मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भगीरथ अभियंता होता ?? एक विचार

आप्पा ·

स्पंदना 14/08/2010 - 18:58
काय माहिती नाही हो पण अस म्हणतात की कौरव हे टेस्ट ट्युब बेबीच पहिल उदाहरण . आपल्या महाकाव्य लेखकांची भरारी इतकी उत्तुन्ग होती की ते त्यांच्या त्या वेळच्या शास्त्रीय भाषेत हे सर्व लिहित होते आणी आजची शास्त्रीय भाषा आन्ग्लौत्पन्न आहे, म्हणुन आपण त्या सर्व प्रकाराला भाकड कथा मानतो, देव जाणे. पण एक सांगा अस एका दरीत जर गंगा उत्त्पन्न झाली असेल तर आज जो आपण पहातो तो उगम असा शंकराच्या जटेच्या आकाराच्या दगडातुन कसा बाहेर पडतो, अन या तुम्ही वर्णीलेल्या कादम्बरीतील गुहांचे ठाव ठीकाण सुद्धा असायला हवे नाही का? काही अधिक उण असेल तर क्षमस्व!!

कठोर प्रयत्नासाठी भगीरथाचे नाव दिले जाते. भगीरथाच्या काही आणखी कथा इथेही वाचायला मिळतील. >>>>भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली कादंबरीचीही जमेल तेव्हा ओळख करुन द्या.....! -दिलीप बिरुटे

पाषाणभेद 14/08/2010 - 20:08
आधुनिक इतिहासकारांच्या मते आर्य भारतात आलेच नव्हते. हिंदू हे आर्यांपासून झाले हा विचारही चुकीचा आहे. आर्य म्हणजे नवर्‍याचे संबोधन होते. जसे 'अहो' च्या ऐवजी आर्य. महाभारतातही पर्यायाने गीतेतही आर्य हा शब्द याच अर्थाने आलेला आहे. जाणकारांना भाष्य करावे. बाकी भगीरथ अभियंत्याच्या जातकुळीचा असावा हे मान्य

In reply to by पाषाणभेद

प्रचंड गोंधळ आहे. मीआर्य या शब्दाचा अर्थ 'to till' म्हणजे शेती करणे असा आहे असं मी नेहरुंनी लिहिलं आहे असं मी इथे म्हटलं होतं. तसेच आर्य या शब्दाचा 'Noble' असाही अर्थ होतो असंही ऐकलं आहे. आधुनिक इतिहासकारांच्या मते आर्य भारतात आलेच नव्हते. याबाबतही खूप कल्ला चालू असतो. कास्ट जेनेटिक्स आणि लिंग्विस्टिक्स वापरुन दोन्ही बाजू एकमेकांशी भांडत असतात.

झंम्प्या 14/08/2010 - 20:55
सदरच्या लेखात उल्लेखलेली बाब हि तात्विक दृष्ट्या मनाला पटणारी आहे... ह्यालाच धरून अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते.. वाचकांना हे विषयांतर वाटेल पण तरीही नमूद कारावास वाटत... नुकतच इरावती कार्वेंचा युगांत पुस्तक वाचनात आलं... त्यांनी ह्या पुस्तकात महाभारतातील व्यक्तिरेखांचे खूप छान शास्त्रीय दृष्ट्या विवेचन केलेलं आढळत.. ह्या विवेचनावरून माझ्या वैयक्तित महाभारताविषयी असणार्या कल्पनांना तडा गेला व नवीन विचार, नवीन दृष्टी मिळाली महाभारताकडे पाहण्याची.. येथे लेखकाने जो मुद्दा मांडला आहे तो तात्विक दृष्ट्या पटण्यासारखा आहे अस माझं वैयक्तित मत आहे.....

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

प्रशु 15/08/2010 - 07:17
दुर्गा भागवतांचं व्यासपर्व देखील वाचा, पे॑स आणी 'दुर्गाबाईशीं गप्पा' हे प्रतिभा रानडे ह्यांच पुस्तक देखील जरुर वाचा खुप छान माहीती मिळेल....

गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का? अन्यथा ही कवीकल्पना राहील. दुसरी शक्यता अशी आहे की भगीरथाने जर एखाद्या नदीचं पाणी वळवून त्याच्या गावाकडे आणलं असेल तर त्या पाण्याला लोकांनी 'गंगाच जणू' असं म्हटलं असेल. शेकडो मैल दूर, हिमशिखरांत जाऊन एखाद्या नदीचा ओघ बदलणे हे त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं. साठ हजार माणसं कित्येक पिढ्या या कामाला लावायच्या - केवळ पाणी मिळवण्यासाठी - मग त्या काळात त्यांच्या शेतांचं काय? वगैरे प्रश्न उभे राहातात.

In reply to by राजेश घासकडवी

मृत्युन्जय 15/08/2010 - 00:35
मान्य की ही कविकल्पना वाटते. पण फक्त तर्कशास्त्राच्या कसोटीवर तासुन बघायची असेल तर मूळ कथेपेक्षा जास्त तर्कशुद्ध वाटते की नाही?

In reply to by मृत्युन्जय

माझ्यामते तर्कशुद्धता ही गरोदरपणासारखी असते - ती असते किंवा नसते. तुम्हाला शक्यता म्हणायचं आहे बहुतेक. तसं असेल तर बरोबर. 'गंगा नदी कुठल्यातरी स्वर्ग नावाच्या भागातून मानवाने, आपल्या प्रयत्नाने जमिनीवर आणली' हे सत्य मानलं तर ते या कथेत सांगितल्याप्रमाणे घडलेलं असण्याची शक्यता खूपच अधिक आहे. पण मुळात जी कविकल्पनाच आहे, कथा आहे, तिला सत्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करणं हा द्राविडी प्राणायाम होतो. त्यापेक्षा मुळात त्या विधानातली नदी गंगा नव्हतीच, किंवा मुळात ती नदी नव्हतीच - छोटासा ओढा होता वगैरे गोष्टी अधिक संभाव्य आहेत. किंवा मनोरंजनासाठी कोणीतरी रचलेली कथा असेल, हे अधिकच शक्य आहे. असा द्राविडी प्राणायाम करून अर्थातच उत्तम कथा होऊ शकेल कदाचित. पण कथेचं सौंदर्य तो प्राणायाम किती चांगला जमला आहे यावर ठरू नये असं मला वाटतं. याउलट चांगल्या कथेसाठी वाचक अनेक अशक्य गोष्टी चालवून घ्यायला तयार असतो.

In reply to by राजेश घासकडवी

शिल्पा ब 15/08/2010 - 04:31
स्वर्ग म्हणजे कदाचित हिमालय आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असावा...तेथील लोकांची वयोमर्यादा इतरांपेक्षा जास्त असते असे म्हणतात....उदा. बौद्ध भिक्षु वगैरे लोक.. आता भगीरथाचे म्हणाल तर कदाचित त्याने तसा प्रयत्न केलाही असेल...कथेप्रमाणे त्याच्या वंशजांनी ते काम पूर्ण केले त्याने नाही...अगदीच अशक्य म्हणता येणार नाही...त्या नदीचे पाणी वळवण्यापूर्वी जे काही छोटे ओढे, नद्या असतील त्याचा वापर शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला असेल...दुष्काळ काही एवढा काळ टिकत नाही..म्हणूनच शक्य असावे असे वाटते. बाकी, इतर जाणकारांनी आणि अभ्यासूंनी प्रकाश टाकावा.

In reply to by राजेश घासकडवी

गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का? अन्यथा ही कवीकल्पना राहील. दुसरी शक्यता अशी आहे की भगीरथाने जर एखाद्या नदीचं पाणी वळवून त्याच्या गावाकडे आणलं असेल तर त्या पाण्याला लोकांनी 'गंगाच जणू' असं म्हटलं असेल. शेकडो मैल दूर, हिमशिखरांत जाऊन एखाद्या नदीचा ओघ बदलणे हे त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं. साठ हजार माणसं कित्येक पिढ्या या कामाला लावायच्या - केवळ पाणी मिळवण्यासाठी - मग त्या काळात त्यांच्या शेतांचं काय? वगैरे प्रश्न उभे राहातात.
पण मुळात जी कविकल्पनाच आहे, कथा आहे, तिला सत्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करणं हा द्राविडी प्राणायाम होतो.
वंदनीय गुरुजींशी सहमत! (नम्र) (वेळात वेळ काढून गुरुजींनी शक्यतो सर्वच धाग्यांवर (आपलं गुंत्यांवर) प्रतिसाद देऊन मेंदू सफाई अधिकार्‍यांचे कर्तव्य पार पाडावे असे कळकळीचे आवाहन करणारा!)

In reply to by राजेश घासकडवी

डावखुरा 26/08/2010 - 10:48
त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं.??? ईजिप्त मध्ये पिरॅमिड चे मोठे शिळा़खंड कसे चढवले असतील? मला नाही वाट्त हे अशक्यप्राय..मनुष्यबळाच्या जोरावर व सामुहिक ईच्छाशक्तीच्या जोरावर काही ही अशक्य नाही...

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 17/12/2012 - 00:07
भगीरथ वैग्रे इश्श्यू अपार्टः
गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का?
हो, ह्याला ठोस पुरावा आहे. हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल नामक ११ खंडी भारताच्या समग्र इतिहासाची माला आहे. त्यातील प्रथम खंडात हे दिलेले आहे. चॅप्टर ४, "द जिऑलॉजिकल बॅकग्रौंड ऑफ इंडियन हिष्ट्री", पान क्र. ८२ ते ८7. सारभूत वाक्ये खाली देतोय. As noted above, by early Pleistocene time, the dominant features of India's geography had taken place and the country had almost acquired most of it present day form except that the land in front of the newly formed Himalayas formed a great longitudinal depression, comlementary to the mountains and parallel to them. This trough was at first occupied by salt-water lagoons, which were gradually freshened. These lagoons were gradually filled by the waste of Himalayas by numerous streams descending from the mountain. This sedimentation continued for a very long time, and thus the narrow strip parallel to Himalayas was transformed into the great Indian plains. The thickness of the debris deposition is such that the bedrock is not found even at 2000 feet deep borings!!!! The greater part of the Indo-Gangetic plains is built up of very late alluvial flood deposits of the Indus & Ganges river systems, borne down from himalayas and deposited at their foot. But most of this terrain became dry and firm enough to be habitable for man only some 5000-7000 years ago. It has no mineral resources and has records for only the yesterday of geological time. Ample evidence is found regarding the common ancestry of Ganga, Brahmaputra and Indus rivers, their reversal & capture before attaining their present state, which affected Indian History at many a turn and corner. It was this notable pre-historic river, named "Shivalik river" by the pilgrim, that flowed from the head of the Sind gulf to the Punjab and thence along the foot of the embryonic Himalaya chains, through Simla and Nainital and Assam. Post-Shivalik earth movements in North-West Punjab brought about a dismemberment of this river system into subsidiary systems: 1. Present day Indus from Hazara. 2. Five rivers of Punjab 3. Rivers in Ganges system that take a South-Eastern course. The severed part of the Shivalik river became the modern Ganges, having in the course of time captured the transversely running Yamuna and converted it into its own affluent. Other Himalayan rivers like Alakananda, Gandak, Kosi, etc. which are really among the oldest water courses of North India, continued to discharge their water into this new river, irrespective of its ultimate destination. The deltas of large rivers were formed early, but their outline and surfaces changed materially in the last few centuries. These rives brought a lot of silt from the Himalayas and as a result, elevated the level of their beds as well as that of the nearby flat country. त्यामुळे , भगीरथ या एका माणसाने गंगा मृत्युलोकात आणली हे म्हणणे चूक असले तरी ती कथा एका खर्‍या नैसर्गिक घटनेवरती आधारलेली आहे याबद्दल शंका असू नये. वरील अवतरणांत "नेमके" पुरावे दिलेले नाहीत हे मान्य आहे, पण सध्या माझ्या हाताशी असलेला हा एकच सोर्स आहे, बाकीचे अधिक नेमके काही असेल तर ते नंतर बघून सांगेन.

Nile 15/08/2010 - 00:29
रविंद्र भटांची ही कादंबरी वाचली आहे, मला ही कल्पना वाचायला फार आवडली होती. भगीरथ प्रयत्न ह्या वाकप्रचार अश्या प्रयत्नाला समर्पक वाटतो (खरे असेल वा खोटे, तप वगैरे करुन आणण्यापेक्षा केव्हाही वरचढ, तेव्हा काय सगळेच तप करायचे ;-) ) यावरुन एक आठवणः रविंद्र भट सज्जनगडावर जाउन लिखाण करत असत, एकदा आजोळावरुन असेच बसने येत असताना सातार्‍यात एक छानश्या आजी शेजारी येउन बसल्या, मी भयंकर बडबड्या असल्याने गप्पा टप्पा सुरु झाल्या. आमची मस्तच गट्टी जमली. मग त्यांनीच मी रविंद्र भटांची पत्नी, ते इथे सज्जनगडावर आहेत वगैरे सांगितले. त्यावेळी (फारसे वाचन नसले, तरी थोडेफार होते) रविंद्र भटांचे एकही पुस्तक वाचलेले नाही म्हणुन स्वतःची लाज वाटली होती.(मग घरी पोहोचल्यावर दुसर्‍याच दिवशी भगीरथ घेतली होती) योगायोगाने पुण्यात त्या आमच्या घराजवळच रहात होत्या. स्वारगेटाहुन आम्ही एकाच रिक्षेत बसुन गेलो. मी तुझी आजीच की म्हणुन त्यांनी माझ्याकडुन रिक्षेचे पैसेही घेतले नाही. कसं कुणाशी नातं जुळेल...

उप्रोल्लेखित पुस्तक वाचलेलं नसल्याकारणाने त्यावर भाष्य करु शकत नाही. पण जुन्या काळामध्ये खूप विकसित अशी संस्कॄती अस्तित्वात होती या गॄहीतकामुळे असे विचार निपजत असावेत. हिंदू जनजागॄती समितीची वेबसाईट पाहिली तर तिथेही अनेक पुरातन धार्मिक गोष्टी करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे किंवा आमचे पूर्वज वैज्ञानिक दॄष्ट्या किती पुढारलेले होते ( जसे हनुमान विमानाने लंकेला गेला, ब्रम्हास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब होय, किंवा परशुरामाने बाणांनी भूमी मागे हटवली म्हणजे रेक्लमेशन केलं इत्यादी, बायकांनी कुंकू लावण्यामागे अमुक तमुक शास्त्रीय कारण आहे इत्यादी) हे ओढूनताणून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. बर्‍याचदा सुशिक्षित माणसांच्या बाबतीत असं होतं की विज्ञानाने केलेली प्रगती ढळढळीतपणे समोर दिसत असते आणि त्यामुळे त्यातून आलेले निष्कर्ष मान्य करावेच लागतात. पण त्याचबरोबर सनातनी मन मात्र कुठेतरी स्वतःच्या पुरातन संस्कॄतीबद्दलचे अभिमान आणि धार्मिक संस्कार यांच्यात अडकलेले असते. मग लॉजिकली न पटणार्‍या, पुराव्याने शाबीत न होउ शकणार्‍या धार्मिक रुढी (ज्याला अडगळ म्हणता येईल ), परंपरा किंवा पौराणिक कथा यांना वैज्ञानिक अ‍ॅप्रॉक्सिमेशन चा मुलामा दिला जातो. हे सगळे रंगीत कागदात दगड बांधून भेटवस्तू म्हणून दिल्यासारखे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

गांधीवादी 24/08/2010 - 07:30
अप्पा काका हे पुस्तक वाचण्यासारखे आहे त्या बाबतीत, शेवटची काही पाने चाळली तर कळून येईल Von Daniken- Chariots of the Gods " alt="" /> अश्याच अर्थाचे पृथ्वीवर माणूस उपरा हे सुद्धा एक पुस्तक वाचनात आले होते.

क्लिंटन 24/08/2010 - 15:58
कोणत्याही गोष्टीसाठी कठोर परिश्रम करण्याला भगिरथ परिश्रम अशी मराठीत म्हणतात हे आपल्याला माहित आहेच.त्यामागे भगिरथाचा सो-कॉल्ड गंगा पृथ्वीवर आणायचा प्रयत्न आहे असे वाटते. समजा भगिरथ अभियंता असला जरी तरी त्याचा सध्याच्या काळात नक्की काय फरक पडणार आहे?कारण का कोणास ठाऊक, भगिरथ अभियंता होता हे रामाकडे पुष्पक विमान होते, शंकराची पिंडी म्हणजे न्युक्लिअर रिऍक्टर वगैरे कुटुंबातील वाक्य वाटत आहे. अहो सध्याच्या काळातील अभियंत्यांचे कौशल्य बघायचे असेल तर लवकरच चीन तिबेटमध्ये मोठी धरणे बांधून ३८,००० मेगॅवॉट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प बांधणार आहे तेच बघावे. तिबेटसारख्या दुर्गम प्रदेशात अशी धरणे बांधून असे अवाढव्य प्रकल्प उभे करणे म्हणजे खायची गोष्ट नक्कीच नव्हे. अशा प्रकल्पांनाही तोंडात मारेल असे काहीतरी भव्यदिव्य आपण आपल्या देशात उभे करून दाखवू असे आपल्याला कधीच वाटत नाही. आपला इंटरेस्ट फक्त पुराणातील वांगी उगाळण्यात. असे का? क्लिंटन

In reply to by क्लिंटन

मृत्युन्जय 24/08/2010 - 16:17
पुराणात ते लिहीलेले आहे तर त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. आणि लिहिलेले असेलच तर त्याबद्दल अभिमान न बाळगण्याचेही काही कारण नाही. राहिता राहिला प्रश्न चीनसारखे काहीतरी भव्यदिव्य करण्याचा तर तो मुद्दा मात्र मला एकदम मान्य आहे. पण आपण काहीच करत नाही आहे असेही नाही. आपली निम्मी शक्ती पाकिस्तानमुळे वाया जाते. चीनल तो प्रश्न नाही. त्यामुळे प्रगतीचा वेग चीनपेक्षा कमी असेलही कदाचित पण अगदीच नकारात्मक भूमिका घेण्याएवढा वाईटही नाही.

In reply to by मृत्युन्जय

क्लिंटन 24/08/2010 - 19:51
पुराणात ते लिहीलेले आहे तर त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. आणि लिहिलेले असेलच तर त्याबद्दल अभिमान न बाळगण्याचेही काही कारण नाही.
पुराणात काही लिहिले असेल तर ते नाकारण्यासारखे नाही हे मान्य.पण त्याचा फुकाचा अभिमान का बाळगावा?रामाकडे पुष्पक विमान होते पण २०१० मध्ये मोठी प्रवासी विमाने बनविणाऱ्या कंपन्या केवळ बोईंग आणि एअरबस. त्यापैकी अर्थात एकही कंपनी भारतीय नाही.पूर्णपणे भारताने विकसित केलेले (त्यातही इंजिन परदेशी बनावटीची) असे सारस हे हवाईदलासाठीचे एकमेव विमान. ते ही अजून हवाईदलात समाविष्ट झालेले नाही. असे असताना पुराणात रामाकडे विमान होते या गोष्टीचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे? उज्ज्वल भूतकाळापासून प्रेरणा घेऊन भविष्यकाळपण तसाच उज्वल व्हावा म्हणून पावले टाकली जात आहेत का? तसे तर दिसत नाही. आपला इन्टरेस्ट पुराणकाळी आमच्याकडे अमुक होते आणि तमुक होते असे म्हणून आपली कॉलर ताठ करण्यात. असला फुकाचा अभिमान काय उपयोगाचा?

In reply to by क्लिंटन

गांधीवादी 26/08/2010 - 06:26
मुद्द्यांशी सहमत : भारताचा (गरिबांसाठी) अर्धा पेला रिकामा आहे, आणि (धनिकांसाठी) अर्धा भरलेला आहे.

स्पंदना 14/08/2010 - 18:58
काय माहिती नाही हो पण अस म्हणतात की कौरव हे टेस्ट ट्युब बेबीच पहिल उदाहरण . आपल्या महाकाव्य लेखकांची भरारी इतकी उत्तुन्ग होती की ते त्यांच्या त्या वेळच्या शास्त्रीय भाषेत हे सर्व लिहित होते आणी आजची शास्त्रीय भाषा आन्ग्लौत्पन्न आहे, म्हणुन आपण त्या सर्व प्रकाराला भाकड कथा मानतो, देव जाणे. पण एक सांगा अस एका दरीत जर गंगा उत्त्पन्न झाली असेल तर आज जो आपण पहातो तो उगम असा शंकराच्या जटेच्या आकाराच्या दगडातुन कसा बाहेर पडतो, अन या तुम्ही वर्णीलेल्या कादम्बरीतील गुहांचे ठाव ठीकाण सुद्धा असायला हवे नाही का? काही अधिक उण असेल तर क्षमस्व!!

कठोर प्रयत्नासाठी भगीरथाचे नाव दिले जाते. भगीरथाच्या काही आणखी कथा इथेही वाचायला मिळतील. >>>>भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली कादंबरीचीही जमेल तेव्हा ओळख करुन द्या.....! -दिलीप बिरुटे

पाषाणभेद 14/08/2010 - 20:08
आधुनिक इतिहासकारांच्या मते आर्य भारतात आलेच नव्हते. हिंदू हे आर्यांपासून झाले हा विचारही चुकीचा आहे. आर्य म्हणजे नवर्‍याचे संबोधन होते. जसे 'अहो' च्या ऐवजी आर्य. महाभारतातही पर्यायाने गीतेतही आर्य हा शब्द याच अर्थाने आलेला आहे. जाणकारांना भाष्य करावे. बाकी भगीरथ अभियंत्याच्या जातकुळीचा असावा हे मान्य

In reply to by पाषाणभेद

प्रचंड गोंधळ आहे. मीआर्य या शब्दाचा अर्थ 'to till' म्हणजे शेती करणे असा आहे असं मी नेहरुंनी लिहिलं आहे असं मी इथे म्हटलं होतं. तसेच आर्य या शब्दाचा 'Noble' असाही अर्थ होतो असंही ऐकलं आहे. आधुनिक इतिहासकारांच्या मते आर्य भारतात आलेच नव्हते. याबाबतही खूप कल्ला चालू असतो. कास्ट जेनेटिक्स आणि लिंग्विस्टिक्स वापरुन दोन्ही बाजू एकमेकांशी भांडत असतात.

झंम्प्या 14/08/2010 - 20:55
सदरच्या लेखात उल्लेखलेली बाब हि तात्विक दृष्ट्या मनाला पटणारी आहे... ह्यालाच धरून अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते.. वाचकांना हे विषयांतर वाटेल पण तरीही नमूद कारावास वाटत... नुकतच इरावती कार्वेंचा युगांत पुस्तक वाचनात आलं... त्यांनी ह्या पुस्तकात महाभारतातील व्यक्तिरेखांचे खूप छान शास्त्रीय दृष्ट्या विवेचन केलेलं आढळत.. ह्या विवेचनावरून माझ्या वैयक्तित महाभारताविषयी असणार्या कल्पनांना तडा गेला व नवीन विचार, नवीन दृष्टी मिळाली महाभारताकडे पाहण्याची.. येथे लेखकाने जो मुद्दा मांडला आहे तो तात्विक दृष्ट्या पटण्यासारखा आहे अस माझं वैयक्तित मत आहे.....

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

प्रशु 15/08/2010 - 07:17
दुर्गा भागवतांचं व्यासपर्व देखील वाचा, पे॑स आणी 'दुर्गाबाईशीं गप्पा' हे प्रतिभा रानडे ह्यांच पुस्तक देखील जरुर वाचा खुप छान माहीती मिळेल....

गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का? अन्यथा ही कवीकल्पना राहील. दुसरी शक्यता अशी आहे की भगीरथाने जर एखाद्या नदीचं पाणी वळवून त्याच्या गावाकडे आणलं असेल तर त्या पाण्याला लोकांनी 'गंगाच जणू' असं म्हटलं असेल. शेकडो मैल दूर, हिमशिखरांत जाऊन एखाद्या नदीचा ओघ बदलणे हे त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं. साठ हजार माणसं कित्येक पिढ्या या कामाला लावायच्या - केवळ पाणी मिळवण्यासाठी - मग त्या काळात त्यांच्या शेतांचं काय? वगैरे प्रश्न उभे राहातात.

In reply to by राजेश घासकडवी

मृत्युन्जय 15/08/2010 - 00:35
मान्य की ही कविकल्पना वाटते. पण फक्त तर्कशास्त्राच्या कसोटीवर तासुन बघायची असेल तर मूळ कथेपेक्षा जास्त तर्कशुद्ध वाटते की नाही?

In reply to by मृत्युन्जय

माझ्यामते तर्कशुद्धता ही गरोदरपणासारखी असते - ती असते किंवा नसते. तुम्हाला शक्यता म्हणायचं आहे बहुतेक. तसं असेल तर बरोबर. 'गंगा नदी कुठल्यातरी स्वर्ग नावाच्या भागातून मानवाने, आपल्या प्रयत्नाने जमिनीवर आणली' हे सत्य मानलं तर ते या कथेत सांगितल्याप्रमाणे घडलेलं असण्याची शक्यता खूपच अधिक आहे. पण मुळात जी कविकल्पनाच आहे, कथा आहे, तिला सत्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करणं हा द्राविडी प्राणायाम होतो. त्यापेक्षा मुळात त्या विधानातली नदी गंगा नव्हतीच, किंवा मुळात ती नदी नव्हतीच - छोटासा ओढा होता वगैरे गोष्टी अधिक संभाव्य आहेत. किंवा मनोरंजनासाठी कोणीतरी रचलेली कथा असेल, हे अधिकच शक्य आहे. असा द्राविडी प्राणायाम करून अर्थातच उत्तम कथा होऊ शकेल कदाचित. पण कथेचं सौंदर्य तो प्राणायाम किती चांगला जमला आहे यावर ठरू नये असं मला वाटतं. याउलट चांगल्या कथेसाठी वाचक अनेक अशक्य गोष्टी चालवून घ्यायला तयार असतो.

In reply to by राजेश घासकडवी

शिल्पा ब 15/08/2010 - 04:31
स्वर्ग म्हणजे कदाचित हिमालय आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असावा...तेथील लोकांची वयोमर्यादा इतरांपेक्षा जास्त असते असे म्हणतात....उदा. बौद्ध भिक्षु वगैरे लोक.. आता भगीरथाचे म्हणाल तर कदाचित त्याने तसा प्रयत्न केलाही असेल...कथेप्रमाणे त्याच्या वंशजांनी ते काम पूर्ण केले त्याने नाही...अगदीच अशक्य म्हणता येणार नाही...त्या नदीचे पाणी वळवण्यापूर्वी जे काही छोटे ओढे, नद्या असतील त्याचा वापर शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला असेल...दुष्काळ काही एवढा काळ टिकत नाही..म्हणूनच शक्य असावे असे वाटते. बाकी, इतर जाणकारांनी आणि अभ्यासूंनी प्रकाश टाकावा.

In reply to by राजेश घासकडवी

गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का? अन्यथा ही कवीकल्पना राहील. दुसरी शक्यता अशी आहे की भगीरथाने जर एखाद्या नदीचं पाणी वळवून त्याच्या गावाकडे आणलं असेल तर त्या पाण्याला लोकांनी 'गंगाच जणू' असं म्हटलं असेल. शेकडो मैल दूर, हिमशिखरांत जाऊन एखाद्या नदीचा ओघ बदलणे हे त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं. साठ हजार माणसं कित्येक पिढ्या या कामाला लावायच्या - केवळ पाणी मिळवण्यासाठी - मग त्या काळात त्यांच्या शेतांचं काय? वगैरे प्रश्न उभे राहातात.
पण मुळात जी कविकल्पनाच आहे, कथा आहे, तिला सत्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करणं हा द्राविडी प्राणायाम होतो.
वंदनीय गुरुजींशी सहमत! (नम्र) (वेळात वेळ काढून गुरुजींनी शक्यतो सर्वच धाग्यांवर (आपलं गुंत्यांवर) प्रतिसाद देऊन मेंदू सफाई अधिकार्‍यांचे कर्तव्य पार पाडावे असे कळकळीचे आवाहन करणारा!)

In reply to by राजेश घासकडवी

डावखुरा 26/08/2010 - 10:48
त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं.??? ईजिप्त मध्ये पिरॅमिड चे मोठे शिळा़खंड कसे चढवले असतील? मला नाही वाट्त हे अशक्यप्राय..मनुष्यबळाच्या जोरावर व सामुहिक ईच्छाशक्तीच्या जोरावर काही ही अशक्य नाही...

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 17/12/2012 - 00:07
भगीरथ वैग्रे इश्श्यू अपार्टः
गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का?
हो, ह्याला ठोस पुरावा आहे. हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल नामक ११ खंडी भारताच्या समग्र इतिहासाची माला आहे. त्यातील प्रथम खंडात हे दिलेले आहे. चॅप्टर ४, "द जिऑलॉजिकल बॅकग्रौंड ऑफ इंडियन हिष्ट्री", पान क्र. ८२ ते ८7. सारभूत वाक्ये खाली देतोय. As noted above, by early Pleistocene time, the dominant features of India's geography had taken place and the country had almost acquired most of it present day form except that the land in front of the newly formed Himalayas formed a great longitudinal depression, comlementary to the mountains and parallel to them. This trough was at first occupied by salt-water lagoons, which were gradually freshened. These lagoons were gradually filled by the waste of Himalayas by numerous streams descending from the mountain. This sedimentation continued for a very long time, and thus the narrow strip parallel to Himalayas was transformed into the great Indian plains. The thickness of the debris deposition is such that the bedrock is not found even at 2000 feet deep borings!!!! The greater part of the Indo-Gangetic plains is built up of very late alluvial flood deposits of the Indus & Ganges river systems, borne down from himalayas and deposited at their foot. But most of this terrain became dry and firm enough to be habitable for man only some 5000-7000 years ago. It has no mineral resources and has records for only the yesterday of geological time. Ample evidence is found regarding the common ancestry of Ganga, Brahmaputra and Indus rivers, their reversal & capture before attaining their present state, which affected Indian History at many a turn and corner. It was this notable pre-historic river, named "Shivalik river" by the pilgrim, that flowed from the head of the Sind gulf to the Punjab and thence along the foot of the embryonic Himalaya chains, through Simla and Nainital and Assam. Post-Shivalik earth movements in North-West Punjab brought about a dismemberment of this river system into subsidiary systems: 1. Present day Indus from Hazara. 2. Five rivers of Punjab 3. Rivers in Ganges system that take a South-Eastern course. The severed part of the Shivalik river became the modern Ganges, having in the course of time captured the transversely running Yamuna and converted it into its own affluent. Other Himalayan rivers like Alakananda, Gandak, Kosi, etc. which are really among the oldest water courses of North India, continued to discharge their water into this new river, irrespective of its ultimate destination. The deltas of large rivers were formed early, but their outline and surfaces changed materially in the last few centuries. These rives brought a lot of silt from the Himalayas and as a result, elevated the level of their beds as well as that of the nearby flat country. त्यामुळे , भगीरथ या एका माणसाने गंगा मृत्युलोकात आणली हे म्हणणे चूक असले तरी ती कथा एका खर्‍या नैसर्गिक घटनेवरती आधारलेली आहे याबद्दल शंका असू नये. वरील अवतरणांत "नेमके" पुरावे दिलेले नाहीत हे मान्य आहे, पण सध्या माझ्या हाताशी असलेला हा एकच सोर्स आहे, बाकीचे अधिक नेमके काही असेल तर ते नंतर बघून सांगेन.

Nile 15/08/2010 - 00:29
रविंद्र भटांची ही कादंबरी वाचली आहे, मला ही कल्पना वाचायला फार आवडली होती. भगीरथ प्रयत्न ह्या वाकप्रचार अश्या प्रयत्नाला समर्पक वाटतो (खरे असेल वा खोटे, तप वगैरे करुन आणण्यापेक्षा केव्हाही वरचढ, तेव्हा काय सगळेच तप करायचे ;-) ) यावरुन एक आठवणः रविंद्र भट सज्जनगडावर जाउन लिखाण करत असत, एकदा आजोळावरुन असेच बसने येत असताना सातार्‍यात एक छानश्या आजी शेजारी येउन बसल्या, मी भयंकर बडबड्या असल्याने गप्पा टप्पा सुरु झाल्या. आमची मस्तच गट्टी जमली. मग त्यांनीच मी रविंद्र भटांची पत्नी, ते इथे सज्जनगडावर आहेत वगैरे सांगितले. त्यावेळी (फारसे वाचन नसले, तरी थोडेफार होते) रविंद्र भटांचे एकही पुस्तक वाचलेले नाही म्हणुन स्वतःची लाज वाटली होती.(मग घरी पोहोचल्यावर दुसर्‍याच दिवशी भगीरथ घेतली होती) योगायोगाने पुण्यात त्या आमच्या घराजवळच रहात होत्या. स्वारगेटाहुन आम्ही एकाच रिक्षेत बसुन गेलो. मी तुझी आजीच की म्हणुन त्यांनी माझ्याकडुन रिक्षेचे पैसेही घेतले नाही. कसं कुणाशी नातं जुळेल...

उप्रोल्लेखित पुस्तक वाचलेलं नसल्याकारणाने त्यावर भाष्य करु शकत नाही. पण जुन्या काळामध्ये खूप विकसित अशी संस्कॄती अस्तित्वात होती या गॄहीतकामुळे असे विचार निपजत असावेत. हिंदू जनजागॄती समितीची वेबसाईट पाहिली तर तिथेही अनेक पुरातन धार्मिक गोष्टी करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे किंवा आमचे पूर्वज वैज्ञानिक दॄष्ट्या किती पुढारलेले होते ( जसे हनुमान विमानाने लंकेला गेला, ब्रम्हास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब होय, किंवा परशुरामाने बाणांनी भूमी मागे हटवली म्हणजे रेक्लमेशन केलं इत्यादी, बायकांनी कुंकू लावण्यामागे अमुक तमुक शास्त्रीय कारण आहे इत्यादी) हे ओढूनताणून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. बर्‍याचदा सुशिक्षित माणसांच्या बाबतीत असं होतं की विज्ञानाने केलेली प्रगती ढळढळीतपणे समोर दिसत असते आणि त्यामुळे त्यातून आलेले निष्कर्ष मान्य करावेच लागतात. पण त्याचबरोबर सनातनी मन मात्र कुठेतरी स्वतःच्या पुरातन संस्कॄतीबद्दलचे अभिमान आणि धार्मिक संस्कार यांच्यात अडकलेले असते. मग लॉजिकली न पटणार्‍या, पुराव्याने शाबीत न होउ शकणार्‍या धार्मिक रुढी (ज्याला अडगळ म्हणता येईल ), परंपरा किंवा पौराणिक कथा यांना वैज्ञानिक अ‍ॅप्रॉक्सिमेशन चा मुलामा दिला जातो. हे सगळे रंगीत कागदात दगड बांधून भेटवस्तू म्हणून दिल्यासारखे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

गांधीवादी 24/08/2010 - 07:30
अप्पा काका हे पुस्तक वाचण्यासारखे आहे त्या बाबतीत, शेवटची काही पाने चाळली तर कळून येईल Von Daniken- Chariots of the Gods " alt="" /> अश्याच अर्थाचे पृथ्वीवर माणूस उपरा हे सुद्धा एक पुस्तक वाचनात आले होते.

क्लिंटन 24/08/2010 - 15:58
कोणत्याही गोष्टीसाठी कठोर परिश्रम करण्याला भगिरथ परिश्रम अशी मराठीत म्हणतात हे आपल्याला माहित आहेच.त्यामागे भगिरथाचा सो-कॉल्ड गंगा पृथ्वीवर आणायचा प्रयत्न आहे असे वाटते. समजा भगिरथ अभियंता असला जरी तरी त्याचा सध्याच्या काळात नक्की काय फरक पडणार आहे?कारण का कोणास ठाऊक, भगिरथ अभियंता होता हे रामाकडे पुष्पक विमान होते, शंकराची पिंडी म्हणजे न्युक्लिअर रिऍक्टर वगैरे कुटुंबातील वाक्य वाटत आहे. अहो सध्याच्या काळातील अभियंत्यांचे कौशल्य बघायचे असेल तर लवकरच चीन तिबेटमध्ये मोठी धरणे बांधून ३८,००० मेगॅवॉट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प बांधणार आहे तेच बघावे. तिबेटसारख्या दुर्गम प्रदेशात अशी धरणे बांधून असे अवाढव्य प्रकल्प उभे करणे म्हणजे खायची गोष्ट नक्कीच नव्हे. अशा प्रकल्पांनाही तोंडात मारेल असे काहीतरी भव्यदिव्य आपण आपल्या देशात उभे करून दाखवू असे आपल्याला कधीच वाटत नाही. आपला इंटरेस्ट फक्त पुराणातील वांगी उगाळण्यात. असे का? क्लिंटन

In reply to by क्लिंटन

मृत्युन्जय 24/08/2010 - 16:17
पुराणात ते लिहीलेले आहे तर त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. आणि लिहिलेले असेलच तर त्याबद्दल अभिमान न बाळगण्याचेही काही कारण नाही. राहिता राहिला प्रश्न चीनसारखे काहीतरी भव्यदिव्य करण्याचा तर तो मुद्दा मात्र मला एकदम मान्य आहे. पण आपण काहीच करत नाही आहे असेही नाही. आपली निम्मी शक्ती पाकिस्तानमुळे वाया जाते. चीनल तो प्रश्न नाही. त्यामुळे प्रगतीचा वेग चीनपेक्षा कमी असेलही कदाचित पण अगदीच नकारात्मक भूमिका घेण्याएवढा वाईटही नाही.

In reply to by मृत्युन्जय

क्लिंटन 24/08/2010 - 19:51
पुराणात ते लिहीलेले आहे तर त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. आणि लिहिलेले असेलच तर त्याबद्दल अभिमान न बाळगण्याचेही काही कारण नाही.
पुराणात काही लिहिले असेल तर ते नाकारण्यासारखे नाही हे मान्य.पण त्याचा फुकाचा अभिमान का बाळगावा?रामाकडे पुष्पक विमान होते पण २०१० मध्ये मोठी प्रवासी विमाने बनविणाऱ्या कंपन्या केवळ बोईंग आणि एअरबस. त्यापैकी अर्थात एकही कंपनी भारतीय नाही.पूर्णपणे भारताने विकसित केलेले (त्यातही इंजिन परदेशी बनावटीची) असे सारस हे हवाईदलासाठीचे एकमेव विमान. ते ही अजून हवाईदलात समाविष्ट झालेले नाही. असे असताना पुराणात रामाकडे विमान होते या गोष्टीचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे? उज्ज्वल भूतकाळापासून प्रेरणा घेऊन भविष्यकाळपण तसाच उज्वल व्हावा म्हणून पावले टाकली जात आहेत का? तसे तर दिसत नाही. आपला इन्टरेस्ट पुराणकाळी आमच्याकडे अमुक होते आणि तमुक होते असे म्हणून आपली कॉलर ताठ करण्यात. असला फुकाचा अभिमान काय उपयोगाचा?

In reply to by क्लिंटन

गांधीवादी 26/08/2010 - 06:26
मुद्द्यांशी सहमत : भारताचा (गरिबांसाठी) अर्धा पेला रिकामा आहे, आणि (धनिकांसाठी) अर्धा भरलेला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली. कादंबरी बरी वाईट हे लिहीण्यासाठी हा धागा नाही पण त्यात जो विचार लेखकाने मांडला होता तो मिपा वाचकांना समजावा हा उद्देश. लेखकाने मांडलेल्या मतानुसार, आर्य हे टोळ्याने भारतात आले. त्यापैकी एका टोळीचा नायक विश्वामीत्र होता. भारतातील मुळ रहिवासी हे शेती, व्यापार करावयाचे. त्यानी गावे वसविली होती. ते सुस्थीतीत रहात होते. आर्य हे आक्रमक होते. मुळ रहीवाश्याकडे आर्यांसारखी आधुनीक शस्त्रे नव्हती. आक्रमक आर्यानी अन्नासाठी मुळ रहिवाश्यावर आक्रमण केले. त्याना दास (दस्यु) बनविले. त्यांच्याकडुन शेती शिकली. त्यांच्या बरोबर विवाह संबध जुळवले.

मिपा पाककृती..

मनि२७ ·

सूर्यपुत्र 09/08/2010 - 11:23
आत्तापर्यंत लक्ष दिले नव्हते. पण गेल्या आठवड्याच्या एकंदरीत चर्चा पाहता या सदराकडे दुर्लक्ष करु नये हे जाणवले.... "एक तरी पाककृती करावी शहाणी....."

झक्कास... 09/08/2010 - 16:04
अगदी सहमत. फोटो जास्त वाटत आहे प्रत्येक पाकृ मध्ये. रेसिपी देणाऱ्या सदस्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आस वाटत. आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय. निश्चितच.

In reply to by झक्कास...

गणपा 09/08/2010 - 17:01
>> आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय. असं का वाटलं बुवा? ओह प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणुन? जरा हे पण पहा 278 वाचने. बाकी वरील मताची नोंद घेतली आहे.

शानबा५१२ 09/08/2010 - 16:58
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय. निर्मळ मनानेच बघा की मग. अहो कधी कधी कांदा कीती बारीक कापायचा व तत्सम गोष्टी कळतात.व पाक्रुही छान समजावुन सांगितलेली असते.

फोटो प्रमाणाबाहेर होताहेत असे मला वाटत नाही. अनेकदा फोटोंमुळे पाककृतीच्या क्रियांचे बारकावे कळतात आणि त्या कळणे सोपे जाते असा अनुभव आहे.

मी-सौरभ 09/08/2010 - 19:55
केवळ फोटो टाकण्याला आक्शेप घेता येइल पण माहिती सह फोटो असतील तर न आवडायच कारण नाही.

In reply to by मनि२७

अर्धवट 10/08/2010 - 11:21
राग तुमचा नाही आला हो तै. तुमचं मत तुम्ही मांडलत, योग्य आणि संयत शब्दात.. तुमच्यावर कसला राग, तुम्हाला तो हक्क आहेच की.. पण गणपानं फोटो कमी केले तर मात्र नक्की राग येइल.

सहज 10/08/2010 - 10:04
अहो अमराठी / देवनागरी न समजणार्‍या कुकला हे स्टेप बाय स्टेप फोटो हातात ठेवून दिले की पाकृ फारशी समजुन द्यायची भानगड नाही ना हो. उलट समजुन देताघेता शब्दात अडकून चव हरवायची. हे फोटोच बेस्ट! फोटो हवेच!

सूर्यपुत्र 09/08/2010 - 11:23
आत्तापर्यंत लक्ष दिले नव्हते. पण गेल्या आठवड्याच्या एकंदरीत चर्चा पाहता या सदराकडे दुर्लक्ष करु नये हे जाणवले.... "एक तरी पाककृती करावी शहाणी....."

झक्कास... 09/08/2010 - 16:04
अगदी सहमत. फोटो जास्त वाटत आहे प्रत्येक पाकृ मध्ये. रेसिपी देणाऱ्या सदस्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आस वाटत. आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय. निश्चितच.

In reply to by झक्कास...

गणपा 09/08/2010 - 17:01
>> आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय. असं का वाटलं बुवा? ओह प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणुन? जरा हे पण पहा 278 वाचने. बाकी वरील मताची नोंद घेतली आहे.

शानबा५१२ 09/08/2010 - 16:58
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय. निर्मळ मनानेच बघा की मग. अहो कधी कधी कांदा कीती बारीक कापायचा व तत्सम गोष्टी कळतात.व पाक्रुही छान समजावुन सांगितलेली असते.

फोटो प्रमाणाबाहेर होताहेत असे मला वाटत नाही. अनेकदा फोटोंमुळे पाककृतीच्या क्रियांचे बारकावे कळतात आणि त्या कळणे सोपे जाते असा अनुभव आहे.

मी-सौरभ 09/08/2010 - 19:55
केवळ फोटो टाकण्याला आक्शेप घेता येइल पण माहिती सह फोटो असतील तर न आवडायच कारण नाही.

In reply to by मनि२७

अर्धवट 10/08/2010 - 11:21
राग तुमचा नाही आला हो तै. तुमचं मत तुम्ही मांडलत, योग्य आणि संयत शब्दात.. तुमच्यावर कसला राग, तुम्हाला तो हक्क आहेच की.. पण गणपानं फोटो कमी केले तर मात्र नक्की राग येइल.

सहज 10/08/2010 - 10:04
अहो अमराठी / देवनागरी न समजणार्‍या कुकला हे स्टेप बाय स्टेप फोटो हातात ठेवून दिले की पाकृ फारशी समजुन द्यायची भानगड नाही ना हो. उलट समजुन देताघेता शब्दात अडकून चव हरवायची. हे फोटोच बेस्ट! फोटो हवेच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाचा पाककृती हे सदर खूप छान आहे..अगदी त्याला कसलीच तोड नाही हे नक्कीच!! . मी मिपा ची नियमित वाचक आणि आता सदस्य पण आहे. पण आज कालच्या पाकृ मध्ये मला फोटो session जास्त आणि पाकृ मधला लेखकाचा रस कमी वाटतोय. फोटो शिवाय मजा नाही मान्य !!! अगदी १०१ % ... पण काही फोटो प्रकाशित केले नाहीत तरी काही हरकत नाही.(उदा. चिरलेले कांदे किंवा टोमाटो) मोजकेच आणि गरजेचे फोटो द्यावे आस माझ मला वाटतय त्यामुळे पाकृ सुटसुटीत आणि नीट वाटेल.. त्यामुळे पाकृ ची चव काही कमी होणार नाही आणि वाचकांचा प्रतिसाद हि नाही .... हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय..ह्यात मला काही कोणाला उद्देशून म्हणायचे नाही...आणि konach मन हि दुखवायचा नाही.. तुम्हाला काय वाटत मिपाकरांनो? टीप:- हे सगळ मला वाटलं म्हणून लिहलय......... मिपाकारांचा मत हवाय.

एसटी पुराण

पाषाणभेद ·

प्रचेतस 04/08/2010 - 14:08
खरेच या लाल पिवळ्या गाड्या महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्याच आहेत. मी ट्रेकिंगच्या निमित्तने बरेच वेळा दुर्गम भागात ह्या गाड्यांनी प्रवास केला आहे. जिथे ह्या गाड्या जाउ शकतात तिथे तश्या सो-कॉल्ड महागड्या लक्झरी बस जायचे धाडस करणारच नाहीत.

चिरोटा 04/08/2010 - 14:20
मस्त लेख. एस्.टी. मध्येही काही प्रकार होते- सुपर एक्स्प्रेस आणि नॉन स्टॉप.ह्या बसेसना मधल्या पिवळ्या पट्ट्याऐवजी पांढरा पट्टा असायचा.लाल अ़क्षरांत जलद्/अतिजलद लिहिलेले असायचे.प्रत्येक एस.टी.वर BOM46 असे का लिहिले असते कधी कळले नाही.

In reply to by अर्चि

चिरोटा 04/08/2010 - 19:12
मुख्य कार्यालय परळला(४०००१३) आहे असे वाटायचे.४०००४६ हा पिनकोड एस्.टी. सोडली तर अनेक वर्षात कोठेही दिसला नव्हता. नेटवरुन तो पिनकोड माटुंग्याचा आहे असे कळले.सहसा माटुंग्याचा कोड-४०००१९(मध्य) किंवा ४०००१६(ले.ज्.मा) असतो.

In reply to by चिरोटा

पाषाणभेद 05/08/2010 - 03:36
BOM46 यात BOM म्हणजे बॉम्बे या अर्थाने नाही. बॉम्बे चे मुंबई कधीच झाले अन एस्टी वाले तर आधी पासूनच मुंबईच म्हणायचे म्हणा. तर BOM म्हणजे Bill of Material. गाडीचा मेटेंनन्स च्या हिशेब ठेवण्यासाठी BOM मेंटेन ठेवतात. आमच्या कडच्या साखरकारखान्याच्यादेखील प्रत्येक गाडीवर असे BOM लिहीलेले असते. मलाही असलाच प्रश्न पडला होता त्या वेळी. नंतर समजले की ते Bill of Material असते म्हणून.

फारच सुंदर लेख. समाजजीवनाशी अतूट असे नाते असलेली एस.टी. ~~ शहराकडे जाण्यासाठी फाट्यावर उभे राहुन "यस्टी" ची वाट पाहणे ही किती गंमतीदार बाब आहे तिचे वर्णन करण्यासाठी धाकटे माडगुळकर किंवा आजचे बिनीचे अनिल अवचटच हवेत. आता "ग्राम सडक सुधार" धडक मोहिमेंतर्गत खेड्यापाड्यातील अप्रोच रोड बर्‍यापैकी सुधारले आहेत, पण ज्या काळात रस्ता म्हणजे धुळीचा खकाणा अशी व्याख्या होती त्याकाळात रणरणत्या उन्हात, मोडक्यातुटक्या शेडचा आसरा घेतला ना घेतला असे करत, "दिलिप जर्द्या" ची देवाणघेवाण करत असलेली डोक्याला लाल-पिवळे-गुलाबी फेटे गुंडाळलेले रामराव, तानाजीराव, सदानंद, वसंतराव ही मंडळी आणि त्यांचे "उसाचे राजकारण, केडीसीच्या म्यानेजरला कसा तोडतो बघच उद्या" या खडाजंगीच्या बोलाचाली.... त्या शेडच्या बाजुला असलेल्या झाडाला टेकुन बसलेल्या हौसाक्का, बायाक्का, शांताकाकु, शकी, वच्छी, शारदी यांच्या दबक्या आवाजातील गप्पा :: ("व्हय गं, आंवदा सरूला दिवस गेल्याती न्हव?", "व्हय बया, बघ तर, म्या म्हटलंत तिला यल्लमाला जावून्शी डोकं टेक तिच्याम्होर ! गेल्ली की म्हायल्या जत्रला, आनि आता बघ कशी मोरासारखी टण्णाना उड्या मार्तिया...." "आसू दे मारू दे, माझ्या म्हायीरचीच हाया ती. लई केलया तिच्या आईनं माझ्यासाठी...") हे चित्र लोभसवाणे आहे, आणि ते आणखीन पाहावे तोच गलका.... "आली आली रं" लांबून निळा-पांढरा धुर आणि राखी रंगाची धूळ मागे बेदरकारपणे उडवत शेडकडे येणारी लालपिवळी "आपुली" यस्टी दिसली की, बस्स ! काय तो आनंद..... काय त्या कंडक्टराची मिजास..."ज्यादा जागा न्हाई, चारच चढा.." मग डझनभरांची अजिजी.... ड्रायवरभाऊंच्या बाजुने वशीला लावणे.... मग उपकार केल्याच्या भावनेने दोन्ही रावसाहेबांची सर्वांना जागा देण्याची तयारी.... ढिगभर गाठोडी पाहुन त्याचा उठणारा मस्तकशूळ.. मग "आसु दे रे राज्या, पोरीकडं सरकारी दवाख्यान्यात चाल्लोया, लई शिक हाया ती. घोंगडीच हाईती त्यात.." अशी एखाद्या जनाबाईची विनवणी....मग कंडक्टरचं ढेकळासारखं विरघळून जाणं. फार सुंदर... घरचे चित्र आहे.... "एस.टी." म्हणजे.

In reply to by इन्द्र्राज पवार

पाषाणभेद 04/08/2010 - 14:35
एकदम बारीक निरीक्षणाचे वर्णन. अशा जनाबाईची विनवणी ऐकून विरघळणार नाही तो कंडक्टर कसला? तो ही त्याच मातीतून आलेला असतो. त्याची नाळ अशीच एखाद्या जनाबाईशी जुळलेली असते. म्हणूनच एस्टी एक समाजजीवन जोडणारी रेषाच आहे. अजूनही मी काहीच काम नसले की उगाचच एसटी स्टँड वर भटकतो. वेगळा न राहता प्रवाशांमध्ये मिसळतो.

वारा 04/08/2010 - 14:58
पन्हाळा, वाघबीळ, गिरोली कोडोली मार्गे वाठार व पेठ वडगांव ला जाउन आल्या सारखे वाटले..

हेम 04/08/2010 - 15:25
एकदम झक्कास लेख ट्रेक संपवून आडनिड्या गांवात कोसळल्यावर, धुरळा उडवत येणार्‍या ला. पि. बशीला पायल्यावर कांय आनंद होतो ते अनुभवींनाच कळेल.. कोकणात आजही या बस म्हणजे प्राणवायू आहेत. . सकाळी पावणेसहाची कोल्हापुर- मालवण टपाल बस.. घाटी अन् मालवणीची झकास सरमिसळ असलेला प्रवास... सध्याची परिवर्तन १ लंबर.. सुरुवातीला भाडं जास्त असेल या विचाराने लोक या बशीत जायला कचरायचे, म्हणून महामंडळाला बसवर लिहावं लागलं...'साध्या दरात' .

समंजस 04/08/2010 - 15:27
व्वा! पाषाणभेदी साहेब एसटी वर सुंदर लेख टाकलाय. अभिनंदन !! एसटीचं महत्त्व खुप आहे ग्रामीण भागात प्रवास करायला. एवढी स्वस्त आणि पक्के रस्ते नसलेल्या ठिकाणी जाण्याकरीता अर्थातच एसटी शिवाय पर्याय नाही. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवल्या जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता. मला स्वतः ला तरी एसटीने प्रवास करणे आवडतं. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी एसटीनेच प्रवास करतो. खाजगी गाडयांनी (अवैध प्रवासी वाहने) यांच्या पेक्षा एसटी खरंच खुप सुरक्षीत वाटते.

दिपक 04/08/2010 - 16:25
वाह पाभे.. जबराट मस्त लेख.. एसटी ची मजाच निराळी. लाल डब्बा पाहिला की मुंबई ते सावंतवाडी केलेल्या फेर्‍या आठवतात. एसटी बस स्थानक पण खुप आवडीचे ठिकाण. ते कानिफनाथ रसवंती गृह... :-)

जोशी 'ले' 04/08/2010 - 16:36
मस्तच लिहिलंय ... आमच्या लहानपणी एक बडबड गीत म्हणत असू ' लाल पिवळी एस टी थांब ना GA जरा , मामाच्या गावाला घेऊन जा ग मला ' त्याची आठवण झाली

मीनल 04/08/2010 - 17:56
मला यस्टी लागते. त्यात आंबा, फणस, काजू यांच्या एकत्रित वासाने हमखास उलटी होते.

मला यस्टी लागते. त्यात आंबा, फणस, काजू यांच्या एकत्रित वासाने हमखास उलटी होते.
सहमत ! माझ्या बाजूला तर कायम एक उंच हिराची केरसुणी घेउन लोक येउन बसतात.

बेभान 04/08/2010 - 18:26
मन फ्रेश केलेस गड्या.. लोक नेहमीच परिवाहन महामंडळ सेवेबद्दल आठ्या घालताना दिसतात पण मला हे एस.टी. चे चालक वाहक दिवाळी, गुढीपाडवा या मोठ्या सणांनासुद्धा आपल्या घरच्यांसमवेत न राहता हे एस.टी. कर्मचारी ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ कामावर असलेले दिसतात तेंव्हा वाटतं की कोण प्रवासी कधी यांना सुखरूप सेवेबद्दल त्यांना धन्यवाद तरी देत असतील काय? हो काही ठिकाणी गरज आहे ती व्यवस्थापन विकासाची. अमेरिकेतल्या बस सेवांकडुन बरेच काही घेण्यासारखे आहे. उदा. ज्याप्रमाणे तिथले वाहक प्रत्येक सुरुवातीच्या थांब्यावर बसमधील सर्व प्रवाशांचे स्वागत करून त्यानंतर आपली ओळख, आणि मग शेवटच्या थांब्यापर्यंत कितीवेळ लागेल, बस कुठे-कुठे आणि कितीवेळ थांबेल याची माहीती देतो, थांब्याआधी त्यांच्याजवळ असलेल्या माइक्रोफोनद्वारे त्या थांब्याची सुचना देणे इ. गोष्टी सुरू करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. काही लोक एस.टी. वाहकांना त्यांच्या उर्मट वागणुकीमुळे त्यांना Customer Relationshipचे शिक्षण देण्याचे सल्ले देतात पण हाच वाहक रोज जवळ जवळ २००+ हौशे, नवशे, गौशे, अडाणी, सुशिक्षीत, म्हातारे, तरणे, गाववाले, शहरी, वाडी-वस्तीवाले, अशां लोकांबरोबर ’डील’ करतो. सकाळी जर आपल्या मनाला न पटणारी गोष्ट झाली तर आपली दिवसभर तावाताव होते. तिथे हा माणुस, दिवसभर यांच्या वाटयाला असलीच कामे येत असतात. त्यातुन महत्वाचं एस.टी.ची अर्थिक जबाबदारी या वाहकाकडे. कोण पासवाले, कोण जेष्ठ नागरीक, कोण १/२ तिकीट, त्यातून प्रत्येकाचा थांबा त्याच्या लक्षात ठेवणं..आपल्याला नसतं बाबा जमलं. एस.टी. चा प्रवास सुरक्षीत प्रवास, गाव तिथे एस.टी., प्रवासात कुठे बरं-वाईट झालं तर फुल नाय फुलाची पाकळी १-२ लाख तरी मिळतात. प्रवाशांची असली काळजी कारते काय खाजगी वाहतुक? वर या खाजगी वाहतुकींच्या वक्तशीरपणाबद्दल सर्वांनाच अनुभव असावा यावर यांचे ड्रायवर कधी-कधी तर्री लावुन, बेशिस्त वाहने चालवताना दिसतात. याउलट जर का एस. टी. चालकाने ठराविक वेळेआधी बस आणली तर त्याच्यावर वेगाच्या उल्लंघनाचे कारणे दाखवा शीट बनते असे एका एस.टी. कर्मचा-याकडून ऐकीवात आहे. एवढं असुनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उन्हाळा, दिवाळीच्या ’सिझन’मध्ये अवैध वाहतुक बंद करण्यासाठी एस.टी. महामंडळाला पोलिसांना पैसे (लाच) द्यावी लागते हे ही मला एस.टी. कर्मचा-याकडुनच सांगण्यात आले. असो महाराष्ट्राची ही ’लाईफलाईन’(१५५०० बसेस १२००० कर्मचारी, ७०लाख रोजचे प्रवासी) धडधाकटपणे प्रवाशांच्या सेवेसाठी प्रगतशील राहो आणि दुसरे काय म्हणणार. यांच्या जालावर कधी गेलोच नव्हतो ..झकास बनवली आहे साइट..http://www.msrtc.gov.in/msrtc_live/index.html

प्रभो 04/08/2010 - 19:54
मस्त लेख रे पाभे...आमचा बाप यास्टीतच कामाला असल्याने (कारकून) मस्त वर्षातून दोन महिने पास मिळायचा....मला १८ पुर्ण झाल्यापासून मिळत नाही आता.. :( पण त्यामुळे जी लहानपणापासून सवय लागलीय यास्टीची ती अजूनही आहे. कुठुनही कुठेही कितीही तास यास्टीने प्रवास करू शकतो... :)

नाना बेरके 04/08/2010 - 20:59
लेख फार मस्त लिहिलात राव तुम्ही. विषयही जिव्हाळ्याचा आहे. एष्टी आणि पोष्टमन ह्या दोनच गोष्टी, कामाच्या निमित्ताने का होईना पण, खेड्याशी नाते जोडून आहेत.

शिल्पा ब 04/08/2010 - 22:33
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये...फारतर ट्रेनने जाता येईल... एक दोनदा नीता का काय travel ने नाशिक ते सीबीडी असं यायचं होता, यष्टीला उशीर होता म्हणून.....गाडी चेम्बुरला स्वस्तिक पार्क जवळ थांबवणार होते...रात्रीची वेळ होती ...आणि आम्हाला त्या लोकांनी "पुलावरून गाडी जाणार म्हणून इथंच उतरायचं " असं करून उतरून दिलं .... अर्धवट झोपेत उतरलो आणि स्वतिक पासून बरेच लांब कि...रिक्षावाले एक दोनच...फारच त्रास झाला... पुन्हा काही असल्या भानगडीत नाही पडणार. लेख भारी आवडला...दिलेल्या वेळेवर यष्टी सुटते आणि ठरलेल्याच जागी नेऊन सोडते... आता लाल डबा थोडा (म्हणजे बरेचदा खूपच ) साफ केलेला नसतो...त्यामुळे फारतर एशियाडने जाते...शिवनेरी वगैरे भानगड अगदीच एशियाड नसेल तरच.. लहानपणच्या खूप चांगल्या आठवणी आहेत येष्टीच्या..

In reply to by शिल्पा ब

सुनील 04/08/2010 - 23:54
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये मान्य. स्वतःचे वाहन उत्तम. अर्थात, जिथे जाणार तिथे जर ओली पार्टी अपेक्षित असेल, तर स्वतःचे वाहन न नेणे (किमान स्वतः न चालवणे) हेच इष्ट! अन्यथा, सरकारी उपक्रमाच्या वाहनांना (येथे एसटी) प्राधान्य देणे हेच योग्य. त्याची प्रमुख कारणे - १) सरकारी उपक्रमांच्या तिकिट भाड्यात विमा अंतर्भूत असतो. २) वाहन बिघडले तर पर्यायी वाहन उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. ३) वाहन ठरलेल्या मार्गावरून, ठरलेले थांबे घेत जाण्याची खात्री असते. बाकी, पाभे, लेख उत्तम. खिडकीची जागा मिळाली असेल तर, लाल डब्बादेखिल लांबच्या प्रवासात विलक्षण आनंद देऊन जातो!

ऋषिकेश 04/08/2010 - 23:59
"गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस्टी" म्हणणारी ही एस्टीच महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी आहे. सुंदर लेख

पवारांची बारीक निरीक्षणंही आवडली. महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोचून अतिशय अल्प दरात सर्वांना प्रवास घडवणाऱ्या एसटीला सलाम. या भारतवारीत दापोलीला जाताना लाल डब्बा प्रवासाचा अनुभव खूप वर्षांनी पुन्हा एकदा आला. भन्नाट वेगाने जाणाऱ्या बसच्या खिडकीत बसून केस भुरभुरल्याचं अजूनही आठवतंय. तीन तास तसं बसल्यानंतर केसांवरनं हात फिरवला की होणारा कडक स्पर्शही. बसचा धडाकेबाज प्रवास, मागच्या सीटवर बसायला लागलं तर बसणारे गचके, सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा... खूप काही आठवलं.

In reply to by राजेश घासकडवी

धन्यवाद राजेश जी.... खरं तर खूप काही लिहिण्यासारखे आहे या ह्र्दयस्पर्शी विषयावर, विशेषतः ज्यांनी एस.टी.ने ये-जा करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे, नोकरी केली आहे (माझी थोरली मावशी - जी जि.प.च्या प्रा. शाळेत सुमारे ४० वर्षे नोकरी करून हेड मिस्ट्रेस (गाव उच्चारी "थोरल्या मास्तरीणबाई") या पदावरून निवृत्त झाली, तिने तर नोकरीचे सारे आयुष्य एस.टी. प्रवास करून काढले, म्हणजे तीने जर लिहायचे मनात आणले तर याच विषयावर फार सुंदर लेखन करेल, इतकी साथ दिली आहे "यस्टी" ने प्रा.शिक्षक मंडळीना. ज्या दिवशी, ज्या गावातून, ती रिटायर झाली त्या दिवशी रितिप्रमाणे सरपंचाच्या हस्ते तिचा सत्कार तर झालाच, पण त्या दिवशी त्या रूटवर असलेल्या एस.टी.कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोघांनीही तितक्यात एक फुलांचा गुच्छ प्राप्त करून "एस.टी. आगाराकडून आमच्या रोजच्या ताईंना....ज्यांनी इतक्या वर्षाच्या प्रवासात एस.टी.बद्दल एकही वाईट शब्द बोललेला नाही." असे भावपूर्ण उद्गार काढून तिच्या हातात दिला. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आलेले आम्ही पाहिले. (मावशीही रडत होती). ही खरी एस.टी.ची आत्मियता ! "सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा" हा एक वेगळाच वाङ्मय प्रकार (किंवा ग्राफिटी) आहे. खूप मजेशीर. इन्द्र

मिसळभोक्ता 05/08/2010 - 04:11
आमच्या लहानपणी, लाल बस वरचा पिवळा पट्टा मागच्या दारावर (मागच्या चाकाच्या बाजूला) झुकायचा. तो नुस्ताचा आडवा झाला, तेव्हा दु:ख झाले होते.

चिगो 25/09/2010 - 12:54
गर्दीत चेंबून घेत, खिडकीतऊन रुमाल टाकुन जागा "पकडून", लहानपणी एकदोनदा तर सरळ खिडकीतून आत घुसून, डायव्हरच्या केबिनमधे बसून, असा विविध प्रकारे केलेला प्रवास आठवला.. खरंच मजा होती यस्टी प्रवास म्हणजे..

अमोल केळकर 25/09/2010 - 13:38
एस टीचा आता एक नवीन ब्रँड आला आहे शीतल पुणे - दादर रुट वर. थोडक्यात एसी एशीयाड . शिवनेरी पेक्षा स्वस्त आणि एशियाड पेक्षा महाग रेल्वे स्टाइल गरिबरथ :) अमोल

साधामाणूस 25/09/2010 - 17:16
श्री. पाषाणभेद यांचा लेख आवडला. त्यांनी शेवटच्या परिच्छेदात वर्णन केल्याप्रमाणे 'यष्टी'तून नेल्या जाणार्या विविध वस्तूंचे आणि एकंदरीत कोकण यष्टी प्रवासाचे छान वर्णन पु. लं. च्या म्हैस या कथेतदेखील आहे. बर्याचदा ग्रामीण भागात ठराविक मार्गांवर ठराविक नंबरांच्या बसेस सोडत असत. आम्ही जेवणाच्या सुटीत घरी निघालो की स्टॅंडवर नेहमी MHQ 8840 ही बस थांबलेली दिसायची. तीही बरेच (तीनेक वर्षे तरी) दिवस. श्री. बेभान यांचा प्रतिसादही आवडला.

योगप्रभू 25/09/2010 - 18:51
एस. टी. मग ती लालपिवळी असो, हिरवी एशियाड असो किंवा निळी शिवनेरी असो कधीच मनातून जाणार नाही. शाळेच्या सहलीच्या वेळी हार घालून सजवलेली एस. टी बघितली की आम्ही मुले हरखून जायचो आणि सहल संपताना आम्हाला न्यायला आलेले सगळे आई-बाबा मंडळी कधी एकदा आमची एस. टी. दिसतीय याची वाट बघताना दिसत. आमच्या लहानपणी सिटीबसचे तिकिट १० पैसे आणि एस. टीचे तिकीट सव्वा रुपया असे बघितले आहे. ते मोजून दिलेले पैसे हरवू नयेत म्हणून घामेजलेल्या मुठीत धरुन ठेवायचे. लक्षात राहायची ती एस.टी. ची हिरव्या रंगाची रेक्झिनची खरखरीत सीट कुशन्स. बहुतेक ड्रायव्हर-कंडक्टर याच कव्हरच्या पिशव्या वापरत आणि स्टाफचा माणूस या पिशव्यांवरुन ओळखत. एका मराठी चित्रपटात अशोक सराफ धांदरटासारखा रेखा रावच्या मांडीवर बसतो. ती त्याच्यावर डाफरते. त्यावर माफी मागून अशोक म्हणतो, 'तरी म्हणलं यश्टीच्या शिटा येवड्या मऊ केव्हापासून झाल्या?' सुटीत सायकलची तुटलेली घंटी आणि दोरी वापरुन घरातच एस. टी. चा आभास तयार करणे किंवा दिवाळीच्या सुटीत रिकाम्या काडेपेट्यांच्या एस. टी. बस तयार करुन, रंगवून किल्ल्यापुढे मांडणे. कॉलेजच्या दिवसात आमचा वात्रटपणा चालायचा. बसमध्ये शेजारी वही ठेऊन बसायचे. कुणी विचारले तर 'बसलंय कुणीतरी 'असं बिनदिक्कतपणे सांगून टाकायचं आणि कॉलेजातला एखादा छान चेहरा येताना दिसला, की हळूच वही उचलायची आणि मग अर्धा तास छान जायचा. तर हा आमचाही आठवणींचा कोलाज. मस्त विषय छेडला पाषाणभेद यांनी. :)

जिन्क्स 13/10/2010 - 12:03
लहानपणी मला कोणी विचारले कि मोठ झाल्यावर काय होणार तर मी सांगायचो की एस. टी. ड्रायवर होणार. ड्रायवरच्या मागच्या सीट वर बसुन तो गाडी कशी चालवतो हे पहाण्यात धन्यता वाटे (अजुनही वाटते) . जुन्नर - घाटघर हा प्रवास ट्रेकर्स मंडळी बर्याच वेळेला करतात. त्या मंडळींचा हा प्रवास केल्या नंतर एस. टी. बद्दलचा आदर द्विगुनित होतो. तेवढं ते ३रा, ४था आणि ५वा गियर टाकतानी डायवर मामा क्लच दाबत नाही हे बघुन फार वाइट वाटे. डायवर मामा हि एक आळशी जमात आहे असा आमचा आजही समज आहे.

गणामास्तर 04/03/2012 - 19:00
लहानपणीचे एकट्याने केलेले पुणे- उस्मानाबाद प्रवास आठवले. प्रत्येक स्थानका वरील ते कानिफनाथ रसवंती गृह आणि नौशाद कोल्ड्रिंक्स सुद्धा आठवले..:) सर्व आठवणींमुळे अंमळ हळवा झालो आहे.

प्रचेतस 04/08/2010 - 14:08
खरेच या लाल पिवळ्या गाड्या महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्याच आहेत. मी ट्रेकिंगच्या निमित्तने बरेच वेळा दुर्गम भागात ह्या गाड्यांनी प्रवास केला आहे. जिथे ह्या गाड्या जाउ शकतात तिथे तश्या सो-कॉल्ड महागड्या लक्झरी बस जायचे धाडस करणारच नाहीत.

चिरोटा 04/08/2010 - 14:20
मस्त लेख. एस्.टी. मध्येही काही प्रकार होते- सुपर एक्स्प्रेस आणि नॉन स्टॉप.ह्या बसेसना मधल्या पिवळ्या पट्ट्याऐवजी पांढरा पट्टा असायचा.लाल अ़क्षरांत जलद्/अतिजलद लिहिलेले असायचे.प्रत्येक एस.टी.वर BOM46 असे का लिहिले असते कधी कळले नाही.

In reply to by अर्चि

चिरोटा 04/08/2010 - 19:12
मुख्य कार्यालय परळला(४०००१३) आहे असे वाटायचे.४०००४६ हा पिनकोड एस्.टी. सोडली तर अनेक वर्षात कोठेही दिसला नव्हता. नेटवरुन तो पिनकोड माटुंग्याचा आहे असे कळले.सहसा माटुंग्याचा कोड-४०००१९(मध्य) किंवा ४०००१६(ले.ज्.मा) असतो.

In reply to by चिरोटा

पाषाणभेद 05/08/2010 - 03:36
BOM46 यात BOM म्हणजे बॉम्बे या अर्थाने नाही. बॉम्बे चे मुंबई कधीच झाले अन एस्टी वाले तर आधी पासूनच मुंबईच म्हणायचे म्हणा. तर BOM म्हणजे Bill of Material. गाडीचा मेटेंनन्स च्या हिशेब ठेवण्यासाठी BOM मेंटेन ठेवतात. आमच्या कडच्या साखरकारखान्याच्यादेखील प्रत्येक गाडीवर असे BOM लिहीलेले असते. मलाही असलाच प्रश्न पडला होता त्या वेळी. नंतर समजले की ते Bill of Material असते म्हणून.

फारच सुंदर लेख. समाजजीवनाशी अतूट असे नाते असलेली एस.टी. ~~ शहराकडे जाण्यासाठी फाट्यावर उभे राहुन "यस्टी" ची वाट पाहणे ही किती गंमतीदार बाब आहे तिचे वर्णन करण्यासाठी धाकटे माडगुळकर किंवा आजचे बिनीचे अनिल अवचटच हवेत. आता "ग्राम सडक सुधार" धडक मोहिमेंतर्गत खेड्यापाड्यातील अप्रोच रोड बर्‍यापैकी सुधारले आहेत, पण ज्या काळात रस्ता म्हणजे धुळीचा खकाणा अशी व्याख्या होती त्याकाळात रणरणत्या उन्हात, मोडक्यातुटक्या शेडचा आसरा घेतला ना घेतला असे करत, "दिलिप जर्द्या" ची देवाणघेवाण करत असलेली डोक्याला लाल-पिवळे-गुलाबी फेटे गुंडाळलेले रामराव, तानाजीराव, सदानंद, वसंतराव ही मंडळी आणि त्यांचे "उसाचे राजकारण, केडीसीच्या म्यानेजरला कसा तोडतो बघच उद्या" या खडाजंगीच्या बोलाचाली.... त्या शेडच्या बाजुला असलेल्या झाडाला टेकुन बसलेल्या हौसाक्का, बायाक्का, शांताकाकु, शकी, वच्छी, शारदी यांच्या दबक्या आवाजातील गप्पा :: ("व्हय गं, आंवदा सरूला दिवस गेल्याती न्हव?", "व्हय बया, बघ तर, म्या म्हटलंत तिला यल्लमाला जावून्शी डोकं टेक तिच्याम्होर ! गेल्ली की म्हायल्या जत्रला, आनि आता बघ कशी मोरासारखी टण्णाना उड्या मार्तिया...." "आसू दे मारू दे, माझ्या म्हायीरचीच हाया ती. लई केलया तिच्या आईनं माझ्यासाठी...") हे चित्र लोभसवाणे आहे, आणि ते आणखीन पाहावे तोच गलका.... "आली आली रं" लांबून निळा-पांढरा धुर आणि राखी रंगाची धूळ मागे बेदरकारपणे उडवत शेडकडे येणारी लालपिवळी "आपुली" यस्टी दिसली की, बस्स ! काय तो आनंद..... काय त्या कंडक्टराची मिजास..."ज्यादा जागा न्हाई, चारच चढा.." मग डझनभरांची अजिजी.... ड्रायवरभाऊंच्या बाजुने वशीला लावणे.... मग उपकार केल्याच्या भावनेने दोन्ही रावसाहेबांची सर्वांना जागा देण्याची तयारी.... ढिगभर गाठोडी पाहुन त्याचा उठणारा मस्तकशूळ.. मग "आसु दे रे राज्या, पोरीकडं सरकारी दवाख्यान्यात चाल्लोया, लई शिक हाया ती. घोंगडीच हाईती त्यात.." अशी एखाद्या जनाबाईची विनवणी....मग कंडक्टरचं ढेकळासारखं विरघळून जाणं. फार सुंदर... घरचे चित्र आहे.... "एस.टी." म्हणजे.

In reply to by इन्द्र्राज पवार

पाषाणभेद 04/08/2010 - 14:35
एकदम बारीक निरीक्षणाचे वर्णन. अशा जनाबाईची विनवणी ऐकून विरघळणार नाही तो कंडक्टर कसला? तो ही त्याच मातीतून आलेला असतो. त्याची नाळ अशीच एखाद्या जनाबाईशी जुळलेली असते. म्हणूनच एस्टी एक समाजजीवन जोडणारी रेषाच आहे. अजूनही मी काहीच काम नसले की उगाचच एसटी स्टँड वर भटकतो. वेगळा न राहता प्रवाशांमध्ये मिसळतो.

वारा 04/08/2010 - 14:58
पन्हाळा, वाघबीळ, गिरोली कोडोली मार्गे वाठार व पेठ वडगांव ला जाउन आल्या सारखे वाटले..

हेम 04/08/2010 - 15:25
एकदम झक्कास लेख ट्रेक संपवून आडनिड्या गांवात कोसळल्यावर, धुरळा उडवत येणार्‍या ला. पि. बशीला पायल्यावर कांय आनंद होतो ते अनुभवींनाच कळेल.. कोकणात आजही या बस म्हणजे प्राणवायू आहेत. . सकाळी पावणेसहाची कोल्हापुर- मालवण टपाल बस.. घाटी अन् मालवणीची झकास सरमिसळ असलेला प्रवास... सध्याची परिवर्तन १ लंबर.. सुरुवातीला भाडं जास्त असेल या विचाराने लोक या बशीत जायला कचरायचे, म्हणून महामंडळाला बसवर लिहावं लागलं...'साध्या दरात' .

समंजस 04/08/2010 - 15:27
व्वा! पाषाणभेदी साहेब एसटी वर सुंदर लेख टाकलाय. अभिनंदन !! एसटीचं महत्त्व खुप आहे ग्रामीण भागात प्रवास करायला. एवढी स्वस्त आणि पक्के रस्ते नसलेल्या ठिकाणी जाण्याकरीता अर्थातच एसटी शिवाय पर्याय नाही. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवल्या जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता. मला स्वतः ला तरी एसटीने प्रवास करणे आवडतं. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी एसटीनेच प्रवास करतो. खाजगी गाडयांनी (अवैध प्रवासी वाहने) यांच्या पेक्षा एसटी खरंच खुप सुरक्षीत वाटते.

दिपक 04/08/2010 - 16:25
वाह पाभे.. जबराट मस्त लेख.. एसटी ची मजाच निराळी. लाल डब्बा पाहिला की मुंबई ते सावंतवाडी केलेल्या फेर्‍या आठवतात. एसटी बस स्थानक पण खुप आवडीचे ठिकाण. ते कानिफनाथ रसवंती गृह... :-)

जोशी 'ले' 04/08/2010 - 16:36
मस्तच लिहिलंय ... आमच्या लहानपणी एक बडबड गीत म्हणत असू ' लाल पिवळी एस टी थांब ना GA जरा , मामाच्या गावाला घेऊन जा ग मला ' त्याची आठवण झाली

मीनल 04/08/2010 - 17:56
मला यस्टी लागते. त्यात आंबा, फणस, काजू यांच्या एकत्रित वासाने हमखास उलटी होते.

मला यस्टी लागते. त्यात आंबा, फणस, काजू यांच्या एकत्रित वासाने हमखास उलटी होते.
सहमत ! माझ्या बाजूला तर कायम एक उंच हिराची केरसुणी घेउन लोक येउन बसतात.

बेभान 04/08/2010 - 18:26
मन फ्रेश केलेस गड्या.. लोक नेहमीच परिवाहन महामंडळ सेवेबद्दल आठ्या घालताना दिसतात पण मला हे एस.टी. चे चालक वाहक दिवाळी, गुढीपाडवा या मोठ्या सणांनासुद्धा आपल्या घरच्यांसमवेत न राहता हे एस.टी. कर्मचारी ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ कामावर असलेले दिसतात तेंव्हा वाटतं की कोण प्रवासी कधी यांना सुखरूप सेवेबद्दल त्यांना धन्यवाद तरी देत असतील काय? हो काही ठिकाणी गरज आहे ती व्यवस्थापन विकासाची. अमेरिकेतल्या बस सेवांकडुन बरेच काही घेण्यासारखे आहे. उदा. ज्याप्रमाणे तिथले वाहक प्रत्येक सुरुवातीच्या थांब्यावर बसमधील सर्व प्रवाशांचे स्वागत करून त्यानंतर आपली ओळख, आणि मग शेवटच्या थांब्यापर्यंत कितीवेळ लागेल, बस कुठे-कुठे आणि कितीवेळ थांबेल याची माहीती देतो, थांब्याआधी त्यांच्याजवळ असलेल्या माइक्रोफोनद्वारे त्या थांब्याची सुचना देणे इ. गोष्टी सुरू करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. काही लोक एस.टी. वाहकांना त्यांच्या उर्मट वागणुकीमुळे त्यांना Customer Relationshipचे शिक्षण देण्याचे सल्ले देतात पण हाच वाहक रोज जवळ जवळ २००+ हौशे, नवशे, गौशे, अडाणी, सुशिक्षीत, म्हातारे, तरणे, गाववाले, शहरी, वाडी-वस्तीवाले, अशां लोकांबरोबर ’डील’ करतो. सकाळी जर आपल्या मनाला न पटणारी गोष्ट झाली तर आपली दिवसभर तावाताव होते. तिथे हा माणुस, दिवसभर यांच्या वाटयाला असलीच कामे येत असतात. त्यातुन महत्वाचं एस.टी.ची अर्थिक जबाबदारी या वाहकाकडे. कोण पासवाले, कोण जेष्ठ नागरीक, कोण १/२ तिकीट, त्यातून प्रत्येकाचा थांबा त्याच्या लक्षात ठेवणं..आपल्याला नसतं बाबा जमलं. एस.टी. चा प्रवास सुरक्षीत प्रवास, गाव तिथे एस.टी., प्रवासात कुठे बरं-वाईट झालं तर फुल नाय फुलाची पाकळी १-२ लाख तरी मिळतात. प्रवाशांची असली काळजी कारते काय खाजगी वाहतुक? वर या खाजगी वाहतुकींच्या वक्तशीरपणाबद्दल सर्वांनाच अनुभव असावा यावर यांचे ड्रायवर कधी-कधी तर्री लावुन, बेशिस्त वाहने चालवताना दिसतात. याउलट जर का एस. टी. चालकाने ठराविक वेळेआधी बस आणली तर त्याच्यावर वेगाच्या उल्लंघनाचे कारणे दाखवा शीट बनते असे एका एस.टी. कर्मचा-याकडून ऐकीवात आहे. एवढं असुनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उन्हाळा, दिवाळीच्या ’सिझन’मध्ये अवैध वाहतुक बंद करण्यासाठी एस.टी. महामंडळाला पोलिसांना पैसे (लाच) द्यावी लागते हे ही मला एस.टी. कर्मचा-याकडुनच सांगण्यात आले. असो महाराष्ट्राची ही ’लाईफलाईन’(१५५०० बसेस १२००० कर्मचारी, ७०लाख रोजचे प्रवासी) धडधाकटपणे प्रवाशांच्या सेवेसाठी प्रगतशील राहो आणि दुसरे काय म्हणणार. यांच्या जालावर कधी गेलोच नव्हतो ..झकास बनवली आहे साइट..http://www.msrtc.gov.in/msrtc_live/index.html

प्रभो 04/08/2010 - 19:54
मस्त लेख रे पाभे...आमचा बाप यास्टीतच कामाला असल्याने (कारकून) मस्त वर्षातून दोन महिने पास मिळायचा....मला १८ पुर्ण झाल्यापासून मिळत नाही आता.. :( पण त्यामुळे जी लहानपणापासून सवय लागलीय यास्टीची ती अजूनही आहे. कुठुनही कुठेही कितीही तास यास्टीने प्रवास करू शकतो... :)

नाना बेरके 04/08/2010 - 20:59
लेख फार मस्त लिहिलात राव तुम्ही. विषयही जिव्हाळ्याचा आहे. एष्टी आणि पोष्टमन ह्या दोनच गोष्टी, कामाच्या निमित्ताने का होईना पण, खेड्याशी नाते जोडून आहेत.

शिल्पा ब 04/08/2010 - 22:33
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये...फारतर ट्रेनने जाता येईल... एक दोनदा नीता का काय travel ने नाशिक ते सीबीडी असं यायचं होता, यष्टीला उशीर होता म्हणून.....गाडी चेम्बुरला स्वस्तिक पार्क जवळ थांबवणार होते...रात्रीची वेळ होती ...आणि आम्हाला त्या लोकांनी "पुलावरून गाडी जाणार म्हणून इथंच उतरायचं " असं करून उतरून दिलं .... अर्धवट झोपेत उतरलो आणि स्वतिक पासून बरेच लांब कि...रिक्षावाले एक दोनच...फारच त्रास झाला... पुन्हा काही असल्या भानगडीत नाही पडणार. लेख भारी आवडला...दिलेल्या वेळेवर यष्टी सुटते आणि ठरलेल्याच जागी नेऊन सोडते... आता लाल डबा थोडा (म्हणजे बरेचदा खूपच ) साफ केलेला नसतो...त्यामुळे फारतर एशियाडने जाते...शिवनेरी वगैरे भानगड अगदीच एशियाड नसेल तरच.. लहानपणच्या खूप चांगल्या आठवणी आहेत येष्टीच्या..

In reply to by शिल्पा ब

सुनील 04/08/2010 - 23:54
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये मान्य. स्वतःचे वाहन उत्तम. अर्थात, जिथे जाणार तिथे जर ओली पार्टी अपेक्षित असेल, तर स्वतःचे वाहन न नेणे (किमान स्वतः न चालवणे) हेच इष्ट! अन्यथा, सरकारी उपक्रमाच्या वाहनांना (येथे एसटी) प्राधान्य देणे हेच योग्य. त्याची प्रमुख कारणे - १) सरकारी उपक्रमांच्या तिकिट भाड्यात विमा अंतर्भूत असतो. २) वाहन बिघडले तर पर्यायी वाहन उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. ३) वाहन ठरलेल्या मार्गावरून, ठरलेले थांबे घेत जाण्याची खात्री असते. बाकी, पाभे, लेख उत्तम. खिडकीची जागा मिळाली असेल तर, लाल डब्बादेखिल लांबच्या प्रवासात विलक्षण आनंद देऊन जातो!

ऋषिकेश 04/08/2010 - 23:59
"गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस्टी" म्हणणारी ही एस्टीच महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी आहे. सुंदर लेख

पवारांची बारीक निरीक्षणंही आवडली. महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोचून अतिशय अल्प दरात सर्वांना प्रवास घडवणाऱ्या एसटीला सलाम. या भारतवारीत दापोलीला जाताना लाल डब्बा प्रवासाचा अनुभव खूप वर्षांनी पुन्हा एकदा आला. भन्नाट वेगाने जाणाऱ्या बसच्या खिडकीत बसून केस भुरभुरल्याचं अजूनही आठवतंय. तीन तास तसं बसल्यानंतर केसांवरनं हात फिरवला की होणारा कडक स्पर्शही. बसचा धडाकेबाज प्रवास, मागच्या सीटवर बसायला लागलं तर बसणारे गचके, सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा... खूप काही आठवलं.

In reply to by राजेश घासकडवी

धन्यवाद राजेश जी.... खरं तर खूप काही लिहिण्यासारखे आहे या ह्र्दयस्पर्शी विषयावर, विशेषतः ज्यांनी एस.टी.ने ये-जा करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे, नोकरी केली आहे (माझी थोरली मावशी - जी जि.प.च्या प्रा. शाळेत सुमारे ४० वर्षे नोकरी करून हेड मिस्ट्रेस (गाव उच्चारी "थोरल्या मास्तरीणबाई") या पदावरून निवृत्त झाली, तिने तर नोकरीचे सारे आयुष्य एस.टी. प्रवास करून काढले, म्हणजे तीने जर लिहायचे मनात आणले तर याच विषयावर फार सुंदर लेखन करेल, इतकी साथ दिली आहे "यस्टी" ने प्रा.शिक्षक मंडळीना. ज्या दिवशी, ज्या गावातून, ती रिटायर झाली त्या दिवशी रितिप्रमाणे सरपंचाच्या हस्ते तिचा सत्कार तर झालाच, पण त्या दिवशी त्या रूटवर असलेल्या एस.टी.कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोघांनीही तितक्यात एक फुलांचा गुच्छ प्राप्त करून "एस.टी. आगाराकडून आमच्या रोजच्या ताईंना....ज्यांनी इतक्या वर्षाच्या प्रवासात एस.टी.बद्दल एकही वाईट शब्द बोललेला नाही." असे भावपूर्ण उद्गार काढून तिच्या हातात दिला. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आलेले आम्ही पाहिले. (मावशीही रडत होती). ही खरी एस.टी.ची आत्मियता ! "सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा" हा एक वेगळाच वाङ्मय प्रकार (किंवा ग्राफिटी) आहे. खूप मजेशीर. इन्द्र

मिसळभोक्ता 05/08/2010 - 04:11
आमच्या लहानपणी, लाल बस वरचा पिवळा पट्टा मागच्या दारावर (मागच्या चाकाच्या बाजूला) झुकायचा. तो नुस्ताचा आडवा झाला, तेव्हा दु:ख झाले होते.

चिगो 25/09/2010 - 12:54
गर्दीत चेंबून घेत, खिडकीतऊन रुमाल टाकुन जागा "पकडून", लहानपणी एकदोनदा तर सरळ खिडकीतून आत घुसून, डायव्हरच्या केबिनमधे बसून, असा विविध प्रकारे केलेला प्रवास आठवला.. खरंच मजा होती यस्टी प्रवास म्हणजे..

अमोल केळकर 25/09/2010 - 13:38
एस टीचा आता एक नवीन ब्रँड आला आहे शीतल पुणे - दादर रुट वर. थोडक्यात एसी एशीयाड . शिवनेरी पेक्षा स्वस्त आणि एशियाड पेक्षा महाग रेल्वे स्टाइल गरिबरथ :) अमोल

साधामाणूस 25/09/2010 - 17:16
श्री. पाषाणभेद यांचा लेख आवडला. त्यांनी शेवटच्या परिच्छेदात वर्णन केल्याप्रमाणे 'यष्टी'तून नेल्या जाणार्या विविध वस्तूंचे आणि एकंदरीत कोकण यष्टी प्रवासाचे छान वर्णन पु. लं. च्या म्हैस या कथेतदेखील आहे. बर्याचदा ग्रामीण भागात ठराविक मार्गांवर ठराविक नंबरांच्या बसेस सोडत असत. आम्ही जेवणाच्या सुटीत घरी निघालो की स्टॅंडवर नेहमी MHQ 8840 ही बस थांबलेली दिसायची. तीही बरेच (तीनेक वर्षे तरी) दिवस. श्री. बेभान यांचा प्रतिसादही आवडला.

योगप्रभू 25/09/2010 - 18:51
एस. टी. मग ती लालपिवळी असो, हिरवी एशियाड असो किंवा निळी शिवनेरी असो कधीच मनातून जाणार नाही. शाळेच्या सहलीच्या वेळी हार घालून सजवलेली एस. टी बघितली की आम्ही मुले हरखून जायचो आणि सहल संपताना आम्हाला न्यायला आलेले सगळे आई-बाबा मंडळी कधी एकदा आमची एस. टी. दिसतीय याची वाट बघताना दिसत. आमच्या लहानपणी सिटीबसचे तिकिट १० पैसे आणि एस. टीचे तिकीट सव्वा रुपया असे बघितले आहे. ते मोजून दिलेले पैसे हरवू नयेत म्हणून घामेजलेल्या मुठीत धरुन ठेवायचे. लक्षात राहायची ती एस.टी. ची हिरव्या रंगाची रेक्झिनची खरखरीत सीट कुशन्स. बहुतेक ड्रायव्हर-कंडक्टर याच कव्हरच्या पिशव्या वापरत आणि स्टाफचा माणूस या पिशव्यांवरुन ओळखत. एका मराठी चित्रपटात अशोक सराफ धांदरटासारखा रेखा रावच्या मांडीवर बसतो. ती त्याच्यावर डाफरते. त्यावर माफी मागून अशोक म्हणतो, 'तरी म्हणलं यश्टीच्या शिटा येवड्या मऊ केव्हापासून झाल्या?' सुटीत सायकलची तुटलेली घंटी आणि दोरी वापरुन घरातच एस. टी. चा आभास तयार करणे किंवा दिवाळीच्या सुटीत रिकाम्या काडेपेट्यांच्या एस. टी. बस तयार करुन, रंगवून किल्ल्यापुढे मांडणे. कॉलेजच्या दिवसात आमचा वात्रटपणा चालायचा. बसमध्ये शेजारी वही ठेऊन बसायचे. कुणी विचारले तर 'बसलंय कुणीतरी 'असं बिनदिक्कतपणे सांगून टाकायचं आणि कॉलेजातला एखादा छान चेहरा येताना दिसला, की हळूच वही उचलायची आणि मग अर्धा तास छान जायचा. तर हा आमचाही आठवणींचा कोलाज. मस्त विषय छेडला पाषाणभेद यांनी. :)

जिन्क्स 13/10/2010 - 12:03
लहानपणी मला कोणी विचारले कि मोठ झाल्यावर काय होणार तर मी सांगायचो की एस. टी. ड्रायवर होणार. ड्रायवरच्या मागच्या सीट वर बसुन तो गाडी कशी चालवतो हे पहाण्यात धन्यता वाटे (अजुनही वाटते) . जुन्नर - घाटघर हा प्रवास ट्रेकर्स मंडळी बर्याच वेळेला करतात. त्या मंडळींचा हा प्रवास केल्या नंतर एस. टी. बद्दलचा आदर द्विगुनित होतो. तेवढं ते ३रा, ४था आणि ५वा गियर टाकतानी डायवर मामा क्लच दाबत नाही हे बघुन फार वाइट वाटे. डायवर मामा हि एक आळशी जमात आहे असा आमचा आजही समज आहे.

गणामास्तर 04/03/2012 - 19:00
लहानपणीचे एकट्याने केलेले पुणे- उस्मानाबाद प्रवास आठवले. प्रत्येक स्थानका वरील ते कानिफनाथ रसवंती गृह आणि नौशाद कोल्ड्रिंक्स सुद्धा आठवले..:) सर्व आठवणींमुळे अंमळ हळवा झालो आहे.
एसटी पुराण एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली.

विरासत

लॉरी टांगटूंगकर ·

वा वा अत्यंत छान अशी अप्रतिम माहिती. अशीच माहिती कायम आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. रात्रभर चालणार्‍या मैफिलींवर आमचा फार जीव.

वा वा अत्यंत छान अशी अप्रतिम माहिती. अशीच माहिती कायम आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. रात्रभर चालणार्‍या मैफिलींवर आमचा फार जीव.
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.

IT WIFE आणि स्वयंपाक

सुजय कुलकर्णी ·

चतुरंग 31/07/2010 - 17:02
देव तुमचं रक्षण करो! :) (जाता जाता - सांगली मिरज भागातले काय हो तुम्ही? नाही, तुमच्या काही शब्दांवरुन तशी शंका आली बाकी काही नाही.)

In reply to by चतुरंग

मिसळभोक्ता 02/08/2010 - 11:11
सुजय भाऊंना मानले पाहिजे. पदार्पणातच सेंचुरी, आणि तीही इकडे (हिरव्या नोटांच्या देशात) वीकांत असताना ! जबरा.. आयटी, बायका, स्वयंपाक, युयुत्सुची विचारशैली, असे सगळे प्वाईंट आलेत. मुक्य म्हणजे, कोल्हापूरच्या निबंधलेखकांची आठवण करून देणारे लेखन. साला,झाडावर चढून बसायची संधीच दिली नाही. पण समजा "अमेरिकेतील आयटीतील बायका" असे आले असते, तर ऑल टाईम हाय धागा झाला असता, हे नक्की. पुढील लेखनास शुभेच्छा.

In reply to by मिसळभोक्ता

त्यांनी हे गांधीहत्या, लेन प्रकरण, पुणेरी दुकानदार, शिवाजी, स्वयंसंपादन, एकंदरीतच संपादन... असे हॉट वायर विषय टाळून सेंचुरी मारली हे महत्त्वाचं. म्हणजे साहेबांनी कव्हर ड्राइव्ह न मारता सेंचुरी केल्यासारखं...

तुमचं लग्नं झालं असेल तर तुमच्या बायकोबद्दल फार वाईट वाटलं. आणि झालं नसेल तर ठरेल, होईल त्याआधी त्या दुर्दैवी मुलीला तुमचे हे २०० वर्ष पुराणे विचार जरूर वाचून दाखवा. मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. आता लग्नं होऊन अडीच वर्ष झालं आहे आणि स्वयंपाकाची आवड असलेली बायको असण्यापेक्षा जिच्याशी आवडीच्या विषयांवर चर्चा करता येते तिच्याशी लग्नं करणं हा योग्य निर्णय होता असं तो जाहीरपणे स्वतःच्या मित्रांनादेखील सांगतो. काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो. पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!! हे झाले माझे दोन पैसे, नॉन-आयटी वाईफचे!! बाकी चालू द्यात तुमची १९ व्या शतकातली विचारगिरण! अदिती

In reply to by निस्का

नुसते वाईट वाटले ? अरेरे....!! स्वयंपाक शिकायला हवा हे कधी वाटणार...?? तुम्ही (नॉन्-आयटी) लिहिलात फार उत्तम केलत.....तुम्हाला बहुतेक स्वयंपाक येत असावा.....! :-) येत नसला तर थोडातरी शिका हि विनंती ....!

In reply to by सुजय कुलकर्णी

निस्का 31/07/2010 - 20:19
तुमच्या आचरट विनंती/टोमण्यांना उत्तर देऊन मला त्याची पत वाढवायची नाही. या थिल्लर धाग्यावारचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि हो, तुम्हाला शुभेच्छा!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर 31/07/2010 - 19:41
तुमच्या बायकोबद्दल(असलेल्या/होणार्‍या) खूपच सहानुभूती वाटते... माझ्या मते स्वयंपाक फक्त मुलींनाच यायला पाहिजे असे नाही. जर तुम्ही स्वतः आयटी मध्ये असाल आणि ऑनसाईट जाण्याची स्वप्ने बघत असाल, तर तुमची बायको करू शकते तसा अर्धकच्चा स्वयंपाक तरी येतो का हो तुम्हांला???? आणि जे काम तुम्ही करता, तेच बायकोही तिच्या ऑफिसात करते. मग घरी आल्यावर म्हटले की मदत कर, तर त्यात तुमचा पुरूषी अहंगंड इतका का दुखावतो?? आणि तुम्हाला बायको चांगली शिकलेली हवी, चांगली नोकरी करणारी(पक्षी: चारलोकांत तुमचे स्टेटस सांभाळणारी) हवी, दिसायला चांगली हवी, तिच्याशी काव्यशास्त्रविनोद चर्चा करता येणारी हवी(अशी तुमची अपेक्षा असल्याचे तुमच्या लेखावरून जरी दिसत नसले तरी इतरांची अशी अपेक्षा असू शकते), हापिसात ९-१० तास काम करूनही घरी आल्यावर न थकता एकटीने आठवडाभर चारी ठाव स्वयंपाक करणारी हवी..... अपेक्षा जरा जास्तच होत नाहीत का हो???? जरा बायकोशी तिला टोमणे मारणॅ सोडून इतर विषयांबद्दल बोलत असाल, तर तिच्याही तिच्या नवर्‍याकडून काय अपेक्षा आहेत हे विचारून घ्या... अर्थात ती सूज्ञ असेल, आणि त्यामुळे भांडण होईल असे वाटत असेल तर ती उत्तर देणार नाही.... आणि पंचविशीतल्या मुलींनी स्वत:ला काकू म्हणवून नाही घेतले, म्हणून व्हॉट युवर अंकल गोझ... हे कोडे काही उलगडले नाही..... अवांतर: स्वतःची जाहिरात नाही, पण मी स्वतः आईकडून (तुमच्या भाषेत शिकायच्या वयात) शिकले नाही... स्वयंपाकाला सुरूवात करून साधारण वर्षभर झाले असेल. कुणाला फोन करण्यापेक्षा गुगलून पदार्थ बनवते आणि ते नक्कीच माणसाने खावे असे चांगले(माझ्या मते ) बनवते. (पुराव्यासाठी विचारा किंवा लिहा: बिका, मोडक, निदे, डॉन, सुबक ठेंगणी) त्यामुळे सरसकटीकरण करताना थोडा विचार करून करा..

In reply to by मस्त कलंदर

सविता 04/08/2010 - 11:51
णम्र विणंटी - हे बाडिस म्हणजे काय हे मला कुणी सांगेल का? व्यनी, ख्ररड केले तर बरे होईल... १०० च्या वर प्रतिसाद गेलेल्या लेखात माझा प्रश्न असलेला प्रतिसाद... त्यावर आलेले उपप्रतिसाद.. शेधणे अंमळ अवघड आहे.... -सविता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मधुशाला 01/08/2010 - 23:33
मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते. काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो पण त्याला घरच्या जेवणाची गोडी नसते. स्वतः एखादा पदार्थ करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना खाऊ घालणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणात नसते. पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!! विचार शेअर करण्यासाठी बायको/नवराच कशाला हवा/हवी? जालावर किंवा मित्रांबरोबर सुद्धा विचार शेअर करता येतातच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर समान विषय विचार शेअर करण्यासाठी शोधता येतातच की... सगळ्याना स्वयंपाक यावा ही जर १९ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतकच पुढारलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी स्वयंपाक करूच नये हीच नवीन विचारसरणी असेल तर धन्यच आहे...

In reply to by मधुशाला

तुमच्या प्रतिसादात मी अदलाबदल केली आहे. कशी वाटते सांगा... >प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते. काय आहे ना, विचार बाहेरून मिळवता येतात आणि/किंवा विचार शेअर करण्यासाठी माणूस शोधता येतो पण त्याला घरच्या विचारांची गोडी नसते. स्वतः एखादा विचार करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना सांगणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने सांगितलेल्या विचारांत नसते. >पण जेवण करण्यासाठी बायको वर जबरदस्ती करता येत नाही ना!! जेवण करण्यासाठी बायकोच कशाला हवी? हॉटेलात किंवा स्वयंपाक्याकडून सुद्धा जेवण करून घेता येतंच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर जेवण करण्यासाठी शोधता येतातच की... सगळ्याना विचार करता यायला यावा ही जर २१ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतक मागासलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी विचार करूच नये हीच जुनी विचारसरणी असेल तर धन्यच आहे... वा: छान जुळतंय की. अदितीचे विचार तयार झाले. मी काय म्हणतो, तुम्ही जेवण तयार करा, अदितीला विचार शेअर करू देत. काय? एव्हरीबडी विन्स. हेच एक पाऊल पुढे नेऊन मी म्हणेन, की मिपावर तरी विचार का शेअर करता, त्यापेक्षा आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवा की. आम्ही आनंदाने येऊ. :)

In reply to by मधुशाला

चावटमेला 02/08/2010 - 12:02
काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो असे उर्मटपणाचे विचार पाहता, १९ वे शतकच खूप बरे असावे असे दिसते..

In reply to by चावटमेला

आम्ही (मी आणि माझा नवरा) आमच्या (दोघांच्या) उर्मटपणात खूष आहोत, तुम्ही तुमचा सोज्ज्वळ, १९ व्या शतकातला जोडीडार (शोधला नसल्यास) शोधा. १९ आणि २१ व्या शतकांनी एकत्र राहिलं पाहिजे असं थोडीच आहे? पण मुद्दामच दुसर्‍याला डिवचायला जायचा १९ व्या शतकातला सोज्ज्वळ आगाऊपणा कशासाठी? बाकी मधुशालाभौ (किंवा तै) बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणाला घरची गोडी कुठून येणार हा प्रश्न मला पडला नाही. आमच्या यादवकाकूंनी अगदी आईच्या मायेने गेली आठ वर्ष घरी जेवण बनवलं आहे आणि त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील. शोधली चांगली माणसं आणि त्यांनाही माया लावली तर असे प्रश्न कधीही पडत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्म्म्म......!! अदिती काकू , तुम्ही फारच मनाला लावून घेतलात अदिती काकू.....! पण तुम्ही इतके प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! नवर्‍याने प्रेमळपणाने विचारलेल्या प्रश्नाला उर्मट व खोचकपणे उलटप्रश्न केलात त्यावरून तुम्हालाच वाद घालायचा होता हे स्पष्ट होते....! तुमचा बिचारा नवरा....!! :-( ८ वर्षे तुमच्यासाठी जेवण बनवून सुद्धा तुम्ही यादवकाकूना "बाहेरची माणसे" समजता ह्याचे सर्वप्रथम आश्चर्य वाटले....! ह्यावरूनच तुम्ही कोणती माया लावली हे आमच्यापर्यंत पोहचले...! आणि हो , स्वयंपाकाची आवड असणे आणि स्वयंपाक येणे ह्या २ वेगवेगळ्या गोष्टी आहेत........स्वयंपाक येतो पण आवड नाही असे असू शकते.....! पण स्वयंपाक येत नाही आणि स्वयंपाकाची आवड ही नाही अश्या मुली,काकू non -IT मध्येही आहेत हे तुमच्या प्रतिसादावरून कळाले....! बाकी तुमच्या विचारांवर ( जे अवैचारिक आहेत असे लोक समजत आहेत ) 2-3 लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत....त्या वाचाव्यात....! " त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील".... हे तुमचे घटकाभर मान्य....पण चुकून त्या कधी आजारी पडल्या ( देव करो असं कधी न होवो.. ) तर तुम्हाला स्वयंपाक करून त्यांना खायला घातला येईल किमान तेवढा तरी स्वयंपाक करायला शिका.....!! तात्पर्य... :- एवढा वेळ उर्मट उत्तरे देऊन घालवण्यापेक्षा एखाद दुसरा पदार्थ शिकून झाला असता तुमचा....!

In reply to by सुजय कुलकर्णी

जाऊ द्या हो, तुम्ही माझ्या खाण्याची आणि कौशल्याची काळजी करू नका. यादव काकू आजारी पडल्या तर आजूबाजूला खाण्याची आणि खिलवण्याची आवड असणार्‍या चार मित्र-मैत्रिणी, काका-काकू जमा करून ठेवले आहेत. जाताजाता: मी वयाच्या आठ-दहाव्या वर्षापासून "मला खायला आवडतं ते बनवता आलं पाहिजे" या विचारांमुळे मोठ्या भावाच्या हाताखाली स्वयंपाकघरात खुडबूड करायला लागले. तेव्हा तुमची गाडी चुकली आहे "स्वयंपाक शिका" असा सल्ला देण्यात. तात्पर्यः बाळ सुजय, मिपावर, एका मोठ्या व्यासपीठावर, आता आलाच आहात तर, व्यक्तीगत विरोध करण्यापेक्षा विचारांना विरोध करण्याएवढे 'मोठे व्हा'*. *कॉपीराईटः श्रावण मोडक

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चावटमेला 02/08/2010 - 14:57
आदिती ताई, विचारांना विचारांनीच विरोध करायचा हे तुम्हाला पटले तर, मग इतका आक्रस्ताळेपणा कशासाठी, प्रस्तुत लेखातील विचारांशी तुम्ही सहमत नसालही, माग त्याला विचारांनीच उत्तर द्यावे, असे भांडून आणि, एखाद्या व्यक्तिच्या प्रांतावरुन/गावावरोन खोचक विधाने करणे हे केविलाणे आणि निंदनीय आहे.. संपादक महाशय, असे प्रांतवादाचे विष पसरविणारे प्रतिसाद आक्षेपार्ह नाहीत का? असो, सुरुवातीला हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता, पण ताईंचे असले आततायी प्रतिसाद पाहून लेख हा पूर्णपणे वास्तववादी असावा असे वाटत आहे :)

In reply to by चावटमेला

अर्रर्र, तुम्ही सांख्यिकी विषयाचा अभ्यास कमी पडताना दिसतो आहे. केला असतात तर एका उदाहरणावरून अर्ध्या जगाची परीक्षा केली नसतीत! बादवे, माझं नाव आदिती नसून अदिती आहे. होते चूक अशी माणसाची, पण १९ व्या शतकातल्या सोज्ज्वळ वातावरणात अशा अपेक्षा नव्हत्या, म्हणून एकदा सांगितलं!
हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता
मला मात्र केकता कपूरच्या मालिकांएवढा विषारी वाटला! बाकी तुम्हाला आंजावरची कोल्हापूरची महती माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतो आहे. आमच्या पर्‍याला विचारा हे प्रश्न, लगेच उत्तरं मिळतील. प्रांतवादाचे विष का काय तुम्ही म्हणत आहात तो तुमचा चष्मा असेल. असल्या लेखांवरून स्त्रियांना दुय्यम मानव समजण्याबद्दल खंत व्यक्त करणारा एखाद्या प्रांतात रहाणारा आंजा स्नेही आठवला तर ते विष वाटत असेल तर खरंच चष्मा बदलाच ... (हा, जमलं एकदम मुसुटाईपचं वाक्य!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मधुशाला 02/08/2010 - 21:32
तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास दांडगा दिसतो... "पर्‍या " या एकाच आंजा मित्राच्या बोलण्यावरून कोल्हापूरविषयी काहिही बरळत सुटला आहात. हाच का तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास? कोल्हापूरची महती आम्हाला तुमच्याकडून ऐकायची गरज नाही आणि त्याचा अभ्यास करायचीही गरज नाही. कुठलाही आंडूपांडू उठून कोल्हापूरबद्दल काहीही भकला म्हणून कोल्हापूरची महती कमी होत नाही तर बोलणार्‍याची बुद्धीची भोकं दिसतात. "प्रांतवादाचे विष" असं 'चावटमेला' जे म्हणत आहेत त्यासाठी तुमचाच खालचा प्रतिसाद वाचा. तुमच्या सोयीसाठी इथेही तो चिकटवतो. कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या! या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच! फक्त एका आंजा स्नेह्याच्या म्हणण्यावरून तुम्ही हे ठरवून टाकलं कि "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो". आणि तरीही हा प्रांतवाद नाही आणि सांख्यिकी तुम्हाला जास्त कळते. (जळजळ होत असेल तर सोडा घ्या. अर्थात कोल्हापूरचा गोटी सोडा काय तुम्हाला झेपणार नाय. इनो नाय तर पुदीन हरा बेष्ट)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चावटमेला 02/08/2010 - 21:52
दितीताई, हा आमचा चष्मा नाही, तुमचाच जहरी प्रतिसाद बोलत आहे. अरे वा, आणि आपला सांख्यिकिचा अभ्यास भलताच दांडगा दिसतो आहे, म्हणूनच कुठ्ल्याशा लेखाचा आधार घेवून आपल्याच मनातील पश्चिम महाष्ट्राबद्दलची जळजळ निघते आहे. तुम्हाला विचारांना विचाराने उत्तर देता येत नसेल तर उगाच त्रागा करु नका आणि तुमचा वैयक्तिक द्वेष असा चव्हाट्यावर आणू नका.. स्वगत :-> भगवन्ता, काय हेय घोर कलियुग दाखवितोस २१ व्या शतकात :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जिन्क्स 03/08/2010 - 12:41
सुजय कुलकर्णीच्या बायकोचं जाउ ध्या , पण मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. हे वाचल्यावर तुमच्या नवर्याचं फार वाईट वाटलं.... बाकी चालू द्या...

In reply to by जिन्क्स

हे वाचल्यावरच का हो, मला पदोपदी त्याच्याबद्दल वाईट वाटतं. असो तुमच्या सद्भावना पोहोचवते मी त्याला! तो काही मिपा वाचणं शक्य नाही!

चिरोटा 31/07/2010 - 17:17
मजेशीर लेख.आय टी मधला 'ट्फ' जॉब करुन घरी जावून जेवण बनवणार्‍या काही स्त्रियाही असतात. वीकांताला त्यांच्या पतिराजांना काय काय भोगावे लागत असेल याची कल्पना केलेली बरी.!! ------------

In reply to by रामदास

वाहीदा 04/08/2010 - 13:23
खास रामदासकाका स्टाईल प्रतिसाद ! अवांतर : अरेच्या एवढया हुच्च(?) धाग्यावर, हे कसे काय वाचायचे राहून गेले ? :-?

In reply to by चित्रा

विंजिनेर 31/07/2010 - 18:43
अगदी. मुलांनासुद्धा जरूरी पुरता स्वयंपाक यायलाच पाहिजे. पण खरी कसोटी स्वयंपाक येण्या-न येण्यात नसतेच मुळी. खरी कसोटी आठवड्याचे ६-७ दिवस चारी-ठाव स्वयंपाक न थकता/कंटाळता करण्यात असते. (वीकेंड स्वयंपाकी)विंजिनेर बाकी प्रक्षोभक लेख लि हून कोणीत्सूला कांपिटिशन आली म्हणायची ;-) (वाचक राजा)विंजिनेर

In reply to by चित्रा

मधुशाला 01/08/2010 - 23:35
स्त्रियांना आणि पुरूषांनाही किमान पाककला यायलाच हवी!

प्रचेतस 31/07/2010 - 17:24
हाच लेख मला अगदी ७/८ दिवसांपुर्विच इमेल ने आला होता. त्याचे मूळ लेखक तुम्हीच काय? का साहित्यचौर्याचा हा एक नमुनाच. लेख मूळ तुमचाच असेल तर सुरेखच........मग माझे शब्द मागे घेतोच.

In reply to by प्रचेतस

असुर 01/08/2010 - 03:03
+१ असेच म्हणतो. मलाही हा लेख काही दिवसांपूर्वी इ-मेल मधून वाचायला मिळाला होता. जर हा लेख तुमचाच असेल तर तुम्हाला 'ऑल द बेस्ट' कारण आपण मिपा वर प्रसिद्ध करायच्या आधीच त्याची चोरी झालीये. आणि तुमचा नसेल तर... बाकी माझ्या सर्व आय.टी. मित्रांकडे अशीच 'विन विन सिच्युएशन' आहे की "बायको आय.टी. मध्ये आहे, आणि तरी ती टकाटक स्वयंपाक बनवते आणि तिला कंटाळा येतो तेव्हा नवरा जब्बर जेवण बनवतो. दोघानाही कंटाळा येतो तेव्हा दोघांपैकी कुणाची एकाची सासू A1 J1 बनवते!" आता इतके सगळे फक्त 'नशीबवान' च आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मला वाटतंय की विदा कुठेतरी कमी पडतोय की काय? म्हणजे सुवर्णमध्याच्या पलीकडचा विदा मिळवायचा राहून गेलाय की काय अशी एक शंका आली! --असुर

छोटा डॉन 31/07/2010 - 17:25
लेख मजेशीर आहे, आता मिपावरच्या त्याहुन मजेशीर प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे. बरेच मुद्दे अंमळ 'रोचक' वाटले. अवांतर : सोमवारी हाच लेख मी आमच्या नॉन-मराठी मैत्रिणींना ट्रान्सलेट करुन वाचुन दाखवेन व त्यांच्या प्रतिक्रिया पुन्हा ट्रान्सलेट करुन मिपावर लिहेन. त्यांची आठवड्यातुन २-३ दिवस तरी हीच तक्रार असते ( नाही, आयटीवाला नवरा जेवण चांगले बनवत नाही ;) अशी नाही, नवरा मदत करत नाही ही तक्रार ). तोवर बाकी प्रतिक्रिया वाचतो आहे. :) अतिअवांतर : अहो आयटीवाल्या बायकोचे काय पण आयटीवाल्या मैत्रिणीही तसल्याच असे आम्हाला वैयक्तिकरित्या वाटते ;) (सदर घटना संपुर्ण काल्पनिक आहे, त्याचा वास्तवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये )

बहुगुणी 31/07/2010 - 17:25
(मी हे टायपायच्या आत अदितीची प्रतिक्रिया आलीच, अशा अनेक येणार हे गॅरंटीड!!) सुजयः तुमचं हे (निदान इथे तरी) पहिलंच लिखाण असावं असं तुमच्या 'वाटचाली'वरून दिसतं, सुरूवात तरी 'पदार्पणातच शतक' अशी होऊ शकेल! लिखाणाची स्टाईल विनोदाची असावी असं धरून चाललं तर ठीक आहे, पण 'पाककृती' 'सल्ला' या सदरात लिहितांना "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा विचार 'professionalism' घरात आणणं आहे हे तुम्हाला लिहितांना जाणवलं ना, मग तुम्ही स्वतः लग्नाआधी (किंवा झालं असेल तर आता नंतरही) कितीसा स्वयंपाक करता हो? सल्ला देताय तर आधिकार असेलच असं म्हणूयात, तर मग शिकवा की आय टी तल्या पत्नीला, एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ! (बाय द वे, इथे मिसळपावावर गणपा आणि प्रभाकर पेठकरांसारखे बल्लवाचार्य आहेत, त्यांनी तुमच्या सारखा विचार केला असता तर आम्ही किती उत्तमोत्तम पाककृतींना मुकलो असतो अशी भीती वाटून गेली!)

In reply to by रेवती

अगदी बरोबर....!! :-) लेख वाचून एका ओळीत तात्पर्य सांगितल्याबद्दल आभारी....!! तुमचा प्रतिसाद मुले आणि मुली ( शक्यतो IT )मनापासून वाचतील आणि आचरणात आणतील अशी अपेक्षा करतो....! :-)

In reply to by सुजय कुलकर्णी

अर्धवट 01/08/2010 - 12:18
IT IT काय लावलय सारखं... काय जगावेगळे समजता का काय स्वतःला... आणि आयटी म्हणजे नक्की काय हो.. डेवलप्मेंट हमाली.. छिद्रान्वेषीन् टेस्टर का ऊंटावरचे म्यानेजर.. बाहेर या आयटी मधुन.. च्यायला प्रतिक्रिया देणार नव्हतो.. मलाही हेच ढकलपत्र काही दिवसांपुर्वी आलेल आहे.. तेव्हाच रागराग झाला होता.. उत्तरही देणार होतो पण कशाला उगाच शेणात दगड मारा म्हणुन गप्प बसलो.. तर मिपा वर पुन्हा तेच.. केवळ आयटी मधे असल्यामुळे सारख्या टिर्र्या बडवणार्‍यांचा मोठा प्रॉब्लेम आहे बाबा हा.. आपल्या समस्या जगावेगळ्या आहेत आणि जगानं त्या सोडवायला हव्यात हाच अट्टाहास सारखा.. सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा, कुचाळक्या करायच्या, आपण मनमोहनचे बाप असल्यासारखे कळत नसलेल्या विशयावर अकलेचे तारे तोडायचे.. आणि शनिवार रविवार ढुंगण वर करुन बायकोला आदेष सोडायचे... असो.. जास्त बोललो.. जाउद्या स्वयपाकाबद्दल सांगायच तर मला फक्त मॅगी आणि चहा करता येतो आणि त्याची मला लाज वाटते... खुप वेळा खुप त्रास सहन करावा लागतो अनोळखी ठिकाणी.. प्रत्येकाला स्वयपाक आला पाहिजे की नाही हे मला माहित नाही... केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आला पाहिजे हे म्हणणं म्हणजे मुर्खपणाचं आहे... बाकी आदितीशी बाडीस.. तिच्या प्रतिक्रियेवर उत्तर नाही दिले तुम्ही....

In reply to by अर्धवट

अर्धवटराव, आम्ही IT लोक अभिमानाने स्वत:हून कुठेही IT IT म्हणून मिरवत नाही......त्याची गरजही नाही....पण तुम्हाला IT वाल्यांबद्दल एवढा का संताप आहे ते मला कळले नाही...! बाकी ...सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा हे माझ्या बाबतीत तरी अगदी खरे आहे...! :-) केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आलाच पाहिजे हे म्हणणं तुमचच आहे त्यामुळेच ते मुर्खपणाचं असाव...!! मी लेखात असे कुठेही म्हटलेलं नाही....! तुम्हाला स्वयंपाक काहीही येत नाही हे तुम्ही निर्लज्जपणे सांगितलेले आहेच.....आता थोडातरी स्वयंपाक शिका ....!

In reply to by रेवती

माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.
सहमत. माझ्या काकाला कुणी विचारले कि तुला पोहता येते का तर तो उत्तर द्यायचा मला तरंगता येते.त्याच्या उत्तराची आठवण झाली.

रामदास 31/07/2010 - 17:46
पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी असतं काय ? नसेल येत रांधप .चलता है . हळूहळू सगळं येतं . योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" असंही म्हणू नये.त्या योग्य वयात ती बिचारी तुझ्यासारखीच आय.टी. किंवा इतर काहीतरी शिकत असणार. मग सैपाक वगैरे शिकेलच. संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले. असो. लेखाचा आशय कदाचीत वादग्रस्त ठरेल तरी लेखाची मांडणी चांगली आहे.आणखी अनुभव लिहायला काही हरकत नाही वाचायला आवडेल.

In reply to by रामदास

रामदास भाऊ , योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" असं कधीही म्हणू नये हे मी लिहिलेलंच आहे.... :-) स्वयंपाक वगैरे नंतर शिकेलच ह्याची रिस्क कुणी किती घ्यायची ते ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे....!! माझा मुद्दा एकच.....लग्न करताना मुलींना थोडातरी स्वयंपाक येणे आवश्यक आहे....!! पण "ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा".....हे विधान थोडे वादग्रस्त.....मान्य... :-) लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...!!

In reply to by रामदास

पांथस्थ 03/08/2010 - 23:48
संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले.
देवा आता करंजी कुणी करायची असा वाद व्हायचा :) झिंदगी है खेल कोई पास कोई फेल खिलाडी है कोई अनाडी है कोई ओ बाबू समझे क्या...

संपादक मंडळ 31/07/2010 - 18:02
हे लेखन ढकलपत्रातून आले असल्याची नोंद घेतली गेली आहे. मिसळपावावरील लेखन लेखकाचे स्वतःचे असले पाहिजे अशी अट आहे. यासंबंधीचे धोरण येथे पहावे : http://www.misalpav.com/node/13199 वरील लेखन लेखकाचे स्वतःचे आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर येत्या १२ तासांमध्ये येथे द्यावे अशी अपेक्षा आहे. ह्या मुदतीपर्यंत लेखकाचे समाधानकारक उत्तर न आल्यास हा लेख संपादक मंडळ अप्रकाशित करेल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. संपादक मंडळ

In reply to by संपादक मंडळ

नमस्कार , वरील लेखन हे माझेच आहे. हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!! "मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला..... मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन धन्यवाद, सुजय कुलकर्णी , कोल्हापूर

In reply to by सुजय कुलकर्णी

कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या! या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्धवट 01/08/2010 - 12:22
आदितीतै... पश्चीम महराष्ट्रावर जायचं काम नाय... तो लेख लिवनारा काय पश्चीम महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे काय... त्याचे वैयक्तीक विचार आहेत.. त्याची जबाबदारी त्याच्यावर.. असो.. आदितीतै मुद्दा काय.. तुम्ही प्रांतवादात कशाला घुसताय..

In reply to by अर्धवट

छे छे, माझा कुठल्याच भागावर जास्त राग अथवा लोभ नाही. पण सदर आंजा स्नेही पश्चिम महाराष्ट्रातले असल्याने तिथल्या तरूणांना, पुरूषांना नावं ठेवत होते. पण तरीही जालावर कोल्हापूर भलत्याच कारणांनी प्रसिद्ध आहे; विश्वास नसेल तर पर्‍याला विचारा.

In reply to by सुजय कुलकर्णी

सुहास.. 01/08/2010 - 11:58
कसला पेटलायस रे स्वयंपाकाच्या मुद्द्यावर ??? का ?? अरे जरा किचनमध्ये बायकोबरोबर स्वयंपाक करुन बघ ..तिने फोडणी द्यावी ..आपण टमाटे चिरावेत...तिने चपाती लाटुन तव्यावर टाकावी..आपण भाजुन घ्यावी ....तिने दाल-वडे हातात चेपुन कढईत सोडावेत....आपण हातात झारा घेऊन तळुन घ्यावेत ...पळीतुन गरम रस्सा हातात घ्यावा...आणी तिला चव बघायला द्यावा.... छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे... आयटीतल्या पाचव्या एमएनसीत काम करणारा..

In reply to by सुहास..

तुमचा प्रतिसाद आवडला.
छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे...
सगळेच नाही, पण लेखाचे प्रवर्तक एकदम हेडमास्तर आयटीवाले दिसताहेत.

In reply to by सुहास..

सुहाशा तू म्हणतोस ते खरे आहे. पण त्यासाठी दोघांनाही चांगला स्वैपाक यायला हवा किंवा दोघांचाही स्वैपाकाच्या बाबतीत आनंदी आनंद असावा. :)

नमस्कार , वरील लेखन हे माझेच आहे. हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!! "मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला..... मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन :-) धन्यवाद, सुजय कुलकर्णी.

नितिन थत्ते 31/07/2010 - 18:39
१. का हो कुलकर्णी साहेब, तुम्ही पण स्वयंपाकात मदत करावी अशी अपेक्षा केली तर तुम्हाला त्यात आक्षेपार्ह काय वाटले? स्वयंपाक हे बायकोचेच काम आहे अशी (सध्याच्या काळात अ‍ॅबनॉर्मल असलेली) कल्पना तुम्ही लग्नापूर्वी बायकोला स्पष्टपणे दिली होती का? २. तुम्हाला येणारी बहुतेक कामे तिला येत असणारच. पण तिला येणारी सगळी कामे तुम्हाला करता येतात का? उदाहरणार्थ अर्धाकच्चा का होईना (हे तुमच्या लेखावरून म्हणत आहे) तिला स्वयंपाक येतो तुम्हाला बहुधा तेवढाही येत नाही. तुम्ही का नाही लग्नापूर्वी स्वैपाक शिकून घेतला? (जुन्या काळच्या वाईट भाषेत- तुम्हाला तुमच्या वडिलांनी स्वयंपाक करण्याचे वळण का नाही लावले?) ३. आयटी मधल्या बायका जशा मॉल मध्ये ओळखू येतात तसे आयटी पुरुषही ओळखू येतात. सांगू लक्षणे? तुमची बायको तुम्हाला वठणीवर आणण्यात यशस्वी व्हावी यासाठी तिला सदिच्छा आणि तुम्हाला 'सुधारा' असा सल्ला.

In reply to by नितिन थत्ते

नितीन साहेब , सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही ....आजच्या IT काळात लग्न झालेली मुले ही स्वयंपाकात मदत करतातच....! पण IT मुलीना देखील "स्वत:ला किमान स्वयंपाक यायला हवा हा उद्देश ह्या मागचा आहे तसेच मुलींकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका असे मला सांगायचे आहे...!! माझ्या बाबतीत म्हणाल तर मला उत्तम स्वयंपाक येत नसला तरी बर्‍यापैकी येतो ( अर्धाकच्चा नाही). आणि हा स्वयंपाक मी लग्नापूर्वीच शिकलो आहे. मुलानाही किमान स्वयंपाक यायला हवा ह्या विचारसरणीचा मी आहे. माझ्या मोठ्या भावाला उत्तम स्वयंपाक येतो. ( वहिनीलाही येतो :-) ) आणि वडिलांचं म्हणाल तर माझ्या वडिलांना अतिउत्तम स्वयंपाक येतो. "तुम्ही कधीतरी घरी या" म्हणजे शंका दूर होईल...!! इथे मला वडिलांनी सांगितलेलं नमूद कराव वाटत...."ज्याचे हात राड , त्याचे तोंड राड....." म्हणजेच ज्याला स्वत:ला बनवता येत तो उपाशी कधी मरत नाही...! तुम्हाला फक्त बोलताच येत का स्वयंपाकही येतो हे मला माहित नाही....! btw , तुमच्या वडिलांनी तुम्हाला माझ्या वडिलांसारखेच वळण लावले असावे हि अपेक्षा करतो. तुम्ही चांगले वळण शिकला नसाल असेच वाटते....! आयटी पुरुषही कसे ओळखू येतात हे मला जास्त माहित नाही.तुमच्या एवढ्या बारीक नजरेने मी पुरुषांकडे बघत नाही.....:-)

बहुगुणी 31/07/2010 - 18:49
विनोदी लिखाण म्हणून लेख टाकला होता का? - 'हो' असं उत्तर असेल तर वाचलात!! (इथे 'झुंजी' पहायला मिळणार नाहीत म्हणून काही जण खंतावतील ती बात अलाहिदा:-)) की स्वानुभवावरून इतरांना 'शहाणं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न' होता? - तसं असेल तर (धागा सुरूच केला आहेत तेंव्हा) काही प्रतिक्रियांची तरी उत्तरं तुमच्याकडून मिळायला हरकत नाही. ती उत्तरंही लेखाइतक्याच खुसखुशीत भाषेत येउ द्या. वाचायला आवडतील. निदान, आज एकविसाव्या शतकातही असा विचार करणारी तरूण मंडळी का असू शकतात, याचं कुतुहल आहे ते सुटेल.

मस्तानी 31/07/2010 - 19:32
पहिल्या परीच्छेदात : "माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले." शेवटच्या परीच्छेदात: "लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही." काय हो सुजय साहेब ... काय कांदा बिंदा चिरायला लावला काय बायकोने ... इतकी जळजळ झाली कशाने म्हणायची तुमची ... असो, तुमची केवळ बायकोच नव्हे तर तुमची आई - काकू - मावशी - आत्या - आजी - मुलगी - होणारी सून आणि तुमच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक स्त्री ची दया येतेय ... देव त्यांना तुम्हाला सहान करण्याची शक्ती देवो ... जाता जाता ... मिसळपाव वर नवीन आहात म्हणताय ? पाककृती सदर बघा जरा एकदा जाऊन ... "इथले" पुरुष कसे आहेत ते कळेलच तुम्हाला :)

ऋषिकेश 31/07/2010 - 19:45
काय अडाणीपणा लावलाय.. मिपावर स्वागत.. मात्र क्षमस्व.. हे उत्तर देण्याच्या / टिप्पणी करण्याच्या लायकीचेही विचार नाहित.. हा प्रतिसाद केवळ पोच

मनुराणी 31/07/2010 - 19:55
लेखक महाशयांनी लग्न उगाच केले. स्वयंपाकाला बाई ठेवली असती तर त्यांची गरज भागली असती आणि त्यांचा खूप मनस्ताप वाचला असता. -एक IT wife

हेम 31/07/2010 - 19:59
लेखाच्या पहिल्या परिच्छेदात सुजयभाउ म्हंतात.... माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. नंतर नितिनभाउंना पाठवलेल्या प्रेमपत्रांत म्हन्ले. नितीन साहेब , सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही .... कांय कळ्नांहा नाय या भुरग्याचा... जन्माचार्य मोदकांला इंद्रायणी वापरलाय की कोळपी यांवर काथ्याकूट करण्यापेक्षा २ मोदक जास्त खाईन म्हणतो..

In reply to by हेम

पुष्करिणी 31/07/2010 - 23:47
अगदी हेच लिहिणार होते... एकंदरीत हा लेख बराच काल्पनिक आहे. लेखकाला मुलींना स्वयंपाक न येणं, मुलींनी सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करणं, ब्रँडेड कपडे घालणं, भाजीवाल्याशी घासाघीस करणं , नवर्‍याकडून घरकामात मदतीची अपेक्षा करणं, गुगलवरून पाकृ. वाचून स्वयंपाक करणं, कुणीही काकू म्हटलेलं न आवडणं इ.इ. असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत...वाचून गंमत वाटली. सुजय काकांना शुभेच्छा!

In reply to by पुष्करिणी

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! तुम्ही वरती लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीला माझा प्रोब्लेम नाही....( except "स्वयंपाक न येणं" ) . मी software engineer असून ( software engineer व्हायला कष्ट पडले नाहीत हि गोष्ट वेगळी ;-) ) मला स्वयंपाक येतो....त्यामुळे software मध्ये काम करते , कष्ट घेऊन engineer झाले त्यामुळे स्वयंपाक शिकायला वेळ मिळाला नाही हे स्वयंपाक न येण्याचे कारण होऊ शकत नाही....!!

अडगळ 31/07/2010 - 20:50
आयला , आमच्या गावची माण्सं सुधरायची न्हाईत. लै कष्ट असतात मालक स्वयपाक म्हणजे . चेष्टा नव्हे. आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या.. नायगावकर काका हुशार आहेत. आयला आमी बहिणाबाईंचा सत्कार पण निर्लेप चा तवा देऊनच करणार. (म्हादेव प्रसाद , दौलत मध्ये पडिक आणि रस्सामंडळाच्या ष्टो चा मेस्त्री , राजारामपुरीतला ) अडगळ. बाकी जाता जाता " तु तर फक्कड मासिक हुंडा" ही नायगावकर काकांची कवितापण आठवली.

छोटा डॉन 31/07/2010 - 21:03
आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या..
=)) =)) =)) हे मात्र १००% पटले बरं का !

गणपा 31/07/2010 - 21:39
ह्म्म्म लेखकाने आपले विचार खुप वादग्रस्त रीतीने मांडलेत. पहिल्याच लिखाणात १०० ओलांडणार बहुतेक. आगावु अभिनंदन. २+ वर्ष झाली पण आम्ही अजुन ६० नाही ओलांडली. :( असो. मी पण आयटीतलाच, फार चांगला नाही पण उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो. घरुन मुलगा / मुलगी हा भेद न करता आईबाबांनी मला आणि बहिणीला सगळी काम शिकवली. अगदी कपडे धुणे / वाळत घालणे ते स्वयंपाक. मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. जेव्हा बायको(लग्नाआधी) मला पहायला आली (हो बरोबर लिहिलय. भेटण्याचा कार्यक्रम मुद्दाम मीच घरी ठरवला होता.) तेव्हा गप्पा मरताना जेव्हा एक-मेकांच्या छंदा विषयी विषय निघाल्यावर मी कुकिंग म्हटल्यावर ती फक्त गोड हसली. लग्न झाल्या वर त्या हसण्या मागचं गुपीत कळलं. बाईसाहेबांना फक्त चहा येत होता. पण ती १-२ महिन्यात सगळं शिकली. आणि हो माझी बायको नॉन आयटी वाली आहे :)

In reply to by चतुरंग

मिसळपाव 31/07/2010 - 22:58
'असा मी असामी' मधे एके ठिकाणी पुलनी लिहिलंय - " तिचं वय अनेक वर्षे सोळावर येउन थांबलं आहे. या हिशोबाने धाकट्या भावंडांच्या वयाचा विचार केला तर काही भावंडाना वयच रहात नाही. कींवा बीजगणितातल्यासारखं मायनस एक, मायनह दोन असं रहातं!!". तसं, गणपा जर 'उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो.' म्हणणार असेल तर माझी अवस्था म्हणजे .... !!!!

In reply to by गणपा

पांथस्थ 04/08/2010 - 00:16
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.
हमारा भी ऐसाईच हुव्या! बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. असो. १. नवरा बायको दोघेही IT/Non-IT पण नोकरी करणारे असतील तर स्वयंपाक हि दोघांची जबाबदारी हवी २. तसे नसल्यास ज्याने घर सांभाळायची जबाबदारी घेतली असेल (स्त्री/पुरुष) त्याने स्वयंपाक करावा पण महत्वाचे म्हणजे संसारात असे कोणतेही नियम लागु होत नाहित. परस्पर-सामंजस्य आणी आपापल्या कर्तव्याची जाणीव ह्यावर गाडा चालत असतो. तेव्हा स्वयंपाक कोणी करायचा हा मुद्दा जरा गौण ठरतो. मी IT मधे आहे (काय करता!) आणी बायको घर सांभाळते. पण अनेकदा ऑफीसमधुन आल्यावर मी स्वंयपाक करतो. कारण हात फार वळवळ करतात. घरात सगळ्यांनाच स्वयंपाक येतो. स्वयंपाक करण्यात गम्मत आहे हे कळले तर तो शिकवायची अथवा शिक म्हणुन मागे लागायची गरज पडत नाहि. माझ्या मुली मी कु़कींग (हा शब्द मला स्वयंपाक करण्या पेक्षा बरा वाटतो) करत असतांना कधी कधी observe करत असतात. त्यातुन त्या शिकतीलहि. आणी त्यांनी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे (just for the sake of it मला मुलं असती तरीही मी त्यांना cooking शिकवले असते!). तेव्हा अधिक सांगणे नको! असो, फारच अवांतर झाला वाटतं प्रतिसाद.

In reply to by पांथस्थ

बेसनलाडू 04/08/2010 - 03:00
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. हमारा भी ऐसाईच हुव्या! आमचेही अगदी असेच झाले. (स्वयंपाकी)बेसनलाडू बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. आणी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे. १००% सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू

उपास 31/07/2010 - 22:02
साहेब, लोकांना यडे बनवायचे आ़णि उचकवायचे धंदे सोडा.. लेखात म्हणताय लग्न झालंय, बायको अमुक अमुक म्हणाली आणि प्रतिसादात म्हणताय लग्न झालेलं नाही. . स्वयंपाक जाउंदे पण लग्न होणं म्हणजे काय हे तरी कळतय का? तुमचा राग नक्की कशावर आहे, आयटीवाल्या बायकांवर, त्यांच्या जिन्सवर (फीट ठेवलेली तब्येत), त्यांच्या महागड्या मोबाईलवर (म्हणजे श्रीमंतीवर?) कि स्वयंपाक ऑऊटसोर्स करण्याच्या (तुमच्या भाषेत आळशी) वृत्तीवर.. जरा इनो घ्या.. ती मुलगी आयटी मधे आहे म्हणजे तिने चार भिंतीतून आणि स्वयंपाकघरातून बाहेर येऊन (अथवा तिथे न घुसमटता) मान मोडेस्तोवर अभ्यास केलाय, इंजिनिअरींग वगैरे केलय आणि स्पर्धात्मक जगात पाऊल ठेवून ती पैसे कमवतेय.. त्याच्यावर तुमचा राग का? उलट तिचं, तिच्या वडिलांच (ज्यांनी तिला असं चाकोरीबाहेर यायला प्रोत्साहन दिलय) त्यांच कौतुक करायला हवं.. तुम्हाला पोळ्या लाटून हव्या असतील तर आयटीची मुलगी लागतेच कशाला.. तुमच्या सारख्यांना पैसा हवा आयटीतल्या मुलीचा आणि तिने गाढवासारख्म घरात राबायलाही हवं.. तुम्ही स्वयंपाक करण, धुणी भांडी आउटसोर्स करु शकता पण पैसे कमवणारी बायको कशी आउटसोर्स करणार? तेव्हा ती तुम्हाला चार घास घालतेय खायला त्याचे आभार माना.. (बायको असेल तर) सुखाने मिळून मिसळून संसार करा.. आणि कांदा चिरणे, कोथिंबीर निवडणे ह्यापलिकडे तुमचा रिझुमे जातो का ह्यावर विचार आणि प्रयत्न करा.. लागली तर गणपाशेठ, पेठकर काकांची मदत घ्या.. आणि अशा स्वतच्या वैचारिक मर्यादांची बुंदी पाडणार्या लेखांना पसरवणे शक्य झालं तर थांबवा.. - (हितचिंतक) उपास

चावटमेला 31/07/2010 - 22:51
सर्वप्रथम, सुजयचे अभिनन्दन, खरोखर, पहिल्याच लेखात सेन्च्यरी मारणार तुम्ही राव. बाकि , योग्य वयात हा लेख वाचायला मिळाला, वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद :) इतक्या तिखट प्रतिक्रिया पाहून खरेतर हसूच आले, हा लेख एक fiction + real experinces चा ब्लेन्ड असू शकतो, म्हणूनच माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. या प्रकारचे लेखन आलेले असावे, केवळ अश्या क्षुल्लक गोष्टीला पकडून वैयक्तिक चिखलफेक करणे योग्य नाही. काही मंडळींनी हा लेख फारच वैयक्तिक घेतलेला दिसतो :) तर लोकहो, just chill, लेखाच मूळ उद्देश हा केवळ स्रियांनीच स्वयंपाक करावा आणि उत्तमच करावा असा मूळीच वाटत नाही, उलट पुरुषांनीही स्व्यंपाक शिकावा आणि आजच्या IT युगात बायकोकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत असाच दिसतो. शेवटी, सुजय भाऊ, लेख कम्प्लीट नादखुळा, अगदी, कोल्हापूरी, रश्श्यसारखा झणझणीत :)

मराठमोळा 01/08/2010 - 00:28
हाहाहाहाहा.. शिर्षक वाचुनच आत काय असेल याची कल्पना आली होती... अपेक्षेला खरा उतरला लेख आणी प्रतिसाद्स. :) आयटी असो वा नॉन आयटी, घरातील सर्व कामे पहाणार्‍या स्त्रियांची संख्या जास्तच आहे.. पुरुष मोजकेच. नोकरी करणार्‍या, पण तरी स्वयंपाक घरात नवर्‍याला पाऊल न ठेवु देणार्‍या बायका सुद्धा मी पाहिल्यात. पण स्वयंपाकासारख्या क्षुल्लक गोष्टीवरुन जर तुम्ही चांगल्या जीवनसंगिनीला मुकणार असाल तर त्याहुन वाईट काहीही नाही.. एक प्रामाणिक सल्ला: जर तुम्हाला परफेक्ट गृहिणी बायको म्हणुन हवी असेल तर मग शिक्षण्/नोकरी अशी अपेक्षा ठेवु नका. लग्नाच्या बाजारात हवे तसे पॅकेजेस उपलब्ध आहेत.. ;) नशिब थोर असेल तर तुम्हाला हवे असलेले सर्व गुण एकाच मुलीत सुद्धा मिळतील कदाचित, बी ऑप्टीमिस्टीक. :) शेवटी लग्न हा एक जुगारच असावा/ लव असो वा अरेंज. ज्याचे त्याचे नशिब आणी ज्याचा त्याचा अनुभव. :) (लग्नासाठी फक्त विचार जुळण्याला महत्व देणारा )

चतुरंग 31/07/2010 - 17:02
देव तुमचं रक्षण करो! :) (जाता जाता - सांगली मिरज भागातले काय हो तुम्ही? नाही, तुमच्या काही शब्दांवरुन तशी शंका आली बाकी काही नाही.)

In reply to by चतुरंग

मिसळभोक्ता 02/08/2010 - 11:11
सुजय भाऊंना मानले पाहिजे. पदार्पणातच सेंचुरी, आणि तीही इकडे (हिरव्या नोटांच्या देशात) वीकांत असताना ! जबरा.. आयटी, बायका, स्वयंपाक, युयुत्सुची विचारशैली, असे सगळे प्वाईंट आलेत. मुक्य म्हणजे, कोल्हापूरच्या निबंधलेखकांची आठवण करून देणारे लेखन. साला,झाडावर चढून बसायची संधीच दिली नाही. पण समजा "अमेरिकेतील आयटीतील बायका" असे आले असते, तर ऑल टाईम हाय धागा झाला असता, हे नक्की. पुढील लेखनास शुभेच्छा.

In reply to by मिसळभोक्ता

त्यांनी हे गांधीहत्या, लेन प्रकरण, पुणेरी दुकानदार, शिवाजी, स्वयंसंपादन, एकंदरीतच संपादन... असे हॉट वायर विषय टाळून सेंचुरी मारली हे महत्त्वाचं. म्हणजे साहेबांनी कव्हर ड्राइव्ह न मारता सेंचुरी केल्यासारखं...

तुमचं लग्नं झालं असेल तर तुमच्या बायकोबद्दल फार वाईट वाटलं. आणि झालं नसेल तर ठरेल, होईल त्याआधी त्या दुर्दैवी मुलीला तुमचे हे २०० वर्ष पुराणे विचार जरूर वाचून दाखवा. मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. आता लग्नं होऊन अडीच वर्ष झालं आहे आणि स्वयंपाकाची आवड असलेली बायको असण्यापेक्षा जिच्याशी आवडीच्या विषयांवर चर्चा करता येते तिच्याशी लग्नं करणं हा योग्य निर्णय होता असं तो जाहीरपणे स्वतःच्या मित्रांनादेखील सांगतो. काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो. पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!! हे झाले माझे दोन पैसे, नॉन-आयटी वाईफचे!! बाकी चालू द्यात तुमची १९ व्या शतकातली विचारगिरण! अदिती

In reply to by निस्का

नुसते वाईट वाटले ? अरेरे....!! स्वयंपाक शिकायला हवा हे कधी वाटणार...?? तुम्ही (नॉन्-आयटी) लिहिलात फार उत्तम केलत.....तुम्हाला बहुतेक स्वयंपाक येत असावा.....! :-) येत नसला तर थोडातरी शिका हि विनंती ....!

In reply to by सुजय कुलकर्णी

निस्का 31/07/2010 - 20:19
तुमच्या आचरट विनंती/टोमण्यांना उत्तर देऊन मला त्याची पत वाढवायची नाही. या थिल्लर धाग्यावारचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि हो, तुम्हाला शुभेच्छा!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर 31/07/2010 - 19:41
तुमच्या बायकोबद्दल(असलेल्या/होणार्‍या) खूपच सहानुभूती वाटते... माझ्या मते स्वयंपाक फक्त मुलींनाच यायला पाहिजे असे नाही. जर तुम्ही स्वतः आयटी मध्ये असाल आणि ऑनसाईट जाण्याची स्वप्ने बघत असाल, तर तुमची बायको करू शकते तसा अर्धकच्चा स्वयंपाक तरी येतो का हो तुम्हांला???? आणि जे काम तुम्ही करता, तेच बायकोही तिच्या ऑफिसात करते. मग घरी आल्यावर म्हटले की मदत कर, तर त्यात तुमचा पुरूषी अहंगंड इतका का दुखावतो?? आणि तुम्हाला बायको चांगली शिकलेली हवी, चांगली नोकरी करणारी(पक्षी: चारलोकांत तुमचे स्टेटस सांभाळणारी) हवी, दिसायला चांगली हवी, तिच्याशी काव्यशास्त्रविनोद चर्चा करता येणारी हवी(अशी तुमची अपेक्षा असल्याचे तुमच्या लेखावरून जरी दिसत नसले तरी इतरांची अशी अपेक्षा असू शकते), हापिसात ९-१० तास काम करूनही घरी आल्यावर न थकता एकटीने आठवडाभर चारी ठाव स्वयंपाक करणारी हवी..... अपेक्षा जरा जास्तच होत नाहीत का हो???? जरा बायकोशी तिला टोमणे मारणॅ सोडून इतर विषयांबद्दल बोलत असाल, तर तिच्याही तिच्या नवर्‍याकडून काय अपेक्षा आहेत हे विचारून घ्या... अर्थात ती सूज्ञ असेल, आणि त्यामुळे भांडण होईल असे वाटत असेल तर ती उत्तर देणार नाही.... आणि पंचविशीतल्या मुलींनी स्वत:ला काकू म्हणवून नाही घेतले, म्हणून व्हॉट युवर अंकल गोझ... हे कोडे काही उलगडले नाही..... अवांतर: स्वतःची जाहिरात नाही, पण मी स्वतः आईकडून (तुमच्या भाषेत शिकायच्या वयात) शिकले नाही... स्वयंपाकाला सुरूवात करून साधारण वर्षभर झाले असेल. कुणाला फोन करण्यापेक्षा गुगलून पदार्थ बनवते आणि ते नक्कीच माणसाने खावे असे चांगले(माझ्या मते ) बनवते. (पुराव्यासाठी विचारा किंवा लिहा: बिका, मोडक, निदे, डॉन, सुबक ठेंगणी) त्यामुळे सरसकटीकरण करताना थोडा विचार करून करा..

In reply to by मस्त कलंदर

सविता 04/08/2010 - 11:51
णम्र विणंटी - हे बाडिस म्हणजे काय हे मला कुणी सांगेल का? व्यनी, ख्ररड केले तर बरे होईल... १०० च्या वर प्रतिसाद गेलेल्या लेखात माझा प्रश्न असलेला प्रतिसाद... त्यावर आलेले उपप्रतिसाद.. शेधणे अंमळ अवघड आहे.... -सविता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मधुशाला 01/08/2010 - 23:33
मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते. काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो पण त्याला घरच्या जेवणाची गोडी नसते. स्वतः एखादा पदार्थ करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना खाऊ घालणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणात नसते. पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!! विचार शेअर करण्यासाठी बायको/नवराच कशाला हवा/हवी? जालावर किंवा मित्रांबरोबर सुद्धा विचार शेअर करता येतातच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर समान विषय विचार शेअर करण्यासाठी शोधता येतातच की... सगळ्याना स्वयंपाक यावा ही जर १९ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतकच पुढारलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी स्वयंपाक करूच नये हीच नवीन विचारसरणी असेल तर धन्यच आहे...

In reply to by मधुशाला

तुमच्या प्रतिसादात मी अदलाबदल केली आहे. कशी वाटते सांगा... >प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते. काय आहे ना, विचार बाहेरून मिळवता येतात आणि/किंवा विचार शेअर करण्यासाठी माणूस शोधता येतो पण त्याला घरच्या विचारांची गोडी नसते. स्वतः एखादा विचार करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना सांगणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने सांगितलेल्या विचारांत नसते. >पण जेवण करण्यासाठी बायको वर जबरदस्ती करता येत नाही ना!! जेवण करण्यासाठी बायकोच कशाला हवी? हॉटेलात किंवा स्वयंपाक्याकडून सुद्धा जेवण करून घेता येतंच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर जेवण करण्यासाठी शोधता येतातच की... सगळ्याना विचार करता यायला यावा ही जर २१ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतक मागासलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी विचार करूच नये हीच जुनी विचारसरणी असेल तर धन्यच आहे... वा: छान जुळतंय की. अदितीचे विचार तयार झाले. मी काय म्हणतो, तुम्ही जेवण तयार करा, अदितीला विचार शेअर करू देत. काय? एव्हरीबडी विन्स. हेच एक पाऊल पुढे नेऊन मी म्हणेन, की मिपावर तरी विचार का शेअर करता, त्यापेक्षा आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवा की. आम्ही आनंदाने येऊ. :)

In reply to by मधुशाला

चावटमेला 02/08/2010 - 12:02
काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो असे उर्मटपणाचे विचार पाहता, १९ वे शतकच खूप बरे असावे असे दिसते..

In reply to by चावटमेला

आम्ही (मी आणि माझा नवरा) आमच्या (दोघांच्या) उर्मटपणात खूष आहोत, तुम्ही तुमचा सोज्ज्वळ, १९ व्या शतकातला जोडीडार (शोधला नसल्यास) शोधा. १९ आणि २१ व्या शतकांनी एकत्र राहिलं पाहिजे असं थोडीच आहे? पण मुद्दामच दुसर्‍याला डिवचायला जायचा १९ व्या शतकातला सोज्ज्वळ आगाऊपणा कशासाठी? बाकी मधुशालाभौ (किंवा तै) बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणाला घरची गोडी कुठून येणार हा प्रश्न मला पडला नाही. आमच्या यादवकाकूंनी अगदी आईच्या मायेने गेली आठ वर्ष घरी जेवण बनवलं आहे आणि त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील. शोधली चांगली माणसं आणि त्यांनाही माया लावली तर असे प्रश्न कधीही पडत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्म्म्म......!! अदिती काकू , तुम्ही फारच मनाला लावून घेतलात अदिती काकू.....! पण तुम्ही इतके प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! नवर्‍याने प्रेमळपणाने विचारलेल्या प्रश्नाला उर्मट व खोचकपणे उलटप्रश्न केलात त्यावरून तुम्हालाच वाद घालायचा होता हे स्पष्ट होते....! तुमचा बिचारा नवरा....!! :-( ८ वर्षे तुमच्यासाठी जेवण बनवून सुद्धा तुम्ही यादवकाकूना "बाहेरची माणसे" समजता ह्याचे सर्वप्रथम आश्चर्य वाटले....! ह्यावरूनच तुम्ही कोणती माया लावली हे आमच्यापर्यंत पोहचले...! आणि हो , स्वयंपाकाची आवड असणे आणि स्वयंपाक येणे ह्या २ वेगवेगळ्या गोष्टी आहेत........स्वयंपाक येतो पण आवड नाही असे असू शकते.....! पण स्वयंपाक येत नाही आणि स्वयंपाकाची आवड ही नाही अश्या मुली,काकू non -IT मध्येही आहेत हे तुमच्या प्रतिसादावरून कळाले....! बाकी तुमच्या विचारांवर ( जे अवैचारिक आहेत असे लोक समजत आहेत ) 2-3 लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत....त्या वाचाव्यात....! " त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील".... हे तुमचे घटकाभर मान्य....पण चुकून त्या कधी आजारी पडल्या ( देव करो असं कधी न होवो.. ) तर तुम्हाला स्वयंपाक करून त्यांना खायला घातला येईल किमान तेवढा तरी स्वयंपाक करायला शिका.....!! तात्पर्य... :- एवढा वेळ उर्मट उत्तरे देऊन घालवण्यापेक्षा एखाद दुसरा पदार्थ शिकून झाला असता तुमचा....!

In reply to by सुजय कुलकर्णी

जाऊ द्या हो, तुम्ही माझ्या खाण्याची आणि कौशल्याची काळजी करू नका. यादव काकू आजारी पडल्या तर आजूबाजूला खाण्याची आणि खिलवण्याची आवड असणार्‍या चार मित्र-मैत्रिणी, काका-काकू जमा करून ठेवले आहेत. जाताजाता: मी वयाच्या आठ-दहाव्या वर्षापासून "मला खायला आवडतं ते बनवता आलं पाहिजे" या विचारांमुळे मोठ्या भावाच्या हाताखाली स्वयंपाकघरात खुडबूड करायला लागले. तेव्हा तुमची गाडी चुकली आहे "स्वयंपाक शिका" असा सल्ला देण्यात. तात्पर्यः बाळ सुजय, मिपावर, एका मोठ्या व्यासपीठावर, आता आलाच आहात तर, व्यक्तीगत विरोध करण्यापेक्षा विचारांना विरोध करण्याएवढे 'मोठे व्हा'*. *कॉपीराईटः श्रावण मोडक

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चावटमेला 02/08/2010 - 14:57
आदिती ताई, विचारांना विचारांनीच विरोध करायचा हे तुम्हाला पटले तर, मग इतका आक्रस्ताळेपणा कशासाठी, प्रस्तुत लेखातील विचारांशी तुम्ही सहमत नसालही, माग त्याला विचारांनीच उत्तर द्यावे, असे भांडून आणि, एखाद्या व्यक्तिच्या प्रांतावरुन/गावावरोन खोचक विधाने करणे हे केविलाणे आणि निंदनीय आहे.. संपादक महाशय, असे प्रांतवादाचे विष पसरविणारे प्रतिसाद आक्षेपार्ह नाहीत का? असो, सुरुवातीला हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता, पण ताईंचे असले आततायी प्रतिसाद पाहून लेख हा पूर्णपणे वास्तववादी असावा असे वाटत आहे :)

In reply to by चावटमेला

अर्रर्र, तुम्ही सांख्यिकी विषयाचा अभ्यास कमी पडताना दिसतो आहे. केला असतात तर एका उदाहरणावरून अर्ध्या जगाची परीक्षा केली नसतीत! बादवे, माझं नाव आदिती नसून अदिती आहे. होते चूक अशी माणसाची, पण १९ व्या शतकातल्या सोज्ज्वळ वातावरणात अशा अपेक्षा नव्हत्या, म्हणून एकदा सांगितलं!
हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता
मला मात्र केकता कपूरच्या मालिकांएवढा विषारी वाटला! बाकी तुम्हाला आंजावरची कोल्हापूरची महती माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतो आहे. आमच्या पर्‍याला विचारा हे प्रश्न, लगेच उत्तरं मिळतील. प्रांतवादाचे विष का काय तुम्ही म्हणत आहात तो तुमचा चष्मा असेल. असल्या लेखांवरून स्त्रियांना दुय्यम मानव समजण्याबद्दल खंत व्यक्त करणारा एखाद्या प्रांतात रहाणारा आंजा स्नेही आठवला तर ते विष वाटत असेल तर खरंच चष्मा बदलाच ... (हा, जमलं एकदम मुसुटाईपचं वाक्य!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मधुशाला 02/08/2010 - 21:32
तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास दांडगा दिसतो... "पर्‍या " या एकाच आंजा मित्राच्या बोलण्यावरून कोल्हापूरविषयी काहिही बरळत सुटला आहात. हाच का तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास? कोल्हापूरची महती आम्हाला तुमच्याकडून ऐकायची गरज नाही आणि त्याचा अभ्यास करायचीही गरज नाही. कुठलाही आंडूपांडू उठून कोल्हापूरबद्दल काहीही भकला म्हणून कोल्हापूरची महती कमी होत नाही तर बोलणार्‍याची बुद्धीची भोकं दिसतात. "प्रांतवादाचे विष" असं 'चावटमेला' जे म्हणत आहेत त्यासाठी तुमचाच खालचा प्रतिसाद वाचा. तुमच्या सोयीसाठी इथेही तो चिकटवतो. कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या! या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच! फक्त एका आंजा स्नेह्याच्या म्हणण्यावरून तुम्ही हे ठरवून टाकलं कि "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो". आणि तरीही हा प्रांतवाद नाही आणि सांख्यिकी तुम्हाला जास्त कळते. (जळजळ होत असेल तर सोडा घ्या. अर्थात कोल्हापूरचा गोटी सोडा काय तुम्हाला झेपणार नाय. इनो नाय तर पुदीन हरा बेष्ट)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चावटमेला 02/08/2010 - 21:52
दितीताई, हा आमचा चष्मा नाही, तुमचाच जहरी प्रतिसाद बोलत आहे. अरे वा, आणि आपला सांख्यिकिचा अभ्यास भलताच दांडगा दिसतो आहे, म्हणूनच कुठ्ल्याशा लेखाचा आधार घेवून आपल्याच मनातील पश्चिम महाष्ट्राबद्दलची जळजळ निघते आहे. तुम्हाला विचारांना विचाराने उत्तर देता येत नसेल तर उगाच त्रागा करु नका आणि तुमचा वैयक्तिक द्वेष असा चव्हाट्यावर आणू नका.. स्वगत :-> भगवन्ता, काय हेय घोर कलियुग दाखवितोस २१ व्या शतकात :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जिन्क्स 03/08/2010 - 12:41
सुजय कुलकर्णीच्या बायकोचं जाउ ध्या , पण मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. हे वाचल्यावर तुमच्या नवर्याचं फार वाईट वाटलं.... बाकी चालू द्या...

In reply to by जिन्क्स

हे वाचल्यावरच का हो, मला पदोपदी त्याच्याबद्दल वाईट वाटतं. असो तुमच्या सद्भावना पोहोचवते मी त्याला! तो काही मिपा वाचणं शक्य नाही!

चिरोटा 31/07/2010 - 17:17
मजेशीर लेख.आय टी मधला 'ट्फ' जॉब करुन घरी जावून जेवण बनवणार्‍या काही स्त्रियाही असतात. वीकांताला त्यांच्या पतिराजांना काय काय भोगावे लागत असेल याची कल्पना केलेली बरी.!! ------------

In reply to by रामदास

वाहीदा 04/08/2010 - 13:23
खास रामदासकाका स्टाईल प्रतिसाद ! अवांतर : अरेच्या एवढया हुच्च(?) धाग्यावर, हे कसे काय वाचायचे राहून गेले ? :-?

In reply to by चित्रा

विंजिनेर 31/07/2010 - 18:43
अगदी. मुलांनासुद्धा जरूरी पुरता स्वयंपाक यायलाच पाहिजे. पण खरी कसोटी स्वयंपाक येण्या-न येण्यात नसतेच मुळी. खरी कसोटी आठवड्याचे ६-७ दिवस चारी-ठाव स्वयंपाक न थकता/कंटाळता करण्यात असते. (वीकेंड स्वयंपाकी)विंजिनेर बाकी प्रक्षोभक लेख लि हून कोणीत्सूला कांपिटिशन आली म्हणायची ;-) (वाचक राजा)विंजिनेर

In reply to by चित्रा

मधुशाला 01/08/2010 - 23:35
स्त्रियांना आणि पुरूषांनाही किमान पाककला यायलाच हवी!

प्रचेतस 31/07/2010 - 17:24
हाच लेख मला अगदी ७/८ दिवसांपुर्विच इमेल ने आला होता. त्याचे मूळ लेखक तुम्हीच काय? का साहित्यचौर्याचा हा एक नमुनाच. लेख मूळ तुमचाच असेल तर सुरेखच........मग माझे शब्द मागे घेतोच.

In reply to by प्रचेतस

असुर 01/08/2010 - 03:03
+१ असेच म्हणतो. मलाही हा लेख काही दिवसांपूर्वी इ-मेल मधून वाचायला मिळाला होता. जर हा लेख तुमचाच असेल तर तुम्हाला 'ऑल द बेस्ट' कारण आपण मिपा वर प्रसिद्ध करायच्या आधीच त्याची चोरी झालीये. आणि तुमचा नसेल तर... बाकी माझ्या सर्व आय.टी. मित्रांकडे अशीच 'विन विन सिच्युएशन' आहे की "बायको आय.टी. मध्ये आहे, आणि तरी ती टकाटक स्वयंपाक बनवते आणि तिला कंटाळा येतो तेव्हा नवरा जब्बर जेवण बनवतो. दोघानाही कंटाळा येतो तेव्हा दोघांपैकी कुणाची एकाची सासू A1 J1 बनवते!" आता इतके सगळे फक्त 'नशीबवान' च आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मला वाटतंय की विदा कुठेतरी कमी पडतोय की काय? म्हणजे सुवर्णमध्याच्या पलीकडचा विदा मिळवायचा राहून गेलाय की काय अशी एक शंका आली! --असुर

छोटा डॉन 31/07/2010 - 17:25
लेख मजेशीर आहे, आता मिपावरच्या त्याहुन मजेशीर प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे. बरेच मुद्दे अंमळ 'रोचक' वाटले. अवांतर : सोमवारी हाच लेख मी आमच्या नॉन-मराठी मैत्रिणींना ट्रान्सलेट करुन वाचुन दाखवेन व त्यांच्या प्रतिक्रिया पुन्हा ट्रान्सलेट करुन मिपावर लिहेन. त्यांची आठवड्यातुन २-३ दिवस तरी हीच तक्रार असते ( नाही, आयटीवाला नवरा जेवण चांगले बनवत नाही ;) अशी नाही, नवरा मदत करत नाही ही तक्रार ). तोवर बाकी प्रतिक्रिया वाचतो आहे. :) अतिअवांतर : अहो आयटीवाल्या बायकोचे काय पण आयटीवाल्या मैत्रिणीही तसल्याच असे आम्हाला वैयक्तिकरित्या वाटते ;) (सदर घटना संपुर्ण काल्पनिक आहे, त्याचा वास्तवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये )

बहुगुणी 31/07/2010 - 17:25
(मी हे टायपायच्या आत अदितीची प्रतिक्रिया आलीच, अशा अनेक येणार हे गॅरंटीड!!) सुजयः तुमचं हे (निदान इथे तरी) पहिलंच लिखाण असावं असं तुमच्या 'वाटचाली'वरून दिसतं, सुरूवात तरी 'पदार्पणातच शतक' अशी होऊ शकेल! लिखाणाची स्टाईल विनोदाची असावी असं धरून चाललं तर ठीक आहे, पण 'पाककृती' 'सल्ला' या सदरात लिहितांना "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा विचार 'professionalism' घरात आणणं आहे हे तुम्हाला लिहितांना जाणवलं ना, मग तुम्ही स्वतः लग्नाआधी (किंवा झालं असेल तर आता नंतरही) कितीसा स्वयंपाक करता हो? सल्ला देताय तर आधिकार असेलच असं म्हणूयात, तर मग शिकवा की आय टी तल्या पत्नीला, एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ! (बाय द वे, इथे मिसळपावावर गणपा आणि प्रभाकर पेठकरांसारखे बल्लवाचार्य आहेत, त्यांनी तुमच्या सारखा विचार केला असता तर आम्ही किती उत्तमोत्तम पाककृतींना मुकलो असतो अशी भीती वाटून गेली!)

In reply to by रेवती

अगदी बरोबर....!! :-) लेख वाचून एका ओळीत तात्पर्य सांगितल्याबद्दल आभारी....!! तुमचा प्रतिसाद मुले आणि मुली ( शक्यतो IT )मनापासून वाचतील आणि आचरणात आणतील अशी अपेक्षा करतो....! :-)

In reply to by सुजय कुलकर्णी

अर्धवट 01/08/2010 - 12:18
IT IT काय लावलय सारखं... काय जगावेगळे समजता का काय स्वतःला... आणि आयटी म्हणजे नक्की काय हो.. डेवलप्मेंट हमाली.. छिद्रान्वेषीन् टेस्टर का ऊंटावरचे म्यानेजर.. बाहेर या आयटी मधुन.. च्यायला प्रतिक्रिया देणार नव्हतो.. मलाही हेच ढकलपत्र काही दिवसांपुर्वी आलेल आहे.. तेव्हाच रागराग झाला होता.. उत्तरही देणार होतो पण कशाला उगाच शेणात दगड मारा म्हणुन गप्प बसलो.. तर मिपा वर पुन्हा तेच.. केवळ आयटी मधे असल्यामुळे सारख्या टिर्र्या बडवणार्‍यांचा मोठा प्रॉब्लेम आहे बाबा हा.. आपल्या समस्या जगावेगळ्या आहेत आणि जगानं त्या सोडवायला हव्यात हाच अट्टाहास सारखा.. सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा, कुचाळक्या करायच्या, आपण मनमोहनचे बाप असल्यासारखे कळत नसलेल्या विशयावर अकलेचे तारे तोडायचे.. आणि शनिवार रविवार ढुंगण वर करुन बायकोला आदेष सोडायचे... असो.. जास्त बोललो.. जाउद्या स्वयपाकाबद्दल सांगायच तर मला फक्त मॅगी आणि चहा करता येतो आणि त्याची मला लाज वाटते... खुप वेळा खुप त्रास सहन करावा लागतो अनोळखी ठिकाणी.. प्रत्येकाला स्वयपाक आला पाहिजे की नाही हे मला माहित नाही... केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आला पाहिजे हे म्हणणं म्हणजे मुर्खपणाचं आहे... बाकी आदितीशी बाडीस.. तिच्या प्रतिक्रियेवर उत्तर नाही दिले तुम्ही....

In reply to by अर्धवट

अर्धवटराव, आम्ही IT लोक अभिमानाने स्वत:हून कुठेही IT IT म्हणून मिरवत नाही......त्याची गरजही नाही....पण तुम्हाला IT वाल्यांबद्दल एवढा का संताप आहे ते मला कळले नाही...! बाकी ...सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा हे माझ्या बाबतीत तरी अगदी खरे आहे...! :-) केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आलाच पाहिजे हे म्हणणं तुमचच आहे त्यामुळेच ते मुर्खपणाचं असाव...!! मी लेखात असे कुठेही म्हटलेलं नाही....! तुम्हाला स्वयंपाक काहीही येत नाही हे तुम्ही निर्लज्जपणे सांगितलेले आहेच.....आता थोडातरी स्वयंपाक शिका ....!

In reply to by रेवती

माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.
सहमत. माझ्या काकाला कुणी विचारले कि तुला पोहता येते का तर तो उत्तर द्यायचा मला तरंगता येते.त्याच्या उत्तराची आठवण झाली.

रामदास 31/07/2010 - 17:46
पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी असतं काय ? नसेल येत रांधप .चलता है . हळूहळू सगळं येतं . योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" असंही म्हणू नये.त्या योग्य वयात ती बिचारी तुझ्यासारखीच आय.टी. किंवा इतर काहीतरी शिकत असणार. मग सैपाक वगैरे शिकेलच. संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले. असो. लेखाचा आशय कदाचीत वादग्रस्त ठरेल तरी लेखाची मांडणी चांगली आहे.आणखी अनुभव लिहायला काही हरकत नाही वाचायला आवडेल.

In reply to by रामदास

रामदास भाऊ , योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" असं कधीही म्हणू नये हे मी लिहिलेलंच आहे.... :-) स्वयंपाक वगैरे नंतर शिकेलच ह्याची रिस्क कुणी किती घ्यायची ते ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे....!! माझा मुद्दा एकच.....लग्न करताना मुलींना थोडातरी स्वयंपाक येणे आवश्यक आहे....!! पण "ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा".....हे विधान थोडे वादग्रस्त.....मान्य... :-) लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...!!

In reply to by रामदास

पांथस्थ 03/08/2010 - 23:48
संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले.
देवा आता करंजी कुणी करायची असा वाद व्हायचा :) झिंदगी है खेल कोई पास कोई फेल खिलाडी है कोई अनाडी है कोई ओ बाबू समझे क्या...

संपादक मंडळ 31/07/2010 - 18:02
हे लेखन ढकलपत्रातून आले असल्याची नोंद घेतली गेली आहे. मिसळपावावरील लेखन लेखकाचे स्वतःचे असले पाहिजे अशी अट आहे. यासंबंधीचे धोरण येथे पहावे : http://www.misalpav.com/node/13199 वरील लेखन लेखकाचे स्वतःचे आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर येत्या १२ तासांमध्ये येथे द्यावे अशी अपेक्षा आहे. ह्या मुदतीपर्यंत लेखकाचे समाधानकारक उत्तर न आल्यास हा लेख संपादक मंडळ अप्रकाशित करेल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. संपादक मंडळ

In reply to by संपादक मंडळ

नमस्कार , वरील लेखन हे माझेच आहे. हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!! "मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला..... मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन धन्यवाद, सुजय कुलकर्णी , कोल्हापूर

In reply to by सुजय कुलकर्णी

कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या! या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्धवट 01/08/2010 - 12:22
आदितीतै... पश्चीम महराष्ट्रावर जायचं काम नाय... तो लेख लिवनारा काय पश्चीम महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे काय... त्याचे वैयक्तीक विचार आहेत.. त्याची जबाबदारी त्याच्यावर.. असो.. आदितीतै मुद्दा काय.. तुम्ही प्रांतवादात कशाला घुसताय..

In reply to by अर्धवट

छे छे, माझा कुठल्याच भागावर जास्त राग अथवा लोभ नाही. पण सदर आंजा स्नेही पश्चिम महाराष्ट्रातले असल्याने तिथल्या तरूणांना, पुरूषांना नावं ठेवत होते. पण तरीही जालावर कोल्हापूर भलत्याच कारणांनी प्रसिद्ध आहे; विश्वास नसेल तर पर्‍याला विचारा.

In reply to by सुजय कुलकर्णी

सुहास.. 01/08/2010 - 11:58
कसला पेटलायस रे स्वयंपाकाच्या मुद्द्यावर ??? का ?? अरे जरा किचनमध्ये बायकोबरोबर स्वयंपाक करुन बघ ..तिने फोडणी द्यावी ..आपण टमाटे चिरावेत...तिने चपाती लाटुन तव्यावर टाकावी..आपण भाजुन घ्यावी ....तिने दाल-वडे हातात चेपुन कढईत सोडावेत....आपण हातात झारा घेऊन तळुन घ्यावेत ...पळीतुन गरम रस्सा हातात घ्यावा...आणी तिला चव बघायला द्यावा.... छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे... आयटीतल्या पाचव्या एमएनसीत काम करणारा..

In reply to by सुहास..

तुमचा प्रतिसाद आवडला.
छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे...
सगळेच नाही, पण लेखाचे प्रवर्तक एकदम हेडमास्तर आयटीवाले दिसताहेत.

In reply to by सुहास..

सुहाशा तू म्हणतोस ते खरे आहे. पण त्यासाठी दोघांनाही चांगला स्वैपाक यायला हवा किंवा दोघांचाही स्वैपाकाच्या बाबतीत आनंदी आनंद असावा. :)

नमस्कार , वरील लेखन हे माझेच आहे. हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!! "मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला..... मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन :-) धन्यवाद, सुजय कुलकर्णी.

नितिन थत्ते 31/07/2010 - 18:39
१. का हो कुलकर्णी साहेब, तुम्ही पण स्वयंपाकात मदत करावी अशी अपेक्षा केली तर तुम्हाला त्यात आक्षेपार्ह काय वाटले? स्वयंपाक हे बायकोचेच काम आहे अशी (सध्याच्या काळात अ‍ॅबनॉर्मल असलेली) कल्पना तुम्ही लग्नापूर्वी बायकोला स्पष्टपणे दिली होती का? २. तुम्हाला येणारी बहुतेक कामे तिला येत असणारच. पण तिला येणारी सगळी कामे तुम्हाला करता येतात का? उदाहरणार्थ अर्धाकच्चा का होईना (हे तुमच्या लेखावरून म्हणत आहे) तिला स्वयंपाक येतो तुम्हाला बहुधा तेवढाही येत नाही. तुम्ही का नाही लग्नापूर्वी स्वैपाक शिकून घेतला? (जुन्या काळच्या वाईट भाषेत- तुम्हाला तुमच्या वडिलांनी स्वयंपाक करण्याचे वळण का नाही लावले?) ३. आयटी मधल्या बायका जशा मॉल मध्ये ओळखू येतात तसे आयटी पुरुषही ओळखू येतात. सांगू लक्षणे? तुमची बायको तुम्हाला वठणीवर आणण्यात यशस्वी व्हावी यासाठी तिला सदिच्छा आणि तुम्हाला 'सुधारा' असा सल्ला.

In reply to by नितिन थत्ते

नितीन साहेब , सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही ....आजच्या IT काळात लग्न झालेली मुले ही स्वयंपाकात मदत करतातच....! पण IT मुलीना देखील "स्वत:ला किमान स्वयंपाक यायला हवा हा उद्देश ह्या मागचा आहे तसेच मुलींकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका असे मला सांगायचे आहे...!! माझ्या बाबतीत म्हणाल तर मला उत्तम स्वयंपाक येत नसला तरी बर्‍यापैकी येतो ( अर्धाकच्चा नाही). आणि हा स्वयंपाक मी लग्नापूर्वीच शिकलो आहे. मुलानाही किमान स्वयंपाक यायला हवा ह्या विचारसरणीचा मी आहे. माझ्या मोठ्या भावाला उत्तम स्वयंपाक येतो. ( वहिनीलाही येतो :-) ) आणि वडिलांचं म्हणाल तर माझ्या वडिलांना अतिउत्तम स्वयंपाक येतो. "तुम्ही कधीतरी घरी या" म्हणजे शंका दूर होईल...!! इथे मला वडिलांनी सांगितलेलं नमूद कराव वाटत...."ज्याचे हात राड , त्याचे तोंड राड....." म्हणजेच ज्याला स्वत:ला बनवता येत तो उपाशी कधी मरत नाही...! तुम्हाला फक्त बोलताच येत का स्वयंपाकही येतो हे मला माहित नाही....! btw , तुमच्या वडिलांनी तुम्हाला माझ्या वडिलांसारखेच वळण लावले असावे हि अपेक्षा करतो. तुम्ही चांगले वळण शिकला नसाल असेच वाटते....! आयटी पुरुषही कसे ओळखू येतात हे मला जास्त माहित नाही.तुमच्या एवढ्या बारीक नजरेने मी पुरुषांकडे बघत नाही.....:-)

बहुगुणी 31/07/2010 - 18:49
विनोदी लिखाण म्हणून लेख टाकला होता का? - 'हो' असं उत्तर असेल तर वाचलात!! (इथे 'झुंजी' पहायला मिळणार नाहीत म्हणून काही जण खंतावतील ती बात अलाहिदा:-)) की स्वानुभवावरून इतरांना 'शहाणं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न' होता? - तसं असेल तर (धागा सुरूच केला आहेत तेंव्हा) काही प्रतिक्रियांची तरी उत्तरं तुमच्याकडून मिळायला हरकत नाही. ती उत्तरंही लेखाइतक्याच खुसखुशीत भाषेत येउ द्या. वाचायला आवडतील. निदान, आज एकविसाव्या शतकातही असा विचार करणारी तरूण मंडळी का असू शकतात, याचं कुतुहल आहे ते सुटेल.

मस्तानी 31/07/2010 - 19:32
पहिल्या परीच्छेदात : "माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले." शेवटच्या परीच्छेदात: "लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही." काय हो सुजय साहेब ... काय कांदा बिंदा चिरायला लावला काय बायकोने ... इतकी जळजळ झाली कशाने म्हणायची तुमची ... असो, तुमची केवळ बायकोच नव्हे तर तुमची आई - काकू - मावशी - आत्या - आजी - मुलगी - होणारी सून आणि तुमच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक स्त्री ची दया येतेय ... देव त्यांना तुम्हाला सहान करण्याची शक्ती देवो ... जाता जाता ... मिसळपाव वर नवीन आहात म्हणताय ? पाककृती सदर बघा जरा एकदा जाऊन ... "इथले" पुरुष कसे आहेत ते कळेलच तुम्हाला :)

ऋषिकेश 31/07/2010 - 19:45
काय अडाणीपणा लावलाय.. मिपावर स्वागत.. मात्र क्षमस्व.. हे उत्तर देण्याच्या / टिप्पणी करण्याच्या लायकीचेही विचार नाहित.. हा प्रतिसाद केवळ पोच

मनुराणी 31/07/2010 - 19:55
लेखक महाशयांनी लग्न उगाच केले. स्वयंपाकाला बाई ठेवली असती तर त्यांची गरज भागली असती आणि त्यांचा खूप मनस्ताप वाचला असता. -एक IT wife

हेम 31/07/2010 - 19:59
लेखाच्या पहिल्या परिच्छेदात सुजयभाउ म्हंतात.... माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. नंतर नितिनभाउंना पाठवलेल्या प्रेमपत्रांत म्हन्ले. नितीन साहेब , सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही .... कांय कळ्नांहा नाय या भुरग्याचा... जन्माचार्य मोदकांला इंद्रायणी वापरलाय की कोळपी यांवर काथ्याकूट करण्यापेक्षा २ मोदक जास्त खाईन म्हणतो..

In reply to by हेम

पुष्करिणी 31/07/2010 - 23:47
अगदी हेच लिहिणार होते... एकंदरीत हा लेख बराच काल्पनिक आहे. लेखकाला मुलींना स्वयंपाक न येणं, मुलींनी सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करणं, ब्रँडेड कपडे घालणं, भाजीवाल्याशी घासाघीस करणं , नवर्‍याकडून घरकामात मदतीची अपेक्षा करणं, गुगलवरून पाकृ. वाचून स्वयंपाक करणं, कुणीही काकू म्हटलेलं न आवडणं इ.इ. असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत...वाचून गंमत वाटली. सुजय काकांना शुभेच्छा!

In reply to by पुष्करिणी

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! तुम्ही वरती लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीला माझा प्रोब्लेम नाही....( except "स्वयंपाक न येणं" ) . मी software engineer असून ( software engineer व्हायला कष्ट पडले नाहीत हि गोष्ट वेगळी ;-) ) मला स्वयंपाक येतो....त्यामुळे software मध्ये काम करते , कष्ट घेऊन engineer झाले त्यामुळे स्वयंपाक शिकायला वेळ मिळाला नाही हे स्वयंपाक न येण्याचे कारण होऊ शकत नाही....!!

अडगळ 31/07/2010 - 20:50
आयला , आमच्या गावची माण्सं सुधरायची न्हाईत. लै कष्ट असतात मालक स्वयपाक म्हणजे . चेष्टा नव्हे. आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या.. नायगावकर काका हुशार आहेत. आयला आमी बहिणाबाईंचा सत्कार पण निर्लेप चा तवा देऊनच करणार. (म्हादेव प्रसाद , दौलत मध्ये पडिक आणि रस्सामंडळाच्या ष्टो चा मेस्त्री , राजारामपुरीतला ) अडगळ. बाकी जाता जाता " तु तर फक्कड मासिक हुंडा" ही नायगावकर काकांची कवितापण आठवली.

छोटा डॉन 31/07/2010 - 21:03
आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या..
=)) =)) =)) हे मात्र १००% पटले बरं का !

गणपा 31/07/2010 - 21:39
ह्म्म्म लेखकाने आपले विचार खुप वादग्रस्त रीतीने मांडलेत. पहिल्याच लिखाणात १०० ओलांडणार बहुतेक. आगावु अभिनंदन. २+ वर्ष झाली पण आम्ही अजुन ६० नाही ओलांडली. :( असो. मी पण आयटीतलाच, फार चांगला नाही पण उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो. घरुन मुलगा / मुलगी हा भेद न करता आईबाबांनी मला आणि बहिणीला सगळी काम शिकवली. अगदी कपडे धुणे / वाळत घालणे ते स्वयंपाक. मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. जेव्हा बायको(लग्नाआधी) मला पहायला आली (हो बरोबर लिहिलय. भेटण्याचा कार्यक्रम मुद्दाम मीच घरी ठरवला होता.) तेव्हा गप्पा मरताना जेव्हा एक-मेकांच्या छंदा विषयी विषय निघाल्यावर मी कुकिंग म्हटल्यावर ती फक्त गोड हसली. लग्न झाल्या वर त्या हसण्या मागचं गुपीत कळलं. बाईसाहेबांना फक्त चहा येत होता. पण ती १-२ महिन्यात सगळं शिकली. आणि हो माझी बायको नॉन आयटी वाली आहे :)

In reply to by चतुरंग

मिसळपाव 31/07/2010 - 22:58
'असा मी असामी' मधे एके ठिकाणी पुलनी लिहिलंय - " तिचं वय अनेक वर्षे सोळावर येउन थांबलं आहे. या हिशोबाने धाकट्या भावंडांच्या वयाचा विचार केला तर काही भावंडाना वयच रहात नाही. कींवा बीजगणितातल्यासारखं मायनस एक, मायनह दोन असं रहातं!!". तसं, गणपा जर 'उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो.' म्हणणार असेल तर माझी अवस्था म्हणजे .... !!!!

In reply to by गणपा

पांथस्थ 04/08/2010 - 00:16
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.
हमारा भी ऐसाईच हुव्या! बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. असो. १. नवरा बायको दोघेही IT/Non-IT पण नोकरी करणारे असतील तर स्वयंपाक हि दोघांची जबाबदारी हवी २. तसे नसल्यास ज्याने घर सांभाळायची जबाबदारी घेतली असेल (स्त्री/पुरुष) त्याने स्वयंपाक करावा पण महत्वाचे म्हणजे संसारात असे कोणतेही नियम लागु होत नाहित. परस्पर-सामंजस्य आणी आपापल्या कर्तव्याची जाणीव ह्यावर गाडा चालत असतो. तेव्हा स्वयंपाक कोणी करायचा हा मुद्दा जरा गौण ठरतो. मी IT मधे आहे (काय करता!) आणी बायको घर सांभाळते. पण अनेकदा ऑफीसमधुन आल्यावर मी स्वंयपाक करतो. कारण हात फार वळवळ करतात. घरात सगळ्यांनाच स्वयंपाक येतो. स्वयंपाक करण्यात गम्मत आहे हे कळले तर तो शिकवायची अथवा शिक म्हणुन मागे लागायची गरज पडत नाहि. माझ्या मुली मी कु़कींग (हा शब्द मला स्वयंपाक करण्या पेक्षा बरा वाटतो) करत असतांना कधी कधी observe करत असतात. त्यातुन त्या शिकतीलहि. आणी त्यांनी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे (just for the sake of it मला मुलं असती तरीही मी त्यांना cooking शिकवले असते!). तेव्हा अधिक सांगणे नको! असो, फारच अवांतर झाला वाटतं प्रतिसाद.

In reply to by पांथस्थ

बेसनलाडू 04/08/2010 - 03:00
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. हमारा भी ऐसाईच हुव्या! आमचेही अगदी असेच झाले. (स्वयंपाकी)बेसनलाडू बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. आणी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे. १००% सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू

उपास 31/07/2010 - 22:02
साहेब, लोकांना यडे बनवायचे आ़णि उचकवायचे धंदे सोडा.. लेखात म्हणताय लग्न झालंय, बायको अमुक अमुक म्हणाली आणि प्रतिसादात म्हणताय लग्न झालेलं नाही. . स्वयंपाक जाउंदे पण लग्न होणं म्हणजे काय हे तरी कळतय का? तुमचा राग नक्की कशावर आहे, आयटीवाल्या बायकांवर, त्यांच्या जिन्सवर (फीट ठेवलेली तब्येत), त्यांच्या महागड्या मोबाईलवर (म्हणजे श्रीमंतीवर?) कि स्वयंपाक ऑऊटसोर्स करण्याच्या (तुमच्या भाषेत आळशी) वृत्तीवर.. जरा इनो घ्या.. ती मुलगी आयटी मधे आहे म्हणजे तिने चार भिंतीतून आणि स्वयंपाकघरातून बाहेर येऊन (अथवा तिथे न घुसमटता) मान मोडेस्तोवर अभ्यास केलाय, इंजिनिअरींग वगैरे केलय आणि स्पर्धात्मक जगात पाऊल ठेवून ती पैसे कमवतेय.. त्याच्यावर तुमचा राग का? उलट तिचं, तिच्या वडिलांच (ज्यांनी तिला असं चाकोरीबाहेर यायला प्रोत्साहन दिलय) त्यांच कौतुक करायला हवं.. तुम्हाला पोळ्या लाटून हव्या असतील तर आयटीची मुलगी लागतेच कशाला.. तुमच्या सारख्यांना पैसा हवा आयटीतल्या मुलीचा आणि तिने गाढवासारख्म घरात राबायलाही हवं.. तुम्ही स्वयंपाक करण, धुणी भांडी आउटसोर्स करु शकता पण पैसे कमवणारी बायको कशी आउटसोर्स करणार? तेव्हा ती तुम्हाला चार घास घालतेय खायला त्याचे आभार माना.. (बायको असेल तर) सुखाने मिळून मिसळून संसार करा.. आणि कांदा चिरणे, कोथिंबीर निवडणे ह्यापलिकडे तुमचा रिझुमे जातो का ह्यावर विचार आणि प्रयत्न करा.. लागली तर गणपाशेठ, पेठकर काकांची मदत घ्या.. आणि अशा स्वतच्या वैचारिक मर्यादांची बुंदी पाडणार्या लेखांना पसरवणे शक्य झालं तर थांबवा.. - (हितचिंतक) उपास

चावटमेला 31/07/2010 - 22:51
सर्वप्रथम, सुजयचे अभिनन्दन, खरोखर, पहिल्याच लेखात सेन्च्यरी मारणार तुम्ही राव. बाकि , योग्य वयात हा लेख वाचायला मिळाला, वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद :) इतक्या तिखट प्रतिक्रिया पाहून खरेतर हसूच आले, हा लेख एक fiction + real experinces चा ब्लेन्ड असू शकतो, म्हणूनच माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. या प्रकारचे लेखन आलेले असावे, केवळ अश्या क्षुल्लक गोष्टीला पकडून वैयक्तिक चिखलफेक करणे योग्य नाही. काही मंडळींनी हा लेख फारच वैयक्तिक घेतलेला दिसतो :) तर लोकहो, just chill, लेखाच मूळ उद्देश हा केवळ स्रियांनीच स्वयंपाक करावा आणि उत्तमच करावा असा मूळीच वाटत नाही, उलट पुरुषांनीही स्व्यंपाक शिकावा आणि आजच्या IT युगात बायकोकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत असाच दिसतो. शेवटी, सुजय भाऊ, लेख कम्प्लीट नादखुळा, अगदी, कोल्हापूरी, रश्श्यसारखा झणझणीत :)

मराठमोळा 01/08/2010 - 00:28
हाहाहाहाहा.. शिर्षक वाचुनच आत काय असेल याची कल्पना आली होती... अपेक्षेला खरा उतरला लेख आणी प्रतिसाद्स. :) आयटी असो वा नॉन आयटी, घरातील सर्व कामे पहाणार्‍या स्त्रियांची संख्या जास्तच आहे.. पुरुष मोजकेच. नोकरी करणार्‍या, पण तरी स्वयंपाक घरात नवर्‍याला पाऊल न ठेवु देणार्‍या बायका सुद्धा मी पाहिल्यात. पण स्वयंपाकासारख्या क्षुल्लक गोष्टीवरुन जर तुम्ही चांगल्या जीवनसंगिनीला मुकणार असाल तर त्याहुन वाईट काहीही नाही.. एक प्रामाणिक सल्ला: जर तुम्हाला परफेक्ट गृहिणी बायको म्हणुन हवी असेल तर मग शिक्षण्/नोकरी अशी अपेक्षा ठेवु नका. लग्नाच्या बाजारात हवे तसे पॅकेजेस उपलब्ध आहेत.. ;) नशिब थोर असेल तर तुम्हाला हवे असलेले सर्व गुण एकाच मुलीत सुद्धा मिळतील कदाचित, बी ऑप्टीमिस्टीक. :) शेवटी लग्न हा एक जुगारच असावा/ लव असो वा अरेंज. ज्याचे त्याचे नशिब आणी ज्याचा त्याचा अनुभव. :) (लग्नासाठी फक्त विचार जुळण्याला महत्व देणारा )
लेखनविषय:
लेखनप्रकार
लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला.

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

इंटरनेटस्नेही ·

आगाऊ कार्टा 29/07/2010 - 15:39
माझे मोबाईल मुळे नव्हे तर मोबाईलचेच नुकसान झाले आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री पार्टी करुन आम्ही सुमारे ११ वाजताच्या दरम्यान CCD (कॅफे कॉफी डे) मिरामार येथे गेलो. सगळ्यांनी कॉफी मागवली आणि गप्पा मारत बसलो होतो. मी लगेच माझा मोबाईल (Nokia 5610 xpress music with 3.2 MP camera) काढून फोटो काढायला सुरुवात केली. कॉफी आल्यावर मोबाईल टेबलावर ठेवला आणि कॉफी प्यायला सुरुवात केली. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही निघालो आणि आपापल्या रुमवर गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना लक्षात आले की मोबाईल गायब आहे. मग शोधाशोध सुरु. CCD मध्ये जाऊन पण आलो पण काही उपयोग झाला नाही. मित्रांनी पण जाम शिव्या घातल्या.

मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. सहमत आहे. मोबाईल सोबत असल्यावर आपण एकटे असलो तरी आपण आपल्या लोकांशी कनेक्टेड आहोत असे वाटत असते. गर्दी गोंगाटात हेडफोन कानाला लावले आणि आपली आवडती गाणी लागली की, सर्व कोलाहलापासून आपण दूर जातो. मनातले विचार मनसोक्त मागे पुढे धावत असतात. नुकसानीचे म्हणाल तर मी पाहिले आहे की, मोबाईलवर बोलतांना देहभान हरपून बोलत चालणा-यांची गम्मत वाटत असते. आपल्याच नादात रस्त्यावरुन याला त्याला धडकत चालत असतात. एकाच जागेवर चकरा मारत बोलणारे, मोठमोठ्याने बोलणारे, डोळे बंद करुन बोलणारे, मोबाईलवर बोलणा-यांचे निरिक्षण केले की मजा येते. तोंडावर हात ठेवून बोलणारे, एकदा कानाला आणि एकदा तोंडाला मोबाईल लावणारे, दुचाकीवरुन जातांना खांदा आणि कान याच्यात मोबाईल दाबून बोलणारे तर विचारु नका. अपघाताला आमंत्रण देणारे वरीलपैकी एखादा प्रसंग नक्की असू शकतो हे मात्र तितकेच खरे आहे. आपल्याकडे थ्रीजी सुविधा आल्यावर म्हणे बोलणारा दिसणार आहे, मोबाईलवर वेगाने नेटस्पीड मिळणार आहे, असे काय नी काय ऐकून आहे, त्याची सुविधा मिळाली की अजून काही ना काही घडणार आहे तेव्हा त्याचे स्वागत करण्याची मी तरी वाट पाहात आहे. :) अवांतर : मोबाईल वर मिळणार्‍या थ्रीजी सुविधेची माहिती द्या रे कोणीतरी ? -दिलीप बिरुटे

आगाऊ कार्टा 29/07/2010 - 15:39
माझे मोबाईल मुळे नव्हे तर मोबाईलचेच नुकसान झाले आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री पार्टी करुन आम्ही सुमारे ११ वाजताच्या दरम्यान CCD (कॅफे कॉफी डे) मिरामार येथे गेलो. सगळ्यांनी कॉफी मागवली आणि गप्पा मारत बसलो होतो. मी लगेच माझा मोबाईल (Nokia 5610 xpress music with 3.2 MP camera) काढून फोटो काढायला सुरुवात केली. कॉफी आल्यावर मोबाईल टेबलावर ठेवला आणि कॉफी प्यायला सुरुवात केली. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही निघालो आणि आपापल्या रुमवर गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना लक्षात आले की मोबाईल गायब आहे. मग शोधाशोध सुरु. CCD मध्ये जाऊन पण आलो पण काही उपयोग झाला नाही. मित्रांनी पण जाम शिव्या घातल्या.

मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. सहमत आहे. मोबाईल सोबत असल्यावर आपण एकटे असलो तरी आपण आपल्या लोकांशी कनेक्टेड आहोत असे वाटत असते. गर्दी गोंगाटात हेडफोन कानाला लावले आणि आपली आवडती गाणी लागली की, सर्व कोलाहलापासून आपण दूर जातो. मनातले विचार मनसोक्त मागे पुढे धावत असतात. नुकसानीचे म्हणाल तर मी पाहिले आहे की, मोबाईलवर बोलतांना देहभान हरपून बोलत चालणा-यांची गम्मत वाटत असते. आपल्याच नादात रस्त्यावरुन याला त्याला धडकत चालत असतात. एकाच जागेवर चकरा मारत बोलणारे, मोठमोठ्याने बोलणारे, डोळे बंद करुन बोलणारे, मोबाईलवर बोलणा-यांचे निरिक्षण केले की मजा येते. तोंडावर हात ठेवून बोलणारे, एकदा कानाला आणि एकदा तोंडाला मोबाईल लावणारे, दुचाकीवरुन जातांना खांदा आणि कान याच्यात मोबाईल दाबून बोलणारे तर विचारु नका. अपघाताला आमंत्रण देणारे वरीलपैकी एखादा प्रसंग नक्की असू शकतो हे मात्र तितकेच खरे आहे. आपल्याकडे थ्रीजी सुविधा आल्यावर म्हणे बोलणारा दिसणार आहे, मोबाईलवर वेगाने नेटस्पीड मिळणार आहे, असे काय नी काय ऐकून आहे, त्याची सुविधा मिळाली की अजून काही ना काही घडणार आहे तेव्हा त्याचे स्वागत करण्याची मी तरी वाट पाहात आहे. :) अवांतर : मोबाईल वर मिळणार्‍या थ्रीजी सुविधेची माहिती द्या रे कोणीतरी ? -दिलीप बिरुटे
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती

पाषाणभेद ·
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्‍याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ७

जयंत कुलकर्णी ·

Manoj Katwe 04/07/2010 - 17:07
खुप अवघड आहे हो हे सर्व समजुन घ्यायला. सोप्या भाषेत माहिती देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद !! मी खरंच ह्या सगळ्या बाबतींत खुप अज्ञानी आहे. फक्त एकच छोटी शंका, मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?

In reply to by Manoj Katwe

मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?
या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं कठीण नाही. आपण समजा सध्याच्या एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या... असं करत कोट्यवधी पिढ्या मागे गेलं तर आपल्याला मेंदूची क्लिष्टता कमी कमी होत जाताना दिसेल. एक वेळी फक्त काही संदेशवाहक पेशी दिसतील... तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'मेंदू' म्हणायचं थांबवाल. त्याहीपाठी गेलं तर बिनमेंदूचे, व त्याही पाठी बिनपेशींचे 'जीव' दिसतील. पण मेंदूप्रमाणेच तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'जीव' म्हणायचं थांबवाल. हे उत्क्रांतीने दिलेलं उत्तर आहे.

तिमा 05/07/2010 - 13:23
हा लेख वाचल्यावर मला माझा एक अनुभव आठवला. मी प्रतिज्ञेवर सांगू शकतो की त्यात कसलीही अतिशयोक्ति नाही. शिक्षणासाठी पुण्यात असताना मी जवळच्या सपा कॉलेजच्या तलावावर पोहण्यास जात असे. एक दिवस मी पोहत असताना एका नवशिक्या मुलाने एकदम खोल भागात उडी मारली. त्याला पोहता नीट येत नसावे, कारण तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो. तर त्याने मला पुढून गच्च मिठी मारली. मला हातपाय हलवता येईना. मगरमिठी म्हणजे काय याचा साक्षात अनुभव आला. आम्ही दोघेही तळाला पोचलो. मी जीवाच्या आकांताने पायाने तळाला लाथ मारुन वर आलो व तसे करताना दोन्ही हातानी त्या मुलाची मिठी सोडवली. वर येताक्षणीच कोणीतरी त्या मुलाला हात दिला आणि मरणाच्या दाढेतून सुटलो. तर सांगायचा मुद्दा हा की, जेंव्हा आपण मरणार असे मला वाटले तेंव्हा मला लहानपणापासून ते त्या वयापर्यंतचा प्रवास, एखादा सिनेमा पहावा तसा अत्यंत फास्ट स्पीडने दिसला. हा एक अदभूत अनुभव होता. तो इतका हादरवून टाकणारा होता की इतक्या वर्षांनंतरही जसाच्या तसा लक्षांत आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

आपल्या अनुभवावर विश्वास ठेवावाच लागेल. या अपघातात प्राणवायूची कमतरता तर सिध्द्च आहे. जेव्हा मेंदूचा प्राणवायूचा पुरवठा बंद होत आला, तेव्हा त्याने सर्व मेमरी स्कॅन केली, या वर काही मार्ग सापडतोय का, किंवा अशी घटना किंवा अशा घटनेबद्दल काही माहीती सापडतेय का हे बघायला. पण खरा प्रश्न आहे, जर मेंदू ही मेमरी असेल तर स्कॅन कोनी केली ? तेच चित्त का ? तसे असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात...... हा माझा अंदाज आहे. तो बहुदा चुकिचा असण्याची शक्यताच जास्त असणार. माझ्या या लेखनप्रपंचाचा उद्देश सफल होतो आहे असेच म्हणावे लागेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by तिमा

गामा पैलवान 08/04/2016 - 00:46
तिमा, तुमचा अनुभव निश्चितच भीतीदायक आहे. मी जेव्हा मारायला टेकलो होतो तेव्हा मात्र तुमच्यासारखा अनुभव आला नाही. हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. आपण हा देह सोडून दुसरीकडे जाणार असं वाटंत होतं. त्यामुळे प्राण देहात धरून ठेवायची म्हणजेच जीव वाचवायची धडपड चालली होती. पण सगळी आंतरिक होती. बाह्य लक्षणं फारशी नव्हती. फक्त चेहरा फिक्का पडला होता. शेवटी सगळे प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. पण तशी वेळ आलीच नाही. आ.न., -गा.पै.

Manoj Katwe 04/07/2010 - 17:07
खुप अवघड आहे हो हे सर्व समजुन घ्यायला. सोप्या भाषेत माहिती देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद !! मी खरंच ह्या सगळ्या बाबतींत खुप अज्ञानी आहे. फक्त एकच छोटी शंका, मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?

In reply to by Manoj Katwe

मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?
या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं कठीण नाही. आपण समजा सध्याच्या एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या... असं करत कोट्यवधी पिढ्या मागे गेलं तर आपल्याला मेंदूची क्लिष्टता कमी कमी होत जाताना दिसेल. एक वेळी फक्त काही संदेशवाहक पेशी दिसतील... तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'मेंदू' म्हणायचं थांबवाल. त्याहीपाठी गेलं तर बिनमेंदूचे, व त्याही पाठी बिनपेशींचे 'जीव' दिसतील. पण मेंदूप्रमाणेच तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'जीव' म्हणायचं थांबवाल. हे उत्क्रांतीने दिलेलं उत्तर आहे.

तिमा 05/07/2010 - 13:23
हा लेख वाचल्यावर मला माझा एक अनुभव आठवला. मी प्रतिज्ञेवर सांगू शकतो की त्यात कसलीही अतिशयोक्ति नाही. शिक्षणासाठी पुण्यात असताना मी जवळच्या सपा कॉलेजच्या तलावावर पोहण्यास जात असे. एक दिवस मी पोहत असताना एका नवशिक्या मुलाने एकदम खोल भागात उडी मारली. त्याला पोहता नीट येत नसावे, कारण तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो. तर त्याने मला पुढून गच्च मिठी मारली. मला हातपाय हलवता येईना. मगरमिठी म्हणजे काय याचा साक्षात अनुभव आला. आम्ही दोघेही तळाला पोचलो. मी जीवाच्या आकांताने पायाने तळाला लाथ मारुन वर आलो व तसे करताना दोन्ही हातानी त्या मुलाची मिठी सोडवली. वर येताक्षणीच कोणीतरी त्या मुलाला हात दिला आणि मरणाच्या दाढेतून सुटलो. तर सांगायचा मुद्दा हा की, जेंव्हा आपण मरणार असे मला वाटले तेंव्हा मला लहानपणापासून ते त्या वयापर्यंतचा प्रवास, एखादा सिनेमा पहावा तसा अत्यंत फास्ट स्पीडने दिसला. हा एक अदभूत अनुभव होता. तो इतका हादरवून टाकणारा होता की इतक्या वर्षांनंतरही जसाच्या तसा लक्षांत आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

आपल्या अनुभवावर विश्वास ठेवावाच लागेल. या अपघातात प्राणवायूची कमतरता तर सिध्द्च आहे. जेव्हा मेंदूचा प्राणवायूचा पुरवठा बंद होत आला, तेव्हा त्याने सर्व मेमरी स्कॅन केली, या वर काही मार्ग सापडतोय का, किंवा अशी घटना किंवा अशा घटनेबद्दल काही माहीती सापडतेय का हे बघायला. पण खरा प्रश्न आहे, जर मेंदू ही मेमरी असेल तर स्कॅन कोनी केली ? तेच चित्त का ? तसे असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात...... हा माझा अंदाज आहे. तो बहुदा चुकिचा असण्याची शक्यताच जास्त असणार. माझ्या या लेखनप्रपंचाचा उद्देश सफल होतो आहे असेच म्हणावे लागेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by तिमा

गामा पैलवान 08/04/2016 - 00:46
तिमा, तुमचा अनुभव निश्चितच भीतीदायक आहे. मी जेव्हा मारायला टेकलो होतो तेव्हा मात्र तुमच्यासारखा अनुभव आला नाही. हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. आपण हा देह सोडून दुसरीकडे जाणार असं वाटंत होतं. त्यामुळे प्राण देहात धरून ठेवायची म्हणजेच जीव वाचवायची धडपड चालली होती. पण सगळी आंतरिक होती. बाह्य लक्षणं फारशी नव्हती. फक्त चेहरा फिक्का पडला होता. शेवटी सगळे प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. पण तशी वेळ आलीच नाही. आ.न., -गा.पै.
3

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

परिकथेतील राजकुमार ·

अवलिया 21/06/2010 - 12:03
तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल.. --अवलिया

हा हा हा,परा साहेब मिपा वर प्रसिद्ध होण्याचा हा मार्ग सुचाल्याबद्दल धन्यवाद.आता आमची क्याटेगरी विचारजंत कि टुकार असा एक धागा काढावा म्हणतो.म्हंजे लगेच प्रसिद्ध होता येईल. मिपा वरचे चार सदस्य पण धड ओळखत नाही असा चंद्र

शानबा५१२ 21/06/2010 - 12:10
प्र्ण लेख वाचुन झाल्यावर हायस वाटल.फक्त जोरात हुश! करायच बाकी राहील होत. माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. उदाहरणादाखल 'घोड्याला माहीती असेल नियम नाही पाळले तर घोडा............' हा 'unicorn घोडा' की काय त्या लेखावरचे प्रतिसाद व प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद. धन्यवाद!

In reply to by शानबा५१२

अवलिया 21/06/2010 - 12:14
>>मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. --अवलिया

In reply to by अवलिया

मदनबाण 21/06/2010 - 13:01
बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला. ख्या ख्या ख्या. खी खी खी मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

In reply to by अवलिया

II विकास II 21/06/2010 - 12:20
>>काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. == नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन.

In reply to by II विकास II

मदनबाण 21/06/2010 - 12:30
नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन. अरे सख्या...नाना तिकडे आंब्यांच्या मागे लागलाय अन् तू पेढे कसले वाटतोस ? ;) चांगला चोखताना गोड लागेल असा केसर दे त्याला !!! ;) मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

आंबोळी 21/06/2010 - 12:19
अतिशय अभ्यासु लेख. परा यांनी नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन केलय.... खरे म्हणजे त्याना सुट्टी असल्याने ते असे एकावर एक सुंदर धागे काढत आहेत. मित्राची व्यथा त्यांनी येथे फारच प्रभावीपणे मांडली आहे. येथे खरे म्हणजे विचारजंतांवर आजून विस्तृत चर्चा करता आली असती. पण हरकत नाही. पु.ले.शु. आंबोळी

वेताळ 21/06/2010 - 12:21
माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. हे कसे काय तु म्हणु शकतोस? परा हलकट आहे हे परत सिध्द झाले.सगळी गुपिते बाहेर फोडतो. X( वेताळ

In reply to by वेताळ

शानबा५१२ 21/06/2010 - 12:30
सांगायची इच्छा नव्हती पण विचारलस म्हणुन सांगतो. एक उदाहरण दीलच आहे,तु मग त्यावरुन अंदाज नाही का काढु शकत? लिहणार होतो सर्व शोधुन शोधुन पण राहु दे कोणाची नाव आली तर तापतील माझ्यावर!

सहज 21/06/2010 - 12:22
क्षणभर वाटले की थोर विचारवंत परा यांनी टुकारवंतीय लोकांच्या हातात कोलीत दिले आहे की काय? पण धागा दुसर्‍यांदा वाचला तेव्हा त्यामागील खरा उद्देश कळाला. अर्थात ज्यांना कळाला नाही त्यांनी स्व:ताला लेसर ह्युमन समजुन पराचा राग राग करायला काहीच हरकत नाही. लगे रहो पराभाय! लेखमाला होउन जाउ दे.

In reply to by सहज

Nile 22/06/2010 - 13:03
सौंदर्यफुफाटाफेम पराकुमार यांच्या अलौकिक प्रतिभेने नटलेल्या लेखावर छिन्न विछिन्न प्रतिसाद पाहुन मन व्याकुळ झाले. मिपावर साचत चाललेल्या तद्दन पकाउ धाग्यांच्या ढिगामुळे आलेल्या विसरतेनेच की काय पराकुमार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौनच बाळगतात. अश्या ह्या टुकार लेखकांच्या पुरात मिपाकर वाहुन जात असताना पाहुन आलेल्या हताशतेने पराकुमार हतबल झालेले असावेत असे त्यांच्या लेखातील टिंब टिंबातुन टपकत आहे. अश्या अघटितापुढे साक्षात पराकुमारांनीच हात टेकले तर चार घटका शब्द-कण-प्राशन इच्छेने मिपावर येणार्‍या सामान्याने प्रेरणा घ्यावी तरी कुठुन? ह्या भविष्य अंधारात लोटणार्‍या परिस्थितीवर ज्वलंत टिका करण्याच्या हेतुने लेख सुरु केलेल्या पराकुमार यांच्या मनसुब्यावर कुणीतरी मुंबईच्या पर्ज्यनाचा प्रहार केला आहे की काय असे वाटल्याशिवाय रहावत नाही. -Nile

ऋषिकेश 21/06/2010 - 15:13
मिपावर "मिपा" आणि त्यावरील लेखन/लेखक वगैरे विषयांवर चांगले./वाईट/अभ्यासपूर्ण/ एकोळीचे वगैरे वगैरे धागा/कौल काढणारे विसरलास का? तेही लग्गेच प्रसिद्ध होतात ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

प्रभो 21/06/2010 - 18:23
हॅहॅहॅ...क्याफेतला सौंदर्यफुफाटा कमी झालेला दिसतोय.... लेख बिख लिहायला लागलास ....ते पण विचारजंती... ;)

तिमा 21/06/2010 - 18:24
परा, टारझन, सहज्,शानबा ५१२, घासकडवी, वेताळ, विकास, आंबोळी, छोटा डॉन, शिल्पा ब, मदनबाण, अवलिया, ते कोण ते डायबिटिसवाले, बिरुटेसर, घाटपांडे, क्लिंटन, विसोबा खेचर ही सहज आठवणारी नांवे आहेत. म्हणून या मिपावर प्रसिध्द व्यक्ति आहेत असे म्हणता येईल का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शुचि 21/06/2010 - 18:38
>>अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्‍या स्मायली काढतात.>> =)) =)) =))

पाषाणभेद 21/06/2010 - 19:00
ज्याप्रमाणे विचार हि एक प्रवृत्ती आहे अन विचारजंत हा त्या प्रवृत्तीचा एक प्राणी आहे त्याच प्रमाणे टुकार ही एक हि एक प्रवृत्ती आहे. तत्राप आपण विचारजंत हा प्राणी असल्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे टुकारजंत ह्या प्राण्याचाच उल्लेख करायला हवा होता. आपण केवळ टुकार असा उल्लेख केल्याने लेखात जे वजन प्राप्त होणे क्रमप्राप्त होते ते प्राप्त न होता अवास्तव महत्व (त्या शब्दाला - लेखाला नव्हे) प्राप्त झाले हे आपणास ठावूक नसल्याने आम्हास ते तुम्हास व त्याचप्रमाणे इतर सर्व वाचकांस नम्रपणे कथीत करू वाटते. त्या वाटण्यामागेही (चटणी नव्हे)आपल्याप्रती असणारे गुण जसे स्नेह, प्रेम, अभिलाशा, सहृदता, आत्मियता, करूणा, दया, क्षमा, शितलता (म्हणजे थंडपणा - आपल्या प्रकृतीचा नव्हे- आपल्या स्वभावाचा) कारणीभूत आहे. आपले विशाल अतं:करण या विचाररंजनाला सामावून घेतीलच अशी आम्हास आशा, विश्वास आमच्या नेत्रांस दृषष्टीगोचर होत आहे. असो. देवाजीची करूणा आहेच. ती आपणांस लाभो या सदिच्छा, शुभेच्छा, आशा, विश्वास आहे. तथास्तू. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नितिन थत्ते 21/06/2010 - 21:56
शुद्धलेखन या अश्लील शब्दाचा मिपासारख्या सोज्वळ संकेतस्थलावर उघड उल्लेख केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध. संपादक झोपले आहेत का? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

संपादक झोपले आहेत का? मिपावरील कर्मकांडातील सध्याचा एक आवश्यक विधी पूर्ण केल्याबद्दल मी तुमचेपण पांग कसे फेडू याचाच विचार करून तळमळतो आहे. इतका वेळ कोणीही अजून असे लिहिले कसे नाही म्हणून तळमळत होतो. मी तुमचे उपकार खरोखरीच जल्मभर विसरणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 22/06/2010 - 12:12
>>तुमचेपण पांग कसे फेडू आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते? --अवलिया

In reply to by अवलिया

आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते?
"फेडिन पाङ्गकर्ते" हे जास्ती योग्य वाटते ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुक्तसुनीत 21/06/2010 - 21:58
>> प्रसिद्धिपरांङमुख शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते! प्रसिद्धीपराङ्मुख हे "शुद्ध" आहे का ? -सुषुम्नावस्थेतला संपादक !

टारझन 21/06/2010 - 21:14
केवळ अफलातुन !! हा विषय घेऊन टार टार फाड्ण्याचा विचार होता , परंतु तो लेख मनातल्या मनात खारिज करुन टाकला , बिपीनदा मुळे , उगाच माझ्यामुळे त्यांना खराब णको वाटायला !! टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे :) ह्यात मी सुद्धा आलो :)

In reply to by प्रभो

टारझन 21/06/2010 - 21:53
आयडी पण ऊडवा राव ... कारण छाण छाण गोड गोड बळेच वागणे आपल्याला जमणार नाय ... आणि डोक्याला शॉट देणारं वाचल्यावर केकलल्या शिवाय आत्मा पांडुरंगाला चैन काय पडत नाय :) जुलै म्हैण्यापासनं जालिय व्हिआरेस च घेतो :)

In reply to by टारझन

पंगा 21/06/2010 - 22:03
टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे Smile ह्यात मी सुद्धा आलो Smile
सहमत. आम्ही मान्य करतो. काहीजण करत नसतीलही. ज्याचात्याचा प्रश्न. काय? - पंडित गागाभट्ट.

In reply to by टारझन

Pain 21/06/2010 - 22:49
टारझन फॅक्ट्स: चूक. आणि स्वतः ला त्यात धरल्याने चुकिची वस्तुस्थिती होणार नाही.

Pain 21/06/2010 - 22:53
आधी सुरु केलेली मुलाची गोष्ट पुर्ण कर आणि मग काहीही लिही. या क्रमशः वाल्यांचे काहीतरी केले पाहिजे.

सुहास.. 29/03/2011 - 12:50
हा कसा काय मिस झाला ;) =)) =)) =)) झकास लिखाण आणि त्यावरील प्रतिसाद ही

कवितानागेश 29/03/2011 - 14:56
पुन्हा एकदा खूप हसले. शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. >> ही प्रतिक्रिया बेष्ट आहे!

हा सगळा लेख वाचल्यावर मिपा वर लिहावे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण आम्ही नवीन लोकांना प्रसिद्धी नको पण वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल हिच अपेक्षा आहे …

* विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. *जमेल तेव्हडा धागा काढणार्‍याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्‍यांचा अपमान करावा. अगदि मान्य... असेच होते इथे

धागा हा हटके विषयावर असावा....निराळ्या बाजुने घटनेचा विचार करुन धागा गुंफावा ...जेंव्हा शब्द अपुरे पडतात त्या वेळी चित्रांचा मुक्त हस्ते वापर करावा..[चित्रे कशी चढवायची याच्या सुचना दिल्या आहेतच ] टिकाकाराना घाबरू नये..पण सुचनांचा आदर करावा.. .....बरेच वेळा तुमचे धागे उडतात ...पण ना उमेद होऊ नये.. धागा काढताना आपले व इतरांचे २ घटका मनोरंजन इतकी माफक अपेक्षा ठेवून धागा गुंफावा ...

अवलिया 21/06/2010 - 12:03
तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल.. --अवलिया

हा हा हा,परा साहेब मिपा वर प्रसिद्ध होण्याचा हा मार्ग सुचाल्याबद्दल धन्यवाद.आता आमची क्याटेगरी विचारजंत कि टुकार असा एक धागा काढावा म्हणतो.म्हंजे लगेच प्रसिद्ध होता येईल. मिपा वरचे चार सदस्य पण धड ओळखत नाही असा चंद्र

शानबा५१२ 21/06/2010 - 12:10
प्र्ण लेख वाचुन झाल्यावर हायस वाटल.फक्त जोरात हुश! करायच बाकी राहील होत. माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. उदाहरणादाखल 'घोड्याला माहीती असेल नियम नाही पाळले तर घोडा............' हा 'unicorn घोडा' की काय त्या लेखावरचे प्रतिसाद व प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद. धन्यवाद!

In reply to by शानबा५१२

अवलिया 21/06/2010 - 12:14
>>मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. --अवलिया

In reply to by अवलिया

मदनबाण 21/06/2010 - 13:01
बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला. ख्या ख्या ख्या. खी खी खी मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

In reply to by अवलिया

II विकास II 21/06/2010 - 12:20
>>काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. == नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन.

In reply to by II विकास II

मदनबाण 21/06/2010 - 12:30
नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन. अरे सख्या...नाना तिकडे आंब्यांच्या मागे लागलाय अन् तू पेढे कसले वाटतोस ? ;) चांगला चोखताना गोड लागेल असा केसर दे त्याला !!! ;) मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

आंबोळी 21/06/2010 - 12:19
अतिशय अभ्यासु लेख. परा यांनी नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन केलय.... खरे म्हणजे त्याना सुट्टी असल्याने ते असे एकावर एक सुंदर धागे काढत आहेत. मित्राची व्यथा त्यांनी येथे फारच प्रभावीपणे मांडली आहे. येथे खरे म्हणजे विचारजंतांवर आजून विस्तृत चर्चा करता आली असती. पण हरकत नाही. पु.ले.शु. आंबोळी

वेताळ 21/06/2010 - 12:21
माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. हे कसे काय तु म्हणु शकतोस? परा हलकट आहे हे परत सिध्द झाले.सगळी गुपिते बाहेर फोडतो. X( वेताळ

In reply to by वेताळ

शानबा५१२ 21/06/2010 - 12:30
सांगायची इच्छा नव्हती पण विचारलस म्हणुन सांगतो. एक उदाहरण दीलच आहे,तु मग त्यावरुन अंदाज नाही का काढु शकत? लिहणार होतो सर्व शोधुन शोधुन पण राहु दे कोणाची नाव आली तर तापतील माझ्यावर!

सहज 21/06/2010 - 12:22
क्षणभर वाटले की थोर विचारवंत परा यांनी टुकारवंतीय लोकांच्या हातात कोलीत दिले आहे की काय? पण धागा दुसर्‍यांदा वाचला तेव्हा त्यामागील खरा उद्देश कळाला. अर्थात ज्यांना कळाला नाही त्यांनी स्व:ताला लेसर ह्युमन समजुन पराचा राग राग करायला काहीच हरकत नाही. लगे रहो पराभाय! लेखमाला होउन जाउ दे.

In reply to by सहज

Nile 22/06/2010 - 13:03
सौंदर्यफुफाटाफेम पराकुमार यांच्या अलौकिक प्रतिभेने नटलेल्या लेखावर छिन्न विछिन्न प्रतिसाद पाहुन मन व्याकुळ झाले. मिपावर साचत चाललेल्या तद्दन पकाउ धाग्यांच्या ढिगामुळे आलेल्या विसरतेनेच की काय पराकुमार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौनच बाळगतात. अश्या ह्या टुकार लेखकांच्या पुरात मिपाकर वाहुन जात असताना पाहुन आलेल्या हताशतेने पराकुमार हतबल झालेले असावेत असे त्यांच्या लेखातील टिंब टिंबातुन टपकत आहे. अश्या अघटितापुढे साक्षात पराकुमारांनीच हात टेकले तर चार घटका शब्द-कण-प्राशन इच्छेने मिपावर येणार्‍या सामान्याने प्रेरणा घ्यावी तरी कुठुन? ह्या भविष्य अंधारात लोटणार्‍या परिस्थितीवर ज्वलंत टिका करण्याच्या हेतुने लेख सुरु केलेल्या पराकुमार यांच्या मनसुब्यावर कुणीतरी मुंबईच्या पर्ज्यनाचा प्रहार केला आहे की काय असे वाटल्याशिवाय रहावत नाही. -Nile

ऋषिकेश 21/06/2010 - 15:13
मिपावर "मिपा" आणि त्यावरील लेखन/लेखक वगैरे विषयांवर चांगले./वाईट/अभ्यासपूर्ण/ एकोळीचे वगैरे वगैरे धागा/कौल काढणारे विसरलास का? तेही लग्गेच प्रसिद्ध होतात ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

प्रभो 21/06/2010 - 18:23
हॅहॅहॅ...क्याफेतला सौंदर्यफुफाटा कमी झालेला दिसतोय.... लेख बिख लिहायला लागलास ....ते पण विचारजंती... ;)

तिमा 21/06/2010 - 18:24
परा, टारझन, सहज्,शानबा ५१२, घासकडवी, वेताळ, विकास, आंबोळी, छोटा डॉन, शिल्पा ब, मदनबाण, अवलिया, ते कोण ते डायबिटिसवाले, बिरुटेसर, घाटपांडे, क्लिंटन, विसोबा खेचर ही सहज आठवणारी नांवे आहेत. म्हणून या मिपावर प्रसिध्द व्यक्ति आहेत असे म्हणता येईल का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शुचि 21/06/2010 - 18:38
>>अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्‍या स्मायली काढतात.>> =)) =)) =))

पाषाणभेद 21/06/2010 - 19:00
ज्याप्रमाणे विचार हि एक प्रवृत्ती आहे अन विचारजंत हा त्या प्रवृत्तीचा एक प्राणी आहे त्याच प्रमाणे टुकार ही एक हि एक प्रवृत्ती आहे. तत्राप आपण विचारजंत हा प्राणी असल्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे टुकारजंत ह्या प्राण्याचाच उल्लेख करायला हवा होता. आपण केवळ टुकार असा उल्लेख केल्याने लेखात जे वजन प्राप्त होणे क्रमप्राप्त होते ते प्राप्त न होता अवास्तव महत्व (त्या शब्दाला - लेखाला नव्हे) प्राप्त झाले हे आपणास ठावूक नसल्याने आम्हास ते तुम्हास व त्याचप्रमाणे इतर सर्व वाचकांस नम्रपणे कथीत करू वाटते. त्या वाटण्यामागेही (चटणी नव्हे)आपल्याप्रती असणारे गुण जसे स्नेह, प्रेम, अभिलाशा, सहृदता, आत्मियता, करूणा, दया, क्षमा, शितलता (म्हणजे थंडपणा - आपल्या प्रकृतीचा नव्हे- आपल्या स्वभावाचा) कारणीभूत आहे. आपले विशाल अतं:करण या विचाररंजनाला सामावून घेतीलच अशी आम्हास आशा, विश्वास आमच्या नेत्रांस दृषष्टीगोचर होत आहे. असो. देवाजीची करूणा आहेच. ती आपणांस लाभो या सदिच्छा, शुभेच्छा, आशा, विश्वास आहे. तथास्तू. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नितिन थत्ते 21/06/2010 - 21:56
शुद्धलेखन या अश्लील शब्दाचा मिपासारख्या सोज्वळ संकेतस्थलावर उघड उल्लेख केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध. संपादक झोपले आहेत का? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

संपादक झोपले आहेत का? मिपावरील कर्मकांडातील सध्याचा एक आवश्यक विधी पूर्ण केल्याबद्दल मी तुमचेपण पांग कसे फेडू याचाच विचार करून तळमळतो आहे. इतका वेळ कोणीही अजून असे लिहिले कसे नाही म्हणून तळमळत होतो. मी तुमचे उपकार खरोखरीच जल्मभर विसरणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 22/06/2010 - 12:12
>>तुमचेपण पांग कसे फेडू आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते? --अवलिया

In reply to by अवलिया

आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते?
"फेडिन पाङ्गकर्ते" हे जास्ती योग्य वाटते ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुक्तसुनीत 21/06/2010 - 21:58
>> प्रसिद्धिपरांङमुख शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते! प्रसिद्धीपराङ्मुख हे "शुद्ध" आहे का ? -सुषुम्नावस्थेतला संपादक !

टारझन 21/06/2010 - 21:14
केवळ अफलातुन !! हा विषय घेऊन टार टार फाड्ण्याचा विचार होता , परंतु तो लेख मनातल्या मनात खारिज करुन टाकला , बिपीनदा मुळे , उगाच माझ्यामुळे त्यांना खराब णको वाटायला !! टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे :) ह्यात मी सुद्धा आलो :)

In reply to by प्रभो

टारझन 21/06/2010 - 21:53
आयडी पण ऊडवा राव ... कारण छाण छाण गोड गोड बळेच वागणे आपल्याला जमणार नाय ... आणि डोक्याला शॉट देणारं वाचल्यावर केकलल्या शिवाय आत्मा पांडुरंगाला चैन काय पडत नाय :) जुलै म्हैण्यापासनं जालिय व्हिआरेस च घेतो :)

In reply to by टारझन

पंगा 21/06/2010 - 22:03
टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे Smile ह्यात मी सुद्धा आलो Smile
सहमत. आम्ही मान्य करतो. काहीजण करत नसतीलही. ज्याचात्याचा प्रश्न. काय? - पंडित गागाभट्ट.

In reply to by टारझन

Pain 21/06/2010 - 22:49
टारझन फॅक्ट्स: चूक. आणि स्वतः ला त्यात धरल्याने चुकिची वस्तुस्थिती होणार नाही.

Pain 21/06/2010 - 22:53
आधी सुरु केलेली मुलाची गोष्ट पुर्ण कर आणि मग काहीही लिही. या क्रमशः वाल्यांचे काहीतरी केले पाहिजे.

सुहास.. 29/03/2011 - 12:50
हा कसा काय मिस झाला ;) =)) =)) =)) झकास लिखाण आणि त्यावरील प्रतिसाद ही

कवितानागेश 29/03/2011 - 14:56
पुन्हा एकदा खूप हसले. शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. >> ही प्रतिक्रिया बेष्ट आहे!

हा सगळा लेख वाचल्यावर मिपा वर लिहावे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण आम्ही नवीन लोकांना प्रसिद्धी नको पण वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल हिच अपेक्षा आहे …

* विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. *जमेल तेव्हडा धागा काढणार्‍याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्‍यांचा अपमान करावा. अगदि मान्य... असेच होते इथे

धागा हा हटके विषयावर असावा....निराळ्या बाजुने घटनेचा विचार करुन धागा गुंफावा ...जेंव्हा शब्द अपुरे पडतात त्या वेळी चित्रांचा मुक्त हस्ते वापर करावा..[चित्रे कशी चढवायची याच्या सुचना दिल्या आहेतच ] टिकाकाराना घाबरू नये..पण सुचनांचा आदर करावा.. .....बरेच वेळा तुमचे धागे उडतात ...पण ना उमेद होऊ नये.. धागा काढताना आपले व इतरांचे २ घटका मनोरंजन इतकी माफक अपेक्षा ठेवून धागा गुंफावा ...
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

योगायोग

आनंद घारे ·

In reply to by अवलिया

आंबोळी 14/06/2010 - 15:37
अगदी अगदी.... अत्तापावेतो लारा आणि कुंबळेचे विक्रम केंव्हाच मोडीत निघाले असते नै... आंबोळी

In reply to by अवलिया

आंबोळी 14/06/2010 - 15:37
अगदी अगदी.... अत्तापावेतो लारा आणि कुंबळेचे विक्रम केंव्हाच मोडीत निघाले असते नै... आंबोळी
लेखनविषय:
लेखनप्रकार
योगायोग म्हणजे 'कोइन्सिडन्स' या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या वाटणार्‍या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला 'योगायोग' असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सूर्य उगवला आणि सकाळ झाली याला योगायोग म्हणत नाहीत, कारण सूर्योदयाच्या वेळेलाच सकाळ असे नांव दिले आहे.