तुझ्या उंबऱ्याची माती

लेखनप्रकार
तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्‍याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्‍या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो.

लाभले आम्हास भाग्य..

लेखनविषय:
लेखनप्रकार
'लाभले आम्हास भाग्य.. ' भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या.

दबंगला शुभेच्छा

लेखनविषय:
मतदान न करता राजकारन्याना नावे टेवने आणि पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर. मी दबंग पाहिला नाही.प्रोमोज पाहिले .प्रोमोज सुसह्य आहेत.थ्री इडियट्च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडले. आनंद झाला. खूप जणांनी दबंग ला शिव्या पण दिल्या. आमीरची स्तुती केली.दोन पिच्चरची तुलना केली. एक जण दबंग ला म्हणतो 'लोक आजकाल कचरा पण विकत घेतात...

आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो का?

लेखनविषय:
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्‍याच्या बायकोसारखा दुसर्‍याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा. आपणही विचार मांडा.

प्रिय राहूल देशपांडे,

लेखनविषय:
प्रिय राहुल देशपांडे, (केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद, मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही.

नक्को नक्को रे!

लेखनप्रकार
"केतन, नाकात बोटं नको घालू.... " "केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का?
Subscribe to मत