मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाथा इराणी (ऐसी अक्षरे -२१)

Bhakti ·

कंजूस Wed, 12/04/2024 - 04:27
हे पुस्तक वाचलं आहे. प्रदेश पर्यटनाची मीना प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत. ती वाचली तेव्हा कळलं की त्या डॉक्टर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या असल्याने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत होते पर्यटन दौरा आखण्यात. सामान्य पर्यटकाला हे काही मिळत नाही. स्वतः जाणे किंवा पर्यटन आयोजकांतर्फे जाणे यात स्थळे, वेळ आणि पैशांचे बंधन पडते. ( पुस्तकातील चित्रांना प्रताधिकार असणार.)

छान लेख. इराण म्हटले की नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट आठवतो.
सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.
अयातुल्ला खोमेनी अगदीच धर्मांध होता यात अजिबात शंका नाही. पण तो खोमेनी सत्तेत यावा यासाठी अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? तर ती अमेरिकेने. १९५१ मध्ये इराणमध्ये निवडणुक झाली होती आणि मोहंमद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. तेल विहिरींमधून तेल काढण्याबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यायची यावरून वर उल्लेख केलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमशी मोसादेघ यांच्या सरकारचे वाजले. इराण सरकार अधिक रॉयल्टीची मागणी करत होते तर त्याला ब्रिटिश पेट्रोलियम तयार नव्हती. मग मोसादेघने ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या देशातून हाकलून देऊन सगळा तेल उद्योग इराण सरकारच्या मालकीचा (राष्ट्रीयीकरण) केले. मग इंग्लंड अमेरिका खवळले. मोसादेघना सत्तेवरून खाली खेचायचा चंग त्यांनी बांधला. त्यावेळेस जगात कम्युनिस्ट जगात शिरजोर होतील ही भिती अमेरिकन्सना होती. त्यातून मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा अपप्रचार अमेरिकेने सुरू केला. तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले तरी मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण म्हणू तसे न करणार्‍या राज्यकर्त्याला कम्युनिस्ट म्हणणे अमेरिकेच्या सोयीचे होते. मग सी.आय.ए ने इराणमधील पत्रकार, विचारवंत यांना चारापाणी टाकून मोसादेघ कसे हुकूमशहा आहेत, कसे वाईट आहेत, कसे अमुक आहेत, कसे तमुक आहेत असे लेख इराणी वर्तमानपत्रात यायला लागले. मग हळूहळू असेच पैसे दिलेले लोक मोसादेघ सरकारविरोधात रस्त्यावर आले. रस्त्यावर आलेल्या लोकांना बघून मोसादेघ खरोखरच वाईट आहेत असे वाटून आणखी काही लोक रस्त्यावर आले, मग आणखी काही असे करत करत डॉमिनो इफेक्ट झाला आणि सरकारविरोधात मोठी निदर्शने वगैरे झाली. हा सगळा सी.आय.ए ने घडवून आणणेला manufactured dissent होता. शेवटी मोसादेघना सत्ता सोडावी लागली आणि राजे शहा पेहलवी यांच्याकडे सर्वाधिकार आले. एकूण झाले काय की अमेरिकेने काड्या घातल्या आणि त्यातून अमेरिकाविरोधी वातावरण इराणमध्ये आले त्याचा फायदा खोमेनीसारख्या धर्मांधाने घेतला. रझा पेहलवी अमेरिका सांगेल तसे करत होते म्हणून ते खूप सुसंस्कृत वगैरे त्यांचे कौतुक झाले. नंतरच्या काळात सत्तेत आलेले खोमेनी पाहता त्यातुलनेत पेहलवी नक्कीच आधुनिक आणि सुसंस्कृत होते. पण अमेरिकेने काड्या घातल्या त्यातूनच खोमेनी सत्तेत यायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेने घडवून आणणेला हा पहिला रेजिम चेंज. साधारण त्याच काळात अमेरिकेने ग्वातेमालामध्येही असाच नालायकपणा केला होता. इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलियमशी सरकारचे वाजले तर ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रुट कंपनीशी सरकारचे वाजले. दोन्ही ठिकाणी परिणाम तोच झाला. त्यानंतर ग्वातेमाला कित्येक वर्षे अस्थिर होता. हे रेजिम चेंजचे खटलं २०२४ मध्ये बांगलादेशापर्यंत चालू आहे. म्हातारड्या थेरड्या जो बायडनने भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तोच किळसवाणा प्रकार करायचा प्रयत्न केला असे दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti Mon, 12/09/2024 - 13:20
खुप चांगली माहिती दिली.योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे. ,यातल पहिलं प्रकरण ब्रिटिश - अमेरिका तेल धोरण विरोधात लढणारा पहिला तेलिया इराणीय मोसादेघ यावरच आहे.एकदम हीच माहिती आणखिन सविस्तर आहे.

In reply to by Bhakti

माझ्या बॅग मध्येही एका तेलियानेर पडून आहे पण सध्या मी दुसऱ्या महायुद्धात श्री. हिटलर ह्यांच्या सोबत बीसी असल्याने त्याला स्पर्श केलेला नाही.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 13:40
योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे.
'एका तेलियाने' हे पुस्तक अवश्य वाचा... आणि मग त्या पुस्तकाच्या लेखकाचे लोकसत्तातले गेल्या दशकातले सगळे संपादकीय लेख वाचा. गिरीश 'कुबेर' हे लेखक महोदय पुढे वैचारिकदृष्ट्या इतके 'दरिद्री' कसे काय झाले असतील हा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही! मालक सांगेल त्यावर भुंकायचे अशी भूमिका संपादकाने स्वीकारली की काय होते ह्याचे (मदर टेरेसा नामक भंपक संतावर लिहिलेला लेख मागे घेणारे) गिरीश कुबेर हे गेल्या दिडेक वर्षातले पहिले उदाहरण... दुसरे कुठले ते सांगायची गरज आहे असे वाटत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 03:45
लोकसत्ता, मटा, सकाळ इथे पण संपादकीय खूप काही वैचारीक लिहीत नाहीत. आमचे बाबा महाराज दोंबोलीकर म्हणतात की, "दिगू कधीच वेडा झाला."

कर्नलतपस्वी Sat, 12/07/2024 - 12:52
आवडला. नवनवीन पुस्तक ओळखीमुळे वाचनाची आवड आणखीन वाढत आहे. धन्यवाद. काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे. त्यांचेही आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 15:19
"काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे." पण , काही वयाने वाढलेल्या पण अज्ञानी लोकांचे प्रतिसाद वाचतांना मनोरंजन पण होते. त्यामुळे, मिपा हे ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे पण उत्तम साधन आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 16:58
त्यामुळे सुरुवात, "माझे लंडन" ह्या पासून कर. लेखिकेचा जीवनप्रवास समजला की ह्यांचे प्रवासवर्णन वाचायला जास्त मजा येईल. शक्यतो, ह्यांची पुस्तके विकत घे. काही पुस्तकांच्या बरोबर, CD पण आहे. पुस्तक वाचता वाचता, CD वरील फोटो बघत जायचे.

मनो Sun, 12/08/2024 - 08:40
काही सुधारणा ताई, काही उच्चार थोडे चुकले आहेत, ते सांगतो. हफ्ट - हे हफ्त हवे, जसे हिंदीत आठवडा, सात दिवस याला हफ्ता म्हणतात. व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क ) हे सिरका हवे, शेवटचा ह silent म्हणून आ उच्चार होतो. सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib ) हे सेब, आपले हिंदी सफरचंद! फार पूर्वीपासून अरबी आणि इतर भाषा, फार्सी, संस्कृत इत्यादींत अक्षर मूल्ये आकड्यात असण्याची पद्धत आहे. ती वापरून एक कविता करून त्याचा कालश्लेश बनवतात. म्हणजे 'ही इमारत अमक्या तमक्याने बनवली ' यातील अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली की त्या प्रसंगाचे वर्ष येते. बिस्मिल्ला ... या कुराणातील पहिल्या आयाचे अक्षर मूल्य ७८६ येते म्हणून त्या आकड्याला काही मुसलमान शुभ मानतात. प्रभू बाईंचे लंडन मला आवडले होते, त्यानंतर त्यांनी एकच छापाची भाराभर पुस्तके लिहिल्याने ते एकसुरी प्रवास वर्णन वाचण्याचा कंटाळा येऊन वाचन सुटले. असो, लेख उत्तम झाला आहे, अजून काही लिहा!

In reply to by मनो

Bhakti Mon, 12/09/2024 - 13:23
धन्यवाद मनो नौरूजची माहिती मी विकिपीडियाहून कॉपी पेस्ट केली.पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे आहे.अक्षरमूल्य कन्सेप्ट सध्या तरी समजली नाही,पुढे कधीतरी नक्की समजून घेउन.

चामुंडराय Sun, 12/08/2024 - 09:26
छान लेख ! का कोणास ठाऊक परंतु इराण बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे. एका इराणी कलीग बरोबर बऱ्याचदा इराण बद्दल चर्चा होत असते. वरती एका प्रतिसादात चंसूकु ह्यांनी "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे (त्याच चित्रपटाच्या नावाचे) ते माझ्या संग्रही आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका इराणी माणसाबरोबर लग्न केलेल्या अमेरिकन स्त्री ची कथा आहे. तिला आणि मुलीला तो इराणला फक्त भेटीसाठी जाऊ असे सांगून घेऊन जातो. इराणमध्ये गेल्यावर मात्र तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन डांबून ठेवतो, इस्लामिक रितीरिवाज आणि वेशभूषा तिच्यावर लादतो. ती इराण मधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तिथले एजन्ट तिला सांगतात तुला आम्ही बाहेर पडायला मदत करू परंतु तुझ्या लहान मुलीला बरोबर नेणे शक्य नाही. ती मुलीला न घेता एकटी बाहेर पडायला तयार होत नाही. "नॉट विदाऊट माय डॉटर" असे स्पष्ट सांगते. पुढे ती लहान मुलीबरोबर अनेक प्रसंगानं तोंड देत, चालत, हाल अपेष्टा सहन करत इराणची सरहद्द ओलांडते आणि अमेरिकन एम्बसी मध्ये आश्रय घेते व अमेरिकेला परतते. त्या अनुभवांवर तिने ते पुस्तक लिहिले आहे. अतिशय थ्रिलिंग आहे, जरूर वाचावे.

In reply to by चामुंडराय

Bhakti Mon, 12/09/2024 - 13:26
"नॉट विदाऊट माय डॉटर "मी १२ वर्षांपूर्वीच हे पुस्तक वाचले आहे.या प्रकारची गोष्ट घेऊन एक हिंदी सिनेमा आला होता 'शक्ती'!एखादा इंग्लिश सिनेमाही असावा.

कंजूस Wed, 12/04/2024 - 04:27
हे पुस्तक वाचलं आहे. प्रदेश पर्यटनाची मीना प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत. ती वाचली तेव्हा कळलं की त्या डॉक्टर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या असल्याने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत होते पर्यटन दौरा आखण्यात. सामान्य पर्यटकाला हे काही मिळत नाही. स्वतः जाणे किंवा पर्यटन आयोजकांतर्फे जाणे यात स्थळे, वेळ आणि पैशांचे बंधन पडते. ( पुस्तकातील चित्रांना प्रताधिकार असणार.)

छान लेख. इराण म्हटले की नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट आठवतो.
सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.
अयातुल्ला खोमेनी अगदीच धर्मांध होता यात अजिबात शंका नाही. पण तो खोमेनी सत्तेत यावा यासाठी अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? तर ती अमेरिकेने. १९५१ मध्ये इराणमध्ये निवडणुक झाली होती आणि मोहंमद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. तेल विहिरींमधून तेल काढण्याबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यायची यावरून वर उल्लेख केलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमशी मोसादेघ यांच्या सरकारचे वाजले. इराण सरकार अधिक रॉयल्टीची मागणी करत होते तर त्याला ब्रिटिश पेट्रोलियम तयार नव्हती. मग मोसादेघने ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या देशातून हाकलून देऊन सगळा तेल उद्योग इराण सरकारच्या मालकीचा (राष्ट्रीयीकरण) केले. मग इंग्लंड अमेरिका खवळले. मोसादेघना सत्तेवरून खाली खेचायचा चंग त्यांनी बांधला. त्यावेळेस जगात कम्युनिस्ट जगात शिरजोर होतील ही भिती अमेरिकन्सना होती. त्यातून मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा अपप्रचार अमेरिकेने सुरू केला. तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले तरी मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण म्हणू तसे न करणार्‍या राज्यकर्त्याला कम्युनिस्ट म्हणणे अमेरिकेच्या सोयीचे होते. मग सी.आय.ए ने इराणमधील पत्रकार, विचारवंत यांना चारापाणी टाकून मोसादेघ कसे हुकूमशहा आहेत, कसे वाईट आहेत, कसे अमुक आहेत, कसे तमुक आहेत असे लेख इराणी वर्तमानपत्रात यायला लागले. मग हळूहळू असेच पैसे दिलेले लोक मोसादेघ सरकारविरोधात रस्त्यावर आले. रस्त्यावर आलेल्या लोकांना बघून मोसादेघ खरोखरच वाईट आहेत असे वाटून आणखी काही लोक रस्त्यावर आले, मग आणखी काही असे करत करत डॉमिनो इफेक्ट झाला आणि सरकारविरोधात मोठी निदर्शने वगैरे झाली. हा सगळा सी.आय.ए ने घडवून आणणेला manufactured dissent होता. शेवटी मोसादेघना सत्ता सोडावी लागली आणि राजे शहा पेहलवी यांच्याकडे सर्वाधिकार आले. एकूण झाले काय की अमेरिकेने काड्या घातल्या आणि त्यातून अमेरिकाविरोधी वातावरण इराणमध्ये आले त्याचा फायदा खोमेनीसारख्या धर्मांधाने घेतला. रझा पेहलवी अमेरिका सांगेल तसे करत होते म्हणून ते खूप सुसंस्कृत वगैरे त्यांचे कौतुक झाले. नंतरच्या काळात सत्तेत आलेले खोमेनी पाहता त्यातुलनेत पेहलवी नक्कीच आधुनिक आणि सुसंस्कृत होते. पण अमेरिकेने काड्या घातल्या त्यातूनच खोमेनी सत्तेत यायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेने घडवून आणणेला हा पहिला रेजिम चेंज. साधारण त्याच काळात अमेरिकेने ग्वातेमालामध्येही असाच नालायकपणा केला होता. इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलियमशी सरकारचे वाजले तर ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रुट कंपनीशी सरकारचे वाजले. दोन्ही ठिकाणी परिणाम तोच झाला. त्यानंतर ग्वातेमाला कित्येक वर्षे अस्थिर होता. हे रेजिम चेंजचे खटलं २०२४ मध्ये बांगलादेशापर्यंत चालू आहे. म्हातारड्या थेरड्या जो बायडनने भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तोच किळसवाणा प्रकार करायचा प्रयत्न केला असे दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti Mon, 12/09/2024 - 13:20
खुप चांगली माहिती दिली.योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे. ,यातल पहिलं प्रकरण ब्रिटिश - अमेरिका तेल धोरण विरोधात लढणारा पहिला तेलिया इराणीय मोसादेघ यावरच आहे.एकदम हीच माहिती आणखिन सविस्तर आहे.

In reply to by Bhakti

माझ्या बॅग मध्येही एका तेलियानेर पडून आहे पण सध्या मी दुसऱ्या महायुद्धात श्री. हिटलर ह्यांच्या सोबत बीसी असल्याने त्याला स्पर्श केलेला नाही.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 13:40
योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे.
'एका तेलियाने' हे पुस्तक अवश्य वाचा... आणि मग त्या पुस्तकाच्या लेखकाचे लोकसत्तातले गेल्या दशकातले सगळे संपादकीय लेख वाचा. गिरीश 'कुबेर' हे लेखक महोदय पुढे वैचारिकदृष्ट्या इतके 'दरिद्री' कसे काय झाले असतील हा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही! मालक सांगेल त्यावर भुंकायचे अशी भूमिका संपादकाने स्वीकारली की काय होते ह्याचे (मदर टेरेसा नामक भंपक संतावर लिहिलेला लेख मागे घेणारे) गिरीश कुबेर हे गेल्या दिडेक वर्षातले पहिले उदाहरण... दुसरे कुठले ते सांगायची गरज आहे असे वाटत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 03:45
लोकसत्ता, मटा, सकाळ इथे पण संपादकीय खूप काही वैचारीक लिहीत नाहीत. आमचे बाबा महाराज दोंबोलीकर म्हणतात की, "दिगू कधीच वेडा झाला."

कर्नलतपस्वी Sat, 12/07/2024 - 12:52
आवडला. नवनवीन पुस्तक ओळखीमुळे वाचनाची आवड आणखीन वाढत आहे. धन्यवाद. काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे. त्यांचेही आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 15:19
"काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे." पण , काही वयाने वाढलेल्या पण अज्ञानी लोकांचे प्रतिसाद वाचतांना मनोरंजन पण होते. त्यामुळे, मिपा हे ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे पण उत्तम साधन आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 16:58
त्यामुळे सुरुवात, "माझे लंडन" ह्या पासून कर. लेखिकेचा जीवनप्रवास समजला की ह्यांचे प्रवासवर्णन वाचायला जास्त मजा येईल. शक्यतो, ह्यांची पुस्तके विकत घे. काही पुस्तकांच्या बरोबर, CD पण आहे. पुस्तक वाचता वाचता, CD वरील फोटो बघत जायचे.

मनो Sun, 12/08/2024 - 08:40
काही सुधारणा ताई, काही उच्चार थोडे चुकले आहेत, ते सांगतो. हफ्ट - हे हफ्त हवे, जसे हिंदीत आठवडा, सात दिवस याला हफ्ता म्हणतात. व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क ) हे सिरका हवे, शेवटचा ह silent म्हणून आ उच्चार होतो. सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib ) हे सेब, आपले हिंदी सफरचंद! फार पूर्वीपासून अरबी आणि इतर भाषा, फार्सी, संस्कृत इत्यादींत अक्षर मूल्ये आकड्यात असण्याची पद्धत आहे. ती वापरून एक कविता करून त्याचा कालश्लेश बनवतात. म्हणजे 'ही इमारत अमक्या तमक्याने बनवली ' यातील अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली की त्या प्रसंगाचे वर्ष येते. बिस्मिल्ला ... या कुराणातील पहिल्या आयाचे अक्षर मूल्य ७८६ येते म्हणून त्या आकड्याला काही मुसलमान शुभ मानतात. प्रभू बाईंचे लंडन मला आवडले होते, त्यानंतर त्यांनी एकच छापाची भाराभर पुस्तके लिहिल्याने ते एकसुरी प्रवास वर्णन वाचण्याचा कंटाळा येऊन वाचन सुटले. असो, लेख उत्तम झाला आहे, अजून काही लिहा!

In reply to by मनो

Bhakti Mon, 12/09/2024 - 13:23
धन्यवाद मनो नौरूजची माहिती मी विकिपीडियाहून कॉपी पेस्ट केली.पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे आहे.अक्षरमूल्य कन्सेप्ट सध्या तरी समजली नाही,पुढे कधीतरी नक्की समजून घेउन.

चामुंडराय Sun, 12/08/2024 - 09:26
छान लेख ! का कोणास ठाऊक परंतु इराण बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे. एका इराणी कलीग बरोबर बऱ्याचदा इराण बद्दल चर्चा होत असते. वरती एका प्रतिसादात चंसूकु ह्यांनी "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे (त्याच चित्रपटाच्या नावाचे) ते माझ्या संग्रही आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका इराणी माणसाबरोबर लग्न केलेल्या अमेरिकन स्त्री ची कथा आहे. तिला आणि मुलीला तो इराणला फक्त भेटीसाठी जाऊ असे सांगून घेऊन जातो. इराणमध्ये गेल्यावर मात्र तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन डांबून ठेवतो, इस्लामिक रितीरिवाज आणि वेशभूषा तिच्यावर लादतो. ती इराण मधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तिथले एजन्ट तिला सांगतात तुला आम्ही बाहेर पडायला मदत करू परंतु तुझ्या लहान मुलीला बरोबर नेणे शक्य नाही. ती मुलीला न घेता एकटी बाहेर पडायला तयार होत नाही. "नॉट विदाऊट माय डॉटर" असे स्पष्ट सांगते. पुढे ती लहान मुलीबरोबर अनेक प्रसंगानं तोंड देत, चालत, हाल अपेष्टा सहन करत इराणची सरहद्द ओलांडते आणि अमेरिकन एम्बसी मध्ये आश्रय घेते व अमेरिकेला परतते. त्या अनुभवांवर तिने ते पुस्तक लिहिले आहे. अतिशय थ्रिलिंग आहे, जरूर वाचावे.

In reply to by चामुंडराय

Bhakti Mon, 12/09/2024 - 13:26
"नॉट विदाऊट माय डॉटर "मी १२ वर्षांपूर्वीच हे पुस्तक वाचले आहे.या प्रकारची गोष्ट घेऊन एक हिंदी सिनेमा आला होता 'शक्ती'!एखादा इंग्लिश सिनेमाही असावा.
लेखनविषय:
गाथा इराणी -लेखिका मीना प्रभू A इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.

आज मी साबणाने आंघोळ केली

विवेकपटाईत ·

चांदणे संदीप Mon, 12/02/2024 - 17:06
किमान या विषयात तरी समंजसपणा दाखवला सासूबाईंनी याचे कौतुक. कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. चांगलं आहे की. आधीच लोकसंख्या किती झालीये? लोकसंख्या आटोक्यात आणायला अश्या सासवाना सरकारने प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा. लाडकी सासूबाई योजना आणायला हवी.

नठ्यारा Mon, 12/02/2024 - 22:45
साबण लावून आंघोळ करायची आयडिया लई भारी. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे दडून अनेक भ्रष्टाचारी मनसोक्त चरंत होते. त्यामुळे मनमोहनसिंगांना रेनकोट घालून आंघोळ करणारे म्हणायचे. त्या धर्तीवर साबण लावून आंघोळ करणे म्हणजे काय ते चतुर वाचकांच्या सहज ध्यानी यावे. -नाठाळ नठ्या

कंजूस Tue, 12/03/2024 - 04:48
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक. ते नेहमी दूध डाळीचं पीठ/ बेसन लावूनच आंघोळी करत असणार. पण त्यांत काही केमिकल असतात कळल्याने नवीन साबणाकडे वळले की काय. तसा घरात फतवाही निघाला असेल. सगळ्यांनी अमुक ( मेडिमिक्स?) साबणानेच अंघोळ करायची. यमुनेचे पाणी हल्ली दूषीत होत चाललं आहे किंवा दिल्लीच्या वाईट हवेसाठी हाच पर्याय आहे. दूध बेसन सर्वांनीच वापरलं तर महागाई वाढेल. . . . पण लेख आता वाचला आणि समजलं की नवीन पिढीकडे कोणता वारसा हस्तांतरीत झाला आहे. अब पुराना किला नये किल्ले को कुछ करना चाहता है. .. मी पण साबण शोधायला जाणारच होतो पण रात्रीचा प्रहर उलटून रस्त्यावर पाववाला ओरडत सायकलने फिरायची वेळ झाली आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Tue, 12/03/2024 - 11:20
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक
अगदी अगदी... मी पण आज थोडा बिचकतच धागा उघडला आणि सुखद धक्का बसला! समोसा पुराणानंतरची ही साबणाने केलेली आंघोळ वाचुन मजा आली हो पटाईतकाका... 👍

In reply to by टर्मीनेटर

विवेकपटाईत Tue, 12/03/2024 - 11:56
धन्यवाद टेर्मीनेटर साहेब. बाकी माझ्या दृष्टीने औषधी आयुर्वेदिक किंवा एलोपथि नसतात. सर्वच त्या फक्त जैविक, खनिज आणि रसायन आधारित असतात.

वामन देशमुख Tue, 12/03/2024 - 12:37
काय हे पटाईत काका! तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक मिपावर असं काही लिहू लागले तर आमच्यासारख्या कनिष्ठांनी काय करायचं? हघ्याहेवेसांन --- बाकी, प्रौढ मिपा दिवाळी अंकानंतरचा हा लेख आवडला. प्रत्येक दाम्पत्यांची अशी काही गुपिते असतातच; घरोघरी साबणाच्या आंघोळी, दुसरं काय? --- घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! ;-)

In reply to by वामन देशमुख

विवेकपटाईत Tue, 12/03/2024 - 16:31
घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! यात तथ्य असण्याची संभावना जास्त. महानगरात जिथे कार्यालयात जण्या येण्यात तीन ते चार तास लागतात. तिथे या समस्या आहेत. बहुतेक एक जुना चित्रपट बहुतेक नाव मबईचा जावई अशीच समस्या दाखविली आहे.

Bhakti Tue, 12/03/2024 - 20:10
ओएमजी ;) परवलीचे वाक्य,किस्सा वाचून हसून हसून वाट लागली. म्हणूनच रात्रीला 'खिचडी' हे भारतीय समीकरण इतकी वर्षे हीट आहे तर ...हा हा!

वामन देशमुख गुरुवार, 12/05/2024 - 10:53
हायला! कुणी सकाळी साबणांघोळ करतं, कुणी रात्री खिचडी लावतं तर कुणी अजून काय काय करतं! चला मिपाखरांनो, आपापले परवलीचे शब्द सांगा पाहू. सर्वोत्तम मिपाखराचा काय सत्कार करायचा ते विवेकपटाईत साहेब सांगतीलच.

In reply to by वामन देशमुख

नठ्यारा गुरुवार, 12/05/2024 - 19:58
हा परवलीचा संभाव्य वाक्प्रचार होऊ शकेल का ? :- खुंटा हलवून बळकट करणे. जाणकारांची भाष्ये अभिप्रेत. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 11:48
"खुंटा हलवून बळकट करणे" वरून स्व. दादा कोंडकेंच्या 'पांडू हवालदार' चित्रपटाच्या सुरुवातीचे अ‍ॅनिमेशन आठवले.... 'दार हलवा पांडू', 'पार हलवा दांडू' असे अक्षरांचे क्रम बदलत केलेल्या शब्दरचनेतून विनोद निर्मिती करत पुढे ती योग्य क्रमात लावत चित्रपटाचे 'पांडू हवालदार' हे शीर्षक दाखवणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नक्कीच नाही! त्यांच्याबद्दल कोणाची काहीही मते असतील पण दादांसारखा प्रचंड बुद्धिमान माणूसच ते करू शकतो ह्याविषयी मला तरी 'शेण खा' आपलं 'शंका' नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

रामचंद्र Fri, 12/06/2024 - 18:11
अनिता पाध्यांच्या पुस्तकात वर्णन केलेला मोरोपंतांच्या आर्येच्या दादांनी केलेल्या फोडीचा किस्साही असाच अफलातून आहे!

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा Fri, 12/06/2024 - 19:43
इथे बरीच चरचा आहे _ https://www.misalpav.com/node/21614 _पण ती आर्या नाहीच सापडली. मिपाकरांनो कुणीतरी या पामर मिपाकराचे अज्ञ्यान दुर करा हो

In reply to by चौथा कोनाडा

गवि Mon, 12/09/2024 - 13:30
त्या चर्चेतच आर्येचे शब्द आहेत. ते सर्च केले की पूर्ण मिळेलच. काही नाही. खोकल्यावरचे घरगुती उपाय आहेत.

In reply to by गवि

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 14:33
ओहो... असे आहे होय... चौ कोंनी धाग्याची लिंक दिली होती पण त्यावर त्यांना आर्या सापडली नसल्याचे म्हंटले होते म्हणुन मी तो धागा उघडण्याचे कष्ट घेतले नव्हते. पण आत्ता उघडून पाहिला आणि त्यात 'वल्ली' अर्थात प्रचेतेस ह्यांची कॉमेंट वाचल्यावर उलगडा झाला... आणि पूर्वी ऐकली असली तरी शोधकार्यात नव्याने सापडलेली ती आर्या खाली देतो आहे. पण त्याची अशी फोड स्व. दादा कोंडकेंनी केली होती हे मलातरी नव्यानेच समजले... प्रचंड आवडत्या दादां विषयीचा अभ्यास वाढवावा लागेल!
आपल्यावर सतत होणारा द्वयर्थी विनोदाचा आरोप खोडून काढताना दादांनी अत्यंत समर्पक उदाहरणे देऊन आपल्या हजरजबाबीपणाची प्रचीती दिली आहे. ते म्हणतात --- मोठमोठ्या कवींना शब्दांची गम्मत करण्याचा मोह आवरलेला नाही. मोरोपंत हे महान कवी होते कि नाही ? होतेच . त्यांच्या आर्या अतिशय गाजलेल्या आहेत कि नाही ? आहेतच . मग त्यांनीच केलेल्या एका आर्येचे उदाहरण घेऊ या .. "स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडीरा खावी | ती हि नसता , स्वहस्ते चीबुल्ली दाबावी || " . आता यात थोडे संस्कृत आहे म्हणून अर्थ सांगितला पाहिजे . कंडू म्हणजे खोकला आणि रंडीरा म्हणजे खडीसाखर . अर्थ असा आहे कि स्वत:ची बायको घरात नसली आणि खोकला आला तर काय करावं ? तर खडीसाखर खावी . तीही म्हणजे खडीसाखर घरात नसली तर चीबुल्ली म्हणजे कंठमणी . तो हाताने थोडा दाबावा . अर्थ किती सरळ सोपा आहे कि नाही ? पण याच आर्येतील 'रंडीरा' या शब्दातला 'रा' जर पुढच्या शब्दाला जोडला आणि 'चीबुल्ली' मधला ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय अर्थ होईल ?

In reply to by टर्मीनेटर

गवि Mon, 12/09/2024 - 14:48
१. ही खरोखर आर्या आहे? २. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे? ३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि) ही कविता / रचना ऐकली आहे पूर्वी पण. तरीही त्याच्या अस्सलपणाबद्दल काहीही माहीत नाही. वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 17:54
१. ही खरोखर आर्या आहे?
काव्य ह्या साहित्य प्रकाराशी कधी नाळ जुळलीच नसल्याने ह्यबद्दल खरंच काही माहिती नाही... आर्या १ आणि आर्या २ हे अल्लु अर्जुनचे दोन चित्रपट आणि ह्या धाग्यावरच्या प्रतिसादांत आलेला तो शब्द सोडल्यास 'आर्या' ह्या नाम/संज्ञेशी माझातरी आजतागायत कधी संबंध आलेला नाही 😀 (बाकी 'आर्या १' पासुन अल्लु अर्जुन वर जडलेली माया 'पुष्पा २ द रुल' पर्यंत तरी टिकुन आहे आणि आगामी 'पुष्पा ३ द रँपेज' पर्यंत ती कायम असेल हे नक्की.)
२. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे?
आता हे मोरोपंत कोण असा प्रश्न विचारावासा वाटतोय पण उगाच आपले अज्ञान कशाला प्रकट करायचे ह्या विचाराने तो प्रश्न विचारणे टाळतोय. इथे कोणी सांगीतले की "ही आर्या मोरोपंतांनी लिहिली नसुन आमरेंद्र बाहुबलींनी लिहिली आहे" तरी मी त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवीन. ह्यावरुन माझ्या काव्य/पद्याबद्दलच्या अज्ञानाची कल्पना येऊ शकेल 😂
३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि)
हे राम!
वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.
+१००० मी त्या बाबतीत अगदीच अनाडी आहे! पण दादांबद्दलचा अभ्यास वाढवावा लागणार आहे हे ह्या निमित्ताने मला समजले आहे आणि ह्या महान कलवंताच्या येत्या जयंती/पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांचावर एखादा लेख लिहावा असेही वाटु लागले आहे!

In reply to by रामचंद्र

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 12:39
दादांचे बरेच धमाल किस्से ऐकले आहेत, वाचले आहेत... पण ह्या आर्येचा किस्सा काही आठवत नाहीये, वर चौ को म्हणाले आहेत त्याप्रमाणे काही क्लू दिलात तर तो किस्सा आठवायला मदत होईल!

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 11:42
परवलीच्या शब्दावरून "वॉशिंग मशीन चालू आहे का? की आज पण हातानेच कपडे धुवावे लागतील" वाला जुना चावट विनोद आठवला 😀

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख Fri, 12/06/2024 - 12:01
काय हे मिपाखरांनो! खुंटा काय, वॉशिंग मशीन काय, सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का? काहीतरी कामाचं शिका; चला सैपाक करायला शिका पाहू. घ्या पहिला धडा - कणिक चांगली तिंबली की मग पदर चांगले सुटतात. - (शिकाऊ मिपाखरु) द्येस्मुक् राव्

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 13:57
सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का?
आमच्या सारख्या साध्या, सरळमार्गी, सज्जनांनी निरागसपणे काही लिहिले की लगेच त्यात काहितरी चुकीचा/चावट अर्थ शोधुन प्रस्थापितांकडुन टवाळी केली जाते ह्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो... 😀 "मसल मसल के कडक किया... थुक लगाके डाल दिया... बोलो क्या?" असे एक हिंदी भाषेत कोडे आहे... परंतु त्यातही काहितरी चावटपणा शोधण्याचा प्रयत्न इथले काही 'शैतानी दिमाग' वाले लोक करणार ह्याची खात्री असल्याने मी त्याचे उत्तर पण सांगुन टाकतो.. ह्या कोड्याचे साधे, सरळ, निष्पाप उत्तर 'सुई में धागा डालना' असे आहे 😂

कंजूस गुरुवार, 12/05/2024 - 20:10
मुंबईत व्यापारानिमित्त येऊन जागा पक्की केलेल्या समाजात व्यवसायाची जागा मुख्य आणि राहण्याची गौण धरली. त्यांच्याकडे रीतसर टाईमटेबलच असते - कुणी आंघोळ कधी करायची, कुणी देवदर्शनाला जायचं, कुणी कधी तीर्थयात्रा पर्यटनाला जायचे.

चौथा कोनाडा Fri, 12/06/2024 - 11:30
आप्ल्या नावातच पटाईत आहे, त्यामुळं क्लूप्त्या काढण्यात तुम्ही पटाईत असणारच ! :) ही " साबणाने आंघोळ केली " केली आयडिया लै आवडली. लिहित रहा .. छान ओघवतं लिहिता, वाचायला मजा येते.

मुक्त विहारि Fri, 12/06/2024 - 20:30
लग्ना नंतर १९९२ ते १९९८ , आम्ही दोघे राजाराणी असल्यानं "कोड वर्ड" वापरायची वेळ आली नाही. आणि १९९८ ते आजतागायत, "डोळ्यात वाच माझ्या..." हीच भूमिका दोघांचीही आहे.

चित्रगुप्त Sun, 12/08/2024 - 06:35
सुरुवतीला एवढे डीटेलवार रूटीन सांगण्याचे कारण शेवटी समजले. मस्त. दिवस गेले ... सॉरी... गेले ते दिवस. विवेकपंत, या खुसखुषीत लेखाबद्दल आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट. रसिक मिपाकरांसाठी हे साबण खरेदी करण्यासाठी दुवा: https://www.etsy.com/in-en/listing/1157895761/penis-shaped-soap-penis-soap-mature-18 .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 11:43
साबण काय.... केक काय... कलाकार मंडळी विविध क्षेत्रात आपल्या 'कलाकारी'चे दर्शन घडवत आहेत... बघा आणि मजा घ्या 😀 बाकी पुर्वी बॅचलर पार्टीज पुरता मर्यादीत असलेला हा प्रकार मागे पवईच्या चर्च मध्ये एका व्यक्तीच्या ६१ व्या वाढदिवशी पाहिल्यावर उडालोच होतो 😂 त्यावर एक सविस्तर प्रतिसादही लिहिला होता इथल्या एका धाग्यवर...

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा Mon, 12/09/2024 - 17:49
केक पण .... ! चिगुंनी दिलेल्या फोटोत मेणाची आलिंगने आहेत .. इथं पण मेणबत्ती कामी आली म्हणायची .. हा .... हा .... हा .... ! (मुलींचे वगॄ, लाईट जाणे अन मेणबत्ती चा जुना ज्योक आठवला !

In reply to by चित्रगुप्त

विवेकपटाईत Mon, 12/09/2024 - 18:48
साबणाच्या जोडीचा सप्रेम स्वीकार करतो. बाकी अजून आमच्या सौ. हा लेख वाचलेला नाही. "यथार्थ" हॉस्पिटल ग्रेटर नोएडा सहा किमी दूर आहे.

चित्रगुप्त Mon, 12/09/2024 - 21:00
काही वर्षांपूर्वी पॅरिसात असलेले Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) बघितले होते. तिथे पुष्कळ फोटोही काढले होते. त्यावर सचित्र लेख लिहायचे राहून गेलेले आहे. या लेखाच्या निमित्ताने जालावर धांडोळा घेता ते नोहेंबर २०१६ मधे बंद करण्यात आल्याचे समजले. ते जुने फोटो हुडकून आता तो राहून गेलेला लेख लिहीला पाहिजे. त्यातली भारतियांच्या दृष्टीने स्फोटक अशी एक वस्तु म्हणजे गणपतीबाप्पाची रतिमुद्रेतली मूर्ती. Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) was a sex museum in Paris devoted to the erotic art collections of antique dealer Alain Plumey and French teacher Jo Khalifa. It closed its doors on November 7, 2016.

चांदणे संदीप Mon, 12/02/2024 - 17:06
किमान या विषयात तरी समंजसपणा दाखवला सासूबाईंनी याचे कौतुक. कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. चांगलं आहे की. आधीच लोकसंख्या किती झालीये? लोकसंख्या आटोक्यात आणायला अश्या सासवाना सरकारने प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा. लाडकी सासूबाई योजना आणायला हवी.

नठ्यारा Mon, 12/02/2024 - 22:45
साबण लावून आंघोळ करायची आयडिया लई भारी. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे दडून अनेक भ्रष्टाचारी मनसोक्त चरंत होते. त्यामुळे मनमोहनसिंगांना रेनकोट घालून आंघोळ करणारे म्हणायचे. त्या धर्तीवर साबण लावून आंघोळ करणे म्हणजे काय ते चतुर वाचकांच्या सहज ध्यानी यावे. -नाठाळ नठ्या

कंजूस Tue, 12/03/2024 - 04:48
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक. ते नेहमी दूध डाळीचं पीठ/ बेसन लावूनच आंघोळी करत असणार. पण त्यांत काही केमिकल असतात कळल्याने नवीन साबणाकडे वळले की काय. तसा घरात फतवाही निघाला असेल. सगळ्यांनी अमुक ( मेडिमिक्स?) साबणानेच अंघोळ करायची. यमुनेचे पाणी हल्ली दूषीत होत चाललं आहे किंवा दिल्लीच्या वाईट हवेसाठी हाच पर्याय आहे. दूध बेसन सर्वांनीच वापरलं तर महागाई वाढेल. . . . पण लेख आता वाचला आणि समजलं की नवीन पिढीकडे कोणता वारसा हस्तांतरीत झाला आहे. अब पुराना किला नये किल्ले को कुछ करना चाहता है. .. मी पण साबण शोधायला जाणारच होतो पण रात्रीचा प्रहर उलटून रस्त्यावर पाववाला ओरडत सायकलने फिरायची वेळ झाली आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Tue, 12/03/2024 - 11:20
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक
अगदी अगदी... मी पण आज थोडा बिचकतच धागा उघडला आणि सुखद धक्का बसला! समोसा पुराणानंतरची ही साबणाने केलेली आंघोळ वाचुन मजा आली हो पटाईतकाका... 👍

In reply to by टर्मीनेटर

विवेकपटाईत Tue, 12/03/2024 - 11:56
धन्यवाद टेर्मीनेटर साहेब. बाकी माझ्या दृष्टीने औषधी आयुर्वेदिक किंवा एलोपथि नसतात. सर्वच त्या फक्त जैविक, खनिज आणि रसायन आधारित असतात.

वामन देशमुख Tue, 12/03/2024 - 12:37
काय हे पटाईत काका! तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक मिपावर असं काही लिहू लागले तर आमच्यासारख्या कनिष्ठांनी काय करायचं? हघ्याहेवेसांन --- बाकी, प्रौढ मिपा दिवाळी अंकानंतरचा हा लेख आवडला. प्रत्येक दाम्पत्यांची अशी काही गुपिते असतातच; घरोघरी साबणाच्या आंघोळी, दुसरं काय? --- घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! ;-)

In reply to by वामन देशमुख

विवेकपटाईत Tue, 12/03/2024 - 16:31
घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे! यात तथ्य असण्याची संभावना जास्त. महानगरात जिथे कार्यालयात जण्या येण्यात तीन ते चार तास लागतात. तिथे या समस्या आहेत. बहुतेक एक जुना चित्रपट बहुतेक नाव मबईचा जावई अशीच समस्या दाखविली आहे.

Bhakti Tue, 12/03/2024 - 20:10
ओएमजी ;) परवलीचे वाक्य,किस्सा वाचून हसून हसून वाट लागली. म्हणूनच रात्रीला 'खिचडी' हे भारतीय समीकरण इतकी वर्षे हीट आहे तर ...हा हा!

वामन देशमुख गुरुवार, 12/05/2024 - 10:53
हायला! कुणी सकाळी साबणांघोळ करतं, कुणी रात्री खिचडी लावतं तर कुणी अजून काय काय करतं! चला मिपाखरांनो, आपापले परवलीचे शब्द सांगा पाहू. सर्वोत्तम मिपाखराचा काय सत्कार करायचा ते विवेकपटाईत साहेब सांगतीलच.

In reply to by वामन देशमुख

नठ्यारा गुरुवार, 12/05/2024 - 19:58
हा परवलीचा संभाव्य वाक्प्रचार होऊ शकेल का ? :- खुंटा हलवून बळकट करणे. जाणकारांची भाष्ये अभिप्रेत. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 11:48
"खुंटा हलवून बळकट करणे" वरून स्व. दादा कोंडकेंच्या 'पांडू हवालदार' चित्रपटाच्या सुरुवातीचे अ‍ॅनिमेशन आठवले.... 'दार हलवा पांडू', 'पार हलवा दांडू' असे अक्षरांचे क्रम बदलत केलेल्या शब्दरचनेतून विनोद निर्मिती करत पुढे ती योग्य क्रमात लावत चित्रपटाचे 'पांडू हवालदार' हे शीर्षक दाखवणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नक्कीच नाही! त्यांच्याबद्दल कोणाची काहीही मते असतील पण दादांसारखा प्रचंड बुद्धिमान माणूसच ते करू शकतो ह्याविषयी मला तरी 'शेण खा' आपलं 'शंका' नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

रामचंद्र Fri, 12/06/2024 - 18:11
अनिता पाध्यांच्या पुस्तकात वर्णन केलेला मोरोपंतांच्या आर्येच्या दादांनी केलेल्या फोडीचा किस्साही असाच अफलातून आहे!

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा Fri, 12/06/2024 - 19:43
इथे बरीच चरचा आहे _ https://www.misalpav.com/node/21614 _पण ती आर्या नाहीच सापडली. मिपाकरांनो कुणीतरी या पामर मिपाकराचे अज्ञ्यान दुर करा हो

In reply to by चौथा कोनाडा

गवि Mon, 12/09/2024 - 13:30
त्या चर्चेतच आर्येचे शब्द आहेत. ते सर्च केले की पूर्ण मिळेलच. काही नाही. खोकल्यावरचे घरगुती उपाय आहेत.

In reply to by गवि

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 14:33
ओहो... असे आहे होय... चौ कोंनी धाग्याची लिंक दिली होती पण त्यावर त्यांना आर्या सापडली नसल्याचे म्हंटले होते म्हणुन मी तो धागा उघडण्याचे कष्ट घेतले नव्हते. पण आत्ता उघडून पाहिला आणि त्यात 'वल्ली' अर्थात प्रचेतेस ह्यांची कॉमेंट वाचल्यावर उलगडा झाला... आणि पूर्वी ऐकली असली तरी शोधकार्यात नव्याने सापडलेली ती आर्या खाली देतो आहे. पण त्याची अशी फोड स्व. दादा कोंडकेंनी केली होती हे मलातरी नव्यानेच समजले... प्रचंड आवडत्या दादां विषयीचा अभ्यास वाढवावा लागेल!
आपल्यावर सतत होणारा द्वयर्थी विनोदाचा आरोप खोडून काढताना दादांनी अत्यंत समर्पक उदाहरणे देऊन आपल्या हजरजबाबीपणाची प्रचीती दिली आहे. ते म्हणतात --- मोठमोठ्या कवींना शब्दांची गम्मत करण्याचा मोह आवरलेला नाही. मोरोपंत हे महान कवी होते कि नाही ? होतेच . त्यांच्या आर्या अतिशय गाजलेल्या आहेत कि नाही ? आहेतच . मग त्यांनीच केलेल्या एका आर्येचे उदाहरण घेऊ या .. "स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडीरा खावी | ती हि नसता , स्वहस्ते चीबुल्ली दाबावी || " . आता यात थोडे संस्कृत आहे म्हणून अर्थ सांगितला पाहिजे . कंडू म्हणजे खोकला आणि रंडीरा म्हणजे खडीसाखर . अर्थ असा आहे कि स्वत:ची बायको घरात नसली आणि खोकला आला तर काय करावं ? तर खडीसाखर खावी . तीही म्हणजे खडीसाखर घरात नसली तर चीबुल्ली म्हणजे कंठमणी . तो हाताने थोडा दाबावा . अर्थ किती सरळ सोपा आहे कि नाही ? पण याच आर्येतील 'रंडीरा' या शब्दातला 'रा' जर पुढच्या शब्दाला जोडला आणि 'चीबुल्ली' मधला ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय अर्थ होईल ?

In reply to by टर्मीनेटर

गवि Mon, 12/09/2024 - 14:48
१. ही खरोखर आर्या आहे? २. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे? ३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि) ही कविता / रचना ऐकली आहे पूर्वी पण. तरीही त्याच्या अस्सलपणाबद्दल काहीही माहीत नाही. वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 17:54
१. ही खरोखर आर्या आहे?
काव्य ह्या साहित्य प्रकाराशी कधी नाळ जुळलीच नसल्याने ह्यबद्दल खरंच काही माहिती नाही... आर्या १ आणि आर्या २ हे अल्लु अर्जुनचे दोन चित्रपट आणि ह्या धाग्यावरच्या प्रतिसादांत आलेला तो शब्द सोडल्यास 'आर्या' ह्या नाम/संज्ञेशी माझातरी आजतागायत कधी संबंध आलेला नाही 😀 (बाकी 'आर्या १' पासुन अल्लु अर्जुन वर जडलेली माया 'पुष्पा २ द रुल' पर्यंत तरी टिकुन आहे आणि आगामी 'पुष्पा ३ द रँपेज' पर्यंत ती कायम असेल हे नक्की.)
२. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे?
आता हे मोरोपंत कोण असा प्रश्न विचारावासा वाटतोय पण उगाच आपले अज्ञान कशाला प्रकट करायचे ह्या विचाराने तो प्रश्न विचारणे टाळतोय. इथे कोणी सांगीतले की "ही आर्या मोरोपंतांनी लिहिली नसुन आमरेंद्र बाहुबलींनी लिहिली आहे" तरी मी त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवीन. ह्यावरुन माझ्या काव्य/पद्याबद्दलच्या अज्ञानाची कल्पना येऊ शकेल 😂
३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि)
हे राम!
वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.
+१००० मी त्या बाबतीत अगदीच अनाडी आहे! पण दादांबद्दलचा अभ्यास वाढवावा लागणार आहे हे ह्या निमित्ताने मला समजले आहे आणि ह्या महान कलवंताच्या येत्या जयंती/पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांचावर एखादा लेख लिहावा असेही वाटु लागले आहे!

In reply to by रामचंद्र

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 12:39
दादांचे बरेच धमाल किस्से ऐकले आहेत, वाचले आहेत... पण ह्या आर्येचा किस्सा काही आठवत नाहीये, वर चौ को म्हणाले आहेत त्याप्रमाणे काही क्लू दिलात तर तो किस्सा आठवायला मदत होईल!

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 11:42
परवलीच्या शब्दावरून "वॉशिंग मशीन चालू आहे का? की आज पण हातानेच कपडे धुवावे लागतील" वाला जुना चावट विनोद आठवला 😀

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख Fri, 12/06/2024 - 12:01
काय हे मिपाखरांनो! खुंटा काय, वॉशिंग मशीन काय, सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का? काहीतरी कामाचं शिका; चला सैपाक करायला शिका पाहू. घ्या पहिला धडा - कणिक चांगली तिंबली की मग पदर चांगले सुटतात. - (शिकाऊ मिपाखरु) द्येस्मुक् राव्

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 13:57
सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का?
आमच्या सारख्या साध्या, सरळमार्गी, सज्जनांनी निरागसपणे काही लिहिले की लगेच त्यात काहितरी चुकीचा/चावट अर्थ शोधुन प्रस्थापितांकडुन टवाळी केली जाते ह्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो... 😀 "मसल मसल के कडक किया... थुक लगाके डाल दिया... बोलो क्या?" असे एक हिंदी भाषेत कोडे आहे... परंतु त्यातही काहितरी चावटपणा शोधण्याचा प्रयत्न इथले काही 'शैतानी दिमाग' वाले लोक करणार ह्याची खात्री असल्याने मी त्याचे उत्तर पण सांगुन टाकतो.. ह्या कोड्याचे साधे, सरळ, निष्पाप उत्तर 'सुई में धागा डालना' असे आहे 😂

कंजूस गुरुवार, 12/05/2024 - 20:10
मुंबईत व्यापारानिमित्त येऊन जागा पक्की केलेल्या समाजात व्यवसायाची जागा मुख्य आणि राहण्याची गौण धरली. त्यांच्याकडे रीतसर टाईमटेबलच असते - कुणी आंघोळ कधी करायची, कुणी देवदर्शनाला जायचं, कुणी कधी तीर्थयात्रा पर्यटनाला जायचे.

चौथा कोनाडा Fri, 12/06/2024 - 11:30
आप्ल्या नावातच पटाईत आहे, त्यामुळं क्लूप्त्या काढण्यात तुम्ही पटाईत असणारच ! :) ही " साबणाने आंघोळ केली " केली आयडिया लै आवडली. लिहित रहा .. छान ओघवतं लिहिता, वाचायला मजा येते.

मुक्त विहारि Fri, 12/06/2024 - 20:30
लग्ना नंतर १९९२ ते १९९८ , आम्ही दोघे राजाराणी असल्यानं "कोड वर्ड" वापरायची वेळ आली नाही. आणि १९९८ ते आजतागायत, "डोळ्यात वाच माझ्या..." हीच भूमिका दोघांचीही आहे.

चित्रगुप्त Sun, 12/08/2024 - 06:35
सुरुवतीला एवढे डीटेलवार रूटीन सांगण्याचे कारण शेवटी समजले. मस्त. दिवस गेले ... सॉरी... गेले ते दिवस. विवेकपंत, या खुसखुषीत लेखाबद्दल आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट. रसिक मिपाकरांसाठी हे साबण खरेदी करण्यासाठी दुवा: https://www.etsy.com/in-en/listing/1157895761/penis-shaped-soap-penis-soap-mature-18 .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 11:43
साबण काय.... केक काय... कलाकार मंडळी विविध क्षेत्रात आपल्या 'कलाकारी'चे दर्शन घडवत आहेत... बघा आणि मजा घ्या 😀 बाकी पुर्वी बॅचलर पार्टीज पुरता मर्यादीत असलेला हा प्रकार मागे पवईच्या चर्च मध्ये एका व्यक्तीच्या ६१ व्या वाढदिवशी पाहिल्यावर उडालोच होतो 😂 त्यावर एक सविस्तर प्रतिसादही लिहिला होता इथल्या एका धाग्यवर...

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा Mon, 12/09/2024 - 17:49
केक पण .... ! चिगुंनी दिलेल्या फोटोत मेणाची आलिंगने आहेत .. इथं पण मेणबत्ती कामी आली म्हणायची .. हा .... हा .... हा .... ! (मुलींचे वगॄ, लाईट जाणे अन मेणबत्ती चा जुना ज्योक आठवला !

In reply to by चित्रगुप्त

विवेकपटाईत Mon, 12/09/2024 - 18:48
साबणाच्या जोडीचा सप्रेम स्वीकार करतो. बाकी अजून आमच्या सौ. हा लेख वाचलेला नाही. "यथार्थ" हॉस्पिटल ग्रेटर नोएडा सहा किमी दूर आहे.

चित्रगुप्त Mon, 12/09/2024 - 21:00
काही वर्षांपूर्वी पॅरिसात असलेले Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) बघितले होते. तिथे पुष्कळ फोटोही काढले होते. त्यावर सचित्र लेख लिहायचे राहून गेलेले आहे. या लेखाच्या निमित्ताने जालावर धांडोळा घेता ते नोहेंबर २०१६ मधे बंद करण्यात आल्याचे समजले. ते जुने फोटो हुडकून आता तो राहून गेलेला लेख लिहीला पाहिजे. त्यातली भारतियांच्या दृष्टीने स्फोटक अशी एक वस्तु म्हणजे गणपतीबाप्पाची रतिमुद्रेतली मूर्ती. Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) was a sex museum in Paris devoted to the erotic art collections of antique dealer Alain Plumey and French teacher Jo Khalifa. It closed its doors on November 7, 2016.
लेखनविषय:
लेखनप्रकार
या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ.

पश्चिमाई

कुमार जावडेकर ·
लेखनविषय:
काव्यरस
पूर्वरंगांची जुन्या प्रतिमा नवी ही पश्चिमाई शब्दवेलींना नवेली पालवी ही पश्चिमाई विस्मृतींचे दाटती काहूर जेव्हा अंतरी या भोवताली फेर धरते लाघवी ही पश्चिमाई चोरुनी बघता हिला मी चोरते नजरा कधी ही खेळते नेत्रांतुनी का पल्लवी ही पश्चिमाई बोलते, हसते तशी, रुसते कधी फुगते कधी ही सांग ना होते कशाला मानवी ही पश्चिमाई कोण तू अन् कोण मी हा शोध आता संपला अन् भासते अवघी मनाला भैरवी ही पश्चिमाई - कुमार जावडेकर (अलीकडेच 'पश्चिमाई' हा ब्लॉग (त्रैमासिक स्वरूपात) आम्ही यु.के.त सुरू केला. त्याच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली ही गझल.) https://pashchimaai.blogspot.com/2024/10/blog-post_18.html

पानगळीचा रंगोत्सव

चामुंडराय ·

कर्नलतपस्वी Mon, 12/02/2024 - 17:48
खुशाल गळता गळा दळांनो हसत सरा माझीया क्षणांनो बघे क्षणांच्या पानगळीत मी अक्षयपण उमले... आणखी एक पान गळले..... -वा रा कांत सगळी पाने गळतील. झाडांचे खराटे आकाशाचे आंगण झाडतील. धरित्री पांढरी शाल ओढून काही दिवस विश्राम करेल. पुन्हा नवनवोन्मेषाचे क्षण जन्माला येतील. सुंदर ऋतूचक्र. अमेरीकेत पाहीलेला शरद ऋतू. फक्त पांढराशुभ्र रंग चहूकडे..... संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्रधवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून हा धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची आशा हीच उद्याची .....

चामुंडराय Sun, 12/08/2024 - 09:46
आपल्या प्रसंशात्मक प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. कर्नल साहेबांची कविता छान आहे. फॉल कलर्सचा रंग बदल दर्शवणारे एक प्रकाशचित्र. 7p

कर्नलतपस्वी Mon, 12/02/2024 - 17:48
खुशाल गळता गळा दळांनो हसत सरा माझीया क्षणांनो बघे क्षणांच्या पानगळीत मी अक्षयपण उमले... आणखी एक पान गळले..... -वा रा कांत सगळी पाने गळतील. झाडांचे खराटे आकाशाचे आंगण झाडतील. धरित्री पांढरी शाल ओढून काही दिवस विश्राम करेल. पुन्हा नवनवोन्मेषाचे क्षण जन्माला येतील. सुंदर ऋतूचक्र. अमेरीकेत पाहीलेला शरद ऋतू. फक्त पांढराशुभ्र रंग चहूकडे..... संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्रधवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून हा धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची आशा हीच उद्याची .....

चामुंडराय Sun, 12/08/2024 - 09:46
आपल्या प्रसंशात्मक प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. कर्नल साहेबांची कविता छान आहे. फॉल कलर्सचा रंग बदल दर्शवणारे एक प्रकाशचित्र. 7p
लेखनविषय:
लेखनप्रकार
1p 2p इस रंग बदलती दुनिया मे ... २१ जून रोजी मध्यान्ही सूर्य कर्कवृत्तावर (Tropic of Cancer)

उभा ठाकला

रोहन जगताप ·

निनाद Wed, 12/04/2024 - 05:36
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद! छान आहे!

निनाद Wed, 12/04/2024 - 05:36
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद! छान आहे!
लेखनविषय:
भरण्या घडा रिक्त जो सांडलेला खेळण्या उगा डाव हा मांडलेला रडण्या कुठे काळ तो थांबलेला भिडण्या उभा ठाकला पांगलेला
जगाने जरी हारला मानलेला समर्पूण सारे जगा जाणलेला प्रसंगात ओढून तो ताणलेला सुटे बाण लक्ष्याकडे ठाणलेला
दिवा तेवता जागला लाविलेला उभी रात्र सांभाळतो वाहिलेला स्वतः साक्ष अंधार तो राहिलेला असा सूर्य नारायणा पाहिलेला
ललाटात आभाळही फाटलेला एकांतात सारे उरी दाटलेला जमा संपलेलाच तो वाटलेला तयातून साम्राज्यही थाटलेला

ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

मार्गी ·

शुभेच्छा. इंजॉय. बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना. तपशीलवार मराठीत इकडे लिहा. वेळ मिळाला की वाचत राहीन. -दिलीप बिरुटे ( मन-मौजी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके Fri, 11/29/2024 - 13:04
आंतरजालीय प्रतिक्रियांवरुन माणूस प्रेमाने विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की खवचटपणाने विचारतोय, काही म्हणता काही कळत नाही. आता खालील वाक्यच बघा ना..
बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना.
म्हणजे हे तुम्ही उत्सुकतेने विचारताय की जर पहिल्या पानावरच येत असेल तर कशाला नसते उपद्व्याप करा या अर्थाने लिहिले याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून मला समोरासमोरचा वार्तालाप आवडतो. (अर्थात तिथेही मी माणसे ओळखण्यात कमी पडतो म्हणा). अवांतर : निवडणूकीच्या कामातून मोकळे झाला असाल तर त्याविषयी फर्स्ट हँड रिपोर्ट दुसर्‍ञा एका लेखात येऊ द्यात. ही विनंती करायची ही जागा नव्हे हे मान्य !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि Sun, 12/01/2024 - 08:55
काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना
अर्थात मन पहिल्या पानावर येणारच. पण जगण्या-मरण्याच्या धावपळीत तेच मन कसं ताळ्यावर ठेवायचं याची जाणीव ध्यानामुळे झालेली असते, त्यामुळे जरी पहिल्या पानावर मन आलं तरीही ते पहिल्याप्रमाणेच अवखळ न राहता किंचीत ताब्यात येऊ शकतं! - (पहिल्या पानावर असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत Sun, 12/01/2024 - 16:14
सहमत. अशी शिबीरं म्हणजे नेटप्रॅक्टीस. जास्तीत जास्त अनुकूल परिस्थितीत मनावर ताबा मिळवण्याचा केलेला प्रयत्न. नेहमाचं जिवन जगणं ही जणू प्रत्यक्ष मॅच.

धर्मराजमुटके Fri, 11/29/2024 - 12:58
छान ! ध्यानाचा अनुभव न घेताही मला त्याचे महत्त्व पटते आहे पण कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. असो.

सुबोध खरे Fri, 11/29/2024 - 19:09
कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे प्राणायामाचा आणि ध्यान धारणेचा, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावावर उत्तम उपयोग होतो असे अनेक वैद्यकीय शोध निबंधात सिद्ध झालेले आहे. परंतु अजूनही मला त्यात अजिबात रस वाटत नाही. आपली पट्टी काळी २, त्यामुळे हे पांढरी पाच मध्ये गाणे झेपत नाही हेच खरं.

सोत्रि Sun, 12/01/2024 - 07:44
सक्रीय ध्यानाबद्दल माहिती शोधताना ओशोंच हे व्याख्यान मिळालं. ते प्राणायामातील भस्त्रिकेच ओशोकरण केलेलं रूप आहे हे कळल. पण त्यानंतर काय करावं हे जे त्यांनी सांगितलंय ते महत्वाच वाटलं. व्याख्यानाची लिंकः https://youtu.be/msZ4gc3bqK0?si=mvSM0LHgWP6gW_i5 - (सक्रीय) सोकाजी

मार्गी Sun, 12/01/2024 - 11:47
कळतंय पण वळत नाही म्हणजे राग- संताप- लोभ हानीकारक आहे हे कळतं, पण ते बदलवता येत नाही हा जो फरक आहे त्यासाठीच सक्रिय ध्यान उपयोगी असतं. कॉन्शस पातळीवर- बुद्धीच्या पातळीवर आपल्याला सगळं कळतं, पण आणीबाणीच्या ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता येत नाही. कारण अवचेतन मनामध्ये तो संताप/ लोभ साठलेला असतो. सक्रिय ध्यान खोलवर ही समज नेण्यासाठी उपयोगी पडतं. प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! ध्यानाचा कोणताही प्रकार/ पद्धत असली तरी त्यामध्ये "जागरूकता" महत्त्वाची‌ असते. शिबिरात एक- दोन दिवस करून फक्त ती टेक्निक कळते. पुढे ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. @ सो त्रि जी, सक्रिय ध्यान केवळ भस्त्रिका नाहीय. केवळ त्याबद्दल ऐकून किंवा त्याचे व्हिडिओज/ ऑडिओज ऐकून पूर्ण कल्पना येणार नाही. तो एक खरंच वेगळा अनुभव आहे. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सोत्रि Sun, 12/01/2024 - 13:39
ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
डीट्टो!!! - (सातत्य साधण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

चौथा कोनाडा Mon, 12/02/2024 - 11:35
छान माहिती मिळाली. चर्चा ही उत्तम. हें करायलाच हवे या मताचा मी आहे. मागे २२-२५ वर्षांपूर्वी जवळच्या विवेकानंद केंद्रात उबव्यायाम, सूर्य नमस्कार, आसने चा १० दिवसांचा एक तासाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तेव्हा सर्व फायदे कळालेच. पण हळूहळू त्यात खंड पडला. आता जेमतेम करतो. संकल्प शक्ती कमी पडते. थोडा वेळ लागेल, पण पुढे मागे करणार हे नक्की. हेच आद्य आहे, हेच अभिजात आहे, बाकी सगळं प्रासंगिक ट्रेंड्स आहेत. याची मनोमन खात्री पटलेली आहे.

अर्धवटराव Tue, 12/03/2024 - 21:43
योगानंदांनी स्थापन केलेली YSS क्रियायोगातुन ध्यान शिकवते हे माहित होतं.. त्यात बहुतेक शक्तीपात दिक्षा पण असते. ओशो सुद्ध त्याच मार्गातले आहेत का ?? ओशोंबद्दल जे काहि थोडंफार वाचलं / ऐकलं त्यात क्रियायोग संप्रदायाचा उल्लेख आल्याचं आठवत नाहि. ज्ञानगंज संबंधी साधक मात्र ओशोंचा उल्लेख करतात.

शुभेच्छा. इंजॉय. बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना. तपशीलवार मराठीत इकडे लिहा. वेळ मिळाला की वाचत राहीन. -दिलीप बिरुटे ( मन-मौजी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके Fri, 11/29/2024 - 13:04
आंतरजालीय प्रतिक्रियांवरुन माणूस प्रेमाने विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की खवचटपणाने विचारतोय, काही म्हणता काही कळत नाही. आता खालील वाक्यच बघा ना..
बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना.
म्हणजे हे तुम्ही उत्सुकतेने विचारताय की जर पहिल्या पानावरच येत असेल तर कशाला नसते उपद्व्याप करा या अर्थाने लिहिले याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून मला समोरासमोरचा वार्तालाप आवडतो. (अर्थात तिथेही मी माणसे ओळखण्यात कमी पडतो म्हणा). अवांतर : निवडणूकीच्या कामातून मोकळे झाला असाल तर त्याविषयी फर्स्ट हँड रिपोर्ट दुसर्‍ञा एका लेखात येऊ द्यात. ही विनंती करायची ही जागा नव्हे हे मान्य !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि Sun, 12/01/2024 - 08:55
काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना
अर्थात मन पहिल्या पानावर येणारच. पण जगण्या-मरण्याच्या धावपळीत तेच मन कसं ताळ्यावर ठेवायचं याची जाणीव ध्यानामुळे झालेली असते, त्यामुळे जरी पहिल्या पानावर मन आलं तरीही ते पहिल्याप्रमाणेच अवखळ न राहता किंचीत ताब्यात येऊ शकतं! - (पहिल्या पानावर असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत Sun, 12/01/2024 - 16:14
सहमत. अशी शिबीरं म्हणजे नेटप्रॅक्टीस. जास्तीत जास्त अनुकूल परिस्थितीत मनावर ताबा मिळवण्याचा केलेला प्रयत्न. नेहमाचं जिवन जगणं ही जणू प्रत्यक्ष मॅच.

धर्मराजमुटके Fri, 11/29/2024 - 12:58
छान ! ध्यानाचा अनुभव न घेताही मला त्याचे महत्त्व पटते आहे पण कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. असो.

सुबोध खरे Fri, 11/29/2024 - 19:09
कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे प्राणायामाचा आणि ध्यान धारणेचा, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावावर उत्तम उपयोग होतो असे अनेक वैद्यकीय शोध निबंधात सिद्ध झालेले आहे. परंतु अजूनही मला त्यात अजिबात रस वाटत नाही. आपली पट्टी काळी २, त्यामुळे हे पांढरी पाच मध्ये गाणे झेपत नाही हेच खरं.

सोत्रि Sun, 12/01/2024 - 07:44
सक्रीय ध्यानाबद्दल माहिती शोधताना ओशोंच हे व्याख्यान मिळालं. ते प्राणायामातील भस्त्रिकेच ओशोकरण केलेलं रूप आहे हे कळल. पण त्यानंतर काय करावं हे जे त्यांनी सांगितलंय ते महत्वाच वाटलं. व्याख्यानाची लिंकः https://youtu.be/msZ4gc3bqK0?si=mvSM0LHgWP6gW_i5 - (सक्रीय) सोकाजी

मार्गी Sun, 12/01/2024 - 11:47
कळतंय पण वळत नाही म्हणजे राग- संताप- लोभ हानीकारक आहे हे कळतं, पण ते बदलवता येत नाही हा जो फरक आहे त्यासाठीच सक्रिय ध्यान उपयोगी असतं. कॉन्शस पातळीवर- बुद्धीच्या पातळीवर आपल्याला सगळं कळतं, पण आणीबाणीच्या ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता येत नाही. कारण अवचेतन मनामध्ये तो संताप/ लोभ साठलेला असतो. सक्रिय ध्यान खोलवर ही समज नेण्यासाठी उपयोगी पडतं. प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! ध्यानाचा कोणताही प्रकार/ पद्धत असली तरी त्यामध्ये "जागरूकता" महत्त्वाची‌ असते. शिबिरात एक- दोन दिवस करून फक्त ती टेक्निक कळते. पुढे ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. @ सो त्रि जी, सक्रिय ध्यान केवळ भस्त्रिका नाहीय. केवळ त्याबद्दल ऐकून किंवा त्याचे व्हिडिओज/ ऑडिओज ऐकून पूर्ण कल्पना येणार नाही. तो एक खरंच वेगळा अनुभव आहे. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सोत्रि Sun, 12/01/2024 - 13:39
ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
डीट्टो!!! - (सातत्य साधण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

चौथा कोनाडा Mon, 12/02/2024 - 11:35
छान माहिती मिळाली. चर्चा ही उत्तम. हें करायलाच हवे या मताचा मी आहे. मागे २२-२५ वर्षांपूर्वी जवळच्या विवेकानंद केंद्रात उबव्यायाम, सूर्य नमस्कार, आसने चा १० दिवसांचा एक तासाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तेव्हा सर्व फायदे कळालेच. पण हळूहळू त्यात खंड पडला. आता जेमतेम करतो. संकल्प शक्ती कमी पडते. थोडा वेळ लागेल, पण पुढे मागे करणार हे नक्की. हेच आद्य आहे, हेच अभिजात आहे, बाकी सगळं प्रासंगिक ट्रेंड्स आहेत. याची मनोमन खात्री पटलेली आहे.

अर्धवटराव Tue, 12/03/2024 - 21:43
योगानंदांनी स्थापन केलेली YSS क्रियायोगातुन ध्यान शिकवते हे माहित होतं.. त्यात बहुतेक शक्तीपात दिक्षा पण असते. ओशो सुद्ध त्याच मार्गातले आहेत का ?? ओशोंबद्दल जे काहि थोडंफार वाचलं / ऐकलं त्यात क्रियायोग संप्रदायाचा उल्लेख आल्याचं आठवत नाहि. ज्ञानगंज संबंधी साधक मात्र ओशोंचा उल्लेख करतात.
लेखनप्रकार
सर्वांना नमस्कार. नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे.

गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा

Bhakti ·

कर्नलतपस्वी गुरुवार, 11/28/2024 - 05:06
घर,नवरा,मुले बाळं,नोकरी,दुनिदारी सांभाळून स्वांनंदाचचे क्षण शोधणाऱ्या भक्ती उर्फ दुर्गेश नंदिनी आपले ट्रेक पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सुंदर प्रची आणी माहीती. नाथ संप्रदायातील सन्यासी पुर्वी खुप दिसायचे. संप्रदायातील प्रत्येक नाथांची जन्म कथा आणी कार्य विलक्षण आहे. पुण्यात बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर असल्याने बरेच लोक जातात. पण संध्याकाळ नंतर मात्र तो भाग असुरक्षित आहे. लेख आवडला.

कंजूस गुरुवार, 11/28/2024 - 11:17
चांगली केली प्रदक्षिणा. मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो होतो गोरखगडावर. म्हणजे अर्धीच चढाई करता आली. हरिहर / कलावंतिण गडासारख्या उभ्या पायऱ्यांची वाट आहे. वर गुहा आहेत. पण चक्कर येऊ लागली मग खाली आलो. (मच्छिंद्रगड याहूनही अवघड आहे म्हणतात. ) काही लोक वर जात होते ते म्हणाले मदत करतो या वर. पण विचार केला एकट्यानेच जाणार , वर राहणार आणि दुसरे दिवशी खाली येणार हे काही जमणार नाही. परावलंबीपणा नकोच.

In reply to by कंजूस

Bhakti गुरुवार, 11/28/2024 - 12:17
होय ,गोरखगड,हरिहर गड अवघड आहेत.सरळ सरळ गड चढाई,सुरेक्षेसाठी पुरेशी उपाययोजना नसल्याने कठिणच वाटतात.

In reply to by कंजूस

प्रचेतस गुरुवार, 11/28/2024 - 12:39
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा नव्हे, तो उभा पायऱ्यांचा गोरखगड आहे कशेळे जवळ. सिद्धगड, गोरख आणि मच्छिंद्र सुळका. ह्या गोरखगडावर गुहा आणि शेवटी अवघड सुळकेवजा शिखर आहे. भक्ती म्हणतायत तो गोरखगड नगर जिल्ह्यातला आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस गुरुवार, 11/28/2024 - 12:52
त्या सिद्धगडावरही जायचा प्रयत्न केला होता. वाटेत एक गुहा आहे तिथे एक साधू ( संसारी साधू, कल्याणचा ) राहतो. त्याला भेटलो. त्याने मला सावध केले. वाट सोपी आहे पण धोकादायक आहे. कशी? तर वाटेच्या एका बाजूस कडा आणि दुसऱ्या बाजूस दरी. वाटेवरचे दगड गोटे हे मातीत आहेत आणि कातळखडकातले नाहीत. पाय ठेवल्यावर गोटा मातीतून निसटतो आणि गोट्यासह आपण दरीत कोसळतो. मी थोडे वर जाऊन या गोष्टीचा अनुभव घ्यायचे ठरवले. पायाने धोंडे हलवून पाहिले. ते निसटून खाली पडायचे, वाटेला भगदाड पडायचे. परत गुहेत आलो. साधूचा पाहुणचार घेतला. रात्री डाळ भाताचं जेवण, पेटी वाजवून त्याने केलेलं गायन आणि सकाळी चहा बिस्कीटे. आंघोळीसाठी गरम पाणी. मजा आली. एकूण तिन्ही नाथगड घातकी आहेत. ते योगीच चढू जाणे.

कंजूस गुरुवार, 11/28/2024 - 13:00
तुमची भटकंतीची आवड पाहून सुचवतो - माथेरान. मी बऱ्याचदा जातो आणि या https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=cDJxnXXwrmG-LWZ- विडिओतून चानेलने चांगला आढावा घेतला आहे. शनिवार रविवार सोडून जाणे हे मात्र खरे आहे. यातून ८०% माथेरान सादर केलं आहे. तसं एकाच भटकंतीत सर्व करूच नये. पुन्हा जावे आणि नवीन जागा पाहाव्यात. परत परत जाण्यासारखे हिल स्टेशन नक्कीच आहे. तिन्ही ऋतूत वेगळे आणि जाण्यासारखे. थोड्याच जागा पण निवांतपणे फिरण्यात गंमत आहे.

मार्गी Sun, 12/01/2024 - 11:51
अरे वा! वेगळाच ट्रेक. अभिनंदन. नवीन परिसराची‌ व क्षेत्रांची माहिती मिळाली. आधी प्रश्न पडला की, गोरखगड तर किती‌ दुर्गम, त्याला परिक्रमा किती दुर्गम असेल. मुरबाड जवळचा गोरखगड वाटला आधी. पण नंतर कळालं की हे स्थान व हा रूट वेगळा आहे.

टर्मीनेटर Sun, 12/01/2024 - 18:26
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...👍 एप्रिल २०२२ मध्ये (आपला नगर कट्टा झाला होता तेव्हा) इथे गेलो होतो तेव्हा मंदिराच्या आतल्या भागाच्या आणि पायरी मर्गाच्या डागडुजीचे काम सुरु होते! 1 आता लेखातल्या पहिल्या फोटोत रंगरंगोटीचे काम पुर्ण झाल्यावर आणि वरच्या 'ॐ शिव गोरख' मधली गळालेली अक्षरेही लावल्यावर मंदिर अजुन छान दिसत आहे...

कर्नलतपस्वी गुरुवार, 11/28/2024 - 05:06
घर,नवरा,मुले बाळं,नोकरी,दुनिदारी सांभाळून स्वांनंदाचचे क्षण शोधणाऱ्या भक्ती उर्फ दुर्गेश नंदिनी आपले ट्रेक पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सुंदर प्रची आणी माहीती. नाथ संप्रदायातील सन्यासी पुर्वी खुप दिसायचे. संप्रदायातील प्रत्येक नाथांची जन्म कथा आणी कार्य विलक्षण आहे. पुण्यात बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर असल्याने बरेच लोक जातात. पण संध्याकाळ नंतर मात्र तो भाग असुरक्षित आहे. लेख आवडला.

कंजूस गुरुवार, 11/28/2024 - 11:17
चांगली केली प्रदक्षिणा. मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो होतो गोरखगडावर. म्हणजे अर्धीच चढाई करता आली. हरिहर / कलावंतिण गडासारख्या उभ्या पायऱ्यांची वाट आहे. वर गुहा आहेत. पण चक्कर येऊ लागली मग खाली आलो. (मच्छिंद्रगड याहूनही अवघड आहे म्हणतात. ) काही लोक वर जात होते ते म्हणाले मदत करतो या वर. पण विचार केला एकट्यानेच जाणार , वर राहणार आणि दुसरे दिवशी खाली येणार हे काही जमणार नाही. परावलंबीपणा नकोच.

In reply to by कंजूस

Bhakti गुरुवार, 11/28/2024 - 12:17
होय ,गोरखगड,हरिहर गड अवघड आहेत.सरळ सरळ गड चढाई,सुरेक्षेसाठी पुरेशी उपाययोजना नसल्याने कठिणच वाटतात.

In reply to by कंजूस

प्रचेतस गुरुवार, 11/28/2024 - 12:39
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा नव्हे, तो उभा पायऱ्यांचा गोरखगड आहे कशेळे जवळ. सिद्धगड, गोरख आणि मच्छिंद्र सुळका. ह्या गोरखगडावर गुहा आणि शेवटी अवघड सुळकेवजा शिखर आहे. भक्ती म्हणतायत तो गोरखगड नगर जिल्ह्यातला आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस गुरुवार, 11/28/2024 - 12:52
त्या सिद्धगडावरही जायचा प्रयत्न केला होता. वाटेत एक गुहा आहे तिथे एक साधू ( संसारी साधू, कल्याणचा ) राहतो. त्याला भेटलो. त्याने मला सावध केले. वाट सोपी आहे पण धोकादायक आहे. कशी? तर वाटेच्या एका बाजूस कडा आणि दुसऱ्या बाजूस दरी. वाटेवरचे दगड गोटे हे मातीत आहेत आणि कातळखडकातले नाहीत. पाय ठेवल्यावर गोटा मातीतून निसटतो आणि गोट्यासह आपण दरीत कोसळतो. मी थोडे वर जाऊन या गोष्टीचा अनुभव घ्यायचे ठरवले. पायाने धोंडे हलवून पाहिले. ते निसटून खाली पडायचे, वाटेला भगदाड पडायचे. परत गुहेत आलो. साधूचा पाहुणचार घेतला. रात्री डाळ भाताचं जेवण, पेटी वाजवून त्याने केलेलं गायन आणि सकाळी चहा बिस्कीटे. आंघोळीसाठी गरम पाणी. मजा आली. एकूण तिन्ही नाथगड घातकी आहेत. ते योगीच चढू जाणे.

कंजूस गुरुवार, 11/28/2024 - 13:00
तुमची भटकंतीची आवड पाहून सुचवतो - माथेरान. मी बऱ्याचदा जातो आणि या https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=cDJxnXXwrmG-LWZ- विडिओतून चानेलने चांगला आढावा घेतला आहे. शनिवार रविवार सोडून जाणे हे मात्र खरे आहे. यातून ८०% माथेरान सादर केलं आहे. तसं एकाच भटकंतीत सर्व करूच नये. पुन्हा जावे आणि नवीन जागा पाहाव्यात. परत परत जाण्यासारखे हिल स्टेशन नक्कीच आहे. तिन्ही ऋतूत वेगळे आणि जाण्यासारखे. थोड्याच जागा पण निवांतपणे फिरण्यात गंमत आहे.

मार्गी Sun, 12/01/2024 - 11:51
अरे वा! वेगळाच ट्रेक. अभिनंदन. नवीन परिसराची‌ व क्षेत्रांची माहिती मिळाली. आधी प्रश्न पडला की, गोरखगड तर किती‌ दुर्गम, त्याला परिक्रमा किती दुर्गम असेल. मुरबाड जवळचा गोरखगड वाटला आधी. पण नंतर कळालं की हे स्थान व हा रूट वेगळा आहे.

टर्मीनेटर Sun, 12/01/2024 - 18:26
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...👍 एप्रिल २०२२ मध्ये (आपला नगर कट्टा झाला होता तेव्हा) इथे गेलो होतो तेव्हा मंदिराच्या आतल्या भागाच्या आणि पायरी मर्गाच्या डागडुजीचे काम सुरु होते! 1 आता लेखातल्या पहिल्या फोटोत रंगरंगोटीचे काम पुर्ण झाल्यावर आणि वरच्या 'ॐ शिव गोरख' मधली गळालेली अक्षरेही लावल्यावर मंदिर अजुन छान दिसत आहे...
लेखनविषय:
लेखनप्रकार
अ नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता.

महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण

विवेकपटाईत ·

जाऊ दे हो पटाईतकाका. भाजपवाल्यांनी ईव्हीएम हॅक केली होती, अडानीकरवी पैसे वाटले होते आणि लोकशाहीचा मुडदाच पाडला गेला आहे हे आधीच ठरविले असेल तर असे लोक अशाप्रकारचे लॉजिकल काही लिहिलेले ऐकण्याच्या मनस्थितीत असणार आहेत का?

कानडाऊ योगेशु Tue, 11/26/2024 - 20:24
मनसेने उबाठा पक्षाची बरीच मते खाल्ली असे एका विश्लेषणात ऐकले होते. मनसे नसली असती तर ह्या जागा उबाठा पक्षाने जिंकल्या असत्या व चित्र वेगळे दिसले असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

विवेकपटाईत Wed, 11/27/2024 - 08:54
मनसे मुळे उद्धव सेनेला काही जागा जिंकू शकल्या. उदा. वर्सोवाहून उद्धव सेनेचे हारून खान निवडून आले. भाजप उमेदवार 1600 मतांनी पराजित झाला. मनसे ने 5000 हून जास्त मते घेतली. एका आणखीन स्वतंत्र उमेदवाराने 5000 पेक्षा जास्त मते घेतली. मनसे नसती तर उद्धव सेनेले दहा जागा ही मिळाल्या नसत्या. बहुजन समाजाचे मत विभाजित करण्यासाठी या वेळी मोठ्या प्रमाणात स्वतंत्र उमेदवार उभे होते. लोकसभेत ही रणनीती सफल झाली. पण या वेळी मतदान जास्त असल्याने ही रणनीती असफल झाली. उद्धवने शॉर्ट टर्म फायद्यासाठी स्वतचे नुकसान करून घेतले.

"अमूक पक्षाने मते खाल्ली नाहीतर.. " असल्या विधानांना काही अर्थ नसतो. त्या दुसर्या प़क्षालाही जिंकायचेच असते ना? मग जी मते मिळाली त्यांच्यावर हक्क कुणाचा असतो? मित्रपक्षापेक्षा आपल्याला जास्त जागा मिळाव्यात.. ही सुप्त ईच्छा प्रत्येक राजकीय पक्षाला असते. पण उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे. असो. अशा शह-काटशहांनी दीर्घकाळ राजकारण करता येत नाही. कोणत्या पक्षाच्या नेते/कार्यकर्त्यांचा समाजात जास्त वावर असतो? कोणत्या पक्षाचे नेते/कार्यकर्ते समाजातील पर्त्येक स्तरावर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात? सहसा तो पक्ष निवड्णूक जिंकतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे कधी?

जाऊ दे हो पटाईतकाका. भाजपवाल्यांनी ईव्हीएम हॅक केली होती, अडानीकरवी पैसे वाटले होते आणि लोकशाहीचा मुडदाच पाडला गेला आहे हे आधीच ठरविले असेल तर असे लोक अशाप्रकारचे लॉजिकल काही लिहिलेले ऐकण्याच्या मनस्थितीत असणार आहेत का?

कानडाऊ योगेशु Tue, 11/26/2024 - 20:24
मनसेने उबाठा पक्षाची बरीच मते खाल्ली असे एका विश्लेषणात ऐकले होते. मनसे नसली असती तर ह्या जागा उबाठा पक्षाने जिंकल्या असत्या व चित्र वेगळे दिसले असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

विवेकपटाईत Wed, 11/27/2024 - 08:54
मनसे मुळे उद्धव सेनेला काही जागा जिंकू शकल्या. उदा. वर्सोवाहून उद्धव सेनेचे हारून खान निवडून आले. भाजप उमेदवार 1600 मतांनी पराजित झाला. मनसे ने 5000 हून जास्त मते घेतली. एका आणखीन स्वतंत्र उमेदवाराने 5000 पेक्षा जास्त मते घेतली. मनसे नसती तर उद्धव सेनेले दहा जागा ही मिळाल्या नसत्या. बहुजन समाजाचे मत विभाजित करण्यासाठी या वेळी मोठ्या प्रमाणात स्वतंत्र उमेदवार उभे होते. लोकसभेत ही रणनीती सफल झाली. पण या वेळी मतदान जास्त असल्याने ही रणनीती असफल झाली. उद्धवने शॉर्ट टर्म फायद्यासाठी स्वतचे नुकसान करून घेतले.

"अमूक पक्षाने मते खाल्ली नाहीतर.. " असल्या विधानांना काही अर्थ नसतो. त्या दुसर्या प़क्षालाही जिंकायचेच असते ना? मग जी मते मिळाली त्यांच्यावर हक्क कुणाचा असतो? मित्रपक्षापेक्षा आपल्याला जास्त जागा मिळाव्यात.. ही सुप्त ईच्छा प्रत्येक राजकीय पक्षाला असते. पण उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे. असो. अशा शह-काटशहांनी दीर्घकाळ राजकारण करता येत नाही. कोणत्या पक्षाच्या नेते/कार्यकर्त्यांचा समाजात जास्त वावर असतो? कोणत्या पक्षाचे नेते/कार्यकर्ते समाजातील पर्त्येक स्तरावर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात? सहसा तो पक्ष निवड्णूक जिंकतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्धव आणि त्यांच्या सेनेने ह्यावेळी मित्रपक्ष कसे पडतील ह्याचा हिशोब केला अशी कबुली उद्धव ह्यांनीच दिली आहे कधी?
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते.

इलेक्शनी चारोळ्या

विवेकपटाईत ·

कर्नलतपस्वी Mon, 11/25/2024 - 11:40
जानवसा सजला, वऱ्हाडी जमलं एका नवरी साठी तिन,तिन नवरं कधीचा म्होतूर, भटांची एकच घाई बाशिंग कोण बांधणार पत्त्याच नाही

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 11:56
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले की, EVM घोटाळा नसतो.... बाय द वे, चीनच्या आणि सोरोसच्या, हातातील कठपुतळी होण्यापेक्षा, भारतातला पैसा भारतात राहणे उत्तम. ....राष्ट्र प्रथम...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत गुरुवार, 12/05/2024 - 18:39
कधीच शिव्या भैय्यांना कधी शिव्या अण्णांना कधी शिव्या गुज्जुंना मतदाराचे मन मात्र आम्हा कळत नाही. ईव्हीएम वर खापर फोडून आम्ही स्यापा करतो. * स्यापा = रडगाणे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 16:22
अहो, तुमचेच तर म्हणणे आहे की EVM चा घोटाळा. पण .... हा घोटाळा फक्त महाराष्ट्र राज्या पुरताच की इतर पण सगळ्या राज्यात?

ई.व्हि.एम मध्ये घोटाळा हे ऐकुन आला कंटाळा आता रोज सकाळी नउ वाजता 'मुंबई महाराष्ट्रापासुन तोडण्याचा डाव' दमलेली तुतारी म्हणाली-भूक लागली, खाउन घ्या वडापाव

डॅनी ओशन Sun, 12/01/2024 - 10:51
लोकसभेत जिंकले बेडकीगत फुगले लाडक्या बहिणीने टाच ठेवली बाहेरचे सारे घरामंदी आले घर घरापरी वाटेचना सगळे फिरले दादा मात्र तिथेच गाडीभर पुरावे कचऱ्यात गेले

कर्नलतपस्वी Mon, 11/25/2024 - 11:40
जानवसा सजला, वऱ्हाडी जमलं एका नवरी साठी तिन,तिन नवरं कधीचा म्होतूर, भटांची एकच घाई बाशिंग कोण बांधणार पत्त्याच नाही

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 11:56
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले की, EVM घोटाळा नसतो.... बाय द वे, चीनच्या आणि सोरोसच्या, हातातील कठपुतळी होण्यापेक्षा, भारतातला पैसा भारतात राहणे उत्तम. ....राष्ट्र प्रथम...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत गुरुवार, 12/05/2024 - 18:39
कधीच शिव्या भैय्यांना कधी शिव्या अण्णांना कधी शिव्या गुज्जुंना मतदाराचे मन मात्र आम्हा कळत नाही. ईव्हीएम वर खापर फोडून आम्ही स्यापा करतो. * स्यापा = रडगाणे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 12/07/2024 - 16:22
अहो, तुमचेच तर म्हणणे आहे की EVM चा घोटाळा. पण .... हा घोटाळा फक्त महाराष्ट्र राज्या पुरताच की इतर पण सगळ्या राज्यात?

ई.व्हि.एम मध्ये घोटाळा हे ऐकुन आला कंटाळा आता रोज सकाळी नउ वाजता 'मुंबई महाराष्ट्रापासुन तोडण्याचा डाव' दमलेली तुतारी म्हणाली-भूक लागली, खाउन घ्या वडापाव

डॅनी ओशन Sun, 12/01/2024 - 10:51
लोकसभेत जिंकले बेडकीगत फुगले लाडक्या बहिणीने टाच ठेवली बाहेरचे सारे घरामंदी आले घर घरापरी वाटेचना सगळे फिरले दादा मात्र तिथेच गाडीभर पुरावे कचऱ्यात गेले
लेखनविषय:
(१) समुंदर हूं मैं लौटकर आऊंगा. त्सुनामी आली वाहून गेले त्यांचे स्वप्नांचे मनोरे. (२) चित भी मेरी पट भी मेरी सरडे माझे सारे जिंकले. (३) शेअर बाजाराचा फंडा त्याला कळलाच नाही. शॉर्ट टर्म गेन साठी लाँग टर्म तोटा केला.

माझे काय चुकले? २.०

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस Sun, 11/24/2024 - 23:21
काय चुकलं? चुका दाखवणे चुकलं. तुमचा धाड पॅटर्न लोकांना आवडत नाही . वरवर बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं हे कधी शिकणार? माझंही हेच होतं. मित्र आणि शेजारी दूर जातात.

सुबोध खरे Mon, 11/25/2024 - 12:13
आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस मास्तरांनी मला मैदानात झाडू मारायला पाठवले हे समोर दिसूनही माझे काय चुकले विचारताय? आश्चर्य आहे. असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि Tue, 11/26/2024 - 06:32
तुमचे काहीच चुकले नाही. असेच खरे बोलत रहा. पण सातत्य असणे महत्वाचे. प्रत्येक वाक्य सत्य असावे. त्यात अपवाद नसावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 11/26/2024 - 10:11
पण मी चुकीचे काय बोललो होतो? खरं तेच बोललो होतो ना? असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा. सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. मुलाखतीला गेल्यावर मुलाखतकाराच्या दिसण्यावर टिप्पणी करून एकदा पहाच. "सत्य असले तरी"

In reply to by सुबोध खरे

सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. अच्छा. असे होय. शाळेत भिंतीवर “नेहमीखरे बोलावे असे साने गुरुजींच्या फोटोसह लिहिलेले होते ते का म्हणून? :(

चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही एक add करतो. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. आणि एकमुखाने EVM वर खापर फोडले. मी भीत भीतच विचारले "खरंच घोटाळा झालाय का आपण हरलो म्हणून म्हणायचंय?". मावळ्यांनी मला नामर्द म्हणून तुडव तूडव तुडवला. सांगा, माझे काय चुकले?

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्यावर आणखी एक. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. जिंकल्याबद्दल सर्व एकमेकांचे अभिनंदन करत होते. “कुठलीही लाट नसताना, मराठा समाज, दलित विरोधात असताना, सभा फ्लॉप जात असताना आपण जिंकलो कसे?” मी विचारले. त्यांनी माझ्या खिशात नोटांचे बंडल कोंबून चुप बस म्हणून सांगितले. :)

निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. हरल्याबद्दल काहीजण डोळे पुसत होते ,काही एकमेकांना धीर देत होते. "ई.व्हि.एममध्ये १००% घोटाळा आहे आणि पैसा पण खूप वाटलाय" सगळे एकसुरात म्हणाले. "मग कर्नाटकात त्याचवेळी तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवड्णुकीत आपण निवडुन आलो. तेथे पण ई.व्ही.एम घोटाळा होता का ? आपण पैसे वाटले का? मी आपले सहज विचारले. 'हाता'ला धरून त्यांनी मला बाहेर काढले. सांगा माझे काय चुकले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

“संशय येऊ नये म्हणून तसे करावे लागते, गरीब राज्ये काँग्रेसला तर श्रीमंत राज्य आपल्याला “सेट” करावे लागते. घरी आल्यावर माईना त्यांच्या ह्यानी सांगितले. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा हा हा. ते ह्यांनी १९६० साली सांगितले होते. सध्या कर्नाटक देशातील तिसरे श्रीमंत राज्य आहे असे ह्यांनी हल्लीच सांगितले होते. "महाराष्ट्रात काँग्रेसची जी वाताहत झाली त्याबद्दल मी ई.व्ही.एम ला दोष देणार नाही" असे पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणी मंत्री मुनियप्पा म्हणाले होते, ते लिहायचे राहुन गेले. https://www.deccanherald.com/india/karnataka/dont-want-to-blame-evms-for-defeat-of-congress-in-maharashtra-k-h-muniyappa-3291413

संजय खांडेकर Tue, 12/03/2024 - 16:27
दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही ठरवून समूहातून रिमूव्ह केले नी आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? बाकी काही चुको व ना चुको तुमची मटण पार्टी चुकली हेच खरं

चावटमेला Wed, 12/04/2024 - 14:41
एका मराठी वॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये एकाने विक्रम संवत नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, मी म्हणालो की, महाराष्ट्रात शक संवत नव वर्ष साजरं करतात, विक्रम संवत उत्तर भारतीय भय्यांमध्ये प्रचलित आहे, तेव्हापासून सदर सदस्याने माझ्याशी बोलणे सोडले, सांगा माझे काय चुकले?

कंजूस Sun, 11/24/2024 - 23:21
काय चुकलं? चुका दाखवणे चुकलं. तुमचा धाड पॅटर्न लोकांना आवडत नाही . वरवर बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं हे कधी शिकणार? माझंही हेच होतं. मित्र आणि शेजारी दूर जातात.

सुबोध खरे Mon, 11/25/2024 - 12:13
आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस मास्तरांनी मला मैदानात झाडू मारायला पाठवले हे समोर दिसूनही माझे काय चुकले विचारताय? आश्चर्य आहे. असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि Tue, 11/26/2024 - 06:32
तुमचे काहीच चुकले नाही. असेच खरे बोलत रहा. पण सातत्य असणे महत्वाचे. प्रत्येक वाक्य सत्य असावे. त्यात अपवाद नसावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 11/26/2024 - 10:11
पण मी चुकीचे काय बोललो होतो? खरं तेच बोललो होतो ना? असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा. सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. मुलाखतीला गेल्यावर मुलाखतकाराच्या दिसण्यावर टिप्पणी करून एकदा पहाच. "सत्य असले तरी"

In reply to by सुबोध खरे

सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. अच्छा. असे होय. शाळेत भिंतीवर “नेहमीखरे बोलावे असे साने गुरुजींच्या फोटोसह लिहिलेले होते ते का म्हणून? :(

चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही एक add करतो. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. आणि एकमुखाने EVM वर खापर फोडले. मी भीत भीतच विचारले "खरंच घोटाळा झालाय का आपण हरलो म्हणून म्हणायचंय?". मावळ्यांनी मला नामर्द म्हणून तुडव तूडव तुडवला. सांगा, माझे काय चुकले?

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्यावर आणखी एक. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. जिंकल्याबद्दल सर्व एकमेकांचे अभिनंदन करत होते. “कुठलीही लाट नसताना, मराठा समाज, दलित विरोधात असताना, सभा फ्लॉप जात असताना आपण जिंकलो कसे?” मी विचारले. त्यांनी माझ्या खिशात नोटांचे बंडल कोंबून चुप बस म्हणून सांगितले. :)

निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. हरल्याबद्दल काहीजण डोळे पुसत होते ,काही एकमेकांना धीर देत होते. "ई.व्हि.एममध्ये १००% घोटाळा आहे आणि पैसा पण खूप वाटलाय" सगळे एकसुरात म्हणाले. "मग कर्नाटकात त्याचवेळी तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवड्णुकीत आपण निवडुन आलो. तेथे पण ई.व्ही.एम घोटाळा होता का ? आपण पैसे वाटले का? मी आपले सहज विचारले. 'हाता'ला धरून त्यांनी मला बाहेर काढले. सांगा माझे काय चुकले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

“संशय येऊ नये म्हणून तसे करावे लागते, गरीब राज्ये काँग्रेसला तर श्रीमंत राज्य आपल्याला “सेट” करावे लागते. घरी आल्यावर माईना त्यांच्या ह्यानी सांगितले. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा हा हा. ते ह्यांनी १९६० साली सांगितले होते. सध्या कर्नाटक देशातील तिसरे श्रीमंत राज्य आहे असे ह्यांनी हल्लीच सांगितले होते. "महाराष्ट्रात काँग्रेसची जी वाताहत झाली त्याबद्दल मी ई.व्ही.एम ला दोष देणार नाही" असे पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणी मंत्री मुनियप्पा म्हणाले होते, ते लिहायचे राहुन गेले. https://www.deccanherald.com/india/karnataka/dont-want-to-blame-evms-for-defeat-of-congress-in-maharashtra-k-h-muniyappa-3291413

संजय खांडेकर Tue, 12/03/2024 - 16:27
दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही ठरवून समूहातून रिमूव्ह केले नी आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? बाकी काही चुको व ना चुको तुमची मटण पार्टी चुकली हेच खरं

चावटमेला Wed, 12/04/2024 - 14:41
एका मराठी वॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये एकाने विक्रम संवत नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, मी म्हणालो की, महाराष्ट्रात शक संवत नव वर्ष साजरं करतात, विक्रम संवत उत्तर भारतीय भय्यांमध्ये प्रचलित आहे, तेव्हापासून सदर सदस्याने माझ्याशी बोलणे सोडले, सांगा माझे काय चुकले?
लेखनविषय:
लेखनप्रकार
• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले? • “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? • शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या.