मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

जयंत कुलकर्णी ·

मदनबाण 04/01/2011 - 16:23
आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. १००% सहमत... आमच्या ठाण्यातले काही राजकारणी दादोजींचे नाव असलेल्या स्टेडियमचे नाव बदला अशी मागणी करु लागले आहेत्...या फोकलिच्यांना ठाण्यातले भिकार रस्ते दिसत नाहीत्...पण त्याच रस्त्यांवर जागो जागी या साहेबांचे पोस्टर मात्र लागलेले दिसतात !!! (ठाण्यातल्या अती भिकार- राजकारणी आणि रस्त्यांना वैतागलेला )

लेखात असा दावा केला आहे:
दादाजी कोंडदेवाच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख ‘सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब’ असा आला आहे. राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजीच्या पत्रातला हा ‘मातुश्री जिजाआऊ साहेबांचा’ उल्लेख हे चोख उत्तर नाही का?
आणि तुम्ही म्हणता आहात की त्याच पत्रामुळे ब्रिगेडच्या अतिरेक्यांनाही चोख उत्तर दिले आहे. जिजाबाई शहाजींची पत्नी होत्या आणि दादोजी शहाजींचे कारभारी होते. त्यामुळे वतनपत्रासारख्या अधिकृत दस्तात दादोजींनी जिजाबाईंचा असा उल्लेख करणं साहजिक वाटतं. पण त्यामुळे चोख उत्तर कुणाला आणि कसं मिळतं ते कळलं नाही.

धमाल मुलगा 04/01/2011 - 17:54
जयंतराव, बलकवड्यांनीही शेवटी एक सुत्र अवलंबलं, 'गाढवापुढं गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता.' जोवर आपापली उखळं पांढरी करुन घेण्यासाठी पुंडाई माजवणार्‍या राजकीय वरदहस्ताचा जोरा आहे तोवर हे असंच चालणार. काय बोलायचं?

प्रियाली 04/01/2011 - 19:10
ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे.
ब्रिगेडचे अतिरेकी जेम्स लेन सोबत होते का? असे असेल तर भांडारकर संस्थेची नासधूस का बरे केली?

आम्हाघरीधन 04/01/2011 - 20:58
हे बलकावडे तेच ना ज्यांनी पुण्यात २४ एप्रिल २००६ ला मराठा विकास मंचाने आयोजित केलेल्या 'दादोजी कोंडदेव कोण होते?' या खुल्या चर्चा सत्रातुन पळ काढला होता........ त्यावेळी संधी असुनही त्यांनी पळ काढला तेंव्हा त्यांचे म्हणने आज किती मनावर घ्यायचे हे वाचकांनीच ठरवावे.. असो. जयवंत राव आपण चालु ठेवा....

In reply to by धमाल मुलगा

अर्धवटराव 04/01/2011 - 22:47
धमु, तुमच्या "का" ला उत्तर नाहि. कारण दादोजींवरचा आक्षेप हा कुठल्याही गैरसमजातुन किंवा सत्यशोधनातुन आलेला नसुन जातीआधारीत गलिच्छ राजकारणातुन आलेला आहे. दगडावर डोकं आपटुन घ्यायला कोण शहाणा या लोकांच्या सभेला जाईल?? (वेडा) अर्धवटराव

In reply to by आम्हाघरीधन

अर्धवटराव 04/01/2011 - 22:51
बलकावड्यांनी पळ (??) का काढला हे शोधुन काढता येईल हो... पण त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर तुमचं मत काय ? अर्थात ते तुम्ही मनावर घेणार नाहिच हे तुम्ही अगोदरच सांगीतल आहे म्हणा. आणि मनावन न घेण्याचं कारणही सांगीतल आहे... "मनाचा भाव" चालायचच. अर्धवटराव

In reply to by आम्हाघरीधन

मृगनयनी 05/01/2011 - 13:40
'मराठा महासंघा'ने सम्भाजी ब्रिगेड्'च्या- (उर्फ काँ. आणि रा.वा. काँ' च्या पा__ल्या _त्र्या च्या) पळपुट्या धोरणाचे जाहीरपणे वाभाडे काढून रातोरात शिवगुरु= दादोजींचा पुतळा हलवण्याच्या हलकट कृतीचा धिक्कार केलेला आहे.... याबद्दल कुणाला काय बरे वाटते? :-?

अवतार 05/01/2011 - 01:43
शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आदिलशाहमधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष् ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी) १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते. वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही. ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत (जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत) बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत.  दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे.  आता दादोजींचा हात का तोडला गेला याबद्दल:  सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वत: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.ऐतिहासिक निवाड्यांवरुन हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळली आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे. आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे किती मनोविक्रुत असतील हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

In reply to by अवतार

मैत्र 05/01/2011 - 12:08
१. ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. --> आजवर कुठेही ब्रिगेड / डॉ. जयसिंगराव पवार आणि इतर लोक जसे बेडेकर किंवा बलकवडे यांनी दादोजींचा मृत्यू ही आत्महत्या होती असा उल्लेख केलेला वाचलेला नाही. याचा संदर्भ समजू शकेल काय.. २. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५) -- दादोजींचा हात प्रत्यक्ष कोणी तोडला होता असा कुठेही उल्लेख आलेला नाही. याचाही संदर्भ मिळू शकेल काय... ३. शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष् ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत (जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत) बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. --> यातून दोन गोष्टी स्पष्ट आहेत की त्यांच्या कामावर आणि निष्ठेवर शहाजी राजे, जिजाऊ आणि शिवाजी या सर्वांचा मोठा भरवसा होता. नाही तर त्यांना सुभेदारी आणि जहागिरीची जबाबदारी दिलीच नसती. आणि जिजाऊ आणि लहान शिवाजी यांना बंगळूराहून इतक्या लांब पुण्याला पाठवले नसते. तसेच शेवटपर्यंत ते चाकरी करीत होते. म्हणजे त्यांचे इमान / स्वामिनिष्ठा याबद्दल दुमत नाही. दुसरी गोष्ट बलकवडे यांनी अनेक संदर्भ दिले आहेत जे हेच सिद्ध करतात. (अजूनही ते गुरू होते यावर आलेलो नाही. पण हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. की हा मनुष्य कृतघ्न अथवा कारस्थानी होता असे त्यांना अजिबात न मानणार्‍यांनीही म्हटलेले नाही.) ३. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते. --> धर्म निरपेक्षतेचा प्रश्नच नव्हता. अवघा महाराष्ट्र -शहाजी / मालोजी / लखूजी आणि पूर्वज हे निजाम / आदिलशहा इ. च्या चाकरीत पिढ्यन पिढ्या होते. आपल्या जहागिरीत पठाण तुकड्या आणि इतर खान सुभेदारांबरोबर एकत्र एका शाहीची चाकरी वतनदारी ही काही वेगळी गोष्ट नव्हती. मग यात पहिला संस्कार घडला असं कसं म्हणता येईल. बंगळूरास काय सगळे मराठा सुभेदार / शिलेदार होते काय? दुसरं गोमाजी नाईक पान संबळ हे मोठं नाव आहे. ते शिवनेरीला कधी होते? त्यांनी नंतरही स्वराज्यात काम केलं आहे असे उल्लेख आहेत. -- मग शिवाजी महाराज त्यांच्या कडून शिवनेरीला कधी शिकले. आणी शिवनेरीला ते शहाजींच्या संबंधांमुळे त्या किल्लेदाराकडे राहिले. तिथे लखुजींनी गोमाजींना कधी पाठवलं याचा काय संदर्भ आहे. ४. वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही. ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. --> पुण्यात राजे काहीच शिकले नाहीत काय? म्हणजे महाराजांनी बंगळूर आणि शिवनेरी ला राहून सर्व परिस्थीती समजावून घेतली आणि राज्य स्थापन करायचं ठरवलं असा अर्थ काढला जातो आहे. बाजी पासलकर किंवा इतर जे लढवय्ये महाराजांना शिकवण्यासाठी नेमण्यात आले ते शहाजीराजांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती - जे त्यांचे काही नाही म्हटलं तर चक्क काम होतं त्या दादोजींनी नेमले नाहीत तर पुण्यात येऊन दुसर्‍या कोणी केलं काय? दादोजी वृद्ध होते. त्यांनी स्वतः राजांना तलवार चालवायला शिकवलं असेल असा कुठे उल्लेखही नाही. त्यामुळे तसा दावा फोल असण्यासाठी मुळात तसा कोणी दावाच केलेला नसावा. दुसरं न्यायदान, सुभ्याचा कारभार, देशमुखांची कामं, इ. सदरेवरच्या गोष्टी महाराज तेव्हा असलेल्या सुभेदार किंवा योग्य शब्द कारभार्‍यांकडून शिकले नसतील तर अजून कोणाकडून शिकले. --> ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. दादोजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे प्रेरक होते असं कुठेही कोणी म्हटल्याचं ऐकिवात नाही. इतिहासाच्या पुस्तकात नव्हतं. मग हा कोणाचा दावा निकालात काढला आहे. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वत: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.ऐतिहासिक निवाड्यांवरुन हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळली आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे. --> हा नवीन संदर्भ आहे आणि ब्रिगेडच्या आरोपात किंवा बलकवडे आणि इतर इतिहास संशोधकांबरोबर असलेल्या वादात आलेला दिसत नाही. जर आधीच आला असेल तर क्षमस्व. पण संदर्भ द्यावा ही विनंती. कारण हा प्रचंड गंभीर आरोप आहे. आणि त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्वामिनिष्ठेवर मोठा डाग आहे. मग बलकवडे यांनी दिलेले सगळे संदर्भ आणि शाहू महाराजांनी केलेला गौरव पूर्ण उल्लेख चूक आहे. आणि खुद्द डॉ. जयसिंगराव पवार यांचंही लिखाण चुकीचं आहे असा अर्थ ध्वनित होतो आहे. आपण मिपावर प्रथमच अतिशय उत्तम ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत (अशी माहितीपूर्ण उत्तरं आत्तापर्यंत कोणीच दिलेली नाहीत. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण संदर्भ वर्षानुवर्ष दिले नाहीत) त्यामुळे माझ्यासारख्या इतिहासप्रेमी पण इतके तपशिलवार खुलासे / साल/ बखरी / जेधे शकावली इ. चा अभ्यास नसलेल्यांना तुमच्या उत्तरातून खूप माहिती मिळू शकेल. एकूणात वरील संदर्भांचा आणि प्रश्नांचा खुलास मिळाल्यास सर्व मिपाकरांना अतिशय मोलाचे ठरेल.

In reply to by अवतार

योगप्रभू 05/01/2011 - 14:06
अवतार महोदयांची ही वरील पोस्ट म्हणजे संजय सोनवणी यांची ब्लॉगपोस्ट ढापून जशीच्या तशी येथे चिकटवली आहे. निदान तसा संदर्भ तरी द्यायचा.

अर्धवटराव 05/01/2011 - 07:14
बलकवड्यांनी जे संदर्भ दिलेत ते विकृत मनोवृत्तीचे म्हणावे काय ?? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

शिल्पा ब 05/01/2011 - 07:54
दगडावर डोकं आपटुन घ्यायला कोण शहाणा या लोकांच्या सभेला जाईल?? तुम्हीच वर लिहिलंय ना हे? तरीही!!! शेवटी ज्याची त्याची समज...ज्याचे त्याचे संस्कार वगैरे वगैरे...कोणत्याही प्रकारची ताकद जवळ नसेल तर जाऊ द्या..

In reply to by शिल्पा ब

नितिन थत्ते 05/01/2011 - 08:34
>>.कोणत्याही प्रकारची ताकद जवळ नसेल तर जाऊ द्या.. जात्युच्छेदनाच्या कामात गुंतले असताना सावरकरांना ऐकायला मिळालेल्या "आत्ता पेशवाई असती तर....." या वाक्याची आठवण झाली.

In reply to by अवलिया

नितिन थत्ते 05/01/2011 - 11:51
इकडे इतके सावरकरभक्त आहेत की वरील संदर्भ लगेच कळेल असे वाटले होते. पण सावरकरभक्त सावरकरांचे लिखाण वाचत नसावेत म्हणून..... सावरकर रत्नागिरीत असताना रूढीभंजनाचे कार्य करीत होते. तेव्हा ते हिंदुधर्मातील अनिष्ट रूढींवर टीका करीत असत. त्यावेळच्या सनातन्यांनी "आज जर पेशवाई असती तर (सावरकरांना) हत्तीच्या पायी तुडवले असते" असे विधान केले होते. शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 05/01/2011 - 12:53
>>>>इकडे इतके सावरकरभक्त आहेत की वरील संदर्भ लगेच कळेल असे वाटले होते. पण सावरकरभक्त सावरकरांचे लिखाण वाचत नसावेत म्हणून..... छे छे तुमच्यासारखे हुशार आणि अभ्यासु मंडळी असतांना आम्ही फक्त आरती ओवाळण्याचे काम करतो. तुम्ही बरोबर हवे ते संदर्भ, हवे तसे ,हवे तेव्हा देतातच त्यामुळे काळजी नसते. असो >>>>सावरकर रत्नागिरीत असताना रूढीभंजनाचे कार्य करीत होते. तेव्हा ते हिंदुधर्मातील अनिष्ट रूढींवर टीका करीत असत. त्यावेळच्या सनातन्यांनी "आज जर पेशवाई असती तर (सावरकरांना) हत्तीच्या पायी तुडवले असते" असे विधान केले होते. जात्युच्छेदनाच्या कामात गुंतले असताना सावरकरांना ऐकायला मिळालेल्या "आत्ता पेशवाई असती तर....." या वाक्याची आठवण झाली. इथे तुम्ही तुमच्या प्रतिसादातील वाक्य उपमा रुपाने वापरले आहे. उपमे मधे साधर्म्य अपेक्षित असते असे काहीसे वाटते. तुमच्या वाक्याचा उत्तरार्ध वरिल प्रतिसादकाच्या मनातील भावना आणि तथाकथित विधानातील भावना यांचा एकमेकांवर आरोप होत साधर्म्य असल्याचे आपण प्रतिपादन करत आहात. याचाच अर्थ तुमचे वाक्य अर्थगर्भ आणि परिपुर्ण होण्यासाठी, कारण तुम्ही निरर्थक आणि अनावश्यक लिहित नाही असा तुमचा गौरव असल्याने, तुमच्या वाक्यातील पुर्वार्ध ज्यामधे तुम्ही सावरकरांचे जातीभेद उच्छेदन करण्याचे कार्य आणि वरिल प्रतिसाद ज्या भावनेतुन आला आहे त्या प्रतिसादाचे मूळ कारण असलेले काही राजकारणी आणि जातीवर आधारीत भेद करत समाजात दुही माजवण्याचे कार्य करणारे काही ब्रिगेडी कार्यकर्ते, नेते यांचे मुल्यमापन एकाच स्तरावर करत असुन ते समान आहेत असेच तुमचे म्हणणे आहे हे तुम्ही उपमा अलंकार वापरला आहे यावरुन सिद्ध होत आहे. मागे तुम्हीच एका राष्ट्रपुरुषाची विटंबना करणारा लेख लिहिला होता आणि संपादक मंडळातील तसेच संपादकांशी जवळीक असलेल्या काही व्यक्तिंनी त्याला टाळ्या वाजवल्या होत्या याची आठवण झाली. >>>>शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली. शिल्पा ब यांनी उत्तर दिले आहे सबब नो कमेंटस.

In reply to by अवलिया

नितिन थत्ते 05/01/2011 - 13:16
१. मी व्यक्त केलेले भावना साधर्म्य आहेच असे शिल्पा ब यांनी मान्य केले आहे त्यामुळे तुमचा हा सगळा प्रतिसादच दुर्लक्षिण्यायोग्य आहे. २. आपण उद्धृत केलेल्या धाग्यावरील माझे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाल्यावर "भांडण संपल्याचे" आपण जाहीर केले होते.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 05/01/2011 - 13:19
>>>१. मी व्यक्त केलेले भावना साधर्म्य आहेच असे शिल्पा ब यांनी मान्य केले आहे त्यामुळे तुमचा हा सगळा प्रतिसादच दुर्लक्षिण्यायोग्य आहे. जरुर दुर्लक्ष करा. >>>>२. आपण उद्धृत केलेल्या धाग्यावरील माझे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाल्यावर "भांडण संपल्याचे" आपण जाहीर केले होते. भांडण संपले असले तरी त्याची आठवण आम्हाला येऊ नये असा नियम नाही. जशी तुम्हाला आठवण आली तशी आम्हाला पण आली. असो.

In reply to by अवलिया

शिल्पा ब 06/01/2011 - 07:58
>>>>शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली. शिल्पा ब यांनी उत्तर दिले आहे सबब नो कमेंटस. याविषयी मी इतका विचार केलाच नव्हता त्यामुळेच मी चुकीचा प्रतिसाद दिला...चूक माझीच आहे. तुमच्या मताशी सहमत आहे.

In reply to by नितिन थत्ते

विकास 06/01/2011 - 07:59
नितीनरावांचे एकंदरीत या वर्तमानासंदर्भात आणि विषयासंदर्भात काय मत आहे? संभाजी ब्रिगेड ज्या पद्धतीने आवाज करत आहे, ज्या पद्धतीने त्यांनी भांडारकर इन्स्टीट्यूटमधे गोंधळ घातला असे म्हणले जाते ते आपल्याला योग्य वाटते का?

In reply to by विकास

नितिन थत्ते 06/01/2011 - 12:40
मागील वर्षी "पोटतिडिकीने लिहिलेले पत्र" या (आता उडालेल्या) याच विषयावरच्या धाग्यात मत व्यक्त केले होते. असो. बलकवडेंच्या मोठ्ठ्या लेखात ९१ कलमी बखरीतले एकच वाक्य दादोजी गुरू असल्याचे सूचीत करते. इतर सर्व फाफटपसारा शिवाजी महाराजांना दादोजीविषयी आदर असल्याविषयी आहे.

In reply to by नितिन थत्ते

मैत्र 06/01/2011 - 13:02
इतर सर्व माहिती हा फाफट पसारा आहे या विधानाचं कारणही देणं सयुक्तिक ठरेल. श्रीमंत महाराज भोसले त्यांची बखर, म्हणजेच शेडगावकर भोसले बखर, या बखरीतही शाहजी राजांची जहागीर भरभराटीस आणण्याकरिता दादाजीने केलेल्या व्यवस्थेचे तपशीलवार वर्णन केले आहे. आणि शेवटी ‘‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यांस तयार केले’’ असे म्हटले आहे. शिवादिग्विजय बखरीतदेखील ‘‘शिवाजी महाराज पुणे प्रांती राहून दादाजीपंती विद्याभ्यास करविला; मल्लयुद्ध, शस्त्रयुद्ध करावयाच्या गती शिकविल्या’’ असे म्हटले आहे. -> वरील दोन संदर्भ आपल्या नजरेतून अनवधानाने सुटले असावेत. तसेच यानंतर असे वाक्य त्या लेखात आहे--> येथवर दादाजीपंताच्या कामगिरीविषयीचे पुरावे काय आहेत ते संक्षेपाने सांगितले. आता या व इतर पुराव्यांवरून नामवंत इतिहासकारांनी काय निष्कर्ष काढले आहेत ते थोडक्यात सांगतो. म्हणजे फक्त सगळे संदर्भ दादोजी हे गुरू होते याचेच असण्याचं कारण नाही आणि तसा दावाही नाही. मग हा फाफट पसारा आहे या विधानाचा आधार किंवा Assumption काय ? म्हणून, पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित अशीच आहे. --> हे वाक्य शेवटी ज्या पद्धतीने मांडले आहे त्यावर ते लेखाचे conclusion वाटते. मग या वाक्याला अनुसरून इतर माहिती आहे असे तुम्हाला वाटत नाही का? आणि का?

In reply to by मैत्र

नितिन थत्ते 06/01/2011 - 13:16
ओक्के मुळात वादाची सुरुवात दादोजी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नाही याने झाली होती म्हणून मी त्याच दृष्टीने बलकवडेंचा (जो जुना आहे) लेख वाचला. दादोजींची व्यवस्थापकीय कामगिरी उत्तमच असावी. त्यामुळे "सोन्याचा नांगर --- पुतळा" काढण्याची गरज नाही. तो काढला गेला ही चूकच झाली असावी.

In reply to by नितिन थत्ते

विकास 06/01/2011 - 17:02
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मात्र माझा प्रश्न त्या प्रश्नावरून झालेल्या हिंसा/दंग्यासंदर्भात होता.

In reply to by शिल्पा ब

मृगनयनी 05/01/2011 - 10:18
सहमत! हा हा हा! दादोजींनी शिवबांस शहाणे केले! परन्तु अजित- दादांना कोण बरे शहाणे करणार? असो! हा न सम्पणारा विषय आहे. तूर्तास पुण्या'चे "जिजापूर" होऊ नये म्हणजे झालं! :) जय परशुराम!

पंगा 06/01/2011 - 08:17
ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे.
ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजी कसे काय बरे उत्तर देऊ शकले? ब्रिगेड आणि दादोजी हे समकालीन होते*, की दादोजी हे चिरंजीव आहेत? * संभाजीमहाराजांच्या नावाने काढलेली ब्रिगेड ही दादोजींच्या समकालीन??? की ब्रिगेडच्या नावातला 'संभाजी' हा वेगळाच कोणीतरी, शिवाजीमहाराजांचा समकालीन किंवा अगोदरचा आहे? (अवांतरः दादोजींच्या 'चोख उत्तरा'वरून आठवले. कॉलेजच्या दिवसांत एक टुकार हिंदी पिच्चर पाहिला होता. पिच्चरचे नाव आता आठवत नाही. ते महत्त्वाचेही नाही. तर पिच्चरमध्ये आमच्या साइडहीरोला बदनाम करण्यासाठी त्याचे त्याच्या मानलेल्या वहिनीशी संबंध आहेत असे व्हिलनमंडळी उगाचच उठवून देतात. आमच्या साइडहीरोला ते खूप लागते. पुढे याच व्हिलनमंडळींकडून आमच्या साइडहीरोचा भर रस्त्यात खून होतो. तर फूटपाथच्या कडेला कोसळून मरता मरता आमचा साइडहीरो आपल्या अंगातून सांडणार्‍या ग्यालनभर रक्ताने शेजारच्या भिंतीवर हाताने मोठ्या अक्षरांत 'भाभी मेरी माँ' असे लिहितो, आणि मग लगेच खास हिंदी पिच्चरच्या पद्धतीस अनुसरून धाड्कन मरून पडतो. असो.)

In reply to by शिल्पा ब

पंगा 06/01/2011 - 10:24
बाकी असले टुकार पिच्चर तुम्ही पाहता हे वाचून डोळे पाणावले (माझेच..)
डोळे आमचेही पाणावायचे. पण काय करणार! कँपसवर जे पिच्चर दाखवायचे ते झक मारत पहावे लागायचे. दुसरा पर्याय नव्हता. मजबूरी का नाम... (नाही म्हणायला दुसरा एक पर्याय होता. कँपसबाहेर गावात एक डब्बा थेटर होते - 'डब्बा'च म्हणायचे त्याला - पण त्यात त्याहूनही रद्दी पिच्चर लागत. आणि कँपसवरच्या पिच्चरमध्ये असला काही सीन आला तर तो नाइलाजाने टॉलरेट केला जायचा - गावातल्या थेटरात आला तर गावकरी थेटरात आनंदाने टाळ्या वगैरे वाजवायचे. आता बोला!)

प्रेषक आम्हाघरीधन दि. मंगळ, 04/01/2011 - 20:58. याना उत्तर - हे बलकावडे तेच ना ज्यांनी पुण्यात २४ एप्रिल २००६ ला मराठा विकास मंचाने आयोजित केलेल्या 'दादोजी कोंडदेव कोण होते?' या खुल्या चर्चा सत्रातुन पळ काढला होता........ त्यावेळी संधी असुनही त्यांनी पळ काढला तेंव्हा त्यांचे म्हणने आज किती मनावर घ्यायचे हे वाचकांनीच ठरवावे.. असो. जयवंत राव आपण चालु ठेवा.... मी स्वत: एकदा संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला गेलो होतो. कारण एकच होते की त्यांचे काही मुद्दे असले तर ते स्वत: ऐकावेत. पण तेथे गेल्यावर उकिरड्यात भुंकणारी कुत्री बरी अशी भाषा ऐकून माझ्यासारखे अनेक श्रोते त्या सभेतून उठून गेले. नशिबाने त्यात अनेक मराठेही होते. अशा सभेत कोणीही शहाणा, ज्याचा मेंदू शाबूत आहे तो जाणार नाही हेच सत्य आहे. श्री बलकवडे तेथे गेले नाहीत हेच बरोबर आहे. आम्ही उठून जात असताना आमची जी खिल्ली उडवण्यात आली त्यावरून मला वरील उपमा सुचली आहे. यात अतिशोयक्ती काहीही नाही. उत्तर अवतार यांना- दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. प्रेषक अवतार दि. बुध, 05/01/2011 - 01:43. १ यावेळी शहाजी मुघलांच्या नोकरीत होता. तेव्हा हा किल्ला शहाजीच्या जहागिरीत होता असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. त्या काळी प्रमूख सरदारानी नोकरी बदलली की त्याचा मुलूख आपोआप त्या नवीन मालकाच्या मुलखात सामील व्हायचा. व त्यातला सगळा कर त्या नवीन मालकाला मिळे. हे दोन प्रकारे शक्य होत असे. एक म्हणजे त्या सरदाराने नोकरी बदलली तर किंवा त्याचा पराभव झाला आणि त्या नवीन मालकाने त्याला सरदारकी देऊ केली तर. पुर्वी छोट्या छोट्या सरदारांकदे सुध्दा दादाजी कोंडदेवांसारखी माणसे असायची. दादाजी कोंडदेव अदिलशाहच्या नोकरीत अप्रत्यक्षरित्या होता कारण शहाजी हा अदिलशहाचा नोकर होता आणि दादाजी शहाजीचा. असेच घडून १६३६ च्या शेवटास शहाजी याचा माहूली येथे पराभव होऊन त्याला अदिलशहाच्या नोकरीत जावे लागले. त्यामुळे त्याच्या मुलखातील त्याची सर्व माणसे ही अदिलशहाची अप्रत्यक्ष नोकरीत गेली. १६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे. “शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....) या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या. २ १६३६ साली शहाजी राजे अदिलशहाचे सरदार बनले नाही तर त्यांचा माहूली येथे अदिलशहाने पराभव केला व त्यांच्या आश्रयास असलेल्या निजामशहास ग्वाल्हेरला तुरुंगात टाकले. त्यांनी काही जॉब बदलला नाही. आता दादोजींच्या तथाकथित आत्महत्येबद्दल. हा उल्लेख जदूनाथ सरकार यांच्या एका लेखात आली आहे ती कशी आली ते बघुयात. एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे. कारण यात असाही उल्लेख आहे की दादोजींच्या मृत्यीनंतर शिवाजीने शहाजीराजांची सर्व मालमत्ता व खजीना जप्त केला. परत हा जो उल्लेख (आत्महत्येचा) २४ व्या कलमात आहे असे म्हटले गेले ते कलमच मुळ बखरीत नाही. ( पारसनीस यांची प्रत). दादोजींच्या मृत्यूचा उल्लेख असलेली तीन अस्सल पत्रे खुद्द शिवाजी महाराजांनीच लिहीली आहेत त्यात काय लिहीले आहे ते बघुयात. १ पहिले पत्र १५ ऑक्टोबर १६४७चे आहे. ते त्यांनी पुणे परगण्यातील कर्हेलपठार तरफेच्या कारकुनास पाठवले आहे. त्यात त्यांनी पुर्वी जे इनाम चालू होते तेच चालू ठेवण्यास सांगितले आहे. त्यात असा उल्लेख आहे “ सालमजकुराकारणे मशहुरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा झाली म्हणऊनू” मशहूर : प्रसिध्द, हजरत : या शब्दाचा अर्थ माधव ज्युलियन यांनी असा दिला आहे “ राजास, पैंगमबरास,अगर श्रेष्ठ व वंद्य पुरूषास या शब्दाने स्वामी या अर्थाने संबोधितात. या वरून शिवाजीमहाराजांच्या मनात या माणसाबद्दल काय भावना होती हे समजते. २ दुसरे पत्र २४ मे १६४७ च्या आसपासचे आहे ते त्यांनी लिहीले आहे पुण्याच्या देशमुखांना पाठवलेले आहे त्यात सुध्दा त्यांनी एका मशिदीचे इनाम तसेच चालू ठेवायला सांगितले आहे. त्यात पण त्यांनी दादोजींचा असाच आदरपुर्वक उल्लेख केलेला आहे. ३ तिसरे महादजीभटाच्या तक्रारी विषयी पुण्याच्या देशमुखांना लिहीतांना त्यांनी म्हटले आहे “हाली मशहूरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यास देवाज्ञा जाली म्हणोन” इ.... जर शिवाजी महाराजांच्या उद्योगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असती तर त्यांचा उल्लेख असा करायची शिवाजी महाराजांना गरज नव्हती हे मला वाटते मान्य असावे. कृपया जेधे शकावलीत व तारीख-इ-शिवाजी यात हे कोठे लिहीले आहे हे सांगावे. तारीख-इ-शिवाजी म्हणजे मुसलमानांनी केलेले एक्याण्णव कलमी बखरीचे फार्सी भाषांतर. त्यात अनेक त्यांच्या फायद्याच्या गोष्टी घुसडलेल्या ! ज्याचे केले त्याचे खरे नाव आहे “ तफ्सील अहवाल अरूज व खुरज राजाहाये व सरदारान दखन” याचा अर्थ दखनच्या राजांचा व सरदारांच्या उत्कर्षाचा व विद्रोहाचा इतिहास” हे सगळे मुळीच विश्वासार्ह नाही. यदुनाथ सरकारांना मराठी, मोडी, अजिबात येते नव्हते हे जगजाहीर आहे. त्यांनी लिहीले ते सगळे ग्रॅंट डफ आणि फार्सी साधनांवरून. त्यावर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. हे म्हणजे नेहरुंनी शिवाजीला चोर आणि लुटेरा म्हटले त्यावर विश्वास ठेवण्यासारखे झाले. खरे तर ते १६४१ पर्यंत बेगलोरला होते. शिवभारतात शिवाजी बेंगलोरास सात वर्षाचा झाला असा उल्लेख आहे. आता हे गोमाजी नाईक पानसंबळ कोण होते हे बघूयात. जिजाबाईंचे लग्न जेव्हा शहाजी महाराजांशी झाले तेव्हा जाधवांनी एका नोकर माणसास जिजाऊंबरोबर दिले. त्याचे नाव होते “ गोमाजी नाईक पानसंबळ जामदार” याचा उल्लेख महाराजांनी अफजलखानाच्या स्वारीत बैठकीच्या वेळी जे हजर होते ( सल्लामसलतीची) त्या लोकांच्यात आहे. जामादार/जामदार म्हणजे कपडे/दागदागिने संभाळणारा. हा एक गडी जाधवांनी जिजाऊंबरोबर दिला होता. जाधवांचे आणि भोसल्यांचे संबंध पहाता शिवाजीला शिकवण्यासाठी जाधव एखादा माणूस देतील आणि भोसले तो त्या कामासाठी स्विकारतील हे असंभवनीय. शिवाय एक पत्रात शिवाजी महाराजांनी या नाईकांना समज दिली असाही उल्लेख आहे तो असा. महाराजांनी हे पत्र मावळच्या देशाअधिकार्याठस पाठवले आहे. पाषाण, तर्फ कर्यात मावल, येथील पाटीलकी गोविंदराव शितोळे, देशमूख, परगणा पुणे यांची आहे. वाडी करंदी येथील कुणबी रणपिसे हा आपल्याला निराळा मजरा करून दिला आहे म्हणून भांडण करतो. तुम्ही त्याच्या सांगण्यावरून शितोळ्यांशी भांडण करता असे त्यांनी आमच्याकडे येऊन विदीत केले आहे. तरी नसती पाटीलकीची नवी भांडणे करावयाची तुला काय गरज आहे ? आम्ही लहानपणापासून या मुलखात आहोत. मिरासदार कोण व गैरमिरासदार कोण हे आम्ही चांगलेच जाणतो आणि माणसाचे माणूस ओळखतो. तू नवा सुभा करायला आला आहेस. तुला हे काही ठाऊक नाही आणि उगाच एकाच्या सांगण्यावरून दुसर्‍याशी भांडण करतोस. हे तुला करायला कोणी सांगितले आहे ? यापुढे नसती मिरासदारांची नवी भांडणे करशील तर आपले केलेले पावशील हे समजून शितोळ्यांशी भांडणे न करावीत. पूर्वी मातुश्री आऊसाहेबांनी करंदी हा वेगळा मजरा करायला सांगितले होते, त्यावेळी आम्ही ते मानले नाही. त्यानंतर गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शितोळ्यांशी तंटा केला. ते वर्तमान आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांस ताकीद केली. आत्तापर्यंत सुरळीत चालू आहे. त्याप्रमाणे आत्ताही शितोळ्यांची पाटीलकी सुरळीत चालवणे. वाडी करंदीचा मजरा केलेला नाही. मातुश्री आऊसाहेबांचे अगर दुसर्‍या कुणाचे पत्र तंट्यामुळे त्याने ( रणपिशाने) नेले असेल त्यावर जाऊ नये. शितोळ्यांशी काही भांडण केलेस तर आम्हाला बोल नाही. ताकिद होईल. जाणिजे.” या पत्रात या गोमाजींना ताकीद दिली असा स्पष्ट उल्लेख आहे. गुरूजींना ताकीद देण्याइतके महाराज उध्दट असावेत किंवा हा त्यांचा गुरू नसावा. दुसर्‍याची शक्यता जास्त वाटते. तसेच हेही लक्षात घेतले पाहिजे की महाराजांनी साक्षात स्वत:च्या आईचे म्हणणे ऐकले नाही व न्याय दिला. त्यात त्यांच्या माहेरचा माणसाने शितोळ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला असताना सुध्दा. पण इतिहासात अशा अनेक नोंदी (जवळ जवळ सगळ्या निकालाबाबत) आहेत की महाराजांनी स्पष्टच सांगितले आहे की दादोजींनी दिलेला निर्णयच पुढे चालवावा. १ १६२९ साली लखूजी जाधवाचा विजापूर दरबारात खून झाल्यावर शहाजी महाराज पुण्यात येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी हा मुकासा कधीही हातचा जाऊ दिला नाही. त्यांना इकडून तिकडे नोकरदारी केली पण हा मुकासा सोडला नाही. त्यांच्या अनेक पत्रात दादाजींचा उल्लेख मायन्यात असा केलेला आढळतो “राजश्री दादाजी कोनदेऊ शुभेदार किले कोंडाणा व परगणा पुणा व माहालानिहाये” दादोजी हा शहाजीने नेमलेला एका किल्ल्याचा सुभेदार होता. अदिलशाहीत व मुघलांच्या दरबारात सुभेदार हे पद फार मोठे होते व सहसा त्यांच्या नातेवाईकातच दिले जायचे. खुद्द शहाजी महाराज सुध्दा कधी सुभेदार झाले असावेत की नाही ही शंकाच आहे. कारण त्यांचा तसा उल्लेख कुठेही नाही. पण ज्या प्रमाणे इंग्लीश सिनेमाची कॉपी हिंदीमधे व हिंदीची मराठीमधे त्या प्रमाणे छोट्या छोट्या परगण्यातसुध्दा पेशवे, सबनीस, सुभेदार असायचे..... अर्थात दादोजींच्या परगण्यातून शहाजीला अदिलशहाला कर द्यावा लागत असणारच तो दादोंजी मार्फतच देत असणार. तो जर अदिलशाचा सुभेदार असता तर त्याला शहाजीच्या आज्ञा पाळायची काही गरज नव्हती. पण तो शहाजीच्या, जिजाऊंच्या व शिवाजीच्या आज्ञा पाळताना दिसतोय. तो नि:संशय शहाजीचाचा सरदार/नोकर होता. दुसरे म्हणजे सर्व कागदपत्रात दादोजींचा उल्लेख हा शहाजींच्या वतनासंबंधीतच येतो. तसे नसते तर इतरही परगण्याबाबत उल्लेख सापडले असते. पहिल्यापासून दादोजी हे शहाजीचे व शिवाजीचे एकनिष्ठ बुध्दिमान सेवक होते. शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता. तुमच्या घरातली वरीष्ठ मंडळी जेव्हा कौतुकाने तुमच्याबद्दल “ हा सारखा बंदूक बंदूक खेळत असतो” अशी तक्रार करतात तेव्हा त्यांना तुम्ही पुढे अतिरेकी देशद्रोही होणार असे म्हणायचे असते का ? इतिहासात अनेक घटनांची तर्कशुध्द संग्ती लावायची असते. ती करताना प्रत्येक गोष्टीचा काटेकोर पुरावा असतोच असे नाही. नाहीतर फालतू व चक्रम प्रश्नही विचारता येतात. हे काही सापडले नाही. कृपया लेख स्कॅन करून द्या, म्हणजे आभ्यास करता येईल. पण दादोजींच्या हाताचा एक उल्लेख एका दंतकथेत आहे. तो असा. ती त्या एक्याण्णव कलमी बखरीतील आहे म्हणून दंतकथा. “दादोजीने शिवापूर येथे शहाजीच्या नावाने एक आमराई लावली होती. त्यातला एक आंबा त्याने तोडला. ही आपली चूक असे समजून तो आपला हात कापायला निघाला. लोकांनी त्याला त्यापासून प्रवृत्त केले. त्याची आठ्वण म्हणून त्याने त्याच्या अंगरख्याची एक बाही लांडी केली. ही हकिकत समजल्यावर शहाजीने समजूत काढण्यासाठी त्याला मानाची वस्त्रे पाठवली व त्यानंतर दादोजीने लांडी बाही वापरायचे सोडून दिले.” इ..... शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे..... अजून काय लिहावे ......................... या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेड्चे प्रवक्ते यांनी टि.व्ही.वर एका मुलाखतीत "एक उल्लेख सोडला तर हे पुस्तक उत्कृष्ट आहे" असा उदगार काढले त्याला काय म्हणावे ? आणि यासाठी इतिहास बदलायला निघालेल्यांना कुठली विकृती आहे.... हे आपल्याला समजले असेलच. या विकृतीचे नाव आहे xxर..... महाराज आत्ता असते तर त्यांनी दादोजींच्या बदनामी केल्याच्या गुन्ह्यासाठी लेन आणि ब्रिगेडच्या शूरविरांचा चौरंग करायची शिक्षा दिली असती हे निश्चित......

In reply to by जयंत कुलकर्णी

अर्धवटराव 10/01/2011 - 22:53
अहो हे कोणाला सांगताय? त्यांना इतिहासाशी काहि घेणे देणे नाहि हो. भविष्यात रंगणार्‍या एका गलिच्छ आणि आत्मघातकी कलगीतुर्‍याची पार्श्व्भूमी तयार करताहेत हे लोक. साला हिंदुंना शापच आहे एकमेकांचे गळे घोटुन परकियांचे खिसे भरण्याचा... (शापित) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

उत्तर जेथे शक्य आहे तेथे द्यायलाच पाहिजेना ! म्हणून एवढा वेळ घालवून हे उत्तर तयार केले. दुसरे म्हणजे मिपावर हेच म्हणणे रहायला नको, आणि पुढे याला कोणी उत्तर दिले नाही म्हणून हे बरोबर आहे असेही कोणाला वाटायला नको. म्हणून हे उत्तर !

In reply to by जयंत कुलकर्णी

योग्य, अभ्यासपूर्ण आणि खणखणीत उत्तर. ते देण्यामागची भूमिका स्पष्ट केलीत हे बरे झाले. पण ही आचरट लोकं परत ४-५ ओळीत गलिच्छ आरोप करून मोकळे होतील आणि तुम्हाला परत मोठ्ठा प्रतिसाद लिहावा लागेल. त्यामुळे प्रत्येक आरोपाचे खंडन करू नका. यातील एक सदस्य तर दोन वर्षे जुन्या प्रतिसादाला अजून उत्तर देत नाही आहेत. मुळात समज कमी असेल तर मुद्देसूद उत्तर द्यायला जमणार कसे? पाषाणावर कितीही पाणी ओतले तरी तो मऊ होत नाही. तो प्रयत्न सोडून द्या.

In reply to by जयंत कुलकर्णी

अर्धवटराव 11/01/2011 - 23:32
तुमच्या संयमाया दाद देतो. >>पुढे याला कोणी उत्तर दिले नाही म्हणून हे बरोबर आहे असेही कोणाला वाटायला नको अगदी बरोबर. मी थोडं फ्रस्टेट होउन प्रतीसाद दिला होता. सत्य कोणि ऐको वा न ऐको, सांगणार्‍याने सांगत जावे... अर्धवटराव

In reply to by जयंत कुलकर्णी

विकास 12/01/2011 - 02:00
सहमत. प्रतिसाद आवडला. "त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !" असे वागला नाहीत ते योग्यच झाले. :-) बरीच नवीन माहिती कळली. याच्या विरुद्ध जर कोणी अशीच अभ्यासांती माहिती दिली तर ती देखील वाचायला आवडेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

सुधीर काळे 12/01/2011 - 08:17
जय हो, जयंतराव! Bravo!! तुमच्या इतिहासाच्या आणि बखरीच्या अभ्यासाची खोली पाहून 'म्या पामर' थक्कच झालो!! हे काम असेच नेटाने चालू ठेवा.....

In reply to by जयंत कुलकर्णी

मालोजीराव 16/01/2011 - 00:43
दादोजींचे स्थान थोरल्या महाराजांच्या आयुष्यात नक्कीच ठळक होते,परंतु ते स्थान एका पथदर्शक,गुरु चे होते का...हा नक्कीच सखोल संशोधनाचा विषय आहे.कारण गुरुपद हे अढळस्थानी असतं, आणि याचा उल्लेख हर प्रकारच्या शिवचरित्रात यायला हवा होता, मुख्यत्वे कुठलेही तत्कालीन परदेशी इतिहासकार वा उत्तरेतील महाराजांचे चरित्रकार याचे दाखले देत नाहीत. मेहेंदळेसरांनी सुद्धा यासंदर्भात कोणतेही संदर्भ दिले नाहीत, अजून हजारो कागदपत्रे प्रकाशात यावयाची आहेत.कदाचित त्यात ते गुरु असण्याचे पुरावे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.घाईघाईत निष्कर्षप्रत पोचण्यापेक्षा,तटस्थ राहून अधिक अधिक संशोधन व्हायला हवे.

In reply to by मालोजीराव

अर्धवटराव 16/01/2011 - 02:00
तुम्ही पथदर्शक, गाईड या अर्थाने जर म्हणाल तर दादोजी शिवरायांचे गुरू नसावे. दादोजींनी शिवबाला सिव्हील एडमिनिस्ट्रेशनचे आणि न्यायदानाचे ट्रेनींग दिले असावे. इतर विषयांकरता, शस्त्रविद्येकरता वेगवेगळे ट्रेनर्स कामाला लावले असतील. मुलुखाची, माणसांची आणि तत्कालीन समाज जीवनाची ओळख दादोजींनी शिवबाला करुन दिली असावी. ज्या अर्थाने तुम्ही गुरू म्हणताय त्याअर्थाने शिवाजीचा गुरू ना दादोजी, ना समर्थ रामदासस्वामी, ना तुकाराम वगैरे मंडळी. शिवबाचा गुरू म्हणजे त्याची आई जिजाऊ. इतरांनी शिवाजीला जाणता-कळता झाल्यावर शिकवण दिली असेल, पण जिजाऊनी गर्भावस्थेपासुन शिवबावर संस्कार केले, त्याचा पींड तयार केला, बाल शिवबात जीजाऊने आपली तळमळ ओतली, स्वप्न रुजवले. त्यातून शिवचरित्र घडले असावे. अर्धवटराव

सुधीर काळे 12/01/2011 - 07:55
बलकवडे यांनी लिहिलेला लेख शरदरावांच्या (शरदराव पवार-केंद्रीय मंत्री) कदाचित् वाचनात आलेला नसेल म्हणून मी तो लेख त्यांना त्यांच्या लोकसभेच्या pawars@sansad.nic.in या ई-मेल पत्त्यावर पाठविण्याचा प्रयत्न माझ्या खासगी 'याहू' आयडी वरून तसेच माझ्या कंपनीच्या 'चक्रास्टील.कॉम' आयडीवरून केला पण माझ्या दोन्ही 'आयडी'वरून तो बाउन्स झाला. शरदरावांचा आणखी कुठला आयडी इथे कुणाला माहीत असल्यास कळवावा. कारण त्यांना हे पटणे आवश्यक आहे असे मला वाटते. धन्यवाद

भारी समर्थ 12/01/2011 - 12:40
तुजं माजं पटाना आन् तुज्या वाचून कटाना... काय रे हिकडची झुंबाझुंबी... म्हाराजांवरून येवडे वाद झाले, येवड्या प्रतिक्रिया इकडं झडल्या (हो, झडल्याच!) पण हाती कायबी नाय गवसलं राव... आलिकडच्यांना पलिकडचे कुत्रे वाटायलेत आणि वायशे वर्शा... शेवटी कसंय की, पत्रातून किंवा इतर ऐतिहाशिक दस्तावेजातून जे काही आसतंय ना तेचा अर्थ कोण कसा काडल काय सांगावं? बरं, येकाद्याला समाजलेलाच अर्थ दुसर्‍यानी आगदी तसाच समजून घ्यावा हा त्याचा आट्टहास कशापायी बरं? त्ये काय वादातीतलं निसर्गसत्य हाय वय, की सगळ्यांनी येकाच सुरात म्हणायला? आमी सगळ्यांचं सगळं वाचतो. आणि सोताचा शिवाजी उभा करतो. पण मनात. तो आन् मी, मदी कुणीच न्हाइ. जसा तो मला, तसाच तो दुसर्‍या कुणाला न्हाइ. कारण, आमाला जे काय वादग्रस्त वाटतं हे आमी कुणाला सांगतच न्हाइ. हा, पर चांगल्या गोष्टी तेवड्या समद्यांना धरू धरू सांगतो. जाऊ द्या, पर इकडं काय फरक पडायचा दिसत न्हाइ राव... चालू द्या तुमची पुराणपोथी. सुकोबाराय म्हणूनच म्हणतेत- सुका म्हणे जगी | भांडी सर्व जनीं || शिवबाचा आदर्श | कोण ठेवे || जय हारी विट्ठाल!!! भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

असे सगळ्यांनीच केले असते तर माझा एवढा वेळ गेला नसता आणि हे एवढे सगळे लिहायचीही वेळ आली नसती. उरला प्रश्न समजण्याचा - काळा रंग काळा आहे आणि केशरी रंग केशरी आहे हे समजण्यासाठी काही विषेश बुध्दी पाहीजे असे नाही :-) त्या मुळे जे इतिहासात लिहीलेले आहे त्यातून काही वेडावाकडा अर्थ काढणे हे काम नालायक लोकंच करू शकतात. ते आपण पहातच आहात. :-)

In reply to by भारी समर्थ

अर्धवटराव 12/01/2011 - 22:52
अहो हे वादंग इतिहासाच्या वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन्स वरुन नाहि माजलय. ऐतिहासिक व्यक्तींच्या नावावर सामाजीक तेढ माजवुन त्यावर स्वार्थाची पोळी भाजण्याचा घाणेरडा डाव आहे हा. अर्धवटराव

मदनबाण 04/01/2011 - 16:23
आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. १००% सहमत... आमच्या ठाण्यातले काही राजकारणी दादोजींचे नाव असलेल्या स्टेडियमचे नाव बदला अशी मागणी करु लागले आहेत्...या फोकलिच्यांना ठाण्यातले भिकार रस्ते दिसत नाहीत्...पण त्याच रस्त्यांवर जागो जागी या साहेबांचे पोस्टर मात्र लागलेले दिसतात !!! (ठाण्यातल्या अती भिकार- राजकारणी आणि रस्त्यांना वैतागलेला )

लेखात असा दावा केला आहे:
दादाजी कोंडदेवाच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख ‘सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब’ असा आला आहे. राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजीच्या पत्रातला हा ‘मातुश्री जिजाआऊ साहेबांचा’ उल्लेख हे चोख उत्तर नाही का?
आणि तुम्ही म्हणता आहात की त्याच पत्रामुळे ब्रिगेडच्या अतिरेक्यांनाही चोख उत्तर दिले आहे. जिजाबाई शहाजींची पत्नी होत्या आणि दादोजी शहाजींचे कारभारी होते. त्यामुळे वतनपत्रासारख्या अधिकृत दस्तात दादोजींनी जिजाबाईंचा असा उल्लेख करणं साहजिक वाटतं. पण त्यामुळे चोख उत्तर कुणाला आणि कसं मिळतं ते कळलं नाही.

धमाल मुलगा 04/01/2011 - 17:54
जयंतराव, बलकवड्यांनीही शेवटी एक सुत्र अवलंबलं, 'गाढवापुढं गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता.' जोवर आपापली उखळं पांढरी करुन घेण्यासाठी पुंडाई माजवणार्‍या राजकीय वरदहस्ताचा जोरा आहे तोवर हे असंच चालणार. काय बोलायचं?

प्रियाली 04/01/2011 - 19:10
ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे.
ब्रिगेडचे अतिरेकी जेम्स लेन सोबत होते का? असे असेल तर भांडारकर संस्थेची नासधूस का बरे केली?

आम्हाघरीधन 04/01/2011 - 20:58
हे बलकावडे तेच ना ज्यांनी पुण्यात २४ एप्रिल २००६ ला मराठा विकास मंचाने आयोजित केलेल्या 'दादोजी कोंडदेव कोण होते?' या खुल्या चर्चा सत्रातुन पळ काढला होता........ त्यावेळी संधी असुनही त्यांनी पळ काढला तेंव्हा त्यांचे म्हणने आज किती मनावर घ्यायचे हे वाचकांनीच ठरवावे.. असो. जयवंत राव आपण चालु ठेवा....

In reply to by धमाल मुलगा

अर्धवटराव 04/01/2011 - 22:47
धमु, तुमच्या "का" ला उत्तर नाहि. कारण दादोजींवरचा आक्षेप हा कुठल्याही गैरसमजातुन किंवा सत्यशोधनातुन आलेला नसुन जातीआधारीत गलिच्छ राजकारणातुन आलेला आहे. दगडावर डोकं आपटुन घ्यायला कोण शहाणा या लोकांच्या सभेला जाईल?? (वेडा) अर्धवटराव

In reply to by आम्हाघरीधन

अर्धवटराव 04/01/2011 - 22:51
बलकावड्यांनी पळ (??) का काढला हे शोधुन काढता येईल हो... पण त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर तुमचं मत काय ? अर्थात ते तुम्ही मनावर घेणार नाहिच हे तुम्ही अगोदरच सांगीतल आहे म्हणा. आणि मनावन न घेण्याचं कारणही सांगीतल आहे... "मनाचा भाव" चालायचच. अर्धवटराव

In reply to by आम्हाघरीधन

मृगनयनी 05/01/2011 - 13:40
'मराठा महासंघा'ने सम्भाजी ब्रिगेड्'च्या- (उर्फ काँ. आणि रा.वा. काँ' च्या पा__ल्या _त्र्या च्या) पळपुट्या धोरणाचे जाहीरपणे वाभाडे काढून रातोरात शिवगुरु= दादोजींचा पुतळा हलवण्याच्या हलकट कृतीचा धिक्कार केलेला आहे.... याबद्दल कुणाला काय बरे वाटते? :-?

अवतार 05/01/2011 - 01:43
शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आदिलशाहमधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष् ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी) १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते. वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही. ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत (जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत) बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत.  दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे.  आता दादोजींचा हात का तोडला गेला याबद्दल:  सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वत: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.ऐतिहासिक निवाड्यांवरुन हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळली आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे. आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे किती मनोविक्रुत असतील हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

In reply to by अवतार

मैत्र 05/01/2011 - 12:08
१. ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. --> आजवर कुठेही ब्रिगेड / डॉ. जयसिंगराव पवार आणि इतर लोक जसे बेडेकर किंवा बलकवडे यांनी दादोजींचा मृत्यू ही आत्महत्या होती असा उल्लेख केलेला वाचलेला नाही. याचा संदर्भ समजू शकेल काय.. २. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५) -- दादोजींचा हात प्रत्यक्ष कोणी तोडला होता असा कुठेही उल्लेख आलेला नाही. याचाही संदर्भ मिळू शकेल काय... ३. शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष् ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत (जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत) बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. --> यातून दोन गोष्टी स्पष्ट आहेत की त्यांच्या कामावर आणि निष्ठेवर शहाजी राजे, जिजाऊ आणि शिवाजी या सर्वांचा मोठा भरवसा होता. नाही तर त्यांना सुभेदारी आणि जहागिरीची जबाबदारी दिलीच नसती. आणि जिजाऊ आणि लहान शिवाजी यांना बंगळूराहून इतक्या लांब पुण्याला पाठवले नसते. तसेच शेवटपर्यंत ते चाकरी करीत होते. म्हणजे त्यांचे इमान / स्वामिनिष्ठा याबद्दल दुमत नाही. दुसरी गोष्ट बलकवडे यांनी अनेक संदर्भ दिले आहेत जे हेच सिद्ध करतात. (अजूनही ते गुरू होते यावर आलेलो नाही. पण हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. की हा मनुष्य कृतघ्न अथवा कारस्थानी होता असे त्यांना अजिबात न मानणार्‍यांनीही म्हटलेले नाही.) ३. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते. --> धर्म निरपेक्षतेचा प्रश्नच नव्हता. अवघा महाराष्ट्र -शहाजी / मालोजी / लखूजी आणि पूर्वज हे निजाम / आदिलशहा इ. च्या चाकरीत पिढ्यन पिढ्या होते. आपल्या जहागिरीत पठाण तुकड्या आणि इतर खान सुभेदारांबरोबर एकत्र एका शाहीची चाकरी वतनदारी ही काही वेगळी गोष्ट नव्हती. मग यात पहिला संस्कार घडला असं कसं म्हणता येईल. बंगळूरास काय सगळे मराठा सुभेदार / शिलेदार होते काय? दुसरं गोमाजी नाईक पान संबळ हे मोठं नाव आहे. ते शिवनेरीला कधी होते? त्यांनी नंतरही स्वराज्यात काम केलं आहे असे उल्लेख आहेत. -- मग शिवाजी महाराज त्यांच्या कडून शिवनेरीला कधी शिकले. आणी शिवनेरीला ते शहाजींच्या संबंधांमुळे त्या किल्लेदाराकडे राहिले. तिथे लखुजींनी गोमाजींना कधी पाठवलं याचा काय संदर्भ आहे. ४. वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही. ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. --> पुण्यात राजे काहीच शिकले नाहीत काय? म्हणजे महाराजांनी बंगळूर आणि शिवनेरी ला राहून सर्व परिस्थीती समजावून घेतली आणि राज्य स्थापन करायचं ठरवलं असा अर्थ काढला जातो आहे. बाजी पासलकर किंवा इतर जे लढवय्ये महाराजांना शिकवण्यासाठी नेमण्यात आले ते शहाजीराजांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती - जे त्यांचे काही नाही म्हटलं तर चक्क काम होतं त्या दादोजींनी नेमले नाहीत तर पुण्यात येऊन दुसर्‍या कोणी केलं काय? दादोजी वृद्ध होते. त्यांनी स्वतः राजांना तलवार चालवायला शिकवलं असेल असा कुठे उल्लेखही नाही. त्यामुळे तसा दावा फोल असण्यासाठी मुळात तसा कोणी दावाच केलेला नसावा. दुसरं न्यायदान, सुभ्याचा कारभार, देशमुखांची कामं, इ. सदरेवरच्या गोष्टी महाराज तेव्हा असलेल्या सुभेदार किंवा योग्य शब्द कारभार्‍यांकडून शिकले नसतील तर अजून कोणाकडून शिकले. --> ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. दादोजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे प्रेरक होते असं कुठेही कोणी म्हटल्याचं ऐकिवात नाही. इतिहासाच्या पुस्तकात नव्हतं. मग हा कोणाचा दावा निकालात काढला आहे. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वत: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.ऐतिहासिक निवाड्यांवरुन हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळली आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे. --> हा नवीन संदर्भ आहे आणि ब्रिगेडच्या आरोपात किंवा बलकवडे आणि इतर इतिहास संशोधकांबरोबर असलेल्या वादात आलेला दिसत नाही. जर आधीच आला असेल तर क्षमस्व. पण संदर्भ द्यावा ही विनंती. कारण हा प्रचंड गंभीर आरोप आहे. आणि त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्वामिनिष्ठेवर मोठा डाग आहे. मग बलकवडे यांनी दिलेले सगळे संदर्भ आणि शाहू महाराजांनी केलेला गौरव पूर्ण उल्लेख चूक आहे. आणि खुद्द डॉ. जयसिंगराव पवार यांचंही लिखाण चुकीचं आहे असा अर्थ ध्वनित होतो आहे. आपण मिपावर प्रथमच अतिशय उत्तम ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत (अशी माहितीपूर्ण उत्तरं आत्तापर्यंत कोणीच दिलेली नाहीत. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण संदर्भ वर्षानुवर्ष दिले नाहीत) त्यामुळे माझ्यासारख्या इतिहासप्रेमी पण इतके तपशिलवार खुलासे / साल/ बखरी / जेधे शकावली इ. चा अभ्यास नसलेल्यांना तुमच्या उत्तरातून खूप माहिती मिळू शकेल. एकूणात वरील संदर्भांचा आणि प्रश्नांचा खुलास मिळाल्यास सर्व मिपाकरांना अतिशय मोलाचे ठरेल.

In reply to by अवतार

योगप्रभू 05/01/2011 - 14:06
अवतार महोदयांची ही वरील पोस्ट म्हणजे संजय सोनवणी यांची ब्लॉगपोस्ट ढापून जशीच्या तशी येथे चिकटवली आहे. निदान तसा संदर्भ तरी द्यायचा.

अर्धवटराव 05/01/2011 - 07:14
बलकवड्यांनी जे संदर्भ दिलेत ते विकृत मनोवृत्तीचे म्हणावे काय ?? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

शिल्पा ब 05/01/2011 - 07:54
दगडावर डोकं आपटुन घ्यायला कोण शहाणा या लोकांच्या सभेला जाईल?? तुम्हीच वर लिहिलंय ना हे? तरीही!!! शेवटी ज्याची त्याची समज...ज्याचे त्याचे संस्कार वगैरे वगैरे...कोणत्याही प्रकारची ताकद जवळ नसेल तर जाऊ द्या..

In reply to by शिल्पा ब

नितिन थत्ते 05/01/2011 - 08:34
>>.कोणत्याही प्रकारची ताकद जवळ नसेल तर जाऊ द्या.. जात्युच्छेदनाच्या कामात गुंतले असताना सावरकरांना ऐकायला मिळालेल्या "आत्ता पेशवाई असती तर....." या वाक्याची आठवण झाली.

In reply to by अवलिया

नितिन थत्ते 05/01/2011 - 11:51
इकडे इतके सावरकरभक्त आहेत की वरील संदर्भ लगेच कळेल असे वाटले होते. पण सावरकरभक्त सावरकरांचे लिखाण वाचत नसावेत म्हणून..... सावरकर रत्नागिरीत असताना रूढीभंजनाचे कार्य करीत होते. तेव्हा ते हिंदुधर्मातील अनिष्ट रूढींवर टीका करीत असत. त्यावेळच्या सनातन्यांनी "आज जर पेशवाई असती तर (सावरकरांना) हत्तीच्या पायी तुडवले असते" असे विधान केले होते. शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 05/01/2011 - 12:53
>>>>इकडे इतके सावरकरभक्त आहेत की वरील संदर्भ लगेच कळेल असे वाटले होते. पण सावरकरभक्त सावरकरांचे लिखाण वाचत नसावेत म्हणून..... छे छे तुमच्यासारखे हुशार आणि अभ्यासु मंडळी असतांना आम्ही फक्त आरती ओवाळण्याचे काम करतो. तुम्ही बरोबर हवे ते संदर्भ, हवे तसे ,हवे तेव्हा देतातच त्यामुळे काळजी नसते. असो >>>>सावरकर रत्नागिरीत असताना रूढीभंजनाचे कार्य करीत होते. तेव्हा ते हिंदुधर्मातील अनिष्ट रूढींवर टीका करीत असत. त्यावेळच्या सनातन्यांनी "आज जर पेशवाई असती तर (सावरकरांना) हत्तीच्या पायी तुडवले असते" असे विधान केले होते. जात्युच्छेदनाच्या कामात गुंतले असताना सावरकरांना ऐकायला मिळालेल्या "आत्ता पेशवाई असती तर....." या वाक्याची आठवण झाली. इथे तुम्ही तुमच्या प्रतिसादातील वाक्य उपमा रुपाने वापरले आहे. उपमे मधे साधर्म्य अपेक्षित असते असे काहीसे वाटते. तुमच्या वाक्याचा उत्तरार्ध वरिल प्रतिसादकाच्या मनातील भावना आणि तथाकथित विधानातील भावना यांचा एकमेकांवर आरोप होत साधर्म्य असल्याचे आपण प्रतिपादन करत आहात. याचाच अर्थ तुमचे वाक्य अर्थगर्भ आणि परिपुर्ण होण्यासाठी, कारण तुम्ही निरर्थक आणि अनावश्यक लिहित नाही असा तुमचा गौरव असल्याने, तुमच्या वाक्यातील पुर्वार्ध ज्यामधे तुम्ही सावरकरांचे जातीभेद उच्छेदन करण्याचे कार्य आणि वरिल प्रतिसाद ज्या भावनेतुन आला आहे त्या प्रतिसादाचे मूळ कारण असलेले काही राजकारणी आणि जातीवर आधारीत भेद करत समाजात दुही माजवण्याचे कार्य करणारे काही ब्रिगेडी कार्यकर्ते, नेते यांचे मुल्यमापन एकाच स्तरावर करत असुन ते समान आहेत असेच तुमचे म्हणणे आहे हे तुम्ही उपमा अलंकार वापरला आहे यावरुन सिद्ध होत आहे. मागे तुम्हीच एका राष्ट्रपुरुषाची विटंबना करणारा लेख लिहिला होता आणि संपादक मंडळातील तसेच संपादकांशी जवळीक असलेल्या काही व्यक्तिंनी त्याला टाळ्या वाजवल्या होत्या याची आठवण झाली. >>>>शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली. शिल्पा ब यांनी उत्तर दिले आहे सबब नो कमेंटस.

In reply to by अवलिया

नितिन थत्ते 05/01/2011 - 13:16
१. मी व्यक्त केलेले भावना साधर्म्य आहेच असे शिल्पा ब यांनी मान्य केले आहे त्यामुळे तुमचा हा सगळा प्रतिसादच दुर्लक्षिण्यायोग्य आहे. २. आपण उद्धृत केलेल्या धाग्यावरील माझे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाल्यावर "भांडण संपल्याचे" आपण जाहीर केले होते.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 05/01/2011 - 13:19
>>>१. मी व्यक्त केलेले भावना साधर्म्य आहेच असे शिल्पा ब यांनी मान्य केले आहे त्यामुळे तुमचा हा सगळा प्रतिसादच दुर्लक्षिण्यायोग्य आहे. जरुर दुर्लक्ष करा. >>>>२. आपण उद्धृत केलेल्या धाग्यावरील माझे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाल्यावर "भांडण संपल्याचे" आपण जाहीर केले होते. भांडण संपले असले तरी त्याची आठवण आम्हाला येऊ नये असा नियम नाही. जशी तुम्हाला आठवण आली तशी आम्हाला पण आली. असो.

In reply to by अवलिया

शिल्पा ब 06/01/2011 - 07:58
>>>>शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली. शिल्पा ब यांनी उत्तर दिले आहे सबब नो कमेंटस. याविषयी मी इतका विचार केलाच नव्हता त्यामुळेच मी चुकीचा प्रतिसाद दिला...चूक माझीच आहे. तुमच्या मताशी सहमत आहे.

In reply to by नितिन थत्ते

विकास 06/01/2011 - 07:59
नितीनरावांचे एकंदरीत या वर्तमानासंदर्भात आणि विषयासंदर्भात काय मत आहे? संभाजी ब्रिगेड ज्या पद्धतीने आवाज करत आहे, ज्या पद्धतीने त्यांनी भांडारकर इन्स्टीट्यूटमधे गोंधळ घातला असे म्हणले जाते ते आपल्याला योग्य वाटते का?

In reply to by विकास

नितिन थत्ते 06/01/2011 - 12:40
मागील वर्षी "पोटतिडिकीने लिहिलेले पत्र" या (आता उडालेल्या) याच विषयावरच्या धाग्यात मत व्यक्त केले होते. असो. बलकवडेंच्या मोठ्ठ्या लेखात ९१ कलमी बखरीतले एकच वाक्य दादोजी गुरू असल्याचे सूचीत करते. इतर सर्व फाफटपसारा शिवाजी महाराजांना दादोजीविषयी आदर असल्याविषयी आहे.

In reply to by नितिन थत्ते

मैत्र 06/01/2011 - 13:02
इतर सर्व माहिती हा फाफट पसारा आहे या विधानाचं कारणही देणं सयुक्तिक ठरेल. श्रीमंत महाराज भोसले त्यांची बखर, म्हणजेच शेडगावकर भोसले बखर, या बखरीतही शाहजी राजांची जहागीर भरभराटीस आणण्याकरिता दादाजीने केलेल्या व्यवस्थेचे तपशीलवार वर्णन केले आहे. आणि शेवटी ‘‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यांस तयार केले’’ असे म्हटले आहे. शिवादिग्विजय बखरीतदेखील ‘‘शिवाजी महाराज पुणे प्रांती राहून दादाजीपंती विद्याभ्यास करविला; मल्लयुद्ध, शस्त्रयुद्ध करावयाच्या गती शिकविल्या’’ असे म्हटले आहे. -> वरील दोन संदर्भ आपल्या नजरेतून अनवधानाने सुटले असावेत. तसेच यानंतर असे वाक्य त्या लेखात आहे--> येथवर दादाजीपंताच्या कामगिरीविषयीचे पुरावे काय आहेत ते संक्षेपाने सांगितले. आता या व इतर पुराव्यांवरून नामवंत इतिहासकारांनी काय निष्कर्ष काढले आहेत ते थोडक्यात सांगतो. म्हणजे फक्त सगळे संदर्भ दादोजी हे गुरू होते याचेच असण्याचं कारण नाही आणि तसा दावाही नाही. मग हा फाफट पसारा आहे या विधानाचा आधार किंवा Assumption काय ? म्हणून, पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित अशीच आहे. --> हे वाक्य शेवटी ज्या पद्धतीने मांडले आहे त्यावर ते लेखाचे conclusion वाटते. मग या वाक्याला अनुसरून इतर माहिती आहे असे तुम्हाला वाटत नाही का? आणि का?

In reply to by मैत्र

नितिन थत्ते 06/01/2011 - 13:16
ओक्के मुळात वादाची सुरुवात दादोजी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नाही याने झाली होती म्हणून मी त्याच दृष्टीने बलकवडेंचा (जो जुना आहे) लेख वाचला. दादोजींची व्यवस्थापकीय कामगिरी उत्तमच असावी. त्यामुळे "सोन्याचा नांगर --- पुतळा" काढण्याची गरज नाही. तो काढला गेला ही चूकच झाली असावी.

In reply to by नितिन थत्ते

विकास 06/01/2011 - 17:02
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मात्र माझा प्रश्न त्या प्रश्नावरून झालेल्या हिंसा/दंग्यासंदर्भात होता.

In reply to by शिल्पा ब

मृगनयनी 05/01/2011 - 10:18
सहमत! हा हा हा! दादोजींनी शिवबांस शहाणे केले! परन्तु अजित- दादांना कोण बरे शहाणे करणार? असो! हा न सम्पणारा विषय आहे. तूर्तास पुण्या'चे "जिजापूर" होऊ नये म्हणजे झालं! :) जय परशुराम!

पंगा 06/01/2011 - 08:17
ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे.
ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजी कसे काय बरे उत्तर देऊ शकले? ब्रिगेड आणि दादोजी हे समकालीन होते*, की दादोजी हे चिरंजीव आहेत? * संभाजीमहाराजांच्या नावाने काढलेली ब्रिगेड ही दादोजींच्या समकालीन??? की ब्रिगेडच्या नावातला 'संभाजी' हा वेगळाच कोणीतरी, शिवाजीमहाराजांचा समकालीन किंवा अगोदरचा आहे? (अवांतरः दादोजींच्या 'चोख उत्तरा'वरून आठवले. कॉलेजच्या दिवसांत एक टुकार हिंदी पिच्चर पाहिला होता. पिच्चरचे नाव आता आठवत नाही. ते महत्त्वाचेही नाही. तर पिच्चरमध्ये आमच्या साइडहीरोला बदनाम करण्यासाठी त्याचे त्याच्या मानलेल्या वहिनीशी संबंध आहेत असे व्हिलनमंडळी उगाचच उठवून देतात. आमच्या साइडहीरोला ते खूप लागते. पुढे याच व्हिलनमंडळींकडून आमच्या साइडहीरोचा भर रस्त्यात खून होतो. तर फूटपाथच्या कडेला कोसळून मरता मरता आमचा साइडहीरो आपल्या अंगातून सांडणार्‍या ग्यालनभर रक्ताने शेजारच्या भिंतीवर हाताने मोठ्या अक्षरांत 'भाभी मेरी माँ' असे लिहितो, आणि मग लगेच खास हिंदी पिच्चरच्या पद्धतीस अनुसरून धाड्कन मरून पडतो. असो.)

In reply to by शिल्पा ब

पंगा 06/01/2011 - 10:24
बाकी असले टुकार पिच्चर तुम्ही पाहता हे वाचून डोळे पाणावले (माझेच..)
डोळे आमचेही पाणावायचे. पण काय करणार! कँपसवर जे पिच्चर दाखवायचे ते झक मारत पहावे लागायचे. दुसरा पर्याय नव्हता. मजबूरी का नाम... (नाही म्हणायला दुसरा एक पर्याय होता. कँपसबाहेर गावात एक डब्बा थेटर होते - 'डब्बा'च म्हणायचे त्याला - पण त्यात त्याहूनही रद्दी पिच्चर लागत. आणि कँपसवरच्या पिच्चरमध्ये असला काही सीन आला तर तो नाइलाजाने टॉलरेट केला जायचा - गावातल्या थेटरात आला तर गावकरी थेटरात आनंदाने टाळ्या वगैरे वाजवायचे. आता बोला!)

प्रेषक आम्हाघरीधन दि. मंगळ, 04/01/2011 - 20:58. याना उत्तर - हे बलकावडे तेच ना ज्यांनी पुण्यात २४ एप्रिल २००६ ला मराठा विकास मंचाने आयोजित केलेल्या 'दादोजी कोंडदेव कोण होते?' या खुल्या चर्चा सत्रातुन पळ काढला होता........ त्यावेळी संधी असुनही त्यांनी पळ काढला तेंव्हा त्यांचे म्हणने आज किती मनावर घ्यायचे हे वाचकांनीच ठरवावे.. असो. जयवंत राव आपण चालु ठेवा.... मी स्वत: एकदा संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला गेलो होतो. कारण एकच होते की त्यांचे काही मुद्दे असले तर ते स्वत: ऐकावेत. पण तेथे गेल्यावर उकिरड्यात भुंकणारी कुत्री बरी अशी भाषा ऐकून माझ्यासारखे अनेक श्रोते त्या सभेतून उठून गेले. नशिबाने त्यात अनेक मराठेही होते. अशा सभेत कोणीही शहाणा, ज्याचा मेंदू शाबूत आहे तो जाणार नाही हेच सत्य आहे. श्री बलकवडे तेथे गेले नाहीत हेच बरोबर आहे. आम्ही उठून जात असताना आमची जी खिल्ली उडवण्यात आली त्यावरून मला वरील उपमा सुचली आहे. यात अतिशोयक्ती काहीही नाही. उत्तर अवतार यांना- दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. प्रेषक अवतार दि. बुध, 05/01/2011 - 01:43. १ यावेळी शहाजी मुघलांच्या नोकरीत होता. तेव्हा हा किल्ला शहाजीच्या जहागिरीत होता असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. त्या काळी प्रमूख सरदारानी नोकरी बदलली की त्याचा मुलूख आपोआप त्या नवीन मालकाच्या मुलखात सामील व्हायचा. व त्यातला सगळा कर त्या नवीन मालकाला मिळे. हे दोन प्रकारे शक्य होत असे. एक म्हणजे त्या सरदाराने नोकरी बदलली तर किंवा त्याचा पराभव झाला आणि त्या नवीन मालकाने त्याला सरदारकी देऊ केली तर. पुर्वी छोट्या छोट्या सरदारांकदे सुध्दा दादाजी कोंडदेवांसारखी माणसे असायची. दादाजी कोंडदेव अदिलशाहच्या नोकरीत अप्रत्यक्षरित्या होता कारण शहाजी हा अदिलशहाचा नोकर होता आणि दादाजी शहाजीचा. असेच घडून १६३६ च्या शेवटास शहाजी याचा माहूली येथे पराभव होऊन त्याला अदिलशहाच्या नोकरीत जावे लागले. त्यामुळे त्याच्या मुलखातील त्याची सर्व माणसे ही अदिलशहाची अप्रत्यक्ष नोकरीत गेली. १६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे. “शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....) या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या. २ १६३६ साली शहाजी राजे अदिलशहाचे सरदार बनले नाही तर त्यांचा माहूली येथे अदिलशहाने पराभव केला व त्यांच्या आश्रयास असलेल्या निजामशहास ग्वाल्हेरला तुरुंगात टाकले. त्यांनी काही जॉब बदलला नाही. आता दादोजींच्या तथाकथित आत्महत्येबद्दल. हा उल्लेख जदूनाथ सरकार यांच्या एका लेखात आली आहे ती कशी आली ते बघुयात. एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे. कारण यात असाही उल्लेख आहे की दादोजींच्या मृत्यीनंतर शिवाजीने शहाजीराजांची सर्व मालमत्ता व खजीना जप्त केला. परत हा जो उल्लेख (आत्महत्येचा) २४ व्या कलमात आहे असे म्हटले गेले ते कलमच मुळ बखरीत नाही. ( पारसनीस यांची प्रत). दादोजींच्या मृत्यूचा उल्लेख असलेली तीन अस्सल पत्रे खुद्द शिवाजी महाराजांनीच लिहीली आहेत त्यात काय लिहीले आहे ते बघुयात. १ पहिले पत्र १५ ऑक्टोबर १६४७चे आहे. ते त्यांनी पुणे परगण्यातील कर्हेलपठार तरफेच्या कारकुनास पाठवले आहे. त्यात त्यांनी पुर्वी जे इनाम चालू होते तेच चालू ठेवण्यास सांगितले आहे. त्यात असा उल्लेख आहे “ सालमजकुराकारणे मशहुरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा झाली म्हणऊनू” मशहूर : प्रसिध्द, हजरत : या शब्दाचा अर्थ माधव ज्युलियन यांनी असा दिला आहे “ राजास, पैंगमबरास,अगर श्रेष्ठ व वंद्य पुरूषास या शब्दाने स्वामी या अर्थाने संबोधितात. या वरून शिवाजीमहाराजांच्या मनात या माणसाबद्दल काय भावना होती हे समजते. २ दुसरे पत्र २४ मे १६४७ च्या आसपासचे आहे ते त्यांनी लिहीले आहे पुण्याच्या देशमुखांना पाठवलेले आहे त्यात सुध्दा त्यांनी एका मशिदीचे इनाम तसेच चालू ठेवायला सांगितले आहे. त्यात पण त्यांनी दादोजींचा असाच आदरपुर्वक उल्लेख केलेला आहे. ३ तिसरे महादजीभटाच्या तक्रारी विषयी पुण्याच्या देशमुखांना लिहीतांना त्यांनी म्हटले आहे “हाली मशहूरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यास देवाज्ञा जाली म्हणोन” इ.... जर शिवाजी महाराजांच्या उद्योगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असती तर त्यांचा उल्लेख असा करायची शिवाजी महाराजांना गरज नव्हती हे मला वाटते मान्य असावे. कृपया जेधे शकावलीत व तारीख-इ-शिवाजी यात हे कोठे लिहीले आहे हे सांगावे. तारीख-इ-शिवाजी म्हणजे मुसलमानांनी केलेले एक्याण्णव कलमी बखरीचे फार्सी भाषांतर. त्यात अनेक त्यांच्या फायद्याच्या गोष्टी घुसडलेल्या ! ज्याचे केले त्याचे खरे नाव आहे “ तफ्सील अहवाल अरूज व खुरज राजाहाये व सरदारान दखन” याचा अर्थ दखनच्या राजांचा व सरदारांच्या उत्कर्षाचा व विद्रोहाचा इतिहास” हे सगळे मुळीच विश्वासार्ह नाही. यदुनाथ सरकारांना मराठी, मोडी, अजिबात येते नव्हते हे जगजाहीर आहे. त्यांनी लिहीले ते सगळे ग्रॅंट डफ आणि फार्सी साधनांवरून. त्यावर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. हे म्हणजे नेहरुंनी शिवाजीला चोर आणि लुटेरा म्हटले त्यावर विश्वास ठेवण्यासारखे झाले. खरे तर ते १६४१ पर्यंत बेगलोरला होते. शिवभारतात शिवाजी बेंगलोरास सात वर्षाचा झाला असा उल्लेख आहे. आता हे गोमाजी नाईक पानसंबळ कोण होते हे बघूयात. जिजाबाईंचे लग्न जेव्हा शहाजी महाराजांशी झाले तेव्हा जाधवांनी एका नोकर माणसास जिजाऊंबरोबर दिले. त्याचे नाव होते “ गोमाजी नाईक पानसंबळ जामदार” याचा उल्लेख महाराजांनी अफजलखानाच्या स्वारीत बैठकीच्या वेळी जे हजर होते ( सल्लामसलतीची) त्या लोकांच्यात आहे. जामादार/जामदार म्हणजे कपडे/दागदागिने संभाळणारा. हा एक गडी जाधवांनी जिजाऊंबरोबर दिला होता. जाधवांचे आणि भोसल्यांचे संबंध पहाता शिवाजीला शिकवण्यासाठी जाधव एखादा माणूस देतील आणि भोसले तो त्या कामासाठी स्विकारतील हे असंभवनीय. शिवाय एक पत्रात शिवाजी महाराजांनी या नाईकांना समज दिली असाही उल्लेख आहे तो असा. महाराजांनी हे पत्र मावळच्या देशाअधिकार्याठस पाठवले आहे. पाषाण, तर्फ कर्यात मावल, येथील पाटीलकी गोविंदराव शितोळे, देशमूख, परगणा पुणे यांची आहे. वाडी करंदी येथील कुणबी रणपिसे हा आपल्याला निराळा मजरा करून दिला आहे म्हणून भांडण करतो. तुम्ही त्याच्या सांगण्यावरून शितोळ्यांशी भांडण करता असे त्यांनी आमच्याकडे येऊन विदीत केले आहे. तरी नसती पाटीलकीची नवी भांडणे करावयाची तुला काय गरज आहे ? आम्ही लहानपणापासून या मुलखात आहोत. मिरासदार कोण व गैरमिरासदार कोण हे आम्ही चांगलेच जाणतो आणि माणसाचे माणूस ओळखतो. तू नवा सुभा करायला आला आहेस. तुला हे काही ठाऊक नाही आणि उगाच एकाच्या सांगण्यावरून दुसर्‍याशी भांडण करतोस. हे तुला करायला कोणी सांगितले आहे ? यापुढे नसती मिरासदारांची नवी भांडणे करशील तर आपले केलेले पावशील हे समजून शितोळ्यांशी भांडणे न करावीत. पूर्वी मातुश्री आऊसाहेबांनी करंदी हा वेगळा मजरा करायला सांगितले होते, त्यावेळी आम्ही ते मानले नाही. त्यानंतर गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शितोळ्यांशी तंटा केला. ते वर्तमान आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांस ताकीद केली. आत्तापर्यंत सुरळीत चालू आहे. त्याप्रमाणे आत्ताही शितोळ्यांची पाटीलकी सुरळीत चालवणे. वाडी करंदीचा मजरा केलेला नाही. मातुश्री आऊसाहेबांचे अगर दुसर्‍या कुणाचे पत्र तंट्यामुळे त्याने ( रणपिशाने) नेले असेल त्यावर जाऊ नये. शितोळ्यांशी काही भांडण केलेस तर आम्हाला बोल नाही. ताकिद होईल. जाणिजे.” या पत्रात या गोमाजींना ताकीद दिली असा स्पष्ट उल्लेख आहे. गुरूजींना ताकीद देण्याइतके महाराज उध्दट असावेत किंवा हा त्यांचा गुरू नसावा. दुसर्‍याची शक्यता जास्त वाटते. तसेच हेही लक्षात घेतले पाहिजे की महाराजांनी साक्षात स्वत:च्या आईचे म्हणणे ऐकले नाही व न्याय दिला. त्यात त्यांच्या माहेरचा माणसाने शितोळ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला असताना सुध्दा. पण इतिहासात अशा अनेक नोंदी (जवळ जवळ सगळ्या निकालाबाबत) आहेत की महाराजांनी स्पष्टच सांगितले आहे की दादोजींनी दिलेला निर्णयच पुढे चालवावा. १ १६२९ साली लखूजी जाधवाचा विजापूर दरबारात खून झाल्यावर शहाजी महाराज पुण्यात येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी हा मुकासा कधीही हातचा जाऊ दिला नाही. त्यांना इकडून तिकडे नोकरदारी केली पण हा मुकासा सोडला नाही. त्यांच्या अनेक पत्रात दादाजींचा उल्लेख मायन्यात असा केलेला आढळतो “राजश्री दादाजी कोनदेऊ शुभेदार किले कोंडाणा व परगणा पुणा व माहालानिहाये” दादोजी हा शहाजीने नेमलेला एका किल्ल्याचा सुभेदार होता. अदिलशाहीत व मुघलांच्या दरबारात सुभेदार हे पद फार मोठे होते व सहसा त्यांच्या नातेवाईकातच दिले जायचे. खुद्द शहाजी महाराज सुध्दा कधी सुभेदार झाले असावेत की नाही ही शंकाच आहे. कारण त्यांचा तसा उल्लेख कुठेही नाही. पण ज्या प्रमाणे इंग्लीश सिनेमाची कॉपी हिंदीमधे व हिंदीची मराठीमधे त्या प्रमाणे छोट्या छोट्या परगण्यातसुध्दा पेशवे, सबनीस, सुभेदार असायचे..... अर्थात दादोजींच्या परगण्यातून शहाजीला अदिलशहाला कर द्यावा लागत असणारच तो दादोंजी मार्फतच देत असणार. तो जर अदिलशाचा सुभेदार असता तर त्याला शहाजीच्या आज्ञा पाळायची काही गरज नव्हती. पण तो शहाजीच्या, जिजाऊंच्या व शिवाजीच्या आज्ञा पाळताना दिसतोय. तो नि:संशय शहाजीचाचा सरदार/नोकर होता. दुसरे म्हणजे सर्व कागदपत्रात दादोजींचा उल्लेख हा शहाजींच्या वतनासंबंधीतच येतो. तसे नसते तर इतरही परगण्याबाबत उल्लेख सापडले असते. पहिल्यापासून दादोजी हे शहाजीचे व शिवाजीचे एकनिष्ठ बुध्दिमान सेवक होते. शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता. तुमच्या घरातली वरीष्ठ मंडळी जेव्हा कौतुकाने तुमच्याबद्दल “ हा सारखा बंदूक बंदूक खेळत असतो” अशी तक्रार करतात तेव्हा त्यांना तुम्ही पुढे अतिरेकी देशद्रोही होणार असे म्हणायचे असते का ? इतिहासात अनेक घटनांची तर्कशुध्द संग्ती लावायची असते. ती करताना प्रत्येक गोष्टीचा काटेकोर पुरावा असतोच असे नाही. नाहीतर फालतू व चक्रम प्रश्नही विचारता येतात. हे काही सापडले नाही. कृपया लेख स्कॅन करून द्या, म्हणजे आभ्यास करता येईल. पण दादोजींच्या हाताचा एक उल्लेख एका दंतकथेत आहे. तो असा. ती त्या एक्याण्णव कलमी बखरीतील आहे म्हणून दंतकथा. “दादोजीने शिवापूर येथे शहाजीच्या नावाने एक आमराई लावली होती. त्यातला एक आंबा त्याने तोडला. ही आपली चूक असे समजून तो आपला हात कापायला निघाला. लोकांनी त्याला त्यापासून प्रवृत्त केले. त्याची आठ्वण म्हणून त्याने त्याच्या अंगरख्याची एक बाही लांडी केली. ही हकिकत समजल्यावर शहाजीने समजूत काढण्यासाठी त्याला मानाची वस्त्रे पाठवली व त्यानंतर दादोजीने लांडी बाही वापरायचे सोडून दिले.” इ..... शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे..... अजून काय लिहावे ......................... या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेड्चे प्रवक्ते यांनी टि.व्ही.वर एका मुलाखतीत "एक उल्लेख सोडला तर हे पुस्तक उत्कृष्ट आहे" असा उदगार काढले त्याला काय म्हणावे ? आणि यासाठी इतिहास बदलायला निघालेल्यांना कुठली विकृती आहे.... हे आपल्याला समजले असेलच. या विकृतीचे नाव आहे xxर..... महाराज आत्ता असते तर त्यांनी दादोजींच्या बदनामी केल्याच्या गुन्ह्यासाठी लेन आणि ब्रिगेडच्या शूरविरांचा चौरंग करायची शिक्षा दिली असती हे निश्चित......

In reply to by जयंत कुलकर्णी

अर्धवटराव 10/01/2011 - 22:53
अहो हे कोणाला सांगताय? त्यांना इतिहासाशी काहि घेणे देणे नाहि हो. भविष्यात रंगणार्‍या एका गलिच्छ आणि आत्मघातकी कलगीतुर्‍याची पार्श्व्भूमी तयार करताहेत हे लोक. साला हिंदुंना शापच आहे एकमेकांचे गळे घोटुन परकियांचे खिसे भरण्याचा... (शापित) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

उत्तर जेथे शक्य आहे तेथे द्यायलाच पाहिजेना ! म्हणून एवढा वेळ घालवून हे उत्तर तयार केले. दुसरे म्हणजे मिपावर हेच म्हणणे रहायला नको, आणि पुढे याला कोणी उत्तर दिले नाही म्हणून हे बरोबर आहे असेही कोणाला वाटायला नको. म्हणून हे उत्तर !

In reply to by जयंत कुलकर्णी

योग्य, अभ्यासपूर्ण आणि खणखणीत उत्तर. ते देण्यामागची भूमिका स्पष्ट केलीत हे बरे झाले. पण ही आचरट लोकं परत ४-५ ओळीत गलिच्छ आरोप करून मोकळे होतील आणि तुम्हाला परत मोठ्ठा प्रतिसाद लिहावा लागेल. त्यामुळे प्रत्येक आरोपाचे खंडन करू नका. यातील एक सदस्य तर दोन वर्षे जुन्या प्रतिसादाला अजून उत्तर देत नाही आहेत. मुळात समज कमी असेल तर मुद्देसूद उत्तर द्यायला जमणार कसे? पाषाणावर कितीही पाणी ओतले तरी तो मऊ होत नाही. तो प्रयत्न सोडून द्या.

In reply to by जयंत कुलकर्णी

अर्धवटराव 11/01/2011 - 23:32
तुमच्या संयमाया दाद देतो. >>पुढे याला कोणी उत्तर दिले नाही म्हणून हे बरोबर आहे असेही कोणाला वाटायला नको अगदी बरोबर. मी थोडं फ्रस्टेट होउन प्रतीसाद दिला होता. सत्य कोणि ऐको वा न ऐको, सांगणार्‍याने सांगत जावे... अर्धवटराव

In reply to by जयंत कुलकर्णी

विकास 12/01/2011 - 02:00
सहमत. प्रतिसाद आवडला. "त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !" असे वागला नाहीत ते योग्यच झाले. :-) बरीच नवीन माहिती कळली. याच्या विरुद्ध जर कोणी अशीच अभ्यासांती माहिती दिली तर ती देखील वाचायला आवडेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

सुधीर काळे 12/01/2011 - 08:17
जय हो, जयंतराव! Bravo!! तुमच्या इतिहासाच्या आणि बखरीच्या अभ्यासाची खोली पाहून 'म्या पामर' थक्कच झालो!! हे काम असेच नेटाने चालू ठेवा.....

In reply to by जयंत कुलकर्णी

मालोजीराव 16/01/2011 - 00:43
दादोजींचे स्थान थोरल्या महाराजांच्या आयुष्यात नक्कीच ठळक होते,परंतु ते स्थान एका पथदर्शक,गुरु चे होते का...हा नक्कीच सखोल संशोधनाचा विषय आहे.कारण गुरुपद हे अढळस्थानी असतं, आणि याचा उल्लेख हर प्रकारच्या शिवचरित्रात यायला हवा होता, मुख्यत्वे कुठलेही तत्कालीन परदेशी इतिहासकार वा उत्तरेतील महाराजांचे चरित्रकार याचे दाखले देत नाहीत. मेहेंदळेसरांनी सुद्धा यासंदर्भात कोणतेही संदर्भ दिले नाहीत, अजून हजारो कागदपत्रे प्रकाशात यावयाची आहेत.कदाचित त्यात ते गुरु असण्याचे पुरावे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.घाईघाईत निष्कर्षप्रत पोचण्यापेक्षा,तटस्थ राहून अधिक अधिक संशोधन व्हायला हवे.

In reply to by मालोजीराव

अर्धवटराव 16/01/2011 - 02:00
तुम्ही पथदर्शक, गाईड या अर्थाने जर म्हणाल तर दादोजी शिवरायांचे गुरू नसावे. दादोजींनी शिवबाला सिव्हील एडमिनिस्ट्रेशनचे आणि न्यायदानाचे ट्रेनींग दिले असावे. इतर विषयांकरता, शस्त्रविद्येकरता वेगवेगळे ट्रेनर्स कामाला लावले असतील. मुलुखाची, माणसांची आणि तत्कालीन समाज जीवनाची ओळख दादोजींनी शिवबाला करुन दिली असावी. ज्या अर्थाने तुम्ही गुरू म्हणताय त्याअर्थाने शिवाजीचा गुरू ना दादोजी, ना समर्थ रामदासस्वामी, ना तुकाराम वगैरे मंडळी. शिवबाचा गुरू म्हणजे त्याची आई जिजाऊ. इतरांनी शिवाजीला जाणता-कळता झाल्यावर शिकवण दिली असेल, पण जिजाऊनी गर्भावस्थेपासुन शिवबावर संस्कार केले, त्याचा पींड तयार केला, बाल शिवबात जीजाऊने आपली तळमळ ओतली, स्वप्न रुजवले. त्यातून शिवचरित्र घडले असावे. अर्धवटराव

सुधीर काळे 12/01/2011 - 07:55
बलकवडे यांनी लिहिलेला लेख शरदरावांच्या (शरदराव पवार-केंद्रीय मंत्री) कदाचित् वाचनात आलेला नसेल म्हणून मी तो लेख त्यांना त्यांच्या लोकसभेच्या pawars@sansad.nic.in या ई-मेल पत्त्यावर पाठविण्याचा प्रयत्न माझ्या खासगी 'याहू' आयडी वरून तसेच माझ्या कंपनीच्या 'चक्रास्टील.कॉम' आयडीवरून केला पण माझ्या दोन्ही 'आयडी'वरून तो बाउन्स झाला. शरदरावांचा आणखी कुठला आयडी इथे कुणाला माहीत असल्यास कळवावा. कारण त्यांना हे पटणे आवश्यक आहे असे मला वाटते. धन्यवाद

भारी समर्थ 12/01/2011 - 12:40
तुजं माजं पटाना आन् तुज्या वाचून कटाना... काय रे हिकडची झुंबाझुंबी... म्हाराजांवरून येवडे वाद झाले, येवड्या प्रतिक्रिया इकडं झडल्या (हो, झडल्याच!) पण हाती कायबी नाय गवसलं राव... आलिकडच्यांना पलिकडचे कुत्रे वाटायलेत आणि वायशे वर्शा... शेवटी कसंय की, पत्रातून किंवा इतर ऐतिहाशिक दस्तावेजातून जे काही आसतंय ना तेचा अर्थ कोण कसा काडल काय सांगावं? बरं, येकाद्याला समाजलेलाच अर्थ दुसर्‍यानी आगदी तसाच समजून घ्यावा हा त्याचा आट्टहास कशापायी बरं? त्ये काय वादातीतलं निसर्गसत्य हाय वय, की सगळ्यांनी येकाच सुरात म्हणायला? आमी सगळ्यांचं सगळं वाचतो. आणि सोताचा शिवाजी उभा करतो. पण मनात. तो आन् मी, मदी कुणीच न्हाइ. जसा तो मला, तसाच तो दुसर्‍या कुणाला न्हाइ. कारण, आमाला जे काय वादग्रस्त वाटतं हे आमी कुणाला सांगतच न्हाइ. हा, पर चांगल्या गोष्टी तेवड्या समद्यांना धरू धरू सांगतो. जाऊ द्या, पर इकडं काय फरक पडायचा दिसत न्हाइ राव... चालू द्या तुमची पुराणपोथी. सुकोबाराय म्हणूनच म्हणतेत- सुका म्हणे जगी | भांडी सर्व जनीं || शिवबाचा आदर्श | कोण ठेवे || जय हारी विट्ठाल!!! भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

असे सगळ्यांनीच केले असते तर माझा एवढा वेळ गेला नसता आणि हे एवढे सगळे लिहायचीही वेळ आली नसती. उरला प्रश्न समजण्याचा - काळा रंग काळा आहे आणि केशरी रंग केशरी आहे हे समजण्यासाठी काही विषेश बुध्दी पाहीजे असे नाही :-) त्या मुळे जे इतिहासात लिहीलेले आहे त्यातून काही वेडावाकडा अर्थ काढणे हे काम नालायक लोकंच करू शकतात. ते आपण पहातच आहात. :-)

In reply to by भारी समर्थ

अर्धवटराव 12/01/2011 - 22:52
अहो हे वादंग इतिहासाच्या वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन्स वरुन नाहि माजलय. ऐतिहासिक व्यक्तींच्या नावावर सामाजीक तेढ माजवुन त्यावर स्वार्थाची पोळी भाजण्याचा घाणेरडा डाव आहे हा. अर्धवटराव
मित्रहो, लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. जयंत कुलकर्णी.

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे - भाग -०३

५० फक्त ·

मी-सौरभ 28/12/2010 - 23:41
कोकण एक्सप्रेस अन् कामत जवळच आहेत. ते सुद्धा १ चांगला पर्याय आहेत. अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात. (खादाड) :)

In reply to by मी-सौरभ

मृत्युन्जय 29/12/2010 - 10:23
कामत गेलं आता. त्याच्याजागी थाटबाट आलंय. अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात स्वागत की स्वीकार (नळ स्टॉपवर पण एक स्वीकार आहे ते वेगळे. ते हॉटेल आहे. ही टपरी आहे)

In reply to by मृत्युन्जय

धमाल मुलगा 29/12/2010 - 20:43
च्यायला... स्विकारपाशी पडीक रे एकेकाळी आम्ही. त्याच्या टपरीसमोर गाडी लावायची, त्याच्याकडचे पोहे म्हणजे जन्नत साला जन्नत! नंतर पोहे संपता संपता मित्राला टोकन घेऊन चहाच्या रांगेत उभं करायचं आणि कॉर्नरच्या टपरीवरुन बिडी आणायला पळायचं....मग त्या फंटाश्टिक चहासोबत २-३ जणात एक बिडी फिरवत निवांत गजाल्या कराव्यात! वेळ नाय, काळ नाय...स्विकारवाल्यानं हाकलेपर्यंत पब्लिक तिथंच पडीक. हो! कोण हलतंय कशाला तिथून? भूक लागली की खायची सोय होतेय, चहा-अग्निहोत्र तर आहेच...शिवाय पक्षीनिरिक्षणासाठी अप्रतिम स्पॉट! सगळे साले 'सलीम अली' होऊन जायचे. ;)

५० फक्त 28/12/2010 - 23:48
कामतचं आता थाट्बाट झालंय, आणि तिथली गुजराथी थाळी काही फार चांगली नाही. कोकण एक्स. मध्ये व्हेज पर्याय फारच कमी आहेत. स्वागतचं नक्की लोकेशन सांगाल काय जाईन उद्याच. अवांतर - तुम्ही मु.पो. तळेगाव दाभाडे असाल तर- तिथं एक पांड्वांचं मंदिर आहे म्हणे, जरा सांगाल काय कसे जायचं ते. हर्षद.

In reply to by ५० फक्त

मी-सौरभ 28/12/2010 - 23:53
१. स्वागतः बँक ऑफ महाराष्ट्र समोर. कर्वे पुतळ्याकडून नळस्टॉप कडे येताना पहिल्या सिग्नलला डावीकडे वळल्यावर लगेच उजव्या हाताला. २. हो असे एक मंदीर आहे पण मी कधी गेलेलो नाही. पण ते गावातच आहे त्यामुळे रिक्षावाला नक्की नेऊ शकेल.

५० फक्त 28/12/2010 - 23:59
आता विषय निघालाच आहे तर, स्वागतच्या लाईनला थोडं पुढे एक लोणि डोसा वाला असतो, त्याचा डोसा खाउन पहा, खुप मस्त असतो. अतिशय म उ आणि भरपुर लोणि घातलेला, कधि येतो आहेस सांग जाउ या. तो दुपारी २पर्य्तंत असतो. हर्षद.

In reply to by ५० फक्त

गवि 29/12/2010 - 16:55
जं. महाराज रोडवरपण एक लोणी डोसावाला असून त्याच्याकडे अनेकदा (रात्री) खाल्लेले छोटे छोटे मऊ लुसलुशीत डोसे खूप आवडले. तो पांढरे लोणी डोश्यावर घालतो. मला वाटतं दावणगिरी लोणी डोश्यांची "हॉट चिप्स" सारखीच (पण अनब्रँडेड) आउटलेट्स ठिकठिकाणी निघाली आहेत गेल्या काही काळात.

सखी 29/12/2010 - 00:06
शीतलचा दही वडा एकदम चांगला असायचा, गेल्या ३-४ वर्षात चक्कर नाही, त्यामुळे सध्याचे माहीती नाही.

गणेशा 29/12/2010 - 16:49
जायला पायजे शीतल ला .. अजुन गेलो नाही. कोकण एक्स्प्रेस मस्त आहे ... जोग शाळेपुढे कायम जाणे होते पण स्वागत माहिती नाही.. पाहतो नक्की .. खाण्यासाठी मी कोठे ही जायला तयार असतो ..

छान लेखमाला. लेखकानी शक्य झाल्यास सारबागेबाहेरील स्टॉलवाले, संभाजी बागेबाहेरील पाणीपुरीवाले तसेच सकाळी सकाळी नाष्ट्याचे डबे घेउन तुळशीबाग, लक्ष्मी रोड ह्या ठिकाणी स्टॉल लावणारे ह्यांची देखील ओळख करुन द्यावी.

गवि 29/12/2010 - 17:14
हो.. अजून माहिती द्याच. अंदाजाने ट्राय करु गेल्यास वेळ फुकट जातो. आमच्या सारख्या व्हिजिटर्सना पुन्हा पुन्हा वेगवेगळी ठिकाणे ट्राय करायला चान्स कमी असतो. असेच त्या संभाजी उद्यानाबाहेर सपना हॉटेलसमोर असलेल्या स्टीमी अफेअर्स म्हणून स्टॉलवर अनंत टाईपच्या इडल्या दिसल्या म्हणून काही नमुने चाखले. अजिबात आवडले नाही.

सखी 29/12/2010 - 19:08
लज्जत नावाचे हॉटेल आहे अजुन कोणाला माहीती आहे का? - कुमठेकर रस्त्याच्या आतल्या रस्त्यावर होते, गणपुले क्लासेसच्या समोर. तिथे बरेच हटके पदार्थ असायचे, व सगळ्यांची चव नावाप्रमाणेच लज्जतदार होती :) आता गुगलुन पाहीले असता एक दुसरेच लज्जत ला.ब. रस्त्यावर दिसते आहे, पण ते हे नसावे.

५० फक्त 29/12/2010 - 22:35
सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद तसेच वाचनमात्रांना पण धन्यवाद. श्री. परा, निश्चितच, आठवड्यातले कमीत कमी ३ दिवस तरी बाहेर कुठेतरी खायला जातोच.( हे वाचुन बायको मारणार आहे). सध्या जरा इतर कामं जास्त आहेत म्हणुन थोडा वेळ लागतो आहे. हर्षद.

In reply to by ५० फक्त

सविता 29/12/2010 - 23:23
अहो..... ते कुठल्या उद्देशाने बोलले ते कळलंच नाही तुम्हाला! अजून सरावला नाहीत वाटतं मिपा आणि हलकट मिपाकर यांना तुम्ही!!! :)

In reply to by सविता

गणपा 30/12/2010 - 03:35
हा हा हा, सविता ताई ते हर्षदराव बी पुन्याच हाईत. ;) अट्टल पुणेकर दुसर्‍या पुणेकराकडुन अपमान करवुन घेईलच कसा :D

मी-सौरभ 28/12/2010 - 23:41
कोकण एक्सप्रेस अन् कामत जवळच आहेत. ते सुद्धा १ चांगला पर्याय आहेत. अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात. (खादाड) :)

In reply to by मी-सौरभ

मृत्युन्जय 29/12/2010 - 10:23
कामत गेलं आता. त्याच्याजागी थाटबाट आलंय. अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात स्वागत की स्वीकार (नळ स्टॉपवर पण एक स्वीकार आहे ते वेगळे. ते हॉटेल आहे. ही टपरी आहे)

In reply to by मृत्युन्जय

धमाल मुलगा 29/12/2010 - 20:43
च्यायला... स्विकारपाशी पडीक रे एकेकाळी आम्ही. त्याच्या टपरीसमोर गाडी लावायची, त्याच्याकडचे पोहे म्हणजे जन्नत साला जन्नत! नंतर पोहे संपता संपता मित्राला टोकन घेऊन चहाच्या रांगेत उभं करायचं आणि कॉर्नरच्या टपरीवरुन बिडी आणायला पळायचं....मग त्या फंटाश्टिक चहासोबत २-३ जणात एक बिडी फिरवत निवांत गजाल्या कराव्यात! वेळ नाय, काळ नाय...स्विकारवाल्यानं हाकलेपर्यंत पब्लिक तिथंच पडीक. हो! कोण हलतंय कशाला तिथून? भूक लागली की खायची सोय होतेय, चहा-अग्निहोत्र तर आहेच...शिवाय पक्षीनिरिक्षणासाठी अप्रतिम स्पॉट! सगळे साले 'सलीम अली' होऊन जायचे. ;)

५० फक्त 28/12/2010 - 23:48
कामतचं आता थाट्बाट झालंय, आणि तिथली गुजराथी थाळी काही फार चांगली नाही. कोकण एक्स. मध्ये व्हेज पर्याय फारच कमी आहेत. स्वागतचं नक्की लोकेशन सांगाल काय जाईन उद्याच. अवांतर - तुम्ही मु.पो. तळेगाव दाभाडे असाल तर- तिथं एक पांड्वांचं मंदिर आहे म्हणे, जरा सांगाल काय कसे जायचं ते. हर्षद.

In reply to by ५० फक्त

मी-सौरभ 28/12/2010 - 23:53
१. स्वागतः बँक ऑफ महाराष्ट्र समोर. कर्वे पुतळ्याकडून नळस्टॉप कडे येताना पहिल्या सिग्नलला डावीकडे वळल्यावर लगेच उजव्या हाताला. २. हो असे एक मंदीर आहे पण मी कधी गेलेलो नाही. पण ते गावातच आहे त्यामुळे रिक्षावाला नक्की नेऊ शकेल.

५० फक्त 28/12/2010 - 23:59
आता विषय निघालाच आहे तर, स्वागतच्या लाईनला थोडं पुढे एक लोणि डोसा वाला असतो, त्याचा डोसा खाउन पहा, खुप मस्त असतो. अतिशय म उ आणि भरपुर लोणि घातलेला, कधि येतो आहेस सांग जाउ या. तो दुपारी २पर्य्तंत असतो. हर्षद.

In reply to by ५० फक्त

गवि 29/12/2010 - 16:55
जं. महाराज रोडवरपण एक लोणी डोसावाला असून त्याच्याकडे अनेकदा (रात्री) खाल्लेले छोटे छोटे मऊ लुसलुशीत डोसे खूप आवडले. तो पांढरे लोणी डोश्यावर घालतो. मला वाटतं दावणगिरी लोणी डोश्यांची "हॉट चिप्स" सारखीच (पण अनब्रँडेड) आउटलेट्स ठिकठिकाणी निघाली आहेत गेल्या काही काळात.

सखी 29/12/2010 - 00:06
शीतलचा दही वडा एकदम चांगला असायचा, गेल्या ३-४ वर्षात चक्कर नाही, त्यामुळे सध्याचे माहीती नाही.

गणेशा 29/12/2010 - 16:49
जायला पायजे शीतल ला .. अजुन गेलो नाही. कोकण एक्स्प्रेस मस्त आहे ... जोग शाळेपुढे कायम जाणे होते पण स्वागत माहिती नाही.. पाहतो नक्की .. खाण्यासाठी मी कोठे ही जायला तयार असतो ..

छान लेखमाला. लेखकानी शक्य झाल्यास सारबागेबाहेरील स्टॉलवाले, संभाजी बागेबाहेरील पाणीपुरीवाले तसेच सकाळी सकाळी नाष्ट्याचे डबे घेउन तुळशीबाग, लक्ष्मी रोड ह्या ठिकाणी स्टॉल लावणारे ह्यांची देखील ओळख करुन द्यावी.

गवि 29/12/2010 - 17:14
हो.. अजून माहिती द्याच. अंदाजाने ट्राय करु गेल्यास वेळ फुकट जातो. आमच्या सारख्या व्हिजिटर्सना पुन्हा पुन्हा वेगवेगळी ठिकाणे ट्राय करायला चान्स कमी असतो. असेच त्या संभाजी उद्यानाबाहेर सपना हॉटेलसमोर असलेल्या स्टीमी अफेअर्स म्हणून स्टॉलवर अनंत टाईपच्या इडल्या दिसल्या म्हणून काही नमुने चाखले. अजिबात आवडले नाही.

सखी 29/12/2010 - 19:08
लज्जत नावाचे हॉटेल आहे अजुन कोणाला माहीती आहे का? - कुमठेकर रस्त्याच्या आतल्या रस्त्यावर होते, गणपुले क्लासेसच्या समोर. तिथे बरेच हटके पदार्थ असायचे, व सगळ्यांची चव नावाप्रमाणेच लज्जतदार होती :) आता गुगलुन पाहीले असता एक दुसरेच लज्जत ला.ब. रस्त्यावर दिसते आहे, पण ते हे नसावे.

५० फक्त 29/12/2010 - 22:35
सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद तसेच वाचनमात्रांना पण धन्यवाद. श्री. परा, निश्चितच, आठवड्यातले कमीत कमी ३ दिवस तरी बाहेर कुठेतरी खायला जातोच.( हे वाचुन बायको मारणार आहे). सध्या जरा इतर कामं जास्त आहेत म्हणुन थोडा वेळ लागतो आहे. हर्षद.

In reply to by ५० फक्त

सविता 29/12/2010 - 23:23
अहो..... ते कुठल्या उद्देशाने बोलले ते कळलंच नाही तुम्हाला! अजून सरावला नाहीत वाटतं मिपा आणि हलकट मिपाकर यांना तुम्ही!!! :)

In reply to by सविता

गणपा 30/12/2010 - 03:35
हा हा हा, सविता ताई ते हर्षदराव बी पुन्याच हाईत. ;) अट्टल पुणेकर दुसर्‍या पुणेकराकडुन अपमान करवुन घेईलच कसा :D
3

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

अमोल देशमुख ·

गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते
अगदी अगदी. ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. काय बोल्ता ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 24/12/2010 - 18:05
ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. >> हा हा हा !!पर्‍या अजुन दादोंजीच्या पुतळ्याची 'व्यवस्था ' कुठे करणार हे चर्चीले गेले नाहीये . धाग्याबद्दल : उद्या म्हणाल त्यांच्या पत्रीकेतदेखील गुरु नव्हता.

यकु 24/12/2010 - 16:47
मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल,
हे लिहीत अस्तानाही तुम्हाला तुमचा हात आवरावा वाटला नाही ;-) कमाल आहे बुवा..

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:57
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती
शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात कोणत्याही एकाच जातीचा कैवार घेतल्याचे आढळले नाही. मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:07
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....
म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.
गो आणि ब्राम्हण (यांना आदराने बामण असे देखील म्हणले जाते) हे सोडून उरतील ते सगळे 'इतर' ह्या सदरात मोडतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:14
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
हाही एक प्रश्न विचारला होता. ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?

In reply to by आजानुकर्ण

स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
स्वयंभूंना कशाचीच गरज नसते. मग ते गुरु असो वा प्रतिपालक. (हा अर्थ आम्ही वरिल लेखातुन प्राप्त केला आहे.)
ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत. तुम्ही लेख निट वाचला नसावा किंवा हा महान लेख तुमच्या आकलनाबाहेर असावा. अनेक रहस्ये उलगडून दाखवणार हा लेख म्हणजे जणु ज्ञानेश्वरीच आहे. जितकी वाचावी तेवढे नवे नवे कळत जाते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:24
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत
म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.
मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सर्व ज्ञान आम्हाला सदर लेखातुनच मिळाले आहे. आपण लेख तर सोडाच पण माझे प्रतिसाद देखील निट वाचत नाही असे दिसते. असो... तुम्हाला एका गुरुची गरज आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:31
सदर लेखातून जर तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर माफ करा. मला या लेखात तसे काही आढळले नाही. तुमचे प्रतिसाद नीट वाचूनच त्यात पुरेसे स्पष्टीकरण नसल्याने मी काही शंका विचारल्या होत्या. त्यांची समाधानकारक उत्तरे देणे तुम्हाला शक्य नाही असे दिसते.
तुम्हाला एका गुरुची गरज आहे.
हा वदतोव्याघात वाटतो. तुमच्या गृहीतकानुसार सर्व अब्राम्हण स्वयंभू आहेत. मी ब्राम्हण नाही त्यामुळे मला गुरूची गरज नसावी. मात्र तुम्ही मला गुरूची गरज असल्याचे प्रतिपादन करत आहात. त्यामुळे तुमच्या मूळ गृहीतकात किंवा वरील निष्कर्षात काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या कधी होता बरे? आमच्या माहीतीनुसार बडोद्याचे तुकोजीराव होळकर यांचा कुत्रा होता वाघ्या. स्मारक निधी साठी सर्वात जास्त देणगी तुकोजीरावांनी दिली होती व त्या बदल्यात त्यांच्या वाघ्याची समाधी तेथे बांधली होती असे वाचलेले आहे. अर्थात तुकोजीराजे प्रजाहितदक्ष व देशप्रेमी असल्याने त्यांना हा गुन्हा माफ.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:19
तुमची माहिती चुकीची आहे. बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात?

In reply to by ए.चंद्रशेखर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:25
निनाद बेडेकर हे शाहीरच आहेत. पण त्यांचे लेखन वगळता कुठेही वाघ्या कुत्रा होळकरांचा होता असे वाचनात आले नाही. म्हणून तेवढा संदर्भ देता आला. त्यांच्या लेखनाचे संदर्भ देणे विश्वासार्ह नाही. ते भाजपाच्या व्यासपीठावरही असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:33
वाघ्या कुत्रा होळकरांचा असल्याचे प्रतिपादन तुमचे होते माझे नाही. (मी फक्त ते कुठे वाचले हे सांगितले). एक तर तुम्ही होळकर हे बडोद्याचे असल्याचे सांगितले. ते धादांत चूक आहे. (निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे). वाघ्या कुत्र्याची समाधी होळकरांनी बांधली असल्याचे संदर्भ फक्त बेडेकरांच्याच लेखनात आले आहेत आणि ते पुरेसे विश्वासार्ह नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे. पुन्हा वाचावे. आणि त्यांच्या म्हणजे होळकरांच्या असाच सकृत दर्शनी अर्थ निघतो. किंवा आपल्या लिखाणात पुरेशी स्पष्टता नाही हे दिसते. निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:42
आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे
निनाद बेडेकर यांनी तसे लिहिले आहे. मी नाही.
निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.
हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात.

In reply to by आजानुकर्ण

हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात. आम्ही त्यांच्यावर कुठे खार खाल्ला आहे बॉ? आम्ही सत्य प्रतिपादन केले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:49
तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे.
मान्य आहे पण त्यांची नावे अचानक घेण्याचे कारण समजले नाही. सदर चर्चेत निनाद बेडेकर यांचा संदर्भ वाघ्या कुत्र्याची समाधी कोणाची ह्या तुम्ही उपस्थित केलेल्या शंकेतूनच आला. मात्र जयसिंगराव पाटील व इतरांबाबतची तुमची टिप्पणी सत्य असल्याचे क्षणभर गृहित धरले तरी हे सत्यप्रतिपादन अस्थानी वाटते. मी आज दुपारी वडापाव खाल्ला हे सत्य आहे पण या चर्चेत त्याचे प्रतिपादन करणे अस्थानी आहे असे मला वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. बरोबर. आमची मिष्टेक मान्य करतो. चुकून बडोद्याचे ऐसा टायपला. तुमची माहिती चुकीची आहे मान्य पण मग शिवाजीमहाराजांचा वाघ्या ही तुम्ही पुरवलेली माहीती चुकीची आहे हे मान्य आहे ना. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात? तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:37
वाघ्या शिवाजीमहाराजांचा नव्हता हे सिद्ध कुठे झाले आहे? माझी माहिती चुकीची असल्याचे सिद्ध न झाल्याने मी तसे मान्य का करू.
तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत?

In reply to by आजानुकर्ण

मग वाघ्या शिवरायांचा होता हे कुठे सिद्ध झाले आहे ते दाखवा... हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:58
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला । झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥ राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥
अनेक गीतांमध्ये, पोवाड्यांमध्ये, लोककथांमध्ये वाघ्या शिवरायांचा होता अशी समजूत प्रचलित आहे. ही समजूत (श्रीरामकथेप्रमाणेच) ग्राह्य धरून मी तो दावा केला होता. मात्र ही समजूत खोटी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यास वाघ्या शिवरायांचा होता हे अमान्य करता येईल. पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?
आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो.

In reply to by आजानुकर्ण

सदर पवाडा कोणत्या शाहीराचा? आणि तो ग्राह्य कसा मानायचा? बाकी कोणत्या शाहीराचा पवाडा ग्राह्य मानायचा आणि कोणाचा नाही याचे निकष काय? पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना. हा उगाच मूळ चर्चेला फाटे फोडण्याचा प्रयत्न वाटतो आहे. आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो. तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:28
शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का?
फाटे फोडण्याचा प्रयत्न नाही. महाराजांकडे गाईबैल आहेत, त्याचप्रमाणे कुत्रा आणि घोडीही आहेत.महाराजांची कुत्रा आणि घोडी ही त्यांच्याकडच्या गाईबैलांपेक्षा अधिक लोकप्रिय असावीत असे अनेक पोवाडी, कथा, वाघ्याची समाधी वगैरे उदाहरणांवरून वाटते. त्यामुळे महाराजांना निदान श्वानप्रतिपालक किंवा अश्वप्रतिपालक म्हणणे सयुक्तिक ठरले असते असे सामान्य तर्क लावला असता वाटते. पण सत्य इतके सरळसोट कधीच असत नाही. मग महाराजांना गो आणि ब्राम्हण यांचेच प्रतिपालक ठरवण्याचा आणि जयजयकाराच्या मार्फत पुन्हा पुन्हा ठसवण्याचा उद्देश काय हे समजावून घेत आहे.
तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!
असे काही नाही. तुम्हाला साक्षात तुकोजी होळकरांसारख्यांना माफी देण्याचे अधिकार असल्याचे (तुम्हीच लिहिल्याचे) वाचून थोडा सावध पवित्रा घ्यावा असे वाटले.

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? अगदी अगदी. शिवाजी महाराजांनी स्वतः तयार करवून घेतलेल्या राजमुद्रेवरसुद्धा गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द लिहिलेला आहे. याबाबत कोणावर खटला भरावा याबद्दल काही मार्गदर्शन केल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:40
शिवाजीराजांच्या मुद्रेवर खालील ओळी होत्या. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते यात गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द कुठे दिसतो? तुम्हाला एखादी स्पेशल राजमुद्रा माहीत आहे काय?

In reply to by आजानुकर्ण

ओक्के ओक्के. आमची चूक झाली असेल. आपण ज्ञानी आहात असे वाटते. पण मग 'गोब्राम्हणप्रतिपालक' हा शब्द कुठून ईंट्रोड्यूस झाला याबाबत काही ज्ञान दिल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:06
माफ करा मी ज्ञानी नाही. मिपाकरांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन काही ज्ञानकण वेचण्यास मी येथे येतो. मात्र माझ्या शंकांचे समाधान करणारी उत्तरे मिळत नसल्याने वाईट वाटते. गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द कुठून आला हे वाचण्यास मलाही आवडेल.

In reply to by आजानुकर्ण

माफ करा मी ज्ञानी नाही. हा तुमचा विनय तर नाही ना ? आत्ताच थोडे गूगलून पाहिले.यु-ट्युब किंवा गूगलवर शिव गर्जना असे टाईप करा. असंख्य संबंधित क्लिप्स मिळतील. ही आरोळी याआधीही अनेकदा ऐकली आहे.

In reply to by आजानुकर्ण

सूर्य 24/12/2010 - 21:32
आरं तिच्या... हा पण खोडसाळपणा आहे होय. शाळेत शिकवलेला इतिहासच फक्त माहीत असल्याने हा खोडसाळपणा आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. असो. वरिजनली, हा खोडसाळपणा आणि अजुन जे काही असतील ते, कोणी केले ते शोधले पाहिजे. फारच त्रास होतोय आजकाल. - सूर्य

ए.चंद्रशेखर 24/12/2010 - 17:02
"महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे " आजच्या सरकारमधील नेते ४०० वर्षे वयाचे आहेत हे माहीत नव्हते ब्वा!

विजुभाऊ 24/12/2010 - 17:21
बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? वा वा वा. तुम्ही हे लिहीताना नक्की कोणत्या उद्देशाने लिहीलय हे उमजले नाही. पण कितीही थोर व्यक्ती असली तरी तिला गुरुची आवश्यकता असतेच ना. माणसाची पहिली गुरु आई असते. शिक्षण घेतले नाही तर ती व्यक्ती थोर कशी होणार? राम , कृष्ण या देवतेसमान व्यक्तीना सुद्धा गुरु होते. त्यानी शाळेत्/आश्रमात शिक्षण घेतले होते. दत्तत्रेया नी तर २४ गुरु केले होते म्हणे. लहानपणी शिवाजी महाराज जर राज्यशास्त्राचे /तलवारबाजीचे /युद्धशास्त्राचे धडे शिकले नसते तर त्यानी मोठेपणी राज्य कसे स्थापन केले असते? काहीही शिकायचे म्हंटले तरे निदान इन्डायरेक्ट गुरु तरी हवाच ना?

गणेशा 24/12/2010 - 17:32
अमोल जी पहिल्यांदा हा धागा पाहिला तेंव्हा वाटले होते पुन्हा एकदा तेच तेच सुरु झाले वाटते .. परंतु आपण लिहिलेले विचार आणि त्यामागील शुद्ध हेतु स्पष्ट कळत आहे. तुम्ही जे लिहिले आहे तसेच बर्याच जणांना वाटते .. परंतु त्यांच्या वाटण्याकडे जआणीवेने दुरल्क्ष केले जाते ही खंत आहे.. --- ह्या धाग्यातील मुख्य हेतु खुप छान होता असे मला वाटले .. पण पुन्हा रिप्लाय वाचुन खेद वाटला .. आपणही काही तरी तर्क घेवुन भांडतच आहोत तर मग काही लोक फक्त वेगळ्या पातळीवरुन भांडत आहेत .. मग त्यांना आपण दोष देतो .. तर मग आपण काय करतोय ? तेच ना .. जावुद्या व्यर्थ वादात पडायचे नाहिये .. वाईट वाटले बस्स ..

स्पा 24/12/2010 - 17:50
गुरुविण नाही कोणी रे.... गुरु नाम हाची ध्यास रे............... गुरूचा महिमा अगाध आहे..... शिवरायांची आई हि सुद्धा त्यांची गुरूच होती.... हिरा जरी स्वयंभू असला तरी त्याला तासणारा हा लागतोच.... अंगीभूत गुण जागृत करतो तो गुरु....

पुतळा हलवु देणार् नाहि..उद्धव साहेब गरजले.. आधि औरंगाबादचे संभाजी नगर करा... स्टेडीयम बाहेर गोंधळ....प्रबोधन कारा बद्दलचे ब्रिगेडचे प्रेम बेगडी.. सेनेच्या श्री शिंदे यांची प्रतिक्रिया पुण्यात भाजप. व सेना व नागरिकांचा मोर्चा.. स्टार माझा..

Pain 24/12/2010 - 22:52
----------------------------------------------------------------- महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे. अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे. - संपादक मंडळ ------------------------------------------------------------------- तुम्हाला त्यांच्या आणि संबंधितांच्या प्रतिष्ठेची खरच इतकी काळजी असती तर असे द्वेषमूलक, चिथावणीखोर आणि चुकिची माहिती पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यारे धागे इथे येउच दिले नसते.

प्रशु 24/12/2010 - 23:33
ज्या घोषणे वरुन वाद सुरु आहे ती अर्धवट आहे , गो ब्राम्हण च्या पुढे 'क्षत्रिय कुलावंत' हा शब्द राहुन गेलाय...

In reply to by टारझन

शिल्पा ब 26/12/2010 - 21:16
जाउद्या... बाकी आम्हालापण गुरुची गरजच नव्हती पण घरी त्रास देतो म्हणुन शाळेत घातलं...त्यामुळेच आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.)

In reply to by शिल्पा ब

पंगा 26/12/2010 - 21:55
आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.
लपंडाव नाही खेळलात कधी लहानपणी? राज्य नाही आलं कधी तुमच्यावर?

डावखुरा 25/12/2010 - 00:38
१)गो-गाय : गायीचे महत्व फार पुर्वीपासुन भारतीय समाजात आहे... गायीला आपण पवित्र मानतो... तसेच तिच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास आहे अशी श्रद्धा आहे... आणि मुस्लिमांपासुन गोमातेला संरक्षण देणारा राजा .... पण ब्राह्मण का यावर मी काही बोलु नाही शकत... २)शिवरायांचे गुरु.. शस्त्रास्त्र शास्त्र आणि राज्य्कारभार : दादोजी कोंडदेव अध्यात्मिक आणि राजकीय गुरु.. : समर्थ रामदास स्वामी (दासबोधकार आणि शक्तीउपासनेला सदिव प्रोत्साहन देणारे...) एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ... जय भवानी जय शिवाजी

In reply to by डावखुरा

छत्रपती 26/12/2010 - 14:11
एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ...
हे जर्स्त्य अस्येल त्र अवरन्गजेबाच्या पद्री अस्नार्या अन्सी टक्के रज्पुत सयनिकाचे सुन्ता क झले नाहे? अस मझा परस्न आहे.

वेताळ 25/12/2010 - 09:42
पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " एक शंका शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतात विशेष करुन उत्तर भारतात हिंदु रहात होते कि नव्हते? महाराज मुस्लिम विरोधात होते हे सतत का सांगत असता तुम्ही?

रन्गराव 25/12/2010 - 14:37
काय चालल आहे? जातीयवाद, जाज्वल्य अभिमान ह्या गोष्टी किती टोकाला न्यायच्या? तुम्ही अमक्या जातीत जन्मलात हा योगायोग होता, त्यात अभिमान बाळगण्यासारखा काय कमवल? गेल्या काही महिन्यातील लेखांवरील प्रतिक्रिया वाचून जातीयवाद कमी होण्याएवजी वाढतोच आहे अस वाटू लागल आहे. " सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांच्यासाठी कोणीही काही करत नाहीत" , " ब्राह्मणांनी हजारो वर्षे दलितांवर अन्याय केला" ही काही उदाहरणे. ह्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे प्रतिसाद येऊ शकत नाहीत.

अविनाश कदम 26/12/2010 - 03:01
दादोजी कोंडदेव हे एक कारभारी होते. शहाजी राज्यांच्या जहागीरीतील पुणे परगण्याचा कारभार ते पहात होते. जिजाऊ व शिवाजी महाराजांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्याना शिवाजी महाराजांना शिकवण्याचे काम दिलेले नव्हते. शिवाजी महाराजांना शस्त्रात्रे चालवण्याचे इ. काम दुसर्‍या कुणी तरी केलेले असणार. दादोजी कोंडदेवाना गुरू म्हटल्याने त्यांची किंमत वाढते कारभारी म्हटल्याने कमी होते असं मानण्याचं कारण नाही.

In reply to by शिल्पा ब

अविनाश कदम 28/12/2010 - 00:30
या माहीतीचा स्रोत काय आहे? शिवशाहीचा इतिहास म्हणून आढावा घेणार्‍या इतिहासकारांची (शाहिरांची नव्हेत) पुस्तके.

प्राजु 26/12/2010 - 05:51
सध्या जी काही चर्चा आणि गोंधळ चालला आहे महाराष्ट्रात तो बघून, 'पुन्हा एकदा शिवाजी' म्हणून कोणीजन्म घ्यायला धजावेल असे वाटत नाही. अगदी प्रत्यक्ष महाराज सुद्धा!

सन्जोप राव 26/12/2010 - 06:04
वर चालू असलेल्या अत्यंत उद्बोधक व ज्ञानवर्धक चर्चेत ब्राह्मण हा शब्द दोन प्रकारे लिहिला गेला आहे. शिवछत्रपतींनी हा शब्द कोणत्या प्रकारे लिहिला आहे याबाबत जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल. इथे छत्रपतींना लिहिता-वाचता येते असे गृहितक आहे. मिरासदारांचे या बाबतीतले मत वेगळे आहे.

In reply to by सन्जोप राव

पंगा 26/12/2010 - 20:23
मराठी शुद्धलेखनाच्या 'जुन्या' (पारंपरिक?) नियमांप्रमाणे 'ब्राह्मण' (अर्थात संस्कृताप्रमाणे) हे रूप बरोबर आहे. 'नव्या' (सुधारित किंवा सुलभीकृत? नाही म्हणायला हे लागू होऊनसुद्धा गेला बाजार चाळीसएक वर्षे होऊन गेली असावीत) नियमांप्रमाणे 'ब्राम्हण' हे रूप (अर्थात मराठीतील उच्चारास अनुसरून) बरोबर आहे, परंतु 'ब्राह्मण' हे रूप वापरल्यास चुकीचे मानले जात नाही, असे काहीसे आठवते. (याच नियमानुसार 'आह्लाद', 'प्रह्लाद', 'चिह्न' हे शब्द नव्या मराठी शुद्धलेखनात अनुक्रमे 'आल्हाद', 'प्रल्हाद' आणि 'चिन्ह' असे लिहिले जातात. मात्र काही कारणाकरिता 'ह्य' हे जोडाक्षर या नियमास अपवाद आहे. 'बाह्य' हा शब्द 'बाय्ह' असा लिहिता येत नाही.) मी माध्यमिक शाळेत असताना (१९७५-१९८१) पाठ्यपुस्तकांतून 'ब्राम्हण' हे एकमेव रूप वापरले जात असल्याचे आठवते. शिवाजीमहाराजांच्या काळात मराठी शुद्धलेखनाचे काही काटेकोर नियम असण्याबद्दल साशंक आहे, परंतु यदाकदाचित असलेच, तर बहुधा हा शब्द महाराजांनी 'ब्राह्मण' असा (संस्कृतानुरूप) लिहिला असण्याची शक्यता दाट वाटते. (चूभूद्याघ्या.)

अनामिका 26/12/2010 - 19:02
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो | अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं || राखी रजपुती , रजधानी राखी राजन की | धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं || भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की | देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं || साही के सपूत , सिवराज समशेर तेरी | दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं || वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत | रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं || हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की | कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं || मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह | बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं || राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज | देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं || देवल गिराविते , फिराविते निसान अली | ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी || गौर गणपती आप , औरनको देत ताप | आपनी ही बार सब , मारी गये दबकी || पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत | सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की || कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती | सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी || - कविराज भूषण. जगन्मान्य असलेल्या जाणत्या राजाला स्वत:च्या स्वार्थासाठी आधुनिक काळातला स्वयंघोषित जाणता राजा आपल्या बगलबच्च्यांकरवी जाणिवपुर्वक वापरतोय हे या वादाचे सत्य आहे...सगळ्या बाजूने कोंडित सापडल्यावर भावनेला हात घालत राजकारण करणे हाच सत्ताधारी पक्षाचा जुनाच हातखंडा आहे...ज्यांची शिवछत्रपतींवर निस्सिम व निस्पृह भक्ती आहे ते कदापी जेम्स लेन सारख्याच्या अनर्घल लिखाणाला आपल्या तेजस्वी विचारात थारा देणार नाहित.....मुळात या नव्याने इतिहास प्रसवणार्‍यांकडे कसलेही पुरावे नाहित पण आमचेच खरे म्हणत छत्रपतींना फक्त मराठा समाजाच्या दावणीला बांधण्याचा हा निव्वळ अट्टाहास आहे.....काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे यांना केवळ ब्राम्हणवादाने पछाडलेले आहे.....आणि याच भावनेतुन दोदोजी व समर्थ शिवरायांचे गुरु नव्हते अश्या प्रकारचा विखारी प्रचार या बगलबच्च्यांनी सुरु केला...पुतळे हटवले म्हणून दादोजींचे शिवरायांच्या जिवनाच्या जडणघडणीतले स्थान कमी होत नाही....आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहासाची विटंबना करणार्‍यांचा व भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍यांचा भविष्यात लिहिला जाणारा इतिहास हा काळाकुट्ट असणार आहे जो पुढच्या पिढीला प्रेरणादायी कदापी असणार नाही....दादोजींचे नाव शिवरायांबरोबर कायमच जोडल व सुवर्णाक्षरांनी कोरल गेलय ते पुसण्याचा प्रमाद या स्वयंनिर्मित नव-इतिहासकारांनी करु नये ती त्यांची तितकी कुवत देखिल नाही व पात्रता तर मुळीच नाही. जय हिंद! जय महाराष्ट्र!

मैत्र 27/12/2010 - 10:33
एक वेगळा मुद्दा मनात आला... संभाजी ब्रिगेड नामक एका नव्यानेच अस्तित्वात आलेल्या संघटनेने जेम्स लेन प्रकरणात तोड फोड केल्या नंतर सर्व सामान्य लोकांना दोन गोष्टींची माहिती मिळाली - १. या नावाची एका कुठल्याही बर्‍या वाईट संस्थेवर / लोकांवर शाब्दिक शारिरीक हल्ला करू शकणारी एक संघटना आहे. ज्यांना संभाजी महाराजांच्या थोर नावानंतर एक मराठी शब्द सुद्धा मिळाला नाही संघटनेला नाव ठरवताना. २. कोणी एक जेम्स लेन नावाचा इतिहास संशोधक भारतात आला होता. तो पुण्यात राहिला. त्याने शिवाजी महाराजांबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. त्यात एका पानावर कुठे एक अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. त्याने प्रस्तावनेत त्याला पुण्यात ज्यांनी मदत केली त्यांचे आभार प्रदर्शन आहे. खरं तर हे होई पर्यंत सामान्य मनुष्य सोडा, कोणालाही या सर्व प्रकरणाची सुतराम कल्पना नव्हती. नेहमी वाचन करणारे, अनेक विषयांचा चांगला अभ्यास असलेले अनेक लोकही पूर्ण अनभिज्ञ होते. अनेक लोकांनी लिहिलं नंतर की पुण्यात पन्नास वर्षांच्या वास्तव्यात असले दळभद्री विचार कुठे ऐकले नाहीत. पुन्हा खूप धुरळा उठला. माहिती कळल्यानंतर जेवढा ब्रिगेडच्या गुंडगिरीचा निषेध झाला त्याहून जास्त लेनच्या पुस्तकाला एकत्र पणे विरोध झाला. कारण तिथे कोणालाही जात / व्यक्ती मध्ये आली नाही. महाराजांबद्दलचा आदर आणि अभिमान याहून महाराष्ट्रात काहीही मोठं नाही. पण इथे विषय संपला असता तर काही चूक नव्हतं एका अर्थी... पण तो गेली अनेक वर्ष मुद्दामून चावला गेला आणि पुन्हा पुन्हा अतिशय विखारी पद्धतीने धुरळा उठवला जात आहे. एक विचार मनात आला. की पुतळा काढू नये, दादोजी कोंडदेव हेच महाराजांचे गुरू होते म्हणणार्‍यांनाही विचारा की इतिहासात शाळेत वाचलेला भाग काय, कादंबर्‍या, नाटकांमध्ये पाहिलेला काय कोणाच्याही मनात किती मोठं स्थान होतं दादोजींविषयी... अतिशय परखडपणे पाहिलं तर खूप मोठं नव्हतंच ! नेहमी दादोजी हे कारभारी आणि कर्तव्य दक्ष व्यक्ती ज्यांनी आपल्या होणार्‍या सुभेदाराला / शहाजी राजांसारख्या अतिशय महत्त्वाच्या सरदाराच्या मुलाला मार्गदर्शन केलं. म्हणजे बरोबर बसवून न्याय, महसूल वगैरे त्यांच्या अखत्यारीतल्या गोष्टी दाखवल्या / समजावल्या. त्यांना शरीरसंपदा कमावण्यासाठी आणि तेव्हाची शस्त्रं वापरण्याची - तलवार, दांडपट्टा, भाला, बिचवा इ., योग्य व्यक्तींची नेमणूक केली. मला वाटतंय की अगदी दादोजी या व्यक्तीला पूर्ण समर्थन असलेल्यांना सुद्धा असं कधीच मनात नसावं की जसं चाणक्याने चंद्रगुप्ताला शोधून तयार केलं आणि एका काळापर्यंत पूर्ण सेना उभारली, राज्य सांभाळलं त्याच्या जवळपास सुद्धा दादोजींचं काम होतं. दुसरी गोष्ट बहुतेकांना हेही माहीत नव्हतं की ही व्यक्ती कुठल्या जातीची होती. ही सर्व माहिती बहुसंख्य सामान्य जनांना आणि अभिजनांना ब्रिगेडनेच पुरवली. मग फक्त हे सिद्ध असताना की या नावाची एक व्यक्ती कारभारी म्हणून होती, ते कारभारी म्हणून खरंच चांगलं वजन आणि महत्त्व असलेले होते. तसं नसेल तर ब्रिगेड आणि आपण सर्व चक्क शहाजी राजांबद्दलच अविश्वास दाखवतोय ज्यांनी आपली बायको आणि लहान मुलगा, त्यांच्या जबाबदारीवर जहागिर सांभाळण्यासाठी पुण्याला पाठवले. तेव्हा असं वाटतं की तेवढं जे काही थोडं महत्त्व आहे ते खूप मोठा गदारोळ करून खोडून काढण्याने ब्रिगेड चक्क त्यांचं महत्त्व वाढवतेय ! अजून एक मुद्दा आज सकाळ मध्ये आलेला - काही विरोधकांनी म्हटलंय की सोन्याचा नांगर वगैरे भाकड कल्पना महाराजांशी जोडल्या जाऊ नयेत. असं वाचनात आलं होतं की मुरार जगदेवाने पुणं जाळून गाढवाचा नांगर फिरवला आणि पुणं नष्ट झाल्याची घोषणा केली. तेव्हा सोन्याचा नांगर हे प्रतिकात्मक होतं की आता नव्याने पुणं वसवून इथे सुवर्ण भूमी उभी केली जाईल... जर दुसरी गोष्ट खोटी असेल तर पहिली पण खोटीच असली पाहिजे. हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. थोडक्यात - ज्या गोष्टीने फार फरक पडत नाही त्याचा खूप मोठा मुद्दा करण्यात राजकीय सोडता (आणि कसलेही कारण नसलेल्या जातीय संदर्भाचा) कुठलाही लाभ किंवा हेतू दिसत नाही.

In reply to by मैत्र

सुहास.. 27/12/2010 - 13:42
हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. >> +१ .. १ ) जेम्स लेन ने पुस्तक लिही पर्यंत ब्रिगेड कोठे होती ? २ ) शिवधर्म स्थापन करुन ' शिवधर्म 'च मुळात न पाळणार्‍यांचा नेमका धर्म कुठला ? सरळ - सोट पणे हा सगळा प्रकारच राजकारण आहे.

In reply to by मैत्र

गणेशा 27/12/2010 - 16:53
आपला रिप्लाय मनापासुन आवडला ... सामान्य माणसाचे मत असेच असते .. पण ज्यांना प्रसिद्धी .. राजकारण हवे असते ते अश्या गोष्टींना जाणीवेन बगल देतात

सोनोपंत डबीर ह्यांचा महाराष्ट्रात कुठे पुतळा आहे का ? ब्रीग्रेड संघटनेला लगेच माहिती पुरवावी म्हणजे अजून एक अचाट सत्याचे प्रयोग करतील ते . त्वरा करा

नाना बेरके 27/12/2010 - 12:34
१. 'सोनोपंत डबीर' हे कोण होते ? २. वरच्या प्रतिसादात 'ब्रीग्रेड' हा शब्द आला आहे. तो शुध्दलेखनदृष्ट्या योग्य आहे कां ? कारण काही लेखनात हाच शब्द बीग्रेड किंवा ब्रिगेड असाही आला आहे. ३. जसा एखादा राजा स्वयंभू असू शकतो तश्याच इतरही गोष्टी स्वयंभू असू शकतात कां ? उदा. स्वयंभू गुरु, स्वयंभू शिष्य इ. इ. एक स्वयंभू प्रतिसादक नाना भू-रके

In reply to by नाना बेरके

महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ठाऊक नाही आपल्याला ? बाकी कशाला शुध्द लेखनाची आपण पर्वा करायची बिहार विकासाच्या मार्गावर लागलाय आणि त्याची मोडतोड संस्कृती महराष्ट्रात वणव्यासारखी पसरत आहे . पुण्यनगरीत झालेला तमाशा नववर्षाचे स्वागत करणार तर .

सुधीर काळे 27/12/2010 - 13:30
हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्यावर मी नुकताच पोस्ट केलेल्या "भारतीय-कसा मी? असा मी!" मधील खालील परिच्छेदाची आठवण झाली आणि आपण कुठे चाललो आहोत याबद्दल काळजी निर्माण झाली. सर्वांनी विचार करून असले फूट पाडणारे विषय टाळायला हवेत! त्यांची संवेदनशीलता राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक सांप्रदायिक अतिरेकाचा अवलंब करतील कीं त्यांची अक्कल आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं ’सर्व-भारतीय-एक’ ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल?

अविनाश कदम 28/12/2010 - 00:47
भारतीय समाज व्यवस्था निधर्मी असणं केव्हाच शक्य नाही. भारत हे बहुधर्मीय राष्ट्रच आहे. म्हणूनच इथली शासनव्यवस्था व राज्य व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणंच उपयोगाचं आहे. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचंच तत्त्व स्विकारलेलं आहे.

गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते
अगदी अगदी. ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. काय बोल्ता ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 24/12/2010 - 18:05
ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. >> हा हा हा !!पर्‍या अजुन दादोंजीच्या पुतळ्याची 'व्यवस्था ' कुठे करणार हे चर्चीले गेले नाहीये . धाग्याबद्दल : उद्या म्हणाल त्यांच्या पत्रीकेतदेखील गुरु नव्हता.

यकु 24/12/2010 - 16:47
मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल,
हे लिहीत अस्तानाही तुम्हाला तुमचा हात आवरावा वाटला नाही ;-) कमाल आहे बुवा..

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:57
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती
शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात कोणत्याही एकाच जातीचा कैवार घेतल्याचे आढळले नाही. मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:07
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....
म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.
गो आणि ब्राम्हण (यांना आदराने बामण असे देखील म्हणले जाते) हे सोडून उरतील ते सगळे 'इतर' ह्या सदरात मोडतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:14
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
हाही एक प्रश्न विचारला होता. ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?

In reply to by आजानुकर्ण

स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
स्वयंभूंना कशाचीच गरज नसते. मग ते गुरु असो वा प्रतिपालक. (हा अर्थ आम्ही वरिल लेखातुन प्राप्त केला आहे.)
ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत. तुम्ही लेख निट वाचला नसावा किंवा हा महान लेख तुमच्या आकलनाबाहेर असावा. अनेक रहस्ये उलगडून दाखवणार हा लेख म्हणजे जणु ज्ञानेश्वरीच आहे. जितकी वाचावी तेवढे नवे नवे कळत जाते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:24
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत
म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.
मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सर्व ज्ञान आम्हाला सदर लेखातुनच मिळाले आहे. आपण लेख तर सोडाच पण माझे प्रतिसाद देखील निट वाचत नाही असे दिसते. असो... तुम्हाला एका गुरुची गरज आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:31
सदर लेखातून जर तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर माफ करा. मला या लेखात तसे काही आढळले नाही. तुमचे प्रतिसाद नीट वाचूनच त्यात पुरेसे स्पष्टीकरण नसल्याने मी काही शंका विचारल्या होत्या. त्यांची समाधानकारक उत्तरे देणे तुम्हाला शक्य नाही असे दिसते.
तुम्हाला एका गुरुची गरज आहे.
हा वदतोव्याघात वाटतो. तुमच्या गृहीतकानुसार सर्व अब्राम्हण स्वयंभू आहेत. मी ब्राम्हण नाही त्यामुळे मला गुरूची गरज नसावी. मात्र तुम्ही मला गुरूची गरज असल्याचे प्रतिपादन करत आहात. त्यामुळे तुमच्या मूळ गृहीतकात किंवा वरील निष्कर्षात काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या कधी होता बरे? आमच्या माहीतीनुसार बडोद्याचे तुकोजीराव होळकर यांचा कुत्रा होता वाघ्या. स्मारक निधी साठी सर्वात जास्त देणगी तुकोजीरावांनी दिली होती व त्या बदल्यात त्यांच्या वाघ्याची समाधी तेथे बांधली होती असे वाचलेले आहे. अर्थात तुकोजीराजे प्रजाहितदक्ष व देशप्रेमी असल्याने त्यांना हा गुन्हा माफ.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:19
तुमची माहिती चुकीची आहे. बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात?

In reply to by ए.चंद्रशेखर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:25
निनाद बेडेकर हे शाहीरच आहेत. पण त्यांचे लेखन वगळता कुठेही वाघ्या कुत्रा होळकरांचा होता असे वाचनात आले नाही. म्हणून तेवढा संदर्भ देता आला. त्यांच्या लेखनाचे संदर्भ देणे विश्वासार्ह नाही. ते भाजपाच्या व्यासपीठावरही असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:33
वाघ्या कुत्रा होळकरांचा असल्याचे प्रतिपादन तुमचे होते माझे नाही. (मी फक्त ते कुठे वाचले हे सांगितले). एक तर तुम्ही होळकर हे बडोद्याचे असल्याचे सांगितले. ते धादांत चूक आहे. (निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे). वाघ्या कुत्र्याची समाधी होळकरांनी बांधली असल्याचे संदर्भ फक्त बेडेकरांच्याच लेखनात आले आहेत आणि ते पुरेसे विश्वासार्ह नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे. पुन्हा वाचावे. आणि त्यांच्या म्हणजे होळकरांच्या असाच सकृत दर्शनी अर्थ निघतो. किंवा आपल्या लिखाणात पुरेशी स्पष्टता नाही हे दिसते. निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:42
आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे
निनाद बेडेकर यांनी तसे लिहिले आहे. मी नाही.
निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.
हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात.

In reply to by आजानुकर्ण

हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात. आम्ही त्यांच्यावर कुठे खार खाल्ला आहे बॉ? आम्ही सत्य प्रतिपादन केले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:49
तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे.
मान्य आहे पण त्यांची नावे अचानक घेण्याचे कारण समजले नाही. सदर चर्चेत निनाद बेडेकर यांचा संदर्भ वाघ्या कुत्र्याची समाधी कोणाची ह्या तुम्ही उपस्थित केलेल्या शंकेतूनच आला. मात्र जयसिंगराव पाटील व इतरांबाबतची तुमची टिप्पणी सत्य असल्याचे क्षणभर गृहित धरले तरी हे सत्यप्रतिपादन अस्थानी वाटते. मी आज दुपारी वडापाव खाल्ला हे सत्य आहे पण या चर्चेत त्याचे प्रतिपादन करणे अस्थानी आहे असे मला वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. बरोबर. आमची मिष्टेक मान्य करतो. चुकून बडोद्याचे ऐसा टायपला. तुमची माहिती चुकीची आहे मान्य पण मग शिवाजीमहाराजांचा वाघ्या ही तुम्ही पुरवलेली माहीती चुकीची आहे हे मान्य आहे ना. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात? तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:37
वाघ्या शिवाजीमहाराजांचा नव्हता हे सिद्ध कुठे झाले आहे? माझी माहिती चुकीची असल्याचे सिद्ध न झाल्याने मी तसे मान्य का करू.
तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत?

In reply to by आजानुकर्ण

मग वाघ्या शिवरायांचा होता हे कुठे सिद्ध झाले आहे ते दाखवा... हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:58
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला । झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥ राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥
अनेक गीतांमध्ये, पोवाड्यांमध्ये, लोककथांमध्ये वाघ्या शिवरायांचा होता अशी समजूत प्रचलित आहे. ही समजूत (श्रीरामकथेप्रमाणेच) ग्राह्य धरून मी तो दावा केला होता. मात्र ही समजूत खोटी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यास वाघ्या शिवरायांचा होता हे अमान्य करता येईल. पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?
आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो.

In reply to by आजानुकर्ण

सदर पवाडा कोणत्या शाहीराचा? आणि तो ग्राह्य कसा मानायचा? बाकी कोणत्या शाहीराचा पवाडा ग्राह्य मानायचा आणि कोणाचा नाही याचे निकष काय? पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना. हा उगाच मूळ चर्चेला फाटे फोडण्याचा प्रयत्न वाटतो आहे. आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो. तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:28
शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का?
फाटे फोडण्याचा प्रयत्न नाही. महाराजांकडे गाईबैल आहेत, त्याचप्रमाणे कुत्रा आणि घोडीही आहेत.महाराजांची कुत्रा आणि घोडी ही त्यांच्याकडच्या गाईबैलांपेक्षा अधिक लोकप्रिय असावीत असे अनेक पोवाडी, कथा, वाघ्याची समाधी वगैरे उदाहरणांवरून वाटते. त्यामुळे महाराजांना निदान श्वानप्रतिपालक किंवा अश्वप्रतिपालक म्हणणे सयुक्तिक ठरले असते असे सामान्य तर्क लावला असता वाटते. पण सत्य इतके सरळसोट कधीच असत नाही. मग महाराजांना गो आणि ब्राम्हण यांचेच प्रतिपालक ठरवण्याचा आणि जयजयकाराच्या मार्फत पुन्हा पुन्हा ठसवण्याचा उद्देश काय हे समजावून घेत आहे.
तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!
असे काही नाही. तुम्हाला साक्षात तुकोजी होळकरांसारख्यांना माफी देण्याचे अधिकार असल्याचे (तुम्हीच लिहिल्याचे) वाचून थोडा सावध पवित्रा घ्यावा असे वाटले.

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? अगदी अगदी. शिवाजी महाराजांनी स्वतः तयार करवून घेतलेल्या राजमुद्रेवरसुद्धा गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द लिहिलेला आहे. याबाबत कोणावर खटला भरावा याबद्दल काही मार्गदर्शन केल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:40
शिवाजीराजांच्या मुद्रेवर खालील ओळी होत्या. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते यात गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द कुठे दिसतो? तुम्हाला एखादी स्पेशल राजमुद्रा माहीत आहे काय?

In reply to by आजानुकर्ण

ओक्के ओक्के. आमची चूक झाली असेल. आपण ज्ञानी आहात असे वाटते. पण मग 'गोब्राम्हणप्रतिपालक' हा शब्द कुठून ईंट्रोड्यूस झाला याबाबत काही ज्ञान दिल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:06
माफ करा मी ज्ञानी नाही. मिपाकरांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन काही ज्ञानकण वेचण्यास मी येथे येतो. मात्र माझ्या शंकांचे समाधान करणारी उत्तरे मिळत नसल्याने वाईट वाटते. गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द कुठून आला हे वाचण्यास मलाही आवडेल.

In reply to by आजानुकर्ण

माफ करा मी ज्ञानी नाही. हा तुमचा विनय तर नाही ना ? आत्ताच थोडे गूगलून पाहिले.यु-ट्युब किंवा गूगलवर शिव गर्जना असे टाईप करा. असंख्य संबंधित क्लिप्स मिळतील. ही आरोळी याआधीही अनेकदा ऐकली आहे.

In reply to by आजानुकर्ण

सूर्य 24/12/2010 - 21:32
आरं तिच्या... हा पण खोडसाळपणा आहे होय. शाळेत शिकवलेला इतिहासच फक्त माहीत असल्याने हा खोडसाळपणा आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. असो. वरिजनली, हा खोडसाळपणा आणि अजुन जे काही असतील ते, कोणी केले ते शोधले पाहिजे. फारच त्रास होतोय आजकाल. - सूर्य

ए.चंद्रशेखर 24/12/2010 - 17:02
"महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे " आजच्या सरकारमधील नेते ४०० वर्षे वयाचे आहेत हे माहीत नव्हते ब्वा!

विजुभाऊ 24/12/2010 - 17:21
बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? वा वा वा. तुम्ही हे लिहीताना नक्की कोणत्या उद्देशाने लिहीलय हे उमजले नाही. पण कितीही थोर व्यक्ती असली तरी तिला गुरुची आवश्यकता असतेच ना. माणसाची पहिली गुरु आई असते. शिक्षण घेतले नाही तर ती व्यक्ती थोर कशी होणार? राम , कृष्ण या देवतेसमान व्यक्तीना सुद्धा गुरु होते. त्यानी शाळेत्/आश्रमात शिक्षण घेतले होते. दत्तत्रेया नी तर २४ गुरु केले होते म्हणे. लहानपणी शिवाजी महाराज जर राज्यशास्त्राचे /तलवारबाजीचे /युद्धशास्त्राचे धडे शिकले नसते तर त्यानी मोठेपणी राज्य कसे स्थापन केले असते? काहीही शिकायचे म्हंटले तरे निदान इन्डायरेक्ट गुरु तरी हवाच ना?

गणेशा 24/12/2010 - 17:32
अमोल जी पहिल्यांदा हा धागा पाहिला तेंव्हा वाटले होते पुन्हा एकदा तेच तेच सुरु झाले वाटते .. परंतु आपण लिहिलेले विचार आणि त्यामागील शुद्ध हेतु स्पष्ट कळत आहे. तुम्ही जे लिहिले आहे तसेच बर्याच जणांना वाटते .. परंतु त्यांच्या वाटण्याकडे जआणीवेने दुरल्क्ष केले जाते ही खंत आहे.. --- ह्या धाग्यातील मुख्य हेतु खुप छान होता असे मला वाटले .. पण पुन्हा रिप्लाय वाचुन खेद वाटला .. आपणही काही तरी तर्क घेवुन भांडतच आहोत तर मग काही लोक फक्त वेगळ्या पातळीवरुन भांडत आहेत .. मग त्यांना आपण दोष देतो .. तर मग आपण काय करतोय ? तेच ना .. जावुद्या व्यर्थ वादात पडायचे नाहिये .. वाईट वाटले बस्स ..

स्पा 24/12/2010 - 17:50
गुरुविण नाही कोणी रे.... गुरु नाम हाची ध्यास रे............... गुरूचा महिमा अगाध आहे..... शिवरायांची आई हि सुद्धा त्यांची गुरूच होती.... हिरा जरी स्वयंभू असला तरी त्याला तासणारा हा लागतोच.... अंगीभूत गुण जागृत करतो तो गुरु....

पुतळा हलवु देणार् नाहि..उद्धव साहेब गरजले.. आधि औरंगाबादचे संभाजी नगर करा... स्टेडीयम बाहेर गोंधळ....प्रबोधन कारा बद्दलचे ब्रिगेडचे प्रेम बेगडी.. सेनेच्या श्री शिंदे यांची प्रतिक्रिया पुण्यात भाजप. व सेना व नागरिकांचा मोर्चा.. स्टार माझा..

Pain 24/12/2010 - 22:52
----------------------------------------------------------------- महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे. अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे. - संपादक मंडळ ------------------------------------------------------------------- तुम्हाला त्यांच्या आणि संबंधितांच्या प्रतिष्ठेची खरच इतकी काळजी असती तर असे द्वेषमूलक, चिथावणीखोर आणि चुकिची माहिती पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यारे धागे इथे येउच दिले नसते.

प्रशु 24/12/2010 - 23:33
ज्या घोषणे वरुन वाद सुरु आहे ती अर्धवट आहे , गो ब्राम्हण च्या पुढे 'क्षत्रिय कुलावंत' हा शब्द राहुन गेलाय...

In reply to by टारझन

शिल्पा ब 26/12/2010 - 21:16
जाउद्या... बाकी आम्हालापण गुरुची गरजच नव्हती पण घरी त्रास देतो म्हणुन शाळेत घातलं...त्यामुळेच आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.)

In reply to by शिल्पा ब

पंगा 26/12/2010 - 21:55
आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.
लपंडाव नाही खेळलात कधी लहानपणी? राज्य नाही आलं कधी तुमच्यावर?

डावखुरा 25/12/2010 - 00:38
१)गो-गाय : गायीचे महत्व फार पुर्वीपासुन भारतीय समाजात आहे... गायीला आपण पवित्र मानतो... तसेच तिच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास आहे अशी श्रद्धा आहे... आणि मुस्लिमांपासुन गोमातेला संरक्षण देणारा राजा .... पण ब्राह्मण का यावर मी काही बोलु नाही शकत... २)शिवरायांचे गुरु.. शस्त्रास्त्र शास्त्र आणि राज्य्कारभार : दादोजी कोंडदेव अध्यात्मिक आणि राजकीय गुरु.. : समर्थ रामदास स्वामी (दासबोधकार आणि शक्तीउपासनेला सदिव प्रोत्साहन देणारे...) एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ... जय भवानी जय शिवाजी

In reply to by डावखुरा

छत्रपती 26/12/2010 - 14:11
एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ...
हे जर्स्त्य अस्येल त्र अवरन्गजेबाच्या पद्री अस्नार्या अन्सी टक्के रज्पुत सयनिकाचे सुन्ता क झले नाहे? अस मझा परस्न आहे.

वेताळ 25/12/2010 - 09:42
पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " एक शंका शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतात विशेष करुन उत्तर भारतात हिंदु रहात होते कि नव्हते? महाराज मुस्लिम विरोधात होते हे सतत का सांगत असता तुम्ही?

रन्गराव 25/12/2010 - 14:37
काय चालल आहे? जातीयवाद, जाज्वल्य अभिमान ह्या गोष्टी किती टोकाला न्यायच्या? तुम्ही अमक्या जातीत जन्मलात हा योगायोग होता, त्यात अभिमान बाळगण्यासारखा काय कमवल? गेल्या काही महिन्यातील लेखांवरील प्रतिक्रिया वाचून जातीयवाद कमी होण्याएवजी वाढतोच आहे अस वाटू लागल आहे. " सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांच्यासाठी कोणीही काही करत नाहीत" , " ब्राह्मणांनी हजारो वर्षे दलितांवर अन्याय केला" ही काही उदाहरणे. ह्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे प्रतिसाद येऊ शकत नाहीत.

अविनाश कदम 26/12/2010 - 03:01
दादोजी कोंडदेव हे एक कारभारी होते. शहाजी राज्यांच्या जहागीरीतील पुणे परगण्याचा कारभार ते पहात होते. जिजाऊ व शिवाजी महाराजांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्याना शिवाजी महाराजांना शिकवण्याचे काम दिलेले नव्हते. शिवाजी महाराजांना शस्त्रात्रे चालवण्याचे इ. काम दुसर्‍या कुणी तरी केलेले असणार. दादोजी कोंडदेवाना गुरू म्हटल्याने त्यांची किंमत वाढते कारभारी म्हटल्याने कमी होते असं मानण्याचं कारण नाही.

In reply to by शिल्पा ब

अविनाश कदम 28/12/2010 - 00:30
या माहीतीचा स्रोत काय आहे? शिवशाहीचा इतिहास म्हणून आढावा घेणार्‍या इतिहासकारांची (शाहिरांची नव्हेत) पुस्तके.

प्राजु 26/12/2010 - 05:51
सध्या जी काही चर्चा आणि गोंधळ चालला आहे महाराष्ट्रात तो बघून, 'पुन्हा एकदा शिवाजी' म्हणून कोणीजन्म घ्यायला धजावेल असे वाटत नाही. अगदी प्रत्यक्ष महाराज सुद्धा!

सन्जोप राव 26/12/2010 - 06:04
वर चालू असलेल्या अत्यंत उद्बोधक व ज्ञानवर्धक चर्चेत ब्राह्मण हा शब्द दोन प्रकारे लिहिला गेला आहे. शिवछत्रपतींनी हा शब्द कोणत्या प्रकारे लिहिला आहे याबाबत जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल. इथे छत्रपतींना लिहिता-वाचता येते असे गृहितक आहे. मिरासदारांचे या बाबतीतले मत वेगळे आहे.

In reply to by सन्जोप राव

पंगा 26/12/2010 - 20:23
मराठी शुद्धलेखनाच्या 'जुन्या' (पारंपरिक?) नियमांप्रमाणे 'ब्राह्मण' (अर्थात संस्कृताप्रमाणे) हे रूप बरोबर आहे. 'नव्या' (सुधारित किंवा सुलभीकृत? नाही म्हणायला हे लागू होऊनसुद्धा गेला बाजार चाळीसएक वर्षे होऊन गेली असावीत) नियमांप्रमाणे 'ब्राम्हण' हे रूप (अर्थात मराठीतील उच्चारास अनुसरून) बरोबर आहे, परंतु 'ब्राह्मण' हे रूप वापरल्यास चुकीचे मानले जात नाही, असे काहीसे आठवते. (याच नियमानुसार 'आह्लाद', 'प्रह्लाद', 'चिह्न' हे शब्द नव्या मराठी शुद्धलेखनात अनुक्रमे 'आल्हाद', 'प्रल्हाद' आणि 'चिन्ह' असे लिहिले जातात. मात्र काही कारणाकरिता 'ह्य' हे जोडाक्षर या नियमास अपवाद आहे. 'बाह्य' हा शब्द 'बाय्ह' असा लिहिता येत नाही.) मी माध्यमिक शाळेत असताना (१९७५-१९८१) पाठ्यपुस्तकांतून 'ब्राम्हण' हे एकमेव रूप वापरले जात असल्याचे आठवते. शिवाजीमहाराजांच्या काळात मराठी शुद्धलेखनाचे काही काटेकोर नियम असण्याबद्दल साशंक आहे, परंतु यदाकदाचित असलेच, तर बहुधा हा शब्द महाराजांनी 'ब्राह्मण' असा (संस्कृतानुरूप) लिहिला असण्याची शक्यता दाट वाटते. (चूभूद्याघ्या.)

अनामिका 26/12/2010 - 19:02
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो | अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं || राखी रजपुती , रजधानी राखी राजन की | धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं || भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की | देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं || साही के सपूत , सिवराज समशेर तेरी | दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं || वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत | रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं || हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की | कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं || मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह | बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं || राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज | देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं || देवल गिराविते , फिराविते निसान अली | ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी || गौर गणपती आप , औरनको देत ताप | आपनी ही बार सब , मारी गये दबकी || पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत | सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की || कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती | सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी || - कविराज भूषण. जगन्मान्य असलेल्या जाणत्या राजाला स्वत:च्या स्वार्थासाठी आधुनिक काळातला स्वयंघोषित जाणता राजा आपल्या बगलबच्च्यांकरवी जाणिवपुर्वक वापरतोय हे या वादाचे सत्य आहे...सगळ्या बाजूने कोंडित सापडल्यावर भावनेला हात घालत राजकारण करणे हाच सत्ताधारी पक्षाचा जुनाच हातखंडा आहे...ज्यांची शिवछत्रपतींवर निस्सिम व निस्पृह भक्ती आहे ते कदापी जेम्स लेन सारख्याच्या अनर्घल लिखाणाला आपल्या तेजस्वी विचारात थारा देणार नाहित.....मुळात या नव्याने इतिहास प्रसवणार्‍यांकडे कसलेही पुरावे नाहित पण आमचेच खरे म्हणत छत्रपतींना फक्त मराठा समाजाच्या दावणीला बांधण्याचा हा निव्वळ अट्टाहास आहे.....काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे यांना केवळ ब्राम्हणवादाने पछाडलेले आहे.....आणि याच भावनेतुन दोदोजी व समर्थ शिवरायांचे गुरु नव्हते अश्या प्रकारचा विखारी प्रचार या बगलबच्च्यांनी सुरु केला...पुतळे हटवले म्हणून दादोजींचे शिवरायांच्या जिवनाच्या जडणघडणीतले स्थान कमी होत नाही....आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहासाची विटंबना करणार्‍यांचा व भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍यांचा भविष्यात लिहिला जाणारा इतिहास हा काळाकुट्ट असणार आहे जो पुढच्या पिढीला प्रेरणादायी कदापी असणार नाही....दादोजींचे नाव शिवरायांबरोबर कायमच जोडल व सुवर्णाक्षरांनी कोरल गेलय ते पुसण्याचा प्रमाद या स्वयंनिर्मित नव-इतिहासकारांनी करु नये ती त्यांची तितकी कुवत देखिल नाही व पात्रता तर मुळीच नाही. जय हिंद! जय महाराष्ट्र!

मैत्र 27/12/2010 - 10:33
एक वेगळा मुद्दा मनात आला... संभाजी ब्रिगेड नामक एका नव्यानेच अस्तित्वात आलेल्या संघटनेने जेम्स लेन प्रकरणात तोड फोड केल्या नंतर सर्व सामान्य लोकांना दोन गोष्टींची माहिती मिळाली - १. या नावाची एका कुठल्याही बर्‍या वाईट संस्थेवर / लोकांवर शाब्दिक शारिरीक हल्ला करू शकणारी एक संघटना आहे. ज्यांना संभाजी महाराजांच्या थोर नावानंतर एक मराठी शब्द सुद्धा मिळाला नाही संघटनेला नाव ठरवताना. २. कोणी एक जेम्स लेन नावाचा इतिहास संशोधक भारतात आला होता. तो पुण्यात राहिला. त्याने शिवाजी महाराजांबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. त्यात एका पानावर कुठे एक अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. त्याने प्रस्तावनेत त्याला पुण्यात ज्यांनी मदत केली त्यांचे आभार प्रदर्शन आहे. खरं तर हे होई पर्यंत सामान्य मनुष्य सोडा, कोणालाही या सर्व प्रकरणाची सुतराम कल्पना नव्हती. नेहमी वाचन करणारे, अनेक विषयांचा चांगला अभ्यास असलेले अनेक लोकही पूर्ण अनभिज्ञ होते. अनेक लोकांनी लिहिलं नंतर की पुण्यात पन्नास वर्षांच्या वास्तव्यात असले दळभद्री विचार कुठे ऐकले नाहीत. पुन्हा खूप धुरळा उठला. माहिती कळल्यानंतर जेवढा ब्रिगेडच्या गुंडगिरीचा निषेध झाला त्याहून जास्त लेनच्या पुस्तकाला एकत्र पणे विरोध झाला. कारण तिथे कोणालाही जात / व्यक्ती मध्ये आली नाही. महाराजांबद्दलचा आदर आणि अभिमान याहून महाराष्ट्रात काहीही मोठं नाही. पण इथे विषय संपला असता तर काही चूक नव्हतं एका अर्थी... पण तो गेली अनेक वर्ष मुद्दामून चावला गेला आणि पुन्हा पुन्हा अतिशय विखारी पद्धतीने धुरळा उठवला जात आहे. एक विचार मनात आला. की पुतळा काढू नये, दादोजी कोंडदेव हेच महाराजांचे गुरू होते म्हणणार्‍यांनाही विचारा की इतिहासात शाळेत वाचलेला भाग काय, कादंबर्‍या, नाटकांमध्ये पाहिलेला काय कोणाच्याही मनात किती मोठं स्थान होतं दादोजींविषयी... अतिशय परखडपणे पाहिलं तर खूप मोठं नव्हतंच ! नेहमी दादोजी हे कारभारी आणि कर्तव्य दक्ष व्यक्ती ज्यांनी आपल्या होणार्‍या सुभेदाराला / शहाजी राजांसारख्या अतिशय महत्त्वाच्या सरदाराच्या मुलाला मार्गदर्शन केलं. म्हणजे बरोबर बसवून न्याय, महसूल वगैरे त्यांच्या अखत्यारीतल्या गोष्टी दाखवल्या / समजावल्या. त्यांना शरीरसंपदा कमावण्यासाठी आणि तेव्हाची शस्त्रं वापरण्याची - तलवार, दांडपट्टा, भाला, बिचवा इ., योग्य व्यक्तींची नेमणूक केली. मला वाटतंय की अगदी दादोजी या व्यक्तीला पूर्ण समर्थन असलेल्यांना सुद्धा असं कधीच मनात नसावं की जसं चाणक्याने चंद्रगुप्ताला शोधून तयार केलं आणि एका काळापर्यंत पूर्ण सेना उभारली, राज्य सांभाळलं त्याच्या जवळपास सुद्धा दादोजींचं काम होतं. दुसरी गोष्ट बहुतेकांना हेही माहीत नव्हतं की ही व्यक्ती कुठल्या जातीची होती. ही सर्व माहिती बहुसंख्य सामान्य जनांना आणि अभिजनांना ब्रिगेडनेच पुरवली. मग फक्त हे सिद्ध असताना की या नावाची एक व्यक्ती कारभारी म्हणून होती, ते कारभारी म्हणून खरंच चांगलं वजन आणि महत्त्व असलेले होते. तसं नसेल तर ब्रिगेड आणि आपण सर्व चक्क शहाजी राजांबद्दलच अविश्वास दाखवतोय ज्यांनी आपली बायको आणि लहान मुलगा, त्यांच्या जबाबदारीवर जहागिर सांभाळण्यासाठी पुण्याला पाठवले. तेव्हा असं वाटतं की तेवढं जे काही थोडं महत्त्व आहे ते खूप मोठा गदारोळ करून खोडून काढण्याने ब्रिगेड चक्क त्यांचं महत्त्व वाढवतेय ! अजून एक मुद्दा आज सकाळ मध्ये आलेला - काही विरोधकांनी म्हटलंय की सोन्याचा नांगर वगैरे भाकड कल्पना महाराजांशी जोडल्या जाऊ नयेत. असं वाचनात आलं होतं की मुरार जगदेवाने पुणं जाळून गाढवाचा नांगर फिरवला आणि पुणं नष्ट झाल्याची घोषणा केली. तेव्हा सोन्याचा नांगर हे प्रतिकात्मक होतं की आता नव्याने पुणं वसवून इथे सुवर्ण भूमी उभी केली जाईल... जर दुसरी गोष्ट खोटी असेल तर पहिली पण खोटीच असली पाहिजे. हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. थोडक्यात - ज्या गोष्टीने फार फरक पडत नाही त्याचा खूप मोठा मुद्दा करण्यात राजकीय सोडता (आणि कसलेही कारण नसलेल्या जातीय संदर्भाचा) कुठलाही लाभ किंवा हेतू दिसत नाही.

In reply to by मैत्र

सुहास.. 27/12/2010 - 13:42
हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. >> +१ .. १ ) जेम्स लेन ने पुस्तक लिही पर्यंत ब्रिगेड कोठे होती ? २ ) शिवधर्म स्थापन करुन ' शिवधर्म 'च मुळात न पाळणार्‍यांचा नेमका धर्म कुठला ? सरळ - सोट पणे हा सगळा प्रकारच राजकारण आहे.

In reply to by मैत्र

गणेशा 27/12/2010 - 16:53
आपला रिप्लाय मनापासुन आवडला ... सामान्य माणसाचे मत असेच असते .. पण ज्यांना प्रसिद्धी .. राजकारण हवे असते ते अश्या गोष्टींना जाणीवेन बगल देतात

सोनोपंत डबीर ह्यांचा महाराष्ट्रात कुठे पुतळा आहे का ? ब्रीग्रेड संघटनेला लगेच माहिती पुरवावी म्हणजे अजून एक अचाट सत्याचे प्रयोग करतील ते . त्वरा करा

नाना बेरके 27/12/2010 - 12:34
१. 'सोनोपंत डबीर' हे कोण होते ? २. वरच्या प्रतिसादात 'ब्रीग्रेड' हा शब्द आला आहे. तो शुध्दलेखनदृष्ट्या योग्य आहे कां ? कारण काही लेखनात हाच शब्द बीग्रेड किंवा ब्रिगेड असाही आला आहे. ३. जसा एखादा राजा स्वयंभू असू शकतो तश्याच इतरही गोष्टी स्वयंभू असू शकतात कां ? उदा. स्वयंभू गुरु, स्वयंभू शिष्य इ. इ. एक स्वयंभू प्रतिसादक नाना भू-रके

In reply to by नाना बेरके

महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ठाऊक नाही आपल्याला ? बाकी कशाला शुध्द लेखनाची आपण पर्वा करायची बिहार विकासाच्या मार्गावर लागलाय आणि त्याची मोडतोड संस्कृती महराष्ट्रात वणव्यासारखी पसरत आहे . पुण्यनगरीत झालेला तमाशा नववर्षाचे स्वागत करणार तर .

सुधीर काळे 27/12/2010 - 13:30
हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्यावर मी नुकताच पोस्ट केलेल्या "भारतीय-कसा मी? असा मी!" मधील खालील परिच्छेदाची आठवण झाली आणि आपण कुठे चाललो आहोत याबद्दल काळजी निर्माण झाली. सर्वांनी विचार करून असले फूट पाडणारे विषय टाळायला हवेत! त्यांची संवेदनशीलता राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक सांप्रदायिक अतिरेकाचा अवलंब करतील कीं त्यांची अक्कल आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं ’सर्व-भारतीय-एक’ ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल?

अविनाश कदम 28/12/2010 - 00:47
भारतीय समाज व्यवस्था निधर्मी असणं केव्हाच शक्य नाही. भारत हे बहुधर्मीय राष्ट्रच आहे. म्हणूनच इथली शासनव्यवस्था व राज्य व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणंच उपयोगाचं आहे. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचंच तत्त्व स्विकारलेलं आहे.
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

५० फक्त ·

चिंतामणी 09/12/2010 - 12:43
तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला. तु बोलविशील तेंव्हा. एकदा जायला हवे हे नक्कीच. यावेळेस पदार्थांचे दर नाही दिलेस.

५० फक्त 09/12/2010 - 16:19
डेक्कन कडुन नळस्टॉप कडे येताना, नळस्टॉपच्या आधिचा शेवटचा डाविकडचा बोळ. याच्या सुरवातीला आनंद व्हेज नावाचं हॉटेल आहे. हा बोळ शेवटी शारदा सेंटरच्या मागच्या गेटकडे जातो. याच बोळांत डाविकडे हे हॉटेल आहे. याचं गेट खुप छोटं आहे त्यामुळे गडबडीत चुकण्याची शक्यता आहे. एका बंगल्याच्या कम्पाउंड मध्ये असलेले हे हॉटेल आहे. नक्की जा. हर्षद.

In reply to by ५० फक्त

चिंतामणी 10/12/2010 - 00:25
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये - म्हणजे अजूबाच्या समोर ना? होटल आनंद म्हणल्यावर पटकन लक्षात येणार नाही. "अजूबा" म्हणल्यावर लगेचच समजेल सगळ्यांना.

चिंतामणी 09/12/2010 - 12:43
तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला. तु बोलविशील तेंव्हा. एकदा जायला हवे हे नक्कीच. यावेळेस पदार्थांचे दर नाही दिलेस.

५० फक्त 09/12/2010 - 16:19
डेक्कन कडुन नळस्टॉप कडे येताना, नळस्टॉपच्या आधिचा शेवटचा डाविकडचा बोळ. याच्या सुरवातीला आनंद व्हेज नावाचं हॉटेल आहे. हा बोळ शेवटी शारदा सेंटरच्या मागच्या गेटकडे जातो. याच बोळांत डाविकडे हे हॉटेल आहे. याचं गेट खुप छोटं आहे त्यामुळे गडबडीत चुकण्याची शक्यता आहे. एका बंगल्याच्या कम्पाउंड मध्ये असलेले हे हॉटेल आहे. नक्की जा. हर्षद.

In reply to by ५० फक्त

चिंतामणी 10/12/2010 - 00:25
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये - म्हणजे अजूबाच्या समोर ना? होटल आनंद म्हणल्यावर पटकन लक्षात येणार नाही. "अजूबा" म्हणल्यावर लगेचच समजेल सगळ्यांना.
3

अल्लाह के बंदे

परिकथेतील राजकुमार ·

रन्गराव 04/12/2010 - 14:02
city of god ( http://www.imdb.com/title/tt0317248/ ) ची भारतीय आवृती आहे अस वाटल समीक्षा वाचून. मूळ चित्रपट लै भारी होता.

विसुनाना 04/12/2010 - 16:11
रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे.
-म्हणजे 'आधुनिकोत्तरोत्तर' आहे तर.

सन्जोप राव 04/12/2010 - 17:17
या रविवारी हा चित्रपट बघावा की काय असा विचार सुरु होता. पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by अवलिया

टारझन 06/12/2010 - 13:07
तसा ही हिंदी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पहाणं म्हनजे एक जुगारंच !! मस्त परिक्षण !

परिक्षण छान. आजकाल थेटरात पिक्चर कवचितच पाहतो. परीक्षण वाचुन चॅनेलवर पाहायचे का नाही ते ठरवतो.
दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील..
नव्या दिवार मधे अक्षय खन्ना आहे.

In reply to by यकु

तेच लक्षात येत नाहीये. अक्षरशः एखाद्या कलाकाराला वाया घालवणे म्हणजे काय असते ते ही भुमिका बघुन लक्षात येते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

एक 07/12/2010 - 23:08
मिडीयम आहे. अ‍ॅक्टर चं नाही. तुम्ही चेहर्‍यावर लाख चांगले एक्स्प्रेशन /रिअ‍ॅक्शन द्याल हो पण कॅमेरामन ने क्लोजप मधे नीट टिपलेच नाहीत किंवा एडिटर ने तो सीन नीट टायमींग ने जोडलाच नाही तर काय करणार? याच्या उलटं उदाहरण "वेन्सडे" मधे परवा बघितलं. लाँग शॉट मधे जिमी शेरगील तुरूंगाच्या बाहेर बाह्या सावरत येताना दिसतो आणि दुसर्‍या मिडशॉट मधे आतला कैदी मुततो. हे २ शॉट इतके छान जोडले आहेत की त्यामुळे जिमी शेरगील चं कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं. आणि हे करण्यात शेरगिल ला कसलाही जादा अभिनय करावा लागला नाही. म्हणून नाटकात रिएक्शन ला आणि टायमिंग ला महत्त्व येतं आणि जास्त अवघड ठरतं. नाटक अ‍ॅक्टरचं मिडीयम आहे. तात्पर्य, दोष नसिरूद्दीनचा नाही..किंवा त्याच्या भुमिकेच्या निवडीचा नाही. त्याला डिरेक्टरची कुवत जाणता नाही आली हा दोष असू शकतो.

गवि 06/12/2010 - 11:26
बादवे..काल फस गये ओबामा पाहिला. जरा जरा मजा आली. तेरे बिन लादेन अजून बरा होता असं वाटलं. ष्टोरीलाईन चांगली असूनही कुठेतरी माशी शिंकते आणि कुठे ते आम्हाला कळत नाही. पराभाऊ, तुमच्या लेखात शब्दात बरोबर पकडता तुम्ही या गोष्टी.

कलाकारांची नावे बघून शिनूमा बघावा असे वाटत होते. परा, तुझ्या ह्या परिक्षणामुळे तो विचार बदलतो आहे. स्वाती

टारझन 06/12/2010 - 14:52
आज परा ने हा लेख लिहिला नसता तर किति तरी लोकांचे पैसे आणि वेळ वाया गेले असते ... त्याच्या मुळेच आज थोडेफार लोक वेळ आणि पैसा बचावुन आहेत. :)

विजुभाऊ 06/12/2010 - 15:33
परा महा महा मानव आहे. ( ताल चित्रपतातल्या अक्षय खन्नाच्या भूमिकेचे नाव " मानव " होते. हीरॉईन ने प्रेम करावे अशा कोणत्याच क्वालिटी त्यात नव्हता. तरिसुद्धा त्याच्यावर ती का प्रेम करते हे कधीच कळत नाही )

इतक्या लोकांना पैसे खर्च करण्यापासून परावृत्त करणाऱ्या परा-वृत्ताचा (की प्रवृत्तीचा?) निषेध. लोकांनी भुक्कड खर्च केले नाहीत तर इकॉनॉमी वाढणार कशी?

चांगले चित्रपट परीक्षण. आमचे आणि आमच्या मैत्रीणीचे १००० रुपये वाचवल्याबद्दल परासाहेबांचे मनापासुन आभार. हे थोर समाजकार्य करत राहण्यासाठी देव त्यांना अशीच शक्ती व सहनशीलता देत राहो.

हा सिनेमा पाहण्याचा विलक्षण मोह झाला होता .तो आता टाळता येईल .बाकी नामांकित इंग्रजी व हिंदी व काही मराठी समीक्षकांनी तर ह्याला ४ तारे दिले होते (ते बिचारे पगारी नोकर /फुकट मिळणाऱ्या मदिरा व चकण्याचे इमान राहून खरडतात .पण परखड मते लिहिणारा एकच असतो .(त्याला समीक्षक म्हणून कुठल्या ही नियतकालिकात व पेपरात काम मिळत नाही .) पण तो सिने रसिकांच्या दुवा घेतो . लगे रहो.

रन्गराव 04/12/2010 - 14:02
city of god ( http://www.imdb.com/title/tt0317248/ ) ची भारतीय आवृती आहे अस वाटल समीक्षा वाचून. मूळ चित्रपट लै भारी होता.

विसुनाना 04/12/2010 - 16:11
रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे.
-म्हणजे 'आधुनिकोत्तरोत्तर' आहे तर.

सन्जोप राव 04/12/2010 - 17:17
या रविवारी हा चित्रपट बघावा की काय असा विचार सुरु होता. पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by अवलिया

टारझन 06/12/2010 - 13:07
तसा ही हिंदी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पहाणं म्हनजे एक जुगारंच !! मस्त परिक्षण !

परिक्षण छान. आजकाल थेटरात पिक्चर कवचितच पाहतो. परीक्षण वाचुन चॅनेलवर पाहायचे का नाही ते ठरवतो.
दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील..
नव्या दिवार मधे अक्षय खन्ना आहे.

In reply to by यकु

तेच लक्षात येत नाहीये. अक्षरशः एखाद्या कलाकाराला वाया घालवणे म्हणजे काय असते ते ही भुमिका बघुन लक्षात येते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

एक 07/12/2010 - 23:08
मिडीयम आहे. अ‍ॅक्टर चं नाही. तुम्ही चेहर्‍यावर लाख चांगले एक्स्प्रेशन /रिअ‍ॅक्शन द्याल हो पण कॅमेरामन ने क्लोजप मधे नीट टिपलेच नाहीत किंवा एडिटर ने तो सीन नीट टायमींग ने जोडलाच नाही तर काय करणार? याच्या उलटं उदाहरण "वेन्सडे" मधे परवा बघितलं. लाँग शॉट मधे जिमी शेरगील तुरूंगाच्या बाहेर बाह्या सावरत येताना दिसतो आणि दुसर्‍या मिडशॉट मधे आतला कैदी मुततो. हे २ शॉट इतके छान जोडले आहेत की त्यामुळे जिमी शेरगील चं कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं. आणि हे करण्यात शेरगिल ला कसलाही जादा अभिनय करावा लागला नाही. म्हणून नाटकात रिएक्शन ला आणि टायमिंग ला महत्त्व येतं आणि जास्त अवघड ठरतं. नाटक अ‍ॅक्टरचं मिडीयम आहे. तात्पर्य, दोष नसिरूद्दीनचा नाही..किंवा त्याच्या भुमिकेच्या निवडीचा नाही. त्याला डिरेक्टरची कुवत जाणता नाही आली हा दोष असू शकतो.

गवि 06/12/2010 - 11:26
बादवे..काल फस गये ओबामा पाहिला. जरा जरा मजा आली. तेरे बिन लादेन अजून बरा होता असं वाटलं. ष्टोरीलाईन चांगली असूनही कुठेतरी माशी शिंकते आणि कुठे ते आम्हाला कळत नाही. पराभाऊ, तुमच्या लेखात शब्दात बरोबर पकडता तुम्ही या गोष्टी.

कलाकारांची नावे बघून शिनूमा बघावा असे वाटत होते. परा, तुझ्या ह्या परिक्षणामुळे तो विचार बदलतो आहे. स्वाती

टारझन 06/12/2010 - 14:52
आज परा ने हा लेख लिहिला नसता तर किति तरी लोकांचे पैसे आणि वेळ वाया गेले असते ... त्याच्या मुळेच आज थोडेफार लोक वेळ आणि पैसा बचावुन आहेत. :)

विजुभाऊ 06/12/2010 - 15:33
परा महा महा मानव आहे. ( ताल चित्रपतातल्या अक्षय खन्नाच्या भूमिकेचे नाव " मानव " होते. हीरॉईन ने प्रेम करावे अशा कोणत्याच क्वालिटी त्यात नव्हता. तरिसुद्धा त्याच्यावर ती का प्रेम करते हे कधीच कळत नाही )

इतक्या लोकांना पैसे खर्च करण्यापासून परावृत्त करणाऱ्या परा-वृत्ताचा (की प्रवृत्तीचा?) निषेध. लोकांनी भुक्कड खर्च केले नाहीत तर इकॉनॉमी वाढणार कशी?

चांगले चित्रपट परीक्षण. आमचे आणि आमच्या मैत्रीणीचे १००० रुपये वाचवल्याबद्दल परासाहेबांचे मनापासुन आभार. हे थोर समाजकार्य करत राहण्यासाठी देव त्यांना अशीच शक्ती व सहनशीलता देत राहो.

हा सिनेमा पाहण्याचा विलक्षण मोह झाला होता .तो आता टाळता येईल .बाकी नामांकित इंग्रजी व हिंदी व काही मराठी समीक्षकांनी तर ह्याला ४ तारे दिले होते (ते बिचारे पगारी नोकर /फुकट मिळणाऱ्या मदिरा व चकण्याचे इमान राहून खरडतात .पण परखड मते लिहिणारा एकच असतो .(त्याला समीक्षक म्हणून कुठल्या ही नियतकालिकात व पेपरात काम मिळत नाही .) पण तो सिने रसिकांच्या दुवा घेतो . लगे रहो.
बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो.

वर्तूळ - एक अनुभव

जयंत कुलकर्णी ·

यकु 23/11/2010 - 21:39
चित्रफित पाहाण्याआधीच सर्व कलाकारांचे आणि श्री. संतोष राम यांचे अभिनंदन. आणि लोकांना चित्रफित दाखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल तुमचेही अभिनंदन. मलाही असाच नाद आहे लोकांना कॉम्प्युटरवर काहीतरी, विशेषत: हॉलीवूडचे चित्रपट दाखवत राहाण्याचा. ब्लड डायमंड, दि किंगडम, हॉटेल रवांडा (हा पाहिल्यावर उगाच बिअर पिऊन आलो होतो) मर्डर बाय डेथ असला एखाद दुसरा चांगला पिक्चर शोधायला सहा-सहा चित्रपटांच्या डीव्हीडी आणा! वेस्टेज डीव्हीडी साठ्वा! या डीव्हीडींचं काय करायचं त्याचा क्ल्यू द्या हो कुणीतरी - दोन्/अडीचशे डीव्हीडी पडून आहेत.

चित्रगुप्त 18/05/2015 - 09:22
...."आमचा एक नऊ मित्रांचा ग्रूप आहे.".... ......किती भाग्यवान आहात, कुलकर्णी साहेब .... वर्तुळ ही चित्रफीत तूनळीवर सापडली नाही, कुठे बघता येईल ?

खेडूत 18/05/2015 - 09:51
लिंक मिळाली तर बरे होईल …. ईमेल आता करून उपयोग होईल का? पाहूयात ! @ जेपी: संतोष राम यांचा पत्ता काढून थेट विचारा की (फोन लागना गेलाय) - हाकानाका ! धागा वर आणल्याबद्दल आभार.

यकु 23/11/2010 - 21:39
चित्रफित पाहाण्याआधीच सर्व कलाकारांचे आणि श्री. संतोष राम यांचे अभिनंदन. आणि लोकांना चित्रफित दाखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल तुमचेही अभिनंदन. मलाही असाच नाद आहे लोकांना कॉम्प्युटरवर काहीतरी, विशेषत: हॉलीवूडचे चित्रपट दाखवत राहाण्याचा. ब्लड डायमंड, दि किंगडम, हॉटेल रवांडा (हा पाहिल्यावर उगाच बिअर पिऊन आलो होतो) मर्डर बाय डेथ असला एखाद दुसरा चांगला पिक्चर शोधायला सहा-सहा चित्रपटांच्या डीव्हीडी आणा! वेस्टेज डीव्हीडी साठ्वा! या डीव्हीडींचं काय करायचं त्याचा क्ल्यू द्या हो कुणीतरी - दोन्/अडीचशे डीव्हीडी पडून आहेत.

चित्रगुप्त 18/05/2015 - 09:22
...."आमचा एक नऊ मित्रांचा ग्रूप आहे.".... ......किती भाग्यवान आहात, कुलकर्णी साहेब .... वर्तुळ ही चित्रफीत तूनळीवर सापडली नाही, कुठे बघता येईल ?

खेडूत 18/05/2015 - 09:51
लिंक मिळाली तर बरे होईल …. ईमेल आता करून उपयोग होईल का? पाहूयात ! @ जेपी: संतोष राम यांचा पत्ता काढून थेट विचारा की (फोन लागना गेलाय) - हाकानाका ! धागा वर आणल्याबद्दल आभार.
आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात काही खास अशी गोष्ट नसते, तरीही पण आपण तो चित्रपट बघितल्यावर काहीतरी वेगळा अनुभव घेतला आहे असे आपल्याला सारखे वाटत रहाते.

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

मी, बाटली आणि देशद्रोही

परिकथेतील राजकुमार ·

अवलिया 16/11/2010 - 12:08
सर्वसामान्य सुशिक्षितांच्या आवडीनिवडीचा लसावी या पिक्चरच्या परिक्षणाने मिळतो. ---स्टॉलात पाय अभिरुची आणि प्रकटीकरणाची खरी विचारसरणी सुशिक्षित भारतीयांना कळलीच नाही -- डोक्यात बत्ते या चित्रपटावर एकदा बसुन बोलु या -- हताश.. वा ! पराचे काम म्हणजे लै भारी -- खवट

सहज 16/11/2010 - 12:19
देशासमोर एवढे ज्वलंत प्रश्न असुन त्याचा काथ्याकूट करायचे सोडून असल्या सिनेमाचे परिक्षण लिहणारा परा हाच खरा देशद्रोही! पुपे (शेखर) व धमु (केआरके) यांना घेउन हा सिनेमा मराठीत काढावा काय?

In reply to by सहज

आणि नारायणराव बालगंधर्व(इथे कानाला हात) ज्या प्रमाणे स्त्रीपार्ट करत तशी ग्रेसीची भूमिका सहज यांना द्यावी. कमालरावांचा रोल खुद्द परा यांना द्यावा. :)

नगरीनिरंजन 16/11/2010 - 12:33
>>जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना >>पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे. _/\_ =)) >>आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न :- भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली? ठ्ठो.. बाटली रिचवून का होईना हा चित्रपटरुपी अत्याचार सहन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

गवि 16/11/2010 - 12:50
क्या बात्..क्या बात्..क्या बात..झकास लिहिलंय.. माझा चुकला हा पिच्चर...हाय रे दैवा. असली धमाल चुकवणे परवडण्यासारखे नाही. परत कधी आहे बारीक लक्ष ठेवून बघतो. तुमची रॉयल स्टॅग आणि आमची आर्.सी. घेऊन बसू..

In reply to by अप्पा जोगळेकर

chipatakhdumdum 17/11/2010 - 23:25
ग्लेनफिडिचच्या उल्लेखाने मन भरल. आम्हाला कळल. दारू न पिता भाउ तुम्हाला हा चित्रपट कळणार नाही का ? की अप्पाजोगळेकर ग्लेन्फिडिच पितात तरच त्याना चित्रपट कळतो ?

चिगो 16/11/2010 - 14:53
आमच्या (न पाहताच) अति-आवडत्या चित्रपटाचा एवढा खरपुस समाचार घेतल्याबद्दल परासाहेबांचा निषेध... ;-) अरे, कुठे मिळेल हा चित्रपट ?? मला पाहीजे, मला पाहीजे...

चिगो 16/11/2010 - 15:05
अगोगो, अवोव्वो, अरेरे.... अहो, ते ट्रेलर्स पाहीलेत आताच... मेलो. फुटलो.. गचकलो... आईच्यान, लॉफींग क्लब उघडण्याऐवजी हा पिक्चर दावा सगळीकडं... :-D अर्रर्रा..

स्पा 16/11/2010 - 15:07
कमाल खान नावाचा माठ प्राणी कसा काय अभिनय करू शकतो...... ;) बाकी परीक्षण म्हणजे जबराट हाय राव......... मजा आली....... ठार मेलोय हसून हसून.... बघितलास पाहिजे हा picture

धमाल मुलगा 16/11/2010 - 18:50
पर्‍या, हे काय बरोबर नाय हां! अशी प्यायल्यावरच जर तुझी रुध्द प्रतिभा अशी चतुरस्त्र वाहू लागणार असेल तर तू पी...रोज पी! अगदी ओकेपर्यंत पी....पण लिही... अग्गदी कोणी 'आमचा परा हल्ली फार पियाला लागला आहे' असं म्हणालं तरी पी आणि लिही. :D

नंदन 16/11/2010 - 19:23
अगायाया, कं लिवलंय, कं लिवलंय! जा, आजपासून 'आंतरजालीय कणेकर' ही उपाधी तुझ्या नावावर केली ;) >>> तर ह्या बिहारीला मुंबईतली पहिली लाथ घालण्यासाठी मामा काणे नावाचे मराठी पात्र बळच २ मिनिटांसाठी आणले आहे --- बोंबला, मामा काणे? बिचार्‍या स्वर्गीय मामा काण्यांना का मध्ये आणलं यात? मागे एकदा गोविंदाने कुठल्याशा पिक्चरमधल्या* पात्राची वेशभूषा (खाकी हाफ चड्डी, पांढरा शर्ट आणि टोपी --- सखाराम गटणे तर नव्हे? :)) मामा काण्यांच्या वेशभूषेला डोळ्यासमोर ठेवून केली होती असं एका मुलाखतीत म्हटल्यावर लोकसत्तेतल्या वाचकांच्या पत्रव्यवहारात हे चुकीचं असून यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं खरमरीत पत्र आलं होतं. आता याबद्दल अशी काही पत्रांची मारामारी झाली काय याचा शोध घ्यावा लागेल. *हिरो नं. १ (श्रेयअव्हेर - सुहास..)

In reply to by नंदन

श्रावण मोडक 16/11/2010 - 19:51
आजपासून 'आंतरजालीय कणेकर' ही उपाधी तुझ्या नावावर केली
हे मात्र "तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे" किंवा "तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलंय बळ" यातलं झालं नंदनराव. :)

In reply to by श्रावण मोडक

सुहास.. 16/11/2010 - 20:24
सासू न सासरा चौकशी करतो तिसराच... >>> नावातच आहे सार !! सा-माहीत आहेच की आपल्याला सू-सूहास (पुर्वी*चा का असेना ) * म्हणजे ही http://mymodellingagency.com/2010/09/purvi-ahuja-female-model-delhi/ नाही .

तिमा 16/11/2010 - 19:42
जबराट परीक्षण. परा तुम्हाला साष्टांग दंडवत.

सूर्य 16/11/2010 - 20:15
हॅ हॅ हॅ हॅ हॅ .. लै झकास परिक्षण... तरी हपिसात असल्यामुळे विडिओज बघता आलेले नाहीत. आता घरी गेल्यावर बघतो आणि पुन्हा वाचतो. - सूर्य.

योगी९०० 16/11/2010 - 21:32
मस्त परिक्षण ...खुप हसलो.. बाकी हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा त्याला महाराष्ट्रात बंदी होती. आता टिव्हीवर कसा काय दाखवला कोण जाणे.. त्या कमालखानच्या सणसणीत कानाखाली वाजवावी असे चित्रपट पहाताना वाटते. गंमत म्हणजे हाच कमाल खान जेव्हा मागच्या वर्षी बिग बॉस मध्ये होता..तेव्हा बरेच जण ( बिग बॉस मधले सहभागी) त्याच्या ह्या चित्रपटाचे डॉयलाग किंवा गाणे म्हणून त्याचे गोडवे गात होते. त्यांना कदाचित वाटले असावे की ह्या माणसाचे कौतूक केले तर आपल्याला त्याच्या पुढील चित्रपटात रोल मिळेल... संधी मिळाली तर काही लोकांना तुडवावे असे वाटते.. त्या लिस्टमध्ये ह्या माणसाचा नंबर बराच वरचा आहे.

पराच्या पदार्पणाच्या धाग्यातच काही मौल्यवान विचार लिहीले होते तेव्हा जाहीर शरम आणि माफीनाम्याचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा आता नकोच काही लिहायला इथे! काय बिका??

मस्त चित्रपट परिक्षण. अत्यंत आवडले. परासाहेब आणि रॉयल स्टॅग हे कॉम्बिनेशनच अत्यंत भारी आहे! चित्रपट डाऊनलोड करायला टाकला आहे.. आणि रॉयल स्टॅगसाठी आमच्या पालकांकडे मागणी देखील केली आहे. :) एक संध्याकाळ चांगलीच जाणार याची खात्री! - रॉयल इंटेश.

सुहास.. 28/12/2010 - 20:40
जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे >>> अग्गा गा !! ' खरपुस समाचार घेणे ' या वाकप्रचाराचा पुरेपुर अर्थ समजतो चित्रपट-परिक्षण वाचल्यावर !! धन्य आहेस रे पर्‍या __/\__

In reply to by स्पा

किसन शिंदे 15/07/2011 - 17:17
:D :D :D एक डिवीडी आणली होती थोरल्या बंधुराजांनी घरी, म्हणाले एक तुफान विनोदी चित्रपट आहे. पाहतोय तर हाच तद्दन भिक्कार चित्रपट त्यांनी उचलून आणला होता. पराचं हे चित्रपट परिक्षण आपल्याकडून राहीलं कसं काय बुवा...

श्रीरंग 25/07/2012 - 21:30
कहर.. जब्बरदस्त परिक्षण. अशा चित्रपटांना असेच समिक्षक हवेत (अँड व्हाईस व्हर्सा ;) ) तहलका फरिश्ते ऐलान-ए-जंग यपैकी एकावर तरी लिहीच, अशी पराला कळकळीची विनंती ..

मृत्युन्जय 27/07/2012 - 15:31
अरारारा. सालं चित्रपटाची सालं काढली असेही म्हणवत नाही आहे. के आर के ला कोणीतरी हा लेख वाचायला द्या रे. त्याचा स्वतः बद्दलचा ढोर गैरसमज तरी दूर होइल. अशक्य आहे हे परीक्षण.

अवलिया 16/11/2010 - 12:08
सर्वसामान्य सुशिक्षितांच्या आवडीनिवडीचा लसावी या पिक्चरच्या परिक्षणाने मिळतो. ---स्टॉलात पाय अभिरुची आणि प्रकटीकरणाची खरी विचारसरणी सुशिक्षित भारतीयांना कळलीच नाही -- डोक्यात बत्ते या चित्रपटावर एकदा बसुन बोलु या -- हताश.. वा ! पराचे काम म्हणजे लै भारी -- खवट

सहज 16/11/2010 - 12:19
देशासमोर एवढे ज्वलंत प्रश्न असुन त्याचा काथ्याकूट करायचे सोडून असल्या सिनेमाचे परिक्षण लिहणारा परा हाच खरा देशद्रोही! पुपे (शेखर) व धमु (केआरके) यांना घेउन हा सिनेमा मराठीत काढावा काय?

In reply to by सहज

आणि नारायणराव बालगंधर्व(इथे कानाला हात) ज्या प्रमाणे स्त्रीपार्ट करत तशी ग्रेसीची भूमिका सहज यांना द्यावी. कमालरावांचा रोल खुद्द परा यांना द्यावा. :)

नगरीनिरंजन 16/11/2010 - 12:33
>>जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना >>पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे. _/\_ =)) >>आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न :- भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली? ठ्ठो.. बाटली रिचवून का होईना हा चित्रपटरुपी अत्याचार सहन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

गवि 16/11/2010 - 12:50
क्या बात्..क्या बात्..क्या बात..झकास लिहिलंय.. माझा चुकला हा पिच्चर...हाय रे दैवा. असली धमाल चुकवणे परवडण्यासारखे नाही. परत कधी आहे बारीक लक्ष ठेवून बघतो. तुमची रॉयल स्टॅग आणि आमची आर्.सी. घेऊन बसू..

In reply to by अप्पा जोगळेकर

chipatakhdumdum 17/11/2010 - 23:25
ग्लेनफिडिचच्या उल्लेखाने मन भरल. आम्हाला कळल. दारू न पिता भाउ तुम्हाला हा चित्रपट कळणार नाही का ? की अप्पाजोगळेकर ग्लेन्फिडिच पितात तरच त्याना चित्रपट कळतो ?

चिगो 16/11/2010 - 14:53
आमच्या (न पाहताच) अति-आवडत्या चित्रपटाचा एवढा खरपुस समाचार घेतल्याबद्दल परासाहेबांचा निषेध... ;-) अरे, कुठे मिळेल हा चित्रपट ?? मला पाहीजे, मला पाहीजे...

चिगो 16/11/2010 - 15:05
अगोगो, अवोव्वो, अरेरे.... अहो, ते ट्रेलर्स पाहीलेत आताच... मेलो. फुटलो.. गचकलो... आईच्यान, लॉफींग क्लब उघडण्याऐवजी हा पिक्चर दावा सगळीकडं... :-D अर्रर्रा..

स्पा 16/11/2010 - 15:07
कमाल खान नावाचा माठ प्राणी कसा काय अभिनय करू शकतो...... ;) बाकी परीक्षण म्हणजे जबराट हाय राव......... मजा आली....... ठार मेलोय हसून हसून.... बघितलास पाहिजे हा picture

धमाल मुलगा 16/11/2010 - 18:50
पर्‍या, हे काय बरोबर नाय हां! अशी प्यायल्यावरच जर तुझी रुध्द प्रतिभा अशी चतुरस्त्र वाहू लागणार असेल तर तू पी...रोज पी! अगदी ओकेपर्यंत पी....पण लिही... अग्गदी कोणी 'आमचा परा हल्ली फार पियाला लागला आहे' असं म्हणालं तरी पी आणि लिही. :D

नंदन 16/11/2010 - 19:23
अगायाया, कं लिवलंय, कं लिवलंय! जा, आजपासून 'आंतरजालीय कणेकर' ही उपाधी तुझ्या नावावर केली ;) >>> तर ह्या बिहारीला मुंबईतली पहिली लाथ घालण्यासाठी मामा काणे नावाचे मराठी पात्र बळच २ मिनिटांसाठी आणले आहे --- बोंबला, मामा काणे? बिचार्‍या स्वर्गीय मामा काण्यांना का मध्ये आणलं यात? मागे एकदा गोविंदाने कुठल्याशा पिक्चरमधल्या* पात्राची वेशभूषा (खाकी हाफ चड्डी, पांढरा शर्ट आणि टोपी --- सखाराम गटणे तर नव्हे? :)) मामा काण्यांच्या वेशभूषेला डोळ्यासमोर ठेवून केली होती असं एका मुलाखतीत म्हटल्यावर लोकसत्तेतल्या वाचकांच्या पत्रव्यवहारात हे चुकीचं असून यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं खरमरीत पत्र आलं होतं. आता याबद्दल अशी काही पत्रांची मारामारी झाली काय याचा शोध घ्यावा लागेल. *हिरो नं. १ (श्रेयअव्हेर - सुहास..)

In reply to by नंदन

श्रावण मोडक 16/11/2010 - 19:51
आजपासून 'आंतरजालीय कणेकर' ही उपाधी तुझ्या नावावर केली
हे मात्र "तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे" किंवा "तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलंय बळ" यातलं झालं नंदनराव. :)

In reply to by श्रावण मोडक

सुहास.. 16/11/2010 - 20:24
सासू न सासरा चौकशी करतो तिसराच... >>> नावातच आहे सार !! सा-माहीत आहेच की आपल्याला सू-सूहास (पुर्वी*चा का असेना ) * म्हणजे ही http://mymodellingagency.com/2010/09/purvi-ahuja-female-model-delhi/ नाही .

तिमा 16/11/2010 - 19:42
जबराट परीक्षण. परा तुम्हाला साष्टांग दंडवत.

सूर्य 16/11/2010 - 20:15
हॅ हॅ हॅ हॅ हॅ .. लै झकास परिक्षण... तरी हपिसात असल्यामुळे विडिओज बघता आलेले नाहीत. आता घरी गेल्यावर बघतो आणि पुन्हा वाचतो. - सूर्य.

योगी९०० 16/11/2010 - 21:32
मस्त परिक्षण ...खुप हसलो.. बाकी हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा त्याला महाराष्ट्रात बंदी होती. आता टिव्हीवर कसा काय दाखवला कोण जाणे.. त्या कमालखानच्या सणसणीत कानाखाली वाजवावी असे चित्रपट पहाताना वाटते. गंमत म्हणजे हाच कमाल खान जेव्हा मागच्या वर्षी बिग बॉस मध्ये होता..तेव्हा बरेच जण ( बिग बॉस मधले सहभागी) त्याच्या ह्या चित्रपटाचे डॉयलाग किंवा गाणे म्हणून त्याचे गोडवे गात होते. त्यांना कदाचित वाटले असावे की ह्या माणसाचे कौतूक केले तर आपल्याला त्याच्या पुढील चित्रपटात रोल मिळेल... संधी मिळाली तर काही लोकांना तुडवावे असे वाटते.. त्या लिस्टमध्ये ह्या माणसाचा नंबर बराच वरचा आहे.

पराच्या पदार्पणाच्या धाग्यातच काही मौल्यवान विचार लिहीले होते तेव्हा जाहीर शरम आणि माफीनाम्याचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा आता नकोच काही लिहायला इथे! काय बिका??

मस्त चित्रपट परिक्षण. अत्यंत आवडले. परासाहेब आणि रॉयल स्टॅग हे कॉम्बिनेशनच अत्यंत भारी आहे! चित्रपट डाऊनलोड करायला टाकला आहे.. आणि रॉयल स्टॅगसाठी आमच्या पालकांकडे मागणी देखील केली आहे. :) एक संध्याकाळ चांगलीच जाणार याची खात्री! - रॉयल इंटेश.

सुहास.. 28/12/2010 - 20:40
जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे >>> अग्गा गा !! ' खरपुस समाचार घेणे ' या वाकप्रचाराचा पुरेपुर अर्थ समजतो चित्रपट-परिक्षण वाचल्यावर !! धन्य आहेस रे पर्‍या __/\__

In reply to by स्पा

किसन शिंदे 15/07/2011 - 17:17
:D :D :D एक डिवीडी आणली होती थोरल्या बंधुराजांनी घरी, म्हणाले एक तुफान विनोदी चित्रपट आहे. पाहतोय तर हाच तद्दन भिक्कार चित्रपट त्यांनी उचलून आणला होता. पराचं हे चित्रपट परिक्षण आपल्याकडून राहीलं कसं काय बुवा...

श्रीरंग 25/07/2012 - 21:30
कहर.. जब्बरदस्त परिक्षण. अशा चित्रपटांना असेच समिक्षक हवेत (अँड व्हाईस व्हर्सा ;) ) तहलका फरिश्ते ऐलान-ए-जंग यपैकी एकावर तरी लिहीच, अशी पराला कळकळीची विनंती ..

मृत्युन्जय 27/07/2012 - 15:31
अरारारा. सालं चित्रपटाची सालं काढली असेही म्हणवत नाही आहे. के आर के ला कोणीतरी हा लेख वाचायला द्या रे. त्याचा स्वतः बद्दलचा ढोर गैरसमज तरी दूर होइल. अशक्य आहे हे परीक्षण.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

पॅट टिलमन : एक शोकांतिका

हुप्प्या ·

नेत्रेश 04/11/2010 - 23:20
ऑक्टोबर २०१० मध्ये नेवाडा - अ‍ॅरिझोना या राज्याना जोडणारा (हुव्हर डॅम बायपास) ब्रिज चालु झाला. त्या ब्रिज ला 'पॅट टिलमन मेमोरियल ब्रिज' असे नाव देण्यात आले आहे. हुप्प्याभाउ, जरा मोठे भाग लिहा हो.

नेत्रेश 04/11/2010 - 23:20
ऑक्टोबर २०१० मध्ये नेवाडा - अ‍ॅरिझोना या राज्याना जोडणारा (हुव्हर डॅम बायपास) ब्रिज चालु झाला. त्या ब्रिज ला 'पॅट टिलमन मेमोरियल ब्रिज' असे नाव देण्यात आले आहे. हुप्प्याभाउ, जरा मोठे भाग लिहा हो.
3

फुल्ल टू दबंग

परिकथेतील राजकुमार ·

मराठमोळा 29/10/2010 - 12:29
डोकं बाजुला ठेवुन बघावे अशा सिनेमांचीच आजकाल चलती आहे, हेच सिनेमे एकमेकांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड मोडीत काढत असतात. दबंग पण याच कॅटेगरीमधला, पैसा कमाने का है तो फिर जो बिकता है वोईच बनाओ. अपनी अकल मत लगाओ. :) बाकी आजकाल साऊथ ईंडीयन स्टाइल सिनेमे लोकांना आवडायला लागले आहेत.

मृत्युन्जय 29/10/2010 - 12:42
खरं सांगु का? तद्दन गल्लाभरु, बकवास, तर्कहीन, मसाला चित्रपट असलेला दबंग मलासुद्धा आवडला होता. काही चित्रपट असतात की ते १० वर्षांनी सुद्धा "आवडतात" असे म्हणायचे असते. दबंग आवडला होता या कॅटेगरीमधला आहे. अजुनही जर कधी लागला तर बघेन. याउलत "आवडतो" कॅटेगरी मधला असलेला रंग दे बसंती प्रत्येक वेळेस लागेल त्यावेळेस बघेन असेच नाही.

सुहास.. 29/10/2010 - 12:52
चित्रपट-परिक्षण लिहावे ते दोघांनेच एक तर फारएन्ड आणी दुसरं म्हणंजे पर्‍यानी. आजपासुन पर्‍याला " चित्रपट-परिक्षण केसरी " का खिताब देत आहोत (सोबत त्याची आवडत्या द्रव्याची बाटली ही देण्यात येईल ही नोंद घ्यावी, आता कसा पुरस्कार स्विकारत नाही ते बघुयात) चित्रपट पाहिला . आवडला . परिक्षण वाचले. आवडले. मला सोनाक्षी चित्रपटात,खामोsssssssssश !! असा डायलॉग मारते की काय अशी भिती वाटत होती,पण त्यो डायल्वाक एकुन मीच खामोश झालो. दुसरे म्हणजे अगदी शेवटचा फाईट सिक्वेन्स , हॉलीवुडच्या गाय रिची ने दिगदर्शीत केलेल्या, शेरलॉक होम्स चित्रपटातुन अगदी जसाच्या तसा ऊचललेला आहे. तस ही बॉलीवुड मध्ये ऊचलेगिरी चालतेच. एकुण डोक बाजुला ठेवुन पाहिले तर दोन-अडीच तासाची निख्खळ करमणुक !!

झुणका भाकर 29/10/2010 - 12:54
२) अंतिम मारामारीत सलमानच्या अंगावरुन टराटरा फाटून चिंध्या होउन वार्‍यावर उडालेला शर्ट सलमान खलनायकाला मारुन ट्रॅक्टरमधून परत येताना तोच शर्ट त्याच्या अंगावर असतो. हे पाहुन तर आम्हाला अर्नाल्ड चीच आठवण झाली.

utkarsh shah 29/10/2010 - 14:52
हान.. तर आता इकडे चुलबुल आणि सलमान मधला संघर्ष चांगलाच पेट घेतो तर मी पहिलेल्या दबंग मध्ये चुलबुलचा रोल सलमान करत होता. बहुतेक तुमचा दबांग वेगळा असेल बुवा कदाचित.. (ह. घ्या.)

चिगो 29/10/2010 - 16:28
मस्त पराक्षण... आपलं, परीक्षण !! दबंग आवडला. फुल्लटू टाईमपास..

चिंतामणी 29/10/2010 - 17:10
प रा. तुझे परीक्षंण एक दम "फुल्ल टू" कडक. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो. हे वाचल्यावर मी तु कसा दिसत असशील त्यावेळी हे डोळ्यासमोर आणण्याचे फुल्ल टु प्रयत्न करीत आहे. :-/ विचारात पडलेला चिंतामणी

प्रियाली 29/10/2010 - 17:19
वाँटेडनंतर मीही दबंग बघायला उत्सुक आहे. असे चित्रपट बघून डोकेदुखी डोक्यासोबत पळून जाते असा अनुभव आहे. ;) असो.
तसा मी काही फार जाणकार परीक्षक किंवा एखाद्या कलाकाराला पारखू शकेन असा कसबी वगैरे नाही,
कसबी? कसाब आहेस बाबा तू! बायदवे, मला वॉंटेडमधला "पास्ता पास्ता रोज डब्बामें पास्ता लेके जाती है|" हा डायलॉक भारी आवडतो. =)) असे भारी डॉयलॉक लिहिणार्‍या प्राण्याला मी हात जोडून नमस्कार करते. दबंगमध्येही असेच संवाद आहेत का?

In reply to by प्रियाली

दबंगमध्येही असेच संवाद आहेत का?
दबंगमध्ये तर क ह र आहे ! उद :- कमिनीसे याद आया, पांडेजी आपकी बिवी कैसी है ? =)) इथे अजुनही काही रोचक संवाद वाचता येतील.

In reply to by धमाल मुलगा

प्रियाली 29/10/2010 - 19:06
ती तर पंचलाईन आहे पण ते पास्ता पास्ता आणि ती पास्ता खाणारी आणि डब्ब्यात घेऊन जाणारी आयेशा टकिया भारीच. (ती त्या अबू आझमीच्या लेकालाही रोज पास्ता खायला घालत असेल का असा विचारही डोक्यात आला होता. ;) )

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 29/10/2010 - 19:09
पास्ता पास्ता आणि ती पास्ता खाणारी आणि डब्ब्यात घेऊन जाणारी आयेशा टकिया भारीच.
+१, आयेशा टाकिया भारीच ह्याच्याशी संपुर्ण सहमती. आमच्या टारु नावाच्या मित्रालाही ती फार्फार आवडायची.
(ती त्या अबू आझमीच्या लेकालाही रोज पास्ता खायला घालत असेल का असा विचारही डोक्यात आला होता. )
"(जर रोज स्वत: आयेशा त्याला पाश्ता खाऊ घालत असेल तर ) नशिबवान आहे लेकाचा" एवढेच म्हणतो. ;) - छोटा डॉन

धमाल मुलगा 29/10/2010 - 18:41
श्री.प.रा., हा काय फालतुपणा आहे? कोणत्यातरी क्षुल्लक देमार चित्रपटांबद्दल भरभरुन लिहायला पब्लिक फोरम कशाला वापरता? ह्या असल्या लोकांमुळे आणि गोष्टींमुळेच समाजात हिंसेची अंधश्रध्दा वाढते. असो. ह्या विषयावर अजुन आपले रॉबिनहुड देशपांडे उर्फे चुलबुल देशपांडे काही कसे बोलले नाहीत? ;)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/10/2010 - 19:04
हा काय फालतुपणा आहे? कोणत्यातरी क्षुल्लक देमार चित्रपटांबद्दल भरभरुन लिहायला पब्लिक फोरम कशाला वापरता? ह्या असल्या लोकांमुळे आणि गोष्टींमुळेच समाजात हिंसेची अंधश्रध्दा वाढते.
+१, हेच म्हणतो. असल्या भिकार चित्रपटांची परिक्षणे ? आयला असले टुकार आणि गल्लाभरु चित्रपट पहावतात कसे हाच प्रश्न आहे. त्यापेक्षा पराने "डायरी" लिहायला सुरवात करावी असे सुचवतो. ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/10/2010 - 19:10
आपण रजनी आणि चिरंजीवी, नागार्जुना ह्यांचे डायहार्ड फ्यान आहात हे आम्ही तुर्त विसर्लो आहोत, कारण एकच..आपण आमच्य भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे. (तत्वः तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो.) श्री.प.रा. ह्यांना नम्र विनंती, की त्यांनी आपल्या प्रतिभेची प्रतिमा अधिकाधिक उजळवावी आणि आम्हास वाचनमेजवानी द्यावी. ;)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/10/2010 - 19:22
श्री. मुलगा, आपली अंमळ गल्लत होते आहे, आम्ही केवळ सत्य तेच बोलत असतो व वर तेच लिहले आहे. "दबंग" सारखे पिक्चर अत्यंत टाकाऊ, हलक्या प्रतीचे आहेत हे आमचे स्पष्ट मत आहे आणि आम्ही ते आग्रहाने मांडले आहे, आता ह्याला आपलीही सहमती निघाली हा योगायोग समजावा. ह्या निमित्ताने उगाच स्वतःचीच पाठ थोपटुन घेण्याचे हास्यास्पद प्रकार करु नयेत. असो, चांगले पिक्चर म्हणजे नक्की काय हे पहायचे असेल तर आपण "रजनी, चिरंजीवी, बालकॄष्णा, विक्रम, महेशबाबु' ह्यांचे चित्रपट पहावेत असे सुचवतो. मला वेळ मिळाला की थोड्याच दिवसात "मदिगरा / इन्द्रा - दी टायगर / स्टालिन / शंकरादादा सेरीज " ह्यापैकी एखाद्या अजरामर महान कलाकृतीचे परिक्षण टाकेन. बाकी असो. - ( उच्च अभिरुचीवाला ) छोटा डॉन

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 29/10/2010 - 19:29
>>वरच्या यादीत NTR Jr. ह्यांचे नाव कसे नाही बरे ? गल्ली चुकली मालक. हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी खुद्द NTR Jr. ला विचारावा की "बाबारे, डॉन्याच्या यादीत तुझे नाव का नाही?" बाकी असो. - छोटा डॉन

परा, मस्त परिक्षण रे..! लवकरच पाहतो. :) बाकी, ' तेरे मस्त मस्त दो नैन' गाणं ऐकायला एकदम मस्त आहे. [लेखात टाकलेला दुवा चालत नाही तो भाग वेगळा. :) ] -दिलीप बिरुटे

मस्त कलंदर 29/10/2010 - 19:37
परा नेहमीप्रमाणे मस्तच परिचय रे.. मी वाँटेड पाह्यला नाही.. पण तुझा लेख वाचून परत एकदा दबंगमधले सगळे सीन्स आठवले.. शेवटचा डायलॉग तर अगदी कहरच आहे.. सोनाक्षी म्हणते, "पांडेजी, हमने उलटी कर दी है, आप सुलटे हो सकतें हैं।" बाकी, पिक्चर मेंदू बाजूला ठेवून पाहायचा हे अगदी बरोब्बर!!!

लै भारी!!!! शिन्मा अर लैच भारीये... फुल्टू टीपी!!! पैसा वस्सूल स्साला!!! बाय द वे... पर्‍या, तुझा आवडता देशद्रोही पिच्चर उद्या का परवा टीव्हीवर येतो आहे म्हणे... :)

In reply to by रेवती

परिक्षण आवडलं, पिच्चर आवडेल याची खात्री आहे, पण सोनाक्षी मलातरी अंमळ रिटार्ड वाटली. ईशा देओल जास्त मंद आहे का सोनाक्षी सिन्हा याची स्पर्धा लावायला हरकत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 29/10/2010 - 21:42
ईशा देओल मला परग्रहावरची पाहुणी वाटते. डोकं मोठं, चेहर्‍यावर विक्षिप्त भाव वगैरे त्यामानाने सोनाक्षी पृथ्वीवरली तरी दिसते.

मितान 29/10/2010 - 20:42
मला आवडला नाही. फारच फालतू ! पण पराभौ परीक्षण जबरा लिवत्यात यात वादच नै ! असले भिकार शिणेमे चालण्यासाठी अशी परीक्षणे पोस्टरसोबतच लावली पाहिजेत. :)

In reply to by मितान

chipatakhdumdum 30/10/2010 - 02:08
२०१० मध्ये फक्त २ पिक्चर चाल्ले. येक रोबो ,दुसरा दबंग. असले भिकार शिणेमे चालण्यासाठी अशी परीक्षणे पोस्टरसोबतच लावली पाहिजेत. पिक्चर चालून लागून निघून सुध्दा गेला, आता कुठल परीक्षण लावतो भाउ हा चालण्यासाठी ?

sneharani 30/10/2010 - 10:06
पिक्चर नाही आवडला!. तेव्हा एखाद्या चांगल्या पिक्चरचे परिक्षण येऊ दे.

सहज 30/10/2010 - 11:23
काळवीटांची शिकार, फुटपाथवरच्या माणसांचा जीव घेणे, आता करबुडवेगिरी इतके आरोप तसेच गुन्हे दाखल झालेल्या तसेच सुमार अभिनय करणार्‍या एका 'खाना'चे मिपावर ब्राम्हणी (का बामनी??) तत्वांकडून झालेले असे कोडकौतुक पाहून अत्यंत शरम वाटली. परा आता पापाचे परिमार्जन - चिंतातूरजंतूंनी सुचवलेले १ अफ्रिकन, १ स्कॅन्डेनेव्हीयन, १ पूर्व आशीयायी, १ पूर्व युरोपीयन, १ अफगणिस्तानी असे ५ सिनेमे पाठोपाठ दाखवा. किंवा इंद्राज व क्रेमर यांनी सुचवलेली भाषानियमविषयक ५ पुस्तके! ------------------------------------------------------------- एक चित्रपटभक्त नात्याने मनुष्यवध, जनावरांची हत्या, करबुडवेगिरी, बेक्कार अभिनय करणार्‍यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका असे आवाहन करतो.

पराचे परीक्षण आवडले. पण चित्रपट अजिबात आवडला नाही. चित्रपट प्रदर्शनानंतर सुरवातीचे काही दिवस ३ इडिय्ट्सबरोबर ह्या चित्रपटाची मुद्दामुन तुलना केली जात होती. पण डबंगच्या मानाने ३ इडियट्स कितीतरी पटीने चांगला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला फार हाईप करुन सुपरडुपर हिट बनवल्यासारखे वाटते. बाकी सलमान मिशीमध्ये छान दिसतो. जिंतेद्रनेही हिंमतवालानंतरच्या काही चित्रपटात मिशी ठेवली होती. आणि ते चित्रपट बर्यापैकी गाजले सुध्दा.! अमिताभने बहुदा महानमध्ये मिशीचा प्रयोग केला होता पण तो साफ फसला. (मिशीवाला) योगेश

मराठमोळा 29/10/2010 - 12:29
डोकं बाजुला ठेवुन बघावे अशा सिनेमांचीच आजकाल चलती आहे, हेच सिनेमे एकमेकांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड मोडीत काढत असतात. दबंग पण याच कॅटेगरीमधला, पैसा कमाने का है तो फिर जो बिकता है वोईच बनाओ. अपनी अकल मत लगाओ. :) बाकी आजकाल साऊथ ईंडीयन स्टाइल सिनेमे लोकांना आवडायला लागले आहेत.

मृत्युन्जय 29/10/2010 - 12:42
खरं सांगु का? तद्दन गल्लाभरु, बकवास, तर्कहीन, मसाला चित्रपट असलेला दबंग मलासुद्धा आवडला होता. काही चित्रपट असतात की ते १० वर्षांनी सुद्धा "आवडतात" असे म्हणायचे असते. दबंग आवडला होता या कॅटेगरीमधला आहे. अजुनही जर कधी लागला तर बघेन. याउलत "आवडतो" कॅटेगरी मधला असलेला रंग दे बसंती प्रत्येक वेळेस लागेल त्यावेळेस बघेन असेच नाही.

सुहास.. 29/10/2010 - 12:52
चित्रपट-परिक्षण लिहावे ते दोघांनेच एक तर फारएन्ड आणी दुसरं म्हणंजे पर्‍यानी. आजपासुन पर्‍याला " चित्रपट-परिक्षण केसरी " का खिताब देत आहोत (सोबत त्याची आवडत्या द्रव्याची बाटली ही देण्यात येईल ही नोंद घ्यावी, आता कसा पुरस्कार स्विकारत नाही ते बघुयात) चित्रपट पाहिला . आवडला . परिक्षण वाचले. आवडले. मला सोनाक्षी चित्रपटात,खामोsssssssssश !! असा डायलॉग मारते की काय अशी भिती वाटत होती,पण त्यो डायल्वाक एकुन मीच खामोश झालो. दुसरे म्हणजे अगदी शेवटचा फाईट सिक्वेन्स , हॉलीवुडच्या गाय रिची ने दिगदर्शीत केलेल्या, शेरलॉक होम्स चित्रपटातुन अगदी जसाच्या तसा ऊचललेला आहे. तस ही बॉलीवुड मध्ये ऊचलेगिरी चालतेच. एकुण डोक बाजुला ठेवुन पाहिले तर दोन-अडीच तासाची निख्खळ करमणुक !!

झुणका भाकर 29/10/2010 - 12:54
२) अंतिम मारामारीत सलमानच्या अंगावरुन टराटरा फाटून चिंध्या होउन वार्‍यावर उडालेला शर्ट सलमान खलनायकाला मारुन ट्रॅक्टरमधून परत येताना तोच शर्ट त्याच्या अंगावर असतो. हे पाहुन तर आम्हाला अर्नाल्ड चीच आठवण झाली.

utkarsh shah 29/10/2010 - 14:52
हान.. तर आता इकडे चुलबुल आणि सलमान मधला संघर्ष चांगलाच पेट घेतो तर मी पहिलेल्या दबंग मध्ये चुलबुलचा रोल सलमान करत होता. बहुतेक तुमचा दबांग वेगळा असेल बुवा कदाचित.. (ह. घ्या.)

चिगो 29/10/2010 - 16:28
मस्त पराक्षण... आपलं, परीक्षण !! दबंग आवडला. फुल्लटू टाईमपास..

चिंतामणी 29/10/2010 - 17:10
प रा. तुझे परीक्षंण एक दम "फुल्ल टू" कडक. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो. हे वाचल्यावर मी तु कसा दिसत असशील त्यावेळी हे डोळ्यासमोर आणण्याचे फुल्ल टु प्रयत्न करीत आहे. :-/ विचारात पडलेला चिंतामणी

प्रियाली 29/10/2010 - 17:19
वाँटेडनंतर मीही दबंग बघायला उत्सुक आहे. असे चित्रपट बघून डोकेदुखी डोक्यासोबत पळून जाते असा अनुभव आहे. ;) असो.
तसा मी काही फार जाणकार परीक्षक किंवा एखाद्या कलाकाराला पारखू शकेन असा कसबी वगैरे नाही,
कसबी? कसाब आहेस बाबा तू! बायदवे, मला वॉंटेडमधला "पास्ता पास्ता रोज डब्बामें पास्ता लेके जाती है|" हा डायलॉक भारी आवडतो. =)) असे भारी डॉयलॉक लिहिणार्‍या प्राण्याला मी हात जोडून नमस्कार करते. दबंगमध्येही असेच संवाद आहेत का?

In reply to by प्रियाली

दबंगमध्येही असेच संवाद आहेत का?
दबंगमध्ये तर क ह र आहे ! उद :- कमिनीसे याद आया, पांडेजी आपकी बिवी कैसी है ? =)) इथे अजुनही काही रोचक संवाद वाचता येतील.

In reply to by धमाल मुलगा

प्रियाली 29/10/2010 - 19:06
ती तर पंचलाईन आहे पण ते पास्ता पास्ता आणि ती पास्ता खाणारी आणि डब्ब्यात घेऊन जाणारी आयेशा टकिया भारीच. (ती त्या अबू आझमीच्या लेकालाही रोज पास्ता खायला घालत असेल का असा विचारही डोक्यात आला होता. ;) )

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 29/10/2010 - 19:09
पास्ता पास्ता आणि ती पास्ता खाणारी आणि डब्ब्यात घेऊन जाणारी आयेशा टकिया भारीच.
+१, आयेशा टाकिया भारीच ह्याच्याशी संपुर्ण सहमती. आमच्या टारु नावाच्या मित्रालाही ती फार्फार आवडायची.
(ती त्या अबू आझमीच्या लेकालाही रोज पास्ता खायला घालत असेल का असा विचारही डोक्यात आला होता. )
"(जर रोज स्वत: आयेशा त्याला पाश्ता खाऊ घालत असेल तर ) नशिबवान आहे लेकाचा" एवढेच म्हणतो. ;) - छोटा डॉन

धमाल मुलगा 29/10/2010 - 18:41
श्री.प.रा., हा काय फालतुपणा आहे? कोणत्यातरी क्षुल्लक देमार चित्रपटांबद्दल भरभरुन लिहायला पब्लिक फोरम कशाला वापरता? ह्या असल्या लोकांमुळे आणि गोष्टींमुळेच समाजात हिंसेची अंधश्रध्दा वाढते. असो. ह्या विषयावर अजुन आपले रॉबिनहुड देशपांडे उर्फे चुलबुल देशपांडे काही कसे बोलले नाहीत? ;)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/10/2010 - 19:04
हा काय फालतुपणा आहे? कोणत्यातरी क्षुल्लक देमार चित्रपटांबद्दल भरभरुन लिहायला पब्लिक फोरम कशाला वापरता? ह्या असल्या लोकांमुळे आणि गोष्टींमुळेच समाजात हिंसेची अंधश्रध्दा वाढते.
+१, हेच म्हणतो. असल्या भिकार चित्रपटांची परिक्षणे ? आयला असले टुकार आणि गल्लाभरु चित्रपट पहावतात कसे हाच प्रश्न आहे. त्यापेक्षा पराने "डायरी" लिहायला सुरवात करावी असे सुचवतो. ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/10/2010 - 19:10
आपण रजनी आणि चिरंजीवी, नागार्जुना ह्यांचे डायहार्ड फ्यान आहात हे आम्ही तुर्त विसर्लो आहोत, कारण एकच..आपण आमच्य भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे. (तत्वः तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो.) श्री.प.रा. ह्यांना नम्र विनंती, की त्यांनी आपल्या प्रतिभेची प्रतिमा अधिकाधिक उजळवावी आणि आम्हास वाचनमेजवानी द्यावी. ;)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/10/2010 - 19:22
श्री. मुलगा, आपली अंमळ गल्लत होते आहे, आम्ही केवळ सत्य तेच बोलत असतो व वर तेच लिहले आहे. "दबंग" सारखे पिक्चर अत्यंत टाकाऊ, हलक्या प्रतीचे आहेत हे आमचे स्पष्ट मत आहे आणि आम्ही ते आग्रहाने मांडले आहे, आता ह्याला आपलीही सहमती निघाली हा योगायोग समजावा. ह्या निमित्ताने उगाच स्वतःचीच पाठ थोपटुन घेण्याचे हास्यास्पद प्रकार करु नयेत. असो, चांगले पिक्चर म्हणजे नक्की काय हे पहायचे असेल तर आपण "रजनी, चिरंजीवी, बालकॄष्णा, विक्रम, महेशबाबु' ह्यांचे चित्रपट पहावेत असे सुचवतो. मला वेळ मिळाला की थोड्याच दिवसात "मदिगरा / इन्द्रा - दी टायगर / स्टालिन / शंकरादादा सेरीज " ह्यापैकी एखाद्या अजरामर महान कलाकृतीचे परिक्षण टाकेन. बाकी असो. - ( उच्च अभिरुचीवाला ) छोटा डॉन

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 29/10/2010 - 19:29
>>वरच्या यादीत NTR Jr. ह्यांचे नाव कसे नाही बरे ? गल्ली चुकली मालक. हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी खुद्द NTR Jr. ला विचारावा की "बाबारे, डॉन्याच्या यादीत तुझे नाव का नाही?" बाकी असो. - छोटा डॉन

परा, मस्त परिक्षण रे..! लवकरच पाहतो. :) बाकी, ' तेरे मस्त मस्त दो नैन' गाणं ऐकायला एकदम मस्त आहे. [लेखात टाकलेला दुवा चालत नाही तो भाग वेगळा. :) ] -दिलीप बिरुटे

मस्त कलंदर 29/10/2010 - 19:37
परा नेहमीप्रमाणे मस्तच परिचय रे.. मी वाँटेड पाह्यला नाही.. पण तुझा लेख वाचून परत एकदा दबंगमधले सगळे सीन्स आठवले.. शेवटचा डायलॉग तर अगदी कहरच आहे.. सोनाक्षी म्हणते, "पांडेजी, हमने उलटी कर दी है, आप सुलटे हो सकतें हैं।" बाकी, पिक्चर मेंदू बाजूला ठेवून पाहायचा हे अगदी बरोब्बर!!!

लै भारी!!!! शिन्मा अर लैच भारीये... फुल्टू टीपी!!! पैसा वस्सूल स्साला!!! बाय द वे... पर्‍या, तुझा आवडता देशद्रोही पिच्चर उद्या का परवा टीव्हीवर येतो आहे म्हणे... :)

In reply to by रेवती

परिक्षण आवडलं, पिच्चर आवडेल याची खात्री आहे, पण सोनाक्षी मलातरी अंमळ रिटार्ड वाटली. ईशा देओल जास्त मंद आहे का सोनाक्षी सिन्हा याची स्पर्धा लावायला हरकत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 29/10/2010 - 21:42
ईशा देओल मला परग्रहावरची पाहुणी वाटते. डोकं मोठं, चेहर्‍यावर विक्षिप्त भाव वगैरे त्यामानाने सोनाक्षी पृथ्वीवरली तरी दिसते.

मितान 29/10/2010 - 20:42
मला आवडला नाही. फारच फालतू ! पण पराभौ परीक्षण जबरा लिवत्यात यात वादच नै ! असले भिकार शिणेमे चालण्यासाठी अशी परीक्षणे पोस्टरसोबतच लावली पाहिजेत. :)

In reply to by मितान

chipatakhdumdum 30/10/2010 - 02:08
२०१० मध्ये फक्त २ पिक्चर चाल्ले. येक रोबो ,दुसरा दबंग. असले भिकार शिणेमे चालण्यासाठी अशी परीक्षणे पोस्टरसोबतच लावली पाहिजेत. पिक्चर चालून लागून निघून सुध्दा गेला, आता कुठल परीक्षण लावतो भाउ हा चालण्यासाठी ?

sneharani 30/10/2010 - 10:06
पिक्चर नाही आवडला!. तेव्हा एखाद्या चांगल्या पिक्चरचे परिक्षण येऊ दे.

सहज 30/10/2010 - 11:23
काळवीटांची शिकार, फुटपाथवरच्या माणसांचा जीव घेणे, आता करबुडवेगिरी इतके आरोप तसेच गुन्हे दाखल झालेल्या तसेच सुमार अभिनय करणार्‍या एका 'खाना'चे मिपावर ब्राम्हणी (का बामनी??) तत्वांकडून झालेले असे कोडकौतुक पाहून अत्यंत शरम वाटली. परा आता पापाचे परिमार्जन - चिंतातूरजंतूंनी सुचवलेले १ अफ्रिकन, १ स्कॅन्डेनेव्हीयन, १ पूर्व आशीयायी, १ पूर्व युरोपीयन, १ अफगणिस्तानी असे ५ सिनेमे पाठोपाठ दाखवा. किंवा इंद्राज व क्रेमर यांनी सुचवलेली भाषानियमविषयक ५ पुस्तके! ------------------------------------------------------------- एक चित्रपटभक्त नात्याने मनुष्यवध, जनावरांची हत्या, करबुडवेगिरी, बेक्कार अभिनय करणार्‍यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका असे आवाहन करतो.

पराचे परीक्षण आवडले. पण चित्रपट अजिबात आवडला नाही. चित्रपट प्रदर्शनानंतर सुरवातीचे काही दिवस ३ इडिय्ट्सबरोबर ह्या चित्रपटाची मुद्दामुन तुलना केली जात होती. पण डबंगच्या मानाने ३ इडियट्स कितीतरी पटीने चांगला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला फार हाईप करुन सुपरडुपर हिट बनवल्यासारखे वाटते. बाकी सलमान मिशीमध्ये छान दिसतो. जिंतेद्रनेही हिंमतवालानंतरच्या काही चित्रपटात मिशी ठेवली होती. आणि ते चित्रपट बर्यापैकी गाजले सुध्दा.! अमिताभने बहुदा महानमध्ये मिशीचा प्रयोग केला होता पण तो साफ फसला. (मिशीवाला) योगेश
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.