मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विसर

आनंदमयी ·
लेखनविषय:
भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव आता तुला गाठायचा आहे तुझा गाव आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ हरवुदे वाट आडवळणी खट्याळ खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा तुला-मला जोडणारा तोड आता धागा नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू जायचीच निसटून हातातली वाळू सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा... राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून ..... -अ

थोड positive थोड negative

मालविका ·

पाषाणभेद Mon, 04/28/2014 - 00:57
मी पयला. फारच छान. असे धैर्य पाहीजे. अशा माणसांना चांगली अद्दल घडवली पाहीजे.

श्रीगुरुजी Tue, 04/29/2014 - 14:48
चांगला लेख! प्रवासात गैरफायदा घेऊन स्त्रियांना त्रास देणार्‍या विकृतांना चांगली अद्दल घडविलीत. नुसत्या नखांनी ओरबाडण्यापेक्षा नेलकटर किंवा पिन जोरात टोचायला हवी होती.

In reply to by श्रीगुरुजी

दिव्यश्री Tue, 04/29/2014 - 15:24
+++ १ . माझ्या एका मैत्रिणी ने सहाआसनी गाडीमध्ये हा प्रयोग केला होता . ती व्यक्ती ५ मिनिटात गाडीतून खाली उतरली . सर्वशक्तीनिशी तिने पिन टोचली होती कदाचित रक्तही आलं असेल . अशा माणसाना सोडता कामा नये . एका वेळेस सुटले तर पुढे नक्कीच ते असा प्रयत्न करणार . ८-१० वर्षाच्या रोजच्या प्रवासात घडलेले बरेच किस्से आहेत . आपले आपणच धाडस केले पाहिजे . बऱ्याच वेळा मुली घाबरतात आणि अशा हलकटांचे फावते . एक मुलगी अक्षरशः रडली होती बस मध्ये . तशी लहान होती बिचारी घरारून गेलेली . तो बेशरम उतरून गेल्यावर बोलली आधीच बोलली असती तर काहीतरी करता आलं असत . याला कोणी अपवाद नाही अगदी सुशिक्षित लोकांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत . म्हातारे जास्त नालायक असतात कारण वयामुळे कोणी संशय घेणार नाही असे त्यांना वाटते / खात्रीच असते . एकवेळ तरुण परवडले पण म्हातारे नाही . तरुण माणसांना चांगलच माहिती असत गडबड केली तर आपणच बदडून निघू म्हणून तरी ते गप्प बसतात . असो . नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच असतात . कोणीही लगेच याचा उपयोग करून मनोरंजन करू नये . धन्यवाद .

In reply to by दिव्यश्री

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 18:50
नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच असतात . कोणीही लगेच याचा उपयोग करून मनोरंजन करू नये . धन्यवाद .
तुमच्या कल्पना शक्तिची खिल्ली उडवली नसती जर किमान सोदाहरण हे वाक्य मांडले असते. आता मात्र अतिशय कीव येतेय. धिक्कार असो.

In reply to by आत्मशून्य

दिव्यश्री Wed, 04/30/2014 - 12:39
चला प्रतिसाद देण्याचे अगदी सार्थक झाले . उदाहरण मीच द्यायला हवे असे आहे का ? अहो जर डोळस पणे वावरल कि कैक उदाहरणे सापडतील . मला जर कोणी सांगेल का कि मिपावर काही लोकाना इतर सदस्यांची अक्कल / बुद्धी / संस्कार / कल्पनाशक्ती आणि अजून काही काढण्याचे लायसन दिलेय का पेशल ??? इथे मी कोणाला उद्देशून लिहील नाही पण बर्याच वेळा मी पाहिलं आहे काही आयडी सर्रास या गोष्टी करत असतात . आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही कि या प्रकारात आपल्याही बर्याच गोष्टी निघतात . जस एक बोट दुसर्याकडे केल तर आपल्याकडे काही बोटे येतात . गळ्यात माळ पोटात काळ , साठी बुद्धी नाठी असंही असतच कि पण म्हणून याचा अर्थ असा नाही की सगळे लोक तसेच असतात . उडदामाजी काळेगोरे . सुदैवाने, अर्थातच माझ्या माझी कोणी कीव करावी अशी वेळ अजून पर्यंत ना आली आहे न मी ती येऊ देईल , तुम्ही करावी अशी तर नक्कीच नाही . बाकी मला काही लोकांचे नेहमीच कौतुक वाटते कि बरोबर अशी काही वाक्ये / शब्द निवडतात, वाट्टेल तसे अर्थ काढतात ; वाद घालायला कि ते म्हणतील ते पटेल काही लोकाना तरी . असो काही प्रतिसाद फाट्यावर मारण्याच्याही पलीकडचे असतात पण क्या करे .

In reply to by दिव्यश्री

प्यारे१ Tue, 04/29/2014 - 19:49
>>> याला कोणी अपवाद नाही आँ? सगळेच असं करतात असं म्हणताय का काय तुम्ही? आमचं जौ द्या (आम्हाला नावंच ठेवतात लोक) पण बाकी बरेच खरंच खूप सज्जन लोक आहेत हो!

In reply to by प्यारे१

>>> आँ? सगळेच असं करतात असं म्हणताय का काय तुम्ही? >>> नाही हो साहेब, असं नाही ते. अपवाद नाही म्हणजे सुशिक्षित-अशिक्षित, तरुण-म्हातारे, गरिब, श्रिमंत अश्या समाजाच्या सगळ्या थरांमधे हे विकृत लोक आढळतात. माझा अनुभव देतेय ..

In reply to by प्यारे१

दिव्यश्री Wed, 04/30/2014 - 12:48
हेच ते वाट्टेल तसा , आपल्या सोयीने अर्थ काढणे आणि मग वाद घालणे . असो . बाकी तुमच्याकडून तरी हि अपेक्षा नव्हती . परत सांगते पुरुष हा पुरुष असतो यात गरीब /श्रीमंत / काळा/ गोरा / उंच /बुटका / म्हातारा /तरुण आणि अजून जे काय असेल ते हा भेद नाही . फक्त चांगला कि वा ई ट इतकाच फरक असू शकतो अस मला तरी वाटतय . लोकांना स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवू नये करण ते त्याच गोष्टी ऐकतात ज्या त्यांना ऐकायला आवडतात हे अगदी पटले . चावल्याशिवाय गिळत नाही अन अनुभवाशिवाय काळात नाही . स्वरा धन्यवाद ... :)

मुक्त विहारि Tue, 04/29/2014 - 15:03
आवडला. बादवे, मी आणि माझे कुटुंब सकाळी ५:५०च्या चिपळूण-पुणे एशियाडने जायचो. फार मस्त प्रवास असायचा.सातार्‍याला आमलेट पाव आणि मग पुण्यात उतरलो की लगेच जेवायला हॉटेलात. ते फार मस्त दिवस होते.

कंजूस Wed, 04/30/2014 - 06:36
अशा प्रवाशांना तक्रारकरून वाटेत उतरवता येते .मात्र पुढच्या पोलिस स्टेशनलाही नोंद करायला बस न्या म्हटले की मात्रा चांगलीच लागू पडते .अशा घटना मुळातच घडता कामा नयेत . आम्ही एकदा लोणावळ्याहून खोपोलीला (त्यांची सिटि बस)दुपारी येत होतो .एकजण ड्रायवरच्या बाजूच्या असणाऱ्या सिटवर बसून ड्रायवरशी वाद घालत होता ,त्याला सांगत होता घाल अंगावर लोकांच्या .विशेष म्हणजे ड्रा० त्याचे गुमाने ऐकून घेत होते .कंडक्टरने तिकीट पण फाडले नाही .तो बहुतेक त्यांचाच युनीअनचा असावा आणि प्यायलेला वाटत होता .खंडाळ्याचा घाट आल्यावर मात्र मी कंडक्टरला तक्रार केली ड्रायवरशी बोलून अपघात होईल .आता मात्र कंडक्टरने घंटी मारली त्याला सांगितले प्रवाशांची कंप्लेट आहे उतर इकडे .आणि तिकीट काढ .पोलिस स्टेशनला गाडी नेतो .बारा रुपयांचे तिकीट काढून गुपचूप बसला .

नविन नविन नोकरीला लागले होते. सकाळी ठाणे स्टेशन ते १६ नंबर बसस्टॉप वागळे ईस्टेट आणि संध्याकाळी उलट असा जिवघेणा प्रवास करायचे बस ने. एकदा संध्याकाळी अशिच धडपडुन बस मधे घुसायला आणि जेमतेम उभं रहायला जागा मिळाली. आणि...क्षणात मागुन काहितरी टोचल. मला वाटल कि पेन असेल म्हणुन मी मागच्याला सांगितल कि तुमचं पेन टोचतय मला. तर तो एक्दम कावराबावरा झाला आणि 'हो, हो, ठिक आहे ठिक आहे ' असं काहितरी म्हणाला. परत दुसर्‍या दिवशी आणि एक दोन वेळा हा प्रकार झाल्यावर विचित्र वाटायला लागल. बर, बिन गर्दिची बस आणणार तरी कुठून..? माझ्या एका मैत्रिणीला हा अनुभव सांगितल्यावर तिने जे काही सांगितले ना ते ऐकुन लाज, किळस, अपमान अश्या संमिश्र भावना दाटुन आल्या. नंतर मी अश्या लोकांच्या पावलावर चपलेचा जोरदार पाय द्यायला शिकले. आणि हो, या 'पेन' टोचणार्‍यांमधे तरुण-म्हातारे असा कुठलाही अपवाद नव्हता, बाकी त्यांच्या सामाजिक परिस्थितीची कल्पना नाही.

पाषाणभेद Mon, 04/28/2014 - 00:57
मी पयला. फारच छान. असे धैर्य पाहीजे. अशा माणसांना चांगली अद्दल घडवली पाहीजे.

श्रीगुरुजी Tue, 04/29/2014 - 14:48
चांगला लेख! प्रवासात गैरफायदा घेऊन स्त्रियांना त्रास देणार्‍या विकृतांना चांगली अद्दल घडविलीत. नुसत्या नखांनी ओरबाडण्यापेक्षा नेलकटर किंवा पिन जोरात टोचायला हवी होती.

In reply to by श्रीगुरुजी

दिव्यश्री Tue, 04/29/2014 - 15:24
+++ १ . माझ्या एका मैत्रिणी ने सहाआसनी गाडीमध्ये हा प्रयोग केला होता . ती व्यक्ती ५ मिनिटात गाडीतून खाली उतरली . सर्वशक्तीनिशी तिने पिन टोचली होती कदाचित रक्तही आलं असेल . अशा माणसाना सोडता कामा नये . एका वेळेस सुटले तर पुढे नक्कीच ते असा प्रयत्न करणार . ८-१० वर्षाच्या रोजच्या प्रवासात घडलेले बरेच किस्से आहेत . आपले आपणच धाडस केले पाहिजे . बऱ्याच वेळा मुली घाबरतात आणि अशा हलकटांचे फावते . एक मुलगी अक्षरशः रडली होती बस मध्ये . तशी लहान होती बिचारी घरारून गेलेली . तो बेशरम उतरून गेल्यावर बोलली आधीच बोलली असती तर काहीतरी करता आलं असत . याला कोणी अपवाद नाही अगदी सुशिक्षित लोकांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत . म्हातारे जास्त नालायक असतात कारण वयामुळे कोणी संशय घेणार नाही असे त्यांना वाटते / खात्रीच असते . एकवेळ तरुण परवडले पण म्हातारे नाही . तरुण माणसांना चांगलच माहिती असत गडबड केली तर आपणच बदडून निघू म्हणून तरी ते गप्प बसतात . असो . नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच असतात . कोणीही लगेच याचा उपयोग करून मनोरंजन करू नये . धन्यवाद .

In reply to by दिव्यश्री

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 18:50
नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच असतात . कोणीही लगेच याचा उपयोग करून मनोरंजन करू नये . धन्यवाद .
तुमच्या कल्पना शक्तिची खिल्ली उडवली नसती जर किमान सोदाहरण हे वाक्य मांडले असते. आता मात्र अतिशय कीव येतेय. धिक्कार असो.

In reply to by आत्मशून्य

दिव्यश्री Wed, 04/30/2014 - 12:39
चला प्रतिसाद देण्याचे अगदी सार्थक झाले . उदाहरण मीच द्यायला हवे असे आहे का ? अहो जर डोळस पणे वावरल कि कैक उदाहरणे सापडतील . मला जर कोणी सांगेल का कि मिपावर काही लोकाना इतर सदस्यांची अक्कल / बुद्धी / संस्कार / कल्पनाशक्ती आणि अजून काही काढण्याचे लायसन दिलेय का पेशल ??? इथे मी कोणाला उद्देशून लिहील नाही पण बर्याच वेळा मी पाहिलं आहे काही आयडी सर्रास या गोष्टी करत असतात . आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही कि या प्रकारात आपल्याही बर्याच गोष्टी निघतात . जस एक बोट दुसर्याकडे केल तर आपल्याकडे काही बोटे येतात . गळ्यात माळ पोटात काळ , साठी बुद्धी नाठी असंही असतच कि पण म्हणून याचा अर्थ असा नाही की सगळे लोक तसेच असतात . उडदामाजी काळेगोरे . सुदैवाने, अर्थातच माझ्या माझी कोणी कीव करावी अशी वेळ अजून पर्यंत ना आली आहे न मी ती येऊ देईल , तुम्ही करावी अशी तर नक्कीच नाही . बाकी मला काही लोकांचे नेहमीच कौतुक वाटते कि बरोबर अशी काही वाक्ये / शब्द निवडतात, वाट्टेल तसे अर्थ काढतात ; वाद घालायला कि ते म्हणतील ते पटेल काही लोकाना तरी . असो काही प्रतिसाद फाट्यावर मारण्याच्याही पलीकडचे असतात पण क्या करे .

In reply to by दिव्यश्री

प्यारे१ Tue, 04/29/2014 - 19:49
>>> याला कोणी अपवाद नाही आँ? सगळेच असं करतात असं म्हणताय का काय तुम्ही? आमचं जौ द्या (आम्हाला नावंच ठेवतात लोक) पण बाकी बरेच खरंच खूप सज्जन लोक आहेत हो!

In reply to by प्यारे१

>>> आँ? सगळेच असं करतात असं म्हणताय का काय तुम्ही? >>> नाही हो साहेब, असं नाही ते. अपवाद नाही म्हणजे सुशिक्षित-अशिक्षित, तरुण-म्हातारे, गरिब, श्रिमंत अश्या समाजाच्या सगळ्या थरांमधे हे विकृत लोक आढळतात. माझा अनुभव देतेय ..

In reply to by प्यारे१

दिव्यश्री Wed, 04/30/2014 - 12:48
हेच ते वाट्टेल तसा , आपल्या सोयीने अर्थ काढणे आणि मग वाद घालणे . असो . बाकी तुमच्याकडून तरी हि अपेक्षा नव्हती . परत सांगते पुरुष हा पुरुष असतो यात गरीब /श्रीमंत / काळा/ गोरा / उंच /बुटका / म्हातारा /तरुण आणि अजून जे काय असेल ते हा भेद नाही . फक्त चांगला कि वा ई ट इतकाच फरक असू शकतो अस मला तरी वाटतय . लोकांना स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवू नये करण ते त्याच गोष्टी ऐकतात ज्या त्यांना ऐकायला आवडतात हे अगदी पटले . चावल्याशिवाय गिळत नाही अन अनुभवाशिवाय काळात नाही . स्वरा धन्यवाद ... :)

मुक्त विहारि Tue, 04/29/2014 - 15:03
आवडला. बादवे, मी आणि माझे कुटुंब सकाळी ५:५०च्या चिपळूण-पुणे एशियाडने जायचो. फार मस्त प्रवास असायचा.सातार्‍याला आमलेट पाव आणि मग पुण्यात उतरलो की लगेच जेवायला हॉटेलात. ते फार मस्त दिवस होते.

कंजूस Wed, 04/30/2014 - 06:36
अशा प्रवाशांना तक्रारकरून वाटेत उतरवता येते .मात्र पुढच्या पोलिस स्टेशनलाही नोंद करायला बस न्या म्हटले की मात्रा चांगलीच लागू पडते .अशा घटना मुळातच घडता कामा नयेत . आम्ही एकदा लोणावळ्याहून खोपोलीला (त्यांची सिटि बस)दुपारी येत होतो .एकजण ड्रायवरच्या बाजूच्या असणाऱ्या सिटवर बसून ड्रायवरशी वाद घालत होता ,त्याला सांगत होता घाल अंगावर लोकांच्या .विशेष म्हणजे ड्रा० त्याचे गुमाने ऐकून घेत होते .कंडक्टरने तिकीट पण फाडले नाही .तो बहुतेक त्यांचाच युनीअनचा असावा आणि प्यायलेला वाटत होता .खंडाळ्याचा घाट आल्यावर मात्र मी कंडक्टरला तक्रार केली ड्रायवरशी बोलून अपघात होईल .आता मात्र कंडक्टरने घंटी मारली त्याला सांगितले प्रवाशांची कंप्लेट आहे उतर इकडे .आणि तिकीट काढ .पोलिस स्टेशनला गाडी नेतो .बारा रुपयांचे तिकीट काढून गुपचूप बसला .

नविन नविन नोकरीला लागले होते. सकाळी ठाणे स्टेशन ते १६ नंबर बसस्टॉप वागळे ईस्टेट आणि संध्याकाळी उलट असा जिवघेणा प्रवास करायचे बस ने. एकदा संध्याकाळी अशिच धडपडुन बस मधे घुसायला आणि जेमतेम उभं रहायला जागा मिळाली. आणि...क्षणात मागुन काहितरी टोचल. मला वाटल कि पेन असेल म्हणुन मी मागच्याला सांगितल कि तुमचं पेन टोचतय मला. तर तो एक्दम कावराबावरा झाला आणि 'हो, हो, ठिक आहे ठिक आहे ' असं काहितरी म्हणाला. परत दुसर्‍या दिवशी आणि एक दोन वेळा हा प्रकार झाल्यावर विचित्र वाटायला लागल. बर, बिन गर्दिची बस आणणार तरी कुठून..? माझ्या एका मैत्रिणीला हा अनुभव सांगितल्यावर तिने जे काही सांगितले ना ते ऐकुन लाज, किळस, अपमान अश्या संमिश्र भावना दाटुन आल्या. नंतर मी अश्या लोकांच्या पावलावर चपलेचा जोरदार पाय द्यायला शिकले. आणि हो, या 'पेन' टोचणार्‍यांमधे तरुण-म्हातारे असा कुठलाही अपवाद नव्हता, बाकी त्यांच्या सामाजिक परिस्थितीची कल्पना नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एस टि तिल काही अनुभव कायम स्वरूपी लक्षात राहिले. सध्याच्या महिलन्वरिल वाढत्या अत्याचारचे प्रमाण बघता हे अनुभव मला नेहमी आठवतात. मी पुण्याला नोकरी करायला होते.

रसीक बलमा..

विजुभाऊ ·

चौकटराजा Mon, 04/28/2014 - 04:56
हे गीत शुद्ध कल्याण रागावर आधारित. मराठी नाट्यपद " सुजन कसा मन चोरी" हे ही असेच. रसिक बलमा मधील बलमा मधील 'मा' वरील लांब केलेला ठहराव आपल्याला 'सुजन मधे चोरी या शब्दातील 'चो" वर आढळेल.तीच गोष्ट सचिनदेव बर्मन यांच्या 'चांद फिर निकला " मधी ला या शब्दाची. माझ्या अंदाजाने ही गीत शंकर-जय मधील जयकिशन यानी चालीत बांधले असावे कारण शुद्ध कल्याण , भूप, बिलावल हे त्यांचे आवडते राग होते.

शुचि Mon, 04/28/2014 - 18:26
मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.
सुंदर पकडले आहे शब्दात. माझे आवडते गाणे - हृदयनाथ मंगेश्करांनी संगीत दिलेले, कुसुमाग्रजांनी लिहीलेले, लताबाईंचे - "घन तमी शुक्र बघ राज्य करी" ....... फक्त निश्चल होऊन ऐकत रहावे, असे हे गाणे. समाधीच लागते या गाण्याच्या सौंदर्याने. शब्द किती सुंदर अन इतक्या सुंदर शब्दांना पं. हृदयनाथांचे संगीत ...... और क्या चाहिये?

तिमा Mon, 04/28/2014 - 19:03
पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे. रसिक बलमा, हे गाणं आधीच वरच्या पट्टीत रेकॉर्ड झाल्यामुळे चित्रफितीत ऐकताना लताचा आवाज अनैसर्गिकरीत्या वरच्या पट्टीत गेला आहे. परिणामी, 'नेहा लगाके हारी' या ओळीत त्या फ्रिक्वेन्सीज कानाला त्रास देतात. असे, लताबाईंच्या बर्‍याच गाण्यांत झाले आहे. दुसरे उदाहरण म्हणजे, एहेसान तेरा होगा मुझपर यातील कडवी. कदाचित माझे कानच फार सेंसिटिव्ह असतील.

In reply to by तिमा

प्रदीप Mon, 04/28/2014 - 20:28
पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे.
गाणी 'फोल्डबॅक' मध्ये चित्रीत केली जातात. ह्यामधे गाणे सुरूवातीस स्टुडियोत टेप केले जाते, व चित्रीकरणाच्या वेळी एका विशीष्ट ('नागरा') उच्च दर्जाच्या टेपरेकॉर्डरवर प्ले केले जाते. ह्यावेळी ३५ मि. मि. फिल्म कॅमेरा ह्या नागरास 'पल्सेस' ने लॉक केला जातो, ज्यामुळे फिल्मवरील चित्रीकरण मूळच्या रेकॉर्डींगशी सिंकमधे रहाते. तेव्हा आपण लिहीता तशा प्रकारचे 'वरच्या पट्टीत' जाणे मला पटत नाही. [वरील परिच्छेदातील टेपरेकॉर्डर, ३५ एम. एम. फिल्म इ. उल्लेख तत्कालीन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहेत. आता टेप नसून डिस्क रेकॉर्डर आहे, 'नागरा' डिस्क प्ले करतो, आणि चित्रीकरण ३५ एम. एम. फिल्मवर न होता डिजीटल व्हिडीयोमधे होते इ. सर्व खरे असले, तरीही तत्संबंधीच्या 'लॉकींग'च्या तंत्रात काही फरक नसावा]. लताला अनेक संगीतकार अतिशय वरच्या पट्टीत गायला लावत. शंकर- जयकिशनच्या संदर्भात बोलतांना तिनेच एके ठिकाणी 'ते मला खूप चढ्या सुरात गावयास लावायचे, माझे त्यांच्याबरोबर ह्यावरून वादही व्हायचे' असे नमूद केले आहे. विशेषतः पुरूष व स्त्री अशा दोघांनी स्वतंत्रपणे गायिलेल्या एकाच गीतातही, तिला पुरूषाचा सूर लावावा लागायचा. तुम्ही दिलेले 'एहसान तेरा' हे असेच एक उदाहरण.

In reply to by प्रदीप

तिमा Tue, 04/29/2014 - 10:11
तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. एका एक्स्पर्टशी चर्चा केल्यावर हे कळले की मूळ चित्रफितीचे 'पीएएल' व्हर्जन करताना, पट्टी १०४% होते. हा फरक अमेरिकन एनटीएससी' मधे होत नाही. त्यामुळे टी. व्ही. वरच्या चित्र फितीत पट्टी वाढलेली जाणवते.तुम्ही कुठलेही जुने गाणे ओरिजिनल ७८ आरपीएम च्या रेकॉर्डवर ऐका आणि त्याची 'पाल' व्हिडिओ चित्रफीतही त्याचवेळी बघा. तुम्हाला पट्टीतला फरक नक्कीच जाणवेल. याबाबत ह्या साईटवर लिहिले आहे. http://www.michaeldvd.com.au/articles/PALSpeedUp/PALSpeedUp.asp

In reply to by तिमा

प्रदीप Tue, 04/29/2014 - 10:30
पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे
असे आपण लिहीलेत. त्यात 'चित्रफीत' म्हणजे फिल्मची ऑप्टिकल असे आपणांस म्हणायचे आहे, असा माझा गैरसमज झाला. 'चित्रफीत' म्हणजे 'व्हिडीयो" असे आपणास अभिप्रेत आहे असे दिसते. (म्हणजे तेच बरोबर असावे, चूक माझी आहे). फिल्म २४ frames per sec. ने चालते. ती ५० Hz. च्या (PAL अथवा, आताच्या संदर्भात, 625i25) व्हिडीयोत ट्रान्सफर करतांना,25 frames per sec. ने टेलिसिनेमध्ये चालवली जाते. २५/२४ = १.०४. म्हणून ह्यावेळी ट्रान्स्फर केलेल्या व्हिडीयोत चित्र (व ध्वनि) मूळपेक्षा ४ % अधिक वेगाने चालतात. त्यामुळे आपण म्हणता तसा पिच थोडा वरचा होतो. NTSC अथवा आताच्या संदर्भात 525i29.97 मधे ट्रान्स्फर करतांना मात्र फिल्म टेलिसिनेमधे मूळ वेगानेच चालवली जाते. तेव्हा तिथे हा परिणाम जाणवत नाही.

विजुभाऊ Tue, 04/29/2014 - 01:41
"ये जिंदगी उसी की है " या तील शेवटच्या " अलविदा अलविदा " हे शब्द गाताना ची पट्टी किती उंच आहे ते बघा. ही अर्थातच गाण्यातील जागेची गरज होती.

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले गुरुवार, 05/01/2014 - 10:08
'ये जिंदगी उसीकी हैं' हे सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गाणे मूळ शारदा नाटकातील ' मूर्तीमंत भीती उभी मज समोर राहिली', या गाण्याची कॉपी वाट्ते. दोन्ही गाणी एका नंतर एक गुणगुणून बघा.

In reply to by रमेश आठवले

रमेश आठवले गुरुवार, 05/01/2014 - 10:22
मूर्तीमंत चा धागा मूळ बालगंधर्व यांनी गायलेले हे गाणे 'जिंदगी उसिकी' गाणाऱ्या लता बाईंनी हीं गायलेले आहे. त्याचा धागा : http://www.saavn.com/s/song/marathi/Lata-Mangeshkar---Chitrapat-Geete---Samagra---Vol-8/Murtimant-Bhiti-Ubhi/BxJaQzpeAHc

In reply to by रमेश आठवले

तिमा गुरुवार, 05/01/2014 - 11:00
या गाण्याबद्दलची सी. रामचंद्र यांची मुलाखत मी वाचलेली आहे. त्यांनी स्वतःच, 'ये जिंदगी' हे गाणे, 'मूर्तिमंत भीति उभी' या गाण्यावरुन घेतल्याचे सांगितले होते.

विजुभौ आम्हाला गाण्यातल्या जागा बिगा कळत नै पण जीवाला घोर लावणा-या गाण्यांची आठ्वण नका करुन देत जाऊ राव. 'दिल क्यु लगाया, जैसा रोग लगाया' असे ऐकले की कोणाला तरी जीव लावणारा माणुस मुळापसून हलतो ना राव... -दिलीप बिरुटे

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 16:28
हेच काय लतादीदींची असंख्य गाणी आहेत आवडीची. हम प्यारमें जलनेवालोंको चैन कहां...जेलर सैया झूठोन्का बडा सरताज ...दो आंखे बारा हाथ जा रे उड जा रे पंछी तेरा जाना दिलके अरमानोंका लुट जाना...अनाडी अन खूप काही.. !

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 19:39
आणखी सुरेख गाणी, ज्यांची स्वररचना खास आहे आणि लताच्या ताकदीचा पुरेपूर उपयोग केला आहे, ती म्हणजे श्रीनिवास खळेसाहेबांची लताने म्हटलेली कोणतीही गाणी आठवा.

चौकटराजा Mon, 04/28/2014 - 04:56
हे गीत शुद्ध कल्याण रागावर आधारित. मराठी नाट्यपद " सुजन कसा मन चोरी" हे ही असेच. रसिक बलमा मधील बलमा मधील 'मा' वरील लांब केलेला ठहराव आपल्याला 'सुजन मधे चोरी या शब्दातील 'चो" वर आढळेल.तीच गोष्ट सचिनदेव बर्मन यांच्या 'चांद फिर निकला " मधी ला या शब्दाची. माझ्या अंदाजाने ही गीत शंकर-जय मधील जयकिशन यानी चालीत बांधले असावे कारण शुद्ध कल्याण , भूप, बिलावल हे त्यांचे आवडते राग होते.

शुचि Mon, 04/28/2014 - 18:26
मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.
सुंदर पकडले आहे शब्दात. माझे आवडते गाणे - हृदयनाथ मंगेश्करांनी संगीत दिलेले, कुसुमाग्रजांनी लिहीलेले, लताबाईंचे - "घन तमी शुक्र बघ राज्य करी" ....... फक्त निश्चल होऊन ऐकत रहावे, असे हे गाणे. समाधीच लागते या गाण्याच्या सौंदर्याने. शब्द किती सुंदर अन इतक्या सुंदर शब्दांना पं. हृदयनाथांचे संगीत ...... और क्या चाहिये?

तिमा Mon, 04/28/2014 - 19:03
पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे. रसिक बलमा, हे गाणं आधीच वरच्या पट्टीत रेकॉर्ड झाल्यामुळे चित्रफितीत ऐकताना लताचा आवाज अनैसर्गिकरीत्या वरच्या पट्टीत गेला आहे. परिणामी, 'नेहा लगाके हारी' या ओळीत त्या फ्रिक्वेन्सीज कानाला त्रास देतात. असे, लताबाईंच्या बर्‍याच गाण्यांत झाले आहे. दुसरे उदाहरण म्हणजे, एहेसान तेरा होगा मुझपर यातील कडवी. कदाचित माझे कानच फार सेंसिटिव्ह असतील.

In reply to by तिमा

प्रदीप Mon, 04/28/2014 - 20:28
पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे.
गाणी 'फोल्डबॅक' मध्ये चित्रीत केली जातात. ह्यामधे गाणे सुरूवातीस स्टुडियोत टेप केले जाते, व चित्रीकरणाच्या वेळी एका विशीष्ट ('नागरा') उच्च दर्जाच्या टेपरेकॉर्डरवर प्ले केले जाते. ह्यावेळी ३५ मि. मि. फिल्म कॅमेरा ह्या नागरास 'पल्सेस' ने लॉक केला जातो, ज्यामुळे फिल्मवरील चित्रीकरण मूळच्या रेकॉर्डींगशी सिंकमधे रहाते. तेव्हा आपण लिहीता तशा प्रकारचे 'वरच्या पट्टीत' जाणे मला पटत नाही. [वरील परिच्छेदातील टेपरेकॉर्डर, ३५ एम. एम. फिल्म इ. उल्लेख तत्कालीन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहेत. आता टेप नसून डिस्क रेकॉर्डर आहे, 'नागरा' डिस्क प्ले करतो, आणि चित्रीकरण ३५ एम. एम. फिल्मवर न होता डिजीटल व्हिडीयोमधे होते इ. सर्व खरे असले, तरीही तत्संबंधीच्या 'लॉकींग'च्या तंत्रात काही फरक नसावा]. लताला अनेक संगीतकार अतिशय वरच्या पट्टीत गायला लावत. शंकर- जयकिशनच्या संदर्भात बोलतांना तिनेच एके ठिकाणी 'ते मला खूप चढ्या सुरात गावयास लावायचे, माझे त्यांच्याबरोबर ह्यावरून वादही व्हायचे' असे नमूद केले आहे. विशेषतः पुरूष व स्त्री अशा दोघांनी स्वतंत्रपणे गायिलेल्या एकाच गीतातही, तिला पुरूषाचा सूर लावावा लागायचा. तुम्ही दिलेले 'एहसान तेरा' हे असेच एक उदाहरण.

In reply to by प्रदीप

तिमा Tue, 04/29/2014 - 10:11
तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. एका एक्स्पर्टशी चर्चा केल्यावर हे कळले की मूळ चित्रफितीचे 'पीएएल' व्हर्जन करताना, पट्टी १०४% होते. हा फरक अमेरिकन एनटीएससी' मधे होत नाही. त्यामुळे टी. व्ही. वरच्या चित्र फितीत पट्टी वाढलेली जाणवते.तुम्ही कुठलेही जुने गाणे ओरिजिनल ७८ आरपीएम च्या रेकॉर्डवर ऐका आणि त्याची 'पाल' व्हिडिओ चित्रफीतही त्याचवेळी बघा. तुम्हाला पट्टीतला फरक नक्कीच जाणवेल. याबाबत ह्या साईटवर लिहिले आहे. http://www.michaeldvd.com.au/articles/PALSpeedUp/PALSpeedUp.asp

In reply to by तिमा

प्रदीप Tue, 04/29/2014 - 10:30
पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे
असे आपण लिहीलेत. त्यात 'चित्रफीत' म्हणजे फिल्मची ऑप्टिकल असे आपणांस म्हणायचे आहे, असा माझा गैरसमज झाला. 'चित्रफीत' म्हणजे 'व्हिडीयो" असे आपणास अभिप्रेत आहे असे दिसते. (म्हणजे तेच बरोबर असावे, चूक माझी आहे). फिल्म २४ frames per sec. ने चालते. ती ५० Hz. च्या (PAL अथवा, आताच्या संदर्भात, 625i25) व्हिडीयोत ट्रान्सफर करतांना,25 frames per sec. ने टेलिसिनेमध्ये चालवली जाते. २५/२४ = १.०४. म्हणून ह्यावेळी ट्रान्स्फर केलेल्या व्हिडीयोत चित्र (व ध्वनि) मूळपेक्षा ४ % अधिक वेगाने चालतात. त्यामुळे आपण म्हणता तसा पिच थोडा वरचा होतो. NTSC अथवा आताच्या संदर्भात 525i29.97 मधे ट्रान्स्फर करतांना मात्र फिल्म टेलिसिनेमधे मूळ वेगानेच चालवली जाते. तेव्हा तिथे हा परिणाम जाणवत नाही.

विजुभाऊ Tue, 04/29/2014 - 01:41
"ये जिंदगी उसी की है " या तील शेवटच्या " अलविदा अलविदा " हे शब्द गाताना ची पट्टी किती उंच आहे ते बघा. ही अर्थातच गाण्यातील जागेची गरज होती.

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले गुरुवार, 05/01/2014 - 10:08
'ये जिंदगी उसीकी हैं' हे सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गाणे मूळ शारदा नाटकातील ' मूर्तीमंत भीती उभी मज समोर राहिली', या गाण्याची कॉपी वाट्ते. दोन्ही गाणी एका नंतर एक गुणगुणून बघा.

In reply to by रमेश आठवले

रमेश आठवले गुरुवार, 05/01/2014 - 10:22
मूर्तीमंत चा धागा मूळ बालगंधर्व यांनी गायलेले हे गाणे 'जिंदगी उसिकी' गाणाऱ्या लता बाईंनी हीं गायलेले आहे. त्याचा धागा : http://www.saavn.com/s/song/marathi/Lata-Mangeshkar---Chitrapat-Geete---Samagra---Vol-8/Murtimant-Bhiti-Ubhi/BxJaQzpeAHc

In reply to by रमेश आठवले

तिमा गुरुवार, 05/01/2014 - 11:00
या गाण्याबद्दलची सी. रामचंद्र यांची मुलाखत मी वाचलेली आहे. त्यांनी स्वतःच, 'ये जिंदगी' हे गाणे, 'मूर्तिमंत भीति उभी' या गाण्यावरुन घेतल्याचे सांगितले होते.

विजुभौ आम्हाला गाण्यातल्या जागा बिगा कळत नै पण जीवाला घोर लावणा-या गाण्यांची आठ्वण नका करुन देत जाऊ राव. 'दिल क्यु लगाया, जैसा रोग लगाया' असे ऐकले की कोणाला तरी जीव लावणारा माणुस मुळापसून हलतो ना राव... -दिलीप बिरुटे

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 16:28
हेच काय लतादीदींची असंख्य गाणी आहेत आवडीची. हम प्यारमें जलनेवालोंको चैन कहां...जेलर सैया झूठोन्का बडा सरताज ...दो आंखे बारा हाथ जा रे उड जा रे पंछी तेरा जाना दिलके अरमानोंका लुट जाना...अनाडी अन खूप काही.. !

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 19:39
आणखी सुरेख गाणी, ज्यांची स्वररचना खास आहे आणि लताच्या ताकदीचा पुरेपूर उपयोग केला आहे, ती म्हणजे श्रीनिवास खळेसाहेबांची लताने म्हटलेली कोणतीही गाणी आठवा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चोरी चोरी चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. त्यातले कोणते एक निवडायचे ठरवणे हे खूप अवघड आहे. चोरीचोरीतील प्रत्यक गाण्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. अर्थात लता मंगेशकर हा प्रत्येक गान्यातील कॉमन फॅक्टर आहे. रसिक बलमा.... हे गाणं अजब आहे. स्वरांवरचा ठहराव आणि आंदोलने यांची एक मजेदार जुगलबंदी बघायला मिळते. गाण्याच्या सुरवातीला " रसिक बलमा ........ मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.

खुराकी खारीक

कंजूस ·

पिंगू Mon, 04/28/2014 - 12:07
सेम ह्याच प्रकारे खजुराच्या चंद्रकला पण करतात. पण तो प्रकार भलताच गोड असतो. कंजूसकाका, एक प्रश्न आहे की हे देशी चॉकलेट किती दिवस टिकतात?

दिपक.कुवेत Mon, 04/28/2014 - 12:30
नुसती खारीक खाण्यापेक्षा हा प्रकार मस्त आहे. पण त्या पाण्यात भीजवुन ठेवल्या तर चीकट नाहि का होणार? चला ह्या निमित्ताने मी असेच स्टफ्ड खजुर रोल्स केलेले आठवले.

कंजूस Mon, 04/28/2014 - 14:20
देसी चॉकलेट टिकत नाहित .रोज एक वा दोन खारका नवीन भिजवायच्या आणि दुसरे दिवशी खायच्या .याचे सारण मात्र आपण करून ठेवू शकतो .या सारणातच खारकेचे तुकडे टाकून ठेवता येतील .ते टिकेल .परंतु जसे ते गुजराती लोक करतात ते दिले आहे . पौष्टिक आहार हा माफक परंतु नियमित घ्यायचा असतो .

राही Mon, 04/28/2014 - 14:28
खारकेच्या आतमध्ये पानमसाला(मघई सुकवून,गुलकंद, गुंजेच्या पानांचे चूर्ण, भाजून कुटलेली बडीशोप, सुके खोबरे, थंडक वगैरे) भरून वर्ख लावून विकायला असतात. मुखशुद्धीसाठी फारच सुंदर.

कंजूस Mon, 04/28/2014 - 18:32
होय .आणि याने (खारीक अधिक खोबरे)मोठ्यांचे पाय दुखायचे थांबतात असा कच्छी लोकांचा विश्वास आहे .कोणत्याही भरड आणि तुरट गोष्टी उपयुक्त आणि चिकन्या (मैद्यासारख्या ) ,गोड शरीरास अपायकारक समजतात .

पिंगू Mon, 04/28/2014 - 12:07
सेम ह्याच प्रकारे खजुराच्या चंद्रकला पण करतात. पण तो प्रकार भलताच गोड असतो. कंजूसकाका, एक प्रश्न आहे की हे देशी चॉकलेट किती दिवस टिकतात?

दिपक.कुवेत Mon, 04/28/2014 - 12:30
नुसती खारीक खाण्यापेक्षा हा प्रकार मस्त आहे. पण त्या पाण्यात भीजवुन ठेवल्या तर चीकट नाहि का होणार? चला ह्या निमित्ताने मी असेच स्टफ्ड खजुर रोल्स केलेले आठवले.

कंजूस Mon, 04/28/2014 - 14:20
देसी चॉकलेट टिकत नाहित .रोज एक वा दोन खारका नवीन भिजवायच्या आणि दुसरे दिवशी खायच्या .याचे सारण मात्र आपण करून ठेवू शकतो .या सारणातच खारकेचे तुकडे टाकून ठेवता येतील .ते टिकेल .परंतु जसे ते गुजराती लोक करतात ते दिले आहे . पौष्टिक आहार हा माफक परंतु नियमित घ्यायचा असतो .

राही Mon, 04/28/2014 - 14:28
खारकेच्या आतमध्ये पानमसाला(मघई सुकवून,गुलकंद, गुंजेच्या पानांचे चूर्ण, भाजून कुटलेली बडीशोप, सुके खोबरे, थंडक वगैरे) भरून वर्ख लावून विकायला असतात. मुखशुद्धीसाठी फारच सुंदर.

कंजूस Mon, 04/28/2014 - 18:32
होय .आणि याने (खारीक अधिक खोबरे)मोठ्यांचे पाय दुखायचे थांबतात असा कच्छी लोकांचा विश्वास आहे .कोणत्याही भरड आणि तुरट गोष्टी उपयुक्त आणि चिकन्या (मैद्यासारख्या ) ,गोड शरीरास अपायकारक समजतात .
आमच्या लहानपणी टिव्ही नव्हते त्यावेळी मुंबईतल्या राणीचा बाग ,हँगिग गार्डन ,फाईव गार्डन,गिरगाव दादर जुहू चौपाटीवर हिंडणे ,गेटवेला जाणे असा लोकांचा सुटीतला टाईमपास असायचा .आइसक्रीम ,कुल्फी ,पाणीपुरी आणि भेळ हे नेहमीचं खाणे .फोर्टात कामाच्या दिवशी फक्त नोकरीवाले जायचे .पण एक दोन वेळा बाबांबरोबर जाण्याचा योग आला आणि गजबजाट पाहाण्यास मिळाला होता .त्यावेळी फोर्टात एक विशेष वस्तु खायला मिळाली होती .पौष्टिक खुराकी खारीक .ती फार आवडली होती . ती दुपारच्या वेळी विकायला एकदोनजण बसायचे .गुजराती व्यापारी ते खायचे .आम्ही ती करूनही पाहिली होती .

दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

चित्रगुप्त ·

वा, वा ! राजधानीत मिपाकट्ट्याची सुरुवातच नाही तर दर महिन्याच्या वेळापत्रकाची नांदी झाली हे विषेश ! आता कधी तिकडे फेरी झाली तर अगोदर सांगून मिपाकट्टा ठरवायची सोय झाली असावी काय ? ;) लेख आणि फोटो सुंदर आहेत हेवेसांनल !

पैसा Sun, 04/27/2014 - 16:55
वृत्तांत मस्तच! फोटोही आवडले. सगळ्यांना प्रथमच फोटोत पहाते आहे. ते महाराष्ट्र सदनही झकास दिसते आहे. दिल्लीत गेल्यावर जाण्याचे एक ठिकाण म्हणून नोंद घेतली आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 17:27
धन्यवाद.
सगळ्यांना प्रथमच फोटोत पहाते आहे.
आशय पोहोचला आहे पण सर्वाधिक योग्य वाक्यरचना काय असावी हे मला खूप विचार करूनही सुचत नाहीय. :)

In reply to by arunjoshi123

पैसा Sun, 04/27/2014 - 19:31
मला पण खरं तर सुचलं नाही एग्झॅक्ट काय लिहावं ते. तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष पाहिलं नाहीच पण तुमचे फोटोसुद्धा पहिल्यांदा पहाते आहे! कारण तुम्ही कोणीच फेसबुकग्रस्त नसावेत बहुधा! :D

In reply to by पैसा

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 20:03
तसं इग्नोर करता आलं असतं. पण "सगळ्यांना पहिल्यांदाच दारू पिऊन पेंगलं असल्याचं पाहिलं" सदृश वाक्यरचना वाटली म्हणून नोंद केली. शिवाय ते भाषांतरही लांब झालंय, जरा थोडक्यात नेमकं लिहायला कोणाला जमेल का पाहू.

In reply to by arunjoshi123

प्यारे१ Sun, 04/27/2014 - 22:59
१.'आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वाचे प्रथमच दर्शन झाले' २.'अरे वा, अरुण जोशी आपणच का?' आणि आम्च्याकडं 'आज पैल्यांदाच तुम्चं त्वांड (आहे, ह्याऐवजी दुसरा शब्द आहे) बगिटलो!' :) -हलकं घ्या हो साहेब!

In reply to by प्यारे१

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 23:35
"यापूर्वी तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष पाहिलं नाहीच पण तुमचे फोटोसुद्धा पहिल्यांदा पहाते आहे!" मधला फोटो हा माहितीचा भाग या तिन्ही वाक्यांत नाही.

चौकटराजा Sun, 04/27/2014 - 16:59
नवे सदन तर चकाचक दिसतेय. हा कट्टा मला तरी पॅरिस मधला वाटतोय. चित्रकार व उदरनिर्वाह या वरून पुलं चा एक किस्सा आठवला. रत्नागिरीचे जावईबापूना तिथल्या एकाने विचारले,. "काय करता ?" " गाण्याचे कार्यक्रम !! " ( अभिमानाने) हो पण पोटापाण्याचा काही व्यवसाय असेलच ना ? ( अभिमानाची ऐशी तैशी ). बाकी संख्येपेक्षा , स्वादापेक्षा, संवादाला महत्व आहे. व कट्टेकर्‍याची नावे पहाता तो " लय भारी" झाला असणार यात शंका नाही.

प्रचेतस Sun, 04/27/2014 - 17:10
वृत्तांत आवडला. दिल्ली वैतागवाणी असूनही जाम भारी आहे. तिथल्या चांदणी चौक, पालिका बझार, करोलबाग ह्या भागात तर फिरायला अतिशय आवडते.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 21:59
दिल्ली अजिबात वैतागवाणी नाही. मुंबई च्या तुलनेत तर ही शंका स्वप्नातही नको. सभोवताल कसाही असो प्रत्यक्ष दिल्ली मात्र ओएसिस आहे. प्रोपर दिल्लीकर नसूनही दिल्ली वैताग्वानी म्हणणार नाही

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 23:31
दिल्ली मुंबईच्या तुलनेत कैक पट छान जागा आहे, कैक अर्थानी. व्यक्तिगत कारणानी म्हणा व्यक्तिगत आवडनिवडीने म्हणा मला दिल्ली खूप आवडते नि मुंबई मुळीच आवडत नाही. १०० पैकी मी दिल्लीला ७०-८० नि मुंबईला १०-१५ मार्क देईन.

भाते Sun, 04/27/2014 - 17:19
वृत्तांत आवडला. फोटो छानच आहेत. दिल्लीत दरमहा कट्टा होणार हे वाचुन आनंद झाला.

शुचि Sun, 04/27/2014 - 18:21
वृत्तांत अन फोटोही छान आहेत .
'चित्रकलेने आम चित्रकाराचे घर चालू शकते का?' या टिपिकल इंजिनिअरिंगची मानसिकता दर्शविणार्‍या माझ्या प्रश्नाला चित्रगुप्तजींनी मार्मिक उत्तर दिले. त्यात 'त्या काळी मी इंजिनिअरिंग २ वर्षांत सोडून देऊन चित्रकलेचाच कोर्स चालू ठेवला' हा षटकारही होता.
:)

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 19:17
छान वृत्तांत व राजधानीकरांचे व महाराष्ट्र सदनाचे फोटो पाहून अगदी भरभरून आले! मला या तिघात अटकेपार झेंडे लावायला निघालेले मर्द मराठी सरदारच दिसत आहेत! असेच पुढील छान वृत्तांत पाठवावेत ही विनंती.

मुक्त विहारि Sun, 04/27/2014 - 19:31
खूद्द दिल्लीत कट्टा!, पण खाण्याचे फोटो न टाकण्याचे प्रयोजन काही समजले नाही. आपण सगळे ह्या निमीत्ताने भेटलात, ही आनंदाची गोष्ट.

चित्रगुप्त Sun, 04/27/2014 - 21:51
खाण्याचे फोटो मुळात काढलेच नाहीत, कारण त्यात अगदी खास असे काही नव्हते, म्हणजे पदार्थ चांगले होते, पण घरगुती टाईप. थोडक्यात म्हणजे ते खाऊन असले काही होईल, असे नव्हते: ,.,

मस्तच ह्या कट्या निमित्ताने दिल्लीतील ह्या ह्या स्थळाची माहिती झाली , एवढी प्रशस्त वास्तू मराठी माणसाच्या साठी खुद्द महाराष्टात असेल कि नाही ह्या बद्दल शंका आहे. मला एका मिपाकाराचा व्यनि आला असून पुढच्या आठवड्यात आमच्या शहरात कुटुंबासह भटकंती निमित्ताने येत आहेत तेव्हा कट्टा तो बनता हे

अहाहा काय सुंदर गोष्ट. मराठी मिपाकरांनी दिल्लीचे तख्त कट्ट्याने गाजवले म्हणायचे. बाकी चौराकाका म्हणतात त्याप्रमाणे >>>या तिघांच्या कट्ट्याचा वृतांत यायलाच पाहिजे >>> तर नका हो देवु त्यांच्या खादाडीचा वृत्तांत नाहीतर मि पा ची बँन्ड विड्थ फुल होईल. च्यायला कसलं खादाडतायत ते.

विकास Mon, 04/28/2014 - 09:48
वृत्तांत आवडला. महाराष्ट्र सदनाला कोणिही भेट देऊ शकते का?

चित्रगुप्त Mon, 04/28/2014 - 10:53
माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र सदनात कोणीही जाऊ शकते, आणि तेथील उपहारगृहात जेवण, चहापानादि करू शकते. तिथे मुक्काम करण्यासाठी बहुधा सरकारदरबारचा काही लग्गा लावावा लागत असेल. दोन-चार तास बसून भेटायला, गप्पा करायला अगदी मध्यवस्तीत असूनही मोकळेचाकळे असे छान ठिकाण आहे. हल्लीच्या महागाईत जेवणादि स्वस्त वाटावे, असे दर आहे.

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:54
कट्टा एे देहली... रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे.

वा, वा ! राजधानीत मिपाकट्ट्याची सुरुवातच नाही तर दर महिन्याच्या वेळापत्रकाची नांदी झाली हे विषेश ! आता कधी तिकडे फेरी झाली तर अगोदर सांगून मिपाकट्टा ठरवायची सोय झाली असावी काय ? ;) लेख आणि फोटो सुंदर आहेत हेवेसांनल !

पैसा Sun, 04/27/2014 - 16:55
वृत्तांत मस्तच! फोटोही आवडले. सगळ्यांना प्रथमच फोटोत पहाते आहे. ते महाराष्ट्र सदनही झकास दिसते आहे. दिल्लीत गेल्यावर जाण्याचे एक ठिकाण म्हणून नोंद घेतली आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 17:27
धन्यवाद.
सगळ्यांना प्रथमच फोटोत पहाते आहे.
आशय पोहोचला आहे पण सर्वाधिक योग्य वाक्यरचना काय असावी हे मला खूप विचार करूनही सुचत नाहीय. :)

In reply to by arunjoshi123

पैसा Sun, 04/27/2014 - 19:31
मला पण खरं तर सुचलं नाही एग्झॅक्ट काय लिहावं ते. तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष पाहिलं नाहीच पण तुमचे फोटोसुद्धा पहिल्यांदा पहाते आहे! कारण तुम्ही कोणीच फेसबुकग्रस्त नसावेत बहुधा! :D

In reply to by पैसा

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 20:03
तसं इग्नोर करता आलं असतं. पण "सगळ्यांना पहिल्यांदाच दारू पिऊन पेंगलं असल्याचं पाहिलं" सदृश वाक्यरचना वाटली म्हणून नोंद केली. शिवाय ते भाषांतरही लांब झालंय, जरा थोडक्यात नेमकं लिहायला कोणाला जमेल का पाहू.

In reply to by arunjoshi123

प्यारे१ Sun, 04/27/2014 - 22:59
१.'आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वाचे प्रथमच दर्शन झाले' २.'अरे वा, अरुण जोशी आपणच का?' आणि आम्च्याकडं 'आज पैल्यांदाच तुम्चं त्वांड (आहे, ह्याऐवजी दुसरा शब्द आहे) बगिटलो!' :) -हलकं घ्या हो साहेब!

In reply to by प्यारे१

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 23:35
"यापूर्वी तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष पाहिलं नाहीच पण तुमचे फोटोसुद्धा पहिल्यांदा पहाते आहे!" मधला फोटो हा माहितीचा भाग या तिन्ही वाक्यांत नाही.

चौकटराजा Sun, 04/27/2014 - 16:59
नवे सदन तर चकाचक दिसतेय. हा कट्टा मला तरी पॅरिस मधला वाटतोय. चित्रकार व उदरनिर्वाह या वरून पुलं चा एक किस्सा आठवला. रत्नागिरीचे जावईबापूना तिथल्या एकाने विचारले,. "काय करता ?" " गाण्याचे कार्यक्रम !! " ( अभिमानाने) हो पण पोटापाण्याचा काही व्यवसाय असेलच ना ? ( अभिमानाची ऐशी तैशी ). बाकी संख्येपेक्षा , स्वादापेक्षा, संवादाला महत्व आहे. व कट्टेकर्‍याची नावे पहाता तो " लय भारी" झाला असणार यात शंका नाही.

प्रचेतस Sun, 04/27/2014 - 17:10
वृत्तांत आवडला. दिल्ली वैतागवाणी असूनही जाम भारी आहे. तिथल्या चांदणी चौक, पालिका बझार, करोलबाग ह्या भागात तर फिरायला अतिशय आवडते.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 21:59
दिल्ली अजिबात वैतागवाणी नाही. मुंबई च्या तुलनेत तर ही शंका स्वप्नातही नको. सभोवताल कसाही असो प्रत्यक्ष दिल्ली मात्र ओएसिस आहे. प्रोपर दिल्लीकर नसूनही दिल्ली वैताग्वानी म्हणणार नाही

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 23:31
दिल्ली मुंबईच्या तुलनेत कैक पट छान जागा आहे, कैक अर्थानी. व्यक्तिगत कारणानी म्हणा व्यक्तिगत आवडनिवडीने म्हणा मला दिल्ली खूप आवडते नि मुंबई मुळीच आवडत नाही. १०० पैकी मी दिल्लीला ७०-८० नि मुंबईला १०-१५ मार्क देईन.

भाते Sun, 04/27/2014 - 17:19
वृत्तांत आवडला. फोटो छानच आहेत. दिल्लीत दरमहा कट्टा होणार हे वाचुन आनंद झाला.

शुचि Sun, 04/27/2014 - 18:21
वृत्तांत अन फोटोही छान आहेत .
'चित्रकलेने आम चित्रकाराचे घर चालू शकते का?' या टिपिकल इंजिनिअरिंगची मानसिकता दर्शविणार्‍या माझ्या प्रश्नाला चित्रगुप्तजींनी मार्मिक उत्तर दिले. त्यात 'त्या काळी मी इंजिनिअरिंग २ वर्षांत सोडून देऊन चित्रकलेचाच कोर्स चालू ठेवला' हा षटकारही होता.
:)

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 19:17
छान वृत्तांत व राजधानीकरांचे व महाराष्ट्र सदनाचे फोटो पाहून अगदी भरभरून आले! मला या तिघात अटकेपार झेंडे लावायला निघालेले मर्द मराठी सरदारच दिसत आहेत! असेच पुढील छान वृत्तांत पाठवावेत ही विनंती.

मुक्त विहारि Sun, 04/27/2014 - 19:31
खूद्द दिल्लीत कट्टा!, पण खाण्याचे फोटो न टाकण्याचे प्रयोजन काही समजले नाही. आपण सगळे ह्या निमीत्ताने भेटलात, ही आनंदाची गोष्ट.

चित्रगुप्त Sun, 04/27/2014 - 21:51
खाण्याचे फोटो मुळात काढलेच नाहीत, कारण त्यात अगदी खास असे काही नव्हते, म्हणजे पदार्थ चांगले होते, पण घरगुती टाईप. थोडक्यात म्हणजे ते खाऊन असले काही होईल, असे नव्हते: ,.,

मस्तच ह्या कट्या निमित्ताने दिल्लीतील ह्या ह्या स्थळाची माहिती झाली , एवढी प्रशस्त वास्तू मराठी माणसाच्या साठी खुद्द महाराष्टात असेल कि नाही ह्या बद्दल शंका आहे. मला एका मिपाकाराचा व्यनि आला असून पुढच्या आठवड्यात आमच्या शहरात कुटुंबासह भटकंती निमित्ताने येत आहेत तेव्हा कट्टा तो बनता हे

अहाहा काय सुंदर गोष्ट. मराठी मिपाकरांनी दिल्लीचे तख्त कट्ट्याने गाजवले म्हणायचे. बाकी चौराकाका म्हणतात त्याप्रमाणे >>>या तिघांच्या कट्ट्याचा वृतांत यायलाच पाहिजे >>> तर नका हो देवु त्यांच्या खादाडीचा वृत्तांत नाहीतर मि पा ची बँन्ड विड्थ फुल होईल. च्यायला कसलं खादाडतायत ते.

विकास Mon, 04/28/2014 - 09:48
वृत्तांत आवडला. महाराष्ट्र सदनाला कोणिही भेट देऊ शकते का?

चित्रगुप्त Mon, 04/28/2014 - 10:53
माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र सदनात कोणीही जाऊ शकते, आणि तेथील उपहारगृहात जेवण, चहापानादि करू शकते. तिथे मुक्काम करण्यासाठी बहुधा सरकारदरबारचा काही लग्गा लावावा लागत असेल. दोन-चार तास बसून भेटायला, गप्पा करायला अगदी मध्यवस्तीत असूनही मोकळेचाकळे असे छान ठिकाण आहे. हल्लीच्या महागाईत जेवणादि स्वस्त वाटावे, असे दर आहे.

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:54
कट्टा एे देहली... रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे.
लेखनप्रकार
चित्रगुप्त उवाच: दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.

मोदींच्या लोकप्रियतेचे कारण

drsunilahirrao ·

डावखुरा Sun, 04/27/2014 - 13:09
तुमचे बरोबरही असेल पण मुस्लीम समाजाचाही पाठींबा आहेच..की.. त्यांनी सद्भावना रॅलीत टोपीचा स्वीकार न करुनच दाखवुन दिले...आणि तरीही कोणी फार ठ्ळक आरोप करु शकले नाही... पण बहुसंख्याक परंतु युपीए राजवटीत दुर्लक्षित असलेल्यांची मने जिंकली...

drsunilahirrao Sun, 04/27/2014 - 13:43
सद्भावना रॅलीपर्यँत मुस्लीमांचा पाठीँबा असेलही. पण टोपीच्या प्रसंगामुळे नंतर मुस्लीम समुदाय मोदींपासून दुरावला आणि हिंदू समाज अधिक जवळ आला असे म्हणता येईल.

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 14:17
सहमत आहे. बरेच जणांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा हिंदूहृदयसम्राट म्हणून मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी हवे आहेत. अवांतर - मला वाटते यावेळी अल्पसंख्यांक ज्यांना मोदी नको आहेत, वा जे मोदी येण्याची भिती बाळगून आहेत असे देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरले असतील. अर्थात त्यांनी आपला कैवारी समजून मते कोणाला दिली असतील हे ज्याचे त्यालाच ठाऊक.

प्यारे१ Sun, 04/27/2014 - 14:31
४८ साली संघ का वाढला, ७७-७८ साली आणखी का वाढला, ९५ ला शिवसेना भाजप महाराष्ट्रात का सत्तेवर आलं, ८४ ला ४ असणारे ८९ ला ९० का झाले... घरातल्या सर्वार्थानं 'बर्‍या' मुलाला सातत्यानं त्याच्याच बेजबाबदार नि वांड भावासाठी (महात्म्याचे शब्द ना?) तडजोड करावी लागत असेल तर बर्‍या मुलाला कधीतरी काड्या कराव्या असं वाटल्यास काय चूक???? - पॉपकॉर्न विकायला कोणी आहे का याची वाट बघत बसलेला!

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 23:39
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
नाही. दंगली हिदुंचे शिरकाण झाल्यामुळे घडल्या, त्यानुशंगाने उलट हिंदुसमाज मोदींवर जास्त नाराज नको काय ? पण वस्तुस्थिती तशी नाही कारण विकास. खरे तर बेसिक गोश्टीच पुरवल्या पण त्याही पुरवायला काँग्रेसने दाखवलेली इछ्चाशक्तीची दिवाळ्खोरी हे एकमेव कारण आहे की आज काँग्रेसविरोध म्हणून मोदींची लाट कार्यक्षमता विषेश उठुन दिसते आहे. हा काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारुन घेतलेला धोंडा आहे. केजरीवाल तो अभी नया हय.

चिरोटा Mon, 04/28/2014 - 11:41
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही
गेल्या १२ वर्षात गुजरातमध्ये तसे काही घडले असते ती ही शंका घ्यायला वाव होता.पण उलट घडते आहे.'तणावपूर्ण परिस्थिती,दुकाने बंद्/जाळपोळ,संशयितांना अटक' असल्या बातम्या कुठून् जास्त येतात? 'सेक्युलर' महाराष्ट्र,आंध्र... की गुजरात?

चौकटराजा Tue, 04/29/2014 - 07:27
भारतात सर्वाधिक आवश्यकता कशाची असेल तर सुप्रशासनाची. पण मोदी याबाबतीत बदल घडवून आणतील असे मला वाटत नाही. न्यायालये, गुप्तचर यंत्रणा, पोलीस, लाचलुचपत प्रतिबंध यात कमालीच्या सुधारणा आणणे गरजेचे आहे. जो आमदार घरबांधणीचा कायदा करतो तोच बेकायदेशीर बांधकामे नियमित करा म्हणून उपोषण करतो. अशा आमदाराला मोदी तुरूंगाचा रस्ता दाखवतील काय? मग आता मोदी लोकप्रिय आहेत याचे कारण काय? खरे तर ते भारतभर लोकप्रिय नाहीतच. बाजपेयीही नव्हते. भारतभर लोकप्रियता फक्त नेहरू, इंदिरा,लालबहादूर शास्त्रीजी व राजीव गांधी या चारच जणाना मिळाली. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मात्र नरेंद्र मोदी ये लोकप्रिय आहेत यात शंका नाही. तरूणाना भाषणातून स्फूर्ति मिळते. त्यात सोनिया ,मनमोहन कुचकामी आहेत.मोदी यात आघाडी घेऊन आहेत.केजरीवाल देखील भाषणात तेच ते मुद्दे उपस्थित करतात. त्या मानाने मोदी बरेच " तयारीचे" नेते आहेत. हे त्यांच्या कट्टर शत्रूला देखील मान्य करावे लागेल.

भाजपसाठी प्रचार केल्याने झारखंडमधे मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार PATNA: A Muslim woman in Jharkhand has alleged she was gang-raped by more than a dozen men because of her working for BJP in ongoing Lok Sabha elections, police said on Tuesday.

राही Tue, 04/29/2014 - 20:21
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यामुळे महाराष्ट्रात काही फरक पडेल असे वाटत नाही. गेली पंचवीसतीस वर्षे मुंबई महानगरपालिका शिवसेना भाजपकडे आहे. मुंबईत शासनव्यवस्थेचे किती अवमूल्यन झाले आहे हे वेगळे सांगायला नको.

संचित Wed, 04/30/2014 - 22:35
गेल्या ५ वर्षात दररोज नवीन घोटाळे देणाऱ्या कॉंग्रेस मुळे कंटाळलेल्या जनतेला सध्या तरी एकाच पर्याय दिसत आहे. यावेळी देऊन पाहू मत, मोदी करतो तरी काय.

In reply to by संचित

मैत्र गुरुवार, 05/01/2014 - 11:50
बहुतेक लोकांना दंगली / हिंदू मुस्लिम वादाबद्दल फारसा इंटरेस्ट नाही.. पाच वर्षांपूर्वी विश्वासाने सत्ता दिल्यावर काँग्रेस आणि युपीए ने जे घोटाळे केले आणि त्यानंतर ज्या बेमुर्वतखोर पद्धतीने वर्तन केले त्याला लोक चिडले आहेत. त्यात महागाई, इन्फ्लेशन, सुरक्षितता आणि सर्वत्र उघड असलेला संधिसाधू पणा. जर २००९ ते २०१३ मध्ये २००४-०९ सारखे चांगले वातावरण राहिले असते तर आज मोदींची इतकी हवा झाली नसती. मोदींनी या anti incumbency चा नीट आणि आक्रमक प्लॅन करून फायदा करून घेतला आहे.. केजरीवाल हा एकच त्यांना समर्थ विरोधक ठरू शकला असता.. पण दिल्लीच्या गोंधळामुळे त्याचा लोकाश्रय कमी झाला. आणि राहुल गांधी हे समर्थ प्रतिस्पर्धी होऊ शकलेच नाहीत. मोदींच्या लोकप्रियतेचे कारण - काँग्रेसविरोधी वातावरण, उत्तम प्लॅनिंग, आक्रमक प्रचार, चांगले मुद्दे..

विजुभाऊ गुरुवार, 05/01/2014 - 15:09
मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण : ते लोकप्रीय आहेत हे सदोदीत "गोबेल्स " टाइप प्रचाराने लोकांवर बिंबवत रहाणे. काही ना काही कारण काढत चर्चेत रहाणे ( प्रचारात मुद्दे यापेक्षा गुद्दे आणणे , जाणून बुजून वादग्रस्त वर्तन करणे उदा: मतदानासाठी जाताना मुद्दाम पक्षाचे चिन्ह जाणीवपूर्वक प्रदर्शीत करणे ) प्रसंगी मिडीया मॅनेज मरून चर्चेत रहाणे. त्या अर्थाने त्यांची तुलना राखी सावंतां बरोबर करता येईल.

In reply to by विजुभाऊ

संचित गुरुवार, 05/01/2014 - 20:09
मोदींच वर्तन थोड जास्त आक्रमक असत. पण हल्ली ते जुन्या आणि विवादित मुद्द्याबद्दल बोलताना ते शक्य तेवढा वाद टाळताना दिसतात. जुने मुद्दे परत परत उकरून काढले जात असताना सध्या मोदी आधीच्या तुलनेत असे मुद्दे बरेच शांतपणे हाताळताना दिसत आहे. हे सुद्धा एक कारण आहे, कि अधिक जनता आता त्यांना स्वीकारताना दिसते आहे. आणि मला तरी वाटते प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांना कॉंग्रेस ने बाजूला करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. राहुल गांधी यांचा साधेपणाच फुगा फुटला आणि लोकांना त्यांचे आकर्षण जवळ पास संपले. आता प्रियांका वड्रा हीच काय ती कॉंग्रेस जवळ अशा दिसते आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 05/01/2014 - 20:56
>>> मोदींच्या लोकप्रियतेचे कारण काही कारणे ... - निर्णयक्षमता असलेला स्वतःचे नेतृत्वगूण सिद्ध केलेला एक अत्यंत खंबीर नेता - अत्यंत स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त राजकीय व वैयक्तिक कारकीर्द - अहंकारी स्वभाव असला तरी तो अहंकार कर्तृत्वातून आलेला आहे - प्रभावी वक्तृत्व - समोरच्याला न घाबरता शिंगावर घेऊन थेट आव्हान देण्याचा सडेतोड स्वभाव - १२ वर्षांहून अधिक काळ पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधक, तपास संस्था, प्रसारमाध्यमे, तथाकथित उच्चभ्रू व्यक्तिमत्वे इ. शी खंबीरपणे झुंझणारा नेता अजूनही अनेक कारणे असतील.

. हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

हे आयोगवाले उगाचच काहीतरी काढत बसताहेत झाल. पूर्वी इंदिराही मतदान केल्यावर आपला उजवा हात उंच करून दाखवे. (मोदी पंतप्रधान अशी अपेक्षा करणारी) माई

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 20:26
>>> हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. :yahoo: >>> जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल :dance: >>> आणि उमेदवारीही रद्द होईल... :clapping: >>> मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल. *HI*

In reply to by संजय क्षीरसागर

सचिन Fri, 05/02/2014 - 21:20
येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? हे काँग्रेसवाले त्यांना अटक करा म्हणतात, पण आझमखानाबद्दल मूग गिळून गप्प का? मुलायम म्हणतो " लडकोंसे गलती होती है" .. त्यावर काही बोलत नाहीत.

In reply to by सचिन

निवडणूक आयोगानंच FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि दोन FIR दाखल झालेत. आपण मतदान केलं असं दर्शवणं वेगळं आणि मतदान केल्याची खूण असलेल्या तर्जनीसमोर निवडणूक चिन्ह धरुन फोटो काढणं वेगळं; हे समजण्या इतके शहाणे तर ते नक्कीच असावेत. पण सत्तालोभापायी आलेला उतावीळपणा नडतोयं.

In reply to by संजय क्षीरसागर

The EC, however, isn't convinced and has justified the decision on the ground that Modi's address to the media right after he cast his vote in Vadodra on Wednesday did not seem spontaneous for a number of reasons. "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 14:44
>>> "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. "A spontaneous byte to the media" किती वेळ चालला पाहिजे (म्हणजे जास्तीत जास्त किती सेकंद किंवा किती मिनिटे) याची काही व्याख्या आहे का निवडणुक आयोगाकडे? यावर काही कायदेशीर वेळमर्यादा आहे का? असा काही कायदा किंवा नियम आहे का ज्यानुसार "A spontaneous byte to the media" ठराविक सेकंदांपेक्षा किंवा मिनिटांपेक्षा लांबला तर तो गुन्हा आहे व त्यापेक्षा कमी असला तर चालेल? >>> Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. टेबल-खुर्च्या भाजपने किंवा मोदींनीच पूर्वयोजनेनुसार आणल्या होत्या असा काही पुरावा आहे का? पत्रकार परिषद करायची असेल तर तसे अधिकृत निमंत्रण वृत्तसंस्थांना व माध्यमांना पत्रकार परिषदेच्या आधी काळ पाठवावे लागते. असे अधिकृत निमंत्रण मोदींनी किंवा भाजपने पाठविले होते का? >>> "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added. brief किंवा long interaction ची व्याख्या किंवा नियमावली आहे का निवडणुक आयोगाकडे? किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे long interaction किंवा किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे brief याची व्याख्या किंवा नियमावली आहे का? एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने १ सेकंदापेक्षा कमी म्हणजे brief असेल तर दुसर्‍याला वाटेल की २ तासांपेक्षा कमी म्हणजे brief. प्रत्येक व्यक्तीचा भिन्न दृष्टीकोन असू शकतो. त्यामुळे brief म्हणजे नक्की किती काळ किंवा long interaction म्हणजे नक्की किती काळ याची सुस्पष्ट व निसंदिग्ध मार्गदर्शक तत्वे किंवा नियम असल्याशिवाय असल्या आरोपांना अर्थ नाही. आता राहिला पक्षचिन्हाचा मुद्दा. मतदानकेंद्रापासून १०० (की २०० ?) मीटर अंतराच्या आत पक्षचिन्ह लावता येत नाही. पण त्या परीघाबाहेर उमेदवारांचे बूथ, भित्तिपत्रके असतातच. जर मोदींनी ही अंतराची मर्यादा पाळली असेल तर पक्षचिन्ह दाखविल्याने कोणताच गुन्हा होत नाही. पूर्वी यापेक्षाही गंभीर गुन्हे नेत्यांनी केलेले आहेत. पण आयोगाने आजवर त्यांच्यावर कधीही कारवाई केलेली नाही. २००४ (किंवा २००६ मध्ये) च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या एका कम्युनिस्ट मंत्र्याने स्वतःच्या मतपत्रिकेवर स्वतःच्या उमेदवाराच्या पुढे शिक्का मारून ती मतपत्रिका माध्यमांना संपूर्ण दाखवून नंतर घडी करून मतपेटीत टाकली होती. गुप्त मतदान कायद्याचा हा उघडउघड भंग होता. त्यांच्यावर आयोगाने आजतगायत कारवाई केलेली नाही. मोदींवर एफआयआर दाखल करण्यामागे काँग्रेसचा दबाव आहे. काहीतरी करून मोदींना निवडणुकीतून बाद करण्यासाठी काँग्रेस उरलेल्या १०-११ दिवसात जीवाचे रान करीत आहे. त्यातूनच हे फुसके प्रकरण विनाकारण तापविले जात आहे. आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. भाजप लगेच न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणेल व त्यामुळे निवडणुक आयोगाचे व पर्यायाने काँग्रेसचे पुन्हा एकदा हसे होईल.

In reply to by श्रीगुरुजी

प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 20:48
>>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. कधी सिद्ध झाला? >>> इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. सवलतीचा प्रश्नच नाही. चूक केलीच नाही तर सवलत कशाला? >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे. तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला नाही. वाचला असल्यास तुम्हाला तो समजलेला नाही. न्याय हा ठोस निष्कर्षांवर दिला जातो. भाषण प्रदीर्घ होते की संक्षिप्त याचा निर्णय प्रदीर्घ व संक्षिप्त या दोन्हींची सुस्पष्ट व निसंदिग्ध व्याख्या असल्याशिवाय होऊ शकत नाही. २० मिनिटांचा पत्रकारांशी संवाद हा संक्षिप्त होता की प्रदीर्घ हे याच कारणामुळे न्यायालय ठरवू शकणार नाही. आणि जर पत्रकारांशी संवाद कायदेशीर परीघाच्या बाहेर असेल तर परीघाच्या बाहेर पक्षचिन्ह दाखविणे किंवा पत्रकारांशी संवाद करणे हा गुन्हा होऊच शकत नाही. वकील असीम सरोदेंच्या माहितीनुसार, जर समजा मोदींनी कायद्याचे उल्लंघन केले असे सिद्ध झाले तरी त्यासाठी जास्तीत जास्त रू. २५० दंड होऊ शकतो. फक्त एकच अपवाद. जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते. सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तो किती वेळ केला यावर गुन्हा अवलंबून नाही. निवडणूक चिन्ह हद्दीबाहेर दाखवलं (किंवा पत्रकारांसमोर भाषण बूथपासून लांब अंतरावर केलं ) अशी मखलाशी केली तरी `टेलिकास्ट' हा नव्या प्रकारचा गुन्हा आहे; त्याला अंतराचं बंधन नाही. मोदी दोषी आहेत किंवा कसं ते यावरनं ठरेल : "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election. 6[126. Prohibition of public meetings during period of forty—eight hours ending with hour fixed for conclusion of poll.— (1) No person shall— (a)convene, hold or attend, join or address any public meeting or procession in connection with an election; or (b) display to the public any election matter by means of cinematograph, television or other similar apparatus; or (c) propagate any election matter to the public by holding, or by arranging the holding of, any musical concert or any theatrical performance or any other entertainment or amusement with a view to attracting the members of the public thereto, in any polling area during the period of forty-eight hours ending with the fixed for the conclusion of the poll for any election in the polling area. (2) Any person who contravenes the provisions of sub-section (1) shall be punishable with imprisonment for a term which may extend to two years, or with fine, or with both. (3) In this section, the expression "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election.].

In reply to by श्रीगुरुजी

हे त्या दिव्य असीम सरोदेंचं (२५० रुपये दंडवाल्या) मत आहे का तुमचं? खरं तर निवडणूक आयोगनं FIR दाखल करण्यापूर्वी तुमचा (किंवा सरोदेंचा) सल्ला घ्यायला हवा होता!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 05/05/2014 - 22:33
दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची भाषा व त्याचा अर्थ समजत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळं स्वतःचंच खरं वाटतं. वरील ३ पैकी कोणतेही क्लॉज वाचले तरी कोणाच्याही सहज लक्षात येईल की मोदींनी कोणत्याही क्लॉजचे उल्लंघन केलेले नाही. तुमच्या लक्षात आले नसेल तर एखाद्या अ‍ॅ किंवा बॅ ला विचारा. तो/ती नीट समजावून सांगेल. मागच्याही प्रतिसादात तुम्ही "मोदींवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे" निवडणुक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे अत्यंत हास्यास्पद वाक्य लिहिले होते. मी "गुन्हा कधी सिद्ध झाला?" असे विचारल्यावर तुम्ही केजरीवालांच्या गंगाघाटावरील व राजघाटावरील मौनाप्रमाणे मौनात गेलात. आता तरी उत्तर द्या.

In reply to by श्रीगुरुजी

गुरु़जी जाऊद्या. त्यांना नै समजणार. त्यासाठी प्रगल्भ राजकीय बुद्ध्यांक असावा लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Mon, 05/05/2014 - 22:35
>>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. >>> कधी सिद्ध झाला? या उत्तराची वाट पहात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो.
जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते.
हे तुम्हीच म्हटलंय आणि (नशीबानं) बरोबर आहे, त्यावर आयोगानं म्हटलंय :
The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting."
पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं :
सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.
पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 12:19
>>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. बरोबर आहे. >>> गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. असं काही नाही. निवडणुक आयोगाने यापूर्वी अनेकांवर अनेक वेळा एफआयआर दाखल केलेला होता व नंतर न्यायालयाने तो एफआयआर रद्द केल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. २००९ मध्ये वरूण गांधींच्या विरूद्ध दाखल केलेला एफआयआर). निवडणुक आयोगाच्या आजवरच्या इतिहासात अनेकवेळा अनेक जणांवर एफआयआर दाखल करून सुद्धा काहीही कारवाई ने केल्याची तसेच काहीही कारवाई न करता आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. निवडणुक आयोगाने दाखल केलेले एफआयआर अनेक वेळा राजकीय दडपणामुळे दाखल केलेले असतात. त्यात काहीही दम नसतो. मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे. निव्वळ एफआयआर दाखल केला म्हणून तुमच्या सारख्या अज्ञानांना आनंदाचे भरते आले आहे. काही दिवसातच तुमचा हिरमोड होणार आहे. >>> सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. निवडणुक आयोगाने दाखल केलेले अनेक एफआयआर न्यायालयाने पूर्वी रद्द केले आहेत. परंतु ते कधीही आयोगाच्या अंगलट आलेलं नाही. >>> कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो. अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे नामांकित वकील आहेत. दुर्दैवाने ते तुमच्या आकलनापलिकडचं आहे. त्यात तुमचा दोष नाही. >>> The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting." एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा tone and tenor कसा आहे हे सब्जेक्टिव्ह मत आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार टोन चे विश्लेषण बदलते. (उदा. केजरीवालांचा टोन त्यांच्या आंधळ्या भक्तांना प्रामाणिकपणाचा वाटतो. पण तटस्थ नागरिकांना तोच टोन ढोंगीपणाचा वाटतो.) त्यामुळे आयोगाच्या या मताला काडीमात्र किंमत नाही. त्यांनी राजकीय भाषण केले होते हे निखालस असत्य आहे. कारण पत्रकारांनी स्वत:हून विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. भाषण करणे व न बोलविता स्वतःहून आलेल्या पत्रकारांना उत्तरे देणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यांनी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला या आयोगाच्या आरोपाला टँजिबल पुरावे असल्याशिवाय काडीमात्र महत्त्व नाही. >>> पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं : सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही. निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणुक आयोग काम करतो हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळेच मोदींनी आव्हान दिले आहे. >>> पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. स्वतःची सेल्फी काढणे हा जगातल्या कोणत्याही न्यायालयात गुन्हा समजला जात नाही. त्यांचा सेल्फी काढतानाचा फोटो माध्यमांनी घेऊन माध्यमांनी प्रदर्शित केला होता. मोदींनी स्वतःचा फोटो प्रदर्शित केलेला नाही. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. टीव्ही प्रक्षेपण मोदींनी केलेले नाही. ते माध्यमांनी केलेले आहे. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. मोदी फक्त पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ती पत्रकार परीषद नव्हती. मोदींनी पत्रकार परिषद बोलाविलेली किंवा घेतलीच नव्हती. पत्रकार स्वत:हून त्यांच्याकडे गेले व त्यांना प्रश्न विचारून त्याचे प्रक्षेपण दाखविले गेले. जर यात कोणाचा दोष असेल तर तो माध्यमांचा व निवडणुक केंद्राजवळ माध्यमांना उपस्थित रहायला परवानगी देणार्‍या निवडणुक आयोगाचा आहे. मोदींचा यात दोष नाही. दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. असो. मोदींवर कारवाई होऊन शिक्षा होईल या अज्ञानाच्या आनंदात अजून काही काळ रहा.

In reply to by श्रीगुरुजी

गब्रिएल Tue, 05/06/2014 - 18:34
दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. आत्ता !!! काय गुरुजी तुमीबी. यवढं म्हाय्त हाय आनी कोनितरी म्हनलयं ना की "भूतकालात्ली कुर्तीवरुन, म्होर्ल्या कालातलि कुर्ती वळकता येती". आता येखांद्या मान्साला 'मि चुक्लो' म्हनाय्ला लईच शरम वाटती. अस्तो येकायेकाचा सोबाव. दग्डाच्या भिंतीला वलसा घालून जावं. त्येच्यावं डोस्कं आपटून काय फाय्दा? आ?

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत Sat, 05/03/2014 - 21:26
मोदी मूर्ख नाहीत १०० गजा पेक्षा दूर होते. बाकी निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांची रिपोर्ट पाहोल्या विना अत्यंत दबाव खालील FIR दर्ज करण्याच्या आदेश बहुतेक दिला गेला असावा. असाच दबाव प्रसार भारती वर पडला होता त्यांच्या अधिकार्याने कबूल नामा ही दिला. इच्छा नसताना ही आता मोदींचा ती मुलाकात आता कित्येक वाहिनीन वर कितीदा तरी पहावी लागेल. करायला गेलो आणि झाले एक अशीच परिस्थिती सूचना मंत्रींच्या उतावळे पण मुळे झाली.

In reply to by संजय क्षीरसागर

पोलीसांनी निर्वाळा दिला आहे की मतदान केंद्रापासून २०० मीटर पलिकडच्या भागात हा प्रकार घडल्याने तो गुन्हा ठरत नाही. बसा बोंबलत :D

In reply to by मंदार दिलीप जोशी

कलम १२६ (अ) आणि (ब) ला अंतराची मर्यादा नाही. प्रचार झाला की नाही हा मुद्दा आहे. आधी नीट वाचता यायला हवं तर पुढे अर्थ कळण्याची शक्यता असते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 05/07/2014 - 15:42
दिलगीरी व्यक्त केली की निवडणुक आयोग मोठ्या मनानी सर्वांना माफ करतो. ह्या पेक्षा दोनदा मतदान करा हा सल्ला कितीतरी घातक होता. पण काही कारवाई झाली नाही.

रमेश आठवले Fri, 05/02/2014 - 14:19
असा मुलभूत प्रश्न मला सुनील अहिरराव यांना विचारावासा वाटतो. भारताचे निवडणूक पंच मन्डळ निपक्ष असल्याचे सिद्ध झालेले आहे . त्यांच्या देखरेखेखाली झालेल्या सर्व लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये मोदींनी विजय मिळवला आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांनी या जनमत कौलाचा आदर करावयास हवा. हिटलर अथवा मुसोलिनी असे मोदींना म्हणणार्या लोकांनी हे दोघे डिक्टेटर वारंवार निवडणुकीच्या अग्निदिव्यातून गेले नाहीत हे लक्षात घ्यावे. गेली दहा वर्षे केंद्र सरकार मोदींच्या मागे हात धुवून लागले आहे. एका मुख्यमंत्र्याची, खास संशोधक पथकाच्या (SIT ) अधिकार्यांनी, ११ तास उलट तपासणी केल्याचे दुसरे कुठले उदाहरण नाही. या तपासा नंतर सर्वोच्च न्यायालाने त्याना निर्दोष ठरवले. इतका तावून सुलाखुन निघालेला नेता दुसरा नाही. हा माणूस स्व्च्छ राजवट करणारा आणि निर्लिप्त आहे. असा कर्तृत्ववान माणूस या देशाला पन्तप्रधान म्हणून मिळाला तर देशाचे कल्याणच होईल. काही पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळी त्यांच्यावर टीका करत राहतील. पण हा ही एका निकोप लोकशाहीचाच भाग आहे.

In reply to by रमेश आठवले

विनोद१८ Fri, 05/02/2014 - 14:34
जाऊद्या हो, नाही समजायचे त्या 'तथाकथीत काही बधीरबुद्धी, पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळीना तत्सम विचारजंताना'. त्यांच्या बुद्धिपलीकडले आहे ते. राज्यकरत्यानी फेकलेल्या उष्टया-खरकट्या तुकड्यांवर जगणार्‍यांकडुन यापेक्षा वेगळी अपेक्शा कशी करता येइल.

विनोद१८ Fri, 05/02/2014 - 14:20
हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.
दिवास्वप्ने फार पाहु नयेत माणसाने...कारण ती कधीही प्रत्यक्षात उतरत नाहीत. हा, जर केवळ स्वताचे आत्मसमाधानच करायचे असेल तर ती जरुर पहावीत.

इरसाल Sat, 05/03/2014 - 10:12
व्हाला भाइ अने बेन, पोतानु आ विचार थये शे के मोदी उप्पर, कोरटमा पोलीस केस नाखवी जोईये. आ भाइ "चायवाला चायवाला" कहिने म्हारी अने बीजी म्हारे दस-अग्यार साथिदारोंनी चायनी लॉरी बंद करवी नाखी.

In reply to by मदनबाण

बाळकराम Fri, 05/09/2014 - 04:44
याचा विचार करतोय बराच वेळ! कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? असो, आपण आपले मनोरंजन करुन घ्यायचे मात्र! मदणबाण, व्हिडो भारी बरंका? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष ;)

In reply to by बाळकराम

मदनबाण Mon, 05/12/2014 - 12:35
कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? हॅहॅहॅ... काय आहे ना बाळ्या १० वर्ष राज्य करुन सुद्धा कॉग्रेसला देशाचा विकास साधता आला नाही ! इतके वर्ष राज्य करुन सुद्धा गरिबीच्या नावावर मते मागतात तर कधी गरिबीची रेखा शोधुन काढतात्. शिवाय यांच्या आणि यांच्या मित्र पक्षांच्या मंडळींनी भ्रष्टाराचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे.आपल्या देशाच्या प्रंतप्रधानपदी इतकी दुबळी व्यक्ती इतके वर्ष आहे की त्यांची सार्‍या जगानेच टिंगल केली. आता मोदी शिवाय इतर सशक्त पर्यात दिसत नसल्याने निदान आफ्रिकन लोकांच्या मुखातुन आलेला संदेश तरी आपल्या देशातील लोकांच्या डोक्यात शिरेल असा कोणा हिंदूस्थानी माणसाच्या डोक्यात विचार आला असेल... तसेही साउथ आफ्रिका आणि आपल्या देशाचे गांधींजींमुळे विशेष नाते आहेच ना ? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष बाळ्या तुमची आवड कळली बरं का... *LOL* जाता जाता :- मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे, अबकी बार मोदी सरकारचा प्रचार जरीही मोठ्या प्रमाणात झाला असला तरी सुद्धा मोंदींसाठी हा रस्ता सोपा नाही.

In reply to by मदनबाण

प्यारे१ Mon, 05/12/2014 - 13:52
>>> मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे तुमच्याकडं 'निकाल' आधीच लागले काय? ;)

In reply to by मदनबाण

बाळकराम Fri, 05/16/2014 - 02:10
"बाळ्या" का? वा वा चान, चान! शनिवारवाड्यासमोरच्या पुलावर कानकोरणी घेऊन बसतोस वाटतं तू, मदनबाण? नाही, म्हणजे संस्कार, अदब इ. चा वारापण तुला लागलेला दिसत नाही, म्हणून म्हटलं.

विजुभाऊ Sat, 05/03/2014 - 20:07
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची?

In reply to by विजुभाऊ

विकास Tue, 05/06/2014 - 00:38
"इंदीराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा" हे आठवले... ठाण्याला तर कांती कोळी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यावर नंतर पेपरात दुसर्‍या दिवशी या अर्थाचे वाचल्याचे आठवले: वरती स्वर्गीय इंदीराजींचे पोस्टर आणि ही घोषणा होती आणि खाली अक्षरशः देशी दारूचा पिंप होता ज्यातून बुंद बुंद गळत होते... *drinks*

In reply to by विजुभाऊ

मदनबाण Wed, 05/07/2014 - 11:39
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची? काय इजुभाउ ? एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन गेल्या १० वर्षात भाजपा दिसला ? नाही ना ? मग नमो नमो माळ ओढण्या पलिकडे त्यांच्या हातात काय उरले ? अजुन समजवुन घ्यायचे असेल किंवा वेगळ्या भाषेत उत्तर हवे असेल तर अरनब गोस्वामीनी जी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे ती पहा... राज ठाकरेंनी या प्रश्नावर "व्यवस्थित" उत्तर दिलय बघा. बाकी मी कोणत्याच पक्षाचा समर्थक नाही, जो देशाची आणि देशातल्या लोकांच्या उन्नतीचा प्रयत्न करेल त्याला माझे समर्थन नेहमीच असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तसही प्रतंप्रधानपदी बुजगावण असण्यापे़क्षा मोदी बरे असा इचार वरच्या क्लीप बनवणार्‍याच्या डोक्यात तर नसावा ना ?

विवेकपटाईत Sat, 05/03/2014 - 21:19
वाईट मानू, कुठल्या ही विषयावर लिहिताना लेखकाने वास्तविकता काय होती ते जाणले पाहिजे. केवळ खोट्या प्रचाराला बळी पडून लेख लिहिला नाही पाहिजे. १. गुजरात दंगा ISI आणि स्थानीय त्यांच्या स्थानीय हितचिंतकांनी घडवून आणला होता. प्रतिक्रिया स्वरूप जवळपास ८५० मुस्लीम आणि २५० हिंदू ही मारल्या गेले होते. २. मोदी भारताचे एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगेखोरांवर सक्तीने कार्यवाही केली. ११६ च्या वर दंगेखोर मारल्या गेले त्यात ९०% हिंदू होते. निश्चित हे दंगेखोर भा ज प वाले नसतील अन्यथा मोदी पुढची निवडणूक जिंकले नसते. ३. मोदींच्या सक्ती मुळे गुजरात मध्ये शांतता पसरली आणि त्या मुळे विकास ही झाला. खर म्हणाल तर सेकुलर म्हणविणारे पक्ष अल्प्संख्कांचे खरे शत्रू आहेत म्हंटले तर ४. दिल्लीत ३५०० वर शीख मारल्या गेले पण एक ही दंगेखोर पोलिसांनी मारला नाही. ५. आत्ताच झालेल्या मुझफ्फरनगर भागातल्या दंगलीत ही पोलिसांनी एक ही दंगेखोराला मारले नाही. ६.महाराष्ट्रात ही १९९०-२००० काळात दंगे भडकले होते. पोलिसांनी किती दंगेखोरांना कंठस्नान घातले. (माहित काढा, सत्य कळेलच) ७. अल्पसंख्यकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांचे वोट घेणे म्हणजे सेकुलर वाद. त्या साठी त्यांना मागास ठेवणे ही रणनीती.

मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे.
हे गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर :
`निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे'
तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास Tue, 05/06/2014 - 18:55
हे गुजराथ नाही. अगदी अगदी! ये तो दिल्ली है! निवडणू़क आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणजे काही साधे प्रकरण नाही! ते २००९ पर्यंत (म्हणजे कोल गेट च्या सुमारास) उर्जा मंत्रालयाचे प्रमुख सचीव होते. नंतर ते निवडणूक आयुक्त आणि मग मुख्य आयुक्त झाले. जेंव्हा कोल गेट प्रकरण बाहेर आले तेंव्हा सि बी आय ने त्यांची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाला केली. पण आता ते मुख्यायुक्त असल्याने घटनासिद्ध पदी आहेत म्हणून त्यांची चौकशी करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

दुवा: "Coalgate: Centre won't let CBI quiz PM's adviser, ECs"

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 20:32
>>> गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. तुमची निराधार वाचाळता निव्वळ मोदीद्वेषापोटी आहे. न्याय हा व्यक्तिसापेक्ष किंवा एखाद्या व्यक्तीच्या पर्सेप्शन वर दिला जात नसून वस्तुनिष्ठ पुराव्यांवर दिला जातो. मोदींनी दंगल भडकावली असे कितीही जणांचे पर्सेप्शन असले तरी प्रत्यक्षात न्यायालयात या आरोपाच्या समर्थनार्थ आजतगायत तसूभरही पुरावा मिळालेला नाही. युपीए सरकार, अनेक स्वयंघोषित एनजीओ व नामवंत निधर्मांध गेली १२ वर्षे मोदींविरूध्द बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत. पण न्यायालयात त्यांचे आरोप केव्हाच खोटे ठरले आहेत. निवडणुक प्रचारामध्ये मोदींवर केलेल्या आरोपांचे अगदी तसेच होणार आहे. दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत. असो. >>> असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर : `निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे' तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच. अज्ञानात सुखी रहा.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही म्हणता ते खरंय :
दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत.
करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास Tue, 05/06/2014 - 23:12
आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच शिल्लक आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 11:41
>>> करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात दुर्दैवाने तुमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांना त्याचा अर्थ समजतच नाही. ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते. मोदी मुद्दाम ठरवून त्या मुलाखतीतून का निघून गेले याचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. जरा गुगलून बघा. >>> याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. तुम्हाला काहीच समजत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत. मोदींनी आजतगायत स्वतःला कधीही अपराधी मानलेलं नाही, कारण ते दोषी नव्हतेच. अलिकडच्या काळात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत त्यांनी हेच सांगितलं की मी माफी वगैरे मागण्याचे नाटक करणार नाही. माझी चौकशी करा व मी दोषी असल्यास फाशी द्या. "याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो." ही वाक्ये वाचूनच हसायला आलं आणि तुमच्या अज्ञानाची पुन्हा एकदा कीव आली. >>> इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. मग प्रेसवाल्यांना काय मोदींनी आमंत्रण दिलं होतं का? तुम्हाला काहीच कसं समजत नाही हो? >>> म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) प्रेसवाल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तराची बलात्काराशी तुलना करणे म्हणजे जरा अतिच होत नाही का? म्हणजे "मी गरीब आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे नाहीत. माझ्या खिशात फक्त ५०० रूपये आहेत." असं मानभावीपणे सांगून दुसर्‍याच दिवशी अर्ज भरताना २.५ कोटींची मालमत्ता जाहीर केल्यासारखं आहे. >>>> फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. भारतात प्रभू श्रीरामांचे चित्र लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? आणि मशिदीत जाऊन जातीय दंगलीत सहभाग असलेल्या मुल्लामौलवींचे पाय धरणे, प्रचार करताना दर्ग्यावर चादर चढविणे, टोपीवर उर्दूवर काहीतरी लिहिणे, नमाजाची बांग ऐकू आल्यावर राष्ट्रगीतासारखी मानवंदना देणे हा काय सेक्युलर प्रचार आहे का? >>> मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. काय चुकीचं आहे यात? मोदी काय स्वतःच्या सभेचं स्टेज स्वतः खपून तयार करतात का? >>> धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. धन्य ते तुमचे अज्ञान! >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. काँग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? (जमल्यास) लवकर बरे व्हा आणि (जमल्यास) मोठे पण व्हा!

In reply to by श्रीगुरुजी

इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते.
शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 20:37
>>>> शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. धन्य आहे तुमच्या अज्ञानाची! >>> ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन! मोदी आणि पवार हे दोन परस्परविरोधी ध्रुव आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना होऊच शकत नाही. दुर्दैवाने तुम्हाला हे समजतच नाही. यात तुमचा दोष नाही. (जमल्यास) लवकर मोठे व्हा आणि (जमल्यास) लवकर बरे व्हा.

In reply to by संजय क्षीरसागर

अनुप ढेरे Wed, 05/07/2014 - 15:07
रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता
रामाचा आणि जातीचा काय संबंध? की रामाचे भक्ती एकाच जातीतले लोक करतात?

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 20:29
>>> इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. उत्तर नाही म्हणताना मोठा पण निरर्थक प्रतिसाद लिहून गेलात. >>> ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. कोणाला विश्लेषक लागतो? मोदींना? काहीतरीच काय? उलट मोदींच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण विचारवंत (!) भिंग लावून करत असतात. मराठी किंवा हिंदी बातम्यांच्या वाहिन्या बघा म्हणजे समजेल. >>> फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! जो माणूस संपूर्ण निर्दोष असतो तोच हे आव्हान देऊ शकतो. ज्या व्यक्तीविरूद्ध सर्व यंत्रणा व माध्यमे १२ वर्षॅ वापरून सुद्धा कणभरही दोष सापडला नाही तीच व्यक्ती असे आव्हान देऊ शकते. >>> त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. अहो, खरंच आहे ते. प्रेसवाले तिथे मोदींच्या मागोमाग स्वतःहून गेले होते. केजरीवाल नदीवर टॉवेल गुंडाळून अंघोळीला जाताना, सर्वांच्या देखत आपल्या थोबाडीत मारायला सांगितलेल्या स्वतःच्याच पक्षाच्या व्यक्तीला भेटायला जाताना प्रेसवाले बरोबर घेऊन जातात. मोदींना असली नौटंकी करण्याची कधीही गरज भासलेली नाही. >>> रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? रामाचा फोटो लावणे ही जातीनिर्देशकता? धन्य आहे तुमची! >>> मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. छबि स्टेजवर लावणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. रामनाम घेणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. नाही. आप व काँग्रेस एकाचे माळेचे मणी आहेत. म्हणून तर त्यांचं साटंलोटं आहे. भाजप पूर्ण वेगळा आहे. >>> प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते. तुम्हाला बुद्धीच नसल्याने वापरायचा किंवा न वापरायचा प्रश्नच उद्भवत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

केवळ तुम्हीच उतरु शकता. त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. तेव्हा रहा भ्रमात.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर गुरुवार, 05/08/2014 - 17:09
तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला केवळ तुम्हीच उतरु शकता.
आँ????????? रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. उदाहरणादाखलः- http://www.misalpav.com/comment/502272#comment-502272 ह्यात तर तुम्ही फार त्या माणसाच्या कामाला "निम्न्स्तरावरील काम" वगैरे म्हणुन मो़कळे झालात..!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 17:57
तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच ग्रे म्याटर असतं तर मिपावर जिलब्या पाडणं सोडून अन्य कामंही करता आली असती, पण काये ना, वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं तरी ३१ जुलैच्या कामांचा दट्ट्या लागायचा तो लागलाच. सबब काय ते समजा ;)

In reply to by पिलीयन रायडर

श्रीगुरुजी गुरुवार, 05/08/2014 - 20:22
>>> रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. यांचं म्हणजे "मी नाही बाई त्यातली, ..." असं असतं.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी गुरुवार, 05/08/2014 - 20:20
>>> केवळ तुम्हीच उतरु शकता. तुमचा नम्र स्वभाव आवडला. >>> त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. मग कशाला इतका वेळ कालापव्यय केलात? >>> तेव्हा रहा भ्रमात. भ्रमात तुम्ही आहात. मी नव्हे. वेगवेगळ्या धाग्यांवर तुमच्या भ्रमाचा भोपळा अनेकांनी फोडलेला आहे. तुमच्यासारखी मंडळी कायमच भ्रमात असतात. बादवे, याच्या आधीच्या प्रतिसादात "तस्मात थांबतो" असे लिहिले होते. पण न थांबता पुन्हा एकदा लिहिण्याची सुरसुरी आलेली दिसत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बाळकराम Fri, 05/09/2014 - 04:30
- पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो- पवारांच्या वाक्यांत ज्या लोकांना सूचक आणि गूढ अर्थ सापडतो, अशा लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला पहिल्यापासूनच अपार आदर वाटत आला आहे!

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Sun, 05/11/2014 - 21:01
>>> >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. >>> ग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? निवडणुक आयोग हा तटस्थ असतो असे म्हटले जाते. निवडणुक आयोग हा कदाचित तटस्थ असू शकेल, पण निवडणुक आयुक्त मात्र तटस्थ असतीलच असे नाही. विशेषतः जेव्हा सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीने व सोयीच्या व्यक्ती त्या पदावर बसवितो, तेव्हा तटस्थपणाची अपेक्षाच करता येत नाही. गेल्या काही दिवसातील घटनांनी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोदींनी बडोद्यातील मतदानानंतर स्वतःची सेल्फी काढताना माध्यमांनी त्यांचा फोटो टिपला व नंतर स्वतःहून आलेल्या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावर आयोगाने अक्षरशः काही तासातच त्यांच्याविरूद्ध थेट एफआयआर दाखल केला. पण पप्पू अमेठीत मतदानाच्या दिवशी एक मतदार मतदान करत असताना थेट मतदान यंत्राशेजारी उभा असल्याचे ३ वेगवेगळे फोटो माध्यमांनी टिपलेले असताना पप्पूला मात्र हाच आयोग क्लीन चिट देउन मोकळा झाला. ३ दिवसांपूर्वी मोदींनी वाराणशीतील बेनियाबाग भागात सभेला व रोड शो करायला आयोगाने बंदी घातली. पण त्याच भागात दुसर्‍याच दिवशी पप्पू आणि अखिलेश यादवला रोड शो ला परवानगी दिली. आज निवडणुक आयोगाने भाजपच्या वाराणशीतील कार्यालयावर विनाकारण धाड घालून प्रचाराचे बिल्ले, टोप्या इ. जप्त केले. भाजप म्हणे या गोष्टी मतदारांना वाटणार होता. कालच प्रचार संपल्याने हे उरलेले साहित्य आहे असे भाजपने सांगून सुद्धा आयोगाने आपला हट्ट सोडला नाही. धाड टाकून साहित्य जप्त केल्यावर काही तासातच आयोगाने सर्व साहित्य परत दिले व भाजप प्रचारासाठी हे साहित्य वापरणार नसल्याची कबुली दिली. काँग्रेस, आप, सप, बसप इ. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर धाड टाकली असती तरी त्यात त्या पक्षाच्या प्रचाराचे उरलेले साहित्य मिळालेच असते. मग इतर पक्ष सोडून फक्त भाजपच्याच कार्यालयावर का धाड टाकली? मुद्दाम भाजपला बदनाम करणे व भीति दाखविणे हे दोनच उद्देश यामागे दिसतात. मी आधीच लिहिल्याप्रमाणे निवडणुक आयोग कदाचित तटस्थ असेल, पण निवडणुक आयुक्त तसे असतील अशी खात्री नाही.

In reply to by श्रीगुरुजी

या बाबतीत सहमत . EC हा काँग्रेसधार्जिणा असावा, महाराष्ट्रात मतदार संघ पुर्नरचनेत जाणत्या राजाची मतं घेऊन काम झाल्याची चर्चा होती.

विकास Wed, 05/07/2014 - 00:49
Gujarat Land Acquisition Model is the Best: Commerce Ministry Report काँग्रेसच्या आनंद शर्मा या मंत्र्यांच्या अख्त्यारीतील क्रेंद्रीय व्यापार मंत्रालयाने आज गुजरात मधील भूसंपादन पद्धतीला आदर्श पद्धत म्हणल्याचे आले आहे.

In reply to by विकास

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 01:16
हे आले मोदि भक्त :D ...अहो, बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. मोदिभक्तांना&%$#&*%&$# जातीयवाद%&$&-%$# आकलन &$&##मानसीकता*&#@&$& (आपापल्या वकुबाप्रमाणे ब्लाब्लाब्ला चा अर्थ लावावा हि विनंती :P )

In reply to by अर्धवटराव

विकास Wed, 05/07/2014 - 01:34
डिसक्लेमरः आम्ही मोदी भक्त नसून अ आणि ब काँग्रेस भक्तांचे विचार मोदीत सॉरी मोडीत निघालेत हे सिद्ध करणारे विचारकृमीकिटक आहोत. :) बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. ते ही खरेच म्हणा. आदर्श मधे चव्हाण साहेब आहेत. मोदी थोडेच! ;) :D

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 20:42
http://www.loksatta.com/desh-videsh-news/ishrat-jahan-encounter-no-prosecutable-evidence-against-shah-says-cbi-497881/ भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे सरचिटणीस आणि गुजरातमधील माजी मंत्री अमित शाह यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी इशरत जहॉं चकमकप्रकरणी क्लिन चीट दिली. याप्रकरणी अमित शाह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करता येईल, असे कोणतेही पुरावे आपल्याकडे नसल्याचे सीबीआयने सांगितले. शाह यांच्याबरोबरच गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही सीबीआयने क्लिनचीट दिली आहे. सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही आरोपींविरोधात आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. यामुळे ऐन निवडणुकीच्या मोसमात शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाही सीबीआयच्या भूमिकाचा फायदाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. इशरत जहॉं चकमकीमध्ये मारला गेलेला प्रणेश ऊर्फ जावेद शेख याच्या वडिलांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी सीबीआयने आपली बाजू मांडली. या चकमकीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये निलंबित करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल यांच्यासह 'आयबी'तील चार अधिकाऱयांचा समावेश आहे. सत्यमेव जयते!

In reply to by श्रीगुरुजी

विकास Wed, 05/07/2014 - 20:46
ते तुम्ही काही म्हणा... पण अरविंद केजरीवालच एकमेकाव्दितीय... कोणिही मारो त्यांना थप्पड बेदम फिर भी इस बंदे मे ही है दम. *dash1*

विकास गुरुवार, 05/08/2014 - 05:18
आज टाईम्स ऑफ इंडीया मधे आलेल्या बातमीनुसार मोदी सरकारला युपिए सरकारकडून विविध प्रकारची २८५ बक्षिसे/प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. त्यातला काही ठळक भाग खालील प्रमाणे:
Modi's case for his governance is perhaps spurred by the awards that the Gujarat government has received since 2004, which amount to more than 285. Among these are seven Prime Minister's awards, 82 conferred by various central government departments, and 172 by well-known national and international agencies for performances in various development areas. Over the past few years, under the Congress-led UPA rule, the Gujarat government got the Prime Minister's award for best water and sanitation management in rural areas, housing development for poor urban people, and for best practices in controlling maternal and infant mortality. In 2010-11, the Government of India's department of administrative reforms and public grievances and the department of information technology awarded Modi's office (the Chief Minister's Office) best practices award for people-oriented services. The Gujarat Urban Development Department has bagged several central government awards for the BRTS, implementation of reforms norms, and for the seven-point charter of JnNURM. Other awards the state won include those for transportation, solid waste management, and water supply projects.
आता यावरून मोदींना केवळ business friendly असे लेबल लावायचे का? यात प्रश्न परत मोदीसमर्थनाचा नाही तर आपल्याला न आवडणार्‍या व्यक्तीस काय वाट्टेल ते करून बदनाम करणे हे योग्य आहे का, हा आहे. सध्या आंधळ्या मोदीभक्तीपेक्षा आंधळा मोदीद्वेषच उतू जाऊ लागला आहे असे वातावरण आहे. असो.

अभिजित - १ गुरुवार, 05/08/2014 - 17:43
९व्या टप्प्यातल्या फक्त ४१ जागा बाकी असताना सरकार आणि प्रशासन यांच्याविरोधात अचानक सूडाचं राजकारण करण्याचं कारण जाणण्यासाठी नरेंद्र मोदींचं अमेठीतलं भाषण यु-ट्युबवर पहायला हवं. अमेठी आणि रायबरेलीत विरोधी पक्षांनी ताकदवान उमेदवार उभा न करण्याचा, महत्त्वाच्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचार न करण्याचा आणि गांधी घराण्यातील उमेदवारांवर थेट टीका न करण्याचा एक संकेत होता जो अटल बिहारी वाजपयी आणि लाल कृष्ण आडवाणींनीही पाळला होता. पण नरेंद्र मोदींनी तो साफ धुडकावून लावला. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/modi-and-varansi बोस्टन विमानतळावर पप्पू ला पकडले होते. १ लाख डॉलर कॅश बाळगली होती म्हणून. तेव्हा अटलबिहारी पंतप्रधान होते. त्यांनी पप्पूला सोडवले. हे वरच्या लेवलचे नेते सगळे मैत्री बाळगून असतात आपसात. खाबुगिरी करण्यात पण. मोदी नक्कीच वेगळे आहेत. सहिष्णू राजकारण खूप झाले. पवार साहेब नेहमी महाराष्ट्रच्य सहिष्णू राजकारणाचे गोडवे गात असतात. आता मोदी सारखा असहिष्णू नेताच पाहिजे आहे.

भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन होऊ शकतो पण त्यावर पक्ष चालवता येत नाहीत. तुम्ही विधान सभेची निवडणूक दिल्लीत लढवली दिल्लीच्या वीज ,पाणी ह्या मुलभूत प्रश्नाला हात घातला म्हणून तुम्हाला आता यश मिळाले. आता लोक सभेसाठी सार्या देशभर निवडणुका लढवणार तेव्हा लोकसभेच्या दृष्टीने तुमच्या पक्षाची आर्थिक , परराष्ट्र , सांस्कृतिक , सामाजिक ,धार्मिक धोरणे प्रभावी पणे जनतेच्या समोर अजून आप ने मांडली नाही. केजू फक्त व्यक्तिगत हल्ले करत होता. एका मुलाखतीत खाजगीकरणाला त्याचा विरोध आहे हा मुद्दा त्याने वगळायला सांगितला कारण ह्या विरोधाचे कारण तांत्रिक असून ते आता सांगण्याचा वेळ नसल्याने उगाच मध्यमवर्गीयांचा रोष नको अशी चालबाजी करत होता. अरे बाबा तुझे तांत्रिक मुद्दे जनतेला कधी सांगणार का तुझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन तू तांत्रिक मुद्दे आहेत असे करणार तुझे विचार जनतेपुढे मांडणाताना संधार्भासाहित स्पष्टीकरण देणे द्याला गरजेचे वाटत नाही. ह्याउलट मोदी गेल्या दीड वर्षापासून त्यांचे पर्यटन ते इतर आर्थिक , शैक्षणिक धोरणे काय आहेत हे विविध ठिकाणी भाषणातून नुसते सांगितले नाही तर गुजरात मध्ये त्या संबंधी काय केले ह्याचे उदाहरण दिले. आज केजू सरकार बनवणार नाही बनवणार दोघेच राहुल किंवा मोदी आता शेवटी शेवटी ह्या दोघांची पंगा घेऊन प्रसार मध्यांना चालणार नाही त्यामुळे कधी केजू , कधी राज असे तत्कालीन गल्ला भरायला प्रसार माध्यमांना चालतात. मात्र दीर्घ काळासाठी बिग शॉट वर लक्ष द्यावे लागते. आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही मोदी मे हे दम मोदी हे सिंघम लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

अर्धवटराव Fri, 05/09/2014 - 03:48
आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही
लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही
नेम्कं काय म्हन्नं हाय ?

In reply to by विकास

बाळकराम Fri, 05/09/2014 - 12:05
दिसतोय विकासराव?!! ;) पण गटारामुळे येणार्‍या घाणीला ईनो काय करणार? तिथे रुमाल पाहिजे जो मी नाकाला लावून बसलोय आधीच, त्यामुळे सल्ल्याबद्दल थँक्स बट नो थँक्स!

अभिजित - १ Fri, 05/16/2014 - 21:18
गुजरात मध्ये करून दाखवलं . आणि खरेच करून दाखवलं . शिवसेने सारखे नाही , नुसते होर्डिंग पुरते. अटल किवा अडवाणी सारखे सर्वसमावेशकतेचे ( थोडक्यात सेटिंग बाजी ) राजकारण करणार नाहीत हि खात्री. खूप सोसले आहे देशाने. आता कोण तरी कट्टर कडवा माणूस पाहिजे सर्व स्तरावरची लढाई लढायला. मग तो लढा भ्रष्टाचार , पाकिस्तान , काश्मीर प्रश्न नाहीतर अजून काहीही असू दे. आणि झटपट निकाल लावायची क्षमता. जी नमो मध्ये आहे. हेच खरे महत्वाचे प्लस point आहेत नमोचे. विधान सभे मध्ये चित्र नक्कीच वेगळे असणार आहे,

डावखुरा Sun, 04/27/2014 - 13:09
तुमचे बरोबरही असेल पण मुस्लीम समाजाचाही पाठींबा आहेच..की.. त्यांनी सद्भावना रॅलीत टोपीचा स्वीकार न करुनच दाखवुन दिले...आणि तरीही कोणी फार ठ्ळक आरोप करु शकले नाही... पण बहुसंख्याक परंतु युपीए राजवटीत दुर्लक्षित असलेल्यांची मने जिंकली...

drsunilahirrao Sun, 04/27/2014 - 13:43
सद्भावना रॅलीपर्यँत मुस्लीमांचा पाठीँबा असेलही. पण टोपीच्या प्रसंगामुळे नंतर मुस्लीम समुदाय मोदींपासून दुरावला आणि हिंदू समाज अधिक जवळ आला असे म्हणता येईल.

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 14:17
सहमत आहे. बरेच जणांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा हिंदूहृदयसम्राट म्हणून मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी हवे आहेत. अवांतर - मला वाटते यावेळी अल्पसंख्यांक ज्यांना मोदी नको आहेत, वा जे मोदी येण्याची भिती बाळगून आहेत असे देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरले असतील. अर्थात त्यांनी आपला कैवारी समजून मते कोणाला दिली असतील हे ज्याचे त्यालाच ठाऊक.

प्यारे१ Sun, 04/27/2014 - 14:31
४८ साली संघ का वाढला, ७७-७८ साली आणखी का वाढला, ९५ ला शिवसेना भाजप महाराष्ट्रात का सत्तेवर आलं, ८४ ला ४ असणारे ८९ ला ९० का झाले... घरातल्या सर्वार्थानं 'बर्‍या' मुलाला सातत्यानं त्याच्याच बेजबाबदार नि वांड भावासाठी (महात्म्याचे शब्द ना?) तडजोड करावी लागत असेल तर बर्‍या मुलाला कधीतरी काड्या कराव्या असं वाटल्यास काय चूक???? - पॉपकॉर्न विकायला कोणी आहे का याची वाट बघत बसलेला!

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 23:39
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
नाही. दंगली हिदुंचे शिरकाण झाल्यामुळे घडल्या, त्यानुशंगाने उलट हिंदुसमाज मोदींवर जास्त नाराज नको काय ? पण वस्तुस्थिती तशी नाही कारण विकास. खरे तर बेसिक गोश्टीच पुरवल्या पण त्याही पुरवायला काँग्रेसने दाखवलेली इछ्चाशक्तीची दिवाळ्खोरी हे एकमेव कारण आहे की आज काँग्रेसविरोध म्हणून मोदींची लाट कार्यक्षमता विषेश उठुन दिसते आहे. हा काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारुन घेतलेला धोंडा आहे. केजरीवाल तो अभी नया हय.

चिरोटा Mon, 04/28/2014 - 11:41
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही
गेल्या १२ वर्षात गुजरातमध्ये तसे काही घडले असते ती ही शंका घ्यायला वाव होता.पण उलट घडते आहे.'तणावपूर्ण परिस्थिती,दुकाने बंद्/जाळपोळ,संशयितांना अटक' असल्या बातम्या कुठून् जास्त येतात? 'सेक्युलर' महाराष्ट्र,आंध्र... की गुजरात?

चौकटराजा Tue, 04/29/2014 - 07:27
भारतात सर्वाधिक आवश्यकता कशाची असेल तर सुप्रशासनाची. पण मोदी याबाबतीत बदल घडवून आणतील असे मला वाटत नाही. न्यायालये, गुप्तचर यंत्रणा, पोलीस, लाचलुचपत प्रतिबंध यात कमालीच्या सुधारणा आणणे गरजेचे आहे. जो आमदार घरबांधणीचा कायदा करतो तोच बेकायदेशीर बांधकामे नियमित करा म्हणून उपोषण करतो. अशा आमदाराला मोदी तुरूंगाचा रस्ता दाखवतील काय? मग आता मोदी लोकप्रिय आहेत याचे कारण काय? खरे तर ते भारतभर लोकप्रिय नाहीतच. बाजपेयीही नव्हते. भारतभर लोकप्रियता फक्त नेहरू, इंदिरा,लालबहादूर शास्त्रीजी व राजीव गांधी या चारच जणाना मिळाली. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मात्र नरेंद्र मोदी ये लोकप्रिय आहेत यात शंका नाही. तरूणाना भाषणातून स्फूर्ति मिळते. त्यात सोनिया ,मनमोहन कुचकामी आहेत.मोदी यात आघाडी घेऊन आहेत.केजरीवाल देखील भाषणात तेच ते मुद्दे उपस्थित करतात. त्या मानाने मोदी बरेच " तयारीचे" नेते आहेत. हे त्यांच्या कट्टर शत्रूला देखील मान्य करावे लागेल.

भाजपसाठी प्रचार केल्याने झारखंडमधे मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार PATNA: A Muslim woman in Jharkhand has alleged she was gang-raped by more than a dozen men because of her working for BJP in ongoing Lok Sabha elections, police said on Tuesday.

राही Tue, 04/29/2014 - 20:21
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यामुळे महाराष्ट्रात काही फरक पडेल असे वाटत नाही. गेली पंचवीसतीस वर्षे मुंबई महानगरपालिका शिवसेना भाजपकडे आहे. मुंबईत शासनव्यवस्थेचे किती अवमूल्यन झाले आहे हे वेगळे सांगायला नको.

संचित Wed, 04/30/2014 - 22:35
गेल्या ५ वर्षात दररोज नवीन घोटाळे देणाऱ्या कॉंग्रेस मुळे कंटाळलेल्या जनतेला सध्या तरी एकाच पर्याय दिसत आहे. यावेळी देऊन पाहू मत, मोदी करतो तरी काय.

In reply to by संचित

मैत्र गुरुवार, 05/01/2014 - 11:50
बहुतेक लोकांना दंगली / हिंदू मुस्लिम वादाबद्दल फारसा इंटरेस्ट नाही.. पाच वर्षांपूर्वी विश्वासाने सत्ता दिल्यावर काँग्रेस आणि युपीए ने जे घोटाळे केले आणि त्यानंतर ज्या बेमुर्वतखोर पद्धतीने वर्तन केले त्याला लोक चिडले आहेत. त्यात महागाई, इन्फ्लेशन, सुरक्षितता आणि सर्वत्र उघड असलेला संधिसाधू पणा. जर २००९ ते २०१३ मध्ये २००४-०९ सारखे चांगले वातावरण राहिले असते तर आज मोदींची इतकी हवा झाली नसती. मोदींनी या anti incumbency चा नीट आणि आक्रमक प्लॅन करून फायदा करून घेतला आहे.. केजरीवाल हा एकच त्यांना समर्थ विरोधक ठरू शकला असता.. पण दिल्लीच्या गोंधळामुळे त्याचा लोकाश्रय कमी झाला. आणि राहुल गांधी हे समर्थ प्रतिस्पर्धी होऊ शकलेच नाहीत. मोदींच्या लोकप्रियतेचे कारण - काँग्रेसविरोधी वातावरण, उत्तम प्लॅनिंग, आक्रमक प्रचार, चांगले मुद्दे..

विजुभाऊ गुरुवार, 05/01/2014 - 15:09
मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण : ते लोकप्रीय आहेत हे सदोदीत "गोबेल्स " टाइप प्रचाराने लोकांवर बिंबवत रहाणे. काही ना काही कारण काढत चर्चेत रहाणे ( प्रचारात मुद्दे यापेक्षा गुद्दे आणणे , जाणून बुजून वादग्रस्त वर्तन करणे उदा: मतदानासाठी जाताना मुद्दाम पक्षाचे चिन्ह जाणीवपूर्वक प्रदर्शीत करणे ) प्रसंगी मिडीया मॅनेज मरून चर्चेत रहाणे. त्या अर्थाने त्यांची तुलना राखी सावंतां बरोबर करता येईल.

In reply to by विजुभाऊ

संचित गुरुवार, 05/01/2014 - 20:09
मोदींच वर्तन थोड जास्त आक्रमक असत. पण हल्ली ते जुन्या आणि विवादित मुद्द्याबद्दल बोलताना ते शक्य तेवढा वाद टाळताना दिसतात. जुने मुद्दे परत परत उकरून काढले जात असताना सध्या मोदी आधीच्या तुलनेत असे मुद्दे बरेच शांतपणे हाताळताना दिसत आहे. हे सुद्धा एक कारण आहे, कि अधिक जनता आता त्यांना स्वीकारताना दिसते आहे. आणि मला तरी वाटते प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांना कॉंग्रेस ने बाजूला करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. राहुल गांधी यांचा साधेपणाच फुगा फुटला आणि लोकांना त्यांचे आकर्षण जवळ पास संपले. आता प्रियांका वड्रा हीच काय ती कॉंग्रेस जवळ अशा दिसते आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 05/01/2014 - 20:56
>>> मोदींच्या लोकप्रियतेचे कारण काही कारणे ... - निर्णयक्षमता असलेला स्वतःचे नेतृत्वगूण सिद्ध केलेला एक अत्यंत खंबीर नेता - अत्यंत स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त राजकीय व वैयक्तिक कारकीर्द - अहंकारी स्वभाव असला तरी तो अहंकार कर्तृत्वातून आलेला आहे - प्रभावी वक्तृत्व - समोरच्याला न घाबरता शिंगावर घेऊन थेट आव्हान देण्याचा सडेतोड स्वभाव - १२ वर्षांहून अधिक काळ पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधक, तपास संस्था, प्रसारमाध्यमे, तथाकथित उच्चभ्रू व्यक्तिमत्वे इ. शी खंबीरपणे झुंझणारा नेता अजूनही अनेक कारणे असतील.

. हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

हे आयोगवाले उगाचच काहीतरी काढत बसताहेत झाल. पूर्वी इंदिराही मतदान केल्यावर आपला उजवा हात उंच करून दाखवे. (मोदी पंतप्रधान अशी अपेक्षा करणारी) माई

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 20:26
>>> हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. :yahoo: >>> जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल :dance: >>> आणि उमेदवारीही रद्द होईल... :clapping: >>> मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल. *HI*

In reply to by संजय क्षीरसागर

सचिन Fri, 05/02/2014 - 21:20
येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? हे काँग्रेसवाले त्यांना अटक करा म्हणतात, पण आझमखानाबद्दल मूग गिळून गप्प का? मुलायम म्हणतो " लडकोंसे गलती होती है" .. त्यावर काही बोलत नाहीत.

In reply to by सचिन

निवडणूक आयोगानंच FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि दोन FIR दाखल झालेत. आपण मतदान केलं असं दर्शवणं वेगळं आणि मतदान केल्याची खूण असलेल्या तर्जनीसमोर निवडणूक चिन्ह धरुन फोटो काढणं वेगळं; हे समजण्या इतके शहाणे तर ते नक्कीच असावेत. पण सत्तालोभापायी आलेला उतावीळपणा नडतोयं.

In reply to by संजय क्षीरसागर

The EC, however, isn't convinced and has justified the decision on the ground that Modi's address to the media right after he cast his vote in Vadodra on Wednesday did not seem spontaneous for a number of reasons. "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 14:44
>>> "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. "A spontaneous byte to the media" किती वेळ चालला पाहिजे (म्हणजे जास्तीत जास्त किती सेकंद किंवा किती मिनिटे) याची काही व्याख्या आहे का निवडणुक आयोगाकडे? यावर काही कायदेशीर वेळमर्यादा आहे का? असा काही कायदा किंवा नियम आहे का ज्यानुसार "A spontaneous byte to the media" ठराविक सेकंदांपेक्षा किंवा मिनिटांपेक्षा लांबला तर तो गुन्हा आहे व त्यापेक्षा कमी असला तर चालेल? >>> Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. टेबल-खुर्च्या भाजपने किंवा मोदींनीच पूर्वयोजनेनुसार आणल्या होत्या असा काही पुरावा आहे का? पत्रकार परिषद करायची असेल तर तसे अधिकृत निमंत्रण वृत्तसंस्थांना व माध्यमांना पत्रकार परिषदेच्या आधी काळ पाठवावे लागते. असे अधिकृत निमंत्रण मोदींनी किंवा भाजपने पाठविले होते का? >>> "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added. brief किंवा long interaction ची व्याख्या किंवा नियमावली आहे का निवडणुक आयोगाकडे? किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे long interaction किंवा किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे brief याची व्याख्या किंवा नियमावली आहे का? एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने १ सेकंदापेक्षा कमी म्हणजे brief असेल तर दुसर्‍याला वाटेल की २ तासांपेक्षा कमी म्हणजे brief. प्रत्येक व्यक्तीचा भिन्न दृष्टीकोन असू शकतो. त्यामुळे brief म्हणजे नक्की किती काळ किंवा long interaction म्हणजे नक्की किती काळ याची सुस्पष्ट व निसंदिग्ध मार्गदर्शक तत्वे किंवा नियम असल्याशिवाय असल्या आरोपांना अर्थ नाही. आता राहिला पक्षचिन्हाचा मुद्दा. मतदानकेंद्रापासून १०० (की २०० ?) मीटर अंतराच्या आत पक्षचिन्ह लावता येत नाही. पण त्या परीघाबाहेर उमेदवारांचे बूथ, भित्तिपत्रके असतातच. जर मोदींनी ही अंतराची मर्यादा पाळली असेल तर पक्षचिन्ह दाखविल्याने कोणताच गुन्हा होत नाही. पूर्वी यापेक्षाही गंभीर गुन्हे नेत्यांनी केलेले आहेत. पण आयोगाने आजवर त्यांच्यावर कधीही कारवाई केलेली नाही. २००४ (किंवा २००६ मध्ये) च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या एका कम्युनिस्ट मंत्र्याने स्वतःच्या मतपत्रिकेवर स्वतःच्या उमेदवाराच्या पुढे शिक्का मारून ती मतपत्रिका माध्यमांना संपूर्ण दाखवून नंतर घडी करून मतपेटीत टाकली होती. गुप्त मतदान कायद्याचा हा उघडउघड भंग होता. त्यांच्यावर आयोगाने आजतगायत कारवाई केलेली नाही. मोदींवर एफआयआर दाखल करण्यामागे काँग्रेसचा दबाव आहे. काहीतरी करून मोदींना निवडणुकीतून बाद करण्यासाठी काँग्रेस उरलेल्या १०-११ दिवसात जीवाचे रान करीत आहे. त्यातूनच हे फुसके प्रकरण विनाकारण तापविले जात आहे. आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. भाजप लगेच न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणेल व त्यामुळे निवडणुक आयोगाचे व पर्यायाने काँग्रेसचे पुन्हा एकदा हसे होईल.

In reply to by श्रीगुरुजी

प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 20:48
>>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. कधी सिद्ध झाला? >>> इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. सवलतीचा प्रश्नच नाही. चूक केलीच नाही तर सवलत कशाला? >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे. तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला नाही. वाचला असल्यास तुम्हाला तो समजलेला नाही. न्याय हा ठोस निष्कर्षांवर दिला जातो. भाषण प्रदीर्घ होते की संक्षिप्त याचा निर्णय प्रदीर्घ व संक्षिप्त या दोन्हींची सुस्पष्ट व निसंदिग्ध व्याख्या असल्याशिवाय होऊ शकत नाही. २० मिनिटांचा पत्रकारांशी संवाद हा संक्षिप्त होता की प्रदीर्घ हे याच कारणामुळे न्यायालय ठरवू शकणार नाही. आणि जर पत्रकारांशी संवाद कायदेशीर परीघाच्या बाहेर असेल तर परीघाच्या बाहेर पक्षचिन्ह दाखविणे किंवा पत्रकारांशी संवाद करणे हा गुन्हा होऊच शकत नाही. वकील असीम सरोदेंच्या माहितीनुसार, जर समजा मोदींनी कायद्याचे उल्लंघन केले असे सिद्ध झाले तरी त्यासाठी जास्तीत जास्त रू. २५० दंड होऊ शकतो. फक्त एकच अपवाद. जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते. सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तो किती वेळ केला यावर गुन्हा अवलंबून नाही. निवडणूक चिन्ह हद्दीबाहेर दाखवलं (किंवा पत्रकारांसमोर भाषण बूथपासून लांब अंतरावर केलं ) अशी मखलाशी केली तरी `टेलिकास्ट' हा नव्या प्रकारचा गुन्हा आहे; त्याला अंतराचं बंधन नाही. मोदी दोषी आहेत किंवा कसं ते यावरनं ठरेल : "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election. 6[126. Prohibition of public meetings during period of forty—eight hours ending with hour fixed for conclusion of poll.— (1) No person shall— (a)convene, hold or attend, join or address any public meeting or procession in connection with an election; or (b) display to the public any election matter by means of cinematograph, television or other similar apparatus; or (c) propagate any election matter to the public by holding, or by arranging the holding of, any musical concert or any theatrical performance or any other entertainment or amusement with a view to attracting the members of the public thereto, in any polling area during the period of forty-eight hours ending with the fixed for the conclusion of the poll for any election in the polling area. (2) Any person who contravenes the provisions of sub-section (1) shall be punishable with imprisonment for a term which may extend to two years, or with fine, or with both. (3) In this section, the expression "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election.].

In reply to by श्रीगुरुजी

हे त्या दिव्य असीम सरोदेंचं (२५० रुपये दंडवाल्या) मत आहे का तुमचं? खरं तर निवडणूक आयोगनं FIR दाखल करण्यापूर्वी तुमचा (किंवा सरोदेंचा) सल्ला घ्यायला हवा होता!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 05/05/2014 - 22:33
दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची भाषा व त्याचा अर्थ समजत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळं स्वतःचंच खरं वाटतं. वरील ३ पैकी कोणतेही क्लॉज वाचले तरी कोणाच्याही सहज लक्षात येईल की मोदींनी कोणत्याही क्लॉजचे उल्लंघन केलेले नाही. तुमच्या लक्षात आले नसेल तर एखाद्या अ‍ॅ किंवा बॅ ला विचारा. तो/ती नीट समजावून सांगेल. मागच्याही प्रतिसादात तुम्ही "मोदींवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे" निवडणुक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे अत्यंत हास्यास्पद वाक्य लिहिले होते. मी "गुन्हा कधी सिद्ध झाला?" असे विचारल्यावर तुम्ही केजरीवालांच्या गंगाघाटावरील व राजघाटावरील मौनाप्रमाणे मौनात गेलात. आता तरी उत्तर द्या.

In reply to by श्रीगुरुजी

गुरु़जी जाऊद्या. त्यांना नै समजणार. त्यासाठी प्रगल्भ राजकीय बुद्ध्यांक असावा लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Mon, 05/05/2014 - 22:35
>>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. >>> कधी सिद्ध झाला? या उत्तराची वाट पहात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो.
जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते.
हे तुम्हीच म्हटलंय आणि (नशीबानं) बरोबर आहे, त्यावर आयोगानं म्हटलंय :
The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting."
पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं :
सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.
पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 12:19
>>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. बरोबर आहे. >>> गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. असं काही नाही. निवडणुक आयोगाने यापूर्वी अनेकांवर अनेक वेळा एफआयआर दाखल केलेला होता व नंतर न्यायालयाने तो एफआयआर रद्द केल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. २००९ मध्ये वरूण गांधींच्या विरूद्ध दाखल केलेला एफआयआर). निवडणुक आयोगाच्या आजवरच्या इतिहासात अनेकवेळा अनेक जणांवर एफआयआर दाखल करून सुद्धा काहीही कारवाई ने केल्याची तसेच काहीही कारवाई न करता आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. निवडणुक आयोगाने दाखल केलेले एफआयआर अनेक वेळा राजकीय दडपणामुळे दाखल केलेले असतात. त्यात काहीही दम नसतो. मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे. निव्वळ एफआयआर दाखल केला म्हणून तुमच्या सारख्या अज्ञानांना आनंदाचे भरते आले आहे. काही दिवसातच तुमचा हिरमोड होणार आहे. >>> सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. निवडणुक आयोगाने दाखल केलेले अनेक एफआयआर न्यायालयाने पूर्वी रद्द केले आहेत. परंतु ते कधीही आयोगाच्या अंगलट आलेलं नाही. >>> कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो. अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे नामांकित वकील आहेत. दुर्दैवाने ते तुमच्या आकलनापलिकडचं आहे. त्यात तुमचा दोष नाही. >>> The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting." एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा tone and tenor कसा आहे हे सब्जेक्टिव्ह मत आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार टोन चे विश्लेषण बदलते. (उदा. केजरीवालांचा टोन त्यांच्या आंधळ्या भक्तांना प्रामाणिकपणाचा वाटतो. पण तटस्थ नागरिकांना तोच टोन ढोंगीपणाचा वाटतो.) त्यामुळे आयोगाच्या या मताला काडीमात्र किंमत नाही. त्यांनी राजकीय भाषण केले होते हे निखालस असत्य आहे. कारण पत्रकारांनी स्वत:हून विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. भाषण करणे व न बोलविता स्वतःहून आलेल्या पत्रकारांना उत्तरे देणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यांनी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला या आयोगाच्या आरोपाला टँजिबल पुरावे असल्याशिवाय काडीमात्र महत्त्व नाही. >>> पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं : सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही. निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणुक आयोग काम करतो हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळेच मोदींनी आव्हान दिले आहे. >>> पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. स्वतःची सेल्फी काढणे हा जगातल्या कोणत्याही न्यायालयात गुन्हा समजला जात नाही. त्यांचा सेल्फी काढतानाचा फोटो माध्यमांनी घेऊन माध्यमांनी प्रदर्शित केला होता. मोदींनी स्वतःचा फोटो प्रदर्शित केलेला नाही. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. टीव्ही प्रक्षेपण मोदींनी केलेले नाही. ते माध्यमांनी केलेले आहे. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. मोदी फक्त पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ती पत्रकार परीषद नव्हती. मोदींनी पत्रकार परिषद बोलाविलेली किंवा घेतलीच नव्हती. पत्रकार स्वत:हून त्यांच्याकडे गेले व त्यांना प्रश्न विचारून त्याचे प्रक्षेपण दाखविले गेले. जर यात कोणाचा दोष असेल तर तो माध्यमांचा व निवडणुक केंद्राजवळ माध्यमांना उपस्थित रहायला परवानगी देणार्‍या निवडणुक आयोगाचा आहे. मोदींचा यात दोष नाही. दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. असो. मोदींवर कारवाई होऊन शिक्षा होईल या अज्ञानाच्या आनंदात अजून काही काळ रहा.

In reply to by श्रीगुरुजी

गब्रिएल Tue, 05/06/2014 - 18:34
दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. आत्ता !!! काय गुरुजी तुमीबी. यवढं म्हाय्त हाय आनी कोनितरी म्हनलयं ना की "भूतकालात्ली कुर्तीवरुन, म्होर्ल्या कालातलि कुर्ती वळकता येती". आता येखांद्या मान्साला 'मि चुक्लो' म्हनाय्ला लईच शरम वाटती. अस्तो येकायेकाचा सोबाव. दग्डाच्या भिंतीला वलसा घालून जावं. त्येच्यावं डोस्कं आपटून काय फाय्दा? आ?

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत Sat, 05/03/2014 - 21:26
मोदी मूर्ख नाहीत १०० गजा पेक्षा दूर होते. बाकी निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांची रिपोर्ट पाहोल्या विना अत्यंत दबाव खालील FIR दर्ज करण्याच्या आदेश बहुतेक दिला गेला असावा. असाच दबाव प्रसार भारती वर पडला होता त्यांच्या अधिकार्याने कबूल नामा ही दिला. इच्छा नसताना ही आता मोदींचा ती मुलाकात आता कित्येक वाहिनीन वर कितीदा तरी पहावी लागेल. करायला गेलो आणि झाले एक अशीच परिस्थिती सूचना मंत्रींच्या उतावळे पण मुळे झाली.

In reply to by संजय क्षीरसागर

पोलीसांनी निर्वाळा दिला आहे की मतदान केंद्रापासून २०० मीटर पलिकडच्या भागात हा प्रकार घडल्याने तो गुन्हा ठरत नाही. बसा बोंबलत :D

In reply to by मंदार दिलीप जोशी

कलम १२६ (अ) आणि (ब) ला अंतराची मर्यादा नाही. प्रचार झाला की नाही हा मुद्दा आहे. आधी नीट वाचता यायला हवं तर पुढे अर्थ कळण्याची शक्यता असते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 05/07/2014 - 15:42
दिलगीरी व्यक्त केली की निवडणुक आयोग मोठ्या मनानी सर्वांना माफ करतो. ह्या पेक्षा दोनदा मतदान करा हा सल्ला कितीतरी घातक होता. पण काही कारवाई झाली नाही.

रमेश आठवले Fri, 05/02/2014 - 14:19
असा मुलभूत प्रश्न मला सुनील अहिरराव यांना विचारावासा वाटतो. भारताचे निवडणूक पंच मन्डळ निपक्ष असल्याचे सिद्ध झालेले आहे . त्यांच्या देखरेखेखाली झालेल्या सर्व लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये मोदींनी विजय मिळवला आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांनी या जनमत कौलाचा आदर करावयास हवा. हिटलर अथवा मुसोलिनी असे मोदींना म्हणणार्या लोकांनी हे दोघे डिक्टेटर वारंवार निवडणुकीच्या अग्निदिव्यातून गेले नाहीत हे लक्षात घ्यावे. गेली दहा वर्षे केंद्र सरकार मोदींच्या मागे हात धुवून लागले आहे. एका मुख्यमंत्र्याची, खास संशोधक पथकाच्या (SIT ) अधिकार्यांनी, ११ तास उलट तपासणी केल्याचे दुसरे कुठले उदाहरण नाही. या तपासा नंतर सर्वोच्च न्यायालाने त्याना निर्दोष ठरवले. इतका तावून सुलाखुन निघालेला नेता दुसरा नाही. हा माणूस स्व्च्छ राजवट करणारा आणि निर्लिप्त आहे. असा कर्तृत्ववान माणूस या देशाला पन्तप्रधान म्हणून मिळाला तर देशाचे कल्याणच होईल. काही पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळी त्यांच्यावर टीका करत राहतील. पण हा ही एका निकोप लोकशाहीचाच भाग आहे.

In reply to by रमेश आठवले

विनोद१८ Fri, 05/02/2014 - 14:34
जाऊद्या हो, नाही समजायचे त्या 'तथाकथीत काही बधीरबुद्धी, पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळीना तत्सम विचारजंताना'. त्यांच्या बुद्धिपलीकडले आहे ते. राज्यकरत्यानी फेकलेल्या उष्टया-खरकट्या तुकड्यांवर जगणार्‍यांकडुन यापेक्षा वेगळी अपेक्शा कशी करता येइल.

विनोद१८ Fri, 05/02/2014 - 14:20
हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.
दिवास्वप्ने फार पाहु नयेत माणसाने...कारण ती कधीही प्रत्यक्षात उतरत नाहीत. हा, जर केवळ स्वताचे आत्मसमाधानच करायचे असेल तर ती जरुर पहावीत.

इरसाल Sat, 05/03/2014 - 10:12
व्हाला भाइ अने बेन, पोतानु आ विचार थये शे के मोदी उप्पर, कोरटमा पोलीस केस नाखवी जोईये. आ भाइ "चायवाला चायवाला" कहिने म्हारी अने बीजी म्हारे दस-अग्यार साथिदारोंनी चायनी लॉरी बंद करवी नाखी.

In reply to by मदनबाण

बाळकराम Fri, 05/09/2014 - 04:44
याचा विचार करतोय बराच वेळ! कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? असो, आपण आपले मनोरंजन करुन घ्यायचे मात्र! मदणबाण, व्हिडो भारी बरंका? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष ;)

In reply to by बाळकराम

मदनबाण Mon, 05/12/2014 - 12:35
कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? हॅहॅहॅ... काय आहे ना बाळ्या १० वर्ष राज्य करुन सुद्धा कॉग्रेसला देशाचा विकास साधता आला नाही ! इतके वर्ष राज्य करुन सुद्धा गरिबीच्या नावावर मते मागतात तर कधी गरिबीची रेखा शोधुन काढतात्. शिवाय यांच्या आणि यांच्या मित्र पक्षांच्या मंडळींनी भ्रष्टाराचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे.आपल्या देशाच्या प्रंतप्रधानपदी इतकी दुबळी व्यक्ती इतके वर्ष आहे की त्यांची सार्‍या जगानेच टिंगल केली. आता मोदी शिवाय इतर सशक्त पर्यात दिसत नसल्याने निदान आफ्रिकन लोकांच्या मुखातुन आलेला संदेश तरी आपल्या देशातील लोकांच्या डोक्यात शिरेल असा कोणा हिंदूस्थानी माणसाच्या डोक्यात विचार आला असेल... तसेही साउथ आफ्रिका आणि आपल्या देशाचे गांधींजींमुळे विशेष नाते आहेच ना ? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष बाळ्या तुमची आवड कळली बरं का... *LOL* जाता जाता :- मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे, अबकी बार मोदी सरकारचा प्रचार जरीही मोठ्या प्रमाणात झाला असला तरी सुद्धा मोंदींसाठी हा रस्ता सोपा नाही.

In reply to by मदनबाण

प्यारे१ Mon, 05/12/2014 - 13:52
>>> मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे तुमच्याकडं 'निकाल' आधीच लागले काय? ;)

In reply to by मदनबाण

बाळकराम Fri, 05/16/2014 - 02:10
"बाळ्या" का? वा वा चान, चान! शनिवारवाड्यासमोरच्या पुलावर कानकोरणी घेऊन बसतोस वाटतं तू, मदनबाण? नाही, म्हणजे संस्कार, अदब इ. चा वारापण तुला लागलेला दिसत नाही, म्हणून म्हटलं.

विजुभाऊ Sat, 05/03/2014 - 20:07
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची?

In reply to by विजुभाऊ

विकास Tue, 05/06/2014 - 00:38
"इंदीराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा" हे आठवले... ठाण्याला तर कांती कोळी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यावर नंतर पेपरात दुसर्‍या दिवशी या अर्थाचे वाचल्याचे आठवले: वरती स्वर्गीय इंदीराजींचे पोस्टर आणि ही घोषणा होती आणि खाली अक्षरशः देशी दारूचा पिंप होता ज्यातून बुंद बुंद गळत होते... *drinks*

In reply to by विजुभाऊ

मदनबाण Wed, 05/07/2014 - 11:39
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची? काय इजुभाउ ? एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन गेल्या १० वर्षात भाजपा दिसला ? नाही ना ? मग नमो नमो माळ ओढण्या पलिकडे त्यांच्या हातात काय उरले ? अजुन समजवुन घ्यायचे असेल किंवा वेगळ्या भाषेत उत्तर हवे असेल तर अरनब गोस्वामीनी जी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे ती पहा... राज ठाकरेंनी या प्रश्नावर "व्यवस्थित" उत्तर दिलय बघा. बाकी मी कोणत्याच पक्षाचा समर्थक नाही, जो देशाची आणि देशातल्या लोकांच्या उन्नतीचा प्रयत्न करेल त्याला माझे समर्थन नेहमीच असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तसही प्रतंप्रधानपदी बुजगावण असण्यापे़क्षा मोदी बरे असा इचार वरच्या क्लीप बनवणार्‍याच्या डोक्यात तर नसावा ना ?

विवेकपटाईत Sat, 05/03/2014 - 21:19
वाईट मानू, कुठल्या ही विषयावर लिहिताना लेखकाने वास्तविकता काय होती ते जाणले पाहिजे. केवळ खोट्या प्रचाराला बळी पडून लेख लिहिला नाही पाहिजे. १. गुजरात दंगा ISI आणि स्थानीय त्यांच्या स्थानीय हितचिंतकांनी घडवून आणला होता. प्रतिक्रिया स्वरूप जवळपास ८५० मुस्लीम आणि २५० हिंदू ही मारल्या गेले होते. २. मोदी भारताचे एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगेखोरांवर सक्तीने कार्यवाही केली. ११६ च्या वर दंगेखोर मारल्या गेले त्यात ९०% हिंदू होते. निश्चित हे दंगेखोर भा ज प वाले नसतील अन्यथा मोदी पुढची निवडणूक जिंकले नसते. ३. मोदींच्या सक्ती मुळे गुजरात मध्ये शांतता पसरली आणि त्या मुळे विकास ही झाला. खर म्हणाल तर सेकुलर म्हणविणारे पक्ष अल्प्संख्कांचे खरे शत्रू आहेत म्हंटले तर ४. दिल्लीत ३५०० वर शीख मारल्या गेले पण एक ही दंगेखोर पोलिसांनी मारला नाही. ५. आत्ताच झालेल्या मुझफ्फरनगर भागातल्या दंगलीत ही पोलिसांनी एक ही दंगेखोराला मारले नाही. ६.महाराष्ट्रात ही १९९०-२००० काळात दंगे भडकले होते. पोलिसांनी किती दंगेखोरांना कंठस्नान घातले. (माहित काढा, सत्य कळेलच) ७. अल्पसंख्यकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांचे वोट घेणे म्हणजे सेकुलर वाद. त्या साठी त्यांना मागास ठेवणे ही रणनीती.

मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे.
हे गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर :
`निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे'
तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास Tue, 05/06/2014 - 18:55
हे गुजराथ नाही. अगदी अगदी! ये तो दिल्ली है! निवडणू़क आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणजे काही साधे प्रकरण नाही! ते २००९ पर्यंत (म्हणजे कोल गेट च्या सुमारास) उर्जा मंत्रालयाचे प्रमुख सचीव होते. नंतर ते निवडणूक आयुक्त आणि मग मुख्य आयुक्त झाले. जेंव्हा कोल गेट प्रकरण बाहेर आले तेंव्हा सि बी आय ने त्यांची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाला केली. पण आता ते मुख्यायुक्त असल्याने घटनासिद्ध पदी आहेत म्हणून त्यांची चौकशी करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

दुवा: "Coalgate: Centre won't let CBI quiz PM's adviser, ECs"

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 20:32
>>> गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. तुमची निराधार वाचाळता निव्वळ मोदीद्वेषापोटी आहे. न्याय हा व्यक्तिसापेक्ष किंवा एखाद्या व्यक्तीच्या पर्सेप्शन वर दिला जात नसून वस्तुनिष्ठ पुराव्यांवर दिला जातो. मोदींनी दंगल भडकावली असे कितीही जणांचे पर्सेप्शन असले तरी प्रत्यक्षात न्यायालयात या आरोपाच्या समर्थनार्थ आजतगायत तसूभरही पुरावा मिळालेला नाही. युपीए सरकार, अनेक स्वयंघोषित एनजीओ व नामवंत निधर्मांध गेली १२ वर्षे मोदींविरूध्द बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत. पण न्यायालयात त्यांचे आरोप केव्हाच खोटे ठरले आहेत. निवडणुक प्रचारामध्ये मोदींवर केलेल्या आरोपांचे अगदी तसेच होणार आहे. दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत. असो. >>> असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर : `निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे' तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच. अज्ञानात सुखी रहा.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही म्हणता ते खरंय :
दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत.
करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास Tue, 05/06/2014 - 23:12
आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच शिल्लक आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 11:41
>>> करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात दुर्दैवाने तुमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांना त्याचा अर्थ समजतच नाही. ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते. मोदी मुद्दाम ठरवून त्या मुलाखतीतून का निघून गेले याचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. जरा गुगलून बघा. >>> याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. तुम्हाला काहीच समजत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत. मोदींनी आजतगायत स्वतःला कधीही अपराधी मानलेलं नाही, कारण ते दोषी नव्हतेच. अलिकडच्या काळात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत त्यांनी हेच सांगितलं की मी माफी वगैरे मागण्याचे नाटक करणार नाही. माझी चौकशी करा व मी दोषी असल्यास फाशी द्या. "याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो." ही वाक्ये वाचूनच हसायला आलं आणि तुमच्या अज्ञानाची पुन्हा एकदा कीव आली. >>> इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. मग प्रेसवाल्यांना काय मोदींनी आमंत्रण दिलं होतं का? तुम्हाला काहीच कसं समजत नाही हो? >>> म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) प्रेसवाल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तराची बलात्काराशी तुलना करणे म्हणजे जरा अतिच होत नाही का? म्हणजे "मी गरीब आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे नाहीत. माझ्या खिशात फक्त ५०० रूपये आहेत." असं मानभावीपणे सांगून दुसर्‍याच दिवशी अर्ज भरताना २.५ कोटींची मालमत्ता जाहीर केल्यासारखं आहे. >>>> फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. भारतात प्रभू श्रीरामांचे चित्र लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? आणि मशिदीत जाऊन जातीय दंगलीत सहभाग असलेल्या मुल्लामौलवींचे पाय धरणे, प्रचार करताना दर्ग्यावर चादर चढविणे, टोपीवर उर्दूवर काहीतरी लिहिणे, नमाजाची बांग ऐकू आल्यावर राष्ट्रगीतासारखी मानवंदना देणे हा काय सेक्युलर प्रचार आहे का? >>> मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. काय चुकीचं आहे यात? मोदी काय स्वतःच्या सभेचं स्टेज स्वतः खपून तयार करतात का? >>> धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. धन्य ते तुमचे अज्ञान! >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. काँग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? (जमल्यास) लवकर बरे व्हा आणि (जमल्यास) मोठे पण व्हा!

In reply to by श्रीगुरुजी

इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते.
शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 20:37
>>>> शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. धन्य आहे तुमच्या अज्ञानाची! >>> ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन! मोदी आणि पवार हे दोन परस्परविरोधी ध्रुव आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना होऊच शकत नाही. दुर्दैवाने तुम्हाला हे समजतच नाही. यात तुमचा दोष नाही. (जमल्यास) लवकर मोठे व्हा आणि (जमल्यास) लवकर बरे व्हा.

In reply to by संजय क्षीरसागर

अनुप ढेरे Wed, 05/07/2014 - 15:07
रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता
रामाचा आणि जातीचा काय संबंध? की रामाचे भक्ती एकाच जातीतले लोक करतात?

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 20:29
>>> इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. उत्तर नाही म्हणताना मोठा पण निरर्थक प्रतिसाद लिहून गेलात. >>> ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. कोणाला विश्लेषक लागतो? मोदींना? काहीतरीच काय? उलट मोदींच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण विचारवंत (!) भिंग लावून करत असतात. मराठी किंवा हिंदी बातम्यांच्या वाहिन्या बघा म्हणजे समजेल. >>> फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! जो माणूस संपूर्ण निर्दोष असतो तोच हे आव्हान देऊ शकतो. ज्या व्यक्तीविरूद्ध सर्व यंत्रणा व माध्यमे १२ वर्षॅ वापरून सुद्धा कणभरही दोष सापडला नाही तीच व्यक्ती असे आव्हान देऊ शकते. >>> त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. अहो, खरंच आहे ते. प्रेसवाले तिथे मोदींच्या मागोमाग स्वतःहून गेले होते. केजरीवाल नदीवर टॉवेल गुंडाळून अंघोळीला जाताना, सर्वांच्या देखत आपल्या थोबाडीत मारायला सांगितलेल्या स्वतःच्याच पक्षाच्या व्यक्तीला भेटायला जाताना प्रेसवाले बरोबर घेऊन जातात. मोदींना असली नौटंकी करण्याची कधीही गरज भासलेली नाही. >>> रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? रामाचा फोटो लावणे ही जातीनिर्देशकता? धन्य आहे तुमची! >>> मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. छबि स्टेजवर लावणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. रामनाम घेणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. नाही. आप व काँग्रेस एकाचे माळेचे मणी आहेत. म्हणून तर त्यांचं साटंलोटं आहे. भाजप पूर्ण वेगळा आहे. >>> प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते. तुम्हाला बुद्धीच नसल्याने वापरायचा किंवा न वापरायचा प्रश्नच उद्भवत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

केवळ तुम्हीच उतरु शकता. त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. तेव्हा रहा भ्रमात.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर गुरुवार, 05/08/2014 - 17:09
तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला केवळ तुम्हीच उतरु शकता.
आँ????????? रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. उदाहरणादाखलः- http://www.misalpav.com/comment/502272#comment-502272 ह्यात तर तुम्ही फार त्या माणसाच्या कामाला "निम्न्स्तरावरील काम" वगैरे म्हणुन मो़कळे झालात..!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 17:57
तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच ग्रे म्याटर असतं तर मिपावर जिलब्या पाडणं सोडून अन्य कामंही करता आली असती, पण काये ना, वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं तरी ३१ जुलैच्या कामांचा दट्ट्या लागायचा तो लागलाच. सबब काय ते समजा ;)

In reply to by पिलीयन रायडर

श्रीगुरुजी गुरुवार, 05/08/2014 - 20:22
>>> रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. यांचं म्हणजे "मी नाही बाई त्यातली, ..." असं असतं.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी गुरुवार, 05/08/2014 - 20:20
>>> केवळ तुम्हीच उतरु शकता. तुमचा नम्र स्वभाव आवडला. >>> त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. मग कशाला इतका वेळ कालापव्यय केलात? >>> तेव्हा रहा भ्रमात. भ्रमात तुम्ही आहात. मी नव्हे. वेगवेगळ्या धाग्यांवर तुमच्या भ्रमाचा भोपळा अनेकांनी फोडलेला आहे. तुमच्यासारखी मंडळी कायमच भ्रमात असतात. बादवे, याच्या आधीच्या प्रतिसादात "तस्मात थांबतो" असे लिहिले होते. पण न थांबता पुन्हा एकदा लिहिण्याची सुरसुरी आलेली दिसत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बाळकराम Fri, 05/09/2014 - 04:30
- पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो- पवारांच्या वाक्यांत ज्या लोकांना सूचक आणि गूढ अर्थ सापडतो, अशा लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला पहिल्यापासूनच अपार आदर वाटत आला आहे!

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Sun, 05/11/2014 - 21:01
>>> >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. >>> ग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? निवडणुक आयोग हा तटस्थ असतो असे म्हटले जाते. निवडणुक आयोग हा कदाचित तटस्थ असू शकेल, पण निवडणुक आयुक्त मात्र तटस्थ असतीलच असे नाही. विशेषतः जेव्हा सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीने व सोयीच्या व्यक्ती त्या पदावर बसवितो, तेव्हा तटस्थपणाची अपेक्षाच करता येत नाही. गेल्या काही दिवसातील घटनांनी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोदींनी बडोद्यातील मतदानानंतर स्वतःची सेल्फी काढताना माध्यमांनी त्यांचा फोटो टिपला व नंतर स्वतःहून आलेल्या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावर आयोगाने अक्षरशः काही तासातच त्यांच्याविरूद्ध थेट एफआयआर दाखल केला. पण पप्पू अमेठीत मतदानाच्या दिवशी एक मतदार मतदान करत असताना थेट मतदान यंत्राशेजारी उभा असल्याचे ३ वेगवेगळे फोटो माध्यमांनी टिपलेले असताना पप्पूला मात्र हाच आयोग क्लीन चिट देउन मोकळा झाला. ३ दिवसांपूर्वी मोदींनी वाराणशीतील बेनियाबाग भागात सभेला व रोड शो करायला आयोगाने बंदी घातली. पण त्याच भागात दुसर्‍याच दिवशी पप्पू आणि अखिलेश यादवला रोड शो ला परवानगी दिली. आज निवडणुक आयोगाने भाजपच्या वाराणशीतील कार्यालयावर विनाकारण धाड घालून प्रचाराचे बिल्ले, टोप्या इ. जप्त केले. भाजप म्हणे या गोष्टी मतदारांना वाटणार होता. कालच प्रचार संपल्याने हे उरलेले साहित्य आहे असे भाजपने सांगून सुद्धा आयोगाने आपला हट्ट सोडला नाही. धाड टाकून साहित्य जप्त केल्यावर काही तासातच आयोगाने सर्व साहित्य परत दिले व भाजप प्रचारासाठी हे साहित्य वापरणार नसल्याची कबुली दिली. काँग्रेस, आप, सप, बसप इ. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर धाड टाकली असती तरी त्यात त्या पक्षाच्या प्रचाराचे उरलेले साहित्य मिळालेच असते. मग इतर पक्ष सोडून फक्त भाजपच्याच कार्यालयावर का धाड टाकली? मुद्दाम भाजपला बदनाम करणे व भीति दाखविणे हे दोनच उद्देश यामागे दिसतात. मी आधीच लिहिल्याप्रमाणे निवडणुक आयोग कदाचित तटस्थ असेल, पण निवडणुक आयुक्त तसे असतील अशी खात्री नाही.

In reply to by श्रीगुरुजी

या बाबतीत सहमत . EC हा काँग्रेसधार्जिणा असावा, महाराष्ट्रात मतदार संघ पुर्नरचनेत जाणत्या राजाची मतं घेऊन काम झाल्याची चर्चा होती.

विकास Wed, 05/07/2014 - 00:49
Gujarat Land Acquisition Model is the Best: Commerce Ministry Report काँग्रेसच्या आनंद शर्मा या मंत्र्यांच्या अख्त्यारीतील क्रेंद्रीय व्यापार मंत्रालयाने आज गुजरात मधील भूसंपादन पद्धतीला आदर्श पद्धत म्हणल्याचे आले आहे.

In reply to by विकास

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 01:16
हे आले मोदि भक्त :D ...अहो, बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. मोदिभक्तांना&%$#&*%&$# जातीयवाद%&$&-%$# आकलन &$&##मानसीकता*&#@&$& (आपापल्या वकुबाप्रमाणे ब्लाब्लाब्ला चा अर्थ लावावा हि विनंती :P )

In reply to by अर्धवटराव

विकास Wed, 05/07/2014 - 01:34
डिसक्लेमरः आम्ही मोदी भक्त नसून अ आणि ब काँग्रेस भक्तांचे विचार मोदीत सॉरी मोडीत निघालेत हे सिद्ध करणारे विचारकृमीकिटक आहोत. :) बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. ते ही खरेच म्हणा. आदर्श मधे चव्हाण साहेब आहेत. मोदी थोडेच! ;) :D

श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 20:42
http://www.loksatta.com/desh-videsh-news/ishrat-jahan-encounter-no-prosecutable-evidence-against-shah-says-cbi-497881/ भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे सरचिटणीस आणि गुजरातमधील माजी मंत्री अमित शाह यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी इशरत जहॉं चकमकप्रकरणी क्लिन चीट दिली. याप्रकरणी अमित शाह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करता येईल, असे कोणतेही पुरावे आपल्याकडे नसल्याचे सीबीआयने सांगितले. शाह यांच्याबरोबरच गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही सीबीआयने क्लिनचीट दिली आहे. सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही आरोपींविरोधात आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. यामुळे ऐन निवडणुकीच्या मोसमात शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाही सीबीआयच्या भूमिकाचा फायदाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. इशरत जहॉं चकमकीमध्ये मारला गेलेला प्रणेश ऊर्फ जावेद शेख याच्या वडिलांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी सीबीआयने आपली बाजू मांडली. या चकमकीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये निलंबित करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल यांच्यासह 'आयबी'तील चार अधिकाऱयांचा समावेश आहे. सत्यमेव जयते!

In reply to by श्रीगुरुजी

विकास Wed, 05/07/2014 - 20:46
ते तुम्ही काही म्हणा... पण अरविंद केजरीवालच एकमेकाव्दितीय... कोणिही मारो त्यांना थप्पड बेदम फिर भी इस बंदे मे ही है दम. *dash1*

विकास गुरुवार, 05/08/2014 - 05:18
आज टाईम्स ऑफ इंडीया मधे आलेल्या बातमीनुसार मोदी सरकारला युपिए सरकारकडून विविध प्रकारची २८५ बक्षिसे/प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. त्यातला काही ठळक भाग खालील प्रमाणे:
Modi's case for his governance is perhaps spurred by the awards that the Gujarat government has received since 2004, which amount to more than 285. Among these are seven Prime Minister's awards, 82 conferred by various central government departments, and 172 by well-known national and international agencies for performances in various development areas. Over the past few years, under the Congress-led UPA rule, the Gujarat government got the Prime Minister's award for best water and sanitation management in rural areas, housing development for poor urban people, and for best practices in controlling maternal and infant mortality. In 2010-11, the Government of India's department of administrative reforms and public grievances and the department of information technology awarded Modi's office (the Chief Minister's Office) best practices award for people-oriented services. The Gujarat Urban Development Department has bagged several central government awards for the BRTS, implementation of reforms norms, and for the seven-point charter of JnNURM. Other awards the state won include those for transportation, solid waste management, and water supply projects.
आता यावरून मोदींना केवळ business friendly असे लेबल लावायचे का? यात प्रश्न परत मोदीसमर्थनाचा नाही तर आपल्याला न आवडणार्‍या व्यक्तीस काय वाट्टेल ते करून बदनाम करणे हे योग्य आहे का, हा आहे. सध्या आंधळ्या मोदीभक्तीपेक्षा आंधळा मोदीद्वेषच उतू जाऊ लागला आहे असे वातावरण आहे. असो.

अभिजित - १ गुरुवार, 05/08/2014 - 17:43
९व्या टप्प्यातल्या फक्त ४१ जागा बाकी असताना सरकार आणि प्रशासन यांच्याविरोधात अचानक सूडाचं राजकारण करण्याचं कारण जाणण्यासाठी नरेंद्र मोदींचं अमेठीतलं भाषण यु-ट्युबवर पहायला हवं. अमेठी आणि रायबरेलीत विरोधी पक्षांनी ताकदवान उमेदवार उभा न करण्याचा, महत्त्वाच्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचार न करण्याचा आणि गांधी घराण्यातील उमेदवारांवर थेट टीका न करण्याचा एक संकेत होता जो अटल बिहारी वाजपयी आणि लाल कृष्ण आडवाणींनीही पाळला होता. पण नरेंद्र मोदींनी तो साफ धुडकावून लावला. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/modi-and-varansi बोस्टन विमानतळावर पप्पू ला पकडले होते. १ लाख डॉलर कॅश बाळगली होती म्हणून. तेव्हा अटलबिहारी पंतप्रधान होते. त्यांनी पप्पूला सोडवले. हे वरच्या लेवलचे नेते सगळे मैत्री बाळगून असतात आपसात. खाबुगिरी करण्यात पण. मोदी नक्कीच वेगळे आहेत. सहिष्णू राजकारण खूप झाले. पवार साहेब नेहमी महाराष्ट्रच्य सहिष्णू राजकारणाचे गोडवे गात असतात. आता मोदी सारखा असहिष्णू नेताच पाहिजे आहे.

भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन होऊ शकतो पण त्यावर पक्ष चालवता येत नाहीत. तुम्ही विधान सभेची निवडणूक दिल्लीत लढवली दिल्लीच्या वीज ,पाणी ह्या मुलभूत प्रश्नाला हात घातला म्हणून तुम्हाला आता यश मिळाले. आता लोक सभेसाठी सार्या देशभर निवडणुका लढवणार तेव्हा लोकसभेच्या दृष्टीने तुमच्या पक्षाची आर्थिक , परराष्ट्र , सांस्कृतिक , सामाजिक ,धार्मिक धोरणे प्रभावी पणे जनतेच्या समोर अजून आप ने मांडली नाही. केजू फक्त व्यक्तिगत हल्ले करत होता. एका मुलाखतीत खाजगीकरणाला त्याचा विरोध आहे हा मुद्दा त्याने वगळायला सांगितला कारण ह्या विरोधाचे कारण तांत्रिक असून ते आता सांगण्याचा वेळ नसल्याने उगाच मध्यमवर्गीयांचा रोष नको अशी चालबाजी करत होता. अरे बाबा तुझे तांत्रिक मुद्दे जनतेला कधी सांगणार का तुझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन तू तांत्रिक मुद्दे आहेत असे करणार तुझे विचार जनतेपुढे मांडणाताना संधार्भासाहित स्पष्टीकरण देणे द्याला गरजेचे वाटत नाही. ह्याउलट मोदी गेल्या दीड वर्षापासून त्यांचे पर्यटन ते इतर आर्थिक , शैक्षणिक धोरणे काय आहेत हे विविध ठिकाणी भाषणातून नुसते सांगितले नाही तर गुजरात मध्ये त्या संबंधी काय केले ह्याचे उदाहरण दिले. आज केजू सरकार बनवणार नाही बनवणार दोघेच राहुल किंवा मोदी आता शेवटी शेवटी ह्या दोघांची पंगा घेऊन प्रसार मध्यांना चालणार नाही त्यामुळे कधी केजू , कधी राज असे तत्कालीन गल्ला भरायला प्रसार माध्यमांना चालतात. मात्र दीर्घ काळासाठी बिग शॉट वर लक्ष द्यावे लागते. आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही मोदी मे हे दम मोदी हे सिंघम लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

अर्धवटराव Fri, 05/09/2014 - 03:48
आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही
लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही
नेम्कं काय म्हन्नं हाय ?

In reply to by विकास

बाळकराम Fri, 05/09/2014 - 12:05
दिसतोय विकासराव?!! ;) पण गटारामुळे येणार्‍या घाणीला ईनो काय करणार? तिथे रुमाल पाहिजे जो मी नाकाला लावून बसलोय आधीच, त्यामुळे सल्ल्याबद्दल थँक्स बट नो थँक्स!

अभिजित - १ Fri, 05/16/2014 - 21:18
गुजरात मध्ये करून दाखवलं . आणि खरेच करून दाखवलं . शिवसेने सारखे नाही , नुसते होर्डिंग पुरते. अटल किवा अडवाणी सारखे सर्वसमावेशकतेचे ( थोडक्यात सेटिंग बाजी ) राजकारण करणार नाहीत हि खात्री. खूप सोसले आहे देशाने. आता कोण तरी कट्टर कडवा माणूस पाहिजे सर्व स्तरावरची लढाई लढायला. मग तो लढा भ्रष्टाचार , पाकिस्तान , काश्मीर प्रश्न नाहीतर अजून काहीही असू दे. आणि झटपट निकाल लावायची क्षमता. जी नमो मध्ये आहे. हेच खरे महत्वाचे प्लस point आहेत नमोचे. विधान सभे मध्ये चित्र नक्कीच वेगळे असणार आहे,
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे. आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे. विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.

मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

उडन खटोला ·

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 11:51
जागतिकीकरणामुळे व आधुनिक विचारशैली अंगीकारल्याने असे प्रसंग दिसणे काही नवीन नाही. या प्रसंगात दाखविलेले मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही. मुंज केली अथवा नाही, हे असे ग्लोबल संस्कार होण्यावाचून राहणार थोडीच? नाही तरी आजकाल घराघरात टीवी व International Scool च्या माध्यमातून ह्या साऱ्या गोष्टी सर्वात आधी लहान मुलांपुढे येणारच की! आपल्या लहानपणी असलेले फिल्म्स ला U/A certificate देणारे censorship टीवी व प्रिंट मेडीयाला का लागू नाही? हाही प्रश्न उरतोच. मुलांची विचारशक्ती दृढ करण्यासाठी जे काही महत्त्वाचे संस्कार करायचे आहेत त्याची मात्र कधीही उणीव होऊ देवू नये, हीच विनंती.

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 12:13
मला नक्की तुमचा मुद्दा कळला नाही. तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे?
  1. मुंज करणे
  2. दारु पिणे
  3. पबमध्ये जाणे
  4. आयटम साँग्ज ब्यांडवर वाजवायला सांगणे
  5. त्या गाण्यांवर वरातीत नाचणे
  6. वरातीत घरच्या बायांनी नाचणे
  7. वरच्या गोष्टी मराठी ब्राह्मण कुटुंबात घडणं
च्यायला! एकतर रविवार, त्यात बारा वाजलेले...माझा बहुतेक मराठी कुटुंबातला सरदार झालाय.

In reply to by धमाल मुलगा

यसवायजी Sun, 04/27/2014 - 12:26
हैय्या.. त्यांचा विरोध 'चहा पिणे' किंवा 'दही खाणे' याबद्दल नसुन,चहात दही मिसळून खाण्याबद्दल आहे (असे वाटते).

राही Sun, 04/27/2014 - 12:29
ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? हे सर्व आणि गायत्री मंत्र एकत्र राहू शकत नाहीत काय? त्यांनी तसे एकत्र राहू नये काय? 'गायत्रीमंत्र' या शब्दाची निव्वळ माहिती असण्यासाठी उपरोल्लेखित गोष्टीं न करणे ही प्री-कंडिशन आहे काय? केव्हापासून? ती तशी असावी काय?

काका, पुण्यातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर बसून कपाळावर आठ्या पाडून शिरा ताणत करायचा कर्कश काथ्याकूट इथे कशाला टाकताय? आणि सारखी 'ब्राह्मण'त्वाची टिमकी वाजवायचं कारण काय? मराठी ब्राह्मण म्हणून जन्मले म्हणजे कोणी आकाशातून पडले नाहीत आणि संस्कृतीरक्षण करण्याचा ठेकाही घेऊन आलेले नाहीत. त्यांना स्वतःच्या पैशाने तंगड्या चावायच्यायत आणि बियर रिचवायची आहे तर तुमचं काय गेलं? तुम्ही आपले वरण-भात-लोणचं-रायतं-खीर ओरपत परंपरा सांभाळा की! तुमच्या तर घशात नाही कोणी बियर ओतायला आलं. उगाच आम्ही म्हणजे 'इतरांपेक्षा' कोणीतरी वेगळे आहोत म्हणून अहंभाव बाळगत फिरायचं आणि 'आपल्यातलेच' काही लोक आता 'इतरांसारखे वशाट खायला लागून' धर्म बुडवताहेत अशा अभिनिवेशात धागे पाडण्याचं हसू आलं. आणि मुंजीचा आणि ३१ डिसेंबरचा, ग्रिलचा, माशांचा कशाचाच संबध काय? नक्की काय म्हणायचंय? तुमच्याकडे काय ३१ डिसेंबर साबुदाण्याची खिचडी खाऊन आणि पियुष पिऊन साजरा करतात का? असतीलही. म्हणून इतरांनी काय करायचं हे सांगणारे आपण कोण? मासे खाल्ले तर गायत्री मंत्राची पावर कमी होते का? का ब्रह्मतेजाला ग्रहण लागतं? जरा त्या बंगाली ब्राह्मणांना विचारून बघू या. आणि ३/४ प्यांटमध्य काय वाईट आहे? ३/४ घालून संस्कॄती बुडते आणि आणि धोतर नेसून वर येते काय? च्यायला त्या झिरझिरीत धोतर वापरणार्‍या आजोबा लोकांचे आतले लंगोट सुद्धा दिसत असत (घातले असल्यास) आणि नऊवारी साडीबद्दल काय बोलावं! साडी नेसायची इतकी विशोभित पद्धत अक्ख्या हिंदुस्थानात नाही. काय तर दोन पायांमधून तो पिळा मागे घेऊन मागच्या मागे 'खुपसायचा', आणि एवढे नऊ वार वापरून पोटर्‍या उघड्या पडायच्या त्या पडायच्याच. गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे! पण नऊवारी पारंपारिक म्हणून चांगली, आणि चांगल्या अंग झाकणार्‍या फॉर्मल ट्राऊझर्स मात्र वाईट होय? का बुवा?

In reply to by चिन्मय खंडागळे

चैदजा Sun, 04/27/2014 - 13:51
गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे!
नऊ वार साडी नेसण्याचे ३-४ प्रकार आहेत. त्यात ब्राह्मणी, लावणी या २ महत्त्वाच्या. ब्राह्मणी प्रकारात पाय ऊघडे पडत नाहीत. झैरात -- माझी बायको सगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवते. गेल्या ५ वर्षात तिने अंदाजे ४०० साडया शिवल्या आहेत. अमेरीकेपासुन ऑस्ट्रेलिया पर्यंत साडया गेल्या आहेत.

In reply to by चैदजा

दिव्यश्री Sun, 04/27/2014 - 14:19
+++++++++++++++++ ११ फक्त योग्य पद्धतीने साडी नेसता आली पाहिजे . बाकी सहावार साडीमध्ये देखील अंगप्रदर्शन होतेच . असो .

In reply to by चिन्मय खंडागळे

नऊ वार साडी अने तंगडी उघडी ही म्हण "किती केले साडे तरी भागाबाईचे कुले उघडे' अशा प्रकारची असावी. नऊवार साडी जनरलाईझ करण्यासाठी नसावी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रभाकर पेठकर Sun, 04/27/2014 - 20:05
नऊ वार साडीला 'एव्हढे मोठे वस्त्र नेटकेपणाने नेसण्याचे, जगातील एकमेव 'कॉश्च्युम' म्हणून वाखाणले गेले आहे.

चैदजा Sun, 04/27/2014 - 13:36
माज असल्याची लक्षणे, दुसरे काय ?
मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही.
मग करता कशाला मुंज ? येव्हढीच हौस आहे, तर त्याऐवजी आपण लहान मुलांचे ऊष्टावण करतो तसे मुलगा १०-१२ वर्षाचा झाल्यावर बियरावण करावे.

मुंज हा आता कालबाह्य संस्कार आहे. तरीपण लोक ट्रॆडिशन जपण्याचा प्रयत्न करतात त्यात त्यांना मजा येते. एन्जॊय करतात. एक पारंपारिक सोहळा 'शास्त्रा'पुरता साजरा करतात. काही दिवसांनी संध्येच्या वेळी आचमने बिअर नी पण होतील. आता शेंडी ठेवणारे , जानवं घालणारे, संध्या करणारे किती ब्राह्मण राहिलेत?

In reply to by प्रकाश घाटपांडे

पैसा Sun, 04/27/2014 - 14:14
हेच लिहायला आले होते. आता ३ साडेतीन वर्षाच्या मुला-मुलींना शिकवायला सुरुवात करतात आणि गुरूच्या घरी तर कोणीच रहायला जात नाहीत. त्या काळात मुलं गुरूच्या घरी रहायला जायची, त्यांना १२ वर्षे कष्टात काढावी लागतील म्हणून पक्वान्ने वगैरे करून घालत. आता त्यापैकी काहीच शिल्लक राहिले नाही. या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही. राहिली गोष्ट दारू पिणे आणि नाचणे. त्यासाठी मुंजीचाच मुहूर्त कशाला? कधीही करता येईल की! छापा पत्रिका आणि वाटा. "अमूक दिवशी, अमूक ठिकाणी दारू पिऊन नाचण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सहकुटुंब सहपरिवार येण्याचे करावे." हाकानाका!

In reply to by पैसा

आयुर्हित Mon, 04/28/2014 - 00:52
लहानपणचे अनिर्बंध वर्तन सोडूनशील, दृढनिश्रय व शिस्त अंगी बाणून ज्ञान संपादन करणे, ब्रम्हचर्याचे काटेकोर पालन करणे हा व्रतबंध संस्काराचा प्रमुख हेतू आहे. यज्ञोपवीत धारण करण्याने वरील नियमांची आठवण सतत जागृत राहते. हा संस्कार मुलगा आठ वर्षाचा असतांना करणे चांगले. उपनयन संस्कारात अनेक उपविधी खालीलप्रमाणे असतात. 1 चौलकर्म - क्षौर करणे 2 वस्त्रधारण -नेसायचा पंचा मानेशी गाठ मारुन नेसावा व अंगावर पांघरायचा पंचा दोन्ही खांदयावरुन घ्यावा. 3 अजिनधारण -बसण्यासाठी लोकरीचे आसनघेणे. 4 यज्ञोपवीत धारण - यज्ञोपवीत म्हणजे जानवे. जानवे तीन पदरी असते. तीन पदरावरती तीनवेद व ब्रम्हगाठीवर अथर्व वेदाची स्थापना केली जाते. जानवे गळयात घालण्यापूर्वी सूर्याला दाखवावे. नंतर उजवा हात वर करून प्रथम हातात व नंतर गळयात घालावे. 5 आचमनविधी - संध्याकर्मविधी 6 प्रधनाज्य होम 7 अवक्षारणविधी - सूर्यदेवाची कृपा व्हावी म्हणून अवक्षारण विधी केला जातो. 8 विभूतिग्रहण 9 गायञीउपदेश 10 मेखलाधारण 11 दंडधारण– पळसाचा दंड (बटूच्या मस्तकाइतकीउंचीचीकाठी) 12 आचारबोध 13 अनुप्रवचनीयहोम. 14 मेधाजनन : हा विधी स्मरण, ग्रहण व धारण वाढविण्यासाठी केला जातो. 15 भिक्षाग्रहण - ओमभवतिभिक्षांदेही ! चातुर्वेदान षटशात्राणि अष्टादश पुराणनि पठीता भवामि || आई, मला भिक्षा दे मी चार वेद सहाशास्त्रे, अठरा पुराणे यांचे अध्ययन करणार आहे. असे म्हणून भिक्षा मागावी. 16 भोजनविधी - मौजीबंधन झालेल्या भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी करण्यास येणारा विधी पात्रा भोवती पाणी फिरवावे. पात्राच्या उजव्या बाजूस खालून वरच्या दिशेस भाताच्या छोटया पाच आहुती दयाव्यात. आहुत्या देताना चित्राय स्वाहा| चित्रगुप्ताय स्वाहा | यमाय स्वाहा | यामधार्मय स्वाहा | सर्वेभ्योभूतेभ्याःस्वाहा | हे पाच मंत्र म्हणावेत. नंतर उजव्या हाताने आहुत्या वरून खाली गोळा कराव्यात. डाव्या हाताने हातावर थोडे पाणी घालून हात धुतल्यासारखा करावा. पात्रावर डाव्या हातावर उजवा हात पालथा धरून अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिना देहामाश्रितः | प्राणापान सामायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम || हा श्लोक म्हणावा. नंतर "अमृतोपास्तानमासि" हा मंत्र म्हणत आचमन घ्यावे. नंतर प्राणाय स्वाहा | अपानाय स्वाहा | व्यानाय स्वाहा | उदानाय स्वाहा | समानाय स्वाहा | ब्राम्हणे स्वाहा | ह्या मंत्रांनी भाताच्या सहा प्राणायुती मुखात घ्याव्यात. डाव्या हाताच्या बोटाने थोडे पाणी डोळ्याला लावावे. नंतर भोजनास सुरुवात करावी. भोजन झाल्यावर डाव्या हाताने एक पळी पाणी उजव्या हातात घेऊन "अमृतोपास्तानमासि" | असे म्हणून आपोष्णी घ्यावी. समावर्तन : सोडमुंज: ब्राम्हच्र्याश्रामातून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी समावर्तन-सोडमुंज संस्कार करण्यात येतो हल्ली मुंजीनंतर लगेच सोडमुंज करण्याची प्रथा निर्माण झाली आहे हे शास्त्रीय दृष्ट्या अनुचित आहे.

In reply to by आयुर्हित

अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित ! ह्या १६ विधींबद्दल अजुन दीटेल्स मधे म्हणजे मंत्र विधीं सकट लिहिता आले तर एक स्वतंत्र धागाच टाका ना !

In reply to by प्रसाद गोडबोले

बालगंधर्व Fri, 05/02/2014 - 21:32
अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित !
गोदबोले सहेब, अताआ तुमेपन मज्यासार्क लिहिला. हानतेच्यायला मा;;;;; अयुर्हित सहेब, तुमला कुहुप जिवन मिलुदे.

In reply to by आनंदी गोपाळ

आयुर्हित Fri, 05/02/2014 - 21:33
हा ब्लॉग माझा नसून "विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई" यांचा आहे. यावरून हे स्पष्ट होते की मुंज ही फक्त एका समाजाशी निगडीत नसून चा सर्व भारतीय लोकांनी मानलेल्या १६ संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे!

In reply to by प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ Mon, 04/28/2014 - 00:55
मुंज करणे / लग्नातला लाजा होम करणे हा एक फालतू पणाच आहे. काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Mon, 04/28/2014 - 02:00
नक्की अडचण काय आहे जर कुणाला त्रास होत नसेल तर? तशी कैक प्रतीके वेष्टर्न संस्कृतीतही आहेतच की. कशाला पाहिजे नववर्ष काय अन व्हॅलेंटाईन्स डे तरी मग? अन शेवटी हेही विसरले जाते की या माध्यमातून लोकांना एकत्र जमून टीपी करायचा असतो. तथाकथित सिग्निफिकन्स हा कुणाच्याही गावी नसतो- आधीही फारसा कुणाच्याच गावी नव्हता. दे जस्ट वॉना हॅव फन, दॅट्स ऑल!

In reply to by विजुभाऊ

काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?
>>> जोवर जातिआधारित/ धर्माधारित आरक्षणे आहेत तोवर ! अर्थात यावश्चंद्रदिवाकरौ !! :P

In reply to by विजुभाऊ

विजुभौ, सहमत आहे. माणुस जसा अधिक व्यस्त होत जाईल, अजून आधुनिक होत जाईल, दृष्टीकोणात फरक होत जाईल तेव्हा हे कमी होईल असे वाटते. अशा कितीतरी परंपरेच्या गोष्टी आता कालौघात मागे पडत चालल्याच आहेत 'काहो, मुलाची मुंजी केलीत की नै' आणि या प्रश्नाला 'आम्ही असलं काही करत नाही' अशी उत्तरं यायला लागलीत की हे बंद होईल. हं आता यातही परंपरा जपणारे आणि आधुनिक असे दोन गट होतील. किरकोळ कारकोळ चालूच राहील. -दिलीप बिरुटे

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 14:09
भले मग तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल. भले मग तुम्ही कोणत्याही सणाला, पार्टीला वा कोणत्याही ओकेजनला पित असाल. भले मग तुम्ही देशी पित असाल वा विदेशी पित असाल. भले मग तुम्ही स्वताच्या पैश्याची पित असाल वा फुकटाची पित असाल. भले मग तुम्ही मंगळवारी पित असाल वा रविवारी पित असाल दारू ही वाईटच !! फक्त एवढेच सांगू इच्छितो, अभ्या दारू पितो, अभ्या किडे करतो, अभ्या पोरींशी लफडे करतो. अभ्या कसाही असेल, पण अभ्या नीच नाही रे ..

अवतार Sun, 04/27/2014 - 14:11
लग्नाआधी नाईलाज म्हणून मुंज केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर मटन कबाब आणि चिकन तवा राइसची पार्टी करून मुंज साजरी केली. कहर म्हणजे कबाब खातांना, "आता मात्र मी अगदी कर्मठ ब्राम्हण होणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी चिकन मटन हादडायला मोकळे आहोत." हे सतत चालू होतेच! ह्यात त्यालाही आणि मलाही काही वावगे वाटत नाही! :) मुठीतून वाळू निसटणारच आहे हे माहित असूनही जर मुठीत वाळू पकडण्याचा मोह आवरत नसेल तर अशा वेळी उपदेश करण्यापेक्षा संयम उपयुक्त ठरतो.

In reply to by प्यारे१

माझ्यामते मुंज काही एका विशिष्ठ जातीची मक्तेदारी न्हवे ... आर्य त्रैवर्णिकांना मुंजीचा अधिकार आहे...शिवाजी महाराजांनीही राज्याभिषेकाच्या आधी मुंज केल्याचे ऐकीवात आहे ! ... केवळ इतर जातीतल्या लोकांनी मुंज करणाचे बंद केल्याने मुंज हा एक संकार केवळ एका जातीतल्या लोकांच्या अखत्यारित आला आहे ... आजही जर इतर त्रैवर्णिक लोकांनी मुंज करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे निओ-मॉडर्न हिंदु समाजाकडुन कौतुकच होईल असा अंदाज आहे !!

आदूबाळ Sun, 04/27/2014 - 14:36
उडन खटोला भाऊ / बहन तुम्हाला काय म्हणायचंय ते कळलं. पण सगळा गुताडा झालाय. तुमच्या डोक्यात असलेलं आदर्श ब्राह्मणाचं / मुंजीचं / नव वर्ष साजरं करण्याचं / वर्तनाचं / जगाचं मॉडेल जरा मांडता का? म्हणजे आक्षेप नक्की कशावर आहे हे पिनपॉईंट करायला बरं पडेल...

लेख पटला :) शो ऑफ्फ्, सेलिब्रेशन्स , धांगडधिंगा करायचा असेल तर त्याला इतर १७६० कारणं आहेतच की ...मुंज कशाला त्यात घुसडा ? अवांतर : पोराला वैदिक शिक्षणाला घालणार असाल तरच त्याची मुंज करायची अन्यथा नाही .... असा स्पष्ट पवित्रा मी घेतल्याने आमच्या घरातले आधीच बिचकुन आहेत ... त्यांना हा लेख दाखवतो ;)

आणि हो हे फक्त ब्राम्हणांवरच का लिहिलय? बाकीचे जातीजमातीवाले हे सगळं करत नाहीत काय? उगीच उठलं पळी-भांड आणि जानव्यावर टिका केली की झालं का? दारु पिण, रस्त्यावर नंगानाच घालणं किंवा ३१ डिसेंबरला टल्ली होणं हे सगळ्याच बेवड्यांच्या घरी चालतं. गमतीची गोष्ट अशी की आधी ब्राम्हण घरात शक्यतो दारु प्यायली जात नाही. प्यायली तरी नंगानाच करणारे १०० पैकी ५ सुद्धा नसतील. तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे? मुंज करण्यावर? दारु पिण्यावर? ब्राम्हणांनी दारु पिण्यावर? मांसाहार करण्यावर? कुठले कपडे घालायचे ह्यावर? उगीचं जनरलायझेशन करु नका.

उपजात चित्पावनच असणार.. आजकाल ब्राह्मण्य जपण्याची नैतिक जबाबदारी देशस्थांवर येऊन पडली आहे.बरेच देशस्थ व्यवस्थीत धार्मिक विधी करतात. चित्पावन युवक युवती मात्र, indian born confused american या कॅटॅगरीत केव्हाचेच गेले आहेत.

In reply to by मंदार दिलीप जोशी

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:43
ठ्ठो ! सॉरी सॉरी. ते ढिच्कॅव असे वाचावे. (पुर्वी बार टाकत आता पिस्तुलातुन गोळी झाडतात........भेंडी रस्त्यात गोळ्या पडल्यात आणी पिस्तुलाची नळी हातात धरुन कोणी रस्ता झाडतोय असे चित्र नजरेसमोर उभे र्‍हायलेय.)

राही Sun, 04/27/2014 - 16:23
लग्नमुंजींच्या वरातीतले बेंडबाजे किंवा गणपतीविसर्जनाच्या ठणठणाटी मिरवणुका व्यक्तिशः आवडत नाहीत. पण एक फरक जाणवतो. काही समाजांमध्ये -उदा.पंजाबी, गुजराती,- प्रसंगानुसार स्त्रीपुरुषांनी एकत्र मुक्तपणे (स्वैरपणे नव्हे) संगीताच्या तालावर डोलण्याची, नाचण्याची परंपरा आहे. युरोपमध्येही वॉल्त्झची संथ नृत्ये आनंददायी असतात. आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे? बीटल्सच्या लोकप्रियतेमागे तरुणाईला बेधुंद नृत्याची संधी मिळण्याचा मोठा हिस्सा होता. अर्थात अशी अ‍ॅम्फेटामाइनयुक्त नृत्ये योग्य नाहीतच. पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?

In reply to by राही

आनन्दा Mon, 04/28/2014 - 18:04
पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?
त्याला आक्षेप नाही, पण मुंज हा संस्कार हाच मुळात या सार्‍यांवर विजय मिळवायचे/ नियंत्रित जीवन जगण्यचे शिक्षण द्यायला केल जातो. त्याच दिवशी असे अनियंत्रित वागून आपण त्या मुलावर काय संस्कार करणार?

In reply to by मंदार कात्रे

बॅटमॅन Tue, 04/29/2014 - 19:37
अनिर्बंधच व्हायचे असेल तर त्यासाठी आपल्या संस्कृतीत स्पेशल सण दिलेलाच आहे - शिमगा. काय घालायचा तो दंगा घाला तेव्हा.

In reply to by राही

आनंदी गोपाळ Fri, 05/02/2014 - 21:32
आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे?
घोटूल मधे ढोलियाच्या तालावर हलकेच थिरकणारी पावलं आपल्याकडलीच असलीत, तरी, मध्यंतरीच्या काळात 'मराठे' म्हणजे 'जेत्यांची संस्कृती' होती. मराठीमधे मार्दव नाही. हार्श शब्दप्रयोग आहेत. बसा! अन तश्रीफ रखिये, (इथे कोणत्याही इतर भाषेतील शब्द वापरा : उदा. प्लीज हॅव अ सीट, अगदी प्लीज वगळूनही.) यातला फरक पहा. या मराठी भाषेत अनेकदा मार्दव अन अजीजी यांत फरक रहात नाही. एकतर अजीजी नायतर 'बसून घ्याला सांगून र्‍हाय्लोय ना!' स्टाईल शब्द. यातच मधे कुठेतरी मराठे 'बायकांसोबत नाचत' नाहीत, ते 'बायका नाचवतात', असला एक समज प्रचलित झाला असावा. तमाशा त्याचे एक उदाहरण. बाईसोबत नाचणारा पुरुष फक्त नाच्याच. दरम्यानच्या काळात कुठेतरी आपण जगज्जेते सुसंस्कृत लोक, थिरकणे विसरलो. तुम्ही नृत्याचे म्हणताहात, समूहगान असाही एक प्रकार असतो. तोदेखिल विरळा होत गेला आहे आपल्याकडे. पण माणसाची मूळ प्रवृत्ती जात नाही. जाणार नाही. खेडोपाडी गरबा खेळला जातो आजकाल. अगदी लग्नाच्या मिरवणूकीत लोक गरबा खेळल्यासारखे नाचतात. तीच गाणी डीजेवर लावून. इ. असो. असे का असावे या प्रश्नाचे हे माझ्या मतीनुसारचे उत्तर आहे. 'मराठे' हा शब्द मरहट्टे, महाराष्ट्र देशीचे अटकेपार झेंडे फडकवणारे वीर, या हिशोबाने वाचावा. जात/धर्म इ.वादी शब्दप्रयोग तो नाही, हे नोंदवितो.

कंजूस Sun, 04/27/2014 - 16:26
समाजातला दांभिकपणा उघडा पडण्याचा आणि एक सुमुहूर्त ?मुंजीची पार्टी ऐवजी पार्टीनंतर मुंज उरकली असेल .निमंत्रितांनी तोंडभरून बटु आणि आईवडीलांना आशिर्वाद दिले असतील .आणखी काय पाहिजे ? ज्यांना या संस्काराबद्दल काही कळते ते श्रृंगेरी ,श्रीशैलम ,माटुंग्याचा शंकरमठ ,कुर्ला (प)कृष्णमंदिर ,सायन पूर्व कृष्ण मंदिर ,जिएसबी संघ ,चेंबूरचा मठ ,डोंबिवलीचे ज्ञानेश्वर कार्यालय इत्यादी गाठतात आणि गाजावाजा करत नाहीत .

भाते Sun, 04/27/2014 - 17:08
दारू सर्वजातिय/ धर्मिय पितात. तेच मांसाहारा बाबत. अगदी वर्षभर. मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? आपल्या पैकी किती जण रोज सकाळी देवपूजेनंतर संध्या करतात? लहानपणी मुंज झाल्यावर नवलाईचे नऊ दिवस असल्याप्रमाणे सुट्टीत रोज संध्या केली जाते. पण पुढे शाळा सुरु झाल्यावर ते जमतेच असे नाही. रोजच्या ऑफिसच्या गडबडीत देवपूजा आटोपल्यावर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणताना नजर घडयाळाच्या काटयावर असते. मग कशाला तो मुंजीचा अट्टाहास! दारू पिणारे अनेक ब्राम्हण मी बघितले आहेत जे आधी गळ्यातले जानवे काढुन खिशात ठेवतात आणि मग दारू ढोसतात. कशाला का दिखाऊपणा? ३१ डिसेंबरचा ऊल्लेख आला आहे म्हणुन सांगतो. १ जानेवारी २०१३ ला अंगारकी चतुर्थी होती. ३१ डिसेंबर २०१२ ला रात्री पावणे बारा पर्यंत लॉलीपॉप खात दारू धोसणारे (सर्वजातिय) दुसऱ्या दिवशी माझा ऊपास आहे असे सांगत होते. काय उपयोग आहे त्याचा? कशाला ते ऊपासतापास!

In reply to by भाते

नितिन थत्ते Mon, 04/28/2014 - 14:29
>>मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? बाकीचे काय फुकटच गेलेले असतात (ब्राह्मण तस्सं मुळ्ळीच करत नैत) अशी ज्यांची समजूत असते त्यांना "बॉ बॉ बॉ; ब्राह्मण दारू पितात !!!" असं वाटणारच. ;)

बॅटमॅन Sun, 04/27/2014 - 17:52
बाकी काहीही असो, मशारनिल्हे ब्राह्मण कुटुंबाने मांसाहार आणि सोमरसपान करून प्राचीन आर्य संस्कृती टिकवली असेच म्हणणे आहे. पोषाख म्लेंच्छ असला म्हणून काय झाले? उलट आजकाल मांस आणि सोमरस ही आपल्या संस्कृतीची प्राचीन प्रतीके अहद दिल्ली (लाहोर म्हण्णार होतो पण साला १९४७ चा घोळ झाला.) तहद चंदावर नव्या जोमाने दिसू लागली आहेत. म्हणा, गर्व से कहो...

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:28
आयला! बॅट्याची बॅट सचिनच्या वरताण तळपली की. :) जाता जाता: 'गर्व से कहो...' ला उत्तर देण्याआधी आपल्याला क्युबन सिगार्स, पाईप्स वगैरे अस्सल जिंदादिल खानदानी माणसाला शोभणार शौक हाळी देणार्‍याने केलेले चालतात की झोंबतात हे मात्र पडताळून पहायला हवं.

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन Sun, 04/27/2014 - 23:18
:) बाकी हाळी देणारे कोण? तथाकथित संस्कृतिरक्षक तर नव्हे? तसे तर शौक ज्यांना पर्वडतात अन झेपतात त्या सर्वांनीच करावे, हाकानाका.

दिव्यश्री Sun, 04/27/2014 - 18:03
हा पहा फरक ...एक आहे नौ वार साडी आणि दुसरी आहे काष्टा . https://lh3.googleusercontent.com/-1bVYfzv-i88/U1z4XiX8JwI/AAAAAAAAAVs/uAc_A15BEQw/s188/9vaar_Br.jpg.jpg https://lh3.googleusercontent.com/-la3OPsgmErc/U1z4LKwWruI/AAAAAAAAAVg/0mcToEqgCRQ/s194/1_kashta.jpg https://lh3.googleusercontent.com/-la3OPsgmErc/U1z4LKwWruI/AAAAAAAAAVg/0mcToEqgCRQ/s194/1_kashta.jpg

विकास Sun, 04/27/2014 - 19:05
मुंज हा कधीकाळी तयार झालेल्या १६ संस्कारांमधील एक संस्कार आहे. तो करावा का नाही हा अगदी गौण मुद्दा आहे. ज्यांना करायची असेल ते करतील आणि ज्यांना करायची नसेल त्यांनी करू नये. माझ्या बाबतीत लहानपणीच मुंज आणि सोडमुंज हे ३ दिवसांच्या अंतराने झाले, मी कधी संध्या केलेली नाही. जानवे नंतर स्विमिंगला गेलो तेंव्हा स्विमिंग पूल मधेच हात मारताना पडले.... त्यामुळे मी काही धार्मिक पध्दतीने याचा विचार करत नाही. पण तरी देखील त्या वयातला एक संस्कार - केवळ त्या दिवशीचे होम-हवन, मंत्र वगैरेच नाही, तर तो सोहळा करायच्या आधीचे प्लॅनिंग, त्यातील नातेवाईकांची आणि आप्तेष्टांची involvement, प्रेम या सगळ्याचा एक मनावर एक सुखद परीणाम झाला जो कायमचा लक्षात राहीला. माझ्या दृष्टीने हा सगळा एक संस्कार असतो. कारण किंचित समजायला लागणार्‍या वयात पण तरी देखील आपल्याला कळत-नकळ आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुंजच नाही पण कुठलिही गोष्ट जेंव्हा केवळ शो ऑफ म्हणून होते तेंव्हा त्यातून दूरगामी ना धड संस्कार होतात ना इतर काही सकारात्मक फायदा... अशाच प्रकारचा (किंचीत मोठ्या) मुला-मुलीवरील ज्यूइश संस्कार बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा पाहीले आहेत. त्यातील मुद्दा हा मुल हे वयात येत असतानाचा एक संस्कार आणि सोहळा आहे. तोच प्रकार मुंजीच्या बाबतीत समजून घेतला आणि मग संस्कार म्हणून केले तर अधुनिक काळाला अनुसरून एक चांगला संस्कार तयार करता येईल. त्यात जात आणायची काही गरज देखील नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो: बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा हे ज्या दिवशी होतात त्या दिवशी मुळ सोहळा हा पारंपारीक असतो. त्यात राबाय (ज्यू प्रिस्ट) कडून त्यांच्या पध्दतीने धार्मिक संस्कार केले जातात वगैरे. त्यांच्या पध्दतीत पार्टी असल्याने त्याअनुषंगाने खाणे-पिणे आणि डान्सिंग केले जाते.... पण महत्वाचा मुद्दा त्या आधीचा असतो. आधी एक वर्षभर त्या मुलाला-मुलीला थोडेफार संस्कार (बेसिक हिब्रू भाषा येणे, इतिहास वगैरे) शिकवले जातात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे छोटासा का होईना एक समाजसेवेचा प्रकल्प हा (मदत घेऊन) प्लॅन करणे आणि पुर्ण करणे गरजेचे असते. त्या सगळ्याचा मुलांवर नक्कीच चांगला परीणाम होतो.

In reply to by विकास

मेघवेडा Tue, 06/03/2014 - 01:03
"मुंज हा कालबाह्य संस्कार आहे/या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही/निर्बुद्ध बाष्कळपणा" - हे सगळं तुम्ही 'विधीं'ना अनुसरून म्हणत असाल तर ठीक परंतु संस्कार आणि त्यामागचं तत्त्व, विचार वगैरे काहीच कालबाह्य, अकारण वा निर्बुद्ध बाष्कळ वाटत नाही. मुलानं गुरूगृही वेदाध्ययन करायला जाण्याऐवजी तोच मुलगा (फॉर दॅट मॅटर मुलगी - म्हणजे कुणी मला विचारलं मुलींची मुंज करावी का तर त्याला माझं उत्तर 'हो' आहे) हल्ली शाळा झाल्यावर युनिव्हर्सिटीला जायला घराबाहेर पडू लागला आहे. तेथे त्याला स्वतः पडेल ते काम करून पैसे कमवण्याची अक्कल पक्षी व्यवहारज्ञानाचे अध्ययन करायचे आहे. गुरू कोण - हे जग. मग मातृभोजनाचा काय अर्थ - झालं आता, आईकडून लाड करून घेतले ते पुरे आता यापुढे आपले आपण काय ते बघा. भिक्षावळ? मुला घराबाहेर पडतो आहेस तेव्हा ही घे आपली भिक्षा/शिदोरी. पुढे मात्र पोटापाण्याला काहीतरी कर. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलगा आता शिशुवयातून कुमारवयात चालला. स्वावलंबी होण्याकडे त्याने एक पाऊल टाकलं - असा उदात्त विचार अशी व्यापक धारणा या उपनयन संस्कारामागे आहे. या धारणेचे आपण अनुयायी बनले पाहिजे. या संस्कारांमागची तत्त्वं आपण बघावी. नुसतंच जर आपण विधींमध्ये अडकून बसलो तर खरंच आपलं देव भलं करो. विधी = फंक्शन (काळ). काळ बदलला तसे विधी बदलायला हवेत. अजिनधारणाला आजच्या युगात काही अर्थ नाही. हरणं मारणं कायद्यानं गुन्हा आहे तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. कन्यादानाला काही अर्थ नाही. कन्या कमॉडिटी नाहीत तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. पण म्हणून काही समग्र उपनयन अथवा विवाह 'संस्कार' कालबाह्य नि बाष्कळ ठरत नाहीत. कालबाह्य ठरतात ते केवळ विधी. पण कोणते विधी करावेत नि कोणते करू नयेत हे आपण ठरवूच शकतोच की. तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं. उरला प्रश्न कार्याचा तर वर विकास यांनी म्हणल्याप्रमाणे किंचित समजायला लागणार्‍या वयात असलं तरी देखील मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म. धर्म म्हणजे शिखा धारण केलेला बटू नाही. धर्म म्हणजे जानव्याची ब्रह्मगाठ नाही. धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.

In reply to by मेघवेडा

@तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं.>>> +++++१११११ @धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.>>>>> यासाठी एक कडक सॅल्युट.

In reply to by मेघवेडा

प्यारे१ Tue, 06/03/2014 - 12:46
>>>धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे. वा! आक्खा प्रतिसाद सुंदर. ह्यासाठी एक 'प्यार्टी' लागू. हवंतर जानवं काढून ठेवा तीर्थप्राशन होईस्तोवर ;)

In reply to by मेघवेडा

बाळ सप्रे Tue, 06/03/2014 - 15:12
विधी = फंक्शन (काळ).
वा वा!! पण प्रत्यक्षात काय होत.. विधी हे अशा पोथीपुस्तकातून वाचून केले जातात ज्यांना काळाप्रमाणे बदलण्याचे वावडे असते!! मुंज हा विधी केला जातो.. त्यामागचे तत्व, विचार (जे कालबाह्य नाही) ते सगळं गुंडाळून ठेवले जातं .. त्या तत्व/ विचारांनुसार आजच्या काळाला अनुरुप विधी कुठेही होत नाहित!!

In reply to by बाळ सप्रे

रेवती Tue, 06/03/2014 - 18:23
सप्रेसाहेब, लग्नातल्या विधींचे अर्थही असेच आपापल्या सोयीने गुंडाळून ठेवले आहेत, म्हणून कोणी लग्न करायचे थांबते काय? पण त्याविषयीचे लेख पाडले जात नाहीत.

In reply to by रेवती

बाळ सप्रे Wed, 06/04/2014 - 10:32
लग्न करायचे कुणी थांबत नाही, थांबूही नये पण कालबाह्य विधी थांबवता येतील.. लग्न म्हणजे विधी नव्हेत. लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात. जे आवश्यक आहे. गतानुगतिक विधी टाळून लग्न म्हणजे आजच्या काळात लग्नाचे रजिस्ट्रेशन, मित्र/ नातेवाईकांना बोलावून सहभोजन ई. तसेच मुंज म्हणजे विधी नव्हेत.. तर शिक्षणासाठी मुलाला दूर पाठवणे (मेघवेडा यांच्या प्रतिसादानुसार).. मग ते गतानुगतिक पद्धतिने ८ व्या वर्षी मुहूर्त बघून न करता जेव्हा मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी दूर जाण्याची वेळ येइल (if applicable) तेव्हा म्हणजे साधारण १०वी १२वी नंतर मुलं गावात सुविधा नसल्याने शहरात जातात तेव्हा किंवा परदेशी शिक्षणासाठी जाण्यावेळी करणे..

In reply to by मेघवेडा

सखी Tue, 06/03/2014 - 17:22
सुरेख प्रतिसाद, खरं तर सगळाच संग्रही ठेवावा असा, खालचे विशेष आवडले. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म.

In reply to by मेघवेडा

पैसा Wed, 06/04/2014 - 21:57
बरं वाटलं प्रतिसाद वाचून. बरंचंसं पटलं. विधींना पकडून राहण्यात काहीच अर्थ नाही. लेखातील उदाहरणांमधे मुंजीचे विधी हे त्याचा अर्थ किंवा कारण समजून न घेता केवळ एकत्र जमायचे निमित्त म्हणून केलेले दिसत आहेत. तसे असेल तर अजिबात करू नये असंच मी म्हणेन. आपल्या मनाला पटेल ते करावं. त्याची पूर्वापार करायला सांगितलं आहे म्हणून कोणत्यातरी संस्काराशी नावापुरती सांगड घालू नये. माझ्या मुलाची मुंज अगदी थोडक्यात आणि गंभीरपणे केली होती. आहेर-देणेघेणे इ. ला पूर्ण फाटा दिला. फक्त जवळचे नातेवाईक त्या निमित्ताने एकत्र जमले. गप्पा झाल्या. मजा आली. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीतच सोडमुंज केली. तेव्हा भाचा काशीला जायला निघतो, त्याला परत आणण्यासाठी मामा "तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! सगळेच खूश!

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 05:31
>>>>"तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! बायकोची स्मरणशक्ती, म्हणजे डाटा साठविण्याची आणि रिट्रिव्ह करण्याचा वेग दोन्ही अफाट असते. 'सहा महिन्यांपूर्वी हिच भाजी शेजारच्या अमुकतमुक बाईंनी पाठविली होती तेंव्हा बोटं चाटत (स्वतःचीच) खाल्ली होती.' किंवा, 'आज वन्संचं कौतुक करताय, करा, पण हेच मी ३ वर्षांपूर्वी शार्दूलच्या मुंजीत सांगितलं होतं तर 'तुला काही कळत नाही म्हणाला होतात'' किंवा, 'वन्संच्या दिराला, वशिला लावून बँकेत चिकटवून घेताय पण ५ वर्षांपूर्वी, माझ्या भावाला बँकेत चिकटवून घ्या म्हंटलं तर तेंव्हा व्हेकन्सी नव्हती, म्हणे.' वगैरे वगैर डाटा साठवणं आणि नेमक्यावेळी रिट्रिव्ह करणं ३२ जीबी पेनड्राईव्हला, बिचार्‍याला, काय जमणार?

In reply to by प्रभाकर पेठकर

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 12:28
आणि या साठवणीतल्या आठवणी काहीही प्रयास न करता (म्हणजे कॉप्युटर सुरू करा, पेनड्राईव्ह लावा, फाईल सर्च करा, इ, इ) प्रकाशापेक्षा जास्त वेगाने येऊन तुमच्यावर आदळतात. छॅ, छॅ, पेनड्रईव्हला तिच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखाशीही स्पर्धा करता येणे शक्य नाही ;) =))

रेवती Sun, 04/27/2014 - 19:12
मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर अहो मग त्याला काय झालं? उन्हाळा सुरु आहे ना? घालू द्या की त्यांना हवे तसे कपडे? त्या बाई आणि बुवांनी अगदी पारंपारिक वेषात जरी आमंत्रण दिले असते ना तरी "आले मोठे परंपरा जपणारे, माहितीये, यांच्या घरी मांसाहार चालतो" असं म्हणायलाही कमी करत नाहीत लोक! म्हणजे कसंही वागलं तरी लोक्स हे नावे ठेवण्यासाठीच अपॉईंट केलेले असतात. मी मात्र पंजाबी कपडे घालून आमंत्रण दिले असते (साडीबीडी आवडते पण झेपत नै हो) कारण मला ते आवडतात. मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार छे हो, माझ्या मुलांनी अज्याबात नकार दिला होता. पहिली संध्या त्याने मुंजीच्या दुसर्‍या दिवशी केली होती. आमचे पुण्यातले घर लहान असल्याने ज्या गेस्ट हाउसावर नातेवाईक राहिले होते तिकडे हा संध्याकाळी खेळायला पळाला. रात्री हा पेंगत असताना आजीनं दृष्ट काढली तेवढच! ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता घालू द्याकी! त्यांना निदान भिक्षावळीच्यावेळी असं काही करता आलं, आम्हाला तर मनपाने परवानगी दिली नव्हती. दिली असती तरी कोणीही नाचले नसते याची ग्यारेंटी, सगळे वयस्क नातेवाईक गुढगे दुखी, पाठदुखी ने त्रस्त आहेत. आजकाल कोणत्याही जातीधर्मात भयंकर जुन्या पद्धतीने काहीही समारंभ होत नाहीत. अमूक हॉल, तमूक गार्डन नावे असलेल्या ठिकाणी हिरवळीवर जेवणाचे स्टॉल लावून उभा उभ्या जेवणे होणारे समारंभ, लग्नाअधी होणार्‍या ब्याचलरांच्या पार्ट्या आजकाल महाराष्ट्रातही चालतात ते सगळे काय ब्राह्मण असतात का? त्यांनी परंपरा न पाळल्याचे लेख मात्र छापून येत नाहीत. तुम्ही वरील लेख लिहून एका जातीवर उगीच अन्याय करताय. ;) ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात ३१ डिसेंबरच कश्याला रेव्हपार्टीमध्ये पकडलेली मुले, मुली हा सगळा ब्रह्मवर्गच असतो काय? डिसेंबरात पार्टी करणे का अधिकार फक्त ब्राह्मणांनाच दिलाय का? तसे असल्यास कागदोपत्री दाखवा. पाहयला गेलं तर महाराष्ट्रीय लोकच नव्हे तर इतर राज्यीय लोकही खाद्यपेयांचा आस्वाद जास्तच प्रेमाने घेत असलेले दिसतील. तुमच्याकडून विदा गोळा करण्यात चूक झालीये का जरा बघा. लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून त्यांना हवे ते करू शकतात, तेही त्यांचे पैसे खर्च करून! तुम्हाला रुचत नसेल तर आमंत्रण देणार्‍यांना सरळ तोंडावर सांगा. गायत्री मंत्र फक्त माझ्या मुलालाच नाही तर त्याच्या सगळ्या जातींच्या, विविध भाषा बोलणार्‍या (भारतीय) मित्रांना अगदी खणखणीत आवाजात (कधीकधी जास्तच जोरात) म्हणता येतो आणि तो म्हणणे हा त्यांचा हक्क आहे. हामेरिकन सरकारही त्याला आक्षेप घेत नाही.

In reply to by रेवती

रेवती Sun, 04/27/2014 - 19:35
एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते म्हणजे ज्यांना गायत्री मंत्र म्हणता येत नाही त्यांचेही काही वाईट होणार नसते. दुसरं असं की तुमच्या लेखातून काय म्हणायचय हे समजलं. हा बदललेला प्रकार, फक्त मुंजीतीलच नव्हे, लग्नातीलही पाहिल्यावर मलाही विचित्र वाटले होते हे कबूल करते पण बदल हा असणारच! तुम्ही, मी किंवा कोणीही हा बदल थांबवू शकत नाही मग आहे त्यातच आनंद मानायला शिकले. दोन वर्षांपूर्वी माझ्या भाचीचा साखरपूडा हा लग्नासारखा मोठा केला होता आणि साडी वगैरे जाऊ दे, घागरा पद्धत आली असल्याचे जाणवले. असो, त्यांचे लग्न होऊन ते सुखात आहेत हे महत्वाचे! माझा मुलगा नक्की काय करणार आहे हे मलाही माहित नाही. त्याने समारंभातच नव्हे पण इतरवेळीही मद्यपान करू नये यासाठी मी आग्रही राहीन पण बाकी विविध प्राणी खाण्यात सध्या तरबेज झालाय.

In reply to by रेवती

जोशी 'ले' Sun, 04/27/2014 - 19:42
जौ द्या मला तरी हे किस्से जरा अतिच 'वेचक' वाटताय..निदान माझ्या तरि पहाण्यात असले काहि आले नाहि..

In reply to by जोशी 'ले'

रेवती Mon, 04/28/2014 - 03:01
कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे की मी लिहिलेले? असू द्या हो, त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले व माझे मी लिहिले.

In reply to by चिंतामणी

रेवती Mon, 04/28/2014 - 03:04
चिंतुकाका, किती दिवसांनी पाठींबा द्यायला आलात! काही नै जरा गंमत केली. धागाकर्त्यांचे म्हणणे काही पूर्णपणे खोटे नाही पण आज टंकायला वेळ होता तो सत्कारणी लावला.

In reply to by रेवती

चिंतामणी Mon, 04/28/2014 - 17:43
खूप दिवसांनी इकडे फिरकलो आणि तुझी बॅटींग बघून प्रतिसाद दिल्यावाचुन राहवेना. असेच भारी भारी पोस्ट वाचायला मिळाले तर पुन्हा पुन्हा नक्की येइन.

>>> ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता >>>> माझ्याकडे माझं पोर आणि त्याची चुलत भावंड, अशी एकत्रित मुंज झाली पालीला. मुंज लावणारा ऐंशीचा खडुस, म्हातारा ब्रम्हवृंद होता. त्यानी हे नाचगाणे, मुलांना वरातीच्या वेळा सजविणे ई.ई. काहिही करु दिले नाही. सारखा वसावसा ओरडत फक्त होता," साँस्कांर ओंहे नां हां, नाँच गाँणी कसली काँरताँय डोंबार्‍याँ साँरखीं...!!!" (खडुस म्हातार्‍याची उपजात सांगण्याचा मोह आवरत नाहीये पण आवरते..*diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO* )

In reply to by यसवायजी

प्यारे१ Sun, 04/27/2014 - 23:11
त्यांनी असल्या बर्‍याच पाकृ करुन बघितल्या आहेत. ;) हवं असल्यास खोदकाम करा अथवा (त्यांच्याशीच) संपर्क साधा! @ भडकमकर मास्तर, नया(लगता) है वह! =))

चौकटराजा Sun, 04/27/2014 - 21:53
सगळे पर्तिसाद रॉक्स !!!! मौजी त मौज असते. गोटा असतो . बेटकुळी भरण्याची धमकी असते. गोट्यावरून घेर्‍यातून खोडकर पणे हात फिरविणे असते.मुंज मुलाला सिल्कची सुळासुळीत चड्डी घालयला मिळते. मौजी एक सामाजिक कार्य आहे. नाभिकाना एरवीच्या पाचपट पयशे मिळतात.

In reply to by चौकटराजा

इरसाल Mon, 04/28/2014 - 17:04
नाभिका वरुन आठवले, नाभिकारे वारा वाहे रे... डौलाने हाक जरा नाव आज रे असे वाटायचे. म्हटलां नाभिक कसा नाव हाकल शेवटी ते नाविका रे असे आहे हे सम्जले.

मंदार कात्रे Sun, 04/27/2014 - 23:37
या धाग्यात शतक पार करण्याचे पोटेन्शियल दिसते आहे.... :) बाकी आत्मुबाबा स्मायलीवाले यांचा जरा सविस्तर प्रतिसाद अपेक्षित !

मनीषा Mon, 04/28/2014 - 00:26
एखाद्या अधुनिक पद्धतीने रहाणार्‍या कुटुंबातील मुलाची मुंज जर त्यानी त्यांना पहिजे त्या पद्धतीने केली तर हरकत काय आहे? माझ्या दोनही भावांच्या आणि नात्यातल्या काहींच्या मुंजी अगदी साग्रसंगीत, वाड्यात मांडव वगैरे घालून केलेल्या आठवतात. काही दिवस त्यांनी संध्या, जेवताना चित्राहूती घालणे वगैरे केल्याचे स्मरते. पण नंतर आजतागायत पळी, ताम्हन हातात तरी घेतले असेल की नाही शंका आहे. गणपतीच्या वेळी नवे जानवे विकत घ्यावे लागते. (त्यांचं ऐकून गायत्री मंत्र मलाही पाठ झाला होता... ) पण यात कुणाला दोष देण्याचे आणि आकांडतांडव करण्याचे काही कारण मला दिसत नाही. पूर्वी मुंज झाल्यानंतर मुलगा गुरूगृही जात असे आणि त्याच अनुषंगाने मुंजीचे विधी असतात. म्हणजे मातृभोजन, भिक्षावळ, पित्याने गुरूमंत्र (मुलाच्या कानात) सांगणे इ. पण आता मुलं गुरूगृही जात नाहीत त्यामुळे तसेही मुंजीचे सांकेतिक महत्व आता राहीले नाही. मुंज ८ व्या ९व्या वर्षी होऊन मग विद्याभ्यासाला प्रारंभ होत असे. आता शिक्षण वयाच्या ३र्‍या ४थ्या वर्षा पासून सुरू होते. मग मुंज करण्यात काय अर्थ राहीला आहे ? पण तरीही असे समारंभ होत रहावेत असे मला वाटते. त्यातल्या धार्मिक घटकां बरोबरच तो एक आनंद सोहळा आहे हे समजावे. म्हणजे करण्यात काही कमी-जास्तं झाले तर राग येणार नाही. असे समारंभ म्हणजे एक कौटुंबिक संमेलन असते. इतरवेळी कार्यव्यग्रतेमुळे भेटु न शकणार नातेवाईक, मित्रंमंडळी आवर्जुन एकत्रं येतात अशा वेळी थोडीफार मौजमजा केली तर काय हरकत आहे? चिकनीचमेली गाण्यावर नाचणे वगैरे जरा अतिशयोक्ती वाटते आहे. कारण मी तर सकाळी मुंज, संध्याकाळी दारुपार्टी असं घडताना पाहिलेलं नाही. लोकं (विशेषतः मराठी) इतकं तारतम्यं नक्कीच बाळगत असतील. ते जोडपं तुम्हाला आवर्जुन निमंत्रण द्यायला आले हे लक्षात न घेता तुम्ही त्यांच्या कपड्यावर टिका करणे याला काय म्हणावे ? जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल. आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली.

In reply to by मनीषा

पांथस्थ Wed, 04/30/2014 - 10:34
जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.
काय बहारदार प्रतिसाद आहे! क्या बात है! अनेक प्रतिसाद वाचनीय आहेत, विदा, स्वानुभव पण दिले आहेत अनेकांनी. पण तुम्ही दोन ओळीत जो सार सांगीतलात त्याला तोड नाही! अपना तो दिन बन गया!

In reply to by मनीषा

@जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif @आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली. .>>> आमच्या धर्मशास्त्र्यांना त्याची किंमत नसते. आजही ते..अज्ञाताच्या गुहेत काठ्या मारत फिरण्याला आदर्श-सदाचारी-जीवन समजतात. असो!

माझ्या मुंजीची १९८८ साली विडीयो केसेट केली होती. घोड्यावरून भिक्षावळ फडके रोड वरून गणपतीच्या मंदिरात गेली होती. त्यांनतर महिनाभर मी संध्या केली. मग आठवत नाही पण पुढे त्यात खंड पडला ,आज इतक्या वर्षाने कधीतरी ती विडीयो कसेट पहिली तर ह्या सभारंभाच्या निमित्ताने जमलेले अनेक नातेवाईक ज्यातले काही कैलासवासी झाले आहेत त्यांना पाहता आले. बरे वाटले. धाग्याचा विषय पाहून ज्या अपेक्षेने तो उघडला होता व तडक प्रतिसाद वाचायला घेतेले , मग मूळ लेख वाचला. तेव्हा अपेक्षापूर्ती झाली.

साती Mon, 04/28/2014 - 03:08
पूर्वी म्हणे बायका पण शिकत असत आणि वैदिक ज्ञान वैगेरे घेत असत. मग मुंज फक्तं मुलाचीच का? मुलीची का नाही? अगदी हौशी मौजीसाठी मुंज म्हटलं तरी मुलीच्या नावाने हौस मौज का नाही? ता. क. माझ्या नवर्याच्या धर्मात मुंजीसारखा विधी मुलगा मुलगी दोघांसाठी आहे. मुलासाठी 'शाल' आणि मुलीला 'किरगुणी' बर्याचदा एकाच मांडवात घरातल्या मुलामुलींची एकत्र शाल किरगुणी करतात. आजकाल यातही मुख्य विधी संपल्यावर मुलांना भेटवस्तू द्यायच्या वेळेस बाजूला ऑर्केस्ट्रा चालू करतात. ;) अजून दारू पिणे वैगेरे पाहिले नाही.

In reply to by साती

पिशी अबोली Mon, 04/28/2014 - 13:11
माझ्या मैत्रिणीची झाली आहे मुंज. मुंज मुलींची करु नये असं शास्त्र कुणाला माहीत असल्यास संदर्भ जाणून घ्यायला आवडेल. बाकी हौसेमौजेखातर मुलीची मुंज करायची आहे असं एक उदाहरण आणि वैदिकीचा अधिकार तिला यावा म्हणून करायची आहे असं दुसरं अशी दोन हल्लीच ऐकली.

In reply to by पिशी अबोली

कवितानागेश Mon, 04/28/2014 - 18:30
होय. मुलींची मुंज करता येते. पूर्वी मनशक्ती केंद्रात स्वामी विज्ञानानंद सामूहिक मुंज करायचे,त्यात मुलींचीही मुंज होत असे. अजूनही करत असतील , कल्पना नाही. बाकी , मुंजीनिमित्त 'चिकन पार्टी' आमच्या काही नातेवाईकांमध्येही झाली आहे. अगदी माझ्या लहानपणीपण पाहिलिये. ज्याची त्याची मर्जी! हे जर का खरोखरच 'चुकीचे' असेल, तरी असे वागणार्‍यांना मी दोष देणार नाही. तर 'मुंज' म्हणजे नक्की काय, हे कधीही न कळलेल्या आपल्या समाजाच्या आधीच्या काही पिढ्यांना देइन. माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट, एक दाक्षिणात्य ( कर्मठ ब्राह्मण) काकू मुलाच्या मुंजीचे आमंत्रण करायला घरी आल्या होत्या. त्याचवेळेस एक उत्तर भारतीय (ब्राह्मण) काका बसले होते. त्यांनी विचारलं, 'उपनयन' चा अर्थ काय हो? आई काहीतरी सांगणार तेवढ्यात काकू चटकन म्हणाल्या , ' उप' म्हणजे 'सब' ( इन्लिशमध्ये). म्हणजे ते एक छोटं 'लग्न'च असतं!! ... आईनी तोंडावर आलेले सगळं संस्कृत गपकन गिळून टाकलं... मी हसायला आत पळाले!

In reply to by कवितानागेश

शुचि Mon, 04/28/2014 - 18:34
लिम्स, लगेच अर्थ शोधला. - 'उपनयन' का अर्थ है "पास या सन्निकट ले जाना।" सम्भवत: आरम्भ में इसका तात्पर्य था "आचार्य के पास (शिक्षण के लिए) ले जाना।" हो सकता है; इसका तात्पर्य रहा हो नवशिष्य को विद्यार्थीपन की अवस्था तक पहुँचा दे

In reply to by पिशी अबोली

यशोधरा Mon, 04/28/2014 - 19:56
असं शास्त्र नाही, असं वाटतं. कधी वाचण्यात आलं नाही. माझ्याही मैत्रिणीची आणि तिच्या घरातील प्रत्येक मुलीची मुंज झाली आहे.

राही Mon, 04/28/2014 - 08:09
पारशांमध्ये नवजोत समारंभ मुलगे-मुली दोघांचाही करतात. क्रिस्टिअनांमध्ये फर्स्ट कम्यूनिअन दोघांचेही असते. पारशांमध्ये सात वर्षांखालच्या 'खुर्द'--लहानग्यांचे नवजोत होऊ शकत नाही. त्यावेळेस प्रथमच मुला/मुलीला सद्रा चढवण्यात येतो आणि 'कश्टि' नावाचा जानव्यासारखा धागा कंबरेला बांधण्यात येतो. पुढील आयुष्यात त्यांनी या दोन गोष्टी कायम अंगावर बाळगायच्या असतात.

सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 12:04
गालिब शराब पीने दे मस्जिद मी बैठकर या वो जगह बता दे जहां पार खुदा न हो I एखाद्या गोष्टीचे औचित्य असते तेवढाही विधिनिषेध नसेल तर प्रश्नच मिटला. शेवटी आपण देवळात बसून ओली पार्टी केली किंवा राजघाटावर बायका नाचवल्या आणी ओली पार्टी केली तरी फरक पडत नाही. महात्मा गांधीना शिव्या देणारे लोक सुद्धा त्या स्थळाचे पावित्र्य समजून घेताना पाहीले. ( जेंव्हा त्यांना प्रश्न विचारला कि हे कसे तेंव्हा ते म्हणाले आमचा गांधीजींच्या विचारसरणीला विरोध आहे. त्यांच्या प्रामाणिक पणाला किंवा इतर गुणांना नव्हे). आत्यंतिक विरोध असूनही त्यांना स्थळाचे पावित्र्य समजत होते. कोर्टात अर्धी चड्डी घातली तर चालेल काय? किंवा आपल्या बायकोला घेऊन स्त्रीरोग तज्ञा कडे गेल्यावर लोड शेडींग आहे म्हणून तो अर्ध्या चड्डीत बसलेला असेल तर चालेल काय? आता याचे उत्तर हो असेल तर प्रश्नच मिटला. बाकी मुंज केली काय किंवा नाही केली काय? काय फरक पडतो. हा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या डॉक्टर मित्राच्या दवाखान्याच्या बाहेरून एक लग्नाची वरात चालली होती त्यात बँड वाले अतिशय सुरात गाणे वाजवत होते "दिल मी छुपा के प्यार का तुफान ले चले I हम आज अपनी मौत का समान ले चले I कसलाही विधिनिषेध नसेल तर आईबापांचे कामजीवन अशा विषयावर सुद्धा रसभरीत चर्चा करता येईल किंवा मुलान्समोरही कामक्रीडा करता येईल . असो ज्याचे मत त्याच्या पाशी.

सूड Mon, 04/28/2014 - 15:16
उपजात सांगायचा मोह आवरलात नि माती खाल्लीत. ती सांगता तर एव्हाना दोन-अडिचशे प्रतिसाद सहज मिळत होते. बाकी मुंज हा विधी फक्त ब्राह्मणांतच करतात हा ब्राह्मणेतरांतला गैरसमज आणि आमची बरोबरी करायला ब्राह्मणेतर मुंज करतात ही एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्याने (आता त्याची उपजात सांगायचा मोह मी आवरतो) उधळलेली मुक्ताफळे असं दोन्ही ऐकून कान केव्हाच तृप्त झालेत. जाता जाता, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

In reply to by सूड

बघा बघा...खाल्लीत कि नाही माती तुम्ही पण..!! या, बरोबरच केक कापू..! जाता जाता, हल्ली असे उपजातीपातींवरुन युद्ध पेटत नाहीत हो...जास्त थोर्थोर विषय हवेत...

दिव्यश्री Mon, 04/28/2014 - 15:28
काही वर्षांपूर्वी एका सुप्रशिद्ध महाराजांनी त्यांच्या नातवाची मुंज केली होती . त्यावेळी लैच धुराळा उडाला होता . यागोष्टीची आठवण झाली . असो . ज्यांनी फोटू दिसण्यासाठी कष्ट घेतले त्यांचे जाहीर आभार . धन्यवाद . वरील फटू पाहून सुजाण , चाणाक्ष लोक/वाचक लग्गेच ओळखतील कि ब्राह्मणी नौ वार कोणती आणि 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' हा प्रकार कोणता . बाकी ती म्हण कोपी पेस्ट केली आहे हे सुज्ञाना वेगळे सांगायला नकोच . धन्यवादच .

इष्टुर फाकडा Mon, 04/28/2014 - 15:43
लेख थोडा दात ओठ खाऊ झालाय. मुंज प्रकार कालबाह्य झालाय हे खरच आहे. तरीही माझ्या मुलाची मुंज घरातल्या लोकांना करायचीच असेल तर ती घरातच करायला लावेन आणि बाकी समारंभ न केल्यामुळे वाचलेल्या पैशातून काहीतरी माझ्या गावातल्या शाळेतल्या पोरांसाठी करेन. हे मी करेन बाकीच्यांनी काय करावं हे ते ठरवतील :)

राही Mon, 04/28/2014 - 16:38
नऊवार लुगडी अने बन्ने तंगडी उघडी ही म्हण बडोदा मराठीत (हिला धेडगुजरी म्हणावं की धेड मराठी?) खूप चालते. मराठी सरदारांच्या आणि एकूणच मराठी लोकांच्या पोकळ बडेजावाची टिंगल करण्यासाठी ती वापरली जाई. ब्राह्मण बायकांचे नऊवारी नेसण ओचे खोचलेले असते, आणि इतर अनेक जातीतल्या बायकाही ओचे खोचतात मात्र ते थोडे आखूड खोचतात. काम करताना आखूड नेसण बरे पडते. मी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले एक दुर्मीळ कुटुंबछायचित्र पाहिले आहे. त्यात त्या ब्राह्मण कुटुंबातल्या बाईंनी ओचे अगदी आखूड म्हणजे अर्ध्या पोटरीपर्यंत खोचलेले आहेत. पायांवर निर्‍या लोळवणारे नेसण मला वाटते बालगंधर्वांनी लोकप्रिय केले. त्यांची उंची कमी होती त्यामुळे त्यांना भरपूर पन्ह्याचे लुगडे पायघोळ होत असावे. ते पदराचा एक काठदेखील अगदी खालून म्हणजे अगदी घोट्यापासून घेत. जुन्या लोकांकडून असे ऐकले आहे की असे पायघोळ आणि पावलांवर निर्‍या लोळवणारे नेसण गरत्या बाईचे लक्षण मानले जात नसे. बाईचे नेसण सैल, अघळपघळ फलकारणारे असू नये असा संकेत होता. स्वयंपाकाची वगैरे कामे करणार्‍या गरीब ब्राह्मण बायकांनाही असे नेसण सोयीचे होते. कष्टकरी बायका दुहेरी ओचे खोचत. म्हणजे डावीकडे खोचलेल्या ओच्यामधे पुन्हा उजवीकडची एखादी निरी अडकवीत. यामुळे कुठल्याही पावलामध्ये लुगडे अडकण्याचा प्रश्न येत नसे. बाकी नऊवारी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी निर्‍या उजवीकडे फिरवून खोचतात तर कोणी डावीकडे. कोणी कोणी निर्‍यांचे दोन भाग करून ते विरुद्ध दिशांना म्हणजे डावी-उजवीकडे वळवून खोचतात. कोळी बायका निर्‍या फार ठेवीत नसत. कमी निर्‍यांमुळे सुटा राहिलेला पदर कंबरेभोवती घट्ट गुंडाळीत. यामुळे वजन उचलताना कंबरेत लचक किंवा उसण भरत नसे. या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील तर जाणून घ्यायला आवडेल. पेशवाईमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. खाणे-पिणे, वस्त्रप्रावरणे, भाषा अशा बाबतीत नवी मूल्ये प्रस्थापित झाली. तेव्हा त्या आधीचा महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

In reply to by राही

नऊवार नेसुन घोड्यावर पण बसता यायचे म्हणे. त्यादृष्टीनेही आखूड नेसणच योग्य असावं. अर्थात आखुड नेसा वा पायघोळ नेसा, नऊवार फक्त पुढुनच पिसारा फुलवलेल्या मोरासारखी आकर्षक दिसते. मागुन नेटका पदर अंगभर घेतला तरच ठीक... (नऊवार अज्जिबात ना आवडणारी...स्वरा)

उडन खटोला Mon, 04/28/2014 - 18:08
धागा शतकपार नेल्याबद्दल समस्त मिपा करांचे आभार ! बरीच साधक बाधक चर्चा झालेली आहे . पण ती नौवारी साडीवर घसरेल, अशी अपेक्षा नव्हती! असो आभार

सूड Mon, 04/28/2014 - 19:00
पूर्वी नऊवारी/ धोतर (थोडक्यात कोणतंही सकच्छ नेसलेलं वस्त्र)हे घरंदाज पणाचं लक्षण मानलं जाई. कासोट्याशिवायची लुगडी फक्त देवदास्या (मुरळ्या वैगरे), वारांगना आदि स्त्रिया नेशीत असत, म्हणून घरंदाज स्त्रियांनी अशी लुगडी नेसणं पसंत केलं जात नसे. नंतरच्या काळात शन्वारे तेल्यांच्या स्त्रिया पाचवारी लुगडी नेशीत असत. थोडक्यात त्या काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी होता.

सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 19:31
सूड साहेब एकदा वैद्यकीय सर्वेक्षणासाठी बुधवार पेठेत जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा तेथील स्त्रियांची चेहेर्याची अतिशय भडक रंगरंगोटी (मेक अप) पाहून मी माझ्या मित्राला विचारले कि या स्त्रिया एवढे भडक रंग का वापरतात? त्याचे उत्तर असे होते कि साधे सोज्वळ रंग वापरले तर त्या स्त्रिया "तशा" आहेत हे लोकांना कसे कळेल? थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो. .

In reply to by सुबोध खरे

रेवती Mon, 04/28/2014 - 19:39
अगदी असाच संवाद मी आणि आईमध्ये झाला. बुधवार पेठेतील बायका वेगळ्या का दिसतात यावर आईने घाबरून लक्ष्मीरोडवर रिक्षा थांबवली व मला घरी आणले. यापुढे त्यापेठेबद्दल काही विचारायचे नाही वगैरे दटावले. मी नवव्या यत्तेत होते व असे काही स्पष्टीकरण देणे तिला अवघड वाटले असावे.

In reply to by सुबोध खरे

सूड Mon, 04/28/2014 - 19:50
>>थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो ह्म्म!! शक्यता नाकारता येत नाही.

आदिजोशी Wed, 04/30/2014 - 12:22
मुळात असलं काही घडलं ह्यावरच माझा विश्वास नाही. कितीही उच्चभॄ झाले तरी ब्राह्मण इतके उथळ होणार नाहीत. उगाच ब्राह्मणांना नावं ठेवण्यासाठी तयार केलेला कल्पनाविलास आहे हा. पुरावे द्या.

In reply to by आदिजोशी

+ ईन्फिनिटी. हेच म्हणतो. ह्यांच्या 'टु डु लिस्ट' मधे ब्राम्हणांच्या नावानी शंख करणे ही रोजची एक टास्क असते. (गो ब्राम्हणाभिमानी) अनिरुद्ध.

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 11:51
जागतिकीकरणामुळे व आधुनिक विचारशैली अंगीकारल्याने असे प्रसंग दिसणे काही नवीन नाही. या प्रसंगात दाखविलेले मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही. मुंज केली अथवा नाही, हे असे ग्लोबल संस्कार होण्यावाचून राहणार थोडीच? नाही तरी आजकाल घराघरात टीवी व International Scool च्या माध्यमातून ह्या साऱ्या गोष्टी सर्वात आधी लहान मुलांपुढे येणारच की! आपल्या लहानपणी असलेले फिल्म्स ला U/A certificate देणारे censorship टीवी व प्रिंट मेडीयाला का लागू नाही? हाही प्रश्न उरतोच. मुलांची विचारशक्ती दृढ करण्यासाठी जे काही महत्त्वाचे संस्कार करायचे आहेत त्याची मात्र कधीही उणीव होऊ देवू नये, हीच विनंती.

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 12:13
मला नक्की तुमचा मुद्दा कळला नाही. तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे?
  1. मुंज करणे
  2. दारु पिणे
  3. पबमध्ये जाणे
  4. आयटम साँग्ज ब्यांडवर वाजवायला सांगणे
  5. त्या गाण्यांवर वरातीत नाचणे
  6. वरातीत घरच्या बायांनी नाचणे
  7. वरच्या गोष्टी मराठी ब्राह्मण कुटुंबात घडणं
च्यायला! एकतर रविवार, त्यात बारा वाजलेले...माझा बहुतेक मराठी कुटुंबातला सरदार झालाय.

In reply to by धमाल मुलगा

यसवायजी Sun, 04/27/2014 - 12:26
हैय्या.. त्यांचा विरोध 'चहा पिणे' किंवा 'दही खाणे' याबद्दल नसुन,चहात दही मिसळून खाण्याबद्दल आहे (असे वाटते).

राही Sun, 04/27/2014 - 12:29
ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? हे सर्व आणि गायत्री मंत्र एकत्र राहू शकत नाहीत काय? त्यांनी तसे एकत्र राहू नये काय? 'गायत्रीमंत्र' या शब्दाची निव्वळ माहिती असण्यासाठी उपरोल्लेखित गोष्टीं न करणे ही प्री-कंडिशन आहे काय? केव्हापासून? ती तशी असावी काय?

काका, पुण्यातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर बसून कपाळावर आठ्या पाडून शिरा ताणत करायचा कर्कश काथ्याकूट इथे कशाला टाकताय? आणि सारखी 'ब्राह्मण'त्वाची टिमकी वाजवायचं कारण काय? मराठी ब्राह्मण म्हणून जन्मले म्हणजे कोणी आकाशातून पडले नाहीत आणि संस्कृतीरक्षण करण्याचा ठेकाही घेऊन आलेले नाहीत. त्यांना स्वतःच्या पैशाने तंगड्या चावायच्यायत आणि बियर रिचवायची आहे तर तुमचं काय गेलं? तुम्ही आपले वरण-भात-लोणचं-रायतं-खीर ओरपत परंपरा सांभाळा की! तुमच्या तर घशात नाही कोणी बियर ओतायला आलं. उगाच आम्ही म्हणजे 'इतरांपेक्षा' कोणीतरी वेगळे आहोत म्हणून अहंभाव बाळगत फिरायचं आणि 'आपल्यातलेच' काही लोक आता 'इतरांसारखे वशाट खायला लागून' धर्म बुडवताहेत अशा अभिनिवेशात धागे पाडण्याचं हसू आलं. आणि मुंजीचा आणि ३१ डिसेंबरचा, ग्रिलचा, माशांचा कशाचाच संबध काय? नक्की काय म्हणायचंय? तुमच्याकडे काय ३१ डिसेंबर साबुदाण्याची खिचडी खाऊन आणि पियुष पिऊन साजरा करतात का? असतीलही. म्हणून इतरांनी काय करायचं हे सांगणारे आपण कोण? मासे खाल्ले तर गायत्री मंत्राची पावर कमी होते का? का ब्रह्मतेजाला ग्रहण लागतं? जरा त्या बंगाली ब्राह्मणांना विचारून बघू या. आणि ३/४ प्यांटमध्य काय वाईट आहे? ३/४ घालून संस्कॄती बुडते आणि आणि धोतर नेसून वर येते काय? च्यायला त्या झिरझिरीत धोतर वापरणार्‍या आजोबा लोकांचे आतले लंगोट सुद्धा दिसत असत (घातले असल्यास) आणि नऊवारी साडीबद्दल काय बोलावं! साडी नेसायची इतकी विशोभित पद्धत अक्ख्या हिंदुस्थानात नाही. काय तर दोन पायांमधून तो पिळा मागे घेऊन मागच्या मागे 'खुपसायचा', आणि एवढे नऊ वार वापरून पोटर्‍या उघड्या पडायच्या त्या पडायच्याच. गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे! पण नऊवारी पारंपारिक म्हणून चांगली, आणि चांगल्या अंग झाकणार्‍या फॉर्मल ट्राऊझर्स मात्र वाईट होय? का बुवा?

In reply to by चिन्मय खंडागळे

चैदजा Sun, 04/27/2014 - 13:51
गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे!
नऊ वार साडी नेसण्याचे ३-४ प्रकार आहेत. त्यात ब्राह्मणी, लावणी या २ महत्त्वाच्या. ब्राह्मणी प्रकारात पाय ऊघडे पडत नाहीत. झैरात -- माझी बायको सगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवते. गेल्या ५ वर्षात तिने अंदाजे ४०० साडया शिवल्या आहेत. अमेरीकेपासुन ऑस्ट्रेलिया पर्यंत साडया गेल्या आहेत.

In reply to by चैदजा

दिव्यश्री Sun, 04/27/2014 - 14:19
+++++++++++++++++ ११ फक्त योग्य पद्धतीने साडी नेसता आली पाहिजे . बाकी सहावार साडीमध्ये देखील अंगप्रदर्शन होतेच . असो .

In reply to by चिन्मय खंडागळे

नऊ वार साडी अने तंगडी उघडी ही म्हण "किती केले साडे तरी भागाबाईचे कुले उघडे' अशा प्रकारची असावी. नऊवार साडी जनरलाईझ करण्यासाठी नसावी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रभाकर पेठकर Sun, 04/27/2014 - 20:05
नऊ वार साडीला 'एव्हढे मोठे वस्त्र नेटकेपणाने नेसण्याचे, जगातील एकमेव 'कॉश्च्युम' म्हणून वाखाणले गेले आहे.

चैदजा Sun, 04/27/2014 - 13:36
माज असल्याची लक्षणे, दुसरे काय ?
मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही.
मग करता कशाला मुंज ? येव्हढीच हौस आहे, तर त्याऐवजी आपण लहान मुलांचे ऊष्टावण करतो तसे मुलगा १०-१२ वर्षाचा झाल्यावर बियरावण करावे.

मुंज हा आता कालबाह्य संस्कार आहे. तरीपण लोक ट्रॆडिशन जपण्याचा प्रयत्न करतात त्यात त्यांना मजा येते. एन्जॊय करतात. एक पारंपारिक सोहळा 'शास्त्रा'पुरता साजरा करतात. काही दिवसांनी संध्येच्या वेळी आचमने बिअर नी पण होतील. आता शेंडी ठेवणारे , जानवं घालणारे, संध्या करणारे किती ब्राह्मण राहिलेत?

In reply to by प्रकाश घाटपांडे

पैसा Sun, 04/27/2014 - 14:14
हेच लिहायला आले होते. आता ३ साडेतीन वर्षाच्या मुला-मुलींना शिकवायला सुरुवात करतात आणि गुरूच्या घरी तर कोणीच रहायला जात नाहीत. त्या काळात मुलं गुरूच्या घरी रहायला जायची, त्यांना १२ वर्षे कष्टात काढावी लागतील म्हणून पक्वान्ने वगैरे करून घालत. आता त्यापैकी काहीच शिल्लक राहिले नाही. या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही. राहिली गोष्ट दारू पिणे आणि नाचणे. त्यासाठी मुंजीचाच मुहूर्त कशाला? कधीही करता येईल की! छापा पत्रिका आणि वाटा. "अमूक दिवशी, अमूक ठिकाणी दारू पिऊन नाचण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सहकुटुंब सहपरिवार येण्याचे करावे." हाकानाका!

In reply to by पैसा

आयुर्हित Mon, 04/28/2014 - 00:52
लहानपणचे अनिर्बंध वर्तन सोडूनशील, दृढनिश्रय व शिस्त अंगी बाणून ज्ञान संपादन करणे, ब्रम्हचर्याचे काटेकोर पालन करणे हा व्रतबंध संस्काराचा प्रमुख हेतू आहे. यज्ञोपवीत धारण करण्याने वरील नियमांची आठवण सतत जागृत राहते. हा संस्कार मुलगा आठ वर्षाचा असतांना करणे चांगले. उपनयन संस्कारात अनेक उपविधी खालीलप्रमाणे असतात. 1 चौलकर्म - क्षौर करणे 2 वस्त्रधारण -नेसायचा पंचा मानेशी गाठ मारुन नेसावा व अंगावर पांघरायचा पंचा दोन्ही खांदयावरुन घ्यावा. 3 अजिनधारण -बसण्यासाठी लोकरीचे आसनघेणे. 4 यज्ञोपवीत धारण - यज्ञोपवीत म्हणजे जानवे. जानवे तीन पदरी असते. तीन पदरावरती तीनवेद व ब्रम्हगाठीवर अथर्व वेदाची स्थापना केली जाते. जानवे गळयात घालण्यापूर्वी सूर्याला दाखवावे. नंतर उजवा हात वर करून प्रथम हातात व नंतर गळयात घालावे. 5 आचमनविधी - संध्याकर्मविधी 6 प्रधनाज्य होम 7 अवक्षारणविधी - सूर्यदेवाची कृपा व्हावी म्हणून अवक्षारण विधी केला जातो. 8 विभूतिग्रहण 9 गायञीउपदेश 10 मेखलाधारण 11 दंडधारण– पळसाचा दंड (बटूच्या मस्तकाइतकीउंचीचीकाठी) 12 आचारबोध 13 अनुप्रवचनीयहोम. 14 मेधाजनन : हा विधी स्मरण, ग्रहण व धारण वाढविण्यासाठी केला जातो. 15 भिक्षाग्रहण - ओमभवतिभिक्षांदेही ! चातुर्वेदान षटशात्राणि अष्टादश पुराणनि पठीता भवामि || आई, मला भिक्षा दे मी चार वेद सहाशास्त्रे, अठरा पुराणे यांचे अध्ययन करणार आहे. असे म्हणून भिक्षा मागावी. 16 भोजनविधी - मौजीबंधन झालेल्या भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी करण्यास येणारा विधी पात्रा भोवती पाणी फिरवावे. पात्राच्या उजव्या बाजूस खालून वरच्या दिशेस भाताच्या छोटया पाच आहुती दयाव्यात. आहुत्या देताना चित्राय स्वाहा| चित्रगुप्ताय स्वाहा | यमाय स्वाहा | यामधार्मय स्वाहा | सर्वेभ्योभूतेभ्याःस्वाहा | हे पाच मंत्र म्हणावेत. नंतर उजव्या हाताने आहुत्या वरून खाली गोळा कराव्यात. डाव्या हाताने हातावर थोडे पाणी घालून हात धुतल्यासारखा करावा. पात्रावर डाव्या हातावर उजवा हात पालथा धरून अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिना देहामाश्रितः | प्राणापान सामायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम || हा श्लोक म्हणावा. नंतर "अमृतोपास्तानमासि" हा मंत्र म्हणत आचमन घ्यावे. नंतर प्राणाय स्वाहा | अपानाय स्वाहा | व्यानाय स्वाहा | उदानाय स्वाहा | समानाय स्वाहा | ब्राम्हणे स्वाहा | ह्या मंत्रांनी भाताच्या सहा प्राणायुती मुखात घ्याव्यात. डाव्या हाताच्या बोटाने थोडे पाणी डोळ्याला लावावे. नंतर भोजनास सुरुवात करावी. भोजन झाल्यावर डाव्या हाताने एक पळी पाणी उजव्या हातात घेऊन "अमृतोपास्तानमासि" | असे म्हणून आपोष्णी घ्यावी. समावर्तन : सोडमुंज: ब्राम्हच्र्याश्रामातून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी समावर्तन-सोडमुंज संस्कार करण्यात येतो हल्ली मुंजीनंतर लगेच सोडमुंज करण्याची प्रथा निर्माण झाली आहे हे शास्त्रीय दृष्ट्या अनुचित आहे.

In reply to by आयुर्हित

अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित ! ह्या १६ विधींबद्दल अजुन दीटेल्स मधे म्हणजे मंत्र विधीं सकट लिहिता आले तर एक स्वतंत्र धागाच टाका ना !

In reply to by प्रसाद गोडबोले

बालगंधर्व Fri, 05/02/2014 - 21:32
अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित !
गोदबोले सहेब, अताआ तुमेपन मज्यासार्क लिहिला. हानतेच्यायला मा;;;;; अयुर्हित सहेब, तुमला कुहुप जिवन मिलुदे.

In reply to by आनंदी गोपाळ

आयुर्हित Fri, 05/02/2014 - 21:33
हा ब्लॉग माझा नसून "विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई" यांचा आहे. यावरून हे स्पष्ट होते की मुंज ही फक्त एका समाजाशी निगडीत नसून चा सर्व भारतीय लोकांनी मानलेल्या १६ संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे!

In reply to by प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ Mon, 04/28/2014 - 00:55
मुंज करणे / लग्नातला लाजा होम करणे हा एक फालतू पणाच आहे. काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Mon, 04/28/2014 - 02:00
नक्की अडचण काय आहे जर कुणाला त्रास होत नसेल तर? तशी कैक प्रतीके वेष्टर्न संस्कृतीतही आहेतच की. कशाला पाहिजे नववर्ष काय अन व्हॅलेंटाईन्स डे तरी मग? अन शेवटी हेही विसरले जाते की या माध्यमातून लोकांना एकत्र जमून टीपी करायचा असतो. तथाकथित सिग्निफिकन्स हा कुणाच्याही गावी नसतो- आधीही फारसा कुणाच्याच गावी नव्हता. दे जस्ट वॉना हॅव फन, दॅट्स ऑल!

In reply to by विजुभाऊ

काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?
>>> जोवर जातिआधारित/ धर्माधारित आरक्षणे आहेत तोवर ! अर्थात यावश्चंद्रदिवाकरौ !! :P

In reply to by विजुभाऊ

विजुभौ, सहमत आहे. माणुस जसा अधिक व्यस्त होत जाईल, अजून आधुनिक होत जाईल, दृष्टीकोणात फरक होत जाईल तेव्हा हे कमी होईल असे वाटते. अशा कितीतरी परंपरेच्या गोष्टी आता कालौघात मागे पडत चालल्याच आहेत 'काहो, मुलाची मुंजी केलीत की नै' आणि या प्रश्नाला 'आम्ही असलं काही करत नाही' अशी उत्तरं यायला लागलीत की हे बंद होईल. हं आता यातही परंपरा जपणारे आणि आधुनिक असे दोन गट होतील. किरकोळ कारकोळ चालूच राहील. -दिलीप बिरुटे

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 14:09
भले मग तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल. भले मग तुम्ही कोणत्याही सणाला, पार्टीला वा कोणत्याही ओकेजनला पित असाल. भले मग तुम्ही देशी पित असाल वा विदेशी पित असाल. भले मग तुम्ही स्वताच्या पैश्याची पित असाल वा फुकटाची पित असाल. भले मग तुम्ही मंगळवारी पित असाल वा रविवारी पित असाल दारू ही वाईटच !! फक्त एवढेच सांगू इच्छितो, अभ्या दारू पितो, अभ्या किडे करतो, अभ्या पोरींशी लफडे करतो. अभ्या कसाही असेल, पण अभ्या नीच नाही रे ..

अवतार Sun, 04/27/2014 - 14:11
लग्नाआधी नाईलाज म्हणून मुंज केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर मटन कबाब आणि चिकन तवा राइसची पार्टी करून मुंज साजरी केली. कहर म्हणजे कबाब खातांना, "आता मात्र मी अगदी कर्मठ ब्राम्हण होणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी चिकन मटन हादडायला मोकळे आहोत." हे सतत चालू होतेच! ह्यात त्यालाही आणि मलाही काही वावगे वाटत नाही! :) मुठीतून वाळू निसटणारच आहे हे माहित असूनही जर मुठीत वाळू पकडण्याचा मोह आवरत नसेल तर अशा वेळी उपदेश करण्यापेक्षा संयम उपयुक्त ठरतो.

In reply to by प्यारे१

माझ्यामते मुंज काही एका विशिष्ठ जातीची मक्तेदारी न्हवे ... आर्य त्रैवर्णिकांना मुंजीचा अधिकार आहे...शिवाजी महाराजांनीही राज्याभिषेकाच्या आधी मुंज केल्याचे ऐकीवात आहे ! ... केवळ इतर जातीतल्या लोकांनी मुंज करणाचे बंद केल्याने मुंज हा एक संकार केवळ एका जातीतल्या लोकांच्या अखत्यारित आला आहे ... आजही जर इतर त्रैवर्णिक लोकांनी मुंज करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे निओ-मॉडर्न हिंदु समाजाकडुन कौतुकच होईल असा अंदाज आहे !!

आदूबाळ Sun, 04/27/2014 - 14:36
उडन खटोला भाऊ / बहन तुम्हाला काय म्हणायचंय ते कळलं. पण सगळा गुताडा झालाय. तुमच्या डोक्यात असलेलं आदर्श ब्राह्मणाचं / मुंजीचं / नव वर्ष साजरं करण्याचं / वर्तनाचं / जगाचं मॉडेल जरा मांडता का? म्हणजे आक्षेप नक्की कशावर आहे हे पिनपॉईंट करायला बरं पडेल...

लेख पटला :) शो ऑफ्फ्, सेलिब्रेशन्स , धांगडधिंगा करायचा असेल तर त्याला इतर १७६० कारणं आहेतच की ...मुंज कशाला त्यात घुसडा ? अवांतर : पोराला वैदिक शिक्षणाला घालणार असाल तरच त्याची मुंज करायची अन्यथा नाही .... असा स्पष्ट पवित्रा मी घेतल्याने आमच्या घरातले आधीच बिचकुन आहेत ... त्यांना हा लेख दाखवतो ;)

आणि हो हे फक्त ब्राम्हणांवरच का लिहिलय? बाकीचे जातीजमातीवाले हे सगळं करत नाहीत काय? उगीच उठलं पळी-भांड आणि जानव्यावर टिका केली की झालं का? दारु पिण, रस्त्यावर नंगानाच घालणं किंवा ३१ डिसेंबरला टल्ली होणं हे सगळ्याच बेवड्यांच्या घरी चालतं. गमतीची गोष्ट अशी की आधी ब्राम्हण घरात शक्यतो दारु प्यायली जात नाही. प्यायली तरी नंगानाच करणारे १०० पैकी ५ सुद्धा नसतील. तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे? मुंज करण्यावर? दारु पिण्यावर? ब्राम्हणांनी दारु पिण्यावर? मांसाहार करण्यावर? कुठले कपडे घालायचे ह्यावर? उगीचं जनरलायझेशन करु नका.

उपजात चित्पावनच असणार.. आजकाल ब्राह्मण्य जपण्याची नैतिक जबाबदारी देशस्थांवर येऊन पडली आहे.बरेच देशस्थ व्यवस्थीत धार्मिक विधी करतात. चित्पावन युवक युवती मात्र, indian born confused american या कॅटॅगरीत केव्हाचेच गेले आहेत.

In reply to by मंदार दिलीप जोशी

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:43
ठ्ठो ! सॉरी सॉरी. ते ढिच्कॅव असे वाचावे. (पुर्वी बार टाकत आता पिस्तुलातुन गोळी झाडतात........भेंडी रस्त्यात गोळ्या पडल्यात आणी पिस्तुलाची नळी हातात धरुन कोणी रस्ता झाडतोय असे चित्र नजरेसमोर उभे र्‍हायलेय.)

राही Sun, 04/27/2014 - 16:23
लग्नमुंजींच्या वरातीतले बेंडबाजे किंवा गणपतीविसर्जनाच्या ठणठणाटी मिरवणुका व्यक्तिशः आवडत नाहीत. पण एक फरक जाणवतो. काही समाजांमध्ये -उदा.पंजाबी, गुजराती,- प्रसंगानुसार स्त्रीपुरुषांनी एकत्र मुक्तपणे (स्वैरपणे नव्हे) संगीताच्या तालावर डोलण्याची, नाचण्याची परंपरा आहे. युरोपमध्येही वॉल्त्झची संथ नृत्ये आनंददायी असतात. आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे? बीटल्सच्या लोकप्रियतेमागे तरुणाईला बेधुंद नृत्याची संधी मिळण्याचा मोठा हिस्सा होता. अर्थात अशी अ‍ॅम्फेटामाइनयुक्त नृत्ये योग्य नाहीतच. पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?

In reply to by राही

आनन्दा Mon, 04/28/2014 - 18:04
पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?
त्याला आक्षेप नाही, पण मुंज हा संस्कार हाच मुळात या सार्‍यांवर विजय मिळवायचे/ नियंत्रित जीवन जगण्यचे शिक्षण द्यायला केल जातो. त्याच दिवशी असे अनियंत्रित वागून आपण त्या मुलावर काय संस्कार करणार?

In reply to by मंदार कात्रे

बॅटमॅन Tue, 04/29/2014 - 19:37
अनिर्बंधच व्हायचे असेल तर त्यासाठी आपल्या संस्कृतीत स्पेशल सण दिलेलाच आहे - शिमगा. काय घालायचा तो दंगा घाला तेव्हा.

In reply to by राही

आनंदी गोपाळ Fri, 05/02/2014 - 21:32
आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे?
घोटूल मधे ढोलियाच्या तालावर हलकेच थिरकणारी पावलं आपल्याकडलीच असलीत, तरी, मध्यंतरीच्या काळात 'मराठे' म्हणजे 'जेत्यांची संस्कृती' होती. मराठीमधे मार्दव नाही. हार्श शब्दप्रयोग आहेत. बसा! अन तश्रीफ रखिये, (इथे कोणत्याही इतर भाषेतील शब्द वापरा : उदा. प्लीज हॅव अ सीट, अगदी प्लीज वगळूनही.) यातला फरक पहा. या मराठी भाषेत अनेकदा मार्दव अन अजीजी यांत फरक रहात नाही. एकतर अजीजी नायतर 'बसून घ्याला सांगून र्‍हाय्लोय ना!' स्टाईल शब्द. यातच मधे कुठेतरी मराठे 'बायकांसोबत नाचत' नाहीत, ते 'बायका नाचवतात', असला एक समज प्रचलित झाला असावा. तमाशा त्याचे एक उदाहरण. बाईसोबत नाचणारा पुरुष फक्त नाच्याच. दरम्यानच्या काळात कुठेतरी आपण जगज्जेते सुसंस्कृत लोक, थिरकणे विसरलो. तुम्ही नृत्याचे म्हणताहात, समूहगान असाही एक प्रकार असतो. तोदेखिल विरळा होत गेला आहे आपल्याकडे. पण माणसाची मूळ प्रवृत्ती जात नाही. जाणार नाही. खेडोपाडी गरबा खेळला जातो आजकाल. अगदी लग्नाच्या मिरवणूकीत लोक गरबा खेळल्यासारखे नाचतात. तीच गाणी डीजेवर लावून. इ. असो. असे का असावे या प्रश्नाचे हे माझ्या मतीनुसारचे उत्तर आहे. 'मराठे' हा शब्द मरहट्टे, महाराष्ट्र देशीचे अटकेपार झेंडे फडकवणारे वीर, या हिशोबाने वाचावा. जात/धर्म इ.वादी शब्दप्रयोग तो नाही, हे नोंदवितो.

कंजूस Sun, 04/27/2014 - 16:26
समाजातला दांभिकपणा उघडा पडण्याचा आणि एक सुमुहूर्त ?मुंजीची पार्टी ऐवजी पार्टीनंतर मुंज उरकली असेल .निमंत्रितांनी तोंडभरून बटु आणि आईवडीलांना आशिर्वाद दिले असतील .आणखी काय पाहिजे ? ज्यांना या संस्काराबद्दल काही कळते ते श्रृंगेरी ,श्रीशैलम ,माटुंग्याचा शंकरमठ ,कुर्ला (प)कृष्णमंदिर ,सायन पूर्व कृष्ण मंदिर ,जिएसबी संघ ,चेंबूरचा मठ ,डोंबिवलीचे ज्ञानेश्वर कार्यालय इत्यादी गाठतात आणि गाजावाजा करत नाहीत .

भाते Sun, 04/27/2014 - 17:08
दारू सर्वजातिय/ धर्मिय पितात. तेच मांसाहारा बाबत. अगदी वर्षभर. मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? आपल्या पैकी किती जण रोज सकाळी देवपूजेनंतर संध्या करतात? लहानपणी मुंज झाल्यावर नवलाईचे नऊ दिवस असल्याप्रमाणे सुट्टीत रोज संध्या केली जाते. पण पुढे शाळा सुरु झाल्यावर ते जमतेच असे नाही. रोजच्या ऑफिसच्या गडबडीत देवपूजा आटोपल्यावर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणताना नजर घडयाळाच्या काटयावर असते. मग कशाला तो मुंजीचा अट्टाहास! दारू पिणारे अनेक ब्राम्हण मी बघितले आहेत जे आधी गळ्यातले जानवे काढुन खिशात ठेवतात आणि मग दारू ढोसतात. कशाला का दिखाऊपणा? ३१ डिसेंबरचा ऊल्लेख आला आहे म्हणुन सांगतो. १ जानेवारी २०१३ ला अंगारकी चतुर्थी होती. ३१ डिसेंबर २०१२ ला रात्री पावणे बारा पर्यंत लॉलीपॉप खात दारू धोसणारे (सर्वजातिय) दुसऱ्या दिवशी माझा ऊपास आहे असे सांगत होते. काय उपयोग आहे त्याचा? कशाला ते ऊपासतापास!

In reply to by भाते

नितिन थत्ते Mon, 04/28/2014 - 14:29
>>मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? बाकीचे काय फुकटच गेलेले असतात (ब्राह्मण तस्सं मुळ्ळीच करत नैत) अशी ज्यांची समजूत असते त्यांना "बॉ बॉ बॉ; ब्राह्मण दारू पितात !!!" असं वाटणारच. ;)

बॅटमॅन Sun, 04/27/2014 - 17:52
बाकी काहीही असो, मशारनिल्हे ब्राह्मण कुटुंबाने मांसाहार आणि सोमरसपान करून प्राचीन आर्य संस्कृती टिकवली असेच म्हणणे आहे. पोषाख म्लेंच्छ असला म्हणून काय झाले? उलट आजकाल मांस आणि सोमरस ही आपल्या संस्कृतीची प्राचीन प्रतीके अहद दिल्ली (लाहोर म्हण्णार होतो पण साला १९४७ चा घोळ झाला.) तहद चंदावर नव्या जोमाने दिसू लागली आहेत. म्हणा, गर्व से कहो...

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:28
आयला! बॅट्याची बॅट सचिनच्या वरताण तळपली की. :) जाता जाता: 'गर्व से कहो...' ला उत्तर देण्याआधी आपल्याला क्युबन सिगार्स, पाईप्स वगैरे अस्सल जिंदादिल खानदानी माणसाला शोभणार शौक हाळी देणार्‍याने केलेले चालतात की झोंबतात हे मात्र पडताळून पहायला हवं.

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन Sun, 04/27/2014 - 23:18
:) बाकी हाळी देणारे कोण? तथाकथित संस्कृतिरक्षक तर नव्हे? तसे तर शौक ज्यांना पर्वडतात अन झेपतात त्या सर्वांनीच करावे, हाकानाका.

दिव्यश्री Sun, 04/27/2014 - 18:03
हा पहा फरक ...एक आहे नौ वार साडी आणि दुसरी आहे काष्टा . https://lh3.googleusercontent.com/-1bVYfzv-i88/U1z4XiX8JwI/AAAAAAAAAVs/uAc_A15BEQw/s188/9vaar_Br.jpg.jpg https://lh3.googleusercontent.com/-la3OPsgmErc/U1z4LKwWruI/AAAAAAAAAVg/0mcToEqgCRQ/s194/1_kashta.jpg https://lh3.googleusercontent.com/-la3OPsgmErc/U1z4LKwWruI/AAAAAAAAAVg/0mcToEqgCRQ/s194/1_kashta.jpg

विकास Sun, 04/27/2014 - 19:05
मुंज हा कधीकाळी तयार झालेल्या १६ संस्कारांमधील एक संस्कार आहे. तो करावा का नाही हा अगदी गौण मुद्दा आहे. ज्यांना करायची असेल ते करतील आणि ज्यांना करायची नसेल त्यांनी करू नये. माझ्या बाबतीत लहानपणीच मुंज आणि सोडमुंज हे ३ दिवसांच्या अंतराने झाले, मी कधी संध्या केलेली नाही. जानवे नंतर स्विमिंगला गेलो तेंव्हा स्विमिंग पूल मधेच हात मारताना पडले.... त्यामुळे मी काही धार्मिक पध्दतीने याचा विचार करत नाही. पण तरी देखील त्या वयातला एक संस्कार - केवळ त्या दिवशीचे होम-हवन, मंत्र वगैरेच नाही, तर तो सोहळा करायच्या आधीचे प्लॅनिंग, त्यातील नातेवाईकांची आणि आप्तेष्टांची involvement, प्रेम या सगळ्याचा एक मनावर एक सुखद परीणाम झाला जो कायमचा लक्षात राहीला. माझ्या दृष्टीने हा सगळा एक संस्कार असतो. कारण किंचित समजायला लागणार्‍या वयात पण तरी देखील आपल्याला कळत-नकळ आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुंजच नाही पण कुठलिही गोष्ट जेंव्हा केवळ शो ऑफ म्हणून होते तेंव्हा त्यातून दूरगामी ना धड संस्कार होतात ना इतर काही सकारात्मक फायदा... अशाच प्रकारचा (किंचीत मोठ्या) मुला-मुलीवरील ज्यूइश संस्कार बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा पाहीले आहेत. त्यातील मुद्दा हा मुल हे वयात येत असतानाचा एक संस्कार आणि सोहळा आहे. तोच प्रकार मुंजीच्या बाबतीत समजून घेतला आणि मग संस्कार म्हणून केले तर अधुनिक काळाला अनुसरून एक चांगला संस्कार तयार करता येईल. त्यात जात आणायची काही गरज देखील नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो: बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा हे ज्या दिवशी होतात त्या दिवशी मुळ सोहळा हा पारंपारीक असतो. त्यात राबाय (ज्यू प्रिस्ट) कडून त्यांच्या पध्दतीने धार्मिक संस्कार केले जातात वगैरे. त्यांच्या पध्दतीत पार्टी असल्याने त्याअनुषंगाने खाणे-पिणे आणि डान्सिंग केले जाते.... पण महत्वाचा मुद्दा त्या आधीचा असतो. आधी एक वर्षभर त्या मुलाला-मुलीला थोडेफार संस्कार (बेसिक हिब्रू भाषा येणे, इतिहास वगैरे) शिकवले जातात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे छोटासा का होईना एक समाजसेवेचा प्रकल्प हा (मदत घेऊन) प्लॅन करणे आणि पुर्ण करणे गरजेचे असते. त्या सगळ्याचा मुलांवर नक्कीच चांगला परीणाम होतो.

In reply to by विकास

मेघवेडा Tue, 06/03/2014 - 01:03
"मुंज हा कालबाह्य संस्कार आहे/या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही/निर्बुद्ध बाष्कळपणा" - हे सगळं तुम्ही 'विधीं'ना अनुसरून म्हणत असाल तर ठीक परंतु संस्कार आणि त्यामागचं तत्त्व, विचार वगैरे काहीच कालबाह्य, अकारण वा निर्बुद्ध बाष्कळ वाटत नाही. मुलानं गुरूगृही वेदाध्ययन करायला जाण्याऐवजी तोच मुलगा (फॉर दॅट मॅटर मुलगी - म्हणजे कुणी मला विचारलं मुलींची मुंज करावी का तर त्याला माझं उत्तर 'हो' आहे) हल्ली शाळा झाल्यावर युनिव्हर्सिटीला जायला घराबाहेर पडू लागला आहे. तेथे त्याला स्वतः पडेल ते काम करून पैसे कमवण्याची अक्कल पक्षी व्यवहारज्ञानाचे अध्ययन करायचे आहे. गुरू कोण - हे जग. मग मातृभोजनाचा काय अर्थ - झालं आता, आईकडून लाड करून घेतले ते पुरे आता यापुढे आपले आपण काय ते बघा. भिक्षावळ? मुला घराबाहेर पडतो आहेस तेव्हा ही घे आपली भिक्षा/शिदोरी. पुढे मात्र पोटापाण्याला काहीतरी कर. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलगा आता शिशुवयातून कुमारवयात चालला. स्वावलंबी होण्याकडे त्याने एक पाऊल टाकलं - असा उदात्त विचार अशी व्यापक धारणा या उपनयन संस्कारामागे आहे. या धारणेचे आपण अनुयायी बनले पाहिजे. या संस्कारांमागची तत्त्वं आपण बघावी. नुसतंच जर आपण विधींमध्ये अडकून बसलो तर खरंच आपलं देव भलं करो. विधी = फंक्शन (काळ). काळ बदलला तसे विधी बदलायला हवेत. अजिनधारणाला आजच्या युगात काही अर्थ नाही. हरणं मारणं कायद्यानं गुन्हा आहे तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. कन्यादानाला काही अर्थ नाही. कन्या कमॉडिटी नाहीत तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. पण म्हणून काही समग्र उपनयन अथवा विवाह 'संस्कार' कालबाह्य नि बाष्कळ ठरत नाहीत. कालबाह्य ठरतात ते केवळ विधी. पण कोणते विधी करावेत नि कोणते करू नयेत हे आपण ठरवूच शकतोच की. तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं. उरला प्रश्न कार्याचा तर वर विकास यांनी म्हणल्याप्रमाणे किंचित समजायला लागणार्‍या वयात असलं तरी देखील मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म. धर्म म्हणजे शिखा धारण केलेला बटू नाही. धर्म म्हणजे जानव्याची ब्रह्मगाठ नाही. धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.

In reply to by मेघवेडा

@तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं.>>> +++++१११११ @धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.>>>>> यासाठी एक कडक सॅल्युट.

In reply to by मेघवेडा

प्यारे१ Tue, 06/03/2014 - 12:46
>>>धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे. वा! आक्खा प्रतिसाद सुंदर. ह्यासाठी एक 'प्यार्टी' लागू. हवंतर जानवं काढून ठेवा तीर्थप्राशन होईस्तोवर ;)

In reply to by मेघवेडा

बाळ सप्रे Tue, 06/03/2014 - 15:12
विधी = फंक्शन (काळ).
वा वा!! पण प्रत्यक्षात काय होत.. विधी हे अशा पोथीपुस्तकातून वाचून केले जातात ज्यांना काळाप्रमाणे बदलण्याचे वावडे असते!! मुंज हा विधी केला जातो.. त्यामागचे तत्व, विचार (जे कालबाह्य नाही) ते सगळं गुंडाळून ठेवले जातं .. त्या तत्व/ विचारांनुसार आजच्या काळाला अनुरुप विधी कुठेही होत नाहित!!

In reply to by बाळ सप्रे

रेवती Tue, 06/03/2014 - 18:23
सप्रेसाहेब, लग्नातल्या विधींचे अर्थही असेच आपापल्या सोयीने गुंडाळून ठेवले आहेत, म्हणून कोणी लग्न करायचे थांबते काय? पण त्याविषयीचे लेख पाडले जात नाहीत.

In reply to by रेवती

बाळ सप्रे Wed, 06/04/2014 - 10:32
लग्न करायचे कुणी थांबत नाही, थांबूही नये पण कालबाह्य विधी थांबवता येतील.. लग्न म्हणजे विधी नव्हेत. लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात. जे आवश्यक आहे. गतानुगतिक विधी टाळून लग्न म्हणजे आजच्या काळात लग्नाचे रजिस्ट्रेशन, मित्र/ नातेवाईकांना बोलावून सहभोजन ई. तसेच मुंज म्हणजे विधी नव्हेत.. तर शिक्षणासाठी मुलाला दूर पाठवणे (मेघवेडा यांच्या प्रतिसादानुसार).. मग ते गतानुगतिक पद्धतिने ८ व्या वर्षी मुहूर्त बघून न करता जेव्हा मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी दूर जाण्याची वेळ येइल (if applicable) तेव्हा म्हणजे साधारण १०वी १२वी नंतर मुलं गावात सुविधा नसल्याने शहरात जातात तेव्हा किंवा परदेशी शिक्षणासाठी जाण्यावेळी करणे..

In reply to by मेघवेडा

सखी Tue, 06/03/2014 - 17:22
सुरेख प्रतिसाद, खरं तर सगळाच संग्रही ठेवावा असा, खालचे विशेष आवडले. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म.

In reply to by मेघवेडा

पैसा Wed, 06/04/2014 - 21:57
बरं वाटलं प्रतिसाद वाचून. बरंचंसं पटलं. विधींना पकडून राहण्यात काहीच अर्थ नाही. लेखातील उदाहरणांमधे मुंजीचे विधी हे त्याचा अर्थ किंवा कारण समजून न घेता केवळ एकत्र जमायचे निमित्त म्हणून केलेले दिसत आहेत. तसे असेल तर अजिबात करू नये असंच मी म्हणेन. आपल्या मनाला पटेल ते करावं. त्याची पूर्वापार करायला सांगितलं आहे म्हणून कोणत्यातरी संस्काराशी नावापुरती सांगड घालू नये. माझ्या मुलाची मुंज अगदी थोडक्यात आणि गंभीरपणे केली होती. आहेर-देणेघेणे इ. ला पूर्ण फाटा दिला. फक्त जवळचे नातेवाईक त्या निमित्ताने एकत्र जमले. गप्पा झाल्या. मजा आली. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीतच सोडमुंज केली. तेव्हा भाचा काशीला जायला निघतो, त्याला परत आणण्यासाठी मामा "तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! सगळेच खूश!

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 05:31
>>>>"तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! बायकोची स्मरणशक्ती, म्हणजे डाटा साठविण्याची आणि रिट्रिव्ह करण्याचा वेग दोन्ही अफाट असते. 'सहा महिन्यांपूर्वी हिच भाजी शेजारच्या अमुकतमुक बाईंनी पाठविली होती तेंव्हा बोटं चाटत (स्वतःचीच) खाल्ली होती.' किंवा, 'आज वन्संचं कौतुक करताय, करा, पण हेच मी ३ वर्षांपूर्वी शार्दूलच्या मुंजीत सांगितलं होतं तर 'तुला काही कळत नाही म्हणाला होतात'' किंवा, 'वन्संच्या दिराला, वशिला लावून बँकेत चिकटवून घेताय पण ५ वर्षांपूर्वी, माझ्या भावाला बँकेत चिकटवून घ्या म्हंटलं तर तेंव्हा व्हेकन्सी नव्हती, म्हणे.' वगैरे वगैर डाटा साठवणं आणि नेमक्यावेळी रिट्रिव्ह करणं ३२ जीबी पेनड्राईव्हला, बिचार्‍याला, काय जमणार?

In reply to by प्रभाकर पेठकर

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 12:28
आणि या साठवणीतल्या आठवणी काहीही प्रयास न करता (म्हणजे कॉप्युटर सुरू करा, पेनड्राईव्ह लावा, फाईल सर्च करा, इ, इ) प्रकाशापेक्षा जास्त वेगाने येऊन तुमच्यावर आदळतात. छॅ, छॅ, पेनड्रईव्हला तिच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखाशीही स्पर्धा करता येणे शक्य नाही ;) =))

रेवती Sun, 04/27/2014 - 19:12
मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर अहो मग त्याला काय झालं? उन्हाळा सुरु आहे ना? घालू द्या की त्यांना हवे तसे कपडे? त्या बाई आणि बुवांनी अगदी पारंपारिक वेषात जरी आमंत्रण दिले असते ना तरी "आले मोठे परंपरा जपणारे, माहितीये, यांच्या घरी मांसाहार चालतो" असं म्हणायलाही कमी करत नाहीत लोक! म्हणजे कसंही वागलं तरी लोक्स हे नावे ठेवण्यासाठीच अपॉईंट केलेले असतात. मी मात्र पंजाबी कपडे घालून आमंत्रण दिले असते (साडीबीडी आवडते पण झेपत नै हो) कारण मला ते आवडतात. मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार छे हो, माझ्या मुलांनी अज्याबात नकार दिला होता. पहिली संध्या त्याने मुंजीच्या दुसर्‍या दिवशी केली होती. आमचे पुण्यातले घर लहान असल्याने ज्या गेस्ट हाउसावर नातेवाईक राहिले होते तिकडे हा संध्याकाळी खेळायला पळाला. रात्री हा पेंगत असताना आजीनं दृष्ट काढली तेवढच! ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता घालू द्याकी! त्यांना निदान भिक्षावळीच्यावेळी असं काही करता आलं, आम्हाला तर मनपाने परवानगी दिली नव्हती. दिली असती तरी कोणीही नाचले नसते याची ग्यारेंटी, सगळे वयस्क नातेवाईक गुढगे दुखी, पाठदुखी ने त्रस्त आहेत. आजकाल कोणत्याही जातीधर्मात भयंकर जुन्या पद्धतीने काहीही समारंभ होत नाहीत. अमूक हॉल, तमूक गार्डन नावे असलेल्या ठिकाणी हिरवळीवर जेवणाचे स्टॉल लावून उभा उभ्या जेवणे होणारे समारंभ, लग्नाअधी होणार्‍या ब्याचलरांच्या पार्ट्या आजकाल महाराष्ट्रातही चालतात ते सगळे काय ब्राह्मण असतात का? त्यांनी परंपरा न पाळल्याचे लेख मात्र छापून येत नाहीत. तुम्ही वरील लेख लिहून एका जातीवर उगीच अन्याय करताय. ;) ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात ३१ डिसेंबरच कश्याला रेव्हपार्टीमध्ये पकडलेली मुले, मुली हा सगळा ब्रह्मवर्गच असतो काय? डिसेंबरात पार्टी करणे का अधिकार फक्त ब्राह्मणांनाच दिलाय का? तसे असल्यास कागदोपत्री दाखवा. पाहयला गेलं तर महाराष्ट्रीय लोकच नव्हे तर इतर राज्यीय लोकही खाद्यपेयांचा आस्वाद जास्तच प्रेमाने घेत असलेले दिसतील. तुमच्याकडून विदा गोळा करण्यात चूक झालीये का जरा बघा. लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून त्यांना हवे ते करू शकतात, तेही त्यांचे पैसे खर्च करून! तुम्हाला रुचत नसेल तर आमंत्रण देणार्‍यांना सरळ तोंडावर सांगा. गायत्री मंत्र फक्त माझ्या मुलालाच नाही तर त्याच्या सगळ्या जातींच्या, विविध भाषा बोलणार्‍या (भारतीय) मित्रांना अगदी खणखणीत आवाजात (कधीकधी जास्तच जोरात) म्हणता येतो आणि तो म्हणणे हा त्यांचा हक्क आहे. हामेरिकन सरकारही त्याला आक्षेप घेत नाही.

In reply to by रेवती

रेवती Sun, 04/27/2014 - 19:35
एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते म्हणजे ज्यांना गायत्री मंत्र म्हणता येत नाही त्यांचेही काही वाईट होणार नसते. दुसरं असं की तुमच्या लेखातून काय म्हणायचय हे समजलं. हा बदललेला प्रकार, फक्त मुंजीतीलच नव्हे, लग्नातीलही पाहिल्यावर मलाही विचित्र वाटले होते हे कबूल करते पण बदल हा असणारच! तुम्ही, मी किंवा कोणीही हा बदल थांबवू शकत नाही मग आहे त्यातच आनंद मानायला शिकले. दोन वर्षांपूर्वी माझ्या भाचीचा साखरपूडा हा लग्नासारखा मोठा केला होता आणि साडी वगैरे जाऊ दे, घागरा पद्धत आली असल्याचे जाणवले. असो, त्यांचे लग्न होऊन ते सुखात आहेत हे महत्वाचे! माझा मुलगा नक्की काय करणार आहे हे मलाही माहित नाही. त्याने समारंभातच नव्हे पण इतरवेळीही मद्यपान करू नये यासाठी मी आग्रही राहीन पण बाकी विविध प्राणी खाण्यात सध्या तरबेज झालाय.

In reply to by रेवती

जोशी 'ले' Sun, 04/27/2014 - 19:42
जौ द्या मला तरी हे किस्से जरा अतिच 'वेचक' वाटताय..निदान माझ्या तरि पहाण्यात असले काहि आले नाहि..

In reply to by जोशी 'ले'

रेवती Mon, 04/28/2014 - 03:01
कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे की मी लिहिलेले? असू द्या हो, त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले व माझे मी लिहिले.

In reply to by चिंतामणी

रेवती Mon, 04/28/2014 - 03:04
चिंतुकाका, किती दिवसांनी पाठींबा द्यायला आलात! काही नै जरा गंमत केली. धागाकर्त्यांचे म्हणणे काही पूर्णपणे खोटे नाही पण आज टंकायला वेळ होता तो सत्कारणी लावला.

In reply to by रेवती

चिंतामणी Mon, 04/28/2014 - 17:43
खूप दिवसांनी इकडे फिरकलो आणि तुझी बॅटींग बघून प्रतिसाद दिल्यावाचुन राहवेना. असेच भारी भारी पोस्ट वाचायला मिळाले तर पुन्हा पुन्हा नक्की येइन.

>>> ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता >>>> माझ्याकडे माझं पोर आणि त्याची चुलत भावंड, अशी एकत्रित मुंज झाली पालीला. मुंज लावणारा ऐंशीचा खडुस, म्हातारा ब्रम्हवृंद होता. त्यानी हे नाचगाणे, मुलांना वरातीच्या वेळा सजविणे ई.ई. काहिही करु दिले नाही. सारखा वसावसा ओरडत फक्त होता," साँस्कांर ओंहे नां हां, नाँच गाँणी कसली काँरताँय डोंबार्‍याँ साँरखीं...!!!" (खडुस म्हातार्‍याची उपजात सांगण्याचा मोह आवरत नाहीये पण आवरते..*diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO* )

In reply to by यसवायजी

प्यारे१ Sun, 04/27/2014 - 23:11
त्यांनी असल्या बर्‍याच पाकृ करुन बघितल्या आहेत. ;) हवं असल्यास खोदकाम करा अथवा (त्यांच्याशीच) संपर्क साधा! @ भडकमकर मास्तर, नया(लगता) है वह! =))

चौकटराजा Sun, 04/27/2014 - 21:53
सगळे पर्तिसाद रॉक्स !!!! मौजी त मौज असते. गोटा असतो . बेटकुळी भरण्याची धमकी असते. गोट्यावरून घेर्‍यातून खोडकर पणे हात फिरविणे असते.मुंज मुलाला सिल्कची सुळासुळीत चड्डी घालयला मिळते. मौजी एक सामाजिक कार्य आहे. नाभिकाना एरवीच्या पाचपट पयशे मिळतात.

In reply to by चौकटराजा

इरसाल Mon, 04/28/2014 - 17:04
नाभिका वरुन आठवले, नाभिकारे वारा वाहे रे... डौलाने हाक जरा नाव आज रे असे वाटायचे. म्हटलां नाभिक कसा नाव हाकल शेवटी ते नाविका रे असे आहे हे सम्जले.

मंदार कात्रे Sun, 04/27/2014 - 23:37
या धाग्यात शतक पार करण्याचे पोटेन्शियल दिसते आहे.... :) बाकी आत्मुबाबा स्मायलीवाले यांचा जरा सविस्तर प्रतिसाद अपेक्षित !

मनीषा Mon, 04/28/2014 - 00:26
एखाद्या अधुनिक पद्धतीने रहाणार्‍या कुटुंबातील मुलाची मुंज जर त्यानी त्यांना पहिजे त्या पद्धतीने केली तर हरकत काय आहे? माझ्या दोनही भावांच्या आणि नात्यातल्या काहींच्या मुंजी अगदी साग्रसंगीत, वाड्यात मांडव वगैरे घालून केलेल्या आठवतात. काही दिवस त्यांनी संध्या, जेवताना चित्राहूती घालणे वगैरे केल्याचे स्मरते. पण नंतर आजतागायत पळी, ताम्हन हातात तरी घेतले असेल की नाही शंका आहे. गणपतीच्या वेळी नवे जानवे विकत घ्यावे लागते. (त्यांचं ऐकून गायत्री मंत्र मलाही पाठ झाला होता... ) पण यात कुणाला दोष देण्याचे आणि आकांडतांडव करण्याचे काही कारण मला दिसत नाही. पूर्वी मुंज झाल्यानंतर मुलगा गुरूगृही जात असे आणि त्याच अनुषंगाने मुंजीचे विधी असतात. म्हणजे मातृभोजन, भिक्षावळ, पित्याने गुरूमंत्र (मुलाच्या कानात) सांगणे इ. पण आता मुलं गुरूगृही जात नाहीत त्यामुळे तसेही मुंजीचे सांकेतिक महत्व आता राहीले नाही. मुंज ८ व्या ९व्या वर्षी होऊन मग विद्याभ्यासाला प्रारंभ होत असे. आता शिक्षण वयाच्या ३र्‍या ४थ्या वर्षा पासून सुरू होते. मग मुंज करण्यात काय अर्थ राहीला आहे ? पण तरीही असे समारंभ होत रहावेत असे मला वाटते. त्यातल्या धार्मिक घटकां बरोबरच तो एक आनंद सोहळा आहे हे समजावे. म्हणजे करण्यात काही कमी-जास्तं झाले तर राग येणार नाही. असे समारंभ म्हणजे एक कौटुंबिक संमेलन असते. इतरवेळी कार्यव्यग्रतेमुळे भेटु न शकणार नातेवाईक, मित्रंमंडळी आवर्जुन एकत्रं येतात अशा वेळी थोडीफार मौजमजा केली तर काय हरकत आहे? चिकनीचमेली गाण्यावर नाचणे वगैरे जरा अतिशयोक्ती वाटते आहे. कारण मी तर सकाळी मुंज, संध्याकाळी दारुपार्टी असं घडताना पाहिलेलं नाही. लोकं (विशेषतः मराठी) इतकं तारतम्यं नक्कीच बाळगत असतील. ते जोडपं तुम्हाला आवर्जुन निमंत्रण द्यायला आले हे लक्षात न घेता तुम्ही त्यांच्या कपड्यावर टिका करणे याला काय म्हणावे ? जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल. आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली.

In reply to by मनीषा

पांथस्थ Wed, 04/30/2014 - 10:34
जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.
काय बहारदार प्रतिसाद आहे! क्या बात है! अनेक प्रतिसाद वाचनीय आहेत, विदा, स्वानुभव पण दिले आहेत अनेकांनी. पण तुम्ही दोन ओळीत जो सार सांगीतलात त्याला तोड नाही! अपना तो दिन बन गया!

In reply to by मनीषा

@जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif @आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली. .>>> आमच्या धर्मशास्त्र्यांना त्याची किंमत नसते. आजही ते..अज्ञाताच्या गुहेत काठ्या मारत फिरण्याला आदर्श-सदाचारी-जीवन समजतात. असो!

माझ्या मुंजीची १९८८ साली विडीयो केसेट केली होती. घोड्यावरून भिक्षावळ फडके रोड वरून गणपतीच्या मंदिरात गेली होती. त्यांनतर महिनाभर मी संध्या केली. मग आठवत नाही पण पुढे त्यात खंड पडला ,आज इतक्या वर्षाने कधीतरी ती विडीयो कसेट पहिली तर ह्या सभारंभाच्या निमित्ताने जमलेले अनेक नातेवाईक ज्यातले काही कैलासवासी झाले आहेत त्यांना पाहता आले. बरे वाटले. धाग्याचा विषय पाहून ज्या अपेक्षेने तो उघडला होता व तडक प्रतिसाद वाचायला घेतेले , मग मूळ लेख वाचला. तेव्हा अपेक्षापूर्ती झाली.

साती Mon, 04/28/2014 - 03:08
पूर्वी म्हणे बायका पण शिकत असत आणि वैदिक ज्ञान वैगेरे घेत असत. मग मुंज फक्तं मुलाचीच का? मुलीची का नाही? अगदी हौशी मौजीसाठी मुंज म्हटलं तरी मुलीच्या नावाने हौस मौज का नाही? ता. क. माझ्या नवर्याच्या धर्मात मुंजीसारखा विधी मुलगा मुलगी दोघांसाठी आहे. मुलासाठी 'शाल' आणि मुलीला 'किरगुणी' बर्याचदा एकाच मांडवात घरातल्या मुलामुलींची एकत्र शाल किरगुणी करतात. आजकाल यातही मुख्य विधी संपल्यावर मुलांना भेटवस्तू द्यायच्या वेळेस बाजूला ऑर्केस्ट्रा चालू करतात. ;) अजून दारू पिणे वैगेरे पाहिले नाही.

In reply to by साती

पिशी अबोली Mon, 04/28/2014 - 13:11
माझ्या मैत्रिणीची झाली आहे मुंज. मुंज मुलींची करु नये असं शास्त्र कुणाला माहीत असल्यास संदर्भ जाणून घ्यायला आवडेल. बाकी हौसेमौजेखातर मुलीची मुंज करायची आहे असं एक उदाहरण आणि वैदिकीचा अधिकार तिला यावा म्हणून करायची आहे असं दुसरं अशी दोन हल्लीच ऐकली.

In reply to by पिशी अबोली

कवितानागेश Mon, 04/28/2014 - 18:30
होय. मुलींची मुंज करता येते. पूर्वी मनशक्ती केंद्रात स्वामी विज्ञानानंद सामूहिक मुंज करायचे,त्यात मुलींचीही मुंज होत असे. अजूनही करत असतील , कल्पना नाही. बाकी , मुंजीनिमित्त 'चिकन पार्टी' आमच्या काही नातेवाईकांमध्येही झाली आहे. अगदी माझ्या लहानपणीपण पाहिलिये. ज्याची त्याची मर्जी! हे जर का खरोखरच 'चुकीचे' असेल, तरी असे वागणार्‍यांना मी दोष देणार नाही. तर 'मुंज' म्हणजे नक्की काय, हे कधीही न कळलेल्या आपल्या समाजाच्या आधीच्या काही पिढ्यांना देइन. माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट, एक दाक्षिणात्य ( कर्मठ ब्राह्मण) काकू मुलाच्या मुंजीचे आमंत्रण करायला घरी आल्या होत्या. त्याचवेळेस एक उत्तर भारतीय (ब्राह्मण) काका बसले होते. त्यांनी विचारलं, 'उपनयन' चा अर्थ काय हो? आई काहीतरी सांगणार तेवढ्यात काकू चटकन म्हणाल्या , ' उप' म्हणजे 'सब' ( इन्लिशमध्ये). म्हणजे ते एक छोटं 'लग्न'च असतं!! ... आईनी तोंडावर आलेले सगळं संस्कृत गपकन गिळून टाकलं... मी हसायला आत पळाले!

In reply to by कवितानागेश

शुचि Mon, 04/28/2014 - 18:34
लिम्स, लगेच अर्थ शोधला. - 'उपनयन' का अर्थ है "पास या सन्निकट ले जाना।" सम्भवत: आरम्भ में इसका तात्पर्य था "आचार्य के पास (शिक्षण के लिए) ले जाना।" हो सकता है; इसका तात्पर्य रहा हो नवशिष्य को विद्यार्थीपन की अवस्था तक पहुँचा दे

In reply to by पिशी अबोली

यशोधरा Mon, 04/28/2014 - 19:56
असं शास्त्र नाही, असं वाटतं. कधी वाचण्यात आलं नाही. माझ्याही मैत्रिणीची आणि तिच्या घरातील प्रत्येक मुलीची मुंज झाली आहे.

राही Mon, 04/28/2014 - 08:09
पारशांमध्ये नवजोत समारंभ मुलगे-मुली दोघांचाही करतात. क्रिस्टिअनांमध्ये फर्स्ट कम्यूनिअन दोघांचेही असते. पारशांमध्ये सात वर्षांखालच्या 'खुर्द'--लहानग्यांचे नवजोत होऊ शकत नाही. त्यावेळेस प्रथमच मुला/मुलीला सद्रा चढवण्यात येतो आणि 'कश्टि' नावाचा जानव्यासारखा धागा कंबरेला बांधण्यात येतो. पुढील आयुष्यात त्यांनी या दोन गोष्टी कायम अंगावर बाळगायच्या असतात.

सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 12:04
गालिब शराब पीने दे मस्जिद मी बैठकर या वो जगह बता दे जहां पार खुदा न हो I एखाद्या गोष्टीचे औचित्य असते तेवढाही विधिनिषेध नसेल तर प्रश्नच मिटला. शेवटी आपण देवळात बसून ओली पार्टी केली किंवा राजघाटावर बायका नाचवल्या आणी ओली पार्टी केली तरी फरक पडत नाही. महात्मा गांधीना शिव्या देणारे लोक सुद्धा त्या स्थळाचे पावित्र्य समजून घेताना पाहीले. ( जेंव्हा त्यांना प्रश्न विचारला कि हे कसे तेंव्हा ते म्हणाले आमचा गांधीजींच्या विचारसरणीला विरोध आहे. त्यांच्या प्रामाणिक पणाला किंवा इतर गुणांना नव्हे). आत्यंतिक विरोध असूनही त्यांना स्थळाचे पावित्र्य समजत होते. कोर्टात अर्धी चड्डी घातली तर चालेल काय? किंवा आपल्या बायकोला घेऊन स्त्रीरोग तज्ञा कडे गेल्यावर लोड शेडींग आहे म्हणून तो अर्ध्या चड्डीत बसलेला असेल तर चालेल काय? आता याचे उत्तर हो असेल तर प्रश्नच मिटला. बाकी मुंज केली काय किंवा नाही केली काय? काय फरक पडतो. हा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या डॉक्टर मित्राच्या दवाखान्याच्या बाहेरून एक लग्नाची वरात चालली होती त्यात बँड वाले अतिशय सुरात गाणे वाजवत होते "दिल मी छुपा के प्यार का तुफान ले चले I हम आज अपनी मौत का समान ले चले I कसलाही विधिनिषेध नसेल तर आईबापांचे कामजीवन अशा विषयावर सुद्धा रसभरीत चर्चा करता येईल किंवा मुलान्समोरही कामक्रीडा करता येईल . असो ज्याचे मत त्याच्या पाशी.

सूड Mon, 04/28/2014 - 15:16
उपजात सांगायचा मोह आवरलात नि माती खाल्लीत. ती सांगता तर एव्हाना दोन-अडिचशे प्रतिसाद सहज मिळत होते. बाकी मुंज हा विधी फक्त ब्राह्मणांतच करतात हा ब्राह्मणेतरांतला गैरसमज आणि आमची बरोबरी करायला ब्राह्मणेतर मुंज करतात ही एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्याने (आता त्याची उपजात सांगायचा मोह मी आवरतो) उधळलेली मुक्ताफळे असं दोन्ही ऐकून कान केव्हाच तृप्त झालेत. जाता जाता, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

In reply to by सूड

बघा बघा...खाल्लीत कि नाही माती तुम्ही पण..!! या, बरोबरच केक कापू..! जाता जाता, हल्ली असे उपजातीपातींवरुन युद्ध पेटत नाहीत हो...जास्त थोर्थोर विषय हवेत...

दिव्यश्री Mon, 04/28/2014 - 15:28
काही वर्षांपूर्वी एका सुप्रशिद्ध महाराजांनी त्यांच्या नातवाची मुंज केली होती . त्यावेळी लैच धुराळा उडाला होता . यागोष्टीची आठवण झाली . असो . ज्यांनी फोटू दिसण्यासाठी कष्ट घेतले त्यांचे जाहीर आभार . धन्यवाद . वरील फटू पाहून सुजाण , चाणाक्ष लोक/वाचक लग्गेच ओळखतील कि ब्राह्मणी नौ वार कोणती आणि 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' हा प्रकार कोणता . बाकी ती म्हण कोपी पेस्ट केली आहे हे सुज्ञाना वेगळे सांगायला नकोच . धन्यवादच .

इष्टुर फाकडा Mon, 04/28/2014 - 15:43
लेख थोडा दात ओठ खाऊ झालाय. मुंज प्रकार कालबाह्य झालाय हे खरच आहे. तरीही माझ्या मुलाची मुंज घरातल्या लोकांना करायचीच असेल तर ती घरातच करायला लावेन आणि बाकी समारंभ न केल्यामुळे वाचलेल्या पैशातून काहीतरी माझ्या गावातल्या शाळेतल्या पोरांसाठी करेन. हे मी करेन बाकीच्यांनी काय करावं हे ते ठरवतील :)

राही Mon, 04/28/2014 - 16:38
नऊवार लुगडी अने बन्ने तंगडी उघडी ही म्हण बडोदा मराठीत (हिला धेडगुजरी म्हणावं की धेड मराठी?) खूप चालते. मराठी सरदारांच्या आणि एकूणच मराठी लोकांच्या पोकळ बडेजावाची टिंगल करण्यासाठी ती वापरली जाई. ब्राह्मण बायकांचे नऊवारी नेसण ओचे खोचलेले असते, आणि इतर अनेक जातीतल्या बायकाही ओचे खोचतात मात्र ते थोडे आखूड खोचतात. काम करताना आखूड नेसण बरे पडते. मी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले एक दुर्मीळ कुटुंबछायचित्र पाहिले आहे. त्यात त्या ब्राह्मण कुटुंबातल्या बाईंनी ओचे अगदी आखूड म्हणजे अर्ध्या पोटरीपर्यंत खोचलेले आहेत. पायांवर निर्‍या लोळवणारे नेसण मला वाटते बालगंधर्वांनी लोकप्रिय केले. त्यांची उंची कमी होती त्यामुळे त्यांना भरपूर पन्ह्याचे लुगडे पायघोळ होत असावे. ते पदराचा एक काठदेखील अगदी खालून म्हणजे अगदी घोट्यापासून घेत. जुन्या लोकांकडून असे ऐकले आहे की असे पायघोळ आणि पावलांवर निर्‍या लोळवणारे नेसण गरत्या बाईचे लक्षण मानले जात नसे. बाईचे नेसण सैल, अघळपघळ फलकारणारे असू नये असा संकेत होता. स्वयंपाकाची वगैरे कामे करणार्‍या गरीब ब्राह्मण बायकांनाही असे नेसण सोयीचे होते. कष्टकरी बायका दुहेरी ओचे खोचत. म्हणजे डावीकडे खोचलेल्या ओच्यामधे पुन्हा उजवीकडची एखादी निरी अडकवीत. यामुळे कुठल्याही पावलामध्ये लुगडे अडकण्याचा प्रश्न येत नसे. बाकी नऊवारी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी निर्‍या उजवीकडे फिरवून खोचतात तर कोणी डावीकडे. कोणी कोणी निर्‍यांचे दोन भाग करून ते विरुद्ध दिशांना म्हणजे डावी-उजवीकडे वळवून खोचतात. कोळी बायका निर्‍या फार ठेवीत नसत. कमी निर्‍यांमुळे सुटा राहिलेला पदर कंबरेभोवती घट्ट गुंडाळीत. यामुळे वजन उचलताना कंबरेत लचक किंवा उसण भरत नसे. या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील तर जाणून घ्यायला आवडेल. पेशवाईमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. खाणे-पिणे, वस्त्रप्रावरणे, भाषा अशा बाबतीत नवी मूल्ये प्रस्थापित झाली. तेव्हा त्या आधीचा महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

In reply to by राही

नऊवार नेसुन घोड्यावर पण बसता यायचे म्हणे. त्यादृष्टीनेही आखूड नेसणच योग्य असावं. अर्थात आखुड नेसा वा पायघोळ नेसा, नऊवार फक्त पुढुनच पिसारा फुलवलेल्या मोरासारखी आकर्षक दिसते. मागुन नेटका पदर अंगभर घेतला तरच ठीक... (नऊवार अज्जिबात ना आवडणारी...स्वरा)

उडन खटोला Mon, 04/28/2014 - 18:08
धागा शतकपार नेल्याबद्दल समस्त मिपा करांचे आभार ! बरीच साधक बाधक चर्चा झालेली आहे . पण ती नौवारी साडीवर घसरेल, अशी अपेक्षा नव्हती! असो आभार

सूड Mon, 04/28/2014 - 19:00
पूर्वी नऊवारी/ धोतर (थोडक्यात कोणतंही सकच्छ नेसलेलं वस्त्र)हे घरंदाज पणाचं लक्षण मानलं जाई. कासोट्याशिवायची लुगडी फक्त देवदास्या (मुरळ्या वैगरे), वारांगना आदि स्त्रिया नेशीत असत, म्हणून घरंदाज स्त्रियांनी अशी लुगडी नेसणं पसंत केलं जात नसे. नंतरच्या काळात शन्वारे तेल्यांच्या स्त्रिया पाचवारी लुगडी नेशीत असत. थोडक्यात त्या काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी होता.

सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 19:31
सूड साहेब एकदा वैद्यकीय सर्वेक्षणासाठी बुधवार पेठेत जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा तेथील स्त्रियांची चेहेर्याची अतिशय भडक रंगरंगोटी (मेक अप) पाहून मी माझ्या मित्राला विचारले कि या स्त्रिया एवढे भडक रंग का वापरतात? त्याचे उत्तर असे होते कि साधे सोज्वळ रंग वापरले तर त्या स्त्रिया "तशा" आहेत हे लोकांना कसे कळेल? थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो. .

In reply to by सुबोध खरे

रेवती Mon, 04/28/2014 - 19:39
अगदी असाच संवाद मी आणि आईमध्ये झाला. बुधवार पेठेतील बायका वेगळ्या का दिसतात यावर आईने घाबरून लक्ष्मीरोडवर रिक्षा थांबवली व मला घरी आणले. यापुढे त्यापेठेबद्दल काही विचारायचे नाही वगैरे दटावले. मी नवव्या यत्तेत होते व असे काही स्पष्टीकरण देणे तिला अवघड वाटले असावे.

In reply to by सुबोध खरे

सूड Mon, 04/28/2014 - 19:50
>>थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो ह्म्म!! शक्यता नाकारता येत नाही.

आदिजोशी Wed, 04/30/2014 - 12:22
मुळात असलं काही घडलं ह्यावरच माझा विश्वास नाही. कितीही उच्चभॄ झाले तरी ब्राह्मण इतके उथळ होणार नाहीत. उगाच ब्राह्मणांना नावं ठेवण्यासाठी तयार केलेला कल्पनाविलास आहे हा. पुरावे द्या.

In reply to by आदिजोशी

+ ईन्फिनिटी. हेच म्हणतो. ह्यांच्या 'टु डु लिस्ट' मधे ब्राम्हणांच्या नावानी शंख करणे ही रोजची एक टास्क असते. (गो ब्राम्हणाभिमानी) अनिरुद्ध.
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे.

माहिती हवी आहे.......इंदूर ( म प) येथील मिपाकराची ..

चौकटराजा ·

चित्रगुप्त Sun, 04/27/2014 - 12:50
माझा भाऊ, बहीण, सासुरवाड, मित्र असे बरेच जण इंदुरात आहेत. भाड्याने घर घेण्याविषयी काय अपेक्षित आहे, ते व्यनीने कळवा, मी मदत करू शकेन.

चित्रगुप्त Sun, 04/27/2014 - 12:50
माझा भाऊ, बहीण, सासुरवाड, मित्र असे बरेच जण इंदुरात आहेत. भाड्याने घर घेण्याविषयी काय अपेक्षित आहे, ते व्यनीने कळवा, मी मदत करू शकेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
इंदूर मध्यप्रदेश येथील काही माहिती हवी आहे. विशेषत: जागा भाड्याने घेण्यासंबंधी... कोणी मिपाकर इंदुरात स्थायिक असल्यास मला कृपया त्वरित व्यनि करावा ही नम्र विनंति.

फणसाच्या आठ्या आणि सोडे.

गणपा ·

दिपक.कुवेत Sun, 04/27/2014 - 11:07
पाहुनच तोंडाला पाणी सुटलयं. सालां सकट वाल घालण्याएवजी मोड आलेले वाल (डाळींब्या) घातल्या तर?? कारण सालासकट वाल खाल्ले तर शेवट सालींचा चोथा तोंडात रहायची शक्यता आहे ना?

In reply to by दिपक.कुवेत

पिंगू Mon, 04/28/2014 - 12:12
अरे ते ओले वाल आहेत. तुझा प्रश्न सुक्या वालांच्या बाबतीत येईल. सुके वाल भिजवून, मोड आणून आणि सोलून घातल्यास तेही छानच लागतील..

जेपी Sun, 04/27/2014 - 11:31
आमच्याकड कदी फणस मिळेल अस वाटल नाय . पण काल बाजारात दिसल . त्याची साईज बगुन घ्यावा की नाय घ्याव विचार करतोय . बर फणस किती दिवस टिकत ? चांगल्या फणसाचे लक्षण काय ?

स्पंदना Sun, 04/27/2014 - 14:32
अरे देवा! काय ते फोटो! काय ते पदार्थ! अस कोण सुकट करणारं आहे का? मी जरा जाउन,चार दिवस राहुन, खाउन पिउन, धाटी मोती होउन यावी म्हणतेय. (आमच्या घरात कोणीच खात नाही सुकट :( )

In reply to by स्पंदना

भावना कल्लोळ Mon, 04/28/2014 - 16:36
अपर्णे …. कधी येतेस? चांगली माझ्यासारखीच करून पाठवते तुला. सुकट माझा हि जीव कि प्राण आहे. गणपाभाऊ .... रेसिपी मस्तच.

In reply to by स्पंदना

प्यारे१ Tue, 04/29/2014 - 15:56
सध्या आमच्याकडं 'चल रे भोपळ्या टुणुक्टुणुक' ही गोष्ट साभिनय सुरु असते. तीच आत्ता आठवली. 'भावनाकडं जाईन, सुकट बिकट खाईन, जाडजुड होईन मग मला खा' असं म्हणणारी (म्हातारी)आप्पातै!

प्रभाकर पेठकर Sun, 04/27/2014 - 16:24
आठ्या? आम्ही आठळ्या म्हणतो. अतिंम पदार्थ अगदी झकास दिसतोय (म्हणजे चवीलाही असणारच). सध्या वेळ नसल्याने 'पास' पण एकदा करून पाहिला पाहिजे.

In reply to by प्रभाकर पेठकर

अस्मी Sun, 04/27/2014 - 20:49
आम्ही पण आठळ्याच म्हणतो :-) पाकृ एकदम मस्स्त!!!आणि तो पहिला आठळ्यांचा फोटो खतरनाक. ..थेट आठळ्या समोर असल्यासारखेच वाटले

आम्ही फणसाचा आठ्या नुसत्या उकडुन मीठ लावुन खातो ... गणपाराव एखादी शाकाहारी(पक्षी: घासपुस वाली ) पाककृती सुचवा ना !

काय झक्कस पाकृ आहे :) आतापर्यंत दुधी-सोडे, वांगी-बटाटा-सोडे, सुका जवळा भरुन वांगी+बटाट्याचे कालवण आवडीने खाल्ले आहे पण आठळ्या आणी वाल घालून कधी ट्राय केले नाही...नवीनच पाकृ समजली. फोटो बघून तोंपासु. आता आठळ्यांसाठी आधी गरे शोधणे आले....

बाळ सप्रे Mon, 04/28/2014 - 10:40
वा!! सोडे आणि वांगी वगळून करुन बघणार.. शेवटी दिलेला प्रकार बोंबलाच्या जागी वांग वापरुन करता येइल..

गणपा Mon, 04/28/2014 - 13:21
सर्व श्री/सौ मुवि, एक्का काका, यशो, अभिषेक, शुचि, पेठकर काका, अस्मी, बुवा, जेपी, बाळ सप्रे, सुहास आपल्या अभिप्रायाबद्दल आभर. @ नंदन अगदी अगदी, काल स्वर्गवासीच होतो. ;) @ जेनी व्यनिला उत्तर दिलं आहे. @ खटपट्या हो आठल्या ही म्हणतात. मैला गणिक भाषेत थोडाफार फरक पडत जातो, आपल्या इथे आठ्या हाच शब्द लहान पणापासुन कानावर आलाय. :) @ दिपक, सालांसकटच्या वालामध्ये जी मजा/चव आहे ती डाळींब्यांमध्ये येणे नाही. वाल संपुर्ण शिजले की कसलाही चोथा उरत नाही. :) @ पिंगू, मी ओले वाल नाही तर कडधान्य भिजवून ते घेतलेत. ओले वाल (कडवा वाल/ वाल पापडी) जर उपलब्ध असले तर उत्तमच. @ अपर्णा ताय ये की माहेरपणाला. :) @ रेवती/प्रसाद/पिंगू हाच पदार्थ सोडे वगळुन करावा. फक्त सोड्याची चव काय ती उतरणार नाही पण बाकी चव फक्कड असेलच याची गॅरंटी. @सानिकास्वप्निल वाल आणि सुकट भन्नाट काँबो आहे तेही ट्राय करुन पहा. @मनीषा, वांगी आवडत नसल्यास वगळली तरी चालेल.

     कडवा वाल. वाल पापडी.
वरील चित्रे जालावरुन साभार.

In reply to by गणपा

प्यारे१ Mon, 04/28/2014 - 13:54
कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का? आम्ही त्या फोटोतल्या जिन्नसाला पावटा म्हणतो. ते आमी वशाटाचं खायत न्हाय म्हणून गप बसलेलो. पण आता गणपाच्या बैलाला नेहमीप्रमाणेच हो....!

In reply to by गणपा

१. डावीकडच्या फोटोत दिसताहेत त्या वालाच्या शेंगा. (जाणकार असल्याशिवाय आणि सोलल्याशिवाय वालाच्या आणि पावट्याच्या शेंगा एकमेकापासून ओळखायला जरा कठीणच !) २. तयार झालेल्या शेंगा सोलून काढलेले वाळविलेले दाणे म्हणजे वाल. ३. वालाच्या शेंगा मडक्यात भरून, मडक्याचे तोंड भांबूर्डीच्या पानाने बंद करून ते जमिनीतल्या खड्ड्यात उलटे ठेवून त्याच्यावर शेकोटी केली की शेंगा त्यांच्या अंतर्गत रसात उकडल्या जातात आणि त्यांना भांबुर्डीचा जरासा तिखटसर वास व स्वाद येतो... ही झाली पोपटी. पोपटीतल्या शेंगातले वाल ताज्या कोवळ्या नारळाच्या खोबर्‍याबरोबर फक्कड लागतात. पोपटी करताना मडक्यात बटाटे, रताळी, कधी कधी चिकन, इ ही ठेवतात. कोकणात पोपटी ही देशावरच्या हुरडा पार्टीसारखी फेमस आहे ! ४. वाळलेले वाल २-३ दिवस पाण्यात भिजवून त्याची साले काढून टाकली की मिळते ते बिरडे / डाळिंब्या. ते शिजल्यावरही त्यांना बिरडे / डाळिंब्या च म्हणतात. आमच्या घरी रस्साभाजी असेल तर त्याला बिरडे म्हणतात, सुकी भाजी असेल तर डाळिंब्या म्हणतात. ५. वाळवलेले वाल तूर, चणे, इ प्रमाणे भरडून साल काढून वालाची डाळ बनवली जाते. भिजवणे, सोलणे इ ना काट मारून झटपट बिरडे (रस्साभाजी) बनवायला तिचा उपयोग होतो. पण ही पद्धत इतकी जास्त प्रचलीत नाही कारण त्यांत पूर्ण डाळिंब्या बरोबर भरपूर चुरा पदरात पडतो. सहसा टपोरे वाल वेगळे केल्यावर उरलेल्या वालांचे असे बायप्रोडक्ट बनवले जाते ;) . या दोन कारणांमुळे पट्टीचे वालखाऊ असे बिरडे जरा नाराजीनेच खातात :) ॥ अथ वालपुराणम् संपुर्णम् ॥

In reply to by प्यारे१

कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का? ही एकाच कुटुंबातली पण वेगळी व्दिदल कडधान्ये आहेत. कडवा वाल आकाराने किंचीत लहान असतो. वाळल्यावर वालाच्या सालाचा रंग लाल-तपकिरी होतो तर पावट्याचा पांढरा होतो. चविला साधारण तसेच असले तरी वालाला एक खास स्वाद असतो त्याची सर पावट्याला नाही.

इरसाल Mon, 04/28/2014 - 13:37
कोणी सोडे मला दुधात घालुन किंवा शेपुच्या भाजीत जरी घालुन दिले तरी चालतील. आता इथे सोडे कुठे शोधु ? पाकृ छान, आज अंबाडी सुकट करावी म्हणतो.

राही Mon, 04/28/2014 - 14:58
कडवे वाल, सफेद वाल, लाल वाल असे तीन चार प्रकार असतात. कडवे वाल जरासे कडसर असतात आणि त्यांना भिजून मोड यायला अधिक वेळ लागतो. सफेद वाल पट्कन भिजतात आणि सोलायला फारसा त्रास देत नाहीत. हे चवीला कडू नसतात. मला वाटते ह्या सफेद वालांतसुद्धा दोन प्रकार असावेत. एक जाड सालीचे आणि दुसरे पातळ सालीचे. मोड न आणता भिजवलेले पातळ सालीचे सफेद वाल न सोलता सरळ भाजीत घालता येतात किंवा त्यांचीच उसळ करता येते. मोड आणून सोललेल्या कडव्या वालांना बिरडे किंवा डाळिंब्या म्हणत असावेत. पण वालांची सुकवलेली आणि साले काढलेली डाळ भिजवून केलेल्या प्रकारासही डाळिंब्यांची उसळ म्हणत असावेत. अलीकडे लग्नात आवर्जून मराठमोळे जेवण ठेवण्याची टूम्/स्टाईल्/फॅशन आहे. अशा जेवणात पुष्कळ वेळा ही उसळ असते. (टिपिकल प्रादेशिकता आणण्यासाठी अनसाफणसाची भाजी, भरली वांगी, काळ्या वाटाण्याचे सांबार, तांदुळपिठाच्या उकड काढून केलेल्या भाकरी असा जंगी म्हणजे कठिण म्हणजे खायला कठिण मेनू ठेवतात. कारण धड कशाचीच चव जमलेली नसते.) बरोबर एखादा मेक्सिकन, इटालिअन पदार्थ, चाट, वेगवेगळे इवलेइवले दोसे वगैरे अष्टरंगी कॉम्बिनेशन असते. थाई नारळकढी सुद्धा यातच घुसडलेली असते. असो.

राही Tue, 04/29/2014 - 15:21
पोपटी हा शब्द 'फुफाटी' ह्या शब्दावरून आला असे शंकर सखाराम यांनी लिहिले आहे. पोपटी केली म्हणजे खरे तर फुफाटी केली. फुफाटी म्हणजे अर्थातच छोटा फुफाटा.

पैसा Tue, 04/29/2014 - 20:09
मस्त पाकृ आणि फोटो कातिलाना! शाकाहारी लोकांनी सोड्यांच्या ऐवजी काजूगर घालून ट्राय करा.

राही Wed, 04/30/2014 - 07:53
ह्यातला 'मसाला' म्हणजे नुसती तिखटपूड असते की त्यात आणखी काही जिन्नस मिसळलेले असतात?

In reply to by राही

गणपा Wed, 04/30/2014 - 13:06
आमच्याकडे वर्षाचा मसाला एकदाच दळून ठेवतात. त्याची कृती जागू यांनी मिपावर दिली आहे. http://www.misalpav.com/node/20012 विषेशतः मासे आणि इतर सामिष पदार्थांसाठी वापरला जातो. सर्व वाचक/प्रतिसादकर्त्यांचे आभार.

संदीप चित्रे Wed, 04/30/2014 - 18:30
असे पदार्थ इथे देऊन तूच आपण भेटल्यावर करून द्यायच्या पदार्थांची यादी वाढवतोस रे ! दुसरे म्हणजे नू जर्सीला स्थलांतर करायचे मनावर घे :) भन्नाट रेसिपी!!!

दिपक.कुवेत Sun, 04/27/2014 - 11:07
पाहुनच तोंडाला पाणी सुटलयं. सालां सकट वाल घालण्याएवजी मोड आलेले वाल (डाळींब्या) घातल्या तर?? कारण सालासकट वाल खाल्ले तर शेवट सालींचा चोथा तोंडात रहायची शक्यता आहे ना?

In reply to by दिपक.कुवेत

पिंगू Mon, 04/28/2014 - 12:12
अरे ते ओले वाल आहेत. तुझा प्रश्न सुक्या वालांच्या बाबतीत येईल. सुके वाल भिजवून, मोड आणून आणि सोलून घातल्यास तेही छानच लागतील..

जेपी Sun, 04/27/2014 - 11:31
आमच्याकड कदी फणस मिळेल अस वाटल नाय . पण काल बाजारात दिसल . त्याची साईज बगुन घ्यावा की नाय घ्याव विचार करतोय . बर फणस किती दिवस टिकत ? चांगल्या फणसाचे लक्षण काय ?

स्पंदना Sun, 04/27/2014 - 14:32
अरे देवा! काय ते फोटो! काय ते पदार्थ! अस कोण सुकट करणारं आहे का? मी जरा जाउन,चार दिवस राहुन, खाउन पिउन, धाटी मोती होउन यावी म्हणतेय. (आमच्या घरात कोणीच खात नाही सुकट :( )

In reply to by स्पंदना

भावना कल्लोळ Mon, 04/28/2014 - 16:36
अपर्णे …. कधी येतेस? चांगली माझ्यासारखीच करून पाठवते तुला. सुकट माझा हि जीव कि प्राण आहे. गणपाभाऊ .... रेसिपी मस्तच.

In reply to by स्पंदना

प्यारे१ Tue, 04/29/2014 - 15:56
सध्या आमच्याकडं 'चल रे भोपळ्या टुणुक्टुणुक' ही गोष्ट साभिनय सुरु असते. तीच आत्ता आठवली. 'भावनाकडं जाईन, सुकट बिकट खाईन, जाडजुड होईन मग मला खा' असं म्हणणारी (म्हातारी)आप्पातै!

प्रभाकर पेठकर Sun, 04/27/2014 - 16:24
आठ्या? आम्ही आठळ्या म्हणतो. अतिंम पदार्थ अगदी झकास दिसतोय (म्हणजे चवीलाही असणारच). सध्या वेळ नसल्याने 'पास' पण एकदा करून पाहिला पाहिजे.

In reply to by प्रभाकर पेठकर

अस्मी Sun, 04/27/2014 - 20:49
आम्ही पण आठळ्याच म्हणतो :-) पाकृ एकदम मस्स्त!!!आणि तो पहिला आठळ्यांचा फोटो खतरनाक. ..थेट आठळ्या समोर असल्यासारखेच वाटले

आम्ही फणसाचा आठ्या नुसत्या उकडुन मीठ लावुन खातो ... गणपाराव एखादी शाकाहारी(पक्षी: घासपुस वाली ) पाककृती सुचवा ना !

काय झक्कस पाकृ आहे :) आतापर्यंत दुधी-सोडे, वांगी-बटाटा-सोडे, सुका जवळा भरुन वांगी+बटाट्याचे कालवण आवडीने खाल्ले आहे पण आठळ्या आणी वाल घालून कधी ट्राय केले नाही...नवीनच पाकृ समजली. फोटो बघून तोंपासु. आता आठळ्यांसाठी आधी गरे शोधणे आले....

बाळ सप्रे Mon, 04/28/2014 - 10:40
वा!! सोडे आणि वांगी वगळून करुन बघणार.. शेवटी दिलेला प्रकार बोंबलाच्या जागी वांग वापरुन करता येइल..

गणपा Mon, 04/28/2014 - 13:21
सर्व श्री/सौ मुवि, एक्का काका, यशो, अभिषेक, शुचि, पेठकर काका, अस्मी, बुवा, जेपी, बाळ सप्रे, सुहास आपल्या अभिप्रायाबद्दल आभर. @ नंदन अगदी अगदी, काल स्वर्गवासीच होतो. ;) @ जेनी व्यनिला उत्तर दिलं आहे. @ खटपट्या हो आठल्या ही म्हणतात. मैला गणिक भाषेत थोडाफार फरक पडत जातो, आपल्या इथे आठ्या हाच शब्द लहान पणापासुन कानावर आलाय. :) @ दिपक, सालांसकटच्या वालामध्ये जी मजा/चव आहे ती डाळींब्यांमध्ये येणे नाही. वाल संपुर्ण शिजले की कसलाही चोथा उरत नाही. :) @ पिंगू, मी ओले वाल नाही तर कडधान्य भिजवून ते घेतलेत. ओले वाल (कडवा वाल/ वाल पापडी) जर उपलब्ध असले तर उत्तमच. @ अपर्णा ताय ये की माहेरपणाला. :) @ रेवती/प्रसाद/पिंगू हाच पदार्थ सोडे वगळुन करावा. फक्त सोड्याची चव काय ती उतरणार नाही पण बाकी चव फक्कड असेलच याची गॅरंटी. @सानिकास्वप्निल वाल आणि सुकट भन्नाट काँबो आहे तेही ट्राय करुन पहा. @मनीषा, वांगी आवडत नसल्यास वगळली तरी चालेल.

     कडवा वाल. वाल पापडी.
वरील चित्रे जालावरुन साभार.

In reply to by गणपा

प्यारे१ Mon, 04/28/2014 - 13:54
कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का? आम्ही त्या फोटोतल्या जिन्नसाला पावटा म्हणतो. ते आमी वशाटाचं खायत न्हाय म्हणून गप बसलेलो. पण आता गणपाच्या बैलाला नेहमीप्रमाणेच हो....!

In reply to by गणपा

१. डावीकडच्या फोटोत दिसताहेत त्या वालाच्या शेंगा. (जाणकार असल्याशिवाय आणि सोलल्याशिवाय वालाच्या आणि पावट्याच्या शेंगा एकमेकापासून ओळखायला जरा कठीणच !) २. तयार झालेल्या शेंगा सोलून काढलेले वाळविलेले दाणे म्हणजे वाल. ३. वालाच्या शेंगा मडक्यात भरून, मडक्याचे तोंड भांबूर्डीच्या पानाने बंद करून ते जमिनीतल्या खड्ड्यात उलटे ठेवून त्याच्यावर शेकोटी केली की शेंगा त्यांच्या अंतर्गत रसात उकडल्या जातात आणि त्यांना भांबुर्डीचा जरासा तिखटसर वास व स्वाद येतो... ही झाली पोपटी. पोपटीतल्या शेंगातले वाल ताज्या कोवळ्या नारळाच्या खोबर्‍याबरोबर फक्कड लागतात. पोपटी करताना मडक्यात बटाटे, रताळी, कधी कधी चिकन, इ ही ठेवतात. कोकणात पोपटी ही देशावरच्या हुरडा पार्टीसारखी फेमस आहे ! ४. वाळलेले वाल २-३ दिवस पाण्यात भिजवून त्याची साले काढून टाकली की मिळते ते बिरडे / डाळिंब्या. ते शिजल्यावरही त्यांना बिरडे / डाळिंब्या च म्हणतात. आमच्या घरी रस्साभाजी असेल तर त्याला बिरडे म्हणतात, सुकी भाजी असेल तर डाळिंब्या म्हणतात. ५. वाळवलेले वाल तूर, चणे, इ प्रमाणे भरडून साल काढून वालाची डाळ बनवली जाते. भिजवणे, सोलणे इ ना काट मारून झटपट बिरडे (रस्साभाजी) बनवायला तिचा उपयोग होतो. पण ही पद्धत इतकी जास्त प्रचलीत नाही कारण त्यांत पूर्ण डाळिंब्या बरोबर भरपूर चुरा पदरात पडतो. सहसा टपोरे वाल वेगळे केल्यावर उरलेल्या वालांचे असे बायप्रोडक्ट बनवले जाते ;) . या दोन कारणांमुळे पट्टीचे वालखाऊ असे बिरडे जरा नाराजीनेच खातात :) ॥ अथ वालपुराणम् संपुर्णम् ॥

In reply to by प्यारे१

कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का? ही एकाच कुटुंबातली पण वेगळी व्दिदल कडधान्ये आहेत. कडवा वाल आकाराने किंचीत लहान असतो. वाळल्यावर वालाच्या सालाचा रंग लाल-तपकिरी होतो तर पावट्याचा पांढरा होतो. चविला साधारण तसेच असले तरी वालाला एक खास स्वाद असतो त्याची सर पावट्याला नाही.

इरसाल Mon, 04/28/2014 - 13:37
कोणी सोडे मला दुधात घालुन किंवा शेपुच्या भाजीत जरी घालुन दिले तरी चालतील. आता इथे सोडे कुठे शोधु ? पाकृ छान, आज अंबाडी सुकट करावी म्हणतो.

राही Mon, 04/28/2014 - 14:58
कडवे वाल, सफेद वाल, लाल वाल असे तीन चार प्रकार असतात. कडवे वाल जरासे कडसर असतात आणि त्यांना भिजून मोड यायला अधिक वेळ लागतो. सफेद वाल पट्कन भिजतात आणि सोलायला फारसा त्रास देत नाहीत. हे चवीला कडू नसतात. मला वाटते ह्या सफेद वालांतसुद्धा दोन प्रकार असावेत. एक जाड सालीचे आणि दुसरे पातळ सालीचे. मोड न आणता भिजवलेले पातळ सालीचे सफेद वाल न सोलता सरळ भाजीत घालता येतात किंवा त्यांचीच उसळ करता येते. मोड आणून सोललेल्या कडव्या वालांना बिरडे किंवा डाळिंब्या म्हणत असावेत. पण वालांची सुकवलेली आणि साले काढलेली डाळ भिजवून केलेल्या प्रकारासही डाळिंब्यांची उसळ म्हणत असावेत. अलीकडे लग्नात आवर्जून मराठमोळे जेवण ठेवण्याची टूम्/स्टाईल्/फॅशन आहे. अशा जेवणात पुष्कळ वेळा ही उसळ असते. (टिपिकल प्रादेशिकता आणण्यासाठी अनसाफणसाची भाजी, भरली वांगी, काळ्या वाटाण्याचे सांबार, तांदुळपिठाच्या उकड काढून केलेल्या भाकरी असा जंगी म्हणजे कठिण म्हणजे खायला कठिण मेनू ठेवतात. कारण धड कशाचीच चव जमलेली नसते.) बरोबर एखादा मेक्सिकन, इटालिअन पदार्थ, चाट, वेगवेगळे इवलेइवले दोसे वगैरे अष्टरंगी कॉम्बिनेशन असते. थाई नारळकढी सुद्धा यातच घुसडलेली असते. असो.

राही Tue, 04/29/2014 - 15:21
पोपटी हा शब्द 'फुफाटी' ह्या शब्दावरून आला असे शंकर सखाराम यांनी लिहिले आहे. पोपटी केली म्हणजे खरे तर फुफाटी केली. फुफाटी म्हणजे अर्थातच छोटा फुफाटा.

पैसा Tue, 04/29/2014 - 20:09
मस्त पाकृ आणि फोटो कातिलाना! शाकाहारी लोकांनी सोड्यांच्या ऐवजी काजूगर घालून ट्राय करा.

राही Wed, 04/30/2014 - 07:53
ह्यातला 'मसाला' म्हणजे नुसती तिखटपूड असते की त्यात आणखी काही जिन्नस मिसळलेले असतात?

In reply to by राही

गणपा Wed, 04/30/2014 - 13:06
आमच्याकडे वर्षाचा मसाला एकदाच दळून ठेवतात. त्याची कृती जागू यांनी मिपावर दिली आहे. http://www.misalpav.com/node/20012 विषेशतः मासे आणि इतर सामिष पदार्थांसाठी वापरला जातो. सर्व वाचक/प्रतिसादकर्त्यांचे आभार.

संदीप चित्रे Wed, 04/30/2014 - 18:30
असे पदार्थ इथे देऊन तूच आपण भेटल्यावर करून द्यायच्या पदार्थांची यादी वाढवतोस रे ! दुसरे म्हणजे नू जर्सीला स्थलांतर करायचे मनावर घे :) भन्नाट रेसिपी!!!
ध्यानी मनी नसताना आणि फणसाचा हंगाम नसतानाही या एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच फणस खायला मिळाला. फणसाच्या रसाळ गर्‍यांच्या जोडीने त्यांच्या आठ्या (बीया) ही आमच्या घरात सगळ्यांना प्रिय आहेत. नुसत्या उकडुन आणि वरुन थोडंसं मीठ भुरभुरुन उत्तम लागतातच पण मला त्या नुसत्या उकडुन खाण्यापेक्षा सुकट टाकुन केलेल्या कालवणात जास्त आवडतात. यावेळी येताना आईने आठवणीने सोडे दिलेत.

डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा

शुचि ·

(४) जो काटाचमचा-चमचा न वापरता हाताने अन्न ओरपतो.
=)) च्यायला, डेट गेली खड्ड्यात, काही पदार्थ असे असतात जे हातानीचं ओरपावे असे असतात. डेट भारतात चालुये असं गृहित धरु, मिसळीमधे पाव सुरीनी कापुन नंतर काट्यानी उचलुन खाणं डोळ्यासमोर पण आणवत नाहीये. उद्या टेबल मॅनर्स च्या नावाखाली पुरणपोळी काट्यानी तोडुन मग दुधात किंवा तुपात बुडवुन खायला लागली तर पुरणपोळी खाणं सोडुन द्यायची वेळ येईल. :). (मसाला डोसा काट्या-चमच्यानी खाता नं येणारा) अनिरुद्ध

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:33
मी पण ते वाचून दचकलोच पण.... अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. :) डोसा नाही खाता येत काही हरकत नाही, वडा सांबार मागवा. बाकी पहिल्या डेटला डोसा आणि वडासांबार हेच चित्र डोळ्यसमोर विनोदी म्हणून येतेय ;) यावरून आठवले - मी माझ्या बायकोबरोबर लग्नाआधी जेव्हा गर्लफ्रेंड म्हणून डेटींग करायला सुरुवात केली होती तेव्हा ती मला सांगते की तीच तेव्हा जास्त कॉशिअस असायाची, काय खायचे कसे खायचे, इम्प्रेशन चुकीचे नाही पडणार ना वगैरे वगैरे.. खरे तर ती माझ्यापेक्षा जास्त टेबल मॅनर्स जाणून आहे आणि माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. पण बहुधा त्यामुळेच मी देखील तसा विचार करत असेल या विचाराने ती काळजी घ्यायची आणि मी मस्त खुलेपणाने वागायचो.

In reply to by तुमचा अभिषेक

अहो उदाहरण दिलं हो. टेबल मॅनर्स अगदी झक्कासपणे पाळता येतात. फॉर्मल लंच किंवा डिनर ला पाळावेत. पण जे पदार्थ हातानी खायचे आहेत त्याला उगाच चमचा कशाला लावायचा? डेटला नाही हो वडा किंवा डोसा =)). बा.द.वे. काँशिअस झालं की जास्त चुका होतात =))

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि Sun, 04/27/2014 - 14:47
अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. Smile
खरे आहे, पहिल्या डेटला, काटेरी आख्खा मासा, भरलेले खेकडे किंवा खेकड्याचा रस्सा (भारतात) अन पोर्क रिब्ज rack (परदेशात) मागवू नये अन मागवलेच तर हाताने खायला लाजू नये.

चौथा कोनाडा Sun, 04/27/2014 - 09:45
पुस्तका बद्दल छान माहिती. चेकलिस्ट मनोरंजक आहे. या बाबतीत आपणा सर्वांचा अनुभव पाहता हा धागा लढाईचा आखाडा बनायला फुल्ल स्कोप आहे !

In reply to by चौथा कोनाडा

एसमाळी Sun, 04/27/2014 - 11:23
smart भारतीय मुली पहिल्या डिनरडेटला काय चेकलिस्ट बघत असतिल हे कुणी सांगेल का ? पहिल्या डिनरडेटला मी तर हातानेंच curd rice ओरपला होता.

जेनी... Sun, 04/27/2014 - 10:06
सहिय ..... पण डेटिंग साठी येणारा पूरुष स्त्री वर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतो ... हे वरचे पॉईंट्स जरा विचित्रच आहेत ... म्हणजे असं वागताना पाहिलहि नाहि न ऐकलहि नाहि .. एनिवेज .... माझी पहिली वहिली डीनर्डेट चा किस्सा सांगायला आवडेल ... कुणाला ऐकायला आवडनार असेल तर ;)

In reply to by जेनी...

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:37
सांगा की, मी सुद्धा माझ्या एका ऑर्कुट डेटचा किस्सा लिहिलेला तो आठवला.. त्याची लिंक हि.. माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 12:22
आयला! हे पुस्तक वाचून जी कोण डिनरडेटचे निष्कर्ष काढत बसेल ती बहुतेक आयुक्षभर डिनरडेट्सच करत बसेलसं दिसतंय. मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच. मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच. थोडक्यात, इथून पुढे (जर कधी संधी..हे आपलं.. वेळ आलीच तर!) डिनरडेटला जाण्यापुर्वी जिच्यासोबत डेट आहे तीने हे पुस्तक वाचलेलं नाही ह्याची खातरजमा केल्याशिवाय हाटेलात पाय टाकणे नाही! हौ ना राव. सगळं व्यवस्थित करुन सवरुन फुकट इज्जतीचा पंचनामा करुन घ्यायला कुणी सांगितलंय? म्हणजे, तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! ;)

In reply to by धमाल मुलगा

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:57
मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच. मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच. वरवर कन्फ्यूजिंग वाटत असले तरी सोप्पय ते. पहिले म्हणजे शक्यतो संभाषणाचे वेटेज ५०-५० टक्के वा त्याच्या जवळपास हवे. एकच जण बोलतोय आणि एका काहीच नाही असे टाळावे. समोरच्या मुलीलाही बोलायची आवड असेल आणि तिला बोलायला नाही दिले तर तिची प्रचंड चीडचीड होणारच. त्यामुळे बोलायलाही द्यावे आणि काय बोलतेय ते ईंटरेस्ट घेऊन ऐकावेही, हे महत्वाचे अन्यथा इकडे तिकडे लक्ष दिल्यास तिच्या मनात समोरच्या टेबलावरचा ग्लास उचलून तुमच्या डोक्यात मारावा असे विचार येण्याची संभावना असते. जर तिला ऐकण्यातच रस जास्त असेल तर मात्र तिला ऐकण्यात ईंटरेस्ट आहे अश्याच विषयांवर बोलावे. पण आपल्याला जे बोलता येते आणि जे विषय आवडतात त्यात त्या मुलीला ईंटरेस्ट नसेल तर तिने आपल्याला बाद करायच्या आधी आपणच तिला बाद करावे. पहिल्याच भेटीत उगाचच्या उगाच स्वताचेच पुराण लावणे टाळावे. कोणीही बोर होणारच. हे दुसर्‍या तिसर्‍या चौथ्या भेटींसाठी ठेवावे. पण जर ती मुलगी आधीच आपल्या प्रेमात असेल तर मात्र तिला हे आवडू शकते. तळटीप - लग्नासाठीच डेटींग असेल तर स्वता जसे आहोत तसेच वागणे कधीही चांगले. पण एखाद्या मुलीला भेटताना आपल्याला काही गोष्टींचे तारतम्य बाळगता येत नसेल तर ती नक्कीच सुधारणेची जागा आहे. हि एकमेकांशी बोलण्याची ट्यूनिंग जमली की खरे तर इतर बर्‍याच गोष्टी गौण असतात. आमचे स्वताचेही इतर सर्व गोष्टी एकमेकांशी जराही मिळत्याजुळत्या नसून या एका मुद्द्यावर जुळले आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:30
आहोऽऽऽ....तो माझा एक इनोद करण्याचा केविलवाणा (आणि आता बहुधा निष्फळ) प्रयत्न होता हो! इतक्या होपलेसली रोम्यांटिक बाबी इतक्या शिरेसली घेऊ नका जी. त्यात आणि मी बोलत असेल तर बिलकुलच नको. :)

In reply to by धमाल मुलगा

शुचि Sun, 04/27/2014 - 15:23
तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! Wink
वाट्टेल त्या अतिरेकी म्हणी बनवू नकोस =))

In reply to by प्रसाद गोडबोले

शुचि Sun, 04/27/2014 - 14:58
पाश्चात्यांत हाताने खाण्याकडे विशेषता: चारचौघात (fOrmal भेटीत ) खरच गर्हणीय मानले जात असावे . माझ्या मुलीच्या मैत्रिणीचे आई (Indonesian) अन वडील (कॉकेशिअन) आले असताना मी चुकून मटन तसे(हाताने ) खाल्ले होते कारण फार मोठे तुकडे असलेले मटन त्या दिवशी केले होते :( पण त्या लोकांना जेवण तर निट गेलेच नाही परत नंतर त्यांनी आमच्याबरोबर्चे संबंध अत्यल्प करून टाकल्याचे स्मरते. :( :( तेव्हापासून मी धडा घेतला आहे.

In reply to by शुचि

मग त्यांना घरी बोलवुन एकदा वरणभात आणि आळुची भाजी असा बेत करायला हवा होता ... अशी अळुची भाजी ओरपुन खाताना पाहुन ते चक्कर येवुनच पडले असते =)) बाकी माज्या मते तर आपण जिथल्या तिथल्या प्रथा पाळाव्यात ... मला तर चायनिज चॉप्स्टिक्सनेही अगदी व्यवस्थित जेवता येत पण ते केवळ चायनिज (चायनिज चायनिज : ऑथेन्टीक चायनिज) रेस्टरों मध्येच ! आणि आजही उत्तपम काटाचमचाने खाणार्‍यांची कीवच वाटते मला :)

पैसा Sun, 04/27/2014 - 15:09
म्हणजे डिनरडेटला सगळे सैधिंडियन्स पार नापास होणार की! ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!

In reply to by पैसा

शुचि Sun, 04/27/2014 - 15:26
कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!
हाहाहा लई म्हंजी लई खरं आहे!!! Traumaa होउन बसायचा त्याना ;)

In reply to by पैसा

विजुभाऊ Mon, 04/28/2014 - 01:36
ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार या पेक्षा कहर म्हणजे. भाताचे गोळे आणि दोन बोटांधून पिचकारीप्रमाणे पाझरणारे सांबार

रेवती Sun, 04/27/2014 - 18:36
भारतीय रेस्तरांत मी भाजी पोळी हाताने खात असताना शेजारच्या टेबलावरील हामेरिकन कुटुंब डोळ्याच्या कोपर्‍यातून बघत होते. त्यांनी प्रयत्न केला पण जमले नाही. मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली. शाकाहारी असल्याने नॉनव्हेजीय पदार्थांशी कुस्ती खेळत खाण्याचा प्रसंग माझ्यावर आला नाही पण दोसा मऊ असल्यास काटा सुरीने जास्त चाम्गल्या पद्धतीने खाता येतो असे मत बनले आहे. तसाही पपडासारखा दोसा खाउन समाधानही होत नाही. शुचीमामी, वरील सर्व यमनियम वाचून भूक जाईल एखाद्याची, किंवा यासगळ्यात जेवायचे कधी? असा प्रश्न पडेल. बिले देण्यास मी मागेपुढे पहात नाही. नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. ;) पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल. ;)

In reply to by रेवती

>>> नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. >>>> रेवती....डिट्टो...!!! *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol

In reply to by रेवती

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:37
काकांच्या नशिबाचं नेहमीचं कौतुक वाटत आलं आहे, आज मात्र हे वाचून आनंदानं डोळेच पाणावले. :) काकू तुस्सी ग्रेट हो! भार्रऽत माताऽऽ की ज्जय!!!!

In reply to by रेवती

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 20:38
मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली. सेम असाच अनुभव आपल्याइथे वाशीच्या मॉलमध्ये घेतलाय. एक आफ्रिकन कपल भगत ताराचंदची वेज थाळी घेऊन आता ती कशी खायची या विचारात होते. पाहिले तर त्यातील हिरो असाच चपातीचा रोल करून डाळीत डुबुक डुबूक करून खाऊ लागला, आणि भाजी राहिली बाजूलाच. एक तर त्याला तसे डाळचपाती खाण्यात मजाही येत नसणार आणि चपातीबरोबरच डाळ संपवली तर भाताबरोबर हा भाजी खाणार की त्यात ताक ओतणार. पण जे काही करेल त्यानंतर परत आपल्या देशात जाऊन भारतीत फूड ला नावे मात्र नक्की ठेवणार हे दिसून आल्याने मी देश के इज्जत क सवाल है बोलत लागलीच त्याच्या मदतीला धावलो. सुदैवाने आम्हीही तशीच एक वेज थाली मागवली असल्याने त्याला समजावणे सोपे पडले. बरेपैकी जमले त्यांना !

In reply to by रेवती

स्पंदना Mon, 04/28/2014 - 07:32
भर हो भर!! अशी हजारो बिलं भरत जा गो रेवक्का!! :)) :)) पाहिलतं? पाहिलतं? आमच्या रेवाक्काच मन किती मोठठ आहे ते? :))

In reply to by रेवती

शुचि Mon, 04/28/2014 - 19:21
पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल.
रेवती, खालती सुहास यांच्या प्रतिसादास , उप-प्रतिसादात आमचे कसे जम्ले ते लिहीले आहे. इच्छा असल्यास तुझे अनुभव शेअर कर :) .... मजा येते गं अन माहीते सगळ्यांच्या शेअरींगमधून एक सम्यक अनुभव मिळतो.

In reply to by शुचि

रेवती Mon, 04/28/2014 - 19:34
होय, तुझा वाचला अनुभव. चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत! ;) आमचे लग्न ५ मिनिटात ठरल्याने (व पुरती ओळख होण्याच्या आत झाल्याने)अनुभव असे काहीच नाहीत. लग्नाआधी एकदा बाहेर जेवायला गेल्यावर जेवताना गप्पा मारून विषय संपले मग बील येईपर्यंत बोलायला काही उरले नसल्याने गप्प बसून होतो दोघेही. फारशी ओळख नसल्याने काय बोलायचे हा प्रश्न! बील नवर्‍यानेच दिले व भाजीपोळी टाईप जेवण होते त्यामुळे खमंग किस्से नाहीत. एकंदरीतच माझे लग्न इतक्या नेहमीच्या आणि साध्या पद्धतीने ठरले की "अय्या, असं झालं का? " टाईप किस्से नाहीत. शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले. विश्वनाथन आनंदशिवाय विषय नसतो. सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.

In reply to by रेवती

शुचि Mon, 04/28/2014 - 21:47
चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत!
दुसरी भेट होती कारण पहीली सासू-सासरे व आई-बाबा अन मॅरेज ब्युरोतील एका व्यक्तीच्या समक्षच झाले. त्याचे पहीले वाक्य होते "त्याला म्युझिकचे व्यसन आहे" अन लगोलग माझे वाक्य होते "आणखी कोणती व्यसने आहेत आपल्याला?" त्यावर तो खूप हसला होता :) ..... वन ऑफ सम रियली फॉन्ड मेमरीज ऑफ दोस डेज!!! :)
शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले.सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.
हाहाहा

बाप रे........!!!

डेटींग हे प्रकरण असलं भयंकर असतं होय! http://www.sherv.net/cm/emo/hearts/sick.gif आमस्नी तर ह्ये सम्दं मुळ्ळीच खरं वाटत नाय. तिच्यायला,आम्च्या घाटावर..खेड्यापाड्यात सुदीक..पोरं पोरी कालिजात वळख होऊन..कुटतरी चिचच्या झाडाखाली,न्हायतर ओढ्याकाठी..येकदम्म पिरेमाच्या फुल्ल करंटमदी येऊन..कुनी हाकायला येत न्हाई..तो परेंत गुलुगुलु..गुलूगुलू करत्यात.. त्ये ह्या डेटिंग का फेटींग परास लै फर्मास!!! http://www.sherv.net/cm/emo/hug/cute-hug.gif आनी माणशिक आरोग्यास अत्यंण्त लाबदायक! http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif
काय म्हण्न्ता???

In reply to by शुचि

आत्मशून्य Mon, 04/28/2014 - 02:11
जोडिदाराला फरक पडत नसावा. आपण डेलिक्सि व जोडिदाराचा सेल्फ रिस्पेक्ट किती जपतो आणी काय धमाल करतो इतकेच महत्वाचे आहे. छोटसेे उदाहरण देतो, एकी सोबत Sndt रोड वर फिरत होतो, नुकतच स्वाद मधून बाहेर आलो होतो, तोच खिशात एक्लेअर्स सापडले, लगेच तोंडात टाकले व रेपर रस्त्यावर सोडुन दिले. लगेच मंजूळ आवाज कानी... असा रस्त्यावर कचरा कसा टाकतोस ? मी लगेच ते वेष्टन उचलून खिशात कोम्ब्ले. पुन्हा मंजूळ आवाज GOOD BOY. मी सांगितले म्हणून एकाही मुलाने आज पर्यंत लगेच असे काही परत उचलले नाहिये. तु GOOD BOY आहेस. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती स्त्रीमन दुखावु नये म्हणून केलेली. पण अर्थात व्यक्ती परत्वे हे आपोआप करावेसे वाट्ने सुधा महत्वाचे असते. उगा बिल बघून चेहरा कसा केला, काटा चमचा वापरला की नाही यागोष्टी वरील चेमिस्त्री साध्य झाल्यास गउन ठरतात.

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2014 - 01:44
बापरे! हल्ली असे 'नियमानुसार' प्रेम करावे लागते? बरं झालं आमच्या काळी हे कांही नव्हतं. बटाटेवडा (हो 'टे' वडा), वडा पाव, मिसळ पाव, व्हेज सँडविच, कांदा-बटाटा-मिरची भजी, चहा-पाव वगैरे वगैरेंवर आमचं प्रेम जोपासलं, फोफावलं आणि लग्नाच्या जाळ्यात जाऊन अडकलं ते आजतागायत. आजही बरेचसे पदार्थ हाताने आणि पाण्याचं भांडं तोंडाला लावून पिण्यातच सुख मानतो. अगदी गोर्‍यांच्या देशात जाऊनही. आपल्या भारतात येऊन्/राहूनही ते हाताने जेवायला शिकले नाहीत तर त्यांचेच स्वदेश प्रेम लक्षात ठेवून मी ही कधी माझ्या देशाच्या चालीरिती, निदान त्यांना रिझवायला तरी, सोडल्या नाहीत.

राजेश घासकडवी Mon, 04/28/2014 - 08:23
च्यायला, - दहा नियम बिलाविषयी आहेत. -पाच नियम गप्पा मारण्याविषयी आहेत. निष्कर्ष - स्मार्ट विमेनांना हा माणूस आपल्याशी बोलतो कसा यापेक्षा दुप्पट हा बिल कसा देतो याविषयी पडलेली असते.

बाबा पाटील Mon, 04/28/2014 - 13:02
आपल्याला बापजन्मी जमणार नाही.जेंव्हा कधी कुठल्या ललनेबरोबर मोठ्या हाटीलात हादडायचा टाइम आला तेंव्हा तेंव्हा तिला अगोदर टपरीवरचा चहा पाजला होता,त्यामूळे असला काय शानपणाचा विषय कोनी केलाच नाय.आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.

In reply to by बाबा पाटील

शुचि Mon, 04/28/2014 - 19:01
आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.
हाहाहा :)

सुहास.. Mon, 04/28/2014 - 13:29
डिनरडेट चा अनुभव नाsssssssssssssssé ही ... बाकी शुचिमामींचा काही अनुभव असल्यास आम्हाला वाचायला काही हरकत नाही ..धन्यवाद !!

In reply to by सुहास..

शुचि Mon, 04/28/2014 - 19:06
हाहाहा फार काही अनुभव नाही. माझ्या बी एस सी नंतर, नवरा मुंबईहून मला पहायला पुण्यात आलेला तेव्हा मी भला मोठा गॉगल लावून लुनावरुन आलेले. अजूनही नवरा म्हणतो अगं केवढा मोठा तो गॉगल, संपूर्ण चेहराभरच की. (अन तेव्हा मी समजत होते गॉगलमध्ये मी स्मार्ट दिसते आहे ;) )आम्ही फर्ग्युसन टेकडीवर गेलो, गप्पा मारल्या अन मग फर्ग्युसनच्या समोर तेव्हा व्हेन्कीज होते तिथे आईस्क्रीम सोडा अन चिकन नगेट्स मागवले होते. गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. सोडा अफलातून होता. मला तो आवडलेला. माझा होकार होता पण याने १ वर्ष घेतलं होकार कळवायला. तोपर्यंत मी आय आय टी मध्ये अ‍ॅड्मिशन घेतली होती पण त्याला विसरले नव्हतेच नव्हते.

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 06:53
Friendships of women have usually been not merely unsung , but mocked, belittled and falsely interpreted.
दाट संशय येतोय हे सहितले वाक्य याच What Smart Women Know पुस्तकातील असावे.

कवितानागेश Tue, 04/29/2014 - 12:34
गमतीदार प्रकार आहेत. यातला १४वा प्रकार मी आणि माझा नवरा दोघे रेग्युलरली करतो. १०वा प्रकार मीच कधीतरी करते आणि २४वा प्रकार नवरा कायम करतो. :)

सूड Tue, 04/29/2014 - 15:35
खाण्याचं राहू देत हो...पहिल्या भेटीत मी मुलीच्या मराठी व्याकरण, उच्चारांच्या चुका काढेन की काय याची भीती वाटते आताशा. माझं नावंच ही चूक काढायला पहिलं कारण ठरु नये ही ईश्वरचरणी प्रार्थना!! ;)

समीरसूर Tue, 04/29/2014 - 15:45
यातलं बहुधा मी काहीच करणार नाही पण सणसणीत अपवाद क्र. ४! काही पदार्थ हातानेच खायला मजा येते. इन फॅक्ट, आपले जेवण काटा-चमच्याने कसे जेवावे? डाळगंडोरी, भरीत, भाकरी, शेवभाजी, सावजी चिकन, उकडलेल्या बटाट्याची लालेलाल रस्सा असलेली भाजी (भूक लागली राव!), इत्यादी स्वर्गीय पदार्थ काटा-चमच्याने कसे बरे खायचे? आणि तसा प्रयत्न करणे देखील अपमान आहे; त्या पदार्थांचा! रात्री १२ वाजताची वेळ आहे; पिक्चरचा शेवटचा खेळ झाल्यानंतर मित्रांचे टोळके घरी जायला निघाले आहे. थंडी कपड्यांमधून शिरून बोचते आहे. 'मैं खिलाडी तू अनाडी' बघून लक्ष्मीनारायण टॉकीजवरून दोन-तीन दुचाक्यांवर स्वार होऊन तुम्ही रस्त्यावर घरंगळत जात आहात. "च्यायला, भूक लागली राव!" असं कुणीतरी कोकलतं. मग तुम्ही गाड्या स्वारगेट बसस्थानकाजवळ हळू करता. बाहेरच्या गाड्या तुम्हाला प्रेमळ साद घालतात. गरमागरम भुर्जी, भाजलेला पाव कळकट ताटल्यांमध्ये घेऊन तुम्ही चापायला सुरुवात करता. भूक शमेपर्यंत पावाचा रतीब सुरु असतो. लागल्यास अजून एक डबल भूर्जी मागवता. जठराग्नी शांत झाल्यावर गाड्यांवर निवांत बसून चहाचे घोट घेत घेत बिड्यांचा धूर सोडत गप्पा ठोकत बसता. बाकीचं जाऊ द्या पण हा भुर्जी-पाव काटा-चमच्याने खाणार कसा? तो गाडीवाला गाडी तशीच सोडून पळून जाईल. :-) बाकीच्या मुद्द्यांशी लई वेळा सहमत.

नानबा Tue, 04/29/2014 - 16:36
इकडे सिडनीत चायनिज मैत्रिणीसोबत हाटेलात गेलो, तर वेटरने ऑक्टोपस सलाड आणि नूडल्सच्या बाऊल्स सोबत त्या खायला लाकडी कांडक्या (चॉपस्टीक का कसलीशी अवदसा) आणून ठेवल्या. आमची परिस्थिती छोटी सी बात मधल्या चायनिज हाटेलात गेलेल्या असरानीसारखी. :))

In reply to by सूड

शुचि Tue, 04/29/2014 - 16:50
हाहाहा असा वाक्य दोहरायला (मराठी शब्द?) लावणारा खवचट प्रश्न विचारणे हा सूड मोडच झाला आहे. मी पहिल्यांदा लंबूटांग यांच्या प्रतिसादानंतर पाहिला व आता परत :)

सिफ़र Tue, 04/29/2014 - 17:25
(२२) एकाच खानावळीत/रेस्तोरन्त मध्ये गेली १० वर्षे आपण कसा एकच पदार्थ मागवतोय याच्या कहाण्या जो तुम्हाला ऐकवतो.
यावरून तर पोरगा पोरीशी एकनिष्ठता पाळू शकतो असंच वाटत... १० वर्षे बिच्यार्याची खायची सुद्धा टेस्ट बदलत नाही तर बाकी तर सोडाच ;)

माझ्या मते काही पदार्थ हे हाताने खाण्याचे असतात तर काही काटा चमच्याने चपखल उदाहरण द्यायचे तर मेकडोनाल्ड चे बर्गर व के एफ सी चे चिकन हे जगाच्या पाठीवर कोठेही हाताने खातात मात्र जगाच्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात बर्गर हा सर्व करतांना काटा चमचा देतात .आणि त्याने खातांना मी माणसे पहिली आहेत. परदेशात भारतीय उपहार गृहात गोरेच काय पण भारतीय सुद्धा भात व बिर्याणी चमच्याने खातात. मला आमच्या घरी चमच्यानेच खावा लागतो. पण हा अपवाद वगळता , डोसे , ते नान हे हाताने खातात. आम्हाला हॉटेल व्यवस्थापनाच्या पहिल्या वर्षाला टेबेल मेनेर्स शिकवत असतांना एका चुकार मुलाचे लक्ष नव्हते ते पाहून आमचे सर त्याला सणसणीत पारशी शिवी हासडून म्हणाले ,ह्या कोर्स मध्ये शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी ना कधी तरी उपयोगी पडणार ,

(४) जो काटाचमचा-चमचा न वापरता हाताने अन्न ओरपतो.
=)) च्यायला, डेट गेली खड्ड्यात, काही पदार्थ असे असतात जे हातानीचं ओरपावे असे असतात. डेट भारतात चालुये असं गृहित धरु, मिसळीमधे पाव सुरीनी कापुन नंतर काट्यानी उचलुन खाणं डोळ्यासमोर पण आणवत नाहीये. उद्या टेबल मॅनर्स च्या नावाखाली पुरणपोळी काट्यानी तोडुन मग दुधात किंवा तुपात बुडवुन खायला लागली तर पुरणपोळी खाणं सोडुन द्यायची वेळ येईल. :). (मसाला डोसा काट्या-चमच्यानी खाता नं येणारा) अनिरुद्ध

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:33
मी पण ते वाचून दचकलोच पण.... अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. :) डोसा नाही खाता येत काही हरकत नाही, वडा सांबार मागवा. बाकी पहिल्या डेटला डोसा आणि वडासांबार हेच चित्र डोळ्यसमोर विनोदी म्हणून येतेय ;) यावरून आठवले - मी माझ्या बायकोबरोबर लग्नाआधी जेव्हा गर्लफ्रेंड म्हणून डेटींग करायला सुरुवात केली होती तेव्हा ती मला सांगते की तीच तेव्हा जास्त कॉशिअस असायाची, काय खायचे कसे खायचे, इम्प्रेशन चुकीचे नाही पडणार ना वगैरे वगैरे.. खरे तर ती माझ्यापेक्षा जास्त टेबल मॅनर्स जाणून आहे आणि माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. पण बहुधा त्यामुळेच मी देखील तसा विचार करत असेल या विचाराने ती काळजी घ्यायची आणि मी मस्त खुलेपणाने वागायचो.

In reply to by तुमचा अभिषेक

अहो उदाहरण दिलं हो. टेबल मॅनर्स अगदी झक्कासपणे पाळता येतात. फॉर्मल लंच किंवा डिनर ला पाळावेत. पण जे पदार्थ हातानी खायचे आहेत त्याला उगाच चमचा कशाला लावायचा? डेटला नाही हो वडा किंवा डोसा =)). बा.द.वे. काँशिअस झालं की जास्त चुका होतात =))

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि Sun, 04/27/2014 - 14:47
अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. Smile
खरे आहे, पहिल्या डेटला, काटेरी आख्खा मासा, भरलेले खेकडे किंवा खेकड्याचा रस्सा (भारतात) अन पोर्क रिब्ज rack (परदेशात) मागवू नये अन मागवलेच तर हाताने खायला लाजू नये.

चौथा कोनाडा Sun, 04/27/2014 - 09:45
पुस्तका बद्दल छान माहिती. चेकलिस्ट मनोरंजक आहे. या बाबतीत आपणा सर्वांचा अनुभव पाहता हा धागा लढाईचा आखाडा बनायला फुल्ल स्कोप आहे !

In reply to by चौथा कोनाडा

एसमाळी Sun, 04/27/2014 - 11:23
smart भारतीय मुली पहिल्या डिनरडेटला काय चेकलिस्ट बघत असतिल हे कुणी सांगेल का ? पहिल्या डिनरडेटला मी तर हातानेंच curd rice ओरपला होता.

जेनी... Sun, 04/27/2014 - 10:06
सहिय ..... पण डेटिंग साठी येणारा पूरुष स्त्री वर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतो ... हे वरचे पॉईंट्स जरा विचित्रच आहेत ... म्हणजे असं वागताना पाहिलहि नाहि न ऐकलहि नाहि .. एनिवेज .... माझी पहिली वहिली डीनर्डेट चा किस्सा सांगायला आवडेल ... कुणाला ऐकायला आवडनार असेल तर ;)

In reply to by जेनी...

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:37
सांगा की, मी सुद्धा माझ्या एका ऑर्कुट डेटचा किस्सा लिहिलेला तो आठवला.. त्याची लिंक हि.. माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 12:22
आयला! हे पुस्तक वाचून जी कोण डिनरडेटचे निष्कर्ष काढत बसेल ती बहुतेक आयुक्षभर डिनरडेट्सच करत बसेलसं दिसतंय. मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच. मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच. थोडक्यात, इथून पुढे (जर कधी संधी..हे आपलं.. वेळ आलीच तर!) डिनरडेटला जाण्यापुर्वी जिच्यासोबत डेट आहे तीने हे पुस्तक वाचलेलं नाही ह्याची खातरजमा केल्याशिवाय हाटेलात पाय टाकणे नाही! हौ ना राव. सगळं व्यवस्थित करुन सवरुन फुकट इज्जतीचा पंचनामा करुन घ्यायला कुणी सांगितलंय? म्हणजे, तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! ;)

In reply to by धमाल मुलगा

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:57
मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच. मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच. वरवर कन्फ्यूजिंग वाटत असले तरी सोप्पय ते. पहिले म्हणजे शक्यतो संभाषणाचे वेटेज ५०-५० टक्के वा त्याच्या जवळपास हवे. एकच जण बोलतोय आणि एका काहीच नाही असे टाळावे. समोरच्या मुलीलाही बोलायची आवड असेल आणि तिला बोलायला नाही दिले तर तिची प्रचंड चीडचीड होणारच. त्यामुळे बोलायलाही द्यावे आणि काय बोलतेय ते ईंटरेस्ट घेऊन ऐकावेही, हे महत्वाचे अन्यथा इकडे तिकडे लक्ष दिल्यास तिच्या मनात समोरच्या टेबलावरचा ग्लास उचलून तुमच्या डोक्यात मारावा असे विचार येण्याची संभावना असते. जर तिला ऐकण्यातच रस जास्त असेल तर मात्र तिला ऐकण्यात ईंटरेस्ट आहे अश्याच विषयांवर बोलावे. पण आपल्याला जे बोलता येते आणि जे विषय आवडतात त्यात त्या मुलीला ईंटरेस्ट नसेल तर तिने आपल्याला बाद करायच्या आधी आपणच तिला बाद करावे. पहिल्याच भेटीत उगाचच्या उगाच स्वताचेच पुराण लावणे टाळावे. कोणीही बोर होणारच. हे दुसर्‍या तिसर्‍या चौथ्या भेटींसाठी ठेवावे. पण जर ती मुलगी आधीच आपल्या प्रेमात असेल तर मात्र तिला हे आवडू शकते. तळटीप - लग्नासाठीच डेटींग असेल तर स्वता जसे आहोत तसेच वागणे कधीही चांगले. पण एखाद्या मुलीला भेटताना आपल्याला काही गोष्टींचे तारतम्य बाळगता येत नसेल तर ती नक्कीच सुधारणेची जागा आहे. हि एकमेकांशी बोलण्याची ट्यूनिंग जमली की खरे तर इतर बर्‍याच गोष्टी गौण असतात. आमचे स्वताचेही इतर सर्व गोष्टी एकमेकांशी जराही मिळत्याजुळत्या नसून या एका मुद्द्यावर जुळले आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:30
आहोऽऽऽ....तो माझा एक इनोद करण्याचा केविलवाणा (आणि आता बहुधा निष्फळ) प्रयत्न होता हो! इतक्या होपलेसली रोम्यांटिक बाबी इतक्या शिरेसली घेऊ नका जी. त्यात आणि मी बोलत असेल तर बिलकुलच नको. :)

In reply to by धमाल मुलगा

शुचि Sun, 04/27/2014 - 15:23
तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! Wink
वाट्टेल त्या अतिरेकी म्हणी बनवू नकोस =))

In reply to by प्रसाद गोडबोले

शुचि Sun, 04/27/2014 - 14:58
पाश्चात्यांत हाताने खाण्याकडे विशेषता: चारचौघात (fOrmal भेटीत ) खरच गर्हणीय मानले जात असावे . माझ्या मुलीच्या मैत्रिणीचे आई (Indonesian) अन वडील (कॉकेशिअन) आले असताना मी चुकून मटन तसे(हाताने ) खाल्ले होते कारण फार मोठे तुकडे असलेले मटन त्या दिवशी केले होते :( पण त्या लोकांना जेवण तर निट गेलेच नाही परत नंतर त्यांनी आमच्याबरोबर्चे संबंध अत्यल्प करून टाकल्याचे स्मरते. :( :( तेव्हापासून मी धडा घेतला आहे.

In reply to by शुचि

मग त्यांना घरी बोलवुन एकदा वरणभात आणि आळुची भाजी असा बेत करायला हवा होता ... अशी अळुची भाजी ओरपुन खाताना पाहुन ते चक्कर येवुनच पडले असते =)) बाकी माज्या मते तर आपण जिथल्या तिथल्या प्रथा पाळाव्यात ... मला तर चायनिज चॉप्स्टिक्सनेही अगदी व्यवस्थित जेवता येत पण ते केवळ चायनिज (चायनिज चायनिज : ऑथेन्टीक चायनिज) रेस्टरों मध्येच ! आणि आजही उत्तपम काटाचमचाने खाणार्‍यांची कीवच वाटते मला :)

पैसा Sun, 04/27/2014 - 15:09
म्हणजे डिनरडेटला सगळे सैधिंडियन्स पार नापास होणार की! ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!

In reply to by पैसा

शुचि Sun, 04/27/2014 - 15:26
कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!
हाहाहा लई म्हंजी लई खरं आहे!!! Traumaa होउन बसायचा त्याना ;)

In reply to by पैसा

विजुभाऊ Mon, 04/28/2014 - 01:36
ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार या पेक्षा कहर म्हणजे. भाताचे गोळे आणि दोन बोटांधून पिचकारीप्रमाणे पाझरणारे सांबार

रेवती Sun, 04/27/2014 - 18:36
भारतीय रेस्तरांत मी भाजी पोळी हाताने खात असताना शेजारच्या टेबलावरील हामेरिकन कुटुंब डोळ्याच्या कोपर्‍यातून बघत होते. त्यांनी प्रयत्न केला पण जमले नाही. मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली. शाकाहारी असल्याने नॉनव्हेजीय पदार्थांशी कुस्ती खेळत खाण्याचा प्रसंग माझ्यावर आला नाही पण दोसा मऊ असल्यास काटा सुरीने जास्त चाम्गल्या पद्धतीने खाता येतो असे मत बनले आहे. तसाही पपडासारखा दोसा खाउन समाधानही होत नाही. शुचीमामी, वरील सर्व यमनियम वाचून भूक जाईल एखाद्याची, किंवा यासगळ्यात जेवायचे कधी? असा प्रश्न पडेल. बिले देण्यास मी मागेपुढे पहात नाही. नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. ;) पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल. ;)

In reply to by रेवती

>>> नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. >>>> रेवती....डिट्टो...!!! *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol

In reply to by रेवती

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:37
काकांच्या नशिबाचं नेहमीचं कौतुक वाटत आलं आहे, आज मात्र हे वाचून आनंदानं डोळेच पाणावले. :) काकू तुस्सी ग्रेट हो! भार्रऽत माताऽऽ की ज्जय!!!!

In reply to by रेवती

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 20:38
मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली. सेम असाच अनुभव आपल्याइथे वाशीच्या मॉलमध्ये घेतलाय. एक आफ्रिकन कपल भगत ताराचंदची वेज थाळी घेऊन आता ती कशी खायची या विचारात होते. पाहिले तर त्यातील हिरो असाच चपातीचा रोल करून डाळीत डुबुक डुबूक करून खाऊ लागला, आणि भाजी राहिली बाजूलाच. एक तर त्याला तसे डाळचपाती खाण्यात मजाही येत नसणार आणि चपातीबरोबरच डाळ संपवली तर भाताबरोबर हा भाजी खाणार की त्यात ताक ओतणार. पण जे काही करेल त्यानंतर परत आपल्या देशात जाऊन भारतीत फूड ला नावे मात्र नक्की ठेवणार हे दिसून आल्याने मी देश के इज्जत क सवाल है बोलत लागलीच त्याच्या मदतीला धावलो. सुदैवाने आम्हीही तशीच एक वेज थाली मागवली असल्याने त्याला समजावणे सोपे पडले. बरेपैकी जमले त्यांना !

In reply to by रेवती

स्पंदना Mon, 04/28/2014 - 07:32
भर हो भर!! अशी हजारो बिलं भरत जा गो रेवक्का!! :)) :)) पाहिलतं? पाहिलतं? आमच्या रेवाक्काच मन किती मोठठ आहे ते? :))

In reply to by रेवती

शुचि Mon, 04/28/2014 - 19:21
पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल.
रेवती, खालती सुहास यांच्या प्रतिसादास , उप-प्रतिसादात आमचे कसे जम्ले ते लिहीले आहे. इच्छा असल्यास तुझे अनुभव शेअर कर :) .... मजा येते गं अन माहीते सगळ्यांच्या शेअरींगमधून एक सम्यक अनुभव मिळतो.

In reply to by शुचि

रेवती Mon, 04/28/2014 - 19:34
होय, तुझा वाचला अनुभव. चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत! ;) आमचे लग्न ५ मिनिटात ठरल्याने (व पुरती ओळख होण्याच्या आत झाल्याने)अनुभव असे काहीच नाहीत. लग्नाआधी एकदा बाहेर जेवायला गेल्यावर जेवताना गप्पा मारून विषय संपले मग बील येईपर्यंत बोलायला काही उरले नसल्याने गप्प बसून होतो दोघेही. फारशी ओळख नसल्याने काय बोलायचे हा प्रश्न! बील नवर्‍यानेच दिले व भाजीपोळी टाईप जेवण होते त्यामुळे खमंग किस्से नाहीत. एकंदरीतच माझे लग्न इतक्या नेहमीच्या आणि साध्या पद्धतीने ठरले की "अय्या, असं झालं का? " टाईप किस्से नाहीत. शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले. विश्वनाथन आनंदशिवाय विषय नसतो. सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.

In reply to by रेवती

शुचि Mon, 04/28/2014 - 21:47
चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत!
दुसरी भेट होती कारण पहीली सासू-सासरे व आई-बाबा अन मॅरेज ब्युरोतील एका व्यक्तीच्या समक्षच झाले. त्याचे पहीले वाक्य होते "त्याला म्युझिकचे व्यसन आहे" अन लगोलग माझे वाक्य होते "आणखी कोणती व्यसने आहेत आपल्याला?" त्यावर तो खूप हसला होता :) ..... वन ऑफ सम रियली फॉन्ड मेमरीज ऑफ दोस डेज!!! :)
शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले.सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.
हाहाहा

बाप रे........!!!

डेटींग हे प्रकरण असलं भयंकर असतं होय! http://www.sherv.net/cm/emo/hearts/sick.gif आमस्नी तर ह्ये सम्दं मुळ्ळीच खरं वाटत नाय. तिच्यायला,आम्च्या घाटावर..खेड्यापाड्यात सुदीक..पोरं पोरी कालिजात वळख होऊन..कुटतरी चिचच्या झाडाखाली,न्हायतर ओढ्याकाठी..येकदम्म पिरेमाच्या फुल्ल करंटमदी येऊन..कुनी हाकायला येत न्हाई..तो परेंत गुलुगुलु..गुलूगुलू करत्यात.. त्ये ह्या डेटिंग का फेटींग परास लै फर्मास!!! http://www.sherv.net/cm/emo/hug/cute-hug.gif आनी माणशिक आरोग्यास अत्यंण्त लाबदायक! http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif
काय म्हण्न्ता???

In reply to by शुचि

आत्मशून्य Mon, 04/28/2014 - 02:11
जोडिदाराला फरक पडत नसावा. आपण डेलिक्सि व जोडिदाराचा सेल्फ रिस्पेक्ट किती जपतो आणी काय धमाल करतो इतकेच महत्वाचे आहे. छोटसेे उदाहरण देतो, एकी सोबत Sndt रोड वर फिरत होतो, नुकतच स्वाद मधून बाहेर आलो होतो, तोच खिशात एक्लेअर्स सापडले, लगेच तोंडात टाकले व रेपर रस्त्यावर सोडुन दिले. लगेच मंजूळ आवाज कानी... असा रस्त्यावर कचरा कसा टाकतोस ? मी लगेच ते वेष्टन उचलून खिशात कोम्ब्ले. पुन्हा मंजूळ आवाज GOOD BOY. मी सांगितले म्हणून एकाही मुलाने आज पर्यंत लगेच असे काही परत उचलले नाहिये. तु GOOD BOY आहेस. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती स्त्रीमन दुखावु नये म्हणून केलेली. पण अर्थात व्यक्ती परत्वे हे आपोआप करावेसे वाट्ने सुधा महत्वाचे असते. उगा बिल बघून चेहरा कसा केला, काटा चमचा वापरला की नाही यागोष्टी वरील चेमिस्त्री साध्य झाल्यास गउन ठरतात.

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2014 - 01:44
बापरे! हल्ली असे 'नियमानुसार' प्रेम करावे लागते? बरं झालं आमच्या काळी हे कांही नव्हतं. बटाटेवडा (हो 'टे' वडा), वडा पाव, मिसळ पाव, व्हेज सँडविच, कांदा-बटाटा-मिरची भजी, चहा-पाव वगैरे वगैरेंवर आमचं प्रेम जोपासलं, फोफावलं आणि लग्नाच्या जाळ्यात जाऊन अडकलं ते आजतागायत. आजही बरेचसे पदार्थ हाताने आणि पाण्याचं भांडं तोंडाला लावून पिण्यातच सुख मानतो. अगदी गोर्‍यांच्या देशात जाऊनही. आपल्या भारतात येऊन्/राहूनही ते हाताने जेवायला शिकले नाहीत तर त्यांचेच स्वदेश प्रेम लक्षात ठेवून मी ही कधी माझ्या देशाच्या चालीरिती, निदान त्यांना रिझवायला तरी, सोडल्या नाहीत.

राजेश घासकडवी Mon, 04/28/2014 - 08:23
च्यायला, - दहा नियम बिलाविषयी आहेत. -पाच नियम गप्पा मारण्याविषयी आहेत. निष्कर्ष - स्मार्ट विमेनांना हा माणूस आपल्याशी बोलतो कसा यापेक्षा दुप्पट हा बिल कसा देतो याविषयी पडलेली असते.

बाबा पाटील Mon, 04/28/2014 - 13:02
आपल्याला बापजन्मी जमणार नाही.जेंव्हा कधी कुठल्या ललनेबरोबर मोठ्या हाटीलात हादडायचा टाइम आला तेंव्हा तेंव्हा तिला अगोदर टपरीवरचा चहा पाजला होता,त्यामूळे असला काय शानपणाचा विषय कोनी केलाच नाय.आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.

In reply to by बाबा पाटील

शुचि Mon, 04/28/2014 - 19:01
आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.
हाहाहा :)

सुहास.. Mon, 04/28/2014 - 13:29
डिनरडेट चा अनुभव नाsssssssssssssssé ही ... बाकी शुचिमामींचा काही अनुभव असल्यास आम्हाला वाचायला काही हरकत नाही ..धन्यवाद !!

In reply to by सुहास..

शुचि Mon, 04/28/2014 - 19:06
हाहाहा फार काही अनुभव नाही. माझ्या बी एस सी नंतर, नवरा मुंबईहून मला पहायला पुण्यात आलेला तेव्हा मी भला मोठा गॉगल लावून लुनावरुन आलेले. अजूनही नवरा म्हणतो अगं केवढा मोठा तो गॉगल, संपूर्ण चेहराभरच की. (अन तेव्हा मी समजत होते गॉगलमध्ये मी स्मार्ट दिसते आहे ;) )आम्ही फर्ग्युसन टेकडीवर गेलो, गप्पा मारल्या अन मग फर्ग्युसनच्या समोर तेव्हा व्हेन्कीज होते तिथे आईस्क्रीम सोडा अन चिकन नगेट्स मागवले होते. गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. सोडा अफलातून होता. मला तो आवडलेला. माझा होकार होता पण याने १ वर्ष घेतलं होकार कळवायला. तोपर्यंत मी आय आय टी मध्ये अ‍ॅड्मिशन घेतली होती पण त्याला विसरले नव्हतेच नव्हते.

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 06:53
Friendships of women have usually been not merely unsung , but mocked, belittled and falsely interpreted.
दाट संशय येतोय हे सहितले वाक्य याच What Smart Women Know पुस्तकातील असावे.

कवितानागेश Tue, 04/29/2014 - 12:34
गमतीदार प्रकार आहेत. यातला १४वा प्रकार मी आणि माझा नवरा दोघे रेग्युलरली करतो. १०वा प्रकार मीच कधीतरी करते आणि २४वा प्रकार नवरा कायम करतो. :)

सूड Tue, 04/29/2014 - 15:35
खाण्याचं राहू देत हो...पहिल्या भेटीत मी मुलीच्या मराठी व्याकरण, उच्चारांच्या चुका काढेन की काय याची भीती वाटते आताशा. माझं नावंच ही चूक काढायला पहिलं कारण ठरु नये ही ईश्वरचरणी प्रार्थना!! ;)

समीरसूर Tue, 04/29/2014 - 15:45
यातलं बहुधा मी काहीच करणार नाही पण सणसणीत अपवाद क्र. ४! काही पदार्थ हातानेच खायला मजा येते. इन फॅक्ट, आपले जेवण काटा-चमच्याने कसे जेवावे? डाळगंडोरी, भरीत, भाकरी, शेवभाजी, सावजी चिकन, उकडलेल्या बटाट्याची लालेलाल रस्सा असलेली भाजी (भूक लागली राव!), इत्यादी स्वर्गीय पदार्थ काटा-चमच्याने कसे बरे खायचे? आणि तसा प्रयत्न करणे देखील अपमान आहे; त्या पदार्थांचा! रात्री १२ वाजताची वेळ आहे; पिक्चरचा शेवटचा खेळ झाल्यानंतर मित्रांचे टोळके घरी जायला निघाले आहे. थंडी कपड्यांमधून शिरून बोचते आहे. 'मैं खिलाडी तू अनाडी' बघून लक्ष्मीनारायण टॉकीजवरून दोन-तीन दुचाक्यांवर स्वार होऊन तुम्ही रस्त्यावर घरंगळत जात आहात. "च्यायला, भूक लागली राव!" असं कुणीतरी कोकलतं. मग तुम्ही गाड्या स्वारगेट बसस्थानकाजवळ हळू करता. बाहेरच्या गाड्या तुम्हाला प्रेमळ साद घालतात. गरमागरम भुर्जी, भाजलेला पाव कळकट ताटल्यांमध्ये घेऊन तुम्ही चापायला सुरुवात करता. भूक शमेपर्यंत पावाचा रतीब सुरु असतो. लागल्यास अजून एक डबल भूर्जी मागवता. जठराग्नी शांत झाल्यावर गाड्यांवर निवांत बसून चहाचे घोट घेत घेत बिड्यांचा धूर सोडत गप्पा ठोकत बसता. बाकीचं जाऊ द्या पण हा भुर्जी-पाव काटा-चमच्याने खाणार कसा? तो गाडीवाला गाडी तशीच सोडून पळून जाईल. :-) बाकीच्या मुद्द्यांशी लई वेळा सहमत.

नानबा Tue, 04/29/2014 - 16:36
इकडे सिडनीत चायनिज मैत्रिणीसोबत हाटेलात गेलो, तर वेटरने ऑक्टोपस सलाड आणि नूडल्सच्या बाऊल्स सोबत त्या खायला लाकडी कांडक्या (चॉपस्टीक का कसलीशी अवदसा) आणून ठेवल्या. आमची परिस्थिती छोटी सी बात मधल्या चायनिज हाटेलात गेलेल्या असरानीसारखी. :))

In reply to by सूड

शुचि Tue, 04/29/2014 - 16:50
हाहाहा असा वाक्य दोहरायला (मराठी शब्द?) लावणारा खवचट प्रश्न विचारणे हा सूड मोडच झाला आहे. मी पहिल्यांदा लंबूटांग यांच्या प्रतिसादानंतर पाहिला व आता परत :)

सिफ़र Tue, 04/29/2014 - 17:25
(२२) एकाच खानावळीत/रेस्तोरन्त मध्ये गेली १० वर्षे आपण कसा एकच पदार्थ मागवतोय याच्या कहाण्या जो तुम्हाला ऐकवतो.
यावरून तर पोरगा पोरीशी एकनिष्ठता पाळू शकतो असंच वाटत... १० वर्षे बिच्यार्याची खायची सुद्धा टेस्ट बदलत नाही तर बाकी तर सोडाच ;)

माझ्या मते काही पदार्थ हे हाताने खाण्याचे असतात तर काही काटा चमच्याने चपखल उदाहरण द्यायचे तर मेकडोनाल्ड चे बर्गर व के एफ सी चे चिकन हे जगाच्या पाठीवर कोठेही हाताने खातात मात्र जगाच्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात बर्गर हा सर्व करतांना काटा चमचा देतात .आणि त्याने खातांना मी माणसे पहिली आहेत. परदेशात भारतीय उपहार गृहात गोरेच काय पण भारतीय सुद्धा भात व बिर्याणी चमच्याने खातात. मला आमच्या घरी चमच्यानेच खावा लागतो. पण हा अपवाद वगळता , डोसे , ते नान हे हाताने खातात. आम्हाला हॉटेल व्यवस्थापनाच्या पहिल्या वर्षाला टेबेल मेनेर्स शिकवत असतांना एका चुकार मुलाचे लक्ष नव्हते ते पाहून आमचे सर त्याला सणसणीत पारशी शिवी हासडून म्हणाले ,ह्या कोर्स मध्ये शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी ना कधी तरी उपयोगी पडणार ,
लेखनप्रकार
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.