मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस Fri, 12/20/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य Sat, 12/21/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha Wed, 12/25/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर Wed, 12/25/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख Wed, 02/05/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस Fri, 12/20/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य Sat, 12/21/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha Wed, 12/25/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर Wed, 12/25/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख Wed, 02/05/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ

गोरगावलेकर ·

गवि Fri, 12/20/2024 - 06:00
खूपच छान. लोलयेचा वेताळ खरेच गूढ. उन्हातान्हात उघड्यावर सदैव उभा असलेला तो वेताळ गावाचे रक्षण करतो. रानावनातून काटेकुटे तुडवत फिरतो अशी श्रद्धा आहे. त्याच्या बरगडीत विंचू असतो. प्रचूने त्यावर खूप सविस्तर छान लिहीले आहे आणि त्याच्या लेखामुळेच मीही तो वेताळ खास शोधून तिथे जाऊन बराच वेळ रेंगाळत पाहिला. बाकी किनारे देखील सुंदर. तुम्ही ज्या पायऱ्या वापरून पाळोळे बीच वरून पलीकडे गेलात तोच माझ्या मते पाटणे बीच. जाता जाता. अगोंदा याचा उच्चार अगोंद असा आहे असे सांगून पुढील भागाची प्रतीक्षा.

मस्तच. बटरफ्लाय बीच आणि हनीमून बीचला गेलो होतो त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गोव्याचा तो भाग खूपच सुंदर आहे. आता पुढच्या भागात काय असेल याची उत्सुकता लागली आहे.

चौथा कोनाडा Sat, 12/21/2024 - 21:37
व्वा ... एक नंबर, फर्मास वर्णन आणि झक्कास प्रचि ! मजा आली भटकंती बघताना ! आता गोव्याला जातना तुमचेच धागे बघुन जातो ! NCqwqwLq456

प्रचेतस Mon, 12/23/2024 - 15:44
हा भागही खूप आवडला, पाळोळे किनारा तर खूप आवडीचा आहे, पण हल्ली खूप गर्दी असते. तुम्ही आवर्जून लोलये आणि पैंगिणच्या वेताळ मंदिरात जाऊन आले हे बघून खूप छान वाटले. लोलये वेताळ आहे तसाच आहे, पैंगिण मंदिरात मात्र खूपच बदल झाला, वेताळ मूर्ती बदलण्याची काय जरूर पडली कुणास ठाऊक, शिवाय जुना काष्ठमंडप आता गेलेला दिसतो. काष्ठमंडप हे गोवे कोकणातल्या मंदिरांचं खरं वैभव.

गेल्या काही वर्षात गोव्यात येणार्‍या पर्यटकांचा आकडा कमी झाला आहे आणि तो वाढायची काहीही चिन्हे नाहीत तर तो कमीच होत आहे अशी चिन्हे आहेत. गोव्यासारख्या राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारीत असल्याने पर्यटकांचा कमी होणारा आकडा राज्यापुढील अडचणी वाढवेल अशी चिन्हे आहेत. एक तर गोव्यात (खरं तर भारतातच) परदेशापेक्षा हॉटेल कैच्याकै महाग आहेत. पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे यावर्षी जरा किंमती कमी झालेल्या दिसत आहेत. आज बुक केले तर २७ ते २८ डिसेंबर या एका दिवसासाठी पंचतारांकीत हॉटेल्स दररोज २० ते २५ हजारात मिळत आहेत असे दिसते. पूर्वी तो आकडा ३० हजार+ पण मी बघितला होता. थायलंडमध्ये फुकेत किंवा व्हिएटनाममध्ये हॅनोईमध्ये त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात त्याच दिवसात हॉटेल्स उपलब्ध आहेत. अनेकदा ब्रिटिश पर्यटक एखाद महिना राहायच्या उद्देशाने येतात. रशियन पर्यटक तर ४ महिने राहायच्या उद्देशाने येतात. जर थायलंड, व्हिएटनाम अशा ठिकाणी अर्ध्या किंमतीत हॉटेल्स मिळत असतील तर त्यांचे भरपूर पैसे तिथे गेल्यावर वाचतील. तसेच गोव्यात नुसते समुद्रकिनारे आहेत. तिकडे त्या नेहमीच्या बोट राईड्स, पॅरॅशूट राईड्स इत्यादी गोष्टीच आहेत. फुकेतमध्ये समुद्रकिनारे तर आहेतच. पण त्याव्यतिरिक्त तिथे करण्यासारखे बरेच काही आहे. तीच गोष्ट व्हिएटनामची. मग परदेशी पर्यटकांच्या दृष्टीने फुकेत किंवा व्हिएटनाम ही अधिक चांगली पर्यटनस्थळे आहेत. इंडोनेशियात बालीमध्येही समुद्रकिनारे आहेतच. त्याव्यतिरिक्त डोंगर आहेत आणि इतरही अनेक अनुभव घेण्यासारख्या गोष्टी आहेत. गोव्यातील टॅक्सीमाफियांविषयी लिहावे तितके थोडे आहे. त्याविषयी सोशल मिडियावर अगदी भरभरून लिहिले गेले आहे. त्यांच्या दबावामुळे गोव्यात उबर-ओलाही येऊ शकलेली नाही. गोवा माईल्स म्हणून स्थानिक अ‍ॅप आहे. पण टॅक्सी माफियांच्या स्टॅन्डजवळ ते लोक येऊ शकत नाहीत इतकी त्यांची दहशत आहे. १२ वर्षांपूर्वी एकदा वारकाहून मडगावला जाताना हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांचे दर ऐकून म्हटले की त्यांच्याकडून टॅक्सी नको, थोडे बाहेर गेल्यावर काहीतरी मिळेल. तशी एक रीक्षा एखाद किलोमीटर चालल्यावर मिळाली. परत येताना त्या रीक्षावाल्याने हॉटेलपासून असेच एक किलोमीटर दूर सोडले कारण तो हॉटेलजवळ गेला असता तर बाहेरच्या टॅक्सीवाल्यांनी त्याला मारहाण करायलाही कमी केले नसते ही भिती त्याला होती. हातात सामान नसेल आणि एखाद किलोमीटर चालणे शक्य होत असेल तर ठीक आहे पण नाहीतर अवजड बॅगा घेऊन लांब चालत जाणे तसे कठीणच. मग परत त्याच टॅक्सी माफियांवर अवलंबून राहावे लागते. राज्य सरकार याविषयी काहीही करताना दिसत नाही. राज्य सरकार दरवर्षी शॅक उभारायला अनामत रक्कम आणि इतर चार्जेस वाढवत आहे. शॅक्स रात्री ११ पर्यंत चालू ठेवता येतील असे कागदोपत्री नियम आहेत. आम्ही जातो तिथे दक्षिण गोव्यात समुद्रकिनार्‍यावर विशेष नाईट लाईफ नसते तरी रात्री ११ ही शॅक बंद करायची वेळ अगदीच अव्यवहार्य आहे. उत्तर गोव्यात कलंगूट, बागा, कोंदोळी अशा ठिकाणी भरपूर नाईट लाईफ असते तिथे रात्री ११ वाजता शॅक बंद करणे कसे काय चालणार आहे? प्रत्यक्षात तो नियम पाळला गेला तर शॅकवाल्यांचे भरपूर नुकसान होणार. पण मुळात असा नियम सरकारी अधिकार्‍यांना चिरीमिरी मिळवायची सोय म्हणून केला आहे की काय समजत नाही. परदेशी पर्यटकांसाठी भारताचा पर्यटक व्हिसाला अर्ज करणे हे पण डोकेदुखीचे आहे. उलट थायलंडसारखा देश पर्यटकांना आकर्षित करायला अनेक देशांच्या नागरीकांना व्हिसा-फ्री प्रवेश देत आहे. या सगळ्या कारणाने गोव्यातील पर्यटनावर परिणाम होत आहे याविषयी अनेक युट्यूब व्हिडिओ गेल्या काही दिवसात बघायला मिळाले. मी गोव्याशी संबंधित अनेक फेसबुक ग्रुप्सचा सदस्य आहे. त्यात बरेचसे ब्रिटिश लोक आहेत. ते पण या सगळ्याविषयी तक्रार करताना दिसतात. या परिस्थितीत सुधारणा होईल ही अपेक्षा. (कट्टर गोवाप्रेमी) चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि Tue, 12/24/2024 - 11:04
दर वर्षी किमान एकदा तरी गोव्यात जात असल्याने हे सर्व नजरेत स्पष्ट भरते आहेच. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांचे अमर्याद चढत गेलेले अवास्तव दर. साध्या बेसिक हॉटेलात देखील रूम सीझनमध्ये दहा ते वीस हजार. ऑफ सीझनला पण सहा आठ हजार. कोणत्याही बीच शॅक किंवा गोवन रेस्टॉरंटमध्ये कोणताही पदार्थ किमान साडेतीनशे ते कमाल कितीही. कवालासारख्या ठिकाणी केवळ संगीत ऐकण्यासाठी जाणे आणि त्या निमित्ताने ड्रिंक्स, जेवण (मुख्यतः फिंगर फूड) हा पूर्वी साधा आणि रास्त किंमत असलेला कार्यक्रम आता प्रति माणशी तीन ते पाच हजारात जातो, अगदी किमान आणि स्वस्त बाजूचा मेन्यू मागवून देखील. हे एक उदाहरण. अगदी छप्री टाईप शॅक्स पण केवळ समुद्र किनाऱ्यावर आहेत म्हणून कोणतेही ड्रिंक चारशे ते पाचशे आणि अन्न पाचशे ते हजार प्रति प्लेट असेच विकत आहेत. प्युर व्हेज उडपी हॉटेल्स, नवतारा, नवरत्न वगैरे हीच सामान्य मध्यमवर्गीय पर्यटकाला उरली आहेत. तिथे जेवणे म्हणजे केवळ सोय इतकेच. टॅक्सी लूट ही क्रिमिनल लेव्हलची आहे. पॉइंट टू पॉइंट मोजून जाणे येणे आणि अव्वाच्या सव्वा दर यामुळे स्वत:ची कार नेण्याला पर्याय नाही. किंवा मग फिरणे अति मर्यादित होते. त्यातल्या त्यात सेल्फ ड्राईव्ह हा एक ऑप्शन अजून बरा पडतोय. एकूण हळुहळू सामान्य पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला तर नवल नाही. परदेशी ओघ आटला आहे आणि भारतीय स्थानिक पर्यटकांकडून तीच डॉलर लेव्हल किंमत वसूल करणे असे स्वप्न असेल तर ते मोडणारच एक दिवस. या उलट याच काळात मी थायलंड आणि व्हिएतनाम या ठिकाणी पर्यटन केले. मनसोक्त स्वतःच्या प्लॅन नुसार बुकिंग आणि ग्रॅब टॅक्सी वापरून हवे तसे फिरता आले. आणि उत्कृष्ट लक्झरी हॉटेल्सचे दर दीड हजार भारतीय रुपये इथपासून सुरू होते आणि अति भारी हॉटेल पण चार पाच हजारात मिळत होते. टॅक्सी इमानदारीत रास्त आणि आधीच ठरलेले भाडे घेऊन गप गुमान सगळीकडे मिळत होती. अतिशय सुखद आणि स्वस्त अनुभव. सीझन मधली गोवा ट्रिप विएतनाम ट्रिप पेक्षा जास्त खर्चिक ठरू लागली आहे. (विमान प्रवास वगळता).

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कंजूस Wed, 12/25/2024 - 10:11
भांगरभूय किंवा गोवंश न्यूज पेपर डिजिटल ओनलाइन आहेत ते वाचले तर गोव्याचं पर्यटन धोरण, अडचणी, पळवाटा , नियम हे सर्व कळतं. अधिकृत हॉटेल लायसनधारक विरुध्द विनापरवाना गुपचूप धंधा करणारे यांचेही काम कसे चालते तेही आले होते. किनाऱ्यावर काय पदार्थ नेता येणार, क्रूझमध्ये काय करता येईल वगैरेसाठी नियम बनवले ते पर्यटकांस नको आहेत. शेजारच्या कर्नाटकातील तरुण पोट्टे बीचवर येऊन काय उद्योग करतात कुठे राहतात यावरही लेख आले आहेत. त्यांच्या त्रासाला ही पर्यटक आणि स्थानिक कंटाळले. ( फोटोग्राफी करत फिरणे वगैरे, बाजूच्या आड रस्त्यांवर वाहनं लावून तिथेच स्वयंपाक करणे वगैरे)

कंजूस Tue, 12/24/2024 - 12:48
Wittyspace channel ( https://youtube.com/@wittyspace?si=Z33t_wlAV0gAaQ5s ) श्वेता राठोड हिने हल्लीच व्हिएटनाम थाइलँडचे विडिओ टाकले आहेत. शाकाहारी असून एकटीच एक महिना व्हिएटनाम येथे राहिली होती. सर्व डिटेल दिले आहेत. रस्ता ओलांडणे आणि शाकाहारी आहार मिळवणे या दोन अडचणी आहेत. बाकी इतरांना सोपंच ठरेल.

In reply to by कंजूस

गवि Tue, 12/24/2024 - 15:37
तिने मलेशिया पण कव्हर केले आहे थोडे. या सोलो आणि बॅकपॅकर लोकांचे व्हिडिओ असतात तर रोचक (पॅसेंजर परमवीर, श्वेता, अनेक नोमॅड आदि नावे लावणारे लोक). पण त्यांची आहार, निवास आणि प्रवास इत्यादि योजना आणि निवडलेले पर्याय हे अनेकदा सोलो जाणाऱ्यालाच योग्य ठरतील असे असतात. खूप जास्त फिरायचे असल्याने स्वस्तात स्वस्त हॉस्टेल, डॉर्मीटरी, कॉमन शेअरिंग, बेड अँड ब्रेकफास्ट असे ऑप्शन्स. उभ्या उभ्या स्ट्रीट फूड) हे सर्व गमतीशीर असले तरी जवळपास फक्त एका प्रकारचा प्रवास (फिट, सडाफटिंग, बॅचलर, एकटा घुमक्कड) त्यात कव्हर होतो. कुटुंब घेऊन विविध वयाचे लोक किंवा ग्रुप यांच्यासाठी इतर vlog शोधावे लागतील. अशा वेळी फक्त कमी बजेट हे एकमेव ध्येय नसते.

In reply to by गवि

कंजूस Tue, 12/24/2024 - 18:32
कमीतकमी किती जाता येईल हे कळते. १) सरदार पुतळा आणि परिसर - किती आणि काय पाहता येईल तरीही आपल्या कामाचे काय हे पाहावे लागते वेगवेगळ्या लोकांकडून २) अवडंबर माजवलेल्या जागा बऱ्याच किती लायकीच्या आहेत. ३) काही ठिकाणी वयस्कर पर्यटक जाऊ शकत नाहीत तिथे हे तरुण लोक पटापट जाऊन येतात आणि तो भागही समजतो. ( Dr. Bro यांचा दूधसागर ) थोडक्यात यांचेही ब्लॉग काही सांगून जातात. ४) काही जागांचा तरुण लोक मजेशिरपणे आनंद लुटतात तसा वयस्कर लोक घेऊ शकत नाहीत. जागा तीच पण आनंद आणि उत्साह वेगळा असतो. इंदोर सराफा बाजार खाऊ गल्ली ( मैथिली ठाकूर आणि भाऊ, visa2explore, अभिनव साप्रा) ५) आपण काही ठिकाणी योग्य वयात गेलो नाही तर ती वेळ पुन्हा येत नाही. मग आपल्या वयाप्रमाणेच पर्यटन करावे लागते. जगातल्या सर्व जागा काही पाहता येणार नाहीत. तरीही थोडक्यात आनंद हवा असेल तर एकटे किंवा आपल्याच कुटुंबातील तीन चार जणानेच जायला हवे. मित्र परिवार गर्दी नकोच.

हॉटेलच्या आणि टॅक्सी च्या वाढलेल्या किमती बरोबरच अजून एका गोष्टी मुळे गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होत असेल तो म्हणजे गोव्याच्या लोकांचा मजुरडेपणा. ज्या ज्यावेळेस गोव्याला जाण झालं त्या त्या वेळेस ह्याचा अनुभव आला. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असेल तर योग्यच केल आहे. आर्थिक नुकसान झालं तर कदाचित सुधरतीलही.

In reply to by रात्रीचे चांदणे

मुक्त विहारि Tue, 12/24/2024 - 22:44
सामान्य नागरिक उत्तम वागतात. पण, सगळे व्यावसायिक, आला बकरा करा खिमा , ह्याच न्यायाने वागतात.

सुबोध खरे गुरुवार, 12/26/2024 - 12:03
१९८९ पासून गोव्यात जात आलो आहे त्यापैकी १९९९ ते २००४ पर्यंत गोव्यातच वास्तव्य होते. त्यामुळे गोव्याचा काना कोपरा पाहिला आहे. गोव्यातील वाहतूकदार यांचे सरकार वर भरपूर वजन आहे. एकतर गोव्याची लोकसांख्या कमी आहे आणि घरटी एकदोन तरी वाहतूक आणि पर्यटन संबंधित व्यवसायाशी निगडित असल्यामुळे त्यांच्या मतांसाठी तेथील लोकप्रतिनिधी काहीही करू धजावत नाहीत त्यामुळे सरकार तेथे काहीही करू इच्छित नाही. यास्तव सामान्य माणसाने त्याकडे पाठ फिरवली तर आश्चर्य वाटत नाही. जर पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने बाजाराच्या रेट्यानेच गोष्टी ( सुधारल्या तर) सुधारतील उलट आपल्या सारख्या माणसांनी तळकोकण (सिंधुदुर्ग जिल्हा) पर्यटन केल्यास तेथील पर्यटनास हातभार लागतोच याशिवाय या भागात इतके जास्त पर्यटक नाही त्याशिवाय स्वस्त दारू सोडली तर गोव्यात जे काही मिळते ते सर्वच्या सर्व सिंधुदुर्गात स्वस्त मिळतेच याशिवाय फसवले गेल्याची भावना येत नाही. तळकोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यात असंख्य सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. दोन वर्षांपूर्वी आम्ही चार चुलत भाऊ बायकांसहित मालवण देवगड तारकर्ली असा प्रवास केला. जनशताब्दीच्या व्हिस्टाडोमने प्रवास केला आणि कुडाळ ते कुडाळ अशी १२ सीटर गाडी केली होती. गोव्याच्या २/३ पैशात उत्तम ट्रिप झाली. आणि कुठेही फसवले गेल्याची भावना आली नाही.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 12:45
कोकणात सुंदर समुद्रकिनारे आहेत हे नक्की. मात्र कोकणात गोव्यासारखा पर्यटन व्यवसाय विकसित झालेला नाही. दरवर्षी लाखांनी पर्यटक येऊ शकतील इतकी हॉटेल्स आणि इतर सोयी कोकणात आहेत का? गोव्यात अगदी होम स्टे किंवा लॉजसारख्या ठिकाणांपासून व्लादिमीर पुतीन उतरले होते त्या लीला पर्यंत हॉटेलांची मोठी रेंज आहे. कोकणात लीलासारखे हॉटेल तर सोडाच तीन तारांकित हॉटेल तरी आहे की नाही शंकाच वाटते. 'येथे राहायची आणि अस्सल मालवणी जेवणाची सोय होईल' अशा पाट्या मालवणात घराघराबाहेर असतात म्हणे. त्यातून लाखांनी पर्यटकांची उतरायची सोय करता येऊ शकेल इतकी स्केल त्यात आहे का? कोकणात समुद्रकिनार्‍यावर शॅक आहेत का? समुद्रकिनार्‍यावर शॅकमध्ये बसून उकडीचे मोदक आणि सोलकढी घ्यावी अशी कितीही इच्छा असली तरी ते शक्य होणार आहे का? त्याविषयीचे महाराष्ट्र सरकारचे नियम कसे आहेत याची कल्पना नाही. कोकणात पर्यटन वाढवायचे असेल आणि गोव्याला प्रतिस्पर्धी म्हणून कोकणला पुढे आणायचे असेल तर तिथे दारूची पण सोय करावी लागेल- शेवटी दारू पिणे हा बर्‍याच पर्यटकांचा गोव्याला जायचा उद्देश असतो हे नाकारता येणारच नाही. ते कोकणात करता येईल का? स्थानिक लोक त्याला तयार होतील का? तसेच अनेक कोकणात समुद्रकिनार्‍यांजवळ देवस्थाने आहेत. उदाहरणार्थ हरिहरेश्वर, गणपतीपुळे, हेदवी, वेळणेश्वर वगैरे. अशा ठिकाणी दारू चालायचीही नाही. मी दारूडा आहे किंवा दारू प्यायला मला आवडते अशातला भाग नाही पण गोव्याला जाणार्‍या पर्यटकांसाठी 'पिणे' हे एक मोठे आकर्षण असते हे नाकारता येणार नाहीच. ते जर पूर्ण करता आले नाही तर कोकणात पर्यटनाचा विकास व्हायला मर्यादा येणारच. गोव्यातील गावांपासून समुद्रकिनारे तसे दूर आहेत. माझ्या अतिशय आवडत्या बाणावलीच्या समुद्रकिनार्‍यापासून बाणावली गाव दीड-दोन किलोमीटर वर तरी असेल. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावर पर्यटक दारू प्यायले किंवा मोठ्यानी गाणी लाऊन नाचले तरी त्याचा उपद्रव गावातील स्थानिक लोकांना होत नाही. कोकणात तसे आहे का?मी कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, मालगुंड असे थोडेसेच समुद्रकिनारे बघितले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर एकही समुद्रकिनारा बघितलेला नाही त्यामुळे विशेष कल्पना नाही. जर समुद्रकिनारा गावाजवळच असेल तर या गोष्टींचा उपद्रव स्थानिक लोकांना व्हायची शक्यता असते आणि त्यातून मग विरोध व्हायची शक्यताही वाढते. कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गोर्‍या स्त्रियांना बिकिनीमध्ये सूर्यस्नान करायला आवडते. तशा बिकिनी परिधान करून गोर्‍या आलेल्या कोकणातील लोकांना चालणार आहेत का? गोव्यात तर नुसत्या गोर्‍याच नव्हे तर भारतीय स्त्रिया-मुलीही बर्‍यापैकी अंगप्रदर्शन करत असतात- भले त्या बिकिनी घालत नसूदेत पण भारतीय स्त्रिया-मुलींनीही लो कट टॉप घालणे ही अजिबात दुर्मिळ गोष्ट नाही. तसे समजा कोकणात झाले तर ते तिथल्या लोकांना चालणार आहे का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कंजूस गुरुवार, 12/26/2024 - 13:09
कोकणात पर्यटक हे महाराष्ट्रातील देवदर्शनाला आले तर चालतात. मज्जा करायला आलेले, पिणारे, विविध प्रकारचे खाणं खाणारे, वाटेल तसे कपडे घालून फिरणारे पर्यटक चालवून घेण्याची मानसिकता स्थानिक कोकणवासियांकडे नाही. विषय संपला.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 12/26/2024 - 13:40
काहीही नवीन बदलास विरोध हा कोंकणचा आजवरचा स्वभाव विशेष आहे. गोव्यात देखील मूळ मानसिकता तशीच आहे. तसा तर कोणताही नैसर्गिक दृष्ट्या वरदान लाभलेला (privileged) प्रदेश याला अपवाद नसावा. बाहेरून आलेले लोक चार दिवस पर्यटक म्हणून ठीक आहेत. पण त्यांनी इथे स्थायिक होत उद्योगधंदे सुरू करून शिरकाव करून बसू नये अशी सर्वत्रच स्थानिकांची इच्छा असते. इथली आमची मूळ संस्कृती, राहणी, जीवनपद्धती टिकावी आणि तत्सम इतर मुद्दे यांमुळे मोठे बदल करणे कठीणच असत आले आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर गुरुवार, 12/26/2024 - 14:07
चंद्रसूर्यकुमार, दुर्दैवाने तुम्ही उपस्थित केलेल्या जवळपास सर्व प्रश्नांचे उत्तर 'नाही' असेच आहे/असेल! ह्या विषयावर सांगोपांग चर्चा होऊ शकेल, पण वेळे अभावी तुर्तास "A picture is worth a thousand words" ह्या म्हणीला अनुसरुन देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर लावलेल्या एका फलकाचा काढलेला फोटो खाली देतो, त्यवरचा मजकुर वाचल्यावर तुम्ही उपस्थीत केलेल्या काही मुद्द्यांना पुष्टी मिळेल! 1 कोकण, तळकोकण खरोखर खुप सुंदर आहे. माझी त्यावरची लेखमालिका काही कारणाने अपुर्ण राहीली त्यामुळे तिथल्या अनेक प्रेक्षणीय स्थळे, समुद्र किनारे, मंदिरांबद्दल लिहायचे बाकी राहुन गेले आहे! पण हरकत नाही, आता विषय निघालाच आहे तर ह्या धाग्यावर अजुन एका प्रतिसादात काही फोटोज डकवतो...

In reply to by टर्मीनेटर

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 14:39
देवस्थानजवळ दारू नको हा आग्रह असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. पण सगळ्याच समुद्रकिनार्‍याजवळ देवस्थाने आहेत का?समजा असली तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने दारू उपलब्ध झाली नाही तर कोकणात पर्यटनाच्या विकासावर मर्यादा येणारच. गोर्‍या सूर्यस्नानासाठी बिकिनी परीधान करून समुद्रावर पहुडतात ही सत्य परिस्थिती आहे तरीही गोरे लोक बहुतांश नियमांचे पालन करतात. अगदी इटली आणि स्पेनमध्येही समुद्रकिनारे सोडून इतर ठिकाणी बिकिनी घालून फिरायला बंदी आहे तर त्याचे ते पालन करतात. तसे नियम आपल्याकडे केले तर गोरे त्याचे पालन करणार नाहीत असे मानायचे काहीही कारण नाही. पण तसे नियम नसतील तर आपल्याला काहीही करायचे स्वातंत्र्य आहे असे त्यांना वाटते. फ्लॉरीडात अगदी विद्यापीठांच्या हिरवळीवर अशा सूर्यस्नान करणार्‍या गोर्‍या पडलेल्या अनेकदा दिसतात. व्हॅन्कुअरमध्ये तर युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या कॅम्पसपासून अगदी काही अंतरावर- म्हणजे शंभर सव्वाशे पायर्‍या उतरून एक Wreck beach म्हणून येतो तो तर clothing optional beach आहे. कोणतेही निर्बंध नसतील तर गोरे काहीही करतात पण निर्बंध टाकले तर त्याचे पालन करतात. तसे आपल्याकडे करता येणार नाही असे मानायचे काही कारण नाही. मात्र पर्यटक आकर्षित होतील असे काहीतरी तिथे ठेवायला हवे हे नक्कीच. एक तर दारू नाहीतर दुसरे काही. प्रत्येक ठिकाणी अमुक चालणार नाही तमुक चालणार नाही असा दृष्टीकोन ठेवल्यास मग पर्यटन वाढणार नाही हा परिणाम होणारच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर गुरुवार, 12/26/2024 - 18:45
देवस्थानजवळ दारू नको हा आग्रह असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. पण सगळ्याच समुद्रकिनार्‍याजवळ देवस्थाने आहेत का?समजा असली तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने दारू उपलब्ध झाली नाही तर कोकणात पर्यटनाच्या विकासावर मर्यादा येणारच.
तुमच्या शंका रास्त आहेत. तळकोकणातल्याही अनेक समुद्र्किनाऱ्यांवर देवस्थाने आहेत. त्यामुळे सहाजिकच दारूच्या बाबतीत त्याठीकाणी बंधने येतात, अर्थात ती पाळायची की नाही हे ज्याने त्याने ठरवावे पण निदान मराठी माणसांसाठी तरी तिथली परिस्थिती तुम्हाला वाटते तेवढी निराशाजनक नाही एवढे नक्की! मी एक काम करतो, माझ्या अपुर्ण राहिलेल्या मालिकेचे दोनेक भाग कॅप्शन सहीत फोटोज आणि काही अगदी छोटे छोटे व्हिडिओज टाकुन 'तळकोकणाचे चित्र दर्शन' अशा स्वरुपात आधी प्रकाशित करतो, ते पटकन होईल, आणि त्यातल्या वर्णनाच्या 'गाळलेल्या जागा' नंतर फुरसतमध्ये भरत बसतो... त्यानिमित्ताने ती मालिका तरी पुर्ण होईल 😎 कंकाकांनी ह्या विषयावरील चर्चेवर आधीच हरकत नोंदवुन झालेली आहेच, इतर धाग्यांचे काश्मिर होते तसे गोरगावलेकर ताईंच्या दक्षिण गोव्यावरील ह्या सुंदर धाग्याचे उगाच 'तळकोकण' नको व्हायला 😀 माझ्या त्या तळकोकणाच्या धाग्यांची पार 'गाझा पट्टी' किंवा 'सिरिया' झाला तरी हरकत नाही 😂

In reply to by टर्मीनेटर

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 19:48
माझ्या अपुर्ण राहिलेल्या मालिकेचे दोनेक भाग कॅप्शन सहीत फोटोज आणि काही अगदी छोटे छोटे व्हिडिओज टाकुन 'तळकोकणाचे चित्र दर्शन' अशा स्वरुपात आधी प्रकाशित करतो, ते पटकन होईल, आणि त्यातल्या वर्णनाच्या 'गाळलेल्या जागा' नंतर फुरसतमध्ये भरत बसतो... त्यानिमित्ताने ती मालिका तरी पुर्ण होईल
जरूर. वाट बघत आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे गुरुवार, 12/26/2024 - 18:57
छे छे, गोव्याच्या पर्यटनाची सिंधुदुर्गच्या पर्यटनाशी सध्या तरी तुलना करता येणार नाही. गोव्याची नको ईतकी गर्दी टाळण्यासाठी पण तितकाच सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ही अतिशय उत्तम प्रवासी जागा आहे. गोव्या तील हॉटेल्स पेक्षा येथील हॉटेल्स आणि इतर सेवा स्वस्त आहेत. त्यामुळे दारू पिणार्यांना सुद्धा अंतिमतः सिंधुदुर्ग स्वस्त पडेल, गोव्यापेक्षा सुंदर असे तोंडवळी तळाशील किंवा तारकर्ली देवबाग चे नितांत सुदर समुद्र किनारे आहेत. मी संपूर्ण गोव्याचे समुद्रकिनारे पाहिलेले आहेत. त्यातील सर्वोत्तम समुद्रकिनार्याना नक्की टक्कर देऊ शकतील असे हे किनारे आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन गोव्याच्या अर्ध्या किंवा त्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. अर्थात येथे पंचतारांकित सुविधा नगण्य किंवा अभावानेच मिळतील पण स्वस्त आणि मस्त अशा सुविधा नक्की आहेत. आम्ही स्क्युबा डायव्हिंग केले ते केवळ १००० रुपये माणशी होते. आणि आमच्या बरोबर आलेल्या एका प्रवाशाने आद्ल्या दिवशीच गोव्यात त्याच साठी रुपये ५००० मोजले होते आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे देवबागच्या पाणी जास्त स्वच्छ आणि नितळ होते. वॉटर स्पोर्ट्स सुद्धा सिंधुदुर्गात कितीतरी स्वस्त आहे. आणि येथे सुरक्षेची सर्व व्यवस्था चोख होती. गोव्यासारखी येथली माणसे इंग्रजीत बोलू शकत नसली तरी "येवा, कोकण आपलाच असा" हे त्यांच्या साध्या वागण्यात आम्हाला तरी नक्की जाणवले. कालच आम्ही आमच्या गावच्या घरी श्री क्षेत्र परशुराम येथे गेलो असता तेथील हॉटेलातील कर्मचारी वर्ग सुद्धा अत्यन्त अदबशीरपणे वागताना दिसला. परदेशी प्रवाशांना भावणाऱ्या गोष्टी येथे नसतील परंतु आपल्यासारख्या लोकांना ( नवीन वर्षाच्या आसपासचा काळ सोडून गेल्यास) नक्कीच सुखद अनुभव येतील. गोव्यातील वाहतूकदार आणि त्यांची मक्तेदारी आणि दंडेली हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि याबाबतीत सिंधुदुर्ग गोव्याच्या कितीतरी पटीने पुढे आहे. मी गोव्यात १९८९ पासून जवळ जवळ दर वर्षी जात आलो आहे. आणि सिंधुदुर्गात सुद्धा पाच सहा फेऱ्या झाल्या आहेत त्यामुळे मी त्याची तुलना नक्की करू शकतो.

In reply to by सुबोध खरे

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 19:44
धन्यवाद.
गोव्याची नको ईतकी गर्दी टाळण्यासाठी पण तितकाच सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ही अतिशय उत्तम प्रवासी जागा आहे.
हो पण कोकणात जर तितक्या प्रमाणावर हॉटेल आणि अशा सोयी उपलब्ध नसतील तर एका मर्यादेपुढे पर्यटन वाढू शकणार नाही हे पण खरेच. समजा बायको आणि मुलीला बरोबर घेऊन जायचे असेल तर राहायला चांगली सोय हवी. मी एकटा कुठेही राहू शकेन पण त्यांना घेऊन गेल्यास उतरायला ठिकाणही चांगले हवे. तसे कोकणात सगळीकडे आहे का हा प्रश्न पडतो. उत्तर गोव्यात कलंगुटला खरं तर जाऊ नये असे वाटावे इतकी गर्दी मी तिथे १५ मार्चनंतर म्हणजे ऑफ सिझनला पण बघितली आहे. तिथे हॉटेलात उतरलो नव्हतो. आम्ही उतरलो होतो दक्षिण गोव्यात कोलव्याला. त्या हॉटेलचे एक दिवस उत्तर गोवा आणि एक दिवस दक्षिण गोवा असे पॅकेज होते त्यातून कलंगूट बघितले होते. ती गर्दी बघितल्यावरच ठरविले की कलंगुटला अजिबात जायचे नाही. पण आम्ही नेहमी जातो तो दक्षिण गोव्याचा भाग- विशेषत: वारका, बाणावली, कॅवेलोसिम आणि थोडे वर बेतालबातिम, उतोर्डा वगैरे विशेष गर्दीचे नसतात. त्यामुळे तिथे जायला आवडते. राहायला जास्त चांगली हॉटेलही त्या भागात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीला गेलो आहे पण कोणत्याही समुद्रकिनार्‍याला नाही. आंबोली नक्कीच खूप आवडले. तिकडे जाऊन आता बरीच वर्षे झाली आहेत- जवळपास १५. तेव्हा दररोज ७०० रूपयात एम.टी.डी.सी मध्ये ठिकठाक खोली मिळाली होती. इतक्या स्वस्तात गोव्यात तेव्हाही कोणतीही हॉटेलमधील खोली मिळणे अशक्य होते हे नक्की. तेव्हा कोकणात जायला नक्कीच आवडेल पण राहायला चांगली हॉटेल आहेत की नाही हा प्रश्न नेहमी पडतो. ती परिस्थिती बदलली तर नक्कीच आवडेल.

कंजूस गुरुवार, 12/26/2024 - 16:33
चर्चा करून काय होणार? त्यांना नको आहे तर तिकडे जायचे नाही. गेलोच तर नको असलेल्या गोष्टी करायच्या नाहीत. निसर्ग पाहायचा आणि परत फिरायचे. महाग वाटले तर दुसरीकडे जायचे. पर्यटन वाढवून पैसे मिळवायची त्यांना इच्छा नाही. ओके. ---------------- बाकी ट्रेनने (१२१३३)रात्री जाणे म्हणजे ठाण्याला डोळे मिटायचे. उघडले की मडगाव. त्यामुळे सोपे वाटते. तसं कोकणचं होत नाही.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर गुरुवार, 12/26/2024 - 18:17
"चर्चा करून काय होणार?"
काही होईल की काही नाही होणार ते महत्वाचे नाही 😀 पण त्यांना समुद्रकिनारे खूप आवडत असल्याचे त्यांनी अनेकदा लिहिले आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या सागरप्रेमी व्यक्तीने लिहिलेल्या प्रतिसादातील
"मी कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, मालगुंड असे थोडेसेच समुद्रकिनारे बघितले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर एकही समुद्रकिनारा बघितलेला नाही त्यामुळे विशेष कल्पना नाही."
वरील ओळी वाचल्या आणि स्थानिकांची मानसिकता व 'गोवा' आणि 'तळकोकण' मधल्या पर्यटन आणि खानपान विषयक सेवा- सुविधांची तुलना होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती असल्याने त्यांनी मांडलेले मुद्दे व उपस्थित केलेले प्रश्न रास्त वाटले त्यामुळे थेट "मज्जा करायला आलेले, पिणारे, विविध प्रकारचे खाणं खाणारे, वाटेल तसे कपडे घालून फिरणारे पर्यटक चालवून घेण्याची मानसिकता स्थानिक कोकणवासियांकडे नाही. विषय संपला" असे जाहीर करण्यापेक्षा प्रत्यक्षात परिस्थिती तेवढीही निराशाजनक नाही हे चर्चेद्वारे स्पष्ट करून त्यांच्या मनात जर काही पूर्वग्रह असल्यास ते दूर होऊन त्यांनीही तळकोकणातल्या अफाट निसर्गसौंदर्याचा मनोसोक्त आनंद घ्यावा असे मनापासून वाटले म्हणून... बाकी काही नाही!

In reply to by कंजूस

सुबोध खरे गुरुवार, 12/26/2024 - 19:06
आपण कोकण कन्या एक्सप्रेस २०१११ ने प्रवास करा २३ .४५ ठाणे ते ०६.४२ कणकवली, ०७. ०० सिंधुदुर्ग, ०७. ११ कुडाळ आणि ०७.३० सावंतवाडी रोड असे तळकोकणात सर्वत्र जाता येईल. कोकण कन्या एक्सप्रेस च्या वेळेला त्यात्या स्थानकावर एस टी ची लाल परी उभी असेल. आणि आपल्याला टॅक्सी च्या माजोरडेपणाचा अनुभव न येता कोकणातील बहुसंख्य पर्यटन स्थळांना जात येईल. गाडी एक तास पर्यंत उशीर होणार असेल तर एस टी ला तेथे थांबण्याचे हुकूमही आहेत.

गवि गुरुवार, 12/26/2024 - 19:38
वर काही ठिकाणी स्वस्त दारूचा उल्लेख आला आहे. गोव्यात जरी भारतीय मद्य स्वस्त पडत असले तरी ते इतकेही स्वस्त नसते की त्यापायी गोवा गाठावा. स्वस्त दारूपेक्षाही तिथले तुलनेत अधिक मोकळे आणि सर्वत्र दारू पिण्याचे असलेले वातावरण, जागोजागी तशा सोयी, एकूण मद्यपान एन्जॉय करण्याची सदैव सेलिब्रेशन चालू असावे तशी वृत्ती, रंगीबेरंगी कपडे आणि तशीच बहुरंगी संस्कृती यांचे पर्यटकांना जास्त आकर्षण आहे. तो माहोल मद्यपान आणि मत्स्याहार करणाऱ्यांना आकर्षित करतो. कोंकण हे त्यामानाने निसर्गदृष्ट्या तितकेच सुंदर असले तरी ते हॉलिडे एन्जॉय करण्याचे वातावरण, पब्लिक तिथे नाही.

In reply to by गवि

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 19:53
रंगीबेरंगी कपडे आणि तशीच बहुरंगी संस्कृती यांचे पर्यटकांना जास्त आकर्षण आहे. तो माहोल मद्यपान आणि मत्स्याहार करणाऱ्यांना आकर्षित करतो.
+१. मी कॉलेजात शेवटच्या वर्षाला असताना आमच्या बरोबरचे बरेच जण गोव्याला दारू प्यायला गेले होते. दारूबरोबरच बिकिनीमधील गोर्‍या बघणे हा पण एक त्यांचा उद्देश होता. त्या वयात अशा बिकिनीतल्या गोर्‍यांचे आकर्षण वाटणे यात अस्वाभाविक किंवा अनैसर्गिक काहीच नाही. खरं तर त्या वयात तसे आकर्षण वाटले नाही तरच काहीतरी गफलत आहे असे म्हणेन. ते आकर्षण मलाही होतेच. पण मी दारूवाला नसल्याने त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो :)

In reply to by गवि

मुक्त विहारि गुरुवार, 12/26/2024 - 20:48
सहमत आहे.... ज्याचा त्याचा पर्यटन दृष्टीकोन... समुद्र किनारी बसून, शांतपणे बियरचा आस्वाद घ्यायचा असेल तर, "गुहागर" हे माझे आवडते ठिकाण. आणि हॉटेल मध्ये बसून, समुद्राचे दर्शन घेता घेता, बियरचा आस्वाद घ्यायचा असेल तर, रत्नागिरीला काळया समुद्रा जवळ, एक हॉटेल आहे. तिथे मासे पण उत्तम मिळतात. साड्या खरेदी करायच्या असतील तर मात्र गोवा हे उत्तम ठिकाण आहे. नवरात्री मध्ये, काही देवस्थानात साड्यांचा लिलाव होतो. नशीब उत्तम असेल तर, २५% किमतीत , उत्तम साड्या मिळतात. (साड्या खरेदी केल्या की, बायको बियर प्यायला आडकाठी नाही...हा अजून एक फायदा....)

गवि गुरुवार, 12/26/2024 - 20:08
क्लिंटन, कोंकणात रत्नागिरीत किंवा गणपतीपुळ्यात राहून आसपास बऱ्यापैकी ठिकाणे बघता येतात. काही बीचेस काही समुद्रापासून थोडी दूरची असे मिश्रण. सिंधुदुर्गात वेंगुर्ला मुक्काम करून मोचेमाड बीच, रेडी, तेरेखोल असे गोव्याच्या सीमेपर्यंत फिरून परत मुक्कामी येता येते. गोव्यात जसा माहोल असतो तसा इथे नसला तरी शांत असते. बाहेर उकाडा असला तरी मनाला गार वाटते. हिवाळ्यात गेल्यास तर फारच उत्तम. दोन्हीची तुलना होऊ शकत नाही.

In reply to by गवि

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 20:57
हो. गणपतीपुळ्याला उतरून गुहागरला आमचे कुलदैवत वाडेश्वर आणि देवी दुर्गादेवी, हेदवी, वेळणेश्वर, डेरवण हे सगळे भाग बघितले आहेत. मालगुंड तर गणपतीपुळ्याशेजारीच आहे. तिकडचे कवी केशवसुत स्मारक आणि प्राचीन कोकण पण बघितले. एक तर बरीचशी देवस्थाने बघणे हा त्या भेटीचा उद्देश होता. मी आस्तिक असलो तरी देवस्थानांना भेटी द्यायची मला आवड नाही. त्यामुळे त्या भेटीत माझ्यासाठी फार आकर्षक असे काही नव्हते. पुढे तळकोकणात आंबोली मात्र खूप आवडले. आणि रत्नागिरीच्या खाली राजापूर, खारेपाटण आणि तो सगळा रस्ता मस्तच आहे. का कोणास ठाऊक गोव्याविषयी जसे आकर्षण वाटते तसे कोकणाविषयी वाटत नाही. गोव्याला दहावेळा जाऊनही परत परत जावेसे वाटते. I just can't have enough of Goa. तसे कोकणात परत परत जावेसे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सौंदाळा Fri, 12/27/2024 - 12:44
तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, देवबागला तशी गर्दी असते. पण वेंगुर्ला, सागरेश्वर, मोचेमाड, आरवली, शिरोडा, रेडी इकडे गर्दी कमी आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. वेंगुर्ला, शिरोडा, रेडी (यशवंतगडाजवळील किनारा) येथे समुद्राला लागून हॉटेल (थ्री, फाईव्ह स्टार मात्र नाहीत) मद्यपान, मस्त्याहारासाठी चांगले आहेत. @गवि, टर्मिनेटर: गोव्यात मत्स्याहार कोणत्याही हॉटेलमधे (छोट्या, मोठ्या, तारांकीत) माशांचे कितीतरी प्रकार उपलब्ध असतात. नेहमीचे सुरमई, पापलेट, कोलंबी, सौंदाळा, बांगडा सोडून तांबोशी (रेड स्नायपर), व्हाईट स्नायपर, चोणक (जिताडा), धोडगा, पेडवे, मा़कूळ ( स्क्विड), शेवंड (लॉबस्टर), लेप, मोरी (बेबी शार्क), शेणाणे (मोठे शिंपले) वगैरे. तेवढे कोकणात सर्रास नसतात. क्वचित काही ठीकाणी मिळतात. काही वेळा तर मी आणयला सांगितले होते (होम स्टे मधे) पण बाजारात मिळाले नाही हे उत्तर. एकदा देवगड मधे एका छोट्या हॉटेल मधे विचारले तेच उत्तर. तेवढ्यात दोन लोकल (कामगार, मजूर) वाटणारे लोक आले, नेहमीचे असावेत. आल्या आल्या त्यांनी मच्छी कढी भात अशी ओर्डर दिली आणि त्यांना अंगठ्या येवढे असणारे मासे आमटी आणि भरपूर भात आणून दिला. मी वेटरला म्हणालो मला हीच मच्छी कढी पाहिजे तर तो म्हणे साहेब हे तुमच्यासाठी नाही तुम्ही खा की मस्त सुरमई, पापलेट. पण मी हट्टाने त्याला तेच आणायला लावले. ती बोट पेडव्यांची कढी आणि भात अजून चव जीभेवर आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर Fri, 12/27/2024 - 13:54
तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, देवबागला तशी गर्दी असते. पण वेंगुर्ला, सागरेश्वर, मोचेमाड, आरवली, शिरोडा, रेडी इकडे गर्दी कमी आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत.
+१००० मी माझी अर्धवट राहिलेली मालिका पुर्ण करायला घेतली आहे. एक भाग (देवबाग, तारकर्ली, वालावल) ऑलमोस्ट पुर्ण होत आलाय तो करतो थोड्याच वेळात प्रकाशित, आणि पुढचा भाग (तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा) पण टाकतो ३१ डिसेंबर किंवा त्यापुर्वीच! मालवण, मोचेमाड, आरवली हे आधी बघुन झाले होते त्यामुळे ह्या सहलीत त्यांचा समावेश केला नाहिये...

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 13:00
खर्चाच्या बाबतीत सांगायचं तर एकटं दुकटं जाण्यापेक्षा कमीतकमी एका गाडीचे पर्यटक असले तर स्थानिक भटकंतीचा खर्च बराच कमी होतो . रेल्वे प्रवासासाठी अनेक पर्याय आहेत. आपल्या आवडीप्रमाणे किंवा बजेटप्रमाणे त्यातील एखादा पर्याय निवडणे आपल्याच हातात असते . हॉटेलचेही असेच आहे . मोक्याच्या ठिकाणी रूम हवी असल्यास जास्त भाडे द्यावे लागेल हे निश्चितच . आपण कोणत्या वेळी जातो हेही तितकेच महत्वाचे . पाळोळेला आम्ही जी रूम घेतली तीच रूम लेकीने गेल्या वर्षी पण वेगळ्या सिझनला अर्ध्या किमतीत घेतली होती . प्रत्येकाचे अनुभव वेगळे . प्रतिसादांमधून खूप नवीन माहिती मिळते आहे . चर्चा सुरु राहावी .

गवि Fri, 12/20/2024 - 06:00
खूपच छान. लोलयेचा वेताळ खरेच गूढ. उन्हातान्हात उघड्यावर सदैव उभा असलेला तो वेताळ गावाचे रक्षण करतो. रानावनातून काटेकुटे तुडवत फिरतो अशी श्रद्धा आहे. त्याच्या बरगडीत विंचू असतो. प्रचूने त्यावर खूप सविस्तर छान लिहीले आहे आणि त्याच्या लेखामुळेच मीही तो वेताळ खास शोधून तिथे जाऊन बराच वेळ रेंगाळत पाहिला. बाकी किनारे देखील सुंदर. तुम्ही ज्या पायऱ्या वापरून पाळोळे बीच वरून पलीकडे गेलात तोच माझ्या मते पाटणे बीच. जाता जाता. अगोंदा याचा उच्चार अगोंद असा आहे असे सांगून पुढील भागाची प्रतीक्षा.

मस्तच. बटरफ्लाय बीच आणि हनीमून बीचला गेलो होतो त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गोव्याचा तो भाग खूपच सुंदर आहे. आता पुढच्या भागात काय असेल याची उत्सुकता लागली आहे.

चौथा कोनाडा Sat, 12/21/2024 - 21:37
व्वा ... एक नंबर, फर्मास वर्णन आणि झक्कास प्रचि ! मजा आली भटकंती बघताना ! आता गोव्याला जातना तुमचेच धागे बघुन जातो ! NCqwqwLq456

प्रचेतस Mon, 12/23/2024 - 15:44
हा भागही खूप आवडला, पाळोळे किनारा तर खूप आवडीचा आहे, पण हल्ली खूप गर्दी असते. तुम्ही आवर्जून लोलये आणि पैंगिणच्या वेताळ मंदिरात जाऊन आले हे बघून खूप छान वाटले. लोलये वेताळ आहे तसाच आहे, पैंगिण मंदिरात मात्र खूपच बदल झाला, वेताळ मूर्ती बदलण्याची काय जरूर पडली कुणास ठाऊक, शिवाय जुना काष्ठमंडप आता गेलेला दिसतो. काष्ठमंडप हे गोवे कोकणातल्या मंदिरांचं खरं वैभव.

गेल्या काही वर्षात गोव्यात येणार्‍या पर्यटकांचा आकडा कमी झाला आहे आणि तो वाढायची काहीही चिन्हे नाहीत तर तो कमीच होत आहे अशी चिन्हे आहेत. गोव्यासारख्या राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारीत असल्याने पर्यटकांचा कमी होणारा आकडा राज्यापुढील अडचणी वाढवेल अशी चिन्हे आहेत. एक तर गोव्यात (खरं तर भारतातच) परदेशापेक्षा हॉटेल कैच्याकै महाग आहेत. पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे यावर्षी जरा किंमती कमी झालेल्या दिसत आहेत. आज बुक केले तर २७ ते २८ डिसेंबर या एका दिवसासाठी पंचतारांकीत हॉटेल्स दररोज २० ते २५ हजारात मिळत आहेत असे दिसते. पूर्वी तो आकडा ३० हजार+ पण मी बघितला होता. थायलंडमध्ये फुकेत किंवा व्हिएटनाममध्ये हॅनोईमध्ये त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात त्याच दिवसात हॉटेल्स उपलब्ध आहेत. अनेकदा ब्रिटिश पर्यटक एखाद महिना राहायच्या उद्देशाने येतात. रशियन पर्यटक तर ४ महिने राहायच्या उद्देशाने येतात. जर थायलंड, व्हिएटनाम अशा ठिकाणी अर्ध्या किंमतीत हॉटेल्स मिळत असतील तर त्यांचे भरपूर पैसे तिथे गेल्यावर वाचतील. तसेच गोव्यात नुसते समुद्रकिनारे आहेत. तिकडे त्या नेहमीच्या बोट राईड्स, पॅरॅशूट राईड्स इत्यादी गोष्टीच आहेत. फुकेतमध्ये समुद्रकिनारे तर आहेतच. पण त्याव्यतिरिक्त तिथे करण्यासारखे बरेच काही आहे. तीच गोष्ट व्हिएटनामची. मग परदेशी पर्यटकांच्या दृष्टीने फुकेत किंवा व्हिएटनाम ही अधिक चांगली पर्यटनस्थळे आहेत. इंडोनेशियात बालीमध्येही समुद्रकिनारे आहेतच. त्याव्यतिरिक्त डोंगर आहेत आणि इतरही अनेक अनुभव घेण्यासारख्या गोष्टी आहेत. गोव्यातील टॅक्सीमाफियांविषयी लिहावे तितके थोडे आहे. त्याविषयी सोशल मिडियावर अगदी भरभरून लिहिले गेले आहे. त्यांच्या दबावामुळे गोव्यात उबर-ओलाही येऊ शकलेली नाही. गोवा माईल्स म्हणून स्थानिक अ‍ॅप आहे. पण टॅक्सी माफियांच्या स्टॅन्डजवळ ते लोक येऊ शकत नाहीत इतकी त्यांची दहशत आहे. १२ वर्षांपूर्वी एकदा वारकाहून मडगावला जाताना हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांचे दर ऐकून म्हटले की त्यांच्याकडून टॅक्सी नको, थोडे बाहेर गेल्यावर काहीतरी मिळेल. तशी एक रीक्षा एखाद किलोमीटर चालल्यावर मिळाली. परत येताना त्या रीक्षावाल्याने हॉटेलपासून असेच एक किलोमीटर दूर सोडले कारण तो हॉटेलजवळ गेला असता तर बाहेरच्या टॅक्सीवाल्यांनी त्याला मारहाण करायलाही कमी केले नसते ही भिती त्याला होती. हातात सामान नसेल आणि एखाद किलोमीटर चालणे शक्य होत असेल तर ठीक आहे पण नाहीतर अवजड बॅगा घेऊन लांब चालत जाणे तसे कठीणच. मग परत त्याच टॅक्सी माफियांवर अवलंबून राहावे लागते. राज्य सरकार याविषयी काहीही करताना दिसत नाही. राज्य सरकार दरवर्षी शॅक उभारायला अनामत रक्कम आणि इतर चार्जेस वाढवत आहे. शॅक्स रात्री ११ पर्यंत चालू ठेवता येतील असे कागदोपत्री नियम आहेत. आम्ही जातो तिथे दक्षिण गोव्यात समुद्रकिनार्‍यावर विशेष नाईट लाईफ नसते तरी रात्री ११ ही शॅक बंद करायची वेळ अगदीच अव्यवहार्य आहे. उत्तर गोव्यात कलंगूट, बागा, कोंदोळी अशा ठिकाणी भरपूर नाईट लाईफ असते तिथे रात्री ११ वाजता शॅक बंद करणे कसे काय चालणार आहे? प्रत्यक्षात तो नियम पाळला गेला तर शॅकवाल्यांचे भरपूर नुकसान होणार. पण मुळात असा नियम सरकारी अधिकार्‍यांना चिरीमिरी मिळवायची सोय म्हणून केला आहे की काय समजत नाही. परदेशी पर्यटकांसाठी भारताचा पर्यटक व्हिसाला अर्ज करणे हे पण डोकेदुखीचे आहे. उलट थायलंडसारखा देश पर्यटकांना आकर्षित करायला अनेक देशांच्या नागरीकांना व्हिसा-फ्री प्रवेश देत आहे. या सगळ्या कारणाने गोव्यातील पर्यटनावर परिणाम होत आहे याविषयी अनेक युट्यूब व्हिडिओ गेल्या काही दिवसात बघायला मिळाले. मी गोव्याशी संबंधित अनेक फेसबुक ग्रुप्सचा सदस्य आहे. त्यात बरेचसे ब्रिटिश लोक आहेत. ते पण या सगळ्याविषयी तक्रार करताना दिसतात. या परिस्थितीत सुधारणा होईल ही अपेक्षा. (कट्टर गोवाप्रेमी) चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि Tue, 12/24/2024 - 11:04
दर वर्षी किमान एकदा तरी गोव्यात जात असल्याने हे सर्व नजरेत स्पष्ट भरते आहेच. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांचे अमर्याद चढत गेलेले अवास्तव दर. साध्या बेसिक हॉटेलात देखील रूम सीझनमध्ये दहा ते वीस हजार. ऑफ सीझनला पण सहा आठ हजार. कोणत्याही बीच शॅक किंवा गोवन रेस्टॉरंटमध्ये कोणताही पदार्थ किमान साडेतीनशे ते कमाल कितीही. कवालासारख्या ठिकाणी केवळ संगीत ऐकण्यासाठी जाणे आणि त्या निमित्ताने ड्रिंक्स, जेवण (मुख्यतः फिंगर फूड) हा पूर्वी साधा आणि रास्त किंमत असलेला कार्यक्रम आता प्रति माणशी तीन ते पाच हजारात जातो, अगदी किमान आणि स्वस्त बाजूचा मेन्यू मागवून देखील. हे एक उदाहरण. अगदी छप्री टाईप शॅक्स पण केवळ समुद्र किनाऱ्यावर आहेत म्हणून कोणतेही ड्रिंक चारशे ते पाचशे आणि अन्न पाचशे ते हजार प्रति प्लेट असेच विकत आहेत. प्युर व्हेज उडपी हॉटेल्स, नवतारा, नवरत्न वगैरे हीच सामान्य मध्यमवर्गीय पर्यटकाला उरली आहेत. तिथे जेवणे म्हणजे केवळ सोय इतकेच. टॅक्सी लूट ही क्रिमिनल लेव्हलची आहे. पॉइंट टू पॉइंट मोजून जाणे येणे आणि अव्वाच्या सव्वा दर यामुळे स्वत:ची कार नेण्याला पर्याय नाही. किंवा मग फिरणे अति मर्यादित होते. त्यातल्या त्यात सेल्फ ड्राईव्ह हा एक ऑप्शन अजून बरा पडतोय. एकूण हळुहळू सामान्य पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला तर नवल नाही. परदेशी ओघ आटला आहे आणि भारतीय स्थानिक पर्यटकांकडून तीच डॉलर लेव्हल किंमत वसूल करणे असे स्वप्न असेल तर ते मोडणारच एक दिवस. या उलट याच काळात मी थायलंड आणि व्हिएतनाम या ठिकाणी पर्यटन केले. मनसोक्त स्वतःच्या प्लॅन नुसार बुकिंग आणि ग्रॅब टॅक्सी वापरून हवे तसे फिरता आले. आणि उत्कृष्ट लक्झरी हॉटेल्सचे दर दीड हजार भारतीय रुपये इथपासून सुरू होते आणि अति भारी हॉटेल पण चार पाच हजारात मिळत होते. टॅक्सी इमानदारीत रास्त आणि आधीच ठरलेले भाडे घेऊन गप गुमान सगळीकडे मिळत होती. अतिशय सुखद आणि स्वस्त अनुभव. सीझन मधली गोवा ट्रिप विएतनाम ट्रिप पेक्षा जास्त खर्चिक ठरू लागली आहे. (विमान प्रवास वगळता).

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कंजूस Wed, 12/25/2024 - 10:11
भांगरभूय किंवा गोवंश न्यूज पेपर डिजिटल ओनलाइन आहेत ते वाचले तर गोव्याचं पर्यटन धोरण, अडचणी, पळवाटा , नियम हे सर्व कळतं. अधिकृत हॉटेल लायसनधारक विरुध्द विनापरवाना गुपचूप धंधा करणारे यांचेही काम कसे चालते तेही आले होते. किनाऱ्यावर काय पदार्थ नेता येणार, क्रूझमध्ये काय करता येईल वगैरेसाठी नियम बनवले ते पर्यटकांस नको आहेत. शेजारच्या कर्नाटकातील तरुण पोट्टे बीचवर येऊन काय उद्योग करतात कुठे राहतात यावरही लेख आले आहेत. त्यांच्या त्रासाला ही पर्यटक आणि स्थानिक कंटाळले. ( फोटोग्राफी करत फिरणे वगैरे, बाजूच्या आड रस्त्यांवर वाहनं लावून तिथेच स्वयंपाक करणे वगैरे)

कंजूस Tue, 12/24/2024 - 12:48
Wittyspace channel ( https://youtube.com/@wittyspace?si=Z33t_wlAV0gAaQ5s ) श्वेता राठोड हिने हल्लीच व्हिएटनाम थाइलँडचे विडिओ टाकले आहेत. शाकाहारी असून एकटीच एक महिना व्हिएटनाम येथे राहिली होती. सर्व डिटेल दिले आहेत. रस्ता ओलांडणे आणि शाकाहारी आहार मिळवणे या दोन अडचणी आहेत. बाकी इतरांना सोपंच ठरेल.

In reply to by कंजूस

गवि Tue, 12/24/2024 - 15:37
तिने मलेशिया पण कव्हर केले आहे थोडे. या सोलो आणि बॅकपॅकर लोकांचे व्हिडिओ असतात तर रोचक (पॅसेंजर परमवीर, श्वेता, अनेक नोमॅड आदि नावे लावणारे लोक). पण त्यांची आहार, निवास आणि प्रवास इत्यादि योजना आणि निवडलेले पर्याय हे अनेकदा सोलो जाणाऱ्यालाच योग्य ठरतील असे असतात. खूप जास्त फिरायचे असल्याने स्वस्तात स्वस्त हॉस्टेल, डॉर्मीटरी, कॉमन शेअरिंग, बेड अँड ब्रेकफास्ट असे ऑप्शन्स. उभ्या उभ्या स्ट्रीट फूड) हे सर्व गमतीशीर असले तरी जवळपास फक्त एका प्रकारचा प्रवास (फिट, सडाफटिंग, बॅचलर, एकटा घुमक्कड) त्यात कव्हर होतो. कुटुंब घेऊन विविध वयाचे लोक किंवा ग्रुप यांच्यासाठी इतर vlog शोधावे लागतील. अशा वेळी फक्त कमी बजेट हे एकमेव ध्येय नसते.

In reply to by गवि

कंजूस Tue, 12/24/2024 - 18:32
कमीतकमी किती जाता येईल हे कळते. १) सरदार पुतळा आणि परिसर - किती आणि काय पाहता येईल तरीही आपल्या कामाचे काय हे पाहावे लागते वेगवेगळ्या लोकांकडून २) अवडंबर माजवलेल्या जागा बऱ्याच किती लायकीच्या आहेत. ३) काही ठिकाणी वयस्कर पर्यटक जाऊ शकत नाहीत तिथे हे तरुण लोक पटापट जाऊन येतात आणि तो भागही समजतो. ( Dr. Bro यांचा दूधसागर ) थोडक्यात यांचेही ब्लॉग काही सांगून जातात. ४) काही जागांचा तरुण लोक मजेशिरपणे आनंद लुटतात तसा वयस्कर लोक घेऊ शकत नाहीत. जागा तीच पण आनंद आणि उत्साह वेगळा असतो. इंदोर सराफा बाजार खाऊ गल्ली ( मैथिली ठाकूर आणि भाऊ, visa2explore, अभिनव साप्रा) ५) आपण काही ठिकाणी योग्य वयात गेलो नाही तर ती वेळ पुन्हा येत नाही. मग आपल्या वयाप्रमाणेच पर्यटन करावे लागते. जगातल्या सर्व जागा काही पाहता येणार नाहीत. तरीही थोडक्यात आनंद हवा असेल तर एकटे किंवा आपल्याच कुटुंबातील तीन चार जणानेच जायला हवे. मित्र परिवार गर्दी नकोच.

हॉटेलच्या आणि टॅक्सी च्या वाढलेल्या किमती बरोबरच अजून एका गोष्टी मुळे गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होत असेल तो म्हणजे गोव्याच्या लोकांचा मजुरडेपणा. ज्या ज्यावेळेस गोव्याला जाण झालं त्या त्या वेळेस ह्याचा अनुभव आला. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असेल तर योग्यच केल आहे. आर्थिक नुकसान झालं तर कदाचित सुधरतीलही.

In reply to by रात्रीचे चांदणे

मुक्त विहारि Tue, 12/24/2024 - 22:44
सामान्य नागरिक उत्तम वागतात. पण, सगळे व्यावसायिक, आला बकरा करा खिमा , ह्याच न्यायाने वागतात.

सुबोध खरे गुरुवार, 12/26/2024 - 12:03
१९८९ पासून गोव्यात जात आलो आहे त्यापैकी १९९९ ते २००४ पर्यंत गोव्यातच वास्तव्य होते. त्यामुळे गोव्याचा काना कोपरा पाहिला आहे. गोव्यातील वाहतूकदार यांचे सरकार वर भरपूर वजन आहे. एकतर गोव्याची लोकसांख्या कमी आहे आणि घरटी एकदोन तरी वाहतूक आणि पर्यटन संबंधित व्यवसायाशी निगडित असल्यामुळे त्यांच्या मतांसाठी तेथील लोकप्रतिनिधी काहीही करू धजावत नाहीत त्यामुळे सरकार तेथे काहीही करू इच्छित नाही. यास्तव सामान्य माणसाने त्याकडे पाठ फिरवली तर आश्चर्य वाटत नाही. जर पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने बाजाराच्या रेट्यानेच गोष्टी ( सुधारल्या तर) सुधारतील उलट आपल्या सारख्या माणसांनी तळकोकण (सिंधुदुर्ग जिल्हा) पर्यटन केल्यास तेथील पर्यटनास हातभार लागतोच याशिवाय या भागात इतके जास्त पर्यटक नाही त्याशिवाय स्वस्त दारू सोडली तर गोव्यात जे काही मिळते ते सर्वच्या सर्व सिंधुदुर्गात स्वस्त मिळतेच याशिवाय फसवले गेल्याची भावना येत नाही. तळकोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यात असंख्य सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. दोन वर्षांपूर्वी आम्ही चार चुलत भाऊ बायकांसहित मालवण देवगड तारकर्ली असा प्रवास केला. जनशताब्दीच्या व्हिस्टाडोमने प्रवास केला आणि कुडाळ ते कुडाळ अशी १२ सीटर गाडी केली होती. गोव्याच्या २/३ पैशात उत्तम ट्रिप झाली. आणि कुठेही फसवले गेल्याची भावना आली नाही.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 12:45
कोकणात सुंदर समुद्रकिनारे आहेत हे नक्की. मात्र कोकणात गोव्यासारखा पर्यटन व्यवसाय विकसित झालेला नाही. दरवर्षी लाखांनी पर्यटक येऊ शकतील इतकी हॉटेल्स आणि इतर सोयी कोकणात आहेत का? गोव्यात अगदी होम स्टे किंवा लॉजसारख्या ठिकाणांपासून व्लादिमीर पुतीन उतरले होते त्या लीला पर्यंत हॉटेलांची मोठी रेंज आहे. कोकणात लीलासारखे हॉटेल तर सोडाच तीन तारांकित हॉटेल तरी आहे की नाही शंकाच वाटते. 'येथे राहायची आणि अस्सल मालवणी जेवणाची सोय होईल' अशा पाट्या मालवणात घराघराबाहेर असतात म्हणे. त्यातून लाखांनी पर्यटकांची उतरायची सोय करता येऊ शकेल इतकी स्केल त्यात आहे का? कोकणात समुद्रकिनार्‍यावर शॅक आहेत का? समुद्रकिनार्‍यावर शॅकमध्ये बसून उकडीचे मोदक आणि सोलकढी घ्यावी अशी कितीही इच्छा असली तरी ते शक्य होणार आहे का? त्याविषयीचे महाराष्ट्र सरकारचे नियम कसे आहेत याची कल्पना नाही. कोकणात पर्यटन वाढवायचे असेल आणि गोव्याला प्रतिस्पर्धी म्हणून कोकणला पुढे आणायचे असेल तर तिथे दारूची पण सोय करावी लागेल- शेवटी दारू पिणे हा बर्‍याच पर्यटकांचा गोव्याला जायचा उद्देश असतो हे नाकारता येणारच नाही. ते कोकणात करता येईल का? स्थानिक लोक त्याला तयार होतील का? तसेच अनेक कोकणात समुद्रकिनार्‍यांजवळ देवस्थाने आहेत. उदाहरणार्थ हरिहरेश्वर, गणपतीपुळे, हेदवी, वेळणेश्वर वगैरे. अशा ठिकाणी दारू चालायचीही नाही. मी दारूडा आहे किंवा दारू प्यायला मला आवडते अशातला भाग नाही पण गोव्याला जाणार्‍या पर्यटकांसाठी 'पिणे' हे एक मोठे आकर्षण असते हे नाकारता येणार नाहीच. ते जर पूर्ण करता आले नाही तर कोकणात पर्यटनाचा विकास व्हायला मर्यादा येणारच. गोव्यातील गावांपासून समुद्रकिनारे तसे दूर आहेत. माझ्या अतिशय आवडत्या बाणावलीच्या समुद्रकिनार्‍यापासून बाणावली गाव दीड-दोन किलोमीटर वर तरी असेल. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावर पर्यटक दारू प्यायले किंवा मोठ्यानी गाणी लाऊन नाचले तरी त्याचा उपद्रव गावातील स्थानिक लोकांना होत नाही. कोकणात तसे आहे का?मी कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, मालगुंड असे थोडेसेच समुद्रकिनारे बघितले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर एकही समुद्रकिनारा बघितलेला नाही त्यामुळे विशेष कल्पना नाही. जर समुद्रकिनारा गावाजवळच असेल तर या गोष्टींचा उपद्रव स्थानिक लोकांना व्हायची शक्यता असते आणि त्यातून मग विरोध व्हायची शक्यताही वाढते. कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गोर्‍या स्त्रियांना बिकिनीमध्ये सूर्यस्नान करायला आवडते. तशा बिकिनी परिधान करून गोर्‍या आलेल्या कोकणातील लोकांना चालणार आहेत का? गोव्यात तर नुसत्या गोर्‍याच नव्हे तर भारतीय स्त्रिया-मुलीही बर्‍यापैकी अंगप्रदर्शन करत असतात- भले त्या बिकिनी घालत नसूदेत पण भारतीय स्त्रिया-मुलींनीही लो कट टॉप घालणे ही अजिबात दुर्मिळ गोष्ट नाही. तसे समजा कोकणात झाले तर ते तिथल्या लोकांना चालणार आहे का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कंजूस गुरुवार, 12/26/2024 - 13:09
कोकणात पर्यटक हे महाराष्ट्रातील देवदर्शनाला आले तर चालतात. मज्जा करायला आलेले, पिणारे, विविध प्रकारचे खाणं खाणारे, वाटेल तसे कपडे घालून फिरणारे पर्यटक चालवून घेण्याची मानसिकता स्थानिक कोकणवासियांकडे नाही. विषय संपला.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 12/26/2024 - 13:40
काहीही नवीन बदलास विरोध हा कोंकणचा आजवरचा स्वभाव विशेष आहे. गोव्यात देखील मूळ मानसिकता तशीच आहे. तसा तर कोणताही नैसर्गिक दृष्ट्या वरदान लाभलेला (privileged) प्रदेश याला अपवाद नसावा. बाहेरून आलेले लोक चार दिवस पर्यटक म्हणून ठीक आहेत. पण त्यांनी इथे स्थायिक होत उद्योगधंदे सुरू करून शिरकाव करून बसू नये अशी सर्वत्रच स्थानिकांची इच्छा असते. इथली आमची मूळ संस्कृती, राहणी, जीवनपद्धती टिकावी आणि तत्सम इतर मुद्दे यांमुळे मोठे बदल करणे कठीणच असत आले आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर गुरुवार, 12/26/2024 - 14:07
चंद्रसूर्यकुमार, दुर्दैवाने तुम्ही उपस्थित केलेल्या जवळपास सर्व प्रश्नांचे उत्तर 'नाही' असेच आहे/असेल! ह्या विषयावर सांगोपांग चर्चा होऊ शकेल, पण वेळे अभावी तुर्तास "A picture is worth a thousand words" ह्या म्हणीला अनुसरुन देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर लावलेल्या एका फलकाचा काढलेला फोटो खाली देतो, त्यवरचा मजकुर वाचल्यावर तुम्ही उपस्थीत केलेल्या काही मुद्द्यांना पुष्टी मिळेल! 1 कोकण, तळकोकण खरोखर खुप सुंदर आहे. माझी त्यावरची लेखमालिका काही कारणाने अपुर्ण राहीली त्यामुळे तिथल्या अनेक प्रेक्षणीय स्थळे, समुद्र किनारे, मंदिरांबद्दल लिहायचे बाकी राहुन गेले आहे! पण हरकत नाही, आता विषय निघालाच आहे तर ह्या धाग्यावर अजुन एका प्रतिसादात काही फोटोज डकवतो...

In reply to by टर्मीनेटर

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 14:39
देवस्थानजवळ दारू नको हा आग्रह असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. पण सगळ्याच समुद्रकिनार्‍याजवळ देवस्थाने आहेत का?समजा असली तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने दारू उपलब्ध झाली नाही तर कोकणात पर्यटनाच्या विकासावर मर्यादा येणारच. गोर्‍या सूर्यस्नानासाठी बिकिनी परीधान करून समुद्रावर पहुडतात ही सत्य परिस्थिती आहे तरीही गोरे लोक बहुतांश नियमांचे पालन करतात. अगदी इटली आणि स्पेनमध्येही समुद्रकिनारे सोडून इतर ठिकाणी बिकिनी घालून फिरायला बंदी आहे तर त्याचे ते पालन करतात. तसे नियम आपल्याकडे केले तर गोरे त्याचे पालन करणार नाहीत असे मानायचे काहीही कारण नाही. पण तसे नियम नसतील तर आपल्याला काहीही करायचे स्वातंत्र्य आहे असे त्यांना वाटते. फ्लॉरीडात अगदी विद्यापीठांच्या हिरवळीवर अशा सूर्यस्नान करणार्‍या गोर्‍या पडलेल्या अनेकदा दिसतात. व्हॅन्कुअरमध्ये तर युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या कॅम्पसपासून अगदी काही अंतरावर- म्हणजे शंभर सव्वाशे पायर्‍या उतरून एक Wreck beach म्हणून येतो तो तर clothing optional beach आहे. कोणतेही निर्बंध नसतील तर गोरे काहीही करतात पण निर्बंध टाकले तर त्याचे पालन करतात. तसे आपल्याकडे करता येणार नाही असे मानायचे काही कारण नाही. मात्र पर्यटक आकर्षित होतील असे काहीतरी तिथे ठेवायला हवे हे नक्कीच. एक तर दारू नाहीतर दुसरे काही. प्रत्येक ठिकाणी अमुक चालणार नाही तमुक चालणार नाही असा दृष्टीकोन ठेवल्यास मग पर्यटन वाढणार नाही हा परिणाम होणारच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर गुरुवार, 12/26/2024 - 18:45
देवस्थानजवळ दारू नको हा आग्रह असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. पण सगळ्याच समुद्रकिनार्‍याजवळ देवस्थाने आहेत का?समजा असली तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने दारू उपलब्ध झाली नाही तर कोकणात पर्यटनाच्या विकासावर मर्यादा येणारच.
तुमच्या शंका रास्त आहेत. तळकोकणातल्याही अनेक समुद्र्किनाऱ्यांवर देवस्थाने आहेत. त्यामुळे सहाजिकच दारूच्या बाबतीत त्याठीकाणी बंधने येतात, अर्थात ती पाळायची की नाही हे ज्याने त्याने ठरवावे पण निदान मराठी माणसांसाठी तरी तिथली परिस्थिती तुम्हाला वाटते तेवढी निराशाजनक नाही एवढे नक्की! मी एक काम करतो, माझ्या अपुर्ण राहिलेल्या मालिकेचे दोनेक भाग कॅप्शन सहीत फोटोज आणि काही अगदी छोटे छोटे व्हिडिओज टाकुन 'तळकोकणाचे चित्र दर्शन' अशा स्वरुपात आधी प्रकाशित करतो, ते पटकन होईल, आणि त्यातल्या वर्णनाच्या 'गाळलेल्या जागा' नंतर फुरसतमध्ये भरत बसतो... त्यानिमित्ताने ती मालिका तरी पुर्ण होईल 😎 कंकाकांनी ह्या विषयावरील चर्चेवर आधीच हरकत नोंदवुन झालेली आहेच, इतर धाग्यांचे काश्मिर होते तसे गोरगावलेकर ताईंच्या दक्षिण गोव्यावरील ह्या सुंदर धाग्याचे उगाच 'तळकोकण' नको व्हायला 😀 माझ्या त्या तळकोकणाच्या धाग्यांची पार 'गाझा पट्टी' किंवा 'सिरिया' झाला तरी हरकत नाही 😂

In reply to by टर्मीनेटर

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 19:48
माझ्या अपुर्ण राहिलेल्या मालिकेचे दोनेक भाग कॅप्शन सहीत फोटोज आणि काही अगदी छोटे छोटे व्हिडिओज टाकुन 'तळकोकणाचे चित्र दर्शन' अशा स्वरुपात आधी प्रकाशित करतो, ते पटकन होईल, आणि त्यातल्या वर्णनाच्या 'गाळलेल्या जागा' नंतर फुरसतमध्ये भरत बसतो... त्यानिमित्ताने ती मालिका तरी पुर्ण होईल
जरूर. वाट बघत आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे गुरुवार, 12/26/2024 - 18:57
छे छे, गोव्याच्या पर्यटनाची सिंधुदुर्गच्या पर्यटनाशी सध्या तरी तुलना करता येणार नाही. गोव्याची नको ईतकी गर्दी टाळण्यासाठी पण तितकाच सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ही अतिशय उत्तम प्रवासी जागा आहे. गोव्या तील हॉटेल्स पेक्षा येथील हॉटेल्स आणि इतर सेवा स्वस्त आहेत. त्यामुळे दारू पिणार्यांना सुद्धा अंतिमतः सिंधुदुर्ग स्वस्त पडेल, गोव्यापेक्षा सुंदर असे तोंडवळी तळाशील किंवा तारकर्ली देवबाग चे नितांत सुदर समुद्र किनारे आहेत. मी संपूर्ण गोव्याचे समुद्रकिनारे पाहिलेले आहेत. त्यातील सर्वोत्तम समुद्रकिनार्याना नक्की टक्कर देऊ शकतील असे हे किनारे आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन गोव्याच्या अर्ध्या किंवा त्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. अर्थात येथे पंचतारांकित सुविधा नगण्य किंवा अभावानेच मिळतील पण स्वस्त आणि मस्त अशा सुविधा नक्की आहेत. आम्ही स्क्युबा डायव्हिंग केले ते केवळ १००० रुपये माणशी होते. आणि आमच्या बरोबर आलेल्या एका प्रवाशाने आद्ल्या दिवशीच गोव्यात त्याच साठी रुपये ५००० मोजले होते आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे देवबागच्या पाणी जास्त स्वच्छ आणि नितळ होते. वॉटर स्पोर्ट्स सुद्धा सिंधुदुर्गात कितीतरी स्वस्त आहे. आणि येथे सुरक्षेची सर्व व्यवस्था चोख होती. गोव्यासारखी येथली माणसे इंग्रजीत बोलू शकत नसली तरी "येवा, कोकण आपलाच असा" हे त्यांच्या साध्या वागण्यात आम्हाला तरी नक्की जाणवले. कालच आम्ही आमच्या गावच्या घरी श्री क्षेत्र परशुराम येथे गेलो असता तेथील हॉटेलातील कर्मचारी वर्ग सुद्धा अत्यन्त अदबशीरपणे वागताना दिसला. परदेशी प्रवाशांना भावणाऱ्या गोष्टी येथे नसतील परंतु आपल्यासारख्या लोकांना ( नवीन वर्षाच्या आसपासचा काळ सोडून गेल्यास) नक्कीच सुखद अनुभव येतील. गोव्यातील वाहतूकदार आणि त्यांची मक्तेदारी आणि दंडेली हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि याबाबतीत सिंधुदुर्ग गोव्याच्या कितीतरी पटीने पुढे आहे. मी गोव्यात १९८९ पासून जवळ जवळ दर वर्षी जात आलो आहे. आणि सिंधुदुर्गात सुद्धा पाच सहा फेऱ्या झाल्या आहेत त्यामुळे मी त्याची तुलना नक्की करू शकतो.

In reply to by सुबोध खरे

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 19:44
धन्यवाद.
गोव्याची नको ईतकी गर्दी टाळण्यासाठी पण तितकाच सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ही अतिशय उत्तम प्रवासी जागा आहे.
हो पण कोकणात जर तितक्या प्रमाणावर हॉटेल आणि अशा सोयी उपलब्ध नसतील तर एका मर्यादेपुढे पर्यटन वाढू शकणार नाही हे पण खरेच. समजा बायको आणि मुलीला बरोबर घेऊन जायचे असेल तर राहायला चांगली सोय हवी. मी एकटा कुठेही राहू शकेन पण त्यांना घेऊन गेल्यास उतरायला ठिकाणही चांगले हवे. तसे कोकणात सगळीकडे आहे का हा प्रश्न पडतो. उत्तर गोव्यात कलंगुटला खरं तर जाऊ नये असे वाटावे इतकी गर्दी मी तिथे १५ मार्चनंतर म्हणजे ऑफ सिझनला पण बघितली आहे. तिथे हॉटेलात उतरलो नव्हतो. आम्ही उतरलो होतो दक्षिण गोव्यात कोलव्याला. त्या हॉटेलचे एक दिवस उत्तर गोवा आणि एक दिवस दक्षिण गोवा असे पॅकेज होते त्यातून कलंगूट बघितले होते. ती गर्दी बघितल्यावरच ठरविले की कलंगुटला अजिबात जायचे नाही. पण आम्ही नेहमी जातो तो दक्षिण गोव्याचा भाग- विशेषत: वारका, बाणावली, कॅवेलोसिम आणि थोडे वर बेतालबातिम, उतोर्डा वगैरे विशेष गर्दीचे नसतात. त्यामुळे तिथे जायला आवडते. राहायला जास्त चांगली हॉटेलही त्या भागात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीला गेलो आहे पण कोणत्याही समुद्रकिनार्‍याला नाही. आंबोली नक्कीच खूप आवडले. तिकडे जाऊन आता बरीच वर्षे झाली आहेत- जवळपास १५. तेव्हा दररोज ७०० रूपयात एम.टी.डी.सी मध्ये ठिकठाक खोली मिळाली होती. इतक्या स्वस्तात गोव्यात तेव्हाही कोणतीही हॉटेलमधील खोली मिळणे अशक्य होते हे नक्की. तेव्हा कोकणात जायला नक्कीच आवडेल पण राहायला चांगली हॉटेल आहेत की नाही हा प्रश्न नेहमी पडतो. ती परिस्थिती बदलली तर नक्कीच आवडेल.

कंजूस गुरुवार, 12/26/2024 - 16:33
चर्चा करून काय होणार? त्यांना नको आहे तर तिकडे जायचे नाही. गेलोच तर नको असलेल्या गोष्टी करायच्या नाहीत. निसर्ग पाहायचा आणि परत फिरायचे. महाग वाटले तर दुसरीकडे जायचे. पर्यटन वाढवून पैसे मिळवायची त्यांना इच्छा नाही. ओके. ---------------- बाकी ट्रेनने (१२१३३)रात्री जाणे म्हणजे ठाण्याला डोळे मिटायचे. उघडले की मडगाव. त्यामुळे सोपे वाटते. तसं कोकणचं होत नाही.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर गुरुवार, 12/26/2024 - 18:17
"चर्चा करून काय होणार?"
काही होईल की काही नाही होणार ते महत्वाचे नाही 😀 पण त्यांना समुद्रकिनारे खूप आवडत असल्याचे त्यांनी अनेकदा लिहिले आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या सागरप्रेमी व्यक्तीने लिहिलेल्या प्रतिसादातील
"मी कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, मालगुंड असे थोडेसेच समुद्रकिनारे बघितले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर एकही समुद्रकिनारा बघितलेला नाही त्यामुळे विशेष कल्पना नाही."
वरील ओळी वाचल्या आणि स्थानिकांची मानसिकता व 'गोवा' आणि 'तळकोकण' मधल्या पर्यटन आणि खानपान विषयक सेवा- सुविधांची तुलना होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती असल्याने त्यांनी मांडलेले मुद्दे व उपस्थित केलेले प्रश्न रास्त वाटले त्यामुळे थेट "मज्जा करायला आलेले, पिणारे, विविध प्रकारचे खाणं खाणारे, वाटेल तसे कपडे घालून फिरणारे पर्यटक चालवून घेण्याची मानसिकता स्थानिक कोकणवासियांकडे नाही. विषय संपला" असे जाहीर करण्यापेक्षा प्रत्यक्षात परिस्थिती तेवढीही निराशाजनक नाही हे चर्चेद्वारे स्पष्ट करून त्यांच्या मनात जर काही पूर्वग्रह असल्यास ते दूर होऊन त्यांनीही तळकोकणातल्या अफाट निसर्गसौंदर्याचा मनोसोक्त आनंद घ्यावा असे मनापासून वाटले म्हणून... बाकी काही नाही!

In reply to by कंजूस

सुबोध खरे गुरुवार, 12/26/2024 - 19:06
आपण कोकण कन्या एक्सप्रेस २०१११ ने प्रवास करा २३ .४५ ठाणे ते ०६.४२ कणकवली, ०७. ०० सिंधुदुर्ग, ०७. ११ कुडाळ आणि ०७.३० सावंतवाडी रोड असे तळकोकणात सर्वत्र जाता येईल. कोकण कन्या एक्सप्रेस च्या वेळेला त्यात्या स्थानकावर एस टी ची लाल परी उभी असेल. आणि आपल्याला टॅक्सी च्या माजोरडेपणाचा अनुभव न येता कोकणातील बहुसंख्य पर्यटन स्थळांना जात येईल. गाडी एक तास पर्यंत उशीर होणार असेल तर एस टी ला तेथे थांबण्याचे हुकूमही आहेत.

गवि गुरुवार, 12/26/2024 - 19:38
वर काही ठिकाणी स्वस्त दारूचा उल्लेख आला आहे. गोव्यात जरी भारतीय मद्य स्वस्त पडत असले तरी ते इतकेही स्वस्त नसते की त्यापायी गोवा गाठावा. स्वस्त दारूपेक्षाही तिथले तुलनेत अधिक मोकळे आणि सर्वत्र दारू पिण्याचे असलेले वातावरण, जागोजागी तशा सोयी, एकूण मद्यपान एन्जॉय करण्याची सदैव सेलिब्रेशन चालू असावे तशी वृत्ती, रंगीबेरंगी कपडे आणि तशीच बहुरंगी संस्कृती यांचे पर्यटकांना जास्त आकर्षण आहे. तो माहोल मद्यपान आणि मत्स्याहार करणाऱ्यांना आकर्षित करतो. कोंकण हे त्यामानाने निसर्गदृष्ट्या तितकेच सुंदर असले तरी ते हॉलिडे एन्जॉय करण्याचे वातावरण, पब्लिक तिथे नाही.

In reply to by गवि

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 19:53
रंगीबेरंगी कपडे आणि तशीच बहुरंगी संस्कृती यांचे पर्यटकांना जास्त आकर्षण आहे. तो माहोल मद्यपान आणि मत्स्याहार करणाऱ्यांना आकर्षित करतो.
+१. मी कॉलेजात शेवटच्या वर्षाला असताना आमच्या बरोबरचे बरेच जण गोव्याला दारू प्यायला गेले होते. दारूबरोबरच बिकिनीमधील गोर्‍या बघणे हा पण एक त्यांचा उद्देश होता. त्या वयात अशा बिकिनीतल्या गोर्‍यांचे आकर्षण वाटणे यात अस्वाभाविक किंवा अनैसर्गिक काहीच नाही. खरं तर त्या वयात तसे आकर्षण वाटले नाही तरच काहीतरी गफलत आहे असे म्हणेन. ते आकर्षण मलाही होतेच. पण मी दारूवाला नसल्याने त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो :)

In reply to by गवि

मुक्त विहारि गुरुवार, 12/26/2024 - 20:48
सहमत आहे.... ज्याचा त्याचा पर्यटन दृष्टीकोन... समुद्र किनारी बसून, शांतपणे बियरचा आस्वाद घ्यायचा असेल तर, "गुहागर" हे माझे आवडते ठिकाण. आणि हॉटेल मध्ये बसून, समुद्राचे दर्शन घेता घेता, बियरचा आस्वाद घ्यायचा असेल तर, रत्नागिरीला काळया समुद्रा जवळ, एक हॉटेल आहे. तिथे मासे पण उत्तम मिळतात. साड्या खरेदी करायच्या असतील तर मात्र गोवा हे उत्तम ठिकाण आहे. नवरात्री मध्ये, काही देवस्थानात साड्यांचा लिलाव होतो. नशीब उत्तम असेल तर, २५% किमतीत , उत्तम साड्या मिळतात. (साड्या खरेदी केल्या की, बायको बियर प्यायला आडकाठी नाही...हा अजून एक फायदा....)

गवि गुरुवार, 12/26/2024 - 20:08
क्लिंटन, कोंकणात रत्नागिरीत किंवा गणपतीपुळ्यात राहून आसपास बऱ्यापैकी ठिकाणे बघता येतात. काही बीचेस काही समुद्रापासून थोडी दूरची असे मिश्रण. सिंधुदुर्गात वेंगुर्ला मुक्काम करून मोचेमाड बीच, रेडी, तेरेखोल असे गोव्याच्या सीमेपर्यंत फिरून परत मुक्कामी येता येते. गोव्यात जसा माहोल असतो तसा इथे नसला तरी शांत असते. बाहेर उकाडा असला तरी मनाला गार वाटते. हिवाळ्यात गेल्यास तर फारच उत्तम. दोन्हीची तुलना होऊ शकत नाही.

In reply to by गवि

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/26/2024 - 20:57
हो. गणपतीपुळ्याला उतरून गुहागरला आमचे कुलदैवत वाडेश्वर आणि देवी दुर्गादेवी, हेदवी, वेळणेश्वर, डेरवण हे सगळे भाग बघितले आहेत. मालगुंड तर गणपतीपुळ्याशेजारीच आहे. तिकडचे कवी केशवसुत स्मारक आणि प्राचीन कोकण पण बघितले. एक तर बरीचशी देवस्थाने बघणे हा त्या भेटीचा उद्देश होता. मी आस्तिक असलो तरी देवस्थानांना भेटी द्यायची मला आवड नाही. त्यामुळे त्या भेटीत माझ्यासाठी फार आकर्षक असे काही नव्हते. पुढे तळकोकणात आंबोली मात्र खूप आवडले. आणि रत्नागिरीच्या खाली राजापूर, खारेपाटण आणि तो सगळा रस्ता मस्तच आहे. का कोणास ठाऊक गोव्याविषयी जसे आकर्षण वाटते तसे कोकणाविषयी वाटत नाही. गोव्याला दहावेळा जाऊनही परत परत जावेसे वाटते. I just can't have enough of Goa. तसे कोकणात परत परत जावेसे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सौंदाळा Fri, 12/27/2024 - 12:44
तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, देवबागला तशी गर्दी असते. पण वेंगुर्ला, सागरेश्वर, मोचेमाड, आरवली, शिरोडा, रेडी इकडे गर्दी कमी आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. वेंगुर्ला, शिरोडा, रेडी (यशवंतगडाजवळील किनारा) येथे समुद्राला लागून हॉटेल (थ्री, फाईव्ह स्टार मात्र नाहीत) मद्यपान, मस्त्याहारासाठी चांगले आहेत. @गवि, टर्मिनेटर: गोव्यात मत्स्याहार कोणत्याही हॉटेलमधे (छोट्या, मोठ्या, तारांकीत) माशांचे कितीतरी प्रकार उपलब्ध असतात. नेहमीचे सुरमई, पापलेट, कोलंबी, सौंदाळा, बांगडा सोडून तांबोशी (रेड स्नायपर), व्हाईट स्नायपर, चोणक (जिताडा), धोडगा, पेडवे, मा़कूळ ( स्क्विड), शेवंड (लॉबस्टर), लेप, मोरी (बेबी शार्क), शेणाणे (मोठे शिंपले) वगैरे. तेवढे कोकणात सर्रास नसतात. क्वचित काही ठीकाणी मिळतात. काही वेळा तर मी आणयला सांगितले होते (होम स्टे मधे) पण बाजारात मिळाले नाही हे उत्तर. एकदा देवगड मधे एका छोट्या हॉटेल मधे विचारले तेच उत्तर. तेवढ्यात दोन लोकल (कामगार, मजूर) वाटणारे लोक आले, नेहमीचे असावेत. आल्या आल्या त्यांनी मच्छी कढी भात अशी ओर्डर दिली आणि त्यांना अंगठ्या येवढे असणारे मासे आमटी आणि भरपूर भात आणून दिला. मी वेटरला म्हणालो मला हीच मच्छी कढी पाहिजे तर तो म्हणे साहेब हे तुमच्यासाठी नाही तुम्ही खा की मस्त सुरमई, पापलेट. पण मी हट्टाने त्याला तेच आणायला लावले. ती बोट पेडव्यांची कढी आणि भात अजून चव जीभेवर आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर Fri, 12/27/2024 - 13:54
तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, देवबागला तशी गर्दी असते. पण वेंगुर्ला, सागरेश्वर, मोचेमाड, आरवली, शिरोडा, रेडी इकडे गर्दी कमी आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत.
+१००० मी माझी अर्धवट राहिलेली मालिका पुर्ण करायला घेतली आहे. एक भाग (देवबाग, तारकर्ली, वालावल) ऑलमोस्ट पुर्ण होत आलाय तो करतो थोड्याच वेळात प्रकाशित, आणि पुढचा भाग (तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा) पण टाकतो ३१ डिसेंबर किंवा त्यापुर्वीच! मालवण, मोचेमाड, आरवली हे आधी बघुन झाले होते त्यामुळे ह्या सहलीत त्यांचा समावेश केला नाहिये...

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 13:00
खर्चाच्या बाबतीत सांगायचं तर एकटं दुकटं जाण्यापेक्षा कमीतकमी एका गाडीचे पर्यटक असले तर स्थानिक भटकंतीचा खर्च बराच कमी होतो . रेल्वे प्रवासासाठी अनेक पर्याय आहेत. आपल्या आवडीप्रमाणे किंवा बजेटप्रमाणे त्यातील एखादा पर्याय निवडणे आपल्याच हातात असते . हॉटेलचेही असेच आहे . मोक्याच्या ठिकाणी रूम हवी असल्यास जास्त भाडे द्यावे लागेल हे निश्चितच . आपण कोणत्या वेळी जातो हेही तितकेच महत्वाचे . पाळोळेला आम्ही जी रूम घेतली तीच रूम लेकीने गेल्या वर्षी पण वेगळ्या सिझनला अर्ध्या किमतीत घेतली होती . प्रत्येकाचे अनुभव वेगळे . प्रतिसादांमधून खूप नवीन माहिती मिळते आहे . चर्चा सुरु राहावी .
आधीचा भाग : हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे आज सहलीचा तिसरा दिवस. लवकरच जाग आली आणि सहज म्हणून किनाऱ्यावर फिरायला बाहेर पडलो . आमचे हॉटेल पाळोळे किनार्याच्या अगदी दक्षिण टोकाला होते . काल संध्याकाळी ओंडक्यांवरून ढकलत आणलेल्या काही होड्या अजूनही किनाऱ्यावरच उभ्या होत्या .

श्रीगणेशदर्शन

प्रसाद गोडबोले ·

Bhakti Sat, 12/21/2024 - 10:33
फारच सुंदर!असा विचारच केला नव्हता.तुमचा अद्वैताचा अभ्यास खरोखर शुद्ध, शास्त्रोक्त आहे,हे खुप दुर्मिळ आहे.मला ज्यावेळी शिवशक्ती अद्वैत उमगले तत्क्षणी बरेच बदल झाले.

मुक्त विहारि Sat, 12/21/2024 - 11:35
वेगळी अनुभूती... हा माझा प्रांत नाही, हे तरी उमजले..... आमचे कपाट वेगळे... C to C via C हे आमचे कपाट.... (चाणक्य ते चार्ली चॅप्लिन व्हाया Chivas Regal....)

Bhakti Sat, 12/21/2024 - 10:33
फारच सुंदर!असा विचारच केला नव्हता.तुमचा अद्वैताचा अभ्यास खरोखर शुद्ध, शास्त्रोक्त आहे,हे खुप दुर्मिळ आहे.मला ज्यावेळी शिवशक्ती अद्वैत उमगले तत्क्षणी बरेच बदल झाले.

मुक्त विहारि Sat, 12/21/2024 - 11:35
वेगळी अनुभूती... हा माझा प्रांत नाही, हे तरी उमजले..... आमचे कपाट वेगळे... C to C via C हे आमचे कपाट.... (चाणक्य ते चार्ली चॅप्लिन व्हाया Chivas Regal....)
लेखनविषय:
लेखनप्रकार
||मोरया || काल संकष्टीचतुर्थी होती, श्रीगणेशाचे दर्शन "झालं" का ? नाही झालं ? लक्षात नाही राहिलं ? विसरुन गेलास ? हरकत नाही , आत्ता करू दर्शन. ____________________________ मुळात शिवशक्ती द्वैत च नाही. जो शिव आहे तीच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे ! हे दोघे भिन्न आहेत असे वाटणे , हे द्वैत आहे , असे वाटणे हा "तुझा" विचार आहे . आणि हा विचार मायेचा आहे, एकट्या शक्तीचा आहे, फक्त एकट्या शक्तीने घडवलेला आहे. कारण मुळात शुध्द शिवस्वरुपाच्याठायी विचार वगैरे काहीच नाही.

अघमर्षण

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 05:25
साष्टांग दंडवत प्रगो. हे सगळे मजसारख्या पामरांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगावे ही नम्र विनंती.
शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. -- उदाहरणार्थ मला ('मी' ला) या दोन्हीपैकी काहीच वाटत नाही. अश्या लोकांनी काय करावे ?

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्त काका. आपण नेहमी आवर्जुन प्रतिसाद देता हे लेखनाचा हुरुप वाढवणारे आहे.
अश्या लोकांनी काय करावे ?
सगळ्यांना सगळं कळलेच पाहिजे असा दुराग्रह नाही. ह्या इथे मला अमृतानुभवातील ३ ओव्या उधृत कराव्याश्या वाटतात :
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तरी ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तरी कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
समजा राजाला तुम्ही तुम्ही राजा असे नाही म्हणालात तरी तो राजाच असतो. त्याचे राजेपण तुम्हाला जो प्रत्यय येतोय किंव्वा येत नाहीये ह्यावर अवलंबुन नसते. तसेच शिवस्वरुपाला तुम्ही समजुन घेतले काय किंवा नाही समजुन घेतले काय , त्याने काहीच फरक पडत नाही ! आहे हे असं आहे. :) दोन्ही पैकी काहीच वाटत नाही हे अनध्ययनाचे प्रतीक आहे, आता सगळ्यांनी अध्ययन केलेच पाहिजे असा आपला हट्ट नाही. तुम्हाला हौस असल्यास करा , नसल्यास नका करु. हे समजुन घ्यायची हौस आहे पण कळत नाहीये असे म्हणत असाल तर मात्र मी तुम्हाला शंकराचार्य उपनिषदभाष्य वगैरे वाचण्याआधी, लोकमान्यांचे गीतारहस्य वाचन करा असे सुचवेन कारण त्यांनी एकदम उत्तम पध्दतीने स्टेप बाय स्टेप विवेचन केले आहे ! :) पुनश्च एकवार धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 09:51
मुळात 'पाप' म्हणजे (नेमके) काय ? विविध धर्मात वेगवेगळ्या कृत्यांची गणना 'पाप' म्हणून होते. तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?

In reply to by चित्रगुप्त

तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?
>>> उत्तर वर लेखातच आहे अगदी सुरुवातीलाच !

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Fri, 12/20/2024 - 17:20
अध्यात्म वैगेरे फारसे समजत आणि पटत नसल्याने बाकी काही नाही. पण लेखात पाप म्हणजे काय हे सापडले नाही. पापाची दोन उदाहरणे मात्र आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा Sat, 12/21/2024 - 20:00
प्राडॉ ..... पण फूल टू करमणूक असते म्हणून असे विषय इंजॉय करण्याशी असहमत .. असं वाचन करत हळूहळु समजुन घेणं, प्रगल्भ होत जाणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.. गंभीरपणेच घ्यायला हवी असं मला वाटतं !

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 12/20/2024 - 10:04
ह्या बद्दल धन्यवाद.... नक्कीच वाचीन... अहंकार कमी करायला, ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो का? कारण, कमी अधिक प्रमाणात, प्रत्येक व्यक्तीला थोडा तरी अहंकार असतोच.

In reply to by मुक्त विहारि

आपल्याला अहंकार कमी करणे जास्त करणे वगैरे सव्यापसव्य करावयाचे नाहीत, आपल्याला फक्त ह्यातील "अहं" कोण आहे एवढाच शोध घ्यायचा आहे . तुम्हाला गीतारहस्यातील चौथ्या प्रकरणात "आधिभौतिक सुखवाद" ह्या प्रकरणात उत्तर मिळेल अशी आशा आहे !

In reply to by मुक्त विहारि

सखोल अभ्यास असे नाही पण वाचन मात्र नीट केले आहे. माझ्या मते गीतारहस्य हा इतका लोकोत्तर ग्रंथ आहे लोकमान्यांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात स्वदेश स्वराज्य ह्या विषयी काडीमात्र काम केले नसते तरीही केवळ हा एक ग्रंथ लिहिला म्हणुन त्यांचे नाव इतिहासात कोरलेच गेले असते ! अवांतर : गीतारहस्याच्या , त्यातील सिध्दांतांच्या , अनुमानांच्या काही मर्यादा आहेत , पण वेदांताचा , आचार्यांच्या भाष्याचा सखोल अभ्यास केलेल्या व्यक्तींनाच त्या जाणवु शकतात . तस्मात त्याविषयी मी बोलणे टाळतो . अन केवल माऊलींची ज्ञानेस्वरीतील ही ओवी उधृत करतो : जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥ जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ १७२ ॥ धन्यवाद !

प्रचेतस Fri, 12/20/2024 - 06:23
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि ॥ योहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि ॥ अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा ॥
तुमच्या विधानात "मी" आणि "ब्रह्म" यांना समानार्थी मानले आहे, मात्र यामध्ये तर्कसुसंगती आवश्यक आहे. "मी" म्हणजे व्यक्तीचे अहंभाव किंवा आत्मचेतना. "ब्रह्म" म्हणजे विश्वव्यापी, शाश्वत, निर्गुण सत्य. व्यक्तीचा "मी" (अहं) मर्यादित असतो, तर ब्रह्म अमर्यादित आहे. मग मर्यादित "मी" अमर्यादित "ब्रह्म" कसा होऊ शकतो? शिवाय ज्ञान ही निर्जीव गोष्ट नाही, तर ज्ञान हे अनुभवातून साकार होते. मग फक्त "मी" ला ज्ञान कसे म्हणता येईल? "मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते. खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म. येथे "मी" म्हणजे शुद्ध आत्मा आहे, जो ब्रह्माशी एकरूप आहे. शेवटी हा द्वैताद्वाचा खेळच झाला.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली सर !
"मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते.
अगदी अगदी एकदम योग्य बोललात ! ही साधनेच्या स्तरावरील शेवटची पायरी मानतात . तुमच्या पायात लोखंडाची बेडी होती, त्याची तुम्हाला किल्ली सापडली, ती किल्ली मात्र शुध्द सोन्याची आहे ! आता तुम्ही ह्या किल्लीने लोकांडाच्या बेडीतुन मुक्त झालात तर किल्लीचीही गरज नाही ना ! बेडी काढुन टाकली तशी किल्ली ही टाकुन द्या ! किल्ली सुंदर आहे, मौल्यवान आहे, असे वाटते त्यांची अवस्था दयनीय आहे . #माय_प्रेशियस इये विषयी आपल्याला इशोपनिषदात एक सुंदर विधान सापडते
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते। ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥
जे लोक "मी ब्रह्म नाही , काहीतरी भिन्न देह वगैरे आहे " ह्या अज्ञानाचा आश्रय करुन राहतात ते अंधःकारात भरकटालेले आहेत, मात्र जे "मी ब्रह्म आहे" ह्या ज्ञानात गुंतुन पडले आहेत ते त्याही पेक्षा गहन अंधःकारात भरकटलेले आहेत ! ! ह्यावर ओशो ने अतिषय सुंदर प्रवचन दिलंय पण मला आत्ता त्याची लिंक सापडत नाहीये .
खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म.
अगदी बरोबर. ह्या ब्रह्मानुभवात, अनुभव , अनुभाव्य आणि अनुभाविक राहातच नाहीत ! काय बोलणार ! जे जे काही ह्या वस्थेचे वर्णन करणारे साहित्य आहे ते सारे त्या लोकांनी लिहिलेले आहे जे ह्या शुध्द ब्रह्म अवस्थेतेतुन एक पातळी खाली उतरले आहेत . आणि संस्कृतमध्ये खाली उतरणे ला काय म्हणतात ? अव + तर = अवतार ! शुध्द अनुभव हा शब्दातीत आहे - त्या साठी आचार्यांनी अपरोक्षअनुभूती असा शब्द वापरला आहे, समर्थांनी अनुर्वाच्च समाधान असा शब्द वापरला आहे , माऊली म्हणतात >
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
मीही हे जे काही लिहितोय हा सगळा शब्देविण संवादु , दुजेविण अनुवादु आहे. "ज्यांना कळतं, त्यांना कळतं" , ते माझ्याकडे पाहुन फक्त हसतात गालातल्या गालात. त्यांना माहीती आहे मी कोण आहे , मला माहीती आहे ते कोण आहेत . :) m meherbaba nkb

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Sat, 12/21/2024 - 12:17
प्रगो सर, काही तात्विक चर्चा- किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. "विद्या आणि अविद्या" यांचे उदाहरण दिले गेले आहे, परंतु दोन्ही अवस्थांमध्ये अंधःकार असल्याचे विधान चुकीचे वाटते. ज्ञान (विद्या) हे नेहमीच प्रकाशाचा स्रोत मानले जाते, आणि त्यामध्ये गहन अंधःकाराचा उल्लेख करण्याचा अर्थ आत्मज्ञानाच्या संकल्पनेलाच विरोधाभासी ठरतो. त्यामुळे इथे उपनिषदातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. तुम्ही नंतर अवताराचा उल्लेख केलात त्याच्याच व्याख्येनुसार "अवतार" म्हणजे खाली उतरणे असे मानले गेले आहे, पण शुद्ध ब्रह्मानुभवातून खाली येणे म्हणजे तो अनुभवच भंग पावतो. खाली उतरलेल्या व्यक्तीला त्या अवस्थेचा पूर्ण सत्यभाव कसा सांगता येईल? आता तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता की "शुद्ध अनुभव हा शब्दातीत आहे." हे विधान योग्य आहे, परंतु अनुभवाची संकल्पना मांडण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो. तुम्हीच श्लोकांचा, वाक्यांचा उपयोग करत आहात, म्हणजे स्वतःच्या विधानाचाच विरोध करत आहात.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Sat, 12/21/2024 - 22:58
किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. काही अंशी सहमत | एकदा बेडीतून मुक्त झाल्यावर किल्लीचा उपयोग नाही म्हणून किल्ली सोन्याची असली तरी (नव्हे सोन्याची असल्यामुळेच टाकून द्यावी, नाहीतर तिचा देखील मोह होतो) अशा अर्थाने वाचावे. मात्र एकदा बेडी सुटली म्हणजे परत मनुष्य बेडीत अडकणारच नाही असे देखील नाही. मात्र नवीन बेडीला पुर्वीचीच किल्ली लागेल काय याची शाश्वती नाही. (किंबहुना न लागण्याचीच शक्यता अधि़क) त्यामुळे कदाचित किल्लीचा त्याग करावा असा विचार असावा. अहंकारमुक्त होण्याचा साधनेचाच माणसास अहंकार येतो अशी उदाहरणे जागोजागी सापडतात. मानवदेह म्हटला की अहंकार, मोह मरेपर्यंत सुटत नाही. साधूला लंगोटीचा देखील मोह पडतो अशी देखील उदाहरणे आहेत. मात्र आपण प्रयत्न करावे. अपयश देणे न देणे दुसर्‍या कोणाच्या तरी हाती आहे असे समजले की कर्माचा अहंकार आणि साधनेचा भार होत नाही. असो.

उजव्या हातात पाणी घ्या , ऋतं च सत्यं ... म्हणा , ओंजळीतील पाण्यावर उछ्वास टाकून ते डाव्याबाजूला टाकून द्या. झालं अघमर्षण। आता पापं संपली.
चला लागा कामाला...! =)) -दिलीप बिरुटे (पापमुक्त)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला लागा कामाला...! =))
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही ! पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे , मोठ्ठ्या माश्याने छोट्या माश्याला खाल्ले म्हणुन त्याला पाप लागत नाही :) ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही ! धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 10:18
ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही !
रूढीप्रमाणे 'द्विज' जरी असलो तरी 'पाप म्हणजे काय माहीतच नाही' या क्याट्यागरीत 'मी' येत असल्याने या भानगडीत पडण्याचे कारण नाही. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

एक्झ्यॅक्टली काका एक्झ्यॅक्टली ! मनुस्मृती अन अन्य अनेक ठिकाणी हे जे काही म्हणले आहे की "वेदाध्ययनाचा , उपनिषदांचा अधिकार केवळ द्विजांना आहे , इतरांना नाही. " त्याचा अर्थ हाच होता जो तुम्ही वर लिहिलेला आहे. इतरांना गरजच नाही ह्या भानगडीत पडायची ! आता द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण . कारण क्षत्रिय वैश्य असं कोणी राहिलंच नाही. आता ह्या ब्राह्मणातही तुम्ही म्हणालात तसे बहुसंख्य हे "रूढीप्रमाणे 'द्विज' " असल्याने त्यांनाही गरज च नाही वेदाध्ययन उपनिषद वगैरे अभ्यासण्याची ! ह्याला उच्च्नीचता किंवा भेदभाव म्हणुन बघुच नका. ही केवळ अनावश्यकता आहे ! as simple as that ! अगदी पटकन सहज सुचले म्हणुन एक मजेशीर उदाहरण सांगतो - तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 13:37
तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे
यावरून आठवले, 'सैराट' च्या दोनतीन गाण्यांचे रेकॉर्डिंग अमेरिकेत झाले. भलामोठा सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. त्यांना वाजवण्यासाठी दिलेले लिखित संगीताचे 'स्कोअर्स' अजय-अतुललापण दिले गेले, त्यांनी संगितले की आम्हाला यातले काहीही समजत नाही. तिथले वादक थक्कच झाले की यांना काहीही कळत नसता एवढी सुंदर संगीतरचना मुळात यांनी केलीच कशी ? https://youtu.be/yo4E0tWGcV4?si=tB-nNrYzTh_29bmx

In reply to by चित्रगुप्त

तुर्रमखान Fri, 12/20/2024 - 14:33
कै कै गोष्टींचं फारच शैक्षणिकीकरण झाल्यामुळे एका विशिष्ठ साच्याच घालून त्याला कैतरी नाव देवून शिकवणं सुरू झालं. एखाद्याला तो प्रकार माहीत नसणं म्हणजे ती संकल्पनाच माहीत नसणं असं होत नाही. एकही भाषा ज्ञात नसलेली व्यक्ती विचार करू शकतेच की. 'एखादी गोष्ट पाप आहे हे माहीत नसेल तर पाप लागत नाही' म्हणजे तर हैट आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे....
होय, मलाही धक्का बसलेला हे लक्षात आल्यावर . सध्या धर्मशास्त्राचा इतिहास वाचत आहे आमचा भारतरत्न पां.वा. काणे सरांनी लिहिलेला. त्यात काही प्रकर्षाने जाणवलेली उदाहरणे लिहितो इथे . समुद्रउल्लंघन हे पाप मानले जायचे . धर्मशात्रानुसार हे पाप फक्त ब्राह्मणांच्या करिता होते , क्षत्रिय वैश्य शुद्रांना मुक्त संचार करण्याची मुभा होती. मद्यपान हे पाप मानले जायचे - पण हे फक्त ब्राह्मणांच्या आणि वैश्यांच्या करिता, क्षत्रिय आणि शुद्रांना मद्यपानाची मुभा होती. धनसंचय करणे हे ब्राह्मणाच्यासाठी पाप मानले होते मात्र क्षत्रिय वैश्यांना आणि शुद्रांना त्याची मुभा होती. धर्मशास्त्रात त्रैवर्णिकांना घटस्फोट नावाचा विधीच नाही, पण शुद्रांना काडीमोड घेण्याची मुभा होती. थोडक्यात काय तर पाप आणि प्रायश्चित्त हे बहुतांश करुन द्विजांकरिताच होते , शुद्रांना बहुसंख्य वेळा हे नियम, ह्या संकल्पना बांधील नसत ! खुप उदाहरणे आहेत. सर्वच लिहित बसत नाही. धर्मशास्त्राचा इतिहास संपुर्ण वाचुन झाल्यावर सारांश रुप लिहिण्याचा मानस आहे तेव्हा लिहिन नक्की !

In reply to by प्रसाद गोडबोले

धक्का वगैरे काही बसवून घ्यायचे नाही. वाचन आणि समज वाढली की, हळुहळु सगळं लक्षात येत जातं. साक्षात ज्या विधात्याच्या मुखातून द्विजन उत्पन्न झाल्यामुळे, आणि त्याच्या श्रेष्ठत्वामुळे जे सर्व वर्णाचे जे स्वामी बनले आहेत त्यांना खरं तर, पाप पूण्य वगैरे नसायलाच पाहिजे होतं. क्षत्रीय वैश्य शूद्र यांच्या जिविताचे मोल तसं ही धर्मशास्त्रानूसार अल्प समजल्या जात होतं. गतजन्मातील पाप-पुण्य कर्म-आणि पापांमुळेच तर, त्यांना अपवित्र अशा क्षत्रीय-वैश्य किंवा शुद्राचा जन्म त्यांना मिळाला असावा. (अवघड आहे सगळं ) ज्या कोणी बिचा-या सुत्रकारांनी द्विजनांना समुद्रौल्लंघन पाप ठरवले असेल त्यांचा अभ्यास कमी पडला असावा असे वाटते. आणि ज्यांनी कोणी असे समुद्रोल्लंघन केले असेल ते डाव्या-उजव्या बाजूला पाणी शिंपडून तसेही पापमुक्त झालेच असतील. शास्त्रे -सुत्रे ही आजच्या भाषेत त्याकाळातील सर्वोच्च कायदे असल्यामुळे त्यांनी जे लिहिले आहे, इतरांनी तितकेच फॉलो करायचं. विधात्याच्या मुखातून निर्माण झालेले ऑलरेडी पवित्र आणि सर्वोच्च होते. शास्त्रांच्या नियमांनुसार वागतांना इतर आणि स्ववर्णांवर वचक राहिला पाहिजे, इतरत्र जगभ्रमण करु नये म्हणून त्याला पाप ठरवले असावे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:29
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही !
च्यामारी ब्राह्मण कोण? क्षत्रिय कोण? वैश्य कोण? आणि शुद्र कोण? ह्यावर प्रचंड वैचारिक गोंधळ माजला आहे माझ्या डोक्यात! जात्याधारित वर्णव्यवस्था मानावी तर अस्मादिकांचा जन्म कोकणस्थ ब्राम्हण परिवारात झाला आहे त्यामुळे 'ब्राम्हण' असे म्हणता येईल! कर्माधारित वर्णव्यवस्था मानावी तर मी एक व्यापारी/व्यावसायिक असल्याने वैश्य, माझ्याकडे नोकरीवर रुजू होणाऱ्यांना काम कसे करावे ते शिकवतो म्हणजे अध्यापन करतो म्हणुन ब्राम्हण, (पूर्वी समाजातील कोणासाठीही रस्त्यावरही उतरणारा) पण आता फक्त परिचयातील कोणावरही अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उभा राहतो त्यामुळे क्षत्रिय, की घरी नेमलेले सफाई कर्मचारी अनुपस्थित असतील त्यादिवशी किंवा विकएंड होमवर कोणी मदतनीस उपलब्ध नं झाल्यास आपल्याच घरातील संडास साफ करावा लागल्यास, किंवा फार्म वरील एखाद्या पाळीव प्राण्याचा अंत्यसंस्कार आपल्याच हातानी करावा लागल्यास शूद्र ठरणार असीन तर मी नक्की कोण आहे? त्यामुळे माझ्या मते मी आणि माझ्या आजूबाजूला राहणारे / वावरणारे / बोलणारे सगळे मनुष्यप्राणी आहेत... त्यांची जात कुठली आणि धर्म कुठला ह्याला माझ्यादृष्टीने तरी काही महत्व नाही आणि त्याच्या तपशीलात जायची मलातरी गरज वाटत नाही. माझे काही गैरसमज असल्यास ते जरूर दूर करावेत... पण कृपया बोली/व्यावहारिक भाषेत... ती वेद आणि उपनिषादांची भाषा मज पामराच्या आकलनाच्या पलीकडची आहे साहेब!

