Skip to main content

भाजपला मत देण्याअगोदर

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 04/10/2014 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..?? वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे. १) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता .. >> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ? २) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ? >> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर. ३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..? >>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते. ४) नसेल तर मग युती का तोडली.. ? >> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली. ५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत) >>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही. ६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ? >>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे. >>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या. >>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या. >>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या. >>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या. ७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत.. >>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या. -- एक सामान्य नागरिक

वाचने 30672
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

चालू द्या....

रक्षा खडसे,पंकजा मुंडे? असो. दोन्ही सेना नेते वात्रटासारखे बरळत आहेत. त्यामानाने भाजपावाले बरे. राष्ट्रवादी आता पवारवादी झाले आहेत.शरद आपल्या कन्येचे व पुतण्याचे घोडे पुढे दामटतोय.'शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदित्य ठाकरे....' अशी बातमी ह्यांनी कुठ्ल्या एका चॅनेलवर ऐकली व ह्यांना ताप भरला... तो बीट्स पिलानीवाला संगणकतज्ञ पृथ्वीराजच योग्य वाटतोय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

"ह्यांना" एकदा चंद्रकांत खैरेंनी आदित्य ठाकरेंचे पाय धरल्याचा विडेओ दाखवा आणी रिअ‍ॅक्शन काय होतेय ते लिहा इथे :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सर्व नेत्यांना 'एकेरी' संबोधलेले बघुन भारी मौज वाटते. अर्थात तो तुमचा अधिकारच आहे म्हणा.

भाजप
हा कुठचा नवीन पक्ष आहे का? आजच नाव ऐकले मी!

केंद्रासारखेच येथे बहुमत मिळेल असे भाजपला वाटते आहे.


कॉग्रेस हा भाजपाचा राजकीय गुरू असून. हळू हळू भाजपाचा ही बॅका, युनियन्स , कारखाने यात प्रवेश होत आहे. त्यानी ऑलरेडी म गांधी उचलले आहेतच .शिवाजी महाराज ही. काही दिवसानी ते इतरानाही राजकारणाच्या पाशात ओढतील. मुळात संघात काही काळ घातलेला माणूस किंवा सेवादलात असलेला माणूस काँग्रेसी नेत्यापेक्षा भाषणबाजीत अधिक तेज असतोच. व भाषणांचा राजकारणात फार मोठा रोल असतो. श्री शरद पवारांची भाषणे ऐकलीत तर त्यात काही दम नसतो. हे दिसून येईल. तात्पर्य- भाजपा ही एक वीट असून ती इतर दगडांपेक्षा मऊ आहे हे नक्की.

भाजपा वीट आहे
भाजपा वीट नसून दगडच आहे, फक्त काव फासलेला. (कावेचा रंग भगवा असतो हा योगायोग समजावा)

In reply to by नानासाहेब नेफळे

वीत आणि दगडांनी इमारती बांधल्या जातात, पोकळ आश्वासनांनी नाही. आज वीट आणि दगडांची देशाला गरज आहे.

तुम्हीच प्रश्न विचारलेयत आणि तुम्हीच उत्तरं दिलियेत... त्यामुळे हा प्रचार धागा ठरून त्याचं मूल्य शून्य झालंय..... तरीही महाराष्ट्रापुरता भाजपाचा विचार करता.... मोदी नॅशनल नेते आहेत हे चांगलं आहे, पण जर ते भारताचं पंतप्रधानपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला तयार नसतील तर... महाराष्ट्रातलं विद्यमान भाजपा नेतेमंडळ अगदी म्हणजे अगदीच सुमार आहे!!!! खडसे एका विरोधी पक्षाचे नेते म्हणून ठीक आहेत पण त्यांच्यात मुख्यमंत्रीपद पेलण्याची क्षमता आहे असं वाटत नाही. तरी सर्वाधिक आदर खडसेंबद्दलच आहे. बाकीचे नेते काय वर्णावे? फडणवीस, हे गेल्या काही महिन्यांपूर्वी कोण होते, कुठे होते? तावडे, हे कोकणातले नेते असावेत. आधी कोकणातल्या एखाद्या मतदारसंघातून निवडून आले तरच यांचा विचार करूया. आणि रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का? (हाच प्रश्न आम्ही आदित्य ठाकरेंना करू इच्छितो, सबब आमच्यावर सेक्सिस्ट असा आरोप करू नये!!!)

In reply to by पिवळा डांबिस

रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का? ह्यांच्यापैकी कोणाला उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचा मूर्खपणा, मला वाटतं, भाजपात कोणी करणार नाही. फक्त भविष्यातील महिला नेत्यांना पुढे आणण्यासाठी आत्तापासून 'हवा' निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले आहे.

In reply to by पिवळा डांबिस

फडणवीस कोण होते हे शोधले तर सापडेल. वयाच्या २१व्या वर्षी स्वकर्तृत्वाने नागपूराचे महापौर फडणवीस झाले होते. भारतातले लहान वयात महापौर बनणारे दुसरे नेते होत. कायद्याची पदवी प्राप्त केलेले फडणवीस बर्लिनमधील कोणत्यातरी कायदेविषयक संस्थेचे पदवीधरही आहेत. आताच्या लेटेस्ट इलेक्शन मधे मुंडे, गडकरी गटांमधल्या साठमार्‍या थांबवण्याचे श्रेय फडणवीसांचेच. त्यांच्या अभ्यासपूर्ण मुलाखती पाहील्या असत्या तर हा प्रश्न कदाचित पडला नसता. पण भारताबाहेर कदाचित या बातम्यांचा रतीब नसावा म्हणून तुम्हाला त्या पहायला मिळाल्या नसतील असे असणे शक्य आहे. कारण भाजपाच नव्हे तर इतर विरोधकही देवेंद्र हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून 'शेटजी भटजी' असा प्रचार करू लागले आहेत. तावडे कोण आहेत बरे? २००३-०४ मधे गीतरामायणाच्या ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्कावर गीत रामायाणाचा जंगी कार्यक्रम घडवून हे प्रकाशात आले. तेव्हा पासून ते भाजपाचा मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात आशिष शेलार हे त्यांचे एक मोठे सहकारी. असो.

In reply to by उदयन

केंद्रीय मंत्री असणार्या शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईक आहेत का ?
हो त्याच त्या चणा डाल घोटाळा फेम शोभा फडणवीस या देवेंद्र यांच्या आई आहेत.

In reply to by विजुभाऊ

चणा डाळीत घोटाळा!!! निदान मसुर डाळीत तरी घोटाळा करायचा ,तेवढेच ,'भगव्याशी ईमान राखले' अशी पळवाट शोधता आली असती!!!! :lol:

In reply to by विजुभाऊ

देवेंन्द्र फडणवीस आणि शोभा फडणवीस ह्यांच्यात फक्त आडणाव साध्यर्म आहे. भुमिकेचं बेअरिंग सांभाळा पण विरोध करायचा म्हणुन काहिहि बोलु नका...तुमच्यात आणि त्या माईसाहेब, नानासाहेब आणि आणखी काही अशी बरीच पात्रे एकाच वेळेस बजावणार्‍यात काहि फरक ठेवा..

In reply to by काउबॉय

21 वयात महापौर ? काउबॉय - Mon, 06/10/2014 - 16:34 इम्प्रेसिव. डोमिनेटिंग.हम्म ...!
त्यात नवल काही नाही. ते जेंव्हा महापौर झाली त्या काळात त्याम्च्या मातोश्री राज्यात मंत्री होत्या. भाजप ला तेथे घराणी शाही जाणवली नाही.

In reply to by उदयन

शोभा फडणवीस यांचा चणा डाळ घोटाळा गाजला होता. बाकी देवेंद्र यांचे पिता गंगाधर फडणवीस हे पण आमदार होते म्हणजे घराणेशाही इकडे पण आहेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पण भारताबाहेर कदाचित या बातम्यांचा रतीब नसावा म्हणून तुम्हाला त्या पहायला मिळाल्या नसतील असे असणे शक्य आहे.
करेक्ट, तसंच झालं असावं. आणि तो रतीब घालण्याच्या निमित्ताने का होईना बर्‍याच दिवसांनी आमच्या प्रतिसादी पायधूळ झाडल्याबद्दल आपल्याला पेशल धन्यवाद!!! :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ओके वकील आहेत, महापौर होते, ठीक आहे. पण श्री. फडणवीस यांना राज्यपातळीवर कितीसा अनुभव आहे? विरोधी पक्षात असल्याने त्यांना मंत्रीपदावरच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसावा पण ते गेली किती टर्म आमदार आहेत? एखाद्या खात्याचे मंत्री ते कदाचित होऊ शकत असतीलही, पण येकदम थेट मुख्यमंत्री? जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला... पण तुम्हाला ते पटणार नाही याची जाणीव आहे!!!

In reply to by पिवळा डांबिस

देवेंद्र १९९९ पासून सलग आमदार आहेत. नाथाभाऊ अधिक अनुभवी आहेत परंतु त्यांची प्रकृती आजकाल साथ देत नाही अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.

In reply to by पिवळा डांबिस

अरे बाबा, शरद ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाला होता. तुझा तो राजीव ४०व्या वर्षी पंतप्रधान झाला होता. आणी तुझा तो ओबामा?

In reply to by पिवळा डांबिस

>>> जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला... सहमत आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी ४-५ नावे आहेत. त्यापैकी गडकरी हे रस्तेबांधणी मंत्री म्हणूनच जास्त योग्य आहेत. या कामातच त्यांचे कौशल्य दिसून येते. उगाच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली तर त्यांची कार्यक्षमता कमी होईल. विनोद तावडे अननुभवी आहेत. फडणवीस कितीही चांगले वाटत असले तरी त्यांचे आडनाव त्यांना कायम त्रासदायक ठरेल. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांच्या आडनावाशी जोडला जाईल. त्या तुलनेत खडसे खूपच अनुभवी आहेत. ते फारश्या वादात सापडलेले दिसत नाहीत. सद्यपरिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी तेच योग्य वाटतात.

In reply to by श्रीगुरुजी

रोडकरीला मुख्यमंत्री केले तर पाच वर्षे फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस वे, पंच्चावण्ण उड्डाण पुल याचेच गणित सांगत बसेल. मागच्या पंधरा वर्शांत नव्वद किमीच्या एक्प्रेसवे च्या पुण्याईवर दुकान चालू आहे यांचे. बेरोजगारी ,शेतकी, महसुल, आरोग्य या विषयी यांचा अभ्यास शुन्य असावा. फडणवीस- नागपुरचे महापौर व तीथले आमदार असतानाचे एकही विधायक काम आजपर्यंत ऐकलेले नाही , तावडे- हाच एक मोठा विनोद आहे. खडसे- कालपर्यंत तोंड फाटोस्तोर ज्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांना आज भाजपात घेऊन खडसे त्याचे निर्लज्ज समर्थन करत आहे .कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? हा आघाडी सरकारचेच मंत्रीमंडळ राज्याला देईल, पाचपुते गावीत वगैरे. त्यापेक्षा ओरीजनल काँग्रेस काय वाईट आहे असाच लोक विचार करतील. पृथ्वीबाबा तसेही जनेत शिस्तप्रिय म्हणुन प्रसिद्ध आहेतच.

In reply to by नानासाहेब नेफळे

हेच म्हणते. बिल्डर्,साखर्,कंत्राटदार लॉब्यांना पृथ्वीराज दूर ठेवेल तर राज्याचे तेवढेच हिताचे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

खडसे तोडपाणीसाठी प्रसिद्ध आहेत. तावडे खरा विनोद आहेत. फडणवीस आधी अभ्यासू वाटायचे पण आता त्यांची वक्तव्ये बघून तेपण काही फार वेगळे वाटत नाहीत. मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा नेता राज्य भापाकडे नाहीच काही अंशी गडकरी आहेत जे मास लीडर नाहीत मात्र शहा- मोदिंपुढे उभे राहण्याची हिम्मत तरी दाखवू शकतील. भाजप आकड्यांचे गणित जमवू शकली तर गडकरीच तुलनेने बर वाटतात पण जीभेवर ताबा हवा. मात्र हे जर तरच्या गोष्टी आहेत. शिवसेनेच्या जास्त जागा येणार आणि मुख्यमंत्री सेनेचाच असेल हा आपला अंदाज आहे.

In reply to by दुश्यन्त

मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा नेता राज्य भापाकडे नाहीच
मुंडे जिवंत असते तर असे बोल्ला असतात का हो? का आपले उगीच मेल्या म्हशीला म्हणभर दूध? बाकी मुंडे गेल्यामुळे महाराश्ट्रात भाजपाचे खूप नुकसान झाले आहे याच्याशी मात्र सहमत.

गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते गेल्यावर भाजपला समर्थ चेहरा नाही हे जरी खरं असलं तरी नवीन चेहरा या निवडणुकीत मिळेल असं समजायला हरकत नाही. शिवाय भाजपची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथले नेते निवडणूक लढवून, जनाधार घेऊन विधिमंडळात जातात, अगदी पंतप्रधान सुद्धा.

In reply to by बोका-ए-आझम

गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते गेल्यावर भाजपला समर्थ चेहरा नाही
सहमत
नवीन चेहरा या निवडणुकीत मिळेल असं समजायला हरकत नाही.
फक्त आपल्या मतदारसंघातून निवडणूक जिंकली की ती व्यक्ती मुख्यमंत्रई बनायला योग्य ठरते?
भाजपची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथले नेते निवडणूक लढवून, जनाधार घेऊन विधिमंडळात जातात, अगदी पंतप्रधान सुद्धा
आणि अरूण जैटलींचं काय? विचार करावा हो लिहिण्यापूर्वी!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आणि अरूण जैटलींचं काय? विचार करावा हो लिहिण्यापूर्वी!!!!
भलत्यासलत्या अपेक्षा ठेवण्याबद्दल मी एका बाजूने पिवळा डांबिस यांची कीव करतो. दुसऱ्या बाजूने 'अमुक आचार करा' असे आदेश ऐकण्याची सवय असणारांना 'विचार करा' असा कन्फ्युजिंग सल्ला देण्याबद्ल निषेध.

In reply to by पिवळा डांबिस

निवडुन जनाधार घेउनच गेल्यात ना? तसेच ते जावडेकर देखील प्रचंड मताधिक्याने जिंकुन आलेले त्यांना देखील मोठ्ठा जनाधार मिळालेला बरोबर ना ?

भाजपाचा प्रचार चालु आहे का ? चालु द्या. असे ही खोटे बोलायची सवय आहेच ज्यांनी गुजरात मधे १०-१५ वर्षात मेट्रो जाउ द्या साधी लोकल ट्रेन आणली नाही ते मुंबईत येउन मेट्रोवर भाषणे ठोकत आहेत. या पेक्षा मोठ्ठा विनोद काय असेल

In reply to by उदयन

पुण्यातल्या ब्यार्टीपेक्षा गुजरातेतल्या ब्यार्ट्या अगदी चान आहेत. आणि मध्य प्रदेशातल्या पण. असो.

राजकीय धाग्यांनी, पक्षांनी आणि त्यांच्या समर्थकांनी वीट आणि काव असे दोन्ही आणलंय राव! बस करा आता. १४ दिवस धीर धरा काय ते कळेलच.

In reply to by अन्या दातार

आनि आमी तुमच्या दाराशी 'पर्तिसाद द्या!!' म्हनून आक्षत आनून धरलीया जनू!!!!! आता तुमी उद्या सकाळच्याला मिशरी लावल्यावर जर आमी "आता १४ दिवस धीर धरा!!" आसं म्हनलं तर भागेल काय? :)

In reply to by पिवळा डांबिस

पिवळा डांबिस : जबरा. प्रत्येक पक्षाची जागा निवडणूक संपल्यानंतर जनता दाखवेलच अशी अपेक्षा आहे.

मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.

लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. हरियाणा दरडोई उपन्नात ८ व्या स्थानावर आहे मोदी म्हणालेत तो शतकिय विनोद होता. खरतर लिस्ट काढणार्याने बघितले सुध्द्दा नाही की अल्फाबिटीक्ली नाव लिहिलेली आहेत त्यानुसार हरियाणा ८व्या क्रमांकावर आहे आणि उत्पन्नाने १-२ र्‍या क्रमांकावर आहे पण हे तथ्य अतिहुशारीत घाई केली आणि भाजपाच्या पंतप्रधानांचा भरसभेत विचका झाला. इतकी गंभीर चुक या पदावर बसणार्या व्यक्तीने केली नाही पाहिजे. एका सभेत ५ महिन्या अगोदर काय झाले हे आठवा म्हणणारे मोदी स्वतः एका महिन्या अगोदर काय झाले विसरुन गेलेत :)

In reply to by उदयन

एक महीन्यापुर्वा पोटनिवडणुकात हरले, तेव्हा भाजपचे लोक तिथे स्थानिक मुद्द्यावर मतदान झाले असे म्हणत होते. मग जर विधानसभेत स्थानिक मुद्दे महत्वाचे असतात तर मोदीला कशाला तालुका लेवलवर सभा घ्यायला लावतायत ?

लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. +१ हेच म्हणत होतो. लोकसभेत मोदी अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र उभे करण्यात यशस्वी ठरले. महाराष्ट्रात तसे नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादी बदनाम आहे पण नुसता नेतृत्वाचा चेहऱ्यावर निवडणूक लढवली तर देवेंद्र-तावडे- खडसे हे पृथ्वीराज/ उद्धव ठाकरे/ शरद पवार यांच्यासमोर कच्चे ठरतील. म्हणून मोदींना पोस्टरबॉय बनवत आहेत पण हे लोकसभा नाही विधानसभा नाही. राज्यात सेनेचे संघटन जास्त मजबूत आहे आणि उद्धव यांच्याकडे ओरभावी वक्तृत्व नाही पण सेनेचे ते एकमुखी नेतृत्व आहे. भाजपच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला आणि त्यांना चावी द्यायला मोदी आणि शहा.सेनेची साथ सोडून भाजपच्या उतावीळ नेत्यांनी चूक केली.

जर बीजेपी सत्तेवर आली तर, मुख्यमंत्री मोदीच्या तालावर नाचणार. ईतर कोणी पक्ष निवडुन आला तर केंद्र सरकार त्यांच्या धोरणांना मदत करणार नाही. मह्णजे काय? कोणीही येवो महराष्ट्राची झोळी रिकामी होत रहाणार आणि गुजरातची झोळी भरत रहाणार. मला तर मोदीं फक्त गुजरातचे पंतप्रधान वाटतात.

नाशकात भुरभुर पाउस फक्त आहे तरी मुसळधार पाउस आहे बातमी फिरवुन सभा रद्द केली. लोकच जमली नाहीत सभेला म्हणुन तर रद्द केली नाही ना ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मोदींच्या सगळ्याच सभा फ्लॉप गेल्या. तासगावमधल्या सभेला तर आख्खे मैदान रिकामे होते. नाशकातही रिकामे राहणार हे ओळखून भाजपच्या लोकांनी मैदानात टँकरमधून पाणी आणून ओतले आणि चिखल करून ठेवला आणि नंतर पावसाचे कारण पुढे करून सभा रद्द केली.

In reply to by श्रीगुरुजी

अहो श्रीगुरूजी ज्यांना पुण्याच्या पेशव्यांनी प्रतिसाद दिला ते एक अत्यंत विद्वान महाशय आहेत-- साक्षात बृहस्पतींनी त्यांचे शिष्यत्व पत्करावे इतकी त्यांची योग्यता आहे हे तुम्हाला माहित नाही का? म्हणूनच त्यांना पंतप्रधानांनी केलेले विदेश दौरे आणि पिकनिक यात फरक जाणवत नाही. इतक्या ज्ञानी माणसाचा प्रतिवाद करायची आपल्यासारख्यांची लायकी आहे का?

भाजप इतका डोळे झाकून दूध पिणारा पक्ष दुसरा कोणता नसावा. त्यांच्या राजकीय झैराती म्हणजे मोठ्ठा विनोद आहेत. उदा : १) इथले उद्योग परप्रान्तात गेले आहेत. कूठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा : इथले उद्योग गुजराथ मधे गेले आहेत. तेथे भाजपचेच राज्य आहेत. २) टोल बाबतीतेल विधाने: हा तर अती मोठ्ठा विनोद आहे.: टोल सम्राट गडकरी हे भाजपचेच आहेत. पूर्ती कम्पनी ही गडकरींचीच आहे. टोल मुक्ती कशी देणार महाराष्ट्राला?

In reply to by विजुभाऊ

एक नंबर विभा, महाराष्ट्र हा गुजराथचा एकमेव प्रतिस्पर्धी आहे .एकदा महाराष्ट्र कंगाल केला कि मग तो गुजरातच्या तुलनेत बराच मागे पडेल ,हे मोदीचे धुर्त षडयंत्र आहे .राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा. ठिकाय काँग्रेसविरोधी असाल तर इतर पक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत ,त्यांना मत द्या हवेतर, पण या धुर्त भाजपाला नको.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा. काही पुरावे? आकडेवारी? का नेहमीप्रमाणे नुसत्याच तोंडच्या गप्पा?

In reply to by विजुभाऊ

आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच . या संस्था गुजरातला गेल्यात हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का? का आपली नेहमीचीच फेकाफेकी? >>> परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत. बादवे, JNPT या महाराष्ट्रातील बंदराला नेहरूंचे नाव कोणी दिले हो? त्यासाठी महाराष्ट्रातील एकही महापुरूष सापडला नाही वाटतं? आणि २-३ वर्षांपूर्वी वरळी येथील सागरपुलाला राजीव गांधींचं नाव द्या अशी जाहीर सूचना कोणी केली होती ते आठवतं का? तेव्हासुद्धा एकही मराठी माणूस सापडला नाही?

In reply to by श्रीगुरुजी

अगदी खरे. पूर्वी मिशलिन कंपनी अर्थमूव्हर्सचे टायर बनवायचा प्लांट चाकणमधे करणार होते. प्रंप्रिय, प्रुगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४९% स्टेक त्यांच्या गरीब कार्यकर्त्याच्या नावाने मागितल्या मुळे शेवटी तो प्लांट चेन्नै ला गेला. एमाअयडीसीतली धर्मनिरपेक्ष गुंडगिरी अनुभवली असेल तर उद्योगधंदे गुजराथला का जातात ते कळेल. जे एन पी टी च्या सुविधा सुमार असल्याने पुण्याच्या सँडविक कंपनी मधे येणारा माल देखील गुजरातेत अडाणीच्या बंदरात उतरतो आणि रस्त्याने पुण्यात येतो आणि जातो देखील. जे एन पी टी ची अवस्था का बरे दुर्दैवी झाली? मोदिंनी केली का?

In reply to by श्रीगुरुजी

>>> >>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच . पुराव्यांची आतुरतेने वाट बघतोय नानासाहेब. पुरावे नसतील तर ही सगळी फेकाफेकी होती हे तरी मोठ्या मनाने कबूल करा.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.dnaindia.com/mumbai/report-safer-coasts-maharashtra-sets-mar… http://www.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarat-to-get-marine-police… या दोन बातम्या वाचा. २०१३ आणि २०१४च्या .आता बोला यावर..... कुणी पळवले मरीन ट्रेनिंग सेंटर? बाकीच्या दरोडेखोरीचे पुरावे देईनच, आधी याविषयी समाधानकारक उत्तर द्या.खोटे आरोप करुन पळुन जायला मी सोमय्या किंवा खडसे वाटलो की काय तुम्हाला?

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब फेकडे, तुम्ही स्वतःच दिलेल्या लिंक्स नीट वाचा हो आणि नंतर फेकाफेकी करा. तुम्हीच दिलेल्या लिंकमधील ही खालील वाक्ये वाचा. In the terrorist attack on Mumbai in November 2008, boats belonging to Porbandar fishermen were used by the Pakistan-trained terrorists. It was after this incident that the Gujarat government proposed such an academy in the state. तत्कालीन गुजरात सरकारनेच या संस्थेच्या स्थापनेची मागणी केली होती. The Centre is believed to have granted approval to a proposal of the state government for a first-of-its-kind National Marine Training Academy in Gujarat that was rejected by the previous UPA regime. > तुमच्या युपीए सरकारने ही मागणी धुडकावून लावली होती कारण अर्थातच ती मोदींनी केली होती. देशाच्या सुरक्षेपेक्षा मोदींना त्याचे क्रेडीट मिळू नये म्हणून केवढी ही धडपड. आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच ही मागणी मान्य झाली आहे. या संस्थेची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी केली होती. मोदींना अपशकुन करण्यासाठी युपीएने ती धुडकावली होती आणि आता त्या संस्थेचे महत्त्व ओळखून मोदींनी मान्यता दिली आहे. या सगळ्यात महाराष्ट्राचा काय संबंध? पुन्हा एकदा माती खाल्लीत नाना!

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी ,मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं.... कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत? हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. ही संस्था कधी महाराष्ट्राला मिळाली होती? किती तारखेला? म्हणजे युपीएच्या काळात की वाजपेयींच्या काळात की मोदींच्या काळात? समजा युपीए किंवा वाजपेयींच्या काळात असली तर ती संस्था आजतगायत का सुरू झाली नव्हती? मोदींनी युपीएने केवळ मोदीद्वेषामुळे परवानगी नाकारलेली संस्था सुरू करायला परवानगी दिली. यात महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही. >>> हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं.... कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत? त्यांनी कधी केलं तुझं माझं? ज्या राज्याने परवानगी मागितली त्याच राज्याला परवानगी दिली. महाराष्ट्राने परवानगी मागितली असती तर तिथे परवानगी मिळाली असती. २६/११/२००८ ते १६/५/२०१४ या साडेपाच वर्षात केंद्रात व राज्यात युपीएचे सरकार होते. या काळात महाराष्ट्र सरकारने परवानगी मागितली होती का? आणि असल्यास साडेपाच वर्षात परवानगी कोणी व का दिली नव्हती? >>> हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय. तुमचा निव्वळ इतिहास-भूगोलच कच्चा नसून तुम्हाला इंग्लिशही कळत नाही असं दिसतंय. आपणच दिलेल्या लिंका जरा नीट वाचा आणि बाता मारणे बंद करा.

In reply to by नानासाहेब नेफळे

पुण्यातली वॉक्सवॅगन गुजरातला गेली? बाप रे....काय सांगता काय नेफळेबुवा? म्हैतीचं न्हवतं....आमच्या मित्राला भौतेक कंपनीनी नवा पत्ता दिला नसेल म्हणता का काय?