मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उचललेस तू मीठ मुठभर

भोचक ·

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?
अगदी अगदी ! ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !! ©º°¨¨°º© दुरात्मा परादास गांधी ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by विनायक प्रभू

भोचक 13/11/2009 - 18:48
खलिल जिब्रानविषयी वाचत होतो नि त्याचे एक वचन सापडले. निश्चितपणे मिठात एक पावित्र्य आहे, कारण त्याचे अस्तित्व अश्रूतही आहे नि समुद्रातही ! -खलिल जिब्रान (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

एकलव्य 12/11/2009 - 22:30
साधारण ३महिन्यांपूर्वी मी दांडीयात्रेच्या दरम्यान त्याकाळी विविध पत्रकारांनी केलेले लिखाण वाचले आणि एका केवढ्या मोठ्या रोमांचकारी (आणि शिकविणार्‍याही) इतिहासाकडे वरवर पाहिले होते याची जाणीव झाली. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही? नक्कीच! एकलव्य

In reply to by प्रशान्त पुरकर

घाबरू नका. माझा हृदय परीवर्तनावर पूर्ण विश्वास आहे. उदाहरणार्थः ते कलंत्रीकाका बघा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

श्री भोचक, एका चांगल्या लेखाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. देशाला स्वातंत्र्य कशामुळे मिळाले यावर विचार होत राहतील पण गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा मार्ग त्यानंतर मार्टीन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनीही यशस्वीपणे अवलंबिला यावरून या आंदोलनाची परिणामकारकता लक्षात यावी.

कलंत्री 12/11/2009 - 21:22
या सत्यग्रहाचे वेगळेच असे अंग आहे. गांधींनी महिलाना स्वातंत्र्य लढयात भाग घ्यायला नेहमीच उद्यूक्त केले, पण या आंदोलनासाठी त्यांनी मात्र स्त्रींयाना दुरच ठेवले. तेंव्हा सरोजिनी नायडूंनी असा पवित्रा घेतला की तुम्ही यात भाग घेण्यासाठी जर आम्हाला परवानंगी दिली नाही तर प्रथम तुमच्याविरुद्ध आमचा सत्याग्रह सुरु होईल आणि शेवटी त्यांना परवानंगी मिळाली.

jaypal 12/11/2009 - 21:36
प.रा. जी "कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !!" ज्ञानदेवा रचीला पाया तुका झालासी कळस. (म्हणुन केवळ तुका स्रेष्ठ ठरत नाही की निव्वळ ज्ञानदेव) सर्वच महान होते. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विकास 12/11/2009 - 22:52
अंबरीश मिश्रांचे "गंगेमधे गगन निवळले" अशा काहीशा नावाचे एक गांधीजींवर चांगले पुस्तक आहे, त्यात हे सर्व तसेच एकंदरीतच गांधीजींचे भारतातील राजकीय जीवन हे "श्रद्धावंता"च्या नजरेतून उर्धृत केलेले आहे. त्यातील एकंदरीत सूर (अथवा पुस्तकाचे/लेखकाचे अनुमान) असे आहे की गांधीजींनी काँग्रेसला आवडो - नआवडो स्वतःच्या विचारांतून चळवळ चालू केली. त्याला येणारी समाजमान्यता लक्षात घेता काँग्रेसला त्यांचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. बाकी वर पराने म्हणल्याशी काही अंशी सहमत. तरी देखील "दे दी हमे आझादी बीना..." पेक्षा गदीमांचे "उचलीलेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" थोडे अतिशयोक्तीपर असले तरी मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही. ------------------------------------------- बाकी टिळकांच्या दिशेने चालू झालेली स्वदेशी जीचा वापर सावरकरांनी विद्यार्थी दशेत केला ज्याचा परीणाम पण विसरता कामा नये. टिळक पर्भृतींनी चालू केलेल्या फर्ग्यूसन मधून त्यामुळे सावरकरांना निलंबीत व्हावे लागले, ते केले कोणी तर रँग्लर परांजप्यांनी! असो. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की त्यातूनच पुढे गांधीजींच्या खादीस स्वदेशी म्हणून मान्यता मिळवणे सोपे झाले. स्वदेशीच्या माध्यमातून टिळकांनी चालू केलेली चळवळ हे केवळ ज्यांना जमू शकेल अशांच्याच हातातील स्वातंत्र्ययुद्ध म्हणूनही राहीले नाही आणि त्यात असलेली गर्भित/प्रकट आर्थिक नाकेबंदी हा ब्रिटीशांच्या धंदेवाईक वृत्तीस आणि पर्यायाने साम्राज्यास दिलेले पहीले उत्तर होते. टिळकांना यामुळे स्वातंत्र्य तात्काळ मिळेल असे वाटले नव्हते, किंबहूना स्वतःच्या जिवंतपणी स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना कधीच वाटत नव्हते. ते फक्त स्वातंत्र्यचळवळीसाठी पुढील सर्व सामाजीक पिढीस तयार करायचा त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत होते. (त्यांच्या भाषेत ते फक्त चळवळीचा श्रीगणेशा करत होते). या स्वदेशीचाच पुढचा भाग, मीठ सत्याग्रह होता. पैशावरून पुन्हा एकदा नाकेबंदी करून, गांधीजींनी योग्य अशीच आर्थिक कारणावरून दांडी यात्रेत नाकेबंदी घडवून आणली...१९२० सालला म्हणूनच टिळकयुगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरवात असे म्हणले जाते. आर्थिक कारणांप्रमाणेच, १९४६ साली प्रत्यक्षात झालेले नावीक दलाचे बंड जे आता कधीपण होऊ शकेल अशी भिती ब्रिटीशांमधे उत्पन्न झाली ते म्हणजे मुख्य सावरकर आणि तसेच त्या विचारांच्या इतर नेतृत्वाचा असलेला सैनिकीकरणास पाठींबा हे पण कारण होते. असे सर्व म्हणण्यात गांधीजींचे महत्व आणि नेतॄत्व गूण कमी होत नाहीत पण त्यावर दाखवली जाणारी एकांगी श्रद्धामात्र रहात नाही आणि योग्य त्या ठिकाणी आदर आणि "क्रेडीट" पण दाखवले जाते.

In reply to by विकास

मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही.
असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.>>> प्रत्येक गोष्टीतुन स्वतःला सोयिस्कर तो अर्थ काढणे कुणी तुमच्याकडुन शिकावे. असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. >>> बापुंचे ठिक आहे, पण मग "दे दी हमे आझादी....." सारखी गाणी काय दर्शवतात? गांधीजींना कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. त्यांचं महत्व शिरसावंद्यच आहे, पण गांधीजींचा महिमा गाताना इतरांच्या देशभक्तीकडे, त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष होवू नये एवढीच अपेक्षा. भगतसिंग प्रभुतींचे प्राणार्पण, सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या हाल अपेष्टा, सुभाषबाबूंनी केलेले महत्प्रयास, टिळक, चाफेकरादी देशभक्तांचे कार्य, बंगालमधील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी अर्पण केलेले प्राण हे सगळे व्यर्थ आहे का? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधीजींचे नाव ऐकताच त्यांना झोंबलेल्या मिरच्या पाहून तुम्हाला मीरच्या झोंबल्या हे पाहून मौज वाटली. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by विकास

भोचक 13/11/2009 - 11:29
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विकासजी, अंबरिश मिश्र यांचे जे पुस्तक आहे, ते 'गंगेत गगन वितळले' या नावाचे आहे. त्यात गांधीजींनी भारतात जे काही कार्य केले, त्याचा पाय दक्षिण आफ्रिकेत कसा रचला गेला. त्यांनी काय काय 'प्रयोग' केले ते त्यात दिले आहेत. गांधीजींची जडणघडण त्यातून कळते. अर्थात, हे लिहिताना गांधींकडे फार खालून पाहिल्याने ते उंच दिसतात, यात काही वाद नाही. पण गांधींची ही जडणघडणही सोपी नाही. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी त्यांनी इतरांनाही भरडले आहे, स्वतःला तर आहेच आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा फार अभ्यास त्यांनी केल्याचेही लक्षात येते. बाकी. गांधींच्या या एका सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणण्याचे धाडस मी तरी कधीच करणार नाही. कारण बाकीच्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही मला तितकीच आस्था आहे. थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, चौरीचौराच्या आंदोलनानंतर आंदोलकांचा हिरमोड करणारे, चले जावमधील हिंसेबद्दल काही न बोलणारे, फाळणीच्या योजनेला मान्यता देणारे, प्रसंगी जिनांकडे या देशाची धुरा द्या, पण फाळणी होऊ देऊ नका असे म्हणणारे, पाकिस्तानी टोळीवाल्यानी घुसखोरी केल्यानंतरही पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे ५५ कोटी द्या असा आग्रह धरणारे असेच गांधी होती. गांधींविषयी नकारात्मक मते बनविण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी होती. यालाच मग नेहरूंना पुढे आणणे, पटेलांना मागे सारणे, सुभाषबाबूंना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू न देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे, भगतसिंगांच्या फाशीविषयी स्वतःचा शब्द खर्ची न पाडणारे इत्यादी उपप्रकरणेही गांधींची 'खलनायक' म्हणून प्रतिमा करायला पुरेशी होती. ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. त्यात एका मोठ्या माणसांविषयी त्याच्या चुका दर्शविणारी पुस्तके बरीच असल्याने आणि चर्चा त्याचीच होत असल्याने ही मतेही ठाम बनली होती. पण पुढे गांधी वाचायला सुरवात केली आणि काही धुके निवळले. त्यांचे इतरही गुण पैलू दिसून आले. याचा अर्थ गांधी पूर्णांशाने चांगले होते असे नाही, पण त्या कालखंडावर अफाट असा प्रभाव त्यांनी कसा निर्माण केला याविषयी काही हाती लागले. मुळात गांधी अखिल भारताला व्यापून कसे उरले होते, याचे आश्चर्य वाटायचे. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता का होती? ब्रिटिशांनाही भारताविषयी बोलण्यांसाठी हा नंगा फकिरच का सापडायचा? आणि परदेशातही त्यांनी अनेकांना प्रेरणा कशी दिली असावी? असे अनेक प्रश्न पडायचे. माझ्या पणजे सासूबाईंनी एकदा सांगितले, की त्या बंगालमध्ये असताना गांधीजी त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडलो, त्यासाठी कशी झटापट चालली होती याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक स्त्रियांना त्यावेळी त्यांच्यासमोर आंदोलनासाठी स्वतःचे दागिने काढून दिल्याचे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर तर अजूनच आश्चर्य वाटले. असे किस्से पुस्तकातून वाचणे वेगळे नि प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार असलेल्या व्यक्तीकडून ऐकणे वेगळे. त्यांच्या या किश्श्यामुळे थरारून जाऊन मी गांधी वाचायला सुरवात केली. त्यात काही चांगल्या गोष्टी सापडत गेल्या. त्यांची जडणघडण कळली. स्वतःवर केलेले प्रयोगही समजले. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती याचा अभ्यास त्यांच्याइतका दुसर्‍या कोणत्याही भारतीय नेत्याने क्वचित केला असावा असे वाटले. भारतीय मानसिकताही त्यांनी बरोबर ओळखली म्हणूनच त्यांना झेपेल, पचेल रूचेल असेच आंदोलन त्यांनी चालवले. पण त्याचवेळी त्यांचे इतरही 'गुण' जाणवले. संयमनाचा अतिरेक. नैतिक मुल्यांमध्ये त्यांच्या मुलांची झालेली फरफट. खादीचा अट्टाहास. वगैरे वगैरे. दुसर्‍यांना स्वतःच्या नियमांमध्ये बसविण्याचा अट्टाहास करणारा हटवादी 'महात्मा'ही यातूनच कळला. (प्रभा नारायण आणि जयप्रकाश नारायण यांना म्हणे त्यांनी 'आत्मसंयमन' पाळायला सांगितले होते! ) या देशाला फक्त गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांचे योगदान मोठे होते, हेही टाळून चालणार नाही. त्याचवेळी गांधींचा कॉंग्रेसमध्ये झालेला उदय तोपर्यंत कॉंग्रेसमध्येच सक्रिय असलेल्या जिनांना वळचणीला टाकणारा ठरला आणि त्यातच फुटीरतेची बिजे पेरली गेली हेही तितकेच सत्य आहे. कॉंग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून गांधींनी एस्टाब्लिश होताना जिनांना अलगद दूर सारले नि कॉंग्रेसवर वर्चस्व मिळवले हे सत्य आहे. पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले (जिना वगळता) हेही लक्षात घेण्यासारखे आहे. जिना आणि गांधी यांच्यातील 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिपही पहाण्यासारखी आहे. गांधीजींच्या हत्येनंतर जिनांनी पाकिस्तानातील शोकसभेत त्यांचा उल्लेख म्हणे 'मि. गांधी' असाच केला होता. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

चिरोटा 13/11/2009 - 12:18
आईनस्टाईनने एका पत्रात म्हंटले आहे- Mahatma Gandhi's life achievement stands unique in political history. He has invented a completely new and humane means for the liberation war of an oppressed country, and practised it with greatest energy and devotion.We may all be happy and grateful that destiny gifted us with such an enlightened contemporary, a role model for the generations to come. गांधी हत्येनंतर आईन्स्टाईन यानी म्हंटले होते- Generations to come, it may be, will scarce believe that such a one as this, ever in flesh and blood walked upon this earth. भेंडी P = NP

In reply to by गणपा

प्रतिसाद भयंकर आवडला... माझ्याच मनातलं बोललात.... त्यांच्या सर्व चुकाबिका आणि राजकारण मान्य करूनही प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतुहल वाटतेच...

In reply to by भोचक

यशोधरा 13/11/2009 - 13:24
भोचक, आपला लेख उत्तम आहे, तसाच, तुम्ही लिहिलेला प्रतिसादही. फक्त, "पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले.. " ह्या ऐवजी, ज्यांनी गांधींची तत्वे मान्य केली, त्यांना बरोबर घेतले, असे वाटते. नाहीतर सुभाषबाबू, स्वा. सावरकर यासारख्या व्यक्तींना जर का आपल्या लोकप्रियतेचा फायदा जर त्यांनी करुन दिला असता, तर कदाचित आज भारताचे चित्र वेगळे असू शकले असते...

In reply to by भोचक

विकास 13/11/2009 - 20:41
भोचकराव, पुस्तकाचे नाव दुरूस्ती केल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम कुठल्याही ऐतिहासीक नेतृत्वाबद्दल मला आदरच आहे, त्याचे विचार पटोत अथवा न पटोत. विचार करा नुसत्या एका संकेतस्थळावर स्वतःचे विचार इतरांपर्यंत पोचवायला अवघड जाते, पटवणे तर फारच लांब! तिथे स्वतःच्या बाजूने लोकांना वळवून समाजमन बदलण्याची ताकद असते आणि ती देखील स्वतःच्यापश्चात टिकते तिथे तुम्ही-आम्ही कोण! :) थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, ...ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. प्रामाणिकपणे, माझ्या नजरेतील, वरील सर्व मान्य असूनही यातील कुठल्याही गोष्टींमुळे गांधीजींबद्दलचा आदर कमी होत नाही फक्त तो डोळस राहतो. केवळ निष्क्रीय माणूसच बिनचूक असू शकतो असे वाटते... वास्तवीक पहाता हे माझेच नाही तर इतर अनेकांचे, जे स्वतःला गांधी-विरोधक समजतात, त्यांचे त्यांच्या नकळत असेच म्हणणे असू शकते असे वाटते. थोडक्यात गांधीजींना होणारा विरोध हा त्या व्यक्तीपेक्षा गांधीवादाला आहे, ज्यात स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणणार्‍यांनी निव्वळ ढोंगबाजी आणि स्वाध्यायशून्यता आणत जनसामान्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कधी कधी वाटते की स्वातंत्र्योत्तर नेहरूंनंतर जर शास्त्री अधिक काळासाठी पंतप्रधान म्हणून राहून देशास नेतृत्व देऊ शकले असते तर कदाचीत गांधीजींची इतकी टवाळी झाली नसती....अर्थात तीच अवस्था हिंदूत्ववाद्यांची आणि तशाच इतर चांगल्या विचारधारांची आहे. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. या बाबतीतपण माझे त्याच पद्धतीत म्हणणे मात्र उलट स्वरूपातही आहे. म्हणजे, गांधीवादाला उदात्त करण्यासाठी सावरकर आणि हिंदूत्ववादास झोडपले जाते. बरं गांधीवादाचा वापर तरी समाज घडवायला झाला आहे का? तर तसेही दिसत नाही तो निव्वळ त्याची समाजमनासाठी अफूची गोळी करून स्वतःच्या स्वार्थाचे घोडे पुढे दामटवायला झाला आहे. आपल्या वरील लेखात देखील (आपण, अथवा अंबरीश मिश्रांनी) जरी नेताजी, सावरकर, भगतसिंग आदींना नावे ठेवली नसली तरी त्यांचा उल्लेख करत नकळत गांधीजींची थोरवी वाढवायचा प्रयत्न झाला आहे आणि लगेच शेवट येतो की, "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता. मला खात्री आहे की आपण हे मुद्दामून केले नाहीत, पण ती आपल्याला (म्हणजे तुम्हा-आम्हाला-समाजाला) सवयच लागलेली आहे. इथे सर्व खटकते आणि म्हणूनच पुढचे उत्तर हे गांधेतर नेत्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी नाही तर मूळ लेखातील खटकलेली बाब आणि त्यातील अर्धाच दिसणारा इतिहास पूर्ण दाखवण्यासाठी देणे भाग पडते. जर लेखात गांधीजीच असते तर माझ्या उत्तरातही केवळ गांधीजीच दिसले असते. कृपया यातील काही व्यक्तिगत नाही अथवा मूळ लेखावर वरचा मुद्दा सोडल्यास टिका अथवा आक्षेपही नाही ह्याची खात्री असावी. धन्यवाद

In reply to by विकास

भोचक 14/11/2009 - 11:43
"उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता.
विकासजी, मुळ अंबरिश्र मिश्र यांच्या लेखातही या ओळी नाहीत. त्या लेखाविषयी लिहावे असे वाटत असताना अचानक त्या आठवल्या नि लिहिल्या गेल्या. हे लिहिण्यातून स्वातंत्र्य मिळविण्याचे पूर्ण श्रेय गांधींच्या पदरी जाईल, असे वाटलेही नव्हते. (सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे याच ओळीतल्या उत्तरार्थाची खिल्ली मी स्वतःच पूर्वी उडवत होतोच.) पण दुर्देवाने त्या ओळीतून नको तोच संदेश गेला. मला गांधींशी असलेले मतभेद राखून त्यांचे व्यापकत्व मांडायचे होते. गांधींवर टीका करणारी कडवी मंडळी असतानाही आणि त्यांच्या टीकेतही नक्कीच काही तथ्य असतानाही, (त्यांचे आकर्षण वाटण्याची तीव्र शक्यता असतानाही) गांधींचा जनमानसावर इतका प्रभाव का आणि कसा 'होता', याविषयी मला पडलेले कुतूहल आहे. केवळ कॉंग्रेसचे प्रमुख नेते असे गांधींचे स्थान कधीच नव्हते. (ते स्वतःही कॉंग्रेसचे एका आण्याचेही सदस्य नव्हते.) मग एका भल्या मोठ्या समाजाला गांधी इतके स्वीकारावे का वाटले असतील हे समजत नाही. तेच शोधून काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. बाकी तुमचा असाच अभ्यासपूर्ण प्रतिसाद अपेक्षित होता हे सांगणे न लगे. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

फारएन्ड 13/11/2009 - 06:06
चांगला लेख आहे. आवडला. त्या 'उचललेस तू..' या ओळी कोठेतरी वाचल्यासारख्या वाटतात. कदाचित शाळेच्या पुस्तकात. त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे?

In reply to by फारएन्ड

विकास 13/11/2009 - 08:51
त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे? मला वाटते ती कविता वगैरे नाही आहे, केवळ त्या एका घटनेवरून सुचलेल्या त्या ओळी आहेत. त्या पाठ्यपुस्तकात आपल्याला होत्या.

सुनील 13/11/2009 - 10:22
ह्या ऐतिहासिक घटनेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा उत्तम लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हर्षद आनंदी 13/11/2009 - 12:33
ही राष्ट्रभक्ती अफ्रीकेत बॅरीस्टर म्हणुन जगताना कुठे गेली होती? देवभोळ्या, सहिष्णु भारतीयाला अहिंसेचे नपुंसक धडे देऊन नेभळट बनविल्याबद्दल महात्म्याचे आभार!! अहिंसा बलवानाला शोभते, मात्र महात्म्याला अहिंसा कळली होती का, हाच प्रश्न उपस्थित होतो जेव्हा जालियनवाला बागेतील अत्याचाराचा बदला घेतल्यावर महात्मा निषेध करतो किंवा सैनिकीबळावर भारतीयांना प्रबल बनवुन देश जिंकुन घेण्याचा प्रयत्न करणार्‍या बोस, सावरकरांना पध्दतशीरपणे राजकारण करुन वाळीत टाकले जाते तेव्हा!!! जेव्हा ईंग्रजांचे कंबरडे हिटलरने मोडले, तेव्हा भीक घातल्यासारखे देशाचे २ तुकडे करुन स्वातंत्र्य पदरात पाडुन घेणार्‍या, त्या स्वातंत्र्यापोटी इंग्रजांनी रुजविलेल्या धार्मिक द्वेषाच्या झाडाला खतपाणी घालुन असंख्य भारतीयांच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या महात्म्यास कोटी कोटी प्रणाम! कदाचित हिटलर नसता तर महात्मा कधीच महात्मा बनु शकला नसता, दाचित हा लेखनप्रपंच ही नसता.. कदाचित... कदाचित कदाचित... रक्ताची किंमत मोजुन मिळालेले स्वातंत्र्य आज एवढे भ्रष्ट झाले नसते. गांधीवधानंतर एक थोर समाजसुधारक, राजकारणी म्हणाला होता "it is best news ever I heard" असे त्यांच्या पी.ए. ने लिहुन ठेवले आहे. वा काय महात्मा आहे?

हर्शल यान्च्याशी सहमत्....कदाचित दुसर्‍या महायुधात एन्ग्रजान्चे कम्बरडे मोडले नसते तर त्यनि अपल्याला एवढे सहजासहजि स्वन्त्रत्र केले नसते....फक्त गन्धिन्मुळे मि़ळाले हे खरच पट्त नाहि...

ऋषिकेश 13/11/2009 - 13:46
लेख उत्तम आहे.. खूप आवडला काहि प्रतिसादांमधे अपेक्षेप्रमाणे (प्रथेप्रमाणे) काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटली :) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

In reply to by ऋषिकेश

काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटल>>> गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ. कारण गांधीजींना त्यांच्या चुका उघडपणे दाखवुन देणारे आणि गांधीजींमुळेच भारतीय राजकारणातुन वाळीत टाकले गेलेले असे हे महापुरुष आहेत सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

ऋषिकेश 13/11/2009 - 18:19
गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ.
हे माझ्यासाठी नवीन आहे. असो. माझ्या मते इतर महापुरूषांचे कर्तृत्त्व इतके मोठे आहे की त्याला सिद्ध करायला गांधीद्वेषाच्या कुबड्यांची गरज नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

भोचकभाऊ, लेख आणि प्रतिसाद तुमच्या किर्तीला जागणारे, माहीतीपूर्ण आणि अभ्यासू! मी गांधींचं, त्यांच्याबद्दल साहित्य वाचलं तर त्याचा दोष तुम्हालाही! :-) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भोचक 13/11/2009 - 15:47
अदिती , या दोषाचा धनी व्हायला नक्की आवडेल. समंजसरावांचा प्रतिसादही त्यांच्या नावाला साजेसा. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

समंजस 13/11/2009 - 15:17
गांधींजींना आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या मागे जाउन, मिठ सत्याग्रह यशस्वी केल्या बद्दल गांधींजी आणि त्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. ती एक मोठी आणि फार महत्त्वाची घटना होती. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात करोडो लोकांचा सहभाग होता. जेव्हढ्यांनी नेत्रुत्व केले, ते सर्वच महान होते. त्या सर्वच लोकांनी आपले वैयक्तीक आयुष्य ह्या कार्यात घालवलं (आजचे करोडपती नेते सत्ते करता भांडताना बघून वाटतं की बरं झालं, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांना भविष्य माहित नव्हतं) सर्वांचा मार्ग एकच नव्हता, मात्र उद्देश एकच होता, स्वातंत्र्य मिळवीणे. आणि तेच जास्त महत्वाचे होते. गांधीजींचे सर्वच विचार हे पटो ना पटो, त्यांचे स्वातंत्र्य चळवळतील योगदान महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य चळवळ ही क्रिकेट च्या सामन्या सारखी नव्हती की, त्यात कोणाचे योगदान किती हे मोजता येईल किंवा कोण सामनावीर हे ठरवता येईल तसेच लढाईत कोण मृत्युमुखी पडला, कोण वाचला या वरून, शुरपणा ठरत नसतो तर जिंकलो की हरलो हे महत्त्वाचे (व्यक्तीगत मत) करोडो लोकांना जागे करणे, घराबाहेर काढणे, मागे यायला लावणे, प्रंसगी लाठ्या खायला लावणे(ते सुद्धा भारता सारख्या देशात जिथे कृतीशून्य, संवेदना बोथट झालेल्या, आपला स्वार्थ आधी बघण्यार्‍या लोकांचा भरणा जास्त आहे) त्यांना विश्वास देणे की स्वातंत्र्य हे मिळणारच. ही माझ्या दृष्टीने एक अशक्यप्राय गोष्ट जी गांधीजींनी प्रत्यक्ष केली. त्यांच्या ह्या नेत्रुत्व गुणाला माझा सलाम (ह्याच बाबतीत मनावर प्रभाव टाकणारा दुसरा नेता म्हणजे हिटलर. त्याचे एकूण कार्य मला न पटो, पण त्याच्या ह्या लोकांना प्रभावीत करण्यार्‍या गुणा मुळे तरी मी त्याला सलाम करतो.)

सुवर्णा 13/11/2009 - 16:07
गांधीजीकडे असलेले नेतॄत्वगुण आणि त्यांना मिळालेला भारतीय जनतेचा पाठिंबा हे खरेच कौतुकास्पद आहे, आणि त्यांनी अध्यात्म, भारतीय संस्कॄती-परंपरा वगैरे यांचा केलेला अभ्यास हेसुध्दा.. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरी त्यांना त्यांच्यातल्या षडरिपूंवर त्यांना पूर्णपणे मात नाही करता आली आणि इथेच त्यांच्यातला महात्मा हरला.. असो.. शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं.. सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

In reply to by सुवर्णा

टारझन 13/11/2009 - 16:16
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कसला जबरदस्त विचार आहे !! शिवाजी महाराज हातात एक काठी आणि दोन बायका पुढे :) असं करून औरंग्या समोर उपोषणाला बसलेत .. आणि बाकी मावळेही त्यांच्यामागे भजनं गात बसलेत !! वा वा वा !! औरंग्या आणि मुघल साम्राज्य पळूनच गेलं असतं घाबरून =)) आणि गांधीजींना घोड्यावर पसून तलवार घेऊन "जय भवानी... जय शिवाजी" "हरहर महादेव" च्या घोषणा देताना इमॅजिन केलं .. आणि आपल्या भावना पोचल्या !! (आज हसून हसून विचारवंत होणार कदाचीत)

In reply to by टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आवरा रे ह्याला !! टार्‍या लेका तु आजकाल अनआवरेबल झाला आहेस बघ. तुझा रतिसाद... आपल प्रतिसाद वाचुन गलित गात्र झालो एकदम. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by टारझन

सुवर्णा 13/11/2009 - 16:55
मी तर फक्त तुलना केली होती.. तुमचा प्रतिसाद बघितला.. आता काय बोलनार!! =)) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

टारझन 13/11/2009 - 16:10
भोचक आणि प्रतिसादकर्ते (खासकरून पर्‍या आणि हर्षद) , खुलाश्याबद्दल धन्यवाद !!! -- टोचक

नितीनमहाजन 13/11/2009 - 16:56
ब्रिटिशांच्या जुलुमामुळे व त्रासामुळे सर्वच भारतीय जनता त्रासलेली होती. सामान्य जनता मनातून याचा विरोध कसा करावा याचा विचार करीत होती. सामान्य माणसाला सशत्र क्रांतीचा पर्याय नक्कीच आकर्षक वाटत होता कारण त्यातून ब्रिटिश सत्तेविरुध्द ताबडतोब व थेट हल्ला करता येतो हे दिसत होते. पण त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता, धैर्य व शारिरीक तयारी सर्वांजवळ नव्हती. मला काहिही करून या जुलुमाचा विरोध करायचा आहे, पण तो कसा करायचा हे समजत नाही अशा द्विधा मनस्थितीत ही पारतंत्र्यातील जनता वावरत होती. या सर्वांना गांधीजींनी योग्य मार्ग दाखविला तो म्हणजे अहिंसेने व सविनय कायदेभंग. सामान्य माणसाच्या हातात फक्त त्याचा देह आणी त्याचे मन असले तरी तो या अहिंसात्मक प्रतिकाराद्वारे आपला विरोध दाखवू शकतो हे गांधीजींनी जाणले. या अतीशय परिणामकारक अशा शस्त्राने सारा भारत देश नक्की पेटून उठेल याची त्यांना खात्री होती. जेव्हा सामान्य माणसाचा सहभाग एखाद्या चळवळीत होतो तेव्हा ती फोफावायला वेळ लागत नाही. प्रत्येक सामान्य माणूस विचार करायला लागतो की अरे माझ्या शेजार्‍याला जर हे जमते जर मला का नाही जमणार? मग प्रत्यक्ष सहभागानंतर तो सामान्य माणूसही अभिमानाने म्हणू शकला की मी ब्रिटिश सत्तेला विरोध केला, माझाही या स्वातंत्रलढ्यात खारीचा का होईना पण वाटा आहे. आणि येथेच गांधीजी व सशस्त्र क्रांतीकारक यांच्यात फरक होतो. सशस्त्र क्रांतीकारकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सामान्य माणसामध्ये स्फुल्लिंग जागवण्याचे काम करणे फार अवघड होते. मला येथे गांधीजी, सावरकर व सुभाषचंद्र बोस यांची तुलना करायची नाही पण स्वातंत्रलढ्यामध्ये सामान्य जनतेला सहभागी करुन घेण्यामध्ये गांधीजी यशस्वी झाले हे मात्र नक्की. मला स्वतःला सावरकर व सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान याला जगात तोड नाही. सावरकरांची बोटीतील उडी, अंदमानमधील काळेपाणी यासारखे दुसरे उदाहरण जगात नाही. तसेच सुभाषचंद्र बोस यांनी प्रत्य्क्ष ब्रिटिश सेनेलाच आपल्याबाजूला वळवले हेही उदाहरण जगात एकमेवाद्वितीयच. पण एक सामान्य माणूस यापैकी काय करू शकतो. तुम्ही स्वतःला विचारून पहा की यापैकी आपण कशात सामिल झालो असतो. ज्याप्रमाणे आपल्या संतांनी संसारात राहून देवभक्ती करायला शिकवले ससेच गांधीजींनी पारतंत्र्यातील गांजलेल्या सामान्य माणसाला देशभक्ती करायला शिकवली असे मी म्हणतो. मिठाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांवर बोट ठेवले व दाखवून दिले की पहा हे ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या जमिनीवर तयार केलेले मीठ आपल्यालाच अधिक रक्क्म देऊन खरेदी करायला लावत आहेत. तुम्हीच विचार करा हे योग्य आहे का? जर अयोग्य वाटत असेल तर चला माझ्याबरोबर विरोध करायला. का नाही सामान्य माणूस पेटून उठणार सांगा? बाकी चर्चा उत्तम चालली आहे. नितीन

मनीषा 15/11/2009 - 11:05
गांधीजी .. म्हणलं की मला पु.लं च्या अंतु बर्व्याचे तत्वज्ञान आठवते ... " --- माणूस असेल मोठा , पण आम्ही त्यांचा मोठेपणा कुठ्ल्या खाती नोंदवावा ? ---- रोज तुपाशी खाणर्‍या उपाशी माणसाचे कौतुक .. इथे निम्मे कोकण उपाशी " आणि " ---इंग्रज गेला तो कंटाळून , लुटण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही म्हणुन फुंकले दिवाळे " गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली . तोपर्यंत मुठभर विचारवंतच फक्त ब्रिटीश सत्तेशी झगडत होते . पण 'गांधींजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले-----' हे विधान अतिशय विपरर्यस्त आहे .

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 11:20
गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली
अच्छा , म्हणजे गांधीजींनी आंदोलन करण्याआगोदर "तळागाळातली लोकांना" अगदी स्वातंत्र्य असल्याची अनुभुती मिळत होती काय?

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 12:30
अनुभूती कसली? त्यांना स्वतंत्र्य म्हणजे काय हेच माहित नव्हते ... भारतातील ६०% ते ७०% जनता शेती आणि शेती संबधीत व्यवसाय करणारी ... ब्रिटीशांच्या आधी जमिनदार , वतनदार त्यांना लुटत होते. आपले हक्क काय आहेत, आपल्यावर अन्याय होतो आहे त्याचा प्रतिकार करायला हवा आणि तो आपण करु शकतो ह्याची जाणिव नक्कीच गांधीजींच्या आंदोलनामुळे झाली

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 12:47
इंग्रजांनी एवढं गुपचूप राज्य केलं आपल्यावर ? तरीच ते एवढे दिवस राज्य करू शकले.. थँक्स टू गांधी !! ते नसते तर आजही आपल्याला कळले नसते की आपल्यावर नक्की कोण राज्य करतोय ते !! मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता ..

In reply to by टारझन

श्री. टारझन, सुधा मूर्ती यांनी 'वाईज अँड अदरवाईज'मधे लिहिलं आहे की उदीशा*च्या जंगलांमधे त्यांना असेही म्हातारे भेटले होते ज्यांना राणीचंच राज्य सुरू आहे असं वाटत होतं. अदिती *उदीशा किंवा उडीसा किंवा ओरिसा, माझा प्रचंड गोंधळ झाला आहे या नावाबद्दल!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 15/11/2009 - 13:43
श्रीमती अदिती, श्री टारझन, हे कुमार टारझन आहेत. त्यामुळे त्यांना सदर संदर्भ देऊन उगाच त्यांच्या डोक्यात कीडे करण्यापेक्षा, आपले संदर्भासहित स्पष्टिकरण एक वेगळा लेख म्हणून प्रकाशित करावे ही विनंती. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते नाव आहे, ओडिशा. (ओड्र विशय - ओडिविशा - ओडिशा). ओडिया लोकांना`श' नीट म्हणता येत नाही. ते "स'" म्हणतात. आणि इथे ड ला र करतात. म्हणून ओरिसा. सुधा मूर्तींचा अनुभव खराच. मला २००९ मध्ये असे तरूण लोक (म्हातारे सोडा) ओरिसामध्ये भेटले आहेत ज्यांना खरंच माहीत नाही राज्य कोण करतं. असो. विषयांतर नको. पण कमालीचे दारिद्र्य आणि घोर अज्ञान जो कुणी जवळून पाहील त्याला गांधीजी आपोआप नीट समजतील. कसलेही वाद घालण्याची त्याची इच्छा होणार नाही. आळश्यांचा राजा

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 13:32
समजुतीचा घोटाळा दिसतो आहे ... ब्रिटीशांनी गुपचुप राज्य केलं नाही तर त्यांनी केलेल्या अन्यायाचा जनतेने प्रतिकार केला नाही असं मला म्हणायचं होतं . (तुम्ही नीळ आणि कापूस शेती करणार्‍यांवर ब्रिटीशांनी लादलेले नियम आणि कायदे इ. बद्दल वाचले असेल. ) मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता .. आपल्याला जे वाटतं ते नेहमी बरोबरच असतं असं नाही ..

विसोबा खेचर 15/11/2009 - 11:59
मोहनदास गांधींची नसती कवतिकं चालू द्या भोचकराव!
ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ??
सह्ही बोल्लात पराशेठ! मिपावर गांधींवर कवतिकपर लेख येतात हे मिपाचं नसलं तरी मालक म्हणून माझं वैयक्तिक दुर्दैव! चालू द्या...! सुवर्णातै,
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
आपण काय बोलतो आहोत, काय लिहितो आहोत याचं कृपया भान ठेवा. ज्या वाक्यात सशस्त्र क्रांन्तीच्या उग्र दैवताचं -शिवछत्रपतींचं नांव आहे त्या वाक्यात कुणाही सोम्यागोम्याचं नाव नका घेऊ हो प्लीज! असो.. आता माझी दोन आयटम बायकांच्या खांद्यावर हात टाकून शेळीला दूध पाजायला जायची वेळ झाली आहे! :) धन्यवाद.. तात्या.

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?
अगदी अगदी ! ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !! ©º°¨¨°º© दुरात्मा परादास गांधी ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by विनायक प्रभू

भोचक 13/11/2009 - 18:48
खलिल जिब्रानविषयी वाचत होतो नि त्याचे एक वचन सापडले. निश्चितपणे मिठात एक पावित्र्य आहे, कारण त्याचे अस्तित्व अश्रूतही आहे नि समुद्रातही ! -खलिल जिब्रान (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

एकलव्य 12/11/2009 - 22:30
साधारण ३महिन्यांपूर्वी मी दांडीयात्रेच्या दरम्यान त्याकाळी विविध पत्रकारांनी केलेले लिखाण वाचले आणि एका केवढ्या मोठ्या रोमांचकारी (आणि शिकविणार्‍याही) इतिहासाकडे वरवर पाहिले होते याची जाणीव झाली. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही? नक्कीच! एकलव्य

In reply to by प्रशान्त पुरकर

घाबरू नका. माझा हृदय परीवर्तनावर पूर्ण विश्वास आहे. उदाहरणार्थः ते कलंत्रीकाका बघा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

श्री भोचक, एका चांगल्या लेखाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. देशाला स्वातंत्र्य कशामुळे मिळाले यावर विचार होत राहतील पण गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा मार्ग त्यानंतर मार्टीन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनीही यशस्वीपणे अवलंबिला यावरून या आंदोलनाची परिणामकारकता लक्षात यावी.

कलंत्री 12/11/2009 - 21:22
या सत्यग्रहाचे वेगळेच असे अंग आहे. गांधींनी महिलाना स्वातंत्र्य लढयात भाग घ्यायला नेहमीच उद्यूक्त केले, पण या आंदोलनासाठी त्यांनी मात्र स्त्रींयाना दुरच ठेवले. तेंव्हा सरोजिनी नायडूंनी असा पवित्रा घेतला की तुम्ही यात भाग घेण्यासाठी जर आम्हाला परवानंगी दिली नाही तर प्रथम तुमच्याविरुद्ध आमचा सत्याग्रह सुरु होईल आणि शेवटी त्यांना परवानंगी मिळाली.

jaypal 12/11/2009 - 21:36
प.रा. जी "कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !!" ज्ञानदेवा रचीला पाया तुका झालासी कळस. (म्हणुन केवळ तुका स्रेष्ठ ठरत नाही की निव्वळ ज्ञानदेव) सर्वच महान होते. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विकास 12/11/2009 - 22:52
अंबरीश मिश्रांचे "गंगेमधे गगन निवळले" अशा काहीशा नावाचे एक गांधीजींवर चांगले पुस्तक आहे, त्यात हे सर्व तसेच एकंदरीतच गांधीजींचे भारतातील राजकीय जीवन हे "श्रद्धावंता"च्या नजरेतून उर्धृत केलेले आहे. त्यातील एकंदरीत सूर (अथवा पुस्तकाचे/लेखकाचे अनुमान) असे आहे की गांधीजींनी काँग्रेसला आवडो - नआवडो स्वतःच्या विचारांतून चळवळ चालू केली. त्याला येणारी समाजमान्यता लक्षात घेता काँग्रेसला त्यांचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. बाकी वर पराने म्हणल्याशी काही अंशी सहमत. तरी देखील "दे दी हमे आझादी बीना..." पेक्षा गदीमांचे "उचलीलेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" थोडे अतिशयोक्तीपर असले तरी मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही. ------------------------------------------- बाकी टिळकांच्या दिशेने चालू झालेली स्वदेशी जीचा वापर सावरकरांनी विद्यार्थी दशेत केला ज्याचा परीणाम पण विसरता कामा नये. टिळक पर्भृतींनी चालू केलेल्या फर्ग्यूसन मधून त्यामुळे सावरकरांना निलंबीत व्हावे लागले, ते केले कोणी तर रँग्लर परांजप्यांनी! असो. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की त्यातूनच पुढे गांधीजींच्या खादीस स्वदेशी म्हणून मान्यता मिळवणे सोपे झाले. स्वदेशीच्या माध्यमातून टिळकांनी चालू केलेली चळवळ हे केवळ ज्यांना जमू शकेल अशांच्याच हातातील स्वातंत्र्ययुद्ध म्हणूनही राहीले नाही आणि त्यात असलेली गर्भित/प्रकट आर्थिक नाकेबंदी हा ब्रिटीशांच्या धंदेवाईक वृत्तीस आणि पर्यायाने साम्राज्यास दिलेले पहीले उत्तर होते. टिळकांना यामुळे स्वातंत्र्य तात्काळ मिळेल असे वाटले नव्हते, किंबहूना स्वतःच्या जिवंतपणी स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना कधीच वाटत नव्हते. ते फक्त स्वातंत्र्यचळवळीसाठी पुढील सर्व सामाजीक पिढीस तयार करायचा त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत होते. (त्यांच्या भाषेत ते फक्त चळवळीचा श्रीगणेशा करत होते). या स्वदेशीचाच पुढचा भाग, मीठ सत्याग्रह होता. पैशावरून पुन्हा एकदा नाकेबंदी करून, गांधीजींनी योग्य अशीच आर्थिक कारणावरून दांडी यात्रेत नाकेबंदी घडवून आणली...१९२० सालला म्हणूनच टिळकयुगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरवात असे म्हणले जाते. आर्थिक कारणांप्रमाणेच, १९४६ साली प्रत्यक्षात झालेले नावीक दलाचे बंड जे आता कधीपण होऊ शकेल अशी भिती ब्रिटीशांमधे उत्पन्न झाली ते म्हणजे मुख्य सावरकर आणि तसेच त्या विचारांच्या इतर नेतृत्वाचा असलेला सैनिकीकरणास पाठींबा हे पण कारण होते. असे सर्व म्हणण्यात गांधीजींचे महत्व आणि नेतॄत्व गूण कमी होत नाहीत पण त्यावर दाखवली जाणारी एकांगी श्रद्धामात्र रहात नाही आणि योग्य त्या ठिकाणी आदर आणि "क्रेडीट" पण दाखवले जाते.

In reply to by विकास

मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही.
असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.>>> प्रत्येक गोष्टीतुन स्वतःला सोयिस्कर तो अर्थ काढणे कुणी तुमच्याकडुन शिकावे. असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. >>> बापुंचे ठिक आहे, पण मग "दे दी हमे आझादी....." सारखी गाणी काय दर्शवतात? गांधीजींना कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. त्यांचं महत्व शिरसावंद्यच आहे, पण गांधीजींचा महिमा गाताना इतरांच्या देशभक्तीकडे, त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष होवू नये एवढीच अपेक्षा. भगतसिंग प्रभुतींचे प्राणार्पण, सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या हाल अपेष्टा, सुभाषबाबूंनी केलेले महत्प्रयास, टिळक, चाफेकरादी देशभक्तांचे कार्य, बंगालमधील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी अर्पण केलेले प्राण हे सगळे व्यर्थ आहे का? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

बाकी गांधीजींचे नाव ऐकताच त्यांना झोंबलेल्या मिरच्या पाहून तुम्हाला मीरच्या झोंबल्या हे पाहून मौज वाटली. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by विकास

भोचक 13/11/2009 - 11:29
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विकासजी, अंबरिश मिश्र यांचे जे पुस्तक आहे, ते 'गंगेत गगन वितळले' या नावाचे आहे. त्यात गांधीजींनी भारतात जे काही कार्य केले, त्याचा पाय दक्षिण आफ्रिकेत कसा रचला गेला. त्यांनी काय काय 'प्रयोग' केले ते त्यात दिले आहेत. गांधीजींची जडणघडण त्यातून कळते. अर्थात, हे लिहिताना गांधींकडे फार खालून पाहिल्याने ते उंच दिसतात, यात काही वाद नाही. पण गांधींची ही जडणघडणही सोपी नाही. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी त्यांनी इतरांनाही भरडले आहे, स्वतःला तर आहेच आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा फार अभ्यास त्यांनी केल्याचेही लक्षात येते. बाकी. गांधींच्या या एका सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणण्याचे धाडस मी तरी कधीच करणार नाही. कारण बाकीच्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही मला तितकीच आस्था आहे. थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, चौरीचौराच्या आंदोलनानंतर आंदोलकांचा हिरमोड करणारे, चले जावमधील हिंसेबद्दल काही न बोलणारे, फाळणीच्या योजनेला मान्यता देणारे, प्रसंगी जिनांकडे या देशाची धुरा द्या, पण फाळणी होऊ देऊ नका असे म्हणणारे, पाकिस्तानी टोळीवाल्यानी घुसखोरी केल्यानंतरही पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे ५५ कोटी द्या असा आग्रह धरणारे असेच गांधी होती. गांधींविषयी नकारात्मक मते बनविण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी होती. यालाच मग नेहरूंना पुढे आणणे, पटेलांना मागे सारणे, सुभाषबाबूंना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू न देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे, भगतसिंगांच्या फाशीविषयी स्वतःचा शब्द खर्ची न पाडणारे इत्यादी उपप्रकरणेही गांधींची 'खलनायक' म्हणून प्रतिमा करायला पुरेशी होती. ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. त्यात एका मोठ्या माणसांविषयी त्याच्या चुका दर्शविणारी पुस्तके बरीच असल्याने आणि चर्चा त्याचीच होत असल्याने ही मतेही ठाम बनली होती. पण पुढे गांधी वाचायला सुरवात केली आणि काही धुके निवळले. त्यांचे इतरही गुण पैलू दिसून आले. याचा अर्थ गांधी पूर्णांशाने चांगले होते असे नाही, पण त्या कालखंडावर अफाट असा प्रभाव त्यांनी कसा निर्माण केला याविषयी काही हाती लागले. मुळात गांधी अखिल भारताला व्यापून कसे उरले होते, याचे आश्चर्य वाटायचे. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता का होती? ब्रिटिशांनाही भारताविषयी बोलण्यांसाठी हा नंगा फकिरच का सापडायचा? आणि परदेशातही त्यांनी अनेकांना प्रेरणा कशी दिली असावी? असे अनेक प्रश्न पडायचे. माझ्या पणजे सासूबाईंनी एकदा सांगितले, की त्या बंगालमध्ये असताना गांधीजी त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडलो, त्यासाठी कशी झटापट चालली होती याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक स्त्रियांना त्यावेळी त्यांच्यासमोर आंदोलनासाठी स्वतःचे दागिने काढून दिल्याचे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर तर अजूनच आश्चर्य वाटले. असे किस्से पुस्तकातून वाचणे वेगळे नि प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार असलेल्या व्यक्तीकडून ऐकणे वेगळे. त्यांच्या या किश्श्यामुळे थरारून जाऊन मी गांधी वाचायला सुरवात केली. त्यात काही चांगल्या गोष्टी सापडत गेल्या. त्यांची जडणघडण कळली. स्वतःवर केलेले प्रयोगही समजले. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती याचा अभ्यास त्यांच्याइतका दुसर्‍या कोणत्याही भारतीय नेत्याने क्वचित केला असावा असे वाटले. भारतीय मानसिकताही त्यांनी बरोबर ओळखली म्हणूनच त्यांना झेपेल, पचेल रूचेल असेच आंदोलन त्यांनी चालवले. पण त्याचवेळी त्यांचे इतरही 'गुण' जाणवले. संयमनाचा अतिरेक. नैतिक मुल्यांमध्ये त्यांच्या मुलांची झालेली फरफट. खादीचा अट्टाहास. वगैरे वगैरे. दुसर्‍यांना स्वतःच्या नियमांमध्ये बसविण्याचा अट्टाहास करणारा हटवादी 'महात्मा'ही यातूनच कळला. (प्रभा नारायण आणि जयप्रकाश नारायण यांना म्हणे त्यांनी 'आत्मसंयमन' पाळायला सांगितले होते! ) या देशाला फक्त गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांचे योगदान मोठे होते, हेही टाळून चालणार नाही. त्याचवेळी गांधींचा कॉंग्रेसमध्ये झालेला उदय तोपर्यंत कॉंग्रेसमध्येच सक्रिय असलेल्या जिनांना वळचणीला टाकणारा ठरला आणि त्यातच फुटीरतेची बिजे पेरली गेली हेही तितकेच सत्य आहे. कॉंग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून गांधींनी एस्टाब्लिश होताना जिनांना अलगद दूर सारले नि कॉंग्रेसवर वर्चस्व मिळवले हे सत्य आहे. पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले (जिना वगळता) हेही लक्षात घेण्यासारखे आहे. जिना आणि गांधी यांच्यातील 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिपही पहाण्यासारखी आहे. गांधीजींच्या हत्येनंतर जिनांनी पाकिस्तानातील शोकसभेत त्यांचा उल्लेख म्हणे 'मि. गांधी' असाच केला होता. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

चिरोटा 13/11/2009 - 12:18
आईनस्टाईनने एका पत्रात म्हंटले आहे- Mahatma Gandhi's life achievement stands unique in political history. He has invented a completely new and humane means for the liberation war of an oppressed country, and practised it with greatest energy and devotion.We may all be happy and grateful that destiny gifted us with such an enlightened contemporary, a role model for the generations to come. गांधी हत्येनंतर आईन्स्टाईन यानी म्हंटले होते- Generations to come, it may be, will scarce believe that such a one as this, ever in flesh and blood walked upon this earth. भेंडी P = NP

In reply to by गणपा

प्रतिसाद भयंकर आवडला... माझ्याच मनातलं बोललात.... त्यांच्या सर्व चुकाबिका आणि राजकारण मान्य करूनही प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतुहल वाटतेच...

In reply to by भोचक

यशोधरा 13/11/2009 - 13:24
भोचक, आपला लेख उत्तम आहे, तसाच, तुम्ही लिहिलेला प्रतिसादही. फक्त, "पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले.. " ह्या ऐवजी, ज्यांनी गांधींची तत्वे मान्य केली, त्यांना बरोबर घेतले, असे वाटते. नाहीतर सुभाषबाबू, स्वा. सावरकर यासारख्या व्यक्तींना जर का आपल्या लोकप्रियतेचा फायदा जर त्यांनी करुन दिला असता, तर कदाचित आज भारताचे चित्र वेगळे असू शकले असते...

In reply to by भोचक

विकास 13/11/2009 - 20:41
भोचकराव, पुस्तकाचे नाव दुरूस्ती केल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम कुठल्याही ऐतिहासीक नेतृत्वाबद्दल मला आदरच आहे, त्याचे विचार पटोत अथवा न पटोत. विचार करा नुसत्या एका संकेतस्थळावर स्वतःचे विचार इतरांपर्यंत पोचवायला अवघड जाते, पटवणे तर फारच लांब! तिथे स्वतःच्या बाजूने लोकांना वळवून समाजमन बदलण्याची ताकद असते आणि ती देखील स्वतःच्यापश्चात टिकते तिथे तुम्ही-आम्ही कोण! :) थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, ...ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली. प्रामाणिकपणे, माझ्या नजरेतील, वरील सर्व मान्य असूनही यातील कुठल्याही गोष्टींमुळे गांधीजींबद्दलचा आदर कमी होत नाही फक्त तो डोळस राहतो. केवळ निष्क्रीय माणूसच बिनचूक असू शकतो असे वाटते... वास्तवीक पहाता हे माझेच नाही तर इतर अनेकांचे, जे स्वतःला गांधी-विरोधक समजतात, त्यांचे त्यांच्या नकळत असेच म्हणणे असू शकते असे वाटते. थोडक्यात गांधीजींना होणारा विरोध हा त्या व्यक्तीपेक्षा गांधीवादाला आहे, ज्यात स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणणार्‍यांनी निव्वळ ढोंगबाजी आणि स्वाध्यायशून्यता आणत जनसामान्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कधी कधी वाटते की स्वातंत्र्योत्तर नेहरूंनंतर जर शास्त्री अधिक काळासाठी पंतप्रधान म्हणून राहून देशास नेतृत्व देऊ शकले असते तर कदाचीत गांधीजींची इतकी टवाळी झाली नसती....अर्थात तीच अवस्था हिंदूत्ववाद्यांची आणि तशाच इतर चांगल्या विचारधारांची आहे. सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. या बाबतीतपण माझे त्याच पद्धतीत म्हणणे मात्र उलट स्वरूपातही आहे. म्हणजे, गांधीवादाला उदात्त करण्यासाठी सावरकर आणि हिंदूत्ववादास झोडपले जाते. बरं गांधीवादाचा वापर तरी समाज घडवायला झाला आहे का? तर तसेही दिसत नाही तो निव्वळ त्याची समाजमनासाठी अफूची गोळी करून स्वतःच्या स्वार्थाचे घोडे पुढे दामटवायला झाला आहे. आपल्या वरील लेखात देखील (आपण, अथवा अंबरीश मिश्रांनी) जरी नेताजी, सावरकर, भगतसिंग आदींना नावे ठेवली नसली तरी त्यांचा उल्लेख करत नकळत गांधीजींची थोरवी वाढवायचा प्रयत्न झाला आहे आणि लगेच शेवट येतो की, "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता. मला खात्री आहे की आपण हे मुद्दामून केले नाहीत, पण ती आपल्याला (म्हणजे तुम्हा-आम्हाला-समाजाला) सवयच लागलेली आहे. इथे सर्व खटकते आणि म्हणूनच पुढचे उत्तर हे गांधेतर नेत्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी नाही तर मूळ लेखातील खटकलेली बाब आणि त्यातील अर्धाच दिसणारा इतिहास पूर्ण दाखवण्यासाठी देणे भाग पडते. जर लेखात गांधीजीच असते तर माझ्या उत्तरातही केवळ गांधीजीच दिसले असते. कृपया यातील काही व्यक्तिगत नाही अथवा मूळ लेखावर वरचा मुद्दा सोडल्यास टिका अथवा आक्षेपही नाही ह्याची खात्री असावी. धन्यवाद

In reply to by विकास

भोचक 14/11/2009 - 11:43
"उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता.
विकासजी, मुळ अंबरिश्र मिश्र यांच्या लेखातही या ओळी नाहीत. त्या लेखाविषयी लिहावे असे वाटत असताना अचानक त्या आठवल्या नि लिहिल्या गेल्या. हे लिहिण्यातून स्वातंत्र्य मिळविण्याचे पूर्ण श्रेय गांधींच्या पदरी जाईल, असे वाटलेही नव्हते. (सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे याच ओळीतल्या उत्तरार्थाची खिल्ली मी स्वतःच पूर्वी उडवत होतोच.) पण दुर्देवाने त्या ओळीतून नको तोच संदेश गेला. मला गांधींशी असलेले मतभेद राखून त्यांचे व्यापकत्व मांडायचे होते. गांधींवर टीका करणारी कडवी मंडळी असतानाही आणि त्यांच्या टीकेतही नक्कीच काही तथ्य असतानाही, (त्यांचे आकर्षण वाटण्याची तीव्र शक्यता असतानाही) गांधींचा जनमानसावर इतका प्रभाव का आणि कसा 'होता', याविषयी मला पडलेले कुतूहल आहे. केवळ कॉंग्रेसचे प्रमुख नेते असे गांधींचे स्थान कधीच नव्हते. (ते स्वतःही कॉंग्रेसचे एका आण्याचेही सदस्य नव्हते.) मग एका भल्या मोठ्या समाजाला गांधी इतके स्वीकारावे का वाटले असतील हे समजत नाही. तेच शोधून काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. बाकी तुमचा असाच अभ्यासपूर्ण प्रतिसाद अपेक्षित होता हे सांगणे न लगे. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

फारएन्ड 13/11/2009 - 06:06
चांगला लेख आहे. आवडला. त्या 'उचललेस तू..' या ओळी कोठेतरी वाचल्यासारख्या वाटतात. कदाचित शाळेच्या पुस्तकात. त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे?

In reply to by फारएन्ड

विकास 13/11/2009 - 08:51
त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे? मला वाटते ती कविता वगैरे नाही आहे, केवळ त्या एका घटनेवरून सुचलेल्या त्या ओळी आहेत. त्या पाठ्यपुस्तकात आपल्याला होत्या.

सुनील 13/11/2009 - 10:22
ह्या ऐतिहासिक घटनेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा उत्तम लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हर्षद आनंदी 13/11/2009 - 12:33
ही राष्ट्रभक्ती अफ्रीकेत बॅरीस्टर म्हणुन जगताना कुठे गेली होती? देवभोळ्या, सहिष्णु भारतीयाला अहिंसेचे नपुंसक धडे देऊन नेभळट बनविल्याबद्दल महात्म्याचे आभार!! अहिंसा बलवानाला शोभते, मात्र महात्म्याला अहिंसा कळली होती का, हाच प्रश्न उपस्थित होतो जेव्हा जालियनवाला बागेतील अत्याचाराचा बदला घेतल्यावर महात्मा निषेध करतो किंवा सैनिकीबळावर भारतीयांना प्रबल बनवुन देश जिंकुन घेण्याचा प्रयत्न करणार्‍या बोस, सावरकरांना पध्दतशीरपणे राजकारण करुन वाळीत टाकले जाते तेव्हा!!! जेव्हा ईंग्रजांचे कंबरडे हिटलरने मोडले, तेव्हा भीक घातल्यासारखे देशाचे २ तुकडे करुन स्वातंत्र्य पदरात पाडुन घेणार्‍या, त्या स्वातंत्र्यापोटी इंग्रजांनी रुजविलेल्या धार्मिक द्वेषाच्या झाडाला खतपाणी घालुन असंख्य भारतीयांच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या महात्म्यास कोटी कोटी प्रणाम! कदाचित हिटलर नसता तर महात्मा कधीच महात्मा बनु शकला नसता, दाचित हा लेखनप्रपंच ही नसता.. कदाचित... कदाचित कदाचित... रक्ताची किंमत मोजुन मिळालेले स्वातंत्र्य आज एवढे भ्रष्ट झाले नसते. गांधीवधानंतर एक थोर समाजसुधारक, राजकारणी म्हणाला होता "it is best news ever I heard" असे त्यांच्या पी.ए. ने लिहुन ठेवले आहे. वा काय महात्मा आहे?

हर्शल यान्च्याशी सहमत्....कदाचित दुसर्‍या महायुधात एन्ग्रजान्चे कम्बरडे मोडले नसते तर त्यनि अपल्याला एवढे सहजासहजि स्वन्त्रत्र केले नसते....फक्त गन्धिन्मुळे मि़ळाले हे खरच पट्त नाहि...

ऋषिकेश 13/11/2009 - 13:46
लेख उत्तम आहे.. खूप आवडला काहि प्रतिसादांमधे अपेक्षेप्रमाणे (प्रथेप्रमाणे) काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटली :) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

In reply to by ऋषिकेश

काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटल>>> गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ. कारण गांधीजींना त्यांच्या चुका उघडपणे दाखवुन देणारे आणि गांधीजींमुळेच भारतीय राजकारणातुन वाळीत टाकले गेलेले असे हे महापुरुष आहेत सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

ऋषिकेश 13/11/2009 - 18:19
गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ.
हे माझ्यासाठी नवीन आहे. असो. माझ्या मते इतर महापुरूषांचे कर्तृत्त्व इतके मोठे आहे की त्याला सिद्ध करायला गांधीद्वेषाच्या कुबड्यांची गरज नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

भोचकभाऊ, लेख आणि प्रतिसाद तुमच्या किर्तीला जागणारे, माहीतीपूर्ण आणि अभ्यासू! मी गांधींचं, त्यांच्याबद्दल साहित्य वाचलं तर त्याचा दोष तुम्हालाही! :-) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भोचक 13/11/2009 - 15:47
अदिती , या दोषाचा धनी व्हायला नक्की आवडेल. समंजसरावांचा प्रतिसादही त्यांच्या नावाला साजेसा. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

समंजस 13/11/2009 - 15:17
गांधींजींना आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या मागे जाउन, मिठ सत्याग्रह यशस्वी केल्या बद्दल गांधींजी आणि त्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. ती एक मोठी आणि फार महत्त्वाची घटना होती. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात करोडो लोकांचा सहभाग होता. जेव्हढ्यांनी नेत्रुत्व केले, ते सर्वच महान होते. त्या सर्वच लोकांनी आपले वैयक्तीक आयुष्य ह्या कार्यात घालवलं (आजचे करोडपती नेते सत्ते करता भांडताना बघून वाटतं की बरं झालं, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांना भविष्य माहित नव्हतं) सर्वांचा मार्ग एकच नव्हता, मात्र उद्देश एकच होता, स्वातंत्र्य मिळवीणे. आणि तेच जास्त महत्वाचे होते. गांधीजींचे सर्वच विचार हे पटो ना पटो, त्यांचे स्वातंत्र्य चळवळतील योगदान महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य चळवळ ही क्रिकेट च्या सामन्या सारखी नव्हती की, त्यात कोणाचे योगदान किती हे मोजता येईल किंवा कोण सामनावीर हे ठरवता येईल तसेच लढाईत कोण मृत्युमुखी पडला, कोण वाचला या वरून, शुरपणा ठरत नसतो तर जिंकलो की हरलो हे महत्त्वाचे (व्यक्तीगत मत) करोडो लोकांना जागे करणे, घराबाहेर काढणे, मागे यायला लावणे, प्रंसगी लाठ्या खायला लावणे(ते सुद्धा भारता सारख्या देशात जिथे कृतीशून्य, संवेदना बोथट झालेल्या, आपला स्वार्थ आधी बघण्यार्‍या लोकांचा भरणा जास्त आहे) त्यांना विश्वास देणे की स्वातंत्र्य हे मिळणारच. ही माझ्या दृष्टीने एक अशक्यप्राय गोष्ट जी गांधीजींनी प्रत्यक्ष केली. त्यांच्या ह्या नेत्रुत्व गुणाला माझा सलाम (ह्याच बाबतीत मनावर प्रभाव टाकणारा दुसरा नेता म्हणजे हिटलर. त्याचे एकूण कार्य मला न पटो, पण त्याच्या ह्या लोकांना प्रभावीत करण्यार्‍या गुणा मुळे तरी मी त्याला सलाम करतो.)

सुवर्णा 13/11/2009 - 16:07
गांधीजीकडे असलेले नेतॄत्वगुण आणि त्यांना मिळालेला भारतीय जनतेचा पाठिंबा हे खरेच कौतुकास्पद आहे, आणि त्यांनी अध्यात्म, भारतीय संस्कॄती-परंपरा वगैरे यांचा केलेला अभ्यास हेसुध्दा.. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरी त्यांना त्यांच्यातल्या षडरिपूंवर त्यांना पूर्णपणे मात नाही करता आली आणि इथेच त्यांच्यातला महात्मा हरला.. असो.. शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं.. सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

In reply to by सुवर्णा

टारझन 13/11/2009 - 16:16
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कसला जबरदस्त विचार आहे !! शिवाजी महाराज हातात एक काठी आणि दोन बायका पुढे :) असं करून औरंग्या समोर उपोषणाला बसलेत .. आणि बाकी मावळेही त्यांच्यामागे भजनं गात बसलेत !! वा वा वा !! औरंग्या आणि मुघल साम्राज्य पळूनच गेलं असतं घाबरून =)) आणि गांधीजींना घोड्यावर पसून तलवार घेऊन "जय भवानी... जय शिवाजी" "हरहर महादेव" च्या घोषणा देताना इमॅजिन केलं .. आणि आपल्या भावना पोचल्या !! (आज हसून हसून विचारवंत होणार कदाचीत)

In reply to by टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आवरा रे ह्याला !! टार्‍या लेका तु आजकाल अनआवरेबल झाला आहेस बघ. तुझा रतिसाद... आपल प्रतिसाद वाचुन गलित गात्र झालो एकदम. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by टारझन

सुवर्णा 13/11/2009 - 16:55
मी तर फक्त तुलना केली होती.. तुमचा प्रतिसाद बघितला.. आता काय बोलनार!! =)) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

टारझन 13/11/2009 - 16:10
भोचक आणि प्रतिसादकर्ते (खासकरून पर्‍या आणि हर्षद) , खुलाश्याबद्दल धन्यवाद !!! -- टोचक

नितीनमहाजन 13/11/2009 - 16:56
ब्रिटिशांच्या जुलुमामुळे व त्रासामुळे सर्वच भारतीय जनता त्रासलेली होती. सामान्य जनता मनातून याचा विरोध कसा करावा याचा विचार करीत होती. सामान्य माणसाला सशत्र क्रांतीचा पर्याय नक्कीच आकर्षक वाटत होता कारण त्यातून ब्रिटिश सत्तेविरुध्द ताबडतोब व थेट हल्ला करता येतो हे दिसत होते. पण त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता, धैर्य व शारिरीक तयारी सर्वांजवळ नव्हती. मला काहिही करून या जुलुमाचा विरोध करायचा आहे, पण तो कसा करायचा हे समजत नाही अशा द्विधा मनस्थितीत ही पारतंत्र्यातील जनता वावरत होती. या सर्वांना गांधीजींनी योग्य मार्ग दाखविला तो म्हणजे अहिंसेने व सविनय कायदेभंग. सामान्य माणसाच्या हातात फक्त त्याचा देह आणी त्याचे मन असले तरी तो या अहिंसात्मक प्रतिकाराद्वारे आपला विरोध दाखवू शकतो हे गांधीजींनी जाणले. या अतीशय परिणामकारक अशा शस्त्राने सारा भारत देश नक्की पेटून उठेल याची त्यांना खात्री होती. जेव्हा सामान्य माणसाचा सहभाग एखाद्या चळवळीत होतो तेव्हा ती फोफावायला वेळ लागत नाही. प्रत्येक सामान्य माणूस विचार करायला लागतो की अरे माझ्या शेजार्‍याला जर हे जमते जर मला का नाही जमणार? मग प्रत्यक्ष सहभागानंतर तो सामान्य माणूसही अभिमानाने म्हणू शकला की मी ब्रिटिश सत्तेला विरोध केला, माझाही या स्वातंत्रलढ्यात खारीचा का होईना पण वाटा आहे. आणि येथेच गांधीजी व सशस्त्र क्रांतीकारक यांच्यात फरक होतो. सशस्त्र क्रांतीकारकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सामान्य माणसामध्ये स्फुल्लिंग जागवण्याचे काम करणे फार अवघड होते. मला येथे गांधीजी, सावरकर व सुभाषचंद्र बोस यांची तुलना करायची नाही पण स्वातंत्रलढ्यामध्ये सामान्य जनतेला सहभागी करुन घेण्यामध्ये गांधीजी यशस्वी झाले हे मात्र नक्की. मला स्वतःला सावरकर व सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान याला जगात तोड नाही. सावरकरांची बोटीतील उडी, अंदमानमधील काळेपाणी यासारखे दुसरे उदाहरण जगात नाही. तसेच सुभाषचंद्र बोस यांनी प्रत्य्क्ष ब्रिटिश सेनेलाच आपल्याबाजूला वळवले हेही उदाहरण जगात एकमेवाद्वितीयच. पण एक सामान्य माणूस यापैकी काय करू शकतो. तुम्ही स्वतःला विचारून पहा की यापैकी आपण कशात सामिल झालो असतो. ज्याप्रमाणे आपल्या संतांनी संसारात राहून देवभक्ती करायला शिकवले ससेच गांधीजींनी पारतंत्र्यातील गांजलेल्या सामान्य माणसाला देशभक्ती करायला शिकवली असे मी म्हणतो. मिठाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांवर बोट ठेवले व दाखवून दिले की पहा हे ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या जमिनीवर तयार केलेले मीठ आपल्यालाच अधिक रक्क्म देऊन खरेदी करायला लावत आहेत. तुम्हीच विचार करा हे योग्य आहे का? जर अयोग्य वाटत असेल तर चला माझ्याबरोबर विरोध करायला. का नाही सामान्य माणूस पेटून उठणार सांगा? बाकी चर्चा उत्तम चालली आहे. नितीन

मनीषा 15/11/2009 - 11:05
गांधीजी .. म्हणलं की मला पु.लं च्या अंतु बर्व्याचे तत्वज्ञान आठवते ... " --- माणूस असेल मोठा , पण आम्ही त्यांचा मोठेपणा कुठ्ल्या खाती नोंदवावा ? ---- रोज तुपाशी खाणर्‍या उपाशी माणसाचे कौतुक .. इथे निम्मे कोकण उपाशी " आणि " ---इंग्रज गेला तो कंटाळून , लुटण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही म्हणुन फुंकले दिवाळे " गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली . तोपर्यंत मुठभर विचारवंतच फक्त ब्रिटीश सत्तेशी झगडत होते . पण 'गांधींजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले-----' हे विधान अतिशय विपरर्यस्त आहे .

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 11:20
गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली
अच्छा , म्हणजे गांधीजींनी आंदोलन करण्याआगोदर "तळागाळातली लोकांना" अगदी स्वातंत्र्य असल्याची अनुभुती मिळत होती काय?

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 12:30
अनुभूती कसली? त्यांना स्वतंत्र्य म्हणजे काय हेच माहित नव्हते ... भारतातील ६०% ते ७०% जनता शेती आणि शेती संबधीत व्यवसाय करणारी ... ब्रिटीशांच्या आधी जमिनदार , वतनदार त्यांना लुटत होते. आपले हक्क काय आहेत, आपल्यावर अन्याय होतो आहे त्याचा प्रतिकार करायला हवा आणि तो आपण करु शकतो ह्याची जाणिव नक्कीच गांधीजींच्या आंदोलनामुळे झाली

In reply to by मनीषा

टारझन 15/11/2009 - 12:47
इंग्रजांनी एवढं गुपचूप राज्य केलं आपल्यावर ? तरीच ते एवढे दिवस राज्य करू शकले.. थँक्स टू गांधी !! ते नसते तर आजही आपल्याला कळले नसते की आपल्यावर नक्की कोण राज्य करतोय ते !! मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता ..

In reply to by टारझन

श्री. टारझन, सुधा मूर्ती यांनी 'वाईज अँड अदरवाईज'मधे लिहिलं आहे की उदीशा*च्या जंगलांमधे त्यांना असेही म्हातारे भेटले होते ज्यांना राणीचंच राज्य सुरू आहे असं वाटत होतं. अदिती *उदीशा किंवा उडीसा किंवा ओरिसा, माझा प्रचंड गोंधळ झाला आहे या नावाबद्दल!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 15/11/2009 - 13:43
श्रीमती अदिती, श्री टारझन, हे कुमार टारझन आहेत. त्यामुळे त्यांना सदर संदर्भ देऊन उगाच त्यांच्या डोक्यात कीडे करण्यापेक्षा, आपले संदर्भासहित स्पष्टिकरण एक वेगळा लेख म्हणून प्रकाशित करावे ही विनंती. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते नाव आहे, ओडिशा. (ओड्र विशय - ओडिविशा - ओडिशा). ओडिया लोकांना`श' नीट म्हणता येत नाही. ते "स'" म्हणतात. आणि इथे ड ला र करतात. म्हणून ओरिसा. सुधा मूर्तींचा अनुभव खराच. मला २००९ मध्ये असे तरूण लोक (म्हातारे सोडा) ओरिसामध्ये भेटले आहेत ज्यांना खरंच माहीत नाही राज्य कोण करतं. असो. विषयांतर नको. पण कमालीचे दारिद्र्य आणि घोर अज्ञान जो कुणी जवळून पाहील त्याला गांधीजी आपोआप नीट समजतील. कसलेही वाद घालण्याची त्याची इच्छा होणार नाही. आळश्यांचा राजा

In reply to by टारझन

मनीषा 15/11/2009 - 13:32
समजुतीचा घोटाळा दिसतो आहे ... ब्रिटीशांनी गुपचुप राज्य केलं नाही तर त्यांनी केलेल्या अन्यायाचा जनतेने प्रतिकार केला नाही असं मला म्हणायचं होतं . (तुम्ही नीळ आणि कापूस शेती करणार्‍यांवर ब्रिटीशांनी लादलेले नियम आणि कायदे इ. बद्दल वाचले असेल. ) मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता .. आपल्याला जे वाटतं ते नेहमी बरोबरच असतं असं नाही ..

विसोबा खेचर 15/11/2009 - 11:59
मोहनदास गांधींची नसती कवतिकं चालू द्या भोचकराव!
ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ??
सह्ही बोल्लात पराशेठ! मिपावर गांधींवर कवतिकपर लेख येतात हे मिपाचं नसलं तरी मालक म्हणून माझं वैयक्तिक दुर्दैव! चालू द्या...! सुवर्णातै,
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
आपण काय बोलतो आहोत, काय लिहितो आहोत याचं कृपया भान ठेवा. ज्या वाक्यात सशस्त्र क्रांन्तीच्या उग्र दैवताचं -शिवछत्रपतींचं नांव आहे त्या वाक्यात कुणाही सोम्यागोम्याचं नाव नका घेऊ हो प्लीज! असो.. आता माझी दोन आयटम बायकांच्या खांद्यावर हात टाकून शेळीला दूध पाजायला जायची वेळ झाली आहे! :) धन्यवाद.. तात्या.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

विकांत - मालवण (तारकर्ली).....

नाम्या झंगाट ·

प्रशु 05/11/2009 - 16:04
मी गेल्याच विकांतला जाऊन आलो. तुम्हि प्रथम मालवण ला जा आणी तेथुन तारकर्ली अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तारकर्लीत रहाण्याची/जेवणाचई चांगली सोय आहे. पण बोटींग मला महाग वाट्ले. माणसी रुपये ९००/- फक्त ते पण २ तास..... मालवण/भराडी देवी/ धामापुर तलाव पण बघुन घ्या वेळ असेल तर....

JAGOMOHANPYARE 05/11/2009 - 17:25
.. कसे जाणार आहात? कोल्हापूरवरून जाणार असाल, तर एक रात्र दाजीपूरला घालवू शकता.आधी बुकिंग केले तर टेंट मिळतात चांगले.. एम टी डी सी चे... त्याचे बुकिंग मुंबईत पण होते बहुतेक..... .. तिथे चिकन चांगले असते म्हणे, ( मी १ वर्श फोंडाघाटला राहिलो, पण कधी नाही खाल्ले..... ) तारकर्लीला पण एम टी डी सी आहे बहुतेक , पण प्रायवेट घरातून चांगली सोय होते.. हॉटेलप्रमाणे, पण ते फार पॉश नसतात.. नुसती (हनीमूनपुरती) प्रायवसी मिळते आणि जेवण मिळते... नाही तर मग हॉटेल आहेत.. ( कोल्हापूर- राधानगरी-दाजीपूर- फोंडा- कणकवली- मालवण मार्ग) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

मितालि 05/11/2009 - 17:42
येवा मालवण आपलाच आसा... खुप मासे , काजु खा तिकडे.. हे दोन वेबसाईट बघा. http://www.malvancity.com/ http://santoshpednekar.wordpress.com/category/deobag-malvan/

मालवण-तारकर्ली सुरेख आहे.. तारकर्ली मालवणपासुन १५-२० मिनिटाच्या अंतरावार आहे... मालवण मद्धे राहु नका..त्यापेक्षा तारकर्ली मद्धे "एम्.टी.डी.सी." मद्धे सोय होते का पहा...सुंदर समुद्रकिनार्‍यावर आहे रहाण्याची सोय.. प्रत्येक रुम म्हणजे स्वतंत्र छोटा टेंटच आहे...प्रत्येकाला स्वतंत्र ओसरी आहे पुढे...तिथे निवांत खुर्चित बसुन समुद्र न्याहळता येतो... पण "एम्.टी.डी.सी." मद्धे चुकुनही जेवु नका.. त्यपेक्शा मालवण मद्धे मुख्य बाजारपेठेत छान खानावळी आहेत.. तारकर्ली मद्धे "घर मिटबावकरांचं" नावाचं एक घरगुती हॉटेल आहे. तिथे पण राहाण्याची सोय ठाकठीक वाटली... तिथे वडे-सागुते आणि मोदक झक्कास होते :-)

सुनिल पाटकर 06/11/2009 - 21:50
तारकरली मालवण पासुन ७ कि,मि... सिंधुदुर्ग हा जलदुर्ग पा्हण्यासाठी होडीतुन जावे लागते..मिठबावबिच .देवगड जवळ १० व्या शतकातील कुणकेश्वर मंदीर, विजयदुर्ग हा जलदुर्ग ,हिलस्टेशन अंबोली, रेडीचा गणपती,कुणकेश्वर गुहा,, धामापुर तलाव ,सावंतवाडी,हि ठिकाणे पहावी.

मालवन ल मी अत्ताच जाउन आले मी. सिन्धुदुर्ग बघाय्ल जतान जर पअन्यातले प्रवाल बघाय्चे असतिल तर २५० रुपयात ते लोक दाखव्तात. जरूर बघावे. किल्ला देखिल उत्तम आहे. सुप्रिया

हर्षद आनंदी 09/11/2009 - 07:27
कुडाळ-धामापुर-मालवण-तारकर्ली-कुणकेश्वर-देवगड-विजयदुर्ग अप्रतिम पट्टा आहे. तारकर्ली इतर ठीकाणांपेक्षा थोडे महागडे आहे. तारकर्ली पेक्षा सुंदर बीच माल्वण पासुन १७-१८ किमीवर असलेल्या गावात आहे, धामापुरचा तलाव मस्त आहे, बोटिंगची सोय आहे. आगाऊ सल्ला : एस. टी महामंडळाची उत्तम सेवा या भागात आहे, त्यामूळे ५०० रु. ४ दिवस प्रवास ही सुविधा प्रवास सुंदर बनवते. तुम्हाला त्या भागाची माहीती हवी असल्यास, माझ्या ई-मेल वर संपर्क करा. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

प्रशु 05/11/2009 - 16:04
मी गेल्याच विकांतला जाऊन आलो. तुम्हि प्रथम मालवण ला जा आणी तेथुन तारकर्ली अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तारकर्लीत रहाण्याची/जेवणाचई चांगली सोय आहे. पण बोटींग मला महाग वाट्ले. माणसी रुपये ९००/- फक्त ते पण २ तास..... मालवण/भराडी देवी/ धामापुर तलाव पण बघुन घ्या वेळ असेल तर....

JAGOMOHANPYARE 05/11/2009 - 17:25
.. कसे जाणार आहात? कोल्हापूरवरून जाणार असाल, तर एक रात्र दाजीपूरला घालवू शकता.आधी बुकिंग केले तर टेंट मिळतात चांगले.. एम टी डी सी चे... त्याचे बुकिंग मुंबईत पण होते बहुतेक..... .. तिथे चिकन चांगले असते म्हणे, ( मी १ वर्श फोंडाघाटला राहिलो, पण कधी नाही खाल्ले..... ) तारकर्लीला पण एम टी डी सी आहे बहुतेक , पण प्रायवेट घरातून चांगली सोय होते.. हॉटेलप्रमाणे, पण ते फार पॉश नसतात.. नुसती (हनीमूनपुरती) प्रायवसी मिळते आणि जेवण मिळते... नाही तर मग हॉटेल आहेत.. ( कोल्हापूर- राधानगरी-दाजीपूर- फोंडा- कणकवली- मालवण मार्ग) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

मितालि 05/11/2009 - 17:42
येवा मालवण आपलाच आसा... खुप मासे , काजु खा तिकडे.. हे दोन वेबसाईट बघा. http://www.malvancity.com/ http://santoshpednekar.wordpress.com/category/deobag-malvan/

मालवण-तारकर्ली सुरेख आहे.. तारकर्ली मालवणपासुन १५-२० मिनिटाच्या अंतरावार आहे... मालवण मद्धे राहु नका..त्यापेक्षा तारकर्ली मद्धे "एम्.टी.डी.सी." मद्धे सोय होते का पहा...सुंदर समुद्रकिनार्‍यावर आहे रहाण्याची सोय.. प्रत्येक रुम म्हणजे स्वतंत्र छोटा टेंटच आहे...प्रत्येकाला स्वतंत्र ओसरी आहे पुढे...तिथे निवांत खुर्चित बसुन समुद्र न्याहळता येतो... पण "एम्.टी.डी.सी." मद्धे चुकुनही जेवु नका.. त्यपेक्शा मालवण मद्धे मुख्य बाजारपेठेत छान खानावळी आहेत.. तारकर्ली मद्धे "घर मिटबावकरांचं" नावाचं एक घरगुती हॉटेल आहे. तिथे पण राहाण्याची सोय ठाकठीक वाटली... तिथे वडे-सागुते आणि मोदक झक्कास होते :-)

सुनिल पाटकर 06/11/2009 - 21:50
तारकरली मालवण पासुन ७ कि,मि... सिंधुदुर्ग हा जलदुर्ग पा्हण्यासाठी होडीतुन जावे लागते..मिठबावबिच .देवगड जवळ १० व्या शतकातील कुणकेश्वर मंदीर, विजयदुर्ग हा जलदुर्ग ,हिलस्टेशन अंबोली, रेडीचा गणपती,कुणकेश्वर गुहा,, धामापुर तलाव ,सावंतवाडी,हि ठिकाणे पहावी.

मालवन ल मी अत्ताच जाउन आले मी. सिन्धुदुर्ग बघाय्ल जतान जर पअन्यातले प्रवाल बघाय्चे असतिल तर २५० रुपयात ते लोक दाखव्तात. जरूर बघावे. किल्ला देखिल उत्तम आहे. सुप्रिया

हर्षद आनंदी 09/11/2009 - 07:27
कुडाळ-धामापुर-मालवण-तारकर्ली-कुणकेश्वर-देवगड-विजयदुर्ग अप्रतिम पट्टा आहे. तारकर्ली इतर ठीकाणांपेक्षा थोडे महागडे आहे. तारकर्ली पेक्षा सुंदर बीच माल्वण पासुन १७-१८ किमीवर असलेल्या गावात आहे, धामापुरचा तलाव मस्त आहे, बोटिंगची सोय आहे. आगाऊ सल्ला : एस. टी महामंडळाची उत्तम सेवा या भागात आहे, त्यामूळे ५०० रु. ४ दिवस प्रवास ही सुविधा प्रवास सुंदर बनवते. तुम्हाला त्या भागाची माहीती हवी असल्यास, माझ्या ई-मेल वर संपर्क करा. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
लेखनविषय:
मिपाकरहो, येणा-या विकांतासाठी हापिसच्या गँग सोबत मालवण (तारकर्ली) येथे जाण्याचे प्रयोजन केले आहे. फिरस्त्यांना मालवण (तारकर्ली) बाबतचे (मार्ग, रहण्याची व जेवणाची सोय, कुठे-कुठे आणी कोणते ठिकाणी भेट दिली पाहिजे इत्यादि... )आपले अनूभव, सुचना, शिफारस "शेअर" करण्याची नम्र विनंती..... कळावे, लोभ असावा नाम्या झंगाट

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

पाषाणभेद ·

प्रभो 03/11/2009 - 11:51
दफो.....छान ओळख --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

पाषाणभेद 03/11/2009 - 14:26
फोटो टाकलेले आहेत. धन्यवाद. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अमोल केळकर 03/11/2009 - 16:51
मस्त मुलाखत ' नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते ' - वा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दशानन 03/11/2009 - 18:00
आनंद वाटतो अश्या अवलियाबद्दल वाचल्यावर... मस्त रे भावा. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

प्रमोद देव 03/11/2009 - 18:59
वा पाषाणभेद. एका ’अवलिया’ची मस्त ओळख करून दिलीत. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

In reply to by प्रमोद देव

पाषाणभेद 04/11/2009 - 08:23
म्या बी 'सायकलवाला अवलिया' आसलं कायबाय हेडींग देनार हुतो पन त्यो ट्रेड मार्क आपल्या ईठं अवलियानी घ्येतल्येला हाय. मंग म्या दुसरं हेडींग दिल. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

चतुरंग 03/11/2009 - 21:02
मुलखावेगळा ध्यास घेऊन माणसे शांतपणे त्या त्या मार्गाने जात असतात. अहिरेबाबांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद पाषाणभाऊ. बाकी इतका प्रचंड सायकलप्रवास करताना एकदाही सायकल पंक्चर होऊ नये म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा! B) (सायकलस्वार)चतुरंग

In reply to by टुकुल

पाषाणभेद 04/11/2009 - 01:34
बाकी इतका प्रचंड सायकलप्रवास करताना एकदाही सायकल पंक्चर होऊ नये म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा! मी पण या विषयावर खोदून खोदून विचारले. ते म्हटले की मी आता खोटे कशाला बोलू. सगळी देवाची माया आहे. बर एक नाही सगळ्या प्रवासात असे घडले आहे. हे तर आश्चर्य आहे. मी आताची सायकल बघीतली. टायर गोटा झालेले आहेत. पण पंक्चर नाही! अहो, मी तर जास्त प्रश्न सायकल विषयीच विचारले. मेंटेनन्स कसा करायचा, आऊट कसे काढायचे, कोणते पान्हे वापरायचे इ. ते तर कधी सायकलची हवा पण चेक करत नसत. नाही म्हणायला वालपीन, वाल ४/५ वेळा बदलले असे सांगितले. मी तर आठवड्यातून काय २० किमी चालवतो तरीही ६ महिन्यात २/३ वेळा पंक्चर होतेच. मला वाटते, हायवेला कमी खडे असतात, रस्ते चांगले असतात. तरीही सगळा प्रवास पंक्चरविना म्हणजे आश्चर्यच. पुन्हा त्यांची भेट झाली की या विषयी जास्त विचारेन म्हणतो. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अश्विनीका 03/11/2009 - 23:10
छान मुलाखत. अहिरे बाबांची ओळख आवडली. त्यांच्या पुढील सायकल प्रवासासाठी शुभेच्च्छा. - अश्विनी

मदनबाण 03/11/2009 - 23:56
दफोराव, छान माहिती दिलीत... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

पाषाणभेद 05/11/2009 - 08:51
" नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते ' - वा !!" आजूनबी त्यांचेवाले दुकान हाये तिथं. हा आता त्ये बंद आसत म्हना. आन सगळ्यांला धन्यवाद बर कां भौ. कधीमधी अहिरे बाबा भ्येटले का मी त्येंला तुमच्या सगळ्यांचे नाव सांगतो बर का. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

प्रभो 03/11/2009 - 11:51
दफो.....छान ओळख --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

पाषाणभेद 03/11/2009 - 14:26
फोटो टाकलेले आहेत. धन्यवाद. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अमोल केळकर 03/11/2009 - 16:51
मस्त मुलाखत ' नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते ' - वा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दशानन 03/11/2009 - 18:00
आनंद वाटतो अश्या अवलियाबद्दल वाचल्यावर... मस्त रे भावा. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

प्रमोद देव 03/11/2009 - 18:59
वा पाषाणभेद. एका ’अवलिया’ची मस्त ओळख करून दिलीत. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

In reply to by प्रमोद देव

पाषाणभेद 04/11/2009 - 08:23
म्या बी 'सायकलवाला अवलिया' आसलं कायबाय हेडींग देनार हुतो पन त्यो ट्रेड मार्क आपल्या ईठं अवलियानी घ्येतल्येला हाय. मंग म्या दुसरं हेडींग दिल. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

चतुरंग 03/11/2009 - 21:02
मुलखावेगळा ध्यास घेऊन माणसे शांतपणे त्या त्या मार्गाने जात असतात. अहिरेबाबांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद पाषाणभाऊ. बाकी इतका प्रचंड सायकलप्रवास करताना एकदाही सायकल पंक्चर होऊ नये म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा! B) (सायकलस्वार)चतुरंग

In reply to by टुकुल

पाषाणभेद 04/11/2009 - 01:34
बाकी इतका प्रचंड सायकलप्रवास करताना एकदाही सायकल पंक्चर होऊ नये म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा! मी पण या विषयावर खोदून खोदून विचारले. ते म्हटले की मी आता खोटे कशाला बोलू. सगळी देवाची माया आहे. बर एक नाही सगळ्या प्रवासात असे घडले आहे. हे तर आश्चर्य आहे. मी आताची सायकल बघीतली. टायर गोटा झालेले आहेत. पण पंक्चर नाही! अहो, मी तर जास्त प्रश्न सायकल विषयीच विचारले. मेंटेनन्स कसा करायचा, आऊट कसे काढायचे, कोणते पान्हे वापरायचे इ. ते तर कधी सायकलची हवा पण चेक करत नसत. नाही म्हणायला वालपीन, वाल ४/५ वेळा बदलले असे सांगितले. मी तर आठवड्यातून काय २० किमी चालवतो तरीही ६ महिन्यात २/३ वेळा पंक्चर होतेच. मला वाटते, हायवेला कमी खडे असतात, रस्ते चांगले असतात. तरीही सगळा प्रवास पंक्चरविना म्हणजे आश्चर्यच. पुन्हा त्यांची भेट झाली की या विषयी जास्त विचारेन म्हणतो. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अश्विनीका 03/11/2009 - 23:10
छान मुलाखत. अहिरे बाबांची ओळख आवडली. त्यांच्या पुढील सायकल प्रवासासाठी शुभेच्च्छा. - अश्विनी

मदनबाण 03/11/2009 - 23:56
दफोराव, छान माहिती दिलीत... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

पाषाणभेद 05/11/2009 - 08:51
" नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते ' - वा !!" आजूनबी त्यांचेवाले दुकान हाये तिथं. हा आता त्ये बंद आसत म्हना. आन सगळ्यांला धन्यवाद बर कां भौ. कधीमधी अहिरे बाबा भ्येटले का मी त्येंला तुमच्या सगळ्यांचे नाव सांगतो बर का. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

हमारा बीज अभियान २

अजुन कच्चाच आहे ·

विकास 04/11/2009 - 05:25
रासायनीक खते आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बीजे यांच्यामुळे अनेक बदल घडत आहेत. त्यासंदर्भात अधिक माहीती लिहीता आली तर अवश्य पहा. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नसल्यास पाच वर्षे झाली तरी न होण्यामागे जनमताचा प्रभाव समजता येईल का? मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे?

अवलिया 04/11/2009 - 11:20
चांगली माहिती..... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 04/11/2009 - 13:06
ह्या बिलाचे सध्या काय स्वरुप आहे? कोणत्या पक्षाची काय भुमीका आहे काही माहीती?

प्रलंबित रहाण्याची राजकीय्/आर्थिक कारणे, दबावगटांची त्यातील भुमिका वगैरे विषयांवरही उहापोह वाचायला आवडेल. शेतकरी नेतेही या विषयावर मुग गिळुन गप्प आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चे पण तसेच आहे. आपण या विषयावर अभ्यासपुर्ण लिहित असल्याने अश्या मुद्यांचेपण परामर्श घ्यावेत ही विनंती. लेख आवडला हे वेगळे सांगायला हवे असे वाटत नाही.

मदनबाण 04/11/2009 - 20:51
चांगली माहिती दिल्याबद्धल धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

जालाच्या दुनियेला नवा वाटणाऱ्या विषयावर ही मिपाकरांनी दाखवलेल्या इंटरेस्ट बद्दल धन्यवाद. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नाही. आत्ता त्या समीतीचे रिकमंडेशनस् तयार झाले आहेत. या वेळी तो संमत होण्याचे चान्सेस आहेत. मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे? या बिलाचे लिखाण व भाषा पाहीली तर हे बिल कोणा एका कंपनीनेच लिहून घेतल्या सारखे वाटते, इतके की त्याला MONSANTO BILL म्हणावेसे वाटते. या संदर्भात आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. जमेल तसे लिहीनच. ................. अजून कच्चाच आहे.

विकास 04/11/2009 - 05:25
रासायनीक खते आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बीजे यांच्यामुळे अनेक बदल घडत आहेत. त्यासंदर्भात अधिक माहीती लिहीता आली तर अवश्य पहा. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नसल्यास पाच वर्षे झाली तरी न होण्यामागे जनमताचा प्रभाव समजता येईल का? मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे?

अवलिया 04/11/2009 - 11:20
चांगली माहिती..... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 04/11/2009 - 13:06
ह्या बिलाचे सध्या काय स्वरुप आहे? कोणत्या पक्षाची काय भुमीका आहे काही माहीती?

प्रलंबित रहाण्याची राजकीय्/आर्थिक कारणे, दबावगटांची त्यातील भुमिका वगैरे विषयांवरही उहापोह वाचायला आवडेल. शेतकरी नेतेही या विषयावर मुग गिळुन गप्प आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चे पण तसेच आहे. आपण या विषयावर अभ्यासपुर्ण लिहित असल्याने अश्या मुद्यांचेपण परामर्श घ्यावेत ही विनंती. लेख आवडला हे वेगळे सांगायला हवे असे वाटत नाही.

मदनबाण 04/11/2009 - 20:51
चांगली माहिती दिल्याबद्धल धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

जालाच्या दुनियेला नवा वाटणाऱ्या विषयावर ही मिपाकरांनी दाखवलेल्या इंटरेस्ट बद्दल धन्यवाद. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नाही. आत्ता त्या समीतीचे रिकमंडेशनस् तयार झाले आहेत. या वेळी तो संमत होण्याचे चान्सेस आहेत. मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे? या बिलाचे लिखाण व भाषा पाहीली तर हे बिल कोणा एका कंपनीनेच लिहून घेतल्या सारखे वाटते, इतके की त्याला MONSANTO BILL म्हणावेसे वाटते. या संदर्भात आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. जमेल तसे लिहीनच. ................. अजून कच्चाच आहे.
3

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

पाषाणभेद ·

टारझन 28/10/2009 - 20:50
पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.
हॅहॅहॅ ... हॅहॅहॅ ... काय हो श्री पाषाणभेद ? पाषाण-खेड

In reply to by टारझन

श्री टारझन, प्यांट ह्या शब्दाचे लिंग स्त्रिलिंग आहे. (प्यांट घातला नव्हे, घातली) तेव्हा स्त्रिलिंगी असलेल्या ह्या वस्राचे 'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.

In reply to by निमीत्त मात्र

गणपा 28/10/2009 - 21:59
मान्य मात्रसाहेब, पण पँन्टीची म्हणण्या पेक्षा प्याँटची /पॅंटची म्हटल तर जास्त योग्य वाटेल. बाकी व्याकरणातल आपल्याला काही कळत नाही. बाकी मिपाकर व्याकरण आणि शुद्धलेखन फाट्यावर मारतात...

In reply to by निमीत्त मात्र

टारझन 28/10/2009 - 21:51
श्री निमित्त मात्र ,
'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.
अच्छा .. कशातून लिंग अचुक कळते म्हणालात ? असो ... आपल्याला लिंगाशी खेळण्यात बराच रस दिसतो ... बाकी मी व्याकरणा बद्दल काही म्हणालो नाही बरंका .. फक्त हॅहॅहॅ केलं .. आता हॅहॅहॅ ही काही कविता नाही .. ज्यातून खरा-खोटा अर्थ काढला जायला =)) - बेशुद्ध छात्र

In reply to by टारझन

धमाल मुलगा 28/10/2009 - 21:58
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) श्री. टार्‍या मेल्या.... आत्ता चचलो असतो इतकी बेक्कार कॉफी नरड्यात अडकली!

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 28/10/2009 - 22:58
च्यायला हा टार्‍या १ नंबरचा हि&हि आहे :) :) :) :)

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 29/10/2009 - 18:20
मा. श्री. धमालराव, आपण काय ऑफिसात सारखी कॉफीच पीत असता काय? नाही जेव्हा बघावं तेव्हा कॉफी नरड्यात अडकते, कीबोर्डवर फुर्रर्र करून सांडते वगैरे म्हणून विचारलं...

In reply to by घाटावरचे भट

टारझन 29/10/2009 - 18:27
लेका .. धम्या ऑफिस मधे काय करतो असं तुला वाटलं ? गॅरेज वाल्याचे हात दिवस भर ग्रीस न ऑइल ने मळलेलेच असतात . -- घाटावरचा पाटा

In reply to by घाटावरचे भट

धमाल मुलगा 29/10/2009 - 18:32
श्री.घाटावरचे भट, माफ करा पण हा प्रश्न फारच वैयक्तिक होतो आहे असं नाही का वाटत? तरीही देतो उत्तर, होय मी हापिसात सारखं कॉफीच पित असतो. माझ्या डेस्कावर कॉफी व्हेंडिंगमशीनची पाईपलाईन आहे. आपणांस काही त्रास? धन्यवाद. -धमाल अर्धमात्रे.

In reply to by धमाल मुलगा

सर्वश्री अर्धपात्रे आणि घाटावरचे पाट, रा.रा. तात्या यांनी स्वतःच्या मिळकतीतील काही हिश्याचा व्यय करून आपणांस सर्व (काही अश्लाघ्य सोडून) प्रकारच्या व्यक्तीगत संवादासाठी खरडवहीची व्यवस्था करून दिली आहे. आपण त्याचा उपयोग का करत नाही आहात. अदिती (जेव्हा जोक्स संपतात तेव्हा धमाल्याची कॉफीही उडून संपलेलीच असते.)

In reply to by टारझन

अवलिया 29/10/2009 - 10:50
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --गलित गात्र ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by टारझन

हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ! हा टार्‍या साला कधी कधी बेक्कार 'अन-आवरेबल' होतो !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रभो 29/10/2009 - 14:57
हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ...तोपर्यन्त आमचा _/\_ घ्या... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by निमीत्त मात्र

विजुभाऊ 29/10/2009 - 09:23
चूक प्यान्ट हा लिंग मुक्त शब्द आहे.( उभयलिंगी म्हणाना) हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

>> हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. काही काय मालक? फरक असतोच की. मटेरीयल सेम असेल पण आकारात फरक असतोच. :) का अजून फरक जाणवला नाहीये? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

प्यांटीला विस्त्री करताना सावद र्‍हावे. विल्याष्टिक असेल तर अगदी जपुन नाडी असेल तर काय वांदा नाई. परवाच आमच्या यका क्वाश्चुम डिजाइनरला ईचारल जीनच्या प्यांटीमदुन नाडी ववता येईन का? हिकडुन घालायची आन तिकडुन काडायची हाय काय नाई काय? म्हनल पायजे तर जीनची नाडी वव. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 29/10/2009 - 06:50
मी स्वत: जिन्स पँन्ट ३ /४ दिवस वापरतो. (सलग दिवस नाही हो. मधे मधे.) पँन्ट धुतली की चुरगळते. मग मी जुना उपाय अवलंबतो. पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो. मी स्वतः जीन्स ७-८ वेळा वापरतो (सलग नाही, मधे मधे). हां आता एखाद दिवशी जीन्स घालून बारमध्ये गेलो तर मात्र (सिगरेटचा वास भरल्यामुळे) ती जीन्स पुन्हा धुवावी लागते, ते वेगळे. दुसरे म्हणजे, मी जीन्सला कधीही इस्त्री करीत नाही, कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे, असे माझे मत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

पाषाणभेद 31/10/2009 - 09:15
वा सुनील राव आपण खरेच पर्यावरणवादी आहात. कुणीतरी माझ्यासारखा विचार करतो व ते सार्वजनीकरीत्या प्रकट करतो हे पाहून आनंद झाला. बरेचशे बॅचलर टाईप लोकांनाही धुणे, इस्त्री करणे याचा तिटकारा असतो. त्या लोकांसाठी या विचारांचे लेबल लावून जर त्यांनी जिन्स कापडाबाबत जर वरील विचार अंमलात आणले तर बरेच सामाजीक काम होईल, नाही का? -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

सूहास 29/10/2009 - 18:41
कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे>>> चुकुन ईस्त्री हा शब्द स्त्री वाचला गेला... सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा

टारझन 28/10/2009 - 20:50
पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.
हॅहॅहॅ ... हॅहॅहॅ ... काय हो श्री पाषाणभेद ? पाषाण-खेड

In reply to by टारझन

श्री टारझन, प्यांट ह्या शब्दाचे लिंग स्त्रिलिंग आहे. (प्यांट घातला नव्हे, घातली) तेव्हा स्त्रिलिंगी असलेल्या ह्या वस्राचे 'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.

In reply to by निमीत्त मात्र

गणपा 28/10/2009 - 21:59
मान्य मात्रसाहेब, पण पँन्टीची म्हणण्या पेक्षा प्याँटची /पॅंटची म्हटल तर जास्त योग्य वाटेल. बाकी व्याकरणातल आपल्याला काही कळत नाही. बाकी मिपाकर व्याकरण आणि शुद्धलेखन फाट्यावर मारतात...

In reply to by निमीत्त मात्र

टारझन 28/10/2009 - 21:51
श्री निमित्त मात्र ,
'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.
अच्छा .. कशातून लिंग अचुक कळते म्हणालात ? असो ... आपल्याला लिंगाशी खेळण्यात बराच रस दिसतो ... बाकी मी व्याकरणा बद्दल काही म्हणालो नाही बरंका .. फक्त हॅहॅहॅ केलं .. आता हॅहॅहॅ ही काही कविता नाही .. ज्यातून खरा-खोटा अर्थ काढला जायला =)) - बेशुद्ध छात्र

In reply to by टारझन

धमाल मुलगा 28/10/2009 - 21:58
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) श्री. टार्‍या मेल्या.... आत्ता चचलो असतो इतकी बेक्कार कॉफी नरड्यात अडकली!

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 28/10/2009 - 22:58
च्यायला हा टार्‍या १ नंबरचा हि&हि आहे :) :) :) :)

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 29/10/2009 - 18:20
मा. श्री. धमालराव, आपण काय ऑफिसात सारखी कॉफीच पीत असता काय? नाही जेव्हा बघावं तेव्हा कॉफी नरड्यात अडकते, कीबोर्डवर फुर्रर्र करून सांडते वगैरे म्हणून विचारलं...

In reply to by घाटावरचे भट

टारझन 29/10/2009 - 18:27
लेका .. धम्या ऑफिस मधे काय करतो असं तुला वाटलं ? गॅरेज वाल्याचे हात दिवस भर ग्रीस न ऑइल ने मळलेलेच असतात . -- घाटावरचा पाटा

In reply to by घाटावरचे भट

धमाल मुलगा 29/10/2009 - 18:32
श्री.घाटावरचे भट, माफ करा पण हा प्रश्न फारच वैयक्तिक होतो आहे असं नाही का वाटत? तरीही देतो उत्तर, होय मी हापिसात सारखं कॉफीच पित असतो. माझ्या डेस्कावर कॉफी व्हेंडिंगमशीनची पाईपलाईन आहे. आपणांस काही त्रास? धन्यवाद. -धमाल अर्धमात्रे.

In reply to by धमाल मुलगा

सर्वश्री अर्धपात्रे आणि घाटावरचे पाट, रा.रा. तात्या यांनी स्वतःच्या मिळकतीतील काही हिश्याचा व्यय करून आपणांस सर्व (काही अश्लाघ्य सोडून) प्रकारच्या व्यक्तीगत संवादासाठी खरडवहीची व्यवस्था करून दिली आहे. आपण त्याचा उपयोग का करत नाही आहात. अदिती (जेव्हा जोक्स संपतात तेव्हा धमाल्याची कॉफीही उडून संपलेलीच असते.)

In reply to by टारझन

अवलिया 29/10/2009 - 10:50
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --गलित गात्र ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by टारझन

हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ! हा टार्‍या साला कधी कधी बेक्कार 'अन-आवरेबल' होतो !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रभो 29/10/2009 - 14:57
हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ...तोपर्यन्त आमचा _/\_ घ्या... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by निमीत्त मात्र

विजुभाऊ 29/10/2009 - 09:23
चूक प्यान्ट हा लिंग मुक्त शब्द आहे.( उभयलिंगी म्हणाना) हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

>> हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. काही काय मालक? फरक असतोच की. मटेरीयल सेम असेल पण आकारात फरक असतोच. :) का अजून फरक जाणवला नाहीये? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

प्यांटीला विस्त्री करताना सावद र्‍हावे. विल्याष्टिक असेल तर अगदी जपुन नाडी असेल तर काय वांदा नाई. परवाच आमच्या यका क्वाश्चुम डिजाइनरला ईचारल जीनच्या प्यांटीमदुन नाडी ववता येईन का? हिकडुन घालायची आन तिकडुन काडायची हाय काय नाई काय? म्हनल पायजे तर जीनची नाडी वव. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 29/10/2009 - 06:50
मी स्वत: जिन्स पँन्ट ३ /४ दिवस वापरतो. (सलग दिवस नाही हो. मधे मधे.) पँन्ट धुतली की चुरगळते. मग मी जुना उपाय अवलंबतो. पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो. मी स्वतः जीन्स ७-८ वेळा वापरतो (सलग नाही, मधे मधे). हां आता एखाद दिवशी जीन्स घालून बारमध्ये गेलो तर मात्र (सिगरेटचा वास भरल्यामुळे) ती जीन्स पुन्हा धुवावी लागते, ते वेगळे. दुसरे म्हणजे, मी जीन्सला कधीही इस्त्री करीत नाही, कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे, असे माझे मत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

पाषाणभेद 31/10/2009 - 09:15
वा सुनील राव आपण खरेच पर्यावरणवादी आहात. कुणीतरी माझ्यासारखा विचार करतो व ते सार्वजनीकरीत्या प्रकट करतो हे पाहून आनंद झाला. बरेचशे बॅचलर टाईप लोकांनाही धुणे, इस्त्री करणे याचा तिटकारा असतो. त्या लोकांसाठी या विचारांचे लेबल लावून जर त्यांनी जिन्स कापडाबाबत जर वरील विचार अंमलात आणले तर बरेच सामाजीक काम होईल, नाही का? -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

सूहास 29/10/2009 - 18:41
कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे>>> चुकुन ईस्त्री हा शब्द स्त्री वाचला गेला... सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

... देवाचं घर !

दशानन ·

सुबक ठेंगणी 24/10/2009 - 12:21
सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...
हा भाग विशेष आवडला. "एका रात्रीची गोष्ट" लिहिणारा माणूस खरंच हाच का :?

In reply to by सुबक ठेंगणी

अवलिया 24/10/2009 - 16:16
"एका रात्रीची गोष्ट" लिहिणारा माणूस खरंच हाच का हाच विचार करतो :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा 24/10/2009 - 12:29
वाह राजे मस्तच लिहिलयस.. जियो लेका.

In reply to by माधुरी दिक्षित

दशानन 24/10/2009 - 12:52
:) सगळा नाही पण खुप फिरलो आहे. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

मिसळभोक्ता 24/10/2009 - 13:30
राज, खरच सांग. हल्ली तुझ्या नावाने लेख कोण लिहितो ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

दशानन 24/10/2009 - 13:52
हे साहेब आले आपलं दही घेऊन. जरा काही चांगले उच्चभ्रु लिहावे म्हटलं तर आउटसोर्सचा आरोप सरळ सरळ ;) मी आपला सरळ सरळ आता प्रेमभंगाच्याच कथा लिहीतो... नाही तर गेला बाझार शेयर मार्केटच्या. जा भाऊ तिकडे खुप धागे पडले आहेत.. मोकळे.

In reply to by श्रावण मोडक

कंपूतल्या कोणीतरि सहमत लिहिलं आहे म्हणून न वाचता मी +१ लिहीलं. मूळ लेखावर प्रतिक्रिया: सुंदर लिहिलं आहे. मिभोकाका स्टाईल: हल्ली सुरा सोडली का धरली? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चतुरंग 25/10/2009 - 22:12
सुरा घेतलेली असली की सुरा घेतलेला असतो! ;) (असुरा)चतुरंग

In reply to by चतुरंग

छ्या, काय हे रंगराव, सुरा म्हणजे दारू! आता "दारू म्हणजे काय" हा प्रश्न विचारू नका म्हणजे झालं! (सुरा आणि सुरांपासून लांब) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 31/10/2009 - 12:53
कृपया विम्याचे पैसे हे हिरव्या डॉलरचा माज करून वाया घालवू नयेत !! :) असो .. राजे बुआ ... ... एका रात्रीची गोष्ट वगैरे प्रकार बंद करून ... देवाचं घर सारखे नितांत सुंदर लेख प्रसवत चला :) --(सॅन) ॥ होजे ॥ आपली स्टाईल .. आपला बाणा .. पकवतो जो ,, त्याला धरून हाणा ...

In reply to by टारझन

दशानन 31/10/2009 - 15:57
>>असो .. राजे बुआ ... ... एका रात्रीची गोष्ट वगैरे प्रकार बंद करून ... देवाचं घर सारखे नितांत सुंदर लेख प्रसवत चला हो, मित्रा सगळे पालथेधंदे बंद करुन फक्त चांगलेले लेखन करण्याकडेच लक्ष देत आहे, आपण मनापासून सल्ला दिला हे पाहून आनंद झाला. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

प्रभो 24/10/2009 - 14:02
मस्त बे छान लिवलय !!! मनापासून लिहिलय्स ते दिसतय.. :) (ईंजिनियर)प्रभो

संजीव नाईक 24/10/2009 - 16:39
राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा. आपल्या blogspot वर छान आहे. काही तरी नविन वाचायला मिळते त्यातच समाधान. फार छान . फोटो असते तर फार छान झाले असते. GO Head with wish.. Sanjeev Naik http://vastuclass.blogspot.com

In reply to by संजीव नाईक

अवलिया 24/10/2009 - 16:41
राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा. माझा आक्षेप आहे या विधानाला. संजीव नाईक यांना मिपावर अशा विषयांची कदर होत नाही असे काहीसे सुचवायचे आहे काय असे वाटते? कृपया खुलासा करावा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by संजीव नाईक

दशानन 25/10/2009 - 10:29
अपुलकी दाखवल्या बद्दल आभार. माझे लेखन नेहमीच येथे आधी प्रसिध्द होते व बॅकअपसाठी ब्लॉगवर. >>राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा :) येथे कदरवान आहेत खुप. माझ्या लेखाचे. आम्ही एक काय करु असा एक ओळीचा लेख जरी टाकला तरी १०-१२ जणे कदर करुन जातात ह्यातच सर्व काही आलं ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

लवंगी 24/10/2009 - 18:02
मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. केवळ सुरेख.. असच लिहित जा

अवलिया 24/10/2009 - 19:19
राजे आता कुठे वेळ मिळाला लेख वाचायला... सुरेख लेख आहे. साल्या तु आता सिद्धहस्त झालास बुवा... ! मजा आहे ! लिही अजुन असेच छान छान लिही.. ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

राजे, मंदिरांची भटकंती सुरेख झाली आहे. लेखन आणि लेखनाची भाषा तर खूपच ओघवती. भाषेतला गोडवा हे तुमच्या लेखनाचं वैशिष्टे...! अवांतर : तुमच्या हिंदी शब्दांनी यावेळेस फार घुसखोरी केली नाही. >> सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही. क्या बात है ! केवळ सुंदर..!!! =D> -दिलीप बिरुटे

हर्षद आनंदी 31/10/2009 - 10:15
पण अचानक देवाची आठवण कशी काय आली बुवा? हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला... देवगड जवळील "कु़णकेश्वर" हे मंदीर... अगदी समुद्राच्या काठावर आहे. ईथल्या गाभार्‍यात समुद्राच्या लाटांची गाज आजकाल फक्त रात्रीच ऐकायला मिळते, (ह्या शंकराची स्थापना मुस्लीम व्यापार्‍याने केली आहे, अश्या आशयाची कथा आहे) कात्रजला जे श्वेतांबर जैनांचे मंदीर {दुग्गड परीवार}ऊभारले आहे ते निव्वळ अप्रतिम आहे, भेट द्याच एकदा

jaypal 31/10/2009 - 11:09
"सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही." केवळ,केवळ आणि केवळ "अ प्र ति म" चांगले वाचायला दिल्या बद्द्ल धन्यवाद ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

चेतन 31/10/2009 - 12:37
राजे लेख चांगला जमलाय चेतन अवांतरः आधी राजे पाहुन वाटलं राजेंवर चाल अस्त्राचा प्रयोग झालेला दिसतोय ;)

राजे.... मस्तच लेख... ते एका रात्रीची गोष्ट बिष्ट बंद करा आता.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मदनबाण 01/11/2009 - 20:02
मस्त लिहलंय... :) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

साधामाणूस 01/11/2009 - 23:22
छान लेख! या लेखावरून सुमारे २० एक वर्षापूर्वी पाहिलेली गोव्याची मन्दिरे आठवली. गोव्याची मन्दिरे खूपच नीटनेटकी , स्वच्छ व सुबक असतात.

shweta 02/11/2009 - 03:10
लेख वाचुन असे वाटले कि ..... मंदिरात उभे (किंवा बसलेले) आहोत मंदिरांच्या दगडा-दगडा चा अनुभव आला. क्या बात है ! क्या कहने !

धमाल मुलगा 02/11/2009 - 12:42
काय बोलु सायबा? वाचता वाचता आठवणींतल्या एकेक मंदिर, त्यांचा एकेक चिरा नजरेसमोर यायला लागला....मला माहिती नाही मी तुझा लेख वाचला की देवळांच्या आठवणीत रमत गेलो... :) येऊ दे असेच आणखी! अवांतरः ह्यापायी टावाळक्या सोडल्यास तर परत महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही! ;)

दशानन 27/12/2014 - 19:53
ज्या लेखाने माझी ओळख निर्माण केली, त्यावर अनेकांनी मला लिहिण्यासाठी उम्मेद दिली... त्या सर्वांचे आभार! याच विषयातील माझे पहिले पुस्तक २०१५ मध्ये प्रकाशित होत आहे.. पण तुमच्या सर्वांनी दिलेल्या योगदानाचे काय मोल करावे? म्हणून फक्त... आभार व्यक्त करतो!

सुबक ठेंगणी 24/10/2009 - 12:21
सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...
हा भाग विशेष आवडला. "एका रात्रीची गोष्ट" लिहिणारा माणूस खरंच हाच का :?

In reply to by सुबक ठेंगणी

अवलिया 24/10/2009 - 16:16
"एका रात्रीची गोष्ट" लिहिणारा माणूस खरंच हाच का हाच विचार करतो :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा 24/10/2009 - 12:29
वाह राजे मस्तच लिहिलयस.. जियो लेका.

In reply to by माधुरी दिक्षित

दशानन 24/10/2009 - 12:52
:) सगळा नाही पण खुप फिरलो आहे. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

मिसळभोक्ता 24/10/2009 - 13:30
राज, खरच सांग. हल्ली तुझ्या नावाने लेख कोण लिहितो ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

दशानन 24/10/2009 - 13:52
हे साहेब आले आपलं दही घेऊन. जरा काही चांगले उच्चभ्रु लिहावे म्हटलं तर आउटसोर्सचा आरोप सरळ सरळ ;) मी आपला सरळ सरळ आता प्रेमभंगाच्याच कथा लिहीतो... नाही तर गेला बाझार शेयर मार्केटच्या. जा भाऊ तिकडे खुप धागे पडले आहेत.. मोकळे.

In reply to by श्रावण मोडक

कंपूतल्या कोणीतरि सहमत लिहिलं आहे म्हणून न वाचता मी +१ लिहीलं. मूळ लेखावर प्रतिक्रिया: सुंदर लिहिलं आहे. मिभोकाका स्टाईल: हल्ली सुरा सोडली का धरली? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चतुरंग 25/10/2009 - 22:12
सुरा घेतलेली असली की सुरा घेतलेला असतो! ;) (असुरा)चतुरंग

In reply to by चतुरंग

छ्या, काय हे रंगराव, सुरा म्हणजे दारू! आता "दारू म्हणजे काय" हा प्रश्न विचारू नका म्हणजे झालं! (सुरा आणि सुरांपासून लांब) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 31/10/2009 - 12:53
कृपया विम्याचे पैसे हे हिरव्या डॉलरचा माज करून वाया घालवू नयेत !! :) असो .. राजे बुआ ... ... एका रात्रीची गोष्ट वगैरे प्रकार बंद करून ... देवाचं घर सारखे नितांत सुंदर लेख प्रसवत चला :) --(सॅन) ॥ होजे ॥ आपली स्टाईल .. आपला बाणा .. पकवतो जो ,, त्याला धरून हाणा ...

In reply to by टारझन

दशानन 31/10/2009 - 15:57
>>असो .. राजे बुआ ... ... एका रात्रीची गोष्ट वगैरे प्रकार बंद करून ... देवाचं घर सारखे नितांत सुंदर लेख प्रसवत चला हो, मित्रा सगळे पालथेधंदे बंद करुन फक्त चांगलेले लेखन करण्याकडेच लक्ष देत आहे, आपण मनापासून सल्ला दिला हे पाहून आनंद झाला. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

प्रभो 24/10/2009 - 14:02
मस्त बे छान लिवलय !!! मनापासून लिहिलय्स ते दिसतय.. :) (ईंजिनियर)प्रभो

संजीव नाईक 24/10/2009 - 16:39
राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा. आपल्या blogspot वर छान आहे. काही तरी नविन वाचायला मिळते त्यातच समाधान. फार छान . फोटो असते तर फार छान झाले असते. GO Head with wish.. Sanjeev Naik http://vastuclass.blogspot.com

In reply to by संजीव नाईक

अवलिया 24/10/2009 - 16:41
राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा. माझा आक्षेप आहे या विधानाला. संजीव नाईक यांना मिपावर अशा विषयांची कदर होत नाही असे काहीसे सुचवायचे आहे काय असे वाटते? कृपया खुलासा करावा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by संजीव नाईक

दशानन 25/10/2009 - 10:29
अपुलकी दाखवल्या बद्दल आभार. माझे लेखन नेहमीच येथे आधी प्रसिध्द होते व बॅकअपसाठी ब्लॉगवर. >>राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा :) येथे कदरवान आहेत खुप. माझ्या लेखाचे. आम्ही एक काय करु असा एक ओळीचा लेख जरी टाकला तरी १०-१२ जणे कदर करुन जातात ह्यातच सर्व काही आलं ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

लवंगी 24/10/2009 - 18:02
मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. केवळ सुरेख.. असच लिहित जा

अवलिया 24/10/2009 - 19:19
राजे आता कुठे वेळ मिळाला लेख वाचायला... सुरेख लेख आहे. साल्या तु आता सिद्धहस्त झालास बुवा... ! मजा आहे ! लिही अजुन असेच छान छान लिही.. ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

राजे, मंदिरांची भटकंती सुरेख झाली आहे. लेखन आणि लेखनाची भाषा तर खूपच ओघवती. भाषेतला गोडवा हे तुमच्या लेखनाचं वैशिष्टे...! अवांतर : तुमच्या हिंदी शब्दांनी यावेळेस फार घुसखोरी केली नाही. >> सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही. क्या बात है ! केवळ सुंदर..!!! =D> -दिलीप बिरुटे

हर्षद आनंदी 31/10/2009 - 10:15
पण अचानक देवाची आठवण कशी काय आली बुवा? हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला... देवगड जवळील "कु़णकेश्वर" हे मंदीर... अगदी समुद्राच्या काठावर आहे. ईथल्या गाभार्‍यात समुद्राच्या लाटांची गाज आजकाल फक्त रात्रीच ऐकायला मिळते, (ह्या शंकराची स्थापना मुस्लीम व्यापार्‍याने केली आहे, अश्या आशयाची कथा आहे) कात्रजला जे श्वेतांबर जैनांचे मंदीर {दुग्गड परीवार}ऊभारले आहे ते निव्वळ अप्रतिम आहे, भेट द्याच एकदा

jaypal 31/10/2009 - 11:09
"सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही." केवळ,केवळ आणि केवळ "अ प्र ति म" चांगले वाचायला दिल्या बद्द्ल धन्यवाद ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

चेतन 31/10/2009 - 12:37
राजे लेख चांगला जमलाय चेतन अवांतरः आधी राजे पाहुन वाटलं राजेंवर चाल अस्त्राचा प्रयोग झालेला दिसतोय ;)

राजे.... मस्तच लेख... ते एका रात्रीची गोष्ट बिष्ट बंद करा आता.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मदनबाण 01/11/2009 - 20:02
मस्त लिहलंय... :) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

साधामाणूस 01/11/2009 - 23:22
छान लेख! या लेखावरून सुमारे २० एक वर्षापूर्वी पाहिलेली गोव्याची मन्दिरे आठवली. गोव्याची मन्दिरे खूपच नीटनेटकी , स्वच्छ व सुबक असतात.

shweta 02/11/2009 - 03:10
लेख वाचुन असे वाटले कि ..... मंदिरात उभे (किंवा बसलेले) आहोत मंदिरांच्या दगडा-दगडा चा अनुभव आला. क्या बात है ! क्या कहने !

धमाल मुलगा 02/11/2009 - 12:42
काय बोलु सायबा? वाचता वाचता आठवणींतल्या एकेक मंदिर, त्यांचा एकेक चिरा नजरेसमोर यायला लागला....मला माहिती नाही मी तुझा लेख वाचला की देवळांच्या आठवणीत रमत गेलो... :) येऊ दे असेच आणखी! अवांतरः ह्यापायी टावाळक्या सोडल्यास तर परत महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही! ;)

दशानन 27/12/2014 - 19:53
ज्या लेखाने माझी ओळख निर्माण केली, त्यावर अनेकांनी मला लिहिण्यासाठी उम्मेद दिली... त्या सर्वांचे आभार! याच विषयातील माझे पहिले पुस्तक २०१५ मध्ये प्रकाशित होत आहे.. पण तुमच्या सर्वांनी दिलेल्या योगदानाचे काय मोल करावे? म्हणून फक्त... आभार व्यक्त करतो!
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

हमारा बिज अभियान

अजुन कच्चाच आहे ·

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.
3

व्यर्थ न हो त्यांचे बलिदान....

प्रसन्न केसकर ·

गणपा 20/10/2009 - 14:52
छान लेख पुनेरी. त्या वीर सुपुत्रांना नम्र आदरांजली.

In reply to by गणपा

प्रभो 20/10/2009 - 17:18
छान लेख प्रसनदा. त्या वीर सुपुत्रांना नम्र आदरांजली. --प्रभो

चेतन 20/10/2009 - 18:05
माझी ही त्यांना आदरांजली चेतन अवांतर: १९ नाही, बहुतेक २० जण होते

दशानन 20/10/2009 - 18:05
माझी ही त्यांना आदरांजली *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

विकास 20/10/2009 - 18:36
माझी पण सर्व शहीद पोलीसांना आदरांजली. ह्या पोलिस स्मृति दिनाची माहीती करून दिल्याबद्दल आभार! पोलीसांच्या भ्रष्टाचाराबद्दल, मग्रुरीबद्दल, गुन्हेगारी जगताशी असलेल्या संगनमताबद्दल वगैरे आपण ऐकत असतोच पण त्यातही असे अनेक असतात जे कर्तव्यपुर्ती करत असतात. २६ नोव्हेंबर हे जसे ठळक उदाहरण या वर्षासाठी आहे, तसेच अनेक पोलीस जे नक्षलवाद्यांच्या मुळे धारातिर्थीपडले ते पण आहे. मात्र या दिनाची ओळख सामान्यांप्रमाणेच पोलीसदलातील बहुतांशी कर्मचार्‍यांना पण करून देण्याची गरज आहे असे वाटते.

In reply to by प्रसन्न केसकर

प्रदीप 20/10/2009 - 19:20
दिल्याबद्दल धन्यवाद. पोलिस दिनाविषयी काहीही माहिती नव्हते, ह्या लेखातून खूप चांगली माहिती समजली. गेल्या नोव्हेंबरात मुंबईवर झालेल्या हल्य्यातही अत्यंत तुटपुंज्या सामग्रीनिशी लढणार्‍या मुंबई पोलिसांनी शौर्याने सामना केला, त्यात त्यातील काही शहीदही झाले. जो एकमेव दहशतवादी पकडला गेला आहे, तोही त्या पोलिसांमुळेच! महाराष्ट्र पोलिसांच्या राहणीमानाविषयी एक खूप चांगला लेख, मला वाटते 'युनिक फीचर्स' ने सिंडिकेट केलेला, काही वषांपूर्वी एका दिवाळी अंकात वाचावयास मिळाला होता. त्यात त्यांचे क्वार्टर्स किती जुनाट आहेत, त्यांचे कामाचे तास व कामाची ठिकाणे, त्यांना रोजच ज्या हालापेष्टांमधून जावे लागते, त्याविषयी उपयुक्त माहिती होती. सर्वसाधारणपणे आपण मध्यम्वर्गीय माणसे पोलिसांवर टिकाच करत असतो. आपण सर्वांनीच कधी ना कधी तरी त्यांच्या मग्रूरीचा व 'खाबूगिरी'चा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला असतो, अथवा त्याविषयी काहीतरी ऐकलेले असते. पण अनेकदा ते ज्या परिस्थितीत काम करत असतात, ते पाहिले की अत्यंत वाईट वाटते. उदा. धारावी ६० फूटी रस्त्यावर माहिम स्टेशनच्या क्रॉसिंगवर वाहतूकीचे नियंत्रण एक पोलिस मधोमध उभा राहून करत असतो. रोज सुमारे ४५ तास तसे केल्यावर त्याच्या शरिरावर काय परिणाम होत असेल? मुंबई- पुण्यातील किती पोलिस हृदयविकाराचे बळी झालेले आहेत? ह्याविषयी कुण्या जाणकाराने अवश्य लिहावे. पुन्हा एकदा: पुनेरी ह्यांच्या आतापर्यंतच्या लौकिकास साजरा असा हा लेख आहे. माहितीपूर्ण व उगाच आक्रस्ताळी नाही. असेच लिहीत रहा.

In reply to by प्रदीप

पुनेरीसाहेबांनी एक ज्वलंत विषय मांडला. त्याला प्रदिपजींचा योग्य प्रतिसाद. १. एकंदर मुंबई व पुण्या सारख्या शहरात पोलीस मरमर काम करताना आपण पहातो. रोज गाडी चालवताना वाहतुक पोलीसांना जेव्हा मी पहातो, तेव्हा त्यांच्या वरील ताणा बद्दल विचार करतो. सर्व वाहन चालकांनी जर वाहतूकीचे नियम कसोशीने पाळले तर पोलिसांवरचा ताण बराच कमी होईल. २. हल्ली सतत येणार्‍या बातम्यां मधे माओवादी, नक्षलवादी आदिंच्या हल्ल्यात पोलीस मरले जात आहेत हे कळते. हे पोलीस मारले जात आहेत ते राजकारण्यांच्या मुर्दाडपणामुळे, ते घाबरट वा पळपुटे आहेत म्हणून नव्हे. आमचे राजकारणी मुठभर अतीरेक्यांना पाठीशी घालताना एका पोलीसाच्या कुटूंबाचा बळी दुर्लक्षीतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण 20/10/2009 - 21:39
माझी पण सर्व शहीद पोलीसांना आदरांजली... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

सुधीर काळे 20/10/2009 - 21:47
शहीद पोलिसांना, त्यातही कसाबला जिवंत पकडून देणारे कै. तुकाराम ओंबळे, धारातीर्थी पडलेले कै. करकरे व इतर पोलिसांना, खास श्रद्धांजली. तिबेटच्या सीमेवर शहीद झालेले पोलीस CRP चे जवान होते. ही संस्था त्यामानाने राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असते. मी मुकुंदमध्ये काम करत असताना CRPच्या कांहीं तुकड्या कंपनीत संपकाळात तैनात होत्या. त्यांची रोजची कावाईत वगैरे पहाण्यासारखी होती. रोज दुपारी जवळ-जवळ तीन तास कवाईत चालायची व त्यांचा कमांडरही त्यांच्या बरोबर कवाईत करायचा. CRP पोलीस दल केंद्रीय असल्यामुळे राज्य सरकाराच्या कक्षेबाहेर असतात व त्यामुळेच राजकारण्यांचे हात त्यांच्यापर्यंत पोचत नाहींत. राजकारण्यांपासून पोलिसांना कसं संरक्षण मिळेल यावर वृत्तपत्रांनी एक भक्कम आघाडी उघडण्याची वळ आलेली आहे असे मला मनापासून वाटते. सुधीर काळे ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

देवदत्त 20/10/2009 - 23:52
माहितीबद्दल धन्यवाद. आता थोड्या वेळापूर्वीच पोलिसखात्याकडून SMS आला. त्यात त्यांनी नायगाव पोलिस मुख्यालयात उद्या सकाळी ७:५० वा. संचालनाला हजर राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे लोकांना आवाहन करावे लागते का असे वाटले होते. पण ह्या दिनाची माहितीच माझ्याप्रमाणेच भरपूर लोकांना नाही त्यामुळे त्यांना असे सांगावे लागते हे कळले आणि स्वतःबद्दलच वाईट वाटले. तेथे जाणे सध्या तरी शक्य नाही. :( त्या ८३३ पोलिसांना माझी आदरांजली व सलाम.

ऋषिकेश 20/10/2009 - 23:46
इतक्या छान माहितीबद्दल अनेक आभार. पुनेरी यांचा लेख म्हणजे अनवट आणि विचार करायला लावणारे काहितरी मिळणार या अपेक्षेची पुर्तता करणारे लेखन. सर्व शहिदांना आदरांजली व त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सलाम ऋषिकेश ------------------

गणपा 20/10/2009 - 14:52
छान लेख पुनेरी. त्या वीर सुपुत्रांना नम्र आदरांजली.

In reply to by गणपा

प्रभो 20/10/2009 - 17:18
छान लेख प्रसनदा. त्या वीर सुपुत्रांना नम्र आदरांजली. --प्रभो

चेतन 20/10/2009 - 18:05
माझी ही त्यांना आदरांजली चेतन अवांतर: १९ नाही, बहुतेक २० जण होते

दशानन 20/10/2009 - 18:05
माझी ही त्यांना आदरांजली *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

विकास 20/10/2009 - 18:36
माझी पण सर्व शहीद पोलीसांना आदरांजली. ह्या पोलिस स्मृति दिनाची माहीती करून दिल्याबद्दल आभार! पोलीसांच्या भ्रष्टाचाराबद्दल, मग्रुरीबद्दल, गुन्हेगारी जगताशी असलेल्या संगनमताबद्दल वगैरे आपण ऐकत असतोच पण त्यातही असे अनेक असतात जे कर्तव्यपुर्ती करत असतात. २६ नोव्हेंबर हे जसे ठळक उदाहरण या वर्षासाठी आहे, तसेच अनेक पोलीस जे नक्षलवाद्यांच्या मुळे धारातिर्थीपडले ते पण आहे. मात्र या दिनाची ओळख सामान्यांप्रमाणेच पोलीसदलातील बहुतांशी कर्मचार्‍यांना पण करून देण्याची गरज आहे असे वाटते.

In reply to by प्रसन्न केसकर

प्रदीप 20/10/2009 - 19:20
दिल्याबद्दल धन्यवाद. पोलिस दिनाविषयी काहीही माहिती नव्हते, ह्या लेखातून खूप चांगली माहिती समजली. गेल्या नोव्हेंबरात मुंबईवर झालेल्या हल्य्यातही अत्यंत तुटपुंज्या सामग्रीनिशी लढणार्‍या मुंबई पोलिसांनी शौर्याने सामना केला, त्यात त्यातील काही शहीदही झाले. जो एकमेव दहशतवादी पकडला गेला आहे, तोही त्या पोलिसांमुळेच! महाराष्ट्र पोलिसांच्या राहणीमानाविषयी एक खूप चांगला लेख, मला वाटते 'युनिक फीचर्स' ने सिंडिकेट केलेला, काही वषांपूर्वी एका दिवाळी अंकात वाचावयास मिळाला होता. त्यात त्यांचे क्वार्टर्स किती जुनाट आहेत, त्यांचे कामाचे तास व कामाची ठिकाणे, त्यांना रोजच ज्या हालापेष्टांमधून जावे लागते, त्याविषयी उपयुक्त माहिती होती. सर्वसाधारणपणे आपण मध्यम्वर्गीय माणसे पोलिसांवर टिकाच करत असतो. आपण सर्वांनीच कधी ना कधी तरी त्यांच्या मग्रूरीचा व 'खाबूगिरी'चा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला असतो, अथवा त्याविषयी काहीतरी ऐकलेले असते. पण अनेकदा ते ज्या परिस्थितीत काम करत असतात, ते पाहिले की अत्यंत वाईट वाटते. उदा. धारावी ६० फूटी रस्त्यावर माहिम स्टेशनच्या क्रॉसिंगवर वाहतूकीचे नियंत्रण एक पोलिस मधोमध उभा राहून करत असतो. रोज सुमारे ४५ तास तसे केल्यावर त्याच्या शरिरावर काय परिणाम होत असेल? मुंबई- पुण्यातील किती पोलिस हृदयविकाराचे बळी झालेले आहेत? ह्याविषयी कुण्या जाणकाराने अवश्य लिहावे. पुन्हा एकदा: पुनेरी ह्यांच्या आतापर्यंतच्या लौकिकास साजरा असा हा लेख आहे. माहितीपूर्ण व उगाच आक्रस्ताळी नाही. असेच लिहीत रहा.

In reply to by प्रदीप

पुनेरीसाहेबांनी एक ज्वलंत विषय मांडला. त्याला प्रदिपजींचा योग्य प्रतिसाद. १. एकंदर मुंबई व पुण्या सारख्या शहरात पोलीस मरमर काम करताना आपण पहातो. रोज गाडी चालवताना वाहतुक पोलीसांना जेव्हा मी पहातो, तेव्हा त्यांच्या वरील ताणा बद्दल विचार करतो. सर्व वाहन चालकांनी जर वाहतूकीचे नियम कसोशीने पाळले तर पोलिसांवरचा ताण बराच कमी होईल. २. हल्ली सतत येणार्‍या बातम्यां मधे माओवादी, नक्षलवादी आदिंच्या हल्ल्यात पोलीस मरले जात आहेत हे कळते. हे पोलीस मारले जात आहेत ते राजकारण्यांच्या मुर्दाडपणामुळे, ते घाबरट वा पळपुटे आहेत म्हणून नव्हे. आमचे राजकारणी मुठभर अतीरेक्यांना पाठीशी घालताना एका पोलीसाच्या कुटूंबाचा बळी दुर्लक्षीतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण 20/10/2009 - 21:39
माझी पण सर्व शहीद पोलीसांना आदरांजली... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

सुधीर काळे 20/10/2009 - 21:47
शहीद पोलिसांना, त्यातही कसाबला जिवंत पकडून देणारे कै. तुकाराम ओंबळे, धारातीर्थी पडलेले कै. करकरे व इतर पोलिसांना, खास श्रद्धांजली. तिबेटच्या सीमेवर शहीद झालेले पोलीस CRP चे जवान होते. ही संस्था त्यामानाने राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असते. मी मुकुंदमध्ये काम करत असताना CRPच्या कांहीं तुकड्या कंपनीत संपकाळात तैनात होत्या. त्यांची रोजची कावाईत वगैरे पहाण्यासारखी होती. रोज दुपारी जवळ-जवळ तीन तास कवाईत चालायची व त्यांचा कमांडरही त्यांच्या बरोबर कवाईत करायचा. CRP पोलीस दल केंद्रीय असल्यामुळे राज्य सरकाराच्या कक्षेबाहेर असतात व त्यामुळेच राजकारण्यांचे हात त्यांच्यापर्यंत पोचत नाहींत. राजकारण्यांपासून पोलिसांना कसं संरक्षण मिळेल यावर वृत्तपत्रांनी एक भक्कम आघाडी उघडण्याची वळ आलेली आहे असे मला मनापासून वाटते. सुधीर काळे ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

देवदत्त 20/10/2009 - 23:52
माहितीबद्दल धन्यवाद. आता थोड्या वेळापूर्वीच पोलिसखात्याकडून SMS आला. त्यात त्यांनी नायगाव पोलिस मुख्यालयात उद्या सकाळी ७:५० वा. संचालनाला हजर राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे लोकांना आवाहन करावे लागते का असे वाटले होते. पण ह्या दिनाची माहितीच माझ्याप्रमाणेच भरपूर लोकांना नाही त्यामुळे त्यांना असे सांगावे लागते हे कळले आणि स्वतःबद्दलच वाईट वाटले. तेथे जाणे सध्या तरी शक्य नाही. :( त्या ८३३ पोलिसांना माझी आदरांजली व सलाम.

ऋषिकेश 20/10/2009 - 23:46
इतक्या छान माहितीबद्दल अनेक आभार. पुनेरी यांचा लेख म्हणजे अनवट आणि विचार करायला लावणारे काहितरी मिळणार या अपेक्षेची पुर्तता करणारे लेखन. सर्व शहिदांना आदरांजली व त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सलाम ऋषिकेश ------------------
लेखनविषय:
उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो. उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल.

[अनुभव] बॅन्कांचा हलकटपणा

युयुत्सु ·

अवलिया 19/10/2009 - 10:27
तुमचं नशीबच खत्रुड ब्वा. सगळे हलकट लोक तुम्हालाच भेटतात. एकदा कुंडली दाखवुन घ्या जाणकाराला आणि काय शांती वगैरे असेल ती करुन घ्या. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

JAGOMOHANPYARE 19/10/2009 - 11:30
साठी-सत्तरी गाठलेल्या लोकांना नवा खाते क्रमांक बदलायला लावण्यासाठी धावाधाव करायला लावून बॅंकाना काय मिळते हे कळायला मार्ग नाही. >>>>>>>>>>>> साठीखालील लोकाना एक वेगळा नंबर आणि नंतरच्याना एक वेगळा नंबर असे बँकानी करावे की काय? प्रणाली बदलली की सर्वाना बदलावेच लागते... क्रेडीट कार्ड अनुभव... मात्र अगदी सार्वजनिक आहे..... असे अनुभव यायला नकोत, याला अनुमोदन. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

यात ग्राहकाभिमुख होण्यासाठी जशी आंतरजालावर डोमेन नेम सर्विस चालू झाली तशी ग्राहकसुलभ खाते क्रमांक हा कोअर बँकिंग मधील लांबलचक नंबरात रुपांतरीत करणारी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे होईल. बाकी हल्ली ग्राहक सेवेत-करारात अनेक छुपे मुद्दे असतात. सर्व वाचुन सही करायची हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य होत नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पाषाणभेद 20/10/2009 - 09:30
तुमाला त्याच बँकेत जायच आसल तर शेवटले लंबर ३/४ ध्यानात राहू द्या. त्योच खात लंबर र्‍हातूया. पयले सगले लंबर सगळ्यांस्नी सारखे र्‍हात्यात. -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

In reply to by प्रकाश घाटपांडे

पाषाणभेद 20/10/2009 - 09:30
तुमाला त्याच बँकेत जायच आसल तर शेवटले लंबर ३/४ ध्यानात राहू द्या. त्योच खात लंबर र्‍हातूया. पयले सगले लंबर सगळ्यांस्नी सारखे र्‍हात्यात. -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

देवदत्त 19/10/2009 - 11:59
तुम्ही बँकेच्या ग्राहक केंद्रावर फोन करून खात्री करून घ्या. बहुतेक वेळा हे कॉल एजंटकडून असतात. बँक आणि हे एजंट ह्यांना परस्परासंबंधी माहिती विचारल्यास त्यांना ती नसते (ते देत नाहीत असे मला वाटत नाही) माझ्या माहितीप्रमाणे, बँक परस्पर काही गोष्टी करू शकते, पण त्याबाबतचा उल्लेख भरलेल्या अर्जात आहे का हे तपासून पहावे. जर ग्राहकाला अतिरिक्त आर्थिक भार पडत असेल तर त्याची सूचना ग्राहकाला आधी देणे बंधनकारक आहे. शोधल्यानंतर थोडीफार माहिती येथे मिळाली. The card issuing bank/NBFC should not unilaterally upgrade credit cards and enhance credit limits. Prior consent of the borrower should invariably be taken whenever there are any change/s in terms and conditions. बाकी, बँकेच्या प्रश्नाबद्दल मला उत्तर रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावर अजून मिळाली नाही. ग्राहकाच्या बदललेल्या खात्याची माहिती ते देणार नाहीत, अन्यथा ग्राहकाची माहिती दुसर्‍याला दिल्याचा आरोप त्यांच्यावर येऊ शकतो. त्यामुळे असे वाटते की बँका स्वत: सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतील.

In reply to by देवदत्त

युयुत्सु 20/10/2009 - 16:35
महत्त्वाच्या संदर्भाबद्दल आभारी आहे... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

तिमा 19/10/2009 - 13:52
लहानपणापासून मला एका प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. कोणी जाणकार सांगू शकेल ? बेंक मधील मो.कि. अर्धा असे 'नवा वेपार' या खेळात लिहिलेले असायचे. त्याचा अर्थ काय ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

मला असाच अनुभव H.S.B.C बँकेकडुन आला.कंपनीत बँकेचा कुणी एजंट आला होता आणि क्रेडिट कार्ड घेतले तर एक टेबल-क्लॉक मिळणार होते.माझ्यासकट झाडुन सगळ्या कलिग्जनी त्या फुकटात मिळणार्या क्लॉकसाठी क्रेडिट कार्ड साठी अप्लाय केले.वर्षभरानंतरच सगळ्यांना बँकेचे जे स्टेटमेंट आले त्यात बँकेने क्रेडिट-कार्डची वार्षिक फी लावली होती. बँकेच्या कस्टमर केअर वर फोन केल्यानंतर आणि कार्ड कॅन्सल करण्याची धमकी दिल्यानंतर बँकेने ती ड्यु अमाऊंट रिवर्ट केली.पण अजुनही असे पुन्हा होणार नाही ह्याची काडीमात्र खात्री नाही.

अवलिया 19/10/2009 - 10:27
तुमचं नशीबच खत्रुड ब्वा. सगळे हलकट लोक तुम्हालाच भेटतात. एकदा कुंडली दाखवुन घ्या जाणकाराला आणि काय शांती वगैरे असेल ती करुन घ्या. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

JAGOMOHANPYARE 19/10/2009 - 11:30
साठी-सत्तरी गाठलेल्या लोकांना नवा खाते क्रमांक बदलायला लावण्यासाठी धावाधाव करायला लावून बॅंकाना काय मिळते हे कळायला मार्ग नाही. >>>>>>>>>>>> साठीखालील लोकाना एक वेगळा नंबर आणि नंतरच्याना एक वेगळा नंबर असे बँकानी करावे की काय? प्रणाली बदलली की सर्वाना बदलावेच लागते... क्रेडीट कार्ड अनुभव... मात्र अगदी सार्वजनिक आहे..... असे अनुभव यायला नकोत, याला अनुमोदन. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

यात ग्राहकाभिमुख होण्यासाठी जशी आंतरजालावर डोमेन नेम सर्विस चालू झाली तशी ग्राहकसुलभ खाते क्रमांक हा कोअर बँकिंग मधील लांबलचक नंबरात रुपांतरीत करणारी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे होईल. बाकी हल्ली ग्राहक सेवेत-करारात अनेक छुपे मुद्दे असतात. सर्व वाचुन सही करायची हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य होत नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पाषाणभेद 20/10/2009 - 09:30
तुमाला त्याच बँकेत जायच आसल तर शेवटले लंबर ३/४ ध्यानात राहू द्या. त्योच खात लंबर र्‍हातूया. पयले सगले लंबर सगळ्यांस्नी सारखे र्‍हात्यात. -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

In reply to by प्रकाश घाटपांडे

पाषाणभेद 20/10/2009 - 09:30
तुमाला त्याच बँकेत जायच आसल तर शेवटले लंबर ३/४ ध्यानात राहू द्या. त्योच खात लंबर र्‍हातूया. पयले सगले लंबर सगळ्यांस्नी सारखे र्‍हात्यात. -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

देवदत्त 19/10/2009 - 11:59
तुम्ही बँकेच्या ग्राहक केंद्रावर फोन करून खात्री करून घ्या. बहुतेक वेळा हे कॉल एजंटकडून असतात. बँक आणि हे एजंट ह्यांना परस्परासंबंधी माहिती विचारल्यास त्यांना ती नसते (ते देत नाहीत असे मला वाटत नाही) माझ्या माहितीप्रमाणे, बँक परस्पर काही गोष्टी करू शकते, पण त्याबाबतचा उल्लेख भरलेल्या अर्जात आहे का हे तपासून पहावे. जर ग्राहकाला अतिरिक्त आर्थिक भार पडत असेल तर त्याची सूचना ग्राहकाला आधी देणे बंधनकारक आहे. शोधल्यानंतर थोडीफार माहिती येथे मिळाली. The card issuing bank/NBFC should not unilaterally upgrade credit cards and enhance credit limits. Prior consent of the borrower should invariably be taken whenever there are any change/s in terms and conditions. बाकी, बँकेच्या प्रश्नाबद्दल मला उत्तर रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावर अजून मिळाली नाही. ग्राहकाच्या बदललेल्या खात्याची माहिती ते देणार नाहीत, अन्यथा ग्राहकाची माहिती दुसर्‍याला दिल्याचा आरोप त्यांच्यावर येऊ शकतो. त्यामुळे असे वाटते की बँका स्वत: सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतील.

In reply to by देवदत्त

युयुत्सु 20/10/2009 - 16:35
महत्त्वाच्या संदर्भाबद्दल आभारी आहे... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

तिमा 19/10/2009 - 13:52
लहानपणापासून मला एका प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. कोणी जाणकार सांगू शकेल ? बेंक मधील मो.कि. अर्धा असे 'नवा वेपार' या खेळात लिहिलेले असायचे. त्याचा अर्थ काय ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

मला असाच अनुभव H.S.B.C बँकेकडुन आला.कंपनीत बँकेचा कुणी एजंट आला होता आणि क्रेडिट कार्ड घेतले तर एक टेबल-क्लॉक मिळणार होते.माझ्यासकट झाडुन सगळ्या कलिग्जनी त्या फुकटात मिळणार्या क्लॉकसाठी क्रेडिट कार्ड साठी अप्लाय केले.वर्षभरानंतरच सगळ्यांना बँकेचे जे स्टेटमेंट आले त्यात बँकेने क्रेडिट-कार्डची वार्षिक फी लावली होती. बँकेच्या कस्टमर केअर वर फोन केल्यानंतर आणि कार्ड कॅन्सल करण्याची धमकी दिल्यानंतर बँकेने ती ड्यु अमाऊंट रिवर्ट केली.पण अजुनही असे पुन्हा होणार नाही ह्याची काडीमात्र खात्री नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्याकडे Standard Chartered बॅंकेचे क्रेडीट कार्ड आहे. नुकताच मला बॅंकेकडून फोन आला. पलीकडे फोनवरुन बोलणारा सेल्समन, त्याची सगळी कौशल्ये पणाला लावून मला म्हणाला की माझे आतापर्यंतचे रेकॉर्ड बघुन बॅन्केने माझे कार्ड upgrade करायचे ठरवले आहे. त्या कार्डाच्या सुविधा मला एक वर्ष फुकट वापरता येतील. त्याअगोदर माझे सध्याचे कार्ड एक महिन्या नंतर रद्द होईल, इत्यादि. मी टेलिफोनवर खपविण्यात येणा-या कोणत्याही योजनेस कधिही भुलत नाही. वरील संभाषणात मी त्या सेल्समनला एक प्रश्न परत परत विचारला - या नव्या कार्डाची वार्षिक फी एका वर्षानंतर मला किती द्यावी लागेल.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर ·

हेरंब 18/10/2009 - 11:18
'चित्रलेखा' या जुन्या सिनेमाची गाणी लिहिताना साहिर लुधियानवीने या जगन् मिथ्या वाल्यांना सणसणीत उत्तर दिले होते. 'संसारसे भागे फिरते हो' हे गाणे आठवा! त्यातली प्रत्येक ओळ न् ओळ या भोंदू निराशावादी थिअरीला फटकारणारी आहे. ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे | किंवा हम कहते है ये जग अपना है तुम कहते हो झुटा सपना है हम जनम बिता कर जायेंगे तुम जनम गवां कर जाओगे | मला वाटते, यापेक्षा दुसरे चांगले उत्तर या मंडळींना कोणी दिले नसेल. सध्याच्या जमान्यात असे लिहिले तर लगेच संस्कृतीसंरक्षक येतील दंडा घेऊन!

नंदू 18/10/2009 - 11:21
मूळ लेखाला केवळ एक प्रतिसाद आणि इथे हा पहिलाच असं का व्हावं बाकी पदवी "तीर्थशास्त्रि अशी हवी होती. ;) नंदू

विसोबा खेचर 18/10/2009 - 11:26
ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे |
क्या केहेने! तात्या. -- अरे दाद द्या रे. सारा निसर्ग दाद मागून राहिला आहे यार तुमच्याकडे. पावसाळ्यात आकाशात मेघांचा पखवाज आणि बिजलीचा कथ्थक सुरू होतो, मोर नाचू लागतात? कुणासाठी? तुमच्याआमच्यासाठीच ना? मेंडकीरोडवर बेडकं ओरडतात. ओहोहो, काय खर्ज लागतो एकेका बेडकाचा! असं वाटतं कुठी दशग्रंथी ब्राह्मण वेदपठण करून राहिले आहेत बेटे! (इति काकाजी : नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 22/10/2009 - 19:13
भोग आणि गूढवादाबद्दल गणित कठिण आहे. या गूढ गणितासाठी ही कडवी लागू पडतील असे वाटते. श्रावण मोडक यांच्या "गणित" कवितेत दोन-चार शब्द बदलून अर्थ पूर्णपणे वेगळ्या दिशेला नेला आहे. (माफी असावी.) - - - अनंगाचे अंग - - - नव्या शेजेमध्ये शिरताना प्रेमी स्वतःशीच म्हणाला, "शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध - रती अनंग की अंग?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंकार अंगाकडून अंगाकडे झेपावला... *** वस्त्र कवच उतरवताना शय्येवर पाहिले प्रेम्याने तेव्हा 'अनंगा'तही त्याला अंग-प्रत्यंगच दिसले... दिसणं, आणि असणं या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... फैलावत शक्त-सबल बाहू एकदा मिठीत घेतलं तेव्हा त्याच्याकडंच पाहात ते अंग म्हणालं, "अंग हेच तर अनंग!" - - -

पार्टनर 18/10/2009 - 21:01
याबाबत एक श्लोक सापडला .. जाणकार लोकांनी अजून माहिती द्यावी ! श्रीराम : कस्त्वम ? हनुमान : देहबुद्‍ध्या त्वदासोऽहं जीवबुद्‍ध्या त्वदंशकः। आत्मबुद्‍ध्या त्वमेवाहम् इति मे निश्चिता मतिः॥ संदर्भ : http://kirtimukha.com/surfings/Valmiki/ValmikiRamayanam.htm

युयुत्सु 19/10/2009 - 10:33
तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.
बोद्धमताचे खंडन करताचा ब-याच ठिकाणी खोडसाळपणे misquoting, उचलेगिरी इत्यादी गोष्टी शंकराचार्यांनी आणि अद्वैतवादांच्या समर्थकांनी केल्याचे अनेक विद्वानांकडून ऐकले होते. त्याची यानिमित्ताने आठवण झाली... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

JAGOMOHANPYARE 19/10/2009 - 12:20
चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती..... हाच तो बदल ! बाकी यात त्यांचे चुकले काय, हे मात्र सांगू शकत नाही.... कारण धर्मप्रसार हे देखील एक राजकारणच ! ते सगळेच धर्म खेळत असतात... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

विकास 23/10/2009 - 08:15
चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती..... हे प्रथमच ऐकत आहे म्हणून हा प्रश्नः यासाठी कुठला संदर्भ सुचवू शकाल का? (कृपया ह्या प्रश्नातून गैरसमज करून घेऊ नये. अविश्वास म्हणून नाही, तर मला जर इतरत्र हे वापरायचे असेल तर कुठेतरी संदर्भ असलेले लिखाण माहीती असणे आवश्यक आहे, म्हणून...)

In reply to by विकास

JAGOMOHANPYARE 25/10/2009 - 12:17
हे बर्‍याच ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल.... चार्वाक वादावरची पुस्तके वाचलीत तर मूळ श्लोक मिळेल.... शंकराचार्यांचा संदर्भ मी अलीकडेच एका पुस्तकात्/कादंबरीत वाचला... को$हं असे नाव आहे, लेखक माहीत नाही, पण पुस्तक छान आहे....... जगभरच्या सगळ्या धर्मांचा एक ओझरता इतिहास कथेची पार्श्वभूमी म्हणून वापरला आहे......... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by विकास

JAGOMOHANPYARE 26/10/2009 - 09:05
नाही, लोन्ढेंची विज्ञानकथा आहे.... ही वेगळी आहे.... नावदेखील सोहं की कोहं आता आठवत नाही.... पण त्यात हा संदर्भ अगदी डिटेलमध्ये आहे........ *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

jaypal 19/10/2009 - 12:44
A buddha-mind is a pure consciousness. It is like a mirror: it simply reflects, it does not project. It has no ideas, no content, no thoughts, no desires, no imagination, no memory. It is present to the everpresent, it lives in the present. And when you are totally in the present, the mind disappears, it loses all its boundaries.------ budha

"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" हे आपल्याला काय कळत नाही. सत्य कशाला म्हणावे आणि मिथ्य कशाला म्हणावे हे काय माझ्यासारख्याला झेपणारं नाही. पण, तुमच्या मित्राला कसंही करुन ज्ञानेश्वरांवर त्यांच्या विचारांवर चर्चा आणायची असते असे वाटते. अर्थात तसे करतात म्हणून आपल्या काय अडचण नाही. फक्त जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. उगाच कशाला शंकाराचार्यांना वेठीस धरायचे, नाही का ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 20/10/2009 - 09:39
पण, तुमच्या मित्राला कसंही करुन ज्ञानेश्वरांवर त्यांच्या विचारांवर चर्चा आणायची असते असे वाटते.
हा हा हा!
अर्थात तसे करतात म्हणून आपल्या काय अडचण नाही. फक्त जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे.
खरं आहे!
उगाच कशाला शंकाराचार्यांना वेठीस धरायचे, नाही का ?
हा हा हा! सर, बरोब्बर ओळखलंत बॉ! : ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, तुमचे मूळ विषयावरील चर्चाकार मित्र [उपक्रमवर]खरड करुन विचारतात की, बिरुटे साहेब "वेठीस धरणे" म्हणजे नक्की काय? मी शंकराचार्यांना वेठीस धरले आहे म्हणजे नेमके काय केले आहे? [ संदर्भ या संस्थळावरील चर्चेचा असल्यामुळे हा खुलासा इथेच] वेठीस धरणे चा अर्थ आहे 'आपले काम करण्यासाठी एखाद्याला भाग पाडणे'. आता इथे शब्दशः अर्थ घेऊ नये. आपल्याला काही सांगायचे आहे, पण कोणाला तरी पुढे करुन ते सांगायचे, या अर्थाने तसे म्हणायचे आहे. आता शंकराचार्यांना वेठीस धरले म्हणजे काय केले आहे. ''जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे. अ़ज्ञानाने ब्रह्माला झाकल्याने हा मिथ्याभास होतो. याला विवर्तवाद असे नाव आहे'' त्यावर ज्ञानेश्वरांचे मत काय आहे, हे सांगण्यासाठी आपला चर्चेचा खटाटोप आहे. खटाटोपाबद्दल माझी काही तक्रार नाही. पण, जे काय सांगायचे ते स्पष्ट सांगायचे. शंकराचार्य त्यांच्या जागी मोठे आहेत आणि ज्ञानेश्वर त्यांच्या जागी मोठे आहेत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे म्हणतात, ज्ञानेश्वरीमधे अनेक ग्रंथातील तत्त्वज्ञानाचे पडसाद दिसून येतात. वेद,उपनिषदे,भगवद्गगीता,शांकरभाष्य,काव्य,नाटक,मीमांसा, इत्यादी. त्यामुळे शंकराचार्यांचे "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या"चुकीचे आणि ज्ञानेश्वरांचे तत्व दोन-पाच अध्यायाचे दाखले देऊन ते कसे बरोबर आहेत हे स्पष्ट होणार नाही. आणि नेमके आपण ते करु पाहात असे वाटते. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वाद प्रसिद्ध आहे, मंडनमिश्र सारख्या विद्वानास वादात ते पुरले नाहीत. आपण तर फार लहान ठरु नाही का ? म्हणून 'वेठीस धरणे' हा शब्दप्रयोग वापरला आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वाद प्रसिद्ध आहे, मंडनमिश्र सारख्या विद्वानास वादात ते पुरले नाहीत. आपण तर फार लहान ठरु नाही का ?
कोण कोणाला वादात पुरलं नाही, मंडनमिश्र का आदी शंकराचार्य? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>कोण कोणाला वादात पुरलं नाही, मंडनमिश्र का आदी शंकराचार्य? आदि शंकराचार्य मंडनमिश्रला भारी पडलेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 25/10/2009 - 21:50
मंडनमिश्रांना वादात पुरुन उरले असे म्हणायचे असावे बिरुटेसाहेब तुम्हाला! (कारण तुमच्या मूळ वाक्याचा अर्थ बरोब्बर उलटा होतोय) चतुरंग

In reply to by चतुरंग

>>मंडनमिश्रांना वादात पुरुन उरले असे म्हणायचे असावे बिरुटेसाहेब तुम्हाला! करेक्ट...! असेच म्हणायचे आहे. चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यू.......! [मुळ चर्चाकाराने प्रतिसाद वाचून अजून एक खरड टाकली आहे, प्रतिसाद थोड्याच वेळात] :) -दिलीप बिरुटे (वेंधळा)

jaypal 19/10/2009 - 20:37
देव साहेब बुद्ध बी फारिन रिटर्न्ड व्हता की काय? याची मला कल्पना नाही. इंग्रजी मधे पोस्ट करण्याच कारण मला गमभन निट वापरता येत नाही. लब्जों को छोड दो. मतलब समजलो. "दया क्षमा आणि शांति" सगळ्यांच मंगल होवो.

विजुभाऊ 20/10/2009 - 11:45
रजनीशानी या असल्या तथाकथीत ब्रम्हचार्यांवर मस्त टीप्पण्णी केली आहे. ते म्हणतात की संसारी माणसाला स्त्री जितक्यावेळा आठवते त्यापेक्षा कैक पटीने अधीक वेळेस ती ब्रम्हचार्याला आठवते. याचे कारण म्हणजे की ब्रम्हचारी एका नैसर्गीक सत्यापासून पळ काढत असतो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सहज 20/10/2009 - 12:08
>मिपाकरांची मतं अपेक्षित... तर्कतीर्थ तात्यास्वामी तुमचे दोस्त जोशीबुवा यांनी खिशाला खार लावून असल्या विषयावर चर्चा करायला स्वतंत्र स्थळ काढून सोय करुन दिली आहे ना. तिकडे टाका. मिपाचे उपक्रम करु नये, ही विनंती. अधीक चर्चा केल्यास महर्षी व्यास पुरस्काराने गौरवण्यात येईल.

In reply to by सहज

अवलिया 20/10/2009 - 12:10
हा हा हा सहजरावांशी सहमत आहे. तात्या, उगाचच विचारवंतांच्या समजुतींच्या मर्यादा उघड करणारे लेख, प्रतिसाद मिपावर नको ब्वा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विनायक 25/10/2009 - 22:27
खरे तर लोकांना सांगायची गरज नाही. तरीपण एक गोष्ट स्पष्ट करतो. ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा. तिथे उत्तर देईन. बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही. विनायक

In reply to by विनायक

>>बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही. माझ्या आठवणी नुसार माझ्या मसं वरील आंतरजालीय कारकिर्दीत मी आपल्याला हा प्रतिसाद लिहीपर्यंत कधीच खरड केलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला खरडी करण्याचा प्रश्नच नाही. उलट आपल्याच खरडी येऊन पडल्या आहेत. >>ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा. मला आपल्याकडून कोणत्याच प्रतिसादाची अपेक्षा नाही आणि आपल्याकडून मला काही समजूनही घ्यायचे नाही. धन्यवाद....!!! -दिलीप बिरुटे

In reply to by विनायक

अवलिया 26/10/2009 - 10:48
बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही. बिरुटे नाही... प्रा.डॉ.बिरुटे... :) मिपावरील सन्माननीय सदस्य आणि संपादक असलेल्या सरांचा "बिरुट्यांनी" असा केलेला उल्लेख खटकला. किमान बिरुटे सर असे म्हणणे गरजेचे होते. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे 28/10/2009 - 21:42
हा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा आहे, मला पेलत नाहीं. म्हणून "नो कॉमेंट्स". सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!

हेरंब 18/10/2009 - 11:18
'चित्रलेखा' या जुन्या सिनेमाची गाणी लिहिताना साहिर लुधियानवीने या जगन् मिथ्या वाल्यांना सणसणीत उत्तर दिले होते. 'संसारसे भागे फिरते हो' हे गाणे आठवा! त्यातली प्रत्येक ओळ न् ओळ या भोंदू निराशावादी थिअरीला फटकारणारी आहे. ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे | किंवा हम कहते है ये जग अपना है तुम कहते हो झुटा सपना है हम जनम बिता कर जायेंगे तुम जनम गवां कर जाओगे | मला वाटते, यापेक्षा दुसरे चांगले उत्तर या मंडळींना कोणी दिले नसेल. सध्याच्या जमान्यात असे लिहिले तर लगेच संस्कृतीसंरक्षक येतील दंडा घेऊन!

नंदू 18/10/2009 - 11:21
मूळ लेखाला केवळ एक प्रतिसाद आणि इथे हा पहिलाच असं का व्हावं बाकी पदवी "तीर्थशास्त्रि अशी हवी होती. ;) नंदू

विसोबा खेचर 18/10/2009 - 11:26
ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे |
क्या केहेने! तात्या. -- अरे दाद द्या रे. सारा निसर्ग दाद मागून राहिला आहे यार तुमच्याकडे. पावसाळ्यात आकाशात मेघांचा पखवाज आणि बिजलीचा कथ्थक सुरू होतो, मोर नाचू लागतात? कुणासाठी? तुमच्याआमच्यासाठीच ना? मेंडकीरोडवर बेडकं ओरडतात. ओहोहो, काय खर्ज लागतो एकेका बेडकाचा! असं वाटतं कुठी दशग्रंथी ब्राह्मण वेदपठण करून राहिले आहेत बेटे! (इति काकाजी : नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 22/10/2009 - 19:13
भोग आणि गूढवादाबद्दल गणित कठिण आहे. या गूढ गणितासाठी ही कडवी लागू पडतील असे वाटते. श्रावण मोडक यांच्या "गणित" कवितेत दोन-चार शब्द बदलून अर्थ पूर्णपणे वेगळ्या दिशेला नेला आहे. (माफी असावी.) - - - अनंगाचे अंग - - - नव्या शेजेमध्ये शिरताना प्रेमी स्वतःशीच म्हणाला, "शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध - रती अनंग की अंग?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंकार अंगाकडून अंगाकडे झेपावला... *** वस्त्र कवच उतरवताना शय्येवर पाहिले प्रेम्याने तेव्हा 'अनंगा'तही त्याला अंग-प्रत्यंगच दिसले... दिसणं, आणि असणं या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... फैलावत शक्त-सबल बाहू एकदा मिठीत घेतलं तेव्हा त्याच्याकडंच पाहात ते अंग म्हणालं, "अंग हेच तर अनंग!" - - -

पार्टनर 18/10/2009 - 21:01
याबाबत एक श्लोक सापडला .. जाणकार लोकांनी अजून माहिती द्यावी ! श्रीराम : कस्त्वम ? हनुमान : देहबुद्‍ध्या त्वदासोऽहं जीवबुद्‍ध्या त्वदंशकः। आत्मबुद्‍ध्या त्वमेवाहम् इति मे निश्चिता मतिः॥ संदर्भ : http://kirtimukha.com/surfings/Valmiki/ValmikiRamayanam.htm

युयुत्सु 19/10/2009 - 10:33
तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.
बोद्धमताचे खंडन करताचा ब-याच ठिकाणी खोडसाळपणे misquoting, उचलेगिरी इत्यादी गोष्टी शंकराचार्यांनी आणि अद्वैतवादांच्या समर्थकांनी केल्याचे अनेक विद्वानांकडून ऐकले होते. त्याची यानिमित्ताने आठवण झाली... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

JAGOMOHANPYARE 19/10/2009 - 12:20
चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती..... हाच तो बदल ! बाकी यात त्यांचे चुकले काय, हे मात्र सांगू शकत नाही.... कारण धर्मप्रसार हे देखील एक राजकारणच ! ते सगळेच धर्म खेळत असतात... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

विकास 23/10/2009 - 08:15
चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती..... हे प्रथमच ऐकत आहे म्हणून हा प्रश्नः यासाठी कुठला संदर्भ सुचवू शकाल का? (कृपया ह्या प्रश्नातून गैरसमज करून घेऊ नये. अविश्वास म्हणून नाही, तर मला जर इतरत्र हे वापरायचे असेल तर कुठेतरी संदर्भ असलेले लिखाण माहीती असणे आवश्यक आहे, म्हणून...)

In reply to by विकास

JAGOMOHANPYARE 25/10/2009 - 12:17
हे बर्‍याच ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल.... चार्वाक वादावरची पुस्तके वाचलीत तर मूळ श्लोक मिळेल.... शंकराचार्यांचा संदर्भ मी अलीकडेच एका पुस्तकात्/कादंबरीत वाचला... को$हं असे नाव आहे, लेखक माहीत नाही, पण पुस्तक छान आहे....... जगभरच्या सगळ्या धर्मांचा एक ओझरता इतिहास कथेची पार्श्वभूमी म्हणून वापरला आहे......... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by विकास

JAGOMOHANPYARE 26/10/2009 - 09:05
नाही, लोन्ढेंची विज्ञानकथा आहे.... ही वेगळी आहे.... नावदेखील सोहं की कोहं आता आठवत नाही.... पण त्यात हा संदर्भ अगदी डिटेलमध्ये आहे........ *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

jaypal 19/10/2009 - 12:44
A buddha-mind is a pure consciousness. It is like a mirror: it simply reflects, it does not project. It has no ideas, no content, no thoughts, no desires, no imagination, no memory. It is present to the everpresent, it lives in the present. And when you are totally in the present, the mind disappears, it loses all its boundaries.------ budha

"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" हे आपल्याला काय कळत नाही. सत्य कशाला म्हणावे आणि मिथ्य कशाला म्हणावे हे काय माझ्यासारख्याला झेपणारं नाही. पण, तुमच्या मित्राला कसंही करुन ज्ञानेश्वरांवर त्यांच्या विचारांवर चर्चा आणायची असते असे वाटते. अर्थात तसे करतात म्हणून आपल्या काय अडचण नाही. फक्त जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. उगाच कशाला शंकाराचार्यांना वेठीस धरायचे, नाही का ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 20/10/2009 - 09:39
पण, तुमच्या मित्राला कसंही करुन ज्ञानेश्वरांवर त्यांच्या विचारांवर चर्चा आणायची असते असे वाटते.
हा हा हा!
अर्थात तसे करतात म्हणून आपल्या काय अडचण नाही. फक्त जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे.
खरं आहे!
उगाच कशाला शंकाराचार्यांना वेठीस धरायचे, नाही का ?
हा हा हा! सर, बरोब्बर ओळखलंत बॉ! : ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, तुमचे मूळ विषयावरील चर्चाकार मित्र [उपक्रमवर]खरड करुन विचारतात की, बिरुटे साहेब "वेठीस धरणे" म्हणजे नक्की काय? मी शंकराचार्यांना वेठीस धरले आहे म्हणजे नेमके काय केले आहे? [ संदर्भ या संस्थळावरील चर्चेचा असल्यामुळे हा खुलासा इथेच] वेठीस धरणे चा अर्थ आहे 'आपले काम करण्यासाठी एखाद्याला भाग पाडणे'. आता इथे शब्दशः अर्थ घेऊ नये. आपल्याला काही सांगायचे आहे, पण कोणाला तरी पुढे करुन ते सांगायचे, या अर्थाने तसे म्हणायचे आहे. आता शंकराचार्यांना वेठीस धरले म्हणजे काय केले आहे. ''जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे. अ़ज्ञानाने ब्रह्माला झाकल्याने हा मिथ्याभास होतो. याला विवर्तवाद असे नाव आहे'' त्यावर ज्ञानेश्वरांचे मत काय आहे, हे सांगण्यासाठी आपला चर्चेचा खटाटोप आहे. खटाटोपाबद्दल माझी काही तक्रार नाही. पण, जे काय सांगायचे ते स्पष्ट सांगायचे. शंकराचार्य त्यांच्या जागी मोठे आहेत आणि ज्ञानेश्वर त्यांच्या जागी मोठे आहेत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे म्हणतात, ज्ञानेश्वरीमधे अनेक ग्रंथातील तत्त्वज्ञानाचे पडसाद दिसून येतात. वेद,उपनिषदे,भगवद्गगीता,शांकरभाष्य,काव्य,नाटक,मीमांसा, इत्यादी. त्यामुळे शंकराचार्यांचे "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या"चुकीचे आणि ज्ञानेश्वरांचे तत्व दोन-पाच अध्यायाचे दाखले देऊन ते कसे बरोबर आहेत हे स्पष्ट होणार नाही. आणि नेमके आपण ते करु पाहात असे वाटते. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वाद प्रसिद्ध आहे, मंडनमिश्र सारख्या विद्वानास वादात ते पुरले नाहीत. आपण तर फार लहान ठरु नाही का ? म्हणून 'वेठीस धरणे' हा शब्दप्रयोग वापरला आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वाद प्रसिद्ध आहे, मंडनमिश्र सारख्या विद्वानास वादात ते पुरले नाहीत. आपण तर फार लहान ठरु नाही का ?
कोण कोणाला वादात पुरलं नाही, मंडनमिश्र का आदी शंकराचार्य? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>कोण कोणाला वादात पुरलं नाही, मंडनमिश्र का आदी शंकराचार्य? आदि शंकराचार्य मंडनमिश्रला भारी पडलेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 25/10/2009 - 21:50
मंडनमिश्रांना वादात पुरुन उरले असे म्हणायचे असावे बिरुटेसाहेब तुम्हाला! (कारण तुमच्या मूळ वाक्याचा अर्थ बरोब्बर उलटा होतोय) चतुरंग

In reply to by चतुरंग

>>मंडनमिश्रांना वादात पुरुन उरले असे म्हणायचे असावे बिरुटेसाहेब तुम्हाला! करेक्ट...! असेच म्हणायचे आहे. चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यू.......! [मुळ चर्चाकाराने प्रतिसाद वाचून अजून एक खरड टाकली आहे, प्रतिसाद थोड्याच वेळात] :) -दिलीप बिरुटे (वेंधळा)

jaypal 19/10/2009 - 20:37
देव साहेब बुद्ध बी फारिन रिटर्न्ड व्हता की काय? याची मला कल्पना नाही. इंग्रजी मधे पोस्ट करण्याच कारण मला गमभन निट वापरता येत नाही. लब्जों को छोड दो. मतलब समजलो. "दया क्षमा आणि शांति" सगळ्यांच मंगल होवो.

विजुभाऊ 20/10/2009 - 11:45
रजनीशानी या असल्या तथाकथीत ब्रम्हचार्यांवर मस्त टीप्पण्णी केली आहे. ते म्हणतात की संसारी माणसाला स्त्री जितक्यावेळा आठवते त्यापेक्षा कैक पटीने अधीक वेळेस ती ब्रम्हचार्याला आठवते. याचे कारण म्हणजे की ब्रम्हचारी एका नैसर्गीक सत्यापासून पळ काढत असतो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सहज 20/10/2009 - 12:08
>मिपाकरांची मतं अपेक्षित... तर्कतीर्थ तात्यास्वामी तुमचे दोस्त जोशीबुवा यांनी खिशाला खार लावून असल्या विषयावर चर्चा करायला स्वतंत्र स्थळ काढून सोय करुन दिली आहे ना. तिकडे टाका. मिपाचे उपक्रम करु नये, ही विनंती. अधीक चर्चा केल्यास महर्षी व्यास पुरस्काराने गौरवण्यात येईल.

In reply to by सहज

अवलिया 20/10/2009 - 12:10
हा हा हा सहजरावांशी सहमत आहे. तात्या, उगाचच विचारवंतांच्या समजुतींच्या मर्यादा उघड करणारे लेख, प्रतिसाद मिपावर नको ब्वा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विनायक 25/10/2009 - 22:27
खरे तर लोकांना सांगायची गरज नाही. तरीपण एक गोष्ट स्पष्ट करतो. ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा. तिथे उत्तर देईन. बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही. विनायक

In reply to by विनायक

>>बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही. माझ्या आठवणी नुसार माझ्या मसं वरील आंतरजालीय कारकिर्दीत मी आपल्याला हा प्रतिसाद लिहीपर्यंत कधीच खरड केलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला खरडी करण्याचा प्रश्नच नाही. उलट आपल्याच खरडी येऊन पडल्या आहेत. >>ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा. मला आपल्याकडून कोणत्याच प्रतिसादाची अपेक्षा नाही आणि आपल्याकडून मला काही समजूनही घ्यायचे नाही. धन्यवाद....!!! -दिलीप बिरुटे

In reply to by विनायक

अवलिया 26/10/2009 - 10:48
बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही. बिरुटे नाही... प्रा.डॉ.बिरुटे... :) मिपावरील सन्माननीय सदस्य आणि संपादक असलेल्या सरांचा "बिरुट्यांनी" असा केलेला उल्लेख खटकला. किमान बिरुटे सर असे म्हणणे गरजेचे होते. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे 28/10/2009 - 21:42
हा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा आहे, मला पेलत नाहीं. म्हणून "नो कॉमेंट्स". सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.