मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खूप थंडी आहे यंदा

पाषाणभेद ·
लेखनविषय:
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.

'भाबडी', स्लोलर्नरतेची आजची कहाणी?

माहितगार ·

चित्रगुप्त गुरुवार, 03/27/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस गुरुवार, 03/27/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/10/2025 - 16:16
अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म गुरुवार, 04/10/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.

चित्रगुप्त गुरुवार, 03/27/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस गुरुवार, 03/27/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/10/2025 - 16:16
अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म गुरुवार, 04/10/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण

मिसळपाव ·

अहिरावण Sat, 03/16/2024 - 07:53
छान ! छान !! छान !!! नाही म्हणजे कसे आहे की भारताबद्दल कणव असणा-या पण भारताबाहेर राहणा-या लोकांचे मनापासून कौतुक करण्याची पद्धत आहे ती आम्ही पार पाडली. तुम्हाला जागरुक नागरीक म्हणून चिंता वाटते की चिंता वाटते असे दाखवले की जागरुक नागरीक म्हणून मिरवता येते हे तुमचे तुम्हाला नक्की माहित असणारच. कुणी तरी म्हटले आहेच तोरा मन दर्पन कहलाए !! वगैरे त्यातही भारताबद्दल फार काळजी वाटते सांगितले की अजूनच भारी. मग आपल्या आईबापांना, सासुसास-यांना, नव-याला वा बायकोला, पोरांना वा पोरींना प्रसंगी फाट्यावर मारुन त्यांची काळजी न करता करिअरच्या नावाखाली देश सोडून गेल्याची अपराधगंड भावना थोडी कमी व्हायला मदत होते. निदान चारचौघांत तोंड दाखवायला जागा उरते. अर्थात ज्याची त्याची जाण समज इत्यादी बाकी ते सर्वेक्षण का काय ते करा ! त्याचा भारताला वा भारतीयांना काहीही उपयोग होणार नाही. साधे सरळ आहे. तपमान वाढते म्हणून मी फ्रीज वापरु नये, माझ्या गरीब बहिणीनी चुल पेटवू नये म्हणून तुम्ही सांगणार आणि तुमच्या सर्वे साठी २४ तास चालू असलेले गुगलचे वा तत्सम सर्वर वापरणार, सर्वेचे निकाल आलयाबर त्यवर भाषण ठोक्ण्यासाठी पाक्च सातशे मैल कार चालवत, वीज जाळत माईकवर ठणाणा करणार. त्या भाषणातुन मिळालेले पैसे गुंतवणूक म्हणून बीटकॉईनमधे टाकणार. आणि दणादण बीटकॉईनच्या माईनिंगवर तपमान वाढ करणारे सर्वर जाळणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान... दुसरे काय. हांं.. तुमचे प्रमोशन, पगारवाढ, सजगता म्हणून चार पुरस्कार उदहरनार्थ वगैरे मिळतील.. त्याची कवतिक फेबु, इन्स्टा, ऐसी ...जमलंच तर मिपा इथे टाकाच. तोंड भरुन कवतुक करु हो आम्ही त्यांच. नाव काढलं हो...परदेशात जाऊन. इथे काळं कुत्रं विचारत नव्हतं !!! बाकी तापमान वाढ ही समस्या पाश्चिमात्यांनी देण आहे. आणि भारतातील लोकसंख्येमुळे प्रदूषण जितके होते त्यापेक्षा अधिक प्रदुषण पाश्चिमात्यांनी कमी लोकसंख्येत करुन दाखवले आहे, दाखवत आहेत आणि दाखवतील यात शंका नाही. बाकी तुम्हाला शुभेच्छा !! टीप : वरती तुम्ही असला उल्लेख असला तरी तो लेखक/लेखिका यांना वैयक्तिक उद्देशून नाही. इतकी समज लेखकांची असावी. नसेल तर देव (असलेला/नसलेला) त्यांचे कल्याण करो !!

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 14:16
अनेकानेक क्षेत्रात माजलेल्या अनागोंदीचा, ढोंगीपणाचा नेमका आलेख मांडला आहे. ---रच्याकने, भारतीय, ग्रीक, इजिप्शियन, चिनी, मेक्सिकन वगैरे संस्कृतींच्या प्राचीन ग्रंथातून हवामान बदल वगैरेंचे उल्लेख सापडतात का? - - उदाहरणार्थ, भीष्म पितामह अभिमन्यूला म्हणतात - "आमच्या लहानपणी एवढा उन्हाळा नसायचा बुवा" ... वगैरे??

In reply to by वामन देशमुख

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:04
सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय इतिहासाचा तसेच त्यांच्या सर्व मित्रमंडळींचा पूर्ण अभ्यास असल्याने ते विधान केले होते.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख Mon, 03/18/2024 - 08:06
>>> सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय... >>> (खालील प्रतिसादांमध्ये काही संदर्भ)... अगदी अगदी. १. दुसऱ्या एका धाग्यावर भारतवासी भारतीय / भारत अनिवासी भारतीय असा वाद काही समाजकंटक घालत होते तो संदर्भ मनात होता. २. असल्या विक्षिप्त लोकांची काम करण्याची संहिता कशी असते ते सर्वज्ञात आहेच.

Bhakti Sat, 03/16/2024 - 11:11
खूप छान काम करत आहात.सर्वेक्षण अहवाल भरला आहे.याबाबत आणखी माहिती घ्यायला आवडेल. ग्लोबल वार्मिंग ही समस्या खुप भयानक आहे.पृथ्वीचे सरसकट २ डिग्रीने तापमान वाढता कामा नये ते खाली यावे यासाठी सर्व जगाचे एकत्रित खूप प्रयत्न सुरू आहेत.

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 14:05
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?
फॉर्म मध्ये वरील प्रश्न आहे. याचे विस्तृत उत्तर आधी इथे द्यावे त्यावरुन या सर्वेक्षणात भाग घ्यायचा का हे ठरवता येईल.

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 14:54
दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी, यांना मिपाचे सदस्यत्व घेऊन स्वतःच इथे लेख टाकून सर्वेक्षण करता येईल की. काही तांत्रिक समस्या असल्यास मिपामालक हैतच सोडवायला. नुस्ता फॉर्म भरून पाठवण्यापेक्षा मिपावर होऊन जाऊ द्या की चर्चा आणि काथ्याकूट. फॉर्ममधल्या प्रश्नांपेक्षाही भारी माहिती देणारे, प्रश्न उपस्थित करणारे इथे भेटतील. त्यातून सर्वेक्षणाला मदतच होईल. ---- की त्यांना हे नकोच आहे, म्हणून कुबड्या घेऊन सर्वेक्षण करायचे आहे ? नेमकी तांत्रिक समस्या आहे तरी काय ? अगदी वय, लिंग, शिक्षण, काम-धंदा, रहाती/कामाची जागा, सामाजिक्/आर्थिक वर्ग, ईमेल आयडी वगैरे माहिती भरून फॉर्ममधील फुसक्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, त्यापेक्षा इथेच काथ्याकूट करा ना.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 17:02
"माझे खाते तिकडे register होत नाहीय."
- दिप्तीची समस्या. मी जरी त्यांच्यातर्फे वितरीत केला ईथे तरी ईथल्या प्रश्णोत्तरांचं काही करता येणार नाही ही कमतरता लक्षात आली होती. पण निदान कोणी माहीती तरी भरू शकेल म्हणून लिहिला ईथे.

वामन देशमुख Sat, 03/16/2024 - 15:32
जागतिक तापमानवाढ हा मुद्दा खरंच काळजीचा आहे का? असेल तर अग्रक्रमाने कुणी पावले उचलायला हवीत? आजवरच्या तापमानवाढीची जबाबदारी कुणाची? त्यान्वर काय कारवाई करणार? --- calling @साहना, @अरुण जोशी --- जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत. --- तस्मात, अशी सर्व्हेत सहभागी होण्याची आवाहने होत राहतात, आपण चिल मारावे! --- ते जाऊ द्या, सध्या उकाडा फार वाढलाय; थंडगार बिअर आणि हलीम मारुयात, कोण कोण येतंय? beers haleem

In reply to by वामन देशमुख

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:07
जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत.
नेमके. एक धरणवाली बै आणि तिचे "भलते" उद्योग आठवले. हीच मोडस ओपरंडी.

कर्नलतपस्वी Sat, 03/16/2024 - 18:01
मला अहिरावण यांचा प्रतिसाद व सांप्रत लेख वाचल्यावर गोंधळ उडाला म्हणून पुढे जाऊन प्रश्नावली वाचून उत्तर द्यावे असे वाटले. प्रश्न क्रमांक १- वय आणी तापमान याचा काही संबंध आहे का?मार्तंड पन्नास डिग्री आग ओकत असेल तर वयोमानानुसार काही फरक पडतो का? प्रश्न क्रमांक २- शिक्षण आणी तापमान याचा परस्परांशी काय संबंध? अशिक्षित माणसांना मार्तंड जास्त जाळतो का किवां मॅट्रिक, पदवीधर किवां विद्यावाचस्पती असल्यास काही कन्सेशन मिळते का? प्रश्न क्रमांक ३- महिलादिनी बायकांना काही विशेष सुट मिळते का? व्हॅलेंटाइन दिनी प्रेम करणाऱ्यांवर मार्तंड काही ......लिंगभेदा नुसार तापमानात वाढ घट होते का? तसेच अन्य प्रश्न सर्वेक्षण करण्यात फारसे मदत करणार नसून ते फक्त वाचकांचे सामान्य ज्ञान किती आहे हे कळण्यास मदत करतील. सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले. तसेही ग्लोबल वाॅर्मींग आणी उर्वरित आयुष्य याचे व्यस्त प्रमाण असल्याने माला व्यक्तीगत काहीच फरक पडेल असे वाटत नाही. आपली प्रश्नावली पुन्हा एकदा तपासून बघा असेच म्हणेन..... अंतत: अहिरावण, चित्रगुप्त यांचे प्रतिसाद बरोबरच आहेत असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 19:29
हा सर्व्हे माझा नाहीये, परंतु दोन मुद्दे कुठल्याही सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती. - वय / शिक्षण / लिंग याचा सर्वेक्षणाच्या मुद्द्याशी (जसा की ईथे जागतिक तपमानवाढ) थेट सबंध असेलच असं नाही. पण याबाबत "स्त्रियांमधे पुरूषांपेक्षा जास्त सजगता आहे का?", किंवा "कमी शिक्षित लोकांमधे एखाद्या गोष्टिचा जास्त प्रादुर्भाव असेल वाटलं होतं. पण सर्वेक्षणाने दाखवलं की प्रत्यक्षात हे उलटं आहे" अशी काही माहीती मिळवण्याच्या दृष्टीने या गोष्टी विचारलेल्या असतात. - बर्‍याचदा प्रश्णाला एकच पर्याय प्रतिसादकर्त्याने निवडणं अपेक्षित असतं. सर्वेक्षण करणारा सगळ्या शक्यतांचा विचार करून पर्याय देतो. पण त्यात कमतरता असू शकतात. असं झालं की प्रतिसादकर्त्याला एकतर त्यातल्या त्यात बरा पर्याय निवडावा लागतो (म्हणजे त्रुटी आली. आणि "त्यातल्या त्यात बरा" पर्याय पण उपलब्ध नसला म्हणून कुठलातरी निवडला तर नुसतीच त्रुटी नव्हे, साफ चूकीचीच मोजणी झाली) किंवा प्रश्णाला उत्तर देणं टाळायला लागतं (म्हणजे "ईथे उत्तर हवंच आहे" अशा स्वरूपाचा प्रश्ण असला तर प्रतिसादकर्ता सर्वेक्षण पुरंच न करण्याची शक्यता आली). तसं होऊ नये म्हणून "मला माहित नाही", "मला उत्तर द्यायचं नाहीये" असे पर्याय दिलेले असतात. प्रतिसादांचं जेव्हा संख्याशास्त्राच्या पद्धती वापरून विश्लेषण केलं जातं, तेव्हा त्यात अशा प्रतिसादांचा - अंतिम निर्णयावर विपरित परिणाम न होऊ देता - कसा वापर करावा याच्या पद्धती उपलब्ध असतात. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

कर्नलतपस्वी Sat, 03/16/2024 - 20:47
म्हणजे प्रश्नच संपला. इथे फक्त विदा गोळा करण्यासाठी लेख डकवला आहे. शंका विचारून काही उपयोग नाही कारण शंका समाधान होणार नाही. ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! काहिही हं श्री... हे दस्तावेज सामान्य माणूस का वाचेल,वाचले तरी राजकारणी,बिल्डर लाॅबी बरोबर पंगा घेऊ शकतो का? संबंधित लोकच वाचणार. दिलेला तर्क तर्कसंगत नाही. बाकी, स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सजग,शिक्षीत पेक्षा अशिक्षित जास्त सजग याने काय फरक पडतो. त्यापेक्षा,पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता विचारले असते तर जास्त सुसंगत वाटले असते. जाऊ द्यात, नका उत्तर देण्याच्या भानगडीत पडू.कारण सर्वेक्षण तुमचे नाहीच मुळी.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 21:32
"परंतु दोन मुद्दे

कुठल्याही

सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती." असो - एव्हढंच पुरे! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि समस्यांच्या निमित्ताने आपण केलेल्या आवहनानुसार प्रश्नावली भरुन दिली. पण, दुर्दैवाने प्रश्नांचे स्वरुप अजिबात विषयाशी संबंधित वाटले नाही. इंग्रजी प्रश्नांचे मराठी भाषेतून अनुवाद करण्याच्या गडबडीत म्हणा की अन्य काही म्हणा आपल्याला प्रश्नावली नीट करता आलीच नाही. एखाद्या प्रश्नाने उत्तराचा शोध घेवून काही नवी माहिती मिळवून एक विदा तयार करता येईल असे प्रश्नाचे स्वरुप वाटले नाही. असो, जशी असेल तशी प्रश्नावली भरुन दिली आहे. -दिलीप बिरुटे

गवि Sat, 03/16/2024 - 19:09
प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे जाणवले. वर इतरांनी उल्लेख केला आहेच. पण त्यातही अनेक प्रश्न असे आहेत की अमुक रिपोर्ट, तमुक रिपोर्ट, सरकारी दस्तऐवज, कोणतातरी क्ष अहवाल.. हे सर्व तुम्ही वाचले आहेत का? जे बहुतांश सामान्य नागरिकांनी वाचले असण्याची काडीमात्र शक्यता नाही असेच दिसते आहे. त्यामुळे बहुसंख्य लोकांना या विषयाबद्दल अनास्था आहे किंवा हे सर्व रिपोर्ट्स बनवून देखील लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहेत हे सिद्ध करणे हे साध्य होईल. निकाल पाहणे रोचक असेल.

In reply to by गवि

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 19:40
कदाचित "...हे जाणून घेणं हे साध्य होईल..." जास्त योग्य ठरेल का? सर्वेक्षण मी केलेलं नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे लेखिकेला हे माहीती आहे आणि ते सिद्ध करण्याचा उद्देश असेल. मला काय जाणवलं, तर या विषयाबद्दल ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 19:20
सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले.
एकंदरित त्या फॉर्मातील प्रश्न बघता या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची या विषयीची अनास्थाच अधोरेखित करणे हा आहे की काय असे वाटले. म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 19:31
कृपया माझा कर्नलतपस्वीना दिलेला प्रतिसाद पहा https://misalpav.com/comment/1177057#comment-1177057

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:10
>>> म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते. थोडक्यात काय ... टुमी हिंडू लोकं *ते आहात. हेच सिद्ध करायचे आहेत.

धर्मराजमुटके Sat, 03/16/2024 - 21:39
सर्वेक्षणात भाग घेऊन विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश सामान्यांप्रमाणे मला ही जागतिक तापमानवाढ संज्ञा माहित आहे मात्र त्याबद्द्ल अगदी कळकळीची चिंता वाटत नाही हे सत्य आहे त्याचे कारण 'अ़ज्ञानात सुख असते' असेही असू शकतो किंवा त्याबद्द्ल काय करता येईल याची सुस्पष्ट कल्पना नाहिये. वस्तूंचा पुर्नवापर (रिसायकलींग) केल्याने तापमानवाढीची समस्या कमी होईल अशा विचारातून काही वस्तूंचा वापर करतो मात्र तो उपाय कितपत प्रभावी आहे याची कल्यना नाही. बाकी मिपाकरांच्या प्रतिसादांविषयी थोडेसे : मिपावर फार पुर्वी राजकिय चर्चा नावाचा शाब्दिक हाणामारीचा प्रकार असायचा. होळीला बोंबा मारायला किंवा रंगपंचमीला त्वेषाने समोरच्याचे तोंड रंगवायला जेवढी मज्जा येते तश्शीच किंबहुना त्यापेक्षा काकणभर मजा तिथे चर्चा करताना यायची. तो विषय म्हणजे कुकरची शिट्टीच म्हणा ना एक प्रकारची. मात्र शिट्टीमार्गे जास्तची वाफ बाहेर पडू लागल्यामुळे मुळ पदार्थ शिजेनासा झाल्यावर मिपा मालकांनी कुकरची शिट्टीच बंद करुन टाकली. त्याचाच परिणाम म्हणून असे विषय आले की मिपाकर भसाभसा मनातील वाफ सोडून देतात. विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, त्यांना निदान सयंत नकार दिले असते तर मिपाप्रतिमावर्धनास हातभार लागला असता असे उगीचच वाटून गेले. असो. आपणास आपल्या भावी कार्यास शुभेच्छा ! सवेक्षणाचे निकाल इथे नक्की येऊ द्या हि विनंती.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:12
किंचित माहिती. >>विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, सदर विषय मांडणा-यांपैकी एक येथीलच होत्या हे जुने जाणते मिपाकर ओळखून असतील. त्या पाहुण्या नाहीत.

In reply to by Trump

अहिरावण Mon, 03/18/2024 - 19:06
हल्ली आम्ही त्यांना नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत असे म्हणतो.

नठ्यारा Sun, 03/17/2024 - 00:08
जगदोष्मन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिचा मानवी हस्ताक्षेपाशी कवडीमात्र संबंध नाही. ७५ मिनिटं वेळ असेल तर कृपया हे इंग्रजी चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=oYhCQv5tNsQ अन्यथा ते पाहून मी काढलेले अल्पसे मुद्दे खाली पहा : १. जगदोष्मन सैराट जागतिक तापमान वाढीसाठी मानवी जीवनास जबाबदार धरतात. त्यांतही कर्बवायूस ( CO2 ) हाच केवळ जबाबदार आहे असा यांचा दावा आहे. कर्बवायू हा हरितवायू असल्याने त्याच्यामुळे सूर्याचा उष्मा हवेत अडकून राहतो असा यांचा दावा आहे. यांत समस्या अशी की कर्बवायूसोबत पाण्याचे बाष्प हेही एक अतिशय प्रभावशाली हरितगृह वायू आहे. ९५ % उष्मा बाष्पामुळे धरून ठेवला जातो आणि फक्त ५ % उष्मा कर्बवायू धरून ठेवतो. बाष्प हवेत मिसळू नये म्हणून सैराट समुद्रावर झाकण बसवणार का? २. हवेतल्या कर्बवायूचा माणूस हा निश्चितपणे एक स्रोत आहे. मात्र तो अत्यंत मामुली स्रोत आहे. खरा स्रोत समुद्र व ज्वालामुखी हे आहेत. सैराट समुद्रावर झाकण घालणार आहेत. त्याचप्रमाणे ज्वालामुखीही थंड करून सोडावेत इतकीच त्यांना विनंती. सध्या इतकेच मुद्दे पुरेत. अमेरिकी राजकारणी अल गोर ला पैसे छापता यावेत म्हणून हा तमाशा चालू आहेत. त्यावर अधिक वेळ घालवायची माझी इच्छा नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by अहिरावण

अथांग आकाश Sun, 03/17/2024 - 13:16
डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय? 0

चित्रगुप्त Sun, 03/17/2024 - 03:48
आत्तापावेतोच्या प्रतिसादांवरून आणखी काही नाही, तरी सगळे मिपाकर लई मंजे लईच चॅप्टर बोxचे आहेत, हे सर्वेक्षणकर्त्या विदुषिंच्या ध्यानात आले असेल ... अर्थात त्या मिपावर येऊन वाचण्याचे श्रम घेत असतील तर. एकाद्या गलबतावरून संशोधकांचा लहानसा चमू समुद्रपर्यटन करत असावा, आणि सुंदर वनराजीने नटलेले एकादे रमणीय द्वीप बघून त्यांनी नांगर टाकून त्या द्वीपात प्रविष्ट व्हावे, तोच तिथल्या नतद्रष्ट, सैराट आदिवासींनी त्यांच्यावर दगडांचा अखंड वर्षाव सुरू करावा, तद्वत हे झाले.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख Mon, 03/18/2024 - 12:55
संशोधकांची की बंदूकधारी चाच्यांचा चमु याबद्दल चर्चा होऊ शकते.
बंदूकधारी चाच्यांचा चमुच! दुसरं काय?

चित्रगुप्त Sun, 03/17/2024 - 04:11
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम ( -- तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?) -- असे नुस्ते सर्वेक्षणात विचारण्याऐवजी सर्वेक्षणकर्त्या विदुषींनी ते परिणाम इथे मिपावर सविस्तर लिहील्यास जनतेचे प्रबोधन होऊन चर्चेला योग्य वळण मिळू शकेल. (अन्यथा चर्चा हळूहळू --- अल गोर - ट्रंप - मोदी - प.रम पू.जनीय - डावे - अंधभक्त --- असे वळण घेईल आणि मूळ हेतु बाजूलाच राहील) म्हणूनच मी माझ्या आधीच्या प्रतिसादातून तशी विनंती केली होती. असे प्रबोधन करण्यात त्यांना कितपत रुचि आहे ? हे तरी निदान सांगावे.

In reply to by वामन देशमुख

चामुंडराय Tue, 03/19/2024 - 03:42
विदाषी ?? ह्या शब्दासारखा सतत, उगीचच, अर्थहीन वाद घालणाऱ्याला "वादश्री" संबोधण्यात यावे का?

मदनबाण Sun, 03/17/2024 - 10:38
जागतिक तापमानाचे ठावूक नाही, परंतु आमच्या ठाण्याचे तापमान मात्र वाढले आहे इतक नक्की ! सगळीकडे काँक्रीटीकरण, प्रचंड प्रदुषण आणि झाडांची तोड ही मुख्य कारणे मला दिसतात. ज्या ठिकाणी पुर्वी हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात व्ह्यायची तो भाग आता साधारण ३ किलोमीटर पुढे सरकल्याचे मला जाणवलेले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

In reply to by मदनबाण

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:14
तुमच्या ठाण्यात ३५ अंशाच्या वर तपमान जात नव्हते तेव्हा आमच्या अमरावतीत तापमान ४५-४६ असायचे. आजही आहे. झाडी तेव्हा होती आजही आहे.

In reply to by नठ्यारा

अहिरावण Mon, 03/18/2024 - 10:42
भारतातील लोक सरपण जाळतात त्यामुळे तपमानवाढते, पर्यावरण बिघडते - एक महान अमेरिकन भारतातील लोक वर्षभरात सरपणामुळे जेवढा धूर करतात तेवढा रशियाने एक दिवसात युक्रेनमधे, इस्त्रायलने हमासमधे, अमेरीकेने सिरियामधे केला. या तिघांनी वर्षभरात जितका धूर केला तितका आईसलँडमधील ज्वालामुखीने एक दिवसात केला * बोला ! आता काय करायचे नेमके? किती सर्व्हे करायचे या समस्येवर मात करायला? १६ व्या शतकात अचानक कमी तपमान का झाले होते? ११ हजार ते १५ हजार वर्षांपूर्वी कुठलेही औद्योगिक कारखाने नसतांना, भारतीय लोक सरपण जाळत नसतांना ( तेव्हा गव्हाचा शोध नव्हता, पोळी, भाकर्री नव्हती तवा नव्हता, त्यामुळे चुल नव्हती) कसा काय कार्बन डाय ऑक्साईड वाढला? * वरवरची तुलनात्मक मांडणी. नेमके आकडे वेगळे, अधिक भयावह असू शकतात. साप समजून दोरी तुडवली जात आहे का?

In reply to by अहिरावण

वामन देशमुख Mon, 03/18/2024 - 12:58
साप समजून दोरी तुडवली जात आहे का?
साप कोणता, दोरी कोणती, हे बडवणार्‍यांना स्पष्ट माहीत आहेच; त्यांच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सापाला सोडून दोरी बडवणे आवश्यक आहे, इतकेच!

नगरी Sat, 03/30/2024 - 19:44
माणसाचा उगम माकडा पासून झाला असे डार्विन म्हणतो. असेल, पण काही लोकांची उत्क्रन्तीत गेलेली शेपटी वाकडी ते वाकडीच राहिली. आश्चर्य याचे वाटते कि सिनिअर लोक त्यात आहेत! आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का?

In reply to by नगरी

अहिरावण Sun, 03/31/2024 - 10:40
>>आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का? या ज्या कोणी आहेत त्यांचे "कार्य" शिनिअर लोकांना माहित नसेल असे तुम्हाला वाटते का?

अहिरावण Sun, 05/12/2024 - 19:51
झालं का सर्वेक्षण आणि त्यावरचं विश्लेषण का काय ते? काय ठरलं मग? की लोकांनी जो फार्म भरल्या त्यानुसार तुम्हाला हवे ते निकाला मिळालेच नाहीत म्हणून बारगळलं सगळं? की ऐन वेळेस पायथान गंडलं? की पांडा, चार्ट हवे तसे वळवता आले नाहीत? की मार्च एंडच्या अप्रेझल मधे आम्ही यंव केलं आम्ही त्यंव केलं म्हणून टाकलं आणि काम झालं? एकंदर आनंदच दिसत आहे. =)) बाकी आमच्या विदर्भात सध्या मस्त वळवाचा पाऊस येत आहे, गारा पडत आहेत... तापमान कमी झालं आहे.. =))

अहिरावण गुरुवार, 06/06/2024 - 11:22
अरेरे !! सर्वे बारगळला वाटते. का जमले नाही का निष्कर्ष काढायला? आव तर फार मोठा आणला होता.. आम्हाला कित्ती काळजी अन काय काय... नुसतीच हवा ! ढुस्स.... !! =)) चक चक चक... पुढील सर्वे साठी शुभेच्छा ! विषय घ्या - १) २०२९ मधे बीजेपी हरणार का? २) मिडटर्म मोदी राजीनामा देणार का? ३) बीजेपी फुटणार का? ४) कॉग्रेस फुटणार का? ५) योगी पीएम होणार का? ६) फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून संपणार का? ७) शरदपवार अजून ७ ८ इलेक्शन लढवणार का? ८) वगैरे इत्यादी हे तपामान वाढ वगैरे तुम्हाला काही झेपणार नाही.. उगा असले अर्धवट सर्वे करुन हसं मात्र करुन घ्याल ! तशी करुन घ्यायला आमची हरकत नाही.. आम्हाला काय हसायला आम्हाला काही कारण थोडीच लागते !! हि हि ही

नठ्यारा Sun, 09/01/2024 - 00:03
लोकहो, महाराष्ट्रात इतकी कर्तुमअकर्तुम शक्ती आहे की विचारायची सोय नाही. हेच बघा ना दादोबा धरणभऱ्यांनी समस्त ज्वालामुखी थंड करून सोडले आणि झाकणझुल्याने समुद्रावर झाकणं बशीवली. मग काय अटलांटिक महासागर थंड होऊ लागला. पण अज्ञ लोकांना महाराष्ट्राची प्रसिद्धीपराङ्मुख ताकद कधी समजणार ! बातम्यांचे दुवे ( इंग्रजी ) : १. https://www.newscientist.com/article/2444394-part-of-the-atlantic-is-cooling-at-record-speed-and-nobody-knows-why/ २. https://www.msn.com/en-ie/weather/topstories/large-patch-of-the-atlantic-ocean-near-the-equator-has-been-cooling-at-record-speeds-and-scientists-can-t-figure-out-why/ar-AA1pBxtf दिल्लीचेही तख्त राखतो सागरासही मस्त झाकतो लाव्हारसास खस्त टाकतो महाराष्ट्र माझा ! आपला नम्र, -नाठाळ नठ्या

अहिरावण Sat, 03/16/2024 - 07:53
छान ! छान !! छान !!! नाही म्हणजे कसे आहे की भारताबद्दल कणव असणा-या पण भारताबाहेर राहणा-या लोकांचे मनापासून कौतुक करण्याची पद्धत आहे ती आम्ही पार पाडली. तुम्हाला जागरुक नागरीक म्हणून चिंता वाटते की चिंता वाटते असे दाखवले की जागरुक नागरीक म्हणून मिरवता येते हे तुमचे तुम्हाला नक्की माहित असणारच. कुणी तरी म्हटले आहेच तोरा मन दर्पन कहलाए !! वगैरे त्यातही भारताबद्दल फार काळजी वाटते सांगितले की अजूनच भारी. मग आपल्या आईबापांना, सासुसास-यांना, नव-याला वा बायकोला, पोरांना वा पोरींना प्रसंगी फाट्यावर मारुन त्यांची काळजी न करता करिअरच्या नावाखाली देश सोडून गेल्याची अपराधगंड भावना थोडी कमी व्हायला मदत होते. निदान चारचौघांत तोंड दाखवायला जागा उरते. अर्थात ज्याची त्याची जाण समज इत्यादी बाकी ते सर्वेक्षण का काय ते करा ! त्याचा भारताला वा भारतीयांना काहीही उपयोग होणार नाही. साधे सरळ आहे. तपमान वाढते म्हणून मी फ्रीज वापरु नये, माझ्या गरीब बहिणीनी चुल पेटवू नये म्हणून तुम्ही सांगणार आणि तुमच्या सर्वे साठी २४ तास चालू असलेले गुगलचे वा तत्सम सर्वर वापरणार, सर्वेचे निकाल आलयाबर त्यवर भाषण ठोक्ण्यासाठी पाक्च सातशे मैल कार चालवत, वीज जाळत माईकवर ठणाणा करणार. त्या भाषणातुन मिळालेले पैसे गुंतवणूक म्हणून बीटकॉईनमधे टाकणार. आणि दणादण बीटकॉईनच्या माईनिंगवर तपमान वाढ करणारे सर्वर जाळणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान... दुसरे काय. हांं.. तुमचे प्रमोशन, पगारवाढ, सजगता म्हणून चार पुरस्कार उदहरनार्थ वगैरे मिळतील.. त्याची कवतिक फेबु, इन्स्टा, ऐसी ...जमलंच तर मिपा इथे टाकाच. तोंड भरुन कवतुक करु हो आम्ही त्यांच. नाव काढलं हो...परदेशात जाऊन. इथे काळं कुत्रं विचारत नव्हतं !!! बाकी तापमान वाढ ही समस्या पाश्चिमात्यांनी देण आहे. आणि भारतातील लोकसंख्येमुळे प्रदूषण जितके होते त्यापेक्षा अधिक प्रदुषण पाश्चिमात्यांनी कमी लोकसंख्येत करुन दाखवले आहे, दाखवत आहेत आणि दाखवतील यात शंका नाही. बाकी तुम्हाला शुभेच्छा !! टीप : वरती तुम्ही असला उल्लेख असला तरी तो लेखक/लेखिका यांना वैयक्तिक उद्देशून नाही. इतकी समज लेखकांची असावी. नसेल तर देव (असलेला/नसलेला) त्यांचे कल्याण करो !!

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 14:16
अनेकानेक क्षेत्रात माजलेल्या अनागोंदीचा, ढोंगीपणाचा नेमका आलेख मांडला आहे. ---रच्याकने, भारतीय, ग्रीक, इजिप्शियन, चिनी, मेक्सिकन वगैरे संस्कृतींच्या प्राचीन ग्रंथातून हवामान बदल वगैरेंचे उल्लेख सापडतात का? - - उदाहरणार्थ, भीष्म पितामह अभिमन्यूला म्हणतात - "आमच्या लहानपणी एवढा उन्हाळा नसायचा बुवा" ... वगैरे??

In reply to by वामन देशमुख

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:04
सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय इतिहासाचा तसेच त्यांच्या सर्व मित्रमंडळींचा पूर्ण अभ्यास असल्याने ते विधान केले होते.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख Mon, 03/18/2024 - 08:06
>>> सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय... >>> (खालील प्रतिसादांमध्ये काही संदर्भ)... अगदी अगदी. १. दुसऱ्या एका धाग्यावर भारतवासी भारतीय / भारत अनिवासी भारतीय असा वाद काही समाजकंटक घालत होते तो संदर्भ मनात होता. २. असल्या विक्षिप्त लोकांची काम करण्याची संहिता कशी असते ते सर्वज्ञात आहेच.

Bhakti Sat, 03/16/2024 - 11:11
खूप छान काम करत आहात.सर्वेक्षण अहवाल भरला आहे.याबाबत आणखी माहिती घ्यायला आवडेल. ग्लोबल वार्मिंग ही समस्या खुप भयानक आहे.पृथ्वीचे सरसकट २ डिग्रीने तापमान वाढता कामा नये ते खाली यावे यासाठी सर्व जगाचे एकत्रित खूप प्रयत्न सुरू आहेत.

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 14:05
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?
फॉर्म मध्ये वरील प्रश्न आहे. याचे विस्तृत उत्तर आधी इथे द्यावे त्यावरुन या सर्वेक्षणात भाग घ्यायचा का हे ठरवता येईल.

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 14:54
दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी, यांना मिपाचे सदस्यत्व घेऊन स्वतःच इथे लेख टाकून सर्वेक्षण करता येईल की. काही तांत्रिक समस्या असल्यास मिपामालक हैतच सोडवायला. नुस्ता फॉर्म भरून पाठवण्यापेक्षा मिपावर होऊन जाऊ द्या की चर्चा आणि काथ्याकूट. फॉर्ममधल्या प्रश्नांपेक्षाही भारी माहिती देणारे, प्रश्न उपस्थित करणारे इथे भेटतील. त्यातून सर्वेक्षणाला मदतच होईल. ---- की त्यांना हे नकोच आहे, म्हणून कुबड्या घेऊन सर्वेक्षण करायचे आहे ? नेमकी तांत्रिक समस्या आहे तरी काय ? अगदी वय, लिंग, शिक्षण, काम-धंदा, रहाती/कामाची जागा, सामाजिक्/आर्थिक वर्ग, ईमेल आयडी वगैरे माहिती भरून फॉर्ममधील फुसक्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, त्यापेक्षा इथेच काथ्याकूट करा ना.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 17:02
"माझे खाते तिकडे register होत नाहीय."
- दिप्तीची समस्या. मी जरी त्यांच्यातर्फे वितरीत केला ईथे तरी ईथल्या प्रश्णोत्तरांचं काही करता येणार नाही ही कमतरता लक्षात आली होती. पण निदान कोणी माहीती तरी भरू शकेल म्हणून लिहिला ईथे.

वामन देशमुख Sat, 03/16/2024 - 15:32
जागतिक तापमानवाढ हा मुद्दा खरंच काळजीचा आहे का? असेल तर अग्रक्रमाने कुणी पावले उचलायला हवीत? आजवरच्या तापमानवाढीची जबाबदारी कुणाची? त्यान्वर काय कारवाई करणार? --- calling @साहना, @अरुण जोशी --- जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत. --- तस्मात, अशी सर्व्हेत सहभागी होण्याची आवाहने होत राहतात, आपण चिल मारावे! --- ते जाऊ द्या, सध्या उकाडा फार वाढलाय; थंडगार बिअर आणि हलीम मारुयात, कोण कोण येतंय? beers haleem

In reply to by वामन देशमुख

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:07
जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत.
नेमके. एक धरणवाली बै आणि तिचे "भलते" उद्योग आठवले. हीच मोडस ओपरंडी.

कर्नलतपस्वी Sat, 03/16/2024 - 18:01
मला अहिरावण यांचा प्रतिसाद व सांप्रत लेख वाचल्यावर गोंधळ उडाला म्हणून पुढे जाऊन प्रश्नावली वाचून उत्तर द्यावे असे वाटले. प्रश्न क्रमांक १- वय आणी तापमान याचा काही संबंध आहे का?मार्तंड पन्नास डिग्री आग ओकत असेल तर वयोमानानुसार काही फरक पडतो का? प्रश्न क्रमांक २- शिक्षण आणी तापमान याचा परस्परांशी काय संबंध? अशिक्षित माणसांना मार्तंड जास्त जाळतो का किवां मॅट्रिक, पदवीधर किवां विद्यावाचस्पती असल्यास काही कन्सेशन मिळते का? प्रश्न क्रमांक ३- महिलादिनी बायकांना काही विशेष सुट मिळते का? व्हॅलेंटाइन दिनी प्रेम करणाऱ्यांवर मार्तंड काही ......लिंगभेदा नुसार तापमानात वाढ घट होते का? तसेच अन्य प्रश्न सर्वेक्षण करण्यात फारसे मदत करणार नसून ते फक्त वाचकांचे सामान्य ज्ञान किती आहे हे कळण्यास मदत करतील. सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले. तसेही ग्लोबल वाॅर्मींग आणी उर्वरित आयुष्य याचे व्यस्त प्रमाण असल्याने माला व्यक्तीगत काहीच फरक पडेल असे वाटत नाही. आपली प्रश्नावली पुन्हा एकदा तपासून बघा असेच म्हणेन..... अंतत: अहिरावण, चित्रगुप्त यांचे प्रतिसाद बरोबरच आहेत असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 19:29
हा सर्व्हे माझा नाहीये, परंतु दोन मुद्दे कुठल्याही सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती. - वय / शिक्षण / लिंग याचा सर्वेक्षणाच्या मुद्द्याशी (जसा की ईथे जागतिक तपमानवाढ) थेट सबंध असेलच असं नाही. पण याबाबत "स्त्रियांमधे पुरूषांपेक्षा जास्त सजगता आहे का?", किंवा "कमी शिक्षित लोकांमधे एखाद्या गोष्टिचा जास्त प्रादुर्भाव असेल वाटलं होतं. पण सर्वेक्षणाने दाखवलं की प्रत्यक्षात हे उलटं आहे" अशी काही माहीती मिळवण्याच्या दृष्टीने या गोष्टी विचारलेल्या असतात. - बर्‍याचदा प्रश्णाला एकच पर्याय प्रतिसादकर्त्याने निवडणं अपेक्षित असतं. सर्वेक्षण करणारा सगळ्या शक्यतांचा विचार करून पर्याय देतो. पण त्यात कमतरता असू शकतात. असं झालं की प्रतिसादकर्त्याला एकतर त्यातल्या त्यात बरा पर्याय निवडावा लागतो (म्हणजे त्रुटी आली. आणि "त्यातल्या त्यात बरा" पर्याय पण उपलब्ध नसला म्हणून कुठलातरी निवडला तर नुसतीच त्रुटी नव्हे, साफ चूकीचीच मोजणी झाली) किंवा प्रश्णाला उत्तर देणं टाळायला लागतं (म्हणजे "ईथे उत्तर हवंच आहे" अशा स्वरूपाचा प्रश्ण असला तर प्रतिसादकर्ता सर्वेक्षण पुरंच न करण्याची शक्यता आली). तसं होऊ नये म्हणून "मला माहित नाही", "मला उत्तर द्यायचं नाहीये" असे पर्याय दिलेले असतात. प्रतिसादांचं जेव्हा संख्याशास्त्राच्या पद्धती वापरून विश्लेषण केलं जातं, तेव्हा त्यात अशा प्रतिसादांचा - अंतिम निर्णयावर विपरित परिणाम न होऊ देता - कसा वापर करावा याच्या पद्धती उपलब्ध असतात. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

कर्नलतपस्वी Sat, 03/16/2024 - 20:47
म्हणजे प्रश्नच संपला. इथे फक्त विदा गोळा करण्यासाठी लेख डकवला आहे. शंका विचारून काही उपयोग नाही कारण शंका समाधान होणार नाही. ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! काहिही हं श्री... हे दस्तावेज सामान्य माणूस का वाचेल,वाचले तरी राजकारणी,बिल्डर लाॅबी बरोबर पंगा घेऊ शकतो का? संबंधित लोकच वाचणार. दिलेला तर्क तर्कसंगत नाही. बाकी, स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सजग,शिक्षीत पेक्षा अशिक्षित जास्त सजग याने काय फरक पडतो. त्यापेक्षा,पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता विचारले असते तर जास्त सुसंगत वाटले असते. जाऊ द्यात, नका उत्तर देण्याच्या भानगडीत पडू.कारण सर्वेक्षण तुमचे नाहीच मुळी.

In reply to by कर्नलतपस्वी

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 21:32
"परंतु दोन मुद्दे

कुठल्याही

सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती." असो - एव्हढंच पुरे! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि समस्यांच्या निमित्ताने आपण केलेल्या आवहनानुसार प्रश्नावली भरुन दिली. पण, दुर्दैवाने प्रश्नांचे स्वरुप अजिबात विषयाशी संबंधित वाटले नाही. इंग्रजी प्रश्नांचे मराठी भाषेतून अनुवाद करण्याच्या गडबडीत म्हणा की अन्य काही म्हणा आपल्याला प्रश्नावली नीट करता आलीच नाही. एखाद्या प्रश्नाने उत्तराचा शोध घेवून काही नवी माहिती मिळवून एक विदा तयार करता येईल असे प्रश्नाचे स्वरुप वाटले नाही. असो, जशी असेल तशी प्रश्नावली भरुन दिली आहे. -दिलीप बिरुटे

गवि Sat, 03/16/2024 - 19:09
प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे जाणवले. वर इतरांनी उल्लेख केला आहेच. पण त्यातही अनेक प्रश्न असे आहेत की अमुक रिपोर्ट, तमुक रिपोर्ट, सरकारी दस्तऐवज, कोणतातरी क्ष अहवाल.. हे सर्व तुम्ही वाचले आहेत का? जे बहुतांश सामान्य नागरिकांनी वाचले असण्याची काडीमात्र शक्यता नाही असेच दिसते आहे. त्यामुळे बहुसंख्य लोकांना या विषयाबद्दल अनास्था आहे किंवा हे सर्व रिपोर्ट्स बनवून देखील लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहेत हे सिद्ध करणे हे साध्य होईल. निकाल पाहणे रोचक असेल.

In reply to by गवि

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 19:40
कदाचित "...हे जाणून घेणं हे साध्य होईल..." जास्त योग्य ठरेल का? सर्वेक्षण मी केलेलं नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे लेखिकेला हे माहीती आहे आणि ते सिद्ध करण्याचा उद्देश असेल. मला काय जाणवलं, तर या विषयाबद्दल ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

चित्रगुप्त Sat, 03/16/2024 - 19:20
सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले.
एकंदरित त्या फॉर्मातील प्रश्न बघता या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची या विषयीची अनास्थाच अधोरेखित करणे हा आहे की काय असे वाटले. म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते.

In reply to by चित्रगुप्त

मिसळपाव Sat, 03/16/2024 - 19:31
कृपया माझा कर्नलतपस्वीना दिलेला प्रतिसाद पहा https://misalpav.com/comment/1177057#comment-1177057

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:10
>>> म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते. थोडक्यात काय ... टुमी हिंडू लोकं *ते आहात. हेच सिद्ध करायचे आहेत.

धर्मराजमुटके Sat, 03/16/2024 - 21:39
सर्वेक्षणात भाग घेऊन विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश सामान्यांप्रमाणे मला ही जागतिक तापमानवाढ संज्ञा माहित आहे मात्र त्याबद्द्ल अगदी कळकळीची चिंता वाटत नाही हे सत्य आहे त्याचे कारण 'अ़ज्ञानात सुख असते' असेही असू शकतो किंवा त्याबद्द्ल काय करता येईल याची सुस्पष्ट कल्पना नाहिये. वस्तूंचा पुर्नवापर (रिसायकलींग) केल्याने तापमानवाढीची समस्या कमी होईल अशा विचारातून काही वस्तूंचा वापर करतो मात्र तो उपाय कितपत प्रभावी आहे याची कल्यना नाही. बाकी मिपाकरांच्या प्रतिसादांविषयी थोडेसे : मिपावर फार पुर्वी राजकिय चर्चा नावाचा शाब्दिक हाणामारीचा प्रकार असायचा. होळीला बोंबा मारायला किंवा रंगपंचमीला त्वेषाने समोरच्याचे तोंड रंगवायला जेवढी मज्जा येते तश्शीच किंबहुना त्यापेक्षा काकणभर मजा तिथे चर्चा करताना यायची. तो विषय म्हणजे कुकरची शिट्टीच म्हणा ना एक प्रकारची. मात्र शिट्टीमार्गे जास्तची वाफ बाहेर पडू लागल्यामुळे मुळ पदार्थ शिजेनासा झाल्यावर मिपा मालकांनी कुकरची शिट्टीच बंद करुन टाकली. त्याचाच परिणाम म्हणून असे विषय आले की मिपाकर भसाभसा मनातील वाफ सोडून देतात. विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, त्यांना निदान सयंत नकार दिले असते तर मिपाप्रतिमावर्धनास हातभार लागला असता असे उगीचच वाटून गेले. असो. आपणास आपल्या भावी कार्यास शुभेच्छा ! सवेक्षणाचे निकाल इथे नक्की येऊ द्या हि विनंती.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:12
किंचित माहिती. >>विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, सदर विषय मांडणा-यांपैकी एक येथीलच होत्या हे जुने जाणते मिपाकर ओळखून असतील. त्या पाहुण्या नाहीत.

In reply to by Trump

अहिरावण Mon, 03/18/2024 - 19:06
हल्ली आम्ही त्यांना नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत असे म्हणतो.

नठ्यारा Sun, 03/17/2024 - 00:08
जगदोष्मन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिचा मानवी हस्ताक्षेपाशी कवडीमात्र संबंध नाही. ७५ मिनिटं वेळ असेल तर कृपया हे इंग्रजी चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=oYhCQv5tNsQ अन्यथा ते पाहून मी काढलेले अल्पसे मुद्दे खाली पहा : १. जगदोष्मन सैराट जागतिक तापमान वाढीसाठी मानवी जीवनास जबाबदार धरतात. त्यांतही कर्बवायूस ( CO2 ) हाच केवळ जबाबदार आहे असा यांचा दावा आहे. कर्बवायू हा हरितवायू असल्याने त्याच्यामुळे सूर्याचा उष्मा हवेत अडकून राहतो असा यांचा दावा आहे. यांत समस्या अशी की कर्बवायूसोबत पाण्याचे बाष्प हेही एक अतिशय प्रभावशाली हरितगृह वायू आहे. ९५ % उष्मा बाष्पामुळे धरून ठेवला जातो आणि फक्त ५ % उष्मा कर्बवायू धरून ठेवतो. बाष्प हवेत मिसळू नये म्हणून सैराट समुद्रावर झाकण बसवणार का? २. हवेतल्या कर्बवायूचा माणूस हा निश्चितपणे एक स्रोत आहे. मात्र तो अत्यंत मामुली स्रोत आहे. खरा स्रोत समुद्र व ज्वालामुखी हे आहेत. सैराट समुद्रावर झाकण घालणार आहेत. त्याचप्रमाणे ज्वालामुखीही थंड करून सोडावेत इतकीच त्यांना विनंती. सध्या इतकेच मुद्दे पुरेत. अमेरिकी राजकारणी अल गोर ला पैसे छापता यावेत म्हणून हा तमाशा चालू आहेत. त्यावर अधिक वेळ घालवायची माझी इच्छा नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by अहिरावण

अथांग आकाश Sun, 03/17/2024 - 13:16
डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय? 0

चित्रगुप्त Sun, 03/17/2024 - 03:48
आत्तापावेतोच्या प्रतिसादांवरून आणखी काही नाही, तरी सगळे मिपाकर लई मंजे लईच चॅप्टर बोxचे आहेत, हे सर्वेक्षणकर्त्या विदुषिंच्या ध्यानात आले असेल ... अर्थात त्या मिपावर येऊन वाचण्याचे श्रम घेत असतील तर. एकाद्या गलबतावरून संशोधकांचा लहानसा चमू समुद्रपर्यटन करत असावा, आणि सुंदर वनराजीने नटलेले एकादे रमणीय द्वीप बघून त्यांनी नांगर टाकून त्या द्वीपात प्रविष्ट व्हावे, तोच तिथल्या नतद्रष्ट, सैराट आदिवासींनी त्यांच्यावर दगडांचा अखंड वर्षाव सुरू करावा, तद्वत हे झाले.

In reply to by अहिरावण

वामन देशमुख Mon, 03/18/2024 - 12:55
संशोधकांची की बंदूकधारी चाच्यांचा चमु याबद्दल चर्चा होऊ शकते.
बंदूकधारी चाच्यांचा चमुच! दुसरं काय?

चित्रगुप्त Sun, 03/17/2024 - 04:11
जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम ( -- तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?) -- असे नुस्ते सर्वेक्षणात विचारण्याऐवजी सर्वेक्षणकर्त्या विदुषींनी ते परिणाम इथे मिपावर सविस्तर लिहील्यास जनतेचे प्रबोधन होऊन चर्चेला योग्य वळण मिळू शकेल. (अन्यथा चर्चा हळूहळू --- अल गोर - ट्रंप - मोदी - प.रम पू.जनीय - डावे - अंधभक्त --- असे वळण घेईल आणि मूळ हेतु बाजूलाच राहील) म्हणूनच मी माझ्या आधीच्या प्रतिसादातून तशी विनंती केली होती. असे प्रबोधन करण्यात त्यांना कितपत रुचि आहे ? हे तरी निदान सांगावे.

In reply to by वामन देशमुख

चामुंडराय Tue, 03/19/2024 - 03:42
विदाषी ?? ह्या शब्दासारखा सतत, उगीचच, अर्थहीन वाद घालणाऱ्याला "वादश्री" संबोधण्यात यावे का?

मदनबाण Sun, 03/17/2024 - 10:38
जागतिक तापमानाचे ठावूक नाही, परंतु आमच्या ठाण्याचे तापमान मात्र वाढले आहे इतक नक्की ! सगळीकडे काँक्रीटीकरण, प्रचंड प्रदुषण आणि झाडांची तोड ही मुख्य कारणे मला दिसतात. ज्या ठिकाणी पुर्वी हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात व्ह्यायची तो भाग आता साधारण ३ किलोमीटर पुढे सरकल्याचे मला जाणवलेले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

In reply to by मदनबाण

अहिरावण Sun, 03/17/2024 - 12:14
तुमच्या ठाण्यात ३५ अंशाच्या वर तपमान जात नव्हते तेव्हा आमच्या अमरावतीत तापमान ४५-४६ असायचे. आजही आहे. झाडी तेव्हा होती आजही आहे.

In reply to by नठ्यारा

अहिरावण Mon, 03/18/2024 - 10:42
भारतातील लोक सरपण जाळतात त्यामुळे तपमानवाढते, पर्यावरण बिघडते - एक महान अमेरिकन भारतातील लोक वर्षभरात सरपणामुळे जेवढा धूर करतात तेवढा रशियाने एक दिवसात युक्रेनमधे, इस्त्रायलने हमासमधे, अमेरीकेने सिरियामधे केला. या तिघांनी वर्षभरात जितका धूर केला तितका आईसलँडमधील ज्वालामुखीने एक दिवसात केला * बोला ! आता काय करायचे नेमके? किती सर्व्हे करायचे या समस्येवर मात करायला? १६ व्या शतकात अचानक कमी तपमान का झाले होते? ११ हजार ते १५ हजार वर्षांपूर्वी कुठलेही औद्योगिक कारखाने नसतांना, भारतीय लोक सरपण जाळत नसतांना ( तेव्हा गव्हाचा शोध नव्हता, पोळी, भाकर्री नव्हती तवा नव्हता, त्यामुळे चुल नव्हती) कसा काय कार्बन डाय ऑक्साईड वाढला? * वरवरची तुलनात्मक मांडणी. नेमके आकडे वेगळे, अधिक भयावह असू शकतात. साप समजून दोरी तुडवली जात आहे का?

In reply to by अहिरावण

वामन देशमुख Mon, 03/18/2024 - 12:58
साप समजून दोरी तुडवली जात आहे का?
साप कोणता, दोरी कोणती, हे बडवणार्‍यांना स्पष्ट माहीत आहेच; त्यांच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सापाला सोडून दोरी बडवणे आवश्यक आहे, इतकेच!

नगरी Sat, 03/30/2024 - 19:44
माणसाचा उगम माकडा पासून झाला असे डार्विन म्हणतो. असेल, पण काही लोकांची उत्क्रन्तीत गेलेली शेपटी वाकडी ते वाकडीच राहिली. आश्चर्य याचे वाटते कि सिनिअर लोक त्यात आहेत! आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का?

In reply to by नगरी

अहिरावण Sun, 03/31/2024 - 10:40
>>आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का? या ज्या कोणी आहेत त्यांचे "कार्य" शिनिअर लोकांना माहित नसेल असे तुम्हाला वाटते का?

अहिरावण Sun, 05/12/2024 - 19:51
झालं का सर्वेक्षण आणि त्यावरचं विश्लेषण का काय ते? काय ठरलं मग? की लोकांनी जो फार्म भरल्या त्यानुसार तुम्हाला हवे ते निकाला मिळालेच नाहीत म्हणून बारगळलं सगळं? की ऐन वेळेस पायथान गंडलं? की पांडा, चार्ट हवे तसे वळवता आले नाहीत? की मार्च एंडच्या अप्रेझल मधे आम्ही यंव केलं आम्ही त्यंव केलं म्हणून टाकलं आणि काम झालं? एकंदर आनंदच दिसत आहे. =)) बाकी आमच्या विदर्भात सध्या मस्त वळवाचा पाऊस येत आहे, गारा पडत आहेत... तापमान कमी झालं आहे.. =))

अहिरावण गुरुवार, 06/06/2024 - 11:22
अरेरे !! सर्वे बारगळला वाटते. का जमले नाही का निष्कर्ष काढायला? आव तर फार मोठा आणला होता.. आम्हाला कित्ती काळजी अन काय काय... नुसतीच हवा ! ढुस्स.... !! =)) चक चक चक... पुढील सर्वे साठी शुभेच्छा ! विषय घ्या - १) २०२९ मधे बीजेपी हरणार का? २) मिडटर्म मोदी राजीनामा देणार का? ३) बीजेपी फुटणार का? ४) कॉग्रेस फुटणार का? ५) योगी पीएम होणार का? ६) फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून संपणार का? ७) शरदपवार अजून ७ ८ इलेक्शन लढवणार का? ८) वगैरे इत्यादी हे तपामान वाढ वगैरे तुम्हाला काही झेपणार नाही.. उगा असले अर्धवट सर्वे करुन हसं मात्र करुन घ्याल ! तशी करुन घ्यायला आमची हरकत नाही.. आम्हाला काय हसायला आम्हाला काही कारण थोडीच लागते !! हि हि ही

नठ्यारा Sun, 09/01/2024 - 00:03
लोकहो, महाराष्ट्रात इतकी कर्तुमअकर्तुम शक्ती आहे की विचारायची सोय नाही. हेच बघा ना दादोबा धरणभऱ्यांनी समस्त ज्वालामुखी थंड करून सोडले आणि झाकणझुल्याने समुद्रावर झाकणं बशीवली. मग काय अटलांटिक महासागर थंड होऊ लागला. पण अज्ञ लोकांना महाराष्ट्राची प्रसिद्धीपराङ्मुख ताकद कधी समजणार ! बातम्यांचे दुवे ( इंग्रजी ) : १. https://www.newscientist.com/article/2444394-part-of-the-atlantic-is-cooling-at-record-speed-and-nobody-knows-why/ २. https://www.msn.com/en-ie/weather/topstories/large-patch-of-the-atlantic-ocean-near-the-equator-has-been-cooling-at-record-speeds-and-scientists-can-t-figure-out-why/ar-AA1pBxtf दिल्लीचेही तख्त राखतो सागरासही मस्त झाकतो लाव्हारसास खस्त टाकतो महाराष्ट्र माझा ! आपला नम्र, -नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
(हा लेख मी ऐसीवरच्या दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी यांच्या वतीने, त्यांच्या विनंतीनुसार ईथे देत आहे कारण काही तांत्रिक समस्येमुळे त्याना ईथे वितरीत करता आला नाहीये) ---------------------------------------------------------------------- नमस्कार! आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते.

मानवी कामजीवन:प्रश्न आणि उत्तर

राहुल ·

कानडाऊ योगेशु गुरुवार, 09/29/2022 - 09:19
डॉ साहेब शीर्षकात अनुक्रमांकही लिहिला तर उत्तम होईल. मी तुमच्या मागच्याच लेखाचे विडंबन असेल ह्या हेतुने धागा उघडला. आणि पुन्हा सगळा वाचला! रच्याकने. मी पयला!

तर्कवादी गुरुवार, 09/29/2022 - 15:52
सर्व धाग्यांचे शीर्षक एकच - "मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर" पण प्रश्नही डॉक्टरांचेच आणि उत्तरही त्यांचेच, आणि धाग्यावरील प्रतिसादांना डॉक्टर काही उत्तर देत नाहीत..

काय डॉक्टर , आज लेख नाही आला ? ऐसे कैसे चलेगा ? महिन्याला २१ चं टारगेट आहे लक्षात आहे ना ? मजा येवो न येवो , दरमहा नित्यनेमाने २१ लेख पाडत राहिलं पाहिजे. =))))

कानडाऊ योगेशु गुरुवार, 09/29/2022 - 09:19
डॉ साहेब शीर्षकात अनुक्रमांकही लिहिला तर उत्तम होईल. मी तुमच्या मागच्याच लेखाचे विडंबन असेल ह्या हेतुने धागा उघडला. आणि पुन्हा सगळा वाचला! रच्याकने. मी पयला!

तर्कवादी गुरुवार, 09/29/2022 - 15:52
सर्व धाग्यांचे शीर्षक एकच - "मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर" पण प्रश्नही डॉक्टरांचेच आणि उत्तरही त्यांचेच, आणि धाग्यावरील प्रतिसादांना डॉक्टर काही उत्तर देत नाहीत..

काय डॉक्टर , आज लेख नाही आला ? ऐसे कैसे चलेगा ? महिन्याला २१ चं टारगेट आहे लक्षात आहे ना ? मजा येवो न येवो , दरमहा नित्यनेमाने २१ लेख पाडत राहिलं पाहिजे. =))))
लेखनविषय:
कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे ? विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृतीच्या पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसे काही डॉक्टर बिनधास्त सांगतातही. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया, पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल ·

अनिकेत वैद्य Wed, 09/28/2022 - 13:08
ह्यापूर्वीच्या लेखातही प्रश्न विचारला होता. बहुदा आपल्या ज्ञानाची खिल्ली न उडवाल्यानी आपण प्रतिसाद दिला नाहीत. शैक्षणिक डिग्री सार्वजनिक करायला हरकत नसावी (त्यात काय खासगी आहे?). हवंतर कॉलेजचं नाव किंवा उत्तीर्ण झाल्याचे गुण/ वर्ष नका सांगू.

In reply to by अनिकेत वैद्य

खर आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा नुसत्या डॉ उपाधीने मॉडर्न मेडिसीन ( अ‍ॅलोपथी) होमिओपॅथी की आयुर्वेद शाखेतील डॉक्टर आहेत हे समजत नाही. दवाखान्यात पाटीवर डॉक्टरांची डिग्री लिहिणे हे बंधनकारक असते. मेडिकल एथिक्स बाबत नॅशनल मेडिकल कौन्सिल ने नवीन कोड ऑफ कंडक्ट चा मसुदा शासनाला दिला आहे. महत्वाची बातमी आहे. त्यानुसार आपापल्या पॆथी व्यतिरिक्त डॉक्टरांना अन्य पॆथीची औषधे देता येणार नाहीत. https://www.newindianexpress.com/nation/2022/may/30/nmc-prescribes-new-rules-for-ayush-doctors-2459600.html?fbclid=IwAR28OeAZdZiOl98LHMtyAYYHJ4F8dzirZg2vAvD1tQ5ZcrwsbtN4ud-k-Bs

In reply to by प्रकाश घाटपांडे

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 17:54
+१ खरं आहे, असे लेख लिहिताना सुद्धा शैक्षणिक उपाधी लिहिणे गरजेचे वाटते. आजकाल या क्षेत्रात सुद्धा सुळसुळाट झाला आहे, बरेच विना नोंदणी / बोगस डॉक्टर्स पकडल्याच्या बातम्या येत असतात. या पार्श्वभुमीवर शैक्षणिक उपाधी आणि नोंदणी क्रमांक लिहिणे गरजेचे वाटते !

In reply to by चौथा कोनाडा

दिलेल्या लिंकवरुन डॉक्टर राहूल पाटील हे BAMS आहेत. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर ना ? अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/29/2022 - 09:48
अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.
पण उपचार करण्यासाठी आहे. शिवाय दिलेली माहितीचा स्त्रोत व विश्वासार्हता देखील वाचकांच्या दृष्टीने महत्वाची आहे असे प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. त्यावेळी खुलासा लेखकाकडून अपेक्षित असतो. लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो हे देखील प्रतिक्रियेत आलेले आहे अशा वेळी जर लेखकाने खुलास केला तर विश्वासार्हता वाढते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे गुरुवार, 09/29/2022 - 10:55
लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो - डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754) अधोरेखित गोष्टी हेच दर्शवतात. हे वैद्यकीय नीतितत्त्वात बसते का?

कर्नलतपस्वी Wed, 09/28/2022 - 19:34
मला आजुनही वाटतयं की असल्या ज्ञानाची इथे मिपावर जरूर आहे का? १.बहुतेक सर्व सदस्य वयस्क आणी सर्वांनीच ती "जपानी रमलाची रात्र" अनुभवलेली आहे. बरेचसे सदस्य आयुष्याच्या विद्यापीठातून ही प्रश्न पत्रीका सोडवित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या विषयावर काही विद्यावाचस्पती सुद्धा असतील. "तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात रचीत होते शयनमहाली निळी चांदरात" २. बरेच सदस्य या क्षेत्रातील आपापली जबाबदारी पार पाडून निवृत्त झाले आहेत. २. स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. ३.बरेच सदस्य माझ्यासारखेच आनंदयात्री. मुक्कामाच्या शेवटच्या गाडीची वाट पहात आहेत. ५.महिला सदस्य सुद्धा आहेत व भारतीय महिलांना अशा विषयावर सार्वजनिक पणे व्यक्त होण्यास अडचण वाटते. ६.ह्या सर्व गोष्टी वाचकांना आकर्षित करण्यासाठी वर्तमानपत्रात नियमित वाचायला मीळतात. नवीन काहीच नाही. बाकी लोकशाही आहे त्यामुळे डाॅक्टरांनी लेख या विषयावर लिहावे अथवा नाही हा त्यांचा विषय आहे. डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ आहेत.(MD psychology असावेत असे गृहीत धरतो) फार चांगली गोष्ट आहे.Instead of Sexology, त्यांनी जर खालील विषयावर प्रकाश टाकला तर सदस्यांना फायदा होईल असे माझे मत आहे. Depression Schizophrenia and marital harmony Psychosis Phobia Intellectual Disability Psychological Disorders Developmental Disorders. Senile Depression Anxiety Disorders. इत्यादी.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Wed, 09/28/2022 - 20:51
स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. कारण काय? वात्सायनाने अनैसर्गिक मैथुनची कशास म्हटले आहे?

सुबोध खरे Wed, 09/28/2022 - 19:51
जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा "स्वप्नरंजन" याचे मानवी जीवनात आणि लैंगिक सुखात अपरिमित महत्व आहे. सर्वांच्या बायका अप्सरा नसतात. त्यातून स्त्रीदेह सिनेमात, मासिकात जसा दाखवला जातो तो आदर्श असा असतो. सर्वाना अप्सरा बायको म्हणून मिळत नाही त्यातून स्त्री चिरतरुण नसते. तारुण्य काळानंतर स्त्रीदेहात बराच बदल होतो आणि तिशीनंतर हा बदल दर पाच वर्षात जाणवण्याइतका जास्त असतो. शिवाय ४५ च्या आसपास स्त्रियांची रजोनिवृत्ती होते त्यानंतर तर हे फारच वेगाने होऊ लागते. वस्त्राच्छादित आणि वस्त्रहीन स्त्रीदेह यात प्रचंड फरक असतो.यामुळे स्पर्श होणारा स्त्रीदेह आणि स्वप्नरंजनात दिसणारा स्त्रीदेह याची सांगड घालून पुरुष संबंधाचे सुख मिळवू शकतो. आता हा प्रश्न स्त्रियांमध्ये नाही का? आहेच परंतु समागमात स्त्री हि सक्रिय नसते. त्यामुळे पुरुषाचा देह आवडत नसला तरी स्त्रीला लिंग उथ्थानाची गरज नसल्यामुळे तिच्या सक्रियतेची गरज नसते. स्त्रीरोग शास्त्रात काम सुरुवात केल्यावर सुरुवातीच्या काही आठवड्यात स्त्रीदेहाबद्दल किळस निर्माण होते हा डॉक्टरांचा सार्वत्रिक अनुभव आहे. यानंतर माणसे हा कप्पा बंद करायला शिकतात.( compartmentalisation) (बाकी जीवनात सात्विक असणारी माणसे जशी व्यवसायात एकमेकांचा गळा कापू शकतात). स्त्रीसुखात समाधानीअसणारा माणूस बाहेरख्याली होण्याची शक्यता (अंशतः का होईना) कमी होते हे पतिपत्नीत संबंध दृढ होण्यासाठी महत्त्वाचे आहेच. त्यामुळे अंधारात समागम करणे हि अनेकांची गरज/ आवश्यकता असू शकते.

कपिलमुनी Wed, 09/28/2022 - 22:39
बेसिक असले तरि सगळ्यंना माहिती असेल असे नाही, अशी माहिती लिहिण्यात वाईट काही नाही. दरमहा घडामोडीचे धागे काढून राजकीय , धार्मिक पो टा़कण्या पेक्षा बरेच उत्तम.

अनिकेत वैद्य Wed, 09/28/2022 - 13:08
ह्यापूर्वीच्या लेखातही प्रश्न विचारला होता. बहुदा आपल्या ज्ञानाची खिल्ली न उडवाल्यानी आपण प्रतिसाद दिला नाहीत. शैक्षणिक डिग्री सार्वजनिक करायला हरकत नसावी (त्यात काय खासगी आहे?). हवंतर कॉलेजचं नाव किंवा उत्तीर्ण झाल्याचे गुण/ वर्ष नका सांगू.

In reply to by अनिकेत वैद्य

खर आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा नुसत्या डॉ उपाधीने मॉडर्न मेडिसीन ( अ‍ॅलोपथी) होमिओपॅथी की आयुर्वेद शाखेतील डॉक्टर आहेत हे समजत नाही. दवाखान्यात पाटीवर डॉक्टरांची डिग्री लिहिणे हे बंधनकारक असते. मेडिकल एथिक्स बाबत नॅशनल मेडिकल कौन्सिल ने नवीन कोड ऑफ कंडक्ट चा मसुदा शासनाला दिला आहे. महत्वाची बातमी आहे. त्यानुसार आपापल्या पॆथी व्यतिरिक्त डॉक्टरांना अन्य पॆथीची औषधे देता येणार नाहीत. https://www.newindianexpress.com/nation/2022/may/30/nmc-prescribes-new-rules-for-ayush-doctors-2459600.html?fbclid=IwAR28OeAZdZiOl98LHMtyAYYHJ4F8dzirZg2vAvD1tQ5ZcrwsbtN4ud-k-Bs

In reply to by प्रकाश घाटपांडे

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 17:54
+१ खरं आहे, असे लेख लिहिताना सुद्धा शैक्षणिक उपाधी लिहिणे गरजेचे वाटते. आजकाल या क्षेत्रात सुद्धा सुळसुळाट झाला आहे, बरेच विना नोंदणी / बोगस डॉक्टर्स पकडल्याच्या बातम्या येत असतात. या पार्श्वभुमीवर शैक्षणिक उपाधी आणि नोंदणी क्रमांक लिहिणे गरजेचे वाटते !

In reply to by चौथा कोनाडा

दिलेल्या लिंकवरुन डॉक्टर राहूल पाटील हे BAMS आहेत. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर ना ? अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/29/2022 - 09:48
अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.
पण उपचार करण्यासाठी आहे. शिवाय दिलेली माहितीचा स्त्रोत व विश्वासार्हता देखील वाचकांच्या दृष्टीने महत्वाची आहे असे प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. त्यावेळी खुलासा लेखकाकडून अपेक्षित असतो. लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो हे देखील प्रतिक्रियेत आलेले आहे अशा वेळी जर लेखकाने खुलास केला तर विश्वासार्हता वाढते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे गुरुवार, 09/29/2022 - 10:55
लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो - डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754) अधोरेखित गोष्टी हेच दर्शवतात. हे वैद्यकीय नीतितत्त्वात बसते का?

कर्नलतपस्वी Wed, 09/28/2022 - 19:34
मला आजुनही वाटतयं की असल्या ज्ञानाची इथे मिपावर जरूर आहे का? १.बहुतेक सर्व सदस्य वयस्क आणी सर्वांनीच ती "जपानी रमलाची रात्र" अनुभवलेली आहे. बरेचसे सदस्य आयुष्याच्या विद्यापीठातून ही प्रश्न पत्रीका सोडवित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या विषयावर काही विद्यावाचस्पती सुद्धा असतील. "तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात रचीत होते शयनमहाली निळी चांदरात" २. बरेच सदस्य या क्षेत्रातील आपापली जबाबदारी पार पाडून निवृत्त झाले आहेत. २. स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. ३.बरेच सदस्य माझ्यासारखेच आनंदयात्री. मुक्कामाच्या शेवटच्या गाडीची वाट पहात आहेत. ५.महिला सदस्य सुद्धा आहेत व भारतीय महिलांना अशा विषयावर सार्वजनिक पणे व्यक्त होण्यास अडचण वाटते. ६.ह्या सर्व गोष्टी वाचकांना आकर्षित करण्यासाठी वर्तमानपत्रात नियमित वाचायला मीळतात. नवीन काहीच नाही. बाकी लोकशाही आहे त्यामुळे डाॅक्टरांनी लेख या विषयावर लिहावे अथवा नाही हा त्यांचा विषय आहे. डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ आहेत.(MD psychology असावेत असे गृहीत धरतो) फार चांगली गोष्ट आहे.Instead of Sexology, त्यांनी जर खालील विषयावर प्रकाश टाकला तर सदस्यांना फायदा होईल असे माझे मत आहे. Depression Schizophrenia and marital harmony Psychosis Phobia Intellectual Disability Psychological Disorders Developmental Disorders. Senile Depression Anxiety Disorders. इत्यादी.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Wed, 09/28/2022 - 20:51
स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. कारण काय? वात्सायनाने अनैसर्गिक मैथुनची कशास म्हटले आहे?

