मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

sadism एक आदिम मानवी प्रवृत्ती.

मारवा ·

मनीषा 26/04/2014 - 20:58
माझ्या भाच्याने एकदा त्यांच्या एका खेळाबद्दल सांगीतले होते. एकाला मधे ठेवून त्याच्याभोवती वर्तुळाकार उभे रहायचे. आणि त्या मधल्या मुलाला भरपूर चिडवायचे, त्याच्या खोड्या करायच्या इ. तो मधे असलेला, जोवर न रडता, तक्रार न करता राहतो तो पर्यंत तो खेळात आहे. ज्यावेळी तो रडेल, चिडेल, तक्रार करेल किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्नं करेल त्या वेळी तो खेळातून बाद ठरतो म्हणे.

सहजीवन ही मूळ प्रवृत्ती आहे कारण अस्तित्वात आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत. फक्त मानव मानवांशी जोडलेले आहेत असं नाही, वृक्ष आपल्याशी जोडलेले आहेत कारण त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आहे आणि आपला उत्छ्वास त्यांचा श्वास आहे. आपण समुद्राशी जोडलेलो आहोत कारण तो जलनीधी वर्षेचा कारक आहे. चंद्र सागराशी जोडलेलायं कारण त्याच्यामुळे सागराला भरती-ओहोटी आहे; सागर चलायमान आहे. पृथ्वीचं सूर्याशी नातं आहे आणि पृथ्वीवर जीवन प्रकट झालंय म्हणून सूर्याला प्रकाशण्यात आनंद आहे. सूर्यामुळे पृथ्वी आहे असं नाही तर सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रह-तार्‍यामुळे सूर्य विविक्षित ठिकाणी आहे. आणि अश्या अनंत सूर्यमाला एकमेकांशी संलग्न आहेत कारण त्यांच्यात पारस्पारिक अनुबंध आहे! त्यामुळे सॅडिझम (परपीडन) किंवा मॅसोचिजम (स्वपीडन) सुख देत नाही ते उन्माद निर्माण करतं. तो उन्माद क्षणीक सुखाचा आभास निर्माण करतो पण शेवटी त्याचं रुपांतर अपराध भावात होतं. हा अपराधभाव विसरायला किंबा जस्टीफाय करायला पुन्हा नवा उन्माद लागतो आणि ते दुष्टचक्र चालू राहातं. तस्मात, सॅडिझम ही आदीम मानवी प्रवृत्ती नाही हे लक्षात घेणं श्रेयस आहे. एकदा आपण सर्व अस्तित्वाशी एकरुप आहोत याची जाणीव झाली की पीडनात दु:ख आहे हे समजतं.

छान लेख आहे. बरेच कवर केलेत. स्वताला काही माहीतीची फारशी भर टाकता येणार नाही. स्वानुभव बोलायचे झाल्यास माझ्यासाठी हातावर बसलेला मच्छर एकाच फटक्यात मारून त्याचे रक्त काढणे इतपतच आसूरी आनंद. अर्थात त्यापासून स्वताला धोका असेल तरच, अन्यथा इतर किडा न मारता उचलून भिरकाऊन देतो. तर माझ्यात याचा अंश नाहीये असे बोलू शकतो. तरी लहानपणी चतुर दोरीला बांधून त्यांचा छळ करायचो. हॉस्टेलमधले किळसवाणे आणि लैगिकतेशी संबंधित असलेले रॅगिंग प्रकाराबद्दल माहीत आहेच. नक्कीच हा मानसिक आजार वा विकृती, अन्यथा किडे तर आम्हीही केले. कधीतरी मस्करीची कुस्करी देखील होते पण काही जणांचा हेतूच कुस्करी करायचा असतो.

माहितगार 27/04/2014 - 09:27
मारवा यांचा सॅडीझम या विषयाचा विस्तृत धांडोळा घेण्याचा प्रयास स्तुत्य वाटतो. (त्याचवेळी एकाच बास्केट मध्ये अनेकवीध उपप्रकार एकत्र भरले गेले असल्याने प्रत्येक वाचक त्याच्या वेगवेगळ्या उपप्रकारावर प्रतिसाद नोंदवू शकतो असे होऊ शकते. हे नोंदवण्याचे कारण माझा प्रतिसाद माझ्या आधीच्या अथवा नंतरच्या प्रतिसादांशी जुळेलच असे नाही.) sadism ला मराठी न्यायव्यवहार कोशात परपिडानंद आणि masochism ला आत्मपीडानंद हे सुचवलेले शब्द चपखल वाटतात. वरच्या प्रतिसादात 'तुमचा अभिषेक' यांनी वापरलेला असूरीआनंद हा शब्दसुद्धा आहे पण काही वेगळ्या अर्थछटांचाही त्यात आंतर्भाव होत असावा का, अर्थात इतर अर्थछटा हा धाग्याचा मुख्य विषय नाही. मी मानववंशशास्त्राचा जाणकार नाही, ही माझी मर्यादा असूनही; शिकारी अवस्थेतून होत आलेल्या मानवी उत्क्रांतीच्या अंगाने या मानवी समस्यांना समजावून घेणे शक्य आहे का याबाबतीत माझ्या अनुमानीत परिकल्पना मांडणे आवडेल.

मारवा 27/04/2014 - 11:30
या दोन प्रयोगातुन येणारे निष्कर्ष धक्कादायक आहेत. हे प्रयोग सर्वसामान्य माणसांमध्ये सॅडीस्टीक वृत्ती कशा विपुल प्रमाणावर आढळुन येतात हे दाखवितात. यातील पहील्या प्रयोगात ७१ विद्यार्थ्यांना ४ प्रकारची कामे देण्यात आली आणि कोणते काम निवडायचे याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले. यात एक काम होते बग्ज मारणे दुसरे बग्ज मारण्यासाठी मदत करणे तिसरे टॉयलेट क्लीन करणे चौथे थंड पाण्यात हात घालुन काम करणे यात बग्ज कीलर च काम घेणारयांची संख्या सर्वात जास्त होती त्यांना मग एक एक जीवंत बग देण्यात आला त्या बग्ज ना मुद्दाम नावे देण्यात आली त्यांना एक एक बग कॉफी ग्राइंडर मध्ये टाकण्यास सांगण्यात आले त्यानंतर एक क्वेश्चनरी देण्यात आली त्यात त्यांना त्यांच्या भावनासंबंधी विचारण्यात आले...... ..... ...... कृपया हा आणि पुढील प्रयोगा साठी येथे वाचा त्यातुन एक निष्कर्ष असा काढण्यात आला की.........तीन प्रकारच्या प्रवृत्ती एक वा अधिक प्रमाणात ज्या व्यक्ती त आढळतात ती सह्सा सॅडीझम कडे झुकते त्या म्हणजे narcissism, psychopathy, and Machiavellianism. तिघांना मिळुन संबोधन आहे डार्क टायरॅड ..... या संबधातील लिंक कृपया बघावी हा लेख मुळातुन वाचण्यासारखा आहे http://well.blogs.nytimes.com/2013/09/16/everyday-sadists-among-us/?_php=true&_type=blogs&_r=0

In reply to by मारवा

माहितगार 27/04/2014 - 14:22
मारवाजी, माझ्या मतांना कदाचित कुठे बदलण्याची गरज असू शकते, या मोकळेपणा सहीत आपले आणि इतरांचे विचार अभ्यासेन; मी विषयातला कुणी जाणकार वगैरे नाही त्यामुळे कदाचित जरा अंमळ वेळ घेईन, कदाचित माझ्या विचारांच्या फ्लो मधील विचार आधी लिहून मोकळा होईन, पण स्वतःच्या अल्पमतीने आपल्या उत्तरांना प्रतिसाद नक्कीच देण्याचा माझा निश्चीत प्रयत्न असेल. माझ्या प्रतिसादांना आपली उत्तरे येताहेत ती अशीच येऊ द्यात आपल्या धाग्यांच्या आणि प्रतिसादांच्या निमीत्ताने मला माझे विचार पडताळून घेण्याची संधी आपण उपलब्ध करून देताय त्या बद्दल धन्यवाद.

मारवा 27/04/2014 - 11:46
माणुस कसा असला पाहीजे काय केले पाहीजे हे सर्व आयडीयलीझम मध्ये येते. तुमच स्टेटमेंट आयडीयलीस्टीक आहे. परंतु प्रत्यक्षात माणुस कसा आहे व्हॉट इज जे आहे ते जसा माणुस आहे तसा हे हा आयडीयलीझम नाकारतो. बिकमींग महत्वाचे असु शकते असायला हवे परंतु बीइंग कम्स फर्स्ट, माणसात हिंसा, वर्चस्वाची भावना सॅडीझम असतो हे वास्तव आहे. त्याच काय करायच त्याला कस बदलायच हा नंतरचा भाग आहे महत्वाचा विषय ही आहे. पण मुळात माणसात हे सर्व ट्रेट्स आहेत हे स्वीकार करण ही सत्याकडे जाण्याची पहीली पायरी आहे. एक म्हण या संदर्भात आठवतेय मॅन इज नो डाउट ग्रेटेस्ट अ‍ॅनिमल अमाँग ऑल अ‍ॅनिमल्स बट ही कन्व्हेनियंटली फरगेट्स दॅट ही इज अ‍ॅनिमल फर्स्ट !

In reply to by मारवा

आणि पीडन हा व्यक्तिमत्त्वाचा परिणाम आहे, वास्तविकतेचा नाही. चुकीच्या गृहितकांवर बांधलेली इमारत बरोबर असू शकत नाही. मागे समर्पण नांवाची (अती) दीर्घकथा इथे प्रकशित झाली होती, त्यावेळी पीडन म्हणजे प्रेम नाही यावर भरपूर चर्चा झालेली आहे. तस्मात, पीडनवृत्ती आदिम आहे म्हणून ती मान्य करण्यात आणि त्यायोगे जस्टीफाय करण्यात अर्थ नाही. I n short, sadism is not a natural condition and if one claims so, it needs correction.

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 27/04/2014 - 14:01
The mantis is famous because the female often eats the male during intercourse, the latter being easily overpowered by his mate, but hardwired to proceed with the mating process. The sadistic part is that mantises do not bother to kill their prey before eating them: as soon as the insect embraces the hapless lover, it begins to consume it alive. Although we tend to be less sympathetic towards invertebrates, the brutality of mantis eating habits is noteworthy, and viewed as the creature is viewed as a remorseless killer by many cultures around the world.

In reply to by मारवा

मारवा 27/04/2014 - 14:08
मला एक सांगा माणसामध्ये द्वेष,हिंसा,क्रोध अशा नकारात्मक प्रवृत्ती आहेत ना ? त्या त्याच्या बीइंग चा पार्ट नाहीत का ? त्यांच अस्तित्व आपण नाकारु शकतो का ? अगदी लहान बालकांमध्ये ज्यांच व्यक्तीमत्व अजुन पुरत विकसीत ही झालेल नाही त्या मध्ये ही या प्रवृत्ती आढळुन येतात यांना नाकारण शक्य आहे काअ ? तसेच वर दिलेल्या प्राणि जगतातील उदाहरणात ही सॅडीझम दिसुन येतो तो ही अनैसर्गिक आहे असे आपणास म्हणायचे आहे का? संस्कृती ने आपले काम ज्या माणसावर सुरु केले नाही त्यात हे आढळत नाही का ? आपणास माहीत आहे का की एके काळी जवळ जवळ संपुर्ण मानवी समाज हा कानीबलीस्ट होता ?

In reply to by मारवा

मारवा 27/04/2014 - 14:16
विल ड्युरांट याच्या स्टोरी ऑफ सीव्हीलायझेशन च्या पहील्या अवर ओरीएंटल हेरीटेज या पहील्या भागातील पुस्तकाचा हा उतारा बघा यात कानिबालीझम कीती आदिम काळापासुन प्रचलित आहे हे दिसुन येते. याच पुस्तकात विल ड्युरांट दाखवुन देतात की वात्सल्य आदि भावना या कशा हळु हळु नंतर विकसीत होत गेल्या. वात्सल्य ही काही आदिम भावना नव्हती. To all the varied articles of diet that we have enumerated, man added the greatest delicacy of all- his fellowman. Cannibalism was at one time practically universal; it has been found in nearly all primitive tribes, and among such later peoples as the Irish, the Iberians, the Picts, and the eleventh-century Danes. `010217 Among many tribes human flesh was a staple of trade, and funerals were unknown. In the Upper Congo living men, women and children were bought and sold frankly as articles of food; `010218 on the island of New Britain human meat was sold in shops as butcher's meat is sold among ourselves; and in some of the Solomon Islands human victims, preferably women, were fattened for a feast like pigs. `010219 The Fuegians ranked women above dogs because, they said, "dogs taste of otter." In Tahiti an old Polynesian chief explained his diet to Pierre Loti: "The white man, when well roasted, tastes like a ripe banana." The Fijians, however, complained that the flesh of the whites was too salty and tough, and that a European sailor was hardly fit to eat; a Polynesian tasted better. `010220 What was the origin of this practice? There is no surety that the custom arose, as formerly supposed, out of a shortage of other food; if it did, the taste once formed survived the shortage, and became a passionate predilection. `010221 Everywhere among nature peoples blood is regarded as a delicacy- never with horror; even primitive vegetarians take to it with gusto. Human blood is constantly drunk by tribes otherwise kindly and generous; sometimes as medicine, sometimes as a rite or covenant, often in the belief that it will add to the drinker the vital force of the victim. `010222 No shame was felt in preferring human flesh; primitive man seems to have recognized no distinction in morals between eating men and eating other animals. In Melanesia the chief who could treat his friends to a dish of roast man soared in social esteem. "When I have slain an enemy," explained a Brazilian philosopher-chief, "it is surely better to eat him than to let him waste.... The worst is not to be eaten, but to die; if I am killed it is all the same whether my tribal enemy eats me or not. But I could not think of any game that would taste better than he would.... You whites are really too dainty." `010223 Doubtless the custom had certain social advantages. It anticipated Dean Swift's plan for the utilization of superfluous children, and it gave the old an opportunity to die usefully. There is a point of view from which funerals seem an unnecessary extravagance. To Montaigne it appeared more barbarous to torture a man to death under the cover of piety, as was the mode of his time, than to roast and eat him after he was dead. We must respect one another's delusions.

In reply to by मारवा

१) मँटीस इज अ‍ॅन एक्सेप्शन आणि अपवाद नियमच सिद्ध करतो! २) दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. इतर सजीव अस्तित्त्वाशी अजाणता एकरुप आहेत त्यामुळे (मँटीस सोडता) परपीडन करतांना कुणीही दिसत नाही. त्यात पुन्हा, `मादीला आनंद होतो' असं मानणं हा निव्वळ मानवी दृष्टीकोन आहे. अस्तित्वाशी आपणही एकरुपच आहोत पण ते समजण्याची क्षमता (`जाणीवपूर्वक एकरुपता') ही संभावना फक्त माणसात आहे. त्यामुळे चुकीच्या गृहितकामुळे ती संभावना संपेल. Now with this understanding, love is basic & positive whereas sadism is un-natural & negative. Sadism needs correction.

दादा कोंडके 27/04/2014 - 11:58
यातील १२० डेज ऒफ़ सोडोम वर आधारीत असलेला सिनेमा सालो १२० डेज ओफ़ सोडोम या नावाने पिएर पाउलो पासोलीनी या दिग्दर्शकाने बनविला.
बघायला पाहिजे हा सिनेमा. 'हॉस्टेल' सुद्धा याच थीमवर होता. मागे चीन मध्ये वाघ-सिंहाच्या पिंजर्‍यात जिवंत गाय-बैल सोडून त्यांची शिकार (?) बघण्यासाठी लोकं तिकिट काढून जात. प्रसारमाध्यमातून बोंबाबोंब झाल्यावर ते प्रकरण थांबलं असावं. बाकी, सॅडीझम आणि मॅसोचिझम या मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत आणि प्रत्येकात त्या थोड्या-फार प्रमाणात असतातच या बाबत दुमत असू नये. पण याचं ग्लोरिफिकेशन करू नये याच्याशीही सहमत.

माहितगार 27/04/2014 - 12:15
आदिम मानवाच्या अगदी शिकारीपूर्व स्थितीचा आपण विचार करू लागतो तेव्हा, ज्याला शिकारीकरता शस्त्र वापरण्याचीही माहिती झाली नसेल, तृणधान्यांचीही ओळख कदाचित झाली नसेल, गवत आणि पाला खाऊ शकत नाही, झाडावर फळे नाहीत किंवा वृक्षराजीपासून दूर जायला लागतय अशी स्थितींमध्ये इतर हिंस्त्र श्वापदांपासून कोणत्याही शस्त्रावाचून स्वतःचा बचाव करणे, त्यांनी मारलेले प्राणी/भक्ष्य इतर अनेक तशाच प्राण्यांशी स्पर्धा करत मिळवणे हे कौशल्य साध्यकरताना स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर पाळीव प्राणी हिंस्र श्वापदांपुढे स्वतःहूनही जाणार नाहीत तर मानवी समूह बनवून त्यांना त्याकडे ढकेलणे अशा काही रणनितींचा वापर करावा लागला असेल. हा फक्त स्वतःचे अन्न मिळवण्याची लढा नाही तर स्वतःचा समूह सुरक्षीत ठेवण्यासाठीही प्रत्येक क्षणी लढावी लागलेली लढाई असणार. मिळवलेल्या अन्नाला इतर प्राण्यांपासून सुरक्षीत ठेऊन स्वतःसाठी पोटभर मिळवण्यासाठी मानवी समूहात आपापसातील चढाओढही होत असणार. या जीवनाच्या चढाओढीत ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स हे ही तत्व मोठ्या प्रमाणावर आमलात आले असेल. इतर हिंस्र प्राण्यांनी केलेली प्रत्येक शिकार त्यांना चकवा देऊन ती मिळवणे ती मिळवताना सामूहीक कृतीच्या वेळी निर्माण करावे लागणारे उन्माद, आणि यश मिळाल्या नंतरचा आनंद हा वेळोवेळी नियमीतपणे साजरा होत असणार. ती जीवनशैली जगतानाची ती किमान गरज असणार. शस्त्रांसहीत शिकार करता येऊ लागल्या नंतर प्रत्येक शिकारीच्या विजयाचा आनंद साजरा केला जात असेल तर नवल नाही. ह्यातील हिंस्रश्वापदा सोबतच्या असंख्य बॅटल्स लूजींग ठरून मानवी समूहांना त्यांचे अनेक सदस्य गमवावेही लागत असणार. (आणि त्या प्रत्येकवेळी (उन्मादाच्या) त्याच नाण्याची विषादाची दुसरी बा़जूही मानव अनुभवत असणार आणि या विषादांच्या भावनांच रुपांतरण कालानुक्रमे अंहीसेच्या इच्छेतही विकसीत झाल असू शकत.) जिथे प्रश्नच प्रत्येक क्षण जगण्याचा जिंकण्याचा आहे तेथे इतर प्राण्याला परपिडा होताना स्वतःची भूक येत्या काही क्षणात भागवली जाईल याचा आनंद होण हा तत्कालीन मानवाकरता कदाचित अपवाद नव्हे नियम असेल का ? (टिपः इथे उद्देश आताच्या मानवाच्या परपिडानंदाच समर्थन असा नाही. केवळ एक शक्यता समजून घेण्याचा प्रयत्न मात्र आहे.)

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 12:47
आजच्या काळात लहानमुलांना टोकाची हिंसा पहावयासही मिळू नये अशी सहसा आपली इच्छा असते (मी व्यक्तीशः या बाबतीत आग्रही असतो). मला नसीरुद्दीन शहाच्या चित्रपटातला एक सीन (अंधूक) आठवतो ज्यात तो दोन लहान मुलांना कोणतासा प्राणी मारून खाण्यास देतो/शिकवतो आणि हेच वास्तव आहे आणि हा जीवनाचा संघर्ष तो लढलाच पाहीजे टाईप काही प्रभावी डायलॉग आहे. (कुणाला या चित्रपटाचे नेमके नाव, डायलॉग ठाऊक असल्यास कृपया द्यावा). अर्थात त्यावेळीतरी नसीरुद्दीन च्या तोंडचा डायलॉग मला भावला होता. प्राण्यांची माहिती देणारी बर्‍यापैकी चॅनल्स आहेत त्यातल्या एका कोणत्याश्या लघूपटात एक रानडूकरांच्या कळपातील पिल्लू पाणवठ्यावर पाणी पिता पिता श्वापदाची चाहूल लागताच त्याच्या सोबतचा कळप पुढे निघून जातो पिल्लू मागे राहत, पिल्लाच्या आईला लक्षात आल्या नंतर ती मागे फिरते पोहोचे पोहोचे पर्यंत श्वापदाने ते पिल्लू तिच्या समोर गट्टम केल असतं तीचा चेहरा पडतानाच ती वास्तव स्विकारून कळपाकडे मागे फिरते. त्यात एका खर्‍या खूर्‍या प्राणी (रानडूक्कर) आईच्या चेहर्‍यावरचे दोन्ही भाव दुख्खाचा आणि वस्तुस्थिती स्विकारल्याचा लपत नाहीत. आजच्या काळात आपण आपल्या मुलांना जपतो आदीम मानव आणि त्याची मुलं हे वास्तव प्रत्येक क्षणाला डोळ्या देखत अनुभवत तोंड देतच आणि प्रसंगी जगण्यासाठी स्वतःही त्याच हिंस्रता बाणवत जगली वाढली असली असावीत.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 14:10
मुले आपापल्या पालकांना शिकारींचा आनंद घेताना पाहून स्वतःही आंनद घेण्यात शिकली असणार. घटना घडतानाच आठवतात असे नाही. तर एखादी घटना घडण्याची शक्यता वाटून सुद्धा मनात विचार येतात, खरे तर एखाद्या घटनेच्या प्रसंगी कसे वागावे याची मानसीक पुर्वतयारी हे (बर्‍याचदा इंट्रूजीव्ह) विचार घडवून घेत असतात. संधी अथवा आव्हान समोर आल्यानंतर दुर्लक्षकरणे, गर्भगळीत होणे, पळून जाणे, स्वसंरक्षणाचा सामना करणे ते ऑफेन्सीव्ह स्टान्स घेणे प्रसंगी क्रौर्यासहीत ऑफेन्सीव्ह स्टान्स घेणे हे या घूसखोरी करणार्‍या (इंट्रूजीव्ह) विचारांचा अविभाज्य आणि नैसर्गिक भाग असते. इतर विचारांसोबत क्रौर्यासहीत ऑफेन्सीव्ह स्टान्सचा घूसखोर विचार सुद्धा पर्यायांच्या स्वरूपात सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेळोवेळी कळत नकळत येऊन जातच असतात नव्हे तर त्यातून असणार्‍या रिस्क अ‍ॅव्हर्शन करता मनाची पुर्वतयारी करण्यासाथी ते गरजेचे सुद्धा असतात. एक हिंस्र श्वापद तुमच्या पुढ्यात आहे तुम्हाला गर्भगळीत होणे जमलेले नाहीए माघारीचा पळण्याचा मार्ग उपलब्ध नाहीए त्याने हल्ला आधी हल्ला केला तर तुम्हाला स्वसंरक्षणाचा वेळ सुद्धा मिळणार नाहीए, तुमच्या हातात शस्त्र आहे तुम्ही ऑफेन्सीव्ह वर जाणार की नाही ? इथे काय चांगले काय वाईट हा प्रश्न नाहीए मार्ग काढण्यासाठी लागणार्‍या तुमच्या मनाच्या तयारीचा प्रश्न आहे आणि या संबंधीचे विचार अगदी क्रूरसुद्धा तुम्हाला त्यातील जोखीमांचा (रिस्कची) जाणीव करून देत असतात. तुम्ही अचानक घरात आलाय गॅस बंद आहे गॅसवरील भांड्यातला एक पदार्थ तुम्हाला चाखायचा आहे. तुम्ही डोळे झाकून त्या भांड्याला हात लावाल? बहुधा नाही, कारण बंद गॅसवरील गोष्टही गरम असू शकते त्याचा चटका बसू शकतो हे पुर्वीचे अनुभव आणि घूसखोर विचार/स्वप्ने यांनी तुमच्या मनाची तयारी करून ठेवलेली असते. कोणत्याही ललित कलेचा आस्वाद घेत असताना रौद्र, बीभत्स, भयानक इत्यादी रसांचाही समावेश केला जातो, क्रुरतेच्या बातम्या ऐकतो अथवा टिव्हीवरील एखादी एपीसोड बघतो तेव्हा यातील नको असलेले बाजूला सारावयाचे अनुभव पर्याय आणि कृती आपण नकळत आपण आपल्या मनाला सांगत असतो. म्हणून नकारात्मक विचार घूसखोर पद्धतीने मनात येण स्वागतार्ह आहे जो पर्यंत तुमच मन त्याला अंमलबजावणी योग्य म्हणून स्विकारत नाही. परपिडांनद घेऊ इच्छिणार्‍या स्थिती आणि तशी इच्छा नसलेल्या स्थिती मधला हा फरक नाही की इच्छा नसलेल्या लोकांमध्ये घूसखोर नकारात्मक विचार येतच नाही पण सोबत गॅसवरचे भांडे गरम असू शकते या शक्यते प्रमाणे त्याच्या नावडत्या/नकोशा परिणामांच्या अथवा आवडत्या गोष्टीला दुखवायचे नाही या कल्पनेने ते नाकारले जात असतात. राजे रजवाड्यांचा फावल्या वेळातील उद्योग शिकारीचाच असे. आजही शिकारींचा आनंद घेणारे लोक आढळून येतात. अर्थात माणूस सुसंस्कृत होऊ लागला तसा हा परपिडेचा आनंद शिकार्‍यांकरताही बहुतांश इतर प्राण्यांबद्दल मर्यादीत झाला असावा.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 15:43
या विषयात एकुण उपप्रकार बरेच आहेत, त्यामूळे विश्लेषणा पुर्वीच सरमिसळ आणि निष्कर्श घाईची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात इतर उपप्रकारांकडे वळण्या पुर्वी अक्रौर्य अथवा परपीडा टाळण्याची वृत्ती काही जणांना तेवढीच नैसर्गीक पणे संस्कार न देताही येते का? एक व्यक्ती एका पक्षाला शिकारी साठी मारतीए, त्याच्या सोबतच्या दहा व्यक्ती त्याचा आनंद घेण्याचीच शक्यता जास्त असते का ? मला इजा होऊन दु:ख होऊ शकते तर त्या पक्षालाही इजा होऊन दु:ख होत असणार हि सम-वेदनाही (संवेदनशीलता) अहींसेकडे नेण्यास कारणीभूत होऊ शकते पण इथेही त्या व्यक्तीचा त्या पक्ष्याला होणारी इजा आणि मला होऊ शकणारी इजा याचा मनोव्यापारातील कार्य कारण संबंध विचारात घ्यावा लागतो. अपवादात्मक लोकांच्या मनोव्यापारात हे नैसर्गीकपणे घडते त्यांना त्या पक्षाला शक्य असलेली वेदना स्वतःहून नकोशी होते पण बहुतांश हिंसा टाळणार्‍या लोकांना ह्या संवेदनेची जाणीव होते पण ती इतर कुणीतरी करून दिल्या नंतर हा फरक किरकोळ वाटला तरी प्रत्यक्षात महत्वाचा असावा कारण हि संवेदना बहुतांश लोकांना त्या मर्यादीत क्षेत्रा पर्यंतच होत असू शकते का? कारण याच संवेदनांनी हिंसा टाळण्यासाठी आग्रही पणे शाकाहार घेणारे लोक इतर काही प्रसंगी परपीडेचा आनंदही घेताना दिसून येतात. बर्‍याच प्रसंगी या विरोधाभासांकडे विश्लेषण करताना दुर्लक्ष होत असते का ? आणि शिकार खेळताना आनंद उपभोगणारा राजाच्या मनात इतर प्रसंगी चुकूनही परपीडेचा आनंद घेण्याची इच्छा होत नाही किंवा घेताना दिसत नाही असे होते का? बरेच लोक अहींसेकडे जगा आणि जगू द्या हा प्युअर रॅशनलीझम ते पापपुण्य नर्कातल्या शीक्षांच्या भिती ते पुर्नजन्म नको असणे इतपर्यंत कारणेही असू शकतात. पण सर्वात महत्वाचे पालक किंवा बाजूच्या समाजाच्या वागणूकीतून वेळीच मिळणारे सुयोग्य संस्कार/ सुयोग्य समज हि बहुधा सर्वात प्रभावी घटक ठरत असावी.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 16:13
आता क्रौर्याच्या मुद्याकडे वापस येऊ या. क्रौर्य करणारा प्रत्येक क्रुरतेच्या घटनेत आनंद अनुभवत असेलच असेही नाही. निव्वळ पेशन्स तुटल्या नंतरचे फ्रस्ट्रेशन, बदला या ठिकाणी क्रौर्य करणार्या व्यक्तीचा अनुभव कदाचित अगतीकता संपवण्याचा किंवा रागाचा असू शकेल किंवा रेल्वे इंजीनच्या ड्रायव्हरचा अनूभव खेदाचा दुख्खाचाही असू शकेल किंवा खाटीक खान्यात काम करणार्‍या व्यक्तीला आनंदही नाही दुख्खही नाही अशी बोथट जाणीव सूद्धा असू शकेल का ? तर युद्धात झालेले क्रौर्य केवळ जीवनसंघर्षाचा भाग असल्यामुळे युद्ध उन्माद असूनही आनंद असेलच असेही नाही अशीही स्थिती असू शकते का ? फ्रस्ट्रेशन, बदला यासाठी बर्‍याचदा परपिडानंद नसताच्याही क्रौर्यालाही बर्‍याचदा परपिडानंद या कॅटॅगरीत टाकले जाऊ शकते. इथे परपिडानंदाचा आरोप करणारी व्यक्ती केवळ भावनाविवशतेतून तसे करत असते का शिक्षा अधिक कठोर झाल्यामुळे भावनाविवश व्यक्तींनाही परपिडानंद मिळणार असतो ?

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 16:39
परपिडांनद घेण किंवा न घेण हे माझ्या मते मुख्यत्वे संस्कारसिद्ध आहे, जे संस्कार जाणता अथवा अजाणता पालक आणि आजूबाजूच्या परिसराने दिलेले असतात. एकच सारखा संस्कार देणारी व्यक्ती एका व्यक्तीस संस्कार देण्यास सफल होऊ शकते आणि दुसर्‍या व्यक्तीस संस्कार देण्यास असफल होऊ शकते. असफल होणे हे संस्कार घेणार्‍या व्यक्तीवर असलेल्या इतर विचारांचे, निष्कर्षांचे, प्रभावांचे फलित असू शकते पण असे नकारात्मक फलित येईल म्हणून संस्कार देणे सोडले गेल्यास महत्वाची संधी दवडल्या सारखेही होऊ शकते. पालकांच्या संस्कारातून वाढलेली परपिडानंद न घेणारी व्यक्ती नंतरच्या कालावधीत पिअरप्रेशरने परपिडेचा आनंद उपभोगतानाही आढळू शकते जसे कि रॅगींगचे उदाहरण. रॅगिंगचे रॅकेट चालवणार्‍या एखाद्याला लहाणपणा पासून परपिडानंद असू शकतो म्हणून रॅगींग करणार्‍या प्रत्येकाला लहाणपणापासून परपिडानंद घेण्याची सवय असेलच असेही नाही तो त्या कालावधीत नकारात्मक संस्कारांना मिळालेल्या संधीचा प्रभाव असतो. रॅगींग घेणारी व्यक्ती महाविद्यालयीन जीवनाच्या आधी आणि नंतरही परपीडानंद न अनुभवणारी असू शकते. असच अजून एक उदाहरण व्यक्ती परपिडानंद न घेणारी नाहीए परंतु एखाद्या शत्रुचा पराजय झाला की (तो पराभव स्वतः केला नसला तरीही) परपिडानंद घेताना दिसून येते म्हणजे कमी अधिक प्रमाणात परपिडानंद प्रासंगिक स्वरूपात कुणालाही होऊ शकतो. परपिडानंद प्रासंगिक स्वरूपात कुणालाही होऊ शकतो याच कारण अस की परपिडानंद न होण जेवढ नैसर्गीक असू शकत तेवढच क्वचीत परपिडेने आनंद होणही नैसर्गीकही असू शकत. स्वतः प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परपिडा न दिलेला पण स्वतःच नैराश्य/दु:ख दूरकरणारा परपिडानंद आदर्श नसेल पण मन मोकळ करणारा असू शकतो का हे त्याच्या मर्यादांसहीत लक्षात घेतले पाहीजे कारण या परपिडानंदातून पुढच्या वेळी स्वतः परपिडा देण्याचे समर्थन करण्याची भिती असू शकते.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 17:16
परिस्थिती अथवा घटनाजन्य असमाधानाचे प्रतिसाद बऱ्याचादा सुयोग्य अधिकृत मार्गाने उमटून शंकांचे निरसन होत नाही तर ते व्यक्ती व्यक्तीत अथवा समाजात निंदा नालस्तीच्या स्वरूपात प्रकट होत रहातात. एका बाजूने दोन किंवा अधिक व्यक्ती अनुपस्थीत व्यक्ती अथवा परिस्थितीबद्दल निंदाकरतात तेव्हा त्यांचे आपापसातेले भावबंध घट्ट होण्यास सहाय्यकारी होते. येथे परनिंदेचा नकारात्मक परिणाम पूर्वग्रह, रोष आणि असंतोषास बळकटी येत जाते. बऱ्याचदा या सामाजिक असंतोष अथवा असमाधानाच्या परिस्थीतीचा टोकाची भाषा वाढीस लागते. (अंशत संदर्भ: मराठी विकिपीडिया) जर असंतोष समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटातील असेल तर दुसऱ्या गटातील लोकसुद्धा तशाच स्वरूपाच्या पण असमाधान निंदा पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटीच्या स्थितींना पोहोचतो. दोन्ही समूहाचे असे नेते सलेक्टीव्हली दुसऱ्या समूहाच्या नकारात्मक बाजू दाखवण्यात मग्न होतात. परिणामी समूहात परस्पर अविश्वास आणि असुरक्षीततेची भावना घर करते. अफवा पसरतात अथवा पसरवल्या जातात एखाद्या क्षूल्लक कारणावरून ठिणगी पडल्याचा फायदा घेत परस्पर विरोधी गटांना परपिडा दिली जाते. कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा फायदा इतरही गुन्हेगार लूटारू आणि इतर हिसंबंधी उठवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे परिस्थितीस बऱ्याचदा गंभीर वळण लागण्याचा संभव असतो. परस्पर विरोधी आक्रोश असलेल्यांना परपिडा देण्याची इच्छा असू शकते पण आनंद येण्याची शक्यता कमी असली तरी पिअर ग्रूप मधील स्वतः प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परपिडा न दिलेल्यास स्वतःच नैराश्य/दु:ख दूरकरणारा परपिडानंद होताना पाहून परपिडा देणारा स्वतःचे परपिडा देणे जस्टीफाय करू लागण्याची शक्यता असते का ? आणि परिस्थितीत केवळ संधी म्हणून लूट करणार्‍यांचा परपिडानंद कशा प्रकारचा असतो याच्या व्यक्ती आणि समूहाच्या मानसशास्त्रीय उकलीची संधी आणि प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. तसे त्या बाबतीतील सामाजिक संस्कार घडणेही होत नसावे. हेच अविश्वास टिकून राहील्यास क्वचीत परिणती जिनोसाईड मध्येही होऊ शकते त्यामुळे अप्रीय घटना घडून गेल्या नंतर काहीच न घडल्याचे डिनायल (दोन किंवा अधिक बाजूंचे) किंवा केवळ आक्रस्ताळा आक्रोश या पेक्षा एकमेकांची बाजू वेळीच समजून घेऊन अविश्वास दूर करण्यास साहाय्यभूत तर्कसुसंगत भूमीका साहाय्यकारी असू शकतात एवढेच या निमीत्ताने नोंदवता येऊ शकते बाकी हा स्वतंत्र चर्चांचा विषय आहे.

अनुप ढेरे 27/04/2014 - 12:16
प्रत्यक्ष हिंसा बघायला आवडणं हे तुम्ही सेडीझमचं उदाहरण म्हणून दिलं आहे? पण वॉयलंट सिनेमे, टॅरेंटिनोचे काही सिनेमे, अथवा अपोकॅलिप्टो सारखे सिनेमे आवडणं हे पण सेडिझम आहे का? अवांतरः 'होली' या नाटकावर सिनेमा पण आहे. होली याच नावाचा. केतन मेहता नी दिग्दर्शित केलेला. आमिर खानचा पहिला पिच्चर बहुदा,

मारवा 27/04/2014 - 13:31
सॅडीझम चा अवलंब केला जातो. रॅगिंग करणारे सुशिक्षीत विद्यार्थी सुसंस्कृत व संपन्न घरातील असतात. सर्व्हायव्हल ची अशी कुठलीही निकड त्यांना नसते. निव्वळ सुख (उन्माद) जे सॅडीझम पासुन मिळते त्यासाठी, सत्ता गाजविण्याची उपजत वृत्ती यातुन, तसेच वर दिलेल्या नारसिसिझम (स्व च्या अतिरेकी प्रेमात पडण्यातुन, ) इत्यादीतुन ही याचा अवलंब केला जातो. अबु गरीब मधील अमेरीक्न सैनिकांना निर्वस्त्र/निशस्त्र/निसत्व करुन टाकलेल्या अफगाणिंकडुन कुठल्याही प्रकारची थ्रेट नव्हती. परंतु त्यांना ही शिअर प्ल्रेझर ऑफ सॅडीझम साठी टॉर्चर करण्यात आले यात अपमानित करुन आनंद मिळविणयाचा ही बराच भाग होता. कटटर मुस्लीम धर्मीयात असलेल्या आस्थांना लक्ष्य करुन ही त्यांना टॉर्चर करुन अमेरीकन सैनिकांनी सॅडीझम चा अवलंब केला होता.

मारवा 27/04/2014 - 13:45
पासोलिनी याच्या सालो १२० डेज ऑफ सोडोम या चित्रपटात प्रतिभाशाली दिग्दर्शक पासोलीनी एक अप्रतिम ट्रीक करतो ती अशी की या सिनेमात शेवटी शेवटी यातील चार मुख्य खलनायक ज्यांनी अतिशय कोवळ्या तरुण तरुणींना पकडुन एका मोट्या प्रासादतुल्य घरात कैद केलेले असते. त्यांच्यावर क्रमाक्रमाने विवीध प्रकारचे अत्याचार करण्यात येतात व त्यांना टोकाचे अपमानित व अत्यंत क्रुर पणे वागविण्यात येते. यातील क्रुरता सिनेमात उत्तरोत्तर वाढत जाते तर अशाच एका प्रसंगात घरासमोरच्या ग्राउंड मध्ये या तरुण तरुणींवर भीषण अत्याचार सुरु होतो व त्यातील चार ही खलनायक पाळीपाळीने एक एक करुन समोरील घरातील खिडकीत एका खुर्चीवर बसुन दुर्बीण घेउन तो सर्व प्रकार अतिशय रस घेउन तल्लीन होउन बघत असतात. ते तो अत्याचार निव्वळ बघण्याचा आनंद घेत असतात .... आणि अचानक एका फ्रेम मध्ये दिग्दर्शक पासोलिनी आपल्याला जाणीवपुर्वक फक्त दुर्बीणीचे दोन वर्तुळ दाखवितो पुर्ण पडदाभरुन आपण प्रेक्षकाला फक्त दुर्बीणीचे दोन वर्तुळ मात्र दिसतात.... पासोलीनी अत्यंत कुशलतेने आपल्यातला सॅडीस्ट दाखवुन देतो....... तो हे सुचवितो की बघा तुम्ही प्रेक्षक जो हा सिनेमा बघतायत .... तुम्ही सुध्हा सॅडीस्ट च आहात... यु आर ऑल्सो एन्जॉयींग टु वॉच जस्ट लाइक दोज व्हिलन्स.... तर अनुप असे सिनेमे पाहणे ज्यात हे कंटेट आहेत हे निश्चीतच सॅडीस्ट वृत्तीचे च एक उदाहरण आहे..

शुचि 27/04/2014 - 14:22
पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून खटल्यची कुप्रसिद्ध केस, जक्कल - सुतार द्वयीतील , जक्कल हा लहानापणापासूनच sadist प्रवृत्ती दाखवे अशा प्रकारचे ठोस (confirmed )वर्णन , त्याच खटल्यातील माफीचा साक्षीदार मुनवर शहाच्या "आय am not गिल्टी" या पुस्तकात आढळते. निव्वळ मजा/टाईमपास म्हणून हे खून झाल्याचे भयंकर सत्य पुढे आले, तेव्हा आख्खे पुणे या निर्घृण हत्यांमुळे हादरल्याचे स्मरते.

मारवा 27/04/2014 - 14:36
शुचि अनेक सीरीयल कीलर्स च्या बालपणात डोकावुन बघितले असता ते मोस्टली सॅडीस्टीक बालपणापासुन च असल्याचे आढळुन येते. असे लोक निव्वळ थ्रिल साठी एका अनाकलनीय ऑरगज्मिक नेचर च्या थ्रिल साठी खुन करतात. बाय द वे अति अति अवांतर रामाला तर भोगु दिल ना हो लव कुश ही दाम्पत्य सुखाची च परीणीती होते ना ? ओळी अशा असायला हव्या होत्या का की उर्मिलेला सासरवास, सासु कैकयीने केला लक्ष्मणासारखा भरतार हिने भोगु नाही दिला आपले कवि ग्रेस म्हणतात तस लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी ... तसे.. मला रामायणाची फार खोलात जाउन माहीती नाही हो इतर ही काही बाजु असेल तर जाणुन घ्यायला आवडेल बाकी कवितेचा अर्थ नाही लागला म्हणुन अवांतर केल,,, इतकच

In reply to by मारवा

शुचि 27/04/2014 - 14:41
मारवा आपण म्हणता तशाही ओळी होउ शकतात. स्वाक्षरीत उधृत केलेल्या धाग्यातून अहिराणी भाषेतील ही ओवी मी सहजच निवडली आहे. :)

मारवा 27/04/2014 - 14:36
शुचि अनेक सीरीयल कीलर्स च्या बालपणात डोकावुन बघितले असता ते मोस्टली सॅडीस्टीक बालपणापासुन च असल्याचे आढळुन येते. असे लोक निव्वळ थ्रिल साठी एका अनाकलनीय ऑरगज्मिक नेचर च्या थ्रिल साठी खुन करतात. बाय द वे अति अति अवांतर रामाला तर भोगु दिल ना हो लव कुश ही दाम्पत्य सुखाची च परीणीती होते ना ? ओळी अशा असायला हव्या होत्या का की उर्मिलेला सासरवास, सासु कैकयीने केला लक्ष्मणासारखा भरतार हिने भोगु नाही दिला आपले कवि ग्रेस म्हणतात तस लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी ... तसे.. मला रामायणाची फार खोलात जाउन माहीती नाही हो इतर ही काही बाजु असेल तर जाणुन घ्यायला आवडेल बाकी कवितेचा अर्थ नाही लागला म्हणुन अवांतर केल,,, इतकच

In reply to by मारवा

प्यारे१ 27/04/2014 - 14:44
लवकुश ही संतती सुद्धा वनवासातून परत आल्यावरच झालेली आहे. लक्ष्मण उर्मिलेला सुद्धा मूल/ मुलं झाली होती. बाकी चालू द्या.

In reply to by प्यारे१

मारवा 27/04/2014 - 15:03
सहन करावा लागला कारण लक्ष्मण एकटाच वनवासात रामाबरोबर गेला होता. त्या काळात राम्-सीता कीमान एकत्र राहत होते. मात्र उर्मिलेला ती लक्ष्मणाबरोबर राहत नसल्याने दाम्पत्य सुखाचा अनुभव घेता आला नव्हता. तिच्या या विरहवेदनेवर कवि ग्रेस यांनी अतिशय सुंदर असे मार्मीक भाष्य केलेले आहे. तसे सीतेला कुठे भोगावे लागले ? बहुधा उत्तर रामायणात असेल ते धोबी मॅटर झाल्यानंतर असो यार मी का भरकटतोय कुणास ठाउक

In reply to by मारवा

आत्मशून्य 30/04/2014 - 03:47
त्या काळात राम्-सीता कीमान एकत्र राहत होते.
राम्-सीता वनवासात कीमान किती काळ एकत्र होते यावर कवी ग्रेस यांचे काही भाष्य उपलब्ध आहे का ? मी तर म्हणेन फक्त उर्मीलेलाच क्रेडीट ड्यु आहे रामावाचा वनवास आणी रावणा विरोधातील युध्दा विजय मिळवण्यात महत्वाची भुमीका निभावल्याबद्दल. पण बहुदा एक स्त्री म्हणून इतीहासाने तिचावर अन्याव केला असावा.

मारवा 27/04/2014 - 14:57
त्यातही भारतीय अध्यात्माला तर नाहीच नाही. प्रयोगाद्वारे काढलेले निष्कर्ष, विदा, पुरावे एकीकडे आणि गांधीजी फेम अंतरात्म्याचा आवाज दुसरीकडे जीत तो आखिर तय ही है ! तरी प्रतिवादा चा केविलवाणा प्रयत्न करुन बघतो आपण म्हणता की 1- इतर सजीव अस्तित्त्वाशी अजाणता एकरुप आहेत आपण बहुधा सर्व सजीवांविषयी बोलत आहात. आता माझी एल्सा नावाची कुत्री आणि आमच्या जुन्या लाकडी कपाटात कपारीत दडलेली ३ ते ५ ढेकुणांची फॅमिली हे सर्व मी सजीवात धरले तर चालेल का ? आणि आता एल्सा व हे ढेकुण अस्तित्वाशी अजाणता एकरुप आहेत म्हणजे नेमके काय आहेत ? आणि अस्तित्व म्हणजे नेमक काय व एल्सा/ढेकुण यांचा अस्तित्वाशी नेमका संबध कसा हे आपण आध्यात्मिक जर्गन टाळुन एक्स्प्लेन करु शकता काय ?

In reply to by मारवा

जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, साधी गोष्ट आहे. सर्व सजीवांचं अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे त्यामुळे ते वृक्षांशी जोडलेले आहेत. वृक्ष पावसाशी जोडलेले आहेत कारण पाण्याशिवाय वृक्ष-वल्ली जगू शकत नाहीत. सगळं पाणी समुद्राशी जोडलेलं आहे आणि पाण्याला बाष्पीभवनासाठी सूर्य हवायं. त्यामुळे सगळे सूर्याशी जोडलेले आहेत. वृक्ष-वल्ली, पीकं; जमीनीशी निगडीत आहेत आणि सजीवांची शरीरधारणा त्यांनी निर्मिलेल्या अन्नावर अवलंबून आहे त्यामुळे आपण जमीनीशी जोडलेलो आहोत. खरं तर शरीर हे अन्नाचं रुपांतरण आहे म्हणून आपण सर्व मृत्तीकेचीच जाणीव असलेली रुपं आहोत. एल्साचं शरीर ज्या अन्नावर अवलंबून आहे ते एकतर जमीनीतनं निर्माण झालंय किंवा मग इतर सजीव, जे तिचं अन्न आहेत, ते धरोत्पन्न अन्नापासून निर्माण झालेत. त्यामुळे एल्सा सुद्धा पृथ्वीशी जोडलेली आहे. एल्सा सजीव आहे त्यामुळे ती वृक्षांशी सुद्धा निगडित आहे. अस्तित्वात सर्वस्वी अनाकलनीय आणि गूढ रितीनं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीशी जोडलेली आहे. अत्यंत व्यापक परिमाणावर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. त्यामुळे स्टीफन हॉकिंग्ज अस्तित्वाला `द ग्रेट डिझाईन' म्हणतो. आता थोडे पुढे जाऊ. या अस्तित्त्वात आपण सगळे परस्परांशी एकाच जाणीवेनं जोडलेलो आहोत जी निराकार आहे. त्यामुळे एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तुम्ही जाणू शकता आणि तुम्ही मूडमधे नाही हे एल्सा तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जाणू शकते; ती तुमच्या भोवती घुटमळत राहाते. अस्तित्त्व एक आहे याचा अर्थ, अस्तित्व एकाच निराकार जाणीवेची अनेक रुपं आहे. त्यामुळे सम-वेदना आणि प्रेम या मूलभूत गोष्टी ठरतात. फरक फक्त इतकाच की एल्सा हे समजू शकत नाही आणि तुम्ही ते समजू शकता. ही एकरुपता समजण्याची संभावना, परपीडन ही मूळ वृत्ती आहे अशी कल्पना करुन घेतली की संपुष्टात येते.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 27/04/2014 - 16:31
दर दोन वर्षांनी स्वतःनेच ठवलेले नियम मॉडणारा होंगिंक्स चे प्रमाण देण्या पेक्षा... देह अन्नाने, अन्न पृथ्विपासुन, प्रुथ्वि जलापासुन, जल अग्नि पासुन, अग्नि वायुपासुन, वायु आकाशापासुन, आकाश आत्म्यापासुन बनते या आशयाचा आपल्या संस्कृतीमधील दिव्य श्लोक तुम्हास माहित नाही काय ?
यामुळे एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तुम्ही जाणू शकता आणि तुम्ही मूडमधे नाही हे एल्सा तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जाणू शकते;
अहो एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तो ढेकुण जाणू शकणार आहे का ? की ढेकणाची चिरडले जाण्याची वेदना तुम्हाला जाणवणार आहे ? काय बोलताय ?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 27/04/2014 - 17:09
संजय मला आपले उत्तर पुर्ण कळले असे मी म्हणत नाही परंतु मी समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे असे वाटते. पण माझ्या प्रश्न विचारण्याच्या शैलीची चुक माझ्या लक्षात आली त्यासाठी मी आपली माफी मागतो.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकटराजा 29/04/2014 - 17:38
सर्व सजीवांचं अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे हे वाक्य दुरूस्त करून असं म्हणू या सर्व सजीवांचं अस्तित्व प्राणवायू वर अवलंबून आहे .पण मला वाटते काही प्राणी असे आहेत ज्यांची केमिस्ट्री प्राणवायूवर आधारलेली नाही.( अनारोबिक) ते वृक्षावल्लीशी जीवनचक्रात जोडले आहेत असे कसे म्हणता येईल ?

पण सॅडीझम प्रत्येक वेळी वाईटच असते असे मत बनवने योग्य नाही ... सॅडीस्ट व्यक्तीला मसोचिस्ट पार्टनर मिळाला/ली. तर त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही .. अवांतर : सॅडीझम/मसोचिझमच्या पॉसिटिव्ह अ‍ॅन्गल कडे पाहण्याकरिता "सबमिशन ऑफ एम्मा मार्क" हा चित्रपट आवर्जुन पाहण्यासारखा आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 27/04/2014 - 15:49
सॅडीस्ट व्यक्तीला मसोचिस्ट पार्टनर मिळाला/ली. तर त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही ..
खरच माहित नाही. शुद्ध रॅशनलीस्ट अहींसावादी विचारांना परपिडानंद वाला साथीदार मानवणार नाहीच पण आत्मपिडानंद घेणाराही मानवणार नाही. सबमिसीव्ह आत्मपिडानंद वाला/ली कदाचीत एका मर्यादेपर्यंत परपिडानंद वाल्याची साथ देऊ शकत असेल पण या दोघांचेही मानसिक प्रश्न सोडवण्या पेक्षा त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही .. या वेगळ्या टोकाच्या विचारांशी सहमत होण्यापुर्वी पुन्हा विचार करण्याची गरज भासेल असे वाटते.

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा 27/04/2014 - 17:15
प्रसाद मी हा चित्रपट बघितलेला नाही व त्या संदर्भात काही वाचण्यात ही आले नाही. पण तुम्ही कृपया थोड डीटेल सांगु शकता का या विषयी आणि पॉझीटीव्ह म्हणजे कस नेमक थोड विस्तृत विवेचन केल्यास आम्हाला नविन माहीती मिळेल.

In reply to by मारवा

सदर चित्रपट क्षक्षक्ष दर्जाचा असल्याने इथे जास्त लिहिता येणार नाही ... गूगल केल्यास अवश्य सापडेल http://bit.ly/1rHMsWO

शुचि 27/04/2014 - 15:39
या सर्वांमधील विरोधाभास म्हणजे धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र आणि बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.
या वाक्याला केवळ टाळ्या!!

In reply to by शुचि

बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.
प्रश्न उपद्रवाचा आहे. जर युगुलाला आनंददायी ठरत असेल तर ते परपीडन होत नाही. त्यामुळे ती परस्पर स्विकृत आहे. इट इज नॉट सॅडिजम.
धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र
हा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे. मी त्या साधना जस्टीफाय करत नाही पण स्वतःचं शरीरापासून वेगळेपण जाणण्यासाठी त्या सांगितल्या आहेत. थोडक्यात, शरीराला झालेली वेदना `स्व' ला कळते पण त्याला बाधा येत नाही, हा त्या साधना प्रणालींचा हेतू आहे. जाणीवपूर्वक आणि हेतू समजून केलेल्या अशा साधना मॅसोजचिम नाहीत. मला वाटतं मी यावर अधिक उहापोह न करणं योग्य होईल. पण धार्मिक साधना आणि सॅडिजम यांचा वरकरणी संबंध फक्त त्या साधनांचा हेतू न समजल्यानं वाटू शकतो; वास्तविकात सॅडिजम (खरं तर मॅसोचिजम) आणि धार्मिक साधनांचा काहीही संबंध नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि 27/04/2014 - 16:16
हा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे.
ओह अन मी समजत होते गालात सळया खुपसून किंवा पाठीला हूक्स लावून टांगून घेणे याकडे लेखकाचा निर्देश होता. मला वाटले मुंबईत,ते एका पायावर उभे रहाणारे साधू अन त्यांचा सडणारा ,पहिला पाय याकडे लेखकाचा निर्देश होता.

मारवा 27/04/2014 - 17:30
संजय आणि शुचि वरील मर्यादीत जागेत जरी मी जैन धर्मातील एक उदाहरण दिलेले असले तरी जवळ जवळ प्रत्येकच धर्मात मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण केलेले आढळते. स्वपीडन करणे मग ते आत्मसंयमाच्या गोंडस नावाखाली अतिरेकी उपास करणे विवीध प्रकारची तपे (काहीतर अगदीच अतार्कीक अनावश्यक) करुन स्व शरीराला पीडा देणे त्यात गौरव मानणे. शुचि म्हणतात तसे सळया हुक्स खुपसणे, मुसलमानांमध्ये कुठल्यातरी एका दिवशी एक मिरवणुक निघते त्यात स्वतःला अक्षरशः रक्तबंबाळ करुन घेउन कुठल्यातरी शहीद (बहुदा हुसेन नक्की माहीत नाही) पवित्र व्यक्तीची आठवण त्यांनी भोगलेल्या वेदना प्रतिकात्मकतेने भोगुन केली जाते. शंकराचार्यांचे विवेक चुडामणी नावाचे ग्रंथ आहे त्यात अनेक श्लोक शरीर कीती गलिच्छ वाईट आहे हे समजावुन देण्यात च खर्ची केलेली आहेत. त्यामुळे त्याला कायम कसे कठोर वागविणे आवश्यक आहे हे सांगितलेले आहे. ख्रिस्ती धर्मात तर येशु ने तुमच्यासाठी सर्व छळ सोसला हे सतत बिंबविले जाते. नेमकी उदाहरणे आठवत नाहीत पण विवीध धर्माच्या असंख्य परंपरा स्व-शरीरा चा धिक्कार करण्यात त्याला यातना देण्यात काहीतरी श्रेष्ठ धार्मीक आहे असे मानतात. प्रत्येक धर्म हा काही ना काही प्रमाणात सॅडो-मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण करणारया परंपरा बाळगतो.

In reply to by मारवा

कारण असे प्रतिसाद मला वाचवत देखिल नाहीत. तस्मात, आय वोंट टेक द सब्जेक्ट एनी फरदर.

मारवा 27/04/2014 - 17:31
संजय आणि शुचि वरील मर्यादीत जागेत जरी मी जैन धर्मातील एक उदाहरण दिलेले असले तरी जवळ जवळ प्रत्येकच धर्मात मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण केलेले आढळते. स्वपीडन करणे मग ते आत्मसंयमाच्या गोंडस नावाखाली अतिरेकी उपास करणे विवीध प्रकारची तपे (काहीतर अगदीच अतार्कीक अनावश्यक) करुन स्व शरीराला पीडा देणे त्यात गौरव मानणे. शुचि म्हणतात तसे सळया हुक्स खुपसणे, मुसलमानांमध्ये कुठल्यातरी एका दिवशी एक मिरवणुक निघते त्यात स्वतःला अक्षरशः रक्तबंबाळ करुन घेउन कुठल्यातरी शहीद (बहुदा हुसेन नक्की माहीत नाही) पवित्र व्यक्तीची आठवण त्यांनी भोगलेल्या वेदना प्रतिकात्मकतेने भोगुन केली जाते. शंकराचार्यांचे विवेक चुडामणी नावाचे ग्रंथ आहे त्यात अनेक श्लोक शरीर कीती गलिच्छ वाईट आहे हे समजावुन देण्यात च खर्ची केलेली आहेत. त्यामुळे त्याला कायम कसे कठोर वागविणे आवश्यक आहे हे सांगितलेले आहे. ख्रिस्ती धर्मात तर येशु ने तुमच्यासाठी सर्व छळ सोसला हे सतत बिंबविले जाते. नेमकी उदाहरणे आठवत नाहीत पण विवीध धर्माच्या असंख्य परंपरा स्व-शरीरा चा धिक्कार करण्यात त्याला यातना देण्यात काहीतरी श्रेष्ठ धार्मीक आहे असे मानतात. प्रत्येक धर्म हा काही ना काही प्रमाणात सॅडो-मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण करणारया परंपरा बाळगतो.

मारवा 27/04/2014 - 17:42
तुलनेने आधुनिक काळात इंटरनेट मुळे अधिक प्रचलित झालेले परस्पर संमतीने स्वीकारलेले व समर्थक ज्याला अ‍ॅज अ लाइफ स्टाइल म्हणतात. ज्यात या आदिम प्रवृत्तींचा सेफ लिमीट्स मध्ये कुशलतेने आनंद मिळविण्यासाठी वापर करण्यात येतो. व अशा बीडीएसएम चा हेतु हा केवळ दैनंदिन लैंगिक आयुष्यातील बोअरडम ( जो हमखास प्रत्येक विवाहा त काही कालावधी नंतर येतो.) त्याला थोडा स्पाइस अप करण्यासाठी वापरला जातो. हा बीडीएसएम चा युज वरील धार्मीक उग्र वापरापेक्षा हेतु प्रक्रीया परीणाम अनेक बाबतीत भिन्न आहे. यातली गंमत अशी आहे की रीलीजीयस बीडीएसएम ला अत्यंत पवित्र गौरवाने बघितले जाते आणि या मॉक बीडीएसएम ला अतिशय काहीतरी विकृत आहे पाश्च्यात्य आहे असे बघितले जाते. मागे एकदा हा गमंत जंमत बीडीएसएम करण जोहर ने त्याच्या एका सिनेमात दाखविला होता ज्यात राणी मुखर्जी आपल्या बोअर्ड सेक्स्युअल लाइफ ला स्पाइस अप करण्यासाठी याचा अवलंब करते नाव नाय आठवत यार पण काहीतरी गंमतीदार प्रसंग होता इतक नक्क्की आठवतय.

In reply to by मारवा

सॅडिजमची किंवा मॅसोचिजमची (निरुपद्रवी असला तरी) आवश्यकता नाही. खरं तर पारस्पारिक अनुबंधात प्रणय उत्तोरत्तर खुलत जातो कारण द कपल डिवेलप्स ग्रोईंग ग्रॅटिट्यूड टोवर्डस इच अदर, असा व्यक्तिगत अनुभव आहे. धर्मातल्या सॅडिजमचं कारण साधनाप्रक्रियेचा हेतू आणि मुळात त्यातला डेलिकेटनेस न समजणं (खरं तर सो कॉल्ड धर्मगुरुंचं संपूर्ण अज्ञान) हा आहे. ज्यांना या प्रक्रियांविषयी रस आहे त्यांनी ओशोंचा The Book of Secrets हा ग्रंथ (कारण तो १२५० पानी आहे) वाचावा.

माहितगार 27/04/2014 - 18:55
(मागील भागावरून पुढे चालू आधीच्या प्रतिसादांची लांबी बरीच वाढल्याने आपण वेगळ्या धाग्यावरतर पोहोचलो नाही असे वाचकांना वाटू नये म्हणून येथून प्रतिसाद जरा खाली आणला आहे.) ऐतिहासिक काळात योध्यांनी आणि शासकांनी युद्धांच्या दरम्यान आपली जरब बसवण्यासाठी अमानुष अत्याचार केल्याच्या नोंदी पहाण्यास मिळतात, मानवी इतिहासापूर्व काळातील असंख्य प्रसंग हे विस्मरणात देखील गेले असणार तर, इतिहासातील काही स्मृती लोकांच्या मनात अजूनही जाग्याच नाही तर असे अन्याय करणार्‍या मानवी समुहांच्या वंशजांवरही अविश्वास, राग प्रसंगी बदल्याची टोकाची भावनाही आढळून येऊ शकते. योद्धे आणि राज्यकर्त्यांचे इतिहासातील काही क्रौर्य प्रसंग हे परपिडानंदाचे असू शकतात हे वास्तव जसे स्विकारले पाहीजे तसे आजच्या सारखी आधूनिक दळणवळण नसलेल्या काळात दूरच्या प्रदेशांवर सातत्याची देखरेख करणे शक्य नसे त्यामुळे एकदाचीच जरब अथवा दहशत बसवणार्‍या मार्गांवर विसंबण्या शिवाय प्रसंगी प्रत्यवायही राहत नसावा त्यामुळेही ऐतिहासिक काळातील असंख्य शीक्षांचे युद्धातील कारवायांचे स्वरूप अमानुष असे होते. त्यामुळे ऐतिहासिक काळ त्या परिपेक्षात पहाणे अधिक सुसंगत ठरू शकते

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 19:35
कायद्याचे राज्य हि संकल्पना नसलेल्या काळात निती नियमांची आखणी धर्मसंस्थांनी त्यांच्या अखत्यारीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एका स्त्रीला दगड मारण्याची मागणी झाली असता येशु ख्रिस्ताने ज्याने कधीही एकही पाप केले नाही त्यांनीच फक्त दगड मारावेत म्हटल्या नंतर एकही व्यक्ती पुढे आली नाही, काही भारतीय ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचा केलेला निषेध, वर्षाऋतूत चातुर्मासाचे पालन, किंवा बौद्ध आणि जैन धर्माने सांगितलेली अधिक कडक अहिंसा असे परपिडानंद थांबवणारे अपवाद सोडले असता; या धाग्यात म्हटल्याप्रमाणे धर्मसंस्थांनी अनेक नितींमध्ये परपिडानंदाचा आंतर्भावच केलेला आढळतोच सोबतच बर्‍याच ठिकाणी त्याचे अनफेअर, बायस्ड, अर्बीट्ररी असणे जाणवते. एक अंधश्रद्धांमुळे दुसरे पुरुषांच्या भावनांना प्राधान्य देणार्‍या, स्त्रीयांवर लादावयाच्या पिडांना धार्मीक मान्यता देऊन होणारे अप्रत्यक्ष साटेलोटे यामुळे या परपिडांनदांना वेळोवेळी चालवूनच घेतले गेले नाही तर समर्थनही केले जाते. मग जे काही इतिहास काळात झाले असेल त्याची चुक स्विकारून नैतीक जबाबदारी घेणे अद्यापतरी बहुतांश धर्मसंस्थांना झेपलेले नाही. टोकाच्या आत्मपिडनाचा समर्थन अथवा आग्रह हे दुसर्‍या अंगाने शीष्याचे धर्मसंस्थेने अथवा गुरुने केलेले सानंद परपिडन नाही किंवा कसे हे विचारणेही अनेकांच्या मनाला दुखावू शकेल त्यामुळे मी तसे विचारण्याचे टाळतो.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 20:47
कायद्याचे राज्य, मानवाधिकार, मानसशास्त्रीय विश्लेषण आणि समुपदेशन साहाय्य इत्यादी अभिनव संकल्पनांमुळे आधूनिक काळात ऐतिहासिक काळापेक्षा परपिडानंद चे प्रकार आणि घटनांची संख्येची टक्केवारी पहावयास गेल्यास वस्तुतः निश्चित कमी भरेल. आज आपण याची अधिक चर्चा करतो कारण या विषयांबद्दल आपण अधिक जागरूक आहोत. त्याच वेळी सुसंस्कृततेस अभिप्रेत पातळीपासून बरेचसे लाबं आहोत. अजूनही डिनायल्सचे अस्तीत्व आहे. परपिडानंद टाळण्यासाठी लागणार्‍या संस्कारांपासून अद्यापही वंचितता आहे. तर काही ठिकाणी जसे की शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या नितीमुल्यांच्या ठिकाणी असो अथवा कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या अधिकार्‍यांच्या अंगी आवश्यक निती मुल्यांचे अवमुल्यन झाल्या मुळे वरचा माणूस आदर्श असेल तर बाकी सारे आदर्श वागतील ते आदर्श आधारस्तंभ ढासळले आहे याला अंशतः स्वतः समाजही जबाबदार असतोच कारण हे आदर्श आधारस्तंभ समाजानेच उपलब्ध करून द्यावयाचे असतात. इथे लहानवया पासून द्यावयाच्या सुयोग्य संस्कारांची चर्चाही अभिप्रेत आहे. खासकरून एखादे बालवयातील मूल जेव्हा एखाद्या हिंसक घटनेस पाहते अथवा अनुभवते तेव्हा त्या मुलाला बोलते करणे त्याने तो अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे समजून घेणे आणि मग एका बाजूला अयोग्य मार्गाचे त्याच्या मनात समर्थन निर्माण होत नाही आहे अथवा दुसर्‍या बाजूला त्याच्या मनात भिती दहशत अथवा नैराश्य वास करत नाही आहे हे दोन्हीही पाहणे हि पालकांची शिक्षकांची समुपदेशकांची आणि समाजाचीही आवश्यकता आहे. तुम्ही केलेल्या परपिडानंदाला तुमचे आप्तस्वकीय सुद्धा अ‍ॅप्रीसिएट करणार नाहीत हे सांगणारी वाल्याकोळ्याचा पश्चातापाने वाल्मिकी होणारी कथा समाजाला परपिडानंदापासून दूर नेण्याचे उद्दीष्ट साधण्यासाठी उजवी वाटते.

चित्रगुप्त 29/04/2014 - 11:04
परपीडनाचे बाबतीत मानवाची प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती यांचा कितपत सहभाग असावा? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. उदाहरणार्थ लहानपणी एकदा माझ्या हातात बासरी पडली. सहज फुंकून बघता निघणारा आवाज बरा वाटला, मग काहीतरी बोटांची चाळवाचाळव करू लागलो, एकदा अचानक कुठल्याश्या गाण्याचे सूर प्रकटले, मग ते मुद्दाम वाजवून बघितले, ते जमले, मग आणखी प्रयत्न केले, तर 'करता येऊ' लागले. रस वाढत गेला, आणि चांगल्यापैकी वाजवू लागलो. हेच चित्रकला, जादू, लंबक, लेखन इ.इ. चे बाबतीत घडले. अर्थात या सर्व गोष्टी समाजमान्य असल्याने उघडपणे करता येत. घरच्यांनी मनाई केली असती, तर एकतर चोरून केले असते, वा सोडून दिले असते, आणि कधीतरी अनुकूल परिस्थिती येताच ते पुन्हा उफाळून आले असते. परपीडनाचे बाबतीत असेच काही होत असेल का?

In reply to by चित्रगुप्त

परपीडनाचे बाबतीत मानवाची प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती यांचा कितपत सहभाग असावा?
If you look into the deepest, खरं तर निव्वळ जगणं हीच हिंसा आहे! आपल्या अन्नात पीकाची हिंसा आहे, श्वासात सूक्ष्म जिवाणूंची हत्या आहे आणि बोलण्यात शांततेला धक्का आहे. त्यामुळे `मिनीमम डॅमेज टू द इग्झिस्टन्स' हा जगण्याचा (सहजीवनाचा) सर्वोत्तम मार्ग समजला गेलायं. थोडक्यात `जेवढा बाहेर धक्का कमी तितकी आत अविचलता' असं सूत्र आहे. पीडन हा मात्र हेतूपुरस्सर केलेला हिंस्त्रपणा आहे. बासरी शिकणं इतरांना त्रासदायक आहे पण एकदा सुरेख वाजवता आली की त्यात स्वानंद आणि परानंद दोन्हीही आहे. सो द बेसिक प्रिंसिपल प्रिव्हेल्स, तुमच्या वादनाचा हेतू जेंव्हा स्वतःला आनंद मिळावा हा असतो आणि तुम्ही पुरेसे संवेदनाशील असता तेंव्हा प्रॅक्टीस निर्जन ठिकाणी किंवा इतरांना कमीतकमी त्रास होईल अशा पद्धतीनं करता. आणि एकदा सराईतपणे वाजवता येऊ लागलं की मग आपल्या आनंदात इतरांना सहभागी करुन घेता. पीडनाची मानसिकता नेमकी विरुद्ध आहे, त्यात संवेदनाशीलतेचा आभाव आहे. दुसर्‍याला दुखावून स्वतः सुखी होऊ अशी मानसिकता आहे. परिस्थिती जरी अनुकूल असली आणि मॅसोचिस्ट व्यक्ती मिळाली तरी अशा क्रियेतून उन्मादा व्यतिरिक्त काहीही निर्माण होत नाही.

In reply to by चित्रगुप्त

मारवा 29/04/2014 - 12:24
Most of us try to avoid inflicting pain on others. But some people seem to gain pleasure from inflicting pain or watching people suffer without feeling guilt, or remorse. New research just published in the journal Psychological Science suggests that this kind of everyday sadism is real and more common than we might think. Two studies led by psychologist Erin Buckels show that people who score high on a measure of sadism seem to derive pleasure from behaviors that hurt others, and are even willing to expend extra effort to make someone else suffer. “Some find it hard to reconcile sadism with the concept of ‘normal’ psychological functioning, but our findings show that sadistic tendencies among otherwise well-adjusted people must be acknowledged,” says Buckels, a doctoral student at the University of Manitoba who conducted her research while doing her Master’s at the University of British Columbia. She adds: “These people aren’t necessarily serial killers or sexual deviants but they gain some emotional benefit in causing or simply observing others’ suffering.”

In reply to by मारवा

मारवा 29/04/2014 - 12:38
सॅडीझम आढळतो. याचाच अर्थ असे लोक नक्कीच आपली इछा पुर्ण करण्यासाठी टपुन बसलेल्याच असतात. योग्य संधी मिळताच त्यांच्यातील या प्रवृत्ती उफाळुन येतात. आपल्या पेक्षा कमजोर सावज मिळाल्यावर हा प्रकार होतच असणार पण हे अगदी गुप्त आणि खाजगी पातळीवर होत असल्याने बाहेर येत नसावे जसे लैंगिक बाबतीत बरच काय काय घडत असत पण बाहेर कोणाला एखादा वरकरणी अगदी नॉर्मल दिसणारा माणुस त्याच्या बेडरुम मध्ये नेमक काय करतो हे माहीत पडण्याची शक्यता अगदीच कमी असते त्याप्रमाणे, हे ही माहीत पडण्याची शक्यता अर्थातच कमी असते. पण रॅगिंग ची संधी मिळताच अनुकुल वातावरण मिळताच तसेच रस्त्यावर बघा एखादा चोर पकडला गेल्यास वा एखादा कीरकोळ गुन्ह्यासाठी लोकांच्या ग्रुपच्या तावडीत सापडल्यावर त्याचे भीषण हाल करण्याच्या अनेक घटना भारतात तर फार च मोट्या प्रमाणात आढळतात या केसेस मध्ये तर ज्यांचा काहीच संबध त्या प्रकरणाशी नसतो असे ही येऊन टॉर्चर मध्ये सामील होतात. उदा. हा व्हीडीयो बघा http://www.youtube.com/watch?v=G7F0ULPh9gE

In reply to by मारवा

मारवा 29/04/2014 - 13:17
मिसळपाव वर अनेक ऑदरवाइज सभ्य सुसंस्कृत शालीन आयडी ज्यांचा पास्ट अतिशय नीट आणि क्लीन होता. ज्यांनी सहसा कधी ट्रोलींग इतर धाग्यांवर केल नव्हत ( जे रेग्युलर राडेबाज होते ते सोडुन द्या) पण असे अनेक नॉर्मल आयडी देखील जे खात्रीपुर्वक सभ्य या वर्गवारीत मोडत होते आणि मोडतात ही ते देखील जेव्हा संजय क्षीरसागरांच्या आध्यात्मिक धाग्यांवर प्रतिसाद देतांना अत्यंत सॅडीस्टीकली प्रतिसाद देत. एक प्रकारच शाब्दीक रॅगिंग सुरु होते. घेराव घालुन जाणीवपुर्वक अतिशय क्रुरतेने त्यांच्यावर हल्ला चढवुन आपल्यातील सॅडीझम चा प्रत्यय अनेक नॉर्मल आय डी नी दिलेला आहे हे आपल्या अतिशय जवळचे उदाहरण च अत्यंत बोलके आहे. आजही त्यांनी असा एखादा आध्यात्मिक विषय घेतला तर त्याची पुनरावृत्ती होइल असे म्हणण्यास वाव आहे.पण माणसामध्ये एम्पाथी हा ही एक भाग असतोच त्याचा प्रत्यय गवि नावाच्या आयडीने ( मी माणुस म्हणुन त्यांना ओळखत नाही म्हणुन आय डी म्हणतो) दिला त्यांनी प्रवाहाच्या अगदी विरोधात जाउन ही क्षीरसागरजींचा जो काय पॉइंट होता तो समजण्याचा प्रयत्न केला तशी दुर्मिळ संवेदनशीलता एम्पाथी दाखविली ( दया या अर्थाने म्हणत नाही कृपया गैरसमज नसावा) तर संजय जींच्या मिसळपाव वरील धाग्याच्या केस मध्ये आपल्याला दोन्ही बाजुंचे विलक्षण दर्शन होते. ही एक उत्कृष्ठ केस स्टडी आहे. तसेच इंटरनेट ट्रोलिंग करणारे हे सॅडीस्ट असण्यासंदर्भात मोठा विदा आपणास इंटरनेट वर च मिळेल. दुसर उदाहरण वर लेखात दिल्याप्रमाणे तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालु आहे यात बेणारे बाईंचा जो अत्यंत हिंस्त्र अशा रीतीने मानसिक छळ केला जातो वरकरणी अगदी साध्या लोकांकडुन नाटकाचे निमीत्त्त घेउन ते तर निव्वळ चकीत करणार आहे तेंडुलकरांनी मानवी मनातला जो अत्यंत सुक्ष्म पदर हिंसेचा परपीडनाचा दाखविलेला आहे त्याला तोड नाही.

चांगला लेख आणि उत्तम प्रतिसाद. सँडीझम जर मानवी प्रवृत्ती असेल तर तिला कमी करावं किंवा असूच नये असे सुचवायचं आहे का ? आणि काही वेळी मानवी मनात असलेल्या भावना उफाळून येतात तेव्हा या प्रेरणा दाबून टाकल्या पाहिजेत असे म्हणावे काय ? उदा. समजा 'अ' नावाच्या व्यक्तीने 'ब' ची फसवणूक केली आहे, अशा वेळी कोणतीही व्यवस्था जर 'अ' ला शिक्षा देऊ शकत नसेल तर ती व्यक्ती व्यक्त होऊ पाहाते अशा वेळी जर एखादा समुह जर 'अ'ला सार्वजनिक ठिकाणी फटके देत असेल (सार्वजनिक ठिकाणी फटके देणे हे चूकच) तर 'अ' ला मिळालेला आनंद मोजायचा की त्याच्यातला सँडीझमची चर्चा केली पाहिजे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शासन ही समजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून केलेली योजना आहे आणि सॅडिझम ही निव्वळ परपीडनातून आनंद मिळवण्याची वृत्ती आहे. फसवणूक करणार्‍याला शासन व्हावं असं वाटणं वेगळं आणि काहीही कारण नसतांना दुसर्‍याला पीडा देण्यातून आनंद मिळवणं वेगळं. The first is punishment & the second, sadism. अर्थात, शासन, पीडनानंदात केंव्हा बदलेल सांगता येत नाही. थोडक्यात, शासन जर झालेल्या नुकसानाच्या भरपाईपर्यंत मर्यादित असेल तर ठीक पण त्यापेक्षा जास्त होऊ लागलं तर सॅडिजम हॅज ओवर टेकन पनीशमंट!

In reply to by अनुप ढेरे

शुचि 29/04/2014 - 16:40
इस्लामी शासन काळात देण्यात येणारया अनेक प्रकारच्या शिक्षा ज्यात गुन्हेगाराला सरळ साधे मारुन टाकण्यापेक्षा हाल हाल करुन सार्वजनिक रीत्या मारणे यामध्ये तेथील लोकांची सॅडीस्टीक प्रवृत्ती दिसुन येते.
अगदी अगदी!!! मला ते sadistic न वाटता न्यायपूर्णच वाटतं.

In reply to by शुचि

शिक्षेचा हेतू गुन्हेगारात सुधारणा व्हावी असा असायला हवा म्हणून मृत्यूदंडाला विरोध आहे. गुन्हेगारच संपला तर सुधारणा कुणात होणार? म्हणजे ज्याची हत्त्या झाली त्याबद्दल काही करता येत नाही Because the person is dead. आता जे हयात आहेत त्यात तीन प्रकारचे लोक आहेत : एक, मृताशी संबंधित व्यक्ती; त्यांना हानीची भरपाई मिळून सुखानं जगता यावं हे उचित आहे. थोडक्यात, मृत व्यक्ती हयात असती तर त्यांचं जीवनमान जसं चाललं असतं तसं चालावं. (जे गुन्हेगारला फाशी दिल्यानं भावनिकदृष्ट्या साध्य झालं तरी त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचा फायदा होत नाही) दोन, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती; त्यांना दहशत बसते हे खरं असलं तरी फाशीची शिक्षा असून देखिल गुन्हे घडत आहेतच. त्यामुळे तो हेतू देखिल साधला जातो असं म्हणता येणार नाही. तीन, असंबधित लोक; त्यांना फक्त बातमी वाचायचं समाधान मिळतं. आपण जर असंबधित असू तर फाशीच्या शिक्षेनं आपल्याला आनंद होणं हे (सहज लक्षात न येणारं) सॅडिजम आहे.

In reply to by शुचि

पण त्या वस्तुस्थितीचा अनुभव आल्याशिवाय सर्वांशी नातं जुळत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो. मला आहाराविषयी वाद निर्माण करायचा नाही, फक्त हिंसेचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे. आपली सांप्रत नाती (निव्वळ) मानसिक आहेत, ती जाणीवेतून निर्माण झालेली नाहीत त्यामुळे तिसर्‍या समूहाला `असंबधित' म्हटलंय. इस्लामी पद्धतीचं वर्णन आणि हेतू मॅसोचिजम आहे आणि त्या अनुषंगानं ती पद्धत न्यायं वाटणं सॅडिजम आहे असा विचार मांडला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 30/04/2014 - 00:09
अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो.
बुद्धाबद्दल काय मत आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि 30/04/2014 - 00:34
मला तर उलटं वाटतं अतिभावनिक (= संवेदनाशील????) लोकांनाच न्याय्य कायदाव्यवस्थेचे महत्त्व कळेल. ज्यांनी विकृती अनुभवलीच नाहीये त्यांना कळणारच नाही अन ते भूतदया भूतदया करत गुन्हेगारांना पाठीशीच घालत रहाणार. . . . हां आता त्यांनी जोशींच्या टीनेजर मुलाला नग्न करुन, नायलॉनच्या दोरीने फास आवळून मारले असेल ना का, अभ्यंकरांच्या नातीला जाईला नग्न करुन घरभर फिरुन मौल्यवान वस्तू दाखवायला लावून मग मारले असेनाका पण आपले भूतदया दाखविणारे आडवे पडणारच! कारण ...... जाई परत येणार नाही, मुलगा परत येणार नाही, त्यांचे ह्युमिलिएशन मिटणार नाही पण हे बिचारे गुन्हेगार कशाला फासावर लटकवायचे? अन काय विदा आहे की फाशीमुळे गुन्हे कमी झालेले नाहीत याचा? मान्य आहे पूर्ण नामशेष झालेले नाहीत पण कशावरुन कमी झालेले नाहीत?

In reply to by शुचि

आपण काय साधण्याचा प्रयास करतोयं हा आहे. जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला. मी गुन्हेगारीची भलामण करत नाही, संवेदनाशीलता कशी वाढवता येईल याचा विचार व्हावा असा मुद्दा मांडतो. समाजाची संवेदनाशीलता वाढली की गुन्हेगारी आपोआप आवाक्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि 30/04/2014 - 00:56
जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला.
होय कळतय पण वळत नाहीये :)

In reply to by शुचि

मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." नाऊ जस्ट सी धिस थॉट, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. द वेरी फॅक्ट दॅट वी कॅन सी इज सच अ वंडरफुल फिनॉमिना. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की, वी स्टार्ट फिलींग ग्रॅटिट्यूड टोवर्ड्स अवर पार्टनर्स बॉडी. वॉट अ‍ॅन एक्स्ट्सी इट इज टू बी टुगेदर इन अ स्टार स्टडेड नाईट! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की सारी फ्रॅगरन्सेसची दुनिया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेला मार्दवानं हँडल करायला लागतो. आणि उमजतं की, इट इज अ‍ॅन इनवॅल्युएबल ट्रेजर ऑफ ब्लिस अराऊंड अस. जस्ट टू बी सायलेंट इज सच अ प्लेजर! मग सॅडिजम, मॅसोचिजम, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 01/05/2014 - 10:48
@संक्षि: प्रतिसाद आवडला, पण एवढी इंग्रजी वाक्यं कशाला हवीत त्यात? या वाक्यातून जे सांगयचंय, ते व्यक्त करू शकण्याएवढी नक्कीच संपन्न आहे मराठी भाषा. एका भाषेत दुसरी भाषा घुसडणं, हा सुद्धा त्या भाषेच्या सौंदर्याचा, संपन्नतेचा अवमान आहे, आणि एकाअर्थी हिंसकपणा देखील आहे. संपूर्ण प्रतिसाद मराठीचं मार्दव्य, पावित्र्य राखत लिहून तर बघा, या भाषेची अद्भुत किमया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटेल...

In reply to by चित्रगुप्त

व्यक्त होतांना मला भाषेचा अडसर येत नाही. पण माझ्या लेखी भाषेपेक्षा संवाद आणि त्याचा परिणाम महत्त्वाचायं. लेखवरच्या प्रतिसादांची भाषा संयुक्त आहे त्यामुळे प्रतिसाद देतांना तसं लिहीलंय. बाय द वे, तुमच्यासाठी तीच जादू, मराठीतून: मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." किती दुर्लभ विचार आहे पाहा, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. आपण पाहू शकतो हीच किती विलोभनीय गोष्ट आहे. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की आपण सखीच्या देहाप्रती कृतज्ञ होतो. चांदण्या रात्रीतला सखीसंग म्हणजे जणू स्वर्गच धरेवर उतरतो! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की इतक्या सार्‍या गंधांची, हरक्षणी चित्तप्रसन्न करणारी दुनिया, आपल्याला पूर्वीच कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेशी मार्दवानं वागायला लागतो. आणि उमजतं की, आपल्याला सतत वेढून असणारा तो रेशीमकोष आहे. नुसतं शांत बसणं ही सुद्धा काय ऐयाशी आहे! मग परपीडन, स्वपीडन, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

अगदी बरोबर. मृत्यूदंडाने अपेक्षीत हेतू साध्य होत नसेल तर निष्कारण एखाद्याचा गिनि पिग करणे कितपत योग्य आहे?

आत्मशून्य 29/04/2014 - 17:22
सेडिसम ही कोणती विशिष्ट भावना नसून( विशेषत: खोडसाळ/खोडकर पणाची ) बेसुमार इंटेसिटी आहे. कोनाला तो करायला आवडतो कोनाला सहण करायला आवडत असेल. अथवा याविरुध्द सरां प्रमाने सेडिसम बाबत दिशाभूल व तीव्र तिटकरा व्यक्त करून पुन्हा स्वत:चा सेडिजमच प्रदर्शित करायला पण मान्य मात्र न करायला आवडत असेल. मला स्वत:ला मर्यादित तीव्रतेचा सेडिस्म पसंत आहे. सर्वच बाबतीत.

Pain 02/05/2014 - 11:06
खासकरुन इंजिनीयरींग आणि मेडीकल मध्य याचे तुलनेने फ़ार जास्त प्रमाण दिसुन येते. म्हणजे जो सर्वात जास्त हुशार अभ्यासु असा एज्युकेटेड क्लास आहे त्यात सॅडीझम तर जास्त च दिसुन येतो. संस्कृतीने चढविलेली शिक्षण संस्काराची पुटे कीते तकलादु असतात ती आय आय टी च्या रॅगिंग च्या घटना बघितल्यावर कळुन येते. बर विशेष म्हणजे येथे आलेला क्लास हा जनरली सर्वच बाबतीत सहसा उच्च असतो आणि त्यातही परत शहरी भागातुन आलेल्यांकडुन ग्रामीण विद्यार्थ्यांची रॅगिंग अधिक तीव्रतेने होत असलेले हे दिसते जनरलायझेशन (सार्वत्रिकीकरण?). संस्कृतीचा, शिक्शणाचा, शहर - खेडेगावात राहण्याचा आणि ही विकृती असण्याचा परस्परांशी काहीही संबध नाही. अमेरीकन सैनिकांनी जे अफ़गाणी कैद्यांवर अत्याचार केले त्यात विशेष म्हणजे काही अमेरीकन महिला सैनिकांचा देखील समावेश होता. या अमेरीकन महीला सैनिंकांनी अतिशय भीषण अशी सॅडीस्टीक प्रवृत्ती पुरुष सहकारयांच्या बरोबरीने दाखविली विषेश म्हणाजे? स्त्रिया कधी काही गुन्हे करत नहीत का? पुन्हा तेच!

मनीषा 26/04/2014 - 20:58
माझ्या भाच्याने एकदा त्यांच्या एका खेळाबद्दल सांगीतले होते. एकाला मधे ठेवून त्याच्याभोवती वर्तुळाकार उभे रहायचे. आणि त्या मधल्या मुलाला भरपूर चिडवायचे, त्याच्या खोड्या करायच्या इ. तो मधे असलेला, जोवर न रडता, तक्रार न करता राहतो तो पर्यंत तो खेळात आहे. ज्यावेळी तो रडेल, चिडेल, तक्रार करेल किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्नं करेल त्या वेळी तो खेळातून बाद ठरतो म्हणे.

सहजीवन ही मूळ प्रवृत्ती आहे कारण अस्तित्वात आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत. फक्त मानव मानवांशी जोडलेले आहेत असं नाही, वृक्ष आपल्याशी जोडलेले आहेत कारण त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आहे आणि आपला उत्छ्वास त्यांचा श्वास आहे. आपण समुद्राशी जोडलेलो आहोत कारण तो जलनीधी वर्षेचा कारक आहे. चंद्र सागराशी जोडलेलायं कारण त्याच्यामुळे सागराला भरती-ओहोटी आहे; सागर चलायमान आहे. पृथ्वीचं सूर्याशी नातं आहे आणि पृथ्वीवर जीवन प्रकट झालंय म्हणून सूर्याला प्रकाशण्यात आनंद आहे. सूर्यामुळे पृथ्वी आहे असं नाही तर सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रह-तार्‍यामुळे सूर्य विविक्षित ठिकाणी आहे. आणि अश्या अनंत सूर्यमाला एकमेकांशी संलग्न आहेत कारण त्यांच्यात पारस्पारिक अनुबंध आहे! त्यामुळे सॅडिझम (परपीडन) किंवा मॅसोचिजम (स्वपीडन) सुख देत नाही ते उन्माद निर्माण करतं. तो उन्माद क्षणीक सुखाचा आभास निर्माण करतो पण शेवटी त्याचं रुपांतर अपराध भावात होतं. हा अपराधभाव विसरायला किंबा जस्टीफाय करायला पुन्हा नवा उन्माद लागतो आणि ते दुष्टचक्र चालू राहातं. तस्मात, सॅडिझम ही आदीम मानवी प्रवृत्ती नाही हे लक्षात घेणं श्रेयस आहे. एकदा आपण सर्व अस्तित्वाशी एकरुप आहोत याची जाणीव झाली की पीडनात दु:ख आहे हे समजतं.

छान लेख आहे. बरेच कवर केलेत. स्वताला काही माहीतीची फारशी भर टाकता येणार नाही. स्वानुभव बोलायचे झाल्यास माझ्यासाठी हातावर बसलेला मच्छर एकाच फटक्यात मारून त्याचे रक्त काढणे इतपतच आसूरी आनंद. अर्थात त्यापासून स्वताला धोका असेल तरच, अन्यथा इतर किडा न मारता उचलून भिरकाऊन देतो. तर माझ्यात याचा अंश नाहीये असे बोलू शकतो. तरी लहानपणी चतुर दोरीला बांधून त्यांचा छळ करायचो. हॉस्टेलमधले किळसवाणे आणि लैगिकतेशी संबंधित असलेले रॅगिंग प्रकाराबद्दल माहीत आहेच. नक्कीच हा मानसिक आजार वा विकृती, अन्यथा किडे तर आम्हीही केले. कधीतरी मस्करीची कुस्करी देखील होते पण काही जणांचा हेतूच कुस्करी करायचा असतो.

माहितगार 27/04/2014 - 09:27
मारवा यांचा सॅडीझम या विषयाचा विस्तृत धांडोळा घेण्याचा प्रयास स्तुत्य वाटतो. (त्याचवेळी एकाच बास्केट मध्ये अनेकवीध उपप्रकार एकत्र भरले गेले असल्याने प्रत्येक वाचक त्याच्या वेगवेगळ्या उपप्रकारावर प्रतिसाद नोंदवू शकतो असे होऊ शकते. हे नोंदवण्याचे कारण माझा प्रतिसाद माझ्या आधीच्या अथवा नंतरच्या प्रतिसादांशी जुळेलच असे नाही.) sadism ला मराठी न्यायव्यवहार कोशात परपिडानंद आणि masochism ला आत्मपीडानंद हे सुचवलेले शब्द चपखल वाटतात. वरच्या प्रतिसादात 'तुमचा अभिषेक' यांनी वापरलेला असूरीआनंद हा शब्दसुद्धा आहे पण काही वेगळ्या अर्थछटांचाही त्यात आंतर्भाव होत असावा का, अर्थात इतर अर्थछटा हा धाग्याचा मुख्य विषय नाही. मी मानववंशशास्त्राचा जाणकार नाही, ही माझी मर्यादा असूनही; शिकारी अवस्थेतून होत आलेल्या मानवी उत्क्रांतीच्या अंगाने या मानवी समस्यांना समजावून घेणे शक्य आहे का याबाबतीत माझ्या अनुमानीत परिकल्पना मांडणे आवडेल.

मारवा 27/04/2014 - 11:30
या दोन प्रयोगातुन येणारे निष्कर्ष धक्कादायक आहेत. हे प्रयोग सर्वसामान्य माणसांमध्ये सॅडीस्टीक वृत्ती कशा विपुल प्रमाणावर आढळुन येतात हे दाखवितात. यातील पहील्या प्रयोगात ७१ विद्यार्थ्यांना ४ प्रकारची कामे देण्यात आली आणि कोणते काम निवडायचे याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले. यात एक काम होते बग्ज मारणे दुसरे बग्ज मारण्यासाठी मदत करणे तिसरे टॉयलेट क्लीन करणे चौथे थंड पाण्यात हात घालुन काम करणे यात बग्ज कीलर च काम घेणारयांची संख्या सर्वात जास्त होती त्यांना मग एक एक जीवंत बग देण्यात आला त्या बग्ज ना मुद्दाम नावे देण्यात आली त्यांना एक एक बग कॉफी ग्राइंडर मध्ये टाकण्यास सांगण्यात आले त्यानंतर एक क्वेश्चनरी देण्यात आली त्यात त्यांना त्यांच्या भावनासंबंधी विचारण्यात आले...... ..... ...... कृपया हा आणि पुढील प्रयोगा साठी येथे वाचा त्यातुन एक निष्कर्ष असा काढण्यात आला की.........तीन प्रकारच्या प्रवृत्ती एक वा अधिक प्रमाणात ज्या व्यक्ती त आढळतात ती सह्सा सॅडीझम कडे झुकते त्या म्हणजे narcissism, psychopathy, and Machiavellianism. तिघांना मिळुन संबोधन आहे डार्क टायरॅड ..... या संबधातील लिंक कृपया बघावी हा लेख मुळातुन वाचण्यासारखा आहे http://well.blogs.nytimes.com/2013/09/16/everyday-sadists-among-us/?_php=true&_type=blogs&_r=0

In reply to by मारवा

माहितगार 27/04/2014 - 14:22
मारवाजी, माझ्या मतांना कदाचित कुठे बदलण्याची गरज असू शकते, या मोकळेपणा सहीत आपले आणि इतरांचे विचार अभ्यासेन; मी विषयातला कुणी जाणकार वगैरे नाही त्यामुळे कदाचित जरा अंमळ वेळ घेईन, कदाचित माझ्या विचारांच्या फ्लो मधील विचार आधी लिहून मोकळा होईन, पण स्वतःच्या अल्पमतीने आपल्या उत्तरांना प्रतिसाद नक्कीच देण्याचा माझा निश्चीत प्रयत्न असेल. माझ्या प्रतिसादांना आपली उत्तरे येताहेत ती अशीच येऊ द्यात आपल्या धाग्यांच्या आणि प्रतिसादांच्या निमीत्ताने मला माझे विचार पडताळून घेण्याची संधी आपण उपलब्ध करून देताय त्या बद्दल धन्यवाद.

मारवा 27/04/2014 - 11:46
माणुस कसा असला पाहीजे काय केले पाहीजे हे सर्व आयडीयलीझम मध्ये येते. तुमच स्टेटमेंट आयडीयलीस्टीक आहे. परंतु प्रत्यक्षात माणुस कसा आहे व्हॉट इज जे आहे ते जसा माणुस आहे तसा हे हा आयडीयलीझम नाकारतो. बिकमींग महत्वाचे असु शकते असायला हवे परंतु बीइंग कम्स फर्स्ट, माणसात हिंसा, वर्चस्वाची भावना सॅडीझम असतो हे वास्तव आहे. त्याच काय करायच त्याला कस बदलायच हा नंतरचा भाग आहे महत्वाचा विषय ही आहे. पण मुळात माणसात हे सर्व ट्रेट्स आहेत हे स्वीकार करण ही सत्याकडे जाण्याची पहीली पायरी आहे. एक म्हण या संदर्भात आठवतेय मॅन इज नो डाउट ग्रेटेस्ट अ‍ॅनिमल अमाँग ऑल अ‍ॅनिमल्स बट ही कन्व्हेनियंटली फरगेट्स दॅट ही इज अ‍ॅनिमल फर्स्ट !

In reply to by मारवा

आणि पीडन हा व्यक्तिमत्त्वाचा परिणाम आहे, वास्तविकतेचा नाही. चुकीच्या गृहितकांवर बांधलेली इमारत बरोबर असू शकत नाही. मागे समर्पण नांवाची (अती) दीर्घकथा इथे प्रकशित झाली होती, त्यावेळी पीडन म्हणजे प्रेम नाही यावर भरपूर चर्चा झालेली आहे. तस्मात, पीडनवृत्ती आदिम आहे म्हणून ती मान्य करण्यात आणि त्यायोगे जस्टीफाय करण्यात अर्थ नाही. I n short, sadism is not a natural condition and if one claims so, it needs correction.

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 27/04/2014 - 14:01
The mantis is famous because the female often eats the male during intercourse, the latter being easily overpowered by his mate, but hardwired to proceed with the mating process. The sadistic part is that mantises do not bother to kill their prey before eating them: as soon as the insect embraces the hapless lover, it begins to consume it alive. Although we tend to be less sympathetic towards invertebrates, the brutality of mantis eating habits is noteworthy, and viewed as the creature is viewed as a remorseless killer by many cultures around the world.

In reply to by मारवा

मारवा 27/04/2014 - 14:08
मला एक सांगा माणसामध्ये द्वेष,हिंसा,क्रोध अशा नकारात्मक प्रवृत्ती आहेत ना ? त्या त्याच्या बीइंग चा पार्ट नाहीत का ? त्यांच अस्तित्व आपण नाकारु शकतो का ? अगदी लहान बालकांमध्ये ज्यांच व्यक्तीमत्व अजुन पुरत विकसीत ही झालेल नाही त्या मध्ये ही या प्रवृत्ती आढळुन येतात यांना नाकारण शक्य आहे काअ ? तसेच वर दिलेल्या प्राणि जगतातील उदाहरणात ही सॅडीझम दिसुन येतो तो ही अनैसर्गिक आहे असे आपणास म्हणायचे आहे का? संस्कृती ने आपले काम ज्या माणसावर सुरु केले नाही त्यात हे आढळत नाही का ? आपणास माहीत आहे का की एके काळी जवळ जवळ संपुर्ण मानवी समाज हा कानीबलीस्ट होता ?

In reply to by मारवा

मारवा 27/04/2014 - 14:16
विल ड्युरांट याच्या स्टोरी ऑफ सीव्हीलायझेशन च्या पहील्या अवर ओरीएंटल हेरीटेज या पहील्या भागातील पुस्तकाचा हा उतारा बघा यात कानिबालीझम कीती आदिम काळापासुन प्रचलित आहे हे दिसुन येते. याच पुस्तकात विल ड्युरांट दाखवुन देतात की वात्सल्य आदि भावना या कशा हळु हळु नंतर विकसीत होत गेल्या. वात्सल्य ही काही आदिम भावना नव्हती. To all the varied articles of diet that we have enumerated, man added the greatest delicacy of all- his fellowman. Cannibalism was at one time practically universal; it has been found in nearly all primitive tribes, and among such later peoples as the Irish, the Iberians, the Picts, and the eleventh-century Danes. `010217 Among many tribes human flesh was a staple of trade, and funerals were unknown. In the Upper Congo living men, women and children were bought and sold frankly as articles of food; `010218 on the island of New Britain human meat was sold in shops as butcher's meat is sold among ourselves; and in some of the Solomon Islands human victims, preferably women, were fattened for a feast like pigs. `010219 The Fuegians ranked women above dogs because, they said, "dogs taste of otter." In Tahiti an old Polynesian chief explained his diet to Pierre Loti: "The white man, when well roasted, tastes like a ripe banana." The Fijians, however, complained that the flesh of the whites was too salty and tough, and that a European sailor was hardly fit to eat; a Polynesian tasted better. `010220 What was the origin of this practice? There is no surety that the custom arose, as formerly supposed, out of a shortage of other food; if it did, the taste once formed survived the shortage, and became a passionate predilection. `010221 Everywhere among nature peoples blood is regarded as a delicacy- never with horror; even primitive vegetarians take to it with gusto. Human blood is constantly drunk by tribes otherwise kindly and generous; sometimes as medicine, sometimes as a rite or covenant, often in the belief that it will add to the drinker the vital force of the victim. `010222 No shame was felt in preferring human flesh; primitive man seems to have recognized no distinction in morals between eating men and eating other animals. In Melanesia the chief who could treat his friends to a dish of roast man soared in social esteem. "When I have slain an enemy," explained a Brazilian philosopher-chief, "it is surely better to eat him than to let him waste.... The worst is not to be eaten, but to die; if I am killed it is all the same whether my tribal enemy eats me or not. But I could not think of any game that would taste better than he would.... You whites are really too dainty." `010223 Doubtless the custom had certain social advantages. It anticipated Dean Swift's plan for the utilization of superfluous children, and it gave the old an opportunity to die usefully. There is a point of view from which funerals seem an unnecessary extravagance. To Montaigne it appeared more barbarous to torture a man to death under the cover of piety, as was the mode of his time, than to roast and eat him after he was dead. We must respect one another's delusions.

In reply to by मारवा

१) मँटीस इज अ‍ॅन एक्सेप्शन आणि अपवाद नियमच सिद्ध करतो! २) दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. इतर सजीव अस्तित्त्वाशी अजाणता एकरुप आहेत त्यामुळे (मँटीस सोडता) परपीडन करतांना कुणीही दिसत नाही. त्यात पुन्हा, `मादीला आनंद होतो' असं मानणं हा निव्वळ मानवी दृष्टीकोन आहे. अस्तित्वाशी आपणही एकरुपच आहोत पण ते समजण्याची क्षमता (`जाणीवपूर्वक एकरुपता') ही संभावना फक्त माणसात आहे. त्यामुळे चुकीच्या गृहितकामुळे ती संभावना संपेल. Now with this understanding, love is basic & positive whereas sadism is un-natural & negative. Sadism needs correction.

दादा कोंडके 27/04/2014 - 11:58
यातील १२० डेज ऒफ़ सोडोम वर आधारीत असलेला सिनेमा सालो १२० डेज ओफ़ सोडोम या नावाने पिएर पाउलो पासोलीनी या दिग्दर्शकाने बनविला.
बघायला पाहिजे हा सिनेमा. 'हॉस्टेल' सुद्धा याच थीमवर होता. मागे चीन मध्ये वाघ-सिंहाच्या पिंजर्‍यात जिवंत गाय-बैल सोडून त्यांची शिकार (?) बघण्यासाठी लोकं तिकिट काढून जात. प्रसारमाध्यमातून बोंबाबोंब झाल्यावर ते प्रकरण थांबलं असावं. बाकी, सॅडीझम आणि मॅसोचिझम या मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत आणि प्रत्येकात त्या थोड्या-फार प्रमाणात असतातच या बाबत दुमत असू नये. पण याचं ग्लोरिफिकेशन करू नये याच्याशीही सहमत.

माहितगार 27/04/2014 - 12:15
आदिम मानवाच्या अगदी शिकारीपूर्व स्थितीचा आपण विचार करू लागतो तेव्हा, ज्याला शिकारीकरता शस्त्र वापरण्याचीही माहिती झाली नसेल, तृणधान्यांचीही ओळख कदाचित झाली नसेल, गवत आणि पाला खाऊ शकत नाही, झाडावर फळे नाहीत किंवा वृक्षराजीपासून दूर जायला लागतय अशी स्थितींमध्ये इतर हिंस्त्र श्वापदांपासून कोणत्याही शस्त्रावाचून स्वतःचा बचाव करणे, त्यांनी मारलेले प्राणी/भक्ष्य इतर अनेक तशाच प्राण्यांशी स्पर्धा करत मिळवणे हे कौशल्य साध्यकरताना स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर पाळीव प्राणी हिंस्र श्वापदांपुढे स्वतःहूनही जाणार नाहीत तर मानवी समूह बनवून त्यांना त्याकडे ढकेलणे अशा काही रणनितींचा वापर करावा लागला असेल. हा फक्त स्वतःचे अन्न मिळवण्याची लढा नाही तर स्वतःचा समूह सुरक्षीत ठेवण्यासाठीही प्रत्येक क्षणी लढावी लागलेली लढाई असणार. मिळवलेल्या अन्नाला इतर प्राण्यांपासून सुरक्षीत ठेऊन स्वतःसाठी पोटभर मिळवण्यासाठी मानवी समूहात आपापसातील चढाओढही होत असणार. या जीवनाच्या चढाओढीत ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स हे ही तत्व मोठ्या प्रमाणावर आमलात आले असेल. इतर हिंस्र प्राण्यांनी केलेली प्रत्येक शिकार त्यांना चकवा देऊन ती मिळवणे ती मिळवताना सामूहीक कृतीच्या वेळी निर्माण करावे लागणारे उन्माद, आणि यश मिळाल्या नंतरचा आनंद हा वेळोवेळी नियमीतपणे साजरा होत असणार. ती जीवनशैली जगतानाची ती किमान गरज असणार. शस्त्रांसहीत शिकार करता येऊ लागल्या नंतर प्रत्येक शिकारीच्या विजयाचा आनंद साजरा केला जात असेल तर नवल नाही. ह्यातील हिंस्रश्वापदा सोबतच्या असंख्य बॅटल्स लूजींग ठरून मानवी समूहांना त्यांचे अनेक सदस्य गमवावेही लागत असणार. (आणि त्या प्रत्येकवेळी (उन्मादाच्या) त्याच नाण्याची विषादाची दुसरी बा़जूही मानव अनुभवत असणार आणि या विषादांच्या भावनांच रुपांतरण कालानुक्रमे अंहीसेच्या इच्छेतही विकसीत झाल असू शकत.) जिथे प्रश्नच प्रत्येक क्षण जगण्याचा जिंकण्याचा आहे तेथे इतर प्राण्याला परपिडा होताना स्वतःची भूक येत्या काही क्षणात भागवली जाईल याचा आनंद होण हा तत्कालीन मानवाकरता कदाचित अपवाद नव्हे नियम असेल का ? (टिपः इथे उद्देश आताच्या मानवाच्या परपिडानंदाच समर्थन असा नाही. केवळ एक शक्यता समजून घेण्याचा प्रयत्न मात्र आहे.)

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 12:47
आजच्या काळात लहानमुलांना टोकाची हिंसा पहावयासही मिळू नये अशी सहसा आपली इच्छा असते (मी व्यक्तीशः या बाबतीत आग्रही असतो). मला नसीरुद्दीन शहाच्या चित्रपटातला एक सीन (अंधूक) आठवतो ज्यात तो दोन लहान मुलांना कोणतासा प्राणी मारून खाण्यास देतो/शिकवतो आणि हेच वास्तव आहे आणि हा जीवनाचा संघर्ष तो लढलाच पाहीजे टाईप काही प्रभावी डायलॉग आहे. (कुणाला या चित्रपटाचे नेमके नाव, डायलॉग ठाऊक असल्यास कृपया द्यावा). अर्थात त्यावेळीतरी नसीरुद्दीन च्या तोंडचा डायलॉग मला भावला होता. प्राण्यांची माहिती देणारी बर्‍यापैकी चॅनल्स आहेत त्यातल्या एका कोणत्याश्या लघूपटात एक रानडूकरांच्या कळपातील पिल्लू पाणवठ्यावर पाणी पिता पिता श्वापदाची चाहूल लागताच त्याच्या सोबतचा कळप पुढे निघून जातो पिल्लू मागे राहत, पिल्लाच्या आईला लक्षात आल्या नंतर ती मागे फिरते पोहोचे पोहोचे पर्यंत श्वापदाने ते पिल्लू तिच्या समोर गट्टम केल असतं तीचा चेहरा पडतानाच ती वास्तव स्विकारून कळपाकडे मागे फिरते. त्यात एका खर्‍या खूर्‍या प्राणी (रानडूक्कर) आईच्या चेहर्‍यावरचे दोन्ही भाव दुख्खाचा आणि वस्तुस्थिती स्विकारल्याचा लपत नाहीत. आजच्या काळात आपण आपल्या मुलांना जपतो आदीम मानव आणि त्याची मुलं हे वास्तव प्रत्येक क्षणाला डोळ्या देखत अनुभवत तोंड देतच आणि प्रसंगी जगण्यासाठी स्वतःही त्याच हिंस्रता बाणवत जगली वाढली असली असावीत.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 14:10
मुले आपापल्या पालकांना शिकारींचा आनंद घेताना पाहून स्वतःही आंनद घेण्यात शिकली असणार. घटना घडतानाच आठवतात असे नाही. तर एखादी घटना घडण्याची शक्यता वाटून सुद्धा मनात विचार येतात, खरे तर एखाद्या घटनेच्या प्रसंगी कसे वागावे याची मानसीक पुर्वतयारी हे (बर्‍याचदा इंट्रूजीव्ह) विचार घडवून घेत असतात. संधी अथवा आव्हान समोर आल्यानंतर दुर्लक्षकरणे, गर्भगळीत होणे, पळून जाणे, स्वसंरक्षणाचा सामना करणे ते ऑफेन्सीव्ह स्टान्स घेणे प्रसंगी क्रौर्यासहीत ऑफेन्सीव्ह स्टान्स घेणे हे या घूसखोरी करणार्‍या (इंट्रूजीव्ह) विचारांचा अविभाज्य आणि नैसर्गिक भाग असते. इतर विचारांसोबत क्रौर्यासहीत ऑफेन्सीव्ह स्टान्सचा घूसखोर विचार सुद्धा पर्यायांच्या स्वरूपात सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेळोवेळी कळत नकळत येऊन जातच असतात नव्हे तर त्यातून असणार्‍या रिस्क अ‍ॅव्हर्शन करता मनाची पुर्वतयारी करण्यासाथी ते गरजेचे सुद्धा असतात. एक हिंस्र श्वापद तुमच्या पुढ्यात आहे तुम्हाला गर्भगळीत होणे जमलेले नाहीए माघारीचा पळण्याचा मार्ग उपलब्ध नाहीए त्याने हल्ला आधी हल्ला केला तर तुम्हाला स्वसंरक्षणाचा वेळ सुद्धा मिळणार नाहीए, तुमच्या हातात शस्त्र आहे तुम्ही ऑफेन्सीव्ह वर जाणार की नाही ? इथे काय चांगले काय वाईट हा प्रश्न नाहीए मार्ग काढण्यासाठी लागणार्‍या तुमच्या मनाच्या तयारीचा प्रश्न आहे आणि या संबंधीचे विचार अगदी क्रूरसुद्धा तुम्हाला त्यातील जोखीमांचा (रिस्कची) जाणीव करून देत असतात. तुम्ही अचानक घरात आलाय गॅस बंद आहे गॅसवरील भांड्यातला एक पदार्थ तुम्हाला चाखायचा आहे. तुम्ही डोळे झाकून त्या भांड्याला हात लावाल? बहुधा नाही, कारण बंद गॅसवरील गोष्टही गरम असू शकते त्याचा चटका बसू शकतो हे पुर्वीचे अनुभव आणि घूसखोर विचार/स्वप्ने यांनी तुमच्या मनाची तयारी करून ठेवलेली असते. कोणत्याही ललित कलेचा आस्वाद घेत असताना रौद्र, बीभत्स, भयानक इत्यादी रसांचाही समावेश केला जातो, क्रुरतेच्या बातम्या ऐकतो अथवा टिव्हीवरील एखादी एपीसोड बघतो तेव्हा यातील नको असलेले बाजूला सारावयाचे अनुभव पर्याय आणि कृती आपण नकळत आपण आपल्या मनाला सांगत असतो. म्हणून नकारात्मक विचार घूसखोर पद्धतीने मनात येण स्वागतार्ह आहे जो पर्यंत तुमच मन त्याला अंमलबजावणी योग्य म्हणून स्विकारत नाही. परपिडांनद घेऊ इच्छिणार्‍या स्थिती आणि तशी इच्छा नसलेल्या स्थिती मधला हा फरक नाही की इच्छा नसलेल्या लोकांमध्ये घूसखोर नकारात्मक विचार येतच नाही पण सोबत गॅसवरचे भांडे गरम असू शकते या शक्यते प्रमाणे त्याच्या नावडत्या/नकोशा परिणामांच्या अथवा आवडत्या गोष्टीला दुखवायचे नाही या कल्पनेने ते नाकारले जात असतात. राजे रजवाड्यांचा फावल्या वेळातील उद्योग शिकारीचाच असे. आजही शिकारींचा आनंद घेणारे लोक आढळून येतात. अर्थात माणूस सुसंस्कृत होऊ लागला तसा हा परपिडेचा आनंद शिकार्‍यांकरताही बहुतांश इतर प्राण्यांबद्दल मर्यादीत झाला असावा.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 15:43
या विषयात एकुण उपप्रकार बरेच आहेत, त्यामूळे विश्लेषणा पुर्वीच सरमिसळ आणि निष्कर्श घाईची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात इतर उपप्रकारांकडे वळण्या पुर्वी अक्रौर्य अथवा परपीडा टाळण्याची वृत्ती काही जणांना तेवढीच नैसर्गीक पणे संस्कार न देताही येते का? एक व्यक्ती एका पक्षाला शिकारी साठी मारतीए, त्याच्या सोबतच्या दहा व्यक्ती त्याचा आनंद घेण्याचीच शक्यता जास्त असते का ? मला इजा होऊन दु:ख होऊ शकते तर त्या पक्षालाही इजा होऊन दु:ख होत असणार हि सम-वेदनाही (संवेदनशीलता) अहींसेकडे नेण्यास कारणीभूत होऊ शकते पण इथेही त्या व्यक्तीचा त्या पक्ष्याला होणारी इजा आणि मला होऊ शकणारी इजा याचा मनोव्यापारातील कार्य कारण संबंध विचारात घ्यावा लागतो. अपवादात्मक लोकांच्या मनोव्यापारात हे नैसर्गीकपणे घडते त्यांना त्या पक्षाला शक्य असलेली वेदना स्वतःहून नकोशी होते पण बहुतांश हिंसा टाळणार्‍या लोकांना ह्या संवेदनेची जाणीव होते पण ती इतर कुणीतरी करून दिल्या नंतर हा फरक किरकोळ वाटला तरी प्रत्यक्षात महत्वाचा असावा कारण हि संवेदना बहुतांश लोकांना त्या मर्यादीत क्षेत्रा पर्यंतच होत असू शकते का? कारण याच संवेदनांनी हिंसा टाळण्यासाठी आग्रही पणे शाकाहार घेणारे लोक इतर काही प्रसंगी परपीडेचा आनंदही घेताना दिसून येतात. बर्‍याच प्रसंगी या विरोधाभासांकडे विश्लेषण करताना दुर्लक्ष होत असते का ? आणि शिकार खेळताना आनंद उपभोगणारा राजाच्या मनात इतर प्रसंगी चुकूनही परपीडेचा आनंद घेण्याची इच्छा होत नाही किंवा घेताना दिसत नाही असे होते का? बरेच लोक अहींसेकडे जगा आणि जगू द्या हा प्युअर रॅशनलीझम ते पापपुण्य नर्कातल्या शीक्षांच्या भिती ते पुर्नजन्म नको असणे इतपर्यंत कारणेही असू शकतात. पण सर्वात महत्वाचे पालक किंवा बाजूच्या समाजाच्या वागणूकीतून वेळीच मिळणारे सुयोग्य संस्कार/ सुयोग्य समज हि बहुधा सर्वात प्रभावी घटक ठरत असावी.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 16:13
आता क्रौर्याच्या मुद्याकडे वापस येऊ या. क्रौर्य करणारा प्रत्येक क्रुरतेच्या घटनेत आनंद अनुभवत असेलच असेही नाही. निव्वळ पेशन्स तुटल्या नंतरचे फ्रस्ट्रेशन, बदला या ठिकाणी क्रौर्य करणार्या व्यक्तीचा अनुभव कदाचित अगतीकता संपवण्याचा किंवा रागाचा असू शकेल किंवा रेल्वे इंजीनच्या ड्रायव्हरचा अनूभव खेदाचा दुख्खाचाही असू शकेल किंवा खाटीक खान्यात काम करणार्‍या व्यक्तीला आनंदही नाही दुख्खही नाही अशी बोथट जाणीव सूद्धा असू शकेल का ? तर युद्धात झालेले क्रौर्य केवळ जीवनसंघर्षाचा भाग असल्यामुळे युद्ध उन्माद असूनही आनंद असेलच असेही नाही अशीही स्थिती असू शकते का ? फ्रस्ट्रेशन, बदला यासाठी बर्‍याचदा परपिडानंद नसताच्याही क्रौर्यालाही बर्‍याचदा परपिडानंद या कॅटॅगरीत टाकले जाऊ शकते. इथे परपिडानंदाचा आरोप करणारी व्यक्ती केवळ भावनाविवशतेतून तसे करत असते का शिक्षा अधिक कठोर झाल्यामुळे भावनाविवश व्यक्तींनाही परपिडानंद मिळणार असतो ?

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 16:39
परपिडांनद घेण किंवा न घेण हे माझ्या मते मुख्यत्वे संस्कारसिद्ध आहे, जे संस्कार जाणता अथवा अजाणता पालक आणि आजूबाजूच्या परिसराने दिलेले असतात. एकच सारखा संस्कार देणारी व्यक्ती एका व्यक्तीस संस्कार देण्यास सफल होऊ शकते आणि दुसर्‍या व्यक्तीस संस्कार देण्यास असफल होऊ शकते. असफल होणे हे संस्कार घेणार्‍या व्यक्तीवर असलेल्या इतर विचारांचे, निष्कर्षांचे, प्रभावांचे फलित असू शकते पण असे नकारात्मक फलित येईल म्हणून संस्कार देणे सोडले गेल्यास महत्वाची संधी दवडल्या सारखेही होऊ शकते. पालकांच्या संस्कारातून वाढलेली परपिडानंद न घेणारी व्यक्ती नंतरच्या कालावधीत पिअरप्रेशरने परपिडेचा आनंद उपभोगतानाही आढळू शकते जसे कि रॅगींगचे उदाहरण. रॅगिंगचे रॅकेट चालवणार्‍या एखाद्याला लहाणपणा पासून परपिडानंद असू शकतो म्हणून रॅगींग करणार्‍या प्रत्येकाला लहाणपणापासून परपिडानंद घेण्याची सवय असेलच असेही नाही तो त्या कालावधीत नकारात्मक संस्कारांना मिळालेल्या संधीचा प्रभाव असतो. रॅगींग घेणारी व्यक्ती महाविद्यालयीन जीवनाच्या आधी आणि नंतरही परपीडानंद न अनुभवणारी असू शकते. असच अजून एक उदाहरण व्यक्ती परपिडानंद न घेणारी नाहीए परंतु एखाद्या शत्रुचा पराजय झाला की (तो पराभव स्वतः केला नसला तरीही) परपिडानंद घेताना दिसून येते म्हणजे कमी अधिक प्रमाणात परपिडानंद प्रासंगिक स्वरूपात कुणालाही होऊ शकतो. परपिडानंद प्रासंगिक स्वरूपात कुणालाही होऊ शकतो याच कारण अस की परपिडानंद न होण जेवढ नैसर्गीक असू शकत तेवढच क्वचीत परपिडेने आनंद होणही नैसर्गीकही असू शकत. स्वतः प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परपिडा न दिलेला पण स्वतःच नैराश्य/दु:ख दूरकरणारा परपिडानंद आदर्श नसेल पण मन मोकळ करणारा असू शकतो का हे त्याच्या मर्यादांसहीत लक्षात घेतले पाहीजे कारण या परपिडानंदातून पुढच्या वेळी स्वतः परपिडा देण्याचे समर्थन करण्याची भिती असू शकते.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 17:16
परिस्थिती अथवा घटनाजन्य असमाधानाचे प्रतिसाद बऱ्याचादा सुयोग्य अधिकृत मार्गाने उमटून शंकांचे निरसन होत नाही तर ते व्यक्ती व्यक्तीत अथवा समाजात निंदा नालस्तीच्या स्वरूपात प्रकट होत रहातात. एका बाजूने दोन किंवा अधिक व्यक्ती अनुपस्थीत व्यक्ती अथवा परिस्थितीबद्दल निंदाकरतात तेव्हा त्यांचे आपापसातेले भावबंध घट्ट होण्यास सहाय्यकारी होते. येथे परनिंदेचा नकारात्मक परिणाम पूर्वग्रह, रोष आणि असंतोषास बळकटी येत जाते. बऱ्याचदा या सामाजिक असंतोष अथवा असमाधानाच्या परिस्थीतीचा टोकाची भाषा वाढीस लागते. (अंशत संदर्भ: मराठी विकिपीडिया) जर असंतोष समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटातील असेल तर दुसऱ्या गटातील लोकसुद्धा तशाच स्वरूपाच्या पण असमाधान निंदा पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटीच्या स्थितींना पोहोचतो. दोन्ही समूहाचे असे नेते सलेक्टीव्हली दुसऱ्या समूहाच्या नकारात्मक बाजू दाखवण्यात मग्न होतात. परिणामी समूहात परस्पर अविश्वास आणि असुरक्षीततेची भावना घर करते. अफवा पसरतात अथवा पसरवल्या जातात एखाद्या क्षूल्लक कारणावरून ठिणगी पडल्याचा फायदा घेत परस्पर विरोधी गटांना परपिडा दिली जाते. कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा फायदा इतरही गुन्हेगार लूटारू आणि इतर हिसंबंधी उठवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे परिस्थितीस बऱ्याचदा गंभीर वळण लागण्याचा संभव असतो. परस्पर विरोधी आक्रोश असलेल्यांना परपिडा देण्याची इच्छा असू शकते पण आनंद येण्याची शक्यता कमी असली तरी पिअर ग्रूप मधील स्वतः प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परपिडा न दिलेल्यास स्वतःच नैराश्य/दु:ख दूरकरणारा परपिडानंद होताना पाहून परपिडा देणारा स्वतःचे परपिडा देणे जस्टीफाय करू लागण्याची शक्यता असते का ? आणि परिस्थितीत केवळ संधी म्हणून लूट करणार्‍यांचा परपिडानंद कशा प्रकारचा असतो याच्या व्यक्ती आणि समूहाच्या मानसशास्त्रीय उकलीची संधी आणि प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. तसे त्या बाबतीतील सामाजिक संस्कार घडणेही होत नसावे. हेच अविश्वास टिकून राहील्यास क्वचीत परिणती जिनोसाईड मध्येही होऊ शकते त्यामुळे अप्रीय घटना घडून गेल्या नंतर काहीच न घडल्याचे डिनायल (दोन किंवा अधिक बाजूंचे) किंवा केवळ आक्रस्ताळा आक्रोश या पेक्षा एकमेकांची बाजू वेळीच समजून घेऊन अविश्वास दूर करण्यास साहाय्यभूत तर्कसुसंगत भूमीका साहाय्यकारी असू शकतात एवढेच या निमीत्ताने नोंदवता येऊ शकते बाकी हा स्वतंत्र चर्चांचा विषय आहे.

अनुप ढेरे 27/04/2014 - 12:16
प्रत्यक्ष हिंसा बघायला आवडणं हे तुम्ही सेडीझमचं उदाहरण म्हणून दिलं आहे? पण वॉयलंट सिनेमे, टॅरेंटिनोचे काही सिनेमे, अथवा अपोकॅलिप्टो सारखे सिनेमे आवडणं हे पण सेडिझम आहे का? अवांतरः 'होली' या नाटकावर सिनेमा पण आहे. होली याच नावाचा. केतन मेहता नी दिग्दर्शित केलेला. आमिर खानचा पहिला पिच्चर बहुदा,

मारवा 27/04/2014 - 13:31
सॅडीझम चा अवलंब केला जातो. रॅगिंग करणारे सुशिक्षीत विद्यार्थी सुसंस्कृत व संपन्न घरातील असतात. सर्व्हायव्हल ची अशी कुठलीही निकड त्यांना नसते. निव्वळ सुख (उन्माद) जे सॅडीझम पासुन मिळते त्यासाठी, सत्ता गाजविण्याची उपजत वृत्ती यातुन, तसेच वर दिलेल्या नारसिसिझम (स्व च्या अतिरेकी प्रेमात पडण्यातुन, ) इत्यादीतुन ही याचा अवलंब केला जातो. अबु गरीब मधील अमेरीक्न सैनिकांना निर्वस्त्र/निशस्त्र/निसत्व करुन टाकलेल्या अफगाणिंकडुन कुठल्याही प्रकारची थ्रेट नव्हती. परंतु त्यांना ही शिअर प्ल्रेझर ऑफ सॅडीझम साठी टॉर्चर करण्यात आले यात अपमानित करुन आनंद मिळविणयाचा ही बराच भाग होता. कटटर मुस्लीम धर्मीयात असलेल्या आस्थांना लक्ष्य करुन ही त्यांना टॉर्चर करुन अमेरीकन सैनिकांनी सॅडीझम चा अवलंब केला होता.

मारवा 27/04/2014 - 13:45
पासोलिनी याच्या सालो १२० डेज ऑफ सोडोम या चित्रपटात प्रतिभाशाली दिग्दर्शक पासोलीनी एक अप्रतिम ट्रीक करतो ती अशी की या सिनेमात शेवटी शेवटी यातील चार मुख्य खलनायक ज्यांनी अतिशय कोवळ्या तरुण तरुणींना पकडुन एका मोट्या प्रासादतुल्य घरात कैद केलेले असते. त्यांच्यावर क्रमाक्रमाने विवीध प्रकारचे अत्याचार करण्यात येतात व त्यांना टोकाचे अपमानित व अत्यंत क्रुर पणे वागविण्यात येते. यातील क्रुरता सिनेमात उत्तरोत्तर वाढत जाते तर अशाच एका प्रसंगात घरासमोरच्या ग्राउंड मध्ये या तरुण तरुणींवर भीषण अत्याचार सुरु होतो व त्यातील चार ही खलनायक पाळीपाळीने एक एक करुन समोरील घरातील खिडकीत एका खुर्चीवर बसुन दुर्बीण घेउन तो सर्व प्रकार अतिशय रस घेउन तल्लीन होउन बघत असतात. ते तो अत्याचार निव्वळ बघण्याचा आनंद घेत असतात .... आणि अचानक एका फ्रेम मध्ये दिग्दर्शक पासोलिनी आपल्याला जाणीवपुर्वक फक्त दुर्बीणीचे दोन वर्तुळ दाखवितो पुर्ण पडदाभरुन आपण प्रेक्षकाला फक्त दुर्बीणीचे दोन वर्तुळ मात्र दिसतात.... पासोलीनी अत्यंत कुशलतेने आपल्यातला सॅडीस्ट दाखवुन देतो....... तो हे सुचवितो की बघा तुम्ही प्रेक्षक जो हा सिनेमा बघतायत .... तुम्ही सुध्हा सॅडीस्ट च आहात... यु आर ऑल्सो एन्जॉयींग टु वॉच जस्ट लाइक दोज व्हिलन्स.... तर अनुप असे सिनेमे पाहणे ज्यात हे कंटेट आहेत हे निश्चीतच सॅडीस्ट वृत्तीचे च एक उदाहरण आहे..

शुचि 27/04/2014 - 14:22
पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून खटल्यची कुप्रसिद्ध केस, जक्कल - सुतार द्वयीतील , जक्कल हा लहानापणापासूनच sadist प्रवृत्ती दाखवे अशा प्रकारचे ठोस (confirmed )वर्णन , त्याच खटल्यातील माफीचा साक्षीदार मुनवर शहाच्या "आय am not गिल्टी" या पुस्तकात आढळते. निव्वळ मजा/टाईमपास म्हणून हे खून झाल्याचे भयंकर सत्य पुढे आले, तेव्हा आख्खे पुणे या निर्घृण हत्यांमुळे हादरल्याचे स्मरते.

मारवा 27/04/2014 - 14:36
शुचि अनेक सीरीयल कीलर्स च्या बालपणात डोकावुन बघितले असता ते मोस्टली सॅडीस्टीक बालपणापासुन च असल्याचे आढळुन येते. असे लोक निव्वळ थ्रिल साठी एका अनाकलनीय ऑरगज्मिक नेचर च्या थ्रिल साठी खुन करतात. बाय द वे अति अति अवांतर रामाला तर भोगु दिल ना हो लव कुश ही दाम्पत्य सुखाची च परीणीती होते ना ? ओळी अशा असायला हव्या होत्या का की उर्मिलेला सासरवास, सासु कैकयीने केला लक्ष्मणासारखा भरतार हिने भोगु नाही दिला आपले कवि ग्रेस म्हणतात तस लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी ... तसे.. मला रामायणाची फार खोलात जाउन माहीती नाही हो इतर ही काही बाजु असेल तर जाणुन घ्यायला आवडेल बाकी कवितेचा अर्थ नाही लागला म्हणुन अवांतर केल,,, इतकच

In reply to by मारवा

शुचि 27/04/2014 - 14:41
मारवा आपण म्हणता तशाही ओळी होउ शकतात. स्वाक्षरीत उधृत केलेल्या धाग्यातून अहिराणी भाषेतील ही ओवी मी सहजच निवडली आहे. :)

मारवा 27/04/2014 - 14:36
शुचि अनेक सीरीयल कीलर्स च्या बालपणात डोकावुन बघितले असता ते मोस्टली सॅडीस्टीक बालपणापासुन च असल्याचे आढळुन येते. असे लोक निव्वळ थ्रिल साठी एका अनाकलनीय ऑरगज्मिक नेचर च्या थ्रिल साठी खुन करतात. बाय द वे अति अति अवांतर रामाला तर भोगु दिल ना हो लव कुश ही दाम्पत्य सुखाची च परीणीती होते ना ? ओळी अशा असायला हव्या होत्या का की उर्मिलेला सासरवास, सासु कैकयीने केला लक्ष्मणासारखा भरतार हिने भोगु नाही दिला आपले कवि ग्रेस म्हणतात तस लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी ... तसे.. मला रामायणाची फार खोलात जाउन माहीती नाही हो इतर ही काही बाजु असेल तर जाणुन घ्यायला आवडेल बाकी कवितेचा अर्थ नाही लागला म्हणुन अवांतर केल,,, इतकच

In reply to by मारवा

प्यारे१ 27/04/2014 - 14:44
लवकुश ही संतती सुद्धा वनवासातून परत आल्यावरच झालेली आहे. लक्ष्मण उर्मिलेला सुद्धा मूल/ मुलं झाली होती. बाकी चालू द्या.

In reply to by प्यारे१

मारवा 27/04/2014 - 15:03
सहन करावा लागला कारण लक्ष्मण एकटाच वनवासात रामाबरोबर गेला होता. त्या काळात राम्-सीता कीमान एकत्र राहत होते. मात्र उर्मिलेला ती लक्ष्मणाबरोबर राहत नसल्याने दाम्पत्य सुखाचा अनुभव घेता आला नव्हता. तिच्या या विरहवेदनेवर कवि ग्रेस यांनी अतिशय सुंदर असे मार्मीक भाष्य केलेले आहे. तसे सीतेला कुठे भोगावे लागले ? बहुधा उत्तर रामायणात असेल ते धोबी मॅटर झाल्यानंतर असो यार मी का भरकटतोय कुणास ठाउक

In reply to by मारवा

आत्मशून्य 30/04/2014 - 03:47
त्या काळात राम्-सीता कीमान एकत्र राहत होते.
राम्-सीता वनवासात कीमान किती काळ एकत्र होते यावर कवी ग्रेस यांचे काही भाष्य उपलब्ध आहे का ? मी तर म्हणेन फक्त उर्मीलेलाच क्रेडीट ड्यु आहे रामावाचा वनवास आणी रावणा विरोधातील युध्दा विजय मिळवण्यात महत्वाची भुमीका निभावल्याबद्दल. पण बहुदा एक स्त्री म्हणून इतीहासाने तिचावर अन्याव केला असावा.

मारवा 27/04/2014 - 14:57
त्यातही भारतीय अध्यात्माला तर नाहीच नाही. प्रयोगाद्वारे काढलेले निष्कर्ष, विदा, पुरावे एकीकडे आणि गांधीजी फेम अंतरात्म्याचा आवाज दुसरीकडे जीत तो आखिर तय ही है ! तरी प्रतिवादा चा केविलवाणा प्रयत्न करुन बघतो आपण म्हणता की 1- इतर सजीव अस्तित्त्वाशी अजाणता एकरुप आहेत आपण बहुधा सर्व सजीवांविषयी बोलत आहात. आता माझी एल्सा नावाची कुत्री आणि आमच्या जुन्या लाकडी कपाटात कपारीत दडलेली ३ ते ५ ढेकुणांची फॅमिली हे सर्व मी सजीवात धरले तर चालेल का ? आणि आता एल्सा व हे ढेकुण अस्तित्वाशी अजाणता एकरुप आहेत म्हणजे नेमके काय आहेत ? आणि अस्तित्व म्हणजे नेमक काय व एल्सा/ढेकुण यांचा अस्तित्वाशी नेमका संबध कसा हे आपण आध्यात्मिक जर्गन टाळुन एक्स्प्लेन करु शकता काय ?

In reply to by मारवा

जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, साधी गोष्ट आहे. सर्व सजीवांचं अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे त्यामुळे ते वृक्षांशी जोडलेले आहेत. वृक्ष पावसाशी जोडलेले आहेत कारण पाण्याशिवाय वृक्ष-वल्ली जगू शकत नाहीत. सगळं पाणी समुद्राशी जोडलेलं आहे आणि पाण्याला बाष्पीभवनासाठी सूर्य हवायं. त्यामुळे सगळे सूर्याशी जोडलेले आहेत. वृक्ष-वल्ली, पीकं; जमीनीशी निगडीत आहेत आणि सजीवांची शरीरधारणा त्यांनी निर्मिलेल्या अन्नावर अवलंबून आहे त्यामुळे आपण जमीनीशी जोडलेलो आहोत. खरं तर शरीर हे अन्नाचं रुपांतरण आहे म्हणून आपण सर्व मृत्तीकेचीच जाणीव असलेली रुपं आहोत. एल्साचं शरीर ज्या अन्नावर अवलंबून आहे ते एकतर जमीनीतनं निर्माण झालंय किंवा मग इतर सजीव, जे तिचं अन्न आहेत, ते धरोत्पन्न अन्नापासून निर्माण झालेत. त्यामुळे एल्सा सुद्धा पृथ्वीशी जोडलेली आहे. एल्सा सजीव आहे त्यामुळे ती वृक्षांशी सुद्धा निगडित आहे. अस्तित्वात सर्वस्वी अनाकलनीय आणि गूढ रितीनं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीशी जोडलेली आहे. अत्यंत व्यापक परिमाणावर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. त्यामुळे स्टीफन हॉकिंग्ज अस्तित्वाला `द ग्रेट डिझाईन' म्हणतो. आता थोडे पुढे जाऊ. या अस्तित्त्वात आपण सगळे परस्परांशी एकाच जाणीवेनं जोडलेलो आहोत जी निराकार आहे. त्यामुळे एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तुम्ही जाणू शकता आणि तुम्ही मूडमधे नाही हे एल्सा तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जाणू शकते; ती तुमच्या भोवती घुटमळत राहाते. अस्तित्त्व एक आहे याचा अर्थ, अस्तित्व एकाच निराकार जाणीवेची अनेक रुपं आहे. त्यामुळे सम-वेदना आणि प्रेम या मूलभूत गोष्टी ठरतात. फरक फक्त इतकाच की एल्सा हे समजू शकत नाही आणि तुम्ही ते समजू शकता. ही एकरुपता समजण्याची संभावना, परपीडन ही मूळ वृत्ती आहे अशी कल्पना करुन घेतली की संपुष्टात येते.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 27/04/2014 - 16:31
दर दोन वर्षांनी स्वतःनेच ठवलेले नियम मॉडणारा होंगिंक्स चे प्रमाण देण्या पेक्षा... देह अन्नाने, अन्न पृथ्विपासुन, प्रुथ्वि जलापासुन, जल अग्नि पासुन, अग्नि वायुपासुन, वायु आकाशापासुन, आकाश आत्म्यापासुन बनते या आशयाचा आपल्या संस्कृतीमधील दिव्य श्लोक तुम्हास माहित नाही काय ?
यामुळे एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तुम्ही जाणू शकता आणि तुम्ही मूडमधे नाही हे एल्सा तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जाणू शकते;
अहो एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तो ढेकुण जाणू शकणार आहे का ? की ढेकणाची चिरडले जाण्याची वेदना तुम्हाला जाणवणार आहे ? काय बोलताय ?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 27/04/2014 - 17:09
संजय मला आपले उत्तर पुर्ण कळले असे मी म्हणत नाही परंतु मी समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे असे वाटते. पण माझ्या प्रश्न विचारण्याच्या शैलीची चुक माझ्या लक्षात आली त्यासाठी मी आपली माफी मागतो.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकटराजा 29/04/2014 - 17:38
सर्व सजीवांचं अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे हे वाक्य दुरूस्त करून असं म्हणू या सर्व सजीवांचं अस्तित्व प्राणवायू वर अवलंबून आहे .पण मला वाटते काही प्राणी असे आहेत ज्यांची केमिस्ट्री प्राणवायूवर आधारलेली नाही.( अनारोबिक) ते वृक्षावल्लीशी जीवनचक्रात जोडले आहेत असे कसे म्हणता येईल ?

पण सॅडीझम प्रत्येक वेळी वाईटच असते असे मत बनवने योग्य नाही ... सॅडीस्ट व्यक्तीला मसोचिस्ट पार्टनर मिळाला/ली. तर त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही .. अवांतर : सॅडीझम/मसोचिझमच्या पॉसिटिव्ह अ‍ॅन्गल कडे पाहण्याकरिता "सबमिशन ऑफ एम्मा मार्क" हा चित्रपट आवर्जुन पाहण्यासारखा आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 27/04/2014 - 15:49
सॅडीस्ट व्यक्तीला मसोचिस्ट पार्टनर मिळाला/ली. तर त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही ..
खरच माहित नाही. शुद्ध रॅशनलीस्ट अहींसावादी विचारांना परपिडानंद वाला साथीदार मानवणार नाहीच पण आत्मपिडानंद घेणाराही मानवणार नाही. सबमिसीव्ह आत्मपिडानंद वाला/ली कदाचीत एका मर्यादेपर्यंत परपिडानंद वाल्याची साथ देऊ शकत असेल पण या दोघांचेही मानसिक प्रश्न सोडवण्या पेक्षा त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही .. या वेगळ्या टोकाच्या विचारांशी सहमत होण्यापुर्वी पुन्हा विचार करण्याची गरज भासेल असे वाटते.

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा 27/04/2014 - 17:15
प्रसाद मी हा चित्रपट बघितलेला नाही व त्या संदर्भात काही वाचण्यात ही आले नाही. पण तुम्ही कृपया थोड डीटेल सांगु शकता का या विषयी आणि पॉझीटीव्ह म्हणजे कस नेमक थोड विस्तृत विवेचन केल्यास आम्हाला नविन माहीती मिळेल.

In reply to by मारवा

सदर चित्रपट क्षक्षक्ष दर्जाचा असल्याने इथे जास्त लिहिता येणार नाही ... गूगल केल्यास अवश्य सापडेल http://bit.ly/1rHMsWO

शुचि 27/04/2014 - 15:39
या सर्वांमधील विरोधाभास म्हणजे धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र आणि बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.
या वाक्याला केवळ टाळ्या!!

In reply to by शुचि

बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.
प्रश्न उपद्रवाचा आहे. जर युगुलाला आनंददायी ठरत असेल तर ते परपीडन होत नाही. त्यामुळे ती परस्पर स्विकृत आहे. इट इज नॉट सॅडिजम.
धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र
हा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे. मी त्या साधना जस्टीफाय करत नाही पण स्वतःचं शरीरापासून वेगळेपण जाणण्यासाठी त्या सांगितल्या आहेत. थोडक्यात, शरीराला झालेली वेदना `स्व' ला कळते पण त्याला बाधा येत नाही, हा त्या साधना प्रणालींचा हेतू आहे. जाणीवपूर्वक आणि हेतू समजून केलेल्या अशा साधना मॅसोजचिम नाहीत. मला वाटतं मी यावर अधिक उहापोह न करणं योग्य होईल. पण धार्मिक साधना आणि सॅडिजम यांचा वरकरणी संबंध फक्त त्या साधनांचा हेतू न समजल्यानं वाटू शकतो; वास्तविकात सॅडिजम (खरं तर मॅसोचिजम) आणि धार्मिक साधनांचा काहीही संबंध नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि 27/04/2014 - 16:16
हा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे.
ओह अन मी समजत होते गालात सळया खुपसून किंवा पाठीला हूक्स लावून टांगून घेणे याकडे लेखकाचा निर्देश होता. मला वाटले मुंबईत,ते एका पायावर उभे रहाणारे साधू अन त्यांचा सडणारा ,पहिला पाय याकडे लेखकाचा निर्देश होता.

मारवा 27/04/2014 - 17:30
संजय आणि शुचि वरील मर्यादीत जागेत जरी मी जैन धर्मातील एक उदाहरण दिलेले असले तरी जवळ जवळ प्रत्येकच धर्मात मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण केलेले आढळते. स्वपीडन करणे मग ते आत्मसंयमाच्या गोंडस नावाखाली अतिरेकी उपास करणे विवीध प्रकारची तपे (काहीतर अगदीच अतार्कीक अनावश्यक) करुन स्व शरीराला पीडा देणे त्यात गौरव मानणे. शुचि म्हणतात तसे सळया हुक्स खुपसणे, मुसलमानांमध्ये कुठल्यातरी एका दिवशी एक मिरवणुक निघते त्यात स्वतःला अक्षरशः रक्तबंबाळ करुन घेउन कुठल्यातरी शहीद (बहुदा हुसेन नक्की माहीत नाही) पवित्र व्यक्तीची आठवण त्यांनी भोगलेल्या वेदना प्रतिकात्मकतेने भोगुन केली जाते. शंकराचार्यांचे विवेक चुडामणी नावाचे ग्रंथ आहे त्यात अनेक श्लोक शरीर कीती गलिच्छ वाईट आहे हे समजावुन देण्यात च खर्ची केलेली आहेत. त्यामुळे त्याला कायम कसे कठोर वागविणे आवश्यक आहे हे सांगितलेले आहे. ख्रिस्ती धर्मात तर येशु ने तुमच्यासाठी सर्व छळ सोसला हे सतत बिंबविले जाते. नेमकी उदाहरणे आठवत नाहीत पण विवीध धर्माच्या असंख्य परंपरा स्व-शरीरा चा धिक्कार करण्यात त्याला यातना देण्यात काहीतरी श्रेष्ठ धार्मीक आहे असे मानतात. प्रत्येक धर्म हा काही ना काही प्रमाणात सॅडो-मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण करणारया परंपरा बाळगतो.

In reply to by मारवा

कारण असे प्रतिसाद मला वाचवत देखिल नाहीत. तस्मात, आय वोंट टेक द सब्जेक्ट एनी फरदर.

मारवा 27/04/2014 - 17:31
संजय आणि शुचि वरील मर्यादीत जागेत जरी मी जैन धर्मातील एक उदाहरण दिलेले असले तरी जवळ जवळ प्रत्येकच धर्मात मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण केलेले आढळते. स्वपीडन करणे मग ते आत्मसंयमाच्या गोंडस नावाखाली अतिरेकी उपास करणे विवीध प्रकारची तपे (काहीतर अगदीच अतार्कीक अनावश्यक) करुन स्व शरीराला पीडा देणे त्यात गौरव मानणे. शुचि म्हणतात तसे सळया हुक्स खुपसणे, मुसलमानांमध्ये कुठल्यातरी एका दिवशी एक मिरवणुक निघते त्यात स्वतःला अक्षरशः रक्तबंबाळ करुन घेउन कुठल्यातरी शहीद (बहुदा हुसेन नक्की माहीत नाही) पवित्र व्यक्तीची आठवण त्यांनी भोगलेल्या वेदना प्रतिकात्मकतेने भोगुन केली जाते. शंकराचार्यांचे विवेक चुडामणी नावाचे ग्रंथ आहे त्यात अनेक श्लोक शरीर कीती गलिच्छ वाईट आहे हे समजावुन देण्यात च खर्ची केलेली आहेत. त्यामुळे त्याला कायम कसे कठोर वागविणे आवश्यक आहे हे सांगितलेले आहे. ख्रिस्ती धर्मात तर येशु ने तुमच्यासाठी सर्व छळ सोसला हे सतत बिंबविले जाते. नेमकी उदाहरणे आठवत नाहीत पण विवीध धर्माच्या असंख्य परंपरा स्व-शरीरा चा धिक्कार करण्यात त्याला यातना देण्यात काहीतरी श्रेष्ठ धार्मीक आहे असे मानतात. प्रत्येक धर्म हा काही ना काही प्रमाणात सॅडो-मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण करणारया परंपरा बाळगतो.

मारवा 27/04/2014 - 17:42
तुलनेने आधुनिक काळात इंटरनेट मुळे अधिक प्रचलित झालेले परस्पर संमतीने स्वीकारलेले व समर्थक ज्याला अ‍ॅज अ लाइफ स्टाइल म्हणतात. ज्यात या आदिम प्रवृत्तींचा सेफ लिमीट्स मध्ये कुशलतेने आनंद मिळविण्यासाठी वापर करण्यात येतो. व अशा बीडीएसएम चा हेतु हा केवळ दैनंदिन लैंगिक आयुष्यातील बोअरडम ( जो हमखास प्रत्येक विवाहा त काही कालावधी नंतर येतो.) त्याला थोडा स्पाइस अप करण्यासाठी वापरला जातो. हा बीडीएसएम चा युज वरील धार्मीक उग्र वापरापेक्षा हेतु प्रक्रीया परीणाम अनेक बाबतीत भिन्न आहे. यातली गंमत अशी आहे की रीलीजीयस बीडीएसएम ला अत्यंत पवित्र गौरवाने बघितले जाते आणि या मॉक बीडीएसएम ला अतिशय काहीतरी विकृत आहे पाश्च्यात्य आहे असे बघितले जाते. मागे एकदा हा गमंत जंमत बीडीएसएम करण जोहर ने त्याच्या एका सिनेमात दाखविला होता ज्यात राणी मुखर्जी आपल्या बोअर्ड सेक्स्युअल लाइफ ला स्पाइस अप करण्यासाठी याचा अवलंब करते नाव नाय आठवत यार पण काहीतरी गंमतीदार प्रसंग होता इतक नक्क्की आठवतय.

In reply to by मारवा

सॅडिजमची किंवा मॅसोचिजमची (निरुपद्रवी असला तरी) आवश्यकता नाही. खरं तर पारस्पारिक अनुबंधात प्रणय उत्तोरत्तर खुलत जातो कारण द कपल डिवेलप्स ग्रोईंग ग्रॅटिट्यूड टोवर्डस इच अदर, असा व्यक्तिगत अनुभव आहे. धर्मातल्या सॅडिजमचं कारण साधनाप्रक्रियेचा हेतू आणि मुळात त्यातला डेलिकेटनेस न समजणं (खरं तर सो कॉल्ड धर्मगुरुंचं संपूर्ण अज्ञान) हा आहे. ज्यांना या प्रक्रियांविषयी रस आहे त्यांनी ओशोंचा The Book of Secrets हा ग्रंथ (कारण तो १२५० पानी आहे) वाचावा.

माहितगार 27/04/2014 - 18:55
(मागील भागावरून पुढे चालू आधीच्या प्रतिसादांची लांबी बरीच वाढल्याने आपण वेगळ्या धाग्यावरतर पोहोचलो नाही असे वाचकांना वाटू नये म्हणून येथून प्रतिसाद जरा खाली आणला आहे.) ऐतिहासिक काळात योध्यांनी आणि शासकांनी युद्धांच्या दरम्यान आपली जरब बसवण्यासाठी अमानुष अत्याचार केल्याच्या नोंदी पहाण्यास मिळतात, मानवी इतिहासापूर्व काळातील असंख्य प्रसंग हे विस्मरणात देखील गेले असणार तर, इतिहासातील काही स्मृती लोकांच्या मनात अजूनही जाग्याच नाही तर असे अन्याय करणार्‍या मानवी समुहांच्या वंशजांवरही अविश्वास, राग प्रसंगी बदल्याची टोकाची भावनाही आढळून येऊ शकते. योद्धे आणि राज्यकर्त्यांचे इतिहासातील काही क्रौर्य प्रसंग हे परपिडानंदाचे असू शकतात हे वास्तव जसे स्विकारले पाहीजे तसे आजच्या सारखी आधूनिक दळणवळण नसलेल्या काळात दूरच्या प्रदेशांवर सातत्याची देखरेख करणे शक्य नसे त्यामुळे एकदाचीच जरब अथवा दहशत बसवणार्‍या मार्गांवर विसंबण्या शिवाय प्रसंगी प्रत्यवायही राहत नसावा त्यामुळेही ऐतिहासिक काळातील असंख्य शीक्षांचे युद्धातील कारवायांचे स्वरूप अमानुष असे होते. त्यामुळे ऐतिहासिक काळ त्या परिपेक्षात पहाणे अधिक सुसंगत ठरू शकते

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 19:35
कायद्याचे राज्य हि संकल्पना नसलेल्या काळात निती नियमांची आखणी धर्मसंस्थांनी त्यांच्या अखत्यारीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एका स्त्रीला दगड मारण्याची मागणी झाली असता येशु ख्रिस्ताने ज्याने कधीही एकही पाप केले नाही त्यांनीच फक्त दगड मारावेत म्हटल्या नंतर एकही व्यक्ती पुढे आली नाही, काही भारतीय ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचा केलेला निषेध, वर्षाऋतूत चातुर्मासाचे पालन, किंवा बौद्ध आणि जैन धर्माने सांगितलेली अधिक कडक अहिंसा असे परपिडानंद थांबवणारे अपवाद सोडले असता; या धाग्यात म्हटल्याप्रमाणे धर्मसंस्थांनी अनेक नितींमध्ये परपिडानंदाचा आंतर्भावच केलेला आढळतोच सोबतच बर्‍याच ठिकाणी त्याचे अनफेअर, बायस्ड, अर्बीट्ररी असणे जाणवते. एक अंधश्रद्धांमुळे दुसरे पुरुषांच्या भावनांना प्राधान्य देणार्‍या, स्त्रीयांवर लादावयाच्या पिडांना धार्मीक मान्यता देऊन होणारे अप्रत्यक्ष साटेलोटे यामुळे या परपिडांनदांना वेळोवेळी चालवूनच घेतले गेले नाही तर समर्थनही केले जाते. मग जे काही इतिहास काळात झाले असेल त्याची चुक स्विकारून नैतीक जबाबदारी घेणे अद्यापतरी बहुतांश धर्मसंस्थांना झेपलेले नाही. टोकाच्या आत्मपिडनाचा समर्थन अथवा आग्रह हे दुसर्‍या अंगाने शीष्याचे धर्मसंस्थेने अथवा गुरुने केलेले सानंद परपिडन नाही किंवा कसे हे विचारणेही अनेकांच्या मनाला दुखावू शकेल त्यामुळे मी तसे विचारण्याचे टाळतो.

In reply to by माहितगार

माहितगार 27/04/2014 - 20:47
कायद्याचे राज्य, मानवाधिकार, मानसशास्त्रीय विश्लेषण आणि समुपदेशन साहाय्य इत्यादी अभिनव संकल्पनांमुळे आधूनिक काळात ऐतिहासिक काळापेक्षा परपिडानंद चे प्रकार आणि घटनांची संख्येची टक्केवारी पहावयास गेल्यास वस्तुतः निश्चित कमी भरेल. आज आपण याची अधिक चर्चा करतो कारण या विषयांबद्दल आपण अधिक जागरूक आहोत. त्याच वेळी सुसंस्कृततेस अभिप्रेत पातळीपासून बरेचसे लाबं आहोत. अजूनही डिनायल्सचे अस्तीत्व आहे. परपिडानंद टाळण्यासाठी लागणार्‍या संस्कारांपासून अद्यापही वंचितता आहे. तर काही ठिकाणी जसे की शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या नितीमुल्यांच्या ठिकाणी असो अथवा कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या अधिकार्‍यांच्या अंगी आवश्यक निती मुल्यांचे अवमुल्यन झाल्या मुळे वरचा माणूस आदर्श असेल तर बाकी सारे आदर्श वागतील ते आदर्श आधारस्तंभ ढासळले आहे याला अंशतः स्वतः समाजही जबाबदार असतोच कारण हे आदर्श आधारस्तंभ समाजानेच उपलब्ध करून द्यावयाचे असतात. इथे लहानवया पासून द्यावयाच्या सुयोग्य संस्कारांची चर्चाही अभिप्रेत आहे. खासकरून एखादे बालवयातील मूल जेव्हा एखाद्या हिंसक घटनेस पाहते अथवा अनुभवते तेव्हा त्या मुलाला बोलते करणे त्याने तो अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे समजून घेणे आणि मग एका बाजूला अयोग्य मार्गाचे त्याच्या मनात समर्थन निर्माण होत नाही आहे अथवा दुसर्‍या बाजूला त्याच्या मनात भिती दहशत अथवा नैराश्य वास करत नाही आहे हे दोन्हीही पाहणे हि पालकांची शिक्षकांची समुपदेशकांची आणि समाजाचीही आवश्यकता आहे. तुम्ही केलेल्या परपिडानंदाला तुमचे आप्तस्वकीय सुद्धा अ‍ॅप्रीसिएट करणार नाहीत हे सांगणारी वाल्याकोळ्याचा पश्चातापाने वाल्मिकी होणारी कथा समाजाला परपिडानंदापासून दूर नेण्याचे उद्दीष्ट साधण्यासाठी उजवी वाटते.

चित्रगुप्त 29/04/2014 - 11:04
परपीडनाचे बाबतीत मानवाची प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती यांचा कितपत सहभाग असावा? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. उदाहरणार्थ लहानपणी एकदा माझ्या हातात बासरी पडली. सहज फुंकून बघता निघणारा आवाज बरा वाटला, मग काहीतरी बोटांची चाळवाचाळव करू लागलो, एकदा अचानक कुठल्याश्या गाण्याचे सूर प्रकटले, मग ते मुद्दाम वाजवून बघितले, ते जमले, मग आणखी प्रयत्न केले, तर 'करता येऊ' लागले. रस वाढत गेला, आणि चांगल्यापैकी वाजवू लागलो. हेच चित्रकला, जादू, लंबक, लेखन इ.इ. चे बाबतीत घडले. अर्थात या सर्व गोष्टी समाजमान्य असल्याने उघडपणे करता येत. घरच्यांनी मनाई केली असती, तर एकतर चोरून केले असते, वा सोडून दिले असते, आणि कधीतरी अनुकूल परिस्थिती येताच ते पुन्हा उफाळून आले असते. परपीडनाचे बाबतीत असेच काही होत असेल का?

In reply to by चित्रगुप्त

परपीडनाचे बाबतीत मानवाची प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती यांचा कितपत सहभाग असावा?
If you look into the deepest, खरं तर निव्वळ जगणं हीच हिंसा आहे! आपल्या अन्नात पीकाची हिंसा आहे, श्वासात सूक्ष्म जिवाणूंची हत्या आहे आणि बोलण्यात शांततेला धक्का आहे. त्यामुळे `मिनीमम डॅमेज टू द इग्झिस्टन्स' हा जगण्याचा (सहजीवनाचा) सर्वोत्तम मार्ग समजला गेलायं. थोडक्यात `जेवढा बाहेर धक्का कमी तितकी आत अविचलता' असं सूत्र आहे. पीडन हा मात्र हेतूपुरस्सर केलेला हिंस्त्रपणा आहे. बासरी शिकणं इतरांना त्रासदायक आहे पण एकदा सुरेख वाजवता आली की त्यात स्वानंद आणि परानंद दोन्हीही आहे. सो द बेसिक प्रिंसिपल प्रिव्हेल्स, तुमच्या वादनाचा हेतू जेंव्हा स्वतःला आनंद मिळावा हा असतो आणि तुम्ही पुरेसे संवेदनाशील असता तेंव्हा प्रॅक्टीस निर्जन ठिकाणी किंवा इतरांना कमीतकमी त्रास होईल अशा पद्धतीनं करता. आणि एकदा सराईतपणे वाजवता येऊ लागलं की मग आपल्या आनंदात इतरांना सहभागी करुन घेता. पीडनाची मानसिकता नेमकी विरुद्ध आहे, त्यात संवेदनाशीलतेचा आभाव आहे. दुसर्‍याला दुखावून स्वतः सुखी होऊ अशी मानसिकता आहे. परिस्थिती जरी अनुकूल असली आणि मॅसोचिस्ट व्यक्ती मिळाली तरी अशा क्रियेतून उन्मादा व्यतिरिक्त काहीही निर्माण होत नाही.

In reply to by चित्रगुप्त

मारवा 29/04/2014 - 12:24
Most of us try to avoid inflicting pain on others. But some people seem to gain pleasure from inflicting pain or watching people suffer without feeling guilt, or remorse. New research just published in the journal Psychological Science suggests that this kind of everyday sadism is real and more common than we might think. Two studies led by psychologist Erin Buckels show that people who score high on a measure of sadism seem to derive pleasure from behaviors that hurt others, and are even willing to expend extra effort to make someone else suffer. “Some find it hard to reconcile sadism with the concept of ‘normal’ psychological functioning, but our findings show that sadistic tendencies among otherwise well-adjusted people must be acknowledged,” says Buckels, a doctoral student at the University of Manitoba who conducted her research while doing her Master’s at the University of British Columbia. She adds: “These people aren’t necessarily serial killers or sexual deviants but they gain some emotional benefit in causing or simply observing others’ suffering.”

In reply to by मारवा

मारवा 29/04/2014 - 12:38
सॅडीझम आढळतो. याचाच अर्थ असे लोक नक्कीच आपली इछा पुर्ण करण्यासाठी टपुन बसलेल्याच असतात. योग्य संधी मिळताच त्यांच्यातील या प्रवृत्ती उफाळुन येतात. आपल्या पेक्षा कमजोर सावज मिळाल्यावर हा प्रकार होतच असणार पण हे अगदी गुप्त आणि खाजगी पातळीवर होत असल्याने बाहेर येत नसावे जसे लैंगिक बाबतीत बरच काय काय घडत असत पण बाहेर कोणाला एखादा वरकरणी अगदी नॉर्मल दिसणारा माणुस त्याच्या बेडरुम मध्ये नेमक काय करतो हे माहीत पडण्याची शक्यता अगदीच कमी असते त्याप्रमाणे, हे ही माहीत पडण्याची शक्यता अर्थातच कमी असते. पण रॅगिंग ची संधी मिळताच अनुकुल वातावरण मिळताच तसेच रस्त्यावर बघा एखादा चोर पकडला गेल्यास वा एखादा कीरकोळ गुन्ह्यासाठी लोकांच्या ग्रुपच्या तावडीत सापडल्यावर त्याचे भीषण हाल करण्याच्या अनेक घटना भारतात तर फार च मोट्या प्रमाणात आढळतात या केसेस मध्ये तर ज्यांचा काहीच संबध त्या प्रकरणाशी नसतो असे ही येऊन टॉर्चर मध्ये सामील होतात. उदा. हा व्हीडीयो बघा http://www.youtube.com/watch?v=G7F0ULPh9gE

In reply to by मारवा

मारवा 29/04/2014 - 13:17
मिसळपाव वर अनेक ऑदरवाइज सभ्य सुसंस्कृत शालीन आयडी ज्यांचा पास्ट अतिशय नीट आणि क्लीन होता. ज्यांनी सहसा कधी ट्रोलींग इतर धाग्यांवर केल नव्हत ( जे रेग्युलर राडेबाज होते ते सोडुन द्या) पण असे अनेक नॉर्मल आयडी देखील जे खात्रीपुर्वक सभ्य या वर्गवारीत मोडत होते आणि मोडतात ही ते देखील जेव्हा संजय क्षीरसागरांच्या आध्यात्मिक धाग्यांवर प्रतिसाद देतांना अत्यंत सॅडीस्टीकली प्रतिसाद देत. एक प्रकारच शाब्दीक रॅगिंग सुरु होते. घेराव घालुन जाणीवपुर्वक अतिशय क्रुरतेने त्यांच्यावर हल्ला चढवुन आपल्यातील सॅडीझम चा प्रत्यय अनेक नॉर्मल आय डी नी दिलेला आहे हे आपल्या अतिशय जवळचे उदाहरण च अत्यंत बोलके आहे. आजही त्यांनी असा एखादा आध्यात्मिक विषय घेतला तर त्याची पुनरावृत्ती होइल असे म्हणण्यास वाव आहे.पण माणसामध्ये एम्पाथी हा ही एक भाग असतोच त्याचा प्रत्यय गवि नावाच्या आयडीने ( मी माणुस म्हणुन त्यांना ओळखत नाही म्हणुन आय डी म्हणतो) दिला त्यांनी प्रवाहाच्या अगदी विरोधात जाउन ही क्षीरसागरजींचा जो काय पॉइंट होता तो समजण्याचा प्रयत्न केला तशी दुर्मिळ संवेदनशीलता एम्पाथी दाखविली ( दया या अर्थाने म्हणत नाही कृपया गैरसमज नसावा) तर संजय जींच्या मिसळपाव वरील धाग्याच्या केस मध्ये आपल्याला दोन्ही बाजुंचे विलक्षण दर्शन होते. ही एक उत्कृष्ठ केस स्टडी आहे. तसेच इंटरनेट ट्रोलिंग करणारे हे सॅडीस्ट असण्यासंदर्भात मोठा विदा आपणास इंटरनेट वर च मिळेल. दुसर उदाहरण वर लेखात दिल्याप्रमाणे तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालु आहे यात बेणारे बाईंचा जो अत्यंत हिंस्त्र अशा रीतीने मानसिक छळ केला जातो वरकरणी अगदी साध्या लोकांकडुन नाटकाचे निमीत्त्त घेउन ते तर निव्वळ चकीत करणार आहे तेंडुलकरांनी मानवी मनातला जो अत्यंत सुक्ष्म पदर हिंसेचा परपीडनाचा दाखविलेला आहे त्याला तोड नाही.

चांगला लेख आणि उत्तम प्रतिसाद. सँडीझम जर मानवी प्रवृत्ती असेल तर तिला कमी करावं किंवा असूच नये असे सुचवायचं आहे का ? आणि काही वेळी मानवी मनात असलेल्या भावना उफाळून येतात तेव्हा या प्रेरणा दाबून टाकल्या पाहिजेत असे म्हणावे काय ? उदा. समजा 'अ' नावाच्या व्यक्तीने 'ब' ची फसवणूक केली आहे, अशा वेळी कोणतीही व्यवस्था जर 'अ' ला शिक्षा देऊ शकत नसेल तर ती व्यक्ती व्यक्त होऊ पाहाते अशा वेळी जर एखादा समुह जर 'अ'ला सार्वजनिक ठिकाणी फटके देत असेल (सार्वजनिक ठिकाणी फटके देणे हे चूकच) तर 'अ' ला मिळालेला आनंद मोजायचा की त्याच्यातला सँडीझमची चर्चा केली पाहिजे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शासन ही समजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून केलेली योजना आहे आणि सॅडिझम ही निव्वळ परपीडनातून आनंद मिळवण्याची वृत्ती आहे. फसवणूक करणार्‍याला शासन व्हावं असं वाटणं वेगळं आणि काहीही कारण नसतांना दुसर्‍याला पीडा देण्यातून आनंद मिळवणं वेगळं. The first is punishment & the second, sadism. अर्थात, शासन, पीडनानंदात केंव्हा बदलेल सांगता येत नाही. थोडक्यात, शासन जर झालेल्या नुकसानाच्या भरपाईपर्यंत मर्यादित असेल तर ठीक पण त्यापेक्षा जास्त होऊ लागलं तर सॅडिजम हॅज ओवर टेकन पनीशमंट!

In reply to by अनुप ढेरे

शुचि 29/04/2014 - 16:40
इस्लामी शासन काळात देण्यात येणारया अनेक प्रकारच्या शिक्षा ज्यात गुन्हेगाराला सरळ साधे मारुन टाकण्यापेक्षा हाल हाल करुन सार्वजनिक रीत्या मारणे यामध्ये तेथील लोकांची सॅडीस्टीक प्रवृत्ती दिसुन येते.
अगदी अगदी!!! मला ते sadistic न वाटता न्यायपूर्णच वाटतं.

In reply to by शुचि

शिक्षेचा हेतू गुन्हेगारात सुधारणा व्हावी असा असायला हवा म्हणून मृत्यूदंडाला विरोध आहे. गुन्हेगारच संपला तर सुधारणा कुणात होणार? म्हणजे ज्याची हत्त्या झाली त्याबद्दल काही करता येत नाही Because the person is dead. आता जे हयात आहेत त्यात तीन प्रकारचे लोक आहेत : एक, मृताशी संबंधित व्यक्ती; त्यांना हानीची भरपाई मिळून सुखानं जगता यावं हे उचित आहे. थोडक्यात, मृत व्यक्ती हयात असती तर त्यांचं जीवनमान जसं चाललं असतं तसं चालावं. (जे गुन्हेगारला फाशी दिल्यानं भावनिकदृष्ट्या साध्य झालं तरी त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचा फायदा होत नाही) दोन, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती; त्यांना दहशत बसते हे खरं असलं तरी फाशीची शिक्षा असून देखिल गुन्हे घडत आहेतच. त्यामुळे तो हेतू देखिल साधला जातो असं म्हणता येणार नाही. तीन, असंबधित लोक; त्यांना फक्त बातमी वाचायचं समाधान मिळतं. आपण जर असंबधित असू तर फाशीच्या शिक्षेनं आपल्याला आनंद होणं हे (सहज लक्षात न येणारं) सॅडिजम आहे.

In reply to by शुचि

पण त्या वस्तुस्थितीचा अनुभव आल्याशिवाय सर्वांशी नातं जुळत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो. मला आहाराविषयी वाद निर्माण करायचा नाही, फक्त हिंसेचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे. आपली सांप्रत नाती (निव्वळ) मानसिक आहेत, ती जाणीवेतून निर्माण झालेली नाहीत त्यामुळे तिसर्‍या समूहाला `असंबधित' म्हटलंय. इस्लामी पद्धतीचं वर्णन आणि हेतू मॅसोचिजम आहे आणि त्या अनुषंगानं ती पद्धत न्यायं वाटणं सॅडिजम आहे असा विचार मांडला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 30/04/2014 - 00:09
अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो.
बुद्धाबद्दल काय मत आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि 30/04/2014 - 00:34
मला तर उलटं वाटतं अतिभावनिक (= संवेदनाशील????) लोकांनाच न्याय्य कायदाव्यवस्थेचे महत्त्व कळेल. ज्यांनी विकृती अनुभवलीच नाहीये त्यांना कळणारच नाही अन ते भूतदया भूतदया करत गुन्हेगारांना पाठीशीच घालत रहाणार. . . . हां आता त्यांनी जोशींच्या टीनेजर मुलाला नग्न करुन, नायलॉनच्या दोरीने फास आवळून मारले असेल ना का, अभ्यंकरांच्या नातीला जाईला नग्न करुन घरभर फिरुन मौल्यवान वस्तू दाखवायला लावून मग मारले असेनाका पण आपले भूतदया दाखविणारे आडवे पडणारच! कारण ...... जाई परत येणार नाही, मुलगा परत येणार नाही, त्यांचे ह्युमिलिएशन मिटणार नाही पण हे बिचारे गुन्हेगार कशाला फासावर लटकवायचे? अन काय विदा आहे की फाशीमुळे गुन्हे कमी झालेले नाहीत याचा? मान्य आहे पूर्ण नामशेष झालेले नाहीत पण कशावरुन कमी झालेले नाहीत?

In reply to by शुचि

आपण काय साधण्याचा प्रयास करतोयं हा आहे. जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला. मी गुन्हेगारीची भलामण करत नाही, संवेदनाशीलता कशी वाढवता येईल याचा विचार व्हावा असा मुद्दा मांडतो. समाजाची संवेदनाशीलता वाढली की गुन्हेगारी आपोआप आवाक्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि 30/04/2014 - 00:56
जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला.
होय कळतय पण वळत नाहीये :)

In reply to by शुचि

मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." नाऊ जस्ट सी धिस थॉट, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. द वेरी फॅक्ट दॅट वी कॅन सी इज सच अ वंडरफुल फिनॉमिना. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की, वी स्टार्ट फिलींग ग्रॅटिट्यूड टोवर्ड्स अवर पार्टनर्स बॉडी. वॉट अ‍ॅन एक्स्ट्सी इट इज टू बी टुगेदर इन अ स्टार स्टडेड नाईट! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की सारी फ्रॅगरन्सेसची दुनिया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेला मार्दवानं हँडल करायला लागतो. आणि उमजतं की, इट इज अ‍ॅन इनवॅल्युएबल ट्रेजर ऑफ ब्लिस अराऊंड अस. जस्ट टू बी सायलेंट इज सच अ प्लेजर! मग सॅडिजम, मॅसोचिजम, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 01/05/2014 - 10:48
@संक्षि: प्रतिसाद आवडला, पण एवढी इंग्रजी वाक्यं कशाला हवीत त्यात? या वाक्यातून जे सांगयचंय, ते व्यक्त करू शकण्याएवढी नक्कीच संपन्न आहे मराठी भाषा. एका भाषेत दुसरी भाषा घुसडणं, हा सुद्धा त्या भाषेच्या सौंदर्याचा, संपन्नतेचा अवमान आहे, आणि एकाअर्थी हिंसकपणा देखील आहे. संपूर्ण प्रतिसाद मराठीचं मार्दव्य, पावित्र्य राखत लिहून तर बघा, या भाषेची अद्भुत किमया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटेल...

In reply to by चित्रगुप्त

व्यक्त होतांना मला भाषेचा अडसर येत नाही. पण माझ्या लेखी भाषेपेक्षा संवाद आणि त्याचा परिणाम महत्त्वाचायं. लेखवरच्या प्रतिसादांची भाषा संयुक्त आहे त्यामुळे प्रतिसाद देतांना तसं लिहीलंय. बाय द वे, तुमच्यासाठी तीच जादू, मराठीतून: मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." किती दुर्लभ विचार आहे पाहा, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. आपण पाहू शकतो हीच किती विलोभनीय गोष्ट आहे. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की आपण सखीच्या देहाप्रती कृतज्ञ होतो. चांदण्या रात्रीतला सखीसंग म्हणजे जणू स्वर्गच धरेवर उतरतो! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की इतक्या सार्‍या गंधांची, हरक्षणी चित्तप्रसन्न करणारी दुनिया, आपल्याला पूर्वीच कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेशी मार्दवानं वागायला लागतो. आणि उमजतं की, आपल्याला सतत वेढून असणारा तो रेशीमकोष आहे. नुसतं शांत बसणं ही सुद्धा काय ऐयाशी आहे! मग परपीडन, स्वपीडन, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

अगदी बरोबर. मृत्यूदंडाने अपेक्षीत हेतू साध्य होत नसेल तर निष्कारण एखाद्याचा गिनि पिग करणे कितपत योग्य आहे?

आत्मशून्य 29/04/2014 - 17:22
सेडिसम ही कोणती विशिष्ट भावना नसून( विशेषत: खोडसाळ/खोडकर पणाची ) बेसुमार इंटेसिटी आहे. कोनाला तो करायला आवडतो कोनाला सहण करायला आवडत असेल. अथवा याविरुध्द सरां प्रमाने सेडिसम बाबत दिशाभूल व तीव्र तिटकरा व्यक्त करून पुन्हा स्वत:चा सेडिजमच प्रदर्शित करायला पण मान्य मात्र न करायला आवडत असेल. मला स्वत:ला मर्यादित तीव्रतेचा सेडिस्म पसंत आहे. सर्वच बाबतीत.

Pain 02/05/2014 - 11:06
खासकरुन इंजिनीयरींग आणि मेडीकल मध्य याचे तुलनेने फ़ार जास्त प्रमाण दिसुन येते. म्हणजे जो सर्वात जास्त हुशार अभ्यासु असा एज्युकेटेड क्लास आहे त्यात सॅडीझम तर जास्त च दिसुन येतो. संस्कृतीने चढविलेली शिक्षण संस्काराची पुटे कीते तकलादु असतात ती आय आय टी च्या रॅगिंग च्या घटना बघितल्यावर कळुन येते. बर विशेष म्हणजे येथे आलेला क्लास हा जनरली सर्वच बाबतीत सहसा उच्च असतो आणि त्यातही परत शहरी भागातुन आलेल्यांकडुन ग्रामीण विद्यार्थ्यांची रॅगिंग अधिक तीव्रतेने होत असलेले हे दिसते जनरलायझेशन (सार्वत्रिकीकरण?). संस्कृतीचा, शिक्शणाचा, शहर - खेडेगावात राहण्याचा आणि ही विकृती असण्याचा परस्परांशी काहीही संबध नाही. अमेरीकन सैनिकांनी जे अफ़गाणी कैद्यांवर अत्याचार केले त्यात विशेष म्हणजे काही अमेरीकन महिला सैनिकांचा देखील समावेश होता. या अमेरीकन महीला सैनिंकांनी अतिशय भीषण अशी सॅडीस्टीक प्रवृत्ती पुरुष सहकारयांच्या बरोबरीने दाखविली विषेश म्हणाजे? स्त्रिया कधी काही गुन्हे करत नहीत का? पुन्हा तेच!
या शब्दाचा उगम मार्क्वीस द साद या १८ व्या शतकातील फ़्रेंच सरदार व लेखक याच्या नावावरुन झाला. याचा जन्म तेव्हाच्या एका प्रभावशाली उमराव कुटुंबात झाला. हा सुरुवातीपासुन इतरांना यातना देउन लैंगिक आनंद मिळविण्यात समाधान मानत असे. याला अनेकवेळा वेश्यांशी अत्यंत क्रुरतेने वागल्याच्या कारणासाठी तुरुंगात टाकण्यात आले. बॅस्टील च्या कुप्रसिद्ध तुरुंगात ही याला टाकण्यात आले होते. तेथे त्याने त्याची अनेक कुप्रसिद्ध पुस्तके लिहीली. त्यात जस्टाइन आणि १२० डेज ओफ़ सॅडोम या बहुचर्चित पुस्तकांचा समावेश आहे.

मतदार यादी घोटाळा आणि कारस्थान

मंदार कात्रे ·

आशु जोग 26/04/2014 - 12:55
हे पहा https://www.youtube.com/watch?v=n9o-yT048Lg माहितीपूर्ण आहे

आशु जोग 26/04/2014 - 12:55
हे पहा https://www.youtube.com/watch?v=n9o-yT048Lg माहितीपूर्ण आहे
केवळ महाराष्ट्रात 64 लाख मतदारांची नावे गायब . म्हणजे एकूण साडेआठ कोटी मतदारांपैकी 8% मतदारांची नावे गायब केली आहेत. यामागे फार मोठे कारस्थान असू शकते ,किंबहुना आहेच ! जरा विचार करा की संपूर्ण देशात जर आशा प्रकारे कारस्थान करून सुमारे 8 ते 10 % मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले असेल, तर सत्ताधारी कोंग्रेस पक्षाची फार मोठी खेळी यामागे आहे.

'साप्ताहिक प्याफक्त' विचार धन - १. मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ वाद

चित्रगुप्त ·

चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या लेखाबद्दल लेखकाचा टीव्र णीशेद !!! =)) टीप : छान छान चित्रे टाकून एडिट केलेल्या लेखाचा डोळ्यांनी स्वाद घेतल्यावर आम्चा प्रोटेष्ट मागे घेतला जावू शकतो.

बालगंधर्व 26/04/2014 - 13:15
खनदन मिसरा हेकाय अहे? अनि तयनचा पुन्याशे कय समबन्दह? मला सदहया चिनचवद जवल अहे. खनदन मिसराचे कहे निशने चिनच्वदला असेल, तर मे पहु शकेन. अनि अचरया पन कोन अहेत, मल सनगाअ..

In reply to by बालगंधर्व

तमुचि भशहा वचुन मिसराककानि चिनचवद महदुन पहळ कधला अहे. भशहा सुद्र्ल्यास विहिचाहर कहरुहु अहसाहा निहिरोप दिलाहा आह्हाह्हाहे. सहमहजहलह ?

शुचि 26/04/2014 - 17:36
अग्गागा बाजार बाजार उठवलाय!!! काय एकेक चौके लावलेत!!!
(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.
खी: खी: खी:
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
फुटले!!! वाचवा!!

@सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/roflmao.gif

असंका 26/04/2014 - 19:22
मी साधारणपणे आपल्या मतांशी सहमत असल्याची मखलाशी करून विचारू इच्छितो की- आपला वरील लेख हा वैयक्तिक हल्ल्याचा प्रकार समजला जाइल का? (कृपया गैरसमज करून घेउ नये. मी नवीन सदस्य आहे. मी इथल्या नियमांचा अभ्यास आधीच केलेला आहे, परंतू तरीही मला हा प्रश्न पडला आहे...)

मनीषा 26/04/2014 - 20:30
पण मी काय म्हणते ..... सदाशिव पेठ हेच पुणे आणि तेच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र स्थान आहे यात शंका घेण्यासारखे आहेच काय? व्युत्पन्न महर्षि आणि आचार्यांनी ते आधीच सिद्ध केले आहे. आपण फक्तं त्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कधी अनुभूती घेतली आहे का? तुम्ही स्वतः पुण्यात या सदाशिव पेठेत रहा मग तुम्हाला अशी शंका येणारच नाही. आणि जर तुम्ही स्वतः अनुभूती घेऊनही तुम्हाला शंका येते आहे तर तुमच्या विचारधारणेत काहीतरी चूक आहे किंवा ती दिव्य अनूभूती येण्याइतका तुमच्या बुद्धीचा आवाका नाही. तेव्हा मान्यं कराच की सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र आहे.

In reply to by आत्मशून्य

बालगंधर्व 01/05/2014 - 12:08
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.

In reply to by बालगंधर्व

चित्रगुप्त 01/05/2014 - 13:23
सदाशिव पेत बददल तुमज्या पुर्न ना झलेल्या ज्य्या अपेकशा होत्या, तया कोनट्या, हे सामगाल तर आमाली बी कलएल सदासिव पेत बद्डल.

In reply to by बालगंधर्व

आत्मशून्य 02/05/2014 - 04:12
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.
हे वाक्य विडंबन म्हणून लाइक केल्या आहे, कठीण आहे राव. एकाक्षरी प्रतिसादातुन गैरसमज होउ शकतात हे एकवेळ मान्य, पण हे म्हणजे...

सुहास.. 28/04/2014 - 13:34
ब्ब्बाब्बौ ..............!! अग्गाअयायाया !! बाप्पा रे !! अरे काय डोक हाय का हिरवागार मळा . ऐन्ह उन्हाळ्यात शब्द-पावसाळ्यानी अध्यात्म गारेगार झाल्यागत वाटलं की !! __/\__ लल्लन का भाई जल्लन !! ;)

एस 28/04/2014 - 19:03
आता घाटपांड्यांच्या ह्या प्रतिसादाचेही कुणीतरी विडंबन करा. (सध्या घाईत आहे म्हणून - आमचा खंबा वाट पाहतोय हो! ;-) )

In reply to by एस

कंजूस 01/05/2014 - 13:50
बदकांबरोबर पोहलात तर शिकाल केव्हा पाण्यात बुडायचे ,केव्हा चालायचे आणि केव्हा दहा हजार किमी दूर उडत जायचे .खरा स्माट पक्षी .

सस्नेह 01/05/2014 - 16:15
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.' a

हे वाचायचेच राहिले होते. एका महत्वाच्या विषयाला चित्रगुप्त काकांनी हात घातला आहे. सदाशिव पेठ पुणे ३० हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. काही विद्रोही हेच केंद्र डोंबिवली येथे आहे असा सुर लावताना दिसतात. पण मांजराने डोळे मिटुन दुध प्यायले तरी उजाडायचे रहात नाही.

चित्रगुप्त 03/05/2014 - 13:03
सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे -- आणि हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. ........ शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आमच्या मच्छराचार्यंनी जनसामान्यांना सहज आकलन होईल अश्या किती सोप्या भाषेत, नेमकेपणाने मांडला आहे, हे बघून कुणालाही कौतूक वाटावे. शेवटी खंडनमिश्रांना देखील हा सिद्धांत मान्य करावाच लागला, हा खंबायत-प्रभाव नसून वैश्विक सत्याचा झालेला विजय होय.

In reply to by चित्रगुप्त

सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे नाही.. नाही.. पुणे म्हणजेच सदाशिव पेठ या जगात जे काही आहे ते सदाशिव पेठेत आहेच. सदाशिव पेठेत नाही ते जगातच नाही.

चित्रगुप्त 05/05/2014 - 10:04
अहो, आम्हाला सदाशिव पेठ नेमकी कुठे आहे, हे सुद्धा ठाऊक नाही, तरीपण 'चि. वि. जोशी बनू पाहाणे' हा फार मोठा सन्मान बहाल केल्याबद्दल दिलसे शुक्रगुजार.

चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या लेखाबद्दल लेखकाचा टीव्र णीशेद !!! =)) टीप : छान छान चित्रे टाकून एडिट केलेल्या लेखाचा डोळ्यांनी स्वाद घेतल्यावर आम्चा प्रोटेष्ट मागे घेतला जावू शकतो.

बालगंधर्व 26/04/2014 - 13:15
खनदन मिसरा हेकाय अहे? अनि तयनचा पुन्याशे कय समबन्दह? मला सदहया चिनचवद जवल अहे. खनदन मिसराचे कहे निशने चिनच्वदला असेल, तर मे पहु शकेन. अनि अचरया पन कोन अहेत, मल सनगाअ..

In reply to by बालगंधर्व

तमुचि भशहा वचुन मिसराककानि चिनचवद महदुन पहळ कधला अहे. भशहा सुद्र्ल्यास विहिचाहर कहरुहु अहसाहा निहिरोप दिलाहा आह्हाह्हाहे. सहमहजहलह ?

शुचि 26/04/2014 - 17:36
अग्गागा बाजार बाजार उठवलाय!!! काय एकेक चौके लावलेत!!!
(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.
खी: खी: खी:
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
फुटले!!! वाचवा!!

@सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/roflmao.gif

असंका 26/04/2014 - 19:22
मी साधारणपणे आपल्या मतांशी सहमत असल्याची मखलाशी करून विचारू इच्छितो की- आपला वरील लेख हा वैयक्तिक हल्ल्याचा प्रकार समजला जाइल का? (कृपया गैरसमज करून घेउ नये. मी नवीन सदस्य आहे. मी इथल्या नियमांचा अभ्यास आधीच केलेला आहे, परंतू तरीही मला हा प्रश्न पडला आहे...)

मनीषा 26/04/2014 - 20:30
पण मी काय म्हणते ..... सदाशिव पेठ हेच पुणे आणि तेच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र स्थान आहे यात शंका घेण्यासारखे आहेच काय? व्युत्पन्न महर्षि आणि आचार्यांनी ते आधीच सिद्ध केले आहे. आपण फक्तं त्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कधी अनुभूती घेतली आहे का? तुम्ही स्वतः पुण्यात या सदाशिव पेठेत रहा मग तुम्हाला अशी शंका येणारच नाही. आणि जर तुम्ही स्वतः अनुभूती घेऊनही तुम्हाला शंका येते आहे तर तुमच्या विचारधारणेत काहीतरी चूक आहे किंवा ती दिव्य अनूभूती येण्याइतका तुमच्या बुद्धीचा आवाका नाही. तेव्हा मान्यं कराच की सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र आहे.

In reply to by आत्मशून्य

बालगंधर्व 01/05/2014 - 12:08
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.

In reply to by बालगंधर्व

चित्रगुप्त 01/05/2014 - 13:23
सदाशिव पेत बददल तुमज्या पुर्न ना झलेल्या ज्य्या अपेकशा होत्या, तया कोनट्या, हे सामगाल तर आमाली बी कलएल सदासिव पेत बद्डल.

In reply to by बालगंधर्व

आत्मशून्य 02/05/2014 - 04:12
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.
हे वाक्य विडंबन म्हणून लाइक केल्या आहे, कठीण आहे राव. एकाक्षरी प्रतिसादातुन गैरसमज होउ शकतात हे एकवेळ मान्य, पण हे म्हणजे...

सुहास.. 28/04/2014 - 13:34
ब्ब्बाब्बौ ..............!! अग्गाअयायाया !! बाप्पा रे !! अरे काय डोक हाय का हिरवागार मळा . ऐन्ह उन्हाळ्यात शब्द-पावसाळ्यानी अध्यात्म गारेगार झाल्यागत वाटलं की !! __/\__ लल्लन का भाई जल्लन !! ;)

एस 28/04/2014 - 19:03
आता घाटपांड्यांच्या ह्या प्रतिसादाचेही कुणीतरी विडंबन करा. (सध्या घाईत आहे म्हणून - आमचा खंबा वाट पाहतोय हो! ;-) )

In reply to by एस

कंजूस 01/05/2014 - 13:50
बदकांबरोबर पोहलात तर शिकाल केव्हा पाण्यात बुडायचे ,केव्हा चालायचे आणि केव्हा दहा हजार किमी दूर उडत जायचे .खरा स्माट पक्षी .

सस्नेह 01/05/2014 - 16:15
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.' a

हे वाचायचेच राहिले होते. एका महत्वाच्या विषयाला चित्रगुप्त काकांनी हात घातला आहे. सदाशिव पेठ पुणे ३० हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. काही विद्रोही हेच केंद्र डोंबिवली येथे आहे असा सुर लावताना दिसतात. पण मांजराने डोळे मिटुन दुध प्यायले तरी उजाडायचे रहात नाही.

चित्रगुप्त 03/05/2014 - 13:03
सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे -- आणि हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. ........ शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आमच्या मच्छराचार्यंनी जनसामान्यांना सहज आकलन होईल अश्या किती सोप्या भाषेत, नेमकेपणाने मांडला आहे, हे बघून कुणालाही कौतूक वाटावे. शेवटी खंडनमिश्रांना देखील हा सिद्धांत मान्य करावाच लागला, हा खंबायत-प्रभाव नसून वैश्विक सत्याचा झालेला विजय होय.

In reply to by चित्रगुप्त

सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे नाही.. नाही.. पुणे म्हणजेच सदाशिव पेठ या जगात जे काही आहे ते सदाशिव पेठेत आहेच. सदाशिव पेठेत नाही ते जगातच नाही.

चित्रगुप्त 05/05/2014 - 10:04
अहो, आम्हाला सदाशिव पेठ नेमकी कुठे आहे, हे सुद्धा ठाऊक नाही, तरीपण 'चि. वि. जोशी बनू पाहाणे' हा फार मोठा सन्मान बहाल केल्याबद्दल दिलसे शुक्रगुजार.
आमची प्रेरणा: 'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्या-फक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री मच्छराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री मच्छराचार्य व खंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या.

पाकिस्तानी खेळाडू आणि आयपीएल - भारतीय क्रिकेट बोर्डाचे धोरण ??

तुमचा अभिषेक ·

In reply to by जेपी

नाहीतर काय, शेवटच्या वाक्यात मोदींचे नाव घेऊनही प्रतिसाद नाही,त्यांचीही लोकप्रियता घसरावी ? माफ करा, पण निवडणूक संपताच कोण ते नेते आता पुढच्या पाच वर्षांनीच तुम्हाला ओळख दाखवू हा जनतेचा अ‍ॅटीट्यूड चांगला नव्हे.

पैसा 26/04/2014 - 11:31
ते काय असतं? कोण पाकिस्तान? आप्लयाकडे काही प्रॉब्लेम्स आहेत का? पाकिस्तानपेक्षा मोदी हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे हे माहित नाही काय? आणि हिंदी सिनेमावाल्यांसोबत एवढे योगायोग कसे आले हा मोठाच योगायोग नाही का?

In reply to by क्लिंटन

आयपीएल... जिथे करोडो रुपयांचा चुराडा होतो.. फिक्सिंग सारख्या प्रकरणात जिथे अंडरवर्ल्ड गुंतलेय.. काळा पैसा खेळवायचा जो एक अड्डा झाला आहे.. आपले माननीय राजकारणी राज्याच्या वा देशाच्या इतर प्रश्नांत लक्ष घालण्याऐवजी ज्या क्रिकेट बोर्डाचे पद भूषवण्यात धन्यता मानतात त्या खेळाची एक स्पर्धा, आयपीएल !

म्हणजे, इंडियाके पागल लोग. साला चुतिया बनानेका धंदा. आता गंमत अशी आहे, की भले भले ज्योतीषी पण नक्की कोण जिंकेल आणि किती रन्सने किंवा किती विकेटने, किंवा नक्की कोण टॉस जिंकणार्?किती रन्स बनणार? हे सांगू शकत नाहीत. पण पंटर लोक मात्र, मॅच सुरु व्हायच्या आधीच बॉल टू बॉल सगळे सांगू शकतात, असे ऐकिवात आहे. नक्की खरे की खोटे, हे तो एक दावूदच जाणे.

श्रीगुरुजी 27/04/2014 - 12:43
आय पी एल वर एक नवीन धागा सुरू करण्याचा विचार होता. पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. त्यामुळे विचार लांबणीवर टाकला.

In reply to by श्रीगुरुजी

१) पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. २) तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. जर पहिल्या कारणाने आपण हा धागा काढला नसेल तर ते चूक आहे. जर दुसर्‍या कारणाने काढला नसेल तर ओके. क्रिकेट न आवडणे आणि आयपीएलचा राग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच. आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे. त्यामुळे मूळ क्रिकेट या खेळालाच बदनाम करण्यात काही अर्थ नाही. क्रिकेट न आवडणार्‍यांनी आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतात हे बोलून क्रिकेटला टारगेट करणे चुकीचे आहे तसेच क्रिकेटप्रेमींनीही क्रिकेटच्या प्रेमाखातर आयपीएलमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करने चुकीचे आहे. असेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, देव आणि काही मंदीरांनी श्रद्धेच्या चालवल्या बाजाराबद्दल असेच म्हणता येईल. नास्तिकांनी त्याकडे बोट दाखवत देवाला टारगेट करू नये कारण कोणता देव सांगत नाही ते तसे करायला. तसेच आस्तिकांनी देखील या बाबत आपले डोळे उघडे ठेवावेत, देवाच्या नावावर जे काही चालेल त्याची निव्वळ देवावरच्या श्रद्धेपोटी पाठराखण करण्यात काहीच हशील नाही.

In reply to by जेपी

नाहीतर काय, शेवटच्या वाक्यात मोदींचे नाव घेऊनही प्रतिसाद नाही,त्यांचीही लोकप्रियता घसरावी ? माफ करा, पण निवडणूक संपताच कोण ते नेते आता पुढच्या पाच वर्षांनीच तुम्हाला ओळख दाखवू हा जनतेचा अ‍ॅटीट्यूड चांगला नव्हे.

पैसा 26/04/2014 - 11:31
ते काय असतं? कोण पाकिस्तान? आप्लयाकडे काही प्रॉब्लेम्स आहेत का? पाकिस्तानपेक्षा मोदी हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे हे माहित नाही काय? आणि हिंदी सिनेमावाल्यांसोबत एवढे योगायोग कसे आले हा मोठाच योगायोग नाही का?

In reply to by क्लिंटन

आयपीएल... जिथे करोडो रुपयांचा चुराडा होतो.. फिक्सिंग सारख्या प्रकरणात जिथे अंडरवर्ल्ड गुंतलेय.. काळा पैसा खेळवायचा जो एक अड्डा झाला आहे.. आपले माननीय राजकारणी राज्याच्या वा देशाच्या इतर प्रश्नांत लक्ष घालण्याऐवजी ज्या क्रिकेट बोर्डाचे पद भूषवण्यात धन्यता मानतात त्या खेळाची एक स्पर्धा, आयपीएल !

म्हणजे, इंडियाके पागल लोग. साला चुतिया बनानेका धंदा. आता गंमत अशी आहे, की भले भले ज्योतीषी पण नक्की कोण जिंकेल आणि किती रन्सने किंवा किती विकेटने, किंवा नक्की कोण टॉस जिंकणार्?किती रन्स बनणार? हे सांगू शकत नाहीत. पण पंटर लोक मात्र, मॅच सुरु व्हायच्या आधीच बॉल टू बॉल सगळे सांगू शकतात, असे ऐकिवात आहे. नक्की खरे की खोटे, हे तो एक दावूदच जाणे.

श्रीगुरुजी 27/04/2014 - 12:43
आय पी एल वर एक नवीन धागा सुरू करण्याचा विचार होता. पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. त्यामुळे विचार लांबणीवर टाकला.

In reply to by श्रीगुरुजी

१) पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. २) तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. जर पहिल्या कारणाने आपण हा धागा काढला नसेल तर ते चूक आहे. जर दुसर्‍या कारणाने काढला नसेल तर ओके. क्रिकेट न आवडणे आणि आयपीएलचा राग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच. आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे. त्यामुळे मूळ क्रिकेट या खेळालाच बदनाम करण्यात काही अर्थ नाही. क्रिकेट न आवडणार्‍यांनी आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतात हे बोलून क्रिकेटला टारगेट करणे चुकीचे आहे तसेच क्रिकेटप्रेमींनीही क्रिकेटच्या प्रेमाखातर आयपीएलमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करने चुकीचे आहे. असेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, देव आणि काही मंदीरांनी श्रद्धेच्या चालवल्या बाजाराबद्दल असेच म्हणता येईल. नास्तिकांनी त्याकडे बोट दाखवत देवाला टारगेट करू नये कारण कोणता देव सांगत नाही ते तसे करायला. तसेच आस्तिकांनी देखील या बाबत आपले डोळे उघडे ठेवावेत, देवाच्या नावावर जे काही चालेल त्याची निव्वळ देवावरच्या श्रद्धेपोटी पाठराखण करण्यात काहीच हशील नाही.
भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सोडलेय. अर्थात आजच्या तारखेला. कारण हि धरपकड चालूच असते. पण सध्या तरी या दोन देशांमध्ये अमन की आशा क्रिकेटच्या माध्यमातून करण्याबाबत कोणी पुढाकार घेत नाहीये. त्या अंतर्गत आपण पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जात नाही (आता तिथे कोणीच जात नाही ती गोष्ट निराळी) तसेच ते आपल्याकडे येत नाहीत. ना आपण तटस्थ ठिकाणी त्यांच्याशी खेळतो. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतो तेव्हाच काय ती लढत.

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

चित्रगुप्त ·

काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच. सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:46
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.

दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!! दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

कंजूस 26/04/2014 - 08:48
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे . एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:43
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.

भाते 26/04/2014 - 10:38
सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा. कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :) कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.

कंजूस 26/04/2014 - 11:24
एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:19
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे

काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच. सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:46
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.

दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!! दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

कंजूस 26/04/2014 - 08:48
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे . एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:43
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.

भाते 26/04/2014 - 10:38
सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा. कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :) कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.

कंजूस 26/04/2014 - 11:24
एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:19
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान.

सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय

विवेकपटाईत ·

असंका 25/04/2014 - 21:58
अप्रतिम रूपक! सत्ताधिकारी म्हणतील तो गुन्हा, आणि सत्ताधिकारी म्हणतील ती शिक्षा.....आणि तेही अपिलाशिवाय! धरला की टाकला तुरुंगात! अगदी भविष्यवेधी लेखन!! (आणि किती कमी शब्दात आणि तरीही नेटकेपणे मांडणी केली आहे. )

अगोचर 26/04/2014 - 00:41
सत्ययुगात (धर्मराज्याच्या काळात) मनातल्या विचारांनी पण पाप लागत असे आणि शिक्षा दिली जात असे, कलीयुगात फक्त कृतिमधे काही वाउगे घडले तर गुन्हा थरतो हा फरक आहे म्हणे. अजुन विचार करतो आहे. न्याय पटला नाही म्हणुन उपोषणाला बसीन म्हणतो. thinking smiley

आयुर्हित 26/04/2014 - 05:53
ही गोष्ट पानशेतच्या धरणफुटीच्या दिवशीची/वेळेची आहे. नदीजवळ पेठेत राहणारे(पुण्यातील एका दुचाकी कंपनीतील)एक कामगार ज्यांच्या घराची एक सामायिक भिंत कोसळली. बाजूला एका सोन्याचे काम/विक्री करणाऱ्याचे घर असल्याने सामायिक भिंतीत कपाटात(हंड्यात/डब्यात भरलेली)काही सोन्याची नाणी, जी आधीपासून ठेवलेली असल्याने ती सामायिक भिंत पड्ल्याने, ह्या कामगार महाशयांच्या घरात पडली. दोन तीन दिवसांनी पावसाचा जोर ओसरल्याने व पुराचे पाणी कमी झाल्याने हे कामगार महाशयांनी ती सोन्याची नाणी पहिली व दडवून ठेवली,जी मुळात कामगार महाशयांच्या मालकीची नव्हती. पण नंतर लक्षात आले जर शेजाऱ्याने आपल्या घराची झडती घेतली तर सोने सापडेल, या विचाराने रातोरात एक हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील मित्राकडे ठेवायला दिला व दुसरा हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील नातेवाईकाकडे ठेवायला दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या शेजाऱ्याने ह्या कामगार महाशयांना त्यांच्या भिंतीत ठेवलेल्या धनाबद्दल विचारले तेव्हा ह्या कामगार महाशयांनी सोने मिळाले नाही म्हणून(खोटेच)सांगितले. हा विषय येथेच मिटला. कालांतराने थोडे दिवस/महिने गेल्यानंतर ह्या कामगार महाशयांनी त्यांच्या विश्वासू मित्राकडे व नातेवाईकाकडे,त्यांनी ठेवायला दिलेल्या सोन्याची मागणी केली तर त्यांना दोघांकडून नकार मिळाला व ते धन मिळालेच नाही. (अर्थात ते मुळात त्यांचे नव्हतेच, त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ना नफा झाला ना तोटा झाला) पण पुढे काही कालांतराने दुचाकी कंपनितून हे कामगार महाशय निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीचा सारा पैसा सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाजवळ व्याजाच्या आमिषाने दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाचा मुलगा हा काही पैसे शेअर्समध्ये गुंतवू लागला. पण नेमके हर्षद मेहता साहेबांच्यावेळी घेतलेल्या शेअर्स च्या भावात एवढे नुकसान झाले की सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाने(जो कदाचित शेअर ब्रोकर ही असावा)पुलावरून वाहत्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. आता ज्याकडे पैसे ठेवले होते, तोच नाही तर पैसे कोणाकडून मागणार? अशा रीतीने कामगार महाशयांचे निवृत्तीचे सारे पैसे बुडाले!

आत्मशून्य 26/04/2014 - 05:56
त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.
त्या नाण्यावर लिहले होते का ते मेहनतीचे आहे म्हणुन ? मग ? काहीही समज मनाचे कसे करुन घ्यायचे ? यापेक्षा डोळस तर अगदी अंधश्रध्दाळु सुधा असतील.
त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.
पुन्हा तेच, नॉनसेंन्स ? चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.
आय थिंक हा परिछ्चेद विडंबंन असावे याच धाग्याच्या दुसर्‍या परिछ्चेदाचे. जर एखादी गोष्ट चोरी नाही तर त्या बद्दल शिक्षा कसली ? =)) =)) =))

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 26/04/2014 - 06:01
पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 01:39
चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुम्ही लीगल पॉईंट बद्दल बोलताय. ती ही इंडियन पिनल कोड बद्दल. मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते. म्हणून तर महाभारत घडलं. लीगली कौरव बरोबर होते. मॉरली चूक होते.

In reply to by काळा पहाड

आत्मशून्य 27/04/2014 - 01:40
अ थेफ्ट इस अ‍ॅक्ट ओफ पोसेसिंग स्मथिंग आत्मशून्य - Sat, 26/04/2014 - 00:31 पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.
हे सुधा वाचले का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 27/04/2014 - 01:42
आणी वर लिहलेले वाचले असेल. तरीही दुसर्‍याची गोष्ट घेणे आणी कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट घेणे यात फरक आहेच की ?

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 08:50
तुम्ही ते नाणे म्हणजे कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट असे मानताय. नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. भले त्या माणसाकडून ते पडलं असलं तरी. म्हणजे ती चोरीच झाली.

In reply to by काळा पहाड

यसवायजी 27/04/2014 - 12:09
नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. कुणीतरी म्हटलंय- येशी उघडा जाशी उघडा. क्या लेके आए थे? क्या लेके जाओगे? ;) काय आणलं होतं की जे तुम्ही हरवलं? आँ? त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

In reply to by यसवायजी

काळा पहाड 27/04/2014 - 16:59
त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.
जर मी ते नाणं मेहनतीनं कमावलं असेल तर ते माझं. नसेल तर ते माझं नाही ना? जर मला असं वाटलं की ते मला ते सापडलंय तर मी त्याच्या मालकाचा शोध घेवून त्याला ते परत केलं पाहिजे. मालक सापडला नाही तर मी ते सरकारात/ राज्याकडे जमा करायला हवं कारण मग त्याचा मालक राज्यकर्ता असेल. जर मी दोन्ही करत नसेन व ते ठेवून घेत असेन तर मी अशी गोष्ट करतोय जी कायदेशीर दृष्ट्या कदाचित बरोबर असेल (खरतर हे ही तितकसं बरोबर नाहीयः जर तुम्हाला खोदकाम करताना नाणी सापडली तर ती सरकारात जमा करावी लागतात), पण नैतिक्दृष्ट्या चूकच ना?

In reply to by आत्मशून्य

आनन्दा 28/04/2014 - 11:26
समजा उद्या तुम्ही रस्त्यावरुन चलले आहात. तुम्हाला एक पिशवी दिसली, ती उघडल्यावर त्यात १-१ लाखाची १० बंडले दिसली. तुम्ही ती बॅग खांद्याला लावली आणि निघाला. ही एक केस. यात तुम्ही चुकीचे वागताय हे देखील तुम्हाला माहीत नाही. (कोणि सांगितलेच नसेल कधी). हे वागणे चूक आहे, पण तुम्ही स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक आहात. तुम्ही ती बॅग बघितलीत, मनात चलबिचल झाली, तुम्ही आजूबाजूला पाहिले, कोणि बघत नाही असे बघून पटकन ती बॅग उचलली, ही दुसरी केस, यात तुम्ही जे करत आहात हे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, दुसर्‍या कोणी पाहिले तर तुम्हाला शिक्षा होईल, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, समाजाला फसवताय. तिसर्‍या केसमध्ये तुम्ही समाजाला तर फसवत आहातच, पण स्वतःला सुद्धा फसवताय, हा अधिक मोठा गुन्हा आहे.

In reply to by काळा पहाड

असंका 27/04/2014 - 11:20
स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा? १. मी कुणाचे तरी एक काम करतो. त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो. समजा आज मला एक लाख रुपये एव्हढा मोबदला मिळाला. आता ही चोरी झाली का?(गृहित धरा, की हे काम करण्यासाठी कोणताही इतर खर्च अपेक्षित नाही) २. माझ्या पुढ्च्या गल्लीत एक जण तेच काम ५० हजारात करतो. आता मी जे केले त्यात काही भाग चोरीचा झाल का? ३. आणि एक जण जाहिरात करतो, की तो तेच काम फुकट करून देइल, आता मी आणि हा वरचा (क्रमांक २) ह्यांनी चोरी केली का? ४. वरील तीनही उदाहरणांमध्ये कुणी तरी आपले ते काम करून घेतले आहे. माझ्या गिर्‍हाइकाला त्या कामासाठी १ लाख रुपये खर्च आला, दुसर्‍याला ५० हजार आणि तीसर्‍याला शून्य रुपये. मग आता दुसर्‍याच्या गिर्‍हाइकाने ५० हजाराची आणि तिसर्‍याच्या गिर्‍हाइकाने एक लाखाची चोरी केली का? (कायदा बाजूला ठेवा. नैतिक दृष्टिने (म्हणजे morally ..) चोरी कुणी आणि कशी केली?) देवाने देताना सगळे सगळ्यांना दिले हो. त्याला कशाला तुमच्या आमच्या व्यापात/ व्यापारात गुंतवता?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 12:46
Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात. त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 14:33
"Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात." उत्तरः इतर खर्च नाहित असे तर गृहित आहे. वर स्पष्ट सांगितले आहे तसे. हे एक सोपे केलेले उदाहरण आहे. "त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत." उत्तरः हे आपण का म्हणत आहात हे कळले नाही. पण अमान्य करण्यासारखे यात काहीच नाही. "थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये" उत्तरः हेही आपण का म्हणत आहात हे कळत नाहिये. मी एक उदाहरण दिले आहे. त्यात चोरी झाली कि नाही? झाली तर कशी झाली, नाही झाली तर कशी नाही झाली, याव्यतिरिक्त इतर प्रतिसाद अवांतर आहेत.

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 14:52
माझ्या या साऱ्या प्रतिसादाचे प्रयोजन आहे आपला लेख आणि आपल्या लेखातील पहिले वाक्य आहे "स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा"? हे पहिले वाक्य आपण नेमके विसरलात! गजनी च्या आमिरखान(short term memory loss होता त्याला)सारखे नका करू हो!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 23:16
(नाही. आपल्या या प्रतिसादाचे प्रयोजन आहे, चीड आणणे. आणि सुरुवातीस तरी त्यात आपण यशस्वी झाले आहात. कोणतेही कारण नसताना आपण अशा संतापजनक पद्धतीचे प्रतिसाद देत आहात. पण क्षणभर असे गृहित धरतो, की माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असून आपण प्रामाणिकपणे जे प्रतिसाद देत आहात, ते समजून घेण्यात मी कमी पडत आहे. ) तुमचे काय प्रयोजन आहे ते कळाले. त्याप्रमाणे आपली कृतीही झाली असेही पुढे आपले मत असावे, नाहीतर माझ्यावर विसरण्याचा आरोप आपण केला नसतात. पण मला ना आपल्या मूळ प्रतिसादात, ना या प्रस्तूत प्रतिसादात, आपली कृती दिसली. खर्चांचा हिशेब, ग्राहकाशी संबंध, त्याची शिकवणूक, त्याचे अज्ञान, त्याला देव समजणे, व्यवहारात पारदर्शीपणा आणणे, आणि ग्राहकाबद्दलची संवेदनशीलता यातून मालकी हक्क (पक्षी : स्वतःचं काय हे) कसा प्रस्थापित होणार? आपला वरील प्रतिसाद अवांतर होता असे मी म्हणाल्यावर जर आपले मत असेल की तसे नाही, तर तुम्ही कमीत कमी तेव्ह्ढे तरी स्पष्ट म्हणायला हवे होते. ते न म्हणता, आपण आपले प्रयोजन काय होते हे सांगता. माझा प्रश्न सरळ आहे. चोरी कुणी केली आणि कशी. ह्यावर बोला. किंवा म्हणा चोरी झालीच नाही.

In reply to by असंका

आत्मशून्य 27/04/2014 - 23:30
पण आपली शब्दयोजना बरीच विस्कळीत आहे, आयुर्हीत म्हणतात त्यानुशंगाने त्याचा सांगोपांग ठाव घेणे सुधा अपेक्षित आहे. थोडे रिफ्रेज कराल काय ?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 23:47
व्यवहारात पारदर्शिता आहे, ग्राहकाला सद्य परिस्थितीची आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दर याची कल्पना आहे, हे समजून त्याने आपल्याकडून ठरल्याप्रमाणे काम करून घेतले असेल तर ती चोरी ठरणार नाही. पण त्याला जर आज (किंवा काही वर्षांनी का असेना)असे वाटले की आपण फसलो गेलो (कारण आपण दिलेली चुकीची माहिती किंवा काम पूर्ण न होणे किंवा कामात त्रुटी आढळणे), तर ती नक्कीच चोरी ठरेल!

In reply to by आयुर्हित

असंका 28/04/2014 - 00:55
नाही साहेब. आपण ४ अटी घातल्या- १. पारदर्शीता. २. सद्य परीस्थितीची पूर्ण कल्पना ३. प्रतिस्पर्ध्यांच्या दराबद्द्ल पूर्ण कल्पना ४. ठरल्याप्रमाणे काम होणे. यातील १ आणि ४ उघडपणे साध्य आहेत. २ आणि ३ पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता येते. ती राहते. बाजूला करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे गेल्यास स्वतःच्या कृतीपेक्षा इतरांच्या कृतीवरून ( फसवले गेल्याची ग्राहकाची भावना) त्याने चोरी केली की नाही हे ठरवले जात आहे. हे कसे योग्य आहे? शिवाय हा फक्त निम्माच भाग झाला. ज्याला सेवा मिळाली, त्याबद्द्ल कसे? मूळ लेख कुणाला तरी काही तरी मिळाले त्याबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद आहे. सेवा देणार्‍यापेक्षा सेवा घेणार्‍याची भूमिका येथे लागू केली पाहिजे. आता ज्याला सेवा फुकट मिळाली, त्याला जर माहित असेल की ह्या सेवेसाठी काही लोक खर्च करत आहेत, तरीही त्याने ती फुकटात मिळते आहे म्हणून स्विकारली. मग तो चोर आहे की नाही?

In reply to by असंका

आयुर्हित 28/04/2014 - 09:15
जो फुकट घेतो तो चोर नाही, भिकारी आहे. पण कोणीही असे समजू नये, की एखादी गोष्ट त्याने फुकट मिळवली आहे. तो कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची किंमत चुकवावी लागणारच आहे. There is no free lunch in the world. उदाहरण: पुण्यातील सत्य घटना पहा. सोन्याचे नाणे असलेले हंडा/डब्बा फुकट मिळाला होता, पण त्याचा मोबदला त्याला निवृत्तीनंतर आलेले पैसे घालवून चुकता करावा लागला. एका उद्योजकाने (भले ग्राहक गेला उडत तरी चालेल पण)कोणतीही गोष्ट फुकट देवू नये, ह्या मताचा मी आहे. एक म्हण आहे: घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या? कोणीही दान देणाऱ्या माणसानेही कोणाही धडधाकट माणसाला काहीही फुकट दान करू नये. अवांतर: आजकाल लोकांना फुकट पाणी/वीज/दारू/तांदूळ/laptop घ्यायची सवय लागली आहे. एक तर त्याची किंमत ते ठेवत/करत नाहीत आणि भरपूर संसाधने वाया घालवतात आणि ह्या बदल्यात हीच लोक लाखो रुपये कमवायची संधी/साधने गमावून बसतात!

In reply to by असंका

काळा पहाड 27/04/2014 - 17:07
जर कामाचा खरा मोबदला १ लाख रुपये असेल तर मी चोरी करत नाहीय. जर खरा मोबदला ५० हजार असेल तर मी करतोय. (म्हणून तर सर्व बिल्डर चोर आहेत असं म्हणतात ते खरंच आहे). आता जर एखादा म्हणत असेल की तो काम फुकट करून देइल, तर तो असं का म्हणतोय हे पहायला नको का? बरेच लोक समाजसेवा म्हणून असं काम करतात. यात कोणी दोषी असेल का? असू ही शकेल. समाजाला (किंवा त्यातल्या एखाद्या घटकाला फुकट घेण्याची सवय लावणे ही नैतिक् दृष्ट्या चुकीची गोष्ट असूही शकेल). म्हणजे खरं तर फुकट काम करणारा दोषी असेल. जर मी हे काम माझं कर्तव्य म्हणून करत असेन (उदाहरणार्थ भूकंपात मदत) तर यात कोणीच दोषी नसेल.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 00:01
आपल्या ह्या प्रतिसादातून अनेक उप प्रश्न निर्माण होतात साहेब.- विषय कमीत कमी भरकटेल असे खालील प्रश्न विचारतो. १. माझ्या कामाचा खरा मोबदला कुणी ठरवायचा? २. तसा तर खरा मोबदला माहित नाही, पण दुसरे कोणी तरी हे काम स्वस्तात करून देत आहे, तर तो खरा मोबदला का? म्हणजे, मी चोर आहे की नाही हे दुसर्‍याच्या कृतीवरून ठरवावे लागत आहे. हे योग्य आहे का? ३.साहेब हे सोपे केलेले उदाहरण आहे. जेवढी माहिती आहे, त्यावरूनच निष्कर्ष काढायचे आहेत. फुकट काम करून देणारा का तसे देत आहे हे सोडा. तो देत आहे हे खरे. आणि समाजसेवा वगैरे काही नाही. त्याला बरे वाटते म्हणून तो करतो. असं समजा की समाजाला त्याच्या कामाचा त्रासच जास्त होतो. ( -अशी कामं असतात, उदा. वाद्न करणे वगैरे). माझा मुद्दा असा आहे साहेब, की देवाचा काही संबंध नाही इथे. हे माणसांचे जग आहे, आणि माणसांच्या परस्परसंबंधांवर इथले व्यवहार होतात. त्यात देवाला ओढणे अयोग्य आहे. नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत. दामाजीपंतांची गोष्ट आठवा. आता प्रत्येक जण दामाजीपंत होउ पाहिल तर चालेल का?

In reply to by असंका

काळा पहाड 28/04/2014 - 01:14
तुमच्या शेवटच्या पॅरेग्राफ बद्दल उत्तर सुरवातीस देतो. हे माणसांचे जग आहे हे मला मान्य आहे. पण आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल चर्चा करत आहोत. आणि तो न्याय बरोबर आहे की चुकीचा हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या वातावरणात केस चालते, त्या वातावरणावरूनच निवाडा होईल ना? माणसांच्या जगाचे नियम तिथे कसे लागू पडतील? यात देवाचा संबंधच नाही. एखाद्याची कृती धर्माप्रमाणे होती का नव्हती हे ठरवताना दैवी शक्ती "सापेक्षता" का वापरतील? आपल्या व्यवहारात आपण देवू का एखादे नाणे राज्यसरकारला परत? पण जसा प्रश्न एका विशिष्ट मर्यादित सीमेत विचारला गेलाय, तर त्याचे उत्तरही नको का त्याच मर्यादेत द्यायला? आता तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. येथे तुमच्या "नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत" या वाक्याचा उपयोग होईल. मी पाप करतोय की नाही हे सापेक्ष आहे. आणि हे ठरवणं तसं फार सोपं आहे. मला माहिती आहे की या कामाला ५० हजारच लागणार आहेत (मोबदला धरून). म्हणजे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी जर १ लाख मागितले तर मी माझ्या कामाशिवाय मी जास्त मागतोय. तुम्हाला या गोष्टीबद्द्ल कुणालाही स्पष्टीकरण करण्याची गरजच नाहिये. हा तुमचा तुमच्याबरोबरच संवाद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चोर आहात. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही नाही आहात. या जगात तरी तुम्ही गुन्हेगार नाही आहात. दुसरा स्वस्तात काम करून देत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पापाचा हिशेब त्याचा आत्मा ठरवेल. हां, तुम्ही जर स्वस्तात काम करून देताय तर त्याचे परिणाम (repercussions) असतील. म्हणजे तुमचे स्वस्तात काम करून देणे एखाद्याच्या हिताचे असेलच असे नाही. त्यामुळे ते करताना तुम्ही त्याचे वाईट परिणाम ध्यानात घेवून ते केलं असेल (उदा: एखाद्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाहेर करणे) तर तुम्हाला ते न्यायाच्या कुठल्या बाजूला आहे हे माहीत असेलच. शेवटी हे सगळं तुमच्या पुरतंच असतं. कदाचित तुमच्या आत्म्यावर त्याचे ओरखडे पडत ही असतील. म्हणून बुद्धीवादाप्रमाणे तुम्ही व्यवहारी असालही, पण नैतिक दृष्ट्या असालच असे नाही. बाकी माझा एक मित्र या सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी काय म्हणाला होता हे थोडक्यात सांगतो. तो म्हणाला, एखाद्याने एखाद्याचा खून केला तर ते पाप असेलच असं नाही. कदाचित तो एखाद्या वैश्विक न्यायाचा परिपाक असेल. आणि या कृत्याचा जाब कदाचित पुढच्या जन्मात खुन्याला द्यावाही लागेल. तशाच प्रकारे खून केला जावून.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 18:18
आपल्या दीर्घ आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या बहुतेक प्रतिसादाशी मी सहमत आहे. फक्त मी खालील पुस्ती जोडू इच्छितो- आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल बोलत आहोत. प्रश्न एका विशिष्ट मर्यादेत विचारला गेला आहे. ही मर्यादा कशी आहे पहा: तीन माणसांची समान कृती घडते. बहुतेक पृथ्वीवर. हे असे होणे अगदी सहज शक्य आहे. तिसर्‍या माणसाने जे केले ते पहिल्या दोघांपेक्षा काही वेगळे नाही. फक्त त्याने थोडी पौराणिक पार्श्वभूमी वापरून, ते नाणे त्याने उचलावे अशी देवाचीच इच्छा असल्याचा समज करून घेतला होता. मग त्यांचा निवाडा केला जातो. तोही पौराणिक पात्रांकडून. तिथे मात्र, मुळात पौराणिक पात्रे असणार्‍या या कथेत आधी सांगितलेल्या पौराणिक कथेला अगदी सपशेल खोटे पाडले आहे. ती गोष्ट खोटी पाडायला काय आधार दिला आहे? काहीच नाही. एक तर पूर्ण गोष्ट (निवाड्यापर्यंत) खोटी म्हणा. किंवा तिसर्‍या माणसाचे वर्तन नैतिक असल्याचे मान्य करा. त्या विचारी माणसाला आठवलेली कथा खोटी आणि लेखक सांगतो ती गोष्ट खरी, हे कसे? खरं तर लेखक आपले म्हणणे देवांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण "धर्मराज निवाडा करतो" असं म्हणाल्यावर जे वजन प्राप्त होते, त्यासाठी ही कथा रचली आहे. निवाड्याच्या वेळी त्या विचारी माणसावर भगवंताला आपल्या व्यापात गुंतवण्याचा अरोप करून त्याच्या कृत्याचा आधारच काढून घेतला आहे. धर्मराजाला या कथेतून काढलं ना, तर या एकूण कथेलाही तेच स्वरूप प्राप्त होइल. या कथेला आधारच रहाणार नाही. तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. ही या गोष्टीची मर्यादा आहे. गोष्ट म्हणून चांगली आहे. पण ही प्रचारकी कथा आहे.

In reply to by असंका

पोटे 29/04/2014 - 12:16
तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. अख्खा हिंदु धर्म, त्यातल्या कथा, या अशाच आहेत. लबाड लोकांनी भोळ्या लोकांची दिशाभूल होण्यासाठी लिहिलेल्या या गोष्टी आहेत. :)

In reply to by पोटे

आयुर्हित 30/04/2014 - 03:23
पूर्वग्रह चुकीचे असतील तर आपल्याला हेच वाटेल. पण हेच जर जरा मन लावून अभ्यास केला,शास्त्रीय/वेगळा दृष्टीकोन ठेवून जर या साऱ्या कथा वाचल्यात तर आपल्याला खूप मोठ्ठा खजिनाच सापडेल. इतरांना लबाड म्हणण्याआधी आपण कुठल्या कथा अभ्यासपूर्ण वाचल्यात हे जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल. स्वत:ला भोळे समजत असाल, तर इतरांना लबाड बोलायची गरज नसती पडली. या वरील कथेतील धर्मराज म्हणजे कोण हे तरी सांगता येईल का?

In reply to by असंका

आनन्दा 28/04/2014 - 11:35
माझे २ पैसे. एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणे ही देखील एक प्रकारे चोरीच ठरते. बाकी वाजवी दर कसा ठरवायचा ते सांगणे कठीन आहे, पण प्रत्येकाला कल्पना असते की आपण जो दर आकारत आहोत तो वजवी आहे की नाही ते.

आत्मशून्य 27/04/2014 - 01:46
पण काही जण मात्र २०१४ मधे पोचायला विषेश वेळ घेतलाय या एकमेव कारणाने मिपाची दिशाभुल करायचा हक्क प्राप्त झालाय या आवेषात लेखन करत आहेत त्याची मज्या वाटते.

arunjoshi123 27/04/2014 - 20:16
यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा. स्वैर अनुवाद - The Election Commission brought the Aam Aadami Party to face the electorate. People of India decided not to vote them to power for at least 100 years from now. AAP sought explanation for this. It exhorted that it is not a fraud party like BJP and Congress. It said we have just received donations (source of which is highly suspicious!!!). We do not plead guilty. We think people have voted randomly. We will complain, fast. Fasting is our style. Indian electorate replied we are wise and not unjust. (Sarcastically - This is not India.) You think you are the more educated than Modi and Rahul. You think that only you are correct whatever media may say. You surely understand what is right and what is wrong. Not only that you have acted on behalf of vested interests, you have also tried to fool voters by projecting yourself as the cleanest clan. Hence the punishment!

In reply to by आनन्दा

arunjoshi123 28/04/2014 - 14:09
विवेककाका नेहमी महाभारत, धर्मकारण, शास्त्रे इ इ विषय लिहित आहेत असे वाटते. पण त्यांना मुळात त्याच्याशी काही देणे घेणे नसते. ते सद्य राजकीय स्थिती असली रुपके देऊन सांगतात. त्यांच्या मागच्या पोस्ट्स पाहिल्या तरी हेच जाणवेल.

पोटे 28/04/2014 - 13:38
धर्मराजाला हिंदु धर्माचे ज्ञान नव्हते हेच सिद्ध होते. शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या धाग्यात दिले होते.... आचार्य म्हणतात - सर्व देवाच्या इच्छेने होते. मिश्रा म्हणाले .... कर्माचे फळ म्हणून ती घटना होते. शंकराचार्य जिंकले याचा अर्थ सर्व काही परमेशवरी इच्छा म्हनून होते. , कर्माचा संबंध नाही. म्हणजे नाणे पडण्यापासून ते उचलण्यापर्यंत सर्व भगवंती इच्छेनेच झाले. मग कर्मानुसार शिक्षा का व्हावी?

असंका 25/04/2014 - 21:58
अप्रतिम रूपक! सत्ताधिकारी म्हणतील तो गुन्हा, आणि सत्ताधिकारी म्हणतील ती शिक्षा.....आणि तेही अपिलाशिवाय! धरला की टाकला तुरुंगात! अगदी भविष्यवेधी लेखन!! (आणि किती कमी शब्दात आणि तरीही नेटकेपणे मांडणी केली आहे. )

अगोचर 26/04/2014 - 00:41
सत्ययुगात (धर्मराज्याच्या काळात) मनातल्या विचारांनी पण पाप लागत असे आणि शिक्षा दिली जात असे, कलीयुगात फक्त कृतिमधे काही वाउगे घडले तर गुन्हा थरतो हा फरक आहे म्हणे. अजुन विचार करतो आहे. न्याय पटला नाही म्हणुन उपोषणाला बसीन म्हणतो. thinking smiley

आयुर्हित 26/04/2014 - 05:53
ही गोष्ट पानशेतच्या धरणफुटीच्या दिवशीची/वेळेची आहे. नदीजवळ पेठेत राहणारे(पुण्यातील एका दुचाकी कंपनीतील)एक कामगार ज्यांच्या घराची एक सामायिक भिंत कोसळली. बाजूला एका सोन्याचे काम/विक्री करणाऱ्याचे घर असल्याने सामायिक भिंतीत कपाटात(हंड्यात/डब्यात भरलेली)काही सोन्याची नाणी, जी आधीपासून ठेवलेली असल्याने ती सामायिक भिंत पड्ल्याने, ह्या कामगार महाशयांच्या घरात पडली. दोन तीन दिवसांनी पावसाचा जोर ओसरल्याने व पुराचे पाणी कमी झाल्याने हे कामगार महाशयांनी ती सोन्याची नाणी पहिली व दडवून ठेवली,जी मुळात कामगार महाशयांच्या मालकीची नव्हती. पण नंतर लक्षात आले जर शेजाऱ्याने आपल्या घराची झडती घेतली तर सोने सापडेल, या विचाराने रातोरात एक हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील मित्राकडे ठेवायला दिला व दुसरा हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील नातेवाईकाकडे ठेवायला दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या शेजाऱ्याने ह्या कामगार महाशयांना त्यांच्या भिंतीत ठेवलेल्या धनाबद्दल विचारले तेव्हा ह्या कामगार महाशयांनी सोने मिळाले नाही म्हणून(खोटेच)सांगितले. हा विषय येथेच मिटला. कालांतराने थोडे दिवस/महिने गेल्यानंतर ह्या कामगार महाशयांनी त्यांच्या विश्वासू मित्राकडे व नातेवाईकाकडे,त्यांनी ठेवायला दिलेल्या सोन्याची मागणी केली तर त्यांना दोघांकडून नकार मिळाला व ते धन मिळालेच नाही. (अर्थात ते मुळात त्यांचे नव्हतेच, त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ना नफा झाला ना तोटा झाला) पण पुढे काही कालांतराने दुचाकी कंपनितून हे कामगार महाशय निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीचा सारा पैसा सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाजवळ व्याजाच्या आमिषाने दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाचा मुलगा हा काही पैसे शेअर्समध्ये गुंतवू लागला. पण नेमके हर्षद मेहता साहेबांच्यावेळी घेतलेल्या शेअर्स च्या भावात एवढे नुकसान झाले की सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाने(जो कदाचित शेअर ब्रोकर ही असावा)पुलावरून वाहत्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. आता ज्याकडे पैसे ठेवले होते, तोच नाही तर पैसे कोणाकडून मागणार? अशा रीतीने कामगार महाशयांचे निवृत्तीचे सारे पैसे बुडाले!

आत्मशून्य 26/04/2014 - 05:56
त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.
त्या नाण्यावर लिहले होते का ते मेहनतीचे आहे म्हणुन ? मग ? काहीही समज मनाचे कसे करुन घ्यायचे ? यापेक्षा डोळस तर अगदी अंधश्रध्दाळु सुधा असतील.
त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.
पुन्हा तेच, नॉनसेंन्स ? चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.
आय थिंक हा परिछ्चेद विडंबंन असावे याच धाग्याच्या दुसर्‍या परिछ्चेदाचे. जर एखादी गोष्ट चोरी नाही तर त्या बद्दल शिक्षा कसली ? =)) =)) =))

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 26/04/2014 - 06:01
पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 01:39
चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुम्ही लीगल पॉईंट बद्दल बोलताय. ती ही इंडियन पिनल कोड बद्दल. मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते. म्हणून तर महाभारत घडलं. लीगली कौरव बरोबर होते. मॉरली चूक होते.

In reply to by काळा पहाड

आत्मशून्य 27/04/2014 - 01:40
अ थेफ्ट इस अ‍ॅक्ट ओफ पोसेसिंग स्मथिंग आत्मशून्य - Sat, 26/04/2014 - 00:31 पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.
हे सुधा वाचले का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 27/04/2014 - 01:42
आणी वर लिहलेले वाचले असेल. तरीही दुसर्‍याची गोष्ट घेणे आणी कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट घेणे यात फरक आहेच की ?

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 08:50
तुम्ही ते नाणे म्हणजे कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट असे मानताय. नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. भले त्या माणसाकडून ते पडलं असलं तरी. म्हणजे ती चोरीच झाली.

In reply to by काळा पहाड

यसवायजी 27/04/2014 - 12:09
नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. कुणीतरी म्हटलंय- येशी उघडा जाशी उघडा. क्या लेके आए थे? क्या लेके जाओगे? ;) काय आणलं होतं की जे तुम्ही हरवलं? आँ? त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

In reply to by यसवायजी

काळा पहाड 27/04/2014 - 16:59
त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.
जर मी ते नाणं मेहनतीनं कमावलं असेल तर ते माझं. नसेल तर ते माझं नाही ना? जर मला असं वाटलं की ते मला ते सापडलंय तर मी त्याच्या मालकाचा शोध घेवून त्याला ते परत केलं पाहिजे. मालक सापडला नाही तर मी ते सरकारात/ राज्याकडे जमा करायला हवं कारण मग त्याचा मालक राज्यकर्ता असेल. जर मी दोन्ही करत नसेन व ते ठेवून घेत असेन तर मी अशी गोष्ट करतोय जी कायदेशीर दृष्ट्या कदाचित बरोबर असेल (खरतर हे ही तितकसं बरोबर नाहीयः जर तुम्हाला खोदकाम करताना नाणी सापडली तर ती सरकारात जमा करावी लागतात), पण नैतिक्दृष्ट्या चूकच ना?

In reply to by आत्मशून्य

आनन्दा 28/04/2014 - 11:26
समजा उद्या तुम्ही रस्त्यावरुन चलले आहात. तुम्हाला एक पिशवी दिसली, ती उघडल्यावर त्यात १-१ लाखाची १० बंडले दिसली. तुम्ही ती बॅग खांद्याला लावली आणि निघाला. ही एक केस. यात तुम्ही चुकीचे वागताय हे देखील तुम्हाला माहीत नाही. (कोणि सांगितलेच नसेल कधी). हे वागणे चूक आहे, पण तुम्ही स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक आहात. तुम्ही ती बॅग बघितलीत, मनात चलबिचल झाली, तुम्ही आजूबाजूला पाहिले, कोणि बघत नाही असे बघून पटकन ती बॅग उचलली, ही दुसरी केस, यात तुम्ही जे करत आहात हे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, दुसर्‍या कोणी पाहिले तर तुम्हाला शिक्षा होईल, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, समाजाला फसवताय. तिसर्‍या केसमध्ये तुम्ही समाजाला तर फसवत आहातच, पण स्वतःला सुद्धा फसवताय, हा अधिक मोठा गुन्हा आहे.

In reply to by काळा पहाड

असंका 27/04/2014 - 11:20
स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा? १. मी कुणाचे तरी एक काम करतो. त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो. समजा आज मला एक लाख रुपये एव्हढा मोबदला मिळाला. आता ही चोरी झाली का?(गृहित धरा, की हे काम करण्यासाठी कोणताही इतर खर्च अपेक्षित नाही) २. माझ्या पुढ्च्या गल्लीत एक जण तेच काम ५० हजारात करतो. आता मी जे केले त्यात काही भाग चोरीचा झाल का? ३. आणि एक जण जाहिरात करतो, की तो तेच काम फुकट करून देइल, आता मी आणि हा वरचा (क्रमांक २) ह्यांनी चोरी केली का? ४. वरील तीनही उदाहरणांमध्ये कुणी तरी आपले ते काम करून घेतले आहे. माझ्या गिर्‍हाइकाला त्या कामासाठी १ लाख रुपये खर्च आला, दुसर्‍याला ५० हजार आणि तीसर्‍याला शून्य रुपये. मग आता दुसर्‍याच्या गिर्‍हाइकाने ५० हजाराची आणि तिसर्‍याच्या गिर्‍हाइकाने एक लाखाची चोरी केली का? (कायदा बाजूला ठेवा. नैतिक दृष्टिने (म्हणजे morally ..) चोरी कुणी आणि कशी केली?) देवाने देताना सगळे सगळ्यांना दिले हो. त्याला कशाला तुमच्या आमच्या व्यापात/ व्यापारात गुंतवता?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 12:46
Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात. त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 14:33
"Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात." उत्तरः इतर खर्च नाहित असे तर गृहित आहे. वर स्पष्ट सांगितले आहे तसे. हे एक सोपे केलेले उदाहरण आहे. "त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत." उत्तरः हे आपण का म्हणत आहात हे कळले नाही. पण अमान्य करण्यासारखे यात काहीच नाही. "थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये" उत्तरः हेही आपण का म्हणत आहात हे कळत नाहिये. मी एक उदाहरण दिले आहे. त्यात चोरी झाली कि नाही? झाली तर कशी झाली, नाही झाली तर कशी नाही झाली, याव्यतिरिक्त इतर प्रतिसाद अवांतर आहेत.

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 14:52
माझ्या या साऱ्या प्रतिसादाचे प्रयोजन आहे आपला लेख आणि आपल्या लेखातील पहिले वाक्य आहे "स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा"? हे पहिले वाक्य आपण नेमके विसरलात! गजनी च्या आमिरखान(short term memory loss होता त्याला)सारखे नका करू हो!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 23:16
(नाही. आपल्या या प्रतिसादाचे प्रयोजन आहे, चीड आणणे. आणि सुरुवातीस तरी त्यात आपण यशस्वी झाले आहात. कोणतेही कारण नसताना आपण अशा संतापजनक पद्धतीचे प्रतिसाद देत आहात. पण क्षणभर असे गृहित धरतो, की माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असून आपण प्रामाणिकपणे जे प्रतिसाद देत आहात, ते समजून घेण्यात मी कमी पडत आहे. ) तुमचे काय प्रयोजन आहे ते कळाले. त्याप्रमाणे आपली कृतीही झाली असेही पुढे आपले मत असावे, नाहीतर माझ्यावर विसरण्याचा आरोप आपण केला नसतात. पण मला ना आपल्या मूळ प्रतिसादात, ना या प्रस्तूत प्रतिसादात, आपली कृती दिसली. खर्चांचा हिशेब, ग्राहकाशी संबंध, त्याची शिकवणूक, त्याचे अज्ञान, त्याला देव समजणे, व्यवहारात पारदर्शीपणा आणणे, आणि ग्राहकाबद्दलची संवेदनशीलता यातून मालकी हक्क (पक्षी : स्वतःचं काय हे) कसा प्रस्थापित होणार? आपला वरील प्रतिसाद अवांतर होता असे मी म्हणाल्यावर जर आपले मत असेल की तसे नाही, तर तुम्ही कमीत कमी तेव्ह्ढे तरी स्पष्ट म्हणायला हवे होते. ते न म्हणता, आपण आपले प्रयोजन काय होते हे सांगता. माझा प्रश्न सरळ आहे. चोरी कुणी केली आणि कशी. ह्यावर बोला. किंवा म्हणा चोरी झालीच नाही.

In reply to by असंका

आत्मशून्य 27/04/2014 - 23:30
पण आपली शब्दयोजना बरीच विस्कळीत आहे, आयुर्हीत म्हणतात त्यानुशंगाने त्याचा सांगोपांग ठाव घेणे सुधा अपेक्षित आहे. थोडे रिफ्रेज कराल काय ?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 23:47
व्यवहारात पारदर्शिता आहे, ग्राहकाला सद्य परिस्थितीची आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दर याची कल्पना आहे, हे समजून त्याने आपल्याकडून ठरल्याप्रमाणे काम करून घेतले असेल तर ती चोरी ठरणार नाही. पण त्याला जर आज (किंवा काही वर्षांनी का असेना)असे वाटले की आपण फसलो गेलो (कारण आपण दिलेली चुकीची माहिती किंवा काम पूर्ण न होणे किंवा कामात त्रुटी आढळणे), तर ती नक्कीच चोरी ठरेल!

In reply to by आयुर्हित

असंका 28/04/2014 - 00:55
नाही साहेब. आपण ४ अटी घातल्या- १. पारदर्शीता. २. सद्य परीस्थितीची पूर्ण कल्पना ३. प्रतिस्पर्ध्यांच्या दराबद्द्ल पूर्ण कल्पना ४. ठरल्याप्रमाणे काम होणे. यातील १ आणि ४ उघडपणे साध्य आहेत. २ आणि ३ पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता येते. ती राहते. बाजूला करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे गेल्यास स्वतःच्या कृतीपेक्षा इतरांच्या कृतीवरून ( फसवले गेल्याची ग्राहकाची भावना) त्याने चोरी केली की नाही हे ठरवले जात आहे. हे कसे योग्य आहे? शिवाय हा फक्त निम्माच भाग झाला. ज्याला सेवा मिळाली, त्याबद्द्ल कसे? मूळ लेख कुणाला तरी काही तरी मिळाले त्याबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद आहे. सेवा देणार्‍यापेक्षा सेवा घेणार्‍याची भूमिका येथे लागू केली पाहिजे. आता ज्याला सेवा फुकट मिळाली, त्याला जर माहित असेल की ह्या सेवेसाठी काही लोक खर्च करत आहेत, तरीही त्याने ती फुकटात मिळते आहे म्हणून स्विकारली. मग तो चोर आहे की नाही?

In reply to by असंका

आयुर्हित 28/04/2014 - 09:15
जो फुकट घेतो तो चोर नाही, भिकारी आहे. पण कोणीही असे समजू नये, की एखादी गोष्ट त्याने फुकट मिळवली आहे. तो कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची किंमत चुकवावी लागणारच आहे. There is no free lunch in the world. उदाहरण: पुण्यातील सत्य घटना पहा. सोन्याचे नाणे असलेले हंडा/डब्बा फुकट मिळाला होता, पण त्याचा मोबदला त्याला निवृत्तीनंतर आलेले पैसे घालवून चुकता करावा लागला. एका उद्योजकाने (भले ग्राहक गेला उडत तरी चालेल पण)कोणतीही गोष्ट फुकट देवू नये, ह्या मताचा मी आहे. एक म्हण आहे: घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या? कोणीही दान देणाऱ्या माणसानेही कोणाही धडधाकट माणसाला काहीही फुकट दान करू नये. अवांतर: आजकाल लोकांना फुकट पाणी/वीज/दारू/तांदूळ/laptop घ्यायची सवय लागली आहे. एक तर त्याची किंमत ते ठेवत/करत नाहीत आणि भरपूर संसाधने वाया घालवतात आणि ह्या बदल्यात हीच लोक लाखो रुपये कमवायची संधी/साधने गमावून बसतात!

In reply to by असंका

काळा पहाड 27/04/2014 - 17:07
जर कामाचा खरा मोबदला १ लाख रुपये असेल तर मी चोरी करत नाहीय. जर खरा मोबदला ५० हजार असेल तर मी करतोय. (म्हणून तर सर्व बिल्डर चोर आहेत असं म्हणतात ते खरंच आहे). आता जर एखादा म्हणत असेल की तो काम फुकट करून देइल, तर तो असं का म्हणतोय हे पहायला नको का? बरेच लोक समाजसेवा म्हणून असं काम करतात. यात कोणी दोषी असेल का? असू ही शकेल. समाजाला (किंवा त्यातल्या एखाद्या घटकाला फुकट घेण्याची सवय लावणे ही नैतिक् दृष्ट्या चुकीची गोष्ट असूही शकेल). म्हणजे खरं तर फुकट काम करणारा दोषी असेल. जर मी हे काम माझं कर्तव्य म्हणून करत असेन (उदाहरणार्थ भूकंपात मदत) तर यात कोणीच दोषी नसेल.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 00:01
आपल्या ह्या प्रतिसादातून अनेक उप प्रश्न निर्माण होतात साहेब.- विषय कमीत कमी भरकटेल असे खालील प्रश्न विचारतो. १. माझ्या कामाचा खरा मोबदला कुणी ठरवायचा? २. तसा तर खरा मोबदला माहित नाही, पण दुसरे कोणी तरी हे काम स्वस्तात करून देत आहे, तर तो खरा मोबदला का? म्हणजे, मी चोर आहे की नाही हे दुसर्‍याच्या कृतीवरून ठरवावे लागत आहे. हे योग्य आहे का? ३.साहेब हे सोपे केलेले उदाहरण आहे. जेवढी माहिती आहे, त्यावरूनच निष्कर्ष काढायचे आहेत. फुकट काम करून देणारा का तसे देत आहे हे सोडा. तो देत आहे हे खरे. आणि समाजसेवा वगैरे काही नाही. त्याला बरे वाटते म्हणून तो करतो. असं समजा की समाजाला त्याच्या कामाचा त्रासच जास्त होतो. ( -अशी कामं असतात, उदा. वाद्न करणे वगैरे). माझा मुद्दा असा आहे साहेब, की देवाचा काही संबंध नाही इथे. हे माणसांचे जग आहे, आणि माणसांच्या परस्परसंबंधांवर इथले व्यवहार होतात. त्यात देवाला ओढणे अयोग्य आहे. नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत. दामाजीपंतांची गोष्ट आठवा. आता प्रत्येक जण दामाजीपंत होउ पाहिल तर चालेल का?

In reply to by असंका

काळा पहाड 28/04/2014 - 01:14
तुमच्या शेवटच्या पॅरेग्राफ बद्दल उत्तर सुरवातीस देतो. हे माणसांचे जग आहे हे मला मान्य आहे. पण आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल चर्चा करत आहोत. आणि तो न्याय बरोबर आहे की चुकीचा हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या वातावरणात केस चालते, त्या वातावरणावरूनच निवाडा होईल ना? माणसांच्या जगाचे नियम तिथे कसे लागू पडतील? यात देवाचा संबंधच नाही. एखाद्याची कृती धर्माप्रमाणे होती का नव्हती हे ठरवताना दैवी शक्ती "सापेक्षता" का वापरतील? आपल्या व्यवहारात आपण देवू का एखादे नाणे राज्यसरकारला परत? पण जसा प्रश्न एका विशिष्ट मर्यादित सीमेत विचारला गेलाय, तर त्याचे उत्तरही नको का त्याच मर्यादेत द्यायला? आता तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. येथे तुमच्या "नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत" या वाक्याचा उपयोग होईल. मी पाप करतोय की नाही हे सापेक्ष आहे. आणि हे ठरवणं तसं फार सोपं आहे. मला माहिती आहे की या कामाला ५० हजारच लागणार आहेत (मोबदला धरून). म्हणजे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी जर १ लाख मागितले तर मी माझ्या कामाशिवाय मी जास्त मागतोय. तुम्हाला या गोष्टीबद्द्ल कुणालाही स्पष्टीकरण करण्याची गरजच नाहिये. हा तुमचा तुमच्याबरोबरच संवाद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चोर आहात. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही नाही आहात. या जगात तरी तुम्ही गुन्हेगार नाही आहात. दुसरा स्वस्तात काम करून देत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पापाचा हिशेब त्याचा आत्मा ठरवेल. हां, तुम्ही जर स्वस्तात काम करून देताय तर त्याचे परिणाम (repercussions) असतील. म्हणजे तुमचे स्वस्तात काम करून देणे एखाद्याच्या हिताचे असेलच असे नाही. त्यामुळे ते करताना तुम्ही त्याचे वाईट परिणाम ध्यानात घेवून ते केलं असेल (उदा: एखाद्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाहेर करणे) तर तुम्हाला ते न्यायाच्या कुठल्या बाजूला आहे हे माहीत असेलच. शेवटी हे सगळं तुमच्या पुरतंच असतं. कदाचित तुमच्या आत्म्यावर त्याचे ओरखडे पडत ही असतील. म्हणून बुद्धीवादाप्रमाणे तुम्ही व्यवहारी असालही, पण नैतिक दृष्ट्या असालच असे नाही. बाकी माझा एक मित्र या सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी काय म्हणाला होता हे थोडक्यात सांगतो. तो म्हणाला, एखाद्याने एखाद्याचा खून केला तर ते पाप असेलच असं नाही. कदाचित तो एखाद्या वैश्विक न्यायाचा परिपाक असेल. आणि या कृत्याचा जाब कदाचित पुढच्या जन्मात खुन्याला द्यावाही लागेल. तशाच प्रकारे खून केला जावून.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 18:18
आपल्या दीर्घ आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या बहुतेक प्रतिसादाशी मी सहमत आहे. फक्त मी खालील पुस्ती जोडू इच्छितो- आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल बोलत आहोत. प्रश्न एका विशिष्ट मर्यादेत विचारला गेला आहे. ही मर्यादा कशी आहे पहा: तीन माणसांची समान कृती घडते. बहुतेक पृथ्वीवर. हे असे होणे अगदी सहज शक्य आहे. तिसर्‍या माणसाने जे केले ते पहिल्या दोघांपेक्षा काही वेगळे नाही. फक्त त्याने थोडी पौराणिक पार्श्वभूमी वापरून, ते नाणे त्याने उचलावे अशी देवाचीच इच्छा असल्याचा समज करून घेतला होता. मग त्यांचा निवाडा केला जातो. तोही पौराणिक पात्रांकडून. तिथे मात्र, मुळात पौराणिक पात्रे असणार्‍या या कथेत आधी सांगितलेल्या पौराणिक कथेला अगदी सपशेल खोटे पाडले आहे. ती गोष्ट खोटी पाडायला काय आधार दिला आहे? काहीच नाही. एक तर पूर्ण गोष्ट (निवाड्यापर्यंत) खोटी म्हणा. किंवा तिसर्‍या माणसाचे वर्तन नैतिक असल्याचे मान्य करा. त्या विचारी माणसाला आठवलेली कथा खोटी आणि लेखक सांगतो ती गोष्ट खरी, हे कसे? खरं तर लेखक आपले म्हणणे देवांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण "धर्मराज निवाडा करतो" असं म्हणाल्यावर जे वजन प्राप्त होते, त्यासाठी ही कथा रचली आहे. निवाड्याच्या वेळी त्या विचारी माणसावर भगवंताला आपल्या व्यापात गुंतवण्याचा अरोप करून त्याच्या कृत्याचा आधारच काढून घेतला आहे. धर्मराजाला या कथेतून काढलं ना, तर या एकूण कथेलाही तेच स्वरूप प्राप्त होइल. या कथेला आधारच रहाणार नाही. तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. ही या गोष्टीची मर्यादा आहे. गोष्ट म्हणून चांगली आहे. पण ही प्रचारकी कथा आहे.

In reply to by असंका

पोटे 29/04/2014 - 12:16
तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. अख्खा हिंदु धर्म, त्यातल्या कथा, या अशाच आहेत. लबाड लोकांनी भोळ्या लोकांची दिशाभूल होण्यासाठी लिहिलेल्या या गोष्टी आहेत. :)

In reply to by पोटे

आयुर्हित 30/04/2014 - 03:23
पूर्वग्रह चुकीचे असतील तर आपल्याला हेच वाटेल. पण हेच जर जरा मन लावून अभ्यास केला,शास्त्रीय/वेगळा दृष्टीकोन ठेवून जर या साऱ्या कथा वाचल्यात तर आपल्याला खूप मोठ्ठा खजिनाच सापडेल. इतरांना लबाड म्हणण्याआधी आपण कुठल्या कथा अभ्यासपूर्ण वाचल्यात हे जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल. स्वत:ला भोळे समजत असाल, तर इतरांना लबाड बोलायची गरज नसती पडली. या वरील कथेतील धर्मराज म्हणजे कोण हे तरी सांगता येईल का?

In reply to by असंका

आनन्दा 28/04/2014 - 11:35
माझे २ पैसे. एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणे ही देखील एक प्रकारे चोरीच ठरते. बाकी वाजवी दर कसा ठरवायचा ते सांगणे कठीन आहे, पण प्रत्येकाला कल्पना असते की आपण जो दर आकारत आहोत तो वजवी आहे की नाही ते.

आत्मशून्य 27/04/2014 - 01:46
पण काही जण मात्र २०१४ मधे पोचायला विषेश वेळ घेतलाय या एकमेव कारणाने मिपाची दिशाभुल करायचा हक्क प्राप्त झालाय या आवेषात लेखन करत आहेत त्याची मज्या वाटते.

arunjoshi123 27/04/2014 - 20:16
यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा. स्वैर अनुवाद - The Election Commission brought the Aam Aadami Party to face the electorate. People of India decided not to vote them to power for at least 100 years from now. AAP sought explanation for this. It exhorted that it is not a fraud party like BJP and Congress. It said we have just received donations (source of which is highly suspicious!!!). We do not plead guilty. We think people have voted randomly. We will complain, fast. Fasting is our style. Indian electorate replied we are wise and not unjust. (Sarcastically - This is not India.) You think you are the more educated than Modi and Rahul. You think that only you are correct whatever media may say. You surely understand what is right and what is wrong. Not only that you have acted on behalf of vested interests, you have also tried to fool voters by projecting yourself as the cleanest clan. Hence the punishment!

In reply to by आनन्दा

arunjoshi123 28/04/2014 - 14:09
विवेककाका नेहमी महाभारत, धर्मकारण, शास्त्रे इ इ विषय लिहित आहेत असे वाटते. पण त्यांना मुळात त्याच्याशी काही देणे घेणे नसते. ते सद्य राजकीय स्थिती असली रुपके देऊन सांगतात. त्यांच्या मागच्या पोस्ट्स पाहिल्या तरी हेच जाणवेल.

पोटे 28/04/2014 - 13:38
धर्मराजाला हिंदु धर्माचे ज्ञान नव्हते हेच सिद्ध होते. शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या धाग्यात दिले होते.... आचार्य म्हणतात - सर्व देवाच्या इच्छेने होते. मिश्रा म्हणाले .... कर्माचे फळ म्हणून ती घटना होते. शंकराचार्य जिंकले याचा अर्थ सर्व काही परमेशवरी इच्छा म्हनून होते. , कर्माचा संबंध नाही. म्हणजे नाणे पडण्यापासून ते उचलण्यापर्यंत सर्व भगवंती इच्छेनेच झाले. मग कर्मानुसार शिक्षा का व्हावी?
लेखनविषय:
लेखनप्रकार
भल्या पाहते उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय आहे. सुवर्णाच्या कृपेने माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते. फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले.नकाही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले.

कॉकटेल लाउंज : ब्लु मंडे

सोत्रि ·

सुबोध खरे 25/04/2014 - 19:28
वा सोत्री साहेब, पाहूनच गार वाटले. विक्रांत वर आमच्या साकी (बार टेंडर) ने हे क्युरासाओ संत्र्याच्या रसाबरोबर( क्वैन्त्रो आणि व्होडका ऐवजी) अशाच ग्लासात आणून दिले होते. यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 25/04/2014 - 19:45
यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली
:) - ('डॉक्टर तुम्हीसुद्धा?' हा डायलॉक आठवलेला) सोकाजी

आत्मशून्य 26/04/2014 - 00:16
शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
अभी उन्हाळेमे तो हर सप्ताअखेर एक - दो कॉकटेल मंगता...! आजच एके ठिकाणी ब्लु ओशन म्हणून सोडायुक्त मॉकटेल पिले. त्याचा आणी या कॉकटेलचा रंग मात्र शेम टु शेम आहे. नुस्त बघत र्हावे असा. मजा आली.

क्लास् ! भूमध्य समुद्रात क्रूझ बोटीच्या डेकवर समोरच्या टेबलावर पाय टाकून आरामात रेलून एक एक सिप् घेत आहे असं चित्र डोळ्यासमोर तरळलं !

सुहास.. 28/04/2014 - 14:25
कधीच नाही ;) ( त्यो फक्त स्वतः पुरत बनवितो, हे फोटो मधील ग्लास बघुन देखील समजले नाही का तुला )

इथे आम्ही सौदी शँपेन पिवून आली रात्र साजरी करत आहोत, आणि तुम्ही मात्र असे भन्नाट आणि अचाट कॉकटेल सादर करता. असो, कॉकटेलची दखल घेतल्या गेली आहे. जाता जाता, एक सुचना कम विनंती. ह्या कॉकटेल बरोबर योग्य चखना काय?

बे-वडे 04/06/2014 - 21:40
कॉकटेल वाचुनच झिंगलो...पण या बे-वड्याची विचारणा - हे सगळं भुसावळ्च्या ( जि. जळगाव ) नजिक कुठे प्राप्त होईल ? कृपया ही सोय करुन द्यावी... पार्टी आभारी आहे !!!

क्वांत्रो आणि क्युरासाओ, ट्रिपल सेक असल्या गोष्टी कोठे मिळतात हो? आमच्या नेहेमीच्या मधुशालेत किंवा दुकानांत कधी दिसल्या नाहीत? या बाबत जरासे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल !

सुबोध खरे 25/04/2014 - 19:28
वा सोत्री साहेब, पाहूनच गार वाटले. विक्रांत वर आमच्या साकी (बार टेंडर) ने हे क्युरासाओ संत्र्याच्या रसाबरोबर( क्वैन्त्रो आणि व्होडका ऐवजी) अशाच ग्लासात आणून दिले होते. यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 25/04/2014 - 19:45
यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली
:) - ('डॉक्टर तुम्हीसुद्धा?' हा डायलॉक आठवलेला) सोकाजी

आत्मशून्य 26/04/2014 - 00:16
शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
अभी उन्हाळेमे तो हर सप्ताअखेर एक - दो कॉकटेल मंगता...! आजच एके ठिकाणी ब्लु ओशन म्हणून सोडायुक्त मॉकटेल पिले. त्याचा आणी या कॉकटेलचा रंग मात्र शेम टु शेम आहे. नुस्त बघत र्हावे असा. मजा आली.

क्लास् ! भूमध्य समुद्रात क्रूझ बोटीच्या डेकवर समोरच्या टेबलावर पाय टाकून आरामात रेलून एक एक सिप् घेत आहे असं चित्र डोळ्यासमोर तरळलं !

सुहास.. 28/04/2014 - 14:25
कधीच नाही ;) ( त्यो फक्त स्वतः पुरत बनवितो, हे फोटो मधील ग्लास बघुन देखील समजले नाही का तुला )

इथे आम्ही सौदी शँपेन पिवून आली रात्र साजरी करत आहोत, आणि तुम्ही मात्र असे भन्नाट आणि अचाट कॉकटेल सादर करता. असो, कॉकटेलची दखल घेतल्या गेली आहे. जाता जाता, एक सुचना कम विनंती. ह्या कॉकटेल बरोबर योग्य चखना काय?

बे-वडे 04/06/2014 - 21:40
कॉकटेल वाचुनच झिंगलो...पण या बे-वड्याची विचारणा - हे सगळं भुसावळ्च्या ( जि. जळगाव ) नजिक कुठे प्राप्त होईल ? कृपया ही सोय करुन द्यावी... पार्टी आभारी आहे !!!

क्वांत्रो आणि क्युरासाओ, ट्रिपल सेक असल्या गोष्टी कोठे मिळतात हो? आमच्या नेहेमीच्या मधुशालेत किंवा दुकानांत कधी दिसल्या नाहीत? या बाबत जरासे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल !
आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है| ‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु मंडेपार्श्वभूमी: ब्लु कुरासो (blue curacao, pronounced as "blue cure-a-sow") हे निळ्या रंगाचे एक मस्त ऑरेंज बेस्ड लिक्युअर आहे, माझ्या आवडीचे.

विठ्ठलराव गाडगीळ यांच्या बद्दलच्या लेखाकरीता माहिती हवी

माहितगार ·

विकास 25/04/2014 - 19:59
बॅरीस्टर विठ्ठलराव, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते. त्यांचे बोलणे (सॉर्ट ऑफ वक्तृत्व) चांगले होते तसेच मिष्कील देखील. जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन... वडील काँग्रेसमन काकासाहेब गाडगीळ. गाडगीळासंदर्भातच पण विकीसाठी योग्य नसल्याने अवांतर - आचार्य अत्र्यांच्या भाषणाची ध्वनीफीत माझ्याकडे आहे. त्यातून हा प्रसंग. थोडक्यात अत्र्यांच्या नावावर खपवले जाणार्‍यातला विनोदातला नसून, वास्तवात घडलेला प्रसंग अत्र्यांच्या साठी निमित्त पुण्यात सत्कार सोहळा होता. त्याला त्यांचे कडाक्याचे भांडण असलेले ना.सी फडके देखील व्यासपिठावर उपस्थित होते. (तो एक वेगळाच मुद्दा आहे. परत कधितरी). त्यावेळेस अत्र्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी विठ्ठलरावांवर होती. अत्रे विनोदी बोलतात, इतरांच्या (शाब्दीक) टपलीत मारतात तसाच आपण देखील अत्र्यांवर मिष्कीलपणे विनोद करावा असे विठ्ठलरावांना वाटण्याची चूकच म्हणा, झाली. :) व्यवस्थित ओळख करून दिल्यावर जाता जाता ते श्रोत्यांना उद्देशून (या अर्थाचे) म्हणाले, "अत्र्यांना आपल्या भाषणात अतिशयोक्ती करायची सवय आहे. तेंव्हा तेव्हढे लक्षात ठेवून त्यांचे भाषण ऐका." पब्लीक हसले. मग अत्रे सत्कार सोहळ्यास उत्तर देण्यास उठले आणि म्हणाले, "आत्ताच, आमची ओळख आमचे परममित्र कै. काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, (मग पॉज घेऊन, विठ्ठलरावांकडे बघत) - यात काही अतिशयोक्ती नाही ना?..." ;)

In reply to by विकास

माहितगार 25/04/2014 - 23:29
अरे वा तुम्ही दिलेला उल्लेख गूगलवर शोधला तर लोकसत्तात ग.प्र.प्रधानांनी केलेले परिक्षणही मिळाले. गाडगीळांच्या लेखनाच्या उजव्या बाजू मांडताना इंदीरा गांधींबाबत लिहीताना मात्र गाडगीळांची लेखणी अडखळत असे अशी रास्त टिकाही ग. प्र. प्रधानांनी केली आहे. संदर्भा साठी धन्यवाद.

एक अभ्यासू व इंदिरा,राजीव ह्यांच्या खास विश्वासातला एक मराठी ब्राम्हण नेता.माझ्या/ह्यांच्या आठवणीप्रमाणे ते सल्लागाराचेही काम करत.त्यांचे भाषण मात्र शुद्धलेखन घातल्यासारखे-खूप मोठे पॉझेस.

स्व नरसिंहराव पंतप्रधान असताना स्व विठ्ठलरावांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषवले होते. त्याकाळी दूरदर्शनच्या हिंदी / इंग्रजी बातम्यांमध्ये त्यांची छबी बरेचदा दिसायची.

http://www.zoominfo.com/p/V.N.-Gadgil/90764320 येथे आपल्याला स्व विठ्ठलरावांच्या कारकिर्दीविषयी मोलाची माहिती मिळेल अशी आशा आहे.

आशु जोग 26/04/2014 - 13:18
>> जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते ना ते

In reply to by आशु जोग

माहितगार 26/04/2014 - 13:41
बरे झाले आठवण केलीत, मला वाटते त्यांचे या विषयावरचे संसदेतील भाषण गाजले होते. त्यांच्या संसदीय भाषणाचे काही ऑनलाईन दुव्यांच्या उपलब्धते बाबत कुणास ठाऊक असल्यास त्या बद्दलही कल्पना द्यावी. विठ्ठलराव गाडगीळांनी केवळ संसदेतच भूमिका मांडली का संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता ? या निमीत्ताने विठ्ठलराव गाडगीळांनी काँग्रेसच्या मुख्य भूमीके पासून हटके अन्य काही भूमीका घेतल्या का ? आणीबाणी बाबत त्यांनी कधी काही जाहीर वाच्यता केली होती का ? या बाबतही कुणी माहिती देऊ शकल्यास आवडेल.

विकास 25/04/2014 - 19:59
बॅरीस्टर विठ्ठलराव, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते. त्यांचे बोलणे (सॉर्ट ऑफ वक्तृत्व) चांगले होते तसेच मिष्कील देखील. जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन... वडील काँग्रेसमन काकासाहेब गाडगीळ. गाडगीळासंदर्भातच पण विकीसाठी योग्य नसल्याने अवांतर - आचार्य अत्र्यांच्या भाषणाची ध्वनीफीत माझ्याकडे आहे. त्यातून हा प्रसंग. थोडक्यात अत्र्यांच्या नावावर खपवले जाणार्‍यातला विनोदातला नसून, वास्तवात घडलेला प्रसंग अत्र्यांच्या साठी निमित्त पुण्यात सत्कार सोहळा होता. त्याला त्यांचे कडाक्याचे भांडण असलेले ना.सी फडके देखील व्यासपिठावर उपस्थित होते. (तो एक वेगळाच मुद्दा आहे. परत कधितरी). त्यावेळेस अत्र्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी विठ्ठलरावांवर होती. अत्रे विनोदी बोलतात, इतरांच्या (शाब्दीक) टपलीत मारतात तसाच आपण देखील अत्र्यांवर मिष्कीलपणे विनोद करावा असे विठ्ठलरावांना वाटण्याची चूकच म्हणा, झाली. :) व्यवस्थित ओळख करून दिल्यावर जाता जाता ते श्रोत्यांना उद्देशून (या अर्थाचे) म्हणाले, "अत्र्यांना आपल्या भाषणात अतिशयोक्ती करायची सवय आहे. तेंव्हा तेव्हढे लक्षात ठेवून त्यांचे भाषण ऐका." पब्लीक हसले. मग अत्रे सत्कार सोहळ्यास उत्तर देण्यास उठले आणि म्हणाले, "आत्ताच, आमची ओळख आमचे परममित्र कै. काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, (मग पॉज घेऊन, विठ्ठलरावांकडे बघत) - यात काही अतिशयोक्ती नाही ना?..." ;)

In reply to by विकास

माहितगार 25/04/2014 - 23:29
अरे वा तुम्ही दिलेला उल्लेख गूगलवर शोधला तर लोकसत्तात ग.प्र.प्रधानांनी केलेले परिक्षणही मिळाले. गाडगीळांच्या लेखनाच्या उजव्या बाजू मांडताना इंदीरा गांधींबाबत लिहीताना मात्र गाडगीळांची लेखणी अडखळत असे अशी रास्त टिकाही ग. प्र. प्रधानांनी केली आहे. संदर्भा साठी धन्यवाद.

एक अभ्यासू व इंदिरा,राजीव ह्यांच्या खास विश्वासातला एक मराठी ब्राम्हण नेता.माझ्या/ह्यांच्या आठवणीप्रमाणे ते सल्लागाराचेही काम करत.त्यांचे भाषण मात्र शुद्धलेखन घातल्यासारखे-खूप मोठे पॉझेस.

स्व नरसिंहराव पंतप्रधान असताना स्व विठ्ठलरावांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषवले होते. त्याकाळी दूरदर्शनच्या हिंदी / इंग्रजी बातम्यांमध्ये त्यांची छबी बरेचदा दिसायची.

http://www.zoominfo.com/p/V.N.-Gadgil/90764320 येथे आपल्याला स्व विठ्ठलरावांच्या कारकिर्दीविषयी मोलाची माहिती मिळेल अशी आशा आहे.

आशु जोग 26/04/2014 - 13:18
>> जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते ना ते

In reply to by आशु जोग

माहितगार 26/04/2014 - 13:41
बरे झाले आठवण केलीत, मला वाटते त्यांचे या विषयावरचे संसदेतील भाषण गाजले होते. त्यांच्या संसदीय भाषणाचे काही ऑनलाईन दुव्यांच्या उपलब्धते बाबत कुणास ठाऊक असल्यास त्या बद्दलही कल्पना द्यावी. विठ्ठलराव गाडगीळांनी केवळ संसदेतच भूमिका मांडली का संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता ? या निमीत्ताने विठ्ठलराव गाडगीळांनी काँग्रेसच्या मुख्य भूमीके पासून हटके अन्य काही भूमीका घेतल्या का ? आणीबाणी बाबत त्यांनी कधी काही जाहीर वाच्यता केली होती का ? या बाबतही कुणी माहिती देऊ शकल्यास आवडेल.
विकिपिडियावर माजी खासदारांची नावे चाळताना विठ्ठल गाडगीळ यांच्या बद्दल माहितीचा अगदीच अभाव असल्याचे लक्षात आले. मराठी विकिपीडियावर "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. फेब्रुवारी ६ इ.स. २००१ रोजी त्यांचे निधन झाले." एवढीच ओळ आहे. इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या नावाचा लेखही आढळला नाही. १) जन्म २) व्यक्तीगत जीवन ३) कारकीर्द ४) लेखन आणि भाषणे या संबंधाने माहिती हवी आहे.

नेदरलँड्स - वॉलंदाम आणि झांसेस कांस

सानिकास्वप्निल ·

प्यारे१ 25/04/2014 - 17:45
पाकृ छानच! (अ र्र र्र... ) भटकंतीचा धागाय नाही का? सानिकातैचं अतिक्रमण खरंच चांगलंय. एक नंबर फोटो आणि वर्णन! सौंदर्यदृष्टी आणि कॅमेरा दोन्ही उत्तम असल्यानं पाकृ असो अथवा स्थळ, फोटो भारीच येतात ह्या काकूंचे.

आदूबाळ 25/04/2014 - 18:19
सानिकातै स्त्रूपवाफल नावाची खास डच बिस्किटं खाल्ली का? (तसंच पांचट अ‍ॅम्स्टेलपेक्षा ग्रॉल्श्च नावाची डच बीयर जास्त टेष्टी असते हे नम्र मत!)

अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन. ८ मे ला जातो आहे. त्यावेळी पुन्हा हा लेख वाचून माझे वेळापत्रक ठरवेन. धन्यवाद.

मैत्र 25/04/2014 - 22:55
नेदरलँड्सच्या वास्तव्यात इतक नितांत सुंदर जागा हुकल्याची रुखरुख वाटते आहे.. कधी परत या देशात जाण्याचा योग आला तर इथे नक्की जावं असं तुमच्या फोटो आणि रसाळ वर्णनामुळे ठाम मत झालं आहे. अवांतरः डच भाषेत v चा उच्चार f कडे झुकणारा असतो. म्हणजे जर्मन v आणि इंग्लिश v च्या काहीसा मध्ये...

खेडूत 26/04/2014 - 13:19
सुंदर! पहिला फोटू एकदम भारी. असा प्रकार अजून एकदा चेपु वर पाहिला होता- बहुधा द. अमेरिकेतला, पण हे दुर्मिळ असणार! बाकी 'खरा' युरोप वाटतो तो इकडेच. चीझ च्या पाकृ वर एक छान माहितीपट पाहिला होता. मिळाला तर इथे पेस्टवतो .

आयुर्हित 27/04/2014 - 13:54
नेहमीप्रमाणे चांगले फोटो व महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. आपल्या पहिल्या फोटोवरून लक्षात आलेले अॅमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोल चे अप्रतिम विडीओ शुटींग: airport https://www.youtube.com/watch?v=9sE4xXiWa90

In reply to by आयुर्हित

आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे. ही स्कीफॉलची छोटी झलक...  .  .  .  . आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...  ...... . विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :) (जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्‍या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) ) .

प्यारे१ 25/04/2014 - 17:45
पाकृ छानच! (अ र्र र्र... ) भटकंतीचा धागाय नाही का? सानिकातैचं अतिक्रमण खरंच चांगलंय. एक नंबर फोटो आणि वर्णन! सौंदर्यदृष्टी आणि कॅमेरा दोन्ही उत्तम असल्यानं पाकृ असो अथवा स्थळ, फोटो भारीच येतात ह्या काकूंचे.

आदूबाळ 25/04/2014 - 18:19
सानिकातै स्त्रूपवाफल नावाची खास डच बिस्किटं खाल्ली का? (तसंच पांचट अ‍ॅम्स्टेलपेक्षा ग्रॉल्श्च नावाची डच बीयर जास्त टेष्टी असते हे नम्र मत!)

अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन. ८ मे ला जातो आहे. त्यावेळी पुन्हा हा लेख वाचून माझे वेळापत्रक ठरवेन. धन्यवाद.

मैत्र 25/04/2014 - 22:55
नेदरलँड्सच्या वास्तव्यात इतक नितांत सुंदर जागा हुकल्याची रुखरुख वाटते आहे.. कधी परत या देशात जाण्याचा योग आला तर इथे नक्की जावं असं तुमच्या फोटो आणि रसाळ वर्णनामुळे ठाम मत झालं आहे. अवांतरः डच भाषेत v चा उच्चार f कडे झुकणारा असतो. म्हणजे जर्मन v आणि इंग्लिश v च्या काहीसा मध्ये...

खेडूत 26/04/2014 - 13:19
सुंदर! पहिला फोटू एकदम भारी. असा प्रकार अजून एकदा चेपु वर पाहिला होता- बहुधा द. अमेरिकेतला, पण हे दुर्मिळ असणार! बाकी 'खरा' युरोप वाटतो तो इकडेच. चीझ च्या पाकृ वर एक छान माहितीपट पाहिला होता. मिळाला तर इथे पेस्टवतो .

आयुर्हित 27/04/2014 - 13:54
नेहमीप्रमाणे चांगले फोटो व महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. आपल्या पहिल्या फोटोवरून लक्षात आलेले अॅमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोल चे अप्रतिम विडीओ शुटींग: airport https://www.youtube.com/watch?v=9sE4xXiWa90

In reply to by आयुर्हित

आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे. ही स्कीफॉलची छोटी झलक...  .  .  .  . आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...  ...... . विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :) (जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्‍या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) ) .
भाग - १ Keukenhof / क्युकेनहॉफची ट्रिप मस्तं झाली होती. रात्री मित्राच्या घरी येऊन दमलो असतानाही मस्तं गप्पा मारत बसलो त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला ही थोडा उशीर झाला :P आवरुन आम्ही प्रथम वॉलंदामला निघालो वाटेत आम्हाला एका फ्लायओव्हरवर नुकतेच उतरलेले केएलएमचे विमान रनवेवर चालताना दिसले. त्या फ्लायओव्हरवरच रनवे असल्यामुळे खालून गाड्या जात आहेत आणि वरुन विमान असे दृश्य दिसत होते.

झटपट उत्तापा.

निवेदिता-ताई ·

दिपक.कुवेत 25/04/2014 - 14:02
झटपट उत्तापाची पाकृ आवडली. आता झटपट त्याचे फोटो टाका पाहु त्याशीवाय मी झटपट प्रतीक्रिया कशी देणार???

In reply to by दिपक.कुवेत

पण कदाचित.... जितक्या झटपट उत्तप्पे केले तितक्याच किंबहूना त्याहून अधिक झटपट ते खाल्ल्या गेले असतील, त्यामुळे झटपट फोटो काढता आले नसतील.

दिपक.कुवेत 25/04/2014 - 14:02
झटपट उत्तापाची पाकृ आवडली. आता झटपट त्याचे फोटो टाका पाहु त्याशीवाय मी झटपट प्रतीक्रिया कशी देणार???

In reply to by दिपक.कुवेत

पण कदाचित.... जितक्या झटपट उत्तप्पे केले तितक्याच किंबहूना त्याहून अधिक झटपट ते खाल्ल्या गेले असतील, त्यामुळे झटपट फोटो काढता आले नसतील.
साहित्य - दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदूळाचे पिठ, एक वाटी ताक्,अर्धा टी-स्पुन बेकींग पावडर, चवीनुसार मिठ, दोन मोठे कांदे, एक-दोन टोमॅटो, तीन्-चार हिरव्या मिरच्या(अथवा आवडीनुसार कितीही),अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती - रवा, तांदूळाचे पिठ, ताक्, बेकींग पावडर, चवीनुसार मिठ हे सर्व एकत्र करुन थोडे पाणी घालून सरसरीत भिजवा, आता हे दहा मिनिटे बाजूला ठेवा, तो पर्यंत कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सर्व बारीक चिरुन ठेवा. आता आपला नॉनस्टीक तवा गरम करुन घ्या, त्याला थोडेसेच तेल लावुन त्यावर पळीने पिठ घाला व जरा जाडसरच पसरा, त्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पसरुन घाला.