मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 03/19/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Wed, 03/20/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण Wed, 03/20/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

मुक्त विहारि Wed, 03/20/2024 - 07:09
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो Wed, 03/20/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार Wed, 03/20/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख Wed, 03/20/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

चांदणे संदीप Wed, 03/20/2024 - 16:26
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 03/19/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Wed, 03/20/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण Wed, 03/20/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

मुक्त विहारि Wed, 03/20/2024 - 07:09
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो Wed, 03/20/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार Wed, 03/20/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख Wed, 03/20/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

चांदणे संदीप Wed, 03/20/2024 - 16:26
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(न्हाऊन ये त्वरेने)

ज्ञानोबाचे पैजार ·

कर्नलतपस्वी Fri, 06/30/2023 - 06:09
एक तर लईच दिवसानी आलात. वाट पाहूनी जीव शिणला... व्य नि करावा या विचारात होतो. आलात तर आलात एकादशीला आलात आणी क..... गटारी करून गेलात. आरारा... या विडंबनाला काहीतरी दुसरा शब्द सुचवा आता. मस्त. आवडले पण नाक दाबून वाचले. 🙂

जबरदस्त!! "घाणेरडी कुठची!! जा पळ, आंघोळ कर आधी"--असे सकाळचे संवाद आठवले. रच्याकने--"काळीशार मळकुटी ती " आणि "नाकातले केसुले" मीटरमध्ये येत नाहीये. गंध आसपास,--"हा गंध आसपास" महिषी जाफराबादी--गे महिषी जाफ्राबादी असे बदलल्यास बसेल :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

भागो Fri, 06/30/2023 - 15:35
मी जेव्हा केव्हा रिक्षातून/टॅॅक्सी तून प्रवास करतो तेव्हा माझे पण मीटरवर बारीक लक्ष असते.

चांदणे संदीप Fri, 06/30/2023 - 11:15
अविश्वसनीय रचना जी अहिराणी नाहीये पण काणकोण करता कोडाईकनालला जाऊन गरम पाण्याच्या कुंडात न्हाऊन इंदुरी पोह्याचा नैवेद्य कृष्णमुर्तीच्या पायावर अर्पण. कृष्णाला पोहेच गोडच लागणार. कारण एकतर ते इंदुरी आहेत. दुसरे म्हणजे बुवांच्या कढईतून आलेत. "काहीच्या काही" राहिले म्हणून हा काहीच्या काही प्रतिसाद. =)) सं - दी - प

चित्रगुप्त Fri, 06/30/2023 - 16:46
प्राचुताईंनी 'जाफरानी' शब्द प्रचलित केल्यापासून आता 'लई भारी' ऐवजी 'जाफरानी'च सुचू लगले आहे. "उघड्या पुन्हा जहाल्या ... (ललना पुलातल्या ... ) ची चालपण लागते आहे. मस्त जाफरानी प्रतिकविता.

कर्नलतपस्वी Fri, 06/30/2023 - 06:09
एक तर लईच दिवसानी आलात. वाट पाहूनी जीव शिणला... व्य नि करावा या विचारात होतो. आलात तर आलात एकादशीला आलात आणी क..... गटारी करून गेलात. आरारा... या विडंबनाला काहीतरी दुसरा शब्द सुचवा आता. मस्त. आवडले पण नाक दाबून वाचले. 🙂

जबरदस्त!! "घाणेरडी कुठची!! जा पळ, आंघोळ कर आधी"--असे सकाळचे संवाद आठवले. रच्याकने--"काळीशार मळकुटी ती " आणि "नाकातले केसुले" मीटरमध्ये येत नाहीये. गंध आसपास,--"हा गंध आसपास" महिषी जाफराबादी--गे महिषी जाफ्राबादी असे बदलल्यास बसेल :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

भागो Fri, 06/30/2023 - 15:35
मी जेव्हा केव्हा रिक्षातून/टॅॅक्सी तून प्रवास करतो तेव्हा माझे पण मीटरवर बारीक लक्ष असते.

चांदणे संदीप Fri, 06/30/2023 - 11:15
अविश्वसनीय रचना जी अहिराणी नाहीये पण काणकोण करता कोडाईकनालला जाऊन गरम पाण्याच्या कुंडात न्हाऊन इंदुरी पोह्याचा नैवेद्य कृष्णमुर्तीच्या पायावर अर्पण. कृष्णाला पोहेच गोडच लागणार. कारण एकतर ते इंदुरी आहेत. दुसरे म्हणजे बुवांच्या कढईतून आलेत. "काहीच्या काही" राहिले म्हणून हा काहीच्या काही प्रतिसाद. =)) सं - दी - प

चित्रगुप्त Fri, 06/30/2023 - 16:46
प्राचुताईंनी 'जाफरानी' शब्द प्रचलित केल्यापासून आता 'लई भारी' ऐवजी 'जाफरानी'च सुचू लगले आहे. "उघड्या पुन्हा जहाल्या ... (ललना पुलातल्या ... ) ची चालपण लागते आहे. मस्त जाफरानी प्रतिकविता.
आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच... चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी, दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.

माझी पहिली अहीराणी कविता

RDK ·

पैसा गुरुवार, 09/21/2017 - 13:26
मराठीत प्रचलित नाहीत त्या शब्दांचे अर्थ देता का? म्हणजे कविता समजेल.

पैसा गुरुवार, 09/21/2017 - 13:26
मराठीत प्रचलित नाहीत त्या शब्दांचे अर्थ देता का? म्हणजे कविता समजेल.
लेखनविषय:
काव्यरस
बठा चालना गयात ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत पण तो वट्टा

अरे पाचशे हजार

मधुका ·
लेखनविषय:
काव्यरस
(बहिणाबाईंची माफी मागून) अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही, भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही! अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं, येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!

देवाचे स्थान कुठे ।।

माहीराज ·

In reply to by स्पा

सतिश गावडे Sun, 04/03/2016 - 21:11
तसं आपण मानायचं असतं. नाहीतरी देव ही मानण्याचीच गोष्ट आहे की नाही. रच्याकने, मी वर दिलेली ओळ ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेल्या गाण्यातील आहे. हेच गाणे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातही आहे. छान वाटते ऐकायला हे गाणे.

चौकटराजा Sun, 04/03/2016 - 17:41
लाखो वर्षे अस्तिक लोकाना न सुटलेले हे हे कोडे आहे. नास्तिकाना ते पडलेलेच नाही. एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. आमचा निष्कर्ष देव जर असलाच तर त्याचे स्थान नियति इतके मोठे खचितच नाही. देव हा अंडर सेक्रेटरी असून नियति हा मन्त्रि आहे. सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे Sun, 04/03/2016 - 21:19
सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.
नियती हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. काही नकारात्मक घडले तर "नियतीपुढे कोणाचे चालत नाही" असे आपण सहजतेने म्हणतो. मानवी जीवनाची असहायता किंवा हतबलता म्हणजे नियती असे म्हणता येईल. माणूस आस्तिक असो वा नास्तिक त्याला ही परिस्थितीची अपरिहार्यता चुकत नाही. काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जात असताना जर देवाचा धावा केला तर देव धावून येतो मदतीला असे म्हणतात. अशा भाग्यवंतांचा मला हेवा वाटतो. मात्र देव धावून आला नाही तर देवाला दोष न देता नशिबाला दोष देणारे लोक जास्त पाहण्यात येतात.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा Sun, 04/03/2016 - 21:48
नियति हा केवळ नकारात्मक वापरला जाणारा शब्द नाही. एकच उदाहरण देतो. जोशी अभ्यकर हत्याकांडात आरोप्पी पोलीस॑ स्टेशनला जाउन सारखे अमुक चा काही शोध लागला का अशी चौकशी करीत. असेच ते बाहेर पडत असताना एका तिर्हाइताने त्याना पाहिले व त्याना काही दिवसापूरवी पोलिस स्टशनच्या भागात पाहिल्याचे पोलिसाना सांगेतले. त्यावरून पोलिसानी धागा पकडून एका गहन प्रकरणाचा छाडा लावला. त्या अरोपीना चौकशीची बुद्धी व त्या तिर्हाहिताने त्याचे वेळी तिथे येणे व त्यातून जोशी अभ्यन्कर गोखले हेगडे कुटूंम्बियाना न्याय मिळणे ही नियतीने घडवलेली कटू नव्हे तर गोड योजना आहे.

माहीराज गुरुवार, 02/02/2017 - 13:22
एक नियती सार्यांसाठी ..... . ...त्या देवाचे स्थान कुठे।। या ओळींसाठी माझा एकच सरळ अर्थ होता , तो म्हणजे आपण जे भाषिक, प्रांतीय आणि धार्मिक गठ पाडून आपापसात भांडतो पण सार्यांचा जन्म आणि मृत्युची परिसीमा एकच आहे, सार्यांवर अंकुश ठेवणारी नियती ही एकच आहे .... आणि अध्यात्मिक दृष्टा पाहीलंतर प्रत्येकाच्या देवाने या पृथ्वीची रचना केलेली आहे ..... म्हणुन सर्वांना माझा हाच प्रश्न आहे कि नक्की त्या देवाचे स्थान कुठे आहे ?

In reply to by स्पा

सतिश गावडे Sun, 04/03/2016 - 21:11
तसं आपण मानायचं असतं. नाहीतरी देव ही मानण्याचीच गोष्ट आहे की नाही. रच्याकने, मी वर दिलेली ओळ ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेल्या गाण्यातील आहे. हेच गाणे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातही आहे. छान वाटते ऐकायला हे गाणे.

चौकटराजा Sun, 04/03/2016 - 17:41
लाखो वर्षे अस्तिक लोकाना न सुटलेले हे हे कोडे आहे. नास्तिकाना ते पडलेलेच नाही. एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. आमचा निष्कर्ष देव जर असलाच तर त्याचे स्थान नियति इतके मोठे खचितच नाही. देव हा अंडर सेक्रेटरी असून नियति हा मन्त्रि आहे. सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे Sun, 04/03/2016 - 21:19
सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.
नियती हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. काही नकारात्मक घडले तर "नियतीपुढे कोणाचे चालत नाही" असे आपण सहजतेने म्हणतो. मानवी जीवनाची असहायता किंवा हतबलता म्हणजे नियती असे म्हणता येईल. माणूस आस्तिक असो वा नास्तिक त्याला ही परिस्थितीची अपरिहार्यता चुकत नाही. काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जात असताना जर देवाचा धावा केला तर देव धावून येतो मदतीला असे म्हणतात. अशा भाग्यवंतांचा मला हेवा वाटतो. मात्र देव धावून आला नाही तर देवाला दोष न देता नशिबाला दोष देणारे लोक जास्त पाहण्यात येतात.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा Sun, 04/03/2016 - 21:48
नियति हा केवळ नकारात्मक वापरला जाणारा शब्द नाही. एकच उदाहरण देतो. जोशी अभ्यकर हत्याकांडात आरोप्पी पोलीस॑ स्टेशनला जाउन सारखे अमुक चा काही शोध लागला का अशी चौकशी करीत. असेच ते बाहेर पडत असताना एका तिर्हाइताने त्याना पाहिले व त्याना काही दिवसापूरवी पोलिस स्टशनच्या भागात पाहिल्याचे पोलिसाना सांगेतले. त्यावरून पोलिसानी धागा पकडून एका गहन प्रकरणाचा छाडा लावला. त्या अरोपीना चौकशीची बुद्धी व त्या तिर्हाहिताने त्याचे वेळी तिथे येणे व त्यातून जोशी अभ्यन्कर गोखले हेगडे कुटूंम्बियाना न्याय मिळणे ही नियतीने घडवलेली कटू नव्हे तर गोड योजना आहे.

माहीराज गुरुवार, 02/02/2017 - 13:22
एक नियती सार्यांसाठी ..... . ...त्या देवाचे स्थान कुठे।। या ओळींसाठी माझा एकच सरळ अर्थ होता , तो म्हणजे आपण जे भाषिक, प्रांतीय आणि धार्मिक गठ पाडून आपापसात भांडतो पण सार्यांचा जन्म आणि मृत्युची परिसीमा एकच आहे, सार्यांवर अंकुश ठेवणारी नियती ही एकच आहे .... आणि अध्यात्मिक दृष्टा पाहीलंतर प्रत्येकाच्या देवाने या पृथ्वीची रचना केलेली आहे ..... म्हणुन सर्वांना माझा हाच प्रश्न आहे कि नक्की त्या देवाचे स्थान कुठे आहे ?
लेखनविषय:
काव्यरस
मान कुठे, सन्मान कुठे, सद्भावाचे भान कुठे, ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. पुजा आमची नित्याची, नैवेद्य ही नित्याचेच श्रद्धेपोटी उगाच आमुचे वादविवाद ही नित्याचेच वाटून घेतले देवही आम्ही माणुसकीचे गान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. जाती धर्माची वर्गवारी करून घेतली आम्ही जागा प्रत्येक मंदिराची वाटून घेतली आम्ही एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी गुरुवार, 10/16/2014 - 02:44
नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ गुरुवार, 10/16/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 11:58
खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 11:40
पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण गुरुवार, 10/16/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा गुरुवार, 10/16/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी गुरुवार, 10/16/2014 - 23:16
पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

अनुप ढेरे गुरुवार, 10/16/2014 - 09:34
हे ही आठवले. http://www.misalpav.com/node/2935 सर्किट, घाटावरचे भट आणि मुक्तसुनीत यांचे प्रतिसाद वाचनीय आहेत.

In reply to by असंका

बॅटमॅन गुरुवार, 10/16/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी गुरुवार, 10/16/2014 - 02:44
नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ गुरुवार, 10/16/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 11:58
खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 11:40
पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण गुरुवार, 10/16/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा गुरुवार, 10/16/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी गुरुवार, 10/16/2014 - 23:16
पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

अनुप ढेरे गुरुवार, 10/16/2014 - 09:34
हे ही आठवले. http://www.misalpav.com/node/2935 सर्किट, घाटावरचे भट आणि मुक्तसुनीत यांचे प्रतिसाद वाचनीय आहेत.

In reply to by असंका

बॅटमॅन गुरुवार, 10/16/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
लेखनविषय:
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

पाषाणभेद ·

छान. आवडली कविता. तुमच्याकडे लाख पैसे येऊ दे, पण सुपडाबाईला तुम्ही आवडले पाहिजे ना. :) भाषा आवडली. वाचतांनाही मजा आली. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर Sun, 07/14/2013 - 18:44
मस्त.. अहिराणी भाषेचा लहेजा..मराठी, हिन्दी, गुजराथी भाषांचा प्रभाव ऐकायला/वाचायला चांगला प्रेमळ वाटतो. बहिणाबाईंच्या रचना अहिराणी भाषेत आहेत असे वाटते. अशाच अजून कविता येऊ द्या. अभिनंदन.

सुधीर Sun, 07/14/2013 - 22:22
कविता आवडली. काही ठिकाणी थोडी गुजराथी सारखी वाटली.

पाषाणभेद Mon, 07/15/2013 - 08:20
प्रतिसादांबद्दल सर्व रसिक वाचकांचे मन:पुर्वक आभार. मराठीत अनेक बोलीभाषा आहेत जसे मालवणी, आगरी, वर्‍हाडी, अहिराणी आदी. खानदेश परिसर म्हणजेच जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा व नंदूरबार जिल्हा तसेच या जिल्ह्यांलगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालूका (सटाणा), मालेगाव तालूका, कळवण तालूका आदी जिल्ह्यांमध्ये ही बोलीभाषा बोलली जाते. या भागांमध्ये गुजरात तसेच मध्यप्रदेशातील काही भागही येतो. ह्या भाषेवर गुजराती भाषेचे काही संस्कार आढळतात. ऐकायला गोड वाटणारी ही बोलीभाषा प्रमाण मराठी बोलणार्‍याला सहज समजू शकते. वर उल्लेखलेल्या प्रांतांमध्ये या भाषेचे पोटभेद देखील आहेत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात, तसेच नंदूरबार धुळे जिल्ह्यात अहिराणी बोली आढळते. जळगाव जिल्ह्यात खानदेशी बोलीचा प्रभाव आढळतो. या भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहे. येथील निसर्ग अजूनही संपन्न आहे. नागर संस्कृतीचे अतिक्रमण या भागांमध्ये कमी प्रमाणात आहे. सर्वसाधारण पुर्वपरंपरा, देवआचरण, रितभात या भागातले लोक पाळतांना आढळतात. ही बोलीभाषा लिहीण्यासाठी मराठी वर्णमाला वापरली जाते. बोलीभाषांना स्वत:चे असे व्याकरण, शब्दांचे भांडार, उच्चारण शैली असते. असे असतांना प्रमाणभाषेचे बोलीभाषेवर प्रभुत्व जाणवते. बोलीभाषा साधारणत: एखाद्या प्रदेशात बोलली जाते. ती भाषा बोलणारे लोक इतर सरकारी, व्यावहारीक, शैक्षणिक व्यवहार पार पाडतांना प्रमाणभाषेचे सहाय्य घेतात. प्रमाणभाषा कायम बोलणारा व्यक्तीसमूहात मात्र बोलीभाषा बोलणारा व्यक्ती गावंढळ, गावठी, अशिक्षीत आहे असा समज होतो. असे पायंडे पडणे हे बोलीभाषांना मारक आहे. बोलीभाषांचा योग्य सन्मान हाच भाषाविकासाचा पाया आहे.

मदनबाण Mon, 07/15/2013 - 12:51
मला वाटलं समदा सुपडा साफ यावर कविता केली की काय ! ;) पण कविता आवडली. आगरी स्त्रीयांच्या नावामधे बर्‍याचदा "बाई" हा शब्द आठळुन येतो...उदा.शांताबाई इ.इ.तसेत भय्या स्त्रीयांमधे "देवी" हा शब्द आढळुन येतो उदा.राबडीदेवी. इ. :)

इरसाल Mon, 07/15/2013 - 15:17
प्रयत्न छान आहे. काही ठिकाणी काही बदल आवश्यक आहेत. महत्त्वाचे म्हणजे अहिराणी भाषेत 'ळ' नाही. तरी सटाणा-नाशिक भागामधील अहिराणीत ळ वापरला जातो.वेळ मिळताच अजुन टायपतो.

छान. आवडली कविता. तुमच्याकडे लाख पैसे येऊ दे, पण सुपडाबाईला तुम्ही आवडले पाहिजे ना. :) भाषा आवडली. वाचतांनाही मजा आली. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर Sun, 07/14/2013 - 18:44
मस्त.. अहिराणी भाषेचा लहेजा..मराठी, हिन्दी, गुजराथी भाषांचा प्रभाव ऐकायला/वाचायला चांगला प्रेमळ वाटतो. बहिणाबाईंच्या रचना अहिराणी भाषेत आहेत असे वाटते. अशाच अजून कविता येऊ द्या. अभिनंदन.

सुधीर Sun, 07/14/2013 - 22:22
कविता आवडली. काही ठिकाणी थोडी गुजराथी सारखी वाटली.

पाषाणभेद Mon, 07/15/2013 - 08:20
प्रतिसादांबद्दल सर्व रसिक वाचकांचे मन:पुर्वक आभार. मराठीत अनेक बोलीभाषा आहेत जसे मालवणी, आगरी, वर्‍हाडी, अहिराणी आदी. खानदेश परिसर म्हणजेच जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा व नंदूरबार जिल्हा तसेच या जिल्ह्यांलगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालूका (सटाणा), मालेगाव तालूका, कळवण तालूका आदी जिल्ह्यांमध्ये ही बोलीभाषा बोलली जाते. या भागांमध्ये गुजरात तसेच मध्यप्रदेशातील काही भागही येतो. ह्या भाषेवर गुजराती भाषेचे काही संस्कार आढळतात. ऐकायला गोड वाटणारी ही बोलीभाषा प्रमाण मराठी बोलणार्‍याला सहज समजू शकते. वर उल्लेखलेल्या प्रांतांमध्ये या भाषेचे पोटभेद देखील आहेत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात, तसेच नंदूरबार धुळे जिल्ह्यात अहिराणी बोली आढळते. जळगाव जिल्ह्यात खानदेशी बोलीचा प्रभाव आढळतो. या भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहे. येथील निसर्ग अजूनही संपन्न आहे. नागर संस्कृतीचे अतिक्रमण या भागांमध्ये कमी प्रमाणात आहे. सर्वसाधारण पुर्वपरंपरा, देवआचरण, रितभात या भागातले लोक पाळतांना आढळतात. ही बोलीभाषा लिहीण्यासाठी मराठी वर्णमाला वापरली जाते. बोलीभाषांना स्वत:चे असे व्याकरण, शब्दांचे भांडार, उच्चारण शैली असते. असे असतांना प्रमाणभाषेचे बोलीभाषेवर प्रभुत्व जाणवते. बोलीभाषा साधारणत: एखाद्या प्रदेशात बोलली जाते. ती भाषा बोलणारे लोक इतर सरकारी, व्यावहारीक, शैक्षणिक व्यवहार पार पाडतांना प्रमाणभाषेचे सहाय्य घेतात. प्रमाणभाषा कायम बोलणारा व्यक्तीसमूहात मात्र बोलीभाषा बोलणारा व्यक्ती गावंढळ, गावठी, अशिक्षीत आहे असा समज होतो. असे पायंडे पडणे हे बोलीभाषांना मारक आहे. बोलीभाषांचा योग्य सन्मान हाच भाषाविकासाचा पाया आहे.

मदनबाण Mon, 07/15/2013 - 12:51
मला वाटलं समदा सुपडा साफ यावर कविता केली की काय ! ;) पण कविता आवडली. आगरी स्त्रीयांच्या नावामधे बर्‍याचदा "बाई" हा शब्द आठळुन येतो...उदा.शांताबाई इ.इ.तसेत भय्या स्त्रीयांमधे "देवी" हा शब्द आढळुन येतो उदा.राबडीदेवी. इ. :)

इरसाल Mon, 07/15/2013 - 15:17
प्रयत्न छान आहे. काही ठिकाणी काही बदल आवश्यक आहेत. महत्त्वाचे म्हणजे अहिराणी भाषेत 'ळ' नाही. तरी सटाणा-नाशिक भागामधील अहिराणीत ळ वापरला जातो.वेळ मिळताच अजुन टायपतो.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत.