Skip to main content

मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

लेखक उडन खटोला यांनी रविवार, 27/04/2014 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे?? ..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे? वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

वाचने 62150
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

जागतिकीकरणामुळे व आधुनिक विचारशैली अंगीकारल्याने असे प्रसंग दिसणे काही नवीन नाही. या प्रसंगात दाखविलेले मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही. मुंज केली अथवा नाही, हे असे ग्लोबल संस्कार होण्यावाचून राहणार थोडीच? नाही तरी आजकाल घराघरात टीवी व International Scool च्या माध्यमातून ह्या साऱ्या गोष्टी सर्वात आधी लहान मुलांपुढे येणारच की! आपल्या लहानपणी असलेले फिल्म्स ला U/A certificate देणारे censorship टीवी व प्रिंट मेडीयाला का लागू नाही? हाही प्रश्न उरतोच. मुलांची विचारशक्ती दृढ करण्यासाठी जे काही महत्त्वाचे संस्कार करायचे आहेत त्याची मात्र कधीही उणीव होऊ देवू नये, हीच विनंती.

मला नक्की तुमचा मुद्दा कळला नाही. तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे?
  1. मुंज करणे
  2. दारु पिणे
  3. पबमध्ये जाणे
  4. आयटम साँग्ज ब्यांडवर वाजवायला सांगणे
  5. त्या गाण्यांवर वरातीत नाचणे
  6. वरातीत घरच्या बायांनी नाचणे
  7. वरच्या गोष्टी मराठी ब्राह्मण कुटुंबात घडणं
च्यायला! एकतर रविवार, त्यात बारा वाजलेले...माझा बहुतेक मराठी कुटुंबातला सरदार झालाय.

In reply to by धमाल मुलगा

हैय्या.. त्यांचा विरोध 'चहा पिणे' किंवा 'दही खाणे' याबद्दल नसुन,चहात दही मिसळून खाण्याबद्दल आहे (असे वाटते).

ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? हे सर्व आणि गायत्री मंत्र एकत्र राहू शकत नाहीत काय? त्यांनी तसे एकत्र राहू नये काय? 'गायत्रीमंत्र' या शब्दाची निव्वळ माहिती असण्यासाठी उपरोल्लेखित गोष्टीं न करणे ही प्री-कंडिशन आहे काय? केव्हापासून? ती तशी असावी काय?

काका, पुण्यातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर बसून कपाळावर आठ्या पाडून शिरा ताणत करायचा कर्कश काथ्याकूट इथे कशाला टाकताय? आणि सारखी 'ब्राह्मण'त्वाची टिमकी वाजवायचं कारण काय? मराठी ब्राह्मण म्हणून जन्मले म्हणजे कोणी आकाशातून पडले नाहीत आणि संस्कृतीरक्षण करण्याचा ठेकाही घेऊन आलेले नाहीत. त्यांना स्वतःच्या पैशाने तंगड्या चावायच्यायत आणि बियर रिचवायची आहे तर तुमचं काय गेलं? तुम्ही आपले वरण-भात-लोणचं-रायतं-खीर ओरपत परंपरा सांभाळा की! तुमच्या तर घशात नाही कोणी बियर ओतायला आलं. उगाच आम्ही म्हणजे 'इतरांपेक्षा' कोणीतरी वेगळे आहोत म्हणून अहंभाव बाळगत फिरायचं आणि 'आपल्यातलेच' काही लोक आता 'इतरांसारखे वशाट खायला लागून' धर्म बुडवताहेत अशा अभिनिवेशात धागे पाडण्याचं हसू आलं. आणि मुंजीचा आणि ३१ डिसेंबरचा, ग्रिलचा, माशांचा कशाचाच संबध काय? नक्की काय म्हणायचंय? तुमच्याकडे काय ३१ डिसेंबर साबुदाण्याची खिचडी खाऊन आणि पियुष पिऊन साजरा करतात का? असतीलही. म्हणून इतरांनी काय करायचं हे सांगणारे आपण कोण? मासे खाल्ले तर गायत्री मंत्राची पावर कमी होते का? का ब्रह्मतेजाला ग्रहण लागतं? जरा त्या बंगाली ब्राह्मणांना विचारून बघू या. आणि ३/४ प्यांटमध्य काय वाईट आहे? ३/४ घालून संस्कॄती बुडते आणि आणि धोतर नेसून वर येते काय? च्यायला त्या झिरझिरीत धोतर वापरणार्‍या आजोबा लोकांचे आतले लंगोट सुद्धा दिसत असत (घातले असल्यास) आणि नऊवारी साडीबद्दल काय बोलावं! साडी नेसायची इतकी विशोभित पद्धत अक्ख्या हिंदुस्थानात नाही. काय तर दोन पायांमधून तो पिळा मागे घेऊन मागच्या मागे 'खुपसायचा', आणि एवढे नऊ वार वापरून पोटर्‍या उघड्या पडायच्या त्या पडायच्याच. गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे! पण नऊवारी पारंपारिक म्हणून चांगली, आणि चांगल्या अंग झाकणार्‍या फॉर्मल ट्राऊझर्स मात्र वाईट होय? का बुवा?

In reply to by चिन्मय खंडागळे

गुजराती लोकांमध्ये तर आपल्या या नऊवारी प्रकरणाबद्दल 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' अशी कायशीशी म्हण सुद्धा प्रचलित होती म्हणे!
नऊ वार साडी नेसण्याचे ३-४ प्रकार आहेत. त्यात ब्राह्मणी, लावणी या २ महत्त्वाच्या. ब्राह्मणी प्रकारात पाय ऊघडे पडत नाहीत. झैरात -- माझी बायको सगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवते. गेल्या ५ वर्षात तिने अंदाजे ४०० साडया शिवल्या आहेत. अमेरीकेपासुन ऑस्ट्रेलिया पर्यंत साडया गेल्या आहेत.

In reply to by चैदजा

+++++++++++++++++ ११ फक्त योग्य पद्धतीने साडी नेसता आली पाहिजे . बाकी सहावार साडीमध्ये देखील अंगप्रदर्शन होतेच . असो .

In reply to by चिन्मय खंडागळे

नऊ वार साडी अने तंगडी उघडी ही म्हण "किती केले साडे तरी भागाबाईचे कुले उघडे' अशा प्रकारची असावी. नऊवार साडी जनरलाईझ करण्यासाठी नसावी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नऊ वार साडीला 'एव्हढे मोठे वस्त्र नेटकेपणाने नेसण्याचे, जगातील एकमेव 'कॉश्च्युम' म्हणून वाखाणले गेले आहे.

माज असल्याची लक्षणे, दुसरे काय ?
मुंज हे कारण मात्र निमित्तमात्र आहे व त्या कारणाने एक Global family Get together होत आहे, यात काही वावगे आहे असे वाटत नाही.
मग करता कशाला मुंज ? येव्हढीच हौस आहे, तर त्याऐवजी आपण लहान मुलांचे ऊष्टावण करतो तसे मुलगा १०-१२ वर्षाचा झाल्यावर बियरावण करावे.

मुंज हा आता कालबाह्य संस्कार आहे. तरीपण लोक ट्रॆडिशन जपण्याचा प्रयत्न करतात त्यात त्यांना मजा येते. एन्जॊय करतात. एक पारंपारिक सोहळा 'शास्त्रा'पुरता साजरा करतात. काही दिवसांनी संध्येच्या वेळी आचमने बिअर नी पण होतील. आता शेंडी ठेवणारे , जानवं घालणारे, संध्या करणारे किती ब्राह्मण राहिलेत?

In reply to by प्रकाश घाटपांडे

हेच लिहायला आले होते. आता ३ साडेतीन वर्षाच्या मुला-मुलींना शिकवायला सुरुवात करतात आणि गुरूच्या घरी तर कोणीच रहायला जात नाहीत. त्या काळात मुलं गुरूच्या घरी रहायला जायची, त्यांना १२ वर्षे कष्टात काढावी लागतील म्हणून पक्वान्ने वगैरे करून घालत. आता त्यापैकी काहीच शिल्लक राहिले नाही. या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही. राहिली गोष्ट दारू पिणे आणि नाचणे. त्यासाठी मुंजीचाच मुहूर्त कशाला? कधीही करता येईल की! छापा पत्रिका आणि वाटा. "अमूक दिवशी, अमूक ठिकाणी दारू पिऊन नाचण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सहकुटुंब सहपरिवार येण्याचे करावे." हाकानाका!

In reply to by पैसा

लहानपणचे अनिर्बंध वर्तन सोडूनशील, दृढनिश्रय व शिस्त अंगी बाणून ज्ञान संपादन करणे, ब्रम्हचर्याचे काटेकोर पालन करणे हा व्रतबंध संस्काराचा प्रमुख हेतू आहे. यज्ञोपवीत धारण करण्याने वरील नियमांची आठवण सतत जागृत राहते. हा संस्कार मुलगा आठ वर्षाचा असतांना करणे चांगले. उपनयन संस्कारात अनेक उपविधी खालीलप्रमाणे असतात. 1 चौलकर्म - क्षौर करणे 2 वस्त्रधारण -नेसायचा पंचा मानेशी गाठ मारुन नेसावा व अंगावर पांघरायचा पंचा दोन्ही खांदयावरुन घ्यावा. 3 अजिनधारण -बसण्यासाठी लोकरीचे आसनघेणे. 4 यज्ञोपवीत धारण - यज्ञोपवीत म्हणजे जानवे. जानवे तीन पदरी असते. तीन पदरावरती तीनवेद व ब्रम्हगाठीवर अथर्व वेदाची स्थापना केली जाते. जानवे गळयात घालण्यापूर्वी सूर्याला दाखवावे. नंतर उजवा हात वर करून प्रथम हातात व नंतर गळयात घालावे. 5 आचमनविधी - संध्याकर्मविधी 6 प्रधनाज्य होम 7 अवक्षारणविधी - सूर्यदेवाची कृपा व्हावी म्हणून अवक्षारण विधी केला जातो. 8 विभूतिग्रहण 9 गायञीउपदेश 10 मेखलाधारण 11 दंडधारण– पळसाचा दंड (बटूच्या मस्तकाइतकीउंचीचीकाठी) 12 आचारबोध 13 अनुप्रवचनीयहोम. 14 मेधाजनन : हा विधी स्मरण, ग्रहण व धारण वाढविण्यासाठी केला जातो. 15 भिक्षाग्रहण - ओमभवतिभिक्षांदेही ! चातुर्वेदान षटशात्राणि अष्टादश पुराणनि पठीता भवामि || आई, मला भिक्षा दे मी चार वेद सहाशास्त्रे, अठरा पुराणे यांचे अध्ययन करणार आहे. असे म्हणून भिक्षा मागावी. 16 भोजनविधी - मौजीबंधन झालेल्या भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी करण्यास येणारा विधी पात्रा भोवती पाणी फिरवावे. पात्राच्या उजव्या बाजूस खालून वरच्या दिशेस भाताच्या छोटया पाच आहुती दयाव्यात. आहुत्या देताना चित्राय स्वाहा| चित्रगुप्ताय स्वाहा | यमाय स्वाहा | यामधार्मय स्वाहा | सर्वेभ्योभूतेभ्याःस्वाहा | हे पाच मंत्र म्हणावेत. नंतर उजव्या हाताने आहुत्या वरून खाली गोळा कराव्यात. डाव्या हाताने हातावर थोडे पाणी घालून हात धुतल्यासारखा करावा. पात्रावर डाव्या हातावर उजवा हात पालथा धरून अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिना देहामाश्रितः | प्राणापान सामायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम || हा श्लोक म्हणावा. नंतर "अमृतोपास्तानमासि" हा मंत्र म्हणत आचमन घ्यावे. नंतर प्राणाय स्वाहा | अपानाय स्वाहा | व्यानाय स्वाहा | उदानाय स्वाहा | समानाय स्वाहा | ब्राम्हणे स्वाहा | ह्या मंत्रांनी भाताच्या सहा प्राणायुती मुखात घ्याव्यात. डाव्या हाताच्या बोटाने थोडे पाणी डोळ्याला लावावे. नंतर भोजनास सुरुवात करावी. भोजन झाल्यावर डाव्या हाताने एक पळी पाणी उजव्या हातात घेऊन "अमृतोपास्तानमासि" | असे म्हणून आपोष्णी घ्यावी. समावर्तन : सोडमुंज: ब्राम्हच्र्याश्रामातून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी समावर्तन-सोडमुंज संस्कार करण्यात येतो हल्ली मुंजीनंतर लगेच सोडमुंज करण्याची प्रथा निर्माण झाली आहे हे शास्त्रीय दृष्ट्या अनुचित आहे.

In reply to by आयुर्हित

अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित ! ह्या १६ विधींबद्दल अजुन दीटेल्स मधे म्हणजे मंत्र विधीं सकट लिहिता आले तर एक स्वतंत्र धागाच टाका ना !

In reply to by प्रसाद गोडबोले

अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित !
गोदबोले सहेब, अताआ तुमेपन मज्यासार्क लिहिला. हानतेच्यायला मा;;;;; अयुर्हित सहेब, तुमला कुहुप जिवन मिलुदे.

In reply to by आनंदी गोपाळ

अगदी "गायत्री"चा गायञीउपदेश करून वरून बोल्ड केलाय. महान आहात.

In reply to by आनंदी गोपाळ

हा ब्लॉग माझा नसून "विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई" यांचा आहे. यावरून हे स्पष्ट होते की मुंज ही फक्त एका समाजाशी निगडीत नसून चा सर्व भारतीय लोकांनी मानलेल्या १६ संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मुंज करणे / लग्नातला लाजा होम करणे हा एक फालतू पणाच आहे. काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?

In reply to by विजुभाऊ

नक्की अडचण काय आहे जर कुणाला त्रास होत नसेल तर? तशी कैक प्रतीके वेष्टर्न संस्कृतीतही आहेतच की. कशाला पाहिजे नववर्ष काय अन व्हॅलेंटाईन्स डे तरी मग? अन शेवटी हेही विसरले जाते की या माध्यमातून लोकांना एकत्र जमून टीपी करायचा असतो. तथाकथित सिग्निफिकन्स हा कुणाच्याही गावी नसतो- आधीही फारसा कुणाच्याच गावी नव्हता. दे जस्ट वॉना हॅव फन, दॅट्स ऑल!

In reply to by विजुभाऊ

काप गेले भोके राहिली सारखे किती दिवस हा असला निर्बुद्ध बाष्कळपणा आपण परंपराम्हणून वागवत रहाणार आहोत?
>>> जोवर जातिआधारित/ धर्माधारित आरक्षणे आहेत तोवर ! अर्थात यावश्चंद्रदिवाकरौ !! :P

In reply to by विजुभाऊ

विजुभौ, सहमत आहे. माणुस जसा अधिक व्यस्त होत जाईल, अजून आधुनिक होत जाईल, दृष्टीकोणात फरक होत जाईल तेव्हा हे कमी होईल असे वाटते. अशा कितीतरी परंपरेच्या गोष्टी आता कालौघात मागे पडत चालल्याच आहेत 'काहो, मुलाची मुंजी केलीत की नै' आणि या प्रश्नाला 'आम्ही असलं काही करत नाही' अशी उत्तरं यायला लागलीत की हे बंद होईल. हं आता यातही परंपरा जपणारे आणि आधुनिक असे दोन गट होतील. किरकोळ कारकोळ चालूच राहील. -दिलीप बिरुटे

भले मग तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल. भले मग तुम्ही कोणत्याही सणाला, पार्टीला वा कोणत्याही ओकेजनला पित असाल. भले मग तुम्ही देशी पित असाल वा विदेशी पित असाल. भले मग तुम्ही स्वताच्या पैश्याची पित असाल वा फुकटाची पित असाल. भले मग तुम्ही मंगळवारी पित असाल वा रविवारी पित असाल दारू ही वाईटच !! फक्त एवढेच सांगू इच्छितो, अभ्या दारू पितो, अभ्या किडे करतो, अभ्या पोरींशी लफडे करतो. अभ्या कसाही असेल, पण अभ्या नीच नाही रे ..

लग्नाआधी नाईलाज म्हणून मुंज केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर मटन कबाब आणि चिकन तवा राइसची पार्टी करून मुंज साजरी केली. कहर म्हणजे कबाब खातांना, "आता मात्र मी अगदी कर्मठ ब्राम्हण होणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी चिकन मटन हादडायला मोकळे आहोत." हे सतत चालू होतेच! ह्यात त्यालाही आणि मलाही काही वावगे वाटत नाही! :) मुठीतून वाळू निसटणारच आहे हे माहित असूनही जर मुठीत वाळू पकडण्याचा मोह आवरत नसेल तर अशा वेळी उपदेश करण्यापेक्षा संयम उपयुक्त ठरतो.

In reply to by प्यारे१

माझ्यामते मुंज काही एका विशिष्ठ जातीची मक्तेदारी न्हवे ... आर्य त्रैवर्णिकांना मुंजीचा अधिकार आहे...शिवाजी महाराजांनीही राज्याभिषेकाच्या आधी मुंज केल्याचे ऐकीवात आहे ! ... केवळ इतर जातीतल्या लोकांनी मुंज करणाचे बंद केल्याने मुंज हा एक संकार केवळ एका जातीतल्या लोकांच्या अखत्यारित आला आहे ... आजही जर इतर त्रैवर्णिक लोकांनी मुंज करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे निओ-मॉडर्न हिंदु समाजाकडुन कौतुकच होईल असा अंदाज आहे !!

उडन खटोला भाऊ / बहन तुम्हाला काय म्हणायचंय ते कळलं. पण सगळा गुताडा झालाय. तुमच्या डोक्यात असलेलं आदर्श ब्राह्मणाचं / मुंजीचं / नव वर्ष साजरं करण्याचं / वर्तनाचं / जगाचं मॉडेल जरा मांडता का? म्हणजे आक्षेप नक्की कशावर आहे हे पिनपॉईंट करायला बरं पडेल...

लेख पटला :) शो ऑफ्फ्, सेलिब्रेशन्स , धांगडधिंगा करायचा असेल तर त्याला इतर १७६० कारणं आहेतच की ...मुंज कशाला त्यात घुसडा ? अवांतर : पोराला वैदिक शिक्षणाला घालणार असाल तरच त्याची मुंज करायची अन्यथा नाही .... असा स्पष्ट पवित्रा मी घेतल्याने आमच्या घरातले आधीच बिचकुन आहेत ... त्यांना हा लेख दाखवतो ;)

आणि हो हे फक्त ब्राम्हणांवरच का लिहिलय? बाकीचे जातीजमातीवाले हे सगळं करत नाहीत काय? उगीच उठलं पळी-भांड आणि जानव्यावर टिका केली की झालं का? दारु पिण, रस्त्यावर नंगानाच घालणं किंवा ३१ डिसेंबरला टल्ली होणं हे सगळ्याच बेवड्यांच्या घरी चालतं. गमतीची गोष्ट अशी की आधी ब्राम्हण घरात शक्यतो दारु प्यायली जात नाही. प्यायली तरी नंगानाच करणारे १०० पैकी ५ सुद्धा नसतील. तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे? मुंज करण्यावर? दारु पिण्यावर? ब्राम्हणांनी दारु पिण्यावर? मांसाहार करण्यावर? कुठले कपडे घालायचे ह्यावर? उगीचं जनरलायझेशन करु नका.

इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी
अचं नाई कलायचं, मग मज्जा मज्जा कशी येणार? ;)

उपजात चित्पावनच असणार.. आजकाल ब्राह्मण्य जपण्याची नैतिक जबाबदारी देशस्थांवर येऊन पडली आहे.बरेच देशस्थ व्यवस्थीत धार्मिक विधी करतात. चित्पावन युवक युवती मात्र, indian born confused american या कॅटॅगरीत केव्हाचेच गेले आहेत.

In reply to by शुचि

हांगाश्शी ... नेफ़ळे आजोबा रॉक्स!!! आता मज्जा मज्जा , गम्माडी जम्मत येणार
हेच म्हणतो ... =))

In reply to by मंदार दिलीप जोशी

ठ्ठो ! सॉरी सॉरी. ते ढिच्कॅव असे वाचावे. (पुर्वी बार टाकत आता पिस्तुलातुन गोळी झाडतात........भेंडी रस्त्यात गोळ्या पडल्यात आणी पिस्तुलाची नळी हातात धरुन कोणी रस्ता झाडतोय असे चित्र नजरेसमोर उभे र्‍हायलेय.)

लग्नमुंजींच्या वरातीतले बेंडबाजे किंवा गणपतीविसर्जनाच्या ठणठणाटी मिरवणुका व्यक्तिशः आवडत नाहीत. पण एक फरक जाणवतो. काही समाजांमध्ये -उदा.पंजाबी, गुजराती,- प्रसंगानुसार स्त्रीपुरुषांनी एकत्र मुक्तपणे (स्वैरपणे नव्हे) संगीताच्या तालावर डोलण्याची, नाचण्याची परंपरा आहे. युरोपमध्येही वॉल्त्झची संथ नृत्ये आनंददायी असतात. आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे? बीटल्सच्या लोकप्रियतेमागे तरुणाईला बेधुंद नृत्याची संधी मिळण्याचा मोठा हिस्सा होता. अर्थात अशी अ‍ॅम्फेटामाइनयुक्त नृत्ये योग्य नाहीतच. पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?

In reply to by राही

पण थोडेसे सैल व्हायला, संकोच थोडासा झुगारायला काय हरकत आहे? अंग सदैव आखडलेले, वृत्ती सदैव आक्रसलेल्याच असायला हव्यात का?
त्याला आक्षेप नाही, पण मुंज हा संस्कार हाच मुळात या सार्‍यांवर विजय मिळवायचे/ नियंत्रित जीवन जगण्यचे शिक्षण द्यायला केल जातो. त्याच दिवशी असे अनियंत्रित वागून आपण त्या मुलावर काय संस्कार करणार?

In reply to by मंदार कात्रे

अनिर्बंधच व्हायचे असेल तर त्यासाठी आपल्या संस्कृतीत स्पेशल सण दिलेलाच आहे - शिमगा. काय घालायचा तो दंगा घाला तेव्हा.

In reply to by राही

आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे?
घोटूल मधे ढोलियाच्या तालावर हलकेच थिरकणारी पावलं आपल्याकडलीच असलीत, तरी, मध्यंतरीच्या काळात 'मराठे' म्हणजे 'जेत्यांची संस्कृती' होती. मराठीमधे मार्दव नाही. हार्श शब्दप्रयोग आहेत. बसा! अन तश्रीफ रखिये, (इथे कोणत्याही इतर भाषेतील शब्द वापरा : उदा. प्लीज हॅव अ सीट, अगदी प्लीज वगळूनही.) यातला फरक पहा. या मराठी भाषेत अनेकदा मार्दव अन अजीजी यांत फरक रहात नाही. एकतर अजीजी नायतर 'बसून घ्याला सांगून र्‍हाय्लोय ना!' स्टाईल शब्द. यातच मधे कुठेतरी मराठे 'बायकांसोबत नाचत' नाहीत, ते 'बायका नाचवतात', असला एक समज प्रचलित झाला असावा. तमाशा त्याचे एक उदाहरण. बाईसोबत नाचणारा पुरुष फक्त नाच्याच. दरम्यानच्या काळात कुठेतरी आपण जगज्जेते सुसंस्कृत लोक, थिरकणे विसरलो. तुम्ही नृत्याचे म्हणताहात, समूहगान असाही एक प्रकार असतो. तोदेखिल विरळा होत गेला आहे आपल्याकडे. पण माणसाची मूळ प्रवृत्ती जात नाही. जाणार नाही. खेडोपाडी गरबा खेळला जातो आजकाल. अगदी लग्नाच्या मिरवणूकीत लोक गरबा खेळल्यासारखे नाचतात. तीच गाणी डीजेवर लावून. इ. असो. असे का असावे या प्रश्नाचे हे माझ्या मतीनुसारचे उत्तर आहे. 'मराठे' हा शब्द मरहट्टे, महाराष्ट्र देशीचे अटकेपार झेंडे फडकवणारे वीर, या हिशोबाने वाचावा. जात/धर्म इ.वादी शब्दप्रयोग तो नाही, हे नोंदवितो.

समाजातला दांभिकपणा उघडा पडण्याचा आणि एक सुमुहूर्त ?मुंजीची पार्टी ऐवजी पार्टीनंतर मुंज उरकली असेल .निमंत्रितांनी तोंडभरून बटु आणि आईवडीलांना आशिर्वाद दिले असतील .आणखी काय पाहिजे ? ज्यांना या संस्काराबद्दल काही कळते ते श्रृंगेरी ,श्रीशैलम ,माटुंग्याचा शंकरमठ ,कुर्ला (प)कृष्णमंदिर ,सायन पूर्व कृष्ण मंदिर ,जिएसबी संघ ,चेंबूरचा मठ ,डोंबिवलीचे ज्ञानेश्वर कार्यालय इत्यादी गाठतात आणि गाजावाजा करत नाहीत .

दारू सर्वजातिय/ धर्मिय पितात. तेच मांसाहारा बाबत. अगदी वर्षभर. मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? आपल्या पैकी किती जण रोज सकाळी देवपूजेनंतर संध्या करतात? लहानपणी मुंज झाल्यावर नवलाईचे नऊ दिवस असल्याप्रमाणे सुट्टीत रोज संध्या केली जाते. पण पुढे शाळा सुरु झाल्यावर ते जमतेच असे नाही. रोजच्या ऑफिसच्या गडबडीत देवपूजा आटोपल्यावर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणताना नजर घडयाळाच्या काटयावर असते. मग कशाला तो मुंजीचा अट्टाहास! दारू पिणारे अनेक ब्राम्हण मी बघितले आहेत जे आधी गळ्यातले जानवे काढुन खिशात ठेवतात आणि मग दारू ढोसतात. कशाला का दिखाऊपणा? ३१ डिसेंबरचा ऊल्लेख आला आहे म्हणुन सांगतो. १ जानेवारी २०१३ ला अंगारकी चतुर्थी होती. ३१ डिसेंबर २०१२ ला रात्री पावणे बारा पर्यंत लॉलीपॉप खात दारू धोसणारे (सर्वजातिय) दुसऱ्या दिवशी माझा ऊपास आहे असे सांगत होते. काय उपयोग आहे त्याचा? कशाला ते ऊपासतापास!

In reply to by भाते

>>मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? बाकीचे काय फुकटच गेलेले असतात (ब्राह्मण तस्सं मुळ्ळीच करत नैत) अशी ज्यांची समजूत असते त्यांना "बॉ बॉ बॉ; ब्राह्मण दारू पितात !!!" असं वाटणारच. ;)

बाकी काहीही असो, मशारनिल्हे ब्राह्मण कुटुंबाने मांसाहार आणि सोमरसपान करून प्राचीन आर्य संस्कृती टिकवली असेच म्हणणे आहे. पोषाख म्लेंच्छ असला म्हणून काय झाले? उलट आजकाल मांस आणि सोमरस ही आपल्या संस्कृतीची प्राचीन प्रतीके अहद दिल्ली (लाहोर म्हण्णार होतो पण साला १९४७ चा घोळ झाला.) तहद चंदावर नव्या जोमाने दिसू लागली आहेत. म्हणा, गर्व से कहो...

In reply to by बॅटमॅन

आयला! बॅट्याची बॅट सचिनच्या वरताण तळपली की. :) जाता जाता: 'गर्व से कहो...' ला उत्तर देण्याआधी आपल्याला क्युबन सिगार्स, पाईप्स वगैरे अस्सल जिंदादिल खानदानी माणसाला शोभणार शौक हाळी देणार्‍याने केलेले चालतात की झोंबतात हे मात्र पडताळून पहायला हवं.

In reply to by धमाल मुलगा

:) बाकी हाळी देणारे कोण? तथाकथित संस्कृतिरक्षक तर नव्हे? तसे तर शौक ज्यांना पर्वडतात अन झेपतात त्या सर्वांनीच करावे, हाकानाका.

http://www.sherv.net/cm/emo/funny/1/hammer-smiley-emoticon.gif ======================== बाकि .. चालू द्या!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

एव्हढाव्ह प्रतीसाद तुमच्याकडुन अपेक्षीत नाही. करा थोडी बॅटींग.

In reply to by चिंतामणी

करा थोडी बॅटींग.
>>> हेच म्हणतो :)