मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरू आतला

रोहन जगताप ·

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

मुक्त विहारि Sun, 12/15/2024 - 17:29
माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा Tue, 12/24/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

मुक्त विहारि Sun, 12/15/2024 - 17:29
माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप Sat, 12/14/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा Tue, 12/24/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !
लेखनविषय:
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले

इव्हेंटफुल रात्र

कर्नलतपस्वी ·

कंजूस Fri, 12/13/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 09:56
प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 12:14
वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 14:06
अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 14:16
इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 14:34
परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 14:13
मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 13:56
रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 14:43
चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 17:01
सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख Sat, 12/14/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/19/2024 - 11:09
अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 12:54
आता काही लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबणार...

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख गुरुवार, 12/19/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.

कंजूस Fri, 12/13/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 09:56
प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 12:14
वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 14:06
अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 14:16
इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 14:34
परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 12/13/2024 - 14:13
मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 13:56
रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 14:43
चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 17:01
सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख Sat, 12/14/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/19/2024 - 11:09
अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 12:54
आता काही लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबणार...

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख गुरुवार, 12/19/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रसंग क्र. १.... खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती. चिंताग्रस्त अवस्थेत परत घरात आलो. बिछान्यावर बायको घोरत होती. तीला उठवून विचारण्यात काही अर्थ नव्हता. शेजारील टीपाॅय वरच्या बाटलीतून एक घोट पाणी प्यालो व लगेचच पुन्हा झोप लागली. ________________________________________ प्रसंग क्र-२.... "सापडली,सापडली", झोपेतच जोर जोरात ओरडत उठलो.बायकोची पण झोपमोड झाली होती.

वावटळ

सुजित जाधव ·

श्रीगुरुजी गुरुवार, 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

रात्रीचे चांदणे गुरुवार, 12/12/2024 - 22:05
दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी गुरुवार, 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत Fri, 12/13/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख Fri, 12/13/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Tue, 12/17/2024 - 07:31
अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा Mon, 12/16/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?

श्रीगुरुजी गुरुवार, 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

रात्रीचे चांदणे गुरुवार, 12/12/2024 - 22:05
दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी गुरुवार, 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत Fri, 12/13/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख Fri, 12/13/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस Tue, 12/17/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Tue, 12/17/2024 - 07:31
अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा Mon, 12/16/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १ : प्रवास

गोरगावलेकर ·

मस्त लेख. कधीतरी व्हिस्टाडोमने जायचे आहे. कधी योग येतो ते बघायचे. कोलव्याहून थोड्या अंतरावर वारका बीच आहे. जमल्यास तिथेही जाऊन या. तिकडची वाळू अगदी अशक्य मऊ आहे. तशी मऊ वाळू मी तरी दुसरीकडे कुठेच बघितलेली नाही. मी फ्लॅट फूटेड असल्याने थोडेसे काही असले तरी ते पायाच्या तळव्यांना टोचते. तसा काहीही त्रास वारकाला झाला नाही. गोव्याच्या थेट दक्षिणेला म्हणजे अगोंडाला राहणार असाल तर समुद्रकिनार्‍याला समांतर रस्त्याचे फोटो येतीलच याची खात्री आहे. अगदी दृष्ट लागावी तसा एखाद्या चित्रात असतो तसा देखणा रस्ता आहे तो. (शरीराने कुठेही असला तरी मनाने गोव्यातच राहणारा गोवाभक्त) चंसूकु

चौथा कोनाडा Wed, 12/11/2024 - 22:37
व्वा ... मस्त ..... व्हिस्टाडोम अनुभव आवडला. तुमच्या भटकंती धाग्याचे आम्ही अ‍ॅडिक्ट होत चाललो आहोत... फोटो आणी वर्णन दोन्ही सही असते.. || पुभाप्र ||

गोरगावलेकर गुरुवार, 12/12/2024 - 08:22
@कंजूस, कर्नलतपस्वी, चंद्रसूर्यकुमार, Bhakti, चौथा कोनाडा, गवि, प्रचेतस. प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार .

वामन देशमुख गुरुवार, 12/12/2024 - 10:40
गोरगावलेकर, तुमची प्रवासवर्णने, विशेषतः प्रवास-तयारी-वर्णने आवडतात. प्रवास-पर्यटन-देशाटन इ ची मलाही आवड आहे. लिहीत रहा, आम्ही वाचत राहतो. पुभाप्र.

झकासराव गुरुवार, 12/12/2024 - 15:10
छान सुरवात Vista डोम कोच कुठे असणार ते बुक करताना कळत नाही का? फसवणूक केल्यासारखे आहे इंजिन बघणे म्हणजे.

कंजूस गुरुवार, 12/12/2024 - 15:35
रेल्वेने विस्टाडोम डबे जोडायला सुरुवात केल्यावर त्याच्या प्रवासाचे बरेच विडिओ आले होते यूट्यूबवर. किती छान वगैरे. पण एकाने ' विस्टाडोमने प्रवास न करण्याची चार कारणे' असा विडिओ टाकल्यावर कळले की हे आपल्यासाठी नाही. आता तो विडिओ सापडत नाही.

गवि गुरुवार, 12/12/2024 - 15:42
विस्टाडोमचे तिकीट विमानाइतके किंवा कधी कधी त्याहून जास्त असते * (विमान योग्य वेळ आधी बुक केल्यास). अशा वेळी कोंकणाची रम्य दृश्ये बघता यावीत म्हणून ते बुक केले जाणार. त्यात जर असे इंजिनचे ढुंगण बघत प्रवास करावा लागला तर नक्कीच मूड ऑफ होणार. साईडच्या खिडकीतूनच बघायचे तर तुलनेत स्वस्त डबा घेणे बरे. सीट लहान असतील आणि गोल फिरत नसतील किंवा आडव्या होत नसतील पण प्रवास देखील तसा दिवसरात्र नाहीये. तिकिटात खूपच फरक आहे चेअर कार आणि विस्टाडोम असे आठवते. मागे एकदा दोनदा चेक केले होते. * चुभूद्याघ्या

In reply to by गवि

कंजूस गुरुवार, 12/12/2024 - 18:50
थंडीच्या दिवसांत ठीक आहे पण..... ऊन तापले की तिरके आतमध्ये येणार तोंडावर. पडदे सोडा मग त्या काचांचा उपयोग शून्य. * अर्धा पाऊण तास झाडी पाहिल्यावर प्रवासी आपल्या वयाप्रमाणे मोबल्यात गुंग होतात किंवा वाचन करतात किंवा स्लीपर डब्यांत बर्थ सीट्स एका बाजूच्या पाडून आळीपाळीने लोळतात तसे करता येत नाही. कायम झगझगीत उजेड नकोसा वाटतो. पहाटे लवकर निघालेले प्रवासी एक झोप काढायची. * बॅगा जवळच ठेवता येत नाहीत. मग त्यातले डबे उघडून आणलेला खाऊ चरता येत नाही. *एखादे दृष्य चांगले वाटले तर पटकन मोबाईलमध्ये फोटो काढता येत नाहीत. काच आडवी येते. काचा नंतर धुरकटही होतात. * गाडी एखाद्या स्टेशनवर थांबल्यास फलाटावरचा एखादा पदार्थ खिडकीतून विकत घेता येत नाही.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 12/12/2024 - 18:57
बॅगा जवळच ठेवता येत नाहीत.
हा पण एक बुचकळ्यात टाकणारा प्रकार आहे. आपणच सामान तिथे ठेवायचे आणि आपणच आपले स्टेशन आले की नेमके आपले सामान उचलून चालते व्हायचे असे असते की कोणी मनुष्य तिथे बसून व्यवस्थापन, टोकन वगैरे बघत असतो? एरवी मामला गडबडीचा आहे. चोरी वगैरे ही एक शक्यता आणि कोणीतरी एकसारख्या दिसणाऱ्या बॅगा उचलून चालू पडणे हा दुसरा धोका..

श्वेता२४ गुरुवार, 12/12/2024 - 17:44
आम्ही मधुचंद्राकरीता गोव्याला गेलो होतो. त्यावेळी स्टेट बॅंकेच्या गेस्ट हाऊसला २००/- प्रति रात्री या दराने ४ दिवस मडगाव येथे राहिलो होतो. त्यावेळी १ दिवस दक्षिण गोव्याची बस टूर केली व नंतर १ दिवस बाईक ने पाळेलोम या सुंदर बीच ला भेट दिली. तुमच्या लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. आता पुन्हा एकदा जायचे आहे. तुमचा लेख कामी येईल.

मस्त लेख. कधीतरी व्हिस्टाडोमने जायचे आहे. कधी योग येतो ते बघायचे. कोलव्याहून थोड्या अंतरावर वारका बीच आहे. जमल्यास तिथेही जाऊन या. तिकडची वाळू अगदी अशक्य मऊ आहे. तशी मऊ वाळू मी तरी दुसरीकडे कुठेच बघितलेली नाही. मी फ्लॅट फूटेड असल्याने थोडेसे काही असले तरी ते पायाच्या तळव्यांना टोचते. तसा काहीही त्रास वारकाला झाला नाही. गोव्याच्या थेट दक्षिणेला म्हणजे अगोंडाला राहणार असाल तर समुद्रकिनार्‍याला समांतर रस्त्याचे फोटो येतीलच याची खात्री आहे. अगदी दृष्ट लागावी तसा एखाद्या चित्रात असतो तसा देखणा रस्ता आहे तो. (शरीराने कुठेही असला तरी मनाने गोव्यातच राहणारा गोवाभक्त) चंसूकु

चौथा कोनाडा Wed, 12/11/2024 - 22:37
व्वा ... मस्त ..... व्हिस्टाडोम अनुभव आवडला. तुमच्या भटकंती धाग्याचे आम्ही अ‍ॅडिक्ट होत चाललो आहोत... फोटो आणी वर्णन दोन्ही सही असते.. || पुभाप्र ||

गोरगावलेकर गुरुवार, 12/12/2024 - 08:22
@कंजूस, कर्नलतपस्वी, चंद्रसूर्यकुमार, Bhakti, चौथा कोनाडा, गवि, प्रचेतस. प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार .

वामन देशमुख गुरुवार, 12/12/2024 - 10:40
गोरगावलेकर, तुमची प्रवासवर्णने, विशेषतः प्रवास-तयारी-वर्णने आवडतात. प्रवास-पर्यटन-देशाटन इ ची मलाही आवड आहे. लिहीत रहा, आम्ही वाचत राहतो. पुभाप्र.

झकासराव गुरुवार, 12/12/2024 - 15:10
छान सुरवात Vista डोम कोच कुठे असणार ते बुक करताना कळत नाही का? फसवणूक केल्यासारखे आहे इंजिन बघणे म्हणजे.

कंजूस गुरुवार, 12/12/2024 - 15:35
रेल्वेने विस्टाडोम डबे जोडायला सुरुवात केल्यावर त्याच्या प्रवासाचे बरेच विडिओ आले होते यूट्यूबवर. किती छान वगैरे. पण एकाने ' विस्टाडोमने प्रवास न करण्याची चार कारणे' असा विडिओ टाकल्यावर कळले की हे आपल्यासाठी नाही. आता तो विडिओ सापडत नाही.

गवि गुरुवार, 12/12/2024 - 15:42
विस्टाडोमचे तिकीट विमानाइतके किंवा कधी कधी त्याहून जास्त असते * (विमान योग्य वेळ आधी बुक केल्यास). अशा वेळी कोंकणाची रम्य दृश्ये बघता यावीत म्हणून ते बुक केले जाणार. त्यात जर असे इंजिनचे ढुंगण बघत प्रवास करावा लागला तर नक्कीच मूड ऑफ होणार. साईडच्या खिडकीतूनच बघायचे तर तुलनेत स्वस्त डबा घेणे बरे. सीट लहान असतील आणि गोल फिरत नसतील किंवा आडव्या होत नसतील पण प्रवास देखील तसा दिवसरात्र नाहीये. तिकिटात खूपच फरक आहे चेअर कार आणि विस्टाडोम असे आठवते. मागे एकदा दोनदा चेक केले होते. * चुभूद्याघ्या

In reply to by गवि

कंजूस गुरुवार, 12/12/2024 - 18:50
थंडीच्या दिवसांत ठीक आहे पण..... ऊन तापले की तिरके आतमध्ये येणार तोंडावर. पडदे सोडा मग त्या काचांचा उपयोग शून्य. * अर्धा पाऊण तास झाडी पाहिल्यावर प्रवासी आपल्या वयाप्रमाणे मोबल्यात गुंग होतात किंवा वाचन करतात किंवा स्लीपर डब्यांत बर्थ सीट्स एका बाजूच्या पाडून आळीपाळीने लोळतात तसे करता येत नाही. कायम झगझगीत उजेड नकोसा वाटतो. पहाटे लवकर निघालेले प्रवासी एक झोप काढायची. * बॅगा जवळच ठेवता येत नाहीत. मग त्यातले डबे उघडून आणलेला खाऊ चरता येत नाही. *एखादे दृष्य चांगले वाटले तर पटकन मोबाईलमध्ये फोटो काढता येत नाहीत. काच आडवी येते. काचा नंतर धुरकटही होतात. * गाडी एखाद्या स्टेशनवर थांबल्यास फलाटावरचा एखादा पदार्थ खिडकीतून विकत घेता येत नाही.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 12/12/2024 - 18:57
बॅगा जवळच ठेवता येत नाहीत.
हा पण एक बुचकळ्यात टाकणारा प्रकार आहे. आपणच सामान तिथे ठेवायचे आणि आपणच आपले स्टेशन आले की नेमके आपले सामान उचलून चालते व्हायचे असे असते की कोणी मनुष्य तिथे बसून व्यवस्थापन, टोकन वगैरे बघत असतो? एरवी मामला गडबडीचा आहे. चोरी वगैरे ही एक शक्यता आणि कोणीतरी एकसारख्या दिसणाऱ्या बॅगा उचलून चालू पडणे हा दुसरा धोका..

श्वेता२४ गुरुवार, 12/12/2024 - 17:44
आम्ही मधुचंद्राकरीता गोव्याला गेलो होतो. त्यावेळी स्टेट बॅंकेच्या गेस्ट हाऊसला २००/- प्रति रात्री या दराने ४ दिवस मडगाव येथे राहिलो होतो. त्यावेळी १ दिवस दक्षिण गोव्याची बस टूर केली व नंतर १ दिवस बाईक ने पाळेलोम या सुंदर बीच ला भेट दिली. तुमच्या लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. आता पुन्हा एकदा जायचे आहे. तुमचा लेख कामी येईल.
गेल्या दहा वर्षांपासून होणारी कौटुंबिक हिवाळी सहल यावेळी रद्द झाली. त्याला कारण मे महिन्यात ग्रुपने एका यात्रा कंपनीतर्फे केलेली हिमालयीन चारधाम यात्रा. कंपनीचे मूळचे पॅकेज स्वस्त दिसत असले तरी थोड्या चांगल्या रूम , ग्रुपसाठी स्वतंत्र वाहन असे करत किंमत वाढत गेली . त्याचबरोबर पिट्ठू , घोडा, पालखी, मधल्या वेळातले जेवण यावर बराच खर्च झाल्याने सगळ्यांनी दुसरी मोठी सहल करण्याचे टाळले . यात्रेसाठी आमच्या नावाचीही नोंदणी झाली होती पण मुंबईहून जळगांव जाणारी रेल्वे सोळा तास उशिराने सुटणार असल्याने आम्हाला जळगावपासूनची कनेक्टेड गाडी मिळणे शक्य नव्हते .

धाग्याबाबा, प्रतिसादक आणि वाचकाची गोची

जोनाथन हार्कर ·

वामन देशमुख Mon, 12/09/2024 - 13:42
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे. संपादक मंडळाने परवा खफची साफसफाई केली. काही आइडींचीही साफसफाई करणे आवश्यक आहे... दीर्घकाळापासून हे काम प्रलंबित आहे.

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 13:51
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे.
धाग्याच्या आशयाशी मी सहमत नाही पण शेवटी दिलेल्या संदेशाशी
संदेश: राजकीय लेखन आणि त्यावर होणारी चर्चा समाजाला प्रगल्भ बनवण्यासाठी असावी, वाद निर्माण करण्यासाठी नव्हे. सामान्य माणसाच्या गरजा आणि प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे.
पूर्णपणे सहमत आहे! 'हे भान चर्चेकऱ्यांनी ठेवले असते तर मिपावर राजकीय चर्चा बंद करण्याची वेळ आली नसती' असे माझे वैयक्तिक मत... सतत कोणाचातरी द्वेष आणि कोणाचा तरी उदोउदो ह्यालाच महत्व आल्यावर दुसरे काय होणार म्हणा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 03:32
तुमचा आयडी जेमतेम ८ वर्षे जुना. मग तुम्हाला २०१४च्या आधीचे मीपा वातावरण कसे काय माहीत? तुम्ही आधीच्या लेखांचा अभ्यास केला असेल तर, लेखांची लिंक पाठवलीत तर उत्तम...

चौथा कोनाडा Mon, 12/09/2024 - 17:20
हा ... हा,... हा .... शॉल्लिड लिव्हलंय ! एकांकिका करण्याची आयडिया आवडली. अजून वाढवून चांगलं स्किट होऊ शकतं असं वाटतं. घ्या भांडी ठोकायला. आमी म्हंजे वाचक क्याटेगिरीतिल.... कधी कधी जातो काड्या टाकून अन बघत बसतो मजा भिंतीवरची !

विवेकपटाईत Mon, 12/09/2024 - 18:44
धागा काढा किंवा प्रतिसाद द्या. आपण माय मराठीची सेवा करतो. मिसळपाव आहे. मी मराठीत चार शब्द टंकू शकलो. राजकीय धागा असेल हृदयातील प्रतिभा जागृत होते चारोळ्या सुचतात. आजच मला शकूनी आणि दुर्योधनाची आठवण आली. शकुनीचे षडयंत्र कधीच थांबत नाही... पुढचा धागा

वामन देशमुख Mon, 12/09/2024 - 13:42
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे. संपादक मंडळाने परवा खफची साफसफाई केली. काही आइडींचीही साफसफाई करणे आवश्यक आहे... दीर्घकाळापासून हे काम प्रलंबित आहे.

टर्मीनेटर Mon, 12/09/2024 - 13:51
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे.
धाग्याच्या आशयाशी मी सहमत नाही पण शेवटी दिलेल्या संदेशाशी
संदेश: राजकीय लेखन आणि त्यावर होणारी चर्चा समाजाला प्रगल्भ बनवण्यासाठी असावी, वाद निर्माण करण्यासाठी नव्हे. सामान्य माणसाच्या गरजा आणि प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे.
पूर्णपणे सहमत आहे! 'हे भान चर्चेकऱ्यांनी ठेवले असते तर मिपावर राजकीय चर्चा बंद करण्याची वेळ आली नसती' असे माझे वैयक्तिक मत... सतत कोणाचातरी द्वेष आणि कोणाचा तरी उदोउदो ह्यालाच महत्व आल्यावर दुसरे काय होणार म्हणा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 03:32
तुमचा आयडी जेमतेम ८ वर्षे जुना. मग तुम्हाला २०१४च्या आधीचे मीपा वातावरण कसे काय माहीत? तुम्ही आधीच्या लेखांचा अभ्यास केला असेल तर, लेखांची लिंक पाठवलीत तर उत्तम...

चौथा कोनाडा Mon, 12/09/2024 - 17:20
हा ... हा,... हा .... शॉल्लिड लिव्हलंय ! एकांकिका करण्याची आयडिया आवडली. अजून वाढवून चांगलं स्किट होऊ शकतं असं वाटतं. घ्या भांडी ठोकायला. आमी म्हंजे वाचक क्याटेगिरीतिल.... कधी कधी जातो काड्या टाकून अन बघत बसतो मजा भिंतीवरची !

विवेकपटाईत Mon, 12/09/2024 - 18:44
धागा काढा किंवा प्रतिसाद द्या. आपण माय मराठीची सेवा करतो. मिसळपाव आहे. मी मराठीत चार शब्द टंकू शकलो. राजकीय धागा असेल हृदयातील प्रतिभा जागृत होते चारोळ्या सुचतात. आजच मला शकूनी आणि दुर्योधनाची आठवण आली. शकुनीचे षडयंत्र कधीच थांबत नाही... पुढचा धागा
लेखनविषय:
लेखनप्रकार
पात्रे: 1. धाग्याबाबा - राजकीय लेख लिहिणारा, वाद निर्माण करण्यात पटाईत 2. प्रथम प्रतिसादक - लेखावर जोरदार समर्थन करणारा 3. द्वितीय प्रतिसादक - लेखावर चिरफाड करणारा 4. वाचक - वादाच्या गोंधळात सापडलेला साधा नागरिक --- (पडदा उघडतो. एका कॅफेच्या कोपऱ्यात धाग्याबाबा लॅपटॉपवर टाइप करत बसलेला आहे. प्रथम आणि द्वितीय प्रतिसादक फोनवर चर्चा करतायत. वाचक एका टेबलवर शांत बसून वर्तमानपत्र वाचतो.) --- धाग्याबाबा: (लॅपटॉपवर टाइप करत) "आजच्या सरकारच्या निर्णयांनी देश प्रगतीच्या वाटेवर आहे.

वाहुनी तू रहावे

रोहन जगताप ·

चौथा कोनाडा Mon, 12/09/2024 - 21:30
छान रचना.... आवडली !
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी
शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते... नायतं .. शांत रहायचं

चौथा कोनाडा Mon, 12/09/2024 - 21:30
छान रचना.... आवडली !
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी
शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते... नायतं .. शांत रहायचं
लेखनविषय:
नसे सोय बोलून सत्यात काही जगाला हवे ते असत्यात राही उगा मौन राखून विश्वा पहावे वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी मुकी साचताना उरी दैव देणी अबोलाच बोलून गाईल गाणी स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
झरे ज्ञान मर्मातले होत ओळी जरी सांडले वेचले घेत झोळी शिदोरीच वाटेत ही चालवावी उपाशी जिवा तेवढी चाखवावी
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

मार्गी ·

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 07:27
चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !

कर्नलतपस्वी Fri, 12/13/2024 - 07:27
चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!

वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

टर्मीनेटर ·

चित्रगुप्त गुरुवार, 12/05/2024 - 21:40
अमेरिकेत अनेकांना अमीश जीवनपद्धतीबद्दल आदरयुक्त कुतुहल असल्याचे जाणवते. पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती. या लेखमालेत याविषयी समग्र माहिती मिळेल याची खात्री आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 13:29
पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती.
क्या बात! मस्तच... 👍 AI चित्र आवडले... मलाही लेखातले चित्र बनवताना तुमच्या चित्रातल्या प्रमाणे गवताच्या टोप्या येणे अपेक्षित होते, खाली दिलेल्या चार पैकी दोन चित्रांत त्या आल्याही, AP-combo पण पहिल्या चित्रातल्या बाईच्या कमरेवर आलेला कोणा अज्ञाताचा हात आणि बाकीच्या दोनातली अपत्यांची कमी संख्या व अन्य डिटेल्स न आवडल्याने चारातल्या शेवटच्या चित्राची निवड केली... प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

वामन देशमुख Fri, 12/06/2024 - 17:51
"'अमीश' जीवनपद्धती"बद्धल याआधी कधी वाचण्यात आले नव्हते. प्रकरण रोचक दिसतंय; पुभाप्र. --- सवांतर: कृबु निर्मित चित्रांच्या निर्मितीप्रक्रियेतील अज्ञाताचा हात पाहून खुदकन हसू आले. --- अवांतर: नाही, नेहमीप्रमाणे हा हप्ताही, आपलं ते हे हा धागाही रंजक, माहितीपूर्ण झालाय यात काही वाद नाही; पण तुमच्यावर असलेल्या इतर कर्जांचे शिल्लक राहिलेले हप्ते यापुढे चुकवून चालणार नाही, हं.

सौंदाळा Mon, 12/09/2024 - 13:15
वाचावे ते नवलच पहिल्यांदाच ऐकले. पुढील भागात विस्तृत माहिती वाचण्यास उत्सुक.

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/26/2024 - 07:43
२०२५ मधे परदेशवारीचा योग आहे. पेनसिल्वानिया येथील जाणार आहे. दोन उद्देश, एक विद्यापीठ बघणे. अनंदी बाई जोशी पहिल्या महीला डाॅ इथेच शिकल्या. आणी आता तुमचा लेख. तेथे खुप मोठे मोठे द्राक्षांचे मळे आहेत कदाचीत याच लोकांचे असावेत. नवीन माहीती साठी धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त गुरुवार, 12/26/2024 - 21:40
पेन्सिल्व्हानियात कोणत्या गावी जाणार ? पूर्वेकडे फिलाडेल्फिया तर पश्चिमेकडे पिट्सबर्ग, दोन्हीत सुमारे ५०० कि.मी. अंतर आहे. दोन्हीत छान संग्रहालये आहेत. .

चित्रगुप्त गुरुवार, 12/05/2024 - 21:40
अमेरिकेत अनेकांना अमीश जीवनपद्धतीबद्दल आदरयुक्त कुतुहल असल्याचे जाणवते. पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती. या लेखमालेत याविषयी समग्र माहिती मिळेल याची खात्री आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Fri, 12/06/2024 - 13:29
पेनसिल्वानियात फिरताना अमीश लोकांनी जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर वगैरेची दुकाने बघण्यात आली होती.
क्या बात! मस्तच... 👍 AI चित्र आवडले... मलाही लेखातले चित्र बनवताना तुमच्या चित्रातल्या प्रमाणे गवताच्या टोप्या येणे अपेक्षित होते, खाली दिलेल्या चार पैकी दोन चित्रांत त्या आल्याही, AP-combo पण पहिल्या चित्रातल्या बाईच्या कमरेवर आलेला कोणा अज्ञाताचा हात आणि बाकीच्या दोनातली अपत्यांची कमी संख्या व अन्य डिटेल्स न आवडल्याने चारातल्या शेवटच्या चित्राची निवड केली... प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

वामन देशमुख Fri, 12/06/2024 - 17:51
"'अमीश' जीवनपद्धती"बद्धल याआधी कधी वाचण्यात आले नव्हते. प्रकरण रोचक दिसतंय; पुभाप्र. --- सवांतर: कृबु निर्मित चित्रांच्या निर्मितीप्रक्रियेतील अज्ञाताचा हात पाहून खुदकन हसू आले. --- अवांतर: नाही, नेहमीप्रमाणे हा हप्ताही, आपलं ते हे हा धागाही रंजक, माहितीपूर्ण झालाय यात काही वाद नाही; पण तुमच्यावर असलेल्या इतर कर्जांचे शिल्लक राहिलेले हप्ते यापुढे चुकवून चालणार नाही, हं.

सौंदाळा Mon, 12/09/2024 - 13:15
वाचावे ते नवलच पहिल्यांदाच ऐकले. पुढील भागात विस्तृत माहिती वाचण्यास उत्सुक.

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/26/2024 - 07:43
२०२५ मधे परदेशवारीचा योग आहे. पेनसिल्वानिया येथील जाणार आहे. दोन उद्देश, एक विद्यापीठ बघणे. अनंदी बाई जोशी पहिल्या महीला डाॅ इथेच शिकल्या. आणी आता तुमचा लेख. तेथे खुप मोठे मोठे द्राक्षांचे मळे आहेत कदाचीत याच लोकांचे असावेत. नवीन माहीती साठी धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त गुरुवार, 12/26/2024 - 21:40
पेन्सिल्व्हानियात कोणत्या गावी जाणार ? पूर्वेकडे फिलाडेल्फिया तर पश्चिमेकडे पिट्सबर्ग, दोन्हीत सुमारे ५०० कि.मी. अंतर आहे. दोन्हीत छान संग्रहालये आहेत. .
लेखनविषय:
लेखनप्रकार

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.

देणाऱ्याचे हात घ्यावे

अनन्त्_यात्री ·

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/05/2024 - 12:53
स्वप्ने सर्वांचीच असतात कुणाची काळाच्या ओघात ..... तर कुणाची सत्यात उतरतात. सुंदर.

मनिष Wed, 01/01/2025 - 17:36
सर्रकन अंगावर काटा आला. गोष्टीसारखी चित्रदर्शी (लोकलमधली "सांडणारी गर्दी" हे अगदीच पटलं), पण तरल आणि संवेदनशील कविता खूप आवडली (विंदाच्या कवितेच्या संदर्भासकट) - लिहित रहा.

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/05/2024 - 12:53
स्वप्ने सर्वांचीच असतात कुणाची काळाच्या ओघात ..... तर कुणाची सत्यात उतरतात. सुंदर.

मनिष Wed, 01/01/2025 - 17:36
सर्रकन अंगावर काटा आला. गोष्टीसारखी चित्रदर्शी (लोकलमधली "सांडणारी गर्दी" हे अगदीच पटलं), पण तरल आणि संवेदनशील कविता खूप आवडली (विंदाच्या कवितेच्या संदर्भासकट) - लिहित रहा.
लेखनविषय:
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून फलाटावर धो धो कोसळणाऱ्या बेफाम गर्दीचा बेहाल थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट... ...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी चट्दिशी उठून वाहत्या गर्दीच्या काठावर गेली एक नेहमीसारखा खाली बसला अन् दुसरा ऐटीत उभा राहून स्वतःच्या भिकेतले नाणे बसलेल्याच्या ओंजळीत टाकून निर्व्याज हसू लागला मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल.. ...विंदांच्या "घेता" कवितेच्या शेवटच्या दोन ओळींची लव्हाळी गर्दीच्या महापुरातही अनवधानाने जिवंत ठेवणारी ती लेकरं पुन्हा दिसलीच नाहीत कधी

तो परत आला...

बाजीगर ·
लेखनविषय:
जातीयवादींचे प्राण झाले कासावीस, परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !! अपमानाचे पचवले हलाहल, शांत राहिले, पाहून कोलाहल ।। जातियवादींचा विषारी अपप्रचार, देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।। अति केला द्वेष कारण ब्राम्हण, आता तरी हा सक्षम आहे म्हण ।। चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे, लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।। योग्य वेळी हिंदूशक्ती एकवटली, घराणेशाहीने सफशेल धूळ चाटली ।। देवेंद्रच आहे भगव्याशक्तीचा शिल्पकार, राखेतून घेतली झेप,विजय स्वप्नसाकार ।।