाय रेज मुळे फारच न्याय दिलात रानफुलांना. तिसरा फोटोतली कवला फुले कास पठारावर बरीच असतात. सोनकीचा पिवळा गालीचा आता सह्याद्रीच्या माळांवर पसरेल. जांभळा तेरडा वाटांवर आहेच. झकास.

भिंगरी गुरुवार, 09/18/2014 - 23:03
फोटो मध्ये दिसतोय तो तेरडाच आहे. आम्ही लहान असताना याच्या देठाने पाटी पुसायचो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस Fri, 09/19/2014 - 15:04
नक्कीच वापरली असणार. त्याशिवाय इतके चांगले छायाचित्र येणे अवघड आहे. कदाचित एनडी फिल्टर सुद्धा वापरलेला असावा.

In reply to by प्रचेतस

नांदेडीअन Fri, 09/19/2014 - 23:11
हॅंडहेल्ड आहे हा फोटो. ND फिल्टरसुद्धा नाहीये. श्वास रोखून धरायची टेक्निक बर्‍यापैकी जमायला लागली आहे आता. :)

धन्या Fri, 09/19/2014 - 15:04
पाबे घाट अफलातूनच आहे. सिंहगडाच्या नावाने रुसुन बसलेल्या आमच्या एका मित्राला आम्ही पाबेघाटातून सिंहगड प्रदक्षिणा घडवली होती ते आठवलं. त्या प्रदक्षिणेची सांगताही सिंहगडावरच झाली होती खेड शिवापूरच्या दिशेने चढाई करुन.

In reply to by धन्या

सूड Fri, 09/19/2014 - 16:00
त्या प्रसंगाला जवळपास वर्ष होत येईल आता....वाटेत राजगडाकडे जे काही वळून वळून बघणं चाललं होतं त्यामुळे मी जरा धास्तावलो होतो.

मदनबाण Sat, 09/20/2014 - 11:16
कवला आणि सोनकी केवळ अप्रतिम ! :) एक विनंती फोटो कंप्रेस करुन टाकलेत तर धागा पटकन उघडुन पाहता येतो, विशेषतः हापिसातुन ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }

काय फोटो काढलेत राव, जबरदस्त. गदिमांनी म्हटलंय तसं, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उक्तट! हा कॅमेरा कोणतायं?

In reply to by सुहास..

नांदेडीअन गुरुवार, 09/18/2014 - 22:33
धन्यवाद. :) अहो सांगितले ना ! पाबे घाटातल्या फोटो आहेत सगळ्या. तो तिसर्‍या क्रमांकाचा फोटो घाटाच्या मध्यावरून काढलाय. तिथे एक छोटेसे मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला फलक आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 15:58
सुंदर छायाचित्रं. जुन्या आठवणी जागवल्या. पाबे घाटाबद्दल माझी एक आठवण आहे. नविनच गाडी घेतली होती. मी सपत्नीक रायगडला निघालो होतो. मस्त पाऊस पडत होता. रस्त्यात एक बाई झाडाच्या आडोशाला उभी होती. पत्नीच्या परवानगीनेच तिला विचारलं 'कुठे जायचंय? कुठे सोडू का?' तिला घाट उतरून खाली कुठल्याशा गावात जायचं होतं. 'बसा गाडीत' म्हणालो. बसल्यावर धन्यवाद वगैरे देऊन झाले. आणि मी घाटाची वळणे गिरवायला सुरुवात केली. इथे तिची टकळी सुरू झाली. 'लय डेंजर घाट आहे. गेल्याच आठवड्यात एक बाबा, चांगला पट्टीचा चालवणारा बरं का! असाच पाऊस होता. गेला नं खाली गडगडत. नवरा, बायकू आनी पोरगं तिघंही मेले त्या अपघातात.' मला हसू आलं. मनात आलं आपणही तिघेच आहोत. बायको घाबरली. नेहमीचीच सवय. 'हळू चालवा हो' दम मारत होती. मला जास्तच हसू आलं. 'हसू नका भाऊ! खोटं न्हाई सांगत. दरवर्षी हिते अपघात होत्यात, मानसं मरत्यात. लई वंगाळ हाए हा घाट.' तो पर्यंत आम्ही घाट उतरून खाली आलो होतो. 'कुठ सोडायचं तुम्हाला.' 'आँ! संपला का घाट. हितंच फुडं सोडा देवळा जवळ.' तिला त्या देवळाजवळ सोडल्यावर ती आधी देवळात गेली. देवाला नमस्कार वगैरे केला असणार सुखरूप पोहोचविल्याबद्दल.

In reply to by टवाळ कार्टा

नांदेडीअन Fri, 09/19/2014 - 23:09
ती सोबत आलेल्या मित्राची आहे. तिकडून आल्यापासून बंद पडलीये त्याची गाडी.:P माझी बापडी पॅशन प्लस होती.

In reply to by प्रभाकर पेठकर

सह्यमित्र Fri, 09/19/2014 - 15:56
रायगड ला जायला पाबे घाटात कसे गेलात? तुम्हाला राजगड म्हण्याचे आहे का? पाबे घाट पुण्याहून खानापूर मार्गे वेल्हे, राजगड, तोरणा इकडे जाताना लागतो

In reply to by सह्यमित्र

प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2014 - 17:38
होय तसाच गेलो होतो, नकाशावर रस्ता शोधत शोधत. मस्त धुवाँधार पाऊस. सोबत बायको. कोथरूडहून रायगडला पोहोचायला ७ तास लागले होते. बट, फिकीर नॉट. रस्ता एन्जॉय करत करत गेलो होतो. वेल्ह्याहून भोरकडे वळून तिथून रायगड गाठला होता. येताना, मुळशी मार्गे रात्री उशीराने कोथरुडास परतलो. होतो. संपूर्ण वृत्तांत रायगड -१, रायगड - २ आणि रायगड - ३ इथे वाचायला मिळेल.

कंजूस गुरुवार, 09/18/2014 - 16:29
पाबे घाटात देव भेटला त्या बाईला. नांदेडीअन, या सर्व फोटोत हाय रेज मुळे फारच न्याय दिलात रानफुलांना. तिसरा फोटोतली कवला फुले कास पठारावर बरीच असतात. सोनकीचा पिवळा गालीचा आता सह्याद्रीच्या माळांवर पसरेल. जांभळा तेरडा वाटांवर आहेच. झकास.

भिंगरी गुरुवार, 09/18/2014 - 23:03
फोटो मध्ये दिसतोय तो तेरडाच आहे. आम्ही लहान असताना याच्या देठाने पाटी पुसायचो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस Fri, 09/19/2014 - 15:04
नक्कीच वापरली असणार. त्याशिवाय इतके चांगले छायाचित्र येणे अवघड आहे. कदाचित एनडी फिल्टर सुद्धा वापरलेला असावा.

In reply to by प्रचेतस

नांदेडीअन Fri, 09/19/2014 - 23:11
हॅंडहेल्ड आहे हा फोटो. ND फिल्टरसुद्धा नाहीये. श्वास रोखून धरायची टेक्निक बर्‍यापैकी जमायला लागली आहे आता. :)

धन्या Fri, 09/19/2014 - 15:04
पाबे घाट अफलातूनच आहे. सिंहगडाच्या नावाने रुसुन बसलेल्या आमच्या एका मित्राला आम्ही पाबेघाटातून सिंहगड प्रदक्षिणा घडवली होती ते आठवलं. त्या प्रदक्षिणेची सांगताही सिंहगडावरच झाली होती खेड शिवापूरच्या दिशेने चढाई करुन.

In reply to by धन्या

सूड Fri, 09/19/2014 - 16:00
त्या प्रसंगाला जवळपास वर्ष होत येईल आता....वाटेत राजगडाकडे जे काही वळून वळून बघणं चाललं होतं त्यामुळे मी जरा धास्तावलो होतो.

मदनबाण Sat, 09/20/2014 - 11:16
कवला आणि सोनकी केवळ अप्रतिम ! :) एक विनंती फोटो कंप्रेस करुन टाकलेत तर धागा पटकन उघडुन पाहता येतो, विशेषतः हापिसातुन ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }

काय फोटो काढलेत राव, जबरदस्त. गदिमांनी म्हटलंय तसं, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उक्तट! हा कॅमेरा कोणतायं?

पोकळी

बेसनलाडू ·

अजय जोशी गुरुवार, 09/18/2014 - 20:04
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले व्वा...

मनिष Fri, 09/19/2014 - 11:37
मस्त!!!! खूप आवडली :-) जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले

अजय जोशी गुरुवार, 09/18/2014 - 20:04
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले व्वा...

मनिष Fri, 09/19/2014 - 11:37
मस्त!!!! खूप आवडली :-) जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले
लेखनविषय:
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले) शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले

पोळी पापडी चाट

दिपक.कुवेत ·

मृत्युन्जय गुरुवार, 09/18/2014 - 15:46
अशक्य सुंदर आहे. शिळ्या पोळ्यांची फोडणीची पोळी आम्हाला खुपच प्रिय आहे. पण या पदार्थासाठी कधीतरी त्याचाही त्याग करायला मी तयार आहे :)

सुहास.. गुरुवार, 09/18/2014 - 15:48
महामस्त पाकृ !! ( स्वगत : वाश्या , लेका उपासाच्या दिवशी रेसीपी चा विभाग उघडत जावु नकोस )

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 16:12
मस्त. एक वेगळीच पाककृती. >>>>रंगीत पाण्याबरोबर मस्त साईड चखणा होतो. अरे दारू म्हण की मर्दा! इथे स्तनाग्रांवर निसंकोच चर्चा होत असताना, 'दारू' शब्द उच्चारायलाही तुला लाज वाटते? ह्हात्त्तुला काय म्हणू?

आदूबाळ गुरुवार, 09/18/2014 - 17:48
पाकृ आवडलीच, पण या पाकृचा "टॉलरन्स झोन" छोटा आहे. म्हणजे तुकडे तळताना ते कमी/जास्त तळले गेले तर पूर्ण चाटचा विचका होईल. "हैद्राबादी मिरची का सालन" आणि "तवा पुलाव" मध्ये टॉलरन्स झोन कसा मोठा होता. थोडं इकडे तिकडे झालं तरी चालत होतं.

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 21:34
तुकडे मंद आंचेवर तळावेत. फक्त तेल व्यवस्थित तापल्यावर (आधी एक तुकडा तेलात सोडून कसा तळला जातोय ते पाहावे) थोडे थोडे करून सर्व तुकडे तळून घेतल्यास कमी/जास्त न होता व्यवस्थित तळले जातील.

In reply to by राघवेंद्र

दिपक.कुवेत गुरुवार, 09/18/2014 - 18:59
तो पर्याय मी आधीच दिला आहे (जरा पाकॄ डिट्टेल वाच बरं) पण ते एक एक तुकडे भाजायला फार वेळ जाईल. निदान माझ्यात तरी तेवढा धीर नाहिये....चाट डोळ्यासमोर असल्यावर :)

चित्रगुप्त Fri, 09/19/2014 - 06:01
व्वा. शिळ्या पोळ्यांचे लाडू आणी फोडणीचा कुस्करा खात आलोय, आता यात आणखी एक मस्त भर पडली.

ganu Sat, 09/20/2014 - 23:09
हेच तुकडे जर तेल,लाल तिखट आणि मीठ लावून मंद अग्नी ठेऊन तव्यावर खरपूस आणि कडक भाजून घेतले तर अजून चवदार लागतील.चूक भूल द्यावी घ्यावी.

मृत्युन्जय गुरुवार, 09/18/2014 - 15:46
अशक्य सुंदर आहे. शिळ्या पोळ्यांची फोडणीची पोळी आम्हाला खुपच प्रिय आहे. पण या पदार्थासाठी कधीतरी त्याचाही त्याग करायला मी तयार आहे :)

सुहास.. गुरुवार, 09/18/2014 - 15:48
महामस्त पाकृ !! ( स्वगत : वाश्या , लेका उपासाच्या दिवशी रेसीपी चा विभाग उघडत जावु नकोस )

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 16:12
मस्त. एक वेगळीच पाककृती. >>>>रंगीत पाण्याबरोबर मस्त साईड चखणा होतो. अरे दारू म्हण की मर्दा! इथे स्तनाग्रांवर निसंकोच चर्चा होत असताना, 'दारू' शब्द उच्चारायलाही तुला लाज वाटते? ह्हात्त्तुला काय म्हणू?

आदूबाळ गुरुवार, 09/18/2014 - 17:48
पाकृ आवडलीच, पण या पाकृचा "टॉलरन्स झोन" छोटा आहे. म्हणजे तुकडे तळताना ते कमी/जास्त तळले गेले तर पूर्ण चाटचा विचका होईल. "हैद्राबादी मिरची का सालन" आणि "तवा पुलाव" मध्ये टॉलरन्स झोन कसा मोठा होता. थोडं इकडे तिकडे झालं तरी चालत होतं.

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 21:34
तुकडे मंद आंचेवर तळावेत. फक्त तेल व्यवस्थित तापल्यावर (आधी एक तुकडा तेलात सोडून कसा तळला जातोय ते पाहावे) थोडे थोडे करून सर्व तुकडे तळून घेतल्यास कमी/जास्त न होता व्यवस्थित तळले जातील.

In reply to by राघवेंद्र

दिपक.कुवेत गुरुवार, 09/18/2014 - 18:59
तो पर्याय मी आधीच दिला आहे (जरा पाकॄ डिट्टेल वाच बरं) पण ते एक एक तुकडे भाजायला फार वेळ जाईल. निदान माझ्यात तरी तेवढा धीर नाहिये....चाट डोळ्यासमोर असल्यावर :)

चित्रगुप्त Fri, 09/19/2014 - 06:01
व्वा. शिळ्या पोळ्यांचे लाडू आणी फोडणीचा कुस्करा खात आलोय, आता यात आणखी एक मस्त भर पडली.

ganu Sat, 09/20/2014 - 23:09
हेच तुकडे जर तेल,लाल तिखट आणि मीठ लावून मंद अग्नी ठेऊन तव्यावर खरपूस आणि कडक भाजून घेतले तर अजून चवदार लागतील.चूक भूल द्यावी घ्यावी.
नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो. chat 1 साहित्यः अ. पापडी साठि: १. शीळ्या पोळ्या - ४ ते ५ २. तळण्यासाठि तेल ब. चटण्या: १.