मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

आजानुकर्ण 01/12/2007 - 21:32
आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता. विनम्र श्रद्धांजली. - आजानुकर्ण

विसोबा खेचर 02/12/2007 - 00:30
बिरुटेसाहेब, प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे. मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली.... तात्या.

धोंडोपंत 02/12/2007 - 15:34
प्राध्यापक साहेब, सरांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आपला लेख उत्तम झाला आहे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 02/12/2007 - 15:39
सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. धोंडोपंत, वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! आपला. साहित्याचा वारकरी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया 19/07/2010 - 17:58
पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे.... विठठल ...विठठल.. !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

प्रमोद देव 02/12/2007 - 21:19
प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली. मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे. तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.

धोंडोपंत 03/12/2007 - 10:33
ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. वा वा प्राध्यापक साहेब, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. दादांचा शेर आठवला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो. झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा - "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा ?" हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो. आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मितभाषी 19/07/2010 - 17:11
दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले.
हम्म्म.. मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही. नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.

आजानुकर्ण 01/12/2007 - 21:32
आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता. विनम्र श्रद्धांजली. - आजानुकर्ण

विसोबा खेचर 02/12/2007 - 00:30
बिरुटेसाहेब, प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे. मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली.... तात्या.

धोंडोपंत 02/12/2007 - 15:34
प्राध्यापक साहेब, सरांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आपला लेख उत्तम झाला आहे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 02/12/2007 - 15:39
सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. धोंडोपंत, वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! आपला. साहित्याचा वारकरी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया 19/07/2010 - 17:58
पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे.... विठठल ...विठठल.. !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

प्रमोद देव 02/12/2007 - 21:19
प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली. मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे. तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.

धोंडोपंत 03/12/2007 - 10:33
ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. वा वा प्राध्यापक साहेब, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. दादांचा शेर आठवला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो. झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा - "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा ?" हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो. आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मितभाषी 19/07/2010 - 17:11
दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले.
हम्म्म.. मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही. नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.
लेखनप्रकार

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.

पांढरपेशी कविता

ॐकार ·

विसोबा खेचर 25/11/2007 - 17:31
बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.

In reply to by देवदत्त

ॐकार 25/11/2007 - 18:32
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|

In reply to by ॐकार

देवदत्त 25/11/2007 - 19:04
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )

सर्किट 26/11/2007 - 08:32
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट

विसोबा खेचर 25/11/2007 - 17:31
बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.

In reply to by देवदत्त

ॐकार 25/11/2007 - 18:32
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|

In reply to by ॐकार

देवदत्त 25/11/2007 - 19:04
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )

सर्किट 26/11/2007 - 08:32
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

प्रासंगिक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर 24/11/2007 - 09:25
त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा.. तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे... बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या.

बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या, मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे. पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे ! तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 24/11/2007 - 10:27
>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.

आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/11/2007 - 12:47
तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

तर्री 15/06/2012 - 15:35
आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे. अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे. मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे. आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 15/06/2012 - 18:52
आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान? बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.

विसोबा खेचर 24/11/2007 - 09:25
त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा.. तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे... बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या.

बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या, मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे. पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे ! तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 24/11/2007 - 10:27
>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.

आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/11/2007 - 12:47
तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

तर्री 15/06/2012 - 15:35
आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे. अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे. मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे. आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 15/06/2012 - 18:52
आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान? बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.

     !! तुळशीचे लग्न !!

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

एजीओजी

ॐकार ·

इस्कुट 08/11/2007 - 12:26
एजी....ओजी, लोजी सुनो जी करता हु मै वो तुम भी करो जी... आता मरठित... एजी....ओजी घ्याजी ...ऐकाजी करतो जे मी ते तुम्हीही कराजी एक दोन चं चार्...चार दोन चं एक माझं नाव आहे लखन...माझं नाव आहे लखन. आपल्या कार्याला माझ्या हार्दीक्...हर्दीक शु...शु...शु... थाम्बा... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . शु करुन आलो हो...घाईची लागली होती. हा तर मी काय म्हनत होतो, आप्ल्या कर्याला हर्दीक शुभेच्छा...

विकेड बनी 09/11/2007 - 16:42
नव्या कार्याला शुभेच्छाच आहेत ओंकारशेट पण हा काय प्रकार आहे? एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत.

In reply to by विकेड बनी

ॐकार 10/11/2007 - 10:01
एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत. मी वर प्रयोजन नमूद केलेलेच आहे. चॅट रूम्सचा वापर सर्वांना करता यावा यासाठी पाहुण्या सदस्यांना दार खुले ठेवले होते. त्यांच्या मतांशी मी सहमत असेनच असे नाही. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परिणाम बरे नाहीत असे वाटल्याने आता यापुढे केवळ सदस्यांना गप्पा मारता येतील असे बदल केले आहेत.

इस्कुट 08/11/2007 - 12:26
एजी....ओजी, लोजी सुनो जी करता हु मै वो तुम भी करो जी... आता मरठित... एजी....ओजी घ्याजी ...ऐकाजी करतो जे मी ते तुम्हीही कराजी एक दोन चं चार्...चार दोन चं एक माझं नाव आहे लखन...माझं नाव आहे लखन. आपल्या कार्याला माझ्या हार्दीक्...हर्दीक शु...शु...शु... थाम्बा... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . शु करुन आलो हो...घाईची लागली होती. हा तर मी काय म्हनत होतो, आप्ल्या कर्याला हर्दीक शुभेच्छा...

विकेड बनी 09/11/2007 - 16:42
नव्या कार्याला शुभेच्छाच आहेत ओंकारशेट पण हा काय प्रकार आहे? एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत.

In reply to by विकेड बनी

ॐकार 10/11/2007 - 10:01
एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत. मी वर प्रयोजन नमूद केलेलेच आहे. चॅट रूम्सचा वापर सर्वांना करता यावा यासाठी पाहुण्या सदस्यांना दार खुले ठेवले होते. त्यांच्या मतांशी मी सहमत असेनच असे नाही. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परिणाम बरे नाहीत असे वाटल्याने आता यापुढे केवळ सदस्यांना गप्पा मारता येतील असे बदल केले आहेत.
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक

सहज ·

राज जैन 21/09/2007 - 16:18
सहज व सुंदर ! क्या बात है ! राज जैन

In reply to by टीकाकार-१

सहज 21/09/2007 - 16:36
>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही. असे का बरे?

सहजराव, काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले ! अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:09
प्रा. डॉ. साहेब, तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास... तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;) बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)

In reply to by टीकाकार-१

एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत) बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे. आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टीकाकार-१

आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे ! नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज जैन 21/09/2007 - 17:48
;) मस्त नाव आहे ! पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही ! अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील ! पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे ! राज जैन "मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:53
राजे साहेब.. इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?

विसोबा खेचर 21/09/2007 - 18:35
ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्‍याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते. अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :) असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:) अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली. हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :) काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :) नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला. गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्‍या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्‍याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको. क्या बात है! सुंदर लेख.. आपला, (एक नंबर काड्याघालू!) तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:44
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय खूपच हसलो !! आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्‍या भागात.) - सर्किट

कोलबेर 21/09/2007 - 23:39
टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!! बाकी लेख 'सहज' सुंदर -कोलबेर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 22/09/2007 - 08:34
शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.

In reply to by टिकाकार

कोलबेर 23/09/2007 - 23:47
टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 24/09/2007 - 00:04
हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो! कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :) तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्‍याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्‍या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं! बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :) असो, काळजी घे... तात्या.

गुंडोपंत 24/09/2007 - 13:17
व आवडले लेखन... मस्तच हाणलाय हो! "नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला." सही! मजा आ गया! आपला गुंडोपंत

क्रेमर 22/07/2010 - 22:50
या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

राज जैन 21/09/2007 - 16:18
सहज व सुंदर ! क्या बात है ! राज जैन

In reply to by टीकाकार-१

सहज 21/09/2007 - 16:36
>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही. असे का बरे?

सहजराव, काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले ! अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:09
प्रा. डॉ. साहेब, तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास... तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;) बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)

In reply to by टीकाकार-१

एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत) बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे. आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टीकाकार-१

आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे ! नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज जैन 21/09/2007 - 17:48
;) मस्त नाव आहे ! पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही ! अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील ! पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे ! राज जैन "मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:53
राजे साहेब.. इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?

विसोबा खेचर 21/09/2007 - 18:35
ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्‍याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते. अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :) असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:) अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली. हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :) काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :) नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला. गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्‍या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्‍याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको. क्या बात है! सुंदर लेख.. आपला, (एक नंबर काड्याघालू!) तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:44
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय खूपच हसलो !! आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्‍या भागात.) - सर्किट

कोलबेर 21/09/2007 - 23:39
टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!! बाकी लेख 'सहज' सुंदर -कोलबेर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 22/09/2007 - 08:34
शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.

In reply to by टिकाकार

कोलबेर 23/09/2007 - 23:47
टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 24/09/2007 - 00:04
हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो! कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :) तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्‍याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्‍या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं! बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :) असो, काळजी घे... तात्या.

गुंडोपंत 24/09/2007 - 13:17
व आवडले लेखन... मस्तच हाणलाय हो! "नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला." सही! मजा आ गया! आपला गुंडोपंत

क्रेमर 22/07/2010 - 22:50
या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का.

मराठी आंतरजालीय साहित्यिक!

विसोबा खेचर ·

सहज 16/09/2007 - 13:33
हं तात्या छान आहे. त्या निमित्ताने येथे वाचक त्यांना आवडत्या लेखकाचे नाव टाकू शकतील. म्हणून हीट लिस्ट म्हणालो हा. हीट लेखकांची लिस्ट, गैरसमज नको ;-) बाकी मला देखील जरा वैयक्तिक उल्लेख जर का आला तर काय बिघडले असे वाटते. मिसळपाव वर तशी संधी मिळावी व ते ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट बनावे की इतर संकेतस्थळे जरा "लुजन अप" व्हावी व तसे झाले तर मिसळपाव एकदम हीट झाले / पावले म्हणा. हे माझे मत. बाकी नको कोणाचे नाव घेऊन कोणाला चढवायला नको. मला फक्त लेख जमला की नाही तेवढेच पुरेसे आहे. कारण कोणीही सदा सर्वच काही लिहतो ते चांगले असे मला वाटत नाही. (किंवा सदासर्वदा जे चांगले त्यालाच कदाचीत संत साहीत्य (संत वांगमय - जमत नाही हो टाइप करायला. म्हणूनच मी लिहीत नाही) म्हणत असतील. हो त्या कोणाच्या धार्मीक लिखाणा विरुध्द लिहायची आपली हिम्मत नाय. काही लिहले तर मात्र आम्हालाच जाळून टाकण्यात येईल हो. त्यामुळे बाकीचे साहित्य आवडते, कुणाला ना कुणाला तरी आवडतेच कोणीही काहीही लिहले तरी. ----------------------------------------------------------------------- वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.

गुंडोपंत 16/09/2007 - 13:44
छान! वेगळा लेखक हाच लेखाचा विषय!? लेखक म्हणजे मिसळीचे मुख्य मसाले. असो, अजूनही खरं तर अनेक लेखक आहेत. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) असणार, असेल नसेलही, पण बाकी कांदे कोथिंबीरी असतातच प्रतिसाद नि वाद विवाद घालायला ;)) त्याशिवाय मिसळ कशी पुर्ण होणार तात्या? आपला कच्चा कांदोपंत

In reply to by गुंडोपंत

विसोबा खेचर 16/09/2007 - 14:09
>>अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! खरं आहे. मी मुख्यत्वेकरून ललित साहित्याचा विचार केला आहे.. अर्थात, ललितसाहित्याच्या बाबतील लिखाळरावांचा आणि शैलेशरावांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. आणिही काही मंडळींचा उल्लेख अनवधानाने करायचा राहिला असण्याची शक्यता आहे. >>पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 16/09/2007 - 14:46
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) वा मग उत्तम आहे बरं का! आम्ही आपले उगाच छेडून पाहतो आहोत निश्चयापासून ढळला तर नाही ना! ;)) आपला खुंटे हलवून घट्ट आहेत की नाही पाहणारा गुंडोपंत

आजानुकर्ण 16/09/2007 - 13:47
असेच आठवलेले. १. चौकस २. संजोप राव ३. गायत्री ४. मी मराठी (हिंदी नको इंग्रजी हवी वाले) ५. जी.एस. ६. दिनेश शिंदे. (मायबोलीवर दिनेशव्हीएस नावाने लिहितात. त्यांची रंगीबेरंगी विभागातील अनुदिनी अप्रतिम आहे. याशिवाय पाककृतींचे ज्ञानही) ७. प्रदीप ८. टग्या ९. धनंजय १०. वाचक्नवी ११. यनावाला १२. सर्वसाक्षी. (हवाई सुंदरी सकट ;) ) १३. अनु १४. प्रियाली १५. नंदन १६. महेश वेलणकर (यांच्या "माझी अडगळ" ह्या अनुदिनीवरच्या कविता व लेख सुरेख आहेत.) १७. तात्या १८. मिलिंद १९. प्रकाश घाटपांडे २०. प्रा. बिरुटे सर

नंदन 16/09/2007 - 14:17
धन्यवाद तात्या/आजानुकर्ण :). मराठी अनुदिनीविश्वाचा विचार केला तर ट्युलिप, अभिजित बाठे, मेघना भुसकुटे, कोहम, योगेश, अर्चना , सुमेधा, अजित ओक, आनंद घारे या नावांची भर या यादीत घालावीशी वाटते. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव 16/09/2007 - 15:25
माझ्या मनातले बहुधा तात्याने जाणले असावे. आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांवरील व्यक्ती आणि वल्ली( जशा मला दिसल्या,भावल्या,समजल्या तशा) अशा तर्‍हेचे काही तरी लिखाण करावे असे बरेच दिवस मनात आहे. अर्थात मला त्यात कितपत यश येईल ही प्रामाणिक शंका असल्यामुळे मी तो विचार दूर ढकलत होतो. माझ्यामते ह्या विषयावर समर्थपणे जर कुणी लिहू शकेल तर ते म्हणजे स्वत: तात्या आणि दुसरे म्हणजे आमचे रावसाहेब(संजोपजी)! तात्याचा व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा आहे. ह्या बाबतीत कुणाचा विरोध होईल असे मला वाटत नाही. तात्यावर जाणता/अजाणता पुलंचा प्रभाव आहेच आणि तो त्याच्या लिखाणातही वारंवार दिसत असतो. रावसाहेबांना लोकांच्यातील गुणदोषांचे नेमके भान असावे असे वाटते . कारण त्यांच्या लेखनात ते वारंवार प्रकट झालेय. जीए हा त्यांचा ’हळवा’ विषय आहे. आता अजून काही आवडत्या लेखकासंबंधी! अरूण वडुलेकरांना मी कसा विसरू शकेन? त्यांच्या आखाती मुशाफिरीतून त्यांनी मानवी स्वभावाचे दाखवलेले विविध पैलू आणि निर्धाराच्या जोरावर अवघड परिस्थितीवर मात कशी करता येते ह्या बद्दलचे त्यांचे अनुभव ज्या सहजसुंदर भाषेत मांडलेत त्याला तोड नाही. अनु ही अशीच एक समर्थ लेखिका आहे. अतिशय मार्मिक निरीक्षण आणि ते तितक्याच समर्थपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. खरे तर स्वत:वर विनोद करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.पण तीच गोष्ट ती लीलया करते जे भल्याभल्यांना जमत नाही. अजून कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांच्या वैशिष्ठ्यांबद्द्ल बोलायचे झाले तर कदाचित काही प्रकरणे लिहावी लागतील. चटकन आठवणारी नावे म्हणजे जयश्री अंबासकर,प्रियाली,मीरा फाटक,अदिती,वेदश्री,साती,सुवर्णमयी,अनमिक,राधिका,स्वाती दिनेश,प्राजु,जीवन जिज्ञासा ,ऐहिक सारख्या समर्थ लेखिका/कवियत्री (अजून बर्‍याच आहेत) आणि लेखकांमध्ये चौकस,सर्वसाक्षी,प्रभाकर पेठकर,नंदन,अभिजित पापळकर,यनावाला,धनंजय,धोंडोपंत,विकास,वाचक्नवी,आनंदघन,योगेश,कोहम अशी किती बरे नावे घ्यावीत? कवी मंडळीतही भरपूर दिग्गज आहेत. चित्तरंजन,वैभव जोशी,प्रसाद शिरगावकर,प्रदिप कुलकर्णी,मिलिंद फणसे,जयंतराव कुलकर्णी,खोडसाळ,केशवसुमार,माफीचा साक्षीदार(आणि असे कितीतरी) अशी किती नावे घ्यावीत. ह्या महाजालावर अजून असंख्य लेखक/लेखिका आहेत ह्याची नम्र जाणीव आहे. मात्र मी आजवर ज्यांचे काही वाचलेले आहे आणि त्यातही जे चटकन आठवले त्यांचीच नावे इथे घेतलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या सर्वांच्या लेखन आणि स्वभावाविषयी एक एक लेख लिहायचा म्हटले तर किती साहित्य निर्माण होईल? माणसांचे किती नवनवे नमुने बघायला मिळतील कोण जाणे? पण हे करण्यासाठी तसाच समर्थ लेख हवा! आमचे ते काम नाही.

In reply to by प्रमोद देव

आजानुकर्ण 16/09/2007 - 16:59
तुमचेही लेखन वाचायला आवडते. अनवधानाने नाव राहून गेले. याशिवाय केशवसुमार व मिल्या यांची विडंबने मस्त. विनायक आणि नीलकांत यांचे प्रतिसाद अभ्यासू असतात. कवितांमधले फारसे कळत नाही पण बैरागी यांची "गाजला किती पाऊस" ही कविता आवडली होती. गमभनकार ओंकारच्या गझलही मस्त. :)

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव 16/09/2007 - 18:09
अरे योगेश नावात काय आहे? सहज तोंडावर आले त्यांची नावे घेतली म्हणजे ज्यांचा उल्लेख राहून जातो ते कमी दर्जाचे असा अर्थ नसतोच मुळी.माझे नाव नाही घेतले म्हणून मी नाखूष होणार नाही आणि घेतले म्हणून खूषही होणार नाही. कारण इथे लिहिणारे किती समर्थ लोक आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वतःला तरी अजून बाळबोध-लेखक समजतो. म्हणजे लिहितो म्हणून लेखक! बस्स! बाकी ते कुणाला आवडते हे कळले की बरे वाटते(खोटं कशाला बोला)हे देखील तितकेच खरे आहे. पण त्यात प्रगती व्हावी अशी इच्छा आहे आणि ते केवळ त्यात चूका काढणार्‍या आणि वर्मावर बोट ठेवणार्‍या प्रतिसादातूनच साध्य होऊ शकेल.पण दूर्दैवाने तसे प्रतिसाद देणे लोक टाळतात. मग प्रगती कशी होणार! शैलेश खांडेकर,मिल्या,विनायक,रोहिणी,नीलकांत अशा सारख्या अजून बर्‍याच जणांची नावे राहिलीत हे बाकी खरे आहे पण त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.

प्रियाली 16/09/2007 - 16:34
लेखात आणि प्रतिसादांत ज्यांची नावे आली आणि ज्यांची नावे राहून गेली त्यापैकी जे सर्व लेखनाचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते सर्वच चांगले लेखक असावेत. प्रत्येकाची शैली आणि आवड वेगळी. अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका. अवांतरः पोष्टहापिस हे नाव मस्त आहे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/09/2007 - 19:08
प्रियाली, अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका तू सांगितल्याप्रमाणे सध्या रौशनीचा प्रथम व द्वितीय भाग इथेही टाकत आहे. तिसरा भाग बराचसा लिहून पूर्ण आहे तो ही आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन. तात्या.

तात्या, अभ्यासासाठी एक मस्त विषय आहे.( आमचे नाव आपण घेतले म्हणून नव्हे,त्याबाबत आपण जरा घाई केली,असे वाटते.)उपक्रमच्या आमच्या पहिल्यावहिल्या 'या दशकातील साहित्य'या लेखात या दशकाचा लेखक आणि साहित्यविषयक विचार चाललेला होता, तेव्हा त्यात मराठी संकेतस्थळावरील लेखकाचा आणि त्यांच्या साहित्यविषयक एक ओझरता उल्लेख केला होता.तो याच साठी केला होता की,संकेतस्थळावर अनेक दर्जेदार लेखक आहेत.पण त्यांच्या लेखनाची नोंद घेतली गेलेली नाही .संकेतस्थळावर उत्तम लेखन करणारे लेखक कोण ? याचा शोध घेतांना कविता,कथा,वैचारिक लेख,संशोधनपर लेख,भाषाविषयक लेख त्यांची संख्या त्याच बरोबर कोणत्या वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन लेखक लेखन करतो हेही तपासले पाहिजे. चारशे मराठी अनुदिन्या आहेत म्हणजे चारशे लेखक आहेत.साहित्यविषयक त्यांचे स्वत:चे साहित्य कोणते त्याचा स्वतंत्र अभ्यास करुन संकेतस्थळावरील लेखक निवडले पाहिजेत असे वाटते.असा प्रयत्न भविष्यात एखादे दोन वर्षात आमचाच विद्यार्थी करेल असे वाटते,आता अनेक नावे ओठावर आहेत त्यांच्याविषयी भरभरुन बोलावे वाटते पण ते इथे आता तरी टाळतो आहे.

सन्जोप राव 16/09/2007 - 22:23
'तो' चे लिखाण अभ्यासपूर्ण -क्वचित कोरडे असले तरीही - असते. 'ही माहिती त्याला नवीन आहे' ही 'त्याची' शैलीही वेगळी आहे. प्रदीप (कुलकर्णी नव्हे, तेही चांगले लिहितात, पण हे नुसतेच प्रदीप) यांनी स्वतंत्र लिहिलेला एकच लेख मला आठवतो तो म्हणजे दत्ताराम यांच्यावरचा. उत्तम लेख. तेही खूप छान लिहू शकतील. त्यांचे वाचन दांडगे आहे.रोहिणी यांनी पाककृतींनी मजा आणली आहेच, पण ललित लेखनासाठीही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्रकाश घाटपांडेंच्या साहित्यीक आयुष्यातील फलज्योतिष आणि दुर्मिळ पुस्तकांचा बोळा निघाला (माफ करा, प्रकाशराव) ( आणि सर्वसाक्षी व द्वारकानाथ कलंत्रींच्या साहित्यीक आयुष्यातील इतिहास / मराठीप्रेम यांचा) तर तेही उत्तम लिहू शकतील. विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. अरुण वडुलेकरांचा उल्लेख कसा राहिला असे वाटत होते, पण तो वर झालाच आहे. तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. आजानुकर्णाने आता स्वतंत्र गद्य आणि केशवसुमाराने अधिक स्वतंत्र पद्य लेखन सुरु करावे असे वाटते. चित्तरंजनकडे एक 'सटायरिकल व्हेन' आहे, त्यातून चांगले विनोदी लेखनही उत्पन्न होऊ शकेल असे वाटते. जीवन जिज्ञासा आणि प्रियाली यांचा व्यासंग दांडगा आहे, पण तो कधीकधी रंजकतेला पूर्ण गिळून टाकतो. जी. एस. मोजके पण चांगले लिहितात. अत्त्यानंदांचे लेखन प्रामाणिक आणि अभिनिवेशरहित असते. मीरा फाटक आणि अदिती यांचे लिखाणही वाचनीय असते. मीराताई, अदिती आणि अनु या तीघींनी केलेल्या होम्सकथांचे अनुवाद अफलातून. आणि दिगम्भांना कसे काय विसरलो आपण? (आठवा 'मारे गये गुलफाम') खोडसाळ यांची विडंबने बरी असली तरी त्यांच्या अतिरिक्त टीकावृत्तीमुळे रसभंग होतो. ( 'खोडसाळ ज्या दिवशी स्वतःहून कुणाला चांगले म्हणतील त्या दिवशी सन्जोप राव सत्यनारायणाची पूजा घालून स्वतः सोवळे नेसून पूजेला बसतील' असे कुणीसे म्हटल्याचे स्मरते!) टवाळ आणि नरेंद्र गोळे यांच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराबद्दल बाकी काही न लिहिलेले बरे! माफ करा, मूळ चर्चाविषय 'आवडते लेखक' असा होता, पण आतापर्यंत विषयांतर किंवा वाद उत्पन्न झालेला नाही ( कोण रे तो 'कारण अद्यापि सर्किट येथे आलेले नाहीत म्हणून...'म्हणाला तो?) म्हणून हा प्रतिसाद. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 22:55
वा रावसाहेब, आमच्याकडून आणि इतरांकडून अनवधानाने राहिलेल्या बर्‍याच मंडळींना आपण कव्हर केलेत याचे समाधान वाटले! :) विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. सहमत आहे. परंतु विनायकराव आता येथे मात्र प्रतिसादमात्र धाटणीत राहणार नाहीत, आणि विनायक म्हणे, 'आता उरलो प्रतिसादापुरता' अशी ओवीही गाणार नाहीत! :) कारण हे संकेतस्थळ आता त्यांचेच आहे, तुम्हा सर्वांचे आहे. आता तुम्ही आणि विनयाकराव दोघे मिळून इथे हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगीन गाण्यांची, त्याच्या आस्वादाची छानशी रांगोळी घाला! आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ! बाय द वे, मी आपल्याला वणकुद्रेअण्णांच्या 'पिंजरा' वर लिहा असं अजून नक्की किती वेळा विनवायचं तेही सांगून ठेवा! :) तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. वडिलकीच्या नात्याने कुठली पथ्ये पाळायची हे सांगणारं एखादं पोष्टकार्ड पाठवलंत तर अधिक आवडेल. किंवा वाटल्यास जेव्हा एखाददा पुण्यात 'बसू' तेव्हा सांगा! :) बाय द वे, मिसळपाववर 'व्यक्तिगत निरोप' या भारी शब्दाऐवजी 'पोष्टकार्ड' हा आपला साधासुधा मराठी शब्द वापरायचं आम्ही ठरवलं आहे, तश्या तांत्रिक दुरुस्त्या सुरू आहेत! :) असो! प्रतिसादाबद्दल आभार रावसाहेब.. सर्कीटच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे, कसाही असला तरी साला दोस्त आहे आपला! :)) तात्या.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 23:49
अनवधानाने घ्यायचे राहिले. तिने त्सुनामी, वीज पडणे यासरखे काही अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख अत्यंत मेहनत घेऊन लिहिले आहेत.. राधिकाही संस्कृत नाटकांचे रसग्रहण छान करते..मात्र तिच्या वर्ण, स्वर विषयक लेखात तिचा व्यासंग दिसतो पण त्यातलं आपल्याला काय कळत नाय बा! ते कळायला धन्याशेठ, वाचन्कवी यांच्यासारखीच मंडळी हवीत..:) आणि हो, आमचे प्रवासीही राहिलेच! त्यांच्याही गझला आणि प्रतिसाद मला फार आवडत! :) तात्या.

कोलबेर 17/09/2007 - 00:47
इथं हे नाव जरी कमी वेळा आलं असलं तरी आपण तर एकदम ज्याम फ्यान आहोत. जालावरचे साहित्य हा पूर्णपणे वेगळा प्रकार असून आणि त्यामध्ये ह्यांचा नंबर निश्चितच खूपच वरचा आहे. (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! - कोलबेर

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 17/09/2007 - 01:05
वरूणदेवा, (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! तुझ्याशी सहमत आहे! :) आपला, (सर्कीटवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by कोलबेर

बाबुराव 17/09/2007 - 06:34
तेला आवतनं देलं का ? म्हून फुगला आसन ? जरशीग फूगीर बी है म्हणा ते. राग नका येऊन देऊ भौ जरशीक फटकन बोलतू पर लोक म्हणतेत खरं बोलतू बाबूराव.

सर्किट 17/09/2007 - 11:01
येथे सर्किट ह्यांच्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया देणार्‍या कोलबेर, विसोबा खेचर आणि आजानुकर्ण ह्यांना आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही (कर्णा, पुणे विद्यापीठात तुला आणि नीलकांतला भेटलो तेव्हा चहाचे पैसे नीलकांतने दिल्याचे आठवते, आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अरे लेको, मला इथे बोलवायला तुम्हाला माझी तारीफ करण्याची काहीही गरज नाही रे. हे तर आपल्या घरचं कार्य ! इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलु गेला गगनावेरी अशी आमची मनस्थिती सध्या आहे. (वेलु, म्हणजे वेल.. शक्ती वेलु कोण म्हणतंय रे तिकडे विंगेत ?) आलोच... - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 17/09/2007 - 21:52
आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही आपण आमचे ग्लेनफिडिच विसरलात आणि आम्ही आपली रघुनाथराव कर्व्यांवरील चित्रपटाची सीडी विसरलो! :) आता पुढच्या वेळेला मात्र नक्की! च्यामारी आम्ही तरी केव्हा भांडारकरांच्या पैशांनी फुकट दारू पिणार! :) आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अहो मालक, ती गाडी आमची नव्हती बरं का! आमच्या एका क्लाएंटची होती! नाहीतर हा तात्या साला मालदार माणूस आहे असा लोकांचा फुक्कटचा गैरसमज व्हायचा! असो, व्यक्तिगत होतंय का फार? परंतु आपण व्यक्तिगत वर उतरलात त्यामुळे आम्हालादेखील एक दारुचा लहानसा ड्रम आपल्यावर फेकावा लागला! पिंपे आम्ही राखीव ठेवली असून लहान लहान ड्रमावरच सध्या काम भागवतो...:)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 17/09/2007 - 22:29
असो, व्यक्तिगत होतंय का फार? नाही, फार नाही. :-) पण संजोपरावांनी अद्याप विषयांतर झालं नाही, म्हणून हळहळ व्यक्त केली होती. म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे मला आवश्यक होते. पुन्हा चर्चा मूळपदावर आणतो. वरील सर्व उल्लेखित लेखक मलाही आवडतात. ह्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेख मीही लिहायला घेतला आहे. परंतु, वरील लेखकांत माझे परममित्र माधव कुळकर्णी ह्यांचे नाव आलेले नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अनुदिनीवर आणि माझे शब्द वर त्यांनी उत्तम लिखाण केले होते. माझे शब्द च्या चालकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्यात त्यांना बरीच मते मिळाली होते, हे स्मरते. - सर्किट

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:05
पुणे विद्यापीठात चहा प्यायल्याचा उल्लेख वाचल्यानंतर हा प्रतिसाद सर्किट यांनीच दिला आहे याविषयी खात्री पटली. इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्ह. हा आयडी सर्किट यांचाच आहे हे. स्वागत आहे.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 17/09/2007 - 11:08
इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्हणजे, आमचे कार्यालयीन मित्र आमच्या नावाने प्रतिसाद देत आहेत असे वाटत होते की काय रे, कर्णा ? असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी... पण बाकी आपल्या नीलकांताने मिसळपाव जबरा बनवले आहे बरं का ! त्याला माझ्या वतीने अनिकेत मध्ये चा पाज आणखी एकदा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:11
नीलकांताला मानलं. विशेषतः संगणकशास्त्राचे पुस्तकी ज्ञान नसूनही त्याचा या विषयातील रस व अभ्यास उल्लेखनीय आहे.

धनंजय 17/09/2007 - 17:34
मनोगत, उपक्रम हे मराठी जालविश्व आहे हे मला कळून अवघा एक महिना झालेला आहे. आणि उद्याचे (आजचेसुद्धा) कसदार मराठी लेखन वाचायला मला ठिकाण सापडले. पण संमेलनात उशीरा पोचल्यामुळे कुठे काय चालू आहे माहीत नाही, काय रटाळ आणि काय रसाळ आहे, ती इथल्या साहित्यिकांशी हळूहळू ओळख करून घेतो आहे. आवडला चर्चाप्रपंच. थोड्याथोड्या लेखकांचा उल्लेख करून सुरुवात केली ते चांगले. या ठिकाणी मला सुरुवातीचा क्रॅशकोर्स हवाच होता. तर या चर्चेत आलेल्या लेखकांपासून सुरू करेन. आतापर्यंत मनोगतावर "नवीन गद्य" आणि "नवीन कविता" अशा प्रकारे शोध करत होतो. एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/09/2007 - 17:43
एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात! क्या बात है धन्या! सुंदर वाक्य..:) आपला, (नर्मदेतला गोटा!) तात्या.

In reply to by टिकाकार

विसोबा खेचर 17/09/2007 - 18:36
आपले आज दिवसभरातले ठिकठिकाणचे प्रतिसाद पाहिले की हे अगदी पटते! :) अहो पण प्रसिद्धीची हाव असलेल्यांनी नावानिशी, ठावठिकाण्यासहीत प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं! तात्या.

In reply to by टिकाकार

घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत॥। (मड्की फोडावीत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे काहीही करुन प्रसिद्ध पुरुष व्हावे) अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर 17/09/2007 - 20:57
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. हा हा हा! :) च्यामारी सक्काळपासून बघतोय, जिथ्थे तिथ्थे हा टीकाकार कडमडतोय! :)

राज जैन 18/09/2007 - 00:11
तात्यानू ! लिस्ट मध्ये माझे नाव नाय ! लई वंगाळ वाटलं बघा ! लवकरच तुम्हा सर्वांना एक नवाच जैनाचे कार्टे पाहावयास मिळेल.........च्या मायला काय काय विषय डोक्यात नाहीत तेच बघतो ! लवकरच तुम्हाला व सर्व मराठी संकेतस्थळानां राज जैन नावाचा विभाग चालू करायला लावतो की नाही बघाच ! ;) अता येथे मिसळपाव व देखील ह.घ्या. हे लिवायला लागले म्हणजे ........ नवरीला सांगण्यासारखे की बाई हळद ही पिवळी असते ;)) जोक्य आहे ! राज जैन ! "आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)" राजौ, अस लिवु नको बाबा! जो देवाला आवडतोय त्येला तो उचलून नेतोय. आता प्रमोद देवांना आवल्डं तर ठीक आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राज जैन 19/09/2007 - 08:33
हा हा ! अरे लिहताना मी ह्या बाजूचा तर विचारच केला नव्हता, मी ती ओळ लिहण्यामागचे कारण हे होते की जिवंत असताना लोक अनेक नावे ठेवतात, शिव्या देतात पण अचानक मानूस गच्चकला की तो किती चांगला होता व त्याचे गुण किती आफाट होते हे सांगण्याची लोकांमध्ये रस्सीखेच लागते ! असा त्या ओळीचा भावार्थ आहे. राज जैन

दिगम्भा 18/09/2007 - 10:15
मला यादगार यांच्या जुन्या गजला व जी.एस. यांच्या कथा फार आवडतात. विशेषतः जी एस यांच्या भूलपाखरू व (नाव न आठवणारी) पॉटहोलला मध्यवर्ती पात्र करून लिहिलेली कथा या अप्रतिम. पॉटहोलवरची इतकी सुंदर व अचाट कल्पक कथा दुसरी असणे अशक्य असे माझे मत. आता हे दोघे (पूर्वीसारखे) का लिहीत माहीत देव जाणे. "माफीचा साक्षीदार" हे सुद्धा पूर्वीच्या ऍटिट्यूड् ने लिहीत नाहीत असे वाटते, खूप मोठी कैद भोगल्यानंतर जसा जन्मठेपेचा कैदी अध्यात्माला लागतो तसे काहीसे. - दिगम्भा

जुना अभिजित 18/09/2007 - 10:20
वर आलेली बरीच नावे सर्वाना परिचित असतीलच असे नाही. तेव्हा नावाबरोबरच या लेखकांच काही लिखाण किंवा अनुदिनीचा पत्ता दिला तर अत्युत्तम. कसं म्हणजे लगोलग वाचून त्यांना आप्ल्या हिट लिष्ट मध्ये टाकता येईल. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

कवटी 05/03/2009 - 12:30
सर्किट विषयी अवघ्या सव्वा वर्षापूर्वी मान्यवरानी काढलेले उद्गार वाचून अंमळ गंमत वाटली. कवटी

सहज 16/09/2007 - 13:33
हं तात्या छान आहे. त्या निमित्ताने येथे वाचक त्यांना आवडत्या लेखकाचे नाव टाकू शकतील. म्हणून हीट लिस्ट म्हणालो हा. हीट लेखकांची लिस्ट, गैरसमज नको ;-) बाकी मला देखील जरा वैयक्तिक उल्लेख जर का आला तर काय बिघडले असे वाटते. मिसळपाव वर तशी संधी मिळावी व ते ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट बनावे की इतर संकेतस्थळे जरा "लुजन अप" व्हावी व तसे झाले तर मिसळपाव एकदम हीट झाले / पावले म्हणा. हे माझे मत. बाकी नको कोणाचे नाव घेऊन कोणाला चढवायला नको. मला फक्त लेख जमला की नाही तेवढेच पुरेसे आहे. कारण कोणीही सदा सर्वच काही लिहतो ते चांगले असे मला वाटत नाही. (किंवा सदासर्वदा जे चांगले त्यालाच कदाचीत संत साहीत्य (संत वांगमय - जमत नाही हो टाइप करायला. म्हणूनच मी लिहीत नाही) म्हणत असतील. हो त्या कोणाच्या धार्मीक लिखाणा विरुध्द लिहायची आपली हिम्मत नाय. काही लिहले तर मात्र आम्हालाच जाळून टाकण्यात येईल हो. त्यामुळे बाकीचे साहित्य आवडते, कुणाला ना कुणाला तरी आवडतेच कोणीही काहीही लिहले तरी. ----------------------------------------------------------------------- वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.

गुंडोपंत 16/09/2007 - 13:44
छान! वेगळा लेखक हाच लेखाचा विषय!? लेखक म्हणजे मिसळीचे मुख्य मसाले. असो, अजूनही खरं तर अनेक लेखक आहेत. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) असणार, असेल नसेलही, पण बाकी कांदे कोथिंबीरी असतातच प्रतिसाद नि वाद विवाद घालायला ;)) त्याशिवाय मिसळ कशी पुर्ण होणार तात्या? आपला कच्चा कांदोपंत

In reply to by गुंडोपंत

विसोबा खेचर 16/09/2007 - 14:09
>>अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! खरं आहे. मी मुख्यत्वेकरून ललित साहित्याचा विचार केला आहे.. अर्थात, ललितसाहित्याच्या बाबतील लिखाळरावांचा आणि शैलेशरावांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. आणिही काही मंडळींचा उल्लेख अनवधानाने करायचा राहिला असण्याची शक्यता आहे. >>पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 16/09/2007 - 14:46
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) वा मग उत्तम आहे बरं का! आम्ही आपले उगाच छेडून पाहतो आहोत निश्चयापासून ढळला तर नाही ना! ;)) आपला खुंटे हलवून घट्ट आहेत की नाही पाहणारा गुंडोपंत

आजानुकर्ण 16/09/2007 - 13:47
असेच आठवलेले. १. चौकस २. संजोप राव ३. गायत्री ४. मी मराठी (हिंदी नको इंग्रजी हवी वाले) ५. जी.एस. ६. दिनेश शिंदे. (मायबोलीवर दिनेशव्हीएस नावाने लिहितात. त्यांची रंगीबेरंगी विभागातील अनुदिनी अप्रतिम आहे. याशिवाय पाककृतींचे ज्ञानही) ७. प्रदीप ८. टग्या ९. धनंजय १०. वाचक्नवी ११. यनावाला १२. सर्वसाक्षी. (हवाई सुंदरी सकट ;) ) १३. अनु १४. प्रियाली १५. नंदन १६. महेश वेलणकर (यांच्या "माझी अडगळ" ह्या अनुदिनीवरच्या कविता व लेख सुरेख आहेत.) १७. तात्या १८. मिलिंद १९. प्रकाश घाटपांडे २०. प्रा. बिरुटे सर

नंदन 16/09/2007 - 14:17
धन्यवाद तात्या/आजानुकर्ण :). मराठी अनुदिनीविश्वाचा विचार केला तर ट्युलिप, अभिजित बाठे, मेघना भुसकुटे, कोहम, योगेश, अर्चना , सुमेधा, अजित ओक, आनंद घारे या नावांची भर या यादीत घालावीशी वाटते. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव 16/09/2007 - 15:25
माझ्या मनातले बहुधा तात्याने जाणले असावे. आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांवरील व्यक्ती आणि वल्ली( जशा मला दिसल्या,भावल्या,समजल्या तशा) अशा तर्‍हेचे काही तरी लिखाण करावे असे बरेच दिवस मनात आहे. अर्थात मला त्यात कितपत यश येईल ही प्रामाणिक शंका असल्यामुळे मी तो विचार दूर ढकलत होतो. माझ्यामते ह्या विषयावर समर्थपणे जर कुणी लिहू शकेल तर ते म्हणजे स्वत: तात्या आणि दुसरे म्हणजे आमचे रावसाहेब(संजोपजी)! तात्याचा व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा आहे. ह्या बाबतीत कुणाचा विरोध होईल असे मला वाटत नाही. तात्यावर जाणता/अजाणता पुलंचा प्रभाव आहेच आणि तो त्याच्या लिखाणातही वारंवार दिसत असतो. रावसाहेबांना लोकांच्यातील गुणदोषांचे नेमके भान असावे असे वाटते . कारण त्यांच्या लेखनात ते वारंवार प्रकट झालेय. जीए हा त्यांचा ’हळवा’ विषय आहे. आता अजून काही आवडत्या लेखकासंबंधी! अरूण वडुलेकरांना मी कसा विसरू शकेन? त्यांच्या आखाती मुशाफिरीतून त्यांनी मानवी स्वभावाचे दाखवलेले विविध पैलू आणि निर्धाराच्या जोरावर अवघड परिस्थितीवर मात कशी करता येते ह्या बद्दलचे त्यांचे अनुभव ज्या सहजसुंदर भाषेत मांडलेत त्याला तोड नाही. अनु ही अशीच एक समर्थ लेखिका आहे. अतिशय मार्मिक निरीक्षण आणि ते तितक्याच समर्थपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. खरे तर स्वत:वर विनोद करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.पण तीच गोष्ट ती लीलया करते जे भल्याभल्यांना जमत नाही. अजून कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांच्या वैशिष्ठ्यांबद्द्ल बोलायचे झाले तर कदाचित काही प्रकरणे लिहावी लागतील. चटकन आठवणारी नावे म्हणजे जयश्री अंबासकर,प्रियाली,मीरा फाटक,अदिती,वेदश्री,साती,सुवर्णमयी,अनमिक,राधिका,स्वाती दिनेश,प्राजु,जीवन जिज्ञासा ,ऐहिक सारख्या समर्थ लेखिका/कवियत्री (अजून बर्‍याच आहेत) आणि लेखकांमध्ये चौकस,सर्वसाक्षी,प्रभाकर पेठकर,नंदन,अभिजित पापळकर,यनावाला,धनंजय,धोंडोपंत,विकास,वाचक्नवी,आनंदघन,योगेश,कोहम अशी किती बरे नावे घ्यावीत? कवी मंडळीतही भरपूर दिग्गज आहेत. चित्तरंजन,वैभव जोशी,प्रसाद शिरगावकर,प्रदिप कुलकर्णी,मिलिंद फणसे,जयंतराव कुलकर्णी,खोडसाळ,केशवसुमार,माफीचा साक्षीदार(आणि असे कितीतरी) अशी किती नावे घ्यावीत. ह्या महाजालावर अजून असंख्य लेखक/लेखिका आहेत ह्याची नम्र जाणीव आहे. मात्र मी आजवर ज्यांचे काही वाचलेले आहे आणि त्यातही जे चटकन आठवले त्यांचीच नावे इथे घेतलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या सर्वांच्या लेखन आणि स्वभावाविषयी एक एक लेख लिहायचा म्हटले तर किती साहित्य निर्माण होईल? माणसांचे किती नवनवे नमुने बघायला मिळतील कोण जाणे? पण हे करण्यासाठी तसाच समर्थ लेख हवा! आमचे ते काम नाही.

In reply to by प्रमोद देव

आजानुकर्ण 16/09/2007 - 16:59
तुमचेही लेखन वाचायला आवडते. अनवधानाने नाव राहून गेले. याशिवाय केशवसुमार व मिल्या यांची विडंबने मस्त. विनायक आणि नीलकांत यांचे प्रतिसाद अभ्यासू असतात. कवितांमधले फारसे कळत नाही पण बैरागी यांची "गाजला किती पाऊस" ही कविता आवडली होती. गमभनकार ओंकारच्या गझलही मस्त. :)

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव 16/09/2007 - 18:09
अरे योगेश नावात काय आहे? सहज तोंडावर आले त्यांची नावे घेतली म्हणजे ज्यांचा उल्लेख राहून जातो ते कमी दर्जाचे असा अर्थ नसतोच मुळी.माझे नाव नाही घेतले म्हणून मी नाखूष होणार नाही आणि घेतले म्हणून खूषही होणार नाही. कारण इथे लिहिणारे किती समर्थ लोक आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वतःला तरी अजून बाळबोध-लेखक समजतो. म्हणजे लिहितो म्हणून लेखक! बस्स! बाकी ते कुणाला आवडते हे कळले की बरे वाटते(खोटं कशाला बोला)हे देखील तितकेच खरे आहे. पण त्यात प्रगती व्हावी अशी इच्छा आहे आणि ते केवळ त्यात चूका काढणार्‍या आणि वर्मावर बोट ठेवणार्‍या प्रतिसादातूनच साध्य होऊ शकेल.पण दूर्दैवाने तसे प्रतिसाद देणे लोक टाळतात. मग प्रगती कशी होणार! शैलेश खांडेकर,मिल्या,विनायक,रोहिणी,नीलकांत अशा सारख्या अजून बर्‍याच जणांची नावे राहिलीत हे बाकी खरे आहे पण त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.

प्रियाली 16/09/2007 - 16:34
लेखात आणि प्रतिसादांत ज्यांची नावे आली आणि ज्यांची नावे राहून गेली त्यापैकी जे सर्व लेखनाचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते सर्वच चांगले लेखक असावेत. प्रत्येकाची शैली आणि आवड वेगळी. अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका. अवांतरः पोष्टहापिस हे नाव मस्त आहे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/09/2007 - 19:08
प्रियाली, अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका तू सांगितल्याप्रमाणे सध्या रौशनीचा प्रथम व द्वितीय भाग इथेही टाकत आहे. तिसरा भाग बराचसा लिहून पूर्ण आहे तो ही आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन. तात्या.

तात्या, अभ्यासासाठी एक मस्त विषय आहे.( आमचे नाव आपण घेतले म्हणून नव्हे,त्याबाबत आपण जरा घाई केली,असे वाटते.)उपक्रमच्या आमच्या पहिल्यावहिल्या 'या दशकातील साहित्य'या लेखात या दशकाचा लेखक आणि साहित्यविषयक विचार चाललेला होता, तेव्हा त्यात मराठी संकेतस्थळावरील लेखकाचा आणि त्यांच्या साहित्यविषयक एक ओझरता उल्लेख केला होता.तो याच साठी केला होता की,संकेतस्थळावर अनेक दर्जेदार लेखक आहेत.पण त्यांच्या लेखनाची नोंद घेतली गेलेली नाही .संकेतस्थळावर उत्तम लेखन करणारे लेखक कोण ? याचा शोध घेतांना कविता,कथा,वैचारिक लेख,संशोधनपर लेख,भाषाविषयक लेख त्यांची संख्या त्याच बरोबर कोणत्या वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन लेखक लेखन करतो हेही तपासले पाहिजे. चारशे मराठी अनुदिन्या आहेत म्हणजे चारशे लेखक आहेत.साहित्यविषयक त्यांचे स्वत:चे साहित्य कोणते त्याचा स्वतंत्र अभ्यास करुन संकेतस्थळावरील लेखक निवडले पाहिजेत असे वाटते.असा प्रयत्न भविष्यात एखादे दोन वर्षात आमचाच विद्यार्थी करेल असे वाटते,आता अनेक नावे ओठावर आहेत त्यांच्याविषयी भरभरुन बोलावे वाटते पण ते इथे आता तरी टाळतो आहे.

सन्जोप राव 16/09/2007 - 22:23
'तो' चे लिखाण अभ्यासपूर्ण -क्वचित कोरडे असले तरीही - असते. 'ही माहिती त्याला नवीन आहे' ही 'त्याची' शैलीही वेगळी आहे. प्रदीप (कुलकर्णी नव्हे, तेही चांगले लिहितात, पण हे नुसतेच प्रदीप) यांनी स्वतंत्र लिहिलेला एकच लेख मला आठवतो तो म्हणजे दत्ताराम यांच्यावरचा. उत्तम लेख. तेही खूप छान लिहू शकतील. त्यांचे वाचन दांडगे आहे.रोहिणी यांनी पाककृतींनी मजा आणली आहेच, पण ललित लेखनासाठीही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्रकाश घाटपांडेंच्या साहित्यीक आयुष्यातील फलज्योतिष आणि दुर्मिळ पुस्तकांचा बोळा निघाला (माफ करा, प्रकाशराव) ( आणि सर्वसाक्षी व द्वारकानाथ कलंत्रींच्या साहित्यीक आयुष्यातील इतिहास / मराठीप्रेम यांचा) तर तेही उत्तम लिहू शकतील. विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. अरुण वडुलेकरांचा उल्लेख कसा राहिला असे वाटत होते, पण तो वर झालाच आहे. तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. आजानुकर्णाने आता स्वतंत्र गद्य आणि केशवसुमाराने अधिक स्वतंत्र पद्य लेखन सुरु करावे असे वाटते. चित्तरंजनकडे एक 'सटायरिकल व्हेन' आहे, त्यातून चांगले विनोदी लेखनही उत्पन्न होऊ शकेल असे वाटते. जीवन जिज्ञासा आणि प्रियाली यांचा व्यासंग दांडगा आहे, पण तो कधीकधी रंजकतेला पूर्ण गिळून टाकतो. जी. एस. मोजके पण चांगले लिहितात. अत्त्यानंदांचे लेखन प्रामाणिक आणि अभिनिवेशरहित असते. मीरा फाटक आणि अदिती यांचे लिखाणही वाचनीय असते. मीराताई, अदिती आणि अनु या तीघींनी केलेल्या होम्सकथांचे अनुवाद अफलातून. आणि दिगम्भांना कसे काय विसरलो आपण? (आठवा 'मारे गये गुलफाम') खोडसाळ यांची विडंबने बरी असली तरी त्यांच्या अतिरिक्त टीकावृत्तीमुळे रसभंग होतो. ( 'खोडसाळ ज्या दिवशी स्वतःहून कुणाला चांगले म्हणतील त्या दिवशी सन्जोप राव सत्यनारायणाची पूजा घालून स्वतः सोवळे नेसून पूजेला बसतील' असे कुणीसे म्हटल्याचे स्मरते!) टवाळ आणि नरेंद्र गोळे यांच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराबद्दल बाकी काही न लिहिलेले बरे! माफ करा, मूळ चर्चाविषय 'आवडते लेखक' असा होता, पण आतापर्यंत विषयांतर किंवा वाद उत्पन्न झालेला नाही ( कोण रे तो 'कारण अद्यापि सर्किट येथे आलेले नाहीत म्हणून...'म्हणाला तो?) म्हणून हा प्रतिसाद. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 22:55
वा रावसाहेब, आमच्याकडून आणि इतरांकडून अनवधानाने राहिलेल्या बर्‍याच मंडळींना आपण कव्हर केलेत याचे समाधान वाटले! :) विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. सहमत आहे. परंतु विनायकराव आता येथे मात्र प्रतिसादमात्र धाटणीत राहणार नाहीत, आणि विनायक म्हणे, 'आता उरलो प्रतिसादापुरता' अशी ओवीही गाणार नाहीत! :) कारण हे संकेतस्थळ आता त्यांचेच आहे, तुम्हा सर्वांचे आहे. आता तुम्ही आणि विनयाकराव दोघे मिळून इथे हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगीन गाण्यांची, त्याच्या आस्वादाची छानशी रांगोळी घाला! आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ! बाय द वे, मी आपल्याला वणकुद्रेअण्णांच्या 'पिंजरा' वर लिहा असं अजून नक्की किती वेळा विनवायचं तेही सांगून ठेवा! :) तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. वडिलकीच्या नात्याने कुठली पथ्ये पाळायची हे सांगणारं एखादं पोष्टकार्ड पाठवलंत तर अधिक आवडेल. किंवा वाटल्यास जेव्हा एखाददा पुण्यात 'बसू' तेव्हा सांगा! :) बाय द वे, मिसळपाववर 'व्यक्तिगत निरोप' या भारी शब्दाऐवजी 'पोष्टकार्ड' हा आपला साधासुधा मराठी शब्द वापरायचं आम्ही ठरवलं आहे, तश्या तांत्रिक दुरुस्त्या सुरू आहेत! :) असो! प्रतिसादाबद्दल आभार रावसाहेब.. सर्कीटच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे, कसाही असला तरी साला दोस्त आहे आपला! :)) तात्या.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 23:49
अनवधानाने घ्यायचे राहिले. तिने त्सुनामी, वीज पडणे यासरखे काही अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख अत्यंत मेहनत घेऊन लिहिले आहेत.. राधिकाही संस्कृत नाटकांचे रसग्रहण छान करते..मात्र तिच्या वर्ण, स्वर विषयक लेखात तिचा व्यासंग दिसतो पण त्यातलं आपल्याला काय कळत नाय बा! ते कळायला धन्याशेठ, वाचन्कवी यांच्यासारखीच मंडळी हवीत..:) आणि हो, आमचे प्रवासीही राहिलेच! त्यांच्याही गझला आणि प्रतिसाद मला फार आवडत! :) तात्या.

कोलबेर 17/09/2007 - 00:47
इथं हे नाव जरी कमी वेळा आलं असलं तरी आपण तर एकदम ज्याम फ्यान आहोत. जालावरचे साहित्य हा पूर्णपणे वेगळा प्रकार असून आणि त्यामध्ये ह्यांचा नंबर निश्चितच खूपच वरचा आहे. (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! - कोलबेर

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 17/09/2007 - 01:05
वरूणदेवा, (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! तुझ्याशी सहमत आहे! :) आपला, (सर्कीटवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by कोलबेर

बाबुराव 17/09/2007 - 06:34
तेला आवतनं देलं का ? म्हून फुगला आसन ? जरशीग फूगीर बी है म्हणा ते. राग नका येऊन देऊ भौ जरशीक फटकन बोलतू पर लोक म्हणतेत खरं बोलतू बाबूराव.

सर्किट 17/09/2007 - 11:01
येथे सर्किट ह्यांच्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया देणार्‍या कोलबेर, विसोबा खेचर आणि आजानुकर्ण ह्यांना आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही (कर्णा, पुणे विद्यापीठात तुला आणि नीलकांतला भेटलो तेव्हा चहाचे पैसे नीलकांतने दिल्याचे आठवते, आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अरे लेको, मला इथे बोलवायला तुम्हाला माझी तारीफ करण्याची काहीही गरज नाही रे. हे तर आपल्या घरचं कार्य ! इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलु गेला गगनावेरी अशी आमची मनस्थिती सध्या आहे. (वेलु, म्हणजे वेल.. शक्ती वेलु कोण म्हणतंय रे तिकडे विंगेत ?) आलोच... - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 17/09/2007 - 21:52
आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही आपण आमचे ग्लेनफिडिच विसरलात आणि आम्ही आपली रघुनाथराव कर्व्यांवरील चित्रपटाची सीडी विसरलो! :) आता पुढच्या वेळेला मात्र नक्की! च्यामारी आम्ही तरी केव्हा भांडारकरांच्या पैशांनी फुकट दारू पिणार! :) आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अहो मालक, ती गाडी आमची नव्हती बरं का! आमच्या एका क्लाएंटची होती! नाहीतर हा तात्या साला मालदार माणूस आहे असा लोकांचा फुक्कटचा गैरसमज व्हायचा! असो, व्यक्तिगत होतंय का फार? परंतु आपण व्यक्तिगत वर उतरलात त्यामुळे आम्हालादेखील एक दारुचा लहानसा ड्रम आपल्यावर फेकावा लागला! पिंपे आम्ही राखीव ठेवली असून लहान लहान ड्रमावरच सध्या काम भागवतो...:)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 17/09/2007 - 22:29
असो, व्यक्तिगत होतंय का फार? नाही, फार नाही. :-) पण संजोपरावांनी अद्याप विषयांतर झालं नाही, म्हणून हळहळ व्यक्त केली होती. म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे मला आवश्यक होते. पुन्हा चर्चा मूळपदावर आणतो. वरील सर्व उल्लेखित लेखक मलाही आवडतात. ह्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेख मीही लिहायला घेतला आहे. परंतु, वरील लेखकांत माझे परममित्र माधव कुळकर्णी ह्यांचे नाव आलेले नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अनुदिनीवर आणि माझे शब्द वर त्यांनी उत्तम लिखाण केले होते. माझे शब्द च्या चालकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्यात त्यांना बरीच मते मिळाली होते, हे स्मरते. - सर्किट

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:05
पुणे विद्यापीठात चहा प्यायल्याचा उल्लेख वाचल्यानंतर हा प्रतिसाद सर्किट यांनीच दिला आहे याविषयी खात्री पटली. इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्ह. हा आयडी सर्किट यांचाच आहे हे. स्वागत आहे.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 17/09/2007 - 11:08
इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्हणजे, आमचे कार्यालयीन मित्र आमच्या नावाने प्रतिसाद देत आहेत असे वाटत होते की काय रे, कर्णा ? असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी... पण बाकी आपल्या नीलकांताने मिसळपाव जबरा बनवले आहे बरं का ! त्याला माझ्या वतीने अनिकेत मध्ये चा पाज आणखी एकदा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:11
नीलकांताला मानलं. विशेषतः संगणकशास्त्राचे पुस्तकी ज्ञान नसूनही त्याचा या विषयातील रस व अभ्यास उल्लेखनीय आहे.

धनंजय 17/09/2007 - 17:34
मनोगत, उपक्रम हे मराठी जालविश्व आहे हे मला कळून अवघा एक महिना झालेला आहे. आणि उद्याचे (आजचेसुद्धा) कसदार मराठी लेखन वाचायला मला ठिकाण सापडले. पण संमेलनात उशीरा पोचल्यामुळे कुठे काय चालू आहे माहीत नाही, काय रटाळ आणि काय रसाळ आहे, ती इथल्या साहित्यिकांशी हळूहळू ओळख करून घेतो आहे. आवडला चर्चाप्रपंच. थोड्याथोड्या लेखकांचा उल्लेख करून सुरुवात केली ते चांगले. या ठिकाणी मला सुरुवातीचा क्रॅशकोर्स हवाच होता. तर या चर्चेत आलेल्या लेखकांपासून सुरू करेन. आतापर्यंत मनोगतावर "नवीन गद्य" आणि "नवीन कविता" अशा प्रकारे शोध करत होतो. एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/09/2007 - 17:43
एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात! क्या बात है धन्या! सुंदर वाक्य..:) आपला, (नर्मदेतला गोटा!) तात्या.

In reply to by टिकाकार

विसोबा खेचर 17/09/2007 - 18:36
आपले आज दिवसभरातले ठिकठिकाणचे प्रतिसाद पाहिले की हे अगदी पटते! :) अहो पण प्रसिद्धीची हाव असलेल्यांनी नावानिशी, ठावठिकाण्यासहीत प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं! तात्या.

In reply to by टिकाकार

घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत॥। (मड्की फोडावीत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे काहीही करुन प्रसिद्ध पुरुष व्हावे) अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर 17/09/2007 - 20:57
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. हा हा हा! :) च्यामारी सक्काळपासून बघतोय, जिथ्थे तिथ्थे हा टीकाकार कडमडतोय! :)

राज जैन 18/09/2007 - 00:11
तात्यानू ! लिस्ट मध्ये माझे नाव नाय ! लई वंगाळ वाटलं बघा ! लवकरच तुम्हा सर्वांना एक नवाच जैनाचे कार्टे पाहावयास मिळेल.........च्या मायला काय काय विषय डोक्यात नाहीत तेच बघतो ! लवकरच तुम्हाला व सर्व मराठी संकेतस्थळानां राज जैन नावाचा विभाग चालू करायला लावतो की नाही बघाच ! ;) अता येथे मिसळपाव व देखील ह.घ्या. हे लिवायला लागले म्हणजे ........ नवरीला सांगण्यासारखे की बाई हळद ही पिवळी असते ;)) जोक्य आहे ! राज जैन ! "आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)" राजौ, अस लिवु नको बाबा! जो देवाला आवडतोय त्येला तो उचलून नेतोय. आता प्रमोद देवांना आवल्डं तर ठीक आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राज जैन 19/09/2007 - 08:33
हा हा ! अरे लिहताना मी ह्या बाजूचा तर विचारच केला नव्हता, मी ती ओळ लिहण्यामागचे कारण हे होते की जिवंत असताना लोक अनेक नावे ठेवतात, शिव्या देतात पण अचानक मानूस गच्चकला की तो किती चांगला होता व त्याचे गुण किती आफाट होते हे सांगण्याची लोकांमध्ये रस्सीखेच लागते ! असा त्या ओळीचा भावार्थ आहे. राज जैन

दिगम्भा 18/09/2007 - 10:15
मला यादगार यांच्या जुन्या गजला व जी.एस. यांच्या कथा फार आवडतात. विशेषतः जी एस यांच्या भूलपाखरू व (नाव न आठवणारी) पॉटहोलला मध्यवर्ती पात्र करून लिहिलेली कथा या अप्रतिम. पॉटहोलवरची इतकी सुंदर व अचाट कल्पक कथा दुसरी असणे अशक्य असे माझे मत. आता हे दोघे (पूर्वीसारखे) का लिहीत माहीत देव जाणे. "माफीचा साक्षीदार" हे सुद्धा पूर्वीच्या ऍटिट्यूड् ने लिहीत नाहीत असे वाटते, खूप मोठी कैद भोगल्यानंतर जसा जन्मठेपेचा कैदी अध्यात्माला लागतो तसे काहीसे. - दिगम्भा

जुना अभिजित 18/09/2007 - 10:20
वर आलेली बरीच नावे सर्वाना परिचित असतीलच असे नाही. तेव्हा नावाबरोबरच या लेखकांच काही लिखाण किंवा अनुदिनीचा पत्ता दिला तर अत्युत्तम. कसं म्हणजे लगोलग वाचून त्यांना आप्ल्या हिट लिष्ट मध्ये टाकता येईल. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

कवटी 05/03/2009 - 12:30
सर्किट विषयी अवघ्या सव्वा वर्षापूर्वी मान्यवरानी काढलेले उद्गार वाचून अंमळ गंमत वाटली. कवटी
राम राम मंडळी, मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!) मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं?