Skip to main content

देणाऱ्याचे हात घ्यावे

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 05/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून फलाटावर धो धो कोसळणाऱ्या बेफाम गर्दीचा बेहाल थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट... ...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी चट्दिशी उठून वाहत्या गर्दीच्या काठावर गेली एक नेहमीसारखा खाली बसला अन् दुसरा ऐटीत उभा राहून स्वतःच्या भिकेतले नाणे बसलेल्याच्या ओंजळीत टाकून निर्व्याज हसू लागला मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल.. ...विंदांच्या "घेता" कवितेच्या शेवटच्या दोन ओळींची लव्हाळी गर्दीच्या महापुरातही अनवधानाने जिवंत ठेवणारी ती लेकरं पुन्हा दिसलीच नाहीत कधी

तो परत आला...

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 04/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जातीयवादींचे प्राण झाले कासावीस, परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !! अपमानाचे पचवले हलाहल, शांत राहिले, पाहून कोलाहल ।। जातियवादींचा विषारी अपप्रचार, देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।। अति केला द्वेष कारण ब्राम्हण, आता तरी हा सक्षम आहे म्हण ।। चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे, लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।। योग्य वेळी हिंदूशक्ती एकवटली, घराणेशाहीने सफशेल धूळ चाटली ।। देवेंद्रच आहे भगव्याशक्तीचा शिल्पकार, राखेतून घेतली झेप,विजय स्वप्नसाकार ।।

गाथा इराणी (ऐसी अक्षरे -२१)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 03/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
गाथा इराणी -लेखिका मीना प्रभू A इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.

आज मी साबणाने आंघोळ केली

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 02/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ.

पश्चिमाई

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 02/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंगांची जुन्या प्रतिमा नवी ही पश्चिमाई शब्दवेलींना नवेली पालवी ही पश्चिमाई विस्मृतींचे दाटती काहूर जेव्हा अंतरी या भोवताली फेर धरते लाघवी ही पश्चिमाई चोरुनी बघता हिला मी चोरते नजरा कधी ही खेळते नेत्रांतुनी का पल्लवी ही पश्चिमाई बोलते, हसते तशी, रुसते कधी फुगते कधी ही सांग ना होते कशाला मानवी ही पश्चिमाई कोण तू अन् कोण मी हा शोध आता संपला अन् भासते अवघी मनाला भैरवी ही पश्चिमाई - कुमार जावडेकर (अलीकडेच 'पश्चिमाई' हा ब्लॉग (त्रैमासिक स्वरूपात) आम्ही यु.के.त सुरू केला.
काव्यरस

पानगळीचा रंगोत्सव

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 01/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
1p 2p इस रंग बदलती दुनिया मे ... २१ जून रोजी मध्यान्ही सूर्य कर्कवृत्तावर (Tropic of Cancer)

उभा ठाकला

लेखक रोहन जगताप यांनी रविवार, 01/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भरण्या घडा रिक्त जो सांडलेला खेळण्या उगा डाव हा मांडलेला रडण्या कुठे काळ तो थांबलेला भिडण्या उभा ठाकला पांगलेला
जगाने जरी हारला मानलेला समर्पूण सारे जगा जाणलेला प्रसंगात ओढून तो ताणलेला सुटे बाण लक्ष्याकडे ठाणलेला
दिवा तेवता जागला लाविलेला उभी रात्र सांभाळतो वाहिलेला स्वतः साक्ष अंधार तो राहिलेला असा सूर्य नारायणा पाहिलेला
ललाटात आभाळही फाटलेला एकांतात सारे उरी दाटलेला जमा संपलेलाच तो वाटलेला तयातून साम्राज्यही थाटलेला

ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/11/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे.

गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा

लेखक Bhakti यांनी बुधवार, 27/11/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अ नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता.

महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 26/11/2024 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते.