मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा.

माहितगार ·
लेखनप्रकार
जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.

नॉस्टॅल्जिआ

ऋषिकेश ·

शुचि 24/04/2014 - 15:06
पहिल्यांदा ती समोरच्या खिडकीत येत असे -(१) मग ती चहा बनवून देउ लागली - (२) मग ती परत का गेली? - (३) . . . ओह ओके ओके ती स्वर्गवासी झाली ? :( WOW!!! A different poem!!! Very touching!

समीरसूर 24/04/2014 - 15:49
कविता छान आहे. आपले लाडके गायक मोहम्मद अझीझ यांचं एक गाणं होतं. आजकल याद कुछ और रहता नही, एक बस आपकी याद आने के बाद याद आने से पहले चले आईये, और फिर जाईये याद जाने के बाद... आनंद बक्षींचा हा शाब्दिक झोल बहुधा 'नगीना' मधला होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं. ऐकायला भारी आवडायचं. ही कविता वाचून या गाण्याची आठवण झाली. :-)

In reply to by समीरसूर

खेडूत 25/04/2014 - 01:12
>> और फिर जाईये याद जाने के बाद.. हे डायरेक्ट ''जान जाने के बाद'' होतं! पण त्या काळी आम्हाला चांद जाने के बाद- मंजे सकाळी! असं ऐकू यायचं :) तो मो अझीझ काय गाणं बोल्तो कळायचं नाय!

In reply to by खेडूत

समीरसूर 02/05/2014 - 11:52
बरोबर आहे; माझी चूक झाली. ते 'जान' आहे. बाकी मो. अझीझ आणि शब्बीर कुमार हे दोन गायकरत्न हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले स्वप्नं आहेत. :-)

आयुर्हित 25/04/2014 - 00:08
आज मी नॉस्टॅल्जिक होणार नाही असे ठरवले. म्हटले चला नेहमीप्रमाणे, ग्यालरीपर्यंत स्केटिंग करत येवून, तिथे ठेवलेला, एक आर्ट पेपर पेन पेन्सिल क्रेयोंसचा ढीग समोर टाकत, वाफाळत्या बोर्नविटा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा ओरिओ सारखे चाखत, कोवळ्या सूर्यकिरणांना पाठीवर घेत, आतून येणार्‍या मॅगीच्या वासाकडे लक्ष देत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर चिमण्या, खारुताई आणि त्या भारद्वाज पक्ष्यावर मान उंचावून बघत, चेहर्‍यावर येणारी वाफ फुंकून उडवत, स्वतःच सांडलेल्या बोर्नविटाचा, चटका बसता बसता वाचलेल्या, पहिला घोट घेणारा बंकूकडे पाहून मला लहानपणाचा विजयनाथच आठवला आणि नेहमीप्रमाणे नॉस्टॅल्जिक झालो! -भूतनाथ उर्फ कैलाशनाथ

शुचि 24/04/2014 - 15:06
पहिल्यांदा ती समोरच्या खिडकीत येत असे -(१) मग ती चहा बनवून देउ लागली - (२) मग ती परत का गेली? - (३) . . . ओह ओके ओके ती स्वर्गवासी झाली ? :( WOW!!! A different poem!!! Very touching!

समीरसूर 24/04/2014 - 15:49
कविता छान आहे. आपले लाडके गायक मोहम्मद अझीझ यांचं एक गाणं होतं. आजकल याद कुछ और रहता नही, एक बस आपकी याद आने के बाद याद आने से पहले चले आईये, और फिर जाईये याद जाने के बाद... आनंद बक्षींचा हा शाब्दिक झोल बहुधा 'नगीना' मधला होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं. ऐकायला भारी आवडायचं. ही कविता वाचून या गाण्याची आठवण झाली. :-)

In reply to by समीरसूर

खेडूत 25/04/2014 - 01:12
>> और फिर जाईये याद जाने के बाद.. हे डायरेक्ट ''जान जाने के बाद'' होतं! पण त्या काळी आम्हाला चांद जाने के बाद- मंजे सकाळी! असं ऐकू यायचं :) तो मो अझीझ काय गाणं बोल्तो कळायचं नाय!

In reply to by खेडूत

समीरसूर 02/05/2014 - 11:52
बरोबर आहे; माझी चूक झाली. ते 'जान' आहे. बाकी मो. अझीझ आणि शब्बीर कुमार हे दोन गायकरत्न हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले स्वप्नं आहेत. :-)

आयुर्हित 25/04/2014 - 00:08
आज मी नॉस्टॅल्जिक होणार नाही असे ठरवले. म्हटले चला नेहमीप्रमाणे, ग्यालरीपर्यंत स्केटिंग करत येवून, तिथे ठेवलेला, एक आर्ट पेपर पेन पेन्सिल क्रेयोंसचा ढीग समोर टाकत, वाफाळत्या बोर्नविटा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा ओरिओ सारखे चाखत, कोवळ्या सूर्यकिरणांना पाठीवर घेत, आतून येणार्‍या मॅगीच्या वासाकडे लक्ष देत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर चिमण्या, खारुताई आणि त्या भारद्वाज पक्ष्यावर मान उंचावून बघत, चेहर्‍यावर येणारी वाफ फुंकून उडवत, स्वतःच सांडलेल्या बोर्नविटाचा, चटका बसता बसता वाचलेल्या, पहिला घोट घेणारा बंकूकडे पाहून मला लहानपणाचा विजयनाथच आठवला आणि नेहमीप्रमाणे नॉस्टॅल्जिक झालो! -भूतनाथ उर्फ कैलाशनाथ
लेखनविषय:
आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले. म्हटले चला जरा पूर्वीसारखा ग्यालरीत पाय पसरून, कोरा करकरीत, घडी न मोडलेला, खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन, वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत, कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत, आतून येणार्‍या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर -नी त्याच्याच मागील खिडकीवरही- एक डोळा ठेवून, चेहर्‍यावर येणारी चहाची वाफ हुंगत, ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा, पहिला घोट घेऊन पाहू. पण छे!

(केजरीवाल जगातील प्रभावी व्यक्तीमत्व ठरल्याने...)

विकास ·

आत्मशून्य 24/04/2014 - 05:55
उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण) Person of the year झाले होते, त्यामुळे असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर नको!
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

In reply to by आत्मशून्य

विकास 24/04/2014 - 06:39
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. केजरीराज्यात पाणी फुकट असल्यामुळे असेल. ;)

In reply to by विकास

गणपा 24/04/2014 - 21:19
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.
थोडी दुरुस्ती करुन असे म्हणतो एक अनिवाशी भारतीय दुसऱ्या निवाशी भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. ए भाग्गो.....

पैसा 24/04/2014 - 09:43
तियानमेन चौकात जावे हे लै आवडले. याच धर्तीवर आणखी काही अपेक्षा आहेत. १. पाकिस्तानात जाऊन दाऊद इब्राहिमजी यांची भेट घ्यावी आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानातल्या तालिबान्याना शांतीचा संदेश द्यावा. (म्हणजे त्याना शांतता पाळायला लावावी.) २. नायजेरियावर दबाव आणून नायजेरियन्संनी अवैधरीत्या गोव्यात राहून ड्रज्ग व्यापार करणे थांबवावे ३. इस्लामी देशांत महिलांची गळचेपी थांबवण्याचे प्रयत्न करावेत. भारतातल्या मुस्लिम महिलांना निदान उन्हाळ्यात बुरखे वापरायची सक्ती करू नये अशी मागणी उलैमांकडे करावी. आणखीन खूप अपेक्षा आहेत. पण सध्या त्यातल्या त्यात सोपी कामे पुढे ठेवली आहेत. ती झाली की मग पुढची यादी देण्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

गब्रिएल 25/04/2014 - 10:09
वा वा. १४०० वर्सापूर्वीपन कोनीतरी आसच क्येलं व्हतं; त्येचाच आवतार म्हनावा का काय हा ? "मी" सोडून जगात कोनीबी अक्कलवान न्हाय आसा आग्रेपाहायेच म्ह्ना आपला. येकदम जंक्शन. होउन जावंद्या. नायतर लय बकाल झालिया जग. होउन जाउद्या इस्कोट. अवतार बाबाकी जय !

आनन्दा 24/04/2014 - 09:44
बाकी ही यादी कशी बनवतात, त्यात कोणाकोणाचे योगदान असते, यावर पण जरा प्रकाश टाका ना भौ.. आणि "दरवर्षी ही यादी याच वेळेस प्रकाशित होते की यावेळेस अंमळ लवकरच प्रकाशित झालेय" असा नसता प्रश्न उगीच डोक्यात येउन गेला.

In reply to by आनन्दा

आनन्दा 24/04/2014 - 09:50
आणि, पहिले दोनही नेते भारतातले? भारत सोडून जगात नेते उरलेच नाहीत की काय? काय हे? आता जगाचे कसे होणार? थोडक्यात, ही यादी म्हणजे मला केजरी आणि मोदी समर्थकांचे युद्ध वाटते, ज्यात केजरीसमर्थक जिंकलेत.

In reply to by आनन्दा

विकास 24/04/2014 - 09:53
बातमी एप्रिल १० ची नसावी. त्या दिवशी ऑनलाईन पोल चालू झाले असावे. २३ एप्रिल (काल) पोल बंद झाले आणि निकाल जाहीर झाले. आज टाईममधे त्यासंदर्भात व्यवस्थित वृत्त येईल. राहूल गांधींचे नाव नसल्यास ते निवृत्त समजावेत. ;) मला वाटते जगभरच्या बातम्यांच्या ट्रेंडवरून ही यादी तयार केली जात असावी असे वाटते. नक्की माहीत नाही.

In reply to by विकास

पैसा 24/04/2014 - 09:58
तिथल्या प्रतिक्रिया वाचल्या. लोकांनी व्होटिंग केलंय आणि काहीतरी वेटेज फॅक्टर लावला आहे. नेमकी पद्धत काय बघावं लागेल. त्यातल्या सुरुवातीच्या काही प्रतिक्रियांवरून बॉट्सनी मतदान केल्याचे निष्कर्ष लोकांनी काढले आहेत. ३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!

In reply to by पैसा

माहितगार 24/04/2014 - 10:41
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!
सहमत

In reply to by माहितगार

आनन्दा 24/04/2014 - 13:15
अजून एक गोष्ट लक्षात आली, १८ अप्रिल ला "Laverne Cox" (मला तो का ती हे माहीत नाही :) ) या यादीत प्रथम क्रमांकावर होता. त्याआधी वेगवेगळे युरोपियन. अमेरिकन लोक या यादीत स्पर्धा करत होते. अचानक १९/२० अप्रिल ला एके सर्वांना मागे टाकून या यादीत प्रथम क्रमांकवर विराजमान झाले. ही पहा १७ अप्रिल ची बातमी - Despite a rocky year for Justin Bieber, the Canadian pop star surged to the top of the TIME 100 reader poll, edging out Egyptian Presidential candidate Abdul Fattah al-Sisi. Though the final TIME 100 list of the most influential people of the year worldwide is always ultimately chosen by the editors, TIME seeks the input of readers in an online poll. Music stars Rihanna and Lady Gaga take third and fourth place in the current poll, though Gaga has a clear lead. असो. सत्य स्पष्ट, आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. बाकी माहीतगार/ ऋषिकेश आणि क्लिंटन यांना या धाग्यावर खेचायचा मोह आवरत नाही, पैकी माहीतगार आहेतच. माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?

In reply to by आनन्दा

माहितगार 24/04/2014 - 14:29
....आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. ........माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?
(:) हा स्मायली केजरींच्यावरीने, ह.घ्या) माझा हा स्मायलीवाला विनोदाचा भाग सोडला तर आकडेवारीत प्रथमदर्शनी काहीतरी गफलत आहे असे वाटते, (माझ जिथपर्यंत निरीक्षण आहे) भारतीय लोकांचा आंतरजालावर एकुण (टक्केवारी) सहभाग सहसा (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा नसतो आणि परदेशी लोकांना भारतीय राजकारणात (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा रस नसतो. तरी सुद्धा हि कॉमेंट कुणी टाईमवर जाऊन टाकावी असे वाटत नाही कारण त्यांनी चुका सुधारल्या तर त्यातील गफलती शोधणे आपल्याला कठीण जाईल. काही मॅन्यूपुलेशन झालच असेलतर (मी संशयवाद जेवण्यातलया चिमूटभर मीठा एवढाच ठेवण्याबद्दल दक्ष असतो तरीही मला शंका वाटते आहेच) केजरीवाल आणि मोदींनाच सरळ जबाबदार धरल पाहीजे अस नाही त्यांच्या समर्थाकांपैकी एखादा उत्साही प्राणी असू शकतो किंवा अशा सॉफ्टवेअरना कस गंडवल हे करून पाहणारे हौसेही या जगात कमी नाहीत. अर्थात या शक्यतांच्या पलिकडे जाऊन परकीय व्यक्ती देश आणि संस्था यांचे इतर हितसंबंधही व्यस्त असू शकतात या संदर्भाने मी वेगळा धागा काढला आहेच त्याचा येथे विस्तार करत नाही. भारत थोडेसे स्रोत असलेला देश आहे त्या पेक्षा तो एक व्यावसायिक संधींकरीता विकसीत होत असलेला देश आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अण्वस्त्र सज्ज देश या नात्याने सामरीक दृष्ट्या खूप सशक्त नसला तरी महत्वाचा देश आहे. जर भारतीय पाकिस्तानी चिनी रशीयन लोकांना आमेरीकेतील तेथील ओपीनीयन इन्फ्ल्यूअन्स करण्याची इच्छा असू शकते (सध्या भारतीय वंशाच्या हॉटेल व्यावसायीकावर क्लिंटनबाईंच कँपेन प्रमाणाबाहेर फायनान्स केल्याबद्दल आमेरीकेत केस चालू आहे) तर आमेरीकेतील अथवा इतर देशातील लोक भारतीय राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप शक्य नसला तरी अप्रत्यक्षपणे ओपीनीयन्स इन्फ्लूएन्स करण्याचा प्रयत्न न करता राहतील का ? आमेरीकेला भारत आणि पाकीस्तान (कडे अणवस्त्रे आहेत म्हणून ती खूपतात असे नव्हे तर इतरही देशांकडे अण्वस्त्रे असण्याच लॉजीकल समर्थन होऊ शकत त्यांच्या स्वतःच्या सामरीक सामर्थ्याला महत्व कमी होऊ शकत वगैरे किंवा खरोखरही भारतीय उपमहाद्वीपातील संघर्ष टोकाला गेलेतर काय या भिती मुळे जे किंवा जे काही कारण असेल ते) मध्ये काश्मिर प्रश्नावर चर्चा होऊन हवी असणे स्वाभाविक आहे आणि भारत इतर तीसर्‍या देशास या चर्चेत घेणार नाही हेही निश्चित आहे. भारत आणि पाकीस्तानच्या उजव्या नसलेल्या गटांकडून कितीही चर्चा झाल्या तरी जनतेची मान्यता मिळणार नाही; शॉक होऊ नका, मी आमेरीकन राजकारण्याच्या बुटात पाय ठेवले तर मी दोन्ही देशातील उजव्यांना पुढे येण्यास प्रोत्साहन देईन आणि चर्चेस बसवेन त्या करता दोन्ही कडे उजवे निवडून येतील या करता बरेच काही पडद्या मागून करण्यास जमलेतर करेन पण निश्चितपणे पडद्या मागून कारण माझा आमेरीकन राजकारणी म्हणून असा प्रत्यक्ष हस्तक्षेप भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही नागरीकांना खपणार नाही. हा भाग एक झाला. आपण इकॉनॉमीक टाईम्सचे आणि भारत आमेरीका व्यापारी संबधांच्या वृत्तांचे अभ्यासक असाल तर दुसर्‍या बाजूला आमेरीकन व्यावसायिकांना हव्या असलेल्या आणि भारत सरकार देत नसलेल्या सवलतींमुळे आम्रेरीकन व्यापार्‍यांची नाराजीमुळे आमेरीक प्रशासनावरील त्यांचे दबाव मननीय आहेत. मी लंडन ऑलीपीक्सच्यावेळेस एक युरोमेरीकन स्त्रीचे नाव भोपाळ गॅसवाल्यांची बाजू घेऊन आमेरीकन कंपनीला विरोध वगैरेकरताना वाचल्याचे आठवते त्यानंतर तीच स्त्री भारतातील एका चळवळीची (आर्थीक) बाजू घेताना दिसली . भोपाल गॅसवर कधी काळी लिहू म्हणून जे दुवे जपले होते ते उघडून पाहताना आंतरजालावरून तीचे नाव हळू हळू गायब होते आहे असे हलकेसे जाणवत होते अशात दोन एक महिन्यापुर्वी ती त्या सर्व संदर्भ दुव्यातून हरवली होती. कदाचीत दुवे नैसर्गिक पणे बंद पडले असतील कदाचित माझा संशयवाद पुर्ण चुकीचाही असू शकतो. अशातील काही लोकांच्या भूमिका इराणशी संबंध सुधारण्यास साहाय्यभूत असणार्‍या असू शकतात असे वाटले सर्व संशय चुकीचे असू शकतात. उद्देश कोणत्याही भारतीय व्यक्ती अथवा पक्षाकडे बोट दाखवण्याचाही नाही. भारतातील निवडणूका परकीय लोकांना पुर्णपणे प्रभावीत करता येणे निश्चीतपणे अशक्य आहे. सध्याचेच भारत सरकार खूप आमेरीकाभिमूख होते तरीही दुरावा येण्याचे थांबले नाही. पाहिजे ते प्रशासन आणून हवे ते सगळे साध्य करता येईल एवढाही कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी भारत कच्चा नक्कीच नाही त्यामुळे अशा शक्यतांची खूप चिंता करावी असे वाटत नाही. माझ्या सागंण्याचा मतितार्थ परकीयवृत्तसंस्थाच्या वृत्तांना प्रमाणा बाहेर महत्व देणे आपण टाळले पाहिजे. किमान पक्षी त्यांच्या वृत्तांनी भारतीय हुरळून जातात त्यांच्या वृत्तात अभिप्रेत असे अर्थ काढून प्रभावित होतात असे त्यांना कळता कामा नये. माझी व्यक्तीगत मते आहेत कोणताही विदा आकडेवारी संदर्भ देणे कदाचित शक्य असणार नाही. कोणत्याही वादात पडण्याचे टाळावे म्हणून मी मिपावर हे लिहिणे टाळले होतो. हा प्रतिसाद न पटल्यास ह.घ्या नाहीतर माझा आणि आनन्दा यांच्यातील व्यक्तीगत मतांचा संवाद म्हणून सोडून द्यावे.

In reply to by आनन्दा

आयुर्हित 24/04/2014 - 17:11
यादी मॅनिप्युलेट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला आहे पण तो Time कडूनच. नाहीतर ५ दिवसात, १७ एप्रिलच्या बातम्यांत मोदी आणि AK४९ चे पहिल्या पाचात नाव असले पाहिजे होते. Time चा हेतू चुकीची माहिती देवून भारतीय(अति हुशार /अति भावनिक)लोकांना गुमराह करायचा दिसतोय, हे नक्की.

In reply to by पैसा

विकास 24/04/2014 - 17:55
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं! व्हॉट्सअ‍ॅप वर टेक्स्टींग करायचे सोडून टाईम साप्ताहीकाकडे जायला कुणाला वेळ तरी आहे का? उगाच आपले काहीतरी... ;)

मोदी पंतप्रधान झाले तर तीन गोष्टी प्राधान्यक्रमानं करतील : १) स्वतःचं लग्न! कारण ते स्वतःला मोस्ट इलिजिबल बॅचलर समजतात. आपकी अदालतमधे पूर्वी झालेल्या इंटर्व्यूमधे ते (लाजत लाजत) म्हणाले होते : "हमको सरकारने जमीन (प्लॉट) तो दे दी है, अब मकान कब बनेगा देखना है". (जसोदाबेन बघा वाट) २) अंबानी, अडानी आणि डिएलफनं प्रचारात केलेल्या उपकाराची भरघोस परतफेड बिजेपीच्या खास `कॉर्पोरेट किक बॅक स्टाईलनं' करणार. (काँग्रेसी अवाक, त्यांचे एकामागून एक घोटाळे उघड होतात आणि हे डोळ्यादेखत लुटतायंत पण काही करता येत नाही) ३) ज्या एकमेव मुद्यावर संघानं (आणि वरुन दाखवायला बिजेपीनं) त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार बनवलं त्याची परिपूर्ती करणार, राममंदिर बांधून! (असंख्य भारतीय खूष! आणि देशासाठी कायमची डोकेदुखी!)

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन 24/04/2014 - 10:26
माणसानं किती किती म्हणून आशावादी असावं ह्यासाठी आजच्या पिढीने तुमच्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे :))

In reply to by सुहासदवन

आता टाईम्सच्या ओपिनियन पोलनं व्यापक स्तरावर लोक काय विचार करतात हे दाखवून दिलंय त्यामुळे बिजेपीप्रेमींची जळजळ होतेयं इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 24/04/2014 - 17:57
लेखात प्रश्न केजरीवालांच्या संदर्भात विचारले होते पण आपण त्या ठिकाणी चुकून मोदी वाचलेले दिसतेयं! असो.

आयुर्हित 24/04/2014 - 10:41
खरोखरच Time चे मनापासून कौतुक करावेसे वाटते. Time सारख्यांनी आपला धंधा(हो धंधाच!) कसा वाढवावा, याचा हा पाठ इतर माध्यमांनी घेण्यासारखा आहे. जो माणूस दिल्लीमध्ये ५०० रुपये दान दिलेल्या एका रिक्षावाल्या वर प्रभाव पाडू शकला नाही,तो जगातील एक नंबरचा प्रभावी नेता कसा असू शकेल? भारताच्या गृहमंत्र्यावर/पोलीस आयुक्तांवर/LGवर काय प्रभाव पाडला होता तेही सर्वांना माहिती आहेच. ज्याने "येडा मुख्यमंत्री" हे शिंदेंनी दिलेलं बिरूद, राजीनामा देऊन सार्थ ठरविले. माझ्या मते जगातला तर सोडाच, भारतातला एक नंबरचा विनोदी माणूस/जोकर म्हणून Time ने नाव घ्यावे. Time ने जी लिस्ट दिली आहे त्यात १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत २०१४ मध्ये "अण्णा हजारे" का नाहीत? माझ्यामते भारतातील रिकामटेकडी जनता जी facebook वर like करते, त्याच्या संख्येवरून ही लिस्ट बनविली आहे, जी पूर्ण पणे बरोबर आहे फक्त "Most liked/disliked people" या नावाने छापली गेली पाहिजे होती. Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे व आपली ही अक्षम्य चूक कशी सुधारता येईल हे पाहावे.

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत 24/04/2014 - 21:32
संजयजी पूर्वग्रसित होऊन मते बनवू नका. किमान योजना आयोगचे अहवाल तरी वाचत जा. ११व्या योजनेत भा ज प शासित राज्यांची कामगिरी अन्य राज्यांपेक्षा जास्त चांगली होती. हे सत्य आहे. बाकी मोदी आल्याने देशात मूलभूत -अर्थात रस्ते, रेल्वे, सिंचन, वीज इत्यादींना महत्व दिले जाईल ज्याने भारतीय उद्योगांचा विकास होईल. अमेरिकेला हे नको आहे म्हणून अमेरिका मोदी विरोधात आहे. ज्या पक्षाच्या १५० अधिक केजरीवाल समेत असे उम्मेद्वार आहेत ज्यांच्या NGO ला कुठून मदत मिळते सांगायची गरज नाही. खाल्लेला मिठाला जगावे लागेतेच. दिल्लीत वीज दर कमी करण्या एवजी सबसिडी वाढवली. सबसिडीचा पैसा कंपनीला बिन विल वसूल करताच मिळतो दिल्लीत वीज बिल वसूल करणे काही सौपे काम नाही. जेवढी जास्त सबसिडी तेवढा जास्त अंबानीचा फायदा (कुणाच्या खिशात आहे, कोण आहे लवकरच कळेल, घोर निराशा होईल) म्हण आहे न चोर मचाये शोर. .

In reply to by विवेकपटाईत

मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं आहे ही गोष्ट उघड दिसत असतांना, उगीच एखाद्या बथ्थड राजकीय नेत्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत `परकीय हस्तक्षेप आहे' असा कल्पनाविलास करणं हा भलताच ग्रह आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन 25/04/2014 - 13:08
मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं
ह्या अश्या प्याद्यांचा उपयोग करूनच जवळ जवळ प्रत्येक मोठा उद्योजक आपली पो़ळी भाजून घेत असतो, त्यात गैर काय आहे? प्रत्येक राज्यात तिथला मोठा उद्योगपती किंवा तेथील उद्योजक हे त्या राज्याच्या शासनावर थोडाफार प्रभाव ठेवून असतातच. शेवटी पैशाची आणि उद्योगांची मोठी उलाढाल तेच करतात. शासकीय तिजोरीत महत्वाची भर तेच घालत असतात. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा साखर आणि सहकाराच्या पैशाच्या माध्यमातून (पण फक्त) महाराष्ट्राच्या शासनावर प्रभाव ठेवून असतातच की. आता समजा मोदीनी अंबानी-अडानी किंवा गुजरात मधील उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत किंवा भारतातील इतर उद्योगांना गुजरातमध्ये एक महत्वाचे स्थान मिळ्वून दिले आहे, तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला कोणी रोखले होते, असे काही करण्यापासून? अंबानी-अडानी च्या लेवलला जाऊ द्या पण महाराष्ट्राच्या मातीतील किती उद्योगांना किंवा उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत स्वत:चे असे स्थान आहे? टाटा नॅनो सारखे किती उद्योग दुसर्‍या राज्यातून खेचून आणून महाराष्ट्रात उभारले गेले? उद्योगांचं जाऊ द्या, महाराष्ट्राच्या नेत्यांचे तरी काय स्थान आणि प्रभाव आहे भारतीय बाजारपेठेत (दिल्लीत)? चांगल किंवा वाईट जाऊ द्या. पण निदान राष्ट्रीय लेवलला अंबानी-अडानी ह्यांच्या सारख्या उद्योजकांचे मोदींशी नाव तरी जो़डले जाते, गुजरातला ते निदान रिप्रेजेंट तरी करतात, पॄथ्वीराज चव्हांणाचे नाव, निदान आडनाव घेतल्यावर तरी कोणता (आदर्श) उद्योग किंवा उद्योजक आठवतो? महाराष्ट्राच्या शासनाने खरंच काही चांगलं केलं असेल तर मग करा ना मार्केटिंग ह्या सार्‍याची. वाट कसली बघताय...मोदी सरकारची!

In reply to by सुहासदवन

त्यानं मोनॉपॉली वाढते आणि त्यात जनतेला पर्याय न राहिल्यानं ती लुटली जाते. मोदी काय किंवा काँग्रेस काय मला सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवणं गैर वाटतं. इंडस्ट्री जनहितासाठी चालली पाहिजे आणि इंडस्टियालिस्टलाही फायदा व्ह्यायला हवा पण संपत्तीच बेतहाशा केंद्रिकरण गैर आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 25/04/2014 - 14:56
सं.क्षी. लेखापरिक्षण आणि अर्थशास्त्र या बाबत आम्हाला आपल्या एवढ प्रगाढ ज्ञान नाही. आमच्या मते दोन गोष्टी आहेत व्यक्ती/संस्था आपल्या भोवतालच्या समाज, संस्कृती आणि व्यवस्थेचीच निर्मिती असतात. घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे. मला आपल्या व्यवसायाला लक्ष्य करायच नाही. पण भारतात लेखापालांची लेखापरिक्षकांची एकुण संख्या किती ? त्यां सर्वांचा सर्व कारभार शुद्ध आदर्श नितीमुल्यांनी चालू आहे असे सर्टीफीकेट आपण द्याल काय ? एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ? संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची. आता महाराष्ट्रातली मतदान संपली आहेत आपापले राजकीय अंगरखे उतरवून समतोल विचारकरणे आत्मपरिक्षणही करणे या बद्दल सर्वांनीच सवडीने विचार करावा, (आणि मी हा निघालो बोलल्याप्रमाणे करण्यासाठी)

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 25/04/2014 - 14:57
संजय क्षीरसागरजी, आधी माणसं ओळखायला शिका! बाकी आपोआप चांगले होईल हो.त्यासाठी आआपजी गरज नाही. आणि हो एक अजून, आम्हाला बोलवा हो थेठरात,सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवतांना बघायला आवडेल! कोण पवार की सोनिया की पप्पू नाचणार आहे तेही कळवा आधी!

In reply to by आयुर्हित

घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे.
चुक नाही फ्रॉड हा शब्द लक्षात घ्या. फ्रॉड म्हणजे संगनमतानं केलेला अपहार. तो व्यवस्थापनातल्या पद्धती डावलून होतो आणि पैशाचा हव्यास हे त्याचं एकमेव कारण असतं.
एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ?
दादाश्री, कोणतीही इमानदार व्यक्ती बेईमान माणसाचं काम करत नाही असा माझा व्यावसायिक अनुभव आहे. You can't bend honesty with money. त्यामुळे बेईमान उद्योजकाची मेहेरबानी प्रामाणिक माणूस स्विकारतच नाही! मोदी; अडानी, अंबानी आणि डिएलएफच्या विमानातनं फिरतायंत आणि या कंपन्यांची कार्यप्रणाली उद्योग जगतात मशहूर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही झाकले तरी मोदी उघडे पडणा. पण डोळेझाकच करायचीये म्हटल्यावर विवेकाचा प्रश्नच मिटला.
संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची
संशय कसला? उघड दिसतंय. आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. असो, आता संधी गेलीये त्यामुळे बोलून उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 25/04/2014 - 22:11
आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. मोदी निवडणूक आणि बहुमतवाल्या पक्षाचे नेते म्हणून निर्वाचीत प्रतिनिधीअंतर्गत निवडणूक जिंकले की मोदीविरोधकांनी मोदी लाट नाही पण मोदीविरोधाची ओहटी मान्य केली ? :) मात्र एक प्रश्न नक्कीच पडतो. जर चुकून मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी कुठलेही वादग्रस्त निर्णय न घेता जनतेच्या भल्यासाठी राज्य केले तर तुम्ही ते तसे वागले हे मान्य कराल का तरी देखील मोदी वाईटच असतील? माझ्या पुरते बोलायचे तर केजरीवालांनी चांगले मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले असते तर आणि अगदी उद्या तेच काय पण पप्पू गांधी जरी पंप्र झाला आणि चांगले निर्णय घेतले तर मी स्वागतच करेन. पण मला मोदी विरोधकांची याबाबतीत खात्री नाही म्हणून विचारत आहे.

In reply to by विकास

इतकंच वाटतं. देशातला भ्रष्टाचार रोखला गेला आणि महागाई आवाक्यात आली की लोक सुखी होतील. मग ते मोदी की आणखी कुणी केलं यानं फरक पडत नाही. अर्थात मोदी जे बोललेत तसे वागले तर त्यांचं मनापासून कौतुक करीन यात वाद नाही. केजरीवालांच्या दिल्लीतल्या राजकीय कारकिर्दी विषयी मतभेद आहेत. मला त्यांच्या सचोटी विषयी तिळमात्र शंका नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा 26/04/2014 - 11:07
मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा
मला वाटते संधी सर्वांना समानच मिळते. काही लोक त्यचा अधिक फायदा घेतात इतकेच. बाकी मी कोणत्याच माणसाला त्याच्या तात्कालिक कृत्यांवरून मापत नाही, अनेक गोष्टींचे दीर्घकालीन परिणाम समजण्यास आपण कमी पडतो, ते बर्‍याच वेळेस राजकारणी लोक दूरदॄष्टीने पाहत असतात, तेव्हा मोदींनी गेली २ वर्ष अदानींवर कृपा केली, डीएलएफचे विमान वापरले म्हणजे नंतर देखील असेच करतील असे नाही. त्या व्यक्तीचे दीर्घकालीन उद्दिष्ट, त्यांचे चरित्र्य वगैरे गोष्टी देखील बघणे आवश्यक आहे. आणि मोदी त्य कसोटीवर उतरतात म्हणूनच माझ त्यांना पाठिम्बा आहे. बाकी चारित्र्य वगैरे गोष्टींवर मोदींची तुलना मनमोहनसिंगांशी करयला माझी ना नाही. आणि मुख्य म्हणजे, माझा क्रांती पेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, आणि हेच मला मोदींपेक्षा केजरीवाल जास्त आवडतात.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 25/04/2014 - 23:56
सं.क्षी. राजकारण बाजूला ठेवल तरी तुम्ही प्रश्नांचा फारच एकांगी विचार करता असं वाटत. मी व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्हीही टाळतो. मी मोदी समर्थक नसताना (मी कोणत्याही एका पक्षाचा कधीच समर्थक नव्हतो) सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो हे अनुभवताना गंमत दुसरीकडे काळजी वाटते काँग्रेसची जागा घेण्याची चांगली संधी असलेला एक पक्ष मतदारांनाच दोषी ठरवत मोठा होऊ पहातो आहे. लोकांना कन्व्हीन्स करण्याच्या मोठे होण्याच्या अशा पद्धती यशस्वी होत असतील तर माहीत नाही सामान्य माणूस म्हणून बघताना प्रांजळपणे सांगायचे झाले तर जुनेच औषध (पद्धतीचे) नव्या बाटली (नव्या नावाने) माझा देश एक चांगल्या बदलाची संधी दवडत नाही ना अशी साशंकता येते हे एक. अशा साशंकता व्यक्त करणार्‍यांना विश्वासात घेण्या एवजी नकारात्मक मार्केटींगचा आधार हे दोन. आणि असे दाखवून देणार्‍यांची लगेच विरोधक म्हणून बोळवण हे तीन, असे सांगणार्‍यांचे ऐकण्याची एक पैसाही तयारी नसणे हे चार, म्हणजे जो तुमचा विरोधक नाही तो पण विरोधक कसा होईल हे स्वतःहून पहाणे. आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही ? उत्साह उपयोगाला येतो पण मर्यादा असतात, महाराष्ट्रात निवडणूका संपल्यात जमा आहेत अंगरखे आणि चष्मे बाजूस ठेऊन आत्मपरीक्षणही केल्यास पुढच्या वेळी आपल्यालाच प्रचारात सुधारणा करण्यास आपल्या चाहत्याची बाजू अधीक समर्पक पणे मांडण्यास उपयोग होईल. माझ्या खालील धाग्याचे सावकाशीने वाचन करावे घाई नाही. नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

In reply to by माहितगार

हो ना, कारण तुम्ही फक्त माहिती जमवतायं,जस्ट अ कॉपी-पेस्ट जॉब ! माहितगाराला स्वतःचं मत नसतं. आणि मजा अशीये की तरी सुद्धा तुमची मतं लपत नाहीत! ही दोलायमान स्थिती आहे आणि त्यामुळे निरुपयोगी ठरते. न घरका न घाटका. तुम्ही म्हटलंय `आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही? ' हे तुम्ही स्वतःचं मत स्वतःवरच लादतायं कारण मी असं कुठेही म्हटलं नाही. उलट तुमच्या प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर दिलं होतं. नुसती माहिती जमवणारा, मोदी हा कॉर्पोरेट फ्रॉड आहे याचा प्रतिवाद करु शकत नाही. तुम्ही तुमच्या धाग्यांची लिस्ट दिली आहे. मी तुमचे धागे वाचत नाही कारण मला ते निरर्थक वाटतात.

आयुर्हित 24/04/2014 - 12:38
विकासजी, आपणास धन्यवाद! आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. हा प्रतिसाद वाचून Time ने चक्क Heading बदलले! नवे heading असे आहे : Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll आधीचे heading असे होते: The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 24/04/2014 - 13:09
>>>आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. >>>संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे. मिपावर श्रेणी देण्याचा प्रकार सुरु होणार आहे का? 'अतिविनोदी' अशी श्रेणी द्यावी-शी वाटत आहे. माणसानं स्वतःबद्दल किती अवास्तव कल्पना कराव्यात ह्याला काही मर्यादा???????????? अवास्तव कल्पना करण्यासाठी ठेवलाय ना एक माणूस मिपावर? कोटा वाढवलाय काय?? ;)

In reply to by आयुर्हित

Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
हे शीर्षक आधीच्या या शीर्षकापेक्षा
The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll
निश्चित जास्त प्रभावी आणि स्पष्ट आहे. (संपादित)

आयुर्हित 24/04/2014 - 13:17
हा विनोद ही नाही, सत्य घटना आहे. पाहिजे तर माझ्याकडे Time चा मूळ लेख, नवा लेख व लेखावरील सर्व कॉमेंट्स copy करून ठेवल्यात. Mail id द्या, mail करतो आपणास!

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 24/04/2014 - 13:44
इथेच टाका की. तुम्च्या प्रतिसादानं टाईमचं हेडींग बदललं असेल तर कौतुकच आहे. टाका इथं. लिंक दिलीत तरी चालेल. तुम्हाला जमत नसेल तर संपादकांना सांगा. मिपाचा एक प्रकारचा विजय असल्यानं संपादक अथवा मालक सुद्धा मदत करतीलच ही खात्री आहे.

In reply to by प्यारे१

आयुर्हित 24/04/2014 - 14:20
प्रशांतजी व admin आपल्याला mail पाठवला आहे. व लिंक्स जोडल्या आहेत. यात पहिल्या file मध्ये ४८८ comments होत्या, ज्या नवीन धाग्यात फक्त ९५ दिसत आहेत, ज्यात माझी comment मला सापडली नाही (बहुतेक उडवलेली दिसते!) आधीचे Heading असलेली file The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll आत्ताचे Heading असलेली file Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस 25/04/2014 - 15:38
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की टाईम्सच्या साईटवर तुम्ही मराठीतून प्रतिक्रीया पाठवलीत. ती त्यांना समजली म्हणून त्यांनी लेखाचं शिर्षक बदललं. आणि ते तुमच्या प्रतिक्रीयेमुळे बदललं हे कुणाला कळू नये म्हणून तुमची मराठीतली प्रतिक्रीया पण उडवली? *ROFL*

चित्रगुप्त 24/04/2014 - 13:42
माझ्या माहिती प्रमाणे पॅरिस मधे आयफेल टॉवर जवळ केजरीवाल प्रेमींनी एक मोठी सभा भरवली होती, त्यानंतर पत्रके वगैरेही वितरित केली गेली होती. याप्रकारच्या सभा परदेशात मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्यास 'टाईम' ने त्या आधारावर मूल्यमापन केले असू शकते. या सभेविषयी जास्त माहिती हवी असल्यास मिळू शकते.

मृत्युन्जय 24/04/2014 - 14:03
एक मिनिट. का फुकाची चर्चा करतो आहोत आपण? जर समजा केजरी वाराणसीमधुन निवडुन आले तर काय ते स्पष्ट होइलच की. मला वाटते केजरीवाल जर जिंकले तर ते जास्त लोकप्रिय आणि प्रभावी आहेत हे लोकांनी मान्य केलेच पाहिजे. टाइम वर आपला विश्वास नसेल कदाचित. जनमतावर ठेउयात ना. तिथे तर कळेलच की. बादवे: अब की बार मोदी सरकार ;)

पैसा 24/04/2014 - 14:33
विकास यांनी विडंबन म्हणून लिहिलेल्या धाग्यावर गंभीर वाद सुरू झाले ही धाग्याची शोकांतिका! आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं. या यादीत ओबामाकाका कुठे आहेत मग?

In reply to by पैसा

माहितगार 24/04/2014 - 14:47
मतदान फेर्‍या संपत आल्यात वादाच्या आपापल्या तोफा वेगवेगळ्या समर्थक मंडळींनी थंड करावयास ठेवल्यास हरकत नाही. धागा आणि मिपावर शांतता नांदण्याच्या दृष्टीने माझे प्रतिसाद कुठे उडवण्याची गरज भासल्यास मोकळेपणाने उडवावा ही नम्र विनंती.

In reply to by माहितगार

पैसा 24/04/2014 - 14:50
माझा प्रतिसाद केवळ एक सामान्य सदस्य म्हणून आहे. तुमच्या एकट्याच्या गंभीर प्रतिसादांचा तिथे काही संबंध नाही. बाकी खूपजण हा धागा गंभीरपणे घेताना बघून मला जाम गंमत वाटत आहे!

In reply to by पैसा

माहितगार 24/04/2014 - 15:01
होय ना या धाग्याचा वेगळा उद्देशपाहून मी माझा वेगळा धागा काढला होता. (तरीही आनन्दांना लांबलचक प्रतिसाद देत बसलो :) ) एनीवे समर्थकांना त्यांचे त्यांचे लोक निवडून येण्याचा सारा प्रभाव मिपा धाग्यांमूळे पडतो एवढा मिपावर विश्वास आहे हे अशा निमीत्ताने सिद्ध होते हे काय कमी आहे ? :) मत आतातशी मतपेटीत गेली पुढची पाचवर्षे हसायचंच काम आहे ;)

In reply to by पैसा

अजून मुंबईत संध्याकाळपर्यंत मतदान होईल आणि टाइम पोलसारख्या गोष्टींचा सूज्ञ लोक (हॅ हॅ हॅ वाले सोडा, त्यांना कशाचंच काही पडलेलं नाही), निश्चित विचार करतील अशी अपेक्षा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 24/04/2014 - 15:38
तर अर्ध्या दिवसाच घोडा मैदान बाकी आहे म्हणताय ? टाइम टाइम ची बात आहे तर !! जो जे वांछील तो ते लाहो आमच्या शुभेच्छा जशा इतरांना तश्याच तुम्हालाही मतदानाचा अर्धा दिवस तुमच्या इच्छेनुसार जावो ही सदिच्छा. विरोधकहो नाराज होऊ नका अशाच सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत. (कुणीही निवडून आले तरी माहितगारच्याच सदिच्छेने ;) ह. घ्या.)

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 24/04/2014 - 15:49
सं.क्षी. राजकारण हा विषय कधीच हसण्यावारी नेत नाहीत असे दिसते. ज्याची त्याची मर्जी पण इतर कोणत्यातरी आवडीच्या विषयात कधी तरी अधून मधून मोकळेपणाने हसून घेत रहा म्हणजे झाले. आपल्या आनंदा करता आमच्या केजरींनाही शुभेच्छा.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 24/04/2014 - 15:49
तुम्हाला केजरीवाल गंमतीशीर वाटतात का? मला ब्वा विनोदी धाग्याला गंभीरपणे घेणारे लोक गंमतीशीर वाटतात! आणि टाईम मॅगेझीनसुद्धा!
आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं.

रजनीकांत नंतर श्री केजरीवाल, श्री मोदी, कु. राहुलगांधी ही आजच्या तारखेला भारतीय सोशलसाईटसवर चांगल्यावाईट कारणांनी धुमाकूळ घालणारी लोकप्रिय व्यक्तीमत्वे आहेत. यात अगदी सौ. सनी लिऑनचेही नाव जोडू शकता. दर दुसरा फॉर्वर्डेड मेसेज यांच्यापैकी एकावरच असतो. त्यामुळे यालाच जनमाणसांवर टाकलेला प्रभाव म्हणून गणले तर हे शक्यय.

विकास 24/04/2014 - 17:03
वर पैसाताईंनी म्हणल्याप्रमाणे हा धागा विरंगुळा आणि ऋषिकेश यांच्या "मोदी पंप्र झाले तर" धाग्याचे काहीसे विडंबन होते. थोडक्यात निव्वळ टाईमपास. अर्थात टाईम साप्ताहीकाने टाईमपास केलेला नाही! एका अर्थाने त्यांचा हा business survey आहे. सध्या टाईम जास्त कुठे वाचले जाऊ शकते, कोण वाचते आणि काय वाचते याचा एक ढोबळ अंदाज यात लागू शकतो असे वाटते. यात टाईम ने कुठेही काही ठरवलेले नाही. निव्वळ जे काही हो - नाही मत पडले त्यावरून क्रमवारी ठरवली आहे. यात केजरीवालांना "हो" अशी जास्त मते मिळाली म्हणून ते "या टाईमाचे" प्रभावी नेते झाले तर मोदींना "नो" म्हणून सगळ्यात जास्त मते मिळाल्याने ते "टाईमलेस" प्रभावी नेते झाले! ;)

१. अरविंद केजरीवाल २. नरेंद्र मोदी ३. Katy Perry : गायिका ४. Justin Bieber : पॉप गायक ५. Laverne Cox : अभिनेत्री ६. Rihanna : अभिनेत्री आणि गायिका ७. Benedict Cumberbatch : नट ८. Beyonce Knowles : अभिनेत्री आणि गायिका ९. Jared Leto : नट, दिग्दर्शक, निर्माता, इ. १०. Lupita Nyong'o : अभिनेत्री, दिग्दर्शक, इ.................................... इतके पुरे नाही का ?! लोक्स, लोक्स, लोक्स... या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय? वरचा डेटा आणि शेवटच्या एकदोन दिवसांतील झालेले मतदान पाहता, एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! इथे तर त्याचा "सबळ पुरावा" म्हणून वापरत लोक "बाजारात तूरी... " चा संगित प्रयोग करत आहेत?! =)) . =)) . =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकास 24/04/2014 - 17:35
एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! सहमत. बाजारात बाकी धान्याचा तुटवडा असला तरी तुरीचे अमाप पिक आले आहे, त्यामुळे काळजी नसावी. ;)

क्लिंटन 24/04/2014 - 17:41
या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय?
छे हो इस्पिक एक्का असे कसे म्हणता? मोदींना मागे टाकून केजरीवाल पहिल्या क्रमांकावर आले आहेत यामुळे मोदी समर्थकांचा कसा जळफळाट होत आहे हे बघितले नाहीत का? :) टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. केजरीवालांना ३२ लाख मते मिळाली आहेत म्हणे. एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का?

In reply to by क्लिंटन

प्यारे१ 24/04/2014 - 18:24
>>>>>>>रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? छे छे! रजनीकांतनं घेतलेल्या सर्व्हेमध्ये टाईमला पहिल्या १० अब्ज मध्ये स्थान नाही!

In reply to by प्यारे१

मदनबाण 25/04/2014 - 15:29
एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? हॅ.हॅ.हॅ... रजनी अण्णाचे नाव जर टाकले असते तर टाईमचा सर्वर लगेच क्रॅश नसता का झाला ? ;)

In reply to by क्लिंटन

नक्कीच. पण आजकाल "केवळ सोईच्याच नव्हे तर आस्तित्वात नसलेल्या / व्हर्च्युअल राईचा देखिल पर्वत करणे" आणि "समोर असलेला गैरसोईचा पर्वत स्वतःचे डोळे घट्ट झाकून आस्तित्वातच नाही" असे म्हणणार्‍या स्वयंघोषीत विचारवंतांची लाट आली आहे... हा आजार सर्वकाळ (एंडेमिक) असतो आणि निवडणूकीच्या मोसमात त्याची जोरदार साथ (एपिडेमिक) येते. काहीजणांत याची लागण उपायापलिकडे गेलेली असल्याने डेटा, अकाऊंटींग, सारासार बुद्धी, समतोल विचार, इ औषधांचा फायदा तर होत नाहीच पण उलट जोरदार अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते ! ;) :)

In reply to by क्लिंटन

टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. एकदा सर्व लोकांना खुला व्हर्चुअल सर्व्हे संस्थळावर प्रसिद्ध केला की मग कोणाला त्याच्या अश्या दुरुपयोगापासून थांबवणे केवळ अशक्य आहे. मात्र त्यात सापडलेल्या डेटाचा खरेपणा आणि उपयुक्तता ठरवायला शास्त्रिय अक्कल जरूर लागते ;)

जयनीत 24/04/2014 - 18:58
कुठल्या एका सर्वेक्षणात कोण आघाडीवर दिसतो ह्याला कितपत महत्व द्यायचे? ही पत्रिका वेळोवेळी अशी सर्वेक्षणे करत असते? पण त्याने नेमके काय सिद्ध होते तेच कळत नाही. पहिल्या नंबर वर केजरीवाल असोत किंवा मोदी किंवा अगदी यादीत त्यांना स्थान ही नसले तरी काय बिघडणार आहे? आपण आपले मत त्या वरुन ठरवणार आहोत का?

विकास 24/04/2014 - 21:04
टाईम साप्ताहीकाने, दोन याद्या तयार केल्या आहेत. एक आहे ती त्यांच्या विश्लेषणानुसार सिलेक्टीव्ह प्रभावी व्यक्तीमत्वाची यादी ज्यात पहीले नाव बियॉन्सीचे आहे. Time 100 असे गुगगले तर ती यादी दिसते. आणि दुसरी यादी आहे : readers’ poll for the 2014 TIME 100 ज्यात एके पहीले आहेत. :( ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. हे ही नसे थोडके. ;)

In reply to by विकास

मदनबाण 25/04/2014 - 15:34
ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. परत एकदा... हॅ.हॅ.हॅ... ;) टाईमवाल्यांना एकेंची "नौटंकी" पराकोटीची आवडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! ;) जाता जाता :- कोणाला तरी केजरी मलेरिया किंवा केजरी काविळ झाल्याचे निदान झाले आहे म्हणे ! ;)

केजरीवाल यांच्याच आरोपानुसार काँग्रेस आणि भाजपा यांनी देशभरच्या मिडीयाला विकत घेतलेय. पण केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय :D

In reply to by तुमचा अभिषेक

आयुर्हित 24/04/2014 - 22:59
केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय असे नसून अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, भारताची अतर्गत सुरक्षा व पाक व्याप्त पाकिस्तानविषयी लुडबुड करायला.. असे आहे! कारण अमेरीकेच्या मिडीयाला माहिती आहे भारतात काही अतिहुशार/अतिभावनिक लोक आहेत AK४९ ला निवडून देणारे!

In reply to by आयुर्हित

विकास 25/04/2014 - 00:23
अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, बादरायणी पीजे... ;) घड्याळाचे काम टाईम दाखवणे आहे आणि घड्याळ हाताला बांधले जाते. याचा अर्थ घड्याळाची हाताशी बांधिलकी आहे. थोडक्यात टाईममधे केजरीवालांना प्राधान्य मिळते याचा अर्थ त्यांचे घड्याळाशी आणि हाताशी संबंध आहेत. :#

नांदेडीअन 24/04/2014 - 23:00
"More than 3.2 million votes were cast in the poll. There were attempts to inflate the voting numbers, but only legitimate votes were tabulated for the final results. On Thursday, TIME will announce this year’s TIME 100 honorees, who are selected by the editors." http://time.com/73538/indian-politician-arvind-kejriwal-wins-time-100-readers-poll/

श्रीगुरुजी 25/04/2014 - 14:35
आकडेवारीचा काहीतरी घोळ दिसतोय. "टाईम"च्या सर्वेक्षणात अवतारी महापुरूष केजरीवाल यांना २२,६५,३४० "येस" मते मिळाली आहेत व खलनायक मोदींना २५,२२,५६७ "येस" मते मिळाली आहेत. पण निकाल वेगळाच दाखवित आहेत.

वेताळ 25/04/2014 - 17:26
मुंबई- ब्रिटनमधील केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संस्थातील प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर तज्ज्ञ अशा सुमारे ७५ भारतीय वंशाच्या मान्यवरांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर टीका केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापक चेतन भट आणि गौतम अप्पा यांनी 'इंडिपेन्डंट' या डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका खुल्या पत्रात नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली आहे. 'मोदी सत्तेवर येण्याच्या कल्पनेने आम्ही भयभीत होतो,' असे त्यांनी म्हटले आहे. 'भारतीय लोक आपले पुढील सरकार निवडून देण्यासाठी मतदान करीत असताना नरेंद्र मोदी प्रणित भाजप सरकारबाबत आम्हाला लोकशाही, मानवाधिकार आणि सामाजिक, धार्मिक विविधतेबद्दल चिंता वाटते,' असे या पत्रात म्हटलं आहे. जगातील निर्वासित भारतिय बुध्दीजीवी लोकाना भारतातील लोकांची काळजी वाटत आहे. भारतातील बरेच बुध्दीजीवी व हुशार लोक मोदी पंतप्रधान झाल्यावर जसे हरदन्हळ्ळी देवेगौडा किंवा अनंतमुर्ती भारत सोडुन परदेशात स्थाईक होणार आहेत. मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे.

In reply to by वेताळ

मला तर असला सरळ सरळ हायजॅक केलेला सर्वे तसाच पुढे ढकलून प्रसिद्ध करणार्‍या टाइम च्या तब्येतिची काळजी वाटू लागली आहे !

In reply to by वेताळ

विकास 25/04/2014 - 17:57
मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे. खरे आहे. पण वास्तवीक त्यांच्या लक्षात येत नाही की मोदी सत्तेवर आले तर त्यांची संशोधनाकरता अनुदाने वाढणार आहेत. या भट्ट साहेबांनी Hindutva in the West: mapping the antinomies of diaspora nationalism असे २००० साली पुस्तक लिहीले होते. किती पैसे त्यांना मिळाले असतील ते बघा. पण नंतर शिंचे युपिए आले आणि या विषयावर दक्षिणाच मिळेनाशा झाल्या. आता मोदी आले की परत मिळू लागतील. माझे तर म्हणणे असे आहे की तुम्हा कुणाआ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट हवी असली तर या भट्ट साहेबांना आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि मोदींवर टिका केलेले स्वतःचे लेख, प्रतिसाद त्यांना पाठवा. तुम्हाला पण अनुदान मिळेल आणि मोदी कसे नरराक्षस आहेत असा (त्यांचाच पुस्तकातले संदर्भ घेऊन)नसंशोधनात्मक प्रबंध लिहील्यावर पिएचडी पण मिळेल.

चौकटराजा 25/04/2014 - 17:48
केजरीवाल की कचरावाल व मोदी की नुसतीच भाजप या झाडाची एक फांदी हे १६ मे ला ठरेल ना ! टाईम वाले , लाईफ वाले, इंडिया टु डे वाले काही का म्हणेनात ! राज ठाकरे की फक्त भाषणबाज ठाकरे हे ही १६ ला कळेल ना !

विकास 26/04/2014 - 07:02
टाईमच्या संपादकीयांच्या निवडीत टाईम १०० लीडरमधे मात्र मोदी आहेत. फरीद झकेरीयांनी करून दिलेली त्यांची ओळख पाश्चात्य माध्यमांच्या दृष्टीकोनातून पाहीले तर संतुलीत वाटली.

श्रीगुरुजी 24/05/2014 - 14:32
केजरीवाल ही व्यक्ती एकंदरीत सुधारण्याच्या पलिकडे गेलेली दिसतेय. गेल्या काही महिन्यात प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थराला जाऊन नौटंकी करणार्‍या या ढोंग्याला व त्याच्या पक्षाला निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन जमिनीवर आणले. पण अजूनही यांचे डोळे उघडत नाहीत. आपल्या नौटंकीला, खोट्या आरोपांना व ढोंगबाजीला जनता अजिबात फसत नाही हे यांच्या डोक्यात अजून घुसतच नाही. त्यांची आता नवीन नौटंकी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात केजरीवालांनी भारतातील त्यांच्या मते सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या ३० जणांची नावे जाहीर केली होती. त्यात गडकरींचे नाव टाकले होते. गांधी परिवाराची नावे अर्थातच त्यांच्या यादीत नव्हती. आपल्या आरोपांना पुरावे देण्याचे फालतू सोपस्कार त्यांना मान्य नसतात. कोणी पुरावे मागितले तर ते भ्रष्टाचार्‍यांच्या बाजूने आहेत असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. गडकरींनी प्रगल्भता दाखवून केजरीवालांविरूद्ध न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केल्यावर निवडणुकांचे निमित्त सांगून इतके दिवस या खटल्याला तोंड देण्याचे त्यांनी टाळले. आता निवडणुक संपल्यावर खटल्यापासून दूर पळायचे कारणच देता येईना. त्यामुळे सुनावणीला उपस्थित रहावे लागले. न्यायालयाने जामीनासाठी १०००० रूं.चा व्यक्तिगत बाँड मागितल्यावर सुरूवातीला देण्याची तयारी दाखवून नंतर घुमजाव केले व तुरूंगात जाणे पसंत केले. आपल्याला बाँड मागणे हे बेकायदेशीर आहे असेही त्यांनी न्यायाधीशांना सुनावले. त्यामुळे त्यांच्या कायद्याच्या अज्ञानाची न्यायाधीशांनी चांगलीच कानउघाडणी केली. ठराविक लोकांवर वाटेल ते बेलगाम आरोप करायचे, आरोपांचे पुरावे मागितल्यावर ते द्यायचे नाहीत कारण मुळातच बिनबुडाचे आरोप केलेले असतात, न्यायालयीन प्रक्रियेवर अविश्वास दाखवायचा आणि स्वतः हुतात्मा झाल्याचे नाटक करायचे ही केजरीवालांची मोड्यूस ऑपरंडी. हे धोरण पूर्ण अयशस्वी ठरले असताना पुन्हा एकदा त्याच नौटंकीच्या मार्गाने हे निघाले आहेत. मी पूर्वी एका धाग्यावर लिहिले होते की वि. प्र. सिंगांचा ज्या वेगाने उदय झाला, त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचा अस्त झाला. केजरीवालांचे तसेच होण्याची शक्यता दिसत होती. आता ही शक्यता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. केजरीवालांसारख्या माथेफिरू व हेकट व्यक्तींना जनतेने दिलेली शिक्षा पुरेशी नाही. त्यांचे डोके ताळ्यावर आणण्यासाठी तुरूंगवासासारख्या शॉक ट्रीटमेंटचीच गरज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असंका 25/05/2014 - 07:56
काय हो दादा, I Told You So असं म्हणायला धागे कमी पडायला लागले का? किती जुने जुने धागे वर काढताय? हा तर विनोदी म्हणून काढलेला धागा होता.... आणि इतकेच जर केजरीवाल अयशस्वी आहेत, तर एव्ह्ढे मोठमोठे प्रतिसाद देऊन त्यांचं महत्त्व का वाढवताय?

नानबा 24/05/2014 - 19:58
आष्ट्रेलियाचे सत्ताधारी अतिआदरणीय आणि जनतेचे लाडके माननीय टोनी अबॉट दादा मुठभर भांडवलशहांच्या हातातली बाहुले कसे बनलेत आणि इकडचा आम आदमी त्यामुळे कसा खवळला आहे हे दाखवण्यासाठी सिडनी हार्बर ब्रिजवर रास्ता रोको करून इकडल्या तिहारसदृश्य जेलात जाऊन बसावे...... :))

आत्मशून्य 24/04/2014 - 05:55
उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण) Person of the year झाले होते, त्यामुळे असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर नको!
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

In reply to by आत्मशून्य

विकास 24/04/2014 - 06:39
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. केजरीराज्यात पाणी फुकट असल्यामुळे असेल. ;)

In reply to by विकास

गणपा 24/04/2014 - 21:19
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.
थोडी दुरुस्ती करुन असे म्हणतो एक अनिवाशी भारतीय दुसऱ्या निवाशी भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. ए भाग्गो.....

पैसा 24/04/2014 - 09:43
तियानमेन चौकात जावे हे लै आवडले. याच धर्तीवर आणखी काही अपेक्षा आहेत. १. पाकिस्तानात जाऊन दाऊद इब्राहिमजी यांची भेट घ्यावी आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानातल्या तालिबान्याना शांतीचा संदेश द्यावा. (म्हणजे त्याना शांतता पाळायला लावावी.) २. नायजेरियावर दबाव आणून नायजेरियन्संनी अवैधरीत्या गोव्यात राहून ड्रज्ग व्यापार करणे थांबवावे ३. इस्लामी देशांत महिलांची गळचेपी थांबवण्याचे प्रयत्न करावेत. भारतातल्या मुस्लिम महिलांना निदान उन्हाळ्यात बुरखे वापरायची सक्ती करू नये अशी मागणी उलैमांकडे करावी. आणखीन खूप अपेक्षा आहेत. पण सध्या त्यातल्या त्यात सोपी कामे पुढे ठेवली आहेत. ती झाली की मग पुढची यादी देण्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

गब्रिएल 25/04/2014 - 10:09
वा वा. १४०० वर्सापूर्वीपन कोनीतरी आसच क्येलं व्हतं; त्येचाच आवतार म्हनावा का काय हा ? "मी" सोडून जगात कोनीबी अक्कलवान न्हाय आसा आग्रेपाहायेच म्ह्ना आपला. येकदम जंक्शन. होउन जावंद्या. नायतर लय बकाल झालिया जग. होउन जाउद्या इस्कोट. अवतार बाबाकी जय !

आनन्दा 24/04/2014 - 09:44
बाकी ही यादी कशी बनवतात, त्यात कोणाकोणाचे योगदान असते, यावर पण जरा प्रकाश टाका ना भौ.. आणि "दरवर्षी ही यादी याच वेळेस प्रकाशित होते की यावेळेस अंमळ लवकरच प्रकाशित झालेय" असा नसता प्रश्न उगीच डोक्यात येउन गेला.

In reply to by आनन्दा

आनन्दा 24/04/2014 - 09:50
आणि, पहिले दोनही नेते भारतातले? भारत सोडून जगात नेते उरलेच नाहीत की काय? काय हे? आता जगाचे कसे होणार? थोडक्यात, ही यादी म्हणजे मला केजरी आणि मोदी समर्थकांचे युद्ध वाटते, ज्यात केजरीसमर्थक जिंकलेत.

In reply to by आनन्दा

विकास 24/04/2014 - 09:53
बातमी एप्रिल १० ची नसावी. त्या दिवशी ऑनलाईन पोल चालू झाले असावे. २३ एप्रिल (काल) पोल बंद झाले आणि निकाल जाहीर झाले. आज टाईममधे त्यासंदर्भात व्यवस्थित वृत्त येईल. राहूल गांधींचे नाव नसल्यास ते निवृत्त समजावेत. ;) मला वाटते जगभरच्या बातम्यांच्या ट्रेंडवरून ही यादी तयार केली जात असावी असे वाटते. नक्की माहीत नाही.

In reply to by विकास

पैसा 24/04/2014 - 09:58
तिथल्या प्रतिक्रिया वाचल्या. लोकांनी व्होटिंग केलंय आणि काहीतरी वेटेज फॅक्टर लावला आहे. नेमकी पद्धत काय बघावं लागेल. त्यातल्या सुरुवातीच्या काही प्रतिक्रियांवरून बॉट्सनी मतदान केल्याचे निष्कर्ष लोकांनी काढले आहेत. ३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!

In reply to by पैसा

माहितगार 24/04/2014 - 10:41
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!
सहमत

In reply to by माहितगार

आनन्दा 24/04/2014 - 13:15
अजून एक गोष्ट लक्षात आली, १८ अप्रिल ला "Laverne Cox" (मला तो का ती हे माहीत नाही :) ) या यादीत प्रथम क्रमांकावर होता. त्याआधी वेगवेगळे युरोपियन. अमेरिकन लोक या यादीत स्पर्धा करत होते. अचानक १९/२० अप्रिल ला एके सर्वांना मागे टाकून या यादीत प्रथम क्रमांकवर विराजमान झाले. ही पहा १७ अप्रिल ची बातमी - Despite a rocky year for Justin Bieber, the Canadian pop star surged to the top of the TIME 100 reader poll, edging out Egyptian Presidential candidate Abdul Fattah al-Sisi. Though the final TIME 100 list of the most influential people of the year worldwide is always ultimately chosen by the editors, TIME seeks the input of readers in an online poll. Music stars Rihanna and Lady Gaga take third and fourth place in the current poll, though Gaga has a clear lead. असो. सत्य स्पष्ट, आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. बाकी माहीतगार/ ऋषिकेश आणि क्लिंटन यांना या धाग्यावर खेचायचा मोह आवरत नाही, पैकी माहीतगार आहेतच. माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?

In reply to by आनन्दा

माहितगार 24/04/2014 - 14:29
....आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. ........माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?
(:) हा स्मायली केजरींच्यावरीने, ह.घ्या) माझा हा स्मायलीवाला विनोदाचा भाग सोडला तर आकडेवारीत प्रथमदर्शनी काहीतरी गफलत आहे असे वाटते, (माझ जिथपर्यंत निरीक्षण आहे) भारतीय लोकांचा आंतरजालावर एकुण (टक्केवारी) सहभाग सहसा (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा नसतो आणि परदेशी लोकांना भारतीय राजकारणात (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा रस नसतो. तरी सुद्धा हि कॉमेंट कुणी टाईमवर जाऊन टाकावी असे वाटत नाही कारण त्यांनी चुका सुधारल्या तर त्यातील गफलती शोधणे आपल्याला कठीण जाईल. काही मॅन्यूपुलेशन झालच असेलतर (मी संशयवाद जेवण्यातलया चिमूटभर मीठा एवढाच ठेवण्याबद्दल दक्ष असतो तरीही मला शंका वाटते आहेच) केजरीवाल आणि मोदींनाच सरळ जबाबदार धरल पाहीजे अस नाही त्यांच्या समर्थाकांपैकी एखादा उत्साही प्राणी असू शकतो किंवा अशा सॉफ्टवेअरना कस गंडवल हे करून पाहणारे हौसेही या जगात कमी नाहीत. अर्थात या शक्यतांच्या पलिकडे जाऊन परकीय व्यक्ती देश आणि संस्था यांचे इतर हितसंबंधही व्यस्त असू शकतात या संदर्भाने मी वेगळा धागा काढला आहेच त्याचा येथे विस्तार करत नाही. भारत थोडेसे स्रोत असलेला देश आहे त्या पेक्षा तो एक व्यावसायिक संधींकरीता विकसीत होत असलेला देश आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अण्वस्त्र सज्ज देश या नात्याने सामरीक दृष्ट्या खूप सशक्त नसला तरी महत्वाचा देश आहे. जर भारतीय पाकिस्तानी चिनी रशीयन लोकांना आमेरीकेतील तेथील ओपीनीयन इन्फ्ल्यूअन्स करण्याची इच्छा असू शकते (सध्या भारतीय वंशाच्या हॉटेल व्यावसायीकावर क्लिंटनबाईंच कँपेन प्रमाणाबाहेर फायनान्स केल्याबद्दल आमेरीकेत केस चालू आहे) तर आमेरीकेतील अथवा इतर देशातील लोक भारतीय राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप शक्य नसला तरी अप्रत्यक्षपणे ओपीनीयन्स इन्फ्लूएन्स करण्याचा प्रयत्न न करता राहतील का ? आमेरीकेला भारत आणि पाकीस्तान (कडे अणवस्त्रे आहेत म्हणून ती खूपतात असे नव्हे तर इतरही देशांकडे अण्वस्त्रे असण्याच लॉजीकल समर्थन होऊ शकत त्यांच्या स्वतःच्या सामरीक सामर्थ्याला महत्व कमी होऊ शकत वगैरे किंवा खरोखरही भारतीय उपमहाद्वीपातील संघर्ष टोकाला गेलेतर काय या भिती मुळे जे किंवा जे काही कारण असेल ते) मध्ये काश्मिर प्रश्नावर चर्चा होऊन हवी असणे स्वाभाविक आहे आणि भारत इतर तीसर्‍या देशास या चर्चेत घेणार नाही हेही निश्चित आहे. भारत आणि पाकीस्तानच्या उजव्या नसलेल्या गटांकडून कितीही चर्चा झाल्या तरी जनतेची मान्यता मिळणार नाही; शॉक होऊ नका, मी आमेरीकन राजकारण्याच्या बुटात पाय ठेवले तर मी दोन्ही देशातील उजव्यांना पुढे येण्यास प्रोत्साहन देईन आणि चर्चेस बसवेन त्या करता दोन्ही कडे उजवे निवडून येतील या करता बरेच काही पडद्या मागून करण्यास जमलेतर करेन पण निश्चितपणे पडद्या मागून कारण माझा आमेरीकन राजकारणी म्हणून असा प्रत्यक्ष हस्तक्षेप भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही नागरीकांना खपणार नाही. हा भाग एक झाला. आपण इकॉनॉमीक टाईम्सचे आणि भारत आमेरीका व्यापारी संबधांच्या वृत्तांचे अभ्यासक असाल तर दुसर्‍या बाजूला आमेरीकन व्यावसायिकांना हव्या असलेल्या आणि भारत सरकार देत नसलेल्या सवलतींमुळे आम्रेरीकन व्यापार्‍यांची नाराजीमुळे आमेरीक प्रशासनावरील त्यांचे दबाव मननीय आहेत. मी लंडन ऑलीपीक्सच्यावेळेस एक युरोमेरीकन स्त्रीचे नाव भोपाळ गॅसवाल्यांची बाजू घेऊन आमेरीकन कंपनीला विरोध वगैरेकरताना वाचल्याचे आठवते त्यानंतर तीच स्त्री भारतातील एका चळवळीची (आर्थीक) बाजू घेताना दिसली . भोपाल गॅसवर कधी काळी लिहू म्हणून जे दुवे जपले होते ते उघडून पाहताना आंतरजालावरून तीचे नाव हळू हळू गायब होते आहे असे हलकेसे जाणवत होते अशात दोन एक महिन्यापुर्वी ती त्या सर्व संदर्भ दुव्यातून हरवली होती. कदाचीत दुवे नैसर्गिक पणे बंद पडले असतील कदाचित माझा संशयवाद पुर्ण चुकीचाही असू शकतो. अशातील काही लोकांच्या भूमिका इराणशी संबंध सुधारण्यास साहाय्यभूत असणार्‍या असू शकतात असे वाटले सर्व संशय चुकीचे असू शकतात. उद्देश कोणत्याही भारतीय व्यक्ती अथवा पक्षाकडे बोट दाखवण्याचाही नाही. भारतातील निवडणूका परकीय लोकांना पुर्णपणे प्रभावीत करता येणे निश्चीतपणे अशक्य आहे. सध्याचेच भारत सरकार खूप आमेरीकाभिमूख होते तरीही दुरावा येण्याचे थांबले नाही. पाहिजे ते प्रशासन आणून हवे ते सगळे साध्य करता येईल एवढाही कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी भारत कच्चा नक्कीच नाही त्यामुळे अशा शक्यतांची खूप चिंता करावी असे वाटत नाही. माझ्या सागंण्याचा मतितार्थ परकीयवृत्तसंस्थाच्या वृत्तांना प्रमाणा बाहेर महत्व देणे आपण टाळले पाहिजे. किमान पक्षी त्यांच्या वृत्तांनी भारतीय हुरळून जातात त्यांच्या वृत्तात अभिप्रेत असे अर्थ काढून प्रभावित होतात असे त्यांना कळता कामा नये. माझी व्यक्तीगत मते आहेत कोणताही विदा आकडेवारी संदर्भ देणे कदाचित शक्य असणार नाही. कोणत्याही वादात पडण्याचे टाळावे म्हणून मी मिपावर हे लिहिणे टाळले होतो. हा प्रतिसाद न पटल्यास ह.घ्या नाहीतर माझा आणि आनन्दा यांच्यातील व्यक्तीगत मतांचा संवाद म्हणून सोडून द्यावे.

In reply to by आनन्दा

आयुर्हित 24/04/2014 - 17:11
यादी मॅनिप्युलेट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला आहे पण तो Time कडूनच. नाहीतर ५ दिवसात, १७ एप्रिलच्या बातम्यांत मोदी आणि AK४९ चे पहिल्या पाचात नाव असले पाहिजे होते. Time चा हेतू चुकीची माहिती देवून भारतीय(अति हुशार /अति भावनिक)लोकांना गुमराह करायचा दिसतोय, हे नक्की.

In reply to by पैसा

विकास 24/04/2014 - 17:55
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं! व्हॉट्सअ‍ॅप वर टेक्स्टींग करायचे सोडून टाईम साप्ताहीकाकडे जायला कुणाला वेळ तरी आहे का? उगाच आपले काहीतरी... ;)

मोदी पंतप्रधान झाले तर तीन गोष्टी प्राधान्यक्रमानं करतील : १) स्वतःचं लग्न! कारण ते स्वतःला मोस्ट इलिजिबल बॅचलर समजतात. आपकी अदालतमधे पूर्वी झालेल्या इंटर्व्यूमधे ते (लाजत लाजत) म्हणाले होते : "हमको सरकारने जमीन (प्लॉट) तो दे दी है, अब मकान कब बनेगा देखना है". (जसोदाबेन बघा वाट) २) अंबानी, अडानी आणि डिएलफनं प्रचारात केलेल्या उपकाराची भरघोस परतफेड बिजेपीच्या खास `कॉर्पोरेट किक बॅक स्टाईलनं' करणार. (काँग्रेसी अवाक, त्यांचे एकामागून एक घोटाळे उघड होतात आणि हे डोळ्यादेखत लुटतायंत पण काही करता येत नाही) ३) ज्या एकमेव मुद्यावर संघानं (आणि वरुन दाखवायला बिजेपीनं) त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार बनवलं त्याची परिपूर्ती करणार, राममंदिर बांधून! (असंख्य भारतीय खूष! आणि देशासाठी कायमची डोकेदुखी!)

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन 24/04/2014 - 10:26
माणसानं किती किती म्हणून आशावादी असावं ह्यासाठी आजच्या पिढीने तुमच्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे :))

In reply to by सुहासदवन

आता टाईम्सच्या ओपिनियन पोलनं व्यापक स्तरावर लोक काय विचार करतात हे दाखवून दिलंय त्यामुळे बिजेपीप्रेमींची जळजळ होतेयं इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 24/04/2014 - 17:57
लेखात प्रश्न केजरीवालांच्या संदर्भात विचारले होते पण आपण त्या ठिकाणी चुकून मोदी वाचलेले दिसतेयं! असो.

आयुर्हित 24/04/2014 - 10:41
खरोखरच Time चे मनापासून कौतुक करावेसे वाटते. Time सारख्यांनी आपला धंधा(हो धंधाच!) कसा वाढवावा, याचा हा पाठ इतर माध्यमांनी घेण्यासारखा आहे. जो माणूस दिल्लीमध्ये ५०० रुपये दान दिलेल्या एका रिक्षावाल्या वर प्रभाव पाडू शकला नाही,तो जगातील एक नंबरचा प्रभावी नेता कसा असू शकेल? भारताच्या गृहमंत्र्यावर/पोलीस आयुक्तांवर/LGवर काय प्रभाव पाडला होता तेही सर्वांना माहिती आहेच. ज्याने "येडा मुख्यमंत्री" हे शिंदेंनी दिलेलं बिरूद, राजीनामा देऊन सार्थ ठरविले. माझ्या मते जगातला तर सोडाच, भारतातला एक नंबरचा विनोदी माणूस/जोकर म्हणून Time ने नाव घ्यावे. Time ने जी लिस्ट दिली आहे त्यात १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत २०१४ मध्ये "अण्णा हजारे" का नाहीत? माझ्यामते भारतातील रिकामटेकडी जनता जी facebook वर like करते, त्याच्या संख्येवरून ही लिस्ट बनविली आहे, जी पूर्ण पणे बरोबर आहे फक्त "Most liked/disliked people" या नावाने छापली गेली पाहिजे होती. Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे व आपली ही अक्षम्य चूक कशी सुधारता येईल हे पाहावे.

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत 24/04/2014 - 21:32
संजयजी पूर्वग्रसित होऊन मते बनवू नका. किमान योजना आयोगचे अहवाल तरी वाचत जा. ११व्या योजनेत भा ज प शासित राज्यांची कामगिरी अन्य राज्यांपेक्षा जास्त चांगली होती. हे सत्य आहे. बाकी मोदी आल्याने देशात मूलभूत -अर्थात रस्ते, रेल्वे, सिंचन, वीज इत्यादींना महत्व दिले जाईल ज्याने भारतीय उद्योगांचा विकास होईल. अमेरिकेला हे नको आहे म्हणून अमेरिका मोदी विरोधात आहे. ज्या पक्षाच्या १५० अधिक केजरीवाल समेत असे उम्मेद्वार आहेत ज्यांच्या NGO ला कुठून मदत मिळते सांगायची गरज नाही. खाल्लेला मिठाला जगावे लागेतेच. दिल्लीत वीज दर कमी करण्या एवजी सबसिडी वाढवली. सबसिडीचा पैसा कंपनीला बिन विल वसूल करताच मिळतो दिल्लीत वीज बिल वसूल करणे काही सौपे काम नाही. जेवढी जास्त सबसिडी तेवढा जास्त अंबानीचा फायदा (कुणाच्या खिशात आहे, कोण आहे लवकरच कळेल, घोर निराशा होईल) म्हण आहे न चोर मचाये शोर. .

In reply to by विवेकपटाईत

मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं आहे ही गोष्ट उघड दिसत असतांना, उगीच एखाद्या बथ्थड राजकीय नेत्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत `परकीय हस्तक्षेप आहे' असा कल्पनाविलास करणं हा भलताच ग्रह आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन 25/04/2014 - 13:08
मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं
ह्या अश्या प्याद्यांचा उपयोग करूनच जवळ जवळ प्रत्येक मोठा उद्योजक आपली पो़ळी भाजून घेत असतो, त्यात गैर काय आहे? प्रत्येक राज्यात तिथला मोठा उद्योगपती किंवा तेथील उद्योजक हे त्या राज्याच्या शासनावर थोडाफार प्रभाव ठेवून असतातच. शेवटी पैशाची आणि उद्योगांची मोठी उलाढाल तेच करतात. शासकीय तिजोरीत महत्वाची भर तेच घालत असतात. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा साखर आणि सहकाराच्या पैशाच्या माध्यमातून (पण फक्त) महाराष्ट्राच्या शासनावर प्रभाव ठेवून असतातच की. आता समजा मोदीनी अंबानी-अडानी किंवा गुजरात मधील उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत किंवा भारतातील इतर उद्योगांना गुजरातमध्ये एक महत्वाचे स्थान मिळ्वून दिले आहे, तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला कोणी रोखले होते, असे काही करण्यापासून? अंबानी-अडानी च्या लेवलला जाऊ द्या पण महाराष्ट्राच्या मातीतील किती उद्योगांना किंवा उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत स्वत:चे असे स्थान आहे? टाटा नॅनो सारखे किती उद्योग दुसर्‍या राज्यातून खेचून आणून महाराष्ट्रात उभारले गेले? उद्योगांचं जाऊ द्या, महाराष्ट्राच्या नेत्यांचे तरी काय स्थान आणि प्रभाव आहे भारतीय बाजारपेठेत (दिल्लीत)? चांगल किंवा वाईट जाऊ द्या. पण निदान राष्ट्रीय लेवलला अंबानी-अडानी ह्यांच्या सारख्या उद्योजकांचे मोदींशी नाव तरी जो़डले जाते, गुजरातला ते निदान रिप्रेजेंट तरी करतात, पॄथ्वीराज चव्हांणाचे नाव, निदान आडनाव घेतल्यावर तरी कोणता (आदर्श) उद्योग किंवा उद्योजक आठवतो? महाराष्ट्राच्या शासनाने खरंच काही चांगलं केलं असेल तर मग करा ना मार्केटिंग ह्या सार्‍याची. वाट कसली बघताय...मोदी सरकारची!

In reply to by सुहासदवन

त्यानं मोनॉपॉली वाढते आणि त्यात जनतेला पर्याय न राहिल्यानं ती लुटली जाते. मोदी काय किंवा काँग्रेस काय मला सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवणं गैर वाटतं. इंडस्ट्री जनहितासाठी चालली पाहिजे आणि इंडस्टियालिस्टलाही फायदा व्ह्यायला हवा पण संपत्तीच बेतहाशा केंद्रिकरण गैर आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 25/04/2014 - 14:56
सं.क्षी. लेखापरिक्षण आणि अर्थशास्त्र या बाबत आम्हाला आपल्या एवढ प्रगाढ ज्ञान नाही. आमच्या मते दोन गोष्टी आहेत व्यक्ती/संस्था आपल्या भोवतालच्या समाज, संस्कृती आणि व्यवस्थेचीच निर्मिती असतात. घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे. मला आपल्या व्यवसायाला लक्ष्य करायच नाही. पण भारतात लेखापालांची लेखापरिक्षकांची एकुण संख्या किती ? त्यां सर्वांचा सर्व कारभार शुद्ध आदर्श नितीमुल्यांनी चालू आहे असे सर्टीफीकेट आपण द्याल काय ? एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ? संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची. आता महाराष्ट्रातली मतदान संपली आहेत आपापले राजकीय अंगरखे उतरवून समतोल विचारकरणे आत्मपरिक्षणही करणे या बद्दल सर्वांनीच सवडीने विचार करावा, (आणि मी हा निघालो बोलल्याप्रमाणे करण्यासाठी)

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 25/04/2014 - 14:57
संजय क्षीरसागरजी, आधी माणसं ओळखायला शिका! बाकी आपोआप चांगले होईल हो.त्यासाठी आआपजी गरज नाही. आणि हो एक अजून, आम्हाला बोलवा हो थेठरात,सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवतांना बघायला आवडेल! कोण पवार की सोनिया की पप्पू नाचणार आहे तेही कळवा आधी!

In reply to by आयुर्हित

घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे.
चुक नाही फ्रॉड हा शब्द लक्षात घ्या. फ्रॉड म्हणजे संगनमतानं केलेला अपहार. तो व्यवस्थापनातल्या पद्धती डावलून होतो आणि पैशाचा हव्यास हे त्याचं एकमेव कारण असतं.
एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ?
दादाश्री, कोणतीही इमानदार व्यक्ती बेईमान माणसाचं काम करत नाही असा माझा व्यावसायिक अनुभव आहे. You can't bend honesty with money. त्यामुळे बेईमान उद्योजकाची मेहेरबानी प्रामाणिक माणूस स्विकारतच नाही! मोदी; अडानी, अंबानी आणि डिएलएफच्या विमानातनं फिरतायंत आणि या कंपन्यांची कार्यप्रणाली उद्योग जगतात मशहूर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही झाकले तरी मोदी उघडे पडणा. पण डोळेझाकच करायचीये म्हटल्यावर विवेकाचा प्रश्नच मिटला.
संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची
संशय कसला? उघड दिसतंय. आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. असो, आता संधी गेलीये त्यामुळे बोलून उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 25/04/2014 - 22:11
आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. मोदी निवडणूक आणि बहुमतवाल्या पक्षाचे नेते म्हणून निर्वाचीत प्रतिनिधीअंतर्गत निवडणूक जिंकले की मोदीविरोधकांनी मोदी लाट नाही पण मोदीविरोधाची ओहटी मान्य केली ? :) मात्र एक प्रश्न नक्कीच पडतो. जर चुकून मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी कुठलेही वादग्रस्त निर्णय न घेता जनतेच्या भल्यासाठी राज्य केले तर तुम्ही ते तसे वागले हे मान्य कराल का तरी देखील मोदी वाईटच असतील? माझ्या पुरते बोलायचे तर केजरीवालांनी चांगले मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले असते तर आणि अगदी उद्या तेच काय पण पप्पू गांधी जरी पंप्र झाला आणि चांगले निर्णय घेतले तर मी स्वागतच करेन. पण मला मोदी विरोधकांची याबाबतीत खात्री नाही म्हणून विचारत आहे.

In reply to by विकास

इतकंच वाटतं. देशातला भ्रष्टाचार रोखला गेला आणि महागाई आवाक्यात आली की लोक सुखी होतील. मग ते मोदी की आणखी कुणी केलं यानं फरक पडत नाही. अर्थात मोदी जे बोललेत तसे वागले तर त्यांचं मनापासून कौतुक करीन यात वाद नाही. केजरीवालांच्या दिल्लीतल्या राजकीय कारकिर्दी विषयी मतभेद आहेत. मला त्यांच्या सचोटी विषयी तिळमात्र शंका नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा 26/04/2014 - 11:07
मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा
मला वाटते संधी सर्वांना समानच मिळते. काही लोक त्यचा अधिक फायदा घेतात इतकेच. बाकी मी कोणत्याच माणसाला त्याच्या तात्कालिक कृत्यांवरून मापत नाही, अनेक गोष्टींचे दीर्घकालीन परिणाम समजण्यास आपण कमी पडतो, ते बर्‍याच वेळेस राजकारणी लोक दूरदॄष्टीने पाहत असतात, तेव्हा मोदींनी गेली २ वर्ष अदानींवर कृपा केली, डीएलएफचे विमान वापरले म्हणजे नंतर देखील असेच करतील असे नाही. त्या व्यक्तीचे दीर्घकालीन उद्दिष्ट, त्यांचे चरित्र्य वगैरे गोष्टी देखील बघणे आवश्यक आहे. आणि मोदी त्य कसोटीवर उतरतात म्हणूनच माझ त्यांना पाठिम्बा आहे. बाकी चारित्र्य वगैरे गोष्टींवर मोदींची तुलना मनमोहनसिंगांशी करयला माझी ना नाही. आणि मुख्य म्हणजे, माझा क्रांती पेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, आणि हेच मला मोदींपेक्षा केजरीवाल जास्त आवडतात.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 25/04/2014 - 23:56
सं.क्षी. राजकारण बाजूला ठेवल तरी तुम्ही प्रश्नांचा फारच एकांगी विचार करता असं वाटत. मी व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्हीही टाळतो. मी मोदी समर्थक नसताना (मी कोणत्याही एका पक्षाचा कधीच समर्थक नव्हतो) सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो हे अनुभवताना गंमत दुसरीकडे काळजी वाटते काँग्रेसची जागा घेण्याची चांगली संधी असलेला एक पक्ष मतदारांनाच दोषी ठरवत मोठा होऊ पहातो आहे. लोकांना कन्व्हीन्स करण्याच्या मोठे होण्याच्या अशा पद्धती यशस्वी होत असतील तर माहीत नाही सामान्य माणूस म्हणून बघताना प्रांजळपणे सांगायचे झाले तर जुनेच औषध (पद्धतीचे) नव्या बाटली (नव्या नावाने) माझा देश एक चांगल्या बदलाची संधी दवडत नाही ना अशी साशंकता येते हे एक. अशा साशंकता व्यक्त करणार्‍यांना विश्वासात घेण्या एवजी नकारात्मक मार्केटींगचा आधार हे दोन. आणि असे दाखवून देणार्‍यांची लगेच विरोधक म्हणून बोळवण हे तीन, असे सांगणार्‍यांचे ऐकण्याची एक पैसाही तयारी नसणे हे चार, म्हणजे जो तुमचा विरोधक नाही तो पण विरोधक कसा होईल हे स्वतःहून पहाणे. आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही ? उत्साह उपयोगाला येतो पण मर्यादा असतात, महाराष्ट्रात निवडणूका संपल्यात जमा आहेत अंगरखे आणि चष्मे बाजूस ठेऊन आत्मपरीक्षणही केल्यास पुढच्या वेळी आपल्यालाच प्रचारात सुधारणा करण्यास आपल्या चाहत्याची बाजू अधीक समर्पक पणे मांडण्यास उपयोग होईल. माझ्या खालील धाग्याचे सावकाशीने वाचन करावे घाई नाही. नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

In reply to by माहितगार

हो ना, कारण तुम्ही फक्त माहिती जमवतायं,जस्ट अ कॉपी-पेस्ट जॉब ! माहितगाराला स्वतःचं मत नसतं. आणि मजा अशीये की तरी सुद्धा तुमची मतं लपत नाहीत! ही दोलायमान स्थिती आहे आणि त्यामुळे निरुपयोगी ठरते. न घरका न घाटका. तुम्ही म्हटलंय `आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही? ' हे तुम्ही स्वतःचं मत स्वतःवरच लादतायं कारण मी असं कुठेही म्हटलं नाही. उलट तुमच्या प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर दिलं होतं. नुसती माहिती जमवणारा, मोदी हा कॉर्पोरेट फ्रॉड आहे याचा प्रतिवाद करु शकत नाही. तुम्ही तुमच्या धाग्यांची लिस्ट दिली आहे. मी तुमचे धागे वाचत नाही कारण मला ते निरर्थक वाटतात.

आयुर्हित 24/04/2014 - 12:38
विकासजी, आपणास धन्यवाद! आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. हा प्रतिसाद वाचून Time ने चक्क Heading बदलले! नवे heading असे आहे : Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll आधीचे heading असे होते: The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 24/04/2014 - 13:09
>>>आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. >>>संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे. मिपावर श्रेणी देण्याचा प्रकार सुरु होणार आहे का? 'अतिविनोदी' अशी श्रेणी द्यावी-शी वाटत आहे. माणसानं स्वतःबद्दल किती अवास्तव कल्पना कराव्यात ह्याला काही मर्यादा???????????? अवास्तव कल्पना करण्यासाठी ठेवलाय ना एक माणूस मिपावर? कोटा वाढवलाय काय?? ;)

In reply to by आयुर्हित

Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
हे शीर्षक आधीच्या या शीर्षकापेक्षा
The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll
निश्चित जास्त प्रभावी आणि स्पष्ट आहे. (संपादित)

आयुर्हित 24/04/2014 - 13:17
हा विनोद ही नाही, सत्य घटना आहे. पाहिजे तर माझ्याकडे Time चा मूळ लेख, नवा लेख व लेखावरील सर्व कॉमेंट्स copy करून ठेवल्यात. Mail id द्या, mail करतो आपणास!

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 24/04/2014 - 13:44
इथेच टाका की. तुम्च्या प्रतिसादानं टाईमचं हेडींग बदललं असेल तर कौतुकच आहे. टाका इथं. लिंक दिलीत तरी चालेल. तुम्हाला जमत नसेल तर संपादकांना सांगा. मिपाचा एक प्रकारचा विजय असल्यानं संपादक अथवा मालक सुद्धा मदत करतीलच ही खात्री आहे.

In reply to by प्यारे१

आयुर्हित 24/04/2014 - 14:20
प्रशांतजी व admin आपल्याला mail पाठवला आहे. व लिंक्स जोडल्या आहेत. यात पहिल्या file मध्ये ४८८ comments होत्या, ज्या नवीन धाग्यात फक्त ९५ दिसत आहेत, ज्यात माझी comment मला सापडली नाही (बहुतेक उडवलेली दिसते!) आधीचे Heading असलेली file The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll आत्ताचे Heading असलेली file Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस 25/04/2014 - 15:38
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की टाईम्सच्या साईटवर तुम्ही मराठीतून प्रतिक्रीया पाठवलीत. ती त्यांना समजली म्हणून त्यांनी लेखाचं शिर्षक बदललं. आणि ते तुमच्या प्रतिक्रीयेमुळे बदललं हे कुणाला कळू नये म्हणून तुमची मराठीतली प्रतिक्रीया पण उडवली? *ROFL*

चित्रगुप्त 24/04/2014 - 13:42
माझ्या माहिती प्रमाणे पॅरिस मधे आयफेल टॉवर जवळ केजरीवाल प्रेमींनी एक मोठी सभा भरवली होती, त्यानंतर पत्रके वगैरेही वितरित केली गेली होती. याप्रकारच्या सभा परदेशात मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्यास 'टाईम' ने त्या आधारावर मूल्यमापन केले असू शकते. या सभेविषयी जास्त माहिती हवी असल्यास मिळू शकते.

मृत्युन्जय 24/04/2014 - 14:03
एक मिनिट. का फुकाची चर्चा करतो आहोत आपण? जर समजा केजरी वाराणसीमधुन निवडुन आले तर काय ते स्पष्ट होइलच की. मला वाटते केजरीवाल जर जिंकले तर ते जास्त लोकप्रिय आणि प्रभावी आहेत हे लोकांनी मान्य केलेच पाहिजे. टाइम वर आपला विश्वास नसेल कदाचित. जनमतावर ठेउयात ना. तिथे तर कळेलच की. बादवे: अब की बार मोदी सरकार ;)

पैसा 24/04/2014 - 14:33
विकास यांनी विडंबन म्हणून लिहिलेल्या धाग्यावर गंभीर वाद सुरू झाले ही धाग्याची शोकांतिका! आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं. या यादीत ओबामाकाका कुठे आहेत मग?

In reply to by पैसा

माहितगार 24/04/2014 - 14:47
मतदान फेर्‍या संपत आल्यात वादाच्या आपापल्या तोफा वेगवेगळ्या समर्थक मंडळींनी थंड करावयास ठेवल्यास हरकत नाही. धागा आणि मिपावर शांतता नांदण्याच्या दृष्टीने माझे प्रतिसाद कुठे उडवण्याची गरज भासल्यास मोकळेपणाने उडवावा ही नम्र विनंती.

In reply to by माहितगार

पैसा 24/04/2014 - 14:50
माझा प्रतिसाद केवळ एक सामान्य सदस्य म्हणून आहे. तुमच्या एकट्याच्या गंभीर प्रतिसादांचा तिथे काही संबंध नाही. बाकी खूपजण हा धागा गंभीरपणे घेताना बघून मला जाम गंमत वाटत आहे!

In reply to by पैसा

माहितगार 24/04/2014 - 15:01
होय ना या धाग्याचा वेगळा उद्देशपाहून मी माझा वेगळा धागा काढला होता. (तरीही आनन्दांना लांबलचक प्रतिसाद देत बसलो :) ) एनीवे समर्थकांना त्यांचे त्यांचे लोक निवडून येण्याचा सारा प्रभाव मिपा धाग्यांमूळे पडतो एवढा मिपावर विश्वास आहे हे अशा निमीत्ताने सिद्ध होते हे काय कमी आहे ? :) मत आतातशी मतपेटीत गेली पुढची पाचवर्षे हसायचंच काम आहे ;)

In reply to by पैसा

अजून मुंबईत संध्याकाळपर्यंत मतदान होईल आणि टाइम पोलसारख्या गोष्टींचा सूज्ञ लोक (हॅ हॅ हॅ वाले सोडा, त्यांना कशाचंच काही पडलेलं नाही), निश्चित विचार करतील अशी अपेक्षा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 24/04/2014 - 15:38
तर अर्ध्या दिवसाच घोडा मैदान बाकी आहे म्हणताय ? टाइम टाइम ची बात आहे तर !! जो जे वांछील तो ते लाहो आमच्या शुभेच्छा जशा इतरांना तश्याच तुम्हालाही मतदानाचा अर्धा दिवस तुमच्या इच्छेनुसार जावो ही सदिच्छा. विरोधकहो नाराज होऊ नका अशाच सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत. (कुणीही निवडून आले तरी माहितगारच्याच सदिच्छेने ;) ह. घ्या.)

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 24/04/2014 - 15:49
सं.क्षी. राजकारण हा विषय कधीच हसण्यावारी नेत नाहीत असे दिसते. ज्याची त्याची मर्जी पण इतर कोणत्यातरी आवडीच्या विषयात कधी तरी अधून मधून मोकळेपणाने हसून घेत रहा म्हणजे झाले. आपल्या आनंदा करता आमच्या केजरींनाही शुभेच्छा.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 24/04/2014 - 15:49
तुम्हाला केजरीवाल गंमतीशीर वाटतात का? मला ब्वा विनोदी धाग्याला गंभीरपणे घेणारे लोक गंमतीशीर वाटतात! आणि टाईम मॅगेझीनसुद्धा!
आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं.

रजनीकांत नंतर श्री केजरीवाल, श्री मोदी, कु. राहुलगांधी ही आजच्या तारखेला भारतीय सोशलसाईटसवर चांगल्यावाईट कारणांनी धुमाकूळ घालणारी लोकप्रिय व्यक्तीमत्वे आहेत. यात अगदी सौ. सनी लिऑनचेही नाव जोडू शकता. दर दुसरा फॉर्वर्डेड मेसेज यांच्यापैकी एकावरच असतो. त्यामुळे यालाच जनमाणसांवर टाकलेला प्रभाव म्हणून गणले तर हे शक्यय.

विकास 24/04/2014 - 17:03
वर पैसाताईंनी म्हणल्याप्रमाणे हा धागा विरंगुळा आणि ऋषिकेश यांच्या "मोदी पंप्र झाले तर" धाग्याचे काहीसे विडंबन होते. थोडक्यात निव्वळ टाईमपास. अर्थात टाईम साप्ताहीकाने टाईमपास केलेला नाही! एका अर्थाने त्यांचा हा business survey आहे. सध्या टाईम जास्त कुठे वाचले जाऊ शकते, कोण वाचते आणि काय वाचते याचा एक ढोबळ अंदाज यात लागू शकतो असे वाटते. यात टाईम ने कुठेही काही ठरवलेले नाही. निव्वळ जे काही हो - नाही मत पडले त्यावरून क्रमवारी ठरवली आहे. यात केजरीवालांना "हो" अशी जास्त मते मिळाली म्हणून ते "या टाईमाचे" प्रभावी नेते झाले तर मोदींना "नो" म्हणून सगळ्यात जास्त मते मिळाल्याने ते "टाईमलेस" प्रभावी नेते झाले! ;)

१. अरविंद केजरीवाल २. नरेंद्र मोदी ३. Katy Perry : गायिका ४. Justin Bieber : पॉप गायक ५. Laverne Cox : अभिनेत्री ६. Rihanna : अभिनेत्री आणि गायिका ७. Benedict Cumberbatch : नट ८. Beyonce Knowles : अभिनेत्री आणि गायिका ९. Jared Leto : नट, दिग्दर्शक, निर्माता, इ. १०. Lupita Nyong'o : अभिनेत्री, दिग्दर्शक, इ.................................... इतके पुरे नाही का ?! लोक्स, लोक्स, लोक्स... या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय? वरचा डेटा आणि शेवटच्या एकदोन दिवसांतील झालेले मतदान पाहता, एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! इथे तर त्याचा "सबळ पुरावा" म्हणून वापरत लोक "बाजारात तूरी... " चा संगित प्रयोग करत आहेत?! =)) . =)) . =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकास 24/04/2014 - 17:35
एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! सहमत. बाजारात बाकी धान्याचा तुटवडा असला तरी तुरीचे अमाप पिक आले आहे, त्यामुळे काळजी नसावी. ;)

क्लिंटन 24/04/2014 - 17:41
या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय?
छे हो इस्पिक एक्का असे कसे म्हणता? मोदींना मागे टाकून केजरीवाल पहिल्या क्रमांकावर आले आहेत यामुळे मोदी समर्थकांचा कसा जळफळाट होत आहे हे बघितले नाहीत का? :) टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. केजरीवालांना ३२ लाख मते मिळाली आहेत म्हणे. एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का?

In reply to by क्लिंटन

प्यारे१ 24/04/2014 - 18:24
>>>>>>>रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? छे छे! रजनीकांतनं घेतलेल्या सर्व्हेमध्ये टाईमला पहिल्या १० अब्ज मध्ये स्थान नाही!

In reply to by प्यारे१

मदनबाण 25/04/2014 - 15:29
एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? हॅ.हॅ.हॅ... रजनी अण्णाचे नाव जर टाकले असते तर टाईमचा सर्वर लगेच क्रॅश नसता का झाला ? ;)

In reply to by क्लिंटन

नक्कीच. पण आजकाल "केवळ सोईच्याच नव्हे तर आस्तित्वात नसलेल्या / व्हर्च्युअल राईचा देखिल पर्वत करणे" आणि "समोर असलेला गैरसोईचा पर्वत स्वतःचे डोळे घट्ट झाकून आस्तित्वातच नाही" असे म्हणणार्‍या स्वयंघोषीत विचारवंतांची लाट आली आहे... हा आजार सर्वकाळ (एंडेमिक) असतो आणि निवडणूकीच्या मोसमात त्याची जोरदार साथ (एपिडेमिक) येते. काहीजणांत याची लागण उपायापलिकडे गेलेली असल्याने डेटा, अकाऊंटींग, सारासार बुद्धी, समतोल विचार, इ औषधांचा फायदा तर होत नाहीच पण उलट जोरदार अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते ! ;) :)

In reply to by क्लिंटन

टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. एकदा सर्व लोकांना खुला व्हर्चुअल सर्व्हे संस्थळावर प्रसिद्ध केला की मग कोणाला त्याच्या अश्या दुरुपयोगापासून थांबवणे केवळ अशक्य आहे. मात्र त्यात सापडलेल्या डेटाचा खरेपणा आणि उपयुक्तता ठरवायला शास्त्रिय अक्कल जरूर लागते ;)

जयनीत 24/04/2014 - 18:58
कुठल्या एका सर्वेक्षणात कोण आघाडीवर दिसतो ह्याला कितपत महत्व द्यायचे? ही पत्रिका वेळोवेळी अशी सर्वेक्षणे करत असते? पण त्याने नेमके काय सिद्ध होते तेच कळत नाही. पहिल्या नंबर वर केजरीवाल असोत किंवा मोदी किंवा अगदी यादीत त्यांना स्थान ही नसले तरी काय बिघडणार आहे? आपण आपले मत त्या वरुन ठरवणार आहोत का?

विकास 24/04/2014 - 21:04
टाईम साप्ताहीकाने, दोन याद्या तयार केल्या आहेत. एक आहे ती त्यांच्या विश्लेषणानुसार सिलेक्टीव्ह प्रभावी व्यक्तीमत्वाची यादी ज्यात पहीले नाव बियॉन्सीचे आहे. Time 100 असे गुगगले तर ती यादी दिसते. आणि दुसरी यादी आहे : readers’ poll for the 2014 TIME 100 ज्यात एके पहीले आहेत. :( ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. हे ही नसे थोडके. ;)

In reply to by विकास

मदनबाण 25/04/2014 - 15:34
ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. परत एकदा... हॅ.हॅ.हॅ... ;) टाईमवाल्यांना एकेंची "नौटंकी" पराकोटीची आवडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! ;) जाता जाता :- कोणाला तरी केजरी मलेरिया किंवा केजरी काविळ झाल्याचे निदान झाले आहे म्हणे ! ;)

केजरीवाल यांच्याच आरोपानुसार काँग्रेस आणि भाजपा यांनी देशभरच्या मिडीयाला विकत घेतलेय. पण केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय :D

In reply to by तुमचा अभिषेक

आयुर्हित 24/04/2014 - 22:59
केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय असे नसून अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, भारताची अतर्गत सुरक्षा व पाक व्याप्त पाकिस्तानविषयी लुडबुड करायला.. असे आहे! कारण अमेरीकेच्या मिडीयाला माहिती आहे भारतात काही अतिहुशार/अतिभावनिक लोक आहेत AK४९ ला निवडून देणारे!

In reply to by आयुर्हित

विकास 25/04/2014 - 00:23
अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, बादरायणी पीजे... ;) घड्याळाचे काम टाईम दाखवणे आहे आणि घड्याळ हाताला बांधले जाते. याचा अर्थ घड्याळाची हाताशी बांधिलकी आहे. थोडक्यात टाईममधे केजरीवालांना प्राधान्य मिळते याचा अर्थ त्यांचे घड्याळाशी आणि हाताशी संबंध आहेत. :#

नांदेडीअन 24/04/2014 - 23:00
"More than 3.2 million votes were cast in the poll. There were attempts to inflate the voting numbers, but only legitimate votes were tabulated for the final results. On Thursday, TIME will announce this year’s TIME 100 honorees, who are selected by the editors." http://time.com/73538/indian-politician-arvind-kejriwal-wins-time-100-readers-poll/

श्रीगुरुजी 25/04/2014 - 14:35
आकडेवारीचा काहीतरी घोळ दिसतोय. "टाईम"च्या सर्वेक्षणात अवतारी महापुरूष केजरीवाल यांना २२,६५,३४० "येस" मते मिळाली आहेत व खलनायक मोदींना २५,२२,५६७ "येस" मते मिळाली आहेत. पण निकाल वेगळाच दाखवित आहेत.

वेताळ 25/04/2014 - 17:26
मुंबई- ब्रिटनमधील केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संस्थातील प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर तज्ज्ञ अशा सुमारे ७५ भारतीय वंशाच्या मान्यवरांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर टीका केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापक चेतन भट आणि गौतम अप्पा यांनी 'इंडिपेन्डंट' या डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका खुल्या पत्रात नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली आहे. 'मोदी सत्तेवर येण्याच्या कल्पनेने आम्ही भयभीत होतो,' असे त्यांनी म्हटले आहे. 'भारतीय लोक आपले पुढील सरकार निवडून देण्यासाठी मतदान करीत असताना नरेंद्र मोदी प्रणित भाजप सरकारबाबत आम्हाला लोकशाही, मानवाधिकार आणि सामाजिक, धार्मिक विविधतेबद्दल चिंता वाटते,' असे या पत्रात म्हटलं आहे. जगातील निर्वासित भारतिय बुध्दीजीवी लोकाना भारतातील लोकांची काळजी वाटत आहे. भारतातील बरेच बुध्दीजीवी व हुशार लोक मोदी पंतप्रधान झाल्यावर जसे हरदन्हळ्ळी देवेगौडा किंवा अनंतमुर्ती भारत सोडुन परदेशात स्थाईक होणार आहेत. मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे.

In reply to by वेताळ

मला तर असला सरळ सरळ हायजॅक केलेला सर्वे तसाच पुढे ढकलून प्रसिद्ध करणार्‍या टाइम च्या तब्येतिची काळजी वाटू लागली आहे !

In reply to by वेताळ

विकास 25/04/2014 - 17:57
मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे. खरे आहे. पण वास्तवीक त्यांच्या लक्षात येत नाही की मोदी सत्तेवर आले तर त्यांची संशोधनाकरता अनुदाने वाढणार आहेत. या भट्ट साहेबांनी Hindutva in the West: mapping the antinomies of diaspora nationalism असे २००० साली पुस्तक लिहीले होते. किती पैसे त्यांना मिळाले असतील ते बघा. पण नंतर शिंचे युपिए आले आणि या विषयावर दक्षिणाच मिळेनाशा झाल्या. आता मोदी आले की परत मिळू लागतील. माझे तर म्हणणे असे आहे की तुम्हा कुणाआ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट हवी असली तर या भट्ट साहेबांना आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि मोदींवर टिका केलेले स्वतःचे लेख, प्रतिसाद त्यांना पाठवा. तुम्हाला पण अनुदान मिळेल आणि मोदी कसे नरराक्षस आहेत असा (त्यांचाच पुस्तकातले संदर्भ घेऊन)नसंशोधनात्मक प्रबंध लिहील्यावर पिएचडी पण मिळेल.

चौकटराजा 25/04/2014 - 17:48
केजरीवाल की कचरावाल व मोदी की नुसतीच भाजप या झाडाची एक फांदी हे १६ मे ला ठरेल ना ! टाईम वाले , लाईफ वाले, इंडिया टु डे वाले काही का म्हणेनात ! राज ठाकरे की फक्त भाषणबाज ठाकरे हे ही १६ ला कळेल ना !

विकास 26/04/2014 - 07:02
टाईमच्या संपादकीयांच्या निवडीत टाईम १०० लीडरमधे मात्र मोदी आहेत. फरीद झकेरीयांनी करून दिलेली त्यांची ओळख पाश्चात्य माध्यमांच्या दृष्टीकोनातून पाहीले तर संतुलीत वाटली.

श्रीगुरुजी 24/05/2014 - 14:32
केजरीवाल ही व्यक्ती एकंदरीत सुधारण्याच्या पलिकडे गेलेली दिसतेय. गेल्या काही महिन्यात प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थराला जाऊन नौटंकी करणार्‍या या ढोंग्याला व त्याच्या पक्षाला निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन जमिनीवर आणले. पण अजूनही यांचे डोळे उघडत नाहीत. आपल्या नौटंकीला, खोट्या आरोपांना व ढोंगबाजीला जनता अजिबात फसत नाही हे यांच्या डोक्यात अजून घुसतच नाही. त्यांची आता नवीन नौटंकी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात केजरीवालांनी भारतातील त्यांच्या मते सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या ३० जणांची नावे जाहीर केली होती. त्यात गडकरींचे नाव टाकले होते. गांधी परिवाराची नावे अर्थातच त्यांच्या यादीत नव्हती. आपल्या आरोपांना पुरावे देण्याचे फालतू सोपस्कार त्यांना मान्य नसतात. कोणी पुरावे मागितले तर ते भ्रष्टाचार्‍यांच्या बाजूने आहेत असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. गडकरींनी प्रगल्भता दाखवून केजरीवालांविरूद्ध न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केल्यावर निवडणुकांचे निमित्त सांगून इतके दिवस या खटल्याला तोंड देण्याचे त्यांनी टाळले. आता निवडणुक संपल्यावर खटल्यापासून दूर पळायचे कारणच देता येईना. त्यामुळे सुनावणीला उपस्थित रहावे लागले. न्यायालयाने जामीनासाठी १०००० रूं.चा व्यक्तिगत बाँड मागितल्यावर सुरूवातीला देण्याची तयारी दाखवून नंतर घुमजाव केले व तुरूंगात जाणे पसंत केले. आपल्याला बाँड मागणे हे बेकायदेशीर आहे असेही त्यांनी न्यायाधीशांना सुनावले. त्यामुळे त्यांच्या कायद्याच्या अज्ञानाची न्यायाधीशांनी चांगलीच कानउघाडणी केली. ठराविक लोकांवर वाटेल ते बेलगाम आरोप करायचे, आरोपांचे पुरावे मागितल्यावर ते द्यायचे नाहीत कारण मुळातच बिनबुडाचे आरोप केलेले असतात, न्यायालयीन प्रक्रियेवर अविश्वास दाखवायचा आणि स्वतः हुतात्मा झाल्याचे नाटक करायचे ही केजरीवालांची मोड्यूस ऑपरंडी. हे धोरण पूर्ण अयशस्वी ठरले असताना पुन्हा एकदा त्याच नौटंकीच्या मार्गाने हे निघाले आहेत. मी पूर्वी एका धाग्यावर लिहिले होते की वि. प्र. सिंगांचा ज्या वेगाने उदय झाला, त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचा अस्त झाला. केजरीवालांचे तसेच होण्याची शक्यता दिसत होती. आता ही शक्यता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. केजरीवालांसारख्या माथेफिरू व हेकट व्यक्तींना जनतेने दिलेली शिक्षा पुरेशी नाही. त्यांचे डोके ताळ्यावर आणण्यासाठी तुरूंगवासासारख्या शॉक ट्रीटमेंटचीच गरज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असंका 25/05/2014 - 07:56
काय हो दादा, I Told You So असं म्हणायला धागे कमी पडायला लागले का? किती जुने जुने धागे वर काढताय? हा तर विनोदी म्हणून काढलेला धागा होता.... आणि इतकेच जर केजरीवाल अयशस्वी आहेत, तर एव्ह्ढे मोठमोठे प्रतिसाद देऊन त्यांचं महत्त्व का वाढवताय?

नानबा 24/05/2014 - 19:58
आष्ट्रेलियाचे सत्ताधारी अतिआदरणीय आणि जनतेचे लाडके माननीय टोनी अबॉट दादा मुठभर भांडवलशहांच्या हातातली बाहुले कसे बनलेत आणि इकडचा आम आदमी त्यामुळे कसा खवळला आहे हे दाखवण्यासाठी सिडनी हार्बर ब्रिजवर रास्ता रोको करून इकडल्या तिहारसदृश्य जेलात जाऊन बसावे...... :))
टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत.

आयाळ असलेला वाघ - १

स्पार्टाकस ·

शुचि 24/04/2014 - 18:12
वाघ-सिंहांना माणसाच्या रक्ताची चटक लागते हे खर आहे तर. पुस्तकात लंबानी शब्द असेल पण म्हणजेच लमाणी का? कारण लमाणी बायकांची वेशभूषाही वर वर्णन केल्यासारखीच अस्ते.

शुचि 24/04/2014 - 18:12
वाघ-सिंहांना माणसाच्या रक्ताची चटक लागते हे खर आहे तर. पुस्तकात लंबानी शब्द असेल पण म्हणजेच लमाणी का? कारण लमाणी बायकांची वेशभूषाही वर वर्णन केल्यासारखीच अस्ते.
लेखनविषय:
शिकार कथा सांगणं ही एक कला आहे. ऐकणा-याची किंवा वाचणा-याची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे शिका-याचं प्रमुख उद्दीष्ट असतं. शिकारीच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीची आणि आलेल्या अपयशाची तो उजळणी करत राहीला तर ते कंटाळवाणं च-हाट होण्याची शक्यता असते. आलेल्या अपयशाचा भाग वगळला तर प्रत्येक शिकार - वाघाची असो वा चित्त्याची - हा काही दिवसांचा आटपणारा आणि हमखास यशस्वी होणारा साधा सऱळ मामला असतो अशी समजून होण्याची दाट शक्यता असते. प्रत्यक्षात मात्र परिस्थीती बरोबर उलट असते. अनेकवेळा शिका-याला पराभवाचं तोंड पाहवं लागतं. काही ना काही कारणाने अपयशाचा सामना करावा लागतो.

'तेंडल्या'

किसन शिंदे ·

विकास 24/04/2014 - 05:32
लेखन एकदम आवडले! पण त्या ही परिस्थितीत मनावर भलीथोरली जखम घेऊन केनियाविरूध्दच्या सामन्यात तो पुन्हा मैदानावर उतरला आणि आपल्या सुरेख फलंदाजीने स्वर्गीय वडिलांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली देऊन गेला. त्याच्या खेळापेक्षाही (म्हणजे ते कमी आहे असे नाही) पण त्याच्या या वृत्तीमुळे त्याच्याबद्दल आदर वाटतो. आजही आपीएल ची दुबईतली मॅच सोडून तो केवळ मतदानासाठी मुंबईला येत आहे. हॅट्स ऑफ!

In reply to by विकास

सुबोध खरे 24/04/2014 - 10:31
मी तेंडुलकरचा चाहता असूनही मला एक प्रश्न पडला वाढदिवस नसता तर काही हजार रुपये खर्च करून तो मतदानासाठी मुंबईत आला असता का? आणि एका मतासाठी एमिरेट्स सारख्या विमान कम्पनीला पैसे देणे हे कितपत व्यवहार्य आहे.(एखादेवेळेस खासदार असल्याने एयर इंडियाचे तिकीट फुकट असेल म्हणून कि काय?) तात्पर्य:- आपण क्रिकेटची म्याच पहावी. क्रिकेटर काय करतो ते नव्हे. त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका

In reply to by सुबोध खरे

शिद 24/04/2014 - 13:46
त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका
+१११११ अगदी अगदी. पण मी जेव्हा असे म्हणतो त्यावेळी माझे बरेसचे सचिन भक्त मित्र माझ्यावर अगदी तुटून पडतात जसा शारजाला सचिन शेन वॉर्न वर तुटून पडला होता. :)

In reply to by सुबोध खरे

विकास 24/04/2014 - 20:19
सचीनने का केले हे केवळ त्यालाच माहीत. पण मला खात्री आहे की प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेस तो घरी नसणार. काही हजार रुपये त्याच्यासाठी काहीच नाहीत. कदाचीत तो (भारतरत्न + खासदार म्हणून मिळणारा)सरकारी पैसा वापरत देखील नसेल कारण त्याला गरज नाही. छपन्न प्रायोजक पैसे देतील.. पण केवळ सचीनच नाही तर कुठलिही सेलिब्रीटी व्यक्ती असे वागते तेंव्हा कळत-नकळत लोकांपुढे एक आदर्श ठेवत असते. सचीन ने ते नक्की केले असे वाटते. शहारूख, अमिर खान यांनी देखील मतदान करून पब्लीसिटी केली तरी म्हणूनच काही गैर वाटत नाही. नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 18:19
नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...
मला पण माझ्या कंपनी ने अमेरिका सोडा अगदी बंगलोर ला जरी पाठवले असते कामा साठी तरी मी मतदाना साठी आलो नसतो. तुम्ही तरी आला असता का?

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 18:16
आणि त्यात एव्हडे कौतुक करण्यासारखे काय आहे. कार्गील चे युद्ध चालू असताना, हाच माणुस पाकीस्तान शी वर्ड कप मधे मॅच खेळत होता.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 18:22
नव्हते ना बंद. पण ती लोक पाकीस्तान शी मॅच खेळत नव्हती. भारताचे सैनिक मरतायत आणि ही माणसे त्या मारणार्‍या देशाशी मॅच खेळतायत. :-( सचिन तेंव्हा अलरेडी सो कॉल्ड देवत्वाला पोचला होता, त्यामुळे तो Hard Stand घेण्याच्या परिस्थितीत होता. एखाद्या नविन खेळाडुने नाही घेतला तर समजु शकतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 25/04/2014 - 18:31
बर खेळला मॅच ... त्यात मैदानावर पाकिस्तानला "हरवले"च ना साले बांग्लादेशी इथे येउन आपल्याच डोक्यावर मिर्या वाटतात ... तेही दररोज...त्यासाठी काय करायचे मग?? "टगे" मु*यची गोश्ट करतात...त्यासाठी काय करायचे मग?? फक्त सचिन उलट उत्तर देत नाही म्हणुन काहिही बोलायचे

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 25/04/2014 - 18:34
आणि "भारताचे सैनिक मरतायत" यासाठी **त दम नसणारे नेते जबाबदार आहेत...वेळीच योग्य निर्णय घेतले असते तर सैनिक मरणे जाउदे...त्यांच्या सावलीलासुध्धा पाकडे टरकले असते

प्रचेतस 24/04/2014 - 08:24
लेख नेहमीप्रमाणेच आवडला. सचिनच्या कित्येक अविस्मरणिय खेळ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या पण शेवटी शेवटी त्याला खेळतांना पाहाणे म्हणजे दाढा पडलेल्या सिंहाने गवत खाण्यासारखे वेदनादायी वाटत होते.

इरसाल 24/04/2014 - 09:42
मस्त लिहीलेस मनातल्या भावनाच उतरवल्यात. असे पण एप्रिलमधे ग्रेट लोकांचे बड्डे असतात. ;)

चावटमेला 24/04/2014 - 12:00
पाकड्यांच्या पावणे तीनशे धावांचा पाठलाग करताना शोएब अख्तरला मारलेला अप्पर कट निव्वळ म्हणजे निव्वळ अप्रतिम
अगदि अगदि. बाकि काही म्हणा, पण ह्या एका फटक्याने भारत-पाकिस्तान सामन्यांतली हवाच काढून घेतली :)

बाबा पाटील 24/04/2014 - 13:09
एका खेळियाने...घातलेले गारुड आयुष्यभर मनावरुन उतरणार नाही.स्वतः खेळतो,त्यामुळे अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला ते केवळ अशक्य याची पुर्ण जाणिव आहे.म्हणुनच सचिन सम कोनी नाही.दोन ते अडिच दशक शाररिक त्याचबरोबर मानसिक फिटनेस टिकवन केवळ अतुल्य.देवा माझ्या आयुष्यात या माणसाचा खेळ मला पहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by बाबा पाटील

>>अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला...... +१ बाबा. बोलिंग मशीनसमोर "ओव्हरपिच आउटसाइड ऑफ" बॉल पडणार माहिती असतानासुद्धा ताशी १४० कि.मी. नी आलेल्या बॉलला बॅट लावता आली नाही तेव्हा क्रिकेट सोडलं. तेव्हापासून कुठल्याही क्रिकेटपटूला .... खरंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूला शिव्या घालणं बंद! समोरून येणारा बॉल अडवायला फे फे उडते.... मागे जाणार्‍या बॉलला दिशा देणं केवळ ह्यूमनली इम्पॉसिबल. बाकी लोकं बोलणारच. बोलूदेत! :-)

In reply to by जे.पी.मॉर्गन

बाबा पाटील 30/04/2014 - 13:43
जे कार्यकर्ते सचिनच्या बॅटींगला शिव्या घालतात ना त्यांच्या हातात बॅट देवुन गेला बाजार एखाद्या क्लबच्याच बोलर पुढे उभे करावे बघुयात काय होत.साला एक सेंटीमिटर्ने तरी पाय हलेल की नाही आणी हलला तर बॉल दिसेल की नाही त्यांनाच ठावुक

आजच्या पिढीतील आयपीएलमध्ये गेल मॅक्सवेल सारख्यांची फटकेबाजी बघत वाढलेल्यांना कदाचित सचिनच्या फटकेबाजीचे लोक का एवढे कौतुक करतात हे कधी समजणार नाही. पण हे ९०च्या दशकातील क्रिकेटप्रेमींनाच माहीती की सचिन काय अवलिया होता. अगदी तसेच जसे माझ्या पिढीतल्या लोकांना कदाचित समजणार नाही की संथ खेळणारा गावस्कर हि काय हस्ती होती. या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. वेस्टैंडीजच्या तोफखान्याला थंड करणारा गावस्कर असो वा पुर्ण भरातल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर वर्चस्व गाजवणारा सचिन असो यांची कामगिरी निव्वळ आकड्यात मोजणे हा त्यांचा अपमानच. फार मोठा विषय आहे सचिन म्हणजे, तुर्तास हॅपी बड्डे सचिन !!!

In reply to by तुमचा अभिषेक

@या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. >>> +++++१११११ सुडुक मोड ऑन>>> किसनदेवांनी सचिनदेवा'वर लिवलेला लेख अवडला! सुडुक मोड ऑफ>>> =))

मी_आहे_ना 24/04/2014 - 14:32
मस्त झकास लेख, प्रत्येक शब्दागणिक सचिनच्या खेळ्या डोळ्यांसमोर येउन गेल्या. काही काळ तो 'विकेट' मिळवणारा हुकमी गोलंदाजही होता (५-३२ सर्वोत्तम). मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची! खरंच एखाद्या वर्षापासून एकदिवसिय (आणि आता १६ नोव्हें २०१३ नंतर कसोटीतही) भारतीय संघात 'ते' नाव नाही बघून चुकल्यासारखं होतं. तेंडल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

In reply to by मी_आहे_ना

बॅटमॅन 24/04/2014 - 16:33
लेख मस्त आवडला.
मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची!
सॅऽचिन टेंडोल्कर हॅज हिट द बॉल अ माइल हाय!!! सॅऽचिन टेंडोल्कर इज द मॅस्टर ऑफ द गेम, व्हॉट ए वंऽडफुल स्ट्रोक बाय दि लिटल मास्टर!! शोएब बॉल्स अ यॉर्कर अँड सॅऽचिन टेंडोल्कर हॅज व्हॅक्ड इट ओव्हर मिड्विकेट!!!! हे असले कायबाय ऐकताना जे खत्रा फीलिंग यायचं त्याची बरोबरी अजून कशानेही होऊ शकत नाही.

जोशी 'ले' 24/04/2014 - 16:21
झक्कास लिहलयं किसन... कणेकर, संझगिरी या पैकी कुणाला आऊटसोर्स नव्हता केला ना हा लेख? :-) कुठेसं वाचलेलं आठवतंय कि ब्रॅड हाॅग ने त्याला पहिल्यांदा आउट केल्यावर खुप जल्लोष केला व दिवसाचा खेळ संपल्यावर त्या बाॅल वर सचिन ची स्वाक्षरी घ्यायला गेला तर त्यावर सचिन ने लिहलं वन्स इन द ब्ल्य मुन...त्या नंतर त्या बाॅलर समोर तीसएक मॅच खेळला पण त्याला परत व्हिकेट काही मिळाली नाहि सचिनची...

जबरी लेख पंचतारांकित विश्वात आपले असामान्यत्व गुणामुळे अनेक खेळातील दिग्गज पैसा , प्रसिद्धी , मदिरा मदिराक्षी मध्ये रमतांना पहिले आहे. अश्यात आपले मध्यमवर्गीयपण जपत आपल्या विनम्र व विनयशील स्वभावामुळे समोरच्याला आपला चाहता बनविण्याचे कसब ह्याची देही ह्याची डोळा मुंबई , लंडन मध्ये कितीतरी वेळा पहिले आहे. देवत्व बहाल झाल्यावर सुद्धा ते डोक्यात जाऊ न देणाऱ्या तेंडल्या माझ्यासाठी अवतारी पुरुष आहे.

लेखनाची शैली छान. लेख आवडला. बाकी सच्या फ्यान क्लबला असे उमाळे अधुन मधुन येतच राहतील असे वाटते. ;) अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत !
अगदी अगदी. हेच आलं होतं मनात. लेख मस्त झालाय. आवडला.

साऊथ अफ्रिकेविरुद्ध जेव्हा सच्याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा २०० धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता तेव्हा रवी शास्त्री म्हणाला होता "टेक अ बो मास्टर" तेव्हा आलेले शहारे अजुनही आठवतात. या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! टेक अ बो मास्टर __/\__!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सुहासदवन 28/04/2014 - 10:37
या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! पण त्याच वेळेला पिचच्या दुसर्‍या टोकाकडून अल्टिमेट मि. अप्पॉर्चुनिस्ट म्हणजे धोनी, हा सचिनला स्ट्राईक न देता स्वतः चौकार मारत बसला होता आणि सचिनचे दुहेरी शतक चुकते की काय असे वाटू लागले होते.

श्रीगुरुजी 28/04/2014 - 14:54
सुंदर लेख! मी सचिनचा पहिल्यापासूनच भक्त आहे. गावसकर निवृत्त झाल्यावर रिकामा झालेला कोनाडा सचिनने भरून काढला होता. आता सचिन निवृत्त झाल्यावर अजूनतरी नवीन देव सापडलेला नाही.

विकास 24/04/2014 - 05:32
लेखन एकदम आवडले! पण त्या ही परिस्थितीत मनावर भलीथोरली जखम घेऊन केनियाविरूध्दच्या सामन्यात तो पुन्हा मैदानावर उतरला आणि आपल्या सुरेख फलंदाजीने स्वर्गीय वडिलांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली देऊन गेला. त्याच्या खेळापेक्षाही (म्हणजे ते कमी आहे असे नाही) पण त्याच्या या वृत्तीमुळे त्याच्याबद्दल आदर वाटतो. आजही आपीएल ची दुबईतली मॅच सोडून तो केवळ मतदानासाठी मुंबईला येत आहे. हॅट्स ऑफ!

In reply to by विकास

सुबोध खरे 24/04/2014 - 10:31
मी तेंडुलकरचा चाहता असूनही मला एक प्रश्न पडला वाढदिवस नसता तर काही हजार रुपये खर्च करून तो मतदानासाठी मुंबईत आला असता का? आणि एका मतासाठी एमिरेट्स सारख्या विमान कम्पनीला पैसे देणे हे कितपत व्यवहार्य आहे.(एखादेवेळेस खासदार असल्याने एयर इंडियाचे तिकीट फुकट असेल म्हणून कि काय?) तात्पर्य:- आपण क्रिकेटची म्याच पहावी. क्रिकेटर काय करतो ते नव्हे. त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका

In reply to by सुबोध खरे

शिद 24/04/2014 - 13:46
त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका
+१११११ अगदी अगदी. पण मी जेव्हा असे म्हणतो त्यावेळी माझे बरेसचे सचिन भक्त मित्र माझ्यावर अगदी तुटून पडतात जसा शारजाला सचिन शेन वॉर्न वर तुटून पडला होता. :)

In reply to by सुबोध खरे

विकास 24/04/2014 - 20:19
सचीनने का केले हे केवळ त्यालाच माहीत. पण मला खात्री आहे की प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेस तो घरी नसणार. काही हजार रुपये त्याच्यासाठी काहीच नाहीत. कदाचीत तो (भारतरत्न + खासदार म्हणून मिळणारा)सरकारी पैसा वापरत देखील नसेल कारण त्याला गरज नाही. छपन्न प्रायोजक पैसे देतील.. पण केवळ सचीनच नाही तर कुठलिही सेलिब्रीटी व्यक्ती असे वागते तेंव्हा कळत-नकळत लोकांपुढे एक आदर्श ठेवत असते. सचीन ने ते नक्की केले असे वाटते. शहारूख, अमिर खान यांनी देखील मतदान करून पब्लीसिटी केली तरी म्हणूनच काही गैर वाटत नाही. नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 18:19
नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...
मला पण माझ्या कंपनी ने अमेरिका सोडा अगदी बंगलोर ला जरी पाठवले असते कामा साठी तरी मी मतदाना साठी आलो नसतो. तुम्ही तरी आला असता का?

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 18:16
आणि त्यात एव्हडे कौतुक करण्यासारखे काय आहे. कार्गील चे युद्ध चालू असताना, हाच माणुस पाकीस्तान शी वर्ड कप मधे मॅच खेळत होता.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 18:22
नव्हते ना बंद. पण ती लोक पाकीस्तान शी मॅच खेळत नव्हती. भारताचे सैनिक मरतायत आणि ही माणसे त्या मारणार्‍या देशाशी मॅच खेळतायत. :-( सचिन तेंव्हा अलरेडी सो कॉल्ड देवत्वाला पोचला होता, त्यामुळे तो Hard Stand घेण्याच्या परिस्थितीत होता. एखाद्या नविन खेळाडुने नाही घेतला तर समजु शकतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 25/04/2014 - 18:31
बर खेळला मॅच ... त्यात मैदानावर पाकिस्तानला "हरवले"च ना साले बांग्लादेशी इथे येउन आपल्याच डोक्यावर मिर्या वाटतात ... तेही दररोज...त्यासाठी काय करायचे मग?? "टगे" मु*यची गोश्ट करतात...त्यासाठी काय करायचे मग?? फक्त सचिन उलट उत्तर देत नाही म्हणुन काहिही बोलायचे

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 25/04/2014 - 18:34
आणि "भारताचे सैनिक मरतायत" यासाठी **त दम नसणारे नेते जबाबदार आहेत...वेळीच योग्य निर्णय घेतले असते तर सैनिक मरणे जाउदे...त्यांच्या सावलीलासुध्धा पाकडे टरकले असते

प्रचेतस 24/04/2014 - 08:24
लेख नेहमीप्रमाणेच आवडला. सचिनच्या कित्येक अविस्मरणिय खेळ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या पण शेवटी शेवटी त्याला खेळतांना पाहाणे म्हणजे दाढा पडलेल्या सिंहाने गवत खाण्यासारखे वेदनादायी वाटत होते.

इरसाल 24/04/2014 - 09:42
मस्त लिहीलेस मनातल्या भावनाच उतरवल्यात. असे पण एप्रिलमधे ग्रेट लोकांचे बड्डे असतात. ;)

चावटमेला 24/04/2014 - 12:00
पाकड्यांच्या पावणे तीनशे धावांचा पाठलाग करताना शोएब अख्तरला मारलेला अप्पर कट निव्वळ म्हणजे निव्वळ अप्रतिम
अगदि अगदि. बाकि काही म्हणा, पण ह्या एका फटक्याने भारत-पाकिस्तान सामन्यांतली हवाच काढून घेतली :)

बाबा पाटील 24/04/2014 - 13:09
एका खेळियाने...घातलेले गारुड आयुष्यभर मनावरुन उतरणार नाही.स्वतः खेळतो,त्यामुळे अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला ते केवळ अशक्य याची पुर्ण जाणिव आहे.म्हणुनच सचिन सम कोनी नाही.दोन ते अडिच दशक शाररिक त्याचबरोबर मानसिक फिटनेस टिकवन केवळ अतुल्य.देवा माझ्या आयुष्यात या माणसाचा खेळ मला पहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by बाबा पाटील

>>अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला...... +१ बाबा. बोलिंग मशीनसमोर "ओव्हरपिच आउटसाइड ऑफ" बॉल पडणार माहिती असतानासुद्धा ताशी १४० कि.मी. नी आलेल्या बॉलला बॅट लावता आली नाही तेव्हा क्रिकेट सोडलं. तेव्हापासून कुठल्याही क्रिकेटपटूला .... खरंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूला शिव्या घालणं बंद! समोरून येणारा बॉल अडवायला फे फे उडते.... मागे जाणार्‍या बॉलला दिशा देणं केवळ ह्यूमनली इम्पॉसिबल. बाकी लोकं बोलणारच. बोलूदेत! :-)

In reply to by जे.पी.मॉर्गन

बाबा पाटील 30/04/2014 - 13:43
जे कार्यकर्ते सचिनच्या बॅटींगला शिव्या घालतात ना त्यांच्या हातात बॅट देवुन गेला बाजार एखाद्या क्लबच्याच बोलर पुढे उभे करावे बघुयात काय होत.साला एक सेंटीमिटर्ने तरी पाय हलेल की नाही आणी हलला तर बॉल दिसेल की नाही त्यांनाच ठावुक

आजच्या पिढीतील आयपीएलमध्ये गेल मॅक्सवेल सारख्यांची फटकेबाजी बघत वाढलेल्यांना कदाचित सचिनच्या फटकेबाजीचे लोक का एवढे कौतुक करतात हे कधी समजणार नाही. पण हे ९०च्या दशकातील क्रिकेटप्रेमींनाच माहीती की सचिन काय अवलिया होता. अगदी तसेच जसे माझ्या पिढीतल्या लोकांना कदाचित समजणार नाही की संथ खेळणारा गावस्कर हि काय हस्ती होती. या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. वेस्टैंडीजच्या तोफखान्याला थंड करणारा गावस्कर असो वा पुर्ण भरातल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर वर्चस्व गाजवणारा सचिन असो यांची कामगिरी निव्वळ आकड्यात मोजणे हा त्यांचा अपमानच. फार मोठा विषय आहे सचिन म्हणजे, तुर्तास हॅपी बड्डे सचिन !!!

In reply to by तुमचा अभिषेक

@या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. >>> +++++१११११ सुडुक मोड ऑन>>> किसनदेवांनी सचिनदेवा'वर लिवलेला लेख अवडला! सुडुक मोड ऑफ>>> =))

मी_आहे_ना 24/04/2014 - 14:32
मस्त झकास लेख, प्रत्येक शब्दागणिक सचिनच्या खेळ्या डोळ्यांसमोर येउन गेल्या. काही काळ तो 'विकेट' मिळवणारा हुकमी गोलंदाजही होता (५-३२ सर्वोत्तम). मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची! खरंच एखाद्या वर्षापासून एकदिवसिय (आणि आता १६ नोव्हें २०१३ नंतर कसोटीतही) भारतीय संघात 'ते' नाव नाही बघून चुकल्यासारखं होतं. तेंडल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

In reply to by मी_आहे_ना

बॅटमॅन 24/04/2014 - 16:33
लेख मस्त आवडला.
मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची!
सॅऽचिन टेंडोल्कर हॅज हिट द बॉल अ माइल हाय!!! सॅऽचिन टेंडोल्कर इज द मॅस्टर ऑफ द गेम, व्हॉट ए वंऽडफुल स्ट्रोक बाय दि लिटल मास्टर!! शोएब बॉल्स अ यॉर्कर अँड सॅऽचिन टेंडोल्कर हॅज व्हॅक्ड इट ओव्हर मिड्विकेट!!!! हे असले कायबाय ऐकताना जे खत्रा फीलिंग यायचं त्याची बरोबरी अजून कशानेही होऊ शकत नाही.

जोशी 'ले' 24/04/2014 - 16:21
झक्कास लिहलयं किसन... कणेकर, संझगिरी या पैकी कुणाला आऊटसोर्स नव्हता केला ना हा लेख? :-) कुठेसं वाचलेलं आठवतंय कि ब्रॅड हाॅग ने त्याला पहिल्यांदा आउट केल्यावर खुप जल्लोष केला व दिवसाचा खेळ संपल्यावर त्या बाॅल वर सचिन ची स्वाक्षरी घ्यायला गेला तर त्यावर सचिन ने लिहलं वन्स इन द ब्ल्य मुन...त्या नंतर त्या बाॅलर समोर तीसएक मॅच खेळला पण त्याला परत व्हिकेट काही मिळाली नाहि सचिनची...

जबरी लेख पंचतारांकित विश्वात आपले असामान्यत्व गुणामुळे अनेक खेळातील दिग्गज पैसा , प्रसिद्धी , मदिरा मदिराक्षी मध्ये रमतांना पहिले आहे. अश्यात आपले मध्यमवर्गीयपण जपत आपल्या विनम्र व विनयशील स्वभावामुळे समोरच्याला आपला चाहता बनविण्याचे कसब ह्याची देही ह्याची डोळा मुंबई , लंडन मध्ये कितीतरी वेळा पहिले आहे. देवत्व बहाल झाल्यावर सुद्धा ते डोक्यात जाऊ न देणाऱ्या तेंडल्या माझ्यासाठी अवतारी पुरुष आहे.

लेखनाची शैली छान. लेख आवडला. बाकी सच्या फ्यान क्लबला असे उमाळे अधुन मधुन येतच राहतील असे वाटते. ;) अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत !
अगदी अगदी. हेच आलं होतं मनात. लेख मस्त झालाय. आवडला.

साऊथ अफ्रिकेविरुद्ध जेव्हा सच्याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा २०० धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता तेव्हा रवी शास्त्री म्हणाला होता "टेक अ बो मास्टर" तेव्हा आलेले शहारे अजुनही आठवतात. या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! टेक अ बो मास्टर __/\__!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सुहासदवन 28/04/2014 - 10:37
या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! पण त्याच वेळेला पिचच्या दुसर्‍या टोकाकडून अल्टिमेट मि. अप्पॉर्चुनिस्ट म्हणजे धोनी, हा सचिनला स्ट्राईक न देता स्वतः चौकार मारत बसला होता आणि सचिनचे दुहेरी शतक चुकते की काय असे वाटू लागले होते.

श्रीगुरुजी 28/04/2014 - 14:54
सुंदर लेख! मी सचिनचा पहिल्यापासूनच भक्त आहे. गावसकर निवृत्त झाल्यावर रिकामा झालेला कोनाडा सचिनने भरून काढला होता. आता सचिन निवृत्त झाल्यावर अजूनतरी नवीन देव सापडलेला नाही.
1 उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचण्याला ४-५ वर्षे होऊन गेली असावीत. होय! हे यासाठीच असं लिहीलंय कारण, माझ्या लहानपणी म्हणजेच ९० दशकाच्या सुरूवातीला मुलाला शाळेत घालायचं असेल तर आत्ताच्या सारखं त्याचं वय न पाहता उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचला की मुलगा शाळेत जाण्यायोग्य झाला असेच समजायचे. शाळेच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी नावाचं भीती घालणारं पुस्तक अजून अभ्यासाला आलं नव्हतं. ९२ चा विश्वचषक पाकड्यांनी जिंकून वर्षे-दोन वर्षे उलटली होती.

विल्यम शेक्सपियर, कॉपीराईट आणि भारत

माहितगार ·

आदूबाळ 23/04/2014 - 21:38
उत्तम लेख!
सॅटेलाईट वरून प्रक्षेपीत होणारे टिव्ही सिग्नल महाशयांच्या पोस्ट तिकीटा एवढ्या आकाराच्या इंस्ट्रूमेंटने पकडता येतात म्हणे. आमेरीकेतील टिव्ही कंपन्यांनी या शोधाला त्यांच्या कॉपीराईटच उल्लंघन होत म्हणून आक्षेप घेतला आहे.
हे रोचक आहे...

In reply to by आदूबाळ

माहितगार 23/04/2014 - 22:17

In reply to by आत्मशून्य

माहितगार 23/04/2014 - 22:21
मी गूगल न्यूजवर कॉपीराईट शब्दावर सर्च देत होतो या बातम्यांवर पोहोचलो . Aereo अथवा Chet Kanojia नावाने गूगल न्यूजला सर्च दिला तरी चालेल, वर टाइम्स ऑफ इंडीया वृत्ताचा दुवा आहेच

आदूबाळ 23/04/2014 - 22:53
लय भारी!! हा कनोजिया माणूस ती सुप्रीम कोर्टातली केस जिंकणार असं मला वाटतंय. मुदलात तो जे काही करू पहातोय ते कॉपीराईट कायद्याचं उल्लंघनच नाही. पुण्याच्या रस्त्यांवर पूर्वी टांगे धावायचे. कालांतराने तंत्रज्ञान सुधारलं आणि रिक्षा आल्या. यावर टांगेवाले "रिक्षा ही आमच्या एकाधिकारावर (पक्षी: कॉपीराईट किंवा तत्सम मालमत्तेवर) आणलेली टाच आहे" असं म्हणू शकत नाहीत.

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 23/04/2014 - 23:07
तर ते रिसीव केल्या नंतर त्याचे पुन्हा ब्रॉडकास्टींग होतय (नेटवर) ते सुध्दा मुळ प्रक्षेपक यंत्रणेच्या (चॅनेल)पुर्व परवानगी शिवाय, अथवा त्यांना कोणतीही फि न देता थोडक्यात हा डीवाइस तयार करणे गुन्हा नाही तर तो वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन देणे सकृत दर्शनी कॉपीराइट कायद्याचा भंग आहे. लहानपणी मी स्वतः घरात फुकट केबल बघत होतो, कारण ती माझ्या टीवी अँटेना जवळुन जात होती. पण आता माझ्याकडे अशी केबल फुकट बघायची सोय (कायदेशीर कचाट्यात न सापडता) आहे म्हणुन त्याचा वापर करुन मी असे हार्डवेअर तयार करुन डीस्ट्रीब्युट केले जे माझ्या घरात फुकट दिसणार्‍या केबलचे (फुकट अथवा) दिड-दमडीच्या भावात वितरण करायची संधी देइल व त्यावर मी व्यवसाय करेन तर तो नक्किच कॉपीराइटचाट्मी वर उल्लेखलेल्या मुद्यानुसार ( असा डिवाइअस वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन ) भंगच आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 24/04/2014 - 00:16
असं कसं भौ?? स्मिथ अँड वेसन कंपनीने तयार केलेलं पिस्तूल घेऊन अन्याने गन्याचा खून केला. स्मिथ अँड वेसन कशी काय दोषी? हां तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पिस्तुलाचं अवैध वितरण करणारा नक्कीच दोषी. कनौजिया बाबा हुशार आहे. तो हार्डवेअर आम्रिकेत विकेल (जे वैध आहे/ठरू शकेल) आणि सॉफ्टवेअर / सर्विस आम्रिकेबाहेरून देईल (जिथे आम्रिकन कायद्याचे हात पोहोचू शकत नाहीत).

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 24/04/2014 - 00:33
गैरलागु आहेच.... पण इथे मुळात कनौजिया हा लक्ष वेधुन घ्यायला धडपडतोय, केस जिंकायला वाटत नाही. यातुन एकच होइल की कनौजिया सोबत करार केला जाइल अथवा ती स्टार्टप विकत घेतल्या जाइल (हे दोन्ही ओप्शन लूजर स्टेट्मधे वापरले जातील जी फार लाअंबची गोश्ट वाटते). हार्ड वेअर मॅनुफॅक्चर गुन्हा नाही. पण त्याचे वितरण जे बेकायदेशीर प्रसारण बघायला प्रवृत्त करते अथवा प्रोत्साहन देते हा मोठा गुन्हा ठरतो. पण या प्रकरणातील मेख एव्हडीच आहे की हे हार्ड वेअर फक्त तेच काम करायला उपयोगी नाहीये अन्यथा एव्हाना कंपनी बंदही झाली असती. जसे रेडीओवर आपण पोलीसांचे संदेश ऐकु शकतो म्हणून तो बॅण करता येत नाही करण त्यावर फक्त तेच काम न्हवे तर प्रत्यक्ष रेडीओ स्टेशनही ऐकता येते तसेच यावर इतर अधिकृत ब्रॉड्कास्टही रिसीव करता येतात म्हणून हार्डवेअर बॅन होत नाही. पण मुळात त्याची कंपनी अधिकृत जाहीरातच कॉपिराइट मटेरीअल मोफत अथवा अत्यल्प दरात बघा अशीच करत असल्याने हा गुन्हा आहे. व यामुळे त्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टींग नक्किच बंद पडेल, व सबस्क्रायबरच्या खिषाला मुळातच मोठी चाट न पडल्याने त्याला फरक पडणार नाही. पुन्हा एखादा सबस्क्रायबरही त्याला ब्रॉकास्टींगचे अधिक्रुत अधिकार आहेत काय यावरुन कोर्टात खेचु शकतो. कारण त्याने अत्यल्प असले तरी या सेवेला पैसे मोजले आहेत, व ग्राहक म्हणून त्याची फसवणुक अथवा हक्कची पायमल्लि करता येणार नाही. आणी जर एकानेही केस जिंकली तर उरलेले सगळे सबस्क्रायबर मागे लागतील. (अर्थात हे त्याने सबस्क्रायबरला सेवा देताना काय कबुल करुन घेतले आहे यावरही अवलंबुन आहे )

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 24/04/2014 - 01:12
१००% मान्य. टाईम्सच्या दुव्यातच असा उल्लेख आहे की कनौजिया ब्रॉडकास्टर्सकडे गेला होता त्याचं तंत्रज्ञान विकायला (म्हणजे माझं तंत्रज्ञान विकत घ्या नाहीतर तुमचा बाजार उठवतो). त्यांनी त्याला फाट्यावर मारला म्हणून हे सव्यापसव्य चालू आहे...

सार्थबोध 25/04/2014 - 10:31
नेहमीप्रमाणे छान ... एक विनंती ...वैयक्तिक लिखाणासाठी कोपीराईट घेण्यासंबंधी कुणी माहिती देऊ शकेल का ?

आदूबाळ 23/04/2014 - 21:38
उत्तम लेख!
सॅटेलाईट वरून प्रक्षेपीत होणारे टिव्ही सिग्नल महाशयांच्या पोस्ट तिकीटा एवढ्या आकाराच्या इंस्ट्रूमेंटने पकडता येतात म्हणे. आमेरीकेतील टिव्ही कंपन्यांनी या शोधाला त्यांच्या कॉपीराईटच उल्लंघन होत म्हणून आक्षेप घेतला आहे.
हे रोचक आहे...

In reply to by आदूबाळ

माहितगार 23/04/2014 - 22:17

In reply to by आत्मशून्य

माहितगार 23/04/2014 - 22:21
मी गूगल न्यूजवर कॉपीराईट शब्दावर सर्च देत होतो या बातम्यांवर पोहोचलो . Aereo अथवा Chet Kanojia नावाने गूगल न्यूजला सर्च दिला तरी चालेल, वर टाइम्स ऑफ इंडीया वृत्ताचा दुवा आहेच

आदूबाळ 23/04/2014 - 22:53
लय भारी!! हा कनोजिया माणूस ती सुप्रीम कोर्टातली केस जिंकणार असं मला वाटतंय. मुदलात तो जे काही करू पहातोय ते कॉपीराईट कायद्याचं उल्लंघनच नाही. पुण्याच्या रस्त्यांवर पूर्वी टांगे धावायचे. कालांतराने तंत्रज्ञान सुधारलं आणि रिक्षा आल्या. यावर टांगेवाले "रिक्षा ही आमच्या एकाधिकारावर (पक्षी: कॉपीराईट किंवा तत्सम मालमत्तेवर) आणलेली टाच आहे" असं म्हणू शकत नाहीत.

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 23/04/2014 - 23:07
तर ते रिसीव केल्या नंतर त्याचे पुन्हा ब्रॉडकास्टींग होतय (नेटवर) ते सुध्दा मुळ प्रक्षेपक यंत्रणेच्या (चॅनेल)पुर्व परवानगी शिवाय, अथवा त्यांना कोणतीही फि न देता थोडक्यात हा डीवाइस तयार करणे गुन्हा नाही तर तो वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन देणे सकृत दर्शनी कॉपीराइट कायद्याचा भंग आहे. लहानपणी मी स्वतः घरात फुकट केबल बघत होतो, कारण ती माझ्या टीवी अँटेना जवळुन जात होती. पण आता माझ्याकडे अशी केबल फुकट बघायची सोय (कायदेशीर कचाट्यात न सापडता) आहे म्हणुन त्याचा वापर करुन मी असे हार्डवेअर तयार करुन डीस्ट्रीब्युट केले जे माझ्या घरात फुकट दिसणार्‍या केबलचे (फुकट अथवा) दिड-दमडीच्या भावात वितरण करायची संधी देइल व त्यावर मी व्यवसाय करेन तर तो नक्किच कॉपीराइटचाट्मी वर उल्लेखलेल्या मुद्यानुसार ( असा डिवाइअस वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन ) भंगच आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 24/04/2014 - 00:16
असं कसं भौ?? स्मिथ अँड वेसन कंपनीने तयार केलेलं पिस्तूल घेऊन अन्याने गन्याचा खून केला. स्मिथ अँड वेसन कशी काय दोषी? हां तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पिस्तुलाचं अवैध वितरण करणारा नक्कीच दोषी. कनौजिया बाबा हुशार आहे. तो हार्डवेअर आम्रिकेत विकेल (जे वैध आहे/ठरू शकेल) आणि सॉफ्टवेअर / सर्विस आम्रिकेबाहेरून देईल (जिथे आम्रिकन कायद्याचे हात पोहोचू शकत नाहीत).

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 24/04/2014 - 00:33
गैरलागु आहेच.... पण इथे मुळात कनौजिया हा लक्ष वेधुन घ्यायला धडपडतोय, केस जिंकायला वाटत नाही. यातुन एकच होइल की कनौजिया सोबत करार केला जाइल अथवा ती स्टार्टप विकत घेतल्या जाइल (हे दोन्ही ओप्शन लूजर स्टेट्मधे वापरले जातील जी फार लाअंबची गोश्ट वाटते). हार्ड वेअर मॅनुफॅक्चर गुन्हा नाही. पण त्याचे वितरण जे बेकायदेशीर प्रसारण बघायला प्रवृत्त करते अथवा प्रोत्साहन देते हा मोठा गुन्हा ठरतो. पण या प्रकरणातील मेख एव्हडीच आहे की हे हार्ड वेअर फक्त तेच काम करायला उपयोगी नाहीये अन्यथा एव्हाना कंपनी बंदही झाली असती. जसे रेडीओवर आपण पोलीसांचे संदेश ऐकु शकतो म्हणून तो बॅण करता येत नाही करण त्यावर फक्त तेच काम न्हवे तर प्रत्यक्ष रेडीओ स्टेशनही ऐकता येते तसेच यावर इतर अधिकृत ब्रॉड्कास्टही रिसीव करता येतात म्हणून हार्डवेअर बॅन होत नाही. पण मुळात त्याची कंपनी अधिकृत जाहीरातच कॉपिराइट मटेरीअल मोफत अथवा अत्यल्प दरात बघा अशीच करत असल्याने हा गुन्हा आहे. व यामुळे त्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टींग नक्किच बंद पडेल, व सबस्क्रायबरच्या खिषाला मुळातच मोठी चाट न पडल्याने त्याला फरक पडणार नाही. पुन्हा एखादा सबस्क्रायबरही त्याला ब्रॉकास्टींगचे अधिक्रुत अधिकार आहेत काय यावरुन कोर्टात खेचु शकतो. कारण त्याने अत्यल्प असले तरी या सेवेला पैसे मोजले आहेत, व ग्राहक म्हणून त्याची फसवणुक अथवा हक्कची पायमल्लि करता येणार नाही. आणी जर एकानेही केस जिंकली तर उरलेले सगळे सबस्क्रायबर मागे लागतील. (अर्थात हे त्याने सबस्क्रायबरला सेवा देताना काय कबुल करुन घेतले आहे यावरही अवलंबुन आहे )

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 24/04/2014 - 01:12
१००% मान्य. टाईम्सच्या दुव्यातच असा उल्लेख आहे की कनौजिया ब्रॉडकास्टर्सकडे गेला होता त्याचं तंत्रज्ञान विकायला (म्हणजे माझं तंत्रज्ञान विकत घ्या नाहीतर तुमचा बाजार उठवतो). त्यांनी त्याला फाट्यावर मारला म्हणून हे सव्यापसव्य चालू आहे...

सार्थबोध 25/04/2014 - 10:31
नेहमीप्रमाणे छान ... एक विनंती ...वैयक्तिक लिखाणासाठी कोपीराईट घेण्यासंबंधी कुणी माहिती देऊ शकेल का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.

आजोबा तुम्ही पुअर आहात का?

विवेकपटाईत ·

आदूबाळ 23/04/2014 - 19:39
छान लेख! एक छिद्रान्वेषी दुरुस्ती: फलंदाज ष्टंपासमोर मांडी घालून बसला तरच बीमर त्रिफळा उडवू शकतो. तुम्हाला बहुदा यॉर्कर म्हणायचे असावे.

शुचि 23/04/2014 - 19:45
तिला नक्की सांगा - इथे देवांनी नटलेले देऊळ आहे, गर्दीने बहरलेल्या बागा आहेत, बीच आहेत, ताजे ताजे मासे मिळणारा मासळीबाजार आहे, इथे घमघम सुवासिक आंबे आहेत, इथे ४ शब्द बोलता येईल अशी माणसे आहेत, लगबग लगबग गर्दी आहे जिच्यात माणसाला माणसातही राहता येते अन हवे तेव्हा एकटेही. इथे आपलेपण आहे.

चार वर्षांच्या नातीने जर हे म्हंटलं असेल तर मला त्यात काहीच वावगं वाटत नाही. लहान मुलं निरागस असतात आणि त्यांची निरिक्षणशक्ती सूक्ष्म असते. त्यांच्याकडे डिप्लोमसी नसते तसाच काही गैरहेतूही नसतो. हां आता आजोबांच्या लेकीने जर असं काही म्हंटलं असतं तर संवेदनशीलतेचा अभाव म्हणता आलं असतं....

गणपा 23/04/2014 - 21:42
हा हा हा दुधावरची साय भारी चुणचुणीत आहे. मागे लेकीने असाच एक गुगली टाकला होता. विमानात चढताना बिझनेस क्लास ओलांडून इकॉनॉमी क्लासची सिट शोधत असताना लेकीने चढ्या सुरात विचारलं बाबा आपण पुअर आहोत का?

शुचि 23/04/2014 - 21:50
माफ करा भारताचे कौतुक करण्याच्या नादात हे सांगीतलेच नाही की लेखनशैली मस्तच. आवडली. दूधावरच्या सायीचा गालगुच्चा घेत वरील मुद्दे नक्की सांगा. इतकच :)

दिव्यश्री 23/04/2014 - 22:04
लेख मस्तच . मला हि पिडा काकांसारखच वाटत . निरागस आहे ती . तिने जे काही आतापर्यंत पाहिलं असेल त्यातून हि तुलना आणि मग फायणल निष्कर्ष . मोठी असती थोडी ८/१० वर्षाची तर मग कदाचित वेगळ वाटल असत . मला तर आधी हसूच आलं . काही म्हणा हि पिढी अतिशय हुशार आहे . या वयात हे असलं आमच्या टकुर्यात / मडक्यात आलं नसत कदाचित . ;) :D

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 22:13
काहीच नाही. प्रत्येकजण कोणा ना कोणाहूनही पुअर असतोच :) पण नंतर नात "आजोबा पुअर आहेत.... आजोबा पुअर आहेत" असे १० लोकांपुढे गात सुटणार नाही याची खात्री नाही. अर्थात तसे गाण्यातही काही प्रॉब्लेम नाही ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 24/04/2014 - 01:57
१००% खरे आहे. ______________________ यावरुन कालचाच प्रसंग आठवला - कालच आम्ही $१० चे सुट्टे(क्वार्टरस) घेतले व चालू लागलो. एक गाल खपाटीला गेलेला अतिशय म्हातारा बेघर मनुष्य भीक मागत होता. मी $१ दिला अन पुढे गेले व मी व मुलगी बोलू लागलो की किती दया येते आहे, काम नसेल मिळत, काय खात असेल अन काय नाही बिचारा वगैरे. वहावत जाऊन, मी मुलीला विचारले "चल परत जाऊ अन $५ देऊन येऊ पण अर्थात २० क्वार्टर्स मध्ये द्यावे लागतील." मुलगी म्हणाली - "ममा भिकारी असला तरी त्याला डिग्निटी आहे. असे क्वार्टर्स त्याला आवडणार नाहीत त्यापेक्षा पुढल्या वेळी एक $५ ची नोट देऊ." मनाशी तेच ठरवून आम्ही पुढे गेलो. गरीब असला म्हणून अशी नाण्यानाण्यांची भीक घालणं नक्कीच शोभावह नव्हतं.

In reply to by शुचि

आत्मशून्य 24/04/2014 - 06:03
असो प्रांजळपणाच्या कोड कौतुकात मुळ मुद्दा दुर्लक्षला गेलाय अन तो म्हणजे अमुक गोष्ट हाताशी असणारी व्यक्ती श्रीमंत व नसणारी गरीब हे फ्याड़ त्या शुध्द मनाच्या बाबिच्या डोक्यात कोणी घुसवले ?

In reply to by आत्मशून्य

हा मुद्दा खरेच ध्यानात नाही आला. ह्याच वयात असे बिनडोक विचार डोक्यात पक्के बसतात. युरोपात लंडन ते अनेक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा हेच दळणवळणाचे साधन आहे. तेथे लहान मुलांच्या डोक्यात अश्या खुळचट कल्पना माझ्या तरी पाहण्यात नाहीत.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित 24/04/2014 - 14:49
धन्यवाद. अजून एक छान विषय मिळाला आपल्यामुळे. "सार्वजनिक वाहतूक सेवा" या विषयावरही नवीन धागा काढून मिपाकर तज्ञांनी आपले मत मांडायला हरकत नाही.

In reply to by आत्मशून्य

ह्यासाठीच माझा हा प्रतिसाद मला तरी महत्त्वाचा वाटतो. संस्कारक्षम वय आहे. ह्या वयातच त्या निष्पाप आणि निरागस नातीवर योग्य ते संस्कार झाले तर तिचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने खुलण्यास मोलाची मदत होईल. ह्याचा अर्थ तिच्या आईवडिलांनी कांही चांगले संस्कार केलेच नाही असे नाही. कधी कधी मुलं कांही चुकीचा विचार करीत आहेत, कांही चुकीच्या कल्पना त्यांच्या मनांत रुजत आहेत हे आपल्या, धकाधकीच्या जीवनांत, लक्षातच येत नाही.

चुणचुणीत आहे तुमची नात. असं काही बोलली की गालगुच्चे घ्या (एक तुमच्यातर्फे आणि एक आमच्या तर्फे) आणि मजा अनुभवा. फार काळ ही अवस्था राहत नाही हो :( ज्या वातावरणात ती वाढते आहे त्याबरोबर इतर सर्व अनुभवांची तुलना सहाजिकच आहे... शिवाय ती निरागस आहे त्यामुळे मनातले लपवून "पोलिटिकली करेक्ट" बोलायला ती अजून शिकली नाही. मोठी होत जाईल तशी (इतरांचे मन सांभाळायला का होईना) आजूबाजूच्या लोकांचा इगो दुखावणार नाही याची काळजी घेऊन बोलायला शिकेल... पण ते बरं की वाईट याबाबत संभ्रम आहे !

अगदी अगदी इथे आपल्यालाही आपला देश गरीब आणि परदेशात गेले की डोळे विस्फारून येतात तर निरागस जीवांना ते वाटणारच आणि ते बोलून दाखवणारच. माझा एका मित्रही असाच बरेच वर्षांनी परदेशाहून परतलेला. देश फिनलंड. तर त्याच्या लहानग्या (वय वर्षे सात-आठ) मुलालाही आता आपला भारत देश अस्वच्छ वाटू लागलाय आणि तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही. आता अपने वतन के मिट्टी की खुशबू वगैरे कसे त्याच्या डोक्यात भरवावे की येईल ती भावना त्याच्यात हळूहळू की सवय होईल त्याला इथल्या वातावरणाची.. बाकी किस्सा छानच :)

In reply to by तुमचा अभिषेक

दिव्यश्री 24/04/2014 - 01:23
तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही.>>> हा प्रकार जवळून अनुभवलाय . नात्यातली मुलगी ३ वर्षाची पण नव्हती त्यावेळी ते परदेशात राहायचे . भारतात कधी आली कि सुरु इथे गार्डन क्लीन नाही मग थोडीफार रडारड . अर्थात ते गार्डन छोट्याशा सोसायटीच होत .

चित्रगुप्त 23/04/2014 - 23:15
लहानपणी वाचलेली 'गरीब' ची व्याख्या सहज आठवली: "ज्याला नेहमी 'आणखी हवे' असे वाटत असते, तो गरीब" ... हे लहानपणीच कळल्याने आयुष्यभर श्रीमंत राहता आले.

श्रीमंताच्या मुलीने गरीबांवर लिहिलेला एक निबंधही वाचल्याचे आठवतेय लहानपणी.. गरीब माणूस, त्याचे कपडे फाटके. त्याच्या बायकोचे कपडे फाटके. त्याच्या पोराबाळांचे कपडे फाटके. त्याच्या नोकरांचे कपडे फाटके. त्याच्या ड्रायव्हरचे कपडे फाटके. एवढेच नव्हे तर त्याच्या गाड्या देखील फाटक्या तुटक्या मोडक्या तोडक्या वगैरे वगैरे..

In reply to by इरसाल

रेवती 24/04/2014 - 18:54
असू द्या हो इरसालजी. हे प्रश्न ४ वर्षाच्या मुलांकडून यायचेच! नंतर नंतर त्यांनाही समजत जातं आणि अडचणीत आणणं कमी होतं. आता नैतर कधी प्रश्न विचारायचे त्यांनी?

विचार करायला लावणारा लेख. नातीला थोड्याच शब्दात, तिला समजेल अशा भाषेत, आनंद आणि सुखाची व्याख्या समजवावी. कदाचित तिच्या वयामुळे आत्ता तिला कांही शब्दांचा, भावनांचा अर्थ लागणार नाही. पण तिचा चौकस स्वभाव आणि तिक्ष्ण बुद्धी शब्द लक्षात ठेवेल आणि एके दिवशी, आजोबांनी बालपणी शिकविलेले, शहाणपण आठवेल.

आमचे कन्यारत्न १४ महिन्याचे असल्याने यंदाच्या भारतभेटीत तिने निखळ आनंद उपभोगला. दोनच आठवड्यात तिने तिच्या आयुष्यात आजतागायत जर्मनीत पहिले नसतील एवढ्या माणसाइतके भारतात नातेवाईक पहिले. युरोपात मिळत माहित अशी रसाळ फळे खाल्ली. पुढे मोठी झाल्यावर तिच्या आईला भारतात आल्यावर जो सांस्कृतिक, सामाजिक धक्का बसला तो बसणार ह्या दौर्यात माझ्या वर्ग मैत्रीण केनेडा वरून आल्याने डोंबिवलीत भेट झाली. तेव्हा तिच्या ५ वर्षाच्या मुलीने रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात , आणि बरेच प्रश्न विचारले. मात्र पेठकर काका म्हणाले तसे आजोबांनी आपल्या नातीला सुखाची व्याख्या आपल्या काळातील समाजवादी सुखाची व्याख्या समजाऊ नये. नात मोठी झाल्यावर आपसूकच दोन देशात तुलनात्मक फरक करायला शिकेल.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित 24/04/2014 - 11:04
निनादजी, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ह्या मुलीला माझ्याकडून मनापासून धन्यवाद. "रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात"या विषयावर एक नवीन लेख येऊ शकतो!

यसवायजी 24/04/2014 - 12:01
आजोबा, अशी हुशार चुणचुणीत नात मिळालीय तुम्हाला, खरंच श्रीमंत आहात. ----- कुठेतरी छानसं वाचलेलं- एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,' कशी झाली ट्रिप ? '' फारच छान डॅड '' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '' हो ' मुलगा म्हणाला.' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलंमुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.वडील स्तब्ध झाले.मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना........

In reply to by यसवायजी

वाचलेले हे आधीही. खरेच पाहण्याचा द्रुष्टीकोण मॅटर्स.. बरेच जण म्हणतात टाईम इज मनी. पण तो टांईम पैसा कमवायलाच वापरला, त्यातून विकत घेतलेले सुख उपभोगायला नाही तर त्याला काय म्हणावे? टाईम इज मनी पेक्षा टाईम स्पेंड विथ हॅपीनेस इज मनी हे समजायला हवे.

दिपक.कुवेत 24/04/2014 - 13:55
केवळ निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख वाचला आणि मजा आली. अजुन लहान आहे तोच असे अनुभव / क्षण अजुन मिळवायचा आनंद लुटा.

In reply to by दिपक.कुवेत

हे हि खरेय, काही लेखांत काथ्याकूट न शोधलेलेच बरे. लहान मुले बोलायचे बोलून जातात आणि आपण त्यात गहन अर्थ वा लॉजिक शोधत राहतो.. ;)

मनीषा 24/04/2014 - 15:50
किस्सा छान आहे आणि आशा आहे की त्या मुलीला मोठेपणी आजोबा गरीब आहेत असे वाटाणार नाही मलाही वाटते गरीबी ही मानसिक अवस्था आहे. जी व्यक्ती समाधानी नाही ती कायमच गरीब राहते. मग त्यांचा खजिना किती का भरलेला असेना अर्थात ही व्याख्या जे खरोखर गरीब आहेत त्यांच्यासाठी लागू होत नाही . त्यांना असे म्हणणे ही क्रूर चेष्टाच ठरेल.

समीरसूर 24/04/2014 - 15:55
आवडेश. लहान मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते. माझा पुतण्या आता ९ वर्षांचा आहे. साधारण डिसेंबर २०१२ मध्ये त्याने आमीर खानचा 'तलाश' पाहिला होता. आणि त्याला तो आवडला होता. अगदी २-३ आठवड्यांपूर्वी मी त्याला त्या चित्रपटातल्या आमीर खानच्या पात्राचे नाव विचारले आणि त्याने तात्काळ 'सुरजन शेखावत' सांगीतले. करीना कपूरच्या पात्राचे नाव विचारल्यावर ताबडतोब 'सिमरन' आणि 'रोझी' सांगीतले. मला खूप आश्चर्य वाटले. हुशार आहेत पोरं. :-)

In reply to by समीरसूर

मलाही लहानपणी शिवा़जी महाराजांच्या आईचं, वडिलांचं, मुलांचं नांव विचारलं की मी झटकन सांगायचो. शिवाजी महाराजांना मारायला आलेला विजापूर सरदार कोण, दिल्लीचा मुघल राजा कोण, राणा प्रताप कोण वगैरे वगैरे सर्व झटकन सांगता यायचं.... पण साला आमच्या लहानपणी कौतुक करणारे नातेवाईकच नव्हते. 'असाच अभ्यास कर' असे कोरडे आशिर्वाद मिळायचे. आमच्या पिढीची हुशारी धुळीला मिळाली.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू 24/04/2014 - 17:03
ह्य..ह्य..ह्य.. :)) आमची शाळा प्रथम बक्षीस १ पेन, दुसरे १ पेन्सिल, व तिस-याला सरळ कांडीच... :) कसले डोम्बल्याचे प्रोत्साहन येणार...

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त 24/04/2014 - 17:32
माझा आईची स्मरणशक्ती अफाट होती. वयाच्या ८० व्या वर्षी पण अगदी लहानपणीच्या कविता (वाहवा वाहवा चेंडू हा..सुरेख कितितरी खचीत हा.... मिस मेरी भोर...) पासून शिवाजी, महाभारत, पेशवाईचा संपूर्ण इतिहास, अनेक मजेदार चित्रविचित्र कथा (उंदरलीची उंदरली खिरीत पडाली...टाईप) अश्या शेकडो गोष्टी तोंडपाठ होत्या. माझ्या आग्रहामुळे तिने आत्मचरित्रात्मक आठवणी लिहिल्या, त्यात सर्व अगदी तपशीलाने लिहिले होते. हल्लीसारखे पोरांचे कवतिक तेंव्हा केले जात नसे, आणि हल्ली तर पोरांना जरा थोडे काही येत असेल, तर त्यांना एकदम 'शेलेब्रिटी'च बनवण्याची घाई आईबापांना लागलेली असते.

तिमा 24/04/2014 - 17:43
नात निरागस, चुणचुणीत असली तरी लेख आवडला असे म्हणवत नाही. अमेरिकनच कशाला, अगदी भारतातल्याच जन्मापासून सगळं मिळालेल्या या नातवंडांना, जिने चढणे,जमिनीवर बसून जेवणे, भारतीय पद्धतीच्या संडासात बसता येणे, मातीत खेळणे, पतंग उडवता येणे, पायी चालणे वगैरे माहितीच नसेल तर, आपत्कालीन परिस्थितीला ते कसे सामोरे जातील, असा विचार मनांत येतो.

In reply to by तिमा

आयुर्हित 24/04/2014 - 18:58
हे खरे तर खूप सोप्पे आहे! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत एकदा तरी गावी राहणाऱ्या आजी-आजोबांकडे किंवा कोकणात एखाद्या गावी किंवा ग्राम-कृषी पर्यटनाला घेवून जायचे! हाकानाका!

विवेकपटाईत 24/04/2014 - 20:17
प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद. तिमा ताई 'निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख' वाचा. जो पर्यंत लहान आणि निरागस असतात तो पर्यंतच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आनंद मिळतो. लहान मुलांचे जेवढे ज्ञान असते त्या आधारावर ते निष्कर्ष काढतात आणि अधिकांश निष्कर्ष गमतीदार असतात. म्हणूनच लहान पोरांबरोबर वेळ घालविण्यात मजा येते. मग मुले अमेरिकेतले असो, दिल्ली-मुंबईचे असो किंवा खेडे गावातले. सर्वच सारखी असतात.

In reply to by मदनबाण

चित्रगुप्त 25/04/2014 - 10:09
पोहोणार्‍या बाळांचे व्हिडो केवळ अद्भुत. वरील व्हिडो संपल्यावर आणखीन येणारे सुद्धा अवश्य बघावेत. धन्यवाद मदनबाणहो.

नगरीनिरंजन 25/04/2014 - 12:30
मुलं गोड असतात पण ती काय बोलतात त्यावरून त्यांचे आईबाप एकमेकांशी काय बोलत असावेत त्याचा अंदाज येतो. आमच्या एका मित्रयुगुलाच्या मुलाने एक-दोनदा त्यांच्या कारने गेल्यावर एकदा "काका, तू कार का घेत नाहीस?" असे विचारले होते.

आदूबाळ 23/04/2014 - 19:39
छान लेख! एक छिद्रान्वेषी दुरुस्ती: फलंदाज ष्टंपासमोर मांडी घालून बसला तरच बीमर त्रिफळा उडवू शकतो. तुम्हाला बहुदा यॉर्कर म्हणायचे असावे.

शुचि 23/04/2014 - 19:45
तिला नक्की सांगा - इथे देवांनी नटलेले देऊळ आहे, गर्दीने बहरलेल्या बागा आहेत, बीच आहेत, ताजे ताजे मासे मिळणारा मासळीबाजार आहे, इथे घमघम सुवासिक आंबे आहेत, इथे ४ शब्द बोलता येईल अशी माणसे आहेत, लगबग लगबग गर्दी आहे जिच्यात माणसाला माणसातही राहता येते अन हवे तेव्हा एकटेही. इथे आपलेपण आहे.

चार वर्षांच्या नातीने जर हे म्हंटलं असेल तर मला त्यात काहीच वावगं वाटत नाही. लहान मुलं निरागस असतात आणि त्यांची निरिक्षणशक्ती सूक्ष्म असते. त्यांच्याकडे डिप्लोमसी नसते तसाच काही गैरहेतूही नसतो. हां आता आजोबांच्या लेकीने जर असं काही म्हंटलं असतं तर संवेदनशीलतेचा अभाव म्हणता आलं असतं....

गणपा 23/04/2014 - 21:42
हा हा हा दुधावरची साय भारी चुणचुणीत आहे. मागे लेकीने असाच एक गुगली टाकला होता. विमानात चढताना बिझनेस क्लास ओलांडून इकॉनॉमी क्लासची सिट शोधत असताना लेकीने चढ्या सुरात विचारलं बाबा आपण पुअर आहोत का?

शुचि 23/04/2014 - 21:50
माफ करा भारताचे कौतुक करण्याच्या नादात हे सांगीतलेच नाही की लेखनशैली मस्तच. आवडली. दूधावरच्या सायीचा गालगुच्चा घेत वरील मुद्दे नक्की सांगा. इतकच :)

दिव्यश्री 23/04/2014 - 22:04
लेख मस्तच . मला हि पिडा काकांसारखच वाटत . निरागस आहे ती . तिने जे काही आतापर्यंत पाहिलं असेल त्यातून हि तुलना आणि मग फायणल निष्कर्ष . मोठी असती थोडी ८/१० वर्षाची तर मग कदाचित वेगळ वाटल असत . मला तर आधी हसूच आलं . काही म्हणा हि पिढी अतिशय हुशार आहे . या वयात हे असलं आमच्या टकुर्यात / मडक्यात आलं नसत कदाचित . ;) :D

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 22:13
काहीच नाही. प्रत्येकजण कोणा ना कोणाहूनही पुअर असतोच :) पण नंतर नात "आजोबा पुअर आहेत.... आजोबा पुअर आहेत" असे १० लोकांपुढे गात सुटणार नाही याची खात्री नाही. अर्थात तसे गाण्यातही काही प्रॉब्लेम नाही ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 24/04/2014 - 01:57
१००% खरे आहे. ______________________ यावरुन कालचाच प्रसंग आठवला - कालच आम्ही $१० चे सुट्टे(क्वार्टरस) घेतले व चालू लागलो. एक गाल खपाटीला गेलेला अतिशय म्हातारा बेघर मनुष्य भीक मागत होता. मी $१ दिला अन पुढे गेले व मी व मुलगी बोलू लागलो की किती दया येते आहे, काम नसेल मिळत, काय खात असेल अन काय नाही बिचारा वगैरे. वहावत जाऊन, मी मुलीला विचारले "चल परत जाऊ अन $५ देऊन येऊ पण अर्थात २० क्वार्टर्स मध्ये द्यावे लागतील." मुलगी म्हणाली - "ममा भिकारी असला तरी त्याला डिग्निटी आहे. असे क्वार्टर्स त्याला आवडणार नाहीत त्यापेक्षा पुढल्या वेळी एक $५ ची नोट देऊ." मनाशी तेच ठरवून आम्ही पुढे गेलो. गरीब असला म्हणून अशी नाण्यानाण्यांची भीक घालणं नक्कीच शोभावह नव्हतं.

In reply to by शुचि

आत्मशून्य 24/04/2014 - 06:03
असो प्रांजळपणाच्या कोड कौतुकात मुळ मुद्दा दुर्लक्षला गेलाय अन तो म्हणजे अमुक गोष्ट हाताशी असणारी व्यक्ती श्रीमंत व नसणारी गरीब हे फ्याड़ त्या शुध्द मनाच्या बाबिच्या डोक्यात कोणी घुसवले ?

In reply to by आत्मशून्य

हा मुद्दा खरेच ध्यानात नाही आला. ह्याच वयात असे बिनडोक विचार डोक्यात पक्के बसतात. युरोपात लंडन ते अनेक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा हेच दळणवळणाचे साधन आहे. तेथे लहान मुलांच्या डोक्यात अश्या खुळचट कल्पना माझ्या तरी पाहण्यात नाहीत.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित 24/04/2014 - 14:49
धन्यवाद. अजून एक छान विषय मिळाला आपल्यामुळे. "सार्वजनिक वाहतूक सेवा" या विषयावरही नवीन धागा काढून मिपाकर तज्ञांनी आपले मत मांडायला हरकत नाही.

In reply to by आत्मशून्य

ह्यासाठीच माझा हा प्रतिसाद मला तरी महत्त्वाचा वाटतो. संस्कारक्षम वय आहे. ह्या वयातच त्या निष्पाप आणि निरागस नातीवर योग्य ते संस्कार झाले तर तिचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने खुलण्यास मोलाची मदत होईल. ह्याचा अर्थ तिच्या आईवडिलांनी कांही चांगले संस्कार केलेच नाही असे नाही. कधी कधी मुलं कांही चुकीचा विचार करीत आहेत, कांही चुकीच्या कल्पना त्यांच्या मनांत रुजत आहेत हे आपल्या, धकाधकीच्या जीवनांत, लक्षातच येत नाही.

चुणचुणीत आहे तुमची नात. असं काही बोलली की गालगुच्चे घ्या (एक तुमच्यातर्फे आणि एक आमच्या तर्फे) आणि मजा अनुभवा. फार काळ ही अवस्था राहत नाही हो :( ज्या वातावरणात ती वाढते आहे त्याबरोबर इतर सर्व अनुभवांची तुलना सहाजिकच आहे... शिवाय ती निरागस आहे त्यामुळे मनातले लपवून "पोलिटिकली करेक्ट" बोलायला ती अजून शिकली नाही. मोठी होत जाईल तशी (इतरांचे मन सांभाळायला का होईना) आजूबाजूच्या लोकांचा इगो दुखावणार नाही याची काळजी घेऊन बोलायला शिकेल... पण ते बरं की वाईट याबाबत संभ्रम आहे !

अगदी अगदी इथे आपल्यालाही आपला देश गरीब आणि परदेशात गेले की डोळे विस्फारून येतात तर निरागस जीवांना ते वाटणारच आणि ते बोलून दाखवणारच. माझा एका मित्रही असाच बरेच वर्षांनी परदेशाहून परतलेला. देश फिनलंड. तर त्याच्या लहानग्या (वय वर्षे सात-आठ) मुलालाही आता आपला भारत देश अस्वच्छ वाटू लागलाय आणि तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही. आता अपने वतन के मिट्टी की खुशबू वगैरे कसे त्याच्या डोक्यात भरवावे की येईल ती भावना त्याच्यात हळूहळू की सवय होईल त्याला इथल्या वातावरणाची.. बाकी किस्सा छानच :)

In reply to by तुमचा अभिषेक

दिव्यश्री 24/04/2014 - 01:23
तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही.>>> हा प्रकार जवळून अनुभवलाय . नात्यातली मुलगी ३ वर्षाची पण नव्हती त्यावेळी ते परदेशात राहायचे . भारतात कधी आली कि सुरु इथे गार्डन क्लीन नाही मग थोडीफार रडारड . अर्थात ते गार्डन छोट्याशा सोसायटीच होत .

चित्रगुप्त 23/04/2014 - 23:15
लहानपणी वाचलेली 'गरीब' ची व्याख्या सहज आठवली: "ज्याला नेहमी 'आणखी हवे' असे वाटत असते, तो गरीब" ... हे लहानपणीच कळल्याने आयुष्यभर श्रीमंत राहता आले.

श्रीमंताच्या मुलीने गरीबांवर लिहिलेला एक निबंधही वाचल्याचे आठवतेय लहानपणी.. गरीब माणूस, त्याचे कपडे फाटके. त्याच्या बायकोचे कपडे फाटके. त्याच्या पोराबाळांचे कपडे फाटके. त्याच्या नोकरांचे कपडे फाटके. त्याच्या ड्रायव्हरचे कपडे फाटके. एवढेच नव्हे तर त्याच्या गाड्या देखील फाटक्या तुटक्या मोडक्या तोडक्या वगैरे वगैरे..

In reply to by इरसाल

रेवती 24/04/2014 - 18:54
असू द्या हो इरसालजी. हे प्रश्न ४ वर्षाच्या मुलांकडून यायचेच! नंतर नंतर त्यांनाही समजत जातं आणि अडचणीत आणणं कमी होतं. आता नैतर कधी प्रश्न विचारायचे त्यांनी?

विचार करायला लावणारा लेख. नातीला थोड्याच शब्दात, तिला समजेल अशा भाषेत, आनंद आणि सुखाची व्याख्या समजवावी. कदाचित तिच्या वयामुळे आत्ता तिला कांही शब्दांचा, भावनांचा अर्थ लागणार नाही. पण तिचा चौकस स्वभाव आणि तिक्ष्ण बुद्धी शब्द लक्षात ठेवेल आणि एके दिवशी, आजोबांनी बालपणी शिकविलेले, शहाणपण आठवेल.

आमचे कन्यारत्न १४ महिन्याचे असल्याने यंदाच्या भारतभेटीत तिने निखळ आनंद उपभोगला. दोनच आठवड्यात तिने तिच्या आयुष्यात आजतागायत जर्मनीत पहिले नसतील एवढ्या माणसाइतके भारतात नातेवाईक पहिले. युरोपात मिळत माहित अशी रसाळ फळे खाल्ली. पुढे मोठी झाल्यावर तिच्या आईला भारतात आल्यावर जो सांस्कृतिक, सामाजिक धक्का बसला तो बसणार ह्या दौर्यात माझ्या वर्ग मैत्रीण केनेडा वरून आल्याने डोंबिवलीत भेट झाली. तेव्हा तिच्या ५ वर्षाच्या मुलीने रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात , आणि बरेच प्रश्न विचारले. मात्र पेठकर काका म्हणाले तसे आजोबांनी आपल्या नातीला सुखाची व्याख्या आपल्या काळातील समाजवादी सुखाची व्याख्या समजाऊ नये. नात मोठी झाल्यावर आपसूकच दोन देशात तुलनात्मक फरक करायला शिकेल.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित 24/04/2014 - 11:04
निनादजी, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ह्या मुलीला माझ्याकडून मनापासून धन्यवाद. "रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात"या विषयावर एक नवीन लेख येऊ शकतो!

यसवायजी 24/04/2014 - 12:01
आजोबा, अशी हुशार चुणचुणीत नात मिळालीय तुम्हाला, खरंच श्रीमंत आहात. ----- कुठेतरी छानसं वाचलेलं- एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,' कशी झाली ट्रिप ? '' फारच छान डॅड '' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '' हो ' मुलगा म्हणाला.' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलंमुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.वडील स्तब्ध झाले.मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना........

In reply to by यसवायजी

वाचलेले हे आधीही. खरेच पाहण्याचा द्रुष्टीकोण मॅटर्स.. बरेच जण म्हणतात टाईम इज मनी. पण तो टांईम पैसा कमवायलाच वापरला, त्यातून विकत घेतलेले सुख उपभोगायला नाही तर त्याला काय म्हणावे? टाईम इज मनी पेक्षा टाईम स्पेंड विथ हॅपीनेस इज मनी हे समजायला हवे.

दिपक.कुवेत 24/04/2014 - 13:55
केवळ निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख वाचला आणि मजा आली. अजुन लहान आहे तोच असे अनुभव / क्षण अजुन मिळवायचा आनंद लुटा.

In reply to by दिपक.कुवेत

हे हि खरेय, काही लेखांत काथ्याकूट न शोधलेलेच बरे. लहान मुले बोलायचे बोलून जातात आणि आपण त्यात गहन अर्थ वा लॉजिक शोधत राहतो.. ;)

मनीषा 24/04/2014 - 15:50
किस्सा छान आहे आणि आशा आहे की त्या मुलीला मोठेपणी आजोबा गरीब आहेत असे वाटाणार नाही मलाही वाटते गरीबी ही मानसिक अवस्था आहे. जी व्यक्ती समाधानी नाही ती कायमच गरीब राहते. मग त्यांचा खजिना किती का भरलेला असेना अर्थात ही व्याख्या जे खरोखर गरीब आहेत त्यांच्यासाठी लागू होत नाही . त्यांना असे म्हणणे ही क्रूर चेष्टाच ठरेल.

समीरसूर 24/04/2014 - 15:55
आवडेश. लहान मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते. माझा पुतण्या आता ९ वर्षांचा आहे. साधारण डिसेंबर २०१२ मध्ये त्याने आमीर खानचा 'तलाश' पाहिला होता. आणि त्याला तो आवडला होता. अगदी २-३ आठवड्यांपूर्वी मी त्याला त्या चित्रपटातल्या आमीर खानच्या पात्राचे नाव विचारले आणि त्याने तात्काळ 'सुरजन शेखावत' सांगीतले. करीना कपूरच्या पात्राचे नाव विचारल्यावर ताबडतोब 'सिमरन' आणि 'रोझी' सांगीतले. मला खूप आश्चर्य वाटले. हुशार आहेत पोरं. :-)

In reply to by समीरसूर

मलाही लहानपणी शिवा़जी महाराजांच्या आईचं, वडिलांचं, मुलांचं नांव विचारलं की मी झटकन सांगायचो. शिवाजी महाराजांना मारायला आलेला विजापूर सरदार कोण, दिल्लीचा मुघल राजा कोण, राणा प्रताप कोण वगैरे वगैरे सर्व झटकन सांगता यायचं.... पण साला आमच्या लहानपणी कौतुक करणारे नातेवाईकच नव्हते. 'असाच अभ्यास कर' असे कोरडे आशिर्वाद मिळायचे. आमच्या पिढीची हुशारी धुळीला मिळाली.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू 24/04/2014 - 17:03
ह्य..ह्य..ह्य.. :)) आमची शाळा प्रथम बक्षीस १ पेन, दुसरे १ पेन्सिल, व तिस-याला सरळ कांडीच... :) कसले डोम्बल्याचे प्रोत्साहन येणार...

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त 24/04/2014 - 17:32
माझा आईची स्मरणशक्ती अफाट होती. वयाच्या ८० व्या वर्षी पण अगदी लहानपणीच्या कविता (वाहवा वाहवा चेंडू हा..सुरेख कितितरी खचीत हा.... मिस मेरी भोर...) पासून शिवाजी, महाभारत, पेशवाईचा संपूर्ण इतिहास, अनेक मजेदार चित्रविचित्र कथा (उंदरलीची उंदरली खिरीत पडाली...टाईप) अश्या शेकडो गोष्टी तोंडपाठ होत्या. माझ्या आग्रहामुळे तिने आत्मचरित्रात्मक आठवणी लिहिल्या, त्यात सर्व अगदी तपशीलाने लिहिले होते. हल्लीसारखे पोरांचे कवतिक तेंव्हा केले जात नसे, आणि हल्ली तर पोरांना जरा थोडे काही येत असेल, तर त्यांना एकदम 'शेलेब्रिटी'च बनवण्याची घाई आईबापांना लागलेली असते.

तिमा 24/04/2014 - 17:43
नात निरागस, चुणचुणीत असली तरी लेख आवडला असे म्हणवत नाही. अमेरिकनच कशाला, अगदी भारतातल्याच जन्मापासून सगळं मिळालेल्या या नातवंडांना, जिने चढणे,जमिनीवर बसून जेवणे, भारतीय पद्धतीच्या संडासात बसता येणे, मातीत खेळणे, पतंग उडवता येणे, पायी चालणे वगैरे माहितीच नसेल तर, आपत्कालीन परिस्थितीला ते कसे सामोरे जातील, असा विचार मनांत येतो.

In reply to by तिमा

आयुर्हित 24/04/2014 - 18:58
हे खरे तर खूप सोप्पे आहे! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत एकदा तरी गावी राहणाऱ्या आजी-आजोबांकडे किंवा कोकणात एखाद्या गावी किंवा ग्राम-कृषी पर्यटनाला घेवून जायचे! हाकानाका!

विवेकपटाईत 24/04/2014 - 20:17
प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद. तिमा ताई 'निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख' वाचा. जो पर्यंत लहान आणि निरागस असतात तो पर्यंतच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आनंद मिळतो. लहान मुलांचे जेवढे ज्ञान असते त्या आधारावर ते निष्कर्ष काढतात आणि अधिकांश निष्कर्ष गमतीदार असतात. म्हणूनच लहान पोरांबरोबर वेळ घालविण्यात मजा येते. मग मुले अमेरिकेतले असो, दिल्ली-मुंबईचे असो किंवा खेडे गावातले. सर्वच सारखी असतात.

In reply to by मदनबाण

चित्रगुप्त 25/04/2014 - 10:09
पोहोणार्‍या बाळांचे व्हिडो केवळ अद्भुत. वरील व्हिडो संपल्यावर आणखीन येणारे सुद्धा अवश्य बघावेत. धन्यवाद मदनबाणहो.

नगरीनिरंजन 25/04/2014 - 12:30
मुलं गोड असतात पण ती काय बोलतात त्यावरून त्यांचे आईबाप एकमेकांशी काय बोलत असावेत त्याचा अंदाज येतो. आमच्या एका मित्रयुगुलाच्या मुलाने एक-दोनदा त्यांच्या कारने गेल्यावर एकदा "काका, तू कार का घेत नाहीस?" असे विचारले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना). माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते.

गरोदर निवडणूक

समीरसूर ·

प्यारे१ 23/04/2014 - 16:52
खा स च! नै नै म्हणत तुम्ही पण निवड्णुकीचाच विषय काढलात की हो... काय म्हणता? ;)

In reply to by प्यारे१

समीरसूर 25/04/2014 - 11:18
खरंच! लक्षातच नाही आलं. :-) बाकी इंटरेस्टिंग आहे तो विषय हे मान्य करायलाच हवे. टीपः माझा खालचा प्रतिसाद "खरंच" हा पेठकरकाकांच्या प्रतिसादावर होता. खाली कसा काय उमटला माहित नाही.

माहितगार 23/04/2014 - 17:46
मस्त लिहिलयत वाचताना मजा आली. वातावरण हलकं करण्या बद्दल धन्यवाद

अगदी मनातलं बोल्लात. मलाही ह्या निवडणूकीपेक्षा 'अंदाजांचा', आरोपप्रत्यारोपांचा, जनतेला गृहीत धरण्याचा आणि मतदारांच्या अनास्थेचा उबग आला आहे.

समीरसूर 25/04/2014 - 11:15
सकाळी चहाला पितांना मोदी, केजरीवाल, राहुल हेच विषय असतात. इकडे केवढे मोठी सभा झाली; तिकडे कसा पचका झाला, तो असं म्हटला, त्याने असं केलं...अरारारारा...भुगा झालाय पार डोस्क्याचा. :-) अबकी बार, माफ भी कर दो यार...

प्यारे१ 23/04/2014 - 16:52
खा स च! नै नै म्हणत तुम्ही पण निवड्णुकीचाच विषय काढलात की हो... काय म्हणता? ;)

In reply to by प्यारे१

समीरसूर 25/04/2014 - 11:18
खरंच! लक्षातच नाही आलं. :-) बाकी इंटरेस्टिंग आहे तो विषय हे मान्य करायलाच हवे. टीपः माझा खालचा प्रतिसाद "खरंच" हा पेठकरकाकांच्या प्रतिसादावर होता. खाली कसा काय उमटला माहित नाही.

माहितगार 23/04/2014 - 17:46
मस्त लिहिलयत वाचताना मजा आली. वातावरण हलकं करण्या बद्दल धन्यवाद

अगदी मनातलं बोल्लात. मलाही ह्या निवडणूकीपेक्षा 'अंदाजांचा', आरोपप्रत्यारोपांचा, जनतेला गृहीत धरण्याचा आणि मतदारांच्या अनास्थेचा उबग आला आहे.

समीरसूर 25/04/2014 - 11:15
सकाळी चहाला पितांना मोदी, केजरीवाल, राहुल हेच विषय असतात. इकडे केवढे मोठी सभा झाली; तिकडे कसा पचका झाला, तो असं म्हटला, त्याने असं केलं...अरारारारा...भुगा झालाय पार डोस्क्याचा. :-) अबकी बार, माफ भी कर दो यार...
लेखनविषय:
लेखनप्रकार
अजून मे महिना आणि त्याची १६ तारीख लई लांब आहेत. आणि आता कधी एकदाचं हे पोटुशा निवडणुकीचं बाळांतपण उरकून नव्या सरकारचा जन्म, त्याचं बारसं, आणि 'आईवर गेलाय अगदी...' चे नवलाईचे दिवस संपतायेत एकदाचे असं झालंय. अहो जिकडे बघावं तिकडे निवडणुकीशिवाय चर्चाच नाहीत! मागे काही दिवसांपूर्वी आमचे दुग्धदमित्र महिन्याचं बिल घ्यायला घरी आले होते. दुग्धदमित्र म्हणजे घरी दूध आणून देणारे हो; लंगोटीयार अशी मैत्रीची एक व्याख्या असू शकते तर दुग्धदमित्र का नाही? जसं जलद म्हणजे जल देणारे तसे दुग्धद म्हणजे दूध आणून देणारे. ते तसे कधीही उगवतात. महिना संपल्यावरच येतात असं नाही.

राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा

माहितगार ·

उत्तम विषय.सगळीकडे मोदीमय वातावरण असताना ह्या विषयावरही उहापोह व्ह्यायला हवा.मला व ह्यांना हा राहूल नाटकी वाटतो. उगाच बोलायचे म्हणून बोलतो असे वाटते. राहूल गांधी ह्यांच्या समोर काय आव्हाने असतील ह्याचे उत्तर आता तरी देणे अवघड वाटते.सत्तेवर असो वा नसो, देशासमोर अनेक आव्हाने आहेत.एखादा मुद्दा त्यांनी जोर लावून धरावा. माई

चित्रगुप्त 23/04/2014 - 15:59
कशाला विरोधी पक्षनेता तरी?? खरेतर आता या मंडळींनी इथला गाशा गुंडाळून (बाईंच्या) मायदेशी परत जावे हे बरे, असे त्याची मुलाखत बघून अनेकांचे मत झालेले आहे.

पैसा 23/04/2014 - 16:30
विरोधी पक्षनेत्याने संसद चालेल तेवढा सर्ववेळ संसदेत उपस्थित रहावे लागते. आणि मग सरकारला अडचणीत आणण्यासाठी मुद्दे काढून प्रभावीरीत्या भाषणे करणे आणि संसदेच्या कामकाजात भाग घेणे अपेक्षित आहे. रागांची आधीच्या लोकसभेतील कामगिरी काय आहे? ४३% उपस्थिती आणि ० प्रश्न उपस्थित केला. २ चर्चात भाग घेतला. संसदेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? संसदेच्या बाहेर ते काय करू शकतील देवजाणे. ते सतत गोंधळलेले वाटतात.

In reply to by पैसा

प्यारे१ 23/04/2014 - 16:59
>>>ते सतत गोंधळलेले वाटतात. अजून डौट आहेच का? ते रागा, भैताड च्यायचं! युवा काँग्रेसच्या शहर उपप्रमुखाला जेवढं राजकारण कळतंय त्याच्या १० % तरी याला कळतं का नाही कुणास ठाऊक. काँग्रेस वाले हुशार खरे... गुळाचा गणपती शिक्का मारुन आणून ठेवला की खाली 'सग्गळं' करायला मोकळे!

माहितगार 23/04/2014 - 16:53
बकी नेत्यांना समाजात स्वानुभवातून बरच शिकता येत आणि दुर्दैवानी या भाऊ बहिणींनी ते जीवन मीस केलय. रिअल लाईफ एक्सप्जर इस रिअल लाईफ एक्सपोजर आणि बहुश्रूततेचा अभाव. नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती त्याचा या भाऊ बहिणींकडे अभाव असणे आश्चर्य कारक नाही. काँग्रेसचे नेते गांधी परिवारा व्यतीरीक्त दुसरा सर्वमान्य नेता देण्यात कमी पडतात म्हणून यांना आपण का झेलाव अस सर्व सामान्य जनतेला वाटल तर आश्चर्य नाही. त्या शिवाय चापलूसगिरी करणार्‍यांच्या कोंडाळ्यानीं यांच बरच नुकसान होत रहात. इन एनी केस राहूल गांधी विरोधी पक्ष नेते पद सांभाळू शकले नाहीत तर विरोधी पक्ष नेते पदा साठी दुसरी कोणती प्रभावी नावे तुम्हाला दिसतात का ? माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा

In reply to by माहितगार

माहितगार 23/04/2014 - 16:54
माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

माहितगार 23/04/2014 - 17:10
नितिनजी धाग्यास प्रतिसादाकरता धन्यवाद वरूनच देतो म्हणजे खाली प्रतिसाद देणार्‍यां उत्साही मिपाकरांच्या जागेत माझी लुडबूड टळेल.

In reply to by माहितगार

दुश्यन्त 23/04/2014 - 19:42
@ माहितगार - नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती. पं नेहरू आणि इंदिराजी बद्दल ठीक मात्र राजीवजी यांच्याबद्दल वैचारिक भूमिका नेमक्या का आणि कश्या घडतात वगैरे लागू होत अस म्हणण्याच धाडस करवत नाही.राजीवजी पण तसे अननुभवी आणि नवखेच होते. सल्लागारांच्या गराड्यात राहून ते पक्ष आणि सरकार नियंत्रित करत असत.राजीवजी आणि स्वातंत्र्य दिवस व गणतंत्र दिवस यांत गल्लत करत याचे किस्से प्रसिद्ध आहेत.मात्र त्यांच्याकडे युवक, तसेच तंत्रज्ञान वगैरे बाबत स्वतःची एक भूमिका होती हे मात्र खरे.

In reply to by धर्मराजमुटके

सुहासदवन 25/04/2014 - 11:02
क्राय + टेरी + या क्राय = सतत रडगाणे गाणे - सत्ताधारी पक्षाने काही चांगले केले तरी आणि नाही केले तरी. टेरी = सतत सत्ताधारी पक्षाची टेर खेचत शब्दांचे खेळ करीत राहाणे. या = या व्यतिरिक्त आम्ही (विरोधी पक्ष) एकही काम करीत नाही.

माहितगार 01/05/2018 - 22:41
राहुलजींसाठी आम्हीपण तीन वर्षापुर्वी चर्चा आपल्या समर्थकांच्याही आधी धागा काढला होता तर ! :) राहुलजी , या क्षणीतरी कदाचित येत्या निवडणूकीसाठी आपल्या वंशाच्या कृपेने राष्ट्रीय विरोधीपक्षनेते म्हणून स्थानापन्न होताना दिसतरय तर ! घोडा मैदाने काही महिन्यांवर येऊन ठेपली आहेत :)

कलंत्री 02/05/2018 - 10:32
भारतासाठी सक्षम नेतृत्व, सत्ताधारी अथवा विरोधी पक्षात नसणे ही एक समस्या झाल्याचे दिसते. भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही आणि विरोधी पक्ष इतका गलितगात्र झालेला बघणेही भयावह झालेला आहे. पक्ष म्हणजे सत्ता संपादनासाठी शिडी, पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे, आपापले आयटी सेल निर्माण करणे, टवाळकी करत राजकारण करणे हे सर्वच काळजी करण्यासारखे झालेले आहे.

In reply to by कलंत्री

arunjoshi123 02/05/2018 - 12:17
भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही
नेहरू नंतर कोण (म्हणजे कोणाला का होइना झेपेल का या अर्थाने) पुस्तके पडायची तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे सबल नेतृत्व होते का? ------------------
आपापले आयटी सेल निर्माण करणे,
यात काय गैर आहे? ------------------------
पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे,
मंजे? कोणी केलं हे? ---------------------------------------
टवाळकी करत राजकारण
काहीही?

In reply to by arunjoshi123

गामा पैलवान 02/05/2018 - 17:59
ज्योतिरादित्य शिंद्यांसारख्या उमद्या तरुणानं पप्पूची चाकरी केलेली पाहतांना अक्षरश: काळजाला घरं पडतात. पण करणार काय. जास्त शहाणपणा केलास तर तुझ्या बापाप्रमाणे तुझीही वासलात लावण्यात येईल. पप्पूचं निमूटपणे ऐक, अशी अप्रत्यक्ष धमकीच मिळालेली आहे. -गा.पै.

माहितगार 24/08/2018 - 20:05
मोदींप्रमाणेच राहुल गांधींच्याही खुल्या मंचावरील प्रश्नोत्तरे कमी झालेली आहेत, गेल्या दोन दिवसातील जर्मनी आणि इंग्लंड मिळूनची आतापर्यंतची राहुल गांधीची खालील तीन सादरीकरणे (प्रथमच पूर्णतः ) ऐकली. यावर भारतीय माध्यमातून इतर मुद्द्यांवर चर्चा / वाद चालू असावा पण मला स्वतःला काही वेगळे मुद्दे जाणवले. १) राहुल गांधी सध्याच्या मोदी सरकारकडे व्हीजन नसल्याची तक्रार करताना दिसतात, प्रत्युत्तरात राहुल गांधींची स्वतःची व्हीजन सविस्तर मांडताना दिसत नाहीत , जेवढी व्हीजन स्पष्ट होते ती सर्वसामान्य राजकीय वाटते, स्टेटमन लाईक असा फील येत नाही. इतर एका माध्यमात राहुलला स्वतःलाच व्हीजनच नसल्याची तक्रार दिसली, पण तिन्ही सादरीकरणे पाहिल्या नंतर राहुल गांधी मोदींवर प्रक्रीया रहीत नी जर्क प्रशासन चालवत असल्याचा आक्षेप ठेवतात त्यात पूर्ण तथ्य नसले तरी त्यांच्या टिकेत अंशतः तथ्य असावे. पण राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या काय प्रक्रीया असतील हे सांगताना दिसत नाहीत. २) मॅन्युफॅक्चरींग जॉब्सचा मुद्दा पकडून राहुल गांधींना हिट करण्याची काँग्रेसी रणनिती दिसते , इथे स्मॉल आणि मिडीयम स्केल उद्योगातून जोब आणू असे राहुल गांधी पॉलीसी मार्केट करताना दिसतात, हा मुद्दा मागच्या काँग्रेस काळात न केलेले नवे काय करणार ; कंझुमरीझम एवजी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा जावा म्हणून मागेही कागदावर पॉलीसी होत्या पण पैसा मॅनुफॅक्चरींग मध्ये लावलाच जात नाही. हातात पैसा असलेला भारतीय व्यापारी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा का लावत नाही याची माहिती राहुल गांधींना त्यांच्या मेव्हण्याकडूनही घेता यावी. मॅनुफॅक्चरींग आणि अ‍ॅग्री इंडस्ट्रीसाठी इंटरेस्ट रेट कमी करणे आणि ते त्यासाठीच वापरले जातील हे पहाणे कर्मकठीण आहे त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस्ने काही मार्ग शोधले आहेत का ? आता या समस्या एवढ्या जवळून माहिती व्हाव्यात एवढे राहुल गांधींचे (आणि अगदी अरुण जेटलींचे ) एक्सपोजर असेल का याची साशंकता वाटते. स्मॉलस्केल मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचा जवळून अनुभव असलेली व्यक्ती फायनान्स मिनीस्टरपदी जाणे गरजेचे असावे. तसे सेक्रेटरी लेव्हल ला प्रायव्हेट इंडस्ट्रीचा एक्सपोजर असलेले लोक घेण्याचे मोदींचे प्रयत्नांचा उद्देश्य चांगला असावा. ३) मोदींवर एकाधिकार शाहीची टिका आणि ऐकण्याचे महत्व सांगणारे राहुल गांधी स्वतःही एकटेच बोलण्याची सवय असलेले जाणवले. केवळ मिडीया मॅनेजनेंट स्टेज करण्यापुरते मो दींपेक्षा मिडिया मॅनेज करणार्‍यांचे अधिक ऐकत असावेत असे वाटून गेले ३) राहुल गांधींची इनक्लुझीवीटी आणि अंहिसावाद महात्मा गांधींच्या खिलाफती राजकारणाच्या जवळ जाणारा वाटला. लिट्टे आणि काश्मिरातील अतीरेक्यांचा हिंसाचार केवळ अहिंसात्मक प्रतिसादाने राहुल गांधी सोडवू शकतात का ? असे असेल तर राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या शिक्षा रद्द का नाही केल्या ? असे बालीश प्रश्न मुलाखत ऐकताना पडत होते. ४) स्त्री समानतेवर बोलताना तलाकचा प्रश्न अनुल्लेखीत ठेवला प्रश्न विचारणार्‍यांनीही ज्या अर्थी विचारले नाही तरी निवडक श्रोत्यांसमोर निवडक बर्‍यापैकी पुर्व नियोजीत प्रश्नोत्तरे असेच स्वरुप असावे. ५) युनिटी आणि डयव्हरसिटी गुरुनानकांच्या काळापासून भारतात आली (म्हणजे त्या पुर्वी भारतात नव्हती) हे समोरचा श्रोतावर्ग पाहून निवडलेली भूमिका राजकारणी घराण्याची पार्श्वभूमीतून विकसीत कौशल्य दाखवते पण .. ६) इतरांना ऐकावे आणि राग आणि द्वेष कमी होण्यसाठी त्यांना समजून घ्यावे यावर बरेच तत्वज्ञाअ सांगितले , भाजपाई आणि संघीयांच्या राग मात्र केवळ मिठी मारुन कमी व्हावा अशी अपेक्षा विरोधाभासी वाटली. खास करुन लांगुलचालनवाद नेहरु ते सोनीया पलिकडे जाऊन गांधींच्या खिलाफतीपर्यंत पोहचणारा असावा असे वाटत राहीले. ७ ) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे ध्येय शहरीकरणाचे होते आणि आहे हे ऐकुन भरुन आले. ८) म. गांधींची अहिंसा खिलाफतवाद घेतला, पण म. गांधी राजकारणातही सत्य बोलण्यावर भर देत त्यापासून राहुल गांधी राजकारणाच्या दृष्टीने दूर असावेत (कुठे कुठे ते भाजपा समर्थकांवर सोडलेले पुरेसे असावे) माझ्या दृष्टीने ते इतरांचे ऐकत असतील आणि महात्मा गांधी आदर्श असेल तर प्रथमतः खानदानी नेपोटीझमला तलाक देण्याची स्वतः आपल्या बहीण आणि मेव्हण्यासह सुरवात करावी. * https://youtu.be/cIvbi61xpcM * https://youtu.be/tUe-91wbcHE * https://youtu.be/3m08A_IL-F4

SHASHANKPARAB 26/08/2018 - 22:34
राहुल गांधींसमोर काय पर्याय आहेत यापेक्षा इंदिरा कॉंग्रेससमोर अध्यक्ष पदासाठी काय पर्याय आहेत, हा खरा प्रश्न आहे. बाकी मुळातच बेचव असणार्‍या कांदेपोह्यांवर कितीही कोथिंबीर किंवा शेव पसरवली, तरीही ते बेचव आहेत हे कळतच. नेतृत्वगुण अंतर्मनात असावा लागतो, तो शिकून केवळ दिखाव्यासाठी वापरता येत नाही हे ज्या दिवशी सोनियामाईना व राहुलला कळेल नि ते पायउतार होऊन इंदिरा कॉंग्रेस पक्षाची धुरा एखाद्या लायक नेत्याकडे सोपवतील, तेव्हाच कॉंग्रेसला काहीतरी आशा असेल.

In reply to by SHASHANKPARAB

माहितगार 26/08/2018 - 23:19
नेपोटीझम तत्वतः मलाही मान्य नाही. पण आपण गेल्या दोन- तीन दिवसातील राहुल गांधीं ची नवीन मांडणीचे व्हीडीओ मुळातून अभ्यासले आहेत का ? त्यांच्या समोर उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांवर त्यांची वरपांगी तरी स्ट्रॅटेजी आता पुढे आली आहे. त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण करण्या साठी भाजपा समर्थक कितपत तयार असतील या बाबत साशंकता वाटते.

डँबिस००७ 27/08/2018 - 01:04
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ? जर्मन व ईंग्लंड मधल्या राहुल गांधींच्या व्हिजिट मध्ये आयोजलेल्या चर्चा सत्रात त्यांना विचारलेल्या प्रश्नामुळे रा गां चा त्रिफळा उडालेला सर्व जनतेला दिसला. प्रश्न :२०१९ मध्ये पंतप्रधान होणार का ? रा गा : मला व्हिजन नाही ! दलित व दबलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी मला काम करायचय ! प्रश्न: तुम्ही पं प्र असता तर डोकलाम ईश्यु कसा हँडल केला असता ? रा गा : मला डोकलाम बद्दल माहिती नाही त्यामुळे मी सांगु शकत नाही ! डोकलाम बद्दलच्या पार्लमेंटरी कमीटी मध्ये रा गा सुद्धा आहेत !

In reply to by डँबिस००७

नितिन थत्ते 27/08/2018 - 07:14
प्रश्नोत्तरांना सामोरा न जाणार्‍या भित्र्या नेत्याचा त्रिफळा उडत नाही हे तितकेच खरे. एकतर्फी भाषणात भरपूर वेळा हिट विकेट करून घेतलेली असते.

In reply to by डँबिस००७

माहितगार 27/08/2018 - 12:34
@ नितीन थत्तेजी, मोदींच्या मर्यादांनी राहुल गांधींच्या मर्यादांचे समर्थन होत नसावे. @ डँबिस००७ , खालील वाक्यात नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ?

नितिन थत्ते 27/08/2018 - 07:11
तर एकुणात रागा (संपादित) आहे याबद्दल एकमत आहे असं दिसतंय. त्याच्या (संपादित) असण्याबाबत आणि त्यावर भाजप करीत असलेल्या चुकीबाबत तवलीन सिंग या पार्शली भक्त पत्रकार बैंचा कालचा लेख. https://indianexpress.com/article/opinion/fifth-column-a-goof-or-a-goof-up-5324872/

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 12:43
विरुद्ध प्रतिक्रीया मिळावी म्हणून अतिशयोक्त विशेषणाचा उपयोग प्रतिसादात केला गेलेला दिसतोय. पहिल्या प्रतिसादातील 'नाटकी' हे विशेषण पुरेसे असावे असे वाटते.

In reply to by माहितगार

अभ्या.. 27/08/2018 - 14:34
हेहेहे तसं काहीच नाहीये. इथे संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना? निदान त्यामुळे देशभक्ती तरी प्रुव्ह होईल. गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही. किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार. हे करुन ते करुन वर डूआयडीच्या मागे लपून दुसर्‍यांनाच कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. अचाट अफाट आहे सारे.

In reply to by अभ्या..

माहितगार 27/08/2018 - 15:39
....कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. ....
या गोष्टींची या धागा चर्चेत अद्याप आठवण केली नव्हती. मिपकरांप्रती व्यक्तिगततेची सुरवातही झालेली नाही. बाकी आपले डू आयडी चे संदर्भ कळाले नाही. मी डू आयडींचा उघड तात्विक समर्थक असलो तरी माझे अद्याप मिपावर डू आयडी खाते नाही . जे काही आहे ते मुद्यांवर बोलावे . मिपाकरांवर व्यक्तिगततेची आपल्याकडून सुरवात करण्याचे औचित्य समजले नाही.
...किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार....
देश विरोधी कारवायांचे समर्थन केल्यावर पदरात अजून काय पडते. (केवळ मिपाकरांबद्दल म्हणत नाहीए एकुणच तथाकथित पुरोगामीत्वाच्या नावा खाली देश विघातक शक्तीचे समर्थना बद्दल प्रश्न चिन्ह आहे )
....गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही.
त्यांच्या मनात देशविरोधी भूमिका घेतल्या नंतर आलेल्या भितीतून अशी त्यांच्याच मनात अशी प्रमेये जन्मात येत असल्यास कल्पना नाही. तसे पहाता मी स्वतःही मोदीं - भाजपा संघावर टिकाही केली आहे आणि देशप्रेमही व्यक्त केले . देशप्रेम व्यक्त करताना तोंड न लपवणार्‍यांना काहीच समस्या नाही. प्रश्न देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जे एक्सक्युजेस देऊन तोंड लपवतात त्यांचा असावा.
....संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना?....
मी व्यक्तिशः संकरीत घराणे अशी टिका केलेली नाही. मी आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांचा समर्थक आहे. फिरोज गांधींच्या शान मध्ये आमची मिपावर फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? नावाची कविता आहे. स्वतः फिरोज गांधीचा परिवार आणि काँग्रेस परिवार फिरोज गांधींचे नाव घेण्यास का लाजतो हा खरा प्रश्न असावा. नव्या मुलखतीत रागाने स्वतः विरोधकांना समजून घेण्याचे महत्व प्रतिपादीत केले आहे. त्याबाबत तो गंधीर असेल तर त्याने परिवारासहीत राजकारण संन्यास घ्यावा कारण नेपोटीझम हि अस्विकार्य गोष्ट असते हे फिरोज गांधींनीही सांगितले असते. काँग्रेसचे अध्यक्षपद १९ वर्षे पहिल्यांदच सलग बाळगले जाते त्या कालावधीतील सर्व काँग्रेस सरकारांवर रिमोट कंट्रोल असतो, शेतकर्‍याम्च्या जमिनींचे इनसाईडर ट्रेडींग होऊन परिवारातील जावई फिरोझ गांधींची लाज काढतात आणि तरीही शहजादे पत्रकार परिषदेत आमच्या परिवारातील कुणि पंतप्रधानपदी नाही अशी मखलाशी करतात ? याचे ज्यांना कौतुक वाटते त्यांनी सुवसिनी होऊन शहजाद्यांची आरती करत बसावे. या धाग्याच्या संदर्भाने * जादवपूर विद्यापीठात देशाच्य एकसंघतेची जी थट्टा झाली त्यावर राहुल गांधींनी राष्ट्रप्रेमी म्हणून भूमिका घेतली का ? घेतली असेल तर नेमकी कोणती भूमिका घेतली होती ? घेतली नसेल तर का घेतली नाही ? * अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या फशीच्या संदर्भाने राहुल गांधींची नेमकी भूमिका काय होती ? या फाश्या झाल्या तेव्हा त्यंच्याच पक्षाचे सरकर होते. नव्या मुलाखतीतून त्यांना म.गांधीचा अहिंसावाद आठवत आहे, लिट्टेच्या प्रभकरनांच्या मृत्यूने त्यांना दुख्ख झाले म्हणतात. अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या कुटूंबाची काळजी करुन त्यांच्या फाश्या अहिंसावादी रागाने पक्षाकडून माफ का केल्या नाहीत ? अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या प्रती त्यांच्या पक्षाकडून झालेल्या असहिष्णूतेसाठी नेमके कोणते प्रायश्चित्त रागा ने घेतले ?

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 27/08/2018 - 16:46
चु* किंवा *त्या असं लिहिलेलं चाललं असतं का? पूर्ण लिहिलेलं चालत नाही असं दिसतं . बा*** भां** अरे कुठे नेऊन ठेवला मिसळपाव (माझा) !!!

SHASHANKPARAB 27/08/2018 - 10:04
राहुल देशात राहून जे काही बोलत असतो, अगदी तेच मुद्दे जरासा विचारवंतांचा आव आणून बोलत आहे. त्यातही वादग्रस्त मुद्दे उगाचच उकरून काढले गेलेत ( शीख दंगल, लिंचिंग आणि बेरोजगारी यांचा संबंध, इसिस इत्यादी). राफेल मुद्द्यावरून सरकारला घेरायचा प्रयत्नही आता थंड पडेल, करण अनिल अंबाणीच्या 5000 कोटींचा दावा केलाय. बाकी नेहेमीचे दलित वगैरे मुद्दे राहुल नेहेमीच उगाळत असतो. भारतातील विरोधी पक्षांची मुख्य समस्या ही आहे की जेव्हा जेव्हा ते बोलतात, तेव्हा एकदातरी ते भाजप किंवा मोदींच नाव घेतातच ! भाजपला फक्त त्या त्या विरोधी नेत्यांची नकारात्मक भूमिका लोकांसमोर मांडायचीय, मग आपोआप मोदी सकारात्मक ठरतात. आणि मग रोज नवीन वक्तव्यांमधून ते अधोरेखित होत जातं. मुळात राजकारणी व्यक्ती त्या पेशामुळेच जगभर बदनाम आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा सगळेच राजकारणी मिळून फक्त एका राजकारण्याला शिव्या घालतात तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा "अपवाद" म्हणून तयार होते. दुर्दैवाने कुठलाही मोदी विरोधी नेता, सत्तेत आल्यावर स्वतः काय करणार किंवा सत्तेत असताना काय चांगली कामे केली याबद्धल बोलत नाही. त्यांचा फक्त मोदी काय चुकीचं करतात नि मोदीं कशी देशाची वाट लावणार आहेत याचाच धोशा सदैव सुरू असतो. याउलट मोदींची वाक्ये पहिली तर त्यातील 25 टक्केच नकारात्मक किंवा टीकात्मक असतात, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांची सकारात्मक बाजूच ठळक होते. भारतातील विरोधी पक्ष एका सापळ्यात अडकलेत, नि त्यांना स्वतःलाच त्यातून बाहेर पडायचं नाही असं दिसतंय. सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते. परंतु आतापर्यंतच्या एकंदर घडामोडींवरून त्यांचा मोदींच्या धोरणांना पाठिंबा असावा असं दिसतं.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 16:54
भक्त नसलेल्या -भक्त मी पण नाही मी व्यक्ती पुजक नाही ती मोदींचीही करत नाही आणि रागाचीही करत नाही- तथाकथित पुरोगामींचा लोकशाही आणि संविधान वरचा विश्वास का काय म्हणतात तो हाच का ? सर्वात महत्वाचे राहुल गांधींच्या बद्दल धागा असूनही विषय सोडून सारखे भाजपावर घसरायला का होत असेल ?

In reply to by SHASHANKPARAB

शाम भागवत 27/08/2018 - 15:35
सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते.
भाजपाने पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमधे ओडिशामधे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते आहे. कॉग्रेस तिसर्‍या स्थानावर गेली आहे. भाजपाचा जनाधार पूर्वीपेक्षा खूप वाढलेला दिसून येतो आहे. याउलट बीजेडीमधेही दुफळी पडलेली आहे. त्यामुळे २०१४ एवढी चांगली स्थिती आजच्या बीजेडीची आहे असे वाटत नाही. वाजपेयींच्या काळातील भाजप बीजेडी युतीमधे भाजपावाल्यांनी पटनाईंकांना खूप त्रास दिला होता. त्यामुळे आघाडी मोडीत निघाली होती. पण आताचे तिथले भाजपवाले मोदी व शहांच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे, या दोन नेत्यांशी जुळवून घेऊन स्थानीक नेत्यांवर कुरघोडी करून, पटनाईक ओडीसा आरामात ताब्यात ठेऊ शकतात. एकंदरीत पाहता पटनाईक मोदींना विरोध न करण्याचे किंबहुना सहकार्य करत असल्याचेच दिसून येते. नितीशकुमारांनीही मोदींच्या हळूहळू जवळ जात, मगच भाजपशी युती करावयाची चाल खेळली होती याची आठवण होते आहे. त्यामुळे लोकसभेसाठी भाजप व बीजेडी मधे युती झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 17:20
मिपावर मिपा धोरणानुसार उपलब्ध 'राजकारण' वर्गीकरणातील लेख आहे, प्रतिसादकाच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण काय आहे? मिपा या संस्थळावरून भारताच्या राजकारणची दिशा निश्चीत होत असल्याच्या भ्रमात प्रस्तुत धागा लेखक नाही -मी राजकारणात अद्यापतरी कधी गेलो नाही आणि कोणत्याही एका पक्षाची भलावण केलेली नाही- पण व्यक्तिगत टिकेवर उतरणार्‍या प्रतिसादकास असा काही भ्रम होतो आहे का की व्यक्तिगत टिकेवर उतरावे लागत आहे? चंद्र दाखवला तर चंद्र दाखवणार्‍याचे बोट कसे वाकडेवर आपण उतरतो आहोत ? धागा लेखात राहुल गांधींच्या किमान एका पैलुची सकारात्मक दखल घेतली आहे दुसर्‍या बाजूला टिकाही केली आहे. राहुल गांधींचे प्रचार मुलाखती ंचे युट्यूब दुवे दिले आहेत. निसटत्या बाजू मांडण्याच्या माझ्या क्षमतेच्या १ टक्का सुद्धा टिका अद्याप केलेली नाही तरीही आपण एवढे परेशान आहात ? इतरांवर अमुक्चे भक्त म्हणून विशेषण बहाल करणार्‍यंनी आपणही कुणाचेतरी 'भक्त' झालो आहोत का हे तपासून पहावे.

नितिन थत्ते 27/08/2018 - 19:26
एक जुना व्यनि संवाद Between you, संपादक मंडळ and पैसा नितिन थत्ते's picture You 12/2/13 मिटवा आज सचीन यांचा एक लेख "भारताचे आशास्थान राहुल गांधी" प्रकाशित झाला होता. तो आता दिसत नाही. तो उडवण्यात आला आहे का? धन्यवाद. नितिन थत्ते संपादक मंडळ's picture संपादक मंडळ 12/2/13 मिटवा Block नमस्कार. प्रचारकी स्वरूपाचे असल्याने सचीन यांचे २ लेख काल आणि आज मिसळपावच्या धोरणानुसार अप्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही. त्यांच्याच अन्य एका लेखावरही कोणतीच सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे तोही वाचनमात्र करण्यात आला. राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या लेखांसाठी कोणत्याही पक्षाने मिपासारखी संस्थळे व्यासपीठ म्हणून वापरू नयेत असे वाटते. धन्यवाद! पैसा's picture पैसा 12/2/13 मिटवा Block तो सं मं चा निर्णय आहे.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 20:01
१.१) मी व्यक्तीशः सेंसॉरशीपचा समर्थक नाही. मिपाचे धोरण जे असेल त्या नुसार मिपाचे काय निर्णय होत असतील. १.२) "भारताचे आशास्थान राहुल गांधी" ह्या धागा लेखा बद्दल मला कोणतीही कल्पना नाही पण प्रथम दर्शनीतरी शीर्षकात प्रचारकता दिसते आहे. आपण माझ्या या धागा लेख चर्चेस आपण कोण्त्या अंगाने प्रचारकी म्हणून पहाता ते कळत नाही. मी राहूल गांधींबद्दल एकच बाजू मांडलेली नाही. माझे राजकीय नेपोटीझमच्या घराणेशाहीच्या संंबंधाने पुर्वग्रह आहेत पण ते जगातल्या सर्व राजकीय घराणेशाहीला जवळपास विना अपवाद लागू होतात. आणि एवढे असूनही लेखाच्या अगदी दुसर्‍या परिच्छेदात मी राजीव आणि राहुल पितापुत्राचे एका मुद्द्यावर कौतुकही केले आहे. शिवाय आता नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदांची दखल घेतली. पण केवळ कौतुकही नाही केले मर्यादांची सुद्धा चर्चा केली. तुम्हाला कोणत्या अंगाने कोणत्या तर्काने हा धागा लेख प्रचारकी वाटतो ते स्पष्ट करावे ? १.३) आपण वगळले गेलेल्या लेखात संपादक मंडळ म्हणते "त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही" आणि या धागा लेखात केवळ एका बाजूचा प्रचार नव्हे साधक बाधक दोन्हीही चर्चा अपेक्षीत आहेत . आपल्या सारखे अनुभवी सदस्य अशी तुलना कशी करु शकतत हे उमगले नाही. १.४) चर्चेची लेव्हल चांगली राहील, मिपाकर एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळतील हे धागा लेखक म्हणून चर्चेवर मी स्वतः लक्ष्य ठेवत असतो. धागा लेख छापून नंतर दिसलोच नाही असे माझ्या धागा लेखांबाबत सहसा दिसले नसावे. उदाहरणार्थ याच धागा लेख चर्चेत या प्रतिसादात आपण आणि सदस्य डँबीस यांच्या परस्पर विरोधी भूमिकांच्या सदस्यांना त्या पैकी एकाची बाजू न घेता लिहिण्याचा प्रयास केला आहे. १.४) त्या धाग्यावर सेंसॉरशीप झाली म्हणून या धाग्यावरही सेंसॉरहीप झालीच पाहीजे ही आपली अपेक्षा आणि त्या पुर्वग्रहातून ह्या धागा लेखकास व्यक्तिगत टिकाकरणारे ट्रोलींग आपल्या सारख्या अनुभवी सदस्याकडून व्हावे हे अनाकलनीय आहे.

डँबिस००७ 27/08/2018 - 19:49
शरद पवार यांनी सांगितला पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याचा फॉर्म्युला आगामी २०१९च्या निवडणुकांच्या रणनितीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय असा सामना होईल असे नुकतेच राहुल गांधी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल. राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. पवार म्हणाले, २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध दर्शवला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जाता जाता देशाच पंतप्रधान पद उपभोगायला मिळेल अशी वेडी आशा पवार साहेबांना आहे अस वाटतय !!

माहितगार 30/05/2019 - 12:51
या चर्चेकडे मागे वळून पहाताना एक वेगळाच प्रश्न मनात आला . 'लोक घराणेशाहीशी एवढे भावनिक दृष्ट्या बांधील कसे होऊ शकत असतील?' हा माझा प्रश्न सर्वच पक्षातील घराणेशाही समर्थकांसाठी आहे तसा गांधी-वड्रा घराणे स्मर्थकांसाठीसुद्धा आहे..

In reply to by माहितगार

बुवाबाजी, घराणेशाही, गुलामी या अश्या सवई आहेत की त्या अंगी भिनल्या की निघता निघत नाहीत... हा झाला मानसिक प्रभाव; त्यांच्यापासून जर काही वैयक्तिक आर्थिक-सामाजिक-राजकिय फायदे मिळत असतील तर मग त्या सवई सोडणे आतबट्ट्याचे असते, हेवेसांन.

उत्तम विषय.सगळीकडे मोदीमय वातावरण असताना ह्या विषयावरही उहापोह व्ह्यायला हवा.मला व ह्यांना हा राहूल नाटकी वाटतो. उगाच बोलायचे म्हणून बोलतो असे वाटते. राहूल गांधी ह्यांच्या समोर काय आव्हाने असतील ह्याचे उत्तर आता तरी देणे अवघड वाटते.सत्तेवर असो वा नसो, देशासमोर अनेक आव्हाने आहेत.एखादा मुद्दा त्यांनी जोर लावून धरावा. माई

चित्रगुप्त 23/04/2014 - 15:59
कशाला विरोधी पक्षनेता तरी?? खरेतर आता या मंडळींनी इथला गाशा गुंडाळून (बाईंच्या) मायदेशी परत जावे हे बरे, असे त्याची मुलाखत बघून अनेकांचे मत झालेले आहे.

पैसा 23/04/2014 - 16:30
विरोधी पक्षनेत्याने संसद चालेल तेवढा सर्ववेळ संसदेत उपस्थित रहावे लागते. आणि मग सरकारला अडचणीत आणण्यासाठी मुद्दे काढून प्रभावीरीत्या भाषणे करणे आणि संसदेच्या कामकाजात भाग घेणे अपेक्षित आहे. रागांची आधीच्या लोकसभेतील कामगिरी काय आहे? ४३% उपस्थिती आणि ० प्रश्न उपस्थित केला. २ चर्चात भाग घेतला. संसदेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? संसदेच्या बाहेर ते काय करू शकतील देवजाणे. ते सतत गोंधळलेले वाटतात.

In reply to by पैसा

प्यारे१ 23/04/2014 - 16:59
>>>ते सतत गोंधळलेले वाटतात. अजून डौट आहेच का? ते रागा, भैताड च्यायचं! युवा काँग्रेसच्या शहर उपप्रमुखाला जेवढं राजकारण कळतंय त्याच्या १० % तरी याला कळतं का नाही कुणास ठाऊक. काँग्रेस वाले हुशार खरे... गुळाचा गणपती शिक्का मारुन आणून ठेवला की खाली 'सग्गळं' करायला मोकळे!

माहितगार 23/04/2014 - 16:53
बकी नेत्यांना समाजात स्वानुभवातून बरच शिकता येत आणि दुर्दैवानी या भाऊ बहिणींनी ते जीवन मीस केलय. रिअल लाईफ एक्सप्जर इस रिअल लाईफ एक्सपोजर आणि बहुश्रूततेचा अभाव. नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती त्याचा या भाऊ बहिणींकडे अभाव असणे आश्चर्य कारक नाही. काँग्रेसचे नेते गांधी परिवारा व्यतीरीक्त दुसरा सर्वमान्य नेता देण्यात कमी पडतात म्हणून यांना आपण का झेलाव अस सर्व सामान्य जनतेला वाटल तर आश्चर्य नाही. त्या शिवाय चापलूसगिरी करणार्‍यांच्या कोंडाळ्यानीं यांच बरच नुकसान होत रहात. इन एनी केस राहूल गांधी विरोधी पक्ष नेते पद सांभाळू शकले नाहीत तर विरोधी पक्ष नेते पदा साठी दुसरी कोणती प्रभावी नावे तुम्हाला दिसतात का ? माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा

In reply to by माहितगार

माहितगार 23/04/2014 - 16:54
माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

माहितगार 23/04/2014 - 17:10
नितिनजी धाग्यास प्रतिसादाकरता धन्यवाद वरूनच देतो म्हणजे खाली प्रतिसाद देणार्‍यां उत्साही मिपाकरांच्या जागेत माझी लुडबूड टळेल.

In reply to by माहितगार

दुश्यन्त 23/04/2014 - 19:42
@ माहितगार - नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती. पं नेहरू आणि इंदिराजी बद्दल ठीक मात्र राजीवजी यांच्याबद्दल वैचारिक भूमिका नेमक्या का आणि कश्या घडतात वगैरे लागू होत अस म्हणण्याच धाडस करवत नाही.राजीवजी पण तसे अननुभवी आणि नवखेच होते. सल्लागारांच्या गराड्यात राहून ते पक्ष आणि सरकार नियंत्रित करत असत.राजीवजी आणि स्वातंत्र्य दिवस व गणतंत्र दिवस यांत गल्लत करत याचे किस्से प्रसिद्ध आहेत.मात्र त्यांच्याकडे युवक, तसेच तंत्रज्ञान वगैरे बाबत स्वतःची एक भूमिका होती हे मात्र खरे.

In reply to by धर्मराजमुटके

सुहासदवन 25/04/2014 - 11:02
क्राय + टेरी + या क्राय = सतत रडगाणे गाणे - सत्ताधारी पक्षाने काही चांगले केले तरी आणि नाही केले तरी. टेरी = सतत सत्ताधारी पक्षाची टेर खेचत शब्दांचे खेळ करीत राहाणे. या = या व्यतिरिक्त आम्ही (विरोधी पक्ष) एकही काम करीत नाही.

माहितगार 01/05/2018 - 22:41
राहुलजींसाठी आम्हीपण तीन वर्षापुर्वी चर्चा आपल्या समर्थकांच्याही आधी धागा काढला होता तर ! :) राहुलजी , या क्षणीतरी कदाचित येत्या निवडणूकीसाठी आपल्या वंशाच्या कृपेने राष्ट्रीय विरोधीपक्षनेते म्हणून स्थानापन्न होताना दिसतरय तर ! घोडा मैदाने काही महिन्यांवर येऊन ठेपली आहेत :)

कलंत्री 02/05/2018 - 10:32
भारतासाठी सक्षम नेतृत्व, सत्ताधारी अथवा विरोधी पक्षात नसणे ही एक समस्या झाल्याचे दिसते. भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही आणि विरोधी पक्ष इतका गलितगात्र झालेला बघणेही भयावह झालेला आहे. पक्ष म्हणजे सत्ता संपादनासाठी शिडी, पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे, आपापले आयटी सेल निर्माण करणे, टवाळकी करत राजकारण करणे हे सर्वच काळजी करण्यासारखे झालेले आहे.

In reply to by कलंत्री

arunjoshi123 02/05/2018 - 12:17
भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही
नेहरू नंतर कोण (म्हणजे कोणाला का होइना झेपेल का या अर्थाने) पुस्तके पडायची तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे सबल नेतृत्व होते का? ------------------
आपापले आयटी सेल निर्माण करणे,
यात काय गैर आहे? ------------------------
पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे,
मंजे? कोणी केलं हे? ---------------------------------------
टवाळकी करत राजकारण
काहीही?

In reply to by arunjoshi123

गामा पैलवान 02/05/2018 - 17:59
ज्योतिरादित्य शिंद्यांसारख्या उमद्या तरुणानं पप्पूची चाकरी केलेली पाहतांना अक्षरश: काळजाला घरं पडतात. पण करणार काय. जास्त शहाणपणा केलास तर तुझ्या बापाप्रमाणे तुझीही वासलात लावण्यात येईल. पप्पूचं निमूटपणे ऐक, अशी अप्रत्यक्ष धमकीच मिळालेली आहे. -गा.पै.

माहितगार 24/08/2018 - 20:05
मोदींप्रमाणेच राहुल गांधींच्याही खुल्या मंचावरील प्रश्नोत्तरे कमी झालेली आहेत, गेल्या दोन दिवसातील जर्मनी आणि इंग्लंड मिळूनची आतापर्यंतची राहुल गांधीची खालील तीन सादरीकरणे (प्रथमच पूर्णतः ) ऐकली. यावर भारतीय माध्यमातून इतर मुद्द्यांवर चर्चा / वाद चालू असावा पण मला स्वतःला काही वेगळे मुद्दे जाणवले. १) राहुल गांधी सध्याच्या मोदी सरकारकडे व्हीजन नसल्याची तक्रार करताना दिसतात, प्रत्युत्तरात राहुल गांधींची स्वतःची व्हीजन सविस्तर मांडताना दिसत नाहीत , जेवढी व्हीजन स्पष्ट होते ती सर्वसामान्य राजकीय वाटते, स्टेटमन लाईक असा फील येत नाही. इतर एका माध्यमात राहुलला स्वतःलाच व्हीजनच नसल्याची तक्रार दिसली, पण तिन्ही सादरीकरणे पाहिल्या नंतर राहुल गांधी मोदींवर प्रक्रीया रहीत नी जर्क प्रशासन चालवत असल्याचा आक्षेप ठेवतात त्यात पूर्ण तथ्य नसले तरी त्यांच्या टिकेत अंशतः तथ्य असावे. पण राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या काय प्रक्रीया असतील हे सांगताना दिसत नाहीत. २) मॅन्युफॅक्चरींग जॉब्सचा मुद्दा पकडून राहुल गांधींना हिट करण्याची काँग्रेसी रणनिती दिसते , इथे स्मॉल आणि मिडीयम स्केल उद्योगातून जोब आणू असे राहुल गांधी पॉलीसी मार्केट करताना दिसतात, हा मुद्दा मागच्या काँग्रेस काळात न केलेले नवे काय करणार ; कंझुमरीझम एवजी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा जावा म्हणून मागेही कागदावर पॉलीसी होत्या पण पैसा मॅनुफॅक्चरींग मध्ये लावलाच जात नाही. हातात पैसा असलेला भारतीय व्यापारी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा का लावत नाही याची माहिती राहुल गांधींना त्यांच्या मेव्हण्याकडूनही घेता यावी. मॅनुफॅक्चरींग आणि अ‍ॅग्री इंडस्ट्रीसाठी इंटरेस्ट रेट कमी करणे आणि ते त्यासाठीच वापरले जातील हे पहाणे कर्मकठीण आहे त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस्ने काही मार्ग शोधले आहेत का ? आता या समस्या एवढ्या जवळून माहिती व्हाव्यात एवढे राहुल गांधींचे (आणि अगदी अरुण जेटलींचे ) एक्सपोजर असेल का याची साशंकता वाटते. स्मॉलस्केल मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचा जवळून अनुभव असलेली व्यक्ती फायनान्स मिनीस्टरपदी जाणे गरजेचे असावे. तसे सेक्रेटरी लेव्हल ला प्रायव्हेट इंडस्ट्रीचा एक्सपोजर असलेले लोक घेण्याचे मोदींचे प्रयत्नांचा उद्देश्य चांगला असावा. ३) मोदींवर एकाधिकार शाहीची टिका आणि ऐकण्याचे महत्व सांगणारे राहुल गांधी स्वतःही एकटेच बोलण्याची सवय असलेले जाणवले. केवळ मिडीया मॅनेजनेंट स्टेज करण्यापुरते मो दींपेक्षा मिडिया मॅनेज करणार्‍यांचे अधिक ऐकत असावेत असे वाटून गेले ३) राहुल गांधींची इनक्लुझीवीटी आणि अंहिसावाद महात्मा गांधींच्या खिलाफती राजकारणाच्या जवळ जाणारा वाटला. लिट्टे आणि काश्मिरातील अतीरेक्यांचा हिंसाचार केवळ अहिंसात्मक प्रतिसादाने राहुल गांधी सोडवू शकतात का ? असे असेल तर राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या शिक्षा रद्द का नाही केल्या ? असे बालीश प्रश्न मुलाखत ऐकताना पडत होते. ४) स्त्री समानतेवर बोलताना तलाकचा प्रश्न अनुल्लेखीत ठेवला प्रश्न विचारणार्‍यांनीही ज्या अर्थी विचारले नाही तरी निवडक श्रोत्यांसमोर निवडक बर्‍यापैकी पुर्व नियोजीत प्रश्नोत्तरे असेच स्वरुप असावे. ५) युनिटी आणि डयव्हरसिटी गुरुनानकांच्या काळापासून भारतात आली (म्हणजे त्या पुर्वी भारतात नव्हती) हे समोरचा श्रोतावर्ग पाहून निवडलेली भूमिका राजकारणी घराण्याची पार्श्वभूमीतून विकसीत कौशल्य दाखवते पण .. ६) इतरांना ऐकावे आणि राग आणि द्वेष कमी होण्यसाठी त्यांना समजून घ्यावे यावर बरेच तत्वज्ञाअ सांगितले , भाजपाई आणि संघीयांच्या राग मात्र केवळ मिठी मारुन कमी व्हावा अशी अपेक्षा विरोधाभासी वाटली. खास करुन लांगुलचालनवाद नेहरु ते सोनीया पलिकडे जाऊन गांधींच्या खिलाफतीपर्यंत पोहचणारा असावा असे वाटत राहीले. ७ ) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे ध्येय शहरीकरणाचे होते आणि आहे हे ऐकुन भरुन आले. ८) म. गांधींची अहिंसा खिलाफतवाद घेतला, पण म. गांधी राजकारणातही सत्य बोलण्यावर भर देत त्यापासून राहुल गांधी राजकारणाच्या दृष्टीने दूर असावेत (कुठे कुठे ते भाजपा समर्थकांवर सोडलेले पुरेसे असावे) माझ्या दृष्टीने ते इतरांचे ऐकत असतील आणि महात्मा गांधी आदर्श असेल तर प्रथमतः खानदानी नेपोटीझमला तलाक देण्याची स्वतः आपल्या बहीण आणि मेव्हण्यासह सुरवात करावी. * https://youtu.be/cIvbi61xpcM * https://youtu.be/tUe-91wbcHE * https://youtu.be/3m08A_IL-F4

SHASHANKPARAB 26/08/2018 - 22:34
राहुल गांधींसमोर काय पर्याय आहेत यापेक्षा इंदिरा कॉंग्रेससमोर अध्यक्ष पदासाठी काय पर्याय आहेत, हा खरा प्रश्न आहे. बाकी मुळातच बेचव असणार्‍या कांदेपोह्यांवर कितीही कोथिंबीर किंवा शेव पसरवली, तरीही ते बेचव आहेत हे कळतच. नेतृत्वगुण अंतर्मनात असावा लागतो, तो शिकून केवळ दिखाव्यासाठी वापरता येत नाही हे ज्या दिवशी सोनियामाईना व राहुलला कळेल नि ते पायउतार होऊन इंदिरा कॉंग्रेस पक्षाची धुरा एखाद्या लायक नेत्याकडे सोपवतील, तेव्हाच कॉंग्रेसला काहीतरी आशा असेल.

In reply to by SHASHANKPARAB

माहितगार 26/08/2018 - 23:19
नेपोटीझम तत्वतः मलाही मान्य नाही. पण आपण गेल्या दोन- तीन दिवसातील राहुल गांधीं ची नवीन मांडणीचे व्हीडीओ मुळातून अभ्यासले आहेत का ? त्यांच्या समोर उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांवर त्यांची वरपांगी तरी स्ट्रॅटेजी आता पुढे आली आहे. त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण करण्या साठी भाजपा समर्थक कितपत तयार असतील या बाबत साशंकता वाटते.

डँबिस००७ 27/08/2018 - 01:04
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ? जर्मन व ईंग्लंड मधल्या राहुल गांधींच्या व्हिजिट मध्ये आयोजलेल्या चर्चा सत्रात त्यांना विचारलेल्या प्रश्नामुळे रा गां चा त्रिफळा उडालेला सर्व जनतेला दिसला. प्रश्न :२०१९ मध्ये पंतप्रधान होणार का ? रा गा : मला व्हिजन नाही ! दलित व दबलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी मला काम करायचय ! प्रश्न: तुम्ही पं प्र असता तर डोकलाम ईश्यु कसा हँडल केला असता ? रा गा : मला डोकलाम बद्दल माहिती नाही त्यामुळे मी सांगु शकत नाही ! डोकलाम बद्दलच्या पार्लमेंटरी कमीटी मध्ये रा गा सुद्धा आहेत !

In reply to by डँबिस००७

नितिन थत्ते 27/08/2018 - 07:14
प्रश्नोत्तरांना सामोरा न जाणार्‍या भित्र्या नेत्याचा त्रिफळा उडत नाही हे तितकेच खरे. एकतर्फी भाषणात भरपूर वेळा हिट विकेट करून घेतलेली असते.

In reply to by डँबिस००७

माहितगार 27/08/2018 - 12:34
@ नितीन थत्तेजी, मोदींच्या मर्यादांनी राहुल गांधींच्या मर्यादांचे समर्थन होत नसावे. @ डँबिस००७ , खालील वाक्यात नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ?

नितिन थत्ते 27/08/2018 - 07:11
तर एकुणात रागा (संपादित) आहे याबद्दल एकमत आहे असं दिसतंय. त्याच्या (संपादित) असण्याबाबत आणि त्यावर भाजप करीत असलेल्या चुकीबाबत तवलीन सिंग या पार्शली भक्त पत्रकार बैंचा कालचा लेख. https://indianexpress.com/article/opinion/fifth-column-a-goof-or-a-goof-up-5324872/

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 12:43
विरुद्ध प्रतिक्रीया मिळावी म्हणून अतिशयोक्त विशेषणाचा उपयोग प्रतिसादात केला गेलेला दिसतोय. पहिल्या प्रतिसादातील 'नाटकी' हे विशेषण पुरेसे असावे असे वाटते.

In reply to by माहितगार

अभ्या.. 27/08/2018 - 14:34
हेहेहे तसं काहीच नाहीये. इथे संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना? निदान त्यामुळे देशभक्ती तरी प्रुव्ह होईल. गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही. किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार. हे करुन ते करुन वर डूआयडीच्या मागे लपून दुसर्‍यांनाच कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. अचाट अफाट आहे सारे.

In reply to by अभ्या..

माहितगार 27/08/2018 - 15:39
....कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. ....
या गोष्टींची या धागा चर्चेत अद्याप आठवण केली नव्हती. मिपकरांप्रती व्यक्तिगततेची सुरवातही झालेली नाही. बाकी आपले डू आयडी चे संदर्भ कळाले नाही. मी डू आयडींचा उघड तात्विक समर्थक असलो तरी माझे अद्याप मिपावर डू आयडी खाते नाही . जे काही आहे ते मुद्यांवर बोलावे . मिपाकरांवर व्यक्तिगततेची आपल्याकडून सुरवात करण्याचे औचित्य समजले नाही.
...किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार....
देश विरोधी कारवायांचे समर्थन केल्यावर पदरात अजून काय पडते. (केवळ मिपाकरांबद्दल म्हणत नाहीए एकुणच तथाकथित पुरोगामीत्वाच्या नावा खाली देश विघातक शक्तीचे समर्थना बद्दल प्रश्न चिन्ह आहे )
....गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही.
त्यांच्या मनात देशविरोधी भूमिका घेतल्या नंतर आलेल्या भितीतून अशी त्यांच्याच मनात अशी प्रमेये जन्मात येत असल्यास कल्पना नाही. तसे पहाता मी स्वतःही मोदीं - भाजपा संघावर टिकाही केली आहे आणि देशप्रेमही व्यक्त केले . देशप्रेम व्यक्त करताना तोंड न लपवणार्‍यांना काहीच समस्या नाही. प्रश्न देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जे एक्सक्युजेस देऊन तोंड लपवतात त्यांचा असावा.
....संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना?....
मी व्यक्तिशः संकरीत घराणे अशी टिका केलेली नाही. मी आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांचा समर्थक आहे. फिरोज गांधींच्या शान मध्ये आमची मिपावर फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? नावाची कविता आहे. स्वतः फिरोज गांधीचा परिवार आणि काँग्रेस परिवार फिरोज गांधींचे नाव घेण्यास का लाजतो हा खरा प्रश्न असावा. नव्या मुलखतीत रागाने स्वतः विरोधकांना समजून घेण्याचे महत्व प्रतिपादीत केले आहे. त्याबाबत तो गंधीर असेल तर त्याने परिवारासहीत राजकारण संन्यास घ्यावा कारण नेपोटीझम हि अस्विकार्य गोष्ट असते हे फिरोज गांधींनीही सांगितले असते. काँग्रेसचे अध्यक्षपद १९ वर्षे पहिल्यांदच सलग बाळगले जाते त्या कालावधीतील सर्व काँग्रेस सरकारांवर रिमोट कंट्रोल असतो, शेतकर्‍याम्च्या जमिनींचे इनसाईडर ट्रेडींग होऊन परिवारातील जावई फिरोझ गांधींची लाज काढतात आणि तरीही शहजादे पत्रकार परिषदेत आमच्या परिवारातील कुणि पंतप्रधानपदी नाही अशी मखलाशी करतात ? याचे ज्यांना कौतुक वाटते त्यांनी सुवसिनी होऊन शहजाद्यांची आरती करत बसावे. या धाग्याच्या संदर्भाने * जादवपूर विद्यापीठात देशाच्य एकसंघतेची जी थट्टा झाली त्यावर राहुल गांधींनी राष्ट्रप्रेमी म्हणून भूमिका घेतली का ? घेतली असेल तर नेमकी कोणती भूमिका घेतली होती ? घेतली नसेल तर का घेतली नाही ? * अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या फशीच्या संदर्भाने राहुल गांधींची नेमकी भूमिका काय होती ? या फाश्या झाल्या तेव्हा त्यंच्याच पक्षाचे सरकर होते. नव्या मुलाखतीतून त्यांना म.गांधीचा अहिंसावाद आठवत आहे, लिट्टेच्या प्रभकरनांच्या मृत्यूने त्यांना दुख्ख झाले म्हणतात. अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या कुटूंबाची काळजी करुन त्यांच्या फाश्या अहिंसावादी रागाने पक्षाकडून माफ का केल्या नाहीत ? अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या प्रती त्यांच्या पक्षाकडून झालेल्या असहिष्णूतेसाठी नेमके कोणते प्रायश्चित्त रागा ने घेतले ?

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 27/08/2018 - 16:46
चु* किंवा *त्या असं लिहिलेलं चाललं असतं का? पूर्ण लिहिलेलं चालत नाही असं दिसतं . बा*** भां** अरे कुठे नेऊन ठेवला मिसळपाव (माझा) !!!

SHASHANKPARAB 27/08/2018 - 10:04
राहुल देशात राहून जे काही बोलत असतो, अगदी तेच मुद्दे जरासा विचारवंतांचा आव आणून बोलत आहे. त्यातही वादग्रस्त मुद्दे उगाचच उकरून काढले गेलेत ( शीख दंगल, लिंचिंग आणि बेरोजगारी यांचा संबंध, इसिस इत्यादी). राफेल मुद्द्यावरून सरकारला घेरायचा प्रयत्नही आता थंड पडेल, करण अनिल अंबाणीच्या 5000 कोटींचा दावा केलाय. बाकी नेहेमीचे दलित वगैरे मुद्दे राहुल नेहेमीच उगाळत असतो. भारतातील विरोधी पक्षांची मुख्य समस्या ही आहे की जेव्हा जेव्हा ते बोलतात, तेव्हा एकदातरी ते भाजप किंवा मोदींच नाव घेतातच ! भाजपला फक्त त्या त्या विरोधी नेत्यांची नकारात्मक भूमिका लोकांसमोर मांडायचीय, मग आपोआप मोदी सकारात्मक ठरतात. आणि मग रोज नवीन वक्तव्यांमधून ते अधोरेखित होत जातं. मुळात राजकारणी व्यक्ती त्या पेशामुळेच जगभर बदनाम आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा सगळेच राजकारणी मिळून फक्त एका राजकारण्याला शिव्या घालतात तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा "अपवाद" म्हणून तयार होते. दुर्दैवाने कुठलाही मोदी विरोधी नेता, सत्तेत आल्यावर स्वतः काय करणार किंवा सत्तेत असताना काय चांगली कामे केली याबद्धल बोलत नाही. त्यांचा फक्त मोदी काय चुकीचं करतात नि मोदीं कशी देशाची वाट लावणार आहेत याचाच धोशा सदैव सुरू असतो. याउलट मोदींची वाक्ये पहिली तर त्यातील 25 टक्केच नकारात्मक किंवा टीकात्मक असतात, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांची सकारात्मक बाजूच ठळक होते. भारतातील विरोधी पक्ष एका सापळ्यात अडकलेत, नि त्यांना स्वतःलाच त्यातून बाहेर पडायचं नाही असं दिसतंय. सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते. परंतु आतापर्यंतच्या एकंदर घडामोडींवरून त्यांचा मोदींच्या धोरणांना पाठिंबा असावा असं दिसतं.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 16:54
भक्त नसलेल्या -भक्त मी पण नाही मी व्यक्ती पुजक नाही ती मोदींचीही करत नाही आणि रागाचीही करत नाही- तथाकथित पुरोगामींचा लोकशाही आणि संविधान वरचा विश्वास का काय म्हणतात तो हाच का ? सर्वात महत्वाचे राहुल गांधींच्या बद्दल धागा असूनही विषय सोडून सारखे भाजपावर घसरायला का होत असेल ?

In reply to by SHASHANKPARAB

शाम भागवत 27/08/2018 - 15:35
सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते.
भाजपाने पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमधे ओडिशामधे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते आहे. कॉग्रेस तिसर्‍या स्थानावर गेली आहे. भाजपाचा जनाधार पूर्वीपेक्षा खूप वाढलेला दिसून येतो आहे. याउलट बीजेडीमधेही दुफळी पडलेली आहे. त्यामुळे २०१४ एवढी चांगली स्थिती आजच्या बीजेडीची आहे असे वाटत नाही. वाजपेयींच्या काळातील भाजप बीजेडी युतीमधे भाजपावाल्यांनी पटनाईंकांना खूप त्रास दिला होता. त्यामुळे आघाडी मोडीत निघाली होती. पण आताचे तिथले भाजपवाले मोदी व शहांच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे, या दोन नेत्यांशी जुळवून घेऊन स्थानीक नेत्यांवर कुरघोडी करून, पटनाईक ओडीसा आरामात ताब्यात ठेऊ शकतात. एकंदरीत पाहता पटनाईक मोदींना विरोध न करण्याचे किंबहुना सहकार्य करत असल्याचेच दिसून येते. नितीशकुमारांनीही मोदींच्या हळूहळू जवळ जात, मगच भाजपशी युती करावयाची चाल खेळली होती याची आठवण होते आहे. त्यामुळे लोकसभेसाठी भाजप व बीजेडी मधे युती झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 17:20
मिपावर मिपा धोरणानुसार उपलब्ध 'राजकारण' वर्गीकरणातील लेख आहे, प्रतिसादकाच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण काय आहे? मिपा या संस्थळावरून भारताच्या राजकारणची दिशा निश्चीत होत असल्याच्या भ्रमात प्रस्तुत धागा लेखक नाही -मी राजकारणात अद्यापतरी कधी गेलो नाही आणि कोणत्याही एका पक्षाची भलावण केलेली नाही- पण व्यक्तिगत टिकेवर उतरणार्‍या प्रतिसादकास असा काही भ्रम होतो आहे का की व्यक्तिगत टिकेवर उतरावे लागत आहे? चंद्र दाखवला तर चंद्र दाखवणार्‍याचे बोट कसे वाकडेवर आपण उतरतो आहोत ? धागा लेखात राहुल गांधींच्या किमान एका पैलुची सकारात्मक दखल घेतली आहे दुसर्‍या बाजूला टिकाही केली आहे. राहुल गांधींचे प्रचार मुलाखती ंचे युट्यूब दुवे दिले आहेत. निसटत्या बाजू मांडण्याच्या माझ्या क्षमतेच्या १ टक्का सुद्धा टिका अद्याप केलेली नाही तरीही आपण एवढे परेशान आहात ? इतरांवर अमुक्चे भक्त म्हणून विशेषण बहाल करणार्‍यंनी आपणही कुणाचेतरी 'भक्त' झालो आहोत का हे तपासून पहावे.

नितिन थत्ते 27/08/2018 - 19:26
एक जुना व्यनि संवाद Between you, संपादक मंडळ and पैसा नितिन थत्ते's picture You 12/2/13 मिटवा आज सचीन यांचा एक लेख "भारताचे आशास्थान राहुल गांधी" प्रकाशित झाला होता. तो आता दिसत नाही. तो उडवण्यात आला आहे का? धन्यवाद. नितिन थत्ते संपादक मंडळ's picture संपादक मंडळ 12/2/13 मिटवा Block नमस्कार. प्रचारकी स्वरूपाचे असल्याने सचीन यांचे २ लेख काल आणि आज मिसळपावच्या धोरणानुसार अप्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही. त्यांच्याच अन्य एका लेखावरही कोणतीच सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे तोही वाचनमात्र करण्यात आला. राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या लेखांसाठी कोणत्याही पक्षाने मिपासारखी संस्थळे व्यासपीठ म्हणून वापरू नयेत असे वाटते. धन्यवाद! पैसा's picture पैसा 12/2/13 मिटवा Block तो सं मं चा निर्णय आहे.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 27/08/2018 - 20:01
१.१) मी व्यक्तीशः सेंसॉरशीपचा समर्थक नाही. मिपाचे धोरण जे असेल त्या नुसार मिपाचे काय निर्णय होत असतील. १.२) "भारताचे आशास्थान राहुल गांधी" ह्या धागा लेखा बद्दल मला कोणतीही कल्पना नाही पण प्रथम दर्शनीतरी शीर्षकात प्रचारकता दिसते आहे. आपण माझ्या या धागा लेख चर्चेस आपण कोण्त्या अंगाने प्रचारकी म्हणून पहाता ते कळत नाही. मी राहूल गांधींबद्दल एकच बाजू मांडलेली नाही. माझे राजकीय नेपोटीझमच्या घराणेशाहीच्या संंबंधाने पुर्वग्रह आहेत पण ते जगातल्या सर्व राजकीय घराणेशाहीला जवळपास विना अपवाद लागू होतात. आणि एवढे असूनही लेखाच्या अगदी दुसर्‍या परिच्छेदात मी राजीव आणि राहुल पितापुत्राचे एका मुद्द्यावर कौतुकही केले आहे. शिवाय आता नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदांची दखल घेतली. पण केवळ कौतुकही नाही केले मर्यादांची सुद्धा चर्चा केली. तुम्हाला कोणत्या अंगाने कोणत्या तर्काने हा धागा लेख प्रचारकी वाटतो ते स्पष्ट करावे ? १.३) आपण वगळले गेलेल्या लेखात संपादक मंडळ म्हणते "त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही" आणि या धागा लेखात केवळ एका बाजूचा प्रचार नव्हे साधक बाधक दोन्हीही चर्चा अपेक्षीत आहेत . आपल्या सारखे अनुभवी सदस्य अशी तुलना कशी करु शकतत हे उमगले नाही. १.४) चर्चेची लेव्हल चांगली राहील, मिपाकर एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळतील हे धागा लेखक म्हणून चर्चेवर मी स्वतः लक्ष्य ठेवत असतो. धागा लेख छापून नंतर दिसलोच नाही असे माझ्या धागा लेखांबाबत सहसा दिसले नसावे. उदाहरणार्थ याच धागा लेख चर्चेत या प्रतिसादात आपण आणि सदस्य डँबीस यांच्या परस्पर विरोधी भूमिकांच्या सदस्यांना त्या पैकी एकाची बाजू न घेता लिहिण्याचा प्रयास केला आहे. १.४) त्या धाग्यावर सेंसॉरशीप झाली म्हणून या धाग्यावरही सेंसॉरहीप झालीच पाहीजे ही आपली अपेक्षा आणि त्या पुर्वग्रहातून ह्या धागा लेखकास व्यक्तिगत टिकाकरणारे ट्रोलींग आपल्या सारख्या अनुभवी सदस्याकडून व्हावे हे अनाकलनीय आहे.

डँबिस००७ 27/08/2018 - 19:49
शरद पवार यांनी सांगितला पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याचा फॉर्म्युला आगामी २०१९च्या निवडणुकांच्या रणनितीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय असा सामना होईल असे नुकतेच राहुल गांधी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल. राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. पवार म्हणाले, २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध दर्शवला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जाता जाता देशाच पंतप्रधान पद उपभोगायला मिळेल अशी वेडी आशा पवार साहेबांना आहे अस वाटतय !!

माहितगार 30/05/2019 - 12:51
या चर्चेकडे मागे वळून पहाताना एक वेगळाच प्रश्न मनात आला . 'लोक घराणेशाहीशी एवढे भावनिक दृष्ट्या बांधील कसे होऊ शकत असतील?' हा माझा प्रश्न सर्वच पक्षातील घराणेशाही समर्थकांसाठी आहे तसा गांधी-वड्रा घराणे स्मर्थकांसाठीसुद्धा आहे..

In reply to by माहितगार

बुवाबाजी, घराणेशाही, गुलामी या अश्या सवई आहेत की त्या अंगी भिनल्या की निघता निघत नाहीत... हा झाला मानसिक प्रभाव; त्यांच्यापासून जर काही वैयक्तिक आर्थिक-सामाजिक-राजकिय फायदे मिळत असतील तर मग त्या सवई सोडणे आतबट्ट्याचे असते, हेवेसांन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एप्रिल २०१४ कोणत्याशा वृत्तपत्रीय विश्लेषणात राहुल गांधी आणि मोदी यांच्या प्रचारातील फरकाचे विश्लेषण वाचण्यात आले त्या पाठोपाठ राहुल गांधींचा नेमके तेच मुद्दे कव्हर करण्यासाठी राहुल गांधींची फाईन ट्यून्ड केलेली इ टीव्ही वरील मुलाखतीचे भाग पाहण्यात आले. टिका झाल्यामुळे किंवा काय माहीत नाही. राहुल गांधींच्या प्रतीमा बदलाचा प्रयत्न होताना दिसतो आहे. हे तुलना झाल्यामुळे प्रतिमा बदलले राहुल गांधी नैसर्गीक वाटत नाहीएत अस माझ व्यक्तीगत मत झाल. आणि हे नैसर्गिक न वाटण्याचा फटकाही त्यांना बसतो आहे अस कुठे तरी वाटत आहे.

टग्यामहाराज बारामतीकर

मंदार दिलीप जोशी ·

सौंदाळा 23/04/2014 - 13:34
मस्त अजुन चिमटे काढायला पहिजे होते. भारनियमन आणि लोक्संख्यावाढीवरुन, परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन, सिंचन घोटाळ्यावरुन वगैरे. असो.. महाकाव्यच होऊन जायचे एखादे ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन>> म्हणून्च लिहीलं ना, "बूच तोच मारी" म्हणजे पाणी अडवतो ;)

ऋषिकेश 23/04/2014 - 13:46
खिक्! प्रत्येक ओळीत सहा शब्द नी शेवटच्या ओळीत चार शब्द असे बंधन पाळून पुन्हा एक हात फिरवा. मग कवितेत अधिक मजा येईल

In reply to by ऋषिकेश

धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य अंत करु पाही मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही टग्या महाराजां दृष्ट लागे पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहतसे पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्य अवतार बारामतीचा टग्या वंदावेच त्याला पुन्हा पुन्हा

In reply to by गणपा

मृगनयनी 25/04/2014 - 15:09
बुच तोच मारी =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. हा शब्दप्रयोग आवडला!!!.. स्व. सतीश तारे'जींची आठवण आली.... :) बूचमारीच्या... त्तुच्च बूचमारीच्या.... मारीच्या तूच बूच!!!! ...

आयुर्हित 23/04/2014 - 15:47
टग्या मुते जेव्हा टग्या मुते तेव्हा पाण्याची गणना कोण करी! टग्या बोले जेव्हा टग्या बोले तेव्हा तयाच्या नादी कोण लागी! टग्या देई धमकी टग्या देई दमडी तयाला मत कोण देई! टग्या जाळी अँटीचेम्बर टग्या जाळी मंत्रालय सिंचनाची फाईल राख होई!

जिन्क्स 23/04/2014 - 17:28
कविता चांगली आहे. त्या पाठीमागच्या कवी च्या भावना हि पोचल्या. पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत. उगाच घरात बसून मिडिया नि उहापोह केलेल्या बातम्या ऐकून, खोट्या उन्मादा खाली अशा कविता प्रसवणे फार अवघड काम नाही. गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला मोदी तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतो पण एका प्रचारी भाषणात चुकून एक शब्द निसटला तर त्याच किती गवगवा. दादांनी नि चूक कबूल पण केली आहे. मोदींची sorry यायची अजून लोक वाट बघत आहेत.

In reply to by जिन्क्स

आयुर्हित 23/04/2014 - 17:48
मोदींची sorry ???? कशाबाबत sorry ???? जी चुक त्यांनी केलीच नाही त्याबद्दल का म्हणावी sorry ???? गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला कोण आहे ? आपणच असाल तेथे. मोदीतर नक्कीच नाही! आपल्या मित्र पक्षांचे सरकार इतके वर्षे सत्तेवर असूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालय व SIT ने देखील त्यांना Clean chit दिली आहे हे आपण हेतू पुरस्सर विसरत आहात? यावरून सर्वोच्च न्यायालय व SITवर आपला विश्वास नाही असेच म्हणायचे का? की आपल्याकडे काही पुरावा आहे याचा? असला तर तो आपन सर्वोच्च न्यायालय व SIT ला का सादर करत नाही? ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????हा लेख आपलाच आहे ना? त्यातले सत्य आपणच लिहिले आहे ना? का फक्त सकाळची जाहीरात करायला लिहिला होता?

In reply to by जिन्क्स

काळा पहाड 24/04/2014 - 01:00
पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत.
आम्ही "व परिसरा" मध्ये रहातो. विकासकामांबद्दल तुमचा अर्थ भकासकामे असा होत असेल तर अशी भकास्कामे बरीच झालेली आहेत.

In reply to by जिन्क्स

बारामती अशीही.. ३७ वर्षांपासून आश्वासने, पण २२ गावे पाण्याविनाच! बारामती म्हणजे बागायती. हे अर्धसत्य असून, याच तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांना भरवशाचे पाणीसुद्धा नाही. इतकेच नव्हे, तर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा, १९७८ साली तिथल्या दुष्काळी २२ गावांना पाण्याचे आश्वासन मिळाले, पण लोक याच आश्वासनावर झुलत राहिले अन् गावे मात्र कोरडीच! ही गावे तहानलेली राहण्यामागे भौगोलिक कारणांबरोबरच राजकीय कारणेसुद्धा आहेत.. कारण ही गावे अगदी अलीकडेपर्यंत बारामती विभानसभा मतदारसंघात समाविष्ट नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यात पाण्याचा मुद्दा उपस्थित झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी मासाळवाडी गावातील बैठकीत एका तरुणाने उपमुख्यमंत्र्यांना पाण्यावरून प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली अन् प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर दबावापोटी 'असे काही घडलेच नाही' असा लेखी खुलासा करण्याची वेळ आली. हे नेमके कसे घडले याची चर्चा परिसरातील गावांमध्ये दबक्या आवाजात सुरूच आहे; त्याचबरोबर पाण्याची प्रतीक्षासुद्धा! या गावांमध्ये फिरताना बारामतीचे दुसरे चित्र दिसले, अगदी अंगावर आले. बागायती बारामती आणि ही कोरडी बारामती यांतील फरक स्पष्ट दिसतो- उत्पन्न, शिक्षण आणि सामाजिक स्थिती या सर्वच बाबतीत! तो लोकांनाही जाणवू लागला आहे. इतके दिवस आशेवर असलेले लोक आता बोलू लागले आहे, अर्थातच नाव उघड न करण्याच्या अटीवर. 'निम्मी बारामती अशीच आहे बघा.' लोक भरभरून सांगतात. बारामतीत शंभराच्या आसपास गावे. त्यापैकी खुद्द बारामती, माळेगाव, सोमेश्वर, निंबूत परिसरातील अशी सुमारे निम्मी गावे ब्रिटिश काळापासून बागायती आहेत. उरलेली कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील गावे जिरायती. त्यातही दोन प्रकार पडतात- काही गावांना काही महिन्यांसाठी कसेबसे पाणी मिळते. उरलेली २२ गावे पूर्णपणे पाण्याविना आहेत. शेतीसाठी पावसावर आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आजही टँकरचीच वाट पाहावी लागते.. मोरगाव, मुर्टी, कऱ्हा वागज, लोणी भापकर, जळगाव या पट्टय़ातील ही गावे. ''पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा गावात सभा झाली होती. तेव्हा आम्हाला गुंजवणी धरणाचं पाणी देणार, असं बोलले होते. त्याला आता ३५ र्वष उलटून गेली, पण पाणी आलंच नाही..'' मुर्टी गावात चहाच्या टपरीवर जमलेले लोक सांगतात. रस्त्याच्या कडेला जागोजागी टँकरच्या पाण्यासाठी उभे केलेले ड्रम, कॅन परिस्थितीचे वर्णन करतात. इथं पाणी न येण्याची भौगेलिक कारणे आहेतच. एक तर कमी पावसाचा प्रदेश. त्यात हा उंचावरचा पठारी भाग. पण यामागे राजकीय कारणेसुद्धा असल्याचेही ऐकायला मिळाले. ''ही गावे पूर्वी विधानसभेच्या दौंड मतदारसंघाला जोडली होती. त्यामुळे ती कशीही राहिली, तरी बारामतीच्या राजकारणावर थेट परिणाम व्हायचा नाही. लोकसभेलाही त्यांचे उपद्रवमूल्य नव्हतेच. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे गेल्या निवडणुकीत ती पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघात आली. म्हणून आमच्याकडं लक्ष गेलं.'' लोक स्पष्टपणे सांगतात. काही जण संतापही व्यक्त करतात. ''इथं पाणी आलं तर लोक जमिनी कशा विकतील? मग यांचे कारखाने कसे उभे राहतील?'' गंभीर आरोपही करतात. याशिवाय इतरही कारणं बोलून दाखवतात. याच पट्टय़ात मोरगाव परिसरात एक जण भेटले. ''लोकांमध्ये समृद्धी आली तर ते जुमानत नाही, स्पर्धक तयार होतात. त्यामुळे आमचा भाग असा ठेवलाय..'' इथे असे बरेच काही ऐकायला मिळते. हा भाग कोरडा राहिल्यामुळे शैक्षणिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा मागास राहिला आहे. शिकायची कितीही इच्छा असली, तरी उच्चशिक्षणासाठी पैसे लागतात. इथंच गाडं अडतं. ना शिक्षण, ना नोकऱ्या. ''बाकी कशाला? आमच्या भागात कोणी मुली द्यायला तयार होत नाही. रोज पाण्याची ओरड, रखरखीत भाग. कसं कोण मुली देईल?'' जळगावचे एक शेतकरी सवाल करतात.. मग हा बारामती तालुक्याचाच भाग आहे का, असा प्रश्न पडतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 23/04/2014 - 19:58
माईसाहेब, ही काय भानगड आहे? कधी तुम्ही पुरूष आयडीने वावरता तर कधी महिलेच्या आयडीने. :)) आम्हाला संशय यायला लागलाय. :yahoo:

कंजूस 23/04/2014 - 20:32
बारामतीकर दिल्लीला गेल्यावर एक वर्षाने मटात व्यंगचित्र आलेले .एक पाय राज्याच्या वजनकाट्यावर ,काटा शंभर किलोवर .दुसरा पाय दिल्लीच्या वजनकाट्यावर तिथलाही काटा शंभर दाखवतोय !आताही चित्र वेगळे नाही .

स्पंदना 24/04/2014 - 05:00
भारी कविता! आयुर्हितांची पण मस्तच. अगदीच ताळ सोडलाय टग्याने हे मात्र खरं. फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.

काळा पहाड 24/04/2014 - 17:55
फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.
खरं तर कुठल्याही काँग्रेसी किंवा राष्ट्रवादीच्या समर्थकाला पाहिलं/ऐकलं तरी चीड येते.

raudransh_27 02/05/2014 - 19:27
बर मग आता महाराज बनवलेच आहे तर हळुहळु मंदिर, चमत्कार कथा आणि एखाद्या नविन बडवे-उत्पात कम्युनिटी ची सोय असा प्ल्यान असेलच...! बाकी कविता जमतीय, बरोबर फक्त द्वेष अन् xyz मानसिकता ऐवजी समस्यानिराकरण काही सकारात्मक दृष्टिकोन असता तर अधिक +1

शाई पुसोनिया मतदान करा द्विगुणित करा आनंदही रामराया पुढे हनुमान उभा तैसेच ठाकले हे ते दोघे बोले तैसा चाले जयांची ही कीर्ती तयांना वंदावे पुन्हा पुन्हा

सौंदाळा 23/04/2014 - 13:34
मस्त अजुन चिमटे काढायला पहिजे होते. भारनियमन आणि लोक्संख्यावाढीवरुन, परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन, सिंचन घोटाळ्यावरुन वगैरे. असो.. महाकाव्यच होऊन जायचे एखादे ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन>> म्हणून्च लिहीलं ना, "बूच तोच मारी" म्हणजे पाणी अडवतो ;)

ऋषिकेश 23/04/2014 - 13:46
खिक्! प्रत्येक ओळीत सहा शब्द नी शेवटच्या ओळीत चार शब्द असे बंधन पाळून पुन्हा एक हात फिरवा. मग कवितेत अधिक मजा येईल

In reply to by ऋषिकेश

धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य अंत करु पाही मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही टग्या महाराजां दृष्ट लागे पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहतसे पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्य अवतार बारामतीचा टग्या वंदावेच त्याला पुन्हा पुन्हा

In reply to by गणपा

मृगनयनी 25/04/2014 - 15:09
बुच तोच मारी =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. हा शब्दप्रयोग आवडला!!!.. स्व. सतीश तारे'जींची आठवण आली.... :) बूचमारीच्या... त्तुच्च बूचमारीच्या.... मारीच्या तूच बूच!!!! ...

आयुर्हित 23/04/2014 - 15:47
टग्या मुते जेव्हा टग्या मुते तेव्हा पाण्याची गणना कोण करी! टग्या बोले जेव्हा टग्या बोले तेव्हा तयाच्या नादी कोण लागी! टग्या देई धमकी टग्या देई दमडी तयाला मत कोण देई! टग्या जाळी अँटीचेम्बर टग्या जाळी मंत्रालय सिंचनाची फाईल राख होई!

जिन्क्स 23/04/2014 - 17:28
कविता चांगली आहे. त्या पाठीमागच्या कवी च्या भावना हि पोचल्या. पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत. उगाच घरात बसून मिडिया नि उहापोह केलेल्या बातम्या ऐकून, खोट्या उन्मादा खाली अशा कविता प्रसवणे फार अवघड काम नाही. गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला मोदी तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतो पण एका प्रचारी भाषणात चुकून एक शब्द निसटला तर त्याच किती गवगवा. दादांनी नि चूक कबूल पण केली आहे. मोदींची sorry यायची अजून लोक वाट बघत आहेत.

In reply to by जिन्क्स

आयुर्हित 23/04/2014 - 17:48
मोदींची sorry ???? कशाबाबत sorry ???? जी चुक त्यांनी केलीच नाही त्याबद्दल का म्हणावी sorry ???? गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला कोण आहे ? आपणच असाल तेथे. मोदीतर नक्कीच नाही! आपल्या मित्र पक्षांचे सरकार इतके वर्षे सत्तेवर असूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालय व SIT ने देखील त्यांना Clean chit दिली आहे हे आपण हेतू पुरस्सर विसरत आहात? यावरून सर्वोच्च न्यायालय व SITवर आपला विश्वास नाही असेच म्हणायचे का? की आपल्याकडे काही पुरावा आहे याचा? असला तर तो आपन सर्वोच्च न्यायालय व SIT ला का सादर करत नाही? ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????हा लेख आपलाच आहे ना? त्यातले सत्य आपणच लिहिले आहे ना? का फक्त सकाळची जाहीरात करायला लिहिला होता?

In reply to by जिन्क्स

काळा पहाड 24/04/2014 - 01:00
पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत.
आम्ही "व परिसरा" मध्ये रहातो. विकासकामांबद्दल तुमचा अर्थ भकासकामे असा होत असेल तर अशी भकास्कामे बरीच झालेली आहेत.

In reply to by जिन्क्स

बारामती अशीही.. ३७ वर्षांपासून आश्वासने, पण २२ गावे पाण्याविनाच! बारामती म्हणजे बागायती. हे अर्धसत्य असून, याच तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांना भरवशाचे पाणीसुद्धा नाही. इतकेच नव्हे, तर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा, १९७८ साली तिथल्या दुष्काळी २२ गावांना पाण्याचे आश्वासन मिळाले, पण लोक याच आश्वासनावर झुलत राहिले अन् गावे मात्र कोरडीच! ही गावे तहानलेली राहण्यामागे भौगोलिक कारणांबरोबरच राजकीय कारणेसुद्धा आहेत.. कारण ही गावे अगदी अलीकडेपर्यंत बारामती विभानसभा मतदारसंघात समाविष्ट नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यात पाण्याचा मुद्दा उपस्थित झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी मासाळवाडी गावातील बैठकीत एका तरुणाने उपमुख्यमंत्र्यांना पाण्यावरून प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली अन् प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर दबावापोटी 'असे काही घडलेच नाही' असा लेखी खुलासा करण्याची वेळ आली. हे नेमके कसे घडले याची चर्चा परिसरातील गावांमध्ये दबक्या आवाजात सुरूच आहे; त्याचबरोबर पाण्याची प्रतीक्षासुद्धा! या गावांमध्ये फिरताना बारामतीचे दुसरे चित्र दिसले, अगदी अंगावर आले. बागायती बारामती आणि ही कोरडी बारामती यांतील फरक स्पष्ट दिसतो- उत्पन्न, शिक्षण आणि सामाजिक स्थिती या सर्वच बाबतीत! तो लोकांनाही जाणवू लागला आहे. इतके दिवस आशेवर असलेले लोक आता बोलू लागले आहे, अर्थातच नाव उघड न करण्याच्या अटीवर. 'निम्मी बारामती अशीच आहे बघा.' लोक भरभरून सांगतात. बारामतीत शंभराच्या आसपास गावे. त्यापैकी खुद्द बारामती, माळेगाव, सोमेश्वर, निंबूत परिसरातील अशी सुमारे निम्मी गावे ब्रिटिश काळापासून बागायती आहेत. उरलेली कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील गावे जिरायती. त्यातही दोन प्रकार पडतात- काही गावांना काही महिन्यांसाठी कसेबसे पाणी मिळते. उरलेली २२ गावे पूर्णपणे पाण्याविना आहेत. शेतीसाठी पावसावर आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आजही टँकरचीच वाट पाहावी लागते.. मोरगाव, मुर्टी, कऱ्हा वागज, लोणी भापकर, जळगाव या पट्टय़ातील ही गावे. ''पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा गावात सभा झाली होती. तेव्हा आम्हाला गुंजवणी धरणाचं पाणी देणार, असं बोलले होते. त्याला आता ३५ र्वष उलटून गेली, पण पाणी आलंच नाही..'' मुर्टी गावात चहाच्या टपरीवर जमलेले लोक सांगतात. रस्त्याच्या कडेला जागोजागी टँकरच्या पाण्यासाठी उभे केलेले ड्रम, कॅन परिस्थितीचे वर्णन करतात. इथं पाणी न येण्याची भौगेलिक कारणे आहेतच. एक तर कमी पावसाचा प्रदेश. त्यात हा उंचावरचा पठारी भाग. पण यामागे राजकीय कारणेसुद्धा असल्याचेही ऐकायला मिळाले. ''ही गावे पूर्वी विधानसभेच्या दौंड मतदारसंघाला जोडली होती. त्यामुळे ती कशीही राहिली, तरी बारामतीच्या राजकारणावर थेट परिणाम व्हायचा नाही. लोकसभेलाही त्यांचे उपद्रवमूल्य नव्हतेच. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे गेल्या निवडणुकीत ती पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघात आली. म्हणून आमच्याकडं लक्ष गेलं.'' लोक स्पष्टपणे सांगतात. काही जण संतापही व्यक्त करतात. ''इथं पाणी आलं तर लोक जमिनी कशा विकतील? मग यांचे कारखाने कसे उभे राहतील?'' गंभीर आरोपही करतात. याशिवाय इतरही कारणं बोलून दाखवतात. याच पट्टय़ात मोरगाव परिसरात एक जण भेटले. ''लोकांमध्ये समृद्धी आली तर ते जुमानत नाही, स्पर्धक तयार होतात. त्यामुळे आमचा भाग असा ठेवलाय..'' इथे असे बरेच काही ऐकायला मिळते. हा भाग कोरडा राहिल्यामुळे शैक्षणिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा मागास राहिला आहे. शिकायची कितीही इच्छा असली, तरी उच्चशिक्षणासाठी पैसे लागतात. इथंच गाडं अडतं. ना शिक्षण, ना नोकऱ्या. ''बाकी कशाला? आमच्या भागात कोणी मुली द्यायला तयार होत नाही. रोज पाण्याची ओरड, रखरखीत भाग. कसं कोण मुली देईल?'' जळगावचे एक शेतकरी सवाल करतात.. मग हा बारामती तालुक्याचाच भाग आहे का, असा प्रश्न पडतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 23/04/2014 - 19:58
माईसाहेब, ही काय भानगड आहे? कधी तुम्ही पुरूष आयडीने वावरता तर कधी महिलेच्या आयडीने. :)) आम्हाला संशय यायला लागलाय. :yahoo:

कंजूस 23/04/2014 - 20:32
बारामतीकर दिल्लीला गेल्यावर एक वर्षाने मटात व्यंगचित्र आलेले .एक पाय राज्याच्या वजनकाट्यावर ,काटा शंभर किलोवर .दुसरा पाय दिल्लीच्या वजनकाट्यावर तिथलाही काटा शंभर दाखवतोय !आताही चित्र वेगळे नाही .

स्पंदना 24/04/2014 - 05:00
भारी कविता! आयुर्हितांची पण मस्तच. अगदीच ताळ सोडलाय टग्याने हे मात्र खरं. फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.

काळा पहाड 24/04/2014 - 17:55
फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.
खरं तर कुठल्याही काँग्रेसी किंवा राष्ट्रवादीच्या समर्थकाला पाहिलं/ऐकलं तरी चीड येते.

raudransh_27 02/05/2014 - 19:27
बर मग आता महाराज बनवलेच आहे तर हळुहळु मंदिर, चमत्कार कथा आणि एखाद्या नविन बडवे-उत्पात कम्युनिटी ची सोय असा प्ल्यान असेलच...! बाकी कविता जमतीय, बरोबर फक्त द्वेष अन् xyz मानसिकता ऐवजी समस्यानिराकरण काही सकारात्मक दृष्टिकोन असता तर अधिक +1

शाई पुसोनिया मतदान करा द्विगुणित करा आनंदही रामराया पुढे हनुमान उभा तैसेच ठाकले हे ते दोघे बोले तैसा चाले जयांची ही कीर्ती तयांना वंदावे पुन्हा पुन्हा
लेखनविषय:
धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य नष्ट करु पाहतो मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही पण टग्यामहाराजांची दृष्ट काढा पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहते करी पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्याचा अवतार टग्या बारामतीकर त्याला वंदावे पुन्हा पुन्हा