सुबोध खरे Wed, 09/28/2022 - 19:51
जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा "स्वप्नरंजन" याचे मानवी जीवनात आणि लैंगिक सुखात अपरिमित महत्व आहे. सर्वांच्या बायका अप्सरा नसतात. त्यातून स्त्रीदेह सिनेमात, मासिकात जसा दाखवला जातो तो आदर्श असा असतो. सर्वाना अप्सरा बायको म्हणून मिळत नाही त्यातून स्त्री चिरतरुण नसते. तारुण्य काळानंतर स्त्रीदेहात बराच बदल होतो आणि तिशीनंतर हा बदल दर पाच वर्षात जाणवण्याइतका जास्त असतो. शिवाय ४५ च्या आसपास स्त्रियांची रजोनिवृत्ती होते त्यानंतर तर हे फारच वेगाने होऊ लागते. वस्त्राच्छादित आणि वस्त्रहीन स्त्रीदेह यात प्रचंड फरक असतो.यामुळे स्पर्श होणारा स्त्रीदेह आणि स्वप्नरंजनात दिसणारा स्त्रीदेह याची सांगड घालून पुरुष संबंधाचे सुख मिळवू शकतो. आता हा प्रश्न स्त्रियांमध्ये नाही का? आहेच परंतु समागमात स्त्री हि सक्रिय नसते. त्यामुळे पुरुषाचा देह आवडत नसला तरी स्त्रीला लिंग उथ्थानाची गरज नसल्यामुळे तिच्या सक्रियतेची गरज नसते. स्त्रीरोग शास्त्रात काम सुरुवात केल्यावर सुरुवातीच्या काही आठवड्यात स्त्रीदेहाबद्दल किळस निर्माण होते हा डॉक्टरांचा सार्वत्रिक अनुभव आहे. यानंतर माणसे हा कप्पा बंद करायला शिकतात.( compartmentalisation) (बाकी जीवनात सात्विक असणारी माणसे जशी व्यवसायात एकमेकांचा गळा कापू शकतात). स्त्रीसुखात समाधानीअसणारा माणूस बाहेरख्याली होण्याची शक्यता (अंशतः का होईना) कमी होते हे पतिपत्नीत संबंध दृढ होण्यासाठी महत्त्वाचे आहेच. त्यामुळे अंधारात समागम करणे हि अनेकांची गरज/ आवश्यकता असू शकते.

कपिलमुनी Wed, 09/28/2022 - 22:39
बेसिक असले तरि सगळ्यंना माहिती असेल असे नाही, अशी माहिती लिहिण्यात वाईट काही नाही. दरमहा घडामोडीचे धागे काढून राजकीय , धार्मिक पो टा़कण्या पेक्षा बरेच उत्तम.
स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का? भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही. फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल ·

हे लेख म्हणजे अक्षरशः वंध्यामैथुन अर्थात वांझेशी रतिक्रिडा आहेत . एकदम अनुत्पादक , व्यर्थ , निष्फळ , श्रम ; निष्फळ व्यापार . काहीकाही सल्ले तर सरळ सरळ चुकीचे वाटताहेत .
विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा
भारतातील सर्वच्या सर्व कायदे स्त्रीयांना बायसड आहेत. त्यामुळे अविवाहित असताना सेक्स करणे हा एक मोठ्ठा जुगार आहे पुरुषांच्यासाठी. अगदी स्त्रीची संपुर्ण संमती असली तरी पुढे मागे पीरीयड्स मध्ये मूड फ्लक्चुएशन्स झाल्यावर तीचे विचार बदलणार नाहीत कशावरुन ? आणि समजा तिने मारली पलटी की पुरुष बिचारा बसेल तुरुंगाची हवा खात . बलात्काराचा खोटा आरोप केला म्हणुन स्त्री तुरुंगात बसली आहे अशी एकही बातमी पाहण्यात आलेली नाहीये. तस्मात अविवाहित असताना सेक्स हा पुरुषांच्यासाठी आगीशी खेळ आहे , ज्याला व्यवस्थित जमत असेल त्यानेच करावा नाहीतर उगाच भाजुन घ्याल हे निश्चित.
दररोज सेक्स करणे चांगले की वाईट ? दोघांचीही इच्छा असेल तर उत्तम.
दररोज ? महिन्यातुन २१ वेळा ? आर यु किडींग मी ? अगदी जवानीच्या ऐन जोशातही महिन्यातुन २१ वेळा सेक्स करावा असे वाटणारी एकही मुलगी पाहण्यात आलेली नाहीये आमच्या . तुम्ही डॉक्टर असल्याने कदाचित तुम्हाला असले ऑऊट्लायर्स भेटले असतील पण ते अफवाद झाले . "अभ्यासु" "जाणकार" मिपाकरांच्या अनुभवात असे कोणी पाहण्यात आलेले असेल तर त्याविषयी जाणुन घेण्याबाबत उत्सुक आहे ;)
पेपरमधील वा इंटरनेटवरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
>>> मिसळपाव वरील लेखांच्याबाबत काय ?

In reply to by राहुल

अभ्यास ? ह्याला तुम्ही अभ्यास म्हणता ? =)))) बाकी कामजीवनाच्या धाग्यावर समर्थांच्या दासबोधातील सुवचन ! उत्तम विरोधाभास आहे हा =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 09/27/2022 - 13:40
२१ हा शब्द वाचून उरलेले शब्द वाचून, समजून घेण्याची तसदी न घेता बोट उचलले आणि ताड ताड टाईप केले असे दिसते आहे :) बाकी ते
अगदी स्त्रीची संपुर्ण संमती असली तरी पुढे मागे पीरीयड्स मध्ये मूड फ्लक्चुएशन्स झाल्यावर तीचे विचार बदलणार नाहीत कशावरुन ?
वाचून भरपूर हसलो.

In reply to by कॉमी

कॉमी , तुअमचे प्रतिसाद असे कायम भरकटलेले का असतात की हेही तुमच्या क्लासिकल कम्युनिझम चे किंव्वा निओमॉडर्निझम व्यवच्छेदक लक्षण आहे ?
२१ हा शब्द वाचून उरलेले शब्द वाचून, समजून घेण्याची तसदी न घेता बोट उचलले आणि ताड ताड टाईप केले असे दिसते आहे
तुम्ही महिन्यातील २१ दिवस कामोपभोग घेतला आहे का कधी ? बरं घेतला असेल तर कितीदा ? एक महिना , दोन महिने की नित्यनेमाने दर महिन्यात २१ वेळा तुम्ही वीर्यपतन करवता ? किमान माझ्या पाहण्यात तरी असे कोणीही नाही .
वाचून भरपूर हसलो.
हां , विनोद हा नेहमीच अज्ञानमुलक असतो. प्रॉपर म्युच्युअल कन्सेंट ने सेक्स केले अन नंतर विचार पालटले म्हणुन बलात्काराचा आरोप दाखल केला अश्या कित्येक केसेस दाखवता येतील. ह्या नादात धनुभाऊंचे अख्खं करीयर उध्वस्त होता होता राहिले. राठोड साहेबांचे मंत्रिपद गेले. ह्याच्या विरुध्द काही केस - म्हणजे पुरुषाने स्त्रीवर बलात्कार अन फसवणुकीचा आरोप केल्याचे एक जरी उदाहरण तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर सांगा ! तस्मात रोमॅन्टिक एन्डेव्हर्स हा आगीशी खेळ आहे, आहेच , ज्याला जमतो त्यानेच करावा असे आमचे ठाम मत आहे . सगळ्यांच शशी थुरुर होता येत नसतं !

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 09/27/2022 - 14:31
हैला, मधनच क्लासिकल कम्युनिझम आणि काय मोडर्निझ्म आणायचे आणि भरकटलेले प्रतिसाद कोणाचे तर माझे ! मज्जा आहे ब्वा. महिन्यातून २१ वेळा वीर्यपतन सहज शक्य आहे- महिनोन महिने आणि वर्षानुवर्षे शक्य आहे- सेक्स किंवा हस्तमैथुनातून. ह्यापलीकडे कोणत्याही व्यक्तिगत पातळीवर उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. मी सेक्शुअली काय आणि कितीवेळा करतो हे काय इथे कन्फर्म करण्याची माझी इच्छा नाही. बाकी मी हसलो ते काय बलात्काराचे खोटे आरोप होतात या कल्पनेमुळे नाही, तर प्रिरियड मध्ये मड चेंज झाला म्हणून बलात्काराचा आरोप या भंकस संकल्पनेवर मला हसू आले. आणि तुमचे तर्क कितो गंडके हे बघा. जर पिरियडमध्ये मूड चेंज होऊन स्त्री पोलीस केस करत असेल तर ती लग्नानंतर सुद्धा करू शकते. लग्नांनातर सेक्स करणे सुद्धा तुमच्या दृष्टीने धोक्याचे असायला हवे.

In reply to by कॉमी

लग्नांनातर सेक्स करणे सुद्धा तुमच्या दृष्टीने धोक्याचे असायला हवे.
होय , तेही धोक्याचे आहेच , मॅरीटल रेप विषयी सुप्रीम कोर्टात आणि विदेशात चाललेला वादविवाद फॉल्लॉ करत नाही का तुम्ही ? तुमचे नाव कॉमी आहे आणि तुमच्या विचारातुन निऑ मॉडर्निस्ट विचार झळकतात हे अगदी उघड आहे ! बाकी वर्षानुवर्षे, दर महिन्याला, न चुकता २१ तोफांची सलामी देणार्‍यांना कोपरापासुन ________________/\______________ मी इतकेच म्हणाअलो की किमान माझ्या पाहण्यात ऐकण्यात वाचण्यात तरी असे कोणी नाही. a 2017 study that appeared in the Archives of Sexual Behavior found that the average adult currently enjoys sex 54 times a year, which equates to about once a week. https://link.springer.com/article/10.1007/s10508-017-0953-1

In reply to by प्रसाद गोडबोले

तर्कवादी Tue, 09/27/2022 - 16:06
भारतातील सर्वच्या सर्व कायदे स्त्रीयांना बायसड आहेत. त्यामुळे अविवाहित असताना सेक्स करणे हा एक मोठ्ठा जुगार आहे पुरुषांच्यासाठी.
मला वाटतं डॉक्टर फक्त वैद्यकीय दृष्टीकोनातून लिहीत आहे. कायदेशीर गोष्टी , समाजात घडणारे गैरप्रकार या अनुषंगाने ते लिहित नाही. तसंही पुर्ण वाक्य होतं की "म्हणजे विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा पण त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे." याचा अर्थ " अविवाहित असताना सेक्स करा" असा सल्ला दिला आहे असं नसून "विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करत असाल तर त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे " अशा प्रकारे त्याचा अर्थ ध्वनित होतो. तसंही विवाहपुर्व वा विवाहबाह्य संबंध यातून स्त्रीने बलात्काराचा आरोप केला तर पुरुषाकरिता अशा प्रकारचे संबंध ठेवण्यात कायदेशीर दृष्टीने धोका आहे असे जरी असले तरी त्याला मोठ्ठा जुगार म्हणता येणार नाही. जुगार ही अशी गोष्ट आहे ज्यात अनुकुल परिणामापेक्षा (पक्षी : जुगारात जिंकणे) प्रतिकूल परिणामांची (पक्षी: जुगारात हरणे) शक्यता जास्त किंबहूना खूप जास्त असते - आणि व्य्वहारातल्या अशाच गोष्टीला साधारणतः जुगाराची उपमा दिली जाते. विवाहपुर्व वा विवाहबाह्य संबंध यातून स्त्रीने बलात्काराचा आरोप करण्याची आणि त्यामुळे पुरुषाला तुरुंगात जावू लागण्याची शक्यता ही असे काही न घडण्याच्या शक्यतेपेक्षा बरीच कमी असते. नाहीतर आसपासच्या /माहितीतल्या तरुण ,अविवाहीत मुलांपैकी महिन्याला एखादा तरी तुरुंगात गेल्याच्या बातम्या कानी आल्या असत्या. रस्त्यावरुन दुचाकीने जाताना अपघात होवून मृत्यू ओढावतो तेव्हा रस्त्याने दुचाकीने फिरणे हा मोठ्ठा जुगार आहे म्हणणार का ? बाकी लेख / लेखमाला यातील उद्देश, विषय, आशय इत्यादींबद्दल सध्यातरी काही टिप्पणी नाही.

आग्या१९९० Tue, 09/27/2022 - 15:00
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे. हो, तीन दिवसांपूर्वी नेटवर ही बातमी वाचली. कठीण असले तरी अशक्य नाही अर्थात ह्यात सातत्य टिकविण्यासाठी फँटासी उपयोगी पडू शकते. छान माहिती मिळत आहे. मालिका चालू ठेवा.

तर्कवादी Tue, 09/27/2022 - 16:08
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे.
हे कोणत्या वयोगटातील पुरुषांसाठी लागू आहे ?

In reply to by आग्या१९९०

तर्कवादी Tue, 09/27/2022 - 16:19
५०+ वयोगटासाठी २१ वेळा , मग विशीतल्या पुरुषांसाठी किती वेळा ?

In reply to by तर्कवादी

आग्या१९९० Tue, 09/27/2022 - 17:28
प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी, पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची शक्यता जास्त असल्याने हा उपाय. https://www.webmd.com/prostate-cancer/ejaculation-prostate-cancer-risk

In reply to by तर्कवादी

तुर्रमखान Tue, 09/27/2022 - 22:59
५०+ वयोगटासाठी २१ वेळा , मग विशीतल्या पुरुषांसाठी किती वेळा ?
महिन्यातून २१वेळा मैथून केल्यावर विशीतच पन्नाशी येइल त्यामुळे त्यांची काळजी नको. :D

कपिलमुनी Wed, 09/28/2022 - 04:33
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे ये कूच ज्यादा ही है !

सनईचौघडा Wed, 09/28/2022 - 06:27
कसं ज्यादा? त्या औरंग्याच्या जनान्यात ५ हजार स्त्रियां होत्या म्हणजे २१ काय त्यापेक्षा जास्त वेळा रोजचं तो उपभोग घेत असणार. मोजा आता.

सुबोध खरे Wed, 09/28/2022 - 10:51
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे. हे विधान दिशाभूल करणारे आणि सरसकट आहे. जितक्या जास्त वेळेस वीर्यस्खलन केले जाते तितकी प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. कर्करोग हे एकच मानक आहे का स्वास्थ्यासाठी? प्रोस्टॅट ग्रंथीचा दाह, वयाप्रमाणे होणारी ग्रंथीची वाढ (बिनाईन हायपर ट्रॉफी) हे प्रश्न/ रोग कर्करोगापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आहेत. आग्या यांनी दिलेल्या दुव्यात खालील गोष्टी पण दिलेल्या आहेत Basically, the more men ejaculated in a month, the less likely they were to get prostate cancer. Ejaculation doesn’t seem to protect against the most deadly or advanced types of prostate cancer. Not all studies have found a benefit. The 2016 study got attention because of its size (almost 32,000 men) and length (18 years). A few even found that some men, specifically younger men, who masturbated more had slightly higher chances of prostate cancer कमीत कमी २१ वेळा वीर्यस्खलन करण्यासाठी पत्नीची तयारी पाहिजे. म्हणजे ४-५ दिवस पाळीचे सोडले तर महिन्यात जवळ जवळ रोजच अशा किती पत्नी तयार होतील ते सुद्धा कधी तरी पुढच्या ३० वर्षांनी होणाऱ्या कर्करोगाची शक्यता २० % नि कमी करण्यासाठी? ते शक्य नाही म्हणून माणसांनी हस्तमैथुन करायचे? यामुळे पत्नीला आपण कमी पडतो किंवा आपण नवऱ्याला आवडत नाही असा न्यूनगंड येण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे १००० जोडप्यापैकी ५०० जोडप्यात बेबनाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. असे सरसकट विधान करणे टाळावे अशी माझी लेखकास विनंती आहे.

चौकस२१२ Wed, 09/28/2022 - 11:31
डॉक्टर , आपले बाकीचे पटले पण , "लग्न झालेले असताना हस्तमैथुन करणे आणि त्यातून नवरा बायकोत गैरसमजूत होयीलच" हे कसे? जर नीट संवाद असेल दोघांच्यात तर टाळता येईल ! आपण त्याला "सेमी सेमी ओपन रेलशनशिप म्हणूयात हवे तर " असो या सगळ्या संवादात मीपरवरील एक तरी स्त्री सभासद भाष्य करति झलि तर अर्थ ... किंवा कोणी डॉक्टर, स्त्री रोगी काय म्हणतात यावर प्रकाश टाकू शकले तर चर्चा सार्थकी लागेल!

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 12:17
तथाकथित एक्सपर्ट मसाला साईट वरून कॉपी करुन भाषांतर ( हो भाषांतरच्, अनुवाद नाही) करून इथे चिटकवला आहे असं वाटतंय ! उदा.
स्त्री सेक्सला नाही म्हणत असेल तरी पुरूष का दबाब करत असतो?
.. एकंदरीत स्वत: धागाकर्त्याने स्वतःचे विचार मांडलेत असं जाणवत नाही

सनईचौघडा Wed, 09/28/2022 - 13:01
यामुळे पत्नीला आपण कमी पडतो किंवा आपण नवऱ्याला आवडत नाही असा न्यूनगंड येण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे १००० जोडप्यापैकी ५०० जोडप्यात बेबनाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.>>> आणि जर नीट संवाद असेल दोघांच्यात तर टाळता येईल !>>>> काय ति निरागसता? कशाला पाहिजे संवाद? अहो कोणता नवरा पत्नीला सांगतो की अगं आज किनई मी ह. मै. केलंय बर.

हे लेख म्हणजे अक्षरशः वंध्यामैथुन अर्थात वांझेशी रतिक्रिडा आहेत . एकदम अनुत्पादक , व्यर्थ , निष्फळ , श्रम ; निष्फळ व्यापार . काहीकाही सल्ले तर सरळ सरळ चुकीचे वाटताहेत .
विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा
भारतातील सर्वच्या सर्व कायदे स्त्रीयांना बायसड आहेत. त्यामुळे अविवाहित असताना सेक्स करणे हा एक मोठ्ठा जुगार आहे पुरुषांच्यासाठी. अगदी स्त्रीची संपुर्ण संमती असली तरी पुढे मागे पीरीयड्स मध्ये मूड फ्लक्चुएशन्स झाल्यावर तीचे विचार बदलणार नाहीत कशावरुन ? आणि समजा तिने मारली पलटी की पुरुष बिचारा बसेल तुरुंगाची हवा खात . बलात्काराचा खोटा आरोप केला म्हणुन स्त्री तुरुंगात बसली आहे अशी एकही बातमी पाहण्यात आलेली नाहीये. तस्मात अविवाहित असताना सेक्स हा पुरुषांच्यासाठी आगीशी खेळ आहे , ज्याला व्यवस्थित जमत असेल त्यानेच करावा नाहीतर उगाच भाजुन घ्याल हे निश्चित.
दररोज सेक्स करणे चांगले की वाईट ? दोघांचीही इच्छा असेल तर उत्तम.
दररोज ? महिन्यातुन २१ वेळा ? आर यु किडींग मी ? अगदी जवानीच्या ऐन जोशातही महिन्यातुन २१ वेळा सेक्स करावा असे वाटणारी एकही मुलगी पाहण्यात आलेली नाहीये आमच्या . तुम्ही डॉक्टर असल्याने कदाचित तुम्हाला असले ऑऊट्लायर्स भेटले असतील पण ते अफवाद झाले . "अभ्यासु" "जाणकार" मिपाकरांच्या अनुभवात असे कोणी पाहण्यात आलेले असेल तर त्याविषयी जाणुन घेण्याबाबत उत्सुक आहे ;)
पेपरमधील वा इंटरनेटवरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
>>> मिसळपाव वरील लेखांच्याबाबत काय ?

In reply to by राहुल

अभ्यास ? ह्याला तुम्ही अभ्यास म्हणता ? =)))) बाकी कामजीवनाच्या धाग्यावर समर्थांच्या दासबोधातील सुवचन ! उत्तम विरोधाभास आहे हा =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 09/27/2022 - 13:40
२१ हा शब्द वाचून उरलेले शब्द वाचून, समजून घेण्याची तसदी न घेता बोट उचलले आणि ताड ताड टाईप केले असे दिसते आहे :) बाकी ते
अगदी स्त्रीची संपुर्ण संमती असली तरी पुढे मागे पीरीयड्स मध्ये मूड फ्लक्चुएशन्स झाल्यावर तीचे विचार बदलणार नाहीत कशावरुन ?
वाचून भरपूर हसलो.

In reply to by कॉमी

कॉमी , तुअमचे प्रतिसाद असे कायम भरकटलेले का असतात की हेही तुमच्या क्लासिकल कम्युनिझम चे किंव्वा निओमॉडर्निझम व्यवच्छेदक लक्षण आहे ?
२१ हा शब्द वाचून उरलेले शब्द वाचून, समजून घेण्याची तसदी न घेता बोट उचलले आणि ताड ताड टाईप केले असे दिसते आहे
तुम्ही महिन्यातील २१ दिवस कामोपभोग घेतला आहे का कधी ? बरं घेतला असेल तर कितीदा ? एक महिना , दोन महिने की नित्यनेमाने दर महिन्यात २१ वेळा तुम्ही वीर्यपतन करवता ? किमान माझ्या पाहण्यात तरी असे कोणीही नाही .
वाचून भरपूर हसलो.
हां , विनोद हा नेहमीच अज्ञानमुलक असतो. प्रॉपर म्युच्युअल कन्सेंट ने सेक्स केले अन नंतर विचार पालटले म्हणुन बलात्काराचा आरोप दाखल केला अश्या कित्येक केसेस दाखवता येतील. ह्या नादात धनुभाऊंचे अख्खं करीयर उध्वस्त होता होता राहिले. राठोड साहेबांचे मंत्रिपद गेले. ह्याच्या विरुध्द काही केस - म्हणजे पुरुषाने स्त्रीवर बलात्कार अन फसवणुकीचा आरोप केल्याचे एक जरी उदाहरण तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर सांगा ! तस्मात रोमॅन्टिक एन्डेव्हर्स हा आगीशी खेळ आहे, आहेच , ज्याला जमतो त्यानेच करावा असे आमचे ठाम मत आहे . सगळ्यांच शशी थुरुर होता येत नसतं !

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 09/27/2022 - 14:31
हैला, मधनच क्लासिकल कम्युनिझम आणि काय मोडर्निझ्म आणायचे आणि भरकटलेले प्रतिसाद कोणाचे तर माझे ! मज्जा आहे ब्वा. महिन्यातून २१ वेळा वीर्यपतन सहज शक्य आहे- महिनोन महिने आणि वर्षानुवर्षे शक्य आहे- सेक्स किंवा हस्तमैथुनातून. ह्यापलीकडे कोणत्याही व्यक्तिगत पातळीवर उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. मी सेक्शुअली काय आणि कितीवेळा करतो हे काय इथे कन्फर्म करण्याची माझी इच्छा नाही. बाकी मी हसलो ते काय बलात्काराचे खोटे आरोप होतात या कल्पनेमुळे नाही, तर प्रिरियड मध्ये मड चेंज झाला म्हणून बलात्काराचा आरोप या भंकस संकल्पनेवर मला हसू आले. आणि तुमचे तर्क कितो गंडके हे बघा. जर पिरियडमध्ये मूड चेंज होऊन स्त्री पोलीस केस करत असेल तर ती लग्नानंतर सुद्धा करू शकते. लग्नांनातर सेक्स करणे सुद्धा तुमच्या दृष्टीने धोक्याचे असायला हवे.

In reply to by कॉमी

लग्नांनातर सेक्स करणे सुद्धा तुमच्या दृष्टीने धोक्याचे असायला हवे.
होय , तेही धोक्याचे आहेच , मॅरीटल रेप विषयी सुप्रीम कोर्टात आणि विदेशात चाललेला वादविवाद फॉल्लॉ करत नाही का तुम्ही ? तुमचे नाव कॉमी आहे आणि तुमच्या विचारातुन निऑ मॉडर्निस्ट विचार झळकतात हे अगदी उघड आहे ! बाकी वर्षानुवर्षे, दर महिन्याला, न चुकता २१ तोफांची सलामी देणार्‍यांना कोपरापासुन ________________/\______________ मी इतकेच म्हणाअलो की किमान माझ्या पाहण्यात ऐकण्यात वाचण्यात तरी असे कोणी नाही. a 2017 study that appeared in the Archives of Sexual Behavior found that the average adult currently enjoys sex 54 times a year, which equates to about once a week. https://link.springer.com/article/10.1007/s10508-017-0953-1

In reply to by प्रसाद गोडबोले

तर्कवादी Tue, 09/27/2022 - 16:06
भारतातील सर्वच्या सर्व कायदे स्त्रीयांना बायसड आहेत. त्यामुळे अविवाहित असताना सेक्स करणे हा एक मोठ्ठा जुगार आहे पुरुषांच्यासाठी.
मला वाटतं डॉक्टर फक्त वैद्यकीय दृष्टीकोनातून लिहीत आहे. कायदेशीर गोष्टी , समाजात घडणारे गैरप्रकार या अनुषंगाने ते लिहित नाही. तसंही पुर्ण वाक्य होतं की "म्हणजे विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा पण त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे." याचा अर्थ " अविवाहित असताना सेक्स करा" असा सल्ला दिला आहे असं नसून "विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करत असाल तर त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे " अशा प्रकारे त्याचा अर्थ ध्वनित होतो. तसंही विवाहपुर्व वा विवाहबाह्य संबंध यातून स्त्रीने बलात्काराचा आरोप केला तर पुरुषाकरिता अशा प्रकारचे संबंध ठेवण्यात कायदेशीर दृष्टीने धोका आहे असे जरी असले तरी त्याला मोठ्ठा जुगार म्हणता येणार नाही. जुगार ही अशी गोष्ट आहे ज्यात अनुकुल परिणामापेक्षा (पक्षी : जुगारात जिंकणे) प्रतिकूल परिणामांची (पक्षी: जुगारात हरणे) शक्यता जास्त किंबहूना खूप जास्त असते - आणि व्य्वहारातल्या अशाच गोष्टीला साधारणतः जुगाराची उपमा दिली जाते. विवाहपुर्व वा विवाहबाह्य संबंध यातून स्त्रीने बलात्काराचा आरोप करण्याची आणि त्यामुळे पुरुषाला तुरुंगात जावू लागण्याची शक्यता ही असे काही न घडण्याच्या शक्यतेपेक्षा बरीच कमी असते. नाहीतर आसपासच्या /माहितीतल्या तरुण ,अविवाहीत मुलांपैकी महिन्याला एखादा तरी तुरुंगात गेल्याच्या बातम्या कानी आल्या असत्या. रस्त्यावरुन दुचाकीने जाताना अपघात होवून मृत्यू ओढावतो तेव्हा रस्त्याने दुचाकीने फिरणे हा मोठ्ठा जुगार आहे म्हणणार का ? बाकी लेख / लेखमाला यातील उद्देश, विषय, आशय इत्यादींबद्दल सध्यातरी काही टिप्पणी नाही.

आग्या१९९० Tue, 09/27/2022 - 15:00
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे. हो, तीन दिवसांपूर्वी नेटवर ही बातमी वाचली. कठीण असले तरी अशक्य नाही अर्थात ह्यात सातत्य टिकविण्यासाठी फँटासी उपयोगी पडू शकते. छान माहिती मिळत आहे. मालिका चालू ठेवा.

तर्कवादी Tue, 09/27/2022 - 16:08
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे.
हे कोणत्या वयोगटातील पुरुषांसाठी लागू आहे ?

In reply to by आग्या१९९०

तर्कवादी Tue, 09/27/2022 - 16:19
५०+ वयोगटासाठी २१ वेळा , मग विशीतल्या पुरुषांसाठी किती वेळा ?

In reply to by तर्कवादी

आग्या१९९० Tue, 09/27/2022 - 17:28
प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी, पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची शक्यता जास्त असल्याने हा उपाय. https://www.webmd.com/prostate-cancer/ejaculation-prostate-cancer-risk

In reply to by तर्कवादी

तुर्रमखान Tue, 09/27/2022 - 22:59
५०+ वयोगटासाठी २१ वेळा , मग विशीतल्या पुरुषांसाठी किती वेळा ?
महिन्यातून २१वेळा मैथून केल्यावर विशीतच पन्नाशी येइल त्यामुळे त्यांची काळजी नको. :D

कपिलमुनी Wed, 09/28/2022 - 04:33
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे ये कूच ज्यादा ही है !

सनईचौघडा Wed, 09/28/2022 - 06:27
कसं ज्यादा? त्या औरंग्याच्या जनान्यात ५ हजार स्त्रियां होत्या म्हणजे २१ काय त्यापेक्षा जास्त वेळा रोजचं तो उपभोग घेत असणार. मोजा आता.

सुबोध खरे Wed, 09/28/2022 - 10:51
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे. हे विधान दिशाभूल करणारे आणि सरसकट आहे. जितक्या जास्त वेळेस वीर्यस्खलन केले जाते तितकी प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. कर्करोग हे एकच मानक आहे का स्वास्थ्यासाठी? प्रोस्टॅट ग्रंथीचा दाह, वयाप्रमाणे होणारी ग्रंथीची वाढ (बिनाईन हायपर ट्रॉफी) हे प्रश्न/ रोग कर्करोगापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आहेत. आग्या यांनी दिलेल्या दुव्यात खालील गोष्टी पण दिलेल्या आहेत Basically, the more men ejaculated in a month, the less likely they were to get prostate cancer. Ejaculation doesn’t seem to protect against the most deadly or advanced types of prostate cancer. Not all studies have found a benefit. The 2016 study got attention because of its size (almost 32,000 men) and length (18 years). A few even found that some men, specifically younger men, who masturbated more had slightly higher chances of prostate cancer कमीत कमी २१ वेळा वीर्यस्खलन करण्यासाठी पत्नीची तयारी पाहिजे. म्हणजे ४-५ दिवस पाळीचे सोडले तर महिन्यात जवळ जवळ रोजच अशा किती पत्नी तयार होतील ते सुद्धा कधी तरी पुढच्या ३० वर्षांनी होणाऱ्या कर्करोगाची शक्यता २० % नि कमी करण्यासाठी? ते शक्य नाही म्हणून माणसांनी हस्तमैथुन करायचे? यामुळे पत्नीला आपण कमी पडतो किंवा आपण नवऱ्याला आवडत नाही असा न्यूनगंड येण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे १००० जोडप्यापैकी ५०० जोडप्यात बेबनाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. असे सरसकट विधान करणे टाळावे अशी माझी लेखकास विनंती आहे.

चौकस२१२ Wed, 09/28/2022 - 11:31
डॉक्टर , आपले बाकीचे पटले पण , "लग्न झालेले असताना हस्तमैथुन करणे आणि त्यातून नवरा बायकोत गैरसमजूत होयीलच" हे कसे? जर नीट संवाद असेल दोघांच्यात तर टाळता येईल ! आपण त्याला "सेमी सेमी ओपन रेलशनशिप म्हणूयात हवे तर " असो या सगळ्या संवादात मीपरवरील एक तरी स्त्री सभासद भाष्य करति झलि तर अर्थ ... किंवा कोणी डॉक्टर, स्त्री रोगी काय म्हणतात यावर प्रकाश टाकू शकले तर चर्चा सार्थकी लागेल!

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 12:17
तथाकथित एक्सपर्ट मसाला साईट वरून कॉपी करुन भाषांतर ( हो भाषांतरच्, अनुवाद नाही) करून इथे चिटकवला आहे असं वाटतंय ! उदा.
स्त्री सेक्सला नाही म्हणत असेल तरी पुरूष का दबाब करत असतो?
.. एकंदरीत स्वत: धागाकर्त्याने स्वतःचे विचार मांडलेत असं जाणवत नाही

सनईचौघडा Wed, 09/28/2022 - 13:01
यामुळे पत्नीला आपण कमी पडतो किंवा आपण नवऱ्याला आवडत नाही असा न्यूनगंड येण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे १००० जोडप्यापैकी ५०० जोडप्यात बेबनाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.>>> आणि जर नीट संवाद असेल दोघांच्यात तर टाळता येईल !>>>> काय ति निरागसता? कशाला पाहिजे संवाद? अहो कोणता नवरा पत्नीला सांगतो की अगं आज किनई मी ह. मै. केलंय बर.
लेखनविषय:
सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी 'सरोगेट पार्टनर' म्हणजे असे पुरुष अथवा स्त्री की जे कामजीवनाविषयी प्रशिक्षण घेतलेले असतात व कामशास्त्रज्ञाकडे आलेल्या स्त्री-पुरुषांना कामजीवनाविषयी काहीवेळा प्रत्यक्ष कृती करून शिकवत असतात. स्त्री-पुरुष दोन्ही 'सरोगेट पार्टनर्स' असतात. स्त्री पेशंटसाठी पुरुष व पुरुष पेशंटसाठी स्त्री सरोगेट पार्टनर तयार असतो.LGBT साठी देखील असे सरोगेट ट्रेन केले असतात. प्रत्येकवेळी सेक्स केला जातोच असे नाही.

सेक्स फॉर रेकॉर्डस

राहुल ·

आपले आजचा सुधारक मधील या विषयावरील लेखन त्याकाळी वाचलेले आहे. इथे ही त्याच प्रकारचे वैचारिक व विस्तृत लेखन करु शकता. आपला या क्षेत्रातील भारतीय पार्श्वभूमीवरील अनुभव जरुर मांडावेत.

डॉक्टर तुम्ही फारच बाळबोध लेख लिहित आहात , हे म्हणजे लॉर्ड्स स्टॅडियम वर जाऊन एक टप्पा आऊट क्रिकेट खेळण्यासारखे आहे. =)))) तुम्ही बिनधास्त लिहा हो , इथे मॅच्युअर्ड क्राऊड आहे. हे घ्या तुम्हाला काही फुलटॉस टाकत आहे , जरा सिक्सर बिक्सर मारा >>> वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ - ७५ व्या वर्षी रीतसर इरेकशन येऊ शकते ? रादर ६५-७५ पर्यंत "पिकल्या पानाचा देठ हिरवा" रहावा म्हणुन तरुणपणापासुन काय काळजी घ्यावी ? ६५-७५ व्या वर्षी पुरुषाला कदाचित कामोत्तेजना होईलही पण स्त्रीयांना होऊ शकते ? नसेल होत तर काय करावे ? ६५-७५ व्या वर्षी कोणा नवीन व्यक्तीला पटवणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे ? मग काय ४०-५० व्या वर्षापासुनच "रीटायरमेंट प्लॅनिंग" म्हणुन काही इन्व्हेटमेन्ट करुन ठेवाव्यात काय ? फॅलोपिअन ट्यूब- त्याचा आणि लैंगिक जीवनाचा काय संबंध ? मुळात प्रजोत्पादनाच्या पलीकडे जाऊन निखळ सुखासाठी सुख असे लैंगिक सुख असे लोकांना कधी कळणार ? कर्वेंनी ह्यावर काही लिहिले आहे का ? फॅलोपियन ट्युब पेक्षा जी-स्पॉट वर लिहा तुम्ही. पोर्नोग्राफी- मग ते योग्य की अयोग्य ? तुमचे मत काय ? इथे फार पुर्वी मोठ्ठा गहजब माजला होता पॉर्न आणि नैतिकता ह्या विषयावर त्याची आठवण झाली. तुम्ही तुमची मते मांडा की ह्या विवादास्पद विषयावर. कामसूत्र प्रथम इंग्रजीमध्ये रूपांतरीत- मुळ कामसुत्र अगदी संस्कृत श्लोक आणि मराठी अनुवादासह वाचले असल्याने मी अधिकारवाणीने म्हणु शकतो की - कामसुत्र हा ग्रंथ हिंदु धर्मासारखा आहे . ह्या देशातील बहुतांश लोकांची बौध्दिक कुवत आणि लायकीच नाही तो समजुन घेण्याची. जुडो-ख्रिश्चन मॉरॅलिटिच्या तद्दन बकवास संकल्पनांच्या नादी लागुन आपल्या लोकांनी आपलेच नुकसान करुन घेतले आहे . नुकतेच अंबरनाथ मंदिराबाहेरील शृंगारशिल्पे पाहताना काही ब्लोजॉब्स, काही ४ सम आणि काही चक्क ऑर्जी चे शिल्प निदर्शनास पडले. हजार वर्षांपुर्वी आपल्या पुर्वजांना हे दगडात कोरुन ठेवताना लाज वाटली नाही अन लोकांना नुसते हे काय आहे हे सांगताना लाज वाटते. 'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग- कंडोम म्हणलं की आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आठवते. =)))) बाकी आमच्या मते स्कोर नॉट आऊट हा सगळ्यात परफेक्ट आहे ;) तुमचा आवडता ब्रँड आणि व्हरायटी कोणती ? शिश्नाचे जलद उद्दीपन- हा एक जेन्युईन प्रॉब्लेम आहे , हिप्स डोन्ट लाय अशे शकिराबाईंनी म्हणुन ठेवले असले तरी ते खोटे आहे , डिक डोन्ट लाय हेच सत्य आहे. एखाद्या मुलीला "आपल्याला ती आवडली आहे" हे कळु न देणे हा एक अवघड प्रकार आहे. अशा वेळेला काय करावे ? पुरुषांमध्ये जलद कामपूर्ती- नॉर्मली किति वेळ लागतो अ‍ॅडल्ट पुरुषांना कामपुर्तीला ? आणि स्त्रीयांना किती वेळ लागतो ? - सिक्सरच्या अपेक्षेत !

In reply to by प्रसाद गोडबोले

कानडाऊ योगेशु Sun, 09/25/2022 - 13:59
डॉक्टरसाहेब अंमळ उशीराच आलेत मिपावर. संक्षीसरांच्या जमान्यात आले असते तर रिंग थेअरी फार पुढे गेली असती असे वाटते. डॉक्टरसाहेबांचा एकुण आवेश पाहता मिपावर सेक्स संदर्भात एक वेगळा विभाग ठेवावा लागेल असे वाटते. अथवा तशी सूचना करुन मी आसनस्थ होतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

सुरिया Sun, 09/25/2022 - 14:58
मी आसनस्थ होतो.
. वाव चांगला श्रमपरिहार. बायदवे कुठले आसन त्यातल्या त्यात चांगले म्हणावे योगेश सर?

In reply to by प्रसाद गोडबोले

सनईचौघडा Mon, 09/26/2022 - 07:23
जल्ला डॉ पेक्षा तुझाच गो आभास नाही नाही अभ्यास म्हणतोय मी भारीच गं. तुला मेलीला गं कशाला पाऊणशे वयात कामोत्तेजना हवीये? तु आपलं एक एक ओवीचं एक एक पानभर बैजवार लेख लिही. आम्ही आहोतंच पारायणं करायला. जेष्ठ मिपा नागरिकांना संघ, पुणे बुद्रुक ४०००३०. स्थापना - माघ २०४३. (पळा आता नाहीतर डबल सिक्सर अंगावर येईल)

In reply to by राहुल

आग्या१९९० Sun, 09/25/2022 - 13:41
लोकांना पॉर्न चा अभ्यास नाही. पॉर्नचा सिलॅबस इतका महाप्रचंड की दहा जन्म घेतले तरी अपुरे पडेल नुसती थिअरी वाचायला. प्रॅक्टिकल साठी अजून किती जन्म घ्यावे लागतील हे व्यक्तीसापेक्ष राहील. जगातील सगळे प्राणिमात्र, वनस्पती, द्रव, धातू, वायू, त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, वस्तू काही म्हणजे काही सोडले नाही पॉर्नने. ह्या विषयावर तुम्ही मिपाकरांची परीक्षा घ्याच. अर्थात मिपा संपादक मंडळाच्या परवानगीने.

In reply to by राहुल

कानडाऊ योगेशु Sun, 09/25/2022 - 14:01
डॉक्टरसाहेब थेअरी संदर्भात जर काही किस्से आले तर मजा येईल. मिपावरुन अजुन काही डॉक्टर मंडळी आहेत आणि स्वतःचे अनुभव लिहिण्याची त्यांची विशिष्ठ अशी वाचनीय शैली पण आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

विशिष्ठ अशी वाचनीय शैली >>> हां ना राव . बरेच दिवसात

" मी बोटीवर होतो तेंव्हा "

हे शब्द पाहिले नाहीत मिपावर , फार चुकल्या चुकल्या सारखं होतं. आमच्या काळंचं मिपा राहिलं नाही आता =))))

आपले आजचा सुधारक मधील या विषयावरील लेखन त्याकाळी वाचलेले आहे. इथे ही त्याच प्रकारचे वैचारिक व विस्तृत लेखन करु शकता. आपला या क्षेत्रातील भारतीय पार्श्वभूमीवरील अनुभव जरुर मांडावेत.

डॉक्टर तुम्ही फारच बाळबोध लेख लिहित आहात , हे म्हणजे लॉर्ड्स स्टॅडियम वर जाऊन एक टप्पा आऊट क्रिकेट खेळण्यासारखे आहे. =)))) तुम्ही बिनधास्त लिहा हो , इथे मॅच्युअर्ड क्राऊड आहे. हे घ्या तुम्हाला काही फुलटॉस टाकत आहे , जरा सिक्सर बिक्सर मारा >>> वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ - ७५ व्या वर्षी रीतसर इरेकशन येऊ शकते ? रादर ६५-७५ पर्यंत "पिकल्या पानाचा देठ हिरवा" रहावा म्हणुन तरुणपणापासुन काय काळजी घ्यावी ? ६५-७५ व्या वर्षी पुरुषाला कदाचित कामोत्तेजना होईलही पण स्त्रीयांना होऊ शकते ? नसेल होत तर काय करावे ? ६५-७५ व्या वर्षी कोणा नवीन व्यक्तीला पटवणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे ? मग काय ४०-५० व्या वर्षापासुनच "रीटायरमेंट प्लॅनिंग" म्हणुन काही इन्व्हेटमेन्ट करुन ठेवाव्यात काय ? फॅलोपिअन ट्यूब- त्याचा आणि लैंगिक जीवनाचा काय संबंध ? मुळात प्रजोत्पादनाच्या पलीकडे जाऊन निखळ सुखासाठी सुख असे लैंगिक सुख असे लोकांना कधी कळणार ? कर्वेंनी ह्यावर काही लिहिले आहे का ? फॅलोपियन ट्युब पेक्षा जी-स्पॉट वर लिहा तुम्ही. पोर्नोग्राफी- मग ते योग्य की अयोग्य ? तुमचे मत काय ? इथे फार पुर्वी मोठ्ठा गहजब माजला होता पॉर्न आणि नैतिकता ह्या विषयावर त्याची आठवण झाली. तुम्ही तुमची मते मांडा की ह्या विवादास्पद विषयावर. कामसूत्र प्रथम इंग्रजीमध्ये रूपांतरीत- मुळ कामसुत्र अगदी संस्कृत श्लोक आणि मराठी अनुवादासह वाचले असल्याने मी अधिकारवाणीने म्हणु शकतो की - कामसुत्र हा ग्रंथ हिंदु धर्मासारखा आहे . ह्या देशातील बहुतांश लोकांची बौध्दिक कुवत आणि लायकीच नाही तो समजुन घेण्याची. जुडो-ख्रिश्चन मॉरॅलिटिच्या तद्दन बकवास संकल्पनांच्या नादी लागुन आपल्या लोकांनी आपलेच नुकसान करुन घेतले आहे . नुकतेच अंबरनाथ मंदिराबाहेरील शृंगारशिल्पे पाहताना काही ब्लोजॉब्स, काही ४ सम आणि काही चक्क ऑर्जी चे शिल्प निदर्शनास पडले. हजार वर्षांपुर्वी आपल्या पुर्वजांना हे दगडात कोरुन ठेवताना लाज वाटली नाही अन लोकांना नुसते हे काय आहे हे सांगताना लाज वाटते. 'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग- कंडोम म्हणलं की आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आठवते. =)))) बाकी आमच्या मते स्कोर नॉट आऊट हा सगळ्यात परफेक्ट आहे ;) तुमचा आवडता ब्रँड आणि व्हरायटी कोणती ? शिश्नाचे जलद उद्दीपन- हा एक जेन्युईन प्रॉब्लेम आहे , हिप्स डोन्ट लाय अशे शकिराबाईंनी म्हणुन ठेवले असले तरी ते खोटे आहे , डिक डोन्ट लाय हेच सत्य आहे. एखाद्या मुलीला "आपल्याला ती आवडली आहे" हे कळु न देणे हा एक अवघड प्रकार आहे. अशा वेळेला काय करावे ? पुरुषांमध्ये जलद कामपूर्ती- नॉर्मली किति वेळ लागतो अ‍ॅडल्ट पुरुषांना कामपुर्तीला ? आणि स्त्रीयांना किती वेळ लागतो ? - सिक्सरच्या अपेक्षेत !

In reply to by प्रसाद गोडबोले

कानडाऊ योगेशु Sun, 09/25/2022 - 13:59
डॉक्टरसाहेब अंमळ उशीराच आलेत मिपावर. संक्षीसरांच्या जमान्यात आले असते तर रिंग थेअरी फार पुढे गेली असती असे वाटते. डॉक्टरसाहेबांचा एकुण आवेश पाहता मिपावर सेक्स संदर्भात एक वेगळा विभाग ठेवावा लागेल असे वाटते. अथवा तशी सूचना करुन मी आसनस्थ होतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

सुरिया Sun, 09/25/2022 - 14:58
मी आसनस्थ होतो.
. वाव चांगला श्रमपरिहार. बायदवे कुठले आसन त्यातल्या त्यात चांगले म्हणावे योगेश सर?

In reply to by प्रसाद गोडबोले

सनईचौघडा Mon, 09/26/2022 - 07:23
जल्ला डॉ पेक्षा तुझाच गो आभास नाही नाही अभ्यास म्हणतोय मी भारीच गं. तुला मेलीला गं कशाला पाऊणशे वयात कामोत्तेजना हवीये? तु आपलं एक एक ओवीचं एक एक पानभर बैजवार लेख लिही. आम्ही आहोतंच पारायणं करायला. जेष्ठ मिपा नागरिकांना संघ, पुणे बुद्रुक ४०००३०. स्थापना - माघ २०४३. (पळा आता नाहीतर डबल सिक्सर अंगावर येईल)

In reply to by राहुल

आग्या१९९० Sun, 09/25/2022 - 13:41
लोकांना पॉर्न चा अभ्यास नाही. पॉर्नचा सिलॅबस इतका महाप्रचंड की दहा जन्म घेतले तरी अपुरे पडेल नुसती थिअरी वाचायला. प्रॅक्टिकल साठी अजून किती जन्म घ्यावे लागतील हे व्यक्तीसापेक्ष राहील. जगातील सगळे प्राणिमात्र, वनस्पती, द्रव, धातू, वायू, त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, वस्तू काही म्हणजे काही सोडले नाही पॉर्नने. ह्या विषयावर तुम्ही मिपाकरांची परीक्षा घ्याच. अर्थात मिपा संपादक मंडळाच्या परवानगीने.

In reply to by राहुल

कानडाऊ योगेशु Sun, 09/25/2022 - 14:01
डॉक्टरसाहेब थेअरी संदर्भात जर काही किस्से आले तर मजा येईल. मिपावरुन अजुन काही डॉक्टर मंडळी आहेत आणि स्वतःचे अनुभव लिहिण्याची त्यांची विशिष्ठ अशी वाचनीय शैली पण आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

विशिष्ठ अशी वाचनीय शैली >>> हां ना राव . बरेच दिवसात

" मी बोटीवर होतो तेंव्हा "

हे शब्द पाहिले नाहीत मिपावर , फार चुकल्या चुकल्या सारखं होतं. आमच्या काळंचं मिपा राहिलं नाही आता =))))
लेखनविषय:
वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते. ◼फॅलोपिअन ट्यूब- फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली.

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

पाषाणभेद ·

विनोदपुनेकर Wed, 09/14/2022 - 16:38
वाफेवर चहा, हवेत गाडि हे असले काहि बाहि विपरित एक्न्याचि सवय झालि आहे गुरुपासुन २०१४ ला आलेत तेव्हापासुन त्यात गड्करि साहेब आपन पन सामिल व्हा गरिब बिचारि प्रजा

विवेकपटाईत Wed, 09/14/2022 - 17:17
माझ्या सरकारी नोकरीचा शेवटचा काळ परिवहन मंत्रालयात गेला. माननीय गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही.

श्रीगुरुजी Wed, 09/14/2022 - 17:28
गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही. पुणे-सातारा महामार्ग लवकरच व्यवस्थित होईल असे गडकरींनी अनेकदा आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्येक वर्षी या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे व टोल प्रचंड वाढत चाललाय. पुणे-मुंबई महामार्गावरील चांदणी चौकात पूर्ण राडा झाला आहे. हे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि भविष्यात किमान ५ वर्षे हा रस्ता व्यवस्थित होण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Sat, 09/17/2022 - 13:41
पुणे सातारा रस्त्याबद्दल सहमत. गडकरी खूप वेळा अतिशय अतिशयोक्तीपूर्ण बोलतात. पुणे बंगलोर अंतर अवघ्या ४ तासात कापता येईल, रस्त्यांची कामे नीट न केल्यास कंत्राटदाराला बुलडोझरखाली चिरडू, २०२४ च्या निवडणूकीपूर्वी भारतातील रस्ते अमेरीकेतल्या रस्त्यांसारखे असतील, उडणारी बस वगैरे वगैरे त्यांची काही अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्ये. पुणे सातारा अथवा मुंबई गोवा महामार्गाची कामे ईतकी रखडलीत व दर्जाहीन होत असून सुध्दा कुणा कंत्राटदारावर काही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. नुसतीच तोंडाची वाफ दवडणे चालू आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Sat, 09/17/2022 - 14:02
गडकरींनी ४-५ महिन्यांपूर्वी लोकसभेत दिलेले अजून एक आश्वासन म्हणजे पुढील १२ महिन्यांच्या आत भारतातील सर्व टोलनाके बंद होऊन सर्वत्र fast tag वापर सुरू होईल. तसे होण्याची शक्यता अजून तरी दिसते नाही.

स्वधर्म Wed, 09/14/2022 - 17:29
पण खरोखरच हा विषय अत्यंत महत्वाचा आणि तितक्याच चुकीच्या पध्दतीने हाताळला जात आहे, असे वाटते. सरकार कोणतेही असो, परिवहन धोरण हे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देणारे असण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त कंत्राटे, जास्तीत जास्त प्रकल्प, त्यातून जास्तीत जास्त मलई, जास्तीत जास्त वाहनांचा खप, टोल कंपन्या यांच्यासाठीच काम करते असे वाटते. एसटी चा संप आणि तिची सध्याची अवस्था हा याचा ढळढळीत पुरावाच.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर Wed, 09/14/2022 - 18:06
+१००० शब्दा शब्दाशी सहमत आहे! तसेच महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादन करताना सरकारी भावापेक्षा कितीतरी अधिक दर देउन त्या मार्गांवरच्या जमीनींचे भाव अव्वाच्या साव्वा वाढवण्यातुन फार मोठ्या घोटाळ्याचा संशय येतो आहे. ह्या आणि अशा अनेक उपदव्यापांमुळे भविष्यात कधीतरी (चुकुन माकुन सत्तापालट झाल्यास) गडकरींना ईडी चौकशीला सामोरे जावे लागल्यास मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही. असो, गंभीर विषय विनोदी पद्धतीने चांगला हाताळला आहेत पाभे 👍

In reply to by टर्मीनेटर

मनो गुरुवार, 09/15/2022 - 08:18
आता पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्ग होणार, तो आपल्याच जमिनीतून जावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. पावसाचे निमित्त करून महामार्ग फलटण, खटाव या अविकसित दुष्काळी भागातून जावा असे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या निवडणुकीची सोय नाहीतर कशी होणार?

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Fri, 09/16/2022 - 09:54
गेल्या आठ वर्षांतील बदल डोळ्यांनी स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हिमाचल उत्तराखंड इथल्या रस्त्यांचा अनुभव हेच सांगतो. पूर्वी नागपुर चंद्रपूर पूर्वी बसला सहा ते सात तास लगायचे आता तीन तास बस घेते. बाकी महाराष्ट्रात काम करणे कठीण आहे, हे ही खरे. (एक अभियंताने मला सहज म्हंटले होते, महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट).

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा Sat, 09/17/2022 - 13:10
"महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट" +१ - आवडलेले वाक्य

तिता Wed, 09/14/2022 - 17:54
मला हा लेख उपरोधिक आहे का खरेच गडकरी असे बोलले हे समजले नाही. विनोदी असेल तर अतिशयोक्ती फार आहे. खरे असेल तर .... माझी समज कमी आहे.

विजुभाऊ Wed, 09/14/2022 - 18:45
मिस्त्री ंच्या निधनानंतर गडकरींनी मागच्या सीटवरील लोकाम्ना सीट बेल्ट सक्तीचा केला . .सीट बेल्ट कम्पल्सरी म्हणजे पोलीसांना वसुलीचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. पण त्या अगोदर चुकीचा डिव्हायडर , खड्डे असलेले रस्ते यांना जबाबदार लोकांना काहीच केले नाही. रस्त्यावर ओसंडून वाहणारे ट्रक चालक आणि मालक यांना काहीच करणार नाहीत , हायवेवरून उजव्या लेन मधला रस्ता आडवून अवजड ट्रक चालवणारे इंडीकेटर नसलेले , बांधकामाच्या सळ्या चारचार फूट बाहेर आणत वाहुन नेणारे ट्रक जुने, खिळखिळे झालेले तरीही वाहतूक करणारे ट्रक याना कोण शासन करणार?

सामान्य माणसाला या खड्डेयुक्त रस्त्यावरुन गाडी चालविल्याशिवाय पर्याय आहे का? १.रस्ते अपघातात "खड्डे चुकविण्यामधे अपघाती मृत्यु " या कारणामुळे यावर्षी ८ जण मरण पावले आहेत. शेवटचा मृत्यु कल्याण जवळील शहाड पुलावर झाला आहे. नोंदले न गेलेले कितीतरी असतील. २. गणपती जाउन आठवडा होत आला तरी गल्लोगल्ली मंडप रस्ते अडवुन उभेच आहेत. आधीच लहान असलेल्या गल्ल्यांमध्ये शाळा भरण्या सुटण्याच्या वेळी जी काही गर्दी आणि ट्रॅफिक जॅम होते ते बघुन हताश व्हायला होते. ३. पुण्यात चांदणी चौक म्हणजे तर भलताच विनोदी विषय झालाय. ऑफिसमधुन घरी येताना किमान २ कि. मी. अलीकडेपासुन बंपर टु बंपर गाडी चालवायला लागते. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांना त्याचा फटका बसल्याने आता मात्र तिकडे अरुंद पूल पाडण्याची जोरदार तयारी चालु आहे. ४. पुणे-सातारा मार्ग-- आपण फक्त टोल भरण्यासाठीच जन्मलो आहोत, त्याबदल्यात काही सुविधा वगैरे मिळाव्यात अशी अपेक्षाच करणे चुक आहे. ५. पुणे-नगर मार्ग म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे असा धागा मिपावर आल्याच्या दुसर्‍याच दिवशी तिथे एक मोठा अपघात होउन एकाच कुटुंबातील ४ जण गेले. ६. सायरस मिस्त्रींचा अपघात झाल्याने मुंबई वलसाड महामार्ग लवकरच सुधारेल असे वाटते. ७. कायप्पावरील विनोद- एखादा नेता किवा मोठा माणुस मेल्याशिवाय रस्त्यांचे भाग्य उजळत नाही, त्यामुळे आता कोकणवासी लोकांनी मुंबई-गोवा महामार्ग लवकर नीट व्हावा म्हणुन नेते मंडळींना "येवा कोकण आपलाच असा" अशी हाक मारली आहे. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

श्रीगुरुजी Wed, 09/14/2022 - 20:28
परवा पुण्यातून कात्रजमार्गे लवळेला जाताना चांदणी चौकाच्या अलिकडे १ किमी पासून वाहतूक खोळंबा सुरू झाला. ते १ किमी अंतर काटण्यास २० मिनिटे लागली. त्यामुळे लवळेतून पुण्यात येतान महामार्ग टाळण्यासाठी सूसवरून पाषाण-सुतारवाडीकडे जाण्यासाठी महामार्गाच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून गेललो. दिशेचा अंदाज घेत पाषाण, सुतारवाडी, NCL, ARDE वरून अभिमानश्री सोसायटीतून बाणेर रस्त्यावर येऊन विद्यापीठाच्या चौकात आल्यावर पहिला सिग्नल लागला. येथपर्यंत सर्व.रस्ते चांगले रूंद असून अत्यंत तुरळक गर्दी होती. नंतर विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता येथेही तुरळक गर्दी होती (रविवार असल्याने गर्दी कमी असावी). लवळेहून येताना परत महामार्ग पकडून चांदणी चौकातून आलो असतो तर दुप्पट वेळ लागला असता. आता लवळेला जाताना व येताना पाषाणमार्गेच जाणार आहे ज्यामुळे महामार्ग टाळता येईल. ५ वर्षांनंतर सुद्धा चांदणी चौकातील काम अपूर्ण आहे व पुढील ५ वर्षे तरी ते पूर्ण होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Wed, 09/14/2022 - 23:12
आणि फलंदाजाने मिड ऑन मधल्या क्षेत्ररक्षणात असलेले अंतर पाहून चेंडू जोरदार टोलवला व सरळ चार धावा. पुणेरी पलटण विजयाच्या टप्यात.

In reply to by श्रीगुरुजी

सतिश गावडे गुरुवार, 09/15/2022 - 21:07
तुमचा परतीचा मार्ग या भागात दिवसा फिरायचे झाल्यास मी नेहमी वापरतो. विना रहदारी, विना सिग्नल रस्ता. मात्र रात्री हा रस्ता निर्मनुष्य होत असावा त्यामुळे सुरक्षित नसावा.

आनन्दा गुरुवार, 09/15/2022 - 18:53
लेख आवडला.. भारी जमला आहे. बाकी गडकरी मला आवडतात, पण म्हणून या लेखातल्या गोष्टी खोट्या आहेत असे मी म्हणणार नाही.. यावर्षी गणपतीत मी पुणे कोल्हापूर प्रवास केला, सातारा रोड चे खड्डे मला तरी कुठे मिळाले नाहीत. गुरुजींना कुठे दिसतायत देव जाणे. चांदणी चौकबद्दल ना बोलणे चांगले.. मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन, त्याला पण चांदणीचौक पेक्षा कमी वेळ लागेल.. बऱ्याच वेळा तिथे एक दीड तास अडकलेला आहे.. 40 मिनीटापेक्षा कमी वेळ लागला तर मी त्याला फाऊल मानतो

In reply to by आनन्दा

सतिश गावडे गुरुवार, 09/15/2022 - 21:04
मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन
या रस्त्यात उजव्या निळकंठेश्र्वर मंदिराची टेकडी लागेल का?

धर्मराजमुटके गुरुवार, 09/15/2022 - 23:46
पुढच्या टप्यात पोटातून निर्माण होणार्‍या गॅस वर चालणार्‍या गाडया पण आणण्याची घोषणा केली गेली तर नवल वाटणार नाही.

विनोदपुनेकर Wed, 09/14/2022 - 16:38
वाफेवर चहा, हवेत गाडि हे असले काहि बाहि विपरित एक्न्याचि सवय झालि आहे गुरुपासुन २०१४ ला आलेत तेव्हापासुन त्यात गड्करि साहेब आपन पन सामिल व्हा गरिब बिचारि प्रजा

विवेकपटाईत Wed, 09/14/2022 - 17:17
माझ्या सरकारी नोकरीचा शेवटचा काळ परिवहन मंत्रालयात गेला. माननीय गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही.

श्रीगुरुजी Wed, 09/14/2022 - 17:28
गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही. पुणे-सातारा महामार्ग लवकरच व्यवस्थित होईल असे गडकरींनी अनेकदा आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्येक वर्षी या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे व टोल प्रचंड वाढत चाललाय. पुणे-मुंबई महामार्गावरील चांदणी चौकात पूर्ण राडा झाला आहे. हे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि भविष्यात किमान ५ वर्षे हा रस्ता व्यवस्थित होण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Sat, 09/17/2022 - 13:41
पुणे सातारा रस्त्याबद्दल सहमत. गडकरी खूप वेळा अतिशय अतिशयोक्तीपूर्ण बोलतात. पुणे बंगलोर अंतर अवघ्या ४ तासात कापता येईल, रस्त्यांची कामे नीट न केल्यास कंत्राटदाराला बुलडोझरखाली चिरडू, २०२४ च्या निवडणूकीपूर्वी भारतातील रस्ते अमेरीकेतल्या रस्त्यांसारखे असतील, उडणारी बस वगैरे वगैरे त्यांची काही अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्ये. पुणे सातारा अथवा मुंबई गोवा महामार्गाची कामे ईतकी रखडलीत व दर्जाहीन होत असून सुध्दा कुणा कंत्राटदारावर काही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. नुसतीच तोंडाची वाफ दवडणे चालू आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Sat, 09/17/2022 - 14:02
गडकरींनी ४-५ महिन्यांपूर्वी लोकसभेत दिलेले अजून एक आश्वासन म्हणजे पुढील १२ महिन्यांच्या आत भारतातील सर्व टोलनाके बंद होऊन सर्वत्र fast tag वापर सुरू होईल. तसे होण्याची शक्यता अजून तरी दिसते नाही.

स्वधर्म Wed, 09/14/2022 - 17:29
पण खरोखरच हा विषय अत्यंत महत्वाचा आणि तितक्याच चुकीच्या पध्दतीने हाताळला जात आहे, असे वाटते. सरकार कोणतेही असो, परिवहन धोरण हे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देणारे असण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त कंत्राटे, जास्तीत जास्त प्रकल्प, त्यातून जास्तीत जास्त मलई, जास्तीत जास्त वाहनांचा खप, टोल कंपन्या यांच्यासाठीच काम करते असे वाटते. एसटी चा संप आणि तिची सध्याची अवस्था हा याचा ढळढळीत पुरावाच.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर Wed, 09/14/2022 - 18:06
+१००० शब्दा शब्दाशी सहमत आहे! तसेच महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादन करताना सरकारी भावापेक्षा कितीतरी अधिक दर देउन त्या मार्गांवरच्या जमीनींचे भाव अव्वाच्या साव्वा वाढवण्यातुन फार मोठ्या घोटाळ्याचा संशय येतो आहे. ह्या आणि अशा अनेक उपदव्यापांमुळे भविष्यात कधीतरी (चुकुन माकुन सत्तापालट झाल्यास) गडकरींना ईडी चौकशीला सामोरे जावे लागल्यास मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही. असो, गंभीर विषय विनोदी पद्धतीने चांगला हाताळला आहेत पाभे 👍

In reply to by टर्मीनेटर

मनो गुरुवार, 09/15/2022 - 08:18
आता पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्ग होणार, तो आपल्याच जमिनीतून जावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. पावसाचे निमित्त करून महामार्ग फलटण, खटाव या अविकसित दुष्काळी भागातून जावा असे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या निवडणुकीची सोय नाहीतर कशी होणार?

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Fri, 09/16/2022 - 09:54
गेल्या आठ वर्षांतील बदल डोळ्यांनी स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हिमाचल उत्तराखंड इथल्या रस्त्यांचा अनुभव हेच सांगतो. पूर्वी नागपुर चंद्रपूर पूर्वी बसला सहा ते सात तास लगायचे आता तीन तास बस घेते. बाकी महाराष्ट्रात काम करणे कठीण आहे, हे ही खरे. (एक अभियंताने मला सहज म्हंटले होते, महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट).

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा Sat, 09/17/2022 - 13:10
"महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट" +१ - आवडलेले वाक्य

तिता Wed, 09/14/2022 - 17:54
मला हा लेख उपरोधिक आहे का खरेच गडकरी असे बोलले हे समजले नाही. विनोदी असेल तर अतिशयोक्ती फार आहे. खरे असेल तर .... माझी समज कमी आहे.

विजुभाऊ Wed, 09/14/2022 - 18:45
मिस्त्री ंच्या निधनानंतर गडकरींनी मागच्या सीटवरील लोकाम्ना सीट बेल्ट सक्तीचा केला . .सीट बेल्ट कम्पल्सरी म्हणजे पोलीसांना वसुलीचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. पण त्या अगोदर चुकीचा डिव्हायडर , खड्डे असलेले रस्ते यांना जबाबदार लोकांना काहीच केले नाही. रस्त्यावर ओसंडून वाहणारे ट्रक चालक आणि मालक यांना काहीच करणार नाहीत , हायवेवरून उजव्या लेन मधला रस्ता आडवून अवजड ट्रक चालवणारे इंडीकेटर नसलेले , बांधकामाच्या सळ्या चारचार फूट बाहेर आणत वाहुन नेणारे ट्रक जुने, खिळखिळे झालेले तरीही वाहतूक करणारे ट्रक याना कोण शासन करणार?

सामान्य माणसाला या खड्डेयुक्त रस्त्यावरुन गाडी चालविल्याशिवाय पर्याय आहे का? १.रस्ते अपघातात "खड्डे चुकविण्यामधे अपघाती मृत्यु " या कारणामुळे यावर्षी ८ जण मरण पावले आहेत. शेवटचा मृत्यु कल्याण जवळील शहाड पुलावर झाला आहे. नोंदले न गेलेले कितीतरी असतील. २. गणपती जाउन आठवडा होत आला तरी गल्लोगल्ली मंडप रस्ते अडवुन उभेच आहेत. आधीच लहान असलेल्या गल्ल्यांमध्ये शाळा भरण्या सुटण्याच्या वेळी जी काही गर्दी आणि ट्रॅफिक जॅम होते ते बघुन हताश व्हायला होते. ३. पुण्यात चांदणी चौक म्हणजे तर भलताच विनोदी विषय झालाय. ऑफिसमधुन घरी येताना किमान २ कि. मी. अलीकडेपासुन बंपर टु बंपर गाडी चालवायला लागते. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांना त्याचा फटका बसल्याने आता मात्र तिकडे अरुंद पूल पाडण्याची जोरदार तयारी चालु आहे. ४. पुणे-सातारा मार्ग-- आपण फक्त टोल भरण्यासाठीच जन्मलो आहोत, त्याबदल्यात काही सुविधा वगैरे मिळाव्यात अशी अपेक्षाच करणे चुक आहे. ५. पुणे-नगर मार्ग म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे असा धागा मिपावर आल्याच्या दुसर्‍याच दिवशी तिथे एक मोठा अपघात होउन एकाच कुटुंबातील ४ जण गेले. ६. सायरस मिस्त्रींचा अपघात झाल्याने मुंबई वलसाड महामार्ग लवकरच सुधारेल असे वाटते. ७. कायप्पावरील विनोद- एखादा नेता किवा मोठा माणुस मेल्याशिवाय रस्त्यांचे भाग्य उजळत नाही, त्यामुळे आता कोकणवासी लोकांनी मुंबई-गोवा महामार्ग लवकर नीट व्हावा म्हणुन नेते मंडळींना "येवा कोकण आपलाच असा" अशी हाक मारली आहे. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

श्रीगुरुजी Wed, 09/14/2022 - 20:28
परवा पुण्यातून कात्रजमार्गे लवळेला जाताना चांदणी चौकाच्या अलिकडे १ किमी पासून वाहतूक खोळंबा सुरू झाला. ते १ किमी अंतर काटण्यास २० मिनिटे लागली. त्यामुळे लवळेतून पुण्यात येतान महामार्ग टाळण्यासाठी सूसवरून पाषाण-सुतारवाडीकडे जाण्यासाठी महामार्गाच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून गेललो. दिशेचा अंदाज घेत पाषाण, सुतारवाडी, NCL, ARDE वरून अभिमानश्री सोसायटीतून बाणेर रस्त्यावर येऊन विद्यापीठाच्या चौकात आल्यावर पहिला सिग्नल लागला. येथपर्यंत सर्व.रस्ते चांगले रूंद असून अत्यंत तुरळक गर्दी होती. नंतर विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता येथेही तुरळक गर्दी होती (रविवार असल्याने गर्दी कमी असावी). लवळेहून येताना परत महामार्ग पकडून चांदणी चौकातून आलो असतो तर दुप्पट वेळ लागला असता. आता लवळेला जाताना व येताना पाषाणमार्गेच जाणार आहे ज्यामुळे महामार्ग टाळता येईल. ५ वर्षांनंतर सुद्धा चांदणी चौकातील काम अपूर्ण आहे व पुढील ५ वर्षे तरी ते पूर्ण होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Wed, 09/14/2022 - 23:12
आणि फलंदाजाने मिड ऑन मधल्या क्षेत्ररक्षणात असलेले अंतर पाहून चेंडू जोरदार टोलवला व सरळ चार धावा. पुणेरी पलटण विजयाच्या टप्यात.

In reply to by श्रीगुरुजी

सतिश गावडे गुरुवार, 09/15/2022 - 21:07
तुमचा परतीचा मार्ग या भागात दिवसा फिरायचे झाल्यास मी नेहमी वापरतो. विना रहदारी, विना सिग्नल रस्ता. मात्र रात्री हा रस्ता निर्मनुष्य होत असावा त्यामुळे सुरक्षित नसावा.

आनन्दा गुरुवार, 09/15/2022 - 18:53
लेख आवडला.. भारी जमला आहे. बाकी गडकरी मला आवडतात, पण म्हणून या लेखातल्या गोष्टी खोट्या आहेत असे मी म्हणणार नाही.. यावर्षी गणपतीत मी पुणे कोल्हापूर प्रवास केला, सातारा रोड चे खड्डे मला तरी कुठे मिळाले नाहीत. गुरुजींना कुठे दिसतायत देव जाणे. चांदणी चौकबद्दल ना बोलणे चांगले.. मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन, त्याला पण चांदणीचौक पेक्षा कमी वेळ लागेल.. बऱ्याच वेळा तिथे एक दीड तास अडकलेला आहे.. 40 मिनीटापेक्षा कमी वेळ लागला तर मी त्याला फाऊल मानतो

In reply to by आनन्दा

सतिश गावडे गुरुवार, 09/15/2022 - 21:04
मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन
या रस्त्यात उजव्या निळकंठेश्र्वर मंदिराची टेकडी लागेल का?

धर्मराजमुटके गुरुवार, 09/15/2022 - 23:46
पुढच्या टप्यात पोटातून निर्माण होणार्‍या गॅस वर चालणार्‍या गाडया पण आणण्याची घोषणा केली गेली तर नवल वाटणार नाही.
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

अनुनाद ·

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह Mon, 09/05/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद Tue, 09/06/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो Tue, 09/06/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड Tue, 09/06/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो Tue, 09/06/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह Tue, 09/06/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड Sun, 09/04/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

धर्मराजमुटके Sun, 09/04/2022 - 22:47
मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

कंजूस Mon, 09/05/2022 - 02:02
नारायण धारपांच्या पुस्तकांची नोंद केली आहे. वाचून पाहेन. इंग्रजी लेखकांची कमी वाचलीत. ज्यूलस वर्नी मात्र आवडला.

कर्नलतपस्वी Mon, 09/05/2022 - 07:44
लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत Mon, 09/05/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ Mon, 09/05/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो Mon, 09/05/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो Mon, 09/05/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm Tue, 09/06/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm Tue, 09/06/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो Tue, 09/06/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti Tue, 09/06/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

In reply to by Bhakti

स्वधर्म Tue, 09/06/2022 - 15:20
धारप यांची ही दीर्घकथा पहिल्यांदा वाचा असे सुचवतो. विज्ञानकथा नाही, भयकथाच आहे; पण धारप ही काय चीज होती, हे समजेल.

अनुनाद Tue, 09/06/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म Tue, 09/06/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद Wed, 09/07/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह Mon, 09/05/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद Tue, 09/06/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो Tue, 09/06/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड Tue, 09/06/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो Tue, 09/06/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह Tue, 09/06/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड Sun, 09/04/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

धर्मराजमुटके Sun, 09/04/2022 - 22:47
मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद Mon, 09/05/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

कंजूस Mon, 09/05/2022 - 02:02
नारायण धारपांच्या पुस्तकांची नोंद केली आहे. वाचून पाहेन. इंग्रजी लेखकांची कमी वाचलीत. ज्यूलस वर्नी मात्र आवडला.

कर्नलतपस्वी Mon, 09/05/2022 - 07:44
लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत Mon, 09/05/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ Mon, 09/05/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद Tue, 09/06/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो Mon, 09/05/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी Mon, 09/05/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो Mon, 09/05/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm Tue, 09/06/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm Tue, 09/06/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो Tue, 09/06/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti Tue, 09/06/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

In reply to by Bhakti

स्वधर्म Tue, 09/06/2022 - 15:20
धारप यांची ही दीर्घकथा पहिल्यांदा वाचा असे सुचवतो. विज्ञानकथा नाही, भयकथाच आहे; पण धारप ही काय चीज होती, हे समजेल.

अनुनाद Tue, 09/06/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म Tue, 09/06/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद Wed, 09/07/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.