मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

संदीप डांगे ·

एस गुरुवार, 09/25/2014 - 12:52
तुम्ही असा फालतू आणि बेसलेस धागा काढण्यापेक्षा तुमच्या व्यवसायात डोके का घालत नाहीत?

In reply to by प्रचेतस

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 13:01
काहीसा सहमत काहीसा असहमत. व्यवसायामध्ये २४*७ डोकं घालून बसता येणं शक्य नाही. शक्य झालं तरी परिणाम दिसायला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा द्यावा लागणारच. आमच्याकडं '९ महिन्याचं' उदाहरण नेहमी दिलं जातं.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 13:09
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 13:07
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 21:45
त्यामागील विचारास सहमती वा असहमती देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तिच गोष्ट संदीप ची. दाभोलकर टाळुन विचार मांडले असते तर त्याला नक्कीच यथोचित पातळी लाभली असती, असो एकुणच नॉन सेन्स थांबवायचा मला अधिकार नाही त्यामुले चालुद्या असे म्हणतो

In reply to by काउबॉय

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 22:15
काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत. मी स्वत: कुणाचा व्यक्तिश: उपमर्द करणार नाही. "आता दाभोळकर नाहीत" याचा अर्थ तोच आहे. पाहिजे ते हे दोन अर्थ घ्या. १. "ते" नाहीत, त्यामुळे आता तुम्हीच जबाबदारीने पुढचे पाउल उचला २. "ते" नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुका टाळण्याची पूर्ण संधी आहे. पण एकूणच नॉन सेन्स म्हणजे काय आणि यथोचित पातळी काय ते जर स्पष्ट करा दादा! असा चिमटा काढून भागो मत!

In reply to by संदीप डांगे

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 23:08
घटकांची घुसड़..! अशी घुसड़ that really doesn't make any sense. यथोचित पातळि म्हणजे मांडलेला विचाराला न्याय मिळेल आशा उंचीवर न्हेउन त्याला चर्चापूरक बनवणे होय.

In reply to by काउबॉय

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 23:13
आपण श्रध्दा अश्रध्दा व अंधश्रदहा सारखी विश्वव्यापक प्रकरणे व्यक्तिसापेक्ष नजरेतुन मर्यादित करुण अनावश्यकरित्या आपल्याच विषयाचे गाम्भीर्य व ऊँची कमी करत आहात :(

कानडाऊ योगेशु गुरुवार, 09/25/2014 - 13:28
त्या धाग्यांवर मि.पा. ची एरव्ही न दिसणारी संवेदनशील बाजु दिसली होती. अश्या धाग्यांवर मात्र मि.पा करांचा नेहेमीचा धुमाकुळ चालणारच एवढेच फक्त लक्षात असु द्या! इथे विशेषतः अश्या धाग्यांवर कधी कोण कुणाला "चपला घालुन ताबडतोब चालु लागा" वा " तुम्हाला फाट्यावर मारण्यात आले आहे" असे म्हणेल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे ट्यार्पी खेचणारे धागे काढताना सगळी तयारी ठेवा. बाकी तुमच्याकडुन असा ट्यार्पी खेचणारा धागा आला ही तुमची मनस्थिती पुन्हा चांगली होत आहे ह्याची खूण आहे असे समजतो आणि असे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 13:50
त्या धाग्यात लिहिलेलं त्या धाग्याबरोबर वाचनमात्र झालं. आज आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते बिनधास्त लिहा आणि चर्चा करा! आज आत्ता तुम्हाला छान वाटतंय ना? बस!

In reply to by पैसा

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 14:38
भाऊ, तुमच्या या धाग्यातील विचारांशी मी काडीमात्र सहमत नसलो, तरी मोकळेपणाने तुम्ही तुमचे विचार मांडले, याबद्दल तुमचे अभिनंदन. मिपाचे ऐक यश आहे, कि अतिशय भिन्न विचारांची लोकं मोकळेपणाने विचार मांडू शकतात.

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 13:55
किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा
बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा
या दोन वाक्यांवरुन तुम्हाला अंधश्रद्धांच वर्गीकरण कसं करायचय ते नक्की समजत नाही. आता एखाद्या शाळेत लिंबू मिरची टांगली तर ती शैक्षणिक अंधश्रद्धा की धार्मिक?? उमेदवारी अर्ज पितृपक्षात न भरणे ही राजकीय की धार्मिक अंधश्रद्धा?? आधी धार्मिक सामाजिक राजकीय अंधश्रद्धा म्हणजे काय ते स्पष्ट करा.. मग फक्त हिंदू धर्मच वगैरे बघु..

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 14:35
राजकीय अंधश्रद्धा: लोकशाहीतल्या आपल्या नेमक्या स्थानाबद्दल लोकांना अजूनही नीट अशी माहिती नाही. आपली कामे करणारा राजकीय नेता हा आपला मालक असल्यासारखा वागतो आणि आपण ते खपवून घेतो. त्यांच्या विरुद्ध आपण उभे राहू शकत नाही हि सामान्य जनतेची अंधश्रद्धा, राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला अण्णा हजारे किंवा तत्सम लोकच लागतात हि अंधश्रद्धा. थोडक्यात लोकशाही म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव न ठेवता आपले सगळे चांगले झाले पाहिजे अशी भावना म्हणजे अंधश्रद्धा. शैक्षणिक: शिक्षण घेतल्याने नोकरी लागते आणि पैसा कमावण्यासाठीच शिक्षण घ्यायचे हि एक मोठ्ठी अंधश्रद्धा. शिक्षण घेतल्याने नोकरी लागेलच अशी कुणीही खात्री देऊ शकत नाही. तरीही लोक बावळटपाने कागदाच्या भेंडोळ्या गोळा करण्यात आयुष्य घालवतात. पैसा ओतला कि हुशार होता येते हि एक आणखी अंधश्रद्धा सामाजिक: जात-पात, धर्म, व्यवसाय यांच्यामुळे जी दरी निर्माण होते ती ओलांडून जाऊन आपण जाऊच शकत नाही अशी सर्वसामान्य अंधश्रद्धा. अपवाद आहेत पण म्हणून नियम मोडत नाहीत. लोक अजूनही जुन्या कालबाह्य सामाजिक गोष्टींचा बाऊ करून आपलाच विकास रोखून धरतात. कारण ह्या काही अंधश्रद्धाच. एवढेच काय, वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा आहेतच की. जसे स्टेम सेल बँकिंग वैगेरे वैगेरे. वेश्या, भिखारी आणि अस्वच्छता ह्यात समाजाच्या काही चुकीच्या समजुतीमुळे तयार झालेल्या समस्या आहेत. त्यांच्या मुळाशी असलेल्या अंधश्रद्धा निपटून काढल्यास बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एखादी संघटना जेंव्हा त्यांच्या नावात अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द वापरते आणि कार्यक्षेत्र फक्त विशिष्ट धर्माशी निगडीत असते तेंव्हा हेतू बद्दल संशय निर्माण होतो.

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 16:21
तुम्ही सगळ्याच समस्या अंधश्रद्धेच्या नावखाली गोळा केल्यायत.. तितकेसे पटत नाही.. उदा. शिक्षणाने नोकरी मिळते. इथे कार्यकारणभाव आहे. नोकरीच्या ठिकाणी पात्रता म्हणून शिक्षणाची अट असते. पण सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं कोणीच म्हणत नाही. मग सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून लोकांनी शिकूच नये का ?? इथे कार्यकारणभाव असल्याने इथे श्रद्धा अंधश्रद्धा शब्द वापरणे योग्य वाटत नाही.. तसेच इतर उदाहरणातही.. कार्यकारणभावाचा अभाव असतो तिथे श्रद्धा हा शब्द वापरता येतो.

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 16:42
अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, पटलाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यकारणभाव या शब्दाबद्दल माझे काही अज्ञान असू शकते. पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा आणि फणस येईल हि अंधश्रद्धा आहे असे माझे मत आहे. नोकरीसाठी शिक्षण हि अट ठेवणे येथूनच हि अंधश्रद्धा सुरु होते. जर तसे नसते तर नोकरीसाठी मुलाखत, वेगवेगळ्या परीक्षा यांची गरज नसती. एखाद्या कंपनीने सरळ पहिल्या दहा विद्यार्थ्यांना अमुक एका नोकरीचे थेट नेमणूक पाठवले असते. असे होत नाही. इथे कार्यकारणभाव कसा? माझ्या मते शिक्षणक्षेत्रात भयंकर अंधश्रद्धा बोकाळली असून त्याचा गैरफायदा घेऊन सामन्यांची पिळवणूक चालली आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:49
पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा
चांगले आंबे येतील ही ना श्रद्धा ना अंधश्रद्धा. ती फक्त "अपेक्षा" किंवा "आशा" ( ते सुद्धा झाड आपले असेल तर ). झाड वैर्‍याचे असेल तर सगळा मोहर गळुन जावा ही "इच्छा".

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 17:20
तुम्हाला सगळ्याच गोष्टीला श्रद्धा म्हणायचे असेल तर म्हणा बुवा .. माझादेखिल काही आग्रह नाही तुम्हाला पटलेच पाहिजे असा..

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 13:56
आणखी एक.. भिकारी, वेश्या, अस्व्च्छता हे सामाजिक प्रश्न झाले पण यात अंधश्रद्धा ( किंवा श्रद्धा) काय ??

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 14:00
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
हे सगळ्यांनीच सर्ववेळ करायला पाहिजे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/25/2014 - 14:15
अंनिसने अमेरिकेत शाखा उघडली पाहिजे असे शिरिष पूर्वी म्हणायचा. त्यांच्या त्या हिरव्या नोटेवर 'In God we trust' लिहिलेले असते म्हणून. तुमच्या त्या व्हॅटिकन सिटीत्,मक्का-मदिना येथे तोबा गर्दी असते.एवढेच काय, केऱळातल्या काही चर्चेसमध्येही भल्यामोठ्या रांगा असतात.अंनिसवाल्यानी ईतर धर्मातील अंधश्रद्धांबद्दल कधी काही केले आहे का?
स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी
राहू,केतू,वेळ पाहून काम करणारी अनेक मंडळी पाहिली आहेत. ती तसे करतात म्हणजे तीमाणसे निष्क्रिय असतात हा एक मोठा गैरसमज आहे. नविन घरात राहायला जायचे तर होम-हवन हवेच.दक्षिण भारतात तर हे कसोशिने पाळले जाते.त्याला अंधश्र्द्धा म्हणनार असाल तर खुशाल म्हणा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गणपा गुरुवार, 09/25/2014 - 18:49
इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत म्हणुन आपल्याही तश्याच राहुद्या असं म्हणायचय का माई? अहो त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं.

In reply to by गणपा

प्रदीप गुरुवार, 09/25/2014 - 21:07
त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं. 'आपले घर' म्हणजे काय? अंनिस जर 'भारतीय समाजासाठी' कार्यरत आहे असे म्हटले, तर मग त्यात हिंदूंव्यतिरीक्त इतर धर्मीयही आलेच ना? का अंनिसने स्वत: हिंदूधर्मिय आहोत असे जाहीर केले आहे?

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:24
दाभोलकरांना स्वताची मोठी अंधश्रद्धा कधी दिसली नाही त्यामुळे ती दुर करण्याचे तर विसराच. भारतीय समाजाला आणि त्याच्या वैचारिक कुवतीला पण दाभोळकर ओळखू शकले नाहीत. अनिस वगैरे काढुन आणि व्याख्याने देवुन भारतातल्या अंधश्रद्धा कमी होतील असे वाटणे म्हणजेच मोठी अंधश्रद्धा आहे. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीवर गुळमुळीत भुमिका घेणे जसे की "आमचा श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला आहे" इत्यादी. दाभोलकरांच्या ३० वर्षाच्या कारकीर्दीतच देवळांच्या रांगा, बुवा, बाबा, महाराज ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यांचा खून झाला म्हणुन नाहीतर ९९ टक्के जनतेला त्यांचे नाव पण माहीती झाले नसते.

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 14:39
गल्लत करू नका. श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे. माझ्या कर्तृत्वावर माझी भक्कम श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, आशा. अजून काय सांगायचे. त्याशिवाय का जगात काही करणे शक्य आहे का? माझी जशी श्रद्धा माझ्या कर्तृत्वावर आहे तशी अंनिस ने इतरांची निर्माण करावी. नुसते हे चूक ते चूक करत फिरू नये. आणि दाभोळकर यांच्यासारख्या माननीय व्यक्तींबद्दल भंकस करण्याचा विषय, तर मी संघटनेद्दल बोलत आहे. दाभोळकर काय होते हे निदान त्यांच्या संघटनेला जरी कळले तरी खूप आहे.

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:43
श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे
एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग केले की मग "माझी ती श्रद्धा आणि तुझी अंधश्रद्धा" असले प्रकार चालू होतात. हे सर्व फार वैयक्तीक आहे, दुसर्‍यांना त्यात पडुच नये ( जो पर्यंत त्यांना त्याचा त्रास होत नाही ). दाभोळकरांना तेव्हडे पण समजले नाही ह्याचे वाईट वाटते.

मुक्त विहारि गुरुवार, 09/25/2014 - 14:52
ह्या धाग्याच्या निमीत्ताने निदान इतके तरी समजले कीए, तुम्ही परत जीवन जगायचा प्रयत्न करत आहात. अजून लिहा. आणि बिंधास्त लिहा.

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 14:56
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? हे म्हणजे भारताने मार्स मिशन हाती घेण्याच्या ऐवजी भारताने दार्द्र्य निर्मुलन हाती का घेतले नाही असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. या सगळ्या गोष्टी समांतरपणेच हाती घेतल्या पाहिजेत ना. सगळेच महत्वाचे आहे. दाभोळकरांचा अप्रोच कदाचित चुकीचा असु शकेल. पण त्यांनी हेच का केले आणि तेच का केले नाही हा प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 15:54
प्रश्न अंनिस च्या सर्वांगीण विचारपद्धतीचा आहे. पण एकंदर एखादी संघटना असाच विचार का ठेवते वैगेरे विचारणे चूक असू शकते. मला हेतू बद्दल शंका आहे. म्हणून हे प्रश्न.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 14:59
मी खरं तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सभेला चाललो होतो पण मध्येच मांजर आडवं गेलं मग बेत रहित करावा लागला. आपली अशी परिस्थिती आहे.

आतिवास गुरुवार, 09/25/2014 - 15:42
? अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा १. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे? २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते? ३. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. आणि मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. !! ४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही? ५..... ६. ... ... ... १००. ....

In reply to by आतिवास

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:53
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?
ना ते विधायक आहे ना ते विघातक आहे. निरर्थक आहे. ज्यांना अंधश्रद्धा सोडायच्या होत्या त्यांन्नी त्या त्यांच्या त्यांच्या सोडल्या. उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या. मनुष्य स्वभाव आहे, कोणाला दुसर्‍याने सांगितलेले आवडत नाही की तू मुर्ख आहेस. त्याचा मूर्खपणा अजुनच घट्ट होतो.

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 16:30
उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !! सगळे जग बदलेल अशी अपेक्षा अंनिसलाही नव्हती. पण जो थोडाफार बदल ते घडवू शकले तो नक्कीच स्वागतार्ह आहे .

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:34
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !!
ज्यांनी सोडल्या त्या त्यांच्या त्यांनी, त्यांच्या विचाराने. अनिस चे काही कॉट्रीब्युशन नाही. माझी बहीण एकाच वेळी दाभोलकरांचे खूप कौतुक करते, त्यांची पुस्तके वाचते आणि शक्य असतील त्या सर्व अंधश्रद्धा पाळते.

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 09/25/2014 - 16:58
अगदी.. अगदी. लोकांना चमत्कारामागची हातचलाखी समजावून सांगणे, प्रात्यक्षिक करुन दाखवणे, भंडाफोड करणे इत्यादि मार्गांनी लोकजागृती करण्याचा काही संस्थांचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी लोकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. मनोरंजन म्हणून लोक पाहतात आणि स्वतःचे बाबा बुवा कोणी असतील त्यांच्याबाबतीत मात्र ही हातचलाखी वगैरे मानायला ते तयार नसतात. श्रद्धा हे एक अत्यंत ताकदवान डिनायल आहे. आमचे बापू, बाबा, महाराज इ इ हे असे जादूगर नाहीच आहेत मुळी.. या घट्ट समजुतीनेच लोक भक्त झालेले असतात. "अ‍ॅक्सिडेंट्स ऑकर टु अदर्स", या तत्वानुसार "भोंदूगिरी इज प्रॅक्टिस्ड बाय अदर बाबाज" अशीच समजूत असल्याने कोणत्याही कार्यक्रमाने त्यांचे मन वळवणे शक्य नाही. कोणाच्यातरी आहारी जाणे ही एक तीव्र ताकदीची गरज आहे (व्यसनाप्रमाणे). अनेक पॅथीज, ज्योतिष आणि कायकाय प्रथा हजारो वर्षे टिकल्या तश्याच अंधश्रद्धाही टिकण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची समाजाला गरज आहे. जी गोष्ट तीव्र गरजेची आहे तीच टिकते. निर्मूलन वगैरे हे वरकरणी आवश्यक दिसतं खरं पण ते अशक्य वाटतं.. मग याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणा किंवा रियल थिंकिंग.

In reply to by गवि

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 17:05
बर्‍याच अंशी सहमत आहे. परिणाम होत नाही याबद्दल असहमती. कारण हजारो वर्षे असलेल्या अंधश्रद्धा या काही दशकात दूर होतील ही अपेक्षा योग्य नाही. त्यामुळे परिणामाच वेग अत्यंत सूक्ष्म आहे.पण आहे. अंमलबजावणी नसु द्यात पण विचार करायला लोक प्रवृत्त होतात हे ही नसे थोडके!

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 17:22
श्रेय द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. माझ्या वैयक्तिक विचारधारा बदलाचं श्रेय मी दाभोलकरांना/ अंनिसला देतो..

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:25
हे जर खरे असेल तर मी माझे मत मागे घेतो. एका माणसाचे विचार बदलण्याचे काम जरी अनिसने केले असेल तर Its worth

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 09/25/2014 - 17:28
ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे होते का आणि नेमका काय बदल झाला आणि किती प्रमाणात यावर हे अवलंबून आहे. त्यांचे आजवरचे प्रतिसाद वाचून ते पूर्वी कधीही अंधश्रद्ध असतील असे वाटत नाही. अर्थात हे वरवरचे मत झाले हेही मान्यच.

In reply to by गवि

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:31
सप्रे साहेब म्हणतायत तर त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. त्यांनीच नीट विचार करुन सांगावे.

In reply to by गवि

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 22:28
रॅशनल थिंकिंग करण्याची पात्रता होती, पण सगळे करतात म्हणून आपणही असं होत गेलं. सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार केला गेला नाही. पण दाभोलकरांची पुस्तके वाचल्यावर हे तर आपल्याला माहीत आहे मग आपण इतके वर्ष असे का वागत राहीलो. सगळे करतात म्हणून करायची गरज नसते याची जाणीव झाली. आणि छोट्या छोट्या गोष्टींची चिकित्सा करुन खरच एखाद्या गोष्टीत तथ्य असेल तरच स्वीकारणे आणि बाकी गोष्टी त्यागणे अशी सवय लागली. अर्थात आई वडीलांमुळेच हे प्रथम वाचनात आले. घरातून मुक्त विचारसरणीला तेवढाच पाठींबा मिळाल्याने विचार आणि आचारात सुसंगती आणू शकतो. घरातील वातावरण पूर्वी खूप धार्मिक होते. बरीच सूक्ते, रुद्र वगैरे पाठ होता. प्रसंगी पूजा वगैरे सांगितल्याही होत्या. लग्न देखिल पत्रिका पाहून वेदोक्त वगैरे झालय!! ९२-९३ ला रामजन्मभूमी मुद्द्यावर भारून जाउन फक्त कारसेवेला जायचे बाकी होते. पण आता कोणताही धार्मिक कार्यक्रम करत नाही. अर्थात दुसर्‍या कोणी बोलवल्यास नातेसंबंध जपण्याच्या हेतुने उपस्थिती धडते. मुलाची मुंज करण्याचा मानस नाही. कुठे शिक्षणाच्या हेतुने दूर ठेवण्याची वेळ आल्यास स्नेहसंमेलनाच्या रुपात धार्मिक विधीशिवाय मुंज होईल. मुलाची पत्रिका अस्तित्वातच नाही. या विचारांची पत्नीवर सक्ती नाही. पण तिलाही बर्‍याच गोष्टी पटतात. इतका बदल घडलाय..

In reply to by एस

विलासराव Fri, 09/26/2014 - 09:17
+१. मलाही दाभोळकरांचे काम मोलाचे वाटते. ज्या गोष्टी पटल्या त्या घेतल्या.न पटलेल्या सोडुन दिल्या.

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 16:18
त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. १५ वर्षांपूर्वी जो आदर आणि मान अंनिस ला होता, ज्या प्रकारची लोकभावना होती ती आज काहीशी धुसर झाली आहे. इतक्या वर्षांच्या अविरत कष्टांनंतर जर लोक आपल्याकडे संशयाने बघत असतील तर ती दाभोलकरांची संघटना बांधणीची सारी मेहनत फुकट जायची. अंनिस एक लोकशाहीवादी संघटना असेल तर त्यांना ह्या टीका आणि प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. सतत लोकांना आव्हान देऊन, चिथावून पदरात अपमान आणि संशय पडण्यापेक्षा अंधश्रद्धेत अडकलेल्या, अडकू शकणाऱ्या जनतेला हळुवारपणे सामंजस्याने योग्य मार्गावर आणणे आवश्यक आहे. कुठलेही आंदोलन उभे राहायला वाढायला प्रचंड कष्ट करावे लागतात. अंनिस रसातळाला जाऊ नये हि अंतिम इच्छा. सुधारणेची अपेक्षा आहे आणि मदतीची तयारीपण आहे. पण अशी सुधारणा खरेच अंनिस मान्य करेल का हा मूळ प्रश्न. अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्ये वाढणारी दैववादी मानसिकता भारताला परत मागे धाडू शकते. इथे असलेल्या प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच. पण खरेच अंनिस वाचवण्यासाठी, तिची परिणामकता वाढवण्यासाठी, तिचे जाहीर उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचाराने आवश्यक आहे. मी असा प्रश्न स्वत:ला विचारला आणि त्यातून अंनिस च्या मूळ किंवा छुपा हेतू काय असेल असाही प्रश्न उभा राहिला. शंका दूर केल्याशिवाय सहभाग शक्य नाही.

In reply to by संदीप डांगे

टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 20:28
एखाद्या माणसाला साप चावल्यावर त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी भगत्/बाबा कडे नेणे हे थांबवण्यासाठी अनिसंने काय केले पाहिजे होते असे तुम्हाला वाटते? तुमचे विचार अनिसंकडे पोहोचविण्याची जबाबदारी माझी...तुमच्या प्रतिसादात एका अक्षराचाही बदल न करता देणार उत्तर???

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 16:19
आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:30
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे. दुसर्‍यांनी काय करावे हे सांगायला मी काही अनिसचा कार्यकर्ता नाही.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 11:46
अरे टवाळा - घाटपांडे साहेबांनी विचारले की "अनिस चे काय करावे" असे, म्हणुन सांगितले. नाहीतर कोणी काय करावे हे सांगायला जायला मी काय अनिस चा कार्यकर्ता आहे? :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 11:53
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे.
हे तुम्हीच लिहिले ना???

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 12:04
अहो पण ते का लिहीले ते बघा ना. पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले. विचारलेच नसते तर कशाला सांगायला आलो असतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 13:20
पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले
मग तुम्ही पण पेठकरकाकांच्या प्रतिसादाखालिच लिहायला हवे होते...इथे का लिहिले??...आणि ते तर म्हणत आहेत की
हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 13:36
आता अस करा की अंनिसने काय प्रकाश घाटपांडे - Thu, 25/09/2014 - 16:19 आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा उत्तर द्या
पेठकर नाही धाटपांडे काका !!!

In reply to by टवाळ कार्टा

थॉर माणूस Fri, 09/26/2014 - 14:41
अहो कुणाशी वाद घालताय... राणीचे पाईक ते. इंग्लंडात बसून भारत कसा फालतू आणि भारतातल्या माणसांनी काय करावं त्याविषयी गफ्फा मारणे हा त्यांचा इगो कुरवाळण्यासाठीचा उद्योग आहे.

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 16:36
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? या वाक्याला एक अहंकाराचा दर्प येतो आहे . इतरांना शुद्धीकरणाचे, आत्मनिरिक्षण / परीक्षण करण्याचे सल्ले देणारे स्वतःच्या योग्यतेबद्दल केव्हढा आत्मविश्वास बाळगून असतात याचे कौतुक वाटते. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. आणि तुम्हाला जे जास्तं योग्यं वाट्ते , म्हणजे भिकारी/ वेश्या निर्मुलन , ते कार्यं (शक्यं असल्यास) हाती घ्यावेत . पण कृपया दुसरा करीत असलेल्या कार्याला असे हीन लेखु नका . समर्थांनी सांगीतले आहे : क्रियेवीण वाचाळता व्यर्थं आहे.

In reply to by मनीषा

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 17:21
माझ्या अहंकाराबद्दलचे आपले गैरसमज दूर होतील अशी आशा करतो, माझ्या प्रश्नातच माझे उत्तर उपरोधिकपणे उच्चारले आहे. अंनिस काय करते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे का? कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न राहातच नाही जेंव्हा मुसलमान किंवा ख्रिश्चन जबरदस्ती किंवा आमिषाने एखाद्यास धर्मांतर करण्यास भाग पडतो. दुसऱ्याच्या घरात घुसून त्याच्या श्रद्धांची चिरफाड करताना चार बोट आपल्याकडेही असतीलच याचे भान असावेच. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही हे कसे ठरवणार? तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. हेच अंनिस ला सांगितले तर आम्ही ढोंगी का? साधे उदाहरण आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही, त्याचा काही उपयोग नाही, लोकांना फक्त लुबाडतात. चला मान्य आहे तुमचे. पण ज्योतिष धुडकावून लावण्याआधी स्वत: खपून काही अभ्यास केला आहे का? नुसते आव्हान देत फिरल्याने काही होत नाही. असो माझ्या ज्योतिषावर विश्वास आहे कि नाही याबद्दल नंतर कधी. वैद्यकशास्त्रात एका डॉक्टरचे निदान दुसरा डॉक्टर मान्य करत नाही, एकाची उपचारपद्धती दुसरा चालू ठेवत नाही. तिथे सुरु असलेला सगळा भोंगळ कारभार चालतो, तो काय लोकांच्या जीवाशी आणि पैश्याशी खेळ नाही का? तिथल्या अंधश्रद्धांचा अंनिस ने काय भांडाफोड केला? अंनिस ने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाविषयी समान भूमिका घ्यावी अन्यथा नाव बदलावे असे माझे एक मत. यात मीच काही कार्य हाती घेतले तरच मला बोलण्याचा अधिकार असे काही आहे का? लोकांना "काहीतरी केल्याचे" समाधान हवे असते. त्याने काय फरक पडतो, नाही पडत याचा त्यांना विचार करण्यास भाग पडले कि ते चिडतात असे आजवरच्या अनुभवांवरून माहित आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 17:42
तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक काय तसेच श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक समस्या यात गल्लत करीत आहात असे वाटते . जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे हा गुन्हाच आहे कारण त्यात सामाजिक/ वैयक्तीक आणि धार्मिक स्वतंत्र्याची पायमल्ली होते आहे. मला वाटते अशा कृत्याचे समर्थन माझ्या उत्तरात कुठेच नाहीये . तुम्हाला अंनीस चे कार्यं पटत नाही हे तुमचे मत आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते . तसेच तुम्हीही इतरांच्या मत स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच.

In reply to by मनीषा

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 18:03
मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत बाल सप्रे ह्यांनी हि मला हाच प्रतिसाद दिला कि आपण समस्या आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात. मग इतर सामाजिक समस्येप्रमाणे अंधश्रद्धा हि सामाजिक समस्या असली पाहिजे की ती वैयक्तिक समस्या आहे? मग वैयक्तिक समस्या हि सामाजिक केंव्हा होते आणि त्यात लुडबुड करण्याचा इतरांना केंव्हा अधिकार प्राप्त होतो? माझा खरच आता गोंधळ व्हायला लागला आहे खरच अंधश्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक अंधश्रद्धा का? ह्या शब्दाला असा संकुचित अर्थ कसा प्राप्त झाला? त्यामुळे अंनिस हे धर्मविरोधी आहे असा नकारात्मक प्रचार झाला आणि त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा Fri, 09/26/2014 - 11:40
उदाहरणार्थ अंनीस ही एक समाजिक चळवळ आणि अंनीस ला विरोध करायचा ? पाठिंबा द्यायचा? की त्या पासून अलिप्त रहायचे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्नं त्यात कुणी ढवळा ढवळ करणे योग्यं होणार नाही . हे तत्वं वापरून तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक बाबींचे वर्गीकरण करा . आणि त्तुमच्या वैयक्तिक समस्यांमधे लुडबुड करायचा अधिकार कुणालाच नाही जो पर्यंत तुमच्या वर्तनाने कुणाला उपद्रव होत नाही. हाच नियम तुम्हालाही लागू होईल . इतरांच्या खाजगी गोष्टींमधे तुम्ही नाक खुपसले तर तो गुन्हा समजला जाईल.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 16:38
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो....

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:40
साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर आज काही जाणवण्या इतका थोडा तरी फरक पडला असता का? माझ्या मते नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:53
७०-८० च्या दशकात नास्तिकतेच प्रमाण जास्त होते. कोणी देव देव करायला लागले तर त्याची थोडी का होइना चेष्टाच होयची. १९९०-२००० नंतर, देव, बाबा, बुवा, सण, परंपरा ह्यांना मोठीच प्रतिष्ठा मिळाली आहे. कदाचित हेच अनिसचे कॉट्रीब्युशन असावे. ( हे हलके घ्या ). माझ्या मते अनिसला महाराष्ट्राच्या इतिहासात २ ओळी इतकी पण जागा नाही. त्या दोन ओळी पण कदाचित खुना बद्दल असतील ( आणि त्यामागच्या राजकारणा बद्दल )

In reply to by प्रकाश घाटपांडे

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 16:48
विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला दाभोलकरांना लागलेल्या बुलेट ने संपवले.

In reply to by संदीप डांगे

स्वप्नांची राणी गुरुवार, 09/25/2014 - 16:54
हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार घेऊन संपवावे लागले त्यांना... त्यापेक्षा सरळ सोप्पी मुठ का मारली नाही..?

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 17:39
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. आत ठसठसतंय चैतन्य, वाट त्याला देणार नाही. मुठीत सामावली दुनिया, प्रकट तिला करणार नाही. जगन्नाथाचा रथ हा, हस्ते परहस्ते चालवणार नाही. ;)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 18:12
___/\___ जौ दे रे! जुन्या पेशवेकाळाच्या पलिकडं जावं लागेल. :) नकोच बोलूस त्यापेक्षा. ;)

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 13:02
मूठ असो वा मिठी पडता ती दिठी अन मग पाठोपाठी काय जाहले || जाहले ते ते पाहिले ऐकिले तैसेचि ठेविले समजले तर समजले नाही का हो ||

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 09/25/2014 - 17:00
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही.
समितीने अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कशी व्याख्या केली आहे? अंधश्रध्दाविरोधी लढा म्हणजे नक्की कशाच्या विरोधात लढा अपेक्षित आहे?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 17:12
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप." "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात" आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे. [आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते. परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे') आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो. तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:15
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि
तुम्ही सुद्धा आता "बाबा वाक्यम प्रमाणम" च्या दिशेने चालला आहात. इथे बाबा दाभोलकर झाले आहेत. बाकी बुवा पण असेच म्हणतात ना की ह्य/त्या धर्मग्रंथात असे लिहीले आहे/तसे लिहीले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 17:19
आपल्या प्रतिसादावरुन असे वाटते की आपण माझा प्रतिसाद पुर्वग्रह न बाळगता वाचला नाही. मी फक्त संदर्भ दिला आहे. माझे आनुषंगिक मत पुढे आले आहेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 09/25/2014 - 18:56
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
याविषयी मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळींमध्ये बरीच ई-मेला ई-मेली झाली होती. त्यातील इतरांनी मांडलेली मते (अ‍ॅसॉर्टेड) इथे लिहित आहे.तसेच मिसळपाववरच आणि इतर संकेतस्थळांवर आणि फेसबुकवर मी जे काही वाचले आहे त्यावरून पुढील गोष्टी लिहित आहे. यापैकी एकही गोष्ट मी मुळात लिहिलेली नाही तरीही सगळ्या मूळ लेखकांची नावे इथे लिहित नाही आणि त्याची गरजही नसावी. घाटपांडे साहेब म्हणतात (की दाभोळकर म्हणतात ते उधृत करतात): "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात".आता ज्ञान किंवा अनुभव म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. एका ई-मेलमध्ये मला खालील मजकूर आला तो इथे जसाच्या तसा चिकटवत आहे: "शास्त्रामध्ये अगदी मूलभूत आणि (अजून तरी) inviolable असे फार नियम नाहीत. असे नियम बहुदा दहा-बाराच असतील (न्यूटनचे नियम, वस्तुमान/उर्जेचा अक्षय्यतेचा नियम,ओहमचा नियम इत्यादी).पण इतर सगळे नियम हे या मूलभूत नियमांवरून derived असतात.अनेकदा असे derived नियम हे universal नसतात तर काही मर्यादांमध्ये लागू होतात.उदाहरणार्थ ऍल्युमिनिअम हे room temperature ला elastic असते पण ते वरच्या तपमानाला आणि एका ठराविक pressure मध्ये तोच धातू पूर्णपणे plastic असतो.या प्रकाराला superplasticity म्हणतात. म्हणजे हा धातू elastic आहे असे आपण म्हणतो त्याचवेळा त्याला एक caveat असते ते म्हणजे room temperature आणि atmospheric pressure.अनेकदा अशी बंधने या नियमांना असतात हे पहिल्यांदा लक्षातच येत नाही तर असे काही प्रयोग झाल्यानंतरच ते कळते.जर का मी असा काही प्रयोग करायला गेलो तर कदाचित सध्याच्या शास्त्रीय बैठकीप्रमाणे ते अशक्य असेल किंवा काऊंटर-इंट्युऊटिव्हही असेल.पण सद्यकालीन शास्त्रीय माहितीच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय असे नवीन प्रयोग होऊच शकणार नाहीत.आणि पूर्णपणे rational व्यक्तिला शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर विचार करणे शक्य कसे होणार?"
तेव्हा ज्याने पहिल्यांदा अ‍ॅल्युमिनिअमच्या सुपरप्लॅस्टिसिटीवर प्रयोग केला तो माणूस अंधश्रध्द का?
कारण त्यावेळी माहित असलेल्या ज्ञानाच्या आधारे सुपरप्लॅस्टिसिटी असे काही असते आणि अ‍ॅल्युमिनिअम हा धातू इलॅस्टिक सोडून दुसरे काही असू शकेल हे माहितच नव्हते.घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे. ई-मेल कंटिन्यूज--- "यावरूनच मी म्हणतो की Circle of rationality is often enlarged by irrational people. जे rational असतात ते एखादी गोष्ट समोर दिसली नाही किंवा अन्य पध्दतीने तिचे अस्तित्व सिध्द करता आले नाही तर ती मान्य करत नाहीत आणि त्यातूनच नकळत आपल्यावरच बंधने घालून घेतात." याविषयी तुमचे काय म्हणणे आहे घाटपांडेसाहेब?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 20:02
घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.
मला जे काही म्हणायचे आहे ते मी वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. शेवटचे दोन परिच्छेद वाचा. आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा.वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
असे असेल तर अंधश्रध्दा निर्मूलन कशाला करायला पाहिजे? समजा आज मला एखादी अंधश्रध्दा वाटत असली तरी काही वर्षांनी अनुभवात आणि ज्ञानात भर पडल्यानंतर तीच गोष्ट अंधश्रध्दा वाटणार नाही याची शक्यता आहेच ना. मग अंधश्रध्देला विरोध म्हणजे नक्की कशाला विरोध हा प्रश्न परत उभा राहतोच की. कारण अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कालनिरपेक्ष व्याख्या करता येत नसेल तर मग विरोध नक्की कशाला?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आज एखादी गोष्ट ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत बसत नसेल तर ती अवैज्ञानिक आहे हे म्हणणे भाग आहे. उद्या ती विज्ञानाच्या कक्षेत बसली तर तिला वैज्ञानिक म्हणु. पण म्हणुन आजच ती वै़ज्ञानिक आहे असे कशाला म्हणायचे? वर भल्या मोठ्या प्रतिसादात मी खरा वैज्ञानिक नकारज्ञ नसतो याचा उहापोह केला आहेच. अंधश्रद्धांना विरोधा हा खरतर त्यामुळे होणार्‍या शोषणाला विरोध आहे जशी विज्ञानाची प्रगती होत जाईल तशी अंधश्रद्धा कमी होतील. पुर्वी देवीचा रोग हा देवीचा कोप मानत होते. आज भारतात देवीचा रोगी शोधुन सापडत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 17:36
बराचसा सहमत. बदल घडवून आणणारा बर्‍याचदा आपल्या बदलाच्या तत्वज्ञानाच्या इतका प्रेमात पडतो की, आपण बदल कशासाठी घडवून आणत आहे ते विसरतो... आणि त्या तत्वज्ञानात जर कोणी बदल सुचवला तर त्याचा कडवा विरोधक बनतो... म्हणजे एका अर्थाने बदलाचाच विरोधक बनतो !

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुंबा Tue, 11/07/2017 - 14:25
अतिशय आवडला हा प्रतिसाद. अंगात येणार्‍या बायका मुळात मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात. घरातल्या व्यक्तिंकडुन अवहेलना, अपमान, हेळसांड सहन करणार्‍या असतात. त्यामुळे त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या असणारे कृत्य करत असल्या तरी मुळात अंधश्रद्धेच्या बळीच असतात. तसेच सार्‍याच अंधश्रद्धेचे. याचा अर्थ अंधश्रद्धा फोफावणार्‍या व्यक्तिला शिक्षा होऊ नये असे नव्हे पण अंधश्रद्धेला समजून घेणे आवश्यक आहे. अंनिसवाल्या सार्‍यांनीच अशे संञत भुमिका घेतली तर मोठे बदल निश्वित घडतील असे वाटते.

धन्या गुरुवार, 09/25/2014 - 17:00
मुळात अंधश्रद्धा म्हणून काही नसते. हा शब्द अंनिसने (किंवा त्यांच्याही आधी शाम मानवांनी ?) वापरायला सुरुवात केली असावी असे वाटते. मला हा शब्दच चुकीचा वाटतो. श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते. अंनिसने देव आणि धर्माविषयीच्या निरुपद्रवी श्रद्धांना (उदा. देवाची पुजाअर्चा) डोळस श्रद्धा म्हटले तर समाजास हानीकारक असणार्‍या श्रद्धांना (उदा. बळी देणे, बुवाबाजी) अंधश्रद्धा म्हटले. आणि त्यांनी त्यांचं लक्ष फक्त "अंधश्रद्धां"वर केंद्रीत केले. ही त्यांची अर्थातच "स्कोप रीडक्शन"ची स्ट्रॅटेजी होती. लोकांच्या "श्रद्धांना" कुणाचाही विरोध नसावा या मताचा मीसुद्धा आहे. प्रत्येकाला आपापली श्रद्धा जोपासण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य असायलाच हवे. मात्र लोकांनी आपल्या श्रद्धा आपल्या घरात जपाव्यात. रस्त्यावर आणू नये. श्रद्धा रस्त्यावर आल्या की त्याचा किती त्रास होतो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

In reply to by धन्या

राजेश घासकडवी गुरुवार, 09/25/2014 - 17:53
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.
परफेक्ट. अवांतर - एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या विचारांपासून ते ट्यार्पीखेचक धाग्याकडे प्रवास केलेला पाहून लेखकाच्या मनोधैर्याचं कौतुक वाटतं. मध्ये एका टप्प्यावर 'धन्यवाद मिपाकरांनो, माझं आता ठीक चाललंय' असा धागा आला असता तर जास्त बरं वाटलं असतं.

In reply to by राजेश घासकडवी

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:59
त्या धाग्याचा दुसरा भाग पण येणार होता पण अजुन आला नाहीये. त्याच्या ऐवजी हे आले.

In reply to by राजेश घासकडवी

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 18:32
येणार येणार येणार दुसरा बी भाग येणार … ह्याच्यापेक्षा ज्यास्त ट्यार्पि खेचक आसनार. सगळेच जरा वळणावर येत आहे. पूर्ण कथा टाकण्यात मजा आहे, उगाच च्यानलांसारखे काय रोज रोज कुटत बसायचे. मनोधर्य शाबूत राहण्यात मिपाची हिमालायेवढी मदत झाली आहे. दुसरा भाग येणार आहे, फुल्ल यांड फायनल.

In reply to by संदीप डांगे

मनीषा Fri, 09/26/2014 - 11:47
पण काही म्हणा , आत्महत्येचे विचार मनात येणे ते अंनीस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणे - हा मनस्थितीतील बदलाचा प्रवास तुम्ही अगदी कमी कालावधीत ( काही दिवसातच) पार केला या बद्दल तुमचे अभिनंदन !!

In reply to by मनीषा

संदीप डांगे Fri, 09/26/2014 - 15:27
अंनिस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्याचा विचार आत्महत्येच्या विचारांपासून निघालेल्या शंभर धाग्यामाधला एक आहे. मला काही लोकांनी पत्रिका, होम हवन, ग्रहशांती वैगेरे पुळचट उपाय करायला सांगितले. त्यानंतर झालेल्या मेंदूवादळानंतर हा सल्ला निपजला. एकूण माझा लेख आणि त्याचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपल्या परीने लावला. सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते कि साधारणपणे सगळ्यांना समोरच्याला "च्या बाजूने/च्या विरुध्द" असे वर्गीकरण केल्याशिवाय जमतच नाही. तुम्ही वादग्रस्त विषय काढले कि एकतर च्या बाजूने समजले जाता किंवा च्या विरुद्ध. ह्या लेखाचा काहीतरी भलताच अर्थ लावला गेला आहे. कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी संबंध नसावा अशी माझी भाबडी अपेक्षा होती. अंनिस चुकीचे काम करत आहे हे कुठेही म्हटले नाही. अंनिस फालतू आणि बेसलेस आहे असेही म्हटले नाही. त्यांच्या कडे लोकांचा बघण्याचा बदलत चालेला दृष्टीकोन आणि सद्य सामाजिक परिस्थिती ह्याच्यावर काही समाधान शोधता आले तर बरे असे मला वाटत होते असो. मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे. पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.

In reply to by संदीप डांगे

सखी Fri, 09/26/2014 - 21:48
तुमच्या लेखाची पहीलीच ओळ आहे. अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा....

In reply to by संदीप डांगे

राजेश घासकडवी Mon, 09/29/2014 - 05:40
मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.
सखी यांनी तुमच्या लेखनातला आणि प्रतिसादातला विरोधाभास दाखवलेला आहेच. तेव्हा मिपाकरांना बिटवीन द लाईन समजत नाही वगैरे गैरसमजात राहू नये.
पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.
एवढं करण्याची गरज नाही. संयत भाषेत प्रामाणिकपणे लेखन केलं की पुरतं. हा प्रामाणिकपणा मिपाकरांना बिटवीन द लाइन स्वच्छ दिसतो. उगाच मिपाकरांना कळलंच नाही असं म्हणणं, आणि वर तिरकस बोलणं टाळलं तर आणखीनच चांगलं.

निश गुरुवार, 09/25/2014 - 17:13
भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन ह्या सुध्दा अंधश्रद्धा निर्मुलनाशी निगडित आहेत. कस ते सांगतो ज्यामुलीना देवाशी लग्न लावुन देवदासी बनवण्यात आल त्यांच्या संमती शिवाय त्या मुली कालांतराने पुरुष वासनेला बळी पडतात व मग वेश्या व्यवसायात ओढ्यल्या जातात. अनिसमुळे येणार्‍या कायद्यामुळे ह्या वाईट प्रथेला नक्कीच लगाम लागेल. भिखारी का वाढतात हे जर बघितल तर जरा आपल्या मंदिराजवळ असणार्‍या त्यांच्या उपस्थितिवरुन कळेल आणि एक जर अनिसच काम एव्ह्ढ महत्वाच नव्हत तर मग दाभोलकरांनसारख्या विद्वान माणसाला जीव का गमवावा लागला. अनिसच काम हे फार महत्वाच होत व ते राहील. दाभोलकर व त्यांच्या अनिसला माझा लाख लाख वेळा सलाम.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 18:00
खंग्री चर्चा. धागाकर्ता स्वत: वाद प्रतिवाद करतोय हे पाहुन बरे वाटले. येत राहीन वाचायला.

शशिकांत ओक गुरुवार, 09/25/2014 - 18:42
अशा विषयावरील धाग्यावर ठरलेले बॅटमन खेळायला आलेले पाहून वरील नाव नाही आले तर कसे चालेल म्हणून माहिती साठी ही प्रतिक्रिया. सरांच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ अंनिसचा खरा चेहरा पुस्तकातील विचारांची आठवण झाली. अनेक नव्या सदस्यांच्या माहितीसाठी सरांच्या पुस्तकातील काही प्रकरणे कोणी विचारणा केली तर डकवीन.

तिमा गुरुवार, 09/25/2014 - 18:48
कुठल्याही व्यक्तीला तू मूर्खपणा करत आहेस, असे सांगितलेले आवडत नाही. अंधश्रद्ध लोकांचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांना शहाणपणा शिकवायला जाऊ नये.आत्मोन्नतीच्या प्रवासात ते आपल्या कैक जन्म मागे आहेत असे समजावे.(याठेकाणी जन्म हा शब्द काल व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. नाहीतर पुनर्जन्मावर तुमचे अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हणेल.)

चित्रगुप्त गुरुवार, 09/25/2014 - 18:54
अंधश्रद्धाच काय, तथाकथित श्रद्धा सुद्धा मला अनावश्यक वाटते, तरीसुद्धा फक्त एवढेच नमूद करतो, की दाभोलकरांच्या व्याख्यानाचा मी बघितलेला एकमेव व्हिडियो मला कैच्या कैच वाटला होता.

मित्रहो Fri, 09/26/2014 - 00:30
मी लहान असताना मला दाभोळकर माहीती नव्हते पण शाम मानव यायचे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेपण यायचे. ते बरेच प्रयोग करुन दाखवयाचे आणि त्यामागचे शास्त्र सांगायचे. तेंव्हा मी श्रद्धा अंधश्रद्धा हे समजण्यापलीकडला होतो. मनात तेंव्हापासून एक पक्के ठसले हे सारे थोतांड आहे नंतरही या साऱ्यांचा विचार करताना मनात कुठेतरी तेच होते आणि असते. समाज बदलत नाही असे नाही तो बदलला आणि बदलतोय. तो अंनिसमुळेच बदलतोय असे म्हणणे कठीण आहे, पण त्याचा काहीतरी परीणाम होत असनार हे नक्की. लहाणपणी जसा समाज होता आणि आता जसा आहे यात बराच बदल झालाय. आता कुणी मांजर आडवे गेेे म्हणून पाच पावलेे मागे जात नाही. लहान असताना हा आमचा खेळ होता, कुणी जात असेल तर मुद्दाम मांजर सोडायचे. तसेच हीचा पायगुण वाइट हाही प्रकार आता बराच कमी झालाय. पूर्ण कमी झालाय असे म्हणता येणार नाही पण कमी झालाय. कुष्ठरोग्याला दिली जाणारी वागणूक. काही बुरसट कल्पनांनी स्त्रीयांना होणारा त्रास आज बराच कमी झालाय. समाज बदलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमटे आणि बंग यांचे कार्य. ते जेंव्हा आदिवासी भागात गेले तेंव्हा कुणीही त्यांच्याकडे यायला तयार नव्हते पण लोक हळूहळू यायला लागले.काही गोष्टी या बदलायलाच हव्या कुण्या नदीत आंघोळ केल्याने पापक्षालन होते ही समजूत. त्या नदीचे काय होते? गंगेविषयी बरेच बोलले जाते पण गोदावरीची परिस्थिती पण काही चांगली नाही मग ती नाशिकला असो की बासरला.तीच गोष्ट पशूबळींची. खरेच या गोष्टी आपल्याला हव्या आहेत का? इथे मला अनिस काय म्हणते यापेक्षा मला काय वाटते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे? हेही खरे आहे की काही गोष्टींचे प्रस्थ वाढलेय ज्योतीष्य, देवळातल्या रांगा, विशिष्ट ठिकाणी जायचा असलेला अट्टहास, कर्मकांड. याला अनिस जबाबदार आहे असे नाही म्हणणार मी. अनिस असते किंवा नसते तरीही असेच घडले असते. आर्थिक सुबत्ता आणि वाढती स्पर्धा हा जो समाजातील विरोधाभास आहे हे कदाचित त्यामागचे कारण असावे. दुसरे म्हणजे या गोष्टींमुळे फार नुकसान होत नाही त्यामुळे कुणी खूप जीव तोडून विरोध करीत नाही. या साऱ्या गोष्टी फार सोय़ीने स्वीकारायची सवय समाजाला जडलीय. ठरवलेल्या दिवशी जर बाळ हवे असेल तर दिवस पाहून सारे ठरविले जाते पण हेच जर का परीस्थिती वाइट झाली तर मग दिवस बघितला जात नाही.आधी अशी टोकाचीभिूमिका घेणारे लोक होते. अनिसचे काम आहे त्यांच्या परीने आणि समजुतीने समाजाचे प्रबोधन करायचे ते त्यांना करु द्यावे ते होते की नाही हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या.

In reply to by दशानन

पिलीयन रायडर Mon, 09/29/2014 - 10:00
साधारण हीच प्रतिक्रिया माझीही आहे... लेखक त्यांच्या मनस्थितीतुन बाहेर पडुन दुसरं काही लिहीत आहेत.. हे छानच आहे.. पण... आत्महत्या की कर्जबाजारी होणे असे पर्याय आयुष्यात उभे ठाकले असताना असे लेख लिहू शकणे व्यक्तिशः मला आश्चर्याचे वाटते.. वर कुठेतरी तुम्ही म्हणत आहात की काम करुन जो वेळ उरतोय त्यातुन हे लेख तिहीतोय.. पण इथे ज्या हिरीरीने प्रतिवाद करत आहात ते पाहुन तसंही वाटत नाहीये.. आणि लेखाबद्दल म्हणायचं झालं तर पहिलीच ओळ इतकी टीआरपी खेचक आहे की त्यावर काही मत देण्याची इच्छाच नाही.. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करावं आणि काय करु नये ह्याच्याशी माझा काही संबंध नाही.. मला फक्त आश्चर्य वाटलं.. दशानन ह्यांना "शॉक" का लागला असावा हे समजतय...

बाबा पाटील Sat, 09/27/2014 - 11:39
फुल्ल करमणुक असते. माझ्या गावात दर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते,देवाची ३०-३५ फुटाची ध्वजाची काठी नाचवत नाचवत मिरवणुकीने देवाकडे नेली जाते , आजपर्यंत गावातल कोनीही अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अन्यथा या दिवशी दर्शन चुकवत नाही. यात दंडवत आणी देव अंगात येणे हे दोन प्रकार मजबुत चालायचे.साधारण मी १० वर्षाचा असताना आमच्या शाळामास्तर बापुसने मला या देव अंगात येण्याच्या कार्यक्रमापुर्वी सराटे दिले,व जेथे देव अंगात येतो त्या ठिकाणी टाकण्यास सांगितले,सराट्याची ( संस्कृत नाव गोक्षुर कंटक) ते कसेही फेका त्याच्यावर पाय पडला की की ते पायात घुसणारच. त्यामुळे ज्याच्या अंगात येइ व देवापुढे घुमायला जाई त्याच्या पायात मातीत पडलेला काटा घुसत असे, त्यावर्षी तर फुल्ल कल्ला, हाच प्रकार सलग तीन-चार वर्ष घडला,आपोआप दरवर्षी या घुमणार्‍यांची संख्या कमी कमी होत गेली व हळु हळु थांबली,विषेश म्हणजे देवाचे सगळ्यात मोठे भक्त गावचे कारभारी आमचे आजोबा.पण मात्रा अचुक लागु पडली आणी मागच्या विस वर्षात तरी परत देवापुढे कोनी नाचत-घुमत बसले नाही. आता दहा एक वर्ष झाली,वडिलच विश्वस्त आहेत विविध सुधारणा चालु आहे,पण श्रद्धा ठेवुन अंद्धश्रद्धेला पुर्ण फाटा देण्यात आला आहे.खरच असा एकतरी मास्तर प्रत्येक गावात असावा,इतक्या वर्षांचे आमचे बापलेकांचे गुपित आज मि.पा.मुळे बाहेर आले.असो.

काउबॉय Sat, 09/27/2014 - 13:55
श्रध्देची व्याख्या
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास
उदा. तेंडुलकर आज शतक ठोकणार... पुरावा काय या आधी ठोकल्याचा अनुभव. असे सगळेच म्हणतात म्हणून... ज्या पिलानेने आयुष्यात प्रथमच सचु खेळताना बघितला आहे तो ही श्रध्देने टाळ्या पिटतोय बरे नाही झाले शतक म्हणून हिरमोड झालाय म्हणुन पुढील म्याचला सुधा तिच तर्हा अन तोच हिरमोड हो शतक काय भोपळा फुटला नाय.... मायला अनीस क्रिकेटवर बंदी का घालत नाही ?

In reply to by काउबॉय

काउबॉय Sat, 09/27/2014 - 14:06
तर आपल्या भौतिक जीवनाच्या ही अविभाज्य भाग आहेत पण शिरोमणी जेंव्हा त्याला निव्वळ विशिष्ट मुद्या पुरते मान्य करून विधाने करतात तेंव्हा निराकार गाढवाची हे वागन बरं न्हवे हीच कविता पुन्हा पुन्हा आठवू लागते

एस गुरुवार, 09/25/2014 - 12:52
तुम्ही असा फालतू आणि बेसलेस धागा काढण्यापेक्षा तुमच्या व्यवसायात डोके का घालत नाहीत?

In reply to by प्रचेतस

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 13:01
काहीसा सहमत काहीसा असहमत. व्यवसायामध्ये २४*७ डोकं घालून बसता येणं शक्य नाही. शक्य झालं तरी परिणाम दिसायला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा द्यावा लागणारच. आमच्याकडं '९ महिन्याचं' उदाहरण नेहमी दिलं जातं.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 13:09
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 13:07
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 21:45
त्यामागील विचारास सहमती वा असहमती देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तिच गोष्ट संदीप ची. दाभोलकर टाळुन विचार मांडले असते तर त्याला नक्कीच यथोचित पातळी लाभली असती, असो एकुणच नॉन सेन्स थांबवायचा मला अधिकार नाही त्यामुले चालुद्या असे म्हणतो

In reply to by काउबॉय

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 22:15
काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत. मी स्वत: कुणाचा व्यक्तिश: उपमर्द करणार नाही. "आता दाभोळकर नाहीत" याचा अर्थ तोच आहे. पाहिजे ते हे दोन अर्थ घ्या. १. "ते" नाहीत, त्यामुळे आता तुम्हीच जबाबदारीने पुढचे पाउल उचला २. "ते" नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुका टाळण्याची पूर्ण संधी आहे. पण एकूणच नॉन सेन्स म्हणजे काय आणि यथोचित पातळी काय ते जर स्पष्ट करा दादा! असा चिमटा काढून भागो मत!

In reply to by संदीप डांगे

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 23:08
घटकांची घुसड़..! अशी घुसड़ that really doesn't make any sense. यथोचित पातळि म्हणजे मांडलेला विचाराला न्याय मिळेल आशा उंचीवर न्हेउन त्याला चर्चापूरक बनवणे होय.

In reply to by काउबॉय

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 23:13
आपण श्रध्दा अश्रध्दा व अंधश्रदहा सारखी विश्वव्यापक प्रकरणे व्यक्तिसापेक्ष नजरेतुन मर्यादित करुण अनावश्यकरित्या आपल्याच विषयाचे गाम्भीर्य व ऊँची कमी करत आहात :(

कानडाऊ योगेशु गुरुवार, 09/25/2014 - 13:28
त्या धाग्यांवर मि.पा. ची एरव्ही न दिसणारी संवेदनशील बाजु दिसली होती. अश्या धाग्यांवर मात्र मि.पा करांचा नेहेमीचा धुमाकुळ चालणारच एवढेच फक्त लक्षात असु द्या! इथे विशेषतः अश्या धाग्यांवर कधी कोण कुणाला "चपला घालुन ताबडतोब चालु लागा" वा " तुम्हाला फाट्यावर मारण्यात आले आहे" असे म्हणेल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे ट्यार्पी खेचणारे धागे काढताना सगळी तयारी ठेवा. बाकी तुमच्याकडुन असा ट्यार्पी खेचणारा धागा आला ही तुमची मनस्थिती पुन्हा चांगली होत आहे ह्याची खूण आहे असे समजतो आणि असे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 13:50
त्या धाग्यात लिहिलेलं त्या धाग्याबरोबर वाचनमात्र झालं. आज आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते बिनधास्त लिहा आणि चर्चा करा! आज आत्ता तुम्हाला छान वाटतंय ना? बस!

In reply to by पैसा

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 14:38
भाऊ, तुमच्या या धाग्यातील विचारांशी मी काडीमात्र सहमत नसलो, तरी मोकळेपणाने तुम्ही तुमचे विचार मांडले, याबद्दल तुमचे अभिनंदन. मिपाचे ऐक यश आहे, कि अतिशय भिन्न विचारांची लोकं मोकळेपणाने विचार मांडू शकतात.

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 13:55
किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा
बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा
या दोन वाक्यांवरुन तुम्हाला अंधश्रद्धांच वर्गीकरण कसं करायचय ते नक्की समजत नाही. आता एखाद्या शाळेत लिंबू मिरची टांगली तर ती शैक्षणिक अंधश्रद्धा की धार्मिक?? उमेदवारी अर्ज पितृपक्षात न भरणे ही राजकीय की धार्मिक अंधश्रद्धा?? आधी धार्मिक सामाजिक राजकीय अंधश्रद्धा म्हणजे काय ते स्पष्ट करा.. मग फक्त हिंदू धर्मच वगैरे बघु..

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 14:35
राजकीय अंधश्रद्धा: लोकशाहीतल्या आपल्या नेमक्या स्थानाबद्दल लोकांना अजूनही नीट अशी माहिती नाही. आपली कामे करणारा राजकीय नेता हा आपला मालक असल्यासारखा वागतो आणि आपण ते खपवून घेतो. त्यांच्या विरुद्ध आपण उभे राहू शकत नाही हि सामान्य जनतेची अंधश्रद्धा, राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला अण्णा हजारे किंवा तत्सम लोकच लागतात हि अंधश्रद्धा. थोडक्यात लोकशाही म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव न ठेवता आपले सगळे चांगले झाले पाहिजे अशी भावना म्हणजे अंधश्रद्धा. शैक्षणिक: शिक्षण घेतल्याने नोकरी लागते आणि पैसा कमावण्यासाठीच शिक्षण घ्यायचे हि एक मोठ्ठी अंधश्रद्धा. शिक्षण घेतल्याने नोकरी लागेलच अशी कुणीही खात्री देऊ शकत नाही. तरीही लोक बावळटपाने कागदाच्या भेंडोळ्या गोळा करण्यात आयुष्य घालवतात. पैसा ओतला कि हुशार होता येते हि एक आणखी अंधश्रद्धा सामाजिक: जात-पात, धर्म, व्यवसाय यांच्यामुळे जी दरी निर्माण होते ती ओलांडून जाऊन आपण जाऊच शकत नाही अशी सर्वसामान्य अंधश्रद्धा. अपवाद आहेत पण म्हणून नियम मोडत नाहीत. लोक अजूनही जुन्या कालबाह्य सामाजिक गोष्टींचा बाऊ करून आपलाच विकास रोखून धरतात. कारण ह्या काही अंधश्रद्धाच. एवढेच काय, वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा आहेतच की. जसे स्टेम सेल बँकिंग वैगेरे वैगेरे. वेश्या, भिखारी आणि अस्वच्छता ह्यात समाजाच्या काही चुकीच्या समजुतीमुळे तयार झालेल्या समस्या आहेत. त्यांच्या मुळाशी असलेल्या अंधश्रद्धा निपटून काढल्यास बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एखादी संघटना जेंव्हा त्यांच्या नावात अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द वापरते आणि कार्यक्षेत्र फक्त विशिष्ट धर्माशी निगडीत असते तेंव्हा हेतू बद्दल संशय निर्माण होतो.

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 16:21
तुम्ही सगळ्याच समस्या अंधश्रद्धेच्या नावखाली गोळा केल्यायत.. तितकेसे पटत नाही.. उदा. शिक्षणाने नोकरी मिळते. इथे कार्यकारणभाव आहे. नोकरीच्या ठिकाणी पात्रता म्हणून शिक्षणाची अट असते. पण सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं कोणीच म्हणत नाही. मग सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून लोकांनी शिकूच नये का ?? इथे कार्यकारणभाव असल्याने इथे श्रद्धा अंधश्रद्धा शब्द वापरणे योग्य वाटत नाही.. तसेच इतर उदाहरणातही.. कार्यकारणभावाचा अभाव असतो तिथे श्रद्धा हा शब्द वापरता येतो.

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 16:42
अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, पटलाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यकारणभाव या शब्दाबद्दल माझे काही अज्ञान असू शकते. पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा आणि फणस येईल हि अंधश्रद्धा आहे असे माझे मत आहे. नोकरीसाठी शिक्षण हि अट ठेवणे येथूनच हि अंधश्रद्धा सुरु होते. जर तसे नसते तर नोकरीसाठी मुलाखत, वेगवेगळ्या परीक्षा यांची गरज नसती. एखाद्या कंपनीने सरळ पहिल्या दहा विद्यार्थ्यांना अमुक एका नोकरीचे थेट नेमणूक पाठवले असते. असे होत नाही. इथे कार्यकारणभाव कसा? माझ्या मते शिक्षणक्षेत्रात भयंकर अंधश्रद्धा बोकाळली असून त्याचा गैरफायदा घेऊन सामन्यांची पिळवणूक चालली आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:49
पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा
चांगले आंबे येतील ही ना श्रद्धा ना अंधश्रद्धा. ती फक्त "अपेक्षा" किंवा "आशा" ( ते सुद्धा झाड आपले असेल तर ). झाड वैर्‍याचे असेल तर सगळा मोहर गळुन जावा ही "इच्छा".

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 17:20
तुम्हाला सगळ्याच गोष्टीला श्रद्धा म्हणायचे असेल तर म्हणा बुवा .. माझादेखिल काही आग्रह नाही तुम्हाला पटलेच पाहिजे असा..

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 13:56
आणखी एक.. भिकारी, वेश्या, अस्व्च्छता हे सामाजिक प्रश्न झाले पण यात अंधश्रद्धा ( किंवा श्रद्धा) काय ??

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 14:00
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
हे सगळ्यांनीच सर्ववेळ करायला पाहिजे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/25/2014 - 14:15
अंनिसने अमेरिकेत शाखा उघडली पाहिजे असे शिरिष पूर्वी म्हणायचा. त्यांच्या त्या हिरव्या नोटेवर 'In God we trust' लिहिलेले असते म्हणून. तुमच्या त्या व्हॅटिकन सिटीत्,मक्का-मदिना येथे तोबा गर्दी असते.एवढेच काय, केऱळातल्या काही चर्चेसमध्येही भल्यामोठ्या रांगा असतात.अंनिसवाल्यानी ईतर धर्मातील अंधश्रद्धांबद्दल कधी काही केले आहे का?
स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी
राहू,केतू,वेळ पाहून काम करणारी अनेक मंडळी पाहिली आहेत. ती तसे करतात म्हणजे तीमाणसे निष्क्रिय असतात हा एक मोठा गैरसमज आहे. नविन घरात राहायला जायचे तर होम-हवन हवेच.दक्षिण भारतात तर हे कसोशिने पाळले जाते.त्याला अंधश्र्द्धा म्हणनार असाल तर खुशाल म्हणा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गणपा गुरुवार, 09/25/2014 - 18:49
इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत म्हणुन आपल्याही तश्याच राहुद्या असं म्हणायचय का माई? अहो त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं.

In reply to by गणपा

प्रदीप गुरुवार, 09/25/2014 - 21:07
त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं. 'आपले घर' म्हणजे काय? अंनिस जर 'भारतीय समाजासाठी' कार्यरत आहे असे म्हटले, तर मग त्यात हिंदूंव्यतिरीक्त इतर धर्मीयही आलेच ना? का अंनिसने स्वत: हिंदूधर्मिय आहोत असे जाहीर केले आहे?

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:24
दाभोलकरांना स्वताची मोठी अंधश्रद्धा कधी दिसली नाही त्यामुळे ती दुर करण्याचे तर विसराच. भारतीय समाजाला आणि त्याच्या वैचारिक कुवतीला पण दाभोळकर ओळखू शकले नाहीत. अनिस वगैरे काढुन आणि व्याख्याने देवुन भारतातल्या अंधश्रद्धा कमी होतील असे वाटणे म्हणजेच मोठी अंधश्रद्धा आहे. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीवर गुळमुळीत भुमिका घेणे जसे की "आमचा श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला आहे" इत्यादी. दाभोलकरांच्या ३० वर्षाच्या कारकीर्दीतच देवळांच्या रांगा, बुवा, बाबा, महाराज ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यांचा खून झाला म्हणुन नाहीतर ९९ टक्के जनतेला त्यांचे नाव पण माहीती झाले नसते.

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 14:39
गल्लत करू नका. श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे. माझ्या कर्तृत्वावर माझी भक्कम श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, आशा. अजून काय सांगायचे. त्याशिवाय का जगात काही करणे शक्य आहे का? माझी जशी श्रद्धा माझ्या कर्तृत्वावर आहे तशी अंनिस ने इतरांची निर्माण करावी. नुसते हे चूक ते चूक करत फिरू नये. आणि दाभोळकर यांच्यासारख्या माननीय व्यक्तींबद्दल भंकस करण्याचा विषय, तर मी संघटनेद्दल बोलत आहे. दाभोळकर काय होते हे निदान त्यांच्या संघटनेला जरी कळले तरी खूप आहे.

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:43
श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे
एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग केले की मग "माझी ती श्रद्धा आणि तुझी अंधश्रद्धा" असले प्रकार चालू होतात. हे सर्व फार वैयक्तीक आहे, दुसर्‍यांना त्यात पडुच नये ( जो पर्यंत त्यांना त्याचा त्रास होत नाही ). दाभोळकरांना तेव्हडे पण समजले नाही ह्याचे वाईट वाटते.

मुक्त विहारि गुरुवार, 09/25/2014 - 14:52
ह्या धाग्याच्या निमीत्ताने निदान इतके तरी समजले कीए, तुम्ही परत जीवन जगायचा प्रयत्न करत आहात. अजून लिहा. आणि बिंधास्त लिहा.

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 14:56
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? हे म्हणजे भारताने मार्स मिशन हाती घेण्याच्या ऐवजी भारताने दार्द्र्य निर्मुलन हाती का घेतले नाही असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. या सगळ्या गोष्टी समांतरपणेच हाती घेतल्या पाहिजेत ना. सगळेच महत्वाचे आहे. दाभोळकरांचा अप्रोच कदाचित चुकीचा असु शकेल. पण त्यांनी हेच का केले आणि तेच का केले नाही हा प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 15:54
प्रश्न अंनिस च्या सर्वांगीण विचारपद्धतीचा आहे. पण एकंदर एखादी संघटना असाच विचार का ठेवते वैगेरे विचारणे चूक असू शकते. मला हेतू बद्दल शंका आहे. म्हणून हे प्रश्न.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 14:59
मी खरं तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सभेला चाललो होतो पण मध्येच मांजर आडवं गेलं मग बेत रहित करावा लागला. आपली अशी परिस्थिती आहे.

आतिवास गुरुवार, 09/25/2014 - 15:42
? अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा १. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे? २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते? ३. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. आणि मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. !! ४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही? ५..... ६. ... ... ... १००. ....

In reply to by आतिवास

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:53
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?
ना ते विधायक आहे ना ते विघातक आहे. निरर्थक आहे. ज्यांना अंधश्रद्धा सोडायच्या होत्या त्यांन्नी त्या त्यांच्या त्यांच्या सोडल्या. उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या. मनुष्य स्वभाव आहे, कोणाला दुसर्‍याने सांगितलेले आवडत नाही की तू मुर्ख आहेस. त्याचा मूर्खपणा अजुनच घट्ट होतो.

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 16:30
उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !! सगळे जग बदलेल अशी अपेक्षा अंनिसलाही नव्हती. पण जो थोडाफार बदल ते घडवू शकले तो नक्कीच स्वागतार्ह आहे .

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:34
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !!
ज्यांनी सोडल्या त्या त्यांच्या त्यांनी, त्यांच्या विचाराने. अनिस चे काही कॉट्रीब्युशन नाही. माझी बहीण एकाच वेळी दाभोलकरांचे खूप कौतुक करते, त्यांची पुस्तके वाचते आणि शक्य असतील त्या सर्व अंधश्रद्धा पाळते.

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 09/25/2014 - 16:58
अगदी.. अगदी. लोकांना चमत्कारामागची हातचलाखी समजावून सांगणे, प्रात्यक्षिक करुन दाखवणे, भंडाफोड करणे इत्यादि मार्गांनी लोकजागृती करण्याचा काही संस्थांचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी लोकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. मनोरंजन म्हणून लोक पाहतात आणि स्वतःचे बाबा बुवा कोणी असतील त्यांच्याबाबतीत मात्र ही हातचलाखी वगैरे मानायला ते तयार नसतात. श्रद्धा हे एक अत्यंत ताकदवान डिनायल आहे. आमचे बापू, बाबा, महाराज इ इ हे असे जादूगर नाहीच आहेत मुळी.. या घट्ट समजुतीनेच लोक भक्त झालेले असतात. "अ‍ॅक्सिडेंट्स ऑकर टु अदर्स", या तत्वानुसार "भोंदूगिरी इज प्रॅक्टिस्ड बाय अदर बाबाज" अशीच समजूत असल्याने कोणत्याही कार्यक्रमाने त्यांचे मन वळवणे शक्य नाही. कोणाच्यातरी आहारी जाणे ही एक तीव्र ताकदीची गरज आहे (व्यसनाप्रमाणे). अनेक पॅथीज, ज्योतिष आणि कायकाय प्रथा हजारो वर्षे टिकल्या तश्याच अंधश्रद्धाही टिकण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची समाजाला गरज आहे. जी गोष्ट तीव्र गरजेची आहे तीच टिकते. निर्मूलन वगैरे हे वरकरणी आवश्यक दिसतं खरं पण ते अशक्य वाटतं.. मग याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणा किंवा रियल थिंकिंग.

In reply to by गवि

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 17:05
बर्‍याच अंशी सहमत आहे. परिणाम होत नाही याबद्दल असहमती. कारण हजारो वर्षे असलेल्या अंधश्रद्धा या काही दशकात दूर होतील ही अपेक्षा योग्य नाही. त्यामुळे परिणामाच वेग अत्यंत सूक्ष्म आहे.पण आहे. अंमलबजावणी नसु द्यात पण विचार करायला लोक प्रवृत्त होतात हे ही नसे थोडके!

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 17:22
श्रेय द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. माझ्या वैयक्तिक विचारधारा बदलाचं श्रेय मी दाभोलकरांना/ अंनिसला देतो..

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:25
हे जर खरे असेल तर मी माझे मत मागे घेतो. एका माणसाचे विचार बदलण्याचे काम जरी अनिसने केले असेल तर Its worth

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 09/25/2014 - 17:28
ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे होते का आणि नेमका काय बदल झाला आणि किती प्रमाणात यावर हे अवलंबून आहे. त्यांचे आजवरचे प्रतिसाद वाचून ते पूर्वी कधीही अंधश्रद्ध असतील असे वाटत नाही. अर्थात हे वरवरचे मत झाले हेही मान्यच.

In reply to by गवि

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:31
सप्रे साहेब म्हणतायत तर त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. त्यांनीच नीट विचार करुन सांगावे.

In reply to by गवि

बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 22:28
रॅशनल थिंकिंग करण्याची पात्रता होती, पण सगळे करतात म्हणून आपणही असं होत गेलं. सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार केला गेला नाही. पण दाभोलकरांची पुस्तके वाचल्यावर हे तर आपल्याला माहीत आहे मग आपण इतके वर्ष असे का वागत राहीलो. सगळे करतात म्हणून करायची गरज नसते याची जाणीव झाली. आणि छोट्या छोट्या गोष्टींची चिकित्सा करुन खरच एखाद्या गोष्टीत तथ्य असेल तरच स्वीकारणे आणि बाकी गोष्टी त्यागणे अशी सवय लागली. अर्थात आई वडीलांमुळेच हे प्रथम वाचनात आले. घरातून मुक्त विचारसरणीला तेवढाच पाठींबा मिळाल्याने विचार आणि आचारात सुसंगती आणू शकतो. घरातील वातावरण पूर्वी खूप धार्मिक होते. बरीच सूक्ते, रुद्र वगैरे पाठ होता. प्रसंगी पूजा वगैरे सांगितल्याही होत्या. लग्न देखिल पत्रिका पाहून वेदोक्त वगैरे झालय!! ९२-९३ ला रामजन्मभूमी मुद्द्यावर भारून जाउन फक्त कारसेवेला जायचे बाकी होते. पण आता कोणताही धार्मिक कार्यक्रम करत नाही. अर्थात दुसर्‍या कोणी बोलवल्यास नातेसंबंध जपण्याच्या हेतुने उपस्थिती धडते. मुलाची मुंज करण्याचा मानस नाही. कुठे शिक्षणाच्या हेतुने दूर ठेवण्याची वेळ आल्यास स्नेहसंमेलनाच्या रुपात धार्मिक विधीशिवाय मुंज होईल. मुलाची पत्रिका अस्तित्वातच नाही. या विचारांची पत्नीवर सक्ती नाही. पण तिलाही बर्‍याच गोष्टी पटतात. इतका बदल घडलाय..

In reply to by एस

विलासराव Fri, 09/26/2014 - 09:17
+१. मलाही दाभोळकरांचे काम मोलाचे वाटते. ज्या गोष्टी पटल्या त्या घेतल्या.न पटलेल्या सोडुन दिल्या.

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 16:18
त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. १५ वर्षांपूर्वी जो आदर आणि मान अंनिस ला होता, ज्या प्रकारची लोकभावना होती ती आज काहीशी धुसर झाली आहे. इतक्या वर्षांच्या अविरत कष्टांनंतर जर लोक आपल्याकडे संशयाने बघत असतील तर ती दाभोलकरांची संघटना बांधणीची सारी मेहनत फुकट जायची. अंनिस एक लोकशाहीवादी संघटना असेल तर त्यांना ह्या टीका आणि प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. सतत लोकांना आव्हान देऊन, चिथावून पदरात अपमान आणि संशय पडण्यापेक्षा अंधश्रद्धेत अडकलेल्या, अडकू शकणाऱ्या जनतेला हळुवारपणे सामंजस्याने योग्य मार्गावर आणणे आवश्यक आहे. कुठलेही आंदोलन उभे राहायला वाढायला प्रचंड कष्ट करावे लागतात. अंनिस रसातळाला जाऊ नये हि अंतिम इच्छा. सुधारणेची अपेक्षा आहे आणि मदतीची तयारीपण आहे. पण अशी सुधारणा खरेच अंनिस मान्य करेल का हा मूळ प्रश्न. अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्ये वाढणारी दैववादी मानसिकता भारताला परत मागे धाडू शकते. इथे असलेल्या प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच. पण खरेच अंनिस वाचवण्यासाठी, तिची परिणामकता वाढवण्यासाठी, तिचे जाहीर उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचाराने आवश्यक आहे. मी असा प्रश्न स्वत:ला विचारला आणि त्यातून अंनिस च्या मूळ किंवा छुपा हेतू काय असेल असाही प्रश्न उभा राहिला. शंका दूर केल्याशिवाय सहभाग शक्य नाही.

In reply to by संदीप डांगे

टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 20:28
एखाद्या माणसाला साप चावल्यावर त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी भगत्/बाबा कडे नेणे हे थांबवण्यासाठी अनिसंने काय केले पाहिजे होते असे तुम्हाला वाटते? तुमचे विचार अनिसंकडे पोहोचविण्याची जबाबदारी माझी...तुमच्या प्रतिसादात एका अक्षराचाही बदल न करता देणार उत्तर???

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 16:19
आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:30
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे. दुसर्‍यांनी काय करावे हे सांगायला मी काही अनिसचा कार्यकर्ता नाही.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 11:46
अरे टवाळा - घाटपांडे साहेबांनी विचारले की "अनिस चे काय करावे" असे, म्हणुन सांगितले. नाहीतर कोणी काय करावे हे सांगायला जायला मी काय अनिस चा कार्यकर्ता आहे? :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 11:53
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे.
हे तुम्हीच लिहिले ना???

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 12:04
अहो पण ते का लिहीले ते बघा ना. पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले. विचारलेच नसते तर कशाला सांगायला आलो असतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 13:20
पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले
मग तुम्ही पण पेठकरकाकांच्या प्रतिसादाखालिच लिहायला हवे होते...इथे का लिहिले??...आणि ते तर म्हणत आहेत की
हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 13:36
आता अस करा की अंनिसने काय प्रकाश घाटपांडे - Thu, 25/09/2014 - 16:19 आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा उत्तर द्या
पेठकर नाही धाटपांडे काका !!!

In reply to by टवाळ कार्टा

थॉर माणूस Fri, 09/26/2014 - 14:41
अहो कुणाशी वाद घालताय... राणीचे पाईक ते. इंग्लंडात बसून भारत कसा फालतू आणि भारतातल्या माणसांनी काय करावं त्याविषयी गफ्फा मारणे हा त्यांचा इगो कुरवाळण्यासाठीचा उद्योग आहे.

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 16:36
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? या वाक्याला एक अहंकाराचा दर्प येतो आहे . इतरांना शुद्धीकरणाचे, आत्मनिरिक्षण / परीक्षण करण्याचे सल्ले देणारे स्वतःच्या योग्यतेबद्दल केव्हढा आत्मविश्वास बाळगून असतात याचे कौतुक वाटते. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. आणि तुम्हाला जे जास्तं योग्यं वाट्ते , म्हणजे भिकारी/ वेश्या निर्मुलन , ते कार्यं (शक्यं असल्यास) हाती घ्यावेत . पण कृपया दुसरा करीत असलेल्या कार्याला असे हीन लेखु नका . समर्थांनी सांगीतले आहे : क्रियेवीण वाचाळता व्यर्थं आहे.

In reply to by मनीषा

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 17:21
माझ्या अहंकाराबद्दलचे आपले गैरसमज दूर होतील अशी आशा करतो, माझ्या प्रश्नातच माझे उत्तर उपरोधिकपणे उच्चारले आहे. अंनिस काय करते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे का? कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न राहातच नाही जेंव्हा मुसलमान किंवा ख्रिश्चन जबरदस्ती किंवा आमिषाने एखाद्यास धर्मांतर करण्यास भाग पडतो. दुसऱ्याच्या घरात घुसून त्याच्या श्रद्धांची चिरफाड करताना चार बोट आपल्याकडेही असतीलच याचे भान असावेच. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही हे कसे ठरवणार? तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. हेच अंनिस ला सांगितले तर आम्ही ढोंगी का? साधे उदाहरण आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही, त्याचा काही उपयोग नाही, लोकांना फक्त लुबाडतात. चला मान्य आहे तुमचे. पण ज्योतिष धुडकावून लावण्याआधी स्वत: खपून काही अभ्यास केला आहे का? नुसते आव्हान देत फिरल्याने काही होत नाही. असो माझ्या ज्योतिषावर विश्वास आहे कि नाही याबद्दल नंतर कधी. वैद्यकशास्त्रात एका डॉक्टरचे निदान दुसरा डॉक्टर मान्य करत नाही, एकाची उपचारपद्धती दुसरा चालू ठेवत नाही. तिथे सुरु असलेला सगळा भोंगळ कारभार चालतो, तो काय लोकांच्या जीवाशी आणि पैश्याशी खेळ नाही का? तिथल्या अंधश्रद्धांचा अंनिस ने काय भांडाफोड केला? अंनिस ने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाविषयी समान भूमिका घ्यावी अन्यथा नाव बदलावे असे माझे एक मत. यात मीच काही कार्य हाती घेतले तरच मला बोलण्याचा अधिकार असे काही आहे का? लोकांना "काहीतरी केल्याचे" समाधान हवे असते. त्याने काय फरक पडतो, नाही पडत याचा त्यांना विचार करण्यास भाग पडले कि ते चिडतात असे आजवरच्या अनुभवांवरून माहित आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 17:42
तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक काय तसेच श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक समस्या यात गल्लत करीत आहात असे वाटते . जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे हा गुन्हाच आहे कारण त्यात सामाजिक/ वैयक्तीक आणि धार्मिक स्वतंत्र्याची पायमल्ली होते आहे. मला वाटते अशा कृत्याचे समर्थन माझ्या उत्तरात कुठेच नाहीये . तुम्हाला अंनीस चे कार्यं पटत नाही हे तुमचे मत आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते . तसेच तुम्हीही इतरांच्या मत स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच.

In reply to by मनीषा

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 18:03
मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत बाल सप्रे ह्यांनी हि मला हाच प्रतिसाद दिला कि आपण समस्या आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात. मग इतर सामाजिक समस्येप्रमाणे अंधश्रद्धा हि सामाजिक समस्या असली पाहिजे की ती वैयक्तिक समस्या आहे? मग वैयक्तिक समस्या हि सामाजिक केंव्हा होते आणि त्यात लुडबुड करण्याचा इतरांना केंव्हा अधिकार प्राप्त होतो? माझा खरच आता गोंधळ व्हायला लागला आहे खरच अंधश्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक अंधश्रद्धा का? ह्या शब्दाला असा संकुचित अर्थ कसा प्राप्त झाला? त्यामुळे अंनिस हे धर्मविरोधी आहे असा नकारात्मक प्रचार झाला आणि त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा Fri, 09/26/2014 - 11:40
उदाहरणार्थ अंनीस ही एक समाजिक चळवळ आणि अंनीस ला विरोध करायचा ? पाठिंबा द्यायचा? की त्या पासून अलिप्त रहायचे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्नं त्यात कुणी ढवळा ढवळ करणे योग्यं होणार नाही . हे तत्वं वापरून तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक बाबींचे वर्गीकरण करा . आणि त्तुमच्या वैयक्तिक समस्यांमधे लुडबुड करायचा अधिकार कुणालाच नाही जो पर्यंत तुमच्या वर्तनाने कुणाला उपद्रव होत नाही. हाच नियम तुम्हालाही लागू होईल . इतरांच्या खाजगी गोष्टींमधे तुम्ही नाक खुपसले तर तो गुन्हा समजला जाईल.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 16:38
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो....

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:40
साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर आज काही जाणवण्या इतका थोडा तरी फरक पडला असता का? माझ्या मते नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:53
७०-८० च्या दशकात नास्तिकतेच प्रमाण जास्त होते. कोणी देव देव करायला लागले तर त्याची थोडी का होइना चेष्टाच होयची. १९९०-२००० नंतर, देव, बाबा, बुवा, सण, परंपरा ह्यांना मोठीच प्रतिष्ठा मिळाली आहे. कदाचित हेच अनिसचे कॉट्रीब्युशन असावे. ( हे हलके घ्या ). माझ्या मते अनिसला महाराष्ट्राच्या इतिहासात २ ओळी इतकी पण जागा नाही. त्या दोन ओळी पण कदाचित खुना बद्दल असतील ( आणि त्यामागच्या राजकारणा बद्दल )

In reply to by प्रकाश घाटपांडे

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 16:48
विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला दाभोलकरांना लागलेल्या बुलेट ने संपवले.

In reply to by संदीप डांगे

स्वप्नांची राणी गुरुवार, 09/25/2014 - 16:54
हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार घेऊन संपवावे लागले त्यांना... त्यापेक्षा सरळ सोप्पी मुठ का मारली नाही..?

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 17:39
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. आत ठसठसतंय चैतन्य, वाट त्याला देणार नाही. मुठीत सामावली दुनिया, प्रकट तिला करणार नाही. जगन्नाथाचा रथ हा, हस्ते परहस्ते चालवणार नाही. ;)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 18:12
___/\___ जौ दे रे! जुन्या पेशवेकाळाच्या पलिकडं जावं लागेल. :) नकोच बोलूस त्यापेक्षा. ;)

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 13:02
मूठ असो वा मिठी पडता ती दिठी अन मग पाठोपाठी काय जाहले || जाहले ते ते पाहिले ऐकिले तैसेचि ठेविले समजले तर समजले नाही का हो ||

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 09/25/2014 - 17:00
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही.
समितीने अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कशी व्याख्या केली आहे? अंधश्रध्दाविरोधी लढा म्हणजे नक्की कशाच्या विरोधात लढा अपेक्षित आहे?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 17:12
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप." "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात" आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे. [आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते. परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे') आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो. तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:15
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि
तुम्ही सुद्धा आता "बाबा वाक्यम प्रमाणम" च्या दिशेने चालला आहात. इथे बाबा दाभोलकर झाले आहेत. बाकी बुवा पण असेच म्हणतात ना की ह्य/त्या धर्मग्रंथात असे लिहीले आहे/तसे लिहीले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 17:19
आपल्या प्रतिसादावरुन असे वाटते की आपण माझा प्रतिसाद पुर्वग्रह न बाळगता वाचला नाही. मी फक्त संदर्भ दिला आहे. माझे आनुषंगिक मत पुढे आले आहेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 09/25/2014 - 18:56
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
याविषयी मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळींमध्ये बरीच ई-मेला ई-मेली झाली होती. त्यातील इतरांनी मांडलेली मते (अ‍ॅसॉर्टेड) इथे लिहित आहे.तसेच मिसळपाववरच आणि इतर संकेतस्थळांवर आणि फेसबुकवर मी जे काही वाचले आहे त्यावरून पुढील गोष्टी लिहित आहे. यापैकी एकही गोष्ट मी मुळात लिहिलेली नाही तरीही सगळ्या मूळ लेखकांची नावे इथे लिहित नाही आणि त्याची गरजही नसावी. घाटपांडे साहेब म्हणतात (की दाभोळकर म्हणतात ते उधृत करतात): "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात".आता ज्ञान किंवा अनुभव म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. एका ई-मेलमध्ये मला खालील मजकूर आला तो इथे जसाच्या तसा चिकटवत आहे: "शास्त्रामध्ये अगदी मूलभूत आणि (अजून तरी) inviolable असे फार नियम नाहीत. असे नियम बहुदा दहा-बाराच असतील (न्यूटनचे नियम, वस्तुमान/उर्जेचा अक्षय्यतेचा नियम,ओहमचा नियम इत्यादी).पण इतर सगळे नियम हे या मूलभूत नियमांवरून derived असतात.अनेकदा असे derived नियम हे universal नसतात तर काही मर्यादांमध्ये लागू होतात.उदाहरणार्थ ऍल्युमिनिअम हे room temperature ला elastic असते पण ते वरच्या तपमानाला आणि एका ठराविक pressure मध्ये तोच धातू पूर्णपणे plastic असतो.या प्रकाराला superplasticity म्हणतात. म्हणजे हा धातू elastic आहे असे आपण म्हणतो त्याचवेळा त्याला एक caveat असते ते म्हणजे room temperature आणि atmospheric pressure.अनेकदा अशी बंधने या नियमांना असतात हे पहिल्यांदा लक्षातच येत नाही तर असे काही प्रयोग झाल्यानंतरच ते कळते.जर का मी असा काही प्रयोग करायला गेलो तर कदाचित सध्याच्या शास्त्रीय बैठकीप्रमाणे ते अशक्य असेल किंवा काऊंटर-इंट्युऊटिव्हही असेल.पण सद्यकालीन शास्त्रीय माहितीच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय असे नवीन प्रयोग होऊच शकणार नाहीत.आणि पूर्णपणे rational व्यक्तिला शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर विचार करणे शक्य कसे होणार?"
तेव्हा ज्याने पहिल्यांदा अ‍ॅल्युमिनिअमच्या सुपरप्लॅस्टिसिटीवर प्रयोग केला तो माणूस अंधश्रध्द का?
कारण त्यावेळी माहित असलेल्या ज्ञानाच्या आधारे सुपरप्लॅस्टिसिटी असे काही असते आणि अ‍ॅल्युमिनिअम हा धातू इलॅस्टिक सोडून दुसरे काही असू शकेल हे माहितच नव्हते.घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे. ई-मेल कंटिन्यूज--- "यावरूनच मी म्हणतो की Circle of rationality is often enlarged by irrational people. जे rational असतात ते एखादी गोष्ट समोर दिसली नाही किंवा अन्य पध्दतीने तिचे अस्तित्व सिध्द करता आले नाही तर ती मान्य करत नाहीत आणि त्यातूनच नकळत आपल्यावरच बंधने घालून घेतात." याविषयी तुमचे काय म्हणणे आहे घाटपांडेसाहेब?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 20:02
घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.
मला जे काही म्हणायचे आहे ते मी वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. शेवटचे दोन परिच्छेद वाचा. आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा.वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
असे असेल तर अंधश्रध्दा निर्मूलन कशाला करायला पाहिजे? समजा आज मला एखादी अंधश्रध्दा वाटत असली तरी काही वर्षांनी अनुभवात आणि ज्ञानात भर पडल्यानंतर तीच गोष्ट अंधश्रध्दा वाटणार नाही याची शक्यता आहेच ना. मग अंधश्रध्देला विरोध म्हणजे नक्की कशाला विरोध हा प्रश्न परत उभा राहतोच की. कारण अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कालनिरपेक्ष व्याख्या करता येत नसेल तर मग विरोध नक्की कशाला?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आज एखादी गोष्ट ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत बसत नसेल तर ती अवैज्ञानिक आहे हे म्हणणे भाग आहे. उद्या ती विज्ञानाच्या कक्षेत बसली तर तिला वैज्ञानिक म्हणु. पण म्हणुन आजच ती वै़ज्ञानिक आहे असे कशाला म्हणायचे? वर भल्या मोठ्या प्रतिसादात मी खरा वैज्ञानिक नकारज्ञ नसतो याचा उहापोह केला आहेच. अंधश्रद्धांना विरोधा हा खरतर त्यामुळे होणार्‍या शोषणाला विरोध आहे जशी विज्ञानाची प्रगती होत जाईल तशी अंधश्रद्धा कमी होतील. पुर्वी देवीचा रोग हा देवीचा कोप मानत होते. आज भारतात देवीचा रोगी शोधुन सापडत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 17:36
बराचसा सहमत. बदल घडवून आणणारा बर्‍याचदा आपल्या बदलाच्या तत्वज्ञानाच्या इतका प्रेमात पडतो की, आपण बदल कशासाठी घडवून आणत आहे ते विसरतो... आणि त्या तत्वज्ञानात जर कोणी बदल सुचवला तर त्याचा कडवा विरोधक बनतो... म्हणजे एका अर्थाने बदलाचाच विरोधक बनतो !

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुंबा Tue, 11/07/2017 - 14:25
अतिशय आवडला हा प्रतिसाद. अंगात येणार्‍या बायका मुळात मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात. घरातल्या व्यक्तिंकडुन अवहेलना, अपमान, हेळसांड सहन करणार्‍या असतात. त्यामुळे त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या असणारे कृत्य करत असल्या तरी मुळात अंधश्रद्धेच्या बळीच असतात. तसेच सार्‍याच अंधश्रद्धेचे. याचा अर्थ अंधश्रद्धा फोफावणार्‍या व्यक्तिला शिक्षा होऊ नये असे नव्हे पण अंधश्रद्धेला समजून घेणे आवश्यक आहे. अंनिसवाल्या सार्‍यांनीच अशे संञत भुमिका घेतली तर मोठे बदल निश्वित घडतील असे वाटते.

धन्या गुरुवार, 09/25/2014 - 17:00
मुळात अंधश्रद्धा म्हणून काही नसते. हा शब्द अंनिसने (किंवा त्यांच्याही आधी शाम मानवांनी ?) वापरायला सुरुवात केली असावी असे वाटते. मला हा शब्दच चुकीचा वाटतो. श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते. अंनिसने देव आणि धर्माविषयीच्या निरुपद्रवी श्रद्धांना (उदा. देवाची पुजाअर्चा) डोळस श्रद्धा म्हटले तर समाजास हानीकारक असणार्‍या श्रद्धांना (उदा. बळी देणे, बुवाबाजी) अंधश्रद्धा म्हटले. आणि त्यांनी त्यांचं लक्ष फक्त "अंधश्रद्धां"वर केंद्रीत केले. ही त्यांची अर्थातच "स्कोप रीडक्शन"ची स्ट्रॅटेजी होती. लोकांच्या "श्रद्धांना" कुणाचाही विरोध नसावा या मताचा मीसुद्धा आहे. प्रत्येकाला आपापली श्रद्धा जोपासण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य असायलाच हवे. मात्र लोकांनी आपल्या श्रद्धा आपल्या घरात जपाव्यात. रस्त्यावर आणू नये. श्रद्धा रस्त्यावर आल्या की त्याचा किती त्रास होतो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

In reply to by धन्या

राजेश घासकडवी गुरुवार, 09/25/2014 - 17:53
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.
परफेक्ट. अवांतर - एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या विचारांपासून ते ट्यार्पीखेचक धाग्याकडे प्रवास केलेला पाहून लेखकाच्या मनोधैर्याचं कौतुक वाटतं. मध्ये एका टप्प्यावर 'धन्यवाद मिपाकरांनो, माझं आता ठीक चाललंय' असा धागा आला असता तर जास्त बरं वाटलं असतं.

In reply to by राजेश घासकडवी

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:59
त्या धाग्याचा दुसरा भाग पण येणार होता पण अजुन आला नाहीये. त्याच्या ऐवजी हे आले.

In reply to by राजेश घासकडवी

संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 18:32
येणार येणार येणार दुसरा बी भाग येणार … ह्याच्यापेक्षा ज्यास्त ट्यार्पि खेचक आसनार. सगळेच जरा वळणावर येत आहे. पूर्ण कथा टाकण्यात मजा आहे, उगाच च्यानलांसारखे काय रोज रोज कुटत बसायचे. मनोधर्य शाबूत राहण्यात मिपाची हिमालायेवढी मदत झाली आहे. दुसरा भाग येणार आहे, फुल्ल यांड फायनल.

In reply to by संदीप डांगे

मनीषा Fri, 09/26/2014 - 11:47
पण काही म्हणा , आत्महत्येचे विचार मनात येणे ते अंनीस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणे - हा मनस्थितीतील बदलाचा प्रवास तुम्ही अगदी कमी कालावधीत ( काही दिवसातच) पार केला या बद्दल तुमचे अभिनंदन !!

In reply to by मनीषा

संदीप डांगे Fri, 09/26/2014 - 15:27
अंनिस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्याचा विचार आत्महत्येच्या विचारांपासून निघालेल्या शंभर धाग्यामाधला एक आहे. मला काही लोकांनी पत्रिका, होम हवन, ग्रहशांती वैगेरे पुळचट उपाय करायला सांगितले. त्यानंतर झालेल्या मेंदूवादळानंतर हा सल्ला निपजला. एकूण माझा लेख आणि त्याचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपल्या परीने लावला. सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते कि साधारणपणे सगळ्यांना समोरच्याला "च्या बाजूने/च्या विरुध्द" असे वर्गीकरण केल्याशिवाय जमतच नाही. तुम्ही वादग्रस्त विषय काढले कि एकतर च्या बाजूने समजले जाता किंवा च्या विरुद्ध. ह्या लेखाचा काहीतरी भलताच अर्थ लावला गेला आहे. कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी संबंध नसावा अशी माझी भाबडी अपेक्षा होती. अंनिस चुकीचे काम करत आहे हे कुठेही म्हटले नाही. अंनिस फालतू आणि बेसलेस आहे असेही म्हटले नाही. त्यांच्या कडे लोकांचा बघण्याचा बदलत चालेला दृष्टीकोन आणि सद्य सामाजिक परिस्थिती ह्याच्यावर काही समाधान शोधता आले तर बरे असे मला वाटत होते असो. मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे. पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.

In reply to by संदीप डांगे

सखी Fri, 09/26/2014 - 21:48
तुमच्या लेखाची पहीलीच ओळ आहे. अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा....

In reply to by संदीप डांगे

राजेश घासकडवी Mon, 09/29/2014 - 05:40
मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.
सखी यांनी तुमच्या लेखनातला आणि प्रतिसादातला विरोधाभास दाखवलेला आहेच. तेव्हा मिपाकरांना बिटवीन द लाईन समजत नाही वगैरे गैरसमजात राहू नये.
पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.
एवढं करण्याची गरज नाही. संयत भाषेत प्रामाणिकपणे लेखन केलं की पुरतं. हा प्रामाणिकपणा मिपाकरांना बिटवीन द लाइन स्वच्छ दिसतो. उगाच मिपाकरांना कळलंच नाही असं म्हणणं, आणि वर तिरकस बोलणं टाळलं तर आणखीनच चांगलं.

निश गुरुवार, 09/25/2014 - 17:13
भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन ह्या सुध्दा अंधश्रद्धा निर्मुलनाशी निगडित आहेत. कस ते सांगतो ज्यामुलीना देवाशी लग्न लावुन देवदासी बनवण्यात आल त्यांच्या संमती शिवाय त्या मुली कालांतराने पुरुष वासनेला बळी पडतात व मग वेश्या व्यवसायात ओढ्यल्या जातात. अनिसमुळे येणार्‍या कायद्यामुळे ह्या वाईट प्रथेला नक्कीच लगाम लागेल. भिखारी का वाढतात हे जर बघितल तर जरा आपल्या मंदिराजवळ असणार्‍या त्यांच्या उपस्थितिवरुन कळेल आणि एक जर अनिसच काम एव्ह्ढ महत्वाच नव्हत तर मग दाभोलकरांनसारख्या विद्वान माणसाला जीव का गमवावा लागला. अनिसच काम हे फार महत्वाच होत व ते राहील. दाभोलकर व त्यांच्या अनिसला माझा लाख लाख वेळा सलाम.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 18:00
खंग्री चर्चा. धागाकर्ता स्वत: वाद प्रतिवाद करतोय हे पाहुन बरे वाटले. येत राहीन वाचायला.

शशिकांत ओक गुरुवार, 09/25/2014 - 18:42
अशा विषयावरील धाग्यावर ठरलेले बॅटमन खेळायला आलेले पाहून वरील नाव नाही आले तर कसे चालेल म्हणून माहिती साठी ही प्रतिक्रिया. सरांच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ अंनिसचा खरा चेहरा पुस्तकातील विचारांची आठवण झाली. अनेक नव्या सदस्यांच्या माहितीसाठी सरांच्या पुस्तकातील काही प्रकरणे कोणी विचारणा केली तर डकवीन.

तिमा गुरुवार, 09/25/2014 - 18:48
कुठल्याही व्यक्तीला तू मूर्खपणा करत आहेस, असे सांगितलेले आवडत नाही. अंधश्रद्ध लोकांचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांना शहाणपणा शिकवायला जाऊ नये.आत्मोन्नतीच्या प्रवासात ते आपल्या कैक जन्म मागे आहेत असे समजावे.(याठेकाणी जन्म हा शब्द काल व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. नाहीतर पुनर्जन्मावर तुमचे अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हणेल.)

चित्रगुप्त गुरुवार, 09/25/2014 - 18:54
अंधश्रद्धाच काय, तथाकथित श्रद्धा सुद्धा मला अनावश्यक वाटते, तरीसुद्धा फक्त एवढेच नमूद करतो, की दाभोलकरांच्या व्याख्यानाचा मी बघितलेला एकमेव व्हिडियो मला कैच्या कैच वाटला होता.

मित्रहो Fri, 09/26/2014 - 00:30
मी लहान असताना मला दाभोळकर माहीती नव्हते पण शाम मानव यायचे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेपण यायचे. ते बरेच प्रयोग करुन दाखवयाचे आणि त्यामागचे शास्त्र सांगायचे. तेंव्हा मी श्रद्धा अंधश्रद्धा हे समजण्यापलीकडला होतो. मनात तेंव्हापासून एक पक्के ठसले हे सारे थोतांड आहे नंतरही या साऱ्यांचा विचार करताना मनात कुठेतरी तेच होते आणि असते. समाज बदलत नाही असे नाही तो बदलला आणि बदलतोय. तो अंनिसमुळेच बदलतोय असे म्हणणे कठीण आहे, पण त्याचा काहीतरी परीणाम होत असनार हे नक्की. लहाणपणी जसा समाज होता आणि आता जसा आहे यात बराच बदल झालाय. आता कुणी मांजर आडवे गेेे म्हणून पाच पावलेे मागे जात नाही. लहान असताना हा आमचा खेळ होता, कुणी जात असेल तर मुद्दाम मांजर सोडायचे. तसेच हीचा पायगुण वाइट हाही प्रकार आता बराच कमी झालाय. पूर्ण कमी झालाय असे म्हणता येणार नाही पण कमी झालाय. कुष्ठरोग्याला दिली जाणारी वागणूक. काही बुरसट कल्पनांनी स्त्रीयांना होणारा त्रास आज बराच कमी झालाय. समाज बदलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमटे आणि बंग यांचे कार्य. ते जेंव्हा आदिवासी भागात गेले तेंव्हा कुणीही त्यांच्याकडे यायला तयार नव्हते पण लोक हळूहळू यायला लागले.काही गोष्टी या बदलायलाच हव्या कुण्या नदीत आंघोळ केल्याने पापक्षालन होते ही समजूत. त्या नदीचे काय होते? गंगेविषयी बरेच बोलले जाते पण गोदावरीची परिस्थिती पण काही चांगली नाही मग ती नाशिकला असो की बासरला.तीच गोष्ट पशूबळींची. खरेच या गोष्टी आपल्याला हव्या आहेत का? इथे मला अनिस काय म्हणते यापेक्षा मला काय वाटते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे? हेही खरे आहे की काही गोष्टींचे प्रस्थ वाढलेय ज्योतीष्य, देवळातल्या रांगा, विशिष्ट ठिकाणी जायचा असलेला अट्टहास, कर्मकांड. याला अनिस जबाबदार आहे असे नाही म्हणणार मी. अनिस असते किंवा नसते तरीही असेच घडले असते. आर्थिक सुबत्ता आणि वाढती स्पर्धा हा जो समाजातील विरोधाभास आहे हे कदाचित त्यामागचे कारण असावे. दुसरे म्हणजे या गोष्टींमुळे फार नुकसान होत नाही त्यामुळे कुणी खूप जीव तोडून विरोध करीत नाही. या साऱ्या गोष्टी फार सोय़ीने स्वीकारायची सवय समाजाला जडलीय. ठरवलेल्या दिवशी जर बाळ हवे असेल तर दिवस पाहून सारे ठरविले जाते पण हेच जर का परीस्थिती वाइट झाली तर मग दिवस बघितला जात नाही.आधी अशी टोकाचीभिूमिका घेणारे लोक होते. अनिसचे काम आहे त्यांच्या परीने आणि समजुतीने समाजाचे प्रबोधन करायचे ते त्यांना करु द्यावे ते होते की नाही हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या.

In reply to by दशानन

पिलीयन रायडर Mon, 09/29/2014 - 10:00
साधारण हीच प्रतिक्रिया माझीही आहे... लेखक त्यांच्या मनस्थितीतुन बाहेर पडुन दुसरं काही लिहीत आहेत.. हे छानच आहे.. पण... आत्महत्या की कर्जबाजारी होणे असे पर्याय आयुष्यात उभे ठाकले असताना असे लेख लिहू शकणे व्यक्तिशः मला आश्चर्याचे वाटते.. वर कुठेतरी तुम्ही म्हणत आहात की काम करुन जो वेळ उरतोय त्यातुन हे लेख तिहीतोय.. पण इथे ज्या हिरीरीने प्रतिवाद करत आहात ते पाहुन तसंही वाटत नाहीये.. आणि लेखाबद्दल म्हणायचं झालं तर पहिलीच ओळ इतकी टीआरपी खेचक आहे की त्यावर काही मत देण्याची इच्छाच नाही.. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करावं आणि काय करु नये ह्याच्याशी माझा काही संबंध नाही.. मला फक्त आश्चर्य वाटलं.. दशानन ह्यांना "शॉक" का लागला असावा हे समजतय...

बाबा पाटील Sat, 09/27/2014 - 11:39
फुल्ल करमणुक असते. माझ्या गावात दर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते,देवाची ३०-३५ फुटाची ध्वजाची काठी नाचवत नाचवत मिरवणुकीने देवाकडे नेली जाते , आजपर्यंत गावातल कोनीही अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अन्यथा या दिवशी दर्शन चुकवत नाही. यात दंडवत आणी देव अंगात येणे हे दोन प्रकार मजबुत चालायचे.साधारण मी १० वर्षाचा असताना आमच्या शाळामास्तर बापुसने मला या देव अंगात येण्याच्या कार्यक्रमापुर्वी सराटे दिले,व जेथे देव अंगात येतो त्या ठिकाणी टाकण्यास सांगितले,सराट्याची ( संस्कृत नाव गोक्षुर कंटक) ते कसेही फेका त्याच्यावर पाय पडला की की ते पायात घुसणारच. त्यामुळे ज्याच्या अंगात येइ व देवापुढे घुमायला जाई त्याच्या पायात मातीत पडलेला काटा घुसत असे, त्यावर्षी तर फुल्ल कल्ला, हाच प्रकार सलग तीन-चार वर्ष घडला,आपोआप दरवर्षी या घुमणार्‍यांची संख्या कमी कमी होत गेली व हळु हळु थांबली,विषेश म्हणजे देवाचे सगळ्यात मोठे भक्त गावचे कारभारी आमचे आजोबा.पण मात्रा अचुक लागु पडली आणी मागच्या विस वर्षात तरी परत देवापुढे कोनी नाचत-घुमत बसले नाही. आता दहा एक वर्ष झाली,वडिलच विश्वस्त आहेत विविध सुधारणा चालु आहे,पण श्रद्धा ठेवुन अंद्धश्रद्धेला पुर्ण फाटा देण्यात आला आहे.खरच असा एकतरी मास्तर प्रत्येक गावात असावा,इतक्या वर्षांचे आमचे बापलेकांचे गुपित आज मि.पा.मुळे बाहेर आले.असो.

काउबॉय Sat, 09/27/2014 - 13:55
श्रध्देची व्याख्या
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास
उदा. तेंडुलकर आज शतक ठोकणार... पुरावा काय या आधी ठोकल्याचा अनुभव. असे सगळेच म्हणतात म्हणून... ज्या पिलानेने आयुष्यात प्रथमच सचु खेळताना बघितला आहे तो ही श्रध्देने टाळ्या पिटतोय बरे नाही झाले शतक म्हणून हिरमोड झालाय म्हणुन पुढील म्याचला सुधा तिच तर्हा अन तोच हिरमोड हो शतक काय भोपळा फुटला नाय.... मायला अनीस क्रिकेटवर बंदी का घालत नाही ?

In reply to by काउबॉय

काउबॉय Sat, 09/27/2014 - 14:06
तर आपल्या भौतिक जीवनाच्या ही अविभाज्य भाग आहेत पण शिरोमणी जेंव्हा त्याला निव्वळ विशिष्ट मुद्या पुरते मान्य करून विधाने करतात तेंव्हा निराकार गाढवाची हे वागन बरं न्हवे हीच कविता पुन्हा पुन्हा आठवू लागते
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत.

अनवाणी नवरात्र

दिपक.कुवेत ·

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 11:58
नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन धर्मात चामडी चप्प्ला वर्ज्य आहेत. त्याच धर्तीवर लोक नवरात्रात पादत्राणे घालत नसावेत. नवरात्रात नऊ चपला न घालणे हे मी पुण्यात सर्वप्रथम पाहिले. हे खूळ जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

In reply to by विजुभाऊ

सुनील गुरुवार, 09/25/2014 - 12:14
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे
हस्ताक्षर सुधारते! ;)

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 12:01
नवरात्रात अनवाणी चालायची पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षी लक्षातच राहिल नाही.बाहेर गेल्यावर लक्षात आले मागे कुठलाही तर्क नाही.मी तुळजापुरात 10 वर्ष घालवली आहेत.त्यामुळे असु शकतो.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 12:02
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत. ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 12:34
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?

In reply to by स्पा

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 14:19
श्री श्री श्री स्पाजी. मग म्या पामराने काय करावे या बद्दल म्या पामर बालकास बहुमोल मार्गदर्शन करावे.

In reply to by स्पा

स्पा गुरुवार, 09/25/2014 - 14:49
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
तुमचेच विचार आहेत हे , सो तिकीट लावणे योग्य वाटते :)

In reply to by स्पा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/25/2014 - 23:55
पांडोबा... , महत्वाचा फरक आहे हो! बासरी वाजविणे ही "श्रद्धा" नाहीये! त्यामुळे "काय वाया जातं?" हां प्रश्नच निकालात निघतो! निरर्थक ठरतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा Fri, 09/26/2014 - 16:13
मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?

In reply to by स्पा

सूड Fri, 09/26/2014 - 16:25
>>मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का? +१ Till its not making any harm to you, be happy in your world let them be in their world !!

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा Fri, 09/26/2014 - 16:47
विजुभाऊ उवाच : श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

In reply to by स्पा

स्पा Fri, 09/26/2014 - 16:48
ज्याला जे वाटेल ते त्याने खुशाल करावे. राम नाम लिहून इतर लोकांना तर इतरास झालेला मी पाहिलेला नाही किंवा नवरात्रात चपला ण घातल्याने ण घातलेल्या त्रास होईल णा, तुम्हाला त्याने काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 09/26/2014 - 13:30
निरर्थक छंद म्हणायचा का ? काही निष्पन्न होत नाही हो त्यातून. कष्ट करुन चांगला बांबू निवडायचा, तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्याला स्मूथ फिनिश द्यायचं, योग्य अंतरावर छिद्र पाडायची, त्यात हवा भरायची, सोडायची, बांबूवर बोटं कशी चालवायची ते शिकायचं. आणि निष्पन्न काय तर काहीच नाही... उगाच कसला तरी आवाज! वादासाठी वाद घालत जाऊ आम्ही, ध्वजा मिसळपावची उंच धरु आम्ही. नेहमीचाच विषय असे जरी तो, नव्याने उगाळू, टाईमपास करु आम्ही. (बूस्टर दिलाय, हाणा स्मॅश! ;) )

In reply to by स्पा

प्यारे१ Fri, 09/26/2014 - 13:35
ओ मी मधेच कुठं आलो? तुमच्या प्रतिसादानंतर खाली कडेला आहे प्रतिसाद. कैपण नै ऐकून घेणार आधीच सांगतो. (दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)

In reply to by स्पा

कवितानागेश Fri, 09/26/2014 - 21:48
स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना छुंदा म्हंजे काय ते विचार! वेडा कुठला!! मी तुला 'छंदांविषयी' नावाचं पुस्तक वाचायला देउ का?

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ Sat, 09/27/2014 - 12:53
हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती. पण छुन्दा करायचा तर कच्च्या कैर्‍या साठी इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 12:43
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
या हिशोबाने सगळ्याच अंधश्रध्धा या श्रध्धा क्याटेगरीत जमा होतात...

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 12:06
नवरात्रीच्या काही दिवस आधी आणी नंतर भवानी निद्राअवस्थेत असते.याकाळा बरेच लोक गादीवर पंलगावर झोपत नाहीत.जमीनीवर झोपतात.शिवाय नवरात्रीचे 9 उपवास.हे उपवास मात्र मी स्वत:करतो.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/25/2014 - 12:39
हो पण खरे श्रध्दाळु लोक राहिले बाजुला आणि हे खुळ कॉलेजमध्ये पण पोहचले. मग काय ती करते तर मी पण करतो (बघ तुझ्यासाठी कायपण)अशी स्टाईल झाली आहे. आणि एक की जो चप्पल घालणार नाही त्याची भक्ती जास्त का? म्हणजे तोच खरा भक्त की काय?

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 12:45
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? >> हो पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..मुलगी स्वाईन फ्लु ने आजारी होती, डॉक्टर ने भरोसा सोडला होता , रुबीच्या हॉल च्या खाली मंदीरात नवस बोलला...मुलगी वाचली.... प्रचीती आली ..तेव्हापासुन करतो ..भक्ती , श्रध्दा अशी जागृत होते ...त्या कर्मकांड लागत नाहीत ,,,धन्यवाद !! हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय असे निरीक्षण नोंदवितो ...भक्ती कमी की जास्त ही काय चर्चा करायची गोष्ट आहे का ;)

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 13:50
पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो .. आमच्या कंपनीतले आणि इतर कंपन्यां मधले मुसलमान तरुण नमाज ची वेळ झाली पार्कींग लॉट मधे जाउन नमाज पठण करतात. त्यांची ही त्यांच्या धर्मा विषयची आस्था आणि कट्टरता मला नेहमीच आवडली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 12:59
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. >> पुन्हा ( हल्ली ) बरेच आयडी शतकी प्रतिसाद-पिपासु झालेत , दिपक कडुन अपेक्षा नव्हती असे पुन्हा स्पारीक्षण नोंदवतो ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 13:06
तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन व्हायला लागले, आणी ते चेस ही व्यायला लागले की मग खेळातली मजा ही जाते ..भविष्यात तो खेळ बघण बंद करतील की लोक्स !! बाकी खेळताना तेच तेच गडी बघुन ही कंटाळा येतोच ...एक सचिन सोडला तर ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 13:08
प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ फिरवणं आवश्यक असताना किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 13:10
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? >> चल, सुरुवात करु यात मग थांबायला !!

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 13:28
@ किसन/सुहास... माझी फक्त शंका/उत्सुकता आहे कि लोकं ह्याच ९ दिवसात का अनवाणी चालतात? बाकि दिवसात किंवा फॉर दॅट मॅटर मग गणपतीत का नाहि? माझ्या धाग्यात मी मुद्दामुन आस्तिक-नास्तिकतेचा मुद्दा टाळलाय/वगळलाय कारण मला माहित होतं कि ह्या विषयाला अनुसरुन ते येणारचं. मी कुणाच्याहि भक्ती / अभक्ती वर गदा घातली नाहिये. आणि मला काहि शतकि धागे करायची हौस नाहि. प्रतिसादांवर तुम्हिच अवांतर (मुळ विषयाला फाटे फोडून) प्रतिसाद घालून संख्या वाढवताय. अजून एक कुणाच्या कुठल्या धाग्यावर काय प्रतिसाद द्यायचा हे तर प्रत्येकाच्या हातात असतं ना?? मग पटलं तर द्या नाहितर द्या सोडून. मिपा दर्जाची एवडढिच काळजी वाटतेय तर दुर्लक्ष करा अश्या धाग्यांकडे. संमं समर्थ आहेत योग्य ती काळजी वाहून न्यायला.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 13:44
देवी ला वावड असत या नऊ दिवसात चमड्याच !! .का ते माहीत नाही .पुर्वी चपला ( थोड का असेना ) चमड्याच्या असायच्या ....खडावा आणि पादुका हा ( बहुधा ) साधुच्या पोशाखात बसायच ....काही मित्र चमडं वापरल जात म्हणून बेल्ट ही घालत नाही ... शंका/उत्सुकता ...ही दिसली पाहिजे धाग्यात ...आम्हाला दोघांना दिसली नाही उलट श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले , स्पष्ट बोलतोय ...राग नसावा ...आणी तु ती घेतली नाही असे समजले ...तरी वातावरण इतक गढुळलय की ..आस्तिक येतात आपल घोड ओढायाला...आणि नास्तिक येतात भांडायला :)

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 13:54
उलट ते अपेक्षीतच आहे मिपावर. माझा आक्षेप फक्त तु जे बोलतो आहेस "श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले" त्यावर आहे. श्रद्धाळू मी हि आहे. पण म्हणून मी जरी असले प्रकार केले नाहित तरी जे करतात त्यांची मी कधीच खील्ली उडवत नाहि / उडवली नाहिये. "संधी घेतोय" हे विषेश खटकलं.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 14:24
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं. >> हम्म !! शब्द मागे घेतो मालक .. आणि जाता जाता : हि शंका ना तु अपर्णा ( हो तिच ऑस्ट्रेलिया स्थित संपादिका ) ला व्यनी वा खव मध्ये विचारली असतीस ना तर आतापर्यंत १०००० शब्दाचा निबंध तिने तुला व्यनी वा करडीत दिला असता ..वाचता वाचता तिसर्‍या मजल्यावरुन तळमजल्यार कधी आला ते देखील समजले नसते ;) तिचा एक धागा आहे बघ या विषयावर ( चॅम्प आहे ती अश्या विषयात ;) )

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 15:02
अरे आधीच हे माहिती असतं तर एवढा काथ्याकूट करण्यात कशाला वेळ (माझा आणि सर्वांचाच) घालवला असता? डायरेक्ट अपर्णालाच विचारलं असतं ना...

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 13:07
सुशिक्षितांची ही अवस्था बघितली की अशिक्षित, अज्ञानी माणसांबद्दल काय बोलावं? मुकी, गरीब बिचारी गुरं हाकावी तशी हाकली जातात, वळवावी तिथे वळतात. असो. अंधश्रद्धा ह्या कदाचित दुसर्‍यांनी घालवून जात नसाव्यात स्वतःलाच कधी स्वतःचे वागणे चुकीचे आहे असे जाणवले तरच जात असाव्यात. आपल्या घरातील पुढची पिढी अंधश्रद्ध निपजणार नाही अशा दृष्टीने संस्कार करीत राहावे, एव्हढेच आपल्या हाती उरते. कदाचित त्याचे सुपरिणाम ३०-४० वर्षांनी दिसू लागतील.

चौथा कोनाडा गुरुवार, 09/25/2014 - 13:13
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस कोणत्याही धाग्यावर कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही ही पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षीच लक्षात राहिलं नाही.

In reply to by चौथा कोनाडा

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 13:38
मग घाबरू नका. वेळ अजूनहि गेलेली नाहिये. नवरात्र आजच सुरू झालाय. लगेच आत्तापासून कल्टि घ्या. डायरेक्ट दसर्‍या नतंर भेटुया मग.

In reply to by दिपक.कुवेत

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:37
छ्या.. छ्या, आता माघार नाही ! एवीतेवी व्रत मोडलेच आहे, प्रतिसाद देवून मग कल्टी कश्यापायी ? उपास मोडलाच आहे तर घ्या नॉनव्हेज चापून ! होऊ दे खर्च, होऊ दे धागा शतकी !! ;-)

In reply to by दिपक.कुवेत

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 14:09
या विषयावरच्या धाग्याला १०० तरी प्रतिसाद नक्की येणार. आणि तुझा धागा म्हणजे मस्त पाकृ असं समेकरणच झालंय ना! ;) पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. तसा आपल्याकडे नवरात्र हा सण मुळात घरगुती. देवीच्या मूर्ती बसवणे इ. प्रकार अन्य प्रांतीयांनी सुरू केले. तसेच हे चपला न घालणे वगैरे असेच कोणाकडून तरी आले असावेत. दक्षिण भारतीय लोक अयप्पासाठी असे काही दिवस चप्पल न घालता वगैरे फिरतात. नवरात्रालाही हेच कारण असेल. निदान कोकणात तरी ही प्रथा मी कधी पाहिलेली नाही.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 15:11
इतरांपेक्षा कांही 'वेगळं' केल्याने, सर्वसामान्यापेक्षा आपलं वेगळंपण उठून दिसतं, असे अनेकांना वाटतं. 'सर्वसामान्यांपेक्षा' वेगळेपण म्हणजेच 'असामान्यत्व' असा विचार ह्या मागे असू शकतो. 'असामान्यत्त्वाची' एव्हढी साधी आणि सोपी व्याख्या भल्याभल्यांना आकर्षित करते. आणि 'मी असामान्य आहे' ह्या कोषात अशी माणसं आनंद मानतात. शिवाय, इतरापेक्षा मी 'वेगळं' कांही करत असल्याकारणाने मी देवाच्या/देवीच्या 'नजरेत' येईन आणि माझे कष्ट पाहून देव/देवी माझ्यावर कृपादृष्टी वळवेल असाही विचार त्या मागे असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 15:17
देव एवढा दूधखुळा नाही हो पण. तू ज्या भावनेनं उद्योग करतोस ते अ‍ॅप्रिशिएशन तुला मिळालं की झालं. ते फळ तिथलं तिथंच. उदाहरणार्थ: प्यारेनं एक लेख लिहीला. प्यारेची लेख लिहीण्याची भावना देवा साठी आहे की वाहवा साठी आहे? जर देवासाठी असेल तर ठीक. वाहवा मिळून प्यारे उडायला लागला तर लेखाचं फळ वाहवा. रोखीचा व्यवहार. देव (काहीही नाव द्या. स्व म्हणालात तरी चालेल सरजी) लांब राहतो अशानं. जवळ अज्जिबात येत नाही. देवाकडं चीटिंग चालत नाय हा !

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 14:10
बस कर पगले अब रुलायेगा क्या? मिपाकर कंटाळले आहेत रे ह्या आस्तिक नास्तिक वादाला. तुझी शंका जेन्युईन असेल पण त्या शंकेचं शेपूट पकडून माझ्यासारखे हरदास आपल्या कथा सांगणार, आणखी कुणी कसं मूर्ख आहे ते वदणार, आपापले स्कोअर्स सेटल करणार इ.इ. सुरु होतं. शंकेचं उत्तरच द्यायचं असेल तर साधना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मनाला शिस्त आणि अ‍ॅडज स्ट करण्याची सवय लागणं हा एक भाग असतो. शरीराला कष्ट देऊन त्याला तापवणं म्हणजे तप करणं हे ऐकलं असशील कुठंतरी. माणसाला काहीतरी टोचलं की त्याला देवाची आठवण येते ही प्रवृत्ती लक्षात घेऊन थोडं जाणीवपूर्वक कष्टात राहा म्हणजे मग देवाची आठवण येईल असं सुरु झालं. म्हणून मग अनवाणी रहा, गार पाण्याची आंघोळ करा, चटईवर झोपा इ.इ. सुरु असतं. बाकी 'शोबाजी' करणं माणसाच्या रक्तात असल्यानं आम्हाला अमुक गोष्ट चालतच नाही हो, आम्ही कडक सोवळं पाळतो इ.इ. सुरु होतं. अर्थात एका हद्दीपर्यंत ते आवश्यक असतंही. पण त्याचं अवडंबर व्हायला नको. उपासनेचा मुख्य हेतू भक्ती नि भक्तीमार्फत भक्तानं आराध्यापर्यंत पोचावं हा असावा. हे असं होतं बघ. असो!

सूड गुरुवार, 09/25/2014 - 14:39
>>तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? दिलेल्या माहितीचा काय उपयोग करणार आहात हे कळलं की उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणेत येईल.

शिद गुरुवार, 09/25/2014 - 14:56
मी हा प्रकार पहिल्यांदा उस्मानाबादला इंजिनिअरींगला असताना पाहिला. जवळजवळ निम्मं कॉलेज अनवाणी यायचं, शक्यतो स्थानिक विद्यार्थी. आमच्या हॉस्टेलची एक परंपरा होती की दसर्‍याच्या आदल्या रात्री हॉस्टेलवरून तुळजापूरला (१८ किमी.) अनवाणी चालत जायचं श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. पहिल्या वर्षी अनवाणी चालत गेलो सगळ्यांबरोबर तेव्हा चालताना काहीच वाटलं नाही पण दुसर्‍या दिवशी पायाला पाण्याचे फोड आले होते. चालता देखील निट येतं नव्हतं इतकी बेक्कार हालत झाली होती आणि ते फोड पुर्णपणे बरे होताहोता ४-५ दिवस गेले, कॉलेजसुद्धा बुडालं. :( दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी देखील सगळ्यांबरोबर चालत गेलो पण अनवाणी नाही. स्वतःला त्रास देऊन देवी पावणार नाही की प्रसन्न सुद्धा होणार नाही हे मनोमन पटल्यामूळे नंतरच्या वर्षी उगाच रीस्क घेतली नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की सगळ्यांबरोबर रात्री गप्पाटप्पा करत देवीच्या दर्शनाला जायला जाम धमाल यायची. :) सध्या मुंबईला देखील असे अनवाणी लोकं नवरात्रीत दिसू लागली आहेत. उस्मानाबादला बरेच स्थानिक स्वतःच्या २-व्हिलरने येत असत त्यामूळे थोडफार बरं होतं पण मुंबईला लोकल ट्रेनच्या भरमसाट गर्दीत ह्या लोकांना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. असो.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 15:09
शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला होतात का ?उ.बाद हुन चालत तुळजापुरला जाण्याची पंरपरा फार जुनी नाही.साधारण 99 नंतर चालु झाली.तक्तालीन कलेक्टरने चालु केली होती.

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 15:14
नवरात्रात अनवाणी चालले की ९ जन्मे स्वर्ग मिळतो असे नास्तिकपावपुराणात सांगितले आहे. तुम्ही चालत नसाल तर लगेच चालायला लागा. प्रश्न जेन्युनली विचारला असेल असे गृहीत धरुन नमूद करतो की यामागे श्रद्धा ही एकमेव भावना असावी. त्या श्रद्धेने जर कुणाचे नुकसा होत नसेल तर त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. श्रद्धेवर बोट धरताना कधीकधी माणसे चांगल्या गोष्टींची वाट लावतात. याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. नवरात्रीत लोक उपासही करतात. का करतात? माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. पहिल्या वर्षी केले तेव्हा मित्राशी पैज लावली म्हणुन केले. आता हे ११ वे वर्ष आहे. वेळोवेळी उपासाच्या नियमात माझ्यापुरते मीच बदल केले. कधी कडक केले (फक्त दूध फळे खाउन), कधी एक वेळ उपासाचे खाउन कधी फक्त संध्याकाळचे फळे खाउन. मला तरी मी जेंव्हा कडक केले होते तेव्हा मला खुप बरे वाटले होते. या १० दिवसात कडक उपास करुनही पित्त झाले नाही (माझी पित्त प्रकृती असुनही). मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो. श्रद्धा आहेच. अनवाणी चालणे हा त्यातलाच एक प्रकार असावा असे वाटते. अनवाणी चालणे, पट्टा न घालणे, दाढी न करणे हे सगळे मी ऑफिसच्या कामास्तव नाही करु शकत. नाही करत.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 15:25
>>> माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. असेच. तिसरं वर्ष आहे. आणि हे सांगायला मला लई अभिमान ;) वाटतो तुम्हाला जमतं का तरी.

In reply to by मृत्युन्जय

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 15:29
>>>>याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. नरेंद्र दाभोळकरच का? माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर शनीशिंगणापूरला गेला असताना त्याच्या बॅगेची चोरी झाली होती. त्याने आरडाओरडाकरून गर्दी जमविल्यावर तिथले दुकानदार जवळ आले आणि त्याला बाजूला घेऊन गेले. 'तुमचे किती नुकसान झाले सांगा आम्ही सर्व दुकानदार भरून देतो. पण आरडाओरडा करून लोक जमवू नका. इथे भक्तगण येतात म्हणून आमची दुकानं चालतात. ह्या जागेचे महत्त्व कमी झाले तर आमचा धंदा बसेल. असे करू नका.' अशी विनवणी केली. >>>>हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. एक अंधश्रद्धा खोटी ठरवली. लोकांना तर्कनिष्ठ विचार करायला शिकवलं. कोणाचं नुकसान नाही झालं. समाज प्रबोधनंच झालं. चोर्‍या सुरु झाल्या असतील तर नागरीकांनी, इतर शहरांप्रमाणे, दारं-खिडक्या आणि कुलपं लावावित. अंधश्रद्धा पसरवून आपापली दुकानं चालविण्यापेक्षा ते जास्त सयुक्तिक आहे.

In reply to by मृत्युन्जय

शिद गुरुवार, 09/25/2014 - 15:29
मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो.
डीट्टो. हे ११वे वर्ष दोन्ही वेळा फक्त दुध व फळं.

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:44
शिंगणापुरात अगोदरही चोर्‍या होतच होत्या, फक्त रिपोर्टिंग दाबले जायचे असे ऐकून आहे.

In reply to by शिद

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 15:34
काल व्हॉट्सअ‍ॅप वरुन माझ्या पर्यंत पोहचला. :) चेपु वापरत नसल्याने माहित नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 15:34
पण अप्रतिम आहे. किती निरागस आहेत हे विकणारी सगळे. काय आनंद होतोय १००० रु. मिळाल्यावर!!!

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 15:37
मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत माझ्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:25
ऐकावं ते नवलच. मी कधी असं पाहिलं वा ऐकलं नाही पण इथले प्रतिसाद पाहून दिसतंय की बर्‍यापैकी पापिलवार प्रथा असावी. आजवर अनवाणी राहणारे म्हणजे ते काळाकभिन्न डिरेस घालणारे अन तितकीच पांढरी शुभ्र लुंगी नेसणारे ते केरळी अय्यप्पावालेच माहिती होते. आज माहितीत भर पडली. बाकी अनवाणी राहणे इ. मला तरी पटत नाही. पण जे राहतात ते राहीनात! उगा सर्दीबिर्दी झाल्यावरही अनवाणी राहून ताप करून घेऊ नका म्हणजे झालं.

भिंगरी गुरुवार, 09/25/2014 - 15:59
नवरात्रीत चप्पल न घालणे,जैन मंदिरात चामड्याच्या वस्तू घालून न जाणे या मागचे नक्की कारण माहीत नाही.पण मी माझ्यापुरता जो अर्थ काढला आहे तो असा, आपल्या शरीरावर जे चामडे आहे त्याचा आपल्याला अभिमान असतो. जे चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो,त्याच्याच भानात सतत असतो.मी अमुक,मी तमुक..... मंदिरात जाताना या चामड्याच्या भानाला बाहेर ठेवावे. आणि परमेश्वराजवळ जाताना स्वच्छ मनाने जावे. परंतू आपण चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवतो आणि मी अमुक आहे, मला वेळ नाही पैसे घ्या पण आधी दर्शन द्या असे सांगतो.सगळेच असे करतात असे नाही पण कोणी करू नये म्हणून असा नियम केला असावा आणि लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला.हे माझे वैयक्तिक मत आहे.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. (यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)

In reply to by भिंगरी

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:33
धन्य ते महाभाग, जे चामड्याच्या चपला न घालता नऊ दिवस अन नऊ रात्री अनवाणी राहून स्वत:चे "मी" पण विसरतात ! (तुमच्या भाषेत चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो, मी अमुक,मी तमुक..... वै) मग स्वतःच्या अंगावरच्या सोन्याच्या दागिन्याचा, महागड्या घड्याळांचा, मोबाईलचा त्याग का नाहित करत ?

पिंपातला उंदीर गुरुवार, 09/25/2014 - 16:43
एक तरुण मुलगा... जुवेनाईल डायबिटीज् असलेला. त्याला कुणी तरी सांगितलं, नवरात्र पाळ. म्हणजे हे खाऊ नको ते खाऊन नको, पायात चप्पल घालू नको. दर्शन घे वगैरे. ऐकलं. अनवाणी फिरू लागला. चालता चालता कुठेतरी डांबराचा लपका तळव्याला चिकटला. तो निघता निघेना. देवीने काही केलं नाही. निघाला अर्धवट तेव्हा जखम झाली. जखम चिघळत गेली. देवीने काही केलं नाही. ती चिघळत हाडापर्यंत गेली. गॅंग्रीन झालं. आणि नवरात्रींची चिरंतन रात्र झाली- लेखन श्रेय मुग्धा कर्णिक

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 16:57
>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक भावना पोचल्या. दाभोलकरांकडून हिंदू श्रद्धांबद्दल बोललं जाणं अपेक्षितच आहे तसं आहे ते. बाकी धागा नेहमीच्या मार्गानं जातोय. दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा! (आम्ही प्रतिसाद देऊन ट्यार्पी वाढवतो आहोतच. लक्ष ठेवून आहोत.)

In reply to by पिंपातला उंदीर

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:42
"नवरात्रींची चिरंतन रात्र झाली" उगीच दुसरे करतात म्हणून आपणही नक्कल करायची असल्या अंधानुकरणाची अशी उदाहरणे पाहिले की वाईट वाटते. "अंध"श्रद्धा फार वाईट ! आपल्या काय झेपते हे तरी पहावे.

In reply to by पिंपातला उंदीर

धन्या Fri, 09/26/2014 - 21:29
देवी अस्तित्वात असेल तर काही करेल ना. जी शक्ती अस्तित्वातच नाही तिच्याकडून मदत कशी मिळेल ?

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 17:29
दीपकला टोमणा? त्याच्या हातच्या पाकृ खायच्यात आम्हाला देवा! आणि जळजळ? ती तर आम्हाला वाटायची बंद झालीये कधीची. सीरियस शुभेच्छा दिल्या हो!

In reply to by विनायक प्रभू

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 18:15
जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं नाही तरी चालेल असं सगळं. बाकी साठी औषधं आहेतच. :) नुकताच आलेला प्रगोंचा धागा कुणी इकडे सुद्धा वापरेल काय?

In reply to by विनायक प्रभू

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 19:10
मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का? >> हो !! अगदीच अब्रम्हण्यम का काय ते ;) ( भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला ;) )

In reply to by सुहास..

मदनबाण Fri, 09/26/2014 - 17:09
भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला जुळ्या चिंबोर्‍यांचा अर्थ त्यावेळी मला समजला नव्हता ! तेव्हा कोणीतरी माझ्या खव मधे ओरडुन गेल तेव्हा मला बोध झाला ! बाकी चिंबोरी प्रकरणा नंतर मास्तुरं बरेच दिवस मिपावर गैर हजर होतं... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

असंका Fri, 09/26/2014 - 16:30
आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटण्यासाठी एक सोपा आणि सहज मार्ग. सदा सर्वकाळ चांगलं वागणं हे सोपं नाही. लहापणी ऐकलेल्या "पुण्या"च्या ज्या अनेक कल्पना आहेत त्यातील आत्मक्लेश ही सर्वाधिक वेळा ऐकली गेलेली कल्पना आहे! हे असे सोपे मार्ग चोखाळून स्वतःचा चांगुलपणा एकदाचा सिद्ध केला की झालं. सदा सर्वकाळ चांगलं वागायची गरज संपली/कमी झाली.

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 17:20
वाघुळमानव(बॅटमॅन) व चौथ्या मितीशी (कोनाडा) सहमत. नावाचा अपभ्रंश केल्याबद्दल क्षमस्व, मैत्रीखात्यात खर्ची टाका. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

चौथा कोनाडा Tue, 09/30/2014 - 21:48
कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो अपभ्रंश कसला ? उलट आम्हाला चौथी मिती हे नविन नाव आवडलेले आहे (सॉरी, सध्याच्या "शुद्ध"लेखन प्रॅक्टीस नुसार आवडल्या गेलेले आहे) ((चौथा कोनाडा हे पुल्लिंगी नावाचे चौथी मिती हे स्त्रीलिंगी नांव म्हणजे नवरात्रा निमित्त देवीची कृपा समजावावी काय ?)) एनीवेज, चौथी मिती म्हंजे हे फारच भारदस्त बुद्धीवादी झाल्या सारखे वाटतेय !

पाषाणभेद Sat, 09/27/2014 - 22:00
एक खुळचट प्रथा पाळली जात आहे. देवी काय म्हणत नाय की पायात चपला घालत जावू नका म्हणून. आपल्याकडे नव्हते असले काही फॅड. सांगोसांगीतून असल्या प्रथा पाळल्या जातात. मी गेल्या पाच सहा वर्षांपासून नवरात्राचे उपास करतो आहे पण असले फॅड बघीतले नव्हते अन केलेही नव्हते. आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून. म्हणजे उगाचच दुसर्‍याला त्रास दिला. नाय पटत आपल्याला. त्याचप्रमाणे ऑफिसात असतांना नमाज पढणे देखील तोच प्रकार वाटतो. धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.

In reply to by पाषाणभेद

प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2014 - 01:18
धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे. सहमत. समस्या अशी आहे की कांहीतरी वेगळं (पुष्कळदा चमत्कारीक) वागून माझ्या भक्तीचं(?) प्रदर्शन नाही केलं तर माझ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि मला महत्त्व मिळत नाही. म्हणून प्रदर्शन अत्यंत आवश्यक बनून जातं. पुण्य मिळालं नाही मिळालं, मेल्यावर स्वर्गात गेलो की नर्कात तरी कोण पाहतंय, त्यात कांही सुख नाही. सुख ह्याच जन्मात चार लोकांची वाहवा शब्दात किंवा नुसत्या नजरेतही मिळविण्यात आहे. ('आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून.' बघा आला नं त्याचा उल्लेख!, ह्यात त्यांना सुख मिळतं.) शिवाय कोणी त्याला वेडेपणा म्हंटले तर 'माझी श्रद्धा आहे' असे म्हणून समोरच्याचे तोंड बंद करता येते. श्रद्धा आहे म्हंटल्यावर तर्काला स्थान नसते.

पाषाणभेद Sat, 09/27/2014 - 22:03
अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं थुंकतात. चपला न घालून फायदा न होता तोटाच होईल आरोग्याला. पुर्वी चपला न घालणार्‍यांचा वावर सीमीत प्रदेशात असावा. त्यामुळे तेथे आरोग्याची जपणूक होत असावी. आजकाल श्रावणात देखील चपला न घातल्याचे बघितले आहे. खुळचट प्रथा काहीही. निषेध.

In reply to by दिपक.कुवेत

वाचला हो ...पण त्यात काही रस वाटला नाही म्हणुन जरा वेगळे वळण घेतले ... चप्पल न घालणे , नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अन टाय अन चड्ड्या बदलणे हे निव्वळ फ्यॅड आहे असे आपले स्पष्ट मत आहे ! अध्यात्मिकतेचे उत्सवीकरण हे हिंदुधर्मा/तत्वज्ञाना पुढील खरेच मोठ्ठे आव्हान आहे पण त्यावर चर्चा नको उगाच इथल्या सुडोसेक्युलर तत्वज्ञआनांच्या हातात कोलीत कशाला द्या ;) मागे वारी बंद करा म्हणाले मग गणेशोत्सव बंद करा म्हणाले ,लगेच गाडी नवरात्रीवर घसरेल मग काय दिवाळी आहेच नंतर... त्यांचे म्हणजे पायाला जखम झाली तर पायच तोडुन टाकला पाहिजे असले काहीसे लॉजिक आहे , कुठं सारखं सारखं त्यांच्या नादाला लागता ? आपल्याला आस्तिकनास्तिकपाव पेक्षा मिसळपावच जास्त आवडते =))

काउबॉय Sun, 09/28/2014 - 14:26
अहो 9 दिवस देवीच्या मंदिरात उभे राहण्याचे व्रत पाळणारेही बघत आहे. दिवसभर उपास रात्री उभ्यानेच आधार घेउन झोपायचे सगळे विधी उभ्यानेच ना बसायचे ना पाठ टेकवायची... अन हे सर्व सामान्य संसारी लोक करत आहेत. 9 दिवस.

In reply to by टवाळ कार्टा

काउबॉय Sun, 09/28/2014 - 15:07
सन्यास घेउन आजन्म उभे राहिल्याचे दावा करणाऱ्याना भेटलो आहे मला फारसा न पटलेला हां प्रकार आहे. त्यामुळे त्याचे वा याचे साध्य काय चे उत्तर मला तर काय बाबात्यातलं कळतं नाही हेच आहे.

vikramaditya Sun, 09/28/2014 - 16:41
स्वतःपुरती मर्यादीत असावी. सश्रद्ध असण्यात काही गैर नाही जो पर्यंत त्यामुळे स्वतःच्या प्रापंचीक जबाबदा-या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळत असेल. परंतु त्यातुन कुठलाही इतर वैयक्तिक (कुटुंब, नोकरी, व्यवसाय या कडे दुर्लक्ष, कर्ज काढुन सण साजरे करणे असले प्रकार) किंवा सामाजिक (ध्वनी प्रदुषण, खंडणी वसुली, वाहतुकीचीगैरसोय आर्थिक फसवणुक, दडपशाही (धर्माची सक्ती), जीवहत्या इ.) त्रास होत नसेल तर.

In reply to by प्यारे१

प्यारे काका , इथे मोक्ष कुणाला हवाय ? देव फॅशन झाला आहे फॅशन ... ( बायदवे हे काही आजचे अन नवीन नाही , स्वामी विवेकानंदही एका भ्हाषणात हे देवाचे धर्माचे तत्त्वज्ञानाचे उत्सवीकरण डेंजरस आहे असे म्हणाल्याचा उल्लेख आहे )

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 11:58
नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन धर्मात चामडी चप्प्ला वर्ज्य आहेत. त्याच धर्तीवर लोक नवरात्रात पादत्राणे घालत नसावेत. नवरात्रात नऊ चपला न घालणे हे मी पुण्यात सर्वप्रथम पाहिले. हे खूळ जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

In reply to by विजुभाऊ

सुनील गुरुवार, 09/25/2014 - 12:14
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे
हस्ताक्षर सुधारते! ;)

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 12:01
नवरात्रात अनवाणी चालायची पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षी लक्षातच राहिल नाही.बाहेर गेल्यावर लक्षात आले मागे कुठलाही तर्क नाही.मी तुळजापुरात 10 वर्ष घालवली आहेत.त्यामुळे असु शकतो.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 12:02
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत. ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 12:34
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?

In reply to by स्पा

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 14:19
श्री श्री श्री स्पाजी. मग म्या पामराने काय करावे या बद्दल म्या पामर बालकास बहुमोल मार्गदर्शन करावे.

In reply to by स्पा

स्पा गुरुवार, 09/25/2014 - 14:49
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
तुमचेच विचार आहेत हे , सो तिकीट लावणे योग्य वाटते :)

In reply to by स्पा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/25/2014 - 23:55
पांडोबा... , महत्वाचा फरक आहे हो! बासरी वाजविणे ही "श्रद्धा" नाहीये! त्यामुळे "काय वाया जातं?" हां प्रश्नच निकालात निघतो! निरर्थक ठरतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा Fri, 09/26/2014 - 16:13
मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?

In reply to by स्पा

सूड Fri, 09/26/2014 - 16:25
>>मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का? +१ Till its not making any harm to you, be happy in your world let them be in their world !!

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा Fri, 09/26/2014 - 16:47
विजुभाऊ उवाच : श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

In reply to by स्पा

स्पा Fri, 09/26/2014 - 16:48
ज्याला जे वाटेल ते त्याने खुशाल करावे. राम नाम लिहून इतर लोकांना तर इतरास झालेला मी पाहिलेला नाही किंवा नवरात्रात चपला ण घातल्याने ण घातलेल्या त्रास होईल णा, तुम्हाला त्याने काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 09/26/2014 - 13:30
निरर्थक छंद म्हणायचा का ? काही निष्पन्न होत नाही हो त्यातून. कष्ट करुन चांगला बांबू निवडायचा, तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्याला स्मूथ फिनिश द्यायचं, योग्य अंतरावर छिद्र पाडायची, त्यात हवा भरायची, सोडायची, बांबूवर बोटं कशी चालवायची ते शिकायचं. आणि निष्पन्न काय तर काहीच नाही... उगाच कसला तरी आवाज! वादासाठी वाद घालत जाऊ आम्ही, ध्वजा मिसळपावची उंच धरु आम्ही. नेहमीचाच विषय असे जरी तो, नव्याने उगाळू, टाईमपास करु आम्ही. (बूस्टर दिलाय, हाणा स्मॅश! ;) )

In reply to by स्पा

प्यारे१ Fri, 09/26/2014 - 13:35
ओ मी मधेच कुठं आलो? तुमच्या प्रतिसादानंतर खाली कडेला आहे प्रतिसाद. कैपण नै ऐकून घेणार आधीच सांगतो. (दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)

In reply to by स्पा

कवितानागेश Fri, 09/26/2014 - 21:48
स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना छुंदा म्हंजे काय ते विचार! वेडा कुठला!! मी तुला 'छंदांविषयी' नावाचं पुस्तक वाचायला देउ का?

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ Sat, 09/27/2014 - 12:53
हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती. पण छुन्दा करायचा तर कच्च्या कैर्‍या साठी इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 12:43
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
या हिशोबाने सगळ्याच अंधश्रध्धा या श्रध्धा क्याटेगरीत जमा होतात...

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 12:06
नवरात्रीच्या काही दिवस आधी आणी नंतर भवानी निद्राअवस्थेत असते.याकाळा बरेच लोक गादीवर पंलगावर झोपत नाहीत.जमीनीवर झोपतात.शिवाय नवरात्रीचे 9 उपवास.हे उपवास मात्र मी स्वत:करतो.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/25/2014 - 12:39
हो पण खरे श्रध्दाळु लोक राहिले बाजुला आणि हे खुळ कॉलेजमध्ये पण पोहचले. मग काय ती करते तर मी पण करतो (बघ तुझ्यासाठी कायपण)अशी स्टाईल झाली आहे. आणि एक की जो चप्पल घालणार नाही त्याची भक्ती जास्त का? म्हणजे तोच खरा भक्त की काय?

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 12:45
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? >> हो पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..मुलगी स्वाईन फ्लु ने आजारी होती, डॉक्टर ने भरोसा सोडला होता , रुबीच्या हॉल च्या खाली मंदीरात नवस बोलला...मुलगी वाचली.... प्रचीती आली ..तेव्हापासुन करतो ..भक्ती , श्रध्दा अशी जागृत होते ...त्या कर्मकांड लागत नाहीत ,,,धन्यवाद !! हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय असे निरीक्षण नोंदवितो ...भक्ती कमी की जास्त ही काय चर्चा करायची गोष्ट आहे का ;)

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 13:50
पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो .. आमच्या कंपनीतले आणि इतर कंपन्यां मधले मुसलमान तरुण नमाज ची वेळ झाली पार्कींग लॉट मधे जाउन नमाज पठण करतात. त्यांची ही त्यांच्या धर्मा विषयची आस्था आणि कट्टरता मला नेहमीच आवडली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 12:59
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. >> पुन्हा ( हल्ली ) बरेच आयडी शतकी प्रतिसाद-पिपासु झालेत , दिपक कडुन अपेक्षा नव्हती असे पुन्हा स्पारीक्षण नोंदवतो ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 13:06
तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन व्हायला लागले, आणी ते चेस ही व्यायला लागले की मग खेळातली मजा ही जाते ..भविष्यात तो खेळ बघण बंद करतील की लोक्स !! बाकी खेळताना तेच तेच गडी बघुन ही कंटाळा येतोच ...एक सचिन सोडला तर ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 13:08
प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ फिरवणं आवश्यक असताना किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 13:10
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? >> चल, सुरुवात करु यात मग थांबायला !!

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 13:28
@ किसन/सुहास... माझी फक्त शंका/उत्सुकता आहे कि लोकं ह्याच ९ दिवसात का अनवाणी चालतात? बाकि दिवसात किंवा फॉर दॅट मॅटर मग गणपतीत का नाहि? माझ्या धाग्यात मी मुद्दामुन आस्तिक-नास्तिकतेचा मुद्दा टाळलाय/वगळलाय कारण मला माहित होतं कि ह्या विषयाला अनुसरुन ते येणारचं. मी कुणाच्याहि भक्ती / अभक्ती वर गदा घातली नाहिये. आणि मला काहि शतकि धागे करायची हौस नाहि. प्रतिसादांवर तुम्हिच अवांतर (मुळ विषयाला फाटे फोडून) प्रतिसाद घालून संख्या वाढवताय. अजून एक कुणाच्या कुठल्या धाग्यावर काय प्रतिसाद द्यायचा हे तर प्रत्येकाच्या हातात असतं ना?? मग पटलं तर द्या नाहितर द्या सोडून. मिपा दर्जाची एवडढिच काळजी वाटतेय तर दुर्लक्ष करा अश्या धाग्यांकडे. संमं समर्थ आहेत योग्य ती काळजी वाहून न्यायला.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 13:44
देवी ला वावड असत या नऊ दिवसात चमड्याच !! .का ते माहीत नाही .पुर्वी चपला ( थोड का असेना ) चमड्याच्या असायच्या ....खडावा आणि पादुका हा ( बहुधा ) साधुच्या पोशाखात बसायच ....काही मित्र चमडं वापरल जात म्हणून बेल्ट ही घालत नाही ... शंका/उत्सुकता ...ही दिसली पाहिजे धाग्यात ...आम्हाला दोघांना दिसली नाही उलट श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले , स्पष्ट बोलतोय ...राग नसावा ...आणी तु ती घेतली नाही असे समजले ...तरी वातावरण इतक गढुळलय की ..आस्तिक येतात आपल घोड ओढायाला...आणि नास्तिक येतात भांडायला :)

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 13:54
उलट ते अपेक्षीतच आहे मिपावर. माझा आक्षेप फक्त तु जे बोलतो आहेस "श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले" त्यावर आहे. श्रद्धाळू मी हि आहे. पण म्हणून मी जरी असले प्रकार केले नाहित तरी जे करतात त्यांची मी कधीच खील्ली उडवत नाहि / उडवली नाहिये. "संधी घेतोय" हे विषेश खटकलं.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 14:24
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं. >> हम्म !! शब्द मागे घेतो मालक .. आणि जाता जाता : हि शंका ना तु अपर्णा ( हो तिच ऑस्ट्रेलिया स्थित संपादिका ) ला व्यनी वा खव मध्ये विचारली असतीस ना तर आतापर्यंत १०००० शब्दाचा निबंध तिने तुला व्यनी वा करडीत दिला असता ..वाचता वाचता तिसर्‍या मजल्यावरुन तळमजल्यार कधी आला ते देखील समजले नसते ;) तिचा एक धागा आहे बघ या विषयावर ( चॅम्प आहे ती अश्या विषयात ;) )

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 15:02
अरे आधीच हे माहिती असतं तर एवढा काथ्याकूट करण्यात कशाला वेळ (माझा आणि सर्वांचाच) घालवला असता? डायरेक्ट अपर्णालाच विचारलं असतं ना...

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 13:07
सुशिक्षितांची ही अवस्था बघितली की अशिक्षित, अज्ञानी माणसांबद्दल काय बोलावं? मुकी, गरीब बिचारी गुरं हाकावी तशी हाकली जातात, वळवावी तिथे वळतात. असो. अंधश्रद्धा ह्या कदाचित दुसर्‍यांनी घालवून जात नसाव्यात स्वतःलाच कधी स्वतःचे वागणे चुकीचे आहे असे जाणवले तरच जात असाव्यात. आपल्या घरातील पुढची पिढी अंधश्रद्ध निपजणार नाही अशा दृष्टीने संस्कार करीत राहावे, एव्हढेच आपल्या हाती उरते. कदाचित त्याचे सुपरिणाम ३०-४० वर्षांनी दिसू लागतील.

चौथा कोनाडा गुरुवार, 09/25/2014 - 13:13
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस कोणत्याही धाग्यावर कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही ही पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षीच लक्षात राहिलं नाही.

In reply to by चौथा कोनाडा

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 13:38
मग घाबरू नका. वेळ अजूनहि गेलेली नाहिये. नवरात्र आजच सुरू झालाय. लगेच आत्तापासून कल्टि घ्या. डायरेक्ट दसर्‍या नतंर भेटुया मग.

In reply to by दिपक.कुवेत

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:37
छ्या.. छ्या, आता माघार नाही ! एवीतेवी व्रत मोडलेच आहे, प्रतिसाद देवून मग कल्टी कश्यापायी ? उपास मोडलाच आहे तर घ्या नॉनव्हेज चापून ! होऊ दे खर्च, होऊ दे धागा शतकी !! ;-)

In reply to by दिपक.कुवेत

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 14:09
या विषयावरच्या धाग्याला १०० तरी प्रतिसाद नक्की येणार. आणि तुझा धागा म्हणजे मस्त पाकृ असं समेकरणच झालंय ना! ;) पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. तसा आपल्याकडे नवरात्र हा सण मुळात घरगुती. देवीच्या मूर्ती बसवणे इ. प्रकार अन्य प्रांतीयांनी सुरू केले. तसेच हे चपला न घालणे वगैरे असेच कोणाकडून तरी आले असावेत. दक्षिण भारतीय लोक अयप्पासाठी असे काही दिवस चप्पल न घालता वगैरे फिरतात. नवरात्रालाही हेच कारण असेल. निदान कोकणात तरी ही प्रथा मी कधी पाहिलेली नाही.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 15:11
इतरांपेक्षा कांही 'वेगळं' केल्याने, सर्वसामान्यापेक्षा आपलं वेगळंपण उठून दिसतं, असे अनेकांना वाटतं. 'सर्वसामान्यांपेक्षा' वेगळेपण म्हणजेच 'असामान्यत्व' असा विचार ह्या मागे असू शकतो. 'असामान्यत्त्वाची' एव्हढी साधी आणि सोपी व्याख्या भल्याभल्यांना आकर्षित करते. आणि 'मी असामान्य आहे' ह्या कोषात अशी माणसं आनंद मानतात. शिवाय, इतरापेक्षा मी 'वेगळं' कांही करत असल्याकारणाने मी देवाच्या/देवीच्या 'नजरेत' येईन आणि माझे कष्ट पाहून देव/देवी माझ्यावर कृपादृष्टी वळवेल असाही विचार त्या मागे असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 15:17
देव एवढा दूधखुळा नाही हो पण. तू ज्या भावनेनं उद्योग करतोस ते अ‍ॅप्रिशिएशन तुला मिळालं की झालं. ते फळ तिथलं तिथंच. उदाहरणार्थ: प्यारेनं एक लेख लिहीला. प्यारेची लेख लिहीण्याची भावना देवा साठी आहे की वाहवा साठी आहे? जर देवासाठी असेल तर ठीक. वाहवा मिळून प्यारे उडायला लागला तर लेखाचं फळ वाहवा. रोखीचा व्यवहार. देव (काहीही नाव द्या. स्व म्हणालात तरी चालेल सरजी) लांब राहतो अशानं. जवळ अज्जिबात येत नाही. देवाकडं चीटिंग चालत नाय हा !

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 14:10
बस कर पगले अब रुलायेगा क्या? मिपाकर कंटाळले आहेत रे ह्या आस्तिक नास्तिक वादाला. तुझी शंका जेन्युईन असेल पण त्या शंकेचं शेपूट पकडून माझ्यासारखे हरदास आपल्या कथा सांगणार, आणखी कुणी कसं मूर्ख आहे ते वदणार, आपापले स्कोअर्स सेटल करणार इ.इ. सुरु होतं. शंकेचं उत्तरच द्यायचं असेल तर साधना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मनाला शिस्त आणि अ‍ॅडज स्ट करण्याची सवय लागणं हा एक भाग असतो. शरीराला कष्ट देऊन त्याला तापवणं म्हणजे तप करणं हे ऐकलं असशील कुठंतरी. माणसाला काहीतरी टोचलं की त्याला देवाची आठवण येते ही प्रवृत्ती लक्षात घेऊन थोडं जाणीवपूर्वक कष्टात राहा म्हणजे मग देवाची आठवण येईल असं सुरु झालं. म्हणून मग अनवाणी रहा, गार पाण्याची आंघोळ करा, चटईवर झोपा इ.इ. सुरु असतं. बाकी 'शोबाजी' करणं माणसाच्या रक्तात असल्यानं आम्हाला अमुक गोष्ट चालतच नाही हो, आम्ही कडक सोवळं पाळतो इ.इ. सुरु होतं. अर्थात एका हद्दीपर्यंत ते आवश्यक असतंही. पण त्याचं अवडंबर व्हायला नको. उपासनेचा मुख्य हेतू भक्ती नि भक्तीमार्फत भक्तानं आराध्यापर्यंत पोचावं हा असावा. हे असं होतं बघ. असो!

सूड गुरुवार, 09/25/2014 - 14:39
>>तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? दिलेल्या माहितीचा काय उपयोग करणार आहात हे कळलं की उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणेत येईल.

शिद गुरुवार, 09/25/2014 - 14:56
मी हा प्रकार पहिल्यांदा उस्मानाबादला इंजिनिअरींगला असताना पाहिला. जवळजवळ निम्मं कॉलेज अनवाणी यायचं, शक्यतो स्थानिक विद्यार्थी. आमच्या हॉस्टेलची एक परंपरा होती की दसर्‍याच्या आदल्या रात्री हॉस्टेलवरून तुळजापूरला (१८ किमी.) अनवाणी चालत जायचं श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. पहिल्या वर्षी अनवाणी चालत गेलो सगळ्यांबरोबर तेव्हा चालताना काहीच वाटलं नाही पण दुसर्‍या दिवशी पायाला पाण्याचे फोड आले होते. चालता देखील निट येतं नव्हतं इतकी बेक्कार हालत झाली होती आणि ते फोड पुर्णपणे बरे होताहोता ४-५ दिवस गेले, कॉलेजसुद्धा बुडालं. :( दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी देखील सगळ्यांबरोबर चालत गेलो पण अनवाणी नाही. स्वतःला त्रास देऊन देवी पावणार नाही की प्रसन्न सुद्धा होणार नाही हे मनोमन पटल्यामूळे नंतरच्या वर्षी उगाच रीस्क घेतली नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की सगळ्यांबरोबर रात्री गप्पाटप्पा करत देवीच्या दर्शनाला जायला जाम धमाल यायची. :) सध्या मुंबईला देखील असे अनवाणी लोकं नवरात्रीत दिसू लागली आहेत. उस्मानाबादला बरेच स्थानिक स्वतःच्या २-व्हिलरने येत असत त्यामूळे थोडफार बरं होतं पण मुंबईला लोकल ट्रेनच्या भरमसाट गर्दीत ह्या लोकांना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. असो.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 15:09
शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला होतात का ?उ.बाद हुन चालत तुळजापुरला जाण्याची पंरपरा फार जुनी नाही.साधारण 99 नंतर चालु झाली.तक्तालीन कलेक्टरने चालु केली होती.

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 15:14
नवरात्रात अनवाणी चालले की ९ जन्मे स्वर्ग मिळतो असे नास्तिकपावपुराणात सांगितले आहे. तुम्ही चालत नसाल तर लगेच चालायला लागा. प्रश्न जेन्युनली विचारला असेल असे गृहीत धरुन नमूद करतो की यामागे श्रद्धा ही एकमेव भावना असावी. त्या श्रद्धेने जर कुणाचे नुकसा होत नसेल तर त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. श्रद्धेवर बोट धरताना कधीकधी माणसे चांगल्या गोष्टींची वाट लावतात. याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. नवरात्रीत लोक उपासही करतात. का करतात? माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. पहिल्या वर्षी केले तेव्हा मित्राशी पैज लावली म्हणुन केले. आता हे ११ वे वर्ष आहे. वेळोवेळी उपासाच्या नियमात माझ्यापुरते मीच बदल केले. कधी कडक केले (फक्त दूध फळे खाउन), कधी एक वेळ उपासाचे खाउन कधी फक्त संध्याकाळचे फळे खाउन. मला तरी मी जेंव्हा कडक केले होते तेव्हा मला खुप बरे वाटले होते. या १० दिवसात कडक उपास करुनही पित्त झाले नाही (माझी पित्त प्रकृती असुनही). मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो. श्रद्धा आहेच. अनवाणी चालणे हा त्यातलाच एक प्रकार असावा असे वाटते. अनवाणी चालणे, पट्टा न घालणे, दाढी न करणे हे सगळे मी ऑफिसच्या कामास्तव नाही करु शकत. नाही करत.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 15:25
>>> माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. असेच. तिसरं वर्ष आहे. आणि हे सांगायला मला लई अभिमान ;) वाटतो तुम्हाला जमतं का तरी.

In reply to by मृत्युन्जय

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 15:29
>>>>याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. नरेंद्र दाभोळकरच का? माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर शनीशिंगणापूरला गेला असताना त्याच्या बॅगेची चोरी झाली होती. त्याने आरडाओरडाकरून गर्दी जमविल्यावर तिथले दुकानदार जवळ आले आणि त्याला बाजूला घेऊन गेले. 'तुमचे किती नुकसान झाले सांगा आम्ही सर्व दुकानदार भरून देतो. पण आरडाओरडा करून लोक जमवू नका. इथे भक्तगण येतात म्हणून आमची दुकानं चालतात. ह्या जागेचे महत्त्व कमी झाले तर आमचा धंदा बसेल. असे करू नका.' अशी विनवणी केली. >>>>हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. एक अंधश्रद्धा खोटी ठरवली. लोकांना तर्कनिष्ठ विचार करायला शिकवलं. कोणाचं नुकसान नाही झालं. समाज प्रबोधनंच झालं. चोर्‍या सुरु झाल्या असतील तर नागरीकांनी, इतर शहरांप्रमाणे, दारं-खिडक्या आणि कुलपं लावावित. अंधश्रद्धा पसरवून आपापली दुकानं चालविण्यापेक्षा ते जास्त सयुक्तिक आहे.

In reply to by मृत्युन्जय

शिद गुरुवार, 09/25/2014 - 15:29
मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो.
डीट्टो. हे ११वे वर्ष दोन्ही वेळा फक्त दुध व फळं.

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:44
शिंगणापुरात अगोदरही चोर्‍या होतच होत्या, फक्त रिपोर्टिंग दाबले जायचे असे ऐकून आहे.

In reply to by शिद

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 15:34
काल व्हॉट्सअ‍ॅप वरुन माझ्या पर्यंत पोहचला. :) चेपु वापरत नसल्याने माहित नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 15:34
पण अप्रतिम आहे. किती निरागस आहेत हे विकणारी सगळे. काय आनंद होतोय १००० रु. मिळाल्यावर!!!

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 15:37
मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत माझ्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:25
ऐकावं ते नवलच. मी कधी असं पाहिलं वा ऐकलं नाही पण इथले प्रतिसाद पाहून दिसतंय की बर्‍यापैकी पापिलवार प्रथा असावी. आजवर अनवाणी राहणारे म्हणजे ते काळाकभिन्न डिरेस घालणारे अन तितकीच पांढरी शुभ्र लुंगी नेसणारे ते केरळी अय्यप्पावालेच माहिती होते. आज माहितीत भर पडली. बाकी अनवाणी राहणे इ. मला तरी पटत नाही. पण जे राहतात ते राहीनात! उगा सर्दीबिर्दी झाल्यावरही अनवाणी राहून ताप करून घेऊ नका म्हणजे झालं.

भिंगरी गुरुवार, 09/25/2014 - 15:59
नवरात्रीत चप्पल न घालणे,जैन मंदिरात चामड्याच्या वस्तू घालून न जाणे या मागचे नक्की कारण माहीत नाही.पण मी माझ्यापुरता जो अर्थ काढला आहे तो असा, आपल्या शरीरावर जे चामडे आहे त्याचा आपल्याला अभिमान असतो. जे चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो,त्याच्याच भानात सतत असतो.मी अमुक,मी तमुक..... मंदिरात जाताना या चामड्याच्या भानाला बाहेर ठेवावे. आणि परमेश्वराजवळ जाताना स्वच्छ मनाने जावे. परंतू आपण चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवतो आणि मी अमुक आहे, मला वेळ नाही पैसे घ्या पण आधी दर्शन द्या असे सांगतो.सगळेच असे करतात असे नाही पण कोणी करू नये म्हणून असा नियम केला असावा आणि लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला.हे माझे वैयक्तिक मत आहे.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. (यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)

In reply to by भिंगरी

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:33
धन्य ते महाभाग, जे चामड्याच्या चपला न घालता नऊ दिवस अन नऊ रात्री अनवाणी राहून स्वत:चे "मी" पण विसरतात ! (तुमच्या भाषेत चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो, मी अमुक,मी तमुक..... वै) मग स्वतःच्या अंगावरच्या सोन्याच्या दागिन्याचा, महागड्या घड्याळांचा, मोबाईलचा त्याग का नाहित करत ?

पिंपातला उंदीर गुरुवार, 09/25/2014 - 16:43
एक तरुण मुलगा... जुवेनाईल डायबिटीज् असलेला. त्याला कुणी तरी सांगितलं, नवरात्र पाळ. म्हणजे हे खाऊ नको ते खाऊन नको, पायात चप्पल घालू नको. दर्शन घे वगैरे. ऐकलं. अनवाणी फिरू लागला. चालता चालता कुठेतरी डांबराचा लपका तळव्याला चिकटला. तो निघता निघेना. देवीने काही केलं नाही. निघाला अर्धवट तेव्हा जखम झाली. जखम चिघळत गेली. देवीने काही केलं नाही. ती चिघळत हाडापर्यंत गेली. गॅंग्रीन झालं. आणि नवरात्रींची चिरंतन रात्र झाली- लेखन श्रेय मुग्धा कर्णिक

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 16:57
>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक भावना पोचल्या. दाभोलकरांकडून हिंदू श्रद्धांबद्दल बोललं जाणं अपेक्षितच आहे तसं आहे ते. बाकी धागा नेहमीच्या मार्गानं जातोय. दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा! (आम्ही प्रतिसाद देऊन ट्यार्पी वाढवतो आहोतच. लक्ष ठेवून आहोत.)

In reply to by पिंपातला उंदीर

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:42
"नवरात्रींची चिरंतन रात्र झाली" उगीच दुसरे करतात म्हणून आपणही नक्कल करायची असल्या अंधानुकरणाची अशी उदाहरणे पाहिले की वाईट वाटते. "अंध"श्रद्धा फार वाईट ! आपल्या काय झेपते हे तरी पहावे.

In reply to by पिंपातला उंदीर

धन्या Fri, 09/26/2014 - 21:29
देवी अस्तित्वात असेल तर काही करेल ना. जी शक्ती अस्तित्वातच नाही तिच्याकडून मदत कशी मिळेल ?

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 17:29
दीपकला टोमणा? त्याच्या हातच्या पाकृ खायच्यात आम्हाला देवा! आणि जळजळ? ती तर आम्हाला वाटायची बंद झालीये कधीची. सीरियस शुभेच्छा दिल्या हो!

In reply to by विनायक प्रभू

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 18:15
जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं नाही तरी चालेल असं सगळं. बाकी साठी औषधं आहेतच. :) नुकताच आलेला प्रगोंचा धागा कुणी इकडे सुद्धा वापरेल काय?

In reply to by विनायक प्रभू

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 19:10
मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का? >> हो !! अगदीच अब्रम्हण्यम का काय ते ;) ( भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला ;) )

In reply to by सुहास..

मदनबाण Fri, 09/26/2014 - 17:09
भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला जुळ्या चिंबोर्‍यांचा अर्थ त्यावेळी मला समजला नव्हता ! तेव्हा कोणीतरी माझ्या खव मधे ओरडुन गेल तेव्हा मला बोध झाला ! बाकी चिंबोरी प्रकरणा नंतर मास्तुरं बरेच दिवस मिपावर गैर हजर होतं... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

असंका Fri, 09/26/2014 - 16:30
आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटण्यासाठी एक सोपा आणि सहज मार्ग. सदा सर्वकाळ चांगलं वागणं हे सोपं नाही. लहापणी ऐकलेल्या "पुण्या"च्या ज्या अनेक कल्पना आहेत त्यातील आत्मक्लेश ही सर्वाधिक वेळा ऐकली गेलेली कल्पना आहे! हे असे सोपे मार्ग चोखाळून स्वतःचा चांगुलपणा एकदाचा सिद्ध केला की झालं. सदा सर्वकाळ चांगलं वागायची गरज संपली/कमी झाली.

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 17:20
वाघुळमानव(बॅटमॅन) व चौथ्या मितीशी (कोनाडा) सहमत. नावाचा अपभ्रंश केल्याबद्दल क्षमस्व, मैत्रीखात्यात खर्ची टाका. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

चौथा कोनाडा Tue, 09/30/2014 - 21:48
कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो अपभ्रंश कसला ? उलट आम्हाला चौथी मिती हे नविन नाव आवडलेले आहे (सॉरी, सध्याच्या "शुद्ध"लेखन प्रॅक्टीस नुसार आवडल्या गेलेले आहे) ((चौथा कोनाडा हे पुल्लिंगी नावाचे चौथी मिती हे स्त्रीलिंगी नांव म्हणजे नवरात्रा निमित्त देवीची कृपा समजावावी काय ?)) एनीवेज, चौथी मिती म्हंजे हे फारच भारदस्त बुद्धीवादी झाल्या सारखे वाटतेय !

पाषाणभेद Sat, 09/27/2014 - 22:00
एक खुळचट प्रथा पाळली जात आहे. देवी काय म्हणत नाय की पायात चपला घालत जावू नका म्हणून. आपल्याकडे नव्हते असले काही फॅड. सांगोसांगीतून असल्या प्रथा पाळल्या जातात. मी गेल्या पाच सहा वर्षांपासून नवरात्राचे उपास करतो आहे पण असले फॅड बघीतले नव्हते अन केलेही नव्हते. आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून. म्हणजे उगाचच दुसर्‍याला त्रास दिला. नाय पटत आपल्याला. त्याचप्रमाणे ऑफिसात असतांना नमाज पढणे देखील तोच प्रकार वाटतो. धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.

In reply to by पाषाणभेद

प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2014 - 01:18
धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे. सहमत. समस्या अशी आहे की कांहीतरी वेगळं (पुष्कळदा चमत्कारीक) वागून माझ्या भक्तीचं(?) प्रदर्शन नाही केलं तर माझ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि मला महत्त्व मिळत नाही. म्हणून प्रदर्शन अत्यंत आवश्यक बनून जातं. पुण्य मिळालं नाही मिळालं, मेल्यावर स्वर्गात गेलो की नर्कात तरी कोण पाहतंय, त्यात कांही सुख नाही. सुख ह्याच जन्मात चार लोकांची वाहवा शब्दात किंवा नुसत्या नजरेतही मिळविण्यात आहे. ('आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून.' बघा आला नं त्याचा उल्लेख!, ह्यात त्यांना सुख मिळतं.) शिवाय कोणी त्याला वेडेपणा म्हंटले तर 'माझी श्रद्धा आहे' असे म्हणून समोरच्याचे तोंड बंद करता येते. श्रद्धा आहे म्हंटल्यावर तर्काला स्थान नसते.

पाषाणभेद Sat, 09/27/2014 - 22:03
अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं थुंकतात. चपला न घालून फायदा न होता तोटाच होईल आरोग्याला. पुर्वी चपला न घालणार्‍यांचा वावर सीमीत प्रदेशात असावा. त्यामुळे तेथे आरोग्याची जपणूक होत असावी. आजकाल श्रावणात देखील चपला न घातल्याचे बघितले आहे. खुळचट प्रथा काहीही. निषेध.

In reply to by दिपक.कुवेत

वाचला हो ...पण त्यात काही रस वाटला नाही म्हणुन जरा वेगळे वळण घेतले ... चप्पल न घालणे , नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अन टाय अन चड्ड्या बदलणे हे निव्वळ फ्यॅड आहे असे आपले स्पष्ट मत आहे ! अध्यात्मिकतेचे उत्सवीकरण हे हिंदुधर्मा/तत्वज्ञाना पुढील खरेच मोठ्ठे आव्हान आहे पण त्यावर चर्चा नको उगाच इथल्या सुडोसेक्युलर तत्वज्ञआनांच्या हातात कोलीत कशाला द्या ;) मागे वारी बंद करा म्हणाले मग गणेशोत्सव बंद करा म्हणाले ,लगेच गाडी नवरात्रीवर घसरेल मग काय दिवाळी आहेच नंतर... त्यांचे म्हणजे पायाला जखम झाली तर पायच तोडुन टाकला पाहिजे असले काहीसे लॉजिक आहे , कुठं सारखं सारखं त्यांच्या नादाला लागता ? आपल्याला आस्तिकनास्तिकपाव पेक्षा मिसळपावच जास्त आवडते =))

काउबॉय Sun, 09/28/2014 - 14:26
अहो 9 दिवस देवीच्या मंदिरात उभे राहण्याचे व्रत पाळणारेही बघत आहे. दिवसभर उपास रात्री उभ्यानेच आधार घेउन झोपायचे सगळे विधी उभ्यानेच ना बसायचे ना पाठ टेकवायची... अन हे सर्व सामान्य संसारी लोक करत आहेत. 9 दिवस.

In reply to by टवाळ कार्टा

काउबॉय Sun, 09/28/2014 - 15:07
सन्यास घेउन आजन्म उभे राहिल्याचे दावा करणाऱ्याना भेटलो आहे मला फारसा न पटलेला हां प्रकार आहे. त्यामुळे त्याचे वा याचे साध्य काय चे उत्तर मला तर काय बाबात्यातलं कळतं नाही हेच आहे.

vikramaditya Sun, 09/28/2014 - 16:41
स्वतःपुरती मर्यादीत असावी. सश्रद्ध असण्यात काही गैर नाही जो पर्यंत त्यामुळे स्वतःच्या प्रापंचीक जबाबदा-या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळत असेल. परंतु त्यातुन कुठलाही इतर वैयक्तिक (कुटुंब, नोकरी, व्यवसाय या कडे दुर्लक्ष, कर्ज काढुन सण साजरे करणे असले प्रकार) किंवा सामाजिक (ध्वनी प्रदुषण, खंडणी वसुली, वाहतुकीचीगैरसोय आर्थिक फसवणुक, दडपशाही (धर्माची सक्ती), जीवहत्या इ.) त्रास होत नसेल तर.

In reply to by प्यारे१

प्यारे काका , इथे मोक्ष कुणाला हवाय ? देव फॅशन झाला आहे फॅशन ... ( बायदवे हे काही आजचे अन नवीन नाही , स्वामी विवेकानंदही एका भ्हाषणात हे देवाचे धर्माचे तत्त्वज्ञानाचे उत्सवीकरण डेंजरस आहे असे म्हणाल्याचा उल्लेख आहे )
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि.

मी पयला... ???

दशानन ·

In reply to by दशानन

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 10:07
"मी पयला" असं क मून बोलू राहिलाबे बेंबट्यान्नो ? अस अफाट पसर्लेल्या आंतरजालावरील मिपाकरांना, आपण दर्डावून विचारताच आम्ही शेजारील पाशिंजरकडे लागलीच खुलासा करून टाकला, "छ्या, आपण नाय बा असं कधी बोल्लो!‘‘

विलासराव Wed, 09/24/2014 - 23:33
विलासराव, जोड्यांनी मारा राव! हे मला या जन्मात तरी शक्य नाही बॉ. मीही हे कधी लिहीत नाही पण आता धागाच त्यावर आला. आनी योगायोगाने मी पाहीला म्हनुन गंमत केली राव. बाकी काही नाही.

पैसा Wed, 09/24/2014 - 23:47
मध्यंतरी जेपीने निरुपद्रवी गंमत म्हणून हे प्रकरण सुरू केलेले. जेपी भारत भ्रमणाला गेला तरी इतरांनी ते सुरूच ठेवले. इतर उपद्रवी प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याच्या घाईत याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र लोकांनी निदान धाग्याच्या पहिल्या काही ओळी तरी वाचून मग प्रतिसाद द्यावेत ही विनंती!ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!

In reply to by पैसा

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/25/2014 - 09:11
ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!
मो.जिं.भाऊंच्या धाग्यावर म्हणायचय का? =))

रामपुरी गुरुवार, 09/25/2014 - 01:03
हे मायबोली वर बघितलंय. कदाचित तिकडूनच आयात झालं असावं. आणखी एक असाच आयात डोक्यात जाणारा शब्द म्हणजे "धन्स्/धन्यू". आणखी २ अक्षरं टंकायला असा किती त्रास होतो काही कळत नाही.

In reply to by रामपुरी

जेनी... गुरुवार, 09/25/2014 - 01:38
एकदम बरोबर ... त्या इंग्रजांनी जर कुठे वाचलं हे धन्स तर धस्कुन मरतिल :-/ हा आता त्यांना मराठी वाचायला येत नै म्हणुन बरं .. बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...

In reply to by बॅटमॅन

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:39
माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि Thanks यांचा वर्णसंकर आहे ! ;) मी कधी-कधी वापरतो हा शब्द प्रयोग. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:27
अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द वापरू लागले तर रुळेलही. शब्द रुळायला काय लागत नाय विशेष. पण सध्या तरी मला हा शब्द विचित्र वाटतो.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Fri, 09/26/2014 - 17:15
अजुन एक शब्द मिपावर सर्रास वापरला जातो :- बाडिस { By default सहमत }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

In reply to by कपिलमुनी

भाते गुरुवार, 09/25/2014 - 20:29
मराठी सोडुन काय बी समजलं नाय बा! काय लिव्हलय हे?

In reply to by पैसा

कपिलमुनी Fri, 09/26/2014 - 15:53
टीपी धाग्यावरचा टीपी.
बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...
यावर प्रतिसाद होता तो.

In reply to by रामपुरी

धन्स आणि धन्यू हे शब्द उपक्रम या संकेतस्थळावर आमच्या मित्रांनी वापरले तेच या शब्दाचे निर्माते आहेत आणि त्यांची ती परंपरा आम्ही पुढे नेली हे नम्रपणे नमूद करतो. आमच्या मित्राची आठवण काढणारे शब्द शोधल्याबद्द्ल धन्स !! (रावसाहेब वाचताय ना प्रतिसाद) -दिलीप बिरुटे -

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/25/2014 - 01:43
माझ्या निरिक्षणाप्रमाणे या प्रकाराला लोकप्रिय करण्यार मुक्त विहारी यांनी पण हातभार लावला आहे. मोजीकथांवर हे आवर्जुन पहायला मिळाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

मुक्त विहारि गुरुवार, 09/25/2014 - 14:48
त्यामुळे फक्त त्यांच्या कथांवरच "मी पहिला" असे लिहायचो. त्याचा राग कधी मोजींना पण आला नाही.(अर्थात "मोजी" हे राग-लोभ-माया-प्रतिसाद- यांच्या पलीकडे पोहोचले आहेत्,हे पण जाता नमूद करु इच्छीतो.) ते आपले धागा सोडतात आणि आम्ही आपले त्या धाग्याचे मनोरंजन करून सोडतो. त्या मनोरंजनांत पहिला प्रतिसाद आपला असावा असा अट्टाहास मात्र बर्‍याच जणांचा असतो.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 04:11
'मी पयला' ला लै मोठा इतिहास हाय. आमी उगा गम्मत मनुन पुना सुरु केली. याबद्दल आमचे एका संपादीके कडुन व्यवस्थित जाहिर कान उघडणी झाली आहे. त्यामुळे लोकांनी हे शब्द उचलुन धरले.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 09:50
जेव्हा मिपाचे नवे दिवस होते, तेव्हा कुठल्हाही धाग्यावर पहिला प्रतिसाद देण्यासाठी चढाओढ लागायची. इतकच काय तर उजवीकडे हजर सभासदात आपलं नाव सातत्याने दिसण्यासाठी ब्राउजर सातत्याने रिफ्रेश मारले जायचे. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

किसन शिंदे गुरुवार, 09/25/2014 - 10:02
अरेच्च्या!! मला वाटलं जेपी आणि मुविंनी धागा हायजॅक करण्यासाठी सुरू केलेली आधुनिक परंपरा आहे ही. ;) (ह.घ्य)

In reply to by किसन शिंदे

मुक्त विहारि गुरुवार, 09/25/2014 - 21:06
"मी पहिला" हे लिहिण्यात जी मज्जा आहे, ती इतर धाग्यांवर नाही.. बाकी, ह्या आधुनिक परंपरेला आमच्याकडून सुरुवात झाली असेल तर, मंडळ आभारी आहे.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 09:51
. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की ! मिपा विश्लेषक आदुबाळ सांगु शकेल.

In reply to by अनुप ढेरे

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 12:39
काय सांगताय ? काल परवा पानिपतात अब्दाली च्या अंगावर धावुन जाताना मी एका सैनिकाच्या तोंडुन " मी पयला " हा शब्द ऐकला आहे !! असो ..जोक्स अपार्ट ....मी पयला काय वा प्यार्टी काय चोप्य पस्ते काय किंवा बा*वला काय शब्द प्रयोग चांगला असेल तर लोकांनी उचलुन धरला आणि थोडी माफक करमणुक म्हणुन खपला तर काय हरकत आहे ..असु देत ..

सर्वसाक्षी गुरुवार, 09/25/2014 - 10:15
जर तुम्ही 'मी पयला' हे टंकण्यासाठीच येत असाल तर तुमची निराशा होत असावी. मात्र जर तुम्ही धागा वाचायला, आस्वाद घ्यायला वा चर्चेत सहभागी व्हायला येत असाल तर कुणी 'मी पयला' असा प्रतिसाद तुम्हाला खटकण्याचेकारण नाही. शिवाय प्रत्येल धाग्यावर प्रतिसाद दिलाच पाहिजे असे नाही. मी पयला असा प्रतिसाद दिसल्याने मी कधीही धाग्याकडे पाठ फिरवली नाही आणि बहुतेक करुन कुणी फिरवत असेल असे वाटत नाही. असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? अगदी पूर्वी याहू मराठी पिपल (१९९८-१९९९ चा सुमार) वर लेखन क्र. शिर्षकासोबत दिसायचा (सर्व विषयांना/ धाग्यांना समाईक असा) तेव्हा ५०००/१००००/१५००० वैगेर क्रमांकाचा प्रतिसाद देण्यासाठी सभासद आतुरतेने वाट पाहत दबा धरुन बसायचे. ज्याचा प्रतिसाद हुकेल तो ज्याने क्रम साधला त्याला खिलाडुपणे 'तू पटकावलास काय' असा प्रतिसाद लिहायचा. मात्र हे कुणाला खटकलं नव्हतं. तुमची आक्षेप नक्की कशासाठी आहे?

In reply to by सर्वसाक्षी

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 14:56
सर्वसाक्षी, >>>>असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. तो त्याचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? ह्याच चालीवर कोणी म्हणेल, 'असते एखाद्याला अशुद्ध लेखनाची आवड. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? काय म्हणता?

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्वसाक्षी गुरुवार, 09/25/2014 - 16:19
पेठकर साहेब तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडुन गाडी उलट्या दिशेने वा अतिवेगाने चालवली तर ते इतरांना धोआकादायक असू शकते मात्र एखाद्याने एका कडेने कुणालाही न आडवता वाहतुकीला अडथळा न आणता गाडी एका कडेने संथ चालवली तर त्याला कुणी हरकत घ्यायचे कारण नाहीए. मी पयला असे एखाद्याने प्रतिसादात म्हटले तर इतरांना काय त्रास आहे? मुळात असे प्रतिसाद वाचुन कुणी लेखन वाचायचे टाळेल हेच पटत नाही कारण सदर प्रतिसाद हा लेखनाला दिलेला प्रतिसाद नसून ते चेपु वरील 'स्टेट्स अपडेट' च्या धर्तीवर असते.

In reply to by सर्वसाक्षी

प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2014 - 01:05
तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. खूप जणांना नियम तोडण्यातच आनंद मिळत असतो. तुलना आनंद मिळविण्याची आहे. (वादावादी/प्रतिसाद उपरोधात आहे हे लक्षात घ्यावे ही विनंती.)

आतिवास गुरुवार, 09/25/2014 - 11:41
निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय ती काही विशिष्ट प्रकारच्या धाग्यांवर होताना दिसते. हेच '१००', '+१,', आणि स्मायलींच्याही बाबतीत म्हणता येईल. बाकी, धागा आधी वाचावा, प्रतिसाद मग वाचावेत असा माझा क्रम असतो. त्यामुळे प्रतिसादांवरुन मी धाग्याबद्दल मत बनवत नाही (आणि धाग्यावरुन प्रतिसादकांबद्दल!)

दशानन गुरुवार, 09/25/2014 - 21:25
थर्ड पार्टी म्हणून कधी या गोष्टीची मज्जा घेऊन पहा. मग शक्यतो ही मज्जा नसून उपद्रव आहे तो त्याच प्रकारात येतो "मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" आज प्रकाशित केलेलेल्या लेखावर देखील मुद्दाम असा प्रतिसाद आलाच! आधी मला वाटले, की मी लेखन पाहिले, म्हणून मी पहिला असा भाव असावा पण तो मी पहिला वाला नंतर लेखनाकडे हुंगुन ही पहात नाही जे जाणवले होते. अचानक अनेक जागे झालेले पाहून आनंद झाला.

In reply to by दशानन

"मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दशानन Sun, 09/28/2014 - 12:36
>>मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ लिहिता ना हे लक्ष्यातच आले नाही हो =)) :D

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 03:03
अभ्यास करायचा नाही, शाळेपासून महिनोन महिने दूर रहायचं... यायचं तेंव्हाही सरळ पहिल्या नांवाने न येता निरनिराळी सोंगं घेऊन यायचं, आणि मग येऊन असे प्रश्न विचारायचे!!!! आधी बाकावर उभा रहा पायाचे अंगठे पकडून!!!! :)

In reply to by सवंगडी

पिवळा डांबिस Sun, 09/28/2014 - 11:22
तुम्हाला कोणी सांगितलंय? ज्याला दशाननाला सांगितलंय त्याला ते कळलंय, मग तुम्ही कशाला उगीचच मध्ये? उगीच बीचमे मेरा चांदभाई!!!!

In reply to by पिवळा डांबिस

सवंगडी Sun, 09/28/2014 - 19:32
आम्हाला कुठायत १० डोकी ? त्यामुळे वाटले मलाच म्हणले तुम्ही !(इथून फुडे नाम लेके बोलो प्लीज्ज ) आता तरी सोडू का सांगा ना ?? ओ पिंडा मास्तर

जेपी Fri, 09/26/2014 - 11:55
या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ जास्तच जोमाने फोफावत आहे. काल पासुन आलेले धागे बघुन हे निरीक्षण नोंदवत आहे. - जेपी (थ्री नॉट थ्री रायकलवाला)

In reply to by यसवायजी

मुक्त विहारि Sun, 09/28/2014 - 00:01
उलट आहे.... वय वाढले की माणूस जास्तीत जास्त लहान मुलासारखाच निर्मळ होत जातो. आणि तसेही, मिपाच्या अंगणांत दंगा-मस्ती होणारच.

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी Sun, 09/28/2014 - 00:42
ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली न्हाई तुमी. दंगा मस्ती तो होनाईच मंगता हय. -पोरकट- SYG ;) @ दशानन- नमस्कारा. ननगे निम्मद बरदिद्द एल्ला तुंबा शेरतद. आदरे, तुम्ही जरा जास्तच शिरेस झालाय.सॉरी बर्का, पण ऑफिसात्न वैतागून आलो की जरा मजा म्हणून कधी कधी असा पोरकटपणा करतो. पण काही धागे फक्त दंगा घालायलाच जन्माला आलेले असतात. फुल्ल वेंजॉय करयाचं.

In reply to by यसवायजी

दशानन Sun, 09/28/2014 - 12:34
दंगा करायला ना नाही आहे, करा की मनसोक्त! मी पण करत असतोच की ( हा धागा काय प्रवचन करायला काढला आहे का ;) ) पण तोच तोच प्रकार करण्यात मध्ये काही अर्थ नाही, आणि मज्जा पण नाही बॉ!

In reply to by दशानन

कवितानागेश Sun, 09/28/2014 - 18:51
इथे शेवटच्या प्रतिसादासाठी धडपडणारे लोक्स पण आहेत. ;) पण तिथे 'माझा शब्द शेवटचा' असं लिहायच्या आत धागाच वाचनमात्र होतो.

In reply to by दशानन

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 10:07
"मी पयला" असं क मून बोलू राहिलाबे बेंबट्यान्नो ? अस अफाट पसर्लेल्या आंतरजालावरील मिपाकरांना, आपण दर्डावून विचारताच आम्ही शेजारील पाशिंजरकडे लागलीच खुलासा करून टाकला, "छ्या, आपण नाय बा असं कधी बोल्लो!‘‘

विलासराव Wed, 09/24/2014 - 23:33
विलासराव, जोड्यांनी मारा राव! हे मला या जन्मात तरी शक्य नाही बॉ. मीही हे कधी लिहीत नाही पण आता धागाच त्यावर आला. आनी योगायोगाने मी पाहीला म्हनुन गंमत केली राव. बाकी काही नाही.

पैसा Wed, 09/24/2014 - 23:47
मध्यंतरी जेपीने निरुपद्रवी गंमत म्हणून हे प्रकरण सुरू केलेले. जेपी भारत भ्रमणाला गेला तरी इतरांनी ते सुरूच ठेवले. इतर उपद्रवी प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याच्या घाईत याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र लोकांनी निदान धाग्याच्या पहिल्या काही ओळी तरी वाचून मग प्रतिसाद द्यावेत ही विनंती!ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!

In reply to by पैसा

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/25/2014 - 09:11
ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!
मो.जिं.भाऊंच्या धाग्यावर म्हणायचय का? =))

रामपुरी गुरुवार, 09/25/2014 - 01:03
हे मायबोली वर बघितलंय. कदाचित तिकडूनच आयात झालं असावं. आणखी एक असाच आयात डोक्यात जाणारा शब्द म्हणजे "धन्स्/धन्यू". आणखी २ अक्षरं टंकायला असा किती त्रास होतो काही कळत नाही.

In reply to by रामपुरी

जेनी... गुरुवार, 09/25/2014 - 01:38
एकदम बरोबर ... त्या इंग्रजांनी जर कुठे वाचलं हे धन्स तर धस्कुन मरतिल :-/ हा आता त्यांना मराठी वाचायला येत नै म्हणुन बरं .. बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...

In reply to by बॅटमॅन

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:39
माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि Thanks यांचा वर्णसंकर आहे ! ;) मी कधी-कधी वापरतो हा शब्द प्रयोग. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:27
अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द वापरू लागले तर रुळेलही. शब्द रुळायला काय लागत नाय विशेष. पण सध्या तरी मला हा शब्द विचित्र वाटतो.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Fri, 09/26/2014 - 17:15
अजुन एक शब्द मिपावर सर्रास वापरला जातो :- बाडिस { By default सहमत }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

In reply to by कपिलमुनी

भाते गुरुवार, 09/25/2014 - 20:29
मराठी सोडुन काय बी समजलं नाय बा! काय लिव्हलय हे?

In reply to by पैसा

कपिलमुनी Fri, 09/26/2014 - 15:53
टीपी धाग्यावरचा टीपी.
बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...
यावर प्रतिसाद होता तो.

In reply to by रामपुरी

धन्स आणि धन्यू हे शब्द उपक्रम या संकेतस्थळावर आमच्या मित्रांनी वापरले तेच या शब्दाचे निर्माते आहेत आणि त्यांची ती परंपरा आम्ही पुढे नेली हे नम्रपणे नमूद करतो. आमच्या मित्राची आठवण काढणारे शब्द शोधल्याबद्द्ल धन्स !! (रावसाहेब वाचताय ना प्रतिसाद) -दिलीप बिरुटे -

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/25/2014 - 01:43
माझ्या निरिक्षणाप्रमाणे या प्रकाराला लोकप्रिय करण्यार मुक्त विहारी यांनी पण हातभार लावला आहे. मोजीकथांवर हे आवर्जुन पहायला मिळाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

मुक्त विहारि गुरुवार, 09/25/2014 - 14:48
त्यामुळे फक्त त्यांच्या कथांवरच "मी पहिला" असे लिहायचो. त्याचा राग कधी मोजींना पण आला नाही.(अर्थात "मोजी" हे राग-लोभ-माया-प्रतिसाद- यांच्या पलीकडे पोहोचले आहेत्,हे पण जाता नमूद करु इच्छीतो.) ते आपले धागा सोडतात आणि आम्ही आपले त्या धाग्याचे मनोरंजन करून सोडतो. त्या मनोरंजनांत पहिला प्रतिसाद आपला असावा असा अट्टाहास मात्र बर्‍याच जणांचा असतो.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 04:11
'मी पयला' ला लै मोठा इतिहास हाय. आमी उगा गम्मत मनुन पुना सुरु केली. याबद्दल आमचे एका संपादीके कडुन व्यवस्थित जाहिर कान उघडणी झाली आहे. त्यामुळे लोकांनी हे शब्द उचलुन धरले.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 09:50
जेव्हा मिपाचे नवे दिवस होते, तेव्हा कुठल्हाही धाग्यावर पहिला प्रतिसाद देण्यासाठी चढाओढ लागायची. इतकच काय तर उजवीकडे हजर सभासदात आपलं नाव सातत्याने दिसण्यासाठी ब्राउजर सातत्याने रिफ्रेश मारले जायचे. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

किसन शिंदे गुरुवार, 09/25/2014 - 10:02
अरेच्च्या!! मला वाटलं जेपी आणि मुविंनी धागा हायजॅक करण्यासाठी सुरू केलेली आधुनिक परंपरा आहे ही. ;) (ह.घ्य)

In reply to by किसन शिंदे

मुक्त विहारि गुरुवार, 09/25/2014 - 21:06
"मी पहिला" हे लिहिण्यात जी मज्जा आहे, ती इतर धाग्यांवर नाही.. बाकी, ह्या आधुनिक परंपरेला आमच्याकडून सुरुवात झाली असेल तर, मंडळ आभारी आहे.

जेपी गुरुवार, 09/25/2014 - 09:51
. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की ! मिपा विश्लेषक आदुबाळ सांगु शकेल.

In reply to by अनुप ढेरे

सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 12:39
काय सांगताय ? काल परवा पानिपतात अब्दाली च्या अंगावर धावुन जाताना मी एका सैनिकाच्या तोंडुन " मी पयला " हा शब्द ऐकला आहे !! असो ..जोक्स अपार्ट ....मी पयला काय वा प्यार्टी काय चोप्य पस्ते काय किंवा बा*वला काय शब्द प्रयोग चांगला असेल तर लोकांनी उचलुन धरला आणि थोडी माफक करमणुक म्हणुन खपला तर काय हरकत आहे ..असु देत ..

सर्वसाक्षी गुरुवार, 09/25/2014 - 10:15
जर तुम्ही 'मी पयला' हे टंकण्यासाठीच येत असाल तर तुमची निराशा होत असावी. मात्र जर तुम्ही धागा वाचायला, आस्वाद घ्यायला वा चर्चेत सहभागी व्हायला येत असाल तर कुणी 'मी पयला' असा प्रतिसाद तुम्हाला खटकण्याचेकारण नाही. शिवाय प्रत्येल धाग्यावर प्रतिसाद दिलाच पाहिजे असे नाही. मी पयला असा प्रतिसाद दिसल्याने मी कधीही धाग्याकडे पाठ फिरवली नाही आणि बहुतेक करुन कुणी फिरवत असेल असे वाटत नाही. असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? अगदी पूर्वी याहू मराठी पिपल (१९९८-१९९९ चा सुमार) वर लेखन क्र. शिर्षकासोबत दिसायचा (सर्व विषयांना/ धाग्यांना समाईक असा) तेव्हा ५०००/१००००/१५००० वैगेर क्रमांकाचा प्रतिसाद देण्यासाठी सभासद आतुरतेने वाट पाहत दबा धरुन बसायचे. ज्याचा प्रतिसाद हुकेल तो ज्याने क्रम साधला त्याला खिलाडुपणे 'तू पटकावलास काय' असा प्रतिसाद लिहायचा. मात्र हे कुणाला खटकलं नव्हतं. तुमची आक्षेप नक्की कशासाठी आहे?

In reply to by सर्वसाक्षी

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 14:56
सर्वसाक्षी, >>>>असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. तो त्याचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? ह्याच चालीवर कोणी म्हणेल, 'असते एखाद्याला अशुद्ध लेखनाची आवड. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? काय म्हणता?

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्वसाक्षी गुरुवार, 09/25/2014 - 16:19
पेठकर साहेब तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडुन गाडी उलट्या दिशेने वा अतिवेगाने चालवली तर ते इतरांना धोआकादायक असू शकते मात्र एखाद्याने एका कडेने कुणालाही न आडवता वाहतुकीला अडथळा न आणता गाडी एका कडेने संथ चालवली तर त्याला कुणी हरकत घ्यायचे कारण नाहीए. मी पयला असे एखाद्याने प्रतिसादात म्हटले तर इतरांना काय त्रास आहे? मुळात असे प्रतिसाद वाचुन कुणी लेखन वाचायचे टाळेल हेच पटत नाही कारण सदर प्रतिसाद हा लेखनाला दिलेला प्रतिसाद नसून ते चेपु वरील 'स्टेट्स अपडेट' च्या धर्तीवर असते.

In reply to by सर्वसाक्षी

प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2014 - 01:05
तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. खूप जणांना नियम तोडण्यातच आनंद मिळत असतो. तुलना आनंद मिळविण्याची आहे. (वादावादी/प्रतिसाद उपरोधात आहे हे लक्षात घ्यावे ही विनंती.)

आतिवास गुरुवार, 09/25/2014 - 11:41
निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय ती काही विशिष्ट प्रकारच्या धाग्यांवर होताना दिसते. हेच '१००', '+१,', आणि स्मायलींच्याही बाबतीत म्हणता येईल. बाकी, धागा आधी वाचावा, प्रतिसाद मग वाचावेत असा माझा क्रम असतो. त्यामुळे प्रतिसादांवरुन मी धाग्याबद्दल मत बनवत नाही (आणि धाग्यावरुन प्रतिसादकांबद्दल!)

दशानन गुरुवार, 09/25/2014 - 21:25
थर्ड पार्टी म्हणून कधी या गोष्टीची मज्जा घेऊन पहा. मग शक्यतो ही मज्जा नसून उपद्रव आहे तो त्याच प्रकारात येतो "मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" आज प्रकाशित केलेलेल्या लेखावर देखील मुद्दाम असा प्रतिसाद आलाच! आधी मला वाटले, की मी लेखन पाहिले, म्हणून मी पहिला असा भाव असावा पण तो मी पहिला वाला नंतर लेखनाकडे हुंगुन ही पहात नाही जे जाणवले होते. अचानक अनेक जागे झालेले पाहून आनंद झाला.

In reply to by दशानन

"मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दशानन Sun, 09/28/2014 - 12:36
>>मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ लिहिता ना हे लक्ष्यातच आले नाही हो =)) :D

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 03:03
अभ्यास करायचा नाही, शाळेपासून महिनोन महिने दूर रहायचं... यायचं तेंव्हाही सरळ पहिल्या नांवाने न येता निरनिराळी सोंगं घेऊन यायचं, आणि मग येऊन असे प्रश्न विचारायचे!!!! आधी बाकावर उभा रहा पायाचे अंगठे पकडून!!!! :)

In reply to by सवंगडी

पिवळा डांबिस Sun, 09/28/2014 - 11:22
तुम्हाला कोणी सांगितलंय? ज्याला दशाननाला सांगितलंय त्याला ते कळलंय, मग तुम्ही कशाला उगीचच मध्ये? उगीच बीचमे मेरा चांदभाई!!!!

In reply to by पिवळा डांबिस

सवंगडी Sun, 09/28/2014 - 19:32
आम्हाला कुठायत १० डोकी ? त्यामुळे वाटले मलाच म्हणले तुम्ही !(इथून फुडे नाम लेके बोलो प्लीज्ज ) आता तरी सोडू का सांगा ना ?? ओ पिंडा मास्तर

जेपी Fri, 09/26/2014 - 11:55
या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ जास्तच जोमाने फोफावत आहे. काल पासुन आलेले धागे बघुन हे निरीक्षण नोंदवत आहे. - जेपी (थ्री नॉट थ्री रायकलवाला)

In reply to by यसवायजी

मुक्त विहारि Sun, 09/28/2014 - 00:01
उलट आहे.... वय वाढले की माणूस जास्तीत जास्त लहान मुलासारखाच निर्मळ होत जातो. आणि तसेही, मिपाच्या अंगणांत दंगा-मस्ती होणारच.

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी Sun, 09/28/2014 - 00:42
ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली न्हाई तुमी. दंगा मस्ती तो होनाईच मंगता हय. -पोरकट- SYG ;) @ दशानन- नमस्कारा. ननगे निम्मद बरदिद्द एल्ला तुंबा शेरतद. आदरे, तुम्ही जरा जास्तच शिरेस झालाय.सॉरी बर्का, पण ऑफिसात्न वैतागून आलो की जरा मजा म्हणून कधी कधी असा पोरकटपणा करतो. पण काही धागे फक्त दंगा घालायलाच जन्माला आलेले असतात. फुल्ल वेंजॉय करयाचं.

In reply to by यसवायजी

दशानन Sun, 09/28/2014 - 12:34
दंगा करायला ना नाही आहे, करा की मनसोक्त! मी पण करत असतोच की ( हा धागा काय प्रवचन करायला काढला आहे का ;) ) पण तोच तोच प्रकार करण्यात मध्ये काही अर्थ नाही, आणि मज्जा पण नाही बॉ!

In reply to by दशानन

कवितानागेश Sun, 09/28/2014 - 18:51
इथे शेवटच्या प्रतिसादासाठी धडपडणारे लोक्स पण आहेत. ;) पण तिथे 'माझा शब्द शेवटचा' असं लिहायच्या आत धागाच वाचनमात्र होतो.
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते.

न्यायालयातील एक दिवस

जानु ·

एस Wed, 09/24/2014 - 22:27
मे. कोर्टाचा काहीच अनुभव नाही. पण आपल्याला पडलेले प्रश्न रास्त आहेत...

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 10:30
१) न्यायालयात निवाडा/ निकाल मिळतो. न्याय मिळतोच असे नाही २) शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये हे त्रिकाल अबाधित सत्य आहे.

देशपांडे विनायक गुरुवार, 09/25/2014 - 11:35
आता विषय निघालाच आहे तर -- तुम्ही जर न्यायालयात जाण्याचा विचार करत असाल तर जाण्यापूर्वी माझ्याशी एकदा बोला वेळ काढून या कारण तुमचा भविष्य काळातील वेळ सत्कारणी लागण्याची शक्यता तुम्हाला दिसू लागण्याची शक्यता आहे न्यायालयात जावेच लागणार असेल तर तेथे जाताना तुमच्या छातीची धडधड थोडी कमी होईल . असा प्रतिसाद मुद्देसूद नाही हे मला कळतेय पण न्यायालयातील ४० वर्षाचा [ चाळीस वर्षाचा ] अनुभव लिहिणे या वयात मला नकोसे वाटते . पण बोलण्यास आवडते . खाण्यापिण्यास आवडते . तेव्हा जरूर या. खातपीत बोलू !! सांगावयाचे राहिले मी वकील नाही . मी कुणाची वकिलीही करत नाही . मी लावलेले दावे आणि माझ्यावर लावले गेलेले दावे या करिता गेली ४० वर्षे मी न्यायालयात जात आहे आता १५ ला जाऊन आलो पुढची तारीख ०८ ऑक्टोबर

In reply to by सुहास..

आदूबाळ गुरुवार, 09/25/2014 - 17:40
४९८ ची केस होती.
असं लिहिलं आहे की त्यांनी. ४९८अ म्हणायचं असावं - कौटुंबिक हिंसाचार. ४९८ "विवाहित स्त्रीला फूस लावून पळवून नेणे" असा काहीसा आहे.

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/25/2014 - 15:49
१. सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन सकाळी लवकर येऊ शकत होता. पण आला नाही. त्रास दिलाच पाहिजे का? सहसा पोलिसांना सणासुदीच्या काळात (आणि सध्या तर कुठल्या न कुठल्या तणावामुळे नेहमीच ) इतर बंदोबस्ताची कामे खूप असतात. त्यांना तिथेही सवलत मिळत नाही. त्यामुळे तिथले कर्तव्य बजावणे महत्वाचे असते. २. न्यायालयात नविन न्यायाधिशांना प्रशिक्षण देतांना जामीनाचे पर्याय शिकविले तर असतील. मग असे का? जामिनाचे विविध असले तरी न्यायाधीशांना समोर असलेल्या परिस्थितीनुसार जामीन ठरवावा लागतो. एखाद्या माणसाने अगोदर कुणाला जामीन दिलेला असल्यास त्याला परत कुणालाही जामीन राहता येत नाही. ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट) हा सोपा उपाय आहे कारण त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय ते मिळत नाही. ३. एक वाक्य ऐकले न्यायाधिश त्या न्यायालयातील देव असतो व त्याच्यापुढे काहीच बोलता येत नाही हे मान्य करावेच लागले. हे खरे आहे कारण त्या कोर्टात जोपर्यंत तो न्यायाधीश असतो तोपर्यंत तो त्याला दिलेल्या कायदेशीर सवलतीनुसार त्या कोर्टाचे कामकाज चालवत असतो. मी कित्येक न्यायाधीश असे पाहिलेले आहेत कि जे सकाळी ११ वाजता न्यायासनावर बसून दिवसभराचा बोर्ड तारखा देऊन संपवतात आणि उठून जातात कारण कुठल्यातरी महत्वाच्या केसचे निकाल अथवा अभ्यास करायचा असतो. कोर्टातल्या इतर कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांच्या कार्यपद्धीतीशी जुळवून घेत घेत नाकी नऊ येतात. ४. शासकीय अधिकार्‍याच्या त्याने घेतलेल्या निर्णयामागील अथवा क्रुती मागील कारणमिमांसा मागितल्यास स्पष्ट करणे किंवा सांगणे बंधनकारक असणे आवश्यक वाटते का? शासकीय अधिकारी तसेच न्यायाधीश ह्यांना रोज त्यांच्या कार्यपद्धतीचा खुलासा अथवा अर्थ सांगणे बंधनकारक नसते तथापि दरवर्षी त्यांचे गोपनीय अहवाल त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या अधिकार्यांकडे जातात. ते खराब होऊ नयेत म्हणून ही सर्व मंडळी जीवाचा प्रचंड आटापिटा करत असतात. हलीच आलेल्या माहितीचा अधिकार कायद्यान्वये बरीचशी माहिती सामान्य माणसालाही मिळू शकते मात्र त्यासाठी खर्च करावा लागतो. अवांतर : जामीन देताना अत्यंत सावध राहा कारण त्या माणसाला गरज पडल्यावर कोर्टात सादर करण्याची हमी तुम्ही कोर्टाला देत असता. त्यामुळे विश्वासू माणसाव्यतिरिक्त शक्यतो कोणालाही जामीन राहू नये.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सवंगडी Fri, 09/26/2014 - 18:11
लई माहिती हाय ओ तुम्हाला ! नक्की तुम्ही कोणत्या माम्लेदाराचा पंखा हो ? मामलेदार मिसळ कि खरा मामलेदार?

जानु गुरुवार, 09/25/2014 - 21:34
श्री. मा. प. - त्या दिवशी कोणताही सण नव्हता. आणि साहेबांना त्या दिवशी एक साक्षही द्यायची होती. एकदा पुकारा ही झाला होता. एकाच गुन्ह्यात २-३ किंवा अधिक आरोपी असतील तर ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट)चालते असे मत क्लार्क ते दुसरे जज्ज सगळ्यांचे होते.

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/25/2014 - 22:16
खास दोस्त असतात.... त्यांच्यात चालतं असं.... वैयक्तीक जातमुचलका हा शक्यतो त्यांच्यासाठी असतो ज्यांना जामीनदार मिळत नाहीत.

जानु गुरुवार, 09/25/2014 - 23:12
श्री. मा.प. आपण अवांतर केलेली सुचना नक्कीच लक्षात ठेवणार.

शि बि आय Sat, 05/23/2015 - 23:16
आहो ... मामलेदारचा पंखा लय माहित हाये कि राव तुम्हाला… नक्की तुम्ही कोन म्हनायचं नुसतं मामलेदारचा पंखा की आजून कुनी ?? झ्याक सल्ले देता राव… बेश्ट हाय

एस Wed, 09/24/2014 - 22:27
मे. कोर्टाचा काहीच अनुभव नाही. पण आपल्याला पडलेले प्रश्न रास्त आहेत...

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 10:30
१) न्यायालयात निवाडा/ निकाल मिळतो. न्याय मिळतोच असे नाही २) शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये हे त्रिकाल अबाधित सत्य आहे.

देशपांडे विनायक गुरुवार, 09/25/2014 - 11:35
आता विषय निघालाच आहे तर -- तुम्ही जर न्यायालयात जाण्याचा विचार करत असाल तर जाण्यापूर्वी माझ्याशी एकदा बोला वेळ काढून या कारण तुमचा भविष्य काळातील वेळ सत्कारणी लागण्याची शक्यता तुम्हाला दिसू लागण्याची शक्यता आहे न्यायालयात जावेच लागणार असेल तर तेथे जाताना तुमच्या छातीची धडधड थोडी कमी होईल . असा प्रतिसाद मुद्देसूद नाही हे मला कळतेय पण न्यायालयातील ४० वर्षाचा [ चाळीस वर्षाचा ] अनुभव लिहिणे या वयात मला नकोसे वाटते . पण बोलण्यास आवडते . खाण्यापिण्यास आवडते . तेव्हा जरूर या. खातपीत बोलू !! सांगावयाचे राहिले मी वकील नाही . मी कुणाची वकिलीही करत नाही . मी लावलेले दावे आणि माझ्यावर लावले गेलेले दावे या करिता गेली ४० वर्षे मी न्यायालयात जात आहे आता १५ ला जाऊन आलो पुढची तारीख ०८ ऑक्टोबर

In reply to by सुहास..

आदूबाळ गुरुवार, 09/25/2014 - 17:40
४९८ ची केस होती.
असं लिहिलं आहे की त्यांनी. ४९८अ म्हणायचं असावं - कौटुंबिक हिंसाचार. ४९८ "विवाहित स्त्रीला फूस लावून पळवून नेणे" असा काहीसा आहे.

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/25/2014 - 15:49
१. सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन सकाळी लवकर येऊ शकत होता. पण आला नाही. त्रास दिलाच पाहिजे का? सहसा पोलिसांना सणासुदीच्या काळात (आणि सध्या तर कुठल्या न कुठल्या तणावामुळे नेहमीच ) इतर बंदोबस्ताची कामे खूप असतात. त्यांना तिथेही सवलत मिळत नाही. त्यामुळे तिथले कर्तव्य बजावणे महत्वाचे असते. २. न्यायालयात नविन न्यायाधिशांना प्रशिक्षण देतांना जामीनाचे पर्याय शिकविले तर असतील. मग असे का? जामिनाचे विविध असले तरी न्यायाधीशांना समोर असलेल्या परिस्थितीनुसार जामीन ठरवावा लागतो. एखाद्या माणसाने अगोदर कुणाला जामीन दिलेला असल्यास त्याला परत कुणालाही जामीन राहता येत नाही. ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट) हा सोपा उपाय आहे कारण त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय ते मिळत नाही. ३. एक वाक्य ऐकले न्यायाधिश त्या न्यायालयातील देव असतो व त्याच्यापुढे काहीच बोलता येत नाही हे मान्य करावेच लागले. हे खरे आहे कारण त्या कोर्टात जोपर्यंत तो न्यायाधीश असतो तोपर्यंत तो त्याला दिलेल्या कायदेशीर सवलतीनुसार त्या कोर्टाचे कामकाज चालवत असतो. मी कित्येक न्यायाधीश असे पाहिलेले आहेत कि जे सकाळी ११ वाजता न्यायासनावर बसून दिवसभराचा बोर्ड तारखा देऊन संपवतात आणि उठून जातात कारण कुठल्यातरी महत्वाच्या केसचे निकाल अथवा अभ्यास करायचा असतो. कोर्टातल्या इतर कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांच्या कार्यपद्धीतीशी जुळवून घेत घेत नाकी नऊ येतात. ४. शासकीय अधिकार्‍याच्या त्याने घेतलेल्या निर्णयामागील अथवा क्रुती मागील कारणमिमांसा मागितल्यास स्पष्ट करणे किंवा सांगणे बंधनकारक असणे आवश्यक वाटते का? शासकीय अधिकारी तसेच न्यायाधीश ह्यांना रोज त्यांच्या कार्यपद्धतीचा खुलासा अथवा अर्थ सांगणे बंधनकारक नसते तथापि दरवर्षी त्यांचे गोपनीय अहवाल त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या अधिकार्यांकडे जातात. ते खराब होऊ नयेत म्हणून ही सर्व मंडळी जीवाचा प्रचंड आटापिटा करत असतात. हलीच आलेल्या माहितीचा अधिकार कायद्यान्वये बरीचशी माहिती सामान्य माणसालाही मिळू शकते मात्र त्यासाठी खर्च करावा लागतो. अवांतर : जामीन देताना अत्यंत सावध राहा कारण त्या माणसाला गरज पडल्यावर कोर्टात सादर करण्याची हमी तुम्ही कोर्टाला देत असता. त्यामुळे विश्वासू माणसाव्यतिरिक्त शक्यतो कोणालाही जामीन राहू नये.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सवंगडी Fri, 09/26/2014 - 18:11
लई माहिती हाय ओ तुम्हाला ! नक्की तुम्ही कोणत्या माम्लेदाराचा पंखा हो ? मामलेदार मिसळ कि खरा मामलेदार?

जानु गुरुवार, 09/25/2014 - 21:34
श्री. मा. प. - त्या दिवशी कोणताही सण नव्हता. आणि साहेबांना त्या दिवशी एक साक्षही द्यायची होती. एकदा पुकारा ही झाला होता. एकाच गुन्ह्यात २-३ किंवा अधिक आरोपी असतील तर ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट)चालते असे मत क्लार्क ते दुसरे जज्ज सगळ्यांचे होते.

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/25/2014 - 22:16
खास दोस्त असतात.... त्यांच्यात चालतं असं.... वैयक्तीक जातमुचलका हा शक्यतो त्यांच्यासाठी असतो ज्यांना जामीनदार मिळत नाहीत.

जानु गुरुवार, 09/25/2014 - 23:12
श्री. मा.प. आपण अवांतर केलेली सुचना नक्कीच लक्षात ठेवणार.

शि बि आय Sat, 05/23/2015 - 23:16
आहो ... मामलेदारचा पंखा लय माहित हाये कि राव तुम्हाला… नक्की तुम्ही कोन म्हनायचं नुसतं मामलेदारचा पंखा की आजून कुनी ?? झ्याक सल्ले देता राव… बेश्ट हाय
आज एका जामीनासाठी कोर्टात जायचा योग आला. ४९८ ची केस होती. आई, वडील, दोन भाउ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन अशी चार मुले, (वय वर्ष १० ते १) चार जामीनदार, दोन वकील असा गोतावळा घेउन आरोपींसह आम्ही कोर्टाच्या आवारात सकाळी बरोबर ११ वाजेच्या ठोक्याला पोहोचलो. त्या कुटुंबापैकी एक कोर्टातच नोकरीला असल्याने तशी काळजी फारशी नव्ह्ती. तालुक्याचे कोर्ट असल्याने सगळा खेड्यातील लोकांचा गलबला सुरु झालेला. बिलीफने पुकारा सुरु केला. आमचे चार्जशीट अजुन आले नसल्याने तपास अधिकार्‍याला फोन केला. त्याने पोलिस स्टेशनवरुनच सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन येत आहे असे सांगितले. आम्ही वाट पाहु लागलो.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

संपादक मंडळ ·

मस्तानी गुरुवार, 09/25/2014 - 05:46
Fall Colours in Michigan Camera DSC-H10 Lens - Focal Length 11.4mm Exposure 1/160 F Number f/9 ISO 125 Camera make SONY Flash Not used मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !

In reply to by किसन शिंदे

मस्तानी Fri, 09/26/2014 - 20:56
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by किसन शिंदे

मस्तानी Fri, 09/26/2014 - 20:57
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by पैसा

मस्तानी Fri, 09/26/2014 - 21:06
काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :( वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 09:04
एक सांगावेसे वाटते. छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते. महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 11:38
हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....

भिंगरी गुरुवार, 09/25/2014 - 10:11
नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. एकदम सहमत

स्पा गुरुवार, 09/25/2014 - 11:31
fgf Camera निकोन डि३१०० Lens - ५५-२०० Focal Length १००मिमि Exposure १/३२० F Number f/७ ISO १००

In reply to by खटपट्या

स्पा Sat, 09/27/2014 - 10:40
@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>> निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)

अनिता ठाकूर गुरुवार, 09/25/2014 - 12:34
सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.

गणपा गुरुवार, 09/25/2014 - 18:30
वाह काय एकसे एक फोटो आहेत. एकादिवसाच्या मुदतीत हे असं तर १२-१५ दिवसांची पुर्वसुचना दिली तर काय होईल राव.

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 22:33
या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/25/2014 - 23:25
इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)). सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 23:59
यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात. आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?

पहाटवारा Fri, 09/26/2014 - 05:47
खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील.. पहाटावारा

In reply to by स्पा

किसन शिंदे Fri, 09/26/2014 - 21:27
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.

In reply to by स्पा

धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोVinchu Kata सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,

पैसा Fri, 09/26/2014 - 12:16
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

In reply to by सुखी

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 22:17
जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/6063303629734422785/6063303632531815426?banner=pwa&pid=6063303632531815426&oid=107373005822261978111 मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.

किल्लेदार Sat, 09/27/2014 - 13:07
कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Yellos_edited

लंबूटांग Sat, 09/27/2014 - 19:17
Fall 2013 Vermont गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

चतुरंग Sun, 09/28/2014 - 21:08
आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. 0 दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(

मस्तानी गुरुवार, 09/25/2014 - 05:46
Fall Colours in Michigan Camera DSC-H10 Lens - Focal Length 11.4mm Exposure 1/160 F Number f/9 ISO 125 Camera make SONY Flash Not used मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !

In reply to by किसन शिंदे

मस्तानी Fri, 09/26/2014 - 20:56
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by किसन शिंदे

मस्तानी Fri, 09/26/2014 - 20:57
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by पैसा

मस्तानी Fri, 09/26/2014 - 21:06
काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :( वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 09:04
एक सांगावेसे वाटते. छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते. महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 11:38
हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....

भिंगरी गुरुवार, 09/25/2014 - 10:11
नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. एकदम सहमत

स्पा गुरुवार, 09/25/2014 - 11:31
fgf Camera निकोन डि३१०० Lens - ५५-२०० Focal Length १००मिमि Exposure १/३२० F Number f/७ ISO १००

In reply to by खटपट्या

स्पा Sat, 09/27/2014 - 10:40
@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>> निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)

अनिता ठाकूर गुरुवार, 09/25/2014 - 12:34
सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.

गणपा गुरुवार, 09/25/2014 - 18:30
वाह काय एकसे एक फोटो आहेत. एकादिवसाच्या मुदतीत हे असं तर १२-१५ दिवसांची पुर्वसुचना दिली तर काय होईल राव.

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 22:33
या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/25/2014 - 23:25
इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)). सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 23:59
यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात. आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?

पहाटवारा Fri, 09/26/2014 - 05:47
खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील.. पहाटावारा

In reply to by स्पा

किसन शिंदे Fri, 09/26/2014 - 21:27
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.

In reply to by स्पा

धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोVinchu Kata सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,

पैसा Fri, 09/26/2014 - 12:16
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

In reply to by सुखी

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 22:17
जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/6063303629734422785/6063303632531815426?banner=pwa&pid=6063303632531815426&oid=107373005822261978111 मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.

किल्लेदार Sat, 09/27/2014 - 13:07
कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Yellos_edited

लंबूटांग Sat, 09/27/2014 - 19:17
Fall 2013 Vermont गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

चतुरंग Sun, 09/28/2014 - 21:08
आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. 0 दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल

संपादक मंडळ ·

शिद Wed, 09/24/2014 - 21:04
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार! पहिल्या व तिसर्‍या फोटोबद्दल मी मत दिलं होतं व ते विजेत्या छायाचित्रांमध्ये निवडून आल्याबद्दल आनंद जाहला. :)

एस Wed, 09/24/2014 - 22:10
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे, प्रतिसादकांचे आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

य्य्य्य्याआआआआ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif माज्जा निकाल मॅच झाला!!!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif गोंदुश गोंदुश ..आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif ================================= ए..धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 09:10
सर्व स्पर्धकांचे कौतुक आहे. पहिल्या तिघांचे विशेष अभिनंदन. >>>>प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत. प्रशस्ती ही चार लोकात झाली तर जास्त आनंददायी असते. अशी व्यक्तीगत निरोपाद्वारे, अगदी कानांत सांगितल्यासारखी, करण्याऐवजी, त्या त्या चित्राखाली, जाहीर केली तर विजेत्यांना योग्य न्याय मिळेल.

असंका गुरुवार, 09/25/2014 - 20:03
शेवटची तारीख डोक्यावर असल्याने, थोडे उशिरा आणि थोडे थोडक्यात आभार मानत आहे!! सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद...!! (अत्रुप्त आत्मा यांचे खासकरून आभार, इतकं मनमोकळं कौतुक करणारं कुणी असतं हे मला पूर्णपणे नवीन आहे!!)

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आंबा खाणार्‍या चिमणीचा फोटु तर तर फारच आवडला होता. तिचे विषेश अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद पैजरबुवा,

शिद Wed, 09/24/2014 - 21:04
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार! पहिल्या व तिसर्‍या फोटोबद्दल मी मत दिलं होतं व ते विजेत्या छायाचित्रांमध्ये निवडून आल्याबद्दल आनंद जाहला. :)

एस Wed, 09/24/2014 - 22:10
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे, प्रतिसादकांचे आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

य्य्य्य्याआआआआ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif माज्जा निकाल मॅच झाला!!!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif गोंदुश गोंदुश ..आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif ================================= ए..धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 09:10
सर्व स्पर्धकांचे कौतुक आहे. पहिल्या तिघांचे विशेष अभिनंदन. >>>>प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत. प्रशस्ती ही चार लोकात झाली तर जास्त आनंददायी असते. अशी व्यक्तीगत निरोपाद्वारे, अगदी कानांत सांगितल्यासारखी, करण्याऐवजी, त्या त्या चित्राखाली, जाहीर केली तर विजेत्यांना योग्य न्याय मिळेल.

असंका गुरुवार, 09/25/2014 - 20:03
शेवटची तारीख डोक्यावर असल्याने, थोडे उशिरा आणि थोडे थोडक्यात आभार मानत आहे!! सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद...!! (अत्रुप्त आत्मा यांचे खासकरून आभार, इतकं मनमोकळं कौतुक करणारं कुणी असतं हे मला पूर्णपणे नवीन आहे!!)

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आंबा खाणार्‍या चिमणीचा फोटु तर तर फारच आवडला होता. तिचे विषेश अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद पैजरबुवा,
लेखनप्रकार
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्‍या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे: विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.

रायडींग ऑन अ सनबीम

श्रीरंग_जोशी ·

अर्धवटराव Wed, 09/24/2014 - 20:55
तिकडे मॉम मंगळाला भेटायला गेल्याच्या प्रवासाची बातमी, आणि इकडे तरुणाईच्या काहिसा अपरिचीत आणि नाविन्यपूर्ण प्रवासाची डॉक्युमेंट्री. मस्त उल्हासीत करणारं वातावरण आहे आज.

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 19:52
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मला देखील हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. मौक्तिकची नुकतीच प्रकाशित झालेली मुलाखत - http://yourstory.com/2014/09/riding-on-a-sunbeam/.

In reply to by मुक्त विहारि

श्रीरंग_जोशी Sun, 12/21/2014 - 06:16
हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. तारीख जाहीर केलेली नाही. या दुव्यावर माहिती मिळत राहील... https://www.facebook.com/RidingOnASunbeam

एस Sun, 12/21/2014 - 10:37
चित्रपट नक्कीच पाहू. मौक्तिकच्या संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

अर्धवटराव Wed, 09/24/2014 - 20:55
तिकडे मॉम मंगळाला भेटायला गेल्याच्या प्रवासाची बातमी, आणि इकडे तरुणाईच्या काहिसा अपरिचीत आणि नाविन्यपूर्ण प्रवासाची डॉक्युमेंट्री. मस्त उल्हासीत करणारं वातावरण आहे आज.

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 19:52
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मला देखील हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. मौक्तिकची नुकतीच प्रकाशित झालेली मुलाखत - http://yourstory.com/2014/09/riding-on-a-sunbeam/.

In reply to by मुक्त विहारि

श्रीरंग_जोशी Sun, 12/21/2014 - 06:16
हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. तारीख जाहीर केलेली नाही. या दुव्यावर माहिती मिळत राहील... https://www.facebook.com/RidingOnASunbeam

एस Sun, 12/21/2014 - 10:37
चित्रपट नक्कीच पाहू. मौक्तिकच्या संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे. Riding on a sunbeam मौक्तिक कुलकर्णी - एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या.

संवेदनशीलता

सह्यमित्र ·

रेवती Wed, 09/24/2014 - 19:41
होय, लेख नव्हता आला! तरी काळजी वाटली नसेल, वाईट वाटलं नसेल असे कोणीही मिपावर नसेल. परवाच आठवण झाली होती. एकवेळ गावाचं पुनर्वसन (राजकारण्यांने होऊ दिलं तर) होईल पण पुनर्बांधणी झालेल्या घरात झोप येईल का? असे वाटले. पूर्वी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना पेप्रात आल्यावर समजत असत. आता जगभराच्या वाईट बातम्या समजतात. दु:ख करायला मनाची जागा पुरत नाही. गप्प बसावसं वाटतं.

In reply to by पैसा

सुहास.. Wed, 09/24/2014 - 22:52
सुहासने काही लिहिले होते >> चार दिवस जात होतो ..ते अनुभव लिहिला होता..मोजक्याच शब्दात ..पण लेखन उडाले ... आज अचानक आठवण यायच कारण ??

In reply to by सुहास..

सुहास.. Wed, 09/24/2014 - 22:55
तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . >>> परत प्रतिसादतोय म्हणुन सॉरी ...मी ही मिपाकर आहे ...आणि माझ्या सोबत अजुन एक मिपाकर होते ...मी तर कामाला नव्हतो ...ते बिचारे वयस्कर असुन, काम धंदा सोडुन , रजा घेवुन भर पावसात रोज अर्धी का असेना बाईक मारत, येत होते .. न राहवुन उल्लेख करतो आहे भाऊ ..नाव घेत नाही ..क्षमा असावी .

नुसती तोंडपाटीलकी नको म्हणून मिपाकरांतर्फे फक्त मूक श्रद्धांजली ! मयत व्यक्तींची सरकारी नुकसानभरपाई रक्कम ऐकून भूछत्रासारखे उगवलेले नातेवाईक पाहून उबग वाटला....

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 11:38
मिपावर सर्व प्रकारची माहिती आणि चर्चा होतात्,आणि वरती सांगितल्या प्रमाणे याही घटने बद्धल लिखाण झाले होते. आता प्रश्न संवेदनेचा, तर मला तर अनेकदा लोकांच्या संवेदना गोठल्या आहेत का ? असा प्रश्न पडतो. लहानपणी वर्तमानपत्रात एस्टीचा अपघात २ ठार अशी बातमी वाचली तरी फार मोठी घटना घडली असे वाटायचे, पण आता माणसं होलसेल मधे मरत आहेत त्याचे लोकांना काहीच वाटत नाही का ? उत्तराखंड्,माळिण घटना आणि अनेक. तिकडे अमेरिकेने इराक अफगणिस्तान बेचिराख करुन टाकला आहे आणि आता सिरीयावर हल्ले करत आहेत ! यात सामन्य माणसे मरत नाहीत ? अपंग होत नाहीत ? कधी कधी वाटत की {निदान हिंदूस्थानात तरी } की अती लोक संख्या झाल्यामुळे माणासाची किंमत उरलेली नाही ! असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 12:01
मला वाटते मिपाकर समंजस आहेत आणि मॅच्युर पण आहेत. अश्या गंभीर दुर्घटनेवर धागे काढुन आणि चर्चा करुन काही होत नाही हे कळत असल्यामुळे धागे काढले जात नाहीत. धागे न काढणे हेच कदाचित संवेदनशीलतेचे उदाहरण असेल. धागे काढायचे विषय वेगळे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय Sun, 09/28/2014 - 15:49
मोठे व्हा, असो. अर्थातच फिरतीवर असल्याने ही घटनाच फार उशिरा समजली (आणि मिपाप्रवेशही न्हवता) पण घटना सुन्न करून गेली... नंतर काही दिवसानीच भीमाशंकरला गेलो होतो आमचा "यो" अवतार बघून बहुदा आम्ही भाविक क्याटेगरितले वाटले नसावे म्हणुन जेंव्हा आम्हाला पर्यटक समजुन माळिण बघायला हया भागात आला होता काय ही तेथे विचारणा झाली तेंव्हा ते ऐकायचिही शरम वाटली... :(

In reply to by कंजूस

पैसा Wed, 10/01/2014 - 14:52
वरचे प्रतिसाद वाचा हो! नेमके त्याच्या दुसर्‍याच दिवशी मिपा बंद पडले होते आणि सुरू व्हायला बर्‍यापैकी वेळ लागला होता. कोणाला लिहायचं असतं तरी कुठे लिहिणार?

In reply to by कंजूस

एस Wed, 10/01/2014 - 15:51
खरडफळ्यावर तेव्हा बरंच काही लिखाण झालं होतं, धागे काढायला मिपा बंद पडलं म्हणून जमलं नव्हतं. अगदी माळीण नेमकं कुठे आहे त्याच्या गूगल मॅपच्या लिंकपासून ते दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यापर्यंत बर्‍याचजणांनी बरेच काही लिहिले होते. असो.

रेवती Wed, 09/24/2014 - 19:41
होय, लेख नव्हता आला! तरी काळजी वाटली नसेल, वाईट वाटलं नसेल असे कोणीही मिपावर नसेल. परवाच आठवण झाली होती. एकवेळ गावाचं पुनर्वसन (राजकारण्यांने होऊ दिलं तर) होईल पण पुनर्बांधणी झालेल्या घरात झोप येईल का? असे वाटले. पूर्वी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना पेप्रात आल्यावर समजत असत. आता जगभराच्या वाईट बातम्या समजतात. दु:ख करायला मनाची जागा पुरत नाही. गप्प बसावसं वाटतं.

In reply to by पैसा

सुहास.. Wed, 09/24/2014 - 22:52
सुहासने काही लिहिले होते >> चार दिवस जात होतो ..ते अनुभव लिहिला होता..मोजक्याच शब्दात ..पण लेखन उडाले ... आज अचानक आठवण यायच कारण ??

In reply to by सुहास..

सुहास.. Wed, 09/24/2014 - 22:55
तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . >>> परत प्रतिसादतोय म्हणुन सॉरी ...मी ही मिपाकर आहे ...आणि माझ्या सोबत अजुन एक मिपाकर होते ...मी तर कामाला नव्हतो ...ते बिचारे वयस्कर असुन, काम धंदा सोडुन , रजा घेवुन भर पावसात रोज अर्धी का असेना बाईक मारत, येत होते .. न राहवुन उल्लेख करतो आहे भाऊ ..नाव घेत नाही ..क्षमा असावी .

नुसती तोंडपाटीलकी नको म्हणून मिपाकरांतर्फे फक्त मूक श्रद्धांजली ! मयत व्यक्तींची सरकारी नुकसानभरपाई रक्कम ऐकून भूछत्रासारखे उगवलेले नातेवाईक पाहून उबग वाटला....

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 11:38
मिपावर सर्व प्रकारची माहिती आणि चर्चा होतात्,आणि वरती सांगितल्या प्रमाणे याही घटने बद्धल लिखाण झाले होते. आता प्रश्न संवेदनेचा, तर मला तर अनेकदा लोकांच्या संवेदना गोठल्या आहेत का ? असा प्रश्न पडतो. लहानपणी वर्तमानपत्रात एस्टीचा अपघात २ ठार अशी बातमी वाचली तरी फार मोठी घटना घडली असे वाटायचे, पण आता माणसं होलसेल मधे मरत आहेत त्याचे लोकांना काहीच वाटत नाही का ? उत्तराखंड्,माळिण घटना आणि अनेक. तिकडे अमेरिकेने इराक अफगणिस्तान बेचिराख करुन टाकला आहे आणि आता सिरीयावर हल्ले करत आहेत ! यात सामन्य माणसे मरत नाहीत ? अपंग होत नाहीत ? कधी कधी वाटत की {निदान हिंदूस्थानात तरी } की अती लोक संख्या झाल्यामुळे माणासाची किंमत उरलेली नाही ! असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 12:01
मला वाटते मिपाकर समंजस आहेत आणि मॅच्युर पण आहेत. अश्या गंभीर दुर्घटनेवर धागे काढुन आणि चर्चा करुन काही होत नाही हे कळत असल्यामुळे धागे काढले जात नाहीत. धागे न काढणे हेच कदाचित संवेदनशीलतेचे उदाहरण असेल. धागे काढायचे विषय वेगळे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय Sun, 09/28/2014 - 15:49
मोठे व्हा, असो. अर्थातच फिरतीवर असल्याने ही घटनाच फार उशिरा समजली (आणि मिपाप्रवेशही न्हवता) पण घटना सुन्न करून गेली... नंतर काही दिवसानीच भीमाशंकरला गेलो होतो आमचा "यो" अवतार बघून बहुदा आम्ही भाविक क्याटेगरितले वाटले नसावे म्हणुन जेंव्हा आम्हाला पर्यटक समजुन माळिण बघायला हया भागात आला होता काय ही तेथे विचारणा झाली तेंव्हा ते ऐकायचिही शरम वाटली... :(

In reply to by कंजूस

पैसा Wed, 10/01/2014 - 14:52
वरचे प्रतिसाद वाचा हो! नेमके त्याच्या दुसर्‍याच दिवशी मिपा बंद पडले होते आणि सुरू व्हायला बर्‍यापैकी वेळ लागला होता. कोणाला लिहायचं असतं तरी कुठे लिहिणार?

In reply to by कंजूस

एस Wed, 10/01/2014 - 15:51
खरडफळ्यावर तेव्हा बरंच काही लिखाण झालं होतं, धागे काढायला मिपा बंद पडलं म्हणून जमलं नव्हतं. अगदी माळीण नेमकं कुठे आहे त्याच्या गूगल मॅपच्या लिंकपासून ते दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यापर्यंत बर्‍याचजणांनी बरेच काही लिहिले होते. असो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ऑगस्ट मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटने बद्दल मिपा वर कुठला धागा वाचनात आला नाहि. एरवी मिपा वर बहुतेक सर्व चालू (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ ) धागे येत असतात. ह्या विषयावर धागा येईल असे वाटले होते. आला असेल तर माझ्या वाचनात तरी नाही आला . अर्थात नुसता धागा काढून चर्चेतून सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा दुर्घटना ग्रस्त लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणेच जास्त योग्य आहे आणि तसे करणारे बरेच मिपाकर असतीलच. पण तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . इथे मी देखील हा विषय योग्य वेळी न मांडता उशिरा मांडत आहे ह्याची मला जाणीव आहे.

होमिओपाथी म्हणजे फसवाफसवी ? हो

शरद ·

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 18:26
ब्राह्मण पुणेकर आस्तिक आणि आता होमिओपॅथी. कंटाळा आला राव. मी यापुढे वाटल्यास साबुदाण्याची खिचडी पण खाणार नाही. पण त्या साबुदाणा गोळ्या वाल्यांना सोडा आता. वात आलाय आता.

In reply to by हाडक्या

काउबॉय Fri, 09/26/2014 - 12:58
लोक तत्वासाठी भांडतात* हां समज व्हावा ? काही असमंजस तसे करत असतिलही पण सुद्न्य लोक त्से करत नसतात हानुभव आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:28
मा. शरद यांस, स.न.वि.वि. हा अभ्यासू लेख लिहून होमिओपॅथी नावाच्या फसवणुकीबद्दल आमचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद! आपण फार महान समाजकार्य करीत आहात हे या निमित्ताने सांगावेसे वाटते. काही सूचना - (१) हा लेख मिपावर प्रसिद्ध करण्याऐवजी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा व निव्वळ मराठीत नव्हे तर हिंदी, इंग्लिश, जर्मन, सर्व भारतीय भाषा इ. भाषातून हे पुस्तक प्रसिद्ध केल्यास जागतिक स्तरावर ही फसवणूक टाळता येईल. (२) होमिओपॅथी डॉक्टर करीत असलेल्या फसवणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. (३) माझ्या काही नातलगांचे कावीळ, डेंगी, अल्सरेटिव्ह कोलायटिस इ. गंभीर आजार होमिओपॅथीमुळे पूर्ण बरे झाल्याचे दिसले. चाई, त्वचारोग, खोकला इ. किरकोळ आजारही बरे झाल्याचे दिसते. परंतु हे आजार औषधामुळे बरे झाले नसून निव्वळ प्लासिबो परीणामांनी बरे झाले असणार आणि मुख्य म्हणजे आपण औषधाने बरे झाले नसून प्लासिबो परीणामांनी बरे झालो आहोत याबद्दल हे रूग्ण अंधारात आहेत. होमिओपॅथी डॉक्टर या रूग्णांची अशी फसवणूक करीत होते हे वाचल्यावर संताप आला. (४) होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. म्हणजे तिथेही फसवणुकच. हा प्लासिबो इफेक्ट अन्य पॅथीतही वापरात आणावा यासाठी आपण चळवळ सुरू करावी. म्हणजे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी कॅप्सूल/गोळ्यांमध्ये प्रत्यक्ष औषधाची मात्रा घालण्याऐवजी ग्लुकोज किंवा असेच काहीतरी निरूपद्रवी पदार्थ घालायचे. औषध घेणारा माणूस आपण औषध घेतले या कल्पनेनीच बरा होईल व बराचसा खर्च व इतर दुष्परीणाम टाळता येतील. किंवा एखादी शस्त्रक्रिया करून आतला काही भाग काढायचा असल्यास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टेबलावर घेऊन भूल देऊन काहीच न करता, पोटावर किंवा शस्त्रक्रियेच्या जागी वरूनच प्लॅस्टर करायचे. आपल्यावर खरंच शस्त्रक्रिया झाली असे जाग आल्यावर त्या रूग्णाला वाटेल आणि त्या प्लासिबो परीणामानेच शस्त्रक्रिया न करताच तो बरा होईल. (५) प्लासिबो परीणाम इतर क्षेत्रातही वापरता येईल. म्हणजे भूक लागली असली तर आपण आमरसपुरीचे भरपूर जेवण जेवलो आहोत किंवा झणझणीत कोल्हापुरी मटणावर आडवा हात मारला आहे अशी नुसती कल्पना करायची. आपोआप पोट भरेल व प्रत्यक्ष अन्नधान्याचा खर्च कमी होईल. एकंदरीत आपण फार महान कार्याला हात घातला आहे. महान कार्याचा पाठीराखा परमेश्वर असतो. त्यामुळे आपल्याला यश मिळणार हे नक्की. या लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! कळावे, आपला नम्र, श्रीगुरूजी

In reply to by श्रीगुरुजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/25/2014 - 14:25
गुरूजींनी विकेट घेतली.असो. होमिओपाथीवर माझा १००% विश्वास नाही पण ते सगळे थोतांड आहे,बकवास आहे हे अमेरिकन व जगभरच्या औषधी कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे असे माझे मत. मोठ्या विमा कंपन्या व औषधी कंपन्या लोकांच्या बोकांडी बसल्या आहेत गेले ५० वर्षे.

In reply to by श्रीगुरुजी

शरद Fri, 09/26/2014 - 07:11
मी सहसा प्रतिसादांचा प्रतिवाद करत नाही. पण अधुनमधून फुस (फुकट सल्ले) मात्र देतो. (वयाचा परिणाम, दुसरे काय !) असा सल्ला कोणी ऐकला नाही तरी बिघडत नाही. श्रीश्री गुरुजी हेही माझे समानधर्मा आहेत हे त्यांनी दिलेल्या फुसवरून कळले व आनंद झाला. म्हटले चला, पन्नासएक वर्षांपूर्वी कॉलेजातील मुलामुलींना गणित शिकवत होतो आता त्याची उजळणी श्रीश्री गुरुजी यांच्याकरिता करावी.त्यांनी एक मिलिग्राम औषधाबद्दल लिहले आहे. डॉ. खरे यांनी त्याला उत्तरही दिले आहे. मी फक्त गणित करणार आहे. आपण 3C पॉवरचे एक मिलिग्राम वजनाचे होमिओपाथीचे औषध घ्यावयाचे आहे असे समजू. कुठले औषध हे महत्वाचे नाही. तर प्रथम एक ग्राम औषध दहा लाख ग्राम पाण्यात विरघळावे लागेल ( 3C म्हणजे १०००००० मध्ये एक) पण आपल्याला तर १ मिलिग्रामच पाहिजे आहे. तेव्हा यातला १/१००० भाग म्हणजे १०००००० भागिले १००० बरोबर १००० ग्राम औषधाचे पाणी घ्यावयाचे आहे.पण पाणी नाही तर गोळ्या घ्यावा लागतात. तर एक ग्राम पाण्यात १० गोळ्या भिजवल्या (बर्‍याच जास्त भिजतील पण हिशेबा करिता १० धरा) म्हणजे तुम्हाला १ मिलिग्राम औषधाकरिता फक्त १०,००० गोळ्या खावयाच्या आहेत. श्रीश्री गुरुजी, अंमळ जास्तच झाल्या नाही ? शरद

In reply to by शरद

श्रीगुरुजी Tue, 09/30/2014 - 20:42
डॉ. सुबोध खरे यांनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे गोळ्यांमध्ये औषधाचे प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे नसून औषध किती प्रभावी आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे १ मिलिग्रॅम होमिओपॅथी औषधाकरीता १०००० गोळ्या लागतील का अजून जास्त लागतील हा मुद्दाच इथे गैरलागू आहे. महाविद्यालयात गणित शिकवित होता तरी ते इथे निरूपयोगी व गैरलागू आहे.

आसुड गुरुवार, 09/25/2014 - 15:20
शरदराव, तुम्हास्नी कंधी कोण्च्या होम्योपदि वाल्या डागतरानी फशीवलाय कि काय :ऑ....तवाच हिकड त्यांची बिन पाण्यान कराय बगताय.... बाकि श्रीगुरुजी यांस स.न.वि.वि. अहो पण गुरुजी, जसे आपण लिहिले आहे ते वाचुन डोळ्यांत पाणी आले हो...प्लासिबोने गोची होईल ना ....हॉटेलात गेलो कि हॉटेल वाले फक्त फोटो दाखवतील आणि ...ती जुणी म्हण आठवेल...खाया पिया कुछ नहि फोटो देखा बारा आना ( आता आना बंद झाला माहित आहे मला )

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 15:37
होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. गुरुजी वरील विधान खरे नाही. कित्येक आधुनिक औषधे इतकी परिणामकारक आहेत कि एकच का ०. १ मि. ग्रॅम औषध सुद्धा पुरेसे आहे. उदा. लीव्हो थाय रोक्सीन ०.१ mg , टामसुलोसीन ०. २ mg , ग्लायमेप्राईड १ mg, अल्फा कॅलसी डॉल ०. २५ मायक्रो ग्रॅम (होय मायक्रोग्रामच). फार कशाला सदाफुलीपासून कर्करोग विरोधी औषध व्हिनक्रिस्टीनचे सुद्धा १ मिली ग्रॅमचे इंजेक्शन मिळते अशी असंख्य औषधे सूक्ष्म प्रमाणात पण काटेकोर पणे तयार केलेल्या पद्धतीने वापरली जातात. आपल्यापैकी कुणाचा असा समज असेल की हि औषधे प्लासिबो परिणाम करतात तर त्यांना माझे खुले आव्हान आहे त्यांनी हि औषधे घेऊन दाखवावीत ज्यांचा त्याच्या परिणामावर विश्वास नाही तर त्यांच्यावर त्या औषधाचा परिणाम होणार नाही. ( व्हिनक्रिस्टीनचे इंजेक्शन घेऊन केस गळले किंवा हगवण लागली तर ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर). प्लासिबो परिणामाचा काही वेळा मनोरुग्णांवर उपयोग करावा लागतो. आपल्याला काही तरी गंभीर आजार झाला आहे असे समजणाऱ्या रुग्णांना किंवा हिस्टेरिया च्या रुग्णांवर शुद्ध पाणी किंवा काम्पोजच्या इंजेक्शन चा प्रभावी परिणाम दिसून येतो. अजून एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक स्त्री मुलाला घेऊन रडत आली होती कि मुलाने मलम खाल्ले. मी हातात घेऊन पहिले तर ते सोफ्रामायसीन चे मलम होते. त्या ट्यूब मध्ये बहूतांश मलम शिल्लक होते. सोफ्रामायसीन आपल्या आतड्यात शोषले जात नाही ( त्यामुळे त्याच्या गोळ्या वापरता येत नाहीत). हे सांगून त्या स्त्रीचे समाधान होत नव्हते. त्या मुलाला मी ब जीवनसत्त्वाचे सिरप पाजले आणि आईला सांगितले कि अर्धा तास थांबा. मुलाला उलटी होते का ते पहा उलटी झाली नाही तर मुलाला धोका नाही. अर्ध्या तासाने ती आई मोठ्या कृतज्ञ भावनेने मला सागू लागली डॉक्टर तुमच्या औषधाचा उत्तम परिणाम झाला आहे आणि मुल छान खेळते आहे. (मुळात मुल पहिल्यापासूनच आनंदात होते). असेच दुसरे उदाहरण -- बरेच मासे खाणारे मोठा काटा गिळतात हा काटा घशाच्या मागच्या भागावर ओरखडा काढतो. त्यामुळे त्या माणसाला घशात काटा अडकला आहे अशी भावना होत राहते. त्यांना एक्स रे काढा किंवा स्क्रीनिंग करा समाधान होत नाही. अशा लोकांना बेरियम मध्ये भिजवलेला कापूस खायला सांगतो आणि असे सांगितले जाते कि जर काटा असेल तर तो कापूस तेथे अडकेल. काटा नसल्याने तो कापूस गिळल्यावर पोटात जाताना स्क्रीन वर दिसतो कि मग त्या माणसांचे समाधान होते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:47
डॉक्टर साहेब - तुम्ही जीव तोडुन नका घेउ, काही ( भारतातल्या बहुसंख्य ) लोकांना डोळ्यासमोर सरळसरळ दिसत असलेल्या फॅक्ट इग्नोर मारायची सवय असते. भारतीयांचा मुळ स्वभाव चमत्काराच्या मागे लागणारा आहे. त्यांना अश्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आवडतो की ज्या खोट्या आहेत आणि सिद्ध होणार नाहीत. ह्याने उत्तरे शोधायचा त्रास वाचतो. होमिओपाथी आणि आयुर्वेदा साठी हा समाज अगदी आयडीयल आहे. नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे. खरे तर तसे ही नाही. ह्या लोकांना बरोबर माहीती आहे की कुठला रोग झाला की कुठल्या डॉक्टर कडे जायचे. सर्दी, अपचन झाले की जातील वैदू कडे पण काही मोठा रोग झाला की येतील तुमच्या कडे.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 15:56
आणि आयुर्वेदा साठी एक मिनिट हॉमिओपॅथी बद्द;अ जे मत असेल ते असो. पण आयुर्वेद हे शास्त्र नाही असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कारण ते चक्क १००% चुकीचे आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:05
क्निनिकल ट्रायल ( शक्यतो अमेरिकेतुन ) पास झालेल्या कुठल्या ही औषधावर माझा विश्वास आहे. आयुर्वेदाने ते करावे, मी नक्की घेइन. मी कोण बोलणार मॉडर्न मेडीसिन वाला डॉक्टरच लिहुन देइल ते पेशंटला. पण क्लिनिकल ट्रायल होत नाहीत तो पर्यंत नाही. आता तुम्ही हजारो वर्षाची परंपरा वगैरे बोलू नका. इतकी खात्री आहे तर का कोणती आयुर्वेदीक औषध कंपनी क्लिनिकल ट्रायल करून घेत. भारता पेक्षा अमेरिका खुप खुप मोठे मार्केट आहे. अजुन एक आणि मी औषध हा शब्द वापरला, र्टॉनिक नाही. दुसरे तुमचा जर आयुर्वेदावर विश्वास असेल तर चिनी, युनानी ने काय घोडे मारले आहे?

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 16:58
मला चिनी युनानी बद्दल काही माहिती नाही. आयुर्वेदाचा आवाका मात्र खुप मोठा आहे. आज्जीबाईचा बटवा असे आपण ज्याला म्हणतो तो सगळा आयुर्वेदात येतो. क्लिनिकल ट्रायल बद्दल म्हणत असाल तर माझा तुमच्या एवढा या विषयातला अभ्यास मोठा नाही. पण बाजारात जी मान्यताप्राप्त आयुर्वेदिक औषधे येतात ती क्लिनिकल ट्रायल नंतरच येत असतील ना? निसर्गातले घटक वापरुन तयार केलेली औषधे ती आयुर्वेदाची असे माझे मत आहे. ही साधारन व्याख्या झाली. वैद्यकीय परिभाषेत यात काही अधिक उणे होइलच. मी हजारो वर्षांच्या इतिहासाबद्दल काय बोलणार? पण अ‍ॅलोपॅथीच्या डागतरांना न जमलेले रोग आयुर्वेदिक डॉक्टरांनी बरे करुन दाखवलेले बघितले आहेत. हे करताना त्यांनी कुठल्या स्टेजला काय प्रगती होइल ते सांगितले. जेव्हा जेव्हा कुपथ्य झाले तेव्हा तेव्हा ते बरोबर ओळखले. अचूक नाडीपरीक्षा केली. औषधे सगळी आयुर्वेदिक दिली. किती दिवसात रुग्ण पुर्ण बरा होइल ते अचूक सांगितले आणि तेवढ्या दिवसात रुग्ण पुर्ण बरा झाला. त्या आधी अ‍ॅलॉपथी डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते. बाप दाखव नाहितर श्राद्ध घाल हे काही लोकांना सिद्ध करावे लागते म्हणुन सांगतो की डॉक्टर पुण्यातले समीर जमदग्नी होते. माझ्या जवळच्या माहितीतील बर्‍याच जणांना इतर काही चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा असाच अनुभव आला. आयुर्वेदतरी किमान नक्की प्लासिबो इफेक्ट वर चालत नाही. शेकडो वेगवेगळ्या पुड्या आणि कडवट काढे हे सगळे प्लासिबो इफेक्ट असते हे मला मान्य नाही. अवांतरः डॉ समीर जमदग्नी आणि माझे कुठलेही नाते नाही. असेलच तर ते मला ज्ञात नाही.

In reply to by मृत्युन्जय

खटपट्या Fri, 09/26/2014 - 02:18
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. आता दिलेले औषध आयुर्वेदिक आहे कि अलोपथिक हे विचारण्याची हिम्मत माझ्यात नाही. कारण लगेच बाबांकडे तक्रार करतील :)

In reply to by खटपट्या

सुहास.. Fri, 09/26/2014 - 18:34
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. >> माझे ही !! पण स्सालं काही ही आजार घेवुन जा ..अगदी दाढ दुखीसुध्दा ..बर करतो ..नाव सरदार आहे आणि आहे पण सरदार :)

In reply to by सुहास..

खटपट्या Sat, 09/27/2014 - 02:27
मी हाच विचार करतोय कि BAMS आणि MBBS या दोन्ही डिग्र्या घेतलेल्या डॉक्टरांचा वैचारिक गोंधळ होत नसावा का ? एखाद्याला अलोपथिक औषध द्यायचे कि आयुर्वेदिक हे ते कसे ठरवत असतील. एखादा रुग्ण त्यांच्याकडे "फक्त आयुर्वेदिक" किंवा "फक्त अलोपथिक" उपचारांची मागणी करू शकतो का ?

In reply to by खटपट्या

प्रभाकर पेठकर Sat, 09/27/2014 - 02:32
अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना, दूसर्‍या पॅथीला वापरायला, एंडॉर्स करायला बंदी असते असे वाचले आहे. डॉ. श्रीराम लागूंनी च्यवनप्राशची जाहिरात केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर्स असोसिएशनकडून कांहीतरी कारवाई झाली होती असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या Sat, 09/27/2014 - 03:49
हा श्रीराम लागुंबद्दल ऐकले आहे. पण त्यांच्यावर चवनप्राश ची जाहिरात केल्याबद्दल कारवाई झाली का हे माहित नाही. मी ऐकलेय कि कोणताच डॉक्टर कोणत्याच औषधाची जाहिरात करू शकत नाही. डॉक्टर मिपाकर प्रकाश टाकतीलच.

In reply to by खटपट्या

सुबोध खरे Sat, 09/27/2014 - 09:22
डॉ. श्रीराम लागूनी च्यवनप्राशची जाहिरात केली त्यावर त्यांच्या काही व्यावसायिक सहकार्यांनी मत्सरामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे तक्रार केली. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने त्या तक्रारीची "दखल" घेत त्यांचे सदस्यत्व काही महिन्यांसाठी निलंबित केले. कारण हे होते कि तुम्ही डॉक्टर असताना एखाद्या औषधाची जाहिरात करणे हे बेकायदेशीर आहे. डॉक्टर लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याविरुद्ध अपील केले आणि त्यात असे म्हटले कि मी त्यात डॉक्टर म्हणून कोणतीही जाहिरात केलेली नाही उलट एक प्रसिद्ध व्यक्ती( CELEBRITY) म्हणून ती जाहिरात केलेली आहे. उच्च न्यायालयाने ते म्हणणे ग्राह्य धरत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची कारवाई रद्द केली. ( मुळात डॉक्टर लागू तेंव्हा बरेच वर्षापासून आपला व्यवसाय करीतच नव्हते)

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस गुरुवार, 09/25/2014 - 16:06
नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे.
गुरुजींच्या (३) प्रमाणे त्यांना कर्माची फळे मिळालीच आहेत (गंभीर आजार बरे होण्याची)

In reply to by मराठी_माणूस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:09
अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी.

In reply to by प्रसाद१९७१

जेपी Fri, 09/26/2014 - 17:13
काविळ आणीडेंगी आपोआप बरा होतो .कसा काय बॉ? काही शास्त्रीय माहिती आहे का ? असल्यास इथल्या एका पेंशटला सांगतो. एक आठवडा झाला हुडकुन हुडकुन o- च ब्लड पुरवत आहोत.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Tue, 09/30/2014 - 20:49
>>> अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी. अहो आश्चर्यम्! पण मग दरवर्षी मुंबई, पुणे इ. शहरात किमान २००-३०० व्यक्ती डेंगी ने मृत्युमुखी पडतात ते कसे काय बोवा? आणि डेंगी झाल्यावर अनेकांना रूग्णालयात दाखल करून शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी? डेंगी आपोआपच बरा होणार असेल तर कशाला डॉक्टरचा, रूग्णालयाचा आणि प्लेटलेट्सचा खर्च करायचा? आणि दरवर्षी महानगरपालिका विनाकारणच डासनिर्मूलन मोहीम राबविते असं दिसतंय कारण डेंगी आपोआपच बरा होतो ना? आणि समजा होमिओपॅथीने डेंगी बरा झालेला नसून तो शरीर लढण्यासाठी टिकून राहिल्यामुळे आपोआप बरा झाला आहे असे गृहीत धरले तर होमिओपॅथी औषधामुळे डेंगीच्या प्रतिकारासाठी शरीर लढण्यासाठी टिकवून धरायला मदत होते असा निष्कर्ष का नाही काढता येणार?

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे Tue, 09/30/2014 - 21:17
शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी?
अहो प्लेटलेट्स काही डेंगूवर उपचार म्हणून नाही भरत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 18:33
गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Wed, 10/01/2014 - 20:54
>>> गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काय हा वेडेपणा. आयुष्यात मॉडर्न मेडिसिनचे औषध घ्यायचे नाही हा पण कशासाठी आणि का करायचा? होमिओपॅथी औषध सुद्धा आजारांवर लागू पडते अशी माझी भूमिका. फक्त होमिओपॅथीच लागू पडते व इतर पॅथी ही फसवणूक/निरूपयोगी आहेत असे मी कधीही म्हटले नाही. >>> काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. माझी अशी ठाम भूमिका आहे की होमिओपॅथी ही फसवणूक नसून अनेक आजारांवर होमिओपॅथीमुळे गुण येतो. >>> मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. >>> तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. मी अ‍ॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी सोडून इतर पॅथींना अजिबात नावे ठेवलेली नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. एखाद्याने "मला दूध आवडत नाही" असे म्हटले तर "म्हणजे तुम्हाला मद्य आवडते" असा अर्थ तुम्ही काढत आहात. होमिओपॅथी ही भोंदूगिरी नसून त्या पॅथीचाही आजार बरे करण्यासाठी उपयोग होतो. हेच मी सांगितले आहे. >>>> असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा. माझे वागणे अजिबात दुटप्पी नाही. तसेच माझे वागणे पूर्वग्रहदूषित सुद्धा नाही. मी माझ्या व माझ्या परिचयातील अनेकांच्या व्यक्तिगत अनुभवावरून होमिओपॅथीविषयी माझे मत ठरविले आहे. होमिओपॅथीच्या बाजूने बोलणे म्हणजे इतर पॅथींचा द्वेष करणे नव्हे हे समजून घ्या.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय Wed, 10/01/2014 - 18:28
तुमचे वक्तव्य थोडेसे "एड्समुळे कोणीही मरत नाही" यासारखे आहे. टेक्निकली बरोबर असु शकते कदाचित. प्रॅक्टिकली अगदीच चुकीचे

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 09/25/2014 - 16:46
@प्रसाद जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे. दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर असे करताना दिसत नाहीत. कदाचित त्यांचे मत "मला काय करायचेय होमिओपथीविषयी बोलून" असे असू शकेल. आणि केवळ व्यवसायाच्या दृष्टीने ते रास्तही असेल. पण रुग्ण चुकीची उपचारपद्धती वापरतात किंवा कसे याकडे लक्ष देणे आणि किमान त्याविषयी माहिती देणे हाही वैद्यकीय व्यवसायाचा भाग मानला पाहिजे असे वाटते. एकदा तत्व माहीत झाले आणि तरीही होमिओपथी घेतली तर मग काहीच म्हणणे असू नये, कारण तो इन्फॉर्म्ड डिसिजन असेल. सध्या माझ्यामते बहुतांश पेशंट्सना हे माहीतच नसतं की होमिओपथीमधे थेट औषधाचा अंश नाही. तेवढं माहीत झालं म्हणजे मग आपापले ठरवणे इष्टच..

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 17:43
जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे.
हे सगळं काही आपल्या तोंडासमोरच बोललं पाहिजे असं काही आहे का? माझ्या मते नसावं. होमिपदीबद्दल कित्ती काय काय रिसर्च पेपर लिहून झालेले आहेत. त्यामुळे 'अ‍ॅलोपथीचे डॉक्टर कै बोलत नैत' हे चूक आहे.

In reply to by सुबोध खरे

पोटे गुरुवार, 09/25/2014 - 16:08
ही प्लासिबोची उदाहरणे वाटत नाहीत. या उदाहरणात रुग्णाला काही झालेलेच नाही. झाले , असे त्याला वाटत आहे. होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:13
होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत
हे सर्व रोग शरीरच बरे करते. नागिणी वर औषध घेण्याची गरज नाही. मधे स्वाईन फ्लु चे वारे होते तेव्हा आम्हाला युके मधे ताप आला तर घरी विश्रांती घ्या आणि ताप वाढला तर पॅरॅसिटेमॉल घ्या इतकाच सल्ला डॉक्टर देत होते. एक पण मृत्यु झाला नाही. भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे गुरुवार, 09/25/2014 - 16:52
सर्व रोग शरीरच बरे करते तर मग आमची अ‍ॅलोपथीही निरर्थ्कच नाही का ? नागिणीवर औषध घेऊ नये हे सांगून मात्र उपकारच केलेत. आमच्या एच आय व्हीच्या ओपीडीत रोज एक पेशंट असतो नागिणीचा. बरं झालं , स्रकारला कळवून टाकतो .. अ‍ॅसायक्लोवीर औषधावर फुकट खर्च करु नका म्हणुन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:58
मालक हे वाचा. शरिरच बरे करते नागिण. हे सपोर्टींग औषध आहे. बरे करण्या साठी नाही. Acyclovir is used to treat infections caused by certain types of viruses. It treats cold sores around the mouth (caused by herpes simplex), shingles (caused by herpes zoster), and chickenpox. This medication is also used to treat outbreaks of genital herpes. In people with frequent outbreaks, acyclovir is used to help reduce the number of future episodes. Acyclovir is an antiviral drug. However, it is not a cure for these infections. The viruses that cause these infections continue to live in the body even between outbreaks. Acyclovir decreases the severity and length of these outbreaks. It helps the sores heal faster, keeps new sores from forming, and decreases pain/itching. This medication may also help reduce how long pain remains after the sores heal. In addition, in people with a weakened immune system, acyclovir can decrease the risk of the virus spreading to other parts of the body and causing serious infections

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Fri, 09/26/2014 - 06:40
परवा मी आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते तेव्हा माझ्यावर तुटून पडला होतात.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:16
आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते
ते क्लिनिकल ट्रायल करुन प्रूव्ह करा, मग मॉडर्न मेडीसिन चे डॉक्टरच लिहुन देतील ना ते पेशंट ला.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे गुरुवार, 09/25/2014 - 16:54
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती. ..... अग्गोबै ! म्हणजे एखादे औस्षध इंग्लंदात असले तरच ते सत्य मानायचे का काय ? ? ?

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:21
हो इंग्लंडात केले चालेल कारण इंग्लंडात कोणाला वाटले म्हणुन कोणी औषध काढुन विकू शकत नाही. क्लिनिकल ट्रायल लागतातच कराव्या.

In reply to by रामपुरी

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:14
कुठल्याही आयुर्वेदिक कींवा होमिओपाथी औषधाची क्लिनिकल ट्रायल झालेली नाही. हे वैदू त्यांना पाहीजे ते देतात. तुम्हाला एक जरी असे औषध माहीती असेल तर सांगा. अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे Fri, 09/26/2014 - 11:16
भ्रम आहे तुमचा. कालच आयु डॉक्टरला विचारलं. तो बोल्ला क्लिनिकल ट्रायल होतात. आयुर्वेदिक साठीही. होमिओ बद्दलही संबंधिताला विचारेन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 11:29
मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवलात? एखादे उदाहरण देत का नाही तुमचा तो वैदु. इथे बघा काही नाव सापडतय का? http://www.cdsco.nic.in/forms/list.aspx?lid=1820&Id=11

In reply to by प्रसाद१९७१

पैसा Fri, 09/26/2014 - 18:07
फारच धाडसी विधान! लोक वैदू बनण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि सरकार त्यांना पदवी देऊन धंदा करायला परवानगीही देतं ही माहिती णवीण आणि फारच भयंकर आहे!

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस Fri, 09/26/2014 - 12:08
क्लिनिकल ट्रायल वगैरे केलेल्या बहुराष्ट्रिय औषध कंपन्यांचे काळे धंदे इथे वाचा http://www.loksatta.com/lokrang-news/drugs-companies-exploit-indian-guinea-pigs-44798/

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही. मॉडर्न मेडिसीनमधली औषधे भारतात विकण्याअगोदर त्यांची भारतिय (किंवा बर्‍याच इतर देशातही स्थानिक) रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल करणे कायद्याने व आरोग्यदृष्टीने जरूर असते... केवळ अमेरिकन ट्रायल यशस्वी झाली म्हणून ती भारतात किंवा इतर अनेक देशांत आपोआप वैध होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे जगातल्या विविध भागांत राहणार्‍या लोकांमधले जैववैविध्य आहे. जैव (जेनेटिक) वैविध्यामुळे एकाच औषधाचे--- जे आधुनिक वैद्यकशास्त्रात रासायनिक अणू (केमिकल मॉलेक्युल) या असे संबोधले जाते--- वेगळी जनुकरचना असणार्‍या माणसांमध्ये वेगळे परिणाम दिसतात... उदा. औषध शरिरात शोषण होण्यातला (शोषलेली मात्रा आणि त्यासाठी लागलेला वेळ) फरक, जैववैविध्यामुळे शरीरावर होणार्‍या परिणामातिल फरक, औषधाचे शरिरात चयापचय होण्यातला फरक, शरिरात औषध शिल्लक राहण्यातला (मात्रा आणि वेळ) फरक, औषध आणि त्याचे विघटन झालेले भाग शरीरातून बाहेर (मूत्र, इत्यादींतून) फेकले जाण्यातला फरक, औषध आणि त्याच्या शरीरात विधटित झालेल्या भागांचे शरीरावरचे दूरगामी परिणाम, इत्यादी.

In reply to by प्रसाद१९७१

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 16:57
मित्र, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही ) आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evidence_for_Homeopathic_Medicine.html ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस ) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे गुरुवार, 09/25/2014 - 16:55
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:59
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...
लस आणि औषध वेगळी

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 20:07
टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे Cure नाही. ते Preventor म्हणुन काम करते. टॅमीफ्लु हे सर्व च टाइप च्या फ्लु साठी preventive medicine म्हणुन वापरु शकतात. फ्लुच्या वाय्ररस शी संपर्क येउन २ दिवस झाले असतील तर टॅमी फ्लु ने फार फरक पडत नाही. माझ्या मुलीला स्वाइन फ्लु झाला होता त्यामुळे मी First Hand माहीतीवर बोलतो आहे. गमतीची गोष्ट म्हणजे टॅमीफ्लु बडीशेपे पासुन बनवतात असे ऐकले आहे.

In reply to by आदिजोशी

सुहास.. Fri, 09/26/2014 - 18:36
रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी? >>> +१०१५४५४६६९७२१३५४६२३१३५४७१२३५४६५४५४३२१६३८५५६४२५४५६७४६४३२४६८७४६५४३५४६८७८

मराठी_माणूस गुरुवार, 09/25/2014 - 17:35
औषधांचे जाउ द्या , ते तसेही आपण फक्त बरे नसतानाच घेतो. पण जे अन्न वर्षानुवर्ष आपण पोटात ढकलतो, जसे पोळी,भाजी, वरण भात ईत्यादी, त्यांची कोणत्या लॅब मधे क्लिनिकल ट्रायल घेतली जाते ? शिवाय ते किति प्रमाणात खायला हवे ह्याचे काही मोजमाप आहे का ? जसे कि पोळी ... ग्राम, भात्....ग्राम ई.

In reply to by बाळ सप्रे

पोटे Fri, 09/26/2014 - 00:39
हेच लिवणार होतो. हे म्हणजे पाकिटमाराने टेलरचा व्यवसाय हा व्यवसायच नाही असे म्हटल्यागत झाले. मंत्रतंत्राच्या क्लिनिकल ट्रायल होतात का ? त्याना अ‍ॅप्रुव कोण करतं

मराठी_माणूस Fri, 09/26/2014 - 13:03
ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे आयुर्वेदा बद्दल खालील मत इथे वाचा http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-to-be-healthy-prevention-and-good-diet-to-be-away-from-diseases-944760/
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी 'सामान्य आरोग्य' या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.

In reply to by मराठी_माणूस

हे तर फार पूर्वीपासून जगमान्यच आहे... अश्या प्रकारच्या विकारां/रोगां-साठी "जीवनशैलीचे विकार (Lifestyle Diseases)" असे नामकरणही केले गेलेले आहे. केवळ जीवनशैली ताळ्यावर आणल्याने ह्यातले बरेच विकार बरे होऊ शकतात किंवा कमीत कमी ताब्यात राहून औषधाची मात्रा कमी करायला मदत होते.

In reply to by मराठी_माणूस

सुहास.. Fri, 09/26/2014 - 18:37
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे >> +१ हे मी मान्य करतो !!

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 17:02
मित्र प्रसाद, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही)आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi... ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)!!! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 17:26
अहो ही होमिओपाथीची जहिरात करणारी आणि कोणी डाना नावाच्या माणसाची जहीरात करणारी साईट आहे, जशी टीव्ही वर शनी कवचाची जहीरात दाखवतात तशी.

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 18:02
मित्र सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन जर्नल प्रमाणीकृत दुवे देत आहे, इतर सिद्धतांचे दुवे नंतर देतो. १. http://journals.bmj.com/search?fulltext=homoeopathy&submit=yes&journalcode=acupmed%7Camiajnl%7Cannrheumdis%7Carchdischild%7Cbjophthalmol%7Cbjsports%7Ccasereports%7Cbmjopen%7Cbmjdrc%7Cbmjresp%7Cbmjspcare%7Cbmjqir%7Cdtb%7Cebmed%7Cebmental%7Cebnurs%7Cedpract%7Cejhpharm%7Cemermed%7Cfamilyplanning%7Cfetalneonatal%7Cflgastro%7Cgutjnl%7Cheartasia%7Cheartjnl%7Cinjuryprev%7Cinpract%7Cjclinpath%7Cjech%7Cjmedgenet%7Cjnnp%7Cjramc%7Clupusscimed%7Cmedethics%7Cmedhum%7Cmolpath%7Cneurintsurg%7Coemed%7Copenhrt%7Cpostgradmedj%7Cpractneurol%7Cqhc%7Csextrans%7Cthoraxjnl%7Ctobaccocontrol%7Cvetrec%7Cvetreccr%7Cvetreco%7Cbmj २. http://www.amcofh.org/research/proving-trials ३. http://www.homeopathy-ecch.org/content/view/50/69/ ४. http://www.theguardian.com/notesandqueries/query/0,,-9542,00.html (द गार्डीअन). दोन प्रश्न : आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तिव कुठल्याही यंत्र वा प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही, मग हे अस्तित्वात नाहीत का? एखादी गोष्ट आपल्या आकालानापडीकले असेल तर ती सत्य असू शकत नाही का? सापडणे(फाईंड) आणी संशोधन(डिस्क्व्हर) ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ह्या दुव्यांनी आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे Fri, 09/26/2014 - 18:25
CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. असे निष्कर्ष बर्याचशा चाचण्यांचे निकाल आपण दिलेल्या दुव्यातून काढताना आढळतात.

In reply to by सुबोध खरे

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. या संसदिय इंग्लिश भाषेतल्या वाक्यांचे संसदिय सोवळेपणा जरा कमी करून केलेले शुद्ध मराठी भाषांतरः आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्या शास्त्रिय चाचण्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मानदंड वापरून केलेल्या नाहीत किंवा कमी प्रतिचे मानदंड वापरून केलेल्या आहेत. शिवाय चाचण्यांच्या निष्कर्षांसंबंधीच्या लिखाणात निर्णय प्रसिद्ध करणार्‍यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे चाचण्यांचे निर्णय जरी सकारात्मक दिसत असले तरी ते शास्त्रिय दृष्ट्या विश्वासू नाहीत. यावरून असे दिसत आहे की, जोपर्यंत होमिओपथिच्या योग्य प्रकारे शास्त्रिय चाचण्या होत नाहीत तोपर्यंत तिला "शास्त्रिय" पद्धत मानणे योग्य होणार नाही. ---------- * "not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias." या शब्दप्रयोगानंतर "there is a legitimate case for further evaluation" हा शब्दप्रयोग... "तुमची चाचणी अशास्त्रिय आहे (अजून इस्काटून... चाचणी फालतू आहे, प्रथम जरा नीट शास्त्रिय चाचण्या करायला शिका !) आणि शिवाय हेतूपूर्वक खोटे निष्कर्ष काढण्याचा तुमचा प्रयत्न पकडला गेला आहे."... हे सांगण्यासाठी केलेली संसदिय वाक्यरचना आहे. ** इंग्लिश इज अ फन्नी लँग्वेज... आणि गोर्‍यांनी ती मुद्दामहून (बाय डिझाईन, नॉट बाय अक्सिडेंट) तशी बनवली आहे ;)

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 18:54
२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी च्या जहिरात करणार्‍या साईट आहेत. गर्डिअन वर इथल्या सारखी चर्चा चालु आहे, बरेसचे उपहासात्मक आहेत.

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे Fri, 09/26/2014 - 19:02
कोऽहम् साहेब आपण दिलेले दुवे वाचून पाहिले. दुर्दैवाने यातील एकही दुवा सज्जड पुरावा म्हणून वापरता येत नाही. कुठे ५० रुग्णांवर( २५ औषधे घेणारे आणी २५ प्लासिबो घेणारे) प्रयोग करून त्यातून अनुमान काढलेले आहे तर कुठे शब्द बंबाळ लिखाण दिसते. शेवटचा दुवा तर लोकांनी पाठविलेल्या पत्रांचा आहे. त्यातील पहिलाच उतारा उद्धृत करीत आहे. हा होमियोपथीच्या (नसलेल्या) परिणामावर आहे. Is there any proof that homeopathic medicine works? J Burgess, Norwich It is possible to answer correctly both yes and no to this question. From a scientific point of view, no it doesn't work, from the believers' point of view, yes it does. This contradiction can easily be explained: Homoepathic medicines are made by diluting to a very high degree, substances which could have an effect in higher concentrations on the workings of the body. The dilution is such that it is practically impossible to find in these medicines one single molecule of the so-called, active ingredient. In other words it's only there on the label. Those who advocate homeopathic medicine argue that the substance doesn't need to be there, it has left its "influence" on the water or other harmless materials in the medicine. This is of course utter nonsense, it is not possible for a chemical or element to leave an imprint, some kind of force on air or water not containing it. If this were so, then the air we breath and the water we drink are themselves homeopathic medicines; no need to bother with the little pills, just breathe! Now, if we are talking of medicines, it is usual, nay a legal requirement, to test them thoroughly before they are marketed. One of the final tests, is the so-called double blind trial. Controlled groups of patients or human guinea pigs are given either the medicine itself or a placebo. In a double blind trial, neither the person administering the medicine nor the patient knows if it is a placebo or truly the medicine. By this means, those running the experiment can best assess whether or not a medicine has an effect. It is claimed by the advocates of homeopathic medicines that double blind trials have been carried out and shown to have worked. These claims must be taken with a great deal of scepticism, the conventional medical establishment is of the opinion that any such trials were conducted incorrectly. However, it has also been shown by conventional medical experimentation that the placebo effect is a very important one in bringing about cures. If people believe that they will get better, they often do so on their own resources. In other words, it can be shown that the visit to the doctor is a more important part of the cure than the pills afterwards. The placebo effect is by no means a rare or insignificant one, quite the contrary in fact. Thus we can be relatively sure that the believers in homeopathy, much of the time, will be able to justify their own argument by their belief. In other words it will work for them. But it is also quite clear that it will not always work. Not too long ago, a hospital came under severe criticism following the death of a young girl who developed diabetes. The parents took her to the hospital, but it was not made clear to them that she needed urgent and immediate treatment. The parents, advocates of natural medicines, undecided what to do, gave her homeopathic treatment whilst they thought about it. Shortly afterwards, their daughter went into a coma from which she never recovered. A classic example of where belief is not enough. बहुसंख्य वेळेस असेच तकलादू पुरावे पुढे येत राहतात त्यामुळे होमियोपाथीत तथ्य आहे असे म्हणणे मला तरी कठीण जाते. यात माझा पूर्वग्रह नक्कीच असेल तरीही मी जेंव्हा जेंव्हा उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा मला सज्जड पुरावा अजूनपर्यंत तरी आढळलेला नाही. मी एक क्ष किरण तज्ञ आहे आणी रोजच्या व्यवसायात मी एकही औषध वापरत नाही कि रुग्णांना देत नाही त्यामुळे मला माझ्या व्यवसायाचे ( किंवा अस्तित्वाचे) समर्थन करण्याची जरूर नाही. ज्याला भौतिकशास्त्राची तोंड ओळख आहे अशा कोणालाही क्ष किरण किंवा कर्णातीत ध्वनी (ULTRASOUND) कसा काम करतो हे सहज पडताळता येईल.कोणत्याही प्रयोगशाळेत ते सहज सिद्ध करता येईल आणी आपण शिकलेल्या मूळ शास्त्राच्या विपरीत कोणतीही उपपत्ती (THEORY ) नाही. असे असूनही मी एक गोष्ट म्हणतो कि कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. ज्याला जी पथी पचते आणी रुचते त्याने ती वापरावी. या वर मी कितीही लिहीले तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. हे जसे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल काही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर त्याचे विचार बदलत नाहीत तसेच आहे.प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचार पद्धतीनेच चालत असतो. ती बदलणे इतके सोपे नाही. हा विषय म्हणजे च्युईंग गम चघळण्य़ासारखा आहे. तुम्ही कितीही चघळा. पोटात काहीही जात नाही आणी काही वेळाने तोंडाला स्वादहि रहात नाही.

In reply to by सुबोध खरे

पोटे Sat, 09/27/2014 - 16:12
तो होमिओपथी डॉ. अज्ञानी होता. डायबेटेस हा अन्शुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. हार्मोन कमतरतेसाठी हार्मोनच द्यावे लागतात असे होमिओपथी सांगते. असो. माझी नागिण होमिओ च्या नक्स वोमिकाने व काली मुरने दोन दिवसात गेली होती. असाकलोवीरचे पाच डोस खाणे जिवावर आले होते म्हणुन मित्राला फोन केला होता. एम बी बी एस माणसाची नागिण बी ए एम एस वैदुने होमिओपथी औषध देउन दोन दिवसात घालवली होती !!!

In reply to by सुबोध खरे

आनन्दा Mon, 09/29/2014 - 10:11
सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ.च्या मोडर्न मेडिसिनबद्दलच्या अज्ञान- अट्टाहासानेच होमिओपॅथीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मोडर्न मेडिसिनला शिव्या घालून, किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा हट्ट धरून कोणाचेच भले होणार नाही. शेवटी रुग्णाला बरे वाटणे, आणि दीर्घकालीन स्वास्थ्य मिळणे हेच डॉ. चे अल्टिमेट लक्ष्य असले पाहिजे.

सामान्यनागरिक Fri, 09/26/2014 - 18:14
मला वाटते आपल्या सारख्या सामान्य पामरांनी मते देण्याऐवजी डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी. मी नुकतेच माझ्या मुलीला होमियोपथीच्याकालेजात घातले आहे. ( केवळ तिथेच विना डोनेशन प्रवेश मिळत होता). जर यावरील चर्चेमधुन काही वाईत निष्पन्न झाले तर मी तिला घरी बसविन धणीभांदी करावयास लावेन. आणि या पुढे होमी डाक्टर कडे जाण्यापूरण्यानीट विचार करेन.

In reply to by सामान्यनागरिक

पोटे Sat, 09/27/2014 - 10:09
होमिओपथी लोकाना अ‍ॅलोपथी शिकवुन त्याना अधिकृतरीत्या अ‍ॅलोपथी करत येण्याची शक्यता आहे. होमिपथीवर टीका करणारे इथले प्रकांड पंडित काही न वाचताच डायल्युशनवर बोलत आहेत. डालयुशन याचा अर्थ नुसते थेंबभर औषध मिसळणे नव्हे. त्ञासाठी ट्रिचुरेशन ही प्रक्रियाही करावी लागते. वजन आणि आकारमान यांचा कार्यक्षमतेशी सम प्रमाण असतेच हे विधान इथल्या लोकानी मांडावे हेही हास्यास्पद आहे. पूर्वी वीस जीबी ची हार्ड डिस्क पाव किलोची असायची. आज बत्तीस जीबी ची चिप तोळामासा असते.

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 18:26
ब्राह्मण पुणेकर आस्तिक आणि आता होमिओपॅथी. कंटाळा आला राव. मी यापुढे वाटल्यास साबुदाण्याची खिचडी पण खाणार नाही. पण त्या साबुदाणा गोळ्या वाल्यांना सोडा आता. वात आलाय आता.

In reply to by हाडक्या

काउबॉय Fri, 09/26/2014 - 12:58
लोक तत्वासाठी भांडतात* हां समज व्हावा ? काही असमंजस तसे करत असतिलही पण सुद्न्य लोक त्से करत नसतात हानुभव आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:28
मा. शरद यांस, स.न.वि.वि. हा अभ्यासू लेख लिहून होमिओपॅथी नावाच्या फसवणुकीबद्दल आमचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद! आपण फार महान समाजकार्य करीत आहात हे या निमित्ताने सांगावेसे वाटते. काही सूचना - (१) हा लेख मिपावर प्रसिद्ध करण्याऐवजी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा व निव्वळ मराठीत नव्हे तर हिंदी, इंग्लिश, जर्मन, सर्व भारतीय भाषा इ. भाषातून हे पुस्तक प्रसिद्ध केल्यास जागतिक स्तरावर ही फसवणूक टाळता येईल. (२) होमिओपॅथी डॉक्टर करीत असलेल्या फसवणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. (३) माझ्या काही नातलगांचे कावीळ, डेंगी, अल्सरेटिव्ह कोलायटिस इ. गंभीर आजार होमिओपॅथीमुळे पूर्ण बरे झाल्याचे दिसले. चाई, त्वचारोग, खोकला इ. किरकोळ आजारही बरे झाल्याचे दिसते. परंतु हे आजार औषधामुळे बरे झाले नसून निव्वळ प्लासिबो परीणामांनी बरे झाले असणार आणि मुख्य म्हणजे आपण औषधाने बरे झाले नसून प्लासिबो परीणामांनी बरे झालो आहोत याबद्दल हे रूग्ण अंधारात आहेत. होमिओपॅथी डॉक्टर या रूग्णांची अशी फसवणूक करीत होते हे वाचल्यावर संताप आला. (४) होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. म्हणजे तिथेही फसवणुकच. हा प्लासिबो इफेक्ट अन्य पॅथीतही वापरात आणावा यासाठी आपण चळवळ सुरू करावी. म्हणजे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी कॅप्सूल/गोळ्यांमध्ये प्रत्यक्ष औषधाची मात्रा घालण्याऐवजी ग्लुकोज किंवा असेच काहीतरी निरूपद्रवी पदार्थ घालायचे. औषध घेणारा माणूस आपण औषध घेतले या कल्पनेनीच बरा होईल व बराचसा खर्च व इतर दुष्परीणाम टाळता येतील. किंवा एखादी शस्त्रक्रिया करून आतला काही भाग काढायचा असल्यास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टेबलावर घेऊन भूल देऊन काहीच न करता, पोटावर किंवा शस्त्रक्रियेच्या जागी वरूनच प्लॅस्टर करायचे. आपल्यावर खरंच शस्त्रक्रिया झाली असे जाग आल्यावर त्या रूग्णाला वाटेल आणि त्या प्लासिबो परीणामानेच शस्त्रक्रिया न करताच तो बरा होईल. (५) प्लासिबो परीणाम इतर क्षेत्रातही वापरता येईल. म्हणजे भूक लागली असली तर आपण आमरसपुरीचे भरपूर जेवण जेवलो आहोत किंवा झणझणीत कोल्हापुरी मटणावर आडवा हात मारला आहे अशी नुसती कल्पना करायची. आपोआप पोट भरेल व प्रत्यक्ष अन्नधान्याचा खर्च कमी होईल. एकंदरीत आपण फार महान कार्याला हात घातला आहे. महान कार्याचा पाठीराखा परमेश्वर असतो. त्यामुळे आपल्याला यश मिळणार हे नक्की. या लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! कळावे, आपला नम्र, श्रीगुरूजी

In reply to by श्रीगुरुजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/25/2014 - 14:25
गुरूजींनी विकेट घेतली.असो. होमिओपाथीवर माझा १००% विश्वास नाही पण ते सगळे थोतांड आहे,बकवास आहे हे अमेरिकन व जगभरच्या औषधी कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे असे माझे मत. मोठ्या विमा कंपन्या व औषधी कंपन्या लोकांच्या बोकांडी बसल्या आहेत गेले ५० वर्षे.

In reply to by श्रीगुरुजी

शरद Fri, 09/26/2014 - 07:11
मी सहसा प्रतिसादांचा प्रतिवाद करत नाही. पण अधुनमधून फुस (फुकट सल्ले) मात्र देतो. (वयाचा परिणाम, दुसरे काय !) असा सल्ला कोणी ऐकला नाही तरी बिघडत नाही. श्रीश्री गुरुजी हेही माझे समानधर्मा आहेत हे त्यांनी दिलेल्या फुसवरून कळले व आनंद झाला. म्हटले चला, पन्नासएक वर्षांपूर्वी कॉलेजातील मुलामुलींना गणित शिकवत होतो आता त्याची उजळणी श्रीश्री गुरुजी यांच्याकरिता करावी.त्यांनी एक मिलिग्राम औषधाबद्दल लिहले आहे. डॉ. खरे यांनी त्याला उत्तरही दिले आहे. मी फक्त गणित करणार आहे. आपण 3C पॉवरचे एक मिलिग्राम वजनाचे होमिओपाथीचे औषध घ्यावयाचे आहे असे समजू. कुठले औषध हे महत्वाचे नाही. तर प्रथम एक ग्राम औषध दहा लाख ग्राम पाण्यात विरघळावे लागेल ( 3C म्हणजे १०००००० मध्ये एक) पण आपल्याला तर १ मिलिग्रामच पाहिजे आहे. तेव्हा यातला १/१००० भाग म्हणजे १०००००० भागिले १००० बरोबर १००० ग्राम औषधाचे पाणी घ्यावयाचे आहे.पण पाणी नाही तर गोळ्या घ्यावा लागतात. तर एक ग्राम पाण्यात १० गोळ्या भिजवल्या (बर्‍याच जास्त भिजतील पण हिशेबा करिता १० धरा) म्हणजे तुम्हाला १ मिलिग्राम औषधाकरिता फक्त १०,००० गोळ्या खावयाच्या आहेत. श्रीश्री गुरुजी, अंमळ जास्तच झाल्या नाही ? शरद

In reply to by शरद

श्रीगुरुजी Tue, 09/30/2014 - 20:42
डॉ. सुबोध खरे यांनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे गोळ्यांमध्ये औषधाचे प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे नसून औषध किती प्रभावी आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे १ मिलिग्रॅम होमिओपॅथी औषधाकरीता १०००० गोळ्या लागतील का अजून जास्त लागतील हा मुद्दाच इथे गैरलागू आहे. महाविद्यालयात गणित शिकवित होता तरी ते इथे निरूपयोगी व गैरलागू आहे.

आसुड गुरुवार, 09/25/2014 - 15:20
शरदराव, तुम्हास्नी कंधी कोण्च्या होम्योपदि वाल्या डागतरानी फशीवलाय कि काय :ऑ....तवाच हिकड त्यांची बिन पाण्यान कराय बगताय.... बाकि श्रीगुरुजी यांस स.न.वि.वि. अहो पण गुरुजी, जसे आपण लिहिले आहे ते वाचुन डोळ्यांत पाणी आले हो...प्लासिबोने गोची होईल ना ....हॉटेलात गेलो कि हॉटेल वाले फक्त फोटो दाखवतील आणि ...ती जुणी म्हण आठवेल...खाया पिया कुछ नहि फोटो देखा बारा आना ( आता आना बंद झाला माहित आहे मला )

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 15:37
होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. गुरुजी वरील विधान खरे नाही. कित्येक आधुनिक औषधे इतकी परिणामकारक आहेत कि एकच का ०. १ मि. ग्रॅम औषध सुद्धा पुरेसे आहे. उदा. लीव्हो थाय रोक्सीन ०.१ mg , टामसुलोसीन ०. २ mg , ग्लायमेप्राईड १ mg, अल्फा कॅलसी डॉल ०. २५ मायक्रो ग्रॅम (होय मायक्रोग्रामच). फार कशाला सदाफुलीपासून कर्करोग विरोधी औषध व्हिनक्रिस्टीनचे सुद्धा १ मिली ग्रॅमचे इंजेक्शन मिळते अशी असंख्य औषधे सूक्ष्म प्रमाणात पण काटेकोर पणे तयार केलेल्या पद्धतीने वापरली जातात. आपल्यापैकी कुणाचा असा समज असेल की हि औषधे प्लासिबो परिणाम करतात तर त्यांना माझे खुले आव्हान आहे त्यांनी हि औषधे घेऊन दाखवावीत ज्यांचा त्याच्या परिणामावर विश्वास नाही तर त्यांच्यावर त्या औषधाचा परिणाम होणार नाही. ( व्हिनक्रिस्टीनचे इंजेक्शन घेऊन केस गळले किंवा हगवण लागली तर ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर). प्लासिबो परिणामाचा काही वेळा मनोरुग्णांवर उपयोग करावा लागतो. आपल्याला काही तरी गंभीर आजार झाला आहे असे समजणाऱ्या रुग्णांना किंवा हिस्टेरिया च्या रुग्णांवर शुद्ध पाणी किंवा काम्पोजच्या इंजेक्शन चा प्रभावी परिणाम दिसून येतो. अजून एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक स्त्री मुलाला घेऊन रडत आली होती कि मुलाने मलम खाल्ले. मी हातात घेऊन पहिले तर ते सोफ्रामायसीन चे मलम होते. त्या ट्यूब मध्ये बहूतांश मलम शिल्लक होते. सोफ्रामायसीन आपल्या आतड्यात शोषले जात नाही ( त्यामुळे त्याच्या गोळ्या वापरता येत नाहीत). हे सांगून त्या स्त्रीचे समाधान होत नव्हते. त्या मुलाला मी ब जीवनसत्त्वाचे सिरप पाजले आणि आईला सांगितले कि अर्धा तास थांबा. मुलाला उलटी होते का ते पहा उलटी झाली नाही तर मुलाला धोका नाही. अर्ध्या तासाने ती आई मोठ्या कृतज्ञ भावनेने मला सागू लागली डॉक्टर तुमच्या औषधाचा उत्तम परिणाम झाला आहे आणि मुल छान खेळते आहे. (मुळात मुल पहिल्यापासूनच आनंदात होते). असेच दुसरे उदाहरण -- बरेच मासे खाणारे मोठा काटा गिळतात हा काटा घशाच्या मागच्या भागावर ओरखडा काढतो. त्यामुळे त्या माणसाला घशात काटा अडकला आहे अशी भावना होत राहते. त्यांना एक्स रे काढा किंवा स्क्रीनिंग करा समाधान होत नाही. अशा लोकांना बेरियम मध्ये भिजवलेला कापूस खायला सांगतो आणि असे सांगितले जाते कि जर काटा असेल तर तो कापूस तेथे अडकेल. काटा नसल्याने तो कापूस गिळल्यावर पोटात जाताना स्क्रीन वर दिसतो कि मग त्या माणसांचे समाधान होते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:47
डॉक्टर साहेब - तुम्ही जीव तोडुन नका घेउ, काही ( भारतातल्या बहुसंख्य ) लोकांना डोळ्यासमोर सरळसरळ दिसत असलेल्या फॅक्ट इग्नोर मारायची सवय असते. भारतीयांचा मुळ स्वभाव चमत्काराच्या मागे लागणारा आहे. त्यांना अश्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आवडतो की ज्या खोट्या आहेत आणि सिद्ध होणार नाहीत. ह्याने उत्तरे शोधायचा त्रास वाचतो. होमिओपाथी आणि आयुर्वेदा साठी हा समाज अगदी आयडीयल आहे. नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे. खरे तर तसे ही नाही. ह्या लोकांना बरोबर माहीती आहे की कुठला रोग झाला की कुठल्या डॉक्टर कडे जायचे. सर्दी, अपचन झाले की जातील वैदू कडे पण काही मोठा रोग झाला की येतील तुमच्या कडे.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 15:56
आणि आयुर्वेदा साठी एक मिनिट हॉमिओपॅथी बद्द;अ जे मत असेल ते असो. पण आयुर्वेद हे शास्त्र नाही असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कारण ते चक्क १००% चुकीचे आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:05
क्निनिकल ट्रायल ( शक्यतो अमेरिकेतुन ) पास झालेल्या कुठल्या ही औषधावर माझा विश्वास आहे. आयुर्वेदाने ते करावे, मी नक्की घेइन. मी कोण बोलणार मॉडर्न मेडीसिन वाला डॉक्टरच लिहुन देइल ते पेशंटला. पण क्लिनिकल ट्रायल होत नाहीत तो पर्यंत नाही. आता तुम्ही हजारो वर्षाची परंपरा वगैरे बोलू नका. इतकी खात्री आहे तर का कोणती आयुर्वेदीक औषध कंपनी क्लिनिकल ट्रायल करून घेत. भारता पेक्षा अमेरिका खुप खुप मोठे मार्केट आहे. अजुन एक आणि मी औषध हा शब्द वापरला, र्टॉनिक नाही. दुसरे तुमचा जर आयुर्वेदावर विश्वास असेल तर चिनी, युनानी ने काय घोडे मारले आहे?

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 16:58
मला चिनी युनानी बद्दल काही माहिती नाही. आयुर्वेदाचा आवाका मात्र खुप मोठा आहे. आज्जीबाईचा बटवा असे आपण ज्याला म्हणतो तो सगळा आयुर्वेदात येतो. क्लिनिकल ट्रायल बद्दल म्हणत असाल तर माझा तुमच्या एवढा या विषयातला अभ्यास मोठा नाही. पण बाजारात जी मान्यताप्राप्त आयुर्वेदिक औषधे येतात ती क्लिनिकल ट्रायल नंतरच येत असतील ना? निसर्गातले घटक वापरुन तयार केलेली औषधे ती आयुर्वेदाची असे माझे मत आहे. ही साधारन व्याख्या झाली. वैद्यकीय परिभाषेत यात काही अधिक उणे होइलच. मी हजारो वर्षांच्या इतिहासाबद्दल काय बोलणार? पण अ‍ॅलोपॅथीच्या डागतरांना न जमलेले रोग आयुर्वेदिक डॉक्टरांनी बरे करुन दाखवलेले बघितले आहेत. हे करताना त्यांनी कुठल्या स्टेजला काय प्रगती होइल ते सांगितले. जेव्हा जेव्हा कुपथ्य झाले तेव्हा तेव्हा ते बरोबर ओळखले. अचूक नाडीपरीक्षा केली. औषधे सगळी आयुर्वेदिक दिली. किती दिवसात रुग्ण पुर्ण बरा होइल ते अचूक सांगितले आणि तेवढ्या दिवसात रुग्ण पुर्ण बरा झाला. त्या आधी अ‍ॅलॉपथी डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते. बाप दाखव नाहितर श्राद्ध घाल हे काही लोकांना सिद्ध करावे लागते म्हणुन सांगतो की डॉक्टर पुण्यातले समीर जमदग्नी होते. माझ्या जवळच्या माहितीतील बर्‍याच जणांना इतर काही चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा असाच अनुभव आला. आयुर्वेदतरी किमान नक्की प्लासिबो इफेक्ट वर चालत नाही. शेकडो वेगवेगळ्या पुड्या आणि कडवट काढे हे सगळे प्लासिबो इफेक्ट असते हे मला मान्य नाही. अवांतरः डॉ समीर जमदग्नी आणि माझे कुठलेही नाते नाही. असेलच तर ते मला ज्ञात नाही.

In reply to by मृत्युन्जय

खटपट्या Fri, 09/26/2014 - 02:18
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. आता दिलेले औषध आयुर्वेदिक आहे कि अलोपथिक हे विचारण्याची हिम्मत माझ्यात नाही. कारण लगेच बाबांकडे तक्रार करतील :)

In reply to by खटपट्या

सुहास.. Fri, 09/26/2014 - 18:34
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. >> माझे ही !! पण स्सालं काही ही आजार घेवुन जा ..अगदी दाढ दुखीसुध्दा ..बर करतो ..नाव सरदार आहे आणि आहे पण सरदार :)

In reply to by सुहास..

खटपट्या Sat, 09/27/2014 - 02:27
मी हाच विचार करतोय कि BAMS आणि MBBS या दोन्ही डिग्र्या घेतलेल्या डॉक्टरांचा वैचारिक गोंधळ होत नसावा का ? एखाद्याला अलोपथिक औषध द्यायचे कि आयुर्वेदिक हे ते कसे ठरवत असतील. एखादा रुग्ण त्यांच्याकडे "फक्त आयुर्वेदिक" किंवा "फक्त अलोपथिक" उपचारांची मागणी करू शकतो का ?

In reply to by खटपट्या

प्रभाकर पेठकर Sat, 09/27/2014 - 02:32
अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना, दूसर्‍या पॅथीला वापरायला, एंडॉर्स करायला बंदी असते असे वाचले आहे. डॉ. श्रीराम लागूंनी च्यवनप्राशची जाहिरात केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर्स असोसिएशनकडून कांहीतरी कारवाई झाली होती असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या Sat, 09/27/2014 - 03:49
हा श्रीराम लागुंबद्दल ऐकले आहे. पण त्यांच्यावर चवनप्राश ची जाहिरात केल्याबद्दल कारवाई झाली का हे माहित नाही. मी ऐकलेय कि कोणताच डॉक्टर कोणत्याच औषधाची जाहिरात करू शकत नाही. डॉक्टर मिपाकर प्रकाश टाकतीलच.

In reply to by खटपट्या

सुबोध खरे Sat, 09/27/2014 - 09:22
डॉ. श्रीराम लागूनी च्यवनप्राशची जाहिरात केली त्यावर त्यांच्या काही व्यावसायिक सहकार्यांनी मत्सरामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे तक्रार केली. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने त्या तक्रारीची "दखल" घेत त्यांचे सदस्यत्व काही महिन्यांसाठी निलंबित केले. कारण हे होते कि तुम्ही डॉक्टर असताना एखाद्या औषधाची जाहिरात करणे हे बेकायदेशीर आहे. डॉक्टर लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याविरुद्ध अपील केले आणि त्यात असे म्हटले कि मी त्यात डॉक्टर म्हणून कोणतीही जाहिरात केलेली नाही उलट एक प्रसिद्ध व्यक्ती( CELEBRITY) म्हणून ती जाहिरात केलेली आहे. उच्च न्यायालयाने ते म्हणणे ग्राह्य धरत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची कारवाई रद्द केली. ( मुळात डॉक्टर लागू तेंव्हा बरेच वर्षापासून आपला व्यवसाय करीतच नव्हते)

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस गुरुवार, 09/25/2014 - 16:06
नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे.
गुरुजींच्या (३) प्रमाणे त्यांना कर्माची फळे मिळालीच आहेत (गंभीर आजार बरे होण्याची)

In reply to by मराठी_माणूस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:09
अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी.

In reply to by प्रसाद१९७१

जेपी Fri, 09/26/2014 - 17:13
काविळ आणीडेंगी आपोआप बरा होतो .कसा काय बॉ? काही शास्त्रीय माहिती आहे का ? असल्यास इथल्या एका पेंशटला सांगतो. एक आठवडा झाला हुडकुन हुडकुन o- च ब्लड पुरवत आहोत.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Tue, 09/30/2014 - 20:49
>>> अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी. अहो आश्चर्यम्! पण मग दरवर्षी मुंबई, पुणे इ. शहरात किमान २००-३०० व्यक्ती डेंगी ने मृत्युमुखी पडतात ते कसे काय बोवा? आणि डेंगी झाल्यावर अनेकांना रूग्णालयात दाखल करून शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी? डेंगी आपोआपच बरा होणार असेल तर कशाला डॉक्टरचा, रूग्णालयाचा आणि प्लेटलेट्सचा खर्च करायचा? आणि दरवर्षी महानगरपालिका विनाकारणच डासनिर्मूलन मोहीम राबविते असं दिसतंय कारण डेंगी आपोआपच बरा होतो ना? आणि समजा होमिओपॅथीने डेंगी बरा झालेला नसून तो शरीर लढण्यासाठी टिकून राहिल्यामुळे आपोआप बरा झाला आहे असे गृहीत धरले तर होमिओपॅथी औषधामुळे डेंगीच्या प्रतिकारासाठी शरीर लढण्यासाठी टिकवून धरायला मदत होते असा निष्कर्ष का नाही काढता येणार?

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे Tue, 09/30/2014 - 21:17
शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी?
अहो प्लेटलेट्स काही डेंगूवर उपचार म्हणून नाही भरत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 18:33
गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Wed, 10/01/2014 - 20:54
>>> गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काय हा वेडेपणा. आयुष्यात मॉडर्न मेडिसिनचे औषध घ्यायचे नाही हा पण कशासाठी आणि का करायचा? होमिओपॅथी औषध सुद्धा आजारांवर लागू पडते अशी माझी भूमिका. फक्त होमिओपॅथीच लागू पडते व इतर पॅथी ही फसवणूक/निरूपयोगी आहेत असे मी कधीही म्हटले नाही. >>> काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. माझी अशी ठाम भूमिका आहे की होमिओपॅथी ही फसवणूक नसून अनेक आजारांवर होमिओपॅथीमुळे गुण येतो. >>> मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. >>> तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. मी अ‍ॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी सोडून इतर पॅथींना अजिबात नावे ठेवलेली नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. एखाद्याने "मला दूध आवडत नाही" असे म्हटले तर "म्हणजे तुम्हाला मद्य आवडते" असा अर्थ तुम्ही काढत आहात. होमिओपॅथी ही भोंदूगिरी नसून त्या पॅथीचाही आजार बरे करण्यासाठी उपयोग होतो. हेच मी सांगितले आहे. >>>> असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा. माझे वागणे अजिबात दुटप्पी नाही. तसेच माझे वागणे पूर्वग्रहदूषित सुद्धा नाही. मी माझ्या व माझ्या परिचयातील अनेकांच्या व्यक्तिगत अनुभवावरून होमिओपॅथीविषयी माझे मत ठरविले आहे. होमिओपॅथीच्या बाजूने बोलणे म्हणजे इतर पॅथींचा द्वेष करणे नव्हे हे समजून घ्या.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय Wed, 10/01/2014 - 18:28
तुमचे वक्तव्य थोडेसे "एड्समुळे कोणीही मरत नाही" यासारखे आहे. टेक्निकली बरोबर असु शकते कदाचित. प्रॅक्टिकली अगदीच चुकीचे

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 09/25/2014 - 16:46
@प्रसाद जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे. दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर असे करताना दिसत नाहीत. कदाचित त्यांचे मत "मला काय करायचेय होमिओपथीविषयी बोलून" असे असू शकेल. आणि केवळ व्यवसायाच्या दृष्टीने ते रास्तही असेल. पण रुग्ण चुकीची उपचारपद्धती वापरतात किंवा कसे याकडे लक्ष देणे आणि किमान त्याविषयी माहिती देणे हाही वैद्यकीय व्यवसायाचा भाग मानला पाहिजे असे वाटते. एकदा तत्व माहीत झाले आणि तरीही होमिओपथी घेतली तर मग काहीच म्हणणे असू नये, कारण तो इन्फॉर्म्ड डिसिजन असेल. सध्या माझ्यामते बहुतांश पेशंट्सना हे माहीतच नसतं की होमिओपथीमधे थेट औषधाचा अंश नाही. तेवढं माहीत झालं म्हणजे मग आपापले ठरवणे इष्टच..

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 17:43
जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे.
हे सगळं काही आपल्या तोंडासमोरच बोललं पाहिजे असं काही आहे का? माझ्या मते नसावं. होमिपदीबद्दल कित्ती काय काय रिसर्च पेपर लिहून झालेले आहेत. त्यामुळे 'अ‍ॅलोपथीचे डॉक्टर कै बोलत नैत' हे चूक आहे.

In reply to by सुबोध खरे

पोटे गुरुवार, 09/25/2014 - 16:08
ही प्लासिबोची उदाहरणे वाटत नाहीत. या उदाहरणात रुग्णाला काही झालेलेच नाही. झाले , असे त्याला वाटत आहे. होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:13
होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत
हे सर्व रोग शरीरच बरे करते. नागिणी वर औषध घेण्याची गरज नाही. मधे स्वाईन फ्लु चे वारे होते तेव्हा आम्हाला युके मधे ताप आला तर घरी विश्रांती घ्या आणि ताप वाढला तर पॅरॅसिटेमॉल घ्या इतकाच सल्ला डॉक्टर देत होते. एक पण मृत्यु झाला नाही. भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे गुरुवार, 09/25/2014 - 16:52
सर्व रोग शरीरच बरे करते तर मग आमची अ‍ॅलोपथीही निरर्थ्कच नाही का ? नागिणीवर औषध घेऊ नये हे सांगून मात्र उपकारच केलेत. आमच्या एच आय व्हीच्या ओपीडीत रोज एक पेशंट असतो नागिणीचा. बरं झालं , स्रकारला कळवून टाकतो .. अ‍ॅसायक्लोवीर औषधावर फुकट खर्च करु नका म्हणुन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:58
मालक हे वाचा. शरिरच बरे करते नागिण. हे सपोर्टींग औषध आहे. बरे करण्या साठी नाही. Acyclovir is used to treat infections caused by certain types of viruses. It treats cold sores around the mouth (caused by herpes simplex), shingles (caused by herpes zoster), and chickenpox. This medication is also used to treat outbreaks of genital herpes. In people with frequent outbreaks, acyclovir is used to help reduce the number of future episodes. Acyclovir is an antiviral drug. However, it is not a cure for these infections. The viruses that cause these infections continue to live in the body even between outbreaks. Acyclovir decreases the severity and length of these outbreaks. It helps the sores heal faster, keeps new sores from forming, and decreases pain/itching. This medication may also help reduce how long pain remains after the sores heal. In addition, in people with a weakened immune system, acyclovir can decrease the risk of the virus spreading to other parts of the body and causing serious infections

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Fri, 09/26/2014 - 06:40
परवा मी आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते तेव्हा माझ्यावर तुटून पडला होतात.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:16
आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते
ते क्लिनिकल ट्रायल करुन प्रूव्ह करा, मग मॉडर्न मेडीसिन चे डॉक्टरच लिहुन देतील ना ते पेशंट ला.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे गुरुवार, 09/25/2014 - 16:54
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती. ..... अग्गोबै ! म्हणजे एखादे औस्षध इंग्लंदात असले तरच ते सत्य मानायचे का काय ? ? ?

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:21
हो इंग्लंडात केले चालेल कारण इंग्लंडात कोणाला वाटले म्हणुन कोणी औषध काढुन विकू शकत नाही. क्लिनिकल ट्रायल लागतातच कराव्या.

In reply to by रामपुरी

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:14
कुठल्याही आयुर्वेदिक कींवा होमिओपाथी औषधाची क्लिनिकल ट्रायल झालेली नाही. हे वैदू त्यांना पाहीजे ते देतात. तुम्हाला एक जरी असे औषध माहीती असेल तर सांगा. अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे Fri, 09/26/2014 - 11:16
भ्रम आहे तुमचा. कालच आयु डॉक्टरला विचारलं. तो बोल्ला क्लिनिकल ट्रायल होतात. आयुर्वेदिक साठीही. होमिओ बद्दलही संबंधिताला विचारेन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 11:29
मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवलात? एखादे उदाहरण देत का नाही तुमचा तो वैदु. इथे बघा काही नाव सापडतय का? http://www.cdsco.nic.in/forms/list.aspx?lid=1820&Id=11

In reply to by प्रसाद१९७१

पैसा Fri, 09/26/2014 - 18:07
फारच धाडसी विधान! लोक वैदू बनण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि सरकार त्यांना पदवी देऊन धंदा करायला परवानगीही देतं ही माहिती णवीण आणि फारच भयंकर आहे!

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस Fri, 09/26/2014 - 12:08
क्लिनिकल ट्रायल वगैरे केलेल्या बहुराष्ट्रिय औषध कंपन्यांचे काळे धंदे इथे वाचा http://www.loksatta.com/lokrang-news/drugs-companies-exploit-indian-guinea-pigs-44798/

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही. मॉडर्न मेडिसीनमधली औषधे भारतात विकण्याअगोदर त्यांची भारतिय (किंवा बर्‍याच इतर देशातही स्थानिक) रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल करणे कायद्याने व आरोग्यदृष्टीने जरूर असते... केवळ अमेरिकन ट्रायल यशस्वी झाली म्हणून ती भारतात किंवा इतर अनेक देशांत आपोआप वैध होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे जगातल्या विविध भागांत राहणार्‍या लोकांमधले जैववैविध्य आहे. जैव (जेनेटिक) वैविध्यामुळे एकाच औषधाचे--- जे आधुनिक वैद्यकशास्त्रात रासायनिक अणू (केमिकल मॉलेक्युल) या असे संबोधले जाते--- वेगळी जनुकरचना असणार्‍या माणसांमध्ये वेगळे परिणाम दिसतात... उदा. औषध शरिरात शोषण होण्यातला (शोषलेली मात्रा आणि त्यासाठी लागलेला वेळ) फरक, जैववैविध्यामुळे शरीरावर होणार्‍या परिणामातिल फरक, औषधाचे शरिरात चयापचय होण्यातला फरक, शरिरात औषध शिल्लक राहण्यातला (मात्रा आणि वेळ) फरक, औषध आणि त्याचे विघटन झालेले भाग शरीरातून बाहेर (मूत्र, इत्यादींतून) फेकले जाण्यातला फरक, औषध आणि त्याच्या शरीरात विधटित झालेल्या भागांचे शरीरावरचे दूरगामी परिणाम, इत्यादी.

In reply to by प्रसाद१९७१

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 16:57
मित्र, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही ) आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evidence_for_Homeopathic_Medicine.html ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस ) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे गुरुवार, 09/25/2014 - 16:55
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 16:59
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...
लस आणि औषध वेगळी

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 20:07
टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे Cure नाही. ते Preventor म्हणुन काम करते. टॅमीफ्लु हे सर्व च टाइप च्या फ्लु साठी preventive medicine म्हणुन वापरु शकतात. फ्लुच्या वाय्ररस शी संपर्क येउन २ दिवस झाले असतील तर टॅमी फ्लु ने फार फरक पडत नाही. माझ्या मुलीला स्वाइन फ्लु झाला होता त्यामुळे मी First Hand माहीतीवर बोलतो आहे. गमतीची गोष्ट म्हणजे टॅमीफ्लु बडीशेपे पासुन बनवतात असे ऐकले आहे.

In reply to by आदिजोशी

सुहास.. Fri, 09/26/2014 - 18:36
रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी? >>> +१०१५४५४६६९७२१३५४६२३१३५४७१२३५४६५४५४३२१६३८५५६४२५४५६७४६४३२४६८७४६५४३५४६८७८

मराठी_माणूस गुरुवार, 09/25/2014 - 17:35
औषधांचे जाउ द्या , ते तसेही आपण फक्त बरे नसतानाच घेतो. पण जे अन्न वर्षानुवर्ष आपण पोटात ढकलतो, जसे पोळी,भाजी, वरण भात ईत्यादी, त्यांची कोणत्या लॅब मधे क्लिनिकल ट्रायल घेतली जाते ? शिवाय ते किति प्रमाणात खायला हवे ह्याचे काही मोजमाप आहे का ? जसे कि पोळी ... ग्राम, भात्....ग्राम ई.

In reply to by बाळ सप्रे

पोटे Fri, 09/26/2014 - 00:39
हेच लिवणार होतो. हे म्हणजे पाकिटमाराने टेलरचा व्यवसाय हा व्यवसायच नाही असे म्हटल्यागत झाले. मंत्रतंत्राच्या क्लिनिकल ट्रायल होतात का ? त्याना अ‍ॅप्रुव कोण करतं

मराठी_माणूस Fri, 09/26/2014 - 13:03
ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे आयुर्वेदा बद्दल खालील मत इथे वाचा http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-to-be-healthy-prevention-and-good-diet-to-be-away-from-diseases-944760/
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी 'सामान्य आरोग्य' या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.

In reply to by मराठी_माणूस

हे तर फार पूर्वीपासून जगमान्यच आहे... अश्या प्रकारच्या विकारां/रोगां-साठी "जीवनशैलीचे विकार (Lifestyle Diseases)" असे नामकरणही केले गेलेले आहे. केवळ जीवनशैली ताळ्यावर आणल्याने ह्यातले बरेच विकार बरे होऊ शकतात किंवा कमीत कमी ताब्यात राहून औषधाची मात्रा कमी करायला मदत होते.

In reply to by मराठी_माणूस

सुहास.. Fri, 09/26/2014 - 18:37
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे >> +१ हे मी मान्य करतो !!

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 17:02
मित्र प्रसाद, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही)आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi... ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)!!! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 17:26
अहो ही होमिओपाथीची जहिरात करणारी आणि कोणी डाना नावाच्या माणसाची जहीरात करणारी साईट आहे, जशी टीव्ही वर शनी कवचाची जहीरात दाखवतात तशी.

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 18:02
मित्र सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन जर्नल प्रमाणीकृत दुवे देत आहे, इतर सिद्धतांचे दुवे नंतर देतो. १. http://journals.bmj.com/search?fulltext=homoeopathy&submit=yes&journalcode=acupmed%7Camiajnl%7Cannrheumdis%7Carchdischild%7Cbjophthalmol%7Cbjsports%7Ccasereports%7Cbmjopen%7Cbmjdrc%7Cbmjresp%7Cbmjspcare%7Cbmjqir%7Cdtb%7Cebmed%7Cebmental%7Cebnurs%7Cedpract%7Cejhpharm%7Cemermed%7Cfamilyplanning%7Cfetalneonatal%7Cflgastro%7Cgutjnl%7Cheartasia%7Cheartjnl%7Cinjuryprev%7Cinpract%7Cjclinpath%7Cjech%7Cjmedgenet%7Cjnnp%7Cjramc%7Clupusscimed%7Cmedethics%7Cmedhum%7Cmolpath%7Cneurintsurg%7Coemed%7Copenhrt%7Cpostgradmedj%7Cpractneurol%7Cqhc%7Csextrans%7Cthoraxjnl%7Ctobaccocontrol%7Cvetrec%7Cvetreccr%7Cvetreco%7Cbmj २. http://www.amcofh.org/research/proving-trials ३. http://www.homeopathy-ecch.org/content/view/50/69/ ४. http://www.theguardian.com/notesandqueries/query/0,,-9542,00.html (द गार्डीअन). दोन प्रश्न : आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तिव कुठल्याही यंत्र वा प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही, मग हे अस्तित्वात नाहीत का? एखादी गोष्ट आपल्या आकालानापडीकले असेल तर ती सत्य असू शकत नाही का? सापडणे(फाईंड) आणी संशोधन(डिस्क्व्हर) ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ह्या दुव्यांनी आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे Fri, 09/26/2014 - 18:25
CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. असे निष्कर्ष बर्याचशा चाचण्यांचे निकाल आपण दिलेल्या दुव्यातून काढताना आढळतात.

In reply to by सुबोध खरे

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. या संसदिय इंग्लिश भाषेतल्या वाक्यांचे संसदिय सोवळेपणा जरा कमी करून केलेले शुद्ध मराठी भाषांतरः आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्या शास्त्रिय चाचण्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मानदंड वापरून केलेल्या नाहीत किंवा कमी प्रतिचे मानदंड वापरून केलेल्या आहेत. शिवाय चाचण्यांच्या निष्कर्षांसंबंधीच्या लिखाणात निर्णय प्रसिद्ध करणार्‍यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे चाचण्यांचे निर्णय जरी सकारात्मक दिसत असले तरी ते शास्त्रिय दृष्ट्या विश्वासू नाहीत. यावरून असे दिसत आहे की, जोपर्यंत होमिओपथिच्या योग्य प्रकारे शास्त्रिय चाचण्या होत नाहीत तोपर्यंत तिला "शास्त्रिय" पद्धत मानणे योग्य होणार नाही. ---------- * "not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias." या शब्दप्रयोगानंतर "there is a legitimate case for further evaluation" हा शब्दप्रयोग... "तुमची चाचणी अशास्त्रिय आहे (अजून इस्काटून... चाचणी फालतू आहे, प्रथम जरा नीट शास्त्रिय चाचण्या करायला शिका !) आणि शिवाय हेतूपूर्वक खोटे निष्कर्ष काढण्याचा तुमचा प्रयत्न पकडला गेला आहे."... हे सांगण्यासाठी केलेली संसदिय वाक्यरचना आहे. ** इंग्लिश इज अ फन्नी लँग्वेज... आणि गोर्‍यांनी ती मुद्दामहून (बाय डिझाईन, नॉट बाय अक्सिडेंट) तशी बनवली आहे ;)

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 18:54
२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी च्या जहिरात करणार्‍या साईट आहेत. गर्डिअन वर इथल्या सारखी चर्चा चालु आहे, बरेसचे उपहासात्मक आहेत.

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे Fri, 09/26/2014 - 19:02
कोऽहम् साहेब आपण दिलेले दुवे वाचून पाहिले. दुर्दैवाने यातील एकही दुवा सज्जड पुरावा म्हणून वापरता येत नाही. कुठे ५० रुग्णांवर( २५ औषधे घेणारे आणी २५ प्लासिबो घेणारे) प्रयोग करून त्यातून अनुमान काढलेले आहे तर कुठे शब्द बंबाळ लिखाण दिसते. शेवटचा दुवा तर लोकांनी पाठविलेल्या पत्रांचा आहे. त्यातील पहिलाच उतारा उद्धृत करीत आहे. हा होमियोपथीच्या (नसलेल्या) परिणामावर आहे. Is there any proof that homeopathic medicine works? J Burgess, Norwich It is possible to answer correctly both yes and no to this question. From a scientific point of view, no it doesn't work, from the believers' point of view, yes it does. This contradiction can easily be explained: Homoepathic medicines are made by diluting to a very high degree, substances which could have an effect in higher concentrations on the workings of the body. The dilution is such that it is practically impossible to find in these medicines one single molecule of the so-called, active ingredient. In other words it's only there on the label. Those who advocate homeopathic medicine argue that the substance doesn't need to be there, it has left its "influence" on the water or other harmless materials in the medicine. This is of course utter nonsense, it is not possible for a chemical or element to leave an imprint, some kind of force on air or water not containing it. If this were so, then the air we breath and the water we drink are themselves homeopathic medicines; no need to bother with the little pills, just breathe! Now, if we are talking of medicines, it is usual, nay a legal requirement, to test them thoroughly before they are marketed. One of the final tests, is the so-called double blind trial. Controlled groups of patients or human guinea pigs are given either the medicine itself or a placebo. In a double blind trial, neither the person administering the medicine nor the patient knows if it is a placebo or truly the medicine. By this means, those running the experiment can best assess whether or not a medicine has an effect. It is claimed by the advocates of homeopathic medicines that double blind trials have been carried out and shown to have worked. These claims must be taken with a great deal of scepticism, the conventional medical establishment is of the opinion that any such trials were conducted incorrectly. However, it has also been shown by conventional medical experimentation that the placebo effect is a very important one in bringing about cures. If people believe that they will get better, they often do so on their own resources. In other words, it can be shown that the visit to the doctor is a more important part of the cure than the pills afterwards. The placebo effect is by no means a rare or insignificant one, quite the contrary in fact. Thus we can be relatively sure that the believers in homeopathy, much of the time, will be able to justify their own argument by their belief. In other words it will work for them. But it is also quite clear that it will not always work. Not too long ago, a hospital came under severe criticism following the death of a young girl who developed diabetes. The parents took her to the hospital, but it was not made clear to them that she needed urgent and immediate treatment. The parents, advocates of natural medicines, undecided what to do, gave her homeopathic treatment whilst they thought about it. Shortly afterwards, their daughter went into a coma from which she never recovered. A classic example of where belief is not enough. बहुसंख्य वेळेस असेच तकलादू पुरावे पुढे येत राहतात त्यामुळे होमियोपाथीत तथ्य आहे असे म्हणणे मला तरी कठीण जाते. यात माझा पूर्वग्रह नक्कीच असेल तरीही मी जेंव्हा जेंव्हा उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा मला सज्जड पुरावा अजूनपर्यंत तरी आढळलेला नाही. मी एक क्ष किरण तज्ञ आहे आणी रोजच्या व्यवसायात मी एकही औषध वापरत नाही कि रुग्णांना देत नाही त्यामुळे मला माझ्या व्यवसायाचे ( किंवा अस्तित्वाचे) समर्थन करण्याची जरूर नाही. ज्याला भौतिकशास्त्राची तोंड ओळख आहे अशा कोणालाही क्ष किरण किंवा कर्णातीत ध्वनी (ULTRASOUND) कसा काम करतो हे सहज पडताळता येईल.कोणत्याही प्रयोगशाळेत ते सहज सिद्ध करता येईल आणी आपण शिकलेल्या मूळ शास्त्राच्या विपरीत कोणतीही उपपत्ती (THEORY ) नाही. असे असूनही मी एक गोष्ट म्हणतो कि कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. ज्याला जी पथी पचते आणी रुचते त्याने ती वापरावी. या वर मी कितीही लिहीले तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. हे जसे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल काही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर त्याचे विचार बदलत नाहीत तसेच आहे.प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचार पद्धतीनेच चालत असतो. ती बदलणे इतके सोपे नाही. हा विषय म्हणजे च्युईंग गम चघळण्य़ासारखा आहे. तुम्ही कितीही चघळा. पोटात काहीही जात नाही आणी काही वेळाने तोंडाला स्वादहि रहात नाही.

In reply to by सुबोध खरे

पोटे Sat, 09/27/2014 - 16:12
तो होमिओपथी डॉ. अज्ञानी होता. डायबेटेस हा अन्शुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. हार्मोन कमतरतेसाठी हार्मोनच द्यावे लागतात असे होमिओपथी सांगते. असो. माझी नागिण होमिओ च्या नक्स वोमिकाने व काली मुरने दोन दिवसात गेली होती. असाकलोवीरचे पाच डोस खाणे जिवावर आले होते म्हणुन मित्राला फोन केला होता. एम बी बी एस माणसाची नागिण बी ए एम एस वैदुने होमिओपथी औषध देउन दोन दिवसात घालवली होती !!!

In reply to by सुबोध खरे

आनन्दा Mon, 09/29/2014 - 10:11
सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ.च्या मोडर्न मेडिसिनबद्दलच्या अज्ञान- अट्टाहासानेच होमिओपॅथीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मोडर्न मेडिसिनला शिव्या घालून, किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा हट्ट धरून कोणाचेच भले होणार नाही. शेवटी रुग्णाला बरे वाटणे, आणि दीर्घकालीन स्वास्थ्य मिळणे हेच डॉ. चे अल्टिमेट लक्ष्य असले पाहिजे.

सामान्यनागरिक Fri, 09/26/2014 - 18:14
मला वाटते आपल्या सारख्या सामान्य पामरांनी मते देण्याऐवजी डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी. मी नुकतेच माझ्या मुलीला होमियोपथीच्याकालेजात घातले आहे. ( केवळ तिथेच विना डोनेशन प्रवेश मिळत होता). जर यावरील चर्चेमधुन काही वाईत निष्पन्न झाले तर मी तिला घरी बसविन धणीभांदी करावयास लावेन. आणि या पुढे होमी डाक्टर कडे जाण्यापूरण्यानीट विचार करेन.

In reply to by सामान्यनागरिक

पोटे Sat, 09/27/2014 - 10:09
होमिओपथी लोकाना अ‍ॅलोपथी शिकवुन त्याना अधिकृतरीत्या अ‍ॅलोपथी करत येण्याची शक्यता आहे. होमिपथीवर टीका करणारे इथले प्रकांड पंडित काही न वाचताच डायल्युशनवर बोलत आहेत. डालयुशन याचा अर्थ नुसते थेंबभर औषध मिसळणे नव्हे. त्ञासाठी ट्रिचुरेशन ही प्रक्रियाही करावी लागते. वजन आणि आकारमान यांचा कार्यक्षमतेशी सम प्रमाण असतेच हे विधान इथल्या लोकानी मांडावे हेही हास्यास्पद आहे. पूर्वी वीस जीबी ची हार्ड डिस्क पाव किलोची असायची. आज बत्तीस जीबी ची चिप तोळामासा असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
होमिओपाथी ( या लेखात बरेच इंग्रजी शब्द / वाक्ये वापरली आहेत. काही वेळी प्रतिशब्द माहीत नाहित म्हणून तर काही वेळा अर्थ सुस्पष्ट रहावा म्हणून. क्षमस्व !) माझ्या तंत्रदर्शन वरील लेखात मी लिहले होते की ". फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की ! " त्या लेखातील शेवटचा परिच्छेद हा तंत्राला लोक का बळी पडतात यावर होता व श्रद्धा व अगतिकता ही दोन कारणे नमुद केली होती. त्यापुढे आणखी एक उदा. म्हणून होमिओपाथीचा निर्देश केला होता. त्याला आक्षेप घेण्यात आले म्हणून हा लेख.

वाघाच्या जबड्यात

वेल्लाभट ·

In reply to by वेल्लाभट

गणपा Wed, 09/24/2014 - 20:17
फिटनेस बघ वाघाचा, येड्या ! ७० किलोच्या माणसाला फरफटत नेलान ! मंग ?!
एका गंभीर घटेनेवर मुळात धागा काढलात तो ही काहीसा मस्करीत काढल्या सारखा. ते कमी की काय म्हणुन ही विनोद केल्या सारखी प्रतिक्रिया. आपसे ये उम्मीद न थी.

In reply to by गणपा

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:37
वेल्लाभटांच्या कुठल्या प्रतिक्रिये मुळे तुमच्या त्यांच्या बद्दल च्या "उम्मीद" वाढल्या होत्या किंवा सेट झाल्या होत्या?

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 16:59
>>>>माणूस मरतोय समोर; व्हिडियो कसला काढतात अडानचोट? तद्दन कोडगेपणा, भावनाहीनतेचं उत्तम उदाहरण. सुरक्षारक्षकाला, पोलिसाला, फायर ब्रिगेडला बोलवाव; त्या वेळी जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं सोडून.... व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील). व्हिडीओ चित्रीकरण करणं कोडगेपणा किंवा भावनाहीनतेचे उदाहरण म्हणता येणार नाही. (फेसबुकावर शेअर करणं नक्कीच चुकीचं आहे.) पण ह्या चित्रीकरणाचा प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला, मिडियाला आणि त्या तरूणाच्या नातेवाईकांना प्रसंगाचे तपशिल मिळण्यास मदत होते. चुक प्राणिसंग्रहालय प्रशासनाची असेल तर प्रशासनाविरुद्ध खटला उभा करण्यात त्या तरूणाच्या नातेवाईकांना सबळ पुरावा मिळू शकतो. प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर मिडियाला त्याविरुद्ध आवाज उठवायला पुरावा मिळू शकतो. सुरक्षा रक्षकांची किंवा सुरक्षा व्यवस्थेत उणीव राहीली असेल तर कारवाई करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाला घटनेचे खरेखुरे (सांगीला सांगी आणि... असे नाहीत) तपशिल मिळून अशा व्हिडीओची मदत होऊ शकते. रस्त्यावरचे अपघात, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट वगैरे वगैरे प्रकरणांमध्ये शेजारपाजारच्या दुकानांचे किंवा कोणी पर्यटकाने केलेल्या व्हिडिओ शुटींगचे फुटेज तपासले जातेच जाते. गुन्हेगारांना पकडायला त्याचा उपयोग होतो. पुन्हा सांगतो, फेसबुकावरील शेअर करणे मलाही खटकले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेल्लाभट Wed, 09/24/2014 - 17:26
व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील).
विश्वास दांडगा आहे.

In reply to by वेल्लाभट

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 17:54
विश्वास दांडगा आहे कारण अजून आपल्या समाजात चांगुलपणा शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसत असतात. आत्ताच ती चित्रफित पाहिली. कदाचित कोणी गेलं नसेल लगेच. पण प्रत्येकजण त्या वाघाचं लक्ष विचलीत करण्याचा आणि तरूणाला वाचवायचा आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. एव्हढ्या भयानक प्रसंगात स्वतःही भांबावल्या अवस्थेत त्या वाघाला त्या तरूणापासून दूर पळवायचा प्रयत्न प्रत्येकाचा होता. असो. तो तरूण आत कसा पडला आणि जवळपास एकही सुरक्षा रक्षक का नव्हता हे समजत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 09/24/2014 - 18:00
हेतू कसाही असला तरी वरुन आलेल्या दगडाने वाघ बिथरला आणि त्याचक्षणी निर्णायक हल्ला केला(दगडफेकीपासून दूर घेऊन जाणे) असे प्रथमदर्शनी स्पष्ट वाटतेय.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 18:35
शक्यता आहे गवि. पण लोकं काय करू शकत होते? शक्यतो आरड्याओरड्याने दगड वगैरे मारून वाघाचे लक्ष विचलीत करावे आणि पळवून लावावे इतका साधा विचार त्या हतबल जमावाने केलेला दिसतो आहे. जंगलात कसे शिकारीला ढोल, थाळ्या वाजवून हाकारे घालतात आणि वाघाला आपल्याला हवे त्या क्षेत्रात आणतात तसाच कांहीसा विचार जमावाने केला असेल. पण वाघ आपल्या शिकारीला घेऊनच पळेल आणि आपला सदहेतू विफल होईल असे वाटले नसेल. प्रसंगाचं गांभिर्य, भांबावलेपण, अननुभवीपणा, आयुष्यात प्रथमच पाहात असलेलं दृष्य वगैरे वगैरे गोष्टींनी भारलेल्या मेंदूत सारासार विवेक हरवला आणि दुर्घटना घडली असे मला वाटते. सुरक्षारक्षकाची अनुपस्थिती अजूनही मनाला पीळ पाडते आहे.

In reply to by गवि

काउबॉय Sat, 09/27/2014 - 12:01
एक तर गोळी घाला अथवा तोंडाने आवाज करा वा प्रतिक्रियाच देऊ नका हे उत्तम, उगा पुचाट हल्ला करून वाघाला डिवचतानाआपण त्याचे काही बिघड्वु शकत नाही याची जाणीव कशाला करून द्यायची ते सुध्दा मुक्त जंगल न्हवे तर त्याच्या हक्काच्या वावराच्या अतिशय मर्यादित परिसरात :(

सुहास.. Wed, 09/24/2014 - 17:45
धागा घेतलास , छान केले ! हल्ली इतक्या क्लिप्स येतात,यु ट्युब वर तर पसाराच आहे !! त्या युस वगैरै च्या अपघाताच्या, ते कुणी मगरीच्या जबड्यात हात गमावल्याचा तर, त्यामुळे एका बाजुने मन थोड असंवेदनशील होत चाललय हे ही तितकेच खरे :) अर्थात , त्या पोरीचे पब बाहेर जे हाल झाले होते ( परत एकदा...शीSSट ) अक्षरशः मनात कालवाकालव झाली होती ... एखाद्याने ती पहिल्यांदा बघीतली की येतो काटा वगैरै ..पण ते मिडिया इतकी लांबड लावतात की तो मृत्युचा तमाशाच वाटायला लागतो ..तुर्तास इतकेच म्हणेन फास्ट वर्ल्ड, ग्लोबल वर्ल्ड नथिंग एल्स मॅटर !!

पैसा Wed, 09/24/2014 - 18:21
आताच मोबाईलवर क्लिपची सुरुवात बघून कसंतरी झालंय. बराच वेळ तो माणूस वाघासमोर बसून हेल्प हेल्प म्हणून ओरडत होता. :( ती क्लिप तिथेच बंद करून टाकली. झूच्या लोकाना बोलावायला कोणी गेले नसावेत बहुतेक. व्हिडिओ काढतायत मेले.

vikramaditya Wed, 09/24/2014 - 19:59
पोलीसांना बोलवायला पाहीजे हे बरोबरच आहे. परंतु बरेचदा ते सुद्धा ज्याला आपण 'ईल प्रीपेअर्ड' म्हणतो तसे असतात. म्हणजे उदा. अतिरेकी येणार एके-४७ घेवुन आणि आपले पोलीस बिचारे एक काठी घेवुन उभे. वाघासमोर तावडीत सापडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नेमके काय करावे लागेल ह्याचे ज्ञान/ प्रशिक्षण सुरक्षा दला कडे असेल का हा वेगळाच विषय आहे. आपल्याकडे बरेचदा अपघातग्रस्तांना हातगाडी वर टाकुन नेले जाते. ह्या शिवाय, वर्षानुवर्षे पिंजर्यात कोंडलेल्या असहाय्य प्राण्यांना बघायला जाणा-या लोकांचे वर्तन भयानक असते. दगड, ब्लेड पासुन सगळ्या वस्तु प्राण्यांवर फेकल्या जातात. असा आपला बहुसंख्य क्राउड असतो.

In reply to by कंजूस

हाडक्या Wed, 09/24/2014 - 20:51
भौ.. स्पार्टकस भाऊंचा 'शिकारीच्या संदर्भातली लेख-मालिका व्यर्थच म्हणायची का ? आता त्या वाघाला मारण्याची मागणी नको येऊ दे म्हणजे झाले.

In reply to by कंजूस

भिंगरी Sun, 10/05/2014 - 00:56
जब जानवर कोई इंसान को मारे कहते है दुनियामे,बेहशी उसे सारे. (किती निरपराध जनावरांचे जीव माणसाने घेतले आहेत) चुप क्यूं है संसार?

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/25/2014 - 13:03
त्या तरूणाचि मानसिक स्थिती ठीक नव्हती असे वाचले इंग्रजी पेपरात.भविष्यात हे प्रसंग कसे टाळता येतील ह्यावर मिपाकरांनी चर्चा करावी.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:20
ह्म्म... आज ती क्लीप पाहिली, दगड मारल्यावर वाघ बिथरला ! लोखंडाची जी जाळी आहे ती सहज ओलांडुन जाता येइल अशी दिसत आहे ! निदान माणसांना, लहान मुलांना सहज ओलांडुन जाता येइल अशी जाळी नसावी ! बाकी असे अनेक व्हिडीयो पाहिले आहेत, खुप वर्षांपूर्वी Eugene Armstrong नावाच्या अमेरिकन सैनिकाचे शीर धडा वेगळे करण्याचा व्हिडीयो कोणी तरी मला पाठवला होता { तो व्हिडीयो पाहण्याच्या आधी तो कशाचा आहे हे माहित नव्हते}, तो पाहिल्या नंतर २ दिवस मला धड झोप आली नव्हती !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

चैदजा Sun, 09/28/2014 - 19:17
पुण्याच्या सर्पोद्यान्यात देखील असेच आहे. सुसरी आणि सापांच्या पिंजरे तर असे आहेत की कडेवर बसलेला मुलगा टुणकन ऊडी मारुन आत जाईल. मी मागेच जॅकडीं.ना त्याबद्द्ल विचारणार होतो.

In reply to by चैदजा

जॅक डनियल्स Sun, 10/05/2014 - 00:36
जेंव्हा तुम्ही कुठल्या पण सार्वजनिक ठिकाणी जातात तेंव्हा तुमची काही तरी जवाबदारी असते. म्हणजे उदा. लग्नाला जाताना चांगले कपडे घालून जायचे, मयताला जाताना साधे जायचे. त्याप्रमाणेच जेंव्हा तुम्ही प्राणीसंग्रहालयात जातात तेंव्हा तुम्ही जवाबदारी ने वागला तर कडे वरचा मुलगा सुसरीच्या खड्यात पडणार नाही. लहान मुले वाकून पडणार नाही एवढी सगळ्या भिंतीची उंची आहे. अजगर-मगर-घोणस यांचे पिंजरे लोकं किडे करतात म्हणूनच बंद आहेत. प्राणीसंग्रहालयात पाळायचे जे काही नियम असतात ते जर पाळले तर अपघात होणार नाहीत.

हुप्प्या Sun, 09/28/2014 - 22:14
एखाद्या कागदाला (वर्तमानपत्र वगैरे) आग लावून तो पिंंजर्यात टाकला असता तर कदाचित वाघ घाबरुन पळाला असता. दगडापेक्षा आगीला तो जास्त घाबरतो असे वाटते. अर्थात ही पश्चात बुद्धी झाली.

मेघना मन्दार Wed, 10/01/2014 - 12:36
वाघ म्हण्जे काय कुत्रा आहे का दगड मारुन त्याला पळ्वायला किन्वा लक्ष दुसरीकडे वळ्वायला?? वाघाच्या टेरिट्रि मध्ये अचानक कोणि माणुस आला तर तो सुद्धा बावचळ्ला असेल. वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे.

In reply to by मेघना मन्दार

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 03:01
>>>>वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे. हो! दगड मारले नसते तर, उगीच थोडा वेळ, त्या तरूणाशी गुदगुल्या गुदगुल्या खेळून, कंटाळून, वाघ गेला पण असता.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय Mon, 10/06/2014 - 01:57
तो शक्य तितका त्याच्या कंफर्टझोनमधे आलेल्या अनाहूत पाहुण्याशी इंटरेक्षन टाळतच होता तो मुला पेक्षा जास्त गोंधळला असावा आणि पब्लिक कडून अनावधानाने त्याचा गोंधळ भीतीमधे बदलेल आशा प्रकारची कृती घडली दोष पब्लिकच्या इच्छेचा नाहिये पण जसे म्हणतात ना Person shouldn't be known by his intention but by the results of his action....that's what really counts.

जॅक डनियल्स Sun, 10/05/2014 - 01:21
मी जेंव्हा ही बातमी वाचली तेंव्हाच मला जाणवले होते की १००% मुलाची चूक आहे. संग्रहालयातील प्राण्यांची मानसिक स्थिती वेगळी असते, त्यांना फक्त १-२ माणसांची जवळून सवय असते, एक खाणे देणारा आणि दुसरा पिंजरा साफ करणारा. साधारण पणे सगळे पांढरे वाघ हे प्राणी संग्रहालयात च लहान चे मोठे झालेले असतात. (म्हणजे पिल्लू आणले जाते आणि मग ते वाढवले जाते. ) त्यांना फक्त त्यांना दिलेले खाणे (जिवंत नाही- मासाचे तुकडे ) शांतपणे खाणे याचीच सवय असते. त्यामुळे हे प्राणी त्यांच्या कीपर बरोबर शांत पणे राहतात कारण त्यांना त्यांची सवय असते. जर कोणी डॉ. आमटे चे नेगल वाचले असेल किंव्हा त्यांचे व्हिडीओ पहिले असतील तर त्यांना कल्पना येइल. पण त्यांच्या पिंजऱ्यात कुठली पण परकीय गोष्ट आली तर (खार, कुत्रा, माणूस इ. ) तर ते बावचळून जातात, त्यांना नक्की काय करायचे ते समजत नाही, ते त्यांच्या "कमफ़र्त झोन च्या" बाहेर असते. खूप लोकं जेंव्हा प्राणी संग्रहालयात जातात तेंव्हा त्यांचे डोके घरी ठेवून जातात, प्राणी झोपला आहे त्याला दगड मार, काठीने त्याला ढोस, आवाज काढ असले प्रकार करतात . मी स्वतः खूप लोकांना या वरून शिव्या दिल्या आहेत. सर्पोद्यान मध्ये दगड मारण्याऱ्याला दंड करायचो आणि जर पैसे नसतील तर भर चौकात उठाबशा काढायला लावायचो. खूप सारी लोक पोरींना इम्प्रेस करायला अनेक गोष्टी करतात , मी एका मुलाला दंड केला होता कारण तो त्याच्या छावीला इम्प्रेस करायला सुसरीच्या जाळीवर चढला होता. लोकं जर थोडे विचार करून प्राणी संग्रहालयात वागले तर अश्या गोष्टी होणार नाहीत . दुसऱ्या लोकांच्या घरी जाताना जसे आपण सभ्य पणे वागतो तसे च जर प्राणी संग्रहालयात वागलो तर प्राण्यांना पण त्रास कमी होइल.

In reply to by जॅक डनियल्स

vikramaditya Wed, 10/08/2014 - 16:28
असो वा पुरातन किल्ले / वास्तु, आपले लोक खरच डोके घरी ठेवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नुकसान करण्याकडे त्यांचा कल असतो. तुम्ही त्यांना झापल्याचे वाचुन फार बरे वाटले. एकंदरीतच बाहेरीलही भटक्या पशु-पक्षांना त्रास देणा-यांना आमचा ग्रुप जोरदार झापतो. बेअक्कल लेकाचे!

अर्धवटराव Sun, 10/05/2014 - 10:28
आपला बेशिस्तपणा आपल्याला जिथे तिथे नडतो. एक माणुस बिचारा हकनाक मेला... त्याची चुक होतीच, पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. . रस्त्यांवर तर आपण सर्कस करतोच; जत्रेत, इस्पीतळात, बस-ट्रेनमधे, आणि आता प्रत्यक्ष वाघाच्या पिंजर्‍यात... अवघड आहे.

In reply to by अर्धवटराव

प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2014 - 10:47
>>>>पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. म्हणजे नक्की काय? आता, प्रत्यक्ष त्या प्रसंगापासून इतक्या दूर सुरक्षित वातावरणात, आपल्या नजरेसमोर कोणी मरत नसताना, आपल्याला (त्यात मीही आलोच) बरेच शहाणपण सुचू शकते पण तिथे समोर मृत्यूचा खेळ चालू असताना, आपले हातपाय गळाल्या अवस्थेत त्या तरुणाला वाचवण्यासाठी वाघाचे लक्ष विचलीत करणे, त्याच्या सावजा वरून हटविणे हे 'प्रथमोपचारासारखे' वाटले असल्यास लोकांना दोष देता येणार नाही असे मला वाटते. फक्त एव्हढ्या गर्दीत अशा प्रसंगातही आगीचा प्रयोग कोणी केला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. तसा केला असता तरीही वाघ आपल्या सावजाला घेऊन त्या घोळक्यापासून दूर आंत गेला असता आणि तो प्रयोगही फसलाच असता. पण उतावळेपणे वागून तो जमाव जाणूनबुजून त्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असे चित्र उभे करणे अन्यायकारक ठरेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव Mon, 10/06/2014 - 20:35
उतावळेपणा म्हणता येईल, जाणुनबुजुन नाहि म्हणता येणार. नक्की काय करायला हवं होतं हे मी खात्रीने सांगु शकत नाहि. पण असा बाका प्रसंग उभा राहिला असताना ( प्रसंग इतका खतरनाक अजीबात नव्हता) आम्हि सर्वप्रथम शक्य तितके कमरेचे पट्टे आणि तत्सम गोष्टी एकत्र करुन पिडीत व्यक्तीला वर ओढण्याचे प्रयत्न केले आहेत. सदर घटनेत नेमकं काय करायला हवं होतं हे सांगणं कठीण आहे. इथे रेस्क्युचा स्कोपच फार कमि आहे. पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.

In reply to by अर्धवटराव

vikramaditya Wed, 10/08/2014 - 16:38
पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.
पर्फेक्ट.

In reply to by वेल्लाभट

गणपा Wed, 09/24/2014 - 20:17
फिटनेस बघ वाघाचा, येड्या ! ७० किलोच्या माणसाला फरफटत नेलान ! मंग ?!
एका गंभीर घटेनेवर मुळात धागा काढलात तो ही काहीसा मस्करीत काढल्या सारखा. ते कमी की काय म्हणुन ही विनोद केल्या सारखी प्रतिक्रिया. आपसे ये उम्मीद न थी.

In reply to by गणपा

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:37
वेल्लाभटांच्या कुठल्या प्रतिक्रिये मुळे तुमच्या त्यांच्या बद्दल च्या "उम्मीद" वाढल्या होत्या किंवा सेट झाल्या होत्या?

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 16:59
>>>>माणूस मरतोय समोर; व्हिडियो कसला काढतात अडानचोट? तद्दन कोडगेपणा, भावनाहीनतेचं उत्तम उदाहरण. सुरक्षारक्षकाला, पोलिसाला, फायर ब्रिगेडला बोलवाव; त्या वेळी जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं सोडून.... व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील). व्हिडीओ चित्रीकरण करणं कोडगेपणा किंवा भावनाहीनतेचे उदाहरण म्हणता येणार नाही. (फेसबुकावर शेअर करणं नक्कीच चुकीचं आहे.) पण ह्या चित्रीकरणाचा प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला, मिडियाला आणि त्या तरूणाच्या नातेवाईकांना प्रसंगाचे तपशिल मिळण्यास मदत होते. चुक प्राणिसंग्रहालय प्रशासनाची असेल तर प्रशासनाविरुद्ध खटला उभा करण्यात त्या तरूणाच्या नातेवाईकांना सबळ पुरावा मिळू शकतो. प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर मिडियाला त्याविरुद्ध आवाज उठवायला पुरावा मिळू शकतो. सुरक्षा रक्षकांची किंवा सुरक्षा व्यवस्थेत उणीव राहीली असेल तर कारवाई करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाला घटनेचे खरेखुरे (सांगीला सांगी आणि... असे नाहीत) तपशिल मिळून अशा व्हिडीओची मदत होऊ शकते. रस्त्यावरचे अपघात, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट वगैरे वगैरे प्रकरणांमध्ये शेजारपाजारच्या दुकानांचे किंवा कोणी पर्यटकाने केलेल्या व्हिडिओ शुटींगचे फुटेज तपासले जातेच जाते. गुन्हेगारांना पकडायला त्याचा उपयोग होतो. पुन्हा सांगतो, फेसबुकावरील शेअर करणे मलाही खटकले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेल्लाभट Wed, 09/24/2014 - 17:26
व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील).
विश्वास दांडगा आहे.

In reply to by वेल्लाभट

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 17:54
विश्वास दांडगा आहे कारण अजून आपल्या समाजात चांगुलपणा शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसत असतात. आत्ताच ती चित्रफित पाहिली. कदाचित कोणी गेलं नसेल लगेच. पण प्रत्येकजण त्या वाघाचं लक्ष विचलीत करण्याचा आणि तरूणाला वाचवायचा आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. एव्हढ्या भयानक प्रसंगात स्वतःही भांबावल्या अवस्थेत त्या वाघाला त्या तरूणापासून दूर पळवायचा प्रयत्न प्रत्येकाचा होता. असो. तो तरूण आत कसा पडला आणि जवळपास एकही सुरक्षा रक्षक का नव्हता हे समजत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 09/24/2014 - 18:00
हेतू कसाही असला तरी वरुन आलेल्या दगडाने वाघ बिथरला आणि त्याचक्षणी निर्णायक हल्ला केला(दगडफेकीपासून दूर घेऊन जाणे) असे प्रथमदर्शनी स्पष्ट वाटतेय.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 18:35
शक्यता आहे गवि. पण लोकं काय करू शकत होते? शक्यतो आरड्याओरड्याने दगड वगैरे मारून वाघाचे लक्ष विचलीत करावे आणि पळवून लावावे इतका साधा विचार त्या हतबल जमावाने केलेला दिसतो आहे. जंगलात कसे शिकारीला ढोल, थाळ्या वाजवून हाकारे घालतात आणि वाघाला आपल्याला हवे त्या क्षेत्रात आणतात तसाच कांहीसा विचार जमावाने केला असेल. पण वाघ आपल्या शिकारीला घेऊनच पळेल आणि आपला सदहेतू विफल होईल असे वाटले नसेल. प्रसंगाचं गांभिर्य, भांबावलेपण, अननुभवीपणा, आयुष्यात प्रथमच पाहात असलेलं दृष्य वगैरे वगैरे गोष्टींनी भारलेल्या मेंदूत सारासार विवेक हरवला आणि दुर्घटना घडली असे मला वाटते. सुरक्षारक्षकाची अनुपस्थिती अजूनही मनाला पीळ पाडते आहे.

In reply to by गवि

काउबॉय Sat, 09/27/2014 - 12:01
एक तर गोळी घाला अथवा तोंडाने आवाज करा वा प्रतिक्रियाच देऊ नका हे उत्तम, उगा पुचाट हल्ला करून वाघाला डिवचतानाआपण त्याचे काही बिघड्वु शकत नाही याची जाणीव कशाला करून द्यायची ते सुध्दा मुक्त जंगल न्हवे तर त्याच्या हक्काच्या वावराच्या अतिशय मर्यादित परिसरात :(

सुहास.. Wed, 09/24/2014 - 17:45
धागा घेतलास , छान केले ! हल्ली इतक्या क्लिप्स येतात,यु ट्युब वर तर पसाराच आहे !! त्या युस वगैरै च्या अपघाताच्या, ते कुणी मगरीच्या जबड्यात हात गमावल्याचा तर, त्यामुळे एका बाजुने मन थोड असंवेदनशील होत चाललय हे ही तितकेच खरे :) अर्थात , त्या पोरीचे पब बाहेर जे हाल झाले होते ( परत एकदा...शीSSट ) अक्षरशः मनात कालवाकालव झाली होती ... एखाद्याने ती पहिल्यांदा बघीतली की येतो काटा वगैरै ..पण ते मिडिया इतकी लांबड लावतात की तो मृत्युचा तमाशाच वाटायला लागतो ..तुर्तास इतकेच म्हणेन फास्ट वर्ल्ड, ग्लोबल वर्ल्ड नथिंग एल्स मॅटर !!

पैसा Wed, 09/24/2014 - 18:21
आताच मोबाईलवर क्लिपची सुरुवात बघून कसंतरी झालंय. बराच वेळ तो माणूस वाघासमोर बसून हेल्प हेल्प म्हणून ओरडत होता. :( ती क्लिप तिथेच बंद करून टाकली. झूच्या लोकाना बोलावायला कोणी गेले नसावेत बहुतेक. व्हिडिओ काढतायत मेले.

vikramaditya Wed, 09/24/2014 - 19:59
पोलीसांना बोलवायला पाहीजे हे बरोबरच आहे. परंतु बरेचदा ते सुद्धा ज्याला आपण 'ईल प्रीपेअर्ड' म्हणतो तसे असतात. म्हणजे उदा. अतिरेकी येणार एके-४७ घेवुन आणि आपले पोलीस बिचारे एक काठी घेवुन उभे. वाघासमोर तावडीत सापडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नेमके काय करावे लागेल ह्याचे ज्ञान/ प्रशिक्षण सुरक्षा दला कडे असेल का हा वेगळाच विषय आहे. आपल्याकडे बरेचदा अपघातग्रस्तांना हातगाडी वर टाकुन नेले जाते. ह्या शिवाय, वर्षानुवर्षे पिंजर्यात कोंडलेल्या असहाय्य प्राण्यांना बघायला जाणा-या लोकांचे वर्तन भयानक असते. दगड, ब्लेड पासुन सगळ्या वस्तु प्राण्यांवर फेकल्या जातात. असा आपला बहुसंख्य क्राउड असतो.

In reply to by कंजूस

हाडक्या Wed, 09/24/2014 - 20:51
भौ.. स्पार्टकस भाऊंचा 'शिकारीच्या संदर्भातली लेख-मालिका व्यर्थच म्हणायची का ? आता त्या वाघाला मारण्याची मागणी नको येऊ दे म्हणजे झाले.

In reply to by कंजूस

भिंगरी Sun, 10/05/2014 - 00:56
जब जानवर कोई इंसान को मारे कहते है दुनियामे,बेहशी उसे सारे. (किती निरपराध जनावरांचे जीव माणसाने घेतले आहेत) चुप क्यूं है संसार?

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/25/2014 - 13:03
त्या तरूणाचि मानसिक स्थिती ठीक नव्हती असे वाचले इंग्रजी पेपरात.भविष्यात हे प्रसंग कसे टाळता येतील ह्यावर मिपाकरांनी चर्चा करावी.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:20
ह्म्म... आज ती क्लीप पाहिली, दगड मारल्यावर वाघ बिथरला ! लोखंडाची जी जाळी आहे ती सहज ओलांडुन जाता येइल अशी दिसत आहे ! निदान माणसांना, लहान मुलांना सहज ओलांडुन जाता येइल अशी जाळी नसावी ! बाकी असे अनेक व्हिडीयो पाहिले आहेत, खुप वर्षांपूर्वी Eugene Armstrong नावाच्या अमेरिकन सैनिकाचे शीर धडा वेगळे करण्याचा व्हिडीयो कोणी तरी मला पाठवला होता { तो व्हिडीयो पाहण्याच्या आधी तो कशाचा आहे हे माहित नव्हते}, तो पाहिल्या नंतर २ दिवस मला धड झोप आली नव्हती !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

चैदजा Sun, 09/28/2014 - 19:17
पुण्याच्या सर्पोद्यान्यात देखील असेच आहे. सुसरी आणि सापांच्या पिंजरे तर असे आहेत की कडेवर बसलेला मुलगा टुणकन ऊडी मारुन आत जाईल. मी मागेच जॅकडीं.ना त्याबद्द्ल विचारणार होतो.

In reply to by चैदजा

जॅक डनियल्स Sun, 10/05/2014 - 00:36
जेंव्हा तुम्ही कुठल्या पण सार्वजनिक ठिकाणी जातात तेंव्हा तुमची काही तरी जवाबदारी असते. म्हणजे उदा. लग्नाला जाताना चांगले कपडे घालून जायचे, मयताला जाताना साधे जायचे. त्याप्रमाणेच जेंव्हा तुम्ही प्राणीसंग्रहालयात जातात तेंव्हा तुम्ही जवाबदारी ने वागला तर कडे वरचा मुलगा सुसरीच्या खड्यात पडणार नाही. लहान मुले वाकून पडणार नाही एवढी सगळ्या भिंतीची उंची आहे. अजगर-मगर-घोणस यांचे पिंजरे लोकं किडे करतात म्हणूनच बंद आहेत. प्राणीसंग्रहालयात पाळायचे जे काही नियम असतात ते जर पाळले तर अपघात होणार नाहीत.

हुप्प्या Sun, 09/28/2014 - 22:14
एखाद्या कागदाला (वर्तमानपत्र वगैरे) आग लावून तो पिंंजर्यात टाकला असता तर कदाचित वाघ घाबरुन पळाला असता. दगडापेक्षा आगीला तो जास्त घाबरतो असे वाटते. अर्थात ही पश्चात बुद्धी झाली.

मेघना मन्दार Wed, 10/01/2014 - 12:36
वाघ म्हण्जे काय कुत्रा आहे का दगड मारुन त्याला पळ्वायला किन्वा लक्ष दुसरीकडे वळ्वायला?? वाघाच्या टेरिट्रि मध्ये अचानक कोणि माणुस आला तर तो सुद्धा बावचळ्ला असेल. वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे.

In reply to by मेघना मन्दार

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 03:01
>>>>वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे. हो! दगड मारले नसते तर, उगीच थोडा वेळ, त्या तरूणाशी गुदगुल्या गुदगुल्या खेळून, कंटाळून, वाघ गेला पण असता.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय Mon, 10/06/2014 - 01:57
तो शक्य तितका त्याच्या कंफर्टझोनमधे आलेल्या अनाहूत पाहुण्याशी इंटरेक्षन टाळतच होता तो मुला पेक्षा जास्त गोंधळला असावा आणि पब्लिक कडून अनावधानाने त्याचा गोंधळ भीतीमधे बदलेल आशा प्रकारची कृती घडली दोष पब्लिकच्या इच्छेचा नाहिये पण जसे म्हणतात ना Person shouldn't be known by his intention but by the results of his action....that's what really counts.

जॅक डनियल्स Sun, 10/05/2014 - 01:21
मी जेंव्हा ही बातमी वाचली तेंव्हाच मला जाणवले होते की १००% मुलाची चूक आहे. संग्रहालयातील प्राण्यांची मानसिक स्थिती वेगळी असते, त्यांना फक्त १-२ माणसांची जवळून सवय असते, एक खाणे देणारा आणि दुसरा पिंजरा साफ करणारा. साधारण पणे सगळे पांढरे वाघ हे प्राणी संग्रहालयात च लहान चे मोठे झालेले असतात. (म्हणजे पिल्लू आणले जाते आणि मग ते वाढवले जाते. ) त्यांना फक्त त्यांना दिलेले खाणे (जिवंत नाही- मासाचे तुकडे ) शांतपणे खाणे याचीच सवय असते. त्यामुळे हे प्राणी त्यांच्या कीपर बरोबर शांत पणे राहतात कारण त्यांना त्यांची सवय असते. जर कोणी डॉ. आमटे चे नेगल वाचले असेल किंव्हा त्यांचे व्हिडीओ पहिले असतील तर त्यांना कल्पना येइल. पण त्यांच्या पिंजऱ्यात कुठली पण परकीय गोष्ट आली तर (खार, कुत्रा, माणूस इ. ) तर ते बावचळून जातात, त्यांना नक्की काय करायचे ते समजत नाही, ते त्यांच्या "कमफ़र्त झोन च्या" बाहेर असते. खूप लोकं जेंव्हा प्राणी संग्रहालयात जातात तेंव्हा त्यांचे डोके घरी ठेवून जातात, प्राणी झोपला आहे त्याला दगड मार, काठीने त्याला ढोस, आवाज काढ असले प्रकार करतात . मी स्वतः खूप लोकांना या वरून शिव्या दिल्या आहेत. सर्पोद्यान मध्ये दगड मारण्याऱ्याला दंड करायचो आणि जर पैसे नसतील तर भर चौकात उठाबशा काढायला लावायचो. खूप सारी लोक पोरींना इम्प्रेस करायला अनेक गोष्टी करतात , मी एका मुलाला दंड केला होता कारण तो त्याच्या छावीला इम्प्रेस करायला सुसरीच्या जाळीवर चढला होता. लोकं जर थोडे विचार करून प्राणी संग्रहालयात वागले तर अश्या गोष्टी होणार नाहीत . दुसऱ्या लोकांच्या घरी जाताना जसे आपण सभ्य पणे वागतो तसे च जर प्राणी संग्रहालयात वागलो तर प्राण्यांना पण त्रास कमी होइल.

In reply to by जॅक डनियल्स

vikramaditya Wed, 10/08/2014 - 16:28
असो वा पुरातन किल्ले / वास्तु, आपले लोक खरच डोके घरी ठेवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नुकसान करण्याकडे त्यांचा कल असतो. तुम्ही त्यांना झापल्याचे वाचुन फार बरे वाटले. एकंदरीतच बाहेरीलही भटक्या पशु-पक्षांना त्रास देणा-यांना आमचा ग्रुप जोरदार झापतो. बेअक्कल लेकाचे!

अर्धवटराव Sun, 10/05/2014 - 10:28
आपला बेशिस्तपणा आपल्याला जिथे तिथे नडतो. एक माणुस बिचारा हकनाक मेला... त्याची चुक होतीच, पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. . रस्त्यांवर तर आपण सर्कस करतोच; जत्रेत, इस्पीतळात, बस-ट्रेनमधे, आणि आता प्रत्यक्ष वाघाच्या पिंजर्‍यात... अवघड आहे.

In reply to by अर्धवटराव

प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2014 - 10:47
>>>>पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. म्हणजे नक्की काय? आता, प्रत्यक्ष त्या प्रसंगापासून इतक्या दूर सुरक्षित वातावरणात, आपल्या नजरेसमोर कोणी मरत नसताना, आपल्याला (त्यात मीही आलोच) बरेच शहाणपण सुचू शकते पण तिथे समोर मृत्यूचा खेळ चालू असताना, आपले हातपाय गळाल्या अवस्थेत त्या तरुणाला वाचवण्यासाठी वाघाचे लक्ष विचलीत करणे, त्याच्या सावजा वरून हटविणे हे 'प्रथमोपचारासारखे' वाटले असल्यास लोकांना दोष देता येणार नाही असे मला वाटते. फक्त एव्हढ्या गर्दीत अशा प्रसंगातही आगीचा प्रयोग कोणी केला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. तसा केला असता तरीही वाघ आपल्या सावजाला घेऊन त्या घोळक्यापासून दूर आंत गेला असता आणि तो प्रयोगही फसलाच असता. पण उतावळेपणे वागून तो जमाव जाणूनबुजून त्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असे चित्र उभे करणे अन्यायकारक ठरेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव Mon, 10/06/2014 - 20:35
उतावळेपणा म्हणता येईल, जाणुनबुजुन नाहि म्हणता येणार. नक्की काय करायला हवं होतं हे मी खात्रीने सांगु शकत नाहि. पण असा बाका प्रसंग उभा राहिला असताना ( प्रसंग इतका खतरनाक अजीबात नव्हता) आम्हि सर्वप्रथम शक्य तितके कमरेचे पट्टे आणि तत्सम गोष्टी एकत्र करुन पिडीत व्यक्तीला वर ओढण्याचे प्रयत्न केले आहेत. सदर घटनेत नेमकं काय करायला हवं होतं हे सांगणं कठीण आहे. इथे रेस्क्युचा स्कोपच फार कमि आहे. पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.

In reply to by अर्धवटराव

vikramaditya Wed, 10/08/2014 - 16:38
पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.
पर्फेक्ट.
कालची धक्कादायक बातमी अनेकांनी वाचली असेलच. दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात झालेली घटना. एक २० वर्षाचा तरूण पांढ-या वाघाच्या खंदकात्/पिंज-यात पडला आणि वाघाने त्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात ऐकायला वाचायला मिळालेली काही मतं आणि त्यावर माझे विचार खालीलप्रमाणे. १) पण तो पडला कसा पहिले म्हणजे? - महत्वाचं हे आहे की सुरक्षाव्यवस्था, आपातकालीन यंत्रणा गेली कुठे? २) त्याच्याच उंगल्या नडल्या. / तो नशेत होता / त्याने आत्महत्या करायला उडी मारली असावी - हे काहीही असेल तरी ते काय आहे ते नंतर बघता आलं असतं.