Skip to main content

अनवाणी नवरात्र

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 25/09/2014 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो. तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?

वाचने 29198
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

>> जर देवासाठी असेल तर ठीक. देवासाठी लेखही लिहीता येतो तर. वाचावे ते नवलच.

बस कर पगले अब रुलायेगा क्या? मिपाकर कंटाळले आहेत रे ह्या आस्तिक नास्तिक वादाला. तुझी शंका जेन्युईन असेल पण त्या शंकेचं शेपूट पकडून माझ्यासारखे हरदास आपल्या कथा सांगणार, आणखी कुणी कसं मूर्ख आहे ते वदणार, आपापले स्कोअर्स सेटल करणार इ.इ. सुरु होतं. शंकेचं उत्तरच द्यायचं असेल तर साधना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मनाला शिस्त आणि अ‍ॅडज स्ट करण्याची सवय लागणं हा एक भाग असतो. शरीराला कष्ट देऊन त्याला तापवणं म्हणजे तप करणं हे ऐकलं असशील कुठंतरी. माणसाला काहीतरी टोचलं की त्याला देवाची आठवण येते ही प्रवृत्ती लक्षात घेऊन थोडं जाणीवपूर्वक कष्टात राहा म्हणजे मग देवाची आठवण येईल असं सुरु झालं. म्हणून मग अनवाणी रहा, गार पाण्याची आंघोळ करा, चटईवर झोपा इ.इ. सुरु असतं. बाकी 'शोबाजी' करणं माणसाच्या रक्तात असल्यानं आम्हाला अमुक गोष्ट चालतच नाही हो, आम्ही कडक सोवळं पाळतो इ.इ. सुरु होतं. अर्थात एका हद्दीपर्यंत ते आवश्यक असतंही. पण त्याचं अवडंबर व्हायला नको. उपासनेचा मुख्य हेतू भक्ती नि भक्तीमार्फत भक्तानं आराध्यापर्यंत पोचावं हा असावा. हे असं होतं बघ. असो!

>>तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? दिलेल्या माहितीचा काय उपयोग करणार आहात हे कळलं की उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणेत येईल.

In reply to by सूड

कारण तु असचं काहिसं विचारशील म्हणून...तुझ्यासाठि हि चर्चा माफ :D

मी हा प्रकार पहिल्यांदा उस्मानाबादला इंजिनिअरींगला असताना पाहिला. जवळजवळ निम्मं कॉलेज अनवाणी यायचं, शक्यतो स्थानिक विद्यार्थी. आमच्या हॉस्टेलची एक परंपरा होती की दसर्‍याच्या आदल्या रात्री हॉस्टेलवरून तुळजापूरला (१८ किमी.) अनवाणी चालत जायचं श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. पहिल्या वर्षी अनवाणी चालत गेलो सगळ्यांबरोबर तेव्हा चालताना काहीच वाटलं नाही पण दुसर्‍या दिवशी पायाला पाण्याचे फोड आले होते. चालता देखील निट येतं नव्हतं इतकी बेक्कार हालत झाली होती आणि ते फोड पुर्णपणे बरे होताहोता ४-५ दिवस गेले, कॉलेजसुद्धा बुडालं. :( दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी देखील सगळ्यांबरोबर चालत गेलो पण अनवाणी नाही. स्वतःला त्रास देऊन देवी पावणार नाही की प्रसन्न सुद्धा होणार नाही हे मनोमन पटल्यामूळे नंतरच्या वर्षी उगाच रीस्क घेतली नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की सगळ्यांबरोबर रात्री गप्पाटप्पा करत देवीच्या दर्शनाला जायला जाम धमाल यायची. :) सध्या मुंबईला देखील असे अनवाणी लोकं नवरात्रीत दिसू लागली आहेत. उस्मानाबादला बरेच स्थानिक स्वतःच्या २-व्हिलरने येत असत त्यामूळे थोडफार बरं होतं पण मुंबईला लोकल ट्रेनच्या भरमसाट गर्दीत ह्या लोकांना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. असो.

शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला होतात का ?उ.बाद हुन चालत तुळजापुरला जाण्याची पंरपरा फार जुनी नाही.साधारण 99 नंतर चालु झाली.तक्तालीन कलेक्टरने चालु केली होती.

In reply to by शिद

>>>>T.P.C.T's COE मध्ये होतो. हा कांहीतरी पोलीसांचा बिनतारी संदेश वाटतो आहे

In reply to by जेपी

>> तक्तालीन कलेक्टर शब्दप्रयोग आवडला. 'तख्तालीन' जास्त योग्य वाटतोय. :)

नवरात्रात अनवाणी चालले की ९ जन्मे स्वर्ग मिळतो असे नास्तिकपावपुराणात सांगितले आहे. तुम्ही चालत नसाल तर लगेच चालायला लागा. प्रश्न जेन्युनली विचारला असेल असे गृहीत धरुन नमूद करतो की यामागे श्रद्धा ही एकमेव भावना असावी. त्या श्रद्धेने जर कुणाचे नुकसा होत नसेल तर त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. श्रद्धेवर बोट धरताना कधीकधी माणसे चांगल्या गोष्टींची वाट लावतात. याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. नवरात्रीत लोक उपासही करतात. का करतात? माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. पहिल्या वर्षी केले तेव्हा मित्राशी पैज लावली म्हणुन केले. आता हे ११ वे वर्ष आहे. वेळोवेळी उपासाच्या नियमात माझ्यापुरते मीच बदल केले. कधी कडक केले (फक्त दूध फळे खाउन), कधी एक वेळ उपासाचे खाउन कधी फक्त संध्याकाळचे फळे खाउन. मला तरी मी जेंव्हा कडक केले होते तेव्हा मला खुप बरे वाटले होते. या १० दिवसात कडक उपास करुनही पित्त झाले नाही (माझी पित्त प्रकृती असुनही). मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो. श्रद्धा आहेच. अनवाणी चालणे हा त्यातलाच एक प्रकार असावा असे वाटते. अनवाणी चालणे, पट्टा न घालणे, दाढी न करणे हे सगळे मी ऑफिसच्या कामास्तव नाही करु शकत. नाही करत.

In reply to by मृत्युन्जय

>>> माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. असेच. तिसरं वर्ष आहे. आणि हे सांगायला मला लई अभिमान ;) वाटतो तुम्हाला जमतं का तरी.

In reply to by मृत्युन्जय

>>>>याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. नरेंद्र दाभोळकरच का? माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर शनीशिंगणापूरला गेला असताना त्याच्या बॅगेची चोरी झाली होती. त्याने आरडाओरडाकरून गर्दी जमविल्यावर तिथले दुकानदार जवळ आले आणि त्याला बाजूला घेऊन गेले. 'तुमचे किती नुकसान झाले सांगा आम्ही सर्व दुकानदार भरून देतो. पण आरडाओरडा करून लोक जमवू नका. इथे भक्तगण येतात म्हणून आमची दुकानं चालतात. ह्या जागेचे महत्त्व कमी झाले तर आमचा धंदा बसेल. असे करू नका.' अशी विनवणी केली. >>>>हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. एक अंधश्रद्धा खोटी ठरवली. लोकांना तर्कनिष्ठ विचार करायला शिकवलं. कोणाचं नुकसान नाही झालं. समाज प्रबोधनंच झालं. चोर्‍या सुरु झाल्या असतील तर नागरीकांनी, इतर शहरांप्रमाणे, दारं-खिडक्या आणि कुलपं लावावित. अंधश्रद्धा पसरवून आपापली दुकानं चालविण्यापेक्षा ते जास्त सयुक्तिक आहे.

In reply to by मृत्युन्जय

मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो.
डीट्टो. हे ११वे वर्ष दोन्ही वेळा फक्त दुध व फळं.

In reply to by मृत्युन्जय

शिंगणापुरात अगोदरही चोर्‍या होतच होत्या, फक्त रिपोर्टिंग दाबले जायचे असे ऐकून आहे.

In reply to by मदनबाण

वरील विडीओची फेसबूकवर आजकाल जाम चलती आहे असे नमूद करू इच्छितो.

In reply to by शिद

काल व्हॉट्सअ‍ॅप वरुन माझ्या पर्यंत पोहचला. :) चेपु वापरत नसल्याने माहित नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

पण अप्रतिम आहे. किती निरागस आहेत हे विकणारी सगळे. काय आनंद होतोय १००० रु. मिळाल्यावर!!!

In reply to by दिपक.कुवेत

मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत माझ्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

अगदी +१ माझ्याही डोळ्यात पाणी आलं. संगीतही छान दिलं आहे या चलचित्रणाला.

ऐकावं ते नवलच. मी कधी असं पाहिलं वा ऐकलं नाही पण इथले प्रतिसाद पाहून दिसतंय की बर्‍यापैकी पापिलवार प्रथा असावी. आजवर अनवाणी राहणारे म्हणजे ते काळाकभिन्न डिरेस घालणारे अन तितकीच पांढरी शुभ्र लुंगी नेसणारे ते केरळी अय्यप्पावालेच माहिती होते. आज माहितीत भर पडली. बाकी अनवाणी राहणे इ. मला तरी पटत नाही. पण जे राहतात ते राहीनात! उगा सर्दीबिर्दी झाल्यावरही अनवाणी राहून ताप करून घेऊ नका म्हणजे झालं.

नवरात्रीत चप्पल न घालणे,जैन मंदिरात चामड्याच्या वस्तू घालून न जाणे या मागचे नक्की कारण माहीत नाही.पण मी माझ्यापुरता जो अर्थ काढला आहे तो असा, आपल्या शरीरावर जे चामडे आहे त्याचा आपल्याला अभिमान असतो. जे चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो,त्याच्याच भानात सतत असतो.मी अमुक,मी तमुक..... मंदिरात जाताना या चामड्याच्या भानाला बाहेर ठेवावे. आणि परमेश्वराजवळ जाताना स्वच्छ मनाने जावे. परंतू आपण चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवतो आणि मी अमुक आहे, मला वेळ नाही पैसे घ्या पण आधी दर्शन द्या असे सांगतो.सगळेच असे करतात असे नाही पण कोणी करू नये म्हणून असा नियम केला असावा आणि लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला.हे माझे वैयक्तिक मत आहे.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. (यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)

In reply to by भिंगरी

धन्य ते महाभाग, जे चामड्याच्या चपला न घालता नऊ दिवस अन नऊ रात्री अनवाणी राहून स्वत:चे "मी" पण विसरतात ! (तुमच्या भाषेत चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो, मी अमुक,मी तमुक..... वै) मग स्वतःच्या अंगावरच्या सोन्याच्या दागिन्याचा, महागड्या घड्याळांचा, मोबाईलचा त्याग का नाहित करत ?

एक तरुण मुलगा... जुवेनाईल डायबिटीज् असलेला. त्याला कुणी तरी सांगितलं, नवरात्र पाळ. म्हणजे हे खाऊ नको ते खाऊन नको, पायात चप्पल घालू नको. दर्शन घे वगैरे. ऐकलं. अनवाणी फिरू लागला. चालता चालता कुठेतरी डांबराचा लपका तळव्याला चिकटला. तो निघता निघेना. देवीने काही केलं नाही. निघाला अर्धवट तेव्हा जखम झाली. जखम चिघळत गेली. देवीने काही केलं नाही. ती चिघळत हाडापर्यंत गेली. गॅंग्रीन झालं. आणि नवरात्रींची चिरंतन रात्र झाली- लेखन श्रेय मुग्धा कर्णिक

In reply to by पिंपातला उंदीर

>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक भावना पोचल्या. दाभोलकरांकडून हिंदू श्रद्धांबद्दल बोललं जाणं अपेक्षितच आहे तसं आहे ते. बाकी धागा नेहमीच्या मार्गानं जातोय. दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा! (आम्ही प्रतिसाद देऊन ट्यार्पी वाढवतो आहोतच. लक्ष ठेवून आहोत.)

In reply to by पिंपातला उंदीर

"नवरात्रींची चिरंतन रात्र झाली" उगीच दुसरे करतात म्हणून आपणही नक्कल करायची असल्या अंधानुकरणाची अशी उदाहरणे पाहिले की वाईट वाटते. "अंध"श्रद्धा फार वाईट ! आपल्या काय झेपते हे तरी पहावे.

In reply to by पिंपातला उंदीर

देवी अस्तित्वात असेल तर काही करेल ना. जी शक्ती अस्तित्वातच नाही तिच्याकडून मदत कशी मिळेल ?

In reply to by पिंपातला उंदीर

धागाकर्त्यालाच आहे. कुठुन हा विषय चर्चे करिता ठेवलाय असं झालय? धागा उडवता येईल का संमं?

In reply to by दिपक.कुवेत

मार्क टेलर ने Bradman चा रेकॉर्ड तोडण्याची संधी असून पण डाव घोषित केल्याची आठवण झाली

In reply to by पिंपातला उंदीर

दीपकला टोमणा? त्याच्या हातच्या पाकृ खायच्यात आम्हाला देवा! आणि जळजळ? ती तर आम्हाला वाटायची बंद झालीये कधीची. सीरियस शुभेच्छा दिल्या हो!

९ दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे नाही म्हणे?

In reply to by विनायक प्रभू

जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं नाही तरी चालेल असं सगळं. बाकी साठी औषधं आहेतच. :) नुकताच आलेला प्रगोंचा धागा कुणी इकडे सुद्धा वापरेल काय?

दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे नाही म्हणे? >> तुम्ही काही करु शकता , सल्ले/पालन ईतरांसाठी आहे मास्तर ;)

In reply to by विनायक प्रभू

मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का? >> हो !! अगदीच अब्रम्हण्यम का काय ते ;) ( भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला ;) )

In reply to by सुहास..

भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला जुळ्या चिंबोर्‍यांचा अर्थ त्यावेळी मला समजला नव्हता ! तेव्हा कोणीतरी माझ्या खव मधे ओरडुन गेल तेव्हा मला बोध झाला ! बाकी चिंबोरी प्रकरणा नंतर मास्तुरं बरेच दिवस मिपावर गैर हजर होतं... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटण्यासाठी एक सोपा आणि सहज मार्ग. सदा सर्वकाळ चांगलं वागणं हे सोपं नाही. लहापणी ऐकलेल्या "पुण्या"च्या ज्या अनेक कल्पना आहेत त्यातील आत्मक्लेश ही सर्वाधिक वेळा ऐकली गेलेली कल्पना आहे! हे असे सोपे मार्ग चोखाळून स्वतःचा चांगुलपणा एकदाचा सिद्ध केला की झालं. सदा सर्वकाळ चांगलं वागायची गरज संपली/कमी झाली.

वाघुळमानव(बॅटमॅन) व चौथ्या मितीशी (कोनाडा) सहमत. नावाचा अपभ्रंश केल्याबद्दल क्षमस्व, मैत्रीखात्यात खर्ची टाका. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो अपभ्रंश कसला ? उलट आम्हाला चौथी मिती हे नविन नाव आवडलेले आहे (सॉरी, सध्याच्या "शुद्ध"लेखन प्रॅक्टीस नुसार आवडल्या गेलेले आहे) ((चौथा कोनाडा हे पुल्लिंगी नावाचे चौथी मिती हे स्त्रीलिंगी नांव म्हणजे नवरात्रा निमित्त देवीची कृपा समजावावी काय ?)) एनीवेज, चौथी मिती म्हंजे हे फारच भारदस्त बुद्धीवादी झाल्या सारखे वाटतेय !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

नऊ दिवस चामड्याच्या चपला न वापरता अनवानी फिरण्यापेक्षा, चमडीगीरी सोडा, देवी आपोआप पावेल ......

एक खुळचट प्रथा पाळली जात आहे. देवी काय म्हणत नाय की पायात चपला घालत जावू नका म्हणून. आपल्याकडे नव्हते असले काही फॅड. सांगोसांगीतून असल्या प्रथा पाळल्या जातात. मी गेल्या पाच सहा वर्षांपासून नवरात्राचे उपास करतो आहे पण असले फॅड बघीतले नव्हते अन केलेही नव्हते. आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून. म्हणजे उगाचच दुसर्‍याला त्रास दिला. नाय पटत आपल्याला. त्याचप्रमाणे ऑफिसात असतांना नमाज पढणे देखील तोच प्रकार वाटतो. धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.

In reply to by पाषाणभेद

धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे. सहमत. समस्या अशी आहे की कांहीतरी वेगळं (पुष्कळदा चमत्कारीक) वागून माझ्या भक्तीचं(?) प्रदर्शन नाही केलं तर माझ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि मला महत्त्व मिळत नाही. म्हणून प्रदर्शन अत्यंत आवश्यक बनून जातं. पुण्य मिळालं नाही मिळालं, मेल्यावर स्वर्गात गेलो की नर्कात तरी कोण पाहतंय, त्यात कांही सुख नाही. सुख ह्याच जन्मात चार लोकांची वाहवा शब्दात किंवा नुसत्या नजरेतही मिळविण्यात आहे. ('आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून.' बघा आला नं त्याचा उल्लेख!, ह्यात त्यांना सुख मिळतं.) शिवाय कोणी त्याला वेडेपणा म्हंटले तर 'माझी श्रद्धा आहे' असे म्हणून समोरच्याचे तोंड बंद करता येते. श्रद्धा आहे म्हंटल्यावर तर्काला स्थान नसते.

अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं थुंकतात. चपला न घालून फायदा न होता तोटाच होईल आरोग्याला. पुर्वी चपला न घालणार्‍यांचा वावर सीमीत प्रदेशात असावा. त्यामुळे तेथे आरोग्याची जपणूक होत असावी. आजकाल श्रावणात देखील चपला न घातल्याचे बघितले आहे. खुळचट प्रथा काहीही. निषेध.

In reply to by दिपक.कुवेत

वाचला हो ...पण त्यात काही रस वाटला नाही म्हणुन जरा वेगळे वळण घेतले ... चप्पल न घालणे , नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अन टाय अन चड्ड्या बदलणे हे निव्वळ फ्यॅड आहे असे आपले स्पष्ट मत आहे ! अध्यात्मिकतेचे उत्सवीकरण हे हिंदुधर्मा/तत्वज्ञाना पुढील खरेच मोठ्ठे आव्हान आहे पण त्यावर चर्चा नको उगाच इथल्या सुडोसेक्युलर तत्वज्ञआनांच्या हातात कोलीत कशाला द्या ;) मागे वारी बंद करा म्हणाले मग गणेशोत्सव बंद करा म्हणाले ,लगेच गाडी नवरात्रीवर घसरेल मग काय दिवाळी आहेच नंतर... त्यांचे म्हणजे पायाला जखम झाली तर पायच तोडुन टाकला पाहिजे असले काहीसे लॉजिक आहे , कुठं सारखं सारखं त्यांच्या नादाला लागता ? आपल्याला आस्तिकनास्तिकपाव पेक्षा मिसळपावच जास्त आवडते =))

अहो 9 दिवस देवीच्या मंदिरात उभे राहण्याचे व्रत पाळणारेही बघत आहे. दिवसभर उपास रात्री उभ्यानेच आधार घेउन झोपायचे सगळे विधी उभ्यानेच ना बसायचे ना पाठ टेकवायची... अन हे सर्व सामान्य संसारी लोक करत आहेत. 9 दिवस.

In reply to by टवाळ कार्टा

सन्यास घेउन आजन्म उभे राहिल्याचे दावा करणाऱ्याना भेटलो आहे मला फारसा न पटलेला हां प्रकार आहे. त्यामुळे त्याचे वा याचे साध्य काय चे उत्तर मला तर काय बाबात्यातलं कळतं नाही हेच आहे.

स्वतःपुरती मर्यादीत असावी. सश्रद्ध असण्यात काही गैर नाही जो पर्यंत त्यामुळे स्वतःच्या प्रापंचीक जबाबदा-या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळत असेल. परंतु त्यातुन कुठलाही इतर वैयक्तिक (कुटुंब, नोकरी, व्यवसाय या कडे दुर्लक्ष, कर्ज काढुन सण साजरे करणे असले प्रकार) किंवा सामाजिक (ध्वनी प्रदुषण, खंडणी वसुली, वाहतुकीचीगैरसोय आर्थिक फसवणुक, दडपशाही (धर्माची सक्ती), जीवहत्या इ.) त्रास होत नसेल तर.

In reply to by प्यारे१

प्यारे काका , इथे मोक्ष कुणाला हवाय ? देव फॅशन झाला आहे फॅशन ... ( बायदवे हे काही आजचे अन नवीन नाही , स्वामी विवेकानंदही एका भ्हाषणात हे देवाचे धर्माचे तत्त्वज्ञानाचे उत्सवीकरण डेंजरस आहे असे म्हणाल्याचा उल्लेख आहे )