मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

मातीचे पाय

चांदणे संदीप ·

मी देव समजलो ज्याला तो निरा दानव निघाला हे सर्व कळावयास खुप वेळ मला झाला हे जग असचं असतं. वेळ निघून गेल्यावर खरे खोटे समजते.

चौथा कोनाडा 28/06/2023 - 18:27
व्वा, खुप सुंदर रचना !

💖

ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले
क्या बात हैं !

राघव 10/07/2023 - 13:57
चांगल्या कल्पना. थोडं मीटरमधे बसवलं तर बहारदार होईल! पुलेशु! :-)

चित्रगुप्त 11/07/2023 - 20:32
कविता आवडली. आता एकच करण्याजोगे आहे: आता एकचि करावे - आपल्या पायीची धूळ ललाटी लावू वाटावी - ऐसे काही करावे... प्रेमळ स्वप्नांची ओल - आपणचि झिरपवावी व्हावे नतमस्तक ऐसे- पाय आपुलेचि असावे... गेले ते गेले जे उरले त्यांसि आपणचि वंदनीय व्हावे...

मी देव समजलो ज्याला तो निरा दानव निघाला हे सर्व कळावयास खुप वेळ मला झाला हे जग असचं असतं. वेळ निघून गेल्यावर खरे खोटे समजते.

चौथा कोनाडा 28/06/2023 - 18:27
व्वा, खुप सुंदर रचना !

💖

ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले
क्या बात हैं !

राघव 10/07/2023 - 13:57
चांगल्या कल्पना. थोडं मीटरमधे बसवलं तर बहारदार होईल! पुलेशु! :-)

चित्रगुप्त 11/07/2023 - 20:32
कविता आवडली. आता एकच करण्याजोगे आहे: आता एकचि करावे - आपल्या पायीची धूळ ललाटी लावू वाटावी - ऐसे काही करावे... प्रेमळ स्वप्नांची ओल - आपणचि झिरपवावी व्हावे नतमस्तक ऐसे- पाय आपुलेचि असावे... गेले ते गेले जे उरले त्यांसि आपणचि वंदनीय व्हावे...
पायांना स्पर्शून आले ते हात मळाले होते लख्ख उमगले तेव्हा ते पाय मातीचे होते मी केवळ पाहत होतो पायांच्या खालची धूळ ती ललाटास लावावी हे एकच माथी खूळ मी इथवर पाहून आलो पाऊलखुणा विरणाऱ्या आधी खुणावत, मागून कपटी विकट हसणाऱ्या आता, पुन्हा चालावे पुढे, की परत फिरावे? सोस ना-लायक पायांचे पुसून अवघे टाकावे? प्रेमळ शब्दांची ओल मनात झिरपत नाही व्हावे नतमस्तक ऐसे पायही दिसत नाही ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले - संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)

मेघदूत..... (ऐसी अक्षरे ..मेळवीन -१०)

Bhakti ·

संस्कृत फक्त तोंडओळख नदी किंवा कवी शब्द चालवता येतो. एखादे दुसरे सुभाषित समोरच्याच्या तोंडावर मारून इम्प्रेशन जमवायचे एवढेच. शांताबाईच्या गावातला ,त्यांचा भक्त म्हणून त्यांच्या इतर पुस्तका बरोबर मेघदूत ही घेतले. फारसे डोक्यात गेले नाही. कामटी, नागपूर ला असताना रामटेक बघीतले. तीथेच मला वाटते हे महाकाव्य रचले असावे. नक्की माहीत नाही. महाकवी कालिदास यांच्या समग्र साहित्याचा संक्षिप्त आढावा ,विषेशता नायीकांचा नागनिका यांनी घेतला आहे. इथे बघा. https://www.misalpav.com/node/type/story "कालिदास दिपशीखा" लिंक कदाचित चुकली वाटतयं. बाकी लेख सुंदर. आषाढ्स्य प्रथमदिने या गोष्टीचा माझ्या पुरता संबंध म्हणजे, आई लहानपणी आषाढ तळायची आणी आम्ही त्यावर तुटून पडायचो. आषाढाला आखाडअसेही म्हणतात. या जन्मात नाही पुढील जन्मात जर संस्कृत शिकायला मिळाले तर कालिदास यांचे सर्व साहित्य वाचायला मिळो.

Bhakti 19/06/2023 - 16:44
शांताबाईच्या गावातला ,त्यांचा भक्त म्हणून त्यांच्या इतर पुस्तका बरोबर मेघदूत ही घेतले. फारसे डोक्यात गेले नाही. हो शांताबाईंनी भाषांतर केले आहे ते जरा समजायला कठीणच आहे.कुसुमाग्रजांनी भाषांतर केलेलं मेघदूत सहज सुंदर आहे,ते वाचा.

पितृदिना निमित्त मुलींनी खुप सारी पुस्तके भेट दिली आहेत. संपली की आणतो. नक्कीच वाचेन.सध्या जिग्ना व्होरा ची आत्मकथी हातात आहे. मनो यांचे अज्ञात पानिपत प्रवासात आहे उद्या येईल. कुसुमाग्रज ही अफलातून आहेत. सेवानिवृत्तीनंतर या सर्व जुन्या मराठी साहित्याच्या वारकऱ्यांनी वेड लावले आहे. धन्यवाद.

समयोचित लेख ! खरे तर आज मला ह्याच विषयावर लिहायचे होते पण वेळ काढता आला नाही. असो. आयुष्यात फार काही शिकायचे / करायचे राहून गेले. संस्कृत शिकणे ही त्यातलीच एक इच्छा. आयुष्याच्या उतारावर आता सुरुवात करावी म्हणतो.संस्कृत मृत भाषा झाली आहे, तिचा सध्याच्या जगात काही उपयोग नाही वगैरे बरेच ऐकले आयुष्यभर. असेही आयुष्यभरात अनावश्यक अशा अनेक गोष्टी केल्यात तर अजून एक करावी. बघू या कसे जमते ते. अवांतर : बायकोने कान उपटल्यामुळे तुलसीदास आणि कालिदास मोठे झाले तशा पुरुषांनी बायकांच्या झिंज्या उपटल्यामुळे त्या मोठ्या झाल्या अशी काही उदाहरणे आहेत काय इतिहासात ?

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 20/06/2023 - 10:56
चांगला प्रश्न आहे.नक्की माहिती नाही पण जनाबाई, कान्होपात्रा,मुक्ताई ह्यांनी तत्कालीन समाजाला पुरुषी वर्चस्वात संत होऊन आदराचे स्थान निर्माण केले.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/06/2023 - 14:56
बायका ह्या मुळातच शहाण्या असल्याने मी हेच लिहिणार होते :),पण स्वतःच स्वतःच कौतुक कसं करावं ;)

प्रचेतस 20/06/2023 - 18:29
आहा...! सुंदर लिहिलंय. कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी नगरीवरचं प्रेम मेघदूतात प्रकर्षाने व्यक्त होतं, वास्तविक मेघाच्या मार्गात अवंती येत नाही मात्र कालिदास यक्षाकरवी मेघाला आग्रह करतोय की अवंतीनगरी अवश्य पाहूनच ये.

In reply to by प्रचेतस

Bhakti 20/06/2023 - 20:38
कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी नगरीवरचं प्रेम मेघदूतात प्रकर्षाने व्यक्त होतं अगदी!निसर्ग वर्णनही अप्रतिम!दैवी प्रतिभा-कालिदास.

पुष्कर 23/06/2023 - 12:28
मेघदूत - एक आवडता विषय आहे. आषाढस्य प्रथमदिवसे काय, नीचैर्गच्छ्त्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण - हा श्लोक काय, सगळेच लिजेंडरी आहेत. कुसुमाग्रजांचं वाचलं होतं. मला शांताबाईंचं भाषांतर जास्त भावलं, जरी ते समवृत्ती नाही, तरीही. बोरकर आणि सी डी देश्मुखांनीही समश्लोकी-समवृती भाषांतर केलं आहे. सी डी देशमुख वाचताना आपण जवळपास संस्कृतच वाचत आहोत असं वाटतं. अतिसंस्कृतप्रचुर भाषांतर आहे त्यांचं. बोरकर माझे आवडते कवी. एरवी मी त्यांच्या बाजूला झुकलो असतो, पण शांताबाईंचे सहज-सोपे शब्द इतके आवडले की त्याला तोड नाही. अर्थात आवड आपली-आपली.

संस्कृत फक्त तोंडओळख नदी किंवा कवी शब्द चालवता येतो. एखादे दुसरे सुभाषित समोरच्याच्या तोंडावर मारून इम्प्रेशन जमवायचे एवढेच. शांताबाईच्या गावातला ,त्यांचा भक्त म्हणून त्यांच्या इतर पुस्तका बरोबर मेघदूत ही घेतले. फारसे डोक्यात गेले नाही. कामटी, नागपूर ला असताना रामटेक बघीतले. तीथेच मला वाटते हे महाकाव्य रचले असावे. नक्की माहीत नाही. महाकवी कालिदास यांच्या समग्र साहित्याचा संक्षिप्त आढावा ,विषेशता नायीकांचा नागनिका यांनी घेतला आहे. इथे बघा. https://www.misalpav.com/node/type/story "कालिदास दिपशीखा" लिंक कदाचित चुकली वाटतयं. बाकी लेख सुंदर. आषाढ्स्य प्रथमदिने या गोष्टीचा माझ्या पुरता संबंध म्हणजे, आई लहानपणी आषाढ तळायची आणी आम्ही त्यावर तुटून पडायचो. आषाढाला आखाडअसेही म्हणतात. या जन्मात नाही पुढील जन्मात जर संस्कृत शिकायला मिळाले तर कालिदास यांचे सर्व साहित्य वाचायला मिळो.

Bhakti 19/06/2023 - 16:44
शांताबाईच्या गावातला ,त्यांचा भक्त म्हणून त्यांच्या इतर पुस्तका बरोबर मेघदूत ही घेतले. फारसे डोक्यात गेले नाही. हो शांताबाईंनी भाषांतर केले आहे ते जरा समजायला कठीणच आहे.कुसुमाग्रजांनी भाषांतर केलेलं मेघदूत सहज सुंदर आहे,ते वाचा.

पितृदिना निमित्त मुलींनी खुप सारी पुस्तके भेट दिली आहेत. संपली की आणतो. नक्कीच वाचेन.सध्या जिग्ना व्होरा ची आत्मकथी हातात आहे. मनो यांचे अज्ञात पानिपत प्रवासात आहे उद्या येईल. कुसुमाग्रज ही अफलातून आहेत. सेवानिवृत्तीनंतर या सर्व जुन्या मराठी साहित्याच्या वारकऱ्यांनी वेड लावले आहे. धन्यवाद.

समयोचित लेख ! खरे तर आज मला ह्याच विषयावर लिहायचे होते पण वेळ काढता आला नाही. असो. आयुष्यात फार काही शिकायचे / करायचे राहून गेले. संस्कृत शिकणे ही त्यातलीच एक इच्छा. आयुष्याच्या उतारावर आता सुरुवात करावी म्हणतो.संस्कृत मृत भाषा झाली आहे, तिचा सध्याच्या जगात काही उपयोग नाही वगैरे बरेच ऐकले आयुष्यभर. असेही आयुष्यभरात अनावश्यक अशा अनेक गोष्टी केल्यात तर अजून एक करावी. बघू या कसे जमते ते. अवांतर : बायकोने कान उपटल्यामुळे तुलसीदास आणि कालिदास मोठे झाले तशा पुरुषांनी बायकांच्या झिंज्या उपटल्यामुळे त्या मोठ्या झाल्या अशी काही उदाहरणे आहेत काय इतिहासात ?

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 20/06/2023 - 10:56
चांगला प्रश्न आहे.नक्की माहिती नाही पण जनाबाई, कान्होपात्रा,मुक्ताई ह्यांनी तत्कालीन समाजाला पुरुषी वर्चस्वात संत होऊन आदराचे स्थान निर्माण केले.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/06/2023 - 14:56
बायका ह्या मुळातच शहाण्या असल्याने मी हेच लिहिणार होते :),पण स्वतःच स्वतःच कौतुक कसं करावं ;)

प्रचेतस 20/06/2023 - 18:29
आहा...! सुंदर लिहिलंय. कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी नगरीवरचं प्रेम मेघदूतात प्रकर्षाने व्यक्त होतं, वास्तविक मेघाच्या मार्गात अवंती येत नाही मात्र कालिदास यक्षाकरवी मेघाला आग्रह करतोय की अवंतीनगरी अवश्य पाहूनच ये.

In reply to by प्रचेतस

Bhakti 20/06/2023 - 20:38
कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी नगरीवरचं प्रेम मेघदूतात प्रकर्षाने व्यक्त होतं अगदी!निसर्ग वर्णनही अप्रतिम!दैवी प्रतिभा-कालिदास.

पुष्कर 23/06/2023 - 12:28
मेघदूत - एक आवडता विषय आहे. आषाढस्य प्रथमदिवसे काय, नीचैर्गच्छ्त्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण - हा श्लोक काय, सगळेच लिजेंडरी आहेत. कुसुमाग्रजांचं वाचलं होतं. मला शांताबाईंचं भाषांतर जास्त भावलं, जरी ते समवृत्ती नाही, तरीही. बोरकर आणि सी डी देश्मुखांनीही समश्लोकी-समवृती भाषांतर केलं आहे. सी डी देशमुख वाचताना आपण जवळपास संस्कृतच वाचत आहोत असं वाटतं. अतिसंस्कृतप्रचुर भाषांतर आहे त्यांचं. बोरकर माझे आवडते कवी. एरवी मी त्यांच्या बाजूला झुकलो असतो, पण शांताबाईंचे सहज-सोपे शब्द इतके आवडले की त्याला तोड नाही. अर्थात आवड आपली-आपली.
लेखनविषय:
आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस कसं होत आठवीत गेल्यावर अ तुकडीला संस्कृत विषय मिळायचा.मधाळ वाणी,स्पष्ट उच्चार असणाऱ्या विद्यार्थिनांना अग राणी अस लाडिक बोलावणाऱ्या कर्वे बाईंच्या तासाला मी मंत्रमुग्ध होऊन जायचे.त्यामुळे संस्कृतची गोडी,आदर निर्माण झाली पण पाठांतर आणि माझा ३६ चा आकडा असल्याने मार्कात उजेड पडला नाही.पण कालिदास या संस्कृत भाषेतला एक महान कवी आहे हे बाईकडून समजले.तो इतका महान होता की त्याने चक्क ढगाला दूत करून दूर निरोप धाडले,वाह काय भारी वाटायचं.त्यामुळे सातवी की आठवीला चित्रकलेत ‘गणपती उत्सवातीईल आरास’ यासाठी ‘कालिदासाचे मेघदूत गायन ‘ असा देखावा असणारे

“ही चोळी कोणाची?”: सुखद दृश्यानुभव

हेमंतकुमार ·

गवि 18/05/2023 - 14:46
तुम्हाला हा चित्रपट काय सर्च केल्यावर सापडला असे विचारत नाही. ;-) एकूण रोचक प्रयोग दिसतो आहे. पूर्ण चित्रपटात कोणीही ब्रा, सॉरी ब्र देखील काढत नाही हे आश्चर्यकारक..

हेमंतकुमार 18/05/2023 - 15:37
चित्रपटाचा शेवट मस्त!
>>> अ-ग-दी-च ! ..
कोणीही ब्रा, सॉरी ब्र देखील काढत नाही
>>> 🙂 ..
तुम्ही सुद्धा?
>>> आपल्या सर्वांचा लसावि एकच असतो राव 😀

टर्मीनेटर 18/05/2023 - 19:38
दुपारी चित्रपटाविषयी उत्सुकता जागृत करणारा हा लेख वाचला आणि कामे हातावेगळी झाल्यावर लगेच पाहिला. 'पुष्पक' ह्या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी कुठल्याही संवादाशिवायही मानवी मनातल्या विविध भावना आणि भल्या-बुऱ्या मनोवृत्तींचे दर्शन घडवणारा हा सायलेंट चित्रपट "स्टार्ट टू एन्ड" आवडला 👍 उत्तम दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटातील लोको पायलट नायक, नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी आणि डॉग हाऊस मध्ये राहणारा तो छोटा मुलगा हि पात्रे लक्षात राहण्यासारखी आहेत. विवाहोत्सुक वयस्कर नायकाची तरुण 'वधू'च्या आईने घेतलेली 'वरपरीक्षा' आणि मॅमोग्राफी शिबिर हे प्रसंग मजेशीर आहेत.
"जेव्हा तो अशा स्त्रियांना बॅगेतून काढून ती चोळी दाखवतो, तेव्हा त्या स्त्रिया "ही माझी नाही" असे लगेच का सांगत नाहीत, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांनी विचारू नये !"
नायक वयस्कर असला तरी विवाहोत्सुक असतो हे आधीच्या प्रसंगावरून स्पष्ट होते. कागदोपत्री हा ‘जर्मन’ चित्रपट आहे. उत्तर जर्मनीत लग्नाच्या आदल्या रात्री होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे 'ब्रम्हचर्य' (Bachelorhood/Bachelorette) संपुष्टात येत असल्याची घोषणा/प्रतीक म्हणून वराची पॅन्ट किंवा वधूची 'ब्रा' जाळण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या स्त्रियांकडुन त्याला मिळणारे वेगवेगळे प्रतिसाद बघता जर्मनीत (किंवा अझरबैजानमध्ये) विवाहोत्सुकाने प्रपोज करण्यासाठीही अशाच 'ब्रा'शी संबंधित एखाद्या प्रथेचा संदर्भ आहे का ते तपासावे लागेल 😀 असो... एका चांगल्या चित्रपटाची ओळख करून दिलीत त्यासाठी धन्यवाद 🙏 (सुरुवातीची २० मिनिटे नॉर्मल स्पीड वर पाहताना चित्रपट थोडा संथ वाटल्याने स्पीड १.२५ करून पाहिला)

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 18/05/2023 - 19:51
माहितीपूर्ण व रंजक प्रतिसाद आवडला.
वराची पॅन्ट किंवा वधूची 'ब्रा' जाळण्याची प्रथा आहे.
ही प्रथा नव्यानेच समजली मजेशीर आहे खरे !

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 19/05/2023 - 10:28
वरच्या प्रतिसादात मी उल्लेख केलेला 'पुष्पक' हा १९८७ सालचा कमल हसन आणि अमलाचा 'ब्लॅक कॉमेडी' प्रकारचा चित्रपट तुम्ही पाहीला आहे का? नसेल पाहीला तर जरुर पहा, युट्युबवर आहे. 'The Bra' प्रमाणेच हा सायलेंट चित्रपटही तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. 'पुष्पक'

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 10:35
पुष्पक माझा बघायचा राहून गेलेला आहे. सवडीने नक्की पाहतो ! दरम्यान मला एक शंका आहे : जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते? निव्वळ दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली त्या भाषेत आहे म्हणून? खरंतर निर्भाषिक अशी नोंद व्हायला व्हावी.

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 10:35
पुष्पक माझा बघायचा राहून गेलेला आहे. सवडीने नक्की पाहतो ! दरम्यान मला एक शंका आहे : जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते? निव्वळ दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली त्या भाषेत आहे म्हणून? खरंतर निर्भाषिक अशी नोंद व्हायला व्हावी.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 19/05/2023 - 10:57
जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते?
चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडुन प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्यातली पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे चित्रपटाची पटकथा! चित्रपटाची पटकथा ज्या भाषेत बोर्डाकडे पाठवली असेल ती त्या चित्रपटाची 'अधिकृत भाषा'. त्यामुळे सायलेंट चित्रपट असला तरी त्याची 'निर्भाषिक' अशी नोंद होऊ शकत नाही. दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली वगैरे दुय्यम गोष्टी आहेत, त्या अनेक भाषांमध्येही दाखवल्या जाउ शकतात, उदा. अनेक हिन्दी चित्रपटांत ह्या गोष्टी 'हिंदी', 'इंग्रजी' आणि 'उर्दु' पैकी एक, दोन किंवा ह्या तीनही भाषांमध्ये दाखवल्या जातात.

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 11:05
चित्रपटाची पटकथा ज्या भाषेत बोर्डाकडे पाठवली असेल ती त्या चित्रपटाची 'अधिकृत भाषा'.
अगदी योग्य मुद्दा ! आता समजले. रच्याकने, द ब्रा मध्ये काही ओरडण्याचे आवाज आहेत असे वर्णन मी इतरत्र वाचले. कुणाला ते युट्युबवरील आवृत्तीत ऐकू आले का ?

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 19/05/2023 - 11:24
द ब्रा मध्ये काही ओरडण्याचे आवाज आहेत असे वर्णन मी इतरत्र वाचले. कुणाला ते युट्युबवरील आवृत्तीत ऐकू आले का ?
असावेत! पण ते पार्श्वसंगीतात मिसळुन गेल्याने तितक्या प्रकर्षाने जाणवले नसावेत. तसे तर एक अगदी छोटेसे गाणेही आहे की! नायकाच्या निवृत्ती नंतर पाच-सहा लोकांच्या उपस्थितीत सेंडऑफ चा छोटासा कार्यक्रम पार पडल्यावर तो जेव्हा रेल्वे रुळांवरून चालत असतो तेव्हा रेल्वेलाइनच्या बाजूला उभ्या असलेल्या सफाई कर्मचारी महिला त्याच्यासाठी गाणे म्हणत असतात तो प्रसंग. आठवला का 😀

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 11:37
गाणे म्हणत असतात तो प्रसंग. आठवला का ?
होय, आता युट्युबवर जाऊन खात्री करून घेतली. 35. 57 या बिंदूवर ते गाणे आहे.

श्रीगुरुजी 19/05/2023 - 17:56
आजच पाहिला. खूप मजेशीर आहे. अर्थात पुष्पक खूपच भारी आहे. त्यातील खोपडी (समीर कक्कर) अनेकदा प्रत्यक्ष भेटल्याने पुष्पक जास्त चांगला वाठत असावा. समीर कक्कर एक दीड महिन्यांंपूर्वीच गेला.

In reply to by श्रीगुरुजी

हेमंतकुमार 19/05/2023 - 18:17
इथली चर्चा वाचून मी आज पुष्पक बघायला घेतला. परंतु पहिल्या दोन मिनिटातच लक्षात आले की, अरे हा आपण हा पूर्वी पाहिलेला आहे ! अर्थात आता पूर्ण कथा जाम आठवत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला ती झाडणारी बाई ‘ज्या प्रकारे’ कॅमेऱ्याने टिपली आहे ती केवळ भन्नाट आहे. ते दृश्य स्मरणशक्तीत अगदी रुतलेले आहे !! 🙂

मस्त खुसखुशीत लेख आवडला. 'सायलेन्ट मूव्ही' नावाचा एक विनोदी चित्रपट ७०च्या दशकात आला होता. तो खरोखरच मूकपट होता. 'नो' हा एकच शब्द त्या चित्रपटात उच्चारला गेला होता. त्यात एक वाह्यात विनोदी प्रवेश होता. पुरुषी विनोद होता हा. त्यात काय झाले याचा अर्थ जेव्हा मी माझ्यासोबतच्या मित्राला सांगितला तेव्हा तो कित्येक मिनिटे हसत होता हे आठवले. अशीच खसखस नंतरही प्रेक्षकात सुरू होती. ही छान आठवण जागृत केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. लेख आवडला हेवेसांनल.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 27/05/2023 - 16:16
धन्यवाद हो ! बऱ्याच दिवसांनी तुम्ही मौनव्रत सोडून सक्रिय झाल्याचे पाहून आनंद वाटला.
'सायलेन्ट मूव्ही' नावाचा एक विनोदी
हा शोधायला पाहिजे. युट्युबवर तरी दिसत नाही

गवि 18/05/2023 - 14:46
तुम्हाला हा चित्रपट काय सर्च केल्यावर सापडला असे विचारत नाही. ;-) एकूण रोचक प्रयोग दिसतो आहे. पूर्ण चित्रपटात कोणीही ब्रा, सॉरी ब्र देखील काढत नाही हे आश्चर्यकारक..

हेमंतकुमार 18/05/2023 - 15:37
चित्रपटाचा शेवट मस्त!
>>> अ-ग-दी-च ! ..
कोणीही ब्रा, सॉरी ब्र देखील काढत नाही
>>> 🙂 ..
तुम्ही सुद्धा?
>>> आपल्या सर्वांचा लसावि एकच असतो राव 😀

टर्मीनेटर 18/05/2023 - 19:38
दुपारी चित्रपटाविषयी उत्सुकता जागृत करणारा हा लेख वाचला आणि कामे हातावेगळी झाल्यावर लगेच पाहिला. 'पुष्पक' ह्या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी कुठल्याही संवादाशिवायही मानवी मनातल्या विविध भावना आणि भल्या-बुऱ्या मनोवृत्तींचे दर्शन घडवणारा हा सायलेंट चित्रपट "स्टार्ट टू एन्ड" आवडला 👍 उत्तम दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटातील लोको पायलट नायक, नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी आणि डॉग हाऊस मध्ये राहणारा तो छोटा मुलगा हि पात्रे लक्षात राहण्यासारखी आहेत. विवाहोत्सुक वयस्कर नायकाची तरुण 'वधू'च्या आईने घेतलेली 'वरपरीक्षा' आणि मॅमोग्राफी शिबिर हे प्रसंग मजेशीर आहेत.
"जेव्हा तो अशा स्त्रियांना बॅगेतून काढून ती चोळी दाखवतो, तेव्हा त्या स्त्रिया "ही माझी नाही" असे लगेच का सांगत नाहीत, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांनी विचारू नये !"
नायक वयस्कर असला तरी विवाहोत्सुक असतो हे आधीच्या प्रसंगावरून स्पष्ट होते. कागदोपत्री हा ‘जर्मन’ चित्रपट आहे. उत्तर जर्मनीत लग्नाच्या आदल्या रात्री होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे 'ब्रम्हचर्य' (Bachelorhood/Bachelorette) संपुष्टात येत असल्याची घोषणा/प्रतीक म्हणून वराची पॅन्ट किंवा वधूची 'ब्रा' जाळण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या स्त्रियांकडुन त्याला मिळणारे वेगवेगळे प्रतिसाद बघता जर्मनीत (किंवा अझरबैजानमध्ये) विवाहोत्सुकाने प्रपोज करण्यासाठीही अशाच 'ब्रा'शी संबंधित एखाद्या प्रथेचा संदर्भ आहे का ते तपासावे लागेल 😀 असो... एका चांगल्या चित्रपटाची ओळख करून दिलीत त्यासाठी धन्यवाद 🙏 (सुरुवातीची २० मिनिटे नॉर्मल स्पीड वर पाहताना चित्रपट थोडा संथ वाटल्याने स्पीड १.२५ करून पाहिला)

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 18/05/2023 - 19:51
माहितीपूर्ण व रंजक प्रतिसाद आवडला.
वराची पॅन्ट किंवा वधूची 'ब्रा' जाळण्याची प्रथा आहे.
ही प्रथा नव्यानेच समजली मजेशीर आहे खरे !

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 19/05/2023 - 10:28
वरच्या प्रतिसादात मी उल्लेख केलेला 'पुष्पक' हा १९८७ सालचा कमल हसन आणि अमलाचा 'ब्लॅक कॉमेडी' प्रकारचा चित्रपट तुम्ही पाहीला आहे का? नसेल पाहीला तर जरुर पहा, युट्युबवर आहे. 'The Bra' प्रमाणेच हा सायलेंट चित्रपटही तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. 'पुष्पक'

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 10:35
पुष्पक माझा बघायचा राहून गेलेला आहे. सवडीने नक्की पाहतो ! दरम्यान मला एक शंका आहे : जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते? निव्वळ दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली त्या भाषेत आहे म्हणून? खरंतर निर्भाषिक अशी नोंद व्हायला व्हावी.

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 10:35
पुष्पक माझा बघायचा राहून गेलेला आहे. सवडीने नक्की पाहतो ! दरम्यान मला एक शंका आहे : जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते? निव्वळ दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली त्या भाषेत आहे म्हणून? खरंतर निर्भाषिक अशी नोंद व्हायला व्हावी.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 19/05/2023 - 10:57
जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते?
चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडुन प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्यातली पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे चित्रपटाची पटकथा! चित्रपटाची पटकथा ज्या भाषेत बोर्डाकडे पाठवली असेल ती त्या चित्रपटाची 'अधिकृत भाषा'. त्यामुळे सायलेंट चित्रपट असला तरी त्याची 'निर्भाषिक' अशी नोंद होऊ शकत नाही. दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली वगैरे दुय्यम गोष्टी आहेत, त्या अनेक भाषांमध्येही दाखवल्या जाउ शकतात, उदा. अनेक हिन्दी चित्रपटांत ह्या गोष्टी 'हिंदी', 'इंग्रजी' आणि 'उर्दु' पैकी एक, दोन किंवा ह्या तीनही भाषांमध्ये दाखवल्या जातात.

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 11:05
चित्रपटाची पटकथा ज्या भाषेत बोर्डाकडे पाठवली असेल ती त्या चित्रपटाची 'अधिकृत भाषा'.
अगदी योग्य मुद्दा ! आता समजले. रच्याकने, द ब्रा मध्ये काही ओरडण्याचे आवाज आहेत असे वर्णन मी इतरत्र वाचले. कुणाला ते युट्युबवरील आवृत्तीत ऐकू आले का ?

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 19/05/2023 - 11:24
द ब्रा मध्ये काही ओरडण्याचे आवाज आहेत असे वर्णन मी इतरत्र वाचले. कुणाला ते युट्युबवरील आवृत्तीत ऐकू आले का ?
असावेत! पण ते पार्श्वसंगीतात मिसळुन गेल्याने तितक्या प्रकर्षाने जाणवले नसावेत. तसे तर एक अगदी छोटेसे गाणेही आहे की! नायकाच्या निवृत्ती नंतर पाच-सहा लोकांच्या उपस्थितीत सेंडऑफ चा छोटासा कार्यक्रम पार पडल्यावर तो जेव्हा रेल्वे रुळांवरून चालत असतो तेव्हा रेल्वेलाइनच्या बाजूला उभ्या असलेल्या सफाई कर्मचारी महिला त्याच्यासाठी गाणे म्हणत असतात तो प्रसंग. आठवला का 😀

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/05/2023 - 11:37
गाणे म्हणत असतात तो प्रसंग. आठवला का ?
होय, आता युट्युबवर जाऊन खात्री करून घेतली. 35. 57 या बिंदूवर ते गाणे आहे.

श्रीगुरुजी 19/05/2023 - 17:56
आजच पाहिला. खूप मजेशीर आहे. अर्थात पुष्पक खूपच भारी आहे. त्यातील खोपडी (समीर कक्कर) अनेकदा प्रत्यक्ष भेटल्याने पुष्पक जास्त चांगला वाठत असावा. समीर कक्कर एक दीड महिन्यांंपूर्वीच गेला.

In reply to by श्रीगुरुजी

हेमंतकुमार 19/05/2023 - 18:17
इथली चर्चा वाचून मी आज पुष्पक बघायला घेतला. परंतु पहिल्या दोन मिनिटातच लक्षात आले की, अरे हा आपण हा पूर्वी पाहिलेला आहे ! अर्थात आता पूर्ण कथा जाम आठवत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला ती झाडणारी बाई ‘ज्या प्रकारे’ कॅमेऱ्याने टिपली आहे ती केवळ भन्नाट आहे. ते दृश्य स्मरणशक्तीत अगदी रुतलेले आहे !! 🙂

मस्त खुसखुशीत लेख आवडला. 'सायलेन्ट मूव्ही' नावाचा एक विनोदी चित्रपट ७०च्या दशकात आला होता. तो खरोखरच मूकपट होता. 'नो' हा एकच शब्द त्या चित्रपटात उच्चारला गेला होता. त्यात एक वाह्यात विनोदी प्रवेश होता. पुरुषी विनोद होता हा. त्यात काय झाले याचा अर्थ जेव्हा मी माझ्यासोबतच्या मित्राला सांगितला तेव्हा तो कित्येक मिनिटे हसत होता हे आठवले. अशीच खसखस नंतरही प्रेक्षकात सुरू होती. ही छान आठवण जागृत केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. लेख आवडला हेवेसांनल.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 27/05/2023 - 16:16
धन्यवाद हो ! बऱ्याच दिवसांनी तुम्ही मौनव्रत सोडून सक्रिय झाल्याचे पाहून आनंद वाटला.
'सायलेन्ट मूव्ही' नावाचा एक विनोदी
हा शोधायला पाहिजे. युट्युबवर तरी दिसत नाही
लेखनविषय:
लेखनप्रकार
चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ? घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ? तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय? आणि शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय? वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट: The Bra. ok विदेशी चित्रपट असल्याने त्याची भाषा कोणती हा महत्त्वाचा मुद्दा.

"The Kerala Story" - एक उत्तम कलाकृती!

टर्मीनेटर ·

हेमंतकुमार 09/05/2023 - 15:38
वास्तवाचे भान देणारी ही 'उत्तम कलाकृती'
आणि तिचे निव्वळ चित्रपट रसिक या दृष्टिकोनातून केलेले रसाळ रसग्रहण मनापासून आवडले. चित्रपटाच्या निर्मात्यांपासून ते कलाकारांपर्यंत महत्त्वाच्या सर्वांची दखल घेतली गेली आहे हेही विशेष.

कपिलमुनी 09/05/2023 - 16:34
छान परिक्षण/ रसग्रहण ! कुठेही प्रचारी किंवा अभिनिवेश नाही. बाहेर एवढा प्रोपोगंडा असताना देखील तुमच्या सोबत मुस्लिम लोक आले हे विशेष ..

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 10/05/2023 - 13:49
@ कपिलमुनी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
बाहेर एवढा प्रोपोगंडा असताना देखील तुमच्या सोबत मुस्लिम लोक आले हे विशेष ..
मुनिवर्य, आम्ही चौघे अनेक चित्रपट एकत्र बघतो. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यावर अशा एकत्र पाहिलेल्या चित्रपटांपैकी 'पुष्पा', 'KGF २', 'भूल भुलैया २', 'धर्मवीर - मु.पो. ठाणे' हि पटकन आठवलेली काही नावे! त्यामुळे 'द केरला स्टोरी' हा चित्रपटही एकत्र पाहणे ह्यात आमच्यासाठी तरी विशेष असे काही नव्हते! बाकी प्रोपगंडा तर काय तिन्ही त्रिकाळ आपल्या सभोवती चालुच असतो, त्या पासुन स्वतःचे संरक्षण करणारी 'इम्युनीटी' आमच्यात तयार झाल्याने त्याच्या सहीत जगण्या-वागण्याची आता सवय झाली आहे 😀

In reply to by कपिलमुनी

मोदक 11/05/2023 - 00:47
अच्छा.. म्हणजे सगळीकडे सुरू असलेला लव्ह जिहाद हा "प्रपोगंडा" आहे तर.. प्रपोगंडा - ideas or statements that may be false or present only one side of an argument that are used in order to gain support for a political leader, party, etc. तुमच्या पुढच्या थिअऱ्या काय असणार आहेत? कसाब शांतता पसरवण्यासाठी मुंबईत आला होता... याकूबचा दिवाळीची दारू आणि RDX मध्ये गोंधळ झाला.. अफझल गुरूला पार्लमेंट मध्ये मिठाई पाठवायची होती.. पोटासाठी काय काय करावे लागते ना..

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 24/05/2023 - 20:01
लव्ह जिहाद (कायद्यानुसार व्याख्या) - Prohibition of unlawful conversion from one religion to another by use of misrepresentation, force, undue influence, coercion, any other fraudulent means, allurement, or promise of marriage. काही आक्षेप किंवा शंका असल्यास न्यायालयात दाद मागावी. अधिक माहिती हवी असल्यास स्वतः शोधावी.

Trump 09/05/2023 - 16:38
पण एका खास मित्राने आग्रही शिफारस केल्यामुळे 'The Kerala Story' हा चित्रपट परवाच्या रविवारी आम्ही दोघं आणि माझा एक अतिशय जवळचा
मुस्लिम मित्र व त्याची बायको
अशा चौघांनी बघितला आणि तो बघण्यासाठी खर्चलेला वेळ आणि पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला असेच मी म्हणेन.
त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती? 'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे! परिक्षणाबद्दल धन्यवाद.

In reply to by Trump

टर्मीनेटर 10/05/2023 - 17:45
@ Trump
त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती?
ट्रंप साहेब चित्रपटाबद्दल त्यांची प्रतिक्रीया काय होती हे मी लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदात लिहिलेले आहे! तरी तुम्ही
'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे!
असे जे लिहीले आहे त्यामागे त्यांचे धर्मविषयक विचार काय असतील हे जाणुन घ्यायची जिज्ञासा असावी असे वाटल्याने काही गोष्टी सांगतो... नाही, तुम्ही उल्लेख केल्या प्रमाणे अशी प्रतिक्रिया नव्हती 😀 आणि विचारांत क्लॅरीटी आणि जीवन शैली/पद्धती विषयी आपले स्वतःचे तत्वज्ञान अंगिकारणाऱ्या मित्रमंडळींच्या संभाषणात असल्या स्पष्टीकरणांची गरजही भासत नाही! आणि धार्मिकतेबद्दल म्हणाल तर त्याचे धर्माविषयक तत्वज्ञान त्याच्याच भाषेत सांगायचे तर "माणसाच्या जिवनात धर्माचे प्रमाण हे एखद्या पदार्थात आवश्यक असलेल्या मिठाच्या प्रमाणा एवढेच असावे, मिठ जास्त झाले तर जशी पदार्थाची चव बिघडते त्याचप्रमाणे जिवनात धर्माचे प्रमाण वाढले तर जिवन बिघडते तसेच अजिबात मिठ नसलेला पदार्थ जसा बेचव होतो त्याचप्रमाणे जिवनात धर्म अजिबात नसेल तर जिवनही बेचव होते." असे अगदी सरळ सोपे आहे. हे त्याच्या शब्दात सांगीतले असले तरी आम्हा खास किंवा जवळच्या मित्रपरिवारतील सर्वच मंडळींची विचारसरणी ही अशीच आहे. बाकी धर्मांध विचाराच्या लोकांना (मग ते कुठ्ल्याही धर्माचे असोत) नुसते मित्र म्हणुनही आम्ही स्विकारत नाही! असो.. प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

In reply to by टर्मीनेटर

चौकस२१२ 11/05/2023 - 10:07
"माणसाच्या जिवनात धर्माचे प्रमाण हे एखद्या पदार्थात आवश्यक असलेल्या मिठाच्या प्रमाणा एवढेच असावे, मिठ जास्त झाले तर जशी पदार्थाची चव बिघडते त्याचप्रमाणे जिवनात धर्माचे प्रमाण वाढले तर जिवन बिघडते टर्मीनेटर, बहुतेक हिंदूंचेही हेच विचार आहेत ...अगदी भाजपाला पाठिंबा देणारी हिंदूंचे सुद्धा , देश आणि चांगले नागरिक ह्यालाच प्राधान्य बहुतेक हिंदू देतात.. अर्थात अनेक जणांचा ह्यावर विश्वास बसणार नाही म्हणा दुर्दैवाने ( निदान वरकरणी तरी असे भासतें) "कि देश आधी धर्म नंतर" किंवा तुम्ही दिलेल्या उपमे प्रमाणे "धर्म चिमूटभर चवीपुरता " हा विचार २ जागतिक अब्राहमीक धर्मातील लोकांकडून कमी दिसतो .. आणि विशेष म्हणजे जिथे हे २ अब्राहमीक धर्माचे लोक अल्पसंख्यांक आहेत तिथे हा अभाव जास्त दिसतो ... ( उधारण वांद्र्यातील क्रिस्टी जेवढे धार्मिक वाटले तेवढ्या प्रमाणात जिथे बहुसंखय ख्रिस्ती आहेत अश्या इंग्लड किंवा इतर पाश्चिमात्य देशात वाटले नाहीत... तसे नसते तर येथे रविवारी चर्च तुडुंब भरले दिसले असते ...! (हेच विधान कदाचित इस्लाम अनुयायांबद्दल मी करणार नाही . कारण साधे आहे जर सरासरी काढली तर एकूण जिथे जिथे ख्रिस्ती बहुसंख्यांक आहेत तिथे धर्मांवर आधारलेली अशी ख्रिस्ती राष्ट्रे कमी आहेत , त्यामानाने जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक आहेत तिथे धर्मांवर आधारलेली अशी मुस्लिम राष्ट्रे जास्त आहेत) मग काही लोक हे विचारतील कि हिंदू जर एवढा सहिष्णू आहे आहे तर गेली ९ + वर्षे तो संघाचं विचारसरणीला का पाठिंबा देतोय? याला अनेक कारणे आहेत , हिंदू अगदी अचानक धार्मिक झालाय हे नाही . आजही "हिंदुराष्ट्र्र करा" या पेक्षा "हिंदूंचा योग्य मान राखणारे" राष्ट्र करा" देश सुस्थित राहो यालाच जास्त प्राधान्य दिले जाईल / असेच बहुतेक हिंदू म्हणेल असे मला वाटते .... हंस असा सहिष्णू हिंदू मात्र वैतागलेले आहे हे खरे सतत रॅडिकॅह डॉ खेळणारे हिंदू फोड चालू ठेवणारे यांचं कारवायांमुळे,, " फार झाले सहिष्णुता गेली चुलीत " असे एक दिवस वैतागून म्हणलं त्याने तर तो त्याचा दोष राहणार नाही....

In reply to by चौकस२१२

अथांग आकाश 11/05/2023 - 12:52
देश आणि चांगले नागरिक ह्यालाच प्राधान्य बहुतेक हिंदू देतात.. अर्थात अनेक जणांचा ह्यावर विश्वास बसणार नाही म्हणा >>> सहमत आहे!

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 12/05/2023 - 12:16
मेरा अब्दुल ऐसा नही है!
@ सुबोध खरे चपखल! प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीला, तारुण्यसुलभ कल्पनांमध्ये तसे वाटणे स्वाभाविक असले तर तिचा अब्दुल 'तसा' निघाल्यास आयुष्याची राख-रांगोळी होणे अपरिहार्य! @ रंगीला रतन व्हिडीओ आवडला!

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 12/05/2023 - 11:29
@ कर्नलतपस्वी
"पण मला एक समजत नाही समाजात अशा अनेक घटना घडत असताना या पासून कुणी धडा घेत का नाही!"
कर्नल साहेब जेव्हा जेव्हा हा विषय ऐरणीवर येतो तेव्हा तेव्हा तो प्रकार कसा खोटा आहे हे समाजमनावर ठसवण्यासाठी सिनेसृष्टीतील नामवंत/पडेल कलाकारांपासून राजकारणी, वकील, प्राध्यापक, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार-संपादक, तथाकथित डावे विचारवंत आणि अशा प्रकाराला ज्यांचे उघड किंवा छुपे समर्थन आहे असे समाजातील विविध घटक हिरीरीने पुढे येतात. त्यावर गदारोळ माजवून विषयाचे गांभीर्य संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो ज्याच्या परिणामी हे प्रकार सुरूच राहतात आणि नवनवीन तरुणी त्याला बळी पडतच रहातात! वास्तविक आज 'लव्ह जिहाद' म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार तसा काही नवीन नाहीये, फार मागे जाण्याची आवश्यकता नाही पण गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण त्यावेळी समाजमाध्यमे अस्तित्वात नसल्याने ती प्रकरणे आजच्यासारखी प्रकाशात येत नव्हती. लोकलज्जेस्तव अशा पीडित स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेव्हाही पोलिसांत तक्रारी देखील केल्या जात नव्हत्या आणि आजही त्या तेवढ्या प्रमाणात केल्या जात नाहीयेत त्यामुळे अशा प्रकरणांची निश्चित आकडेवारी मिळणे हि अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही गोष्ट 'लव्ह जिहाद' हा कांगावा आहे, असे काही अस्तित्वातच नसते वगैरे वगैरे गळे काढणाऱ्यांना देखील माहीत असते, नाही अशातला भाग नाही. पण दांभिकता रक्तात भिनलेली हि मंडळी आपल्या अजेंड्याला मारक ठरू शकेल अशी कुठलीही गोष्ट पुढे आली कि क्षणाचाही विलंब न करता त्याचा विरोध करण्यासाठी त्वरित पुढे येऊन आकांडतांडव करायला सुरुवात करतात. सध्या 'द केरला स्टोरी' ह्या चित्रपटावरून उपरोल्लिखित मंडळी जो गदारोळ करत आहेत त्यातून आपल्या मराठी भाषेत प्रचलित असलेल्या "एकतर हागणाऱ्याला तरी लाज असते किंवा बघणाऱ्याला तरी" असा आशय असलेल्या एका जुन्या म्हणीच्या सत्यतेची प्रचिती येत आहे. इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल! (* वरील परिच्छेदाकडे केवळ उदाहरण म्हणून पाहावे तसे लिहिण्यात त्या पीडित माता/भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उपमर्द/अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही.) तत्कालीन चर्चा-बातम्यांमधून होणाऱ्या जनजागृतीपेक्षा चित्रपटाच्या माध्यमातून साधणारा परिणाम नक्कीच प्रभावी आणि दीर्घकालीन असल्याने ह्या चित्रपटाच्या निमित्ताने विषयाची दाहकता आणि गांभीर्य भारतीय समाजापुढे आणून एकप्रकारे जनजागृतीचे कार्य करणाऱ्या निर्माता,दिग्दर्शक, कलाकार आणि सर्व चमूचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करावेसे वाटते आणि ह्या चित्रपटाविरोधात काहूर माजवणाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करून, त्यांच्या अजेंड्याला पूरक ठरतील अशा त्यांच्या फाजील प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात आपली ऊर्जा आणि वेळ खर्च न करता Keep Calm and Watch "The Kerala Story" एवढे लिहून माझा प्रतिसाद आवरता घेतो!

In reply to by टर्मीनेटर

चौकस२१२ 12/05/2023 - 11:39
खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना .... टर्मीनेटर ने टरमिनेट केले कि ... ये हुई ना बात .. मोगाबॉ खुश हुआ

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 12/05/2023 - 15:44
हे राम... सकाळी लिहिलेला हा प्रतिसाद व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्डच्या रूपाने आता मलाच परत आला आहे… दुनिया गोल है भैया 😀 पण ज्यानी कोणी तो मेसेज म्हणुन पहील्यांदा व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला असेल त्याने कॅापी-पेस्ट करताना वरती आयडी वगैरेही ठेवलाय हे बरे झाले… उगाच साहित्यचोरी वगैरेचे बालंट यायला नको, त्याच्यावरही आणि माझ्यावरही 😂 😂 😂
1

In reply to by टर्मीनेटर

रंगीला रतन 12/05/2023 - 20:36
इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल! लै जोरशात मारली आहे :=)

Bhakti 09/05/2023 - 20:18
मस्तच लिहिलंय! आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात जाणून घ्यायला नक्की आवडेल! मला अनेक परंपरा , अर्थ माहिती आहेत .पण सनातन धर्म आणि धार्मिक परंपरा वेगवेगळ्या असतात हे आताशी समजलं आहे.(खुप दिवसांपासुन लिहायचं होतं हे, तुमच्या धाग्यावर लिहिले :) अवांतर साठी माफी) लेकीला म्हणूनच भरतनाट्यम क्लासला घातलयं.मस्त संस्कृत शब्द ,श्लोक म्हणते..भारी वाटतं.मला तर वाटतं तिनं संस्कृतमध्ये पदवी घ्यावी :) बघूया.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 16/05/2023 - 08:14
मुक्त विहारि | भक्ति प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ भक्ति
"मस्त संस्कृत शब्द ,श्लोक म्हणते..भारी वाटतं.मला तर वाटतं तिनं संस्कृतमध्ये पदवी घ्यावी :) बघूया."
हुशार आहेच की ती, संस्कृतमध्ये पदवी मिळवुन नक्कीच तुमची इच्छा पुर्ण करेल!

आनन्दा 09/05/2023 - 20:24
या धाग्याच्या निमित्ताने. आजच एक वेगळी घटना ऐकली. कॅफे मध्ये बसलेल्या मुलीला डोळ्यात औषध टाकून पळवले. तिला कतार ला विकायचा प्लॅन होता. काहीतरी जुगाड करून ती पळून आली. तिचा पूर्ण ब्रेनवाश केला गेला होता.

चौकस२१२ 10/05/2023 - 05:18
आपलं परीक्षण चित्रपट पाहिल्यावर नीट वाचणार हे नक्की तूर्तास , आपण एका मुस्लिम कुटुंबाबरोबर हा चित्रपट पाह्यला गेलात आणि ते आले या बद्दल आपले आणि त्यांचे कौतुक हा चित्रपट केवळ हिंदुविरोधी कारवायांवर प्रकाश टाकत नसुन हिंदुंकडुन होणाऱ्या चुकांवरही अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत असल्याने असे समतोल विचार दाखवले असतील तर उत्तमच आहे ... दुर्दैवाने " मुस्लिमांच्या भावना दुखावू नका" एवढाच परवलीचा शब्द घेऊन या चित्रपटाला जो विरोध होतोय तो दुर्दैवी ""तुम्ही मला परकिय कम्युनिझमचे धडे देत राहीलात त्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवल्या असत्या तर ..... आणि हे वाक्य ऐकून तर हाहा पो दु झाले

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 16/05/2023 - 08:30
श्रीगणेशा | चौकस२१२ प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चौकस२१२
"आणि हे वाक्य ऐकून तर हाहा पो दु झाले "
प्रत्यक्ष चित्रपट पाहताना ज्या घटनांच्या पार्शवभूमीवर आधारित असा तो संवाद आहे त्या पाहिल्यावर हसू येणार नाही!

प्रचेतस 10/05/2023 - 12:48
संतुलित आणि समतोल परीक्षण आवडले. असे चित्रपट मात्र आवडत नसल्याने बघणार नाहीच. मात्र यानिमित्ताने तुमच्या बॉण्डपटांवरील लेखमालिकेची आठवण करून देत आहे. लिहायला घ्या भो लवकरात लवकर :)

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 16/05/2023 - 08:53
@ प्रचेतस
"असे चित्रपट मात्र आवडत नसल्याने बघणार नाहीच."
मलाही आवडत नाहीत, पण विषयाची योग्य हाताळणी आणि वेगवान, प्रभावी सादरीकरणामुळे हा चित्रपट मात्र आवडला!
"बॉण्डपटांवरील लेखमालिकेची आठवण करून देत आहे. लिहायला घ्या भो लवकरात लवकर :)"
कोकण-गोवा मालिकेचे २-३ भाग अजून लिहायचे बाकी आहेत, ते झाल्यावर बॉंड पंचविशीला हात घालतो 😀

आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात
काही वर्षांपूर्वी बंगरूळात असताना शेजारी एक मुस्लीम कुटुंब राहायला आहे. पती पत्नी व एक लहान मुलगा व त्याची साधारण ८-९ वर्षांची मोठी बहिण असे. माझी कन्या ही साधारण त्याच वयाची असल्याने मुलीसोबत तिची गट्टी जमली. मुलगा ३-४ वर्षांचा होता व बालसुलभ ओढीने माझी कन्याही त्याच्या सोबत खेळत असे. काही दिवसंनंतर जाणवले कि मुलीच्या बोलण्यात उर्दू शब्द यायला लागले होते आधी कौतुक वाटले. काही दिवसांनी माझी कन्या रडत रडत घरी आली कारण विचारले तर मुलाने मारले आम्ही बाहेर आलो. परिवारातील मुस्लीम स्त्री मुलाला रागवत होती पण तिने हात काही उचलला नाही. वो मस्सूम है ना असे म्हणुन प्रकरण मिटवले. नंतर एकदा बाहेर अजान चालु असताना मुलगी एकाएक स्तब्ध झाली तिला विचारले असे का केले तर म्हणाली कि अल्ला जहन्नुम मे डालेगा नही तो .तेव्हा जाणीव झाली कि आता काही केले नाही तर प्रकरण हाताबाहेर जाऊ लागेल.मी ही आस्तिक आहे व रोजच्या दिनचर्येत देवासमोर बसुन स्तोत्र वगैरे म्हणत असतो पण तो पावेतो कन्येला त्यात समाविष्ट केले नव्हते. आणि विशेष म्हणजे त्या परिवारीत्ल मुलीसाठी रोज संध्याकाळी कुराण पठणासाठी एक मौलवी येत असे तेव्हा ती मुलगी अगदी हिजाब वगैरे घालुन तयार राह्त असे. त्या दिवसांपासुन कन्येला देवासमोर प्रार्थना म्हणणे आरती म्हणणे ह्यात अगदी आग्रहाने घेऊ लागलो. आणि तिला आश्वस्त ही केले कि त्या मुलाने पुन्हा हात उचलला तर दोन ठेवुन दे आम्हीही बोलु कि ये भी मस्सूम है वगैरे. पण ती वेळ न्म्तर आली नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:01
@ कानडाऊ योगेशु स्वानुभवाधारित प्रतिसाद आवडला 👍 नव्या पिढीला कर्मठपणा आणि सोवळे-ओवळे शिकवण्याची गरज नाही, पण काही बेसिक धार्मिक संस्कार मुलांवर घरातूनच होणे अत्यावश्यक वाटते!

विवेकपटाईत 10/05/2023 - 17:48
एक अरब स्टोरी ही बनविण्याची गरज आहे. हजारो मुलींना गरीब मुलींशी भारतात येणारे अरब शेख काही दिवसांसाठी लग्न करतात आणि तलाक देतात . काही विदेशात घेऊन जातात मौज मस्ती करतात आणि नंतर त....... https://m-hindi.webdunia.com/latest-deutsche-welle-news/arab-sheikh-marriages-117101300031_1.html

चित्रपट उत्तम आहे. काश्मीर फाईल्स फारच संथ होता. मुद्दा क्र. १ : मुळात लव जिहाद हा एक अँगल झाला मात्र मुळ गोष्ट तीच आहे. स्त्रीला काबूत ठेवण्याची ! पुरुषाची आदिम प्रवृत्ती ! आपल्या प्रॉपर्टीत दुसरा भागीदार होऊ नये ही दुसरी इच्छा ! मुद्दा क्र. २ आई वडीलांनाच धर्माबद्दल माहिती नसते तर मुलांना काय कप्पाळ सांगणार ? गणपतीच्या मिरवणूकीत नाचले आणि गुढीपाडव्याला नऊवारी साड्या आणि फेटे घालून फटफट्या चालवणे म्हणजेच धर्म एवढीच पालकांची समज असेल तर मुलांना काय समजावणार ? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ? तत्त्वज्ञान वगैरे दुरच्या गोष्टी झाल्या पण निदान कथारुपात देव देवतांच्या गोष्टी तरी हिंदूंना माहित असाव्यात. कथा वाचून, ऐकून कदाचित लहान वयात समजणार नाहीत, धर्माबद्द्ल नावड निर्माण होईल किंवा मूल नास्तिक होईल. पण त्या गोष्टींत रस निर्माण झाला तर पुढे जाऊन धर्मबदलाचे भूत तरी मानगुटीवर चढणार नाही. हिंदू धर्म ब्रह्मा आणि सरस्वतीची गोष्ट चुकीची असली तरी खुलेपणाने मांडतो, वेगवेगळ्या पंथांना, मतांना थारा देतो, इतर धर्मीयांचे / पंथीयांचा त्यांच्या आवडीप्रमाणे जगण्याला मंजूरी देतो ही हे स्वातंत्र्य अनुभवायचे असेल तर हिंदू असण्याला पर्याय नाही. आपल्या धर्माबद्द्ल माहीती असेल आणि इतर धर्मांचा थोडा बहूत अभ्यास असेल तर बाळबोध शालीनी प्रमाणे धर्मांतर शक्य होणार नाही. "जो देव आपल्या बायकोला वाचवायला स्वतः सक्षम नसतो तो माकडांची मदत घेतो तो तुम्हाला काय मदत करणार ? " "जो देव आपल्या मुलाला सुळावर जाण्यापासून वाचवू शकला नाही तो देव तुम्हाला कसा वाचवणार " अशा प्रश्नांवर निरुत्तर होण्याची गरज नसते आणि त्याचे उत्तर देण्याची गरज नसते. या प्रश्नाच्या उत्तरादाखल "जो देव त्याच्या सर्वात लाडक्या अनुयायाला साध्या तापापासून वाचवू शकला नाही, त्याला अपस्मारापासून वाचवू शकला नाही तो देव तुम्हाला कशी मदत करणार ? " "जो देव आपल्या लाडक्या अनुयायाच्या नातवाचा खून होण्यापासून वाचवू शकला नाही तो तुम्हाला कशा प्रकारे वाचवणार ? " असे प्रश्न विचारता येऊ शकतात. ज्या दिवशी बाईची जात आपल्या इज्जत, आब्रु सारख्या संकल्पना मोडीत काढेल आणि त्यामुळे आत्महत्या करणार नाही त्या दिवशी पुरुषाच्या हातातील एक प्रभावी आयुध गळून पडेल. हे मध्यमवर्गीय पुरुषांसाठी देखील तितकेच लागू आहे. देव दिसत नाही म्हणून तुम्ही छाती काढून नास्तिक असल्याचे ढिंढोरे पिटता तेवढ्याच मोठ्याने दिसत नसलेल्या इज्जत / आब्रुचे नगारे वाजविणे सोडले तर आयुष्य सुखी होईल. असो. हा प्रतिसाद म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे असे समजून विसरुन गेले तरी चालण्यासारखे आहे.

In reply to by धर्मराजमुटके

अथांग आकाश 11/05/2023 - 13:00
गणपतीच्या मिरवणूकीत नाचले आणि गुढीपाडव्याला नऊवारी साड्या आणि फेटे घालून फटफट्या चालवणे म्हणजेच धर्म एवढीच पालकांची समज असेल तर मुलांना काय समजावणार ? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार >>> हा हा, चपखल!

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:10
विवेकपटाईत | राजेंद्र मेहेंदळे | रंगीला रतन | धर्मराजमुटके प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ धर्मराजमुटके
"हा प्रतिसाद म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे असे समजून विसरुन गेले तरी चालण्यासारखे आहे. "
नाही, तसे काही नाही. प्रतिसादातून भावना व्यवस्थित पोचल्या!

शाम भागवत 11/05/2023 - 06:51
परिक्षण आवडले. मला काही हा सिनेमा पाहवणार नाही. याच कारणाने काश्मिर फाईलही पाहिलेला नाही. पण भारतात हिंदू धर्म जागा होऊ लागला आहे हे नक्की. अगदी नास्तिक हिंदू देखील आता हिंदू धर्मावर होणा-या आघातावर विचार करायला लागला आहे. बोलायला लागला आहे व हे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र यातून अध्यात्माकडे वळणारी माणसे तयार व्हायला पाहिजेत एवढीच इच्छा आहे.

चौकस२१२ 11/05/2023 - 07:19
आपलेच दात आपलेच ओठ, नुकतेच केदार शिंदे या अनुभवी दिगदर्शकने ( शगंगाधर टिपरे ते शाहीर साबळे ) एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी महाराष्ट्रात केरळ स्टोरी फुकट दाखवलं जात आहे यावर नाराजी व्यक्त केली आहे .. हि कसली विचित्र पोटदुखी ..विचित्र प्रवृत्ती .. साहिर साबळेंचं जीवांवरील चित्रपट आणि हिंदू मुलींचे धर्मांतर हे केवढे वेगळे विषय .. काय यांच डोस्क फिरलोय का ? हा विडिओ जरूर पहा https://www.youtube.com/watch?v=3dzSfJJLYFw

सतिश पाटील 11/05/2023 - 12:01
बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, मग तुम्हाला आवडला का चित्रपट ? आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही. बायकोचे मत तेच तुमचे मत का ?

In reply to by सतिश पाटील

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:42
शाम भागवत | सतिश पाटील प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ सतिश पाटील आपण जी दोन वाक्ये अधोरेखित करून दोन प्रश्न विचारले आहेत त्या वाक्यांआधीचे त्या परिच्छेदातले सर्वात पहिले वाक्य
"मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही."
आपल्या वाचनातुन निसटले असावे काय 😀 असो.. वरील प्रश्न विचारण्यामागील आपल्या हेतु विषयी शंका घेण्यास वाव असला तरी उत्तरे देतो. १)
मग तुम्हाला आवडला का चित्रपट ?
ह्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणच अधोरेखीत केलेल्या माझ्या "बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता" ह्या वाक्यातील 'तिलाही' ह्या शब्दात दडलेले आहे 😀 २)
बायकोचे मत तेच तुमचे मत का ?
माझे मत काय असावे हे वरती दिलेल्या पहिल्या वाक्यातील 'ती माझी आवडच नाही.' ह्या शब्दांतुन लक्षात येणे तसे अजिबात अवघड नाही. पण तरीही तुम्हाला अपेक्षित असा तुम्ही काढलेला अर्थही मान्य करण्यासही माझी काहीच हरकत नाही, तसेही म्हणतातच ना "Wife is always right" इथेही तसंच समजा हवंतर 😂

अथांग आकाश 11/05/2023 - 12:19
आम्ही सुद्धा गेल्या रविवारी हा सिनेमा पाहीला असल्याने लेखातील प्रत्येक वाक्याशी सहमती आहे! सर्व भारतियांनी एकदातरी पहावा असा हा सिनेमा आहे!! सिनेमा आणि परिक्षण दोन्ही आवडले. धन्यवाद!!! 0

घरच्यांसोबत चित्रपट पाहिला आणि आवडला. त्यावरचे बरेच लेख वाचले बरेच योउत्युबे व्हिडीओ पण पाहिले. त्या सगळ्यात हे परिक्षण सर्वात जास्त संतुलीत आणि परखड वाटले. चित्रपट यायच्या आधिपासुनच अनेकांची जळजळ सुरु झाली होती. अपेक्षेप्रमाणे या वर राजकारण देखिल सुरु झाले आहे. पण ते सगळे बाजूला ठेवत कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा लेख प्रचंड आवडला. प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे असा सिनेमा. पैजारबुवा,

कंजूस 13/05/2023 - 03:29
"*******पासून कुणी धडा घेत का नाही!" हे एक सामान्य वाक्य म्हणजे मनातील एक कप्पा तडजोड न करण्याबाबत असतो. दुसरा टप्पा पयशे हवे असतील तर *** तमुक करायला हवे हे सांगतो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:47
अथांग आकाश | ज्ञानोबाचे पैजार | कंजूस प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 कंकाका आपला प्रतिसाद माझ्या डोक्यावरून गेला आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

बहुतेक माझ्या प्रतिसादाला उत्तरले असावेत. सुबोध खरे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. बाकी मनाचे काय! मन काळोखाची गुफा मन गरगरते आवर्त माणसागणीक मनाची वेगवेगळी रूपे. कोण सापळा लावून बसलायं आणी कोण त्यात आडकतं.

शाम भागवत 16/05/2023 - 12:49
आज आमच्या एका कौटुंबीक ग्रुपवर मेसेज आलाय. एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे. __________ हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ? एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे…. तुमच्या विवाहित, अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. त्यांना कोणी रोखले आहे? आम्ही नाही. याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ? कपाळावरचे कुंकू ही एके काळी तुमची ओळख होती. तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होता. घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी कपाळावर गंध लावणे सोडले आहे. तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध/तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे. याला मुस्लिम कसे जबाबदार आहेत ? तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात मुस्लिमांची चूक कुठे आहे ? आमच्या समाजात लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेंव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते आणि इबादत/नमाज हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते... तुम्ही लोकांनी मंदिरे पाहणेही सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेंव्हा स्वतःला देवाकडून कांही हवे असते किंवा दुःखात असतील तेंव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात. आता जर तुमच्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहित नसेल, मंदिरात काय करावे माहित नसेल, पूजा हे कर्तव्य आहे. हे ही माहिती नसेल, तर ह्यात मुस्लिमांचा दोष आहे का ? तुमची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी गीता श्लोकांचे पठण केल्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्याने शुभम् करोती कल्याणनम् अथवा गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दु:खही वाटत नाही ! घरातील लहान मूल बोलायला लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना "सलाम" म्हणायला शिकवतो. पण तुमची राम राम, नमस्कार, प्रणाम करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला जबाबदार कोण ? कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात. तुमची मुले रामायण किंवा भगवद्गीता वाचत नाहीत. त्याला संस्कृत येत नाही, आणि ब-याचदा मातृभाषाही येत नाही. हा आमचा दोष आहे का ? तुमच्याकडे आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व कांही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला. मात्र आम्ही त्यांना विसरलो नाही. आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत आणि कधीच सोडणार नाही. तुम्ही स्वतः तिलक,भस्म,यज्ञोपवित घालणे टाळता, शिखा ठेवणे टाळता. तुमच्या स्त्रियांना कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता. या पद्धतींची ओळख दाखवायलाही तुम्हाला लाज वाटते. आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव याला मागासलेपणाचे समजत आहात. याला मुस्लिम जबाबदार कसे ? तुमच्या समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात. तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत? याचा विचार करा. आम्ही कारणीभूत आहोत का ? खरी अडचण ही आहे की तुमचा समाज जागृत व्हावा अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कुणाचा दोष आहे का ? आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो. अनेक दशकांपासून तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात. पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख आम्ही आजही कायम ठेवली आहे. जर तुम्ही तुमच्या परंपरा टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा ठपका इतरांवर का ठेवता ? याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे. आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 16/05/2023 - 12:51
मी यावर आमच्या ग्रुपमधे खालील प्रतिसाद उत्तरादाखल पोस्ट केलाय. ब्राह्मण ब्राह्मणासारखा वागत नाही. मग बाकीच्यांनी त्याला का महत्व द्यावे? पण माझा अनुभव मला असं सांगत आला आहे की, ब्राह्मणाने ब्राह्मणासारखे वागले तर वाईटातला वाईट सुध्दा कालांतराने आपल्याशी चांगले वागायला लागतो. मात्र कलियुगातील "ब्राह्मण" या शब्दाची व्युत्पत्ती मी माझ्यापुरती बदलून घेतली आहे. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असतो असे मानण्याऐवजी, ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणारा तो ब्राह्मण अशी माझी सुधारित व्याख्या आहे. माझ्या विचारांशी सुसंगत पोस्ट आल्याने माझे मत मांडण्यासाठी स्वत:ला आवरू शकलो नाही.

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर 16/05/2023 - 16:07
एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे.
सदर लेखात लेखकाने विचारलेले प्रश्न अजिबात गैरलागू नसले तरी ह्या लेखातला आशय विचारात न घेता तो केवळ एका 'मुसलमान' व्यक्तीने लिहिला आहे म्हणून आपलेच (सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे तथाकथित हिंदू धर्माभिमानी) लोकं एकतर त्याकडे दुर्लक्ष तरी करतील किंवा त्यावर टिका तरी करतील!
"कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात."
ह्या विधानाची सत्यता मी स्वानुभावावरुन मान्य करतो! सौदी अरेबिया ह्या कट्टर इस्लामी देशाकडून जगभरातील मुस्लिमांनी त्यांच्या कट्टर 'वहाबी' पंथाची धार्मिकमुल्ये अनुसरावी ह्यासाठी अब्जावधी 'पेट्रोडॉलर्सची' खिरापत वाटली जाते हि गोष्ट आता लपून राहिलेली नाही! भारतातही ह्या 'कार्यासाठी' त्त्यांच्याकडून प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. मदरसे आणि मशिदींना त्यासाठी अर्थपुरवठा केला गेला/जातो आहेच, तसेच अनेक लहानशा खेडेगावांमध्येही टोलेजंग नवीन मशिदिंच्या उभारणीसाठी तुफान खर्च करण्यात आला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत शहरांत/निमशहरी भागांत आणि लहान-सहान खेडेगावांमध्ये कितीतरी अशा नवीन/चकाचक मशिदिंची उभारणी झालेली आपल्यापैकी अनेक डोळस लोकांच्या दृष्टीस पडली असेल. मशिदींच्या घुमटावरील किंवा मिनारांवरील चंद्रकोरीच्या विशिष्ट कोनावरून अशा सौदी 'फंडिंग' मधून उभारलेल्या नविन मशिदी ओळखणे आधी तसे सोपे होते, पण आता हळू हळू अनेक जुन्या मशिदींवरील चंद्रकोरींचा कोनही बदलण्यात येत असल्याने पुढे अशी ओळख पटवणे अवघड होत जाईल. तर सांगायचा मुद्दा काय तर, जगभरातील सर्व मुस्लिमांची वेशभूषा अरबी पद्धतीची आणि बोली भाषा अरबी असावी ह्यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत. 'उर्दू' ह्या एतद्देशीय भाषेला मूठमाती मिळून भारतीय मुस्लिमांची बोली भाषाही अरबी करण्यासाठी आणि कुराण पठणासाठी मदरसे आणि मशिदींमधून अरबी भाषेचे वर्ग चालवले जातात तसेच भरघोस पारितोषिकांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. लेखात मी उल्लेख केलेल्या माझ्या मुस्लिम मित्राची 'कार्मेल कॉन्व्हेंट स्कुल'मध्ये शिकणारी (आता) १२ वर्षाची झालेली मुलगी लॉकडाऊन संपल्यानंतरही शाळा उघडल्या नव्हत्या त्या काळात मशिदीमध्ये चालणाऱ्या अशा 'अरबी' भाषा वर्गासाठी जात होती. अरबी भाषेचा गंधही नसलेल्या पण जात्याच हुशार असलेल्या ह्या मुलीने अवघ्या सहा महिन्यांत त्या भाषेवर नुसते प्रभुत्वच मिळवले नाही, तर त्यातील प्राविण्य जोखण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिकही पटकावले. भारतात उर्दू भाषेतील बातम्या/कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिन्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत पण येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अ‍ॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले. आता हे त्या लहान मुलांनी अरबी भाषा शिकावी म्हणून दाखवलेले प्रलोभन होते/आहे कि खरंच त्यादृष्टीने तयारी सुरु आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच. एकीकडे 'अल जझीरा' वाहिनीवरील वृत्तनिवेदिकांसारखा पोशाख आणि अगदी हुबेहूब त्यांच्याच लकबीत वार्तांकन करण्याच्या तिच्या सरावाचे व्हिडीओ जेव्हा हि मुलगी मला पाठवते तेव्हा तिची प्रगती बघून फार कौतुकही वाटते तर दुसरीकडे ह्या 'वहाबीकरणातून' भारतीय मुस्लिमांमध्ये वाढत जाणाऱ्या धार्मिक कट्टरतेची चिंताही वाटते. हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!

In reply to by टर्मीनेटर

अथांग आकाश 17/05/2023 - 11:50
येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अ‍ॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले.
म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर 17/05/2023 - 16:06
म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!
होय! आधी जास्तीतजास्त भारतीय मुस्लिमांना अरबी भाषा शिकवायची. मग स्थानिक अरबी वाहिन्या सुरु करायच्या. शहरांपासून गावखेड्यांपर्यंतच्या सुशिक्षित/अशिक्षित, गरीब/श्रीमंत अशा सर्व स्तरांतल्या सुमारे वीस कोटी मुस्लिमांना प्रभावित करू शकणारे हे माध्यम हाताशी आले कि मग त्यावरील कार्यक्रमांतुन कट्टर वहाबी पंथाची शिकवण/चालीरीती ह्यांचा रतीब घालायचा असे काहीसे नियोजन असावे असा अंदाज लावता येईल.

In reply to by टर्मीनेटर

मी, CCC, नावाच्या कंपनीत कामाला होतो, सौदी अरेबिया मध्ये... सन, 2008-09.... बहुसंख्य कामगार, बिहारी मुस्लिम..... आणि त्या सर्वांचे एकमत असे की, सौदी हा आमचा मुलभूत देश आणि आमची खरी भाषा अरबीच आहे.... (कारण, मक्का आणि मदिना, सौदी अरेबिया मध्ये आहेत.) .... पाकिस्तान हा आमचाच भाग... एक ना एक दिवस, भारतात शरियत कायदा आम्ही लागू करणारच, असही ते म्हणायचे.... और 25 साल रुको ... IAS, IPS, MLA और MP भी हमारे होंगे, उस के बाद फिर से भारत में मुस्लिमों का राज होगा ... ह्यावर त्या सर्वांचे एकमत होते .....

हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते! ----- जैन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? पारशी आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? स्वातंत्र्या नंतर आणि विशेषतः 1970 नंतर, बौद्ध आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? ख्रिश्र्चन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? शीख आणि हिंदू यांच्यात किती दंगली झाल्या? ------- बाय द वे, तुम्ही कुराण वाचले आहे का? आणि तुमच्या उदारमतवादी विचारसरणी बद्दल अभिनंदन... मी तुमच्या इतका उदारमतवादी होऊ शकत नाही.... मी, ना राणा संगा होऊ शकतो, ना राणा प्रताप, ना लचित बडफुकन, ना छत्रपती संभाजी महाराज .... पण, मी सुर्याजी पिसाळ किंवा राजा जयचंद कधीच होणार नाही ....

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 16/05/2023 - 23:39
हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!
असे ते एकसंध वाक्य आहे, त्यातले अर्धे वाक्य तुम्ही वेगळे काढुन अधोरेखीत केल्याने संपुर्ण वाक्याच्या मुळ अर्थाचा विपर्यास होतोय आणि त्यामुळे पुढचा तुमचा सगळा प्रतिसादच भरकटल्यासारखा वाटतोय 😀 मुळ वाक्यांची मोडतोड करुन त्यांच्या अर्थाचा विपर्यास करुन सादर करण्याची पत्रकार आणि न्युज चॅनल्सच्या अ‍ॅंकर्सची सवय आता त्यांच्या वाचक्/प्रेक्षकांमध्येही उतरत चालली आहे असे वाटते. असो.........

In reply to by टर्मीनेटर

आणि त्याच्याही आधी पासून, जैन आणि बौद्ध संस्कृति भारतात नांदत आहेत... त्यामुळे, जैन आणि बौद्ध आणि हिंदू, ह्या संस्कृती एकमेकांचा आदर राखूनच होत्या आणि आहेत आणि पुढेही असतील.... तुमच्या वाक्यातील पहिला भाग पटला. पण, त्याच वाक्यातील, पुढचा भाग पटला नाही. म्हणून जो भाग पटला नाही, त्यावरच भाष्य केले.

श्रीगुरुजी 22/05/2023 - 22:57
बरीच किंमत दिली पण वाचली एखाद्या उच्चशिक्षित कमावती मुलीला जेमतेम १२ वी पास, कामधंदा नसलेल्या, मारहाण करणाऱ्या मुस्लिमाविषयी काय आकर्षण असावे?

In reply to by श्रीगुरुजी

सर टोबी 23/05/2023 - 02:48
मागणी तसा मथळे आणि बातम्या यांचा पुरवठा तर होत नाहीय ना? पीडित तरुणी घरातून निघून गेली त्याची ना दाद ना फिर्याद. बरं या “हिडन ट्रुथचे” पाप सेक्युलर सरकारवर मारायचे असेल तर गेली निदान अठरा वर्षे मध्य प्रदेशात जाज्वल्य राष्ट्रप्रेमींचे सरकार आहे. तेव्हा सदरची ”तरुणी" निदान छत्तीस वर्षाची असावी. भरीला तिचं ब्रेन वॉश पण झाले होते पण ती सर्व विचारधारा सिनेमाच्या तीन तासाच्या प्रबोधनाने बदलली. हा म्हणजे “हादसे के वजह से यादगाश वापस” येण्याचाच प्रकार दिसतोय. बघा बुवा. बातम्या छापणं हा वर्तमानपत्र चालवणाऱ्यांचा व्यवसाय झाला. पण तुमचं तसं नाहीय ना. “आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ दुवा द्या” अशी मागणी करायची असेल तर आपले स्वतःचे दावे देखील बळकट असायला हवे ना?

In reply to by श्रीगुरुजी

बाय द वे, श्रीगुरूजी, काही लोकांच्या बरोबर प्रतिसाद-प्रतिसाद हा खेळ मी तरी खेळत नाही ..... आपलाच वेळ वाया जातो ... आजची सही ... उदारमतवादी हिंदू, हा हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे ......

हेमंतकुमार 09/05/2023 - 15:38
वास्तवाचे भान देणारी ही 'उत्तम कलाकृती'
आणि तिचे निव्वळ चित्रपट रसिक या दृष्टिकोनातून केलेले रसाळ रसग्रहण मनापासून आवडले. चित्रपटाच्या निर्मात्यांपासून ते कलाकारांपर्यंत महत्त्वाच्या सर्वांची दखल घेतली गेली आहे हेही विशेष.

कपिलमुनी 09/05/2023 - 16:34
छान परिक्षण/ रसग्रहण ! कुठेही प्रचारी किंवा अभिनिवेश नाही. बाहेर एवढा प्रोपोगंडा असताना देखील तुमच्या सोबत मुस्लिम लोक आले हे विशेष ..

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 10/05/2023 - 13:49
@ कपिलमुनी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
बाहेर एवढा प्रोपोगंडा असताना देखील तुमच्या सोबत मुस्लिम लोक आले हे विशेष ..
मुनिवर्य, आम्ही चौघे अनेक चित्रपट एकत्र बघतो. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यावर अशा एकत्र पाहिलेल्या चित्रपटांपैकी 'पुष्पा', 'KGF २', 'भूल भुलैया २', 'धर्मवीर - मु.पो. ठाणे' हि पटकन आठवलेली काही नावे! त्यामुळे 'द केरला स्टोरी' हा चित्रपटही एकत्र पाहणे ह्यात आमच्यासाठी तरी विशेष असे काही नव्हते! बाकी प्रोपगंडा तर काय तिन्ही त्रिकाळ आपल्या सभोवती चालुच असतो, त्या पासुन स्वतःचे संरक्षण करणारी 'इम्युनीटी' आमच्यात तयार झाल्याने त्याच्या सहीत जगण्या-वागण्याची आता सवय झाली आहे 😀

In reply to by कपिलमुनी

मोदक 11/05/2023 - 00:47
अच्छा.. म्हणजे सगळीकडे सुरू असलेला लव्ह जिहाद हा "प्रपोगंडा" आहे तर.. प्रपोगंडा - ideas or statements that may be false or present only one side of an argument that are used in order to gain support for a political leader, party, etc. तुमच्या पुढच्या थिअऱ्या काय असणार आहेत? कसाब शांतता पसरवण्यासाठी मुंबईत आला होता... याकूबचा दिवाळीची दारू आणि RDX मध्ये गोंधळ झाला.. अफझल गुरूला पार्लमेंट मध्ये मिठाई पाठवायची होती.. पोटासाठी काय काय करावे लागते ना..

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 24/05/2023 - 20:01
लव्ह जिहाद (कायद्यानुसार व्याख्या) - Prohibition of unlawful conversion from one religion to another by use of misrepresentation, force, undue influence, coercion, any other fraudulent means, allurement, or promise of marriage. काही आक्षेप किंवा शंका असल्यास न्यायालयात दाद मागावी. अधिक माहिती हवी असल्यास स्वतः शोधावी.

Trump 09/05/2023 - 16:38
पण एका खास मित्राने आग्रही शिफारस केल्यामुळे 'The Kerala Story' हा चित्रपट परवाच्या रविवारी आम्ही दोघं आणि माझा एक अतिशय जवळचा
मुस्लिम मित्र व त्याची बायको
अशा चौघांनी बघितला आणि तो बघण्यासाठी खर्चलेला वेळ आणि पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला असेच मी म्हणेन.
त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती? 'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे! परिक्षणाबद्दल धन्यवाद.

In reply to by Trump

टर्मीनेटर 10/05/2023 - 17:45
@ Trump
त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती?
ट्रंप साहेब चित्रपटाबद्दल त्यांची प्रतिक्रीया काय होती हे मी लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदात लिहिलेले आहे! तरी तुम्ही
'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे!
असे जे लिहीले आहे त्यामागे त्यांचे धर्मविषयक विचार काय असतील हे जाणुन घ्यायची जिज्ञासा असावी असे वाटल्याने काही गोष्टी सांगतो... नाही, तुम्ही उल्लेख केल्या प्रमाणे अशी प्रतिक्रिया नव्हती 😀 आणि विचारांत क्लॅरीटी आणि जीवन शैली/पद्धती विषयी आपले स्वतःचे तत्वज्ञान अंगिकारणाऱ्या मित्रमंडळींच्या संभाषणात असल्या स्पष्टीकरणांची गरजही भासत नाही! आणि धार्मिकतेबद्दल म्हणाल तर त्याचे धर्माविषयक तत्वज्ञान त्याच्याच भाषेत सांगायचे तर "माणसाच्या जिवनात धर्माचे प्रमाण हे एखद्या पदार्थात आवश्यक असलेल्या मिठाच्या प्रमाणा एवढेच असावे, मिठ जास्त झाले तर जशी पदार्थाची चव बिघडते त्याचप्रमाणे जिवनात धर्माचे प्रमाण वाढले तर जिवन बिघडते तसेच अजिबात मिठ नसलेला पदार्थ जसा बेचव होतो त्याचप्रमाणे जिवनात धर्म अजिबात नसेल तर जिवनही बेचव होते." असे अगदी सरळ सोपे आहे. हे त्याच्या शब्दात सांगीतले असले तरी आम्हा खास किंवा जवळच्या मित्रपरिवारतील सर्वच मंडळींची विचारसरणी ही अशीच आहे. बाकी धर्मांध विचाराच्या लोकांना (मग ते कुठ्ल्याही धर्माचे असोत) नुसते मित्र म्हणुनही आम्ही स्विकारत नाही! असो.. प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

In reply to by टर्मीनेटर

चौकस२१२ 11/05/2023 - 10:07
"माणसाच्या जिवनात धर्माचे प्रमाण हे एखद्या पदार्थात आवश्यक असलेल्या मिठाच्या प्रमाणा एवढेच असावे, मिठ जास्त झाले तर जशी पदार्थाची चव बिघडते त्याचप्रमाणे जिवनात धर्माचे प्रमाण वाढले तर जिवन बिघडते टर्मीनेटर, बहुतेक हिंदूंचेही हेच विचार आहेत ...अगदी भाजपाला पाठिंबा देणारी हिंदूंचे सुद्धा , देश आणि चांगले नागरिक ह्यालाच प्राधान्य बहुतेक हिंदू देतात.. अर्थात अनेक जणांचा ह्यावर विश्वास बसणार नाही म्हणा दुर्दैवाने ( निदान वरकरणी तरी असे भासतें) "कि देश आधी धर्म नंतर" किंवा तुम्ही दिलेल्या उपमे प्रमाणे "धर्म चिमूटभर चवीपुरता " हा विचार २ जागतिक अब्राहमीक धर्मातील लोकांकडून कमी दिसतो .. आणि विशेष म्हणजे जिथे हे २ अब्राहमीक धर्माचे लोक अल्पसंख्यांक आहेत तिथे हा अभाव जास्त दिसतो ... ( उधारण वांद्र्यातील क्रिस्टी जेवढे धार्मिक वाटले तेवढ्या प्रमाणात जिथे बहुसंखय ख्रिस्ती आहेत अश्या इंग्लड किंवा इतर पाश्चिमात्य देशात वाटले नाहीत... तसे नसते तर येथे रविवारी चर्च तुडुंब भरले दिसले असते ...! (हेच विधान कदाचित इस्लाम अनुयायांबद्दल मी करणार नाही . कारण साधे आहे जर सरासरी काढली तर एकूण जिथे जिथे ख्रिस्ती बहुसंख्यांक आहेत तिथे धर्मांवर आधारलेली अशी ख्रिस्ती राष्ट्रे कमी आहेत , त्यामानाने जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक आहेत तिथे धर्मांवर आधारलेली अशी मुस्लिम राष्ट्रे जास्त आहेत) मग काही लोक हे विचारतील कि हिंदू जर एवढा सहिष्णू आहे आहे तर गेली ९ + वर्षे तो संघाचं विचारसरणीला का पाठिंबा देतोय? याला अनेक कारणे आहेत , हिंदू अगदी अचानक धार्मिक झालाय हे नाही . आजही "हिंदुराष्ट्र्र करा" या पेक्षा "हिंदूंचा योग्य मान राखणारे" राष्ट्र करा" देश सुस्थित राहो यालाच जास्त प्राधान्य दिले जाईल / असेच बहुतेक हिंदू म्हणेल असे मला वाटते .... हंस असा सहिष्णू हिंदू मात्र वैतागलेले आहे हे खरे सतत रॅडिकॅह डॉ खेळणारे हिंदू फोड चालू ठेवणारे यांचं कारवायांमुळे,, " फार झाले सहिष्णुता गेली चुलीत " असे एक दिवस वैतागून म्हणलं त्याने तर तो त्याचा दोष राहणार नाही....

In reply to by चौकस२१२

अथांग आकाश 11/05/2023 - 12:52
देश आणि चांगले नागरिक ह्यालाच प्राधान्य बहुतेक हिंदू देतात.. अर्थात अनेक जणांचा ह्यावर विश्वास बसणार नाही म्हणा >>> सहमत आहे!

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 12/05/2023 - 12:16
मेरा अब्दुल ऐसा नही है!
@ सुबोध खरे चपखल! प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीला, तारुण्यसुलभ कल्पनांमध्ये तसे वाटणे स्वाभाविक असले तर तिचा अब्दुल 'तसा' निघाल्यास आयुष्याची राख-रांगोळी होणे अपरिहार्य! @ रंगीला रतन व्हिडीओ आवडला!

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 12/05/2023 - 11:29
@ कर्नलतपस्वी
"पण मला एक समजत नाही समाजात अशा अनेक घटना घडत असताना या पासून कुणी धडा घेत का नाही!"
कर्नल साहेब जेव्हा जेव्हा हा विषय ऐरणीवर येतो तेव्हा तेव्हा तो प्रकार कसा खोटा आहे हे समाजमनावर ठसवण्यासाठी सिनेसृष्टीतील नामवंत/पडेल कलाकारांपासून राजकारणी, वकील, प्राध्यापक, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार-संपादक, तथाकथित डावे विचारवंत आणि अशा प्रकाराला ज्यांचे उघड किंवा छुपे समर्थन आहे असे समाजातील विविध घटक हिरीरीने पुढे येतात. त्यावर गदारोळ माजवून विषयाचे गांभीर्य संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो ज्याच्या परिणामी हे प्रकार सुरूच राहतात आणि नवनवीन तरुणी त्याला बळी पडतच रहातात! वास्तविक आज 'लव्ह जिहाद' म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार तसा काही नवीन नाहीये, फार मागे जाण्याची आवश्यकता नाही पण गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण त्यावेळी समाजमाध्यमे अस्तित्वात नसल्याने ती प्रकरणे आजच्यासारखी प्रकाशात येत नव्हती. लोकलज्जेस्तव अशा पीडित स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेव्हाही पोलिसांत तक्रारी देखील केल्या जात नव्हत्या आणि आजही त्या तेवढ्या प्रमाणात केल्या जात नाहीयेत त्यामुळे अशा प्रकरणांची निश्चित आकडेवारी मिळणे हि अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही गोष्ट 'लव्ह जिहाद' हा कांगावा आहे, असे काही अस्तित्वातच नसते वगैरे वगैरे गळे काढणाऱ्यांना देखील माहीत असते, नाही अशातला भाग नाही. पण दांभिकता रक्तात भिनलेली हि मंडळी आपल्या अजेंड्याला मारक ठरू शकेल अशी कुठलीही गोष्ट पुढे आली कि क्षणाचाही विलंब न करता त्याचा विरोध करण्यासाठी त्वरित पुढे येऊन आकांडतांडव करायला सुरुवात करतात. सध्या 'द केरला स्टोरी' ह्या चित्रपटावरून उपरोल्लिखित मंडळी जो गदारोळ करत आहेत त्यातून आपल्या मराठी भाषेत प्रचलित असलेल्या "एकतर हागणाऱ्याला तरी लाज असते किंवा बघणाऱ्याला तरी" असा आशय असलेल्या एका जुन्या म्हणीच्या सत्यतेची प्रचिती येत आहे. इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल! (* वरील परिच्छेदाकडे केवळ उदाहरण म्हणून पाहावे तसे लिहिण्यात त्या पीडित माता/भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उपमर्द/अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही.) तत्कालीन चर्चा-बातम्यांमधून होणाऱ्या जनजागृतीपेक्षा चित्रपटाच्या माध्यमातून साधणारा परिणाम नक्कीच प्रभावी आणि दीर्घकालीन असल्याने ह्या चित्रपटाच्या निमित्ताने विषयाची दाहकता आणि गांभीर्य भारतीय समाजापुढे आणून एकप्रकारे जनजागृतीचे कार्य करणाऱ्या निर्माता,दिग्दर्शक, कलाकार आणि सर्व चमूचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करावेसे वाटते आणि ह्या चित्रपटाविरोधात काहूर माजवणाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करून, त्यांच्या अजेंड्याला पूरक ठरतील अशा त्यांच्या फाजील प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात आपली ऊर्जा आणि वेळ खर्च न करता Keep Calm and Watch "The Kerala Story" एवढे लिहून माझा प्रतिसाद आवरता घेतो!

In reply to by टर्मीनेटर

चौकस२१२ 12/05/2023 - 11:39
खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना .... टर्मीनेटर ने टरमिनेट केले कि ... ये हुई ना बात .. मोगाबॉ खुश हुआ

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 12/05/2023 - 15:44
हे राम... सकाळी लिहिलेला हा प्रतिसाद व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्डच्या रूपाने आता मलाच परत आला आहे… दुनिया गोल है भैया 😀 पण ज्यानी कोणी तो मेसेज म्हणुन पहील्यांदा व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला असेल त्याने कॅापी-पेस्ट करताना वरती आयडी वगैरेही ठेवलाय हे बरे झाले… उगाच साहित्यचोरी वगैरेचे बालंट यायला नको, त्याच्यावरही आणि माझ्यावरही 😂 😂 😂
1

In reply to by टर्मीनेटर

रंगीला रतन 12/05/2023 - 20:36
इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल! लै जोरशात मारली आहे :=)

Bhakti 09/05/2023 - 20:18
मस्तच लिहिलंय! आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात जाणून घ्यायला नक्की आवडेल! मला अनेक परंपरा , अर्थ माहिती आहेत .पण सनातन धर्म आणि धार्मिक परंपरा वेगवेगळ्या असतात हे आताशी समजलं आहे.(खुप दिवसांपासुन लिहायचं होतं हे, तुमच्या धाग्यावर लिहिले :) अवांतर साठी माफी) लेकीला म्हणूनच भरतनाट्यम क्लासला घातलयं.मस्त संस्कृत शब्द ,श्लोक म्हणते..भारी वाटतं.मला तर वाटतं तिनं संस्कृतमध्ये पदवी घ्यावी :) बघूया.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 16/05/2023 - 08:14
मुक्त विहारि | भक्ति प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ भक्ति
"मस्त संस्कृत शब्द ,श्लोक म्हणते..भारी वाटतं.मला तर वाटतं तिनं संस्कृतमध्ये पदवी घ्यावी :) बघूया."
हुशार आहेच की ती, संस्कृतमध्ये पदवी मिळवुन नक्कीच तुमची इच्छा पुर्ण करेल!

आनन्दा 09/05/2023 - 20:24
या धाग्याच्या निमित्ताने. आजच एक वेगळी घटना ऐकली. कॅफे मध्ये बसलेल्या मुलीला डोळ्यात औषध टाकून पळवले. तिला कतार ला विकायचा प्लॅन होता. काहीतरी जुगाड करून ती पळून आली. तिचा पूर्ण ब्रेनवाश केला गेला होता.

चौकस२१२ 10/05/2023 - 05:18
आपलं परीक्षण चित्रपट पाहिल्यावर नीट वाचणार हे नक्की तूर्तास , आपण एका मुस्लिम कुटुंबाबरोबर हा चित्रपट पाह्यला गेलात आणि ते आले या बद्दल आपले आणि त्यांचे कौतुक हा चित्रपट केवळ हिंदुविरोधी कारवायांवर प्रकाश टाकत नसुन हिंदुंकडुन होणाऱ्या चुकांवरही अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत असल्याने असे समतोल विचार दाखवले असतील तर उत्तमच आहे ... दुर्दैवाने " मुस्लिमांच्या भावना दुखावू नका" एवढाच परवलीचा शब्द घेऊन या चित्रपटाला जो विरोध होतोय तो दुर्दैवी ""तुम्ही मला परकिय कम्युनिझमचे धडे देत राहीलात त्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवल्या असत्या तर ..... आणि हे वाक्य ऐकून तर हाहा पो दु झाले

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 16/05/2023 - 08:30
श्रीगणेशा | चौकस२१२ प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चौकस२१२
"आणि हे वाक्य ऐकून तर हाहा पो दु झाले "
प्रत्यक्ष चित्रपट पाहताना ज्या घटनांच्या पार्शवभूमीवर आधारित असा तो संवाद आहे त्या पाहिल्यावर हसू येणार नाही!

प्रचेतस 10/05/2023 - 12:48
संतुलित आणि समतोल परीक्षण आवडले. असे चित्रपट मात्र आवडत नसल्याने बघणार नाहीच. मात्र यानिमित्ताने तुमच्या बॉण्डपटांवरील लेखमालिकेची आठवण करून देत आहे. लिहायला घ्या भो लवकरात लवकर :)

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 16/05/2023 - 08:53
@ प्रचेतस
"असे चित्रपट मात्र आवडत नसल्याने बघणार नाहीच."
मलाही आवडत नाहीत, पण विषयाची योग्य हाताळणी आणि वेगवान, प्रभावी सादरीकरणामुळे हा चित्रपट मात्र आवडला!
"बॉण्डपटांवरील लेखमालिकेची आठवण करून देत आहे. लिहायला घ्या भो लवकरात लवकर :)"
कोकण-गोवा मालिकेचे २-३ भाग अजून लिहायचे बाकी आहेत, ते झाल्यावर बॉंड पंचविशीला हात घालतो 😀

आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात
काही वर्षांपूर्वी बंगरूळात असताना शेजारी एक मुस्लीम कुटुंब राहायला आहे. पती पत्नी व एक लहान मुलगा व त्याची साधारण ८-९ वर्षांची मोठी बहिण असे. माझी कन्या ही साधारण त्याच वयाची असल्याने मुलीसोबत तिची गट्टी जमली. मुलगा ३-४ वर्षांचा होता व बालसुलभ ओढीने माझी कन्याही त्याच्या सोबत खेळत असे. काही दिवसंनंतर जाणवले कि मुलीच्या बोलण्यात उर्दू शब्द यायला लागले होते आधी कौतुक वाटले. काही दिवसांनी माझी कन्या रडत रडत घरी आली कारण विचारले तर मुलाने मारले आम्ही बाहेर आलो. परिवारातील मुस्लीम स्त्री मुलाला रागवत होती पण तिने हात काही उचलला नाही. वो मस्सूम है ना असे म्हणुन प्रकरण मिटवले. नंतर एकदा बाहेर अजान चालु असताना मुलगी एकाएक स्तब्ध झाली तिला विचारले असे का केले तर म्हणाली कि अल्ला जहन्नुम मे डालेगा नही तो .तेव्हा जाणीव झाली कि आता काही केले नाही तर प्रकरण हाताबाहेर जाऊ लागेल.मी ही आस्तिक आहे व रोजच्या दिनचर्येत देवासमोर बसुन स्तोत्र वगैरे म्हणत असतो पण तो पावेतो कन्येला त्यात समाविष्ट केले नव्हते. आणि विशेष म्हणजे त्या परिवारीत्ल मुलीसाठी रोज संध्याकाळी कुराण पठणासाठी एक मौलवी येत असे तेव्हा ती मुलगी अगदी हिजाब वगैरे घालुन तयार राह्त असे. त्या दिवसांपासुन कन्येला देवासमोर प्रार्थना म्हणणे आरती म्हणणे ह्यात अगदी आग्रहाने घेऊ लागलो. आणि तिला आश्वस्त ही केले कि त्या मुलाने पुन्हा हात उचलला तर दोन ठेवुन दे आम्हीही बोलु कि ये भी मस्सूम है वगैरे. पण ती वेळ न्म्तर आली नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:01
@ कानडाऊ योगेशु स्वानुभवाधारित प्रतिसाद आवडला 👍 नव्या पिढीला कर्मठपणा आणि सोवळे-ओवळे शिकवण्याची गरज नाही, पण काही बेसिक धार्मिक संस्कार मुलांवर घरातूनच होणे अत्यावश्यक वाटते!

विवेकपटाईत 10/05/2023 - 17:48
एक अरब स्टोरी ही बनविण्याची गरज आहे. हजारो मुलींना गरीब मुलींशी भारतात येणारे अरब शेख काही दिवसांसाठी लग्न करतात आणि तलाक देतात . काही विदेशात घेऊन जातात मौज मस्ती करतात आणि नंतर त....... https://m-hindi.webdunia.com/latest-deutsche-welle-news/arab-sheikh-marriages-117101300031_1.html

चित्रपट उत्तम आहे. काश्मीर फाईल्स फारच संथ होता. मुद्दा क्र. १ : मुळात लव जिहाद हा एक अँगल झाला मात्र मुळ गोष्ट तीच आहे. स्त्रीला काबूत ठेवण्याची ! पुरुषाची आदिम प्रवृत्ती ! आपल्या प्रॉपर्टीत दुसरा भागीदार होऊ नये ही दुसरी इच्छा ! मुद्दा क्र. २ आई वडीलांनाच धर्माबद्दल माहिती नसते तर मुलांना काय कप्पाळ सांगणार ? गणपतीच्या मिरवणूकीत नाचले आणि गुढीपाडव्याला नऊवारी साड्या आणि फेटे घालून फटफट्या चालवणे म्हणजेच धर्म एवढीच पालकांची समज असेल तर मुलांना काय समजावणार ? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ? तत्त्वज्ञान वगैरे दुरच्या गोष्टी झाल्या पण निदान कथारुपात देव देवतांच्या गोष्टी तरी हिंदूंना माहित असाव्यात. कथा वाचून, ऐकून कदाचित लहान वयात समजणार नाहीत, धर्माबद्द्ल नावड निर्माण होईल किंवा मूल नास्तिक होईल. पण त्या गोष्टींत रस निर्माण झाला तर पुढे जाऊन धर्मबदलाचे भूत तरी मानगुटीवर चढणार नाही. हिंदू धर्म ब्रह्मा आणि सरस्वतीची गोष्ट चुकीची असली तरी खुलेपणाने मांडतो, वेगवेगळ्या पंथांना, मतांना थारा देतो, इतर धर्मीयांचे / पंथीयांचा त्यांच्या आवडीप्रमाणे जगण्याला मंजूरी देतो ही हे स्वातंत्र्य अनुभवायचे असेल तर हिंदू असण्याला पर्याय नाही. आपल्या धर्माबद्द्ल माहीती असेल आणि इतर धर्मांचा थोडा बहूत अभ्यास असेल तर बाळबोध शालीनी प्रमाणे धर्मांतर शक्य होणार नाही. "जो देव आपल्या बायकोला वाचवायला स्वतः सक्षम नसतो तो माकडांची मदत घेतो तो तुम्हाला काय मदत करणार ? " "जो देव आपल्या मुलाला सुळावर जाण्यापासून वाचवू शकला नाही तो देव तुम्हाला कसा वाचवणार " अशा प्रश्नांवर निरुत्तर होण्याची गरज नसते आणि त्याचे उत्तर देण्याची गरज नसते. या प्रश्नाच्या उत्तरादाखल "जो देव त्याच्या सर्वात लाडक्या अनुयायाला साध्या तापापासून वाचवू शकला नाही, त्याला अपस्मारापासून वाचवू शकला नाही तो देव तुम्हाला कशी मदत करणार ? " "जो देव आपल्या लाडक्या अनुयायाच्या नातवाचा खून होण्यापासून वाचवू शकला नाही तो तुम्हाला कशा प्रकारे वाचवणार ? " असे प्रश्न विचारता येऊ शकतात. ज्या दिवशी बाईची जात आपल्या इज्जत, आब्रु सारख्या संकल्पना मोडीत काढेल आणि त्यामुळे आत्महत्या करणार नाही त्या दिवशी पुरुषाच्या हातातील एक प्रभावी आयुध गळून पडेल. हे मध्यमवर्गीय पुरुषांसाठी देखील तितकेच लागू आहे. देव दिसत नाही म्हणून तुम्ही छाती काढून नास्तिक असल्याचे ढिंढोरे पिटता तेवढ्याच मोठ्याने दिसत नसलेल्या इज्जत / आब्रुचे नगारे वाजविणे सोडले तर आयुष्य सुखी होईल. असो. हा प्रतिसाद म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे असे समजून विसरुन गेले तरी चालण्यासारखे आहे.

In reply to by धर्मराजमुटके

अथांग आकाश 11/05/2023 - 13:00
गणपतीच्या मिरवणूकीत नाचले आणि गुढीपाडव्याला नऊवारी साड्या आणि फेटे घालून फटफट्या चालवणे म्हणजेच धर्म एवढीच पालकांची समज असेल तर मुलांना काय समजावणार ? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार >>> हा हा, चपखल!

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:10
विवेकपटाईत | राजेंद्र मेहेंदळे | रंगीला रतन | धर्मराजमुटके प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ धर्मराजमुटके
"हा प्रतिसाद म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे असे समजून विसरुन गेले तरी चालण्यासारखे आहे. "
नाही, तसे काही नाही. प्रतिसादातून भावना व्यवस्थित पोचल्या!

शाम भागवत 11/05/2023 - 06:51
परिक्षण आवडले. मला काही हा सिनेमा पाहवणार नाही. याच कारणाने काश्मिर फाईलही पाहिलेला नाही. पण भारतात हिंदू धर्म जागा होऊ लागला आहे हे नक्की. अगदी नास्तिक हिंदू देखील आता हिंदू धर्मावर होणा-या आघातावर विचार करायला लागला आहे. बोलायला लागला आहे व हे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र यातून अध्यात्माकडे वळणारी माणसे तयार व्हायला पाहिजेत एवढीच इच्छा आहे.

चौकस२१२ 11/05/2023 - 07:19
आपलेच दात आपलेच ओठ, नुकतेच केदार शिंदे या अनुभवी दिगदर्शकने ( शगंगाधर टिपरे ते शाहीर साबळे ) एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी महाराष्ट्रात केरळ स्टोरी फुकट दाखवलं जात आहे यावर नाराजी व्यक्त केली आहे .. हि कसली विचित्र पोटदुखी ..विचित्र प्रवृत्ती .. साहिर साबळेंचं जीवांवरील चित्रपट आणि हिंदू मुलींचे धर्मांतर हे केवढे वेगळे विषय .. काय यांच डोस्क फिरलोय का ? हा विडिओ जरूर पहा https://www.youtube.com/watch?v=3dzSfJJLYFw

सतिश पाटील 11/05/2023 - 12:01
बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, मग तुम्हाला आवडला का चित्रपट ? आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही. बायकोचे मत तेच तुमचे मत का ?

In reply to by सतिश पाटील

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:42
शाम भागवत | सतिश पाटील प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ सतिश पाटील आपण जी दोन वाक्ये अधोरेखित करून दोन प्रश्न विचारले आहेत त्या वाक्यांआधीचे त्या परिच्छेदातले सर्वात पहिले वाक्य
"मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही."
आपल्या वाचनातुन निसटले असावे काय 😀 असो.. वरील प्रश्न विचारण्यामागील आपल्या हेतु विषयी शंका घेण्यास वाव असला तरी उत्तरे देतो. १)
मग तुम्हाला आवडला का चित्रपट ?
ह्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणच अधोरेखीत केलेल्या माझ्या "बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता" ह्या वाक्यातील 'तिलाही' ह्या शब्दात दडलेले आहे 😀 २)
बायकोचे मत तेच तुमचे मत का ?
माझे मत काय असावे हे वरती दिलेल्या पहिल्या वाक्यातील 'ती माझी आवडच नाही.' ह्या शब्दांतुन लक्षात येणे तसे अजिबात अवघड नाही. पण तरीही तुम्हाला अपेक्षित असा तुम्ही काढलेला अर्थही मान्य करण्यासही माझी काहीच हरकत नाही, तसेही म्हणतातच ना "Wife is always right" इथेही तसंच समजा हवंतर 😂

अथांग आकाश 11/05/2023 - 12:19
आम्ही सुद्धा गेल्या रविवारी हा सिनेमा पाहीला असल्याने लेखातील प्रत्येक वाक्याशी सहमती आहे! सर्व भारतियांनी एकदातरी पहावा असा हा सिनेमा आहे!! सिनेमा आणि परिक्षण दोन्ही आवडले. धन्यवाद!!! 0

घरच्यांसोबत चित्रपट पाहिला आणि आवडला. त्यावरचे बरेच लेख वाचले बरेच योउत्युबे व्हिडीओ पण पाहिले. त्या सगळ्यात हे परिक्षण सर्वात जास्त संतुलीत आणि परखड वाटले. चित्रपट यायच्या आधिपासुनच अनेकांची जळजळ सुरु झाली होती. अपेक्षेप्रमाणे या वर राजकारण देखिल सुरु झाले आहे. पण ते सगळे बाजूला ठेवत कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा लेख प्रचंड आवडला. प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे असा सिनेमा. पैजारबुवा,

कंजूस 13/05/2023 - 03:29
"*******पासून कुणी धडा घेत का नाही!" हे एक सामान्य वाक्य म्हणजे मनातील एक कप्पा तडजोड न करण्याबाबत असतो. दुसरा टप्पा पयशे हवे असतील तर *** तमुक करायला हवे हे सांगतो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/05/2023 - 09:47
अथांग आकाश | ज्ञानोबाचे पैजार | कंजूस प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 कंकाका आपला प्रतिसाद माझ्या डोक्यावरून गेला आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

बहुतेक माझ्या प्रतिसादाला उत्तरले असावेत. सुबोध खरे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. बाकी मनाचे काय! मन काळोखाची गुफा मन गरगरते आवर्त माणसागणीक मनाची वेगवेगळी रूपे. कोण सापळा लावून बसलायं आणी कोण त्यात आडकतं.

शाम भागवत 16/05/2023 - 12:49
आज आमच्या एका कौटुंबीक ग्रुपवर मेसेज आलाय. एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे. __________ हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ? एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे…. तुमच्या विवाहित, अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. त्यांना कोणी रोखले आहे? आम्ही नाही. याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ? कपाळावरचे कुंकू ही एके काळी तुमची ओळख होती. तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होता. घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी कपाळावर गंध लावणे सोडले आहे. तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध/तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे. याला मुस्लिम कसे जबाबदार आहेत ? तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात मुस्लिमांची चूक कुठे आहे ? आमच्या समाजात लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेंव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते आणि इबादत/नमाज हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते... तुम्ही लोकांनी मंदिरे पाहणेही सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेंव्हा स्वतःला देवाकडून कांही हवे असते किंवा दुःखात असतील तेंव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात. आता जर तुमच्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहित नसेल, मंदिरात काय करावे माहित नसेल, पूजा हे कर्तव्य आहे. हे ही माहिती नसेल, तर ह्यात मुस्लिमांचा दोष आहे का ? तुमची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी गीता श्लोकांचे पठण केल्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्याने शुभम् करोती कल्याणनम् अथवा गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दु:खही वाटत नाही ! घरातील लहान मूल बोलायला लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना "सलाम" म्हणायला शिकवतो. पण तुमची राम राम, नमस्कार, प्रणाम करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला जबाबदार कोण ? कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात. तुमची मुले रामायण किंवा भगवद्गीता वाचत नाहीत. त्याला संस्कृत येत नाही, आणि ब-याचदा मातृभाषाही येत नाही. हा आमचा दोष आहे का ? तुमच्याकडे आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व कांही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला. मात्र आम्ही त्यांना विसरलो नाही. आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत आणि कधीच सोडणार नाही. तुम्ही स्वतः तिलक,भस्म,यज्ञोपवित घालणे टाळता, शिखा ठेवणे टाळता. तुमच्या स्त्रियांना कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता. या पद्धतींची ओळख दाखवायलाही तुम्हाला लाज वाटते. आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव याला मागासलेपणाचे समजत आहात. याला मुस्लिम जबाबदार कसे ? तुमच्या समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात. तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत? याचा विचार करा. आम्ही कारणीभूत आहोत का ? खरी अडचण ही आहे की तुमचा समाज जागृत व्हावा अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कुणाचा दोष आहे का ? आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो. अनेक दशकांपासून तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात. पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख आम्ही आजही कायम ठेवली आहे. जर तुम्ही तुमच्या परंपरा टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा ठपका इतरांवर का ठेवता ? याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे. आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 16/05/2023 - 12:51
मी यावर आमच्या ग्रुपमधे खालील प्रतिसाद उत्तरादाखल पोस्ट केलाय. ब्राह्मण ब्राह्मणासारखा वागत नाही. मग बाकीच्यांनी त्याला का महत्व द्यावे? पण माझा अनुभव मला असं सांगत आला आहे की, ब्राह्मणाने ब्राह्मणासारखे वागले तर वाईटातला वाईट सुध्दा कालांतराने आपल्याशी चांगले वागायला लागतो. मात्र कलियुगातील "ब्राह्मण" या शब्दाची व्युत्पत्ती मी माझ्यापुरती बदलून घेतली आहे. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असतो असे मानण्याऐवजी, ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणारा तो ब्राह्मण अशी माझी सुधारित व्याख्या आहे. माझ्या विचारांशी सुसंगत पोस्ट आल्याने माझे मत मांडण्यासाठी स्वत:ला आवरू शकलो नाही.

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर 16/05/2023 - 16:07
एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे.
सदर लेखात लेखकाने विचारलेले प्रश्न अजिबात गैरलागू नसले तरी ह्या लेखातला आशय विचारात न घेता तो केवळ एका 'मुसलमान' व्यक्तीने लिहिला आहे म्हणून आपलेच (सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे तथाकथित हिंदू धर्माभिमानी) लोकं एकतर त्याकडे दुर्लक्ष तरी करतील किंवा त्यावर टिका तरी करतील!
"कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात."
ह्या विधानाची सत्यता मी स्वानुभावावरुन मान्य करतो! सौदी अरेबिया ह्या कट्टर इस्लामी देशाकडून जगभरातील मुस्लिमांनी त्यांच्या कट्टर 'वहाबी' पंथाची धार्मिकमुल्ये अनुसरावी ह्यासाठी अब्जावधी 'पेट्रोडॉलर्सची' खिरापत वाटली जाते हि गोष्ट आता लपून राहिलेली नाही! भारतातही ह्या 'कार्यासाठी' त्त्यांच्याकडून प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. मदरसे आणि मशिदींना त्यासाठी अर्थपुरवठा केला गेला/जातो आहेच, तसेच अनेक लहानशा खेडेगावांमध्येही टोलेजंग नवीन मशिदिंच्या उभारणीसाठी तुफान खर्च करण्यात आला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत शहरांत/निमशहरी भागांत आणि लहान-सहान खेडेगावांमध्ये कितीतरी अशा नवीन/चकाचक मशिदिंची उभारणी झालेली आपल्यापैकी अनेक डोळस लोकांच्या दृष्टीस पडली असेल. मशिदींच्या घुमटावरील किंवा मिनारांवरील चंद्रकोरीच्या विशिष्ट कोनावरून अशा सौदी 'फंडिंग' मधून उभारलेल्या नविन मशिदी ओळखणे आधी तसे सोपे होते, पण आता हळू हळू अनेक जुन्या मशिदींवरील चंद्रकोरींचा कोनही बदलण्यात येत असल्याने पुढे अशी ओळख पटवणे अवघड होत जाईल. तर सांगायचा मुद्दा काय तर, जगभरातील सर्व मुस्लिमांची वेशभूषा अरबी पद्धतीची आणि बोली भाषा अरबी असावी ह्यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत. 'उर्दू' ह्या एतद्देशीय भाषेला मूठमाती मिळून भारतीय मुस्लिमांची बोली भाषाही अरबी करण्यासाठी आणि कुराण पठणासाठी मदरसे आणि मशिदींमधून अरबी भाषेचे वर्ग चालवले जातात तसेच भरघोस पारितोषिकांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. लेखात मी उल्लेख केलेल्या माझ्या मुस्लिम मित्राची 'कार्मेल कॉन्व्हेंट स्कुल'मध्ये शिकणारी (आता) १२ वर्षाची झालेली मुलगी लॉकडाऊन संपल्यानंतरही शाळा उघडल्या नव्हत्या त्या काळात मशिदीमध्ये चालणाऱ्या अशा 'अरबी' भाषा वर्गासाठी जात होती. अरबी भाषेचा गंधही नसलेल्या पण जात्याच हुशार असलेल्या ह्या मुलीने अवघ्या सहा महिन्यांत त्या भाषेवर नुसते प्रभुत्वच मिळवले नाही, तर त्यातील प्राविण्य जोखण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिकही पटकावले. भारतात उर्दू भाषेतील बातम्या/कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिन्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत पण येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अ‍ॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले. आता हे त्या लहान मुलांनी अरबी भाषा शिकावी म्हणून दाखवलेले प्रलोभन होते/आहे कि खरंच त्यादृष्टीने तयारी सुरु आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच. एकीकडे 'अल जझीरा' वाहिनीवरील वृत्तनिवेदिकांसारखा पोशाख आणि अगदी हुबेहूब त्यांच्याच लकबीत वार्तांकन करण्याच्या तिच्या सरावाचे व्हिडीओ जेव्हा हि मुलगी मला पाठवते तेव्हा तिची प्रगती बघून फार कौतुकही वाटते तर दुसरीकडे ह्या 'वहाबीकरणातून' भारतीय मुस्लिमांमध्ये वाढत जाणाऱ्या धार्मिक कट्टरतेची चिंताही वाटते. हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!

In reply to by टर्मीनेटर

अथांग आकाश 17/05/2023 - 11:50
येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अ‍ॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले.
म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर 17/05/2023 - 16:06
म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!
होय! आधी जास्तीतजास्त भारतीय मुस्लिमांना अरबी भाषा शिकवायची. मग स्थानिक अरबी वाहिन्या सुरु करायच्या. शहरांपासून गावखेड्यांपर्यंतच्या सुशिक्षित/अशिक्षित, गरीब/श्रीमंत अशा सर्व स्तरांतल्या सुमारे वीस कोटी मुस्लिमांना प्रभावित करू शकणारे हे माध्यम हाताशी आले कि मग त्यावरील कार्यक्रमांतुन कट्टर वहाबी पंथाची शिकवण/चालीरीती ह्यांचा रतीब घालायचा असे काहीसे नियोजन असावे असा अंदाज लावता येईल.

In reply to by टर्मीनेटर

मी, CCC, नावाच्या कंपनीत कामाला होतो, सौदी अरेबिया मध्ये... सन, 2008-09.... बहुसंख्य कामगार, बिहारी मुस्लिम..... आणि त्या सर्वांचे एकमत असे की, सौदी हा आमचा मुलभूत देश आणि आमची खरी भाषा अरबीच आहे.... (कारण, मक्का आणि मदिना, सौदी अरेबिया मध्ये आहेत.) .... पाकिस्तान हा आमचाच भाग... एक ना एक दिवस, भारतात शरियत कायदा आम्ही लागू करणारच, असही ते म्हणायचे.... और 25 साल रुको ... IAS, IPS, MLA और MP भी हमारे होंगे, उस के बाद फिर से भारत में मुस्लिमों का राज होगा ... ह्यावर त्या सर्वांचे एकमत होते .....

हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते! ----- जैन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? पारशी आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? स्वातंत्र्या नंतर आणि विशेषतः 1970 नंतर, बौद्ध आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? ख्रिश्र्चन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या? शीख आणि हिंदू यांच्यात किती दंगली झाल्या? ------- बाय द वे, तुम्ही कुराण वाचले आहे का? आणि तुमच्या उदारमतवादी विचारसरणी बद्दल अभिनंदन... मी तुमच्या इतका उदारमतवादी होऊ शकत नाही.... मी, ना राणा संगा होऊ शकतो, ना राणा प्रताप, ना लचित बडफुकन, ना छत्रपती संभाजी महाराज .... पण, मी सुर्याजी पिसाळ किंवा राजा जयचंद कधीच होणार नाही ....

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 16/05/2023 - 23:39
हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!
असे ते एकसंध वाक्य आहे, त्यातले अर्धे वाक्य तुम्ही वेगळे काढुन अधोरेखीत केल्याने संपुर्ण वाक्याच्या मुळ अर्थाचा विपर्यास होतोय आणि त्यामुळे पुढचा तुमचा सगळा प्रतिसादच भरकटल्यासारखा वाटतोय 😀 मुळ वाक्यांची मोडतोड करुन त्यांच्या अर्थाचा विपर्यास करुन सादर करण्याची पत्रकार आणि न्युज चॅनल्सच्या अ‍ॅंकर्सची सवय आता त्यांच्या वाचक्/प्रेक्षकांमध्येही उतरत चालली आहे असे वाटते. असो.........

In reply to by टर्मीनेटर

आणि त्याच्याही आधी पासून, जैन आणि बौद्ध संस्कृति भारतात नांदत आहेत... त्यामुळे, जैन आणि बौद्ध आणि हिंदू, ह्या संस्कृती एकमेकांचा आदर राखूनच होत्या आणि आहेत आणि पुढेही असतील.... तुमच्या वाक्यातील पहिला भाग पटला. पण, त्याच वाक्यातील, पुढचा भाग पटला नाही. म्हणून जो भाग पटला नाही, त्यावरच भाष्य केले.

श्रीगुरुजी 22/05/2023 - 22:57
बरीच किंमत दिली पण वाचली एखाद्या उच्चशिक्षित कमावती मुलीला जेमतेम १२ वी पास, कामधंदा नसलेल्या, मारहाण करणाऱ्या मुस्लिमाविषयी काय आकर्षण असावे?

In reply to by श्रीगुरुजी

सर टोबी 23/05/2023 - 02:48
मागणी तसा मथळे आणि बातम्या यांचा पुरवठा तर होत नाहीय ना? पीडित तरुणी घरातून निघून गेली त्याची ना दाद ना फिर्याद. बरं या “हिडन ट्रुथचे” पाप सेक्युलर सरकारवर मारायचे असेल तर गेली निदान अठरा वर्षे मध्य प्रदेशात जाज्वल्य राष्ट्रप्रेमींचे सरकार आहे. तेव्हा सदरची ”तरुणी" निदान छत्तीस वर्षाची असावी. भरीला तिचं ब्रेन वॉश पण झाले होते पण ती सर्व विचारधारा सिनेमाच्या तीन तासाच्या प्रबोधनाने बदलली. हा म्हणजे “हादसे के वजह से यादगाश वापस” येण्याचाच प्रकार दिसतोय. बघा बुवा. बातम्या छापणं हा वर्तमानपत्र चालवणाऱ्यांचा व्यवसाय झाला. पण तुमचं तसं नाहीय ना. “आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ दुवा द्या” अशी मागणी करायची असेल तर आपले स्वतःचे दावे देखील बळकट असायला हवे ना?

In reply to by श्रीगुरुजी

बाय द वे, श्रीगुरूजी, काही लोकांच्या बरोबर प्रतिसाद-प्रतिसाद हा खेळ मी तरी खेळत नाही ..... आपलाच वेळ वाया जातो ... आजची सही ... उदारमतवादी हिंदू, हा हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे ......
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही. बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही.

यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

हेमंतकुमार ·

श्रीगुरुजी 04/05/2023 - 09:13
मी नियमितपणे नाट्यगृहात जाऊन नाटके पाहतो. मागील ३-४ महिन्यात तू सांगशील तसं, ३८ कृष्ण व्हिला, चारचौघी, काळी राणी ही नाटके पाहिली. चारचौघी उत्कृष्ट आहे. काळी राणी नाटकाचे सादरीकरण अत्यंत प्रभावी आहे. तू सांगशील तसं सामान्य आहे. ३८ कृष्ण व्हिला ठीक आहे.

Bhakti 04/05/2023 - 10:57
वाह!अगदी मनातलं लिहिले आहे.परवाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट 'हे प्रशांत दामले या हाडाच्या नाट्य कलावंताचं नाटक पाहिलं.तीस तास निखळ आनंद मिळाला.मी नियमित नाही पाहत.पण आता वर्षाला दोन तरी नाटकं पाहणार.नाटक ही मराठी अस्मिता आहे.यु ट्यूबवरही हौस भागवून घेतात येईल.छान माहिती.

In reply to by Bhakti

Bhakti 04/05/2023 - 11:03
ता क-तेव्हा प्रशांत दामले म्हणाले की या सहकार सभागृहात अनेक वर्षांपूर्वी ते प्रयोगाला आले होते, नाट्यगृहात चांगला बदल झाला आहे.मीही खुप दिवसांनी या नाट्यगृहात गेले होते, उत्तम बदल केला होता, बाल्कनी सुद्धा हाऊसफुल्ल होती.तिकिटाचे दर हाही एक मुद्दा आहे पण व्यावसायिक दृष्टिकोनातून तोही महत्त्वाचा आहे. नाटक जिवंत राहिले पाहिजे.

हेमंतकुमार 04/05/2023 - 12:26
आता लेखाचा विषय असलेल्या काही चित्रित नाटकांचा अल्पपरिचय टप्प्याटप्प्याने लिहितो. 'उणे पुरे शहर एक' ( मूळ कन्नड) गिरीश कारनाड मराठी रूपांतर: प्रदीप वैद्य एक सुंदर नाट्यानुभव ! महानगर... हरतऱ्हेची माणसे... विविध सामाजिक स्तर आणि थर ..... मानवी प्रवृत्ती... भावना... राग, लोभ, आनंद, दुःख, हव्यास, फसवणूक, नैराश्य... प्रेम, करुणा ..... या सगळ्यांची एक सुंदर घट्ट वीण बांधलेली आहे ! प्रसंगांमधील नाट्य म्हणजे काय ते छान समजते.

nutanm 05/05/2023 - 02:05
मी यू ट्यूब वर बॅरिस्टर पाहून थोड्या सुरूवाती नंतर मला धक्काच बसला माझ्या कल्पनेप्रमाणे ते सावरकर , नेहरू , आंबेडकर अशां महापुरूषांवर असेल असे वाटले पण पूर्ण पाहिल्यावर ते एका छोट्या गावातील एका बॅरिस्टर झालेल्यावर होते. व शेवटी शेवटी तर रागच आला की जो माणूस हातात सत्ता असूनही पुरूष व कर्ता पुरूष असूनही कधीही योग्य त्या बाजूला उभा राहून आधार देत नाही व स्त्रीयांच्या दुबळेपणाच्या बाजूने ऊभा न रहाता काहीच कृती करत नाही व षंढच रहातो मग शिक्षण सत्ता थोडाफार पैसा असूनही ऊपयोग काय? त्यापेक्षा आम्ही स्रिया हे सर्व नसूनही लहानपणी मोठ्यांच्या जुनाट मतांच्या विरूद्ध आवाज ऊठवत असू घरातच का होईना दुबळा तरी विरोध करत असू व मोठेपणी नोकरीतही छोटा छोटा विरोध का होईना केलाच. ईथे शिकलेला , बॅरीस्टर वसत्ता थोडी असूनही ऊपयोग काय असेच वटले व षंढ पुरूष इतके टोकाचे म्हणावेसे वाटले पाहून 4/5 वर्षे झाली सविस्तर ़आठवत नाही पण हेच वाटले होते हे आठवले.

nutanm 05/05/2023 - 02:51
त्यापेक्षा शांतता कोर्ट चालू आहे , कुसुम मनोहर लेले ही नाटके यू टूयूबवर बघून त्यांच्या विषयांमुळे धक्का बसला व प्रगल्भ माझी मराठी नाट्यसृष्टी असा अभिमानही वाटला. धक्कादायी व स्रियांचे प्र ष्न मांडणारी पिढ्यान पिढ्याचे अत्याचार स्रीयांवरील पुढे आणले व पुरूषी दांभिकता समोर आणण्याचे धाडस दाखवून थोडे तरी पुरूषांना त्यांची वाईट कृत्ये उघडी करणीरी वाटली दांभिक नुसते. अजूनही ग्रामीण तळखेड्यामधे स्रियांना काय काय भोगावे लागत असेल देव जाणे वाटते व आपण सामान्य अधिकारविहीन स्रिया काय करूया असे वाटते व ज्येष्ठतेच्या वयात .

In reply to by nutanm

हेमंतकुमार 05/05/2023 - 07:20
त्यापेक्षा शांतता कोर्ट चालू आहे , कुसुम मनोहर लेले ही नाटके यू टूयूबवर बघून त्यांच्या विषयांमुळे धक्का बसला व प्रगल्भ माझी मराठी नाट्यसृष्टी असा अभिमानही वाटला.
+११ शांतता कोर्ट चालू आहे हे मूळ सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिकेने गाजले होते. इथे असणाऱ्या नाटकात रेणुका शहाणे आहेत. त्यांनी वठविलेल्या बेणारे बाई या पात्राचे स्वगत अप्रतिम आहे.

हेमंतकुमार 05/05/2023 - 07:22
यू ट्युबवर काही नाट्यस्पर्धेतल्या प्रयोगांचे चित्रीकरण आहे. ते पाहताना काही मर्यादा उघड असतात. रंगमंच आणि त्यावरील कलाकार हे आपल्यापासून खूप दूर असल्यासारखे दिसतात; काही वेळेस धूसरही. रंगमंचाच्या पायथ्याशी बसलेल्या तंत्रज्ञांची डोकी आणि त्यांच्या संगणकाचे वरचे भागही दिसतात ! तसेच संवादही स्वच्छ ऐकू येत नाहीत. त्यामुळे अशी नाटके पाहण्याचे सहसा टाळले जाते. पण अशी काही जुनी नाटके आता चांगल्या व्यावसायिक कलाकारांना घेऊन इथे उपलब्ध होणे अवघड वाटते. म्हणून हिय्या करून मी तेंडुलकरांचे (स्पर्धेतले) कमला नाटक पाहिले आणि एक चांगला नाट्य अनुभव मिळाला. त्या कलाकारांनी खरंच समरसून अभिनय केलेला आहे. संवाद ऐकताना मात्र इअरफोन्स लावलेले चांगले. नाटक १९७०मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. उत्तर भारतातील ढोलापुरात चालत असलेल्या स्त्री-विक्री बाजारातून इंडियन एक्सप्रेसचा एक पत्रकार एका बाईला २३०० रु. ना विकत घेऊन येतो आणि तिला पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर करतो, ही ती घटना. नाटकाचा सारांश दोन वाक्यात सांगता येईल: १. बायकोसह कुठलीही स्त्री ही पुरुषाच्या दृष्टीने व्यवहारातील फक्त एक प्यादे आहे. २. हुच्च सनसनाटी इंग्लिश पत्रकारितेचा केलेला दंभस्फोट. पत्रकाराने विकत आणलेली कमला जेव्हा खुद्द त्याच्याच बायकोला विचारते, “तुला केवढ्याला विकत घेतलेले आहे ?” हे भेदक वाक्य म्हणजे नाटकाचा आत्मा आहे. तसेच... “अहो, मोठ्या पेपरला प्रतिष्ठा नसते, त्यांना असतो तो फक्त खप आणि जाहिराती !” या वाक्यातून तसल्या पत्रकारितेच्या अक्षरशः चिंध्या उडवलेल्या आहेत.

मुळे आमच्या सारखे महाराष्ट्रा पासून दुर राहाणाऱ्याची चांगली सोय झाली. कथा कथन म्हैस,पानवाला,तुच माझी वहिदा रेहमान इ. तसेच वासूची सासू,मोराची मावशी ,एक डाव भटाचा इ. नाटकांचा आनंद घेऊ शकलो. सुट्टीवर आल्यावर भरपुर कॅसेट्स, सीडीज घेऊन जात असू.

• सुंदर मी होणार https://youtu.be/L0BD4s5FQgM • हसवा फसवी https://youtu.be/v4-MqXYJq6o • बटाट्याची चाळ https://youtu.be/5i1xaSZeyOM • श्रीमंत दामोदर पंत https://youtu.be/U7350LnlKCk • शांतता ! कोर्ट चालु आहे https://youtu.be/QG_Pi051qao • नटसम्राट https://youtu.be/yTFPT7-v-Ws • ती फुलराणी https://youtu.be/PLHfek5SO_Q • तो मी नव्हेच https://youtu.be/8TAToq08YuQ • पती सगळे उचापती https://youtu.be/6IZXCmrE09s • मोरुची मावशी https://youtu.be/eCOeRK9N7QM • एका लग्नाची गोष्ट https://youtu.be/JZl_zwm_IPI • गेला माधव कुणीकडे https://youtu.be/1gEZ0WePqV4 • तुझे आहे तुजपाशी https://youtu.be/sTZGYKAWc_4 • असा मी असामी https://youtu.be/S38SOv4f95w • शांतेच कार्ट चालु आहे https://youtu.be/twOnQ3JCTxE • श्री तशी सौ https://youtu.be/N4pwOnoY7zY • वासु ची सासू https://youtu.be/-m3iruEQoJE • अखेरचा सवाल https://youtu.be/DmuCU9Y33sg • शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8 • चल कहितरीच काय https://youtu.be/blOdn2nbDgw • चार दिवस प्रेमाचे https://youtu.be/PD-mBpCvTAw • मी नथुराम गोडसे बोलतोय https://youtu.be/PD-mBpCvTAw • कुर्यात सदा टिंगलम https://youtu.be/LHBWfTRQvvo • तुझ्या माझ्यात https://youtu.be/94YChmH9GYo • खर सांगायच तर https://youtu.be/uMJ9gA2TFrM • सखाराम बाईंडर https://youtu.be/NIMIgL-OLXc • कुसूम मनोहर लेले https://youtu.be/2AH8SgZ2qSI • अशी पाखरे येती https://youtu.be/kqo2tjug3AU • सेलीब्रेशन https://youtu.be/dR6r75iUGXE • अप्पा आणी बाप्पा https://youtu.be/2z4ndcpOLJU • कार्टि काळजात घुसली https://youtu.be/p_FgFnDnFGc • बॅरिसटर https://youtu.be/ZW73zW21eXQ • मित्र https://youtu.be/tKpPpGWJTzw • अश्रूंची झाली फुले https://youtu.be/5HZYa1s1OXo • डाॅक्टर तुम्हीसुद्धा https://youtu.be/SVY0mq7FO1Y • डबल गेम https://youtu.be/v3EFucCuMdM • सूर राहु दे https://youtu.be/ZeT8mqNDkss • गोड गुलाबी https://youtu.be/XZ5pC8x8nQY • अधांतर https://youtu.be/ECwRnB8n2z4 • नातीगोती https://youtu.be/F7dlUMpA5JU • गाभण https://youtu.be/LqQWHhxVaK4

हेमंतकुमार 05/05/2023 - 13:27
छान ! ......... दिवाणखान्यातील नाटकांना कंटाळला असाल तर बदल म्हणून इथले कोर्ट मार्शल हे अनुवादित नाटक (मूळ हिंदी) जरूर पहा. दिग्दर्शक: प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे. लष्करी न्यायालयाच्या पटावर हे नाटक घडते. एका जवानाने त्याच्यावर झालेल्या जातिवाचक अन्याय व मानहानीचा बदला म्हणून दोन लष्करी अधिकाऱ्यांवर गोळीबार केलेला असतो आणि त्यातील एक अधिकारी मरण पावतो. त्या जवानावरील हा लष्करी न्यायालयीन खटला आहे. लष्करी न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रा. विजय दिवान तर आरोपीच्या वकिलाच्या भूमिकेत डॉ. चंद्रकांत शिरोळे आहेत. या दोघांचीही कामे खूप आवडली.

हेमंतकुमार 07/05/2023 - 05:16
सर्वाँना धन्यवाद ! .... महासागर जयवंत दळवी गिरीराज, किशोरी अंबिये, अमिता खोपकर व गिरीश ओक मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब चालवणारा विमा एजंट. त्याची बायको अगदी काकूबाई गृहिणी. अन्य एक अविवाहित पुरुष आणि नटव्या बाईबरोबर त्याचे संबंध. दळवींच्या प्रथेनुसार नाटकात एक वेडे पात्र आहे: नायकाचा भाऊ. शोकांतिका ! मला गिरीराज हा कलाकार या नाटकामुळे माहीत झाला.

In reply to by हेमंतकुमार

चौकस२१२ 17/05/2023 - 07:27
पहिले महासागर विक्रम गोखले / नाना पाटेकर / नीना कुलकर्णी / भा रती आचरेकर डॉक्टर तुम्ही सुद्धा निना कुलकर्णी / सुहास जोशी/ शेंडे / महेश मांजरेकर शिवाजी साटम, नीना कुलकर्णी/ महेश मांजरेकर नाटक नाव आठवत नाही प्रसिद्ध होते Hamidabai Chi Kothi ? कुठे आहे का चित्रित केलेले

हेमंतकुमार 07/05/2023 - 16:11
अशी पाखरे येती विजय तेंडुलकर संजय नार्वेकर, लीना भागवत, ज्योती सुभाष आणि हेमू अधिकारी या सर्वांचा अभिनय एकदम खास. संजय हा प्रेक्षकांना त्याची जीवनकहाणी सांगतोय या पार्श्वभूमीवर नाटक पुढे सरकते. प्रेक्षकांकडे बघून केलेली त्याची स्वगते तर लाजवाब आहेत. किंबहुना त्याने संपूर्ण नाटक आपल्या करंगळीवर तोलले आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे कौटुंबिक वातावरण. मुलगी उपवर आहे. तिचा बाप स्थळासाठी ‘जोडे झिजवतोय’. तेव्हा फक्त मुलाचा होकार म्हणजे अंतिम उत्तर असायचे. मग मुलीने फक्त मान डोलवयाची. मुलीचे लग्न जमत नसल्यास आईवडिलांच्या जीवाला काय तो घोर. अशा कुचंबणा झालेल्या मुलीची भूमिका लीनाने समर्थपणे पेललीय. नाटकातील शेवटचा अर्धा तास तर अगदी उत्कंठापूर्ण. शेवट काय होईल याचा प्रेक्षकांचा अंदाज सतत चुकत राहतो. पण एक गोष्ट मनात येत की शेवटी हे ‘’तें’’ चे नाटक असल्याने अगदी गोग्गोड शेवट नक्कीच होणार नाही. जर आपण मनात ‘अशी पाखरे येती...’ या गाण्याची संपूर्ण ओळ म्हटली तर मग शेवटाचा अंदाज येतो. ‘’तें’’ चे हे हळुवार नाटक पाहिल्यानंतर बाईंडर व गिधाडे लिहीणारे तेंडुलकर हेच का ते, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. ….

श्रीगणेशा 08/05/2023 - 14:33
छान धागा व चर्चा! वाचनखूण साठवली आहे. अजून कधीच नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याचा योग आला नाही. लहानपणी, दूरदर्शनवर कधी कधी दाखविली जायची नाटकं, त्यावेळी चित्रपटांपेक्षा नाटकांना जास्त लक्ष दिलं गेल्याचं आठवतं.

हेमंतकुमार 08/05/2023 - 14:45
धन्यवाद ! .... ‘नातीगोती’ *जयवंत दळवी. *दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब. एका मध्यमवर्गीय पांढरपेशा जोडप्याचा मंदमती मुलगा ही मध्यवर्ती कल्पना. त्या मुलाला सांभाळण्यासाठी बायको दिवसा व नवरा रात्री नोकरी करतात. बायकोचा बॉस आणि त्या दोघांचे तरल संबंध हे एक उप-कथानक. परंतु हे संबंध अगदी निखळ मैत्रीचे राहतात हे वैशिष्ट्य. तो मुलगा वयात येताना त्याच्या आईशीच लगट करायला बघतो हा प्रसंगही सुरेख व संयमित दाखवला आहे. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय हे सर्व रसायन झकास जमल्याने नाटक एक वेगळीच उंची गाठते.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 16/04/2024 - 18:48
त्याच्या आईशीच लगट करायला बघतो.... हे बरोबर आहे पण त्या मंदमती ('आत्म मग्न' हा अलिकडचा शास्त्रीय शब्द) मुलाला लाल रंगाचे वस्त्र दिसले की तो हिंसक होतो अशी एक शास्त्रीय डूब दिलेली आहे. दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब. हे खरेच, तरीही त्यात अतुल परचुरेचा 'मंदमती' मुलगा भाव खाऊन जातो.

हेमंतकुमार 09/05/2023 - 16:42
आसू आणि हसू प्र ल मयेकर *मोहन जोशी, रिमा लागू आणि इतर. नामांकित डॉक्टर व त्याचे मोठे रुग्णालय. या प्रेमविवाहित पती-पत्नीमधील ताणेबाणे आणि भांडणे.. डॉक्टरांच्या रुग्णालयात आलेली एक तरुण स्त्री डॉक्टर.. त्यातून निर्माण झालेल्या कटकटी.. एकमेकींच्या झिंज्या ओढण्यापर्यंत.. अखेरीस नवरा बायकोमधील हृद्य संवाद.. प्रेम, लग्न, मैत्री, संसार, प्रेयसी, सहनिवासी.. अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत तरल शेवट. सुंदर नाट्य !

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा 12/05/2023 - 17:07
नाटक आवडलं. यात दोन वेगवेगळ्या बाजू दाखवल्या आहेत, पात्रे, कथा तीच. फरक हा की -- एका बाजूला संशय, नकारात्मकता, तर दुसरीकडे स्वीकार, समर्पण, सकारात्मकता. आसू आणि हासू. आवडलेलं वाक्य -- शेवटच्या संवादात, डॉ. हेमंत, पत्नी वर्षाला म्हणतात, "शब्दांनी स्पर्श करणं जमतं तुला"

हेमंतकुमार 12/05/2023 - 11:08
नाटक या विषयावरचे एक छान काव्यमय स्फुट: त्यातले हे खूप आवडले:
नाटकाच्या शेवटी नाटक, लेखकाला खडसावतं. मी आहे म्हणून तू आहेस, असं सांगून भेडसावतं. लेखकापेक्षा नाटक मोठं असतं नाटक सोडून, सगळं खोटं असतं.

हेमंतकुमार 13/05/2023 - 06:00
जरा वेगळे कलाकार बघायची इच्छा असल्यास हे एक चांगले आहे: द गेम ले. : मनोहर सोमण प्रमुख भूमिका : रेवती केतकर विषय : एक उद्योगपती स्त्री राजकारण्यांना कशी नमवते. डॉक्टर व कामगार हितचिंतक असलेल्या तरुणासंदर्भातील पहिल्या अंकाच्या अखेरचा धक्काबिंदू चांगला.

तिमा 13/05/2023 - 06:59
मराठी नाटक हे नाट्यगृहात पहा वा यु ट्यूबवर. काही मोजके अपवाद वगळता, सर्वच मराठी कलाकारांचा अभिनय अजून बाल्यावस्थेत आहे. फिल्म फेस्टिवलचे विविध देशांचे चित्रपट पाहिल्यावर याची जाणीव झाली.

हेमंतकुमार 14/05/2023 - 11:41
'मित्र' नाटक मस्त आहे. लेखन (डॉ. आठवले ) व दिग्दर्शन ( वि. केंकरे) उत्तम ! श्रीराम लागू फैय्याज यांच्या अभिनयाची जुगलबंदी लाजवाब ! नाटकाची सुरवात लागूंवर दलित तरूण हल्ला करतात त्याने होते. रुग्णालयात लागूंना 'स्ट्रोक' होतो व त्यामुळे शरीराची उजवी बाजू लुळी पडते. त्यांना घरी आणल्यावर त्यांच्या देखभालीसाठी एका प्रशिक्षित नर्सची (फैय्याज) नेमणूक होते. या बाई दलित आहेत. रुग्ण कडवा ब्राह्मण. सुरवातीस हे दोघे अगदी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. नाटकाच्या शेवटी 'मित्र' झालेले असतात. दोघांच्याही अभिनयास हजार सलाम ! नाटकात राखीव जागांच्या सामाजिक प्रश्नास हात घातला आहे पण अतिशय हळूवारपणे. किंबहुना ही दरी मिटावी असाच संदेश दिला जातो. जरूर पाहावे असे नाटक.

हेमंतकुमार 15/05/2023 - 11:44
धुक्यात हरवली वाट शं ना नवरे सुबोध भावे, सृजा प्रभूदेसाई रवी पटवर्धन व इतर मध्यवर्ती विषय: विवाहबाह्य संबंध. मध्यमवयीन पुरुषाने एका तरुणीला रखेल म्हणून ठेवलेले.. सुरुवातीस चोरून परंतु नंतर ते त्याच्या पत्नीला समजते. पत्नी व रखेलीची भेट आणि पत्नीने मांडलेला प्रस्ताव. त्यावर पूर्ण विचारांची रखेल तिचा निर्णय घेते. आवडले.

हेमंतकुमार 17/05/2023 - 06:50
धुक्यात हरवली वाट शं ना नवरे सुबोध भावे, सृजा प्रभूदेसाई रवी पटवर्धन व इतर मध्यवर्ती विषय: विवाहबाह्य संबंध. मध्यमवयीन पुरुषाने एका तरुणीला रखेल म्हणून ठेवलेले.. सुरुवातीस चोरून परंतु नंतर ते त्याच्या पत्नीला समजते. पत्नी व रखेलीची भेट आणि पत्नीने मांडलेला प्रस्ताव. त्यावर पूर्ण विचारांची रखेल तिचा निर्णय घेते. आवडले.

हेमंतकुमार 17/05/2023 - 12:50
आता वारंवार हेच ऐकायला मिळते आहे:
नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगलेंनी एक संतप्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे. वैभव यांचा अलिकडेच ‘संज्या-छाया’ या नाटकांचा पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग झाले. तिथं आलेल्या अनुभवावर ही पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ' टपुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग 'संज्या छाया'चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक देखील डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले...'

सिरुसेरि 17/05/2023 - 16:14
मराठी नाटक म्हणले की तिस-या घंटेनंतर प्रेक्षाग्रुहात होणारा अंधार , त्यानंतर नाटकाच्या सुरुवातीस होणारे "रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करुन सादर करीत आहोत दोन अंकी नाटक ----------" हे लक्षात आहे . या निवेदनाला पार्श्वसंगीताची साथ असे. राहुल रानडे , अनंत अमेंबल यासारखे मातब्बर संगीतकार या पार्श्वसंगीताची धुरा सांभाळत असत . अनेकदा नाटक सुरु होण्यास उशीर होत असेल तर सुजाण प्रेक्षक टाळ्या वाजवुन नाटकाच्या ग्रुपला वेळेची जाणीव करुन देत असतात . नाटक सुरु होण्यापुर्वी व मध्यंतरात प्रेक्षक एकमेकांशी गप्पा मारताना " मी इथे दोन वर्षांपुर्वी ---- या कलाकाराचे ------- हे नाटक पाहायला आलो होतो ." अशा आठ्वणी सांगतात . या गप्पांमधुन अनेक नव्या जुन्या नाटकांच्या व कलाकारांच्या आठवणींना उजाळा मिळतो . डॉ. काशीनाथ घाणेकर , प्रदीप पटवर्धन , डॉ. श्रीराम लागु , बबन प्रभु , फैयाज , आशालता अशा अनेक नव्या जुन्या कलाकारांच्या आठवणी सांगितल्या जातात . काही वर्षांपुर्वी "निर्णय तुमच्या हाती" या नावाचे रहस्य कथे वर आधारीत दोन अंकी नाटक सादर होत असे . या मधे पहिला अंक संपल्यानंतर मध्यंतरात नाटकाच्या कथेतील गुन्हेगार कोण असावा हे ठरवण्यासाठी काही ठराविक प्रेक्षकांना कोरे कागद देत असत . त्यामधे प्रेक्षकांनी त्यांच्या मते कोण गुन्हेगार आहे ते मत लिहुन द्यायचे असते . यामधुन प्रेक्षकांच्या बहुमताद्वारे गुन्हेगार कोण आहे हे ठरवले जात असे . व त्याप्रमाणे ते पात्र गुन्हेगार असणे व त्याचा गुन्हा पकडला जाणे अशा कथानकावर दुसरा अंक सादर होत असे . कदाचित हे नाटक माउसट्रॅप या इंग्रजी नाटकावर आधारीत असावे .

In reply to by सिरुसेरि

चौथा कोनाडा 19/04/2024 - 14:11
प्रेक्षकांनी त्यांच्या मते कोण गुन्हेगार आहे ते मत लिहुन द्यायचे असते . यामधुन प्रेक्षकांच्या बहुमताद्वारे गुन्हेगार कोण आहे हे ठरवले जात असे . व त्याप्रमाणे ते पात्र गुन्हेगार असणे व त्याचा गुन्हा पकडला जाणे अशा कथानकावर दुसरा अंक सादर होत असे
. हे भारीचं होतं

हेमंतकुमार 17/05/2023 - 17:20
वा, खूप छान आठवणी ! एक भर घालतो. आपण खुर्चीत बसून नाटक सुरू होण्यापूर्वी जेव्हा पडद्याकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती लिहिलेले नाटक किंवा संस्कृती संबंधीचे बोधवाक्य देखील अविस्मरणीय असते. त्यापैकी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात असलेले, "काव्यशास्त्र विनोदार्थं श्रीशाय जनतात्मने .." हे वाक्य माझे अगदी पाठ झालेले आहे. बालगंधर्व मंदिरात बहुतेक काहीतरी कालिदासासंबंधी आहे; ते जरा क्लिष्ट असल्याने पाठ झाले नाही.

हेमंतकुमार 18/05/2023 - 08:12
लग्न जयवंत दळवी माधव अभ्यंकर, लालन सारंग व इतर. या नाटकाचा सारांश त्यातल्या शेवटच्या दोन वाक्यातच आलेला आहे: लग्न न करता माणूस सुखी असतो का ? आणि लग्न केलेला माणूस सुखी होतो का ? ( ज्याने त्याने या प्रश्नांची उत्तरे आपापल्या मनात द्यावीत !) नाटकात खुद्द एक नाटककारच मध्यवर्ती भूमिकेत. त्याची पत्नी आणि दोन मुली ही प्रत्यक्ष दिसणारी पात्रे. इतर न दिसणारी पात्रे म्हणजे, मोठ्या मुलीची सासरची मंडळी आणि धाकटीचा ज्या वृद्धाशी शरीरसंबंध आलेला आहे तो माणूस आणि नाटककाराच्या मैत्रिणी. अनेक अर्थपूर्ण वाक्यातून लग्नसंस्थेला मारलेले जोडे. लग्नाविना सहजीवनाची कल्पना. नाटक छान !

हेमंतकुमार 20/05/2023 - 11:03
कालच युट्युब वर आलेले हे नाटक पाहिले: ब्लाइंड गेम रत्नाकर मतकरी प्रत्यक्ष प्रयोगाचे चित्रीकरण आहे. कोव्हिड नंतर प्रथमच नाट्यगृहात साकारलेला 'ब्लाइंड गेम'चा हा प्रयोग..मास्क आणि ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाला होता. चित्रीकरण ठीक परंतु संवाद नीट ऐकण्यासाठी हेडफोन्स लावलेले बरे. ‘ ब्लाइंड’ चे इथे दोन अर्थ आहेत- मुख्य कलाकार भाग्यश्री देसाई अंध भूमिकेत आहे आणि दिवाणखान्यातील खोलीला बसवलेले पडदे venetian blinds या प्रकाराचे आहेत. काही पात्रे त्या पडद्यांची उघडझाप करतात तो एक संकेत आहे. एका अंध स्त्रीने तीन बदमाश्यांशी दिलेला लढा असे नाटकाचे कथानक आहे. नाटक बरे आहे.

हेमंतकुमार 21/05/2023 - 06:14
सूर राहू दे शं ना नवरे संजय मोने, शुभांगी गोखले व सुनील बर्वे शहरातून खेड्यात आलेला डॉक्टर. त्याची बायको नाईलाजाने त्याच्याबरोबर आलेली पण मनातून सतत कुढत राहणारी. तिचा एक पूर्वाश्रमीचा प्रियकर.. त्याच्याबरोबर ती मुंबईला निघून जाते पण तिकडे तो तिचा धंदा मांडतो. मग ती ‘आपल्या’ घरी परतते.. तेव्हा तिचा नवरा तिला स्वीकारतो का, हे नाटकात बघा.

श्रीगुरुजी 21/05/2023 - 08:28
सखाराम बाईंडर नव्या संचात तूनळीवर उपलब्ध आहे. सखारामच्या भूमिकेत सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, सोनाली कुलकर्णी व चंपाच्या भूमिकेत चिन्मयी सुमित असा नवीन संच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हेमंतकुमार 21/05/2023 - 08:38
मी ते पाहिले आहे. नाटक म्हणून छान आहे. ते 1972 मध्ये गाजले ते त्याला आधी दिलेली परवानगी आणि 13 प्रयोगानंतर काढून घेतलेली परवानगी आणि एकूणच सामाजिक गोंधळ यामुळे. एकंदरीत त्यातील आशय, रांगडी भाषा व अर्वाच्च शिव्या इत्यादी गोष्टी समाजाला मानवल्या नसाव्यात. कलाकारांचा अभिनय तर उत्तमच आहे. गिरीश कार्नाड यांनी तर, ‘गेल्या एक हजार वर्षात असे नाटक झाले नाही’, असा त्याचा गौरव केला आहे.

हेमंतकुमार 22/05/2023 - 07:38
आत्मचरित्र (एकांकिका) दीपक कुलकर्णी विजय केंकरे, सुनील तावडे. आडगावात येऊन कडेकोट बंदोबस्तात राहिलेला एक लेखक- स्वतःमध्येच बुडून गेलेला व लेखनाच्या सर्व व्यावहारिक लाभांपासून दूर राहणारा. या लेखकाने आत्मचरित्र लिहावे असा आग्रह धरणारा त्याचा 'मित्र ' आणि प्रत्यक्षात लेखक मात्र, आता लेखन संपवून चित्रकार होण्याची मनीषा धरणारा. दोन्ही प्रमुख कलाकारा च्या अभिनयाची आणि संवादांची सुरेख जुगलबंदी. शेवटाची कलाटणी सुंदर.

हेमंतकुमार 23/05/2023 - 07:01
सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे दोन चांगले नाट्य कलाकार आहेत. नुकतीच त्या दोघांची एकत्रित मुलाखत "ग गप्पांचा" या मुलाखत मालिकेच्या १० व्या भागात प्रसारित झालेली आहे इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा. चिन्मयीने इथल्या 'सखाराम बाईंडर' मध्ये काम केलेले आहे. त्या संदर्भात तिच्या विजय तेंडुलकरांशी झालेल्या चर्चेबद्दल तिने काही सांगितले आहे.

हेमंतकुमार 24/05/2023 - 13:45
गुलमोहर म. कालेलकर मोहन जोशी, प्रदीप पटवर्धन, अशोक शिंदे आणि इतर गुलमोहर नावाचा बंगला…. त्याचे हॉटेल रूपांतर… तिथे राहायला आलेले विविध लोक…. त्यातला एक लैंगिक कादंबरी लेखक….एक प्रेमभंग झालेली मध्यमवयीन बाई व तिची भाची…बंगल्याचा मालक तिथे येणे… त्या तरुण भाचीचे प्रेमप्रकरण…. दुसरे मध्यमवयीन प्रेम प्रकरण…. होकार…… नकार…… गैरसमज…. दुर्घटना आणि…. गोड शेवट.

हेमंतकुमार 25/05/2023 - 07:06
आवड नसल्यामुळे पौराणिक नाटक कित्येक वर्षात पाहिले नव्हते. परंतु नुकतेच रत्नाकर मतकरी यांचे 1974 मधील आरण्यक पाहिले. ते पाहायला एक कारण घडले, 'गोष्ट खास पुस्तकाची' या पुस्तकात मतकरी यांनी त्या नाटकावर एक लेख लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ती वाचल्यावर नाटकाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. महाभारतातील विदुर, कुंती, ध्रुतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वानप्रस्थाश्रमातील आयुष्यावर बेतलेले हे नाटक आहे; एक प्रकारचे उत्तरकांड. नाटक मुक्तछंदात असून शब्दप्रधान आहे. त्यातील एकेक वाक्य इतके सुरेख आहे की काय विचारू नका. अनेक वाक्यांमध्ये खोल अर्थ आणि जीवनतत्वज्ञान भरलेले आहे. अरण्यामध्ये गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी सोडतानाचा प्रसंग केवळ हृद्य आहे. तो संपताच प्रेक्षागृहातील प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसतात. आपणही सुन्न होतो. एक सुंदर नाट्य अनुभव ! सुमारे अडीच तासांचे हे नाटक मी पाच टप्प्यांमध्ये विभागून पाहिले. ते एकदम बघूच नये हे माझे मत. सावकाश रवंथ करीत बघण्यात आणि ते समजावून घेण्यात खरी मजा आहे ! दिलीप प्रभावळकर (विदुर), रवी पटवर्धन (धृतराष्ट्र), प्रतिभा मतकरी (गांधारी) या दिग्गज कलाकारांसहित इतर सर्व कलाकारांच्या भूमिकाही उत्तम झाल्यात.

हेमंतकुमार 28/05/2023 - 06:26
शिल्लक सागर देशमुख. डॉ. विवेक बेळे, रूपाली भावे आणि इतर. एक निम्न मध्यमवर्गीय नायक आणि त्याचे चौकोनी कुटुंब. पत्नी एक सामान्य नोकरदार आणि गृहकृत्यदक्ष गृहिणी. मुलगा चार वेळेस बारावी नापास होऊन आता छोटी मोठी संगणक हमाली करतोय. मुलगी शाळेत आहे… सतत आर्थिक तंगी.. थकलेली उधारी.. या सगळ्या वातावरणात नाटक तसेच शांतपणे पुढे सरकते. परंतु शेवटच्या पंधरा मिनिटात जरा वेगळीच कलाटणी मिळते. नायक भ्रमिष्ट झालाय आणि काही वेळासाठी त्याच्यात ‘डोंबिवली फास्ट’ संचारलाय. काहीसा गूढ शेवट. नाटक जास्ती करून प्रकाशापेक्षा अंधारातच चालते. सामान्य घरातलं नेपथ्य अगदी उत्तम. सर्व कलाकारांचे उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट. एक तास वीस मिनिटांचा चांगला नाट्य अनुभव !

सिरुसेरि 29/05/2023 - 18:37
सौभद्र हे संगीत नाटक नाट्यगृहामधे बघताना जाणवलेल्या नाट्यानुभवाबद्दल पुर्वी अन्य एका धाग्यावर प्रतिसाद लिहिला होता . हा धागाही नाट्यानुभवाशी संबधीत असल्याने ती प्रतिक्रिया येथेही मुद्रीत करत आहे . संगीत सौभद्र हे नाटक तुनळीवरही आहे . " कृष्ण आणी मराठी नाट्यसंगीत म्हणले की "सौभद्र " , "स्वयंवर" , "देव दिनाघरी धावला " , "सुवर्णतुला " अशी अनेक गाजलेली संगीत नाटके आठवतात . श्रीकृष्णाच्या खेळकर , चतुर व तितक्याच बलशाली व्यक्तीमत्वाच्या अनेक छटा या संगीत नाटकांमधुन पहायला मिळतात . नाटकाचा पहिला अंक संपला आहे . तीर्थयात्रा करत असलेल्या अर्जुनाला नारदमुनींकडुन बलरामाने सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी ठरवल्याची वार्ता कळते . अत्यंत निराश झालेला अर्जुन एक शेवटचा प्रयत्न म्हणुन यतीवेश धारण करुन मथुरेला निघाला आहे . त्याचे सुभद्रेशी लग्न होईल का याची प्रेक्षकांनाही काळजी वाटु लागली आहे . अशा चिंतामय वातावरणात नाटकाचा दुसरा अंक सुरु होतो . आणी रंगमंचावर श्रीकृष्णाचे आगमन होते . प्रेक्षकांना हसतमुखाने विश्वासात घेउन कृष्ण त्यांना आपण चतुराईने रचलेल्या नाट्याची या नाट्यपदामधुन कल्पना देतो - "तस्करा हाती द्विज गोधन हरिले ..तयां पार्थाशी शरण आणिले ..नारदा ते मी त्यास भेटविले ..इकडचे वृत्त जाणविले ..". सर्व काळजी दुर झालेला प्रेक्षक मोकळ्या मनाने श्रीकृष्णाचे नाट्य अनुभवु लागतो . श्रीकृष्णाच्या "कोण तुजसम सांग गुरुराया " , "लाल शालजोडी ", " बहुत दिन नच भेटलो सुंदरीला " , " नच सुंदरी करु कोपा " , "नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी" अशा स्वरांच्या , सुरांच्या जादुमधे हरवुन जातो . अखेर या नाट्यामधे बलरामही सापडतो आणी अर्जुन सुभद्रेच्या लग्नास "नांदा सौख्यभरे" अशी मान्यता देतो . पडदा पडतो आणी प्रेक्षक "सौभद्र"चे , मास्तर कृष्णरावांचे आणी श्रीकृष्णाचे कौतुक करत आनंदाने बाहेर पडतो . " ** मास्तर कॄष्णराव - माननीय संगीतकार श्री. कॄष्णराव फुलंब्रीकर .

हेमंतकुमार 31/05/2023 - 19:46
पर्याय जयवंत दळवी * उषा नाडकर्णी, सुधीर जोशी, जयंत सावरकर व इतर. एकत्र कुटुंब: कजाग सासू , मनमिळाऊ सासरा. मुलीचा नवरा ठोंब्या हुंडाबळी हा नकोसा आणि अंगावर येणारा विषय. शोकांतिका !

हेमंतकुमार 03/06/2023 - 07:26
इथं हवय कुणाला प्रेम रत्नाकर मतकरी * राजन भिसे, चिन्मयी सुमित, स्वाती चिटणीस, वैभव मांगले व इतर एक नाटककार आणि त्याला प्रेमाचे नाटक लिहायचा आग्रह करणारी एक प्रसिद्ध नटी .. प्रेमाचे नमुने दाखवणाऱ्या विविध प्रसंग नाटिका. त्यांतून प्रेम, लग्न, संसार, निव्वळ सहजीवन, व्यापताप, घटस्फोट आणि जुन्या व नव्या जमान्यातील प्रेमाच्या व्याख्या या सगळ्यांवर मार्मिक भाष्य. श्रवणीय गीते आणि प्रेक्षणीय समूह नृत्ये. अखेरीस, “प्रेम असतं की नसतं” या पेचात पडलेला नाटककार आणि त्याच्या बायकोने त्याला एका प्रेमाच्या ‘नाटका’तूनच दिलेले उत्तर . सुंदर नाटक व संगीतिका !

हेमंतकुमार 24/01/2024 - 16:01
अधांतर जयंत पवार ज्योती सुभाष, भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, लीना भागवत *गिरणी कामगारांच्या लढ्याची पार्श्वभूमी.. त्या बंद पडणे ... वैफल्य * एका विधवेची तीन मुले आणि एक मुलगी *एक गुंड - सतत टाडा आणि मोकाची भाषा; दुसरा बेकार आणि तिसरा लेखक. * देशी-विदेशी साहित्यावर तात्विक चर्चा... ती देखील मुद्द्यावरून मुद्यावर येणारी * मुलगी कुमार्गाला लागलेली * बहुतेक सर्व संवाद चढया आवाजातील... तीव्र कौटुंबिक कलह.. शोकांतिका सर्वांचा अभिनय उत्तम !

हेमंतकुमार 24/01/2024 - 16:03
५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मराठी रंगभूमी दिनानिमित्तचा " आणि नाटक सुरू असतं" हा कार्यक्रम छान आहे मराठी रंगभूमीची स्थित्यंतरे छान दाखवली आहेत.

चौथा कोनाडा 24/01/2024 - 18:19
या धाग्याच्या प्रेरणेने "डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?" पाहिले. कड्क आहे एक्दम ... लेखन, अभिनय, दिग्दर्शन एक नंबर ! एकच प्याला देखिल पाहिले : सुरुवात - अंशुमन विचारे, संग्राम संमेल यांच्या संचात आणि उत्तरार्ध : चित्तरंजन कोल्हटकर, रवि पटवर्धन यांच्या संचात ! भारी आहे ! एक नंबर सुंदर आहे हा धागा !

सर टोबी 24/01/2024 - 19:39
गिरीश ओक आणि उत्कर्षा नाईक यांची आभास नावाची एक जुनी थरारक मालिका होती. आपल्या पत्नीला वेगवेगळे भास होतात असे वातावरण तयार करून तिला मानसिक रुग्ण ठरविणे आणि मग घटस्फोट घेऊन मैत्रिणीशी लग्न करणे असा नायकाचा डाव असतो. राजन वाघधरे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. हि मालिका मी युट्युबवर शोधण्याचा प्रयत्न केला पण काही सापडली नाही. कुणाला त्याची लिंक माहिती असल्यास त्याची माहिती द्यावी.

हेमंतकुमार 28/01/2024 - 17:23
२ व्या राज्यनाट्य स्पर्धेतले नाटक (२०२३) : एक्झिट लेखक - अरविंद लिमये दिग्दर्शक - उषा धावडे, मृणाल ढोले कलाकार : मृणाल ढोले, किशोर तळोकार एक गाजलेली अभिनेत्री नैराश्यात जाते. तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या चाहत्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रचलेले एक 'नाटकातले नाटक'. ठीक आहे. ध्वनीमुद्रण सामान्य. अगदी बघितलेच पाहिजे असे नाही…….

हेमंतकुमार 02/02/2024 - 16:20
गहिरे रंग शं. ना. नवरे दि. : राज कुबेर गिरीराज, जयंत सावरकर, शकुंतला नरे, शशिकांत गंधे व इ. एक जोडपे.. नवऱ्यात प्रजननक्षमतेचा दोष.. बायकोवर झालेला बलात्कार आणि गर्भधारणा.. ते पापाचे मूल नको हा पुरुषी अहंकार...अखेर शोकांतिका. प्रमुख कलाकारांचा अभिनय उत्तम. जयंत सावरकरांचा बेरकी काडयाघालू ‘मामा’ देखील लक्षात राहण्यासारखा.

स्मिताके 03/02/2024 - 00:04
ओझ्याविना प्रवासी https://www.youtube.com/watch?v=5KsQA-bP4qQ कलाकार - तुषार दळवी, भक्ती बर्वे, सुनीला प्रधान, किशोरी शहाणे, संदीप मेहता. हा एका फ्रेंच नाटकाचा अनुवाद आहे. भूतकाळ विस्मृतीच्या पडद्याआड हरवलेल्या एका तरुणाचं खरं कुटुंब शोधण्याचा प्रयत्न आणि त्यातून उघडकीला येणारे कौटुंबिक कलह अशी साधारण कथा आहे. जुन्या धनाढय फ्रेंच कुटुंबातली एकंदर विचारधारा आणि त्या ओघाने झालेला शेवट दाखवताना, खिळवून ठेवणारे संवाद आणि सर्व कलाकारांचा सुरेख अभिनय यामुळे नाटक प्रभावी वाटलं. मूळ नाटकातली नावं, वेशभूषा वापरल्यामुळे वेगळेपण जाणवलं.

चौथा कोनाडा 03/02/2024 - 13:22
या धाग्यामुळे "अशी पाखरे येती" आवर्जुन पाहिलं. सुंदर आहे. संजय नार्वेकर, हेमू अधिकारी, लीना भागवत, ज्योती सुभाष यांचा रंगमंचीय अभिनय किती ताकदीचा होता ते दिसुन येते. (यातला सं ना तर भलताच आवडला ... आणि लीना भागवत (पेशल बदाम, (( आपला क्रश :० )) दोन तीन उत्कट प्रसंगामुळे नाटक वर उचलले जाते. (सुरुवातीचे स्वगत बोर वाटले.. कालबाह्य म्हटले तरी चालेल.. पण त्यावेळाच्या नाटकाची गरज असावी) तर ... सांगायचं म्हणजे हा धागा लै भारी आहे .. नेहमी वर येत रहावा हीच इच्छा !

हेमंतकुमार 03/02/2024 - 15:58
"अशी पाखरे येती"
प्रेमात पडावे असे आहेच !! वातावरणनिर्मिती उत्कृष्ट . आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 07/02/2024 - 17:32
आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..
हा ... हा .... हा .... हा .... ! अगदी ... भारी "संस्कारीत" गप्पा ठोकणारा ! टिपि़अल हाफ पॅण्ट संघ दक्ष !

हेमंतकुमार 08/02/2024 - 20:32
अतिथी देवो भव दिग्दर्शक : विजय केंकरे विनय येडेकर, राजन भिसे, लेखा मुकुंद. दिग्दर्शकांचे नाव बघून बघायला घेतले. ठीक आहे. शेवटच्या पंधरा मिनिटात दिलेली भावनिक कलाटणी चांगली आहे परंतु मुख्य ३/४ नाटक विशेष पकड घेत नाही. अतिथी म्हणून कुटुंबात आलेल्या एकजण शेवटी ‘भलताच’ निघतो. दोन्ही पुरुष पात्रे काहीशी आक्रस्ताळी वाटली. त्या मनाने लेखा मुकुंद यांचा वावर सहज आणि चांगला आहे.

हेमंतकुमार 11/02/2024 - 07:39
आपल्याकडे प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकांबद्दल वेगळा धागा नसावा असे वाटते. म्हणून इथेच लिहीतो. क्षमस्व ! … 217 पद्मिनी धाम काल पाहिले. एक उत्कृष्ट नाट्य अनुभव ! रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित नाटक. नाटकाचे नेपथ्य अतिशय सुंदर व प्रकाशयोजनाही गूढ वातावरणाला पूरक. ज्येष्ठ कलाकार मिलिंद शिंदे (माजखोर बेरकी रावराजे) आणि इतर सर्व तरुण कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. उद्योगपती रावराजे यांनी पोसलेले एक कॉलेज. त्यातल्या प्रयोगशाळेतला एक सहाय्यक. त्याचे व रावराजे यांच्या मुलीचे-पद्मिनीचे प्रेम असते. परंतु अखेर ते असफल राहते आणि शोकांतही. नंतर रावराजांनी दुष्टबुद्धीने घेतलेला ‘बदला’ हे नाटकाचे मुख्य सूत्र. दुसरा अंक सुरू होताना रंगमंचावर जो टांगा दाखवलाय तो केवळ अप्रतिम. टांग्यात बसलेला तो सहाय्यक आणि त्याच्या जोडीला कॉलेजला देण्यासाठी म्हणून दिलेली “भीतीदायक भेटवस्तू” असते. हे दृश्य अप्रतिम ! ती भेटवस्तू कॉलेजला पोचवण्याची ‘कामगिरी’ त्याला पार पाडायची आहे. परंतु वास्तवात काहीतरी भलतेसलतेच घडते. ते प्रत्यक्ष पाहण्यातच थरार आहे .. नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल. नेपथ्य लाजबाब व संस्मरणीय !! …. नाट्य अवलोकान युट्युबवर इथे आहे.

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 04/03/2024 - 17:43
सुंदर रसग्रहण. प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकाविषयी इथं लेखनाचं स्वागत ! वाचून पहायलाच हवे असं वाटतंय ! असं सुंदर नेपथ्थ्य नाटकात वेगळेच जबरदस्त वातावरण निर्माण करते

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 04/03/2024 - 17:58
नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल.
.... खूपच स्वागतार्ह आहे हे. आजकाल बर्‍याच नाटकांच्या शेवटी हे सत्र करतात ... याच वेळी रसिकांना त्यांच्यासमवेत फोटो काढायला मिळतात. नाटक व्यवसायाला टॉनिक मिळण्यासाठी हे खूप आवश्यक आहे !

हेमंतकुमार 01/03/2024 - 21:42
फ्रान्सिस ऑगस्टीन प्र. भू. : मोहन जोशी, स्मिता जयकर अनाथालयात वाढलेला एक मुलगा आणि एक मुलगी मोठे झाल्यावर लग्न करतात. आता आपल्याला मूल होण्याआधी आपल्या घरात आजी-आजोबा पाहिजेत हा त्यांचा विचार. दोघेही अनाथ, त्यामुळे त्यांना त्यांचे आई-वडील माहित नाहीत. मग ते जोडते आपण समाजातून आई-वडीलच दत्तक का घेऊ नयेत असा विचार करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. यानंतर घरात त्या चौघांच्या गमती जमती आणि एकंदरीत कौटुंबिक नाटकाचा बाज. नाटक पूर्वार्धात पारशी पकड घेत नाही. तसेच, “तिच्या मनात आलं म्हणून तिने चहात आलं घातलं” यासारखे बाष्कळ विनोद अधूनमधून आहेत. शेवटच्या 25 मिनिटात नाटकाला कारुण्याची छान किनार दिलेली आहे. तसेच एका जोडीचे गुपित उघड झाल्याने कलाटणी मिळते. त्यामुळे नाटक काहीसे वर उचलले जाते.

हेमंतकुमार 28/03/2024 - 10:39
काचेचा चंद्र सुरेश खरे * शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर, जयंत सावरकर कर्मठ कुटुंबातील उपवर तरुणी. आईबाप तिचे लग्न जमवायच्या खटपटीत आहेत. त्या दरम्यान तिला एका चित्रनिर्मात्याकडून चित्रपटात काम करण्याची मागणी येते. त्यावरून घरात वाद होतो. त्यांच्या घरात तिचा एक सावत्र भाऊ देखील नांदत आहे. चित्रपटात जाण्यासाठी आई-वडिलांचा विरोध तर सावत्र भावाचा हट्ट असा तो पेच असतो. एकंदरीत कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून वडिलांना कर्जमुक्त करण्यासाठी ती चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेते. त्या क्षेत्रात वावरताना तिचा सावत्र भाऊ तिचा व्यवस्थापक अर्थात पुरुषी मालक बनतो. पुढे त्याच्या अहंकारापुढे ती पार कोमेजून जाते. तो तिला मद्यव्यसनी बनवतो आणि तिचे पूर्ण दमन करतो. .... शोकांतिका ! (आवडले होते व ४ वर्षांनी काल दुसऱ्यांदा पाहिले)

हेमंतकुमार 14/04/2024 - 09:30
आईशिवाय घर नाही लेखक : राजन लयपुरी व इतर कलाकार : विलास व क्षमा राज, आकांक्षा वनमाळी आणि इतर तरुणांमधील गर्दचे घातक व्यसन या सामाजिक-आरोग्य विषयावर. उद्योगपती पुरुष आणि त्याची आमदार बायको यांचे आपल्या एकुलत्या एक मुलाकडे लक्ष नसल्यामुळे त्याला लागलेले व्यसन. शोकांतिका

Shauryawaan हा डब्ड हिंदी सिनेमा तू-नळीवर दिसला. अर्धा पाहिला. उरलेला उद्यापरवा पाहीन. जबरदस्त आहे. डॉक्टर तुम्हीसुद्धा आवडले. सखाराम बाईंडर, अधांतर पाहिली. फारच अंगावर आली. खूप अस्वस्थ झालो. मित्र, वेड्याचे घर उन्हात, काचेचा चंद्र, लागूंचे नटसम्राट,ऑक्टोपस पूर्वी पाहिली होती. छान आहेत. नाट्यगृहात जाऊन पाहिली त्यातले सुधा करमरकर आणि फैयाजचे वीज म्हणाली धरतीला आवडले. एकदोन गाजलेली नाटके सुमार दर्जाची निघाली. तेव्हापासून हे धारिष्ट्य करीत नाही. त्यापेक्षा तू-नळी बरी. नाही आवडले तर सोडून देता येते. छान धागा. धन्यवाद. अवांतरः तू-नळीवर पाहिलेले लघुपट मात्र मोठ्या संख्येने चांगले निघाले. अनेक लघुपटात प्रथितयश कलाकार भूमिका करतात हे पाहून बरे वाटले.

In reply to by सुधीर कांदळकर

चौथा कोनाडा 16/04/2024 - 17:46
मासा ही अमृता सुभाष यांचा लघुपट आवर्जून पहा. एक वेगळाच आनंद देऊन जाईल. https://www.youtube.com/watch?v=orayV2fpOmY&t=15s

हेमंतकुमार 17/09/2025 - 20:56
कन्यादान * विजय तेंडुलकर यांच्या सामाजिक नाटकाचे हिंदी रूपांतर * नाथच्या भूमिकेत दर्शन जरीवाला तर ज्योतीच्या भूमिकेत मृण्मयी गोडबोले या रूपांतरात अधूनमधून मूळ मराठी वाक्ये कायम ठेवली आहेत. मराठी नाटक बघण्याचा कधी योग आला नव्हता. जातीयता या विषयावरील दमदार आणि प्रक्षोभक नाटक. काही प्रसंग अक्षरशः अंगावर येतात. नाटकाच्या अखेरच्या दहा मिनिटातला नाथ व ज्योतीचा संवाद थरकाप उडवतो आणि ‘मूल्य’ नामक गोष्टींच्या चिंधड्या उडवतो. तिच्या तोंडचे, “राक्षस पण तोच आहे आणि कवी पण तोच आहे”, हे वाक्य सदर नाटकात मराठीतच ठेवून उत्तम परिणाम साधला आहे. https://www.youtube.com/watch?v=Y7G7z_3VWjM . . . एकेकाळी तेंडुलकरांनी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “कन्यादानमधील नाथ देवळालीकर हा मी आहे आणि तो माझ्या पिढीतले मला कळणारे अनेक ‘लिबरल’ प्रवृत्तीची माणसे आहे”.

हेमंतकुमार 17/09/2025 - 20:58
गार्बो महेश एलकुंचवार प्रायोगिक नाटक आहे. नेपथ्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. फारसे कथानक असे नाही. सामाजिक टीकाटिप्पणीचा भाग आहे. प्रायोगिक बघायची सवय नसल्यामुळे डोके जड पडते. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. https://www.youtube.com/watch?v=c_Wln9ImFhA . . . . कथा कुणाची व्यथा कुणा गो. गं. पारखी नाटक दुसऱ्यांना पाहिले. चांगले आहे. रहस्यकथा वाचून त्यातून खून करण्याची कल्पना मिळते हा विषय. प्रसाद पंडित यांनी खलनायकाची भूमिका उत्तम वठवली आहे. https://www.youtube.com/watch?v=Tak73S-b1Xg

श्रीगुरुजी 04/05/2023 - 09:13
मी नियमितपणे नाट्यगृहात जाऊन नाटके पाहतो. मागील ३-४ महिन्यात तू सांगशील तसं, ३८ कृष्ण व्हिला, चारचौघी, काळी राणी ही नाटके पाहिली. चारचौघी उत्कृष्ट आहे. काळी राणी नाटकाचे सादरीकरण अत्यंत प्रभावी आहे. तू सांगशील तसं सामान्य आहे. ३८ कृष्ण व्हिला ठीक आहे.

Bhakti 04/05/2023 - 10:57
वाह!अगदी मनातलं लिहिले आहे.परवाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट 'हे प्रशांत दामले या हाडाच्या नाट्य कलावंताचं नाटक पाहिलं.तीस तास निखळ आनंद मिळाला.मी नियमित नाही पाहत.पण आता वर्षाला दोन तरी नाटकं पाहणार.नाटक ही मराठी अस्मिता आहे.यु ट्यूबवरही हौस भागवून घेतात येईल.छान माहिती.

In reply to by Bhakti

Bhakti 04/05/2023 - 11:03
ता क-तेव्हा प्रशांत दामले म्हणाले की या सहकार सभागृहात अनेक वर्षांपूर्वी ते प्रयोगाला आले होते, नाट्यगृहात चांगला बदल झाला आहे.मीही खुप दिवसांनी या नाट्यगृहात गेले होते, उत्तम बदल केला होता, बाल्कनी सुद्धा हाऊसफुल्ल होती.तिकिटाचे दर हाही एक मुद्दा आहे पण व्यावसायिक दृष्टिकोनातून तोही महत्त्वाचा आहे. नाटक जिवंत राहिले पाहिजे.

हेमंतकुमार 04/05/2023 - 12:26
आता लेखाचा विषय असलेल्या काही चित्रित नाटकांचा अल्पपरिचय टप्प्याटप्प्याने लिहितो. 'उणे पुरे शहर एक' ( मूळ कन्नड) गिरीश कारनाड मराठी रूपांतर: प्रदीप वैद्य एक सुंदर नाट्यानुभव ! महानगर... हरतऱ्हेची माणसे... विविध सामाजिक स्तर आणि थर ..... मानवी प्रवृत्ती... भावना... राग, लोभ, आनंद, दुःख, हव्यास, फसवणूक, नैराश्य... प्रेम, करुणा ..... या सगळ्यांची एक सुंदर घट्ट वीण बांधलेली आहे ! प्रसंगांमधील नाट्य म्हणजे काय ते छान समजते.

nutanm 05/05/2023 - 02:05
मी यू ट्यूब वर बॅरिस्टर पाहून थोड्या सुरूवाती नंतर मला धक्काच बसला माझ्या कल्पनेप्रमाणे ते सावरकर , नेहरू , आंबेडकर अशां महापुरूषांवर असेल असे वाटले पण पूर्ण पाहिल्यावर ते एका छोट्या गावातील एका बॅरिस्टर झालेल्यावर होते. व शेवटी शेवटी तर रागच आला की जो माणूस हातात सत्ता असूनही पुरूष व कर्ता पुरूष असूनही कधीही योग्य त्या बाजूला उभा राहून आधार देत नाही व स्त्रीयांच्या दुबळेपणाच्या बाजूने ऊभा न रहाता काहीच कृती करत नाही व षंढच रहातो मग शिक्षण सत्ता थोडाफार पैसा असूनही ऊपयोग काय? त्यापेक्षा आम्ही स्रिया हे सर्व नसूनही लहानपणी मोठ्यांच्या जुनाट मतांच्या विरूद्ध आवाज ऊठवत असू घरातच का होईना दुबळा तरी विरोध करत असू व मोठेपणी नोकरीतही छोटा छोटा विरोध का होईना केलाच. ईथे शिकलेला , बॅरीस्टर वसत्ता थोडी असूनही ऊपयोग काय असेच वटले व षंढ पुरूष इतके टोकाचे म्हणावेसे वाटले पाहून 4/5 वर्षे झाली सविस्तर ़आठवत नाही पण हेच वाटले होते हे आठवले.

nutanm 05/05/2023 - 02:51
त्यापेक्षा शांतता कोर्ट चालू आहे , कुसुम मनोहर लेले ही नाटके यू टूयूबवर बघून त्यांच्या विषयांमुळे धक्का बसला व प्रगल्भ माझी मराठी नाट्यसृष्टी असा अभिमानही वाटला. धक्कादायी व स्रियांचे प्र ष्न मांडणारी पिढ्यान पिढ्याचे अत्याचार स्रीयांवरील पुढे आणले व पुरूषी दांभिकता समोर आणण्याचे धाडस दाखवून थोडे तरी पुरूषांना त्यांची वाईट कृत्ये उघडी करणीरी वाटली दांभिक नुसते. अजूनही ग्रामीण तळखेड्यामधे स्रियांना काय काय भोगावे लागत असेल देव जाणे वाटते व आपण सामान्य अधिकारविहीन स्रिया काय करूया असे वाटते व ज्येष्ठतेच्या वयात .

In reply to by nutanm

हेमंतकुमार 05/05/2023 - 07:20
त्यापेक्षा शांतता कोर्ट चालू आहे , कुसुम मनोहर लेले ही नाटके यू टूयूबवर बघून त्यांच्या विषयांमुळे धक्का बसला व प्रगल्भ माझी मराठी नाट्यसृष्टी असा अभिमानही वाटला.
+११ शांतता कोर्ट चालू आहे हे मूळ सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिकेने गाजले होते. इथे असणाऱ्या नाटकात रेणुका शहाणे आहेत. त्यांनी वठविलेल्या बेणारे बाई या पात्राचे स्वगत अप्रतिम आहे.

हेमंतकुमार 05/05/2023 - 07:22
यू ट्युबवर काही नाट्यस्पर्धेतल्या प्रयोगांचे चित्रीकरण आहे. ते पाहताना काही मर्यादा उघड असतात. रंगमंच आणि त्यावरील कलाकार हे आपल्यापासून खूप दूर असल्यासारखे दिसतात; काही वेळेस धूसरही. रंगमंचाच्या पायथ्याशी बसलेल्या तंत्रज्ञांची डोकी आणि त्यांच्या संगणकाचे वरचे भागही दिसतात ! तसेच संवादही स्वच्छ ऐकू येत नाहीत. त्यामुळे अशी नाटके पाहण्याचे सहसा टाळले जाते. पण अशी काही जुनी नाटके आता चांगल्या व्यावसायिक कलाकारांना घेऊन इथे उपलब्ध होणे अवघड वाटते. म्हणून हिय्या करून मी तेंडुलकरांचे (स्पर्धेतले) कमला नाटक पाहिले आणि एक चांगला नाट्य अनुभव मिळाला. त्या कलाकारांनी खरंच समरसून अभिनय केलेला आहे. संवाद ऐकताना मात्र इअरफोन्स लावलेले चांगले. नाटक १९७०मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. उत्तर भारतातील ढोलापुरात चालत असलेल्या स्त्री-विक्री बाजारातून इंडियन एक्सप्रेसचा एक पत्रकार एका बाईला २३०० रु. ना विकत घेऊन येतो आणि तिला पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर करतो, ही ती घटना. नाटकाचा सारांश दोन वाक्यात सांगता येईल: १. बायकोसह कुठलीही स्त्री ही पुरुषाच्या दृष्टीने व्यवहारातील फक्त एक प्यादे आहे. २. हुच्च सनसनाटी इंग्लिश पत्रकारितेचा केलेला दंभस्फोट. पत्रकाराने विकत आणलेली कमला जेव्हा खुद्द त्याच्याच बायकोला विचारते, “तुला केवढ्याला विकत घेतलेले आहे ?” हे भेदक वाक्य म्हणजे नाटकाचा आत्मा आहे. तसेच... “अहो, मोठ्या पेपरला प्रतिष्ठा नसते, त्यांना असतो तो फक्त खप आणि जाहिराती !” या वाक्यातून तसल्या पत्रकारितेच्या अक्षरशः चिंध्या उडवलेल्या आहेत.

मुळे आमच्या सारखे महाराष्ट्रा पासून दुर राहाणाऱ्याची चांगली सोय झाली. कथा कथन म्हैस,पानवाला,तुच माझी वहिदा रेहमान इ. तसेच वासूची सासू,मोराची मावशी ,एक डाव भटाचा इ. नाटकांचा आनंद घेऊ शकलो. सुट्टीवर आल्यावर भरपुर कॅसेट्स, सीडीज घेऊन जात असू.

• सुंदर मी होणार https://youtu.be/L0BD4s5FQgM • हसवा फसवी https://youtu.be/v4-MqXYJq6o • बटाट्याची चाळ https://youtu.be/5i1xaSZeyOM • श्रीमंत दामोदर पंत https://youtu.be/U7350LnlKCk • शांतता ! कोर्ट चालु आहे https://youtu.be/QG_Pi051qao • नटसम्राट https://youtu.be/yTFPT7-v-Ws • ती फुलराणी https://youtu.be/PLHfek5SO_Q • तो मी नव्हेच https://youtu.be/8TAToq08YuQ • पती सगळे उचापती https://youtu.be/6IZXCmrE09s • मोरुची मावशी https://youtu.be/eCOeRK9N7QM • एका लग्नाची गोष्ट https://youtu.be/JZl_zwm_IPI • गेला माधव कुणीकडे https://youtu.be/1gEZ0WePqV4 • तुझे आहे तुजपाशी https://youtu.be/sTZGYKAWc_4 • असा मी असामी https://youtu.be/S38SOv4f95w • शांतेच कार्ट चालु आहे https://youtu.be/twOnQ3JCTxE • श्री तशी सौ https://youtu.be/N4pwOnoY7zY • वासु ची सासू https://youtu.be/-m3iruEQoJE • अखेरचा सवाल https://youtu.be/DmuCU9Y33sg • शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8 • चल कहितरीच काय https://youtu.be/blOdn2nbDgw • चार दिवस प्रेमाचे https://youtu.be/PD-mBpCvTAw • मी नथुराम गोडसे बोलतोय https://youtu.be/PD-mBpCvTAw • कुर्यात सदा टिंगलम https://youtu.be/LHBWfTRQvvo • तुझ्या माझ्यात https://youtu.be/94YChmH9GYo • खर सांगायच तर https://youtu.be/uMJ9gA2TFrM • सखाराम बाईंडर https://youtu.be/NIMIgL-OLXc • कुसूम मनोहर लेले https://youtu.be/2AH8SgZ2qSI • अशी पाखरे येती https://youtu.be/kqo2tjug3AU • सेलीब्रेशन https://youtu.be/dR6r75iUGXE • अप्पा आणी बाप्पा https://youtu.be/2z4ndcpOLJU • कार्टि काळजात घुसली https://youtu.be/p_FgFnDnFGc • बॅरिसटर https://youtu.be/ZW73zW21eXQ • मित्र https://youtu.be/tKpPpGWJTzw • अश्रूंची झाली फुले https://youtu.be/5HZYa1s1OXo • डाॅक्टर तुम्हीसुद्धा https://youtu.be/SVY0mq7FO1Y • डबल गेम https://youtu.be/v3EFucCuMdM • सूर राहु दे https://youtu.be/ZeT8mqNDkss • गोड गुलाबी https://youtu.be/XZ5pC8x8nQY • अधांतर https://youtu.be/ECwRnB8n2z4 • नातीगोती https://youtu.be/F7dlUMpA5JU • गाभण https://youtu.be/LqQWHhxVaK4

हेमंतकुमार 05/05/2023 - 13:27
छान ! ......... दिवाणखान्यातील नाटकांना कंटाळला असाल तर बदल म्हणून इथले कोर्ट मार्शल हे अनुवादित नाटक (मूळ हिंदी) जरूर पहा. दिग्दर्शक: प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे. लष्करी न्यायालयाच्या पटावर हे नाटक घडते. एका जवानाने त्याच्यावर झालेल्या जातिवाचक अन्याय व मानहानीचा बदला म्हणून दोन लष्करी अधिकाऱ्यांवर गोळीबार केलेला असतो आणि त्यातील एक अधिकारी मरण पावतो. त्या जवानावरील हा लष्करी न्यायालयीन खटला आहे. लष्करी न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रा. विजय दिवान तर आरोपीच्या वकिलाच्या भूमिकेत डॉ. चंद्रकांत शिरोळे आहेत. या दोघांचीही कामे खूप आवडली.

हेमंतकुमार 07/05/2023 - 05:16
सर्वाँना धन्यवाद ! .... महासागर जयवंत दळवी गिरीराज, किशोरी अंबिये, अमिता खोपकर व गिरीश ओक मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब चालवणारा विमा एजंट. त्याची बायको अगदी काकूबाई गृहिणी. अन्य एक अविवाहित पुरुष आणि नटव्या बाईबरोबर त्याचे संबंध. दळवींच्या प्रथेनुसार नाटकात एक वेडे पात्र आहे: नायकाचा भाऊ. शोकांतिका ! मला गिरीराज हा कलाकार या नाटकामुळे माहीत झाला.

In reply to by हेमंतकुमार

चौकस२१२ 17/05/2023 - 07:27
पहिले महासागर विक्रम गोखले / नाना पाटेकर / नीना कुलकर्णी / भा रती आचरेकर डॉक्टर तुम्ही सुद्धा निना कुलकर्णी / सुहास जोशी/ शेंडे / महेश मांजरेकर शिवाजी साटम, नीना कुलकर्णी/ महेश मांजरेकर नाटक नाव आठवत नाही प्रसिद्ध होते Hamidabai Chi Kothi ? कुठे आहे का चित्रित केलेले

हेमंतकुमार 07/05/2023 - 16:11
अशी पाखरे येती विजय तेंडुलकर संजय नार्वेकर, लीना भागवत, ज्योती सुभाष आणि हेमू अधिकारी या सर्वांचा अभिनय एकदम खास. संजय हा प्रेक्षकांना त्याची जीवनकहाणी सांगतोय या पार्श्वभूमीवर नाटक पुढे सरकते. प्रेक्षकांकडे बघून केलेली त्याची स्वगते तर लाजवाब आहेत. किंबहुना त्याने संपूर्ण नाटक आपल्या करंगळीवर तोलले आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे कौटुंबिक वातावरण. मुलगी उपवर आहे. तिचा बाप स्थळासाठी ‘जोडे झिजवतोय’. तेव्हा फक्त मुलाचा होकार म्हणजे अंतिम उत्तर असायचे. मग मुलीने फक्त मान डोलवयाची. मुलीचे लग्न जमत नसल्यास आईवडिलांच्या जीवाला काय तो घोर. अशा कुचंबणा झालेल्या मुलीची भूमिका लीनाने समर्थपणे पेललीय. नाटकातील शेवटचा अर्धा तास तर अगदी उत्कंठापूर्ण. शेवट काय होईल याचा प्रेक्षकांचा अंदाज सतत चुकत राहतो. पण एक गोष्ट मनात येत की शेवटी हे ‘’तें’’ चे नाटक असल्याने अगदी गोग्गोड शेवट नक्कीच होणार नाही. जर आपण मनात ‘अशी पाखरे येती...’ या गाण्याची संपूर्ण ओळ म्हटली तर मग शेवटाचा अंदाज येतो. ‘’तें’’ चे हे हळुवार नाटक पाहिल्यानंतर बाईंडर व गिधाडे लिहीणारे तेंडुलकर हेच का ते, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. ….

श्रीगणेशा 08/05/2023 - 14:33
छान धागा व चर्चा! वाचनखूण साठवली आहे. अजून कधीच नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याचा योग आला नाही. लहानपणी, दूरदर्शनवर कधी कधी दाखविली जायची नाटकं, त्यावेळी चित्रपटांपेक्षा नाटकांना जास्त लक्ष दिलं गेल्याचं आठवतं.

हेमंतकुमार 08/05/2023 - 14:45
धन्यवाद ! .... ‘नातीगोती’ *जयवंत दळवी. *दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब. एका मध्यमवर्गीय पांढरपेशा जोडप्याचा मंदमती मुलगा ही मध्यवर्ती कल्पना. त्या मुलाला सांभाळण्यासाठी बायको दिवसा व नवरा रात्री नोकरी करतात. बायकोचा बॉस आणि त्या दोघांचे तरल संबंध हे एक उप-कथानक. परंतु हे संबंध अगदी निखळ मैत्रीचे राहतात हे वैशिष्ट्य. तो मुलगा वयात येताना त्याच्या आईशीच लगट करायला बघतो हा प्रसंगही सुरेख व संयमित दाखवला आहे. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय हे सर्व रसायन झकास जमल्याने नाटक एक वेगळीच उंची गाठते.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 16/04/2024 - 18:48
त्याच्या आईशीच लगट करायला बघतो.... हे बरोबर आहे पण त्या मंदमती ('आत्म मग्न' हा अलिकडचा शास्त्रीय शब्द) मुलाला लाल रंगाचे वस्त्र दिसले की तो हिंसक होतो अशी एक शास्त्रीय डूब दिलेली आहे. दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब. हे खरेच, तरीही त्यात अतुल परचुरेचा 'मंदमती' मुलगा भाव खाऊन जातो.

हेमंतकुमार 09/05/2023 - 16:42
आसू आणि हसू प्र ल मयेकर *मोहन जोशी, रिमा लागू आणि इतर. नामांकित डॉक्टर व त्याचे मोठे रुग्णालय. या प्रेमविवाहित पती-पत्नीमधील ताणेबाणे आणि भांडणे.. डॉक्टरांच्या रुग्णालयात आलेली एक तरुण स्त्री डॉक्टर.. त्यातून निर्माण झालेल्या कटकटी.. एकमेकींच्या झिंज्या ओढण्यापर्यंत.. अखेरीस नवरा बायकोमधील हृद्य संवाद.. प्रेम, लग्न, मैत्री, संसार, प्रेयसी, सहनिवासी.. अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत तरल शेवट. सुंदर नाट्य !

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा 12/05/2023 - 17:07
नाटक आवडलं. यात दोन वेगवेगळ्या बाजू दाखवल्या आहेत, पात्रे, कथा तीच. फरक हा की -- एका बाजूला संशय, नकारात्मकता, तर दुसरीकडे स्वीकार, समर्पण, सकारात्मकता. आसू आणि हासू. आवडलेलं वाक्य -- शेवटच्या संवादात, डॉ. हेमंत, पत्नी वर्षाला म्हणतात, "शब्दांनी स्पर्श करणं जमतं तुला"

हेमंतकुमार 12/05/2023 - 11:08
नाटक या विषयावरचे एक छान काव्यमय स्फुट: त्यातले हे खूप आवडले:
नाटकाच्या शेवटी नाटक, लेखकाला खडसावतं. मी आहे म्हणून तू आहेस, असं सांगून भेडसावतं. लेखकापेक्षा नाटक मोठं असतं नाटक सोडून, सगळं खोटं असतं.

हेमंतकुमार 13/05/2023 - 06:00
जरा वेगळे कलाकार बघायची इच्छा असल्यास हे एक चांगले आहे: द गेम ले. : मनोहर सोमण प्रमुख भूमिका : रेवती केतकर विषय : एक उद्योगपती स्त्री राजकारण्यांना कशी नमवते. डॉक्टर व कामगार हितचिंतक असलेल्या तरुणासंदर्भातील पहिल्या अंकाच्या अखेरचा धक्काबिंदू चांगला.

तिमा 13/05/2023 - 06:59
मराठी नाटक हे नाट्यगृहात पहा वा यु ट्यूबवर. काही मोजके अपवाद वगळता, सर्वच मराठी कलाकारांचा अभिनय अजून बाल्यावस्थेत आहे. फिल्म फेस्टिवलचे विविध देशांचे चित्रपट पाहिल्यावर याची जाणीव झाली.

हेमंतकुमार 14/05/2023 - 11:41
'मित्र' नाटक मस्त आहे. लेखन (डॉ. आठवले ) व दिग्दर्शन ( वि. केंकरे) उत्तम ! श्रीराम लागू फैय्याज यांच्या अभिनयाची जुगलबंदी लाजवाब ! नाटकाची सुरवात लागूंवर दलित तरूण हल्ला करतात त्याने होते. रुग्णालयात लागूंना 'स्ट्रोक' होतो व त्यामुळे शरीराची उजवी बाजू लुळी पडते. त्यांना घरी आणल्यावर त्यांच्या देखभालीसाठी एका प्रशिक्षित नर्सची (फैय्याज) नेमणूक होते. या बाई दलित आहेत. रुग्ण कडवा ब्राह्मण. सुरवातीस हे दोघे अगदी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. नाटकाच्या शेवटी 'मित्र' झालेले असतात. दोघांच्याही अभिनयास हजार सलाम ! नाटकात राखीव जागांच्या सामाजिक प्रश्नास हात घातला आहे पण अतिशय हळूवारपणे. किंबहुना ही दरी मिटावी असाच संदेश दिला जातो. जरूर पाहावे असे नाटक.

हेमंतकुमार 15/05/2023 - 11:44
धुक्यात हरवली वाट शं ना नवरे सुबोध भावे, सृजा प्रभूदेसाई रवी पटवर्धन व इतर मध्यवर्ती विषय: विवाहबाह्य संबंध. मध्यमवयीन पुरुषाने एका तरुणीला रखेल म्हणून ठेवलेले.. सुरुवातीस चोरून परंतु नंतर ते त्याच्या पत्नीला समजते. पत्नी व रखेलीची भेट आणि पत्नीने मांडलेला प्रस्ताव. त्यावर पूर्ण विचारांची रखेल तिचा निर्णय घेते. आवडले.

हेमंतकुमार 17/05/2023 - 06:50
धुक्यात हरवली वाट शं ना नवरे सुबोध भावे, सृजा प्रभूदेसाई रवी पटवर्धन व इतर मध्यवर्ती विषय: विवाहबाह्य संबंध. मध्यमवयीन पुरुषाने एका तरुणीला रखेल म्हणून ठेवलेले.. सुरुवातीस चोरून परंतु नंतर ते त्याच्या पत्नीला समजते. पत्नी व रखेलीची भेट आणि पत्नीने मांडलेला प्रस्ताव. त्यावर पूर्ण विचारांची रखेल तिचा निर्णय घेते. आवडले.

हेमंतकुमार 17/05/2023 - 12:50
आता वारंवार हेच ऐकायला मिळते आहे:
नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगलेंनी एक संतप्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे. वैभव यांचा अलिकडेच ‘संज्या-छाया’ या नाटकांचा पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग झाले. तिथं आलेल्या अनुभवावर ही पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ' टपुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग 'संज्या छाया'चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक देखील डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले...'

सिरुसेरि 17/05/2023 - 16:14
मराठी नाटक म्हणले की तिस-या घंटेनंतर प्रेक्षाग्रुहात होणारा अंधार , त्यानंतर नाटकाच्या सुरुवातीस होणारे "रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करुन सादर करीत आहोत दोन अंकी नाटक ----------" हे लक्षात आहे . या निवेदनाला पार्श्वसंगीताची साथ असे. राहुल रानडे , अनंत अमेंबल यासारखे मातब्बर संगीतकार या पार्श्वसंगीताची धुरा सांभाळत असत . अनेकदा नाटक सुरु होण्यास उशीर होत असेल तर सुजाण प्रेक्षक टाळ्या वाजवुन नाटकाच्या ग्रुपला वेळेची जाणीव करुन देत असतात . नाटक सुरु होण्यापुर्वी व मध्यंतरात प्रेक्षक एकमेकांशी गप्पा मारताना " मी इथे दोन वर्षांपुर्वी ---- या कलाकाराचे ------- हे नाटक पाहायला आलो होतो ." अशा आठ्वणी सांगतात . या गप्पांमधुन अनेक नव्या जुन्या नाटकांच्या व कलाकारांच्या आठवणींना उजाळा मिळतो . डॉ. काशीनाथ घाणेकर , प्रदीप पटवर्धन , डॉ. श्रीराम लागु , बबन प्रभु , फैयाज , आशालता अशा अनेक नव्या जुन्या कलाकारांच्या आठवणी सांगितल्या जातात . काही वर्षांपुर्वी "निर्णय तुमच्या हाती" या नावाचे रहस्य कथे वर आधारीत दोन अंकी नाटक सादर होत असे . या मधे पहिला अंक संपल्यानंतर मध्यंतरात नाटकाच्या कथेतील गुन्हेगार कोण असावा हे ठरवण्यासाठी काही ठराविक प्रेक्षकांना कोरे कागद देत असत . त्यामधे प्रेक्षकांनी त्यांच्या मते कोण गुन्हेगार आहे ते मत लिहुन द्यायचे असते . यामधुन प्रेक्षकांच्या बहुमताद्वारे गुन्हेगार कोण आहे हे ठरवले जात असे . व त्याप्रमाणे ते पात्र गुन्हेगार असणे व त्याचा गुन्हा पकडला जाणे अशा कथानकावर दुसरा अंक सादर होत असे . कदाचित हे नाटक माउसट्रॅप या इंग्रजी नाटकावर आधारीत असावे .

In reply to by सिरुसेरि

चौथा कोनाडा 19/04/2024 - 14:11
प्रेक्षकांनी त्यांच्या मते कोण गुन्हेगार आहे ते मत लिहुन द्यायचे असते . यामधुन प्रेक्षकांच्या बहुमताद्वारे गुन्हेगार कोण आहे हे ठरवले जात असे . व त्याप्रमाणे ते पात्र गुन्हेगार असणे व त्याचा गुन्हा पकडला जाणे अशा कथानकावर दुसरा अंक सादर होत असे
. हे भारीचं होतं

हेमंतकुमार 17/05/2023 - 17:20
वा, खूप छान आठवणी ! एक भर घालतो. आपण खुर्चीत बसून नाटक सुरू होण्यापूर्वी जेव्हा पडद्याकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती लिहिलेले नाटक किंवा संस्कृती संबंधीचे बोधवाक्य देखील अविस्मरणीय असते. त्यापैकी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात असलेले, "काव्यशास्त्र विनोदार्थं श्रीशाय जनतात्मने .." हे वाक्य माझे अगदी पाठ झालेले आहे. बालगंधर्व मंदिरात बहुतेक काहीतरी कालिदासासंबंधी आहे; ते जरा क्लिष्ट असल्याने पाठ झाले नाही.

हेमंतकुमार 18/05/2023 - 08:12
लग्न जयवंत दळवी माधव अभ्यंकर, लालन सारंग व इतर. या नाटकाचा सारांश त्यातल्या शेवटच्या दोन वाक्यातच आलेला आहे: लग्न न करता माणूस सुखी असतो का ? आणि लग्न केलेला माणूस सुखी होतो का ? ( ज्याने त्याने या प्रश्नांची उत्तरे आपापल्या मनात द्यावीत !) नाटकात खुद्द एक नाटककारच मध्यवर्ती भूमिकेत. त्याची पत्नी आणि दोन मुली ही प्रत्यक्ष दिसणारी पात्रे. इतर न दिसणारी पात्रे म्हणजे, मोठ्या मुलीची सासरची मंडळी आणि धाकटीचा ज्या वृद्धाशी शरीरसंबंध आलेला आहे तो माणूस आणि नाटककाराच्या मैत्रिणी. अनेक अर्थपूर्ण वाक्यातून लग्नसंस्थेला मारलेले जोडे. लग्नाविना सहजीवनाची कल्पना. नाटक छान !

हेमंतकुमार 20/05/2023 - 11:03
कालच युट्युब वर आलेले हे नाटक पाहिले: ब्लाइंड गेम रत्नाकर मतकरी प्रत्यक्ष प्रयोगाचे चित्रीकरण आहे. कोव्हिड नंतर प्रथमच नाट्यगृहात साकारलेला 'ब्लाइंड गेम'चा हा प्रयोग..मास्क आणि ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाला होता. चित्रीकरण ठीक परंतु संवाद नीट ऐकण्यासाठी हेडफोन्स लावलेले बरे. ‘ ब्लाइंड’ चे इथे दोन अर्थ आहेत- मुख्य कलाकार भाग्यश्री देसाई अंध भूमिकेत आहे आणि दिवाणखान्यातील खोलीला बसवलेले पडदे venetian blinds या प्रकाराचे आहेत. काही पात्रे त्या पडद्यांची उघडझाप करतात तो एक संकेत आहे. एका अंध स्त्रीने तीन बदमाश्यांशी दिलेला लढा असे नाटकाचे कथानक आहे. नाटक बरे आहे.

हेमंतकुमार 21/05/2023 - 06:14
सूर राहू दे शं ना नवरे संजय मोने, शुभांगी गोखले व सुनील बर्वे शहरातून खेड्यात आलेला डॉक्टर. त्याची बायको नाईलाजाने त्याच्याबरोबर आलेली पण मनातून सतत कुढत राहणारी. तिचा एक पूर्वाश्रमीचा प्रियकर.. त्याच्याबरोबर ती मुंबईला निघून जाते पण तिकडे तो तिचा धंदा मांडतो. मग ती ‘आपल्या’ घरी परतते.. तेव्हा तिचा नवरा तिला स्वीकारतो का, हे नाटकात बघा.

श्रीगुरुजी 21/05/2023 - 08:28
सखाराम बाईंडर नव्या संचात तूनळीवर उपलब्ध आहे. सखारामच्या भूमिकेत सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, सोनाली कुलकर्णी व चंपाच्या भूमिकेत चिन्मयी सुमित असा नवीन संच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हेमंतकुमार 21/05/2023 - 08:38
मी ते पाहिले आहे. नाटक म्हणून छान आहे. ते 1972 मध्ये गाजले ते त्याला आधी दिलेली परवानगी आणि 13 प्रयोगानंतर काढून घेतलेली परवानगी आणि एकूणच सामाजिक गोंधळ यामुळे. एकंदरीत त्यातील आशय, रांगडी भाषा व अर्वाच्च शिव्या इत्यादी गोष्टी समाजाला मानवल्या नसाव्यात. कलाकारांचा अभिनय तर उत्तमच आहे. गिरीश कार्नाड यांनी तर, ‘गेल्या एक हजार वर्षात असे नाटक झाले नाही’, असा त्याचा गौरव केला आहे.

हेमंतकुमार 22/05/2023 - 07:38
आत्मचरित्र (एकांकिका) दीपक कुलकर्णी विजय केंकरे, सुनील तावडे. आडगावात येऊन कडेकोट बंदोबस्तात राहिलेला एक लेखक- स्वतःमध्येच बुडून गेलेला व लेखनाच्या सर्व व्यावहारिक लाभांपासून दूर राहणारा. या लेखकाने आत्मचरित्र लिहावे असा आग्रह धरणारा त्याचा 'मित्र ' आणि प्रत्यक्षात लेखक मात्र, आता लेखन संपवून चित्रकार होण्याची मनीषा धरणारा. दोन्ही प्रमुख कलाकारा च्या अभिनयाची आणि संवादांची सुरेख जुगलबंदी. शेवटाची कलाटणी सुंदर.

हेमंतकुमार 23/05/2023 - 07:01
सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे दोन चांगले नाट्य कलाकार आहेत. नुकतीच त्या दोघांची एकत्रित मुलाखत "ग गप्पांचा" या मुलाखत मालिकेच्या १० व्या भागात प्रसारित झालेली आहे इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा. चिन्मयीने इथल्या 'सखाराम बाईंडर' मध्ये काम केलेले आहे. त्या संदर्भात तिच्या विजय तेंडुलकरांशी झालेल्या चर्चेबद्दल तिने काही सांगितले आहे.

हेमंतकुमार 24/05/2023 - 13:45
गुलमोहर म. कालेलकर मोहन जोशी, प्रदीप पटवर्धन, अशोक शिंदे आणि इतर गुलमोहर नावाचा बंगला…. त्याचे हॉटेल रूपांतर… तिथे राहायला आलेले विविध लोक…. त्यातला एक लैंगिक कादंबरी लेखक….एक प्रेमभंग झालेली मध्यमवयीन बाई व तिची भाची…बंगल्याचा मालक तिथे येणे… त्या तरुण भाचीचे प्रेमप्रकरण…. दुसरे मध्यमवयीन प्रेम प्रकरण…. होकार…… नकार…… गैरसमज…. दुर्घटना आणि…. गोड शेवट.

हेमंतकुमार 25/05/2023 - 07:06
आवड नसल्यामुळे पौराणिक नाटक कित्येक वर्षात पाहिले नव्हते. परंतु नुकतेच रत्नाकर मतकरी यांचे 1974 मधील आरण्यक पाहिले. ते पाहायला एक कारण घडले, 'गोष्ट खास पुस्तकाची' या पुस्तकात मतकरी यांनी त्या नाटकावर एक लेख लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ती वाचल्यावर नाटकाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. महाभारतातील विदुर, कुंती, ध्रुतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वानप्रस्थाश्रमातील आयुष्यावर बेतलेले हे नाटक आहे; एक प्रकारचे उत्तरकांड. नाटक मुक्तछंदात असून शब्दप्रधान आहे. त्यातील एकेक वाक्य इतके सुरेख आहे की काय विचारू नका. अनेक वाक्यांमध्ये खोल अर्थ आणि जीवनतत्वज्ञान भरलेले आहे. अरण्यामध्ये गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी सोडतानाचा प्रसंग केवळ हृद्य आहे. तो संपताच प्रेक्षागृहातील प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसतात. आपणही सुन्न होतो. एक सुंदर नाट्य अनुभव ! सुमारे अडीच तासांचे हे नाटक मी पाच टप्प्यांमध्ये विभागून पाहिले. ते एकदम बघूच नये हे माझे मत. सावकाश रवंथ करीत बघण्यात आणि ते समजावून घेण्यात खरी मजा आहे ! दिलीप प्रभावळकर (विदुर), रवी पटवर्धन (धृतराष्ट्र), प्रतिभा मतकरी (गांधारी) या दिग्गज कलाकारांसहित इतर सर्व कलाकारांच्या भूमिकाही उत्तम झाल्यात.

हेमंतकुमार 28/05/2023 - 06:26
शिल्लक सागर देशमुख. डॉ. विवेक बेळे, रूपाली भावे आणि इतर. एक निम्न मध्यमवर्गीय नायक आणि त्याचे चौकोनी कुटुंब. पत्नी एक सामान्य नोकरदार आणि गृहकृत्यदक्ष गृहिणी. मुलगा चार वेळेस बारावी नापास होऊन आता छोटी मोठी संगणक हमाली करतोय. मुलगी शाळेत आहे… सतत आर्थिक तंगी.. थकलेली उधारी.. या सगळ्या वातावरणात नाटक तसेच शांतपणे पुढे सरकते. परंतु शेवटच्या पंधरा मिनिटात जरा वेगळीच कलाटणी मिळते. नायक भ्रमिष्ट झालाय आणि काही वेळासाठी त्याच्यात ‘डोंबिवली फास्ट’ संचारलाय. काहीसा गूढ शेवट. नाटक जास्ती करून प्रकाशापेक्षा अंधारातच चालते. सामान्य घरातलं नेपथ्य अगदी उत्तम. सर्व कलाकारांचे उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट. एक तास वीस मिनिटांचा चांगला नाट्य अनुभव !

सिरुसेरि 29/05/2023 - 18:37
सौभद्र हे संगीत नाटक नाट्यगृहामधे बघताना जाणवलेल्या नाट्यानुभवाबद्दल पुर्वी अन्य एका धाग्यावर प्रतिसाद लिहिला होता . हा धागाही नाट्यानुभवाशी संबधीत असल्याने ती प्रतिक्रिया येथेही मुद्रीत करत आहे . संगीत सौभद्र हे नाटक तुनळीवरही आहे . " कृष्ण आणी मराठी नाट्यसंगीत म्हणले की "सौभद्र " , "स्वयंवर" , "देव दिनाघरी धावला " , "सुवर्णतुला " अशी अनेक गाजलेली संगीत नाटके आठवतात . श्रीकृष्णाच्या खेळकर , चतुर व तितक्याच बलशाली व्यक्तीमत्वाच्या अनेक छटा या संगीत नाटकांमधुन पहायला मिळतात . नाटकाचा पहिला अंक संपला आहे . तीर्थयात्रा करत असलेल्या अर्जुनाला नारदमुनींकडुन बलरामाने सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी ठरवल्याची वार्ता कळते . अत्यंत निराश झालेला अर्जुन एक शेवटचा प्रयत्न म्हणुन यतीवेश धारण करुन मथुरेला निघाला आहे . त्याचे सुभद्रेशी लग्न होईल का याची प्रेक्षकांनाही काळजी वाटु लागली आहे . अशा चिंतामय वातावरणात नाटकाचा दुसरा अंक सुरु होतो . आणी रंगमंचावर श्रीकृष्णाचे आगमन होते . प्रेक्षकांना हसतमुखाने विश्वासात घेउन कृष्ण त्यांना आपण चतुराईने रचलेल्या नाट्याची या नाट्यपदामधुन कल्पना देतो - "तस्करा हाती द्विज गोधन हरिले ..तयां पार्थाशी शरण आणिले ..नारदा ते मी त्यास भेटविले ..इकडचे वृत्त जाणविले ..". सर्व काळजी दुर झालेला प्रेक्षक मोकळ्या मनाने श्रीकृष्णाचे नाट्य अनुभवु लागतो . श्रीकृष्णाच्या "कोण तुजसम सांग गुरुराया " , "लाल शालजोडी ", " बहुत दिन नच भेटलो सुंदरीला " , " नच सुंदरी करु कोपा " , "नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी" अशा स्वरांच्या , सुरांच्या जादुमधे हरवुन जातो . अखेर या नाट्यामधे बलरामही सापडतो आणी अर्जुन सुभद्रेच्या लग्नास "नांदा सौख्यभरे" अशी मान्यता देतो . पडदा पडतो आणी प्रेक्षक "सौभद्र"चे , मास्तर कृष्णरावांचे आणी श्रीकृष्णाचे कौतुक करत आनंदाने बाहेर पडतो . " ** मास्तर कॄष्णराव - माननीय संगीतकार श्री. कॄष्णराव फुलंब्रीकर .

हेमंतकुमार 31/05/2023 - 19:46
पर्याय जयवंत दळवी * उषा नाडकर्णी, सुधीर जोशी, जयंत सावरकर व इतर. एकत्र कुटुंब: कजाग सासू , मनमिळाऊ सासरा. मुलीचा नवरा ठोंब्या हुंडाबळी हा नकोसा आणि अंगावर येणारा विषय. शोकांतिका !

हेमंतकुमार 03/06/2023 - 07:26
इथं हवय कुणाला प्रेम रत्नाकर मतकरी * राजन भिसे, चिन्मयी सुमित, स्वाती चिटणीस, वैभव मांगले व इतर एक नाटककार आणि त्याला प्रेमाचे नाटक लिहायचा आग्रह करणारी एक प्रसिद्ध नटी .. प्रेमाचे नमुने दाखवणाऱ्या विविध प्रसंग नाटिका. त्यांतून प्रेम, लग्न, संसार, निव्वळ सहजीवन, व्यापताप, घटस्फोट आणि जुन्या व नव्या जमान्यातील प्रेमाच्या व्याख्या या सगळ्यांवर मार्मिक भाष्य. श्रवणीय गीते आणि प्रेक्षणीय समूह नृत्ये. अखेरीस, “प्रेम असतं की नसतं” या पेचात पडलेला नाटककार आणि त्याच्या बायकोने त्याला एका प्रेमाच्या ‘नाटका’तूनच दिलेले उत्तर . सुंदर नाटक व संगीतिका !

हेमंतकुमार 24/01/2024 - 16:01
अधांतर जयंत पवार ज्योती सुभाष, भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, लीना भागवत *गिरणी कामगारांच्या लढ्याची पार्श्वभूमी.. त्या बंद पडणे ... वैफल्य * एका विधवेची तीन मुले आणि एक मुलगी *एक गुंड - सतत टाडा आणि मोकाची भाषा; दुसरा बेकार आणि तिसरा लेखक. * देशी-विदेशी साहित्यावर तात्विक चर्चा... ती देखील मुद्द्यावरून मुद्यावर येणारी * मुलगी कुमार्गाला लागलेली * बहुतेक सर्व संवाद चढया आवाजातील... तीव्र कौटुंबिक कलह.. शोकांतिका सर्वांचा अभिनय उत्तम !

हेमंतकुमार 24/01/2024 - 16:03
५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मराठी रंगभूमी दिनानिमित्तचा " आणि नाटक सुरू असतं" हा कार्यक्रम छान आहे मराठी रंगभूमीची स्थित्यंतरे छान दाखवली आहेत.

चौथा कोनाडा 24/01/2024 - 18:19
या धाग्याच्या प्रेरणेने "डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?" पाहिले. कड्क आहे एक्दम ... लेखन, अभिनय, दिग्दर्शन एक नंबर ! एकच प्याला देखिल पाहिले : सुरुवात - अंशुमन विचारे, संग्राम संमेल यांच्या संचात आणि उत्तरार्ध : चित्तरंजन कोल्हटकर, रवि पटवर्धन यांच्या संचात ! भारी आहे ! एक नंबर सुंदर आहे हा धागा !

सर टोबी 24/01/2024 - 19:39
गिरीश ओक आणि उत्कर्षा नाईक यांची आभास नावाची एक जुनी थरारक मालिका होती. आपल्या पत्नीला वेगवेगळे भास होतात असे वातावरण तयार करून तिला मानसिक रुग्ण ठरविणे आणि मग घटस्फोट घेऊन मैत्रिणीशी लग्न करणे असा नायकाचा डाव असतो. राजन वाघधरे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. हि मालिका मी युट्युबवर शोधण्याचा प्रयत्न केला पण काही सापडली नाही. कुणाला त्याची लिंक माहिती असल्यास त्याची माहिती द्यावी.

हेमंतकुमार 28/01/2024 - 17:23
२ व्या राज्यनाट्य स्पर्धेतले नाटक (२०२३) : एक्झिट लेखक - अरविंद लिमये दिग्दर्शक - उषा धावडे, मृणाल ढोले कलाकार : मृणाल ढोले, किशोर तळोकार एक गाजलेली अभिनेत्री नैराश्यात जाते. तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या चाहत्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रचलेले एक 'नाटकातले नाटक'. ठीक आहे. ध्वनीमुद्रण सामान्य. अगदी बघितलेच पाहिजे असे नाही…….

हेमंतकुमार 02/02/2024 - 16:20
गहिरे रंग शं. ना. नवरे दि. : राज कुबेर गिरीराज, जयंत सावरकर, शकुंतला नरे, शशिकांत गंधे व इ. एक जोडपे.. नवऱ्यात प्रजननक्षमतेचा दोष.. बायकोवर झालेला बलात्कार आणि गर्भधारणा.. ते पापाचे मूल नको हा पुरुषी अहंकार...अखेर शोकांतिका. प्रमुख कलाकारांचा अभिनय उत्तम. जयंत सावरकरांचा बेरकी काडयाघालू ‘मामा’ देखील लक्षात राहण्यासारखा.

स्मिताके 03/02/2024 - 00:04
ओझ्याविना प्रवासी https://www.youtube.com/watch?v=5KsQA-bP4qQ कलाकार - तुषार दळवी, भक्ती बर्वे, सुनीला प्रधान, किशोरी शहाणे, संदीप मेहता. हा एका फ्रेंच नाटकाचा अनुवाद आहे. भूतकाळ विस्मृतीच्या पडद्याआड हरवलेल्या एका तरुणाचं खरं कुटुंब शोधण्याचा प्रयत्न आणि त्यातून उघडकीला येणारे कौटुंबिक कलह अशी साधारण कथा आहे. जुन्या धनाढय फ्रेंच कुटुंबातली एकंदर विचारधारा आणि त्या ओघाने झालेला शेवट दाखवताना, खिळवून ठेवणारे संवाद आणि सर्व कलाकारांचा सुरेख अभिनय यामुळे नाटक प्रभावी वाटलं. मूळ नाटकातली नावं, वेशभूषा वापरल्यामुळे वेगळेपण जाणवलं.

चौथा कोनाडा 03/02/2024 - 13:22
या धाग्यामुळे "अशी पाखरे येती" आवर्जुन पाहिलं. सुंदर आहे. संजय नार्वेकर, हेमू अधिकारी, लीना भागवत, ज्योती सुभाष यांचा रंगमंचीय अभिनय किती ताकदीचा होता ते दिसुन येते. (यातला सं ना तर भलताच आवडला ... आणि लीना भागवत (पेशल बदाम, (( आपला क्रश :० )) दोन तीन उत्कट प्रसंगामुळे नाटक वर उचलले जाते. (सुरुवातीचे स्वगत बोर वाटले.. कालबाह्य म्हटले तरी चालेल.. पण त्यावेळाच्या नाटकाची गरज असावी) तर ... सांगायचं म्हणजे हा धागा लै भारी आहे .. नेहमी वर येत रहावा हीच इच्छा !

हेमंतकुमार 03/02/2024 - 15:58
"अशी पाखरे येती"
प्रेमात पडावे असे आहेच !! वातावरणनिर्मिती उत्कृष्ट . आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 07/02/2024 - 17:32
आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..
हा ... हा .... हा .... हा .... ! अगदी ... भारी "संस्कारीत" गप्पा ठोकणारा ! टिपि़अल हाफ पॅण्ट संघ दक्ष !

हेमंतकुमार 08/02/2024 - 20:32
अतिथी देवो भव दिग्दर्शक : विजय केंकरे विनय येडेकर, राजन भिसे, लेखा मुकुंद. दिग्दर्शकांचे नाव बघून बघायला घेतले. ठीक आहे. शेवटच्या पंधरा मिनिटात दिलेली भावनिक कलाटणी चांगली आहे परंतु मुख्य ३/४ नाटक विशेष पकड घेत नाही. अतिथी म्हणून कुटुंबात आलेल्या एकजण शेवटी ‘भलताच’ निघतो. दोन्ही पुरुष पात्रे काहीशी आक्रस्ताळी वाटली. त्या मनाने लेखा मुकुंद यांचा वावर सहज आणि चांगला आहे.

हेमंतकुमार 11/02/2024 - 07:39
आपल्याकडे प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकांबद्दल वेगळा धागा नसावा असे वाटते. म्हणून इथेच लिहीतो. क्षमस्व ! … 217 पद्मिनी धाम काल पाहिले. एक उत्कृष्ट नाट्य अनुभव ! रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित नाटक. नाटकाचे नेपथ्य अतिशय सुंदर व प्रकाशयोजनाही गूढ वातावरणाला पूरक. ज्येष्ठ कलाकार मिलिंद शिंदे (माजखोर बेरकी रावराजे) आणि इतर सर्व तरुण कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. उद्योगपती रावराजे यांनी पोसलेले एक कॉलेज. त्यातल्या प्रयोगशाळेतला एक सहाय्यक. त्याचे व रावराजे यांच्या मुलीचे-पद्मिनीचे प्रेम असते. परंतु अखेर ते असफल राहते आणि शोकांतही. नंतर रावराजांनी दुष्टबुद्धीने घेतलेला ‘बदला’ हे नाटकाचे मुख्य सूत्र. दुसरा अंक सुरू होताना रंगमंचावर जो टांगा दाखवलाय तो केवळ अप्रतिम. टांग्यात बसलेला तो सहाय्यक आणि त्याच्या जोडीला कॉलेजला देण्यासाठी म्हणून दिलेली “भीतीदायक भेटवस्तू” असते. हे दृश्य अप्रतिम ! ती भेटवस्तू कॉलेजला पोचवण्याची ‘कामगिरी’ त्याला पार पाडायची आहे. परंतु वास्तवात काहीतरी भलतेसलतेच घडते. ते प्रत्यक्ष पाहण्यातच थरार आहे .. नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल. नेपथ्य लाजबाब व संस्मरणीय !! …. नाट्य अवलोकान युट्युबवर इथे आहे.

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 04/03/2024 - 17:43
सुंदर रसग्रहण. प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकाविषयी इथं लेखनाचं स्वागत ! वाचून पहायलाच हवे असं वाटतंय ! असं सुंदर नेपथ्थ्य नाटकात वेगळेच जबरदस्त वातावरण निर्माण करते

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 04/03/2024 - 17:58
नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल.
.... खूपच स्वागतार्ह आहे हे. आजकाल बर्‍याच नाटकांच्या शेवटी हे सत्र करतात ... याच वेळी रसिकांना त्यांच्यासमवेत फोटो काढायला मिळतात. नाटक व्यवसायाला टॉनिक मिळण्यासाठी हे खूप आवश्यक आहे !

हेमंतकुमार 01/03/2024 - 21:42
फ्रान्सिस ऑगस्टीन प्र. भू. : मोहन जोशी, स्मिता जयकर अनाथालयात वाढलेला एक मुलगा आणि एक मुलगी मोठे झाल्यावर लग्न करतात. आता आपल्याला मूल होण्याआधी आपल्या घरात आजी-आजोबा पाहिजेत हा त्यांचा विचार. दोघेही अनाथ, त्यामुळे त्यांना त्यांचे आई-वडील माहित नाहीत. मग ते जोडते आपण समाजातून आई-वडीलच दत्तक का घेऊ नयेत असा विचार करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. यानंतर घरात त्या चौघांच्या गमती जमती आणि एकंदरीत कौटुंबिक नाटकाचा बाज. नाटक पूर्वार्धात पारशी पकड घेत नाही. तसेच, “तिच्या मनात आलं म्हणून तिने चहात आलं घातलं” यासारखे बाष्कळ विनोद अधूनमधून आहेत. शेवटच्या 25 मिनिटात नाटकाला कारुण्याची छान किनार दिलेली आहे. तसेच एका जोडीचे गुपित उघड झाल्याने कलाटणी मिळते. त्यामुळे नाटक काहीसे वर उचलले जाते.

हेमंतकुमार 28/03/2024 - 10:39
काचेचा चंद्र सुरेश खरे * शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर, जयंत सावरकर कर्मठ कुटुंबातील उपवर तरुणी. आईबाप तिचे लग्न जमवायच्या खटपटीत आहेत. त्या दरम्यान तिला एका चित्रनिर्मात्याकडून चित्रपटात काम करण्याची मागणी येते. त्यावरून घरात वाद होतो. त्यांच्या घरात तिचा एक सावत्र भाऊ देखील नांदत आहे. चित्रपटात जाण्यासाठी आई-वडिलांचा विरोध तर सावत्र भावाचा हट्ट असा तो पेच असतो. एकंदरीत कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून वडिलांना कर्जमुक्त करण्यासाठी ती चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेते. त्या क्षेत्रात वावरताना तिचा सावत्र भाऊ तिचा व्यवस्थापक अर्थात पुरुषी मालक बनतो. पुढे त्याच्या अहंकारापुढे ती पार कोमेजून जाते. तो तिला मद्यव्यसनी बनवतो आणि तिचे पूर्ण दमन करतो. .... शोकांतिका ! (आवडले होते व ४ वर्षांनी काल दुसऱ्यांदा पाहिले)

हेमंतकुमार 14/04/2024 - 09:30
आईशिवाय घर नाही लेखक : राजन लयपुरी व इतर कलाकार : विलास व क्षमा राज, आकांक्षा वनमाळी आणि इतर तरुणांमधील गर्दचे घातक व्यसन या सामाजिक-आरोग्य विषयावर. उद्योगपती पुरुष आणि त्याची आमदार बायको यांचे आपल्या एकुलत्या एक मुलाकडे लक्ष नसल्यामुळे त्याला लागलेले व्यसन. शोकांतिका

Shauryawaan हा डब्ड हिंदी सिनेमा तू-नळीवर दिसला. अर्धा पाहिला. उरलेला उद्यापरवा पाहीन. जबरदस्त आहे. डॉक्टर तुम्हीसुद्धा आवडले. सखाराम बाईंडर, अधांतर पाहिली. फारच अंगावर आली. खूप अस्वस्थ झालो. मित्र, वेड्याचे घर उन्हात, काचेचा चंद्र, लागूंचे नटसम्राट,ऑक्टोपस पूर्वी पाहिली होती. छान आहेत. नाट्यगृहात जाऊन पाहिली त्यातले सुधा करमरकर आणि फैयाजचे वीज म्हणाली धरतीला आवडले. एकदोन गाजलेली नाटके सुमार दर्जाची निघाली. तेव्हापासून हे धारिष्ट्य करीत नाही. त्यापेक्षा तू-नळी बरी. नाही आवडले तर सोडून देता येते. छान धागा. धन्यवाद. अवांतरः तू-नळीवर पाहिलेले लघुपट मात्र मोठ्या संख्येने चांगले निघाले. अनेक लघुपटात प्रथितयश कलाकार भूमिका करतात हे पाहून बरे वाटले.

In reply to by सुधीर कांदळकर

चौथा कोनाडा 16/04/2024 - 17:46
मासा ही अमृता सुभाष यांचा लघुपट आवर्जून पहा. एक वेगळाच आनंद देऊन जाईल. https://www.youtube.com/watch?v=orayV2fpOmY&t=15s

हेमंतकुमार 17/09/2025 - 20:56
कन्यादान * विजय तेंडुलकर यांच्या सामाजिक नाटकाचे हिंदी रूपांतर * नाथच्या भूमिकेत दर्शन जरीवाला तर ज्योतीच्या भूमिकेत मृण्मयी गोडबोले या रूपांतरात अधूनमधून मूळ मराठी वाक्ये कायम ठेवली आहेत. मराठी नाटक बघण्याचा कधी योग आला नव्हता. जातीयता या विषयावरील दमदार आणि प्रक्षोभक नाटक. काही प्रसंग अक्षरशः अंगावर येतात. नाटकाच्या अखेरच्या दहा मिनिटातला नाथ व ज्योतीचा संवाद थरकाप उडवतो आणि ‘मूल्य’ नामक गोष्टींच्या चिंधड्या उडवतो. तिच्या तोंडचे, “राक्षस पण तोच आहे आणि कवी पण तोच आहे”, हे वाक्य सदर नाटकात मराठीतच ठेवून उत्तम परिणाम साधला आहे. https://www.youtube.com/watch?v=Y7G7z_3VWjM . . . एकेकाळी तेंडुलकरांनी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “कन्यादानमधील नाथ देवळालीकर हा मी आहे आणि तो माझ्या पिढीतले मला कळणारे अनेक ‘लिबरल’ प्रवृत्तीची माणसे आहे”.

हेमंतकुमार 17/09/2025 - 20:58
गार्बो महेश एलकुंचवार प्रायोगिक नाटक आहे. नेपथ्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. फारसे कथानक असे नाही. सामाजिक टीकाटिप्पणीचा भाग आहे. प्रायोगिक बघायची सवय नसल्यामुळे डोके जड पडते. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. https://www.youtube.com/watch?v=c_Wln9ImFhA . . . . कथा कुणाची व्यथा कुणा गो. गं. पारखी नाटक दुसऱ्यांना पाहिले. चांगले आहे. रहस्यकथा वाचून त्यातून खून करण्याची कल्पना मिळते हा विषय. प्रसाद पंडित यांनी खलनायकाची भूमिका उत्तम वठवली आहे. https://www.youtube.com/watch?v=Tak73S-b1Xg
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत. मध्यंतरी पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

पुस्तक परिचय: बनगरवाडी - लेखक: व्यंकटेश माडगुळकर

सुजित जाधव ·

गवि 31/03/2023 - 08:59
छान लिहिले आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या लिखाणाबद्दल काय बोलावे? कोवळे दिवस, सत्तांतर आणि बरेच काही. याखेरीज त्यांचे कथाकथन (कथावाचन म्हणता येत नाही इतके अस्सल नैसर्गिक) हाही एक पैलू अनेकांना माहीत नसू शकतो याही खेरीज त्यांचा अन्य एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते निसर्गप्रेमी आणि निसर्ग अभ्यासक होते. पक्षी मित्र होते. नशिबाने कॉलेज काळात, एका निसर्ग विषयक सेमिनार मध्ये पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी मी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचा अनुभव घेतला आहे. व्यक्ती म्हणून देखील ते प्रेमळ आणि लोभस व्यक्तिमत्त्व होते.

In reply to by गवि

सुजित जाधव 31/03/2023 - 14:54
धन्यवाद..!! आंतरजालावर त्यांच्या पुस्तकांबद्दल माहिती वाचत असताना मलापण बऱ्याच गोष्टी समजल्या. त्यांची बाकीची पुस्तके पण वाचणार आहे. सध्या त्यांचेच माणदेशी माणसं वाचतोय..

तुमचा लेख संग्राह्य झाला आहे. पुस्तक वाचले होते. अमोल पालेकरांच्या चित्रपटाचे खूप कौतूक ऐकलं आहे. एकदा बघायला हवा. या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/03/2023 - 18:17
राम देशमुख यांनी इंग्रजीत 'द व्हिलेज हॅड नो वॉल्स' या नावाने भाषांतर केले आहे.
या बद्दल इंग्रजी वाचकांचा अभिप्राय या बद्दल काही कळु शकते का ? मराठी साहित्यातील अश्या इंग्रजी भाषांतरीत पुस्त़कांचे कसे स्वागत होते ? याचा प्रचार कसा केला जातो ? खप किती होतो ? याच्यावर इंग्रजीमध्ये / इतर भारतीय भाषांमध्ये परिक्षण / समिक्षण लिहिले जाते का ?

nutanm 01/04/2023 - 03:51
मला ही कादंबरी first yr.arts होती व पुष्पा भावे मॅडम शिकवायच्या. तेव्हा मला तिचे इतके महत्व कळले नव्हते व सुुप्रसिद्ध समीक्षक पुष्पा भावेबाई यांचे शिकवणे ही कळले नाही पण त्या खूप विस्तृत विवेचन करत असत. त्या वयाला १६/१७ च्या ते अतिशय कंटाळवाणे वाटे. कारण रोज एकतर पोटात भूक लागली असे व त्यांची ऊच्च दर्जाची भाषा कळत नसे आमच्या शाळेतून काॅलेजात आलेल्या शाळेतील शिक्षकआपली आईवडिलांसारखी काळजी घेतात.अशा मला तरी आपले आपण बघा व करा परीक्षेची तयारी करा प्रत्येक विषयाला वेगवेगळी पुस्तके वाचा व notes काढा मग परीक्षेत उत्तरे लिहा असे होते भाषेला फक्त क्रमिक पुस्तक असे .बाकी economics , indian economy, economic history याला अशीच तयारी करावी लागे .

In reply to by nutanm

चौथा कोनाडा 04/04/2023 - 17:32
मला ही कादंबरी first yr.arts होती व पुष्पा भावे मॅडम शिकवायच्या. तेव्हा मला तिचे इतके महत्व कळले नव्हते व सुुप्रसिद्ध समीक्षक पुष्पा भावेबाई यांचे शिकवणे ही कळले नाही पण त्या खूप विस्तृत विवेचन करत असत. त्या वयाला १६/१७ च्या ते अतिशय कंटाळवाणे वाटे. कारण रोज एकतर पोटात भूक लागली असे व त्यांची ऊच्च दर्जाची भाषा कळत नसे

!!

चौकस२१२ 01/04/2023 - 05:50
व्यंकटेश माडगूळकर वाह.... त्यांच्या लिखाणातून जे ग्रामीण भागातील चित्र उभं राहतं / व्यक्ती गावगाडा / निसर्ग ते फार लोभसवाणे आहे ... विनोदी ढंगाने ग्रामीण भागातील इरसाल पणा दाखवणारे म्हणजे शंकर पाटील ,,, ज्यांना माहित नाही त्यांना मी जरूर सुचवेन कि पाटलांचे कथाकथन नक्की ऐकावे

Bhakti 01/04/2023 - 16:05
छान परिचय! सध्या आमचे हे हेच पुस्तक वाचत आहेत.नंतर मी वाचेन. ग्रामीण लोकजीवन कथा कायम बीज एक सशक्त विषय असते. हा कथा परिचय वाचून 'ख्वाडा' सिनेमा आठवला.धनगर समाजाची कथा, त्यातला नायक छान सिनेमा आहे.'गाणं वाजू द्या 'आदर्श शिंदेंनी गायलेले गाणं माझं आवडतं गाणं आहे. तुम्ही व्यंकटेश माडगूळकर यांचेच दुसरं पुस्तक वाचताय,त्या पुस्तक परिचयाची उत्सुकता आहे.

In reply to by Bhakti

सुजित जाधव 01/04/2023 - 21:51
धन्यवाद..! नक्की वाचा.. दुसऱ्या पुस्तकाचा परिचय वाचायची तुम्हाला उत्सुकता आहे हे ऐकून छान वाटलं..मस्त आहे ते पण.. लवकरच लिहिणार आहे त्या पुस्तकाचा परिचय..

व्यं मां नी एकदा कुठेतरी "व्यं. दि. माडगुळकर" अशी सही केली. त्यावेळी त्यांचे भाऊ ग.दि.मा. लोकप्रिय होते. तर कोणीतरी ती सही चूक असेल असे वाटुन ग.दि. माडगुळकर असे सुधारले. :) यावरुन धडा घेउन व्यं.दि. नी आपली सही नेहमीसाठी बदलली आणि पूर्ण नाव लिहायला सुरुवात केली.

छान लिहिलंय. व्यंकटेश माडगुळकरांची कादंबरी मला बीएच्या ऐच्छिक मराठी घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायला होती. पण, पहिल्यांदाच जेव्हा कादंबरी वाचली तेव्हा कादंबरी वाचून झाल्यावर ती पात्रे आणि कथानकाने जो काय आनंद दिला तो आनंद कायमच राहीला. मास्तर, कारभारी, अंजी, आयुब, दुष्काळ, मेंढ्या, त्या सर्व घटना-पात्रांबरोबर आपण त्या गावातच वावरतो असे वाटायला लागते. कारभा-याचं निधन, मास्तराची बदली सोबत करणारा आयुब आणि दुष्काळामुळे गाव सोडुन जाणारी गावातली माणसं-मेंढरं, या घटनांनी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. सिनेमाही सुंदर आहे, कादंबरीबद्दल छान लिहिलंय. लिहिते राहा. आभार. -दिलीप बिरुटे

संग्रही आहे ,बरेच वेळा वाचन करतो प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव येतो. बनगरवाडी वडिलांसाठी वाचनालयातून आणले होते पण तेंव्हा चांदोबा,कुमार ,अरेबियन नाईट्स, गुलबकावली, सिहांसन बत्तिशी सारखी पुस्तके वाचायचे वय असल्याने व पुढे महाराष्ट्र सोडावा लागला म्हणून मागे पडले. पुस्तक परिचय छान.

गवि 31/03/2023 - 08:59
छान लिहिले आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या लिखाणाबद्दल काय बोलावे? कोवळे दिवस, सत्तांतर आणि बरेच काही. याखेरीज त्यांचे कथाकथन (कथावाचन म्हणता येत नाही इतके अस्सल नैसर्गिक) हाही एक पैलू अनेकांना माहीत नसू शकतो याही खेरीज त्यांचा अन्य एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते निसर्गप्रेमी आणि निसर्ग अभ्यासक होते. पक्षी मित्र होते. नशिबाने कॉलेज काळात, एका निसर्ग विषयक सेमिनार मध्ये पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी मी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचा अनुभव घेतला आहे. व्यक्ती म्हणून देखील ते प्रेमळ आणि लोभस व्यक्तिमत्त्व होते.

In reply to by गवि

सुजित जाधव 31/03/2023 - 14:54
धन्यवाद..!! आंतरजालावर त्यांच्या पुस्तकांबद्दल माहिती वाचत असताना मलापण बऱ्याच गोष्टी समजल्या. त्यांची बाकीची पुस्तके पण वाचणार आहे. सध्या त्यांचेच माणदेशी माणसं वाचतोय..

तुमचा लेख संग्राह्य झाला आहे. पुस्तक वाचले होते. अमोल पालेकरांच्या चित्रपटाचे खूप कौतूक ऐकलं आहे. एकदा बघायला हवा. या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/03/2023 - 18:17
राम देशमुख यांनी इंग्रजीत 'द व्हिलेज हॅड नो वॉल्स' या नावाने भाषांतर केले आहे.
या बद्दल इंग्रजी वाचकांचा अभिप्राय या बद्दल काही कळु शकते का ? मराठी साहित्यातील अश्या इंग्रजी भाषांतरीत पुस्त़कांचे कसे स्वागत होते ? याचा प्रचार कसा केला जातो ? खप किती होतो ? याच्यावर इंग्रजीमध्ये / इतर भारतीय भाषांमध्ये परिक्षण / समिक्षण लिहिले जाते का ?

nutanm 01/04/2023 - 03:51
मला ही कादंबरी first yr.arts होती व पुष्पा भावे मॅडम शिकवायच्या. तेव्हा मला तिचे इतके महत्व कळले नव्हते व सुुप्रसिद्ध समीक्षक पुष्पा भावेबाई यांचे शिकवणे ही कळले नाही पण त्या खूप विस्तृत विवेचन करत असत. त्या वयाला १६/१७ च्या ते अतिशय कंटाळवाणे वाटे. कारण रोज एकतर पोटात भूक लागली असे व त्यांची ऊच्च दर्जाची भाषा कळत नसे आमच्या शाळेतून काॅलेजात आलेल्या शाळेतील शिक्षकआपली आईवडिलांसारखी काळजी घेतात.अशा मला तरी आपले आपण बघा व करा परीक्षेची तयारी करा प्रत्येक विषयाला वेगवेगळी पुस्तके वाचा व notes काढा मग परीक्षेत उत्तरे लिहा असे होते भाषेला फक्त क्रमिक पुस्तक असे .बाकी economics , indian economy, economic history याला अशीच तयारी करावी लागे .

In reply to by nutanm

चौथा कोनाडा 04/04/2023 - 17:32
मला ही कादंबरी first yr.arts होती व पुष्पा भावे मॅडम शिकवायच्या. तेव्हा मला तिचे इतके महत्व कळले नव्हते व सुुप्रसिद्ध समीक्षक पुष्पा भावेबाई यांचे शिकवणे ही कळले नाही पण त्या खूप विस्तृत विवेचन करत असत. त्या वयाला १६/१७ च्या ते अतिशय कंटाळवाणे वाटे. कारण रोज एकतर पोटात भूक लागली असे व त्यांची ऊच्च दर्जाची भाषा कळत नसे

!!

चौकस२१२ 01/04/2023 - 05:50
व्यंकटेश माडगूळकर वाह.... त्यांच्या लिखाणातून जे ग्रामीण भागातील चित्र उभं राहतं / व्यक्ती गावगाडा / निसर्ग ते फार लोभसवाणे आहे ... विनोदी ढंगाने ग्रामीण भागातील इरसाल पणा दाखवणारे म्हणजे शंकर पाटील ,,, ज्यांना माहित नाही त्यांना मी जरूर सुचवेन कि पाटलांचे कथाकथन नक्की ऐकावे

Bhakti 01/04/2023 - 16:05
छान परिचय! सध्या आमचे हे हेच पुस्तक वाचत आहेत.नंतर मी वाचेन. ग्रामीण लोकजीवन कथा कायम बीज एक सशक्त विषय असते. हा कथा परिचय वाचून 'ख्वाडा' सिनेमा आठवला.धनगर समाजाची कथा, त्यातला नायक छान सिनेमा आहे.'गाणं वाजू द्या 'आदर्श शिंदेंनी गायलेले गाणं माझं आवडतं गाणं आहे. तुम्ही व्यंकटेश माडगूळकर यांचेच दुसरं पुस्तक वाचताय,त्या पुस्तक परिचयाची उत्सुकता आहे.

In reply to by Bhakti

सुजित जाधव 01/04/2023 - 21:51
धन्यवाद..! नक्की वाचा.. दुसऱ्या पुस्तकाचा परिचय वाचायची तुम्हाला उत्सुकता आहे हे ऐकून छान वाटलं..मस्त आहे ते पण.. लवकरच लिहिणार आहे त्या पुस्तकाचा परिचय..

व्यं मां नी एकदा कुठेतरी "व्यं. दि. माडगुळकर" अशी सही केली. त्यावेळी त्यांचे भाऊ ग.दि.मा. लोकप्रिय होते. तर कोणीतरी ती सही चूक असेल असे वाटुन ग.दि. माडगुळकर असे सुधारले. :) यावरुन धडा घेउन व्यं.दि. नी आपली सही नेहमीसाठी बदलली आणि पूर्ण नाव लिहायला सुरुवात केली.

छान लिहिलंय. व्यंकटेश माडगुळकरांची कादंबरी मला बीएच्या ऐच्छिक मराठी घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायला होती. पण, पहिल्यांदाच जेव्हा कादंबरी वाचली तेव्हा कादंबरी वाचून झाल्यावर ती पात्रे आणि कथानकाने जो काय आनंद दिला तो आनंद कायमच राहीला. मास्तर, कारभारी, अंजी, आयुब, दुष्काळ, मेंढ्या, त्या सर्व घटना-पात्रांबरोबर आपण त्या गावातच वावरतो असे वाटायला लागते. कारभा-याचं निधन, मास्तराची बदली सोबत करणारा आयुब आणि दुष्काळामुळे गाव सोडुन जाणारी गावातली माणसं-मेंढरं, या घटनांनी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. सिनेमाही सुंदर आहे, कादंबरीबद्दल छान लिहिलंय. लिहिते राहा. आभार. -दिलीप बिरुटे

संग्रही आहे ,बरेच वेळा वाचन करतो प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव येतो. बनगरवाडी वडिलांसाठी वाचनालयातून आणले होते पण तेंव्हा चांदोबा,कुमार ,अरेबियन नाईट्स, गुलबकावली, सिहांसन बत्तिशी सारखी पुस्तके वाचायचे वय असल्याने व पुढे महाराष्ट्र सोडावा लागला म्हणून मागे पडले. पुस्तक परिचय छान.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला कल्पना आहे बहुतांश मिपाकरांनी हे पुस्तक आधीच वाचलं असेल. ज्यांनी ते वाचलेलं आहे त्यांच्या आठवणींना उजाळा व ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना या पुस्तकाबद्दल माहिती मिळावी यासाठी हा परिचय लिहीत आहे. काही दिवसांपूर्वी मी ही कादंबरी वाचली..लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची मी वाचलेली ही पहिलीच कादंबरी होती. आणि पहिलीच कादंबरी वाचून मी लेखकाच्या प्रेमात पडलो.. मी आत्तापर्यंत वाचलेल्या कादंबऱ्यांपेक्षा ही एक वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे असं मला जाणवलं.. या सगळ्यामुळे या कादंबरीबद्दल लिहायचा मोह मला आवरता आला नाही. व्यंकटेश माडगुळकर यांनी १९५५ साली लिहलेली ही कादंबरी आहे.

चर्चबेल –लेखक ग्रेस (ऐसी अक्षरे... मेळवीन ९)

Bhakti ·

वृद्ध देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वा मध्ये जसे उजळती राजे अर्थात, सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी साहित्य संग लाभला व कवीवर्य ग्रेस यांच्या काही कविता वाचायला मिळाल्या. माणीक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस हे कवी बा. सी. मर्ढेकरां नंतरचे एक कलंदर कवी. यांची कवीता समजून घ्यायला दुर्बोध. सहसा कुणी वाटेला जात नाही पण एकदा वाटेला गेला की मग दुसरी वाट चोखाळत नाही. एक दिवस कवी ग्रेस यांची ‘आई’,अतिशय गाजलेली कविता बघीतली,वाचली. *ती गेली तेव्हा* ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा,कंदील एकटा होता हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता युट्यूबवर या कवितेचे रसग्रहण ऐकले. पैकी निमीश उमराणी यांनी केलेले रसग्रहण आवडले. अशीच कवी ग्रेस यांची *मन* , एक दुर्बोध कवीता बरेच वेळा वाचली, अंतरजालावर संदर्भ शोधले तेंव्हा थोडीफार लक्षात आली असा मी माझा गोड गैरसमज करून घेतला. *मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा श्वासांचे तोडून बंधन हे हृदय फुलांचे होई शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई सळसळते पिंपळपान वार्‍यात भुताची गाणी भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी ? मन बहर गुणांचे लोभी समईवर पदर कशाला ? हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात मन कशात लागत नाही ! वर वर साधे सोपे दिसणारे शब्द वाचताना, स्वतःला चक्रव्यूहात सापडल्याचा अनुभव करतो. दुर्बोध कवी असा शिक्कामोर्तब झाल्याचे कविलाही ज्ञात होते.त्यांनी आपली खंत खालील कवीतेत अशा प्रकारे व्यक्त केली आहे. शब्दरचना असबंध वाटते. कवीच्या मनात काय विचार असतील याची सहज कल्पना येत नाही. मी वाचलेली कवीता व समजून घेतलेला अर्थ खालील प्रमाणे. कावळ्यांचा रंग कुणी आपले म्हणेना कुणी बिलगेना गळा कंठ दाटताना झाला रंग कावळ्यांचा काळा.... नसानसांतून वाहे फणा उगारून साप, दूर सावल्यांचा घोळ माझे नाचवितो पाप... कुणी आढ्याला बांधली? रात्र आंधळ्या कौलांची चंद्र पडला मरून इथे पहाडाच्या खाली... ही कविता ग्रेस यांनी बहुतेक त्यांच्या कवितांच्या आलोचनेला त्रस्त होऊन लिहिली असावी. जसे कावळ्याला कोणी आपले म्हणत नाही त्याचा तिरस्कार करतात तसेच त्यांच्या प्रत्येक कविते वर दुर्बोधतेचा आरोप केला. कवीवर्य म्हणतात लोकांना माझ्या कवितांबद्दल सांगून सांगून माझा कंठ दाटून येतो आणि शेवटी माझा रंगही कावळ्याच्या रंगाप्रमाणे काळा पडतो. त्यांचे काही कवितासंग्रह वाचतोय. कविता समजून घेण्यात खुप आनंद होतो. बरेच काही लिहीता येईल पण आपण थोडक्यात पुस्तक परिचय दिला आहे त्याने उत्सुकता वाढली आहे. पुढच्या फेरीत नक्कीच घेणार व वाचणार. आपण नेहमीच छान लिहीता. कविवर्य ग्रेस यांना सादर अभिवादन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 27/03/2023 - 17:24
धन्यवाद! खुप छानच वेध घेतला आहे. दुर्बोध काव्य.... याबाबत ग्रेस म्हणतात "माझी कविता वाचून , जेव्हा त्यातल्या भावना तुम्हाला खरं तर बोचल्या असतात तेव्हा तुम्ही स्वतः वरच चिडतात, आणि ते काव्य दुर्बोध म्हणता" मला तर त्या सृजनात्मक वाटतात.जे कोणालाही उमगले नाही ते त्यांनी शब्दमाधुर्याने सजवले.

वसईच्या सिसिलिया कार्व्हालो यांचा चर्चबेल नावाचा एक कथासंग्रह आहे. त्याचे शीर्षक याच कवितेवरून घेतले असावे. कधी भेट झालीच तर विचारायला हवे. असो. छान, सुरेख लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

छान लिहिलंय आवडलं. अजून सविस्तर लिहायला पाहिजे. ग्रेस म्हणजे दुर्बोध, कळत नाही वगैरे वाचण्यापूर्वीच असा भडीमार झालेले आपण सुरुवात केली की सगळं आवडीने वाचतो. गेले उकरुन घर नाही भिंतींना ओलावा भर ओंजळी चांदणे करु पाचूचा गिलावा. -दिलीप बिरुटे

वृद्ध देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वा मध्ये जसे उजळती राजे अर्थात, सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी साहित्य संग लाभला व कवीवर्य ग्रेस यांच्या काही कविता वाचायला मिळाल्या. माणीक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस हे कवी बा. सी. मर्ढेकरां नंतरचे एक कलंदर कवी. यांची कवीता समजून घ्यायला दुर्बोध. सहसा कुणी वाटेला जात नाही पण एकदा वाटेला गेला की मग दुसरी वाट चोखाळत नाही. एक दिवस कवी ग्रेस यांची ‘आई’,अतिशय गाजलेली कविता बघीतली,वाचली. *ती गेली तेव्हा* ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा,कंदील एकटा होता हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता युट्यूबवर या कवितेचे रसग्रहण ऐकले. पैकी निमीश उमराणी यांनी केलेले रसग्रहण आवडले. अशीच कवी ग्रेस यांची *मन* , एक दुर्बोध कवीता बरेच वेळा वाचली, अंतरजालावर संदर्भ शोधले तेंव्हा थोडीफार लक्षात आली असा मी माझा गोड गैरसमज करून घेतला. *मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा श्वासांचे तोडून बंधन हे हृदय फुलांचे होई शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई सळसळते पिंपळपान वार्‍यात भुताची गाणी भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी ? मन बहर गुणांचे लोभी समईवर पदर कशाला ? हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात मन कशात लागत नाही ! वर वर साधे सोपे दिसणारे शब्द वाचताना, स्वतःला चक्रव्यूहात सापडल्याचा अनुभव करतो. दुर्बोध कवी असा शिक्कामोर्तब झाल्याचे कविलाही ज्ञात होते.त्यांनी आपली खंत खालील कवीतेत अशा प्रकारे व्यक्त केली आहे. शब्दरचना असबंध वाटते. कवीच्या मनात काय विचार असतील याची सहज कल्पना येत नाही. मी वाचलेली कवीता व समजून घेतलेला अर्थ खालील प्रमाणे. कावळ्यांचा रंग कुणी आपले म्हणेना कुणी बिलगेना गळा कंठ दाटताना झाला रंग कावळ्यांचा काळा.... नसानसांतून वाहे फणा उगारून साप, दूर सावल्यांचा घोळ माझे नाचवितो पाप... कुणी आढ्याला बांधली? रात्र आंधळ्या कौलांची चंद्र पडला मरून इथे पहाडाच्या खाली... ही कविता ग्रेस यांनी बहुतेक त्यांच्या कवितांच्या आलोचनेला त्रस्त होऊन लिहिली असावी. जसे कावळ्याला कोणी आपले म्हणत नाही त्याचा तिरस्कार करतात तसेच त्यांच्या प्रत्येक कविते वर दुर्बोधतेचा आरोप केला. कवीवर्य म्हणतात लोकांना माझ्या कवितांबद्दल सांगून सांगून माझा कंठ दाटून येतो आणि शेवटी माझा रंगही कावळ्याच्या रंगाप्रमाणे काळा पडतो. त्यांचे काही कवितासंग्रह वाचतोय. कविता समजून घेण्यात खुप आनंद होतो. बरेच काही लिहीता येईल पण आपण थोडक्यात पुस्तक परिचय दिला आहे त्याने उत्सुकता वाढली आहे. पुढच्या फेरीत नक्कीच घेणार व वाचणार. आपण नेहमीच छान लिहीता. कविवर्य ग्रेस यांना सादर अभिवादन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 27/03/2023 - 17:24
धन्यवाद! खुप छानच वेध घेतला आहे. दुर्बोध काव्य.... याबाबत ग्रेस म्हणतात "माझी कविता वाचून , जेव्हा त्यातल्या भावना तुम्हाला खरं तर बोचल्या असतात तेव्हा तुम्ही स्वतः वरच चिडतात, आणि ते काव्य दुर्बोध म्हणता" मला तर त्या सृजनात्मक वाटतात.जे कोणालाही उमगले नाही ते त्यांनी शब्दमाधुर्याने सजवले.

वसईच्या सिसिलिया कार्व्हालो यांचा चर्चबेल नावाचा एक कथासंग्रह आहे. त्याचे शीर्षक याच कवितेवरून घेतले असावे. कधी भेट झालीच तर विचारायला हवे. असो. छान, सुरेख लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

छान लिहिलंय आवडलं. अजून सविस्तर लिहायला पाहिजे. ग्रेस म्हणजे दुर्बोध, कळत नाही वगैरे वाचण्यापूर्वीच असा भडीमार झालेले आपण सुरुवात केली की सगळं आवडीने वाचतो. गेले उकरुन घर नाही भिंतींना ओलावा भर ओंजळी चांदणे करु पाचूचा गिलावा. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
चर्चबेल –लेखक ग्रेस (लघुलेखसंग्रह) a शब्दयात्री असल्याने शब्द कधी अलगद कुशीत येतात तर कधी दूर दूर वाळवांटामध्ये तप्त होत असतात.अलगद कुशीत येण्याचे दोर म्हणजे ग्रेस यांच्या कविता रसग्रहण! सांजवेळा,थरथरती कातर संध्याकाळ,सूर्याच्या सांज रंगवेली,पापणीचा ओलसर वाळवंट,ह्रुदयाचा आर्त कावळा,मधेच ज्ञानेश्वर यांचा लख्ख प्रकाश ,पाउसाच्या थेंबओळी,गर्द झाडी- सूर्याचे किरणांचे खेळ,झाडांच्या पानांच्या –पक्ष्यांच्या गळाभेटी,माणसाच्या आत्म्याच्या संवेदना, अनुभूतीची हाक आणि आणखिन व्यापक सर्व लाभत राहते ग्रेस

माझी आवडती पुस्तके भाग: २

सुजित जाधव ·

Bhakti 14/03/2023 - 11:42
छान! यापैकी आठ वाचली आहेत ,ती १० वर्षांपूर्वी! तुम्ही वाचनाचा पाहिला टप्पा पार केलाय.आता एक रिसर्च घटक घेऊन विविध पुस्तक वाचा किंवा एकाच लेखकाची सलग तीन तरी पुस्तके वाचा.... -आगाऊ भक्ती ;) -पुस्तकप्रेमी

In reply to by Bhakti

सुजित जाधव 14/03/2023 - 14:48
धन्यवाद ताई..!! माझी वाचनाची चव बदलण्यासाठी, नवीन विषयांची माहिती मिळवण्याकरिता वेगवेगळी पुस्तकं वाचायचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. आणि याआधी वि. स. खांडेकरांची सलग तीन पुस्तकं वाचली आहेत..

Bhakti 14/03/2023 - 11:42
छान! यापैकी आठ वाचली आहेत ,ती १० वर्षांपूर्वी! तुम्ही वाचनाचा पाहिला टप्पा पार केलाय.आता एक रिसर्च घटक घेऊन विविध पुस्तक वाचा किंवा एकाच लेखकाची सलग तीन तरी पुस्तके वाचा.... -आगाऊ भक्ती ;) -पुस्तकप्रेमी

In reply to by Bhakti

सुजित जाधव 14/03/2023 - 14:48
धन्यवाद ताई..!! माझी वाचनाची चव बदलण्यासाठी, नवीन विषयांची माहिती मिळवण्याकरिता वेगवेगळी पुस्तकं वाचायचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. आणि याआधी वि. स. खांडेकरांची सलग तीन पुस्तकं वाचली आहेत..
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या सर्वात आवडत्या पाच पुस्तकांबद्दलचा हा माझा दुसरा लेख आहे.. पहिल्या भागात मी दोन पुस्तकांबद्दल लिहिलंय, या भागात उरलेल्या तीन पुस्तकांबद्दल लीहतोय. पहिल्या भागाचा दुवा: माझी आवडती पुस्तके भाग: १ ३. एक होता कार्व्हर: हे पुस्तक व जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांची करुण व हृदयाला भिडणारी कहाणी अनेकांना वाईट काळात प्रेरणा देते.