मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विसर

आनंदमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव आता तुला गाठायचा आहे तुझा गाव आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ हरवुदे वाट आडवळणी खट्याळ खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा तुला-मला जोडणारा तोड आता धागा नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू जायचीच निसटून हातातली वाळू सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा... राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून ..... -अदिती शरद जोशी

वाचने 1788 वाचनखूण प्रतिक्रिया 5