In reply to by टर्मीनेटर

नमस्कार टर्मिनेटर ! ब्राह्मण - ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण क्षत्रिय - आपल्या भूमीची देशाची धर्माची देवाची संस्कृतीची रक्षा करतो तो क्षत्रिय वैश्य - जो देशात वास करतो , दैनंदिन व्यवहार चालावेत म्हणुन कामे करतो शेती , पशुपालन , कोणत्याही प्रकारचा व्यापार करतो वैश्य शुद्र - वरील त्रैवर्णिकांना त्यांच्या कामात मदत करतो तो शुद्र . वैदिक कालात कर्माने ठरत होते वर्ण , नंतर जन्माने ठरायला लागले , आता वृत्तीने ठरतात असे माझे मत आहे. सो सोप्प्या शब्दात बोलायचं तर तुम्हाला चॉईस आहे तुम्हाला कोणता वर्ण निवडा ! कोणी उच्च नाहीये कोणी नीच नाहीये , जो तो आपापल्या कामात महत्वाचाच आहे. पुरुषसुक्तात म्हणलं आहे तसे - एका देहाचे अवयव ! बाकी धर्माची उतरंड जातींचे पिरॅमिड ही संकल्पनाच चुकीची आहे. उपमा द्यायचीच झाली तर गोएथिक आर्च ही उपमा देता येईल arch ह्यात की स्टोन शीर्षस्थानी आहे म्हणुन तो उच्च असे ठरत नसते , ह्या कमानीतील अन्य कोणताही दगड त्या की स्टोन इतकाच महत्वाचा असतो. कारण कोणताही काढला तरी आर्च ढासळणारच आहे ! असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र एकामेकांवर अवलंबुन आहेत ! थोडक्यात काय तर तुम्हाला तुमचा वर्ण कोणता हे ठरवायची मुभा आहे ! लोकं काहीही का म्हणेनात - इट्स युवर लाईफ, युवर चॉईस !

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस Sat, 12/21/2024 - 08:57
हे कितीही आदर्शवादी वाटत असलं तरी वास्तवात तसं नसतं. कर्माधारीत वर्णव्यवस्था असती तर उच्चकुलीन क्षत्रिय विश्वामित्राला ब्राह्मण बनण्यासाठी इतका संघर्ष करावा लागता ना. इथं तर वैश्य शूद्रांचा विषयच नाही.

In reply to by कॉमी

Bhakti Sat, 12/21/2024 - 11:13
असे लोक धर्माचे रक्षक नाहीत,धर्माचे भक्षक आहेत.ज्ञान साधना जन्माधारित वर्णव्यवस्थेवर आता नक्कीच नाही. आजच्या ही काळात ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा वर्ण मानणारे फेल गेले आहेत.हेच लोक( अशुद्ध विचारसरणी) सनातन बुडवणार....

In reply to by प्रचेतस

अरे वा ! सर्वच जण इतक्या श्रध्देने जन्माधारित वर्णाश्रम व्यवस्था मानत असतील तर त्यात मला आनंदच आहे ! वर्णाश्रमव्यवस्थेने घालुन दिलेली कर्माची बैठक हाच चारही पुरुषार्थांचा आणि विशेषकरुन मोक्षाचा सर्वात सुलभ मार्ग आहे . इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन:। संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ आणि विश्वामित्रांच्या विषयी आपण स्वतंत्रपणे बोलु कारण तो मोठ्ठा विषय आहे. तुर्तास इतकेच म्हणतो कि विश्वामित्रांची वृत्ती क्षत्रियच होती. त्यांची ब्राह्मण होण्याची मनीषा मुळातच वसिष्ठांच्या प्रति असलेल्या असुयेतुन निर्माण झाली होती. कामधेनु आपल्याकडे असावी ह्या इर्ष्येतुन झालेली होती . ही मुळ वृत्ती बदलल्या शिवाय कसे ब्राह्मण होता येईल ? मात्र एकदा ती वृत्ती बदलल्यावर ब्राह्मण विश्वामित्रांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो अक्षरशः लोकोत्तर होता - गायत्री मंत्र जो सर्वात पवित्र मंत्र मानला जातो त्याचे ऋषी हे विश्वामित्र आहेत ! वसिष्ठ नाहीत !! असो. अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर Sat, 12/21/2024 - 10:35
"अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from !"
कर्मधर्मसंयोगाने आमचेही गोत्र कौशिक आहे 😀 So now you know where 'all this' is going to... 😂 BTW आत्ता सहज 'कौशिक गोत्र' असे गुगलवर टंकले तर खालील AI जनरेटेड रिस्पॉन्स आला. त्यातल्या ठळक केलेल्या गोष्टी वाचुन गंमत वाटली... कौशिक, ब्राह्मणों का एक गोत्र और उपनाम है. इसका नाम ब्रह्मर्षि विश्वामित्र के नाम पर रखा गया है. कौशिक गोत्र से जुड़ी कुछ और बातेंः
  • कौशिक एक प्राचीन भारतीय गोत्र है.
  • कौशिक गोत्र के लोगों को कौशिके भी कहा जाता है.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे काफ़ी गुस्से वाले होते हैं.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे नेपाल में हिमालय से निकलने वाली कोसी नदी के किनारे रहते थे.
  • विश्वामित्र को इसी नदी के किनारे तपस्या करते हुए ऋषि का दर्जा मिला था.
  • कौशिक एक भारतीय उपनाम भी है जो बरनवाल का एक गोत्र है.
जनरेटिव एआई की सुविधा फ़िलहाल एक्सपेरिमेंट के तौर पर उपलब्ध है. 😀

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Sat, 12/21/2024 - 12:12
कदाचित त्यामुळेच, तुझे आणि माझे, पहिल्याच भेटीत, विश्वासाचे नाते तयार झाले असावे का?
हा हा हा... असुही शकेल तसे, ब्रम्हर्षी विश्वमित्रांनाच ठाऊक 😀 बाकी ह्यावरुन वरती जो AI जनरेटेड रिस्पॉन्स दिला आहे त्यात
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि उनके आपस में ढेर सारे वैचारिक मतभेद होते हैं
असेही एक वाक्य असायला हवे होते असंही वाटायला लागलंय, कारण आपल्यातही अनेक बाबतीत पराकोटीची मतभिन्नता आहे आणि प्रगो त्यांच्या लेखनातुन/प्रतिसादांतुन जे विचार मांडत असतात त्यातल्या कित्येक विचारांच्या अगदी विरुद्ध टोकाचे माझे विचार असतात! गंमतच आहे सगळी 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

मुक्त विहारि Sat, 12/21/2024 - 13:12
पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Sat, 12/21/2024 - 13:37
मतभेद असणे ही गोष्ट वेगळी... पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
अर्थातच... आणि मतभेद असुनही विश्वास आणि मैत्री पण आहे म्हणुनच तर "गंमतच आहे सगळी 😂 😂 😂" असे लिहिले होते!
प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...
त्यांचे तत्वज्ञानावर आधारीत विचार माझ्याही पार डोक्यावरून जातात, पण सर्वसामान्य किंवा सामाजिक विचार जे सहज 'समजतात' त्यातल्या काही (किंवा बऱ्याच म्हणा हवंतर) बाबतीत वैचारीक मतभेद आहेत असे म्हणयचे होते 😀

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sat, 12/21/2024 - 11:57
मान्य आहे... सामजिक स्तरावर हे मान्य होणे कठीण आहे...(पण अशक्य नाही. कारण तसे असते तर, वाल्या कोळी याला, वाल्मिकी ऋषीं, हे पद नसते मिळाले.) आपण आपला वैयक्तिक पातळीवर विचार करायचा.. आपल्या पुरती तरी जात पात पाळायची नाही. इतर जनतेला जसा विचार करायचा असेल तसा करू देत.. आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, प्रत्येकाचे वैयक्तिक कपाट वेगळेच असते.आपली कापडे त्यात कोंबायला जाऊ नये.

कंजूस Fri, 12/20/2024 - 16:30
ज्यांना गणितातील सेट थिअरी. सेट डायग्राम्स माहिती आहेत त्यांना चित्रे काढून दाखवता शक्य आहे. शब्द जंजाळाशिवाय. एका विश्वात अनेक विश्व असतात. त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. ती संपूर्ण वेगळीच असतात. राजाचं राज्य आणि त्यातली प्रजा एक विश्व धरलं तरी अरण्यात शिकारीला गेल्यावर तिथल्या भिल्ल, अरण्यवासीयांवर त्याचा आदेश चालत नाही. ते अरण्य त्याच्याच राज्यात असलं तरी.

In reply to by कंजूस

गणितातील सेट थिअरी >>> होय होय. मलाही संख्याशास्त्रचा विध्यार्थी असल्याने असा विचार करायला आवडते ! ह्याला अ‍ॅनालिटिकल फिलॉसॉफी म्हणतात . मी एक दोन दा तसा प्रयत्न केला होता , सर्व काही गणिती भाषेत लिहायचा . पण त्यावर एक मित्र बस मला इतकेच म्हणाला - Gödel's incompleteness theorems ! "Any consistent formal system F within which a certain amount of elementary arithmetic can be carried out is incomplete; i.e. there are statements of the language of F which can neither be proved nor disproved in F." आता ह्यावर काय बोलणार ! आम्हाला आता शब्दजंजाळाशिवाय पर्यायच नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

कंजूस Sat, 12/21/2024 - 12:53
'मी' नावाचा एक गोल दुसऱ्या एका मोठ्या गोलात काढला आणि त्या मोठ्या गोलाला ' ब्रह्म' हे नाव दिले तर मी आणि ब्रह्म यांचे स्पष्टीकरण खूप शब्दजंजाळापेक्षा सोपे होईल समजायला. अशीच चित्रे काढून विविध कल्पना समजावता येतील. परंतू 'ज्ञान' किंवा 'विद्या' यांचे गोल कुठे आणि कसे दाखवायचे हे फार कठीण आहे कारण त्यांच्या व्याख्याच स्पष्ट होत नाहीत. सर्व गोल हे एकाच प्रतलावर आहेत असं समजून आपण चित्र मांडायला बसतो तेव्हा काही गोल वेगळ्याच प्रतलांत असण्याची शक्यताही लक्षात घ्यावी लागते. यातून तो ' Gödel's incompleteness theorems !' मांडला जात असणार.

Bhakti Fri, 12/20/2024 - 19:40
चैतन्याला पाप पुण्याचा भोग नसतो.तो जीवात्म्याला असतो.चैतन्यस्वरूपाचा ध्यास असावा,चैतन्याचा आदर असावा.
तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त
यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल.

In reply to by Bhakti

यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल. >> एक खुप सुंदर उदाहरण आठवलं - समजा तुम्ही झोपलेले आहात. अगदी गाढ झोपेत . इतके गाढ झोपेत की तुमच्यासाठी तुमचे स्वप्न हेच सत्य झालेले आहे . आता कल्पना करा की स्वप्नात तुमच्या मागे वाघ लागलाय , तुम्ही जीवाच्या आकांताने पळाताय , तरीही वाघाने तुम्हाला पकडलेच , वाघाची नखं तुमच्या बरगड्यात घुसत आहेत , वाघ तुमच्या नरडीच्या घोट घेत आहे , आता तुम्ही झोपेत जीवाच्या आकांताने ओरडताय , वाचवा .... वाचवा ! आता तुम्हाला ह्या वाघापासुन वाचवण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय काय ? तुम्हाला झोपेतुन जागे करणे ! दॅट्स इट ! मी जीवात्मा आहे, ह्या देहात अडकलो आहे , हे भोग भोगतोय, वगैरे वगैरे स्वप्नातील भास असल्यासारखे आहे, त्यापासुन तुम्हाला तुम्हीच वाचवु शकता ! बस विचाराने विचार बदलुन ! समर्थ म्हणातात : इतुकीं वेडें लाविलीं । ते माथा खेळे खेळ येकली । ते मायेनेंच विराली । पाहिजे माया ॥ श्रीराम मी जीवात्मा आहे , असे वाटणे ही माया आहे , भास आहे , माया तीची ती एकटीच खेळत आहे , तिचा नाश कसा करणार ? मी शिव आहे ह्या धारणेने , ह्या विचाराने . पण हा विचारही मायाच आहे की ! मायेचे बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ।मायाचि गोंवी आणि बंधन । तोडी , तेही माया ॥ श्रीराम आणि माऊलींचे काय बोलणार , त्यांनी तर कहर उपमा दिली आहे ! जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें । तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ जसे पती पत्नीने आपला अनुभव घ्यायचा म्हणुन आपपली मस्तके छाटली अन दुसर्‍याला बसवली तरी तिथे पालट होतच नाही , उलट दोघांचाही जीव जातो ! तसेच "अहं ब्रह्मास्मि" ह्या ज्ञानाने , विचाराने, "मी देहधारी जीवात्मा आहे" ह्या अज्ञानाचे, ह्या विचाराचे खंडन करायला गेल्यास तिथे अज्ञानही रहात नाही आणि ज्ञानही रहात नाही ! . . . माया योग्याची मा‍उली । जेथील तेथें ने‍ऊन घाली । कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥ श्रीराम ! अवांतर : हे असं काही आठवलं की कोल्हापुरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घ्यायची फार इच्छा होते ! पण मागच्यावेळेस दर्शनाला गेलेलो तेव्हा खुप रुसलो होतो जगदंबेवर. महाद्वारात उभा राहुन कडक नवस बोललो , आता तो पुर्ण जाल्याशिवाय तुझ्या दर्शनाला येणार नाही असं म्हणालो. तस्मात, आता बघु कधी बोलावणे धाडते ती ते !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Sat, 12/21/2024 - 07:06
गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि जागृत याचे तुम्ही दिलेले पहिले उदाहरण तर खुप प्रसिद्ध आहेच.आदि शंकराचार्य आणि अद्वैत यांचा अभ्यास करतांना ही पोस्ट मागे एकदा लिहिली होती,ती देते.यात तेच पुन्हा समजते शुद्ध ब्रम्ह... शुद्ध चैतन्य..हेच अद्वैत..पाप पुण्य परे आहे _/\_मलापण काहीतरी सापडलंय..पण नीट मांडता येत नाही.तुम्ही इतक अभ्यासपूर्ण मांडता ,हेवा वाटतो :) धन्यवाद! एक गंमत सांगते याविषयावर एक लेख वाचला होता. याला hallucinations म्हटले जाते???(लोकांना विचारावर विचार करणाऱ्यांना सिक म्हणावं वाटतं, आश्चर्यच आहे ;) #अद्वैत #consciousness अद्वैत तत्त्वज्ञान जाणतांना जनक राजाची गोष्ट समजते. जनक राजाला स्वप्न पडते.त्यात शत्रूंनी त्याच्या राज्यावर आक्रमण केले आहे.तो हरतो,अन्नान दशेत फिरतो.कोणी त्याला शत्रू भीतीने खायला देत नाही.राजा भुकेलेल्या लोकांच्या रांगेत उभा राहतो.जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा अन्न संपते.त्याला उरलेली खरवड मिळते.या सगळ्या अपमानामुळे राजा कोलमडतो आणि रडत देवाचा धावा करत कोसळतो. या दरम्यान झोपेत त्याचा ह्रदय वेग वाढतो, तो जागा होतो.आरडा ओरडा करतो.राणी , सेनापती सर्व राजाला समजावतात.पण राजा बडबडत राहतो. शेवटी अष्टावक्र ऋषी येतात. राजा त्यांना विचारतो" सर्व म्हणत आहे ते स्वप्न होते,पण मी तो अपमान ती अन्नाची भूक सगळं अनुभवलय मग ते खोटं कसं?आता ते कसं नाही?" अष्टावक्र म्हणतात "राजा आता इथे तुला राणी दिसत आहे.सगळ्यांनाही दिसते.ही जागृत अवस्था मना बाहेर पाहते,ही सत्य आहे.स्वप्नात घडलेल्या गोष्टीं मधले शत्रू ,राणी,तुझी भूक याच साक्षीदार तू आहेस तीही स्वप्न अवस्था सत्य आहे.हेही सत्य तेही सत्य.जगत मिथ्या,दोन्ही अवस्थेत तू खरा आहेस." याच्या पुढेच सोन्याचे उदाहरण दिले जाते.सोन्याचे दागिने हार,बांगड्या केल्या जातात.पण हे सर्व वितळवलं तर राहते सोनं राहतेच. ही स्वप्नं,जागृत अवस्थेत आपणच असतो.तेच ब्रम्ह तत्व ,तीच ब्रम्ह अवस्था सतत जाणून राहिल्यास आपण कधीही स्थिर राहू शकतो. चेतनेची एकच कायमस्वरूपी अवस्था आहे आणि ती म्हणजे ब्रह्म. यात जगत मिथ्या म्हटलं गेलंय.पण शंकराचार्यांनी जगाला मिथ्या मानलं नाही.तर जगत आहे,मायाने जग बुद्धीवर आवरण चढून ब्रम्ह अवस्थेचा विसर पडतो. -भक्ती

In reply to by Bhakti

वाह भक्ती ताई ! मलाही अष्टावक्रगीतेची आठवण आलेली . त्यातील एक श्लोक उदृत करतो : मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ आणि म्हणुनच एकदा 'अघमर्षण ' केले की तुम्ही सुटलेले आहात ! त्यानंतर तुमचे सर्व प्रापंचिक व्यवहार हे खेळ आहेत बस्स ... तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥५॥ ___________/\____________

२-३ वेळा वाचला--पण झेपत नाहीये. असो. आपल्याला सगळे समजलेच पाहीजे असा आग्रह नाही. ते रमण महर्षी आणि नीमकरोली बाबा यांच्यामधे कोण आहेत हो गालातल्या गालात हसणारे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti Sat, 12/21/2024 - 07:14
हे नगरचे अवतार मेहेरबाबा! नक्की भेट द्या ,इतके शांत स्थळी आहे.यावरचा आधीचा लेख https://www.misalpav.com/node/49208 फोटो गेले आहेत.विकिपिडिया सर्च करा फोटोसाठी मेहेराबाद,अहिल्या नगर.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कर्नलतपस्वी Sat, 12/21/2024 - 07:29
+१ मातुल घराण्यात दत्तसंप्रदायाच्या अधिकारी,अनुग्रहित व्यक्ती होऊन गेल्यात. माझी पणजी,पणजोबा आणी आजोबा मामा देशपांडे. प्रेम मिळाले पण ज्ञान नाही. मी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या साधू सारखा. साधू तपस्या करत असताना त्यांना देव भेटला. महाराजांनी विचारले ,देवा मोक्ष कधी मिळणार?देव म्हणाला, या झाडावर जीतकी पाने आहेत तितक्या वर्षानंतर. सध्या पाने मोजत आहे. लिहीत रहा वाचत राहू. जेव्हां उजाडेल तेव्हां उजाडेल. काही घाई नाही.

In reply to by Bhakti

प्रचेतस Sat, 12/21/2024 - 13:25
ह्या विषयी शांतिपर्वातील जनक-पंचशिख संवाद व तद्नुषंगाने होणारे बौद्धमताचे खंडन मुळातून वाचणे आवश्यक आहे.

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 05:25
साष्टांग दंडवत प्रगो. हे सगळे मजसारख्या पामरांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगावे ही नम्र विनंती.
शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. -- उदाहरणार्थ मला ('मी' ला) या दोन्हीपैकी काहीच वाटत नाही. अश्या लोकांनी काय करावे ?

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्त काका. आपण नेहमी आवर्जुन प्रतिसाद देता हे लेखनाचा हुरुप वाढवणारे आहे.
अश्या लोकांनी काय करावे ?
सगळ्यांना सगळं कळलेच पाहिजे असा दुराग्रह नाही. ह्या इथे मला अमृतानुभवातील ३ ओव्या उधृत कराव्याश्या वाटतात :
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तरी ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तरी कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
समजा राजाला तुम्ही तुम्ही राजा असे नाही म्हणालात तरी तो राजाच असतो. त्याचे राजेपण तुम्हाला जो प्रत्यय येतोय किंव्वा येत नाहीये ह्यावर अवलंबुन नसते. तसेच शिवस्वरुपाला तुम्ही समजुन घेतले काय किंवा नाही समजुन घेतले काय , त्याने काहीच फरक पडत नाही ! आहे हे असं आहे. :) दोन्ही पैकी काहीच वाटत नाही हे अनध्ययनाचे प्रतीक आहे, आता सगळ्यांनी अध्ययन केलेच पाहिजे असा आपला हट्ट नाही. तुम्हाला हौस असल्यास करा , नसल्यास नका करु. हे समजुन घ्यायची हौस आहे पण कळत नाहीये असे म्हणत असाल तर मात्र मी तुम्हाला शंकराचार्य उपनिषदभाष्य वगैरे वाचण्याआधी, लोकमान्यांचे गीतारहस्य वाचन करा असे सुचवेन कारण त्यांनी एकदम उत्तम पध्दतीने स्टेप बाय स्टेप विवेचन केले आहे ! :) पुनश्च एकवार धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 09:51
मुळात 'पाप' म्हणजे (नेमके) काय ? विविध धर्मात वेगवेगळ्या कृत्यांची गणना 'पाप' म्हणून होते. तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?

In reply to by चित्रगुप्त

तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?
>>> उत्तर वर लेखातच आहे अगदी सुरुवातीलाच !

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Fri, 12/20/2024 - 17:20
अध्यात्म वैगेरे फारसे समजत आणि पटत नसल्याने बाकी काही नाही. पण लेखात पाप म्हणजे काय हे सापडले नाही. पापाची दोन उदाहरणे मात्र आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा Sat, 12/21/2024 - 20:00
प्राडॉ ..... पण फूल टू करमणूक असते म्हणून असे विषय इंजॉय करण्याशी असहमत .. असं वाचन करत हळूहळु समजुन घेणं, प्रगल्भ होत जाणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.. गंभीरपणेच घ्यायला हवी असं मला वाटतं !

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 12/20/2024 - 10:04
ह्या बद्दल धन्यवाद.... नक्कीच वाचीन... अहंकार कमी करायला, ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो का? कारण, कमी अधिक प्रमाणात, प्रत्येक व्यक्तीला थोडा तरी अहंकार असतोच.

In reply to by मुक्त विहारि

आपल्याला अहंकार कमी करणे जास्त करणे वगैरे सव्यापसव्य करावयाचे नाहीत, आपल्याला फक्त ह्यातील "अहं" कोण आहे एवढाच शोध घ्यायचा आहे . तुम्हाला गीतारहस्यातील चौथ्या प्रकरणात "आधिभौतिक सुखवाद" ह्या प्रकरणात उत्तर मिळेल अशी आशा आहे !

In reply to by मुक्त विहारि

सखोल अभ्यास असे नाही पण वाचन मात्र नीट केले आहे. माझ्या मते गीतारहस्य हा इतका लोकोत्तर ग्रंथ आहे लोकमान्यांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात स्वदेश स्वराज्य ह्या विषयी काडीमात्र काम केले नसते तरीही केवळ हा एक ग्रंथ लिहिला म्हणुन त्यांचे नाव इतिहासात कोरलेच गेले असते ! अवांतर : गीतारहस्याच्या , त्यातील सिध्दांतांच्या , अनुमानांच्या काही मर्यादा आहेत , पण वेदांताचा , आचार्यांच्या भाष्याचा सखोल अभ्यास केलेल्या व्यक्तींनाच त्या जाणवु शकतात . तस्मात त्याविषयी मी बोलणे टाळतो . अन केवल माऊलींची ज्ञानेस्वरीतील ही ओवी उधृत करतो : जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥ जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ १७२ ॥ धन्यवाद !

प्रचेतस Fri, 12/20/2024 - 06:23
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि ॥ योहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि ॥ अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा ॥
तुमच्या विधानात "मी" आणि "ब्रह्म" यांना समानार्थी मानले आहे, मात्र यामध्ये तर्कसुसंगती आवश्यक आहे. "मी" म्हणजे व्यक्तीचे अहंभाव किंवा आत्मचेतना. "ब्रह्म" म्हणजे विश्वव्यापी, शाश्वत, निर्गुण सत्य. व्यक्तीचा "मी" (अहं) मर्यादित असतो, तर ब्रह्म अमर्यादित आहे. मग मर्यादित "मी" अमर्यादित "ब्रह्म" कसा होऊ शकतो? शिवाय ज्ञान ही निर्जीव गोष्ट नाही, तर ज्ञान हे अनुभवातून साकार होते. मग फक्त "मी" ला ज्ञान कसे म्हणता येईल? "मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते. खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म. येथे "मी" म्हणजे शुद्ध आत्मा आहे, जो ब्रह्माशी एकरूप आहे. शेवटी हा द्वैताद्वाचा खेळच झाला.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली सर !
"मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते.
अगदी अगदी एकदम योग्य बोललात ! ही साधनेच्या स्तरावरील शेवटची पायरी मानतात . तुमच्या पायात लोखंडाची बेडी होती, त्याची तुम्हाला किल्ली सापडली, ती किल्ली मात्र शुध्द सोन्याची आहे ! आता तुम्ही ह्या किल्लीने लोकांडाच्या बेडीतुन मुक्त झालात तर किल्लीचीही गरज नाही ना ! बेडी काढुन टाकली तशी किल्ली ही टाकुन द्या ! किल्ली सुंदर आहे, मौल्यवान आहे, असे वाटते त्यांची अवस्था दयनीय आहे . #माय_प्रेशियस इये विषयी आपल्याला इशोपनिषदात एक सुंदर विधान सापडते
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते। ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥
जे लोक "मी ब्रह्म नाही , काहीतरी भिन्न देह वगैरे आहे " ह्या अज्ञानाचा आश्रय करुन राहतात ते अंधःकारात भरकटालेले आहेत, मात्र जे "मी ब्रह्म आहे" ह्या ज्ञानात गुंतुन पडले आहेत ते त्याही पेक्षा गहन अंधःकारात भरकटलेले आहेत ! ! ह्यावर ओशो ने अतिषय सुंदर प्रवचन दिलंय पण मला आत्ता त्याची लिंक सापडत नाहीये .
खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म.
अगदी बरोबर. ह्या ब्रह्मानुभवात, अनुभव , अनुभाव्य आणि अनुभाविक राहातच नाहीत ! काय बोलणार ! जे जे काही ह्या वस्थेचे वर्णन करणारे साहित्य आहे ते सारे त्या लोकांनी लिहिलेले आहे जे ह्या शुध्द ब्रह्म अवस्थेतेतुन एक पातळी खाली उतरले आहेत . आणि संस्कृतमध्ये खाली उतरणे ला काय म्हणतात ? अव + तर = अवतार ! शुध्द अनुभव हा शब्दातीत आहे - त्या साठी आचार्यांनी अपरोक्षअनुभूती असा शब्द वापरला आहे, समर्थांनी अनुर्वाच्च समाधान असा शब्द वापरला आहे , माऊली म्हणतात >
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
मीही हे जे काही लिहितोय हा सगळा शब्देविण संवादु , दुजेविण अनुवादु आहे. "ज्यांना कळतं, त्यांना कळतं" , ते माझ्याकडे पाहुन फक्त हसतात गालातल्या गालात. त्यांना माहीती आहे मी कोण आहे , मला माहीती आहे ते कोण आहेत . :) m meherbaba nkb

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Sat, 12/21/2024 - 12:17
प्रगो सर, काही तात्विक चर्चा- किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. "विद्या आणि अविद्या" यांचे उदाहरण दिले गेले आहे, परंतु दोन्ही अवस्थांमध्ये अंधःकार असल्याचे विधान चुकीचे वाटते. ज्ञान (विद्या) हे नेहमीच प्रकाशाचा स्रोत मानले जाते, आणि त्यामध्ये गहन अंधःकाराचा उल्लेख करण्याचा अर्थ आत्मज्ञानाच्या संकल्पनेलाच विरोधाभासी ठरतो. त्यामुळे इथे उपनिषदातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. तुम्ही नंतर अवताराचा उल्लेख केलात त्याच्याच व्याख्येनुसार "अवतार" म्हणजे खाली उतरणे असे मानले गेले आहे, पण शुद्ध ब्रह्मानुभवातून खाली येणे म्हणजे तो अनुभवच भंग पावतो. खाली उतरलेल्या व्यक्तीला त्या अवस्थेचा पूर्ण सत्यभाव कसा सांगता येईल? आता तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता की "शुद्ध अनुभव हा शब्दातीत आहे." हे विधान योग्य आहे, परंतु अनुभवाची संकल्पना मांडण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो. तुम्हीच श्लोकांचा, वाक्यांचा उपयोग करत आहात, म्हणजे स्वतःच्या विधानाचाच विरोध करत आहात.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Sat, 12/21/2024 - 22:58
किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. काही अंशी सहमत | एकदा बेडीतून मुक्त झाल्यावर किल्लीचा उपयोग नाही म्हणून किल्ली सोन्याची असली तरी (नव्हे सोन्याची असल्यामुळेच टाकून द्यावी, नाहीतर तिचा देखील मोह होतो) अशा अर्थाने वाचावे. मात्र एकदा बेडी सुटली म्हणजे परत मनुष्य बेडीत अडकणारच नाही असे देखील नाही. मात्र नवीन बेडीला पुर्वीचीच किल्ली लागेल काय याची शाश्वती नाही. (किंबहुना न लागण्याचीच शक्यता अधि़क) त्यामुळे कदाचित किल्लीचा त्याग करावा असा विचार असावा. अहंकारमुक्त होण्याचा साधनेचाच माणसास अहंकार येतो अशी उदाहरणे जागोजागी सापडतात. मानवदेह म्हटला की अहंकार, मोह मरेपर्यंत सुटत नाही. साधूला लंगोटीचा देखील मोह पडतो अशी देखील उदाहरणे आहेत. मात्र आपण प्रयत्न करावे. अपयश देणे न देणे दुसर्‍या कोणाच्या तरी हाती आहे असे समजले की कर्माचा अहंकार आणि साधनेचा भार होत नाही. असो.

उजव्या हातात पाणी घ्या , ऋतं च सत्यं ... म्हणा , ओंजळीतील पाण्यावर उछ्वास टाकून ते डाव्याबाजूला टाकून द्या. झालं अघमर्षण। आता पापं संपली.
चला लागा कामाला...! =)) -दिलीप बिरुटे (पापमुक्त)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला लागा कामाला...! =))
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही ! पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे , मोठ्ठ्या माश्याने छोट्या माश्याला खाल्ले म्हणुन त्याला पाप लागत नाही :) ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही ! धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 10:18
ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही !
रूढीप्रमाणे 'द्विज' जरी असलो तरी 'पाप म्हणजे काय माहीतच नाही' या क्याट्यागरीत 'मी' येत असल्याने या भानगडीत पडण्याचे कारण नाही. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

एक्झ्यॅक्टली काका एक्झ्यॅक्टली ! मनुस्मृती अन अन्य अनेक ठिकाणी हे जे काही म्हणले आहे की "वेदाध्ययनाचा , उपनिषदांचा अधिकार केवळ द्विजांना आहे , इतरांना नाही. " त्याचा अर्थ हाच होता जो तुम्ही वर लिहिलेला आहे. इतरांना गरजच नाही ह्या भानगडीत पडायची ! आता द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण . कारण क्षत्रिय वैश्य असं कोणी राहिलंच नाही. आता ह्या ब्राह्मणातही तुम्ही म्हणालात तसे बहुसंख्य हे "रूढीप्रमाणे 'द्विज' " असल्याने त्यांनाही गरज च नाही वेदाध्ययन उपनिषद वगैरे अभ्यासण्याची ! ह्याला उच्च्नीचता किंवा भेदभाव म्हणुन बघुच नका. ही केवळ अनावश्यकता आहे ! as simple as that ! अगदी पटकन सहज सुचले म्हणुन एक मजेशीर उदाहरण सांगतो - तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 13:37
तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे
यावरून आठवले, 'सैराट' च्या दोनतीन गाण्यांचे रेकॉर्डिंग अमेरिकेत झाले. भलामोठा सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. त्यांना वाजवण्यासाठी दिलेले लिखित संगीताचे 'स्कोअर्स' अजय-अतुललापण दिले गेले, त्यांनी संगितले की आम्हाला यातले काहीही समजत नाही. तिथले वादक थक्कच झाले की यांना काहीही कळत नसता एवढी सुंदर संगीतरचना मुळात यांनी केलीच कशी ? https://youtu.be/yo4E0tWGcV4?si=tB-nNrYzTh_29bmx

In reply to by चित्रगुप्त

तुर्रमखान Fri, 12/20/2024 - 14:33
कै कै गोष्टींचं फारच शैक्षणिकीकरण झाल्यामुळे एका विशिष्ठ साच्याच घालून त्याला कैतरी नाव देवून शिकवणं सुरू झालं. एखाद्याला तो प्रकार माहीत नसणं म्हणजे ती संकल्पनाच माहीत नसणं असं होत नाही. एकही भाषा ज्ञात नसलेली व्यक्ती विचार करू शकतेच की. 'एखादी गोष्ट पाप आहे हे माहीत नसेल तर पाप लागत नाही' म्हणजे तर हैट आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे....
होय, मलाही धक्का बसलेला हे लक्षात आल्यावर . सध्या धर्मशास्त्राचा इतिहास वाचत आहे आमचा भारतरत्न पां.वा. काणे सरांनी लिहिलेला. त्यात काही प्रकर्षाने जाणवलेली उदाहरणे लिहितो इथे . समुद्रउल्लंघन हे पाप मानले जायचे . धर्मशात्रानुसार हे पाप फक्त ब्राह्मणांच्या करिता होते , क्षत्रिय वैश्य शुद्रांना मुक्त संचार करण्याची मुभा होती. मद्यपान हे पाप मानले जायचे - पण हे फक्त ब्राह्मणांच्या आणि वैश्यांच्या करिता, क्षत्रिय आणि शुद्रांना मद्यपानाची मुभा होती. धनसंचय करणे हे ब्राह्मणाच्यासाठी पाप मानले होते मात्र क्षत्रिय वैश्यांना आणि शुद्रांना त्याची मुभा होती. धर्मशास्त्रात त्रैवर्णिकांना घटस्फोट नावाचा विधीच नाही, पण शुद्रांना काडीमोड घेण्याची मुभा होती. थोडक्यात काय तर पाप आणि प्रायश्चित्त हे बहुतांश करुन द्विजांकरिताच होते , शुद्रांना बहुसंख्य वेळा हे नियम, ह्या संकल्पना बांधील नसत ! खुप उदाहरणे आहेत. सर्वच लिहित बसत नाही. धर्मशास्त्राचा इतिहास संपुर्ण वाचुन झाल्यावर सारांश रुप लिहिण्याचा मानस आहे तेव्हा लिहिन नक्की !

In reply to by प्रसाद गोडबोले

धक्का वगैरे काही बसवून घ्यायचे नाही. वाचन आणि समज वाढली की, हळुहळु सगळं लक्षात येत जातं. साक्षात ज्या विधात्याच्या मुखातून द्विजन उत्पन्न झाल्यामुळे, आणि त्याच्या श्रेष्ठत्वामुळे जे सर्व वर्णाचे जे स्वामी बनले आहेत त्यांना खरं तर, पाप पूण्य वगैरे नसायलाच पाहिजे होतं. क्षत्रीय वैश्य शूद्र यांच्या जिविताचे मोल तसं ही धर्मशास्त्रानूसार अल्प समजल्या जात होतं. गतजन्मातील पाप-पुण्य कर्म-आणि पापांमुळेच तर, त्यांना अपवित्र अशा क्षत्रीय-वैश्य किंवा शुद्राचा जन्म त्यांना मिळाला असावा. (अवघड आहे सगळं ) ज्या कोणी बिचा-या सुत्रकारांनी द्विजनांना समुद्रौल्लंघन पाप ठरवले असेल त्यांचा अभ्यास कमी पडला असावा असे वाटते. आणि ज्यांनी कोणी असे समुद्रोल्लंघन केले असेल ते डाव्या-उजव्या बाजूला पाणी शिंपडून तसेही पापमुक्त झालेच असतील. शास्त्रे -सुत्रे ही आजच्या भाषेत त्याकाळातील सर्वोच्च कायदे असल्यामुळे त्यांनी जे लिहिले आहे, इतरांनी तितकेच फॉलो करायचं. विधात्याच्या मुखातून निर्माण झालेले ऑलरेडी पवित्र आणि सर्वोच्च होते. शास्त्रांच्या नियमांनुसार वागतांना इतर आणि स्ववर्णांवर वचक राहिला पाहिजे, इतरत्र जगभ्रमण करु नये म्हणून त्याला पाप ठरवले असावे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:29
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही !
च्यामारी ब्राह्मण कोण? क्षत्रिय कोण? वैश्य कोण? आणि शुद्र कोण? ह्यावर प्रचंड वैचारिक गोंधळ माजला आहे माझ्या डोक्यात! जात्याधारित वर्णव्यवस्था मानावी तर अस्मादिकांचा जन्म कोकणस्थ ब्राम्हण परिवारात झाला आहे त्यामुळे 'ब्राम्हण' असे म्हणता येईल! कर्माधारित वर्णव्यवस्था मानावी तर मी एक व्यापारी/व्यावसायिक असल्याने वैश्य, माझ्याकडे नोकरीवर रुजू होणाऱ्यांना काम कसे करावे ते शिकवतो म्हणजे अध्यापन करतो म्हणुन ब्राम्हण, (पूर्वी समाजातील कोणासाठीही रस्त्यावरही उतरणारा) पण आता फक्त परिचयातील कोणावरही अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उभा राहतो त्यामुळे क्षत्रिय, की घरी नेमलेले सफाई कर्मचारी अनुपस्थित असतील त्यादिवशी किंवा विकएंड होमवर कोणी मदतनीस उपलब्ध नं झाल्यास आपल्याच घरातील संडास साफ करावा लागल्यास, किंवा फार्म वरील एखाद्या पाळीव प्राण्याचा अंत्यसंस्कार आपल्याच हातानी करावा लागल्यास शूद्र ठरणार असीन तर मी नक्की कोण आहे? त्यामुळे माझ्या मते मी आणि माझ्या आजूबाजूला राहणारे / वावरणारे / बोलणारे सगळे मनुष्यप्राणी आहेत... त्यांची जात कुठली आणि धर्म कुठला ह्याला माझ्यादृष्टीने तरी काही महत्व नाही आणि त्याच्या तपशीलात जायची मलातरी गरज वाटत नाही. माझे काही गैरसमज असल्यास ते जरूर दूर करावेत... पण कृपया बोली/व्यावहारिक भाषेत... ती वेद आणि उपनिषादांची भाषा मज पामराच्या आकलनाच्या पलीकडची आहे साहेब!

In reply to by टर्मीनेटर

नमस्कार टर्मिनेटर ! ब्राह्मण - ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण क्षत्रिय - आपल्या भूमीची देशाची धर्माची देवाची संस्कृतीची रक्षा करतो तो क्षत्रिय वैश्य - जो देशात वास करतो , दैनंदिन व्यवहार चालावेत म्हणुन कामे करतो शेती , पशुपालन , कोणत्याही प्रकारचा व्यापार करतो वैश्य शुद्र - वरील त्रैवर्णिकांना त्यांच्या कामात मदत करतो तो शुद्र . वैदिक कालात कर्माने ठरत होते वर्ण , नंतर जन्माने ठरायला लागले , आता वृत्तीने ठरतात असे माझे मत आहे. सो सोप्प्या शब्दात बोलायचं तर तुम्हाला चॉईस आहे तुम्हाला कोणता वर्ण निवडा ! कोणी उच्च नाहीये कोणी नीच नाहीये , जो तो आपापल्या कामात महत्वाचाच आहे. पुरुषसुक्तात म्हणलं आहे तसे - एका देहाचे अवयव ! बाकी धर्माची उतरंड जातींचे पिरॅमिड ही संकल्पनाच चुकीची आहे. उपमा द्यायचीच झाली तर गोएथिक आर्च ही उपमा देता येईल arch ह्यात की स्टोन शीर्षस्थानी आहे म्हणुन तो उच्च असे ठरत नसते , ह्या कमानीतील अन्य कोणताही दगड त्या की स्टोन इतकाच महत्वाचा असतो. कारण कोणताही काढला तरी आर्च ढासळणारच आहे ! असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र एकामेकांवर अवलंबुन आहेत ! थोडक्यात काय तर तुम्हाला तुमचा वर्ण कोणता हे ठरवायची मुभा आहे ! लोकं काहीही का म्हणेनात - इट्स युवर लाईफ, युवर चॉईस !

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस Sat, 12/21/2024 - 08:57
हे कितीही आदर्शवादी वाटत असलं तरी वास्तवात तसं नसतं. कर्माधारीत वर्णव्यवस्था असती तर उच्चकुलीन क्षत्रिय विश्वामित्राला ब्राह्मण बनण्यासाठी इतका संघर्ष करावा लागता ना. इथं तर वैश्य शूद्रांचा विषयच नाही.

In reply to by कॉमी

Bhakti Sat, 12/21/2024 - 11:13
असे लोक धर्माचे रक्षक नाहीत,धर्माचे भक्षक आहेत.ज्ञान साधना जन्माधारित वर्णव्यवस्थेवर आता नक्कीच नाही. आजच्या ही काळात ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा वर्ण मानणारे फेल गेले आहेत.हेच लोक( अशुद्ध विचारसरणी) सनातन बुडवणार....

In reply to by प्रचेतस

अरे वा ! सर्वच जण इतक्या श्रध्देने जन्माधारित वर्णाश्रम व्यवस्था मानत असतील तर त्यात मला आनंदच आहे ! वर्णाश्रमव्यवस्थेने घालुन दिलेली कर्माची बैठक हाच चारही पुरुषार्थांचा आणि विशेषकरुन मोक्षाचा सर्वात सुलभ मार्ग आहे . इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन:। संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ आणि विश्वामित्रांच्या विषयी आपण स्वतंत्रपणे बोलु कारण तो मोठ्ठा विषय आहे. तुर्तास इतकेच म्हणतो कि विश्वामित्रांची वृत्ती क्षत्रियच होती. त्यांची ब्राह्मण होण्याची मनीषा मुळातच वसिष्ठांच्या प्रति असलेल्या असुयेतुन निर्माण झाली होती. कामधेनु आपल्याकडे असावी ह्या इर्ष्येतुन झालेली होती . ही मुळ वृत्ती बदलल्या शिवाय कसे ब्राह्मण होता येईल ? मात्र एकदा ती वृत्ती बदलल्यावर ब्राह्मण विश्वामित्रांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो अक्षरशः लोकोत्तर होता - गायत्री मंत्र जो सर्वात पवित्र मंत्र मानला जातो त्याचे ऋषी हे विश्वामित्र आहेत ! वसिष्ठ नाहीत !! असो. अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर Sat, 12/21/2024 - 10:35
"अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from !"
कर्मधर्मसंयोगाने आमचेही गोत्र कौशिक आहे 😀 So now you know where 'all this' is going to... 😂 BTW आत्ता सहज 'कौशिक गोत्र' असे गुगलवर टंकले तर खालील AI जनरेटेड रिस्पॉन्स आला. त्यातल्या ठळक केलेल्या गोष्टी वाचुन गंमत वाटली... कौशिक, ब्राह्मणों का एक गोत्र और उपनाम है. इसका नाम ब्रह्मर्षि विश्वामित्र के नाम पर रखा गया है. कौशिक गोत्र से जुड़ी कुछ और बातेंः
  • कौशिक एक प्राचीन भारतीय गोत्र है.
  • कौशिक गोत्र के लोगों को कौशिके भी कहा जाता है.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे काफ़ी गुस्से वाले होते हैं.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे नेपाल में हिमालय से निकलने वाली कोसी नदी के किनारे रहते थे.
  • विश्वामित्र को इसी नदी के किनारे तपस्या करते हुए ऋषि का दर्जा मिला था.
  • कौशिक एक भारतीय उपनाम भी है जो बरनवाल का एक गोत्र है.
जनरेटिव एआई की सुविधा फ़िलहाल एक्सपेरिमेंट के तौर पर उपलब्ध है. 😀

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Sat, 12/21/2024 - 12:12
कदाचित त्यामुळेच, तुझे आणि माझे, पहिल्याच भेटीत, विश्वासाचे नाते तयार झाले असावे का?
हा हा हा... असुही शकेल तसे, ब्रम्हर्षी विश्वमित्रांनाच ठाऊक 😀 बाकी ह्यावरुन वरती जो AI जनरेटेड रिस्पॉन्स दिला आहे त्यात
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि उनके आपस में ढेर सारे वैचारिक मतभेद होते हैं
असेही एक वाक्य असायला हवे होते असंही वाटायला लागलंय, कारण आपल्यातही अनेक बाबतीत पराकोटीची मतभिन्नता आहे आणि प्रगो त्यांच्या लेखनातुन/प्रतिसादांतुन जे विचार मांडत असतात त्यातल्या कित्येक विचारांच्या अगदी विरुद्ध टोकाचे माझे विचार असतात! गंमतच आहे सगळी 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

मुक्त विहारि Sat, 12/21/2024 - 13:12
पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Sat, 12/21/2024 - 13:37
मतभेद असणे ही गोष्ट वेगळी... पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
अर्थातच... आणि मतभेद असुनही विश्वास आणि मैत्री पण आहे म्हणुनच तर "गंमतच आहे सगळी 😂 😂 😂" असे लिहिले होते!
प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...
त्यांचे तत्वज्ञानावर आधारीत विचार माझ्याही पार डोक्यावरून जातात, पण सर्वसामान्य किंवा सामाजिक विचार जे सहज 'समजतात' त्यातल्या काही (किंवा बऱ्याच म्हणा हवंतर) बाबतीत वैचारीक मतभेद आहेत असे म्हणयचे होते 😀

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sat, 12/21/2024 - 11:57
मान्य आहे... सामजिक स्तरावर हे मान्य होणे कठीण आहे...(पण अशक्य नाही. कारण तसे असते तर, वाल्या कोळी याला, वाल्मिकी ऋषीं, हे पद नसते मिळाले.) आपण आपला वैयक्तिक पातळीवर विचार करायचा.. आपल्या पुरती तरी जात पात पाळायची नाही. इतर जनतेला जसा विचार करायचा असेल तसा करू देत.. आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, प्रत्येकाचे वैयक्तिक कपाट वेगळेच असते.आपली कापडे त्यात कोंबायला जाऊ नये.

कंजूस Fri, 12/20/2024 - 16:30
ज्यांना गणितातील सेट थिअरी. सेट डायग्राम्स माहिती आहेत त्यांना चित्रे काढून दाखवता शक्य आहे. शब्द जंजाळाशिवाय. एका विश्वात अनेक विश्व असतात. त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. ती संपूर्ण वेगळीच असतात. राजाचं राज्य आणि त्यातली प्रजा एक विश्व धरलं तरी अरण्यात शिकारीला गेल्यावर तिथल्या भिल्ल, अरण्यवासीयांवर त्याचा आदेश चालत नाही. ते अरण्य त्याच्याच राज्यात असलं तरी.

In reply to by कंजूस

गणितातील सेट थिअरी >>> होय होय. मलाही संख्याशास्त्रचा विध्यार्थी असल्याने असा विचार करायला आवडते ! ह्याला अ‍ॅनालिटिकल फिलॉसॉफी म्हणतात . मी एक दोन दा तसा प्रयत्न केला होता , सर्व काही गणिती भाषेत लिहायचा . पण त्यावर एक मित्र बस मला इतकेच म्हणाला - Gödel's incompleteness theorems ! "Any consistent formal system F within which a certain amount of elementary arithmetic can be carried out is incomplete; i.e. there are statements of the language of F which can neither be proved nor disproved in F." आता ह्यावर काय बोलणार ! आम्हाला आता शब्दजंजाळाशिवाय पर्यायच नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

कंजूस Sat, 12/21/2024 - 12:53
'मी' नावाचा एक गोल दुसऱ्या एका मोठ्या गोलात काढला आणि त्या मोठ्या गोलाला ' ब्रह्म' हे नाव दिले तर मी आणि ब्रह्म यांचे स्पष्टीकरण खूप शब्दजंजाळापेक्षा सोपे होईल समजायला. अशीच चित्रे काढून विविध कल्पना समजावता येतील. परंतू 'ज्ञान' किंवा 'विद्या' यांचे गोल कुठे आणि कसे दाखवायचे हे फार कठीण आहे कारण त्यांच्या व्याख्याच स्पष्ट होत नाहीत. सर्व गोल हे एकाच प्रतलावर आहेत असं समजून आपण चित्र मांडायला बसतो तेव्हा काही गोल वेगळ्याच प्रतलांत असण्याची शक्यताही लक्षात घ्यावी लागते. यातून तो ' Gödel's incompleteness theorems !' मांडला जात असणार.

Bhakti Fri, 12/20/2024 - 19:40
चैतन्याला पाप पुण्याचा भोग नसतो.तो जीवात्म्याला असतो.चैतन्यस्वरूपाचा ध्यास असावा,चैतन्याचा आदर असावा.
तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त
यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल.

In reply to by Bhakti

यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल. >> एक खुप सुंदर उदाहरण आठवलं - समजा तुम्ही झोपलेले आहात. अगदी गाढ झोपेत . इतके गाढ झोपेत की तुमच्यासाठी तुमचे स्वप्न हेच सत्य झालेले आहे . आता कल्पना करा की स्वप्नात तुमच्या मागे वाघ लागलाय , तुम्ही जीवाच्या आकांताने पळाताय , तरीही वाघाने तुम्हाला पकडलेच , वाघाची नखं तुमच्या बरगड्यात घुसत आहेत , वाघ तुमच्या नरडीच्या घोट घेत आहे , आता तुम्ही झोपेत जीवाच्या आकांताने ओरडताय , वाचवा .... वाचवा ! आता तुम्हाला ह्या वाघापासुन वाचवण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय काय ? तुम्हाला झोपेतुन जागे करणे ! दॅट्स इट ! मी जीवात्मा आहे, ह्या देहात अडकलो आहे , हे भोग भोगतोय, वगैरे वगैरे स्वप्नातील भास असल्यासारखे आहे, त्यापासुन तुम्हाला तुम्हीच वाचवु शकता ! बस विचाराने विचार बदलुन ! समर्थ म्हणातात : इतुकीं वेडें लाविलीं । ते माथा खेळे खेळ येकली । ते मायेनेंच विराली । पाहिजे माया ॥ श्रीराम मी जीवात्मा आहे , असे वाटणे ही माया आहे , भास आहे , माया तीची ती एकटीच खेळत आहे , तिचा नाश कसा करणार ? मी शिव आहे ह्या धारणेने , ह्या विचाराने . पण हा विचारही मायाच आहे की ! मायेचे बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ।मायाचि गोंवी आणि बंधन । तोडी , तेही माया ॥ श्रीराम आणि माऊलींचे काय बोलणार , त्यांनी तर कहर उपमा दिली आहे ! जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें । तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ जसे पती पत्नीने आपला अनुभव घ्यायचा म्हणुन आपपली मस्तके छाटली अन दुसर्‍याला बसवली तरी तिथे पालट होतच नाही , उलट दोघांचाही जीव जातो ! तसेच "अहं ब्रह्मास्मि" ह्या ज्ञानाने , विचाराने, "मी देहधारी जीवात्मा आहे" ह्या अज्ञानाचे, ह्या विचाराचे खंडन करायला गेल्यास तिथे अज्ञानही रहात नाही आणि ज्ञानही रहात नाही ! . . . माया योग्याची मा‍उली । जेथील तेथें ने‍ऊन घाली । कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥ श्रीराम ! अवांतर : हे असं काही आठवलं की कोल्हापुरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घ्यायची फार इच्छा होते ! पण मागच्यावेळेस दर्शनाला गेलेलो तेव्हा खुप रुसलो होतो जगदंबेवर. महाद्वारात उभा राहुन कडक नवस बोललो , आता तो पुर्ण जाल्याशिवाय तुझ्या दर्शनाला येणार नाही असं म्हणालो. तस्मात, आता बघु कधी बोलावणे धाडते ती ते !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Sat, 12/21/2024 - 07:06
गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि जागृत याचे तुम्ही दिलेले पहिले उदाहरण तर खुप प्रसिद्ध आहेच.आदि शंकराचार्य आणि अद्वैत यांचा अभ्यास करतांना ही पोस्ट मागे एकदा लिहिली होती,ती देते.यात तेच पुन्हा समजते शुद्ध ब्रम्ह... शुद्ध चैतन्य..हेच अद्वैत..पाप पुण्य परे आहे _/\_मलापण काहीतरी सापडलंय..पण नीट मांडता येत नाही.तुम्ही इतक अभ्यासपूर्ण मांडता ,हेवा वाटतो :) धन्यवाद! एक गंमत सांगते याविषयावर एक लेख वाचला होता. याला hallucinations म्हटले जाते???(लोकांना विचारावर विचार करणाऱ्यांना सिक म्हणावं वाटतं, आश्चर्यच आहे ;) #अद्वैत #consciousness अद्वैत तत्त्वज्ञान जाणतांना जनक राजाची गोष्ट समजते. जनक राजाला स्वप्न पडते.त्यात शत्रूंनी त्याच्या राज्यावर आक्रमण केले आहे.तो हरतो,अन्नान दशेत फिरतो.कोणी त्याला शत्रू भीतीने खायला देत नाही.राजा भुकेलेल्या लोकांच्या रांगेत उभा राहतो.जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा अन्न संपते.त्याला उरलेली खरवड मिळते.या सगळ्या अपमानामुळे राजा कोलमडतो आणि रडत देवाचा धावा करत कोसळतो. या दरम्यान झोपेत त्याचा ह्रदय वेग वाढतो, तो जागा होतो.आरडा ओरडा करतो.राणी , सेनापती सर्व राजाला समजावतात.पण राजा बडबडत राहतो. शेवटी अष्टावक्र ऋषी येतात. राजा त्यांना विचारतो" सर्व म्हणत आहे ते स्वप्न होते,पण मी तो अपमान ती अन्नाची भूक सगळं अनुभवलय मग ते खोटं कसं?आता ते कसं नाही?" अष्टावक्र म्हणतात "राजा आता इथे तुला राणी दिसत आहे.सगळ्यांनाही दिसते.ही जागृत अवस्था मना बाहेर पाहते,ही सत्य आहे.स्वप्नात घडलेल्या गोष्टीं मधले शत्रू ,राणी,तुझी भूक याच साक्षीदार तू आहेस तीही स्वप्न अवस्था सत्य आहे.हेही सत्य तेही सत्य.जगत मिथ्या,दोन्ही अवस्थेत तू खरा आहेस." याच्या पुढेच सोन्याचे उदाहरण दिले जाते.सोन्याचे दागिने हार,बांगड्या केल्या जातात.पण हे सर्व वितळवलं तर राहते सोनं राहतेच. ही स्वप्नं,जागृत अवस्थेत आपणच असतो.तेच ब्रम्ह तत्व ,तीच ब्रम्ह अवस्था सतत जाणून राहिल्यास आपण कधीही स्थिर राहू शकतो. चेतनेची एकच कायमस्वरूपी अवस्था आहे आणि ती म्हणजे ब्रह्म. यात जगत मिथ्या म्हटलं गेलंय.पण शंकराचार्यांनी जगाला मिथ्या मानलं नाही.तर जगत आहे,मायाने जग बुद्धीवर आवरण चढून ब्रम्ह अवस्थेचा विसर पडतो. -भक्ती

In reply to by Bhakti

वाह भक्ती ताई ! मलाही अष्टावक्रगीतेची आठवण आलेली . त्यातील एक श्लोक उदृत करतो : मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ आणि म्हणुनच एकदा 'अघमर्षण ' केले की तुम्ही सुटलेले आहात ! त्यानंतर तुमचे सर्व प्रापंचिक व्यवहार हे खेळ आहेत बस्स ... तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥५॥ ___________/\____________

२-३ वेळा वाचला--पण झेपत नाहीये. असो. आपल्याला सगळे समजलेच पाहीजे असा आग्रह नाही. ते रमण महर्षी आणि नीमकरोली बाबा यांच्यामधे कोण आहेत हो गालातल्या गालात हसणारे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti Sat, 12/21/2024 - 07:14
हे नगरचे अवतार मेहेरबाबा! नक्की भेट द्या ,इतके शांत स्थळी आहे.यावरचा आधीचा लेख https://www.misalpav.com/node/49208 फोटो गेले आहेत.विकिपिडिया सर्च करा फोटोसाठी मेहेराबाद,अहिल्या नगर.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कर्नलतपस्वी Sat, 12/21/2024 - 07:29
+१ मातुल घराण्यात दत्तसंप्रदायाच्या अधिकारी,अनुग्रहित व्यक्ती होऊन गेल्यात. माझी पणजी,पणजोबा आणी आजोबा मामा देशपांडे. प्रेम मिळाले पण ज्ञान नाही. मी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या साधू सारखा. साधू तपस्या करत असताना त्यांना देव भेटला. महाराजांनी विचारले ,देवा मोक्ष कधी मिळणार?देव म्हणाला, या झाडावर जीतकी पाने आहेत तितक्या वर्षानंतर. सध्या पाने मोजत आहे. लिहीत रहा वाचत राहू. जेव्हां उजाडेल तेव्हां उजाडेल. काही घाई नाही.

In reply to by Bhakti

प्रचेतस Sat, 12/21/2024 - 13:25
ह्या विषयी शांतिपर्वातील जनक-पंचशिख संवाद व तद्नुषंगाने होणारे बौद्धमताचे खंडन मुळातून वाचणे आवश्यक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अघमर्षण : संध्येमधील एक महत्वाचा विधी. अघमर्षण म्हणजे पापाचा नाश करणे , त्याग करणे ! पण मुळात पाप म्हणजे काय ? पाप, शिक्षा आणि प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय ? शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. त्या पापाची शिक्षा म्हणजेच द्वैत. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. त्या पापाची शिक्षा म्हणजे असं "वाटणं". अरे पण मग ह्याचे प्रायश्चित्त काय ? कसा त्याग करायचा ह्या पापांचा ? तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त . म्हणून आता अघमर्षण. https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk झाला विचार .

उस्ताद झाकीर हुसेन. एक आठवण

नीलकंठ देशमुख ·

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 18:15
अनुभव कथन आवडले... ध्यानी मनी नसताना अचानक आपले आराध्य दैवत समोर आले की मन सैरभैर होतेच. निळू फुले, यांच्या बाबतीत हा अनुभव घेतला आहे.

चौथा कोनाडा गुरुवार, 12/19/2024 - 20:07
लातूरला त्यांचे तबलावादन सुरु असताना अचानक वीज गेली.पण तबल्यावरची बोटे थांबली नाहीत‌. मेणबत्त्या लावल्या गेल्या.मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेल्या मंचावर झाकीर भाई,त्यांचा तबला, त्यावर थिरकणारी त्यांची बोटे हे दृश्य, त्यांनी तेव्हा निर्माण केलेल्या ताल विश्वाएवढेच किंबहुना त्याहून जास्त परिणाम करुन गेले.ते आज ही डोळ्यासमोर दिसत आहे.
अ ति श य सुंदर अनुभव !

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 18:15
अनुभव कथन आवडले... ध्यानी मनी नसताना अचानक आपले आराध्य दैवत समोर आले की मन सैरभैर होतेच. निळू फुले, यांच्या बाबतीत हा अनुभव घेतला आहे.

चौथा कोनाडा गुरुवार, 12/19/2024 - 20:07
लातूरला त्यांचे तबलावादन सुरु असताना अचानक वीज गेली.पण तबल्यावरची बोटे थांबली नाहीत‌. मेणबत्त्या लावल्या गेल्या.मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेल्या मंचावर झाकीर भाई,त्यांचा तबला, त्यावर थिरकणारी त्यांची बोटे हे दृश्य, त्यांनी तेव्हा निर्माण केलेल्या ताल विश्वाएवढेच किंबहुना त्याहून जास्त परिणाम करुन गेले.ते आज ही डोळ्यासमोर दिसत आहे.
अ ति श य सुंदर अनुभव !
लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद झाकीर हुसेन.   अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी  झाकीर हुसेन यांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पहिल्यांदा पाहिले.अत्यंत आकर्षक  व्यक्तीमत्व असलेले झाकीर म्हणजे प्रचंड उत्साह ,आणि चैतन्य.ते मंचावर  एकटे येत नसत .त्यांचा श्वासच जणू असलेला 'जीवलग 'तबला' दोन्ही हातात असे. त्यांच्या साठी ती निर्जीव वस्तू नव्हती.ते होते त्यांचे आराध्य दैवत! झाकीर भाई येण्याची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट सुरू होई तो थांबतच नसे.त्या स्वागताचा स्विकार करताना तेही श्रोत्यांना अभिवादन करत मंचावरच्या त्यांच्या अस्तित्वाने सगळे वातावरण भारून जात असे.

उस्ताद झाकिर हुसेन - भावपूर्ण श्रद्धांजली

मूकवाचक ·

समयोचित लेख!! आपण भाग्यवान आहोत की अशा कलावंतांना पाहायचा ऐकायचा योग आला. लेखात दिलेल्या लिंक बघता बघता हरवुन गेलो. नकळत डोळे पाणावले. ईश्वर झाकीरभाईंच्या आत्म्यास शांती देवो. बाकी युट्युबच्या माध्यमातुन ते जिवंत आहेतच.

समयोचित लेख...! आपण स्वत: काही तबला वादनातले एक्सपर्ट नसतो पण कानाला तो सुखद वाटणारा तो नाद, ताल अहाहा...! आपल्या जादुई हातांनी तबल्यावर ती वळवळणारी बोटं, एखाद्या मैफिलीत जुगलबंदीतला दैवी अद्भुत ताल-नाद निर्माण करणारा 'जादूगार' पाहिला की एकच दाद येते वाह उस्ताद वाह.... तबल्यावरची थाप खरंच 'शांत' झाली. तबला मूक झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा Wed, 12/18/2024 - 10:26
सुंदर संकलन ! कधीही या धाग्यावर येऊन उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा ताल कानात साठवून ठेवावा ! उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

किसन शिंदे गुरुवार, 12/19/2024 - 12:00
‘बजे सरगम हर तरफ से गुंजे उठकर देश राग’ असं एक गाणं यायचं लहानपणी दूरदर्शन वर, त्यामध्ये अनेक दिग्गज त्यांची संगीत वाद्ये वाजवताना दिसायचे, त्यामध्ये सर्वप्रथम उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांचे अफलातून तबला वादन पाहिले होते. उस्ताद झाकीर यांच्याशी झालेला माझा तो पहिला परिचय होता. त्यानंतर ताज चहाच्या जाहिरातीत “अरे वाह उस्ताद नही, वाह ताज बोलीये” म्हणत अगदी चपळतेने तबल्यावर आपली बोटे थिरकवणारे उस्ताद झाकीर हुसैन आणखी आवडत गेले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतली संतूर, बासरी अथवा सितार अशी कुठलीही वाद्ये असोत त्यांच्या जर जोडीने तबला नसेल तर ती मैफल मला कायम अर्धवट वाटत आलीय. अगदी तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी किंवा पंडित रवीशंकर शर्मा यांची सितार ही कायम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याच्या जोडीनेच ऐकल्याने काहीतरी परिपूर्ण ऐकल्याचे समाधान वाटत आलेय. त्यातही शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी ऐकणे म्हणजे माझ्यासाठी कायम पर्वणी राहत आलीय. गेली जवळपास २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सितार, संतूर, बासरी आणि तबला ही वाद्ये आणि ती वाजवणारे भारतीय शास्त्रीय संगीतातली ही धुरंदर लोक माझ्यासाठी कायम जवळची आणि आपली वाटत राहिली आहेत. याच प्रेमापोटी उस्ताद झाकीर हुसैन यांचे तबला वादन प्रत्यक्षात ऐकण्याचा योग दोन तीनदा जुळून आला, त्यातून एक कलाकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच दुणावला. यापूर्वी शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे जशी हुरहूर लागलेली, अगदी तशीच हुरहूर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या जाण्याने वाटत आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नसण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालीय. तिथे वर स्वर्गात या दोन्ही जिवलग मित्रांची छान जुगलबंदी जमली असेल एव्हाना.

नीलकंठ देशमुख गुरुवार, 12/19/2024 - 16:49
अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई तबलावादक म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच माणूस म्हणून पण महान होते.जमिनीवर पाय असलेला,नम्रपणा अंगी असलेला,इतरां विषयी आदर असणारा,वाद्याला दैवत समजणारा.अशी माणसे जाताना इतरांना हळवे करून जातात.

समयोचित लेख!! आपण भाग्यवान आहोत की अशा कलावंतांना पाहायचा ऐकायचा योग आला. लेखात दिलेल्या लिंक बघता बघता हरवुन गेलो. नकळत डोळे पाणावले. ईश्वर झाकीरभाईंच्या आत्म्यास शांती देवो. बाकी युट्युबच्या माध्यमातुन ते जिवंत आहेतच.

समयोचित लेख...! आपण स्वत: काही तबला वादनातले एक्सपर्ट नसतो पण कानाला तो सुखद वाटणारा तो नाद, ताल अहाहा...! आपल्या जादुई हातांनी तबल्यावर ती वळवळणारी बोटं, एखाद्या मैफिलीत जुगलबंदीतला दैवी अद्भुत ताल-नाद निर्माण करणारा 'जादूगार' पाहिला की एकच दाद येते वाह उस्ताद वाह.... तबल्यावरची थाप खरंच 'शांत' झाली. तबला मूक झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा Wed, 12/18/2024 - 10:26
सुंदर संकलन ! कधीही या धाग्यावर येऊन उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा ताल कानात साठवून ठेवावा ! उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

किसन शिंदे गुरुवार, 12/19/2024 - 12:00
‘बजे सरगम हर तरफ से गुंजे उठकर देश राग’ असं एक गाणं यायचं लहानपणी दूरदर्शन वर, त्यामध्ये अनेक दिग्गज त्यांची संगीत वाद्ये वाजवताना दिसायचे, त्यामध्ये सर्वप्रथम उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांचे अफलातून तबला वादन पाहिले होते. उस्ताद झाकीर यांच्याशी झालेला माझा तो पहिला परिचय होता. त्यानंतर ताज चहाच्या जाहिरातीत “अरे वाह उस्ताद नही, वाह ताज बोलीये” म्हणत अगदी चपळतेने तबल्यावर आपली बोटे थिरकवणारे उस्ताद झाकीर हुसैन आणखी आवडत गेले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतली संतूर, बासरी अथवा सितार अशी कुठलीही वाद्ये असोत त्यांच्या जर जोडीने तबला नसेल तर ती मैफल मला कायम अर्धवट वाटत आलीय. अगदी तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी किंवा पंडित रवीशंकर शर्मा यांची सितार ही कायम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याच्या जोडीनेच ऐकल्याने काहीतरी परिपूर्ण ऐकल्याचे समाधान वाटत आलेय. त्यातही शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी ऐकणे म्हणजे माझ्यासाठी कायम पर्वणी राहत आलीय. गेली जवळपास २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सितार, संतूर, बासरी आणि तबला ही वाद्ये आणि ती वाजवणारे भारतीय शास्त्रीय संगीतातली ही धुरंदर लोक माझ्यासाठी कायम जवळची आणि आपली वाटत राहिली आहेत. याच प्रेमापोटी उस्ताद झाकीर हुसैन यांचे तबला वादन प्रत्यक्षात ऐकण्याचा योग दोन तीनदा जुळून आला, त्यातून एक कलाकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच दुणावला. यापूर्वी शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे जशी हुरहूर लागलेली, अगदी तशीच हुरहूर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या जाण्याने वाटत आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नसण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालीय. तिथे वर स्वर्गात या दोन्ही जिवलग मित्रांची छान जुगलबंदी जमली असेल एव्हाना.

नीलकंठ देशमुख गुरुवार, 12/19/2024 - 16:49
अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई तबलावादक म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच माणूस म्हणून पण महान होते.जमिनीवर पाय असलेला,नम्रपणा अंगी असलेला,इतरां विषयी आदर असणारा,वाद्याला दैवत समजणारा.अशी माणसे जाताना इतरांना हळवे करून जातात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे याचा विचार करत होतो. युट्युबवरच्या काही चित्रफितींचा क्रमबद्ध वापर करत उस्तादजींच्या अष्टपैलू तबलावादनाचा आढावा घ्यावा असे वाटले. त्या दिशेने केलेला हा प्रयत्न. एकल तबला वादनः उस्ताद झाकिर हुसेन यांचे एकल तबलावादन ऐकताना वादनाची सुरूवात ज्या पेशकार या प्रकाराने होते, त्यात दिसणारी त्यांची कल्पकत बेजोड होती.

सायंकाळच्या गंमती जमती.

आजी ·

वामन देशमुख Tue, 12/17/2024 - 16:25
आज्जे, "तुझ्या गमतीजमती वाचून गंमत वाटली" असे कसे म्हणू? आयुष्याच्या सांजवेळीचे दैनंदिन अनुभव व्यक्त करताना तुझ्या विनोदी निवेदनामागची वेदनेची काळी छाया लपून राहत नाही. शारीरिक शक्तीची मर्यादा आहेच, पण तू तुझे मन सतत ताजे ठेवले आहेस हे तुझ्या लिखाणातून नेहमीच जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचे तुझे गणेशोत्सव दर्शन हे तर अगदी मास्टरपीस म्हणावे लागेल! "सांज ये गोकुळी" पासून ते "संध्याछाया भिवविति हृदया" पर्यंत तुझा प्रवासातील तुझ्या गमतीजमती अजून किमान पंचवीस वर्षे तरी मिपाखरांना रिझवत राहाव्यात ही श्रीरामाचरणी प्रार्थना. - (आज्जीचा नातू) द्येस्मुक् राव

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 17:46
वयोमानानुसार आलेल्या शारिरीक व्याधी स्वीकारणे फार कमी लोकांना जमते. तुम्ही अतिशय उत्तम रित्या, ह्या व्याधी स्वीकारल्या आहेत. उशी बाबत सहमत आहे. मला पांघरूण पण ठराविक लागते. आमची आज्जी पण तुमच्या सारखीच होती.

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 18:52
आजी, एकदम खुसखुशीत लेखन. शाळेत असताना श्री. कृ कोल्हटकरांचा एक धडा होता, त्यात त्यांनी विनोदाचे प्रकार वर्णिले होते. त्यात कारुण्यातून झालेल्या विनोदनिर्मितीचीही उदाहरणे होती. आपला लेख ह्याच जातकुळीतला वाटला. लिहिते राहा, वाचत असतोच.

सुबोध खरे Wed, 12/18/2024 - 10:25
आजी काही वर्षांपूर्वी आमच्या आईची एक मैत्रीण माझ्या दवाखान्यात आली होती. वय वर्षे ७५. त्या सांगत होत्या कि अरे डॉक्टर आजकाल माझे गुढघे फार दुखतात आणि कंबरही दुखते. मी त्यांना म्हणालो , 'काकू, एक काम करा. घरभर फिरून पहा ७५ वर्षांपूर्वीची कोणती वस्तू तुमच्या घरात चालू आहे. त्या एक मिनिट विचार करून म्हणाल्या - तू म्हणतोस ते खरं आहे. घरात एकही वस्तू ७५ वर्षे जुनी आणि चालू अशी नाही. मग मी त्यांना म्हणालो कि काकू तुमची गाडी स्कुटर घड्याळ किंवा अशी कोणती वस्तू ७५ वर्षे चालू आहे ते आठवतंय का? त्या नाही म्हणाल्या. मग मी म्हणालो कि तुमचा ७५ वर्षाचं शरीर अजून चालू आहे यात आनंद मानायचा कि दुःख? तरुणपणी तुम्ही काढलेल्या कष्टांमुळे तुमचं शरीर झिजलं आहे. त्याला रामबाण असा उपाय काही नाही. तेंव्हा जर काही दुखत असेल तर त्यावर तात्पुरता उपाय करून आनंदी राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. श्री मंगेश पाडगावकर यांच्या भाषेतच म्हणायचं तर जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मुक्त विहारि Wed, 12/18/2024 - 18:39
तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मुक्त विहारि Wed, 12/18/2024 - 18:39
तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

कर्नलतपस्वी Wed, 12/18/2024 - 21:21
आयुष्याची आता झाली उजवणं येतो तो क्षण अमृताचा आमची पण सत्तरी झाली पण वाटत नाही. उर्वरित आयुष्यातील शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी अट्टाहास.

किल्लेदार गुरुवार, 12/19/2024 - 03:09
एकदम खुसखुशीत लेख आजी. खूप आवडला. वाचताना जेवढी मजा आली तेवढीच स्वतःबद्दल शंकाही आली की इतक्या खिलाडू वृत्तीने हे सगळं स्विकारता येईल का?

In reply to by किल्लेदार

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 06:55
हो... सहज शक्य आहे. एक ना एक दिवस, शरीराचा त्याग करावा लागेल, हे मूलभूत वाक्य. मग, त्या केंद्र वाक्या भोवती, आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नुसार, साठी नंतरचे आयुष्य आखायचे... सुरुवातीला नक्की काय करायचे? हे समजणार पण नाही. पण, एकदा विचार करायला सुरुवात केली की जमून जाते. एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या की दुसऱ्याचा सदरा आपल्याला होत नाही. आपणच आपल्या सदऱ्याचे माप घ्यायचे.

कंजूस गुरुवार, 12/19/2024 - 18:52
कळलं सारं. विनोद नाही पण सत्य परिस्थिती आहे. वृद्धाश्रमाचा एक चानेल पाहण्यात आला https://youtube.com/@jyotipatait4590?si=ghg84zBGe9SrB1-1 __________________ मोबाईल सोडा आणि टॅब्लेट घ्या. मोठा स्क्रीन उपयोगी पडेल. फोन कॉल होतो स्पिकरवरच. ऐकण्याचा प्रश्न सुटेल. कोणाशी काय बोलणं झालं हेसुद्धा रेकॉर्डिंग होतं ते पुन्हा ऐकता येईल. टाइपिंगही सोपं होतं. वाटसपही WhatsApp ही चालतं. विडिओ, विडिओ कॉल छान करता येतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहता येतील. जियो कार्ड टाकलं तर टिवीचे. चानेलसुद्धा पाहता येतील. ( कोणता ? Realme Pad2 , 8+256 GB) . वायरलेस / किंवा वायर्ड कीबोर्ड पाऊसही जोडून कंपुटरसारखा वापरता येतो. घरात इतरांनाही उपयोगी. तेवीस हजारांत. अप्रतिम वस्तू. संपर्काचे उत्तम साधन.

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 18:44
खुसखुशीत म्हणता म्हणता चट्का लावणारं लिहिलं की आजी ! असं काही वाचलं की काही जण जात्यात आहेत आणि आम्ही सुपात आहोत हे जाणवतं !' असो. भारी लिहिलयं, मन मोकळं करणारं लिहिलंय ! छान खुसखुशीत लिहता, लिहित रहा. आमच्या सारखे तुमचे मिपाकर पंखे तुम्च्या धाग्याची वाट पहात असतात याचा विश्वास बाळगा. जय आजी, जय मिपा !

आजी Mon, 01/06/2025 - 13:39
माझ्या या लेखाची चौदाशेहून अधिक वाचने झाली आणि पंधरा प्रतिसाद मिळाले. मला खूप आनंद झाला. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मला आणखी काही लिहायला बळ मिळते. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या वाचक मित्रांनो माझ्या या शारीरिक मर्यादांसकटही मी चांगली आनंदात आहे आणि माझे दिवस छान चाललेत बरं का! पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक धन्यवाद.

वामन देशमुख Tue, 12/17/2024 - 16:25
आज्जे, "तुझ्या गमतीजमती वाचून गंमत वाटली" असे कसे म्हणू? आयुष्याच्या सांजवेळीचे दैनंदिन अनुभव व्यक्त करताना तुझ्या विनोदी निवेदनामागची वेदनेची काळी छाया लपून राहत नाही. शारीरिक शक्तीची मर्यादा आहेच, पण तू तुझे मन सतत ताजे ठेवले आहेस हे तुझ्या लिखाणातून नेहमीच जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचे तुझे गणेशोत्सव दर्शन हे तर अगदी मास्टरपीस म्हणावे लागेल! "सांज ये गोकुळी" पासून ते "संध्याछाया भिवविति हृदया" पर्यंत तुझा प्रवासातील तुझ्या गमतीजमती अजून किमान पंचवीस वर्षे तरी मिपाखरांना रिझवत राहाव्यात ही श्रीरामाचरणी प्रार्थना. - (आज्जीचा नातू) द्येस्मुक् राव

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 17:46
वयोमानानुसार आलेल्या शारिरीक व्याधी स्वीकारणे फार कमी लोकांना जमते. तुम्ही अतिशय उत्तम रित्या, ह्या व्याधी स्वीकारल्या आहेत. उशी बाबत सहमत आहे. मला पांघरूण पण ठराविक लागते. आमची आज्जी पण तुमच्या सारखीच होती.

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 18:52
आजी, एकदम खुसखुशीत लेखन. शाळेत असताना श्री. कृ कोल्हटकरांचा एक धडा होता, त्यात त्यांनी विनोदाचे प्रकार वर्णिले होते. त्यात कारुण्यातून झालेल्या विनोदनिर्मितीचीही उदाहरणे होती. आपला लेख ह्याच जातकुळीतला वाटला. लिहिते राहा, वाचत असतोच.

सुबोध खरे Wed, 12/18/2024 - 10:25
आजी काही वर्षांपूर्वी आमच्या आईची एक मैत्रीण माझ्या दवाखान्यात आली होती. वय वर्षे ७५. त्या सांगत होत्या कि अरे डॉक्टर आजकाल माझे गुढघे फार दुखतात आणि कंबरही दुखते. मी त्यांना म्हणालो , 'काकू, एक काम करा. घरभर फिरून पहा ७५ वर्षांपूर्वीची कोणती वस्तू तुमच्या घरात चालू आहे. त्या एक मिनिट विचार करून म्हणाल्या - तू म्हणतोस ते खरं आहे. घरात एकही वस्तू ७५ वर्षे जुनी आणि चालू अशी नाही. मग मी त्यांना म्हणालो कि काकू तुमची गाडी स्कुटर घड्याळ किंवा अशी कोणती वस्तू ७५ वर्षे चालू आहे ते आठवतंय का? त्या नाही म्हणाल्या. मग मी म्हणालो कि तुमचा ७५ वर्षाचं शरीर अजून चालू आहे यात आनंद मानायचा कि दुःख? तरुणपणी तुम्ही काढलेल्या कष्टांमुळे तुमचं शरीर झिजलं आहे. त्याला रामबाण असा उपाय काही नाही. तेंव्हा जर काही दुखत असेल तर त्यावर तात्पुरता उपाय करून आनंदी राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. श्री मंगेश पाडगावकर यांच्या भाषेतच म्हणायचं तर जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मुक्त विहारि Wed, 12/18/2024 - 18:39
तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मुक्त विहारि Wed, 12/18/2024 - 18:39
तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

कर्नलतपस्वी Wed, 12/18/2024 - 21:21
आयुष्याची आता झाली उजवणं येतो तो क्षण अमृताचा आमची पण सत्तरी झाली पण वाटत नाही. उर्वरित आयुष्यातील शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी अट्टाहास.

किल्लेदार गुरुवार, 12/19/2024 - 03:09
एकदम खुसखुशीत लेख आजी. खूप आवडला. वाचताना जेवढी मजा आली तेवढीच स्वतःबद्दल शंकाही आली की इतक्या खिलाडू वृत्तीने हे सगळं स्विकारता येईल का?

In reply to by किल्लेदार

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 06:55
हो... सहज शक्य आहे. एक ना एक दिवस, शरीराचा त्याग करावा लागेल, हे मूलभूत वाक्य. मग, त्या केंद्र वाक्या भोवती, आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नुसार, साठी नंतरचे आयुष्य आखायचे... सुरुवातीला नक्की काय करायचे? हे समजणार पण नाही. पण, एकदा विचार करायला सुरुवात केली की जमून जाते. एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या की दुसऱ्याचा सदरा आपल्याला होत नाही. आपणच आपल्या सदऱ्याचे माप घ्यायचे.

कंजूस गुरुवार, 12/19/2024 - 18:52
कळलं सारं. विनोद नाही पण सत्य परिस्थिती आहे. वृद्धाश्रमाचा एक चानेल पाहण्यात आला https://youtube.com/@jyotipatait4590?si=ghg84zBGe9SrB1-1 __________________ मोबाईल सोडा आणि टॅब्लेट घ्या. मोठा स्क्रीन उपयोगी पडेल. फोन कॉल होतो स्पिकरवरच. ऐकण्याचा प्रश्न सुटेल. कोणाशी काय बोलणं झालं हेसुद्धा रेकॉर्डिंग होतं ते पुन्हा ऐकता येईल. टाइपिंगही सोपं होतं. वाटसपही WhatsApp ही चालतं. विडिओ, विडिओ कॉल छान करता येतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहता येतील. जियो कार्ड टाकलं तर टिवीचे. चानेलसुद्धा पाहता येतील. ( कोणता ? Realme Pad2 , 8+256 GB) . वायरलेस / किंवा वायर्ड कीबोर्ड पाऊसही जोडून कंपुटरसारखा वापरता येतो. घरात इतरांनाही उपयोगी. तेवीस हजारांत. अप्रतिम वस्तू. संपर्काचे उत्तम साधन.

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 18:44
खुसखुशीत म्हणता म्हणता चट्का लावणारं लिहिलं की आजी ! असं काही वाचलं की काही जण जात्यात आहेत आणि आम्ही सुपात आहोत हे जाणवतं !' असो. भारी लिहिलयं, मन मोकळं करणारं लिहिलंय ! छान खुसखुशीत लिहता, लिहित रहा. आमच्या सारखे तुमचे मिपाकर पंखे तुम्च्या धाग्याची वाट पहात असतात याचा विश्वास बाळगा. जय आजी, जय मिपा !

आजी Mon, 01/06/2025 - 13:39
माझ्या या लेखाची चौदाशेहून अधिक वाचने झाली आणि पंधरा प्रतिसाद मिळाले. मला खूप आनंद झाला. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मला आणखी काही लिहायला बळ मिळते. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या वाचक मित्रांनो माझ्या या शारीरिक मर्यादांसकटही मी चांगली आनंदात आहे आणि माझे दिवस छान चाललेत बरं का! पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
खूप म्हणजे खूपच पूर्वी, लहानपणी शाळेला जाताना मला बसचा कंडक्टर म्हणायचा,"ए पोरी, लवकर चढ. तुझं दप्तर पडतंय बघ." नंतर काही वर्षांनी कंडक्टर मला "ताई" म्हणायचा. मग मावशी, काकू म्हणायला लागला. या संबोधनातल्या चढत्या श्रेणीवरुन माझ्या वाढत्या वयाची श्रेणी तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल. त्यानंतर आता तर मी म्हातारी किंवा चांगल्या शब्दांत वृद्धा, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. येत्या काही वर्षांत मी अतिज्येष्ठ नागरिक होईन. लेखाच्या शीर्षकातला "सायंकाळ" म्हणजे काय ते आता स्पष्ट झालं असेल. तर.. आता लाल बस, आणि रेल्वे पण कायमची सुटली. कारण उंच पायऱ्या लांघून आत चढता येत नाही.

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे

गोरगावलेकर ·

गवि Tue, 12/17/2024 - 04:03
अतिशय सुंदर परिसर आणि तुमचे वर्णन. फोटोंनी आणखीच मजा आली. गोव्याचा हा भाग अतिशय परिचित आणि आवडता असल्याने हा लेख अधिकच आवडला. तुम्ही वाहनासाठी खर्च केलेली रक्कम पाहता असे सुचवेन की गोव्यात बिनधास्त सेल्फ ड्राईव्ह कार घ्या. अतिशय स्वस्त पडते. तुम्ही जो खर्च एका दिवशी थोड्या अंतराच्या टॅक्सीसाठी करता त्यात पाच दिवसांची सेल्फ ड्राईव्ह कार मिळून जाते. ती आल्यापासून निघेपर्यंत सर्व दिवस चोवीस तास आपल्याच हाती असल्याने मनसोक्त कधीही फिरण्याचे स्वातंत्र्य राहते. साधारण नऊशे हजार रुपयांपासून प्रतिदिन या रेटने स्विफ्ट किंवा तत्सम कार सहज मिळतात. थोडी मोठी कार देखील घासाघीस करून बाराशे तेराशेत मिळते. कुठेही आणून देतात आणि घेऊन जातात. एअरपोर्ट बाहेर तर ऐनवेळी देखील मिळते.
बियरचे घोट आणि नेत्रसुख. चेहरे किती खुलले बघा .
:-)) याच वेळी त्यांच्या सोबतच्या स्त्रीवर्गाचे चेहरे देखील एका फोटोत दाखवायला हवे होते. डोळ्यांतील जळजळीत निखारे पाहायला मिळाले असते. ;-)

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 07:09
आला का हा प्रचु??? हं.. काय करणार. प्राक्तन आपले.. हं. तर मा प्रचेतस जी.. तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात. "गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात" या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा. मी रोज येत जाईन. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असे स. त. कुडचेडकरांनी "केतकी पिवळी पडली"त म्हटलंच आहे.

In reply to by गवि

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 07:17
"धन्यवाद तुमच्या आदरभावासाठी! 'गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात'या विषयावर चर्चा करण्यासाठी मला नक्की आनंद होईल. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा जसे ठरतील, तसे सांगेन. तुमचा उत्साह प्रेरणादायी आहे, आणि स. त. कुडचेडकरांच्या विचारांशी तुमची नाळ जुळल्याचे जाणवते. योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया."

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 10:17
योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया.
विषय आवडीचा असल्याने दोन प्रतिभावंतात घडणाऱ्या 'त्या' सांगोपांग चर्चेचे 'सार' सारांशलेखनातुन आमच्यासारख्या जिज्ञासु वाचकांपर्यंत पोचवण्याचेही मनावर घ्यावे अशी नम्र विनंती 😀

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 11:53
त्या चर्चेत सहभागी होऊन आपणही काही ज्ञानकण त्यात शिंपडावेत अशी आपणास आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 12:02
चर्चा सहभागासाठीच्या आपल्या निमंत्रणाचा मी सहर्ष आणि कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत आहे 🙏

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 06:11
सुरेख वर्णन. काब द रामचा केप गोव्याच्या इथे असलेला बीच हा गोव्यातील अत्यंत सुंदर आणि अत्यंत स्वच्छ बीचेसपैकी एक आहे. मात्र इथे पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक आहे. मधेच खोल खड्डे आहेत. बाकी कोला आणि कार्मोना बीचवर कधी जाणे झाले नाही. पाळोलेला एकेकाळी गर्दी नसायची, आता मात्र कायम भरलेला असतो.

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 10:07
मस्त 👍 अत्ता दोन्ही भाग सलग वाचले. आधीच्या भागावरच्या प्रतिसादात प्रचेतस बुवांनी म्हंटल्याप्रमाणे 'रिफ्रेशींग' मालिका होणार आहे. आधी निवडणुका, मग निकाल आणि त्यानंतर सत्तास्थापनेपर्यंतच्या चर्चांमूळे जो वैताग आला होता तो दुर करण्यासाठी आपले विषेश आभार! पुढिल भागांच्या प्रतिक्षेत आहे....

नेहमीप्रमाणे मस्त लेख आणि प्रवासवर्णन. दक्षिण गोव्यातील बरेचशा समुद्रकिनार्‍यांजवळ राहून झाले आहे. त्यामुळे आता पुढच्या ट्रीपला कुठचा समुद्रकिनारा निवडावा हा प्रश्नच होता. कार्मोना चांगला दिसतोय. तिथे जायला हवे. गोव्यातील, विशेषतः दक्षिण गोव्यातील चॅपेल/चर्च बघायला छान वाटते. तिथल्या गावातील सुशेगाद वातावरणात एखादी चर्चची पांढरी इमारत अगदी देखणी दिसते. बेतालबातीम आणि आणखी दक्षिणेला जाताना माजोर्डाहून रस्ता उजवीकडे वळतो तिथेच एक असेच सुंदर चर्च आहे- बहुदा मदर ऑफ गॉड्स की असे काहीतरी त्या चर्चचे नाव आहे. ते बघायला नेहमी आवडते. वरील फोटोतील ते चर्च बघून माजोर्डामधील त्या चर्चचीच आठवण झाली. कधीतरी ख्रिसमसच्या आदल्या दिवशीपासून २ जानेवारी पर्यंत दक्षिण गोव्यात जायचे आहे. बघू कधी योग येतो ते. माजोर्डातील त्या चर्चवरून आठवले. त्या चर्चवरून पुढे गेल्यावर एक रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याच्या आसपास एका दुकानात गोवन मिठाई बेबिंका मिळते. छान असतो तिथला बेबिंका. तो एक प्रकार मला फार आवडतो. काही दिवसांपूर्वी गोव्याहून मुद्दामून बेबिंका मागवला होता. बेबिंका आणि/किंवा डोडोलची चव घेतली का? दोन्ही पदार्थ मस्त असतात. आणि हो.. गोव्यातील काजू फेनी तर अगदीच मस्त असते. (गोव्याविषयी अतोनात आकर्षण वाटणारा आणि बहुतेक मागच्या जन्मीचा गोवन) चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 14:23
मी एकदाच चव घेऊन बघीतली. पण आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu जाऊ द्या.... दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात. टेबलावर पंगत बसली की प्रत्येकाचे ब्रँड वेगळे. एक दिवस बसू या.

In reply to by मुक्त विहारि

आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
बापरे. इतकी नावेही मला माहित नाहीत. माझी उडी फक्त काजू फेनी आणि फार तर पोर्ट वाईन किंवा व्होडकापर्यंत आणि ते पण गोव्यामध्ये. गोव्याबाहेर नाही :)
एक दिवस बसू या
जरूर. मी माझे आवडते पेय पिनाकोलाडा पिणार :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

MipaPremiYogesh Mon, 12/30/2024 - 01:23
वाह आम्ही मित्र बसलो की मी हेच पेय पितो नेहेमी

In reply to by मुक्त विहारि

गवि Tue, 12/17/2024 - 15:16
खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
कार धुण्यातून असे काय पैशे मिळणार की ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा अधिक महाग दारु घेता येईल..?! ;-)

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 15:18
एक दिवस बसू या.
ह्यावरून आठवले.... मुविकाका बरेच दिवसांत ( मला वाटतं कोविड पश्चात आपण एकत्र 'बसलो' नाही... कधी तुमची कोकणातली 'हळद' शेती आड आली तर कधी 'बांबू' शेती... असो... आता जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा कळवा, मस्त मैफील रंगवू...

गवि Tue, 12/17/2024 - 15:20
दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात.
काहीही हं मुविकाका. एक प्रयोग म्हणून अशा ओल्या कट्ट्यावर आधी ठरलेल्या प्लॅनमध्ये फक्त एकच बदल : मद्य अजिबात नाही. (आणि वाटल्यास कट्टा ठिकाण बदलून विना बार) असे जाहीर करून पहा. किती मोत्ये गळतील एकेक करून. एक दोन लोकांचा कट्टा होईल सुद्धा कदाचित, पण काहीच विशेष फरक नसेल असे नाही. ;-))

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 15:29
तुम्ही कट्ट्याला येणार म्हंटल्यावर मी तसाही रद्द पडणार. त्यासाठी मद्य नसण्याची गरज नै. तरी .. प्रयोग करून पहा.

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 15:34
इतक्या सुंदर ठिकाणी जाताना अशी कंपनी सोबत न्यावी लागावी अशी अद्याप वेळ आली नाही. लोलयेच्या वेताळाच्या कृपेने. तिकडे जाऊन चपला वाहणार आहे.

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 15:41
विना मद्य कट्ट्याला सोयीस्करपणे बगल दिलीय हे जाणवले.
जो पॉइंट मी मांडतोय तोच तुम्ही प्रूव्ह करताय. धन्यवाद . मित्र येत नाहीत फारसे. हेच तर म्हणतोय. :-D

In reply to by प्रचेतस

अरे वा. क्युबा अगोंद तुमचेही आवडते ठिकाण आहे का? आम्ही उतरलो होतो क्युबापासून जवळच असलेल्या डनहिलमध्ये पण जेवण आणि नाश्ता वगैरे असायचा क्युबा आणि एच२ओ मध्ये. अगोंदचे क्युबा खूपच सुंदर आहे. त्यामुळे पुढच्या ट्रीपला पाटणेमध्येही क्युबामध्येच उतरलो पण ते अगोंदच्या क्युबाइतके चांगले नाही. थोडी निराशाच झाली तिथे. अगोंदमध्ये चर्चच्या जवळ समुद्रकिनार्‍यावर ओम साई बीच हट्स या नावाचे हॉटेल बघितले होते. गोव्यासारख्या ठिकाणी, जिथे 'पिणे' हा बहुतेक लोकांचा एक मुख्य उद्देश असतो अशा ठिकाणी ओम साई हे सात्विक नाव थोडे वेगळेच वाटले. तिथे दारू देत असतील का? काय माहीत.

In reply to by गवि

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 16:05
एक इस्पिक एक्का ह्यांच्या बरोबर. एक स्पेशल २६ एक जॅक डॅनियल बरोबर आणि एक हेमांगी ताई ह्यांच्या बरोबर एक संमिश्र कट्टा, वाशी येथे झाला होता. कोविड नंतर कट्टा असा झाला नाही. किंबहुना Whats App मुळे, इथे कुणी आजकाल तसे आमंत्रण पण देत नाही.

In reply to by मुक्त विहारि

गवि Tue, 12/17/2024 - 16:35
फरक आहे. मुळात जे कट्टे अथवा मिपाकट्टे सुकेच ठरले होते ते अटेंड करणे आणि ते उत्तम संख्येच्या उपस्थितीने पार पडणे हे वेगळे. जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा. सार्वजनिक जाहीर मिपाकट्ट्याबाबत नव्हे. ते तर अनेकदा उभ्या उभ्या भेळ मिसळ खाऊन देखील होतात.

In reply to by गवि

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 17:52
कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी https://misalpav.com/node/30303#comment-form हा कट्टा सुकाच ठरला होता आणि तसाच पार पडला.

In reply to by मुक्त विहारि

गवि Tue, 12/17/2024 - 19:10
आता फार कीस पाडत नाही. सुका कट्टा ठरला आणि सुकाच झाला असे ठीकच आहे हो. मी एवढेच म्हणत होतो की मद्य हा महत्वाचा भाग नाही असे ऑलरेडी जे ओले कट्टे ठरतात त्यात नसते. ऑलरेडी ठरलेला ओल्या ग्रुपचा कट्टा ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द करून तसाच पार पडला असे होणे दुर्मिळ. अशक्य नाही. पण असू दे. अटीतटीने काही सिद्ध करण्याचा उद्देश नाही. ह. घ्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 22:02
जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा.
सहमत आहे! अशी जाहीर केलेली मैफिल ओली नसेल तर मी तरी तिथे हजेरी लावणार नाही.... जवळ्पासचे एखादे ठिकाण बघुन तिथे बसेन (Who cares?) 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि Tue, 12/17/2024 - 22:32
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)

In reply to by गवि

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 22:59
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)
गंभीर आरोप आहे हा... हे असले काही वाचण्याआधी माझे डोळे का नाही फुटले??? जमत नसेल, किंवा आवडत नसेल तर येउच नये की अशा कट्यांना... फालतु की गर्दी से तो कम गर्दी कभीभी अच्छी 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि Wed, 12/18/2024 - 03:50
मिपाकट्टे बाजूला ठेवा. त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य. लोक देखील एकमेकांना प्रथमच भेटत असतात अनेकजण. काही लोक आधी भेटलेले असतात देखील पण शक्यतो प्लॅन हा कोरडा असतो. इन जनरल म्हणत होतो. एकूण निरीक्षण असे की "तो" भाग महत्वाचा ठरतो जेव्हा आधी मुळात तसाच प्लॅन ठरतो आणि मग काही कारणाने तो भाग वजा करू जाल तर उत्साहात मोठा फरक पडू शकतो. अर्थात निरीक्षणे आणि अनुभव वैयक्तिक पातळीवर बदलू शकतात. यात काही नियम नसतो. गमतीचा भाग होता. आणि त्यात काही चूक आहे असेही नव्हे. :-)

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/18/2024 - 14:30
त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य.
+१००० पाच दिवसांपुर्वी निगडी येथे 'भेटणे हाच मुख्य उद्देश असलेला' एक 'अचानक' कट्टा घडुन आला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 'ओला-सुकाच' काय पण कुठे भेटायचे, कोण कोण येणार आहेत वगैरे गोष्टींचाही कोणाला थांगपत्ता नव्हता 😀 पण तरी निगडीच्या भव्य श्रीकृष्ण मंदीरात साडेसातच्या सुमारास पाच जणांच्या उपस्थितीने सुरु झालेल्या अचानक कट्ट्याचा सहा जणांच्या उपस्थितीत 'बाबा फाईन डाईन' नामक उपहारगृहात सुमारे साडे दहाच्या सुमारास समारोप झाला. प्रशांत शेठची पुणे ते अयोध्या सायकलवारी, प्रचेतस बुवांचे विविध विषयांवरचे महितीपुर्ण निरुपण, कविराज चांदणे संदीप ह्यांच्याकडुन त्यांच्या कवितांच्या जन्माच्या कथा असे उत्तमोत्तम परिसंवाद घडले, खुप मजा आली... पुढे झालेल्या प्रीती-भोजनास मात्र हे तीन दिग्गज मिपाकर थांबु शकले नाहीत ह्याची रुखरुख लागुन राहिली आहे! बादवे... भरघोस मिशा असलेला श्रीकृष्ण ह्या मंदिरात (मुर्तीरुपात) मी पहिल्यांदाच पाहिला...

In reply to by मुक्त विहारि

गोरगावलेकर Wed, 12/18/2024 - 23:16
आठवण ताजी झाली . कट्ट्यास जागा उपलब्ध करून देण्यात थोडासा सहभाग घेतल्याने माझे पती व मी कट्ट्यास निमित्तमात्र हजर राहिलो होतो.

गोरगावलेकर Wed, 12/18/2024 - 23:04
गोवा सगळ्यांच्याच आवडीचे ठिकाण दिसतेय . प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे नांव लिहीत नाही. खूप जणांनी भरभरून प्रतिसाद दिला . लेखाच्या निमित्ताने मिसळपाव कट्ट्यांबद्दलही बरीच चांगली चर्चा वाचावयास मिळाली. इतर सर्व वाचकांचेही धन्यवाद .

गोरगावलेकर Wed, 12/18/2024 - 23:05
विंनंती न करताही संपादकांनी धागा भटकंती विभागात हलवला याबद्दल त्यांचेही विशेष आभार. आता लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक देणे शक्य होणार आहे .

गवि Tue, 12/17/2024 - 04:03
अतिशय सुंदर परिसर आणि तुमचे वर्णन. फोटोंनी आणखीच मजा आली. गोव्याचा हा भाग अतिशय परिचित आणि आवडता असल्याने हा लेख अधिकच आवडला. तुम्ही वाहनासाठी खर्च केलेली रक्कम पाहता असे सुचवेन की गोव्यात बिनधास्त सेल्फ ड्राईव्ह कार घ्या. अतिशय स्वस्त पडते. तुम्ही जो खर्च एका दिवशी थोड्या अंतराच्या टॅक्सीसाठी करता त्यात पाच दिवसांची सेल्फ ड्राईव्ह कार मिळून जाते. ती आल्यापासून निघेपर्यंत सर्व दिवस चोवीस तास आपल्याच हाती असल्याने मनसोक्त कधीही फिरण्याचे स्वातंत्र्य राहते. साधारण नऊशे हजार रुपयांपासून प्रतिदिन या रेटने स्विफ्ट किंवा तत्सम कार सहज मिळतात. थोडी मोठी कार देखील घासाघीस करून बाराशे तेराशेत मिळते. कुठेही आणून देतात आणि घेऊन जातात. एअरपोर्ट बाहेर तर ऐनवेळी देखील मिळते.
बियरचे घोट आणि नेत्रसुख. चेहरे किती खुलले बघा .
:-)) याच वेळी त्यांच्या सोबतच्या स्त्रीवर्गाचे चेहरे देखील एका फोटोत दाखवायला हवे होते. डोळ्यांतील जळजळीत निखारे पाहायला मिळाले असते. ;-)

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 07:09
आला का हा प्रचु??? हं.. काय करणार. प्राक्तन आपले.. हं. तर मा प्रचेतस जी.. तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात. "गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात" या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा. मी रोज येत जाईन. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असे स. त. कुडचेडकरांनी "केतकी पिवळी पडली"त म्हटलंच आहे.

In reply to by गवि

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 07:17
"धन्यवाद तुमच्या आदरभावासाठी! 'गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात'या विषयावर चर्चा करण्यासाठी मला नक्की आनंद होईल. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा जसे ठरतील, तसे सांगेन. तुमचा उत्साह प्रेरणादायी आहे, आणि स. त. कुडचेडकरांच्या विचारांशी तुमची नाळ जुळल्याचे जाणवते. योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया."

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 10:17
योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया.
विषय आवडीचा असल्याने दोन प्रतिभावंतात घडणाऱ्या 'त्या' सांगोपांग चर्चेचे 'सार' सारांशलेखनातुन आमच्यासारख्या जिज्ञासु वाचकांपर्यंत पोचवण्याचेही मनावर घ्यावे अशी नम्र विनंती 😀

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 11:53
त्या चर्चेत सहभागी होऊन आपणही काही ज्ञानकण त्यात शिंपडावेत अशी आपणास आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 12:02
चर्चा सहभागासाठीच्या आपल्या निमंत्रणाचा मी सहर्ष आणि कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत आहे 🙏

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 06:11
सुरेख वर्णन. काब द रामचा केप गोव्याच्या इथे असलेला बीच हा गोव्यातील अत्यंत सुंदर आणि अत्यंत स्वच्छ बीचेसपैकी एक आहे. मात्र इथे पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक आहे. मधेच खोल खड्डे आहेत. बाकी कोला आणि कार्मोना बीचवर कधी जाणे झाले नाही. पाळोलेला एकेकाळी गर्दी नसायची, आता मात्र कायम भरलेला असतो.

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 10:07
मस्त 👍 अत्ता दोन्ही भाग सलग वाचले. आधीच्या भागावरच्या प्रतिसादात प्रचेतस बुवांनी म्हंटल्याप्रमाणे 'रिफ्रेशींग' मालिका होणार आहे. आधी निवडणुका, मग निकाल आणि त्यानंतर सत्तास्थापनेपर्यंतच्या चर्चांमूळे जो वैताग आला होता तो दुर करण्यासाठी आपले विषेश आभार! पुढिल भागांच्या प्रतिक्षेत आहे....

नेहमीप्रमाणे मस्त लेख आणि प्रवासवर्णन. दक्षिण गोव्यातील बरेचशा समुद्रकिनार्‍यांजवळ राहून झाले आहे. त्यामुळे आता पुढच्या ट्रीपला कुठचा समुद्रकिनारा निवडावा हा प्रश्नच होता. कार्मोना चांगला दिसतोय. तिथे जायला हवे. गोव्यातील, विशेषतः दक्षिण गोव्यातील चॅपेल/चर्च बघायला छान वाटते. तिथल्या गावातील सुशेगाद वातावरणात एखादी चर्चची पांढरी इमारत अगदी देखणी दिसते. बेतालबातीम आणि आणखी दक्षिणेला जाताना माजोर्डाहून रस्ता उजवीकडे वळतो तिथेच एक असेच सुंदर चर्च आहे- बहुदा मदर ऑफ गॉड्स की असे काहीतरी त्या चर्चचे नाव आहे. ते बघायला नेहमी आवडते. वरील फोटोतील ते चर्च बघून माजोर्डामधील त्या चर्चचीच आठवण झाली. कधीतरी ख्रिसमसच्या आदल्या दिवशीपासून २ जानेवारी पर्यंत दक्षिण गोव्यात जायचे आहे. बघू कधी योग येतो ते. माजोर्डातील त्या चर्चवरून आठवले. त्या चर्चवरून पुढे गेल्यावर एक रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याच्या आसपास एका दुकानात गोवन मिठाई बेबिंका मिळते. छान असतो तिथला बेबिंका. तो एक प्रकार मला फार आवडतो. काही दिवसांपूर्वी गोव्याहून मुद्दामून बेबिंका मागवला होता. बेबिंका आणि/किंवा डोडोलची चव घेतली का? दोन्ही पदार्थ मस्त असतात. आणि हो.. गोव्यातील काजू फेनी तर अगदीच मस्त असते. (गोव्याविषयी अतोनात आकर्षण वाटणारा आणि बहुतेक मागच्या जन्मीचा गोवन) चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 14:23
मी एकदाच चव घेऊन बघीतली. पण आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu जाऊ द्या.... दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात. टेबलावर पंगत बसली की प्रत्येकाचे ब्रँड वेगळे. एक दिवस बसू या.

In reply to by मुक्त विहारि

आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
बापरे. इतकी नावेही मला माहित नाहीत. माझी उडी फक्त काजू फेनी आणि फार तर पोर्ट वाईन किंवा व्होडकापर्यंत आणि ते पण गोव्यामध्ये. गोव्याबाहेर नाही :)
एक दिवस बसू या
जरूर. मी माझे आवडते पेय पिनाकोलाडा पिणार :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

MipaPremiYogesh Mon, 12/30/2024 - 01:23
वाह आम्ही मित्र बसलो की मी हेच पेय पितो नेहेमी

In reply to by मुक्त विहारि

गवि Tue, 12/17/2024 - 15:16
खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
कार धुण्यातून असे काय पैशे मिळणार की ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा अधिक महाग दारु घेता येईल..?! ;-)

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 15:18
एक दिवस बसू या.
ह्यावरून आठवले.... मुविकाका बरेच दिवसांत ( मला वाटतं कोविड पश्चात आपण एकत्र 'बसलो' नाही... कधी तुमची कोकणातली 'हळद' शेती आड आली तर कधी 'बांबू' शेती... असो... आता जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा कळवा, मस्त मैफील रंगवू...

गवि Tue, 12/17/2024 - 15:20
दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात.
काहीही हं मुविकाका. एक प्रयोग म्हणून अशा ओल्या कट्ट्यावर आधी ठरलेल्या प्लॅनमध्ये फक्त एकच बदल : मद्य अजिबात नाही. (आणि वाटल्यास कट्टा ठिकाण बदलून विना बार) असे जाहीर करून पहा. किती मोत्ये गळतील एकेक करून. एक दोन लोकांचा कट्टा होईल सुद्धा कदाचित, पण काहीच विशेष फरक नसेल असे नाही. ;-))

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 15:29
तुम्ही कट्ट्याला येणार म्हंटल्यावर मी तसाही रद्द पडणार. त्यासाठी मद्य नसण्याची गरज नै. तरी .. प्रयोग करून पहा.

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 15:34
इतक्या सुंदर ठिकाणी जाताना अशी कंपनी सोबत न्यावी लागावी अशी अद्याप वेळ आली नाही. लोलयेच्या वेताळाच्या कृपेने. तिकडे जाऊन चपला वाहणार आहे.

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 12/17/2024 - 15:41
विना मद्य कट्ट्याला सोयीस्करपणे बगल दिलीय हे जाणवले.
जो पॉइंट मी मांडतोय तोच तुम्ही प्रूव्ह करताय. धन्यवाद . मित्र येत नाहीत फारसे. हेच तर म्हणतोय. :-D

In reply to by प्रचेतस

अरे वा. क्युबा अगोंद तुमचेही आवडते ठिकाण आहे का? आम्ही उतरलो होतो क्युबापासून जवळच असलेल्या डनहिलमध्ये पण जेवण आणि नाश्ता वगैरे असायचा क्युबा आणि एच२ओ मध्ये. अगोंदचे क्युबा खूपच सुंदर आहे. त्यामुळे पुढच्या ट्रीपला पाटणेमध्येही क्युबामध्येच उतरलो पण ते अगोंदच्या क्युबाइतके चांगले नाही. थोडी निराशाच झाली तिथे. अगोंदमध्ये चर्चच्या जवळ समुद्रकिनार्‍यावर ओम साई बीच हट्स या नावाचे हॉटेल बघितले होते. गोव्यासारख्या ठिकाणी, जिथे 'पिणे' हा बहुतेक लोकांचा एक मुख्य उद्देश असतो अशा ठिकाणी ओम साई हे सात्विक नाव थोडे वेगळेच वाटले. तिथे दारू देत असतील का? काय माहीत.

In reply to by गवि

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 16:05
एक इस्पिक एक्का ह्यांच्या बरोबर. एक स्पेशल २६ एक जॅक डॅनियल बरोबर आणि एक हेमांगी ताई ह्यांच्या बरोबर एक संमिश्र कट्टा, वाशी येथे झाला होता. कोविड नंतर कट्टा असा झाला नाही. किंबहुना Whats App मुळे, इथे कुणी आजकाल तसे आमंत्रण पण देत नाही.

In reply to by मुक्त विहारि

गवि Tue, 12/17/2024 - 16:35
फरक आहे. मुळात जे कट्टे अथवा मिपाकट्टे सुकेच ठरले होते ते अटेंड करणे आणि ते उत्तम संख्येच्या उपस्थितीने पार पडणे हे वेगळे. जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा. सार्वजनिक जाहीर मिपाकट्ट्याबाबत नव्हे. ते तर अनेकदा उभ्या उभ्या भेळ मिसळ खाऊन देखील होतात.

In reply to by गवि

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 17:52
कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी https://misalpav.com/node/30303#comment-form हा कट्टा सुकाच ठरला होता आणि तसाच पार पडला.

In reply to by मुक्त विहारि

गवि Tue, 12/17/2024 - 19:10
आता फार कीस पाडत नाही. सुका कट्टा ठरला आणि सुकाच झाला असे ठीकच आहे हो. मी एवढेच म्हणत होतो की मद्य हा महत्वाचा भाग नाही असे ऑलरेडी जे ओले कट्टे ठरतात त्यात नसते. ऑलरेडी ठरलेला ओल्या ग्रुपचा कट्टा ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द करून तसाच पार पडला असे होणे दुर्मिळ. अशक्य नाही. पण असू दे. अटीतटीने काही सिद्ध करण्याचा उद्देश नाही. ह. घ्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 22:02
जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा.
सहमत आहे! अशी जाहीर केलेली मैफिल ओली नसेल तर मी तरी तिथे हजेरी लावणार नाही.... जवळ्पासचे एखादे ठिकाण बघुन तिथे बसेन (Who cares?) 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि Tue, 12/17/2024 - 22:32
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)

In reply to by गवि

टर्मीनेटर Tue, 12/17/2024 - 22:59
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)
गंभीर आरोप आहे हा... हे असले काही वाचण्याआधी माझे डोळे का नाही फुटले??? जमत नसेल, किंवा आवडत नसेल तर येउच नये की अशा कट्यांना... फालतु की गर्दी से तो कम गर्दी कभीभी अच्छी 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि Wed, 12/18/2024 - 03:50
मिपाकट्टे बाजूला ठेवा. त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य. लोक देखील एकमेकांना प्रथमच भेटत असतात अनेकजण. काही लोक आधी भेटलेले असतात देखील पण शक्यतो प्लॅन हा कोरडा असतो. इन जनरल म्हणत होतो. एकूण निरीक्षण असे की "तो" भाग महत्वाचा ठरतो जेव्हा आधी मुळात तसाच प्लॅन ठरतो आणि मग काही कारणाने तो भाग वजा करू जाल तर उत्साहात मोठा फरक पडू शकतो. अर्थात निरीक्षणे आणि अनुभव वैयक्तिक पातळीवर बदलू शकतात. यात काही नियम नसतो. गमतीचा भाग होता. आणि त्यात काही चूक आहे असेही नव्हे. :-)

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/18/2024 - 14:30
त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य.
+१००० पाच दिवसांपुर्वी निगडी येथे 'भेटणे हाच मुख्य उद्देश असलेला' एक 'अचानक' कट्टा घडुन आला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 'ओला-सुकाच' काय पण कुठे भेटायचे, कोण कोण येणार आहेत वगैरे गोष्टींचाही कोणाला थांगपत्ता नव्हता 😀 पण तरी निगडीच्या भव्य श्रीकृष्ण मंदीरात साडेसातच्या सुमारास पाच जणांच्या उपस्थितीने सुरु झालेल्या अचानक कट्ट्याचा सहा जणांच्या उपस्थितीत 'बाबा फाईन डाईन' नामक उपहारगृहात सुमारे साडे दहाच्या सुमारास समारोप झाला. प्रशांत शेठची पुणे ते अयोध्या सायकलवारी, प्रचेतस बुवांचे विविध विषयांवरचे महितीपुर्ण निरुपण, कविराज चांदणे संदीप ह्यांच्याकडुन त्यांच्या कवितांच्या जन्माच्या कथा असे उत्तमोत्तम परिसंवाद घडले, खुप मजा आली... पुढे झालेल्या प्रीती-भोजनास मात्र हे तीन दिग्गज मिपाकर थांबु शकले नाहीत ह्याची रुखरुख लागुन राहिली आहे! बादवे... भरघोस मिशा असलेला श्रीकृष्ण ह्या मंदिरात (मुर्तीरुपात) मी पहिल्यांदाच पाहिला...

In reply to by मुक्त विहारि

गोरगावलेकर Wed, 12/18/2024 - 23:16
आठवण ताजी झाली . कट्ट्यास जागा उपलब्ध करून देण्यात थोडासा सहभाग घेतल्याने माझे पती व मी कट्ट्यास निमित्तमात्र हजर राहिलो होतो.

गोरगावलेकर Wed, 12/18/2024 - 23:04
गोवा सगळ्यांच्याच आवडीचे ठिकाण दिसतेय . प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे नांव लिहीत नाही. खूप जणांनी भरभरून प्रतिसाद दिला . लेखाच्या निमित्ताने मिसळपाव कट्ट्यांबद्दलही बरीच चांगली चर्चा वाचावयास मिळाली. इतर सर्व वाचकांचेही धन्यवाद .

गोरगावलेकर Wed, 12/18/2024 - 23:05
विंनंती न करताही संपादकांनी धागा भटकंती विभागात हलवला याबद्दल त्यांचेही विशेष आभार. आता लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक देणे शक्य होणार आहे .
यापूर्वीचा भाग हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १ काल रात्री छान झोप झाली . बंगल्यात गरम पाण्याची तसेच शॉवर वगैरेला चांगल्या दाबाने पाणी मिळण्याची सोय होती .

गुरू आतला

रोहन जगताप ·

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

मुक्त विहारि Sun, 12/15/2024 - 17:29
माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा Tue, 12/24/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

मुक्त विहारि Sun, 12/15/2024 - 17:29
माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा Tue, 12/24/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !
लेखनविषय:
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले