मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मत

माझी लाचखोरी....

जेपी ·
घटना जुनी आहे.१० वी झाल्यावर सगळे करता तस मला सेवायोजन कार्यालयात नावनोंदणी करायला जायच होत. गावाकडुन गादी पकडुन जिल्ह्याला जायला उशीर झाला..१ वाजला.कार्यालयात पोहचलो. माझे येण्याचे कारण तिथल्या कर्मच्यार्‍याला सांगितल..त्यांने बोर्डाकडे बोट दाखबल..कार्यालय १ वाजता बंद.. डोळ्यासमोर तो बोर्ड,कर्मचारी,पुन्हा होणारी चक्कर,वाया जाणारा वेळ आणी पेसा नाचु लागला..

कर्त्याचे उत्तरदायित्व

नरेंद्र गोळे ·
पंतप्रधान महोदय, सादर प्रणाम, (हे पत्र २०१२ साली, तत्कालीन पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग ह्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी आजही ते संदर्भहीन झाले आहे असे नाही. वाचून सांगा की, याबाबत आपण काय म्हणता?) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज पासष्ट वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी अजूनही, भारतात कर्त्यास त्याचे उचित उत्तरदायित्व सुपूर्त करण्यात आलेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी हे का म्हणत आहे ते आधी स्पष्ट करतो. भारतातील सर्वात प्रमुख व्यवसाय शेतीचा आहे असे मानले जाते. सरकार नागरिकांकडून कर प्राप्त करून त्याचे बळावर शासन-व्यवहार चालवत असते. थेट कराचा मुख्य हिस्सा प्राप्ती कर समजला जातो.

कथाश्री २०१४

नाखु ·
कथाश्री २०१४ हा दिवाळी अंक गरज या विषयाला वाहिलेला आहे. या विषयाला अनुसरून उचित लेख आहेतच्,शिवाय मंगला खाडीलकरांनी घेतलेल्या तीन मुलाखती वाचनीय आहेत.
  • कुमार सप्तर्षी यांची मुलाखत त्यांची राजकीय जडण घडण , सामाजीक भान आणि वैचारीक स्पष्टता अगदी तपशीलवार उलगडली जाते. आजच्या राजकीय प्रगल्भतेच्या (दिवाळखोरीच्या) पार्श्वभूमीवर त्यांची पक्षविरहीत मते नक्कीच विचारात पाडतात
  • दुसरी मुलाखत ही विनय सहस्त्रबुद्धे यांची "रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी" च्या वाटचालीबद्दल आणि योगदानाबद्दल आहे.

आशावाद

मित्रहो ·
“काय आज तुझी बाई नाही आली का? “नाही” “२६ जानेवारी, नॅशनल हॉलीडे का?” “तिला तिच्या मुलांना फिरायला घेउन जायचे आहे” “काय?” “हो तीन चार महीन्यातून एकदा मुलांना कुठेतरी फिरायला घेउन जायला सुट्टी घेते.” मी अवाक. खरे म्हणजे मुलांना फिरायला घेउन जाणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते आपण ते नेहमीच करतो परंतु कामवाली बाई ही मुलांना फिरायला घेउन जायला नियमित सुट्टी घेते हे जरा नवीन होते. त्यामुळे आश्चर्य वाटले पण तसा विचार केल्यास ही फार आशादायी अशी घटना होती.

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

स्वप्नांची राणी ·
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.

पत्रकारीतेची ऐशीतैशी

अन्या दातार ·
आजकाल विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांचा भारतात सुळसुळाट झालाय. कित्येक लोकांना रोजगारही मिळाला आहे. पण हे पत्रकार, संपादक, उपसंपादक काय म्हणून त्या पदांवर बसलेत असा सवाल पडतो. पूर्वी काही चुका या उपसंपादकाच्या डुलक्या (उसंडु) या नावाखाली चेष्टेचा भाग मानला जायचा. पण आता मात्र या डुलक्यांची वाढती वारंवारीता बघून क्लेश होतात. वानगीदाखल हे एक उदाहरण १. दै. लोकमत (पुणे आवृत्ती) दि.

ब्रम्हराक्षसाच्या पाठी …

Maheshswami ·
भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची. नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला. जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो.

कथा bigger cypher ची

येडाफुफाटा ·
एक विचार- लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे! यावरुन a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला. म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे! bill अन् melinda gates , warren buffet , Rockfellar किंवा tata वगैरें आयुष्यभर पैसे कमावतात. व नंतर तो स्वहस्ते donate करतात. म्हणजे आयुष्यात आधी कोणत्याही भल्या/बुर्या(रॉबिनहूड,आल्फ्रेड नोबेल वगैरें) मार्गाने पैसे मिळवावे व उतारवयात स्वतःच्याच हस्ते(credit घेउन) खर्च करावे. असे धोरण समाजात मान्य दिसते.

वाणप्रस्थाश्रम,मेंढपाळ -राजा आणी काहीबाही...

जेपी ·
थंडीच काळ आणी रात्रीचा वेळ,यष्टीतुन प्रवास करताना मस्त पेकी डुलकी लागत होती.. तेवढ्यात डोक्यावर टपली बसली,चिडुन मागे पाहील..मक्या होता "अय लिंबुटीबुं काय झोपतो..

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

डॉ सुहास म्हात्रे ·
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.