मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

Bhakti ·

कंजूस 30/01/2026 - 17:24
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.

गामा पैलवान 31/01/2026 - 00:05
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.

Bhakti 31/01/2026 - 11:30
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !

In reply to by Bhakti

Bhakti 31/01/2026 - 11:36
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.

In reply to by Bhakti

गामा पैलवान 01/02/2026 - 15:26
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 01/02/2026 - 20:54
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गामा पैलवान 02/02/2026 - 02:43
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 02/02/2026 - 14:02
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 14:46
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 02/02/2026 - 16:48
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 18:37
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:06
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.

कॉमी 01/02/2026 - 09:44
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?

In reply to by कॉमी

सोत्रि 01/02/2026 - 21:20
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी

प्रचेतस 01/02/2026 - 09:57
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.

In reply to by प्रचेतस

कंजूस 01/02/2026 - 20:18
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 02/02/2026 - 16:58
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.

In reply to by प्रचेतस

लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.

टर्मीनेटर 02/02/2026 - 18:54
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 02/02/2026 - 19:41
परफेक्ट..... ab .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..

सोत्रि 02/02/2026 - 19:47
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:50
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर 03/02/2026 - 00:26
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀

गामा पैलवान 02/02/2026 - 21:19
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.

कंजूस 02/02/2026 - 21:41
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.

In reply to by कंजूस

Bhakti 02/02/2026 - 21:57
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!

In reply to by Bhakti

गामा पैलवान 02/02/2026 - 23:57
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.

In reply to by Bhakti

कंजूस 03/02/2026 - 04:22
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.

लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 03/02/2026 - 10:17
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 03/02/2026 - 19:18
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....

कंजूस 03/02/2026 - 10:38
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]

In reply to by कंजूस

Bhakti 03/02/2026 - 11:50
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.

तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.

गोरगावलेकर 03/02/2026 - 13:24
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.

गवि 03/02/2026 - 13:37
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?

प्रचेतस 03/02/2026 - 14:46
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.

कंजूस 03/02/2026 - 14:56
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.

Bhakti 03/02/2026 - 17:48
योगायोगाने हॆ आजच दिसले.. 1 तुमच्या सर्वांच्या आपुलकीपूर्ण प्रतिसादने खरंच भारवले आहे_/\_ माझं पुस्तकांवर, शब्दांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी लिहिणं थांबवण शक्यच नाही पण काही काळं ब्रेक योग्य ठरेल.भेटू लवकरच!

कंजूस 30/01/2026 - 17:24
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.

गामा पैलवान 31/01/2026 - 00:05
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.

Bhakti 31/01/2026 - 11:30
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !

In reply to by Bhakti

Bhakti 31/01/2026 - 11:36
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.

In reply to by Bhakti

गामा पैलवान 01/02/2026 - 15:26
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 01/02/2026 - 20:54
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गामा पैलवान 02/02/2026 - 02:43
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 02/02/2026 - 14:02
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 14:46
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 02/02/2026 - 16:48
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही

In reply to by Bhakti

सोत्रि 02/02/2026 - 18:37
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:06
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.

कॉमी 01/02/2026 - 09:44
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?

In reply to by कॉमी

सोत्रि 01/02/2026 - 21:20
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी

प्रचेतस 01/02/2026 - 09:57
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.

In reply to by प्रचेतस

कंजूस 01/02/2026 - 20:18
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 02/02/2026 - 16:58
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.

In reply to by प्रचेतस

लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.

टर्मीनेटर 02/02/2026 - 18:54
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 02/02/2026 - 19:41
परफेक्ट..... ab .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..

सोत्रि 02/02/2026 - 19:47
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 02/02/2026 - 19:50
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर 03/02/2026 - 00:26
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀

गामा पैलवान 02/02/2026 - 21:19
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.

कंजूस 02/02/2026 - 21:41
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.

In reply to by कंजूस

Bhakti 02/02/2026 - 21:57
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!

In reply to by Bhakti

गामा पैलवान 02/02/2026 - 23:57
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.

In reply to by Bhakti

कंजूस 03/02/2026 - 04:22
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.

लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 03/02/2026 - 10:17
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 03/02/2026 - 19:18
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....

कंजूस 03/02/2026 - 10:38
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]

In reply to by कंजूस

Bhakti 03/02/2026 - 11:50
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.

तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.

गोरगावलेकर 03/02/2026 - 13:24
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.

गवि 03/02/2026 - 13:37
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?

प्रचेतस 03/02/2026 - 14:46
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.

कंजूस 03/02/2026 - 14:56
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.

Bhakti 03/02/2026 - 17:48
योगायोगाने हॆ आजच दिसले.. 1 तुमच्या सर्वांच्या आपुलकीपूर्ण प्रतिसादने खरंच भारवले आहे_/\_ माझं पुस्तकांवर, शब्दांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी लिहिणं थांबवण शक्यच नाही पण काही काळं ब्रेक योग्य ठरेल.भेटू लवकरच!
लेखनविषय:
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...

उर्जा चक्र

निनाद ·
सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार! खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो.

पत्र निमित्तमात्र

Bhakti ·

गामा पैलवान 17/01/2026 - 19:48
भक्ती, तुमचा हा परिचयपर लेख चांगला रंगला आहे. लेख वाचल्यावर एक प्रश्न पडला आहे. एखादा विचार अचूक शब्दांत उतरवायची हातवटी भाषेची की माणसाची मानायची?असा तो प्रश्न आहे. बघूया, कधी उत्तर मिळतंय. काही सापडलं तर इथे या धाग्यावर उल्लेख करेन. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 17/01/2026 - 19:48
भक्ती, तुमचा हा परिचयपर लेख चांगला रंगला आहे. लेख वाचल्यावर एक प्रश्न पडला आहे. एखादा विचार अचूक शब्दांत उतरवायची हातवटी भाषेची की माणसाची मानायची?असा तो प्रश्न आहे. बघूया, कधी उत्तर मिळतंय. काही सापडलं तर इथे या धाग्यावर उल्लेख करेन. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 सुनीता देशपांडे आणि जी. ए कुलकर्णी यांच्यातील चिंतनशील पत्रव्यवहार (काही संकलन केलेला )नुकताच स्टोरीटेलवर संवादरूपाने ऐकला. गहन व्यक्तिमत्त्वांची निखळ, मायेने ओतप्रोत मैत्री...

नरो वा कुंजरो वा

चांदणे संदीप ·
पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे

सैरभैर डायरी - २.२

कपिलमुनी ·

गवि 08/01/2026 - 11:32
वाह.. भारीच. उत्कंठा वाढत चालली आहे.. असल्या लफड्यातून वकिलाने सोडवल्यावर उगाच इकडे तिकडे न जाणेच उत्तम. घरात शिरून गप पडावे.. ;-) पुभाप्र..

अनुभव उपयोगी पडतील. रस्त्यावर कायतरी मॅटरमध्ये पडायचो व्हाईट कॉलर लोकांची विकेट जायची असल्या लफड्यात फुकटची. काही नाहीतरी खिशाला खार लागणार नी डोक्याला टेन्शन.

कपिलमुनी, उत्कंठा वाढत आहे. पण तुम्ही लिहिताना स्वतःला थोडे सैल केले आहे असे वाटले. म्हणजे, अजून जरासे कष्ट घेऊन जरा गंभीरपणाने (म्हणजे लिहिताना स्वतःला, कंटेट गंभीर नव्हे, आहे तो टोन मस्त आहे) खूप मस्त लिहिता तुम्ही. आवडले मला.

टर्मीनेटर 10/01/2026 - 14:01
सकाळपासून दोन वडापाववर पोरगा दिवसभर माझ्यासाठी पळत होता. याला फोन त्याला फोन , फाटकी पोरं पण पक्की मैत्री !
क्या बात... क्या बात... ही श्रीमंती सगळ्यांच्या नशिबात नसते! 2.2 पण मस्त 👍 और आनेदो फटाफट...

गवि 08/01/2026 - 11:32
वाह.. भारीच. उत्कंठा वाढत चालली आहे.. असल्या लफड्यातून वकिलाने सोडवल्यावर उगाच इकडे तिकडे न जाणेच उत्तम. घरात शिरून गप पडावे.. ;-) पुभाप्र..

अनुभव उपयोगी पडतील. रस्त्यावर कायतरी मॅटरमध्ये पडायचो व्हाईट कॉलर लोकांची विकेट जायची असल्या लफड्यात फुकटची. काही नाहीतरी खिशाला खार लागणार नी डोक्याला टेन्शन.

कपिलमुनी, उत्कंठा वाढत आहे. पण तुम्ही लिहिताना स्वतःला थोडे सैल केले आहे असे वाटले. म्हणजे, अजून जरासे कष्ट घेऊन जरा गंभीरपणाने (म्हणजे लिहिताना स्वतःला, कंटेट गंभीर नव्हे, आहे तो टोन मस्त आहे) खूप मस्त लिहिता तुम्ही. आवडले मला.

टर्मीनेटर 10/01/2026 - 14:01
सकाळपासून दोन वडापाववर पोरगा दिवसभर माझ्यासाठी पळत होता. याला फोन त्याला फोन , फाटकी पोरं पण पक्की मैत्री !
क्या बात... क्या बात... ही श्रीमंती सगळ्यांच्या नशिबात नसते! 2.2 पण मस्त 👍 और आनेदो फटाफट...
लेखनविषय:
लेखनप्रकार
२.१ मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या.. "हाच होता का तो?" पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले २.२ "जा मॅडम पोरींना घेऊन, मेडिकल झाली असाल तर वॉश करून येऊ दे." मॅडम पोरींना घेऊन गेल्या. "पोरींना ओळखता का या?" साहेबांचा प्रश्न . "हो साहेब .

एका किमयागाराचा थक्क करणारा प्रवास

दुसरा चान्दोबा ·

गामा पैलवान 02/01/2026 - 21:15
दुसरा चांदोबा, शेखर कपूर यांच्यावरील परिचयपर लेख उत्कट जमून आलाय. त्यांचं नाव पाहिलं की कलाकृती अस्सल असणार हेच जाणवतं. शेखर कपूरांनी जेव्हा मासूम दिग्दर्शित केला तेव्हा ते त्याचा एक भागंच बनून गेले होते. हे तथ्य फार समर्पक आहे. खरंतर हे त्यांच्या सगळ्यांच चित्रपटांत दिसून येत असावं. 'एलिझाबेथ' पाहिल्यावर चित्रपटाने पकड घेतली होती. संपल्यावर श्रेयावली पाहिली तर दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव चकित करून गेलं. मी चित्रपटांच्या बाबतीत फार बथ्थड आहे. एखादं इंग्लिश नाव अभिप्रेत होतं. भारतीय दिग्दर्शकाने मध्ययुगीन इंग्लिश वातावरण उभं करणं विस्मयकारक होतं. तेव्हापासून हे नाव डोक्यांत घट्ट बसलं आहे. 'एलिझाबेथ' पाहिला तेव्हा त्या वातावरणांत अतिशय रमून जायला झालं होतं. त्यामागील कार्यकारणभाव हा लेख वाचून उलगडला. शेखर कपूर केवळ स्वत:च नाही तर प्रेक्षकांनाही त्या चित्रपटाचा भाग बनवतात. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट घेऊन घरी परततो. आ.न., -गा.पै.

दाढीवाल्या शेखर कपूर ना कुठल्यातरी सिरीयलमध्ये पाहील्याचे आठवतेय. पण दिग्दर्शक म्हणुन त्यांची एव्ह्ढी मोठी कारकिर्द प्रथमच समजली.

गामा पैलवान 02/01/2026 - 21:15
दुसरा चांदोबा, शेखर कपूर यांच्यावरील परिचयपर लेख उत्कट जमून आलाय. त्यांचं नाव पाहिलं की कलाकृती अस्सल असणार हेच जाणवतं. शेखर कपूरांनी जेव्हा मासूम दिग्दर्शित केला तेव्हा ते त्याचा एक भागंच बनून गेले होते. हे तथ्य फार समर्पक आहे. खरंतर हे त्यांच्या सगळ्यांच चित्रपटांत दिसून येत असावं. 'एलिझाबेथ' पाहिल्यावर चित्रपटाने पकड घेतली होती. संपल्यावर श्रेयावली पाहिली तर दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव चकित करून गेलं. मी चित्रपटांच्या बाबतीत फार बथ्थड आहे. एखादं इंग्लिश नाव अभिप्रेत होतं. भारतीय दिग्दर्शकाने मध्ययुगीन इंग्लिश वातावरण उभं करणं विस्मयकारक होतं. तेव्हापासून हे नाव डोक्यांत घट्ट बसलं आहे. 'एलिझाबेथ' पाहिला तेव्हा त्या वातावरणांत अतिशय रमून जायला झालं होतं. त्यामागील कार्यकारणभाव हा लेख वाचून उलगडला. शेखर कपूर केवळ स्वत:च नाही तर प्रेक्षकांनाही त्या चित्रपटाचा भाग बनवतात. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट घेऊन घरी परततो. आ.न., -गा.पै.

दाढीवाल्या शेखर कपूर ना कुठल्यातरी सिरीयलमध्ये पाहील्याचे आठवतेय. पण दिग्दर्शक म्हणुन त्यांची एव्ह्ढी मोठी कारकिर्द प्रथमच समजली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९४५ मध्ये लाहोरच्या एका सुसंस्कृत कुटुंबात एका मुलाचा जन्म होतो . वडील डॉक्टर, प्रेमळ आई ,—घरात एक आनंदी वातावरण होतं. पण १९४७ च्या फाळणीनंतर सगळंच बदललं. चहुकडे रक्ताची होळी खेळली जात होती. अशाच एका रात्री, आपल्या वडिलांची भरभराटीची प्रॅक्टिस, ते वैभव आणि लाहोरची ती माया सोडून ते कुटुंब रक्ताळलेल्या वाटेवरून भारताकडे निघालं, खरं तर निघालं नव्हतं तर निघावं लागल होत. फाळणीच्या काळात एका 'निर्वासितांच्या' ट्रेनमध्ये तो मुलगा , त्यांची बहीण आणि आई प्रवास करत होते. ती ट्रेन म्हणजे केवळ लोखंडाचा डबा नव्हती, तर ते मृत्यूचं साक्षात रूप होतं. वाटेत दंगलखोरांनी ट्रेन रोखली.

'लोकधन' (ऐसी अक्षरे - ३३) ते..... 'The folk आख्यान'

Bhakti ·

सुक्या 17/11/2025 - 13:17
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 17/11/2025 - 15:56
हो 'Folk लोक' हा वेगळा कार्यक्रम तर 'folk प्रबोधन' हा एक तिसराच कार्यक्रम आहे.आता त्यांच्यापण रील्स पाहिल्या फॉरमॅट तिन्ही कार्यक्रमांचा सारखाच वाटत आहे. पण The folk आख्यान व या दोन कार्यक्रमांचे निर्माते वेगवेगळे आहेत

सुक्या 17/11/2025 - 13:18
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही. ३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट --> नारळ ४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी --> मका

स्वधर्म 17/11/2025 - 16:20
नक्की बघणार आहे. भारतातली सगळीकडची तरून मुले मुली टेलर स्विप्ट, के पॉप, योयो हनिसिंग किंवा संजय राठोड यांच्या रॅप आणि पॉपच्या धुनीत असताना असा कार्यक्रम बसवणे आणि तो इतका यशस्वी होणे हेच एक आश्चर्य आहे.

In reply to by स्वधर्म

या आश्चर्य वाटण्यातून हुश्शार प्रगल्भ लोक काही समजून घेत आहेत का? का नेहमीप्रमाणे तरूण पिढीला बोलून मोकळे? एखादी गोश्ट जबरदस्ती, समजत नसताना, (कित्येकदा सान्गणार्यलाही समजत नसताना) कुठलाही सन्दर्भ नसताना मारून मुट्कून का करावी? पण तीच गोश्ट, जर समजाऊन सान्गून, सन्दर्भ देऊन, आम्ही कसे भारी तुम्ही कसे नालायक असा आव न आणता सान्गितली तर "हल्लीची तरूण पिढी" सुद्धा ऐकते याचे उदाहरण म्हणून याकडे बघताय का? तरी बर कार्यक्रम करणारे २५ तील तरूण आहेत. घ॑रातल्या लहान मुलाला, ज्याला इतर वेळेला रात्री जागरण केले तर ओरडले जाते, अश्या मुलाला देवाचे आहे म्हणून किन्वा करायचे असते म्हणून जागरण गोन्धळाला बसवले तर ते कन्टाळणारच ना? मला स्वतहाला ताल वाद्यान्चे प्रचन्ड आकर्शण आहे. पण घरात देवीच्या नावाने गोन्धळ घातला जात असाताना तो सगळा धूर नाका डोळ्यात जात असताना तिथे जबर्दस्ती का बसून रहायचे हेच कळत नव्हते. अशा वेळेला तिथे ताल वाद्य कुठले वाजतेय याकडे लक्श जाईल का? ते एक वाद्य आहे आणि त्याचा आनन्द घेता येऊ शकतो हे कधी जाणवलेच नाही. तरूण पिढीला बोलताना, तुम्ही स्वतहा किति जुन्या गोश्ती करत आहात, साम्भळून ठेवत आहात? का नवीन गोश्ती टाळत आहात? तरूण पिढीशी नाव न ठेवता, अक्कल शिकवण्याचा आव न आणता सम्वाद साधताय का? उस्ताद जाकीर हुसेन यान्चा एक विडीओ बघितला होता. त्यान्ची मुलाखत घेनारी बाई अशीच हल्लीच्या तरूण पिढीबद्दल बोलत होती. पण त्या माणसाने ठामपणे तिचे म्हणणे खोडून काढ्ले. त्यान्नी सान्गितले की मला स्वतहाला अशी अनेक तरूण मुले माहीत आहेत ज्यानी भारतीय शास्त्रीय सन्गीताला वाहून घेतले आहे. मी स्वतहा तुम्हाला त्यान्च्याकडे घेऊन जातो. पण याला तिची तयारी नव्हती.

In reply to by अनामिक सदस्य

स्वधर्म 19/11/2025 - 16:51
आपला संपूर्ण प्रतिसाद हा माझा प्रतिसाद तरूण मुलांवर टिका करणारा होता या समजातून लिहिलेला आहे. पण तसे म्हणायचे नव्हते. केवळ सध्याचा मला जाणवणारा तरुण मुलांचा ट्रेंड हा बराचसा पॉप रॅप इ. कडे असताना हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा आनंद सांगितला होता. त्यामुळे 'अक्कल शिकवणे' वगैरे कांगावा विनाकारण आहे.

पुण्यात जर कार्यक्रम झाला तर नक्कीच बघणार. माझ्या लहानपणी आमच्या घरी चुल,बंब, उखळ,जाते,खलबत्ता,पाटा वरवंटा आडकित्ता अशा अनेक वस्तू वापरात होत्या. आमच्या आजीने अरूंद तोडाच्या (मध्यमा आत जाईल एव्हढे लहान तोंड) चौकोनी बाटलीत लाकडी पायाचा पलंग त्याच्यावर गादी ,गादीवर बाहुली आणी त्याच्यावर हांड्यांझुबंर लटकलेले छत विणले होते. ती बाटली आजही आमच्या आजोळी आहे. मामाच्या मुलांना किती सांगीतले की संग्रहालयात द्या ऐकत नाही. एव्हढी अप्रतिम कलाकृती प्रसिद्धीवीना नष्ट होत चाललीय याचे वाईट वाटते. माझी आई, मावशी ओव्या,उखाणे,वाळवणाची गाणी म्हणताना ऐकले आहे. काही कोडी आजही लक्षात आहेत. १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. सुर्य ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. पणती ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी चुल ८. चुलीत गेली अन् गर्भार झाली.. भाकरी १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई मोटरगाडी ११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई सुई अफलातून होते आपले पूर्वज. अनेक अद्भुत गोष्टी पारतंत्र्यामुळे नष्ट झाल्या. मुठभर मियाँ त्याला हातभर दाढी.....??? आजच्या शहरातील पिढीला नाही सांगता येणार. आणखीन काही आठवले तर परत येईन. लेख आवडला,धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/11/2025 - 17:37
अय्यो भारीच! अजून काही पर्यायी उत्तरं ;) १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. नारळ ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. शेंबूड (यक् ;)) ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी सहाण १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई घंटा

Bhakti 17/11/2025 - 17:41
The folk आख्यानाने त्यांची गाणी प्रसिद्ध नाही केली.लोक मोबाईल शूट करतात ही बाब वेगळी!पण हा अभंग त्यांच्या युट्यूब चॅनलवर आहे.कमाल..कमाल गीत आहे. https://youtu.be/OCmUqw8CDMk?si=1xMY7V9Fd8qo708_

सुक्या 17/11/2025 - 13:17
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 17/11/2025 - 15:56
हो 'Folk लोक' हा वेगळा कार्यक्रम तर 'folk प्रबोधन' हा एक तिसराच कार्यक्रम आहे.आता त्यांच्यापण रील्स पाहिल्या फॉरमॅट तिन्ही कार्यक्रमांचा सारखाच वाटत आहे. पण The folk आख्यान व या दोन कार्यक्रमांचे निर्माते वेगवेगळे आहेत

सुक्या 17/11/2025 - 13:18
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही. ३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट --> नारळ ४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी --> मका

स्वधर्म 17/11/2025 - 16:20
नक्की बघणार आहे. भारतातली सगळीकडची तरून मुले मुली टेलर स्विप्ट, के पॉप, योयो हनिसिंग किंवा संजय राठोड यांच्या रॅप आणि पॉपच्या धुनीत असताना असा कार्यक्रम बसवणे आणि तो इतका यशस्वी होणे हेच एक आश्चर्य आहे.

In reply to by स्वधर्म

या आश्चर्य वाटण्यातून हुश्शार प्रगल्भ लोक काही समजून घेत आहेत का? का नेहमीप्रमाणे तरूण पिढीला बोलून मोकळे? एखादी गोश्ट जबरदस्ती, समजत नसताना, (कित्येकदा सान्गणार्यलाही समजत नसताना) कुठलाही सन्दर्भ नसताना मारून मुट्कून का करावी? पण तीच गोश्ट, जर समजाऊन सान्गून, सन्दर्भ देऊन, आम्ही कसे भारी तुम्ही कसे नालायक असा आव न आणता सान्गितली तर "हल्लीची तरूण पिढी" सुद्धा ऐकते याचे उदाहरण म्हणून याकडे बघताय का? तरी बर कार्यक्रम करणारे २५ तील तरूण आहेत. घ॑रातल्या लहान मुलाला, ज्याला इतर वेळेला रात्री जागरण केले तर ओरडले जाते, अश्या मुलाला देवाचे आहे म्हणून किन्वा करायचे असते म्हणून जागरण गोन्धळाला बसवले तर ते कन्टाळणारच ना? मला स्वतहाला ताल वाद्यान्चे प्रचन्ड आकर्शण आहे. पण घरात देवीच्या नावाने गोन्धळ घातला जात असाताना तो सगळा धूर नाका डोळ्यात जात असताना तिथे जबर्दस्ती का बसून रहायचे हेच कळत नव्हते. अशा वेळेला तिथे ताल वाद्य कुठले वाजतेय याकडे लक्श जाईल का? ते एक वाद्य आहे आणि त्याचा आनन्द घेता येऊ शकतो हे कधी जाणवलेच नाही. तरूण पिढीला बोलताना, तुम्ही स्वतहा किति जुन्या गोश्ती करत आहात, साम्भळून ठेवत आहात? का नवीन गोश्ती टाळत आहात? तरूण पिढीशी नाव न ठेवता, अक्कल शिकवण्याचा आव न आणता सम्वाद साधताय का? उस्ताद जाकीर हुसेन यान्चा एक विडीओ बघितला होता. त्यान्ची मुलाखत घेनारी बाई अशीच हल्लीच्या तरूण पिढीबद्दल बोलत होती. पण त्या माणसाने ठामपणे तिचे म्हणणे खोडून काढ्ले. त्यान्नी सान्गितले की मला स्वतहाला अशी अनेक तरूण मुले माहीत आहेत ज्यानी भारतीय शास्त्रीय सन्गीताला वाहून घेतले आहे. मी स्वतहा तुम्हाला त्यान्च्याकडे घेऊन जातो. पण याला तिची तयारी नव्हती.

In reply to by अनामिक सदस्य

स्वधर्म 19/11/2025 - 16:51
आपला संपूर्ण प्रतिसाद हा माझा प्रतिसाद तरूण मुलांवर टिका करणारा होता या समजातून लिहिलेला आहे. पण तसे म्हणायचे नव्हते. केवळ सध्याचा मला जाणवणारा तरुण मुलांचा ट्रेंड हा बराचसा पॉप रॅप इ. कडे असताना हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा आनंद सांगितला होता. त्यामुळे 'अक्कल शिकवणे' वगैरे कांगावा विनाकारण आहे.

पुण्यात जर कार्यक्रम झाला तर नक्कीच बघणार. माझ्या लहानपणी आमच्या घरी चुल,बंब, उखळ,जाते,खलबत्ता,पाटा वरवंटा आडकित्ता अशा अनेक वस्तू वापरात होत्या. आमच्या आजीने अरूंद तोडाच्या (मध्यमा आत जाईल एव्हढे लहान तोंड) चौकोनी बाटलीत लाकडी पायाचा पलंग त्याच्यावर गादी ,गादीवर बाहुली आणी त्याच्यावर हांड्यांझुबंर लटकलेले छत विणले होते. ती बाटली आजही आमच्या आजोळी आहे. मामाच्या मुलांना किती सांगीतले की संग्रहालयात द्या ऐकत नाही. एव्हढी अप्रतिम कलाकृती प्रसिद्धीवीना नष्ट होत चाललीय याचे वाईट वाटते. माझी आई, मावशी ओव्या,उखाणे,वाळवणाची गाणी म्हणताना ऐकले आहे. काही कोडी आजही लक्षात आहेत. १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. सुर्य ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. पणती ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी चुल ८. चुलीत गेली अन् गर्भार झाली.. भाकरी १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई मोटरगाडी ११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई सुई अफलातून होते आपले पूर्वज. अनेक अद्भुत गोष्टी पारतंत्र्यामुळे नष्ट झाल्या. मुठभर मियाँ त्याला हातभर दाढी.....??? आजच्या शहरातील पिढीला नाही सांगता येणार. आणखीन काही आठवले तर परत येईन. लेख आवडला,धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/11/2025 - 17:37
अय्यो भारीच! अजून काही पर्यायी उत्तरं ;) १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. नारळ ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. शेंबूड (यक् ;)) ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी सहाण १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई घंटा

Bhakti 17/11/2025 - 17:41
The folk आख्यानाने त्यांची गाणी प्रसिद्ध नाही केली.लोक मोबाईल शूट करतात ही बाब वेगळी!पण हा अभंग त्यांच्या युट्यूब चॅनलवर आहे.कमाल..कमाल गीत आहे. https://youtu.be/OCmUqw8CDMk?si=1xMY7V9Fd8qo708_
लेखनप्रकार
इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे. मला मानवाच्या इतिहासाबद्‌दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य वाचून सध्यातरी समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बद‌लून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची भीती आहे. डॉ.

व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचन‌ प्रयोग

Bhakti ·

सुबोध खरे 29/09/2025 - 20:27
आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी राजे शिवाजी संग्रहालयात सुद्धा वॅन गॉफ ची बरीच चित्रे आहेत. मी ऍमस्टरडॅम येथे जाऊन व्हॅन गॉफ चे संग्रहालय पाहिले. २४ युरो तिकीट होते. म्हणजे आजमितीस जवळ जवळ ३००० रुपये. त्यानंतर मुद्दाम आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजीराजे संग्रहालयाला भेट दिली असता आपले संग्रहालय किती श्रीमंत आहे ते लक्षात आले. अनेक युरोपीय चित्रकारांची चित्रे आहेत राजा रविवर्मा यांची सुद्धा. अक्षरशः तीन तास पाहिल्यावरसुद्धा संग्रहालय बरेच बाकी होते. आणि तिकीट केवळ ६० रुपये. आपल्याला आपल्या गोष्टींची किंमत नाही हेच खरे. ज्यांना व्हॅन गोफ यांची चित्रे पाहायची इच्छा आहे त्यांनी मुंबईचा म्युझियम अर्थात छत्रपती शिवाजी राजे संग्रहालय याला जरूर भेट द्यावी

चौथा कोनाडा 29/09/2025 - 22:17
खुपच अप्रतिम आहे व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचनाचा प्रयोग. माझ्या मित्रामुळे पुण्यातील एफटीआयआयच्या प्रेक्षागृहात हे अभिवाचन ऐकण्याचा योग आला. त्यात अभिनेते गिरिश परदेशी आणि अभिनेत्री अश्विनी गिरी आणि इतर अभिवाचक होते.... हा लेख ही सुंदर ..... व्हान गॉग याच्या बद्दल उत्सुकता जागवणारा आणि अभिवाचन ऐकण्याचा अनुभव घेण्याला प्रवृत्त करणारा.

चित्रगुप्त 01/10/2025 - 04:09
व्हिन्सेंट व्हान गॉगबद्दल सखोल माहितीसाठी खालील माहितीपट अवश्य बघावा : बीबीसी डॉक्युमेंटरी (तीन भाग एकत्रितपणे, सुमारे अडीच तास) Waldemar On The Life Of Vincent Van Gogh | Vincent: The Full Story (Full Series) https://youtu.be/365r2m7_B10?si=zcy25utexGfjKbvX

सुबोध खरे 29/09/2025 - 20:27
आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी राजे शिवाजी संग्रहालयात सुद्धा वॅन गॉफ ची बरीच चित्रे आहेत. मी ऍमस्टरडॅम येथे जाऊन व्हॅन गॉफ चे संग्रहालय पाहिले. २४ युरो तिकीट होते. म्हणजे आजमितीस जवळ जवळ ३००० रुपये. त्यानंतर मुद्दाम आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजीराजे संग्रहालयाला भेट दिली असता आपले संग्रहालय किती श्रीमंत आहे ते लक्षात आले. अनेक युरोपीय चित्रकारांची चित्रे आहेत राजा रविवर्मा यांची सुद्धा. अक्षरशः तीन तास पाहिल्यावरसुद्धा संग्रहालय बरेच बाकी होते. आणि तिकीट केवळ ६० रुपये. आपल्याला आपल्या गोष्टींची किंमत नाही हेच खरे. ज्यांना व्हॅन गोफ यांची चित्रे पाहायची इच्छा आहे त्यांनी मुंबईचा म्युझियम अर्थात छत्रपती शिवाजी राजे संग्रहालय याला जरूर भेट द्यावी

चौथा कोनाडा 29/09/2025 - 22:17
खुपच अप्रतिम आहे व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचनाचा प्रयोग. माझ्या मित्रामुळे पुण्यातील एफटीआयआयच्या प्रेक्षागृहात हे अभिवाचन ऐकण्याचा योग आला. त्यात अभिनेते गिरिश परदेशी आणि अभिनेत्री अश्विनी गिरी आणि इतर अभिवाचक होते.... हा लेख ही सुंदर ..... व्हान गॉग याच्या बद्दल उत्सुकता जागवणारा आणि अभिवाचन ऐकण्याचा अनुभव घेण्याला प्रवृत्त करणारा.

चित्रगुप्त 01/10/2025 - 04:09
व्हिन्सेंट व्हान गॉगबद्दल सखोल माहितीसाठी खालील माहितीपट अवश्य बघावा : बीबीसी डॉक्युमेंटरी (तीन भाग एकत्रितपणे, सुमारे अडीच तास) Waldemar On The Life Of Vincent Van Gogh | Vincent: The Full Story (Full Series) https://youtu.be/365r2m7_B10?si=zcy25utexGfjKbvX
लेखनविषय:
लेखनप्रकार
व्हिन्सेंट व्हान गॉग (१८५३-१८९०) १ उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले.

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

मन ·

मन 06/08/2025 - 15:00
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे. "यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात. . "गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून

गवि 06/08/2025 - 15:29
ऑ?? चक्क मनोबा ? अलभ्य लाभ. छान लिहिलं आहे. विचारांचा फ्लो रोचक आहे. पुन्हा वाचतो जरा.
"आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे.
सही...

Bhakti 06/08/2025 - 16:32
अभ्यासपूर्ण समीक्षा आवडली.ठकीशी संवाद नाव आवडलं. नाटकाचे विविध काळातील भाग ही चांगली संकल्पना वाटते पण तेव्हाचे आताचे वातावरण ही तुलनाच का करावी वाटते अनेक लेखकांना काय माहित? गिरीजा ओक आवडतेच,माझ्या लेकीचे नाव तेच आहे.

परीक्षण आवडले.
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो.
यावरूनच हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले. राम गणेश गडकरी अर्थातच माहित आहेत. शाळेत असताना 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा होती त्यामुळे दिवाकरही माहीत आहेत. पण वर्तक कोण? गद्रे कोण? कडदोरा/करदोटा म्हणजे काय? बोंबला. हे वाचतानाच इतके डोक्यावरून जात असेल तर प्रत्यक्ष बघायला गेलो तर घंटा काही कळणार नाही हे समजलेच :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मन 05/01/2026 - 10:53
1 वर्तक कोण? वर्तक, तापकीर गल्ली हा पुण्यातला प्रसिद्ध पत्ता आहे. म्हणजे त्याच्या आसपासची काही दुकाने, संस्था, शाळा, देवळे इत्यादी जुन्या पुणेकरांच्या बोलण्यात येत असतात. ती जास्त चांगली सांगू शकतील. बेसिकली पुण्याचा "heritage walk" म्हणून करायचा ठरला तर विविध भागांचा उल्लेख करत जुन्या पुण्यातून फिरताना लागणाऱ्या भागांच्या उल्लेखा दरम्यान ते आलं होतं. 2 गद्रे कोण? विचारवंत, लेखक म्हणून त्यांचा नाटकात उल्लेख आला होता इतकंच आठवत आहे . तपशिलांची मलाही कल्पना नाही. :( 3 कडदोरा/करदोटा म्हणजे काय? : दृष्ट लागू नये म्हणून लहान बाळांच्या कंबरेभोवती काळा दोरा बांधतात तो कडदोरा/करदोटा.

चौथा कोनाडा 06/08/2025 - 22:25
भारी लिहिलंय .. चंसुकु म्हणत्तात तसेच ' हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले" याची दुरुक्ती करितो. अशी चर्चात्म्क नाट्ये उच्च्भ्रू लोकांना आवडत असतात ... त्यात जर बरा कन्टेन्ट असेल तर मलाही बघायला आवडतात. (एक प्रसंग आठवतो " चंप्र देशपांडे यांचे एक प्रायोगिक नाटक (आता नाव आठवत नाही) बघायला मी माझ्या पत्निला हौसेने सुदर्शनला घेऊन गेलो ... दोन्ही नट दिग्गज होते ... (या नाटकाचे नंतर प्रयोग झाल्याचे आठवत नाही, म्हणून बरेच तपशिल विसरलो) एक लेखक आणि एक बिल्डर असावा असा बिझनेसमन दोघांच्या चर्चा आणि वाद प्रतिवाद नाटक रंगत चालले... मध्यंतरानंतर याचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा याच्यात असं घडतं .... तेव्हा पण खुपच पुनरुक्ती होऊ लागली ... अर्ध्या नंतर कंटाळा येऊ लागला .. नाटक एकदाचे संपले आणि गाढ झोपलेल्या बायकोला मी उठवून घरी नेले)
दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
या वाक्याशी सहमत. '

मन 19/08/2025 - 21:33
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार

तसाही मी नाटकांच्या वाटेला फार जात नाही, पण चुकुन हे असे काही बघितले तर डोक्याची मंडई व्हायची. आणि अभ्यास वगैरे करुन कोण बघायला जाणार हो? त्यपरीस आपल्याला ते हाणामारीचे आणि रडारडीचे शिनेमेच बरे. काय ते तिथल्यातिथे फेडुन यायचं. घरी आल्यावर ताप नको.

मन 06/08/2025 - 15:00
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे. "यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात. . "गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून

गवि 06/08/2025 - 15:29
ऑ?? चक्क मनोबा ? अलभ्य लाभ. छान लिहिलं आहे. विचारांचा फ्लो रोचक आहे. पुन्हा वाचतो जरा.
"आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे.
सही...

Bhakti 06/08/2025 - 16:32
अभ्यासपूर्ण समीक्षा आवडली.ठकीशी संवाद नाव आवडलं. नाटकाचे विविध काळातील भाग ही चांगली संकल्पना वाटते पण तेव्हाचे आताचे वातावरण ही तुलनाच का करावी वाटते अनेक लेखकांना काय माहित? गिरीजा ओक आवडतेच,माझ्या लेकीचे नाव तेच आहे.

परीक्षण आवडले.
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो.
यावरूनच हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले. राम गणेश गडकरी अर्थातच माहित आहेत. शाळेत असताना 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा होती त्यामुळे दिवाकरही माहीत आहेत. पण वर्तक कोण? गद्रे कोण? कडदोरा/करदोटा म्हणजे काय? बोंबला. हे वाचतानाच इतके डोक्यावरून जात असेल तर प्रत्यक्ष बघायला गेलो तर घंटा काही कळणार नाही हे समजलेच :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मन 05/01/2026 - 10:53
1 वर्तक कोण? वर्तक, तापकीर गल्ली हा पुण्यातला प्रसिद्ध पत्ता आहे. म्हणजे त्याच्या आसपासची काही दुकाने, संस्था, शाळा, देवळे इत्यादी जुन्या पुणेकरांच्या बोलण्यात येत असतात. ती जास्त चांगली सांगू शकतील. बेसिकली पुण्याचा "heritage walk" म्हणून करायचा ठरला तर विविध भागांचा उल्लेख करत जुन्या पुण्यातून फिरताना लागणाऱ्या भागांच्या उल्लेखा दरम्यान ते आलं होतं. 2 गद्रे कोण? विचारवंत, लेखक म्हणून त्यांचा नाटकात उल्लेख आला होता इतकंच आठवत आहे . तपशिलांची मलाही कल्पना नाही. :( 3 कडदोरा/करदोटा म्हणजे काय? : दृष्ट लागू नये म्हणून लहान बाळांच्या कंबरेभोवती काळा दोरा बांधतात तो कडदोरा/करदोटा.

चौथा कोनाडा 06/08/2025 - 22:25
भारी लिहिलंय .. चंसुकु म्हणत्तात तसेच ' हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले" याची दुरुक्ती करितो. अशी चर्चात्म्क नाट्ये उच्च्भ्रू लोकांना आवडत असतात ... त्यात जर बरा कन्टेन्ट असेल तर मलाही बघायला आवडतात. (एक प्रसंग आठवतो " चंप्र देशपांडे यांचे एक प्रायोगिक नाटक (आता नाव आठवत नाही) बघायला मी माझ्या पत्निला हौसेने सुदर्शनला घेऊन गेलो ... दोन्ही नट दिग्गज होते ... (या नाटकाचे नंतर प्रयोग झाल्याचे आठवत नाही, म्हणून बरेच तपशिल विसरलो) एक लेखक आणि एक बिल्डर असावा असा बिझनेसमन दोघांच्या चर्चा आणि वाद प्रतिवाद नाटक रंगत चालले... मध्यंतरानंतर याचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा याच्यात असं घडतं .... तेव्हा पण खुपच पुनरुक्ती होऊ लागली ... अर्ध्या नंतर कंटाळा येऊ लागला .. नाटक एकदाचे संपले आणि गाढ झोपलेल्या बायकोला मी उठवून घरी नेले)
दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
या वाक्याशी सहमत. '

मन 19/08/2025 - 21:33
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार

तसाही मी नाटकांच्या वाटेला फार जात नाही, पण चुकुन हे असे काही बघितले तर डोक्याची मंडई व्हायची. आणि अभ्यास वगैरे करुन कोण बघायला जाणार हो? त्यपरीस आपल्याला ते हाणामारीचे आणि रडारडीचे शिनेमेच बरे. काय ते तिथल्यातिथे फेडुन यायचं. घरी आल्यावर ताप नको.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी: 1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही. 2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं 3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती.