Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३
मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती.
मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती.
त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.
ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना,
कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल.
कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात?
या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस. कृष्णमुर्ती यांची ही त्यांच्या आजच्या १०८ व्या जयंतीनिमित्य थोडक्यात ओळख.
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.
आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.
Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत.
आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल.
तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का?
मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह.
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..)
मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले.
मुखपृष्ठ :
गीत :
चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले
नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले
रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट
धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट
परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले
अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी
इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी
गीतातील सूर असे का मधेच पण तुटले
तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार
ही अशीच तव छाया पण मागे धावणार
सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले
गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६
***
पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं". धृवपदाबद्दल लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात,
सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी |
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी ||
नाही, मी माझा पत्ता नाही सांगत आहे इकडे, त्या आणि ह्या धाग्याचा काहीच संबंध नाही
तर आता मुख्य विषयाकडे ,
मला वाटत जेव्हा केव्हा मानवी संस्कृती निर्माण झाली , माणसाला एक ठिकाणाहून दुसरीकडे मुद्दामून जायची गरज निर्माण झाली, किंवा दुसऱ्याला पाठवायची/ बोलवायची गरज निर्माण झाली, तेव्हा पासून पत्ता या संकल्पनेची सुरवात झाली असेल. त्यातूनच एखाद्या मानवी वस्तीला गाव संबोधून त्याला नाव देणे, रस्त्याला नाव देणेही चालू झाले असेल. अर्थात पत्ता हि संकल्पना का निर्माण झाली याचा हा शोध निबंध नाही.