मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ भाग -१

विअर्ड विक्स ·

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 09/22/2014 - 13:03
मलाही पिक्सेलेट झाल्यासारखे दिसताहेत. तसेच विश्वास मित्र मंडळाच्या लाकडी मखराचा वगैरे भाग खाली परत रिपीट झालाय. बाकी पुण्यासारखी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही हे आवडले! :-)

सूड Mon, 09/22/2014 - 16:47
ते ठीकाय, आधी "दुर्गान्डूंची लाडकी गाडी." हे बदलून घ्या आणि अनुस्वार योग्य ठिकाणी देता येत नसेल तर तो शब्द वापरणं थांबवा. अर्थ बदलतोय!!

In reply to by सूड

आदूबाळ Mon, 09/22/2014 - 20:06
विक्सभौ, बाकी "दुर्गाडू" हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

कंजूस Mon, 09/22/2014 - 21:52
प्रसाद देणारे देव मला फारच आवडतात .सत्यनारायणाचा प्रसाद महात्म्य सर्वांना माहितच आहे त्यामुळे सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर बासुंदी लवकर पाठवा.

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 09/22/2014 - 13:03
मलाही पिक्सेलेट झाल्यासारखे दिसताहेत. तसेच विश्वास मित्र मंडळाच्या लाकडी मखराचा वगैरे भाग खाली परत रिपीट झालाय. बाकी पुण्यासारखी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही हे आवडले! :-)

सूड Mon, 09/22/2014 - 16:47
ते ठीकाय, आधी "दुर्गान्डूंची लाडकी गाडी." हे बदलून घ्या आणि अनुस्वार योग्य ठिकाणी देता येत नसेल तर तो शब्द वापरणं थांबवा. अर्थ बदलतोय!!

In reply to by सूड

आदूबाळ Mon, 09/22/2014 - 20:06
विक्सभौ, बाकी "दुर्गाडू" हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

कंजूस Mon, 09/22/2014 - 21:52
प्रसाद देणारे देव मला फारच आवडतात .सत्यनारायणाचा प्रसाद महात्म्य सर्वांना माहितच आहे त्यामुळे सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर बासुंदी लवकर पाठवा.
बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ लेख वाचण्यापूर्वी आगाऊ (पूर्वीच्या या अर्थाने ,तसा मी सरळ माणूस आहे) सूचना १. गणेशाचा मोदकाशी संबंध ,बासुंदी कुठून आली असे प्रश्न विचारू नये. २. शीर्षक पाहून पाककृती सदरातील लेख इथे का टाकला असा प्रश्न विचारला तर आपल्यास रुचेल असे उत्तर मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नये. ३. हा लेख एका दुर्गाडू ने लिहिला असल्याने गणेश दर्शना व्यतिरिक्त अवांतर का लिहिले असा प्रश्न विचारण्याआधी आपण मिपावर किती अवांतर प्रतिसाद दिले आहेत याची उजळणी करावी. ४.

शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

एस ·

हे छान केलेत. दुसर्‍या धाग्यावच्या प्रतिक्रियेपेक्षा ती वेगळा धागा म्हणून का टाकली नाही हाच विचार करत होतो. जेव्हापासून माणसाने फेकून मारण्याची आयुधे (भाल्याच्या आदीम प्रकारापासून सुरुवात झाली) शोधून काढली तेव्हापासून मॅमथने सुरुवात करून आतापर्यंत मोजायला कठीण पडेल इतक्या प्राण्यांचा स्वार्थासाठी (अन्न यात समाविष्ट नाही) आणि क्रिडेसाठी समूळ संहार केला आहे... यात अनेक मानवी समाजही समाविष्ट आहेत. "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे Sun, 09/21/2014 - 23:17
+१०० फक्त "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे ! असहमत. सिंह हे तरस चित्ता बिबळ्या किंवा त्यांची पिल्ले यांना मारून टाकतात ( न खाता). तसेच तरस सुद्धा संधी मिळेल तेंव्हा सिंहाच्या छाव्यांना मारून टाकतात. या मध्ये आपल्या अन्ना साठीची स्पर्धा कमी करणे हि अन्तः प्रेरणा (INSTINCT) असते. तसेच हत्ती किंवा रानरेडे हे सिंह वाघ बिबळे यांच्या छाव्यांना ठार मारतात कारण ती पिल्ले मोठी होऊन त्यांना / त्यांच्या शावकाना धोका निर्माण करू शकतात.

In reply to by सुबोध खरे

एस Mon, 09/22/2014 - 12:57
इएसाहेब आणि खरेसाहेब, तुमचे दोघांचेही बरोबर आहे. जीवसृष्टीच्या दोन मूलभूत प्रेरणा म्हणजे जिवंत राहणं आणि वंशसातत्य टिकवणं (सर्व्हायवल आणि रिप्रॉडक्शन). ह्यामध्ये जे प्राणी/घटक स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांच्यापुढे इतरांवर अवलंबून रहाण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे हरित वनस्पती, त्यावर जगणारे तृणभक्षी आणि तृणभक्षकांवर जगणारे मांक्षभक्षी आणि या सर्वांच्या मृत्यूनंतर विघटनाचे काम करणारे सूक्ष्मजीव अशी अनेकस्तरीय आणि गुंतागुंतीची रचना उत्क्रांतीच्या माध्यमातून विकसित होत असते. यातला अन्न मिळवण्यासाठीचा एक हेतू सोडला तरी दुसर्‍यांना मारण्यामागे आपले वंशसातत्य टिकवणे ही नैसर्गिक प्रेरणाही तितकीच कारणीभूत असते. सिंह हे चित्त्यांनी किंवा बिबळ्यांनी केलेली शिकार हिसकावून घेतात. त्यामुळे उलट एखादा हुशार सिंह असता तर त्याने असे चित्ते आणि बिबटे मुद्दाम पाळले असते आणि आरामात बसून दिवस काढले असते. तरीही सिंह आपल्या प्रभावक्षेत्रात चित्त्यांना सहजासहजी राहू देत नाहीत. त्यांच्या पिल्लांवर हल्ला करून मारून टाकतात. ह्यामागे अन्न मिळवण्याची स्पर्धा कारणीभूत नसून चित्त्यांपासून स्वतःच्या बछड्यांचे संरक्षण करणे हे खरे कारण असते. सिंहच काय, बिबटे, चित्ते, तरस, रानकुत्री, लांडगे, हत्ती, गेंडे, गवे, असे सर्वच घटक हे इतरांचे वर्चस्व स्वतःच्या अस्तित्त्वाच्या आणि वंशसातत्याच्या आड येणार नाही ह्याचा जीवापाड प्रयत्न करतात. अजून एक भाग सिंहांच्या बाबतीत आढळतो किंवा बोकेपण की मादीच्या आधीच्या नर पिल्लांना नवा सिंह ठार मारून टाकतो, जेणेकरून मादी पुन्हा त्याच्याशी मीलनाला तयार होईल. ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.

In reply to by सुबोध खरे

तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण... १. तरस, चित्ता, बिबळ्या इत्यादी प्राणी पिल्ले मारतात त्याची मुख्यतः दोन कारणे आहेत : अ) दुसर्‍या नराचा वंश संपवणे : पहिला नर कमजोर होउन तो पराजीत झाल्यावरच हे शक्य असते. अर्थात कमजोर नराचा वंशच्छेद होतो. आ) स्वतःचा वंश वाढवणे : दुभती मादी जनन करायला असमर्थ असते. नविन नराने दुसर्‍या नराची पिल्ले मारल्यावर लवकरच ती जननक्षम होते आणि नविन, जास्त ताकदवान नराचा, वंश वाढवायला लायक होते. २. नवजात भावंडांमध्ये (सिबलिंग्ज) अन्नासाठीची स्पर्धा कमी करण्यासाठी हत्या होते. याचा एक महत्वाचा नैसर्गिक फायदा म्हणजे नविन पैदाशीतली निर्बल पिले नसल्याने मोजकेच असलेले सर्व अन्न सबल पिलांना मिळून पुढची पिढी बलवान राहते. वरील दोन्ही प्रकारचा संहार त्या प्राणीजमातीचा समूळ नाश करत नाही. उलट हे त्या जाती मानवी हस्तक्षेपाच्या अगोदर करोडो वर्षे तगून होत्या यावरून सिद्ध होते. किंबहुना हा संहार पुढची पिढी अधिक सबळ ठेवण्याच्या नैसर्गिक तरतूदीचे काम करते. या धाग्यात "प्राणीजमातीचा होत असलेला समूळ संहार" हा मुख्य मुद्दा असल्याने अवांतर टाळण्यासाठी मी येथे तेवढ्या खोलात गेलो नव्हतो.

प्यारे१ Sun, 09/21/2014 - 19:51
खूप छान माहितीपूर्ण लेख. स्वॅप्स ह्यांचं कौतुक आणि संपादक मंडळाचे प्रतिसादाला लेखरुपानं स्वतंत्रपणं प्रकाशित केल्याबद्दल आभार. अवांतरः बव्हंशी ;) शाकाहारी झाल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करुन घेतो.

विनोद१८ Sun, 09/21/2014 - 23:28
मानवी क्रुरतेचा हा असला बेजबाबदार व किळसवाणा खेळ पाहिल्यावर आपण स्वताला 'निसर्गातला सर्वात बुद्धिमान प्राणी' कसे काय म्हणवून घेउ शकतो ?? स्वताला तसे म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार माणसाला आहे का ?? गरज नसतानासुद्धा इतर प्राण्यांचा जगण्याचा नैसर्गिक हक्क हिरावून घेणे हे कुठल्या 'नैसर्गिक न्यायात' बसते याचा विचार व्हायलाच हवा. यावर अधिक चर्चा व्हावी. धन्यवाद स्वॅप्स, अप्रतिम लेख...!!

In reply to by विनोद१८

माणुस निसर्गातला सर्वात बुद्धीमान प्राणी आहे यात काहीही शंका नाही... मात्र तो त्याच्या बुद्धीचा उपयोग बहुतेक वेळी सारासार विवेकाने करण्याऐवजी अंध स्वार्थासाठी करतो हीच शोकांतिका आहे.

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:47
वीस हजारांहून अधिक सभासद असलेल्या मिपाकरांपैकी दोन-चार अपवाद सोडले (तेही निश्चित विदा नाही म्हणून) तर कोणी स्वतः शिकार करत असतील असं वाटत नाही... तर मग तुमचं प्रतिपादन तरी काय आहे?

In reply to by पिवळा डांबिस

छ्या, छ्या ! मिपावर लई "एकांडे" आणि "टोळीबाज (तेला हितं कंपू म्हंत्यात)" तरबेज शिकारी हैत... त्यात "कहीपे निगाहे कहीपे निशाना" स्टाईल विडबन्जिल्बीवाले कसलेले शिकारी ही तर मिपाची लैच खास (आणची आम्ची आव्डती) पेशालिटी हाय ! ;) :)

मदनबाण Mon, 09/22/2014 - 16:29
माणसा सारखा स्वार्थी आणि कॄतघ्न दुसरा प्राणी या भूतलावर शोधुनही सापडणार नाही ! पुढच्या पिढ्यांना फक्त फोटो आणि डिव्हीड उपलब्ध राहतील की काय अशी भिती वाटते! :( मनुष्य प्राण्याची प्रजा मात्र फारच वाढत चालली आहे, आपल देश सुद्धा या प्राण्यांच्या संख्येत पुढे आहे त्यामुळे या प्राण्याचे जीवन सुद्धा सध्याच्या काळात तणाव ग्रस्त झाले आहे. :( हल्ली या मोकाट सुटलेल्या प्राण्याच्या वागण्याचा मला तिटकारा येउ लागला आहे. :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

एस Mon, 09/22/2014 - 16:39
इस्पीकचा एक्का, सुबोध खरे, प्यारे१, दशानन, विनोद१८, वल्ली, पिवळा डांबिस, मदनबाण आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:46
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

एस Mon, 09/22/2014 - 17:12
मानवी हस्तक्षेपाचा अगदी अजाणतेपणानेही कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बेटांवर जेव्हा युरोपियन वसाहतवाद्यांनी पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी आणलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींमुळे तिथल्या मूळ पर्यावरणातील जैववैविध्याची प्रचंड हानी झाली. http://www.teara.govt.nz/en/human-effects-on-the-environment/page-3 तिथल्या नैसर्गिक वृक्षांच्या वनांची कत्तल करून पाईनवृक्षाची लागवड केली गेली. तळी आणि दलदलींच्या प्रदेशांवर भर घालून बुजवण्यात आली.
Coastal sand dune habitats have been altered dramatically, with native plants like pīngao (Desmoschoenus spiralis) being replaced by marram grass (Ammophila arenaria) and tree lupin (Lupinus arboreus). Herbaceous hawkweeds (Hieracium species) have taken over some grasslands, reducing them to wasteland, and are spreading into forests and along creeks.
न्यूझीलंड सी लायन आणि व्हेलसारख्या स्थानिक सस्तन प्रजातींची कत्तल तर झालीच, पण डुकरे, कुत्री आणि मांजरांसारख्या बाहेरून आणलेल्या प्राण्यांमुळे तिथल्या अपृष्ठवंशीय आणि सरपटणार्‍या प्राण्यांवर, पक्ष्यांवर भयानक परिणाम झाला.
Since the late 1700s, 54 more mammal species have been brought to New Zealand. Nineteen of these, including two devastating predators (the Indian grey mongoose and the North American raccoon) did not become established in the wild. However, 11 predators successfully became naturalised: three more rodents; three mustelids (ferrets, stoats and weasels); pigs, hedgehogs, possums, dogs and cats. These have had a massive impact on the remaining native birds, invertebrates and reptiles. Forty out of a total 91 land birds are now extinct, with many others in serious decline.
असेच एक उदाहरण म्हणजे मॉरिशस बेटावरील डोडो हा उडता न येणारा पक्षी. ह्याबद्दल वरच्या यादीत दुवा दिलाच आहे.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:50
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 14:31
शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.>>>>> एकतर हा अभिनवेश सोडुन द्या की मानवाचे अस्तित्व बाकीच्या प्रजाती नामशेष होऊ न देण्यासाठी आहे. एकुणच सर्व सजीव सृष्टीची निर्मीती ही कुठलाही हेतू समोर ठेवुन झालेली नाही. प्राणी तयार होयच्या आधी पण ही सॄष्टी होती आणि सर्व नष्ट झाले तरी ही सृष्टी असणारच आहे. अगदी साधी हत्यारे असणारा मानव सुद्धा गेल्या ४-५ हजार वर्षातला आहे. प्राण्यांच्या करोडो प्रजाती तयार झाल्या आणि करोडो नष्ट झाल्या. वाघ नष्ट झाले, साप नष्ट झाले तरी मानवाला काही फरक पडत नाही. गेल्या शंभर वर्षात वाघांची संख्या १% पण राहीली नाही, काय फरक पडला. हा फक्त स्मरण रंजन वाद आहे.

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 18:51
माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद. माणूस जे करतो तसेच करणार्‍या अजूनही काही प्राणीजाती असाव्यात. पण माणसाचा दिमाग लै पावरफुल पडल्याने त्याच्या प्रत्येक कृतीला लय धार आली. याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.

In reply to by बॅटमॅन

एस Mon, 09/22/2014 - 19:36
याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.
हेच तर आपल्यातल्या काही स्वार्थी लोकांना मान्य करायला जड जातेय.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 12:37
झाल्या काही प्रजाती नष्ट, मग काय नुकसान झाले. माणुस नव्हता तेंव्हा ही लाखो प्रजाती नष्ट झाल्या आणि नविन निर्माण झाल्या. नाही आता डोडो पक्षी दिसत, तर काय हरकत आहे. ह्या पर्यावरण वाद्यांचा कंटाळा आलाय

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 14:54
मोबाइलवर जास्त टंकू शकत नाही तरी अगदी थोडक्यात फक्त मुद्दे मांडतो. १. उत्क्रांतीच्या ओघात अनेक प्रजाती नष्ट झाल्या, पण त्यामागे नैसर्गिक कारणे होती. उदा. हिमयुग, उल्कावर्षाव, प्रबळ भक्षकांपुढे आणि खाद्य मिळवण्याच्या स्पर्धेत टिकाव धरता न येणे, बदलत्या परिस्थितीत स्वतःमध्ये बदल करता न येणे इ. २. ही प्रक्रिया अतिशय सावकाश घडते. मानवी हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेचा वेग लाखोहजारो पटींने वाढला. ३. उत्क्रांतीचा फायदा असा की स्पर्धा एकांगी नसते. कमकुवत जीव नष्ट होतात तर सबल जीव टिकतात. ४. मानवाकडून इतर प्रजातींच्या होणार्‍या कत्तलीत सरसकटपणा असल्याने त्याचा मास अ‍ॅण्ड रॅपिड एक्स्टिंक्शनसारखा परिणाम होतो. ५. यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. ६. मानवाचे अस्तित्त्व पर्यावरणाच्या संतुलनाशी इतके अविभाज्यपणे जोडले गेले आहे की पर्यावरणाची थोडीशी हानीसुद्धा आपल्याच पायावर मारून घेतलेली कुर्‍हाड ठरते. ७. नुकसान करणारे थोडेचजण असतात. पण त्याची फळे सर्वांनाच भोगायला लागतात. सविस्तर प्रतिसाद नक्कीच लिहीन. तूर्तास इत्यलम...

In reply to by एस

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 16:18
पर्यावरणाचे नुकसान होते म्हणजे तुमच्या डो़क्यात पर्यावरण म्हणजे जे आत्ता किंवा ५०-१०० वर्षा पूर्वी होते तेच खरे आणि बरोबर पर्यावरण आहे अशी काही कल्पना आहे. पर्यावरण पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होते आणि जर पुढे आण्विक युद्ध झाले तरी असणार आहे. पर्यावरणाचे कशानीच नुकसान वगैरे होत नाही. पर्यावरण फक्त असते. प्रजाती नष्ट झाल्या म्ह्णुन माणसाला काही फरक पडत नाही. तुम्ही नॉस्टालजिक होऊन तुम्हाला आवडते तेच पर्यावरण चांगले असा हेकट स्टँड घेताय. खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

In reply to by एस

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 18:44
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप. त्याबद्दल मी लिहीलेच आहे. दुसरा आक्षेप - पर्यावरण वादी ( विषेश करुन भारतातले ) हे भोंगळ, स्वार्थी, प्रसिद्धीलोलुप, स्वताच्या तुमड्या भरणारे, स्वता: सर्व गोष्टी एंजॉय करुन दुसर्‍यांनी गिल्ट देणारे, सर्व गोष्टीत काड्या घालणारे, दुकान चालवणारे, चुकीचा डाटा देणारे, खोटा डाटा देणारे, बागुलबुवा दाखवणारे, कुठल्या तरी राजकीय पक्षाचे/कंपनीचे एजंट, सत्याचा विपर्यास करणारे , फुकटे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 19:12
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप
माझा लेख नेमक्या कोणत्या गृहीतकावर आधारलेला आहे असे तुम्हांला वाटते?

In reply to by एस

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 19:39
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल. २. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही. ३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार. ४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या. ५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे. ताकः मी शाकाहारी आहे, मला स्वताला प्राणी मारुन खाणे जमत नाही. पण हे प्रजाती नष्ट होणे वगैरे पटत नाही

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 20:45
मुळात मी हा लेख स्वतंत्र असा लिहिला नव्हता. तो दुसर्‍या एका लेखावर दिलेला प्रतिसाद होता. मला स्वतंत्र लेख लिहायचा असता तर तो काही भागांमध्ये आणि अतिशय विस्तृतपणे, सर्व संदर्भांसहीत लिहिला असता. तसे नसल्यामुळे ह्या लेखात काही त्रुटी राहिल्या आहेत ज्यामुळे तुमचा माझ्याबद्दल काहीसा पूर्वग्रह निर्माण झाला आहे. राहिलेल्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे माझे पर्यावरण वि. विकास ह्या मुद्द्यावर काय मत आहे. तसेच मी रॅशनल इकॉलॉजिस्ट आहे की नाही, दुसर्‍या शब्दांत माझा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन डोळस आहे की नाही. लोकसंख्यावाढ हे फार गंभीर कारण आहे आणि त्याविषयी लेखात काहीच लिहिलेले नाही. ह्या आणि तुम्ही वर आजच्या पर्यावरणवाद्यांच्या दुटप्पीपणाच्या अनुभवावर जसे म्हणता आहात त्या काही कारणांनी कदाचित मीही काही मुद्दे मुद्दाम टाळत असेल आणि सोयीस्कर भूमिकाच तेवढी घेत असेल असा आपला माझ्याबद्दल ग्रह झाला असावा. ह्यातील सर्वच मुद्द्यांवर मला वेळेअभावी बोलता येणार नाही, पण आधी कृपया तो पूर्वग्रह मनातून काढून टाका अशी विनंती करतो. आता वरील प्रतिसादातील मुद्द्यांकडे वळूयात:
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल.
>>>प्रजातींच्या परस्परसंबंधातील अचानक आणि फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या बदलांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते, उत्क्रांतीतील जो प्रजातींचा र्‍हास होत असतो त्याचा वेग अतिशय म्हणजे अतिशय, काही लाख-कोटी वर्षांच्या कालावधीत घडत असतो. मानवाने केलेल्या बेकायदा आणि अनिर्बंध शिकारीमुळे प्रजाती नष्ट होण्याचा कालखंड हा लाखो वर्षांवरून काही दशकांवर येऊन ठेपला आहे. इतक्या बेसुमार र्‍हासाची भरपाई नवीन प्रजातींच्या रूपाने पर्यावरण करू शकत नाही कारण उत्क्रांती हे एकमेव साधन त्यासाठी उपलब्ध आहे. मानव हा प्रजाती मारू शकतो, नव्याने निर्माण करण्याइतपत अजून त्याची प्रगती झालेली नाही. पर्यावरण नेहमीच बदलणार, पण त्यातला बदल करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य मानवाने स्वतःच्या हाती घेऊ नये. शेदीडशे वर्षांपूर्वीचेच पर्यावरण मला हवे आहे असे म्हणणे प्रॅक्टीकली शक्य नाहीच. तसे माझे म्हणणेही नाही.
२. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही.
>>>चूक. जोपर्यंत मानवाची लोकसंख्या अतिशय लहान होती आणि शेतीसारख्या उत्पादनक्रियेचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत अन्न मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या शिकारीत आणि वाघ/डायनॅसोर आदींनी केलेल्या शिकारीत फरक नव्हता. मध्य भारतातील एका संस्थानिकाने गेल्या शतकाच्या सुरूवातीला तब्बल १४०० च्या आसपास वाघ केवळ शिकारीच्या हौसेखातर मारले. ह्याचे समर्थन तुम्ही कसे कराल?
३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार.
पिरॅमिड नष्ट/निर्माण होण्याचा वेग हा निसर्गनियंत्रित जोपर्यंत आहे तोपर्यंत हा युक्तिवाद ठीक आहे. वरती म्हटल्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शनचे तत्त्व ज्यात अंतर्भूत नाही अशा बेसुमार कृत्रिम कत्तलीतून केवळ सर्वंकष विनाशच मानवाच्याही वाट्याला येईल. मानव आहेच आणि राहणार हा दंभही अशाच गैरसमजुतीतून आलेला आहे. मानवाच्या जगण्याची सर्व साधने ही अंतिमतः निसर्गावरच अवलंबून आहेत. निसर्ग नसेल तर मानव कुठे जाणार?
४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या.
>>>जैवविविधतेचे काहीएक प्रयोजन नाही असे तुम्हांला थोडक्यात म्हणायचे आहे. हा समज चुकीचा आहे. जितकी जैवविविधता जास्त तितका नैसर्गिक निवडीला स्कोप जास्त असतो आणि एकूणच जीवसृष्टी तगून राहण्यासाठी जैवविविधता जितकी जास्त असेल तितकी ती शक्यता जास्त असते हे विविध सांख्यिकी आणि शास्त्रीय मॉडेलनी सिद्ध झालेले आहे.
५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे.
दुर्दैवाने सहमत. एकीकडे वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारी नैसर्गिक संसाधने अपुरी पडू लागलेली आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसंख्यावाढीचा वेग अगदीच ऋणात्मक होणेही त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू मृत्युपंथावर नेते हा एक गुंतागुंतीचा पॅराडॉक्स आहे आणि ते गणित सोडवणे, योग्य मेळ घालणे तितके सहजसोपे नाही. गेली कित्येक वर्षे मी यावर विचारमंथन करतो आहे पण यावर कुठलाच रामबाण उपाय नाही अशा निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. लोकसंख्या आहे त्यापेक्षा कमी करण्याला खूप सामाजिक-राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय मर्यादा आहेत ज्यांची विस्तृत चर्चा इथे शक्य नाही. सध्यातरी आहे तो इकोबॅलन्स टिकवून ठेवणे इतकेच आपल्या हाती आहे.

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 09/23/2014 - 23:22
मला नाही वाटत डोळ्यांवर झापडे बांधलेले हे मान्य करतील. अगदी सखोल, काटेकोर संशोधनातून पुढे आणलेल्या शास्त्रीय पुराव्यांनाही 'हे असं काही घडतच नसतं, तुम्ही अमुकतमुकचे हस्तक आहात, दुटप्पी आहात' वगैरे पद्धतींच्या दाव्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. असोत. गोबेल्सनीती. ...ठासून बोला!

In reply to by सनी स्॓आस

एस Tue, 09/23/2014 - 23:47
तुम्ही ह्याची काही उदाहरणे देऊ शकाल काय? सरसकट सर्वच पर्यावरणवाद्यांना महाचोर ठरवून मोकळे होणे योग्य तर नाहीच, तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय असाही लोकांचा भ्रम होऊ शकेल.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 14:19
ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे>>>>>> हे विधान कुठल्या जोरावर. समजा जर कोणी तसे करतच असेल तर तो गुन्हा असे तुम्हीच ठरवणार. ही तर हुकुमशाही झाली.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 14:23
मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे >>>>>>> असे का हो? मग ह्याचे काय उत्तर १. मांजर उंदराला खेळवुन खेळवुन मारते. हा मनोरंजनाचा प्रकार नाही का? २. सिंह , वाघ किंवा सर्वच प्राणी स्वता पेक्षा दुबळ्या आणि संरक्षण करु न शकणार्‍या प्राण्यांना मारतात हे कसे काय चालते तुम्हाला? तुम्ही असे का नाही म्हणत, "वाघा तुला अन्नच पाहीजे असेल तर दुसर्‍या वाघालाच मारुन खा. हरिणाची पिल्ले मारुन खाणे हे घृणास्पद आहे."

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 20:47
वर दिलेला माझा हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614715#comment-614715
ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.
मग कसा बरं फरक नाही?

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 16:19
खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

पैसा Tue, 09/23/2014 - 22:24
लेख आवडला. प्रतिसादाचा लेख केल्यामुळे काही मुद्दे राहिले आहेत हे खरे असले तरी आहेत तेही पुरेसे आहेत. दुर्दैवाने कोणतेही सरकार पर्यावरणाच्या बाबत संवेदनाशीलतेने वागत नाही. त्यांना फक्त तात्कालिक फायद्यासाठी खाणसम्राटांना लीज देण्यात रस असतो. जंगले आणि वाघांचां कोणाला काय पडलंय? कागदोपत्री शिकारीवर बंदी आहे, पण मध्यंतरी गोयात एक पट्टेरी वाघ मारला तो एका मोठ्या राजकीय पुढार्‍याच्या घरी नेल्याचे फोटो लोकानी मोबाईलवर काढले होते. :(

एस गुरुवार, 09/25/2014 - 12:04
गोलाबारूद खतम हो गया क्या? धागा इतक्या लवकर थंड पडेल असं वाटलं नव्हतं. :-)

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:27
तुमची मते काही बदलणार नाहीत. वाघ नाहीसे झाल्यामुळे मानव जातीचे नुकसान होणार/झाले आहे असल्या सिद्ध न झालेल्या गोष्टी तुम्ही बोलत रहाणार. मग मी काय बोलणार?

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 15:18
मी तुमच्या प्रतिसादाला दिलेल्या http://misalpav.com/comment/615484#comment-615484 ह्या उत्तरावर तुमचे काय म्हणणे आहे हे आधी सांगता का? वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:22
अहो वाघ कधीच नष्ट झाले. गेल्या ५०-७० वर्षात वाघाचा पर्यावरणावरचा आणि बाकी प्राणीजगतावरचा प्रभाव पूर्ण संपला आहे. मानवावर काही परीणाम झाला का? ह्याच ५० वर्षात भारतातल्या मानवाचे आयुष्यमान वाढले, रहाणीमान सुधारले. मानवजातीचे काय नुकसान झाले?

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:29
वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?
नक्की बदलीन. पण तुम्ही जे काही वाईट परिणाम झाले ते वाघ नष्ट झाल्यामुळेच झाले हे सिद्ध करायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 17:33
तुम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर दिलेत आणि मी मांडलेली कारणमीमांसा खोडून काढलीत तर माझा तसा समज होणार नाही पुन्हा.

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:18
गेल्या १०० वर्षात वाघ आणि बाकी अनेक प्रजाती भारतातुन नष्ट झाल्या तरी अन्नधान्य उत्पन्न वाढले, आयुर्मयादा वाढली. हीच सिद्धता आहे की वाघ संपले तरी काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 18:25
ही तात्पुरती सूज आहे. पर्यावरण विनाशाचे दुष्परिणाम शेवटी मानवाच्याही अस्तित्त्वावर घाला घालणार हे निश्चित.

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:31
घालू दे की काय घाला घालायचा तो १००० वर्षानी. म्हणुन आत्तच्या माणसांनी वाघांच्या हातुन मरायचे का? तसे ही जेंव्हा पर्यावरण जर जास्तच बिघडले ( मानवाच्या दृष्टीने )तर मानवाची लोकसंख्या कमी होउन, पुन्हा बॅलंस होइलच ना. पण मानव आता इतका प्रगत झाला आहे की अणुयुद्धा नी स्वताचा शेवट करु शकतो. पण प्रदुषणात सुद्धा मानवजात शिल्लक राहील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:26
नक्की राहील. फारच प्रदुषण झाले तर आत्ताच्या ७०० कोटी ऐवजी १० कोटी शिल्लक रहातील पण मानवजात शिल्लक राहील हे नक्की. आणि लोकसंख्या १० कोटीच उरल्यामुळे पुन्हा जंगले होतील आणि प्रदुषण कमी होईल. की पुन्हा ७०० कोटी होतील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:32
तिथे कुठे? काय राव चेष्टा करताय? माझे अन्न कुठुन येत हा तुमचा प्रश्न आहे का? कुठल्या तरी शेतातुन येते. कुठल्या हे माझ्यासाठी महत्वाचे नाही.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 12:25
काही दिवसांपूर्वी मी काही बातम्या वाचल्या होत्या, त्या इथे देतो :- Evidence Suggests World’s Largest Solar Farm Burns Birds That Fly over It Solar Farms Threaten Birds California’s new solar power plant is actually a death ray that’s incinerating birds mid-flight

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by प्रसाद१९७१

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:44
तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर फार्म बंद करायचा? प़क्षी कसे वाचवले जातील त्यावर अधिक भर द्यावा... बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:47
समजा मेले ते पक्षी तर काय फरक पडतो. तुम्हाला ही बातमी वाचुन वाईट वाटणे सहाजीक च आहे. पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे?

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 14:51
माणूस जमात संपणं जास्त श्रेयस्कर आहे असं नाही वाटत त्यापेक्षा? हे 'मंद' पशु पक्षी जसं जमेल तसं राहतील तरी. जायच्या वेळी जातीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:20
असहमत. प्राणी पक्षी काय नि माणूस काय, कुणीही संपणे कमीजास्त श्रेयस्कर नाही - जर तत्त्वतः पाहिले तर. पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:25
प्रश्नच नाही. मी माणुस आहे म्हणुन मी माणसांचा विचार करतोय आणि करणार. १०००० वर्षापूर्वी मानवाकडे काही हत्यारे नव्हती तेंव्हा मानवाची लोकसंख्या १ कोटी पण पार करत नव्हती. जर हत्यारांचा शोध वेळीच लागला नसता तर मानवजात कदाचित लुप्त झाली असती डोडो सारखी. काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल

In reply to by प्रसाद१९७१

हाडक्या गुरुवार, 09/25/2014 - 16:33
हम्म्म..
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल
असा कधी आधी विचार केला नव्हता.. रोचकच.. :) (शिकारीचे समर्थन नाहीच पण हा मुद्दा रोचक आहे.) माणूस विचार करु शकतो म्हणून कदाचित हे एवढे चर्चासत्र सुरु आहे. वाघ कमी होत असताना वाघांनी स्वतःहून काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत स्वतःची प्रजा वाचवायला. वरून एक वाघ दूसर्‍या नरापासून झालेली म्हणून वाघिणीची इतर पिल्ले जेव्हा मारत सुटतो तेव्हा तो वाघ पण वाघांची संख्या कमी व्हायला तेवढाच दोषीच नाही का?

In reply to by हाडक्या

एस गुरुवार, 09/25/2014 - 17:16
इएसाहेबांनी दिलेला हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614904#comment-614904 त्यातूनही बोध नाही झाला तर बोलूच.

In reply to by प्रसाद१९७१

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 18:26
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल झालेले आहेत आणि संपलेले आहेत. त्यांची यादी इथे सापडेल. पण "होमो सॅपियन सॅपियन" म्हणजे आधुनिक मानवाने (म्हणजे आपण हो !) नवनविन आयुधे (टुल्स) शोधून काढून जो प्राणीसंहार आणि पर्यावरणसंहार केला आहे / करत आहे त्याला या पृथ्वीच्या इतिहासात तोड नाही !

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 17:45
@ बॅटमॅन, अहो माणूसच निसर्गव्यवस्था त्याला हवी तशी वाकवतोय ना? इतर कुठले पशु पक्षी अशी ढवळाढवळ करत आहेत का? बरं केली तर मग बोंबा मारण्यापेक्षा तुलनेनं माणूस जमात संपलेली बरी असं म्हणतो आहे. एनीवेज धिस इज ऑल अबाऊट इफ्स अ‍ॅण्ड बट्स. >>> पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय. संपला विषय. हे बरोबरच आहे. :)

In reply to by बॅटमॅन

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 19:13
मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. मुख्य मुद्दा हाच आहे ! केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण असा नाही आणि नकोच. कारण, तसे म्हणणार्‍यांकडून आणि तशी समजूत ठेवणार्‍यांकडून खरे तर मूळ मुद्द्याचा विपर्यास होतो. माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे. करोडो वर्षांच्या निसर्गाच्या क्रिया-प्रतिक्रियेतून जो परिणाम साधला गेला आहे त्याचा मानवाला मानव बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्या परिणामात मानवाच्या मेंदूच्या ताकदीने तयार झालेल्या साधनांचा उपयोग सुरू होण्याअगोदर आणि विषेशतः खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वीचा मानवाचा सहभाग बराचसा नैसर्गिकरित्या नियंत्रित होता. त्यामुळे "संहार आणि पुर्निर्माण" या चक्रात निसर्गाला सावरायला पुरेसा वेळ मिळत होता. भाल्याच्या उपयोगाने मानवाने मॅमथ संपवले. त्यातले बहुतेक मांसापेक्षा त्याचे दात आणि हाडांसाठी मारलेले असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. एका बंदूकीने एक माणूस जेव्हा डझनावारी प्रजननक्षम प्राणी काही दिवसांत मारतो तेव्हा कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक क्षमता तेवढ्या वेळात तेवढ्या संख्येने नविन प्राण्यांना जन्म देउन त्यांना प्रजननक्षम बनवण्याइतकी प्रबळ नसल्याने ती प्राणीजात संहाराच्या दिशेने जाते. हेच समीकरण जंगलतोडीला लागू पडते. तयार व्हायला शेकडो-हजारो वर्षे लागलेले जंगल आधुनीक साधने वापरून मानव काही वर्षांत / दशकांत ऊजाड करू शकतो / करत आला आहे... बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत. मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे आणि तेथे मुख्यतः निलगिरी सारखी सहजासहजी आग्नीच्या भक्षस्थानी न पडणारी झाडेच का आहेत याबाबत जे पुरावे समोर आले आहेत / येत आहेत तेही रोचक ठरावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:33
माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे
मी कुठे म्हणतोय की एकांडा जगु शकेल. आत्ता १० लाख प्रजाती असतील. समजा त्यातल्या १ लाख शिल्लक राहील्या तर मानव एकटा कुठे रहाणार आहे.
बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत.
असे काय पुरावे सापडले आहेत? तुम्हाला काय म्हणायचे की थर चे वाळवंट जंगल तोडीमुळे तयार झाले?
मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे
ह्याचे काही पुरावे आहेत का? ऑस्ट्रेलिया मधे १७ व्या शतका पर्यंत काही लाखांची पण लोक वस्ती नव्हती. त्या लोकांनी सगले जंगल तोडले असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग टास्मानियात इतके प्रचंड जंगल कसे शिल्लक राहीले?

In reply to by प्रसाद१९७१

थोडे वाचन वाढवा. सगळेच पुरावे तुमच्यासाठी शोधून आणायला (आणि त्यातली खुसपटे परत नीट करायला) वेळ नाही... पण अगदी आंतरजालावरही ते सर्व आहेत, तेव्हा स्वतः खात्री करून घेऊ शकाल. वेळ आणि श्रम करावे लागतील, पण त्याशिवाय नविन ज्ञान आणि विचार मिळत नाही... निदान मिळालेले बहुदा पटत नाही :) शिवाय केवळ एक मुद्दा पकडून त्याची केवळ स्वतःच्या समजूतीने साल काढण्याऐवजी कोणत्याही प्रश्नाचा त्याबद्दल जगात इतर काय पुरावे आहेत ते सारासार विवेकाने पडताळून मगच मत लिहीले तर जास्त फायद्याचे होईल असे वाटते. असो, जगातल्या सर्वांचे मत बदलणे हा माझ्या जीवनाच उद्देश नाही. मी काही मुद्दे दिले आहेत... त्याचा उपयोग करून स्वसंशोधन करु शकता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण पर्यावरणाचे अतीसमर्थक जितके एकांगी विचार करतात तेवढाच एकांगी विचार त्याचे अतीविरोधकही करतात असा अनुभव आहे. माझ्या मते... "कोणतीही किंंमत देऊन पर्यावरणासाठी पर्यावरण वाचवा" हे योग्य नाही तर "माणसाच्या भल्यासाठी आवश्यक तेवढे पर्यावरण योग्य किंमत देऊन वाचवा" हे जास्त योग्य आहे. पण, हा दुसरा पर्यायही नैसर्गिकपणे आपोआप होणारी घटना नाही... कारण माणसाचा पर्यावरणातील सद्याचा हस्तक्षेप ही आपोआप होणारी नैसर्गिक घटना नाही. असो.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:56
पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे? त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ? बाकी तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाहीत ? ते आधी द्या पाहु.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:09
त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ?
असे कसे, तुमच्या खापर पणजोबांच्या वेळी हजारो वाघ होते, आता ते नाहीत. तुम्हाला ( तुमच्या पिढीला ) काय फरक पडला? आता डोडो नाही, मॅमथ नाही तुम्हा/आम्हाला काय फरक पडला?

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:07
बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 15:22
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.
वर मला कुणीतरी हेकट म्हणालं होतं. तुम्हीच होतातना?

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:18
कुठला त्रास हो, काहीतरीच. काही त्रास वगैरे होत नाहीये सृष्टीला. तुमच्या मनात जे सृष्टीचे चित्र असेल त्याला होत असेल त्रास पण सृष्टी ही पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होती आणि पृथ्वी सूर्य गिळंकृत करेल तो पर्यंत असेल. त्यात कधी जीवन असते कधी नसते.

हे छान केलेत. दुसर्‍या धाग्यावच्या प्रतिक्रियेपेक्षा ती वेगळा धागा म्हणून का टाकली नाही हाच विचार करत होतो. जेव्हापासून माणसाने फेकून मारण्याची आयुधे (भाल्याच्या आदीम प्रकारापासून सुरुवात झाली) शोधून काढली तेव्हापासून मॅमथने सुरुवात करून आतापर्यंत मोजायला कठीण पडेल इतक्या प्राण्यांचा स्वार्थासाठी (अन्न यात समाविष्ट नाही) आणि क्रिडेसाठी समूळ संहार केला आहे... यात अनेक मानवी समाजही समाविष्ट आहेत. "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे Sun, 09/21/2014 - 23:17
+१०० फक्त "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे ! असहमत. सिंह हे तरस चित्ता बिबळ्या किंवा त्यांची पिल्ले यांना मारून टाकतात ( न खाता). तसेच तरस सुद्धा संधी मिळेल तेंव्हा सिंहाच्या छाव्यांना मारून टाकतात. या मध्ये आपल्या अन्ना साठीची स्पर्धा कमी करणे हि अन्तः प्रेरणा (INSTINCT) असते. तसेच हत्ती किंवा रानरेडे हे सिंह वाघ बिबळे यांच्या छाव्यांना ठार मारतात कारण ती पिल्ले मोठी होऊन त्यांना / त्यांच्या शावकाना धोका निर्माण करू शकतात.

In reply to by सुबोध खरे

एस Mon, 09/22/2014 - 12:57
इएसाहेब आणि खरेसाहेब, तुमचे दोघांचेही बरोबर आहे. जीवसृष्टीच्या दोन मूलभूत प्रेरणा म्हणजे जिवंत राहणं आणि वंशसातत्य टिकवणं (सर्व्हायवल आणि रिप्रॉडक्शन). ह्यामध्ये जे प्राणी/घटक स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांच्यापुढे इतरांवर अवलंबून रहाण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे हरित वनस्पती, त्यावर जगणारे तृणभक्षी आणि तृणभक्षकांवर जगणारे मांक्षभक्षी आणि या सर्वांच्या मृत्यूनंतर विघटनाचे काम करणारे सूक्ष्मजीव अशी अनेकस्तरीय आणि गुंतागुंतीची रचना उत्क्रांतीच्या माध्यमातून विकसित होत असते. यातला अन्न मिळवण्यासाठीचा एक हेतू सोडला तरी दुसर्‍यांना मारण्यामागे आपले वंशसातत्य टिकवणे ही नैसर्गिक प्रेरणाही तितकीच कारणीभूत असते. सिंह हे चित्त्यांनी किंवा बिबळ्यांनी केलेली शिकार हिसकावून घेतात. त्यामुळे उलट एखादा हुशार सिंह असता तर त्याने असे चित्ते आणि बिबटे मुद्दाम पाळले असते आणि आरामात बसून दिवस काढले असते. तरीही सिंह आपल्या प्रभावक्षेत्रात चित्त्यांना सहजासहजी राहू देत नाहीत. त्यांच्या पिल्लांवर हल्ला करून मारून टाकतात. ह्यामागे अन्न मिळवण्याची स्पर्धा कारणीभूत नसून चित्त्यांपासून स्वतःच्या बछड्यांचे संरक्षण करणे हे खरे कारण असते. सिंहच काय, बिबटे, चित्ते, तरस, रानकुत्री, लांडगे, हत्ती, गेंडे, गवे, असे सर्वच घटक हे इतरांचे वर्चस्व स्वतःच्या अस्तित्त्वाच्या आणि वंशसातत्याच्या आड येणार नाही ह्याचा जीवापाड प्रयत्न करतात. अजून एक भाग सिंहांच्या बाबतीत आढळतो किंवा बोकेपण की मादीच्या आधीच्या नर पिल्लांना नवा सिंह ठार मारून टाकतो, जेणेकरून मादी पुन्हा त्याच्याशी मीलनाला तयार होईल. ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.

In reply to by सुबोध खरे

तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण... १. तरस, चित्ता, बिबळ्या इत्यादी प्राणी पिल्ले मारतात त्याची मुख्यतः दोन कारणे आहेत : अ) दुसर्‍या नराचा वंश संपवणे : पहिला नर कमजोर होउन तो पराजीत झाल्यावरच हे शक्य असते. अर्थात कमजोर नराचा वंशच्छेद होतो. आ) स्वतःचा वंश वाढवणे : दुभती मादी जनन करायला असमर्थ असते. नविन नराने दुसर्‍या नराची पिल्ले मारल्यावर लवकरच ती जननक्षम होते आणि नविन, जास्त ताकदवान नराचा, वंश वाढवायला लायक होते. २. नवजात भावंडांमध्ये (सिबलिंग्ज) अन्नासाठीची स्पर्धा कमी करण्यासाठी हत्या होते. याचा एक महत्वाचा नैसर्गिक फायदा म्हणजे नविन पैदाशीतली निर्बल पिले नसल्याने मोजकेच असलेले सर्व अन्न सबल पिलांना मिळून पुढची पिढी बलवान राहते. वरील दोन्ही प्रकारचा संहार त्या प्राणीजमातीचा समूळ नाश करत नाही. उलट हे त्या जाती मानवी हस्तक्षेपाच्या अगोदर करोडो वर्षे तगून होत्या यावरून सिद्ध होते. किंबहुना हा संहार पुढची पिढी अधिक सबळ ठेवण्याच्या नैसर्गिक तरतूदीचे काम करते. या धाग्यात "प्राणीजमातीचा होत असलेला समूळ संहार" हा मुख्य मुद्दा असल्याने अवांतर टाळण्यासाठी मी येथे तेवढ्या खोलात गेलो नव्हतो.

प्यारे१ Sun, 09/21/2014 - 19:51
खूप छान माहितीपूर्ण लेख. स्वॅप्स ह्यांचं कौतुक आणि संपादक मंडळाचे प्रतिसादाला लेखरुपानं स्वतंत्रपणं प्रकाशित केल्याबद्दल आभार. अवांतरः बव्हंशी ;) शाकाहारी झाल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करुन घेतो.

विनोद१८ Sun, 09/21/2014 - 23:28
मानवी क्रुरतेचा हा असला बेजबाबदार व किळसवाणा खेळ पाहिल्यावर आपण स्वताला 'निसर्गातला सर्वात बुद्धिमान प्राणी' कसे काय म्हणवून घेउ शकतो ?? स्वताला तसे म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार माणसाला आहे का ?? गरज नसतानासुद्धा इतर प्राण्यांचा जगण्याचा नैसर्गिक हक्क हिरावून घेणे हे कुठल्या 'नैसर्गिक न्यायात' बसते याचा विचार व्हायलाच हवा. यावर अधिक चर्चा व्हावी. धन्यवाद स्वॅप्स, अप्रतिम लेख...!!

In reply to by विनोद१८

माणुस निसर्गातला सर्वात बुद्धीमान प्राणी आहे यात काहीही शंका नाही... मात्र तो त्याच्या बुद्धीचा उपयोग बहुतेक वेळी सारासार विवेकाने करण्याऐवजी अंध स्वार्थासाठी करतो हीच शोकांतिका आहे.

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:47
वीस हजारांहून अधिक सभासद असलेल्या मिपाकरांपैकी दोन-चार अपवाद सोडले (तेही निश्चित विदा नाही म्हणून) तर कोणी स्वतः शिकार करत असतील असं वाटत नाही... तर मग तुमचं प्रतिपादन तरी काय आहे?

In reply to by पिवळा डांबिस

छ्या, छ्या ! मिपावर लई "एकांडे" आणि "टोळीबाज (तेला हितं कंपू म्हंत्यात)" तरबेज शिकारी हैत... त्यात "कहीपे निगाहे कहीपे निशाना" स्टाईल विडबन्जिल्बीवाले कसलेले शिकारी ही तर मिपाची लैच खास (आणची आम्ची आव्डती) पेशालिटी हाय ! ;) :)

मदनबाण Mon, 09/22/2014 - 16:29
माणसा सारखा स्वार्थी आणि कॄतघ्न दुसरा प्राणी या भूतलावर शोधुनही सापडणार नाही ! पुढच्या पिढ्यांना फक्त फोटो आणि डिव्हीड उपलब्ध राहतील की काय अशी भिती वाटते! :( मनुष्य प्राण्याची प्रजा मात्र फारच वाढत चालली आहे, आपल देश सुद्धा या प्राण्यांच्या संख्येत पुढे आहे त्यामुळे या प्राण्याचे जीवन सुद्धा सध्याच्या काळात तणाव ग्रस्त झाले आहे. :( हल्ली या मोकाट सुटलेल्या प्राण्याच्या वागण्याचा मला तिटकारा येउ लागला आहे. :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

एस Mon, 09/22/2014 - 16:39
इस्पीकचा एक्का, सुबोध खरे, प्यारे१, दशानन, विनोद१८, वल्ली, पिवळा डांबिस, मदनबाण आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:46
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

एस Mon, 09/22/2014 - 17:12
मानवी हस्तक्षेपाचा अगदी अजाणतेपणानेही कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बेटांवर जेव्हा युरोपियन वसाहतवाद्यांनी पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी आणलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींमुळे तिथल्या मूळ पर्यावरणातील जैववैविध्याची प्रचंड हानी झाली. http://www.teara.govt.nz/en/human-effects-on-the-environment/page-3 तिथल्या नैसर्गिक वृक्षांच्या वनांची कत्तल करून पाईनवृक्षाची लागवड केली गेली. तळी आणि दलदलींच्या प्रदेशांवर भर घालून बुजवण्यात आली.
Coastal sand dune habitats have been altered dramatically, with native plants like pīngao (Desmoschoenus spiralis) being replaced by marram grass (Ammophila arenaria) and tree lupin (Lupinus arboreus). Herbaceous hawkweeds (Hieracium species) have taken over some grasslands, reducing them to wasteland, and are spreading into forests and along creeks.
न्यूझीलंड सी लायन आणि व्हेलसारख्या स्थानिक सस्तन प्रजातींची कत्तल तर झालीच, पण डुकरे, कुत्री आणि मांजरांसारख्या बाहेरून आणलेल्या प्राण्यांमुळे तिथल्या अपृष्ठवंशीय आणि सरपटणार्‍या प्राण्यांवर, पक्ष्यांवर भयानक परिणाम झाला.
Since the late 1700s, 54 more mammal species have been brought to New Zealand. Nineteen of these, including two devastating predators (the Indian grey mongoose and the North American raccoon) did not become established in the wild. However, 11 predators successfully became naturalised: three more rodents; three mustelids (ferrets, stoats and weasels); pigs, hedgehogs, possums, dogs and cats. These have had a massive impact on the remaining native birds, invertebrates and reptiles. Forty out of a total 91 land birds are now extinct, with many others in serious decline.
असेच एक उदाहरण म्हणजे मॉरिशस बेटावरील डोडो हा उडता न येणारा पक्षी. ह्याबद्दल वरच्या यादीत दुवा दिलाच आहे.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:50
मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे. शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 14:31
शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.>>>>> एकतर हा अभिनवेश सोडुन द्या की मानवाचे अस्तित्व बाकीच्या प्रजाती नामशेष होऊ न देण्यासाठी आहे. एकुणच सर्व सजीव सृष्टीची निर्मीती ही कुठलाही हेतू समोर ठेवुन झालेली नाही. प्राणी तयार होयच्या आधी पण ही सॄष्टी होती आणि सर्व नष्ट झाले तरी ही सृष्टी असणारच आहे. अगदी साधी हत्यारे असणारा मानव सुद्धा गेल्या ४-५ हजार वर्षातला आहे. प्राण्यांच्या करोडो प्रजाती तयार झाल्या आणि करोडो नष्ट झाल्या. वाघ नष्ट झाले, साप नष्ट झाले तरी मानवाला काही फरक पडत नाही. गेल्या शंभर वर्षात वाघांची संख्या १% पण राहीली नाही, काय फरक पडला. हा फक्त स्मरण रंजन वाद आहे.

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 18:51
माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद. माणूस जे करतो तसेच करणार्‍या अजूनही काही प्राणीजाती असाव्यात. पण माणसाचा दिमाग लै पावरफुल पडल्याने त्याच्या प्रत्येक कृतीला लय धार आली. याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.

In reply to by बॅटमॅन

एस Mon, 09/22/2014 - 19:36
याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.
हेच तर आपल्यातल्या काही स्वार्थी लोकांना मान्य करायला जड जातेय.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 12:37
झाल्या काही प्रजाती नष्ट, मग काय नुकसान झाले. माणुस नव्हता तेंव्हा ही लाखो प्रजाती नष्ट झाल्या आणि नविन निर्माण झाल्या. नाही आता डोडो पक्षी दिसत, तर काय हरकत आहे. ह्या पर्यावरण वाद्यांचा कंटाळा आलाय

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 14:54
मोबाइलवर जास्त टंकू शकत नाही तरी अगदी थोडक्यात फक्त मुद्दे मांडतो. १. उत्क्रांतीच्या ओघात अनेक प्रजाती नष्ट झाल्या, पण त्यामागे नैसर्गिक कारणे होती. उदा. हिमयुग, उल्कावर्षाव, प्रबळ भक्षकांपुढे आणि खाद्य मिळवण्याच्या स्पर्धेत टिकाव धरता न येणे, बदलत्या परिस्थितीत स्वतःमध्ये बदल करता न येणे इ. २. ही प्रक्रिया अतिशय सावकाश घडते. मानवी हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेचा वेग लाखोहजारो पटींने वाढला. ३. उत्क्रांतीचा फायदा असा की स्पर्धा एकांगी नसते. कमकुवत जीव नष्ट होतात तर सबल जीव टिकतात. ४. मानवाकडून इतर प्रजातींच्या होणार्‍या कत्तलीत सरसकटपणा असल्याने त्याचा मास अ‍ॅण्ड रॅपिड एक्स्टिंक्शनसारखा परिणाम होतो. ५. यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. ६. मानवाचे अस्तित्त्व पर्यावरणाच्या संतुलनाशी इतके अविभाज्यपणे जोडले गेले आहे की पर्यावरणाची थोडीशी हानीसुद्धा आपल्याच पायावर मारून घेतलेली कुर्‍हाड ठरते. ७. नुकसान करणारे थोडेचजण असतात. पण त्याची फळे सर्वांनाच भोगायला लागतात. सविस्तर प्रतिसाद नक्कीच लिहीन. तूर्तास इत्यलम...

In reply to by एस

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 16:18
पर्यावरणाचे नुकसान होते म्हणजे तुमच्या डो़क्यात पर्यावरण म्हणजे जे आत्ता किंवा ५०-१०० वर्षा पूर्वी होते तेच खरे आणि बरोबर पर्यावरण आहे अशी काही कल्पना आहे. पर्यावरण पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होते आणि जर पुढे आण्विक युद्ध झाले तरी असणार आहे. पर्यावरणाचे कशानीच नुकसान वगैरे होत नाही. पर्यावरण फक्त असते. प्रजाती नष्ट झाल्या म्ह्णुन माणसाला काही फरक पडत नाही. तुम्ही नॉस्टालजिक होऊन तुम्हाला आवडते तेच पर्यावरण चांगले असा हेकट स्टँड घेताय. खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

In reply to by एस

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 18:44
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप. त्याबद्दल मी लिहीलेच आहे. दुसरा आक्षेप - पर्यावरण वादी ( विषेश करुन भारतातले ) हे भोंगळ, स्वार्थी, प्रसिद्धीलोलुप, स्वताच्या तुमड्या भरणारे, स्वता: सर्व गोष्टी एंजॉय करुन दुसर्‍यांनी गिल्ट देणारे, सर्व गोष्टीत काड्या घालणारे, दुकान चालवणारे, चुकीचा डाटा देणारे, खोटा डाटा देणारे, बागुलबुवा दाखवणारे, कुठल्या तरी राजकीय पक्षाचे/कंपनीचे एजंट, सत्याचा विपर्यास करणारे , फुकटे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 19:12
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप
माझा लेख नेमक्या कोणत्या गृहीतकावर आधारलेला आहे असे तुम्हांला वाटते?

In reply to by एस

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 19:39
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल. २. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही. ३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार. ४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या. ५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे. ताकः मी शाकाहारी आहे, मला स्वताला प्राणी मारुन खाणे जमत नाही. पण हे प्रजाती नष्ट होणे वगैरे पटत नाही

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 20:45
मुळात मी हा लेख स्वतंत्र असा लिहिला नव्हता. तो दुसर्‍या एका लेखावर दिलेला प्रतिसाद होता. मला स्वतंत्र लेख लिहायचा असता तर तो काही भागांमध्ये आणि अतिशय विस्तृतपणे, सर्व संदर्भांसहीत लिहिला असता. तसे नसल्यामुळे ह्या लेखात काही त्रुटी राहिल्या आहेत ज्यामुळे तुमचा माझ्याबद्दल काहीसा पूर्वग्रह निर्माण झाला आहे. राहिलेल्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे माझे पर्यावरण वि. विकास ह्या मुद्द्यावर काय मत आहे. तसेच मी रॅशनल इकॉलॉजिस्ट आहे की नाही, दुसर्‍या शब्दांत माझा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन डोळस आहे की नाही. लोकसंख्यावाढ हे फार गंभीर कारण आहे आणि त्याविषयी लेखात काहीच लिहिलेले नाही. ह्या आणि तुम्ही वर आजच्या पर्यावरणवाद्यांच्या दुटप्पीपणाच्या अनुभवावर जसे म्हणता आहात त्या काही कारणांनी कदाचित मीही काही मुद्दे मुद्दाम टाळत असेल आणि सोयीस्कर भूमिकाच तेवढी घेत असेल असा आपला माझ्याबद्दल ग्रह झाला असावा. ह्यातील सर्वच मुद्द्यांवर मला वेळेअभावी बोलता येणार नाही, पण आधी कृपया तो पूर्वग्रह मनातून काढून टाका अशी विनंती करतो. आता वरील प्रतिसादातील मुद्द्यांकडे वळूयात:
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल.
>>>प्रजातींच्या परस्परसंबंधातील अचानक आणि फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या बदलांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते, उत्क्रांतीतील जो प्रजातींचा र्‍हास होत असतो त्याचा वेग अतिशय म्हणजे अतिशय, काही लाख-कोटी वर्षांच्या कालावधीत घडत असतो. मानवाने केलेल्या बेकायदा आणि अनिर्बंध शिकारीमुळे प्रजाती नष्ट होण्याचा कालखंड हा लाखो वर्षांवरून काही दशकांवर येऊन ठेपला आहे. इतक्या बेसुमार र्‍हासाची भरपाई नवीन प्रजातींच्या रूपाने पर्यावरण करू शकत नाही कारण उत्क्रांती हे एकमेव साधन त्यासाठी उपलब्ध आहे. मानव हा प्रजाती मारू शकतो, नव्याने निर्माण करण्याइतपत अजून त्याची प्रगती झालेली नाही. पर्यावरण नेहमीच बदलणार, पण त्यातला बदल करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य मानवाने स्वतःच्या हाती घेऊ नये. शेदीडशे वर्षांपूर्वीचेच पर्यावरण मला हवे आहे असे म्हणणे प्रॅक्टीकली शक्य नाहीच. तसे माझे म्हणणेही नाही.
२. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही.
>>>चूक. जोपर्यंत मानवाची लोकसंख्या अतिशय लहान होती आणि शेतीसारख्या उत्पादनक्रियेचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत अन्न मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या शिकारीत आणि वाघ/डायनॅसोर आदींनी केलेल्या शिकारीत फरक नव्हता. मध्य भारतातील एका संस्थानिकाने गेल्या शतकाच्या सुरूवातीला तब्बल १४०० च्या आसपास वाघ केवळ शिकारीच्या हौसेखातर मारले. ह्याचे समर्थन तुम्ही कसे कराल?
३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार.
पिरॅमिड नष्ट/निर्माण होण्याचा वेग हा निसर्गनियंत्रित जोपर्यंत आहे तोपर्यंत हा युक्तिवाद ठीक आहे. वरती म्हटल्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शनचे तत्त्व ज्यात अंतर्भूत नाही अशा बेसुमार कृत्रिम कत्तलीतून केवळ सर्वंकष विनाशच मानवाच्याही वाट्याला येईल. मानव आहेच आणि राहणार हा दंभही अशाच गैरसमजुतीतून आलेला आहे. मानवाच्या जगण्याची सर्व साधने ही अंतिमतः निसर्गावरच अवलंबून आहेत. निसर्ग नसेल तर मानव कुठे जाणार?
४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या.
>>>जैवविविधतेचे काहीएक प्रयोजन नाही असे तुम्हांला थोडक्यात म्हणायचे आहे. हा समज चुकीचा आहे. जितकी जैवविविधता जास्त तितका नैसर्गिक निवडीला स्कोप जास्त असतो आणि एकूणच जीवसृष्टी तगून राहण्यासाठी जैवविविधता जितकी जास्त असेल तितकी ती शक्यता जास्त असते हे विविध सांख्यिकी आणि शास्त्रीय मॉडेलनी सिद्ध झालेले आहे.
५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे.
दुर्दैवाने सहमत. एकीकडे वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारी नैसर्गिक संसाधने अपुरी पडू लागलेली आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसंख्यावाढीचा वेग अगदीच ऋणात्मक होणेही त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू मृत्युपंथावर नेते हा एक गुंतागुंतीचा पॅराडॉक्स आहे आणि ते गणित सोडवणे, योग्य मेळ घालणे तितके सहजसोपे नाही. गेली कित्येक वर्षे मी यावर विचारमंथन करतो आहे पण यावर कुठलाच रामबाण उपाय नाही अशा निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. लोकसंख्या आहे त्यापेक्षा कमी करण्याला खूप सामाजिक-राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय मर्यादा आहेत ज्यांची विस्तृत चर्चा इथे शक्य नाही. सध्यातरी आहे तो इकोबॅलन्स टिकवून ठेवणे इतकेच आपल्या हाती आहे.

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 09/23/2014 - 23:22
मला नाही वाटत डोळ्यांवर झापडे बांधलेले हे मान्य करतील. अगदी सखोल, काटेकोर संशोधनातून पुढे आणलेल्या शास्त्रीय पुराव्यांनाही 'हे असं काही घडतच नसतं, तुम्ही अमुकतमुकचे हस्तक आहात, दुटप्पी आहात' वगैरे पद्धतींच्या दाव्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. असोत. गोबेल्सनीती. ...ठासून बोला!

In reply to by सनी स्॓आस

एस Tue, 09/23/2014 - 23:47
तुम्ही ह्याची काही उदाहरणे देऊ शकाल काय? सरसकट सर्वच पर्यावरणवाद्यांना महाचोर ठरवून मोकळे होणे योग्य तर नाहीच, तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय असाही लोकांचा भ्रम होऊ शकेल.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 14:19
ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे>>>>>> हे विधान कुठल्या जोरावर. समजा जर कोणी तसे करतच असेल तर तो गुन्हा असे तुम्हीच ठरवणार. ही तर हुकुमशाही झाली.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 14:23
मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे >>>>>>> असे का हो? मग ह्याचे काय उत्तर १. मांजर उंदराला खेळवुन खेळवुन मारते. हा मनोरंजनाचा प्रकार नाही का? २. सिंह , वाघ किंवा सर्वच प्राणी स्वता पेक्षा दुबळ्या आणि संरक्षण करु न शकणार्‍या प्राण्यांना मारतात हे कसे काय चालते तुम्हाला? तुम्ही असे का नाही म्हणत, "वाघा तुला अन्नच पाहीजे असेल तर दुसर्‍या वाघालाच मारुन खा. हरिणाची पिल्ले मारुन खाणे हे घृणास्पद आहे."

In reply to by प्रसाद१९७१

एस Tue, 09/23/2014 - 20:47
वर दिलेला माझा हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614715#comment-614715
ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.
मग कसा बरं फरक नाही?

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 16:19
खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल. खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

पैसा Tue, 09/23/2014 - 22:24
लेख आवडला. प्रतिसादाचा लेख केल्यामुळे काही मुद्दे राहिले आहेत हे खरे असले तरी आहेत तेही पुरेसे आहेत. दुर्दैवाने कोणतेही सरकार पर्यावरणाच्या बाबत संवेदनाशीलतेने वागत नाही. त्यांना फक्त तात्कालिक फायद्यासाठी खाणसम्राटांना लीज देण्यात रस असतो. जंगले आणि वाघांचां कोणाला काय पडलंय? कागदोपत्री शिकारीवर बंदी आहे, पण मध्यंतरी गोयात एक पट्टेरी वाघ मारला तो एका मोठ्या राजकीय पुढार्‍याच्या घरी नेल्याचे फोटो लोकानी मोबाईलवर काढले होते. :(

एस गुरुवार, 09/25/2014 - 12:04
गोलाबारूद खतम हो गया क्या? धागा इतक्या लवकर थंड पडेल असं वाटलं नव्हतं. :-)

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:27
तुमची मते काही बदलणार नाहीत. वाघ नाहीसे झाल्यामुळे मानव जातीचे नुकसान होणार/झाले आहे असल्या सिद्ध न झालेल्या गोष्टी तुम्ही बोलत रहाणार. मग मी काय बोलणार?

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 15:18
मी तुमच्या प्रतिसादाला दिलेल्या http://misalpav.com/comment/615484#comment-615484 ह्या उत्तरावर तुमचे काय म्हणणे आहे हे आधी सांगता का? वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:22
अहो वाघ कधीच नष्ट झाले. गेल्या ५०-७० वर्षात वाघाचा पर्यावरणावरचा आणि बाकी प्राणीजगतावरचा प्रभाव पूर्ण संपला आहे. मानवावर काही परीणाम झाला का? ह्याच ५० वर्षात भारतातल्या मानवाचे आयुष्यमान वाढले, रहाणीमान सुधारले. मानवजातीचे काय नुकसान झाले?

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:29
वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?
नक्की बदलीन. पण तुम्ही जे काही वाईट परिणाम झाले ते वाघ नष्ट झाल्यामुळेच झाले हे सिद्ध करायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 17:33
तुम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर दिलेत आणि मी मांडलेली कारणमीमांसा खोडून काढलीत तर माझा तसा समज होणार नाही पुन्हा.

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:18
गेल्या १०० वर्षात वाघ आणि बाकी अनेक प्रजाती भारतातुन नष्ट झाल्या तरी अन्नधान्य उत्पन्न वाढले, आयुर्मयादा वाढली. हीच सिद्धता आहे की वाघ संपले तरी काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 18:25
ही तात्पुरती सूज आहे. पर्यावरण विनाशाचे दुष्परिणाम शेवटी मानवाच्याही अस्तित्त्वावर घाला घालणार हे निश्चित.

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:31
घालू दे की काय घाला घालायचा तो १००० वर्षानी. म्हणुन आत्तच्या माणसांनी वाघांच्या हातुन मरायचे का? तसे ही जेंव्हा पर्यावरण जर जास्तच बिघडले ( मानवाच्या दृष्टीने )तर मानवाची लोकसंख्या कमी होउन, पुन्हा बॅलंस होइलच ना. पण मानव आता इतका प्रगत झाला आहे की अणुयुद्धा नी स्वताचा शेवट करु शकतो. पण प्रदुषणात सुद्धा मानवजात शिल्लक राहील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:26
नक्की राहील. फारच प्रदुषण झाले तर आत्ताच्या ७०० कोटी ऐवजी १० कोटी शिल्लक रहातील पण मानवजात शिल्लक राहील हे नक्की. आणि लोकसंख्या १० कोटीच उरल्यामुळे पुन्हा जंगले होतील आणि प्रदुषण कमी होईल. की पुन्हा ७०० कोटी होतील.

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:32
तिथे कुठे? काय राव चेष्टा करताय? माझे अन्न कुठुन येत हा तुमचा प्रश्न आहे का? कुठल्या तरी शेतातुन येते. कुठल्या हे माझ्यासाठी महत्वाचे नाही.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 12:25
काही दिवसांपूर्वी मी काही बातम्या वाचल्या होत्या, त्या इथे देतो :- Evidence Suggests World’s Largest Solar Farm Burns Birds That Fly over It Solar Farms Threaten Birds California’s new solar power plant is actually a death ray that’s incinerating birds mid-flight

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by प्रसाद१९७१

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:44
तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर फार्म बंद करायचा? प़क्षी कसे वाचवले जातील त्यावर अधिक भर द्यावा... बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:47
समजा मेले ते पक्षी तर काय फरक पडतो. तुम्हाला ही बातमी वाचुन वाईट वाटणे सहाजीक च आहे. पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे?

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 14:51
माणूस जमात संपणं जास्त श्रेयस्कर आहे असं नाही वाटत त्यापेक्षा? हे 'मंद' पशु पक्षी जसं जमेल तसं राहतील तरी. जायच्या वेळी जातीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:20
असहमत. प्राणी पक्षी काय नि माणूस काय, कुणीही संपणे कमीजास्त श्रेयस्कर नाही - जर तत्त्वतः पाहिले तर. पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:25
प्रश्नच नाही. मी माणुस आहे म्हणुन मी माणसांचा विचार करतोय आणि करणार. १०००० वर्षापूर्वी मानवाकडे काही हत्यारे नव्हती तेंव्हा मानवाची लोकसंख्या १ कोटी पण पार करत नव्हती. जर हत्यारांचा शोध वेळीच लागला नसता तर मानवजात कदाचित लुप्त झाली असती डोडो सारखी. काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल

In reply to by प्रसाद१९७१

हाडक्या गुरुवार, 09/25/2014 - 16:33
हम्म्म..
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल
असा कधी आधी विचार केला नव्हता.. रोचकच.. :) (शिकारीचे समर्थन नाहीच पण हा मुद्दा रोचक आहे.) माणूस विचार करु शकतो म्हणून कदाचित हे एवढे चर्चासत्र सुरु आहे. वाघ कमी होत असताना वाघांनी स्वतःहून काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत स्वतःची प्रजा वाचवायला. वरून एक वाघ दूसर्‍या नरापासून झालेली म्हणून वाघिणीची इतर पिल्ले जेव्हा मारत सुटतो तेव्हा तो वाघ पण वाघांची संख्या कमी व्हायला तेवढाच दोषीच नाही का?

In reply to by हाडक्या

एस गुरुवार, 09/25/2014 - 17:16
इएसाहेबांनी दिलेला हा प्रतिसाद वाचा. http://misalpav.com/comment/614904#comment-614904 त्यातूनही बोध नाही झाला तर बोलूच.

In reply to by प्रसाद१९७१

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 18:26
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल झालेले आहेत आणि संपलेले आहेत. त्यांची यादी इथे सापडेल. पण "होमो सॅपियन सॅपियन" म्हणजे आधुनिक मानवाने (म्हणजे आपण हो !) नवनविन आयुधे (टुल्स) शोधून काढून जो प्राणीसंहार आणि पर्यावरणसंहार केला आहे / करत आहे त्याला या पृथ्वीच्या इतिहासात तोड नाही !

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 17:45
@ बॅटमॅन, अहो माणूसच निसर्गव्यवस्था त्याला हवी तशी वाकवतोय ना? इतर कुठले पशु पक्षी अशी ढवळाढवळ करत आहेत का? बरं केली तर मग बोंबा मारण्यापेक्षा तुलनेनं माणूस जमात संपलेली बरी असं म्हणतो आहे. एनीवेज धिस इज ऑल अबाऊट इफ्स अ‍ॅण्ड बट्स. >>> पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय. संपला विषय. हे बरोबरच आहे. :)

In reply to by बॅटमॅन

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 19:13
मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. मुख्य मुद्दा हाच आहे ! केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण असा नाही आणि नकोच. कारण, तसे म्हणणार्‍यांकडून आणि तशी समजूत ठेवणार्‍यांकडून खरे तर मूळ मुद्द्याचा विपर्यास होतो. माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे. करोडो वर्षांच्या निसर्गाच्या क्रिया-प्रतिक्रियेतून जो परिणाम साधला गेला आहे त्याचा मानवाला मानव बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्या परिणामात मानवाच्या मेंदूच्या ताकदीने तयार झालेल्या साधनांचा उपयोग सुरू होण्याअगोदर आणि विषेशतः खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वीचा मानवाचा सहभाग बराचसा नैसर्गिकरित्या नियंत्रित होता. त्यामुळे "संहार आणि पुर्निर्माण" या चक्रात निसर्गाला सावरायला पुरेसा वेळ मिळत होता. भाल्याच्या उपयोगाने मानवाने मॅमथ संपवले. त्यातले बहुतेक मांसापेक्षा त्याचे दात आणि हाडांसाठी मारलेले असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. एका बंदूकीने एक माणूस जेव्हा डझनावारी प्रजननक्षम प्राणी काही दिवसांत मारतो तेव्हा कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक क्षमता तेवढ्या वेळात तेवढ्या संख्येने नविन प्राण्यांना जन्म देउन त्यांना प्रजननक्षम बनवण्याइतकी प्रबळ नसल्याने ती प्राणीजात संहाराच्या दिशेने जाते. हेच समीकरण जंगलतोडीला लागू पडते. तयार व्हायला शेकडो-हजारो वर्षे लागलेले जंगल आधुनीक साधने वापरून मानव काही वर्षांत / दशकांत ऊजाड करू शकतो / करत आला आहे... बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत. मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे आणि तेथे मुख्यतः निलगिरी सारखी सहजासहजी आग्नीच्या भक्षस्थानी न पडणारी झाडेच का आहेत याबाबत जे पुरावे समोर आले आहेत / येत आहेत तेही रोचक ठरावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 09:33
माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे
मी कुठे म्हणतोय की एकांडा जगु शकेल. आत्ता १० लाख प्रजाती असतील. समजा त्यातल्या १ लाख शिल्लक राहील्या तर मानव एकटा कुठे रहाणार आहे.
बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत.
असे काय पुरावे सापडले आहेत? तुम्हाला काय म्हणायचे की थर चे वाळवंट जंगल तोडीमुळे तयार झाले?
मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे
ह्याचे काही पुरावे आहेत का? ऑस्ट्रेलिया मधे १७ व्या शतका पर्यंत काही लाखांची पण लोक वस्ती नव्हती. त्या लोकांनी सगले जंगल तोडले असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग टास्मानियात इतके प्रचंड जंगल कसे शिल्लक राहीले?

In reply to by प्रसाद१९७१

थोडे वाचन वाढवा. सगळेच पुरावे तुमच्यासाठी शोधून आणायला (आणि त्यातली खुसपटे परत नीट करायला) वेळ नाही... पण अगदी आंतरजालावरही ते सर्व आहेत, तेव्हा स्वतः खात्री करून घेऊ शकाल. वेळ आणि श्रम करावे लागतील, पण त्याशिवाय नविन ज्ञान आणि विचार मिळत नाही... निदान मिळालेले बहुदा पटत नाही :) शिवाय केवळ एक मुद्दा पकडून त्याची केवळ स्वतःच्या समजूतीने साल काढण्याऐवजी कोणत्याही प्रश्नाचा त्याबद्दल जगात इतर काय पुरावे आहेत ते सारासार विवेकाने पडताळून मगच मत लिहीले तर जास्त फायद्याचे होईल असे वाटते. असो, जगातल्या सर्वांचे मत बदलणे हा माझ्या जीवनाच उद्देश नाही. मी काही मुद्दे दिले आहेत... त्याचा उपयोग करून स्वसंशोधन करु शकता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण पर्यावरणाचे अतीसमर्थक जितके एकांगी विचार करतात तेवढाच एकांगी विचार त्याचे अतीविरोधकही करतात असा अनुभव आहे. माझ्या मते... "कोणतीही किंंमत देऊन पर्यावरणासाठी पर्यावरण वाचवा" हे योग्य नाही तर "माणसाच्या भल्यासाठी आवश्यक तेवढे पर्यावरण योग्य किंमत देऊन वाचवा" हे जास्त योग्य आहे. पण, हा दुसरा पर्यायही नैसर्गिकपणे आपोआप होणारी घटना नाही... कारण माणसाचा पर्यावरणातील सद्याचा हस्तक्षेप ही आपोआप होणारी नैसर्गिक घटना नाही. असो.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 14:56
पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे? त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ? बाकी तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाहीत ? ते आधी द्या पाहु.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:09
त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ?
असे कसे, तुमच्या खापर पणजोबांच्या वेळी हजारो वाघ होते, आता ते नाहीत. तुम्हाला ( तुमच्या पिढीला ) काय फरक पडला? आता डोडो नाही, मॅमथ नाही तुम्हा/आम्हाला काय फरक पडला?

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 15:07
बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एस गुरुवार, 09/25/2014 - 15:22
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.
वर मला कुणीतरी हेकट म्हणालं होतं. तुम्हीच होतातना?

In reply to by एस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 17:18
कुठला त्रास हो, काहीतरीच. काही त्रास वगैरे होत नाहीये सृष्टीला. तुमच्या मनात जे सृष्टीचे चित्र असेल त्याला होत असेल त्रास पण सृष्टी ही पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होती आणि पृथ्वी सूर्य गिळंकृत करेल तो पर्यंत असेल. त्यात कधी जीवन असते कधी नसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव शिकार करणे किंवा शिकार होणे हा प्राणिमात्रांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. अगदी प्रागैतिहासिक काळी जेव्हा उत्पादनाची शेतीसारखी साधने मानवाला ज्ञात नव्हती तेव्हा मानवाचा अस्तित्त्वसंघर्ष हा प्रामुख्याने दोन कौशल्यांवर आधारीत होता - हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजेच शिकार आणि (कंदमुळे वगैरे) गोळा करणे. निसर्गातील इतर प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूत आणि मानवाच्या हेतूत एक मोठा फरक हा होता की प्राण्यांसाठी शिकार हे अन्न मिळवण्याचे साधन होते, तर मानवासाठी शिकार अन्नप्राप्तीबरोबरच मनोरंजनासाठी केला जाणारा खेळही होता.

कृष्ण की राधा?

भिंगरी ·

तिमा Sun, 09/21/2014 - 16:39
जुळं होऊन एकाच वेळी जन्माला आले तर सख्ख्या बहिण-भावाला राधा आणि कृष्ण म्हणावे लागू नये, म्हणून असेल कदाचित!

कवितानागेश Sun, 09/21/2014 - 22:30
बरोबर लिहिलं आहेत भिंगरीताई. जोपर्यंत 'राधे'ला जपणं आणि आणि तिला सासरी पाठवताना हुंडा देणं हे प्रकार सुरु आहेत, तोपर्यंत तिला समान वागणून मिळणं कठीण आहे. गरीब वर्गात अजून एक पाहिलेली कटू गोष्ट म्हणजे मुलगा कमावता होउन 'हाताशी' येतो, पण मुलीला मात्र दुसर्‍याकडे पाठवायचय, तिचा काय उपयोग? उलट तिच्यावर खर्चच जास्त होणार, असा अविचार दिसतो. हे बघून खरंच खूप वाईट वाटतं. ज्यांचा प्रत्यक्ष हॉस्पिटल्स, दॉक्टर्स यांच्याशी संबंध येतोय, त्यांना या प्रश्नाची धार निश्चितच कळू शकेल.

भिंगरी Tue, 12/09/2014 - 18:58
सर्व मिपाकरांना कळवण्यात येत आहे की आमच्याकडे राधा आली. कोल्हापूरात घुगर्‍या जिलेबी वाटून धूमधडाक्यात बारसे झाले. मिपाकरांसठी स्पेशल जिलेबी पाडत आहे. येणार येणार म्हणता राधेचे आगमन झाले, "पालवी" असे नामकरण झाले.

गणेशा Tue, 12/09/2014 - 20:08
अभिनंदन ! आमच्याकड पण मुलगीच. आणि तीच हवी होती. लेख आपण टाकलाय बरका.. पण आजकाल मला वाटते मुलगा मुलगी भेद खुप कमी झाला आहे. उलट मला तर वयक्तीक रीत्या मुलगीच चांगली वाटते. आमच्याकडं मुलगी झाल्यावर तिच्य नावापासुन पुढील बर्याच गोष्टी मीच ठरवणार असे ठरले होते. मुलगा झाल्यावर आमची ही .. सांगण्याचा उद्देश मी बाळ होण्या अगोदर खुप (सगळॅए मुलींचीच) नावे निवडली होती. त्यात "पालवी" पण होते. पण गणेश नावाला सुटेबल आराध्या च वाटल्याने ते ठेवले नाव. आणि एक मुलगी असण्याचा अभिमान आहे मला.

भिंगरी Tue, 12/09/2014 - 22:58
गणेशराव, अभिनंदन आपलेही. आणि आराध्याला खुप खुप आशीर्वाद!

विवेकपटाईत Wed, 12/10/2014 - 15:59
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. मला ही पहिली मुलगीच होती, आता ती सासरी गेली, हे वेगळ. डोळ्यांत अश्रू , मनात आनंद आईच्या हृदयी फुटला आता मायेचा पाझर. उबेच्या कुशीत, असा सुरु झाला चिमुकल्या चिमणीचा संसार.

भिंगरी Wed, 12/10/2014 - 16:27
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. धन्यवाद!विवेकजी. पण ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या. माझ्याकडचे म्हणजे दोनही मुलगे,जावा,दिर,पुतण्या सगळे खुश होते.मला तर मुलगीच होउ दे अशी इच्छा होती ती पुर्ण झाली. शेजारी पण खुश झाले. सूनबाईच्या माहेरच्यांचा आवाज थोडा नरम होता. पण आमचा उत्साह पाहुण त्यांची नाराजी पळाली. समोरची मंदिरातल्या पंडीतची बायको तोंडावर निराशेचे भाव आणून वदली,लडकीही हुई क्या? बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते. आता बोला!!!!!! कुठे नेऊन ठेवतात हे लोक 'समाज आपला'.

In reply to by भिंगरी

टवाळ कार्टा Wed, 12/10/2014 - 16:36
ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत
बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते.
लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले ;)

In reply to by टवाळ कार्टा

भिंगरी Wed, 12/10/2014 - 16:52
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत>>>... हे तंत्र मी कायम वापरते. पाप केलेले असेल तर मुलगी होते. असले विचार करणार्‍या स्त्रियाच असतात बहुदा,म्हणूनच एक स्त्री असूनही मला अशा स्त्रियांचा राग येतॉ.

भिंगरी Fri, 12/12/2014 - 17:47
पापाचा स्त्री जन्माशी संबंध असेल तर, जगात इतक्या महान स्त्रिया जन्माला आल्या त्यांच्या पालकांनी काय केले असेल? पाप की पुण्य? >>>>>>

आनन्दा Fri, 12/12/2014 - 19:18
मला मुलगी झाली तेव्हा मी न्युट्रल होतो.. मला मुलगा हवा - मुलगी हवी असे काही नव्हते. पण ते नवजात बाळ पाहिले आणि म्हणले गेले सगळे खड्ड्यात - हे बाळ आपले आहे हे महत्वाचे. मुलगा की मुलगी हा विचार करण्यात काय अर्थ?

अर्धवटराव Sat, 12/13/2014 - 01:03
आमच्या चिंरजीवांच्या आगमनावेळी आमची परिस्थिती मोठी विचित्र होती. मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर अत्यानंद. मुलीकरता आमचा कल जास्त होता. पण च्यायला, आमच्याच (म्हणजे माझ्या) टारगटपणाने पुनर्जन्म घेतला :D मुलगी दत्तक घ्यावी म्हणुन बराच प्रयत्न केला... पण आपल्याक्डे दत्तक प्रोसेस पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे :(

In reply to by अर्धवटराव

मुक्त विहारि Sat, 12/13/2014 - 01:13
....पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे? सहमत आहे... पण बर्‍याच वेळा काही वेगळ्या कारणांमुळे पण कुणी दत्तक मुले-मुली घेत असतील तर? कदाचित तसे होवू नये म्हणूनच ती "दत्तक" प्रक्रिया किचकट करून ठेवली असावी. ह्या "दत्तक प्रक्रियेशी" कुणी संबंधीत मिपाकर असेल तर तो जास्त माहिती देवू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

सखी Sat, 12/13/2014 - 01:20
हो मुलं योग्य घरी जावीत, मधल्यामधे भलतीकडे जाऊ नयेत म्ह्णुन ब्-याच देशात नियम गेल्या काही दशकांमध्ये कडक केले आहेत, पण मुलांच्या भविष्याचा विचार करता ते आवश्यक आहेत असेच वाटते. अभिजित यांची ही मालिका जरुर वाचा दत्तकविधान-१, बहुगुणींनी पहिल्याच भागाच्या प्रतिसादात पुढच्या सगळ्या भागांच्या लिंक्स दिल्या आहेत.

भिंगरी Sat, 12/13/2014 - 12:13
धन्यवाद!!!!!!!!!! अर्धवटराव आणि मु.वि. मला मुलींची हौस आहे,ती मी ४ पुतण्यांमध्ये भागवली.आता त्या लग्न होउन एक एक मुलांच्या आई झाल्या आहेत मग मी माझी हौ आमच्या सोसायटीतील गुरख्याच्या मुलीला कपडे, खेळणी देउन भागवत होते.तीही आता मोठी होत चालली आहे. पण आता माझ्याकडे हक्काची नात आली आहे.ती आल्यावर माझे मिपा मिपा खेळ खेळणे कमी होईल.

तुषार काळभोर Sat, 12/13/2014 - 16:59
आम्हाला तर मुलगी होणार याची इतकी खात्री होती, की मुलीचं नाव पण ठरवून ठेवलं होतं...मुलगा झाल्यावर काय नाव ठेवायचं याचा विचारही केला नव्ह्ता!! . . . ३ महिने नावनोंदणी पण केली नाही, नाव ठरलं नसल्याने..

भिंगरी Sun, 12/14/2014 - 20:22
धन्यवाद!!!!!!!!!! बोका-ए-आझम, जेपी आज्जे जरा जरा गरगरायच कमी कर... म्हणजे नक्की काय करू?

असंका Mon, 12/15/2014 - 12:00
कोल्हापूरच्या होय आपण? आम्ही पण.... मला पण एक लेक आहे आणि गंमत म्हणजे तिचे नाव राधा या अर्थी अनया असे ठेवले आहे. तिचा जन्मच गोकुळाष्टमीचा. त्यामुळे.

तिमा Sun, 09/21/2014 - 16:39
जुळं होऊन एकाच वेळी जन्माला आले तर सख्ख्या बहिण-भावाला राधा आणि कृष्ण म्हणावे लागू नये, म्हणून असेल कदाचित!

कवितानागेश Sun, 09/21/2014 - 22:30
बरोबर लिहिलं आहेत भिंगरीताई. जोपर्यंत 'राधे'ला जपणं आणि आणि तिला सासरी पाठवताना हुंडा देणं हे प्रकार सुरु आहेत, तोपर्यंत तिला समान वागणून मिळणं कठीण आहे. गरीब वर्गात अजून एक पाहिलेली कटू गोष्ट म्हणजे मुलगा कमावता होउन 'हाताशी' येतो, पण मुलीला मात्र दुसर्‍याकडे पाठवायचय, तिचा काय उपयोग? उलट तिच्यावर खर्चच जास्त होणार, असा अविचार दिसतो. हे बघून खरंच खूप वाईट वाटतं. ज्यांचा प्रत्यक्ष हॉस्पिटल्स, दॉक्टर्स यांच्याशी संबंध येतोय, त्यांना या प्रश्नाची धार निश्चितच कळू शकेल.

भिंगरी Tue, 12/09/2014 - 18:58
सर्व मिपाकरांना कळवण्यात येत आहे की आमच्याकडे राधा आली. कोल्हापूरात घुगर्‍या जिलेबी वाटून धूमधडाक्यात बारसे झाले. मिपाकरांसठी स्पेशल जिलेबी पाडत आहे. येणार येणार म्हणता राधेचे आगमन झाले, "पालवी" असे नामकरण झाले.

गणेशा Tue, 12/09/2014 - 20:08
अभिनंदन ! आमच्याकड पण मुलगीच. आणि तीच हवी होती. लेख आपण टाकलाय बरका.. पण आजकाल मला वाटते मुलगा मुलगी भेद खुप कमी झाला आहे. उलट मला तर वयक्तीक रीत्या मुलगीच चांगली वाटते. आमच्याकडं मुलगी झाल्यावर तिच्य नावापासुन पुढील बर्याच गोष्टी मीच ठरवणार असे ठरले होते. मुलगा झाल्यावर आमची ही .. सांगण्याचा उद्देश मी बाळ होण्या अगोदर खुप (सगळॅए मुलींचीच) नावे निवडली होती. त्यात "पालवी" पण होते. पण गणेश नावाला सुटेबल आराध्या च वाटल्याने ते ठेवले नाव. आणि एक मुलगी असण्याचा अभिमान आहे मला.

भिंगरी Tue, 12/09/2014 - 22:58
गणेशराव, अभिनंदन आपलेही. आणि आराध्याला खुप खुप आशीर्वाद!

विवेकपटाईत Wed, 12/10/2014 - 15:59
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. मला ही पहिली मुलगीच होती, आता ती सासरी गेली, हे वेगळ. डोळ्यांत अश्रू , मनात आनंद आईच्या हृदयी फुटला आता मायेचा पाझर. उबेच्या कुशीत, असा सुरु झाला चिमुकल्या चिमणीचा संसार.

भिंगरी Wed, 12/10/2014 - 16:27
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन. धन्यवाद!विवेकजी. पण ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या. माझ्याकडचे म्हणजे दोनही मुलगे,जावा,दिर,पुतण्या सगळे खुश होते.मला तर मुलगीच होउ दे अशी इच्छा होती ती पुर्ण झाली. शेजारी पण खुश झाले. सूनबाईच्या माहेरच्यांचा आवाज थोडा नरम होता. पण आमचा उत्साह पाहुण त्यांची नाराजी पळाली. समोरची मंदिरातल्या पंडीतची बायको तोंडावर निराशेचे भाव आणून वदली,लडकीही हुई क्या? बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते. आता बोला!!!!!! कुठे नेऊन ठेवतात हे लोक 'समाज आपला'.

In reply to by भिंगरी

टवाळ कार्टा Wed, 12/10/2014 - 16:36
ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत
बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते.
लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले ;)

In reply to by टवाळ कार्टा

भिंगरी Wed, 12/10/2014 - 16:52
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत>>>... हे तंत्र मी कायम वापरते. पाप केलेले असेल तर मुलगी होते. असले विचार करणार्‍या स्त्रियाच असतात बहुदा,म्हणूनच एक स्त्री असूनही मला अशा स्त्रियांचा राग येतॉ.

भिंगरी Fri, 12/12/2014 - 17:47
पापाचा स्त्री जन्माशी संबंध असेल तर, जगात इतक्या महान स्त्रिया जन्माला आल्या त्यांच्या पालकांनी काय केले असेल? पाप की पुण्य? >>>>>>

आनन्दा Fri, 12/12/2014 - 19:18
मला मुलगी झाली तेव्हा मी न्युट्रल होतो.. मला मुलगा हवा - मुलगी हवी असे काही नव्हते. पण ते नवजात बाळ पाहिले आणि म्हणले गेले सगळे खड्ड्यात - हे बाळ आपले आहे हे महत्वाचे. मुलगा की मुलगी हा विचार करण्यात काय अर्थ?

अर्धवटराव Sat, 12/13/2014 - 01:03
आमच्या चिंरजीवांच्या आगमनावेळी आमची परिस्थिती मोठी विचित्र होती. मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर अत्यानंद. मुलीकरता आमचा कल जास्त होता. पण च्यायला, आमच्याच (म्हणजे माझ्या) टारगटपणाने पुनर्जन्म घेतला :D मुलगी दत्तक घ्यावी म्हणुन बराच प्रयत्न केला... पण आपल्याक्डे दत्तक प्रोसेस पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे :(

In reply to by अर्धवटराव

मुक्त विहारि Sat, 12/13/2014 - 01:13
....पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे? सहमत आहे... पण बर्‍याच वेळा काही वेगळ्या कारणांमुळे पण कुणी दत्तक मुले-मुली घेत असतील तर? कदाचित तसे होवू नये म्हणूनच ती "दत्तक" प्रक्रिया किचकट करून ठेवली असावी. ह्या "दत्तक प्रक्रियेशी" कुणी संबंधीत मिपाकर असेल तर तो जास्त माहिती देवू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

सखी Sat, 12/13/2014 - 01:20
हो मुलं योग्य घरी जावीत, मधल्यामधे भलतीकडे जाऊ नयेत म्ह्णुन ब्-याच देशात नियम गेल्या काही दशकांमध्ये कडक केले आहेत, पण मुलांच्या भविष्याचा विचार करता ते आवश्यक आहेत असेच वाटते. अभिजित यांची ही मालिका जरुर वाचा दत्तकविधान-१, बहुगुणींनी पहिल्याच भागाच्या प्रतिसादात पुढच्या सगळ्या भागांच्या लिंक्स दिल्या आहेत.

भिंगरी Sat, 12/13/2014 - 12:13
धन्यवाद!!!!!!!!!! अर्धवटराव आणि मु.वि. मला मुलींची हौस आहे,ती मी ४ पुतण्यांमध्ये भागवली.आता त्या लग्न होउन एक एक मुलांच्या आई झाल्या आहेत मग मी माझी हौ आमच्या सोसायटीतील गुरख्याच्या मुलीला कपडे, खेळणी देउन भागवत होते.तीही आता मोठी होत चालली आहे. पण आता माझ्याकडे हक्काची नात आली आहे.ती आल्यावर माझे मिपा मिपा खेळ खेळणे कमी होईल.

तुषार काळभोर Sat, 12/13/2014 - 16:59
आम्हाला तर मुलगी होणार याची इतकी खात्री होती, की मुलीचं नाव पण ठरवून ठेवलं होतं...मुलगा झाल्यावर काय नाव ठेवायचं याचा विचारही केला नव्ह्ता!! . . . ३ महिने नावनोंदणी पण केली नाही, नाव ठरलं नसल्याने..

भिंगरी Sun, 12/14/2014 - 20:22
धन्यवाद!!!!!!!!!! बोका-ए-आझम, जेपी आज्जे जरा जरा गरगरायच कमी कर... म्हणजे नक्की काय करू?

असंका Mon, 12/15/2014 - 12:00
कोल्हापूरच्या होय आपण? आम्ही पण.... मला पण एक लेक आहे आणि गंमत म्हणजे तिचे नाव राधा या अर्थी अनया असे ठेवले आहे. तिचा जन्मच गोकुळाष्टमीचा. त्यामुळे.
आजकाल स्त्री भृणहत्या हा विषय चांगलाच चर्चेत आहे.स्त्रीला समाजात सन्माननीय स्थान मिळावे या साठी सगळ्यांचीच खटपट चालली आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत हल्ली एक मुलगी असलेले पालक सुद्धा दुसऱ्या अपत्याची वाट न पाहता मुलीला उच्च शिक्षण मिळावे म्हणून धडपडत असतात, (समाजातील हा बदल नक्कीच लक्षवेधक आहे.) तर दुसऱ्या बाजूला पाहतो मुलगा होण्याची वाट पाहण्यात, संगोपन करण्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही मुली जन्माला घातल्या जातात.(शेवटास मुलगा होतो कि नाही देव जाणे.) जास्त मुली असणाऱ्या मातेला उगाच अपराधी वाटत असे.

आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १

संदीप डांगे ·

गुळाचा गणपती Sun, 09/21/2014 - 15:11
संदीप, आपण अगदी मनमोकळ्या शब्दात तुमची परिस्थिती जशीच्या तशी मांडल्याने अक्षरशः अंगावर काटा आला. आपल्या झालेल्या चुका मोठ्या मनाने मान्य करणे, इतरांसमोर मांडणे ह्याला खूप धैर्य लागते. पुढील भाग लवकर वाचायला मिळावा.

धन्या Sun, 09/21/2014 - 15:44
तुमच्या त्या धाग्यावर मी काही लिहिले नाही. कारण अशा प्रसंगात काय बोलायचे, काय निर्णय घ्यायचे हे मलाही कळत नाही. बाकी मिपाकरांनी तुम्हाला चांगले सल्ले दिले. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्हाला याक्षणी आवश्यक असणारा भावनिक आधार दिला. मनात असाही प्रश्न उभा राहीला होता की संदीपनी हे सारे मिपावर सांगणे म्हणजे चौकात उभे राहून बोलण्यासारखे नाही का. मात्र असा आधार मिळवणे ही तुमची आताची गरज आहे. त्या धाग्यावर काहींनी समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचाही तुम्ही विचार करावा. ते लोक अशा प्रसंगांमध्ये काय बोलावं याविषयी प्रशिक्षित असतात. अशाच नसल्या तरी अंतिम निष्कर्ष असाच निघणार्‍या अशा दहा प्रकारच्या परिस्थीतीतून जाणार्‍या लोकांना त्यांना धीर दिलेला असतो. असो. तुमचा हा लेख वाचणार्‍या प्रत्येकाला काही ना काही या लेखातून शिकण्यासारखं आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात. तसा हा तुमचा लेख अनेकांना मार्गदर्शक ठरेल.

फक्त एकच गोष्ट माणसाला सार्‍या आयुष्यात आणि कोणत्याही प्रसंगात तारु शकते ती म्हणजे प्रामाणिकपणा! जर तुम्ही कुणाला फसवलं नसेल तर दैवाचे फासे कसेही पडोत, त्याचा दोष आपल्याला लागत नाही. मग आत्महत्त्येचा विचारच मनला शिवत नाही कारण आपण स्वतःशी एकनिष्ठ असतो. असा एकसंध माणूस स्वतःला कशाला संपवेल? फक्त एकच गोष्ट सांगतो, पैसा माझा व्यावसाय आहे आणि जितके कफल्लक मी पाहिलेत त्यांची एकच कहाणी आहे, त्यांना मोह नडलायं. कुणावर कधी काय प्रसंग येईल (जसा तुझ्या पत्नीचा placenta previa, किंवा अपघात), आणि काय आपत्ती ओढवेल ते सांगता येत नाही. पण जबरदस्त आर्थिक फटका बसण्याचं नेमकं कारण मोह हेच आहे. असो, तुझा बायोडेटा माझ्या पर्सनल मेल आयडीवर पाठव, नाशिकला माझा एक प्रथितयश मित्र आहे त्याच्याशी बोलतो. त्यानं जर मनावर घेतलं तर तो तुझं आयुष्य बदलून टाकेल.

पाषाणभेद Sun, 09/21/2014 - 16:13
३. लग्नाचे प्रमाणपत्र नाही म्हणून कुटुंबाचा वैद्यकीय विमा नाही हे कळाले नाही. माझ्या मते जॉईंट विमा पॉलीसी किंवा मेडीक्लेमलाही असला प्रश्न उपस्थीत होत नाही. बाकी आपल्या पुढील आयुष्याला शुभेच्छा.

In reply to by संदीप डांगे

पाषाणभेद Sun, 09/21/2014 - 17:44
भाऊ जॉईंट विमा पॉलीसी (हजबंड अँन्ड वाईफ) किंवा मेडीक्लेमलाही (पुर्ण कुटूंब) यासाठी मॅरीज सर्टीफीकीट लागत नाही. पॅन कार्ड चालते. फक्त जॉईंट विमा पॉलीसी काढतांना सौ.चे माहेरचे डिटेल्स द्यावे लागतात. (म्या पन नाशकात र्‍हातो. आयटी आन बाकीच्या सगळ्याच क्षेत्रात नाशकात चांगला नोकरवर्ग मिळू शकतो. आपल्याला चांगला नोकर मिळू शकले नाहीत हा दुर्दैवाचा भाग असावा. आपल्या लिखाणात तसा उल्लेख आल्याने इतरांचा नाशिकमधील नोकरवर्गाबाबात गैरसमज होवू नये म्हणून असे लिहीत आहे. नाशिकमधील नोकरवर्गाबाबत इतर शहरवासीयांनी गैरसमज करू नये. उडदामाजी काळेगोरे सगळीकडेच असतात. नाशिकबाबात दुराग्रह बाळगू नये. जय नाशिक.)

In reply to by पाषाणभेद

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 18:39
मला वाटतं नाशिककर नोकरदारांना मी कुठेही जनरलाइज केलेलं नाही. संपूर्ण परिच्छेद पुन्हा वाचावा. माझ्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत एवढेच म्हटले आहे. आता यात किती तरी अर्थ निघू शकतात जसे कि माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. घाई घाई मध्ये मुलाखती नीट झाल्या नसतील, त्यांना मला नक्की काय हवे हे समजले नसेल, मुंबई नाशिक च्या संस्कृतीत मुलभूत फरक तो आहेच, निदान मला तरी जाणवला. नाशिककर नोकरदारांना सरसकट दोषी अजिबात धरलेले नाही. मुळात नाशिक ला शिफ्ट होण्याचा व ऑफिस सुरु करण्याचा निर्णय घेण्यामागे हि तुम्ही सांगितलेली आणि ऐकून असलेली कीर्ती होती. नशिबाचे फासे उलटे पडले त्यात कोण काय करणार?

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 16:37
संदीपभाऊ तुम्हाला तुमच्या प्रामाणिक पणाबद्दल अनेक सलाम.! हे सर्व वाचल्यावर एक गोष्ट मात्र कळुन आली. तुम्हाला काम मिळते आहे आणि तुमची कामे करण्याची क्षमता अजुनही अबाधित आहे + मार्केटमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाला मागणी आहे आणि हीच फार महत्वाची गोष्ट आहे. विचार करा जे स्किलसेट तुमच्याकडे आहेत त्यांचीच जर मार्केटमध्ये आवश्यकता उरली नसती तर आलेला प्रसंग हा फार भयानक असला असता.थोडक्यात एका दिवसातच तुम्ही Obsolete होऊ शकला असता.एकुण परिस्थितीला असलेली ही एक चंदेरी किनारच आहे. ह्या गोष्टीवर विचार अवश्य करावा.

पैसा Sun, 09/21/2014 - 17:45
प्रांजळपणे तुमची आत्मकथा इथे शेअर केल्याबद्दल अभिनंदन तसेच धन्यवाद! संपादक मंदळाने इशारा दिला त्याला पूर्वीचे काही अनुभव कारण आहेत. तुमची हकीकत खरी असली तरी मिपाच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ नयेत हीच अधिकृत भूमिका आहे त्यामुळे असा इशारा देणे भाग होते. इथे अनेकांनी तुम्हाला नोकरीसाठी हात देऊ केला आहे. त्याबद्दलही लवकर निर्णय घ्या. स्वतःच्या चुका तुम्हाला कळत आहेत, याचाच अर्थ त्यांचे पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी दिसते. २/३ वेळा तुम्ही थोडीफार माघार घेऊन परत जम बसवला आहे असं दिसतं. जरी धंदाच नेटाने करायचा असेल तरी सध्या घर, सोनेनाणे, धंद्यासाठी आवश्यक मशिनरी फर्निचर जे काही असेल ते, यावर तारण कर्ज कोणत्याही बँकेकडून मिळू शकेल. धंद्यासाठी भांडवली आणि चालू असे दोन प्रकारचे खर्च असतात, त्यासाठी दीर्घ मुदतीची कर्ज आणि कॅश क्रेडिट असे २ प्रकारची कर्ज आवश्यक असतात. पैकी दीर्घ मुदतीचे कर्ज हे दर महिना थोडे थोडे करून भराय्चे असाते. तर कॅश क्रेडिट रोजच्या खर्चासाठी लागते. मात्र तुम्ही ओणत्याही बँकेचे कर्ज न घेता सगळी खाजगी कर्जं घेतलीत, (अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरले नव्हते हे कारण आहे) त्यामुळेच आजची परिस्थिती आली आहे. आता आधीची रिटर्न्स भरायला गेलात तर बहुधा टॅक्स्+दंड भरावा लागेल. पण रिटर्न्स भरत नाही तोपर्यंत बँक कर्ज मिळणे अशक्य आहे. महिना एक लाख उत्पन्न असताना रिटर्न्स भरणे आवश्यक होते असे वाटते. निदान यापुढे तरी हिशेब व्यवस्थित ठेवत जा ही विनंती. आणि हे कर्ज आज ना उद्या फिटेलच, पण यापुढे अशी खाजगी कर्जे अगदी जवळच्या नातेवाईकांचीही घेऊ नका. आत्ता या क्षणी पत्नीचे दागिने, गाडी जे असेल ते डिस्पोज ऑफ करून बर्‍याच कर्जातून मोकळे होता येईल असे वाटते. तुम्ही एवढे प्रांजलपणे लिहिले आहे म्हणूनच हे सर्व लिहीत आहे. तुम्हाला दुखवायचा हेतू नाही. तुमच्या हातात कला आहे, तर या परिस्थितीतून नक्की बाहेर पडाल.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 18:23
तुमचे अनुभव वाचून एव्हढे लक्षात आले की खुपशा गोष्टी, तुम्ही सुद्धा, परिस्थितीचे विश्लेषण करून, स्विकारल्या आहेतच. मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा स्वभाव आधीपासूनच होता. जे जे पाहिजे ते ते हट्टाने कष्ट करून मिळवले. हा स्वभाव वाईट नाही. मात्र स्वतःचे मुल्यमापन स्वतःच सतत करत राहावे लागते. इतरांच्या सांगण्यावर लगेच अम्मल नाही केला तरी इतरांचे नक्कीच ऐकून घ्यावे. मनातल्या मनात त्यावर स्वतःशीच प्रामाणिक चर्चा करावी आणि आपला बंदा रुपया खणखणीत आहे की नाही हे सतत तपासत राहावे. अमुक एक गोष्ट होणारच असे मनात धरले कि ती झाली नाहीतर काय हा विचार केलाच नाही. नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा. धाडसीपणे पुढे टाकलेले पाऊल गरज भासल्यास मागे घेण्यात कसालाच कमीपणा नसतो. तो व्यवहार आहे. धंद्यात भावनेपेक्षा व्यवहार अधिक महत्वाचा असतो. बायको नेहमी सांगायची जे हातात आहे त्याचा विचार करूनच नियोजन करायचे आश्वासन द्यायची. बायकोचे (किंवा कुणाचेही) ऐकायचे की नाही हे ती (बायको किंवा दूसरी व्यक्ती) किती व्यवहारी आहे आणि मनाने विचार करणारी आहे की बुद्धीने ह्यावर अवलंबून असते. बायकोचे सर्वच ऐकणारे आणि कांहीच न ऐकणारे दोघेही खड्ड्यात जाऊ शकतात. त्यामुळे काय ऐकायचे काय नाही हे अनुभवावरून ठरवावे. हे पैसे येतील. तिथून काम येईल ह्या बेभरवश्यच्या नियोजनाला काही अर्थ नसतो. हे बाकी खरं आहे. तुमच्या सौंनी योग्य तोच सल्ला दिला आहे. पण तिचे कधी ऐकले नाही. कारण मागचे "अनुभव". मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आणि हा इगोच दुसर्‍यांच्या सल्यांवर विचारही करायला परवानगी देत नाही. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. असे वागणे धंद्यातच काय पण रोजच्या जीवनातही टाळलेच पाहिजे. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही. आंधळी रिस्क घेण्याने माणूस खड्ड्यात जातो किंवा भिंतीवर आपटतो. धंद्यात जोखिम उचलताना नुसते डोळेच नाही तर कान आणि मन सुद्धा उघडे ठेवावे. तसेच जोखीमीची तीव्रता (इंटेन्सिटी) तपासून बाजी उलटल्यास होणार्‍या नुकसानाबरोबर तोलून पाहावे. ते नुकसान क्षुल्लक किंवा कमी पातळीचे असेल तरच जोखिम उचलावी, मध्यम किंवा उच्च पातळीचे असेल तर उचलू नये. (जोरदार सेटबॅक बसू शकतो). त्यातच मुलगा ५ महिन्याचा असताना अंगावर गरम दुध सांडून ५०% भाजला. त्याचे शरीर भाजले आणि आमच्या दोघांची मने. फार दुर्दैवी घटना. अशा घटनांवर आपलं कांही नियंत्रण नसतं. विमा असता तर फारात फार आर्थिक बाजूची काळजी घेतली गेली असती पण आपल्या पोटच्या मुलाला होणार्‍या यातना आपल्या मनाचे, आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतो. त्यात तुमचा कांही दोष नाही. हा नशिबाचा/दुर्दैवाचा भाग आहे. आमचा संसार दृष्ट लागण्यासार्खाच आहे. त्यामुळे आपल्या सोबत काही चांगले होईल तर त्याचीच भीती वाटू लागली. कारण त्या चांगल्याला कुणाची तरी नजर हमखास लागतेच लागते असा वाईट अनुभव. स्वतःचा व्यवसाय करा किंवा नका करू पण ह्या मानसिकतेतुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडा. भन्नाट आत्मविश्वास ते शुन्य आत्मविश्वास असा प्रवास फार झपाट्याने झाला. ..... आपण हे करू शकणार नाही असा न्यूनगंड आला. तो बराच काळ होता. 'भन्नाट आत्मविश्वास' ह्यात स्वकर्तृत्त्वाचा भाग किती आणि नशिबाचा भाग किती हे तपासून पाहावे. खुप वेळा आपल्या नशिबाने (यशासाठी लागणार्‍या इतर सर्व बाबी आयत्याच जुळून येणे) मिळालेल्या यशालाच आपण आपलं कर्तृत्व समजतो. कित्येकदा ज्याला आपण आत्मविश्वास समजतो तो आपल्या मनावरचा सोनेरी मुलामा असतो. कांही कारणाने तो मुलामा खरवडला गेला तर आपल्याला समजतं आपण सुद्धा आतून, मुळात, इतरांसारखेच आहोत. किंचिंत घाबरट आणि mediocreच आहोत. ह्याचा स्विकार करणं बरंच कठीण जातं. पण लवकरात लवकर हे सत्य स्विकारल्याने पुढील वाटचाल सुरक्षित होते. सरळ राजीनामा दिला. त्या आधी एक २ लाखाचे लोन घेतले. दूसरा मार्ग स्पष्ट दिसण्याआधीच, लांबचा असला तरी सुरक्षित असा मुख्य रस्ता सोडून, काट्याकुट्यांच्या जंगलात (दोन लाखांचे कर्ज) शॉर्ट्कट सापडेल ह्या आशेने नविन वाट शोधण्यात शहाणपणा नाही. नोकरी सोडल्यावर दुसर्याच महिन्यात बायकोची एक आणि मुलाची एक अश्या दोन शस्त्रक्रिया यात बराच खर्च झाला. त्याच्या दुसर्या महिन्यात गाडीचा एक क्षुल्लक अपघात होऊन त्यात ४० हजार खर्च झाले. विम्याचे महत्व लक्षात आले असेलच. जी गंगाजळी ९ महिन्यासाठी प्लान केली होती ती ३ महिन्यात साफ झाली. आजारपणं, अपघात ह्यांचा विचारच न केल्याने ९ महिन्यांचे प्लानिंग केले. ९ महिन्यांना पुरेल इतकेच पैसे जवळ असताना ३ महिन्यांचेच प्लानिंग करायला पाहिजे. अर्थात, असे सल्ले नंतर देणं सोपं असतं. तरीपण ह्या अनुभवाचा भविष्यात उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. नशिबाने पुढे साथ दिली आणि कामाचा ओघ सुरु झाला. एप्रिल २०१२ ते एप्रिल २०१३ फारच मजेत गेले. एव्हढे नकारात्मक अनुभव आल्यानंतर जे कांही पैसे हाती आले त्यात 'फार मजा' न करता भविष्यासाठी विमा किंवा इतर काय तजविज केली? तेंव्हा एका ग्राहकाने पार्टनरशिप चा प्रस्ताव ठेवला. त्याचे पैसे आणि माझी मेहनत व ज्ञान असा तो एकंदर मामला होता. मी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेंव्हा मला एका गुजराथी व्यावसायिकाने सल्ला दिला होता. लहानात लहान धंद्याने सुरुवात कर पण स्वतःचा कर. पार्टनर घेऊ नकोस. सख्ख्या भावालाही, मार्केट दरापेक्षा जास्त दराने पगार देऊन मॅनेजर म्हणून ठेव, पण पार्टनर करून घेऊ नकोस. पार्टनरशिप वाईटच असते असे नाही पण ती सांभाळायला अंगात जास्त हुशारी आणि व्यवसायाचा अनुभव असावा लागतो. पार्टनरशिप यशस्वी झाल्यास 'माझ्यामुळे' आणि नुकसान झाल्यास 'त्याच्यामुळे' अशी दोन्ही भागिदारांची भूमिका असते. दोन्ही परिस्थितीत संवेदनशील व्यक्तीच्या वाट्यास मनःस्तापाव्यतिरिक्त कांही येत नाही. सुमारे १० ते १५ लाख गुंतवणूक होती. ह्या भांडवलात तुमची जमा पुंजी किती होती आणि कर्ज किती होते? जर सर्व गुंतवणूक भागिदार करणार असेल तर तो सतत तुमच्यावर दबाब ठेवणार ह्याची कल्पना असायला हवी होती. एव्हढी रक्कम गुंतविणारा भागिदार स्वस्थ बसून आपल्याला आपल्या मर्जी नुसार धंदा करू देईल असं समजणं हा भाबडेपणा आहे. पार्टनर एक मोठा बिल्डर होता. भागिदार कितीही पैसे गुंतवित असला तरी तो आपल्या तोलामोलाचा असावा. आपल्याला डोईजड होईल असा नसावा. आर्थिकदृष्ट्याही नाही, सामाजिकदृष्ट्याही नाही आणि मसलपॉवरच्या दृष्टीनेही नाही. त्याने त्याची काही माणसे ह्या सगळ्यावर देखरेख व संयोजना साठी दिली. ईथेच घात झाला. वर म्हंटल्याप्रमाणेच, जो १५ लाख गुंतवितो तो स्वस्थ बसणार नाही. तुमच्या प्रत्येक हालचालीवर 'लक्ष' ठेवेल आणि तुम्ही किती वेळा श्वास घेतला आणि सोडला ह्यावरही 'लक्ष' ठेवेल. तुमचे स्वातंत्र्य संपुष्टात येते. म्हणाले मी तुला पैसे देतो. बुडाले तरी हरकत नाही. (हा आशीर्वाद असल्यावर धंदा चालेल तर काय बिशाद) देणार्‍याने असे म्हंटले तरी 'घेणार्‍याने' हे कर्ज आहे आणि आपल्याला हे लवकरात लवकर फेडून आपला हात दगडाखालून मोकळा करून घ्यायचा आहे हे कधीच विसरता कामा नये. तुमचा ह्या मदतीकडे बघायचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. आता शब्द बदलायची बाबांची वेळ होती. त्यांनी पुढचे पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. वरून माझीच खरडपट्टी काढायला लागले. बाबांनीही पैसे दिले होते तेंव्हा त्यांचेही लक्ष असणारच तुमच्या व्यवसायावर. तुमचं व्यवसाय करणं (किंवा वागणं) जर बेदरकार असेल तर त्यांनाही व्यवसायाच्या यशाबद्दल साशंकता वाटणारच. त्यामुळे २ लाखांवर पाणी सोडून बाकीचे पैसे वाचविण्याचा त्यांनी पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे. शिवाय तुमची तुमच्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी, त्यातील खाचाखोचा माहित असल्याने आणि व्यावसायिकतेची ओढ असल्याने त्या दोन लाखाच्या सुरक्षिततेकडे किंवा परताव्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोण आणि तुमच्या वडिलांचा (वरील सर्व गुणांच्या अभावामुळे) दृष्टीकोण ह्यात फरक हा असणारच. त्यातून हे घडले असावे. शिवाय पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते. पुन्हा तुमच्या सौंचा सल्ला स्विकारला असतात तर अशा बेभरवशाच्या अनोळखी ग्राहकाकडून येणार्‍या पैशावर विसंबून राहिला नसतात. आपण ग्राहक असताना विक्रेत्याच्या आणि विक्रेता असताना ग्राहकांच्या 'गोडगोड' बोलण्याला फसायचं नसतं. माझ्याकडेही गिर्‍हाईके येतात. ५-६ माणसांचे जेवण हवे असते. किती खर्च येईल सांगितल्यावर घासघिस सुरु होते. मी शांत राहतो. मग ते हुकमी एक्का बाहेर काढतात अमुक अमुक फंक्शन ३०० माणसं जेवायला येणार आहे. तुम्हालाच ऑर्डर देऊ वगैरे वगैरे आश्वासनं देतात. मी सांगतो 'ह्या ऑर्डरचा हा रेट आहे. ती ऑर्डर येईल तेंव्हा 'त्या' ऑर्डरवर नक्कीच डिस्काउंट देईन.' असो. केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते. चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून किंवा 'अमुल्य' अनुभवाची फी असे समजून सोडून द्यायचे. पुढे चलायचे. खेदाने असे म्हणावे लागेल, धंदा बुडायला चांगले डिझायनर न मिळणे हे एक मोठे कारण आहे. डिझायनरला निवडताना नीट पारखून 'ट्रेड टेस्ट' घेऊन निवडायचे. त्यांच्या बोलण्यावर जायचे नाही. त्यांना नोकरी हवी असते त्यामुळे ते 'हां सर्व कांही करतो. मला सर्व येतं. मागे हे हे काम केलेले आहे.' अशा थापा ठोकतातच. शक्य असेल तर सॅलरी + कमिशन (ह्यात सॅलरी कमी पण दोन्ही मिळून साईजेबल रक्कम होईल) असे आमिष दाखवायचे. त्याचे डिझाईन गिर्‍हाईकाकडून पास झाले तरच पूर्ण रक्कम त्याला मिळेल. अर्थात माझा कुंपणावरून दिलेला सल्ला आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जास्त चांगली कल्पना आहेच. हिम्मत हरु नका. पण अनुभवांच्या जखमा कुरुवाळत बसण्याऐवजी त्यातून धंद्याच्या क्लुप्त्या शिकून घ्या आणि संयमाने यशाच्या मार्गावर पोहोचा. अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.

In reply to by एस

प्यारे१ Sun, 09/21/2014 - 19:36
+२ काय चुका झाल्या हे आत कुठंतरी पक्कं नोट डाऊन करुन त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा (प्राधान्यानं) सध्या त्या निस्तरण्याकडं जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्यातून बाहेर पडून नंतर काय ते ठरवता येईल. (ठरवावं लागेलच) आणि हो, कमीअधिक प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. 'समस्या असणं' हे तत्त्व सारखंच आहे. त्या 'समस्यांचं रुप' हे तपशील आणि तपशीलाचे भाग वेगवेगळे आहेत/असतात. त्यामुळं आपण सगळेच एकाच धारेचे प्रवासी आहोत. काहींच्या बोटी थोड्या कणखर, काहींची वल्हवण्याची क्षमता जास्त, वारं येईल तसं शिडाला दिशा देण्याचं कसब उत्तम, त्यानंतर टीम मेंबर्स नि ट्युनिंग आणि शेवटी अंशतः नशीबाचा हातभार असं सगळं गणित जुळून येणं भाग असतं. बाकी त्रास होतोच. तो एकदाच काय तो करुन घेऊन नंतर मात्र अजिबात न उगाळता पुढं जाणं आवश्यक आहे. शुभेच्छा आहेतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 19:06
छान विश्लेषण केले आहे. पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. अर्थातच "भाग्य कि कर्म" हा सनातन लढा आहेच. असो. मी फक्त एवढेच म्हणेन कि माझे अनुभव घटनेनुसार मांडले आहेत. त्यात बरेच निर्णय हे त्या काळातली उपलब्ध तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले आहेत. त्या परिस्थिती चे सर्वच कंगोरे इथे मांडणे शक्य नाही. उद. बिग पिच्चर दाखवणारे सगळ्याच धंद्यात भेटतात. त्यामुळे अशा लोकांना मी पूर्वीपासूनच ओळखून आहे. प्रस्तुत ग्राहक हा बिग पिच्चर दाखवत नव्हता. कारण आता हे दोन लेबल कर नंतर १०० लेबल ची कामे देतो अशी काही गोष्ट नव्हती. एकदमच १० लेबेल चे त्याने रोख पेमेंट केले होते व नंतरच्या ४ मोठ्या ऑर्डर चे हि रीतसर पेमेंट केले. त्यांचा खरोखरच मोठा झोल झाला. कारण ३ महिन्यात मी त्यांच्या मुळापर्यंत जाऊन खबरबात काढली होती. काहीतरी कारण झाले आणि त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या कंपनीशी त्यांचा काहीतरी वाद झाला. नंतर ती कच्चा मालवली कंपनी मला लेबलची ऑर्डर देत होती पण माझे रेट त्यांना परवडले नाही. ह्यात फार गुंतागुंत आहे. आणि ती सगळीच इथे सांगता येत नाही. असे प्रत्येक घटनेत झाले आहे. तात्पर्य: आपण घटना रोखू शकत नाही. पण त्याच चुका परत करू नये एवढे शिकावे. यशाने हुरळून जाऊ नये किंवा अपयशाने खचून जाऊ नये एवढा संदेश मी आपल्या प्रतिसादातून घेत आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 20:01
>>>> पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. असं मी माझ्या प्रतिसादात कुठे म्हंटले आहे? माझे म्हणणे आहे यशाचे आणि अपयशाचे, दोन्हीचे, डोळे, कान आणि मन उघडे ठेवून विश्लेषण करा. नशिबाने मिळालेल्या यशाला आपल्या कर्तृत्त्वाने मिळविले असे समजू नका. ह्याचा अर्थ यश नशिबाने मिळते आणि अपयश आपल्या मूर्खपणामुळे होते असा चुकीचा अर्थ आपण काढलेला दिसतो आहे. मूर्खपणाचे निर्णय केंव्हाही महागातच पडतात. आंधळी जोखिम उचलू नका. डोळे, कान आणि मन उघडे ठेवून परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करून काय तो निर्णय घ्या. अशा सवयीतून जेंव्हा यशाची चढती कमान सुरु होईल आणि अपयशाचे प्रसंग आले तरी ते सहजतेने हाताळण्याइतके सौम्य असतील अशा परिस्थितीतिल ते यश हे तुमच्या कर्तृत्त्वाचे आणि नशिबाचे प्रतिबिंब असेल. मूर्खपणा सोडून दिल्यामुळे, उध्वस्त होण्यासारखे, अपयश दृष्टीक्षेपातही नसेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 21:51
पेठकर काका, >>>मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आपल्या ह्या वाक्यावरूनच मला असं वाटले. बहुतेक आपण "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" ह्या माझ्या वाक्यावरून असा अंदाज बांधला असावा. तो माझा दुर्दम्य आशावाद होता. अहंकार नाही. आपण खरच उत्कृष्ट विश्लेषण आणि मार्गदर्शन केले आहे यात काहीच वाद नाही. परंतु सदरहू लेख माझ्याच अनुभवांवर आधारित असल्याने वाचकांचे कुठलेच गैरसमज होऊ नये म्हणू हा प्रपंच. मी स्वताला सर्वज्ञ मानत नाही. अजूनही शिकत आहे, समजून घेत आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी वेगवेगळे मत बनत जाते. परंतु कर्तुत्वानेच नशीब सिद्ध होते असे आत्तातरी मला वाटते. त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? अतिशय विपरीत परिस्थितीत मराठा साम्राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असोत कि रिलायंस चे धीरूभाई असोत, यांच्या यशात नशिबाचा भाग किती? त्यांनी यश अपयशाचे कितीसे हिशोब कुठलेही काम हाती घेण्याआधी केले असतील. "मला अमुक एक काम करायचे आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि बुद्धीचा कस लावूया" असेच विचार त्यांनी कुठेलेही काम हाती घेतानी त्यांच्या मनात असतील. त्यांच्या इतिहासावरून तरी असेच दिसते कि त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी जगात त्यांनीच प्रथम केल्या असतील. यशाचा कुठलाही फुलप्रूफ फोर्मुला नसतो. माझ्या मते वांगी कापल्यावरच कळते किडलेले आहे कि नाही ते. मी कापीन ती वांगी चांगलीच निघतील हा वृथा "इगो". शक्यतो न किडलेली वांगी घेऊ नये म्हणजे कापल्यावर किडलेले निघण्याचा धोका टळतो असे कधी शक्य नसते. पण कुठली वांगी किडलेली असू शकतात वा चांगली असू शकतात हा अंदाज अनुभवानेच येतो. कुणीही जन्मताच एक्स्पर्ट नसतो. पण तेवढे हुशार होण्यासाठी त्याला वांगी कापण्याचे "कर्तृत्व" करावेच लागते. याठिकाणी उद. म्हणून नारळ, आंबा, ग्राहक, नोकर काहीही असू शकते. परंतु कर्तुत्वाने मिळवलेल्या यशाचा कैफ चढून मनुष्य नादान चुका करू शकतो. मी कधीच चुकत नाही आणि चुकणारही नाही हा अहंकार भल्याभल्यांना बुडवतो. मला तरी तसा रोग कधी झाला नाही. तसे असते तर वरचा माझा लेख फक्त इतरांवर चिखलफेक करणारा असता. दुसरे म्हणजे आपण माझ्या दोन वाक्यांचा परस्पर वेगळाच अर्थ घेतला आहे. १. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. >>>रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही >माझे समीकरण सरळ आहे: रिस्क कमी = आर्थिक मोबदला कमी , रिस्क जास्त आर्थिक मोबदला जास्त. रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. २. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. >>>सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. >तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. रेड सिग्नल असतानी गाडी चालवावी असा त्याचा अर्थ नाही. अपघात होणार नसेल तरच मी गाडी चालवणार अश्या अर्थाचे ते वाक्य आहे. माझाच त्या वाक्यावर प्रतिवाद आहे कि आयुष्य हे कधीच शेवटच्या क्षणापर्यंत प्लान करता येत नाही. कधी थांबावे लागेल, कधी पळावे लागेल हि कुणीही आधीच जाहीर करू शकत नाही. गाडी बाहेर काढल्यावर अमुक एका चौकात सिग्नल हिरवाच असेल असे कुणीही सांगू शकत नाही. म्हणजे मला कुठेही अडथळा असेल तर मी गाडी काढणारच नाही असे होत नाही. फारतर कुठे कुठे सिग्नल आहेत त्याचा विचार प्रवास चालू करायचा आधी करू शकतो. म्हणजेच व्यवहारात धोके असणारच म्हणून ते करायचेच नाही असे अजिबात नाही. पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे कान, डोळे, मेंदू उघडा ठेऊन सगळीकडे बघावे लागते. ते शंभर टक्के खरे आहे. सगळी काळजी घेऊन कुणीतरी येउन तुम्हाला ठोकतोच तेव्हा ते "नशीब". म्हणून गाडी घरातून काढली हाच माझा मूर्खपणा असे कुणी म्हणत नाही. बाकी आपल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल खरच आभारी आहे. कुठे गल्लत होत असेल तर जरूर सांगा. तुमचा हक्क आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2014 - 02:07
संदिप डांगे, माझ्या प्रतिसादातील दुसर्‍याच वाक्यात मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ते वाक्य म्हणजे, मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः हा 'इगो'चा अनुभवही मी घेतला आहे. तोच माझ्या प्रतिसादात मी मांडला आहे. आपण अपयशाचं विश्लेषण करतो पण यशाचं कधी करीत नाही. ते आपल्या हुशारीनेच मिळाले असे आपण गृहीत धरतो. मीही सुरुवातीला हिच चुक केली होती पण स्वतःच्याच यशापयशाचं मुल्यमापन करताना माझी चुक माझ्या लक्षात आली की सुरुवातीच्या यशात माझे श्रेय विशेष नव्हते पण ते माझ्या हुशारीनेच मिळाले होते असा 'इगो' माझ्यात निर्माण होऊन पुढे जरा सेट बॅक बसला होता. (माझी ४ उपहारगृह नुकसान होऊन बसली.) यशाचं मुल्यमापनही करणं गरजेचं असतं. असो. तुमच्या बाबतीत तसे झाले नसेल तर आनंदच आहे. >>>>त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? मी १९९० साली मस्कत मध्ये पावभाजी, बटाटेवडे, वडापाव वगैरे पदार्थ विक्रीसाठी कॅफेटेरिया सुरु केला. सुरुवातीच्या ४ महिन्यात गिर्‍हाईकांचा ओघ वाढला. गुजराथी मुख्य गिर्‍हाईके. तेंव्हा माझ्या कॅफेटेरीयात इथल्या स्थानिकांसाठी चिकन, अंड्याचे सँडविच, बर्गर हे सुद्धा होते. स्थानिक आणि गुजराथी, मराठी सर्व गिर्‍हाईकांना संतुष्ट करून व्यवसाय भरभराटीस न्यायचा माझा विचार होता. व्यवसायाचा अनुभव शून्य होता. सुरुवातीला भरमसाठ गिर्‍हाईके आली. ह्याला मी माझी हुशारी समजत होतो. पण त्यात नशिबाचा भाग होता. इथे तेंव्हा पावभाजी, वडापाव इत्यादी विकणारी उपहारगृह नव्हती. मी मार्केटचा तसा अभ्यासही केला नव्हता. पण परिस्थिती अशी होती की कोणीही तेंव्हा असा कॅफेटेरीया सुरु केला असता तर यशस्वी झाला असता. कारण त्या काळी ती त्या मार्केटची गरज होती. माझी हुशारी नाही. हा झाला नशिबाचा भाग. मला गुजराथी भाषा येते. त्यामुळे येण्यार्‍या गुजराथी गिर्‍हाईकांशी मी गुजराथीत बोलायचो, मराठी गिर्‍हाईकांशी मराठीत बोलायचो, अरबी गिर्‍हाईकांशी अरबी भाषेत बोलायचो, दक्षिण भारतियांशी हिन्दी आणि इंग्रजीत बोलायचो. बहुसंख्य गिर्‍हाईके ही गुजराथी आणि मद्रासी होती जी शुद्ध शाकाहारी होती. त्यांच्याशी संभाषणातून त्यांचा माझ्या कॅफेटेरियातील मांसाहारी पदार्थ विक्री बद्दल असलेला रोष माझ्या लक्षात आला. आणि मी तडकाफडकी मांसाहारी पदार्थ बंद करून टाकले. कारण एक तर मांसाहाराचा आग्रही समाज हा अरबी होता आणि टक्केवारीत फार कमी होता. कुठल्याही उपहारगृहात हिन्दी आणि अरबी गिर्‍हाईके एकत्र कमीच दिसतात. (त्या काळच्या गोष्टी आहेत ह्या, १९९०) मांसाहारी गिर्‍हाईकांसाठी मी माझा मोठा शाकाहारी वर्ग हातचा सोडू इच्छित नव्हतो. त्यामुळे तो निर्णय निरिक्षणातून, मार्केटचा अभ्यास करून आणि गिर्‍हाईकांशी संभाषण करून मिळविलेल्या माहितीवर होता. ती माझी हुशारी होती (असं मी मानतो) त्यात नशिबाचा भाग नव्हता. मांसाहारी पदार्थ बंद केल्यावर रोजच्या गिर्‍हाईकांने तो विषय काढला किंवा नाही काढला तरी मी आवर्जून 'मांसाहारी पदार्थ बंद केले आहेत आणि आता हा कॅफेटेरिया शुद्ध शाकाहारी आहे' असे सांगायचो. ती माझी जाहिरातबाजी होती ज्याचा गुजराथी आणि मद्रासी गिर्‍हाईके वाढण्यात मला फायदा झाला. मराठी लोकांना (शाकाहारी वर्ग सोडल्यास) विशेष आक्षेप नव्हता पण त्यांनाही कॅफेटेरियाचे बदललेले रुप आवडले आणि एक 'उत्कृष्ट शाकाहारी उपहारगृह' अशी माझ्या कॅफेटेरियाची ओळख वाढत गेली. सोबत धंदा. हा परिणाम मी माझ्या तथाकथित हुशारीने घडविला होता. इथे हुशारीमुळे आपण कुठलेही उपहारगृह नफ्यात आणू शकतो असा माझ्या मनात अहंगड (इगो) निर्माण झाला आणि ह्या नंतरची ४ उपहारगृहे रांगेत खाली बसली. आत्मपरिक्षण केले. मार्केटचा अभ्यास वाढविला. आणि एकुलत्या एक उपहारगृहावर (जे यशस्वी होते) लक्ष केंद्रित केले. इथे-तिथे उड्यामारण्यापेक्षा आहे तो धंदा सांभाळणे/वाढविणे ह्यावर भर दिला. कित्येक वर्षे नविन उपहारगृहात हात घातला नाही. ह्या देशाची खाली गेलेली इकॉनॉमी (अपयशाच्या अनेक कारणातील एक कारण) हळू हळू सावरली गेली पुन्हा भारतियांची ह्या देशात वर्दळ वाढली आणि दुसर्‍या कॅफेटेरियाची गरज निर्माण झाली. ती ओळखून मी दूसरे उपहारगृह सुरु केले तेही चांगले चालले आहे. हा झाला नशिब आणि हुशारीतील फरक, अहंगंडाचा परिणाम आणि धंद्यात सावरण्यासाठी डोळे, कान आणि मन उघडे ठेवून टाकलेली पाऊले. >>>>रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. ती माझी टंकनचुक होती. मलाही तेच म्हणायचे होते 'रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली नाही' आंधळ्या जोखिमीने नुकसान होऊ शकतं. तुम्ही दिलेलं सिग्नलचं उदाहरण चुकीचं आहे त्यामुळे पुढचा माझा प्रतिसाद गंडल्यासारखा तुम्हाला भासतो आहे. गाडीचा प्रवास फक्त सिग्नलाच खुंटतो असे नाही तर रहदारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कुठे अचानक कोणी मधे येतं (आपल्याला ब्रेक मारावा लागतो), कुठे सिग्नल लाल असतो (थांबावं लागतं), कुठे ट्रॅफिक जॅम असतो (रहदारी संथ गतीने जात असते) धंद्याचेही असेच असते कधी धंदा जोरात असतो (मोकळा रस्ता) कधी मधे कोणी कडमडतो (धंदा कमी होण्याची कांही तात्कालीक कारणं) तर कधी नुकसान नाही पण धंदा मंदीत असतो (जसा इथला रमझानचा महिना, शाळांच्या सुट्यांमुळे भारतियांचे स्वदेशी सुट्टीवर प्रयाण वगैरे) ह्या सर्व अडचणींमधून पार पडताना नितीमत्ता, कायदेशीर बाजू सोडायच्या नाहीत जास्त नफ्यासाठी चुकीची रिस्क घ्यायची नाही, नाहीतर मोठे नुकसान, आर्थिक सेट बॅक अशा 'अपघातांना' आपणच आमंत्रण दिल्यासारखे होते. माझे आणि तुमचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. पण एकंदरीत धंद्यात वापरायची सावधगिती बहुतेक सर्व धंद्यात सारखीच असते. तुम्हाला मी धंदा 'शिकवत' नाहीये फक्त आंधळी जोखिम घेऊ नका, अपयशा प्रमाणेच यशाचेही विश्लेषण करा आणि स्वतःबद्दल चुकीच्या धारणा न बाळगता (म्हणजे तुम्ही बाळगता आहात असे मला म्हणायचे नाहिए.) प्रगती करा. यशस्वी व्हाल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 02:39
खरच पटले. बाकी काही खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आल्यावर जरा समज गैरसमज होणारच. (जसे आम्हा बाप-लेकाचे नाते व इतर अनेक गोष्टी.) पण एकदा मिपा ला आपले मानल्यावर मन मोकळ करायचे ठरवल्यावर अस काही होईल याची अपेक्षा होतीच, त्यामुळे दुख: नाही. प्रत्येकाचे आपले एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान असते. त्या त्या अनुभवातून तावून सुलाखून ते मिळालेले असते. त्याचा यथायोग्य आदर आहेच. तुमचे अनुभव ऐकून मस्त वाटले. त्यामुळे तुमचे म्हणणे अजूनच पटले.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरच्या इतका उत्तम व्यवहारी सल्ला मिळणे कठीण आहे. प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्याजोगा आहे ! यात अजून फक्त थोडीशी भर : १. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना (मग तो नोकरीसंबद्धी, व्यवसायासंबद्धी अथवा त्यातल्या एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टसंबंद्धी असो) सर्वप्रथम तो निर्णय फसला वाईटात वाईट काय होईल आणि यशस्वी झाला तर काय चांगले होईल याचे सद्यस्थितीवर अवलंबून (स्वप्नाळूपणे नाही) विश्लेषण करायला पाहिजे. याला "वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ" असे नाव आहे. यातला सर्वात महत्वाचा असतो "वाईटात वाईटाचा विचार करणारा वर्स्ट केस सिनॅरिओ"... त्याला पुढे जाण्याची तयारी असली आणि त्यासाठी आवश्यक (मॅन-मनी-मटेरिएल) बंदोबस्त केलेला असला तर एखादे अपयश तुमच्या मनाच्या उभारीवर आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन प्रगतीवर मोठा परिणाम करू शकणार नाही. वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अविभाज्य भाग असल्यास तुम्हाला अर्थसहाय्य पुरवणार्‍या संस्थेला/माणसाला तुमच्याबद्दल जास्त भरवसा वाटेल. २. अर्थसहाय्य बँक अथवा नॉन-बँकींग फिनान्शियल इन्स्टिट्युशन्स मधूनच घ्यावे हे माझे स्वतःचे मत आहे. त्याची काही अगदी साधी कारणे आहेत... अ) अर्थसहाय देण्याअगोदर वरील संस्था प्रोजेक्ट रिपोर्टचा आग्रह धरतील आणि तो संस्थेचे ठोकताळे वापरून संस्थेमधले विशेषज्ञ पडताळून पाहतील... त्यामुळे व्यवसायाच्या सफलतेसाठी अत्यंत आवश्यक असलेला एक पाया आपोआप तयार होईल. (मात्र कर्जासाठी "सोईस्कर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे/बनवून घेणे" धोक्याचे आहे, तेव्हा ते टाळा.) आ) तुम्ही कितीही फायदा कमावलात तरी वरील संस्था केवळ करारात अगोदर लिहीलेले आहे तेवढेच व्याज आकारतात. किंबहुना तुम्ही यशस्वी उद्योजक झालात आणि कर्जाचे हप्ते वेळेवर / वेळेअगोदर दिलेले असले तर पुढचे कर्ज अधिक सुलभतेने आणि अधिक चांगल्या दराने मिळू शकते. भागीदारांच्या अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यकाच्या परताव्याच्या अपेक्षा सर्वसामान्यपणे व्यवसायाच्या सफलतेच्या अनेक पटींनी जास्त वाढतात. इ) व्यवसायातला एखादा धक्का बँक जास्त समजूतीने घेईल, कारण व्यवसायातल्या अश्या चढउतारांची माहिती असणे हा बँकिंग व्यवसायाचा भाग असते. भागीदार अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यक अशी अपेक्षा ठेवणे सर्वसाधारणपणे महागात पडते... शिवाय ती व्यक्ती नातेवाईकांपैकी असली तर नातेसंबंधातही कडवटपणा येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 22:32
>>>पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. मी आधीच म्हटल्या प्रमाणे प्रत्येक घटनेची विस्तृत कारणमीमांसा शक्य नाही, परंतु आपल्या विश्लेषणाचा रोख लक्षात घेता थोडे लिहितोच. यात वडील चूक कि मी असे काहीही नाही. त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांनी निर्णय बदलला त्याचा फटका मला बसला एवढेच . मीच त्यांना "हे मी कर्ज म्हणूनच घेत आहे" असे सांगितले. आणि त्याचे बाजारभावाप्रमाणे व्याज हि देणार असे हि काबुल केले होते. त्यामुळे हे पैसे नाही दिले तर चालतील असा काही माझा विचार कधीच नव्हता. त्यामुळेच पैसे देण्यास ते तयार झाले. त्यांच्या मते पार्टनर आहे त्याला तू हिस्सा देशील त्यापेक्षा मला दे. आपला पैसा आपल्याच घरात राहील. मी म्हटले :ओके: माझ्या कर्तृत्वात मला कुणाचेच उपकार नकोत अगदी सख्या बापाचेही. कर्ज घेणे मी निषिद्ध मानत नाही. परत करायची प्रामाणिक इच्छा आणि मनगटात ताकत असेल तरच कर्ज घ्यावीत. जोपर्यंत ते कमवू शकतात तोपर्यंत त्यांना माझा आधार नको आहे. परंतु पुढे त्यांच्या व्यवसायात मंदी आली आणि ते असुरक्षित फील करू लागले. म्हणून त्यांनी शब्द फिरवले. (मी दोन लाख आणि बाबांनी एक लाख असे मिळून २००९ मध्ये आम्ही एक घर घेतले त्याची किंमत आज २५ लाख आहे. पण त्या घराचा मी अजिबात विचार करत नाही आणि करणार हि नाही कारण ते आई आणि बाबांसाठी घेतले आहे. आणि ते त्यांच्याच नावावर आहे.)

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड Sun, 09/21/2014 - 23:09
नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा.
प्लान बी हा नॉर्मली वर्स्ट केस सिनारियो नसतो. प्लान फॉर द बेस्ट अ‍ॅन्ड प्रिपेयर फॉर द वर्स्ट या तत्वा नुसार प्लान सी, डी आणि ई सुद्धा हवेत.

विजय_आंग्रे Sun, 09/21/2014 - 18:53
प्रभाकर पेठकर सर तुमची संपुर्ण पोस्ट अप्रतिम आहे.
अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.
__/\__

आनन्दा Sun, 09/21/2014 - 18:57
पेठकरकाकांशी सहमत. बाकी एव्हढेच सांगेन, एखाद्या मोठ्या सहकारी बॅंकेकडून कर्ज मिळवता येते का ते पहा. त्यांच्या मॅनेजरला या सार्‍या गोष्टींची कल्पना द्या, तुमच्या कामाचे रेफेरेन्सेस दाखवा, आणि कदाचित तुम्हाला काहीतरी कर्ज मिळेल. सहकारी बँकांचे नियम थोडे वाकवणेबल असतात असे ऐकून आहे, आणि व्याजदर पण थोडे चढे असतात. पण सध्याच्या स्थितीत तुम्हाला ते देखील परवडेल. आणि बाकी इन जनरल, आम्हाला शाळेत एक श्लोक होता, पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनं, कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनं. आणि कोर्पोरेट भाषेत सांगायचे झाले तर, ही सारे लर्निंग आहे, फक्त अ‍ॅट कॉस्ट.

मुक्त विहारि Sun, 09/21/2014 - 22:11
@ संदीप डांगे, प्रथमतः तुमचे अभिनंदन, कारणे २ १. स्वतःची चूक कबूल करायला धाडस लागते.ते तुम्ही केलेत. २. मिपाची खरी किंमत तुमच्या ह्या धाग्यांमुळे आम्हाला समजली. आणि प्रभाकर दादा, संक्षी, प्यारे१ आणि इ.ए. ह्यांच्या सल्ल्यांमुळे तुम्हाला नक्कीच धैर्य आले असेल.

विजुभाऊ Sun, 09/21/2014 - 22:12
पेठकर काकांशी सहमत. सन्दीप्भौ तुमच्या सारख्या अनुभवातून मी देखील थोडाफार गेलो आहे. अशावेळेस सल्ले देणारे भेटतात तसेच विश्वास ठेवून पैसे देणारे सुद्धा भेटतात. हे लोक आपले भले व्हावे असेच इच्छतात. अशा वेळेस घाईघाईने निर्णय न घेता परिस्थीतीकडे थोड्या त्रयस्थ नजरेने बघावे. काहीवेळेस थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले तर आपल्या चुका काय झाल्या ते कळते तसेच आपल्यात काय चांगले आहे ते देखील समजत. मला वाटते की तुम्ही तुमच्यातील चाम्गल्या गुणांचे अ‍ॅनालिसीस केलेलेच नाहिय्ये. तुम्हाला सहानभुती दाखवणार्‍या लोकांपेक्षा सल्ले देणारांपेक्षा अगदी अनोळखी ज्याना तुमचे बॅग्राऊंड माहीत नाही अशा लोकांशी व्यवहार करून बघा. नाशीक हे एक मोठे शहर आहे तेथे तुम्हाला ओळखणार्‍या लोकाम्पेक्षा न ओळखणारे लोक अनेक पटीने जास्त आहेत. अवांतर : मराठीत "मसाला "नावाचा चित्रपट अशाच एका धडपड्या माणसाच्या कथेवर बेतलेला आहे तो बघा शक्य झाले तर.

कवितानागेश Sun, 09/21/2014 - 23:29
खूपच महत्त्वाचे आणि अनुभवी सल्ले मिळत आहेत इथे. कागदपत्रे नीट न ठेवल्यानी आणि धंद्यात स्वतःकडंचच किंवा जवळच्यांकडून घेउन बरंच भांडवल घातल्यानी झालेलं नुकसान अगदी जवळच्या नातेवाईंकाच पाहिलेलं आहे. तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येतेय. पण पुन्हा नोकरी बघण्याचं आणि नवीन कौशल्य शिकून घेण्याचं धाडस दाखवून ते पुन्हा सगळी फेडून उभे आहेत. तुम्ही यापुढे सगळ्या प्रकारची काळजी घ्याल आणि यशस्वीही व्हाल याबद्दल खात्री आहे. :)

माहितगार Mon, 09/22/2014 - 01:10
संदिप, आपला धागा लेख आणि प्रतिसाद वाचतो आहे. संस्थळाच्या अ‍ॅड्मिनिस्ट्रेटीव्ह जबाबदारीचा भाग म्हणून मिपा संपादकांनी त्यांची जबाबदारी योग्यच पार पाडली. प्रतिसाद बर्‍या पैकी जबाबदारीने येताहेत आणि प्रतिसादांना तुमचा प्रतिसाद सुद्धा चांगला येतो आहे तेव्हा त्या बद्दल अभिनंदनच. चर्चा वाचणार्‍या इतर व्यावसायिकांसाठी म्हणून अडचणींची चर्चा जेवढी लवकर केली तेवढे बरे गूंतागूंत तेवढीच कमी असते. १) इंपल्स (मराठी शब्द ?) आणि विश्वास ठेऊन रिस्क घेण हा उद्योजकतेचा गूण आहे पण सोबतीला इंपल्स मध्ये न अडकणारी, पुन्हा एकदा विचार करून खात्री करून घेण्याचे सांगणारी रिस्क दाखवून देऊ शकणारी व्यक्ती चर्चेसाठी सोबत हवी. २) अंतीम निर्णय आपलेच राहतील एवढ स्वातंत्र्य/अधिकार जतन केलाच पाहीजे पण त्याच वेळी कोणत्याही निगोशिएशन मध्ये आपण स्वतः अंतीम निर्णय घेणारे आहोत हे सांगू नये. इतरांना सांगण्यासाठी एक खरा किंवा इमॅजनरी बॉस नेहमी ठेवावा ( जसे माझ्या डायरेक्टरांना विचारून सांगतो भले डायरेक्टर तुम्ही स्वतःच असा) म्हणजे ऐन निगोशीएशन मध्ये विचारून सांगतो असे म्हणणे आणि अंतीम चर्चा करणे सोपे जाते. (अननुभवी इंपल्सीव लोकांकडून हि डिप्लोमॅटीक स्टेप राहून गेलेली असण्याची आणि नाही तेव्हा गोत्यात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते)
एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते... केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते.
३) वर्कींग कॅपिटल बद्दल आधीच्या काही जणांनी प्रतिसादातून मार्गदर्शन केलच आहे पण हि जागा नेमकी खेळत भांडवल जपण्यासाठी लागणार्‍या शिस्तीची असते. किमान जेवढी देणी (जसे ऑफीसचे भाडे कर्मचार्‍यांचे पगार) कॅश मध्ये जायची तेवढा रोखीचा कस्टमरशी रोखीचा व्यवहार झालाच पाहीजे . उधारीच ग्राहक मोठ असल तरी तो मोह बाजूला ठेऊन रोखीचे ग्राहक आधी करावयास हवेत. ४) इन एनी केस तुमचा मॅनपॉवर टर्न ओव्हर व्यावसायिक यशासाठी स्विकार्य स्तराचा नव्हे. मॅन पॉवर टर्न ओव्हर कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहून माणस कशी जपायची हे माहित करून घेतलच पाहीजे, पण त्या पूर्वी माणूस निवडण्या पुर्वीच माणूस पारखण्यासाठी मुलाखतीं घेण्यासाठी अधिक वेळ मोजला पाहीजे. न आवडलेला माणूस पहिल्या ४८ तासात काढून टाकावा जास्तीत जास्त सात दिवस छोट्या व्यावसायिकांनी या पेक्षा अधिक कालापव्यय माणूस काढून टाकताना करू नये. माणूस केव्हाही सोडून जाऊ शकतो किंवा काढावा लागू शकतो या तयारीत आधीच राहून मुलाखती घेऊन काही जणांना पाईप लाईन मध्ये ठेवावयास हवे. ५) कस्टमरशी प्राईस निगोशीएशन आणि पैसे मागण्याची स्किल्स चांगली हवीत तुम्ही चांगल प्राईस निगोशीएट करू शकले नाही आणि पुरेसे पैसे रोखीत मिळवू शकले नाही तरीही तुम्हाला चांगल मॅनपॉवर मिळणार नाही आणि टिकणार नाही. पैसे मागण्याची स्किल किमान पाच वर्षे सेल्सचा अनुभव असलेल्या व्यक्ती कडून घ्यावीत आणि प्राईस निगोशिएशन स्कील हाय व्हॅल्यू प्रिमीयम प्रॉडक्ट सेलींग करणार्‍या व्यक्तींं कडून घ्यावीत. ६) तुम्हाला चांगला डिझायनर मिळाला नाही तरी दुसर्‍या फ्रिलान्स डिझायन्रर्सना शोधून वापरण्याचा पर्याय कितपत उपयूक्त होता माहित नाही पण तो तुमच्या धागा लेखात दिसला नाही. अर्थात हे सर्व सल्ले सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत, जी गोष्ट स्वतः पाहिली नाही त्याबद्दलचे सल्ले कितपत प्रॅक्टीकल आणि नेमके असतील हे सांगता येत नाही. पण मला प्रथम दर्शनी महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी टंकल्या एवढेच.

In reply to by माहितगार

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 02:27
सर्वोत्तम प्रतिसादांपैकी एक. अश्याच मुलभूत आणि नेमक्या सल्ल्याची अपेक्षा होती, ती आपण पूर्ण केलीत. तुम्ही सांगितलेल्या ह्या सर्व बाबी माझ्यासाठी खरच नवीन आणि उद्बोधक आहेत. विशेषत: इमजिनरि बॉस आणि निगोशिअशन स्किल्स कुणाकडून घ्यावीत. अजूनही अश्या मौलिक माहिती किंवा प्रशिक्षणाची काही खबर असल्यास जरूर कळवणे. मी हुशार, मी धंदा करतो म्हणून मला फार कळते, दुसर्यांनी मला काय शिकवू नये असा माझा अजिबात पिंड नाही. स्वतंत्र व्यवसाय सुरु करून मला उणीपुरी ३ वर्षे झाली आहेत. या दरम्यान चांगल्या वाईट अनुभवांनी बरेच शिकवले. तुम्ही सांगितलेले पाचही मुद्दे मला भरपूर मार्गदर्शक आहेत. अजून शिकायची इच्छा आहे. फ्रीलान्स डिझायनर सोबत काम करणे जरा महागात पडते. त्यांच्या अपेक्षा आणि उत्पादकता यात बरीच तफावत असते. म्हणजे कुणी मध्यस्थ असेल तर त्याची बरीच फरफट होते. या प्रकारात माझ्या अनुभवाप्रमाणे कुणीतरी एक म्हणजे ग्राहक किंवा डिझायनर मध्यस्थाच्या जवळचा अथवा खास पाहिजे. जेणेकरून कामाचा दर्जा व मोबदला यांच्यात अविश्वासाने काही गोंधळ होणार नाही. माझे एक दोन जुने मित्र आणि समव्यवसायी ह्यांच्यासोबत व्यवहारात आहे. परंतु फ्रीलान्स आणि डेडीकेटेड स्टाफ यांच्यात आपापले सामर्थ्य व उणीवा असतात. वेळप्रसंग बघून आयुधे वापरावी लागतात. सांप्रत मला असा अनुभव आहे कि माणूस बिझनेसमन असला कि लोकांचा (विशेषत: नोकरदारांचा) त्याच्याकडे बघण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन काहीसा असा असतो. १. चिक्कार पैसे कमावतात २. नोकरांचे शोषण करतात ३. ग्राहकास लुबाडतात ४. पार पोचलेले असतात ५. प्रचंड हुशार आणि धूर्त असतात ६. माणसे ओळखण्यात पटाईत असतात ७. आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात ८. "तुम्ही बिझनेस करता म्हणजे तुम्हाला हे (…. )माहितीच पाहिजे… " अश्या अर्थाचे उद्गार. ९. हमखास कर बुडवतात १०. बिझनेस भरपूर पैसा गाठीशी आहे किंवा अवाजवी नफा मिळतो म्हणूनच करतात ११. फक्त आणि फक्त पैश्याकडे बघतात. म्हणजे एकंदर व्यापारी आणि लुटारू यांच्यात फक्त एक फरक तो म्हणजे एक गोड बोलतो दुसरा धारदार बोलतो. हे पण मी स्वत: बिझनेसमन झाल्यावर शिकलो. अर्थात बिझनेसमन होणे हे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासारखे नसते. मिळाली पदवी कि झाला बिझनेसमन. तोही चुकू शकतो. धंदा करणाराने सदैव जागृत आणि तत्पर राहिले पाहिजे, त्याच्याकडून चूक होऊच नये. तसे होत असेल तर कशाला करतो धंदा? गुमान नोकरी कर आणि शांत बस असे सल्ले येतात. (हे वैयक्तिक अनुभवले आहे. मला नोकरीसाठी तळमळीने मदत देऊ केलेल्या मिपाकरांसाठी हे नाही. त्यांच्या प्रामाणिक तळमळीबद्दल मला कुठलाही पूर्वग्रह नाही.)

In reply to by संदीप डांगे

माहितगार Mon, 09/22/2014 - 09:14
उत्कृष्ट दर्जा देणार्‍या स्वतःच्या व्यावसायिक कौशल्या सोबत व्यवसाय मिळवणे (खास करून बर्‍याच महाराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी ओळखीच्या परिघा बाहेरचा व्यवसाय मिळवण्याकडे दुर्लक्ष होत अथवा किंमत पाडून मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसतो- जे अ‍ॅप्लिकेबल नसेल ते सोडून द्यावे) आणि विवीध स्टेक होल्डर्सशी व्यावसायिक संबंध टिकवणे ओघाने येतेच. हे एवढ्या साठी नमुद करतो आहे की डिझायनींगची चांगली कला पण केवळ कला असलेल्या इतर व्यक्तीत आणि तुमच्यातला हा फरक समजून घेतला की कौशल्याधारित सुयोग्य मोबदला देऊन माणसे वापरून घेणे सोपे जाते. जो पर्यंत तुम्ही आणि मोबदला घेऊन काम करून देणारा यांचे संबंध चांगले आहेत तो पर्यंत बाकी जग काय म्हणते ते खूप महत्वाचे नाही. प्रचंड हुशार आणि चतूर- हा योग्य शब्द (धूर्त) असतात; . माणसे ओळखण्यात पटाईत असतात, . आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात (हाणून पाडण्यासाठी नकारात्मक टोन मधल्या नसतील तर) अशी इमेज पैसे उभे करताना उपयोगीच पडू शकेल असे वाटते. पण तुमचा व्यवसाय हाणून पाडण्यासाठी ग्राहक सोडून कुणी कॉमेंट मारत असेल तर त्याला तुमचा नकारात्मक स्वभाव असलेला स्पर्धक गृहीत धरा. तुमच्या स्टेक होल्डर समोर तुम्ही केलेल्या दहा सकारात्मक गोष्टी स्पर्धकाच्या वाक्यांचा उल्लेख न करता दाखवून द्या. नोकरांचे शोषण करतात, ग्राहकास लुबाडतात, अशी इमेज मात्र निर्माण होणार नाही याची अधिकाधीक दक्षता घेतलेली व्यवसायाच्या यशाच्या दृष्टीने चांगली. बाकीच्या आणि बाकीच्यांच्या कमेंटांकडे दुर्लक्ष करणे चांगले, व्यवसाय यशस्वी झाल्या नंतर तिच मंडळी आपापली कामे करून घेण्यासाठी बदलतील. चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2014 - 10:16
>>>>चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव लाख मोलाचं विधान. ह्याच पायाभूत विचारांवर विश्वास ठेवून, २४ वर्षे सेवाउद्योगात टिकून आहे.

इनिगोय Mon, 09/22/2014 - 06:45
हे लिहून काढत आहात हे अतिशय उत्तम. यातून तुम्ही (खरंतर कोणत्याही उद्योजकाने) काय टाळायला हवं आणि कोणती खबरदारी घ्यायला हवी या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन होतं आहे. पेठकरकाका, इस्पिकचा एक्का आणि इतरही काही प्रतिसाद खूप मुद्देसूद आहेत. माझ्याकडून एक लहानशी सुचवणी.. रश्मी बन्सल यांचं 'कनेक्ट द डॉटस्' हे पुस्तक मिळवून वाचा. कोणत्याही औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यातूनही तुमच्या उपयोगाचे बरेच काही मिळेल, हे नक्की. उदा. वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतःच्या, नातेवाईकांच्या कमाईचे सारे पैसे व्यवसायात न गुंतवता बँकेकडून कर्ज घेतल्याने नेमके काय साध्य होते, त्यासाठीचे डॉक्युमेंटेशन कसे करावे, इ. आपल्याच सारख्या परिस्थितीतून वाटचाल केलेल्यांचे अनुभव वाचल्याने दृष्टीकोनात खूपच सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. बाकी व्यक्तिगत निरोप धाडला आहे, तो पाहा.

विलासराव Mon, 09/22/2014 - 11:33
औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. माझं नाव आहे का हो त्यात. मी बीई ईलेक्ट्रॉनीक्स झालो १९९४ मधे. नंतर मुंबईला आलो. ९ वर्षे नोकरी केली सर्व्हीस ईंजीनीयर म्हनुन. २००३ ला नोकरी सोडली तेव्हा कर्जबाजारी झालो होतो. मग नोकरीत कर्ज फिटणे अशक्यप्राय झाल्याने व्यवसाय सुरु केला. घर भाडयाचे, डोक्यावर कर्ज आनी दारात देणेकरी अशात माझा व्यवसाय सुरु झाला. घरच्यांनी तर लांब रहाणेच पसंद केले कारण त्यांना वाटले याची सटकली. कारण आमच्या खाणदाणीत व्यवसायात पाउल टाकणारा मी बहुधा पहीलाच. आता नवीन व्यवसाय असल्याने लगेच रोज काम नसायचे. मग मी पुस्तक वाचत दिवस दिवस घरीच पडीक असायचो. घरातले सगळे यावर आपापसात चिंता व्यक्त करायचे. लवकरच मला पहीली ऑर्डर मिळाली. त्याची माझी खरेदी होती ५००० रुपये. विकायचे होते ७००० रुपयांना. यात २००० मार्जीन होते खरे पण १ वर्ष सर्व्हीसही होती. घरातुनच अर्थात मदत मिळाली नाही. बरेच प्रयास करावे लागले त्या पाच हजारासाठी. पण त्याच पार्टीने काम वेळेत करुनही पेमेंट चार महीने लटकवले. मग त्या पाच हजार दिलेल्या लोकांनी आधीच पत नसलेल्या मला काळ्या यादीतच टाकले. मग सगळ्या मित्रमंडळात खबर गेली. सगळे रस्ते जवळपास बंद. मग मी नवीन ऑर्डर मिळवण्याचे प्रतत्न कमी करुन मेंटेनन्स कॉण्ट्रॅक्ट किंवा कॉलबेसीसवर ब्रेक्डाउन कॉल्सला जोर लावला.थोडेसे पैसे जमा झाल्यावर हळूहळू विक्री परत चालु केली. पण खास वाढ होत नव्ह्ती. प्रयत्न तर अथक चालु होते.मी सकाळी स्वैपाक करुन डबा बरोबर घेउन ६ वाजता अंबरनाथवरुन घर सोडायचा ते व्हीटीला माझ्या ऑफीसला यायचो. मग रात्री ११ ची शेवटची फास्ट लोकल पकडायची तेव्हा घरात पोहोचायला पाउन वाजायचा. असो. एवढं करुन पोटपाणी चालत होते पण कर्जदारांचे काय? मला आधार(सहानुभुती) फक्त माझ्या व्यसनाची होती. फक्त बारमधे न जाता मी घरीच पण नियमीत घ्यायचो फक्त रात्री. मग मला एक अभिनव उपाय सुचला. मागाल ते मीळेल वाला. मग मी रोज सकाली त्या अज्ञात शक्तीची तळमळीणे करुणा भाकायला लागलो की मला स्वतःसाठी काय नको पण मला ते देणेकरी दारात नकोत बाबा. आनी कुठल्याही परिस्थीतीत मला बेईमानी करण्याची वेळ येउ देउ नकोस म्हणुन. त्याआधी मी कधीही कोणाकडेही प्रार्थना केलेली नव्ह्ती. कारण हेच लाथ मारेण तिथे पानी काढेण,पण निघत नव्ह्तंना. मग मी हळुच प्रार्थनेत एक ओळ वाढवली की जर मला देणेकरी मिटवुन माझ्याकडे १० लाख आले तर मी कायमची निव्रुत्ती घेईल म्हणौन. आनी साधारनपणे ८-९ महीन्यांनी माझी माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने एका आयटीआयच्या अधीकार्याशी ओळख झाली. त्यांनी माझी कहानी ऐकुन मला मदत केली. संपुर्ण महाराष्ट्राच्या आयटीआयचे काम मला मिळाले तेही स्वतःचा पैसा न लावता. पैसा कंपनीचा ओळख माझी आनी सर्व्हीसही कंपनीची. मग तीनच वर्षात मला १६ लाख त्यातुन मिळाले. चार लाख कर्जदारांचे दिले. १० लाख शेअरबाजारात लावले. दोन लाख पिणे -खाणे आनी भटकंती यात लावुन भारतभर फिरलो. बरेच आश्रमही पालथे घातले. मी ३५ व्या वर्षी रिटायर झालो. माझा मॅनेजर होता माझा चुलतभाउ जो आठवी पास आहे तीही गावची. त्याच्या गळ्यात व्यवसाय घातला, अट एकच संध्याकाळी प्यायला अन मटन-मच्छी खायला पाहीजे मला बस्स. बाकी तुझे. त्याने बेट्याने जोमाने धंदा वाढवला, आज तीनचार घरे आहेत, पैसा गाठीशी आहे, मार्केटला पत आहे, नातेवाई॑कात(दाखवण्याची का होईना) इज्ज्त आहे. नंतर मी विपश्यनेला गेलो. दारु आनी अभक्ष भक्षण ही बंद झाले. आनी आता वेगळ्याच मारगावर स्थिर झालो जो कधीही मी अनुसरेल असे मला कधीच वाटले नव्हते. यात मी लग्न केले नव्हते ही बर्याच जनांना जमेची बाजु वाटते पण त्यापेक्षा मला माझ्या घरच्यांची अनेकपटींनी जबाबदारी होती, आजही आहे. आमच्या घरात आजही मीच न कमावताही कमावता आहे, आईला पेंन्शन आहे. माझा भाउ आजही काहीच कमावत नाही त्यामुळे आईची पेंशन त्याला मिळते व आइला पेंशन मला द्यावी लागते. पण आजही मला असे वातत नाही की मी यांना पोसतो. ते त्यांच्या कर्माचे फळ आहे.असो. प्रयन्त न सोडता प्रार्थना करौन पहा कोणीही हा अनुभव घ्यावा. कुणाला वाटेल ही अंधश्रद्धा आहे पण नाही होते काय. खरोखर निर्मळ( हे मनाने हे आपले आपल्याला चांगले समजते. आनी अहंकार बराच कमी झाल्याशिवाय मन नर्मळ होत नाही हे ध्यानात च्या) मनाने प्रार्थना केल्यावर होते काय की. तुम्ही त्या वेवज जगामधे प्रक्षेपीत करता, आनी त्याच्याशी जुळणारे लोक हळुहलू तुमच्या संपर्कात येतात किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात येता. मनुश्याला मनुश्य म्हणतात कारण वो अपने ही मानस(मनोव्यापार) का पुत्र/संतान है. हा सगळा माझा अनुभव आहे. जे वाइट वागले त्यांच्याबद्दलही सद्भावना बाळगा. आपले मन कुठल्याही परिस्थीतीत दुषीत होउ देउ नका. जे पटेल ते घ्या ,न पटलेले अर्थातच माझ्याकडेच राहील.

जयंत कुलकर्णी Mon, 09/22/2014 - 11:41
डॉ. गोल्डरॅट म्हणतो की बर्‍याच वेळा आपण निर्णय घेतो व त्यानंतर तो चुकला की पश्चत्ताप करत बसतो. निर्णय घ्यायची प्रक्रिया ही आपण जी गृहितके जमेस धरतो त्यावर बरीच अवलंबून असते. निर्णय घेण्या अगोदर जर ही गृहितके (Assumptions) नीट तपासली तर आपले निर्णय चुकिची ठरण्याची शक्यता बरीच कमी होते. या थॉट प्रोसेसवर त्याची पुस्तकेही उपलब्ध आहेत. सगळ्याचे मूळ हे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असल्यामुळे ते अत्यंत महत्वाचे ठरते. कधी कधी हे का ते असेही प्रसंग उदभवतात त्यावेळी तर त्याची थेअरी अत्यंत उपयोगी पडते....असो...आपल्याला पुढील वाटचालीसाठे शुभेच्छा...खात्री आहे आपण अजून एका वर्षात मी या परिस्थितीवर कशी मात केली यावर उद्भोदक लेख लिहाल.....

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 16:41
सगळ्या घटनांचा सुसूत्र विचार करत होतो, तेंव्हा लिहावेसे वाटले, पहिल्या भागातच भूतकाळ संपला आहे. त्यावर काथ्याकुट करणे म्हणजे वेळेचा आणि बुद्धीचा अपव्यय आहे. त्याचबरोबर घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलणे हे अशक्य आणि अनावश्यकही आहे. इथून पुढे नेमके काय करत आहे आणि नेमक्या काय मदतीची अपेक्षा आहे ह्या बद्दल लिहिणार आहे. पहिल्या भागावर प्रतिक्रिया थांबवता येतील असे काही करता येईल का? कारण त्या भागावर मला चर्चेची आवश्यकता वाटत नाही. घडून गेलेल्या घटनांचा उहापोह काहीच उपयोगाचा नाही. मी फार तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला पण चिरफाड होण्यामध्ये तो तटस्थपणा राहणार नाही. चिरफाड होईल अशी अटकळ होतीच. घटनेचे गांभीर्य त्यातले बारीकसारीक तपशील कळले कि कमी होतेच. साधारणपणे परिस्थितीने गांजलेला माणूस आणि स्वताच्या चुकांनी गांजलेला माणूस ह्या दोहोंकडे बघण्याचा दृष्टीकोन एकदम वेगवेगळा होतोच. त्यामुळेच पहिल्या भागावर काही प्रतिसाद दयायचे मी स्वत: थांबवले आहे. आता हातात असलेली कामे करत आहे. भविष्यात काय करेन ह्याचा पूर्ण विचार झाल्यावरच पुढचा भाग लिहिणार आहे. ३ भागात हि मालिका संपणार आहे. तसही माझी कर्मकहाणी चावडीवरची चर्चा व्हावी अशी इच्छा नाही. कुठेतरी जबाबदार ठिकाणी या माझ्या भावनांची नोंद व्हावी अशी अपेक्षा मिपावरच टाकण्यामागे होती

In reply to by संदीप डांगे

एस Mon, 09/22/2014 - 17:45
तुमच्या भावनेशी सहमत आहे. संमंने पहिला आणि हाही धागा वाचनमात्र केल्यास पुढील भागांवरील फोकस कायम राहील आणि उगाच जास्त चर्वितचर्वण टळेल असे मलाही वाटते. आत्तापर्यंत झालेली चर्चा समर्पक असली तरी झाली तेवढी पुरेशी आहे.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 17:35
तटस्थ शब्दात उघड व्यक्त केल्याबद्दल संदीप भाऊंचे अभिनंदन !

गुळाचा गणपती Sun, 09/21/2014 - 15:11
संदीप, आपण अगदी मनमोकळ्या शब्दात तुमची परिस्थिती जशीच्या तशी मांडल्याने अक्षरशः अंगावर काटा आला. आपल्या झालेल्या चुका मोठ्या मनाने मान्य करणे, इतरांसमोर मांडणे ह्याला खूप धैर्य लागते. पुढील भाग लवकर वाचायला मिळावा.

धन्या Sun, 09/21/2014 - 15:44
तुमच्या त्या धाग्यावर मी काही लिहिले नाही. कारण अशा प्रसंगात काय बोलायचे, काय निर्णय घ्यायचे हे मलाही कळत नाही. बाकी मिपाकरांनी तुम्हाला चांगले सल्ले दिले. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्हाला याक्षणी आवश्यक असणारा भावनिक आधार दिला. मनात असाही प्रश्न उभा राहीला होता की संदीपनी हे सारे मिपावर सांगणे म्हणजे चौकात उभे राहून बोलण्यासारखे नाही का. मात्र असा आधार मिळवणे ही तुमची आताची गरज आहे. त्या धाग्यावर काहींनी समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचाही तुम्ही विचार करावा. ते लोक अशा प्रसंगांमध्ये काय बोलावं याविषयी प्रशिक्षित असतात. अशाच नसल्या तरी अंतिम निष्कर्ष असाच निघणार्‍या अशा दहा प्रकारच्या परिस्थीतीतून जाणार्‍या लोकांना त्यांना धीर दिलेला असतो. असो. तुमचा हा लेख वाचणार्‍या प्रत्येकाला काही ना काही या लेखातून शिकण्यासारखं आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात. तसा हा तुमचा लेख अनेकांना मार्गदर्शक ठरेल.

फक्त एकच गोष्ट माणसाला सार्‍या आयुष्यात आणि कोणत्याही प्रसंगात तारु शकते ती म्हणजे प्रामाणिकपणा! जर तुम्ही कुणाला फसवलं नसेल तर दैवाचे फासे कसेही पडोत, त्याचा दोष आपल्याला लागत नाही. मग आत्महत्त्येचा विचारच मनला शिवत नाही कारण आपण स्वतःशी एकनिष्ठ असतो. असा एकसंध माणूस स्वतःला कशाला संपवेल? फक्त एकच गोष्ट सांगतो, पैसा माझा व्यावसाय आहे आणि जितके कफल्लक मी पाहिलेत त्यांची एकच कहाणी आहे, त्यांना मोह नडलायं. कुणावर कधी काय प्रसंग येईल (जसा तुझ्या पत्नीचा placenta previa, किंवा अपघात), आणि काय आपत्ती ओढवेल ते सांगता येत नाही. पण जबरदस्त आर्थिक फटका बसण्याचं नेमकं कारण मोह हेच आहे. असो, तुझा बायोडेटा माझ्या पर्सनल मेल आयडीवर पाठव, नाशिकला माझा एक प्रथितयश मित्र आहे त्याच्याशी बोलतो. त्यानं जर मनावर घेतलं तर तो तुझं आयुष्य बदलून टाकेल.

पाषाणभेद Sun, 09/21/2014 - 16:13
३. लग्नाचे प्रमाणपत्र नाही म्हणून कुटुंबाचा वैद्यकीय विमा नाही हे कळाले नाही. माझ्या मते जॉईंट विमा पॉलीसी किंवा मेडीक्लेमलाही असला प्रश्न उपस्थीत होत नाही. बाकी आपल्या पुढील आयुष्याला शुभेच्छा.

In reply to by संदीप डांगे

पाषाणभेद Sun, 09/21/2014 - 17:44
भाऊ जॉईंट विमा पॉलीसी (हजबंड अँन्ड वाईफ) किंवा मेडीक्लेमलाही (पुर्ण कुटूंब) यासाठी मॅरीज सर्टीफीकीट लागत नाही. पॅन कार्ड चालते. फक्त जॉईंट विमा पॉलीसी काढतांना सौ.चे माहेरचे डिटेल्स द्यावे लागतात. (म्या पन नाशकात र्‍हातो. आयटी आन बाकीच्या सगळ्याच क्षेत्रात नाशकात चांगला नोकरवर्ग मिळू शकतो. आपल्याला चांगला नोकर मिळू शकले नाहीत हा दुर्दैवाचा भाग असावा. आपल्या लिखाणात तसा उल्लेख आल्याने इतरांचा नाशिकमधील नोकरवर्गाबाबात गैरसमज होवू नये म्हणून असे लिहीत आहे. नाशिकमधील नोकरवर्गाबाबत इतर शहरवासीयांनी गैरसमज करू नये. उडदामाजी काळेगोरे सगळीकडेच असतात. नाशिकबाबात दुराग्रह बाळगू नये. जय नाशिक.)

In reply to by पाषाणभेद

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 18:39
मला वाटतं नाशिककर नोकरदारांना मी कुठेही जनरलाइज केलेलं नाही. संपूर्ण परिच्छेद पुन्हा वाचावा. माझ्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत एवढेच म्हटले आहे. आता यात किती तरी अर्थ निघू शकतात जसे कि माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. घाई घाई मध्ये मुलाखती नीट झाल्या नसतील, त्यांना मला नक्की काय हवे हे समजले नसेल, मुंबई नाशिक च्या संस्कृतीत मुलभूत फरक तो आहेच, निदान मला तरी जाणवला. नाशिककर नोकरदारांना सरसकट दोषी अजिबात धरलेले नाही. मुळात नाशिक ला शिफ्ट होण्याचा व ऑफिस सुरु करण्याचा निर्णय घेण्यामागे हि तुम्ही सांगितलेली आणि ऐकून असलेली कीर्ती होती. नशिबाचे फासे उलटे पडले त्यात कोण काय करणार?

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 16:37
संदीपभाऊ तुम्हाला तुमच्या प्रामाणिक पणाबद्दल अनेक सलाम.! हे सर्व वाचल्यावर एक गोष्ट मात्र कळुन आली. तुम्हाला काम मिळते आहे आणि तुमची कामे करण्याची क्षमता अजुनही अबाधित आहे + मार्केटमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाला मागणी आहे आणि हीच फार महत्वाची गोष्ट आहे. विचार करा जे स्किलसेट तुमच्याकडे आहेत त्यांचीच जर मार्केटमध्ये आवश्यकता उरली नसती तर आलेला प्रसंग हा फार भयानक असला असता.थोडक्यात एका दिवसातच तुम्ही Obsolete होऊ शकला असता.एकुण परिस्थितीला असलेली ही एक चंदेरी किनारच आहे. ह्या गोष्टीवर विचार अवश्य करावा.

पैसा Sun, 09/21/2014 - 17:45
प्रांजळपणे तुमची आत्मकथा इथे शेअर केल्याबद्दल अभिनंदन तसेच धन्यवाद! संपादक मंदळाने इशारा दिला त्याला पूर्वीचे काही अनुभव कारण आहेत. तुमची हकीकत खरी असली तरी मिपाच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ नयेत हीच अधिकृत भूमिका आहे त्यामुळे असा इशारा देणे भाग होते. इथे अनेकांनी तुम्हाला नोकरीसाठी हात देऊ केला आहे. त्याबद्दलही लवकर निर्णय घ्या. स्वतःच्या चुका तुम्हाला कळत आहेत, याचाच अर्थ त्यांचे पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी दिसते. २/३ वेळा तुम्ही थोडीफार माघार घेऊन परत जम बसवला आहे असं दिसतं. जरी धंदाच नेटाने करायचा असेल तरी सध्या घर, सोनेनाणे, धंद्यासाठी आवश्यक मशिनरी फर्निचर जे काही असेल ते, यावर तारण कर्ज कोणत्याही बँकेकडून मिळू शकेल. धंद्यासाठी भांडवली आणि चालू असे दोन प्रकारचे खर्च असतात, त्यासाठी दीर्घ मुदतीची कर्ज आणि कॅश क्रेडिट असे २ प्रकारची कर्ज आवश्यक असतात. पैकी दीर्घ मुदतीचे कर्ज हे दर महिना थोडे थोडे करून भराय्चे असाते. तर कॅश क्रेडिट रोजच्या खर्चासाठी लागते. मात्र तुम्ही ओणत्याही बँकेचे कर्ज न घेता सगळी खाजगी कर्जं घेतलीत, (अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरले नव्हते हे कारण आहे) त्यामुळेच आजची परिस्थिती आली आहे. आता आधीची रिटर्न्स भरायला गेलात तर बहुधा टॅक्स्+दंड भरावा लागेल. पण रिटर्न्स भरत नाही तोपर्यंत बँक कर्ज मिळणे अशक्य आहे. महिना एक लाख उत्पन्न असताना रिटर्न्स भरणे आवश्यक होते असे वाटते. निदान यापुढे तरी हिशेब व्यवस्थित ठेवत जा ही विनंती. आणि हे कर्ज आज ना उद्या फिटेलच, पण यापुढे अशी खाजगी कर्जे अगदी जवळच्या नातेवाईकांचीही घेऊ नका. आत्ता या क्षणी पत्नीचे दागिने, गाडी जे असेल ते डिस्पोज ऑफ करून बर्‍याच कर्जातून मोकळे होता येईल असे वाटते. तुम्ही एवढे प्रांजलपणे लिहिले आहे म्हणूनच हे सर्व लिहीत आहे. तुम्हाला दुखवायचा हेतू नाही. तुमच्या हातात कला आहे, तर या परिस्थितीतून नक्की बाहेर पडाल.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 18:23
तुमचे अनुभव वाचून एव्हढे लक्षात आले की खुपशा गोष्टी, तुम्ही सुद्धा, परिस्थितीचे विश्लेषण करून, स्विकारल्या आहेतच. मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा स्वभाव आधीपासूनच होता. जे जे पाहिजे ते ते हट्टाने कष्ट करून मिळवले. हा स्वभाव वाईट नाही. मात्र स्वतःचे मुल्यमापन स्वतःच सतत करत राहावे लागते. इतरांच्या सांगण्यावर लगेच अम्मल नाही केला तरी इतरांचे नक्कीच ऐकून घ्यावे. मनातल्या मनात त्यावर स्वतःशीच प्रामाणिक चर्चा करावी आणि आपला बंदा रुपया खणखणीत आहे की नाही हे सतत तपासत राहावे. अमुक एक गोष्ट होणारच असे मनात धरले कि ती झाली नाहीतर काय हा विचार केलाच नाही. नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा. धाडसीपणे पुढे टाकलेले पाऊल गरज भासल्यास मागे घेण्यात कसालाच कमीपणा नसतो. तो व्यवहार आहे. धंद्यात भावनेपेक्षा व्यवहार अधिक महत्वाचा असतो. बायको नेहमी सांगायची जे हातात आहे त्याचा विचार करूनच नियोजन करायचे आश्वासन द्यायची. बायकोचे (किंवा कुणाचेही) ऐकायचे की नाही हे ती (बायको किंवा दूसरी व्यक्ती) किती व्यवहारी आहे आणि मनाने विचार करणारी आहे की बुद्धीने ह्यावर अवलंबून असते. बायकोचे सर्वच ऐकणारे आणि कांहीच न ऐकणारे दोघेही खड्ड्यात जाऊ शकतात. त्यामुळे काय ऐकायचे काय नाही हे अनुभवावरून ठरवावे. हे पैसे येतील. तिथून काम येईल ह्या बेभरवश्यच्या नियोजनाला काही अर्थ नसतो. हे बाकी खरं आहे. तुमच्या सौंनी योग्य तोच सल्ला दिला आहे. पण तिचे कधी ऐकले नाही. कारण मागचे "अनुभव". मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आणि हा इगोच दुसर्‍यांच्या सल्यांवर विचारही करायला परवानगी देत नाही. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. असे वागणे धंद्यातच काय पण रोजच्या जीवनातही टाळलेच पाहिजे. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही. आंधळी रिस्क घेण्याने माणूस खड्ड्यात जातो किंवा भिंतीवर आपटतो. धंद्यात जोखिम उचलताना नुसते डोळेच नाही तर कान आणि मन सुद्धा उघडे ठेवावे. तसेच जोखीमीची तीव्रता (इंटेन्सिटी) तपासून बाजी उलटल्यास होणार्‍या नुकसानाबरोबर तोलून पाहावे. ते नुकसान क्षुल्लक किंवा कमी पातळीचे असेल तरच जोखिम उचलावी, मध्यम किंवा उच्च पातळीचे असेल तर उचलू नये. (जोरदार सेटबॅक बसू शकतो). त्यातच मुलगा ५ महिन्याचा असताना अंगावर गरम दुध सांडून ५०% भाजला. त्याचे शरीर भाजले आणि आमच्या दोघांची मने. फार दुर्दैवी घटना. अशा घटनांवर आपलं कांही नियंत्रण नसतं. विमा असता तर फारात फार आर्थिक बाजूची काळजी घेतली गेली असती पण आपल्या पोटच्या मुलाला होणार्‍या यातना आपल्या मनाचे, आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतो. त्यात तुमचा कांही दोष नाही. हा नशिबाचा/दुर्दैवाचा भाग आहे. आमचा संसार दृष्ट लागण्यासार्खाच आहे. त्यामुळे आपल्या सोबत काही चांगले होईल तर त्याचीच भीती वाटू लागली. कारण त्या चांगल्याला कुणाची तरी नजर हमखास लागतेच लागते असा वाईट अनुभव. स्वतःचा व्यवसाय करा किंवा नका करू पण ह्या मानसिकतेतुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडा. भन्नाट आत्मविश्वास ते शुन्य आत्मविश्वास असा प्रवास फार झपाट्याने झाला. ..... आपण हे करू शकणार नाही असा न्यूनगंड आला. तो बराच काळ होता. 'भन्नाट आत्मविश्वास' ह्यात स्वकर्तृत्त्वाचा भाग किती आणि नशिबाचा भाग किती हे तपासून पाहावे. खुप वेळा आपल्या नशिबाने (यशासाठी लागणार्‍या इतर सर्व बाबी आयत्याच जुळून येणे) मिळालेल्या यशालाच आपण आपलं कर्तृत्व समजतो. कित्येकदा ज्याला आपण आत्मविश्वास समजतो तो आपल्या मनावरचा सोनेरी मुलामा असतो. कांही कारणाने तो मुलामा खरवडला गेला तर आपल्याला समजतं आपण सुद्धा आतून, मुळात, इतरांसारखेच आहोत. किंचिंत घाबरट आणि mediocreच आहोत. ह्याचा स्विकार करणं बरंच कठीण जातं. पण लवकरात लवकर हे सत्य स्विकारल्याने पुढील वाटचाल सुरक्षित होते. सरळ राजीनामा दिला. त्या आधी एक २ लाखाचे लोन घेतले. दूसरा मार्ग स्पष्ट दिसण्याआधीच, लांबचा असला तरी सुरक्षित असा मुख्य रस्ता सोडून, काट्याकुट्यांच्या जंगलात (दोन लाखांचे कर्ज) शॉर्ट्कट सापडेल ह्या आशेने नविन वाट शोधण्यात शहाणपणा नाही. नोकरी सोडल्यावर दुसर्याच महिन्यात बायकोची एक आणि मुलाची एक अश्या दोन शस्त्रक्रिया यात बराच खर्च झाला. त्याच्या दुसर्या महिन्यात गाडीचा एक क्षुल्लक अपघात होऊन त्यात ४० हजार खर्च झाले. विम्याचे महत्व लक्षात आले असेलच. जी गंगाजळी ९ महिन्यासाठी प्लान केली होती ती ३ महिन्यात साफ झाली. आजारपणं, अपघात ह्यांचा विचारच न केल्याने ९ महिन्यांचे प्लानिंग केले. ९ महिन्यांना पुरेल इतकेच पैसे जवळ असताना ३ महिन्यांचेच प्लानिंग करायला पाहिजे. अर्थात, असे सल्ले नंतर देणं सोपं असतं. तरीपण ह्या अनुभवाचा भविष्यात उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. नशिबाने पुढे साथ दिली आणि कामाचा ओघ सुरु झाला. एप्रिल २०१२ ते एप्रिल २०१३ फारच मजेत गेले. एव्हढे नकारात्मक अनुभव आल्यानंतर जे कांही पैसे हाती आले त्यात 'फार मजा' न करता भविष्यासाठी विमा किंवा इतर काय तजविज केली? तेंव्हा एका ग्राहकाने पार्टनरशिप चा प्रस्ताव ठेवला. त्याचे पैसे आणि माझी मेहनत व ज्ञान असा तो एकंदर मामला होता. मी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेंव्हा मला एका गुजराथी व्यावसायिकाने सल्ला दिला होता. लहानात लहान धंद्याने सुरुवात कर पण स्वतःचा कर. पार्टनर घेऊ नकोस. सख्ख्या भावालाही, मार्केट दरापेक्षा जास्त दराने पगार देऊन मॅनेजर म्हणून ठेव, पण पार्टनर करून घेऊ नकोस. पार्टनरशिप वाईटच असते असे नाही पण ती सांभाळायला अंगात जास्त हुशारी आणि व्यवसायाचा अनुभव असावा लागतो. पार्टनरशिप यशस्वी झाल्यास 'माझ्यामुळे' आणि नुकसान झाल्यास 'त्याच्यामुळे' अशी दोन्ही भागिदारांची भूमिका असते. दोन्ही परिस्थितीत संवेदनशील व्यक्तीच्या वाट्यास मनःस्तापाव्यतिरिक्त कांही येत नाही. सुमारे १० ते १५ लाख गुंतवणूक होती. ह्या भांडवलात तुमची जमा पुंजी किती होती आणि कर्ज किती होते? जर सर्व गुंतवणूक भागिदार करणार असेल तर तो सतत तुमच्यावर दबाब ठेवणार ह्याची कल्पना असायला हवी होती. एव्हढी रक्कम गुंतविणारा भागिदार स्वस्थ बसून आपल्याला आपल्या मर्जी नुसार धंदा करू देईल असं समजणं हा भाबडेपणा आहे. पार्टनर एक मोठा बिल्डर होता. भागिदार कितीही पैसे गुंतवित असला तरी तो आपल्या तोलामोलाचा असावा. आपल्याला डोईजड होईल असा नसावा. आर्थिकदृष्ट्याही नाही, सामाजिकदृष्ट्याही नाही आणि मसलपॉवरच्या दृष्टीनेही नाही. त्याने त्याची काही माणसे ह्या सगळ्यावर देखरेख व संयोजना साठी दिली. ईथेच घात झाला. वर म्हंटल्याप्रमाणेच, जो १५ लाख गुंतवितो तो स्वस्थ बसणार नाही. तुमच्या प्रत्येक हालचालीवर 'लक्ष' ठेवेल आणि तुम्ही किती वेळा श्वास घेतला आणि सोडला ह्यावरही 'लक्ष' ठेवेल. तुमचे स्वातंत्र्य संपुष्टात येते. म्हणाले मी तुला पैसे देतो. बुडाले तरी हरकत नाही. (हा आशीर्वाद असल्यावर धंदा चालेल तर काय बिशाद) देणार्‍याने असे म्हंटले तरी 'घेणार्‍याने' हे कर्ज आहे आणि आपल्याला हे लवकरात लवकर फेडून आपला हात दगडाखालून मोकळा करून घ्यायचा आहे हे कधीच विसरता कामा नये. तुमचा ह्या मदतीकडे बघायचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. आता शब्द बदलायची बाबांची वेळ होती. त्यांनी पुढचे पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. वरून माझीच खरडपट्टी काढायला लागले. बाबांनीही पैसे दिले होते तेंव्हा त्यांचेही लक्ष असणारच तुमच्या व्यवसायावर. तुमचं व्यवसाय करणं (किंवा वागणं) जर बेदरकार असेल तर त्यांनाही व्यवसायाच्या यशाबद्दल साशंकता वाटणारच. त्यामुळे २ लाखांवर पाणी सोडून बाकीचे पैसे वाचविण्याचा त्यांनी पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे. शिवाय तुमची तुमच्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी, त्यातील खाचाखोचा माहित असल्याने आणि व्यावसायिकतेची ओढ असल्याने त्या दोन लाखाच्या सुरक्षिततेकडे किंवा परताव्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोण आणि तुमच्या वडिलांचा (वरील सर्व गुणांच्या अभावामुळे) दृष्टीकोण ह्यात फरक हा असणारच. त्यातून हे घडले असावे. शिवाय पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते. पुन्हा तुमच्या सौंचा सल्ला स्विकारला असतात तर अशा बेभरवशाच्या अनोळखी ग्राहकाकडून येणार्‍या पैशावर विसंबून राहिला नसतात. आपण ग्राहक असताना विक्रेत्याच्या आणि विक्रेता असताना ग्राहकांच्या 'गोडगोड' बोलण्याला फसायचं नसतं. माझ्याकडेही गिर्‍हाईके येतात. ५-६ माणसांचे जेवण हवे असते. किती खर्च येईल सांगितल्यावर घासघिस सुरु होते. मी शांत राहतो. मग ते हुकमी एक्का बाहेर काढतात अमुक अमुक फंक्शन ३०० माणसं जेवायला येणार आहे. तुम्हालाच ऑर्डर देऊ वगैरे वगैरे आश्वासनं देतात. मी सांगतो 'ह्या ऑर्डरचा हा रेट आहे. ती ऑर्डर येईल तेंव्हा 'त्या' ऑर्डरवर नक्कीच डिस्काउंट देईन.' असो. केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते. चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून किंवा 'अमुल्य' अनुभवाची फी असे समजून सोडून द्यायचे. पुढे चलायचे. खेदाने असे म्हणावे लागेल, धंदा बुडायला चांगले डिझायनर न मिळणे हे एक मोठे कारण आहे. डिझायनरला निवडताना नीट पारखून 'ट्रेड टेस्ट' घेऊन निवडायचे. त्यांच्या बोलण्यावर जायचे नाही. त्यांना नोकरी हवी असते त्यामुळे ते 'हां सर्व कांही करतो. मला सर्व येतं. मागे हे हे काम केलेले आहे.' अशा थापा ठोकतातच. शक्य असेल तर सॅलरी + कमिशन (ह्यात सॅलरी कमी पण दोन्ही मिळून साईजेबल रक्कम होईल) असे आमिष दाखवायचे. त्याचे डिझाईन गिर्‍हाईकाकडून पास झाले तरच पूर्ण रक्कम त्याला मिळेल. अर्थात माझा कुंपणावरून दिलेला सल्ला आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जास्त चांगली कल्पना आहेच. हिम्मत हरु नका. पण अनुभवांच्या जखमा कुरुवाळत बसण्याऐवजी त्यातून धंद्याच्या क्लुप्त्या शिकून घ्या आणि संयमाने यशाच्या मार्गावर पोहोचा. अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.

In reply to by एस

प्यारे१ Sun, 09/21/2014 - 19:36
+२ काय चुका झाल्या हे आत कुठंतरी पक्कं नोट डाऊन करुन त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा (प्राधान्यानं) सध्या त्या निस्तरण्याकडं जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्यातून बाहेर पडून नंतर काय ते ठरवता येईल. (ठरवावं लागेलच) आणि हो, कमीअधिक प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. 'समस्या असणं' हे तत्त्व सारखंच आहे. त्या 'समस्यांचं रुप' हे तपशील आणि तपशीलाचे भाग वेगवेगळे आहेत/असतात. त्यामुळं आपण सगळेच एकाच धारेचे प्रवासी आहोत. काहींच्या बोटी थोड्या कणखर, काहींची वल्हवण्याची क्षमता जास्त, वारं येईल तसं शिडाला दिशा देण्याचं कसब उत्तम, त्यानंतर टीम मेंबर्स नि ट्युनिंग आणि शेवटी अंशतः नशीबाचा हातभार असं सगळं गणित जुळून येणं भाग असतं. बाकी त्रास होतोच. तो एकदाच काय तो करुन घेऊन नंतर मात्र अजिबात न उगाळता पुढं जाणं आवश्यक आहे. शुभेच्छा आहेतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 19:06
छान विश्लेषण केले आहे. पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. अर्थातच "भाग्य कि कर्म" हा सनातन लढा आहेच. असो. मी फक्त एवढेच म्हणेन कि माझे अनुभव घटनेनुसार मांडले आहेत. त्यात बरेच निर्णय हे त्या काळातली उपलब्ध तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले आहेत. त्या परिस्थिती चे सर्वच कंगोरे इथे मांडणे शक्य नाही. उद. बिग पिच्चर दाखवणारे सगळ्याच धंद्यात भेटतात. त्यामुळे अशा लोकांना मी पूर्वीपासूनच ओळखून आहे. प्रस्तुत ग्राहक हा बिग पिच्चर दाखवत नव्हता. कारण आता हे दोन लेबल कर नंतर १०० लेबल ची कामे देतो अशी काही गोष्ट नव्हती. एकदमच १० लेबेल चे त्याने रोख पेमेंट केले होते व नंतरच्या ४ मोठ्या ऑर्डर चे हि रीतसर पेमेंट केले. त्यांचा खरोखरच मोठा झोल झाला. कारण ३ महिन्यात मी त्यांच्या मुळापर्यंत जाऊन खबरबात काढली होती. काहीतरी कारण झाले आणि त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या कंपनीशी त्यांचा काहीतरी वाद झाला. नंतर ती कच्चा मालवली कंपनी मला लेबलची ऑर्डर देत होती पण माझे रेट त्यांना परवडले नाही. ह्यात फार गुंतागुंत आहे. आणि ती सगळीच इथे सांगता येत नाही. असे प्रत्येक घटनेत झाले आहे. तात्पर्य: आपण घटना रोखू शकत नाही. पण त्याच चुका परत करू नये एवढे शिकावे. यशाने हुरळून जाऊ नये किंवा अपयशाने खचून जाऊ नये एवढा संदेश मी आपल्या प्रतिसादातून घेत आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 20:01
>>>> पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. असं मी माझ्या प्रतिसादात कुठे म्हंटले आहे? माझे म्हणणे आहे यशाचे आणि अपयशाचे, दोन्हीचे, डोळे, कान आणि मन उघडे ठेवून विश्लेषण करा. नशिबाने मिळालेल्या यशाला आपल्या कर्तृत्त्वाने मिळविले असे समजू नका. ह्याचा अर्थ यश नशिबाने मिळते आणि अपयश आपल्या मूर्खपणामुळे होते असा चुकीचा अर्थ आपण काढलेला दिसतो आहे. मूर्खपणाचे निर्णय केंव्हाही महागातच पडतात. आंधळी जोखिम उचलू नका. डोळे, कान आणि मन उघडे ठेवून परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करून काय तो निर्णय घ्या. अशा सवयीतून जेंव्हा यशाची चढती कमान सुरु होईल आणि अपयशाचे प्रसंग आले तरी ते सहजतेने हाताळण्याइतके सौम्य असतील अशा परिस्थितीतिल ते यश हे तुमच्या कर्तृत्त्वाचे आणि नशिबाचे प्रतिबिंब असेल. मूर्खपणा सोडून दिल्यामुळे, उध्वस्त होण्यासारखे, अपयश दृष्टीक्षेपातही नसेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 21:51
पेठकर काका, >>>मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आपल्या ह्या वाक्यावरूनच मला असं वाटले. बहुतेक आपण "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" ह्या माझ्या वाक्यावरून असा अंदाज बांधला असावा. तो माझा दुर्दम्य आशावाद होता. अहंकार नाही. आपण खरच उत्कृष्ट विश्लेषण आणि मार्गदर्शन केले आहे यात काहीच वाद नाही. परंतु सदरहू लेख माझ्याच अनुभवांवर आधारित असल्याने वाचकांचे कुठलेच गैरसमज होऊ नये म्हणू हा प्रपंच. मी स्वताला सर्वज्ञ मानत नाही. अजूनही शिकत आहे, समजून घेत आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी वेगवेगळे मत बनत जाते. परंतु कर्तुत्वानेच नशीब सिद्ध होते असे आत्तातरी मला वाटते. त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? अतिशय विपरीत परिस्थितीत मराठा साम्राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असोत कि रिलायंस चे धीरूभाई असोत, यांच्या यशात नशिबाचा भाग किती? त्यांनी यश अपयशाचे कितीसे हिशोब कुठलेही काम हाती घेण्याआधी केले असतील. "मला अमुक एक काम करायचे आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि बुद्धीचा कस लावूया" असेच विचार त्यांनी कुठेलेही काम हाती घेतानी त्यांच्या मनात असतील. त्यांच्या इतिहासावरून तरी असेच दिसते कि त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी जगात त्यांनीच प्रथम केल्या असतील. यशाचा कुठलाही फुलप्रूफ फोर्मुला नसतो. माझ्या मते वांगी कापल्यावरच कळते किडलेले आहे कि नाही ते. मी कापीन ती वांगी चांगलीच निघतील हा वृथा "इगो". शक्यतो न किडलेली वांगी घेऊ नये म्हणजे कापल्यावर किडलेले निघण्याचा धोका टळतो असे कधी शक्य नसते. पण कुठली वांगी किडलेली असू शकतात वा चांगली असू शकतात हा अंदाज अनुभवानेच येतो. कुणीही जन्मताच एक्स्पर्ट नसतो. पण तेवढे हुशार होण्यासाठी त्याला वांगी कापण्याचे "कर्तृत्व" करावेच लागते. याठिकाणी उद. म्हणून नारळ, आंबा, ग्राहक, नोकर काहीही असू शकते. परंतु कर्तुत्वाने मिळवलेल्या यशाचा कैफ चढून मनुष्य नादान चुका करू शकतो. मी कधीच चुकत नाही आणि चुकणारही नाही हा अहंकार भल्याभल्यांना बुडवतो. मला तरी तसा रोग कधी झाला नाही. तसे असते तर वरचा माझा लेख फक्त इतरांवर चिखलफेक करणारा असता. दुसरे म्हणजे आपण माझ्या दोन वाक्यांचा परस्पर वेगळाच अर्थ घेतला आहे. १. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. >>>रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही >माझे समीकरण सरळ आहे: रिस्क कमी = आर्थिक मोबदला कमी , रिस्क जास्त आर्थिक मोबदला जास्त. रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. २. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. >>>सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. >तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. रेड सिग्नल असतानी गाडी चालवावी असा त्याचा अर्थ नाही. अपघात होणार नसेल तरच मी गाडी चालवणार अश्या अर्थाचे ते वाक्य आहे. माझाच त्या वाक्यावर प्रतिवाद आहे कि आयुष्य हे कधीच शेवटच्या क्षणापर्यंत प्लान करता येत नाही. कधी थांबावे लागेल, कधी पळावे लागेल हि कुणीही आधीच जाहीर करू शकत नाही. गाडी बाहेर काढल्यावर अमुक एका चौकात सिग्नल हिरवाच असेल असे कुणीही सांगू शकत नाही. म्हणजे मला कुठेही अडथळा असेल तर मी गाडी काढणारच नाही असे होत नाही. फारतर कुठे कुठे सिग्नल आहेत त्याचा विचार प्रवास चालू करायचा आधी करू शकतो. म्हणजेच व्यवहारात धोके असणारच म्हणून ते करायचेच नाही असे अजिबात नाही. पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे कान, डोळे, मेंदू उघडा ठेऊन सगळीकडे बघावे लागते. ते शंभर टक्के खरे आहे. सगळी काळजी घेऊन कुणीतरी येउन तुम्हाला ठोकतोच तेव्हा ते "नशीब". म्हणून गाडी घरातून काढली हाच माझा मूर्खपणा असे कुणी म्हणत नाही. बाकी आपल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल खरच आभारी आहे. कुठे गल्लत होत असेल तर जरूर सांगा. तुमचा हक्क आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2014 - 02:07
संदिप डांगे, माझ्या प्रतिसादातील दुसर्‍याच वाक्यात मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ते वाक्य म्हणजे, मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः हा 'इगो'चा अनुभवही मी घेतला आहे. तोच माझ्या प्रतिसादात मी मांडला आहे. आपण अपयशाचं विश्लेषण करतो पण यशाचं कधी करीत नाही. ते आपल्या हुशारीनेच मिळाले असे आपण गृहीत धरतो. मीही सुरुवातीला हिच चुक केली होती पण स्वतःच्याच यशापयशाचं मुल्यमापन करताना माझी चुक माझ्या लक्षात आली की सुरुवातीच्या यशात माझे श्रेय विशेष नव्हते पण ते माझ्या हुशारीनेच मिळाले होते असा 'इगो' माझ्यात निर्माण होऊन पुढे जरा सेट बॅक बसला होता. (माझी ४ उपहारगृह नुकसान होऊन बसली.) यशाचं मुल्यमापनही करणं गरजेचं असतं. असो. तुमच्या बाबतीत तसे झाले नसेल तर आनंदच आहे. >>>>त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? मी १९९० साली मस्कत मध्ये पावभाजी, बटाटेवडे, वडापाव वगैरे पदार्थ विक्रीसाठी कॅफेटेरिया सुरु केला. सुरुवातीच्या ४ महिन्यात गिर्‍हाईकांचा ओघ वाढला. गुजराथी मुख्य गिर्‍हाईके. तेंव्हा माझ्या कॅफेटेरीयात इथल्या स्थानिकांसाठी चिकन, अंड्याचे सँडविच, बर्गर हे सुद्धा होते. स्थानिक आणि गुजराथी, मराठी सर्व गिर्‍हाईकांना संतुष्ट करून व्यवसाय भरभराटीस न्यायचा माझा विचार होता. व्यवसायाचा अनुभव शून्य होता. सुरुवातीला भरमसाठ गिर्‍हाईके आली. ह्याला मी माझी हुशारी समजत होतो. पण त्यात नशिबाचा भाग होता. इथे तेंव्हा पावभाजी, वडापाव इत्यादी विकणारी उपहारगृह नव्हती. मी मार्केटचा तसा अभ्यासही केला नव्हता. पण परिस्थिती अशी होती की कोणीही तेंव्हा असा कॅफेटेरीया सुरु केला असता तर यशस्वी झाला असता. कारण त्या काळी ती त्या मार्केटची गरज होती. माझी हुशारी नाही. हा झाला नशिबाचा भाग. मला गुजराथी भाषा येते. त्यामुळे येण्यार्‍या गुजराथी गिर्‍हाईकांशी मी गुजराथीत बोलायचो, मराठी गिर्‍हाईकांशी मराठीत बोलायचो, अरबी गिर्‍हाईकांशी अरबी भाषेत बोलायचो, दक्षिण भारतियांशी हिन्दी आणि इंग्रजीत बोलायचो. बहुसंख्य गिर्‍हाईके ही गुजराथी आणि मद्रासी होती जी शुद्ध शाकाहारी होती. त्यांच्याशी संभाषणातून त्यांचा माझ्या कॅफेटेरियातील मांसाहारी पदार्थ विक्री बद्दल असलेला रोष माझ्या लक्षात आला. आणि मी तडकाफडकी मांसाहारी पदार्थ बंद करून टाकले. कारण एक तर मांसाहाराचा आग्रही समाज हा अरबी होता आणि टक्केवारीत फार कमी होता. कुठल्याही उपहारगृहात हिन्दी आणि अरबी गिर्‍हाईके एकत्र कमीच दिसतात. (त्या काळच्या गोष्टी आहेत ह्या, १९९०) मांसाहारी गिर्‍हाईकांसाठी मी माझा मोठा शाकाहारी वर्ग हातचा सोडू इच्छित नव्हतो. त्यामुळे तो निर्णय निरिक्षणातून, मार्केटचा अभ्यास करून आणि गिर्‍हाईकांशी संभाषण करून मिळविलेल्या माहितीवर होता. ती माझी हुशारी होती (असं मी मानतो) त्यात नशिबाचा भाग नव्हता. मांसाहारी पदार्थ बंद केल्यावर रोजच्या गिर्‍हाईकांने तो विषय काढला किंवा नाही काढला तरी मी आवर्जून 'मांसाहारी पदार्थ बंद केले आहेत आणि आता हा कॅफेटेरिया शुद्ध शाकाहारी आहे' असे सांगायचो. ती माझी जाहिरातबाजी होती ज्याचा गुजराथी आणि मद्रासी गिर्‍हाईके वाढण्यात मला फायदा झाला. मराठी लोकांना (शाकाहारी वर्ग सोडल्यास) विशेष आक्षेप नव्हता पण त्यांनाही कॅफेटेरियाचे बदललेले रुप आवडले आणि एक 'उत्कृष्ट शाकाहारी उपहारगृह' अशी माझ्या कॅफेटेरियाची ओळख वाढत गेली. सोबत धंदा. हा परिणाम मी माझ्या तथाकथित हुशारीने घडविला होता. इथे हुशारीमुळे आपण कुठलेही उपहारगृह नफ्यात आणू शकतो असा माझ्या मनात अहंगड (इगो) निर्माण झाला आणि ह्या नंतरची ४ उपहारगृहे रांगेत खाली बसली. आत्मपरिक्षण केले. मार्केटचा अभ्यास वाढविला. आणि एकुलत्या एक उपहारगृहावर (जे यशस्वी होते) लक्ष केंद्रित केले. इथे-तिथे उड्यामारण्यापेक्षा आहे तो धंदा सांभाळणे/वाढविणे ह्यावर भर दिला. कित्येक वर्षे नविन उपहारगृहात हात घातला नाही. ह्या देशाची खाली गेलेली इकॉनॉमी (अपयशाच्या अनेक कारणातील एक कारण) हळू हळू सावरली गेली पुन्हा भारतियांची ह्या देशात वर्दळ वाढली आणि दुसर्‍या कॅफेटेरियाची गरज निर्माण झाली. ती ओळखून मी दूसरे उपहारगृह सुरु केले तेही चांगले चालले आहे. हा झाला नशिब आणि हुशारीतील फरक, अहंगंडाचा परिणाम आणि धंद्यात सावरण्यासाठी डोळे, कान आणि मन उघडे ठेवून टाकलेली पाऊले. >>>>रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही. ती माझी टंकनचुक होती. मलाही तेच म्हणायचे होते 'रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली नाही' आंधळ्या जोखिमीने नुकसान होऊ शकतं. तुम्ही दिलेलं सिग्नलचं उदाहरण चुकीचं आहे त्यामुळे पुढचा माझा प्रतिसाद गंडल्यासारखा तुम्हाला भासतो आहे. गाडीचा प्रवास फक्त सिग्नलाच खुंटतो असे नाही तर रहदारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कुठे अचानक कोणी मधे येतं (आपल्याला ब्रेक मारावा लागतो), कुठे सिग्नल लाल असतो (थांबावं लागतं), कुठे ट्रॅफिक जॅम असतो (रहदारी संथ गतीने जात असते) धंद्याचेही असेच असते कधी धंदा जोरात असतो (मोकळा रस्ता) कधी मधे कोणी कडमडतो (धंदा कमी होण्याची कांही तात्कालीक कारणं) तर कधी नुकसान नाही पण धंदा मंदीत असतो (जसा इथला रमझानचा महिना, शाळांच्या सुट्यांमुळे भारतियांचे स्वदेशी सुट्टीवर प्रयाण वगैरे) ह्या सर्व अडचणींमधून पार पडताना नितीमत्ता, कायदेशीर बाजू सोडायच्या नाहीत जास्त नफ्यासाठी चुकीची रिस्क घ्यायची नाही, नाहीतर मोठे नुकसान, आर्थिक सेट बॅक अशा 'अपघातांना' आपणच आमंत्रण दिल्यासारखे होते. माझे आणि तुमचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. पण एकंदरीत धंद्यात वापरायची सावधगिती बहुतेक सर्व धंद्यात सारखीच असते. तुम्हाला मी धंदा 'शिकवत' नाहीये फक्त आंधळी जोखिम घेऊ नका, अपयशा प्रमाणेच यशाचेही विश्लेषण करा आणि स्वतःबद्दल चुकीच्या धारणा न बाळगता (म्हणजे तुम्ही बाळगता आहात असे मला म्हणायचे नाहिए.) प्रगती करा. यशस्वी व्हाल.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 02:39
खरच पटले. बाकी काही खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आल्यावर जरा समज गैरसमज होणारच. (जसे आम्हा बाप-लेकाचे नाते व इतर अनेक गोष्टी.) पण एकदा मिपा ला आपले मानल्यावर मन मोकळ करायचे ठरवल्यावर अस काही होईल याची अपेक्षा होतीच, त्यामुळे दुख: नाही. प्रत्येकाचे आपले एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान असते. त्या त्या अनुभवातून तावून सुलाखून ते मिळालेले असते. त्याचा यथायोग्य आदर आहेच. तुमचे अनुभव ऐकून मस्त वाटले. त्यामुळे तुमचे म्हणणे अजूनच पटले.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरच्या इतका उत्तम व्यवहारी सल्ला मिळणे कठीण आहे. प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्याजोगा आहे ! यात अजून फक्त थोडीशी भर : १. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना (मग तो नोकरीसंबद्धी, व्यवसायासंबद्धी अथवा त्यातल्या एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टसंबंद्धी असो) सर्वप्रथम तो निर्णय फसला वाईटात वाईट काय होईल आणि यशस्वी झाला तर काय चांगले होईल याचे सद्यस्थितीवर अवलंबून (स्वप्नाळूपणे नाही) विश्लेषण करायला पाहिजे. याला "वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ" असे नाव आहे. यातला सर्वात महत्वाचा असतो "वाईटात वाईटाचा विचार करणारा वर्स्ट केस सिनॅरिओ"... त्याला पुढे जाण्याची तयारी असली आणि त्यासाठी आवश्यक (मॅन-मनी-मटेरिएल) बंदोबस्त केलेला असला तर एखादे अपयश तुमच्या मनाच्या उभारीवर आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन प्रगतीवर मोठा परिणाम करू शकणार नाही. वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अविभाज्य भाग असल्यास तुम्हाला अर्थसहाय्य पुरवणार्‍या संस्थेला/माणसाला तुमच्याबद्दल जास्त भरवसा वाटेल. २. अर्थसहाय्य बँक अथवा नॉन-बँकींग फिनान्शियल इन्स्टिट्युशन्स मधूनच घ्यावे हे माझे स्वतःचे मत आहे. त्याची काही अगदी साधी कारणे आहेत... अ) अर्थसहाय देण्याअगोदर वरील संस्था प्रोजेक्ट रिपोर्टचा आग्रह धरतील आणि तो संस्थेचे ठोकताळे वापरून संस्थेमधले विशेषज्ञ पडताळून पाहतील... त्यामुळे व्यवसायाच्या सफलतेसाठी अत्यंत आवश्यक असलेला एक पाया आपोआप तयार होईल. (मात्र कर्जासाठी "सोईस्कर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे/बनवून घेणे" धोक्याचे आहे, तेव्हा ते टाळा.) आ) तुम्ही कितीही फायदा कमावलात तरी वरील संस्था केवळ करारात अगोदर लिहीलेले आहे तेवढेच व्याज आकारतात. किंबहुना तुम्ही यशस्वी उद्योजक झालात आणि कर्जाचे हप्ते वेळेवर / वेळेअगोदर दिलेले असले तर पुढचे कर्ज अधिक सुलभतेने आणि अधिक चांगल्या दराने मिळू शकते. भागीदारांच्या अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यकाच्या परताव्याच्या अपेक्षा सर्वसामान्यपणे व्यवसायाच्या सफलतेच्या अनेक पटींनी जास्त वाढतात. इ) व्यवसायातला एखादा धक्का बँक जास्त समजूतीने घेईल, कारण व्यवसायातल्या अश्या चढउतारांची माहिती असणे हा बँकिंग व्यवसायाचा भाग असते. भागीदार अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यक अशी अपेक्षा ठेवणे सर्वसाधारणपणे महागात पडते... शिवाय ती व्यक्ती नातेवाईकांपैकी असली तर नातेसंबंधातही कडवटपणा येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे Sun, 09/21/2014 - 22:32
>>>पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे. मी आधीच म्हटल्या प्रमाणे प्रत्येक घटनेची विस्तृत कारणमीमांसा शक्य नाही, परंतु आपल्या विश्लेषणाचा रोख लक्षात घेता थोडे लिहितोच. यात वडील चूक कि मी असे काहीही नाही. त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांनी निर्णय बदलला त्याचा फटका मला बसला एवढेच . मीच त्यांना "हे मी कर्ज म्हणूनच घेत आहे" असे सांगितले. आणि त्याचे बाजारभावाप्रमाणे व्याज हि देणार असे हि काबुल केले होते. त्यामुळे हे पैसे नाही दिले तर चालतील असा काही माझा विचार कधीच नव्हता. त्यामुळेच पैसे देण्यास ते तयार झाले. त्यांच्या मते पार्टनर आहे त्याला तू हिस्सा देशील त्यापेक्षा मला दे. आपला पैसा आपल्याच घरात राहील. मी म्हटले :ओके: माझ्या कर्तृत्वात मला कुणाचेच उपकार नकोत अगदी सख्या बापाचेही. कर्ज घेणे मी निषिद्ध मानत नाही. परत करायची प्रामाणिक इच्छा आणि मनगटात ताकत असेल तरच कर्ज घ्यावीत. जोपर्यंत ते कमवू शकतात तोपर्यंत त्यांना माझा आधार नको आहे. परंतु पुढे त्यांच्या व्यवसायात मंदी आली आणि ते असुरक्षित फील करू लागले. म्हणून त्यांनी शब्द फिरवले. (मी दोन लाख आणि बाबांनी एक लाख असे मिळून २००९ मध्ये आम्ही एक घर घेतले त्याची किंमत आज २५ लाख आहे. पण त्या घराचा मी अजिबात विचार करत नाही आणि करणार हि नाही कारण ते आई आणि बाबांसाठी घेतले आहे. आणि ते त्यांच्याच नावावर आहे.)

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड Sun, 09/21/2014 - 23:09
नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा.
प्लान बी हा नॉर्मली वर्स्ट केस सिनारियो नसतो. प्लान फॉर द बेस्ट अ‍ॅन्ड प्रिपेयर फॉर द वर्स्ट या तत्वा नुसार प्लान सी, डी आणि ई सुद्धा हवेत.

विजय_आंग्रे Sun, 09/21/2014 - 18:53
प्रभाकर पेठकर सर तुमची संपुर्ण पोस्ट अप्रतिम आहे.
अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.
__/\__

आनन्दा Sun, 09/21/2014 - 18:57
पेठकरकाकांशी सहमत. बाकी एव्हढेच सांगेन, एखाद्या मोठ्या सहकारी बॅंकेकडून कर्ज मिळवता येते का ते पहा. त्यांच्या मॅनेजरला या सार्‍या गोष्टींची कल्पना द्या, तुमच्या कामाचे रेफेरेन्सेस दाखवा, आणि कदाचित तुम्हाला काहीतरी कर्ज मिळेल. सहकारी बँकांचे नियम थोडे वाकवणेबल असतात असे ऐकून आहे, आणि व्याजदर पण थोडे चढे असतात. पण सध्याच्या स्थितीत तुम्हाला ते देखील परवडेल. आणि बाकी इन जनरल, आम्हाला शाळेत एक श्लोक होता, पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनं, कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनं. आणि कोर्पोरेट भाषेत सांगायचे झाले तर, ही सारे लर्निंग आहे, फक्त अ‍ॅट कॉस्ट.

मुक्त विहारि Sun, 09/21/2014 - 22:11
@ संदीप डांगे, प्रथमतः तुमचे अभिनंदन, कारणे २ १. स्वतःची चूक कबूल करायला धाडस लागते.ते तुम्ही केलेत. २. मिपाची खरी किंमत तुमच्या ह्या धाग्यांमुळे आम्हाला समजली. आणि प्रभाकर दादा, संक्षी, प्यारे१ आणि इ.ए. ह्यांच्या सल्ल्यांमुळे तुम्हाला नक्कीच धैर्य आले असेल.

विजुभाऊ Sun, 09/21/2014 - 22:12
पेठकर काकांशी सहमत. सन्दीप्भौ तुमच्या सारख्या अनुभवातून मी देखील थोडाफार गेलो आहे. अशावेळेस सल्ले देणारे भेटतात तसेच विश्वास ठेवून पैसे देणारे सुद्धा भेटतात. हे लोक आपले भले व्हावे असेच इच्छतात. अशा वेळेस घाईघाईने निर्णय न घेता परिस्थीतीकडे थोड्या त्रयस्थ नजरेने बघावे. काहीवेळेस थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले तर आपल्या चुका काय झाल्या ते कळते तसेच आपल्यात काय चांगले आहे ते देखील समजत. मला वाटते की तुम्ही तुमच्यातील चाम्गल्या गुणांचे अ‍ॅनालिसीस केलेलेच नाहिय्ये. तुम्हाला सहानभुती दाखवणार्‍या लोकांपेक्षा सल्ले देणारांपेक्षा अगदी अनोळखी ज्याना तुमचे बॅग्राऊंड माहीत नाही अशा लोकांशी व्यवहार करून बघा. नाशीक हे एक मोठे शहर आहे तेथे तुम्हाला ओळखणार्‍या लोकाम्पेक्षा न ओळखणारे लोक अनेक पटीने जास्त आहेत. अवांतर : मराठीत "मसाला "नावाचा चित्रपट अशाच एका धडपड्या माणसाच्या कथेवर बेतलेला आहे तो बघा शक्य झाले तर.

कवितानागेश Sun, 09/21/2014 - 23:29
खूपच महत्त्वाचे आणि अनुभवी सल्ले मिळत आहेत इथे. कागदपत्रे नीट न ठेवल्यानी आणि धंद्यात स्वतःकडंचच किंवा जवळच्यांकडून घेउन बरंच भांडवल घातल्यानी झालेलं नुकसान अगदी जवळच्या नातेवाईंकाच पाहिलेलं आहे. तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येतेय. पण पुन्हा नोकरी बघण्याचं आणि नवीन कौशल्य शिकून घेण्याचं धाडस दाखवून ते पुन्हा सगळी फेडून उभे आहेत. तुम्ही यापुढे सगळ्या प्रकारची काळजी घ्याल आणि यशस्वीही व्हाल याबद्दल खात्री आहे. :)

माहितगार Mon, 09/22/2014 - 01:10
संदिप, आपला धागा लेख आणि प्रतिसाद वाचतो आहे. संस्थळाच्या अ‍ॅड्मिनिस्ट्रेटीव्ह जबाबदारीचा भाग म्हणून मिपा संपादकांनी त्यांची जबाबदारी योग्यच पार पाडली. प्रतिसाद बर्‍या पैकी जबाबदारीने येताहेत आणि प्रतिसादांना तुमचा प्रतिसाद सुद्धा चांगला येतो आहे तेव्हा त्या बद्दल अभिनंदनच. चर्चा वाचणार्‍या इतर व्यावसायिकांसाठी म्हणून अडचणींची चर्चा जेवढी लवकर केली तेवढे बरे गूंतागूंत तेवढीच कमी असते. १) इंपल्स (मराठी शब्द ?) आणि विश्वास ठेऊन रिस्क घेण हा उद्योजकतेचा गूण आहे पण सोबतीला इंपल्स मध्ये न अडकणारी, पुन्हा एकदा विचार करून खात्री करून घेण्याचे सांगणारी रिस्क दाखवून देऊ शकणारी व्यक्ती चर्चेसाठी सोबत हवी. २) अंतीम निर्णय आपलेच राहतील एवढ स्वातंत्र्य/अधिकार जतन केलाच पाहीजे पण त्याच वेळी कोणत्याही निगोशिएशन मध्ये आपण स्वतः अंतीम निर्णय घेणारे आहोत हे सांगू नये. इतरांना सांगण्यासाठी एक खरा किंवा इमॅजनरी बॉस नेहमी ठेवावा ( जसे माझ्या डायरेक्टरांना विचारून सांगतो भले डायरेक्टर तुम्ही स्वतःच असा) म्हणजे ऐन निगोशीएशन मध्ये विचारून सांगतो असे म्हणणे आणि अंतीम चर्चा करणे सोपे जाते. (अननुभवी इंपल्सीव लोकांकडून हि डिप्लोमॅटीक स्टेप राहून गेलेली असण्याची आणि नाही तेव्हा गोत्यात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते)
एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते... केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते.
३) वर्कींग कॅपिटल बद्दल आधीच्या काही जणांनी प्रतिसादातून मार्गदर्शन केलच आहे पण हि जागा नेमकी खेळत भांडवल जपण्यासाठी लागणार्‍या शिस्तीची असते. किमान जेवढी देणी (जसे ऑफीसचे भाडे कर्मचार्‍यांचे पगार) कॅश मध्ये जायची तेवढा रोखीचा कस्टमरशी रोखीचा व्यवहार झालाच पाहीजे . उधारीच ग्राहक मोठ असल तरी तो मोह बाजूला ठेऊन रोखीचे ग्राहक आधी करावयास हवेत. ४) इन एनी केस तुमचा मॅनपॉवर टर्न ओव्हर व्यावसायिक यशासाठी स्विकार्य स्तराचा नव्हे. मॅन पॉवर टर्न ओव्हर कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहून माणस कशी जपायची हे माहित करून घेतलच पाहीजे, पण त्या पूर्वी माणूस निवडण्या पुर्वीच माणूस पारखण्यासाठी मुलाखतीं घेण्यासाठी अधिक वेळ मोजला पाहीजे. न आवडलेला माणूस पहिल्या ४८ तासात काढून टाकावा जास्तीत जास्त सात दिवस छोट्या व्यावसायिकांनी या पेक्षा अधिक कालापव्यय माणूस काढून टाकताना करू नये. माणूस केव्हाही सोडून जाऊ शकतो किंवा काढावा लागू शकतो या तयारीत आधीच राहून मुलाखती घेऊन काही जणांना पाईप लाईन मध्ये ठेवावयास हवे. ५) कस्टमरशी प्राईस निगोशीएशन आणि पैसे मागण्याची स्किल्स चांगली हवीत तुम्ही चांगल प्राईस निगोशीएट करू शकले नाही आणि पुरेसे पैसे रोखीत मिळवू शकले नाही तरीही तुम्हाला चांगल मॅनपॉवर मिळणार नाही आणि टिकणार नाही. पैसे मागण्याची स्किल किमान पाच वर्षे सेल्सचा अनुभव असलेल्या व्यक्ती कडून घ्यावीत आणि प्राईस निगोशिएशन स्कील हाय व्हॅल्यू प्रिमीयम प्रॉडक्ट सेलींग करणार्‍या व्यक्तींं कडून घ्यावीत. ६) तुम्हाला चांगला डिझायनर मिळाला नाही तरी दुसर्‍या फ्रिलान्स डिझायन्रर्सना शोधून वापरण्याचा पर्याय कितपत उपयूक्त होता माहित नाही पण तो तुमच्या धागा लेखात दिसला नाही. अर्थात हे सर्व सल्ले सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत, जी गोष्ट स्वतः पाहिली नाही त्याबद्दलचे सल्ले कितपत प्रॅक्टीकल आणि नेमके असतील हे सांगता येत नाही. पण मला प्रथम दर्शनी महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी टंकल्या एवढेच.

In reply to by माहितगार

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 02:27
सर्वोत्तम प्रतिसादांपैकी एक. अश्याच मुलभूत आणि नेमक्या सल्ल्याची अपेक्षा होती, ती आपण पूर्ण केलीत. तुम्ही सांगितलेल्या ह्या सर्व बाबी माझ्यासाठी खरच नवीन आणि उद्बोधक आहेत. विशेषत: इमजिनरि बॉस आणि निगोशिअशन स्किल्स कुणाकडून घ्यावीत. अजूनही अश्या मौलिक माहिती किंवा प्रशिक्षणाची काही खबर असल्यास जरूर कळवणे. मी हुशार, मी धंदा करतो म्हणून मला फार कळते, दुसर्यांनी मला काय शिकवू नये असा माझा अजिबात पिंड नाही. स्वतंत्र व्यवसाय सुरु करून मला उणीपुरी ३ वर्षे झाली आहेत. या दरम्यान चांगल्या वाईट अनुभवांनी बरेच शिकवले. तुम्ही सांगितलेले पाचही मुद्दे मला भरपूर मार्गदर्शक आहेत. अजून शिकायची इच्छा आहे. फ्रीलान्स डिझायनर सोबत काम करणे जरा महागात पडते. त्यांच्या अपेक्षा आणि उत्पादकता यात बरीच तफावत असते. म्हणजे कुणी मध्यस्थ असेल तर त्याची बरीच फरफट होते. या प्रकारात माझ्या अनुभवाप्रमाणे कुणीतरी एक म्हणजे ग्राहक किंवा डिझायनर मध्यस्थाच्या जवळचा अथवा खास पाहिजे. जेणेकरून कामाचा दर्जा व मोबदला यांच्यात अविश्वासाने काही गोंधळ होणार नाही. माझे एक दोन जुने मित्र आणि समव्यवसायी ह्यांच्यासोबत व्यवहारात आहे. परंतु फ्रीलान्स आणि डेडीकेटेड स्टाफ यांच्यात आपापले सामर्थ्य व उणीवा असतात. वेळप्रसंग बघून आयुधे वापरावी लागतात. सांप्रत मला असा अनुभव आहे कि माणूस बिझनेसमन असला कि लोकांचा (विशेषत: नोकरदारांचा) त्याच्याकडे बघण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन काहीसा असा असतो. १. चिक्कार पैसे कमावतात २. नोकरांचे शोषण करतात ३. ग्राहकास लुबाडतात ४. पार पोचलेले असतात ५. प्रचंड हुशार आणि धूर्त असतात ६. माणसे ओळखण्यात पटाईत असतात ७. आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात ८. "तुम्ही बिझनेस करता म्हणजे तुम्हाला हे (…. )माहितीच पाहिजे… " अश्या अर्थाचे उद्गार. ९. हमखास कर बुडवतात १०. बिझनेस भरपूर पैसा गाठीशी आहे किंवा अवाजवी नफा मिळतो म्हणूनच करतात ११. फक्त आणि फक्त पैश्याकडे बघतात. म्हणजे एकंदर व्यापारी आणि लुटारू यांच्यात फक्त एक फरक तो म्हणजे एक गोड बोलतो दुसरा धारदार बोलतो. हे पण मी स्वत: बिझनेसमन झाल्यावर शिकलो. अर्थात बिझनेसमन होणे हे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासारखे नसते. मिळाली पदवी कि झाला बिझनेसमन. तोही चुकू शकतो. धंदा करणाराने सदैव जागृत आणि तत्पर राहिले पाहिजे, त्याच्याकडून चूक होऊच नये. तसे होत असेल तर कशाला करतो धंदा? गुमान नोकरी कर आणि शांत बस असे सल्ले येतात. (हे वैयक्तिक अनुभवले आहे. मला नोकरीसाठी तळमळीने मदत देऊ केलेल्या मिपाकरांसाठी हे नाही. त्यांच्या प्रामाणिक तळमळीबद्दल मला कुठलाही पूर्वग्रह नाही.)

In reply to by संदीप डांगे

माहितगार Mon, 09/22/2014 - 09:14
उत्कृष्ट दर्जा देणार्‍या स्वतःच्या व्यावसायिक कौशल्या सोबत व्यवसाय मिळवणे (खास करून बर्‍याच महाराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी ओळखीच्या परिघा बाहेरचा व्यवसाय मिळवण्याकडे दुर्लक्ष होत अथवा किंमत पाडून मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसतो- जे अ‍ॅप्लिकेबल नसेल ते सोडून द्यावे) आणि विवीध स्टेक होल्डर्सशी व्यावसायिक संबंध टिकवणे ओघाने येतेच. हे एवढ्या साठी नमुद करतो आहे की डिझायनींगची चांगली कला पण केवळ कला असलेल्या इतर व्यक्तीत आणि तुमच्यातला हा फरक समजून घेतला की कौशल्याधारित सुयोग्य मोबदला देऊन माणसे वापरून घेणे सोपे जाते. जो पर्यंत तुम्ही आणि मोबदला घेऊन काम करून देणारा यांचे संबंध चांगले आहेत तो पर्यंत बाकी जग काय म्हणते ते खूप महत्वाचे नाही. प्रचंड हुशार आणि चतूर- हा योग्य शब्द (धूर्त) असतात; . माणसे ओळखण्यात पटाईत असतात, . आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात (हाणून पाडण्यासाठी नकारात्मक टोन मधल्या नसतील तर) अशी इमेज पैसे उभे करताना उपयोगीच पडू शकेल असे वाटते. पण तुमचा व्यवसाय हाणून पाडण्यासाठी ग्राहक सोडून कुणी कॉमेंट मारत असेल तर त्याला तुमचा नकारात्मक स्वभाव असलेला स्पर्धक गृहीत धरा. तुमच्या स्टेक होल्डर समोर तुम्ही केलेल्या दहा सकारात्मक गोष्टी स्पर्धकाच्या वाक्यांचा उल्लेख न करता दाखवून द्या. नोकरांचे शोषण करतात, ग्राहकास लुबाडतात, अशी इमेज मात्र निर्माण होणार नाही याची अधिकाधीक दक्षता घेतलेली व्यवसायाच्या यशाच्या दृष्टीने चांगली. बाकीच्या आणि बाकीच्यांच्या कमेंटांकडे दुर्लक्ष करणे चांगले, व्यवसाय यशस्वी झाल्या नंतर तिच मंडळी आपापली कामे करून घेण्यासाठी बदलतील. चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2014 - 10:16
>>>>चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव लाख मोलाचं विधान. ह्याच पायाभूत विचारांवर विश्वास ठेवून, २४ वर्षे सेवाउद्योगात टिकून आहे.

इनिगोय Mon, 09/22/2014 - 06:45
हे लिहून काढत आहात हे अतिशय उत्तम. यातून तुम्ही (खरंतर कोणत्याही उद्योजकाने) काय टाळायला हवं आणि कोणती खबरदारी घ्यायला हवी या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन होतं आहे. पेठकरकाका, इस्पिकचा एक्का आणि इतरही काही प्रतिसाद खूप मुद्देसूद आहेत. माझ्याकडून एक लहानशी सुचवणी.. रश्मी बन्सल यांचं 'कनेक्ट द डॉटस्' हे पुस्तक मिळवून वाचा. कोणत्याही औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यातूनही तुमच्या उपयोगाचे बरेच काही मिळेल, हे नक्की. उदा. वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतःच्या, नातेवाईकांच्या कमाईचे सारे पैसे व्यवसायात न गुंतवता बँकेकडून कर्ज घेतल्याने नेमके काय साध्य होते, त्यासाठीचे डॉक्युमेंटेशन कसे करावे, इ. आपल्याच सारख्या परिस्थितीतून वाटचाल केलेल्यांचे अनुभव वाचल्याने दृष्टीकोनात खूपच सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. बाकी व्यक्तिगत निरोप धाडला आहे, तो पाहा.

विलासराव Mon, 09/22/2014 - 11:33
औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. माझं नाव आहे का हो त्यात. मी बीई ईलेक्ट्रॉनीक्स झालो १९९४ मधे. नंतर मुंबईला आलो. ९ वर्षे नोकरी केली सर्व्हीस ईंजीनीयर म्हनुन. २००३ ला नोकरी सोडली तेव्हा कर्जबाजारी झालो होतो. मग नोकरीत कर्ज फिटणे अशक्यप्राय झाल्याने व्यवसाय सुरु केला. घर भाडयाचे, डोक्यावर कर्ज आनी दारात देणेकरी अशात माझा व्यवसाय सुरु झाला. घरच्यांनी तर लांब रहाणेच पसंद केले कारण त्यांना वाटले याची सटकली. कारण आमच्या खाणदाणीत व्यवसायात पाउल टाकणारा मी बहुधा पहीलाच. आता नवीन व्यवसाय असल्याने लगेच रोज काम नसायचे. मग मी पुस्तक वाचत दिवस दिवस घरीच पडीक असायचो. घरातले सगळे यावर आपापसात चिंता व्यक्त करायचे. लवकरच मला पहीली ऑर्डर मिळाली. त्याची माझी खरेदी होती ५००० रुपये. विकायचे होते ७००० रुपयांना. यात २००० मार्जीन होते खरे पण १ वर्ष सर्व्हीसही होती. घरातुनच अर्थात मदत मिळाली नाही. बरेच प्रयास करावे लागले त्या पाच हजारासाठी. पण त्याच पार्टीने काम वेळेत करुनही पेमेंट चार महीने लटकवले. मग त्या पाच हजार दिलेल्या लोकांनी आधीच पत नसलेल्या मला काळ्या यादीतच टाकले. मग सगळ्या मित्रमंडळात खबर गेली. सगळे रस्ते जवळपास बंद. मग मी नवीन ऑर्डर मिळवण्याचे प्रतत्न कमी करुन मेंटेनन्स कॉण्ट्रॅक्ट किंवा कॉलबेसीसवर ब्रेक्डाउन कॉल्सला जोर लावला.थोडेसे पैसे जमा झाल्यावर हळूहळू विक्री परत चालु केली. पण खास वाढ होत नव्ह्ती. प्रयत्न तर अथक चालु होते.मी सकाळी स्वैपाक करुन डबा बरोबर घेउन ६ वाजता अंबरनाथवरुन घर सोडायचा ते व्हीटीला माझ्या ऑफीसला यायचो. मग रात्री ११ ची शेवटची फास्ट लोकल पकडायची तेव्हा घरात पोहोचायला पाउन वाजायचा. असो. एवढं करुन पोटपाणी चालत होते पण कर्जदारांचे काय? मला आधार(सहानुभुती) फक्त माझ्या व्यसनाची होती. फक्त बारमधे न जाता मी घरीच पण नियमीत घ्यायचो फक्त रात्री. मग मला एक अभिनव उपाय सुचला. मागाल ते मीळेल वाला. मग मी रोज सकाली त्या अज्ञात शक्तीची तळमळीणे करुणा भाकायला लागलो की मला स्वतःसाठी काय नको पण मला ते देणेकरी दारात नकोत बाबा. आनी कुठल्याही परिस्थीतीत मला बेईमानी करण्याची वेळ येउ देउ नकोस म्हणुन. त्याआधी मी कधीही कोणाकडेही प्रार्थना केलेली नव्ह्ती. कारण हेच लाथ मारेण तिथे पानी काढेण,पण निघत नव्ह्तंना. मग मी हळुच प्रार्थनेत एक ओळ वाढवली की जर मला देणेकरी मिटवुन माझ्याकडे १० लाख आले तर मी कायमची निव्रुत्ती घेईल म्हणौन. आनी साधारनपणे ८-९ महीन्यांनी माझी माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने एका आयटीआयच्या अधीकार्याशी ओळख झाली. त्यांनी माझी कहानी ऐकुन मला मदत केली. संपुर्ण महाराष्ट्राच्या आयटीआयचे काम मला मिळाले तेही स्वतःचा पैसा न लावता. पैसा कंपनीचा ओळख माझी आनी सर्व्हीसही कंपनीची. मग तीनच वर्षात मला १६ लाख त्यातुन मिळाले. चार लाख कर्जदारांचे दिले. १० लाख शेअरबाजारात लावले. दोन लाख पिणे -खाणे आनी भटकंती यात लावुन भारतभर फिरलो. बरेच आश्रमही पालथे घातले. मी ३५ व्या वर्षी रिटायर झालो. माझा मॅनेजर होता माझा चुलतभाउ जो आठवी पास आहे तीही गावची. त्याच्या गळ्यात व्यवसाय घातला, अट एकच संध्याकाळी प्यायला अन मटन-मच्छी खायला पाहीजे मला बस्स. बाकी तुझे. त्याने बेट्याने जोमाने धंदा वाढवला, आज तीनचार घरे आहेत, पैसा गाठीशी आहे, मार्केटला पत आहे, नातेवाई॑कात(दाखवण्याची का होईना) इज्ज्त आहे. नंतर मी विपश्यनेला गेलो. दारु आनी अभक्ष भक्षण ही बंद झाले. आनी आता वेगळ्याच मारगावर स्थिर झालो जो कधीही मी अनुसरेल असे मला कधीच वाटले नव्हते. यात मी लग्न केले नव्हते ही बर्याच जनांना जमेची बाजु वाटते पण त्यापेक्षा मला माझ्या घरच्यांची अनेकपटींनी जबाबदारी होती, आजही आहे. आमच्या घरात आजही मीच न कमावताही कमावता आहे, आईला पेंन्शन आहे. माझा भाउ आजही काहीच कमावत नाही त्यामुळे आईची पेंशन त्याला मिळते व आइला पेंशन मला द्यावी लागते. पण आजही मला असे वातत नाही की मी यांना पोसतो. ते त्यांच्या कर्माचे फळ आहे.असो. प्रयन्त न सोडता प्रार्थना करौन पहा कोणीही हा अनुभव घ्यावा. कुणाला वाटेल ही अंधश्रद्धा आहे पण नाही होते काय. खरोखर निर्मळ( हे मनाने हे आपले आपल्याला चांगले समजते. आनी अहंकार बराच कमी झाल्याशिवाय मन नर्मळ होत नाही हे ध्यानात च्या) मनाने प्रार्थना केल्यावर होते काय की. तुम्ही त्या वेवज जगामधे प्रक्षेपीत करता, आनी त्याच्याशी जुळणारे लोक हळुहलू तुमच्या संपर्कात येतात किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात येता. मनुश्याला मनुश्य म्हणतात कारण वो अपने ही मानस(मनोव्यापार) का पुत्र/संतान है. हा सगळा माझा अनुभव आहे. जे वाइट वागले त्यांच्याबद्दलही सद्भावना बाळगा. आपले मन कुठल्याही परिस्थीतीत दुषीत होउ देउ नका. जे पटेल ते घ्या ,न पटलेले अर्थातच माझ्याकडेच राहील.

जयंत कुलकर्णी Mon, 09/22/2014 - 11:41
डॉ. गोल्डरॅट म्हणतो की बर्‍याच वेळा आपण निर्णय घेतो व त्यानंतर तो चुकला की पश्चत्ताप करत बसतो. निर्णय घ्यायची प्रक्रिया ही आपण जी गृहितके जमेस धरतो त्यावर बरीच अवलंबून असते. निर्णय घेण्या अगोदर जर ही गृहितके (Assumptions) नीट तपासली तर आपले निर्णय चुकिची ठरण्याची शक्यता बरीच कमी होते. या थॉट प्रोसेसवर त्याची पुस्तकेही उपलब्ध आहेत. सगळ्याचे मूळ हे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असल्यामुळे ते अत्यंत महत्वाचे ठरते. कधी कधी हे का ते असेही प्रसंग उदभवतात त्यावेळी तर त्याची थेअरी अत्यंत उपयोगी पडते....असो...आपल्याला पुढील वाटचालीसाठे शुभेच्छा...खात्री आहे आपण अजून एका वर्षात मी या परिस्थितीवर कशी मात केली यावर उद्भोदक लेख लिहाल.....

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 16:41
सगळ्या घटनांचा सुसूत्र विचार करत होतो, तेंव्हा लिहावेसे वाटले, पहिल्या भागातच भूतकाळ संपला आहे. त्यावर काथ्याकुट करणे म्हणजे वेळेचा आणि बुद्धीचा अपव्यय आहे. त्याचबरोबर घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलणे हे अशक्य आणि अनावश्यकही आहे. इथून पुढे नेमके काय करत आहे आणि नेमक्या काय मदतीची अपेक्षा आहे ह्या बद्दल लिहिणार आहे. पहिल्या भागावर प्रतिक्रिया थांबवता येतील असे काही करता येईल का? कारण त्या भागावर मला चर्चेची आवश्यकता वाटत नाही. घडून गेलेल्या घटनांचा उहापोह काहीच उपयोगाचा नाही. मी फार तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला पण चिरफाड होण्यामध्ये तो तटस्थपणा राहणार नाही. चिरफाड होईल अशी अटकळ होतीच. घटनेचे गांभीर्य त्यातले बारीकसारीक तपशील कळले कि कमी होतेच. साधारणपणे परिस्थितीने गांजलेला माणूस आणि स्वताच्या चुकांनी गांजलेला माणूस ह्या दोहोंकडे बघण्याचा दृष्टीकोन एकदम वेगवेगळा होतोच. त्यामुळेच पहिल्या भागावर काही प्रतिसाद दयायचे मी स्वत: थांबवले आहे. आता हातात असलेली कामे करत आहे. भविष्यात काय करेन ह्याचा पूर्ण विचार झाल्यावरच पुढचा भाग लिहिणार आहे. ३ भागात हि मालिका संपणार आहे. तसही माझी कर्मकहाणी चावडीवरची चर्चा व्हावी अशी इच्छा नाही. कुठेतरी जबाबदार ठिकाणी या माझ्या भावनांची नोंद व्हावी अशी अपेक्षा मिपावरच टाकण्यामागे होती

In reply to by संदीप डांगे

एस Mon, 09/22/2014 - 17:45
तुमच्या भावनेशी सहमत आहे. संमंने पहिला आणि हाही धागा वाचनमात्र केल्यास पुढील भागांवरील फोकस कायम राहील आणि उगाच जास्त चर्वितचर्वण टळेल असे मलाही वाटते. आत्तापर्यंत झालेली चर्चा समर्पक असली तरी झाली तेवढी पुरेशी आहे.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 17:35
तटस्थ शब्दात उघड व्यक्त केल्याबद्दल संदीप भाऊंचे अभिनंदन !
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व प्रतिसाद दात्या मिपाकारांन कोटीकोटी धन्यवाद. माननीय संपादकांनी आरंभीच इशारा देऊन संभाव्य धोक्याची हवाच काढून टाकली. आपली दर्दभरी कहाणी सांगून लोकांना मानसिकरीत्या छळणे आणि काहीतरी आर्थिक मदत मिळवणे हा माझा उद्देश नव्हताच मुळात. या लेख मालेत माझ्यावर हा प्रसंग का ओढवला, त्यात माझ्या चुका, नशिबाचा भाग ह्याची पूर्ण पार्श्वभूमी, सद्यस्थिती आणि भविष्यातली वाटचाल लिहिणार आहे. त्याचबरोबर सर्व मिपाकर मंडळींनी जो उस्फुर्त आणि भरभरून प्रतिसाद व सल्ले दिले, काही प्रश्न टाकले त्याबद्दल पण लिहिणार आहे.

"हमें तुमसे प्यार कितना.."

अन्नू ·

एस Sun, 09/21/2014 - 17:16
बाप रे! भयानक आहे.

एस Sun, 09/21/2014 - 17:16
बाप रे! भयानक आहे.
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.

एक रात्र फुटपाथवरील

शशिकांत ओक ·

गणपा Sun, 09/21/2014 - 12:39
ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या नजरेतून ज्यांच्या जवळ आहे अशा जगाला आजच्या रात्री बघा, अनुभवा. आजच्या रात्रीतील विचार तुमची जगाकडे पहायची नजर, उन्मत्त व उत्शृंखल होऊ देणार नाही. आयुष्यात काहीतरी बनायला त्यातून प्रेरणा घ्या..
मित्राच्या बाबांचे अनुभवी बोल आवडले.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 12:40
त्या रात्री खिशात भरपूर पैसे असूनही आम्हाला असे कष्टमय जिणे वाट्याला का यावे अशी सुरवातीला आलेली मनाची चडफड शांत झाली. पण खरंच अशी वेळ का आली?

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा Sun, 09/21/2014 - 12:51
पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे. कुठलं ठिकाण ते त्यांनी लिहिलं नाही. पण मुंबई जरी असली तरी तेव्हाची अन आत्ताची मुंबई बराच फरक असणार. हल्ली आसतात तशी २४ तास सेवा पुरवणारी लॉजेस तेव्हा नसावीत. (किंवा ते ज्या भागात होते तिथे तरी नसावीत.)

In reply to by गणपा

शशिकांत ओक Sun, 09/21/2014 - 17:32
आधीच्या प्रवासात बस बंद पडल्याने काही बाही करत रत्नागिरी ला पोहोचलो तेंव्हा शेवटची बस हुकली होती. म्हणून ती वेळ आली...

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव Sun, 09/21/2014 - 21:30
अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत एस्टी स्टँडजवळच्या कोणाचंही दार ठोठावलं असतंत तर पिठलंभात टाकला असतान आणि ओसरीत झोपायची सोय केली असतीन. असो. पण अनुभवाच्या पोतडीत चांगली भर पडली हे खरं.

In reply to by मिसळपाव

शशिकांत ओक Sun, 09/21/2014 - 22:51
कोणाचेही कोकणातील दार ठोठवले तर जेवण घालायचे जमले असते? पुणेरी म्हणून हिणवले जाणाऱ्या व्यक्ति कोकणातील मुल वाले साधा पत्ता विचारला तर हुडूत्त करतात असा अनेकांचे अनुभव आहेत!

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव Mon, 09/22/2014 - 02:22
हो. पुणेरी हिणवले जाणारे..पत्ता विचारला... वगैरे जाउंद्या. पण हो, स्टँडजवळच्या कोणीहि तुम्हाला उपाशी राहू दिले नसते. मधल्या आळीतल्या माझ्या आजी-आजोबांकडे आला असतात तर नक्किच नाहि पण ते तिथे रहात होते म्हणून त्यांचं नाव घेतलं एव्हढंच. आळीतल्या कोणाकडेहि गेला असतात तरी हाच प्रातिनिधिक अनुभव आला असता.

काउबॉय Mon, 09/22/2014 - 16:06
अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा
अशा अवस्थेत मनात विचारच येत नसतात. प्रयत्न करुनही.

vikramaditya Mon, 09/22/2014 - 19:50
काही प्रसंग, घटना आयुष्यात अचानक घडतात आणि काही अनुभव देवुन जातात. काही गोष्टी शिकवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करत बसण्यात कधी कधी अर्थ नसतो. कारण तो अनुभव व्यक्तीसापेक्ष असतो. असो.

असंका Tue, 09/23/2014 - 11:24
त्या रात्रीतले अजून काही अनुभव सांगा ना इथे! वय काय होते आपले त्यावेळी? एस टी स्टँड वगैरे नसायचे का? कारण एस टी स्टँडवर पडायला तशी मजा येते..अनेक लोक दिसतात! कोण कसे, कोण कसे!! (रत्नागिरीत आजही रात्रीच्या वेळी एस टी स्टँडवर फार वर्दळ नस्ते हे खरं, पण आतातरी तिथे झोपायला लागणं हे एवढं त्रासदायक वाटत नाही. तेव्हा कसं होतं, हे सांगाल का? )

आदिजोशी Tue, 09/23/2014 - 16:02
फुटपाथवर का झोपलात हे कळलं नाही. स्टँडवर जाऊन झोपायचं की. मजा येते. आम्ही झोपलो आहे कैक वेळा ट्रेकिंगच्या वेळी - स्टँडवर, प्लॅटफॉर्मवर, देवळात, लोकांच्या पडवीत, कधी नुसतंच डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, वगैरे वगैरे.

In reply to by आदिजोशी

शशिकांत ओक Sat, 09/27/2014 - 10:40
त्या जागा आधी बळकावल्या गेल्या होत्या. ५० वर्षा पुर्वी घडलेल्या एका घटनेवर आत्ता असे करायला हवे होते असे भाष्य करायच्या आधी त्या रात्रीने माझ्या मनावर काय प्रभाव टाकला ते महत्वाचे. असो.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 16:27
मला लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. मी सुद्धा एक रात्र रेल्वे फलाटावर काढली आहे ( १५ -२० वर्षा पूर्वी गुजराथ मधे पूर आला होता तेंव्हा ). बर्‍याच लोकांनी असे काहीतरी अनुभवलेच असेल. ह्या एकदम "विचारीपणाने, जिद्दीने सामोरे गेले तर ही दशा पण बदले" एव्ह्डे मोठे तत्वज्ञान कळण्यासारखे काय आहे? आणि एक रात्र बस, रेल्वे, विमान चुकले म्हणुन रस्त्यावर, फलाट अश्या ठीकाणी काढण्यात विषेश काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

शशिकांत ओक Tue, 09/23/2014 - 22:03
विक्रमादित्य यांनी विचार व्यक्त केलेत ते संक्षेपाने योग्य वाटतात.

In reply to by विलासराव

संदीप डांगे Sat, 09/27/2014 - 10:41
आजकाल पादचारी मार्ग झोपायलासुद्धा मिळत नाहीत. मी फोटो काढला तेंव्हा ह्या बाई नुकत्याच उठल्या होत्या. फोटोचा उद्देशही तोच होता. पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे आता रस्ता दुभाजक. पुढे काय?

In reply to by संदीप डांगे

विलासराव Sat, 09/27/2014 - 10:48
पुढे काय? माहीत नाही पण कदाचीत मंगळावरील फुटपाथवर. मी गोवंडीजवळ दोन रेल्वे ट्रॅकमधे झोपडी बांधुन रहात असलेले कुटुंब पाहीले होते, तेही १० वर्षापुर्वी.

गणपा Sun, 09/21/2014 - 12:39
ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या नजरेतून ज्यांच्या जवळ आहे अशा जगाला आजच्या रात्री बघा, अनुभवा. आजच्या रात्रीतील विचार तुमची जगाकडे पहायची नजर, उन्मत्त व उत्शृंखल होऊ देणार नाही. आयुष्यात काहीतरी बनायला त्यातून प्रेरणा घ्या..
मित्राच्या बाबांचे अनुभवी बोल आवडले.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 12:40
त्या रात्री खिशात भरपूर पैसे असूनही आम्हाला असे कष्टमय जिणे वाट्याला का यावे अशी सुरवातीला आलेली मनाची चडफड शांत झाली. पण खरंच अशी वेळ का आली?

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा Sun, 09/21/2014 - 12:51
पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे. कुठलं ठिकाण ते त्यांनी लिहिलं नाही. पण मुंबई जरी असली तरी तेव्हाची अन आत्ताची मुंबई बराच फरक असणार. हल्ली आसतात तशी २४ तास सेवा पुरवणारी लॉजेस तेव्हा नसावीत. (किंवा ते ज्या भागात होते तिथे तरी नसावीत.)

In reply to by गणपा

शशिकांत ओक Sun, 09/21/2014 - 17:32
आधीच्या प्रवासात बस बंद पडल्याने काही बाही करत रत्नागिरी ला पोहोचलो तेंव्हा शेवटची बस हुकली होती. म्हणून ती वेळ आली...

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव Sun, 09/21/2014 - 21:30
अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत एस्टी स्टँडजवळच्या कोणाचंही दार ठोठावलं असतंत तर पिठलंभात टाकला असतान आणि ओसरीत झोपायची सोय केली असतीन. असो. पण अनुभवाच्या पोतडीत चांगली भर पडली हे खरं.

In reply to by मिसळपाव

शशिकांत ओक Sun, 09/21/2014 - 22:51
कोणाचेही कोकणातील दार ठोठवले तर जेवण घालायचे जमले असते? पुणेरी म्हणून हिणवले जाणाऱ्या व्यक्ति कोकणातील मुल वाले साधा पत्ता विचारला तर हुडूत्त करतात असा अनेकांचे अनुभव आहेत!

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव Mon, 09/22/2014 - 02:22
हो. पुणेरी हिणवले जाणारे..पत्ता विचारला... वगैरे जाउंद्या. पण हो, स्टँडजवळच्या कोणीहि तुम्हाला उपाशी राहू दिले नसते. मधल्या आळीतल्या माझ्या आजी-आजोबांकडे आला असतात तर नक्किच नाहि पण ते तिथे रहात होते म्हणून त्यांचं नाव घेतलं एव्हढंच. आळीतल्या कोणाकडेहि गेला असतात तरी हाच प्रातिनिधिक अनुभव आला असता.

काउबॉय Mon, 09/22/2014 - 16:06
अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा
अशा अवस्थेत मनात विचारच येत नसतात. प्रयत्न करुनही.

vikramaditya Mon, 09/22/2014 - 19:50
काही प्रसंग, घटना आयुष्यात अचानक घडतात आणि काही अनुभव देवुन जातात. काही गोष्टी शिकवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करत बसण्यात कधी कधी अर्थ नसतो. कारण तो अनुभव व्यक्तीसापेक्ष असतो. असो.

असंका Tue, 09/23/2014 - 11:24
त्या रात्रीतले अजून काही अनुभव सांगा ना इथे! वय काय होते आपले त्यावेळी? एस टी स्टँड वगैरे नसायचे का? कारण एस टी स्टँडवर पडायला तशी मजा येते..अनेक लोक दिसतात! कोण कसे, कोण कसे!! (रत्नागिरीत आजही रात्रीच्या वेळी एस टी स्टँडवर फार वर्दळ नस्ते हे खरं, पण आतातरी तिथे झोपायला लागणं हे एवढं त्रासदायक वाटत नाही. तेव्हा कसं होतं, हे सांगाल का? )

आदिजोशी Tue, 09/23/2014 - 16:02
फुटपाथवर का झोपलात हे कळलं नाही. स्टँडवर जाऊन झोपायचं की. मजा येते. आम्ही झोपलो आहे कैक वेळा ट्रेकिंगच्या वेळी - स्टँडवर, प्लॅटफॉर्मवर, देवळात, लोकांच्या पडवीत, कधी नुसतंच डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, वगैरे वगैरे.

In reply to by आदिजोशी

शशिकांत ओक Sat, 09/27/2014 - 10:40
त्या जागा आधी बळकावल्या गेल्या होत्या. ५० वर्षा पुर्वी घडलेल्या एका घटनेवर आत्ता असे करायला हवे होते असे भाष्य करायच्या आधी त्या रात्रीने माझ्या मनावर काय प्रभाव टाकला ते महत्वाचे. असो.

प्रसाद१९७१ Tue, 09/23/2014 - 16:27
मला लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. मी सुद्धा एक रात्र रेल्वे फलाटावर काढली आहे ( १५ -२० वर्षा पूर्वी गुजराथ मधे पूर आला होता तेंव्हा ). बर्‍याच लोकांनी असे काहीतरी अनुभवलेच असेल. ह्या एकदम "विचारीपणाने, जिद्दीने सामोरे गेले तर ही दशा पण बदले" एव्ह्डे मोठे तत्वज्ञान कळण्यासारखे काय आहे? आणि एक रात्र बस, रेल्वे, विमान चुकले म्हणुन रस्त्यावर, फलाट अश्या ठीकाणी काढण्यात विषेश काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

शशिकांत ओक Tue, 09/23/2014 - 22:03
विक्रमादित्य यांनी विचार व्यक्त केलेत ते संक्षेपाने योग्य वाटतात.

In reply to by विलासराव

संदीप डांगे Sat, 09/27/2014 - 10:41
आजकाल पादचारी मार्ग झोपायलासुद्धा मिळत नाहीत. मी फोटो काढला तेंव्हा ह्या बाई नुकत्याच उठल्या होत्या. फोटोचा उद्देशही तोच होता. पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे आता रस्ता दुभाजक. पुढे काय?

In reply to by संदीप डांगे

विलासराव Sat, 09/27/2014 - 10:48
पुढे काय? माहीत नाही पण कदाचीत मंगळावरील फुटपाथवर. मी गोवंडीजवळ दोन रेल्वे ट्रॅकमधे झोपडी बांधुन रहात असलेले कुटुंब पाहीले होते, तेही १० वर्षापुर्वी.

एक रात्र फुटपाथवरील

पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो. “...

पुस्तक : सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू !

डांबरट ·

सवंगडी Sun, 09/21/2014 - 17:02
हि पुस्तकं नेमकी वेळ साधून बाहेर येतात कशी ? तुमच पण टायमिंग जमलय हो ! पं. नेहरू यांच्या बद्दल काय बोलावे ?

In reply to by सवंगडी

डांबरट Mon, 09/22/2014 - 09:24
सवंगडी आमच्या टायमिंगच सोडा. पण अशी पुस्तकं बरोब्बर बाजारात आणण्याला मार्केटिंग स्किल म्हणतात. आणि मोठी मोठी नावं घेतली कि भारदस्तपणा पण असावा

डांबरट Mon, 09/22/2014 - 09:20
मी हे पुस्तक आजून वाचलेले नाही. पण याबाबतचा सगळा इतिहास मात्र वाचला आहे. आणि वृत्तपत्रात आलेला कालचा जाहिरात वजा परिचय पुरेसा आहे स्पष्टता येण्यासाठी.

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 09:57
या प्रश्नाचं उत्तर हे,"साहेब, मारूती कांबळेचं काय झालं?" या प्रश्नाइतकंच गूढ आहे.... कॉन्ग्रेस सरकार तर कधी हा रिपोर्ट प्रकाशित करणार नव्हतंच! असो. आता कॉन्ग्रेसेतर सरकार स्थापन झालं आहेच. असेल त्यांच्यात दम तर करील हा रिपोर्ट प्रकाशित... नाहीतर 'उडदामाजि काळे गोरे' हेच खरं...

In reply to by पिवळा डांबिस

सवंगडी Mon, 09/22/2014 - 16:27
मारुती कांबळे ! हा कोण हो ? अन त्याच काय झालं ते झालं … आणि त्याच धर्तीवर हा हेन्डरसन ब्रुक कोण ? अन त्याचा रिपोर्ट कशाला घरी घेऊन गेले हे कोन्ग्रेसी ?? च्यायला बोउन्सरच बाउन्सर !

In reply to by प्यारे१

एस Mon, 09/22/2014 - 17:28
निळू फुल्यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्रात मागे एक लेख आला होता. त्यातील एक आठवण ही 'सामना'शी संबंधित होती. मला वाटतं ह्या चित्रपटाचं चित्रीकरण हे आळेफाटा की बेल्हे की राजूर वगैरे कुठल्याश्या भागात झालं होतं. तिथल्या गावात तो सीन चित्रित होणार होता. निळू फुलेंचा वेश पुढार्‍याचा, पांढर्‍या शुभ्र कपड्यांचा असला तरी प्रत्यक्षात त्यांचे कपडे नीळ घालून निळे रंगवले होते कारण सिनेमा कृष्णधवल होता. सभेचे दृश्य होते. मंडप उभारलेला, गर्दी जमलेली, निळूभाऊ भाषण द्यायला उठतात, सुरू करतात आणि तेवढ्यात खालच्या गर्दीतूनच कोणीतरी ओरडतं, "मारूती कांबळेचं काय झालं?" एकच कोलाहल माजतो. अशा रीतीने तो सीन चित्रित झाला. अगदी खरा वाटावा असा. (वरील तपशील आठवणींच्या भिस्तीवर लिहिला असल्याने तपशीलात चुका असू शकतात. मूळ लेख मला वाटतं रामदास फुटाण्यांचा होता.)

सवंगडी Sun, 09/21/2014 - 17:02
हि पुस्तकं नेमकी वेळ साधून बाहेर येतात कशी ? तुमच पण टायमिंग जमलय हो ! पं. नेहरू यांच्या बद्दल काय बोलावे ?

In reply to by सवंगडी

डांबरट Mon, 09/22/2014 - 09:24
सवंगडी आमच्या टायमिंगच सोडा. पण अशी पुस्तकं बरोब्बर बाजारात आणण्याला मार्केटिंग स्किल म्हणतात. आणि मोठी मोठी नावं घेतली कि भारदस्तपणा पण असावा

डांबरट Mon, 09/22/2014 - 09:20
मी हे पुस्तक आजून वाचलेले नाही. पण याबाबतचा सगळा इतिहास मात्र वाचला आहे. आणि वृत्तपत्रात आलेला कालचा जाहिरात वजा परिचय पुरेसा आहे स्पष्टता येण्यासाठी.

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 09:57
या प्रश्नाचं उत्तर हे,"साहेब, मारूती कांबळेचं काय झालं?" या प्रश्नाइतकंच गूढ आहे.... कॉन्ग्रेस सरकार तर कधी हा रिपोर्ट प्रकाशित करणार नव्हतंच! असो. आता कॉन्ग्रेसेतर सरकार स्थापन झालं आहेच. असेल त्यांच्यात दम तर करील हा रिपोर्ट प्रकाशित... नाहीतर 'उडदामाजि काळे गोरे' हेच खरं...

In reply to by पिवळा डांबिस

सवंगडी Mon, 09/22/2014 - 16:27
मारुती कांबळे ! हा कोण हो ? अन त्याच काय झालं ते झालं … आणि त्याच धर्तीवर हा हेन्डरसन ब्रुक कोण ? अन त्याचा रिपोर्ट कशाला घरी घेऊन गेले हे कोन्ग्रेसी ?? च्यायला बोउन्सरच बाउन्सर !

In reply to by प्यारे१

एस Mon, 09/22/2014 - 17:28
निळू फुल्यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्रात मागे एक लेख आला होता. त्यातील एक आठवण ही 'सामना'शी संबंधित होती. मला वाटतं ह्या चित्रपटाचं चित्रीकरण हे आळेफाटा की बेल्हे की राजूर वगैरे कुठल्याश्या भागात झालं होतं. तिथल्या गावात तो सीन चित्रित होणार होता. निळू फुलेंचा वेश पुढार्‍याचा, पांढर्‍या शुभ्र कपड्यांचा असला तरी प्रत्यक्षात त्यांचे कपडे नीळ घालून निळे रंगवले होते कारण सिनेमा कृष्णधवल होता. सभेचे दृश्य होते. मंडप उभारलेला, गर्दी जमलेली, निळूभाऊ भाषण द्यायला उठतात, सुरू करतात आणि तेवढ्यात खालच्या गर्दीतूनच कोणीतरी ओरडतं, "मारूती कांबळेचं काय झालं?" एकच कोलाहल माजतो. अशा रीतीने तो सीन चित्रित झाला. अगदी खरा वाटावा असा. (वरील तपशील आठवणींच्या भिस्तीवर लिहिला असल्याने तपशीलात चुका असू शकतात. मूळ लेख मला वाटतं रामदास फुटाण्यांचा होता.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मेनन : संरक्षण मंत्री की परराष्ट्र मंत्री ! (माझ्या अभ्यासाप्रमाणे परराष्ट्राचा मंत्री) आजचा म.टा. मधला सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू या पुस्तकावरचा लेख वाचला. हे पुस्तक मूलतः मेनन यांनी लिहिलेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सामान्यतः आपल्याला या लेखाच्या नावावरून वाटतं की,कोण्या संरक्षण मंत्र्याने हे पुस्तक लिहिले आहे म्हणजे फार काहीतरी खळबळजनक खुलासे असणार.कारण सध्या राजकारणी, किवा तथाकथित नोकरशहा यांनी पुस्तकातून स्फोट करायचा धडाका लावलाय. पण तसे नाही. कारण मेनन सध्या हयात नाहीत. पण राहून राहून कोणाला न कोणाला नेहरू घराण्याबद्दल उमाळा येत असतो.

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: कलियुगातील समुद्र मंथन

विवेकपटाईत ·

पैसा Tue, 09/23/2014 - 16:31
आवडलं! पण वासुकी लै पावरबाज होता हो! आम्ही जन्ता कस्ले पावरबाज? पावर सगळी 'तिकडं'.

विवेकपटाईत Fri, 09/26/2014 - 20:20
या कलयुगात समुद्र मंथनातून निघणारे विष पचवायला शिव तैयार नाही त्याला ही अमृतकुंभ पाहिजे. लेख लिहिताना मला जी शंका होती खरी ठरली.

पैसा Tue, 09/23/2014 - 16:31
आवडलं! पण वासुकी लै पावरबाज होता हो! आम्ही जन्ता कस्ले पावरबाज? पावर सगळी 'तिकडं'.

विवेकपटाईत Fri, 09/26/2014 - 20:20
या कलयुगात समुद्र मंथनातून निघणारे विष पचवायला शिव तैयार नाही त्याला ही अमृतकुंभ पाहिजे. लेख लिहिताना मला जी शंका होती खरी ठरली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात गहन विचारात ध्यानमग्न अवस्थेत होते अचानक त्यांनी डोळे उघडले. वेळ न गमावता मी विचारले, बाबा, कसला विचार करता आहात? बाबांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले बच्चा, समुद्र मंथन सुरु आहे, अमृत कुंभ कुणाला मिळणार याचाच विचार करीत होतो. मी म्हणालो, बाबा फार पूर्वी सत्ययुगात समुद्र मंथन झाले होते, आज तर कलयुग आहे. बाबा म्हणाले, काळ बदलला तरी देव आणि दानवांचा संघर्ष हा चिरंतर आहे. मी विचारले, तो कसा काय? बाबा म्हणाले, बच्चा मतपेटी म्हणजे सुमेरू पर्वत जिचा मथण्यासाठी वापर होईल.

तिला नेहमी वाटतं

खटपट्या ·

In reply to by जेनी...

खटपट्या Sun, 09/21/2014 - 02:52
काकुन्ना म्हैते का हे ???
तू पण अशी मनकवडी हायस ना जेनीताई… पण हे माझे मनोगत नाहिचै मुळी. आजूबाजूला मित्र असतात ना. त्यांची तडफड बघून स्फ़ुरलिय हि कविथा. :)

भिंगरी Sun, 09/21/2014 - 07:27
साजुक तुपासारख शुद्ध प्रेम, ज्याच्या नशिबी तो खरा भाग्यवान.

In reply to by पाषाणभेद

मृगनयनी Sun, 09/21/2014 - 11:39
पाषाणभेद
ही पोरगी साजूक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद...
पाषाणभेद.. ही पोरगी साजुक तुपातली असं नसून "ही पोली साजूक तुपातली" असे आहे... :) .. :)

In reply to by टवाळ कार्टा

वत्सा, यासाठी तुला लादेन ध्यान्धार्णा करुन आपली निर्लज्जपणाची पातळी प्रचंड वाढवुन घ्यावी लागेल. सांसारिक जीवनात असे अण्भव येतच अस्तात. तेव्हा लवकरात लवकर लादेन ध्यान्धार्णा करुन आपल्या कातडीची जाडी वाढवुन घेणे. यामुळे एकतर मदनबाण तुम्हाला लागणार नाहीत आणि तुम्हाला उसावर बसवुन ती उसात गेली तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही. निर्लज्ज व्हा. -निर्लज्जेश पोरीपटवी..

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 11:06
चिंता नसावी...आपण (म्हणजे मीच) श्री.श्री.श्री.आमिर "गुलाम" खान यांचा बस, ट्रेन आणि मुलींचा नियम पाळतो ;)

बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 18:22
ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं
असं कोणी पाहिजे असेल तर ती मुलगी हरामखोरच म्हटली पाहिजे. (प्रतिसाद कदाचित संपादित होईल, पंखही लागतील. पण तसं झाल्यास ते इम्मॅच्युअर मनोवृत्तीचेच निर्देशक आहे.)

In reply to by बॅटमॅन

मुलगी हारामखोर म्हनायचं माझ्या जिवावर येतं काहींचा अनुभव असेलही तसा पण सर्वच तशा नसतात. कितीही आयुष्यात व्यस्त असू देत...पण कसायेस रे तू असं विचारल्यावर ...आत जी हालचाल होते ना ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही. - दिलीप बिरुटे (तिच्या आठवणीत रमलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 23:34
ओरिजिनल प्रतिसादाचा चुकीचा अर्थ काढू नका राव. पोरगी झुलवणार हे माहिती असूनही त्या पोरानं विचारपूस करावी ही अपेक्षा अप्पलपोटेपणाची नाही काय तेवढं सांगा. एक आक्षेप काय घेतला तर लगेच अख्ख्या स्त्रीजातीवर कशाला लावता?

In reply to by जेनी...

खटपट्या Sun, 09/21/2014 - 02:52
काकुन्ना म्हैते का हे ???
तू पण अशी मनकवडी हायस ना जेनीताई… पण हे माझे मनोगत नाहिचै मुळी. आजूबाजूला मित्र असतात ना. त्यांची तडफड बघून स्फ़ुरलिय हि कविथा. :)

भिंगरी Sun, 09/21/2014 - 07:27
साजुक तुपासारख शुद्ध प्रेम, ज्याच्या नशिबी तो खरा भाग्यवान.

In reply to by पाषाणभेद

मृगनयनी Sun, 09/21/2014 - 11:39
पाषाणभेद
ही पोरगी साजूक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद...
पाषाणभेद.. ही पोरगी साजुक तुपातली असं नसून "ही पोली साजूक तुपातली" असे आहे... :) .. :)

In reply to by टवाळ कार्टा

वत्सा, यासाठी तुला लादेन ध्यान्धार्णा करुन आपली निर्लज्जपणाची पातळी प्रचंड वाढवुन घ्यावी लागेल. सांसारिक जीवनात असे अण्भव येतच अस्तात. तेव्हा लवकरात लवकर लादेन ध्यान्धार्णा करुन आपल्या कातडीची जाडी वाढवुन घेणे. यामुळे एकतर मदनबाण तुम्हाला लागणार नाहीत आणि तुम्हाला उसावर बसवुन ती उसात गेली तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही. निर्लज्ज व्हा. -निर्लज्जेश पोरीपटवी..

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 11:06
चिंता नसावी...आपण (म्हणजे मीच) श्री.श्री.श्री.आमिर "गुलाम" खान यांचा बस, ट्रेन आणि मुलींचा नियम पाळतो ;)

बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 18:22
ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं
असं कोणी पाहिजे असेल तर ती मुलगी हरामखोरच म्हटली पाहिजे. (प्रतिसाद कदाचित संपादित होईल, पंखही लागतील. पण तसं झाल्यास ते इम्मॅच्युअर मनोवृत्तीचेच निर्देशक आहे.)

In reply to by बॅटमॅन

मुलगी हारामखोर म्हनायचं माझ्या जिवावर येतं काहींचा अनुभव असेलही तसा पण सर्वच तशा नसतात. कितीही आयुष्यात व्यस्त असू देत...पण कसायेस रे तू असं विचारल्यावर ...आत जी हालचाल होते ना ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही. - दिलीप बिरुटे (तिच्या आठवणीत रमलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 23:34
ओरिजिनल प्रतिसादाचा चुकीचा अर्थ काढू नका राव. पोरगी झुलवणार हे माहिती असूनही त्या पोरानं विचारपूस करावी ही अपेक्षा अप्पलपोटेपणाची नाही काय तेवढं सांगा. एक आक्षेप काय घेतला तर लगेच अख्ख्या स्त्रीजातीवर कशाला लावता?
लेखनविषय:
तिला नेहमी वाटतं.... असावं कोणीतरी आपल्यावर एकतर्फी प्रेम करणारं नकार देऊनही आपल्यासाठी झुरणारं आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकणारं राग आला तरी समजूत काढणारं अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणारं आपल्या नकळत आपली काळजी घेणारं आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असणारं गुड मोर्निंग आणि गुड नाईट च्या मेसेज ची वाट बघणारं किती झिडकारलं तरी परत येणारं गुपचूप आपल्यासाठी अश्रू ढालणारं आपल्याबद्दल कितीही वाईट सांगितलं तरी चांगलंच म्हणणारं त्याच्या आयुष्यातील गुपितं फक्त आपल्यालाच सांगणारं ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं कोणीतरी असावं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं

मामाचे गाव - तात्या (३)

दशानन ·

१००मित्र Sun, 09/21/2014 - 09:00
व्वा...दशानन सुंदर. प्रवाही. मुख्य म्हणजे म्हशींबद्दल सविस्तर लिहिलयत. बायकोचे काका म्हशीला नदीवर सोडतात, तर ती म्हैस काकांना लईच दमवते. बाहेर यायलाच तयार नस्ते. त्यांनी तिचं नाव "दमयंती" ठेवलंय !

In reply to by पैसा

दशानन Tue, 09/23/2014 - 21:19
धन्यु! वाचकांचा न मिळालेला प्रतिसाद पाहून थोडा गडबडलो ;) लेख कुठे चूकला हे शोधतो आहे.

श्रीरंग_जोशी Wed, 09/24/2014 - 05:31
सर्व चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले. ग्रामीण लोकजीवनाचे वर्णन आजच्या काळात इतके सहजासहजी वाचायला मिळत नाही. अवांतर - माझ्या लहानपणी माझ्या आजोळी दुधाचा व्यवसाय होता. म्हशींना चारा घालताना सरकी, ढेप व कटियाचे मिश्रण करणे ही कामे मी एखादवेळेस केली आहेत. तसेच आजोबा किंवा मामा गोबरगॅसमध्ये शेण ओतताना पाहणे हे पण आवडते काम होते.

शिद Wed, 09/24/2014 - 13:38
हा भाग पण खुपच छान. लहानपणीच्या आठवणी सगळ्यांच्या थोड्या अधिक प्रमाणात सारख्याच असतात. तुमचे लेख वाचून मला उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी केलेली धमाल आठवते. धन्यवाद. पु.भा.प्र.

सौंदाळा Wed, 09/24/2014 - 14:38
खुपच छान लिहीलय. वातावरण अगदी डोळ्यासमोर उभं राहीले. गावाकडचे जीवन न अनुभवलेल्या आमच्यासारख्या शहरी लोकांसाठी तर हे लेख म्हणजे पर्वणीच आहेत. तुमचे सगळे लेख आवडीने वाचतो. लिहीत राहा. तात्या जोरात चाल्लाय. ईसावअज्जा पण आवडला होता.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दशानन Mon, 10/06/2014 - 23:34
सर्वांचा आभारी आहे, ही लेखमाला लिहिण्यामागे उद्देश असा सुरवातीला नक्कीच नव्हता, पण जसे जसे लेखन करत आहे त्यातून जाणवले की आपण त्या काळातील लोकांचे राहणीमान, पद्धती याबद्दल देखील लिहित आहोत, तर हे लेखन असेच सुरु ठेवण्याचा मानस आहे. कदाचित पुढे कोणाला तरी याचा उपयोग होईल आणि नाहीच झाला तर मनोरंजन मूल्य तर नक्कीच राहील याची मी खबरदारी घेतो आहेच.

१००मित्र Sun, 09/21/2014 - 09:00
व्वा...दशानन सुंदर. प्रवाही. मुख्य म्हणजे म्हशींबद्दल सविस्तर लिहिलयत. बायकोचे काका म्हशीला नदीवर सोडतात, तर ती म्हैस काकांना लईच दमवते. बाहेर यायलाच तयार नस्ते. त्यांनी तिचं नाव "दमयंती" ठेवलंय !

In reply to by पैसा

दशानन Tue, 09/23/2014 - 21:19
धन्यु! वाचकांचा न मिळालेला प्रतिसाद पाहून थोडा गडबडलो ;) लेख कुठे चूकला हे शोधतो आहे.

श्रीरंग_जोशी Wed, 09/24/2014 - 05:31
सर्व चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले. ग्रामीण लोकजीवनाचे वर्णन आजच्या काळात इतके सहजासहजी वाचायला मिळत नाही. अवांतर - माझ्या लहानपणी माझ्या आजोळी दुधाचा व्यवसाय होता. म्हशींना चारा घालताना सरकी, ढेप व कटियाचे मिश्रण करणे ही कामे मी एखादवेळेस केली आहेत. तसेच आजोबा किंवा मामा गोबरगॅसमध्ये शेण ओतताना पाहणे हे पण आवडते काम होते.

शिद Wed, 09/24/2014 - 13:38
हा भाग पण खुपच छान. लहानपणीच्या आठवणी सगळ्यांच्या थोड्या अधिक प्रमाणात सारख्याच असतात. तुमचे लेख वाचून मला उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी केलेली धमाल आठवते. धन्यवाद. पु.भा.प्र.

सौंदाळा Wed, 09/24/2014 - 14:38
खुपच छान लिहीलय. वातावरण अगदी डोळ्यासमोर उभं राहीले. गावाकडचे जीवन न अनुभवलेल्या आमच्यासारख्या शहरी लोकांसाठी तर हे लेख म्हणजे पर्वणीच आहेत. तुमचे सगळे लेख आवडीने वाचतो. लिहीत राहा. तात्या जोरात चाल्लाय. ईसावअज्जा पण आवडला होता.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दशानन Mon, 10/06/2014 - 23:34
सर्वांचा आभारी आहे, ही लेखमाला लिहिण्यामागे उद्देश असा सुरवातीला नक्कीच नव्हता, पण जसे जसे लेखन करत आहे त्यातून जाणवले की आपण त्या काळातील लोकांचे राहणीमान, पद्धती याबद्दल देखील लिहित आहोत, तर हे लेखन असेच सुरु ठेवण्याचा मानस आहे. कदाचित पुढे कोणाला तरी याचा उपयोग होईल आणि नाहीच झाला तर मनोरंजन मूल्य तर नक्कीच राहील याची मी खबरदारी घेतो आहेच.
लेखनप्रकार
मागील भाग मळ्यामध्ये कच्चा रस्त्याच्या एकाबाजूला मावशीचे घर होते व मागे दूरवर पसरलेले शेतच शेत. त्यामध्ये गावातील अनेक लोकांच्या शेताबरोबर मामाचे शेत देखील दूरवर दिसत असे. त्याची ओळख पटवणारी ओळखीची खुण म्हणजे त्याच्या बांधावर उभी असलेली नारळीची ८-१० झाडे आणि शेताच्या मध्यभागी असलेले आंब्याचे भले मोठे झाड. मावशीच्या घराच्या मागच्या बाजूला लागूनच भला मोठा जमिनीचा तुकडा मावशीचा होता, त्यात तात्याने केळीची बाग, डाळिंब्याची झाडे, पापी आणि रोज लागणाऱ्या हिरव्या मिरच्या पासून कोथिंबीरीपर्यंत अनेक वेगवेगळी झाड लावलेली होती.