मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

शब्द झाले मोती...

गणेशा ·

गणेशा 29/05/2015 - 14:32
आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस मात्र शनिवार - रविवार असले तरी मनाचा सुट्टीचा दिवस शुक्रवार ... शुक्रवारी मन खुप मुक्त पणे भरकटते... कधी ते असेच सरळ त्या काळसर डोंगरावर चढुन जाते... कड्या-कपारीतुन फिरुन येते... उन्हातान्हातुन .. सावलीतुन हळुच गिरकी घेवुन येते कधी झाडांच्या फांदीवरुन.. पानांवरुन हलकेच परत येते... कधी मिट्ट काळोख्या रात्रीतील त्या अमुर्त स्वप्नाला अलगद मिठी मारुन येते... कधी हलकेच घराच्या खिडकीतुन पहात राहते... खिडकी.. खिडकी ही मनाची अशी जागा.. की त्यातुन दिसणार्‍या इवल्याशा आभाळावर ही मन आपले राज्य प्रस्तापित करु पाहते... तासन तास त्या आभाळाच्या तुकड्यावर प्रेम करत, ताटकळत उभे असते... आपले अस्तित्व त्या आभाळाकडे जणु ते सुपुर्त करुन देते... मनाचे अस्तित्व कोणी मान्य करो वा न करो .. त्या आभाळाने कदाचीत ते मान्य केले असेल . ------- २९/५/२०१५, १४:३२

In reply to by गणेशा

प्रचेतस 29/05/2015 - 14:47
आज आभाळ भरुन आलंय. मला भरलेलं आभाळ फार आवडतं कारण त्यातूनच बर्‍याच वेळा पाऊस येतो. मागच्या पावसाळ्यात कुठे बाहेर भटकणं झालंच नाही फारसं. याखेपी मात्र भरपूर फिरायचा विचार आहे. मी विचार फारसा करत नाही असे लोक म्हणतात. काही लोक तर तुम्ही निरथक अत्मरंजन करताय असंही म्हणत असतात. निरर्थक अत्मरंजनातूनच माणूस भ्रमवादाचा बळी ठरतो. हल्ली तर आत्मकुंथित भ्रमवादाची मोठी फ्याशन आहे....

In reply to by गणेशा

आम्ही कामगार वर्गात मोडत असल्यामुळे शुक्रवार हा आमच्या साठी आठवड्याचा पहिला दिवस. कालच्या दिवसभरात बायकोनी हातात टेकवलेल्या यादीमधली कोणकोणती कामे राहीली आणि ती आता कशी करायची, पुढच्या गुरुवारवर काय ढकलायचे, त्याचे हिशेब मांडत, आणि आज दिवसभरात ऑफिसमधे काय करायच ते ठरवत पोचले की समोर दुसरेच काहीतरी (साहेबांच्या मते) अतिमहत्वाचे वाढुन ठेवलेले असते. त्यातच वाया जाणारा शुक्रवार दिसत असतो. आपण आपल्यावरच (आणि साहेबावर) चडफडत काम सुरु करावे तर गणेशा सारख्या कोणत्या तरी मित्राचा फोन येतो "शनिवार रविवारचा काय प्लॅन आहे? येतोस का राजगडावर?" मग आम्ही ओशाळावाणे हसत त्याला सांगतो आम्ही दत्तभक्त आहोत म्हणून. "अरे हो.. तू सांगीतले होतेस मागच्या वेळी. सॉरी विसरलोच. पण च्यायला बर आहे रे तुझे, गुरुवारी सुट्टी असल्या मुळे बाहेरची कामे तरी होतात. आम्हाला बाहेरची कामे कराची तर एक हाफ डे तरी वाया घालवायलाच लागतो." अशी मुक्ताफळे उधळत मित्र फोन ठेवतो. आणि आम्ही परत कामाचा ढिगारा उपसायला लागतो. पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 14:40
अरे बाबा अस्तित्व कोठे कोणास असते .. त्या सुगंधाला ही माहीत नाही .. त्याचे अस्तित्व काय आहे ? .. त्या वार्‍याला ही माहित नाही त्याचे अस्तित्व कोठे आहे .. पण मग हे आकाश काय आहे.. त्याच्या अस्तित्वाची पुसटशी रेघ म्हणुन का क्षितिजापाशी ते खाली वाकलेले आहे... का निसर्ग त्याचे अस्तित्व दाखवत आहे.... अश्या नेक प्रश्नांची शृंखला मनात घर करुन आहे... कधी वाटते.. मनाप्रमाणे वागावे.. वाट्टेलसे.. पण कधी वाटते.. आपण उलट निट वागत आहोत.. समाजातील ह्या चालीरीती.. नियम आपण पाळत आहोत.. मन उगाच भरकटलेले आहे.. कधीही कुठेही कसे ही गेले तर चालेले का ? प्रत्येक प्रश्न .. त्याचे अस्तित्व यांना उत्तर खरेच द्यावे का ? मनाचे अस्तित्व मान्य केले तरी मनाप्रमाणे वागले तर कदाचीत येथे आपण वेडे ही ठरु शकु .. आपण नकी काय विचार करत आहे हेच आता कळत नाही.. मनापासुन आपण आचरणाचे नियम पाळत आहोत .. की आचरण करताना मनापासुनच आपण थोडे लांब चालत आहोत .... --- २९/५/२०१५, १४:४०

गणेशा 29/05/2015 - 14:54
प्रश्नांच्या या पानगळीत... उत्तरे दवबिंदुंसम ओली.. हलकाच स्पर्श ओळखीचा... मग उरतात फक्त रिक्त जागा... उडुन गेली अशीच उत्तरे.. त्या प्रकाश किरणांसंगे.. जो दाखवे वाट जगाला.. त्यातच उत्तरे विलीन जाहली.. मग प्रश्न का उरले येथे.. का अस्तित्व ना मिटले काही.. का ओळखीच्या खाणाखुणा शोधतो जणु मी त्यावरी असेच सरली वर्षे .. असेच संपले सारे.. आयुष्याच्या शेवटाला तरी प्रश्न का उरतोच आहे ? ----- २९/५/२०१५, १४:५४

गणेशा 29/05/2015 - 14:59
आभाळ भरुन आलं की.. मला गच्च हुंदक्यांची आठवण येते.. का कोणास ठावुन .. तन भिजवणारा पाऊस माझं मन कदाचीत भ्हिजवत नाही.. कोरड्याच मनाने मी पाहतो मग .. भरुन आलेल ते आभाळ.. ते गच्च आभाळ.. कधीतरी मनाची कोरडीच वीज चमकते .. आणि उठतो आगडोंब मनात... हे मानाचे काहुर ... कसे थांबवावे .. काहीच कळत नाही... हलकेच नंतर पाहताना .. आभाळ निवाळलेलं असत मनात मात्र तेच आभाळ पुन्हा पुन्हा भरुन येत राहते .. बस्स असेच पुन्हा पुन्हा भरुन येते...

गणेशा 29/05/2015 - 15:08
शनिवारी ..रविवारी सगळी मित्र मंडळी.. अशीच फिरायला जातात... आमच्या गुरुवारच्या सुत्टीमध्ये कामे होतात म्हणुन म्हणे त्यांना कौतुकेच जास्त असतात.. डोंगरावरच्या मैनीची ओढ बाकीच्यांना असते.. काटेरी झुडपात तीची अवस्था मात्र आपल्यासारखीच असेल असे सहज वाटुन गेले... आज मी असाच काम करत होतो ... ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? " मी : का गं ? ती : अरे त्याच्याबरोबर ट्रेकिंगला चालले आहे शनिवार- रविवारी, तुला सुट्टी असते गुरुवारी मला खुप कामे आहेत नेमकी ऑफिसला .. तु करशील का ? मी.. हो .. मी (मनात) : दत्त गुरु हे बरे नव्हे .. हलकेच फुलपाखरु जवळ यावे.. आणि ते पुन्हा दूसर्याच्या कळपात शिरावे... हे फक्त तुमच्या ह्या वारामुळे .... तुम्ही तरी हे मनाचे दु:ख समजुन घेताल का ? --- २९/५/२०१५, १५:०८

In reply to by गणेशा

ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
च्या ऐवजी
ती : " दादा... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
असे हवे होते का? पैजारबुवा,

प्रश्र्णांची भिजकी पाने पाठीवर माझ्या पडता उरफोडून धावत सुटतो फिरुनी क्षणही न बघता गलितगात्र मग एक पळी मी कोसळता धरणी वरती देवाचा धावा करतो मी मज तारुन नेण्यासाठी, देवावर ठेवून भिस्त मी दबकत दबकत वळतो पाचोळा पाहून मागे मी क्षणभर मलाच हसतो, पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 15:46
@ पाचोळ्या: पाचोळ्या, मी पाहिलं तुला, डोंगरकडेवरुन तु स्वताला झोकुन देत होतास ... पण का ? कश्यासाठी ? मी असाच फिरत होतो ... तुला मी मुक्त वाटतो .. पण मी स्वैर भतकत असतो.. मलाही नाही कुठलीच दिशा... असेच अस्तित्व वेदणेचे मी पंखांवर घेवुन फिरतो डोंगरदरयामध्ये.. झाडातुन.. पानांतुन.. अनी मित्रा तुझ्या सोनेरी पाउलवाटेवरुन ही.. रोज सकाळी तुला वाटते.. कोण बरे ही असंख्य दवरुपी आसवे तुझ्या अंगावर ठेवुन जातो ... तो मीच आहे.. माझ्याच अस्तित्वाच्या त्या विखुरलेल्या खुणा आहेत.. तर हा , तुला पाहिले मी त्या दोंगरमाध्यावरती.. मी अलगद आलो .. तुला झेलण्यासाठी.. तु हळुच वार्‍यासंगे डुलत खाली चालला होता... मी आलो तुझ्यापाशी .. तर तु पुन्हा चिंब ओला झाला होता.... मग हातात हात घेवुनी आपण तेथेच विसावलो त्या तिथल्या झाडाखाली... असंख्य तुझ्या प्रश्नांना मी प्रश्नांचीच उत्तरे देत होतो .. आठवते ना तुला ? -------- २९/५/२०१५, १५:४५

साले आभाळही आता पहिल्या सारखे आपले राहिलेले नाही त्याच्या कडे बघताना आता मन पहिल्या सारखे प्रसन्न होत नाही उलट तिच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा मात्र ओल्या होतात आणि मग ढगाच्या एखाद्या तुकड्या मधे तिचा चेहरा शोधू लागतात तेवढ्यात सूर्यावर एखादा काळा कुळकुळीत ढग येतो तिच्या सोबतीने भिजलेल्या पहिल्या पावसाची आठवण करुन देतो त्या नंतर जोरदार वार्‍याची आणि कडाडणार्‍या विजेची पाळी असते क्षणभर चमकणार्‍या त्या उजेडामधे मला घट्ट बिलगलेली ती मला दिसते .... क्षणभरच....मग... अंगावरची शाल आणि कानटोपी आणखीनच घट्ट लपेटत मी उठतो आणि दारे खिडक्या बंद करुन डोक्यावरुन पांघरुण ओढून झोपतो नातवंडे म्हणतात म्हातारपण फार वाईट, अजोबांना आजकाल काहीच सहन होत नाही मी मनातच म्हणतो, खरच वाईट कारणजे सहन होत नाही ते कोणाला सांगताही येत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गणेशा 29/05/2015 - 16:11
असा शिल्लक रिप्लाय देणार नव्हतो .. पण ही कविता आता पर्यंतच्या सर्व रिप्लायमधील एक हिरा आहे, अत्यंत उत्कट .. निस्सिम ... याला उत्तर लिहिणे अवघड आहे.. सहज आठवले आधीचे सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी

In reply to by प्रसाद गोडबोले

त्या दुरच्या डोंगरातून, शांतता पसरत खाली येते आणि मी माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे, वेध घेत कशाचा ? त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे माझे विचार भविष्यात ( ?) तर परावर्तित होत नसतील ना ?

गणेशा 29/05/2015 - 16:08
तुझ आभाळ मला दे .. माझ आभाळ तुला .. झाकोळल ज्या हाताने सूर्याला तो जख्मी झालेला सुर्य ही मावळताना मला सोनेरी किनार परिधान करतो.. असंख्य तांबडे पिवळे रंग माझ्यावरती टाकतो ... बघ तु जेंव्हा माझ्याकडे पाहतो , तेंव्हा मी तुला अशीच दिसते का रे ... तांबडे कुकू कपाळावर ल्यालेली .. सोनेरी किनारेची साडी नेसलेली .. सांग ना .. अगद्दी तसीच का रे आहे मी अजुन तुझ्या डोळ्यात .. अन मग बरसतो पाऊस तुझ्या माझ्या डोळ्यात ... अंधुक होतात काळाचे पडते ... अन .. ते काळे क्षणही... फक्त क्षणभर ... मग ... तू पुन्हा सकाळी उठलेला असतो .. सूर्याच्या जखमा कधी कोणास दिसल्यात का ? बस्स .. माझे रुप पाहण्यासाठी तो मात्र त्याचे रक्त त्या जखमांमधुन संध्याकाळी असेच सांडवत असेल ... तुझ्यासारखेच ------ तुझी ती २९/५/२०१५, १६:०७

निखारा नेहमी दुसर्‍याच्या तळहातावरच तेजस्वी भासतो मग आपण अशा पुरुषाची देव म्हणुन भक्ती करु लागतो खरेतर नियती प्रत्येकालाच समान संधी देत असते पण त्यावेळी बहुतेकांना वाळूत तोंड खुपसायला आवडते पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 17:01
धन्यवाद... आता निघतो आहे, सोमवार-मंगळवारी पण सुट्टी टाकली आहे, तरी नेट गावाला चालल्यास येतो अधुन मधुन ... उद्या असेल शक्यतो थोडावेळ... पुन्हा लिहितो आल्यावर.. तो पर्यंत आनखिन रिप्लाय येवुद्या ... छान आहे सर्व .. पैजारबुवा खुप आभारी आहे तुमच्याशिवाय ही शृंखला जमलीच नसती असे वाटते.. तुमच्या आभाळ हे मनातील उत्कट भावनांचे चित्रण हे आजचे फलित ... सर्वांचे आभार ... आनखिन रिप्लाय येवोत ही इच्छा !

हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ...मन रमत नाही यात...त्या खळाळणार्या रेवेत दिसणारं ओथंबलेलं आभाळ परत कधी दिसणार म्हणुन वाहणारे डोळे नक्की कशाची चाहुल देत होते...तुझ्या गमनाची वार्ता होती त्या आकाशाला....म्हणुनच नुसते भरुन आले होते ते....पुर्ण प्रवासात नर्मदेपेक्षा रेवाच जवळची वाटली रे....तीचेच प्रतीरूप.तरीही वेगळे अस्तीत्व दाखवणारे...आपलेही असेच नाही का?तुला माझ्यातुन वगळले तर बाकी काय उरेल...पण उरलेय अजून..तुझ्याशिवायचे सगळे ऋतु अनुभवत...फक्त आता तीचा राैरव नाही..अन् तुझी गाजही..पण आभाळ गाभूळतंच रे त्याच्या काळात...फक्त अनुभवायला तु नसतोस सोबत....असतो एक तुकडा आभाळाचा...मी आपला समज करुन घेते की बघतोयस तु..त्या आभाळाच्या झरोक्यातून..

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

नर्मदा किंवा रेवा सतत प्रवाही असतात, कुणासाठी थांबत नाहीत कारण माहित आहे?.... वहात रहाणे महत्वाचे हे त्यांना माहीत आहे... सतत वहात रहाणे... जगात केवळ एकच गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे बदल...... काही कोटी वर्षांपूर्वी जेव्हा हा सूर्यही अस्तित्वात नव्हता तेव्हाही मी होतोच.... आजूबाजुला कितीही काहिही बदलले तरी..... कालही मी होतोच आजही मी आजही आहे आणि उद्याही असणारच आहे....निरंतर रहाणार आहे.... नर्मदाही मी आणि रेवाही मी, आभाळही मी आणि चारही़ ऋतू म्हणजेही मी, सूर्यही मी आणि काळही मीच. मी केवळ स्वतः कडे निरनिराळ्या कोनांमधून पहात राहिलो आणि हा खेळ बघता बघता वाढतच गेला..... कधी कधी मीच माझ्या या खेळात गुरफटून जातो...... आणि स्वतःच स्वतःला शोधत रहातो.... फार मजा येते असा स्वतःचा शोध घेताना..... पैजारबुवा,

मस्त रे गणेशा! या प्रकारच्या लेखनाचा हा विचारच भारी आहे. उस्फुर्त म्हणजे एकदम उस्फ़ुर्तच ! त्यासाराखे दुसरे भारी काहीही नाही. कारण त्याला कसलेही बंधन नाही. ना विषयाचे, ना वेळेचे, ना कोणाला आवडेल/नावडेल का? असल्या विचारांचे! मनात आले ते उतरवून गेलो. पुसले जाइल की राहील याची तमा न बाळगता! कोणाला आवडो नावडो ,स्वच्छंदि लिहिन मी कुणी जवळ थांबतय की नाही याची अर्थातच..तमा न बाळगता! एक ओळ होवो,वा एक पान भरो वाचलं गेलं तरी लिहिन , न गेलं तरीही!.. अगदी कुणी उघडून पाहिलं की नाही? याचीही तमा न बाळगता मग उस्फ़ूर्ततेचे उद्यान होइल, स्वच्छंदि बागडणाय्रा फ़ुलपाखरांसाठीचे! तिथे फ़ुलं असतील? ,नुसतीच पानं? ,की काटेहि??? .. निश्चितच! याचीही तमा न बाळगता!

गणेशा 31/05/2015 - 00:29
@ पैजार बुवा...@ भाग्यश्री प्रवाह .... आहे ना ... गती आहेच.. पण हे वर्तुळ ...त्याचा परिघ... मला ओलांडताच येत नाहिये.. त्या गाभुळलेल्या आठवणी अजुनही पिंगा घालतात सभोवताली... त्या प्रत्येक क्षणांचे ओरखडे .. हो ओरखडेच आणि ते अजुनही काळाच्या पडद्याआड लपुन हळुच माझ्याकडे पाहुन खुदकन हसतात ... माझ्या मनाच्या झरोक्यातुन पुन्हा ते काळाला छेदुन जुन्या दिवसात जातात.. आणि माझे मन असे असंख्य ओरखडे घेवुन पुन्हा खालमानेने गपचुप निघुन येते... परिघ ओलांडण्याची किंमत माझ्या मनाला माहितेय... मी मात्र अजुनही त्या परिघावरील एक बिंदु बनुन राहिले आहे.. जगासाठी मी त्याच वर्तुळावर रोजचेच प्रवाही आयुष्य जगते आहे... आणि तुझ्यासाठी... हा तुझ्यासाठी मी अजुनही तेथेच आहे... त्या जागीच... त्या परिघावरच तुझी अजुनही वाट पहाते आहे...

गणेशा 31/05/2015 - 00:57
काल रात्री पुन्हा पाऊस आला होता.. मी गच्चीत झोपलो होतो... त्याच्या त्या येण्याने झोप मोडली ... पण मग असे वाटले बरेच झाले... भरलेल्या आभाळाची ती मजा रात्रीत तरी मला निटशी घेता आली नसली तरी भटकण्याची एक चाहुल तेथे ही होती.. आजकाल असच होते... मनाच्या कप्प्यात असंख्य वादळे दाटलेली असतात.. आणि मग त्या करुन कहाण्यात आपण कधी ओढलो जातो ते कळतच नाही... पण त्या कप्प्यांमध्ये आत्ताचा स्पर्ष ही न झालेले कोवळे आभाळ ही बसु शकेल ना..? हा एक नविन कप्पा मला आता केलाच पाहिजे.. अगदी मनसोक्त भटकायच.. पाउस असाच झेलत पुढे चालत रहायचे.. निसर्ग..त्याचे विहंगम चित्रे पुन्हा पुन्हा या नव्या कप्प्यात साठवायचे... काय माहीत पुन्हा केंव्हा तरी हा कप्पा हळुच उघडला की एक निसर्गाचा देखावा कायम पहाता येइल .. पण या कप्प्यात फक्त मी आणि निसर्ग नकोय ... तु पण असशील का ग सोबत... मी.. तू आणि निसर्ग ....

गणेशा 01/06/2015 - 00:29
आज १ जुन, वडिलांचा वाढदिवस .... बारामतीला आलोय ... पाउस पडलाय आज... वातावरण शांत ... बर्याच गोष्टी आठवुन जातात... वाढदिवस तसा आम्ही कोणाचाच साजरा करत नसु.. पण घरात गोड - धोड केले जाई.. आज ही असाच बेत आहे... प्रत्येक वाढदिवशीच सारे काही आधीचे आठवते असे काही नाही...पण या दिवशी त्या आठवणींना थोडा भावनेचा स्पर्श जास्त असतो .. संस्काराची शिदोरी अशीच .. त्या पिढीकडुन आपल्याकडे आली... प्रामाणिक पणा, चिकाटी... सतत कार्यरत राहणे या गोष्टी त्यांच्याकडे पाहुनच आपण शिकत आलो... नाही असे नाही.. बर्याच गोष्टीत वेगळे विचार-- हेतु आहेच .. पण सारासार विचार करता ते जास्त बरोबर ... सुख हे पैश्याच्या श्रीमंतीवर नाही.. तर मनाच्या समाधानावर अवलंबुन असते... समाधान आणि सुख ह्या खरे तर वेगळ्या गोष्टी... आपल्या कडे जास्त चैनीच्या गोष्टी म्हणुन आपण सुखी.. पण त्यांच्याकडे आत्मिक समाधान जास्त ... दूसर्‍यांप्रति असणारा आदरयुक्त भाव... स्वता हालाअपेष्टा सोसुन घरातील प्रत्येकाला स्व-कर्तुत्ववान बनवण्याची धडफड .. निरपेक्ष प्रेम... स्वता पेक्षा इतरांच्या सुखा साठी आयुष्यामधील अनेक क्षण वेचले असल्याने ते जास्त समाधानी... बर्याच दा मनात येते .. माणसाने समाधानी असावे... सुख त्या समाधानाकडे आपोआप खेचले जातेच ... आपण उलटे करतो .. समाधाना पेक्षा सुखाकडे आपला कल जास्त असतो.. त्यामुळे कधीच आपले समाधान होत नाही.. आणि सुखाची एक एक पायरी आपण वाढवत जात राहतो ... नक्की आपण कुठल्या पायर्‍या चढतो आहे हे जेंव्हा जाणवते .. तेंव्हा समाधानाच्या सिमेरेषेपासुन आपण बरेच पुढे आलेलो असतो ... मग आपल्याला कळते आपला रस्ता चुकीचा आहे.. हे कळणे ही कदाचीत महत्वाचे..

In reply to by गणेशा

पळत्याच्या पाठी | लागू नये कधी| हाती लागे अंती| काही नाही|| शेजार्‍याच्या चार | अलिशान कार| आपली स्कूटर | खरी असे || शेजार्‍याची भार्या| दिसते ऐश्र्वर्या| तुझे रुप आर्या|अभिषेक नाही|| सुख समाधान |असती समान जेव्हा तुझे मन| स्थिर असे|| अंतरीचे ध्यान | पहावे करुन खरे समाधान| चित्ती वसे|| बुवा म्हणे राम| नामाचे भजन दुर करी भ्रम| अंतरीचा||

गणेशा 02/06/2015 - 00:04
पाऊस मला वाटते नेहमी तरुणच असावा... त्याला पाहिले की त्या सर्व मोहक आठवणी जाग्या होतात... त्या आठवणींप्रमाणे पावसालाही चिरतारुण्याचे वरदान मिळालेले असेल असेच वाटते.... वर्षातला पहिला पाउस मला पहिल्या प्रेमाप्रमाणेच भासतो...उत्कट ..निर्मळ..अतिव...हवाहवासा... त्या चिरतरुण आठवणींचे मेघ हा असाच दरवर्षी माझ्यावर बरसवत असतो... मग मला जयश्री आठवते... माझं पहिले प्रेम... निर्मळ ...निरागस... तासनतास मारलेल्या गप्पा....ती स्वप्ने ... त्या अनाभाका.... कॉलेजला एकत्र केलेला अभ्यास... तो हवाहवासा स्पर्श ... ते हळुच लाजणे... हवाहवासा वाटणारा हा चिरतरुण आठवणींचा काळ आणि पहिला पाऊस यांचे नातेच एकदम घट्ट... पहिल्या पावसानंतर पावसाच्या आणि आठवणींच्या अनेक सरी बरसतच असतात ... बेलगाम... स्वैर.. मुक्त... बेभान... या तारुण्याच्या कित्येक छटा या पावसात मला आठवतात.. तारुण्याच्या या स्वैर..मुक्त..बेभान आठवणी समोरुन झरकण पुढे सरकतात.. गच्च हिरव्या रानातुन जसे पाण्याचे असंख्य झरे वाहत असतात.. तसेच मनाच्या कड्यांवरुन अनेक विचार... अनेक गोष्टी अश्याच उड्या टाकत होत्या हे आठवते ... असंख्य झरे.. असंख्य ओल्या वाटा... गर्द धुक्यात फक्त आपण ..मुक्त.. स्वच्छ... शेवटी वळवाचा पाऊस येतो...अफाट...अचाट...असह्य..अचानक आलेला... तारुण्यातील या गर्द धुक्यातुन .. असंख्य वाटातुन आपला रस्ता आपल्याला त्यात शोधावाच लागतो ... नाहीतर एकदा हरवलो की आपलाच थांग लागणे कठीण... वळवाच्या पावसाचे ही असेच ... अचानक..अफाट... वळवाचा पाऊस असाच जीवनाचा हमरस्ता शोधुन देण्याचे काम करतो... गच्च हिरव्या रानातील असंख्य आपल्याशा वाटणार्या वाटा असह्य पणे आपल्याला सोडुन द्याव्या लागतात.. कधी कधी अचानक समोर काहीच दिसत नाही... तरीही घट्टपणे मनाशी आपली वाट पक्की करुन आपण चालत रहायचे बस्स...

रातराणी 02/06/2015 - 04:15
आज पाउस यावा असं वाटतंय! मरगळलेल्या मनाला त्यानं स्वच्छ धुऊन जावं, मुळूमुळू रडत येण्यापेक्षा आज गर्जना करीत यावं, सभ्यपणाची शाल आज त्यान घरीच ठेवून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! मळभाची काळी चादर आज त्यान फाडून यावं, प्रेमाची भीक देण्यापेक्षा, मुक्त हस्ताने उधळीत यावं, माझ्या उधारीचा हिशोब आज तरी विसरून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! तहानलेल्या सृष्टीला आज त्यान मिठीत घ्यावं, चिंब चिंब भिजवून तिला तृप्त तृप्त करावं, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आज त्यानच मिटवीत जावं!

भीमराव 02/06/2015 - 13:26
वारामागुन वार येतो अन तसाच निघुन जातो. हल्ली कशाचं काहीच वाटत नाही जे सोमवारचं ते च रवीवारचं. पाऊस येतो पडुन जातो, फुले फुलतात सायंकाळी कधीतरी मग नंतर माना मुरगाळुन तशीच पडुन राहतात. मी मात्र तसाच बसुन असतो. धुंदीत जगत असल्या सारखा. टेकडी वरून दीसनारा सुर्यास्त पाहुन किती दिवस झाले हे तर आठवत सुद्धा नाही. कधीतरी लहर येते पावसात भिजायची, मोठ्याने आरोळी ठोकायची. वाटतं वेडं वाकडं धावावं, पाण्यामधे डुंबावं. पन ही इच्छा सुद्धा मनात कुठेतरी जिरून जाते. कुठेतरी विटी दांडु अन लगोरी- गोट्या असले काहीतरी चालुच असते, मी मात्र मान ताठ करून निघुन येतो. पडनारा पाऊस तुषार, वर्षाव, शिडकावा,श्रावण धारा असलं काही का असेना मी त्याला चिकचीकच म्हणतो. खिडकीवर आलेलं पाखरू सुद्धा आताशा किलबील करने सोडुन कलकलाट करू लागलय तरी बरं मला अजुन माझाच त्रास होत नाही.

In reply to by भीमराव

विहिरीच्या काठावर उभा राहून आजकाल मी विहिरीत नूसते डोकावून बघतो पाण्यात पाय घालायला सुध्दा नको वाटते, काही वर्षांपूर्वी मी सहज विहीरीच्या तळाशी टाकलेले नाणे घेउन येत असे, माझा मुलगा मात्र बिनधास्त उडी मारुन विहिरीतून नाणे काढून आणतो, तो वर येई पर्यंत मी विहिरीचा काठ घट्ट धरुन, पाणी कधी हलतय त्याची वाट बघत पाण्याकडे एकटक पहात उभा असतो, अगदी माझे बाबा उभे असायचे तसाच, मी त्या वेळी बाबांना हसत असे, आणि आज माझा मुलगा आणि माझे बाबा दोघे मला हसतात, आजकाल माझे हे असे का होते? काही वर्षांपूर्वी अमर्यादीत थाळी देणार्‍या हॉटेल मधेच आवर्जून जाणारा मी, आजकाल अर्धा वडापाव टाकून देतो, जात नाही म्हणून, "टाकु नका मी खातो" असे म्हणताना माझा मुलगा दात दाखवत मला हसत असतो, आणि माझे बाबा कवळी सांभळत त्याला साथ देत असतात, आजकाल माझे हे असे का होते? रात्री उशीरा पर्यंत झोप येत नाही, डोक्यात सतत काहीतरी विचार येत असतात, त्या वेळी माझा मुलगा एकाग्रपणे अभ्यास करत बसलेला असतो, आणि बाबा मनलावून कोणता तरी जाडजुड ग्रंथ वाचत असतात, मी मात्र तळमळत इकडून तिकडे फेर्‍या मारत असतो, ते दोघे डोळे मिचकावून एकमेकांकडे बघत, मला हसत असतात, आजकाल माझे हे असे का होते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आजकाल माझे हे असे का होते? मनाच्या गाभार्‍यातुन उमटणारे गुढ प्रश्न आत आत दाबून टाकावेत मनमुक्त होऊन उधळून झुगारावेत असचं वाटत असतांना पायात एक अनामिक बेडी जाणवत राहते असं कां? --- साधी कागदी होडी बादलीतल्या पाण्यावर तरंगतांना बघून लेकीच्या डोळ्यात आलेली लकाकी बघून मन हरखुन जाते पुढच्या क्षणी तिच्या स्वप्नांची होडी तिराला लागेल की नाही या विचाराने जीव कासाविस होतो.. असं कां? ----- अल्याड मी असतो पल्याड स्वप्न असतात मध्ये भला मोठ्ठा जलाशय कधी मन उचल खातं म्हणतं चल मार उडी.. परत तेच मन हात धरुन मागे ओढत राहतं असं कां? -------------------------------------------- काय लिहीलय मी माहीत नाही.. सहज सुचल. बाकी धाग्यावर नजर ठेवून आहेचं. येईन परत.

रोजचा आला दिवस सरताना मागे काही ठसा ठेऊन जातो.कधी ठळक कधी पुसट..काही बोचलेले शब्द काही रेंगाळणारी गुपिते.तर कुठे मनाच्या कोपर्यात जपलेला हिरवा गारवा.काहीही मागे ठेवायचे नाही म्हणताना लेकीची गळामिठी प्रेमाचा ठसा ठेऊन जाते.आणि मी मात्र लांब दिसणारं धुसर चित्र जणू हातात आल्यासारखी नादावते...परत उगवणारा उद्या पायातल्या मणामणाच्या बेड्या संभाळत कोलु पिसु लागतो.अखंड चालणारा हा अविरत घाणा.सुखाचे वंगण अन दुःखाची धार लावुन पळत राहतो.दिसामाजी कापलेले अंतर बघु गेलो तर मागे उरतो माझ्याच पायानी बनलेल्या वतृळाचा ठसा....

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

पैसा 10/06/2015 - 21:44
प्रवास सुरू झाला तेव्हा कुठे जायचंय हे माहीत नव्हतं, किती वेळ लागेल हेही माहीत नव्हतं. अर्धा रस्ता संपला तरी अजून कुठे जायचं हे माहीत नाही अन किती चालायचं हेही माहीत नाही. पावलं तीच, मीही तीच, रस्ताही तोच. सुरुवात झाली तेव्हा लहानशी पायवाट होती. बाजूंनी फुलं होती सगळी. आणि डोक्यावर गर्द सावली. हळूहळू झाडी विरळ झाली. फुलं सुकली आणि डोक्यावर ऊन भाजू लागलं. तरी वाट सरता सरेना. कधीतरी वार्‍याची झुळूक ह़ळूच येऊन गालावर रेंगाळून जाते. माथ्यावर ढग दुरून जराशी सावली देतो अन कधीतरी एखादी पावसाची सरही. आताशा सावलीही पायातळी आली आहे. सुरुवात कशी होती तेही आज धूसर चित्रासारखं आठवतं आहे. शेवट कसा असेल माहीत नाही. आज, आता इथे आहे एवढंच खरं. पण एकच माहीत आहे की मला चालायचं आहे. बाकी सगळे निघून गेले तिथे जाण्यासाठी. पाय साथ देतील तोपर्यंत.

In reply to by पैसा

गणेशा 11/06/2015 - 12:25
ती ज्वारीची शेते .... पाणांवर दवबिंदू ल्यालेली शहारलेली कोवळी पाने... गावाचा तो शेतावरला बांध... काळीकुट्ट जमीन.. आणि त्या काळ्याश्या ठिसुळ ढेकळाला हळुवार पणे भिजवत पुढे चाललेले पाणी.... ती दगडी भिंतीची ओबढ शाळा.... सुंदर झाडलेले आणि सभोवताली अशोकाची उंचच उंच झाडे असलेले पटांगण ... ती पळसाकडील विहीर... तासनतास मारलेल्या गप्पा.. एकत्र केलेला अभ्यास.... ती अनामिक हुरहुर .... सुगंधाचे क्षण.. फुलांचे सांजेला मोहक लाजणे... तो चंद्र .... तो अनामिक दूरावा... ते सैल झालेले मायेचे पाश... त्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा.... ते ओठांआड थांबलेले शब्द .. ते हिरव्या बांगड्यांचे लेणे घेतलेले पण त्या क्षणी अतिव ओढीने थरथरणारे हात.... तो अंगणातील पारिजात... रात्री पडलेला फुलांचा सुगंधीत सडा... ती पहिल्यांदाच न उजाडू वाटणारी सुरेख ..गुलाबी सकाळ... ते इवलेसे टोपडे... इवलेसे स्वेटर... मऊ मनाला आनंदित करणारा स्पर्श... जीवनाचा सर्वोच्च आनंदी क्षण.... ती सकाळची गडबड ... ते कुतुहल.. दप्तराच्या ओझ्यांची चिंता... बंद केलेला टीव्ही ... ती काळजीळतली परिक्षा... हे अर्धे आयुष्य सरले आहे आता.. आयुष्याच्या ह्या एक एका फ्रेम ने मन अगदी काठोकाठ भरुन गेले आहे... पुढच्या प्रवासाची एक अनाम ओढ ... इवल्याशा काळजाच्या तुकड्यात गुंतलेला श्वास... आणि श्वासागणिक वाहिलेले वाहिलेले हे आयुष्य ..पुन्हा तो अंगणातला पारिजात...........

गणेशा 03/06/2015 - 12:55
@मिका.. कागदी होडी वरुन आठवले... गावाकडे अंगणात... पावसात.. पाणीच पाणी साठायचे... अश्या वेळेस क्रिकेट खेळता येत नव्हते म्हणुन मन नाराज होत असे... आणि मग आम्ही मोर्चा वळवत असु कागदी होड्या बनवण्याकडे... आम्ही म्हणजे मी आणि तायडी(ताई) ... तायडी या एकाच शब्दात कीती माया साठवलेली असते ना... या शब्दाच्या उच्चाराने पण मन प्रसन्न झाले... हा..तर या होड्या बनवायचो मी.. तीला पण मीच बनवुन द्यायचो .. तीला बनवायला येत नसत.. मग तासन तास त्या पाण्यात आम्ही खेळत असु..कोणाची होडी लांब जाते त्यावर पैजा लावत असु.. कसलीच चिंता नसायची तेंव्हा... कपडे खराब होण्याची.. अभ्यासाची... भविष्याची.. कसलीच नाही.. कीती मस्त दिवस होते ते.... आणि आता त्या पावसाची आपण वाट पाहत आहे.. पण त्या कागदी होड्यांप्रमाणे त्या बालपणीच्या आठवणींचे आपण काहीच करणार नाही का ? मला वाटते.. लेकीच्या रुपाने ते दिवस पुन्हा आपल्याकडे येवु पाहत आहेत.. तर मग तीच्या सोबत पुन्हा तेच दिवस जगायला आपण सुरुवात केली पाहिजे असे वाटते... कसलीच चिंता न करता.. म्हणुन मी पण आता पावसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहे... सहज मला आवडणारे गाणे आठवले यावरुन... एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी

नाखु 03/06/2015 - 14:15
खरच लहानाबरोबर लहान होणं सोपं असतं का? नसतंच कारण ज्या क्षणी तुम्ही विचार करता की मी लहान होतो आहे तेव्हांच तुमचं बाल्य हरवलेलं असतं. बाल्य कसे पाहिजे मित्रांअम्ध्ये दिलखुलास शेर्‍याला, हजरजबाबीपणाला आपोआप टाळी देणारा-घेणारा हात जसा उस्फुर्त आतून असतो अगदी तसाच. एकदा का तुम्ही बाल्यपणात आपोआप घुसलात की त्या नजरेने जग सुंदर दिसतं अगदी पुस्तकातल्या चित्रा सारखं स्वच्छ, निर्मळ. थोडी कट्टी थोडी बट्टी ,खोटा खोटा स्वयंपाक भातुअकलीच्या भांडयातून दिलेले बेदाणे-शेंगदाणे आपण फार मोठा चविष्ट पदार्थ खातोय असा भाव केल्याबरोबर डोळ्यांत ओसंडणारा आनंद, मध्ये लुड्बुड केली तर लटका राग हे खाली बसून बरोबरीने अनुभवायची गंमत आहे. कपड्यांची धुळीअगोदर, मोठेपणाची वस्त्रे झटकली तरच मस्ट. मी एका वर्षी दिवाळी किल्ल्यासाठी लेकीला आणि लेकाला माती-चिखलात हात घालून किल्ल्यासाठी मदत घेतली तेव्हा किल्ला कसा झालाय त्याहीपेक्षा ही नदी/हा डोंगर मी केलाय याचेच त्या दोघांना खूप अप्रूप होते.(अजून ही चित्रे माळावर आहेत) ह्या दिवाळीत काढावीच बाहेर, आपण का अड्वायच आपल्यातल्या !!!! ताईदादाचा बापूस नाखु

गणेशा 03/06/2015 - 15:49
आपल्या मनातील आपले विचार.. सहजपणे जेंव्हा असे बाहेर येवु लागतील.. आपल्याच लिखानातुन एक एक रुप घेवु लागतील, तेंव्हा त्यांना आपल्याला तठस्थपणे पाहता येवु शकेल... मग कुठल्या विचारांचे रुप आपल्याला बदलायचे.. कुठले चित्र कसे निट करायचे.. हे आपल्यालाच समजेल... आपणच आपल्या विचारांचे चित्रकार.. मुर्तीकार... कुठला टाका कुठे टाकायचा हे ठरवणारे ही आपण .. आणि कुठला रंग कुठे भरला की उठुन दिसेल हे ठरवणारे ही आपण.. निसर्ग ही असाच असेल नाही ?. प्रत्येक वेळेस एक वेगळीच निर्मिती साकारण्याचे सामर्थ्य ही त्याच्यात असेच आले असेल... स्वताच्याच निर्मितीस तठस्थपणे पाहणे ही पण एक कलाच...

हे सुरांनो चंद्र व्हा! काय रचना आहे... विरहणी म्हणजे काय ते हे गाणं ऐकून कळते. परीपूर्ण रचना.. अप्रतिम संगीत आणि अभिषेकीवुबा तर बिनतोड... एकाकी दुर माळरानावर ती उभी आहे. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आहे, आणि तिच्या मनातून उमटलेल्या वेदनेतून या रचनेने जन्म घेतलाय. पण वेदना कशी पोहचवणार? तर ती सुरांनाच सांगते, तुम्हीच चंद्र व्हा आणि चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा. काय कल्पना आहे ना? जीवघेणा प्रकार आहे. तसाच काहीतरी विचार डोक्यात ठेवून हे लिखाणः ---------------------- दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- वाट भरकटून अंधारात चाचपडत चाचपडत त्याच्याकडे पोहचण्याचा निष्फळ प्रयत्न माझा फसलाच परत एकदा --- वेदनेला शब्द सापडतात कधी कधी नि:शब्द तडफड एका क्षणात आकाश व्हावे सगळी वेदना कृष्ण मेघात भरावी आणि बरसावे... रिक्त होईस्तोवर --- आज परत एकदा पौर्णिमा आली आता अधीरता अगतिकता झाली बेचैनी रिक्ततेकडे झुकली अन् वेदना जिवावरचे दुखणे झाले तरीही दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा....

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम. अभिशेकीबुवांच्या गाण्याचा प्रश्र्णच नाही, त्याला काही तोडच नाही, पण हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली ती मुग्धा वैशंपायन https://www.youtube.com/watch?v=1qFJtCMqcK0 पैजारबुवा,

मिका, या झाल्या एका विरहिणीच्या व्यथा पण पुरुषांचे त्यांची प्रेयसी, पत्नी कुठे गावाला गेल्यावर काय कमी हाल होतात का ? हे बघा काय म्हणतो पास्तरनाक..... दरवाजातून आत बघितले माझेच घर मला ओळखू येईना अचानक तिच्या जाण्याने घराचा आणि मनाचा कसा गोंधळ उडाला आहे भयानक. ठणकणार्‍या वेदना आणि डोळ्यांतील अश्रू समजून नाही देत या अवस्था झालेल्या जखमा कशा मोजता येतील आणि कशाने ? मनात एक तीव्र कळ ऊठली. मी जागा होतो का स्वप्नात ? का माझ्या डोळ्यातील पाण्याने माझ्या बुद्धीवर मात केली आहे ? धुरकटलेल्या काचांमुळे का डोळ्यांतील पाण्याने हे जग मला पार तुटलेले वाटते आहे. मनोवेदनेत माझ्या का दिसत आहेत मला राक्षसी लाटा आणि तुटलेली घरे ? ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........

In reply to by जयंत कुलकर्णी

त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले
व्वाह...

In reply to by जयंत कुलकर्णी

ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. सुरेख. -दिलीप बिरुटे

प्यारे१ 03/06/2015 - 18:14
शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे अनिमिष नेत्रांनी बघत फ़क्त आस्वाद घेत राहावं.... शांतपणं मनाच्या खोल तलाशयात या रत्नाना साठवत राहावं... सरस्वतीच्या या पुत्रांना नतमस्तक होत निव्वळ न्याहाळत राहावं... एकेका मुक्तकासाठी/ कवितेसाठी तुम्हाला एक एक पार्टी लागू! मिपा वरचा अप्रतिमोत्तम वरचा क्रमांक असलेला एक धागा

गणेशा 03/06/2015 - 18:55
@ मिका आणि जयंत जी. एकोळी रिप्लाय ह्या धाग्यावर खरे तर द्यायचे नाही ठरवलेले आहे, पण तुम्हा दोघांच्या या अतिउच्च विचार/लिखाना ला सलाम तर करावा लागतोच .... तरीही जाता सुचेल ते लिहितोच. इतरांना मात्र एक विनंती एकोळी रिप्लाय शक्यतो नको.. वा.. छान ही नको.. त्या उलट शब्दांच्या थव्याने तुम्ही येथे या.. मनसोक्त जे वाट्टेल ते लिहा.. त्याची खरी गरज आणि एकदम धागा वाचताना ही मग मध्येच थांबल्या सारखे होणार नाही.. फक्त रिप्लाय किती पेक्षा किती मुक्तके/कविता/चित्रे ते महत्वाचे.. उत्तर लिहितो असेच...

गणेशा 03/06/2015 - 19:48
@ मिका @ जयंत जी... तिचे नसणे माझ्या मनाला मान्यच नसते कधी... ती गेली त्या दिवशी तिने आनंदाने अंगणात रांगोळी काढली होती...ठिपक्या ठिपक्यांचे कासव तीला यायचे.. तेव्हडेच यायचे... ती गेली आणि त्या रांगोळीचे ठिपके धुसर झाले... आज पर्यंत पुन्हा अंगणाला रांगोळीचा स्पर्श झाला नाही.. तिचे मंगल पावित्र्य अंगणाला पुन्हा कधी मिळाले नाही.. ही गत फक्त अंगणाची.. माझ्या आयुष्याचे वेगळे असे काय झाले ? अंधुक भग्न घराच्या कडेकपारीतुन अजुनही तो ओळखीचा सूर ऐकु येतो..... ओठांच्या घाटावर.. त्या शब्दसावल्या अजुनही विखुरलेल्या आहेत .. तश्याच ... आवाज न करता... मळकट पायवाटेवर... ते ओळखीच वारुळ अजुन तसेच आहे... दु:ख पारावर अजुनही तसेच घट्ट बसुन आहे... शेताच्या बांधावर भासांची टोळी अशीच अचानक येते अन मग फाटक्या माझ्या झोळीतुनही त्या टपोर्‍या दाण्यांना अलगद वेचुन न्हेते.. आजकाल हे असेच होते.. पाटाचे पाणी पण हबकुन वाहते... काल वटपोर्णिमा होती.. ते वडाचे झाड मात्र वाळलेले होते.. नाही.. दोरा होता गुंडाळलेला.. करकच्च... पण त्याच्या पारंब्याला माझी स्वप्न लगडलेली होती.. आणि निजले होते माझे विचारगाव त्या तिथेच झाडाखाली...

रातराणी 04/06/2015 - 01:30
कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि वार्याबरोबर उडून गेलेला तिचा सुगंध, आता पुन्हा ती बहरेल का? मोडून पडलेला विश्वास आणि बाहेरून आत शिरू पाहणाऱ्या वादळांची धिटाई, आता पुन्हा ती जळेल का? रुतलेली अदृश्य जखम आणि श्वासांचही ओझ झाल्यासारखा तुझा अनोळखी अबोला, आता पुन्हा ती हसेल का? तू गाशील विरहाचे गाणे आणि ती सोडवत बसेल आठवणींचा गुंता, खर सांगा, आता पुन्हा ती जगेल का? ( हे अगदीच काहीतरी आहे पण आमच्या हाताला खाज फार!)

भीमराव 04/06/2015 - 11:17
कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या भावना यावर सहजतेन हळुवार फुंकर घालनारी तु पहील्याच भेटीमधे मनाला अलगद स्पर्ष करून गेली नसतीस तर मला साहजिकच नवल वाटलं असतं. दररोज तुझ्या मनाचे ऊलगडनारे नवे नवे पदर मला कळत नकळत तुझ्या जवळ खेचत होते. तुझा अल्लडपना तर खुप गोड वाटायचा.मी इतका गुंतत चाललो होतो की तुझा थोडासा विरह देखिल मला खुप अस्वस्थ करून जायचा. तु हाती न लागनारे मृगजळ कधीच न्हवती, मात्र तरीही सहज साद्ध्य ही न्हवती. आयुष्याचं प्रतयेक वळन आजही तुझी साथ मागतं. निवांत अशा एकांतामधे तर मनाला खोल खोल जखमा होऊन जातात. कधी कधी तर तुझ्या आठवणीने इतका वेडा होऊन जातो, माझं मलाच भान रात नाही. वाटलेलं तुझी आठवण मनाला मोरपीसासारखी सुखावत राहील, मऊ पीसाला इतकी धार येईल हे मात्र स्वप्नातही वाटलं न्हवतं

नाखु 04/06/2015 - 12:57
तुमच्या या कवीतेने जखम ओली झाली
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........
जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी.. तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको. आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो. आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला. अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात. एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही. शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे. काकाश्रींचा पंखा नाखुस

गणेशा 04/06/2015 - 15:27
@ बाबुदादा... हळव्या या वातावरणाला थोडेशे चेंज करावे म्हणतो .... ---------------- तु आयुष्यात आली.. अन आनंदाचे उधान आयुष्यात आले... लवासाला पहिल्यांदा भेटलो आपण..लग्ना अगोदर .. साखरपुड्यानंतर .. जाताना मुठा नदी किती सुंदर दिसत होतीना तिकडे... तिथेच विसावलो त्या छोट्ट्याशा ब्रिजवर आपण ... पहिल्यांदाच लाजत झालेला तो स्पर्श .. अह्हा हा किती सुंदर.. मोरपिस अंगावरुन फिरुन जावे तसाच... मग आपण पुढे फिरत गेलो.. निसर्ग आपल्या दोघांना आवडतो.. त्या निसर्गात मनमुराद फिरणे पण .... पण माझा एक रुसवा अजुनही आहे, साखरपुडा आणि लग्नात इतके ४-५ महिन्यांचे अंतर असताना ही आपण फक्त एकदाच भेटु शकलो ... तु आता म्हणत असते आपण पुन्हा लवासा ला जावू .. गेल्यावर्षी खुप हट्ट केला.. पण मी न्हेले नव्हते.. या वर्षी पावसात..आपण जाउया नक्की... खरे सांगु मला तुझ्याशिवाय असे फिरायला जायला आवडत नाही शक्यतो ... १० जून माझा वाढदिवस असतो .. दरवर्षी याच्या आसपासच्या सुट्टीमध्ये आपण फिरायला जातो.. या वर्षी पण त्याच्या आसपास आपण जावु फिरायला... काळ किती फास्ट पळतोय ना.. अस वाटत आहे.. हा काळ असाच थांबावा या क्षणांमध्येच... तु मला शर्ट घेतला या वर्षी पण .. तु नेहमीच वाढदिवसा साठी मला शर्ट घेते.. मला आवडते ते खुप.. यावेळेस चा व्हाईट शर्ट .. तो ही कॅज्युअल pepe jeamo चा.. मस्त आहे एकदम... मला खरेच छान वाटले.. पण तुला असे वाटते.. तु काहीच जास्त घेतले नाही.. कारण तुझ्या वाढदिवसाला तुला २ ड्रेस हवे असताना मी तुला ४ गिफ्ट दिले होते... घरी सांगताना पण आपण १च घेतला असे सांगितले होते... किती दिवस झाले ना आपण पिक्चर ला एकत्र गेलो नाही... आता पर्यंत पिक्चर ला जाताना आपले मात्र लक खुप खराब आहे... आपण लग्ना नंतर पाहिलेला पिक्चर होता डर्टी पिक्चर .. काय करणाअर दोनच ऑप्शन होते... एक डर्टी आणि दुसरा विकी डोनर ... मग डर्टी निवडला.. लग्नाच्या गडबडीत नक्की तो कशावर आहे ते ही माहिती नव्हते... नंतर मात्र धमाल आली मराठी किती सुरेख चित्रपट पाहिले आपण ना.. त्यातल्या त्यात शाळा आणि दुनियादारी मस्तच होते... ती पुस्तके मी तुला वाचायला दिली होती.. तुला वाचनाची जास्त आवड नाही.. पण ही आणि या बरोबर अनेक पुस्तके तु, मी म्हणालो म्हणुन वाचली... आता लवकरच आपण नाटकाला ही जात जावु .. मला नाटके आवडतात.. तु अजुन तशी नाटके पाहिली नाहीसच .. तुला बाहेरचे खायला आवडते.. पाणीपुरी वडापाव भेळ आणि मासे... मला तर खायला आवडतेच त्यामुळे फिरणे आण खाणे होत रहातेच.. पण तु मागच्या काही महिन्यांअगोदर ठरवले आहे, बाहेरचा खर्च कमी.. त्यामुळे आता बरीच मुरड बसली आहे या गोष्टींना.. तसे बरे आहे.. पण तुझी पाणीपुरी मात्र मध्ये मध्ये डोके वर काढतेच आहे...

गणेशा 04/06/2015 - 16:20
मागिल काही दिवसांअगोदर, जवळच झाडावर चूऊताईचे घेरटे पाहिले.... चिऊ आपल्या इवल्याश्या पिल्लांना खाऊ देत होती.... त्या पिल्लांची तिला पाहण्याची ओढच लागली असेल त्याच्या अगोदर.. बिच्चारी चिऊ ताई पण.. कधी एकदा खाऊ घरात बाळांसाठी न्हेते असे वाटुन पटकन माघारी फिरली असेल.. मागच्या आठवड्यात ती पिल्ले हळुच आपल्या आईकडे बघुन घरट्यातुन टुनकन बाहेर आली होती.. जास्त लांब नाही गेली पण थोडे पंखांना बळ देत असल्यासारखे पाहिले त्यांनी .. मग चिऊताईने पुन्हा त्यांना घरट्यात जाण्यास सांगितले नव्हे घरट्यात लोटलेच जणु ... असेच त्यांची शाळाच जणु अजुन चालली होती.. फांदिच्या टोकावर बसुन ती पिल्ले धडपडत का होईना .. हळु हळु पंखात बळ साठवत होती.. चिऊताई आता मास्तरीन म्हणुन पण एकदम छान दिसत होती.. आज ती पिल्ले थोडे दूर उडुन गेली ... पंखात आकाश सामावण्याचा त्यांच्या इरादा होता हे नक्की... बालगीत झाडावरती घरटे चिऊताईचे ... पानांआड दडलेले.. .... घास भरवती पिल्लांना आपल्याच इवल्या चोचीने पंखाना बळ देती ती छडी हातात घेवुनी ... आकाशा ला मिठीत घेवू ही प्रार्थना तिच्या शाळेची... एक दिवस आला असा .. परिक्षा संपली पटकन चिऊताईची शाळा संपली पिल्ले उडाली भुर्रकन

मनीषा 04/06/2015 - 18:08
उपक्रम चांगला आहे. असं लिहून ठेवलेलं चांगलंअसतं. ते परत वाचताना काहीवेळा नवल वाटतं. कधीतरी असही काही आपल्या मनात आलं होतं म्हणून .

In reply to by मनीषा

मनीषा 04/06/2015 - 20:59
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु? ........आणि काय सांगु? नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच आणि आतल्या प्रकाशावर पडू दिली नाही अंधाराची छाया कधी म्हणूनच तर आहेत त्या माझ्या जीवाच्या जीवलग निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात जगाच्या सा-या तापांपासून दूर कधीतरी वाटतं मलाही पहावं .... काय चाललं आहे बाहेर? मग उघडते मी एक छोटासा झरोका बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता त्यातुनच येतात मग जुन्या नव्या आठवणी काही सुखावणा-या .... तर .. काही रडवणा-या त्यांच्याशी बोलत राहते मी कधी ---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही बाहेरचा कोलाहल मला अगदी ----- नवा नवा वाटतो त्यात एखादा ओळखीचा सूरही असतोच त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात ------ मग सगळे चेहरे एकमेकात मिसळतात अन त्यांचा बनतो एकच चेहरा त-हेत-हेच्या भाव-भावनांचे आविष्कार दाखवणारा त्यातून मग अनेक रंग विखूरतात त्यातले काही मला भावतात देखील ... मग मी त्या रंगांना निरखून पाहते त्यांना एक आगळा वेगळा गंध असतो .... तो गंध माझ्या कणाकणात भिनतो मनावर एक अनोखी धुंदी चढते ---- त्या गंधांची ........ त्या रंगांची मग त्या चार भिंतीतलं माझं एकटेपण जणू नाहीसं होतं अनेक भावनांचे रंग... त्यातून तयार होते एक अद्भूत नक्षी कशी माहित नाही ... पण मला ती आवडते त्या नक्षीच्या बिलोरी काचा सा-या घरभर पसरतात त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात माझं मन मोहून जातं त्या कवडशांना हातात घ्यावं त्यांना जवळून पहावं ... असं वाटतं ...... पण त्यांना हातात घ्यायला मी जाते .... तशी ते माझ्यापासून लांब जातात असा खेळ ---------- कितीतरी वेळ चालतो शेवटी मी थकून जाते एका जागी बसून त्या कवडशांकडे पहात राहते हळूहळू उन, आपली पावलं मागे घ्यायला लागतं तसे सारे कवडसे सुद्धा त्याच्या मागे धावतात मग तिथे काहीच रहात नाही दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो शांत ..... सुस्थीर .... अश्वासक....... मनाला दिलासा देणारा काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा माझं मन शांत होतं पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र हरवूनच जातात माझ्या मनात राहतात मग फक्त त्यांच्या आठवणी त्या आठवणी मी माझ्या मनात जपून ठेवते आता त्या आठवणींना माझ्याकडे यण्यासाठी झरोक्याची आवश्यकता नसते त्या चार भिंतींच्या अवकाशात त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या सोबती असतात ..

गणेशा 05/06/2015 - 00:47
आठवणींचा बिलोरी आरसा आपल्याकडे असला की कधी पण आपण त्या आरश्यातुन काळाच्या पडद्याला छेद देत त्यावेळेसचे क्षण पुन्हा अनुभवत असतो ... मन आपल्याच भिंतींना झुगारुन कधी मुक्त होऊन जाते ते ही कळत नाही ... आठवणी त्या सुखाच्या बालपणीच्या ... भातुकलीच्या ... बाहुलीच्या केसांसारख्या.. मखमली सोनेरी रंगांच्या... नववारीतील आज्जीच्या गोष्टीतल्या परीसारख्या... अंगणातल्या अबोलीच्या. आठवणी त्या सुखाच्या ... पहिल्या रिकाम्या दप्तराच्या... पाटीवरील पहिल्या अक्षराच्या... आठवणी त्या सुखाच्या.... बालसंवगड्यांशी खेळण्याचा... माळलेल्या गजर्‍याच्या आठवणी त्या सुखाच्या... पाहिलेल्या नजरेच्या... मुक्या स्पर्श भावनांच्या... आठवणी त्या सप्तपदीच्या प्रितीतल्या गोडव्याच्या तुझ्या माझ्या गोड क्षणांच्या आठवणी त्या सुखाच्या ... अवांतर.. ५ मिनिटात काय लिहिले हे पुन्हा न वाचताच देत आहे... लिहायला गेलो गद्य आणि झाले असेच काहितरी पद्य..

गणेशा 05/06/2015 - 12:29
उद्या... शिवराज्यभिषेक दिन... सगळे मित्र रायगडाची वाटा चालत आहेत.. मी मात्र आज येथेच ऑफिसात .. आज चतुर्थी पण आहे.. सकाळी पाऊस पडला .. वातावारण खुप मस्त आहे... पण पावसामुळे बाळाला घेवुन या चतुर्थीला मोरया गोसावी मंदिरात सकाळी सकाळी जाता आले नाही... संध्याकाळी जाईन पण .. बाळाला बप्पा खुप आवडतो .... मंदिरात गेल्याने छान वाटतेच.. पण महिन्यातुन एकदा सकाळी एकत्र बाहेर पडायला मिळते ते पण खुप छान ... आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्वांसाठी टाईम काढलाच पाहिजे असे वाटते.. मग ते मित्र असुद्या.. फॅमिली असुद्या नाहीतर पर्सनल गोष्ट असुद्या .... मुलांना तर टाईम दिलाच पाहिजे.. प्रत्येक पालकाने हे केलेच पाहिजे.. बाळ मोठे झाल्यावर तर आठवड्यातला एक दिवस मी बाळासाठी रीझर्व ठेवणार आहे.. मग तो शनिवार असेल किंवा रविवार.. पण फक्त बाळाबरोबर.. वाटल्यास बाळाला माझ्यासोबत फिरण्याच्या सवयी लावेल ... बाप झाल्यावर किती गोष्टी बदलतात ना... पहिल्यांदा दुकानात गेलो की मी माझ्या वस्तुंबद्दल विचार करायचो.. मस्त आवडेल ते घ्यायचो .. आजकाल असे होत नाही.. पैसे आले की बाळाला काय घ्यावे असे वाटते.. तीला एखादी फ्रॉक लहान पडत असली की दूसरी आपण बघुन ठेवलेली आता घेवुया असे वाटते... खेळणी.. गाडी..इतकेच काय सायकल ची पण तयारी आताच झाली आहे... खरेच बाप हा मुलगी झाल्यावर पुर्ण बदलतो .. बदलतात त्याचे विचार.. आचार... हे मला आता कळते आहे... जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा माझे वडील तायडी ला बिंधास्त ट्रीप ला जावुन द्यायचे.. तिचे खुप लाड करायचे.. माझ्या पेक्षा.. तेंव्हा मी आईला बोलायचो ते.. आई माझी होती ना.. तायडीचे पप्पा.. पण आज कळते आहे.. हा नैसर्गिक बंध आहे... कदाचीत बाप झाल्यावर आपल्या बापाच्या भावना आपल्याला जास्त कळत असतील .. असेच असेल...

मोहनराव 05/06/2015 - 15:37
बरोबर आहे तुमचे. आजकाल ऑफिसमधुन घरी जाण्याची एक अनामिक ओढ असते. ते इवलेइवले हात हातात घेऊन एक गालाचा मुका घेतला व बाळाचे आपल्याला बघुन खुश होणे पाहिलं की दिवसभराचा थकवा कुठे निघुन जातो कळतच नाही. जगातल्या कसल्याही दुखा:चा लवलेश नाही.. चिंता नाही. असे आयुष्य परत जगता आले तर किती मजा येईल असे वाटते. ये दौलतभी लेलो ये शोहरतभी लेलो... गझल आपसुकच गुणगुणायला लागतो. मध्ये ही बाळाला घेऊन गावी गेलेली महिनाभर, तर मन कशातही रमायचे नाही. चातकासारखी बाळाची वाट पाहिली. परत आली तेव्हा स्वारी ओळखायला तयार नाही :( पण लगेच एक दिवसात परत माझ्याकडे छकुली येऊ लागली. मी विचार केला, आत्ताच आपले हे हाल.. अजुन काही वर्षांनी मुलगी मोठी होऊन सासरी जाऊ लागली तर आपले काय होणार. तेव्हा एका मुलीच्या बापाचे दु:ख काय असते याची कल्पना येऊ लागली.

साधुची झोळी का पडली? नदि काठच्या एका गर्द झाडी मधे बसून, तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करत होता, तिकडुन तो कोणाला सहज दिसत नव्हता, पण तो मात्र बरेच काही पाहू शकत होता, नुकताच वयाच्या सोळाव्या वर्षी विरक्त होउन, त्याने संन्यास घेतला होता, आणि भगवंताचा शोध घेत, दिवसरात्र तो रानोमाळ भटकत होता, अचानक कसल्यातरी आवाजाने, त्याची समाधी भंग पावली, एक लावण्यवती, रमत गमत पाण्याला जाताना, त्याला दिसली, हरणाची चपळाई आणि मोराचा डौल होता, तिच्या पावलो पावली जणु केतकीच्या बना मधून, एखादी नागीण सळाळत निघाली, त्या वेळी त्या दोघांशीवाय, तिथे तिसरे कोणीच नव्हते, तो आपल्याला बघतो आहे, याचे तिला जरा देखील भान नव्हते, तिच्या हातात एक आणि एक कमरेवर एक असे दोन घडे होते, आणि मोकळे लांबसडक केस तिच्या कमरेवरती रुळत होते, इकडे साधूबुवांच्या हृदयाची धडधड मात्र, जोरदार वाढली होती, आता त्या जागेवरुन उठायची सुध्दा, त्यांच्या मधे हिम्मत नव्हती डोळ्यांची पापणी मिटावी, असे ठरवून देखील, ती बंद होत नव्हती दूसरीकडे आपल्या चंचल, कमकुवत मनाची, त्यांना लाज वाटत होती इकडे तिकडे सावध नजर टाकत, क्षणार्धात ती निर्वस्त्र झाली, मासोळी सारखी सुळकन, नदिच्या पाण्यात तिने उडी मारली, मनसोक्त डुंबुन झाल्यावर, ती तशीच ओलेती बाहेर निघाली, अनिमिष नेत्रांनी हे बघणार्‍या साधुच्या, जीवाची मात्र काहीली झाली, हे सगळे कमी होते म्हणुन की काय?, ती इकडेच यायला निघाली, साधुबुवांच्याच समोरच्या झुडपा मागे उभी राहून, अंग कोरडे करु लागली, तिची सूर्यासारखी तेजस्वी नितळ काया, साधुबुवांना अगदी जवळून दिसली, आणि तिच्या अंगप्रत्यांगाच्या गोलाई मधे, बुवांची नजर अडकून बसली, स्वतःच्याच धुंदीत असलेल्या तिला मात्र, कशाचेही भान नव्हते, तिचे ओलसर मोकळे केस, सुर्यकिरण पडून चमचम चमकत होते, तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवातुन, यौवन ओसांडून वहात होते, ते पहाताना साधुमहाराज मात्र, हाताच्या मुठी घट्ट आवळत होते, बर्‍याच वेळा नंतर अखेर, त्यांना मोकळा श्र्वास घेता आला, कारण त्यांच्या समोरचा मोहमायेचा खेळ, होता आता संपला, घागरींमधे पाणी भरुन घेउन, तिने आपल्या गावाचा रस्ता धरला, बुवांनी इतकावेळ नकळत घट्ट आवळलेल्या मांड्या, थोड्या मोकळ्या केल्या, साधुबुवांना आपल्या या निर्लज्ज कृतीची फारच शरम वाटली, तो एक अपघात होता, असे म्हणुन, त्यांनी स्वतःची समजुत घातली, चित्त थार्‍यावर यावे म्हणुन, झोळी मधली पोथी त्यांनी काढली, परमेश्र्वराच्या शोधा कडे, त्यांनी पावले पुन्हा एकदा वळवली, पोटात कावळे कोकलायला लागले, म्हणुन ते गावा कडे गेले, "ओम भवती भिक्षांदेही", असे एका घरा समोर जाउन म्हणाले, याचकाची नजर नेहमी जमिनी कडे हवी, हा नियम ते विसरले, आणि भिक्षा घेउन येणारी स्त्री पाहुन, त्यांचे देहभान हरपले, ती तिच होती, जिला त्यांनी नुकतेच नदिवर पाहिले होते, आता तिने कपाळावर कुंकु गळ्यात मंगळसुत्र घातले होते, सुरेखसा गजरा माळत, केसही तिने निटनेटके बांधले होते, जणू बुवांच्या समोर साक्षात सरस्वतीचेच प्रतिरुप उभे होते, "महाराज भिक्षा घ्यावी", नमस्कार करत ती म्हणाली, बुवांच्या छाती मधली धडधड, पुन्हा एकदा वाढली, पायातली शक्ती गेली, हातातली झोळी खाली पडली, तिच्याकडे न पहाता, बुवांनी तिकडून जोरात धुम ठोकली, एका खोल कड्याच्या टोकावर, स्तब्ध पणे साधुबुवा बसले होते, हे असे का झाले?, याचा विचार करताना, स्वतःलाच हसत होते, कारण विचार करता करता, त्यांच्या हेच लक्षात आले होते, "देव आहे चराचरी" हे तत्व, त्यांना नीटसे समजलेलेच नव्हते, "पुनश्र्च हरी ओम" असे म्हणत, त्यांनी ध्यानासाठी डोळे मिटले, त्यांच्या डोळ्यासमोर, पुन्हा एकदा तेच नदिवरचे दृष्य उभे ठाकले, पण यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित, जराही नाही ढळले, एका तटस्थवृत्तीने, ते आपल्या मनाच्या या खेळाकडे पाहु लागले. पैजारबुवा,

गणेशा 08/06/2015 - 12:12
@ पैजारबुवा ... समरसता ही मनाची एक कला आहे.. या कलेचा आनंद जोपर्यंत माणसाला घेता येत नाही.. तो पर्यंत त्याला जीवन जगणे म्हणजे काय हे कळालेच नाही असे वाटते...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जडभरत 23/07/2015 - 20:58
वाः बुवा वाः लिहिणारे समर्थ तर ग्रेटच पण हा इतका दुर्मिळ आणि अर्थपूर्ण श्लोक लक्षात ठेवणारे तुम्ही पण ग्रेट!!! हा श्लोक पाठ करत आहे.

गणेशा 08/06/2015 - 13:51
देवावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा ... हा मुद्दा वेगळा.. पण माणसांच्यात..मुलांच्यात ..कामात.. मित्रांच्यात सदभावनेने जो वेळ घालवाला जाईल तोच देवपुजेचा अर्थ असावा असे माझे मत आहे.. देवपुजेच महत्व त्यामुळे नक्कीच कमी होत नाही.. स्वता लहानमुलासारखे जगणे थोडे मुस्किलच आहे, या जीवनात फक्त साथ देवुन नाही तर त्याबरोबर योग्य गरज निभावने पण तितकेच मोलाचे ....आणि गरजेला पैश्याची निकड लागतेच.. मग व्यवहारी जगणे आले.. आणि मग पुन्हा कायम, आपल्या मुलांच्यात ही लहान होउन जगता न आल्याचे शल्य पण .. त्यामुळे मुलांशी मैत्रीपुर्ण वागताना लहान व्हायचे.. आनंद साजरा करायचा अगदी त्यांच्याच पद्धतीने.. पण नंतर पुन्हा व्यवहारी बनायचे.. बहुतेक हे असेच करावे लागत असेल जगताना... कदाचीत त्यामुळे निदान अपेक्षांचे शल्य तरी नाही बोचणार .... अपेक्षांचे ओझे आपणच आपल्यावर टाकत जातो .. बहुतेक आपण विचार जास्त करतो .. त्याचेच हे ओझे.. मग आपण जर विचार जास्त करतो तर आपण लहान कसे होऊ .. मग विचार करने सोडुन ही देता येत नाही... हे असेच असते.. अनेक प्रश्नांचे उत्तर आपण एकच करुन ठेवलेले असु शकते.. त्यामुळे उत्तरे बदलायला .. निटसे पुन्हा उत्तरे सुधारायला लागलेच पाहिजे ....

गणेशा 09/06/2015 - 12:57
आत्ताच.. पाउस, ती आणि मी चा भाग १ वाचला आणि थोडे मनाशीच बोलावेसे वाटले.... च्यायला, या असल्या कथा वाचल्या की आमचे काय होते काय माहित .. सगळ्या कॉलेज च्या आठवणी सरसर डोळ्यापुढे येतात. तिच्या डायरीतल्या शेवटच्या पानावरील या ओळी मात्र लगेच आठवतात "तू अशीच हसत रहा... सर्वांचे मन मोहत रहा... माझी नसताना पुन्हा... माझीच होत रहा... " तिने मला डेडिकेट केलेले हे गाणे मात्र माझे ही आवडते गाणे झाले आनि कायम ऐकतो ... " --- --- आते जाते.. ह्सते गाते..सोचा था मैने मन मे कई बार.. ओठो की कली, कुछ और खिली...ये दिल पे हुआ है किसका इफ्तियार तुम कोन हो.. बतलातो दो.. क्यो करने लगी मै तुमपे एतबार खामोश रहु .. या मै कह दू .. या कर लु मै चुपकेसे ये स्विकार यही सच है शायद मैने प्यार किया हा हा तुमसे मैने प्यार किया ... " आठवणी या अश्याच असतात.. प्रेम प्रत्येक वेळेस सफल होईल असे नाही.. पण माणसाने आपल्या नजरेत कधी पडु नये असे मला वाटते.. कोण कधी कोठे असेल .. आणि आयुष्यात फिरुन कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही .. माणसाने माणुसकीने जगले पाहिजे.. भले एकत्र असु नाही तर नसु.. स्वाभिमान मात्र माणसाने कधीच गहान टाकु नये.. आजकालच्या प्रेमात पडलेल्या पोरांकडे बघुन एक खिन्न भाव समोर येतो .. काय ते लागट ..लाचार.. मागे मागे फिरणे.. प्रेम हे असे नसते.. तुम्ही कसे ही असा.. मनातुन कसा आहे हे महत्वाचे..... स्वाभिमानाने प्रेमात जगलेले दिवस आठवले की अजुनही छान वाटते..... त्यानंतर सर्वांचे ब्रदर टाईप मटेरीअल असा आलेला उल्लेख ही आवडला.. कारण नंतर मी कधी मुलींवर प्रेम केलेच नव्हते.. आमची ही आयुष्यात येई पर्यंत.... आणि अचानक ब्रदर टाईप मटेरीअल चे .. हीच्या साठी हजबंड टाईप मटेरीअल मध्ये रुपांतर झाले हे कळलेच नाही...

गणेशा 29/05/2015 - 14:32
आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस मात्र शनिवार - रविवार असले तरी मनाचा सुट्टीचा दिवस शुक्रवार ... शुक्रवारी मन खुप मुक्त पणे भरकटते... कधी ते असेच सरळ त्या काळसर डोंगरावर चढुन जाते... कड्या-कपारीतुन फिरुन येते... उन्हातान्हातुन .. सावलीतुन हळुच गिरकी घेवुन येते कधी झाडांच्या फांदीवरुन.. पानांवरुन हलकेच परत येते... कधी मिट्ट काळोख्या रात्रीतील त्या अमुर्त स्वप्नाला अलगद मिठी मारुन येते... कधी हलकेच घराच्या खिडकीतुन पहात राहते... खिडकी.. खिडकी ही मनाची अशी जागा.. की त्यातुन दिसणार्‍या इवल्याशा आभाळावर ही मन आपले राज्य प्रस्तापित करु पाहते... तासन तास त्या आभाळाच्या तुकड्यावर प्रेम करत, ताटकळत उभे असते... आपले अस्तित्व त्या आभाळाकडे जणु ते सुपुर्त करुन देते... मनाचे अस्तित्व कोणी मान्य करो वा न करो .. त्या आभाळाने कदाचीत ते मान्य केले असेल . ------- २९/५/२०१५, १४:३२

In reply to by गणेशा

प्रचेतस 29/05/2015 - 14:47
आज आभाळ भरुन आलंय. मला भरलेलं आभाळ फार आवडतं कारण त्यातूनच बर्‍याच वेळा पाऊस येतो. मागच्या पावसाळ्यात कुठे बाहेर भटकणं झालंच नाही फारसं. याखेपी मात्र भरपूर फिरायचा विचार आहे. मी विचार फारसा करत नाही असे लोक म्हणतात. काही लोक तर तुम्ही निरथक अत्मरंजन करताय असंही म्हणत असतात. निरर्थक अत्मरंजनातूनच माणूस भ्रमवादाचा बळी ठरतो. हल्ली तर आत्मकुंथित भ्रमवादाची मोठी फ्याशन आहे....

In reply to by गणेशा

आम्ही कामगार वर्गात मोडत असल्यामुळे शुक्रवार हा आमच्या साठी आठवड्याचा पहिला दिवस. कालच्या दिवसभरात बायकोनी हातात टेकवलेल्या यादीमधली कोणकोणती कामे राहीली आणि ती आता कशी करायची, पुढच्या गुरुवारवर काय ढकलायचे, त्याचे हिशेब मांडत, आणि आज दिवसभरात ऑफिसमधे काय करायच ते ठरवत पोचले की समोर दुसरेच काहीतरी (साहेबांच्या मते) अतिमहत्वाचे वाढुन ठेवलेले असते. त्यातच वाया जाणारा शुक्रवार दिसत असतो. आपण आपल्यावरच (आणि साहेबावर) चडफडत काम सुरु करावे तर गणेशा सारख्या कोणत्या तरी मित्राचा फोन येतो "शनिवार रविवारचा काय प्लॅन आहे? येतोस का राजगडावर?" मग आम्ही ओशाळावाणे हसत त्याला सांगतो आम्ही दत्तभक्त आहोत म्हणून. "अरे हो.. तू सांगीतले होतेस मागच्या वेळी. सॉरी विसरलोच. पण च्यायला बर आहे रे तुझे, गुरुवारी सुट्टी असल्या मुळे बाहेरची कामे तरी होतात. आम्हाला बाहेरची कामे कराची तर एक हाफ डे तरी वाया घालवायलाच लागतो." अशी मुक्ताफळे उधळत मित्र फोन ठेवतो. आणि आम्ही परत कामाचा ढिगारा उपसायला लागतो. पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 14:40
अरे बाबा अस्तित्व कोठे कोणास असते .. त्या सुगंधाला ही माहीत नाही .. त्याचे अस्तित्व काय आहे ? .. त्या वार्‍याला ही माहित नाही त्याचे अस्तित्व कोठे आहे .. पण मग हे आकाश काय आहे.. त्याच्या अस्तित्वाची पुसटशी रेघ म्हणुन का क्षितिजापाशी ते खाली वाकलेले आहे... का निसर्ग त्याचे अस्तित्व दाखवत आहे.... अश्या नेक प्रश्नांची शृंखला मनात घर करुन आहे... कधी वाटते.. मनाप्रमाणे वागावे.. वाट्टेलसे.. पण कधी वाटते.. आपण उलट निट वागत आहोत.. समाजातील ह्या चालीरीती.. नियम आपण पाळत आहोत.. मन उगाच भरकटलेले आहे.. कधीही कुठेही कसे ही गेले तर चालेले का ? प्रत्येक प्रश्न .. त्याचे अस्तित्व यांना उत्तर खरेच द्यावे का ? मनाचे अस्तित्व मान्य केले तरी मनाप्रमाणे वागले तर कदाचीत येथे आपण वेडे ही ठरु शकु .. आपण नकी काय विचार करत आहे हेच आता कळत नाही.. मनापासुन आपण आचरणाचे नियम पाळत आहोत .. की आचरण करताना मनापासुनच आपण थोडे लांब चालत आहोत .... --- २९/५/२०१५, १४:४०

गणेशा 29/05/2015 - 14:54
प्रश्नांच्या या पानगळीत... उत्तरे दवबिंदुंसम ओली.. हलकाच स्पर्श ओळखीचा... मग उरतात फक्त रिक्त जागा... उडुन गेली अशीच उत्तरे.. त्या प्रकाश किरणांसंगे.. जो दाखवे वाट जगाला.. त्यातच उत्तरे विलीन जाहली.. मग प्रश्न का उरले येथे.. का अस्तित्व ना मिटले काही.. का ओळखीच्या खाणाखुणा शोधतो जणु मी त्यावरी असेच सरली वर्षे .. असेच संपले सारे.. आयुष्याच्या शेवटाला तरी प्रश्न का उरतोच आहे ? ----- २९/५/२०१५, १४:५४

गणेशा 29/05/2015 - 14:59
आभाळ भरुन आलं की.. मला गच्च हुंदक्यांची आठवण येते.. का कोणास ठावुन .. तन भिजवणारा पाऊस माझं मन कदाचीत भ्हिजवत नाही.. कोरड्याच मनाने मी पाहतो मग .. भरुन आलेल ते आभाळ.. ते गच्च आभाळ.. कधीतरी मनाची कोरडीच वीज चमकते .. आणि उठतो आगडोंब मनात... हे मानाचे काहुर ... कसे थांबवावे .. काहीच कळत नाही... हलकेच नंतर पाहताना .. आभाळ निवाळलेलं असत मनात मात्र तेच आभाळ पुन्हा पुन्हा भरुन येत राहते .. बस्स असेच पुन्हा पुन्हा भरुन येते...

गणेशा 29/05/2015 - 15:08
शनिवारी ..रविवारी सगळी मित्र मंडळी.. अशीच फिरायला जातात... आमच्या गुरुवारच्या सुत्टीमध्ये कामे होतात म्हणुन म्हणे त्यांना कौतुकेच जास्त असतात.. डोंगरावरच्या मैनीची ओढ बाकीच्यांना असते.. काटेरी झुडपात तीची अवस्था मात्र आपल्यासारखीच असेल असे सहज वाटुन गेले... आज मी असाच काम करत होतो ... ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? " मी : का गं ? ती : अरे त्याच्याबरोबर ट्रेकिंगला चालले आहे शनिवार- रविवारी, तुला सुट्टी असते गुरुवारी मला खुप कामे आहेत नेमकी ऑफिसला .. तु करशील का ? मी.. हो .. मी (मनात) : दत्त गुरु हे बरे नव्हे .. हलकेच फुलपाखरु जवळ यावे.. आणि ते पुन्हा दूसर्याच्या कळपात शिरावे... हे फक्त तुमच्या ह्या वारामुळे .... तुम्ही तरी हे मनाचे दु:ख समजुन घेताल का ? --- २९/५/२०१५, १५:०८

In reply to by गणेशा

ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
च्या ऐवजी
ती : " दादा... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
असे हवे होते का? पैजारबुवा,

प्रश्र्णांची भिजकी पाने पाठीवर माझ्या पडता उरफोडून धावत सुटतो फिरुनी क्षणही न बघता गलितगात्र मग एक पळी मी कोसळता धरणी वरती देवाचा धावा करतो मी मज तारुन नेण्यासाठी, देवावर ठेवून भिस्त मी दबकत दबकत वळतो पाचोळा पाहून मागे मी क्षणभर मलाच हसतो, पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 15:46
@ पाचोळ्या: पाचोळ्या, मी पाहिलं तुला, डोंगरकडेवरुन तु स्वताला झोकुन देत होतास ... पण का ? कश्यासाठी ? मी असाच फिरत होतो ... तुला मी मुक्त वाटतो .. पण मी स्वैर भतकत असतो.. मलाही नाही कुठलीच दिशा... असेच अस्तित्व वेदणेचे मी पंखांवर घेवुन फिरतो डोंगरदरयामध्ये.. झाडातुन.. पानांतुन.. अनी मित्रा तुझ्या सोनेरी पाउलवाटेवरुन ही.. रोज सकाळी तुला वाटते.. कोण बरे ही असंख्य दवरुपी आसवे तुझ्या अंगावर ठेवुन जातो ... तो मीच आहे.. माझ्याच अस्तित्वाच्या त्या विखुरलेल्या खुणा आहेत.. तर हा , तुला पाहिले मी त्या दोंगरमाध्यावरती.. मी अलगद आलो .. तुला झेलण्यासाठी.. तु हळुच वार्‍यासंगे डुलत खाली चालला होता... मी आलो तुझ्यापाशी .. तर तु पुन्हा चिंब ओला झाला होता.... मग हातात हात घेवुनी आपण तेथेच विसावलो त्या तिथल्या झाडाखाली... असंख्य तुझ्या प्रश्नांना मी प्रश्नांचीच उत्तरे देत होतो .. आठवते ना तुला ? -------- २९/५/२०१५, १५:४५

साले आभाळही आता पहिल्या सारखे आपले राहिलेले नाही त्याच्या कडे बघताना आता मन पहिल्या सारखे प्रसन्न होत नाही उलट तिच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा मात्र ओल्या होतात आणि मग ढगाच्या एखाद्या तुकड्या मधे तिचा चेहरा शोधू लागतात तेवढ्यात सूर्यावर एखादा काळा कुळकुळीत ढग येतो तिच्या सोबतीने भिजलेल्या पहिल्या पावसाची आठवण करुन देतो त्या नंतर जोरदार वार्‍याची आणि कडाडणार्‍या विजेची पाळी असते क्षणभर चमकणार्‍या त्या उजेडामधे मला घट्ट बिलगलेली ती मला दिसते .... क्षणभरच....मग... अंगावरची शाल आणि कानटोपी आणखीनच घट्ट लपेटत मी उठतो आणि दारे खिडक्या बंद करुन डोक्यावरुन पांघरुण ओढून झोपतो नातवंडे म्हणतात म्हातारपण फार वाईट, अजोबांना आजकाल काहीच सहन होत नाही मी मनातच म्हणतो, खरच वाईट कारणजे सहन होत नाही ते कोणाला सांगताही येत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गणेशा 29/05/2015 - 16:11
असा शिल्लक रिप्लाय देणार नव्हतो .. पण ही कविता आता पर्यंतच्या सर्व रिप्लायमधील एक हिरा आहे, अत्यंत उत्कट .. निस्सिम ... याला उत्तर लिहिणे अवघड आहे.. सहज आठवले आधीचे सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी

In reply to by प्रसाद गोडबोले

त्या दुरच्या डोंगरातून, शांतता पसरत खाली येते आणि मी माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे, वेध घेत कशाचा ? त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे माझे विचार भविष्यात ( ?) तर परावर्तित होत नसतील ना ?

गणेशा 29/05/2015 - 16:08
तुझ आभाळ मला दे .. माझ आभाळ तुला .. झाकोळल ज्या हाताने सूर्याला तो जख्मी झालेला सुर्य ही मावळताना मला सोनेरी किनार परिधान करतो.. असंख्य तांबडे पिवळे रंग माझ्यावरती टाकतो ... बघ तु जेंव्हा माझ्याकडे पाहतो , तेंव्हा मी तुला अशीच दिसते का रे ... तांबडे कुकू कपाळावर ल्यालेली .. सोनेरी किनारेची साडी नेसलेली .. सांग ना .. अगद्दी तसीच का रे आहे मी अजुन तुझ्या डोळ्यात .. अन मग बरसतो पाऊस तुझ्या माझ्या डोळ्यात ... अंधुक होतात काळाचे पडते ... अन .. ते काळे क्षणही... फक्त क्षणभर ... मग ... तू पुन्हा सकाळी उठलेला असतो .. सूर्याच्या जखमा कधी कोणास दिसल्यात का ? बस्स .. माझे रुप पाहण्यासाठी तो मात्र त्याचे रक्त त्या जखमांमधुन संध्याकाळी असेच सांडवत असेल ... तुझ्यासारखेच ------ तुझी ती २९/५/२०१५, १६:०७

निखारा नेहमी दुसर्‍याच्या तळहातावरच तेजस्वी भासतो मग आपण अशा पुरुषाची देव म्हणुन भक्ती करु लागतो खरेतर नियती प्रत्येकालाच समान संधी देत असते पण त्यावेळी बहुतेकांना वाळूत तोंड खुपसायला आवडते पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 17:01
धन्यवाद... आता निघतो आहे, सोमवार-मंगळवारी पण सुट्टी टाकली आहे, तरी नेट गावाला चालल्यास येतो अधुन मधुन ... उद्या असेल शक्यतो थोडावेळ... पुन्हा लिहितो आल्यावर.. तो पर्यंत आनखिन रिप्लाय येवुद्या ... छान आहे सर्व .. पैजारबुवा खुप आभारी आहे तुमच्याशिवाय ही शृंखला जमलीच नसती असे वाटते.. तुमच्या आभाळ हे मनातील उत्कट भावनांचे चित्रण हे आजचे फलित ... सर्वांचे आभार ... आनखिन रिप्लाय येवोत ही इच्छा !

हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ...मन रमत नाही यात...त्या खळाळणार्या रेवेत दिसणारं ओथंबलेलं आभाळ परत कधी दिसणार म्हणुन वाहणारे डोळे नक्की कशाची चाहुल देत होते...तुझ्या गमनाची वार्ता होती त्या आकाशाला....म्हणुनच नुसते भरुन आले होते ते....पुर्ण प्रवासात नर्मदेपेक्षा रेवाच जवळची वाटली रे....तीचेच प्रतीरूप.तरीही वेगळे अस्तीत्व दाखवणारे...आपलेही असेच नाही का?तुला माझ्यातुन वगळले तर बाकी काय उरेल...पण उरलेय अजून..तुझ्याशिवायचे सगळे ऋतु अनुभवत...फक्त आता तीचा राैरव नाही..अन् तुझी गाजही..पण आभाळ गाभूळतंच रे त्याच्या काळात...फक्त अनुभवायला तु नसतोस सोबत....असतो एक तुकडा आभाळाचा...मी आपला समज करुन घेते की बघतोयस तु..त्या आभाळाच्या झरोक्यातून..

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

नर्मदा किंवा रेवा सतत प्रवाही असतात, कुणासाठी थांबत नाहीत कारण माहित आहे?.... वहात रहाणे महत्वाचे हे त्यांना माहीत आहे... सतत वहात रहाणे... जगात केवळ एकच गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे बदल...... काही कोटी वर्षांपूर्वी जेव्हा हा सूर्यही अस्तित्वात नव्हता तेव्हाही मी होतोच.... आजूबाजुला कितीही काहिही बदलले तरी..... कालही मी होतोच आजही मी आजही आहे आणि उद्याही असणारच आहे....निरंतर रहाणार आहे.... नर्मदाही मी आणि रेवाही मी, आभाळही मी आणि चारही़ ऋतू म्हणजेही मी, सूर्यही मी आणि काळही मीच. मी केवळ स्वतः कडे निरनिराळ्या कोनांमधून पहात राहिलो आणि हा खेळ बघता बघता वाढतच गेला..... कधी कधी मीच माझ्या या खेळात गुरफटून जातो...... आणि स्वतःच स्वतःला शोधत रहातो.... फार मजा येते असा स्वतःचा शोध घेताना..... पैजारबुवा,

मस्त रे गणेशा! या प्रकारच्या लेखनाचा हा विचारच भारी आहे. उस्फुर्त म्हणजे एकदम उस्फ़ुर्तच ! त्यासाराखे दुसरे भारी काहीही नाही. कारण त्याला कसलेही बंधन नाही. ना विषयाचे, ना वेळेचे, ना कोणाला आवडेल/नावडेल का? असल्या विचारांचे! मनात आले ते उतरवून गेलो. पुसले जाइल की राहील याची तमा न बाळगता! कोणाला आवडो नावडो ,स्वच्छंदि लिहिन मी कुणी जवळ थांबतय की नाही याची अर्थातच..तमा न बाळगता! एक ओळ होवो,वा एक पान भरो वाचलं गेलं तरी लिहिन , न गेलं तरीही!.. अगदी कुणी उघडून पाहिलं की नाही? याचीही तमा न बाळगता मग उस्फ़ूर्ततेचे उद्यान होइल, स्वच्छंदि बागडणाय्रा फ़ुलपाखरांसाठीचे! तिथे फ़ुलं असतील? ,नुसतीच पानं? ,की काटेहि??? .. निश्चितच! याचीही तमा न बाळगता!

गणेशा 31/05/2015 - 00:29
@ पैजार बुवा...@ भाग्यश्री प्रवाह .... आहे ना ... गती आहेच.. पण हे वर्तुळ ...त्याचा परिघ... मला ओलांडताच येत नाहिये.. त्या गाभुळलेल्या आठवणी अजुनही पिंगा घालतात सभोवताली... त्या प्रत्येक क्षणांचे ओरखडे .. हो ओरखडेच आणि ते अजुनही काळाच्या पडद्याआड लपुन हळुच माझ्याकडे पाहुन खुदकन हसतात ... माझ्या मनाच्या झरोक्यातुन पुन्हा ते काळाला छेदुन जुन्या दिवसात जातात.. आणि माझे मन असे असंख्य ओरखडे घेवुन पुन्हा खालमानेने गपचुप निघुन येते... परिघ ओलांडण्याची किंमत माझ्या मनाला माहितेय... मी मात्र अजुनही त्या परिघावरील एक बिंदु बनुन राहिले आहे.. जगासाठी मी त्याच वर्तुळावर रोजचेच प्रवाही आयुष्य जगते आहे... आणि तुझ्यासाठी... हा तुझ्यासाठी मी अजुनही तेथेच आहे... त्या जागीच... त्या परिघावरच तुझी अजुनही वाट पहाते आहे...

गणेशा 31/05/2015 - 00:57
काल रात्री पुन्हा पाऊस आला होता.. मी गच्चीत झोपलो होतो... त्याच्या त्या येण्याने झोप मोडली ... पण मग असे वाटले बरेच झाले... भरलेल्या आभाळाची ती मजा रात्रीत तरी मला निटशी घेता आली नसली तरी भटकण्याची एक चाहुल तेथे ही होती.. आजकाल असच होते... मनाच्या कप्प्यात असंख्य वादळे दाटलेली असतात.. आणि मग त्या करुन कहाण्यात आपण कधी ओढलो जातो ते कळतच नाही... पण त्या कप्प्यांमध्ये आत्ताचा स्पर्ष ही न झालेले कोवळे आभाळ ही बसु शकेल ना..? हा एक नविन कप्पा मला आता केलाच पाहिजे.. अगदी मनसोक्त भटकायच.. पाउस असाच झेलत पुढे चालत रहायचे.. निसर्ग..त्याचे विहंगम चित्रे पुन्हा पुन्हा या नव्या कप्प्यात साठवायचे... काय माहीत पुन्हा केंव्हा तरी हा कप्पा हळुच उघडला की एक निसर्गाचा देखावा कायम पहाता येइल .. पण या कप्प्यात फक्त मी आणि निसर्ग नकोय ... तु पण असशील का ग सोबत... मी.. तू आणि निसर्ग ....

गणेशा 01/06/2015 - 00:29
आज १ जुन, वडिलांचा वाढदिवस .... बारामतीला आलोय ... पाउस पडलाय आज... वातावरण शांत ... बर्याच गोष्टी आठवुन जातात... वाढदिवस तसा आम्ही कोणाचाच साजरा करत नसु.. पण घरात गोड - धोड केले जाई.. आज ही असाच बेत आहे... प्रत्येक वाढदिवशीच सारे काही आधीचे आठवते असे काही नाही...पण या दिवशी त्या आठवणींना थोडा भावनेचा स्पर्श जास्त असतो .. संस्काराची शिदोरी अशीच .. त्या पिढीकडुन आपल्याकडे आली... प्रामाणिक पणा, चिकाटी... सतत कार्यरत राहणे या गोष्टी त्यांच्याकडे पाहुनच आपण शिकत आलो... नाही असे नाही.. बर्याच गोष्टीत वेगळे विचार-- हेतु आहेच .. पण सारासार विचार करता ते जास्त बरोबर ... सुख हे पैश्याच्या श्रीमंतीवर नाही.. तर मनाच्या समाधानावर अवलंबुन असते... समाधान आणि सुख ह्या खरे तर वेगळ्या गोष्टी... आपल्या कडे जास्त चैनीच्या गोष्टी म्हणुन आपण सुखी.. पण त्यांच्याकडे आत्मिक समाधान जास्त ... दूसर्‍यांप्रति असणारा आदरयुक्त भाव... स्वता हालाअपेष्टा सोसुन घरातील प्रत्येकाला स्व-कर्तुत्ववान बनवण्याची धडफड .. निरपेक्ष प्रेम... स्वता पेक्षा इतरांच्या सुखा साठी आयुष्यामधील अनेक क्षण वेचले असल्याने ते जास्त समाधानी... बर्याच दा मनात येते .. माणसाने समाधानी असावे... सुख त्या समाधानाकडे आपोआप खेचले जातेच ... आपण उलटे करतो .. समाधाना पेक्षा सुखाकडे आपला कल जास्त असतो.. त्यामुळे कधीच आपले समाधान होत नाही.. आणि सुखाची एक एक पायरी आपण वाढवत जात राहतो ... नक्की आपण कुठल्या पायर्‍या चढतो आहे हे जेंव्हा जाणवते .. तेंव्हा समाधानाच्या सिमेरेषेपासुन आपण बरेच पुढे आलेलो असतो ... मग आपल्याला कळते आपला रस्ता चुकीचा आहे.. हे कळणे ही कदाचीत महत्वाचे..

In reply to by गणेशा

पळत्याच्या पाठी | लागू नये कधी| हाती लागे अंती| काही नाही|| शेजार्‍याच्या चार | अलिशान कार| आपली स्कूटर | खरी असे || शेजार्‍याची भार्या| दिसते ऐश्र्वर्या| तुझे रुप आर्या|अभिषेक नाही|| सुख समाधान |असती समान जेव्हा तुझे मन| स्थिर असे|| अंतरीचे ध्यान | पहावे करुन खरे समाधान| चित्ती वसे|| बुवा म्हणे राम| नामाचे भजन दुर करी भ्रम| अंतरीचा||

गणेशा 02/06/2015 - 00:04
पाऊस मला वाटते नेहमी तरुणच असावा... त्याला पाहिले की त्या सर्व मोहक आठवणी जाग्या होतात... त्या आठवणींप्रमाणे पावसालाही चिरतारुण्याचे वरदान मिळालेले असेल असेच वाटते.... वर्षातला पहिला पाउस मला पहिल्या प्रेमाप्रमाणेच भासतो...उत्कट ..निर्मळ..अतिव...हवाहवासा... त्या चिरतरुण आठवणींचे मेघ हा असाच दरवर्षी माझ्यावर बरसवत असतो... मग मला जयश्री आठवते... माझं पहिले प्रेम... निर्मळ ...निरागस... तासनतास मारलेल्या गप्पा....ती स्वप्ने ... त्या अनाभाका.... कॉलेजला एकत्र केलेला अभ्यास... तो हवाहवासा स्पर्श ... ते हळुच लाजणे... हवाहवासा वाटणारा हा चिरतरुण आठवणींचा काळ आणि पहिला पाऊस यांचे नातेच एकदम घट्ट... पहिल्या पावसानंतर पावसाच्या आणि आठवणींच्या अनेक सरी बरसतच असतात ... बेलगाम... स्वैर.. मुक्त... बेभान... या तारुण्याच्या कित्येक छटा या पावसात मला आठवतात.. तारुण्याच्या या स्वैर..मुक्त..बेभान आठवणी समोरुन झरकण पुढे सरकतात.. गच्च हिरव्या रानातुन जसे पाण्याचे असंख्य झरे वाहत असतात.. तसेच मनाच्या कड्यांवरुन अनेक विचार... अनेक गोष्टी अश्याच उड्या टाकत होत्या हे आठवते ... असंख्य झरे.. असंख्य ओल्या वाटा... गर्द धुक्यात फक्त आपण ..मुक्त.. स्वच्छ... शेवटी वळवाचा पाऊस येतो...अफाट...अचाट...असह्य..अचानक आलेला... तारुण्यातील या गर्द धुक्यातुन .. असंख्य वाटातुन आपला रस्ता आपल्याला त्यात शोधावाच लागतो ... नाहीतर एकदा हरवलो की आपलाच थांग लागणे कठीण... वळवाच्या पावसाचे ही असेच ... अचानक..अफाट... वळवाचा पाऊस असाच जीवनाचा हमरस्ता शोधुन देण्याचे काम करतो... गच्च हिरव्या रानातील असंख्य आपल्याशा वाटणार्या वाटा असह्य पणे आपल्याला सोडुन द्याव्या लागतात.. कधी कधी अचानक समोर काहीच दिसत नाही... तरीही घट्टपणे मनाशी आपली वाट पक्की करुन आपण चालत रहायचे बस्स...

रातराणी 02/06/2015 - 04:15
आज पाउस यावा असं वाटतंय! मरगळलेल्या मनाला त्यानं स्वच्छ धुऊन जावं, मुळूमुळू रडत येण्यापेक्षा आज गर्जना करीत यावं, सभ्यपणाची शाल आज त्यान घरीच ठेवून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! मळभाची काळी चादर आज त्यान फाडून यावं, प्रेमाची भीक देण्यापेक्षा, मुक्त हस्ताने उधळीत यावं, माझ्या उधारीचा हिशोब आज तरी विसरून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! तहानलेल्या सृष्टीला आज त्यान मिठीत घ्यावं, चिंब चिंब भिजवून तिला तृप्त तृप्त करावं, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आज त्यानच मिटवीत जावं!

भीमराव 02/06/2015 - 13:26
वारामागुन वार येतो अन तसाच निघुन जातो. हल्ली कशाचं काहीच वाटत नाही जे सोमवारचं ते च रवीवारचं. पाऊस येतो पडुन जातो, फुले फुलतात सायंकाळी कधीतरी मग नंतर माना मुरगाळुन तशीच पडुन राहतात. मी मात्र तसाच बसुन असतो. धुंदीत जगत असल्या सारखा. टेकडी वरून दीसनारा सुर्यास्त पाहुन किती दिवस झाले हे तर आठवत सुद्धा नाही. कधीतरी लहर येते पावसात भिजायची, मोठ्याने आरोळी ठोकायची. वाटतं वेडं वाकडं धावावं, पाण्यामधे डुंबावं. पन ही इच्छा सुद्धा मनात कुठेतरी जिरून जाते. कुठेतरी विटी दांडु अन लगोरी- गोट्या असले काहीतरी चालुच असते, मी मात्र मान ताठ करून निघुन येतो. पडनारा पाऊस तुषार, वर्षाव, शिडकावा,श्रावण धारा असलं काही का असेना मी त्याला चिकचीकच म्हणतो. खिडकीवर आलेलं पाखरू सुद्धा आताशा किलबील करने सोडुन कलकलाट करू लागलय तरी बरं मला अजुन माझाच त्रास होत नाही.

In reply to by भीमराव

विहिरीच्या काठावर उभा राहून आजकाल मी विहिरीत नूसते डोकावून बघतो पाण्यात पाय घालायला सुध्दा नको वाटते, काही वर्षांपूर्वी मी सहज विहीरीच्या तळाशी टाकलेले नाणे घेउन येत असे, माझा मुलगा मात्र बिनधास्त उडी मारुन विहिरीतून नाणे काढून आणतो, तो वर येई पर्यंत मी विहिरीचा काठ घट्ट धरुन, पाणी कधी हलतय त्याची वाट बघत पाण्याकडे एकटक पहात उभा असतो, अगदी माझे बाबा उभे असायचे तसाच, मी त्या वेळी बाबांना हसत असे, आणि आज माझा मुलगा आणि माझे बाबा दोघे मला हसतात, आजकाल माझे हे असे का होते? काही वर्षांपूर्वी अमर्यादीत थाळी देणार्‍या हॉटेल मधेच आवर्जून जाणारा मी, आजकाल अर्धा वडापाव टाकून देतो, जात नाही म्हणून, "टाकु नका मी खातो" असे म्हणताना माझा मुलगा दात दाखवत मला हसत असतो, आणि माझे बाबा कवळी सांभळत त्याला साथ देत असतात, आजकाल माझे हे असे का होते? रात्री उशीरा पर्यंत झोप येत नाही, डोक्यात सतत काहीतरी विचार येत असतात, त्या वेळी माझा मुलगा एकाग्रपणे अभ्यास करत बसलेला असतो, आणि बाबा मनलावून कोणता तरी जाडजुड ग्रंथ वाचत असतात, मी मात्र तळमळत इकडून तिकडे फेर्‍या मारत असतो, ते दोघे डोळे मिचकावून एकमेकांकडे बघत, मला हसत असतात, आजकाल माझे हे असे का होते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आजकाल माझे हे असे का होते? मनाच्या गाभार्‍यातुन उमटणारे गुढ प्रश्न आत आत दाबून टाकावेत मनमुक्त होऊन उधळून झुगारावेत असचं वाटत असतांना पायात एक अनामिक बेडी जाणवत राहते असं कां? --- साधी कागदी होडी बादलीतल्या पाण्यावर तरंगतांना बघून लेकीच्या डोळ्यात आलेली लकाकी बघून मन हरखुन जाते पुढच्या क्षणी तिच्या स्वप्नांची होडी तिराला लागेल की नाही या विचाराने जीव कासाविस होतो.. असं कां? ----- अल्याड मी असतो पल्याड स्वप्न असतात मध्ये भला मोठ्ठा जलाशय कधी मन उचल खातं म्हणतं चल मार उडी.. परत तेच मन हात धरुन मागे ओढत राहतं असं कां? -------------------------------------------- काय लिहीलय मी माहीत नाही.. सहज सुचल. बाकी धाग्यावर नजर ठेवून आहेचं. येईन परत.

रोजचा आला दिवस सरताना मागे काही ठसा ठेऊन जातो.कधी ठळक कधी पुसट..काही बोचलेले शब्द काही रेंगाळणारी गुपिते.तर कुठे मनाच्या कोपर्यात जपलेला हिरवा गारवा.काहीही मागे ठेवायचे नाही म्हणताना लेकीची गळामिठी प्रेमाचा ठसा ठेऊन जाते.आणि मी मात्र लांब दिसणारं धुसर चित्र जणू हातात आल्यासारखी नादावते...परत उगवणारा उद्या पायातल्या मणामणाच्या बेड्या संभाळत कोलु पिसु लागतो.अखंड चालणारा हा अविरत घाणा.सुखाचे वंगण अन दुःखाची धार लावुन पळत राहतो.दिसामाजी कापलेले अंतर बघु गेलो तर मागे उरतो माझ्याच पायानी बनलेल्या वतृळाचा ठसा....

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

पैसा 10/06/2015 - 21:44
प्रवास सुरू झाला तेव्हा कुठे जायचंय हे माहीत नव्हतं, किती वेळ लागेल हेही माहीत नव्हतं. अर्धा रस्ता संपला तरी अजून कुठे जायचं हे माहीत नाही अन किती चालायचं हेही माहीत नाही. पावलं तीच, मीही तीच, रस्ताही तोच. सुरुवात झाली तेव्हा लहानशी पायवाट होती. बाजूंनी फुलं होती सगळी. आणि डोक्यावर गर्द सावली. हळूहळू झाडी विरळ झाली. फुलं सुकली आणि डोक्यावर ऊन भाजू लागलं. तरी वाट सरता सरेना. कधीतरी वार्‍याची झुळूक ह़ळूच येऊन गालावर रेंगाळून जाते. माथ्यावर ढग दुरून जराशी सावली देतो अन कधीतरी एखादी पावसाची सरही. आताशा सावलीही पायातळी आली आहे. सुरुवात कशी होती तेही आज धूसर चित्रासारखं आठवतं आहे. शेवट कसा असेल माहीत नाही. आज, आता इथे आहे एवढंच खरं. पण एकच माहीत आहे की मला चालायचं आहे. बाकी सगळे निघून गेले तिथे जाण्यासाठी. पाय साथ देतील तोपर्यंत.

In reply to by पैसा

गणेशा 11/06/2015 - 12:25
ती ज्वारीची शेते .... पाणांवर दवबिंदू ल्यालेली शहारलेली कोवळी पाने... गावाचा तो शेतावरला बांध... काळीकुट्ट जमीन.. आणि त्या काळ्याश्या ठिसुळ ढेकळाला हळुवार पणे भिजवत पुढे चाललेले पाणी.... ती दगडी भिंतीची ओबढ शाळा.... सुंदर झाडलेले आणि सभोवताली अशोकाची उंचच उंच झाडे असलेले पटांगण ... ती पळसाकडील विहीर... तासनतास मारलेल्या गप्पा.. एकत्र केलेला अभ्यास.... ती अनामिक हुरहुर .... सुगंधाचे क्षण.. फुलांचे सांजेला मोहक लाजणे... तो चंद्र .... तो अनामिक दूरावा... ते सैल झालेले मायेचे पाश... त्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा.... ते ओठांआड थांबलेले शब्द .. ते हिरव्या बांगड्यांचे लेणे घेतलेले पण त्या क्षणी अतिव ओढीने थरथरणारे हात.... तो अंगणातील पारिजात... रात्री पडलेला फुलांचा सुगंधीत सडा... ती पहिल्यांदाच न उजाडू वाटणारी सुरेख ..गुलाबी सकाळ... ते इवलेसे टोपडे... इवलेसे स्वेटर... मऊ मनाला आनंदित करणारा स्पर्श... जीवनाचा सर्वोच्च आनंदी क्षण.... ती सकाळची गडबड ... ते कुतुहल.. दप्तराच्या ओझ्यांची चिंता... बंद केलेला टीव्ही ... ती काळजीळतली परिक्षा... हे अर्धे आयुष्य सरले आहे आता.. आयुष्याच्या ह्या एक एका फ्रेम ने मन अगदी काठोकाठ भरुन गेले आहे... पुढच्या प्रवासाची एक अनाम ओढ ... इवल्याशा काळजाच्या तुकड्यात गुंतलेला श्वास... आणि श्वासागणिक वाहिलेले वाहिलेले हे आयुष्य ..पुन्हा तो अंगणातला पारिजात...........

गणेशा 03/06/2015 - 12:55
@मिका.. कागदी होडी वरुन आठवले... गावाकडे अंगणात... पावसात.. पाणीच पाणी साठायचे... अश्या वेळेस क्रिकेट खेळता येत नव्हते म्हणुन मन नाराज होत असे... आणि मग आम्ही मोर्चा वळवत असु कागदी होड्या बनवण्याकडे... आम्ही म्हणजे मी आणि तायडी(ताई) ... तायडी या एकाच शब्दात कीती माया साठवलेली असते ना... या शब्दाच्या उच्चाराने पण मन प्रसन्न झाले... हा..तर या होड्या बनवायचो मी.. तीला पण मीच बनवुन द्यायचो .. तीला बनवायला येत नसत.. मग तासन तास त्या पाण्यात आम्ही खेळत असु..कोणाची होडी लांब जाते त्यावर पैजा लावत असु.. कसलीच चिंता नसायची तेंव्हा... कपडे खराब होण्याची.. अभ्यासाची... भविष्याची.. कसलीच नाही.. कीती मस्त दिवस होते ते.... आणि आता त्या पावसाची आपण वाट पाहत आहे.. पण त्या कागदी होड्यांप्रमाणे त्या बालपणीच्या आठवणींचे आपण काहीच करणार नाही का ? मला वाटते.. लेकीच्या रुपाने ते दिवस पुन्हा आपल्याकडे येवु पाहत आहेत.. तर मग तीच्या सोबत पुन्हा तेच दिवस जगायला आपण सुरुवात केली पाहिजे असे वाटते... कसलीच चिंता न करता.. म्हणुन मी पण आता पावसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहे... सहज मला आवडणारे गाणे आठवले यावरुन... एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी

नाखु 03/06/2015 - 14:15
खरच लहानाबरोबर लहान होणं सोपं असतं का? नसतंच कारण ज्या क्षणी तुम्ही विचार करता की मी लहान होतो आहे तेव्हांच तुमचं बाल्य हरवलेलं असतं. बाल्य कसे पाहिजे मित्रांअम्ध्ये दिलखुलास शेर्‍याला, हजरजबाबीपणाला आपोआप टाळी देणारा-घेणारा हात जसा उस्फुर्त आतून असतो अगदी तसाच. एकदा का तुम्ही बाल्यपणात आपोआप घुसलात की त्या नजरेने जग सुंदर दिसतं अगदी पुस्तकातल्या चित्रा सारखं स्वच्छ, निर्मळ. थोडी कट्टी थोडी बट्टी ,खोटा खोटा स्वयंपाक भातुअकलीच्या भांडयातून दिलेले बेदाणे-शेंगदाणे आपण फार मोठा चविष्ट पदार्थ खातोय असा भाव केल्याबरोबर डोळ्यांत ओसंडणारा आनंद, मध्ये लुड्बुड केली तर लटका राग हे खाली बसून बरोबरीने अनुभवायची गंमत आहे. कपड्यांची धुळीअगोदर, मोठेपणाची वस्त्रे झटकली तरच मस्ट. मी एका वर्षी दिवाळी किल्ल्यासाठी लेकीला आणि लेकाला माती-चिखलात हात घालून किल्ल्यासाठी मदत घेतली तेव्हा किल्ला कसा झालाय त्याहीपेक्षा ही नदी/हा डोंगर मी केलाय याचेच त्या दोघांना खूप अप्रूप होते.(अजून ही चित्रे माळावर आहेत) ह्या दिवाळीत काढावीच बाहेर, आपण का अड्वायच आपल्यातल्या !!!! ताईदादाचा बापूस नाखु

गणेशा 03/06/2015 - 15:49
आपल्या मनातील आपले विचार.. सहजपणे जेंव्हा असे बाहेर येवु लागतील.. आपल्याच लिखानातुन एक एक रुप घेवु लागतील, तेंव्हा त्यांना आपल्याला तठस्थपणे पाहता येवु शकेल... मग कुठल्या विचारांचे रुप आपल्याला बदलायचे.. कुठले चित्र कसे निट करायचे.. हे आपल्यालाच समजेल... आपणच आपल्या विचारांचे चित्रकार.. मुर्तीकार... कुठला टाका कुठे टाकायचा हे ठरवणारे ही आपण .. आणि कुठला रंग कुठे भरला की उठुन दिसेल हे ठरवणारे ही आपण.. निसर्ग ही असाच असेल नाही ?. प्रत्येक वेळेस एक वेगळीच निर्मिती साकारण्याचे सामर्थ्य ही त्याच्यात असेच आले असेल... स्वताच्याच निर्मितीस तठस्थपणे पाहणे ही पण एक कलाच...

हे सुरांनो चंद्र व्हा! काय रचना आहे... विरहणी म्हणजे काय ते हे गाणं ऐकून कळते. परीपूर्ण रचना.. अप्रतिम संगीत आणि अभिषेकीवुबा तर बिनतोड... एकाकी दुर माळरानावर ती उभी आहे. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आहे, आणि तिच्या मनातून उमटलेल्या वेदनेतून या रचनेने जन्म घेतलाय. पण वेदना कशी पोहचवणार? तर ती सुरांनाच सांगते, तुम्हीच चंद्र व्हा आणि चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा. काय कल्पना आहे ना? जीवघेणा प्रकार आहे. तसाच काहीतरी विचार डोक्यात ठेवून हे लिखाणः ---------------------- दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- वाट भरकटून अंधारात चाचपडत चाचपडत त्याच्याकडे पोहचण्याचा निष्फळ प्रयत्न माझा फसलाच परत एकदा --- वेदनेला शब्द सापडतात कधी कधी नि:शब्द तडफड एका क्षणात आकाश व्हावे सगळी वेदना कृष्ण मेघात भरावी आणि बरसावे... रिक्त होईस्तोवर --- आज परत एकदा पौर्णिमा आली आता अधीरता अगतिकता झाली बेचैनी रिक्ततेकडे झुकली अन् वेदना जिवावरचे दुखणे झाले तरीही दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा....

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम. अभिशेकीबुवांच्या गाण्याचा प्रश्र्णच नाही, त्याला काही तोडच नाही, पण हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली ती मुग्धा वैशंपायन https://www.youtube.com/watch?v=1qFJtCMqcK0 पैजारबुवा,

मिका, या झाल्या एका विरहिणीच्या व्यथा पण पुरुषांचे त्यांची प्रेयसी, पत्नी कुठे गावाला गेल्यावर काय कमी हाल होतात का ? हे बघा काय म्हणतो पास्तरनाक..... दरवाजातून आत बघितले माझेच घर मला ओळखू येईना अचानक तिच्या जाण्याने घराचा आणि मनाचा कसा गोंधळ उडाला आहे भयानक. ठणकणार्‍या वेदना आणि डोळ्यांतील अश्रू समजून नाही देत या अवस्था झालेल्या जखमा कशा मोजता येतील आणि कशाने ? मनात एक तीव्र कळ ऊठली. मी जागा होतो का स्वप्नात ? का माझ्या डोळ्यातील पाण्याने माझ्या बुद्धीवर मात केली आहे ? धुरकटलेल्या काचांमुळे का डोळ्यांतील पाण्याने हे जग मला पार तुटलेले वाटते आहे. मनोवेदनेत माझ्या का दिसत आहेत मला राक्षसी लाटा आणि तुटलेली घरे ? ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........

In reply to by जयंत कुलकर्णी

त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले
व्वाह...

In reply to by जयंत कुलकर्णी

ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. सुरेख. -दिलीप बिरुटे

प्यारे१ 03/06/2015 - 18:14
शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे अनिमिष नेत्रांनी बघत फ़क्त आस्वाद घेत राहावं.... शांतपणं मनाच्या खोल तलाशयात या रत्नाना साठवत राहावं... सरस्वतीच्या या पुत्रांना नतमस्तक होत निव्वळ न्याहाळत राहावं... एकेका मुक्तकासाठी/ कवितेसाठी तुम्हाला एक एक पार्टी लागू! मिपा वरचा अप्रतिमोत्तम वरचा क्रमांक असलेला एक धागा

गणेशा 03/06/2015 - 18:55
@ मिका आणि जयंत जी. एकोळी रिप्लाय ह्या धाग्यावर खरे तर द्यायचे नाही ठरवलेले आहे, पण तुम्हा दोघांच्या या अतिउच्च विचार/लिखाना ला सलाम तर करावा लागतोच .... तरीही जाता सुचेल ते लिहितोच. इतरांना मात्र एक विनंती एकोळी रिप्लाय शक्यतो नको.. वा.. छान ही नको.. त्या उलट शब्दांच्या थव्याने तुम्ही येथे या.. मनसोक्त जे वाट्टेल ते लिहा.. त्याची खरी गरज आणि एकदम धागा वाचताना ही मग मध्येच थांबल्या सारखे होणार नाही.. फक्त रिप्लाय किती पेक्षा किती मुक्तके/कविता/चित्रे ते महत्वाचे.. उत्तर लिहितो असेच...

गणेशा 03/06/2015 - 19:48
@ मिका @ जयंत जी... तिचे नसणे माझ्या मनाला मान्यच नसते कधी... ती गेली त्या दिवशी तिने आनंदाने अंगणात रांगोळी काढली होती...ठिपक्या ठिपक्यांचे कासव तीला यायचे.. तेव्हडेच यायचे... ती गेली आणि त्या रांगोळीचे ठिपके धुसर झाले... आज पर्यंत पुन्हा अंगणाला रांगोळीचा स्पर्श झाला नाही.. तिचे मंगल पावित्र्य अंगणाला पुन्हा कधी मिळाले नाही.. ही गत फक्त अंगणाची.. माझ्या आयुष्याचे वेगळे असे काय झाले ? अंधुक भग्न घराच्या कडेकपारीतुन अजुनही तो ओळखीचा सूर ऐकु येतो..... ओठांच्या घाटावर.. त्या शब्दसावल्या अजुनही विखुरलेल्या आहेत .. तश्याच ... आवाज न करता... मळकट पायवाटेवर... ते ओळखीच वारुळ अजुन तसेच आहे... दु:ख पारावर अजुनही तसेच घट्ट बसुन आहे... शेताच्या बांधावर भासांची टोळी अशीच अचानक येते अन मग फाटक्या माझ्या झोळीतुनही त्या टपोर्‍या दाण्यांना अलगद वेचुन न्हेते.. आजकाल हे असेच होते.. पाटाचे पाणी पण हबकुन वाहते... काल वटपोर्णिमा होती.. ते वडाचे झाड मात्र वाळलेले होते.. नाही.. दोरा होता गुंडाळलेला.. करकच्च... पण त्याच्या पारंब्याला माझी स्वप्न लगडलेली होती.. आणि निजले होते माझे विचारगाव त्या तिथेच झाडाखाली...

रातराणी 04/06/2015 - 01:30
कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि वार्याबरोबर उडून गेलेला तिचा सुगंध, आता पुन्हा ती बहरेल का? मोडून पडलेला विश्वास आणि बाहेरून आत शिरू पाहणाऱ्या वादळांची धिटाई, आता पुन्हा ती जळेल का? रुतलेली अदृश्य जखम आणि श्वासांचही ओझ झाल्यासारखा तुझा अनोळखी अबोला, आता पुन्हा ती हसेल का? तू गाशील विरहाचे गाणे आणि ती सोडवत बसेल आठवणींचा गुंता, खर सांगा, आता पुन्हा ती जगेल का? ( हे अगदीच काहीतरी आहे पण आमच्या हाताला खाज फार!)

भीमराव 04/06/2015 - 11:17
कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या भावना यावर सहजतेन हळुवार फुंकर घालनारी तु पहील्याच भेटीमधे मनाला अलगद स्पर्ष करून गेली नसतीस तर मला साहजिकच नवल वाटलं असतं. दररोज तुझ्या मनाचे ऊलगडनारे नवे नवे पदर मला कळत नकळत तुझ्या जवळ खेचत होते. तुझा अल्लडपना तर खुप गोड वाटायचा.मी इतका गुंतत चाललो होतो की तुझा थोडासा विरह देखिल मला खुप अस्वस्थ करून जायचा. तु हाती न लागनारे मृगजळ कधीच न्हवती, मात्र तरीही सहज साद्ध्य ही न्हवती. आयुष्याचं प्रतयेक वळन आजही तुझी साथ मागतं. निवांत अशा एकांतामधे तर मनाला खोल खोल जखमा होऊन जातात. कधी कधी तर तुझ्या आठवणीने इतका वेडा होऊन जातो, माझं मलाच भान रात नाही. वाटलेलं तुझी आठवण मनाला मोरपीसासारखी सुखावत राहील, मऊ पीसाला इतकी धार येईल हे मात्र स्वप्नातही वाटलं न्हवतं

नाखु 04/06/2015 - 12:57
तुमच्या या कवीतेने जखम ओली झाली
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........
जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी.. तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको. आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो. आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला. अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात. एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही. शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे. काकाश्रींचा पंखा नाखुस

गणेशा 04/06/2015 - 15:27
@ बाबुदादा... हळव्या या वातावरणाला थोडेशे चेंज करावे म्हणतो .... ---------------- तु आयुष्यात आली.. अन आनंदाचे उधान आयुष्यात आले... लवासाला पहिल्यांदा भेटलो आपण..लग्ना अगोदर .. साखरपुड्यानंतर .. जाताना मुठा नदी किती सुंदर दिसत होतीना तिकडे... तिथेच विसावलो त्या छोट्ट्याशा ब्रिजवर आपण ... पहिल्यांदाच लाजत झालेला तो स्पर्श .. अह्हा हा किती सुंदर.. मोरपिस अंगावरुन फिरुन जावे तसाच... मग आपण पुढे फिरत गेलो.. निसर्ग आपल्या दोघांना आवडतो.. त्या निसर्गात मनमुराद फिरणे पण .... पण माझा एक रुसवा अजुनही आहे, साखरपुडा आणि लग्नात इतके ४-५ महिन्यांचे अंतर असताना ही आपण फक्त एकदाच भेटु शकलो ... तु आता म्हणत असते आपण पुन्हा लवासा ला जावू .. गेल्यावर्षी खुप हट्ट केला.. पण मी न्हेले नव्हते.. या वर्षी पावसात..आपण जाउया नक्की... खरे सांगु मला तुझ्याशिवाय असे फिरायला जायला आवडत नाही शक्यतो ... १० जून माझा वाढदिवस असतो .. दरवर्षी याच्या आसपासच्या सुट्टीमध्ये आपण फिरायला जातो.. या वर्षी पण त्याच्या आसपास आपण जावु फिरायला... काळ किती फास्ट पळतोय ना.. अस वाटत आहे.. हा काळ असाच थांबावा या क्षणांमध्येच... तु मला शर्ट घेतला या वर्षी पण .. तु नेहमीच वाढदिवसा साठी मला शर्ट घेते.. मला आवडते ते खुप.. यावेळेस चा व्हाईट शर्ट .. तो ही कॅज्युअल pepe jeamo चा.. मस्त आहे एकदम... मला खरेच छान वाटले.. पण तुला असे वाटते.. तु काहीच जास्त घेतले नाही.. कारण तुझ्या वाढदिवसाला तुला २ ड्रेस हवे असताना मी तुला ४ गिफ्ट दिले होते... घरी सांगताना पण आपण १च घेतला असे सांगितले होते... किती दिवस झाले ना आपण पिक्चर ला एकत्र गेलो नाही... आता पर्यंत पिक्चर ला जाताना आपले मात्र लक खुप खराब आहे... आपण लग्ना नंतर पाहिलेला पिक्चर होता डर्टी पिक्चर .. काय करणाअर दोनच ऑप्शन होते... एक डर्टी आणि दुसरा विकी डोनर ... मग डर्टी निवडला.. लग्नाच्या गडबडीत नक्की तो कशावर आहे ते ही माहिती नव्हते... नंतर मात्र धमाल आली मराठी किती सुरेख चित्रपट पाहिले आपण ना.. त्यातल्या त्यात शाळा आणि दुनियादारी मस्तच होते... ती पुस्तके मी तुला वाचायला दिली होती.. तुला वाचनाची जास्त आवड नाही.. पण ही आणि या बरोबर अनेक पुस्तके तु, मी म्हणालो म्हणुन वाचली... आता लवकरच आपण नाटकाला ही जात जावु .. मला नाटके आवडतात.. तु अजुन तशी नाटके पाहिली नाहीसच .. तुला बाहेरचे खायला आवडते.. पाणीपुरी वडापाव भेळ आणि मासे... मला तर खायला आवडतेच त्यामुळे फिरणे आण खाणे होत रहातेच.. पण तु मागच्या काही महिन्यांअगोदर ठरवले आहे, बाहेरचा खर्च कमी.. त्यामुळे आता बरीच मुरड बसली आहे या गोष्टींना.. तसे बरे आहे.. पण तुझी पाणीपुरी मात्र मध्ये मध्ये डोके वर काढतेच आहे...

गणेशा 04/06/2015 - 16:20
मागिल काही दिवसांअगोदर, जवळच झाडावर चूऊताईचे घेरटे पाहिले.... चिऊ आपल्या इवल्याश्या पिल्लांना खाऊ देत होती.... त्या पिल्लांची तिला पाहण्याची ओढच लागली असेल त्याच्या अगोदर.. बिच्चारी चिऊ ताई पण.. कधी एकदा खाऊ घरात बाळांसाठी न्हेते असे वाटुन पटकन माघारी फिरली असेल.. मागच्या आठवड्यात ती पिल्ले हळुच आपल्या आईकडे बघुन घरट्यातुन टुनकन बाहेर आली होती.. जास्त लांब नाही गेली पण थोडे पंखांना बळ देत असल्यासारखे पाहिले त्यांनी .. मग चिऊताईने पुन्हा त्यांना घरट्यात जाण्यास सांगितले नव्हे घरट्यात लोटलेच जणु ... असेच त्यांची शाळाच जणु अजुन चालली होती.. फांदिच्या टोकावर बसुन ती पिल्ले धडपडत का होईना .. हळु हळु पंखात बळ साठवत होती.. चिऊताई आता मास्तरीन म्हणुन पण एकदम छान दिसत होती.. आज ती पिल्ले थोडे दूर उडुन गेली ... पंखात आकाश सामावण्याचा त्यांच्या इरादा होता हे नक्की... बालगीत झाडावरती घरटे चिऊताईचे ... पानांआड दडलेले.. .... घास भरवती पिल्लांना आपल्याच इवल्या चोचीने पंखाना बळ देती ती छडी हातात घेवुनी ... आकाशा ला मिठीत घेवू ही प्रार्थना तिच्या शाळेची... एक दिवस आला असा .. परिक्षा संपली पटकन चिऊताईची शाळा संपली पिल्ले उडाली भुर्रकन

मनीषा 04/06/2015 - 18:08
उपक्रम चांगला आहे. असं लिहून ठेवलेलं चांगलंअसतं. ते परत वाचताना काहीवेळा नवल वाटतं. कधीतरी असही काही आपल्या मनात आलं होतं म्हणून .

In reply to by मनीषा

मनीषा 04/06/2015 - 20:59
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु? ........आणि काय सांगु? नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच आणि आतल्या प्रकाशावर पडू दिली नाही अंधाराची छाया कधी म्हणूनच तर आहेत त्या माझ्या जीवाच्या जीवलग निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात जगाच्या सा-या तापांपासून दूर कधीतरी वाटतं मलाही पहावं .... काय चाललं आहे बाहेर? मग उघडते मी एक छोटासा झरोका बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता त्यातुनच येतात मग जुन्या नव्या आठवणी काही सुखावणा-या .... तर .. काही रडवणा-या त्यांच्याशी बोलत राहते मी कधी ---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही बाहेरचा कोलाहल मला अगदी ----- नवा नवा वाटतो त्यात एखादा ओळखीचा सूरही असतोच त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात ------ मग सगळे चेहरे एकमेकात मिसळतात अन त्यांचा बनतो एकच चेहरा त-हेत-हेच्या भाव-भावनांचे आविष्कार दाखवणारा त्यातून मग अनेक रंग विखूरतात त्यातले काही मला भावतात देखील ... मग मी त्या रंगांना निरखून पाहते त्यांना एक आगळा वेगळा गंध असतो .... तो गंध माझ्या कणाकणात भिनतो मनावर एक अनोखी धुंदी चढते ---- त्या गंधांची ........ त्या रंगांची मग त्या चार भिंतीतलं माझं एकटेपण जणू नाहीसं होतं अनेक भावनांचे रंग... त्यातून तयार होते एक अद्भूत नक्षी कशी माहित नाही ... पण मला ती आवडते त्या नक्षीच्या बिलोरी काचा सा-या घरभर पसरतात त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात माझं मन मोहून जातं त्या कवडशांना हातात घ्यावं त्यांना जवळून पहावं ... असं वाटतं ...... पण त्यांना हातात घ्यायला मी जाते .... तशी ते माझ्यापासून लांब जातात असा खेळ ---------- कितीतरी वेळ चालतो शेवटी मी थकून जाते एका जागी बसून त्या कवडशांकडे पहात राहते हळूहळू उन, आपली पावलं मागे घ्यायला लागतं तसे सारे कवडसे सुद्धा त्याच्या मागे धावतात मग तिथे काहीच रहात नाही दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो शांत ..... सुस्थीर .... अश्वासक....... मनाला दिलासा देणारा काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा माझं मन शांत होतं पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र हरवूनच जातात माझ्या मनात राहतात मग फक्त त्यांच्या आठवणी त्या आठवणी मी माझ्या मनात जपून ठेवते आता त्या आठवणींना माझ्याकडे यण्यासाठी झरोक्याची आवश्यकता नसते त्या चार भिंतींच्या अवकाशात त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या सोबती असतात ..

गणेशा 05/06/2015 - 00:47
आठवणींचा बिलोरी आरसा आपल्याकडे असला की कधी पण आपण त्या आरश्यातुन काळाच्या पडद्याला छेद देत त्यावेळेसचे क्षण पुन्हा अनुभवत असतो ... मन आपल्याच भिंतींना झुगारुन कधी मुक्त होऊन जाते ते ही कळत नाही ... आठवणी त्या सुखाच्या बालपणीच्या ... भातुकलीच्या ... बाहुलीच्या केसांसारख्या.. मखमली सोनेरी रंगांच्या... नववारीतील आज्जीच्या गोष्टीतल्या परीसारख्या... अंगणातल्या अबोलीच्या. आठवणी त्या सुखाच्या ... पहिल्या रिकाम्या दप्तराच्या... पाटीवरील पहिल्या अक्षराच्या... आठवणी त्या सुखाच्या.... बालसंवगड्यांशी खेळण्याचा... माळलेल्या गजर्‍याच्या आठवणी त्या सुखाच्या... पाहिलेल्या नजरेच्या... मुक्या स्पर्श भावनांच्या... आठवणी त्या सप्तपदीच्या प्रितीतल्या गोडव्याच्या तुझ्या माझ्या गोड क्षणांच्या आठवणी त्या सुखाच्या ... अवांतर.. ५ मिनिटात काय लिहिले हे पुन्हा न वाचताच देत आहे... लिहायला गेलो गद्य आणि झाले असेच काहितरी पद्य..

गणेशा 05/06/2015 - 12:29
उद्या... शिवराज्यभिषेक दिन... सगळे मित्र रायगडाची वाटा चालत आहेत.. मी मात्र आज येथेच ऑफिसात .. आज चतुर्थी पण आहे.. सकाळी पाऊस पडला .. वातावारण खुप मस्त आहे... पण पावसामुळे बाळाला घेवुन या चतुर्थीला मोरया गोसावी मंदिरात सकाळी सकाळी जाता आले नाही... संध्याकाळी जाईन पण .. बाळाला बप्पा खुप आवडतो .... मंदिरात गेल्याने छान वाटतेच.. पण महिन्यातुन एकदा सकाळी एकत्र बाहेर पडायला मिळते ते पण खुप छान ... आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्वांसाठी टाईम काढलाच पाहिजे असे वाटते.. मग ते मित्र असुद्या.. फॅमिली असुद्या नाहीतर पर्सनल गोष्ट असुद्या .... मुलांना तर टाईम दिलाच पाहिजे.. प्रत्येक पालकाने हे केलेच पाहिजे.. बाळ मोठे झाल्यावर तर आठवड्यातला एक दिवस मी बाळासाठी रीझर्व ठेवणार आहे.. मग तो शनिवार असेल किंवा रविवार.. पण फक्त बाळाबरोबर.. वाटल्यास बाळाला माझ्यासोबत फिरण्याच्या सवयी लावेल ... बाप झाल्यावर किती गोष्टी बदलतात ना... पहिल्यांदा दुकानात गेलो की मी माझ्या वस्तुंबद्दल विचार करायचो.. मस्त आवडेल ते घ्यायचो .. आजकाल असे होत नाही.. पैसे आले की बाळाला काय घ्यावे असे वाटते.. तीला एखादी फ्रॉक लहान पडत असली की दूसरी आपण बघुन ठेवलेली आता घेवुया असे वाटते... खेळणी.. गाडी..इतकेच काय सायकल ची पण तयारी आताच झाली आहे... खरेच बाप हा मुलगी झाल्यावर पुर्ण बदलतो .. बदलतात त्याचे विचार.. आचार... हे मला आता कळते आहे... जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा माझे वडील तायडी ला बिंधास्त ट्रीप ला जावुन द्यायचे.. तिचे खुप लाड करायचे.. माझ्या पेक्षा.. तेंव्हा मी आईला बोलायचो ते.. आई माझी होती ना.. तायडीचे पप्पा.. पण आज कळते आहे.. हा नैसर्गिक बंध आहे... कदाचीत बाप झाल्यावर आपल्या बापाच्या भावना आपल्याला जास्त कळत असतील .. असेच असेल...

मोहनराव 05/06/2015 - 15:37
बरोबर आहे तुमचे. आजकाल ऑफिसमधुन घरी जाण्याची एक अनामिक ओढ असते. ते इवलेइवले हात हातात घेऊन एक गालाचा मुका घेतला व बाळाचे आपल्याला बघुन खुश होणे पाहिलं की दिवसभराचा थकवा कुठे निघुन जातो कळतच नाही. जगातल्या कसल्याही दुखा:चा लवलेश नाही.. चिंता नाही. असे आयुष्य परत जगता आले तर किती मजा येईल असे वाटते. ये दौलतभी लेलो ये शोहरतभी लेलो... गझल आपसुकच गुणगुणायला लागतो. मध्ये ही बाळाला घेऊन गावी गेलेली महिनाभर, तर मन कशातही रमायचे नाही. चातकासारखी बाळाची वाट पाहिली. परत आली तेव्हा स्वारी ओळखायला तयार नाही :( पण लगेच एक दिवसात परत माझ्याकडे छकुली येऊ लागली. मी विचार केला, आत्ताच आपले हे हाल.. अजुन काही वर्षांनी मुलगी मोठी होऊन सासरी जाऊ लागली तर आपले काय होणार. तेव्हा एका मुलीच्या बापाचे दु:ख काय असते याची कल्पना येऊ लागली.

साधुची झोळी का पडली? नदि काठच्या एका गर्द झाडी मधे बसून, तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करत होता, तिकडुन तो कोणाला सहज दिसत नव्हता, पण तो मात्र बरेच काही पाहू शकत होता, नुकताच वयाच्या सोळाव्या वर्षी विरक्त होउन, त्याने संन्यास घेतला होता, आणि भगवंताचा शोध घेत, दिवसरात्र तो रानोमाळ भटकत होता, अचानक कसल्यातरी आवाजाने, त्याची समाधी भंग पावली, एक लावण्यवती, रमत गमत पाण्याला जाताना, त्याला दिसली, हरणाची चपळाई आणि मोराचा डौल होता, तिच्या पावलो पावली जणु केतकीच्या बना मधून, एखादी नागीण सळाळत निघाली, त्या वेळी त्या दोघांशीवाय, तिथे तिसरे कोणीच नव्हते, तो आपल्याला बघतो आहे, याचे तिला जरा देखील भान नव्हते, तिच्या हातात एक आणि एक कमरेवर एक असे दोन घडे होते, आणि मोकळे लांबसडक केस तिच्या कमरेवरती रुळत होते, इकडे साधूबुवांच्या हृदयाची धडधड मात्र, जोरदार वाढली होती, आता त्या जागेवरुन उठायची सुध्दा, त्यांच्या मधे हिम्मत नव्हती डोळ्यांची पापणी मिटावी, असे ठरवून देखील, ती बंद होत नव्हती दूसरीकडे आपल्या चंचल, कमकुवत मनाची, त्यांना लाज वाटत होती इकडे तिकडे सावध नजर टाकत, क्षणार्धात ती निर्वस्त्र झाली, मासोळी सारखी सुळकन, नदिच्या पाण्यात तिने उडी मारली, मनसोक्त डुंबुन झाल्यावर, ती तशीच ओलेती बाहेर निघाली, अनिमिष नेत्रांनी हे बघणार्‍या साधुच्या, जीवाची मात्र काहीली झाली, हे सगळे कमी होते म्हणुन की काय?, ती इकडेच यायला निघाली, साधुबुवांच्याच समोरच्या झुडपा मागे उभी राहून, अंग कोरडे करु लागली, तिची सूर्यासारखी तेजस्वी नितळ काया, साधुबुवांना अगदी जवळून दिसली, आणि तिच्या अंगप्रत्यांगाच्या गोलाई मधे, बुवांची नजर अडकून बसली, स्वतःच्याच धुंदीत असलेल्या तिला मात्र, कशाचेही भान नव्हते, तिचे ओलसर मोकळे केस, सुर्यकिरण पडून चमचम चमकत होते, तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवातुन, यौवन ओसांडून वहात होते, ते पहाताना साधुमहाराज मात्र, हाताच्या मुठी घट्ट आवळत होते, बर्‍याच वेळा नंतर अखेर, त्यांना मोकळा श्र्वास घेता आला, कारण त्यांच्या समोरचा मोहमायेचा खेळ, होता आता संपला, घागरींमधे पाणी भरुन घेउन, तिने आपल्या गावाचा रस्ता धरला, बुवांनी इतकावेळ नकळत घट्ट आवळलेल्या मांड्या, थोड्या मोकळ्या केल्या, साधुबुवांना आपल्या या निर्लज्ज कृतीची फारच शरम वाटली, तो एक अपघात होता, असे म्हणुन, त्यांनी स्वतःची समजुत घातली, चित्त थार्‍यावर यावे म्हणुन, झोळी मधली पोथी त्यांनी काढली, परमेश्र्वराच्या शोधा कडे, त्यांनी पावले पुन्हा एकदा वळवली, पोटात कावळे कोकलायला लागले, म्हणुन ते गावा कडे गेले, "ओम भवती भिक्षांदेही", असे एका घरा समोर जाउन म्हणाले, याचकाची नजर नेहमी जमिनी कडे हवी, हा नियम ते विसरले, आणि भिक्षा घेउन येणारी स्त्री पाहुन, त्यांचे देहभान हरपले, ती तिच होती, जिला त्यांनी नुकतेच नदिवर पाहिले होते, आता तिने कपाळावर कुंकु गळ्यात मंगळसुत्र घातले होते, सुरेखसा गजरा माळत, केसही तिने निटनेटके बांधले होते, जणू बुवांच्या समोर साक्षात सरस्वतीचेच प्रतिरुप उभे होते, "महाराज भिक्षा घ्यावी", नमस्कार करत ती म्हणाली, बुवांच्या छाती मधली धडधड, पुन्हा एकदा वाढली, पायातली शक्ती गेली, हातातली झोळी खाली पडली, तिच्याकडे न पहाता, बुवांनी तिकडून जोरात धुम ठोकली, एका खोल कड्याच्या टोकावर, स्तब्ध पणे साधुबुवा बसले होते, हे असे का झाले?, याचा विचार करताना, स्वतःलाच हसत होते, कारण विचार करता करता, त्यांच्या हेच लक्षात आले होते, "देव आहे चराचरी" हे तत्व, त्यांना नीटसे समजलेलेच नव्हते, "पुनश्र्च हरी ओम" असे म्हणत, त्यांनी ध्यानासाठी डोळे मिटले, त्यांच्या डोळ्यासमोर, पुन्हा एकदा तेच नदिवरचे दृष्य उभे ठाकले, पण यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित, जराही नाही ढळले, एका तटस्थवृत्तीने, ते आपल्या मनाच्या या खेळाकडे पाहु लागले. पैजारबुवा,

गणेशा 08/06/2015 - 12:12
@ पैजारबुवा ... समरसता ही मनाची एक कला आहे.. या कलेचा आनंद जोपर्यंत माणसाला घेता येत नाही.. तो पर्यंत त्याला जीवन जगणे म्हणजे काय हे कळालेच नाही असे वाटते...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जडभरत 23/07/2015 - 20:58
वाः बुवा वाः लिहिणारे समर्थ तर ग्रेटच पण हा इतका दुर्मिळ आणि अर्थपूर्ण श्लोक लक्षात ठेवणारे तुम्ही पण ग्रेट!!! हा श्लोक पाठ करत आहे.

गणेशा 08/06/2015 - 13:51
देवावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा ... हा मुद्दा वेगळा.. पण माणसांच्यात..मुलांच्यात ..कामात.. मित्रांच्यात सदभावनेने जो वेळ घालवाला जाईल तोच देवपुजेचा अर्थ असावा असे माझे मत आहे.. देवपुजेच महत्व त्यामुळे नक्कीच कमी होत नाही.. स्वता लहानमुलासारखे जगणे थोडे मुस्किलच आहे, या जीवनात फक्त साथ देवुन नाही तर त्याबरोबर योग्य गरज निभावने पण तितकेच मोलाचे ....आणि गरजेला पैश्याची निकड लागतेच.. मग व्यवहारी जगणे आले.. आणि मग पुन्हा कायम, आपल्या मुलांच्यात ही लहान होउन जगता न आल्याचे शल्य पण .. त्यामुळे मुलांशी मैत्रीपुर्ण वागताना लहान व्हायचे.. आनंद साजरा करायचा अगदी त्यांच्याच पद्धतीने.. पण नंतर पुन्हा व्यवहारी बनायचे.. बहुतेक हे असेच करावे लागत असेल जगताना... कदाचीत त्यामुळे निदान अपेक्षांचे शल्य तरी नाही बोचणार .... अपेक्षांचे ओझे आपणच आपल्यावर टाकत जातो .. बहुतेक आपण विचार जास्त करतो .. त्याचेच हे ओझे.. मग आपण जर विचार जास्त करतो तर आपण लहान कसे होऊ .. मग विचार करने सोडुन ही देता येत नाही... हे असेच असते.. अनेक प्रश्नांचे उत्तर आपण एकच करुन ठेवलेले असु शकते.. त्यामुळे उत्तरे बदलायला .. निटसे पुन्हा उत्तरे सुधारायला लागलेच पाहिजे ....

गणेशा 09/06/2015 - 12:57
आत्ताच.. पाउस, ती आणि मी चा भाग १ वाचला आणि थोडे मनाशीच बोलावेसे वाटले.... च्यायला, या असल्या कथा वाचल्या की आमचे काय होते काय माहित .. सगळ्या कॉलेज च्या आठवणी सरसर डोळ्यापुढे येतात. तिच्या डायरीतल्या शेवटच्या पानावरील या ओळी मात्र लगेच आठवतात "तू अशीच हसत रहा... सर्वांचे मन मोहत रहा... माझी नसताना पुन्हा... माझीच होत रहा... " तिने मला डेडिकेट केलेले हे गाणे मात्र माझे ही आवडते गाणे झाले आनि कायम ऐकतो ... " --- --- आते जाते.. ह्सते गाते..सोचा था मैने मन मे कई बार.. ओठो की कली, कुछ और खिली...ये दिल पे हुआ है किसका इफ्तियार तुम कोन हो.. बतलातो दो.. क्यो करने लगी मै तुमपे एतबार खामोश रहु .. या मै कह दू .. या कर लु मै चुपकेसे ये स्विकार यही सच है शायद मैने प्यार किया हा हा तुमसे मैने प्यार किया ... " आठवणी या अश्याच असतात.. प्रेम प्रत्येक वेळेस सफल होईल असे नाही.. पण माणसाने आपल्या नजरेत कधी पडु नये असे मला वाटते.. कोण कधी कोठे असेल .. आणि आयुष्यात फिरुन कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही .. माणसाने माणुसकीने जगले पाहिजे.. भले एकत्र असु नाही तर नसु.. स्वाभिमान मात्र माणसाने कधीच गहान टाकु नये.. आजकालच्या प्रेमात पडलेल्या पोरांकडे बघुन एक खिन्न भाव समोर येतो .. काय ते लागट ..लाचार.. मागे मागे फिरणे.. प्रेम हे असे नसते.. तुम्ही कसे ही असा.. मनातुन कसा आहे हे महत्वाचे..... स्वाभिमानाने प्रेमात जगलेले दिवस आठवले की अजुनही छान वाटते..... त्यानंतर सर्वांचे ब्रदर टाईप मटेरीअल असा आलेला उल्लेख ही आवडला.. कारण नंतर मी कधी मुलींवर प्रेम केलेच नव्हते.. आमची ही आयुष्यात येई पर्यंत.... आणि अचानक ब्रदर टाईप मटेरीअल चे .. हीच्या साठी हजबंड टाईप मटेरीअल मध्ये रुपांतर झाले हे कळलेच नाही...
लेखनविषय:
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे..

कॉमेडी ऐसपैस

तिमा ·

In reply to by पैसा

सतिश गावडे 21/05/2015 - 22:12
यात महागुरु नसतात. एक ताई, वाजवणारे आणि इतर परिक्षक असतात. सध्याच्या ताईंना "कॉमेडी ऐसपैस" खेळताना पाहून धक्काच बसला होता. त्यांनी एका चित्रपटात खुपच सुंदर काम केले होते.

In reply to by खटपट्या

म्हण्जे हा नक्कीच हॉलीवूडचा सिनेमा नसावा.... (डिस्कव्हरी आणि नॅशनल जियॉग्राफीक प्रेमी) मुवि

नाखु 22/05/2015 - 09:34
निरिक्षण आणि यातले गुरु म्हणजे कहर आहे नुस्ता!!! विनोदी आणि हास्यास्पद यातले नेमके अंतर माहीत असलेला. मुकाट वाचक नाखु

मदनबाण 22/05/2015 - 12:12
हल्लीचे कॉमेडी /गाण्याचे / नाचण्याचे शो पाहुन, यापेक्षा अजुन मुर्खपणा पहावयाचा उरला नाही... याची खात्री पटली आहे ! {डिस्कव्हरी सायन्स ट्यून इन करणारा}

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

गणेशा 22/05/2015 - 13:14
बरोबर आहे, खुप बोअर करत आहेत ते आजकाल .... कॉमेडीचा फालतु पणा केलाय फक्त.. पहिल्यांदा थोडे तरी चांगले विनोद होते तरी, नविन पर्व तर चॅनेल बदलवायला भाग पाडतेच...

क्रेझी 22/05/2015 - 14:26
हा कार्यक्रम किंवा अशाच धाटणीच्या कार्यक्रमासाठी जे लेखक आहेत ते लेखक मिपा, मीम सारख्या मराठी ब्लॉगवर सुध्दा लिहीत होते/आहेत तेंव्हा असं काही बघितलं की थोडं विचित्र वाटतं!!

मित्रहो 23/05/2015 - 12:20
असा समज असावा. प्रेक्षकांना खोटा डोलारा, खोटे हसू आणि खोटेच विनोद दाखविले की ते खूष होतात असा समज असावा. निर्माता आणि मुख्य म्हणजे MBA केलेल्या चॅनेलमधील मॅनेजरचा असा समज असतो. असेल कुठलातरी डेटापॉइंट त्यांच्याकडे. रोज उगाच रडल्याने सिरीयल्स चालतात तर रोज उगाच हसल्याने कॉमेडी का चालू नये? दुसरे म्हणजे अति झाले. दर आठवड्याला काय नवीन लिहीणार आणि काय नवीन करऩार. राजकीय किंवा सद्य घडामोडीवरील व्यंग सोडले तर दर आठवड्याला नवीन शक्य नाही. तसेही तो प्रकार परमफॉर्मंसचा आहे त्यामुळे लिखाण हे गौण असते. बऱ्याच कार्यक्रमात त्यात काम करनारेच अंगविक्षेपांच्या मधेमधे काहीतरी संवाद घालतात. कदाचित मराठीतही टिव्ही चॅनेलव्यतिरीक्त दुसरे विनोदाचे साधन हवे. AIB नेहमीच कमरेच्या बरेच खाली उतरते पण TVF मात्र बऱ्याचदा मजा आणते. माझ्या आवडीचे ते Tech Conversation With Dad. नवीन पिढीला भावनार, कमरेखाली विनोद नसनार तरीही मनुराद हसवनार, उत्तम लेखन आणि संयत अभिनय यांचा उत्तम संगम आहे. कदाचित मराठीतही असेच काहीतरी समांतर हवेय. तेंव्हा या लोकांना कळेल हे जे करताहेत ते कोणीही करु शकतो तेंव्हा जवळ साधन आहेत म्हणून त्याचा दुरुपयोग करु नये.

In reply to by पैसा

सतिश गावडे 21/05/2015 - 22:12
यात महागुरु नसतात. एक ताई, वाजवणारे आणि इतर परिक्षक असतात. सध्याच्या ताईंना "कॉमेडी ऐसपैस" खेळताना पाहून धक्काच बसला होता. त्यांनी एका चित्रपटात खुपच सुंदर काम केले होते.

In reply to by खटपट्या

म्हण्जे हा नक्कीच हॉलीवूडचा सिनेमा नसावा.... (डिस्कव्हरी आणि नॅशनल जियॉग्राफीक प्रेमी) मुवि

नाखु 22/05/2015 - 09:34
निरिक्षण आणि यातले गुरु म्हणजे कहर आहे नुस्ता!!! विनोदी आणि हास्यास्पद यातले नेमके अंतर माहीत असलेला. मुकाट वाचक नाखु

मदनबाण 22/05/2015 - 12:12
हल्लीचे कॉमेडी /गाण्याचे / नाचण्याचे शो पाहुन, यापेक्षा अजुन मुर्खपणा पहावयाचा उरला नाही... याची खात्री पटली आहे ! {डिस्कव्हरी सायन्स ट्यून इन करणारा}

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

गणेशा 22/05/2015 - 13:14
बरोबर आहे, खुप बोअर करत आहेत ते आजकाल .... कॉमेडीचा फालतु पणा केलाय फक्त.. पहिल्यांदा थोडे तरी चांगले विनोद होते तरी, नविन पर्व तर चॅनेल बदलवायला भाग पाडतेच...

क्रेझी 22/05/2015 - 14:26
हा कार्यक्रम किंवा अशाच धाटणीच्या कार्यक्रमासाठी जे लेखक आहेत ते लेखक मिपा, मीम सारख्या मराठी ब्लॉगवर सुध्दा लिहीत होते/आहेत तेंव्हा असं काही बघितलं की थोडं विचित्र वाटतं!!

मित्रहो 23/05/2015 - 12:20
असा समज असावा. प्रेक्षकांना खोटा डोलारा, खोटे हसू आणि खोटेच विनोद दाखविले की ते खूष होतात असा समज असावा. निर्माता आणि मुख्य म्हणजे MBA केलेल्या चॅनेलमधील मॅनेजरचा असा समज असतो. असेल कुठलातरी डेटापॉइंट त्यांच्याकडे. रोज उगाच रडल्याने सिरीयल्स चालतात तर रोज उगाच हसल्याने कॉमेडी का चालू नये? दुसरे म्हणजे अति झाले. दर आठवड्याला काय नवीन लिहीणार आणि काय नवीन करऩार. राजकीय किंवा सद्य घडामोडीवरील व्यंग सोडले तर दर आठवड्याला नवीन शक्य नाही. तसेही तो प्रकार परमफॉर्मंसचा आहे त्यामुळे लिखाण हे गौण असते. बऱ्याच कार्यक्रमात त्यात काम करनारेच अंगविक्षेपांच्या मधेमधे काहीतरी संवाद घालतात. कदाचित मराठीतही टिव्ही चॅनेलव्यतिरीक्त दुसरे विनोदाचे साधन हवे. AIB नेहमीच कमरेच्या बरेच खाली उतरते पण TVF मात्र बऱ्याचदा मजा आणते. माझ्या आवडीचे ते Tech Conversation With Dad. नवीन पिढीला भावनार, कमरेखाली विनोद नसनार तरीही मनुराद हसवनार, उत्तम लेखन आणि संयत अभिनय यांचा उत्तम संगम आहे. कदाचित मराठीतही असेच काहीतरी समांतर हवेय. तेंव्हा या लोकांना कळेल हे जे करताहेत ते कोणीही करु शकतो तेंव्हा जवळ साधन आहेत म्हणून त्याचा दुरुपयोग करु नये.
लेखनप्रकार
" तर आता पहा, नवराबायकोतील हा धम्माल संवाद!!" एक तोकड्या कपड्यांतली वाळकी मुलगी, तिच्या कमावलेल्या आवाजात सांगत असते. तिच्या शब्दाशब्दाला मागचा वाद्यवृंद ठणाणत असतो. एक अत्यंत जाडी,बेढब पण साडी नेसलेली बाई स्टेजवर प्रवेश करते. आताशा, स्टेजवर प्रत्येक पात्राने नाचत नाचत आणि वाजत गाजतच प्रवेश करायचा असतो. तसा डिफॉल्ट प्रोग्रॅमच आहे ना! शिवाय प्रत्यक्ष काही वाक्य उच्चारण्याच्या आधीच नुसत्या आगाऊ देहबोलीवरच प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे हंशे वसूल करायचे असतात. तर ही बे.बा.(बेढब बाई) स्टेजवर एक राऊंड मारतीये तोच तिचा अत्यंत अंगविक्षेपी काटकुळा नवराही(का.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

सत्यकथा .. अध्याय १ आणि २

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 30/04/2015 - 21:41
__/\__ कदाचित तुमचे हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट लेखन असावे.

नाखु 01/05/2015 - 09:24
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ! फक्त आणि फक्त दंडवत...

प्रचेतस 30/04/2015 - 21:41
__/\__ कदाचित तुमचे हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट लेखन असावे.

नाखु 01/05/2015 - 09:24
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ! फक्त आणि फक्त दंडवत...
लेखनविषय:
लेखनप्रकार
..................................................अध्याय पहिला...................................................................... नैमिष नावाचं एक अरण्य होतं. इथे शौनक आणि इतर अनेक ऋषी महर्षी जगत्कारण आणि जगत कल्याणाविषयी चिंतन, अभ्यास, साधना करत असत. एक दिवस त्यांच्यात वाद घडला. आणि सत्य या गोष्टीबद्दल बरीच मतमतांरे झाली. शेवटी खरा निर्णय करण्यासाठी ते सर्व सूत महर्षींकडे गेले. तेंव्हा त्यांच्यात व सूतात झालेला संवाद म्हणजेच हि सत्याची- सत्य कथा होय. ती आपणा सर्वांनी आता ऐकूया.

खाऊगल्ली भाग २

रेवती ·

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

इतिहासाचे मारेकरी आणि पहारेकरी

विकास ·

वाचनीय. आता जबाबदारी नरेंद्रची. त्या फाईल्स उचलाव्यात व सरळ टी.व्ही.वर येऊन वाचून दाखवून 'पर्दाफाश' करावा. मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पॉइंट ब्लँक 15/04/2015 - 23:31
मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.
अस्स जालं होय. तुमच्या खांग्रेसला चाळीस वर्ष निवडून दिलं होत, त्यांना बरं जमलं नाही ते?

In reply to by अर्धवटराव

विकास 15/04/2015 - 23:36
जाणत्या राजाने समजूत घातली आहे. ती वाचल्यावर समजले की ती हेरगिरी नव्हती तर काळजी करण्याची पद्धत होती म्हणून. =)) "When the NCP was in power in Maharashtra and I was a Union minister working in Delhi, people like Bhujbal in the state used to keep a tab on my movements. The department concerned has to keep an eye on important people, who are doing pivotal work in public life for their safety. Hence, the Maharashtra state that kept an eye on me was not for espionage. When I was the home minister in Maharashtra, the department also kept an eye on my movements for safety," he said. "Similarly, the relatives of Netaji Subhash Chandra Bose were important for the country. The government would have been held accountable if anything untoward had happened with them. As a result, the IB had kept an eye on Bose's family for their safety and not for espionage," added Pawar, who was in the city to review activities of the NCP in the district and attend a number of programmes.

hitesh 15/04/2015 - 23:22
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच. बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे.

In reply to by hitesh

विकास 15/04/2015 - 23:31
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे खोटारडे पणा ने तो लावला होता. स्वतःच्या विचारसरणीत असलेला अंगभूत द्वेष पसरवण्याकरता... आता राहूल गांधींना कोर्टात जावे लागणार असल्याने इतर शहाणपणाने तसे बोलणे टाळतील असे समजूयात. म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच. अनुज धर या लेखक-पत्रकाराने आणि "मिशन नेताजी" नामक संस्थेच्या मागितलेल्या माहीती अधिकारांतर्गत विनंतीनुसार पश्चिम बंगालच्या सिआयडी खात्याने दोन जुन्या फाईल्स मुक्त केल्या त्यातील माहितीतून हे बाहेर आले. वास्तवीक काँग्रेस आणि भाजपाने देखील आधी राज्य असताना (आणि आत्ता मोदींच्या काळात हे प्रकरण बाहेर यायच्या आधी) ह्या संदर्भातील फाईल्स मुक्त करायला असमर्थता दर्शवली होती. का? तर सुरक्षा आणि मित्र राष्ट्रांना त्रास होऊ शकतो म्हणून! असो आता मुक्त झालेल्या पत्रांमधून नेहरूंचा हात स्पष्ट दिसतो: Neharu letter

In reply to by hitesh

विकास 16/04/2015 - 00:48
गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे. काय वेळ आली आहे! स्कॉलर्ली पुरावा नसल्याने कुठल्यातरी फुटकळ नाटकात काय लिहीले आहे त्यावरून ठरवले जात आहे. तरी देखील त्या नाटका संदर्भात य.दी फडक्यांचा http://www.mkgandhi-sarvodaya.org/godse.htm लेख वाचा. (आणि हो फडके हे काही उजवे नाहीत...) आणि त्यावर अजून चर्चा करायची असेल तर अवश्य नवीन धागा काढा. तेथे काथ्याकूट करूयात.

In reply to by विकास

आणी धाग्यात तू ही आधीच ठरवले आहेस विकासा-
सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते.
म्हणजे आधी तू हे ठरवूनच टाकले आहेस व त्यावर चर्चा करायची.

In reply to by hitesh

चिनार 16/04/2015 - 12:58
बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे हितेश भाऊ ! गोडसे बोलतोय या नाटकात आपण गोडसेंच बोलणं ऐकणं अपेक्षित आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय "गांधी वधाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे!" वधामागचा कोन्ग्रेस ला "अपेक्षित" असलेल्या मास्टर माइण्ड चे नाव जर नाटकात घेतले असते तर कोन्ग्रेस सरकारने त्या नाटकावर इतके वर्ष बंदी ठेवली नसती. तुझ्या वरच्या प्रतिसादावरून तुझा एकंदरीत व्यासंग आणि बुद्धीची पातळी लक्षात आलेली आहे.

विनोद१८ 16/04/2015 - 00:04
'येथे कुणा एकाची पाठराखण वा कुणाची निंदा' असे नसून, याविषयीची सत्यता काय हे जाणुन घेणे महत्वाचे. आजच केंद्र सरकारने एक समिती गठीत केली असुन ती समिती अशा अन्य ८५ फाईलींच्या बाबत त्या उघड करायच्या का याबद्दल निर्णय घेणार आहे, अशी बातमी दुरदर्शनवर एकली, तसे झाले तर याविषयीचे सत्य काय ते उघड होइलच. सुभाषबाबूंची भारतीय जनतेत स्वातंत्र्यकाळापुर्वीपासुनच 'हीरो' अशी प्रतिमा होती, आहे व राहील यात काहीच शंका नाही, त्यांच्या गूढ मृत्यूबद्दलचे सत्य जाणुन घेण्यात सगळ्यांनाच रस आहे, ते गूढ जर कुणी उकलले तर त्यामध्ये गैर ते काय ? त्याविरोधात एव्हढी कावकाव कशासाठी ?? येउद्या की सत्य बाहेर. येथे 'त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली' ते भारतात नसताना ( जिवंत असताना वा नसताना ) ती ही सतत २० वर्षे, याची गरज त्यावेळच्या आपल्या नवस्वतंत्र देशाच्या सरकारला का भासली ?? अगदी मागील पानावरुन पुढे यापद्ध्तीने ते का ?? येथे हा 'का' महत्वाचा ?? ती कोणी ठेवायला सांगितली हे दुय्यम असे मी समजतो. इंग्रजांनी तसे केले हे आपण समजु शकते, त्याबद्दल हा 'का' उद्भवत नाही परंतु नंतर आलेले तर आपलेच स्वकिय होते. असे कितीतरी 'राजकिय गूढ-मृत्यू' त्या कालखंडात झालेत, त्यांना न्याय मिळायला हवा असे जर कुणाला वाटले तर ते अयोग्य कसे ?? या गूढतेची उकल यथावकाश होइल अशी चिन्हे दिसताहेत. @.....हितेसभॉय, अरे या लोकशाहीतला तुझा विधाने करण्याचा, प्रतिक्रिया देण्याचा अधिकार मान्यच, पण तु स्वतः हिंदु नसताना / नास्तिक असताना व एक सर्वमान्य डु.आय.डी. असताना, वारंवार कोणत्याही विषयाला / चर्चेला ओढूनताणुन आमच्या हिंदु धर्माशी जोडुन, आमच्या देवदिकांना बोल लावण्याचा अधिकार तुला कोणी दिला ?? तुझ्या उपासना पद्धतीबद्दल ( जर असलीच तर ) जर कोणी काही वावगे बोलले तर तु खपवून घेशील काय ?? एक लक्षात ठेव तुला येथे कोणीच गंभीरपणे घेत नाही पण तुला आता 'समजावून सांगण्याची' वेळ आली आहे. तेव्हा यापुढे आमच्या 'हिंदु धर्माबद्दल' लिहीताना जरा जपुन, अंत पाहू नकोस. तुझ्यासाठी तुर्त एव्ह्ढेच.....!!!

क्लिंटन 16/04/2015 - 14:51
लेख आवडला. त्यावर काहीसा विस्कळीत प्रतिसाद--- सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भात जे काही झाले ते पब्लिक डोमेनमध्ये नक्कीच यायला हवे असे वा॑टते. राजनाथ सिंगांनी तसे करता येणार नाही यासाठी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल आणि इतर देशांशी संबंध बिघडू शकतील असे कारण त्यामागे दिले होते. त्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल हे कारणच मला पटलेले नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी राज्य सरकारची असते आणि ते काम राज्य सरकारला न जमल्यास शेवटी ती केंद्राची जबाबदारी ठरेल. सुभाषचंद्र बोस खरोखरच त्या विमान अपघातात गेले की नाही याविषयी बराच संभ्रम आहे.सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्यांचे म्हणणे आहे की सुभाषचंद्र नंतर रशियात गेले आणि त्यांना स्टॅलिनने ठार मारले. जर का ही माहिती उघड केली तर त्यामुळे रशियाशी संबंध बिघडायची भिती का वाटावी? एकतर रशियाने स्वतःच लेनिन आणि स्टॅलिन यांच्या राज्यपध्दतीला नाकारले आहे. या घटनेला किमान ६० वर्षे उलटली आहेत आणि भारत जर रशियाकडून तेल विकत घ्यायला तयार असेल तर पुटिन यांनाही फार काही तक्रार करायचे कारण असेल असे मला तरी वाटत नाही. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये आली आणि त्यामुळे त्यांच्या जनमानसातील प्रतिमेवर परिणाम झाला तरी हरकत नाही ही भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने सुभाषचंद्र बोसांविषयी लोकांच्या मनात जे काही समज-गैरसमज आहेत ते समजले तरी ते चांगलेच असेल. बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. एकतर सुभाषचंद्रांचे गुरू चित्तरंजन दास हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.मुस्लिमांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नसेल तर स्वातंत्र्यलढा यशस्वी होणार नाही असे गांधीजींना वाटत होते तसेच चित्तरंजन दासांनाही वाटत होते. १९२३ मध्ये त्यांनी बंगालमधील मुस्लिम पुढार्‍यांबरोबर (विशेषतः हकिम अजमल खान) 'बंगाल करार' याच उद्देशाने केला होता आणि त्यात मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते. त्या कराराला काँग्रेसमधल्याच अनेक पुढार्‍यांचा विरोध होता. त्यांचे शिष्य सुभाषचंद्रांनी कलकत्ता महानगरपालिकेचे सी.ई.ओ असताना या आरक्षणाची अंमलबजावणीही केली होती. ज्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल गांधीजींविरूध्द हिंदुत्ववादी लोक आगपाखड करतात त्याच चळवळीविषयी सुभाषचंद्र बोस यांनी The Indian Struggle या पुस्तकात पान ५५ वर म्हटले होते--- "In 1921, besides the above three leaders, the Ali brothers (Moulana Mohammed and Moulana Shaukat Ali) had a unique position among the public. This was due partly to their own activities and their suffering during the Great War--partly to the new awakening among the Moslems -- but largely due to the propaganda conducted in their favour by the Mahatma. The Mahatma associated himseld so closely with them that they came to be looked upon as the right and the left hand of the Mahatma, In their company the Mahatma toured the country and one clearly remembers that in those days whenever there was a popular shout of 'Victory to Mahatma Gandhi' (Mahatma Gandhi Ki Jai), it would be accompanies by a shout of 'Victory to the Ali Brothers' (Ali Bhai-o-Ki Jai). Though after some years the Ali brothers parted company with the Mahatma, I do not think one could find fault with the latter for his intimate association with them. The real mistake in my opinion did not lie in connecting the Khilafat issue with the other national issues, but in allowing the Khilafat Committee to be set up as an independent organisation throughout the country, quite apart from the Indian National Congress. The result of this was that when later on Ghazi Mustafa Kemal Pasha, as the leader of the New Turkey, forced the Sultan to abdicate and abolished the office of Khialifa altogether, the Khilafat question lost all meaning and significance and the majority of the members of the Khilafat organisations were absorbed by sectarian, reactionary and pro-British Moslem organisations. If no separat Khilafat committees had been organised and all Khilafatist Moslems had been persuaded to join the ranks of the Indian National Congress, they would probably have been absorbed hy the latter when the Khilafat issue became a dead one." हेच जर का अन्य कोणत्या काँग्रेसच्या पुढार्‍याने म्हटले असते तर तो पुढारी दाढ्या कुरवाळणारा, तळवे चाटणारा वगैरे विशेषणांनी ओळखला गेला असता. सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला विरोध नक्की होता का याविषयीही प्रश्न उभा रहावा असे त्यांचे बर्लिन रेडिओवरून केलेल्या एका भाषणातील विधान होते . या भाषणाचा वृत्तांत ---" He assured Mr Jinnah that his Pakistan scheme would never materialise so long as the British were in India.He emphasised that Pakistan could be created only under a National Government." म्हणजे सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला खरोखरच विरोध होता का? आणि तरीही सुभाषचंद्र असते तर अखंड भारत आपल्याला मिळाला असता हा एक काहीसा भाबडा समज हिंदुत्ववादी लोकांमध्ये आढळतो हे बघून काहीशी गंमतच वाटते.हा प्रकार फेसबुकवरील विविध ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर बघितला आहे. सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायच्या धोरणाविरूध्द मी पूर्वीच मिपावर लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती नको. पण या निमित्ताने अशा काही इतर मुद्द्यांचीही चर्चा जरूर व्हावी असे नक्कीच वाटते.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 16/04/2015 - 15:23
असं म्हणणारा माणूस निदान माझ्या तरी पहाण्यात नाहीत. बहुतांश लोकांना सुभाषबाबू एक हीरो (ज्यांनी थरारक गोष्टी केल्या) म्हणून आवडतात. त्यातल्या राष्ट्रवादी (पक्ष नव्हे) लोकांना या गोष्टी त्यांनी देशासाठी केल्या, देशासाठी खस्ता खाल्ल्या म्हणून आवडतात. त्यातल्या शिकल्या सवरलेल्यांना ते आयसीएस ची परिक्षा पास होवू शकणारे विद्वान होते आणि त्यावर लाथ मारू शकणारे स्वाभिमानी होते म्हणून आवडतात. नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी) सुभाषबाबू उठून दिसतात. ते आर्मी युनिफॉर्म मध्ये रुबाबदारही दिसतात. ज्या गोष्टी आम्ही सर्व सामान्य मध्यमवर्गी लोक करू शकत नाही त्या त्या करणारे ते त्या वेळचे बंडखोर वृत्तीचे नेते, एक कॅरिस्मॅटीक पर्सनॅलिटी म्हणून ते लोकांना आवडतात. त्यांचं आयुष्यच एखाद्या दंतकथे प्रमाणे आहे, त्यांचं नाहीसं होणं धरून. अशा व्यक्तीला जर रशियन स्थानबद्धतेत यातनामय मरण आलं असेल तर त्याची जबाबदारी आम्ही शोधणारच. नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको (स्टॅलीन एक काळी लोकांचा हिरो होता म्हणे). जर असं काही नसेल तर नेहरूंना घाबरायचं काहीच कारण नाही.

In reply to by काळा पहाड

नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी)
आणी
नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?आणी ५०च्या दशकात रशियन सरकारवर दबाव टाकणे म्हणजे बाकरवडी खाण्यासारखे सोपे वाटले का रे पहाडा? बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो. १९५७ पासून लोकसभेत हजेरी लावणार्या अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

क्लिंटन 16/04/2015 - 18:41
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?
अरे काय दिवस आले आहेत? चक्क मी माईसाहेबांशी सहमत आहे :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

hitesh 16/04/2015 - 20:05
.गांधी नेहरु नेभळट होते असे लबाड संघवाले म्हणतात. नेहरुनी म्हणे नेताजीना संपवायला स्टालिनला पत्र लिहिले अsehee लबाड संघवाले म्हणतात. भगतसिंगाना फाशी देऊ नये म्हणुन गांधीजींनी इंग्रजांवर दबाव टाकला नाही असेही हेच लबाड लोक म्हणतात. यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात.. मग वेळ पडली की काँग्रेसचे नेहरु गांधी याना स्मरणीय मान. काँग्रेसच्या पटेलांचा पुतळा बांध. कम्युनिस्ट भगतसिंग , मुस्लिम्प्रेमी नेताजी यांना प्रेमाने आपले म्हणणे, असेही हे लोक करतात.

In reply to by hitesh

विकास 16/04/2015 - 22:52
यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात.. हो ना! ह्यांच्या पारड्यात मोठे नेते असते तर काँग्रेसच्या लोकांसारखे आज फटाके उडवता आले असते! पण कसचं काय... टाईम मॅगझिन मधे आलेल्या प्रेसिडंट ओबामांच्या "रीफॉर्म - इन - चार्ज" फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर असे नेत्याबद्दल वाचावे लागले नसते! (बाकी ओबामा पण चावटच आहेत.... मोदींना "फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर" असे म्हणले "फ्रॉम आम आदमी/कॉमन मॅन टू प्राइम मिनिस्टर" असे नाही म्हणले! ;)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या 16/04/2015 - 21:38
दबाव हा शब्द चुकीचा वाटतो. नेहरु हे ब्रिटिशधार्जिणे होते आणि ते ब्रिटिश लोकांनाही सोयीचे होते. त्यामुळे हे परस्परांच्या सोयीची योजना होती. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे करतो, तुम्ही माझ्यासाठी ते करा अशी देवाणघेवाण होणे अशक्य नव्हते. दुसर्‍या महायुद्धानंतर शीतयुद्ध जोरात होते. जेव्हा अमेरिकेची आणि रशियाची रस्सीखेच जोरात होती त्या काळात भारताचे राजकीय, भौगोलिक आणि एकंदरीत स्ट्रॅटेजिक महत्त्व रशियाच्या लेखी होते. ते तसेच अबाधित रहावे म्हणून स्टालिनने नेहरूना मदत केली असेल अशी शक्यता इतकी अवास्तव वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 16/04/2015 - 22:29
माई, हे नक्की "ह्यां"चं मत आहे की तुझं? तुझा युएसपी तुझे "हे" आहेत हे लक्षात घे.
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?
तू जरा नीट वाच.
अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?
अटल"जी"? फक्त अटल म्हणायचे पद्धत आहे ना? बाकी हे तू अटलजींनाच जावून का विचारत नाहीस? मी बीजेपी मध्ये पण नाही आणि अटलजींचा पीए पण नाही.
बाकरवडी खाण्यासारखे
माई तुझं वय काय, तू खातेस काय. जास्त तेलकट गोष्टी खात जावू नकोस. जोक्स अपार्ट, बोस हे ब्रिटिशांच्या डोळ्यात सलत होते. ब्रिटिशांनी बोसना मारण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. असं असताना ब्रिटिशांनी बोस यांना रशियन सरकारकडून ताब्यात घेण्यासाठी आकाशपाताळ एक केलं असण्याची शक्यता आहे. या बाबतीत ब्रिटीशांना फक्त उकसवायची गरज असावी. बाकी काम त्यांनी केलं असेलच. बाय द वे,
आणि हे जर सिद्ध झालं
बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो. अग मै, जर नेहरूंनी असं पत्र लिहिलं असेल असं कुणीतरी लिहीतय, तर दोष काय शारूक खान ला देणार का?

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 16/04/2015 - 19:07
नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको
मध्यंतरी सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले होते की नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना स्टॅलीनकरवी संपवले. सुब्रमण्यम स्वामींच्या या म्हणण्यातील काही भाग तरी नक्कीच गंमतीशीर आहे. उदाहरणार्थ स्टॅलीनने १९४५ साली नेहरूंना पत्र लिहून सुभाषचंद्र बोसांचे काय करू हे विचारले. मला तरी ही गोष्ट पूर्ण हास्यास्पद वाटते. स्टॅलीनने १९२० च्या दशकाच्या शेवटी रशियन सैन्यात 'पर्ज' घडवून आणून लष्करातील जवळपास सर्व वरीष्ठ नेतृत्व संपविले होते. याच स्टॅलीनने लाखो रशियनांना ठार मारले होते.समजा सुभाषचंद्र बोस त्याच्या तावडीत सापडले असतील तर त्यांना ठार मारायचा आदेश द्यायला याच स्टॅलीनला ऑफ ऑल द पीपल, पंडित नेहरूंच्या सल्ल्याची गरज पडावी हे अनाकलनीय वाटते. दुसरे म्हणजे १९४५ मध्ये स्टॅलीनला नेहरूंना खिजगणतीतही धरायची गरज वाटली असेल असे मानायचे कारण नाही. रशियाने किती प्रतिकूल परिस्थितीत झगडून हिटलरचा पराभव केला हे जगासमोरच होते.युध्द संपल्यानंतर सुरवातीला दोस्त राष्ट्रांचे जर्मनीवर नियंत्रण होते. अशावेळी फ्रान्सला कोणताही भाग देण्यास स्टॅलीनने पूर्ण नकार दिला होता.कारण काय तर रशियाने सुमारे दोन कोटी लोकांची आहुती युद्धात दिली होती तर फ्रान्सने १५ दिवसातच हिटलरपुढे गुढघे टेकले होते अशा फ्रेंचांना विजयातील हिस्सा फुकटात द्यायची काही गरज नाही. फेब्रुवारी १९४५ च्या याल्टा कॉन्फरन्सच्या वेळी स्टॅलीनने रूझवेल्ट यांची राहायची व्यवस्थाही अधिक सोयीची केली होती आणि चर्चिलना फार महत्व दिले नव्हते. असा स्टॅलीन पंडित नेहरूंना सल्ला मागण्याइतके महत्व देऊ शकेल हे मला तरी अशक्य वाटते. मी पण पंडित नेहरूंचा अगदी फार मोठा चाहता आहे असे अजिबात नाही.पण म्हणून एखाद्याला झोडपायचेच म्हणून अशा कुठल्याकुठल्या मुद्द्यावरून राळ उठवायला मला तरी आवडत नाही. बाकी तुम्हाला कुठल्याकुठल्या कारणावरून सुभाषचंद्र बोस आवडत असतील तर ते तुमचे मत झाले.त्याचा आदरही आहे. पण माझ्या स्वतःच्या दृष्टीकोनातून आझाद हिंद सेनेचा पराभव झाला हे चांगलेच झाले. सुभाषचंद्रांच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेऊ शकणारच नाही.पण त्यांचा जपानबरोबर जायचा निर्णय मला स्वतःला अजिबात समर्थनीय वाटत नाही. याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे 16/04/2015 - 20:02
याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.
तेच धागे शोधत होतो. जबरदस्त चर्चा आहेत त्या. धन्यवाद!

In reply to by क्लिंटन

आजानुकर्ण 16/04/2015 - 19:09
मस्त प्रतिसाद क्लिंटनसाहेब, प्रतिसाद आवडला. प्रश्नः कम्युनिष्ट विचारसरणीचे भगतसिंग, फॉरवर्ड ब्लॉकसारख्या पक्षाची सुरुवात करणारे आणि मुस्लिमप्रेमी सुभाषबाबू, गायीला उपयुक्त पशू माना असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ सावरकर, संघावर बंदी आणणारे पटेल या सर्वांमध्ये एक साम्य आहे. त्यामुळे ते सर्व आम्हाला एकाचवेळी प्रिय वाटतात. उत्तरः त्यांचे आडनाव नेहरु किंवा गांधी नाही हेच. बाकी काय बोलणार.

In reply to by क्लिंटन

विकास 16/04/2015 - 20:38
माहितीपूर्ण प्रतिसाद! बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही. पण एक संदर्भ मी सावरकरी वाड्मयात पाहीला आहे तो म्हणजे सावरकर-सुभाषबाबू भेट. सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना आणि नंतर सैनिकी शिक्षण घ्या आणि सैन्यात भरती व्हा असे तरूणांना आवाहन केले होते. त्यावरून त्यांच्यावर टिका देखील झाली होती. (अत्रे, ज्यांनी त्यांना आधी "स्वातंत्र्यवीर" ही पदवी दिली, त्यांनी त्यावरून त्यांना "रिक्रूटवीर" म्हणून हिणावले देखील!). अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा... पण या रिक्रूट भरतीचा उपयोग आझाद हिंद सेनेला काही अंशी झाला. तसेच नंतर नेव्हीचे बंड झाले त्यावेळेस ब्रिटीश घाबरू शकले. तेंव्हा सांगायचा मुद्दा हा की दोघांचे स्वातंत्र्यासाठी मार्ग समान असल्याने आणि कदाचीत सुभाषचंद्रांना देखील काँग्रेसने त्यावेळेस वाळीत टाकल्याने बाकी इतिहास न वाचता सावरकरांच्या बरोबरचे समजत असावेत. बाकी मुद्यांशी सहमतच.

In reply to by विकास

अर्धवटराव 16/04/2015 - 21:35
अभिनव भारतीचा विसर्जन समारंभ करताना सावरकरांनी अध्यक्षस्थानी सुभाषबाबुंचा फोटो ठेवला होता असं कुठेतरी वाचलं होतं. अमेरीका व जपान अखेरचे शांतीप्रयत्न करत असताना देखील जपान महायुद्धात नक्की उतरेल अशी बातमी सावरकरांच्या सोर्सेसनी त्यांना दिली होती. तेंव्हा महायुद्धाचा पुरेपूर उपयोग करुन घ्यायचा असेल तर सुभाषबाबुंना देशाबाहेरुन प्रयत्न या मताचे सावरकर होते (नक्की संदर्भ आठवत नाहि). तसंही सावरकर वगैरे मंडळींचं बरचसं काम गुप्त रुपात चालत असल्यामुळे त्याचे उघड संदर्भ जगजाहीर व्हायचे चान्सेस कमि आहेत. पण सुभाषबाबु आणि सावरकर कुठेतरी लिंक्ड असावे हे नक्की.

In reply to by विकास

क्लिंटन 17/04/2015 - 18:44
टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही.
नरहर कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे 'अहिंसक मार्गाचा अवलंब न करणारे सगळे गांधीविरोधी आणि सगळे गांधीविरोधी हे हिंदुत्ववादी' या न्यायाने सावरकर, भगतसिंग, गदर पार्टी , अनुशीलन समिती इत्यादी सगळे बरोबरचे समजले जातात. आणि सावरकरांचे प्रेरणास्थान असलेले लोकमान्य टिळकही-- मग भले स्वतः टिळकांनी लखनौ करार केला होता, लोकमान्यांनीही गांधीजींप्रमाणेच लोकांच्या प्रबोधनावर भर देऊन लोकांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य हवे ही जाणीव निर्माण करण्यावर भर दिला होता इत्यादी गोष्टींना फाट्यावरच मारायचे. म्हणूनच टिळकांचा उल्लेख केला. अशा स्वरूपाची चित्रेही बघायला मिळतात. त्यात तर शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस आणि चंद्रशेखर आझाद एकत्र दाखविले आहेत.काही चित्रांमध्ये भरीला भर म्हणून राणा प्रतापही असतात.तेव्हा गांधीजींच्या मार्गाला विरोध असलेले सर्व लोक क्रांतिकारक आणि सगळे हिंदुत्ववादी अशा प्रकारची एक धारणा असते.त्याला उद्देशून मी हे विधान केले.
अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा...
याच बरोबर सावरकरांचा उद्देश होता की सैन्यात जाऊन शस्त्रे आणि ती चालवायचे प्रशिक्षण मिळवा.त्या बंदुकांची तोंडे कुठे वळवायची ते कधीही ठरवता येईल. मागे एक गोष्ट वाचल्याची आठवते. चिंतामणराव देशमुख लोकमान्यांना भेटायला गेले होते आणि स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचे आहे असे त्यांनी लोकमान्यांना म्हटले.त्यावर लोकमान्यांनी त्यांना सांगितले की आज ना उद्या स्वातंत्र्य मिळणारच आहे आणि त्यानंतर अर्थतज्ञ आणि बँकर्सची देशाला गरज पडेल. अशावेळी चिंतामणरावांसारखे लोक देशाला गरजेचे असतील म्हणून लोकमान्यांनी चिंतामणरावांना स्वातंत्र्यलढ्यात न पडायचा सल्ला दिला.

In reply to by क्लिंटन

प्रदीप 18/04/2015 - 14:16
शेषराव मोरे ह्यांनी अतिशय सखोल अभ्यास करून लिहीलेल्या "१९४७- काँग्रेसने आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला' ह्या पुस्तकात, 'नेताजी व हिंदू मुस्लिम प्रश्न' ह्या उपप्रकरणांत तत्कलीन भारतीय मुस्लिमांच्या मागण्या व त्यांतून उद्भवलेले जटिल प्रश्न, ह्यांजवर नेताजींची भूमिका काय होती, ह्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. [आवृत्ति दुसरी, पृष्ठे ३०८- ३१५] अनेक संदर्भ देऊन मोरे लिहीतात की नेताजींच्या मते, हिंदू-मुस्लिम समस्या खर्‍या अर्थाने अस्तित्वात नव्हतीच, तर ब्रिटीशांनी ती फूट मुद्दाम निर्माण केलेली होतीं. नेताजींच्या म्हणण्यानुसार "भारतीय जनतेत (राष्ट्रीय व भावनिक दृष्टींनी) फूट पडत नसल्यामुळे त्यंनी भारताची भौगोलिक व राजकीय फाळणी करण्याचे ठरविले. तीच पकिस्तानची योजना होय, की जी ब्रिटीशांच्या सुपीक मेंदूतून जन्माला आलेली आहे", नेताजींच्या मते, पाकिस्तान ही एक 'अजब', 'अव्यवहारीक' व 'अशक्यप्राय' योजना होती. ऑगस्ट १९४२ साली त्यांनी 'स्वतंत्र भारत व त्याचे प्रश्न' नावाच्या लेखात लिहीले होते की "भारतातील आजची मुस्लिम समस्या ब्रिटीशांची कृत्रिम निर्मीती आहे... ब्रिटीशांचे राज्य संपताच ती अदृश्य होऊन जाईल. ....प्रत्येकाला नोकरी, अन्न, शिक्षण आणि धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाल्यास (स्वतंत्र) भारतात अल्पसंख्याकांचा प्रश्नच स्किल्लक उरणार नाही'. 'पाकिस्तान' मागणीवरील तोडगा म्हणून मुस्लिम लीगकडे भारताची सर्व सत्ता देऊन टाकण्याचा नेताजींचा प्रस्ताव होता. जून १९४० मध्ये त्यांनी जिनांची भेट घेऊन लीगने काँग्रेसबरोबर स्वातंत्रयलढ्यात सहभागी होण्याचा व नंतर जिनांनी 'स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा' प्रस्ताव ठेवला होता. मोरे लिहीतात की नेताजी, बंगाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशबंधू चित्तरंजन दास ह्यांचे शिष्य होते. ह्या दासांनी काँग्रेसपुढे १९२३ साली 'बंगाल करार' मांडला होता. काँग्रेसने तो तेव्हा फेटाळला, पण (देशबंधूंच्या नेतृत्वाखालील) बंगाल प्रांतिक काँग्रेसने १९२४ साली तो मान्य केला. त्या करारातून, नेताजींच्या म्हणण्यानुसार 'देशबंधूंनी सर्व मुसलमानांची खात्री करून दिली की ते मुसलमानांचे खरे मित्र आहेत'. ह्या 'बंगाल करारा'नुसार राज्यातील ५२ टक्के मुसलमानांना विधीमंडळात ६० टक्के, तर नोकर्‍यांत ५५ टक्के जागा राखीव होत्या. १९३८ च्या काळात जिना सुभाषबाबूंना म्हणाले होते की "मि. बोस, माझे मित्र चित्तरंजन दास ह्यांचे आपण शिष्य आहात. त्यामुळे तुमचे आणि माझे जमायला काहीच हरकत नाही. माझे आणी गांधींचे मात्र जमणे शक्य नाही". सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद फौजेच्या' प्रतिनिधी मंडळात ७ पैकी ४ प्रतिनिधी (लेफ्टनंट) मुसलमान होते. ही 'आझाद हिंद फौज'ही पाकिस्तानच्या विचारापासून मुक्त नव्हती. इक्बाल शेदाई हे त्या फौजेतील क्रमांक दोनचे प्रभावशाली नेते. त्यांना फौजेचे मुख्यालय इटलीतील रोम येथे पाहिजे होते. नेताजींना हे मान्य झाले नाही. परिणाम असा झाला की शेदाईंनी आझाद हिंद फौजेत फूट पाडून 'आझाद मुस्लिम फौज' स्थापन केली. नेताजींनी १९४२ साली 'आझाद हिंद फौजे'च्या प्रचारासाठी 'आझाद हिंद रेडियो' केंद्र सुरू केले. पण नंतर फौजेतील मुस्लिमांन खूष ठेवण्यासाठी दुसरे 'आझाद मुस्लिम रेडियो' केंद्र चालू केले. सदर उपप्रकरणाचा समारोप करतांना मोरे लिहीतात की "रासबिहारी बोस व सुभाषचंद्र बोस ह्यांना हिंदु- मुस्लिम प्रश्न महत्वाचा वाटत नव्हता; फाळणीची मागणी अजब, अव्यवहार्य व अशक्यप्राय म्हणून गंभीरपणे विचारात घ्यावीशी वाटत नव्हती. स्वतंत्र व अखंड भारतात मुसलमानांचा प्रश्न कसा मिटवावा ह्याबद्दल त्यांची कोणतीही योजना नव्हती व ब्रिटीश गेले की हा प्रश्न आपोआप अदृश्य होईल असे त्यांना वाटत होते. त्या काळातील जिनांच्या गर्जना, मुस्लिम प्रश्नांचे गांभीर्य व सैन्यातील मुस्लिम प्राबल्य लक्षात घेता असे म्हणणे भाग आहे की नेताजींची आझाद हिंद फाउज विजयी झाली असती तरी अखंड व स्वतंत्र भारतात स्थिर लोकसत्ताक सरकार स्थापन होऊ शकले नसते: अराजक व हिंदु- मुस्लिम यादवी युद्धाचे आव्हान उभे ठाकले असते. स्वातंत्र्यप्राप्तीएवढाच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न हिंदू मुस्लिम समस्या आहे, हे नेताजींच्या लक्षात आले नाही.

हुप्प्या 16/04/2015 - 21:44
सुभाषचंद्र बहुधा निधर्मी, कम्युनिस्ट विचारांचे होते तरी ते हिंदुत्ववाद्यांना आवडतात म्हणून इतके आश्चर्य का वाटावे? सावरकर कमालीचे विज्ञाननिष्ठ होते. हिंदुत्त्ववाद्यांना तेही प्रिय आहेत. समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात. शत्रूचा शत्रू तो माझा मित्र असे रोखठोक धोरण जास्त भावणारे होते. गांधी व नेहरूंचे ब्रिटिशांना मदत करण्याचे धोरण अनाकलनीय होते. निदान तटस्थ रहाता आले असते. हिटलर वा जपानी लोकांचे अत्याचार हे आवडतात म्हणून सुभाषचंद्रांना समर्थन द्या असे कुणाही भारतीयाला वाटले असेल असे वाटत नाही. भारतात ज्यू वा चिनी लोकांवर (अगदी मूठभर संख्येने असले तरी) वंशमूलक अत्याचार झालेले नाहीत. तसे करावेत असे कुणाला वाटत असेल असे मला वाटत नाही. तेव्हा हिटलरबद्दल आकर्षण असेल तर केवळ ब्रिटिशांचा शत्रू म्हणूनच. लाखो ज्यूंची कत्तल करणारा म्हणून नाही. तसेच सुभाषचंद्रांविषयीचा आदर हा कम्युनिस्ट विचारसारणी होती, खिलाफतचा समर्थक म्हणून नक्कीच नाही.

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 16/04/2015 - 22:37
समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात.
बरोबर आहे ना. पण सावरकर विज्ञाननिष्ठ असले तरी त्यांना मुस्लिमांना राखीव जागा द्यावात असे वाटत होते का? अर्थातच प्रत्येकाला नक्की कोणते वैशिष्ट्य भावेल हा ज्याचा त्याचा मुद्दा झाला पण तरीही डावे विचार, मुस्लिम आरक्षण, खिलाफत चळवळ इत्यादी गोष्टी बघितल्या तर हिंदुत्ववाद्यांना अन्यथा न आवडणार्‍या गोष्टी सुभाषचंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या. तरीही ते सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे कारण केवळ गांधींपेक्षा त्यांचा मार्ग वेगळा होता यापेक्षा वेगळा अर्थ काढता येईल का? एक तर अनेक लोकांना या गोष्टी माहित नसतात, आणि असल्या तरी ते सुभाषचंद्र गांधीजींपेक्षा वेगळ्या मार्गाचे म्हणून अशा अनेक अत्यंत क्रिटिकल गोष्टींकडे दुर्लक्ष करतात की काय हा प्रश्न नक्कीच पडतो. २६ जानेवारी १९४३ रोजी सुभाषचंद्रांनी बर्लिनमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाल्यानंतर २६ जानेवारी १९३० रोजी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला होता.त्यानंतर १९४७ पर्यंत २६ जानेवारी रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असे) कार्यक्रम आयोजित केला होता त्यात भाषण केले होते. नाझी रेजिमचा ज्यू द्वेष होता हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचे स्थलांतर चालू होते आणि अरबांमध्ये अस्वस्थता होती.ज्यू द्वेषामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने नाझी रेजिमचा या अरबांना पाठिंबा होता. याच अरबांपैकी जेरूसलेमचा मुफ्ती, ज्यूंची इराकमध्ये कत्तल करणारा इराकचा माजी पंतप्रधान इत्यादी या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी सुभाषचंद्रांनी केलेले भाषण बघितलेत तर ते कोणी केले आहे हे नाव न वाचता कोणी नुसते भाषण वाचले तर तो माणूस ताबडतोब दाढ्या कुरवाळणार्‍यांच्या गोटात सामील केला जाईल असे ते भाषण होते. या भाषणाच्या वेळी सुभाषचंद्र त्यांच्या सैनिकी गणवेषात किंवा धोतर-कुर्त्यामध्ये गेले नव्हते तर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये गेले होते. आता ते काय घालून तिथे गेले यावरून फार तर्क करायची इच्छा नाही पण समोरचा ऑडिअन्स लक्षात घेता सुभाषचंद्र मुद्दामून काळ्या शेरवानीमध्ये तिथे गेले हे सूचकात्मक नव्हते का? "“By the beginning of the present century, the British … discovered the Muslim problem in year 1906 when Lord Minto was the Viceroy. Prior to this there was no such problem in India. In the great revolution in 1857, Hindus and Muslims had fought side by side against the British, and it was under the flag of Bahadur Shah, a Muslim, that India’s first war of independence was fought…. Consequently, the British policy has now fallen back on its last hope. If Indian people cannot be divided, then the country – India – has to be spilt up geographically and politically. This is the plan called Pakistan which has emerged from the fertile brain of a Britisher. Though the vast majority of the Indian Muslims want a free and independent India, though the president of the Indian National Congress today is Maulana Abul Kalam Azad, a Muslim, and though only a minority of the Indian Muslims support the idea of Pakistan, the British propaganda throughout the world gives the Indian Muslims are not behind the national struggle for liberty and want India to be divided up.” सुभाषचंद्र.ऑर्ग या वेबसाईटवर सुभाषचंद्रांची भाषणे दिली आहेत.त्यात बघूनही याची खात्री करता येईल. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की इतके विरोधाभास असूनही हिंदुत्ववादी विचारांचे लोक सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे नवल वाटते.विशेषतः ज्या कारणांसाठी गांधीजी दाढ्या कुरवाळणारे ठरतात नेमके तेच सुभाषचंद्रांनी केले तरी त्यांना पाठिंबा हे कोडे मला उलगडलेले नाही.आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे धोरण जपानसारख्या शत्रूच्या शत्रूसंदर्भात समर्थनीय नव्हते हे यापूर्वीच मिपावर मांडले आहे. भारतीय भूभागात इंटरेस्ट नसलेला इतर कोणताही शत्रूचा शत्रू परवडला असता आणि त्याला पाठिंबाच दिला असता पण जपानची केस वेगळी होती.त्यामुळे या कारणावरूनही लोक कसे काय सुभाषचंद्रांना पाठिंबा देऊ शकतात हेच कळत नाही. (स्पष्टीकरणः मला स्वतःला धर्माबिर्माचे फार नाही.पण तरीही मी एक उजव्या गटाचा राष्ट्रवादाला पाठिंबा देणारा आहे. तरीही माझ्यासारख्या विचारांचे अनेक सुभाषचंद्रांना कसा काय पाठिंबा देतात याचे कोडे नक्कीच वाटते. या बाबतीत तरी मी या टिपीकल उजव्यांप्रमाणे नाही)

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 16/04/2015 - 22:54
जर्मनी-जपानची बाजु घ्यायचं एक महत्वाचं आणि सोपं कारण म्हणजे जर हि राष्ट्रे युद्ध जिंकले असते (तशी शक्यता अगदी नगण्य नव्हती) तर ब्रिटीशांनी भारताला एक गुलाम भेट द्यावा तसा जर्मनी-जपानच्या हवाली केला असता. भारताकडे काहिच बार्गेन पॉवर नसती. सुभाषबाबुंच्या प्रयत्नांमुळे फॉर्मेलिटी म्हणुन का होईना, जपानने भारताला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला असता (तसंही आझाद हिंद सेनेचं सरकार जपान्यांनी मान्य केलच होतं). पुढे काय व्हायचं ते रामायण घडायचं ते घडलंच असतं, पण भारत एक स्वतंत्रराष्ट्र म्हणुन जपान्यांचा सामना करायला उभं राहिलं असतं. अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.

In reply to by अर्धवटराव

क्लिंटन 17/04/2015 - 11:57
अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.
पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात :( माझा मुद्दा १९४२-४३ च्या काळापेक्षा सध्याच्या काळास अधिक जास्त निगडीत आहे. सुभाषचंद्रांनी देश स्वतंत्र व्हावा याच उद्देशाने सगळा खटाटोप केला होता याविषयी कोणीही शंका घेऊच शकणार नाही.१९३७-३८ मध्येच ऑस्ट्रेलियातील आणि अमेरिकेतील वर्तमानपत्रांमध्ये जपान्यांनी चीनमध्ये कसे अत्याचार केले होते याविषयी बातम्या येत होत्या.इंग्लंडमधून आय.सी.एस झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पर्स्पेक्टिव्ह असलेल्या सुभाषचंद्रांनाही या बातम्या कळल्या नसतील हे मानणे तसे जडच जाते.पण सर्वसामान्यांना या बातम्या कळल्या नसतील तर ते नक्कीच समजू शकते.भारतातील सर्वसामान्य न्यू यॉर्क आणि मेलबर्नमधील वर्तमानपत्रे नक्कीच वाचत नव्हते.कदाचित त्याकाळी मी असतो तर त्या भारलेल्या वातावरणात आणि देश स्वतंत्र करायचाच आहे या उद्देशाने मी पण सुभाषचंद्रांना डोक्यावर धरले असते. पण २०१५ मध्ये पूर्वी माहित नसलेल्या या अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांनाही माहित झाल्या असतानाही आजचे सर्वसामान्य लोक सुभाषचंद्रांना का डोक्यावर धरतात? नरहर कुरूंदकर म्हणाले होते ते किती बरोबर होते हे आता जाणवते-- "अहिंसेच्या मार्गाचा अवलंब न करणारे सगळेच क्रांतिकारक आणि सगळेच गांधीविरोधी. आणि असे सगळेच गांधीविरोधी म्हणजे हिंदुत्ववादी" अशी सोयीस्कर विभागणी आधीच केलेली असते.बहुदा म्हणूनच सुभाषचंद्रांना उजव्या गटाचेही लोक पाठिंबा देतात.

In reply to by खंडेराव

क्लिंटन 17/04/2015 - 14:07
अंदमान बेटांवर भरपुर अन्याय केले. बरे ते अजुन पुढे आले नाहित.
जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले याविषयीचा हा लेख सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायचे समर्थन करणार्‍या सगळ्यांनी वाचावा असा आहे. अनेकांना वाटते की जपान्यांना भारतीयांविषयी फार प्रेम होते आणि त्यांनी इंग्रजांना हाकलून दिल्यानंतर आपल्याला गपगुमान स्वातंत्र्य दिले असते. जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले हे वाचल्यास हा गैरसमज गळून पडायला हरकत नसावी.आपले मोठे नशीब की जपानी आणि आझाद हिंद सेना यांचा पराभव झाला.अन्यथा जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात केले होते अगदी तसेच अत्याचार भारतातही झाले असते.

In reply to by कपिलमुनी

बबन ताम्बे 17/04/2015 - 19:11
बोका-ए- आझम यांची एक लेखमालिका आहे मिपा वर. त्यात काही लेखांमध्ये दुस-या महायुद्धात जपान्यांनी कीती कृर अत्याचार केले त्याचे शहारे आणणारे वर्णन आहे.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 18/04/2015 - 00:48
क्लिंटन साहेब, स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा काही रोल होता का? बिलकुल होता. आझाद हिंद सेनेचं बनणं, त्यांचं ब्रिटिशांविरुद्ध उभं रहाणं आणि त्यांची कोहिमापर्यंत धडक यानं ब्रिटीश हादरले. त्यांची संपूर्ण मदार २ गोष्टींवर अवलंबून होती. १) भारतीय सैन्याची निष्ठा आणि २) त्यांच्या साम्राज्यावर न मावळणारा सूर्य (थोडक्यात, त्यांची आर्थिक आणि सामरिक महासत्ता असणं). दुसर्‍या महायुद्धानं दुसर्‍या गोष्टीची वाट लावली. आझाद हिंद सेनेनं बाकीच्या भारतीय सैन्यासमोर एक असं उदाहरण उभं केलं की ज्यामुळे त्यांच्या साम्राज्याला धोका उत्पन्न झाला. ब्रिटिशांनी शहाणपणाचा निर्णय घेतला.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 18/04/2015 - 11:27
नक्कीच. स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा वाटा नक्कीच होता.माझा मुद्दा केवळ जपान्यांशी हातमिळवणी करण्यापुरता आहे.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:39
Posterity will ask uncomfortable questions about the vandalism of the Japanese and the role played by them for the freedom of India in collaboration with Subhas Chandra Bose. Ironically, Bose was in Port Blair between December 29-31, 1943. He visited the cellular jail where Diwan Singh, the president of the Indian Independence League and hundreds of his companions were languishing, but he did not visit them. After wining, dining and dancing in the Ross Island he went back to Singapore. This is how Tojo helped Bose to get freedom for India from the British.
असे लेखात लिहिले आहे. याची भाषा लेखकाच्या मानसिकतेची सूचक आहे. बाय द वे, जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर हेच अत्याचार त्यांनी मणिपूरमधे का केले नाहीत?

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:10
अंदमानात अत्याचार केले त्याचे काय?
जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर....
म्हणजे जपानी सैन्याने दक्षिण-पूर्व आशियात जो धुमाकूळ घातला होता त्याकडे दुर्लक्ष करून जपानी सैन्य तसले नव्हते असे तुम्हाला वाटत असल्यास तुमच्या नंदनवनात सुखात रहा.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:23
जपानी सैन्य तसले नव्हते
नाह. नाह. मला तसले नव्हते, इ इ नै म्हणायचं. -------------------------------------------------- युद्धोत्तर काळात चुकुनमाकून जपानचं भारतावर राज्य असतं (एकतर यातल्या चुकुनमाकून शब्दावरच तुम्हाला आपत्ती आहे, पण ते असो.) तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे त्याचा स्रोत काय आहे हे जाणायचे आहे. म्हणजे जपानचे शांतिकालीन अत्याचार, इ इ.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:42
तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे
का हो जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात अगदी १९४० च्या दशकात जे काही केले ते तुम्हाला दिसत नाही का?इतर ठिकाणचे सोडाच आपल्याच अंदमानातही केले ते पण तुम्हाला दिसत नाही का? जे त्यांनी अंदमानातही केले ते बंगालमध्ये कशावरून केले नसते? एखादी गोष्ट विष आहे हे समजले की त्यापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे हे मला समजते. तुम्हाला हवे असेल तर ते विष आहे की नाही हे पिऊन खात्री करावीशी वाटत असेलही. मला तसे वाटत नाही. आणि तुम्ही मला प्रश्न विचारत आहात की जपानी भारताशी दुष्टपणे वागले असते हा विश्वास कशावरून तसाच मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की ते भारताशी दुष्टपणे वागले नसते हा विश्वास तुम्हाला कशावरून वाटतो?

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:57
युद्धकालीन परिस्थिती आणि शांतिकालीन परिस्थिती यांत फरक आहे. I don't think either of us has adequate evidence to establish who was more cruel and whether Japan would have been a worse ruler in peacetime. असो, आपणाशी दर्जात्मक आणि वस्तुनिष्ठ संवाद झाला आहे त्याचा आनंद आहे.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 21/04/2015 - 10:57
नवे मुद्दे आल्यामुळे त्याविषयी लिहित आहे. माओने त्याच्या २७ वर्षांच्या राजवटीत लाखो लोकांना ठार मारले. स्टॅलिननेही तेच केले. आता हा शांततेचा काळ म्हणायचा की युध्दाचा? अन्य कोणत्या देशाशी प्रत्यक्ष युध्द चालू नसलेला काळ शांततेचा म्हटला तरी लाखांना ठार मारले जात असेल तर तो काळ शांततेचा कसा? जपानी फिलीपीन्समध्ये घुसले जानेवारी १९४२ मध्ये. नोव्हेंबर १९४४ मध्ये त्यांना तिथून मागे रेटले गेले. जानेवारी १९४२ नंतर जपान्यांनी पॅसिफिकमधील इतर अनेक ठिकाणे जिंकली होती आणि आपले क्षेत्र फिलीपीन्सपेक्षा बरेच वाढवले होते. अमेरिकन सैन्याने जपान्यांवर फिलीपीन्समध्ये हल्ला केला तो अगदी १९४४ मध्ये. मधल्या काळात तिथे शांतता होती की जपानी इतरत्र युध्दात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? दोन्ही बाजू आपल्या सोयीप्रमाणे तिथे शांतता होती किंवा युध्दजन्य परिस्थिती होती असे म्हणू शकतात. तसेच अंदमानात एकदा जपानी घुसल्यानंतर शांतता म्हणायची की जपानी इतरत्र युद्धात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? तेव्हा जपानी खुनशी होतेच आणि त्यांना युद्धजन्य परिस्थितीची सूट देता येईल असे मला तरी वाटत नाही. तुम्हीच अन्य एका प्रतिसादात जपान्यांना भारताविषयी तो बुध्दाचा देश म्हणून प्रेम वाटत होते असे लिहिले आहेत. म्हणजे जपानी जे काही करत होते तो बुध्दाचा मार्ग होता का? आणि अनेकांना हिटलर आर्य वंशाचा उदोउदो करायचा आणि भारतही मुळातला आर्य लोकांचा देश म्हणून हिटलरलाही भारताविषयी प्रेम होते असा उफराटा सिध्दांत मांडतात. कालच मिपा सदस्य राजघराणे यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयीच लिहिले आहे आणि असे वाटणार्‍यांचे मत कसे चुकीचे आहे हे दाखविओन दिले आहे. आता सगळी दुनिया भारताभोवती फिरत होती आणि सगळ्यांना आपल्याला मदत करायची होती असे वाटायला लागले तर खरोखरच अवघड आहे.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 17/04/2015 - 21:32
" ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी " म्हणजे साहेबांपुढे भारताची जी(काहि उरली सुरली) पत होती त्यापेक्षाही डिग्रेड झालेली आपली कंडीशन याअर्थाने हे वाक्य वापरलं आहे. जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि. तत्कालीन जीव-रासायनीक युद्धाची तयारी करणारं , चीनला ताब्यात ठेवणारं जपान खरच मनुष्यराज्य म्हणुन घ्यायच्या लायकीचं आहे का हा प्रश्न पडावा. अफ्रीका, आशीया, अमेरीकेत ब्रीटनचे प्रताप ऐकुन त्यांच्यात काळीज नावाचा अवयव मिसींग आहे का असं वाटावं. एकदाका माणसाचं माणुस म्हणुन मुल्य नाकारलं कि गोर्‍या युरोपीयनांना आणि काळ्या आशीयायी सत्तांना मनुष्य हाडामासाची केवळ व्यापारी दृष्टीने किंमत उरते. असो. राहिला मुद्दा जनता जनार्दनाच्या गांधीवादी-गांधीविरोधी, हिंसा-अहिंसा, हिंदुत्ववादी-सेक्युलर वगैरे घोळाचा. या तमाशाला थोडंफार करमणुक मुल्य असण्यापलिकडे फार काहि बघायची गरज नाहि. यांना नेहरुंनी आधुनीक भारताची केलेली पायाभरणी पण दिसत नाहि आणि जनसंघापासुन तो आतापावेतो उजव्या आघाडीत एकही कर्तुत्ववान नेता दिसत नाहि. गांधीचा चरखा आणि सावरकरांची पिस्तुल हे केवळ दृष्य परिमाणं होती. ते का धारण केलं गेलं, त्यामागचं मनगट, मन आणि मेंदु काय होता याचा विचार करण्याची गरज फारशी कोणाला वाटत नाहि. स्वतःला हिंदुत्ववादी वा गांधीवादी म्हणणे म्हणजे नेमकं काय याचाच जिथे पत्ता नाहि तिथे बाकी तपशील काय कामाचा.

In reply to by अर्धवटराव

आजानुकर्ण 17/04/2015 - 22:28
नेहरुंचे मूल्यमापन कोणत्या गोष्टीवर करायचे याचीही किमान माहिती पब्लिकला नसते. नेहरुंबाबत लेडी माऊँटबॅटनला सिगरेट ऑफर करणारा स्त्रीलंपट ही इतकीच माहिती शाखेतल्या बौद्धिकात मिळत असल्याने त्यात पब्लिकचाही फारसा दोष नाही.

In reply to by अर्धवटराव

क्लिंटन 17/04/2015 - 22:32
जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि.
मला वाटते की जपानी अधिक भयंकर होते. इंग्रज हे संत अजिबात नव्हते पण जपानी त्याहून कितीतरी पटींनी अधिक खुनशी होते. जपानने मांचुरियावर हल्ला केला १९३२-३३ मध्ये.त्यानंतर १९४५ पर्यंत म्हणजे १२-१३ वर्षात जपानने जो काही धुमाकूळ घातला त्याला तोड नाही. चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली. ब्रिटिशांचे म्हणाल तर ते क्रूर होतेच यात शंका नाही.पण जपानी क्रौर्याच्या बाबतीत ब्रिटिशांच्या चार नाही शंभर पावले पुढे होते. जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे बंगालमध्ये लाखो लोक मारले गेले यात शंकाच नाही.१८५७ नंतरही उत्तर भारतात इंग्रजांनी प्रचंड क्रौर्य दाखविले. तरीही जपान्यांपेक्षा इंग्रज कमी होते याची काही उदाहरणे-- भारतीयांच्या मनातील असंतोषाला वाट करून दिली नाही तर परत १८५७ सारखा उठाव होईल या स्वार्थी हेतूने का होईना त्यामानाने सुसंस्कृत विचार करून काँग्रेसची स्थापना करणारा इंग्रजच होता. राणीच्या जाहिरनाम्यानंतर आलेल्या व्हाईसरॉय कॅनिंगला दयाळू कॅनिंग म्हणायचे असेही वाचले आहे.रिपनही असा एक अत्याचार न करणारा व्हाईसरॉय होता. मुंबई प्रांतालाही रे, एलफिस्टन सारखे गव्हर्नर होते. लोकमान्य टिळकांवर रितसर खटला चालवून, कायद्याप्रमाणे शिक्षा दिली गेली होती. १९०८ मध्ये राजद्रोहाच्या खटल्यात त्यांना ६ वर्षाची शिक्षा झाली तसाच खटला इंग्रज सरकारने त्यांच्याविरूध्द १९१६ मध्ये आणला होता त्यात त्यांची निर्दोष मुक्तताही झाली होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे असे लोकमान्य उघडपणे लिहू शकत होते. स्वराज्य पक्ष निवडणुका लढवून विधीमंडळात जाऊन इंग्रजांची तिथे अडवणुक करायचा प्रयत्न करत होता.त्याला फार महत्व दिले गेले असे नाही पण विधीमंडळात जाऊन भारतीयांची बाजू मांडायला परवानगी होती. सुभाषचंद्र कलकत्याचे आणि सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होऊ शकले.त्यांना तिथे मर्यादित का होईना अधिकार होते. १९३५ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया कायद्यानुसार १९३७ मध्ये निवडणुका होऊन अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची राज्य सरकारे सत्तेत आली.त्यांनाही राज्य पातळीवर मर्यादित का होईना अधिकार होते. यापैकी पाव टक्काही गोष्टी जपानी राज्यात होणे शक्य नव्हते. म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.

In reply to by क्लिंटन

संदीप डांगे 17/04/2015 - 23:10
अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते. अशा काही घटना ऐकल्या, वाचल्या की नेमकी स्वातंत्र्यपूर्व भारतातली परिस्थिती कशी होती याचे कुतूहल अजून वाढत जाते. इंग्रजांविरोधी स्वातंत्र्यलढा आणि त्याचवेळी सामान्य पद्धतीने चाललेले समाजजीवन यांचा परस्परविरोधी सूर शालेय इतिहासात कधीच समोर येत नाही. त्याकाळाचे चित्र आजच्या सामान्य पब्लिकच्या मनात जे आहे त्यापेक्षा वेगळे निश्चित असले पाहिजे हे इतिहासाचा स्नातक असतांना समग्र पद्धतीने अभ्यास करतांना जाणवायचे. अर्थात उपलब्ध करून दिलेल्या मोजक्या साधनांवर आपण केवळ तर्क लावू शकतो. तो तर्कही तसाच लागावा अशी उपलब्ध झालेल्या पुराव्यांची इच्छा असेल तर?

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 20/04/2015 - 17:44
फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते.
सर्व मुस्लिम शासकांत औरंगजेबाच्या दरबारात सर्वाधिक हिंदू मंत्री, अधिकारी होते असे ऐकून आहे.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 17/04/2015 - 23:28
या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ? आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि? स्लो पोइजन देऊन जगाला बटीक बनवणाराव जास्त क्रुर कि सरळ शीर कापणारा? माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता. पण या सर्व जर-तर च्या बाबी झाल्या. असो.

In reply to by अर्धवटराव

काळा पहाड 18/04/2015 - 00:35
या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ?
याला व्हाईट मॅन्स बर्डन असं म्हणतात. http://en.wikipedia.org/wiki/The_White_Man%27s_Burden
आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि?
दोन कारणं. १. जपान हा व्यापारी देश नव्हता. ब्रिटीश सुरवातीला व्यापारी म्हणून आले आणि भारतीय राजांचा मूर्खपणा त्यांनी पाहिला नसता (आणि वर उल्लेखिल्याप्रमाणे व्हाईट मॅन्स बर्डन चा पगडा त्यांच्यावर नसता) तर ते व्यापारीच राहिले असते. २. जपान हा पारंपारिक रित्या साम्राज्यवादी देश नव्हता. त्याचं चरित्र दुसर्‍या महायुद्धामध्ये बदललं ते टोजो सारख्या नेत्यांमुळं. मुळात जपानी राजा या युद्धाबद्दल तितकासा उत्साही नव्हता.
माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता.
अजिबात नाही. जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.

In reply to by काळा पहाड

अर्धवटराव 18/04/2015 - 01:46
जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.
म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं. इंग्रजांबाबत भारतात नाहि म्हणायला सॉफ्ट कॉर्नर होता व स्वतंत्र भारताचे इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध असावे अशीही आपली मनसीकता होती. महायुद्धानंतर जपानने जर भारताला अंकीत करायचा प्रयत्न केला असता तर भारताचा प्रतिकार फार जास्त तिखट असता.

In reply to by अर्धवटराव

क्लिंटन 18/04/2015 - 11:44
म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं.
यात अनेक गृहितके आहेत. पूर्वीही राजपुत, शीख, मराठे, विजयनगर साम्राज्य इत्यादींनी मोंगल आक्रमणांचा मुकाबला केलाच होता.तेव्हा जास्त खुनशी शत्रू असेल तर प्रतिकारही जास्त तिखट होईल असे म्हणणे वरकरणी ठिक आहे. पण पूर्वीची परिस्थिती १९४५ मध्ये राहिली नव्हती. मोंगल असू देत किंवा राजपूत-मराठे, दोघेही पारंपारिक शस्त्रांनीच (तलवारी, भाले इत्यादी) लढाई करायचे. तेव्हा त्यात आपली बाजू फार पडती होती अशी परिस्थिती नव्हती.पण १९४५ मध्ये शत्रूकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, रणगाडे वगैरे होते. आपली तयारी कितपत होती? क्रांतिकारकही गावठी पिस्तुलातून दोन-चार गोळ्या झाडून जुलमी इंग्रज अधिकार्‍यांचा वध करू शकत होते.पण आपल्याकडे अशी शस्त्रास्त्रे, विमाने वगैरे होती का? त्यांच्या मशीनगनला आपली गावठी पिस्तुले कशी पुरी पडणार होती? औरंगजेबाच्या काळापासून १९४५ पर्यंत युध्दतंत्रात मोठे बदल झाले होते आणि वैयक्तिक शौर्याच्या जोरावर जिंकायचे दिवस बरेच मागे पडले होते. सुरवातीला अगदी अशीच पडती बाजू अफगाणिस्तानातील लोकांची रशियनांबरोबर होती.पण अमेरिकेने त्यांना शस्त्रपुरवठा केलाच होता आणि अफगाणिस्तान डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे त्याचा फायदा अफगाणांना झाला. तसा फायदा आपल्याला फार तर मणीपूर, नागालँड अशा ठिकाणी झाला असता पण बंगालसारख्या सपाटीच्या प्रदेशामध्ये आपण काय करणार होतो? आणि ब्रिटिशांविरूध्दचा आपला लढाही ०.००१% क्रांतिकारक सोडले तर 'अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला' अशा स्वरूपाचाच होता. अर्थात असे ठराव करूनच लोकांना स्वातंत्र्य हवे याची जाणीव अधिकाधिक होत होती आणि अशाच वातावरणातून क्रांतिकारक निर्माण होऊ शकतात.पण मुळात स्वातंत्र्य कशाकरता हेच माहित नसेल अशा समाजातून क्रांतिकारक निर्माण कुठून होणार? हे विविध काँग्रेसमधले ठराव ही जाणीव करायचे काम करत होते हे नक्कीच. तेव्हा आपला समाज फारसा लढवय्या नव्हता निदान १८५७ नंतर तरी.अशा समाजातले लोक खुनशी जपान्यांना कसा प्रतिकार करणार आणि त्यातूनही हातात शस्त्रे पुरेशी नसताना? टी.एन.कौल म्हणून आपले अगदी सुरवातीचे आय.एफ.एस ऑफिसर होते.ते १९५०-५१ मध्ये चीनमध्ये भारतीय दुतावासात होते.तिथे त्यांना अफगाणिस्तानचा राजदूत म्हणाला होता-- ३० कोटींच्या तुमच्या देशावर लाख-दीड लाख इंग्रज १५० वर्षे राज्य करूच कसे शकले? आमच्या देशात आम्ही अशा मूठभर इंग्रजांची चटणी उडवली असती आणि पळता भुई थोडी केली असती. याविषयी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचले आहे (पुस्तकाचे नाव विसरलो). तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे प्रचंड खुनशी जपान्यांना प्रतिकार करायची लाख इच्छा आपल्याला असूनही ते शक्य होणे कितपत शक्य होते? विशेषतः आपली बाजू अशी पडती असताना?

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 19/04/2015 - 04:55
महायुद्ध जर ब्रिटेशांच्या पराभवाने संपते तर जपानशी भारताचा सामना तसाहि झालाच असता. प्रश्न केवळ इतका उरतो कि भारत जपानला गुलाम वसाहत म्हणुन हस्तांतरीत होतो कि उपकृत राष्ट्र म्हणुन.

In reply to by अर्धवटराव

प्रदीप 18/04/2015 - 14:46
जपान्यांनी जेते म्हणून इतर देशांत नुसता नरसंहारच केलेला नाही, तर त्यांनी त्याचबरोबर जिवंत माणसांना, त्यांच्या अत्यंत क्रूर व पाशवी धोरणांमुळे, पराकोटीच्या यातना दिलेल्या आहेत. चीन, फिलीनीन्स ('फिलीपाईन्स' नव्हे), कोरीया, हाँगकाँग ह्या सर्व ठिकाणी त्यांनी स्त्रीयंवर बलात्कार व त्यांना जबरदस्तीने वेश्या बनविणे, जीवंत पकडलेल्या शत्रूसैनिकांच्या शरीरांवर, निरनिराळे पाशवी, यमयातना देणारे प्रयोग करणे असे अनेक प्रकार केलेले आहेत. म्हणूनच ह्या सर्व ठिकाणी जपानद्वेषाचे पडसाद अजूनही नेहमी उमटत असतात. कुठलाही परका देश एकाद्या, white knight प्रमाणे आपल्या 'मदतीस' येऊन, आपणांस सोडवेल व नंतर शांतपणे आपला प्रांत आपल्याकडे सोपवून आनंदानेमाघारी जाईल,ह्यासारखी खुळचट कल्पना ज्यांनी केली, त्यांना मी तरी थोर, प्रगल्भ नेते वगैरे मानण्यास तयार नाही. ब्रिटीश मुळात व्यापारी अधिक आणि, धर्म अथवा सत्तेची इर्षा असलेले, कमी. त्यामुळे त्यांनी अनेक वसाहती विषेश क्रौर्य न करता वसवल्या व आर्थिक आणि/किंवा राजकीय अपरिहार्यता येईस्तोंवर त्या तशाच चालवल्या. अर्थात एकदा एखाद्या देशात सत्ताग्रहण केल्यानंतर ते जेते म्हणूनच वावरले, तेव्हा त्यांचे व स्थानिक जनतेचे हितसंबंध समान राहिले नाहीत. तरीही, जगभरच्या वसाहतींचा विचार करता ब्रिट्सांच्या कॉलनीज खूपच 'प्रेम़ळ', स्वतःबरोबरच स्थानिक जनतेचाही थोड्याफार प्रमाणात उद्धार करणार्‍या वाटतात. ते व डच सोडता, इतर कुठल्याही युरोपियन, अमेरिकन जपानी वसाहतींच्या बाबतीत असे म्हणणे कठीण आहे.

In reply to by प्रदीप

अर्धवटराव 19/04/2015 - 05:31
जपानला कुणाही भारतीय नेत्याने आपला भाग्यविधाता समजण्याची चूक केली नव्हती. जपानी पाहुणा आपला नवा मालक बनुन येतो कि उपकारकर्‍ता हाच प्रश्न होता. बाकी ब्रिटीश वीट जपानी दगडापेक्षा मऊ असेलही. अमेरीकेची सगळी दादागिरी उघड दिसत असुन देखील जगाचा पोलीस म्हणुन इतर महासत्तांपेक्षा तेच परवडतात. ( भारताला आपण महासत्ता मानतच नाहि :) ).

In reply to by प्रदीप

हुप्प्या 20/04/2015 - 04:15
जपानचे सहाय्य घेतले असते तर त्यांनी तसेच अत्याचार भारतात केले असते जसे चीन वा अन्य भागात केले ह्यात अनेक गृहितके आहेत. एक म्हणजे भौगोलिक अंतर. जपान हा काही महाकाय देश नाही. त्यामुळे त्यांचे सैन्य भारतापर्यंत पोचले असते तर ते तितकेसे प्रबळ राहू शकले नसते. रसद, दारूगोळा पुरवणे दुरापास्त होत गेले असते. भारतानेही प्रतिकार केलाच असता. तिकडे पॅसिफिकमधे पर्ल हार्बर वगैरे अमेरिकेच्या कुरापती काढून त्या देशाला अंगावर घेणे हेही चालूच होते ह्यामुळे इतक्या विविध आघाडीवर जपान लढत असते तर नक्कीच हरले असते. कदाचित हे सुभाषचंद्रांनाही जाणवले असेल. आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असेल. ब्रिटिश जपान्यांपेक्षा सुसंस्कृत होते ह्यात दुमत नाही. पण शेवटी तो शत्रूच. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जपानचे सहाय्य घेतले म्हणजे लगेच जपान्यांच्या अत्याचाराला खुले द्वार असे मला वाटत नाही. तसेही अणुबॉम्ब प्रकरण झाल्यामुळे ते दाती तृण घेऊन शरण आलेच त्यामुळे जर तर प्रकरण ताणायचे असेल तर अगदी जपान शिरजोर होऊ लागला असता तरी तो फार काळ तसा टिकला नसता. दुसरे असे की सुभाषचंद्रांची विचारसारणी ही नेहरु गांधींपेक्षा वेगळी होती. ते राजकीय विरोधक होते त्यामुळे काँग्रेस व इंग्रज ह्यांच्या बाजूने नेताजींची डाळ शिजण्यासारखी नव्हती. राजकीय महत्त्वाकांक्षा ही निव्वळ गांधी नेहरूंच्या हक्काची गोष्ट असली पाहिजे असे मानणेही खुळचटपणाचेच आहे.

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 20/04/2015 - 10:40
बरोबर आहे ना. पण जपान्यांनी अगदी पापुआ न्यू गिनीमध्येही जाऊन अत्याचार केलेच होते.ते पण जपानला फार जवळ होते असे नाही. आणि जपान्यांनी अंदमानात घुसूनही त्याच गोष्टी केल्याच होत्या.तेव्हा जपान्यांशी संग म्हणजे विषाची परिक्षा होती. तसे जपान्यांना करता आले नसते तर एक भारतीय म्हणून मला आनंदच झाला असता पण जपान्यांना मुद्दामून बरोबर घ्यायला नको होते असे वाटते.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 20/04/2015 - 15:39
ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि पक्ष्यांची गोष्ट आठवली. ( अजून कोणी उल्लेख कसा केला नाही बरं?) झाडाच्या मुळाशी असलेल्या बिळातून एक साप पक्षी घरट्यात नसताना येई आणि त्यांची अंडी पळवायचा प्रयत्न करी. त्याला उपाय म्हणून ते पक्षी त्या बिळापर्यंत मासे विखरुन एका मुंगुसाला बोलावतात. तो सापाला तर मारतो पण आता त्याला नव्या खाद्याचा शोध लागलेला असतो. ते मुंगुस अंड्यांबरोबरच पक्ष्यांवरपण हल्ला करु लागते. आता मुंगसाने हल्ला केला असता की नाही हाच तो प्रश्न आणि त्याबद्दल ही चर्चा. :)

In reply to by हाडक्या

क्लिंटन 20/04/2015 - 15:46
:) अहो मुंगुस म्हटल्यावर ते हल्ला करणारच. आणि मुंगुस आपल्यावर हल्ला करणार नाही आणि सापाला मारून गपगुमान निघून जाईल अशी कल्पना करून घेणे हा पण घातक स्वप्नाळूपणा नाही का?

In reply to by हाडक्या

हुप्प्या 20/04/2015 - 22:51
कुठली बोधकथा वास्तवात वापरत येईल याबाबत तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का? जपानी लोकांच्या अत्याचारामुळे त्यांची खाद्याची, पगाराची, दारुगोळ्याची गरज भागत होती का? की त्याकरता त्यांना त्यांच्या रसदीची सोय करावी लागत होती? गोष्टीतले मुंगुस हे एकाच वेळी जंगलाच्या अनेक मैल दूर असणार्‍या दोन तीन टोकाशी असणार्‍या प्राण्यांशी लढत होते का? वगैरे मुद्देही यात आणता येतील. काही वेळा राजकीय तडजोड म्हणून दुष्ट वृत्तीच्या लोकांशी हातमिळवणी केली गेली आहे. ती प्रत्येक वेळेस अपयशीच ठरली आहे असे नाही. उदा. मित्रराष्ट्रांनी स्टालिनशी केलेले सहकार्य. जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.

In reply to by हुप्प्या

हाडक्या 21/04/2015 - 14:54
मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का?
अहो, बाळबोध बोधकथेचे तात्पर्य घ्यायचे असते (म्हणींसारखेच). अशी कथेची पिसे काढत बसला तर कसे हो.. थोडक्यात या कथेचे तात्पर्य आहे "असंगाशी संग प्राणाशी गाठ". मग तुम्हाला मुंगसाची मानसिकता, धार्मिकता, विचारसरणी इ.इ. अभ्यासायची असेल तर माझी काही हरकत नाही. ;)
जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.
हे अगदी मान्य.. :)

In reply to by अर्धवटराव

प्रदीप 18/04/2015 - 15:51
.. (प्रतिसाद दोनदा प्रकाशित झाल्याने हा काढून टाकत आहे).

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:23
चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली.
३% आणि ४% च फक्त? ब्रिटिशांनी १००% उत्तर अमेरिका नष्ट केली. १००% ऑस्ट्रेलिया. १००% न्यू झी लँड. आफ्रिका ....?? असोच. ---------------------------------------------------------------- युरोपीय सोडून कॉलनी नसण्याचे भाग्य नेपाळ आणि जपान या दोनच देशांना लाभलेले आहे असे ऐकून आहे. जपानी लोक थोडेसे सैल पडले तेव्हा त्यांच्यावर नको ते राजकीय आणि व्यापारी कायदे लादायचा प्रयत्न झाला. (आमचे ऐकत असाल तर तुम्हाला स्वतंत्र म्हणू.) यातून शिकला म्हणून जपान 'मर्सिलेस' बनला. तो तसा नसता तर स्वतंत्र नसता आणि आज एक टुच्चड बिनकामी भूभाग असूनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता नसता.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 17:48
हो बरोबर आहे ना. फक्त जपानने जे काही केले ते ७०-८० वर्षांपूर्वीच्या काळात आणि अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियातील मुळातील संस्कृती पूर्ण नष्ट केली गेली ४०० वर्षांपूर्वी. म्हणजे या दोन घटनांमध्ये किमान तीन शतकांचे अंतर होते.आणि १९४० च्या दशकात आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.अशावेळी ब्रिटिश वीट असतील तर जपानी दगड होते. तेव्हा उत्तर अमेरिकेत युरोपिअनांनीच उच्छेद केला या उल्लेखाचा संदर्भ समजला नाही.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:04
आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.
जपान शरणच आले नसते तर अमेरिकेने एकूण किती अणुबाँब टाकले असते असे वाटते? अमेरिका देखिल १९४० च्या दशकातली होती. आणि युरोपीय देशांपेक्षा कमी क्रूर इ इ मानली जायची. ----------------------------------------------- १९४० असो नैतर १६४०. युरोपीय ते युरोपीय. युद्ध ते युद्ध. आपण श्रेष्ठ , कॉलनी कनिष्ठ, आणि कॉलनीतल्या लोकांशी नीच वागायचे ही विचारधारा युरोपीय आहे. पूर्वेकडे युद्ध संपले, मॅटर क्लोज.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:55
जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता.
चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय? ------------------------------------------------------------------------ आणि हो, भारतीय लोक संपवले असते असं इतक्या सहजासहजी म्हणता येत नाही. मंजे रेड इंडीयन्स संपवणे आणि भारतीय संपवणे यांत बराच फरक आहे. इथे नुसते जालियनवाला झाले तर लोकांचे डोके फिरायचे. बंदुकीला गाईची चरबी लावलेली महाग पडायची. ऑनेस्टली स्पिकिंग, कधीकधी मला भारतात ब्रिटिशांचे राज्य होते कि ती काही एतत्द्देशीयांचीच कुटील अरेंजमेंट होती असा प्रश्न पडतो.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:04
चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय?
यापैकी कोणत्या ठिकाणी जपान्यांचा १५० वर्षे ताबा होता ते सांगा.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:16
'जो खातमा झाला आहे' मंजे जितके टक्के झाला, जितक्या वर्षांत आहे. वॉर टाइम परिस्थिती आणि अदरवाईज परिस्थिती यांची तुलना होऊ शकत नाही.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:31
म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.
http://en.wikipedia.org/wiki/Taiwan_under_Japanese_rule इथे असे लिहिले आहे कि तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:55
तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.
आणि दक्षिण-पूर्व आशियात कित्येक ठिकाणी १९४० च्या दशकात २-४ वर्षातच फुफाटा तुम्हाला दिसत नाही. कारण काय तर १८९० च्या दशकात तैवानमध्ये तसे झाले नाही. उत्तम. जपानने १८७० च्या सुमारास आपले अलगतावाद धोरण संपवले आणि नंतर २५ वर्षातच तैवान गिळंकृत केला. कदाचित त्यांची रक्तपिपासा सुरवातीच्या काळात तितकी नसेलही आणि नंतरच्या काळात ती वाढली. १९४० च्या दशकात तर अगदी निंसंशयपणे जपान्यांनी रक्तपिपासा जोरदार होती. म्हणजे कसे झाले सुरवातीला एखादा वाघ माणसांवर नुसताच गुरगुरत असेल पण मारत नसेल पण नंतर माणसाच्या रक्ताची त्याला चटक लागली. आणि तुमच्यासारखे लोक म्हणणार अरे सुरवातीला तो नुसताच गुरगुरत होता.त्याने कोणाला मारले होते? म्हणजे तो रक्तपिपासू नाहीच. इतर ठिकाणी त्या वाघाने काय केले वगैरे गोष्टींना फाट्यावरच मारायचे. असा वाघ तुम्हाला तुमच्या घरात ठेऊन घ्यावासा वाटत असेल तर तो तुम्हालाच लखलाभ असो. अशा वाघापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हा मुद्दा मी कित्येकवेळा मांडला आहे.तो तुम्हाला मान्य नसल्यास किंवा समजला नसल्यास किंवा समजावून घ्यायचा नसल्यास माझा नाइलाज आहे. सारखी तीच तीच गोष्ट लिहायचा कंटाळा आला आहे. तेव्हा माझ्यातर्फे या चर्चेत पूर्णविराम देत आहे. नवीन मुद्दा आल्यास परत येईनच.पण काळरेषेची गल्लत करून विचित्र मुद्दे कोणी मांडत असेल तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 19:19
कोणत्याही क्षणी चर्चा संपवण्याच्या आपल्या अधिकाराचा मला पूर्ण आदर आहे. पण तरीही ... १. युद्धकालातील देशांचे जिंकलेल्या प्रदेशातील वर्तन हे तत्समान परिस्थितींशीच तोलावे. शांतिकालाशी नाही. त्यांची सरमिसळ करू नये. म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांना आय सी एस बनू दिले वा जालियनवालाबाग हे जपानच्या तैवानमधील तत्समान परिस्थितींशी तोलावे. दुसर्‍या महायुद्धाशी नाही. अँड सो ऑन. ---------------------------------------------------------------------- २. युद्धकालात किंवा यादवी कालात, स्वकीयांशी किंवा परकीयांशी आपण जनरली कोण किती क्रूर आणि सौम्य याचा रिव्ह्यू करू- अ. अमेरिका - दोन अणुबाँब, व्हिएटनाम ब. जर्मनी - ज्यूंची कत्तल क. जपान - पूर्वेकडचे अन्याय ड. रशिया - लेनिन, स्टेलिन चे 'कर्तृत्व' इ. चीन - माओ चे काम ब्रिटीशांकडे, फ्रान्सकडे या महायुद्धांत कत्तल करायचा कोणता मोठा मौका आलेला जो त्यांनी सोडला? बिचारे जिथे जिंकले ती त्यांचीच भूमी होती. रशिया आणि अमेरिकेने त्यांना जिंकून दिले. यात जपानचाच असा बाऊ करण्यात अर्थ नाही. उलट बुद्धाची जन्मभूमी म्हणून जपान्यांत भारताबद्दल नेहमी आदर राहिला आहे.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:42
पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात
असा विचार लोकांना करायला ब्रिटिश भाग पाडू शकतात मंजे नक्कीच फार हुशार असावेत. जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 17:58
जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?
का हो तुम्ही प्रत्येक वेळी काळरेषेची गल्लत का करत आहात? जपानचा खुनशीपणा १८७० च्या सुमारास जपानी साम्राज्य ज्याला म्हणतात त्या काळापासून सुरू झाला. टोजोच्या काळात विशेषतः वाढला. सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:11
सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.
हे मी थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो. अमेरिकेला जपानने आपले वाणिज्यिक नियम, बंधने स्वीकारावी असे वाटायचे. म्हणून अमेरिकेने/युरोपने पुश (मंजे काय ते समजून घ्या) केल्यावर जपानने "परवानगी" बंद केली (व्यापारासाठी किंवा कसेही कोणी आले कि थेट वर. आणि हा प्रकार प्रत्येक शतकात होता. म्हणून जपान आज इतका तगडा नॉन्-युरोपीय देश आहे. नैतर बाकी प्रत्येक देश किती दोहित आहे याचा बराच हिशेब निघतो. ------------------------------------------- भारतात ब्रिटिश किंवा मुस्लिम आक्रमक आले तेव्हा जे घडलं नाही (चोख उत्तर इ इ )याचं जे आपल्याला नेहमी वैफल्य वाटत असतं ते जपानमधे घडलं, अगदी पूर्वीपासून. आणि म्हणून त्यांना एका पातळीवर 'ब्रिटिशांपेक्षा क्रूर' जज करण्याचा प्रयत्न केला जातो.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:34
तुम्ही परत काळरेषेची गल्लत का करत आहात? अमेरिका आणि जपानमधले वाणिज्यिक युध्द १९३० च्या दशकातील. जपान २०० वर्षे जगापासून अलग होते तो कालावधी सतराव्या शतकापासून (१६**) ते सुमारे १८७० पर्यंत. या काळात पहिले १०० वर्षे अमेरिका हा देशच ब्रिटिशांची वसाहत होता. अमेरिकेचे जागतिक घडामोडींमध्ये सगळीकडे नाक खुपसायचे प्रमाणे वाढले पहिल्या महायुध्दाच्या सुमारास.त्यापूर्वीच जपानने अलगतावाद संपविला होता. या काळरेषेच्या गल्लतीविषयीचा मुद्दा मी तीनवेळा मांडला आहे.तो यापुढे परत मांडायचा नाही. आणि जपान्यांनी युरोपिअन आला की ठार मारायचे हा प्रकार केला कारण ते ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतील, आपल्या संस्कृतीवर घाला घालतील म्हणून. ते केले ते अगदी उत्तम केले.तरीही १६-१७ व्या शतकात युरोपिअनांनी उत्तर अमेरिकेत आणि आफ्रिकेत प्रचंड क्रौर्य दाखविले म्हणून १९४० च्या दशकात जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात जे क्रौर्य दाखवले त्यात काय विशेष असे तुम्ही म्हणत असाल आणि असे खुनशी लोक भारतात आलेले चांगले असे तुम्हाला वाटत असेल तर असे वागणे तुम्हालाच लखलाभ असो.

In reply to by क्लिंटन

बबन ताम्बे 20/04/2015 - 18:55
श्री. क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद वाचले. त्यांनी वस्तुनिष्ठ प्रतिपादन केले आहे असे मला वाटते. क्रूर आणि अत्याचारी जपानी भारतात आल्यावर भारतीयांशी सरळ वागले असते ह्याची सुतराम शक्यता दिसत नाही. अमेरिकेने अणुबाँब टाकला नसता तर जपान्यांनी अजून हाहाकार माजवला असता. जपानी राज्यकर्ते आणि सैनिकांनी केलेल्या अत्याचाराची फळे अणुबाँबच्या रुपाने जपानच्या निरपराध जनतेला भोगायला लागली. ब्रिटीशांना घालविण्यासाठी त्यांच्याहून भयंकर सैतानांना घरात घेणे म्हणजे आत्मघात होता असे माझेही मत आहे. गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.

In reply to by बबन ताम्बे

अर्धवटराव 20/04/2015 - 21:11
गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.
मी आजवर जे काहि गांधीजींबद्दल वाचलं वा ऐकलं आहे त्यात हा संदर्भ कुठेच आला नाहि. जमल्यास आठवुन नक्की संदर्भ द्या. गांधीजींच्या राजकीय आणि सामाजीक लढ्याचा बराच काथ्याकुट केला जातो. त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणातील समज फार कुणी प्रकाशात आणत नाहि.

In reply to by अर्धवटराव

बबन ताम्बे 21/04/2015 - 11:32
नक्की कुठे वाचले ते आठ्वत नाही. कदाचीत वर्तमानपत्रात देखील वाचलेले असू शकेल. पण त्या लेखातील "ब्रिटीशांचे राज्य जाऊन जपान्यांचे राज्य येणार असेल तर मी ब्रिटीश राज्यास प्राधान्य देईन " असे गांधीजींचे (किंवा त्यांच्या तोंडी घातलेले) वाक्य नक्की आठवते.

वाचनीय. आता जबाबदारी नरेंद्रची. त्या फाईल्स उचलाव्यात व सरळ टी.व्ही.वर येऊन वाचून दाखवून 'पर्दाफाश' करावा. मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पॉइंट ब्लँक 15/04/2015 - 23:31
मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.
अस्स जालं होय. तुमच्या खांग्रेसला चाळीस वर्ष निवडून दिलं होत, त्यांना बरं जमलं नाही ते?

In reply to by अर्धवटराव

विकास 15/04/2015 - 23:36
जाणत्या राजाने समजूत घातली आहे. ती वाचल्यावर समजले की ती हेरगिरी नव्हती तर काळजी करण्याची पद्धत होती म्हणून. =)) "When the NCP was in power in Maharashtra and I was a Union minister working in Delhi, people like Bhujbal in the state used to keep a tab on my movements. The department concerned has to keep an eye on important people, who are doing pivotal work in public life for their safety. Hence, the Maharashtra state that kept an eye on me was not for espionage. When I was the home minister in Maharashtra, the department also kept an eye on my movements for safety," he said. "Similarly, the relatives of Netaji Subhash Chandra Bose were important for the country. The government would have been held accountable if anything untoward had happened with them. As a result, the IB had kept an eye on Bose's family for their safety and not for espionage," added Pawar, who was in the city to review activities of the NCP in the district and attend a number of programmes.

hitesh 15/04/2015 - 23:22
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच. बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे.

In reply to by hitesh

विकास 15/04/2015 - 23:31
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे खोटारडे पणा ने तो लावला होता. स्वतःच्या विचारसरणीत असलेला अंगभूत द्वेष पसरवण्याकरता... आता राहूल गांधींना कोर्टात जावे लागणार असल्याने इतर शहाणपणाने तसे बोलणे टाळतील असे समजूयात. म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच. अनुज धर या लेखक-पत्रकाराने आणि "मिशन नेताजी" नामक संस्थेच्या मागितलेल्या माहीती अधिकारांतर्गत विनंतीनुसार पश्चिम बंगालच्या सिआयडी खात्याने दोन जुन्या फाईल्स मुक्त केल्या त्यातील माहितीतून हे बाहेर आले. वास्तवीक काँग्रेस आणि भाजपाने देखील आधी राज्य असताना (आणि आत्ता मोदींच्या काळात हे प्रकरण बाहेर यायच्या आधी) ह्या संदर्भातील फाईल्स मुक्त करायला असमर्थता दर्शवली होती. का? तर सुरक्षा आणि मित्र राष्ट्रांना त्रास होऊ शकतो म्हणून! असो आता मुक्त झालेल्या पत्रांमधून नेहरूंचा हात स्पष्ट दिसतो: Neharu letter

In reply to by hitesh

विकास 16/04/2015 - 00:48
गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे. काय वेळ आली आहे! स्कॉलर्ली पुरावा नसल्याने कुठल्यातरी फुटकळ नाटकात काय लिहीले आहे त्यावरून ठरवले जात आहे. तरी देखील त्या नाटका संदर्भात य.दी फडक्यांचा http://www.mkgandhi-sarvodaya.org/godse.htm लेख वाचा. (आणि हो फडके हे काही उजवे नाहीत...) आणि त्यावर अजून चर्चा करायची असेल तर अवश्य नवीन धागा काढा. तेथे काथ्याकूट करूयात.

In reply to by विकास

आणी धाग्यात तू ही आधीच ठरवले आहेस विकासा-
सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते.
म्हणजे आधी तू हे ठरवूनच टाकले आहेस व त्यावर चर्चा करायची.

In reply to by hitesh

चिनार 16/04/2015 - 12:58
बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे हितेश भाऊ ! गोडसे बोलतोय या नाटकात आपण गोडसेंच बोलणं ऐकणं अपेक्षित आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय "गांधी वधाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे!" वधामागचा कोन्ग्रेस ला "अपेक्षित" असलेल्या मास्टर माइण्ड चे नाव जर नाटकात घेतले असते तर कोन्ग्रेस सरकारने त्या नाटकावर इतके वर्ष बंदी ठेवली नसती. तुझ्या वरच्या प्रतिसादावरून तुझा एकंदरीत व्यासंग आणि बुद्धीची पातळी लक्षात आलेली आहे.

विनोद१८ 16/04/2015 - 00:04
'येथे कुणा एकाची पाठराखण वा कुणाची निंदा' असे नसून, याविषयीची सत्यता काय हे जाणुन घेणे महत्वाचे. आजच केंद्र सरकारने एक समिती गठीत केली असुन ती समिती अशा अन्य ८५ फाईलींच्या बाबत त्या उघड करायच्या का याबद्दल निर्णय घेणार आहे, अशी बातमी दुरदर्शनवर एकली, तसे झाले तर याविषयीचे सत्य काय ते उघड होइलच. सुभाषबाबूंची भारतीय जनतेत स्वातंत्र्यकाळापुर्वीपासुनच 'हीरो' अशी प्रतिमा होती, आहे व राहील यात काहीच शंका नाही, त्यांच्या गूढ मृत्यूबद्दलचे सत्य जाणुन घेण्यात सगळ्यांनाच रस आहे, ते गूढ जर कुणी उकलले तर त्यामध्ये गैर ते काय ? त्याविरोधात एव्हढी कावकाव कशासाठी ?? येउद्या की सत्य बाहेर. येथे 'त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली' ते भारतात नसताना ( जिवंत असताना वा नसताना ) ती ही सतत २० वर्षे, याची गरज त्यावेळच्या आपल्या नवस्वतंत्र देशाच्या सरकारला का भासली ?? अगदी मागील पानावरुन पुढे यापद्ध्तीने ते का ?? येथे हा 'का' महत्वाचा ?? ती कोणी ठेवायला सांगितली हे दुय्यम असे मी समजतो. इंग्रजांनी तसे केले हे आपण समजु शकते, त्याबद्दल हा 'का' उद्भवत नाही परंतु नंतर आलेले तर आपलेच स्वकिय होते. असे कितीतरी 'राजकिय गूढ-मृत्यू' त्या कालखंडात झालेत, त्यांना न्याय मिळायला हवा असे जर कुणाला वाटले तर ते अयोग्य कसे ?? या गूढतेची उकल यथावकाश होइल अशी चिन्हे दिसताहेत. @.....हितेसभॉय, अरे या लोकशाहीतला तुझा विधाने करण्याचा, प्रतिक्रिया देण्याचा अधिकार मान्यच, पण तु स्वतः हिंदु नसताना / नास्तिक असताना व एक सर्वमान्य डु.आय.डी. असताना, वारंवार कोणत्याही विषयाला / चर्चेला ओढूनताणुन आमच्या हिंदु धर्माशी जोडुन, आमच्या देवदिकांना बोल लावण्याचा अधिकार तुला कोणी दिला ?? तुझ्या उपासना पद्धतीबद्दल ( जर असलीच तर ) जर कोणी काही वावगे बोलले तर तु खपवून घेशील काय ?? एक लक्षात ठेव तुला येथे कोणीच गंभीरपणे घेत नाही पण तुला आता 'समजावून सांगण्याची' वेळ आली आहे. तेव्हा यापुढे आमच्या 'हिंदु धर्माबद्दल' लिहीताना जरा जपुन, अंत पाहू नकोस. तुझ्यासाठी तुर्त एव्ह्ढेच.....!!!

क्लिंटन 16/04/2015 - 14:51
लेख आवडला. त्यावर काहीसा विस्कळीत प्रतिसाद--- सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भात जे काही झाले ते पब्लिक डोमेनमध्ये नक्कीच यायला हवे असे वा॑टते. राजनाथ सिंगांनी तसे करता येणार नाही यासाठी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल आणि इतर देशांशी संबंध बिघडू शकतील असे कारण त्यामागे दिले होते. त्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल हे कारणच मला पटलेले नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी राज्य सरकारची असते आणि ते काम राज्य सरकारला न जमल्यास शेवटी ती केंद्राची जबाबदारी ठरेल. सुभाषचंद्र बोस खरोखरच त्या विमान अपघातात गेले की नाही याविषयी बराच संभ्रम आहे.सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्यांचे म्हणणे आहे की सुभाषचंद्र नंतर रशियात गेले आणि त्यांना स्टॅलिनने ठार मारले. जर का ही माहिती उघड केली तर त्यामुळे रशियाशी संबंध बिघडायची भिती का वाटावी? एकतर रशियाने स्वतःच लेनिन आणि स्टॅलिन यांच्या राज्यपध्दतीला नाकारले आहे. या घटनेला किमान ६० वर्षे उलटली आहेत आणि भारत जर रशियाकडून तेल विकत घ्यायला तयार असेल तर पुटिन यांनाही फार काही तक्रार करायचे कारण असेल असे मला तरी वाटत नाही. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये आली आणि त्यामुळे त्यांच्या जनमानसातील प्रतिमेवर परिणाम झाला तरी हरकत नाही ही भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने सुभाषचंद्र बोसांविषयी लोकांच्या मनात जे काही समज-गैरसमज आहेत ते समजले तरी ते चांगलेच असेल. बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. एकतर सुभाषचंद्रांचे गुरू चित्तरंजन दास हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.मुस्लिमांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नसेल तर स्वातंत्र्यलढा यशस्वी होणार नाही असे गांधीजींना वाटत होते तसेच चित्तरंजन दासांनाही वाटत होते. १९२३ मध्ये त्यांनी बंगालमधील मुस्लिम पुढार्‍यांबरोबर (विशेषतः हकिम अजमल खान) 'बंगाल करार' याच उद्देशाने केला होता आणि त्यात मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते. त्या कराराला काँग्रेसमधल्याच अनेक पुढार्‍यांचा विरोध होता. त्यांचे शिष्य सुभाषचंद्रांनी कलकत्ता महानगरपालिकेचे सी.ई.ओ असताना या आरक्षणाची अंमलबजावणीही केली होती. ज्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल गांधीजींविरूध्द हिंदुत्ववादी लोक आगपाखड करतात त्याच चळवळीविषयी सुभाषचंद्र बोस यांनी The Indian Struggle या पुस्तकात पान ५५ वर म्हटले होते--- "In 1921, besides the above three leaders, the Ali brothers (Moulana Mohammed and Moulana Shaukat Ali) had a unique position among the public. This was due partly to their own activities and their suffering during the Great War--partly to the new awakening among the Moslems -- but largely due to the propaganda conducted in their favour by the Mahatma. The Mahatma associated himseld so closely with them that they came to be looked upon as the right and the left hand of the Mahatma, In their company the Mahatma toured the country and one clearly remembers that in those days whenever there was a popular shout of 'Victory to Mahatma Gandhi' (Mahatma Gandhi Ki Jai), it would be accompanies by a shout of 'Victory to the Ali Brothers' (Ali Bhai-o-Ki Jai). Though after some years the Ali brothers parted company with the Mahatma, I do not think one could find fault with the latter for his intimate association with them. The real mistake in my opinion did not lie in connecting the Khilafat issue with the other national issues, but in allowing the Khilafat Committee to be set up as an independent organisation throughout the country, quite apart from the Indian National Congress. The result of this was that when later on Ghazi Mustafa Kemal Pasha, as the leader of the New Turkey, forced the Sultan to abdicate and abolished the office of Khialifa altogether, the Khilafat question lost all meaning and significance and the majority of the members of the Khilafat organisations were absorbed by sectarian, reactionary and pro-British Moslem organisations. If no separat Khilafat committees had been organised and all Khilafatist Moslems had been persuaded to join the ranks of the Indian National Congress, they would probably have been absorbed hy the latter when the Khilafat issue became a dead one." हेच जर का अन्य कोणत्या काँग्रेसच्या पुढार्‍याने म्हटले असते तर तो पुढारी दाढ्या कुरवाळणारा, तळवे चाटणारा वगैरे विशेषणांनी ओळखला गेला असता. सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला विरोध नक्की होता का याविषयीही प्रश्न उभा रहावा असे त्यांचे बर्लिन रेडिओवरून केलेल्या एका भाषणातील विधान होते . या भाषणाचा वृत्तांत ---" He assured Mr Jinnah that his Pakistan scheme would never materialise so long as the British were in India.He emphasised that Pakistan could be created only under a National Government." म्हणजे सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला खरोखरच विरोध होता का? आणि तरीही सुभाषचंद्र असते तर अखंड भारत आपल्याला मिळाला असता हा एक काहीसा भाबडा समज हिंदुत्ववादी लोकांमध्ये आढळतो हे बघून काहीशी गंमतच वाटते.हा प्रकार फेसबुकवरील विविध ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर बघितला आहे. सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायच्या धोरणाविरूध्द मी पूर्वीच मिपावर लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती नको. पण या निमित्ताने अशा काही इतर मुद्द्यांचीही चर्चा जरूर व्हावी असे नक्कीच वाटते.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 16/04/2015 - 15:23
असं म्हणणारा माणूस निदान माझ्या तरी पहाण्यात नाहीत. बहुतांश लोकांना सुभाषबाबू एक हीरो (ज्यांनी थरारक गोष्टी केल्या) म्हणून आवडतात. त्यातल्या राष्ट्रवादी (पक्ष नव्हे) लोकांना या गोष्टी त्यांनी देशासाठी केल्या, देशासाठी खस्ता खाल्ल्या म्हणून आवडतात. त्यातल्या शिकल्या सवरलेल्यांना ते आयसीएस ची परिक्षा पास होवू शकणारे विद्वान होते आणि त्यावर लाथ मारू शकणारे स्वाभिमानी होते म्हणून आवडतात. नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी) सुभाषबाबू उठून दिसतात. ते आर्मी युनिफॉर्म मध्ये रुबाबदारही दिसतात. ज्या गोष्टी आम्ही सर्व सामान्य मध्यमवर्गी लोक करू शकत नाही त्या त्या करणारे ते त्या वेळचे बंडखोर वृत्तीचे नेते, एक कॅरिस्मॅटीक पर्सनॅलिटी म्हणून ते लोकांना आवडतात. त्यांचं आयुष्यच एखाद्या दंतकथे प्रमाणे आहे, त्यांचं नाहीसं होणं धरून. अशा व्यक्तीला जर रशियन स्थानबद्धतेत यातनामय मरण आलं असेल तर त्याची जबाबदारी आम्ही शोधणारच. नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको (स्टॅलीन एक काळी लोकांचा हिरो होता म्हणे). जर असं काही नसेल तर नेहरूंना घाबरायचं काहीच कारण नाही.

In reply to by काळा पहाड

नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी)
आणी
नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?आणी ५०च्या दशकात रशियन सरकारवर दबाव टाकणे म्हणजे बाकरवडी खाण्यासारखे सोपे वाटले का रे पहाडा? बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो. १९५७ पासून लोकसभेत हजेरी लावणार्या अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

क्लिंटन 16/04/2015 - 18:41
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?
अरे काय दिवस आले आहेत? चक्क मी माईसाहेबांशी सहमत आहे :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

hitesh 16/04/2015 - 20:05
.गांधी नेहरु नेभळट होते असे लबाड संघवाले म्हणतात. नेहरुनी म्हणे नेताजीना संपवायला स्टालिनला पत्र लिहिले अsehee लबाड संघवाले म्हणतात. भगतसिंगाना फाशी देऊ नये म्हणुन गांधीजींनी इंग्रजांवर दबाव टाकला नाही असेही हेच लबाड लोक म्हणतात. यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात.. मग वेळ पडली की काँग्रेसचे नेहरु गांधी याना स्मरणीय मान. काँग्रेसच्या पटेलांचा पुतळा बांध. कम्युनिस्ट भगतसिंग , मुस्लिम्प्रेमी नेताजी यांना प्रेमाने आपले म्हणणे, असेही हे लोक करतात.

In reply to by hitesh

विकास 16/04/2015 - 22:52
यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात.. हो ना! ह्यांच्या पारड्यात मोठे नेते असते तर काँग्रेसच्या लोकांसारखे आज फटाके उडवता आले असते! पण कसचं काय... टाईम मॅगझिन मधे आलेल्या प्रेसिडंट ओबामांच्या "रीफॉर्म - इन - चार्ज" फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर असे नेत्याबद्दल वाचावे लागले नसते! (बाकी ओबामा पण चावटच आहेत.... मोदींना "फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर" असे म्हणले "फ्रॉम आम आदमी/कॉमन मॅन टू प्राइम मिनिस्टर" असे नाही म्हणले! ;)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या 16/04/2015 - 21:38
दबाव हा शब्द चुकीचा वाटतो. नेहरु हे ब्रिटिशधार्जिणे होते आणि ते ब्रिटिश लोकांनाही सोयीचे होते. त्यामुळे हे परस्परांच्या सोयीची योजना होती. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे करतो, तुम्ही माझ्यासाठी ते करा अशी देवाणघेवाण होणे अशक्य नव्हते. दुसर्‍या महायुद्धानंतर शीतयुद्ध जोरात होते. जेव्हा अमेरिकेची आणि रशियाची रस्सीखेच जोरात होती त्या काळात भारताचे राजकीय, भौगोलिक आणि एकंदरीत स्ट्रॅटेजिक महत्त्व रशियाच्या लेखी होते. ते तसेच अबाधित रहावे म्हणून स्टालिनने नेहरूना मदत केली असेल अशी शक्यता इतकी अवास्तव वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 16/04/2015 - 22:29
माई, हे नक्की "ह्यां"चं मत आहे की तुझं? तुझा युएसपी तुझे "हे" आहेत हे लक्षात घे.
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?
तू जरा नीट वाच.
अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?
अटल"जी"? फक्त अटल म्हणायचे पद्धत आहे ना? बाकी हे तू अटलजींनाच जावून का विचारत नाहीस? मी बीजेपी मध्ये पण नाही आणि अटलजींचा पीए पण नाही.
बाकरवडी खाण्यासारखे
माई तुझं वय काय, तू खातेस काय. जास्त तेलकट गोष्टी खात जावू नकोस. जोक्स अपार्ट, बोस हे ब्रिटिशांच्या डोळ्यात सलत होते. ब्रिटिशांनी बोसना मारण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. असं असताना ब्रिटिशांनी बोस यांना रशियन सरकारकडून ताब्यात घेण्यासाठी आकाशपाताळ एक केलं असण्याची शक्यता आहे. या बाबतीत ब्रिटीशांना फक्त उकसवायची गरज असावी. बाकी काम त्यांनी केलं असेलच. बाय द वे,
आणि हे जर सिद्ध झालं
बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो. अग मै, जर नेहरूंनी असं पत्र लिहिलं असेल असं कुणीतरी लिहीतय, तर दोष काय शारूक खान ला देणार का?

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 16/04/2015 - 19:07
नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको
मध्यंतरी सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले होते की नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना स्टॅलीनकरवी संपवले. सुब्रमण्यम स्वामींच्या या म्हणण्यातील काही भाग तरी नक्कीच गंमतीशीर आहे. उदाहरणार्थ स्टॅलीनने १९४५ साली नेहरूंना पत्र लिहून सुभाषचंद्र बोसांचे काय करू हे विचारले. मला तरी ही गोष्ट पूर्ण हास्यास्पद वाटते. स्टॅलीनने १९२० च्या दशकाच्या शेवटी रशियन सैन्यात 'पर्ज' घडवून आणून लष्करातील जवळपास सर्व वरीष्ठ नेतृत्व संपविले होते. याच स्टॅलीनने लाखो रशियनांना ठार मारले होते.समजा सुभाषचंद्र बोस त्याच्या तावडीत सापडले असतील तर त्यांना ठार मारायचा आदेश द्यायला याच स्टॅलीनला ऑफ ऑल द पीपल, पंडित नेहरूंच्या सल्ल्याची गरज पडावी हे अनाकलनीय वाटते. दुसरे म्हणजे १९४५ मध्ये स्टॅलीनला नेहरूंना खिजगणतीतही धरायची गरज वाटली असेल असे मानायचे कारण नाही. रशियाने किती प्रतिकूल परिस्थितीत झगडून हिटलरचा पराभव केला हे जगासमोरच होते.युध्द संपल्यानंतर सुरवातीला दोस्त राष्ट्रांचे जर्मनीवर नियंत्रण होते. अशावेळी फ्रान्सला कोणताही भाग देण्यास स्टॅलीनने पूर्ण नकार दिला होता.कारण काय तर रशियाने सुमारे दोन कोटी लोकांची आहुती युद्धात दिली होती तर फ्रान्सने १५ दिवसातच हिटलरपुढे गुढघे टेकले होते अशा फ्रेंचांना विजयातील हिस्सा फुकटात द्यायची काही गरज नाही. फेब्रुवारी १९४५ च्या याल्टा कॉन्फरन्सच्या वेळी स्टॅलीनने रूझवेल्ट यांची राहायची व्यवस्थाही अधिक सोयीची केली होती आणि चर्चिलना फार महत्व दिले नव्हते. असा स्टॅलीन पंडित नेहरूंना सल्ला मागण्याइतके महत्व देऊ शकेल हे मला तरी अशक्य वाटते. मी पण पंडित नेहरूंचा अगदी फार मोठा चाहता आहे असे अजिबात नाही.पण म्हणून एखाद्याला झोडपायचेच म्हणून अशा कुठल्याकुठल्या मुद्द्यावरून राळ उठवायला मला तरी आवडत नाही. बाकी तुम्हाला कुठल्याकुठल्या कारणावरून सुभाषचंद्र बोस आवडत असतील तर ते तुमचे मत झाले.त्याचा आदरही आहे. पण माझ्या स्वतःच्या दृष्टीकोनातून आझाद हिंद सेनेचा पराभव झाला हे चांगलेच झाले. सुभाषचंद्रांच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेऊ शकणारच नाही.पण त्यांचा जपानबरोबर जायचा निर्णय मला स्वतःला अजिबात समर्थनीय वाटत नाही. याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे 16/04/2015 - 20:02
याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.
तेच धागे शोधत होतो. जबरदस्त चर्चा आहेत त्या. धन्यवाद!

In reply to by क्लिंटन

आजानुकर्ण 16/04/2015 - 19:09
मस्त प्रतिसाद क्लिंटनसाहेब, प्रतिसाद आवडला. प्रश्नः कम्युनिष्ट विचारसरणीचे भगतसिंग, फॉरवर्ड ब्लॉकसारख्या पक्षाची सुरुवात करणारे आणि मुस्लिमप्रेमी सुभाषबाबू, गायीला उपयुक्त पशू माना असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ सावरकर, संघावर बंदी आणणारे पटेल या सर्वांमध्ये एक साम्य आहे. त्यामुळे ते सर्व आम्हाला एकाचवेळी प्रिय वाटतात. उत्तरः त्यांचे आडनाव नेहरु किंवा गांधी नाही हेच. बाकी काय बोलणार.

In reply to by क्लिंटन

विकास 16/04/2015 - 20:38
माहितीपूर्ण प्रतिसाद! बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही. पण एक संदर्भ मी सावरकरी वाड्मयात पाहीला आहे तो म्हणजे सावरकर-सुभाषबाबू भेट. सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना आणि नंतर सैनिकी शिक्षण घ्या आणि सैन्यात भरती व्हा असे तरूणांना आवाहन केले होते. त्यावरून त्यांच्यावर टिका देखील झाली होती. (अत्रे, ज्यांनी त्यांना आधी "स्वातंत्र्यवीर" ही पदवी दिली, त्यांनी त्यावरून त्यांना "रिक्रूटवीर" म्हणून हिणावले देखील!). अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा... पण या रिक्रूट भरतीचा उपयोग आझाद हिंद सेनेला काही अंशी झाला. तसेच नंतर नेव्हीचे बंड झाले त्यावेळेस ब्रिटीश घाबरू शकले. तेंव्हा सांगायचा मुद्दा हा की दोघांचे स्वातंत्र्यासाठी मार्ग समान असल्याने आणि कदाचीत सुभाषचंद्रांना देखील काँग्रेसने त्यावेळेस वाळीत टाकल्याने बाकी इतिहास न वाचता सावरकरांच्या बरोबरचे समजत असावेत. बाकी मुद्यांशी सहमतच.

In reply to by विकास

अर्धवटराव 16/04/2015 - 21:35
अभिनव भारतीचा विसर्जन समारंभ करताना सावरकरांनी अध्यक्षस्थानी सुभाषबाबुंचा फोटो ठेवला होता असं कुठेतरी वाचलं होतं. अमेरीका व जपान अखेरचे शांतीप्रयत्न करत असताना देखील जपान महायुद्धात नक्की उतरेल अशी बातमी सावरकरांच्या सोर्सेसनी त्यांना दिली होती. तेंव्हा महायुद्धाचा पुरेपूर उपयोग करुन घ्यायचा असेल तर सुभाषबाबुंना देशाबाहेरुन प्रयत्न या मताचे सावरकर होते (नक्की संदर्भ आठवत नाहि). तसंही सावरकर वगैरे मंडळींचं बरचसं काम गुप्त रुपात चालत असल्यामुळे त्याचे उघड संदर्भ जगजाहीर व्हायचे चान्सेस कमि आहेत. पण सुभाषबाबु आणि सावरकर कुठेतरी लिंक्ड असावे हे नक्की.

In reply to by विकास

क्लिंटन 17/04/2015 - 18:44
टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही.
नरहर कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे 'अहिंसक मार्गाचा अवलंब न करणारे सगळे गांधीविरोधी आणि सगळे गांधीविरोधी हे हिंदुत्ववादी' या न्यायाने सावरकर, भगतसिंग, गदर पार्टी , अनुशीलन समिती इत्यादी सगळे बरोबरचे समजले जातात. आणि सावरकरांचे प्रेरणास्थान असलेले लोकमान्य टिळकही-- मग भले स्वतः टिळकांनी लखनौ करार केला होता, लोकमान्यांनीही गांधीजींप्रमाणेच लोकांच्या प्रबोधनावर भर देऊन लोकांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य हवे ही जाणीव निर्माण करण्यावर भर दिला होता इत्यादी गोष्टींना फाट्यावरच मारायचे. म्हणूनच टिळकांचा उल्लेख केला. अशा स्वरूपाची चित्रेही बघायला मिळतात. त्यात तर शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस आणि चंद्रशेखर आझाद एकत्र दाखविले आहेत.काही चित्रांमध्ये भरीला भर म्हणून राणा प्रतापही असतात.तेव्हा गांधीजींच्या मार्गाला विरोध असलेले सर्व लोक क्रांतिकारक आणि सगळे हिंदुत्ववादी अशा प्रकारची एक धारणा असते.त्याला उद्देशून मी हे विधान केले.
अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा...
याच बरोबर सावरकरांचा उद्देश होता की सैन्यात जाऊन शस्त्रे आणि ती चालवायचे प्रशिक्षण मिळवा.त्या बंदुकांची तोंडे कुठे वळवायची ते कधीही ठरवता येईल. मागे एक गोष्ट वाचल्याची आठवते. चिंतामणराव देशमुख लोकमान्यांना भेटायला गेले होते आणि स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचे आहे असे त्यांनी लोकमान्यांना म्हटले.त्यावर लोकमान्यांनी त्यांना सांगितले की आज ना उद्या स्वातंत्र्य मिळणारच आहे आणि त्यानंतर अर्थतज्ञ आणि बँकर्सची देशाला गरज पडेल. अशावेळी चिंतामणरावांसारखे लोक देशाला गरजेचे असतील म्हणून लोकमान्यांनी चिंतामणरावांना स्वातंत्र्यलढ्यात न पडायचा सल्ला दिला.

In reply to by क्लिंटन

प्रदीप 18/04/2015 - 14:16
शेषराव मोरे ह्यांनी अतिशय सखोल अभ्यास करून लिहीलेल्या "१९४७- काँग्रेसने आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला' ह्या पुस्तकात, 'नेताजी व हिंदू मुस्लिम प्रश्न' ह्या उपप्रकरणांत तत्कलीन भारतीय मुस्लिमांच्या मागण्या व त्यांतून उद्भवलेले जटिल प्रश्न, ह्यांजवर नेताजींची भूमिका काय होती, ह्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. [आवृत्ति दुसरी, पृष्ठे ३०८- ३१५] अनेक संदर्भ देऊन मोरे लिहीतात की नेताजींच्या मते, हिंदू-मुस्लिम समस्या खर्‍या अर्थाने अस्तित्वात नव्हतीच, तर ब्रिटीशांनी ती फूट मुद्दाम निर्माण केलेली होतीं. नेताजींच्या म्हणण्यानुसार "भारतीय जनतेत (राष्ट्रीय व भावनिक दृष्टींनी) फूट पडत नसल्यामुळे त्यंनी भारताची भौगोलिक व राजकीय फाळणी करण्याचे ठरविले. तीच पकिस्तानची योजना होय, की जी ब्रिटीशांच्या सुपीक मेंदूतून जन्माला आलेली आहे", नेताजींच्या मते, पाकिस्तान ही एक 'अजब', 'अव्यवहारीक' व 'अशक्यप्राय' योजना होती. ऑगस्ट १९४२ साली त्यांनी 'स्वतंत्र भारत व त्याचे प्रश्न' नावाच्या लेखात लिहीले होते की "भारतातील आजची मुस्लिम समस्या ब्रिटीशांची कृत्रिम निर्मीती आहे... ब्रिटीशांचे राज्य संपताच ती अदृश्य होऊन जाईल. ....प्रत्येकाला नोकरी, अन्न, शिक्षण आणि धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाल्यास (स्वतंत्र) भारतात अल्पसंख्याकांचा प्रश्नच स्किल्लक उरणार नाही'. 'पाकिस्तान' मागणीवरील तोडगा म्हणून मुस्लिम लीगकडे भारताची सर्व सत्ता देऊन टाकण्याचा नेताजींचा प्रस्ताव होता. जून १९४० मध्ये त्यांनी जिनांची भेट घेऊन लीगने काँग्रेसबरोबर स्वातंत्रयलढ्यात सहभागी होण्याचा व नंतर जिनांनी 'स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा' प्रस्ताव ठेवला होता. मोरे लिहीतात की नेताजी, बंगाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशबंधू चित्तरंजन दास ह्यांचे शिष्य होते. ह्या दासांनी काँग्रेसपुढे १९२३ साली 'बंगाल करार' मांडला होता. काँग्रेसने तो तेव्हा फेटाळला, पण (देशबंधूंच्या नेतृत्वाखालील) बंगाल प्रांतिक काँग्रेसने १९२४ साली तो मान्य केला. त्या करारातून, नेताजींच्या म्हणण्यानुसार 'देशबंधूंनी सर्व मुसलमानांची खात्री करून दिली की ते मुसलमानांचे खरे मित्र आहेत'. ह्या 'बंगाल करारा'नुसार राज्यातील ५२ टक्के मुसलमानांना विधीमंडळात ६० टक्के, तर नोकर्‍यांत ५५ टक्के जागा राखीव होत्या. १९३८ च्या काळात जिना सुभाषबाबूंना म्हणाले होते की "मि. बोस, माझे मित्र चित्तरंजन दास ह्यांचे आपण शिष्य आहात. त्यामुळे तुमचे आणि माझे जमायला काहीच हरकत नाही. माझे आणी गांधींचे मात्र जमणे शक्य नाही". सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद फौजेच्या' प्रतिनिधी मंडळात ७ पैकी ४ प्रतिनिधी (लेफ्टनंट) मुसलमान होते. ही 'आझाद हिंद फौज'ही पाकिस्तानच्या विचारापासून मुक्त नव्हती. इक्बाल शेदाई हे त्या फौजेतील क्रमांक दोनचे प्रभावशाली नेते. त्यांना फौजेचे मुख्यालय इटलीतील रोम येथे पाहिजे होते. नेताजींना हे मान्य झाले नाही. परिणाम असा झाला की शेदाईंनी आझाद हिंद फौजेत फूट पाडून 'आझाद मुस्लिम फौज' स्थापन केली. नेताजींनी १९४२ साली 'आझाद हिंद फौजे'च्या प्रचारासाठी 'आझाद हिंद रेडियो' केंद्र सुरू केले. पण नंतर फौजेतील मुस्लिमांन खूष ठेवण्यासाठी दुसरे 'आझाद मुस्लिम रेडियो' केंद्र चालू केले. सदर उपप्रकरणाचा समारोप करतांना मोरे लिहीतात की "रासबिहारी बोस व सुभाषचंद्र बोस ह्यांना हिंदु- मुस्लिम प्रश्न महत्वाचा वाटत नव्हता; फाळणीची मागणी अजब, अव्यवहार्य व अशक्यप्राय म्हणून गंभीरपणे विचारात घ्यावीशी वाटत नव्हती. स्वतंत्र व अखंड भारतात मुसलमानांचा प्रश्न कसा मिटवावा ह्याबद्दल त्यांची कोणतीही योजना नव्हती व ब्रिटीश गेले की हा प्रश्न आपोआप अदृश्य होईल असे त्यांना वाटत होते. त्या काळातील जिनांच्या गर्जना, मुस्लिम प्रश्नांचे गांभीर्य व सैन्यातील मुस्लिम प्राबल्य लक्षात घेता असे म्हणणे भाग आहे की नेताजींची आझाद हिंद फाउज विजयी झाली असती तरी अखंड व स्वतंत्र भारतात स्थिर लोकसत्ताक सरकार स्थापन होऊ शकले नसते: अराजक व हिंदु- मुस्लिम यादवी युद्धाचे आव्हान उभे ठाकले असते. स्वातंत्र्यप्राप्तीएवढाच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न हिंदू मुस्लिम समस्या आहे, हे नेताजींच्या लक्षात आले नाही.

हुप्प्या 16/04/2015 - 21:44
सुभाषचंद्र बहुधा निधर्मी, कम्युनिस्ट विचारांचे होते तरी ते हिंदुत्ववाद्यांना आवडतात म्हणून इतके आश्चर्य का वाटावे? सावरकर कमालीचे विज्ञाननिष्ठ होते. हिंदुत्त्ववाद्यांना तेही प्रिय आहेत. समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात. शत्रूचा शत्रू तो माझा मित्र असे रोखठोक धोरण जास्त भावणारे होते. गांधी व नेहरूंचे ब्रिटिशांना मदत करण्याचे धोरण अनाकलनीय होते. निदान तटस्थ रहाता आले असते. हिटलर वा जपानी लोकांचे अत्याचार हे आवडतात म्हणून सुभाषचंद्रांना समर्थन द्या असे कुणाही भारतीयाला वाटले असेल असे वाटत नाही. भारतात ज्यू वा चिनी लोकांवर (अगदी मूठभर संख्येने असले तरी) वंशमूलक अत्याचार झालेले नाहीत. तसे करावेत असे कुणाला वाटत असेल असे मला वाटत नाही. तेव्हा हिटलरबद्दल आकर्षण असेल तर केवळ ब्रिटिशांचा शत्रू म्हणूनच. लाखो ज्यूंची कत्तल करणारा म्हणून नाही. तसेच सुभाषचंद्रांविषयीचा आदर हा कम्युनिस्ट विचारसारणी होती, खिलाफतचा समर्थक म्हणून नक्कीच नाही.

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 16/04/2015 - 22:37
समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात.
बरोबर आहे ना. पण सावरकर विज्ञाननिष्ठ असले तरी त्यांना मुस्लिमांना राखीव जागा द्यावात असे वाटत होते का? अर्थातच प्रत्येकाला नक्की कोणते वैशिष्ट्य भावेल हा ज्याचा त्याचा मुद्दा झाला पण तरीही डावे विचार, मुस्लिम आरक्षण, खिलाफत चळवळ इत्यादी गोष्टी बघितल्या तर हिंदुत्ववाद्यांना अन्यथा न आवडणार्‍या गोष्टी सुभाषचंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या. तरीही ते सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे कारण केवळ गांधींपेक्षा त्यांचा मार्ग वेगळा होता यापेक्षा वेगळा अर्थ काढता येईल का? एक तर अनेक लोकांना या गोष्टी माहित नसतात, आणि असल्या तरी ते सुभाषचंद्र गांधीजींपेक्षा वेगळ्या मार्गाचे म्हणून अशा अनेक अत्यंत क्रिटिकल गोष्टींकडे दुर्लक्ष करतात की काय हा प्रश्न नक्कीच पडतो. २६ जानेवारी १९४३ रोजी सुभाषचंद्रांनी बर्लिनमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाल्यानंतर २६ जानेवारी १९३० रोजी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला होता.त्यानंतर १९४७ पर्यंत २६ जानेवारी रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असे) कार्यक्रम आयोजित केला होता त्यात भाषण केले होते. नाझी रेजिमचा ज्यू द्वेष होता हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचे स्थलांतर चालू होते आणि अरबांमध्ये अस्वस्थता होती.ज्यू द्वेषामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने नाझी रेजिमचा या अरबांना पाठिंबा होता. याच अरबांपैकी जेरूसलेमचा मुफ्ती, ज्यूंची इराकमध्ये कत्तल करणारा इराकचा माजी पंतप्रधान इत्यादी या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी सुभाषचंद्रांनी केलेले भाषण बघितलेत तर ते कोणी केले आहे हे नाव न वाचता कोणी नुसते भाषण वाचले तर तो माणूस ताबडतोब दाढ्या कुरवाळणार्‍यांच्या गोटात सामील केला जाईल असे ते भाषण होते. या भाषणाच्या वेळी सुभाषचंद्र त्यांच्या सैनिकी गणवेषात किंवा धोतर-कुर्त्यामध्ये गेले नव्हते तर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये गेले होते. आता ते काय घालून तिथे गेले यावरून फार तर्क करायची इच्छा नाही पण समोरचा ऑडिअन्स लक्षात घेता सुभाषचंद्र मुद्दामून काळ्या शेरवानीमध्ये तिथे गेले हे सूचकात्मक नव्हते का? "“By the beginning of the present century, the British … discovered the Muslim problem in year 1906 when Lord Minto was the Viceroy. Prior to this there was no such problem in India. In the great revolution in 1857, Hindus and Muslims had fought side by side against the British, and it was under the flag of Bahadur Shah, a Muslim, that India’s first war of independence was fought…. Consequently, the British policy has now fallen back on its last hope. If Indian people cannot be divided, then the country – India – has to be spilt up geographically and politically. This is the plan called Pakistan which has emerged from the fertile brain of a Britisher. Though the vast majority of the Indian Muslims want a free and independent India, though the president of the Indian National Congress today is Maulana Abul Kalam Azad, a Muslim, and though only a minority of the Indian Muslims support the idea of Pakistan, the British propaganda throughout the world gives the Indian Muslims are not behind the national struggle for liberty and want India to be divided up.” सुभाषचंद्र.ऑर्ग या वेबसाईटवर सुभाषचंद्रांची भाषणे दिली आहेत.त्यात बघूनही याची खात्री करता येईल. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की इतके विरोधाभास असूनही हिंदुत्ववादी विचारांचे लोक सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे नवल वाटते.विशेषतः ज्या कारणांसाठी गांधीजी दाढ्या कुरवाळणारे ठरतात नेमके तेच सुभाषचंद्रांनी केले तरी त्यांना पाठिंबा हे कोडे मला उलगडलेले नाही.आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे धोरण जपानसारख्या शत्रूच्या शत्रूसंदर्भात समर्थनीय नव्हते हे यापूर्वीच मिपावर मांडले आहे. भारतीय भूभागात इंटरेस्ट नसलेला इतर कोणताही शत्रूचा शत्रू परवडला असता आणि त्याला पाठिंबाच दिला असता पण जपानची केस वेगळी होती.त्यामुळे या कारणावरूनही लोक कसे काय सुभाषचंद्रांना पाठिंबा देऊ शकतात हेच कळत नाही. (स्पष्टीकरणः मला स्वतःला धर्माबिर्माचे फार नाही.पण तरीही मी एक उजव्या गटाचा राष्ट्रवादाला पाठिंबा देणारा आहे. तरीही माझ्यासारख्या विचारांचे अनेक सुभाषचंद्रांना कसा काय पाठिंबा देतात याचे कोडे नक्कीच वाटते. या बाबतीत तरी मी या टिपीकल उजव्यांप्रमाणे नाही)

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 16/04/2015 - 22:54
जर्मनी-जपानची बाजु घ्यायचं एक महत्वाचं आणि सोपं कारण म्हणजे जर हि राष्ट्रे युद्ध जिंकले असते (तशी शक्यता अगदी नगण्य नव्हती) तर ब्रिटीशांनी भारताला एक गुलाम भेट द्यावा तसा जर्मनी-जपानच्या हवाली केला असता. भारताकडे काहिच बार्गेन पॉवर नसती. सुभाषबाबुंच्या प्रयत्नांमुळे फॉर्मेलिटी म्हणुन का होईना, जपानने भारताला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला असता (तसंही आझाद हिंद सेनेचं सरकार जपान्यांनी मान्य केलच होतं). पुढे काय व्हायचं ते रामायण घडायचं ते घडलंच असतं, पण भारत एक स्वतंत्रराष्ट्र म्हणुन जपान्यांचा सामना करायला उभं राहिलं असतं. अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.

In reply to by अर्धवटराव

क्लिंटन 17/04/2015 - 11:57
अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.
पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात :( माझा मुद्दा १९४२-४३ च्या काळापेक्षा सध्याच्या काळास अधिक जास्त निगडीत आहे. सुभाषचंद्रांनी देश स्वतंत्र व्हावा याच उद्देशाने सगळा खटाटोप केला होता याविषयी कोणीही शंका घेऊच शकणार नाही.१९३७-३८ मध्येच ऑस्ट्रेलियातील आणि अमेरिकेतील वर्तमानपत्रांमध्ये जपान्यांनी चीनमध्ये कसे अत्याचार केले होते याविषयी बातम्या येत होत्या.इंग्लंडमधून आय.सी.एस झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पर्स्पेक्टिव्ह असलेल्या सुभाषचंद्रांनाही या बातम्या कळल्या नसतील हे मानणे तसे जडच जाते.पण सर्वसामान्यांना या बातम्या कळल्या नसतील तर ते नक्कीच समजू शकते.भारतातील सर्वसामान्य न्यू यॉर्क आणि मेलबर्नमधील वर्तमानपत्रे नक्कीच वाचत नव्हते.कदाचित त्याकाळी मी असतो तर त्या भारलेल्या वातावरणात आणि देश स्वतंत्र करायचाच आहे या उद्देशाने मी पण सुभाषचंद्रांना डोक्यावर धरले असते. पण २०१५ मध्ये पूर्वी माहित नसलेल्या या अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांनाही माहित झाल्या असतानाही आजचे सर्वसामान्य लोक सुभाषचंद्रांना का डोक्यावर धरतात? नरहर कुरूंदकर म्हणाले होते ते किती बरोबर होते हे आता जाणवते-- "अहिंसेच्या मार्गाचा अवलंब न करणारे सगळेच क्रांतिकारक आणि सगळेच गांधीविरोधी. आणि असे सगळेच गांधीविरोधी म्हणजे हिंदुत्ववादी" अशी सोयीस्कर विभागणी आधीच केलेली असते.बहुदा म्हणूनच सुभाषचंद्रांना उजव्या गटाचेही लोक पाठिंबा देतात.

In reply to by खंडेराव

क्लिंटन 17/04/2015 - 14:07
अंदमान बेटांवर भरपुर अन्याय केले. बरे ते अजुन पुढे आले नाहित.
जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले याविषयीचा हा लेख सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायचे समर्थन करणार्‍या सगळ्यांनी वाचावा असा आहे. अनेकांना वाटते की जपान्यांना भारतीयांविषयी फार प्रेम होते आणि त्यांनी इंग्रजांना हाकलून दिल्यानंतर आपल्याला गपगुमान स्वातंत्र्य दिले असते. जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले हे वाचल्यास हा गैरसमज गळून पडायला हरकत नसावी.आपले मोठे नशीब की जपानी आणि आझाद हिंद सेना यांचा पराभव झाला.अन्यथा जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात केले होते अगदी तसेच अत्याचार भारतातही झाले असते.

In reply to by कपिलमुनी

बबन ताम्बे 17/04/2015 - 19:11
बोका-ए- आझम यांची एक लेखमालिका आहे मिपा वर. त्यात काही लेखांमध्ये दुस-या महायुद्धात जपान्यांनी कीती कृर अत्याचार केले त्याचे शहारे आणणारे वर्णन आहे.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 18/04/2015 - 00:48
क्लिंटन साहेब, स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा काही रोल होता का? बिलकुल होता. आझाद हिंद सेनेचं बनणं, त्यांचं ब्रिटिशांविरुद्ध उभं रहाणं आणि त्यांची कोहिमापर्यंत धडक यानं ब्रिटीश हादरले. त्यांची संपूर्ण मदार २ गोष्टींवर अवलंबून होती. १) भारतीय सैन्याची निष्ठा आणि २) त्यांच्या साम्राज्यावर न मावळणारा सूर्य (थोडक्यात, त्यांची आर्थिक आणि सामरिक महासत्ता असणं). दुसर्‍या महायुद्धानं दुसर्‍या गोष्टीची वाट लावली. आझाद हिंद सेनेनं बाकीच्या भारतीय सैन्यासमोर एक असं उदाहरण उभं केलं की ज्यामुळे त्यांच्या साम्राज्याला धोका उत्पन्न झाला. ब्रिटिशांनी शहाणपणाचा निर्णय घेतला.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 18/04/2015 - 11:27
नक्कीच. स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा वाटा नक्कीच होता.माझा मुद्दा केवळ जपान्यांशी हातमिळवणी करण्यापुरता आहे.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:39
Posterity will ask uncomfortable questions about the vandalism of the Japanese and the role played by them for the freedom of India in collaboration with Subhas Chandra Bose. Ironically, Bose was in Port Blair between December 29-31, 1943. He visited the cellular jail where Diwan Singh, the president of the Indian Independence League and hundreds of his companions were languishing, but he did not visit them. After wining, dining and dancing in the Ross Island he went back to Singapore. This is how Tojo helped Bose to get freedom for India from the British.
असे लेखात लिहिले आहे. याची भाषा लेखकाच्या मानसिकतेची सूचक आहे. बाय द वे, जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर हेच अत्याचार त्यांनी मणिपूरमधे का केले नाहीत?

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:10
अंदमानात अत्याचार केले त्याचे काय?
जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर....
म्हणजे जपानी सैन्याने दक्षिण-पूर्व आशियात जो धुमाकूळ घातला होता त्याकडे दुर्लक्ष करून जपानी सैन्य तसले नव्हते असे तुम्हाला वाटत असल्यास तुमच्या नंदनवनात सुखात रहा.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:23
जपानी सैन्य तसले नव्हते
नाह. नाह. मला तसले नव्हते, इ इ नै म्हणायचं. -------------------------------------------------- युद्धोत्तर काळात चुकुनमाकून जपानचं भारतावर राज्य असतं (एकतर यातल्या चुकुनमाकून शब्दावरच तुम्हाला आपत्ती आहे, पण ते असो.) तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे त्याचा स्रोत काय आहे हे जाणायचे आहे. म्हणजे जपानचे शांतिकालीन अत्याचार, इ इ.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:42
तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे
का हो जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात अगदी १९४० च्या दशकात जे काही केले ते तुम्हाला दिसत नाही का?इतर ठिकाणचे सोडाच आपल्याच अंदमानातही केले ते पण तुम्हाला दिसत नाही का? जे त्यांनी अंदमानातही केले ते बंगालमध्ये कशावरून केले नसते? एखादी गोष्ट विष आहे हे समजले की त्यापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे हे मला समजते. तुम्हाला हवे असेल तर ते विष आहे की नाही हे पिऊन खात्री करावीशी वाटत असेलही. मला तसे वाटत नाही. आणि तुम्ही मला प्रश्न विचारत आहात की जपानी भारताशी दुष्टपणे वागले असते हा विश्वास कशावरून तसाच मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की ते भारताशी दुष्टपणे वागले नसते हा विश्वास तुम्हाला कशावरून वाटतो?

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:57
युद्धकालीन परिस्थिती आणि शांतिकालीन परिस्थिती यांत फरक आहे. I don't think either of us has adequate evidence to establish who was more cruel and whether Japan would have been a worse ruler in peacetime. असो, आपणाशी दर्जात्मक आणि वस्तुनिष्ठ संवाद झाला आहे त्याचा आनंद आहे.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 21/04/2015 - 10:57
नवे मुद्दे आल्यामुळे त्याविषयी लिहित आहे. माओने त्याच्या २७ वर्षांच्या राजवटीत लाखो लोकांना ठार मारले. स्टॅलिननेही तेच केले. आता हा शांततेचा काळ म्हणायचा की युध्दाचा? अन्य कोणत्या देशाशी प्रत्यक्ष युध्द चालू नसलेला काळ शांततेचा म्हटला तरी लाखांना ठार मारले जात असेल तर तो काळ शांततेचा कसा? जपानी फिलीपीन्समध्ये घुसले जानेवारी १९४२ मध्ये. नोव्हेंबर १९४४ मध्ये त्यांना तिथून मागे रेटले गेले. जानेवारी १९४२ नंतर जपान्यांनी पॅसिफिकमधील इतर अनेक ठिकाणे जिंकली होती आणि आपले क्षेत्र फिलीपीन्सपेक्षा बरेच वाढवले होते. अमेरिकन सैन्याने जपान्यांवर फिलीपीन्समध्ये हल्ला केला तो अगदी १९४४ मध्ये. मधल्या काळात तिथे शांतता होती की जपानी इतरत्र युध्दात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? दोन्ही बाजू आपल्या सोयीप्रमाणे तिथे शांतता होती किंवा युध्दजन्य परिस्थिती होती असे म्हणू शकतात. तसेच अंदमानात एकदा जपानी घुसल्यानंतर शांतता म्हणायची की जपानी इतरत्र युद्धात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? तेव्हा जपानी खुनशी होतेच आणि त्यांना युद्धजन्य परिस्थितीची सूट देता येईल असे मला तरी वाटत नाही. तुम्हीच अन्य एका प्रतिसादात जपान्यांना भारताविषयी तो बुध्दाचा देश म्हणून प्रेम वाटत होते असे लिहिले आहेत. म्हणजे जपानी जे काही करत होते तो बुध्दाचा मार्ग होता का? आणि अनेकांना हिटलर आर्य वंशाचा उदोउदो करायचा आणि भारतही मुळातला आर्य लोकांचा देश म्हणून हिटलरलाही भारताविषयी प्रेम होते असा उफराटा सिध्दांत मांडतात. कालच मिपा सदस्य राजघराणे यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयीच लिहिले आहे आणि असे वाटणार्‍यांचे मत कसे चुकीचे आहे हे दाखविओन दिले आहे. आता सगळी दुनिया भारताभोवती फिरत होती आणि सगळ्यांना आपल्याला मदत करायची होती असे वाटायला लागले तर खरोखरच अवघड आहे.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 17/04/2015 - 21:32
" ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी " म्हणजे साहेबांपुढे भारताची जी(काहि उरली सुरली) पत होती त्यापेक्षाही डिग्रेड झालेली आपली कंडीशन याअर्थाने हे वाक्य वापरलं आहे. जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि. तत्कालीन जीव-रासायनीक युद्धाची तयारी करणारं , चीनला ताब्यात ठेवणारं जपान खरच मनुष्यराज्य म्हणुन घ्यायच्या लायकीचं आहे का हा प्रश्न पडावा. अफ्रीका, आशीया, अमेरीकेत ब्रीटनचे प्रताप ऐकुन त्यांच्यात काळीज नावाचा अवयव मिसींग आहे का असं वाटावं. एकदाका माणसाचं माणुस म्हणुन मुल्य नाकारलं कि गोर्‍या युरोपीयनांना आणि काळ्या आशीयायी सत्तांना मनुष्य हाडामासाची केवळ व्यापारी दृष्टीने किंमत उरते. असो. राहिला मुद्दा जनता जनार्दनाच्या गांधीवादी-गांधीविरोधी, हिंसा-अहिंसा, हिंदुत्ववादी-सेक्युलर वगैरे घोळाचा. या तमाशाला थोडंफार करमणुक मुल्य असण्यापलिकडे फार काहि बघायची गरज नाहि. यांना नेहरुंनी आधुनीक भारताची केलेली पायाभरणी पण दिसत नाहि आणि जनसंघापासुन तो आतापावेतो उजव्या आघाडीत एकही कर्तुत्ववान नेता दिसत नाहि. गांधीचा चरखा आणि सावरकरांची पिस्तुल हे केवळ दृष्य परिमाणं होती. ते का धारण केलं गेलं, त्यामागचं मनगट, मन आणि मेंदु काय होता याचा विचार करण्याची गरज फारशी कोणाला वाटत नाहि. स्वतःला हिंदुत्ववादी वा गांधीवादी म्हणणे म्हणजे नेमकं काय याचाच जिथे पत्ता नाहि तिथे बाकी तपशील काय कामाचा.

In reply to by अर्धवटराव

आजानुकर्ण 17/04/2015 - 22:28
नेहरुंचे मूल्यमापन कोणत्या गोष्टीवर करायचे याचीही किमान माहिती पब्लिकला नसते. नेहरुंबाबत लेडी माऊँटबॅटनला सिगरेट ऑफर करणारा स्त्रीलंपट ही इतकीच माहिती शाखेतल्या बौद्धिकात मिळत असल्याने त्यात पब्लिकचाही फारसा दोष नाही.

In reply to by अर्धवटराव

क्लिंटन 17/04/2015 - 22:32
जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि.
मला वाटते की जपानी अधिक भयंकर होते. इंग्रज हे संत अजिबात नव्हते पण जपानी त्याहून कितीतरी पटींनी अधिक खुनशी होते. जपानने मांचुरियावर हल्ला केला १९३२-३३ मध्ये.त्यानंतर १९४५ पर्यंत म्हणजे १२-१३ वर्षात जपानने जो काही धुमाकूळ घातला त्याला तोड नाही. चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली. ब्रिटिशांचे म्हणाल तर ते क्रूर होतेच यात शंका नाही.पण जपानी क्रौर्याच्या बाबतीत ब्रिटिशांच्या चार नाही शंभर पावले पुढे होते. जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे बंगालमध्ये लाखो लोक मारले गेले यात शंकाच नाही.१८५७ नंतरही उत्तर भारतात इंग्रजांनी प्रचंड क्रौर्य दाखविले. तरीही जपान्यांपेक्षा इंग्रज कमी होते याची काही उदाहरणे-- भारतीयांच्या मनातील असंतोषाला वाट करून दिली नाही तर परत १८५७ सारखा उठाव होईल या स्वार्थी हेतूने का होईना त्यामानाने सुसंस्कृत विचार करून काँग्रेसची स्थापना करणारा इंग्रजच होता. राणीच्या जाहिरनाम्यानंतर आलेल्या व्हाईसरॉय कॅनिंगला दयाळू कॅनिंग म्हणायचे असेही वाचले आहे.रिपनही असा एक अत्याचार न करणारा व्हाईसरॉय होता. मुंबई प्रांतालाही रे, एलफिस्टन सारखे गव्हर्नर होते. लोकमान्य टिळकांवर रितसर खटला चालवून, कायद्याप्रमाणे शिक्षा दिली गेली होती. १९०८ मध्ये राजद्रोहाच्या खटल्यात त्यांना ६ वर्षाची शिक्षा झाली तसाच खटला इंग्रज सरकारने त्यांच्याविरूध्द १९१६ मध्ये आणला होता त्यात त्यांची निर्दोष मुक्तताही झाली होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे असे लोकमान्य उघडपणे लिहू शकत होते. स्वराज्य पक्ष निवडणुका लढवून विधीमंडळात जाऊन इंग्रजांची तिथे अडवणुक करायचा प्रयत्न करत होता.त्याला फार महत्व दिले गेले असे नाही पण विधीमंडळात जाऊन भारतीयांची बाजू मांडायला परवानगी होती. सुभाषचंद्र कलकत्याचे आणि सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होऊ शकले.त्यांना तिथे मर्यादित का होईना अधिकार होते. १९३५ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया कायद्यानुसार १९३७ मध्ये निवडणुका होऊन अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची राज्य सरकारे सत्तेत आली.त्यांनाही राज्य पातळीवर मर्यादित का होईना अधिकार होते. यापैकी पाव टक्काही गोष्टी जपानी राज्यात होणे शक्य नव्हते. म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.

In reply to by क्लिंटन

संदीप डांगे 17/04/2015 - 23:10
अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते. अशा काही घटना ऐकल्या, वाचल्या की नेमकी स्वातंत्र्यपूर्व भारतातली परिस्थिती कशी होती याचे कुतूहल अजून वाढत जाते. इंग्रजांविरोधी स्वातंत्र्यलढा आणि त्याचवेळी सामान्य पद्धतीने चाललेले समाजजीवन यांचा परस्परविरोधी सूर शालेय इतिहासात कधीच समोर येत नाही. त्याकाळाचे चित्र आजच्या सामान्य पब्लिकच्या मनात जे आहे त्यापेक्षा वेगळे निश्चित असले पाहिजे हे इतिहासाचा स्नातक असतांना समग्र पद्धतीने अभ्यास करतांना जाणवायचे. अर्थात उपलब्ध करून दिलेल्या मोजक्या साधनांवर आपण केवळ तर्क लावू शकतो. तो तर्कही तसाच लागावा अशी उपलब्ध झालेल्या पुराव्यांची इच्छा असेल तर?

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 20/04/2015 - 17:44
फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते.
सर्व मुस्लिम शासकांत औरंगजेबाच्या दरबारात सर्वाधिक हिंदू मंत्री, अधिकारी होते असे ऐकून आहे.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 17/04/2015 - 23:28
या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ? आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि? स्लो पोइजन देऊन जगाला बटीक बनवणाराव जास्त क्रुर कि सरळ शीर कापणारा? माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता. पण या सर्व जर-तर च्या बाबी झाल्या. असो.

In reply to by अर्धवटराव

काळा पहाड 18/04/2015 - 00:35
या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ?
याला व्हाईट मॅन्स बर्डन असं म्हणतात. http://en.wikipedia.org/wiki/The_White_Man%27s_Burden
आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि?
दोन कारणं. १. जपान हा व्यापारी देश नव्हता. ब्रिटीश सुरवातीला व्यापारी म्हणून आले आणि भारतीय राजांचा मूर्खपणा त्यांनी पाहिला नसता (आणि वर उल्लेखिल्याप्रमाणे व्हाईट मॅन्स बर्डन चा पगडा त्यांच्यावर नसता) तर ते व्यापारीच राहिले असते. २. जपान हा पारंपारिक रित्या साम्राज्यवादी देश नव्हता. त्याचं चरित्र दुसर्‍या महायुद्धामध्ये बदललं ते टोजो सारख्या नेत्यांमुळं. मुळात जपानी राजा या युद्धाबद्दल तितकासा उत्साही नव्हता.
माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता.
अजिबात नाही. जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.

In reply to by काळा पहाड

अर्धवटराव 18/04/2015 - 01:46
जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.
म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं. इंग्रजांबाबत भारतात नाहि म्हणायला सॉफ्ट कॉर्नर होता व स्वतंत्र भारताचे इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध असावे अशीही आपली मनसीकता होती. महायुद्धानंतर जपानने जर भारताला अंकीत करायचा प्रयत्न केला असता तर भारताचा प्रतिकार फार जास्त तिखट असता.

In reply to by अर्धवटराव

क्लिंटन 18/04/2015 - 11:44
म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं.
यात अनेक गृहितके आहेत. पूर्वीही राजपुत, शीख, मराठे, विजयनगर साम्राज्य इत्यादींनी मोंगल आक्रमणांचा मुकाबला केलाच होता.तेव्हा जास्त खुनशी शत्रू असेल तर प्रतिकारही जास्त तिखट होईल असे म्हणणे वरकरणी ठिक आहे. पण पूर्वीची परिस्थिती १९४५ मध्ये राहिली नव्हती. मोंगल असू देत किंवा राजपूत-मराठे, दोघेही पारंपारिक शस्त्रांनीच (तलवारी, भाले इत्यादी) लढाई करायचे. तेव्हा त्यात आपली बाजू फार पडती होती अशी परिस्थिती नव्हती.पण १९४५ मध्ये शत्रूकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, रणगाडे वगैरे होते. आपली तयारी कितपत होती? क्रांतिकारकही गावठी पिस्तुलातून दोन-चार गोळ्या झाडून जुलमी इंग्रज अधिकार्‍यांचा वध करू शकत होते.पण आपल्याकडे अशी शस्त्रास्त्रे, विमाने वगैरे होती का? त्यांच्या मशीनगनला आपली गावठी पिस्तुले कशी पुरी पडणार होती? औरंगजेबाच्या काळापासून १९४५ पर्यंत युध्दतंत्रात मोठे बदल झाले होते आणि वैयक्तिक शौर्याच्या जोरावर जिंकायचे दिवस बरेच मागे पडले होते. सुरवातीला अगदी अशीच पडती बाजू अफगाणिस्तानातील लोकांची रशियनांबरोबर होती.पण अमेरिकेने त्यांना शस्त्रपुरवठा केलाच होता आणि अफगाणिस्तान डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे त्याचा फायदा अफगाणांना झाला. तसा फायदा आपल्याला फार तर मणीपूर, नागालँड अशा ठिकाणी झाला असता पण बंगालसारख्या सपाटीच्या प्रदेशामध्ये आपण काय करणार होतो? आणि ब्रिटिशांविरूध्दचा आपला लढाही ०.००१% क्रांतिकारक सोडले तर 'अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला' अशा स्वरूपाचाच होता. अर्थात असे ठराव करूनच लोकांना स्वातंत्र्य हवे याची जाणीव अधिकाधिक होत होती आणि अशाच वातावरणातून क्रांतिकारक निर्माण होऊ शकतात.पण मुळात स्वातंत्र्य कशाकरता हेच माहित नसेल अशा समाजातून क्रांतिकारक निर्माण कुठून होणार? हे विविध काँग्रेसमधले ठराव ही जाणीव करायचे काम करत होते हे नक्कीच. तेव्हा आपला समाज फारसा लढवय्या नव्हता निदान १८५७ नंतर तरी.अशा समाजातले लोक खुनशी जपान्यांना कसा प्रतिकार करणार आणि त्यातूनही हातात शस्त्रे पुरेशी नसताना? टी.एन.कौल म्हणून आपले अगदी सुरवातीचे आय.एफ.एस ऑफिसर होते.ते १९५०-५१ मध्ये चीनमध्ये भारतीय दुतावासात होते.तिथे त्यांना अफगाणिस्तानचा राजदूत म्हणाला होता-- ३० कोटींच्या तुमच्या देशावर लाख-दीड लाख इंग्रज १५० वर्षे राज्य करूच कसे शकले? आमच्या देशात आम्ही अशा मूठभर इंग्रजांची चटणी उडवली असती आणि पळता भुई थोडी केली असती. याविषयी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचले आहे (पुस्तकाचे नाव विसरलो). तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे प्रचंड खुनशी जपान्यांना प्रतिकार करायची लाख इच्छा आपल्याला असूनही ते शक्य होणे कितपत शक्य होते? विशेषतः आपली बाजू अशी पडती असताना?

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 19/04/2015 - 04:55
महायुद्ध जर ब्रिटेशांच्या पराभवाने संपते तर जपानशी भारताचा सामना तसाहि झालाच असता. प्रश्न केवळ इतका उरतो कि भारत जपानला गुलाम वसाहत म्हणुन हस्तांतरीत होतो कि उपकृत राष्ट्र म्हणुन.

In reply to by अर्धवटराव

प्रदीप 18/04/2015 - 14:46
जपान्यांनी जेते म्हणून इतर देशांत नुसता नरसंहारच केलेला नाही, तर त्यांनी त्याचबरोबर जिवंत माणसांना, त्यांच्या अत्यंत क्रूर व पाशवी धोरणांमुळे, पराकोटीच्या यातना दिलेल्या आहेत. चीन, फिलीनीन्स ('फिलीपाईन्स' नव्हे), कोरीया, हाँगकाँग ह्या सर्व ठिकाणी त्यांनी स्त्रीयंवर बलात्कार व त्यांना जबरदस्तीने वेश्या बनविणे, जीवंत पकडलेल्या शत्रूसैनिकांच्या शरीरांवर, निरनिराळे पाशवी, यमयातना देणारे प्रयोग करणे असे अनेक प्रकार केलेले आहेत. म्हणूनच ह्या सर्व ठिकाणी जपानद्वेषाचे पडसाद अजूनही नेहमी उमटत असतात. कुठलाही परका देश एकाद्या, white knight प्रमाणे आपल्या 'मदतीस' येऊन, आपणांस सोडवेल व नंतर शांतपणे आपला प्रांत आपल्याकडे सोपवून आनंदानेमाघारी जाईल,ह्यासारखी खुळचट कल्पना ज्यांनी केली, त्यांना मी तरी थोर, प्रगल्भ नेते वगैरे मानण्यास तयार नाही. ब्रिटीश मुळात व्यापारी अधिक आणि, धर्म अथवा सत्तेची इर्षा असलेले, कमी. त्यामुळे त्यांनी अनेक वसाहती विषेश क्रौर्य न करता वसवल्या व आर्थिक आणि/किंवा राजकीय अपरिहार्यता येईस्तोंवर त्या तशाच चालवल्या. अर्थात एकदा एखाद्या देशात सत्ताग्रहण केल्यानंतर ते जेते म्हणूनच वावरले, तेव्हा त्यांचे व स्थानिक जनतेचे हितसंबंध समान राहिले नाहीत. तरीही, जगभरच्या वसाहतींचा विचार करता ब्रिट्सांच्या कॉलनीज खूपच 'प्रेम़ळ', स्वतःबरोबरच स्थानिक जनतेचाही थोड्याफार प्रमाणात उद्धार करणार्‍या वाटतात. ते व डच सोडता, इतर कुठल्याही युरोपियन, अमेरिकन जपानी वसाहतींच्या बाबतीत असे म्हणणे कठीण आहे.

In reply to by प्रदीप

अर्धवटराव 19/04/2015 - 05:31
जपानला कुणाही भारतीय नेत्याने आपला भाग्यविधाता समजण्याची चूक केली नव्हती. जपानी पाहुणा आपला नवा मालक बनुन येतो कि उपकारकर्‍ता हाच प्रश्न होता. बाकी ब्रिटीश वीट जपानी दगडापेक्षा मऊ असेलही. अमेरीकेची सगळी दादागिरी उघड दिसत असुन देखील जगाचा पोलीस म्हणुन इतर महासत्तांपेक्षा तेच परवडतात. ( भारताला आपण महासत्ता मानतच नाहि :) ).

In reply to by प्रदीप

हुप्प्या 20/04/2015 - 04:15
जपानचे सहाय्य घेतले असते तर त्यांनी तसेच अत्याचार भारतात केले असते जसे चीन वा अन्य भागात केले ह्यात अनेक गृहितके आहेत. एक म्हणजे भौगोलिक अंतर. जपान हा काही महाकाय देश नाही. त्यामुळे त्यांचे सैन्य भारतापर्यंत पोचले असते तर ते तितकेसे प्रबळ राहू शकले नसते. रसद, दारूगोळा पुरवणे दुरापास्त होत गेले असते. भारतानेही प्रतिकार केलाच असता. तिकडे पॅसिफिकमधे पर्ल हार्बर वगैरे अमेरिकेच्या कुरापती काढून त्या देशाला अंगावर घेणे हेही चालूच होते ह्यामुळे इतक्या विविध आघाडीवर जपान लढत असते तर नक्कीच हरले असते. कदाचित हे सुभाषचंद्रांनाही जाणवले असेल. आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असेल. ब्रिटिश जपान्यांपेक्षा सुसंस्कृत होते ह्यात दुमत नाही. पण शेवटी तो शत्रूच. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जपानचे सहाय्य घेतले म्हणजे लगेच जपान्यांच्या अत्याचाराला खुले द्वार असे मला वाटत नाही. तसेही अणुबॉम्ब प्रकरण झाल्यामुळे ते दाती तृण घेऊन शरण आलेच त्यामुळे जर तर प्रकरण ताणायचे असेल तर अगदी जपान शिरजोर होऊ लागला असता तरी तो फार काळ तसा टिकला नसता. दुसरे असे की सुभाषचंद्रांची विचारसारणी ही नेहरु गांधींपेक्षा वेगळी होती. ते राजकीय विरोधक होते त्यामुळे काँग्रेस व इंग्रज ह्यांच्या बाजूने नेताजींची डाळ शिजण्यासारखी नव्हती. राजकीय महत्त्वाकांक्षा ही निव्वळ गांधी नेहरूंच्या हक्काची गोष्ट असली पाहिजे असे मानणेही खुळचटपणाचेच आहे.

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 20/04/2015 - 10:40
बरोबर आहे ना. पण जपान्यांनी अगदी पापुआ न्यू गिनीमध्येही जाऊन अत्याचार केलेच होते.ते पण जपानला फार जवळ होते असे नाही. आणि जपान्यांनी अंदमानात घुसूनही त्याच गोष्टी केल्याच होत्या.तेव्हा जपान्यांशी संग म्हणजे विषाची परिक्षा होती. तसे जपान्यांना करता आले नसते तर एक भारतीय म्हणून मला आनंदच झाला असता पण जपान्यांना मुद्दामून बरोबर घ्यायला नको होते असे वाटते.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 20/04/2015 - 15:39
ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि पक्ष्यांची गोष्ट आठवली. ( अजून कोणी उल्लेख कसा केला नाही बरं?) झाडाच्या मुळाशी असलेल्या बिळातून एक साप पक्षी घरट्यात नसताना येई आणि त्यांची अंडी पळवायचा प्रयत्न करी. त्याला उपाय म्हणून ते पक्षी त्या बिळापर्यंत मासे विखरुन एका मुंगुसाला बोलावतात. तो सापाला तर मारतो पण आता त्याला नव्या खाद्याचा शोध लागलेला असतो. ते मुंगुस अंड्यांबरोबरच पक्ष्यांवरपण हल्ला करु लागते. आता मुंगसाने हल्ला केला असता की नाही हाच तो प्रश्न आणि त्याबद्दल ही चर्चा. :)

In reply to by हाडक्या

क्लिंटन 20/04/2015 - 15:46
:) अहो मुंगुस म्हटल्यावर ते हल्ला करणारच. आणि मुंगुस आपल्यावर हल्ला करणार नाही आणि सापाला मारून गपगुमान निघून जाईल अशी कल्पना करून घेणे हा पण घातक स्वप्नाळूपणा नाही का?

In reply to by हाडक्या

हुप्प्या 20/04/2015 - 22:51
कुठली बोधकथा वास्तवात वापरत येईल याबाबत तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का? जपानी लोकांच्या अत्याचारामुळे त्यांची खाद्याची, पगाराची, दारुगोळ्याची गरज भागत होती का? की त्याकरता त्यांना त्यांच्या रसदीची सोय करावी लागत होती? गोष्टीतले मुंगुस हे एकाच वेळी जंगलाच्या अनेक मैल दूर असणार्‍या दोन तीन टोकाशी असणार्‍या प्राण्यांशी लढत होते का? वगैरे मुद्देही यात आणता येतील. काही वेळा राजकीय तडजोड म्हणून दुष्ट वृत्तीच्या लोकांशी हातमिळवणी केली गेली आहे. ती प्रत्येक वेळेस अपयशीच ठरली आहे असे नाही. उदा. मित्रराष्ट्रांनी स्टालिनशी केलेले सहकार्य. जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.

In reply to by हुप्प्या

हाडक्या 21/04/2015 - 14:54
मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का?
अहो, बाळबोध बोधकथेचे तात्पर्य घ्यायचे असते (म्हणींसारखेच). अशी कथेची पिसे काढत बसला तर कसे हो.. थोडक्यात या कथेचे तात्पर्य आहे "असंगाशी संग प्राणाशी गाठ". मग तुम्हाला मुंगसाची मानसिकता, धार्मिकता, विचारसरणी इ.इ. अभ्यासायची असेल तर माझी काही हरकत नाही. ;)
जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.
हे अगदी मान्य.. :)

In reply to by अर्धवटराव

प्रदीप 18/04/2015 - 15:51
.. (प्रतिसाद दोनदा प्रकाशित झाल्याने हा काढून टाकत आहे).

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:23
चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली.
३% आणि ४% च फक्त? ब्रिटिशांनी १००% उत्तर अमेरिका नष्ट केली. १००% ऑस्ट्रेलिया. १००% न्यू झी लँड. आफ्रिका ....?? असोच. ---------------------------------------------------------------- युरोपीय सोडून कॉलनी नसण्याचे भाग्य नेपाळ आणि जपान या दोनच देशांना लाभलेले आहे असे ऐकून आहे. जपानी लोक थोडेसे सैल पडले तेव्हा त्यांच्यावर नको ते राजकीय आणि व्यापारी कायदे लादायचा प्रयत्न झाला. (आमचे ऐकत असाल तर तुम्हाला स्वतंत्र म्हणू.) यातून शिकला म्हणून जपान 'मर्सिलेस' बनला. तो तसा नसता तर स्वतंत्र नसता आणि आज एक टुच्चड बिनकामी भूभाग असूनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता नसता.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 17:48
हो बरोबर आहे ना. फक्त जपानने जे काही केले ते ७०-८० वर्षांपूर्वीच्या काळात आणि अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियातील मुळातील संस्कृती पूर्ण नष्ट केली गेली ४०० वर्षांपूर्वी. म्हणजे या दोन घटनांमध्ये किमान तीन शतकांचे अंतर होते.आणि १९४० च्या दशकात आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.अशावेळी ब्रिटिश वीट असतील तर जपानी दगड होते. तेव्हा उत्तर अमेरिकेत युरोपिअनांनीच उच्छेद केला या उल्लेखाचा संदर्भ समजला नाही.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:04
आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.
जपान शरणच आले नसते तर अमेरिकेने एकूण किती अणुबाँब टाकले असते असे वाटते? अमेरिका देखिल १९४० च्या दशकातली होती. आणि युरोपीय देशांपेक्षा कमी क्रूर इ इ मानली जायची. ----------------------------------------------- १९४० असो नैतर १६४०. युरोपीय ते युरोपीय. युद्ध ते युद्ध. आपण श्रेष्ठ , कॉलनी कनिष्ठ, आणि कॉलनीतल्या लोकांशी नीच वागायचे ही विचारधारा युरोपीय आहे. पूर्वेकडे युद्ध संपले, मॅटर क्लोज.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:55
जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता.
चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय? ------------------------------------------------------------------------ आणि हो, भारतीय लोक संपवले असते असं इतक्या सहजासहजी म्हणता येत नाही. मंजे रेड इंडीयन्स संपवणे आणि भारतीय संपवणे यांत बराच फरक आहे. इथे नुसते जालियनवाला झाले तर लोकांचे डोके फिरायचे. बंदुकीला गाईची चरबी लावलेली महाग पडायची. ऑनेस्टली स्पिकिंग, कधीकधी मला भारतात ब्रिटिशांचे राज्य होते कि ती काही एतत्द्देशीयांचीच कुटील अरेंजमेंट होती असा प्रश्न पडतो.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:04
चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय?
यापैकी कोणत्या ठिकाणी जपान्यांचा १५० वर्षे ताबा होता ते सांगा.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:16
'जो खातमा झाला आहे' मंजे जितके टक्के झाला, जितक्या वर्षांत आहे. वॉर टाइम परिस्थिती आणि अदरवाईज परिस्थिती यांची तुलना होऊ शकत नाही.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:31
म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.
http://en.wikipedia.org/wiki/Taiwan_under_Japanese_rule इथे असे लिहिले आहे कि तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:55
तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.
आणि दक्षिण-पूर्व आशियात कित्येक ठिकाणी १९४० च्या दशकात २-४ वर्षातच फुफाटा तुम्हाला दिसत नाही. कारण काय तर १८९० च्या दशकात तैवानमध्ये तसे झाले नाही. उत्तम. जपानने १८७० च्या सुमारास आपले अलगतावाद धोरण संपवले आणि नंतर २५ वर्षातच तैवान गिळंकृत केला. कदाचित त्यांची रक्तपिपासा सुरवातीच्या काळात तितकी नसेलही आणि नंतरच्या काळात ती वाढली. १९४० च्या दशकात तर अगदी निंसंशयपणे जपान्यांनी रक्तपिपासा जोरदार होती. म्हणजे कसे झाले सुरवातीला एखादा वाघ माणसांवर नुसताच गुरगुरत असेल पण मारत नसेल पण नंतर माणसाच्या रक्ताची त्याला चटक लागली. आणि तुमच्यासारखे लोक म्हणणार अरे सुरवातीला तो नुसताच गुरगुरत होता.त्याने कोणाला मारले होते? म्हणजे तो रक्तपिपासू नाहीच. इतर ठिकाणी त्या वाघाने काय केले वगैरे गोष्टींना फाट्यावरच मारायचे. असा वाघ तुम्हाला तुमच्या घरात ठेऊन घ्यावासा वाटत असेल तर तो तुम्हालाच लखलाभ असो. अशा वाघापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हा मुद्दा मी कित्येकवेळा मांडला आहे.तो तुम्हाला मान्य नसल्यास किंवा समजला नसल्यास किंवा समजावून घ्यायचा नसल्यास माझा नाइलाज आहे. सारखी तीच तीच गोष्ट लिहायचा कंटाळा आला आहे. तेव्हा माझ्यातर्फे या चर्चेत पूर्णविराम देत आहे. नवीन मुद्दा आल्यास परत येईनच.पण काळरेषेची गल्लत करून विचित्र मुद्दे कोणी मांडत असेल तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 19:19
कोणत्याही क्षणी चर्चा संपवण्याच्या आपल्या अधिकाराचा मला पूर्ण आदर आहे. पण तरीही ... १. युद्धकालातील देशांचे जिंकलेल्या प्रदेशातील वर्तन हे तत्समान परिस्थितींशीच तोलावे. शांतिकालाशी नाही. त्यांची सरमिसळ करू नये. म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांना आय सी एस बनू दिले वा जालियनवालाबाग हे जपानच्या तैवानमधील तत्समान परिस्थितींशी तोलावे. दुसर्‍या महायुद्धाशी नाही. अँड सो ऑन. ---------------------------------------------------------------------- २. युद्धकालात किंवा यादवी कालात, स्वकीयांशी किंवा परकीयांशी आपण जनरली कोण किती क्रूर आणि सौम्य याचा रिव्ह्यू करू- अ. अमेरिका - दोन अणुबाँब, व्हिएटनाम ब. जर्मनी - ज्यूंची कत्तल क. जपान - पूर्वेकडचे अन्याय ड. रशिया - लेनिन, स्टेलिन चे 'कर्तृत्व' इ. चीन - माओ चे काम ब्रिटीशांकडे, फ्रान्सकडे या महायुद्धांत कत्तल करायचा कोणता मोठा मौका आलेला जो त्यांनी सोडला? बिचारे जिथे जिंकले ती त्यांचीच भूमी होती. रशिया आणि अमेरिकेने त्यांना जिंकून दिले. यात जपानचाच असा बाऊ करण्यात अर्थ नाही. उलट बुद्धाची जन्मभूमी म्हणून जपान्यांत भारताबद्दल नेहमी आदर राहिला आहे.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 17:42
पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात
असा विचार लोकांना करायला ब्रिटिश भाग पाडू शकतात मंजे नक्कीच फार हुशार असावेत. जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 17:58
जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?
का हो तुम्ही प्रत्येक वेळी काळरेषेची गल्लत का करत आहात? जपानचा खुनशीपणा १८७० च्या सुमारास जपानी साम्राज्य ज्याला म्हणतात त्या काळापासून सुरू झाला. टोजोच्या काळात विशेषतः वाढला. सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.

In reply to by क्लिंटन

arunjoshi123 20/04/2015 - 18:11
सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.
हे मी थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो. अमेरिकेला जपानने आपले वाणिज्यिक नियम, बंधने स्वीकारावी असे वाटायचे. म्हणून अमेरिकेने/युरोपने पुश (मंजे काय ते समजून घ्या) केल्यावर जपानने "परवानगी" बंद केली (व्यापारासाठी किंवा कसेही कोणी आले कि थेट वर. आणि हा प्रकार प्रत्येक शतकात होता. म्हणून जपान आज इतका तगडा नॉन्-युरोपीय देश आहे. नैतर बाकी प्रत्येक देश किती दोहित आहे याचा बराच हिशेब निघतो. ------------------------------------------- भारतात ब्रिटिश किंवा मुस्लिम आक्रमक आले तेव्हा जे घडलं नाही (चोख उत्तर इ इ )याचं जे आपल्याला नेहमी वैफल्य वाटत असतं ते जपानमधे घडलं, अगदी पूर्वीपासून. आणि म्हणून त्यांना एका पातळीवर 'ब्रिटिशांपेक्षा क्रूर' जज करण्याचा प्रयत्न केला जातो.

In reply to by arunjoshi123

क्लिंटन 20/04/2015 - 18:34
तुम्ही परत काळरेषेची गल्लत का करत आहात? अमेरिका आणि जपानमधले वाणिज्यिक युध्द १९३० च्या दशकातील. जपान २०० वर्षे जगापासून अलग होते तो कालावधी सतराव्या शतकापासून (१६**) ते सुमारे १८७० पर्यंत. या काळात पहिले १०० वर्षे अमेरिका हा देशच ब्रिटिशांची वसाहत होता. अमेरिकेचे जागतिक घडामोडींमध्ये सगळीकडे नाक खुपसायचे प्रमाणे वाढले पहिल्या महायुध्दाच्या सुमारास.त्यापूर्वीच जपानने अलगतावाद संपविला होता. या काळरेषेच्या गल्लतीविषयीचा मुद्दा मी तीनवेळा मांडला आहे.तो यापुढे परत मांडायचा नाही. आणि जपान्यांनी युरोपिअन आला की ठार मारायचे हा प्रकार केला कारण ते ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतील, आपल्या संस्कृतीवर घाला घालतील म्हणून. ते केले ते अगदी उत्तम केले.तरीही १६-१७ व्या शतकात युरोपिअनांनी उत्तर अमेरिकेत आणि आफ्रिकेत प्रचंड क्रौर्य दाखविले म्हणून १९४० च्या दशकात जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात जे क्रौर्य दाखवले त्यात काय विशेष असे तुम्ही म्हणत असाल आणि असे खुनशी लोक भारतात आलेले चांगले असे तुम्हाला वाटत असेल तर असे वागणे तुम्हालाच लखलाभ असो.

In reply to by क्लिंटन

बबन ताम्बे 20/04/2015 - 18:55
श्री. क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद वाचले. त्यांनी वस्तुनिष्ठ प्रतिपादन केले आहे असे मला वाटते. क्रूर आणि अत्याचारी जपानी भारतात आल्यावर भारतीयांशी सरळ वागले असते ह्याची सुतराम शक्यता दिसत नाही. अमेरिकेने अणुबाँब टाकला नसता तर जपान्यांनी अजून हाहाकार माजवला असता. जपानी राज्यकर्ते आणि सैनिकांनी केलेल्या अत्याचाराची फळे अणुबाँबच्या रुपाने जपानच्या निरपराध जनतेला भोगायला लागली. ब्रिटीशांना घालविण्यासाठी त्यांच्याहून भयंकर सैतानांना घरात घेणे म्हणजे आत्मघात होता असे माझेही मत आहे. गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.

In reply to by बबन ताम्बे

अर्धवटराव 20/04/2015 - 21:11
गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.
मी आजवर जे काहि गांधीजींबद्दल वाचलं वा ऐकलं आहे त्यात हा संदर्भ कुठेच आला नाहि. जमल्यास आठवुन नक्की संदर्भ द्या. गांधीजींच्या राजकीय आणि सामाजीक लढ्याचा बराच काथ्याकुट केला जातो. त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणातील समज फार कुणी प्रकाशात आणत नाहि.

In reply to by अर्धवटराव

बबन ताम्बे 21/04/2015 - 11:32
नक्की कुठे वाचले ते आठ्वत नाही. कदाचीत वर्तमानपत्रात देखील वाचलेले असू शकेल. पण त्या लेखातील "ब्रिटीशांचे राज्य जाऊन जपान्यांचे राज्य येणार असेल तर मी ब्रिटीश राज्यास प्राधान्य देईन " असे गांधीजींचे (किंवा त्यांच्या तोंडी घातलेले) वाक्य नक्की आठवते.
सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे. सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली.

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

चित्रगुप्त ·

हाडक्या 10/04/2015 - 15:18
सनीताईंकडून उत्तम अभिनयाची कुणीच अपेक्षा करणार नाही,
आणि हो.. बादवे, सनी (तुमच्याच तै) चांगला अभिनय करु शकते याबद्दल तुम्हास असलेला डाउट्ट पाहून अंमळ आश्चर्य वाटले. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अती समांतरः- कॉलिंग गिरिजा काssssss काssssss!!!
हॅल्लो ... आलो मी !! कोणी काहीही म्हणा मी सनी लिऑनचा फॅन आहे ! ती सुंदर आहे आणि तिला ते चांगलेच ठावुक आहे ! तिच्या सौंदर्यप्रदर्शनात आजवर तरी मला कोठेच बीभत्सपणा दिसलेला नाहीये ... सनी कायम रुपगर्विताच वाटते ! सनीला पहाणे ही एकदम व्हिज्युअल ट्रीट असते ... जसे की क्यॅट्रीना कैफ , सलमा हायेक वगैरेंना पाहताना वाटते तसे ! अगदी संस्कृत साहित्यातील सौंदर्य वर्णनेही आठवतात काही वेळा तन्‍वी श्‍यामा शिखरिदशना पक्‍वबिम्‍बाधरोष्‍ठी मध्‍ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्‍ननाभि:। श्रोणीभारादलसगमना स्‍तोकनम्रा स्तनाभ्‍यां या तत्र स्‍याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:।। कोणी काहीही म्हणा - सनी मला आवडते ... एव्हन कित्येक मुलींच्याकडुनही सनी सुंदर आहेच असे कौतुक ऐकले आहे. . जे जसे आहे त्याचा तसा स्वीकार करावा , सुंदर तर सुंदर ! , दांभिकपणा करुन काही खास लाभ होत असेल तर मला तो माहीत नाही ( प्रवचनकारबुवांना विचारावे लागेल ;)!) समांतर : चित्रपट आवर्जुन पाहणार !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 10/04/2015 - 19:28
तिच्या सौंदर्यप्रदर्शनात आजवर तरी मला कोठेच बीभत्सपणा दिसलेला नाहीये
शंभर टक्के सहमत. मी तर असेही म्हणेन, की वयाच्या चौतिसाव्या वर्षीपण तिच्या चेहर्‍यावर बालपणीची निरागसता टिकून आहे. या सिनेमातील तिची दृष्ये सुरुचीपूर्ण आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

तन्‍वी श्‍यामा शिखरिदशना पक्‍वबिम्‍बाधरोष्‍ठी मध्‍ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्‍ननाभि:। श्रोणीभारादलसगमना स्‍तोकनम्रा स्तनाभ्‍यां या तत्र स्‍याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:। म्हणजे ? अर्थ सांगा की राव !

नगरीनिरंजन 10/04/2015 - 18:15
आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम.
अक्षरशः फुटलो हे वाक्य वाचून! आजकाल कोणी कोणाला कशाबद्दल सलाम करेल सांगता येत नाही. बाकी सलामे ईश्क असतो किंवा लाल सलाम असतो तसा हा कुठला सलाम म्हणायचा हो चिगुकाका? आणि कसा सलाम केला त्याबद्दलही लिहा की.

गणेशा 10/04/2015 - 18:27
खरेतर सनीलिओनी असल्याने आणि या नावामुळॅ हा सिनेमा पाहणार नव्हतो .. पण तुम्ही चांगला म्हणाताय म्हंटल्यावर पहावा काय असे वाटत आहे.. थोडे आनखिन विश्लेषण हवे होते. बाकी मी त्या आमच्या दगडु च्या पिक्चर च्या वेटींग वर होतो

In reply to by गणेशा

चित्रगुप्त 10/04/2015 - 19:14
@गणेशा:
बाकी मी त्या आमच्या दगडु च्या पिक्चर च्या वेटींग वर होतो
हा दगडू कोण बुवा ? कोण हा दगडू ? हा कोण दगडू ? (चिमणरावाचे चर्‍हाट आठवून डोळे पाणावले आमचे)

मात्र तिने सुंदर रंगबेरंगी भारतीय वेशभूषेत आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम. तपशिलवार लिहिलं असतं तर कशाला सलाम आहे कळलं असतं बाकी कै नै. :) -दिलीप बिरुटे (रंगबेरंगी भारतीय वेशभूषेची आवड असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कहर 14/04/2015 - 17:35
Leela हि रंगीबेरंगी वेशभूषा भारतात कोणत्या ठिकाणी आढळते हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. पुढची photography टूर तिकडेच

हाडक्या 10/04/2015 - 15:18
सनीताईंकडून उत्तम अभिनयाची कुणीच अपेक्षा करणार नाही,
आणि हो.. बादवे, सनी (तुमच्याच तै) चांगला अभिनय करु शकते याबद्दल तुम्हास असलेला डाउट्ट पाहून अंमळ आश्चर्य वाटले. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अती समांतरः- कॉलिंग गिरिजा काssssss काssssss!!!
हॅल्लो ... आलो मी !! कोणी काहीही म्हणा मी सनी लिऑनचा फॅन आहे ! ती सुंदर आहे आणि तिला ते चांगलेच ठावुक आहे ! तिच्या सौंदर्यप्रदर्शनात आजवर तरी मला कोठेच बीभत्सपणा दिसलेला नाहीये ... सनी कायम रुपगर्विताच वाटते ! सनीला पहाणे ही एकदम व्हिज्युअल ट्रीट असते ... जसे की क्यॅट्रीना कैफ , सलमा हायेक वगैरेंना पाहताना वाटते तसे ! अगदी संस्कृत साहित्यातील सौंदर्य वर्णनेही आठवतात काही वेळा तन्‍वी श्‍यामा शिखरिदशना पक्‍वबिम्‍बाधरोष्‍ठी मध्‍ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्‍ननाभि:। श्रोणीभारादलसगमना स्‍तोकनम्रा स्तनाभ्‍यां या तत्र स्‍याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:।। कोणी काहीही म्हणा - सनी मला आवडते ... एव्हन कित्येक मुलींच्याकडुनही सनी सुंदर आहेच असे कौतुक ऐकले आहे. . जे जसे आहे त्याचा तसा स्वीकार करावा , सुंदर तर सुंदर ! , दांभिकपणा करुन काही खास लाभ होत असेल तर मला तो माहीत नाही ( प्रवचनकारबुवांना विचारावे लागेल ;)!) समांतर : चित्रपट आवर्जुन पाहणार !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 10/04/2015 - 19:28
तिच्या सौंदर्यप्रदर्शनात आजवर तरी मला कोठेच बीभत्सपणा दिसलेला नाहीये
शंभर टक्के सहमत. मी तर असेही म्हणेन, की वयाच्या चौतिसाव्या वर्षीपण तिच्या चेहर्‍यावर बालपणीची निरागसता टिकून आहे. या सिनेमातील तिची दृष्ये सुरुचीपूर्ण आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

तन्‍वी श्‍यामा शिखरिदशना पक्‍वबिम्‍बाधरोष्‍ठी मध्‍ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्‍ननाभि:। श्रोणीभारादलसगमना स्‍तोकनम्रा स्तनाभ्‍यां या तत्र स्‍याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:। म्हणजे ? अर्थ सांगा की राव !

नगरीनिरंजन 10/04/2015 - 18:15
आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम.
अक्षरशः फुटलो हे वाक्य वाचून! आजकाल कोणी कोणाला कशाबद्दल सलाम करेल सांगता येत नाही. बाकी सलामे ईश्क असतो किंवा लाल सलाम असतो तसा हा कुठला सलाम म्हणायचा हो चिगुकाका? आणि कसा सलाम केला त्याबद्दलही लिहा की.

गणेशा 10/04/2015 - 18:27
खरेतर सनीलिओनी असल्याने आणि या नावामुळॅ हा सिनेमा पाहणार नव्हतो .. पण तुम्ही चांगला म्हणाताय म्हंटल्यावर पहावा काय असे वाटत आहे.. थोडे आनखिन विश्लेषण हवे होते. बाकी मी त्या आमच्या दगडु च्या पिक्चर च्या वेटींग वर होतो

In reply to by गणेशा

चित्रगुप्त 10/04/2015 - 19:14
@गणेशा:
बाकी मी त्या आमच्या दगडु च्या पिक्चर च्या वेटींग वर होतो
हा दगडू कोण बुवा ? कोण हा दगडू ? हा कोण दगडू ? (चिमणरावाचे चर्‍हाट आठवून डोळे पाणावले आमचे)

मात्र तिने सुंदर रंगबेरंगी भारतीय वेशभूषेत आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम. तपशिलवार लिहिलं असतं तर कशाला सलाम आहे कळलं असतं बाकी कै नै. :) -दिलीप बिरुटे (रंगबेरंगी भारतीय वेशभूषेची आवड असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कहर 14/04/2015 - 17:35
Leela हि रंगीबेरंगी वेशभूषा भारतात कोणत्या ठिकाणी आढळते हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. पुढची photography टूर तिकडेच
. १९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता. ...

उचलता वजन हे - Lifting Technique

वेल्लाभट ·

स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात व्यायाम असो का काम शक्यतो डेडलिफ्ट्स टाळावेत डेडलिफ्ट्स मुळे लोवर बॅक चा चुराडा होऊ शकतो (एक्सीडेंट मुळे अनुभवाचे कुबड़ आलेला) बाप्या

In reply to by टवाळ कार्टा

सूड 25/03/2015 - 15:40
टक्या, जो खुद पुल अप्स के चार रीपीटेशन्स का एक सेट मारके ढेर हो जाते है वो बीस-बीस रिपीटेशन्स के तीन-तीन सेट मारनेवालो को डिवचा नही करते.

In reply to by स्पा

मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, अश्याच एका रगेल मस्ती च्या क्षणी बिना वेस्ट बेल्ट चा ६५ कीग्रॅ चा डेड लिफ्ट घेतला!! पाठीतुन अक्षरशः कड़कड़ण्याचा आवाज आला होता !! तीन मिनट्स उताणा पडलो होतो पुढची पंधरा मिनिटे सेंसेस परत यायला गेली!!! जिम सुटली !! पाषास्ट किलो ची ढेरी घेऊन फिरतोय :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 25/03/2015 - 16:57
हे वाचून वाईट वाटलं. पण काहीतरी नक्कीच चुकलं तिथे. बेल्ट लावला नाहीत हे सांगितलंतच तुम्ही. फॉर्मही अत्यंत महत्वाचा ठरतो. असो. धिस वॉज बॅड.

In reply to by स्पा

हो वेल्लाभट् वेळच चुकीची होती साली बहुतेक स्पा , त्यानंतर ताबडतोब ट्रैक्शन लावले होते ३ दिवस नंतर फिजियोथेरेपी अन व्यायाम करुन आता पोस्चर करेक्शन बर्यापैकी झाले आहे पण त्या सहा महिन्यात जी वाकुन चालयची सवय जडली ती जडलीच!!! असो!! सद्ध्या फ़क्त फ्रीहैण्ड अन बॉडीवेट ची परमिशन आहे!!! देवादयेने नोकरी ला गरजेचे ट्रेनिंग अन परेड करू शकलो हेच भरपूर झाले

In reply to by मोहनराव

अहो चेष्टेत लिवले हाय ते मोहनराव!!!! अशी का ढेरी हात पाय (माणसाचे!!) वेगळे कापुन वजन करता येते काय!!

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 25/03/2015 - 15:21
वर स्पा' ने आपली झैरात केलेलीच आहे. तो नक्की सांगेल. हे भस्साभस डेडलिफ्ट करा म्हणेल भौदा... हाय काय नाय काय.

कहर 25/03/2015 - 16:02
इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत नाही गं … ' च्या धर्तीवर 'अजूनही उचलत नाही गं … ' म्हणावेसे वाटतय *dance4* *DANCE* :dance: बादवे कुठेतरी जोक वाचला होता. १४ किलोचे सिलेंडर न उचलू शकणाऱ्याला ५०-५५ किलोची मुलगी आरामात उचलता येते ( इथे सिलेंडर 'गरज असताना' आणि मुलगी 'गरज नसतानाही' असा संदर्भ धरावा ) *help* *HELP*

In reply to by कहर

टवाळ कार्टा 25/03/2015 - 16:14
पोरगी गळ्यात हात टाकते हो...बाकी जरा भविष्यातला विचार केल्यास काय जास्त फायद्याचे हे तुम्हीच ठरवा ;)

In reply to by टवाळ कार्टा

कहर 25/03/2015 - 16:46
गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट वजन कमी होते का ? भौतिकी भाषेत याला उर्ध्वबल (upthrust) म्हणतात पण ते द्रव किंवा वायू पदार्थांमुळे होते असे शिकवले गेलेले (मास्तर मुलगी या पदार्थाबद्दल इसरला कि जाणून बुजून बोल्ला नाय काय ठाऊक )

सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या जीवनात उपयोगी लेख. ====== काय नाय होत मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स मजा येते हे कोणी, कोणत्या पूर्वतयारीने, किती वजन उचलायचे आहे त्यावर अवलंबून आहे. तरीही सावधगिरीच्या सूचना... १. खूप ताकदवान माणसानेही चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्याची "मजा" कधी "सजा" बनेल हे सांगता येत नाही. तेव्हा ते न केलेले केव्हाही चांगले. २. चुकीच्या पद्धतीने आणि / अथवा प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलल्याने व्यावसायिक वेटलिफ्टर्समध्येही पाठीच्या तक्रारी निर्माण होणे विरळ नाही. ३. जिला आपण सर्वसामान्य भाषेत पाठ म्हणतो ती एक मोठ्या संख्येने असलेली हाडे, सांधे, स्नायू, संधिबंधने (लिगामेंट्स), इ ची गुंतागुंतीची संरचना आहे. या संरचनेमध्ये मज्जारज्जू सुरक्षित ठेवलेला असतो व त्यापासून निघालेले मज्जातंतू त्या संरचनेमध्ये असलेल्या अरुंद छेदांतून बाहेर पडतात. अर्थातच, या संरचनेला मध्यम ते मोठा धोका पोहोचला तर ती पूर्णपणे (स्ट्रक्चरली अँड फंक्शनली) मूळस्थितीत आणणे बहुतेक वेळा अशक्य असते. ४. पाठ शरीररचनेच्या केंद्रभागी असल्याने तिचा मानवाच्या बहुतेक सर्व महत्वाच्या हालचालीत सहभाग असतो. त्यामुळे, पाठीला झालेली अगदी छोटी पण कायमस्वरूपी इजा माणसाला लहानसहान कृतीतही त्याने उत्साहाच्या (काहीजण याला जास्त कडक आणि जास्त योग्य शब्द वापरतात) भरात केलेल्या चुकीची सतत जन्मभर आठवण देत राहते. वर उधृत केलेला प्रतिसाद वाचून गैरसमज झाल्याने कोणाचे नुकसान होऊ नये, केवळ याच कारणासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर स्वतःचे निर्णय घेण्यास मोकळा आहेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 26/03/2015 - 18:58
एक्का साहेबांच्या उत्तम प्रतिसादाला एक पुरवणी माझे असे वैयक्तिक मत आहे कि व्यायाम या प्रकारासाठी जमिनीवरून वजन उचलुच नये. ५० % तरी तरुणांना ( ३० वर्षे) या व्यायामानी पाठदुखी होते. आणि चाळीशीनंतर तर नाहीच नाही. त्याला पर्यायी असे सर्व व्यायाम प्रकार वापरावेत. बाकी सिलिंडर उचलायचे प्रसंग ३० च्या आत येऊ नयेत. (आणी मुलगी उचलायचे तिशी नंतर)

पाठीच्या मणक्याशी खेळु नये हे स्वानुभवानी सांगतो. मणक्याला तीन फ्रॅक्चर्स झालेली टी-१२ ला. अजुन किमान ५ पहिने व्यायाम करता येणार नाही. पुर्वीएवढा व्यायाम आता परत कधी करता येईल का हीच शंका वाटते. :'(

In reply to by पॉइंट ब्लँक

आयुर्हित 26/03/2015 - 07:01
दुचाकी वरून फार लांबचे प्रवास करतांना सुरक्षितता महत्त्वाची आहेच, त्याशिवाय बसण्याची पध्दत/आसन (posture) बरोबर हवे. अन्यथा थोड्याशा प्रवासानेही त्रास होवू शकतो. किंवा काहीच प्रवास न करणाऱ्या व कार्यालयात/घरात काम करणाऱ्या व्यक्तीलाही पाठीचा त्रास होवू शकतो.

स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात व्यायाम असो का काम शक्यतो डेडलिफ्ट्स टाळावेत डेडलिफ्ट्स मुळे लोवर बॅक चा चुराडा होऊ शकतो (एक्सीडेंट मुळे अनुभवाचे कुबड़ आलेला) बाप्या

In reply to by टवाळ कार्टा

सूड 25/03/2015 - 15:40
टक्या, जो खुद पुल अप्स के चार रीपीटेशन्स का एक सेट मारके ढेर हो जाते है वो बीस-बीस रिपीटेशन्स के तीन-तीन सेट मारनेवालो को डिवचा नही करते.

In reply to by स्पा

मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, अश्याच एका रगेल मस्ती च्या क्षणी बिना वेस्ट बेल्ट चा ६५ कीग्रॅ चा डेड लिफ्ट घेतला!! पाठीतुन अक्षरशः कड़कड़ण्याचा आवाज आला होता !! तीन मिनट्स उताणा पडलो होतो पुढची पंधरा मिनिटे सेंसेस परत यायला गेली!!! जिम सुटली !! पाषास्ट किलो ची ढेरी घेऊन फिरतोय :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 25/03/2015 - 16:57
हे वाचून वाईट वाटलं. पण काहीतरी नक्कीच चुकलं तिथे. बेल्ट लावला नाहीत हे सांगितलंतच तुम्ही. फॉर्मही अत्यंत महत्वाचा ठरतो. असो. धिस वॉज बॅड.

In reply to by स्पा

हो वेल्लाभट् वेळच चुकीची होती साली बहुतेक स्पा , त्यानंतर ताबडतोब ट्रैक्शन लावले होते ३ दिवस नंतर फिजियोथेरेपी अन व्यायाम करुन आता पोस्चर करेक्शन बर्यापैकी झाले आहे पण त्या सहा महिन्यात जी वाकुन चालयची सवय जडली ती जडलीच!!! असो!! सद्ध्या फ़क्त फ्रीहैण्ड अन बॉडीवेट ची परमिशन आहे!!! देवादयेने नोकरी ला गरजेचे ट्रेनिंग अन परेड करू शकलो हेच भरपूर झाले

In reply to by मोहनराव

अहो चेष्टेत लिवले हाय ते मोहनराव!!!! अशी का ढेरी हात पाय (माणसाचे!!) वेगळे कापुन वजन करता येते काय!!

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 25/03/2015 - 15:21
वर स्पा' ने आपली झैरात केलेलीच आहे. तो नक्की सांगेल. हे भस्साभस डेडलिफ्ट करा म्हणेल भौदा... हाय काय नाय काय.

कहर 25/03/2015 - 16:02
इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत नाही गं … ' च्या धर्तीवर 'अजूनही उचलत नाही गं … ' म्हणावेसे वाटतय *dance4* *DANCE* :dance: बादवे कुठेतरी जोक वाचला होता. १४ किलोचे सिलेंडर न उचलू शकणाऱ्याला ५०-५५ किलोची मुलगी आरामात उचलता येते ( इथे सिलेंडर 'गरज असताना' आणि मुलगी 'गरज नसतानाही' असा संदर्भ धरावा ) *help* *HELP*

In reply to by कहर

टवाळ कार्टा 25/03/2015 - 16:14
पोरगी गळ्यात हात टाकते हो...बाकी जरा भविष्यातला विचार केल्यास काय जास्त फायद्याचे हे तुम्हीच ठरवा ;)

In reply to by टवाळ कार्टा

कहर 25/03/2015 - 16:46
गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट वजन कमी होते का ? भौतिकी भाषेत याला उर्ध्वबल (upthrust) म्हणतात पण ते द्रव किंवा वायू पदार्थांमुळे होते असे शिकवले गेलेले (मास्तर मुलगी या पदार्थाबद्दल इसरला कि जाणून बुजून बोल्ला नाय काय ठाऊक )

सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या जीवनात उपयोगी लेख. ====== काय नाय होत मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स मजा येते हे कोणी, कोणत्या पूर्वतयारीने, किती वजन उचलायचे आहे त्यावर अवलंबून आहे. तरीही सावधगिरीच्या सूचना... १. खूप ताकदवान माणसानेही चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्याची "मजा" कधी "सजा" बनेल हे सांगता येत नाही. तेव्हा ते न केलेले केव्हाही चांगले. २. चुकीच्या पद्धतीने आणि / अथवा प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलल्याने व्यावसायिक वेटलिफ्टर्समध्येही पाठीच्या तक्रारी निर्माण होणे विरळ नाही. ३. जिला आपण सर्वसामान्य भाषेत पाठ म्हणतो ती एक मोठ्या संख्येने असलेली हाडे, सांधे, स्नायू, संधिबंधने (लिगामेंट्स), इ ची गुंतागुंतीची संरचना आहे. या संरचनेमध्ये मज्जारज्जू सुरक्षित ठेवलेला असतो व त्यापासून निघालेले मज्जातंतू त्या संरचनेमध्ये असलेल्या अरुंद छेदांतून बाहेर पडतात. अर्थातच, या संरचनेला मध्यम ते मोठा धोका पोहोचला तर ती पूर्णपणे (स्ट्रक्चरली अँड फंक्शनली) मूळस्थितीत आणणे बहुतेक वेळा अशक्य असते. ४. पाठ शरीररचनेच्या केंद्रभागी असल्याने तिचा मानवाच्या बहुतेक सर्व महत्वाच्या हालचालीत सहभाग असतो. त्यामुळे, पाठीला झालेली अगदी छोटी पण कायमस्वरूपी इजा माणसाला लहानसहान कृतीतही त्याने उत्साहाच्या (काहीजण याला जास्त कडक आणि जास्त योग्य शब्द वापरतात) भरात केलेल्या चुकीची सतत जन्मभर आठवण देत राहते. वर उधृत केलेला प्रतिसाद वाचून गैरसमज झाल्याने कोणाचे नुकसान होऊ नये, केवळ याच कारणासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर स्वतःचे निर्णय घेण्यास मोकळा आहेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 26/03/2015 - 18:58
एक्का साहेबांच्या उत्तम प्रतिसादाला एक पुरवणी माझे असे वैयक्तिक मत आहे कि व्यायाम या प्रकारासाठी जमिनीवरून वजन उचलुच नये. ५० % तरी तरुणांना ( ३० वर्षे) या व्यायामानी पाठदुखी होते. आणि चाळीशीनंतर तर नाहीच नाही. त्याला पर्यायी असे सर्व व्यायाम प्रकार वापरावेत. बाकी सिलिंडर उचलायचे प्रसंग ३० च्या आत येऊ नयेत. (आणी मुलगी उचलायचे तिशी नंतर)

पाठीच्या मणक्याशी खेळु नये हे स्वानुभवानी सांगतो. मणक्याला तीन फ्रॅक्चर्स झालेली टी-१२ ला. अजुन किमान ५ पहिने व्यायाम करता येणार नाही. पुर्वीएवढा व्यायाम आता परत कधी करता येईल का हीच शंका वाटते. :'(

In reply to by पॉइंट ब्लँक

आयुर्हित 26/03/2015 - 07:01
दुचाकी वरून फार लांबचे प्रवास करतांना सुरक्षितता महत्त्वाची आहेच, त्याशिवाय बसण्याची पध्दत/आसन (posture) बरोबर हवे. अन्यथा थोड्याशा प्रवासानेही त्रास होवू शकतो. किंवा काहीच प्रवास न करणाऱ्या व कार्यालयात/घरात काम करणाऱ्या व्यक्तीलाही पाठीचा त्रास होवू शकतो.
लेखनविषय:
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात. पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते.