मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का?

तुमचा अभिषेक ·

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 22:26
एकदा लोकशाही मान्य केल्यावर, मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे.
मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.
तरीही ती चूकच होती. पण लहान वयात अज्ञानापोटी अशा चुका होतात, तेंव्हा ते जाऊदे...
माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले.
व्हेरी गुड!
फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले.
ह्ये तिच्यायला जास्त महत्वाचं!! आणखी व्हेरी गुड!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 22:46
नैतिक गुन्हा येस्स, नैतिक गुन्हा बोलू शकतो. तुलनेत सौम्य शब्द वाटतो. पण मग नीतीमत्ताही व्यक्तीसापेक्ष नाही का, वा नैतिकतेचे निकष कोणी ठरवले, तसेच ते निकष लाऊन इतरांना यावरून दुसर्‍याची नैतिकता ठरवायचा अधिकार काय हे प्रश्न येतातच. लोकशाही येस्स ती मान्य आहेच, त्यालाच अनुसरून हा प्रश्न विचारला आहे की एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का? :)

In reply to by तुमचा अभिषेक

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:22
मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे. लोकशाहीत जगणारा, एरवी लोकशाहीने प्रदान केलेली सगळी स्वातंत्र्य, अधिकार उपभोगणारा माणूस जर एक कर्तव्य म्हणून स्वखुशीने मतदान करत नसेल तर माझ्या मते तो उच्च नीतीमत्तेचा नागरीक नाही.
एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का?
लोकशाही ही व्यवस्था इतर कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे परिपूर्ण नाही, तिच्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे तो तसा तटस्थ राहू शकत नाही. आता नोटा वगैरेची सोय केलीये म्हणतात, तेंव्हा तो ऑप्शन वापरता येईल कदाचित!

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 01:04
नोटा हा पर्याय माझ्या ऐकण्यानुसार काही फायद्याचा नाहीये. (माझी माहिती चुकत असेल तर करेक्ट करा) नोटाला बहुमत मिळाले तरी सर्व उमेदवार बाद असे नसून त्यातूनही ज्याला जास्त मते आहेत तोच विजयी. मग असे असल्यास काय फायदा त्या नोटाचा? मग मतदान न करून नोटा वापरल्यासारखेच झाले, फक्त त्याची रेकॉर्डला नोंद झाली नाही इतकेच.

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 22:43
जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
हो ना मतदान हे ऐच्छिक असते. असं इमोशनल ब्लॅकमेलींग करायचं असेल तर "ऐच्छिक" या शब्दाला अर्थ काय राहीला? अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?

In reply to by शुचि

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:26
अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?
माझ्या मते अशी इमोशनल, पॅसिव्ह असो वा अग्रेसिव्ह, बळजबरी करायची वेळ येणं हा लोकशाहीचा एका प्रकारे पराभव असू शकेल...

In reply to by शुचि

सूड Fri, 04/25/2014 - 21:20
>>आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या पुण्यात ही बाहेरुन लोकं आली आणि शिंची भाषा ती कशी बदल्लीच गो!! आता ह्या निवडणुकांत पुण्यात यायला व्हिसा वैगरे लागू करा असा वटहुकूमच काढायला लावणार आहे. ;) -(शृगालनयन)

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 23:03
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

यसवायजी Fri, 04/25/2014 - 23:32
उकाड्याला उकाडाच बोलतात आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)

In reply to by यसवायजी

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 12:22
आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

बॅटमॅन Sat, 04/26/2014 - 13:44
बोलणे, म्हणणे, सांगणे ही तीनही क्रियापदे कधी वापरावीत याचे शास्त्र आहे. हे न सांगतादेखील बोलता येते असेच म्हणेन ;)

आतिवास गुरुवार, 04/24/2014 - 23:26
उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात पिडां यांनी म्हटल्याप्रमाणे 'नैतिक' गुन्हा आहे. पुढचा प्रश्न असा आहे: हा नैतिक गुन्हा माणसं स्वेच्छेने करतात का?(तुम्ही एकदा केला होता तसा!) मतदान 'ऐच्छिक' असल्याने काय करणर या परिस्थितीत? फक्त जागरूकता कार्यक्रम करू शकतो, आवाहन करू शकतो. पण नेहमी ऐच्छिक असतो हा 'गुन्हा' की परिस्थिती त्यांना हा गुन्हा करायला भाग पाडते? मग ही परिस्थिती जे निर्माण करतात ( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?

In reply to by आतिवास

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:33
( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?
नाही. मतदान करायची इच्छा आहे पण वरील काही, मतदाराचा कंट्रोल नसलेल्या, कारणांमुळे जर मतदान करता आलं नाही तर मी त्यांना नैतिक गुन्हेगार मानणार नाही. अशा वेळेस ही परिस्थीती निर्माण होऊ देणार्‍यांच्या पार्श्वभागावर चार बांबू ओढायची गरज आहे असंही माझं मत आहे!!!

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 23:32
नक्कीच नैतिक गुन्हा आहे. त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.

In reply to by बॅटमॅन

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:02
त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे. हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्‍यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.

In reply to by तुमचा अभिषेक

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:14
चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल तो आपला त्रास मतपेटीतूनदेखील व्यक्त करु शकत नसेल तो तक्रार करणे, त्या तक्रारीचा पाठपुरावा करेल किंवा कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वाटत नाही. इसके लिए ज्यादा मेहनत लगेगी. ("त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.") अशा प्रव्रुत्तीला आम्ही शेटे शेटे आंबे पाडणे असे म्हणतो.

In reply to by धर्मराजमुटके

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:32
मतपेटीतून मत देऊन तो त्रास दूर करणे हा खूप गैरसोयीचा आणि वेळखाऊ प्रकार नाही का? आणि एकाला काढून दुसर्‍याला आणने म्हणजे त्या त्रासातून मुक्तता याची शाश्वतीही असते का? राहीले तक्रारीच्या त्रासाचे तर जर होणारा गलथान कारभाराचा त्रास कोणाला व्यक्तीगत पातळीवर होत असेल तर ती व्यक्ती तक्रार करणारच आणि होणार्‍या त्रासापेक्षा पाठपुराव्याचा त्रास जर कमी असेल तर तक्रारीचा पाठपुरावाही करणारच.

In reply to by धर्मराजमुटके

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:33
असो, आता मला सांगा, याआधी निवडून येणारे सरकारही बहुमतातूनच निवडून आलेले ना, म्हणजे बहुमताची पसंती त्याच पक्षाला होती ना, मग तरीही त्यांनी गलथान कारभार केला, घोटाळे केले, देश बुडवला याचा अर्थ लोकांनी चुकीच्या लोकांना निवडून दिले. म्हणजेच याचा एक अर्थ असाही झाला की या निवडणूक प्रक्रियेतूनही चांगले वा आहे त्या पर्यायातून सर्वोत्तम सरकार मिळेल याची शाश्वती नसतेच. निदान या देशात तरी तसे घडत नाहीये असे बोलू शकतो. आता हे चुकीचे सरकार निवडणारे कोण? ज्यांनी याआधी मतदान केले ते ही जबाबदारी घेतील का? घ्यायला हवी ना, जर मतदान केल्याचा अभिमान आहे तर चुकीचे मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.

In reply to by तुमचा अभिषेक

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:39
घेतो ना साहेब. आता बिपाशा बासू ला घेऊन पिक्चर काढला. नाही चाललां. मंग दुसर्‍या डावात सनी लिओनीला घेतलं. कंच बिगडलं ? सबको एक चानस तो बनता है ना ? आता पिक्चर चालत नाही म्हणून आपण डायरेक्ट साबण तर नाय ना विकू शकत ?

In reply to by धर्मराजमुटके

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 01:00
काही लोकांच्या मते बिपाशा जाऊन सनीच येणार आहे तर तोच चित्रपट बघायला मिळणार काही फरक पडत नाही. तर कित्येक लोकांपर्यंत तर हा चित्रपट पोहोचतही नाही वा कधी बघायला मिळत नाही त्यांनाही मग सनी असो वा बॉबी काही फरक पडत नाही. जर कोणाला हा चित्रपट बघणे त्रासदायक वाटले तर तो आवाज उठवणार पण पुढच्या सिनेमातही आपल्याकडे माधुरी दिक्षितचा पर्याय नसल्याने तो या कास्टींग काऊचच्या भानगडीत पडणारच नाही. तळटीप - आपण बिपाशा आणि सनी नाव वापरलीत म्हणून ती तशी माझ्या पोस्टमध्ये आली, अन्यथा कोणाची कोणाशी तुलना करायचा हेतू नाही. नाही सनीबाई पॉर्नस्टार आहेत म्हणून हा खुलासा :)

In reply to by तुमचा अभिषेक

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 11:45
असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो.
सरकार कीती का वाईट असे ना, सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्‍यांनी च करावे. बाकी च्यांचा काय संबंध? त्यांना जे फुकटात मिळते आहे त्याबद्दल कसली तक्रार?

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 12:01
टॅक्स बद्दल फारशी माहिती नाही म्हणून विचारतो, प्रत्यक्ष आयकर भरण्याखेरीज आपण जी खरेदी करतो, त्यामुळेसुद्धा आपण अप्रत्यक्षपणे सरकारला टॅक्स हा देत असूच ना? हे टॅक्स कोणकोणते असतात, वगैरे माहिती जाणकारांनी द्यावी. ज्यात अगदी अजिबात टॅक्स दिला जात नाही अशी खरेदी असते का?

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 23:41
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का? तर मी एका प्रचंड जनशक्तीचा घटक आहे आणि या जनशक्तीच्या निर्णयप्रक्रियेत माझा खारीचा वाटा आहे. पण मी त्या जनशक्तीचा हिस्सा आहे हे ठरविणे माझ्या हातात नाहीच आहे. मग त्या न्यायाने जेव्हा स्वातंत्र्यलढा चालू होता त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात भाग नघेणारे सर्व गुन्हेगार होते?

In reply to by शुचि

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:54
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का?
होय, होणार आहे!! देशाचे नव्हे, तुमचेच!! तुमचे नैतिक अधःपतन होणारच आहे. तुम्ही इतरांना काही दाखवू नका, पण एक सुशिक्षित माणूस असून तुम्ही तुमचं कर्तव्य करण्यात चुकला आहांत हे तुमचं मन तर तुम्हाला सांगणारच आहे!! आता अभिजीतवर रट्टे ओढायचं म्हणून सांगत नाही पण टीनएजर असतांना एकदा त्याने मतदान न करता इतरत्र गेला हे त्याच्या लक्षात आणि मनात अजूनही आहे!! अभिजीत, हे मी टीका म्हणून लिहित नाहीये कारण मन संवेदनाशील असल्याचं ते एक उदाहरण आहे. कीप इट अप!!!

In reply to by पिवळा डांबिस

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 23:59
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे. मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?

In reply to by पिवळा डांबिस

शुचि Fri, 04/25/2014 - 00:09
:D .... आता हाय म्हनलं म्हण्जी हाय!!!! बाकीची चर्चा खवत करु =)) हाहाहा नाही हो पिडां, असं मला आपलं वाटलं की "कृतीविहीनता" माझा हक्कच आहे.

In reply to by शुचि

मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?
नोटा चा पर्याय आहे ना आता!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 12:21
नोटा च्या पर्याय चा काही तरी उपयोग आहे का? असला बिन कामाचा पर्याय वापरण्यासाठी लोकांनी कशाला मतदान वापरावे. खरे तर जितके मतदान होत नाही, ते सर्व नोटा म्हणुन च धरले जावे.

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:20
टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी ;) मला तर या अभिजीत नावाची एवढी चीड आहे ना की आजवर मला हजारो जणांनी मी त्यांना लाखोवेळा सांगूनही मला करोडोवेळा अभिजीत अशीच हाक मारली आहे. आणि इथे तर "तुमचा अभिषेक" असे ठसठशीत लिहूनही. :( आता वरच्या मुद्द्यावर, माझे ते केवळ एक उदाहरण झाले, ते केवळ एक कारण झाले. त्या उदाहरणात जे कारण होते ते टाळण्यासारखे होते हे मला आज वाटतेय त्यामुळे येस आपण म्हणता तसे वाटतेय. पण तेव्हा त्या वयात ते मतदानापेक्षा जास्त महत्वाचे वाटले हे हे तितकेच खरेय. पण या वयाला अनुसरून वेगळे कारण घेतले म्हणजे जसे की नोकरीधंद्यासाठी मला दूरदेशी अगदी परदेशी जावे लागले तर मी कोणता पर्याय स्विकारेल? अर्थातच मतदान वगैरे करायचेय असा विचार न करता स्वताच्या करीअरसाठी निघून जाईलच. यातही आपण चुटपूट लागतेय म्हणजे मन संवेदनशील आहे असा मुद्दा काढालच पण त्याचा फायदा काय. निर्णय तर बहुतांशी जण वैयक्तिक प्रायोरटीनुसारच घेतात ना. मी गर्लफ्रेंडबरोबर फिरायला गेलो तर मी चुकलो आणि जे जास्तीचे पैसे कमवायला कुठे गेले तर त्यांचा तो नाईलाज.

In reply to by तुमचा अभिषेक

पिवळा डांबिस Fri, 04/25/2014 - 02:04
च्यायला, म्हातारपण आलं!!! अभिजीत नव्हे. अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक!! आमचा!!!!! :)

In reply to by तुमचा अभिषेक

>>टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी मानवी मेंदु व त्याचे वर्तन यावर भाष्य करणारे मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचले तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. बुकगंगावर विकार मनाचे हे डॉ. हिमानी चाफेकरांचे पुस्तक आहे. त्या विषयी थोडकयत माहिती लिहिताना त्यांचा उल्लेख चक्क हिमानी सावरकर असा झाला आहे. पहा इथे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5035230528732846862?BookName=Vikar%20Manache%20by%20Himani%20Chaphekar एका नाटकात ( बहुतेक चि.वि.जोशींच्या) द्वारकानाथ नावाचे पात्र असते. त्याचा उल्लेख नाटकातील दुसरे पात्र हे द्वाराकाधीश असा करत असते. ते द्वारकानाथ वैतागून दुरुस्ती सुचवतात. पुढच्या वेळी या दुरुस्तीस मान देउन त्यांचा उल्लेख द्वारकापती असा व्हायला लागतो. ते चिडून परत दुरुस्ती चे भान देतात. पुढच्या वेळी त्यांचा उल्लेख चक्क द्वारपाल असा होतो. :) एकदा इंटॅलिजंट प्रभात अशा एका इंग्रजी नियतकालिकात माझ्या आख्या ब्लॉगवर एक लेख आला. तो परवानगीसाठी मला पाठवला त्यात माझा उल्लेख प्रत्येक ठिकाणी महेश घाटपांडे असा झाला. मी त्यांना दुकीची दुरुस्ती करायला सुचवली. ओके. दुरुस्त करतो असे त्या पत्रकाराने उत्तर दिले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकाशित झाला तेव्हा परत महेश घाटपांडे. म्हणजे एवढे करुन रामाची आई सीता! :)

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 01:56
. मतदान हक्कही आहेच कि . केवळ कर्तव्य नाही . उगीचच निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर दोषारोप करण्यात काहीच अर्थ नाही . ज्यावेळी आपल्याला संधी मिळाली तेंव्हा आपण काय केले ? ५ वर्षांनी येणाऱ्या संधीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे . कोणी काय कराव हा वैयक्तिक / खाजगी प्रश्न आहे . पण मग अशा लोकांनी निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर बोलण्यात काय अर्थ राहील ? त्यातल्या त्यात कमी नालायक/कमी वाईट पक्ष/उमेदवार आपण नक्कीच निवडू शकतो , आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी . :) मतदान मुळात ऐच्छिक असल्यामुळे कोणाला अपराधी किंवा अगदी गुन्हेगार खरच वाटेल का ?

In reply to by दिव्यश्री

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 09:18
म्हणजे बघा हं, जे मतदानाबद्दल उदासीन आहेत किंवा त्याला जास्त प्राथमिकता देत नाहीत जर त्यांनी मतदान केले तर ते चांगले नेते निवडून देऊ शकतात. आणि याउलट ज्यांना मतदानाचे महत्व समजते, जे आवर्जून मतदान करतात ते मात्र चुकीचे नेते निवडून देतात. हे लॉजिक गंडल्यासारखे नाही वाटत का?

In reply to by तुमचा अभिषेक

हुप्प्या Fri, 04/25/2014 - 10:31
आज जे लोक मत देतात वा आवर्जून मत देतात ते मतदानाचे महत्त्व जाणून मत देतात हे गृहितक चुकीचे आहे. कित्येक लोक दारूची बाटली, ५०० ची नोट असल्या मोबदल्याच्या बदल्यात मत देतात. गरीब वस्तीत अशा प्रकारे मत देणार लोक खूप असतात. अर्थात ज्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते अशा लोकांनी लोकशाहीच्या भविष्याऐवजी दोन वेळच्या जेवणाला जास्त महत्त्व दिले तर त्यांना चूक कसे ठरवता येईल? कित्येक समाजकंटक लोक (श्यान्या गुर्जींच्या सल्ल्याप्रमाणे शाई पुसून) अनेकदा मत देतात. गैरहजर लोकांच्या जागी उभे राहून मत देतात. जर सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात मत देऊ लागले तर अशा विकत घेतलेल्या मतांचे तौलनिक प्रमाण थोडे कमी होऊन जरा जास्त योग्य उमेदवार निवडून येऊ शकतो असा एक विचारप्रवाह आहे.

In reply to by हुप्प्या

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 11:03
खरे तर वरची पोस्ट लिहिताना हे माझ्याही डोक्यात आलेलेच. मात्र सुशिक्षित लोक जास्त योग्य उमेदवार निवडून देतात या गृहीतकावरही शंका घेण्यास वाव आहे पण तौलनिक दृष्ट्या नक्कीच येस . अवांतर - गरीबांना गरीब आणि अशिक्षितांना अशिक्षित ठेवण्यातच काँग्रेसच्या आजवरच्या यशाचे गुपित दडलेय तर.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:06
रोचक! म्ह. स्वतः मतदानासारखी सोपी प्रोसेसही न करता, शासनव्यवस्थेत कसलेही योगदान न देता वर शासनावर टीका करायची आणि ती ऐकून घ्यायची? इतकं असेल तर मग राजकारणी लोकांनी स्वतःची वचने सांभाळली नाहीत असे म्हणण्याचा तरी नैतिक हक्क काय राहतो ओ????

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 11:49
अजिबार गुन्हा वगैरे नाही. नैतिक दृष्टया पण काही चुक नाही. सगळे चोर च उभे असतात, मतदान करणे म्हणजेच गुन्हा आहे अश्यावेळी. नोटा चा खरा उपयोग होईल असा कायदा झाल्याशिवाय मतदान करण्यात अर्थ नाही.

असंका Fri, 04/25/2014 - 11:46
कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट होती. २ मतं एका पक्षाला तर २ मतं दुसर्‍या पक्षाला. आणि खरं म्हणजे लढत अशी त्या दोनच पक्षात असायची. मग आम्ही विचार करायचो की एवी तेवी आमची चार मतं एकमेकांची मतं काटणारच तर आहेत, मग कशाला जा-ये करायची. ह्यावेळी मात्र पक्ष ३ झाले आणि आमच्यातील एकाने पक्ष बदलला आणि मग चकरा मारून मारून नाव नोंदणी करून, त्याची खात्री करून आम्ही मत देत्साते झालो... पण मग कालपर्यंत आम्ही जात नव्हतो तो गुन्हा होता का?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 23:27
हा हा भारीये हे पण .. पण एकाने पक्ष बदलला म्हणजे तो नक्कीच आप'ला मिळाला असणार ;) आणि तसे असेल तर इतर पक्ष धोक्यात आल्याने त्यांनी एकाला एक कॅन्सल न करता मतदान करणेच सेफ समजले असावे..

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 11:50
ज्याला समाजासाठी काही करायचे आहे, तो ते करेल च. निवड्णुकींची वाट बघत बसणार नाही. पण कोणी स्वताचे पैसे खर्च करुन मला निवडुन द्या असे सांगत असेल तर त्याचा त्यात फक्त स्वार्थ च आहे.

मतदानाचा अधिकार / हक्क कायदेशीर आहे पण मतदान न करणे बेकायदेशीर नाही कारण मतदानाचा हक्क ऐच्छिक आहे, मतदान सक्तीचे नाही. मात्र आपले भविष्य ठरविण्याचे अधिकार स्वखुषिने दुसर्‍यांच्या (मतदान करणार्‍यांच्या) हाती सोपवले असल्याने हा हक्क न बजावणार्‍यांना राजकारणाबद्दल काही बोलण्याचा नैतिक हक्क नाही.... निवडणूकी अगोदर/नंतर फुकाच्या गप्पा मारण्याचा आणि वायफळ टीका करण्याचा कायदेशीर अधिकार मात्र आहे *unknw* :(

ब़जरबट्टू Fri, 04/25/2014 - 12:03
माझ्या मते गुन्हा तर नाही, पण आजकाल ज्या प्रकारे याबद्दल जागरुकता होतेय, त्यावरुन ही गोष्ट मनाला जास्त डाचते एव्हडच. माझ्या मते जर सुशिक्षित मतदार आले, तर वर सांगितले तसे विकत घेणा-या मतांचे प्रमाण कमी होईल, तसेच असे विकतचे मत जास्त प्रभाव पाडत नाही म्हंटल्यावर यामागे होणारा काळाबाजार आपोआप कमी होणार. दुसरे म्हणजे माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो. नेता मंडळी पण त्यांना मिळण्या-या मताचे विश्लेषण करतातच की. निवडून आल्यावर मतांचे अंतर, विरोधी पक्षाला मिळालेली मते, ह्या सर्व बाजू नेते पण बघतात, त्यामुळे नक्की कोणते मुद्दे महत्वाचे हे तरी ध्यानात येणार ना. आज नाही पण पुढील पाच वर्षात टिकण्यासाठी काय करायला हवे, हे तुमचे मत सांगते , आणि म्हणूनच ते महत्वाचे ठरते.

In reply to by ब़जरबट्टू

यसवायजी Fri, 04/25/2014 - 12:50
माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो डिपेंड्स. पडेलच असे नाही. मी कुठल्या भागात/समाजात राहतो? माझी/इतरांची जात कोणती आहे? इतरांची आर्थीक परिस्थीती कशी आहे? ते प्रलोभनाला बळी पडतात का? - शराब्/शबाब/कबाब उमेदवार काय लायकीचे आहेत? ते गावातला पाणी पुरवठा बंद करु शकतात का? वगैरे.. एक साधे उदा;- एका वर्गात २२ मुली आहेत आणी फक्त १३ मुलगे. वर्गप्रमुखाच्या निवडणुकीत दोन्हीबाजुनी १-१ उमेदवार आहेत. सगळ्या मुलग्यांनी १००% मतदान केले तरी त्यांचा प्रतिनिधी निवडून येणारच नाही अशी त्यांना खात्री आहे. म्हणून बहुतेकांनी मतदानच केलेच नाही. आणी साहजीक एक मुलगी निवडून आली. चूक कोणाची? - लोकशाही जिंदाबाद. -

In reply to by यसवायजी

ब़जरबट्टू Fri, 04/25/2014 - 13:21
मुळात मी जेव्हा "सुशिक्षित" मतदार म्हणतोय, त्यावेळी त्याने जाती, प्रलोभन, जरब याउपर विचार करावा अशी रास्त अपेक्षा आहे. मुळात बघितले तर, हाच सुशिक्षित मतदार "काय फरक पडतो या गावंढळांना, हे तेच करणार" म्हणून मतादानापासुन दूर राहतो, आणि आपसुक नेत्यासाठी हाच गरीब, जातिवंत, जरबेत वागणारा, मतदार महत्वाचा ठरतो, तुम्ही मतचा देणार नाहीये , किंवा तुमचा टक्काच कमी आहे माहित असल्यावर या नेत्यांनी तुमची कदर तरी का करावी ? तुमच्या उदाहरणात पण उमेदवाराला महत्व आहेच. अत्यंत मंद वा लोफर मुलीला सर्व मुली मत देतीलच हे कशावरुन ? एका चांगल्या मुलाला पण मुलींची मते मिळु शकतील की. आणि तसाही आपला उमेदवार काही येत नाही हा विचार करुन मुलांनी हात मागे घेतले, तर हिच मंद मुलगी एका मताने पण निवडून येईल, कारण तिथे विरोधच नाहीये, आणि मग हीच मूले ओरडतील . सध्या तरी हेच होतेय ना ? येथे मुलांनी पुर्ण जोर लावणे महत्वाचे आहे, व मुलींनी योग्य उमेदवाराला मते देणे अपेक्षित आहे.

मृत्युन्जय Fri, 04/25/2014 - 12:25
माझ्यामते तरी मत न देणार्‍या लोकांना आयुष्यातल्या प्रायोरिटीज अजुन कळालेल्या नाहित. हे तेच लोक असतात जे निवडणुकीनंतर ५ वर्षे सरकारला शिव्या घालतात मग परत मत देत नाहित आणि तेच सरकार निवडुन आल्यावर परत शिव्या घालतात. अयुष्यातला सगळा नैराश्यवाद यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो. काय फरक पडणार आहे हे यांचे ब्रीदवाक्य असते. मत देउन आलेल्या लोकांची टिंगलटवाळी करण्यात यांना धन्यता वाटते. यांची सगळी शक्ती "काय दिवे लावले तुमच्या सोनियाने?" किंवा " काय असा फरक पाडणार आहे तुमचा मोदी" अश्या वक्तव्यात खर्च होते. एका मताने वाजपेयी सरकार गडगडले पण अजुन या मुर्खांना एका मताची किंमत कळालेलीच नाही तर काय करणार? आता मुख्य प्रश्नाकडे. हो. हा एक प्रचंड मोठा नैतिक गुन्हा आहे. याला ज्या दिवशी कायदेशीर गुन्ह्याचे स्वरुप देण्यात येइल (अर्थात त्यासाठी आधी संपुर्ण यंत्रणा सुधारली पाहिजे) त्या दिवशी मी खरेच पेढे वाटेन.

मतदान सक्तीचे करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या ते तसे करता येणार नाही. एखाद्याला आपला हक्क नसेल बजावायचा? हक्क आहे म्हणुन तो वापरलाच पाहिजे असे थोडे बंधन घालता येते? म्हणुन प्रबोधन हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो.

In reply to by पिशी अबोली

असंका Fri, 04/25/2014 - 13:00
माझा मित्र असाच एकदा स्नानशुचिर्भूत वगैरे होउन गंध बिंध लाउन मतदानाला गेला आणि पहातो तो काय्...त्याच्या नावे आधीच कोणीतरी मतदान आटोपले होते...! तोतया मतदान टाळायचे तर पहाटेपासून रांगेत थांबायला हवे हे आम्ही तेव्हा शिकलो...

माहितगार Fri, 04/25/2014 - 14:31
१) आपण मतदानाच कर्तव्य इतरांकरता नाही स्वतः करताच नव्हे स्वतःच्या पुढच्या पिढीकरताही बजावतो आहोत २) अधिकार आणि स्वातंत्र्य खरेतर जन्मसिद्ध नव्हे संस्कृतीसिद्ध असतात तुम्ही वापरल्याने सिद्ध होतात ( न वापरल्याने कळत नकळत गहाळ होण्याची प्रक्रीया होण्याची शक्यता नाकारता येत नाही) ३) जगातली कोणतीही कित्तीही अद्ययावत मतदान पद्धती वापरली तरी ती फेअर राहण्याकरता प्रक्रीयेतील त्रुटी समजून येऊन त्या दुरुस्त आणि सुविहीत राहण्या करता मतदान पद्धतीतला जो लूप पूर्ण व्हावयास हवा तो मतदान न केल्याने पुर्ण होण्याचे राहून जाते तेवढीच तोतया आणि मतदान पद्धतीतील अवैधतांना उत्तेजन मिळते. "दुख्ख म्हातारी मेल्याचे नसते काळ सोकावतो याचे असते" ह्या म्हणीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांनी (स्वत:चे मत नोटा किंवा नको असलेल्या अपक्षाला देऊन वाया घालवावे) मतदान करण्यात शहाणपणा आहे. बाकी आपापल्या प्राधान्यता कुठे ठेवायच्या एवढा विवेक आणि सुज्ञपणा ठेऊन प्रिऑरीटी प्रमाणे वागावे. बाकी आजच्या सकाळ मध्ये एक विकास सबनिस यांच्या रेषागिरीत एक बोलक कार्टून आल आहे. एक जोडप मतदानाच्या दिवशी बीचवर फिरायला जात, जातात तर जातात गप्पा काय मारतात तर 'एसएमएसवर मतदानाचा अधिकार का नसतो ?' :)

हाडक्या Fri, 04/25/2014 - 16:02
हा चर्चा विषय आणि इथल्या प्रतिक्रिया वाचून आमच्या आवडत्या 'दक्षिण बाग ( South Park )' या मालिकेतील निवडणुकीसंदर्भातल्या भागाची आठवण झाली.. त्यातलं एक कार्टं या अभिषेकसारखाच प्रश्न विचारतं आणि आख्ख्या गावात पार हलचल होते.. त्याला गावातून साश्रुनयन तडीपार काय करतात, मग लै ड्रामा होतो. शेवटी हा एक माणूस त्याला समजवायला जातो, vote or die ( अश्लील भाषा आणि चित्रे ज्याना बघवत अथवा ऐकवत नाहीत अशा संवेदनशील लोकांनी लिंक उघडू नये ) हे गाणे ऐकून हे कार्टं मद्दान करायला तयार होतं आणि मग परत एकदा गावात आनंदी आनंद होतो.. मग हे गाणं .. हे खरंतर या भागाचं तात्पर्य आहे आणि अभिषेक राव यांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर देखील, Let's get out and vote!

In reply to by हाडक्या

माहितगार Fri, 04/25/2014 - 16:29
.....अशा संवेदनशील लोकांनी
इंग्रजी विकिपीडियावरील दुवा सध्यातरी सेन्सीबल आहे. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे बरोबर आहे पण मतदात्याला मत देण्यासाठी टेरराईज करण ही लोकशाही नव्हे. मला वाटते आमेरीकेत आधी मतदात्याला रजीस्ट्रेशन करावे लागते मगच मत देता येते असे काहीसे ऐकुन आहे त्या मुळे रजीस्ट्रेशन करवून घेणे आणि मतदान घडवणे असा दुहेरी त्रास तेथे असावा त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन या गाण्यात अप्रत्यक्षपणे दिसते पण चुकीच्या गोष्टीचे गाण्यातन समर्थन होतय कथेतन मतदाराला निराशाच येण अधिक संभवत. आमेरीकेत फक्त दोनच पर्याय आहेत भारतात तुम्हाला अगणित पर्यायातून एक निवडता येतो नोटा सारख वरील पैकी कोणताच नको म्हणता येत हे पर्याय आहेत त्या शिवाय बहुतांश नवमतदारांच रजीस्ट्रेश आपोआप होत . मतदारांच्या अधिकाराच्या दृष्टीने भारतीय लोकशाही त्यातील मर्यादांसहीत मला आमेरीकी लोकशाही पेक्षा अधिक परिपक्व वाटते. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे मात्र बाकी खर

रघुपती.राज Fri, 04/25/2014 - 17:00
मतदानाचा विषय चालु आहे म्हणून हा एक वेगळा लेख वाचा http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/kahihi/entry/to-vote-or-not-to-vote

हाडक्या Fri, 04/25/2014 - 17:18
प्रथमतः ही Satire प्रकारची विनोदी मालिका आहे हे लक्षात घ्या. मग इथे कोणी टेरराईज करून मत द्या असे म्हणत नाहीये. तो 'मत द्या नाहीतर तुम्ही गुन्हेगार, तुम्हाला कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही' वगैरे वगैरे प्रतिक्रियांचे प्रातिनिधिक ( अतिशयोक्त विनोदी ) रूप म्हणु शकाल फार फार तर..( की ज्यांना वैतागून तो इच्छा नसतानाही मतदान करायला गेला इत्यादि ) आपल्याकडे जरी रजीस्ट्रेशन करायची गरज नसली (तुम्ही म्हणताय तशी) तरीही मतदार यादीत नाव आहे का ते आधी पहा, मग नसेल तर धावाधाव करा हे सगळं आहेच की.. लोकशाही संसदीय चांगली की अध्यक्षीय चांगली या बद्दल मत मतांतरे असू शकतात आणि तो इथे अवांतराचा मुद्दा होइल.

मतदान न करणे हा गुन्हा नाही , माझा स्वतःचा लोकशाहीवर विश्वास नाही मी जन्माला यायच्या आधी ४०-५० वर्षांपुर्वी काही मोजक्या लोकांनी मिळुन घटना लिहिली , त्यात माझा सहभाग नव्हता , त्यामुळे इतरांनी लादलेली कित्येक मते मला अमान्य आहेत ..... लोकशाही बाबत मी अबोलिशनिस्ट आहे... आपण भाड्याच्या घरात जसे भाडे देवुन राहतो तसे माझे ह्या देषातले नागरिकत्व आहे , मी रीतसर नियमांनुसार टॅक्स भरतो आणि ह्या देशात रहातो . मग हा देश कोण चालवतो कसा चालवतो , ह्याचाशी मला काही घेणे देणे नाही .( हां , जर कोणत्या पक्षाने टॅक्स कमी करु / बंद करु असे आश्वासन दिले असते तर मी नक्कीच त्या पक्षाला मतदान केले असते :P ) माझी आवडती प्रणाली आहे अनार्चिझम ... पण दुर्दैवाने लोकांना अनाचिझम आणि केऑस मधील फरक लक्षात येत नाही आणि तो समजावुन सांगितला तरी पटत नाही . आता हे सारे बालीश वाटत असेल बर्‍याच जणांना पण हे विचार तसे खुप जुने आहेत .... Thoreau is sometimes cited as an anarchist. Though Civil Disobedience seems to call for improving rather than abolishing government — "I ask for, not at once no government, but at once a better government"— the direction of this improvement points toward anarchism: "'That government is best which governs not at all;' and when men are prepared for it, that will be the kind of government which they will have." --Henry_David_Thoreau

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 12:33
वेगळा आणि चांगला मुद्दा मांडलात. आपल्याकडे लोकांनी मतदानाबाबत जागरुकता दाखवावी अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र मतदान वा निवडणूक प्रक्रिया सुधारीत आणि विश्वासार्ह बनवावी याबाबत कोणाला काही पडले नाहीये. कदाचित हे देशातील सर्वच प्रमुख पक्षांच्या सोयीचे आहे. आज व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होते, मतदार राजा केलेस ना मतदान, चल मग आता फूट, पाच वर्षे तोंड दाखवायला येऊ नकोस. पाच वर्षांसाठी म्हणून एकदाच आणि एकच मत द्यायला मिळणे यामुळे आपल्या त्या मताची किंमत आपल्याला जास्त वाटते पण यात आपली किंमत नाही का घटत.

In reply to by तुमचा अभिषेक

मी म्हणतोय निवडणुका बिवडणुका असले काही नकोच , प्रतिकात्मक लोकशाहीही नको ....म्युचुअल को-ओपरेशन्ने राहु ... तु मला त्रास देवु नकोस मी तुला त्रास देणार नाही ... हा एकच नियम ! ( ह्याला ग्रीक फिलॉसॉफर्स "गोल्डन रुल" का असे काहीतरी म्हणतात ) अवांतर :
लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडले पाहिजे असे गरजेचे नसते. बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.
>>>> ह्यावर खरडवही.तुन चर्चा करुयात :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 14:17
हो आपला मुद्दा समजला होता. माझे पुढचे लिहिलेले त्याला उत्तर वा प्रतिक्रिया म्हणून असे नव्हते तर वेगळ्या पोस्टमध्ये टंकायचा कंटाळा म्हणून त्यातच लिहिले.

मनीषा Sat, 04/26/2014 - 20:40
सामाजिक गुन्हा किंवा अपराध नाही म्हणता येणार परंतु आपल्या मतानूसार काही घडावे, या साठी काही प्रयत्नं करण्याची संधी चुकवली, असे म्हणता येईल. आपण ज्याला मत देऊ तोच उमेदवार निवडून येईल असे नाही, पण तोच निवडून येणारच नाही असेही नाही.

चौथा कोनाडा Fri, 05/09/2014 - 08:37
उदबोधक चर्चा ! काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली. मिपा वरील सुप्रसिद्ध लेखकाचा लेख व त्यावरील चर्चा आठवली. मी मतदान का करावे? http://www.misalpav.com/node/18987 या धाग्याची आठवण झाली!

पैसा Fri, 05/09/2014 - 09:51
काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली.
सहमत. बाकी अपराध असता तर काहीतरी शिक्षा दिली असती नाही का? सध्या तरी मत आहे म्हणून कोणाला तरी देऊया. मग ५ वर्षांनी पुन्हा विचार करू.

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 22:26
एकदा लोकशाही मान्य केल्यावर, मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे.
मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.
तरीही ती चूकच होती. पण लहान वयात अज्ञानापोटी अशा चुका होतात, तेंव्हा ते जाऊदे...
माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले.
व्हेरी गुड!
फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले.
ह्ये तिच्यायला जास्त महत्वाचं!! आणखी व्हेरी गुड!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 22:46
नैतिक गुन्हा येस्स, नैतिक गुन्हा बोलू शकतो. तुलनेत सौम्य शब्द वाटतो. पण मग नीतीमत्ताही व्यक्तीसापेक्ष नाही का, वा नैतिकतेचे निकष कोणी ठरवले, तसेच ते निकष लाऊन इतरांना यावरून दुसर्‍याची नैतिकता ठरवायचा अधिकार काय हे प्रश्न येतातच. लोकशाही येस्स ती मान्य आहेच, त्यालाच अनुसरून हा प्रश्न विचारला आहे की एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का? :)

In reply to by तुमचा अभिषेक

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:22
मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे. लोकशाहीत जगणारा, एरवी लोकशाहीने प्रदान केलेली सगळी स्वातंत्र्य, अधिकार उपभोगणारा माणूस जर एक कर्तव्य म्हणून स्वखुशीने मतदान करत नसेल तर माझ्या मते तो उच्च नीतीमत्तेचा नागरीक नाही.
एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का?
लोकशाही ही व्यवस्था इतर कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे परिपूर्ण नाही, तिच्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे तो तसा तटस्थ राहू शकत नाही. आता नोटा वगैरेची सोय केलीये म्हणतात, तेंव्हा तो ऑप्शन वापरता येईल कदाचित!

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 01:04
नोटा हा पर्याय माझ्या ऐकण्यानुसार काही फायद्याचा नाहीये. (माझी माहिती चुकत असेल तर करेक्ट करा) नोटाला बहुमत मिळाले तरी सर्व उमेदवार बाद असे नसून त्यातूनही ज्याला जास्त मते आहेत तोच विजयी. मग असे असल्यास काय फायदा त्या नोटाचा? मग मतदान न करून नोटा वापरल्यासारखेच झाले, फक्त त्याची रेकॉर्डला नोंद झाली नाही इतकेच.

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 22:43
जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
हो ना मतदान हे ऐच्छिक असते. असं इमोशनल ब्लॅकमेलींग करायचं असेल तर "ऐच्छिक" या शब्दाला अर्थ काय राहीला? अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?

In reply to by शुचि

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:26
अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?
माझ्या मते अशी इमोशनल, पॅसिव्ह असो वा अग्रेसिव्ह, बळजबरी करायची वेळ येणं हा लोकशाहीचा एका प्रकारे पराभव असू शकेल...

In reply to by शुचि

सूड Fri, 04/25/2014 - 21:20
>>आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या पुण्यात ही बाहेरुन लोकं आली आणि शिंची भाषा ती कशी बदल्लीच गो!! आता ह्या निवडणुकांत पुण्यात यायला व्हिसा वैगरे लागू करा असा वटहुकूमच काढायला लावणार आहे. ;) -(शृगालनयन)

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 23:03
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

यसवायजी Fri, 04/25/2014 - 23:32
उकाड्याला उकाडाच बोलतात आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)

In reply to by यसवायजी

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 12:22
आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

बॅटमॅन Sat, 04/26/2014 - 13:44
बोलणे, म्हणणे, सांगणे ही तीनही क्रियापदे कधी वापरावीत याचे शास्त्र आहे. हे न सांगतादेखील बोलता येते असेच म्हणेन ;)

आतिवास गुरुवार, 04/24/2014 - 23:26
उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात पिडां यांनी म्हटल्याप्रमाणे 'नैतिक' गुन्हा आहे. पुढचा प्रश्न असा आहे: हा नैतिक गुन्हा माणसं स्वेच्छेने करतात का?(तुम्ही एकदा केला होता तसा!) मतदान 'ऐच्छिक' असल्याने काय करणर या परिस्थितीत? फक्त जागरूकता कार्यक्रम करू शकतो, आवाहन करू शकतो. पण नेहमी ऐच्छिक असतो हा 'गुन्हा' की परिस्थिती त्यांना हा गुन्हा करायला भाग पाडते? मग ही परिस्थिती जे निर्माण करतात ( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?

In reply to by आतिवास

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:33
( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?
नाही. मतदान करायची इच्छा आहे पण वरील काही, मतदाराचा कंट्रोल नसलेल्या, कारणांमुळे जर मतदान करता आलं नाही तर मी त्यांना नैतिक गुन्हेगार मानणार नाही. अशा वेळेस ही परिस्थीती निर्माण होऊ देणार्‍यांच्या पार्श्वभागावर चार बांबू ओढायची गरज आहे असंही माझं मत आहे!!!

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 23:32
नक्कीच नैतिक गुन्हा आहे. त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.

In reply to by बॅटमॅन

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:02
त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे. हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्‍यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.

In reply to by तुमचा अभिषेक

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:14
चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल तो आपला त्रास मतपेटीतूनदेखील व्यक्त करु शकत नसेल तो तक्रार करणे, त्या तक्रारीचा पाठपुरावा करेल किंवा कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वाटत नाही. इसके लिए ज्यादा मेहनत लगेगी. ("त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.") अशा प्रव्रुत्तीला आम्ही शेटे शेटे आंबे पाडणे असे म्हणतो.

In reply to by धर्मराजमुटके

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:32
मतपेटीतून मत देऊन तो त्रास दूर करणे हा खूप गैरसोयीचा आणि वेळखाऊ प्रकार नाही का? आणि एकाला काढून दुसर्‍याला आणने म्हणजे त्या त्रासातून मुक्तता याची शाश्वतीही असते का? राहीले तक्रारीच्या त्रासाचे तर जर होणारा गलथान कारभाराचा त्रास कोणाला व्यक्तीगत पातळीवर होत असेल तर ती व्यक्ती तक्रार करणारच आणि होणार्‍या त्रासापेक्षा पाठपुराव्याचा त्रास जर कमी असेल तर तक्रारीचा पाठपुरावाही करणारच.

In reply to by धर्मराजमुटके

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:33
असो, आता मला सांगा, याआधी निवडून येणारे सरकारही बहुमतातूनच निवडून आलेले ना, म्हणजे बहुमताची पसंती त्याच पक्षाला होती ना, मग तरीही त्यांनी गलथान कारभार केला, घोटाळे केले, देश बुडवला याचा अर्थ लोकांनी चुकीच्या लोकांना निवडून दिले. म्हणजेच याचा एक अर्थ असाही झाला की या निवडणूक प्रक्रियेतूनही चांगले वा आहे त्या पर्यायातून सर्वोत्तम सरकार मिळेल याची शाश्वती नसतेच. निदान या देशात तरी तसे घडत नाहीये असे बोलू शकतो. आता हे चुकीचे सरकार निवडणारे कोण? ज्यांनी याआधी मतदान केले ते ही जबाबदारी घेतील का? घ्यायला हवी ना, जर मतदान केल्याचा अभिमान आहे तर चुकीचे मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.

In reply to by तुमचा अभिषेक

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:39
घेतो ना साहेब. आता बिपाशा बासू ला घेऊन पिक्चर काढला. नाही चाललां. मंग दुसर्‍या डावात सनी लिओनीला घेतलं. कंच बिगडलं ? सबको एक चानस तो बनता है ना ? आता पिक्चर चालत नाही म्हणून आपण डायरेक्ट साबण तर नाय ना विकू शकत ?

In reply to by धर्मराजमुटके

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 01:00
काही लोकांच्या मते बिपाशा जाऊन सनीच येणार आहे तर तोच चित्रपट बघायला मिळणार काही फरक पडत नाही. तर कित्येक लोकांपर्यंत तर हा चित्रपट पोहोचतही नाही वा कधी बघायला मिळत नाही त्यांनाही मग सनी असो वा बॉबी काही फरक पडत नाही. जर कोणाला हा चित्रपट बघणे त्रासदायक वाटले तर तो आवाज उठवणार पण पुढच्या सिनेमातही आपल्याकडे माधुरी दिक्षितचा पर्याय नसल्याने तो या कास्टींग काऊचच्या भानगडीत पडणारच नाही. तळटीप - आपण बिपाशा आणि सनी नाव वापरलीत म्हणून ती तशी माझ्या पोस्टमध्ये आली, अन्यथा कोणाची कोणाशी तुलना करायचा हेतू नाही. नाही सनीबाई पॉर्नस्टार आहेत म्हणून हा खुलासा :)

In reply to by तुमचा अभिषेक

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 11:45
असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो.
सरकार कीती का वाईट असे ना, सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्‍यांनी च करावे. बाकी च्यांचा काय संबंध? त्यांना जे फुकटात मिळते आहे त्याबद्दल कसली तक्रार?

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 12:01
टॅक्स बद्दल फारशी माहिती नाही म्हणून विचारतो, प्रत्यक्ष आयकर भरण्याखेरीज आपण जी खरेदी करतो, त्यामुळेसुद्धा आपण अप्रत्यक्षपणे सरकारला टॅक्स हा देत असूच ना? हे टॅक्स कोणकोणते असतात, वगैरे माहिती जाणकारांनी द्यावी. ज्यात अगदी अजिबात टॅक्स दिला जात नाही अशी खरेदी असते का?

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 23:41
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का? तर मी एका प्रचंड जनशक्तीचा घटक आहे आणि या जनशक्तीच्या निर्णयप्रक्रियेत माझा खारीचा वाटा आहे. पण मी त्या जनशक्तीचा हिस्सा आहे हे ठरविणे माझ्या हातात नाहीच आहे. मग त्या न्यायाने जेव्हा स्वातंत्र्यलढा चालू होता त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात भाग नघेणारे सर्व गुन्हेगार होते?

In reply to by शुचि

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 23:54
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का?
होय, होणार आहे!! देशाचे नव्हे, तुमचेच!! तुमचे नैतिक अधःपतन होणारच आहे. तुम्ही इतरांना काही दाखवू नका, पण एक सुशिक्षित माणूस असून तुम्ही तुमचं कर्तव्य करण्यात चुकला आहांत हे तुमचं मन तर तुम्हाला सांगणारच आहे!! आता अभिजीतवर रट्टे ओढायचं म्हणून सांगत नाही पण टीनएजर असतांना एकदा त्याने मतदान न करता इतरत्र गेला हे त्याच्या लक्षात आणि मनात अजूनही आहे!! अभिजीत, हे मी टीका म्हणून लिहित नाहीये कारण मन संवेदनाशील असल्याचं ते एक उदाहरण आहे. कीप इट अप!!!

In reply to by पिवळा डांबिस

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 23:59
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे. मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?

In reply to by पिवळा डांबिस

शुचि Fri, 04/25/2014 - 00:09
:D .... आता हाय म्हनलं म्हण्जी हाय!!!! बाकीची चर्चा खवत करु =)) हाहाहा नाही हो पिडां, असं मला आपलं वाटलं की "कृतीविहीनता" माझा हक्कच आहे.

In reply to by शुचि

मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?
नोटा चा पर्याय आहे ना आता!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 12:21
नोटा च्या पर्याय चा काही तरी उपयोग आहे का? असला बिन कामाचा पर्याय वापरण्यासाठी लोकांनी कशाला मतदान वापरावे. खरे तर जितके मतदान होत नाही, ते सर्व नोटा म्हणुन च धरले जावे.

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:20
टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी ;) मला तर या अभिजीत नावाची एवढी चीड आहे ना की आजवर मला हजारो जणांनी मी त्यांना लाखोवेळा सांगूनही मला करोडोवेळा अभिजीत अशीच हाक मारली आहे. आणि इथे तर "तुमचा अभिषेक" असे ठसठशीत लिहूनही. :( आता वरच्या मुद्द्यावर, माझे ते केवळ एक उदाहरण झाले, ते केवळ एक कारण झाले. त्या उदाहरणात जे कारण होते ते टाळण्यासारखे होते हे मला आज वाटतेय त्यामुळे येस आपण म्हणता तसे वाटतेय. पण तेव्हा त्या वयात ते मतदानापेक्षा जास्त महत्वाचे वाटले हे हे तितकेच खरेय. पण या वयाला अनुसरून वेगळे कारण घेतले म्हणजे जसे की नोकरीधंद्यासाठी मला दूरदेशी अगदी परदेशी जावे लागले तर मी कोणता पर्याय स्विकारेल? अर्थातच मतदान वगैरे करायचेय असा विचार न करता स्वताच्या करीअरसाठी निघून जाईलच. यातही आपण चुटपूट लागतेय म्हणजे मन संवेदनशील आहे असा मुद्दा काढालच पण त्याचा फायदा काय. निर्णय तर बहुतांशी जण वैयक्तिक प्रायोरटीनुसारच घेतात ना. मी गर्लफ्रेंडबरोबर फिरायला गेलो तर मी चुकलो आणि जे जास्तीचे पैसे कमवायला कुठे गेले तर त्यांचा तो नाईलाज.

In reply to by तुमचा अभिषेक

पिवळा डांबिस Fri, 04/25/2014 - 02:04
च्यायला, म्हातारपण आलं!!! अभिजीत नव्हे. अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक!! आमचा!!!!! :)

In reply to by तुमचा अभिषेक

>>टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी मानवी मेंदु व त्याचे वर्तन यावर भाष्य करणारे मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचले तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. बुकगंगावर विकार मनाचे हे डॉ. हिमानी चाफेकरांचे पुस्तक आहे. त्या विषयी थोडकयत माहिती लिहिताना त्यांचा उल्लेख चक्क हिमानी सावरकर असा झाला आहे. पहा इथे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5035230528732846862?BookName=Vikar%20Manache%20by%20Himani%20Chaphekar एका नाटकात ( बहुतेक चि.वि.जोशींच्या) द्वारकानाथ नावाचे पात्र असते. त्याचा उल्लेख नाटकातील दुसरे पात्र हे द्वाराकाधीश असा करत असते. ते द्वारकानाथ वैतागून दुरुस्ती सुचवतात. पुढच्या वेळी या दुरुस्तीस मान देउन त्यांचा उल्लेख द्वारकापती असा व्हायला लागतो. ते चिडून परत दुरुस्ती चे भान देतात. पुढच्या वेळी त्यांचा उल्लेख चक्क द्वारपाल असा होतो. :) एकदा इंटॅलिजंट प्रभात अशा एका इंग्रजी नियतकालिकात माझ्या आख्या ब्लॉगवर एक लेख आला. तो परवानगीसाठी मला पाठवला त्यात माझा उल्लेख प्रत्येक ठिकाणी महेश घाटपांडे असा झाला. मी त्यांना दुकीची दुरुस्ती करायला सुचवली. ओके. दुरुस्त करतो असे त्या पत्रकाराने उत्तर दिले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकाशित झाला तेव्हा परत महेश घाटपांडे. म्हणजे एवढे करुन रामाची आई सीता! :)

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 01:56
. मतदान हक्कही आहेच कि . केवळ कर्तव्य नाही . उगीचच निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर दोषारोप करण्यात काहीच अर्थ नाही . ज्यावेळी आपल्याला संधी मिळाली तेंव्हा आपण काय केले ? ५ वर्षांनी येणाऱ्या संधीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे . कोणी काय कराव हा वैयक्तिक / खाजगी प्रश्न आहे . पण मग अशा लोकांनी निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर बोलण्यात काय अर्थ राहील ? त्यातल्या त्यात कमी नालायक/कमी वाईट पक्ष/उमेदवार आपण नक्कीच निवडू शकतो , आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी . :) मतदान मुळात ऐच्छिक असल्यामुळे कोणाला अपराधी किंवा अगदी गुन्हेगार खरच वाटेल का ?

In reply to by दिव्यश्री

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 09:18
म्हणजे बघा हं, जे मतदानाबद्दल उदासीन आहेत किंवा त्याला जास्त प्राथमिकता देत नाहीत जर त्यांनी मतदान केले तर ते चांगले नेते निवडून देऊ शकतात. आणि याउलट ज्यांना मतदानाचे महत्व समजते, जे आवर्जून मतदान करतात ते मात्र चुकीचे नेते निवडून देतात. हे लॉजिक गंडल्यासारखे नाही वाटत का?

In reply to by तुमचा अभिषेक

हुप्प्या Fri, 04/25/2014 - 10:31
आज जे लोक मत देतात वा आवर्जून मत देतात ते मतदानाचे महत्त्व जाणून मत देतात हे गृहितक चुकीचे आहे. कित्येक लोक दारूची बाटली, ५०० ची नोट असल्या मोबदल्याच्या बदल्यात मत देतात. गरीब वस्तीत अशा प्रकारे मत देणार लोक खूप असतात. अर्थात ज्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते अशा लोकांनी लोकशाहीच्या भविष्याऐवजी दोन वेळच्या जेवणाला जास्त महत्त्व दिले तर त्यांना चूक कसे ठरवता येईल? कित्येक समाजकंटक लोक (श्यान्या गुर्जींच्या सल्ल्याप्रमाणे शाई पुसून) अनेकदा मत देतात. गैरहजर लोकांच्या जागी उभे राहून मत देतात. जर सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात मत देऊ लागले तर अशा विकत घेतलेल्या मतांचे तौलनिक प्रमाण थोडे कमी होऊन जरा जास्त योग्य उमेदवार निवडून येऊ शकतो असा एक विचारप्रवाह आहे.

In reply to by हुप्प्या

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 11:03
खरे तर वरची पोस्ट लिहिताना हे माझ्याही डोक्यात आलेलेच. मात्र सुशिक्षित लोक जास्त योग्य उमेदवार निवडून देतात या गृहीतकावरही शंका घेण्यास वाव आहे पण तौलनिक दृष्ट्या नक्कीच येस . अवांतर - गरीबांना गरीब आणि अशिक्षितांना अशिक्षित ठेवण्यातच काँग्रेसच्या आजवरच्या यशाचे गुपित दडलेय तर.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:06
रोचक! म्ह. स्वतः मतदानासारखी सोपी प्रोसेसही न करता, शासनव्यवस्थेत कसलेही योगदान न देता वर शासनावर टीका करायची आणि ती ऐकून घ्यायची? इतकं असेल तर मग राजकारणी लोकांनी स्वतःची वचने सांभाळली नाहीत असे म्हणण्याचा तरी नैतिक हक्क काय राहतो ओ????

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 11:49
अजिबार गुन्हा वगैरे नाही. नैतिक दृष्टया पण काही चुक नाही. सगळे चोर च उभे असतात, मतदान करणे म्हणजेच गुन्हा आहे अश्यावेळी. नोटा चा खरा उपयोग होईल असा कायदा झाल्याशिवाय मतदान करण्यात अर्थ नाही.

असंका Fri, 04/25/2014 - 11:46
कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट होती. २ मतं एका पक्षाला तर २ मतं दुसर्‍या पक्षाला. आणि खरं म्हणजे लढत अशी त्या दोनच पक्षात असायची. मग आम्ही विचार करायचो की एवी तेवी आमची चार मतं एकमेकांची मतं काटणारच तर आहेत, मग कशाला जा-ये करायची. ह्यावेळी मात्र पक्ष ३ झाले आणि आमच्यातील एकाने पक्ष बदलला आणि मग चकरा मारून मारून नाव नोंदणी करून, त्याची खात्री करून आम्ही मत देत्साते झालो... पण मग कालपर्यंत आम्ही जात नव्हतो तो गुन्हा होता का?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 23:27
हा हा भारीये हे पण .. पण एकाने पक्ष बदलला म्हणजे तो नक्कीच आप'ला मिळाला असणार ;) आणि तसे असेल तर इतर पक्ष धोक्यात आल्याने त्यांनी एकाला एक कॅन्सल न करता मतदान करणेच सेफ समजले असावे..

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 11:50
ज्याला समाजासाठी काही करायचे आहे, तो ते करेल च. निवड्णुकींची वाट बघत बसणार नाही. पण कोणी स्वताचे पैसे खर्च करुन मला निवडुन द्या असे सांगत असेल तर त्याचा त्यात फक्त स्वार्थ च आहे.

मतदानाचा अधिकार / हक्क कायदेशीर आहे पण मतदान न करणे बेकायदेशीर नाही कारण मतदानाचा हक्क ऐच्छिक आहे, मतदान सक्तीचे नाही. मात्र आपले भविष्य ठरविण्याचे अधिकार स्वखुषिने दुसर्‍यांच्या (मतदान करणार्‍यांच्या) हाती सोपवले असल्याने हा हक्क न बजावणार्‍यांना राजकारणाबद्दल काही बोलण्याचा नैतिक हक्क नाही.... निवडणूकी अगोदर/नंतर फुकाच्या गप्पा मारण्याचा आणि वायफळ टीका करण्याचा कायदेशीर अधिकार मात्र आहे *unknw* :(

ब़जरबट्टू Fri, 04/25/2014 - 12:03
माझ्या मते गुन्हा तर नाही, पण आजकाल ज्या प्रकारे याबद्दल जागरुकता होतेय, त्यावरुन ही गोष्ट मनाला जास्त डाचते एव्हडच. माझ्या मते जर सुशिक्षित मतदार आले, तर वर सांगितले तसे विकत घेणा-या मतांचे प्रमाण कमी होईल, तसेच असे विकतचे मत जास्त प्रभाव पाडत नाही म्हंटल्यावर यामागे होणारा काळाबाजार आपोआप कमी होणार. दुसरे म्हणजे माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो. नेता मंडळी पण त्यांना मिळण्या-या मताचे विश्लेषण करतातच की. निवडून आल्यावर मतांचे अंतर, विरोधी पक्षाला मिळालेली मते, ह्या सर्व बाजू नेते पण बघतात, त्यामुळे नक्की कोणते मुद्दे महत्वाचे हे तरी ध्यानात येणार ना. आज नाही पण पुढील पाच वर्षात टिकण्यासाठी काय करायला हवे, हे तुमचे मत सांगते , आणि म्हणूनच ते महत्वाचे ठरते.

In reply to by ब़जरबट्टू

यसवायजी Fri, 04/25/2014 - 12:50
माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो डिपेंड्स. पडेलच असे नाही. मी कुठल्या भागात/समाजात राहतो? माझी/इतरांची जात कोणती आहे? इतरांची आर्थीक परिस्थीती कशी आहे? ते प्रलोभनाला बळी पडतात का? - शराब्/शबाब/कबाब उमेदवार काय लायकीचे आहेत? ते गावातला पाणी पुरवठा बंद करु शकतात का? वगैरे.. एक साधे उदा;- एका वर्गात २२ मुली आहेत आणी फक्त १३ मुलगे. वर्गप्रमुखाच्या निवडणुकीत दोन्हीबाजुनी १-१ उमेदवार आहेत. सगळ्या मुलग्यांनी १००% मतदान केले तरी त्यांचा प्रतिनिधी निवडून येणारच नाही अशी त्यांना खात्री आहे. म्हणून बहुतेकांनी मतदानच केलेच नाही. आणी साहजीक एक मुलगी निवडून आली. चूक कोणाची? - लोकशाही जिंदाबाद. -

In reply to by यसवायजी

ब़जरबट्टू Fri, 04/25/2014 - 13:21
मुळात मी जेव्हा "सुशिक्षित" मतदार म्हणतोय, त्यावेळी त्याने जाती, प्रलोभन, जरब याउपर विचार करावा अशी रास्त अपेक्षा आहे. मुळात बघितले तर, हाच सुशिक्षित मतदार "काय फरक पडतो या गावंढळांना, हे तेच करणार" म्हणून मतादानापासुन दूर राहतो, आणि आपसुक नेत्यासाठी हाच गरीब, जातिवंत, जरबेत वागणारा, मतदार महत्वाचा ठरतो, तुम्ही मतचा देणार नाहीये , किंवा तुमचा टक्काच कमी आहे माहित असल्यावर या नेत्यांनी तुमची कदर तरी का करावी ? तुमच्या उदाहरणात पण उमेदवाराला महत्व आहेच. अत्यंत मंद वा लोफर मुलीला सर्व मुली मत देतीलच हे कशावरुन ? एका चांगल्या मुलाला पण मुलींची मते मिळु शकतील की. आणि तसाही आपला उमेदवार काही येत नाही हा विचार करुन मुलांनी हात मागे घेतले, तर हिच मंद मुलगी एका मताने पण निवडून येईल, कारण तिथे विरोधच नाहीये, आणि मग हीच मूले ओरडतील . सध्या तरी हेच होतेय ना ? येथे मुलांनी पुर्ण जोर लावणे महत्वाचे आहे, व मुलींनी योग्य उमेदवाराला मते देणे अपेक्षित आहे.

मृत्युन्जय Fri, 04/25/2014 - 12:25
माझ्यामते तरी मत न देणार्‍या लोकांना आयुष्यातल्या प्रायोरिटीज अजुन कळालेल्या नाहित. हे तेच लोक असतात जे निवडणुकीनंतर ५ वर्षे सरकारला शिव्या घालतात मग परत मत देत नाहित आणि तेच सरकार निवडुन आल्यावर परत शिव्या घालतात. अयुष्यातला सगळा नैराश्यवाद यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो. काय फरक पडणार आहे हे यांचे ब्रीदवाक्य असते. मत देउन आलेल्या लोकांची टिंगलटवाळी करण्यात यांना धन्यता वाटते. यांची सगळी शक्ती "काय दिवे लावले तुमच्या सोनियाने?" किंवा " काय असा फरक पाडणार आहे तुमचा मोदी" अश्या वक्तव्यात खर्च होते. एका मताने वाजपेयी सरकार गडगडले पण अजुन या मुर्खांना एका मताची किंमत कळालेलीच नाही तर काय करणार? आता मुख्य प्रश्नाकडे. हो. हा एक प्रचंड मोठा नैतिक गुन्हा आहे. याला ज्या दिवशी कायदेशीर गुन्ह्याचे स्वरुप देण्यात येइल (अर्थात त्यासाठी आधी संपुर्ण यंत्रणा सुधारली पाहिजे) त्या दिवशी मी खरेच पेढे वाटेन.

मतदान सक्तीचे करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या ते तसे करता येणार नाही. एखाद्याला आपला हक्क नसेल बजावायचा? हक्क आहे म्हणुन तो वापरलाच पाहिजे असे थोडे बंधन घालता येते? म्हणुन प्रबोधन हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो.

In reply to by पिशी अबोली

असंका Fri, 04/25/2014 - 13:00
माझा मित्र असाच एकदा स्नानशुचिर्भूत वगैरे होउन गंध बिंध लाउन मतदानाला गेला आणि पहातो तो काय्...त्याच्या नावे आधीच कोणीतरी मतदान आटोपले होते...! तोतया मतदान टाळायचे तर पहाटेपासून रांगेत थांबायला हवे हे आम्ही तेव्हा शिकलो...

माहितगार Fri, 04/25/2014 - 14:31
१) आपण मतदानाच कर्तव्य इतरांकरता नाही स्वतः करताच नव्हे स्वतःच्या पुढच्या पिढीकरताही बजावतो आहोत २) अधिकार आणि स्वातंत्र्य खरेतर जन्मसिद्ध नव्हे संस्कृतीसिद्ध असतात तुम्ही वापरल्याने सिद्ध होतात ( न वापरल्याने कळत नकळत गहाळ होण्याची प्रक्रीया होण्याची शक्यता नाकारता येत नाही) ३) जगातली कोणतीही कित्तीही अद्ययावत मतदान पद्धती वापरली तरी ती फेअर राहण्याकरता प्रक्रीयेतील त्रुटी समजून येऊन त्या दुरुस्त आणि सुविहीत राहण्या करता मतदान पद्धतीतला जो लूप पूर्ण व्हावयास हवा तो मतदान न केल्याने पुर्ण होण्याचे राहून जाते तेवढीच तोतया आणि मतदान पद्धतीतील अवैधतांना उत्तेजन मिळते. "दुख्ख म्हातारी मेल्याचे नसते काळ सोकावतो याचे असते" ह्या म्हणीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांनी (स्वत:चे मत नोटा किंवा नको असलेल्या अपक्षाला देऊन वाया घालवावे) मतदान करण्यात शहाणपणा आहे. बाकी आपापल्या प्राधान्यता कुठे ठेवायच्या एवढा विवेक आणि सुज्ञपणा ठेऊन प्रिऑरीटी प्रमाणे वागावे. बाकी आजच्या सकाळ मध्ये एक विकास सबनिस यांच्या रेषागिरीत एक बोलक कार्टून आल आहे. एक जोडप मतदानाच्या दिवशी बीचवर फिरायला जात, जातात तर जातात गप्पा काय मारतात तर 'एसएमएसवर मतदानाचा अधिकार का नसतो ?' :)

हाडक्या Fri, 04/25/2014 - 16:02
हा चर्चा विषय आणि इथल्या प्रतिक्रिया वाचून आमच्या आवडत्या 'दक्षिण बाग ( South Park )' या मालिकेतील निवडणुकीसंदर्भातल्या भागाची आठवण झाली.. त्यातलं एक कार्टं या अभिषेकसारखाच प्रश्न विचारतं आणि आख्ख्या गावात पार हलचल होते.. त्याला गावातून साश्रुनयन तडीपार काय करतात, मग लै ड्रामा होतो. शेवटी हा एक माणूस त्याला समजवायला जातो, vote or die ( अश्लील भाषा आणि चित्रे ज्याना बघवत अथवा ऐकवत नाहीत अशा संवेदनशील लोकांनी लिंक उघडू नये ) हे गाणे ऐकून हे कार्टं मद्दान करायला तयार होतं आणि मग परत एकदा गावात आनंदी आनंद होतो.. मग हे गाणं .. हे खरंतर या भागाचं तात्पर्य आहे आणि अभिषेक राव यांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर देखील, Let's get out and vote!

In reply to by हाडक्या

माहितगार Fri, 04/25/2014 - 16:29
.....अशा संवेदनशील लोकांनी
इंग्रजी विकिपीडियावरील दुवा सध्यातरी सेन्सीबल आहे. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे बरोबर आहे पण मतदात्याला मत देण्यासाठी टेरराईज करण ही लोकशाही नव्हे. मला वाटते आमेरीकेत आधी मतदात्याला रजीस्ट्रेशन करावे लागते मगच मत देता येते असे काहीसे ऐकुन आहे त्या मुळे रजीस्ट्रेशन करवून घेणे आणि मतदान घडवणे असा दुहेरी त्रास तेथे असावा त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन या गाण्यात अप्रत्यक्षपणे दिसते पण चुकीच्या गोष्टीचे गाण्यातन समर्थन होतय कथेतन मतदाराला निराशाच येण अधिक संभवत. आमेरीकेत फक्त दोनच पर्याय आहेत भारतात तुम्हाला अगणित पर्यायातून एक निवडता येतो नोटा सारख वरील पैकी कोणताच नको म्हणता येत हे पर्याय आहेत त्या शिवाय बहुतांश नवमतदारांच रजीस्ट्रेश आपोआप होत . मतदारांच्या अधिकाराच्या दृष्टीने भारतीय लोकशाही त्यातील मर्यादांसहीत मला आमेरीकी लोकशाही पेक्षा अधिक परिपक्व वाटते. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे मात्र बाकी खर

रघुपती.राज Fri, 04/25/2014 - 17:00
मतदानाचा विषय चालु आहे म्हणून हा एक वेगळा लेख वाचा http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/kahihi/entry/to-vote-or-not-to-vote

हाडक्या Fri, 04/25/2014 - 17:18
प्रथमतः ही Satire प्रकारची विनोदी मालिका आहे हे लक्षात घ्या. मग इथे कोणी टेरराईज करून मत द्या असे म्हणत नाहीये. तो 'मत द्या नाहीतर तुम्ही गुन्हेगार, तुम्हाला कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही' वगैरे वगैरे प्रतिक्रियांचे प्रातिनिधिक ( अतिशयोक्त विनोदी ) रूप म्हणु शकाल फार फार तर..( की ज्यांना वैतागून तो इच्छा नसतानाही मतदान करायला गेला इत्यादि ) आपल्याकडे जरी रजीस्ट्रेशन करायची गरज नसली (तुम्ही म्हणताय तशी) तरीही मतदार यादीत नाव आहे का ते आधी पहा, मग नसेल तर धावाधाव करा हे सगळं आहेच की.. लोकशाही संसदीय चांगली की अध्यक्षीय चांगली या बद्दल मत मतांतरे असू शकतात आणि तो इथे अवांतराचा मुद्दा होइल.

मतदान न करणे हा गुन्हा नाही , माझा स्वतःचा लोकशाहीवर विश्वास नाही मी जन्माला यायच्या आधी ४०-५० वर्षांपुर्वी काही मोजक्या लोकांनी मिळुन घटना लिहिली , त्यात माझा सहभाग नव्हता , त्यामुळे इतरांनी लादलेली कित्येक मते मला अमान्य आहेत ..... लोकशाही बाबत मी अबोलिशनिस्ट आहे... आपण भाड्याच्या घरात जसे भाडे देवुन राहतो तसे माझे ह्या देषातले नागरिकत्व आहे , मी रीतसर नियमांनुसार टॅक्स भरतो आणि ह्या देशात रहातो . मग हा देश कोण चालवतो कसा चालवतो , ह्याचाशी मला काही घेणे देणे नाही .( हां , जर कोणत्या पक्षाने टॅक्स कमी करु / बंद करु असे आश्वासन दिले असते तर मी नक्कीच त्या पक्षाला मतदान केले असते :P ) माझी आवडती प्रणाली आहे अनार्चिझम ... पण दुर्दैवाने लोकांना अनाचिझम आणि केऑस मधील फरक लक्षात येत नाही आणि तो समजावुन सांगितला तरी पटत नाही . आता हे सारे बालीश वाटत असेल बर्‍याच जणांना पण हे विचार तसे खुप जुने आहेत .... Thoreau is sometimes cited as an anarchist. Though Civil Disobedience seems to call for improving rather than abolishing government — "I ask for, not at once no government, but at once a better government"— the direction of this improvement points toward anarchism: "'That government is best which governs not at all;' and when men are prepared for it, that will be the kind of government which they will have." --Henry_David_Thoreau

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 12:33
वेगळा आणि चांगला मुद्दा मांडलात. आपल्याकडे लोकांनी मतदानाबाबत जागरुकता दाखवावी अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र मतदान वा निवडणूक प्रक्रिया सुधारीत आणि विश्वासार्ह बनवावी याबाबत कोणाला काही पडले नाहीये. कदाचित हे देशातील सर्वच प्रमुख पक्षांच्या सोयीचे आहे. आज व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होते, मतदार राजा केलेस ना मतदान, चल मग आता फूट, पाच वर्षे तोंड दाखवायला येऊ नकोस. पाच वर्षांसाठी म्हणून एकदाच आणि एकच मत द्यायला मिळणे यामुळे आपल्या त्या मताची किंमत आपल्याला जास्त वाटते पण यात आपली किंमत नाही का घटत.

In reply to by तुमचा अभिषेक

मी म्हणतोय निवडणुका बिवडणुका असले काही नकोच , प्रतिकात्मक लोकशाहीही नको ....म्युचुअल को-ओपरेशन्ने राहु ... तु मला त्रास देवु नकोस मी तुला त्रास देणार नाही ... हा एकच नियम ! ( ह्याला ग्रीक फिलॉसॉफर्स "गोल्डन रुल" का असे काहीतरी म्हणतात ) अवांतर :
लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडले पाहिजे असे गरजेचे नसते. बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.
>>>> ह्यावर खरडवही.तुन चर्चा करुयात :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 14:17
हो आपला मुद्दा समजला होता. माझे पुढचे लिहिलेले त्याला उत्तर वा प्रतिक्रिया म्हणून असे नव्हते तर वेगळ्या पोस्टमध्ये टंकायचा कंटाळा म्हणून त्यातच लिहिले.

मनीषा Sat, 04/26/2014 - 20:40
सामाजिक गुन्हा किंवा अपराध नाही म्हणता येणार परंतु आपल्या मतानूसार काही घडावे, या साठी काही प्रयत्नं करण्याची संधी चुकवली, असे म्हणता येईल. आपण ज्याला मत देऊ तोच उमेदवार निवडून येईल असे नाही, पण तोच निवडून येणारच नाही असेही नाही.

चौथा कोनाडा Fri, 05/09/2014 - 08:37
उदबोधक चर्चा ! काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली. मिपा वरील सुप्रसिद्ध लेखकाचा लेख व त्यावरील चर्चा आठवली. मी मतदान का करावे? http://www.misalpav.com/node/18987 या धाग्याची आठवण झाली!

पैसा Fri, 05/09/2014 - 09:51
काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली.
सहमत. बाकी अपराध असता तर काहीतरी शिक्षा दिली असती नाही का? सध्या तरी मत आहे म्हणून कोणाला तरी देऊया. मग ५ वर्षांनी पुन्हा विचार करू.
आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या.

वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई)

प्रचेतस ·

नाखु गुरुवार, 04/24/2014 - 15:25
तुम्ही "घारा पुरी" सारखी "दाखवणार असाल तरच पाहण्यात अर्थ आहे नाही तर आम्ही फक्त चित्र दर्शन पामर.. धन्यवाद.. उर्वरीत प्रतिक्रिया सावकाश धागा वाचल्यावरच.. पु.ले.प्र.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 16:25
वेरूळ्च्या या भागाची परत मस्त उजळणी झाली. तुमच्या तोंडून माहिती ऐकत तेथे सर्व लेणी पहाण्याचा अनुभव अवर्णनिय होता !

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/24/2014 - 17:24
धागा नेहमीप्रमाणेच...मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त....माहितीपूर्ण! आणि नेहमीची कबुली- अगोबा बरोबर सगळीकडे भटकताना नेहमी ही माहिती कमी..अधिक प्रमाणात तिथे मिळत असतेच. पण हे इथे हवं तसं..हवं तेंव्हा निवांत रवंथ करायला मिळत ना.. हे (मला) जास्त फायद्याचं आहे. तिथे ऐकताना जे मिळत ते अनुभूती या स्वरुपातलं असतं..आणि इथे त्याचा होतो तो खरा अनुभव...म्हणूनच आंम्ही सर्वजण ह्या सर्व लेखमालांचं पुस्तक येऊ दे ..म्हणून अगोबास पाठी पडतो..पण अगोबा..हे प्रथम वल्ली असल्यामुळे..ते त्यांच्या मनात-येइल तेंव्हाच घडेल! (आमचं नै ऐकणार कधी! :-/ दु..दु..! :-/ ) असो! ------------------------------------- अता..प्रतिपाद्य विषयातील आमच्या कडील संगती:- अनेक धार्मिक कार्यांमधे- गणपति पूजन..पुण्याहवाचन आणि मातृकापूजन असतं..या मातृकापूजनात (आता) एकंदर २३ मातृका आणि गणपति,दुर्गा,क्षेत्रपाल,आणि वास्तोष्पती या चार परिवार देवता मिळून २७ देवतांचे पूजन होते. गौरी पद्मा शची मेधा,सावित्री विजया जया। देवसेना: स्वधा स्वाहा,मातरो लोकमातरः॥ धृती: पुष्टी: तथा तुष्टी,आत्मनः कुलदेवता। ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा। वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमतरः॥ गणपतिं..दुर्गां..क्षेत्रपालं..वास्तोष्पतीं। -------------------------------- आता यांचा वाहनशोध... दुर्गा सप्तशती>>> पूर्वांग>>> देवी कवचः---- प्रेत संस्था तु चामुण्डा, वाराही महिषासना। ऐन्द्री गज-समारूढ़ा, वैष्णवी गरूड़ासना। माहेश्वरी वृषारूढ़ा, कौमारी शिखि-वाहना। ब्राह्मी हंस-समारूढ़ा, सर्वाभरण-भूषिता। ------------------------------------

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 04/24/2014 - 19:46
धन्यवाद बुवा, पहिल्या श्लोकाप्रमाणेच म्हणजे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी..., ह्याच क्रमाने सप्तमातृका पट सर्वसाधारणपणे आढळतो. मात्र चामुंडा आणि वाराही यांची वाहने मात्र विभिन्न आढळतात.

किसन शिंदे गुरुवार, 04/24/2014 - 21:56
बॅट्याचंच वाक्य उसनं घेतो..
नेहमीप्रमाणेच कडक धागा. वल्लीच्या लेखावर दरवेळेस वेगळं काय म्हणायचं हा प्रश्न आहेच.
इतर ठिकाणांपेक्षा इथे असलेला भव्य सप्तमातृकापट आवडला.! भग्न होण्यापूर्वी किती भारी दिसत असतील हे शिल्पपट.

मराठे Sat, 04/26/2014 - 00:10
या लेण्यांमधे आणि घारापुरीच्या लेण्यांमधलं साम्य बघून दोन्हीकडील शिल्पकार एकच असावेत असं वाटतंय. विषेशतः अंधकासूर शिल्प तर चोप्य-पस्ते केल्यासारखं वाटतंय. बादवे, सप्तमातृकांची काय गोष्ट आहे? त्यांची शिल्प अशी एका रांगेत देण्यामागे काय प्रयोजन आहे? आणि त्याच रांगेत गणपती कसा?

In reply to by मराठे

प्रचेतस Sat, 04/26/2014 - 07:06
अंधकासूरवधमूर्ती हा शिवमूर्तींचा एक प्रकार आहे. अगदी किरकोळ फरक वगळता ही मूर्ती सगळीकडे सारख्याच प्रकारे दाखवली जाते. बाकी घारापुरीचे लेणीशी इथल्या क्र. २९ च्या लेणीशी विलक्षण साम्य आहे. अगदी लेणीचे कोरण्यापासून तिथल्या मूर्तींपर्यंत. पण घारापुरीची शिल्पकला किंबहुना मूर्तीकला ही वेरूळपेक्षा जास्त उजवी आहे असे माझे वैयक्तिक मत. ह्या सप्तमातृका तांत्रिक समजल्या जातात. पूर्वी गणेश हा सुद्धा तांत्रिक पूजेतच पुजला जात होता. मातृकांबरोबर वीरभद्र आणि गणेश हा नेहमी असतोच.

धन्या गुरुवार, 05/01/2014 - 09:46
त्या लेण्यांमध्ये निरुद्देश वाटले नव्हते की या सार्‍या मूर्तींमागे कहाण्या दडलेल्या आहेत.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 16:20
ही शिल्पे तुमच्याशी शिक्रेट्मधे बोलतात अशी आम्हाला दाट शंका आहे ! सप्तमातृका अन काली यांच्यामधला गणेश लै भारी. रच्याकने, वेरूळ आणि बेळ्ळूर यांचा काही संबंध आहे का हो ?

In reply to by सस्नेह

प्रचेतस गुरुवार, 05/01/2014 - 19:53
शिल्पे तिथे गेल्यावर बोलू लागतातच यात काहीच संशय नाही. :) वेरूळ आणि बेळ्ळूरचा काहीच संबंध नाही. वेरूळ हे 'इला' नदीच्या काठावर वसले असल्याने त्याचे मूळचे नाव एलापूर होते. शिलालेखांत तेच नाव आहे. पुढे त्याचा एलापूर, वेलापूर, वेरूळ असा अपभ्रंश झाला तर बेलूर येथील मंदिरे हे कर्णाटकातल्या होयसाळांची १२/१३ व्या शतकातली निर्मिती.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Fri, 05/23/2014 - 12:41
एला नदी आजही आहे. वेरूळच्या सीतेच्या नहाणीजवळचा (धुमार लेणे) जो सर्वात मोठा धबधबा आहे तिथूनच वाहते ती. वेलगंगा हे तिचे आजचे नाव. उन्हाळ्यात कोरडी तर पावसाळ्यात वाहती. इथे बघ गूगल मॅप मध्ये.

स्पा गुरुवार, 05/22/2014 - 14:40
वाव.. जबराट धागा फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे सुसाट आमच्या वेरूळ भ्रमंतीची आठवण झाली

म्हैस Fri, 05/30/2014 - 11:42
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का? :-) आणि एका बाजूला यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ? साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ? साप्तमातृकांच्या ह्या नावांचा उल्लेख कुठे आहे समजेल का?

In reply to by म्हैस

प्रचेतस Fri, 05/30/2014 - 12:34
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का?
:)
यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ?
वाहनांवरून. यमुनेचे वाहन कूर्म तर गंगेचे मकर.
साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ?
लै फेमस नावे आहेत ही. बहुतेक पुराणांत, महाभारतात ही नावे आहेतच. वर बुवांनी काही मंत्र दिलेत. त्यात आहेत ही नावे.

नाखु गुरुवार, 04/24/2014 - 15:25
तुम्ही "घारा पुरी" सारखी "दाखवणार असाल तरच पाहण्यात अर्थ आहे नाही तर आम्ही फक्त चित्र दर्शन पामर.. धन्यवाद.. उर्वरीत प्रतिक्रिया सावकाश धागा वाचल्यावरच.. पु.ले.प्र.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 16:25
वेरूळ्च्या या भागाची परत मस्त उजळणी झाली. तुमच्या तोंडून माहिती ऐकत तेथे सर्व लेणी पहाण्याचा अनुभव अवर्णनिय होता !

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/24/2014 - 17:24
धागा नेहमीप्रमाणेच...मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त....माहितीपूर्ण! आणि नेहमीची कबुली- अगोबा बरोबर सगळीकडे भटकताना नेहमी ही माहिती कमी..अधिक प्रमाणात तिथे मिळत असतेच. पण हे इथे हवं तसं..हवं तेंव्हा निवांत रवंथ करायला मिळत ना.. हे (मला) जास्त फायद्याचं आहे. तिथे ऐकताना जे मिळत ते अनुभूती या स्वरुपातलं असतं..आणि इथे त्याचा होतो तो खरा अनुभव...म्हणूनच आंम्ही सर्वजण ह्या सर्व लेखमालांचं पुस्तक येऊ दे ..म्हणून अगोबास पाठी पडतो..पण अगोबा..हे प्रथम वल्ली असल्यामुळे..ते त्यांच्या मनात-येइल तेंव्हाच घडेल! (आमचं नै ऐकणार कधी! :-/ दु..दु..! :-/ ) असो! ------------------------------------- अता..प्रतिपाद्य विषयातील आमच्या कडील संगती:- अनेक धार्मिक कार्यांमधे- गणपति पूजन..पुण्याहवाचन आणि मातृकापूजन असतं..या मातृकापूजनात (आता) एकंदर २३ मातृका आणि गणपति,दुर्गा,क्षेत्रपाल,आणि वास्तोष्पती या चार परिवार देवता मिळून २७ देवतांचे पूजन होते. गौरी पद्मा शची मेधा,सावित्री विजया जया। देवसेना: स्वधा स्वाहा,मातरो लोकमातरः॥ धृती: पुष्टी: तथा तुष्टी,आत्मनः कुलदेवता। ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा। वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमतरः॥ गणपतिं..दुर्गां..क्षेत्रपालं..वास्तोष्पतीं। -------------------------------- आता यांचा वाहनशोध... दुर्गा सप्तशती>>> पूर्वांग>>> देवी कवचः---- प्रेत संस्था तु चामुण्डा, वाराही महिषासना। ऐन्द्री गज-समारूढ़ा, वैष्णवी गरूड़ासना। माहेश्वरी वृषारूढ़ा, कौमारी शिखि-वाहना। ब्राह्मी हंस-समारूढ़ा, सर्वाभरण-भूषिता। ------------------------------------

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 04/24/2014 - 19:46
धन्यवाद बुवा, पहिल्या श्लोकाप्रमाणेच म्हणजे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी..., ह्याच क्रमाने सप्तमातृका पट सर्वसाधारणपणे आढळतो. मात्र चामुंडा आणि वाराही यांची वाहने मात्र विभिन्न आढळतात.

किसन शिंदे गुरुवार, 04/24/2014 - 21:56
बॅट्याचंच वाक्य उसनं घेतो..
नेहमीप्रमाणेच कडक धागा. वल्लीच्या लेखावर दरवेळेस वेगळं काय म्हणायचं हा प्रश्न आहेच.
इतर ठिकाणांपेक्षा इथे असलेला भव्य सप्तमातृकापट आवडला.! भग्न होण्यापूर्वी किती भारी दिसत असतील हे शिल्पपट.

मराठे Sat, 04/26/2014 - 00:10
या लेण्यांमधे आणि घारापुरीच्या लेण्यांमधलं साम्य बघून दोन्हीकडील शिल्पकार एकच असावेत असं वाटतंय. विषेशतः अंधकासूर शिल्प तर चोप्य-पस्ते केल्यासारखं वाटतंय. बादवे, सप्तमातृकांची काय गोष्ट आहे? त्यांची शिल्प अशी एका रांगेत देण्यामागे काय प्रयोजन आहे? आणि त्याच रांगेत गणपती कसा?

In reply to by मराठे

प्रचेतस Sat, 04/26/2014 - 07:06
अंधकासूरवधमूर्ती हा शिवमूर्तींचा एक प्रकार आहे. अगदी किरकोळ फरक वगळता ही मूर्ती सगळीकडे सारख्याच प्रकारे दाखवली जाते. बाकी घारापुरीचे लेणीशी इथल्या क्र. २९ च्या लेणीशी विलक्षण साम्य आहे. अगदी लेणीचे कोरण्यापासून तिथल्या मूर्तींपर्यंत. पण घारापुरीची शिल्पकला किंबहुना मूर्तीकला ही वेरूळपेक्षा जास्त उजवी आहे असे माझे वैयक्तिक मत. ह्या सप्तमातृका तांत्रिक समजल्या जातात. पूर्वी गणेश हा सुद्धा तांत्रिक पूजेतच पुजला जात होता. मातृकांबरोबर वीरभद्र आणि गणेश हा नेहमी असतोच.

धन्या गुरुवार, 05/01/2014 - 09:46
त्या लेण्यांमध्ये निरुद्देश वाटले नव्हते की या सार्‍या मूर्तींमागे कहाण्या दडलेल्या आहेत.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 16:20
ही शिल्पे तुमच्याशी शिक्रेट्मधे बोलतात अशी आम्हाला दाट शंका आहे ! सप्तमातृका अन काली यांच्यामधला गणेश लै भारी. रच्याकने, वेरूळ आणि बेळ्ळूर यांचा काही संबंध आहे का हो ?

In reply to by सस्नेह

प्रचेतस गुरुवार, 05/01/2014 - 19:53
शिल्पे तिथे गेल्यावर बोलू लागतातच यात काहीच संशय नाही. :) वेरूळ आणि बेळ्ळूरचा काहीच संबंध नाही. वेरूळ हे 'इला' नदीच्या काठावर वसले असल्याने त्याचे मूळचे नाव एलापूर होते. शिलालेखांत तेच नाव आहे. पुढे त्याचा एलापूर, वेलापूर, वेरूळ असा अपभ्रंश झाला तर बेलूर येथील मंदिरे हे कर्णाटकातल्या होयसाळांची १२/१३ व्या शतकातली निर्मिती.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Fri, 05/23/2014 - 12:41
एला नदी आजही आहे. वेरूळच्या सीतेच्या नहाणीजवळचा (धुमार लेणे) जो सर्वात मोठा धबधबा आहे तिथूनच वाहते ती. वेलगंगा हे तिचे आजचे नाव. उन्हाळ्यात कोरडी तर पावसाळ्यात वाहती. इथे बघ गूगल मॅप मध्ये.

स्पा गुरुवार, 05/22/2014 - 14:40
वाव.. जबराट धागा फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे सुसाट आमच्या वेरूळ भ्रमंतीची आठवण झाली

म्हैस Fri, 05/30/2014 - 11:42
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का? :-) आणि एका बाजूला यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ? साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ? साप्तमातृकांच्या ह्या नावांचा उल्लेख कुठे आहे समजेल का?

In reply to by म्हैस

प्रचेतस Fri, 05/30/2014 - 12:34
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का?
:)
यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ?
वाहनांवरून. यमुनेचे वाहन कूर्म तर गंगेचे मकर.
साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ?
लै फेमस नावे आहेत ही. बहुतेक पुराणांत, महाभारतात ही नावे आहेतच. वर बुवांनी काही मंत्र दिलेत. त्यात आहेत ही नावे.
वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- स्थौण नृसिंहाचे हे अप्रतिम शिल्प बघून होताच आपली दशावतार लेण्याची सफर संपते. आता पुढची सफर आहे ती लेणी क्र. १४ अर्थात "रावण की खाई" ची --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- रावण की खाई अर्थात लेणी क्र. १४. ही आहे दशावतार लेणीच्या शेजारीच. पण त्याप्रमाणे दुमजली मात्र नाही.

वंशवेल

सुब्बु ·

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 12:46
पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन. या महत्वाच्या विषयावर योग्य ती चर्चा इथे घडून यावी, असे वाटते.

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 12:47
जे लोक असा वाटा मागतील त्यांना सरळ तोंडावर सुनवा: आमची प्रॉपर्टी अन आमच्या मुली काय ते बघून घेतील, मध्ये निर्लज्ज हावरटागत बोलायचं काम नाही. असले दीडदमडीचे लोक डोक्यात जातात.

In reply to by सुब्बु

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 13:13
मामला प्रॉपर्टी वगैरेचा आहे, तर आत्तापासूनच या विषयीच्या कायदे-कानून इ. ची व्यवस्थित माहिती काढून ठेवावी. पुढचे अनेक त्रास वेळीच व्यवस्थित माहिती करून घेण्यामुळे वाचतील. तुम्हा उभयतांच्या पश्चात तुमच्या वाट्याची प्रॉपर्टी मुलींना मिळावी, यासाठी कायदेशीर तजवीज करून ठेवावी (जरी मुली अद्याप लहान असल्या तरिही). 'सावधपण सर्वविषयी' असे समर्थ सांगून गेलेतच.

राही गुरुवार, 04/24/2014 - 13:02
निदान महाराष्ट्रात तरी आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना त्यांच्या वारसाहक्कउतरंडीच्या प्रमाणात हिस्सा मिळतो असे ऐकले आहे.

बाबा पाटील गुरुवार, 04/24/2014 - 13:40
तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही व तुमच्या दोन्ही मुली सोडुन कोनाचाही कायदेशिर हक्क होवु शकत नाही.त्यामुळे असला विचार सोडा,दुसर सगळ्यात महत्वाच लेकींना फिजिकल आणी मेंटली इतक स्ट्रांग बनवा की त्यांना हिस्सेदारी मागण्याची कोनाच्या बापाची हिंमत होणार नाही.या साठी कराटे क्लास्,योग या सर्व गोष्टींचा अवलंब करा. साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासुन कराटे क्लास लावा. ती पाचवीला जाईपर्यंत ब्लॅक बेल्ट होते. यामुळे फक्त शाररीक नाही तर माणसिक सुदृढता देखिल यामुळे मिळते.दुसरी गोष्ट मोठ्या कन्येला आत्तापासुनच तिला सर्व गोष्टी पहायच्या आहेत याची जाणिव करुन देत जा.कारण कधी कशी वेळ आयुष्यात येईल हे कोनीच सांगू शकत नाही.तिच बालपण हरवु देवु नका पण जबाबदारी देखिल शिकवा.तुमच्या इनव्हेस्टमेंट , अ‍ॅसट्स, कर्जे याची माहिती गप्पा मारता मारता सहज तिच्या कानावर पडेल अस बोलत जा.बराच फरक पड्तो.(मी देखिल दोन लेकींचा बाप आहे पण याचे वाईट किंवा भिती मला कधीच वाटत नाही.माझी मोठी लेक कराटे,स्केटींग,शुटींग,स्विमिंग,नाचण् आणी जमलच तर थोडाफार अभ्यास असे सगळच करते.मीच काय माझ्या अख्या खाणदानात तिच्या कुठल्या गोष्टींवर हक्क सांगायची कोनाचीच हिंमत नाही.)त्यामुळे तुम्हीही ही खंबिर बना आणी लेकींना देखिल खंबिर बनवा.

पिलीयन रायडर गुरुवार, 04/24/2014 - 13:41
लोक काय काहीही बोलतात हो.. त्यांना फाटयावर मारायचं अस्तं (म्हणजे लक्ष द्यायचं नाही..) तुम्हाला मुली असोत वा मुलगे.. तुमची "स्वकष्टार्जित" संपत्ती तुमच्याच लेकरांना मिळते. बाकीच्यांचा काहिही संबंध नाही. बाकी जी संपत्ती वाडवडिलांकडुन मिळाली असेल तिच्या वरही तुमच्या मुलींचा "कायद्याने" मुलांएवढाच हक्क आहे. तरीही वाटत असल्यास "मृत्युपत्र / इच्छापत्र" करुन ठेवा. ही त्या विषयीची माहिती:- स्वतःच तयार करा - स्वतःचे इच्छापत्र!

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 14:05
सल्ले देणारांना फक्त म्हणायचं....'तुम्हाला विचारलंय?' बाकी असे प्रॉपर्टीबद्दल बोलणारांना 'तुम्ही बांगड्या भरल्यात काय, तुम्हाला पैसे मिळवायला काय झालंय' असा प्रश्न विचारा. (स्त्रीवादी येतील भांडायला, त्यांचा विचार करु नका, बांगड्या 'कम्फर्टेबल नसल्यानं' काम करताना काढून ठेवलेल्या बायकाच भांडायला येतील, डोन्ट वरी!)

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 16:19
अजूनही अशी मानसिकता असलेली माणसे आहेत हे ऐकून वाईट वाटले आणि रागही आला . पण तु म्ही भाग्यवान आहात ़ कारण Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.

In reply to by मनीषा

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 16:22
Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.
हा पुरुषद्वेष्टा कोट टाकायची इथे गरज नव्हती असे वाटते. बहुत काय लिहिणे, तुम्ही सूज्ञ असा.

In reply to by प्यारे१

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 16:59
+२ अब्राहम लिंकन म्हणाला होता - "मला गुलामगिरीचा तिटकारा आहे. याचा अर्थ गुलामांप्रति प्रेम आहे असा होत नाही."

In reply to by आयुर्हित

यसवायजी गुरुवार, 04/24/2014 - 17:04
कैच्याकै. असा विचार करणारे आई-बाप 'दुखी आत्मा' कॅटॅगरीत मोडतात. बिचार्‍या मुलांचे मधल्यामध्ये हाल होतात. अनुभवाचे बोल असतील तरी जनरलाइझ करु नका.

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 16:28
हां विचार करणारच आहेत, नावे कुणा कुणाला ठेवणार ? मुली सुध्दा अमुक तमुक मुलाची इस्टेट नोकरी काय आहे बघुनच त्याला जवळ करतात मग या या एकुण प्रकारात अनैसर्गिक काय आहे ?

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 16:33
जी सुशिक्षित पार्श्वभूमी आपल्या कुटुंबाची दिलेली आहे तिथे वारस कोण हां प्रश्नच निर्माण हॉट नाही कायदा मुलगा मुलगी फरक करत नाही हे शेन्बड्या पोरालाही आता ठाउक असते.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 16:49
मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील. या लिखाणावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला सगळं माहिती तर आहे. आता फक्त तेच आचरणात आणा. कायदाही तेच म्हणतो आहे. लोक काय दोन्ही बाजूनी बोंब मारण्यात पटाइत असतात. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हा मंत्र नीट लक्षात ठेवा म्हणजे झाले. हाकानाका.

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 18:14
जयवंत दळवींच्याच एका नाटकात उद्गार आहेत - मुलाला खाली बोटभर असतं ते सोन्याचं असतं का? अर्थात - मुलगा हवा मुलगा हवा अशी जी अडाणी अन दुर्दैवी हौस असते त्यावर ओढलेला कोरडा आहे.

एसमाळी गुरुवार, 04/24/2014 - 18:24
पाहता लेखिकेची भिती अनाठायी आहे.बाकी मुलींच्या नावे संपत्ती करताना स्वत:ची तजविज करुन ठेवा. अशी बरीच प्रकरण पाहिली आहेत की मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित. (अपवादात्मक)

In reply to by एसमाळी

रेवती गुरुवार, 04/24/2014 - 18:44
सहमत. आपली अपत्ये, कायदेकानून बर्‍यापैकी जागेवर असताना लोकांच्या (अगदी नातेवाईकांच्याही) बोलण्याला भीक घालायचे दिवस संपले. म्हणजे तसे ते कधी नव्हते पण आपणच जरा भाव देत होतो. परंपरागत संपत्तीबाबत तुमच्या यजमानांच्या वाटयाला काय यायचे त्यातच भेदभाव केवळ 'तुम्हाला मुली असणे' या कारणामुळे होतोय असे तुमचे म्हणणे आहे की काय ते समजले नाही.

In reply to by एसमाळी

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 19:04
मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित.
खरं आहे. पण एसमाळीजी एकवेळ तसं परवडलं पण हगल्या-पादल्या कारणावरुन भांडून माहेरी येऊन, पालकांच्या डोक्याला कल्हई करणार्‍या मुली नकोत. तशाही पाहील्यात म्हणून म्हणते.

एसमाळी गुरुवार, 04/24/2014 - 20:23
शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. पाल्याला न विचारणारी किंवा रडत भेकत माहेरी येणार्या मुली एकाच वर्गात येतील.रेवती ताईंच्या प्रतिसादातील शेवटचा भाग समजला नाही .

In reply to by एसमाळी

हाडक्या गुरुवार, 04/24/2014 - 20:54
गडबड होतेय हो.. पाल्य नाही पालक .. पाल्य म्हणजे अपत्य आणि पालक म्हणजे त्यांचे पालन पोषण करणारे..

In reply to by एसमाळी

रेवती Fri, 04/25/2014 - 02:55
आजी आजोबा जर म्हणायला लागले की "मुला, तुला रे वाटणी घेऊन काय करायची? तुला मुली आहेत तर देत नाही, किंवा कमी देऊ" असा अर्थ आहे.

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 20:53
एकंदरित स्थावर जंगम वगैरे सर्व मालमत्ता, मुलगे असोत वा मुली, माय-बापाच्या मृत्यूनंतरच वारसांना मिळावी, अशी तजवीज करणेच जास्त चांगले, असे अनेक उदाहरणावरून दिसून येते.

खटपट्या गुरुवार, 04/24/2014 - 22:11
काही काळजी करू नका हो, सगळं व्यवस्थित होईल. कायद्याने तुमचे कोण काही वाकडे करू शकत नाही. फाट्यावर मारा पुढे चला. मलाही दोन मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यावर माझे बरेच नातेवाईक येवून माझे सांत्वन करू लागले. मी संतापून म्हणालो "आयला मला काही दुख: नाही आहे तुम्ही कशाला एवढे सांत्वन करताय ? असे काही बोलायचे असेल तर हॉस्पिटल मध्ये कृपा करून येवू नका"

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 22:15
आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
तुमची तुम्ही म्हणता ती मालमत्ता स्वकष्टार्जित (म्हणजे तुम्ही आनि तुमच्या नवर्‍याने मिळवलेली) आहे का? जर तशी असेल तर वरील वाक्याला अर्थ उरत नाही. स्वकष्टार्जित मालमत्ता तुम्ही तुमच्या मुलींना द्या किंवा गल्लीत वाटून टाका, तो तुमचा अधिकार आहे. जर तुमची मालमत्ता स्वकष्टार्जित आणि पुष्कळ (सबस्टॅन्शियल) असेल तर गावातला सगळ्यात चांगला इस्टेट वकील बघून (मग तो कितीही पैसे चार्ज करत असला तरी तोच घ्या!)तुमचं विल आणि ट्रस्ट करून टाका. तुमचं वय जर चाळीसच्या पुढे असेल तर ही बाब निकडीची आहे.

जेनी... गुरुवार, 04/24/2014 - 22:27
मला एक पटलं नाहि ... जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ... म्हणजे मला म्हणायचय कि इतकं काय लोकांचं ऐकायचं ... दुसर्या लोकांचं एक ऐकलं का मग त्यांच्या अपेक्षा वाढत जातात .. त्यांना वाटतं मग आपलं दुसरं पण ह्यांनी ऐकावं दुसरा चांस तुम्ही स्वखुशीने ... स्वताहाला हवा असताना घ्यायला हवा होता ...

In reply to by शुचि

सुबोध खरे Fri, 04/25/2014 - 13:08
@शुचि ताइ सीता के वनवास जाने मी बडी सीख है सीता के वनवास जाने मी बडी सीख है घरमे तीन तीन सांस हो तो जंगल हि ठीक है

In reply to by जेनी...

पिवळा डांबिस Fri, 04/25/2014 - 00:03
जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ...
कुणाला कशाचं तर पूजेला कशाचं!!! ओ सासूबाई, वाचताय ना? तुमचा धाक कमी होत चाल्लाय हो!!! :)

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 23:46
आपण मेल्यावर काही का होईना, जिवंत असेपर्यंत दुसर्‍या कोणाचं कशाला ऐकावं?
जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
असं तुमच्या जाऊबै म्हणाल्या वाट्टं! तिला मान काय घ्यायचा तो घेऊ दे की! वडिलोपार्जित इस्टेट काय असेल त्यात तुमचा नवरा, दीर, नंणंद सगळ्यांचा सारखाच हक्क आहे. ती इस्टेट पुढे दोन्ही मुलींना सारखी मिळेल. त्यात या दीर जाऊ इ लोकांचा काही संबंध नाही. आणि मुलगा दत्तक घ्या म्हणणारे कोण ते येडपट? तुमच्या मुलींना सांभाळायला ते आले होते का? मग झक मारू देत ना!

नगरीनिरंजन Fri, 04/25/2014 - 05:30
वा वा पहिलाच लेख! दोन मुलींच्या ऐवजी मुलगे असते तर लेखिकेला मिसळपाववर पहिला लेख लिहायची उसंत मिळाली नसती; तरीही स्वागत आहे! बाकी लग्न-बिग्नादि सांस्कृतिक गोष्टींच्या मुळाशी फक्त अर्थव्यवहार असल्याने असे अनुभव आले त्यात काही आश्चर्य नाही. एकतर या निव्वळ संपत्ती रक्षणासाठीच निर्माण झालेल्या लग्नाच्या व्यवस्थेचा स्विकार करु नये आणि केलाच आहे तर जी तिची रीत आहे त्याप्रमाणे आलेले अनुभव स्विकारावे. तरी आधुनिक काळात कायदा आणि बराचसा समाजही मुलींच्या बाजूने असल्याने तुमच्या मुलींनाच तुमची संपत्ती मिळेल. काळजी नसावी. मुळात भविष्यात काय घडेल हे माहित नसताना आपल्या संपत्तीचा विचार करत बसणारे लोक डोक्यात जातात आणि त्यांना महत्त्व देणारेही तेवढेच डोक्यात जातात. आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 08:38
आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.
अगदी खरे. खरेतर हेच महत्वाचे आहे. आणि 'प्रेम' हे मूल्य सर्वोपरी महत्वाचे. तरी सुद्धा 'सावधपण सर्वविषयी'हवेच.

कंजूस Fri, 04/25/2014 - 08:40
तुमच्या नवऱ्याला जो वडीलेपार्जितवाटणीचा हिस्सा मिळणार तो पुढे जावयांपर्यँत पोहोचणार हे त्यांना नको आहे .तसा तो आत्याच्या(नणंदेच्या)नवऱ्यापर्यँत जाणार त्याचेमात्र सुतक नसते . बाकी मुलगे असणाऱ्यांना प्रॉपटीची भांडणे म्हातारपणी बघत बसावी लागतातच .मुलांच्या आधाराने राहिल्यास ब्लैकमेल करतात आणि छळतात .परदेशात आईबाप पोरांना विशीला XXच्यावर मारून हाकलतात आणि स्वतंत्र राहातात पण उतारवयात कोणी पाहात नाही . वंशवेल ही कल्पना खोटी आहे .उतारवयात आपलं कसं होणार हा खरा विचार असतो .दोन्ही पध्दतीत फायदे तोटे आहेत .बाळपणी आणि म्हातारपणी सुख केवळ नशिबाने मिळते ते विकत अथवा कष्टाने मिळत नाही .

त्यामुळे आता प्रॉपर्टीसाठी पुन्हा डान्स न करणं उत्तम. मुलींचं उत्तम संगोपन करुन जावयांनाच पुत्र माना म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Fri, 04/25/2014 - 13:02
म्हणजे तुम्हाला मुलगा हवाच आहे असा अर्थ निघतो. कशाला जावयाला पुत्र माना. जावयाने पैसे मागितले तर अवघड जागी दुखणे होते. मुलासारखे स्वच्छ सांगता येईल का पैसे मिळणार नाहीत म्हणून. साधे सरळ मला दोन मुली( किंवा मुलगे) आहेत त्यांच्या बाललीलांचा आनंद घ्या. त्यांना मोठे होताना बघताना जो आनंद होतो त्याचा उपभोग घ्या कि. जावयाला पुत्र माना ( किंवा सुनेला मुलगी माना) हा आव कशासाठी?

In reply to by सुबोध खरे

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 13:12
बरोब्बर.. मुलीला मुलगा माना.. जावयाला मुलगा माना.. कुणाला न कुणाला तरी "मुलगा" मानाच हे काय नाटक आहे.. ज्या त्या नात्याला, त्या त्या हिशोबानी वागवायचं असतं..

In reply to by सुबोध खरे

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 13:16
+++++++++++++++++++ १११११ . सून कधीही मुलगी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सासू हि सासूच असते . जावई कधीच मुलगा बनू शकत नाही . फारच थोडे अगदी बोटावर मोजण्या इतके देखील अपवाद असतील कि नाही माहिती नाही . उगीचं का जावयाला पत्रिकेतला ग्रह म्हटले जाते ? कित्येक वर्षे झाली तरी बर्याच गोष्टी होत्या तशाच आहेत . सुखावह बदल फारच कमी आहेत . कृपया इथे दुसर्यांची उदाहरणे देऊ नये . अमका-तमका/अमकी-तमकी कसा/कशी मुलासारखा / मुलीसारखी आहे इई. शेवटी मुला-मुली , आई-वडील यासारख असण वेगळ आणी प्रत्यक्षात ते नात असण वेगळं.

In reply to by दिव्यश्री

शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात. मुलीला मुलगा माना, सुनेला मुलगी माना किंवा जावयाला मुलगा माना (किंवा पत्नीला परस्त्री माना!) सगळा वैयक्तिक दृष्टीकोन आणि पारस्पारिक संबंध आहे. मी स्वतः (नातं काय आहे यापेक्षा) समोरच्या प्रसंगात काय योग्य आणि आवश्यक आहे त्याप्रमाणे निर्णय घेतो. मग मुलगा असो, पत्नी, आई की वडील. त्यामुळे जावई पैसे मागतोयं, की मुलगा, की भाऊ, की मित्र यापेक्षा प्रसंग काय आहे आणि घेणार्‍याची सचोटी आणि निकड काय आहे हा निकष राहातो. तस्मात आर्थिक असो की भावनिक कोणत्याही प्रसंगात कधीही पश्चात्तापाची वेळ येत नाही. लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं. कारण खरा मुद्दा असा आहे... 'म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल'.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 14:11
लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं
दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं आवश्यक आहे काय? त्यांच्या मुलीच खंबीर होऊन त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ शकतातच ना. "जावयाला मुलगा माना" ह्याची आवश्यकताच काय? "मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का? मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

आवश्यक आहे काय? नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
"मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का?
इथे मुला-मुलीचा प्रश्न कुठे येतो. प्रत्येक मूल खंबीरच असायला असाच पालकाचा प्रयत्न असतो.
मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?
नाही. मन स्वस्थ होण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो मग संपत्ती असली काय, मुलगी असली काय आणि मुलगा नसला काय कशानं काही फरक पडत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 14:23
नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
आँ? म्हणजे त्यांनी कुणाला न कुणाला मुलगा मानलं की त्यांना दिलासा मिळणारे का? अहो नाही हो.. त्या अगदी उलट म्हणत आहेत.. असो..

In reply to by पिलीयन रायडर

हे लेख वाचून लक्षात येत नाही काय? त्यांना मुलीला मुलगा मानता येत असतं तर विषयच संपला होता.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 14:34
पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील
त्यांनी इथे फक्त त्यांचा अनुभव मांडलाय.. थोडी भीती दर्शवली आहे इतकंच.. पण आपल्या मुलींबाबतच्या मतांवर त्या ठम आहेतच.. कुणाला मुलगा मानु हा त्यांचा प्रश्न नाहिचे (आणि तसं करायची काही एक गरजही नाहीये).. त्या मुलींमध्ये सुखी आहेत..

In reply to by पिलीयन रायडर

त्या भीतीवर तर मी उपाय सांगितलायं! आणि तो नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकपुत्र या संभ्रमापेक्षा सोयीचा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 14:29
+++ १ . प्रसंगानुरूप सगळीच नाती बदलतात . म्हणून याला हे माना त्याला ते माना याची गरजच नाही . रादर तो पर्याय होऊच शकत नाही . जे आहे ते आहे आणि ते कायम तसंच असतचं . आहे ती नाती आधी योग्य प्रकारे सांभाळावीत म्हणजे मग मानलेल्या नात्यांना वागवाव लागत नाही . आई बापाशी संबंध तोडून सासुर्याना आईबाप मानण हे किती जणांना रुचेल आणि त्यांच्या सख्ख्या आईबापाला काय वाटेल याचा विचार केलात का? आणि व्हायीस व्हर्सा . स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ??? मला सांगू नका स्वतःच उत्तर प्रामाणिक असू द्या म्हणजे झाल . सुनेने मात्र परंपरा /रूढी म्हणून सासरीच यायचं . माहेर विसरायचं ई. असो गाडं भलतीकडेच जायचं .

In reply to by दिव्यश्री

जावई घरीच हवा हा अट्टाहास कशापायी? त्यानं मुलींशी सुखात संसार केला आणि सासू-सासर्‍यांचा अडचणीला उपयोगी पडला की झालं.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 14:46
तेच ना लांब राहून करायचं . अगदी अडचणीच्या वेळी सासू सासर्यांनी काय करायचं ? कुठे जावयाला शोधायचं ? जर तो दुसर्या शहरात / राज्यात / देशात असेल तर . याला म्हणतात काडीने औषध लावणे . म्हणजे काय आपण करतो , काळजी आहे हे दाखवायचं पण लांबून . घराजावइ असावा ही अपेक्षाच नसते कोणाला कारण जगजाहीरच आहे . असो . रक्ताची नाती ती रक्ताची नातीच . काही वेळा मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात पण ती मनापासून असली तर जस कि मैत्रीच नात . ते कोणी जबरदस्ती केली म्हणून वागवल/ ताणल जात नाही . ते अगदी आतून असत . इष्टेटीसाठी / स्वार्थासाठी जर नाती जोडायची /मानायची असतील तर बोलायलाच नको .

In reply to by दिव्यश्री

रक्ताची नाती ती रक्ताची नातीच
वस्तुस्थिती तशी नाही....कारण
शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 14:59
असो . कितीही लिहाल तरी कमीच आहे . कारण माझा मुद्दा मला योग्यच वाटतोय तसाच तुमचा तुम्हाला . चर्चा भरकटण्या आधी थांबणे योग्य .

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 13:32
जग कुठे चाललाय आपण कुठे चाललोय . दुसरे लोक इतके महत्वाचे असतात का आपल्या आयुष्यात कि आपण आपले महत्वाचे निर्णय त्यांच्यानुसार घ्यायचे/बदलायचे? तुम्ही सुशिक्षित दिसता . कायद्याच थोडाफार ज्ञान सगळ्यांनाच असत . कमीत कमी स्वतःच्या फायद्याच ग्यान तर नक्कीच . मग हे काय ???? स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशावर / मालमत्तेवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकेल ? चांगला वकील बघा , चांगला सल्ला घ्या . तो जास्त उपयोगी पडेल तुमच्या असल्या फालतू आणि खालच्या दर्जाच्या विचारसरणीच्या माणसांपेक्षा . बाकी सगळ्यांनी योग्यच सांगितलं आहे . मुली आहेत मुलींसारख वागवा . कराटे शिकवा , टफ बनवा , दुनियादारी हळूहळू समजावा . एक मैत्रीण ढसाढसा रडत होती . वडील गेले जानेवारीत . आठव्या दिवसापासून मोठा भाऊ भांडतोय आईशी इष्टेटी साठी . आईकडे बघत नाही . नुसता छळवाद मांडलाय . बर त्याला काही कमी नाही परदेशात राहतो , नोकरी करतो त्यालाही एकाच मुलगा आहे . मनात म्हंटल थांब ग त्याच्यावर हि वेळ येयीलच कधीतरी .

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 12:46
पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन. या महत्वाच्या विषयावर योग्य ती चर्चा इथे घडून यावी, असे वाटते.

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 12:47
जे लोक असा वाटा मागतील त्यांना सरळ तोंडावर सुनवा: आमची प्रॉपर्टी अन आमच्या मुली काय ते बघून घेतील, मध्ये निर्लज्ज हावरटागत बोलायचं काम नाही. असले दीडदमडीचे लोक डोक्यात जातात.

In reply to by सुब्बु

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 13:13
मामला प्रॉपर्टी वगैरेचा आहे, तर आत्तापासूनच या विषयीच्या कायदे-कानून इ. ची व्यवस्थित माहिती काढून ठेवावी. पुढचे अनेक त्रास वेळीच व्यवस्थित माहिती करून घेण्यामुळे वाचतील. तुम्हा उभयतांच्या पश्चात तुमच्या वाट्याची प्रॉपर्टी मुलींना मिळावी, यासाठी कायदेशीर तजवीज करून ठेवावी (जरी मुली अद्याप लहान असल्या तरिही). 'सावधपण सर्वविषयी' असे समर्थ सांगून गेलेतच.

राही गुरुवार, 04/24/2014 - 13:02
निदान महाराष्ट्रात तरी आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना त्यांच्या वारसाहक्कउतरंडीच्या प्रमाणात हिस्सा मिळतो असे ऐकले आहे.

बाबा पाटील गुरुवार, 04/24/2014 - 13:40
तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही व तुमच्या दोन्ही मुली सोडुन कोनाचाही कायदेशिर हक्क होवु शकत नाही.त्यामुळे असला विचार सोडा,दुसर सगळ्यात महत्वाच लेकींना फिजिकल आणी मेंटली इतक स्ट्रांग बनवा की त्यांना हिस्सेदारी मागण्याची कोनाच्या बापाची हिंमत होणार नाही.या साठी कराटे क्लास्,योग या सर्व गोष्टींचा अवलंब करा. साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासुन कराटे क्लास लावा. ती पाचवीला जाईपर्यंत ब्लॅक बेल्ट होते. यामुळे फक्त शाररीक नाही तर माणसिक सुदृढता देखिल यामुळे मिळते.दुसरी गोष्ट मोठ्या कन्येला आत्तापासुनच तिला सर्व गोष्टी पहायच्या आहेत याची जाणिव करुन देत जा.कारण कधी कशी वेळ आयुष्यात येईल हे कोनीच सांगू शकत नाही.तिच बालपण हरवु देवु नका पण जबाबदारी देखिल शिकवा.तुमच्या इनव्हेस्टमेंट , अ‍ॅसट्स, कर्जे याची माहिती गप्पा मारता मारता सहज तिच्या कानावर पडेल अस बोलत जा.बराच फरक पड्तो.(मी देखिल दोन लेकींचा बाप आहे पण याचे वाईट किंवा भिती मला कधीच वाटत नाही.माझी मोठी लेक कराटे,स्केटींग,शुटींग,स्विमिंग,नाचण् आणी जमलच तर थोडाफार अभ्यास असे सगळच करते.मीच काय माझ्या अख्या खाणदानात तिच्या कुठल्या गोष्टींवर हक्क सांगायची कोनाचीच हिंमत नाही.)त्यामुळे तुम्हीही ही खंबिर बना आणी लेकींना देखिल खंबिर बनवा.

पिलीयन रायडर गुरुवार, 04/24/2014 - 13:41
लोक काय काहीही बोलतात हो.. त्यांना फाटयावर मारायचं अस्तं (म्हणजे लक्ष द्यायचं नाही..) तुम्हाला मुली असोत वा मुलगे.. तुमची "स्वकष्टार्जित" संपत्ती तुमच्याच लेकरांना मिळते. बाकीच्यांचा काहिही संबंध नाही. बाकी जी संपत्ती वाडवडिलांकडुन मिळाली असेल तिच्या वरही तुमच्या मुलींचा "कायद्याने" मुलांएवढाच हक्क आहे. तरीही वाटत असल्यास "मृत्युपत्र / इच्छापत्र" करुन ठेवा. ही त्या विषयीची माहिती:- स्वतःच तयार करा - स्वतःचे इच्छापत्र!

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 14:05
सल्ले देणारांना फक्त म्हणायचं....'तुम्हाला विचारलंय?' बाकी असे प्रॉपर्टीबद्दल बोलणारांना 'तुम्ही बांगड्या भरल्यात काय, तुम्हाला पैसे मिळवायला काय झालंय' असा प्रश्न विचारा. (स्त्रीवादी येतील भांडायला, त्यांचा विचार करु नका, बांगड्या 'कम्फर्टेबल नसल्यानं' काम करताना काढून ठेवलेल्या बायकाच भांडायला येतील, डोन्ट वरी!)

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 16:19
अजूनही अशी मानसिकता असलेली माणसे आहेत हे ऐकून वाईट वाटले आणि रागही आला . पण तु म्ही भाग्यवान आहात ़ कारण Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.

In reply to by मनीषा

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 16:22
Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.
हा पुरुषद्वेष्टा कोट टाकायची इथे गरज नव्हती असे वाटते. बहुत काय लिहिणे, तुम्ही सूज्ञ असा.

In reply to by प्यारे१

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 16:59
+२ अब्राहम लिंकन म्हणाला होता - "मला गुलामगिरीचा तिटकारा आहे. याचा अर्थ गुलामांप्रति प्रेम आहे असा होत नाही."

In reply to by आयुर्हित

यसवायजी गुरुवार, 04/24/2014 - 17:04
कैच्याकै. असा विचार करणारे आई-बाप 'दुखी आत्मा' कॅटॅगरीत मोडतात. बिचार्‍या मुलांचे मधल्यामध्ये हाल होतात. अनुभवाचे बोल असतील तरी जनरलाइझ करु नका.

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 16:28
हां विचार करणारच आहेत, नावे कुणा कुणाला ठेवणार ? मुली सुध्दा अमुक तमुक मुलाची इस्टेट नोकरी काय आहे बघुनच त्याला जवळ करतात मग या या एकुण प्रकारात अनैसर्गिक काय आहे ?

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 16:33
जी सुशिक्षित पार्श्वभूमी आपल्या कुटुंबाची दिलेली आहे तिथे वारस कोण हां प्रश्नच निर्माण हॉट नाही कायदा मुलगा मुलगी फरक करत नाही हे शेन्बड्या पोरालाही आता ठाउक असते.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 16:49
मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील. या लिखाणावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला सगळं माहिती तर आहे. आता फक्त तेच आचरणात आणा. कायदाही तेच म्हणतो आहे. लोक काय दोन्ही बाजूनी बोंब मारण्यात पटाइत असतात. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हा मंत्र नीट लक्षात ठेवा म्हणजे झाले. हाकानाका.

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 18:14
जयवंत दळवींच्याच एका नाटकात उद्गार आहेत - मुलाला खाली बोटभर असतं ते सोन्याचं असतं का? अर्थात - मुलगा हवा मुलगा हवा अशी जी अडाणी अन दुर्दैवी हौस असते त्यावर ओढलेला कोरडा आहे.

एसमाळी गुरुवार, 04/24/2014 - 18:24
पाहता लेखिकेची भिती अनाठायी आहे.बाकी मुलींच्या नावे संपत्ती करताना स्वत:ची तजविज करुन ठेवा. अशी बरीच प्रकरण पाहिली आहेत की मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित. (अपवादात्मक)

In reply to by एसमाळी

रेवती गुरुवार, 04/24/2014 - 18:44
सहमत. आपली अपत्ये, कायदेकानून बर्‍यापैकी जागेवर असताना लोकांच्या (अगदी नातेवाईकांच्याही) बोलण्याला भीक घालायचे दिवस संपले. म्हणजे तसे ते कधी नव्हते पण आपणच जरा भाव देत होतो. परंपरागत संपत्तीबाबत तुमच्या यजमानांच्या वाटयाला काय यायचे त्यातच भेदभाव केवळ 'तुम्हाला मुली असणे' या कारणामुळे होतोय असे तुमचे म्हणणे आहे की काय ते समजले नाही.

In reply to by एसमाळी

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 19:04
मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित.
खरं आहे. पण एसमाळीजी एकवेळ तसं परवडलं पण हगल्या-पादल्या कारणावरुन भांडून माहेरी येऊन, पालकांच्या डोक्याला कल्हई करणार्‍या मुली नकोत. तशाही पाहील्यात म्हणून म्हणते.

एसमाळी गुरुवार, 04/24/2014 - 20:23
शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. पाल्याला न विचारणारी किंवा रडत भेकत माहेरी येणार्या मुली एकाच वर्गात येतील.रेवती ताईंच्या प्रतिसादातील शेवटचा भाग समजला नाही .

In reply to by एसमाळी

हाडक्या गुरुवार, 04/24/2014 - 20:54
गडबड होतेय हो.. पाल्य नाही पालक .. पाल्य म्हणजे अपत्य आणि पालक म्हणजे त्यांचे पालन पोषण करणारे..

In reply to by एसमाळी

रेवती Fri, 04/25/2014 - 02:55
आजी आजोबा जर म्हणायला लागले की "मुला, तुला रे वाटणी घेऊन काय करायची? तुला मुली आहेत तर देत नाही, किंवा कमी देऊ" असा अर्थ आहे.

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 20:53
एकंदरित स्थावर जंगम वगैरे सर्व मालमत्ता, मुलगे असोत वा मुली, माय-बापाच्या मृत्यूनंतरच वारसांना मिळावी, अशी तजवीज करणेच जास्त चांगले, असे अनेक उदाहरणावरून दिसून येते.

खटपट्या गुरुवार, 04/24/2014 - 22:11
काही काळजी करू नका हो, सगळं व्यवस्थित होईल. कायद्याने तुमचे कोण काही वाकडे करू शकत नाही. फाट्यावर मारा पुढे चला. मलाही दोन मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यावर माझे बरेच नातेवाईक येवून माझे सांत्वन करू लागले. मी संतापून म्हणालो "आयला मला काही दुख: नाही आहे तुम्ही कशाला एवढे सांत्वन करताय ? असे काही बोलायचे असेल तर हॉस्पिटल मध्ये कृपा करून येवू नका"

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 22:15
आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
तुमची तुम्ही म्हणता ती मालमत्ता स्वकष्टार्जित (म्हणजे तुम्ही आनि तुमच्या नवर्‍याने मिळवलेली) आहे का? जर तशी असेल तर वरील वाक्याला अर्थ उरत नाही. स्वकष्टार्जित मालमत्ता तुम्ही तुमच्या मुलींना द्या किंवा गल्लीत वाटून टाका, तो तुमचा अधिकार आहे. जर तुमची मालमत्ता स्वकष्टार्जित आणि पुष्कळ (सबस्टॅन्शियल) असेल तर गावातला सगळ्यात चांगला इस्टेट वकील बघून (मग तो कितीही पैसे चार्ज करत असला तरी तोच घ्या!)तुमचं विल आणि ट्रस्ट करून टाका. तुमचं वय जर चाळीसच्या पुढे असेल तर ही बाब निकडीची आहे.

जेनी... गुरुवार, 04/24/2014 - 22:27
मला एक पटलं नाहि ... जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ... म्हणजे मला म्हणायचय कि इतकं काय लोकांचं ऐकायचं ... दुसर्या लोकांचं एक ऐकलं का मग त्यांच्या अपेक्षा वाढत जातात .. त्यांना वाटतं मग आपलं दुसरं पण ह्यांनी ऐकावं दुसरा चांस तुम्ही स्वखुशीने ... स्वताहाला हवा असताना घ्यायला हवा होता ...

In reply to by शुचि

सुबोध खरे Fri, 04/25/2014 - 13:08
@शुचि ताइ सीता के वनवास जाने मी बडी सीख है सीता के वनवास जाने मी बडी सीख है घरमे तीन तीन सांस हो तो जंगल हि ठीक है

In reply to by जेनी...

पिवळा डांबिस Fri, 04/25/2014 - 00:03
जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ...
कुणाला कशाचं तर पूजेला कशाचं!!! ओ सासूबाई, वाचताय ना? तुमचा धाक कमी होत चाल्लाय हो!!! :)

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 23:46
आपण मेल्यावर काही का होईना, जिवंत असेपर्यंत दुसर्‍या कोणाचं कशाला ऐकावं?
जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
असं तुमच्या जाऊबै म्हणाल्या वाट्टं! तिला मान काय घ्यायचा तो घेऊ दे की! वडिलोपार्जित इस्टेट काय असेल त्यात तुमचा नवरा, दीर, नंणंद सगळ्यांचा सारखाच हक्क आहे. ती इस्टेट पुढे दोन्ही मुलींना सारखी मिळेल. त्यात या दीर जाऊ इ लोकांचा काही संबंध नाही. आणि मुलगा दत्तक घ्या म्हणणारे कोण ते येडपट? तुमच्या मुलींना सांभाळायला ते आले होते का? मग झक मारू देत ना!

नगरीनिरंजन Fri, 04/25/2014 - 05:30
वा वा पहिलाच लेख! दोन मुलींच्या ऐवजी मुलगे असते तर लेखिकेला मिसळपाववर पहिला लेख लिहायची उसंत मिळाली नसती; तरीही स्वागत आहे! बाकी लग्न-बिग्नादि सांस्कृतिक गोष्टींच्या मुळाशी फक्त अर्थव्यवहार असल्याने असे अनुभव आले त्यात काही आश्चर्य नाही. एकतर या निव्वळ संपत्ती रक्षणासाठीच निर्माण झालेल्या लग्नाच्या व्यवस्थेचा स्विकार करु नये आणि केलाच आहे तर जी तिची रीत आहे त्याप्रमाणे आलेले अनुभव स्विकारावे. तरी आधुनिक काळात कायदा आणि बराचसा समाजही मुलींच्या बाजूने असल्याने तुमच्या मुलींनाच तुमची संपत्ती मिळेल. काळजी नसावी. मुळात भविष्यात काय घडेल हे माहित नसताना आपल्या संपत्तीचा विचार करत बसणारे लोक डोक्यात जातात आणि त्यांना महत्त्व देणारेही तेवढेच डोक्यात जातात. आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 08:38
आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.
अगदी खरे. खरेतर हेच महत्वाचे आहे. आणि 'प्रेम' हे मूल्य सर्वोपरी महत्वाचे. तरी सुद्धा 'सावधपण सर्वविषयी'हवेच.

कंजूस Fri, 04/25/2014 - 08:40
तुमच्या नवऱ्याला जो वडीलेपार्जितवाटणीचा हिस्सा मिळणार तो पुढे जावयांपर्यँत पोहोचणार हे त्यांना नको आहे .तसा तो आत्याच्या(नणंदेच्या)नवऱ्यापर्यँत जाणार त्याचेमात्र सुतक नसते . बाकी मुलगे असणाऱ्यांना प्रॉपटीची भांडणे म्हातारपणी बघत बसावी लागतातच .मुलांच्या आधाराने राहिल्यास ब्लैकमेल करतात आणि छळतात .परदेशात आईबाप पोरांना विशीला XXच्यावर मारून हाकलतात आणि स्वतंत्र राहातात पण उतारवयात कोणी पाहात नाही . वंशवेल ही कल्पना खोटी आहे .उतारवयात आपलं कसं होणार हा खरा विचार असतो .दोन्ही पध्दतीत फायदे तोटे आहेत .बाळपणी आणि म्हातारपणी सुख केवळ नशिबाने मिळते ते विकत अथवा कष्टाने मिळत नाही .

त्यामुळे आता प्रॉपर्टीसाठी पुन्हा डान्स न करणं उत्तम. मुलींचं उत्तम संगोपन करुन जावयांनाच पुत्र माना म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Fri, 04/25/2014 - 13:02
म्हणजे तुम्हाला मुलगा हवाच आहे असा अर्थ निघतो. कशाला जावयाला पुत्र माना. जावयाने पैसे मागितले तर अवघड जागी दुखणे होते. मुलासारखे स्वच्छ सांगता येईल का पैसे मिळणार नाहीत म्हणून. साधे सरळ मला दोन मुली( किंवा मुलगे) आहेत त्यांच्या बाललीलांचा आनंद घ्या. त्यांना मोठे होताना बघताना जो आनंद होतो त्याचा उपभोग घ्या कि. जावयाला पुत्र माना ( किंवा सुनेला मुलगी माना) हा आव कशासाठी?

In reply to by सुबोध खरे

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 13:12
बरोब्बर.. मुलीला मुलगा माना.. जावयाला मुलगा माना.. कुणाला न कुणाला तरी "मुलगा" मानाच हे काय नाटक आहे.. ज्या त्या नात्याला, त्या त्या हिशोबानी वागवायचं असतं..

In reply to by सुबोध खरे

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 13:16
+++++++++++++++++++ १११११ . सून कधीही मुलगी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सासू हि सासूच असते . जावई कधीच मुलगा बनू शकत नाही . फारच थोडे अगदी बोटावर मोजण्या इतके देखील अपवाद असतील कि नाही माहिती नाही . उगीचं का जावयाला पत्रिकेतला ग्रह म्हटले जाते ? कित्येक वर्षे झाली तरी बर्याच गोष्टी होत्या तशाच आहेत . सुखावह बदल फारच कमी आहेत . कृपया इथे दुसर्यांची उदाहरणे देऊ नये . अमका-तमका/अमकी-तमकी कसा/कशी मुलासारखा / मुलीसारखी आहे इई. शेवटी मुला-मुली , आई-वडील यासारख असण वेगळ आणी प्रत्यक्षात ते नात असण वेगळं.

In reply to by दिव्यश्री

शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात. मुलीला मुलगा माना, सुनेला मुलगी माना किंवा जावयाला मुलगा माना (किंवा पत्नीला परस्त्री माना!) सगळा वैयक्तिक दृष्टीकोन आणि पारस्पारिक संबंध आहे. मी स्वतः (नातं काय आहे यापेक्षा) समोरच्या प्रसंगात काय योग्य आणि आवश्यक आहे त्याप्रमाणे निर्णय घेतो. मग मुलगा असो, पत्नी, आई की वडील. त्यामुळे जावई पैसे मागतोयं, की मुलगा, की भाऊ, की मित्र यापेक्षा प्रसंग काय आहे आणि घेणार्‍याची सचोटी आणि निकड काय आहे हा निकष राहातो. तस्मात आर्थिक असो की भावनिक कोणत्याही प्रसंगात कधीही पश्चात्तापाची वेळ येत नाही. लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं. कारण खरा मुद्दा असा आहे... 'म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल'.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 14:11
लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं
दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं आवश्यक आहे काय? त्यांच्या मुलीच खंबीर होऊन त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ शकतातच ना. "जावयाला मुलगा माना" ह्याची आवश्यकताच काय? "मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का? मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

आवश्यक आहे काय? नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
"मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का?
इथे मुला-मुलीचा प्रश्न कुठे येतो. प्रत्येक मूल खंबीरच असायला असाच पालकाचा प्रयत्न असतो.
मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?
नाही. मन स्वस्थ होण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो मग संपत्ती असली काय, मुलगी असली काय आणि मुलगा नसला काय कशानं काही फरक पडत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 14:23
नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
आँ? म्हणजे त्यांनी कुणाला न कुणाला मुलगा मानलं की त्यांना दिलासा मिळणारे का? अहो नाही हो.. त्या अगदी उलट म्हणत आहेत.. असो..

In reply to by पिलीयन रायडर

हे लेख वाचून लक्षात येत नाही काय? त्यांना मुलीला मुलगा मानता येत असतं तर विषयच संपला होता.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Fri, 04/25/2014 - 14:34
पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील
त्यांनी इथे फक्त त्यांचा अनुभव मांडलाय.. थोडी भीती दर्शवली आहे इतकंच.. पण आपल्या मुलींबाबतच्या मतांवर त्या ठम आहेतच.. कुणाला मुलगा मानु हा त्यांचा प्रश्न नाहिचे (आणि तसं करायची काही एक गरजही नाहीये).. त्या मुलींमध्ये सुखी आहेत..

In reply to by पिलीयन रायडर

त्या भीतीवर तर मी उपाय सांगितलायं! आणि तो नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकपुत्र या संभ्रमापेक्षा सोयीचा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 14:29
+++ १ . प्रसंगानुरूप सगळीच नाती बदलतात . म्हणून याला हे माना त्याला ते माना याची गरजच नाही . रादर तो पर्याय होऊच शकत नाही . जे आहे ते आहे आणि ते कायम तसंच असतचं . आहे ती नाती आधी योग्य प्रकारे सांभाळावीत म्हणजे मग मानलेल्या नात्यांना वागवाव लागत नाही . आई बापाशी संबंध तोडून सासुर्याना आईबाप मानण हे किती जणांना रुचेल आणि त्यांच्या सख्ख्या आईबापाला काय वाटेल याचा विचार केलात का? आणि व्हायीस व्हर्सा . स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ??? मला सांगू नका स्वतःच उत्तर प्रामाणिक असू द्या म्हणजे झाल . सुनेने मात्र परंपरा /रूढी म्हणून सासरीच यायचं . माहेर विसरायचं ई. असो गाडं भलतीकडेच जायचं .

In reply to by दिव्यश्री

जावई घरीच हवा हा अट्टाहास कशापायी? त्यानं मुलींशी सुखात संसार केला आणि सासू-सासर्‍यांचा अडचणीला उपयोगी पडला की झालं.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 14:46
तेच ना लांब राहून करायचं . अगदी अडचणीच्या वेळी सासू सासर्यांनी काय करायचं ? कुठे जावयाला शोधायचं ? जर तो दुसर्या शहरात / राज्यात / देशात असेल तर . याला म्हणतात काडीने औषध लावणे . म्हणजे काय आपण करतो , काळजी आहे हे दाखवायचं पण लांबून . घराजावइ असावा ही अपेक्षाच नसते कोणाला कारण जगजाहीरच आहे . असो . रक्ताची नाती ती रक्ताची नातीच . काही वेळा मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात पण ती मनापासून असली तर जस कि मैत्रीच नात . ते कोणी जबरदस्ती केली म्हणून वागवल/ ताणल जात नाही . ते अगदी आतून असत . इष्टेटीसाठी / स्वार्थासाठी जर नाती जोडायची /मानायची असतील तर बोलायलाच नको .

In reply to by दिव्यश्री

रक्ताची नाती ती रक्ताची नातीच
वस्तुस्थिती तशी नाही....कारण
शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 14:59
असो . कितीही लिहाल तरी कमीच आहे . कारण माझा मुद्दा मला योग्यच वाटतोय तसाच तुमचा तुम्हाला . चर्चा भरकटण्या आधी थांबणे योग्य .

दिव्यश्री Fri, 04/25/2014 - 13:32
जग कुठे चाललाय आपण कुठे चाललोय . दुसरे लोक इतके महत्वाचे असतात का आपल्या आयुष्यात कि आपण आपले महत्वाचे निर्णय त्यांच्यानुसार घ्यायचे/बदलायचे? तुम्ही सुशिक्षित दिसता . कायद्याच थोडाफार ज्ञान सगळ्यांनाच असत . कमीत कमी स्वतःच्या फायद्याच ग्यान तर नक्कीच . मग हे काय ???? स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशावर / मालमत्तेवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकेल ? चांगला वकील बघा , चांगला सल्ला घ्या . तो जास्त उपयोगी पडेल तुमच्या असल्या फालतू आणि खालच्या दर्जाच्या विचारसरणीच्या माणसांपेक्षा . बाकी सगळ्यांनी योग्यच सांगितलं आहे . मुली आहेत मुलींसारख वागवा . कराटे शिकवा , टफ बनवा , दुनियादारी हळूहळू समजावा . एक मैत्रीण ढसाढसा रडत होती . वडील गेले जानेवारीत . आठव्या दिवसापासून मोठा भाऊ भांडतोय आईशी इष्टेटी साठी . आईकडे बघत नाही . नुसता छळवाद मांडलाय . बर त्याला काही कमी नाही परदेशात राहतो , नोकरी करतो त्यालाही एकाच मुलगा आहे . मनात म्हंटल थांब ग त्याच्यावर हि वेळ येयीलच कधीतरी .
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे. मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक. मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो. काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही .

रेडीओ

मालविका ·

समीरसूर गुरुवार, 04/24/2014 - 16:01
मनापासून लिहिलेला छान लेख! आठवणींची सोबत मनाला फार भावते. तुम्ही कुठल्या देशात आहत? तिथे आणखी काही सुखद आठवणींचा खजिना तयार करा...:-)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 17:05
माझ्या लहानपणी (६० च्या दशकात), आमच्या एका सुखवस्तू नातेवाईकांकडे मर्फीचा रेडिओ आला. ट्रान्झीस्टर अजून भारतात आला नव्हता. व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. व्हॉल्व्ह तापून रेडिओचे स्टेशन लागेपर्यंत धीर धरावा लागायचा. तर, सांगायची गोष्ट अशी की घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचं लक्षण होतं. आपली श्रीमंती इतरांच्या लक्षात आणून देण्यासाठी लोकं धडपडायचे. आमच्या 'त्या' श्रीमंत नातेवाईकाने आम्हाला रविवारी सकाळी चहापाण्याला बोलावले. आणि नवा रेडिओ आणल्याचे दाखविले. तेंव्हा सकाळी नऊ (की साडेनऊ) वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा. 'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐकाहो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण' असं त्या कार्यक्रमाचं शिर्षक गीत लागायचं. त्यातलं शेवटचे 'गम्मSSSSत जम्मSSSSत' हे शब्द मला खुप आवडायचे. इथून मुलांचा कार्यक्रम सुरु व्हायचा. तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. दुपारी अडीच वाजता विविधभारती, त्यातील 'फौजी भाईयों कि खिदमत में' सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' आणि अमिन सयानीचं सादरीकरण हा एक हवाहवासा वाटणारा कार्यक्रम होता. अमिन सयानीचे भाऊ हमिद सयानी रविवारी दुपारी 'कॅडबरी क्विझ कॉन्टेस्ट' सादर करायचे तोही माहितीपूर्ण कार्यक्रम होता. रात्री सव्वानऊला 'ईगल फ्लास्क' प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालीका लागायची तर 'हवामहल' कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या. असा सर्वांगिण मनोरंजन आणि ज्ञानाचा धबधबा असलेल्या रेडिओने सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध केले होते. त्याकाळी घरेदारे उघडीच असायची त्यामुळे कोणाकडे स्टोव्हवरून दुध उतू गेलंय (त्याचा विशिष्ट वास असतो), कोणाकडे मांसाहार शिजतो आहे, कोणाकडे कुकरची शिट्टी झाली आहे पासून घरची भांडणं, छोट्यांच्या मारामार्‍या, मोठ्या व्यक्तीचं सातमजली हसणं तर एखाद्या मनमोकळया वृद्धांचे आवाजी वायू निस्सारण ह्या सर्व गदारोळात रेडिओ आपले अस्तित्व जाणवून द्यायचाच. एखादे आवडीचे गाणे लागले असेल तर धावतपळत घरी येऊन रेडिओचा कान पिळायचा आणि ते हिन्दी चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं असेल तर मोठ्यांकडून आपला कान पिळून घ्यायचा हे नित्यनेमाने व्हायचे. अभ्यासात 'ढ' असणार्‍या मुलाला 'रेडिओ दुरुस्ती शिक निदान उपाशी तरी मरणार नाही' असा मोलाचा सल्ला दिला जायचा. ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 18:31
बरेचदा यु ट्युबवर "ceylone song"" सर्च देऊन जुनी गाणी ऐकते. सकाळी जाग यायची तेव्हा बाबांनी सिलोन स्टेशन लावलेलं असायचं. दिवसाची सुरुवातच संगीतमय होत असे.

In reply to by प्रभाकर पेठकर

उपाशी बोका गुरुवार, 04/24/2014 - 21:23
पेठकरकाकांशी सहमत. रेडिओवरील अजून १ आवडता कार्यक्रम आढवतो, तो म्हणजे रविवारी दुपारी २ वाजता लागणारा "क्रिकेट विथ विजय मर्चंट" रेडिओबद्दलचे माझे एक आवडते गाणे

In reply to by प्रभाकर पेठकर

निवेदिता-ताई Fri, 04/25/2014 - 12:48
तुमच्याशी सहमत, या रेडिओमुळेच आपले बालपण समृद्ध झाले आहे, त्या काळी माझ्या वडीलांनी आमच्या खेडेगावात पहिला रेडिओ आणला,मग काय सकाळ संध्याकाळ सगळे कुतुहलाने यायचे, मास्तर बातम्या लावा की, फर्माईश व्हायची, रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकता ऐकायला त्या रेडीओ भोवती कोंडाळे केले जायचे,तसेच रविवारी सकाळी ११ वाजता आपली आवड असायची, बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' तर सर्वांच्या आवडीचीच. पहाटे पासून हा रेडिओ आपले अस्तित्व जाणवुन द्यायचा. पुढे कॉलेजला गेल्यावर सुद्धा ही रेडिओची आवड तशीच राहिली, त्या वेळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती आर्वजुन ऐकत होते. आज सुध्दा सकाळी लवकर उठल्याबरोबर आधी रेडिओ लावते. पुणे स्टेशन मला फार आवडते, सर्वच माहिती तिथे मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा Fri, 04/25/2014 - 13:54
वा प्रभाकरपंत ! आमचं पण लहानपण व रेडिओ च नातं असंच. आमच्या वडिलांनी रेडिओ आणला ते विम्याच्या पैशातून. ( म्हण्जे त्यावेळी विम्याची म्याचुरिटी किंमत काय असेल पहा !!!!! हा ! हा ! ) .अहो पंत ते क्रिकेट विथ विजय मर्चंट राहिलं की ! आपल्या मुबईचा पदमाकर शिवलकर या बोर्नविटा चा मला वाटत> एक डवल ऑर क्विट असा कार्यक्रम आला होता त्यात सर्वात जास्त पैसे कमविलेला स्पर्धक होता. सुशील जव्हेरी, एम के धर्मराजा, सुजित सेन पामेला सिंग, बोरून हालदार या बरोबरच " दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत ....." चे एक ग्लॅमर होते. मला शास्त्रीय संगीताची आवड लावण्यात विविध भारतीच्या 'संगीत सरिता' चे फार मोठे ऋण आहे. ( हा कार्यक्रम आजही चालू आहे ) .

In reply to by चौकटराजा

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 19:55
होय. तो 'बोर्नव्हिटाचा'च कार्यक्रम होता. मी चुकून 'कॅडबरी' लिहिलं आहे. कदाचित 'बोर्नव्हिटा' हे 'कॅडबरीचे'च असल्याने चुक झाली असावी.

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 18:28
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही. बातम्यांच्या सुरुवातीला निवेदक खर्जात "ये (पॉज) आकाशवाणी है" असं म्हणाला की त्यापुढचं वाक्य "कोई बच्चों के खेलने की चीज नहीं" असं त्याच्या मनात वाजलेलं आहे, हे लक्षात येतं. यांना अचूकतेची भारी हौस. "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्‍या आकशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे सात वाजून पंचावन्न मिनिटं आणि अठरा सेकंदं झाली आहेत" वगैरे तपशील मिळतात. बाजारभाव, तापमान हे दुसर्‍या डेसिमलपर्यंत सांगतात. कार्यक्रम आणि त्यांचे प्रायोजक कधी बदलतात काय माहीत! "स्वामिनी मराठी भक्तिगीत" आणि "जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल" ऐकतो आहे. आठवणच काढतो आहे तर "बाळाराम मार्केट"ची जाहिरात द्यायचा मोह आवरत नाही:
"ओओ...ओ" "अय्या टारझन!" "आणि तो देखील बाळाराम मार्केटमध्ये!!" "अक्सा सटाकाना सुटाकाना सफारीटागा..." "तो म्हणतोय, सूटिंग शर्टिंग आणि रेडिमेड्सची व्हरायटी अन्य कुठे?" "ओओ...ओ" "अय्या गेला पण!" "बाळाराम मार्केट, लक्ष्मी रोड, पुणे"
अजून खूप खूप खूप आठवणी आहेत. पण परत कधीतरी...

In reply to by आदूबाळ

किसन शिंदे गुरुवार, 04/24/2014 - 18:52
हाहाहाहा खत्री जाहीरात! लहानपणापासून रेडिओशी जुळलेली नाळ अजूनही टिकून आहे. आत्ताही रात्री झोप आली नाही की १००.७ स्टेशन लावून ऎकत बसतो. बर्याचश्या जून्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो तिथे.

In reply to by किसन शिंदे

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 15:46
पण रेडिओवरच्या जाहीराती साधारण खत्रीच असतात. फुल्ल मिमिक्री टाईप. कारण समोरच्याला चित्र दिसत नसते तर शब्दच त्याच्या मनात ठसवायचे असतात. त्यामुळे कधी अतिरेक होणे वा येडे चाले केले जाणे होतेच.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे गुरुवार, 04/24/2014 - 19:42
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही.
एकदम सहमत. मिर्ची वगैरे च्यनल्स वर खूssssssप जाहिराती असतात. पण विविध भारतीवर चांगले दिवस आणि वाईट दिवस असा ढळढळीत फरक असतो. छान गाणी लागली की एका मागे एक भारी गाणी लागतात. पण एखाद दिवशी सगळी भिकार गाणी ! वटवट-वटवट नावाच्या नाटकात पुलंनी मस्त वातावरण उभं केलं आहे रेडीओ स्टेशनच्या कामकाजाचं.
"जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल"
यातल्या जीतेंद्र मधल्या दीर्घ 'जी'चा उच्चार अगदी भाषाशिक्षकाकडून घोटवून घेतल्या सारखा दीर्घ. जीsतेंद्र त्या बाळारामबरोबरच 'घराला घरपण देणारी माणसं' ही डीएस्के ची जाहिरात पण वर्षानुवर्ष चालू आहे.

In reply to by अनुप ढेरे

आणि फिनोलेक्स्ची झायरात हो? ती विसरला का? शेत पिकली सोन्यावाणी. कसला विचार करतोयय रामय्या ही पत्रेवाली जाहीरात. ग्रीटवेल संदेसे आते है. हॅलो मधुमालती. तसेच सांजधारा हे विविधभारतीवर लागणारे कार्यक्रम. ११:३० ला मुंबईवर लागणारी कामगारसभा. मला वाटायचे की आता खरंच कोणतीतरी सभा होणार आहे. करंट मधे गलानी फॅशन्स रतीब घालते आहे. मजा मजा असते.

यसवायजी गुरुवार, 04/24/2014 - 19:00
(सांगली/कोल्हापुर) रेडीओवरच्या काही जाहिराती अजुन आठवतात. ---- सुवासिनीनं कुकवाला आणी मर्दानं 'च्या'ला न्हाई म्हणू नये.. पण आमी नेहमी मगदूमचा कडक च्याच पितो आणी आमी काय उन पाणी पितो काय? ---- वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड. ---- झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी

In reply to by यसवायजी

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:02
वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड.
वारणा दुधाचे दर्जेदार उत्पादन! "सरस्वती च्या" ची अ‍ॅडही तशीच आठवतेय. फिनोलेक्सनं आणलं पाणी, तसेच मगदूम च्या, इ.इ. अनेक खास आपल्या पट्ट्यातल्या झैराती मस्त असायच्या राव. ६:५५ ला संस्कृत बातम्याही असायच्या. "इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |" किती वर्षे तोच होता. नंतर पुढे "प्रवाचकः सूर्यनारायणानन्दः" झाल्यावर त्यातली मजा गेली राव.

In reply to by बॅटमॅन

अन्या दातार Fri, 04/25/2014 - 12:27
च्यायला, या जाहिराती ऐकल्याशिवाय सकाळ झाल्याचे वाटायचेच नाही राव!! अजून एक. लाडा पंप्सची जाहिरात. "लाडा लाडा.......... पाणी वाहे निर्मळ, हिरवी होई शेती...."

In reply to by अन्या दातार

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:28
लाडा लाडा सब्मर्सिबलं पंपं.. पाणी मीळे मुब्लकं.. हिरवी होई शेऽती, हिरवी होई शेऽती... धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... लाडा लाडा...

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Fri, 04/25/2014 - 13:11
@ धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... अरे अजुन कायतर हाय पुढं.. च्यामारी आठवतच नाहीए. शेवटाचं लाडा लाडा तर भारीच!!

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 04/25/2014 - 18:10
नग्गग्ग... अवो सुवासिनिनी कुक्वाला अन मर्दान्न च्याला नगं म्हनू नये... पण आम्ही नेमी मर्दांचा कडक ***चहाच पितो मंग आमी काय उन पानी पितो व्हय ? आम्हीबी आमच्या आबा आज्यापासुं मर्दांचा कडक ***चहाच पितो आसं म्हणता ? मग़ हुञ्जाउदे डबल (का धमाल आठवत नाही)

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Fri, 04/25/2014 - 18:47
:)) मला आधी ते- "धन धान्याची बरकत लाडा पंपाची अपुर्वाई" असं वाटायचं. मग नंतर लाडा पंपाचीया किरपेने.. असं. अजुन समजलेलं न्हाई.. असो.

In reply to by बॅटमॅन

कुसुमावती Fri, 04/25/2014 - 12:33
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका अशी कुठ्ल्यातरी मिरजेतल्या कपड्यांच्या दुकानाची जाहीरात होती. माझ्या बहीणीच नाव राधिका आहे तिला या जाहीरातीप्रमाणे हाक मारायचो आम्ही. वालावालकर कापड दुकान (ट्रस्ट्)ची जाहीरात.. लग्नाचा (इथे काय शब्द होते आठवत नहियेत).. कोल्हापुरच्या अंबाबाईचा आणि लग्नाचा बस्ता वालावालकरांचा. लाडा पंपाची पण अशीच काहीतरी जाहीरात होती, ती कायम शनिवारी सकाळच्या शाळेलाच जाताना ऐकल्याने, एरवी ती जाहीरात कधीही लागली तरी सकाळ झाल्यासारखी वाटायची.. बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.

In reply to by कुसुमावती

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:39
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका
एकदम एकदम!!! दिल राधिका राधिका हो गया. :)
बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.
एक लिंबू झेलू बै दोन लिंबू झेलू दोन लिंबू झेलू बै तीन लिंबू झेलू तीन लिंबू झेलू बै चार लिंबू झेलू चार लिंबू झेलू बै पाच लिंबू झेलू पाचा लिंबांचा पानोठा अभय नारायण पोद्दारान्नी पोद्दारान्नी किमया केली दागीन्यान्नी गृहलक्ष्मी सजली

In reply to by यसवायजी

उपाशी बोका Fri, 04/25/2014 - 04:58
कसला विचार करतोय रामय्या घराला आनि गोठ्याला कुठले पत्रे लावावे अरे, चारमिनार अ‍ॅस्बेस्टॉस सिमेंटचे पत्रे घे, माझ्या आजोबांनी लावलेले अजूनही मजबूत आहेत. अरे हो, खरंच की. चारमिनारचे पत्रे वापरा..

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 19:45
बिन सेल बिन लाईट चा रेडिओ तयार केला होता. अर्थातच त्याला स्विचोफ़ ऑन कळ न्हव्ती. ऐकायचे असेल की हेडफोन डोक्याला लावायचा नको असेल तर बाजुला काढायचा. विशेषत: लाईट गेली की हां बिन विजेचा रेडिओ रात्री अंधारात ऐकत बसने ओसम थिंग होती. टॉप ऑफ़ द वर्ल्ड. - मुलांसाठी सोपे वैज्ञानिक प्रयोग पुस्तकात याची रेसिपी होती.... आहे.

पिवळा डांबिस Fri, 04/25/2014 - 02:55
सकाळची शाळा असायची... सहा वाजता उठलो कि त्याच वेळी मुंबई ब आकाशवाणी केंद्रावरून 'मंगलप्रभात' हा भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा... तो ऐकत चहा, आंघोळ वगैरे उरकली जायची... बरोब्बर सात वाजता घोषणा ऐकू यायची... "आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!!" ती आमची शाळेला जायला घराबाहेर पडायची वेळ!! मी तिसरी किंवा चौथीत असेन... ती घोषणा मी इतक्या वेळा ऐकली होती की एकदा मी आईवडिलांकडे हट्ट धरला की या मे महिन्याच्य सुट्टीत पुण्यालाच जायचं!! आता आम्ही कोकणी माणसं!! दर सुट्टीला कोकणात किंवा गोव्याला पळणारी... अगदीच हट्ट धरला तेंव्हा शेवटी वैतागून बाबांनी विचारलं, "पुण्याला कशाला? तिथे काय ठेवलं आहे तुझं?" मी म्हंटलं, "मला सुधा नरवणेंना बघायचंय!" "कोण सुधा नरवणे?", बाबांना काही कळेना. "त्या, आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!! मधल्या सुधा नरवणे!", मी नरवणेबाईंच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत सांगितलं... कधी नव्हे ते आमचे पिताश्री ठ्ठोऽऽऽ करून गदागदा हसले!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:10
ठ्ठो =)) पिडांकाकांनी खरे तर त्यांच्या बालपणाबद्दल एखादी सेरीजच सुरू केली पाहिजे.

In reply to by पिवळा डांबिस

विकास Sat, 04/26/2014 - 18:42
सुधा नरवणेंमुळे माझ्या देखील आठवणी जागा झाल्या सात पाच च्या बातम्या असायच्या त्या. अशी किंचीत ऑड वेळ का असायची माहीत नव्हते. पण मला वाटते ७ ते ७:०५ पुणे केंद्रावर (मुंबईवाल्यांना नाही) संस्कृत मधे बातम्या असायच्या! सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.. त्यांच्या आवाजाने (खरी) जाग येयची त्यामुळे आम्ही मुले त्यांना गंमतीत डरावणे म्हणायचो! :) खाली बहुगुणींनी आकाशवाणी केंद्राची सिग्नेचर ट्यून दिली आहेच. तशी आपली आवडची पण सिग्नेचर ट्यून आठवते. पण कुठे मिळू शकली नाही. :(

In reply to by विकास

सव्यसाची Sun, 04/27/2014 - 00:27
मला वाटते संस्कृत बातम्या ६:५५ ला असत.. ७ वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रक्षेपित होत असत. मी जेव्हा या बातम्या ऐकायचो तेव्हा भालचंद्र कुलकर्णी बातम्या द्यायचे.. मजा होती राव..!

आत्मशून्य Fri, 04/25/2014 - 03:12
वरून आठवले, याच नावाचा एक चित्रपट सुधाआहे, हिमेशजी रेशामिया भाऊ त्यात नायक असून त्यातले मन का रेडिओ बजने दे जरा.... फुल्टू एटिट्युड देदे तु जरा गाणे आवडल्याने बराच वेळ थेटर हुडकत फिरत होतो.... मग क्ळाले चित्रपट 3 दिवसात उतरवला होता ते. :( बिचारा हिमेस...

पाषाणभेद Fri, 04/25/2014 - 05:18
जुन्या आठवणी जागवल्यात. कामगारसभा म्हणजे खरोखर कामगारांची जेवणाची वेळ पाहून त्याच वेळी प्रसारीत होणारा कार्यक्रम होता. कामगार सभा सकाळी ११ वाजता सुरू होई अन काका बजाज मधून बरोबर ११.०३ ला घरी जेवायला हजर होत. हीच वेळ शाळेसाठी तयारी करण्याची असे अन ११.३० ला घराबाहेर पडण्याची असे. हवामहलमध्ये विनोदी किस्से असायचे. शालेय कार्यक्रम तर बहार होती. बाकी माझ्या रेडिओ कवितेची आठवण आली.

कंजूस Fri, 04/25/2014 - 07:05
जुन्या ट्रांझीस्टर रेडीओचे काय करायचे ?आता मोबाईलमध्ये छान एफेम लागते .ते रेडीओ चार रुपये किलो प्लास्टीक भावाने विकण्यापेक्षा स्पिकर म्हणून खोल्यांतून लावून टाकले .

अनिता ठाकूर Fri, 04/25/2014 - 11:05
दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता गोवा स्टेशनवर १ तास आपली आवड लागायची. त्यात संपूर्ण १ तास फक्त मंगेशकर भावंडांची गाणी लागायची.ते स्टेशन स्पष्टपणे मिळायचे नाही. अगदी कान देउन ऐकावे लागायचे. पण, मन आनंदाने भरून जायचे.रेडिओच्या आठवणी नेहमीच येतात.आमच्या 'घडत्या' वयात आम्हाला रेडिओवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणायचे.

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 11:32
आमचे फॅमिली डॉक्टर होते. 'त्या' काळात त्यांनी, आपल्या नंबराची वाट पाहात बसलेल्या, रुग्णांच्या करमणूकीसाठी असाच मर्फीचा रेडीओ आणला होता. तो कोणाचाही हात पोहोचणार नाही (अगदी त्यांचाही), अशा उंचीवर फळी ठोकून तिथे ठेवलेला होता. तेंव्हा त्या रेडिओची डिलीव्हरी करायला आलेल्या विक्रेत्याकडून यांनी त्यावर 'मुंबई ब' हे स्टेशन लावून ठेवले होते. (हे पुढे आयुष्यात बदलले नाही. एकच स्टेशन ते ऐकायचे), आवाजाची पातळी ठरवून घेतली होती. आणि त्या रेडिओला विजेचा पुरवठा करणारे बटण हात पोहोचेल तिथे होते. डॉक्टरांनी दवाखाना उघडला की ते बटण ऑन करायचे, दवाखाना बंद झाला की बटण बंद करायचे. मधल्या वेळात (ऑन स्थितीत) 'मुंबई ब' वरचे सर्व कार्यक्रम अगदी ओळीने ऐकायला मिळायचे. आम्ही हसायचो. भावगीतं, बाजारभाव (त्यात 'कांदा - लासलगाव, प्रति क्विंटल....' हे माझं आवडतं वाक्य), चर्चा, हवामानाचा अंदाज, बातम्या सर्व सर्व 'पार्श्वसंगित' चालू असायचं. डॉक्टरांना त्याचं कांही सोयरसुतक नसायचं. दवाखान्याच्या वेळात ते रेडिओ ऐकायचेच नाहीत. त्यांचं रुग्ण तपासण्याचे काम अगदी आत्मियतेने चालायचं. त्या रेडियोवर 'हांव अमूक तमूक कोंकणींतून खोंबरें देतां' ह्या वाक्यावरही हसू आवरणं मला अवघड जायचं. डॉक्टर चष्म्याच्या वरून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे आणि गालातल्या गालात हसायचे. ते कारवारी होते. ह्या आमच्या डॉक्टरांवर एक वेगळा व्यक्तिचित्राचा धागा होऊ शकेल.

In reply to by मुक्त विहारि

पाषाणभेद Sat, 04/26/2014 - 01:24
पेठकर काकांच्या पोतडीत अशा अजून किती आठवणी आहेत? लिहाच एक एक करून.

स्पंदना Fri, 04/25/2014 - 11:48
सुरेख मालविका! पण धागा खुलला तो प्रतिसादांनी. प्रपे काकांचे प्रतिसाद तर अतिशय वेधक. अन पिडां काकांची "सुधा नरवणे" :))

नाखु Fri, 04/25/2014 - 12:38
गीतमालेसाठी पान पट्टी गाठत असू.. घ्यायचे काहीच नाही पण तरी पानपट्टीवाला काही आक्षेप घेत नसे.जर पोहचायला उशीर झाला तर आम्च्या वरातीमागून घोड्या सारख्यांसाठी गाण्यांची उजळणी असायची. अगदी अलिकडे म्हणजे "हिरो" (जॅकीचा) पर्यंत ही बिनाका गीतमाला ऐकली आहे.. पेठकर काकांनी "मंतरलेल्या" दिवसांची आठवण काढली हेच खरय.

अस्मी Fri, 04/25/2014 - 12:49
एकदम मस्त लिहीलयस मालविका...आणि सर्वांचे प्रतिसाद पण मस्त!! पुरानी जिन्स बद्दल एकदम सहमत.
इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.
+ १ पुण्याला पीजीमधे राहायला आल्यावर एफएम रेडिओ तर रूमवर कायम सुरू असायचा आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा :) ऑफिसला जातानाही बसमध्ये पूर्ण वेळ एफएम सुरूच असायचं. तुझ्या लेखातल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असल्यामुळे अगदी रीलेट करु शकले. तू चिपळूणची आहेस का गं? :)

In reply to by अस्मी

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 15:40
आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा हे बरेच जण करत असावेत, आमचेही करून झालेय. त्या गाण्यांबरोबर आपणही गाणे, सोबतीला सबमिशनच्या नाईटस या ईंजिनीअरींगमधील बेस्ट आठवणी .. बहुतांश ईंजिनीर्सनी अनुभवल्या असतीलच.

मालविका Fri, 04/25/2014 - 13:15
मिपा वरील सर्व मंडळींचे प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद . मला सरावाच प्रतिसाद आवडले , प्रत्येकाने आपल्या वेगळ्या वेगळ्या आठवणी सांगितल्या . खास करून लक्षात राहिलेल्या जाहिराती . खूपच मस्त वाटल वाचून . मजा आली .

मराठे Fri, 04/25/2014 - 19:29
रेडियोच्या या आठवणी खरोखरच शाळकरी वयात घेऊन जातात. सकाळी आईने रेडियो लाऊन ठेवलेला असायचा, त्यात लता मंगेशकर, भीमसेन यांच्या अभंगाने जाग यायची. 'जे का रंजले गांजले', 'रंगा येई वो रे' .. प्रत्येक गाणं जवळ जवळ पाच मिनीटाचं त्याप्रमाणे सकाळची कामं आवरायची सवय लागलेली. त्या कार्यक्रमात शेवटी एक समूह-गीत असायचं (संगीतकार बहुधा 'कानू-घोष' असायचे), त्यांच 'राही अगर तुझे है अपने पंखो पर विश्वास' किंवा 'हम होंगे कामयाब' सुरू झालं की चपला घालून शाळेत जायची वेळ व्हायची. संध्याकाळी खेळून घरी आलं की शेजार्‍यांच्या रेडियोवर नाट्य-संगीत लागलेलं असायचं. रात्री थोडे हिंदी कार्यक्रम. झोपायच्या वेळी जुनी हिंदी गाणी याचं समीकरणही पक्कं डोक्यात बसलेलं. आपली आवड किंवा इतर श्रुतिका ऐकत खिडकीत उगाचच कोणाची तरी वाट बघत बसलेली आई आत्ता या क्षणीसुद्धा दिसतेय. असो, http://eprasaran.com/ ह्या संकेत स्थळावर सुभाष केळकरांनी त्या जुन्या रेडियोच्या धर्तीवर कार्यक्रम सुरू केले आहेत. जरूर ऐका.

In reply to by मराठे

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 20:15
शनिवारी सकाळी अकरा वाजता कामगार सभेत 'लोकगीतं' लागायची. त्यात बाजीप्रभूंचा ७ मिनिटांचा पोवाडा, त्यातील 'लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, महाराज कूच करावं' हे बाजीप्रभूंचे विरश्रीयुक्त आर्जव, मोजक्या मावळ्यांनीशी लढविलेल्या पावनखिंडीच्या लढाईचे वर्णन, अंगावर तलवारींचे अनंत घाव सोसूनही खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बाजीप्रभू शेवटी अगतिक पणे विचारतात, ' झाले कारे तोफांचे बार? पोहोचले कारे महाराज सुखरुपपणे गडावर? महाराज गडावर पोहोचत नाहीत तो पर्यंत बाजीचे प्राण ह्या देहास सोडून जाणार नाहीत, हर हर महादेव!' शेवटी तोफांचे बार कानी येतात आणि बाजीप्रभू म्हणतात, 'जा! महाराजांना सांगा, तोफांचे बार ऐकू येत नाहीत तोपर्यंत बाजीचे प्राण त्याच्या देहाला सोडून गेले नाही. येतो महाराज, मुजरा स्विकारावा!' हा ७ मिनिटांचा, दोन भागात ऐकवला जाणारा पोवाडा ऐकताना (हज्जारदा ऐकला तरीही) बाजी प्रभूं इतकाच मीही कानात प्राण आणून गडावरच्या तोफांचे आवाज ऐकायला उत्सुक असायचो. बाजी प्रभू प्राण सोडायचे तेंव्हा मलाही गलबलून यायचं, वाटायचं 'बाSSSSजीSSSS' अशी जोरदार हाक द्यावी त्या वीराला आणि सांगावं 'महाराज गडावर पोहोचले आहेत स्वतःला वाचवावं, देह ठेवू नये!' आज, हे लिहीतानाही डोळे पाण्याने भरून आले आहेत.

रेवती Fri, 04/25/2014 - 19:46
आमच्याकडे आज्जी रेडिओवरचं मंडळ की काहीतरी लावून बसायची. मराठी गाणी वगैरे नेहमी चालू असायचं पण सुरुवात मात्र संस्कृत बातम्यांनी! दुसरी आज्जी रात्रीची श्रुतिका चुकवायची नाही. त्यातल्या कथेतील पात्रांमध्ये गुंतायची. मग ऐकता ऐकता "हे वागणं शोभलं का तुला?" किंवा " देवानं मदतीचा हात दिला/ देव पावला" टाईप म्हणायची. मालविका, लेखन आवडले. आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by असंका

खेडूत Sun, 04/27/2014 - 01:20
अजूनही 'ते' रेडिओ चांगले चालतात. पुण्यात पण आहेत. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं या बल्ब चं! १९८५ मध्ये मी हे रेडीओ टीव्ही दुरुस्ती क्लासला जाऊन शिकलो होतो. ट्रान्झीस्टरचे टी व्ही शिकवण्या आधी व्होल्वचे पण शिकवले होते. इंजिनियरिंग करतांना पैसे घेऊन दुरुस्त पण करत असे. पुण्यात रेडिओला पंधरा रुपये आणि टीव्हीला पन्नास रुपये दुरुस्तीला द्यायला पण लोक खुश नसत. मग म्हणलं ''मना-सज्जना त्यापेक्षा इंजिनियर व्हा लवकर!'' आणि हा धंदा बंद केला!

पाषाणभेद Sat, 04/26/2014 - 01:46
पण आजकाल सरकारी नभोवाणीवर जाहिरांतीचा रतीब असतो. कोण कुठलेतरी प्रायोजक दर १० मिनीटांनी बदलतात अन त्यांच्या ओंगळवाण्या जाहिराती जुन्या आकाशवाणीच्या जरतारी साडीला ठिगळ लावलेल्यासारख्या वाजतात. त्यातले फोन नंबर, मोबाईल क्रमांक ऐकतांना ते पाठ होवू नये म्हणून मी मनातल्या मनात किंवा थोडे मोठ्याने 'आआआआअ' असा अर्थहीन घोकतो. जुनी आकाशवाणी खरोखर चांगली होती. महाराष्ट्राला (किंबहूना भारत आणि पाकिस्थानलासुद्धा) आकाशवाणीने पु.ल. वपू. यांसारखी अनेक साहित्तिक मिळवून दिलेत. (ही यादी वाढवा. ज्ञानात भर पडेल.) दोन पिढ्यांच्या बुद्धीवाढीसाठी आकाशवाणीने साहित्तिक खतपाणी दिले. शेतकर्‍याच्या शेतीविषयक ज्ञानात भर टाकली. पुर्वी वेगवेगळ्या राज्यातील रेडीओ केंद्रांच्या कार्यक्रमाची देवाणघेवाण, अनुवादही व्हायचे. कोणतीही रेकॉर्ड तयार झाली की ती रेडीओ लायब्ररीला पाठवण्याचा देखील परिपाठ होता. शॉर्टवेव्ह बँडवर रशियन केंद्र, मध्य आशियातील काही देश आदींमधून हिंदी कार्यक्रमही लागायचे. आता असे रेडीओ सिग्नल्स इतर सिग्नल्सच्या गजबजाटात मिळणे मुश्किल आहे. एक खरा किस्सा फोटोसकट कुठेतरी वाचलेला आहे. आकाशवाणी (पुर्वीची AIR म्हणजेच All India Radio) ही भारतीय नभोवाणीची वाहीनी १९३० साली सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तानचे नामोनिशाण नव्हते. १९४७ साली फाळणी झाल्यानंतर AIR चे पाकिस्तानातील रेडीओकेंद्रे सहाजिकच पाकिस्तानात राहीली. त्यानंतर कित्तेक वर्षे त्या रेडीओ केंद्रांच्यावर AIR असलीची पाटी असायची. नंतर कोणतेतरी भारतिय शिष्टमंडळ तेथील रेडीओ केंद्रांवर भेटी देतांना त्या शिष्टमंडळातील कुणीतरी व्यक्तीने ही जाणीव तेथील अधिकार्‍यांना करून दिली व त्यानंतर बदल झाला. जुन्यात काळानुरूप समयोचीत बदल हवाच पण प्रत्येक जुने म्हणजे उणे असे नव्हे हे आकाशवाणीच्या बाबतीत म्हणावे लागते की काय अशी भिती आता वाटतेय.

खटपट्या Sat, 04/26/2014 - 02:43
मी आख्खा बोक्या सातबंडे रेडिओ वर ऐकला आहे. लहान मुलांसाठी "गम्मत जम्मत" हा कार्यक्रम यायचा. बरीचशी जुनी गाणी फक्त रेडिओ वर ऐकली आहेत म्हणून अजून स्मरणात आहेत. एकदम जुने दिवस आठवले. मराठी अ आणि ब वाहिनी चालू आहे कि माहिती नाही

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 15:35
मी तसा रेडिओच्या जमान्यातला नसलो तरी ट्रांझिस्टरवर क्रिकेट काँमेंटरी ऐकण्याचे नाते आहे आमचे. अगदी डिप्लोमालाही जेव्हा पेजरचा अस्त होऊन नुकतेच मोबाईल येऊ लागले होते तेव्हाही मी कॉलेजला न लाजता वय वर्षे बारा पासून वापरत असलेलो एक जुना ट्रांझिस्टर घेऊन जायचो. (खरे तर जेव्हा विकत घेतला होता तेव्हा मामाने दुबईवरून आणला असल्याने त्याचे कौतुकच होते.) असो, जुना का असेना तो मॅचचा स्कोअर सांगत असल्याने, आणि सर्वांना तो जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने माझा भाव वधारायचाच. पुढे डिग्रीसाठी मी जेव्हा वालचंद सांगलीला गेलो तेव्हाही तिथे आपल्या मुंबईसारखी मॅचची कॉमेंट्री नाही बघून रुखरुख लागलेली. त्यानंतर पुढे मग मोबाईलमध्ये एफएम आले, ईंटरनेट आले, आणि हे सारे दर दुसर्‍याच्या हातात आले, मॅचचा स्कोर समजायचे सतराशे साठ पर्याय उपलब्ध झाले आणि ट्रांझिस्टरची मजा गेली.. तरीही आजही मोबाईल मधील १६-३२ जीबी मेमरीकार्डातील शेकडो-हजारो गाण्यातले एखादे निवडून ते ऐकण्यापेक्षा एफएम वर रॅन्डम लागणारी गाणी, एखादे न आवडल्यास स्टेशन चेंज करत दुसरे तिसरे शोधत ऐकण्यात जास्त मजा येते.

कंजूस Sat, 04/26/2014 - 19:28
रेडीओचे जुने आवडते कलाकार आणि लेखक :शंना नवरे ,रविंद्र पिंगे ,बाळ कुडतरकर ,जयवंत दळवी ,प्रपंच आणि पुन्हा प्रपंचचे आवाज देणारे ,तबस्सुम ,अमिन सयानी ,क्रिकेटचे धावते समालेचक (मराठी),हिंदी आणि इंग्रजीचे कॉमेंटेटर .शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे ,कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे .उदा०कल्याणी ,कोणार्क .कधीकधी कॉफिहॉऊस कट्टा आवडायचा . नवीन एफेमवरचे घंटासिंग आणि अॅँग्रीगणेशन चे जोकस आणि सचिन तेँ०च्या आवाजातली बडबड मस्त असते .रात्रीच्यावेळी टैक्सी चालवणारे वगैरे एफेमवर खुश आहेत .

सुधीर कांदळकर Sat, 04/26/2014 - 20:23
यस्टरडे वन्स मोर मधून खूप जुने नंबर्स आठवले. हमीद सयानींच्या आठवणीने कळ आली. ते खरंच ध्यानीमनी नसतांना अकाली गेले. अमीन सयानींना त्यांची बोर्नव्हीटा क्वीझ कॉन्टेस्टमधली जागा नक्कीच नीटशी घेता आली नाही. इन्सपेक्तर ईगल पण आनंद देऊन गेला. आकाशवाणीच्या हिंदी रेडिओ जाहिरातसृष्टीतली ये ढेरसे कपडे मैं कैसे धोऊं..... ही पहिली सांगितिक जिंगल अशोक पत्कींची होती. अनेक आठवणींना उजाळा देणार्^या लेखाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

अनिवासि Sun, 04/27/2014 - 00:16
हा धागा वाचायला सुरवात केली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या घरी रेडीओ नव्हता. शेजार्यान्कडे जाउन कधी कधी ऐकावयास मिळायचा पण वडलाना ते आवडत नसे. एकदा वडील गावी गेले असताना, तो रेडीओ रात्रीपुरता मागुन आणला - मस्तपैकी गाणी ऐकत झोपलो आणि झोपेत धक्का लागुन तो पडला. वडलाना कळले असते तर माझी धडगत नव्हती! शेवटी आईला शरण गेलो - सदाशिव पेठेत दुरुस्ती करणारे एक जण होते- त्यानी हा भाग मिळत नाही, नन्तर तो भाग मिळत नाही असे करुन चीकार वेळ घेतला- शेजारी समजुन घेणारे होते व वडलानाही चान्गले ओळखत होते म्हणुन त्यानी काही त्रास दीला नाही. शेवटी आईने कसे तरी पैसे भरुन तो परत आणला. आमच्या घरासमोरच एक उडपी रेस्टौरन्ट होते त्याचा रेडीओ क्रिकेट्चा सामना असला की मोठ्याने लागत असे आणी मग तेथे प्रचड गर्दी जमत असे. त्यातुन सामना परदेशात असेल तर रात्री पर्यन्त!! नन्तर मी परदेशात आलो- १९५२- पहिली नोकरी- पगार अगदी तुट्पुन्जा. एक बेड्सीटर खोली- मनोरजनाची साधने अगदी कमी -TV पुर्वीचा काळ-. ५३ साली पहिली मोठी खरेदी- रेडीओ - pilot कम्पनीचा- valve वाला. मग रात्री गाणी ऐकत झोप. रेडिओ सीलोन सारखे radio luxenburgh होते. रेडीओच्या मागच्या जाळीतुन valves चा प्रकाश खोली उजळुन काढायचा. आजही त्याची आठवण आली की भरुन येते. नेहमीप्रमाणे आयुष्यात चढ-उतार आले. शेवटी एकदा तो विकायला काढला पण २६ पौडाला घेतलेल्या त्या रेडीओला ५ पौड पण येईनात म्हणुन विकला नाही. पुढे परत चान्गले दिवस आले. आज तो रेडीओ माझ्या घरात. बसायच्या खोलीत मानाच्या जागेवर विराजत आहे- माझ्या आयुष्याचा साक्षीदार! मला वाटते की त्याची त्यावेळची पावती देखील माळ्यावर कोठेतरि आहे. शेवटी, all India radio चा signature tune - कायम डोक्यात होता. भारतात आलो की तो ऐकावासा वाटे- आज बहुगुणी मुळे ऐकावयास मिळाला. ध्न्यवाद

समीरसूर गुरुवार, 04/24/2014 - 16:01
मनापासून लिहिलेला छान लेख! आठवणींची सोबत मनाला फार भावते. तुम्ही कुठल्या देशात आहत? तिथे आणखी काही सुखद आठवणींचा खजिना तयार करा...:-)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 17:05
माझ्या लहानपणी (६० च्या दशकात), आमच्या एका सुखवस्तू नातेवाईकांकडे मर्फीचा रेडिओ आला. ट्रान्झीस्टर अजून भारतात आला नव्हता. व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. व्हॉल्व्ह तापून रेडिओचे स्टेशन लागेपर्यंत धीर धरावा लागायचा. तर, सांगायची गोष्ट अशी की घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचं लक्षण होतं. आपली श्रीमंती इतरांच्या लक्षात आणून देण्यासाठी लोकं धडपडायचे. आमच्या 'त्या' श्रीमंत नातेवाईकाने आम्हाला रविवारी सकाळी चहापाण्याला बोलावले. आणि नवा रेडिओ आणल्याचे दाखविले. तेंव्हा सकाळी नऊ (की साडेनऊ) वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा. 'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐकाहो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण' असं त्या कार्यक्रमाचं शिर्षक गीत लागायचं. त्यातलं शेवटचे 'गम्मSSSSत जम्मSSSSत' हे शब्द मला खुप आवडायचे. इथून मुलांचा कार्यक्रम सुरु व्हायचा. तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. दुपारी अडीच वाजता विविधभारती, त्यातील 'फौजी भाईयों कि खिदमत में' सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' आणि अमिन सयानीचं सादरीकरण हा एक हवाहवासा वाटणारा कार्यक्रम होता. अमिन सयानीचे भाऊ हमिद सयानी रविवारी दुपारी 'कॅडबरी क्विझ कॉन्टेस्ट' सादर करायचे तोही माहितीपूर्ण कार्यक्रम होता. रात्री सव्वानऊला 'ईगल फ्लास्क' प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालीका लागायची तर 'हवामहल' कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या. असा सर्वांगिण मनोरंजन आणि ज्ञानाचा धबधबा असलेल्या रेडिओने सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध केले होते. त्याकाळी घरेदारे उघडीच असायची त्यामुळे कोणाकडे स्टोव्हवरून दुध उतू गेलंय (त्याचा विशिष्ट वास असतो), कोणाकडे मांसाहार शिजतो आहे, कोणाकडे कुकरची शिट्टी झाली आहे पासून घरची भांडणं, छोट्यांच्या मारामार्‍या, मोठ्या व्यक्तीचं सातमजली हसणं तर एखाद्या मनमोकळया वृद्धांचे आवाजी वायू निस्सारण ह्या सर्व गदारोळात रेडिओ आपले अस्तित्व जाणवून द्यायचाच. एखादे आवडीचे गाणे लागले असेल तर धावतपळत घरी येऊन रेडिओचा कान पिळायचा आणि ते हिन्दी चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं असेल तर मोठ्यांकडून आपला कान पिळून घ्यायचा हे नित्यनेमाने व्हायचे. अभ्यासात 'ढ' असणार्‍या मुलाला 'रेडिओ दुरुस्ती शिक निदान उपाशी तरी मरणार नाही' असा मोलाचा सल्ला दिला जायचा. ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 18:31
बरेचदा यु ट्युबवर "ceylone song"" सर्च देऊन जुनी गाणी ऐकते. सकाळी जाग यायची तेव्हा बाबांनी सिलोन स्टेशन लावलेलं असायचं. दिवसाची सुरुवातच संगीतमय होत असे.

In reply to by प्रभाकर पेठकर

उपाशी बोका गुरुवार, 04/24/2014 - 21:23
पेठकरकाकांशी सहमत. रेडिओवरील अजून १ आवडता कार्यक्रम आढवतो, तो म्हणजे रविवारी दुपारी २ वाजता लागणारा "क्रिकेट विथ विजय मर्चंट" रेडिओबद्दलचे माझे एक आवडते गाणे

In reply to by प्रभाकर पेठकर

निवेदिता-ताई Fri, 04/25/2014 - 12:48
तुमच्याशी सहमत, या रेडिओमुळेच आपले बालपण समृद्ध झाले आहे, त्या काळी माझ्या वडीलांनी आमच्या खेडेगावात पहिला रेडिओ आणला,मग काय सकाळ संध्याकाळ सगळे कुतुहलाने यायचे, मास्तर बातम्या लावा की, फर्माईश व्हायची, रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकता ऐकायला त्या रेडीओ भोवती कोंडाळे केले जायचे,तसेच रविवारी सकाळी ११ वाजता आपली आवड असायची, बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' तर सर्वांच्या आवडीचीच. पहाटे पासून हा रेडिओ आपले अस्तित्व जाणवुन द्यायचा. पुढे कॉलेजला गेल्यावर सुद्धा ही रेडिओची आवड तशीच राहिली, त्या वेळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती आर्वजुन ऐकत होते. आज सुध्दा सकाळी लवकर उठल्याबरोबर आधी रेडिओ लावते. पुणे स्टेशन मला फार आवडते, सर्वच माहिती तिथे मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा Fri, 04/25/2014 - 13:54
वा प्रभाकरपंत ! आमचं पण लहानपण व रेडिओ च नातं असंच. आमच्या वडिलांनी रेडिओ आणला ते विम्याच्या पैशातून. ( म्हण्जे त्यावेळी विम्याची म्याचुरिटी किंमत काय असेल पहा !!!!! हा ! हा ! ) .अहो पंत ते क्रिकेट विथ विजय मर्चंट राहिलं की ! आपल्या मुबईचा पदमाकर शिवलकर या बोर्नविटा चा मला वाटत> एक डवल ऑर क्विट असा कार्यक्रम आला होता त्यात सर्वात जास्त पैसे कमविलेला स्पर्धक होता. सुशील जव्हेरी, एम के धर्मराजा, सुजित सेन पामेला सिंग, बोरून हालदार या बरोबरच " दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत ....." चे एक ग्लॅमर होते. मला शास्त्रीय संगीताची आवड लावण्यात विविध भारतीच्या 'संगीत सरिता' चे फार मोठे ऋण आहे. ( हा कार्यक्रम आजही चालू आहे ) .

In reply to by चौकटराजा

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 19:55
होय. तो 'बोर्नव्हिटाचा'च कार्यक्रम होता. मी चुकून 'कॅडबरी' लिहिलं आहे. कदाचित 'बोर्नव्हिटा' हे 'कॅडबरीचे'च असल्याने चुक झाली असावी.

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 18:28
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही. बातम्यांच्या सुरुवातीला निवेदक खर्जात "ये (पॉज) आकाशवाणी है" असं म्हणाला की त्यापुढचं वाक्य "कोई बच्चों के खेलने की चीज नहीं" असं त्याच्या मनात वाजलेलं आहे, हे लक्षात येतं. यांना अचूकतेची भारी हौस. "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्‍या आकशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे सात वाजून पंचावन्न मिनिटं आणि अठरा सेकंदं झाली आहेत" वगैरे तपशील मिळतात. बाजारभाव, तापमान हे दुसर्‍या डेसिमलपर्यंत सांगतात. कार्यक्रम आणि त्यांचे प्रायोजक कधी बदलतात काय माहीत! "स्वामिनी मराठी भक्तिगीत" आणि "जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल" ऐकतो आहे. आठवणच काढतो आहे तर "बाळाराम मार्केट"ची जाहिरात द्यायचा मोह आवरत नाही:
"ओओ...ओ" "अय्या टारझन!" "आणि तो देखील बाळाराम मार्केटमध्ये!!" "अक्सा सटाकाना सुटाकाना सफारीटागा..." "तो म्हणतोय, सूटिंग शर्टिंग आणि रेडिमेड्सची व्हरायटी अन्य कुठे?" "ओओ...ओ" "अय्या गेला पण!" "बाळाराम मार्केट, लक्ष्मी रोड, पुणे"
अजून खूप खूप खूप आठवणी आहेत. पण परत कधीतरी...

In reply to by आदूबाळ

किसन शिंदे गुरुवार, 04/24/2014 - 18:52
हाहाहाहा खत्री जाहीरात! लहानपणापासून रेडिओशी जुळलेली नाळ अजूनही टिकून आहे. आत्ताही रात्री झोप आली नाही की १००.७ स्टेशन लावून ऎकत बसतो. बर्याचश्या जून्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो तिथे.

In reply to by किसन शिंदे

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 15:46
पण रेडिओवरच्या जाहीराती साधारण खत्रीच असतात. फुल्ल मिमिक्री टाईप. कारण समोरच्याला चित्र दिसत नसते तर शब्दच त्याच्या मनात ठसवायचे असतात. त्यामुळे कधी अतिरेक होणे वा येडे चाले केले जाणे होतेच.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे गुरुवार, 04/24/2014 - 19:42
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही.
एकदम सहमत. मिर्ची वगैरे च्यनल्स वर खूssssssप जाहिराती असतात. पण विविध भारतीवर चांगले दिवस आणि वाईट दिवस असा ढळढळीत फरक असतो. छान गाणी लागली की एका मागे एक भारी गाणी लागतात. पण एखाद दिवशी सगळी भिकार गाणी ! वटवट-वटवट नावाच्या नाटकात पुलंनी मस्त वातावरण उभं केलं आहे रेडीओ स्टेशनच्या कामकाजाचं.
"जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल"
यातल्या जीतेंद्र मधल्या दीर्घ 'जी'चा उच्चार अगदी भाषाशिक्षकाकडून घोटवून घेतल्या सारखा दीर्घ. जीsतेंद्र त्या बाळारामबरोबरच 'घराला घरपण देणारी माणसं' ही डीएस्के ची जाहिरात पण वर्षानुवर्ष चालू आहे.

In reply to by अनुप ढेरे

आणि फिनोलेक्स्ची झायरात हो? ती विसरला का? शेत पिकली सोन्यावाणी. कसला विचार करतोयय रामय्या ही पत्रेवाली जाहीरात. ग्रीटवेल संदेसे आते है. हॅलो मधुमालती. तसेच सांजधारा हे विविधभारतीवर लागणारे कार्यक्रम. ११:३० ला मुंबईवर लागणारी कामगारसभा. मला वाटायचे की आता खरंच कोणतीतरी सभा होणार आहे. करंट मधे गलानी फॅशन्स रतीब घालते आहे. मजा मजा असते.

यसवायजी गुरुवार, 04/24/2014 - 19:00
(सांगली/कोल्हापुर) रेडीओवरच्या काही जाहिराती अजुन आठवतात. ---- सुवासिनीनं कुकवाला आणी मर्दानं 'च्या'ला न्हाई म्हणू नये.. पण आमी नेहमी मगदूमचा कडक च्याच पितो आणी आमी काय उन पाणी पितो काय? ---- वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड. ---- झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी

In reply to by यसवायजी

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:02
वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड.
वारणा दुधाचे दर्जेदार उत्पादन! "सरस्वती च्या" ची अ‍ॅडही तशीच आठवतेय. फिनोलेक्सनं आणलं पाणी, तसेच मगदूम च्या, इ.इ. अनेक खास आपल्या पट्ट्यातल्या झैराती मस्त असायच्या राव. ६:५५ ला संस्कृत बातम्याही असायच्या. "इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |" किती वर्षे तोच होता. नंतर पुढे "प्रवाचकः सूर्यनारायणानन्दः" झाल्यावर त्यातली मजा गेली राव.

In reply to by बॅटमॅन

अन्या दातार Fri, 04/25/2014 - 12:27
च्यायला, या जाहिराती ऐकल्याशिवाय सकाळ झाल्याचे वाटायचेच नाही राव!! अजून एक. लाडा पंप्सची जाहिरात. "लाडा लाडा.......... पाणी वाहे निर्मळ, हिरवी होई शेती...."

In reply to by अन्या दातार

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:28
लाडा लाडा सब्मर्सिबलं पंपं.. पाणी मीळे मुब्लकं.. हिरवी होई शेऽती, हिरवी होई शेऽती... धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... लाडा लाडा...

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Fri, 04/25/2014 - 13:11
@ धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... अरे अजुन कायतर हाय पुढं.. च्यामारी आठवतच नाहीए. शेवटाचं लाडा लाडा तर भारीच!!

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 04/25/2014 - 18:10
नग्गग्ग... अवो सुवासिनिनी कुक्वाला अन मर्दान्न च्याला नगं म्हनू नये... पण आम्ही नेमी मर्दांचा कडक ***चहाच पितो मंग आमी काय उन पानी पितो व्हय ? आम्हीबी आमच्या आबा आज्यापासुं मर्दांचा कडक ***चहाच पितो आसं म्हणता ? मग़ हुञ्जाउदे डबल (का धमाल आठवत नाही)

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Fri, 04/25/2014 - 18:47
:)) मला आधी ते- "धन धान्याची बरकत लाडा पंपाची अपुर्वाई" असं वाटायचं. मग नंतर लाडा पंपाचीया किरपेने.. असं. अजुन समजलेलं न्हाई.. असो.

In reply to by बॅटमॅन

कुसुमावती Fri, 04/25/2014 - 12:33
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका अशी कुठ्ल्यातरी मिरजेतल्या कपड्यांच्या दुकानाची जाहीरात होती. माझ्या बहीणीच नाव राधिका आहे तिला या जाहीरातीप्रमाणे हाक मारायचो आम्ही. वालावालकर कापड दुकान (ट्रस्ट्)ची जाहीरात.. लग्नाचा (इथे काय शब्द होते आठवत नहियेत).. कोल्हापुरच्या अंबाबाईचा आणि लग्नाचा बस्ता वालावालकरांचा. लाडा पंपाची पण अशीच काहीतरी जाहीरात होती, ती कायम शनिवारी सकाळच्या शाळेलाच जाताना ऐकल्याने, एरवी ती जाहीरात कधीही लागली तरी सकाळ झाल्यासारखी वाटायची.. बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.

In reply to by कुसुमावती

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:39
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका
एकदम एकदम!!! दिल राधिका राधिका हो गया. :)
बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.
एक लिंबू झेलू बै दोन लिंबू झेलू दोन लिंबू झेलू बै तीन लिंबू झेलू तीन लिंबू झेलू बै चार लिंबू झेलू चार लिंबू झेलू बै पाच लिंबू झेलू पाचा लिंबांचा पानोठा अभय नारायण पोद्दारान्नी पोद्दारान्नी किमया केली दागीन्यान्नी गृहलक्ष्मी सजली

In reply to by यसवायजी

उपाशी बोका Fri, 04/25/2014 - 04:58
कसला विचार करतोय रामय्या घराला आनि गोठ्याला कुठले पत्रे लावावे अरे, चारमिनार अ‍ॅस्बेस्टॉस सिमेंटचे पत्रे घे, माझ्या आजोबांनी लावलेले अजूनही मजबूत आहेत. अरे हो, खरंच की. चारमिनारचे पत्रे वापरा..

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 19:45
बिन सेल बिन लाईट चा रेडिओ तयार केला होता. अर्थातच त्याला स्विचोफ़ ऑन कळ न्हव्ती. ऐकायचे असेल की हेडफोन डोक्याला लावायचा नको असेल तर बाजुला काढायचा. विशेषत: लाईट गेली की हां बिन विजेचा रेडिओ रात्री अंधारात ऐकत बसने ओसम थिंग होती. टॉप ऑफ़ द वर्ल्ड. - मुलांसाठी सोपे वैज्ञानिक प्रयोग पुस्तकात याची रेसिपी होती.... आहे.

पिवळा डांबिस Fri, 04/25/2014 - 02:55
सकाळची शाळा असायची... सहा वाजता उठलो कि त्याच वेळी मुंबई ब आकाशवाणी केंद्रावरून 'मंगलप्रभात' हा भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा... तो ऐकत चहा, आंघोळ वगैरे उरकली जायची... बरोब्बर सात वाजता घोषणा ऐकू यायची... "आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!!" ती आमची शाळेला जायला घराबाहेर पडायची वेळ!! मी तिसरी किंवा चौथीत असेन... ती घोषणा मी इतक्या वेळा ऐकली होती की एकदा मी आईवडिलांकडे हट्ट धरला की या मे महिन्याच्य सुट्टीत पुण्यालाच जायचं!! आता आम्ही कोकणी माणसं!! दर सुट्टीला कोकणात किंवा गोव्याला पळणारी... अगदीच हट्ट धरला तेंव्हा शेवटी वैतागून बाबांनी विचारलं, "पुण्याला कशाला? तिथे काय ठेवलं आहे तुझं?" मी म्हंटलं, "मला सुधा नरवणेंना बघायचंय!" "कोण सुधा नरवणे?", बाबांना काही कळेना. "त्या, आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!! मधल्या सुधा नरवणे!", मी नरवणेबाईंच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत सांगितलं... कधी नव्हे ते आमचे पिताश्री ठ्ठोऽऽऽ करून गदागदा हसले!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 12:10
ठ्ठो =)) पिडांकाकांनी खरे तर त्यांच्या बालपणाबद्दल एखादी सेरीजच सुरू केली पाहिजे.

In reply to by पिवळा डांबिस

विकास Sat, 04/26/2014 - 18:42
सुधा नरवणेंमुळे माझ्या देखील आठवणी जागा झाल्या सात पाच च्या बातम्या असायच्या त्या. अशी किंचीत ऑड वेळ का असायची माहीत नव्हते. पण मला वाटते ७ ते ७:०५ पुणे केंद्रावर (मुंबईवाल्यांना नाही) संस्कृत मधे बातम्या असायच्या! सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.. त्यांच्या आवाजाने (खरी) जाग येयची त्यामुळे आम्ही मुले त्यांना गंमतीत डरावणे म्हणायचो! :) खाली बहुगुणींनी आकाशवाणी केंद्राची सिग्नेचर ट्यून दिली आहेच. तशी आपली आवडची पण सिग्नेचर ट्यून आठवते. पण कुठे मिळू शकली नाही. :(

In reply to by विकास

सव्यसाची Sun, 04/27/2014 - 00:27
मला वाटते संस्कृत बातम्या ६:५५ ला असत.. ७ वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रक्षेपित होत असत. मी जेव्हा या बातम्या ऐकायचो तेव्हा भालचंद्र कुलकर्णी बातम्या द्यायचे.. मजा होती राव..!

आत्मशून्य Fri, 04/25/2014 - 03:12
वरून आठवले, याच नावाचा एक चित्रपट सुधाआहे, हिमेशजी रेशामिया भाऊ त्यात नायक असून त्यातले मन का रेडिओ बजने दे जरा.... फुल्टू एटिट्युड देदे तु जरा गाणे आवडल्याने बराच वेळ थेटर हुडकत फिरत होतो.... मग क्ळाले चित्रपट 3 दिवसात उतरवला होता ते. :( बिचारा हिमेस...

पाषाणभेद Fri, 04/25/2014 - 05:18
जुन्या आठवणी जागवल्यात. कामगारसभा म्हणजे खरोखर कामगारांची जेवणाची वेळ पाहून त्याच वेळी प्रसारीत होणारा कार्यक्रम होता. कामगार सभा सकाळी ११ वाजता सुरू होई अन काका बजाज मधून बरोबर ११.०३ ला घरी जेवायला हजर होत. हीच वेळ शाळेसाठी तयारी करण्याची असे अन ११.३० ला घराबाहेर पडण्याची असे. हवामहलमध्ये विनोदी किस्से असायचे. शालेय कार्यक्रम तर बहार होती. बाकी माझ्या रेडिओ कवितेची आठवण आली.

कंजूस Fri, 04/25/2014 - 07:05
जुन्या ट्रांझीस्टर रेडीओचे काय करायचे ?आता मोबाईलमध्ये छान एफेम लागते .ते रेडीओ चार रुपये किलो प्लास्टीक भावाने विकण्यापेक्षा स्पिकर म्हणून खोल्यांतून लावून टाकले .

अनिता ठाकूर Fri, 04/25/2014 - 11:05
दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता गोवा स्टेशनवर १ तास आपली आवड लागायची. त्यात संपूर्ण १ तास फक्त मंगेशकर भावंडांची गाणी लागायची.ते स्टेशन स्पष्टपणे मिळायचे नाही. अगदी कान देउन ऐकावे लागायचे. पण, मन आनंदाने भरून जायचे.रेडिओच्या आठवणी नेहमीच येतात.आमच्या 'घडत्या' वयात आम्हाला रेडिओवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणायचे.

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 11:32
आमचे फॅमिली डॉक्टर होते. 'त्या' काळात त्यांनी, आपल्या नंबराची वाट पाहात बसलेल्या, रुग्णांच्या करमणूकीसाठी असाच मर्फीचा रेडीओ आणला होता. तो कोणाचाही हात पोहोचणार नाही (अगदी त्यांचाही), अशा उंचीवर फळी ठोकून तिथे ठेवलेला होता. तेंव्हा त्या रेडिओची डिलीव्हरी करायला आलेल्या विक्रेत्याकडून यांनी त्यावर 'मुंबई ब' हे स्टेशन लावून ठेवले होते. (हे पुढे आयुष्यात बदलले नाही. एकच स्टेशन ते ऐकायचे), आवाजाची पातळी ठरवून घेतली होती. आणि त्या रेडिओला विजेचा पुरवठा करणारे बटण हात पोहोचेल तिथे होते. डॉक्टरांनी दवाखाना उघडला की ते बटण ऑन करायचे, दवाखाना बंद झाला की बटण बंद करायचे. मधल्या वेळात (ऑन स्थितीत) 'मुंबई ब' वरचे सर्व कार्यक्रम अगदी ओळीने ऐकायला मिळायचे. आम्ही हसायचो. भावगीतं, बाजारभाव (त्यात 'कांदा - लासलगाव, प्रति क्विंटल....' हे माझं आवडतं वाक्य), चर्चा, हवामानाचा अंदाज, बातम्या सर्व सर्व 'पार्श्वसंगित' चालू असायचं. डॉक्टरांना त्याचं कांही सोयरसुतक नसायचं. दवाखान्याच्या वेळात ते रेडिओ ऐकायचेच नाहीत. त्यांचं रुग्ण तपासण्याचे काम अगदी आत्मियतेने चालायचं. त्या रेडियोवर 'हांव अमूक तमूक कोंकणींतून खोंबरें देतां' ह्या वाक्यावरही हसू आवरणं मला अवघड जायचं. डॉक्टर चष्म्याच्या वरून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे आणि गालातल्या गालात हसायचे. ते कारवारी होते. ह्या आमच्या डॉक्टरांवर एक वेगळा व्यक्तिचित्राचा धागा होऊ शकेल.

In reply to by मुक्त विहारि

पाषाणभेद Sat, 04/26/2014 - 01:24
पेठकर काकांच्या पोतडीत अशा अजून किती आठवणी आहेत? लिहाच एक एक करून.

स्पंदना Fri, 04/25/2014 - 11:48
सुरेख मालविका! पण धागा खुलला तो प्रतिसादांनी. प्रपे काकांचे प्रतिसाद तर अतिशय वेधक. अन पिडां काकांची "सुधा नरवणे" :))

नाखु Fri, 04/25/2014 - 12:38
गीतमालेसाठी पान पट्टी गाठत असू.. घ्यायचे काहीच नाही पण तरी पानपट्टीवाला काही आक्षेप घेत नसे.जर पोहचायला उशीर झाला तर आम्च्या वरातीमागून घोड्या सारख्यांसाठी गाण्यांची उजळणी असायची. अगदी अलिकडे म्हणजे "हिरो" (जॅकीचा) पर्यंत ही बिनाका गीतमाला ऐकली आहे.. पेठकर काकांनी "मंतरलेल्या" दिवसांची आठवण काढली हेच खरय.

अस्मी Fri, 04/25/2014 - 12:49
एकदम मस्त लिहीलयस मालविका...आणि सर्वांचे प्रतिसाद पण मस्त!! पुरानी जिन्स बद्दल एकदम सहमत.
इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.
+ १ पुण्याला पीजीमधे राहायला आल्यावर एफएम रेडिओ तर रूमवर कायम सुरू असायचा आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा :) ऑफिसला जातानाही बसमध्ये पूर्ण वेळ एफएम सुरूच असायचं. तुझ्या लेखातल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असल्यामुळे अगदी रीलेट करु शकले. तू चिपळूणची आहेस का गं? :)

In reply to by अस्मी

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 15:40
आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा हे बरेच जण करत असावेत, आमचेही करून झालेय. त्या गाण्यांबरोबर आपणही गाणे, सोबतीला सबमिशनच्या नाईटस या ईंजिनीअरींगमधील बेस्ट आठवणी .. बहुतांश ईंजिनीर्सनी अनुभवल्या असतीलच.

मालविका Fri, 04/25/2014 - 13:15
मिपा वरील सर्व मंडळींचे प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद . मला सरावाच प्रतिसाद आवडले , प्रत्येकाने आपल्या वेगळ्या वेगळ्या आठवणी सांगितल्या . खास करून लक्षात राहिलेल्या जाहिराती . खूपच मस्त वाटल वाचून . मजा आली .

मराठे Fri, 04/25/2014 - 19:29
रेडियोच्या या आठवणी खरोखरच शाळकरी वयात घेऊन जातात. सकाळी आईने रेडियो लाऊन ठेवलेला असायचा, त्यात लता मंगेशकर, भीमसेन यांच्या अभंगाने जाग यायची. 'जे का रंजले गांजले', 'रंगा येई वो रे' .. प्रत्येक गाणं जवळ जवळ पाच मिनीटाचं त्याप्रमाणे सकाळची कामं आवरायची सवय लागलेली. त्या कार्यक्रमात शेवटी एक समूह-गीत असायचं (संगीतकार बहुधा 'कानू-घोष' असायचे), त्यांच 'राही अगर तुझे है अपने पंखो पर विश्वास' किंवा 'हम होंगे कामयाब' सुरू झालं की चपला घालून शाळेत जायची वेळ व्हायची. संध्याकाळी खेळून घरी आलं की शेजार्‍यांच्या रेडियोवर नाट्य-संगीत लागलेलं असायचं. रात्री थोडे हिंदी कार्यक्रम. झोपायच्या वेळी जुनी हिंदी गाणी याचं समीकरणही पक्कं डोक्यात बसलेलं. आपली आवड किंवा इतर श्रुतिका ऐकत खिडकीत उगाचच कोणाची तरी वाट बघत बसलेली आई आत्ता या क्षणीसुद्धा दिसतेय. असो, http://eprasaran.com/ ह्या संकेत स्थळावर सुभाष केळकरांनी त्या जुन्या रेडियोच्या धर्तीवर कार्यक्रम सुरू केले आहेत. जरूर ऐका.

In reply to by मराठे

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 20:15
शनिवारी सकाळी अकरा वाजता कामगार सभेत 'लोकगीतं' लागायची. त्यात बाजीप्रभूंचा ७ मिनिटांचा पोवाडा, त्यातील 'लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, महाराज कूच करावं' हे बाजीप्रभूंचे विरश्रीयुक्त आर्जव, मोजक्या मावळ्यांनीशी लढविलेल्या पावनखिंडीच्या लढाईचे वर्णन, अंगावर तलवारींचे अनंत घाव सोसूनही खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बाजीप्रभू शेवटी अगतिक पणे विचारतात, ' झाले कारे तोफांचे बार? पोहोचले कारे महाराज सुखरुपपणे गडावर? महाराज गडावर पोहोचत नाहीत तो पर्यंत बाजीचे प्राण ह्या देहास सोडून जाणार नाहीत, हर हर महादेव!' शेवटी तोफांचे बार कानी येतात आणि बाजीप्रभू म्हणतात, 'जा! महाराजांना सांगा, तोफांचे बार ऐकू येत नाहीत तोपर्यंत बाजीचे प्राण त्याच्या देहाला सोडून गेले नाही. येतो महाराज, मुजरा स्विकारावा!' हा ७ मिनिटांचा, दोन भागात ऐकवला जाणारा पोवाडा ऐकताना (हज्जारदा ऐकला तरीही) बाजी प्रभूं इतकाच मीही कानात प्राण आणून गडावरच्या तोफांचे आवाज ऐकायला उत्सुक असायचो. बाजी प्रभू प्राण सोडायचे तेंव्हा मलाही गलबलून यायचं, वाटायचं 'बाSSSSजीSSSS' अशी जोरदार हाक द्यावी त्या वीराला आणि सांगावं 'महाराज गडावर पोहोचले आहेत स्वतःला वाचवावं, देह ठेवू नये!' आज, हे लिहीतानाही डोळे पाण्याने भरून आले आहेत.

रेवती Fri, 04/25/2014 - 19:46
आमच्याकडे आज्जी रेडिओवरचं मंडळ की काहीतरी लावून बसायची. मराठी गाणी वगैरे नेहमी चालू असायचं पण सुरुवात मात्र संस्कृत बातम्यांनी! दुसरी आज्जी रात्रीची श्रुतिका चुकवायची नाही. त्यातल्या कथेतील पात्रांमध्ये गुंतायची. मग ऐकता ऐकता "हे वागणं शोभलं का तुला?" किंवा " देवानं मदतीचा हात दिला/ देव पावला" टाईप म्हणायची. मालविका, लेखन आवडले. आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by असंका

खेडूत Sun, 04/27/2014 - 01:20
अजूनही 'ते' रेडिओ चांगले चालतात. पुण्यात पण आहेत. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं या बल्ब चं! १९८५ मध्ये मी हे रेडीओ टीव्ही दुरुस्ती क्लासला जाऊन शिकलो होतो. ट्रान्झीस्टरचे टी व्ही शिकवण्या आधी व्होल्वचे पण शिकवले होते. इंजिनियरिंग करतांना पैसे घेऊन दुरुस्त पण करत असे. पुण्यात रेडिओला पंधरा रुपये आणि टीव्हीला पन्नास रुपये दुरुस्तीला द्यायला पण लोक खुश नसत. मग म्हणलं ''मना-सज्जना त्यापेक्षा इंजिनियर व्हा लवकर!'' आणि हा धंदा बंद केला!

पाषाणभेद Sat, 04/26/2014 - 01:46
पण आजकाल सरकारी नभोवाणीवर जाहिरांतीचा रतीब असतो. कोण कुठलेतरी प्रायोजक दर १० मिनीटांनी बदलतात अन त्यांच्या ओंगळवाण्या जाहिराती जुन्या आकाशवाणीच्या जरतारी साडीला ठिगळ लावलेल्यासारख्या वाजतात. त्यातले फोन नंबर, मोबाईल क्रमांक ऐकतांना ते पाठ होवू नये म्हणून मी मनातल्या मनात किंवा थोडे मोठ्याने 'आआआआअ' असा अर्थहीन घोकतो. जुनी आकाशवाणी खरोखर चांगली होती. महाराष्ट्राला (किंबहूना भारत आणि पाकिस्थानलासुद्धा) आकाशवाणीने पु.ल. वपू. यांसारखी अनेक साहित्तिक मिळवून दिलेत. (ही यादी वाढवा. ज्ञानात भर पडेल.) दोन पिढ्यांच्या बुद्धीवाढीसाठी आकाशवाणीने साहित्तिक खतपाणी दिले. शेतकर्‍याच्या शेतीविषयक ज्ञानात भर टाकली. पुर्वी वेगवेगळ्या राज्यातील रेडीओ केंद्रांच्या कार्यक्रमाची देवाणघेवाण, अनुवादही व्हायचे. कोणतीही रेकॉर्ड तयार झाली की ती रेडीओ लायब्ररीला पाठवण्याचा देखील परिपाठ होता. शॉर्टवेव्ह बँडवर रशियन केंद्र, मध्य आशियातील काही देश आदींमधून हिंदी कार्यक्रमही लागायचे. आता असे रेडीओ सिग्नल्स इतर सिग्नल्सच्या गजबजाटात मिळणे मुश्किल आहे. एक खरा किस्सा फोटोसकट कुठेतरी वाचलेला आहे. आकाशवाणी (पुर्वीची AIR म्हणजेच All India Radio) ही भारतीय नभोवाणीची वाहीनी १९३० साली सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तानचे नामोनिशाण नव्हते. १९४७ साली फाळणी झाल्यानंतर AIR चे पाकिस्तानातील रेडीओकेंद्रे सहाजिकच पाकिस्तानात राहीली. त्यानंतर कित्तेक वर्षे त्या रेडीओ केंद्रांच्यावर AIR असलीची पाटी असायची. नंतर कोणतेतरी भारतिय शिष्टमंडळ तेथील रेडीओ केंद्रांवर भेटी देतांना त्या शिष्टमंडळातील कुणीतरी व्यक्तीने ही जाणीव तेथील अधिकार्‍यांना करून दिली व त्यानंतर बदल झाला. जुन्यात काळानुरूप समयोचीत बदल हवाच पण प्रत्येक जुने म्हणजे उणे असे नव्हे हे आकाशवाणीच्या बाबतीत म्हणावे लागते की काय अशी भिती आता वाटतेय.

खटपट्या Sat, 04/26/2014 - 02:43
मी आख्खा बोक्या सातबंडे रेडिओ वर ऐकला आहे. लहान मुलांसाठी "गम्मत जम्मत" हा कार्यक्रम यायचा. बरीचशी जुनी गाणी फक्त रेडिओ वर ऐकली आहेत म्हणून अजून स्मरणात आहेत. एकदम जुने दिवस आठवले. मराठी अ आणि ब वाहिनी चालू आहे कि माहिती नाही

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 15:35
मी तसा रेडिओच्या जमान्यातला नसलो तरी ट्रांझिस्टरवर क्रिकेट काँमेंटरी ऐकण्याचे नाते आहे आमचे. अगदी डिप्लोमालाही जेव्हा पेजरचा अस्त होऊन नुकतेच मोबाईल येऊ लागले होते तेव्हाही मी कॉलेजला न लाजता वय वर्षे बारा पासून वापरत असलेलो एक जुना ट्रांझिस्टर घेऊन जायचो. (खरे तर जेव्हा विकत घेतला होता तेव्हा मामाने दुबईवरून आणला असल्याने त्याचे कौतुकच होते.) असो, जुना का असेना तो मॅचचा स्कोअर सांगत असल्याने, आणि सर्वांना तो जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने माझा भाव वधारायचाच. पुढे डिग्रीसाठी मी जेव्हा वालचंद सांगलीला गेलो तेव्हाही तिथे आपल्या मुंबईसारखी मॅचची कॉमेंट्री नाही बघून रुखरुख लागलेली. त्यानंतर पुढे मग मोबाईलमध्ये एफएम आले, ईंटरनेट आले, आणि हे सारे दर दुसर्‍याच्या हातात आले, मॅचचा स्कोर समजायचे सतराशे साठ पर्याय उपलब्ध झाले आणि ट्रांझिस्टरची मजा गेली.. तरीही आजही मोबाईल मधील १६-३२ जीबी मेमरीकार्डातील शेकडो-हजारो गाण्यातले एखादे निवडून ते ऐकण्यापेक्षा एफएम वर रॅन्डम लागणारी गाणी, एखादे न आवडल्यास स्टेशन चेंज करत दुसरे तिसरे शोधत ऐकण्यात जास्त मजा येते.

कंजूस Sat, 04/26/2014 - 19:28
रेडीओचे जुने आवडते कलाकार आणि लेखक :शंना नवरे ,रविंद्र पिंगे ,बाळ कुडतरकर ,जयवंत दळवी ,प्रपंच आणि पुन्हा प्रपंचचे आवाज देणारे ,तबस्सुम ,अमिन सयानी ,क्रिकेटचे धावते समालेचक (मराठी),हिंदी आणि इंग्रजीचे कॉमेंटेटर .शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे ,कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे .उदा०कल्याणी ,कोणार्क .कधीकधी कॉफिहॉऊस कट्टा आवडायचा . नवीन एफेमवरचे घंटासिंग आणि अॅँग्रीगणेशन चे जोकस आणि सचिन तेँ०च्या आवाजातली बडबड मस्त असते .रात्रीच्यावेळी टैक्सी चालवणारे वगैरे एफेमवर खुश आहेत .

सुधीर कांदळकर Sat, 04/26/2014 - 20:23
यस्टरडे वन्स मोर मधून खूप जुने नंबर्स आठवले. हमीद सयानींच्या आठवणीने कळ आली. ते खरंच ध्यानीमनी नसतांना अकाली गेले. अमीन सयानींना त्यांची बोर्नव्हीटा क्वीझ कॉन्टेस्टमधली जागा नक्कीच नीटशी घेता आली नाही. इन्सपेक्तर ईगल पण आनंद देऊन गेला. आकाशवाणीच्या हिंदी रेडिओ जाहिरातसृष्टीतली ये ढेरसे कपडे मैं कैसे धोऊं..... ही पहिली सांगितिक जिंगल अशोक पत्कींची होती. अनेक आठवणींना उजाळा देणार्^या लेखाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

अनिवासि Sun, 04/27/2014 - 00:16
हा धागा वाचायला सुरवात केली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या घरी रेडीओ नव्हता. शेजार्यान्कडे जाउन कधी कधी ऐकावयास मिळायचा पण वडलाना ते आवडत नसे. एकदा वडील गावी गेले असताना, तो रेडीओ रात्रीपुरता मागुन आणला - मस्तपैकी गाणी ऐकत झोपलो आणि झोपेत धक्का लागुन तो पडला. वडलाना कळले असते तर माझी धडगत नव्हती! शेवटी आईला शरण गेलो - सदाशिव पेठेत दुरुस्ती करणारे एक जण होते- त्यानी हा भाग मिळत नाही, नन्तर तो भाग मिळत नाही असे करुन चीकार वेळ घेतला- शेजारी समजुन घेणारे होते व वडलानाही चान्गले ओळखत होते म्हणुन त्यानी काही त्रास दीला नाही. शेवटी आईने कसे तरी पैसे भरुन तो परत आणला. आमच्या घरासमोरच एक उडपी रेस्टौरन्ट होते त्याचा रेडीओ क्रिकेट्चा सामना असला की मोठ्याने लागत असे आणी मग तेथे प्रचड गर्दी जमत असे. त्यातुन सामना परदेशात असेल तर रात्री पर्यन्त!! नन्तर मी परदेशात आलो- १९५२- पहिली नोकरी- पगार अगदी तुट्पुन्जा. एक बेड्सीटर खोली- मनोरजनाची साधने अगदी कमी -TV पुर्वीचा काळ-. ५३ साली पहिली मोठी खरेदी- रेडीओ - pilot कम्पनीचा- valve वाला. मग रात्री गाणी ऐकत झोप. रेडिओ सीलोन सारखे radio luxenburgh होते. रेडीओच्या मागच्या जाळीतुन valves चा प्रकाश खोली उजळुन काढायचा. आजही त्याची आठवण आली की भरुन येते. नेहमीप्रमाणे आयुष्यात चढ-उतार आले. शेवटी एकदा तो विकायला काढला पण २६ पौडाला घेतलेल्या त्या रेडीओला ५ पौड पण येईनात म्हणुन विकला नाही. पुढे परत चान्गले दिवस आले. आज तो रेडीओ माझ्या घरात. बसायच्या खोलीत मानाच्या जागेवर विराजत आहे- माझ्या आयुष्याचा साक्षीदार! मला वाटते की त्याची त्यावेळची पावती देखील माळ्यावर कोठेतरि आहे. शेवटी, all India radio चा signature tune - कायम डोक्यात होता. भारतात आलो की तो ऐकावासा वाटे- आज बहुगुणी मुळे ऐकावयास मिळाला. ध्न्यवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराल

भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी

पगला गजोधर ·

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 12:59
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, आणि भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे ह्या दोन ओळीच विडंबन किंवा उपहास म्हणता येतील बाकी ओळीत मात्र वास्तवच दिसत. पु.ले.शु.

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 12:59
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, आणि भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे ह्या दोन ओळीच विडंबन किंवा उपहास म्हणता येतील बाकी ओळीत मात्र वास्तवच दिसत. पु.ले.शु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, भ्रष्टाचार सोडून देईल, अशी कोणाची स्वकमाई, भ्रष्टाचार मेडीकल बिलात नांदे, भ्रष्टाचार टॅक्सरिटर्नमध्ये कोंदे भ्रष्टाचार ब्ल्याकच्या तिकिटात, भ्रष्टाचार आहे डोनेशनात भ्रष्टाचार शोधूनिया पाही, भ्रष्टाचार सर्वाभूतां ठायी भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे भ्रष्टाचार आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या-माझ्या जड देही भ्रष्टाचार भरूनिया राही भ्रष्टाचार जरी अवगुण, भ्रष्टाचार सत्तेचे कारण निवडणूक येई, निवडणूक जाई, भ्रष्टाचार आहे तैसा राही ----पगला गजोधर

पडघम २०१४-भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण

क्लिंटन ·

In reply to by शिद

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:03
पण आमच्या पालघर मतदार संघाला का वगळले? त्याचे पण विश्लेषण येउ द्या.
अरे हो. पालघर राहिलेच की. लेख संपादित करून पालघरचा समावेश केला आहे. (हल्ली लेखकालाच लेख संपादित करता येऊ लागले आहेत का? तसे वाटत आहे खरे)

In reply to by क्लिंटन

शिद गुरुवार, 04/24/2014 - 19:57
धन्यवाद क्लिंटन, माझ्या विनंतीचा मान राखुन पालघर मतदारसंघाचे अंदाज व्यक्त केल्याबद्दल. :)
कॉंग्रेसने आपला उमेदवार (राजेन्द्र गावीत) मागे घेतला आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
ह्या मागे फार मोठे अर्थकारण झाले आहे बविआ व कॉंग्रेस मध्ये.
या भागातून कॉंग्रेसचे दामू शिंगडा,
ह्या वेळी दामू शिंगडा ह्यांना कॉंग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज होवुन त्यांनी त्यांच्या मुलाला सचिन शिंगडा ह्यांना अपक्ष म्हणून रींगणात आणले आहे.
तेव्हा सध्याचा अंदाज पालघरमधून भाजप.
तुमचा हा अंदाज खरा ठरावा ही आकाशातल्या बापाकडे मनापासुन प्रार्थना. वसई-विरारकर बविआ'च्या घाणेरड्या राजकारणाला पिचले आहेत. अवांतरः खालील ओळी ह्या अश्याच टिपी म्हणुन माझ्या बविआ समर्थक मित्रांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वर खरडल्या होत्या. तुम्ही काही म्हणा पण विरार ची खूप प्रगती झाली आहे... मनवेलपडा ला संध्याकाळी जायला रिक्षा मिळत नाही म्हणून काय झाले... अंडर ग्राउंड समोर २४ तास वाहतूक कोंडी असली म्हणून काय झाले... बिना लायसन्स रिक्षावाले मोकाट सुटले म्हणून काय झाले.... दिवसा ढवळ्या सोन्याची चेन खेचली म्हणून काय झाले... फेरीवाले कुठे हि ठाण मांडून बसले म्हणून काय झाले.... थोडे फार खड्डे रस्त्यांत असले म्हणून काय झाले.... गरज नसताना स्काय वॉक बांधला म्हणून काय झाले.... गरज असताना ओवर ब्रिज चे काम थांबून ठेवले म्हणून काय झाले... युपी बिहार च्या मस्तवाल लोकांना व बांगलादेशी देशाद्रोहींना राहायला जागा वीज पाणी ची सोय करून दिली म्हणून काय झाले.... कोण म्हणतोय कि विरार ची प्रगती झाली नाही म्हणून...हीच तर खरी आदर्श प्रगती.

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 13:51
शिवसेना ठाणे( राजन विचारे), कल्याण(डॉ श्रीकांत शिंदे), रायगड(अनंत गीते), रत्नागिरी-सिंधूदुर्ग(विनायक राउत) इथे जिंकेलच. पण मुंबई मध्ये गजानन किर्तीकर आणि अरविंद सावंत विजयी होतील. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांना उमेदवारी दिल्याने सामान्य शिवसैनिक आणि सेनचा पारंपारिक मतदार समाधानी आहे तिथे गुजराती समाज पण मोदींमुळे सेनेला मत देईल.नांदगावकर यंदा नाखुशीने मैदानात उतरले आहेत. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत बाळा नांदगावकरांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वार्डात सेनेने मनसेचा पार धुव्वा उडवला होता. अरविंद सावंतांना तिथे चांगली संधी आहे. तसेच दक्षिण मध्य मध्ये सेनेचे राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात जोरात चुरस आहे. मुंबई मध्ये शिवसेनेचे कमीत की २ (जास्तीत जास्त तिन्ही) उमेदवार जिंकतील. मुंबई मध्ये भाजप २ जागा जिंकेल, भाजपला पालघर मध्ये पण चांगली संधी आहे मात्र भिवंडी कॉंग्रेसकडे जाइल असा माझा अंदाज आहे.

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 13:53
पण महाराष्ट्राच्या बाबतीत एक मोठ्ठा ढिस्क्लेमर आहे. मतदान यंत्रातील घोटाळे आणि गायब झालेली ६० लाख नावे (६० लाख म्हणजे ४/५ मतदारसंघ झाले.) यांचा नेमका काय परिणाम होईल हे ती नावे गायब करणारी कंपनीच जाणे. रत्नागिरीतील बरीच नावे गायब झाल्याचे ऐकले आहे.

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 14:02
६० लाख नावे गायब वगैरे कितपत खरे असेल माहित नाही.बरीच नावे एका जागेहून दुसरीकडे टाकली (स्थलांतरित झाल्याने) तरी लोक वगळली म्हणत आहेत.तरीदेखील प्रशासकीय घोळामुले काही नवे नक्कीच गायब आहेत. फक्त आकडा ६० लाख खरा वाटत नाही आणि नावे वगळली गेली तरी सर्वच पक्षांना त्याचा थोड्या फार प्रमाणात सारखाच फटका बसणार आहे.पुण्यात कोथरूड वगैरे भागात बरीच नावे गायब झाली तिथे महायुतीचे मतदार जास्त हे जर वेळ मान्य केले तरी बाकी ठिकाणी तसे नाही. नावे वगळली जाणे याचा सर्वच पक्षांना सारखाच फटका बसेल.

In reply to by दुश्यन्त

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 14:44
इलेक्शन कमिशनचे महाराष्ट्रातील अधिकारी नितीन गद्रे यांनीच हा आकडा दिला आहे. तसेच ती नावे "वगळली" असेही ते म्हणत आहेत. http://www.ndtv.com/elections/article/election-2014/six-million-voters-names-deleted-in-maharashtra-510991 एका जिल्ह्यातली एक लाख नावे दुसर्‍या जिल्ह्यात आपोआप दाखवली गेली हा तर अगदीच विचित्र प्रकार ऐकायला येतो आहे.

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 14:32
मुंबई दक्षिण, उत्तर पूर्व व काही प्रमाणात भिवंडी इथे आआपला बरेच अंडर एस्टिमेट केले आहे असे वाटते. भिवंडीला आआप जिंकणार नक्की नाही पण निकालांवर जाणवणेबल परिणाम करेलसे वाटते. मुंबई दक्षिण व उत्तर पूर्व यात आअपचा अंडरकरंट असण्याची शक्यता आहे. रायगड मध्ये तटकरेंना हरवणे इतके सोपे जाऊ नये. शेकाप वेगळी झाली आहेच, दुसरे असे की शेकापचा पारंपरिक मतदार हो पनवेल, उरण, कर्जत भागात होता तो भाग आता मावळ मतदारसंघात आहे. यातील शहरी भागात (पनवेल वगैरे)शिवसेनाही मजबुत होती. तटकरेंचा मतदार मात्र एकसंध अजुनही शाबुत आहे. या मतदारसंघात मोठी चुरस व्हायची शक्यता आहे. मुंबई दक्षिण मध्य सर्वात चुरशीचा होईल याच्याशी सहमत!

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 14:39
क्लिंटन-२००९ च्या लोकसभेतही महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस आघाडीविरोधी जनमत होते हे मात्र पटले.तुम्ही लिहील तसं मुंबईतील ६ पैकी ५ मतदार संघ, तसेच ठाणे, भिवंडी, नाशिक, पुण्यात मनसेमुळे कॉंग्रेस-एनसीपी निवडून यायला मदत झाली. मुंबई आणि ठाणे जिल्हा मिळून १० जागा लोकसभेच्या आहेत.पैकी २००९ला केवळ कल्याण युतीकडे आले होते बाकी नऊ जागी कॉंग्रेस, एनसीपी आणि पालघरला ब. वि. आघाडी आली होती. मात्र एवढे होवूनही उर्वरित महाराष्ट्रात युतीने (तेव्हा महायुती झाली नव्हती) ३८ पैकि १९ जागा जिंकल्या होत्या, कोल्हापुरात अपक्ष मंडलिक तर हातकनंगले मध्ये राजू शेट्टी हे दोघे कॉंग्रेस- एनसीपीला हरवून विजयी झाले होते. २००९ला मनसेमुळे झालेले विरोधी मतांचे विभाजन होवून कॉंग्रेस- एनसीपीला फायदा झाला होता.अर्थात बाकीही काही मुद्दे नक्कीच होते मात्र हा एक महत्वाचा मिद्द होता. यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.तसेच सेना-भाजप बरोबर आर पी आय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे तेव्हा राज्यात महायुतीला चांगला फायदा होईल असे दिसत आहे.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:08
यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.
हो माझे पण हे गृहितक आहेच. दक्षिण मुंबईतून मनसे तरीही जिंकेल असे मला वाटते कारण आआप मिलिंद देवरांची बरीच मते खाईल. तसेच शिवसेनेचा उमेदवार मोहन रावलेंइतका सुपरिचित आहे असे वाटत नाही.आणि मधल्या काळात मोहन रावले पक्षाबाहेर जाणे (ते परत आले असले तरी) यामुळे शिवसेनेला थोडेफार नुकसान होईलच. महापालिकेत मनसेचा त्या भागातून पराभव झाला होता हे मान्य.पण तरीही महापालिका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मुद्दे नक्कीच वेगळे असतात. प्रत्यक्षात काय होते हे १६ मे रोजीच कळेल :)

In reply to by क्लिंटन

सुधीर Fri, 04/25/2014 - 09:08
मोदी जेव्हा प्रथम मुंबईत आले होते तेव्हा, दक्षिण मुंबईतल्या व्यापारी बंधुंनी मिलिंद देवरा आणि मोदींना एकाच स्टेजवर आणले होते. त्याच्या मतानुसार, आमचा खासदार मिलिंद देवरा, पण सत्ता मोदींची. त्यामुळे काँग्रेसची मत फुटणार नाहीतसे वाटते. शिवाय, आदी गोदरेज आणि दीपक पारेख यांनी देवरांना पसंती दिली आहे. त्याचा नाही म्हणायला "इन्फ्लुअंस" पडतोच. काँग्रेसची मत फुटलीच तर ती भेंडीबाजार/मशिद बंदर मधली फुटतील. देवरांच्या रॅली मध्ये याही एरीयात जोर होता हे मी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसची ही सिट पक्की असावी. आआप फक्त काँग्रेसचीच मत खातील अस मला वाटत नाही. बघू निकाल काय येतोय ते.

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 14:47
ऋषिकेश- भिवंडी बद्दल माहित नाही मात्र मुंबई मध्ये 'आप' ईशान्य मुंबई (मेधा पाटकर) चांगल्यापैकी आणि दक्षिण मुंबईमध्ये (मीरा सन्याल) बर्यापैकी मते घेईल.दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल. ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे.सुरुवातीपासून तिथे आपने आणखी जोर लावला असता तर कदाचित मेधाताई तिथे जिंकल्या सुद्धा असत्या.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:11
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल.
+१. म्हणूनच कधीकधी वाटते की १६ मे रोजी आआपला भाजपची बी टिम असे म्हटले तरी त्यात फारसे आश्चर्य वाटू नये :)
ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे
हो म्हणूनच मुळातल्या लेखात दुसर्‍या स्थानासाठी मेधा पाटकर आणि संजय पाटील यांच्यात लढत होईल असे म्हटले आहे :)

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 17:30
क्लिंटन- महायुतीला मनसे बेजार करत असेल तर तसच काहीस आप आणि सपा कॉंग्रेस आघाडीला ताप देवू शकतात. उर्वरित महाराष्ट्राबद्दलचे अंदाज पण लवकरच येवू देत. :)

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 19:30
चल मतदान तर संपल आता १६ मेला काय ते स्पष्ट होईल. मुंबईमध्ये अंदाजे ५३% तर राज्यात बाकी ठिकाणी सरासरी अंदाजे ५६% अस मतदान झाल्याच समजतंय. अधिकृत आकडे येतीलच. मुंबईमध्ये २००९ल ४१% च्या आसपास मतदान झाल होत म्हणजे यंदा त्यात वाढ झाली आहे. मात्र अपेक्षा आणखी मतदानाची होती.बर्याच लोकांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आल नाही.रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात साधारणपणे ६०% मतदान झाल आहे. मात्र सगळ्यात कमी मतदान कल्याण (४२%), भिवंडी (४३%) आहे ठाणे (५२%).

राजेश घासकडवी गुरुवार, 04/24/2014 - 20:57
छान विश्लेषण. घोडा मैदान जवळच आहे.
२००९ मध्ये देशभर युपीएसाठी अनुकूल वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कौल मात्र त्याविरूध्द होता असे म्हणायला हरकत नाही.
हे विधान फार व्यापक वाटतं. साल कॉंग्रेस+एनसीपी भाजपा+शिवसेना २००४ ४२%(जागा २२) ४३%(जागा २५) २००९ ३९%(जागा २५) ३७%(जागा २०) २००९ साली शिवसेनेची मतं २% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली आणि जागा फक्त एकच कमी झाली. याउलट भाजपाची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट)नी कमी झाली आणि जागा ४ गेल्या. मनसेमुळे मतं कमी झाली हे उघडच आहे. पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेतो आणि नंतरच प्रस्थापित पक्षांच्या मतांना धक्का पोहोचवतो
याही विधानाचा वरच्या आकडेवारीनुरूप पुनर्विचार व्हायला हवा. मनसेसारख्या नवीन पक्षाने भाजपा आणि कॉंग्रेसची मतं खाल्ली. तशीच ती इतर फ्लोटिंग लोकांनीही खाल्ली. टक्केवारीत तोटा राष्ट्रीय पक्षांचा मोठा झाला - दोघांचे मिळून ८% पॉइंट्स! आणि मनसेला ५% मतंच मिळालेली असल्यामुळे इतरांनाही त्यातली काही गेली.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 22:37
पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
पूर्ण राज्यपातळीवरील मते एकत्र केली तर असे चित्र दिसेल.पण ते चित्र पूर्णपणे परिस्थितीशी मिळतेजुळते आहे असे नाही. सर्वप्रथम २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण राज्यपातळीवर पुढीलप्रमाणे चित्र होते:
   
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस२३.८%१९.६%-४.२%
राष्ट्रवादी१८.३%१९.३%१.०%
रिपब्लिकन पक्ष (आठवले)१.०%१.३%०.३%
जोगेन्द्र कवाडे (चिमूर)०.७% -०.७%
बच्चू कडू (अमरावती)०.६% -०.६%
हरीभाऊ महाले (मालेगाव)०.६% -०.६%
एकूण युपीए४५.०%४०.२%-४.८%
शिवसेना२०.१%१७.०%-३.१%
भाजप२२.६%१८.२%-४.४%
अजित घोरपडे (सांगली) ०.९%०.९%
एकूण एन.डी.ए४२.७%३६.१%-६.६%
मनसे ४.१%४.१%
बसपा३.१%४.८%१.७%
सपा०.८%१.०%०.२%
इतर८.४%१३.८%५.४%
मी म्हणतो की राज्यपातळीवरील कल बघितला तर तो परिस्थितीचे नक्की चित्र उभे करत नाही याचे कारण जो मनसेचा इफेक्ट आपण विचारात घेत आहोत तो पूर्णपणे स्थानिक एफेक्ट होता. मुंबई-ठाणे परिसरातील ९ लोकसभा जागांच्या परिसरात (मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण आणि भिवंडी) २००४ आणि २००९ मध्ये चित्र पुढीलप्रमाणे होते.
   
मुंबई-ठाणे ९ जागा  
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस३५.०%२६.४%-८.६%
राष्ट्रवादी१३.६%१२.०%-१.६%
एकूण युपीए४८.६%३८.४%-१०.२%
शिवसेना२५.६%१७.२%-८.४%
भाजप१९.७%१२.८%-६.९%
एकूण एन.डी.ए४५.३%३०.०%-१५.३%
मनसे २०.७%२०.७%
इतर६.१%१०.९%४.८%
यातून कळते की या ९ जागांच्या परिसरात मनसेने तब्बल २०.७% मते मिळवली. भाजप-शिवसेना युतीने १५.३% मते गमावली तर युपीएने १०.२%. मनसे २००९ मध्ये पहिल्यांदा आली तेव्हा या भागात मुळात फ्लोटिंग मते ६.१% म्हणजे त्या मानाने खूप जास्त नव्हती. तसेच मनसे आणि शिवसेना यांच्यातील व्होटबॅंकमधील समानता लक्षात घेता मनसेला ही मते पहिल्यांदा हल्ला करायला नव्हती. त्यामुळे मनसेचा पहिला थेट हल्ला शिवसेना-भाजप युतीच्या मतांवर पडला असे म्हणायला हरकत नसावी. (फ्लोटिंग मतेसुध्दा २००४ ते २००९ या काळात ४.८% ने वाढलेली दिसतात. या वाढलेल्या ४.८% पैकी किमान २.७% मते दोन तगड्या उमेदवारांमुळे वाढलेली होती. मुंबई उत्तर मध्यमधून समाजवादी पक्षाचे अबु आझमी आणि भिवंडीमधून विश्वनाथ पाटील यांनी तितकी मते घेतली. लेखमालेच्या पहिल्या भागात लहान राज्यांमध्ये तगडे उमेदवार--उदाहरणार्थ छत्तिसगडमधील ताराचंद साहू असतील तर ते लहान पक्ष/फ्लोटिंग मते वाढवू शकतात. छत्तिसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा आहेत.मुंबई-ठाणे परिसर हे वेगळे राज्य असे समजले तर या लहान राज्यात स्थानिक तगडे उमेदवार तोच परिणाम साधू शकतात. इथे तेच झाले आहे असे दिसते.) हे विश्लेषण मी मुंबई-ठाणे परिसराविषयी केले आहे. मनसेने पुणे आणि नाशिकमध्येही युतीचे असेच नुकसान केले होते. बाकी मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ भागासाठीचे विश्लेषण करून बघितलेले नाही.प्रायमा फॅसी असे वाटते की युपीएचे अनेक मतदारसंघ क्षेत्रांमध्ये बरेच नुकसान झाले आणि त्यामानाने कमी मतदारसंघ क्षेत्रांमध्ये थोडा फायदा झाला तरी मनसे फॅक्टरमुळे २००४ पेक्षा २००९ मध्ये २ जागा युपीएने जास्त मिळवल्या. २००४ आणि २००९ मध्ये मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा वेगळ्या होत्या त्यामुळे हे विश्लेषण मतदारसंघनिहाय करता येऊ शकले नाही.तसे केल्यास मला म्हणायचे आहे तो मुद्दा अधिक स्पष्ट झाला असता. १९९८ मध्ये वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाला मिळालेली मते आणि त्याचा परिणाम याविषयी पहिल्या भागात लिहिले आहे. तिथेही राज्य पातळीवरील मते लक्षात घेतली तर वाघेलांच्या पक्षाने भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे नुकसान केले नाही असे दिसते.पण मतदारसंघनिहाय विश्लेषण केल्यास अनेक ठिकाणी वाघेलांच्या पक्षाने भाजपपेक्षा कॉंग्रेसचे नुकसान अधिक केले असे दिसते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे अनेकदा हे कल राज्य पातळीवर थोडे कॅमोफ्लॅज होतात.त्यापेक्षा लहान पातळीवर विश्लेषण केल्यास ते अधिक स्पष्ट होतील.

In reply to by क्लिंटन

राजेश घासकडवी गुरुवार, 04/24/2014 - 23:28
तुम्ही दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई-ठाणे परिसरातही कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांची २५ टक्के (पॉइंट) नी कमी झाली, आणि मनसेला २१ (पॉइंट) टक्के मिळाली असं चित्र आहे. मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत. तेव्हा आआप कोणाची मतं कुठे खाईल हे जागानिहाय ठरेल. सरसकट 'फ्लोटर्सचा आधी तोटा, नंतर मोठ्या पक्षांचा' असं म्हणता येणार नाही. मला वाटतं मोठ्या पक्षांना ज्यांनी नाइलाजाने मत दिलेलं आहे असा एक मोठा मतदार वर्ग असतो. नवीन पर्याय उपलब्ध झाला की ते लोक उत्साहाने आणि आशेने त्यांना मतदान करतात. या परिणामाला मी अॅंटि-एस्टॅब्लिशमेंट म्हणेन. ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही. तसं झालं तर काय होईल सांगणं कठीण वाटतं आहे. पण गेल्या वेळी राज्यपातळीवर मनसेमुळे हेच झालं आणि त्याची परिणती युपीएच्या जागा वाढण्यात झाली. तेच आत्ता होईल असं नाही, पण माझा मुद्दा असा आहे की काहीही होऊ शकतं. दुसरा एक मुद्दा (यावर एक स्वतंत्र लेख यावा अशी विनंती). दर निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार मोठ्या संख्येने असतो. सध्याच्या एकूण मतदारांपैकी सुमारे १५-२०% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असतील (आकड्याबद्दल खात्री नाही). तसंच जुने वयस्क मतदार जे बहुतेक वेळा पक्षांचे हक्काचे मतदार असतात ते गेल्या पाच वर्षांत मृत्यू किंवा आजार यामुळे मतदानातून कायमचे बाहेर पडतात. एक फ्लुइडिटी येते. तेव्हा या नवीन तरुण मतदारवर्गाची मतं कोणाला जातील? सर्वसाधारणपणे कोणाला जातात? त्यामुळे आत्तापर्यंत निकालांत कसा फरक पडलेला आहे? जातीनिहाय, धर्मनिहाय वगैरे मतदान होतं तसं वयोगटाप्रमाणेही वेगवेगळं मतदान होतं का? तरुण लोक अधिक राष्ट्रवादी असतात, आशावादी असतात, की सेक्युलर असतात? पुन्हा एकदा, या प्रश्नांबाबत एक स्वतंत्र लेख वाचायला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:21
करे़क्ट. आम्ही याच वर्गात मोडत होतो. पण नव्या पर्यायाने जुन्यापेक्षाही जास्त निराशा केल्यामुळे आम्ही परत जुन्या आणि मोठ्या पक्षाच्या वर्गात. सुबह का भुला शाम को घर लौट आया तो उसे भुला नही कहते ! या चालीवर.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन Fri, 04/25/2014 - 10:34
मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत.
याचे कारण २००४ च्या बेसचा विचार केला तर त्यावेळी मुंबई आणि परिसरात फ्लोटिंग मते केवळ ६% होती.तसेच अबू आझमी, भिवंडीतील विश्वनाथ पाटील यांच्यासारख्या स्थानिक तगड्या उमेदवारांमुळे ही फ्लोटिंग मते २००९ मध्ये वाढलेली दिसतात (२००४ मधील ताराचंद साहूंना समकक्ष परिणाम).तेव्हा पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांना धक्का ही परिस्थिती यायला मुळात तितक्या प्रमाणात फ्लोटिंग मतांचा बेसच मनसेला उपलब्ध नव्हता.त्यामुळे मनसेचा धक्का युती आणि आघाडी या दोन्ही प्रस्थापितांना बसला.त्यातही तो युतीला आघाडीपेक्षा खूपच जास्त बसला. नवा पक्ष फ्लोटिंग मते कशी खातो याची दोन उदाहरणे पहिल्या भागातील http://misalpav.com/comment/564049#comment-564049 या प्रतिसादात दिली आहेत. दिल्लीमध्ये आआपला डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांमध्ये २९.५% मते मिळाली त्यापैकी कुठल्या पक्षाची किती टक्के मते होती हे त्या तक्त्यात कळेल. तरीही यावरून एक गोष्ट कळते की आआपने बसपा, अपक्ष आणि इतरांची २००८ च्या तुलनेत जवळपास ४९% मते खाल्ली तर काँग्रेसची ३९% मते खाल्ली. मुळात काँग्रेसच्या मतांचा बेस २००८ मध्ये ४०% इतका मोठा होता त्यामुळे पक्षाला तोटाही जास्त झाला.पण आआपने जास्त मते बसपा, अपक्ष आणि इतर या फ्लोटिंग मतांमधून जास्त खाल्ली. तीच गोष्ट शंकरसिंग वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाची गुजरातमध्ये १९९८ च्या निवडणुकांमध्ये. आता २०१४ च्या निवडणुकांचा विचार करता मुंबईत मागच्या वेळी मनसेला मिळालेली मते हा मोठा फ्लोटिंग मतांचा मोठा बेस आआपला उपलब्ध आहे.हा बेस २००९ मध्ये मनसेला उपलब्ध असलेल्या बेसपेक्षा बराच जास्त आहे. त्यामुळे मला वाटते की पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांची मते खाणे हा प्रकार आआप मुंबईत करेल (जसे दिल्लीत झाले). नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेणे आणि मग प्रस्थापित मतांवर हल्ला करणे असे का होत असावे याविषयी मला वाटते की एक कारण आहे. ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही.मुळात लोक फ्लोटिंग पक्षांना मते का देतात? त्यांची प्रस्थापित पक्षांकडून निराशा झालेली असते आणि अशांना मोठ्या पक्षांना मत द्यायचे नसते त्यामुळे आपले मत फुकट जायची शक्यता आहे याची कल्पना असतानाही लोक लहान पक्ष/फ्लोटिंग पक्ष यांना मते देतात (लोकसभेपेक्षा विधानसभेत हे प्रमाण जास्त असते हे आपण पहिल्या भागात बघितले आहे). जेव्हा नवा पर्याय येतो तेव्हा हा नवा पर्याय या फ्लोटिंग मतदारांना अधिक अपीलिंग ठरतो.असे मतदार विचार करतात की एवीतेवी आपले मत प्रस्थापित पक्षाला जाणार नाही मग त्यातही नवा पर्याय असेल त्याला का देऊ नये? यातून सुरवातीला अशा नव्या पक्षाचा बेस वाढत जातो.हे निरीक्षण बरोबर आहे का हे एखाद्या पोलिटिकल सायन्सवाल्याला मला विचारायचे आहे.
ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही.
तसे दिल्लीमध्ये झाले.दिल्लीमध्ये भाजप-अकाली दलाची सुमारे ८% मते आआपकडे वळली पण काँग्रेसची मात्र जवळपास ४०% मते आआपकडे वळली हे आपण बघितलेच आहे. त्यातही भाजप-अकाली दलाची मते आआपकडे का वळली असावीत? विधानसभेच्या वेळी केजरीवालांनी केवळ काँग्रेसलाच लक्ष्य केले होते आणि भाजप,मोदी किंवा तथाकथित जातीयवाद/धर्मनिरपेक्षता इत्यादी गोष्टींवर काहीही भाष्य केले नव्हते.त्यामुळे अन्यथा भाजपला ज्या मतदारांनी मत दिले असते त्यापैकी काही मतदारांनी विधानसभेत नव्या पक्षाला संधी देऊन बघू या उद्देशाने आआपला मत दिले असेल असे वाटते. पण आता केजरीवाल काँग्रेसपेक्षा मोदींना टार्गेट करत आहेत हे दिसत आहेच.त्यामुळे यावेळी भाजप समर्थक आआपला मते देतील ही शक्यता फारच थोडी.(डिसेंबरमध्ये मिपावरच आआपला भाजपसमर्थकांकडून मिळणारा पाठिंबा आणि आता मिळणारा पाठिंबा यात बराच फरक आहे हे दिसतेच.) त्यातूनही दिल्लीमध्ये अण्णांच्या उपोषणांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यावेळच्या वातावरणात केजरीवाल हा ओळखीचा चेहरा दिल्लीवाल्यांसाठी होता.मुंबईत मात्र तितक्या प्रमाणात कोणताही ओळखीचा चेहरा आआप यशस्वी झालेला नाही.काही प्रमाणात मेधा पाटकर हा तो चेहरा आहे पण त्यांना पाठिंब्याऐवजी विरोध करणारेच जास्त आहेत. अर्थातच एकही भाजप समर्थकाचे मत आआपला जाणार नाही असे नक्कीच नाही.पण काँग्रेसकडून युतीकडे वळलेली मते त्यापेक्षा जास्त असतील आणि एकूण परिणाम युतीची मते वाढणे आणि आघाडीची कमी होणे हा असेल असे वाटते. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे १६ मे रोजीच कळेल.

विकास गुरुवार, 04/24/2014 - 22:46
मस्त लेखन आणि अंदाज! तरी देखील मतदार याद्यांमधील घोळामुळे कितपत फरक जाणवेल ते बघायचे. आज मुंबईत गेल्या वेळेपेक्षा नक्कीच जास्त मतदान झाले आहे. त्याचा फायदा प्रस्थापितांना मिळणार का नाही हे बघायचे आहे.

ऋषिकेश Fri, 04/25/2014 - 09:33
काल मतदान फार मोठ्या प्रमाणात झालेले नाही. (म्हणजे १०% वाढ आहे, पण बदलासाठी जी लाट येते, अचानक २०% वगैरे मतदानात वाढ होते तसे नाही - जे मुंबईत फारसे कधी होतही नाही म्हणा!) इशान्य मुंबईत, मानखुर्द, भांडूप, विक्रोळी भागात मतदान किती झाले व घाटकोपर, मुलुंड भागात किती झाले यावर मेधाताई जिंकतील की नाही हे ठरावे. ही विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान टक्केवारी कुठे मिळेल? दक्षिण मुंबईचेही तेच! अवांतरः या निवडणूकीत तु महाराष्ट्रातील कोणत्याही अशा एका उमेदवाराचं नाव घे त्याला मी जिंकला असे घोषित करतो अशी ऑफर मला निवडणूक आयुक्तांनी दिली तर मी मेधाताईंचं नाव घेईन.

@ क्लिंटनः एवढा मोठा डेटा गोळा करणे व त्यातली इनफायनाईट व्हेरिएबल्स जमेस धरून त्याचे विश्लेषण करणे आणि परत ते सोप्या भाषेत सरळ लिहीणे या सगळ्यासाठी लागणार्‍या अचाट श्रम, चिकाटी, आवड आणि बुद्धीचे प्रचंड कौतूक आहे ! ___/\___ .

In reply to by शिद

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:03
पण आमच्या पालघर मतदार संघाला का वगळले? त्याचे पण विश्लेषण येउ द्या.
अरे हो. पालघर राहिलेच की. लेख संपादित करून पालघरचा समावेश केला आहे. (हल्ली लेखकालाच लेख संपादित करता येऊ लागले आहेत का? तसे वाटत आहे खरे)

In reply to by क्लिंटन

शिद गुरुवार, 04/24/2014 - 19:57
धन्यवाद क्लिंटन, माझ्या विनंतीचा मान राखुन पालघर मतदारसंघाचे अंदाज व्यक्त केल्याबद्दल. :)
कॉंग्रेसने आपला उमेदवार (राजेन्द्र गावीत) मागे घेतला आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
ह्या मागे फार मोठे अर्थकारण झाले आहे बविआ व कॉंग्रेस मध्ये.
या भागातून कॉंग्रेसचे दामू शिंगडा,
ह्या वेळी दामू शिंगडा ह्यांना कॉंग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज होवुन त्यांनी त्यांच्या मुलाला सचिन शिंगडा ह्यांना अपक्ष म्हणून रींगणात आणले आहे.
तेव्हा सध्याचा अंदाज पालघरमधून भाजप.
तुमचा हा अंदाज खरा ठरावा ही आकाशातल्या बापाकडे मनापासुन प्रार्थना. वसई-विरारकर बविआ'च्या घाणेरड्या राजकारणाला पिचले आहेत. अवांतरः खालील ओळी ह्या अश्याच टिपी म्हणुन माझ्या बविआ समर्थक मित्रांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वर खरडल्या होत्या. तुम्ही काही म्हणा पण विरार ची खूप प्रगती झाली आहे... मनवेलपडा ला संध्याकाळी जायला रिक्षा मिळत नाही म्हणून काय झाले... अंडर ग्राउंड समोर २४ तास वाहतूक कोंडी असली म्हणून काय झाले... बिना लायसन्स रिक्षावाले मोकाट सुटले म्हणून काय झाले.... दिवसा ढवळ्या सोन्याची चेन खेचली म्हणून काय झाले... फेरीवाले कुठे हि ठाण मांडून बसले म्हणून काय झाले.... थोडे फार खड्डे रस्त्यांत असले म्हणून काय झाले.... गरज नसताना स्काय वॉक बांधला म्हणून काय झाले.... गरज असताना ओवर ब्रिज चे काम थांबून ठेवले म्हणून काय झाले... युपी बिहार च्या मस्तवाल लोकांना व बांगलादेशी देशाद्रोहींना राहायला जागा वीज पाणी ची सोय करून दिली म्हणून काय झाले.... कोण म्हणतोय कि विरार ची प्रगती झाली नाही म्हणून...हीच तर खरी आदर्श प्रगती.

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 13:51
शिवसेना ठाणे( राजन विचारे), कल्याण(डॉ श्रीकांत शिंदे), रायगड(अनंत गीते), रत्नागिरी-सिंधूदुर्ग(विनायक राउत) इथे जिंकेलच. पण मुंबई मध्ये गजानन किर्तीकर आणि अरविंद सावंत विजयी होतील. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांना उमेदवारी दिल्याने सामान्य शिवसैनिक आणि सेनचा पारंपारिक मतदार समाधानी आहे तिथे गुजराती समाज पण मोदींमुळे सेनेला मत देईल.नांदगावकर यंदा नाखुशीने मैदानात उतरले आहेत. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत बाळा नांदगावकरांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वार्डात सेनेने मनसेचा पार धुव्वा उडवला होता. अरविंद सावंतांना तिथे चांगली संधी आहे. तसेच दक्षिण मध्य मध्ये सेनेचे राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात जोरात चुरस आहे. मुंबई मध्ये शिवसेनेचे कमीत की २ (जास्तीत जास्त तिन्ही) उमेदवार जिंकतील. मुंबई मध्ये भाजप २ जागा जिंकेल, भाजपला पालघर मध्ये पण चांगली संधी आहे मात्र भिवंडी कॉंग्रेसकडे जाइल असा माझा अंदाज आहे.

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 13:53
पण महाराष्ट्राच्या बाबतीत एक मोठ्ठा ढिस्क्लेमर आहे. मतदान यंत्रातील घोटाळे आणि गायब झालेली ६० लाख नावे (६० लाख म्हणजे ४/५ मतदारसंघ झाले.) यांचा नेमका काय परिणाम होईल हे ती नावे गायब करणारी कंपनीच जाणे. रत्नागिरीतील बरीच नावे गायब झाल्याचे ऐकले आहे.

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 14:02
६० लाख नावे गायब वगैरे कितपत खरे असेल माहित नाही.बरीच नावे एका जागेहून दुसरीकडे टाकली (स्थलांतरित झाल्याने) तरी लोक वगळली म्हणत आहेत.तरीदेखील प्रशासकीय घोळामुले काही नवे नक्कीच गायब आहेत. फक्त आकडा ६० लाख खरा वाटत नाही आणि नावे वगळली गेली तरी सर्वच पक्षांना त्याचा थोड्या फार प्रमाणात सारखाच फटका बसणार आहे.पुण्यात कोथरूड वगैरे भागात बरीच नावे गायब झाली तिथे महायुतीचे मतदार जास्त हे जर वेळ मान्य केले तरी बाकी ठिकाणी तसे नाही. नावे वगळली जाणे याचा सर्वच पक्षांना सारखाच फटका बसेल.

In reply to by दुश्यन्त

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 14:44
इलेक्शन कमिशनचे महाराष्ट्रातील अधिकारी नितीन गद्रे यांनीच हा आकडा दिला आहे. तसेच ती नावे "वगळली" असेही ते म्हणत आहेत. http://www.ndtv.com/elections/article/election-2014/six-million-voters-names-deleted-in-maharashtra-510991 एका जिल्ह्यातली एक लाख नावे दुसर्‍या जिल्ह्यात आपोआप दाखवली गेली हा तर अगदीच विचित्र प्रकार ऐकायला येतो आहे.

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 14:32
मुंबई दक्षिण, उत्तर पूर्व व काही प्रमाणात भिवंडी इथे आआपला बरेच अंडर एस्टिमेट केले आहे असे वाटते. भिवंडीला आआप जिंकणार नक्की नाही पण निकालांवर जाणवणेबल परिणाम करेलसे वाटते. मुंबई दक्षिण व उत्तर पूर्व यात आअपचा अंडरकरंट असण्याची शक्यता आहे. रायगड मध्ये तटकरेंना हरवणे इतके सोपे जाऊ नये. शेकाप वेगळी झाली आहेच, दुसरे असे की शेकापचा पारंपरिक मतदार हो पनवेल, उरण, कर्जत भागात होता तो भाग आता मावळ मतदारसंघात आहे. यातील शहरी भागात (पनवेल वगैरे)शिवसेनाही मजबुत होती. तटकरेंचा मतदार मात्र एकसंध अजुनही शाबुत आहे. या मतदारसंघात मोठी चुरस व्हायची शक्यता आहे. मुंबई दक्षिण मध्य सर्वात चुरशीचा होईल याच्याशी सहमत!

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 14:39
क्लिंटन-२००९ च्या लोकसभेतही महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस आघाडीविरोधी जनमत होते हे मात्र पटले.तुम्ही लिहील तसं मुंबईतील ६ पैकी ५ मतदार संघ, तसेच ठाणे, भिवंडी, नाशिक, पुण्यात मनसेमुळे कॉंग्रेस-एनसीपी निवडून यायला मदत झाली. मुंबई आणि ठाणे जिल्हा मिळून १० जागा लोकसभेच्या आहेत.पैकी २००९ला केवळ कल्याण युतीकडे आले होते बाकी नऊ जागी कॉंग्रेस, एनसीपी आणि पालघरला ब. वि. आघाडी आली होती. मात्र एवढे होवूनही उर्वरित महाराष्ट्रात युतीने (तेव्हा महायुती झाली नव्हती) ३८ पैकि १९ जागा जिंकल्या होत्या, कोल्हापुरात अपक्ष मंडलिक तर हातकनंगले मध्ये राजू शेट्टी हे दोघे कॉंग्रेस- एनसीपीला हरवून विजयी झाले होते. २००९ला मनसेमुळे झालेले विरोधी मतांचे विभाजन होवून कॉंग्रेस- एनसीपीला फायदा झाला होता.अर्थात बाकीही काही मुद्दे नक्कीच होते मात्र हा एक महत्वाचा मिद्द होता. यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.तसेच सेना-भाजप बरोबर आर पी आय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे तेव्हा राज्यात महायुतीला चांगला फायदा होईल असे दिसत आहे.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:08
यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.
हो माझे पण हे गृहितक आहेच. दक्षिण मुंबईतून मनसे तरीही जिंकेल असे मला वाटते कारण आआप मिलिंद देवरांची बरीच मते खाईल. तसेच शिवसेनेचा उमेदवार मोहन रावलेंइतका सुपरिचित आहे असे वाटत नाही.आणि मधल्या काळात मोहन रावले पक्षाबाहेर जाणे (ते परत आले असले तरी) यामुळे शिवसेनेला थोडेफार नुकसान होईलच. महापालिकेत मनसेचा त्या भागातून पराभव झाला होता हे मान्य.पण तरीही महापालिका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मुद्दे नक्कीच वेगळे असतात. प्रत्यक्षात काय होते हे १६ मे रोजीच कळेल :)

In reply to by क्लिंटन

सुधीर Fri, 04/25/2014 - 09:08
मोदी जेव्हा प्रथम मुंबईत आले होते तेव्हा, दक्षिण मुंबईतल्या व्यापारी बंधुंनी मिलिंद देवरा आणि मोदींना एकाच स्टेजवर आणले होते. त्याच्या मतानुसार, आमचा खासदार मिलिंद देवरा, पण सत्ता मोदींची. त्यामुळे काँग्रेसची मत फुटणार नाहीतसे वाटते. शिवाय, आदी गोदरेज आणि दीपक पारेख यांनी देवरांना पसंती दिली आहे. त्याचा नाही म्हणायला "इन्फ्लुअंस" पडतोच. काँग्रेसची मत फुटलीच तर ती भेंडीबाजार/मशिद बंदर मधली फुटतील. देवरांच्या रॅली मध्ये याही एरीयात जोर होता हे मी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसची ही सिट पक्की असावी. आआप फक्त काँग्रेसचीच मत खातील अस मला वाटत नाही. बघू निकाल काय येतोय ते.

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 14:47
ऋषिकेश- भिवंडी बद्दल माहित नाही मात्र मुंबई मध्ये 'आप' ईशान्य मुंबई (मेधा पाटकर) चांगल्यापैकी आणि दक्षिण मुंबईमध्ये (मीरा सन्याल) बर्यापैकी मते घेईल.दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल. ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे.सुरुवातीपासून तिथे आपने आणखी जोर लावला असता तर कदाचित मेधाताई तिथे जिंकल्या सुद्धा असत्या.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:11
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल.
+१. म्हणूनच कधीकधी वाटते की १६ मे रोजी आआपला भाजपची बी टिम असे म्हटले तरी त्यात फारसे आश्चर्य वाटू नये :)
ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे
हो म्हणूनच मुळातल्या लेखात दुसर्‍या स्थानासाठी मेधा पाटकर आणि संजय पाटील यांच्यात लढत होईल असे म्हटले आहे :)

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 17:30
क्लिंटन- महायुतीला मनसे बेजार करत असेल तर तसच काहीस आप आणि सपा कॉंग्रेस आघाडीला ताप देवू शकतात. उर्वरित महाराष्ट्राबद्दलचे अंदाज पण लवकरच येवू देत. :)

दुश्यन्त गुरुवार, 04/24/2014 - 19:30
चल मतदान तर संपल आता १६ मेला काय ते स्पष्ट होईल. मुंबईमध्ये अंदाजे ५३% तर राज्यात बाकी ठिकाणी सरासरी अंदाजे ५६% अस मतदान झाल्याच समजतंय. अधिकृत आकडे येतीलच. मुंबईमध्ये २००९ल ४१% च्या आसपास मतदान झाल होत म्हणजे यंदा त्यात वाढ झाली आहे. मात्र अपेक्षा आणखी मतदानाची होती.बर्याच लोकांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आल नाही.रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात साधारणपणे ६०% मतदान झाल आहे. मात्र सगळ्यात कमी मतदान कल्याण (४२%), भिवंडी (४३%) आहे ठाणे (५२%).

राजेश घासकडवी गुरुवार, 04/24/2014 - 20:57
छान विश्लेषण. घोडा मैदान जवळच आहे.
२००९ मध्ये देशभर युपीएसाठी अनुकूल वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कौल मात्र त्याविरूध्द होता असे म्हणायला हरकत नाही.
हे विधान फार व्यापक वाटतं. साल कॉंग्रेस+एनसीपी भाजपा+शिवसेना २००४ ४२%(जागा २२) ४३%(जागा २५) २००९ ३९%(जागा २५) ३७%(जागा २०) २००९ साली शिवसेनेची मतं २% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली आणि जागा फक्त एकच कमी झाली. याउलट भाजपाची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट)नी कमी झाली आणि जागा ४ गेल्या. मनसेमुळे मतं कमी झाली हे उघडच आहे. पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेतो आणि नंतरच प्रस्थापित पक्षांच्या मतांना धक्का पोहोचवतो
याही विधानाचा वरच्या आकडेवारीनुरूप पुनर्विचार व्हायला हवा. मनसेसारख्या नवीन पक्षाने भाजपा आणि कॉंग्रेसची मतं खाल्ली. तशीच ती इतर फ्लोटिंग लोकांनीही खाल्ली. टक्केवारीत तोटा राष्ट्रीय पक्षांचा मोठा झाला - दोघांचे मिळून ८% पॉइंट्स! आणि मनसेला ५% मतंच मिळालेली असल्यामुळे इतरांनाही त्यातली काही गेली.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 22:37
पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
पूर्ण राज्यपातळीवरील मते एकत्र केली तर असे चित्र दिसेल.पण ते चित्र पूर्णपणे परिस्थितीशी मिळतेजुळते आहे असे नाही. सर्वप्रथम २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण राज्यपातळीवर पुढीलप्रमाणे चित्र होते:
   
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस२३.८%१९.६%-४.२%
राष्ट्रवादी१८.३%१९.३%१.०%
रिपब्लिकन पक्ष (आठवले)१.०%१.३%०.३%
जोगेन्द्र कवाडे (चिमूर)०.७% -०.७%
बच्चू कडू (अमरावती)०.६% -०.६%
हरीभाऊ महाले (मालेगाव)०.६% -०.६%
एकूण युपीए४५.०%४०.२%-४.८%
शिवसेना२०.१%१७.०%-३.१%
भाजप२२.६%१८.२%-४.४%
अजित घोरपडे (सांगली) ०.९%०.९%
एकूण एन.डी.ए४२.७%३६.१%-६.६%
मनसे ४.१%४.१%
बसपा३.१%४.८%१.७%
सपा०.८%१.०%०.२%
इतर८.४%१३.८%५.४%
मी म्हणतो की राज्यपातळीवरील कल बघितला तर तो परिस्थितीचे नक्की चित्र उभे करत नाही याचे कारण जो मनसेचा इफेक्ट आपण विचारात घेत आहोत तो पूर्णपणे स्थानिक एफेक्ट होता. मुंबई-ठाणे परिसरातील ९ लोकसभा जागांच्या परिसरात (मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण आणि भिवंडी) २००४ आणि २००९ मध्ये चित्र पुढीलप्रमाणे होते.
   
मुंबई-ठाणे ९ जागा  
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस३५.०%२६.४%-८.६%
राष्ट्रवादी१३.६%१२.०%-१.६%
एकूण युपीए४८.६%३८.४%-१०.२%
शिवसेना२५.६%१७.२%-८.४%
भाजप१९.७%१२.८%-६.९%
एकूण एन.डी.ए४५.३%३०.०%-१५.३%
मनसे २०.७%२०.७%
इतर६.१%१०.९%४.८%
यातून कळते की या ९ जागांच्या परिसरात मनसेने तब्बल २०.७% मते मिळवली. भाजप-शिवसेना युतीने १५.३% मते गमावली तर युपीएने १०.२%. मनसे २००९ मध्ये पहिल्यांदा आली तेव्हा या भागात मुळात फ्लोटिंग मते ६.१% म्हणजे त्या मानाने खूप जास्त नव्हती. तसेच मनसे आणि शिवसेना यांच्यातील व्होटबॅंकमधील समानता लक्षात घेता मनसेला ही मते पहिल्यांदा हल्ला करायला नव्हती. त्यामुळे मनसेचा पहिला थेट हल्ला शिवसेना-भाजप युतीच्या मतांवर पडला असे म्हणायला हरकत नसावी. (फ्लोटिंग मतेसुध्दा २००४ ते २००९ या काळात ४.८% ने वाढलेली दिसतात. या वाढलेल्या ४.८% पैकी किमान २.७% मते दोन तगड्या उमेदवारांमुळे वाढलेली होती. मुंबई उत्तर मध्यमधून समाजवादी पक्षाचे अबु आझमी आणि भिवंडीमधून विश्वनाथ पाटील यांनी तितकी मते घेतली. लेखमालेच्या पहिल्या भागात लहान राज्यांमध्ये तगडे उमेदवार--उदाहरणार्थ छत्तिसगडमधील ताराचंद साहू असतील तर ते लहान पक्ष/फ्लोटिंग मते वाढवू शकतात. छत्तिसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा आहेत.मुंबई-ठाणे परिसर हे वेगळे राज्य असे समजले तर या लहान राज्यात स्थानिक तगडे उमेदवार तोच परिणाम साधू शकतात. इथे तेच झाले आहे असे दिसते.) हे विश्लेषण मी मुंबई-ठाणे परिसराविषयी केले आहे. मनसेने पुणे आणि नाशिकमध्येही युतीचे असेच नुकसान केले होते. बाकी मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ भागासाठीचे विश्लेषण करून बघितलेले नाही.प्रायमा फॅसी असे वाटते की युपीएचे अनेक मतदारसंघ क्षेत्रांमध्ये बरेच नुकसान झाले आणि त्यामानाने कमी मतदारसंघ क्षेत्रांमध्ये थोडा फायदा झाला तरी मनसे फॅक्टरमुळे २००४ पेक्षा २००९ मध्ये २ जागा युपीएने जास्त मिळवल्या. २००४ आणि २००९ मध्ये मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा वेगळ्या होत्या त्यामुळे हे विश्लेषण मतदारसंघनिहाय करता येऊ शकले नाही.तसे केल्यास मला म्हणायचे आहे तो मुद्दा अधिक स्पष्ट झाला असता. १९९८ मध्ये वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाला मिळालेली मते आणि त्याचा परिणाम याविषयी पहिल्या भागात लिहिले आहे. तिथेही राज्य पातळीवरील मते लक्षात घेतली तर वाघेलांच्या पक्षाने भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे नुकसान केले नाही असे दिसते.पण मतदारसंघनिहाय विश्लेषण केल्यास अनेक ठिकाणी वाघेलांच्या पक्षाने भाजपपेक्षा कॉंग्रेसचे नुकसान अधिक केले असे दिसते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे अनेकदा हे कल राज्य पातळीवर थोडे कॅमोफ्लॅज होतात.त्यापेक्षा लहान पातळीवर विश्लेषण केल्यास ते अधिक स्पष्ट होतील.

In reply to by क्लिंटन

राजेश घासकडवी गुरुवार, 04/24/2014 - 23:28
तुम्ही दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई-ठाणे परिसरातही कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांची २५ टक्के (पॉइंट) नी कमी झाली, आणि मनसेला २१ (पॉइंट) टक्के मिळाली असं चित्र आहे. मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत. तेव्हा आआप कोणाची मतं कुठे खाईल हे जागानिहाय ठरेल. सरसकट 'फ्लोटर्सचा आधी तोटा, नंतर मोठ्या पक्षांचा' असं म्हणता येणार नाही. मला वाटतं मोठ्या पक्षांना ज्यांनी नाइलाजाने मत दिलेलं आहे असा एक मोठा मतदार वर्ग असतो. नवीन पर्याय उपलब्ध झाला की ते लोक उत्साहाने आणि आशेने त्यांना मतदान करतात. या परिणामाला मी अॅंटि-एस्टॅब्लिशमेंट म्हणेन. ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही. तसं झालं तर काय होईल सांगणं कठीण वाटतं आहे. पण गेल्या वेळी राज्यपातळीवर मनसेमुळे हेच झालं आणि त्याची परिणती युपीएच्या जागा वाढण्यात झाली. तेच आत्ता होईल असं नाही, पण माझा मुद्दा असा आहे की काहीही होऊ शकतं. दुसरा एक मुद्दा (यावर एक स्वतंत्र लेख यावा अशी विनंती). दर निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार मोठ्या संख्येने असतो. सध्याच्या एकूण मतदारांपैकी सुमारे १५-२०% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असतील (आकड्याबद्दल खात्री नाही). तसंच जुने वयस्क मतदार जे बहुतेक वेळा पक्षांचे हक्काचे मतदार असतात ते गेल्या पाच वर्षांत मृत्यू किंवा आजार यामुळे मतदानातून कायमचे बाहेर पडतात. एक फ्लुइडिटी येते. तेव्हा या नवीन तरुण मतदारवर्गाची मतं कोणाला जातील? सर्वसाधारणपणे कोणाला जातात? त्यामुळे आत्तापर्यंत निकालांत कसा फरक पडलेला आहे? जातीनिहाय, धर्मनिहाय वगैरे मतदान होतं तसं वयोगटाप्रमाणेही वेगवेगळं मतदान होतं का? तरुण लोक अधिक राष्ट्रवादी असतात, आशावादी असतात, की सेक्युलर असतात? पुन्हा एकदा, या प्रश्नांबाबत एक स्वतंत्र लेख वाचायला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:21
करे़क्ट. आम्ही याच वर्गात मोडत होतो. पण नव्या पर्यायाने जुन्यापेक्षाही जास्त निराशा केल्यामुळे आम्ही परत जुन्या आणि मोठ्या पक्षाच्या वर्गात. सुबह का भुला शाम को घर लौट आया तो उसे भुला नही कहते ! या चालीवर.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन Fri, 04/25/2014 - 10:34
मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत.
याचे कारण २००४ च्या बेसचा विचार केला तर त्यावेळी मुंबई आणि परिसरात फ्लोटिंग मते केवळ ६% होती.तसेच अबू आझमी, भिवंडीतील विश्वनाथ पाटील यांच्यासारख्या स्थानिक तगड्या उमेदवारांमुळे ही फ्लोटिंग मते २००९ मध्ये वाढलेली दिसतात (२००४ मधील ताराचंद साहूंना समकक्ष परिणाम).तेव्हा पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांना धक्का ही परिस्थिती यायला मुळात तितक्या प्रमाणात फ्लोटिंग मतांचा बेसच मनसेला उपलब्ध नव्हता.त्यामुळे मनसेचा धक्का युती आणि आघाडी या दोन्ही प्रस्थापितांना बसला.त्यातही तो युतीला आघाडीपेक्षा खूपच जास्त बसला. नवा पक्ष फ्लोटिंग मते कशी खातो याची दोन उदाहरणे पहिल्या भागातील http://misalpav.com/comment/564049#comment-564049 या प्रतिसादात दिली आहेत. दिल्लीमध्ये आआपला डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांमध्ये २९.५% मते मिळाली त्यापैकी कुठल्या पक्षाची किती टक्के मते होती हे त्या तक्त्यात कळेल. तरीही यावरून एक गोष्ट कळते की आआपने बसपा, अपक्ष आणि इतरांची २००८ च्या तुलनेत जवळपास ४९% मते खाल्ली तर काँग्रेसची ३९% मते खाल्ली. मुळात काँग्रेसच्या मतांचा बेस २००८ मध्ये ४०% इतका मोठा होता त्यामुळे पक्षाला तोटाही जास्त झाला.पण आआपने जास्त मते बसपा, अपक्ष आणि इतर या फ्लोटिंग मतांमधून जास्त खाल्ली. तीच गोष्ट शंकरसिंग वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाची गुजरातमध्ये १९९८ च्या निवडणुकांमध्ये. आता २०१४ च्या निवडणुकांचा विचार करता मुंबईत मागच्या वेळी मनसेला मिळालेली मते हा मोठा फ्लोटिंग मतांचा मोठा बेस आआपला उपलब्ध आहे.हा बेस २००९ मध्ये मनसेला उपलब्ध असलेल्या बेसपेक्षा बराच जास्त आहे. त्यामुळे मला वाटते की पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांची मते खाणे हा प्रकार आआप मुंबईत करेल (जसे दिल्लीत झाले). नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेणे आणि मग प्रस्थापित मतांवर हल्ला करणे असे का होत असावे याविषयी मला वाटते की एक कारण आहे. ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही.मुळात लोक फ्लोटिंग पक्षांना मते का देतात? त्यांची प्रस्थापित पक्षांकडून निराशा झालेली असते आणि अशांना मोठ्या पक्षांना मत द्यायचे नसते त्यामुळे आपले मत फुकट जायची शक्यता आहे याची कल्पना असतानाही लोक लहान पक्ष/फ्लोटिंग पक्ष यांना मते देतात (लोकसभेपेक्षा विधानसभेत हे प्रमाण जास्त असते हे आपण पहिल्या भागात बघितले आहे). जेव्हा नवा पर्याय येतो तेव्हा हा नवा पर्याय या फ्लोटिंग मतदारांना अधिक अपीलिंग ठरतो.असे मतदार विचार करतात की एवीतेवी आपले मत प्रस्थापित पक्षाला जाणार नाही मग त्यातही नवा पर्याय असेल त्याला का देऊ नये? यातून सुरवातीला अशा नव्या पक्षाचा बेस वाढत जातो.हे निरीक्षण बरोबर आहे का हे एखाद्या पोलिटिकल सायन्सवाल्याला मला विचारायचे आहे.
ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही.
तसे दिल्लीमध्ये झाले.दिल्लीमध्ये भाजप-अकाली दलाची सुमारे ८% मते आआपकडे वळली पण काँग्रेसची मात्र जवळपास ४०% मते आआपकडे वळली हे आपण बघितलेच आहे. त्यातही भाजप-अकाली दलाची मते आआपकडे का वळली असावीत? विधानसभेच्या वेळी केजरीवालांनी केवळ काँग्रेसलाच लक्ष्य केले होते आणि भाजप,मोदी किंवा तथाकथित जातीयवाद/धर्मनिरपेक्षता इत्यादी गोष्टींवर काहीही भाष्य केले नव्हते.त्यामुळे अन्यथा भाजपला ज्या मतदारांनी मत दिले असते त्यापैकी काही मतदारांनी विधानसभेत नव्या पक्षाला संधी देऊन बघू या उद्देशाने आआपला मत दिले असेल असे वाटते. पण आता केजरीवाल काँग्रेसपेक्षा मोदींना टार्गेट करत आहेत हे दिसत आहेच.त्यामुळे यावेळी भाजप समर्थक आआपला मते देतील ही शक्यता फारच थोडी.(डिसेंबरमध्ये मिपावरच आआपला भाजपसमर्थकांकडून मिळणारा पाठिंबा आणि आता मिळणारा पाठिंबा यात बराच फरक आहे हे दिसतेच.) त्यातूनही दिल्लीमध्ये अण्णांच्या उपोषणांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यावेळच्या वातावरणात केजरीवाल हा ओळखीचा चेहरा दिल्लीवाल्यांसाठी होता.मुंबईत मात्र तितक्या प्रमाणात कोणताही ओळखीचा चेहरा आआप यशस्वी झालेला नाही.काही प्रमाणात मेधा पाटकर हा तो चेहरा आहे पण त्यांना पाठिंब्याऐवजी विरोध करणारेच जास्त आहेत. अर्थातच एकही भाजप समर्थकाचे मत आआपला जाणार नाही असे नक्कीच नाही.पण काँग्रेसकडून युतीकडे वळलेली मते त्यापेक्षा जास्त असतील आणि एकूण परिणाम युतीची मते वाढणे आणि आघाडीची कमी होणे हा असेल असे वाटते. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे १६ मे रोजीच कळेल.

विकास गुरुवार, 04/24/2014 - 22:46
मस्त लेखन आणि अंदाज! तरी देखील मतदार याद्यांमधील घोळामुळे कितपत फरक जाणवेल ते बघायचे. आज मुंबईत गेल्या वेळेपेक्षा नक्कीच जास्त मतदान झाले आहे. त्याचा फायदा प्रस्थापितांना मिळणार का नाही हे बघायचे आहे.

ऋषिकेश Fri, 04/25/2014 - 09:33
काल मतदान फार मोठ्या प्रमाणात झालेले नाही. (म्हणजे १०% वाढ आहे, पण बदलासाठी जी लाट येते, अचानक २०% वगैरे मतदानात वाढ होते तसे नाही - जे मुंबईत फारसे कधी होतही नाही म्हणा!) इशान्य मुंबईत, मानखुर्द, भांडूप, विक्रोळी भागात मतदान किती झाले व घाटकोपर, मुलुंड भागात किती झाले यावर मेधाताई जिंकतील की नाही हे ठरावे. ही विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान टक्केवारी कुठे मिळेल? दक्षिण मुंबईचेही तेच! अवांतरः या निवडणूकीत तु महाराष्ट्रातील कोणत्याही अशा एका उमेदवाराचं नाव घे त्याला मी जिंकला असे घोषित करतो अशी ऑफर मला निवडणूक आयुक्तांनी दिली तर मी मेधाताईंचं नाव घेईन.

@ क्लिंटनः एवढा मोठा डेटा गोळा करणे व त्यातली इनफायनाईट व्हेरिएबल्स जमेस धरून त्याचे विश्लेषण करणे आणि परत ते सोप्या भाषेत सरळ लिहीणे या सगळ्यासाठी लागणार्‍या अचाट श्रम, चिकाटी, आवड आणि बुद्धीचे प्रचंड कौतूक आहे ! ___/\___ .

'सकाळ' मधे येणारे फोटो

यदुनाथ ·

तुषार काळभोर गुरुवार, 04/24/2014 - 11:58
ताईंचा "तनिश्का"बरोबरचा फोटो. नाहीतर, विविध ठिकाणच्या तनिश्कांनी कायकाय केलं, त्याचा फोटो.

उगा काहितरीच गुरुवार, 04/24/2014 - 12:03
फोटोचं काय घेउन बसलात राव बातम्या, राशिभविष्य, वरच हेडींग, जाहिराती, सोन्याचांदीचे भाव, आयपीएल चा स्कोअर थोड्याफार फरकाने सारखाच असतो.. ;) :)

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 16:32
- पावसाने फुगलेली मुठा नदी बघायला लकडी पुलावर जमलेले लोक (झेड्ब्रिज वरून काढलेला फोटो) - सवाईच्या भरल्या मंडपाचा पाठिमागच्या स्टेजवरून काढलेला फोटो (दरवर्षी तोच दाबतात असा माझा समज होता, पण एकदा फोटोग्राफरला तो फोटो काढताना याचि देही पाहिलं आणि धन्य झालो.) - पावसात भिजणार्‍या दुचाकीस्वाराचा फोटो ("वर्षासरींनी पुणेकरांची तारांबळ") - कानटोपी घालून फिरायला निघालेल्या आजोबांचा फोटो ("थंडीच्या लाटेने पुणेकर गोठले") - चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी) - अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 16:39
अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
औरंगजेब आपला वाढदिवस म्हणे वर्षातून दोनदा साजरा करायचा- शम्सी आणि कम्री अशा दोन कालगणनांप्रमाणे. तसेच कैतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस गुरुवार, 04/24/2014 - 21:34
सर जदुनाथ सरकार यांच्या ' औरंगजेब' ह्या चरित्राचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. कोलारकर यांनी केलेला. www.sahyadribooks.com येथे मिळेल.

In reply to by आदूबाळ

शिद गुरुवार, 04/24/2014 - 20:02
- अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
हा हा हा =))

आशु जोग गुरुवार, 04/24/2014 - 21:55
http://epaper3.esakal.com/24Feb2014/Normal/PuneCity/Pune1Today/index.htm इथे पहा ना विकत का घेता...

तुषार काळभोर गुरुवार, 04/24/2014 - 11:58
ताईंचा "तनिश्का"बरोबरचा फोटो. नाहीतर, विविध ठिकाणच्या तनिश्कांनी कायकाय केलं, त्याचा फोटो.

उगा काहितरीच गुरुवार, 04/24/2014 - 12:03
फोटोचं काय घेउन बसलात राव बातम्या, राशिभविष्य, वरच हेडींग, जाहिराती, सोन्याचांदीचे भाव, आयपीएल चा स्कोअर थोड्याफार फरकाने सारखाच असतो.. ;) :)

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 16:32
- पावसाने फुगलेली मुठा नदी बघायला लकडी पुलावर जमलेले लोक (झेड्ब्रिज वरून काढलेला फोटो) - सवाईच्या भरल्या मंडपाचा पाठिमागच्या स्टेजवरून काढलेला फोटो (दरवर्षी तोच दाबतात असा माझा समज होता, पण एकदा फोटोग्राफरला तो फोटो काढताना याचि देही पाहिलं आणि धन्य झालो.) - पावसात भिजणार्‍या दुचाकीस्वाराचा फोटो ("वर्षासरींनी पुणेकरांची तारांबळ") - कानटोपी घालून फिरायला निघालेल्या आजोबांचा फोटो ("थंडीच्या लाटेने पुणेकर गोठले") - चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी) - अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 16:39
अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
औरंगजेब आपला वाढदिवस म्हणे वर्षातून दोनदा साजरा करायचा- शम्सी आणि कम्री अशा दोन कालगणनांप्रमाणे. तसेच कैतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस गुरुवार, 04/24/2014 - 21:34
सर जदुनाथ सरकार यांच्या ' औरंगजेब' ह्या चरित्राचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. कोलारकर यांनी केलेला. www.sahyadribooks.com येथे मिळेल.

In reply to by आदूबाळ

शिद गुरुवार, 04/24/2014 - 20:02
- अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
हा हा हा =))

आशु जोग गुरुवार, 04/24/2014 - 21:55
http://epaper3.esakal.com/24Feb2014/Normal/PuneCity/Pune1Today/index.htm इथे पहा ना विकत का घेता...
'सकाळ' मधे काही फोटो नित्यनेमाने येतात. जसे १. वर्षातुन एकदा-दोनदा येणारे फोटो - राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन मधला फोटो. राष्ट्रपतीचा फुलाना हात लावतानाचा - सारसबागेतील गणपतीचा स्वेटर घाललेला फोटो - ३१ डिसेंबरला मावळत्या सुर्याचा फोटो - परीक्षा संपल्यावर मुलान्चे आइस्क्रीम खाताना - सकाळ कार्यालयामधला पानसुपारीचा फोटो २. नेहमी येणारे फोटो - ड्रेनेजच्या झाकणाचा फोटो - पुलावरील नक्शीचे ग्रिल - पवार कुटुबिय असेच अजुन काही फोटो असतील तर येथे लिहावेत...

परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा.

माहितगार ·
लेखनप्रकार
जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.

नॉस्टॅल्जिआ

ऋषिकेश ·

सिफ़र गुरुवार, 04/24/2014 - 14:06
मुळ कवितेची कल्पना तशी वाटत नाही पण सहजच, दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन बैठे रहें तसव्वुर -ऐ -जाना किये हुए हे गाणं आठवलं

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 15:06
पहिल्यांदा ती समोरच्या खिडकीत येत असे -(१) मग ती चहा बनवून देउ लागली - (२) मग ती परत का गेली? - (३) . . . ओह ओके ओके ती स्वर्गवासी झाली ? :( WOW!!! A different poem!!! Very touching!

समीरसूर गुरुवार, 04/24/2014 - 15:49
कविता छान आहे. आपले लाडके गायक मोहम्मद अझीझ यांचं एक गाणं होतं. आजकल याद कुछ और रहता नही, एक बस आपकी याद आने के बाद याद आने से पहले चले आईये, और फिर जाईये याद जाने के बाद... आनंद बक्षींचा हा शाब्दिक झोल बहुधा 'नगीना' मधला होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं. ऐकायला भारी आवडायचं. ही कविता वाचून या गाण्याची आठवण झाली. :-)

In reply to by समीरसूर

खेडूत Fri, 04/25/2014 - 01:12
>> और फिर जाईये याद जाने के बाद.. हे डायरेक्ट ''जान जाने के बाद'' होतं! पण त्या काळी आम्हाला चांद जाने के बाद- मंजे सकाळी! असं ऐकू यायचं :) तो मो अझीझ काय गाणं बोल्तो कळायचं नाय!

In reply to by खेडूत

समीरसूर Fri, 05/02/2014 - 11:52
बरोबर आहे; माझी चूक झाली. ते 'जान' आहे. बाकी मो. अझीझ आणि शब्बीर कुमार हे दोन गायकरत्न हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले स्वप्नं आहेत. :-)

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 00:08
आज मी नॉस्टॅल्जिक होणार नाही असे ठरवले. म्हटले चला नेहमीप्रमाणे, ग्यालरीपर्यंत स्केटिंग करत येवून, तिथे ठेवलेला, एक आर्ट पेपर पेन पेन्सिल क्रेयोंसचा ढीग समोर टाकत, वाफाळत्या बोर्नविटा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा ओरिओ सारखे चाखत, कोवळ्या सूर्यकिरणांना पाठीवर घेत, आतून येणार्‍या मॅगीच्या वासाकडे लक्ष देत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर चिमण्या, खारुताई आणि त्या भारद्वाज पक्ष्यावर मान उंचावून बघत, चेहर्‍यावर येणारी वाफ फुंकून उडवत, स्वतःच सांडलेल्या बोर्नविटाचा, चटका बसता बसता वाचलेल्या, पहिला घोट घेणारा बंकूकडे पाहून मला लहानपणाचा विजयनाथच आठवला आणि नेहमीप्रमाणे नॉस्टॅल्जिक झालो! -भूतनाथ उर्फ कैलाशनाथ

सिफ़र गुरुवार, 04/24/2014 - 14:06
मुळ कवितेची कल्पना तशी वाटत नाही पण सहजच, दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन बैठे रहें तसव्वुर -ऐ -जाना किये हुए हे गाणं आठवलं

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 15:06
पहिल्यांदा ती समोरच्या खिडकीत येत असे -(१) मग ती चहा बनवून देउ लागली - (२) मग ती परत का गेली? - (३) . . . ओह ओके ओके ती स्वर्गवासी झाली ? :( WOW!!! A different poem!!! Very touching!

समीरसूर गुरुवार, 04/24/2014 - 15:49
कविता छान आहे. आपले लाडके गायक मोहम्मद अझीझ यांचं एक गाणं होतं. आजकल याद कुछ और रहता नही, एक बस आपकी याद आने के बाद याद आने से पहले चले आईये, और फिर जाईये याद जाने के बाद... आनंद बक्षींचा हा शाब्दिक झोल बहुधा 'नगीना' मधला होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं. ऐकायला भारी आवडायचं. ही कविता वाचून या गाण्याची आठवण झाली. :-)

In reply to by समीरसूर

खेडूत Fri, 04/25/2014 - 01:12
>> और फिर जाईये याद जाने के बाद.. हे डायरेक्ट ''जान जाने के बाद'' होतं! पण त्या काळी आम्हाला चांद जाने के बाद- मंजे सकाळी! असं ऐकू यायचं :) तो मो अझीझ काय गाणं बोल्तो कळायचं नाय!

In reply to by खेडूत

समीरसूर Fri, 05/02/2014 - 11:52
बरोबर आहे; माझी चूक झाली. ते 'जान' आहे. बाकी मो. अझीझ आणि शब्बीर कुमार हे दोन गायकरत्न हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले स्वप्नं आहेत. :-)

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 00:08
आज मी नॉस्टॅल्जिक होणार नाही असे ठरवले. म्हटले चला नेहमीप्रमाणे, ग्यालरीपर्यंत स्केटिंग करत येवून, तिथे ठेवलेला, एक आर्ट पेपर पेन पेन्सिल क्रेयोंसचा ढीग समोर टाकत, वाफाळत्या बोर्नविटा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा ओरिओ सारखे चाखत, कोवळ्या सूर्यकिरणांना पाठीवर घेत, आतून येणार्‍या मॅगीच्या वासाकडे लक्ष देत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर चिमण्या, खारुताई आणि त्या भारद्वाज पक्ष्यावर मान उंचावून बघत, चेहर्‍यावर येणारी वाफ फुंकून उडवत, स्वतःच सांडलेल्या बोर्नविटाचा, चटका बसता बसता वाचलेल्या, पहिला घोट घेणारा बंकूकडे पाहून मला लहानपणाचा विजयनाथच आठवला आणि नेहमीप्रमाणे नॉस्टॅल्जिक झालो! -भूतनाथ उर्फ कैलाशनाथ
लेखनविषय:
आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले. म्हटले चला जरा पूर्वीसारखा ग्यालरीत पाय पसरून, कोरा करकरीत, घडी न मोडलेला, खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन, वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत, कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत, आतून येणार्‍या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर -नी त्याच्याच मागील खिडकीवरही- एक डोळा ठेवून, चेहर्‍यावर येणारी चहाची वाफ हुंगत, ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा, पहिला घोट घेऊन पाहू. पण छे!

(केजरीवाल जगातील प्रभावी व्यक्तीमत्व ठरल्याने...)

विकास ·

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 05:55
उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण) Person of the year झाले होते, त्यामुळे असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर नको!
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

In reply to by आत्मशून्य

विकास गुरुवार, 04/24/2014 - 06:39
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. केजरीराज्यात पाणी फुकट असल्यामुळे असेल. ;)

In reply to by विकास

गणपा गुरुवार, 04/24/2014 - 21:19
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.
थोडी दुरुस्ती करुन असे म्हणतो एक अनिवाशी भारतीय दुसऱ्या निवाशी भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. ए भाग्गो.....

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 09:43
तियानमेन चौकात जावे हे लै आवडले. याच धर्तीवर आणखी काही अपेक्षा आहेत. १. पाकिस्तानात जाऊन दाऊद इब्राहिमजी यांची भेट घ्यावी आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानातल्या तालिबान्याना शांतीचा संदेश द्यावा. (म्हणजे त्याना शांतता पाळायला लावावी.) २. नायजेरियावर दबाव आणून नायजेरियन्संनी अवैधरीत्या गोव्यात राहून ड्रज्ग व्यापार करणे थांबवावे ३. इस्लामी देशांत महिलांची गळचेपी थांबवण्याचे प्रयत्न करावेत. भारतातल्या मुस्लिम महिलांना निदान उन्हाळ्यात बुरखे वापरायची सक्ती करू नये अशी मागणी उलैमांकडे करावी. आणखीन खूप अपेक्षा आहेत. पण सध्या त्यातल्या त्यात सोपी कामे पुढे ठेवली आहेत. ती झाली की मग पुढची यादी देण्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

गब्रिएल Fri, 04/25/2014 - 10:09
वा वा. १४०० वर्सापूर्वीपन कोनीतरी आसच क्येलं व्हतं; त्येचाच आवतार म्हनावा का काय हा ? "मी" सोडून जगात कोनीबी अक्कलवान न्हाय आसा आग्रेपाहायेच म्ह्ना आपला. येकदम जंक्शन. होउन जावंद्या. नायतर लय बकाल झालिया जग. होउन जाउद्या इस्कोट. अवतार बाबाकी जय !

आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 09:44
बाकी ही यादी कशी बनवतात, त्यात कोणाकोणाचे योगदान असते, यावर पण जरा प्रकाश टाका ना भौ.. आणि "दरवर्षी ही यादी याच वेळेस प्रकाशित होते की यावेळेस अंमळ लवकरच प्रकाशित झालेय" असा नसता प्रश्न उगीच डोक्यात येउन गेला.

In reply to by आनन्दा

आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 09:50
आणि, पहिले दोनही नेते भारतातले? भारत सोडून जगात नेते उरलेच नाहीत की काय? काय हे? आता जगाचे कसे होणार? थोडक्यात, ही यादी म्हणजे मला केजरी आणि मोदी समर्थकांचे युद्ध वाटते, ज्यात केजरीसमर्थक जिंकलेत.

In reply to by आनन्दा

विकास गुरुवार, 04/24/2014 - 09:53
बातमी एप्रिल १० ची नसावी. त्या दिवशी ऑनलाईन पोल चालू झाले असावे. २३ एप्रिल (काल) पोल बंद झाले आणि निकाल जाहीर झाले. आज टाईममधे त्यासंदर्भात व्यवस्थित वृत्त येईल. राहूल गांधींचे नाव नसल्यास ते निवृत्त समजावेत. ;) मला वाटते जगभरच्या बातम्यांच्या ट्रेंडवरून ही यादी तयार केली जात असावी असे वाटते. नक्की माहीत नाही.

In reply to by विकास

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 09:58
तिथल्या प्रतिक्रिया वाचल्या. लोकांनी व्होटिंग केलंय आणि काहीतरी वेटेज फॅक्टर लावला आहे. नेमकी पद्धत काय बघावं लागेल. त्यातल्या सुरुवातीच्या काही प्रतिक्रियांवरून बॉट्सनी मतदान केल्याचे निष्कर्ष लोकांनी काढले आहेत. ३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 10:41
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!
सहमत

In reply to by माहितगार

आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 13:15
अजून एक गोष्ट लक्षात आली, १८ अप्रिल ला "Laverne Cox" (मला तो का ती हे माहीत नाही :) ) या यादीत प्रथम क्रमांकावर होता. त्याआधी वेगवेगळे युरोपियन. अमेरिकन लोक या यादीत स्पर्धा करत होते. अचानक १९/२० अप्रिल ला एके सर्वांना मागे टाकून या यादीत प्रथम क्रमांकवर विराजमान झाले. ही पहा १७ अप्रिल ची बातमी - Despite a rocky year for Justin Bieber, the Canadian pop star surged to the top of the TIME 100 reader poll, edging out Egyptian Presidential candidate Abdul Fattah al-Sisi. Though the final TIME 100 list of the most influential people of the year worldwide is always ultimately chosen by the editors, TIME seeks the input of readers in an online poll. Music stars Rihanna and Lady Gaga take third and fourth place in the current poll, though Gaga has a clear lead. असो. सत्य स्पष्ट, आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. बाकी माहीतगार/ ऋषिकेश आणि क्लिंटन यांना या धाग्यावर खेचायचा मोह आवरत नाही, पैकी माहीतगार आहेतच. माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?

In reply to by आनन्दा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 14:29
....आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. ........माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?
(:) हा स्मायली केजरींच्यावरीने, ह.घ्या) माझा हा स्मायलीवाला विनोदाचा भाग सोडला तर आकडेवारीत प्रथमदर्शनी काहीतरी गफलत आहे असे वाटते, (माझ जिथपर्यंत निरीक्षण आहे) भारतीय लोकांचा आंतरजालावर एकुण (टक्केवारी) सहभाग सहसा (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा नसतो आणि परदेशी लोकांना भारतीय राजकारणात (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा रस नसतो. तरी सुद्धा हि कॉमेंट कुणी टाईमवर जाऊन टाकावी असे वाटत नाही कारण त्यांनी चुका सुधारल्या तर त्यातील गफलती शोधणे आपल्याला कठीण जाईल. काही मॅन्यूपुलेशन झालच असेलतर (मी संशयवाद जेवण्यातलया चिमूटभर मीठा एवढाच ठेवण्याबद्दल दक्ष असतो तरीही मला शंका वाटते आहेच) केजरीवाल आणि मोदींनाच सरळ जबाबदार धरल पाहीजे अस नाही त्यांच्या समर्थाकांपैकी एखादा उत्साही प्राणी असू शकतो किंवा अशा सॉफ्टवेअरना कस गंडवल हे करून पाहणारे हौसेही या जगात कमी नाहीत. अर्थात या शक्यतांच्या पलिकडे जाऊन परकीय व्यक्ती देश आणि संस्था यांचे इतर हितसंबंधही व्यस्त असू शकतात या संदर्भाने मी वेगळा धागा काढला आहेच त्याचा येथे विस्तार करत नाही. भारत थोडेसे स्रोत असलेला देश आहे त्या पेक्षा तो एक व्यावसायिक संधींकरीता विकसीत होत असलेला देश आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अण्वस्त्र सज्ज देश या नात्याने सामरीक दृष्ट्या खूप सशक्त नसला तरी महत्वाचा देश आहे. जर भारतीय पाकिस्तानी चिनी रशीयन लोकांना आमेरीकेतील तेथील ओपीनीयन इन्फ्ल्यूअन्स करण्याची इच्छा असू शकते (सध्या भारतीय वंशाच्या हॉटेल व्यावसायीकावर क्लिंटनबाईंच कँपेन प्रमाणाबाहेर फायनान्स केल्याबद्दल आमेरीकेत केस चालू आहे) तर आमेरीकेतील अथवा इतर देशातील लोक भारतीय राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप शक्य नसला तरी अप्रत्यक्षपणे ओपीनीयन्स इन्फ्लूएन्स करण्याचा प्रयत्न न करता राहतील का ? आमेरीकेला भारत आणि पाकीस्तान (कडे अणवस्त्रे आहेत म्हणून ती खूपतात असे नव्हे तर इतरही देशांकडे अण्वस्त्रे असण्याच लॉजीकल समर्थन होऊ शकत त्यांच्या स्वतःच्या सामरीक सामर्थ्याला महत्व कमी होऊ शकत वगैरे किंवा खरोखरही भारतीय उपमहाद्वीपातील संघर्ष टोकाला गेलेतर काय या भिती मुळे जे किंवा जे काही कारण असेल ते) मध्ये काश्मिर प्रश्नावर चर्चा होऊन हवी असणे स्वाभाविक आहे आणि भारत इतर तीसर्‍या देशास या चर्चेत घेणार नाही हेही निश्चित आहे. भारत आणि पाकीस्तानच्या उजव्या नसलेल्या गटांकडून कितीही चर्चा झाल्या तरी जनतेची मान्यता मिळणार नाही; शॉक होऊ नका, मी आमेरीकन राजकारण्याच्या बुटात पाय ठेवले तर मी दोन्ही देशातील उजव्यांना पुढे येण्यास प्रोत्साहन देईन आणि चर्चेस बसवेन त्या करता दोन्ही कडे उजवे निवडून येतील या करता बरेच काही पडद्या मागून करण्यास जमलेतर करेन पण निश्चितपणे पडद्या मागून कारण माझा आमेरीकन राजकारणी म्हणून असा प्रत्यक्ष हस्तक्षेप भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही नागरीकांना खपणार नाही. हा भाग एक झाला. आपण इकॉनॉमीक टाईम्सचे आणि भारत आमेरीका व्यापारी संबधांच्या वृत्तांचे अभ्यासक असाल तर दुसर्‍या बाजूला आमेरीकन व्यावसायिकांना हव्या असलेल्या आणि भारत सरकार देत नसलेल्या सवलतींमुळे आम्रेरीकन व्यापार्‍यांची नाराजीमुळे आमेरीक प्रशासनावरील त्यांचे दबाव मननीय आहेत. मी लंडन ऑलीपीक्सच्यावेळेस एक युरोमेरीकन स्त्रीचे नाव भोपाळ गॅसवाल्यांची बाजू घेऊन आमेरीकन कंपनीला विरोध वगैरेकरताना वाचल्याचे आठवते त्यानंतर तीच स्त्री भारतातील एका चळवळीची (आर्थीक) बाजू घेताना दिसली . भोपाल गॅसवर कधी काळी लिहू म्हणून जे दुवे जपले होते ते उघडून पाहताना आंतरजालावरून तीचे नाव हळू हळू गायब होते आहे असे हलकेसे जाणवत होते अशात दोन एक महिन्यापुर्वी ती त्या सर्व संदर्भ दुव्यातून हरवली होती. कदाचीत दुवे नैसर्गिक पणे बंद पडले असतील कदाचित माझा संशयवाद पुर्ण चुकीचाही असू शकतो. अशातील काही लोकांच्या भूमिका इराणशी संबंध सुधारण्यास साहाय्यभूत असणार्‍या असू शकतात असे वाटले सर्व संशय चुकीचे असू शकतात. उद्देश कोणत्याही भारतीय व्यक्ती अथवा पक्षाकडे बोट दाखवण्याचाही नाही. भारतातील निवडणूका परकीय लोकांना पुर्णपणे प्रभावीत करता येणे निश्चीतपणे अशक्य आहे. सध्याचेच भारत सरकार खूप आमेरीकाभिमूख होते तरीही दुरावा येण्याचे थांबले नाही. पाहिजे ते प्रशासन आणून हवे ते सगळे साध्य करता येईल एवढाही कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी भारत कच्चा नक्कीच नाही त्यामुळे अशा शक्यतांची खूप चिंता करावी असे वाटत नाही. माझ्या सागंण्याचा मतितार्थ परकीयवृत्तसंस्थाच्या वृत्तांना प्रमाणा बाहेर महत्व देणे आपण टाळले पाहिजे. किमान पक्षी त्यांच्या वृत्तांनी भारतीय हुरळून जातात त्यांच्या वृत्तात अभिप्रेत असे अर्थ काढून प्रभावित होतात असे त्यांना कळता कामा नये. माझी व्यक्तीगत मते आहेत कोणताही विदा आकडेवारी संदर्भ देणे कदाचित शक्य असणार नाही. कोणत्याही वादात पडण्याचे टाळावे म्हणून मी मिपावर हे लिहिणे टाळले होतो. हा प्रतिसाद न पटल्यास ह.घ्या नाहीतर माझा आणि आनन्दा यांच्यातील व्यक्तीगत मतांचा संवाद म्हणून सोडून द्यावे.

In reply to by आनन्दा

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 17:11
यादी मॅनिप्युलेट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला आहे पण तो Time कडूनच. नाहीतर ५ दिवसात, १७ एप्रिलच्या बातम्यांत मोदी आणि AK४९ चे पहिल्या पाचात नाव असले पाहिजे होते. Time चा हेतू चुकीची माहिती देवून भारतीय(अति हुशार /अति भावनिक)लोकांना गुमराह करायचा दिसतोय, हे नक्की.

In reply to by पैसा

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:55
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं! व्हॉट्सअ‍ॅप वर टेक्स्टींग करायचे सोडून टाईम साप्ताहीकाकडे जायला कुणाला वेळ तरी आहे का? उगाच आपले काहीतरी... ;)

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 10:06
मोदी पंतप्रधान झाले तर तीन गोष्टी प्राधान्यक्रमानं करतील : १) स्वतःचं लग्न! कारण ते स्वतःला मोस्ट इलिजिबल बॅचलर समजतात. आपकी अदालतमधे पूर्वी झालेल्या इंटर्व्यूमधे ते (लाजत लाजत) म्हणाले होते : "हमको सरकारने जमीन (प्लॉट) तो दे दी है, अब मकान कब बनेगा देखना है". (जसोदाबेन बघा वाट) २) अंबानी, अडानी आणि डिएलफनं प्रचारात केलेल्या उपकाराची भरघोस परतफेड बिजेपीच्या खास `कॉर्पोरेट किक बॅक स्टाईलनं' करणार. (काँग्रेसी अवाक, त्यांचे एकामागून एक घोटाळे उघड होतात आणि हे डोळ्यादेखत लुटतायंत पण काही करता येत नाही) ३) ज्या एकमेव मुद्यावर संघानं (आणि वरुन दाखवायला बिजेपीनं) त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार बनवलं त्याची परिपूर्ती करणार, राममंदिर बांधून! (असंख्य भारतीय खूष! आणि देशासाठी कायमची डोकेदुखी!)

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन गुरुवार, 04/24/2014 - 10:26
माणसानं किती किती म्हणून आशावादी असावं ह्यासाठी आजच्या पिढीने तुमच्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे :))

In reply to by सुहासदवन

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 10:39
आता टाईम्सच्या ओपिनियन पोलनं व्यापक स्तरावर लोक काय विचार करतात हे दाखवून दिलंय त्यामुळे बिजेपीप्रेमींची जळजळ होतेयं इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:57
लेखात प्रश्न केजरीवालांच्या संदर्भात विचारले होते पण आपण त्या ठिकाणी चुकून मोदी वाचलेले दिसतेयं! असो.

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 10:41
खरोखरच Time चे मनापासून कौतुक करावेसे वाटते. Time सारख्यांनी आपला धंधा(हो धंधाच!) कसा वाढवावा, याचा हा पाठ इतर माध्यमांनी घेण्यासारखा आहे. जो माणूस दिल्लीमध्ये ५०० रुपये दान दिलेल्या एका रिक्षावाल्या वर प्रभाव पाडू शकला नाही,तो जगातील एक नंबरचा प्रभावी नेता कसा असू शकेल? भारताच्या गृहमंत्र्यावर/पोलीस आयुक्तांवर/LGवर काय प्रभाव पाडला होता तेही सर्वांना माहिती आहेच. ज्याने "येडा मुख्यमंत्री" हे शिंदेंनी दिलेलं बिरूद, राजीनामा देऊन सार्थ ठरविले. माझ्या मते जगातला तर सोडाच, भारतातला एक नंबरचा विनोदी माणूस/जोकर म्हणून Time ने नाव घ्यावे. Time ने जी लिस्ट दिली आहे त्यात १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत २०१४ मध्ये "अण्णा हजारे" का नाहीत? माझ्यामते भारतातील रिकामटेकडी जनता जी facebook वर like करते, त्याच्या संख्येवरून ही लिस्ट बनविली आहे, जी पूर्ण पणे बरोबर आहे फक्त "Most liked/disliked people" या नावाने छापली गेली पाहिजे होती. Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे व आपली ही अक्षम्य चूक कशी सुधारता येईल हे पाहावे.

In reply to by आयुर्हित

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 10:48
बिजेपी सरकार आलं तर देशाची काय परिस्थिती होते पाहा मग कळेल कुणी कुणाला वेडं बनवलं ते.

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत गुरुवार, 04/24/2014 - 21:32
संजयजी पूर्वग्रसित होऊन मते बनवू नका. किमान योजना आयोगचे अहवाल तरी वाचत जा. ११व्या योजनेत भा ज प शासित राज्यांची कामगिरी अन्य राज्यांपेक्षा जास्त चांगली होती. हे सत्य आहे. बाकी मोदी आल्याने देशात मूलभूत -अर्थात रस्ते, रेल्वे, सिंचन, वीज इत्यादींना महत्व दिले जाईल ज्याने भारतीय उद्योगांचा विकास होईल. अमेरिकेला हे नको आहे म्हणून अमेरिका मोदी विरोधात आहे. ज्या पक्षाच्या १५० अधिक केजरीवाल समेत असे उम्मेद्वार आहेत ज्यांच्या NGO ला कुठून मदत मिळते सांगायची गरज नाही. खाल्लेला मिठाला जगावे लागेतेच. दिल्लीत वीज दर कमी करण्या एवजी सबसिडी वाढवली. सबसिडीचा पैसा कंपनीला बिन विल वसूल करताच मिळतो दिल्लीत वीज बिल वसूल करणे काही सौपे काम नाही. जेवढी जास्त सबसिडी तेवढा जास्त अंबानीचा फायदा (कुणाच्या खिशात आहे, कोण आहे लवकरच कळेल, घोर निराशा होईल) म्हण आहे न चोर मचाये शोर. .

In reply to by विवेकपटाईत

मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं आहे ही गोष्ट उघड दिसत असतांना, उगीच एखाद्या बथ्थड राजकीय नेत्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत `परकीय हस्तक्षेप आहे' असा कल्पनाविलास करणं हा भलताच ग्रह आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन Fri, 04/25/2014 - 13:08
मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं
ह्या अश्या प्याद्यांचा उपयोग करूनच जवळ जवळ प्रत्येक मोठा उद्योजक आपली पो़ळी भाजून घेत असतो, त्यात गैर काय आहे? प्रत्येक राज्यात तिथला मोठा उद्योगपती किंवा तेथील उद्योजक हे त्या राज्याच्या शासनावर थोडाफार प्रभाव ठेवून असतातच. शेवटी पैशाची आणि उद्योगांची मोठी उलाढाल तेच करतात. शासकीय तिजोरीत महत्वाची भर तेच घालत असतात. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा साखर आणि सहकाराच्या पैशाच्या माध्यमातून (पण फक्त) महाराष्ट्राच्या शासनावर प्रभाव ठेवून असतातच की. आता समजा मोदीनी अंबानी-अडानी किंवा गुजरात मधील उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत किंवा भारतातील इतर उद्योगांना गुजरातमध्ये एक महत्वाचे स्थान मिळ्वून दिले आहे, तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला कोणी रोखले होते, असे काही करण्यापासून? अंबानी-अडानी च्या लेवलला जाऊ द्या पण महाराष्ट्राच्या मातीतील किती उद्योगांना किंवा उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत स्वत:चे असे स्थान आहे? टाटा नॅनो सारखे किती उद्योग दुसर्‍या राज्यातून खेचून आणून महाराष्ट्रात उभारले गेले? उद्योगांचं जाऊ द्या, महाराष्ट्राच्या नेत्यांचे तरी काय स्थान आणि प्रभाव आहे भारतीय बाजारपेठेत (दिल्लीत)? चांगल किंवा वाईट जाऊ द्या. पण निदान राष्ट्रीय लेवलला अंबानी-अडानी ह्यांच्या सारख्या उद्योजकांचे मोदींशी नाव तरी जो़डले जाते, गुजरातला ते निदान रिप्रेजेंट तरी करतात, पॄथ्वीराज चव्हांणाचे नाव, निदान आडनाव घेतल्यावर तरी कोणता (आदर्श) उद्योग किंवा उद्योजक आठवतो? महाराष्ट्राच्या शासनाने खरंच काही चांगलं केलं असेल तर मग करा ना मार्केटिंग ह्या सार्‍याची. वाट कसली बघताय...मोदी सरकारची!

In reply to by सुहासदवन

त्यानं मोनॉपॉली वाढते आणि त्यात जनतेला पर्याय न राहिल्यानं ती लुटली जाते. मोदी काय किंवा काँग्रेस काय मला सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवणं गैर वाटतं. इंडस्ट्री जनहितासाठी चालली पाहिजे आणि इंडस्टियालिस्टलाही फायदा व्ह्यायला हवा पण संपत्तीच बेतहाशा केंद्रिकरण गैर आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार Fri, 04/25/2014 - 14:56
सं.क्षी. लेखापरिक्षण आणि अर्थशास्त्र या बाबत आम्हाला आपल्या एवढ प्रगाढ ज्ञान नाही. आमच्या मते दोन गोष्टी आहेत व्यक्ती/संस्था आपल्या भोवतालच्या समाज, संस्कृती आणि व्यवस्थेचीच निर्मिती असतात. घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे. मला आपल्या व्यवसायाला लक्ष्य करायच नाही. पण भारतात लेखापालांची लेखापरिक्षकांची एकुण संख्या किती ? त्यां सर्वांचा सर्व कारभार शुद्ध आदर्श नितीमुल्यांनी चालू आहे असे सर्टीफीकेट आपण द्याल काय ? एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ? संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची. आता महाराष्ट्रातली मतदान संपली आहेत आपापले राजकीय अंगरखे उतरवून समतोल विचारकरणे आत्मपरिक्षणही करणे या बद्दल सर्वांनीच सवडीने विचार करावा, (आणि मी हा निघालो बोलल्याप्रमाणे करण्यासाठी)

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 14:57
संजय क्षीरसागरजी, आधी माणसं ओळखायला शिका! बाकी आपोआप चांगले होईल हो.त्यासाठी आआपजी गरज नाही. आणि हो एक अजून, आम्हाला बोलवा हो थेठरात,सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवतांना बघायला आवडेल! कोण पवार की सोनिया की पप्पू नाचणार आहे तेही कळवा आधी!

In reply to by आयुर्हित

घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे.
चुक नाही फ्रॉड हा शब्द लक्षात घ्या. फ्रॉड म्हणजे संगनमतानं केलेला अपहार. तो व्यवस्थापनातल्या पद्धती डावलून होतो आणि पैशाचा हव्यास हे त्याचं एकमेव कारण असतं.
एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ?
दादाश्री, कोणतीही इमानदार व्यक्ती बेईमान माणसाचं काम करत नाही असा माझा व्यावसायिक अनुभव आहे. You can't bend honesty with money. त्यामुळे बेईमान उद्योजकाची मेहेरबानी प्रामाणिक माणूस स्विकारतच नाही! मोदी; अडानी, अंबानी आणि डिएलएफच्या विमानातनं फिरतायंत आणि या कंपन्यांची कार्यप्रणाली उद्योग जगतात मशहूर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही झाकले तरी मोदी उघडे पडणा. पण डोळेझाकच करायचीये म्हटल्यावर विवेकाचा प्रश्नच मिटला.
संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची
संशय कसला? उघड दिसतंय. आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. असो, आता संधी गेलीये त्यामुळे बोलून उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास Fri, 04/25/2014 - 22:11
आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. मोदी निवडणूक आणि बहुमतवाल्या पक्षाचे नेते म्हणून निर्वाचीत प्रतिनिधीअंतर्गत निवडणूक जिंकले की मोदीविरोधकांनी मोदी लाट नाही पण मोदीविरोधाची ओहटी मान्य केली ? :) मात्र एक प्रश्न नक्कीच पडतो. जर चुकून मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी कुठलेही वादग्रस्त निर्णय न घेता जनतेच्या भल्यासाठी राज्य केले तर तुम्ही ते तसे वागले हे मान्य कराल का तरी देखील मोदी वाईटच असतील? माझ्या पुरते बोलायचे तर केजरीवालांनी चांगले मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले असते तर आणि अगदी उद्या तेच काय पण पप्पू गांधी जरी पंप्र झाला आणि चांगले निर्णय घेतले तर मी स्वागतच करेन. पण मला मोदी विरोधकांची याबाबतीत खात्री नाही म्हणून विचारत आहे.

In reply to by विकास

इतकंच वाटतं. देशातला भ्रष्टाचार रोखला गेला आणि महागाई आवाक्यात आली की लोक सुखी होतील. मग ते मोदी की आणखी कुणी केलं यानं फरक पडत नाही. अर्थात मोदी जे बोललेत तसे वागले तर त्यांचं मनापासून कौतुक करीन यात वाद नाही. केजरीवालांच्या दिल्लीतल्या राजकीय कारकिर्दी विषयी मतभेद आहेत. मला त्यांच्या सचोटी विषयी तिळमात्र शंका नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा Sat, 04/26/2014 - 11:07
मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा
मला वाटते संधी सर्वांना समानच मिळते. काही लोक त्यचा अधिक फायदा घेतात इतकेच. बाकी मी कोणत्याच माणसाला त्याच्या तात्कालिक कृत्यांवरून मापत नाही, अनेक गोष्टींचे दीर्घकालीन परिणाम समजण्यास आपण कमी पडतो, ते बर्‍याच वेळेस राजकारणी लोक दूरदॄष्टीने पाहत असतात, तेव्हा मोदींनी गेली २ वर्ष अदानींवर कृपा केली, डीएलएफचे विमान वापरले म्हणजे नंतर देखील असेच करतील असे नाही. त्या व्यक्तीचे दीर्घकालीन उद्दिष्ट, त्यांचे चरित्र्य वगैरे गोष्टी देखील बघणे आवश्यक आहे. आणि मोदी त्य कसोटीवर उतरतात म्हणूनच माझ त्यांना पाठिम्बा आहे. बाकी चारित्र्य वगैरे गोष्टींवर मोदींची तुलना मनमोहनसिंगांशी करयला माझी ना नाही. आणि मुख्य म्हणजे, माझा क्रांती पेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, आणि हेच मला मोदींपेक्षा केजरीवाल जास्त आवडतात.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार Fri, 04/25/2014 - 23:56
सं.क्षी. राजकारण बाजूला ठेवल तरी तुम्ही प्रश्नांचा फारच एकांगी विचार करता असं वाटत. मी व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्हीही टाळतो. मी मोदी समर्थक नसताना (मी कोणत्याही एका पक्षाचा कधीच समर्थक नव्हतो) सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो हे अनुभवताना गंमत दुसरीकडे काळजी वाटते काँग्रेसची जागा घेण्याची चांगली संधी असलेला एक पक्ष मतदारांनाच दोषी ठरवत मोठा होऊ पहातो आहे. लोकांना कन्व्हीन्स करण्याच्या मोठे होण्याच्या अशा पद्धती यशस्वी होत असतील तर माहीत नाही सामान्य माणूस म्हणून बघताना प्रांजळपणे सांगायचे झाले तर जुनेच औषध (पद्धतीचे) नव्या बाटली (नव्या नावाने) माझा देश एक चांगल्या बदलाची संधी दवडत नाही ना अशी साशंकता येते हे एक. अशा साशंकता व्यक्त करणार्‍यांना विश्वासात घेण्या एवजी नकारात्मक मार्केटींगचा आधार हे दोन. आणि असे दाखवून देणार्‍यांची लगेच विरोधक म्हणून बोळवण हे तीन, असे सांगणार्‍यांचे ऐकण्याची एक पैसाही तयारी नसणे हे चार, म्हणजे जो तुमचा विरोधक नाही तो पण विरोधक कसा होईल हे स्वतःहून पहाणे. आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही ? उत्साह उपयोगाला येतो पण मर्यादा असतात, महाराष्ट्रात निवडणूका संपल्यात जमा आहेत अंगरखे आणि चष्मे बाजूस ठेऊन आत्मपरीक्षणही केल्यास पुढच्या वेळी आपल्यालाच प्रचारात सुधारणा करण्यास आपल्या चाहत्याची बाजू अधीक समर्पक पणे मांडण्यास उपयोग होईल. माझ्या खालील धाग्याचे सावकाशीने वाचन करावे घाई नाही. नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

In reply to by माहितगार

हो ना, कारण तुम्ही फक्त माहिती जमवतायं,जस्ट अ कॉपी-पेस्ट जॉब ! माहितगाराला स्वतःचं मत नसतं. आणि मजा अशीये की तरी सुद्धा तुमची मतं लपत नाहीत! ही दोलायमान स्थिती आहे आणि त्यामुळे निरुपयोगी ठरते. न घरका न घाटका. तुम्ही म्हटलंय `आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही? ' हे तुम्ही स्वतःचं मत स्वतःवरच लादतायं कारण मी असं कुठेही म्हटलं नाही. उलट तुमच्या प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर दिलं होतं. नुसती माहिती जमवणारा, मोदी हा कॉर्पोरेट फ्रॉड आहे याचा प्रतिवाद करु शकत नाही. तुम्ही तुमच्या धाग्यांची लिस्ट दिली आहे. मी तुमचे धागे वाचत नाही कारण मला ते निरर्थक वाटतात.

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 12:38
विकासजी, आपणास धन्यवाद! आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. हा प्रतिसाद वाचून Time ने चक्क Heading बदलले! नवे heading असे आहे : Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll आधीचे heading असे होते: The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 13:09
>>>आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. >>>संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे. मिपावर श्रेणी देण्याचा प्रकार सुरु होणार आहे का? 'अतिविनोदी' अशी श्रेणी द्यावी-शी वाटत आहे. माणसानं स्वतःबद्दल किती अवास्तव कल्पना कराव्यात ह्याला काही मर्यादा???????????? अवास्तव कल्पना करण्यासाठी ठेवलाय ना एक माणूस मिपावर? कोटा वाढवलाय काय?? ;)

In reply to by आयुर्हित

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 13:44
Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
हे शीर्षक आधीच्या या शीर्षकापेक्षा
The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll
निश्चित जास्त प्रभावी आणि स्पष्ट आहे. (संपादित)

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 13:17
हा विनोद ही नाही, सत्य घटना आहे. पाहिजे तर माझ्याकडे Time चा मूळ लेख, नवा लेख व लेखावरील सर्व कॉमेंट्स copy करून ठेवल्यात. Mail id द्या, mail करतो आपणास!

In reply to by आयुर्हित

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 13:44
इथेच टाका की. तुम्च्या प्रतिसादानं टाईमचं हेडींग बदललं असेल तर कौतुकच आहे. टाका इथं. लिंक दिलीत तरी चालेल. तुम्हाला जमत नसेल तर संपादकांना सांगा. मिपाचा एक प्रकारचा विजय असल्यानं संपादक अथवा मालक सुद्धा मदत करतीलच ही खात्री आहे.

In reply to by प्यारे१

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 14:20
प्रशांतजी व admin आपल्याला mail पाठवला आहे. व लिंक्स जोडल्या आहेत. यात पहिल्या file मध्ये ४८८ comments होत्या, ज्या नवीन धाग्यात फक्त ९५ दिसत आहेत, ज्यात माझी comment मला सापडली नाही (बहुतेक उडवलेली दिसते!) आधीचे Heading असलेली file The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll आत्ताचे Heading असलेली file Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस Fri, 04/25/2014 - 15:38
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की टाईम्सच्या साईटवर तुम्ही मराठीतून प्रतिक्रीया पाठवलीत. ती त्यांना समजली म्हणून त्यांनी लेखाचं शिर्षक बदललं. आणि ते तुमच्या प्रतिक्रीयेमुळे बदललं हे कुणाला कळू नये म्हणून तुमची मराठीतली प्रतिक्रीया पण उडवली? *ROFL*

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 13:42
माझ्या माहिती प्रमाणे पॅरिस मधे आयफेल टॉवर जवळ केजरीवाल प्रेमींनी एक मोठी सभा भरवली होती, त्यानंतर पत्रके वगैरेही वितरित केली गेली होती. याप्रकारच्या सभा परदेशात मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्यास 'टाईम' ने त्या आधारावर मूल्यमापन केले असू शकते. या सभेविषयी जास्त माहिती हवी असल्यास मिळू शकते.

मृत्युन्जय गुरुवार, 04/24/2014 - 14:03
एक मिनिट. का फुकाची चर्चा करतो आहोत आपण? जर समजा केजरी वाराणसीमधुन निवडुन आले तर काय ते स्पष्ट होइलच की. मला वाटते केजरीवाल जर जिंकले तर ते जास्त लोकप्रिय आणि प्रभावी आहेत हे लोकांनी मान्य केलेच पाहिजे. टाइम वर आपला विश्वास नसेल कदाचित. जनमतावर ठेउयात ना. तिथे तर कळेलच की. बादवे: अब की बार मोदी सरकार ;)

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 14:33
विकास यांनी विडंबन म्हणून लिहिलेल्या धाग्यावर गंभीर वाद सुरू झाले ही धाग्याची शोकांतिका! आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं. या यादीत ओबामाकाका कुठे आहेत मग?

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 14:47
मतदान फेर्‍या संपत आल्यात वादाच्या आपापल्या तोफा वेगवेगळ्या समर्थक मंडळींनी थंड करावयास ठेवल्यास हरकत नाही. धागा आणि मिपावर शांतता नांदण्याच्या दृष्टीने माझे प्रतिसाद कुठे उडवण्याची गरज भासल्यास मोकळेपणाने उडवावा ही नम्र विनंती.

In reply to by माहितगार

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 14:50
माझा प्रतिसाद केवळ एक सामान्य सदस्य म्हणून आहे. तुमच्या एकट्याच्या गंभीर प्रतिसादांचा तिथे काही संबंध नाही. बाकी खूपजण हा धागा गंभीरपणे घेताना बघून मला जाम गंमत वाटत आहे!

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 15:01
होय ना या धाग्याचा वेगळा उद्देशपाहून मी माझा वेगळा धागा काढला होता. (तरीही आनन्दांना लांबलचक प्रतिसाद देत बसलो :) ) एनीवे समर्थकांना त्यांचे त्यांचे लोक निवडून येण्याचा सारा प्रभाव मिपा धाग्यांमूळे पडतो एवढा मिपावर विश्वास आहे हे अशा निमीत्ताने सिद्ध होते हे काय कमी आहे ? :) मत आतातशी मतपेटीत गेली पुढची पाचवर्षे हसायचंच काम आहे ;)

In reply to by पैसा

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 15:09
अजून मुंबईत संध्याकाळपर्यंत मतदान होईल आणि टाइम पोलसारख्या गोष्टींचा सूज्ञ लोक (हॅ हॅ हॅ वाले सोडा, त्यांना कशाचंच काही पडलेलं नाही), निश्चित विचार करतील अशी अपेक्षा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 15:38
तर अर्ध्या दिवसाच घोडा मैदान बाकी आहे म्हणताय ? टाइम टाइम ची बात आहे तर !! जो जे वांछील तो ते लाहो आमच्या शुभेच्छा जशा इतरांना तश्याच तुम्हालाही मतदानाचा अर्धा दिवस तुमच्या इच्छेनुसार जावो ही सदिच्छा. विरोधकहो नाराज होऊ नका अशाच सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत. (कुणीही निवडून आले तरी माहितगारच्याच सदिच्छेने ;) ह. घ्या.)

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 15:49
सं.क्षी. राजकारण हा विषय कधीच हसण्यावारी नेत नाहीत असे दिसते. ज्याची त्याची मर्जी पण इतर कोणत्यातरी आवडीच्या विषयात कधी तरी अधून मधून मोकळेपणाने हसून घेत रहा म्हणजे झाले. आपल्या आनंदा करता आमच्या केजरींनाही शुभेच्छा.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 15:49
तुम्हाला केजरीवाल गंमतीशीर वाटतात का? मला ब्वा विनोदी धाग्याला गंभीरपणे घेणारे लोक गंमतीशीर वाटतात! आणि टाईम मॅगेझीनसुद्धा!
आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं.

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 14:38
रजनीकांत नंतर श्री केजरीवाल, श्री मोदी, कु. राहुलगांधी ही आजच्या तारखेला भारतीय सोशलसाईटसवर चांगल्यावाईट कारणांनी धुमाकूळ घालणारी लोकप्रिय व्यक्तीमत्वे आहेत. यात अगदी सौ. सनी लिऑनचेही नाव जोडू शकता. दर दुसरा फॉर्वर्डेड मेसेज यांच्यापैकी एकावरच असतो. त्यामुळे यालाच जनमाणसांवर टाकलेला प्रभाव म्हणून गणले तर हे शक्यय.

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 16:09
कुठलही एक कार्य हाती घेण्यास हरकत नाही पण ते पूर्ण करावे . नुस्ती "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात " .... असं नको.

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:03
वर पैसाताईंनी म्हणल्याप्रमाणे हा धागा विरंगुळा आणि ऋषिकेश यांच्या "मोदी पंप्र झाले तर" धाग्याचे काहीसे विडंबन होते. थोडक्यात निव्वळ टाईमपास. अर्थात टाईम साप्ताहीकाने टाईमपास केलेला नाही! एका अर्थाने त्यांचा हा business survey आहे. सध्या टाईम जास्त कुठे वाचले जाऊ शकते, कोण वाचते आणि काय वाचते याचा एक ढोबळ अंदाज यात लागू शकतो असे वाटते. यात टाईम ने कुठेही काही ठरवलेले नाही. निव्वळ जे काही हो - नाही मत पडले त्यावरून क्रमवारी ठरवली आहे. यात केजरीवालांना "हो" अशी जास्त मते मिळाली म्हणून ते "या टाईमाचे" प्रभावी नेते झाले तर मोदींना "नो" म्हणून सगळ्यात जास्त मते मिळाल्याने ते "टाईमलेस" प्रभावी नेते झाले! ;)

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 17:23
१. अरविंद केजरीवाल २. नरेंद्र मोदी ३. Katy Perry : गायिका ४. Justin Bieber : पॉप गायक ५. Laverne Cox : अभिनेत्री ६. Rihanna : अभिनेत्री आणि गायिका ७. Benedict Cumberbatch : नट ८. Beyonce Knowles : अभिनेत्री आणि गायिका ९. Jared Leto : नट, दिग्दर्शक, निर्माता, इ. १०. Lupita Nyong'o : अभिनेत्री, दिग्दर्शक, इ.................................... इतके पुरे नाही का ?! लोक्स, लोक्स, लोक्स... या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय? वरचा डेटा आणि शेवटच्या एकदोन दिवसांतील झालेले मतदान पाहता, एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! इथे तर त्याचा "सबळ पुरावा" म्हणून वापरत लोक "बाजारात तूरी... " चा संगित प्रयोग करत आहेत?! =)) . =)) . =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:35
एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! सहमत. बाजारात बाकी धान्याचा तुटवडा असला तरी तुरीचे अमाप पिक आले आहे, त्यामुळे काळजी नसावी. ;)

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:41
या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय?
छे हो इस्पिक एक्का असे कसे म्हणता? मोदींना मागे टाकून केजरीवाल पहिल्या क्रमांकावर आले आहेत यामुळे मोदी समर्थकांचा कसा जळफळाट होत आहे हे बघितले नाहीत का? :) टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. केजरीवालांना ३२ लाख मते मिळाली आहेत म्हणे. एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का?

In reply to by क्लिंटन

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 18:24
>>>>>>>रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? छे छे! रजनीकांतनं घेतलेल्या सर्व्हेमध्ये टाईमला पहिल्या १० अब्ज मध्ये स्थान नाही!

In reply to by प्यारे१

मदनबाण Fri, 04/25/2014 - 15:29
एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? हॅ.हॅ.हॅ... रजनी अण्णाचे नाव जर टाकले असते तर टाईमचा सर्वर लगेच क्रॅश नसता का झाला ? ;)

In reply to by क्लिंटन

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 18:38
नक्कीच. पण आजकाल "केवळ सोईच्याच नव्हे तर आस्तित्वात नसलेल्या / व्हर्च्युअल राईचा देखिल पर्वत करणे" आणि "समोर असलेला गैरसोईचा पर्वत स्वतःचे डोळे घट्ट झाकून आस्तित्वातच नाही" असे म्हणणार्‍या स्वयंघोषीत विचारवंतांची लाट आली आहे... हा आजार सर्वकाळ (एंडेमिक) असतो आणि निवडणूकीच्या मोसमात त्याची जोरदार साथ (एपिडेमिक) येते. काहीजणांत याची लागण उपायापलिकडे गेलेली असल्याने डेटा, अकाऊंटींग, सारासार बुद्धी, समतोल विचार, इ औषधांचा फायदा तर होत नाहीच पण उलट जोरदार अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते ! ;) :)

In reply to by क्लिंटन

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 18:48
टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. एकदा सर्व लोकांना खुला व्हर्चुअल सर्व्हे संस्थळावर प्रसिद्ध केला की मग कोणाला त्याच्या अश्या दुरुपयोगापासून थांबवणे केवळ अशक्य आहे. मात्र त्यात सापडलेल्या डेटाचा खरेपणा आणि उपयुक्तता ठरवायला शास्त्रिय अक्कल जरूर लागते ;)

जयनीत गुरुवार, 04/24/2014 - 18:58
कुठल्या एका सर्वेक्षणात कोण आघाडीवर दिसतो ह्याला कितपत महत्व द्यायचे? ही पत्रिका वेळोवेळी अशी सर्वेक्षणे करत असते? पण त्याने नेमके काय सिद्ध होते तेच कळत नाही. पहिल्या नंबर वर केजरीवाल असोत किंवा मोदी किंवा अगदी यादीत त्यांना स्थान ही नसले तरी काय बिघडणार आहे? आपण आपले मत त्या वरुन ठरवणार आहोत का?

विकास गुरुवार, 04/24/2014 - 21:04
टाईम साप्ताहीकाने, दोन याद्या तयार केल्या आहेत. एक आहे ती त्यांच्या विश्लेषणानुसार सिलेक्टीव्ह प्रभावी व्यक्तीमत्वाची यादी ज्यात पहीले नाव बियॉन्सीचे आहे. Time 100 असे गुगगले तर ती यादी दिसते. आणि दुसरी यादी आहे : readers’ poll for the 2014 TIME 100 ज्यात एके पहीले आहेत. :( ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. हे ही नसे थोडके. ;)

In reply to by विकास

मदनबाण Fri, 04/25/2014 - 15:34
ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. परत एकदा... हॅ.हॅ.हॅ... ;) टाईमवाल्यांना एकेंची "नौटंकी" पराकोटीची आवडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! ;) जाता जाता :- कोणाला तरी केजरी मलेरिया किंवा केजरी काविळ झाल्याचे निदान झाले आहे म्हणे ! ;)

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 22:19
केजरीवाल यांच्याच आरोपानुसार काँग्रेस आणि भाजपा यांनी देशभरच्या मिडीयाला विकत घेतलेय. पण केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय :D

In reply to by तुमचा अभिषेक

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 22:59
केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय असे नसून अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, भारताची अतर्गत सुरक्षा व पाक व्याप्त पाकिस्तानविषयी लुडबुड करायला.. असे आहे! कारण अमेरीकेच्या मिडीयाला माहिती आहे भारतात काही अतिहुशार/अतिभावनिक लोक आहेत AK४९ ला निवडून देणारे!

In reply to by आयुर्हित

विकास Fri, 04/25/2014 - 00:23
अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, बादरायणी पीजे... ;) घड्याळाचे काम टाईम दाखवणे आहे आणि घड्याळ हाताला बांधले जाते. याचा अर्थ घड्याळाची हाताशी बांधिलकी आहे. थोडक्यात टाईममधे केजरीवालांना प्राधान्य मिळते याचा अर्थ त्यांचे घड्याळाशी आणि हाताशी संबंध आहेत. :#

नांदेडीअन गुरुवार, 04/24/2014 - 23:00
"More than 3.2 million votes were cast in the poll. There were attempts to inflate the voting numbers, but only legitimate votes were tabulated for the final results. On Thursday, TIME will announce this year’s TIME 100 honorees, who are selected by the editors." http://time.com/73538/indian-politician-arvind-kejriwal-wins-time-100-readers-poll/

श्रीगुरुजी Fri, 04/25/2014 - 14:35
आकडेवारीचा काहीतरी घोळ दिसतोय. "टाईम"च्या सर्वेक्षणात अवतारी महापुरूष केजरीवाल यांना २२,६५,३४० "येस" मते मिळाली आहेत व खलनायक मोदींना २५,२२,५६७ "येस" मते मिळाली आहेत. पण निकाल वेगळाच दाखवित आहेत.

वेताळ Fri, 04/25/2014 - 17:26
मुंबई- ब्रिटनमधील केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संस्थातील प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर तज्ज्ञ अशा सुमारे ७५ भारतीय वंशाच्या मान्यवरांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर टीका केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापक चेतन भट आणि गौतम अप्पा यांनी 'इंडिपेन्डंट' या डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका खुल्या पत्रात नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली आहे. 'मोदी सत्तेवर येण्याच्या कल्पनेने आम्ही भयभीत होतो,' असे त्यांनी म्हटले आहे. 'भारतीय लोक आपले पुढील सरकार निवडून देण्यासाठी मतदान करीत असताना नरेंद्र मोदी प्रणित भाजप सरकारबाबत आम्हाला लोकशाही, मानवाधिकार आणि सामाजिक, धार्मिक विविधतेबद्दल चिंता वाटते,' असे या पत्रात म्हटलं आहे. जगातील निर्वासित भारतिय बुध्दीजीवी लोकाना भारतातील लोकांची काळजी वाटत आहे. भारतातील बरेच बुध्दीजीवी व हुशार लोक मोदी पंतप्रधान झाल्यावर जसे हरदन्हळ्ळी देवेगौडा किंवा अनंतमुर्ती भारत सोडुन परदेशात स्थाईक होणार आहेत. मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे.

In reply to by वेताळ

मला तर असला सरळ सरळ हायजॅक केलेला सर्वे तसाच पुढे ढकलून प्रसिद्ध करणार्‍या टाइम च्या तब्येतिची काळजी वाटू लागली आहे !

In reply to by वेताळ

विकास Fri, 04/25/2014 - 17:57
मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे. खरे आहे. पण वास्तवीक त्यांच्या लक्षात येत नाही की मोदी सत्तेवर आले तर त्यांची संशोधनाकरता अनुदाने वाढणार आहेत. या भट्ट साहेबांनी Hindutva in the West: mapping the antinomies of diaspora nationalism असे २००० साली पुस्तक लिहीले होते. किती पैसे त्यांना मिळाले असतील ते बघा. पण नंतर शिंचे युपिए आले आणि या विषयावर दक्षिणाच मिळेनाशा झाल्या. आता मोदी आले की परत मिळू लागतील. माझे तर म्हणणे असे आहे की तुम्हा कुणाआ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट हवी असली तर या भट्ट साहेबांना आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि मोदींवर टिका केलेले स्वतःचे लेख, प्रतिसाद त्यांना पाठवा. तुम्हाला पण अनुदान मिळेल आणि मोदी कसे नरराक्षस आहेत असा (त्यांचाच पुस्तकातले संदर्भ घेऊन)नसंशोधनात्मक प्रबंध लिहील्यावर पिएचडी पण मिळेल.

चौकटराजा Fri, 04/25/2014 - 17:48
केजरीवाल की कचरावाल व मोदी की नुसतीच भाजप या झाडाची एक फांदी हे १६ मे ला ठरेल ना ! टाईम वाले , लाईफ वाले, इंडिया टु डे वाले काही का म्हणेनात ! राज ठाकरे की फक्त भाषणबाज ठाकरे हे ही १६ ला कळेल ना !

विकास Sat, 04/26/2014 - 07:02
टाईमच्या संपादकीयांच्या निवडीत टाईम १०० लीडरमधे मात्र मोदी आहेत. फरीद झकेरीयांनी करून दिलेली त्यांची ओळख पाश्चात्य माध्यमांच्या दृष्टीकोनातून पाहीले तर संतुलीत वाटली.

श्रीगुरुजी Sat, 05/24/2014 - 14:32
केजरीवाल ही व्यक्ती एकंदरीत सुधारण्याच्या पलिकडे गेलेली दिसतेय. गेल्या काही महिन्यात प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थराला जाऊन नौटंकी करणार्‍या या ढोंग्याला व त्याच्या पक्षाला निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन जमिनीवर आणले. पण अजूनही यांचे डोळे उघडत नाहीत. आपल्या नौटंकीला, खोट्या आरोपांना व ढोंगबाजीला जनता अजिबात फसत नाही हे यांच्या डोक्यात अजून घुसतच नाही. त्यांची आता नवीन नौटंकी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात केजरीवालांनी भारतातील त्यांच्या मते सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या ३० जणांची नावे जाहीर केली होती. त्यात गडकरींचे नाव टाकले होते. गांधी परिवाराची नावे अर्थातच त्यांच्या यादीत नव्हती. आपल्या आरोपांना पुरावे देण्याचे फालतू सोपस्कार त्यांना मान्य नसतात. कोणी पुरावे मागितले तर ते भ्रष्टाचार्‍यांच्या बाजूने आहेत असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. गडकरींनी प्रगल्भता दाखवून केजरीवालांविरूद्ध न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केल्यावर निवडणुकांचे निमित्त सांगून इतके दिवस या खटल्याला तोंड देण्याचे त्यांनी टाळले. आता निवडणुक संपल्यावर खटल्यापासून दूर पळायचे कारणच देता येईना. त्यामुळे सुनावणीला उपस्थित रहावे लागले. न्यायालयाने जामीनासाठी १०००० रूं.चा व्यक्तिगत बाँड मागितल्यावर सुरूवातीला देण्याची तयारी दाखवून नंतर घुमजाव केले व तुरूंगात जाणे पसंत केले. आपल्याला बाँड मागणे हे बेकायदेशीर आहे असेही त्यांनी न्यायाधीशांना सुनावले. त्यामुळे त्यांच्या कायद्याच्या अज्ञानाची न्यायाधीशांनी चांगलीच कानउघाडणी केली. ठराविक लोकांवर वाटेल ते बेलगाम आरोप करायचे, आरोपांचे पुरावे मागितल्यावर ते द्यायचे नाहीत कारण मुळातच बिनबुडाचे आरोप केलेले असतात, न्यायालयीन प्रक्रियेवर अविश्वास दाखवायचा आणि स्वतः हुतात्मा झाल्याचे नाटक करायचे ही केजरीवालांची मोड्यूस ऑपरंडी. हे धोरण पूर्ण अयशस्वी ठरले असताना पुन्हा एकदा त्याच नौटंकीच्या मार्गाने हे निघाले आहेत. मी पूर्वी एका धाग्यावर लिहिले होते की वि. प्र. सिंगांचा ज्या वेगाने उदय झाला, त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचा अस्त झाला. केजरीवालांचे तसेच होण्याची शक्यता दिसत होती. आता ही शक्यता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. केजरीवालांसारख्या माथेफिरू व हेकट व्यक्तींना जनतेने दिलेली शिक्षा पुरेशी नाही. त्यांचे डोके ताळ्यावर आणण्यासाठी तुरूंगवासासारख्या शॉक ट्रीटमेंटचीच गरज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Sun, 05/25/2014 - 07:56
काय हो दादा, I Told You So असं म्हणायला धागे कमी पडायला लागले का? किती जुने जुने धागे वर काढताय? हा तर विनोदी म्हणून काढलेला धागा होता.... आणि इतकेच जर केजरीवाल अयशस्वी आहेत, तर एव्ह्ढे मोठमोठे प्रतिसाद देऊन त्यांचं महत्त्व का वाढवताय?

नानबा Sat, 05/24/2014 - 19:58
आष्ट्रेलियाचे सत्ताधारी अतिआदरणीय आणि जनतेचे लाडके माननीय टोनी अबॉट दादा मुठभर भांडवलशहांच्या हातातली बाहुले कसे बनलेत आणि इकडचा आम आदमी त्यामुळे कसा खवळला आहे हे दाखवण्यासाठी सिडनी हार्बर ब्रिजवर रास्ता रोको करून इकडल्या तिहारसदृश्य जेलात जाऊन बसावे...... :))

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 05:55
उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण) Person of the year झाले होते, त्यामुळे असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर नको!
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

In reply to by आत्मशून्य

विकास गुरुवार, 04/24/2014 - 06:39
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. केजरीराज्यात पाणी फुकट असल्यामुळे असेल. ;)

In reply to by विकास

गणपा गुरुवार, 04/24/2014 - 21:19
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.
थोडी दुरुस्ती करुन असे म्हणतो एक अनिवाशी भारतीय दुसऱ्या निवाशी भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. ए भाग्गो.....

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 09:43
तियानमेन चौकात जावे हे लै आवडले. याच धर्तीवर आणखी काही अपेक्षा आहेत. १. पाकिस्तानात जाऊन दाऊद इब्राहिमजी यांची भेट घ्यावी आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानातल्या तालिबान्याना शांतीचा संदेश द्यावा. (म्हणजे त्याना शांतता पाळायला लावावी.) २. नायजेरियावर दबाव आणून नायजेरियन्संनी अवैधरीत्या गोव्यात राहून ड्रज्ग व्यापार करणे थांबवावे ३. इस्लामी देशांत महिलांची गळचेपी थांबवण्याचे प्रयत्न करावेत. भारतातल्या मुस्लिम महिलांना निदान उन्हाळ्यात बुरखे वापरायची सक्ती करू नये अशी मागणी उलैमांकडे करावी. आणखीन खूप अपेक्षा आहेत. पण सध्या त्यातल्या त्यात सोपी कामे पुढे ठेवली आहेत. ती झाली की मग पुढची यादी देण्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

गब्रिएल Fri, 04/25/2014 - 10:09
वा वा. १४०० वर्सापूर्वीपन कोनीतरी आसच क्येलं व्हतं; त्येचाच आवतार म्हनावा का काय हा ? "मी" सोडून जगात कोनीबी अक्कलवान न्हाय आसा आग्रेपाहायेच म्ह्ना आपला. येकदम जंक्शन. होउन जावंद्या. नायतर लय बकाल झालिया जग. होउन जाउद्या इस्कोट. अवतार बाबाकी जय !

आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 09:44
बाकी ही यादी कशी बनवतात, त्यात कोणाकोणाचे योगदान असते, यावर पण जरा प्रकाश टाका ना भौ.. आणि "दरवर्षी ही यादी याच वेळेस प्रकाशित होते की यावेळेस अंमळ लवकरच प्रकाशित झालेय" असा नसता प्रश्न उगीच डोक्यात येउन गेला.

In reply to by आनन्दा

आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 09:50
आणि, पहिले दोनही नेते भारतातले? भारत सोडून जगात नेते उरलेच नाहीत की काय? काय हे? आता जगाचे कसे होणार? थोडक्यात, ही यादी म्हणजे मला केजरी आणि मोदी समर्थकांचे युद्ध वाटते, ज्यात केजरीसमर्थक जिंकलेत.

In reply to by आनन्दा

विकास गुरुवार, 04/24/2014 - 09:53
बातमी एप्रिल १० ची नसावी. त्या दिवशी ऑनलाईन पोल चालू झाले असावे. २३ एप्रिल (काल) पोल बंद झाले आणि निकाल जाहीर झाले. आज टाईममधे त्यासंदर्भात व्यवस्थित वृत्त येईल. राहूल गांधींचे नाव नसल्यास ते निवृत्त समजावेत. ;) मला वाटते जगभरच्या बातम्यांच्या ट्रेंडवरून ही यादी तयार केली जात असावी असे वाटते. नक्की माहीत नाही.

In reply to by विकास

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 09:58
तिथल्या प्रतिक्रिया वाचल्या. लोकांनी व्होटिंग केलंय आणि काहीतरी वेटेज फॅक्टर लावला आहे. नेमकी पद्धत काय बघावं लागेल. त्यातल्या सुरुवातीच्या काही प्रतिक्रियांवरून बॉट्सनी मतदान केल्याचे निष्कर्ष लोकांनी काढले आहेत. ३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 10:41
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!
सहमत

In reply to by माहितगार

आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 13:15
अजून एक गोष्ट लक्षात आली, १८ अप्रिल ला "Laverne Cox" (मला तो का ती हे माहीत नाही :) ) या यादीत प्रथम क्रमांकावर होता. त्याआधी वेगवेगळे युरोपियन. अमेरिकन लोक या यादीत स्पर्धा करत होते. अचानक १९/२० अप्रिल ला एके सर्वांना मागे टाकून या यादीत प्रथम क्रमांकवर विराजमान झाले. ही पहा १७ अप्रिल ची बातमी - Despite a rocky year for Justin Bieber, the Canadian pop star surged to the top of the TIME 100 reader poll, edging out Egyptian Presidential candidate Abdul Fattah al-Sisi. Though the final TIME 100 list of the most influential people of the year worldwide is always ultimately chosen by the editors, TIME seeks the input of readers in an online poll. Music stars Rihanna and Lady Gaga take third and fourth place in the current poll, though Gaga has a clear lead. असो. सत्य स्पष्ट, आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. बाकी माहीतगार/ ऋषिकेश आणि क्लिंटन यांना या धाग्यावर खेचायचा मोह आवरत नाही, पैकी माहीतगार आहेतच. माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?

In reply to by आनन्दा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 14:29
....आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. ........माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?
(:) हा स्मायली केजरींच्यावरीने, ह.घ्या) माझा हा स्मायलीवाला विनोदाचा भाग सोडला तर आकडेवारीत प्रथमदर्शनी काहीतरी गफलत आहे असे वाटते, (माझ जिथपर्यंत निरीक्षण आहे) भारतीय लोकांचा आंतरजालावर एकुण (टक्केवारी) सहभाग सहसा (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा नसतो आणि परदेशी लोकांना भारतीय राजकारणात (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा रस नसतो. तरी सुद्धा हि कॉमेंट कुणी टाईमवर जाऊन टाकावी असे वाटत नाही कारण त्यांनी चुका सुधारल्या तर त्यातील गफलती शोधणे आपल्याला कठीण जाईल. काही मॅन्यूपुलेशन झालच असेलतर (मी संशयवाद जेवण्यातलया चिमूटभर मीठा एवढाच ठेवण्याबद्दल दक्ष असतो तरीही मला शंका वाटते आहेच) केजरीवाल आणि मोदींनाच सरळ जबाबदार धरल पाहीजे अस नाही त्यांच्या समर्थाकांपैकी एखादा उत्साही प्राणी असू शकतो किंवा अशा सॉफ्टवेअरना कस गंडवल हे करून पाहणारे हौसेही या जगात कमी नाहीत. अर्थात या शक्यतांच्या पलिकडे जाऊन परकीय व्यक्ती देश आणि संस्था यांचे इतर हितसंबंधही व्यस्त असू शकतात या संदर्भाने मी वेगळा धागा काढला आहेच त्याचा येथे विस्तार करत नाही. भारत थोडेसे स्रोत असलेला देश आहे त्या पेक्षा तो एक व्यावसायिक संधींकरीता विकसीत होत असलेला देश आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अण्वस्त्र सज्ज देश या नात्याने सामरीक दृष्ट्या खूप सशक्त नसला तरी महत्वाचा देश आहे. जर भारतीय पाकिस्तानी चिनी रशीयन लोकांना आमेरीकेतील तेथील ओपीनीयन इन्फ्ल्यूअन्स करण्याची इच्छा असू शकते (सध्या भारतीय वंशाच्या हॉटेल व्यावसायीकावर क्लिंटनबाईंच कँपेन प्रमाणाबाहेर फायनान्स केल्याबद्दल आमेरीकेत केस चालू आहे) तर आमेरीकेतील अथवा इतर देशातील लोक भारतीय राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप शक्य नसला तरी अप्रत्यक्षपणे ओपीनीयन्स इन्फ्लूएन्स करण्याचा प्रयत्न न करता राहतील का ? आमेरीकेला भारत आणि पाकीस्तान (कडे अणवस्त्रे आहेत म्हणून ती खूपतात असे नव्हे तर इतरही देशांकडे अण्वस्त्रे असण्याच लॉजीकल समर्थन होऊ शकत त्यांच्या स्वतःच्या सामरीक सामर्थ्याला महत्व कमी होऊ शकत वगैरे किंवा खरोखरही भारतीय उपमहाद्वीपातील संघर्ष टोकाला गेलेतर काय या भिती मुळे जे किंवा जे काही कारण असेल ते) मध्ये काश्मिर प्रश्नावर चर्चा होऊन हवी असणे स्वाभाविक आहे आणि भारत इतर तीसर्‍या देशास या चर्चेत घेणार नाही हेही निश्चित आहे. भारत आणि पाकीस्तानच्या उजव्या नसलेल्या गटांकडून कितीही चर्चा झाल्या तरी जनतेची मान्यता मिळणार नाही; शॉक होऊ नका, मी आमेरीकन राजकारण्याच्या बुटात पाय ठेवले तर मी दोन्ही देशातील उजव्यांना पुढे येण्यास प्रोत्साहन देईन आणि चर्चेस बसवेन त्या करता दोन्ही कडे उजवे निवडून येतील या करता बरेच काही पडद्या मागून करण्यास जमलेतर करेन पण निश्चितपणे पडद्या मागून कारण माझा आमेरीकन राजकारणी म्हणून असा प्रत्यक्ष हस्तक्षेप भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही नागरीकांना खपणार नाही. हा भाग एक झाला. आपण इकॉनॉमीक टाईम्सचे आणि भारत आमेरीका व्यापारी संबधांच्या वृत्तांचे अभ्यासक असाल तर दुसर्‍या बाजूला आमेरीकन व्यावसायिकांना हव्या असलेल्या आणि भारत सरकार देत नसलेल्या सवलतींमुळे आम्रेरीकन व्यापार्‍यांची नाराजीमुळे आमेरीक प्रशासनावरील त्यांचे दबाव मननीय आहेत. मी लंडन ऑलीपीक्सच्यावेळेस एक युरोमेरीकन स्त्रीचे नाव भोपाळ गॅसवाल्यांची बाजू घेऊन आमेरीकन कंपनीला विरोध वगैरेकरताना वाचल्याचे आठवते त्यानंतर तीच स्त्री भारतातील एका चळवळीची (आर्थीक) बाजू घेताना दिसली . भोपाल गॅसवर कधी काळी लिहू म्हणून जे दुवे जपले होते ते उघडून पाहताना आंतरजालावरून तीचे नाव हळू हळू गायब होते आहे असे हलकेसे जाणवत होते अशात दोन एक महिन्यापुर्वी ती त्या सर्व संदर्भ दुव्यातून हरवली होती. कदाचीत दुवे नैसर्गिक पणे बंद पडले असतील कदाचित माझा संशयवाद पुर्ण चुकीचाही असू शकतो. अशातील काही लोकांच्या भूमिका इराणशी संबंध सुधारण्यास साहाय्यभूत असणार्‍या असू शकतात असे वाटले सर्व संशय चुकीचे असू शकतात. उद्देश कोणत्याही भारतीय व्यक्ती अथवा पक्षाकडे बोट दाखवण्याचाही नाही. भारतातील निवडणूका परकीय लोकांना पुर्णपणे प्रभावीत करता येणे निश्चीतपणे अशक्य आहे. सध्याचेच भारत सरकार खूप आमेरीकाभिमूख होते तरीही दुरावा येण्याचे थांबले नाही. पाहिजे ते प्रशासन आणून हवे ते सगळे साध्य करता येईल एवढाही कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी भारत कच्चा नक्कीच नाही त्यामुळे अशा शक्यतांची खूप चिंता करावी असे वाटत नाही. माझ्या सागंण्याचा मतितार्थ परकीयवृत्तसंस्थाच्या वृत्तांना प्रमाणा बाहेर महत्व देणे आपण टाळले पाहिजे. किमान पक्षी त्यांच्या वृत्तांनी भारतीय हुरळून जातात त्यांच्या वृत्तात अभिप्रेत असे अर्थ काढून प्रभावित होतात असे त्यांना कळता कामा नये. माझी व्यक्तीगत मते आहेत कोणताही विदा आकडेवारी संदर्भ देणे कदाचित शक्य असणार नाही. कोणत्याही वादात पडण्याचे टाळावे म्हणून मी मिपावर हे लिहिणे टाळले होतो. हा प्रतिसाद न पटल्यास ह.घ्या नाहीतर माझा आणि आनन्दा यांच्यातील व्यक्तीगत मतांचा संवाद म्हणून सोडून द्यावे.

In reply to by आनन्दा

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 17:11
यादी मॅनिप्युलेट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला आहे पण तो Time कडूनच. नाहीतर ५ दिवसात, १७ एप्रिलच्या बातम्यांत मोदी आणि AK४९ चे पहिल्या पाचात नाव असले पाहिजे होते. Time चा हेतू चुकीची माहिती देवून भारतीय(अति हुशार /अति भावनिक)लोकांना गुमराह करायचा दिसतोय, हे नक्की.

In reply to by पैसा

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:55
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं! व्हॉट्सअ‍ॅप वर टेक्स्टींग करायचे सोडून टाईम साप्ताहीकाकडे जायला कुणाला वेळ तरी आहे का? उगाच आपले काहीतरी... ;)

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 10:06
मोदी पंतप्रधान झाले तर तीन गोष्टी प्राधान्यक्रमानं करतील : १) स्वतःचं लग्न! कारण ते स्वतःला मोस्ट इलिजिबल बॅचलर समजतात. आपकी अदालतमधे पूर्वी झालेल्या इंटर्व्यूमधे ते (लाजत लाजत) म्हणाले होते : "हमको सरकारने जमीन (प्लॉट) तो दे दी है, अब मकान कब बनेगा देखना है". (जसोदाबेन बघा वाट) २) अंबानी, अडानी आणि डिएलफनं प्रचारात केलेल्या उपकाराची भरघोस परतफेड बिजेपीच्या खास `कॉर्पोरेट किक बॅक स्टाईलनं' करणार. (काँग्रेसी अवाक, त्यांचे एकामागून एक घोटाळे उघड होतात आणि हे डोळ्यादेखत लुटतायंत पण काही करता येत नाही) ३) ज्या एकमेव मुद्यावर संघानं (आणि वरुन दाखवायला बिजेपीनं) त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार बनवलं त्याची परिपूर्ती करणार, राममंदिर बांधून! (असंख्य भारतीय खूष! आणि देशासाठी कायमची डोकेदुखी!)

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन गुरुवार, 04/24/2014 - 10:26
माणसानं किती किती म्हणून आशावादी असावं ह्यासाठी आजच्या पिढीने तुमच्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे :))

In reply to by सुहासदवन

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 10:39
आता टाईम्सच्या ओपिनियन पोलनं व्यापक स्तरावर लोक काय विचार करतात हे दाखवून दिलंय त्यामुळे बिजेपीप्रेमींची जळजळ होतेयं इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:57
लेखात प्रश्न केजरीवालांच्या संदर्भात विचारले होते पण आपण त्या ठिकाणी चुकून मोदी वाचलेले दिसतेयं! असो.

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 10:41
खरोखरच Time चे मनापासून कौतुक करावेसे वाटते. Time सारख्यांनी आपला धंधा(हो धंधाच!) कसा वाढवावा, याचा हा पाठ इतर माध्यमांनी घेण्यासारखा आहे. जो माणूस दिल्लीमध्ये ५०० रुपये दान दिलेल्या एका रिक्षावाल्या वर प्रभाव पाडू शकला नाही,तो जगातील एक नंबरचा प्रभावी नेता कसा असू शकेल? भारताच्या गृहमंत्र्यावर/पोलीस आयुक्तांवर/LGवर काय प्रभाव पाडला होता तेही सर्वांना माहिती आहेच. ज्याने "येडा मुख्यमंत्री" हे शिंदेंनी दिलेलं बिरूद, राजीनामा देऊन सार्थ ठरविले. माझ्या मते जगातला तर सोडाच, भारतातला एक नंबरचा विनोदी माणूस/जोकर म्हणून Time ने नाव घ्यावे. Time ने जी लिस्ट दिली आहे त्यात १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत २०१४ मध्ये "अण्णा हजारे" का नाहीत? माझ्यामते भारतातील रिकामटेकडी जनता जी facebook वर like करते, त्याच्या संख्येवरून ही लिस्ट बनविली आहे, जी पूर्ण पणे बरोबर आहे फक्त "Most liked/disliked people" या नावाने छापली गेली पाहिजे होती. Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे व आपली ही अक्षम्य चूक कशी सुधारता येईल हे पाहावे.

In reply to by आयुर्हित

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 10:48
बिजेपी सरकार आलं तर देशाची काय परिस्थिती होते पाहा मग कळेल कुणी कुणाला वेडं बनवलं ते.

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत गुरुवार, 04/24/2014 - 21:32
संजयजी पूर्वग्रसित होऊन मते बनवू नका. किमान योजना आयोगचे अहवाल तरी वाचत जा. ११व्या योजनेत भा ज प शासित राज्यांची कामगिरी अन्य राज्यांपेक्षा जास्त चांगली होती. हे सत्य आहे. बाकी मोदी आल्याने देशात मूलभूत -अर्थात रस्ते, रेल्वे, सिंचन, वीज इत्यादींना महत्व दिले जाईल ज्याने भारतीय उद्योगांचा विकास होईल. अमेरिकेला हे नको आहे म्हणून अमेरिका मोदी विरोधात आहे. ज्या पक्षाच्या १५० अधिक केजरीवाल समेत असे उम्मेद्वार आहेत ज्यांच्या NGO ला कुठून मदत मिळते सांगायची गरज नाही. खाल्लेला मिठाला जगावे लागेतेच. दिल्लीत वीज दर कमी करण्या एवजी सबसिडी वाढवली. सबसिडीचा पैसा कंपनीला बिन विल वसूल करताच मिळतो दिल्लीत वीज बिल वसूल करणे काही सौपे काम नाही. जेवढी जास्त सबसिडी तेवढा जास्त अंबानीचा फायदा (कुणाच्या खिशात आहे, कोण आहे लवकरच कळेल, घोर निराशा होईल) म्हण आहे न चोर मचाये शोर. .

In reply to by विवेकपटाईत

मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं आहे ही गोष्ट उघड दिसत असतांना, उगीच एखाद्या बथ्थड राजकीय नेत्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत `परकीय हस्तक्षेप आहे' असा कल्पनाविलास करणं हा भलताच ग्रह आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुहासदवन Fri, 04/25/2014 - 13:08
मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं
ह्या अश्या प्याद्यांचा उपयोग करूनच जवळ जवळ प्रत्येक मोठा उद्योजक आपली पो़ळी भाजून घेत असतो, त्यात गैर काय आहे? प्रत्येक राज्यात तिथला मोठा उद्योगपती किंवा तेथील उद्योजक हे त्या राज्याच्या शासनावर थोडाफार प्रभाव ठेवून असतातच. शेवटी पैशाची आणि उद्योगांची मोठी उलाढाल तेच करतात. शासकीय तिजोरीत महत्वाची भर तेच घालत असतात. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा साखर आणि सहकाराच्या पैशाच्या माध्यमातून (पण फक्त) महाराष्ट्राच्या शासनावर प्रभाव ठेवून असतातच की. आता समजा मोदीनी अंबानी-अडानी किंवा गुजरात मधील उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत किंवा भारतातील इतर उद्योगांना गुजरातमध्ये एक महत्वाचे स्थान मिळ्वून दिले आहे, तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला कोणी रोखले होते, असे काही करण्यापासून? अंबानी-अडानी च्या लेवलला जाऊ द्या पण महाराष्ट्राच्या मातीतील किती उद्योगांना किंवा उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत स्वत:चे असे स्थान आहे? टाटा नॅनो सारखे किती उद्योग दुसर्‍या राज्यातून खेचून आणून महाराष्ट्रात उभारले गेले? उद्योगांचं जाऊ द्या, महाराष्ट्राच्या नेत्यांचे तरी काय स्थान आणि प्रभाव आहे भारतीय बाजारपेठेत (दिल्लीत)? चांगल किंवा वाईट जाऊ द्या. पण निदान राष्ट्रीय लेवलला अंबानी-अडानी ह्यांच्या सारख्या उद्योजकांचे मोदींशी नाव तरी जो़डले जाते, गुजरातला ते निदान रिप्रेजेंट तरी करतात, पॄथ्वीराज चव्हांणाचे नाव, निदान आडनाव घेतल्यावर तरी कोणता (आदर्श) उद्योग किंवा उद्योजक आठवतो? महाराष्ट्राच्या शासनाने खरंच काही चांगलं केलं असेल तर मग करा ना मार्केटिंग ह्या सार्‍याची. वाट कसली बघताय...मोदी सरकारची!

In reply to by सुहासदवन

त्यानं मोनॉपॉली वाढते आणि त्यात जनतेला पर्याय न राहिल्यानं ती लुटली जाते. मोदी काय किंवा काँग्रेस काय मला सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवणं गैर वाटतं. इंडस्ट्री जनहितासाठी चालली पाहिजे आणि इंडस्टियालिस्टलाही फायदा व्ह्यायला हवा पण संपत्तीच बेतहाशा केंद्रिकरण गैर आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार Fri, 04/25/2014 - 14:56
सं.क्षी. लेखापरिक्षण आणि अर्थशास्त्र या बाबत आम्हाला आपल्या एवढ प्रगाढ ज्ञान नाही. आमच्या मते दोन गोष्टी आहेत व्यक्ती/संस्था आपल्या भोवतालच्या समाज, संस्कृती आणि व्यवस्थेचीच निर्मिती असतात. घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे. मला आपल्या व्यवसायाला लक्ष्य करायच नाही. पण भारतात लेखापालांची लेखापरिक्षकांची एकुण संख्या किती ? त्यां सर्वांचा सर्व कारभार शुद्ध आदर्श नितीमुल्यांनी चालू आहे असे सर्टीफीकेट आपण द्याल काय ? एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ? संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची. आता महाराष्ट्रातली मतदान संपली आहेत आपापले राजकीय अंगरखे उतरवून समतोल विचारकरणे आत्मपरिक्षणही करणे या बद्दल सर्वांनीच सवडीने विचार करावा, (आणि मी हा निघालो बोलल्याप्रमाणे करण्यासाठी)

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 14:57
संजय क्षीरसागरजी, आधी माणसं ओळखायला शिका! बाकी आपोआप चांगले होईल हो.त्यासाठी आआपजी गरज नाही. आणि हो एक अजून, आम्हाला बोलवा हो थेठरात,सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवतांना बघायला आवडेल! कोण पवार की सोनिया की पप्पू नाचणार आहे तेही कळवा आधी!

In reply to by आयुर्हित

घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे.
चुक नाही फ्रॉड हा शब्द लक्षात घ्या. फ्रॉड म्हणजे संगनमतानं केलेला अपहार. तो व्यवस्थापनातल्या पद्धती डावलून होतो आणि पैशाचा हव्यास हे त्याचं एकमेव कारण असतं.
एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ?
दादाश्री, कोणतीही इमानदार व्यक्ती बेईमान माणसाचं काम करत नाही असा माझा व्यावसायिक अनुभव आहे. You can't bend honesty with money. त्यामुळे बेईमान उद्योजकाची मेहेरबानी प्रामाणिक माणूस स्विकारतच नाही! मोदी; अडानी, अंबानी आणि डिएलएफच्या विमानातनं फिरतायंत आणि या कंपन्यांची कार्यप्रणाली उद्योग जगतात मशहूर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही झाकले तरी मोदी उघडे पडणा. पण डोळेझाकच करायचीये म्हटल्यावर विवेकाचा प्रश्नच मिटला.
संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची
संशय कसला? उघड दिसतंय. आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. असो, आता संधी गेलीये त्यामुळे बोलून उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास Fri, 04/25/2014 - 22:11
आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. मोदी निवडणूक आणि बहुमतवाल्या पक्षाचे नेते म्हणून निर्वाचीत प्रतिनिधीअंतर्गत निवडणूक जिंकले की मोदीविरोधकांनी मोदी लाट नाही पण मोदीविरोधाची ओहटी मान्य केली ? :) मात्र एक प्रश्न नक्कीच पडतो. जर चुकून मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी कुठलेही वादग्रस्त निर्णय न घेता जनतेच्या भल्यासाठी राज्य केले तर तुम्ही ते तसे वागले हे मान्य कराल का तरी देखील मोदी वाईटच असतील? माझ्या पुरते बोलायचे तर केजरीवालांनी चांगले मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले असते तर आणि अगदी उद्या तेच काय पण पप्पू गांधी जरी पंप्र झाला आणि चांगले निर्णय घेतले तर मी स्वागतच करेन. पण मला मोदी विरोधकांची याबाबतीत खात्री नाही म्हणून विचारत आहे.

In reply to by विकास

इतकंच वाटतं. देशातला भ्रष्टाचार रोखला गेला आणि महागाई आवाक्यात आली की लोक सुखी होतील. मग ते मोदी की आणखी कुणी केलं यानं फरक पडत नाही. अर्थात मोदी जे बोललेत तसे वागले तर त्यांचं मनापासून कौतुक करीन यात वाद नाही. केजरीवालांच्या दिल्लीतल्या राजकीय कारकिर्दी विषयी मतभेद आहेत. मला त्यांच्या सचोटी विषयी तिळमात्र शंका नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा Sat, 04/26/2014 - 11:07
मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा
मला वाटते संधी सर्वांना समानच मिळते. काही लोक त्यचा अधिक फायदा घेतात इतकेच. बाकी मी कोणत्याच माणसाला त्याच्या तात्कालिक कृत्यांवरून मापत नाही, अनेक गोष्टींचे दीर्घकालीन परिणाम समजण्यास आपण कमी पडतो, ते बर्‍याच वेळेस राजकारणी लोक दूरदॄष्टीने पाहत असतात, तेव्हा मोदींनी गेली २ वर्ष अदानींवर कृपा केली, डीएलएफचे विमान वापरले म्हणजे नंतर देखील असेच करतील असे नाही. त्या व्यक्तीचे दीर्घकालीन उद्दिष्ट, त्यांचे चरित्र्य वगैरे गोष्टी देखील बघणे आवश्यक आहे. आणि मोदी त्य कसोटीवर उतरतात म्हणूनच माझ त्यांना पाठिम्बा आहे. बाकी चारित्र्य वगैरे गोष्टींवर मोदींची तुलना मनमोहनसिंगांशी करयला माझी ना नाही. आणि मुख्य म्हणजे, माझा क्रांती पेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, आणि हेच मला मोदींपेक्षा केजरीवाल जास्त आवडतात.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार Fri, 04/25/2014 - 23:56
सं.क्षी. राजकारण बाजूला ठेवल तरी तुम्ही प्रश्नांचा फारच एकांगी विचार करता असं वाटत. मी व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्हीही टाळतो. मी मोदी समर्थक नसताना (मी कोणत्याही एका पक्षाचा कधीच समर्थक नव्हतो) सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो हे अनुभवताना गंमत दुसरीकडे काळजी वाटते काँग्रेसची जागा घेण्याची चांगली संधी असलेला एक पक्ष मतदारांनाच दोषी ठरवत मोठा होऊ पहातो आहे. लोकांना कन्व्हीन्स करण्याच्या मोठे होण्याच्या अशा पद्धती यशस्वी होत असतील तर माहीत नाही सामान्य माणूस म्हणून बघताना प्रांजळपणे सांगायचे झाले तर जुनेच औषध (पद्धतीचे) नव्या बाटली (नव्या नावाने) माझा देश एक चांगल्या बदलाची संधी दवडत नाही ना अशी साशंकता येते हे एक. अशा साशंकता व्यक्त करणार्‍यांना विश्वासात घेण्या एवजी नकारात्मक मार्केटींगचा आधार हे दोन. आणि असे दाखवून देणार्‍यांची लगेच विरोधक म्हणून बोळवण हे तीन, असे सांगणार्‍यांचे ऐकण्याची एक पैसाही तयारी नसणे हे चार, म्हणजे जो तुमचा विरोधक नाही तो पण विरोधक कसा होईल हे स्वतःहून पहाणे. आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही ? उत्साह उपयोगाला येतो पण मर्यादा असतात, महाराष्ट्रात निवडणूका संपल्यात जमा आहेत अंगरखे आणि चष्मे बाजूस ठेऊन आत्मपरीक्षणही केल्यास पुढच्या वेळी आपल्यालाच प्रचारात सुधारणा करण्यास आपल्या चाहत्याची बाजू अधीक समर्पक पणे मांडण्यास उपयोग होईल. माझ्या खालील धाग्याचे सावकाशीने वाचन करावे घाई नाही. नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

In reply to by माहितगार

हो ना, कारण तुम्ही फक्त माहिती जमवतायं,जस्ट अ कॉपी-पेस्ट जॉब ! माहितगाराला स्वतःचं मत नसतं. आणि मजा अशीये की तरी सुद्धा तुमची मतं लपत नाहीत! ही दोलायमान स्थिती आहे आणि त्यामुळे निरुपयोगी ठरते. न घरका न घाटका. तुम्ही म्हटलंय `आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही? ' हे तुम्ही स्वतःचं मत स्वतःवरच लादतायं कारण मी असं कुठेही म्हटलं नाही. उलट तुमच्या प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर दिलं होतं. नुसती माहिती जमवणारा, मोदी हा कॉर्पोरेट फ्रॉड आहे याचा प्रतिवाद करु शकत नाही. तुम्ही तुमच्या धाग्यांची लिस्ट दिली आहे. मी तुमचे धागे वाचत नाही कारण मला ते निरर्थक वाटतात.

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 12:38
विकासजी, आपणास धन्यवाद! आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. हा प्रतिसाद वाचून Time ने चक्क Heading बदलले! नवे heading असे आहे : Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll आधीचे heading असे होते: The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 13:09
>>>आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. >>>संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे. मिपावर श्रेणी देण्याचा प्रकार सुरु होणार आहे का? 'अतिविनोदी' अशी श्रेणी द्यावी-शी वाटत आहे. माणसानं स्वतःबद्दल किती अवास्तव कल्पना कराव्यात ह्याला काही मर्यादा???????????? अवास्तव कल्पना करण्यासाठी ठेवलाय ना एक माणूस मिपावर? कोटा वाढवलाय काय?? ;)

In reply to by आयुर्हित

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 13:44
Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
हे शीर्षक आधीच्या या शीर्षकापेक्षा
The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll
निश्चित जास्त प्रभावी आणि स्पष्ट आहे. (संपादित)

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 13:17
हा विनोद ही नाही, सत्य घटना आहे. पाहिजे तर माझ्याकडे Time चा मूळ लेख, नवा लेख व लेखावरील सर्व कॉमेंट्स copy करून ठेवल्यात. Mail id द्या, mail करतो आपणास!

In reply to by आयुर्हित

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 13:44
इथेच टाका की. तुम्च्या प्रतिसादानं टाईमचं हेडींग बदललं असेल तर कौतुकच आहे. टाका इथं. लिंक दिलीत तरी चालेल. तुम्हाला जमत नसेल तर संपादकांना सांगा. मिपाचा एक प्रकारचा विजय असल्यानं संपादक अथवा मालक सुद्धा मदत करतीलच ही खात्री आहे.

In reply to by प्यारे१

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 14:20
प्रशांतजी व admin आपल्याला mail पाठवला आहे. व लिंक्स जोडल्या आहेत. यात पहिल्या file मध्ये ४८८ comments होत्या, ज्या नवीन धाग्यात फक्त ९५ दिसत आहेत, ज्यात माझी comment मला सापडली नाही (बहुतेक उडवलेली दिसते!) आधीचे Heading असलेली file The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll आत्ताचे Heading असलेली file Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस Fri, 04/25/2014 - 15:38
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की टाईम्सच्या साईटवर तुम्ही मराठीतून प्रतिक्रीया पाठवलीत. ती त्यांना समजली म्हणून त्यांनी लेखाचं शिर्षक बदललं. आणि ते तुमच्या प्रतिक्रीयेमुळे बदललं हे कुणाला कळू नये म्हणून तुमची मराठीतली प्रतिक्रीया पण उडवली? *ROFL*

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 13:42
माझ्या माहिती प्रमाणे पॅरिस मधे आयफेल टॉवर जवळ केजरीवाल प्रेमींनी एक मोठी सभा भरवली होती, त्यानंतर पत्रके वगैरेही वितरित केली गेली होती. याप्रकारच्या सभा परदेशात मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्यास 'टाईम' ने त्या आधारावर मूल्यमापन केले असू शकते. या सभेविषयी जास्त माहिती हवी असल्यास मिळू शकते.

मृत्युन्जय गुरुवार, 04/24/2014 - 14:03
एक मिनिट. का फुकाची चर्चा करतो आहोत आपण? जर समजा केजरी वाराणसीमधुन निवडुन आले तर काय ते स्पष्ट होइलच की. मला वाटते केजरीवाल जर जिंकले तर ते जास्त लोकप्रिय आणि प्रभावी आहेत हे लोकांनी मान्य केलेच पाहिजे. टाइम वर आपला विश्वास नसेल कदाचित. जनमतावर ठेउयात ना. तिथे तर कळेलच की. बादवे: अब की बार मोदी सरकार ;)

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 14:33
विकास यांनी विडंबन म्हणून लिहिलेल्या धाग्यावर गंभीर वाद सुरू झाले ही धाग्याची शोकांतिका! आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं. या यादीत ओबामाकाका कुठे आहेत मग?

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 14:47
मतदान फेर्‍या संपत आल्यात वादाच्या आपापल्या तोफा वेगवेगळ्या समर्थक मंडळींनी थंड करावयास ठेवल्यास हरकत नाही. धागा आणि मिपावर शांतता नांदण्याच्या दृष्टीने माझे प्रतिसाद कुठे उडवण्याची गरज भासल्यास मोकळेपणाने उडवावा ही नम्र विनंती.

In reply to by माहितगार

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 14:50
माझा प्रतिसाद केवळ एक सामान्य सदस्य म्हणून आहे. तुमच्या एकट्याच्या गंभीर प्रतिसादांचा तिथे काही संबंध नाही. बाकी खूपजण हा धागा गंभीरपणे घेताना बघून मला जाम गंमत वाटत आहे!

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 15:01
होय ना या धाग्याचा वेगळा उद्देशपाहून मी माझा वेगळा धागा काढला होता. (तरीही आनन्दांना लांबलचक प्रतिसाद देत बसलो :) ) एनीवे समर्थकांना त्यांचे त्यांचे लोक निवडून येण्याचा सारा प्रभाव मिपा धाग्यांमूळे पडतो एवढा मिपावर विश्वास आहे हे अशा निमीत्ताने सिद्ध होते हे काय कमी आहे ? :) मत आतातशी मतपेटीत गेली पुढची पाचवर्षे हसायचंच काम आहे ;)

In reply to by पैसा

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 15:09
अजून मुंबईत संध्याकाळपर्यंत मतदान होईल आणि टाइम पोलसारख्या गोष्टींचा सूज्ञ लोक (हॅ हॅ हॅ वाले सोडा, त्यांना कशाचंच काही पडलेलं नाही), निश्चित विचार करतील अशी अपेक्षा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 15:38
तर अर्ध्या दिवसाच घोडा मैदान बाकी आहे म्हणताय ? टाइम टाइम ची बात आहे तर !! जो जे वांछील तो ते लाहो आमच्या शुभेच्छा जशा इतरांना तश्याच तुम्हालाही मतदानाचा अर्धा दिवस तुमच्या इच्छेनुसार जावो ही सदिच्छा. विरोधकहो नाराज होऊ नका अशाच सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत. (कुणीही निवडून आले तरी माहितगारच्याच सदिच्छेने ;) ह. घ्या.)

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 15:49
सं.क्षी. राजकारण हा विषय कधीच हसण्यावारी नेत नाहीत असे दिसते. ज्याची त्याची मर्जी पण इतर कोणत्यातरी आवडीच्या विषयात कधी तरी अधून मधून मोकळेपणाने हसून घेत रहा म्हणजे झाले. आपल्या आनंदा करता आमच्या केजरींनाही शुभेच्छा.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 15:49
तुम्हाला केजरीवाल गंमतीशीर वाटतात का? मला ब्वा विनोदी धाग्याला गंभीरपणे घेणारे लोक गंमतीशीर वाटतात! आणि टाईम मॅगेझीनसुद्धा!
आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं.

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 14:38
रजनीकांत नंतर श्री केजरीवाल, श्री मोदी, कु. राहुलगांधी ही आजच्या तारखेला भारतीय सोशलसाईटसवर चांगल्यावाईट कारणांनी धुमाकूळ घालणारी लोकप्रिय व्यक्तीमत्वे आहेत. यात अगदी सौ. सनी लिऑनचेही नाव जोडू शकता. दर दुसरा फॉर्वर्डेड मेसेज यांच्यापैकी एकावरच असतो. त्यामुळे यालाच जनमाणसांवर टाकलेला प्रभाव म्हणून गणले तर हे शक्यय.

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 16:09
कुठलही एक कार्य हाती घेण्यास हरकत नाही पण ते पूर्ण करावे . नुस्ती "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात " .... असं नको.

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:03
वर पैसाताईंनी म्हणल्याप्रमाणे हा धागा विरंगुळा आणि ऋषिकेश यांच्या "मोदी पंप्र झाले तर" धाग्याचे काहीसे विडंबन होते. थोडक्यात निव्वळ टाईमपास. अर्थात टाईम साप्ताहीकाने टाईमपास केलेला नाही! एका अर्थाने त्यांचा हा business survey आहे. सध्या टाईम जास्त कुठे वाचले जाऊ शकते, कोण वाचते आणि काय वाचते याचा एक ढोबळ अंदाज यात लागू शकतो असे वाटते. यात टाईम ने कुठेही काही ठरवलेले नाही. निव्वळ जे काही हो - नाही मत पडले त्यावरून क्रमवारी ठरवली आहे. यात केजरीवालांना "हो" अशी जास्त मते मिळाली म्हणून ते "या टाईमाचे" प्रभावी नेते झाले तर मोदींना "नो" म्हणून सगळ्यात जास्त मते मिळाल्याने ते "टाईमलेस" प्रभावी नेते झाले! ;)

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 17:23
१. अरविंद केजरीवाल २. नरेंद्र मोदी ३. Katy Perry : गायिका ४. Justin Bieber : पॉप गायक ५. Laverne Cox : अभिनेत्री ६. Rihanna : अभिनेत्री आणि गायिका ७. Benedict Cumberbatch : नट ८. Beyonce Knowles : अभिनेत्री आणि गायिका ९. Jared Leto : नट, दिग्दर्शक, निर्माता, इ. १०. Lupita Nyong'o : अभिनेत्री, दिग्दर्शक, इ.................................... इतके पुरे नाही का ?! लोक्स, लोक्स, लोक्स... या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय? वरचा डेटा आणि शेवटच्या एकदोन दिवसांतील झालेले मतदान पाहता, एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! इथे तर त्याचा "सबळ पुरावा" म्हणून वापरत लोक "बाजारात तूरी... " चा संगित प्रयोग करत आहेत?! =)) . =)) . =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकास गुरुवार, 04/24/2014 - 17:35
एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा ! सहमत. बाजारात बाकी धान्याचा तुटवडा असला तरी तुरीचे अमाप पिक आले आहे, त्यामुळे काळजी नसावी. ;)

क्लिंटन गुरुवार, 04/24/2014 - 17:41
या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय?
छे हो इस्पिक एक्का असे कसे म्हणता? मोदींना मागे टाकून केजरीवाल पहिल्या क्रमांकावर आले आहेत यामुळे मोदी समर्थकांचा कसा जळफळाट होत आहे हे बघितले नाहीत का? :) टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. केजरीवालांना ३२ लाख मते मिळाली आहेत म्हणे. एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का?

In reply to by क्लिंटन

प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 18:24
>>>>>>>रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? छे छे! रजनीकांतनं घेतलेल्या सर्व्हेमध्ये टाईमला पहिल्या १० अब्ज मध्ये स्थान नाही!

In reply to by प्यारे१

मदनबाण Fri, 04/25/2014 - 15:29
एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का? हॅ.हॅ.हॅ... रजनी अण्णाचे नाव जर टाकले असते तर टाईमचा सर्वर लगेच क्रॅश नसता का झाला ? ;)

In reply to by क्लिंटन

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 18:38
नक्कीच. पण आजकाल "केवळ सोईच्याच नव्हे तर आस्तित्वात नसलेल्या / व्हर्च्युअल राईचा देखिल पर्वत करणे" आणि "समोर असलेला गैरसोईचा पर्वत स्वतःचे डोळे घट्ट झाकून आस्तित्वातच नाही" असे म्हणणार्‍या स्वयंघोषीत विचारवंतांची लाट आली आहे... हा आजार सर्वकाळ (एंडेमिक) असतो आणि निवडणूकीच्या मोसमात त्याची जोरदार साथ (एपिडेमिक) येते. काहीजणांत याची लागण उपायापलिकडे गेलेली असल्याने डेटा, अकाऊंटींग, सारासार बुद्धी, समतोल विचार, इ औषधांचा फायदा तर होत नाहीच पण उलट जोरदार अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते ! ;) :)

In reply to by क्लिंटन

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/24/2014 - 18:48
टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. एकदा सर्व लोकांना खुला व्हर्चुअल सर्व्हे संस्थळावर प्रसिद्ध केला की मग कोणाला त्याच्या अश्या दुरुपयोगापासून थांबवणे केवळ अशक्य आहे. मात्र त्यात सापडलेल्या डेटाचा खरेपणा आणि उपयुक्तता ठरवायला शास्त्रिय अक्कल जरूर लागते ;)

जयनीत गुरुवार, 04/24/2014 - 18:58
कुठल्या एका सर्वेक्षणात कोण आघाडीवर दिसतो ह्याला कितपत महत्व द्यायचे? ही पत्रिका वेळोवेळी अशी सर्वेक्षणे करत असते? पण त्याने नेमके काय सिद्ध होते तेच कळत नाही. पहिल्या नंबर वर केजरीवाल असोत किंवा मोदी किंवा अगदी यादीत त्यांना स्थान ही नसले तरी काय बिघडणार आहे? आपण आपले मत त्या वरुन ठरवणार आहोत का?

विकास गुरुवार, 04/24/2014 - 21:04
टाईम साप्ताहीकाने, दोन याद्या तयार केल्या आहेत. एक आहे ती त्यांच्या विश्लेषणानुसार सिलेक्टीव्ह प्रभावी व्यक्तीमत्वाची यादी ज्यात पहीले नाव बियॉन्सीचे आहे. Time 100 असे गुगगले तर ती यादी दिसते. आणि दुसरी यादी आहे : readers’ poll for the 2014 TIME 100 ज्यात एके पहीले आहेत. :( ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. हे ही नसे थोडके. ;)

In reply to by विकास

मदनबाण Fri, 04/25/2014 - 15:34
ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. परत एकदा... हॅ.हॅ.हॅ... ;) टाईमवाल्यांना एकेंची "नौटंकी" पराकोटीची आवडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! ;) जाता जाता :- कोणाला तरी केजरी मलेरिया किंवा केजरी काविळ झाल्याचे निदान झाले आहे म्हणे ! ;)

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 22:19
केजरीवाल यांच्याच आरोपानुसार काँग्रेस आणि भाजपा यांनी देशभरच्या मिडीयाला विकत घेतलेय. पण केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय :D

In reply to by तुमचा अभिषेक

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 22:59
केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय असे नसून अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, भारताची अतर्गत सुरक्षा व पाक व्याप्त पाकिस्तानविषयी लुडबुड करायला.. असे आहे! कारण अमेरीकेच्या मिडीयाला माहिती आहे भारतात काही अतिहुशार/अतिभावनिक लोक आहेत AK४९ ला निवडून देणारे!

In reply to by आयुर्हित

विकास Fri, 04/25/2014 - 00:23
अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, बादरायणी पीजे... ;) घड्याळाचे काम टाईम दाखवणे आहे आणि घड्याळ हाताला बांधले जाते. याचा अर्थ घड्याळाची हाताशी बांधिलकी आहे. थोडक्यात टाईममधे केजरीवालांना प्राधान्य मिळते याचा अर्थ त्यांचे घड्याळाशी आणि हाताशी संबंध आहेत. :#

नांदेडीअन गुरुवार, 04/24/2014 - 23:00
"More than 3.2 million votes were cast in the poll. There were attempts to inflate the voting numbers, but only legitimate votes were tabulated for the final results. On Thursday, TIME will announce this year’s TIME 100 honorees, who are selected by the editors." http://time.com/73538/indian-politician-arvind-kejriwal-wins-time-100-readers-poll/

श्रीगुरुजी Fri, 04/25/2014 - 14:35
आकडेवारीचा काहीतरी घोळ दिसतोय. "टाईम"च्या सर्वेक्षणात अवतारी महापुरूष केजरीवाल यांना २२,६५,३४० "येस" मते मिळाली आहेत व खलनायक मोदींना २५,२२,५६७ "येस" मते मिळाली आहेत. पण निकाल वेगळाच दाखवित आहेत.

वेताळ Fri, 04/25/2014 - 17:26
मुंबई- ब्रिटनमधील केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संस्थातील प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर तज्ज्ञ अशा सुमारे ७५ भारतीय वंशाच्या मान्यवरांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर टीका केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापक चेतन भट आणि गौतम अप्पा यांनी 'इंडिपेन्डंट' या डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका खुल्या पत्रात नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली आहे. 'मोदी सत्तेवर येण्याच्या कल्पनेने आम्ही भयभीत होतो,' असे त्यांनी म्हटले आहे. 'भारतीय लोक आपले पुढील सरकार निवडून देण्यासाठी मतदान करीत असताना नरेंद्र मोदी प्रणित भाजप सरकारबाबत आम्हाला लोकशाही, मानवाधिकार आणि सामाजिक, धार्मिक विविधतेबद्दल चिंता वाटते,' असे या पत्रात म्हटलं आहे. जगातील निर्वासित भारतिय बुध्दीजीवी लोकाना भारतातील लोकांची काळजी वाटत आहे. भारतातील बरेच बुध्दीजीवी व हुशार लोक मोदी पंतप्रधान झाल्यावर जसे हरदन्हळ्ळी देवेगौडा किंवा अनंतमुर्ती भारत सोडुन परदेशात स्थाईक होणार आहेत. मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे.

In reply to by वेताळ

मला तर असला सरळ सरळ हायजॅक केलेला सर्वे तसाच पुढे ढकलून प्रसिद्ध करणार्‍या टाइम च्या तब्येतिची काळजी वाटू लागली आहे !

In reply to by वेताळ

विकास Fri, 04/25/2014 - 17:57
मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे. खरे आहे. पण वास्तवीक त्यांच्या लक्षात येत नाही की मोदी सत्तेवर आले तर त्यांची संशोधनाकरता अनुदाने वाढणार आहेत. या भट्ट साहेबांनी Hindutva in the West: mapping the antinomies of diaspora nationalism असे २००० साली पुस्तक लिहीले होते. किती पैसे त्यांना मिळाले असतील ते बघा. पण नंतर शिंचे युपिए आले आणि या विषयावर दक्षिणाच मिळेनाशा झाल्या. आता मोदी आले की परत मिळू लागतील. माझे तर म्हणणे असे आहे की तुम्हा कुणाआ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट हवी असली तर या भट्ट साहेबांना आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि मोदींवर टिका केलेले स्वतःचे लेख, प्रतिसाद त्यांना पाठवा. तुम्हाला पण अनुदान मिळेल आणि मोदी कसे नरराक्षस आहेत असा (त्यांचाच पुस्तकातले संदर्भ घेऊन)नसंशोधनात्मक प्रबंध लिहील्यावर पिएचडी पण मिळेल.

चौकटराजा Fri, 04/25/2014 - 17:48
केजरीवाल की कचरावाल व मोदी की नुसतीच भाजप या झाडाची एक फांदी हे १६ मे ला ठरेल ना ! टाईम वाले , लाईफ वाले, इंडिया टु डे वाले काही का म्हणेनात ! राज ठाकरे की फक्त भाषणबाज ठाकरे हे ही १६ ला कळेल ना !

विकास Sat, 04/26/2014 - 07:02
टाईमच्या संपादकीयांच्या निवडीत टाईम १०० लीडरमधे मात्र मोदी आहेत. फरीद झकेरीयांनी करून दिलेली त्यांची ओळख पाश्चात्य माध्यमांच्या दृष्टीकोनातून पाहीले तर संतुलीत वाटली.

श्रीगुरुजी Sat, 05/24/2014 - 14:32
केजरीवाल ही व्यक्ती एकंदरीत सुधारण्याच्या पलिकडे गेलेली दिसतेय. गेल्या काही महिन्यात प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थराला जाऊन नौटंकी करणार्‍या या ढोंग्याला व त्याच्या पक्षाला निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन जमिनीवर आणले. पण अजूनही यांचे डोळे उघडत नाहीत. आपल्या नौटंकीला, खोट्या आरोपांना व ढोंगबाजीला जनता अजिबात फसत नाही हे यांच्या डोक्यात अजून घुसतच नाही. त्यांची आता नवीन नौटंकी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात केजरीवालांनी भारतातील त्यांच्या मते सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या ३० जणांची नावे जाहीर केली होती. त्यात गडकरींचे नाव टाकले होते. गांधी परिवाराची नावे अर्थातच त्यांच्या यादीत नव्हती. आपल्या आरोपांना पुरावे देण्याचे फालतू सोपस्कार त्यांना मान्य नसतात. कोणी पुरावे मागितले तर ते भ्रष्टाचार्‍यांच्या बाजूने आहेत असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. गडकरींनी प्रगल्भता दाखवून केजरीवालांविरूद्ध न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केल्यावर निवडणुकांचे निमित्त सांगून इतके दिवस या खटल्याला तोंड देण्याचे त्यांनी टाळले. आता निवडणुक संपल्यावर खटल्यापासून दूर पळायचे कारणच देता येईना. त्यामुळे सुनावणीला उपस्थित रहावे लागले. न्यायालयाने जामीनासाठी १०००० रूं.चा व्यक्तिगत बाँड मागितल्यावर सुरूवातीला देण्याची तयारी दाखवून नंतर घुमजाव केले व तुरूंगात जाणे पसंत केले. आपल्याला बाँड मागणे हे बेकायदेशीर आहे असेही त्यांनी न्यायाधीशांना सुनावले. त्यामुळे त्यांच्या कायद्याच्या अज्ञानाची न्यायाधीशांनी चांगलीच कानउघाडणी केली. ठराविक लोकांवर वाटेल ते बेलगाम आरोप करायचे, आरोपांचे पुरावे मागितल्यावर ते द्यायचे नाहीत कारण मुळातच बिनबुडाचे आरोप केलेले असतात, न्यायालयीन प्रक्रियेवर अविश्वास दाखवायचा आणि स्वतः हुतात्मा झाल्याचे नाटक करायचे ही केजरीवालांची मोड्यूस ऑपरंडी. हे धोरण पूर्ण अयशस्वी ठरले असताना पुन्हा एकदा त्याच नौटंकीच्या मार्गाने हे निघाले आहेत. मी पूर्वी एका धाग्यावर लिहिले होते की वि. प्र. सिंगांचा ज्या वेगाने उदय झाला, त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचा अस्त झाला. केजरीवालांचे तसेच होण्याची शक्यता दिसत होती. आता ही शक्यता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. केजरीवालांसारख्या माथेफिरू व हेकट व्यक्तींना जनतेने दिलेली शिक्षा पुरेशी नाही. त्यांचे डोके ताळ्यावर आणण्यासाठी तुरूंगवासासारख्या शॉक ट्रीटमेंटचीच गरज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Sun, 05/25/2014 - 07:56
काय हो दादा, I Told You So असं म्हणायला धागे कमी पडायला लागले का? किती जुने जुने धागे वर काढताय? हा तर विनोदी म्हणून काढलेला धागा होता.... आणि इतकेच जर केजरीवाल अयशस्वी आहेत, तर एव्ह्ढे मोठमोठे प्रतिसाद देऊन त्यांचं महत्त्व का वाढवताय?

नानबा Sat, 05/24/2014 - 19:58
आष्ट्रेलियाचे सत्ताधारी अतिआदरणीय आणि जनतेचे लाडके माननीय टोनी अबॉट दादा मुठभर भांडवलशहांच्या हातातली बाहुले कसे बनलेत आणि इकडचा आम आदमी त्यामुळे कसा खवळला आहे हे दाखवण्यासाठी सिडनी हार्बर ब्रिजवर रास्ता रोको करून इकडल्या तिहारसदृश्य जेलात जाऊन बसावे...... :))
टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत.