Skip to main content

राजकारण

भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय ?

लेखक गामा पैलवान यांनी शनिवार, 15/08/2026 02:56 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळालं. तर हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी माझ्या मनांत थोडाबहुत संभ्रम आहे. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हा लेख लिहितो आहे. स्वातंत्र्यासोबत फाळणीही झाली. त्यामुळे तिचा विचारही आपोआप होणार. तर मुद्द्याला हात घालूया.

झुरळपक्ष आंदोलनामागील शक्तींची कार्यप्रणाली

लेखक गामा पैलवान यांनी गुरुवार, 06/08/2026 01:08 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

झुरळ्या पक्षाने नव्या दिल्लीत जंतरमंतरवर नुकत्याच जुलै अखेरीस केलेल्या आंदोलनाच्या मागील शक्ती कशा प्रकारे काम करतात यांविषयी दोन चलचित्रे पाहण्यात आली. म्हंटलं की यावर एक स्वतंत्र लेखंच लिहायला हवा. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असलं तरी त्यांत इतर अवांछित शक्ती घुसल्या आहेत. हे वेगळे सांगणे नलगे. मात्र या शक्ती नेमक्या कशा काम करतात यावर स्वाती तोरसेकरांनी बराच प्रकाशझोत टाकला आहे. त्यात माझी अधिकची माहिती मिळवून लेख लिहिला आहे. तर मुद्द्यांकडे वळूया.

धर्म, लोकशाही आणि आग

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 23/07/2026 18:02 या दिवशी प्रकाशित केले.

मी 'मुलगा' आहे. मी भारतीय आहे. मी 'हिंदू' आहे. मी 'मराठी' आहे. मी 'एका' राजकीय पक्षाचा पाठीराखा आहे. माझ्यात थोडा माणूसही बाकी आहे. तो माणूस आता संपत चालला आहे...

यातले मुलगा, हिंदू आणि मराठी या ऐवजी जे तुम्हाला लागू होतील असे शब्द टाकले की वरील उतारा ही तुमची सुद्धा ओळख असू शकते.

पेपर फुटला, व्यवस्था सावरली मग आंदोलन कशासाठी?

लेखक झालमुरी यांनी गुरुवार, 23/07/2026 15:57 या दिवशी प्रकाशित केले.

भारतात दरवर्षी वीस लाखांहून अधिक विद्यार्थी एका परीक्षेला बसतात. नीट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी हा एक आयुष्यातला निर्णायक क्षण असतो. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर, म्हणजे एनटीएवर असते.

यावर्षी या प्रक्रियेत मोठीच भानगड झाली. नीटचा पेपर फुटला.

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

कुंपण

लेखक रांचो यांनी शुक्रवार, 23/01/2026 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 21/07/2025 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 06/06/2025 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 15/04/2025 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे