मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जॉन अब्राहम (भाग ५)

श्रीगुरुजी ·

लिंकनच्या हत्येवर युट्यूबवर खूप काही आहे. तरीही मी बघितलेली एक डॉक्युमेन्टरी पुढे देत आहे-- The Last Night of Abraham Lincoln | Part 1: Assassination - https://www.youtube.com/watch?v=HEwy5k3nsT0 The Last Night of Abraham Lincoln | Part 2: Immortality- https://www.youtube.com/watch?v=GgATxed5C-4 केनेडींच्या हत्येवरही अशीच एक डॉ़क्युमेंटरी बघितली होती. ती मिळाल्यावर ती पण देतो.

सौंदाळा गुरुवार, 01/23/2025 - 21:27
हा भाग पण आवडला पदावर असताना किती भारतीय पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांची हत्या झाली असा किडा या धाग्याच्या निमित्ताने डोक्यात आला. लाल बहादूर शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी हे तर माहिती आहेत पण अजून कोण आहेत? वाय एस आर, माधवराव शिंदे यांचा अपघात झाला?

श्रीगुरुजी गुरुवार, 03/13/2025 - 15:27
धन्यवाद! २-३ दिवसात पुढील भाग लिहितो. सध्या खूप व्यग्र असल्याने लिहायला वेळ मिळत नाही.

लिंकनच्या हत्येवर युट्यूबवर खूप काही आहे. तरीही मी बघितलेली एक डॉक्युमेन्टरी पुढे देत आहे-- The Last Night of Abraham Lincoln | Part 1: Assassination - https://www.youtube.com/watch?v=HEwy5k3nsT0 The Last Night of Abraham Lincoln | Part 2: Immortality- https://www.youtube.com/watch?v=GgATxed5C-4 केनेडींच्या हत्येवरही अशीच एक डॉ़क्युमेंटरी बघितली होती. ती मिळाल्यावर ती पण देतो.

सौंदाळा गुरुवार, 01/23/2025 - 21:27
हा भाग पण आवडला पदावर असताना किती भारतीय पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांची हत्या झाली असा किडा या धाग्याच्या निमित्ताने डोक्यात आला. लाल बहादूर शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी हे तर माहिती आहेत पण अजून कोण आहेत? वाय एस आर, माधवराव शिंदे यांचा अपघात झाला?

श्रीगुरुजी गुरुवार, 03/13/2025 - 15:27
धन्यवाद! २-३ दिवसात पुढील भाग लिहितो. सध्या खूप व्यग्र असल्याने लिहायला वेळ मिळत नाही.
लेखनविषय:
a ==> a ==> a ==> a त्यामुळं अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीला विरोध केला. अमेरिकेत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवाला.

दिल्ली विधानसभा निवडणूक

विवेकपटाईत ·

मुक्त विहारि Wed, 01/22/2025 - 17:24
भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल... सहमत आहे... माझ्या मते.. केजरीवाल यायची शक्यता जास्त आहे..

तिता Fri, 01/24/2025 - 09:15
काहीही झाले तरी भाजपाला मत देणारे पण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. हा भाजपाचा एकनिष्ठ एकगठ्ठा मतदार वर्ग आहे. बाकी Freeship तर प्रत्येक पक्ष offer करत आहे. मतदार सुजाण कमी आणि भावनिक जास्त आहेत.

श्रीगुरुजी Fri, 01/24/2025 - 14:49
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. आआपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अवघड आहे. भाजपच्या जागा ७ वरून नक्की वाढतील, पण ३६ पर्यंत जाण्याची शक्यता खूप कमी वाटते. अर्थात आआप हरून भाजपला बहुमत मिळावे हीच इच्छा आहे. भविष्यात रेवड्या वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षापेक्षा वर्तमानात रेवड्या वाटणारा पक्ष मतदारांना अधिक जवळचा वाटतो हे कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 02/06/2025 - 19:36
बहुसंख्य संस्थांनी मतदानोत्तर चाचणी घेऊन भाजपला साधे बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकाद्वारे १२ लाखापर्यंत उत्पन्न असल्यास ते आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ भाजपला कितपत मिळाला हे परवा समजेल. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा भाजपला भरभरून लाभ मिळाला. तसाच लाभ दिल्लीतही मिळेल का हा विविध पक्षांचा औत्सुक्याचा विषय असणार.

विवेकपटाईत गुरुवार, 02/06/2025 - 21:18
दिल्लीत झालेल्या मतदानात. अल्पसंख्यक समुदायाने 80 टक्के मतदान केले आहे. दुसरीकडे 48% हिंदू घरातच बसून राहिला आहे. जर एक्सिट पोलवाल्यांनी अल्पसंख्यक मतांना २२-२५% वेटेज दिले नसेल तर सर्वांचे अंदाज चुकतील. निवडणूक जिंकण्यासाठी आप पार्टीला हिंदूंच्या तीन पैकी फक्त एका मताची गरज आहे. अल्पसंख्यक समुदाय किमान 65 जागांवर आप प्रति एकनिष्ठ आहे. काँग्रेस पार्टी भाजप चे मत खाणार. बाकी केल्या दहा वर्षात दिल्लीत दारूची दुकाने दुप्पट झाली आहे. दिल्लीची जनसंख्या एक कोटी होऊन जास्त वाढली असली तरी सुद्धा दिल्लीत सरकारी शाळा पहिले पेक्षा कमी झाल्या आहेत. डीटीसी असो जलबोर्ड असो वीज कंपन्या असो सर्वच भयंकर तोट्यात आहे. आयुष्यमान योजना ही दिल्लीत नाही. शीला दीक्षित च्या काळात निर्मित झालेले हॉस्पिटल मध्ये आयपीडी अजूनही पूर्णपणे सुरू झाल्या नाही. नवीन बनविण्याचा प्रश्नच येत नाही. मध्यवर्ग मोठ्या प्रमाणात दिल्ली सोडून गुडगाव आणि नोयेदा नोयेडा येथे शिफ्ट होत आहे. माझे बहुतेक दिल्लीतले हे शेवटचे मतदान. बाकी दिल्लीची ७५ टक्के जनता आणि ती अनिधीकृत कॉलोनीच मध्ये राहते. अधिकांश कॉलनीमध्ये पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. साफसफाई खराब गल्या, नाले सफाई इत्यादीमुळे भाजपाचा काही जागा निश्चित वाढतो.

श्रीगुरुजी गुरुवार, 02/06/2025 - 22:56
Axis India exit poll Axis India Exit Poll ________________________________ Other exit polls Other exit polls _________________________________ अजून काही अंदाज - चाणक्य स्ट्रॅटेजी - भाजप (३९-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (२-३) पोल डायरी - भाजप (४२-५०), आआप (१८-२५), कॉंग्रेस व इतर (०-२) पीपल्स इनसाइट - भाजप (४०-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (०-१)

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 18:02
Axis My India, Pmarq आणि Poll Diary यांचा अंदाज बरोबर ठरला. Axis My India चा जागांचा व मतांच्या टक्केवारीचाही अंदाज जवळपास बरोबर आला. इतर काही जणांचा अंदाज जवळपास आला. Matrize आणि Mind Brink चा अंदाज बऱ्याच प्रमाणात चुकला.

उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल कसे लागतात याची उत्सुकता आहे. बर्‍याचशा एक्झिट पोलचा अंदाज आहे की भाजप सत्तेत परतेल. तसे झाल्यास ती एक ऐतिहासिक घटना असेल. भाजपने यापूर्वी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता नोव्हेंबर १९९३ मध्ये. उद्या परत विजय मिळविल्यास त्यानंतर तब्बल ३१ वर्षे आणि जवळपास अडीच महिन्यांनंतर भाजप दिल्लीत विजय मिळवेल. इतक्या वर्षांच्या खंडानंतर कोणत्याही पक्षाने पुनरागमन करून विजय मिळविणे हाच एक विक्रम असेल. काँग्रेसने २०१८ मध्ये २० वर्षांच्या खंडानंतर मध्य प्रदेशात जवळपास बहुमत मिळविले होते (त्यापूर्वी काँग्रेसने १९९८ मध्ये मध्य प्रदेशात बहुमत मिळवले होते). काँग्रेससाठी २० वर्षांच्या खंडानंतर सत्तेत परतणे हा विक्रम होता. २०१७ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपच्या नाकात दम आणला होता ही गोष्ट खरी आहे. समजा तेव्हा काँग्रेसचा गुजरातमध्ये विजय झाला असता तर तो मार्च १९८५ नंतर डिसेंबर २०१७ म्हणजे तब्बल ३२ वर्षे ९ महिन्यांच्या खंडानंतर विजय मिळाला असता. पण तसे झाले नाही. यापुढेही म्हणजे २०२७ किंवा २०३२ मध्ये काँग्रेसला गुजरातमध्ये विजय मिळाल्यात भाजपचा विक्रम मोडायची संधी काँग्रेसकडे असेल. पण भाजपचा उद्या विजय झाल्यास मात्र तो विक्रम सध्या तरी भाजपचाच. भाजपने १९९३ मध्ये ७० पैकी ४९ जागा जिंकल्या होत्या. आधी भाजप २०२५ मध्ये जिंकणार का आणि जिंकल्यास ४९ पेक्षा जास्त जागा जिंकणार का ते बघायचे. दिल्लीतील तरूण मतदारांनी भाजपची सत्ता कधी बघितलेलीही नाही. यापूर्वी १९९३ मध्ये म्हणजे बहुतेक तरूण मतदारांचा जन्म व्हायच्या आधी भाजपने दिल्लीत विधानसभा निवडणुक जिंकली होती. १९९३ मध्ये भाजप जिंकल्यानंतर १९९८ मध्ये पराभव होणे हा एक दैवदुर्विलास होता. मधल्या काळात झालेल्या १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी अनुक्रमे ५ आणि ६ जागा जिंकल्या होत्या. अगदी फेब्रुवारी १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ६ जागा जिंकल्यानंतर ९ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपचा धुव्वा उडाला होता. ९ महिन्यात इतके वातावरण कसे बदलले? तर त्याचे मुख्य कारण होते कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. दिल्लीत आणि उत्तर भारतातच प्रत्येक जेवणात कांद्याचा वापर उदंड प्रमाणात होतो. १९९८ च्या सुरवातीला ४ रूपये किलो असलेला कांदा एकदम ६० रूपये किलो पर्यंत गेला. त्याचे कारण पावसामुळे कांद्याचे पीक गेले होते आणि आधीच करार केले होते त्याप्रमाणे कांद्याची निर्यात केली गेली होती. त्याला नक्की कोण जबाबदार होते? नक्की माहित नाही. भाजप समर्थकांचा दावा होता की नाफेडने वेळेत निर्यात रोखली नाही आणि तेव्हा नाफेडचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते बलराम जाखड होते. तर काँग्रेस समर्थक त्याचा सगळा दोष वाजपेयी सरकारला देत होते. त्यावेळेस निर्यातीचे निर्णय फक्त नाफेडच घेत असेल असे वाटत नाही त्यामुळे वाजपेयी सरकारचीही यात चूक असलीच पाहिजे. जे काही असेल ते असेल पण कांदा प्रकरण भाजपला जड गेले. इतकेच नाही तर आणखी एक कारणही या पराभवाला होते. त्यावेळेस रॉकेलवर चालणारे स्टोव्ह मोठ्या प्रमाणावर वापरले जायचे. त्या रॉकेलमध्ये भेसळ झाल्याने दिल्लीत अनेक ठिकाणी स्टोव्हचे स्फोट झाले होते आणि बरेच- मला वाटते ५० पेक्षा जास्त लोक त्यात जखमी झाले होते. अशा सगळ्या कारणांमुळे आपले कठीण आहे हे लक्षात आल्यावर भाजपने मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मांना हटवून त्यांच्या जागी सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री म्हणून नेमले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे भाजपने दिल्लीत सत्ता गमावली. वातावरण इतके भाजपविरोधात गेले होते की काँग्रेसने शिला दिक्षित या त्यामानाने तेव्हा अपरिचित असलेल्या आणि स्वतःच्या लोकप्रियतेच्या आधारावर फारशी मते फिरवू न शकणार्‍या नेत्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले तरीही भाजपचा धुव्वा उडाला. त्यानंतर दिल्लीत शिला दिक्षित यांनी दिल्लीत नक्कीच चांगले काम केले. आज दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी चांगले आहे. मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची सुरवात शीला दिक्षितांच्या पहिल्या कार्यकाळात झाली होती. त्यामुळे २००३ मध्ये भाजपचा पराभव झाला. २००८ च्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान २६/११ नंतर झाले होते तेव्हा दिल्ली हा शहरी भाग असल्याने मुंबईतील हल्ल्याचा परिणाम होईल आणि काँग्रेस हरेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. २०१३ पासून पुढे काय झाले हे परत वेगळे लिहायलाच नको. उद्या काय होते याची उत्सुकता आहे. बघू काय होते ते.

१० फेब्रुवारी २०१५ रोजी आपटर्ड जे करत होते तो उन्माद नव्हता पण आज भाजप जिंकल्यास भाजप समर्थक (त्यांच्या भाषेत भक्त) जे काही करतील तो उन्माद असेल. काय समजलात?

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 10:15
आताची स्थिती - आआप २८, भाजप ४२, कॉंग्रेस ० केजरीवाल आता पुढे, मनीष सिसोदिया १३००+ व आतिशी १०००+ मतांनी अजूनही मागे.

गवि Sat, 02/08/2025 - 11:22
बरोबर ३५-३५ असे झाले तर काय होईल ? काँग्रेस आणि इतर हे प्रत्येकी शून्य शून्य जागा असल्याने फोडाफोडी करण्याचा स्कोप शून्य दिसतो.

In reply to by गवि

बरोबर ३५-३५ असे झाले तर काय होईल ? काँग्रेस आणि इतर हे प्रत्येकी शून्य शून्य जागा असल्याने फोडाफोडी करण्याचा स्कोप शून्य दिसतो.
१९८९ मध्ये गोव्यात या परिस्थितीच्या एकदम जवळ अशी परिस्थिती आली होती. ४० पैकी काँग्रेस आणि म.गो.पक्षाला प्रत्येकी १९ जागा होत्या तर दोन जागा अपक्षांना होत्या. त्यापैकी एक अपक्ष काँग्रेसच्या बाजूचा तर दुसरा म.गो.पक्षाच्या बाजूचा होता. त्यामुळे २०-२० अशी बरोबरी होत होती. तेव्हा कोणतेही सरकार बनत नव्हते. नोव्हेंबर १९८९ च्या शेवटी मतमोजणी झाली तेव्हा ही परिस्थिती होती. मग त्या दोन्ही अपक्षांनी राजीनामा दिला आणि जानेवारी १९९० मध्ये त्या दोन जागांवर पोटनिवडणुक झाली होती. त्या दोन्ही जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि मग प्रतापसिंग राणे जानेवारी १९९० च्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री झाले होते. ती एक परिस्थिती वगळता इतर कोणत्याही राज्यात तसे झालेले नाही. त्यामुळे त्या परिस्थितीत काय होईल सांगता येणार नाही. मला वाटते अशा परिस्थितीत कोणाला सरकार बनवायला पाचारण करायचे की राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे राज्यपाल ठरवतील. छत्तिसगडमध्ये २००३, २००८ आणि २०१३ या तिनही विधानसभा निवडणुका एकदम चुरशीच्या होत्या. तिन्ही निवडणुकांमध्ये कधी भाजप पुढे होता तर कधी काँग्रेस. पण शेवटी ९० पैकी ४९-५० जागा जिंकून तिन्ही वेळा भाजप जिंकला. त्यावेळेसही ४५-४५ असे झाले तर काय करायचे असा प्रश्न टीव्हीवरील चर्चांमध्ये यायचा. हे लिहित असताना दिल्लीत भाजप ४६ आणि आप २४ अशी स्थिती आहे. काही वेळापूर्वी ३९-३१ असे आकडे होते. त्यामुळे ३५-३५ अशी बरोबरी व्हायची शक्यता त्यामानाने कमी दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि Sat, 02/08/2025 - 12:06
धन्यवाद. नीट लक्षात आले. गोव्यात लोकसभा निवडणुकीत अगदी कमी संख्या असल्याने एका व्यक्तीला देखील अतोनात महत्व प्राप्त होत असते.

In reply to by रात्रीचे चांदणे

गवि Sat, 02/08/2025 - 12:05
आप मधल्यांना फोडणे हा एकमेव उपाय राहिला असता. वर चंद्रसूर्यकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे शंका दूर झाली.

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 12:20
आताची स्थिती - आआप २४, भाजप ४६, कॉंग्रेस ० केजरीवाल १८०० मतांनी मागे, मनीष सिसोदिया पुढे, आतिशी ३२००+ मतांनी अजूनही मागे. आता जवळपास हेच चित्र शेवटपर्यंत राहील असं दिसतंय.

आजच्या निकालामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आतिशी आणि गोपाळ राय वगळता आपचे बहुतेक सगळे मोठे नेते हरले आहेत/ हरत आहेत. स्वतः केजरू हरल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता पाताळविजयन या मद्रासी चित्रपटातील त्या राक्षसाप्रमाणे मी हा हा असे हसणार :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

यश राज Sat, 02/08/2025 - 16:13
आजच्या निकालामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आतिशी आणि गोपाळ राय वगळता आपचे बहुतेक सगळे मोठे नेते हरले आहेत/ हरत आहेत. स्वतः केजरू हरल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता पाताळविजयन या मद्रासी चित्रपटातील त्या राक्षसाप्रमाणे मी हा हा असे हसणार :)
अगदी सहमत कर्म काय ते म्हणतात ते हेच. केजरु स्वतःला दिल्लिचा मालक समजु लागला होता. आज मात्र स्वतःची लायकी कळाली असेल. आता पंजाब राजकारणात काय ऊलथापालथ होतेय ते बघणे मजेशीर असेल.

दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी आहे, अतिशय चांगली आरोग्यव्यवस्था नी अतिशय चांगल्या सरकारी शाळा आता तश्या राहणार नाहीत, त्यांच्यावर होणारा खर्च आता भाजप नेत्यांच्या खिशात जाणार. थोडक्यात चांगल्या दिल्लीचा आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश होणार, भ्रष्टाचार आणी गुन्हेगारीने बजबजपुरी येणार! केजरीवाल मनीष सिसोदिया असे दिग्गज पराभूत होऊ शकत नाही, त्याना पराभूत केले गेले म्हणजे बहुतेक महाराष्ट्र पॅटर्न तिकडेही राबवण्यात आलाय. लोकशाहीला श्रद्धांजली. दिल्लीतील गोबरयुगाला शुभेच्छा !

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:44
मोहल्ला क्लिनिक बद्दल माहिती घ्या. शाहीनबाग मध्ये काय झाले? ह्याची पण माहिती घ्या. शीशमहल बद्दल माहिती घ्या. दारू घोटाळ्या बद्दल माहिती घ्या. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना नंतर पाठिंबा का दिला नाही? ह्या बद्दल माहिती घ्या.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 18:46
https://www.newindianexpress.com/cities/delhi/2024/Oct/01/aaps-flagship-mohalla-clinics-face-closure A visit to several clinics across Delhi reveals a range of operational challenges, including untimely closures and acute staff shortages, which have left many clinics non-functional. An additional concern is the suspension of laboratory tests. These tests, which were previously free for patients and conducted by private labs reimbursed by the government, have been halted. The stoppage followed an Anti-Corruption Branch (ACB) investigation that revealed that nearly 65,000 fictitious patients were prescribed tests between February and December last year. The tests, performed by two private labs, led to ₹4.63 crore being disbursed from government funds for fraudulent services. The ACB inquiry, initiated after a complaint from Special Secretary (Vigilance) Y.V.V.J. Rajasekhar on January 10, uncovered significant discrepancies. According to the report, 63% of patients’ contact numbers were either invalid or belonged to individuals who had never visited the clinics. हे मोदी विरोधकांना दिसत नसले तरी सामान्य जनतेला दिसत असते. आणि तेच मतपेटीतून/ इ व्ही एम मधून प्रतिबिंबित होतं.

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:56
अशी लोकं एकतर व्यक्तीपूजा तरी करत असतात किंवा पराकोटीचा व्यक्तीद्वेष... आणि दोन्ही गोष्टी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी घातकच असतात, हे पण त्यांना कळत नाही. इतर जनांत, अशी माणसे फक्त, इतरांसाठी विदूषकाचे काम करतात. अभ्यास करून, प्रकटावे.....

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 17:29
पक्या इमारतीत कमी भाड्यावर असलेल्या पन्नास पन्नास वर्ष जुने दवाखाने बंद केले. रस्त्याच्या कडेला कार्डबोर्डच्या कोंटेनर सारखे मोहल्ला क्लिनिक उघडले. तिथे पाणी आणि टॉयलेटची सुविधा नाही. हे क्लिनिक सकाळी नऊ ते 1 वाजेपर्यंत उघडे राहतात.प्रत्येक क्लिनिकांत एक डॉक्टर रुग्ण तपासाला रहात असे. रुग्ण रस्त्यावर बाहेर उभे राहतात. अनेक क्लिनिक केंव्हाच तुटून नष्ट झाले आहे. नागल पुला जवळ एक क्लिनिक रस्त्यात दिसायचे. क्लिनिक मला तरी नेहमीच रिकामे दिसत होते. बहुतेक हीच अवस्था अधिकान्श क्लिनिकची होती. तरी देखील कागदांवर मोहल्ला क्लिनिकांत चार तासांत शेकडो रुग्ण तपासले जात होते. अधिक काही बोलत नाही. सत्य पुढील काही दिवसांत जनतेसमोर येईलच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 17:20
दिल्लीत आले असते तर सत्य दिसले असते. गेल्या दहा वर्षांत दिल्लीची जनसंख्या दीड कोटी वाढली त्यात निम्न वर्ग जास्त वाढली. हजार एक नवीन शाळा उघडण्या एवजी आधीचा शाळा बंद झाल्या. (आरटीआय करून तपासू शकता) बाकी अटल योजनेत जवळपास सर्व शाळांना लॅब मिळाली. सरकारी शाळा सोडून मोठ्या प्रमाणात निजी शाळेत गरीबांना ही जावे लागत आहे. आरटीआय करून तथ्य तपासू शकता. शीला दीक्षितच्या काळात सहा नवे हॉस्पिटल उभारले. त्यात आमच्या जनकपुरी येथील 200 बेडचे एक होते. 2013 पर्यन्त opd ही सुरू झाल्या होत्या. आज 2025 सुरू झाले अजूनही चतुर्थांश आयपीडी पूर्ण सुरू नाही झाल्या. आरटीआय करून तपासू शकता. बाकी मोहल्ला क्लिनिक हे चार तास उघडते तिथे पाणी टॉयलेटची सुविधा ही नाही. औषधी नाहीत. बाहेरून रिकामे दिसत असले तरी चार तासांत चारशे पाचशे रोगी एक डॉक्टर तपासतो. पराजयाचे मुख्य कारण दिल्ली जळबोर्ड जे नाले सफाई, सिवर आणि पाणी पुरवठा करते. कमाई अभावी 70000 कोटींच्या तोट्यात असल्याने पगार द्यायला पैसा नाही. पाण्याच्या लाइन दुरुस्त होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून आमच्या भागात घाण पाणी येत आहे. पूर्ण पश्चिम दिल्लीची हीच परिस्थिति. गेल्या वेळी 10 पैकी दहा जागा आपला मिळाल्या होत्या. फक्त घाण पाण्यामुळे 9 जागा हातातून गेल्या. सर्व नाले तुडुंब वाहत आहे, सर्व गल्ल्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. आत्ताची परिस्थिति गेल्या दहा वर्षांत डीटीसीला 25000 कोटींचा तोटा करून दाखविला. प्रती यात्री 30 रु हून जास्त तोटा. बसेस संख्या 2013 पेक्षा कमी झाल्या आहे. हे वेगळे केंद्र सरकारने दिल्ली वर कृपा करत 2000 इलेक्ट्रिक बसेस फ्री दिल्या. बाकी सर्व महिलांना तिकीट घेण्याची गरज नाही. 10 लक्ष महिला बस ने प्रवास करतात. केजरीला विश्वास होता त्यातल्या अर्ध्या निश्चित त्याला मत देतील. गुन्हेगारी म्हणाल तर आमच्या उत्तम नगरचा पूर्व विधायक बाल्यान गुन्हेगारीतच जेल मध्ये गेला आहे. त्याच्या बायकोला तिकीट दिले. तिचा पराजय झाला. दंग्यांच्या ओरोपीन्ंना तिकीट दिले. तो जिंकला ही. केजरी सहित सर्वच मोठे नेता भ्रष्टाचार करून आत किंवा जमानत वर आहेत. खरे म्हणाल तर देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आपची होती. पण दिल्लीतील 18 टक्के मुस्लिम जनसंख्या त्यात अर्धी बंगलादेशी आहे आणि ते 80 टक्के मतदान करतात. बाकी लोकांचे तृतीयांश मत मिळाले तरी आप जिंकू शकते त्यामुळे केजरीवाल निश्चिंत होता. पण नळांना येणारे घाण पानी आणि एका वर एक बाटली फ्री असल्याने मध्यम वर्गीय आप समर्थक आणि छोटे दुकानदार, ऑटो चालक आप पासून दूर गेले.

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 14:32
आआपची बंद दाराआड बैठक सुरू आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. मतयंत्रात गडबड, बनावट मतदार, आमच्या समर्थकांना मत देण्यासाठी जाऊन दिले नाही, मतदारांना पैसेवाटप केले यापैकी कोणकोणती कारणे पराभवासाठी द्यायची यावर बैठकीत उहापोह सुरू आहे.

दिल्ली निवडणूकीत भाजपने घेतलेली आघाडी पाहता भाजपाने सत्ता मिळवलेली दिसत आहे. जवळ जवळ सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत बदल होत आहेत, लोकशाहीत सत्तेत बदल होत राहीले पाहिजेत. साचलेपण आलं की त्याचं गटार होतं आणि माजही यायला लागतो. उदाहरण आपल्याला केंद्रातलं सरकार डोळ्यासमोर आहेच. दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे. तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो. भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन. स्वच्छ यमुना , दिल्ली प्रदुषण, सुशासन, आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही भाजपाची प्राथमिकता असेल. दिल्लीतलं राजकारण पाहता भाजपा दिल्लीत सत्तेसाठी आसूसलेली होती. सर्वप्रकारचे जुमले वापरणे सुरु होते. राज्यपाल आणि आप सरकारचा संघर्ष, इडी, आयकर यांची दडपशाही, आपच्या उमेदवारांना जेलात पाठविण्याची झालेली घाई, खोटेनाटे आरोप करुन आपच्या सरकारचे कंबरडे केंद्रीय सरकारने मोडलेले होते. आपचा संघर्ष आत आणि बाहेर असा दोन्ही ठिकाणी गेली अनेक वर्ष बघायला मिळाला. गल्ली-मोहल्ल्यातल्या आरोग्यसुविधा, सरकारी शाळांचा कायापालट, बीजली हाफ पाणी माफ, वेगवान प्रशासन या आणि अशा लोकप्रिय घोषणांनी केजरीवाल सरकारने आपली एक वेगळी छबी निर्माण केली. काही राज्यांमधे देशभर राजकारणांचा प्रवास सुरुही केला. श्री अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशभर कॉंग्रेस सरकार हटविण्यासाठी जी मोहीम सुरु केली त्याचं यश भाजपाला जसे मिळाले तसे, केजरीवाल सरकारलाही त्याचा फायदा झाला. एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला. येत्या काळात आप विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी करतील त्यांनाही शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 18:39
काय बिरुटे सर? आता किती दिवसांचे सुतक? बाकी सर्व आरोप करून झाले. आता फक्त दिल्लीच्या मतदारांची अक्कल काढायची राहिली आहे. तेच इ व्ही एम, इ डी, सीबी आय, पैशाचा खेळ, धमक्या, दडपशाही,लोकशाहीची हत्या हि तुणतुणी ऐकून दिल्लीचे मतदार कंटाळले आणि दिलं केजरीवालांना हाकलून. तुम्ही वाजवा तेच तुणतुणं-- पुढची पाच वर्षे दिल्लीत आणि महाराष्ट्रात सुद्धा.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, सुतक वगैरे सर्व गोबरभक्तांना असतं. आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 19:00
आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं. हो लढा ना आणि भिडा ना. पण अन्याय नक्की कुठे होतोय आणि कोण करतंय हे निदान समजून तरी घ्या? आरामखुर्चीत बसलेल्या विचारवंतांच्या नादाला लागल्यास निराशाच पदरात येते एवढे समजून चला. दिल्लीतील परिस्थिती मी खूप जवळून पाहिली आहे आणि पाहतो आहे. सुरुवातीला लोकांच्या केजरीवाल यांच्याबद्दल प्रचंड अपेक्षा होत्या. मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी शाळा या दोन गोष्टी त त्यांनी सुरुवातीला केलेल्या सुधारणा नेत्रदीपक होत्या. पण जसा काळ गेला तसा आप ला सुद्धा भ्रष्टाचाराची कीड लागली आणि केजरीवाल यांचा प्रचंड अहंकार त्याला उपाय करायला संपूर्ण अपयशी ठरला. बहुतांश मोहल्ला क्लिनिक बंद पडली आहेत किंवा जेमतेम चालत आहेत. बाकी त्यांनी वाटलेल्या रेवड्यांमुळे दिल्ली वीज मंडळ फायद्यातून तोट्यात आले आहे. डीटीसीच्या बसेस मध्ये बायकांना फुकट प्रवास देण्यापेक्षा स्त्रियांसाठी वेगळ्या बसेस किंवा आहे त्याच बस मध्ये स्त्रियांसाठी वेगळे दार केले असते तर त्यात प्रवास करणाऱ्या स्त्रियांना जास्त सुविधा झाल्या असत्या. अशा अनेक गोष्टी आहेत. पण जाऊ द्या तुम्ही वातानुकूलित खोलीत आरामखुर्चीत बसून कळफलक बडवा

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 19:10
Delhi discoms in crisis: Debt and regulatory gaps the discoms continue to report a substantial shortfall in their revenue from the sale of electricity which is manifest in cumulative monumental RAs of Rs 27,200 crore. discoms will leave no stone unturned in recovering the money say by getting sanction of a steep hike in tariff to make up for the entire cumulative deficit in revenue. Indeed, the matter had gone right up to the Supreme Court (SC) which in an order given in early 2023 had directed the DERC to let discoms recover their RAs. This could lead to a 100 per cent hike in tariff. केजरीवालांच्या रेवड्या आता दिल्लीकरांच्या बोकांडी बसणार

In reply to by सुबोध खरे

१. दिल्लीतील महिलांना २,५०० रुपये. २. दिल्लीतील पहिल्या प्रसुतीनंतर महिलेला ५,००० रुपये व दुसऱ्या प्रसुतीनंतर ६,००० रुपये. ३. सिलेंडरवर गरीब महिलांना ५०० रुपयांचं अनुदान. ४. होळी व दिवाळीला एकेक सिलिंडर मोफत. ५. नवजात बाळासाठी सहा पोषण किट्स. ६. गर्भवती महिलेला २१,००० रुपये. ७. अटल कँटीन योजनेअंतर्गत ५ रुपयांमध्ये भोजन. ८. पन्नास हजार सरकारी नोक-या. ९. दिल्लीत पाच लाख रुपयांचे मोफत उपचार. डॉक्टरसाहेब, या रेवड्यांसाठी किती कर भर लागेल आपल्याला. किती किती जीएसटी द्यावा लागेल. किती आश्वासने पूर्ण होतील. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हमारे देश मे मुफ्त की रेवडी बाटकर वोट बटोरने का कल्चर की कोशीश हो रही है, रेवडी कल्चर देश के विकास के लिये बहोत घातक है, रेवडी कल्चर को देश से हटाना है - आदरणीय मोदीजी यांचे अमुल्य विचार. दुवा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 19:39
रेवड्या हा रोग च आहे. मग तो महाराष्ट्रात असो कि इतर कोणत्या राज्यात आणि कोणता पक्ष देतो ते सुद्धा महत्त्वाचे नाही. हा रोग केवळ दाक्षिणात्य राज्यापुरता मर्यादित होता आणि केजरीवालांनी तो मुख्य प्रवाहात आणला हाच सर्वात वाईट मुद्दा आहे. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडळ कमिशन द्वारे आरक्षणाची बाटली उघडलूयवर तिला बूच घालणे कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेलं नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयाने ५० % चा प्रतिबंध घातल्यामुळे आरक्षण नियंत्रणात आहे आता रेवड्या देऊन निवडणूक जिंकता येतात हा प्रघात त्यांनी दिल्लीत आणि पंजाबात पाडल्यावर इतर राज्यांना आणि पक्षांचा निरुपाय झाला. फडणवीस हुशार असले तरी रेवड्यांशिवाय तरणोपाय नाही हे लक्षातआल्यामुळे महाराष्टात पण लाडकी बहीण सारखी रेवडी वाटून त्यांनी सत्ता मिळवली. कारण सत्ता हातात नसली तर साधन शुचितेला कुत्रं विचारत नाही एवढे समजण्याइतके फडणवीस आणि मोदी धूर्त नक्कीच आहेत आणि साधनशुचितेसाठी सत्ता हातातून घालवण्याइतके मूर्ख हि नाहीत. दुर्दैवाने या रेवड्यांवर सर्वोच्च न्यायालय सुद्धा नक्की निर्णय देऊ शकलेले नाही. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जितके देशाचे नुकसान केले आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान केजरीवाल यांनी केले आहे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 19:05
बरोबर आहे. रोज मरे त्याला कोण रडज? किती दिवस सुतक पाळणार? दरवर्षी अनेक निवडणुका आणि प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर सुतक पाळायचे असेल तर वर्षातले ८-१० महिने सुतकातच जाणार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 18:50
दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे समजा कॉंग्रेसचे उमेदवार नसते तरीही भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळाला असे म्हणता येणार नाही असे म्हणता आले असते कारण अपक्ष, एमआयएम वगैरेंनी घेतलेल्या मतांचा फटका आआपला बसला असे म्हणता आले असते. तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो. २०१३ ते २०२५ या वर्षात फुकट वीज, फुकट पाणी या रेवड्यांना दिल्लीकर भुलला नव्हता का?

In reply to by श्रीगुरुजी

विवेकपटाईत Wed, 03/05/2025 - 09:39
कोंग्रेस आणि आपची युती झाली असती तर भाजपच्या दहा जागा अजून वाढल्या असत्या. कोंग्रेस ने फक्त हिंदू मते खाल्ली. अल्पसंख्यक 99 टक्के आप सोबत होता. बाकी आपचे 25 टक्के मतदार लोकसभेत भाजपला मत देतात. ते उदासीन राहिले असते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 17:40
एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला. डॉक्टर साहेब हा तुम्ही मस्त जोक केला. कारण याहून भ्रष्ट शासन देशात कधीच आले नसेल. उच्च शिक्षणाच्या 20 कोटी पैकी 19.43 कोटी विज्ञापन वर खर्च करणारी सरकार होती. आरोग्य सुविधा सुविधा तर रसातळवर पोहचली होती. दीड कोटी आबादी वाढली त्यात अधिकान्श निम्न वर्ग होता. तरी सकारी शाळा 2013 पेक्षा कमी होणारे हे एकमेव राज्य असेल. बाकी अनेक मंत्री विधायक, भ्रष्टाचार गुंडागर्दी दंगा आरोपात जमनात वर किंवा जेलं मध्ये आहे. आमच्या उत्तम नगर भागातील आता पूर्व विधायक बल्यान तुमच्या भाषेत शांतिपूर्ण कार्यामुळे जेल मध्ये आहे. त्याची बायको निवणूक हरली. गेल्या वेळी प. दिल्ली 10 पैकी 10 जागा आपला मिळाल्या होत्या. पण गेल्या दोन वर्षांपासून नळांना घाण पाणी येत असल्याने 9 जागा आपच्या हातून गेल्या. आता फ्री पाण्यामुळे जळबोर्ड 70000 कोटींच्या तोट्यात आला. जिथे पगार देण्यासाठी पैसा नाही तिथे पाईपलाईन दुरूस्ती नाले सफाई, सिवर लाइन दुरूस्ती कुठून होणार. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी 30 ते 80 रुपये 20 लीटर RO पाण्यासाठी खर्च करावे लागत आहे. डीटीसी ही 30000 कोटींपेक्षा जास्त तोट्यात आहे. 25000 कोटींचा तोटा गेल्या दहावर्षांतला आहे. भयंकर भ्रष्टाचार आणि 2007 पासून भाडे न वाढविल्याचा परिणाम. देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार ही आपची होती.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Sun, 02/09/2025 - 01:58
Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले... https://marathi.abplive.com/elections/anna-hazare-on-arvind-kejriwal-delhi-election-result-senior-social-worker-anna-hazare-has-reacted-to-the-delhi-assembly-results-2025-marathi-news-1343137 -------

हा हा हा मी अशा धाग्यांवर केवळ बिरुटे सरांच्या प्रतिक्रिया पहायाला येतो ! मिपाकर असल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते ! २०२९ पर्यंत अशीच मजा मजा राहणार मिपावर ह्या विचाराने अगदी गुदगुल्या होतात ! =))))

मोदी विरोधकांची खरंच कीव येते. २०१४ पासून एक गोष्ट मनापासून घडत नाही. मध्यंतरी उभाटा सरकार उन्हाळ्यातील थंड वाऱ्याच्या झुळके सारखे आले आणि तसच निघूनही गेले. मग २०२४ ला मोदी सरकार जिंकूनही हरलय अस स्वत ची समजूत करून घेऊन खोटा का असेना पण आनंद व्यक्त करता येत होता. पण महाराष्ट्र निवडणुकीने तो आनंदही हिसकावून घेतला. केजरी कसे का असेना पण मोदी विरोधक आहेत ते काहीतरी करतील वाटत असतानाच ते पाचोळ्या सारखे उडून गेले. त्यात त्यांनी EVM ला दोषही दिला नाही. आत्ता शेवटची आशा म्हणजे बंगालची वाघीण. पण त्यालाही भरपूर वेळ आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

आग्या१९९० Tue, 02/11/2025 - 21:30
चंदिगड महापौर निवडणुकीत बीजेपीने दाखवून दिले ,मतदान कोणत्याही पद्धतीने घ्या, आम्ही त्यात फेरफार करू शकतो. EVM हॅक करून झाले , खोटे मतदार वाढवून झाले, मतदार यादीतून नावे कमी करून झाले. इतकेही करून निवडून आले नाही तर ED चा धाक दाखवून पूर्ण पक्ष फोडून झाले. आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही.

In reply to by आग्या१९९०

आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही. जो पर्यंत भारतात पुन्हा प्रामाणिक निवडणूक यंत्रणा येत नाही तो पर्यंत हीच लोक सत्तेत राहणार! आपण फक्त लोकशाहीला श्रद्धांजली वाहू शकतो.

In reply to by रात्रीचे चांदणे

श्रीगुरुजी Tue, 02/11/2025 - 21:34
कालच उठा म्हणाले की दिल्लीत व महाराष्ट्रात भाजप जिंकला हे मी मानतच नाही. शिक्षण, आरोग्य अश्या क्षेत्रात प्रचंड काम केलेले केजरीवाल हरतीलच कसे? रूग्णवाहिका, रक्तदान अशी अनेक लोकोपयोगी कामे केलेली शिवसेना हरेलच कशी? विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव आहे. काहीतरी गडबड घोटाळा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Tue, 02/11/2025 - 21:52
गेल्यावर्षी चंदीगड महापौर निवडणुकीत बीजेपीने गडबड केली तेव्हापासून खात्रीच झाली ह्यांनी निवडणूक जिंकण्याचे तंत्र अवगत केले आहे. त्यामुळे शंका येणे साहजिकच आहे. निवडणूक आयोग फक्त दावे फेटाळण्यासाठी बसले आहे.

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Tue, 02/11/2025 - 22:27
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. मतपत्रिका पद्धत असताना गडबड झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. तसेच न्यायालयाने ती निवडणूक रद्द केली होती. दिल्ली व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतयंत्राद्वारे झाल्याने गडबडीची शक्यताच नाही. तरीही विश्वास नसल्यास न्यायालयात दाद मागता येईल व मतयंत्रात गडबड केली हे न्यायालयाने मान्य केले तर निवडणूक रद्द होईल.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Tue, 02/11/2025 - 23:14
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. कसं बोललात? अशी गरज का पडली बीजेपीला? ह्याचा अर्थ निवडणूक जिंकण्यासाठी ते अनेक गैरप्रकार करण्यास मागेपुढे करत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या किंवा निवडणूक आयोगाच्या EVM तक्रारीच्या अटी बघितल्या तर त्यांना ह्यातील अनेक तांत्रिक माहिती आहे की नाही ह्याची शंका येते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकांचाच उमेदवार तक्रार करू शकतो ही अटच हास्यास्पद आहे. पुढच्या क्रमांकाची मते वळवली की नाही हे कसे कळणार? निवडणूक आयोग मतदार आणि मतदानाची संख्या आकडेवारीत द्यायला का टाळते आहे? कुठलेही इलेक्ट्रॉनिक मशीन अंतर्गत प्रोग्राम करून किंवा दुरूनही रिमोट द्वारे नियंत्रित करता येऊ शकते.

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Tue, 02/11/2025 - 23:33
महापौर निवडणूक, राज्यसभा निवडणूक, विधानपरीषद निवडणूक मतपत्रिकांवरच असते. मतयंत्रात गडबड करून दाखवा हे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारण्यास एकही पक्ष पुढे आला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Wed, 02/12/2025 - 00:12
मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार आत काय गडबड केली ते, ज्यास निवडणूक आयोग तयार नाही. ह्यापेक्षा मतदार संख्या आणि प्रत्यक्ष मतदान, मतदानाचे ( मतदार रांगेचे ) व्हिडिओ ,१००% VVPAT मोजणी,निवडणूक आयोगाने ह्या मागण्या मान्य कराव्यात , जे सहज शक्य आहे.

In reply to by आग्या१९९०

राघव Wed, 02/12/2025 - 01:48
अरे जर समजतच नसेल की गडबड कशी केली.. तर नक्की काय केल्यानं गडबड होते हेच माहीत नाही असा अर्थ होत नाही का? तसं जर असेल तर कुणालाही गडबड करताच कशी येणार? अन् भाजपवर जर एवढी शंका असेल की त्यांना मशीन उघडायला दिली असेल.. तर जावं की तात्पुरतं भाजपमधे आणि लावावा जोर मशीन हाताळायला मिळावी म्हणून..! अरे ज्याला इंटरनेट कनेक्शन नाही, वायर्ड नेटवर्क कनेक्शन नाही, अगदी सिमकार्ड सुद्धा नाही.. ते स्टँडअलोन डेटाबेस वर आहे हे उघड आहे. केवळ दोन वायर्स त्याला जोडता येतात, एक पॉवर केबल आणि एक प्रिंटर केबल. मतमोजणीच्या दरम्यान सर्व पक्षप्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्या समोर जर गैरप्रकार झालेत तर ते बोंब मारणार नाहीत काय? विरोधी पक्षाचा दावा हा आहे की ईव्हीएम हॅक होतात.. निवडणूक आयोग म्हणतंय कसं होईल? मी म्हणतो की हे प्रश्नच चुकीचे आहेत. प्रश्न आयोगानं विचारले पाहिजेत.. की बॅलेट पेपरनं गैरप्रकार कसे रोखता येतील ते सिद्ध करावं विरोधी पक्षांनी. सोबत बॅलेटपेपरचा वापर जास्त सोपा हे देखील सिद्ध करावं. आणिकही अनेक प्रश्न आणि उपप्रश्न आहेत.. चांगला घोळ घालावा ४०-५० वर्ष.. तोवर कदाचित आणिक उजवं एखादं तंत्रज्ञान आलेलं असेल ईव्हीएम पेक्षा!

In reply to by आग्या१९९०

+१ अचानक वाढलेले मतदार? मुस्लिम एरियातून भाजपला बहुमत,जितके मुस्लिम वोटर नाहीत त्याहून जास्त mim ला मतदान, निवडणूक आयोगाची लपवा छपवी, एखाद्या जिल्ह्यात एकसारखी मते पडणे उदा. १lakh १५ हजार ७८०, बाजूच्याच मतदार संघात १ लाख १५ हजार ८६४ वगैरे, मतदान यंत्राच्या आत काय हे पाहू ना देता नी मतदान यंत्राला हात न लावता हॅक करून दाखवा म्हणून छाती पिटणे, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजप नेत्यांनी सारवा सारव करणे, निवडणूक आयोगात आपली लोक बसवणे, चंदीगड पॅटर्न राबवणे, मतदान यंत्रे गुजरात मधूनच आणणे, मतदान यंत्र बनवणाऱ्या कंपनीत चार भाजपेयी गुजराथी डायरेक्टर म्हणून घुसणे. (मतदान यंत्रात गडबड करता येत नाही तर हे भाजपेयी मतदान यंत्रे बनवणाऱ्या कंपनीत का घुसले? ) एवढं सगळं उघ उघड होत असताना देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणाऱ्या भाजपेयींवर हसू येते.

In reply to by आग्या१९९०

महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. गिरीष बापट वारल्यानंतर पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीने निवडणूक आयोगाने वर्षभर पुण्यात लोकसभेची निवडणूकच घेतली नाही. त्याचवेळी पंजाबात मात्र लोकसभा निवडणूक घेतली होती. निवडणूक आयोग भाजपसाठी असा खुलेआम काम करत असताना निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणे हास्यास्पद आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 09:10
मग निवडणूक आयोगाविरूद्ध जा न्यायालयात. ते जमत नसेल तर २०११ मधील देशव्यापी आंदोलनासारखे आंदोलन करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे. पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही. महाराष्ट्रात आणि दिल्लीत राहुल गांधींनी ४ - ४ सभा घेतल्या. मोदी पंतप्रधान असून जास्त घेतल्या असतील. म्हणजे काहीही कष्ट न करता सत्ता पाहिजे. चुकून मिळाली तर लोकशाही जिंकली हरलो तर EVM आहेच.

In reply to by रात्रीचे चांदणे

आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे. चला, इथपर्यंत प्रगती झाली हेही नसे थोडके. पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही. ईव्हीएम हॅकच करावे असे गरजेचे नाही. मनुपुलेत ही करता येते किंवा बदलताही येते यंत्रणा आणी अधिकारी हाताशी असेल तर. आता निवडणूक आयोगच सोबत असल्यावर भीती ती कुणाची विधानसभेला जितेंद्र आव्हाड ह्यांनी पदोपदी ईव्हीएम वर लक्ष ठेवले त्यांचा निकाल पहा कसा लागलाय. (त्यांनी ट्विट करून ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली) पण सगळेच असे करू शकतात का? आणी का करावे? आणी केले तरी आयोग नी भाजप मिळून काहीतरी नवा मार्ग शोधतील. नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर म्हणून ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत घुसवून ठेवलेत ते कशासाठी? सो देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे रडगाणे भाजपेयींनी आता बंद करायला हवे!

In reply to by रात्रीचे चांदणे

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 09:41
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे तसे असेल तर कॉंग्रेस काळात आयोग तटस्थ होता का? मी खाली एक उदाहरण दिले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात ज्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारी नियंत्रण आहे आस कोणताही सरकारी खात तटस्थ नसणारच. आयोग घटनात्मक संस्था असूनही सरकारच्या कलानेच काम करणार.त्यात निवडणूक आयुक्तांची निवड कमिटी मध्येच सरकारी पक्षच बहुमत आहे. त्यामुळे लहान सहान बाबतीत सरकारी पक्षाला साजेशी भूमिका घेणारच. ह्यात सत्तेत काँग्रेस असो की भाजपा ह्याने काहीही फरक पडणार नाही. आव्हाडच मताधिक्य २०१९ च्या तुलनेत घटलेले आहे. आणि असेच हवेत राहिले तर २०२९ साली हरतील आणि त्यावेळी तेच EVM ला दोष देत बसतील. उभाटा असेच हवेत राहिले होते आणि आपटले. मुळात आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते.

In reply to by रात्रीचे चांदणे

आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते. मोदीना सोनिया गांधीनी वाचवले नहीतर ते आता जेल मधे पाहिजे होते.

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 07:26
मुस्तफाबाद का नाम बदलकर शिव पुरी या शिव विहार रखेंगे…’, दिल्ली में चुनाव जीतते ही BJP के दिग्गज विधायक का बड़ा बयान https://www.jansatta.com/rajya/will-rename-mustafabad-to-shiv-puri-delhi-bjp-mla-mohan-singh-bisht-big-announcement/3822117/ ------

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 09:39
२००९ मध्ये नवीन चावला नामक मुख्य निवडणूक आयुक्त होते. तेव्हा महाराष्ट्रातील ३ राज्यसभा खासदारांची व झारखंडमधील २ राज्यसभा खासदारांची निवडणूक होती. संख्याबळाप्रमाणे महाराष्ट्रात भाजन-सेना युतीचा १ व कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीचे २ खासदार आरामात निवडून येऊ शकत होते. झारखंडमध्ये सुद्धा भाजपचा १ व झामुमो-कॉंग्रेस युतीचा १ खासदार आरामात निवडून येऊ शकत नव्हता. पण नवीन चावलांनी महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी ३ वेगळ्या अधिसूचना काढल्या व झारखंडसाठी २ वेगळ्या अधिसूचना काढल्या. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक जागेसाठी एकदा अशी ३ वेळा निवडणूक झाली व झारखंडमध्ये २ वेळा निवडणूक झाली. परिणामी महाराष्ट्रातील तीनही जागांवर व झारखंडमध्ये दोनही जागांवर भाजपचा उमेदवार हरलो. एकच अधिसूचना असती तर भाजपचे २ खासदार राज्यसभेत निवडून आले असते. पण नवीन चावला या गांधीघराणेनिष्ठ निवडणूक आयुक्तामुळे भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Wed, 02/12/2025 - 09:47
निवडणूक आयोगाने भविष्यात तटस्थ रहावे असे वाटणे चुकीचे आहे का? त्यासाठी सर्वांनी प्रयत्न का करू नये?

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 12:22
नक्कीच. सर्वच यंत्रणा (निवडणूक आयोग, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व संसदीय व विधिमंडळाचे सभापती व उपसभापती, . . .) तटस्थ हव्या. परंतु आजवर कधीही तसे झाले नाही. कोणत्याही पक्षाच्या राजवटीत या यंत्रणा तटस्थ नव्हत्या.

In reply to by श्रीगुरुजी

आधी कुठल्या राज्यपालाने “हिंदुत्व सोडले का? वगैरे फुसकुल्या सोडल्या होत्या? कोणता राष्ट्रपती फॉर्म भरायच्या वेळेस उभा होता? नी पंतप्रधान बसून होता? कोणत्या राष्ट्रपतीने विशिष्ट पक्षाची सत्ता यावी म्हणून रात्री २ वाजता उठून सह्या करून राष्ट्रपती राजवट उठवली होती? alआधी निदान जनाची नाहियात्र मनाची लाक तरी होती आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 14:56
आणीबाणी आठवा.... आणि "आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!" हा तर प्रचंड मनोरंजक प्रतिसाद आहे... मग आत्ता दिल्लीत काय झाले होते? लिलाव होता की निवडणूक?

मुक्त विहारि Wed, 01/22/2025 - 17:24
भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल... सहमत आहे... माझ्या मते.. केजरीवाल यायची शक्यता जास्त आहे..

तिता Fri, 01/24/2025 - 09:15
काहीही झाले तरी भाजपाला मत देणारे पण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. हा भाजपाचा एकनिष्ठ एकगठ्ठा मतदार वर्ग आहे. बाकी Freeship तर प्रत्येक पक्ष offer करत आहे. मतदार सुजाण कमी आणि भावनिक जास्त आहेत.

श्रीगुरुजी Fri, 01/24/2025 - 14:49
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. आआपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अवघड आहे. भाजपच्या जागा ७ वरून नक्की वाढतील, पण ३६ पर्यंत जाण्याची शक्यता खूप कमी वाटते. अर्थात आआप हरून भाजपला बहुमत मिळावे हीच इच्छा आहे. भविष्यात रेवड्या वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षापेक्षा वर्तमानात रेवड्या वाटणारा पक्ष मतदारांना अधिक जवळचा वाटतो हे कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 02/06/2025 - 19:36
बहुसंख्य संस्थांनी मतदानोत्तर चाचणी घेऊन भाजपला साधे बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकाद्वारे १२ लाखापर्यंत उत्पन्न असल्यास ते आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ भाजपला कितपत मिळाला हे परवा समजेल. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा भाजपला भरभरून लाभ मिळाला. तसाच लाभ दिल्लीतही मिळेल का हा विविध पक्षांचा औत्सुक्याचा विषय असणार.

विवेकपटाईत गुरुवार, 02/06/2025 - 21:18
दिल्लीत झालेल्या मतदानात. अल्पसंख्यक समुदायाने 80 टक्के मतदान केले आहे. दुसरीकडे 48% हिंदू घरातच बसून राहिला आहे. जर एक्सिट पोलवाल्यांनी अल्पसंख्यक मतांना २२-२५% वेटेज दिले नसेल तर सर्वांचे अंदाज चुकतील. निवडणूक जिंकण्यासाठी आप पार्टीला हिंदूंच्या तीन पैकी फक्त एका मताची गरज आहे. अल्पसंख्यक समुदाय किमान 65 जागांवर आप प्रति एकनिष्ठ आहे. काँग्रेस पार्टी भाजप चे मत खाणार. बाकी केल्या दहा वर्षात दिल्लीत दारूची दुकाने दुप्पट झाली आहे. दिल्लीची जनसंख्या एक कोटी होऊन जास्त वाढली असली तरी सुद्धा दिल्लीत सरकारी शाळा पहिले पेक्षा कमी झाल्या आहेत. डीटीसी असो जलबोर्ड असो वीज कंपन्या असो सर्वच भयंकर तोट्यात आहे. आयुष्यमान योजना ही दिल्लीत नाही. शीला दीक्षित च्या काळात निर्मित झालेले हॉस्पिटल मध्ये आयपीडी अजूनही पूर्णपणे सुरू झाल्या नाही. नवीन बनविण्याचा प्रश्नच येत नाही. मध्यवर्ग मोठ्या प्रमाणात दिल्ली सोडून गुडगाव आणि नोयेदा नोयेडा येथे शिफ्ट होत आहे. माझे बहुतेक दिल्लीतले हे शेवटचे मतदान. बाकी दिल्लीची ७५ टक्के जनता आणि ती अनिधीकृत कॉलोनीच मध्ये राहते. अधिकांश कॉलनीमध्ये पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. साफसफाई खराब गल्या, नाले सफाई इत्यादीमुळे भाजपाचा काही जागा निश्चित वाढतो.

श्रीगुरुजी गुरुवार, 02/06/2025 - 22:56
Axis India exit poll Axis India Exit Poll ________________________________ Other exit polls Other exit polls _________________________________ अजून काही अंदाज - चाणक्य स्ट्रॅटेजी - भाजप (३९-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (२-३) पोल डायरी - भाजप (४२-५०), आआप (१८-२५), कॉंग्रेस व इतर (०-२) पीपल्स इनसाइट - भाजप (४०-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (०-१)

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 18:02
Axis My India, Pmarq आणि Poll Diary यांचा अंदाज बरोबर ठरला. Axis My India चा जागांचा व मतांच्या टक्केवारीचाही अंदाज जवळपास बरोबर आला. इतर काही जणांचा अंदाज जवळपास आला. Matrize आणि Mind Brink चा अंदाज बऱ्याच प्रमाणात चुकला.

उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल कसे लागतात याची उत्सुकता आहे. बर्‍याचशा एक्झिट पोलचा अंदाज आहे की भाजप सत्तेत परतेल. तसे झाल्यास ती एक ऐतिहासिक घटना असेल. भाजपने यापूर्वी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता नोव्हेंबर १९९३ मध्ये. उद्या परत विजय मिळविल्यास त्यानंतर तब्बल ३१ वर्षे आणि जवळपास अडीच महिन्यांनंतर भाजप दिल्लीत विजय मिळवेल. इतक्या वर्षांच्या खंडानंतर कोणत्याही पक्षाने पुनरागमन करून विजय मिळविणे हाच एक विक्रम असेल. काँग्रेसने २०१८ मध्ये २० वर्षांच्या खंडानंतर मध्य प्रदेशात जवळपास बहुमत मिळविले होते (त्यापूर्वी काँग्रेसने १९९८ मध्ये मध्य प्रदेशात बहुमत मिळवले होते). काँग्रेससाठी २० वर्षांच्या खंडानंतर सत्तेत परतणे हा विक्रम होता. २०१७ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपच्या नाकात दम आणला होता ही गोष्ट खरी आहे. समजा तेव्हा काँग्रेसचा गुजरातमध्ये विजय झाला असता तर तो मार्च १९८५ नंतर डिसेंबर २०१७ म्हणजे तब्बल ३२ वर्षे ९ महिन्यांच्या खंडानंतर विजय मिळाला असता. पण तसे झाले नाही. यापुढेही म्हणजे २०२७ किंवा २०३२ मध्ये काँग्रेसला गुजरातमध्ये विजय मिळाल्यात भाजपचा विक्रम मोडायची संधी काँग्रेसकडे असेल. पण भाजपचा उद्या विजय झाल्यास मात्र तो विक्रम सध्या तरी भाजपचाच. भाजपने १९९३ मध्ये ७० पैकी ४९ जागा जिंकल्या होत्या. आधी भाजप २०२५ मध्ये जिंकणार का आणि जिंकल्यास ४९ पेक्षा जास्त जागा जिंकणार का ते बघायचे. दिल्लीतील तरूण मतदारांनी भाजपची सत्ता कधी बघितलेलीही नाही. यापूर्वी १९९३ मध्ये म्हणजे बहुतेक तरूण मतदारांचा जन्म व्हायच्या आधी भाजपने दिल्लीत विधानसभा निवडणुक जिंकली होती. १९९३ मध्ये भाजप जिंकल्यानंतर १९९८ मध्ये पराभव होणे हा एक दैवदुर्विलास होता. मधल्या काळात झालेल्या १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी अनुक्रमे ५ आणि ६ जागा जिंकल्या होत्या. अगदी फेब्रुवारी १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ६ जागा जिंकल्यानंतर ९ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपचा धुव्वा उडाला होता. ९ महिन्यात इतके वातावरण कसे बदलले? तर त्याचे मुख्य कारण होते कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. दिल्लीत आणि उत्तर भारतातच प्रत्येक जेवणात कांद्याचा वापर उदंड प्रमाणात होतो. १९९८ च्या सुरवातीला ४ रूपये किलो असलेला कांदा एकदम ६० रूपये किलो पर्यंत गेला. त्याचे कारण पावसामुळे कांद्याचे पीक गेले होते आणि आधीच करार केले होते त्याप्रमाणे कांद्याची निर्यात केली गेली होती. त्याला नक्की कोण जबाबदार होते? नक्की माहित नाही. भाजप समर्थकांचा दावा होता की नाफेडने वेळेत निर्यात रोखली नाही आणि तेव्हा नाफेडचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते बलराम जाखड होते. तर काँग्रेस समर्थक त्याचा सगळा दोष वाजपेयी सरकारला देत होते. त्यावेळेस निर्यातीचे निर्णय फक्त नाफेडच घेत असेल असे वाटत नाही त्यामुळे वाजपेयी सरकारचीही यात चूक असलीच पाहिजे. जे काही असेल ते असेल पण कांदा प्रकरण भाजपला जड गेले. इतकेच नाही तर आणखी एक कारणही या पराभवाला होते. त्यावेळेस रॉकेलवर चालणारे स्टोव्ह मोठ्या प्रमाणावर वापरले जायचे. त्या रॉकेलमध्ये भेसळ झाल्याने दिल्लीत अनेक ठिकाणी स्टोव्हचे स्फोट झाले होते आणि बरेच- मला वाटते ५० पेक्षा जास्त लोक त्यात जखमी झाले होते. अशा सगळ्या कारणांमुळे आपले कठीण आहे हे लक्षात आल्यावर भाजपने मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मांना हटवून त्यांच्या जागी सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री म्हणून नेमले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे भाजपने दिल्लीत सत्ता गमावली. वातावरण इतके भाजपविरोधात गेले होते की काँग्रेसने शिला दिक्षित या त्यामानाने तेव्हा अपरिचित असलेल्या आणि स्वतःच्या लोकप्रियतेच्या आधारावर फारशी मते फिरवू न शकणार्‍या नेत्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले तरीही भाजपचा धुव्वा उडाला. त्यानंतर दिल्लीत शिला दिक्षित यांनी दिल्लीत नक्कीच चांगले काम केले. आज दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी चांगले आहे. मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची सुरवात शीला दिक्षितांच्या पहिल्या कार्यकाळात झाली होती. त्यामुळे २००३ मध्ये भाजपचा पराभव झाला. २००८ च्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान २६/११ नंतर झाले होते तेव्हा दिल्ली हा शहरी भाग असल्याने मुंबईतील हल्ल्याचा परिणाम होईल आणि काँग्रेस हरेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. २०१३ पासून पुढे काय झाले हे परत वेगळे लिहायलाच नको. उद्या काय होते याची उत्सुकता आहे. बघू काय होते ते.

१० फेब्रुवारी २०१५ रोजी आपटर्ड जे करत होते तो उन्माद नव्हता पण आज भाजप जिंकल्यास भाजप समर्थक (त्यांच्या भाषेत भक्त) जे काही करतील तो उन्माद असेल. काय समजलात?

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 10:15
आताची स्थिती - आआप २८, भाजप ४२, कॉंग्रेस ० केजरीवाल आता पुढे, मनीष सिसोदिया १३००+ व आतिशी १०००+ मतांनी अजूनही मागे.

गवि Sat, 02/08/2025 - 11:22
बरोबर ३५-३५ असे झाले तर काय होईल ? काँग्रेस आणि इतर हे प्रत्येकी शून्य शून्य जागा असल्याने फोडाफोडी करण्याचा स्कोप शून्य दिसतो.

In reply to by गवि

बरोबर ३५-३५ असे झाले तर काय होईल ? काँग्रेस आणि इतर हे प्रत्येकी शून्य शून्य जागा असल्याने फोडाफोडी करण्याचा स्कोप शून्य दिसतो.
१९८९ मध्ये गोव्यात या परिस्थितीच्या एकदम जवळ अशी परिस्थिती आली होती. ४० पैकी काँग्रेस आणि म.गो.पक्षाला प्रत्येकी १९ जागा होत्या तर दोन जागा अपक्षांना होत्या. त्यापैकी एक अपक्ष काँग्रेसच्या बाजूचा तर दुसरा म.गो.पक्षाच्या बाजूचा होता. त्यामुळे २०-२० अशी बरोबरी होत होती. तेव्हा कोणतेही सरकार बनत नव्हते. नोव्हेंबर १९८९ च्या शेवटी मतमोजणी झाली तेव्हा ही परिस्थिती होती. मग त्या दोन्ही अपक्षांनी राजीनामा दिला आणि जानेवारी १९९० मध्ये त्या दोन जागांवर पोटनिवडणुक झाली होती. त्या दोन्ही जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि मग प्रतापसिंग राणे जानेवारी १९९० च्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री झाले होते. ती एक परिस्थिती वगळता इतर कोणत्याही राज्यात तसे झालेले नाही. त्यामुळे त्या परिस्थितीत काय होईल सांगता येणार नाही. मला वाटते अशा परिस्थितीत कोणाला सरकार बनवायला पाचारण करायचे की राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे राज्यपाल ठरवतील. छत्तिसगडमध्ये २००३, २००८ आणि २०१३ या तिनही विधानसभा निवडणुका एकदम चुरशीच्या होत्या. तिन्ही निवडणुकांमध्ये कधी भाजप पुढे होता तर कधी काँग्रेस. पण शेवटी ९० पैकी ४९-५० जागा जिंकून तिन्ही वेळा भाजप जिंकला. त्यावेळेसही ४५-४५ असे झाले तर काय करायचे असा प्रश्न टीव्हीवरील चर्चांमध्ये यायचा. हे लिहित असताना दिल्लीत भाजप ४६ आणि आप २४ अशी स्थिती आहे. काही वेळापूर्वी ३९-३१ असे आकडे होते. त्यामुळे ३५-३५ अशी बरोबरी व्हायची शक्यता त्यामानाने कमी दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि Sat, 02/08/2025 - 12:06
धन्यवाद. नीट लक्षात आले. गोव्यात लोकसभा निवडणुकीत अगदी कमी संख्या असल्याने एका व्यक्तीला देखील अतोनात महत्व प्राप्त होत असते.

In reply to by रात्रीचे चांदणे

गवि Sat, 02/08/2025 - 12:05
आप मधल्यांना फोडणे हा एकमेव उपाय राहिला असता. वर चंद्रसूर्यकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे शंका दूर झाली.

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 12:20
आताची स्थिती - आआप २४, भाजप ४६, कॉंग्रेस ० केजरीवाल १८०० मतांनी मागे, मनीष सिसोदिया पुढे, आतिशी ३२००+ मतांनी अजूनही मागे. आता जवळपास हेच चित्र शेवटपर्यंत राहील असं दिसतंय.

आजच्या निकालामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आतिशी आणि गोपाळ राय वगळता आपचे बहुतेक सगळे मोठे नेते हरले आहेत/ हरत आहेत. स्वतः केजरू हरल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता पाताळविजयन या मद्रासी चित्रपटातील त्या राक्षसाप्रमाणे मी हा हा असे हसणार :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

यश राज Sat, 02/08/2025 - 16:13
आजच्या निकालामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आतिशी आणि गोपाळ राय वगळता आपचे बहुतेक सगळे मोठे नेते हरले आहेत/ हरत आहेत. स्वतः केजरू हरल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता पाताळविजयन या मद्रासी चित्रपटातील त्या राक्षसाप्रमाणे मी हा हा असे हसणार :)
अगदी सहमत कर्म काय ते म्हणतात ते हेच. केजरु स्वतःला दिल्लिचा मालक समजु लागला होता. आज मात्र स्वतःची लायकी कळाली असेल. आता पंजाब राजकारणात काय ऊलथापालथ होतेय ते बघणे मजेशीर असेल.

दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी आहे, अतिशय चांगली आरोग्यव्यवस्था नी अतिशय चांगल्या सरकारी शाळा आता तश्या राहणार नाहीत, त्यांच्यावर होणारा खर्च आता भाजप नेत्यांच्या खिशात जाणार. थोडक्यात चांगल्या दिल्लीचा आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश होणार, भ्रष्टाचार आणी गुन्हेगारीने बजबजपुरी येणार! केजरीवाल मनीष सिसोदिया असे दिग्गज पराभूत होऊ शकत नाही, त्याना पराभूत केले गेले म्हणजे बहुतेक महाराष्ट्र पॅटर्न तिकडेही राबवण्यात आलाय. लोकशाहीला श्रद्धांजली. दिल्लीतील गोबरयुगाला शुभेच्छा !

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:44
मोहल्ला क्लिनिक बद्दल माहिती घ्या. शाहीनबाग मध्ये काय झाले? ह्याची पण माहिती घ्या. शीशमहल बद्दल माहिती घ्या. दारू घोटाळ्या बद्दल माहिती घ्या. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना नंतर पाठिंबा का दिला नाही? ह्या बद्दल माहिती घ्या.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 18:46
https://www.newindianexpress.com/cities/delhi/2024/Oct/01/aaps-flagship-mohalla-clinics-face-closure A visit to several clinics across Delhi reveals a range of operational challenges, including untimely closures and acute staff shortages, which have left many clinics non-functional. An additional concern is the suspension of laboratory tests. These tests, which were previously free for patients and conducted by private labs reimbursed by the government, have been halted. The stoppage followed an Anti-Corruption Branch (ACB) investigation that revealed that nearly 65,000 fictitious patients were prescribed tests between February and December last year. The tests, performed by two private labs, led to ₹4.63 crore being disbursed from government funds for fraudulent services. The ACB inquiry, initiated after a complaint from Special Secretary (Vigilance) Y.V.V.J. Rajasekhar on January 10, uncovered significant discrepancies. According to the report, 63% of patients’ contact numbers were either invalid or belonged to individuals who had never visited the clinics. हे मोदी विरोधकांना दिसत नसले तरी सामान्य जनतेला दिसत असते. आणि तेच मतपेटीतून/ इ व्ही एम मधून प्रतिबिंबित होतं.

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:56
अशी लोकं एकतर व्यक्तीपूजा तरी करत असतात किंवा पराकोटीचा व्यक्तीद्वेष... आणि दोन्ही गोष्टी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी घातकच असतात, हे पण त्यांना कळत नाही. इतर जनांत, अशी माणसे फक्त, इतरांसाठी विदूषकाचे काम करतात. अभ्यास करून, प्रकटावे.....

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 17:29
पक्या इमारतीत कमी भाड्यावर असलेल्या पन्नास पन्नास वर्ष जुने दवाखाने बंद केले. रस्त्याच्या कडेला कार्डबोर्डच्या कोंटेनर सारखे मोहल्ला क्लिनिक उघडले. तिथे पाणी आणि टॉयलेटची सुविधा नाही. हे क्लिनिक सकाळी नऊ ते 1 वाजेपर्यंत उघडे राहतात.प्रत्येक क्लिनिकांत एक डॉक्टर रुग्ण तपासाला रहात असे. रुग्ण रस्त्यावर बाहेर उभे राहतात. अनेक क्लिनिक केंव्हाच तुटून नष्ट झाले आहे. नागल पुला जवळ एक क्लिनिक रस्त्यात दिसायचे. क्लिनिक मला तरी नेहमीच रिकामे दिसत होते. बहुतेक हीच अवस्था अधिकान्श क्लिनिकची होती. तरी देखील कागदांवर मोहल्ला क्लिनिकांत चार तासांत शेकडो रुग्ण तपासले जात होते. अधिक काही बोलत नाही. सत्य पुढील काही दिवसांत जनतेसमोर येईलच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 17:20
दिल्लीत आले असते तर सत्य दिसले असते. गेल्या दहा वर्षांत दिल्लीची जनसंख्या दीड कोटी वाढली त्यात निम्न वर्ग जास्त वाढली. हजार एक नवीन शाळा उघडण्या एवजी आधीचा शाळा बंद झाल्या. (आरटीआय करून तपासू शकता) बाकी अटल योजनेत जवळपास सर्व शाळांना लॅब मिळाली. सरकारी शाळा सोडून मोठ्या प्रमाणात निजी शाळेत गरीबांना ही जावे लागत आहे. आरटीआय करून तथ्य तपासू शकता. शीला दीक्षितच्या काळात सहा नवे हॉस्पिटल उभारले. त्यात आमच्या जनकपुरी येथील 200 बेडचे एक होते. 2013 पर्यन्त opd ही सुरू झाल्या होत्या. आज 2025 सुरू झाले अजूनही चतुर्थांश आयपीडी पूर्ण सुरू नाही झाल्या. आरटीआय करून तपासू शकता. बाकी मोहल्ला क्लिनिक हे चार तास उघडते तिथे पाणी टॉयलेटची सुविधा ही नाही. औषधी नाहीत. बाहेरून रिकामे दिसत असले तरी चार तासांत चारशे पाचशे रोगी एक डॉक्टर तपासतो. पराजयाचे मुख्य कारण दिल्ली जळबोर्ड जे नाले सफाई, सिवर आणि पाणी पुरवठा करते. कमाई अभावी 70000 कोटींच्या तोट्यात असल्याने पगार द्यायला पैसा नाही. पाण्याच्या लाइन दुरुस्त होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून आमच्या भागात घाण पाणी येत आहे. पूर्ण पश्चिम दिल्लीची हीच परिस्थिति. गेल्या वेळी 10 पैकी दहा जागा आपला मिळाल्या होत्या. फक्त घाण पाण्यामुळे 9 जागा हातातून गेल्या. सर्व नाले तुडुंब वाहत आहे, सर्व गल्ल्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. आत्ताची परिस्थिति गेल्या दहा वर्षांत डीटीसीला 25000 कोटींचा तोटा करून दाखविला. प्रती यात्री 30 रु हून जास्त तोटा. बसेस संख्या 2013 पेक्षा कमी झाल्या आहे. हे वेगळे केंद्र सरकारने दिल्ली वर कृपा करत 2000 इलेक्ट्रिक बसेस फ्री दिल्या. बाकी सर्व महिलांना तिकीट घेण्याची गरज नाही. 10 लक्ष महिला बस ने प्रवास करतात. केजरीला विश्वास होता त्यातल्या अर्ध्या निश्चित त्याला मत देतील. गुन्हेगारी म्हणाल तर आमच्या उत्तम नगरचा पूर्व विधायक बाल्यान गुन्हेगारीतच जेल मध्ये गेला आहे. त्याच्या बायकोला तिकीट दिले. तिचा पराजय झाला. दंग्यांच्या ओरोपीन्ंना तिकीट दिले. तो जिंकला ही. केजरी सहित सर्वच मोठे नेता भ्रष्टाचार करून आत किंवा जमानत वर आहेत. खरे म्हणाल तर देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आपची होती. पण दिल्लीतील 18 टक्के मुस्लिम जनसंख्या त्यात अर्धी बंगलादेशी आहे आणि ते 80 टक्के मतदान करतात. बाकी लोकांचे तृतीयांश मत मिळाले तरी आप जिंकू शकते त्यामुळे केजरीवाल निश्चिंत होता. पण नळांना येणारे घाण पानी आणि एका वर एक बाटली फ्री असल्याने मध्यम वर्गीय आप समर्थक आणि छोटे दुकानदार, ऑटो चालक आप पासून दूर गेले.

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 14:32
आआपची बंद दाराआड बैठक सुरू आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. मतयंत्रात गडबड, बनावट मतदार, आमच्या समर्थकांना मत देण्यासाठी जाऊन दिले नाही, मतदारांना पैसेवाटप केले यापैकी कोणकोणती कारणे पराभवासाठी द्यायची यावर बैठकीत उहापोह सुरू आहे.

दिल्ली निवडणूकीत भाजपने घेतलेली आघाडी पाहता भाजपाने सत्ता मिळवलेली दिसत आहे. जवळ जवळ सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत बदल होत आहेत, लोकशाहीत सत्तेत बदल होत राहीले पाहिजेत. साचलेपण आलं की त्याचं गटार होतं आणि माजही यायला लागतो. उदाहरण आपल्याला केंद्रातलं सरकार डोळ्यासमोर आहेच. दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे. तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो. भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन. स्वच्छ यमुना , दिल्ली प्रदुषण, सुशासन, आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही भाजपाची प्राथमिकता असेल. दिल्लीतलं राजकारण पाहता भाजपा दिल्लीत सत्तेसाठी आसूसलेली होती. सर्वप्रकारचे जुमले वापरणे सुरु होते. राज्यपाल आणि आप सरकारचा संघर्ष, इडी, आयकर यांची दडपशाही, आपच्या उमेदवारांना जेलात पाठविण्याची झालेली घाई, खोटेनाटे आरोप करुन आपच्या सरकारचे कंबरडे केंद्रीय सरकारने मोडलेले होते. आपचा संघर्ष आत आणि बाहेर असा दोन्ही ठिकाणी गेली अनेक वर्ष बघायला मिळाला. गल्ली-मोहल्ल्यातल्या आरोग्यसुविधा, सरकारी शाळांचा कायापालट, बीजली हाफ पाणी माफ, वेगवान प्रशासन या आणि अशा लोकप्रिय घोषणांनी केजरीवाल सरकारने आपली एक वेगळी छबी निर्माण केली. काही राज्यांमधे देशभर राजकारणांचा प्रवास सुरुही केला. श्री अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशभर कॉंग्रेस सरकार हटविण्यासाठी जी मोहीम सुरु केली त्याचं यश भाजपाला जसे मिळाले तसे, केजरीवाल सरकारलाही त्याचा फायदा झाला. एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला. येत्या काळात आप विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी करतील त्यांनाही शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 18:39
काय बिरुटे सर? आता किती दिवसांचे सुतक? बाकी सर्व आरोप करून झाले. आता फक्त दिल्लीच्या मतदारांची अक्कल काढायची राहिली आहे. तेच इ व्ही एम, इ डी, सीबी आय, पैशाचा खेळ, धमक्या, दडपशाही,लोकशाहीची हत्या हि तुणतुणी ऐकून दिल्लीचे मतदार कंटाळले आणि दिलं केजरीवालांना हाकलून. तुम्ही वाजवा तेच तुणतुणं-- पुढची पाच वर्षे दिल्लीत आणि महाराष्ट्रात सुद्धा.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, सुतक वगैरे सर्व गोबरभक्तांना असतं. आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 19:00
आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं. हो लढा ना आणि भिडा ना. पण अन्याय नक्की कुठे होतोय आणि कोण करतंय हे निदान समजून तरी घ्या? आरामखुर्चीत बसलेल्या विचारवंतांच्या नादाला लागल्यास निराशाच पदरात येते एवढे समजून चला. दिल्लीतील परिस्थिती मी खूप जवळून पाहिली आहे आणि पाहतो आहे. सुरुवातीला लोकांच्या केजरीवाल यांच्याबद्दल प्रचंड अपेक्षा होत्या. मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी शाळा या दोन गोष्टी त त्यांनी सुरुवातीला केलेल्या सुधारणा नेत्रदीपक होत्या. पण जसा काळ गेला तसा आप ला सुद्धा भ्रष्टाचाराची कीड लागली आणि केजरीवाल यांचा प्रचंड अहंकार त्याला उपाय करायला संपूर्ण अपयशी ठरला. बहुतांश मोहल्ला क्लिनिक बंद पडली आहेत किंवा जेमतेम चालत आहेत. बाकी त्यांनी वाटलेल्या रेवड्यांमुळे दिल्ली वीज मंडळ फायद्यातून तोट्यात आले आहे. डीटीसीच्या बसेस मध्ये बायकांना फुकट प्रवास देण्यापेक्षा स्त्रियांसाठी वेगळ्या बसेस किंवा आहे त्याच बस मध्ये स्त्रियांसाठी वेगळे दार केले असते तर त्यात प्रवास करणाऱ्या स्त्रियांना जास्त सुविधा झाल्या असत्या. अशा अनेक गोष्टी आहेत. पण जाऊ द्या तुम्ही वातानुकूलित खोलीत आरामखुर्चीत बसून कळफलक बडवा

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 19:10
Delhi discoms in crisis: Debt and regulatory gaps the discoms continue to report a substantial shortfall in their revenue from the sale of electricity which is manifest in cumulative monumental RAs of Rs 27,200 crore. discoms will leave no stone unturned in recovering the money say by getting sanction of a steep hike in tariff to make up for the entire cumulative deficit in revenue. Indeed, the matter had gone right up to the Supreme Court (SC) which in an order given in early 2023 had directed the DERC to let discoms recover their RAs. This could lead to a 100 per cent hike in tariff. केजरीवालांच्या रेवड्या आता दिल्लीकरांच्या बोकांडी बसणार

In reply to by सुबोध खरे

१. दिल्लीतील महिलांना २,५०० रुपये. २. दिल्लीतील पहिल्या प्रसुतीनंतर महिलेला ५,००० रुपये व दुसऱ्या प्रसुतीनंतर ६,००० रुपये. ३. सिलेंडरवर गरीब महिलांना ५०० रुपयांचं अनुदान. ४. होळी व दिवाळीला एकेक सिलिंडर मोफत. ५. नवजात बाळासाठी सहा पोषण किट्स. ६. गर्भवती महिलेला २१,००० रुपये. ७. अटल कँटीन योजनेअंतर्गत ५ रुपयांमध्ये भोजन. ८. पन्नास हजार सरकारी नोक-या. ९. दिल्लीत पाच लाख रुपयांचे मोफत उपचार. डॉक्टरसाहेब, या रेवड्यांसाठी किती कर भर लागेल आपल्याला. किती किती जीएसटी द्यावा लागेल. किती आश्वासने पूर्ण होतील. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हमारे देश मे मुफ्त की रेवडी बाटकर वोट बटोरने का कल्चर की कोशीश हो रही है, रेवडी कल्चर देश के विकास के लिये बहोत घातक है, रेवडी कल्चर को देश से हटाना है - आदरणीय मोदीजी यांचे अमुल्य विचार. दुवा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 19:39
रेवड्या हा रोग च आहे. मग तो महाराष्ट्रात असो कि इतर कोणत्या राज्यात आणि कोणता पक्ष देतो ते सुद्धा महत्त्वाचे नाही. हा रोग केवळ दाक्षिणात्य राज्यापुरता मर्यादित होता आणि केजरीवालांनी तो मुख्य प्रवाहात आणला हाच सर्वात वाईट मुद्दा आहे. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडळ कमिशन द्वारे आरक्षणाची बाटली उघडलूयवर तिला बूच घालणे कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेलं नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयाने ५० % चा प्रतिबंध घातल्यामुळे आरक्षण नियंत्रणात आहे आता रेवड्या देऊन निवडणूक जिंकता येतात हा प्रघात त्यांनी दिल्लीत आणि पंजाबात पाडल्यावर इतर राज्यांना आणि पक्षांचा निरुपाय झाला. फडणवीस हुशार असले तरी रेवड्यांशिवाय तरणोपाय नाही हे लक्षातआल्यामुळे महाराष्टात पण लाडकी बहीण सारखी रेवडी वाटून त्यांनी सत्ता मिळवली. कारण सत्ता हातात नसली तर साधन शुचितेला कुत्रं विचारत नाही एवढे समजण्याइतके फडणवीस आणि मोदी धूर्त नक्कीच आहेत आणि साधनशुचितेसाठी सत्ता हातातून घालवण्याइतके मूर्ख हि नाहीत. दुर्दैवाने या रेवड्यांवर सर्वोच्च न्यायालय सुद्धा नक्की निर्णय देऊ शकलेले नाही. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जितके देशाचे नुकसान केले आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान केजरीवाल यांनी केले आहे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 19:05
बरोबर आहे. रोज मरे त्याला कोण रडज? किती दिवस सुतक पाळणार? दरवर्षी अनेक निवडणुका आणि प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर सुतक पाळायचे असेल तर वर्षातले ८-१० महिने सुतकातच जाणार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 18:50
दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे समजा कॉंग्रेसचे उमेदवार नसते तरीही भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळाला असे म्हणता येणार नाही असे म्हणता आले असते कारण अपक्ष, एमआयएम वगैरेंनी घेतलेल्या मतांचा फटका आआपला बसला असे म्हणता आले असते. तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो. २०१३ ते २०२५ या वर्षात फुकट वीज, फुकट पाणी या रेवड्यांना दिल्लीकर भुलला नव्हता का?

In reply to by श्रीगुरुजी

विवेकपटाईत Wed, 03/05/2025 - 09:39
कोंग्रेस आणि आपची युती झाली असती तर भाजपच्या दहा जागा अजून वाढल्या असत्या. कोंग्रेस ने फक्त हिंदू मते खाल्ली. अल्पसंख्यक 99 टक्के आप सोबत होता. बाकी आपचे 25 टक्के मतदार लोकसभेत भाजपला मत देतात. ते उदासीन राहिले असते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 17:40
एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला. डॉक्टर साहेब हा तुम्ही मस्त जोक केला. कारण याहून भ्रष्ट शासन देशात कधीच आले नसेल. उच्च शिक्षणाच्या 20 कोटी पैकी 19.43 कोटी विज्ञापन वर खर्च करणारी सरकार होती. आरोग्य सुविधा सुविधा तर रसातळवर पोहचली होती. दीड कोटी आबादी वाढली त्यात अधिकान्श निम्न वर्ग होता. तरी सकारी शाळा 2013 पेक्षा कमी होणारे हे एकमेव राज्य असेल. बाकी अनेक मंत्री विधायक, भ्रष्टाचार गुंडागर्दी दंगा आरोपात जमनात वर किंवा जेलं मध्ये आहे. आमच्या उत्तम नगर भागातील आता पूर्व विधायक बल्यान तुमच्या भाषेत शांतिपूर्ण कार्यामुळे जेल मध्ये आहे. त्याची बायको निवणूक हरली. गेल्या वेळी प. दिल्ली 10 पैकी 10 जागा आपला मिळाल्या होत्या. पण गेल्या दोन वर्षांपासून नळांना घाण पाणी येत असल्याने 9 जागा आपच्या हातून गेल्या. आता फ्री पाण्यामुळे जळबोर्ड 70000 कोटींच्या तोट्यात आला. जिथे पगार देण्यासाठी पैसा नाही तिथे पाईपलाईन दुरूस्ती नाले सफाई, सिवर लाइन दुरूस्ती कुठून होणार. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी 30 ते 80 रुपये 20 लीटर RO पाण्यासाठी खर्च करावे लागत आहे. डीटीसी ही 30000 कोटींपेक्षा जास्त तोट्यात आहे. 25000 कोटींचा तोटा गेल्या दहावर्षांतला आहे. भयंकर भ्रष्टाचार आणि 2007 पासून भाडे न वाढविल्याचा परिणाम. देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार ही आपची होती.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Sun, 02/09/2025 - 01:58
Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले... https://marathi.abplive.com/elections/anna-hazare-on-arvind-kejriwal-delhi-election-result-senior-social-worker-anna-hazare-has-reacted-to-the-delhi-assembly-results-2025-marathi-news-1343137 -------

हा हा हा मी अशा धाग्यांवर केवळ बिरुटे सरांच्या प्रतिक्रिया पहायाला येतो ! मिपाकर असल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते ! २०२९ पर्यंत अशीच मजा मजा राहणार मिपावर ह्या विचाराने अगदी गुदगुल्या होतात ! =))))

मोदी विरोधकांची खरंच कीव येते. २०१४ पासून एक गोष्ट मनापासून घडत नाही. मध्यंतरी उभाटा सरकार उन्हाळ्यातील थंड वाऱ्याच्या झुळके सारखे आले आणि तसच निघूनही गेले. मग २०२४ ला मोदी सरकार जिंकूनही हरलय अस स्वत ची समजूत करून घेऊन खोटा का असेना पण आनंद व्यक्त करता येत होता. पण महाराष्ट्र निवडणुकीने तो आनंदही हिसकावून घेतला. केजरी कसे का असेना पण मोदी विरोधक आहेत ते काहीतरी करतील वाटत असतानाच ते पाचोळ्या सारखे उडून गेले. त्यात त्यांनी EVM ला दोषही दिला नाही. आत्ता शेवटची आशा म्हणजे बंगालची वाघीण. पण त्यालाही भरपूर वेळ आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

आग्या१९९० Tue, 02/11/2025 - 21:30
चंदिगड महापौर निवडणुकीत बीजेपीने दाखवून दिले ,मतदान कोणत्याही पद्धतीने घ्या, आम्ही त्यात फेरफार करू शकतो. EVM हॅक करून झाले , खोटे मतदार वाढवून झाले, मतदार यादीतून नावे कमी करून झाले. इतकेही करून निवडून आले नाही तर ED चा धाक दाखवून पूर्ण पक्ष फोडून झाले. आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही.

In reply to by आग्या१९९०

आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही. जो पर्यंत भारतात पुन्हा प्रामाणिक निवडणूक यंत्रणा येत नाही तो पर्यंत हीच लोक सत्तेत राहणार! आपण फक्त लोकशाहीला श्रद्धांजली वाहू शकतो.

In reply to by रात्रीचे चांदणे

श्रीगुरुजी Tue, 02/11/2025 - 21:34
कालच उठा म्हणाले की दिल्लीत व महाराष्ट्रात भाजप जिंकला हे मी मानतच नाही. शिक्षण, आरोग्य अश्या क्षेत्रात प्रचंड काम केलेले केजरीवाल हरतीलच कसे? रूग्णवाहिका, रक्तदान अशी अनेक लोकोपयोगी कामे केलेली शिवसेना हरेलच कशी? विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव आहे. काहीतरी गडबड घोटाळा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Tue, 02/11/2025 - 21:52
गेल्यावर्षी चंदीगड महापौर निवडणुकीत बीजेपीने गडबड केली तेव्हापासून खात्रीच झाली ह्यांनी निवडणूक जिंकण्याचे तंत्र अवगत केले आहे. त्यामुळे शंका येणे साहजिकच आहे. निवडणूक आयोग फक्त दावे फेटाळण्यासाठी बसले आहे.

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Tue, 02/11/2025 - 22:27
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. मतपत्रिका पद्धत असताना गडबड झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. तसेच न्यायालयाने ती निवडणूक रद्द केली होती. दिल्ली व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतयंत्राद्वारे झाल्याने गडबडीची शक्यताच नाही. तरीही विश्वास नसल्यास न्यायालयात दाद मागता येईल व मतयंत्रात गडबड केली हे न्यायालयाने मान्य केले तर निवडणूक रद्द होईल.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Tue, 02/11/2025 - 23:14
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. कसं बोललात? अशी गरज का पडली बीजेपीला? ह्याचा अर्थ निवडणूक जिंकण्यासाठी ते अनेक गैरप्रकार करण्यास मागेपुढे करत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या किंवा निवडणूक आयोगाच्या EVM तक्रारीच्या अटी बघितल्या तर त्यांना ह्यातील अनेक तांत्रिक माहिती आहे की नाही ह्याची शंका येते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकांचाच उमेदवार तक्रार करू शकतो ही अटच हास्यास्पद आहे. पुढच्या क्रमांकाची मते वळवली की नाही हे कसे कळणार? निवडणूक आयोग मतदार आणि मतदानाची संख्या आकडेवारीत द्यायला का टाळते आहे? कुठलेही इलेक्ट्रॉनिक मशीन अंतर्गत प्रोग्राम करून किंवा दुरूनही रिमोट द्वारे नियंत्रित करता येऊ शकते.

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Tue, 02/11/2025 - 23:33
महापौर निवडणूक, राज्यसभा निवडणूक, विधानपरीषद निवडणूक मतपत्रिकांवरच असते. मतयंत्रात गडबड करून दाखवा हे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारण्यास एकही पक्ष पुढे आला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Wed, 02/12/2025 - 00:12
मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार आत काय गडबड केली ते, ज्यास निवडणूक आयोग तयार नाही. ह्यापेक्षा मतदार संख्या आणि प्रत्यक्ष मतदान, मतदानाचे ( मतदार रांगेचे ) व्हिडिओ ,१००% VVPAT मोजणी,निवडणूक आयोगाने ह्या मागण्या मान्य कराव्यात , जे सहज शक्य आहे.

In reply to by आग्या१९९०

राघव Wed, 02/12/2025 - 01:48
अरे जर समजतच नसेल की गडबड कशी केली.. तर नक्की काय केल्यानं गडबड होते हेच माहीत नाही असा अर्थ होत नाही का? तसं जर असेल तर कुणालाही गडबड करताच कशी येणार? अन् भाजपवर जर एवढी शंका असेल की त्यांना मशीन उघडायला दिली असेल.. तर जावं की तात्पुरतं भाजपमधे आणि लावावा जोर मशीन हाताळायला मिळावी म्हणून..! अरे ज्याला इंटरनेट कनेक्शन नाही, वायर्ड नेटवर्क कनेक्शन नाही, अगदी सिमकार्ड सुद्धा नाही.. ते स्टँडअलोन डेटाबेस वर आहे हे उघड आहे. केवळ दोन वायर्स त्याला जोडता येतात, एक पॉवर केबल आणि एक प्रिंटर केबल. मतमोजणीच्या दरम्यान सर्व पक्षप्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्या समोर जर गैरप्रकार झालेत तर ते बोंब मारणार नाहीत काय? विरोधी पक्षाचा दावा हा आहे की ईव्हीएम हॅक होतात.. निवडणूक आयोग म्हणतंय कसं होईल? मी म्हणतो की हे प्रश्नच चुकीचे आहेत. प्रश्न आयोगानं विचारले पाहिजेत.. की बॅलेट पेपरनं गैरप्रकार कसे रोखता येतील ते सिद्ध करावं विरोधी पक्षांनी. सोबत बॅलेटपेपरचा वापर जास्त सोपा हे देखील सिद्ध करावं. आणिकही अनेक प्रश्न आणि उपप्रश्न आहेत.. चांगला घोळ घालावा ४०-५० वर्ष.. तोवर कदाचित आणिक उजवं एखादं तंत्रज्ञान आलेलं असेल ईव्हीएम पेक्षा!

In reply to by आग्या१९९०

+१ अचानक वाढलेले मतदार? मुस्लिम एरियातून भाजपला बहुमत,जितके मुस्लिम वोटर नाहीत त्याहून जास्त mim ला मतदान, निवडणूक आयोगाची लपवा छपवी, एखाद्या जिल्ह्यात एकसारखी मते पडणे उदा. १lakh १५ हजार ७८०, बाजूच्याच मतदार संघात १ लाख १५ हजार ८६४ वगैरे, मतदान यंत्राच्या आत काय हे पाहू ना देता नी मतदान यंत्राला हात न लावता हॅक करून दाखवा म्हणून छाती पिटणे, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजप नेत्यांनी सारवा सारव करणे, निवडणूक आयोगात आपली लोक बसवणे, चंदीगड पॅटर्न राबवणे, मतदान यंत्रे गुजरात मधूनच आणणे, मतदान यंत्र बनवणाऱ्या कंपनीत चार भाजपेयी गुजराथी डायरेक्टर म्हणून घुसणे. (मतदान यंत्रात गडबड करता येत नाही तर हे भाजपेयी मतदान यंत्रे बनवणाऱ्या कंपनीत का घुसले? ) एवढं सगळं उघ उघड होत असताना देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणाऱ्या भाजपेयींवर हसू येते.

In reply to by आग्या१९९०

महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. गिरीष बापट वारल्यानंतर पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीने निवडणूक आयोगाने वर्षभर पुण्यात लोकसभेची निवडणूकच घेतली नाही. त्याचवेळी पंजाबात मात्र लोकसभा निवडणूक घेतली होती. निवडणूक आयोग भाजपसाठी असा खुलेआम काम करत असताना निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणे हास्यास्पद आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 09:10
मग निवडणूक आयोगाविरूद्ध जा न्यायालयात. ते जमत नसेल तर २०११ मधील देशव्यापी आंदोलनासारखे आंदोलन करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे. पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही. महाराष्ट्रात आणि दिल्लीत राहुल गांधींनी ४ - ४ सभा घेतल्या. मोदी पंतप्रधान असून जास्त घेतल्या असतील. म्हणजे काहीही कष्ट न करता सत्ता पाहिजे. चुकून मिळाली तर लोकशाही जिंकली हरलो तर EVM आहेच.

In reply to by रात्रीचे चांदणे

आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे. चला, इथपर्यंत प्रगती झाली हेही नसे थोडके. पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही. ईव्हीएम हॅकच करावे असे गरजेचे नाही. मनुपुलेत ही करता येते किंवा बदलताही येते यंत्रणा आणी अधिकारी हाताशी असेल तर. आता निवडणूक आयोगच सोबत असल्यावर भीती ती कुणाची विधानसभेला जितेंद्र आव्हाड ह्यांनी पदोपदी ईव्हीएम वर लक्ष ठेवले त्यांचा निकाल पहा कसा लागलाय. (त्यांनी ट्विट करून ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली) पण सगळेच असे करू शकतात का? आणी का करावे? आणी केले तरी आयोग नी भाजप मिळून काहीतरी नवा मार्ग शोधतील. नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर म्हणून ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत घुसवून ठेवलेत ते कशासाठी? सो देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे रडगाणे भाजपेयींनी आता बंद करायला हवे!

In reply to by रात्रीचे चांदणे

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 09:41
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे तसे असेल तर कॉंग्रेस काळात आयोग तटस्थ होता का? मी खाली एक उदाहरण दिले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात ज्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारी नियंत्रण आहे आस कोणताही सरकारी खात तटस्थ नसणारच. आयोग घटनात्मक संस्था असूनही सरकारच्या कलानेच काम करणार.त्यात निवडणूक आयुक्तांची निवड कमिटी मध्येच सरकारी पक्षच बहुमत आहे. त्यामुळे लहान सहान बाबतीत सरकारी पक्षाला साजेशी भूमिका घेणारच. ह्यात सत्तेत काँग्रेस असो की भाजपा ह्याने काहीही फरक पडणार नाही. आव्हाडच मताधिक्य २०१९ च्या तुलनेत घटलेले आहे. आणि असेच हवेत राहिले तर २०२९ साली हरतील आणि त्यावेळी तेच EVM ला दोष देत बसतील. उभाटा असेच हवेत राहिले होते आणि आपटले. मुळात आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते.

In reply to by रात्रीचे चांदणे

आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते. मोदीना सोनिया गांधीनी वाचवले नहीतर ते आता जेल मधे पाहिजे होते.

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 07:26
मुस्तफाबाद का नाम बदलकर शिव पुरी या शिव विहार रखेंगे…’, दिल्ली में चुनाव जीतते ही BJP के दिग्गज विधायक का बड़ा बयान https://www.jansatta.com/rajya/will-rename-mustafabad-to-shiv-puri-delhi-bjp-mla-mohan-singh-bisht-big-announcement/3822117/ ------

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 09:39
२००९ मध्ये नवीन चावला नामक मुख्य निवडणूक आयुक्त होते. तेव्हा महाराष्ट्रातील ३ राज्यसभा खासदारांची व झारखंडमधील २ राज्यसभा खासदारांची निवडणूक होती. संख्याबळाप्रमाणे महाराष्ट्रात भाजन-सेना युतीचा १ व कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीचे २ खासदार आरामात निवडून येऊ शकत होते. झारखंडमध्ये सुद्धा भाजपचा १ व झामुमो-कॉंग्रेस युतीचा १ खासदार आरामात निवडून येऊ शकत नव्हता. पण नवीन चावलांनी महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी ३ वेगळ्या अधिसूचना काढल्या व झारखंडसाठी २ वेगळ्या अधिसूचना काढल्या. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक जागेसाठी एकदा अशी ३ वेळा निवडणूक झाली व झारखंडमध्ये २ वेळा निवडणूक झाली. परिणामी महाराष्ट्रातील तीनही जागांवर व झारखंडमध्ये दोनही जागांवर भाजपचा उमेदवार हरलो. एकच अधिसूचना असती तर भाजपचे २ खासदार राज्यसभेत निवडून आले असते. पण नवीन चावला या गांधीघराणेनिष्ठ निवडणूक आयुक्तामुळे भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Wed, 02/12/2025 - 09:47
निवडणूक आयोगाने भविष्यात तटस्थ रहावे असे वाटणे चुकीचे आहे का? त्यासाठी सर्वांनी प्रयत्न का करू नये?

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Wed, 02/12/2025 - 12:22
नक्कीच. सर्वच यंत्रणा (निवडणूक आयोग, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व संसदीय व विधिमंडळाचे सभापती व उपसभापती, . . .) तटस्थ हव्या. परंतु आजवर कधीही तसे झाले नाही. कोणत्याही पक्षाच्या राजवटीत या यंत्रणा तटस्थ नव्हत्या.

In reply to by श्रीगुरुजी

आधी कुठल्या राज्यपालाने “हिंदुत्व सोडले का? वगैरे फुसकुल्या सोडल्या होत्या? कोणता राष्ट्रपती फॉर्म भरायच्या वेळेस उभा होता? नी पंतप्रधान बसून होता? कोणत्या राष्ट्रपतीने विशिष्ट पक्षाची सत्ता यावी म्हणून रात्री २ वाजता उठून सह्या करून राष्ट्रपती राजवट उठवली होती? alआधी निदान जनाची नाहियात्र मनाची लाक तरी होती आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 14:56
आणीबाणी आठवा.... आणि "आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!" हा तर प्रचंड मनोरंजक प्रतिसाद आहे... मग आत्ता दिल्लीत काय झाले होते? लिलाव होता की निवडणूक?
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात.

चूक-२

अमरेंद्र बाहुबली ·

सर्वप्रथम , कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. मिपा प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी. आता कथा का आवडाली नाही ह्यावर काही टिपण्ण्या : १. छेड काढणे म्हणाजे नक्की काय ?
माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा
नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ?
त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली
बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ? २. मागे लागणे म्हणजे नक्की काय ?
माझ्या मागे लागतोय तो.
कथेतील लेखक स्त्रीपात्राच्या मागे लागलाय म्हणजे नक्की काय केले त्याने ? कारण विशिष्ठ मर्यादेत राहुन स्त्री सोबत प्रणयाराधन करणे हे छेड काढणे कसे असु शकते ? विशेषतः, कथेतील स्त्रीने त्या लेखकाला स्पष्टपणे "मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही, मला तुझ्याविषयी काहीही शृंगारिक भावना नाहीत" असे स्प्पष्ट सांगितल्याचे कथेतुन कोठेही निदर्शनास येत नाही. कॉलेजमध्ये , वयात आलेल्या मुलांनी वयात आलेल्या मुलींसोबत विशिष्ठ सभ्य मर्यादेत राहुन प्रणयाराधन करणे , साध्या मराठीत - पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही . ३. अनाकलनीय निर्बुध्दता सदरहु कथेतील स्त्री पात्राची दोन वाक्ये पहा :
बाप दारू पिऊन मरून पडलेला,
माझ्या मनात विश्वास होता की बाबा माझं रक्षण करतील
ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ? ४. भूतकाळातील अव्वाच्यासव्वा काल्पनिक उड्डाणे
मी शिक्षण पूर्ण करीन, नोकरीला लागीन, घराची जबाबदारी उचलू शकेन
ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. कारण आजच्या काळात असा विचार करणारी मुलगी सापडणे हे जवळपास अशक्य आहे. किमान माझ्या पाहण्यात तरी अशी एकही मुलगी नाही. घराची जबाबदारी उचलेन हा विचार मुलांच्या मनात येतो , मुलींच्या नाही. नाहीच नाही. नोकरी लागुन स्वतःच्या पायावर उभेराहिलेली मुलगी - "आयेम अ स्ट्राँग इन्डिपेंडंट वुमन , आय डोन्ट नीड मेन , फाट्यावर मारते मी ह्या दारुड्या बापाला." असेच म्हणेल. ५. आत्मा मृत्यु वगैरे वगैरे
माझ्या आत्म्याही मेलाय.
ह्या वाक्यावरुन सदरहु कथेतील स्त्रीपात्राच्या बाळबोध आकलनाचे दर्शन होते. आत्मा कधीही मरत नसतो. असो. ह्याविषयावर अन्यत्र लिहुन झालेले आहे बर्‍याचदा त्यामुळे इथे पुनरावृत्ती नको. ६. सुख
त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको
सदरहु लेखिकेला काय वाटतं ? त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको ही काय तिच्या संसारात सुखी असणार आहे काय ? तीही कुढत असणारच आहे तिच्या मनात , काही ना काही खुसपट काढुन , काय मेली माझं नशीब , कोणाच्या गळ्यात बांधलं आहे बापाने? त्या राहुल सोबत लग्न केलें असतं तर आज अमेरिकेत रहात असते, इथे नुसतं घुसमटत आहे जीव. वगैरे वगैरे. संपुर्णपणे आत्मतृप्त अशा व्यक्ती विरळ्या असतात ! प्रत्येक स्त्री काही ना काही विषय काढुन मेलोड्रामा करतच असते. खुद्द रामासारखा पती असताना सोनेरी हरीण पाहिजे असा हट्ट धरुन सीतेने मेलोड्रामा केला , अन युध्दिष्ठिरासारखा न्यायनीतीमंत लोकोत्तर पती असलेल्या द्रौपदीने विनाकारण 'आंधळ्याची पोरं आंधळी' असे बोलुन मेलोड्रामा केलाच ना ! गौतमासारखा पती असुन अहिल्या इंद्रासोबत रत झालीच ना , तेही तो इंद्र आहे हे कळत असुन ! गोपिकाबाई म्हणजे खरेतर सुखाच्या परमोच्च शिखरावरची बाई- बाजीरावा सासरा, नानासाहेबांसारखा पती, विश्वासरावांसारखा सुंदर पुत्र अन माधवरावांसारखा धाकटा पुत्रही कर्तृत्ववान, असे असुनही बाई आयुष्यभर काही ना काही उपद्व्याप करुन रडतच राहिलेली आहे. असो , तात्पर्य काय तर - बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे. ७. शेवटी सर्वात महत्वाचे काय ?
माझी काय चूक होती?
सदरहु कथेतील पात्राने अनेक चुका केल्या आहेत :पण सर्वात महत्वाची चुक म्हणजे - आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे. भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. आणि समजा थांबला असता तर तो खरेच चांगला माणुस आहे हे तिलाही पटले असते कदाचित आणि पुढे ती त्याला म्हणु शकली असती की आपण एकत्र कॉलेज करु , स्वतःच्या पायावर उभे राहु अन मग ठरु , चालेल ? तो पर्यंत तू मला कॉलेजात साथ देशील का ? हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो. असो. पुढील लेखनासाठी शुभेछा !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Tue, 01/21/2025 - 12:48
हा हा हा! कथेपेक्षा टीका मोठी ;) हो शेवटचा ७. खुप चांगल्या पद्धतीने तिची चूक काय ते सांगितले.

In reply to by प्रसाद गोडबोले

बाब्बो! छाती, पोट कंबर नी आणखी काय काय दडपणारा अणुबॉम्ब प्रतिसाद. असो. उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. सर्वप्रथम कथा काल्पनिक आहे. नायकाच्या जागी मी स्वतःला उभे केलेय नायिकेच्या जागी…. असो. खरी जरी असती तरी दखलपात्र गुन्हा कसा? मुलीला कुठून शोधून आणले असते? आणी शोधायला गेला असतात तर तिचा नवरा आणलेला लोखंडी पाईप घेऊन अंगावर धावला असता तर?… ह्यावरून एक किस्सा आठवला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात काही दाढीवाले सांगत होते की आम्ही बांग्लादेशी आहोत. काही लोक व्हिडिओ घेऊन पोलिसात गेले तर पोलिसांनी सांगितले की व्हिडिओ वरून कारवाई करता येणार नाही. लउद्या ते कोर्टात उलटून पडले तर? :) तत्समात कथेवरून स्वर्ग गाठू नका. नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ? कदाचित तिने सांगितलेही असेल पण त्याने ऐकले नसेल म्हणून ती बापापर्यंत गेली. छेड नेमकी कोणत्या रीतीने काढली ह्याबाबतीत स्पष्टोक्ती नाही. बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ?>>> काहीतरी वाईट बोलला असेल. आपल्याला काय? सगळ्याच गोष्टी नायिकेने सांगायलाच हव्या का? आणी आपण कसे ठरवणार हे मर्यादेत आहे की नाही ते? जीला बोलला तीच ठरवेल ना? नायक मराठीच आहे. पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही . असे कसे? तिने सांगितले ना पहिले २ वेळा दुर्लक्ष केले. कदाचित तिने पहिल्या दोन वेळा त्याला समजावयचा प्रयत्न केला असेल पण तिसऱ्या वेळी त्याने मर्यादा ओलांडली (ती काहीही असेल. हात धरला असेल, काहीतरी अपशब्द बोलला असेल किंवा काहीही असेल?) त्यामुळे छेड काढली हे ठरवणार नायिकाच! ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ? असे काही नाही, अनेक बेवडे बायको मुलाना सुखवस्तू ठेवतात काहीही कमी पडू देत नाहीत. पिऊन तर्र होऊन पडून असले तरी त्यांच्या पिण्यामुळे कुटुंबाची आबाळ होईल किंवा मुलांचे संरक्षण होणार नाही ह्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. नायिकेचा बाप पिऊन तर्र असला तरी आपण त्याची मुलगी असल्याने ह्या बाबतीत तरी तो समजूतदार पणा दाखवेल असे नायिकेला वाटले होते. पण कसले काय? त्या बेवड्याने किटकिट नको म्हणून तिचे लग्न लावून दिले.त्यामुळे मुलीच्या दृष्टिकोनातून पहा. बाप बेवडा आहे पण बाप आहे. आपला बाप पण तो दाखवेल असे तिला वाटले ह्यात तिची काहीही चूक नाही. ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. नाही मी ३१ वर्षांचा आहे. माझे कॉलेज हे २००९ ते २०१४ ह्या काळात होते. छोट्या शहरात (माझे धुळे) पगारपाणी, संधी कमीच असतात. त्यामुळे अनेक कुटुंब गरीब असतात. अश्या कुटुंबात बापाला (तो ही बेवड्या) नि हलाखीच्या परिस्थितीला फाट्यावर मारून जाणार कुठे? आत्मा कधीही मरत नसतो तेच तर! तिचे स्वप्न हा तिचा शरीर चालवणारा आत्मा होता नी स्वप्नांसोबत तिचा आत्माही मेलाय. (कविकल्पना समजा) बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे. ह्याबाबतीत सहमत. कदाचित तिच्या बापाने दुसर काहीतरी खुसपट काढून तिचे लग्न लावले असते? आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे. चूक! तो छेड काढत होता. प्रेमाराधना करत नव्हता. नायिकेने नि नायकाने तेच सांगितले आहे. ( मला कथा लिहितानाची माझी चूक लक्षात आलीय, मागे लागल्याचा अर्थ वेगळा होतो. तो त्रास देतोय असे तिने आईला सांगायला हवे होते. मालक, चालक, संपादक, मेहेरबान, कदरदान, कथेत योग्य तो बदल करून द्यावा अशी विनंती करतो.) भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. बरोबर. तिने आपली परिस्थिती सांगितली असती तर नायकाने दया येऊन किंवा स्वतची लाज वाटून हे थांबवलं असते. हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो. शतश सहमत. बापाला सांगणे हा मूर्खपणा होता हे नायकाने देखील कथेत कबूल केले आहे. तुम्ही कथेची छान चिरफाड केलीय. उदाहरणेही छान दिलीत. नायिकेच्या चुकाही लक्षात आणून दिल्या. ह्यावरून एक कळले की आपल्या आयुष्याला लागलेल्या ग्रहणासाठी आपणच जबाबदार असतो, दुसऱ्याकडे बोट दाखवून काही फायदा नसतो. निर्णय आपल्याला घेता आलेला नसतो. खूप खूप आभार.

कर्नलतपस्वी Tue, 01/21/2025 - 14:01
समाजात अनेक प्रकारच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया,प्रतिसाद येतात. कोण चुक कोण बरोबर या निष्कर्षाप्रत पोहचणे व आपलाच निष्कर्ष बरोबर असे म्हणणे किंवा कथेतील पात्रां कडे वाचकाने आपल्या दृष्टीकोनातून बघणे स्वाभावीकच. कथानक,पात्र,घटना कशा मांडाव्या हा लेखकाचा ह्क्क तर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद हा वाचकांचा ह्क्क. टोकाची चिरफाड संयुक्तिक, कथेला न्याय देणारी नसते असे माझे मत. असो निंदकाचे घर असावे शेजारी. गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते. नाही, नाही ते पॅथॉलॉजिस्ट जास्त चांगले झाले असते. कथेचे (शव) विच्छेदन अतिशय सुंदर केले आहे.

कर्नलतपस्वी Tue, 01/21/2025 - 14:01
समाजात अनेक प्रकारच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया,प्रतिसाद येतात. कोण चुक कोण बरोबर या निष्कर्षाप्रत पोहचणे व आपलाच निष्कर्ष बरोबर असे म्हणणे किंवा कथेतील पात्रां कडे वाचकाने आपल्या दृष्टीकोनातून बघणे स्वाभावीकच. कथानक,पात्र,घटना कशा मांडाव्या हा लेखकाचा ह्क्क तर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद हा वाचकांचा ह्क्क. टोकाची चिरफाड संयुक्तिक, कथेला न्याय देणारी नसते असे माझे मत. असो निंदकाचे घर असावे शेजारी. गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते. नाही, नाही ते पॅथॉलॉजिस्ट जास्त चांगले झाले असते. कथेचे (शव) विच्छेदन अतिशय सुंदर केले आहे.

टर्मीनेटर Tue, 01/21/2025 - 15:29
अरेरे... (लेखक महराष्ट्रातील कट्टर मराठी भाषा प्रेमी असल्याने आणि कथानकाचे स्थळ-काळ नमुद केलेला नसल्याने स्थळ=महराष्ट्र आणि काळ=गेली ३-४ दशके असे गृहीत धरुन) फुले-शाहुंच्या महराष्ट्रात सावित्रीच्या एका लेकीच्या शिक्षणाची अशा प्रकारे झालेली हेळसांड आणि त्यातुन उद्भवलेला पुढचा दैवदुर्विलास वाचुन काळजाला भोके पडली... ह्याच साठी केला होता का अट्टाहास त्या महात्म्यांनी(?)

सर्वप्रथम , कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. मिपा प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी. आता कथा का आवडाली नाही ह्यावर काही टिपण्ण्या : १. छेड काढणे म्हणाजे नक्की काय ?
माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा
नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ?
त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली
बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ? २. मागे लागणे म्हणजे नक्की काय ?
माझ्या मागे लागतोय तो.
कथेतील लेखक स्त्रीपात्राच्या मागे लागलाय म्हणजे नक्की काय केले त्याने ? कारण विशिष्ठ मर्यादेत राहुन स्त्री सोबत प्रणयाराधन करणे हे छेड काढणे कसे असु शकते ? विशेषतः, कथेतील स्त्रीने त्या लेखकाला स्पष्टपणे "मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही, मला तुझ्याविषयी काहीही शृंगारिक भावना नाहीत" असे स्प्पष्ट सांगितल्याचे कथेतुन कोठेही निदर्शनास येत नाही. कॉलेजमध्ये , वयात आलेल्या मुलांनी वयात आलेल्या मुलींसोबत विशिष्ठ सभ्य मर्यादेत राहुन प्रणयाराधन करणे , साध्या मराठीत - पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही . ३. अनाकलनीय निर्बुध्दता सदरहु कथेतील स्त्री पात्राची दोन वाक्ये पहा :
बाप दारू पिऊन मरून पडलेला,
माझ्या मनात विश्वास होता की बाबा माझं रक्षण करतील
ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ? ४. भूतकाळातील अव्वाच्यासव्वा काल्पनिक उड्डाणे
मी शिक्षण पूर्ण करीन, नोकरीला लागीन, घराची जबाबदारी उचलू शकेन
ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. कारण आजच्या काळात असा विचार करणारी मुलगी सापडणे हे जवळपास अशक्य आहे. किमान माझ्या पाहण्यात तरी अशी एकही मुलगी नाही. घराची जबाबदारी उचलेन हा विचार मुलांच्या मनात येतो , मुलींच्या नाही. नाहीच नाही. नोकरी लागुन स्वतःच्या पायावर उभेराहिलेली मुलगी - "आयेम अ स्ट्राँग इन्डिपेंडंट वुमन , आय डोन्ट नीड मेन , फाट्यावर मारते मी ह्या दारुड्या बापाला." असेच म्हणेल. ५. आत्मा मृत्यु वगैरे वगैरे
माझ्या आत्म्याही मेलाय.
ह्या वाक्यावरुन सदरहु कथेतील स्त्रीपात्राच्या बाळबोध आकलनाचे दर्शन होते. आत्मा कधीही मरत नसतो. असो. ह्याविषयावर अन्यत्र लिहुन झालेले आहे बर्‍याचदा त्यामुळे इथे पुनरावृत्ती नको. ६. सुख
त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको
सदरहु लेखिकेला काय वाटतं ? त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको ही काय तिच्या संसारात सुखी असणार आहे काय ? तीही कुढत असणारच आहे तिच्या मनात , काही ना काही खुसपट काढुन , काय मेली माझं नशीब , कोणाच्या गळ्यात बांधलं आहे बापाने? त्या राहुल सोबत लग्न केलें असतं तर आज अमेरिकेत रहात असते, इथे नुसतं घुसमटत आहे जीव. वगैरे वगैरे. संपुर्णपणे आत्मतृप्त अशा व्यक्ती विरळ्या असतात ! प्रत्येक स्त्री काही ना काही विषय काढुन मेलोड्रामा करतच असते. खुद्द रामासारखा पती असताना सोनेरी हरीण पाहिजे असा हट्ट धरुन सीतेने मेलोड्रामा केला , अन युध्दिष्ठिरासारखा न्यायनीतीमंत लोकोत्तर पती असलेल्या द्रौपदीने विनाकारण 'आंधळ्याची पोरं आंधळी' असे बोलुन मेलोड्रामा केलाच ना ! गौतमासारखा पती असुन अहिल्या इंद्रासोबत रत झालीच ना , तेही तो इंद्र आहे हे कळत असुन ! गोपिकाबाई म्हणजे खरेतर सुखाच्या परमोच्च शिखरावरची बाई- बाजीरावा सासरा, नानासाहेबांसारखा पती, विश्वासरावांसारखा सुंदर पुत्र अन माधवरावांसारखा धाकटा पुत्रही कर्तृत्ववान, असे असुनही बाई आयुष्यभर काही ना काही उपद्व्याप करुन रडतच राहिलेली आहे. असो , तात्पर्य काय तर - बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे. ७. शेवटी सर्वात महत्वाचे काय ?
माझी काय चूक होती?
सदरहु कथेतील पात्राने अनेक चुका केल्या आहेत :पण सर्वात महत्वाची चुक म्हणजे - आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे. भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. आणि समजा थांबला असता तर तो खरेच चांगला माणुस आहे हे तिलाही पटले असते कदाचित आणि पुढे ती त्याला म्हणु शकली असती की आपण एकत्र कॉलेज करु , स्वतःच्या पायावर उभे राहु अन मग ठरु , चालेल ? तो पर्यंत तू मला कॉलेजात साथ देशील का ? हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो. असो. पुढील लेखनासाठी शुभेछा !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Tue, 01/21/2025 - 12:48
हा हा हा! कथेपेक्षा टीका मोठी ;) हो शेवटचा ७. खुप चांगल्या पद्धतीने तिची चूक काय ते सांगितले.

In reply to by प्रसाद गोडबोले

बाब्बो! छाती, पोट कंबर नी आणखी काय काय दडपणारा अणुबॉम्ब प्रतिसाद. असो. उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. सर्वप्रथम कथा काल्पनिक आहे. नायकाच्या जागी मी स्वतःला उभे केलेय नायिकेच्या जागी…. असो. खरी जरी असती तरी दखलपात्र गुन्हा कसा? मुलीला कुठून शोधून आणले असते? आणी शोधायला गेला असतात तर तिचा नवरा आणलेला लोखंडी पाईप घेऊन अंगावर धावला असता तर?… ह्यावरून एक किस्सा आठवला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात काही दाढीवाले सांगत होते की आम्ही बांग्लादेशी आहोत. काही लोक व्हिडिओ घेऊन पोलिसात गेले तर पोलिसांनी सांगितले की व्हिडिओ वरून कारवाई करता येणार नाही. लउद्या ते कोर्टात उलटून पडले तर? :) तत्समात कथेवरून स्वर्ग गाठू नका. नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ? कदाचित तिने सांगितलेही असेल पण त्याने ऐकले नसेल म्हणून ती बापापर्यंत गेली. छेड नेमकी कोणत्या रीतीने काढली ह्याबाबतीत स्पष्टोक्ती नाही. बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ?>>> काहीतरी वाईट बोलला असेल. आपल्याला काय? सगळ्याच गोष्टी नायिकेने सांगायलाच हव्या का? आणी आपण कसे ठरवणार हे मर्यादेत आहे की नाही ते? जीला बोलला तीच ठरवेल ना? नायक मराठीच आहे. पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही . असे कसे? तिने सांगितले ना पहिले २ वेळा दुर्लक्ष केले. कदाचित तिने पहिल्या दोन वेळा त्याला समजावयचा प्रयत्न केला असेल पण तिसऱ्या वेळी त्याने मर्यादा ओलांडली (ती काहीही असेल. हात धरला असेल, काहीतरी अपशब्द बोलला असेल किंवा काहीही असेल?) त्यामुळे छेड काढली हे ठरवणार नायिकाच! ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ? असे काही नाही, अनेक बेवडे बायको मुलाना सुखवस्तू ठेवतात काहीही कमी पडू देत नाहीत. पिऊन तर्र होऊन पडून असले तरी त्यांच्या पिण्यामुळे कुटुंबाची आबाळ होईल किंवा मुलांचे संरक्षण होणार नाही ह्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. नायिकेचा बाप पिऊन तर्र असला तरी आपण त्याची मुलगी असल्याने ह्या बाबतीत तरी तो समजूतदार पणा दाखवेल असे नायिकेला वाटले होते. पण कसले काय? त्या बेवड्याने किटकिट नको म्हणून तिचे लग्न लावून दिले.त्यामुळे मुलीच्या दृष्टिकोनातून पहा. बाप बेवडा आहे पण बाप आहे. आपला बाप पण तो दाखवेल असे तिला वाटले ह्यात तिची काहीही चूक नाही. ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. नाही मी ३१ वर्षांचा आहे. माझे कॉलेज हे २००९ ते २०१४ ह्या काळात होते. छोट्या शहरात (माझे धुळे) पगारपाणी, संधी कमीच असतात. त्यामुळे अनेक कुटुंब गरीब असतात. अश्या कुटुंबात बापाला (तो ही बेवड्या) नि हलाखीच्या परिस्थितीला फाट्यावर मारून जाणार कुठे? आत्मा कधीही मरत नसतो तेच तर! तिचे स्वप्न हा तिचा शरीर चालवणारा आत्मा होता नी स्वप्नांसोबत तिचा आत्माही मेलाय. (कविकल्पना समजा) बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे. ह्याबाबतीत सहमत. कदाचित तिच्या बापाने दुसर काहीतरी खुसपट काढून तिचे लग्न लावले असते? आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे. चूक! तो छेड काढत होता. प्रेमाराधना करत नव्हता. नायिकेने नि नायकाने तेच सांगितले आहे. ( मला कथा लिहितानाची माझी चूक लक्षात आलीय, मागे लागल्याचा अर्थ वेगळा होतो. तो त्रास देतोय असे तिने आईला सांगायला हवे होते. मालक, चालक, संपादक, मेहेरबान, कदरदान, कथेत योग्य तो बदल करून द्यावा अशी विनंती करतो.) भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. बरोबर. तिने आपली परिस्थिती सांगितली असती तर नायकाने दया येऊन किंवा स्वतची लाज वाटून हे थांबवलं असते. हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो. शतश सहमत. बापाला सांगणे हा मूर्खपणा होता हे नायकाने देखील कथेत कबूल केले आहे. तुम्ही कथेची छान चिरफाड केलीय. उदाहरणेही छान दिलीत. नायिकेच्या चुकाही लक्षात आणून दिल्या. ह्यावरून एक कळले की आपल्या आयुष्याला लागलेल्या ग्रहणासाठी आपणच जबाबदार असतो, दुसऱ्याकडे बोट दाखवून काही फायदा नसतो. निर्णय आपल्याला घेता आलेला नसतो. खूप खूप आभार.

कर्नलतपस्वी Tue, 01/21/2025 - 14:01
समाजात अनेक प्रकारच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया,प्रतिसाद येतात. कोण चुक कोण बरोबर या निष्कर्षाप्रत पोहचणे व आपलाच निष्कर्ष बरोबर असे म्हणणे किंवा कथेतील पात्रां कडे वाचकाने आपल्या दृष्टीकोनातून बघणे स्वाभावीकच. कथानक,पात्र,घटना कशा मांडाव्या हा लेखकाचा ह्क्क तर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद हा वाचकांचा ह्क्क. टोकाची चिरफाड संयुक्तिक, कथेला न्याय देणारी नसते असे माझे मत. असो निंदकाचे घर असावे शेजारी. गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते. नाही, नाही ते पॅथॉलॉजिस्ट जास्त चांगले झाले असते. कथेचे (शव) विच्छेदन अतिशय सुंदर केले आहे.

कर्नलतपस्वी Tue, 01/21/2025 - 14:01
समाजात अनेक प्रकारच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया,प्रतिसाद येतात. कोण चुक कोण बरोबर या निष्कर्षाप्रत पोहचणे व आपलाच निष्कर्ष बरोबर असे म्हणणे किंवा कथेतील पात्रां कडे वाचकाने आपल्या दृष्टीकोनातून बघणे स्वाभावीकच. कथानक,पात्र,घटना कशा मांडाव्या हा लेखकाचा ह्क्क तर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद हा वाचकांचा ह्क्क. टोकाची चिरफाड संयुक्तिक, कथेला न्याय देणारी नसते असे माझे मत. असो निंदकाचे घर असावे शेजारी. गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते. नाही, नाही ते पॅथॉलॉजिस्ट जास्त चांगले झाले असते. कथेचे (शव) विच्छेदन अतिशय सुंदर केले आहे.

टर्मीनेटर Tue, 01/21/2025 - 15:29
अरेरे... (लेखक महराष्ट्रातील कट्टर मराठी भाषा प्रेमी असल्याने आणि कथानकाचे स्थळ-काळ नमुद केलेला नसल्याने स्थळ=महराष्ट्र आणि काळ=गेली ३-४ दशके असे गृहीत धरुन) फुले-शाहुंच्या महराष्ट्रात सावित्रीच्या एका लेकीच्या शिक्षणाची अशा प्रकारे झालेली हेळसांड आणि त्यातुन उद्भवलेला पुढचा दैवदुर्विलास वाचुन काळजाला भोके पडली... ह्याच साठी केला होता का अट्टाहास त्या महात्म्यांनी(?)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं. पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा.

काकडेच्या खुन्याची कथा.

भागो ·

सौंदाळा Wed, 03/12/2025 - 09:45
कथा आवडली पण नेहमीचा भागो टच मिसिंग वाटला

सौंदाळा Wed, 03/12/2025 - 09:45
कथा आवडली पण नेहमीचा भागो टच मिसिंग वाटला
लेखनविषय:
काकडेच्या खुन्याची कथा. तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते.

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

प्रसाद गोडबोले ·

वामन देशमुख Mon, 01/20/2025 - 06:51
+१ --- माझा प्रतिसाद वरचा तेवढाच आहे. या लेखावर अजून काही प्रतिक्रिया देणे म्हणजे ताजमहालाला वीट लावण्यासारखं आहे. _/\_

सुबोध खरे Mon, 01/20/2025 - 11:23
प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही . यावर श्री रा भि जोशी यांनी नर्मदा परिक्रमेतील एक अनुभव लिहिला आहे तो येथे उद्धृत करत आहे. ( हा १९५६ सालची गोष्ट आहे) नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना एका ठिकाणी एका गुफेच्या बाहेर लिहिलेले आढळले. १० पैशात ब्रम्हदर्शन. त्यांनी १० पैशात ब्रम्हदर्शन करावे म्हणून आतमध्ये प्रवेश केला. तेथे एक साधू धुनीसमोर ध्यानस्थ तप करत बसला होता. पाच मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि विचारले. आपला हेतू सांगितल्यावर त्या साधूने जोशींना तेथे १० पैसे ठेवायला सांगितले आणि खडीसाखरेचा खडा दिला. आणि म्हणाला हा खा. खडीसाखर खाल्ल्यावर साधूने विचारले कि कसा लागला जोशी - गोड साधु - गोड म्हणजे कसा? गुलाबजाम सारखा? जोशी -नाही साधु - मग जिलबी सारखा? जोशी -नाही. साधु - मग गोड म्हणजे कसा? जोशी - ते कसं सांगणार? त्यासाठी तुम्हाला खाऊन बघायला पाहिजे साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं. दुसर्याने देऊन ब्र्म्हदर्शन होत नाही

In reply to by मारवा

दॅट्स द व्होल पॉईंट ! 10 paise https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9d/10_Indian_paise_%281965%29.jpg कुठल्यातरी धातुच्या तुकड्यावर काही तरी लिहिलेलं आहे किंव्वा कोणत्यातरी कागदाच्या चिटोर्‍याला रंग देऊन कोणीतरी ह्याला 'पैसे/ रुपये' म्हणत आहे, तरी तुम्हाला ठामपणे ठाऊक आहे की मुल्य म्हणजे काय ! इतके ठामपणे की तुम्ही ते परत मागत आहात ! तुम्हाला मुल्य म्हणजे काय हे दाखवता येत नाही , पण 'कळंत' तर आहे ! नाणे , नोटा हे केवळ निर्देशक आहे मुल्याचे ! मुल्य म्हणजे नाणे नव्हे ! तसेच 'गोडीचे' आहे , तुम्हाला गोडी म्हणजे काय हे कोणालाच दाखवता येणार नाही, खडीसाखर केवळ निर्देशक आहे त्या गोडीची ! तुम्हाला गोडी ही स्वतःची स्वतःच अनुभवावी लागेल ! आणि समजा तुमच्या अनुभवास आले की ही गोडी म्हणजे काय आहे तरी तुम्ही ती कोणालाही समजाऊन शकणार नाहीये ! तुम्ही केवळ निर्देशक शब्द वापरु शकाल . दॅट्स द मॅक्स दॅट यु कॅन डू ! दॅट्स द सिंग्युलॅरिटी ! कळ्ळं का ? उपरोधाने नाही , मनापासुन कळकळीने विचारत आहे , कळंलं का ? आर यु गेटींग इट ? --- कोणाला कळ्ळं काय किंवा नाही कळ्ळं काय , त्या 'सिंग्य्लॅरिटीला' काही फरक पडत नाही ! ज्यांना "कळ्ळं " असं वाटतंय त्यांना बस निमिष मात्र हा आनंद आहे की - "हेच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणत होते !!!!! " . आणि पुढच्या क्षणी तोही आनंद विरुन जाणार आहे त्या सिंग्युलॅरिटीमध्ये ! तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥ जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥ कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ ||ॐ||

In reply to by सुबोध खरे

वामन देशमुख Tue, 01/28/2025 - 15:53
साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं.
हा अनुभव-किस्सा आवडला. अर्थात हे इतरही अनेक ठिकाणी लागू पडू शकते. आम्ही तीन मित्र मध्यरात्री दोन-अडीच वाजता वैष्णोदेवी देऊळ डोंगराच्या पायऱ्या उतरत होतो. त्यावेळी एका विशिष्ट वळणावर कुठेतरी सोनचाफ्याची झाडे होती. अर्थात अंधारात ती झाडे दिसत नव्हती. पण त्या झाडांच्या फुलांचा अतिशय मनमोहक सुगंध येत होत होता. तितका उत्कट सुगंध त्यापूर्वी कधीही आला नव्हता. पंधरावीस मिनिटे आम्ही तो सुगंध अनुभवत तिथेच थांबून होतो. तो अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे! तसा विलक्षण सुगंधानुभव पुन्हा कुठेही कधीही मिळाला नाही.

सोत्रि Mon, 01/20/2025 - 19:31
प्रत्यक्ष अनुभुती शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
यथार्थ! - (मुमूक्षू) सोकाजी

राघव Mon, 01/20/2025 - 22:44
ठाकुरही तेच म्हणतात ना - "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही" !! अर्थात् ब्रह्म म्हणजे काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही. ते वर्णनातीत आहे.

मारवा Sun, 01/26/2025 - 21:09
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही. म्हणजे अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते. ती तशी जर खरी मानली एकवेळ तर जे यथार्थ आहे that which is ते जे रोज अनुभवायला येते ते भले बुरे अनेकदा बुरेच अनाकलनीय दुखरे टोकदार भयाण वास्तव जे अनेक अक्राळ विक्राळ तोंडणी आपल्या दैंदिन जीवनात आपल्या समोर ठाकलेले असते. त्यापासून पालयनसाठी दिलं के बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है. कारण तो anesthesia सारखं काम करतो. जबाबदारी पासून मुक्ता करतो तात्कालिक pleasure देतो. एक प्रकारचं वैचारिक हस्तमैथुन ज्यात काहीही इमॅजिन करू शकतो.

In reply to by मारवा

तथास्तु ! :) अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा Mon, 01/27/2025 - 07:06
जडभूतविकारेषु चैतन्यं यत्तु दृश्यते । ताम्बूलपूगचूर्णानां योगाद् राग इवोत्थितम् ।। That is, being in agony over the impermanent we hopefully pursue what we call the permanent. The motive of our search is to find comfort in the ideal of the permanent, and this ideal is born of impermanency, it has grown out of the pain of constant change. The ideal is unreal, whereas the pain is real; but we do not seem to understand the fact of pain, and so we cling to the ideal, to the hope of painlessness. Thus there is born in us the dual state of fact and ideal, with its endless conflict between what is and what should be. The motive of our search is to escape from impermanency, from sorrow, into what the mind thinks is the state of permanency, of everlasting bliss. But that very thought is impermanent, for it is born of sorrow. The opposite, however exalted, holds the seed of its own opposite. Our search, then, is merely the urge to escape from what is.

In reply to by मारवा

परत एकदा तेच म्हणतो ... "तथास्तु" मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किं वदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ ११ ॥ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा Mon, 01/27/2025 - 15:58
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन. मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच. आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी

In reply to by मारवा

मी माझे लेखन किमान ३ ते ४ वेळा वाचुनच प्रकाशित करतो पण तुमचा हा प्रतिसाद पाहुन बुचकळ्यात पडल्याने मी वरील लेखन परत दोन वेळा वाचले ! अहाहा . मजा आली ! त्यामुळे आधी तुम्हाला धन्यवाद देतो :)
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन.
तुम्ही एक तर लेख नीट वाचलाच नाहीये किंवा वाचुन तुम्हाला कळाला नाहीये , किंवा तुम्ही माझे नाव वाचुन आधीच ठरवुन आला होता की काय प्रतिसाद द्यायचे ! मी लेखाचे नावच सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स असे लिहिले आहे , तस्मात तुम्ही वापरलेले हे सगळे शब्द केवळ इव्हेंट होरायझन वर आहेत ! आणि कसलं वंदन अन कसलं काय ? कोण कोणाला काय वंदन करणार ? हे सगळे इव्हेंट होरायझॉनवर , "सिंग्युलॅरिटी" मध्ये नाही !
मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच.
मायेचे आवरण , झाकलेले ब्रह्म वगैरे शब्द तुमचे बाळबोध आकलन आणि तुम्ही लेख वाचलाच नाही ह्याची प्रतीती देत आहेत ! . तुम्हाला कळणार नाहीयेच , पण तरीही रिव्हिजन म्हणुन लिहिति - माया ह्या शब्दाची व्युतप्त्तीच या मा सा माया अर्थात जी नाहीच ती म्हणजे माया अशी आहे . ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी अतिषय सुंदर ओवी लिहिली आहे -
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥
पुढे माऊली म्हणतात :
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥
बाकी तुम्ही शुद्र वगैरे म्हणालात त्यातुन तुमचे पुर्वग्रहदुषित अंतःकरण दिसुन येते , कारण मी माझ्या लेखनात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र , एकुणच सनातन वर्णाश्रम धर्म ह्या विषयी चकार शब्द काढलेला नाही . समर्थांनी स्पष्ट म्हणुन ठेवलं आहे -
ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥
तुमचे पुर्वग्रह तुमच्यापाशी , मला त्यांचा स्पर्ष होत नाही. मी कित्येक अशा शुद्रवर्णातील लोकांना ओळखतो ज्यांचे सनातन धर्मावर , वर्णाश्र्रम व्यवस्थेवर ठाम श्रध्दा आहे , आणि मी एका अशा महाभाग ब्राह्मणालाही ओळखतो जो भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतो आहे. माझ्या लेखी हे असे शुद्र अशा ब्राह्मणांपेक्षा कैकपटीने उच्च आहेत ! आणि तुम्ही लेख नीट वाचला तर तुम्हाला लेखाच्या शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांच्या ब्रह्मानुभुतीचा अभंग दिसेल . तुकोबा स्वतःहुनच "याति शुद्र केला वेवसाय " असे म्हणाले आहेत . तरी त्यांच्या अभंगात मला तीच झलक दिसते जी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात आहे , समर्थांच्या श्लोकात आहे ! फक्त त्यासाठी दृष्टी पाहिजे ! जोवर तुम्ही "मी शुद्र" ह्या अहंकाराला कवटाळुन बसला आहात तोवर तुम्हा सिंग्युलॅरिटी तर सोडाच पण इव्हेंट होरायझॉन देखील दिसणार नाही !
आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी
आता हे तुम्ही उपरोधिक पणे लिहिले आहे की खर्‍या श्रध्देने हे तुमचे तुमालाच ठाऊक , पण कसेही असले तरी परत एकदा तेच म्हणतो जे आधी दोन वेळा म्हणालो आहे - तथास्तु ! अर्थात तसेच असो ! जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ इत्यलम ! अवांतर : समुद्रमंथनाच्या वेळेला जेव्हा भगवान विष्णु मोहिनी रुप घेऊन देवांना अमृत वाटत होते तेव्हा मायावी राहु देवांचे रुप घेऊन त्यांच्या प़तीत जाऊन बसला, इतकेच नव्हे तर त्याने चक्क अमृत प्राशनही केले पण ते लक्षात आल्यावर भगवंतांनी तत्काळ सुदर्शनचक्राने त्याच्या शिरछेद केला आणि अमृत पोटात जाऊन पचण्या आधीच राहु मेला ! अमृत प्राशन करुन देखील मेला ! अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ फार मजेशीर गोष्ट आहे नै ! =))))

In reply to by मारवा

Bhakti Mon, 01/27/2025 - 11:41
पण पाश्चात्य लोक ब्रम्ह शोधण्याऐवजी भौतिक गोष्टींमागे अभ्यास करू लागले.त्यामुळे त्यांनी अधिक प्रगती केली का?असा मला तर प्रश्न पडतो.ब्रम्ह सर्वांमध्ये आहे तर ते शोधायचे कुठे? ब्रम्हज्ञान प्राप्ती झाली हे ओळखायचं कसं?

In reply to by Bhakti

मारवा Mon, 01/27/2025 - 14:03
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत.

In reply to by Bhakti

मारवा Mon, 01/27/2025 - 14:05
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत. शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. Watertight किंवा वर्तुळ पूर्ण करणारी theory शुद्ध तत्त्वज्ञानाचा अनुसार अमान्य असते.

In reply to by मारवा

Bhakti Mon, 01/27/2025 - 14:42
त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. अगदी अगदी.. ब्रम्ह संकल्पनेच्या? यशाचे हे एक मोठे कारण आहे...आनंद! गोळीबंद संकल्पना नव्हतं माहिती, नवीन समजलं.

In reply to by मारवा

स्वधर्म Mon, 01/27/2025 - 19:30
- या दिलासादायक संकल्पना आहेत. - त्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. - शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. मारवा, तुमची वरील वाक्ये अगदी मनोमन पटली आहेत. मूळ थियरी खूप छोटी असली तरी त्यावर हजारो श्लोकांचा, पाचशे पानांचा ग्रंथ भाषाप्रभू लोक पाडतात. जे तसले ग्रंथ वाचत नाहीत, बौध्दिक चर्चा करत नाहीत, ती साधी लोकं अगदी दिपून जातात, भक्त बनतात. आणि जे लोक परिश्रम करून ग्रंथ वाचतात, त्यांना प्रश्न पडले, नाही पटले, तरी संक कॉस्ट फ॓लसी तयार झाल्याने सोडू शकत नाहीत. उलट त्यातच आणखी भर घालत रहातात. बुध्दाने याला बुध्दिविलास, वाणीविलास म्हटले आहे, आणि अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

In reply to by मारवा

सोत्रि Wed, 01/29/2025 - 09:41
अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते.
दुर्दैवाने हे तंतोतंत खरे आहे.
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही
ह्याला कारणीभूत आहे वरच्या परिच्छेदातील पंथ आणि त्यांची माडणी. अध्यात्माला शास्त्रिय दृष्टीकोनातून न बघता त्यात इश्वरी, दैवी, धार्मिक अंगाने बघून कृतीवर भर न देता शब्दांचे अवडंबर केल्याने ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेयेऊ शकत नाही. भूमितीमधे प्रमेय सोडवण्याची एक पद्धत आहे. प्रमेयाची सिद्धता खालील पायर्‍यांनी करतात.
  1. पक्ष
  2. साध्य
  3. सिद्धता
  4. निष्कर्ष
अध्यात्मात दुर्दैवाने पक्ष साध्य आणि निष्कर्ष ह्यांचा जयघोष केला गेलाय. अगणीत शब्दसंपदा केवळ ह्यावरच खर्च केलेली आहे. सिध्दता म्हणजे पक्ष आणि साध्य यांच्या निष्कर्षापर्यंत खात्रीने पोहोचण्याचा मार्ग, तंत्र, पध्दती, कार्यप्रणाली नेमकं हेच हरवलेलं आहे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे नेमकं काय आणि तो खात्रीने नेमका कसा होईल हे ह्याची पध्दती, कार्यप्रणाली कोणीच सांगत नाही. त्याऐवजी शाब्दिक बुडबुडे सोडून निष्कर्षाचा जयघोष केला जातो. त्याने पंथ, गुरू, बुवा, (स्वयं)सिद्ध ह्यांची भरमार होते. बर्‍याच साधनाप्रणालींची अभ्यास केल्यानंतर विपश्यना साधनाप्रणाली ही सिद्धते वर भर देणारी आणि सुस्प्ष्ट मार्ग आणि तंत्र उलगडून सांगणारी साधनाप्रणाली आहे ह्याचा साक्षात्कार झाला.' शरीर आणि मन म्हणजे आपण नाही' म्हणजे नेमकं काय आणि त्याची अनुभूती (साक्षात्कार), आपली आपण, कोणतेही जयघोष करणारे ग्रंथ, पुस्तके, शास्त्र-पुराणे न वाचता, कशी करून घ्यायचे ह्याची कृती विपश्यना शिकवते. त्यामुळे, 'ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही' असं म्हणणं रास्त होणार नाही. - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

हवालदार Wed, 01/29/2025 - 15:17
यम नियमचे महत्व समजावुन देणारा राम ७ वा, योग समजवणारा योगेश्वर ८ वा आणि ब्रह्म कसे अनुभवयाचे हे समजावणारा बुद्ध ९ वा अवतार समजले जात असावेत .

In reply to by सोत्रि

स्वधर्म Wed, 01/29/2025 - 17:27
वरील विवेचनाच्या शब्दाश्ब्दाशी सहमत. शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद अवर्णनीय आहे.

In reply to by स्वधर्म

है का !
शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद
हेच आम्ही सांगितलं तर तुम्हाला पटत नाही . गट क्रमांक १ आणि २ हे अन डिस्युटेबल आहेत . गट क्रमा़ १ मधील कोणीही काहीही लिहिलं तरी तुम्हाला शब्दाचा पिसारा वाटणार आहे . साधं सोप्पं आहे बघा , १९५६ साली बाबासाहेबांनी समस्त जगाला बुध्दाचा मार्ग दाखवुन दिलेला आहे . तुम्ही कशाला ह्या गट क्रमा़ १ वाल्यांच्या शब्दाचा पसारा अन भुलवणारे ग्रंथ वगैरे बघत बसता ! सरळ विपश्यना करा ! मोक्ष बिक्ष आत्मा ब्रह्म बिम्ह सब झूट आहे हे तुम्हाला माहीत आहेच की आधीच ! कशाला तुम्ही हा शब्दांचा पिसारा बघुन त्रास करुन घेताय ? देश स्वतंत्र आहे , ग्रंथ बिंथ जाळायला तुम्हाला मोकळीक आहे ! अगदीच हा लेख आवडला नसेल तर ह्या लेखाची प्रिंट काढुन जाळा ! जाळपोळ करायची परंपरा ही आहेच ! पण ज्यांना शब्दांचा पिसारा फुलवायचा आहे , ग्रंथ वगैरे वाचायचे आहेत त्यांना वाचु द्या की ! त्यांन्नी तुम्हाला आमंत्रण दिले आहे का वाचायचे ? कि तुम्हाला त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची आहे ? तुम्ही तुमच्या आनंदात रहा , त्यांना त्यांच्या आनंदात राहु दे ! तुम्ही बुध्दाच्या मार्गाचे आचरण केले तर त्यात आम्हाला आनंदच आहे कारण आम्ही बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानतोच ! एके हाती दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ||१-१२|| असे म्हणुन माऊलींनी बौध्दमताला गणेशाचा रुपात स्थान दिलेले आहेच ना ! कसेही करा , कोणताही मार्ग आचरा , किंवा कोणताही मार्ग टाळा . आमची कसली सक्ती नाही कि कसला आग्रह नाही ! आमचं काही भांडण नाही विपश्यनेशी . उलट आम्हालाही कौतुकच आहे ! जो जे वांच्छील तो ते लाहो हीच आमची प्रार्थना आहे पहिल्यापासुन ! म्हणुनच म्हण्तो - तथास्तु !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 01/30/2025 - 23:27
मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता? स्वांतसु़खाय म्हणता आणि सुरूवातच प्रत्येकाला कळायला पाहिजे असं नाही म्हणत बहुतेक लोकांना तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान (?) कळणार नाही, असं आधीच सांगता? बरं जर स्वांतसुखायच लिहायचं आहे, तर सार्वजनिक संसंसळावर मुळात टाकता तरी का? (याचं उत्तर खरं तर सगळ्यांना माहित आहे :-) ) इथे टाकलं तर लोक त्यांचे विचार न पटले मांडणारच ना? असो. वेदांचा तो अर्थ | आंम्हासिच ठावा || येरांनी वहावा | भार माथा || हे तुकोबांचे बोल मनोमन पटलेला, - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता?
तुम्ही इतर प्रतिसाद वाचत नाही काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी खालीच एका प्रतिसादात आधीच दिले आहे - मला मजा येत आहे म्हणुन ! तुम्हाला पटलं तरी हरकत नाही , नाही पटलं तरी हरकत नाही . आम्ही तुमच्या भाषेत "शब्दांचा पिसारा " फुलवत राहु , तुम्ही बस त्रास करुन घेऊ नका ! बाकी ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचताय , वेदांचा अर्थ समजुन घेताय हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे , मग मजा तर येणारच ना ! :)

कॉमी Tue, 01/28/2025 - 18:51
एका बाबीचे रिकन्सिलेशन मला कधी करता आले नाही. जर आपण मन नाही, शरीर तर नाहीच नाही - हे मनापासून पटले तर माणूस का ऐहिक बाबींमध्ये वेळ घालवेल? त्यांच्या दृष्टिकोनातून हे करणे म्हणजे जो माणूस आपल्या कपड्यांना इस्त्री करण्यात दररोज बरा तस घालवतो त्याच्याइतकीच निष्फळ घालमेल नाही का? म्हणजे बुवा आमच्यासारखी भौतिक जडवादी मंडळी नऊ ते पाच कामाला जातात हे समजण्यासारखे आहे. आम्ही स्वतःला शरीरापासून वेगळे समजत नाही. आम्हाला स्वतःला अर्थात शरीराला सुख, शांती, समाधान द्यायचे आहे. पण स्वतःला ब्रम्ह समजणारी मंडळी का करतात हे सगळे उद्योग? म्हणजे अजून स्वतःचा साक्षात्कार पूर्ण झाला नाहीये की आणि काही? उपरोध नाही. सिरीयस प्रश्न.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 01/28/2025 - 19:10
कारण सनातननुसार ब्रम्हज्ञानानंतर आत्मसुखासाठी /परम कल्याणासाठी संन्यास अथवा कर्मयोगी यापैकी दोन मार्ग स्वीकारायचे असतात.ज्या अर्थी त्यांनी संन्यास स्विकारला नाही.त्याअर्थी त्यांंनी निष्काम कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला आहे.

In reply to by Bhakti

कॉमी Tue, 01/28/2025 - 20:03
मार्ग आहेत हे ठीक. पण का? ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात? गरज काय आहे? जर स्वतःला इतके स्वतःच्या भावना आणि अशाश्वत गोष्टींपासून अलिप्त करायचे आहे तर मग तेच टिकवण्याची मरमर काय म्हणून?

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 01/28/2025 - 21:13
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही.ब्रम्ह म्हणजे हेच तर की सगळेच जीव/आत्मा जुळलेले आहेत.कर्मयोगीसाठी शरीर हे कर्माचे माध्यम आहे,त्याचा त्याग/ त्याच्या श्रेयसाचा त्याग सर्वांचा समतोल बिघडवतो.

In reply to by Bhakti

कॉमी Tue, 01/28/2025 - 22:32
ब्रम्हाला कर्माची फिकीर कशाला? ब्रम्हाच्या पातळीवर जर दोन काही नाहीच तर पाप पुण्य आलेच कुठून? जर ब्रम्ह सोडून इतर काही नाहीच, आणि साक्षात्कार म्हणजे आपण ब्रह्म आहोत, हा असेल, तर मग ऐहिक गोष्टींची चिंता कशासाठी?

In reply to by कॉमी

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः | या स्वया पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता || एका सुगम अशा भगवद्गीतेचा अभ्यास करा , बाकी इतर सार्‍या शास्त्रांची काय गरज आहे ? ही भगवग्द्गीता जी की साक्षात पद्मनाभ विष्णुंच्या वासुदेवाचा मुखातुन उत्पन्न झालेली आहे ! तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भग्वद्गीतेतील तिसर्‍या अध्यायात मिळेल कारण दुसर्‍या अध्यायात भगवंतान्नी सांख्ययोग विषद केल्यावर अर्जुनाने एक्झॅक्टली हाच प्रश्न भगवंताला विचारला होता की , हे ज्ञान , ही स्थितप्रज्ञ अवस्था , ही ब्राह्मी स्थिती जर सर्व श्रेष्ठ आहे तर मग तुम्ही मला निष्कारण ह्या कर्माच्या फेर्‍यात का अडकवता ? (अर्थात माझा मी आपला ब्रह्मानंदी लागली टाळी अवस्थेत सुखनैव बसतो , तिकडे खड्यात गेली दुनिया, अन हे युध्द, अन राज्य वगैरे ) त्यावर भगवंतांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे ! माऊलींनी काय निरुपण केले आहे राव . निव्वळ लोकोत्तर ! म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥ मी मुद्दाम स्पष्ट उत्तर देत नाहीये कारण माझी इच्छा आहे की ह्या निमित्ताने तुम्ही गीता ज्ञानेश्वरी उघडावी , श्रध्देने वाचावी , त्यातुन तुम्हाला बोध होईल ! I don't want to steal your joy of the discovery of truth ! मला अक्षरशः तुकोबांसारखे "माझी मज झाली अनावर वाचा" असे काहीसे ज्ञानेश्वरी वाचताना होत असल्याने माऊलींच्या अजुन काही ओव्या करतो : तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥ म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥ म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ ८३ ॥ म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥ हा कर्मयोग म्हणजे मजा आहे राव ! हे म्हणजे मायेशी कुस्ती खेळल्यासारखे आहे ! तुम्ही ध्यान धारणा साधना अभ्यास चिंतन करता अन ब्रह्मलीन होता अन मग माया म्हणते - " शिवोहं शिवोहं काय ? तुला वाटतंय ना तु ब्रह्मलीन झाला आहेस , मग आता ह्या अवस्थेत सर्वांभूतीं ब्रह्म पाहुन अन शांत , तद्रुप राहुन दाखव !" अन माया कुस्तीचा डाव टाकते , अन मग आपल्या प्रापंचिक आयुष्यात काहीतरी अडी अडचणी येतात , संकटे येतात , आणि आपण आत्मभावातुन देह भावात परत येतो . मग परत नाम , परत साधना अन परत उपासना, परत गीता ज्ञानेश्वरी दासबोध ! परत संध्यावंदन ! अन आपण परत ब्रह्मभावात लीन होतो ! अन मायेचा डाव उलटवुन लावतो ! आणि मग माया परत गालातल्या गालात हसते , म्हणते - ठीक आहे ठीक आहे ! आता हा नवीन डाव घे ! आणि मग तो डाव असतो आनंदाचा सुखाचा समाधानाचा ! आणि आपण तोही पलटवुन लावतो ! आणि मग एक वेळ अशी येते की तुम्हाला हा सगळा खेळ कळतो अन तुम्हीही तिच्या सोबत हसायला लागता आणि म्हणता - "ठीक आहे , ब्रिंग इट ऑन ! " =))

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 01/29/2025 - 08:54
आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !
अशी प्रस्तावना केल्यावर लेख 'गंगार्पणमस्तू' म्हणून सोडून देण्यातच गंमत आहे (हे माझ मत)! - (स्वांतसुखी होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

येस, इट्स ए मॅटर ऑफ चॉईस ! योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः | यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ‖ मौन धारण करणे आणि प्रश्नोत्तरे करणे दोन्ही चॉईस आहेस. दोन्ही कुस्ती ! ब्रह्मीभूत माणूस स्वच्छंद असतो. त्याला वाटलं तर तो उत्तर देतो नाहीतर तथास्तु म्हणून निघून जातो :) माऊली संजीवन समाधी घेतात , समर्थ भारत भर मठ स्थापन करून जनजागृती करतात. तुकोबा कर्जाच्या वह्या इंद्रायणीत बुडवून सगळं संसार पांडुरंगाच्या पायी अर्पण करतात , एकनाथ सगळं काही व्यवस्थित करतात अगदी सर्वसामान्य गृहस्थ माणसासारखे ! तसेच काहीसे. स्वांत सुखाय. माझा येते आहे तोवर इथे लेख प्रतिसाद गप्पा टप्पा करायच्या , कंटाळा आला की इथून निघून जायचं ! I think one of the most obvious sign of enlightenment is this sort of simple basic freedom ! This is really amazing indeed. ! जय जय रघुवीर समर्थ

In reply to by Bhakti

सोत्रि Wed, 01/29/2025 - 08:49
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.
हे कसं काय चूक आहे? नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही म्हणून हा प्रश्न आहे.
तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही
अलिप्त होण हीच मुक्ती आणि त्यासाठीच तर सर्व अट्टाहास आहे! असो, अलिप्त होऊ शकत नाही हे तुमचे म्हणणे जरा स्पष्ट करून सांगाल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti Wed, 01/29/2025 - 11:10
स्वतःचा साक्षात्कार होतो? तुमचं अस्तित्व/एखादं ज्ञान या जगात आले ते सत्य आहे साक्षात्कार नाही.उगाच mature झालो की त्याला स्वतःचा साक्षात्कार असं नावं दिलं जाते.यानुसार तर मला दर आठवड्याला स्वतः चा नवा साक्षात्कार होतो.मग काय दरवेळी मी काहीतरी समजलं इकडे पहा असं समजू का? सगळ्यांना साक्षात्कार /सत्य उमगते,सगळे mature होतात... कालावधी वेगवेगळा आहे. अलिप्तता ही कोणत्या लेव्हलची आहे.वैयक्तिक नात्यांची? तो झाला संन्यासी ..सामाजिक जबाबदारीची?..तो झाला संन्यासी. पण त्याला पण /इंद्रियांना भूक लागली की भिक्षा मागावीच लागते ना...ना इंद्रियांपासून अलिप्त ना प्रकृती पासून. संत जर अलिप्त राहिले असते तर प्रबोधन केले असते का? समाजाचे /प्रकृतीचे/सर्व जीवांचे(oneness) कल्याण व्हावे यासाठीच मार्ग देत राहतात. अलिप्त म्हणजे मुक्ती नव्हे,अलिप्त म्हणजे कल्याण व्हावे ही इच्छा तुमचं पण माझं पण सर्वांचे पण! -(दार्शनिक जिज्ञासू )भक्ती

In reply to by कॉमी

सोत्रि Wed, 01/29/2025 - 08:42
ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात
दोन उदाहरणं ह्यासाठी. १. ज्ञानेश्वर माउली, त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहीपर्यंत शरीराची उस्तभार केली. त्यानंतर त्यांनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला. २. गौतम बुद्धाला जेव्हा बोधीप्राप्ती झाली तेव्हा त्याच्यातल्या करुणेमुळे, ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी उर्वरीत जीवन त्याची शिकवण शिकवण्यासाठी शरीराची उस्तभार केली सगळे साक्षात्कारी मोस्टली ह्या दोन कॅटेगरीमधे मोडतात. - (मुमूक्षू) सोकाजी

In reply to by सोत्रि

विजुभाऊ Wed, 01/29/2025 - 14:14
ज्याना साक्षात्कार झालेला आहे. आणि शरीराची उस्तरवार करावयाची नाही. त्याना रजनीश " चलते फिरते प्रेत" असे म्हणतात. शरीराची आसक्ति असणे वेगळे आणि विरक्त असणे वेगळे. विरक्त शरीराला ही देहभोग असतातच की.

Bhakti Wed, 01/29/2025 - 11:20
प्रिय मिपाकरांनो खुप छान चर्चा झाली.पण मला लई कामे आहेत😅 त्यामुळे इथल्या शास्त्रार्थांना विराम देते, नाहीतर मंडणमिश्रांप्रमाणे गळ्यातली माळ सुटेपर्यंत टाईप केले असते 😉 अधिक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असल्यास मी सध्या जो ग्रंथ वाचतेय तो तुम्हीही वाचा.... गीतारहस्य!

वामन देशमुख Mon, 01/20/2025 - 06:51
+१ --- माझा प्रतिसाद वरचा तेवढाच आहे. या लेखावर अजून काही प्रतिक्रिया देणे म्हणजे ताजमहालाला वीट लावण्यासारखं आहे. _/\_

सुबोध खरे Mon, 01/20/2025 - 11:23
प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही . यावर श्री रा भि जोशी यांनी नर्मदा परिक्रमेतील एक अनुभव लिहिला आहे तो येथे उद्धृत करत आहे. ( हा १९५६ सालची गोष्ट आहे) नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना एका ठिकाणी एका गुफेच्या बाहेर लिहिलेले आढळले. १० पैशात ब्रम्हदर्शन. त्यांनी १० पैशात ब्रम्हदर्शन करावे म्हणून आतमध्ये प्रवेश केला. तेथे एक साधू धुनीसमोर ध्यानस्थ तप करत बसला होता. पाच मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि विचारले. आपला हेतू सांगितल्यावर त्या साधूने जोशींना तेथे १० पैसे ठेवायला सांगितले आणि खडीसाखरेचा खडा दिला. आणि म्हणाला हा खा. खडीसाखर खाल्ल्यावर साधूने विचारले कि कसा लागला जोशी - गोड साधु - गोड म्हणजे कसा? गुलाबजाम सारखा? जोशी -नाही साधु - मग जिलबी सारखा? जोशी -नाही. साधु - मग गोड म्हणजे कसा? जोशी - ते कसं सांगणार? त्यासाठी तुम्हाला खाऊन बघायला पाहिजे साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं. दुसर्याने देऊन ब्र्म्हदर्शन होत नाही

In reply to by मारवा

दॅट्स द व्होल पॉईंट ! 10 paise https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9d/10_Indian_paise_%281965%29.jpg कुठल्यातरी धातुच्या तुकड्यावर काही तरी लिहिलेलं आहे किंव्वा कोणत्यातरी कागदाच्या चिटोर्‍याला रंग देऊन कोणीतरी ह्याला 'पैसे/ रुपये' म्हणत आहे, तरी तुम्हाला ठामपणे ठाऊक आहे की मुल्य म्हणजे काय ! इतके ठामपणे की तुम्ही ते परत मागत आहात ! तुम्हाला मुल्य म्हणजे काय हे दाखवता येत नाही , पण 'कळंत' तर आहे ! नाणे , नोटा हे केवळ निर्देशक आहे मुल्याचे ! मुल्य म्हणजे नाणे नव्हे ! तसेच 'गोडीचे' आहे , तुम्हाला गोडी म्हणजे काय हे कोणालाच दाखवता येणार नाही, खडीसाखर केवळ निर्देशक आहे त्या गोडीची ! तुम्हाला गोडी ही स्वतःची स्वतःच अनुभवावी लागेल ! आणि समजा तुमच्या अनुभवास आले की ही गोडी म्हणजे काय आहे तरी तुम्ही ती कोणालाही समजाऊन शकणार नाहीये ! तुम्ही केवळ निर्देशक शब्द वापरु शकाल . दॅट्स द मॅक्स दॅट यु कॅन डू ! दॅट्स द सिंग्युलॅरिटी ! कळ्ळं का ? उपरोधाने नाही , मनापासुन कळकळीने विचारत आहे , कळंलं का ? आर यु गेटींग इट ? --- कोणाला कळ्ळं काय किंवा नाही कळ्ळं काय , त्या 'सिंग्य्लॅरिटीला' काही फरक पडत नाही ! ज्यांना "कळ्ळं " असं वाटतंय त्यांना बस निमिष मात्र हा आनंद आहे की - "हेच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणत होते !!!!! " . आणि पुढच्या क्षणी तोही आनंद विरुन जाणार आहे त्या सिंग्युलॅरिटीमध्ये ! तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥ जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥ कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ ||ॐ||

In reply to by सुबोध खरे

वामन देशमुख Tue, 01/28/2025 - 15:53
साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं.
हा अनुभव-किस्सा आवडला. अर्थात हे इतरही अनेक ठिकाणी लागू पडू शकते. आम्ही तीन मित्र मध्यरात्री दोन-अडीच वाजता वैष्णोदेवी देऊळ डोंगराच्या पायऱ्या उतरत होतो. त्यावेळी एका विशिष्ट वळणावर कुठेतरी सोनचाफ्याची झाडे होती. अर्थात अंधारात ती झाडे दिसत नव्हती. पण त्या झाडांच्या फुलांचा अतिशय मनमोहक सुगंध येत होत होता. तितका उत्कट सुगंध त्यापूर्वी कधीही आला नव्हता. पंधरावीस मिनिटे आम्ही तो सुगंध अनुभवत तिथेच थांबून होतो. तो अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे! तसा विलक्षण सुगंधानुभव पुन्हा कुठेही कधीही मिळाला नाही.

सोत्रि Mon, 01/20/2025 - 19:31
प्रत्यक्ष अनुभुती शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
यथार्थ! - (मुमूक्षू) सोकाजी

राघव Mon, 01/20/2025 - 22:44
ठाकुरही तेच म्हणतात ना - "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही" !! अर्थात् ब्रह्म म्हणजे काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही. ते वर्णनातीत आहे.

मारवा Sun, 01/26/2025 - 21:09
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही. म्हणजे अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते. ती तशी जर खरी मानली एकवेळ तर जे यथार्थ आहे that which is ते जे रोज अनुभवायला येते ते भले बुरे अनेकदा बुरेच अनाकलनीय दुखरे टोकदार भयाण वास्तव जे अनेक अक्राळ विक्राळ तोंडणी आपल्या दैंदिन जीवनात आपल्या समोर ठाकलेले असते. त्यापासून पालयनसाठी दिलं के बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है. कारण तो anesthesia सारखं काम करतो. जबाबदारी पासून मुक्ता करतो तात्कालिक pleasure देतो. एक प्रकारचं वैचारिक हस्तमैथुन ज्यात काहीही इमॅजिन करू शकतो.

In reply to by मारवा

तथास्तु ! :) अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा Mon, 01/27/2025 - 07:06
जडभूतविकारेषु चैतन्यं यत्तु दृश्यते । ताम्बूलपूगचूर्णानां योगाद् राग इवोत्थितम् ।। That is, being in agony over the impermanent we hopefully pursue what we call the permanent. The motive of our search is to find comfort in the ideal of the permanent, and this ideal is born of impermanency, it has grown out of the pain of constant change. The ideal is unreal, whereas the pain is real; but we do not seem to understand the fact of pain, and so we cling to the ideal, to the hope of painlessness. Thus there is born in us the dual state of fact and ideal, with its endless conflict between what is and what should be. The motive of our search is to escape from impermanency, from sorrow, into what the mind thinks is the state of permanency, of everlasting bliss. But that very thought is impermanent, for it is born of sorrow. The opposite, however exalted, holds the seed of its own opposite. Our search, then, is merely the urge to escape from what is.

In reply to by मारवा

परत एकदा तेच म्हणतो ... "तथास्तु" मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किं वदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ ११ ॥ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा Mon, 01/27/2025 - 15:58
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन. मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच. आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी

In reply to by मारवा

मी माझे लेखन किमान ३ ते ४ वेळा वाचुनच प्रकाशित करतो पण तुमचा हा प्रतिसाद पाहुन बुचकळ्यात पडल्याने मी वरील लेखन परत दोन वेळा वाचले ! अहाहा . मजा आली ! त्यामुळे आधी तुम्हाला धन्यवाद देतो :)
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन.
तुम्ही एक तर लेख नीट वाचलाच नाहीये किंवा वाचुन तुम्हाला कळाला नाहीये , किंवा तुम्ही माझे नाव वाचुन आधीच ठरवुन आला होता की काय प्रतिसाद द्यायचे ! मी लेखाचे नावच सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स असे लिहिले आहे , तस्मात तुम्ही वापरलेले हे सगळे शब्द केवळ इव्हेंट होरायझन वर आहेत ! आणि कसलं वंदन अन कसलं काय ? कोण कोणाला काय वंदन करणार ? हे सगळे इव्हेंट होरायझॉनवर , "सिंग्युलॅरिटी" मध्ये नाही !
मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच.
मायेचे आवरण , झाकलेले ब्रह्म वगैरे शब्द तुमचे बाळबोध आकलन आणि तुम्ही लेख वाचलाच नाही ह्याची प्रतीती देत आहेत ! . तुम्हाला कळणार नाहीयेच , पण तरीही रिव्हिजन म्हणुन लिहिति - माया ह्या शब्दाची व्युतप्त्तीच या मा सा माया अर्थात जी नाहीच ती म्हणजे माया अशी आहे . ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी अतिषय सुंदर ओवी लिहिली आहे -
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥
पुढे माऊली म्हणतात :
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥
बाकी तुम्ही शुद्र वगैरे म्हणालात त्यातुन तुमचे पुर्वग्रहदुषित अंतःकरण दिसुन येते , कारण मी माझ्या लेखनात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र , एकुणच सनातन वर्णाश्रम धर्म ह्या विषयी चकार शब्द काढलेला नाही . समर्थांनी स्पष्ट म्हणुन ठेवलं आहे -
ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥
तुमचे पुर्वग्रह तुमच्यापाशी , मला त्यांचा स्पर्ष होत नाही. मी कित्येक अशा शुद्रवर्णातील लोकांना ओळखतो ज्यांचे सनातन धर्मावर , वर्णाश्र्रम व्यवस्थेवर ठाम श्रध्दा आहे , आणि मी एका अशा महाभाग ब्राह्मणालाही ओळखतो जो भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतो आहे. माझ्या लेखी हे असे शुद्र अशा ब्राह्मणांपेक्षा कैकपटीने उच्च आहेत ! आणि तुम्ही लेख नीट वाचला तर तुम्हाला लेखाच्या शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांच्या ब्रह्मानुभुतीचा अभंग दिसेल . तुकोबा स्वतःहुनच "याति शुद्र केला वेवसाय " असे म्हणाले आहेत . तरी त्यांच्या अभंगात मला तीच झलक दिसते जी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात आहे , समर्थांच्या श्लोकात आहे ! फक्त त्यासाठी दृष्टी पाहिजे ! जोवर तुम्ही "मी शुद्र" ह्या अहंकाराला कवटाळुन बसला आहात तोवर तुम्हा सिंग्युलॅरिटी तर सोडाच पण इव्हेंट होरायझॉन देखील दिसणार नाही !
आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी
आता हे तुम्ही उपरोधिक पणे लिहिले आहे की खर्‍या श्रध्देने हे तुमचे तुमालाच ठाऊक , पण कसेही असले तरी परत एकदा तेच म्हणतो जे आधी दोन वेळा म्हणालो आहे - तथास्तु ! अर्थात तसेच असो ! जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ इत्यलम ! अवांतर : समुद्रमंथनाच्या वेळेला जेव्हा भगवान विष्णु मोहिनी रुप घेऊन देवांना अमृत वाटत होते तेव्हा मायावी राहु देवांचे रुप घेऊन त्यांच्या प़तीत जाऊन बसला, इतकेच नव्हे तर त्याने चक्क अमृत प्राशनही केले पण ते लक्षात आल्यावर भगवंतांनी तत्काळ सुदर्शनचक्राने त्याच्या शिरछेद केला आणि अमृत पोटात जाऊन पचण्या आधीच राहु मेला ! अमृत प्राशन करुन देखील मेला ! अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ फार मजेशीर गोष्ट आहे नै ! =))))

In reply to by मारवा

Bhakti Mon, 01/27/2025 - 11:41
पण पाश्चात्य लोक ब्रम्ह शोधण्याऐवजी भौतिक गोष्टींमागे अभ्यास करू लागले.त्यामुळे त्यांनी अधिक प्रगती केली का?असा मला तर प्रश्न पडतो.ब्रम्ह सर्वांमध्ये आहे तर ते शोधायचे कुठे? ब्रम्हज्ञान प्राप्ती झाली हे ओळखायचं कसं?

In reply to by Bhakti

मारवा Mon, 01/27/2025 - 14:03
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत.

In reply to by Bhakti

मारवा Mon, 01/27/2025 - 14:05
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत. शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. Watertight किंवा वर्तुळ पूर्ण करणारी theory शुद्ध तत्त्वज्ञानाचा अनुसार अमान्य असते.

In reply to by मारवा

Bhakti Mon, 01/27/2025 - 14:42
त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. अगदी अगदी.. ब्रम्ह संकल्पनेच्या? यशाचे हे एक मोठे कारण आहे...आनंद! गोळीबंद संकल्पना नव्हतं माहिती, नवीन समजलं.

In reply to by मारवा

स्वधर्म Mon, 01/27/2025 - 19:30
- या दिलासादायक संकल्पना आहेत. - त्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. - शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. मारवा, तुमची वरील वाक्ये अगदी मनोमन पटली आहेत. मूळ थियरी खूप छोटी असली तरी त्यावर हजारो श्लोकांचा, पाचशे पानांचा ग्रंथ भाषाप्रभू लोक पाडतात. जे तसले ग्रंथ वाचत नाहीत, बौध्दिक चर्चा करत नाहीत, ती साधी लोकं अगदी दिपून जातात, भक्त बनतात. आणि जे लोक परिश्रम करून ग्रंथ वाचतात, त्यांना प्रश्न पडले, नाही पटले, तरी संक कॉस्ट फ॓लसी तयार झाल्याने सोडू शकत नाहीत. उलट त्यातच आणखी भर घालत रहातात. बुध्दाने याला बुध्दिविलास, वाणीविलास म्हटले आहे, आणि अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

In reply to by मारवा

सोत्रि Wed, 01/29/2025 - 09:41
अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते.
दुर्दैवाने हे तंतोतंत खरे आहे.
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही
ह्याला कारणीभूत आहे वरच्या परिच्छेदातील पंथ आणि त्यांची माडणी. अध्यात्माला शास्त्रिय दृष्टीकोनातून न बघता त्यात इश्वरी, दैवी, धार्मिक अंगाने बघून कृतीवर भर न देता शब्दांचे अवडंबर केल्याने ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेयेऊ शकत नाही. भूमितीमधे प्रमेय सोडवण्याची एक पद्धत आहे. प्रमेयाची सिद्धता खालील पायर्‍यांनी करतात.
  1. पक्ष
  2. साध्य
  3. सिद्धता
  4. निष्कर्ष
अध्यात्मात दुर्दैवाने पक्ष साध्य आणि निष्कर्ष ह्यांचा जयघोष केला गेलाय. अगणीत शब्दसंपदा केवळ ह्यावरच खर्च केलेली आहे. सिध्दता म्हणजे पक्ष आणि साध्य यांच्या निष्कर्षापर्यंत खात्रीने पोहोचण्याचा मार्ग, तंत्र, पध्दती, कार्यप्रणाली नेमकं हेच हरवलेलं आहे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे नेमकं काय आणि तो खात्रीने नेमका कसा होईल हे ह्याची पध्दती, कार्यप्रणाली कोणीच सांगत नाही. त्याऐवजी शाब्दिक बुडबुडे सोडून निष्कर्षाचा जयघोष केला जातो. त्याने पंथ, गुरू, बुवा, (स्वयं)सिद्ध ह्यांची भरमार होते. बर्‍याच साधनाप्रणालींची अभ्यास केल्यानंतर विपश्यना साधनाप्रणाली ही सिद्धते वर भर देणारी आणि सुस्प्ष्ट मार्ग आणि तंत्र उलगडून सांगणारी साधनाप्रणाली आहे ह्याचा साक्षात्कार झाला.' शरीर आणि मन म्हणजे आपण नाही' म्हणजे नेमकं काय आणि त्याची अनुभूती (साक्षात्कार), आपली आपण, कोणतेही जयघोष करणारे ग्रंथ, पुस्तके, शास्त्र-पुराणे न वाचता, कशी करून घ्यायचे ह्याची कृती विपश्यना शिकवते. त्यामुळे, 'ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही' असं म्हणणं रास्त होणार नाही. - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

हवालदार Wed, 01/29/2025 - 15:17
यम नियमचे महत्व समजावुन देणारा राम ७ वा, योग समजवणारा योगेश्वर ८ वा आणि ब्रह्म कसे अनुभवयाचे हे समजावणारा बुद्ध ९ वा अवतार समजले जात असावेत .

In reply to by सोत्रि

स्वधर्म Wed, 01/29/2025 - 17:27
वरील विवेचनाच्या शब्दाश्ब्दाशी सहमत. शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद अवर्णनीय आहे.

In reply to by स्वधर्म

है का !
शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद
हेच आम्ही सांगितलं तर तुम्हाला पटत नाही . गट क्रमांक १ आणि २ हे अन डिस्युटेबल आहेत . गट क्रमा़ १ मधील कोणीही काहीही लिहिलं तरी तुम्हाला शब्दाचा पिसारा वाटणार आहे . साधं सोप्पं आहे बघा , १९५६ साली बाबासाहेबांनी समस्त जगाला बुध्दाचा मार्ग दाखवुन दिलेला आहे . तुम्ही कशाला ह्या गट क्रमा़ १ वाल्यांच्या शब्दाचा पसारा अन भुलवणारे ग्रंथ वगैरे बघत बसता ! सरळ विपश्यना करा ! मोक्ष बिक्ष आत्मा ब्रह्म बिम्ह सब झूट आहे हे तुम्हाला माहीत आहेच की आधीच ! कशाला तुम्ही हा शब्दांचा पिसारा बघुन त्रास करुन घेताय ? देश स्वतंत्र आहे , ग्रंथ बिंथ जाळायला तुम्हाला मोकळीक आहे ! अगदीच हा लेख आवडला नसेल तर ह्या लेखाची प्रिंट काढुन जाळा ! जाळपोळ करायची परंपरा ही आहेच ! पण ज्यांना शब्दांचा पिसारा फुलवायचा आहे , ग्रंथ वगैरे वाचायचे आहेत त्यांना वाचु द्या की ! त्यांन्नी तुम्हाला आमंत्रण दिले आहे का वाचायचे ? कि तुम्हाला त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची आहे ? तुम्ही तुमच्या आनंदात रहा , त्यांना त्यांच्या आनंदात राहु दे ! तुम्ही बुध्दाच्या मार्गाचे आचरण केले तर त्यात आम्हाला आनंदच आहे कारण आम्ही बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानतोच ! एके हाती दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ||१-१२|| असे म्हणुन माऊलींनी बौध्दमताला गणेशाचा रुपात स्थान दिलेले आहेच ना ! कसेही करा , कोणताही मार्ग आचरा , किंवा कोणताही मार्ग टाळा . आमची कसली सक्ती नाही कि कसला आग्रह नाही ! आमचं काही भांडण नाही विपश्यनेशी . उलट आम्हालाही कौतुकच आहे ! जो जे वांच्छील तो ते लाहो हीच आमची प्रार्थना आहे पहिल्यापासुन ! म्हणुनच म्हण्तो - तथास्तु !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 01/30/2025 - 23:27
मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता? स्वांतसु़खाय म्हणता आणि सुरूवातच प्रत्येकाला कळायला पाहिजे असं नाही म्हणत बहुतेक लोकांना तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान (?) कळणार नाही, असं आधीच सांगता? बरं जर स्वांतसुखायच लिहायचं आहे, तर सार्वजनिक संसंसळावर मुळात टाकता तरी का? (याचं उत्तर खरं तर सगळ्यांना माहित आहे :-) ) इथे टाकलं तर लोक त्यांचे विचार न पटले मांडणारच ना? असो. वेदांचा तो अर्थ | आंम्हासिच ठावा || येरांनी वहावा | भार माथा || हे तुकोबांचे बोल मनोमन पटलेला, - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता?
तुम्ही इतर प्रतिसाद वाचत नाही काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी खालीच एका प्रतिसादात आधीच दिले आहे - मला मजा येत आहे म्हणुन ! तुम्हाला पटलं तरी हरकत नाही , नाही पटलं तरी हरकत नाही . आम्ही तुमच्या भाषेत "शब्दांचा पिसारा " फुलवत राहु , तुम्ही बस त्रास करुन घेऊ नका ! बाकी ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचताय , वेदांचा अर्थ समजुन घेताय हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे , मग मजा तर येणारच ना ! :)

कॉमी Tue, 01/28/2025 - 18:51
एका बाबीचे रिकन्सिलेशन मला कधी करता आले नाही. जर आपण मन नाही, शरीर तर नाहीच नाही - हे मनापासून पटले तर माणूस का ऐहिक बाबींमध्ये वेळ घालवेल? त्यांच्या दृष्टिकोनातून हे करणे म्हणजे जो माणूस आपल्या कपड्यांना इस्त्री करण्यात दररोज बरा तस घालवतो त्याच्याइतकीच निष्फळ घालमेल नाही का? म्हणजे बुवा आमच्यासारखी भौतिक जडवादी मंडळी नऊ ते पाच कामाला जातात हे समजण्यासारखे आहे. आम्ही स्वतःला शरीरापासून वेगळे समजत नाही. आम्हाला स्वतःला अर्थात शरीराला सुख, शांती, समाधान द्यायचे आहे. पण स्वतःला ब्रम्ह समजणारी मंडळी का करतात हे सगळे उद्योग? म्हणजे अजून स्वतःचा साक्षात्कार पूर्ण झाला नाहीये की आणि काही? उपरोध नाही. सिरीयस प्रश्न.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 01/28/2025 - 19:10
कारण सनातननुसार ब्रम्हज्ञानानंतर आत्मसुखासाठी /परम कल्याणासाठी संन्यास अथवा कर्मयोगी यापैकी दोन मार्ग स्वीकारायचे असतात.ज्या अर्थी त्यांनी संन्यास स्विकारला नाही.त्याअर्थी त्यांंनी निष्काम कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला आहे.

In reply to by Bhakti

कॉमी Tue, 01/28/2025 - 20:03
मार्ग आहेत हे ठीक. पण का? ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात? गरज काय आहे? जर स्वतःला इतके स्वतःच्या भावना आणि अशाश्वत गोष्टींपासून अलिप्त करायचे आहे तर मग तेच टिकवण्याची मरमर काय म्हणून?

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 01/28/2025 - 21:13
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही.ब्रम्ह म्हणजे हेच तर की सगळेच जीव/आत्मा जुळलेले आहेत.कर्मयोगीसाठी शरीर हे कर्माचे माध्यम आहे,त्याचा त्याग/ त्याच्या श्रेयसाचा त्याग सर्वांचा समतोल बिघडवतो.

In reply to by Bhakti

कॉमी Tue, 01/28/2025 - 22:32
ब्रम्हाला कर्माची फिकीर कशाला? ब्रम्हाच्या पातळीवर जर दोन काही नाहीच तर पाप पुण्य आलेच कुठून? जर ब्रम्ह सोडून इतर काही नाहीच, आणि साक्षात्कार म्हणजे आपण ब्रह्म आहोत, हा असेल, तर मग ऐहिक गोष्टींची चिंता कशासाठी?

In reply to by कॉमी

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः | या स्वया पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता || एका सुगम अशा भगवद्गीतेचा अभ्यास करा , बाकी इतर सार्‍या शास्त्रांची काय गरज आहे ? ही भगवग्द्गीता जी की साक्षात पद्मनाभ विष्णुंच्या वासुदेवाचा मुखातुन उत्पन्न झालेली आहे ! तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भग्वद्गीतेतील तिसर्‍या अध्यायात मिळेल कारण दुसर्‍या अध्यायात भगवंतान्नी सांख्ययोग विषद केल्यावर अर्जुनाने एक्झॅक्टली हाच प्रश्न भगवंताला विचारला होता की , हे ज्ञान , ही स्थितप्रज्ञ अवस्था , ही ब्राह्मी स्थिती जर सर्व श्रेष्ठ आहे तर मग तुम्ही मला निष्कारण ह्या कर्माच्या फेर्‍यात का अडकवता ? (अर्थात माझा मी आपला ब्रह्मानंदी लागली टाळी अवस्थेत सुखनैव बसतो , तिकडे खड्यात गेली दुनिया, अन हे युध्द, अन राज्य वगैरे ) त्यावर भगवंतांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे ! माऊलींनी काय निरुपण केले आहे राव . निव्वळ लोकोत्तर ! म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥ मी मुद्दाम स्पष्ट उत्तर देत नाहीये कारण माझी इच्छा आहे की ह्या निमित्ताने तुम्ही गीता ज्ञानेश्वरी उघडावी , श्रध्देने वाचावी , त्यातुन तुम्हाला बोध होईल ! I don't want to steal your joy of the discovery of truth ! मला अक्षरशः तुकोबांसारखे "माझी मज झाली अनावर वाचा" असे काहीसे ज्ञानेश्वरी वाचताना होत असल्याने माऊलींच्या अजुन काही ओव्या करतो : तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥ म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥ म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ ८३ ॥ म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥ हा कर्मयोग म्हणजे मजा आहे राव ! हे म्हणजे मायेशी कुस्ती खेळल्यासारखे आहे ! तुम्ही ध्यान धारणा साधना अभ्यास चिंतन करता अन ब्रह्मलीन होता अन मग माया म्हणते - " शिवोहं शिवोहं काय ? तुला वाटतंय ना तु ब्रह्मलीन झाला आहेस , मग आता ह्या अवस्थेत सर्वांभूतीं ब्रह्म पाहुन अन शांत , तद्रुप राहुन दाखव !" अन माया कुस्तीचा डाव टाकते , अन मग आपल्या प्रापंचिक आयुष्यात काहीतरी अडी अडचणी येतात , संकटे येतात , आणि आपण आत्मभावातुन देह भावात परत येतो . मग परत नाम , परत साधना अन परत उपासना, परत गीता ज्ञानेश्वरी दासबोध ! परत संध्यावंदन ! अन आपण परत ब्रह्मभावात लीन होतो ! अन मायेचा डाव उलटवुन लावतो ! आणि मग माया परत गालातल्या गालात हसते , म्हणते - ठीक आहे ठीक आहे ! आता हा नवीन डाव घे ! आणि मग तो डाव असतो आनंदाचा सुखाचा समाधानाचा ! आणि आपण तोही पलटवुन लावतो ! आणि मग एक वेळ अशी येते की तुम्हाला हा सगळा खेळ कळतो अन तुम्हीही तिच्या सोबत हसायला लागता आणि म्हणता - "ठीक आहे , ब्रिंग इट ऑन ! " =))

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 01/29/2025 - 08:54
आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !
अशी प्रस्तावना केल्यावर लेख 'गंगार्पणमस्तू' म्हणून सोडून देण्यातच गंमत आहे (हे माझ मत)! - (स्वांतसुखी होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

येस, इट्स ए मॅटर ऑफ चॉईस ! योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः | यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ‖ मौन धारण करणे आणि प्रश्नोत्तरे करणे दोन्ही चॉईस आहेस. दोन्ही कुस्ती ! ब्रह्मीभूत माणूस स्वच्छंद असतो. त्याला वाटलं तर तो उत्तर देतो नाहीतर तथास्तु म्हणून निघून जातो :) माऊली संजीवन समाधी घेतात , समर्थ भारत भर मठ स्थापन करून जनजागृती करतात. तुकोबा कर्जाच्या वह्या इंद्रायणीत बुडवून सगळं संसार पांडुरंगाच्या पायी अर्पण करतात , एकनाथ सगळं काही व्यवस्थित करतात अगदी सर्वसामान्य गृहस्थ माणसासारखे ! तसेच काहीसे. स्वांत सुखाय. माझा येते आहे तोवर इथे लेख प्रतिसाद गप्पा टप्पा करायच्या , कंटाळा आला की इथून निघून जायचं ! I think one of the most obvious sign of enlightenment is this sort of simple basic freedom ! This is really amazing indeed. ! जय जय रघुवीर समर्थ

In reply to by Bhakti

सोत्रि Wed, 01/29/2025 - 08:49
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.
हे कसं काय चूक आहे? नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही म्हणून हा प्रश्न आहे.
तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही
अलिप्त होण हीच मुक्ती आणि त्यासाठीच तर सर्व अट्टाहास आहे! असो, अलिप्त होऊ शकत नाही हे तुमचे म्हणणे जरा स्पष्ट करून सांगाल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti Wed, 01/29/2025 - 11:10
स्वतःचा साक्षात्कार होतो? तुमचं अस्तित्व/एखादं ज्ञान या जगात आले ते सत्य आहे साक्षात्कार नाही.उगाच mature झालो की त्याला स्वतःचा साक्षात्कार असं नावं दिलं जाते.यानुसार तर मला दर आठवड्याला स्वतः चा नवा साक्षात्कार होतो.मग काय दरवेळी मी काहीतरी समजलं इकडे पहा असं समजू का? सगळ्यांना साक्षात्कार /सत्य उमगते,सगळे mature होतात... कालावधी वेगवेगळा आहे. अलिप्तता ही कोणत्या लेव्हलची आहे.वैयक्तिक नात्यांची? तो झाला संन्यासी ..सामाजिक जबाबदारीची?..तो झाला संन्यासी. पण त्याला पण /इंद्रियांना भूक लागली की भिक्षा मागावीच लागते ना...ना इंद्रियांपासून अलिप्त ना प्रकृती पासून. संत जर अलिप्त राहिले असते तर प्रबोधन केले असते का? समाजाचे /प्रकृतीचे/सर्व जीवांचे(oneness) कल्याण व्हावे यासाठीच मार्ग देत राहतात. अलिप्त म्हणजे मुक्ती नव्हे,अलिप्त म्हणजे कल्याण व्हावे ही इच्छा तुमचं पण माझं पण सर्वांचे पण! -(दार्शनिक जिज्ञासू )भक्ती

In reply to by कॉमी

सोत्रि Wed, 01/29/2025 - 08:42
ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात
दोन उदाहरणं ह्यासाठी. १. ज्ञानेश्वर माउली, त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहीपर्यंत शरीराची उस्तभार केली. त्यानंतर त्यांनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला. २. गौतम बुद्धाला जेव्हा बोधीप्राप्ती झाली तेव्हा त्याच्यातल्या करुणेमुळे, ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी उर्वरीत जीवन त्याची शिकवण शिकवण्यासाठी शरीराची उस्तभार केली सगळे साक्षात्कारी मोस्टली ह्या दोन कॅटेगरीमधे मोडतात. - (मुमूक्षू) सोकाजी

In reply to by सोत्रि

विजुभाऊ Wed, 01/29/2025 - 14:14
ज्याना साक्षात्कार झालेला आहे. आणि शरीराची उस्तरवार करावयाची नाही. त्याना रजनीश " चलते फिरते प्रेत" असे म्हणतात. शरीराची आसक्ति असणे वेगळे आणि विरक्त असणे वेगळे. विरक्त शरीराला ही देहभोग असतातच की.

Bhakti Wed, 01/29/2025 - 11:20
प्रिय मिपाकरांनो खुप छान चर्चा झाली.पण मला लई कामे आहेत😅 त्यामुळे इथल्या शास्त्रार्थांना विराम देते, नाहीतर मंडणमिश्रांप्रमाणे गळ्यातली माळ सुटेपर्यंत टाईप केले असते 😉 अधिक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असल्यास मी सध्या जो ग्रंथ वाचतेय तो तुम्हीही वाचा.... गीतारहस्य!
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना : १. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही. २. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम ! ३.

चूक

अमरेंद्र बाहुबली ·

कर्नलतपस्वी Mon, 01/20/2025 - 05:36
शेवटच्या वाक्यात कथेचे सार आले आहे. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... कथानक छान रंगवले आहे. लघुकथा आवडली हे वेगळे सांगणे नको. मिरवनारी नाही.... मिरवणारी....

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद कर्नलसाहेब. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.

विजुभाऊ Mon, 01/20/2025 - 11:29
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. स्वतःच स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा जगाचा न्याय आहे. न च व्याघ्रंच न च सिहं च.अजापुत्रो बलीं दद्यात.

In reply to by विजुभाऊ

अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 01/22/2025 - 14:02
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर मात करण्यासाठी ती वाइट असते हे फक्त बोलून चालत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते. कृती आनि परिणाम या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक हातात घेतली की दुसरीही आपसूक हातात येतेच. त्यापासुन कोणीच दूर जाउ शकत नाही. पण परिणामांची भिती बाळगून आपण निर्णय घेतले तर आपण जेथे आहोत तेथेच रहातो. जे परिणाम माहीत असतात आपण ते सहन करायला तयार होतो. मात्र जे माहीत नसतात त्याबद्दल भीती वाटत असते. उदा : घरात रहायला मिळते म्हणून नवर्‍याचा मार सहन करत रहायचे या पेक्षा काही समाजसेवी संस्थांची / पोलीसांची मदत घेतली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो. ही बाइ आपल्याला घाबरत नाही या गोष्टीची नवर्‍याला भीती वाटू शकते पोलीस , सामाजीक कार्यकर्ते त्या नवर्‍याला सुधरवू शकतात हे चांगले परिणाम ही असू शकतात.

आयुष्य असं सरळ नसतंच. ते असंख्य अनपेक्षित घटनांनी भरलेलं आहे. अशा असंख्य कथानायिका आपल्या आजुबाजूला दिसतील. कथा आवडली असे तरी कसे म्हणावे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत Tue, 01/21/2025 - 13:06
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. त्याने तिचे आयुष्य उध्वस्त केले. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.

In reply to by विवेकपटाईत

छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.

चौथा कोनाडा Tue, 01/21/2025 - 20:07
चुक ती चुकच ! एकट्याने केली काय अन अनेकांनी केली काय ? त्याचे भोग मात्र दुर्दैवी जीवाच्या वाट्याला येतात ... बसतात दुर्दैव उपसत अन भोग भोगत.

विजुभाऊ Wed, 01/22/2025 - 14:10
माझ्या ओळखीतल्या एक गायीका आहेत. त्यांचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी झाले. नवरा त्याम्च्यापेक्षा १० वर्षानी मोठा . दारू पिऊन मारहाण करायचा. त्या बाईंच्या आईने " जिथे नांदायला गेलीस तेच तुझे जग अशी भूमीका घेतली. मारहाणीचाअतिरेक झाल्यानंतर त्या बाईनी पोलीसात तक्रार केली. नवर्‍याला पोलीसांनी दम दिला. बायको पोलीसात जाऊ शकते हे पाहून नवर्‍याने पळ काढला.

कर्नलतपस्वी Mon, 01/20/2025 - 05:36
शेवटच्या वाक्यात कथेचे सार आले आहे. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... कथानक छान रंगवले आहे. लघुकथा आवडली हे वेगळे सांगणे नको. मिरवनारी नाही.... मिरवणारी....

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद कर्नलसाहेब. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.

विजुभाऊ Mon, 01/20/2025 - 11:29
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. स्वतःच स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा जगाचा न्याय आहे. न च व्याघ्रंच न च सिहं च.अजापुत्रो बलीं दद्यात.

In reply to by विजुभाऊ

अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 01/22/2025 - 14:02
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर मात करण्यासाठी ती वाइट असते हे फक्त बोलून चालत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते. कृती आनि परिणाम या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक हातात घेतली की दुसरीही आपसूक हातात येतेच. त्यापासुन कोणीच दूर जाउ शकत नाही. पण परिणामांची भिती बाळगून आपण निर्णय घेतले तर आपण जेथे आहोत तेथेच रहातो. जे परिणाम माहीत असतात आपण ते सहन करायला तयार होतो. मात्र जे माहीत नसतात त्याबद्दल भीती वाटत असते. उदा : घरात रहायला मिळते म्हणून नवर्‍याचा मार सहन करत रहायचे या पेक्षा काही समाजसेवी संस्थांची / पोलीसांची मदत घेतली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो. ही बाइ आपल्याला घाबरत नाही या गोष्टीची नवर्‍याला भीती वाटू शकते पोलीस , सामाजीक कार्यकर्ते त्या नवर्‍याला सुधरवू शकतात हे चांगले परिणाम ही असू शकतात.

आयुष्य असं सरळ नसतंच. ते असंख्य अनपेक्षित घटनांनी भरलेलं आहे. अशा असंख्य कथानायिका आपल्या आजुबाजूला दिसतील. कथा आवडली असे तरी कसे म्हणावे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत Tue, 01/21/2025 - 13:06
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. त्याने तिचे आयुष्य उध्वस्त केले. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.

In reply to by विवेकपटाईत

छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.

चौथा कोनाडा Tue, 01/21/2025 - 20:07
चुक ती चुकच ! एकट्याने केली काय अन अनेकांनी केली काय ? त्याचे भोग मात्र दुर्दैवी जीवाच्या वाट्याला येतात ... बसतात दुर्दैव उपसत अन भोग भोगत.

विजुभाऊ Wed, 01/22/2025 - 14:10
माझ्या ओळखीतल्या एक गायीका आहेत. त्यांचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी झाले. नवरा त्याम्च्यापेक्षा १० वर्षानी मोठा . दारू पिऊन मारहाण करायचा. त्या बाईंच्या आईने " जिथे नांदायला गेलीस तेच तुझे जग अशी भूमीका घेतली. मारहाणीचाअतिरेक झाल्यानंतर त्या बाईनी पोलीसात तक्रार केली. नवर्‍याला पोलीसांनी दम दिला. बायको पोलीसात जाऊ शकते हे पाहून नवर्‍याने पळ काढला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता. आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची. जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत.

जॉन अब्राहम (भाग ४)

श्रीगुरुजी ·

अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ अमेरिकन रंगभूमीवरील एक लोकप्रिय कलाकार होता. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन फोर्ड थिएटरमध्ये 'माय अमेरिकन कझिन' हे विनोदी नाटक बघायला गेले होते. चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता. चार दिवस आधीच युध्द संपल्याने त्यांच्या मनावरील मोठा ताण नाहीसा झाला होता. १४ एप्रिलला शुक्रवार होता. त्या दिवशी रात्री म्हणजे अमेरिकन परिभाषेत 'फ्रायडे नाईटला' ते दडपण नाहीसे झाल्याने काळजीमुक्त वातावरणात ते विनोदी नाटक बघायला गेले होते. त्याकाळी ब्रिटिश लोक स्वतःला अमेरिकन्सपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि ब्रिटनमध्ये ज्यांना काही करता येत नाही असे लोक अमेरिकेला जातात असे ब्रिटिश लोक अगदी पहिल्या महायुध्दापर्यंत समजत असत. असा एक असभ्य आणि असंस्कृत अमेरिकन आपल्या विस्तारीत कुटुंबातील इस्टेटीतील वाटा आपल्याला मिळणार हे कळल्यानंतर ब्रिटनला जातो. तिथे मग तो अमेरिकन आणि ब्रिटिश लोक यांच्यातील सांस्कृतिक खटके वगैरे त्या नाटकात दाखविले होते. त्या नाटकात एक विनोदी वाक्य कथानकात आल्यावर थिएटरमध्ये नेहमी हशा पिकायचा. जॉन विल्क्स बूथला हे माहित होते. तसेच फोर्ड थिएटरचा कोपरा आणि कोपरा त्याला माहित होता. त्या वाक्यावर हशा पिकेल बरोबर तेव्हा लिंकनना गोळी घालायची हे त्याने ठरविले होते. त्यावेळेस मेरी आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन पहिल्या मजल्यावरील गॅलरीत त्यांच्यासाठीच्या विशेष कक्षात बसले होते.कक्षाचे दार बंद होते. पण दाराला जॉन विल्क्स बूथने त्या दिवशी सकाळीच एक छोटे भोक पाडून ठेवले होते. त्यामुळे तो कडी उघडून त्या कक्षात जाऊ शकणार होता. लिंकनचा अंगरक्षक एकच होता आणि तो त्या वेळेस त्या कक्षाच्या बाहेर असणे अपेक्षित होते पण तो तेव्हा जागेवर नव्हता. त्या कक्षाकडे जाणार्‍या जिन्याच्या समोर तळ मजल्याला फोर्ड थिएटरचे एक प्रवेशद्वार होते. तिथे थिएटरशी संबंधित एक माणूस होता. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपला घोडा लावून त्या घोड्याकडे थोडा वेळ लक्ष द्या मी आलोच असे म्हणत जॉन विल्क्स बूथने ते विनोदी वाक्य कथानकात यायच्या काही वेळ आधी तिथून फोर्ड थिएटरमध्ये प्रवेश केला. बूथ हा एक लोकप्रिय आणि नावाजलेला कलाकार असल्याने त्याने फोर्ड थिएटरमध्ये जाणे यात काही विशेष वाटले नसावे. मात्र अध्यक्ष बसले आहेत तिथल्याच बाजूने त्याला का जायचे आहे हा प्रश्न त्या माणसालाही पडला नाही. अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था इतकीच होती. बूथने कडी उघडून आत प्रवेश केला. तोपर्यंत तो मागे दबा धरून उभा होता. लिंकनना त्याची अजिबात कल्पना नव्हती. बरोबर ते विनोदी वाक्य आले आणि सभागृहात हशा पिकला आणि बरोबर त्याच वेळेस बूथने लिंकनना गोळी घातली. गोळीचा एकदम मोठा आवाज आणि धूर आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सभागृहातील लोकांना वरील गॅलरीत लिंकन आहेत आणि तिथून गोळीचा आवाज आला म्हणजे काय झाले असेल याची कल्पना आलीच असेल. तेवढ्यात बूथने त्या गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. उंचावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली- पायाचे हाड थोडेसे फ्रॅक्चरच झाले. व्यासपीठावर उडी मारल्यावर 'Sic semper tyrannis!' म्हणजे 'अत्याचार्‍यांबरोबर असेच व्हायला पाहिजे' या अर्थाचे लॅटिन वाक्य बोलला. बूथ हा ओळखीचा चेहरा असल्याने त्याला लोकांनी लगेच ओळखले. म्हणजे लिंकनना गोळी घालणारा जॉन विल्क्स बूथ हाच आहे हे लगेचच स्पष्ट झाले. सभागृहात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तिथून बूथ निसटला आणि मागच्या बाजूला लावलेला घोडा त्याने ताब्यात घेतला आणि घोड्यावर बसून तो निघून गेला. तो पुढे कुठे गेला पुढील भागांमध्ये येईलच. त्यामुळे आता काही लिहित नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता.
अमेरिकन यादवी युध्दात दोन्ही बाजूंकडून मारल्या गेलेल्यांची संख्या विविध अंदाजांप्रमाणे ७ ते १० लाख इतकी होती. १८६० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ३ कोटी १४ लाख होती. म्हणजे यादवी युध्दात कमितकमी २% पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यामुळे त्याचा अध्यक्षांवर तणाव आला असेल तर अजिबात नवल नाही. खालील फोटोमध्ये त्याची कल्पना येईल. डावीकडच्या फोटोत लिंकन १८६१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी कसे दिसायचे आणि उजवीकडच्या फोटोत त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस ते कसे दिसत होते हे दिसेल. अवघ्या चार वर्षात लिंकन किमान १५-२० वर्षाने अधिक म्हातारे दिसू लागले होते. Lincoln

अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ अमेरिकन रंगभूमीवरील एक लोकप्रिय कलाकार होता. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन फोर्ड थिएटरमध्ये 'माय अमेरिकन कझिन' हे विनोदी नाटक बघायला गेले होते. चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता. चार दिवस आधीच युध्द संपल्याने त्यांच्या मनावरील मोठा ताण नाहीसा झाला होता. १४ एप्रिलला शुक्रवार होता. त्या दिवशी रात्री म्हणजे अमेरिकन परिभाषेत 'फ्रायडे नाईटला' ते दडपण नाहीसे झाल्याने काळजीमुक्त वातावरणात ते विनोदी नाटक बघायला गेले होते. त्याकाळी ब्रिटिश लोक स्वतःला अमेरिकन्सपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि ब्रिटनमध्ये ज्यांना काही करता येत नाही असे लोक अमेरिकेला जातात असे ब्रिटिश लोक अगदी पहिल्या महायुध्दापर्यंत समजत असत. असा एक असभ्य आणि असंस्कृत अमेरिकन आपल्या विस्तारीत कुटुंबातील इस्टेटीतील वाटा आपल्याला मिळणार हे कळल्यानंतर ब्रिटनला जातो. तिथे मग तो अमेरिकन आणि ब्रिटिश लोक यांच्यातील सांस्कृतिक खटके वगैरे त्या नाटकात दाखविले होते. त्या नाटकात एक विनोदी वाक्य कथानकात आल्यावर थिएटरमध्ये नेहमी हशा पिकायचा. जॉन विल्क्स बूथला हे माहित होते. तसेच फोर्ड थिएटरचा कोपरा आणि कोपरा त्याला माहित होता. त्या वाक्यावर हशा पिकेल बरोबर तेव्हा लिंकनना गोळी घालायची हे त्याने ठरविले होते. त्यावेळेस मेरी आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन पहिल्या मजल्यावरील गॅलरीत त्यांच्यासाठीच्या विशेष कक्षात बसले होते.कक्षाचे दार बंद होते. पण दाराला जॉन विल्क्स बूथने त्या दिवशी सकाळीच एक छोटे भोक पाडून ठेवले होते. त्यामुळे तो कडी उघडून त्या कक्षात जाऊ शकणार होता. लिंकनचा अंगरक्षक एकच होता आणि तो त्या वेळेस त्या कक्षाच्या बाहेर असणे अपेक्षित होते पण तो तेव्हा जागेवर नव्हता. त्या कक्षाकडे जाणार्‍या जिन्याच्या समोर तळ मजल्याला फोर्ड थिएटरचे एक प्रवेशद्वार होते. तिथे थिएटरशी संबंधित एक माणूस होता. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपला घोडा लावून त्या घोड्याकडे थोडा वेळ लक्ष द्या मी आलोच असे म्हणत जॉन विल्क्स बूथने ते विनोदी वाक्य कथानकात यायच्या काही वेळ आधी तिथून फोर्ड थिएटरमध्ये प्रवेश केला. बूथ हा एक लोकप्रिय आणि नावाजलेला कलाकार असल्याने त्याने फोर्ड थिएटरमध्ये जाणे यात काही विशेष वाटले नसावे. मात्र अध्यक्ष बसले आहेत तिथल्याच बाजूने त्याला का जायचे आहे हा प्रश्न त्या माणसालाही पडला नाही. अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था इतकीच होती. बूथने कडी उघडून आत प्रवेश केला. तोपर्यंत तो मागे दबा धरून उभा होता. लिंकनना त्याची अजिबात कल्पना नव्हती. बरोबर ते विनोदी वाक्य आले आणि सभागृहात हशा पिकला आणि बरोबर त्याच वेळेस बूथने लिंकनना गोळी घातली. गोळीचा एकदम मोठा आवाज आणि धूर आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सभागृहातील लोकांना वरील गॅलरीत लिंकन आहेत आणि तिथून गोळीचा आवाज आला म्हणजे काय झाले असेल याची कल्पना आलीच असेल. तेवढ्यात बूथने त्या गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. उंचावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली- पायाचे हाड थोडेसे फ्रॅक्चरच झाले. व्यासपीठावर उडी मारल्यावर 'Sic semper tyrannis!' म्हणजे 'अत्याचार्‍यांबरोबर असेच व्हायला पाहिजे' या अर्थाचे लॅटिन वाक्य बोलला. बूथ हा ओळखीचा चेहरा असल्याने त्याला लोकांनी लगेच ओळखले. म्हणजे लिंकनना गोळी घालणारा जॉन विल्क्स बूथ हाच आहे हे लगेचच स्पष्ट झाले. सभागृहात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तिथून बूथ निसटला आणि मागच्या बाजूला लावलेला घोडा त्याने ताब्यात घेतला आणि घोड्यावर बसून तो निघून गेला. तो पुढे कुठे गेला पुढील भागांमध्ये येईलच. त्यामुळे आता काही लिहित नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता.
अमेरिकन यादवी युध्दात दोन्ही बाजूंकडून मारल्या गेलेल्यांची संख्या विविध अंदाजांप्रमाणे ७ ते १० लाख इतकी होती. १८६० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ३ कोटी १४ लाख होती. म्हणजे यादवी युध्दात कमितकमी २% पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यामुळे त्याचा अध्यक्षांवर तणाव आला असेल तर अजिबात नवल नाही. खालील फोटोमध्ये त्याची कल्पना येईल. डावीकडच्या फोटोत लिंकन १८६१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी कसे दिसायचे आणि उजवीकडच्या फोटोत त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस ते कसे दिसत होते हे दिसेल. अवघ्या चार वर्षात लिंकन किमान १५-२० वर्षाने अधिक म्हातारे दिसू लागले होते. Lincoln
लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) ==> जॉन अब्राहम (भाग २) ==> जॉन अब्राहम (भाग ३) जेव्हा स्पष्टपणे गुलामगिरीविरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन यांनी १८६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा सुरूवातीला सात दक्षिणी राज्ये (दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अ‍ॅलाबामा, जॉर्जिया, लुझियाना आणि टेक्सस) यांनी धोका पत्करला आणि संघटित होऊन अमेरिकेतून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला .

कराडची मुलगी

चौथा कोनाडा ·

दुर्गविहारी Sat, 01/18/2025 - 18:30
अप्रतिम शॉर्टफिल्म !! कराडची मुलगी हे धाग्याचे शीर्षक वाचून नवीन बीड कनेक्शन आणि वाल्मिक आण्णाचा काय मॅटर असे वाटून गेले. मात्र फिल्म आणि विषय खरच सुंदर आहे. धन्यवाद

In reply to by रीडर

चावटमेला Sun, 01/19/2025 - 02:48
एकदम बरोब्बर. कै च्या कै आहे. कुठली आय टी कम्पनी आहे बाबा ही? असं काम होत नसतं कुठेही, थोडा रिसर्च करत जा.. अजून जॉईनिंग नाही, आय डी तयार नाही, आणि डायरेक्ट मॅनेजर चा स्वतःचा लॅपटॉप देतोय वापरायला, वर कुठल्याश्या कागदावर पाहून हिला लगेच प्रोजेक्ट कळतो आणि ही मुलगी लगेच इनपुट्स पण देते. ते आमच्या तासगावकर बाई म्हणतात हे ऐकून तर अक्षरशः फुटलो. बादवे त्या प्रोजेक्ट प्रेझेंटशन मध्ये एच आर कशाला हवीये? आयला अशा प्रोजेक्ट मीटिंग मध्ये पण एच आर बसायला लागले तर लागलीच की वाट प्रोजेक्ट ची पण. एकदम बाळबोध आहे फिल्म, एखाद्या स्कूल प्रोजेक्ट सारखी

प्रचेतस Sun, 01/19/2025 - 07:45
खूपच मस्त. मात्र ह्यावेळी तुम्ही लिहिण्यात हात आखडता घेतला असल्याचे जाणवले.

गवि गुरुवार, 01/23/2025 - 20:15
बघितली फिल्म. सुसाईड नोट लिहून ठेवलेल्या मुलीची फाईल सापडली की कराडची मुलगी हडबडून जाईल की मैत्रिणीशी मस्त गप्पा मारत दोघी मिळून शेवटी त्या मुलीच्या जागी हिने जावे असे ठरवू शकतील? त्या मुलीने खरेच जीव दिला असेल आणि आपण तिच्या नावाने कुठेतरी ऑफिसात गेलो तर केवढ्या लफड्यात सापडू याचा विचार देखील शिवू नये म्हणजे फारच निरागस बुवा. अशा वेळी धीट असेल तर पोलिसात जाऊन फाईल देईल किंवा सामान्य घाबरट असेल तर फाईल तिथेच सोडून काढता पाय घेईल. असो.

nutanm Tue, 02/11/2025 - 08:41
बाळबोध फिलम वाटतेय, अशाप्रकारचया बरयाच रहसयकथा पूरवी वाचलयात. फकत थोडासा धकका बसतो. ऊमेश कामत बॉस तयाला माहित असूनही तिचया ईनोसनट दिसणयामङळे किवा खरेच presentention मुळे attract होतो का व महणून नोकरी देतो असे वाटते. याहून धककादायक फिलमस् खूप पाहिलयात. ठीक आहे अशी फिलम्.

धर्मराजमुटके Tue, 02/11/2025 - 12:35
खुप छान फिल्म ! जगात निरागसता आणि बाळबोधपणा जिवंत आहे हे ह्या फिल्म मुळे कळाले. इथे निगेटिव्ह रिप्लाय देणार्‍यांना फाट्यावर मारा. रोजमर्रा च्या जिंदगी च्या कश्मकश मधे त्यांचा इनो(संट)चंटपणा जळून गेला आहे.

श्वेता२४ Wed, 02/12/2025 - 11:02
पटली नाही. नुकताच ऑफीसमधील माहितीच्या व्यक्तीने सुसाईड अटेम्ट केल्याची बातमी कळली तेव्हा काय अवस्था होते त्याचा अनुभव घेतलाय. त्यामुळे खोटेपणाची चीड असणारा उमेश कामत मीत्राच्या बहिणीच्या या अवस्थेत कोणी अन्य फायदा घेतेय हे माहित असूनही इतका शांत कसा हे पटलेले नाही. बाकी ते प्रोजेक्ट प्रेझेंटेशन खरंच बाळबोध वाटलं. काम करणारे कलाकार उत्तम असल्याने एकूण प्रभाव चांगला पडत असला तरी .........मुलगी कराडची नाही तर पुण्याची वाटतेय....

दुर्गविहारी Sat, 01/18/2025 - 18:30
अप्रतिम शॉर्टफिल्म !! कराडची मुलगी हे धाग्याचे शीर्षक वाचून नवीन बीड कनेक्शन आणि वाल्मिक आण्णाचा काय मॅटर असे वाटून गेले. मात्र फिल्म आणि विषय खरच सुंदर आहे. धन्यवाद

In reply to by रीडर

चावटमेला Sun, 01/19/2025 - 02:48
एकदम बरोब्बर. कै च्या कै आहे. कुठली आय टी कम्पनी आहे बाबा ही? असं काम होत नसतं कुठेही, थोडा रिसर्च करत जा.. अजून जॉईनिंग नाही, आय डी तयार नाही, आणि डायरेक्ट मॅनेजर चा स्वतःचा लॅपटॉप देतोय वापरायला, वर कुठल्याश्या कागदावर पाहून हिला लगेच प्रोजेक्ट कळतो आणि ही मुलगी लगेच इनपुट्स पण देते. ते आमच्या तासगावकर बाई म्हणतात हे ऐकून तर अक्षरशः फुटलो. बादवे त्या प्रोजेक्ट प्रेझेंटशन मध्ये एच आर कशाला हवीये? आयला अशा प्रोजेक्ट मीटिंग मध्ये पण एच आर बसायला लागले तर लागलीच की वाट प्रोजेक्ट ची पण. एकदम बाळबोध आहे फिल्म, एखाद्या स्कूल प्रोजेक्ट सारखी

प्रचेतस Sun, 01/19/2025 - 07:45
खूपच मस्त. मात्र ह्यावेळी तुम्ही लिहिण्यात हात आखडता घेतला असल्याचे जाणवले.

गवि गुरुवार, 01/23/2025 - 20:15
बघितली फिल्म. सुसाईड नोट लिहून ठेवलेल्या मुलीची फाईल सापडली की कराडची मुलगी हडबडून जाईल की मैत्रिणीशी मस्त गप्पा मारत दोघी मिळून शेवटी त्या मुलीच्या जागी हिने जावे असे ठरवू शकतील? त्या मुलीने खरेच जीव दिला असेल आणि आपण तिच्या नावाने कुठेतरी ऑफिसात गेलो तर केवढ्या लफड्यात सापडू याचा विचार देखील शिवू नये म्हणजे फारच निरागस बुवा. अशा वेळी धीट असेल तर पोलिसात जाऊन फाईल देईल किंवा सामान्य घाबरट असेल तर फाईल तिथेच सोडून काढता पाय घेईल. असो.

nutanm Tue, 02/11/2025 - 08:41
बाळबोध फिलम वाटतेय, अशाप्रकारचया बरयाच रहसयकथा पूरवी वाचलयात. फकत थोडासा धकका बसतो. ऊमेश कामत बॉस तयाला माहित असूनही तिचया ईनोसनट दिसणयामङळे किवा खरेच presentention मुळे attract होतो का व महणून नोकरी देतो असे वाटते. याहून धककादायक फिलमस् खूप पाहिलयात. ठीक आहे अशी फिलम्.

धर्मराजमुटके Tue, 02/11/2025 - 12:35
खुप छान फिल्म ! जगात निरागसता आणि बाळबोधपणा जिवंत आहे हे ह्या फिल्म मुळे कळाले. इथे निगेटिव्ह रिप्लाय देणार्‍यांना फाट्यावर मारा. रोजमर्रा च्या जिंदगी च्या कश्मकश मधे त्यांचा इनो(संट)चंटपणा जळून गेला आहे.

श्वेता२४ Wed, 02/12/2025 - 11:02
पटली नाही. नुकताच ऑफीसमधील माहितीच्या व्यक्तीने सुसाईड अटेम्ट केल्याची बातमी कळली तेव्हा काय अवस्था होते त्याचा अनुभव घेतलाय. त्यामुळे खोटेपणाची चीड असणारा उमेश कामत मीत्राच्या बहिणीच्या या अवस्थेत कोणी अन्य फायदा घेतेय हे माहित असूनही इतका शांत कसा हे पटलेले नाही. बाकी ते प्रोजेक्ट प्रेझेंटेशन खरंच बाळबोध वाटलं. काम करणारे कलाकार उत्तम असल्याने एकूण प्रभाव चांगला पडत असला तरी .........मुलगी कराडची नाही तर पुण्याची वाटतेय....
लेखनविषय:
लेखनप्रकार
नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ? कराडची मुलगी शिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या शहरात आलीय आणि नोकरी साठी धडपड करत एका कंपनीत पोहोचतेय ... आणि " नाव काय तुझं ? असा प्रश्न आला की उत्तर काय द्यायचं देताना मनात हजार कल्लोळ उठतायत.... काय असेल कारण ? हे समजून घ्यायचं असेल तर नुकतीच प्रदर्शित झालेली "नाव काय तुझं ? " ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी !

गोत्र, जनुकीय दोष इ० इ०

युयुत्सु ·

महिरावण Sat, 01/18/2025 - 12:13
गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आईकडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो."
हा दावा पूर्णतः अचूक नाही. जरी आई-वडिलांकडून समान प्रमाणात अणु (alleles) येत असले तरी माइटोकॉन्ड्रिया DNA फक्त आईकडून येतो, त्यामुळे मातृवंशीय वारसा थोडा अधिक असतो. "जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार." येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. "अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४)..." हा हिशोब गोत्रासंदर्भात नाही. Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते, जर पुरुष वंश टिकून राहिला, तर. त्यामुळे गोत्राशी सरळ संलग्न वारसा याप्रमाणे घटत नाही. धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये सापिण्ड्य संपते..." धर्मशास्त्रात सापिंड्याची व्याख्या रक्तसंबंधावर आधारित नाही, तर सामाजिक संबंधांवर आधारित आहे. यामध्ये जनुकशास्त्राचा थेट समावेश होत नाही. "
बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे
गोत्र ही केवळ पितृवंशाशी निगडित सामाजिक संकल्पना आहे, जी जनुकांच्या dominant किंवा recessive स्वरूपावर अवलंबून नसते.

In reply to by महिरावण

युयुत्सु Sat, 01/18/2025 - 12:55
प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो हे मी स्पष्ट लिहीलेले असताना आपण त्याकडे दूर्लक्ष का केले? येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. याचा प्रतिवादही केलेला आहे. उदा० - "सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही." Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते. अर्धसत्य! Y गुणसूत्र उत्कांत होते आणि त्यामु़ळे वेगवेगळे हॅप्लोग्रुप तयार झाले आहेत. तसेच भविष्यात ते पूर्ण नाहिसे होणार अशी पण शक्यता व्यक्त केली जात आहे. गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. मग गोत्राचा आणि गुण्सूत्रांचा संबंध लावायचा अट्टाहास कशासाठी

सुबोध खरे Sat, 01/18/2025 - 18:34
माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे ज्या गुरुकुलात मुले आणि मुली शिकायला जात असत त्यांचे गोत्र त्या ऋषींचे नाव म्हणून लावले जात आणि शिक्षण करत असताना त्यांच्या प्रेमविवाह होऊ नये म्हणून सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला होता. हि माहिती जर खरी असेल तर गोत्र आणि गुणसूत्रे यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पुढचा काथ्याकूट मुळातच निरर्थक ठरतो. अर्थात माझी माहिती बिनचूक आहे असा माझा दावा नाही. पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 02:00
पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
+१

युट्यूब फीडमध्ये
असे युट्युब फीड मध्ये दिसणार्‍या प्रत्येक विषयावर लेख पाडायचे ठरवले तर मिपा लवकरच सुगीचे दिवस येतील. =)))) बाकी तुम्हाला जे कळले ते आणि फक्त तेच इतरांना कळावे , किंवा इतरांना काही कळातच नाही , त्यांचे सर्व आकलन ते तकलादु आणि मुर्खपणाचे आहे असा जो सुर तुमच्या लेखात आहे तो आवडला ! तुम्ही त्यांची पुस्तके ग्रंथ ह्यांचे सार्वजनिक दहन करा ! स्वतंत्र देश आहे, तुम्हाला जे पटत नाही त्याची जाळपोळ करायला तुम्ही स्वतंत्र आहात !! हाकानाका. २

महिरावण Sat, 01/18/2025 - 12:13
गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आईकडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो."
हा दावा पूर्णतः अचूक नाही. जरी आई-वडिलांकडून समान प्रमाणात अणु (alleles) येत असले तरी माइटोकॉन्ड्रिया DNA फक्त आईकडून येतो, त्यामुळे मातृवंशीय वारसा थोडा अधिक असतो. "जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार." येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. "अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४)..." हा हिशोब गोत्रासंदर्भात नाही. Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते, जर पुरुष वंश टिकून राहिला, तर. त्यामुळे गोत्राशी सरळ संलग्न वारसा याप्रमाणे घटत नाही. धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये सापिण्ड्य संपते..." धर्मशास्त्रात सापिंड्याची व्याख्या रक्तसंबंधावर आधारित नाही, तर सामाजिक संबंधांवर आधारित आहे. यामध्ये जनुकशास्त्राचा थेट समावेश होत नाही. "
बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे
गोत्र ही केवळ पितृवंशाशी निगडित सामाजिक संकल्पना आहे, जी जनुकांच्या dominant किंवा recessive स्वरूपावर अवलंबून नसते.

In reply to by महिरावण

युयुत्सु Sat, 01/18/2025 - 12:55
प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो हे मी स्पष्ट लिहीलेले असताना आपण त्याकडे दूर्लक्ष का केले? येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. याचा प्रतिवादही केलेला आहे. उदा० - "सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही." Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते. अर्धसत्य! Y गुणसूत्र उत्कांत होते आणि त्यामु़ळे वेगवेगळे हॅप्लोग्रुप तयार झाले आहेत. तसेच भविष्यात ते पूर्ण नाहिसे होणार अशी पण शक्यता व्यक्त केली जात आहे. गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. मग गोत्राचा आणि गुण्सूत्रांचा संबंध लावायचा अट्टाहास कशासाठी

सुबोध खरे Sat, 01/18/2025 - 18:34
माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे ज्या गुरुकुलात मुले आणि मुली शिकायला जात असत त्यांचे गोत्र त्या ऋषींचे नाव म्हणून लावले जात आणि शिक्षण करत असताना त्यांच्या प्रेमविवाह होऊ नये म्हणून सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला होता. हि माहिती जर खरी असेल तर गोत्र आणि गुणसूत्रे यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पुढचा काथ्याकूट मुळातच निरर्थक ठरतो. अर्थात माझी माहिती बिनचूक आहे असा माझा दावा नाही. पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 02:00
पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
+१

युट्यूब फीडमध्ये
असे युट्युब फीड मध्ये दिसणार्‍या प्रत्येक विषयावर लेख पाडायचे ठरवले तर मिपा लवकरच सुगीचे दिवस येतील. =)))) बाकी तुम्हाला जे कळले ते आणि फक्त तेच इतरांना कळावे , किंवा इतरांना काही कळातच नाही , त्यांचे सर्व आकलन ते तकलादु आणि मुर्खपणाचे आहे असा जो सुर तुमच्या लेखात आहे तो आवडला ! तुम्ही त्यांची पुस्तके ग्रंथ ह्यांचे सार्वजनिक दहन करा ! स्वतंत्र देश आहे, तुम्हाला जे पटत नाही त्याची जाळपोळ करायला तुम्ही स्वतंत्र आहात !! हाकानाका. २
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या माझ्या युट्यूब फीडमध्ये अचानक "गोत्र" या निरर्थक कल्पनेवर काही व्हिडीओ दिसू लागले आहेत. सर्व व्हिडीओंमध्ये वैज्ञानिक सत्याचे शक्य तेव्हढे विकृतीकरण करून या गोत्र कल्पनेचे पुनरुज्जीवन करायचा हास्यास्पद खटाटोप केलेला दिसतो. समाजाची रचना झाली तेव्हा तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे केवळ काही सोईस्कर कल्पनांच्या उथळ साधर्म्यामुळे गोत्र संकल्पनेला शास्त्रीय बैठक आहे असे दाखविण्याचा आटापीटा करणे हे अतिशय हास्यास्पद आहे.

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Sat, 01/18/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Sat, 01/18/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.