मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चूक

अमरेंद्र बाहुबली ·

शेवटच्या वाक्यात कथेचे सार आले आहे. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... कथानक छान रंगवले आहे. लघुकथा आवडली हे वेगळे सांगणे नको. मिरवनारी नाही.... मिरवणारी....

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद कर्नलसाहेब. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.

विजुभाऊ 20/01/2025 - 11:29
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. स्वतःच स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा जगाचा न्याय आहे. न च व्याघ्रंच न च सिहं च.अजापुत्रो बलीं दद्यात.

In reply to by विजुभाऊ

अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ 22/01/2025 - 14:02
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर मात करण्यासाठी ती वाइट असते हे फक्त बोलून चालत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते. कृती आनि परिणाम या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक हातात घेतली की दुसरीही आपसूक हातात येतेच. त्यापासुन कोणीच दूर जाउ शकत नाही. पण परिणामांची भिती बाळगून आपण निर्णय घेतले तर आपण जेथे आहोत तेथेच रहातो. जे परिणाम माहीत असतात आपण ते सहन करायला तयार होतो. मात्र जे माहीत नसतात त्याबद्दल भीती वाटत असते. उदा : घरात रहायला मिळते म्हणून नवर्‍याचा मार सहन करत रहायचे या पेक्षा काही समाजसेवी संस्थांची / पोलीसांची मदत घेतली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो. ही बाइ आपल्याला घाबरत नाही या गोष्टीची नवर्‍याला भीती वाटू शकते पोलीस , सामाजीक कार्यकर्ते त्या नवर्‍याला सुधरवू शकतात हे चांगले परिणाम ही असू शकतात.

आयुष्य असं सरळ नसतंच. ते असंख्य अनपेक्षित घटनांनी भरलेलं आहे. अशा असंख्य कथानायिका आपल्या आजुबाजूला दिसतील. कथा आवडली असे तरी कसे म्हणावे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 21/01/2025 - 13:06
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. त्याने तिचे आयुष्य उध्वस्त केले. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.

In reply to by विवेकपटाईत

छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.

चौथा कोनाडा 21/01/2025 - 20:07
चुक ती चुकच ! एकट्याने केली काय अन अनेकांनी केली काय ? त्याचे भोग मात्र दुर्दैवी जीवाच्या वाट्याला येतात ... बसतात दुर्दैव उपसत अन भोग भोगत.

विजुभाऊ 22/01/2025 - 14:10
माझ्या ओळखीतल्या एक गायीका आहेत. त्यांचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी झाले. नवरा त्याम्च्यापेक्षा १० वर्षानी मोठा . दारू पिऊन मारहाण करायचा. त्या बाईंच्या आईने " जिथे नांदायला गेलीस तेच तुझे जग अशी भूमीका घेतली. मारहाणीचाअतिरेक झाल्यानंतर त्या बाईनी पोलीसात तक्रार केली. नवर्‍याला पोलीसांनी दम दिला. बायको पोलीसात जाऊ शकते हे पाहून नवर्‍याने पळ काढला.

शेवटच्या वाक्यात कथेचे सार आले आहे. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... कथानक छान रंगवले आहे. लघुकथा आवडली हे वेगळे सांगणे नको. मिरवनारी नाही.... मिरवणारी....

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद कर्नलसाहेब. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.

विजुभाऊ 20/01/2025 - 11:29
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. स्वतःच स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा जगाचा न्याय आहे. न च व्याघ्रंच न च सिहं च.अजापुत्रो बलीं दद्यात.

In reply to by विजुभाऊ

अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ 22/01/2025 - 14:02
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर मात करण्यासाठी ती वाइट असते हे फक्त बोलून चालत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते. कृती आनि परिणाम या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक हातात घेतली की दुसरीही आपसूक हातात येतेच. त्यापासुन कोणीच दूर जाउ शकत नाही. पण परिणामांची भिती बाळगून आपण निर्णय घेतले तर आपण जेथे आहोत तेथेच रहातो. जे परिणाम माहीत असतात आपण ते सहन करायला तयार होतो. मात्र जे माहीत नसतात त्याबद्दल भीती वाटत असते. उदा : घरात रहायला मिळते म्हणून नवर्‍याचा मार सहन करत रहायचे या पेक्षा काही समाजसेवी संस्थांची / पोलीसांची मदत घेतली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो. ही बाइ आपल्याला घाबरत नाही या गोष्टीची नवर्‍याला भीती वाटू शकते पोलीस , सामाजीक कार्यकर्ते त्या नवर्‍याला सुधरवू शकतात हे चांगले परिणाम ही असू शकतात.

आयुष्य असं सरळ नसतंच. ते असंख्य अनपेक्षित घटनांनी भरलेलं आहे. अशा असंख्य कथानायिका आपल्या आजुबाजूला दिसतील. कथा आवडली असे तरी कसे म्हणावे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 21/01/2025 - 13:06
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. त्याने तिचे आयुष्य उध्वस्त केले. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.

In reply to by विवेकपटाईत

छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.

चौथा कोनाडा 21/01/2025 - 20:07
चुक ती चुकच ! एकट्याने केली काय अन अनेकांनी केली काय ? त्याचे भोग मात्र दुर्दैवी जीवाच्या वाट्याला येतात ... बसतात दुर्दैव उपसत अन भोग भोगत.

विजुभाऊ 22/01/2025 - 14:10
माझ्या ओळखीतल्या एक गायीका आहेत. त्यांचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी झाले. नवरा त्याम्च्यापेक्षा १० वर्षानी मोठा . दारू पिऊन मारहाण करायचा. त्या बाईंच्या आईने " जिथे नांदायला गेलीस तेच तुझे जग अशी भूमीका घेतली. मारहाणीचाअतिरेक झाल्यानंतर त्या बाईनी पोलीसात तक्रार केली. नवर्‍याला पोलीसांनी दम दिला. बायको पोलीसात जाऊ शकते हे पाहून नवर्‍याने पळ काढला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता. आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची. जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत.

जॉन अब्राहम (भाग ४)

श्रीगुरुजी ·

अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ अमेरिकन रंगभूमीवरील एक लोकप्रिय कलाकार होता. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन फोर्ड थिएटरमध्ये 'माय अमेरिकन कझिन' हे विनोदी नाटक बघायला गेले होते. चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता. चार दिवस आधीच युध्द संपल्याने त्यांच्या मनावरील मोठा ताण नाहीसा झाला होता. १४ एप्रिलला शुक्रवार होता. त्या दिवशी रात्री म्हणजे अमेरिकन परिभाषेत 'फ्रायडे नाईटला' ते दडपण नाहीसे झाल्याने काळजीमुक्त वातावरणात ते विनोदी नाटक बघायला गेले होते. त्याकाळी ब्रिटिश लोक स्वतःला अमेरिकन्सपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि ब्रिटनमध्ये ज्यांना काही करता येत नाही असे लोक अमेरिकेला जातात असे ब्रिटिश लोक अगदी पहिल्या महायुध्दापर्यंत समजत असत. असा एक असभ्य आणि असंस्कृत अमेरिकन आपल्या विस्तारीत कुटुंबातील इस्टेटीतील वाटा आपल्याला मिळणार हे कळल्यानंतर ब्रिटनला जातो. तिथे मग तो अमेरिकन आणि ब्रिटिश लोक यांच्यातील सांस्कृतिक खटके वगैरे त्या नाटकात दाखविले होते. त्या नाटकात एक विनोदी वाक्य कथानकात आल्यावर थिएटरमध्ये नेहमी हशा पिकायचा. जॉन विल्क्स बूथला हे माहित होते. तसेच फोर्ड थिएटरचा कोपरा आणि कोपरा त्याला माहित होता. त्या वाक्यावर हशा पिकेल बरोबर तेव्हा लिंकनना गोळी घालायची हे त्याने ठरविले होते. त्यावेळेस मेरी आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन पहिल्या मजल्यावरील गॅलरीत त्यांच्यासाठीच्या विशेष कक्षात बसले होते.कक्षाचे दार बंद होते. पण दाराला जॉन विल्क्स बूथने त्या दिवशी सकाळीच एक छोटे भोक पाडून ठेवले होते. त्यामुळे तो कडी उघडून त्या कक्षात जाऊ शकणार होता. लिंकनचा अंगरक्षक एकच होता आणि तो त्या वेळेस त्या कक्षाच्या बाहेर असणे अपेक्षित होते पण तो तेव्हा जागेवर नव्हता. त्या कक्षाकडे जाणार्‍या जिन्याच्या समोर तळ मजल्याला फोर्ड थिएटरचे एक प्रवेशद्वार होते. तिथे थिएटरशी संबंधित एक माणूस होता. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपला घोडा लावून त्या घोड्याकडे थोडा वेळ लक्ष द्या मी आलोच असे म्हणत जॉन विल्क्स बूथने ते विनोदी वाक्य कथानकात यायच्या काही वेळ आधी तिथून फोर्ड थिएटरमध्ये प्रवेश केला. बूथ हा एक लोकप्रिय आणि नावाजलेला कलाकार असल्याने त्याने फोर्ड थिएटरमध्ये जाणे यात काही विशेष वाटले नसावे. मात्र अध्यक्ष बसले आहेत तिथल्याच बाजूने त्याला का जायचे आहे हा प्रश्न त्या माणसालाही पडला नाही. अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था इतकीच होती. बूथने कडी उघडून आत प्रवेश केला. तोपर्यंत तो मागे दबा धरून उभा होता. लिंकनना त्याची अजिबात कल्पना नव्हती. बरोबर ते विनोदी वाक्य आले आणि सभागृहात हशा पिकला आणि बरोबर त्याच वेळेस बूथने लिंकनना गोळी घातली. गोळीचा एकदम मोठा आवाज आणि धूर आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सभागृहातील लोकांना वरील गॅलरीत लिंकन आहेत आणि तिथून गोळीचा आवाज आला म्हणजे काय झाले असेल याची कल्पना आलीच असेल. तेवढ्यात बूथने त्या गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. उंचावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली- पायाचे हाड थोडेसे फ्रॅक्चरच झाले. व्यासपीठावर उडी मारल्यावर 'Sic semper tyrannis!' म्हणजे 'अत्याचार्‍यांबरोबर असेच व्हायला पाहिजे' या अर्थाचे लॅटिन वाक्य बोलला. बूथ हा ओळखीचा चेहरा असल्याने त्याला लोकांनी लगेच ओळखले. म्हणजे लिंकनना गोळी घालणारा जॉन विल्क्स बूथ हाच आहे हे लगेचच स्पष्ट झाले. सभागृहात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तिथून बूथ निसटला आणि मागच्या बाजूला लावलेला घोडा त्याने ताब्यात घेतला आणि घोड्यावर बसून तो निघून गेला. तो पुढे कुठे गेला पुढील भागांमध्ये येईलच. त्यामुळे आता काही लिहित नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता.
अमेरिकन यादवी युध्दात दोन्ही बाजूंकडून मारल्या गेलेल्यांची संख्या विविध अंदाजांप्रमाणे ७ ते १० लाख इतकी होती. १८६० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ३ कोटी १४ लाख होती. म्हणजे यादवी युध्दात कमितकमी २% पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यामुळे त्याचा अध्यक्षांवर तणाव आला असेल तर अजिबात नवल नाही. खालील फोटोमध्ये त्याची कल्पना येईल. डावीकडच्या फोटोत लिंकन १८६१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी कसे दिसायचे आणि उजवीकडच्या फोटोत त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस ते कसे दिसत होते हे दिसेल. अवघ्या चार वर्षात लिंकन किमान १५-२० वर्षाने अधिक म्हातारे दिसू लागले होते. Lincoln

अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ अमेरिकन रंगभूमीवरील एक लोकप्रिय कलाकार होता. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन फोर्ड थिएटरमध्ये 'माय अमेरिकन कझिन' हे विनोदी नाटक बघायला गेले होते. चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता. चार दिवस आधीच युध्द संपल्याने त्यांच्या मनावरील मोठा ताण नाहीसा झाला होता. १४ एप्रिलला शुक्रवार होता. त्या दिवशी रात्री म्हणजे अमेरिकन परिभाषेत 'फ्रायडे नाईटला' ते दडपण नाहीसे झाल्याने काळजीमुक्त वातावरणात ते विनोदी नाटक बघायला गेले होते. त्याकाळी ब्रिटिश लोक स्वतःला अमेरिकन्सपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि ब्रिटनमध्ये ज्यांना काही करता येत नाही असे लोक अमेरिकेला जातात असे ब्रिटिश लोक अगदी पहिल्या महायुध्दापर्यंत समजत असत. असा एक असभ्य आणि असंस्कृत अमेरिकन आपल्या विस्तारीत कुटुंबातील इस्टेटीतील वाटा आपल्याला मिळणार हे कळल्यानंतर ब्रिटनला जातो. तिथे मग तो अमेरिकन आणि ब्रिटिश लोक यांच्यातील सांस्कृतिक खटके वगैरे त्या नाटकात दाखविले होते. त्या नाटकात एक विनोदी वाक्य कथानकात आल्यावर थिएटरमध्ये नेहमी हशा पिकायचा. जॉन विल्क्स बूथला हे माहित होते. तसेच फोर्ड थिएटरचा कोपरा आणि कोपरा त्याला माहित होता. त्या वाक्यावर हशा पिकेल बरोबर तेव्हा लिंकनना गोळी घालायची हे त्याने ठरविले होते. त्यावेळेस मेरी आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन पहिल्या मजल्यावरील गॅलरीत त्यांच्यासाठीच्या विशेष कक्षात बसले होते.कक्षाचे दार बंद होते. पण दाराला जॉन विल्क्स बूथने त्या दिवशी सकाळीच एक छोटे भोक पाडून ठेवले होते. त्यामुळे तो कडी उघडून त्या कक्षात जाऊ शकणार होता. लिंकनचा अंगरक्षक एकच होता आणि तो त्या वेळेस त्या कक्षाच्या बाहेर असणे अपेक्षित होते पण तो तेव्हा जागेवर नव्हता. त्या कक्षाकडे जाणार्‍या जिन्याच्या समोर तळ मजल्याला फोर्ड थिएटरचे एक प्रवेशद्वार होते. तिथे थिएटरशी संबंधित एक माणूस होता. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपला घोडा लावून त्या घोड्याकडे थोडा वेळ लक्ष द्या मी आलोच असे म्हणत जॉन विल्क्स बूथने ते विनोदी वाक्य कथानकात यायच्या काही वेळ आधी तिथून फोर्ड थिएटरमध्ये प्रवेश केला. बूथ हा एक लोकप्रिय आणि नावाजलेला कलाकार असल्याने त्याने फोर्ड थिएटरमध्ये जाणे यात काही विशेष वाटले नसावे. मात्र अध्यक्ष बसले आहेत तिथल्याच बाजूने त्याला का जायचे आहे हा प्रश्न त्या माणसालाही पडला नाही. अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था इतकीच होती. बूथने कडी उघडून आत प्रवेश केला. तोपर्यंत तो मागे दबा धरून उभा होता. लिंकनना त्याची अजिबात कल्पना नव्हती. बरोबर ते विनोदी वाक्य आले आणि सभागृहात हशा पिकला आणि बरोबर त्याच वेळेस बूथने लिंकनना गोळी घातली. गोळीचा एकदम मोठा आवाज आणि धूर आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सभागृहातील लोकांना वरील गॅलरीत लिंकन आहेत आणि तिथून गोळीचा आवाज आला म्हणजे काय झाले असेल याची कल्पना आलीच असेल. तेवढ्यात बूथने त्या गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. उंचावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली- पायाचे हाड थोडेसे फ्रॅक्चरच झाले. व्यासपीठावर उडी मारल्यावर 'Sic semper tyrannis!' म्हणजे 'अत्याचार्‍यांबरोबर असेच व्हायला पाहिजे' या अर्थाचे लॅटिन वाक्य बोलला. बूथ हा ओळखीचा चेहरा असल्याने त्याला लोकांनी लगेच ओळखले. म्हणजे लिंकनना गोळी घालणारा जॉन विल्क्स बूथ हाच आहे हे लगेचच स्पष्ट झाले. सभागृहात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तिथून बूथ निसटला आणि मागच्या बाजूला लावलेला घोडा त्याने ताब्यात घेतला आणि घोड्यावर बसून तो निघून गेला. तो पुढे कुठे गेला पुढील भागांमध्ये येईलच. त्यामुळे आता काही लिहित नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता.
अमेरिकन यादवी युध्दात दोन्ही बाजूंकडून मारल्या गेलेल्यांची संख्या विविध अंदाजांप्रमाणे ७ ते १० लाख इतकी होती. १८६० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ३ कोटी १४ लाख होती. म्हणजे यादवी युध्दात कमितकमी २% पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यामुळे त्याचा अध्यक्षांवर तणाव आला असेल तर अजिबात नवल नाही. खालील फोटोमध्ये त्याची कल्पना येईल. डावीकडच्या फोटोत लिंकन १८६१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी कसे दिसायचे आणि उजवीकडच्या फोटोत त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस ते कसे दिसत होते हे दिसेल. अवघ्या चार वर्षात लिंकन किमान १५-२० वर्षाने अधिक म्हातारे दिसू लागले होते. Lincoln
लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) ==> जॉन अब्राहम (भाग २) ==> जॉन अब्राहम (भाग ३) जेव्हा स्पष्टपणे गुलामगिरीविरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन यांनी १८६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा सुरूवातीला सात दक्षिणी राज्ये (दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अ‍ॅलाबामा, जॉर्जिया, लुझियाना आणि टेक्सस) यांनी धोका पत्करला आणि संघटित होऊन अमेरिकेतून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला .

कराडची मुलगी

चौथा कोनाडा ·

अप्रतिम शॉर्टफिल्म !! कराडची मुलगी हे धाग्याचे शीर्षक वाचून नवीन बीड कनेक्शन आणि वाल्मिक आण्णाचा काय मॅटर असे वाटून गेले. मात्र फिल्म आणि विषय खरच सुंदर आहे. धन्यवाद

In reply to by रीडर

चावटमेला 19/01/2025 - 02:48
एकदम बरोब्बर. कै च्या कै आहे. कुठली आय टी कम्पनी आहे बाबा ही? असं काम होत नसतं कुठेही, थोडा रिसर्च करत जा.. अजून जॉईनिंग नाही, आय डी तयार नाही, आणि डायरेक्ट मॅनेजर चा स्वतःचा लॅपटॉप देतोय वापरायला, वर कुठल्याश्या कागदावर पाहून हिला लगेच प्रोजेक्ट कळतो आणि ही मुलगी लगेच इनपुट्स पण देते. ते आमच्या तासगावकर बाई म्हणतात हे ऐकून तर अक्षरशः फुटलो. बादवे त्या प्रोजेक्ट प्रेझेंटशन मध्ये एच आर कशाला हवीये? आयला अशा प्रोजेक्ट मीटिंग मध्ये पण एच आर बसायला लागले तर लागलीच की वाट प्रोजेक्ट ची पण. एकदम बाळबोध आहे फिल्म, एखाद्या स्कूल प्रोजेक्ट सारखी

प्रचेतस 19/01/2025 - 07:45
खूपच मस्त. मात्र ह्यावेळी तुम्ही लिहिण्यात हात आखडता घेतला असल्याचे जाणवले.

गवि 23/01/2025 - 20:15
बघितली फिल्म. सुसाईड नोट लिहून ठेवलेल्या मुलीची फाईल सापडली की कराडची मुलगी हडबडून जाईल की मैत्रिणीशी मस्त गप्पा मारत दोघी मिळून शेवटी त्या मुलीच्या जागी हिने जावे असे ठरवू शकतील? त्या मुलीने खरेच जीव दिला असेल आणि आपण तिच्या नावाने कुठेतरी ऑफिसात गेलो तर केवढ्या लफड्यात सापडू याचा विचार देखील शिवू नये म्हणजे फारच निरागस बुवा. अशा वेळी धीट असेल तर पोलिसात जाऊन फाईल देईल किंवा सामान्य घाबरट असेल तर फाईल तिथेच सोडून काढता पाय घेईल. असो.

nutanm 11/02/2025 - 08:41
बाळबोध फिलम वाटतेय, अशाप्रकारचया बरयाच रहसयकथा पूरवी वाचलयात. फकत थोडासा धकका बसतो. ऊमेश कामत बॉस तयाला माहित असूनही तिचया ईनोसनट दिसणयामङळे किवा खरेच presentention मुळे attract होतो का व महणून नोकरी देतो असे वाटते. याहून धककादायक फिलमस् खूप पाहिलयात. ठीक आहे अशी फिलम्.

खुप छान फिल्म ! जगात निरागसता आणि बाळबोधपणा जिवंत आहे हे ह्या फिल्म मुळे कळाले. इथे निगेटिव्ह रिप्लाय देणार्‍यांना फाट्यावर मारा. रोजमर्रा च्या जिंदगी च्या कश्मकश मधे त्यांचा इनो(संट)चंटपणा जळून गेला आहे.

श्वेता२४ 12/02/2025 - 11:02
पटली नाही. नुकताच ऑफीसमधील माहितीच्या व्यक्तीने सुसाईड अटेम्ट केल्याची बातमी कळली तेव्हा काय अवस्था होते त्याचा अनुभव घेतलाय. त्यामुळे खोटेपणाची चीड असणारा उमेश कामत मीत्राच्या बहिणीच्या या अवस्थेत कोणी अन्य फायदा घेतेय हे माहित असूनही इतका शांत कसा हे पटलेले नाही. बाकी ते प्रोजेक्ट प्रेझेंटेशन खरंच बाळबोध वाटलं. काम करणारे कलाकार उत्तम असल्याने एकूण प्रभाव चांगला पडत असला तरी .........मुलगी कराडची नाही तर पुण्याची वाटतेय....

अप्रतिम शॉर्टफिल्म !! कराडची मुलगी हे धाग्याचे शीर्षक वाचून नवीन बीड कनेक्शन आणि वाल्मिक आण्णाचा काय मॅटर असे वाटून गेले. मात्र फिल्म आणि विषय खरच सुंदर आहे. धन्यवाद

In reply to by रीडर

चावटमेला 19/01/2025 - 02:48
एकदम बरोब्बर. कै च्या कै आहे. कुठली आय टी कम्पनी आहे बाबा ही? असं काम होत नसतं कुठेही, थोडा रिसर्च करत जा.. अजून जॉईनिंग नाही, आय डी तयार नाही, आणि डायरेक्ट मॅनेजर चा स्वतःचा लॅपटॉप देतोय वापरायला, वर कुठल्याश्या कागदावर पाहून हिला लगेच प्रोजेक्ट कळतो आणि ही मुलगी लगेच इनपुट्स पण देते. ते आमच्या तासगावकर बाई म्हणतात हे ऐकून तर अक्षरशः फुटलो. बादवे त्या प्रोजेक्ट प्रेझेंटशन मध्ये एच आर कशाला हवीये? आयला अशा प्रोजेक्ट मीटिंग मध्ये पण एच आर बसायला लागले तर लागलीच की वाट प्रोजेक्ट ची पण. एकदम बाळबोध आहे फिल्म, एखाद्या स्कूल प्रोजेक्ट सारखी

प्रचेतस 19/01/2025 - 07:45
खूपच मस्त. मात्र ह्यावेळी तुम्ही लिहिण्यात हात आखडता घेतला असल्याचे जाणवले.

गवि 23/01/2025 - 20:15
बघितली फिल्म. सुसाईड नोट लिहून ठेवलेल्या मुलीची फाईल सापडली की कराडची मुलगी हडबडून जाईल की मैत्रिणीशी मस्त गप्पा मारत दोघी मिळून शेवटी त्या मुलीच्या जागी हिने जावे असे ठरवू शकतील? त्या मुलीने खरेच जीव दिला असेल आणि आपण तिच्या नावाने कुठेतरी ऑफिसात गेलो तर केवढ्या लफड्यात सापडू याचा विचार देखील शिवू नये म्हणजे फारच निरागस बुवा. अशा वेळी धीट असेल तर पोलिसात जाऊन फाईल देईल किंवा सामान्य घाबरट असेल तर फाईल तिथेच सोडून काढता पाय घेईल. असो.

nutanm 11/02/2025 - 08:41
बाळबोध फिलम वाटतेय, अशाप्रकारचया बरयाच रहसयकथा पूरवी वाचलयात. फकत थोडासा धकका बसतो. ऊमेश कामत बॉस तयाला माहित असूनही तिचया ईनोसनट दिसणयामङळे किवा खरेच presentention मुळे attract होतो का व महणून नोकरी देतो असे वाटते. याहून धककादायक फिलमस् खूप पाहिलयात. ठीक आहे अशी फिलम्.

खुप छान फिल्म ! जगात निरागसता आणि बाळबोधपणा जिवंत आहे हे ह्या फिल्म मुळे कळाले. इथे निगेटिव्ह रिप्लाय देणार्‍यांना फाट्यावर मारा. रोजमर्रा च्या जिंदगी च्या कश्मकश मधे त्यांचा इनो(संट)चंटपणा जळून गेला आहे.

श्वेता२४ 12/02/2025 - 11:02
पटली नाही. नुकताच ऑफीसमधील माहितीच्या व्यक्तीने सुसाईड अटेम्ट केल्याची बातमी कळली तेव्हा काय अवस्था होते त्याचा अनुभव घेतलाय. त्यामुळे खोटेपणाची चीड असणारा उमेश कामत मीत्राच्या बहिणीच्या या अवस्थेत कोणी अन्य फायदा घेतेय हे माहित असूनही इतका शांत कसा हे पटलेले नाही. बाकी ते प्रोजेक्ट प्रेझेंटेशन खरंच बाळबोध वाटलं. काम करणारे कलाकार उत्तम असल्याने एकूण प्रभाव चांगला पडत असला तरी .........मुलगी कराडची नाही तर पुण्याची वाटतेय....
लेखनविषय:
लेखनप्रकार
नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ? कराडची मुलगी शिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या शहरात आलीय आणि नोकरी साठी धडपड करत एका कंपनीत पोहोचतेय ... आणि " नाव काय तुझं ? असा प्रश्न आला की उत्तर काय द्यायचं देताना मनात हजार कल्लोळ उठतायत.... काय असेल कारण ? हे समजून घ्यायचं असेल तर नुकतीच प्रदर्शित झालेली "नाव काय तुझं ? " ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी !

गोत्र, जनुकीय दोष इ० इ०

युयुत्सु ·

महिरावण 18/01/2025 - 12:13
गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आईकडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो."
हा दावा पूर्णतः अचूक नाही. जरी आई-वडिलांकडून समान प्रमाणात अणु (alleles) येत असले तरी माइटोकॉन्ड्रिया DNA फक्त आईकडून येतो, त्यामुळे मातृवंशीय वारसा थोडा अधिक असतो. "जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार." येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. "अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४)..." हा हिशोब गोत्रासंदर्भात नाही. Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते, जर पुरुष वंश टिकून राहिला, तर. त्यामुळे गोत्राशी सरळ संलग्न वारसा याप्रमाणे घटत नाही. धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये सापिण्ड्य संपते..." धर्मशास्त्रात सापिंड्याची व्याख्या रक्तसंबंधावर आधारित नाही, तर सामाजिक संबंधांवर आधारित आहे. यामध्ये जनुकशास्त्राचा थेट समावेश होत नाही. "
बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे
गोत्र ही केवळ पितृवंशाशी निगडित सामाजिक संकल्पना आहे, जी जनुकांच्या dominant किंवा recessive स्वरूपावर अवलंबून नसते.

In reply to by महिरावण

युयुत्सु 18/01/2025 - 12:55
प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो हे मी स्पष्ट लिहीलेले असताना आपण त्याकडे दूर्लक्ष का केले? येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. याचा प्रतिवादही केलेला आहे. उदा० - "सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही." Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते. अर्धसत्य! Y गुणसूत्र उत्कांत होते आणि त्यामु़ळे वेगवेगळे हॅप्लोग्रुप तयार झाले आहेत. तसेच भविष्यात ते पूर्ण नाहिसे होणार अशी पण शक्यता व्यक्त केली जात आहे. गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. मग गोत्राचा आणि गुण्सूत्रांचा संबंध लावायचा अट्टाहास कशासाठी

सुबोध खरे 18/01/2025 - 18:34
माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे ज्या गुरुकुलात मुले आणि मुली शिकायला जात असत त्यांचे गोत्र त्या ऋषींचे नाव म्हणून लावले जात आणि शिक्षण करत असताना त्यांच्या प्रेमविवाह होऊ नये म्हणून सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला होता. हि माहिती जर खरी असेल तर गोत्र आणि गुणसूत्रे यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पुढचा काथ्याकूट मुळातच निरर्थक ठरतो. अर्थात माझी माहिती बिनचूक आहे असा माझा दावा नाही. पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

अनन्त अवधुत 31/01/2025 - 02:00
पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
+१

युट्यूब फीडमध्ये
असे युट्युब फीड मध्ये दिसणार्‍या प्रत्येक विषयावर लेख पाडायचे ठरवले तर मिपा लवकरच सुगीचे दिवस येतील. =)))) बाकी तुम्हाला जे कळले ते आणि फक्त तेच इतरांना कळावे , किंवा इतरांना काही कळातच नाही , त्यांचे सर्व आकलन ते तकलादु आणि मुर्खपणाचे आहे असा जो सुर तुमच्या लेखात आहे तो आवडला ! तुम्ही त्यांची पुस्तके ग्रंथ ह्यांचे सार्वजनिक दहन करा ! स्वतंत्र देश आहे, तुम्हाला जे पटत नाही त्याची जाळपोळ करायला तुम्ही स्वतंत्र आहात !! हाकानाका. २

महिरावण 18/01/2025 - 12:13
गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आईकडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो."
हा दावा पूर्णतः अचूक नाही. जरी आई-वडिलांकडून समान प्रमाणात अणु (alleles) येत असले तरी माइटोकॉन्ड्रिया DNA फक्त आईकडून येतो, त्यामुळे मातृवंशीय वारसा थोडा अधिक असतो. "जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार." येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. "अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४)..." हा हिशोब गोत्रासंदर्भात नाही. Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते, जर पुरुष वंश टिकून राहिला, तर. त्यामुळे गोत्राशी सरळ संलग्न वारसा याप्रमाणे घटत नाही. धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये सापिण्ड्य संपते..." धर्मशास्त्रात सापिंड्याची व्याख्या रक्तसंबंधावर आधारित नाही, तर सामाजिक संबंधांवर आधारित आहे. यामध्ये जनुकशास्त्राचा थेट समावेश होत नाही. "
बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे
गोत्र ही केवळ पितृवंशाशी निगडित सामाजिक संकल्पना आहे, जी जनुकांच्या dominant किंवा recessive स्वरूपावर अवलंबून नसते.

In reply to by महिरावण

युयुत्सु 18/01/2025 - 12:55
प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो हे मी स्पष्ट लिहीलेले असताना आपण त्याकडे दूर्लक्ष का केले? येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. याचा प्रतिवादही केलेला आहे. उदा० - "सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही." Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते. अर्धसत्य! Y गुणसूत्र उत्कांत होते आणि त्यामु़ळे वेगवेगळे हॅप्लोग्रुप तयार झाले आहेत. तसेच भविष्यात ते पूर्ण नाहिसे होणार अशी पण शक्यता व्यक्त केली जात आहे. गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. मग गोत्राचा आणि गुण्सूत्रांचा संबंध लावायचा अट्टाहास कशासाठी

सुबोध खरे 18/01/2025 - 18:34
माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे ज्या गुरुकुलात मुले आणि मुली शिकायला जात असत त्यांचे गोत्र त्या ऋषींचे नाव म्हणून लावले जात आणि शिक्षण करत असताना त्यांच्या प्रेमविवाह होऊ नये म्हणून सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला होता. हि माहिती जर खरी असेल तर गोत्र आणि गुणसूत्रे यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पुढचा काथ्याकूट मुळातच निरर्थक ठरतो. अर्थात माझी माहिती बिनचूक आहे असा माझा दावा नाही. पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

अनन्त अवधुत 31/01/2025 - 02:00
पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
+१

युट्यूब फीडमध्ये
असे युट्युब फीड मध्ये दिसणार्‍या प्रत्येक विषयावर लेख पाडायचे ठरवले तर मिपा लवकरच सुगीचे दिवस येतील. =)))) बाकी तुम्हाला जे कळले ते आणि फक्त तेच इतरांना कळावे , किंवा इतरांना काही कळातच नाही , त्यांचे सर्व आकलन ते तकलादु आणि मुर्खपणाचे आहे असा जो सुर तुमच्या लेखात आहे तो आवडला ! तुम्ही त्यांची पुस्तके ग्रंथ ह्यांचे सार्वजनिक दहन करा ! स्वतंत्र देश आहे, तुम्हाला जे पटत नाही त्याची जाळपोळ करायला तुम्ही स्वतंत्र आहात !! हाकानाका. २
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या माझ्या युट्यूब फीडमध्ये अचानक "गोत्र" या निरर्थक कल्पनेवर काही व्हिडीओ दिसू लागले आहेत. सर्व व्हिडीओंमध्ये वैज्ञानिक सत्याचे शक्य तेव्हढे विकृतीकरण करून या गोत्र कल्पनेचे पुनरुज्जीवन करायचा हास्यास्पद खटाटोप केलेला दिसतो. समाजाची रचना झाली तेव्हा तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे केवळ काही सोईस्कर कल्पनांच्या उथळ साधर्म्यामुळे गोत्र संकल्पनेला शास्त्रीय बैठक आहे असे दाखविण्याचा आटापीटा करणे हे अतिशय हास्यास्पद आहे.

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/01/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/01/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

विवेकपटाईत ·

"किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल." सहमत आहे.

उद्देश चांगला आहे पण एखाद्या राज्यात आघाडीचे सरकार आले, आणी एखाद्या घटक पक्षाने २ वर्षानी पाठिंबा काढुन घेतला तर काय करायचे? ३वर्षे वाट पहायची? राजकीय पक्षांचे पुढारी सत्तेसाठी किती उतावळे असतात ते आपण पाहतच असतो. त्यांना खर्च वाचवायचा असेल तर भावनिक आवाहने बण्द करा आणि पाच वर्षे गुमान काम करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत 21/01/2025 - 13:14
पाठिंबा काढल्यावर दुसरी सरकार बनते. जसे महाराष्ट्रात झाले. आजच्या घटकेला कोणत्याही पक्षाचे विधायक पाच वर्षाच्या आधी निवडणूक घेण्याचे समर्थन करणार नाही. पुन्हा निवडणूक जिंकणे आता तितके सौपे नाही. (पूर्वी कोंग्रेस पक्षाचे विधायक दहा बारा वेळा सतत निवडणूक जिंकू शकत होते, तो काळ केंव्हाच गेला).

"किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल." सहमत आहे.

उद्देश चांगला आहे पण एखाद्या राज्यात आघाडीचे सरकार आले, आणी एखाद्या घटक पक्षाने २ वर्षानी पाठिंबा काढुन घेतला तर काय करायचे? ३वर्षे वाट पहायची? राजकीय पक्षांचे पुढारी सत्तेसाठी किती उतावळे असतात ते आपण पाहतच असतो. त्यांना खर्च वाचवायचा असेल तर भावनिक आवाहने बण्द करा आणि पाच वर्षे गुमान काम करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत 21/01/2025 - 13:14
पाठिंबा काढल्यावर दुसरी सरकार बनते. जसे महाराष्ट्रात झाले. आजच्या घटकेला कोणत्याही पक्षाचे विधायक पाच वर्षाच्या आधी निवडणूक घेण्याचे समर्थन करणार नाही. पुन्हा निवडणूक जिंकणे आता तितके सौपे नाही. (पूर्वी कोंग्रेस पक्षाचे विधायक दहा बारा वेळा सतत निवडणूक जिंकू शकत होते, तो काळ केंव्हाच गेला).
लेखनविषय:
लेखनप्रकार
निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली.

जॉन अब्राहम (भाग ३)

श्रीगुरुजी ·

अ‍ॅब्रॅहॅम लिंकन रिपब्लिकन पक्षाचे अगदी सुरवातीचे सदस्य होते. हा पक्ष गुलामगिरीविरोधात होता. तर डेमॉक्रॅटिक पक्ष १८२९ ते १८३७ या काळातील वर्णद्वेषी अध्यक्ष अ‍ॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्यांनी स्थापन केला होता. आता मात्र परिस्थिती अगदी उलट दिसते. वर्णवर्चस्ववादी गोरे जास्त करून रिपब्लिकन पक्षात दिसतात तर त्याविरोधी भूमिका असलेले डेमॉक्रॅटिक पक्षात. १८६० मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली होती त्यात लिंकन रिपब्लिकन पक्षाकडून होते. ते उघडपणे गुलामगिरी विरोधात होते. तर त्यावेळेस डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली होती. त्याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधील डेमॉक्रॅटिक नेते गुलामगिरीचे समर्थन करत होते पण उत्तरेकडील नेते उघड समर्थन करू नव्हते पण गुलामगिरी काढावी असे त्यांचे म्हणणे नव्हते. त्यामुळे अधिक कट्टर सदर्न डेमॉक्रॅट्स आणि त्यामानाने सौम्य नॉर्दन डेमॉक्रॅट्स अशी फूट पडली त्यामुळे लिंकनना ती निवडणुक बरीच सोपी गेली. आधीच्या भागातील प्रतिसादात उल्लेख केलेले स्टिफन डग्लस नॉर्दन डेमॉक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार होते. लिंकननी १८६४ ची निवडणुक परत लढवली. त्यावेळेस त्यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते जॉर्ज मॅकलेलान. हे गृहस्थ यादवी युध्दात उत्तरेकडील सैन्याचे (म्हणजे लिंकनच्या बाजूचे) सेनापती होते. त्यांचा स्वतःचा गुलामगिरीला विरोध होता मात्र गुलामगिरीला विरोध करायच्या नादात देशाचे तुकडे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे लिंकननी आदेश दिले तरी कोंडीत पकडल्या गेलेल्या दक्षिणेकडील सैन्याचा निर्णायक पराभव करायला हल्ला करायचा सोडून ते थंड बसून राहिले. १८६४ मध्ये या जॉर्ज मॅकलेलान यांनी पाहिजे असेल तर दक्षिणेच्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेऊ देऊ पण यादवी युध्द थांबवू या अजेंड्यावर लिंकनविरोधात निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात जॉर्ज मॅकलेलान यांनी लिंकनविरोधात विखारी शब्द वापरले होते. लिंकन अध्यक्ष असले तरी त्यांना रणांगणातील डावपेच कळत नव्हते. त्यामुळे ते प्रचारात लिंकनचा उल्लेख 'बफून' म्हणून पण करत होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरवातीला लिंकनचा रिपब्लिकन पक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता. त्या कार्यासाठी स्वतः लिंकननी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तर डेमॉक्रॅटिक पक्ष मात्र वेगळा होता. सगळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते गुलामगिरीच्या बाजूने होते असे नाही पण गुलामगिरी काढावी असे फार डेमॉक्रॅटिक नेत्यांना तितक्या तीव्रतेने वाटत होते असे वाटत नाही. यादवी युद्ध चालू असताना सुरवातीला दक्षिणेकडील लोकही गुलामगिरीच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नसावी. मात्र लिंकनची हत्या झाल्यानंतर ते चित्र बदलले. दक्षिणेतल्या लोकांनाही लिंकनच्या बलिदानानंतर गुलामगिरी वाईट होती हे समजले असे म्हणायला हवे. लिंकनची हत्या केल्यानंतर दक्षिणेतून आपल्याला मोठे समर्थन मिळेल आणि आपण तिथे जाऊन लपू शकू असे लिंकनच्या मारेकर्‍याला वाटत होते पण तसे झाले नाही. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे यादवी युध्द झाल्यानंतर जवळपास ६७ वर्षात व्हाईट हाऊसमध्ये बराचसा काळ रिपब्लिकन अध्यक्ष राहिला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष त्या मानाने कमी काळ राहिला. १८६४ मध्ये लिंकन जिंकले होते. त्यानंतर १८६८ आणि १८७२ मध्ये यादवी युध्द काळात शेवटी उत्तरेचे सेनापती असलेले युलिसिस ग्रँट, १८७६ मध्ये रूदरफोर्ड हेस, १८८० मध्ये जेम्स गारफिल्ड आणि त्यांची हत्या झाल्यानंतर चेस्टर आर्थर हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १८८४ आणि १८९२ मध्ये ग्रोव्हर क्लिव्हलँड हे डेमॉक्रॅटिक अध्यक्ष झाले. पण १८८८ मध्ये बेंजामिन हॅरीसन, १८९६ आणि १९०० मध्ये विलिअम मॅकिन्ली, १९०१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर थिओडोर रूझवेल्ट, १९०४ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९०८ मध्ये विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १९१२ मध्ये माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्यातील मतभेदांमुळे थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. त्यात रूझवेल्ट आणि टाफ्ट या दोघांचाही मतविभागणीमुळे मोठा पराभव झाला आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन १९१२ मध्ये आणि नंतर १९१६ मध्ये अध्यक्षपदावर निवडून गेले. परत १९२० मध्ये वॉरन हार्डिंग,१९२४ मध्ये केल्विन कूलिज आणि १९२८ मध्ये हर्बर्ट हूवर हे रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले. १९२९ ची महामंदी आली नसती तर कदाचित आणखी काही काळ रिपब्लिकनांचे व्हाईट हाऊसवर वर्चस्व राहिले असते. पण त्या महामंदीमुळे १९३२ मध्ये डेमॉक्रॅटिक फ्रँकलीन रूझवेल्ट निवडून आले आणि मग खर्‍या अर्थाने डेमॉक्रॅटिक पक्ष व्हाईट हाऊससाठी शर्यतीत खर्‍या अर्थाने आला. १९३२ च्या सुमारास यादवी युध्द संपून ६७ वर्षे झाली होती. यादवी युध्दाच्या वेळेस गुलामगिरीचे उघड/छुपे समर्थन करणारे डेमॉक्रॅटिक नेतृत्व मागे पडून पूर्ण नवे नेतृत्व पुढे आले होते. त्यामुळे यादवीच्या वेळेस डेमॉक्रॅटिक नेत्यांची भूमिका हा विषय मागे पडला आणि डेमॉक्रॅटिक पक्ष खर्‍या अर्थाने व्हाईट हाऊसच्या शर्यतीत आला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/01/2025 - 13:24
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला? जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?

In reply to by श्रीगुरुजी

अमेरिकेचे अध्यक्ष हा लेख मी २० जानेवारी रोजी लिहिणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांविषयी मला जे काही माहित आहे ते त्या लेखात लिहिणार आहे. तो लेख विनाकारण लांबलचक व्हायला नको म्हणून मूळ लेखात काही मुद्दे आणि नंतर हळूहळू प्रतिसादांमधून उरलेले मुद्दे लिहिणार आहे. त्यात २० जानेवारीलाच याविषयी लिहिणार आहे.

यापुढील कोणत्या तरी भागात या दोघांच्या हत्येविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरींचा उल्लेख करणार ना? करणार असल्यास त्यावर मी लिहित नाही. दोघांच्या, विशेषतः केनेडींच्या हत्येविषयी मसालेदार कॉन्स्पिरसी थिअरी आहे.

सौंदाळा 17/01/2025 - 10:28
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या आणि दक्षिणेतील राज्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरची माहिती होती. पण या लेखमालेतून विस्तृतपणे कळत आहे. हा भाग पण आवडला.

अ‍ॅब्रॅहॅम लिंकन रिपब्लिकन पक्षाचे अगदी सुरवातीचे सदस्य होते. हा पक्ष गुलामगिरीविरोधात होता. तर डेमॉक्रॅटिक पक्ष १८२९ ते १८३७ या काळातील वर्णद्वेषी अध्यक्ष अ‍ॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्यांनी स्थापन केला होता. आता मात्र परिस्थिती अगदी उलट दिसते. वर्णवर्चस्ववादी गोरे जास्त करून रिपब्लिकन पक्षात दिसतात तर त्याविरोधी भूमिका असलेले डेमॉक्रॅटिक पक्षात. १८६० मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली होती त्यात लिंकन रिपब्लिकन पक्षाकडून होते. ते उघडपणे गुलामगिरी विरोधात होते. तर त्यावेळेस डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली होती. त्याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधील डेमॉक्रॅटिक नेते गुलामगिरीचे समर्थन करत होते पण उत्तरेकडील नेते उघड समर्थन करू नव्हते पण गुलामगिरी काढावी असे त्यांचे म्हणणे नव्हते. त्यामुळे अधिक कट्टर सदर्न डेमॉक्रॅट्स आणि त्यामानाने सौम्य नॉर्दन डेमॉक्रॅट्स अशी फूट पडली त्यामुळे लिंकनना ती निवडणुक बरीच सोपी गेली. आधीच्या भागातील प्रतिसादात उल्लेख केलेले स्टिफन डग्लस नॉर्दन डेमॉक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार होते. लिंकननी १८६४ ची निवडणुक परत लढवली. त्यावेळेस त्यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते जॉर्ज मॅकलेलान. हे गृहस्थ यादवी युध्दात उत्तरेकडील सैन्याचे (म्हणजे लिंकनच्या बाजूचे) सेनापती होते. त्यांचा स्वतःचा गुलामगिरीला विरोध होता मात्र गुलामगिरीला विरोध करायच्या नादात देशाचे तुकडे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे लिंकननी आदेश दिले तरी कोंडीत पकडल्या गेलेल्या दक्षिणेकडील सैन्याचा निर्णायक पराभव करायला हल्ला करायचा सोडून ते थंड बसून राहिले. १८६४ मध्ये या जॉर्ज मॅकलेलान यांनी पाहिजे असेल तर दक्षिणेच्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेऊ देऊ पण यादवी युध्द थांबवू या अजेंड्यावर लिंकनविरोधात निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात जॉर्ज मॅकलेलान यांनी लिंकनविरोधात विखारी शब्द वापरले होते. लिंकन अध्यक्ष असले तरी त्यांना रणांगणातील डावपेच कळत नव्हते. त्यामुळे ते प्रचारात लिंकनचा उल्लेख 'बफून' म्हणून पण करत होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरवातीला लिंकनचा रिपब्लिकन पक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता. त्या कार्यासाठी स्वतः लिंकननी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तर डेमॉक्रॅटिक पक्ष मात्र वेगळा होता. सगळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते गुलामगिरीच्या बाजूने होते असे नाही पण गुलामगिरी काढावी असे फार डेमॉक्रॅटिक नेत्यांना तितक्या तीव्रतेने वाटत होते असे वाटत नाही. यादवी युद्ध चालू असताना सुरवातीला दक्षिणेकडील लोकही गुलामगिरीच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नसावी. मात्र लिंकनची हत्या झाल्यानंतर ते चित्र बदलले. दक्षिणेतल्या लोकांनाही लिंकनच्या बलिदानानंतर गुलामगिरी वाईट होती हे समजले असे म्हणायला हवे. लिंकनची हत्या केल्यानंतर दक्षिणेतून आपल्याला मोठे समर्थन मिळेल आणि आपण तिथे जाऊन लपू शकू असे लिंकनच्या मारेकर्‍याला वाटत होते पण तसे झाले नाही. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे यादवी युध्द झाल्यानंतर जवळपास ६७ वर्षात व्हाईट हाऊसमध्ये बराचसा काळ रिपब्लिकन अध्यक्ष राहिला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष त्या मानाने कमी काळ राहिला. १८६४ मध्ये लिंकन जिंकले होते. त्यानंतर १८६८ आणि १८७२ मध्ये यादवी युध्द काळात शेवटी उत्तरेचे सेनापती असलेले युलिसिस ग्रँट, १८७६ मध्ये रूदरफोर्ड हेस, १८८० मध्ये जेम्स गारफिल्ड आणि त्यांची हत्या झाल्यानंतर चेस्टर आर्थर हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १८८४ आणि १८९२ मध्ये ग्रोव्हर क्लिव्हलँड हे डेमॉक्रॅटिक अध्यक्ष झाले. पण १८८८ मध्ये बेंजामिन हॅरीसन, १८९६ आणि १९०० मध्ये विलिअम मॅकिन्ली, १९०१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर थिओडोर रूझवेल्ट, १९०४ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९०८ मध्ये विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १९१२ मध्ये माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्यातील मतभेदांमुळे थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. त्यात रूझवेल्ट आणि टाफ्ट या दोघांचाही मतविभागणीमुळे मोठा पराभव झाला आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन १९१२ मध्ये आणि नंतर १९१६ मध्ये अध्यक्षपदावर निवडून गेले. परत १९२० मध्ये वॉरन हार्डिंग,१९२४ मध्ये केल्विन कूलिज आणि १९२८ मध्ये हर्बर्ट हूवर हे रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले. १९२९ ची महामंदी आली नसती तर कदाचित आणखी काही काळ रिपब्लिकनांचे व्हाईट हाऊसवर वर्चस्व राहिले असते. पण त्या महामंदीमुळे १९३२ मध्ये डेमॉक्रॅटिक फ्रँकलीन रूझवेल्ट निवडून आले आणि मग खर्‍या अर्थाने डेमॉक्रॅटिक पक्ष व्हाईट हाऊससाठी शर्यतीत खर्‍या अर्थाने आला. १९३२ च्या सुमारास यादवी युध्द संपून ६७ वर्षे झाली होती. यादवी युध्दाच्या वेळेस गुलामगिरीचे उघड/छुपे समर्थन करणारे डेमॉक्रॅटिक नेतृत्व मागे पडून पूर्ण नवे नेतृत्व पुढे आले होते. त्यामुळे यादवीच्या वेळेस डेमॉक्रॅटिक नेत्यांची भूमिका हा विषय मागे पडला आणि डेमॉक्रॅटिक पक्ष खर्‍या अर्थाने व्हाईट हाऊसच्या शर्यतीत आला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/01/2025 - 13:24
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला? जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?

In reply to by श्रीगुरुजी

अमेरिकेचे अध्यक्ष हा लेख मी २० जानेवारी रोजी लिहिणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांविषयी मला जे काही माहित आहे ते त्या लेखात लिहिणार आहे. तो लेख विनाकारण लांबलचक व्हायला नको म्हणून मूळ लेखात काही मुद्दे आणि नंतर हळूहळू प्रतिसादांमधून उरलेले मुद्दे लिहिणार आहे. त्यात २० जानेवारीलाच याविषयी लिहिणार आहे.

यापुढील कोणत्या तरी भागात या दोघांच्या हत्येविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरींचा उल्लेख करणार ना? करणार असल्यास त्यावर मी लिहित नाही. दोघांच्या, विशेषतः केनेडींच्या हत्येविषयी मसालेदार कॉन्स्पिरसी थिअरी आहे.

सौंदाळा 17/01/2025 - 10:28
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या आणि दक्षिणेतील राज्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरची माहिती होती. पण या लेखमालेतून विस्तृतपणे कळत आहे. हा भाग पण आवडला.
लेखनविषय:
जॉन अब्राहम १ ==> जॉन अब्राहम २ शेवटी दुसर्‍या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले . . . अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स.

बडिशोप

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा 18/01/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे

चौथा कोनाडा 18/01/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे
बडीशोप काही गोड नाही, ती फार मोठी खोडंही नाही . तंबाखू सारखी वाट लावणारी, ती सर्वांगिण ओढंही नाही . हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही ! तशी ही सोपी आहे साध्या सहज स्वभावाची कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम जो हातावर घेइल , ती त्याची ! आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ? अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय ! आय आय आय ! आला ना आवाज आतून ? हाय हाय हाय ! भाजला ना गाल त्यातून ? आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी ! म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत तुमच्या सगळ्याच गेमि !

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ११ (तेरेखोल, रेडी, शिरोडा)

टर्मीनेटर ·

गोरगावलेकर 15/01/2025 - 08:06
माहितीपूर्ण लेख व सुंदर फोटो. हा सर्व भाग पाहून झाला असल्याने जास्तच भावला.

सौंदाळा 15/01/2025 - 10:33
सुंदर भाग. रेडी गणपती मंदिर आणि यशवंतगड किल्ला पाहिला का? आरवली समुद्र किनारा आणि वेतोबा मंदिर पण तुम्हाला रस्त्यावर दिसले असेल. पुढच्या भागाची वाट बघत आहे.

कंजूस 15/01/2025 - 17:22
संजयने जर कोकण/ गोवा सहली आयोजित केल्या (वर कॉमेन्ट्री फुकट) तर धडाधड बुकींग होईल. ( वडाळा येथून विनोद तावडे यांच्या कोकण प्रतिष्ठान यात्रा कंपनीच्या सहली यशस्वी होत होत्या. चार पाच दिवस आणि एसी बस. आता कंपनी तीच आहे पण मालक बदलले आहेत असं कळतं.)

प्रचेतस 19/01/2025 - 07:54
हा भागही आवडला. डॉ. बर्नाडो पेरेस, हिरवे गुरुजी आणि वाडेकर हतांच्याविषयी काहीच माहीत नव्हते. ही माहिती देण्यासाठी धन्यवाद. बाकी तेरेखोलच्या हॉटेलात राहणे महागडे प्रकरण दिसतेय. सिद्धेश्वर मंदिर, रेडीचा किनारा आवडला. शिरोड्याचा समुद्र तर बेहद्द सुंदर दिसतोय.

मी आम्ही केरकर मूळचे केरी (केरीम ) चे , बटाबाटीनंतर महाराष्ट्रात आलो, इथे ८ पिढी आहे आमची, परंतु जवळच असलेल्या तेरेखोल किल्ल्या बद्दल एवढी माहिती नव्हती, बाकी फोटो अगदी अप्रतिम आहेत. शिरोडा बीच वरून सागरेश्वर ला निघताना वाटेत निर्जन असा मोचेमाड समुद्र किनारा आहे, त्याला भेट दिली असती तर अजून छान झाले असते, सहसा मोचेमाड कुणाच्या लक्षात येत नाही. माझं बालपण ह्या मोचेमाडात गेलंय.

किल्लेदार 05/02/2025 - 07:08
तेरेखोल ला जाऊन आलोय पण एवढ्या खोलात शिरलो नव्हतो. रेडीचा यशवंतगड पाहिलात का ?

गोरगावलेकर 15/01/2025 - 08:06
माहितीपूर्ण लेख व सुंदर फोटो. हा सर्व भाग पाहून झाला असल्याने जास्तच भावला.

सौंदाळा 15/01/2025 - 10:33
सुंदर भाग. रेडी गणपती मंदिर आणि यशवंतगड किल्ला पाहिला का? आरवली समुद्र किनारा आणि वेतोबा मंदिर पण तुम्हाला रस्त्यावर दिसले असेल. पुढच्या भागाची वाट बघत आहे.

कंजूस 15/01/2025 - 17:22
संजयने जर कोकण/ गोवा सहली आयोजित केल्या (वर कॉमेन्ट्री फुकट) तर धडाधड बुकींग होईल. ( वडाळा येथून विनोद तावडे यांच्या कोकण प्रतिष्ठान यात्रा कंपनीच्या सहली यशस्वी होत होत्या. चार पाच दिवस आणि एसी बस. आता कंपनी तीच आहे पण मालक बदलले आहेत असं कळतं.)

प्रचेतस 19/01/2025 - 07:54
हा भागही आवडला. डॉ. बर्नाडो पेरेस, हिरवे गुरुजी आणि वाडेकर हतांच्याविषयी काहीच माहीत नव्हते. ही माहिती देण्यासाठी धन्यवाद. बाकी तेरेखोलच्या हॉटेलात राहणे महागडे प्रकरण दिसतेय. सिद्धेश्वर मंदिर, रेडीचा किनारा आवडला. शिरोड्याचा समुद्र तर बेहद्द सुंदर दिसतोय.

मी आम्ही केरकर मूळचे केरी (केरीम ) चे , बटाबाटीनंतर महाराष्ट्रात आलो, इथे ८ पिढी आहे आमची, परंतु जवळच असलेल्या तेरेखोल किल्ल्या बद्दल एवढी माहिती नव्हती, बाकी फोटो अगदी अप्रतिम आहेत. शिरोडा बीच वरून सागरेश्वर ला निघताना वाटेत निर्जन असा मोचेमाड समुद्र किनारा आहे, त्याला भेट दिली असती तर अजून छान झाले असते, सहसा मोचेमाड कुणाच्या लक्षात येत नाही. माझं बालपण ह्या मोचेमाडात गेलंय.

किल्लेदार 05/02/2025 - 07:08
तेरेखोल ला जाऊन आलोय पण एवढ्या खोलात शिरलो नव्हतो. रेडीचा यशवंतगड पाहिलात का ?
p {text-align: justify;} .mi-content img {box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);} .mi-container { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; }

आजच्या दिवसात अनेक ठिकाणे बघायची असल्याने सकाळी साडेसातलाच उ

तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.