मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोझाम्बिकची निवडणूकः १

आतिवास ·

जेपी Sat, 09/13/2014 - 20:01
लै देश फिरता बॉ तुमी. आपल्याला परकीय राजकारणाच जास्ती कळत नाय. 'मी पयला ' एवढे बोलुन माझे मोजके शब्द संपवतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Sat, 09/13/2014 - 21:52
धागा आणि धागाकर्तीचं नाव वाचूनच धागा उघडला. मालिका रंगणार हे नक्की! पुभाप्र.

रमेश आठवले Sat, 09/13/2014 - 22:50
--"इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक ‘उमेदवाराला’ मत न देता ‘पक्षाला’ मत देतात. पक्षाला जितकी मते मिळतात त्या प्रमाणानुसार National Assembly मध्ये त्या पक्षाला जागा दिल्या जातात. अर्थात पक्ष उमेदवार आधी जाहीर करतात की कोणते सदस्य National Assembly मध्ये जाणार याबाबत पक्ष निकाल जाहीर झाल्यावर निर्णय घेतो हे मला अजून नीट समजलेलं नाही (भाषेची अडचण!) – मला समजलं की त्याबद्दल इथं लिहीन--" जर्मनी मध्ये वर दिलेल्या पद्धती प्रमाणेच निवडणुका होतात.जर्मनी आपल्या सारखेच federal republic आहे. तेथे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची यादी आधी प्रसिद्ध होते आणि मिळालेल्या मतांच्या आधारावर ज्या जागा मिळतील तेवढ्या जागांवर आधी जाहीर केलेल्या यादीतील अनुक्रमाप्रमाणे पार्टीचे सदस्य निवडून येतात.

In reply to by रमेश आठवले

आतिवास Sat, 09/13/2014 - 23:07
या माहितीसाठी धन्यवाद. पण मला अजून इथं राष्ट्राध्यक्ष सोडून इतर उमेदवारांची नावं, त्यांचा प्रचार हे काहीच दिसत नाही. त्यामुळे मनात शंका आहे की नावं आधी जाहीर होतात की नंतर. शोध घेतेय, काहीतरी सापडेल त्या दिशेने ही आशा आहे.

श्रीरंग_जोशी Sun, 09/14/2014 - 00:06
नेहमीच्या माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली जात नसलेल्या देशाबद्दल वाचायला मिळत आहे. पुढच्या भागात अधिक फोटो असल्यास आनंद वाटेल.

In reply to by शिद

आतिवास Mon, 09/15/2014 - 11:59
धन्यवाद. या निमित्ताने वेगवेगळ्या व्यवस्था मला समजत आहेत. तुमच्या दुव्याचा आधार घेऊन मी हा दुवा शोधला; पण त्यातून सविस्तर माहिती मिळत नाही.

सुनील Mon, 09/15/2014 - 12:13
हा भाग आवडला. पुभाप्र. भारतीय पर्यटकांच्या रडारवर सहसा नसलेले देश जसे की जॉर्डन, पेरु, मोझांबिक इत्यादी ठिकाणे पाहिली जाताहेत आणि त्याविषयीची माहिती मराठीत लिहिली जात आहे, हे छानच!

जेपी Sat, 09/13/2014 - 20:01
लै देश फिरता बॉ तुमी. आपल्याला परकीय राजकारणाच जास्ती कळत नाय. 'मी पयला ' एवढे बोलुन माझे मोजके शब्द संपवतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Sat, 09/13/2014 - 21:52
धागा आणि धागाकर्तीचं नाव वाचूनच धागा उघडला. मालिका रंगणार हे नक्की! पुभाप्र.

रमेश आठवले Sat, 09/13/2014 - 22:50
--"इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक ‘उमेदवाराला’ मत न देता ‘पक्षाला’ मत देतात. पक्षाला जितकी मते मिळतात त्या प्रमाणानुसार National Assembly मध्ये त्या पक्षाला जागा दिल्या जातात. अर्थात पक्ष उमेदवार आधी जाहीर करतात की कोणते सदस्य National Assembly मध्ये जाणार याबाबत पक्ष निकाल जाहीर झाल्यावर निर्णय घेतो हे मला अजून नीट समजलेलं नाही (भाषेची अडचण!) – मला समजलं की त्याबद्दल इथं लिहीन--" जर्मनी मध्ये वर दिलेल्या पद्धती प्रमाणेच निवडणुका होतात.जर्मनी आपल्या सारखेच federal republic आहे. तेथे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची यादी आधी प्रसिद्ध होते आणि मिळालेल्या मतांच्या आधारावर ज्या जागा मिळतील तेवढ्या जागांवर आधी जाहीर केलेल्या यादीतील अनुक्रमाप्रमाणे पार्टीचे सदस्य निवडून येतात.

In reply to by रमेश आठवले

आतिवास Sat, 09/13/2014 - 23:07
या माहितीसाठी धन्यवाद. पण मला अजून इथं राष्ट्राध्यक्ष सोडून इतर उमेदवारांची नावं, त्यांचा प्रचार हे काहीच दिसत नाही. त्यामुळे मनात शंका आहे की नावं आधी जाहीर होतात की नंतर. शोध घेतेय, काहीतरी सापडेल त्या दिशेने ही आशा आहे.

श्रीरंग_जोशी Sun, 09/14/2014 - 00:06
नेहमीच्या माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली जात नसलेल्या देशाबद्दल वाचायला मिळत आहे. पुढच्या भागात अधिक फोटो असल्यास आनंद वाटेल.

In reply to by शिद

आतिवास Mon, 09/15/2014 - 11:59
धन्यवाद. या निमित्ताने वेगवेगळ्या व्यवस्था मला समजत आहेत. तुमच्या दुव्याचा आधार घेऊन मी हा दुवा शोधला; पण त्यातून सविस्तर माहिती मिळत नाही.

सुनील Mon, 09/15/2014 - 12:13
हा भाग आवडला. पुभाप्र. भारतीय पर्यटकांच्या रडारवर सहसा नसलेले देश जसे की जॉर्डन, पेरु, मोझांबिक इत्यादी ठिकाणे पाहिली जाताहेत आणि त्याविषयीची माहिती मराठीत लिहिली जात आहे, हे छानच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल. मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली.

सायकलींग (भाग २) - BRM - पुणे-पांचगणी-पुणे

मोदक ·

विलासराव Sat, 09/13/2014 - 14:46
आता तर घेतोच मि सायकल. २० वर्षापुर्वी साधी सायकल चालवायचा अनुभव होता बर्यापैकी. जुलै १३ ला पाँडेचरी ते अ‍ॅरोव्हीलेज हे १३-१४ किमी अंतर आठवड्यात तीनदा पार केले साध्या सायकलने. जुन १४ ला वरळी सीफेस ते नरीमन पॉईंट परत वरळी सीफेस असे अंतर पार केले. सायक्लॉथॉन या स्पर्धेत. ही सायकल गियरची होती पण मी प्रथमच चालवत असल्याने सरळ बिनागियरची असते तशी चालवली. माझा उद्देश कोणतीही स्पर्धा जिंकायचा नसुन मनस्वी सायकलभ्रमन करायचा आहे. त्यात तुम्ही सांगीतले की अचानक पडलेले एखादे स्वप्न खरे व्हावे तसे काहीसे झाले होते. कोणतीही विशेष तयारी न करता केवळ मानसिकदृष्ट्या कणखर राहून केलेली ही महत्वाकांक्षी राईड पूर्ण झाली. संपूर्ण राईड दरम्यान सायकलने अप्रतीम सोबत केली. त्यामुळे उत्साह वाढलाच नाहीतर टिकुनही राहील.

In reply to by विलासराव

मोदक Mon, 09/15/2014 - 13:17
धन्यवाद विलासराव.. सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!!

In reply to by मोदक

विलासराव Mon, 09/15/2014 - 13:23
सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. लवकरच. फक्त साधारण किंमत काय रेंजमधे आहे ते लिहा. घ्यायची तर आहेच. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!! धन्यवाद.

एस Sat, 09/13/2014 - 15:39
पुण्यातले बरेचजण सायकलिंग करतात. दिव्या ताटे, सुनील रणवरे वगैरे मंडळी माहीत आहेत. तुम्ही अतिशय योग्य मार्गावर आहात. पॅरिस-ब्रेख्त-पॅरिस आणि लंडन-एडिंगबर्ग-लंडन करून या. खूपखूप शुभेच्छा आणि जियो!!!

जेपी Sat, 09/13/2014 - 16:50
आवडल. पुर्वी तुळजापुरला असताना तुळजापुर-सोलापुर ट्रिप सायकल वर बर्याच केल्यात.परतीच्या वेळेसे घाट जाम दमवायचा.अता सवय सुटली पण पुन्हा चालु करावी ही इच्छा झालीय धागा वाचुन.

श्रीरंग_जोशी Sat, 09/13/2014 - 20:19
तुझ्या चिकाटीला अन खिलाडूवृत्तीला सादर दंडवत. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन. एक सुचवणी - लौकरच एखादा गोप्रोसारखा कॅमेरा घेऊन टाक व अशा कामगिरीचे चित्रणही कर.

प्यारे१ Sat, 09/13/2014 - 21:57
ज ब र द स्त! जिद्दी आहेस बाबा. सगळ्याच बाबतीत. हॅट्स ऑफ. बाकी ते पसरणी घाटात पहिलं लागतं ते बुवासाहेब मंदिर. मला आठवतंय तसं मंदिर आहेच. यात्रा सुद्धा असते छोट्या प्रमाणावर. (इथं मोठा अपघात झालेला २००३ ला. गुजरातची एक बस खाली कोसळून २३-२४ जण गेलेले) त्याच्या पुढचं छोटं मंदीर साधारण १५ वर्षांपूर्वी एस्टॅब्लिश झालंय. (तिथं एक डंपर उलटलेला १७-१८ वर्षांपूर्वी. ३-४ जण गेले.) आणि घाटाचा 'सी' संपतो तो 'थापा'. उजवीकडं असलेलं १०० मीटरचं छोटं निमुळतं पठार. आता त्याला हॅरिसन फॉली असं गोंडस नाव दिलंय. टेबललँड/ टेबल टॉप/ पॉईंट अगदी वर गेल्यानंतर आहे. तिथं तू 'सायकल'वर गेला नसशील.

सुबोध खरे Sun, 09/14/2014 - 11:22
मोदक राव _^_ साष्टांग नमस्कार. आमच्याच्यान मोटार सायकलीवर होईना २०८ किमी एका दिवसात . आळस हा माणसाचा शत्रू आहे.

सौंदाळा Mon, 09/15/2014 - 11:50
_/\_ दंडवत स्वीकारा. नसरापुरलाच प्रचंड दमलेला असुन चांदणी चौकापर्यंत सायकल मारलीस!! नंतर कसे वाटले? म्हणजे हात, पाय दुखणे वगैरे काही झाले का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मोदक Mon, 09/15/2014 - 11:58
ही BRM पूर्ण करणे स्वतःसाठी ठेवलेले एक टारगेट होते. त्यामुळे "पार करायचेच्च" असे ठरवले होते. नंतर फार त्रास झाला नाही. पाय - त्यातही मांड्या खूप भरून आल्या होत्या. बहुदा त्याचे कारण मी शेवटी शेवटी हार्ड गेअर्स वर सायकल चालवली हे असावे. गरम पाण्याने शेकल्यानंतर पाय एकदम ठीक झाले. उजवा हात पुढे दोन तीन दिवस थोडा बधीर राहिला होता. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी काहीही उपचार न करता फक्त दोन तीन दिवस थांबा असा सल्ला दिला आणि बधीरपणा हळूहळू निघून गेला. "आपल्याला इतके अंतर पार करता आले" ही झींग इतकी चढली होती की या गोष्टींचे फारसे काही वाटले नाही. :D

बाळ सप्रे Mon, 09/15/2014 - 12:19
पहिल्या २.५ तासात ६०किमी करुन पूर्ण १३ तास लागले हे ऐकुन जरा धडकी भरतेय.. आणि अंतरही २०० ऐवजी २०९ !! सध्या माझा ५-६ तासाच्या राईडमध्ये अ‍ॅव्हरेज स्पीड जेमतेम २०-२१ पडतोय.. आणि घाट तर मोठा वीक पॉईंट आहे.. घाटात स्पीड ९-१० वर येतो.. पण तरिही जमवायच यावेळी..

In reply to by बाळ सप्रे

मोदक Mon, 09/15/2014 - 13:14
अहो खूप सोपे आहे सगळे. अंतर २०० ऐवजी २०९ किमी आहे यात नवीन काही नाही. आपल्या घरापासून ते स्टार्टिंग पॉईंट आणि BRM नंतर एंड पॉईंटपासून घर हेही अंतर गृहीत धरा. (या हिशोबाने माझे त्या दिवशीचे २४० किमी सहज झाले असतील.) तुमचा अ‍ॅवरेज स्पीड भरपूर आहे. तो तसाच ठेवा फक्त सध्या सहा तासच राईड करू शकत असाल तर तो वेळ वाढवा. १०० मीटर पळणारा आणि ४०० मीटर पळणारा जसे वेगवेगळी आखणी करतात तसे काहीसे... घाटात १० किमी स्पीड म्हणजे तुम्ही निष्णात सायकलपटू आहात. घाटातला सराव वाढवायचा असेल तर पुणे-पानशेत-कादवे घाट-वेल्हे-पाबे घाट-पुणे हा रूट किंवा आजुबाजूला असलेले सर्व घाट नियमीतपणे पार करा. तुम्हाला सरावाला वेळ आहे याचा पुरेपूर फायदा करून घ्या. चुकुनही अपघात होईल अशा जोखमीने सायकल चालवू नका सायकल हेल्मेट नेहमी वापरा - शहरात फिरताना सुद्धा. भरपूर सायकलींग करताना शरीरावर ताण येवून स्नायूंना दुखापत होईल इतके जास्त प्रयत्न कधीही करू नका. तुमची सायकल कोणती आहे..? आणि BRM कोणत्या सायकलवर करणार आहात..?

In reply to by बाळ सप्रे

मोदक Mon, 09/15/2014 - 17:45
काय राव 'धडकी भरली' वगैरे बोलून चेष्टा करताय का..? ;) तुम्ही जर "टर्नी / २६" टायर / २१ गिअर्स या कन्फीगरेशन वर हा स्पीड राखत असाल तर BRM हसत खेळत पूर्ण कराल. (माझ्या सायकलचे कन्फीगरेशन "अ‍ॅसेरा / २८" टायर आणि २४ गिअर्स" हे आहे.)

पिलीयन रायडर Mon, 09/15/2014 - 12:53
काल दिवस भर तुळशीबागेत जायचे १० वेळा प्लान करुन आणि मोडुन झाले इतका आळस आहे... तू ऑफिस करुन कसं रे बाबा इतकं केलस!!! खुप मोठी गोष्ट केलीस मित्रा!!

मृत्युन्जय Mon, 09/15/2014 - 14:10
अभिनंदन. उत्साहाचा झरा आहे तुझ्यात :) एक शंका: हायवे वर इतकी गर्दी असते. गाड्या भरधाव वेगात असतात. शहरात सुद्धा. मग सायकलिंग करताना त्याचा त्रास होत नाही का? विशेषतः हायवेवर काय काळजी घ्यावी लागते भरधाव गाड्यांच्या अन्नुषंगाने?

In reply to by मृत्युन्जय

मोदक Mon, 09/15/2014 - 16:00
सायकलींग करताना गाड्यांचा खूप त्रास होतो. शहरात जास्त. हायवेवर सायकल शक्यतो सर्वात डावीकडे असलेल्या पांढर्‍या पट्ट्याच्याही बाजूने (रस्ता संपण्यास एक दीड फूट अंतर असते) तेथूनच चालवावी लागते. सायकलला टेललाईट्स असणे गरजेचे असते कारण 'समोर एक सायकल आहे' हे मागच्या गाड्यांना लवकर दिसणे खूप महत्वाचे असते. रिफ्लेक्टीव वेस्टने ते काम आणखी सोपे होते. सर्वाधीक त्रास होतोत तो वाहनचालकांच्या मनोवृत्तीचा. "सायकलच आहे" म्हणून कट मारणे, खूप जवळून खूप वेगाने जाणे, उगाचच मध्ये येवून थांबणे, सायकलला ओव्हरटेक करून लगेच डावीकडे येणे आणि थांबणे. वगैरे प्रकार चीड आणतात. माझी अनेक वाहनचालकांची या विषयावरून बाचाबाची झालेली आहे. थांबलेल्या सायकलशी छेडछाड करणारे महाभागही भरपूर असतात. उत्साहाने सायकल बघत बघत रेंगाळतात आणि गेअर बदलून जातात. हायवेवर वाहनांचा त्रास होतोच होतो पण तेथे समोरच्या वाहनाचा आकार आणि वेग पाहता आपणच आपल्या जीवाला सांभाळून असणे आवश्यक असते. रॅम (Race Across America) सारख्या प्रतिष्ठीत स्पर्धेलाही अपघात ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक सायकलपटूसोबत एक सपोर्ट टीम चारचाकीसह संपूर्णवेळ सोबत असतानाही या रेसमध्ये आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. दोन जण मरण पावले आहेत आणि अनेक जण जायबंदी झाले आहेत. अशाच एका घटनेचा आऊटसाईड मासिकातील दुवा http://www.outsideonline.com/outdoor-adventure/biking/road-biking/Wrecked.html

In reply to by सह्यमित्र

मोदक Mon, 09/15/2014 - 16:04
Cycle Log नावाचे Strava चे अ‍ॅप आहे. http://www.windowsphone.com/en-us/store/app/cycle-log/85580544-6c9d-e011-986b-78e7d1fa76f8 हा विंडोज स्टोअरचा दुवा आहे. या अ‍ॅपचा एकच कच्चा दुवा म्हणजे आपण ब्रेक घेतला तरी हे अ‍ॅप वेळ मोजतच राहते, अचूक वेग आणि वेळ हवा असल्यास प्रत्येक वेळी अ‍ॅप पॉझ करावे लागते.

चित्रगुप्त Tue, 09/16/2014 - 23:12
व्वा महाराज. खूप आनंद झाला वाचून. आम्ही तरूणपणी इन्दौरहून एकदा बडोद्याला (तिथली म्युझियम्स बघायला) आणि एकदा अजिंठा-वेरूळ वगैरेला जाऊन आलो होतो, ते आठवले. अलिकडे मी पुन्हा नवीन सायकल घेतली आहे, परंतु आता पूर्वीसारखे रस्ते मोकळे मिळणे अशक्य झाल्याने दूरवरचा पल्ला गाठणे वगैरे कठीण. पुढील अनेक सायकल-सफरींसाठी शुभेच्छा. जमल्यास राजस्थानातील 'शेखावटी' एरियात सायकलने भ्रमण करा. मैलोन मैल अगदी निर्मनुष्य रस्ते, अतिशय सुंदर हवेल्या, मंदिरे, सरळ स्वभावाचे लोक, उंट, किल्ले, वगैरे .. वगैरे

मस्त मी फक्त कॉलेजला येण्या-जाण्यासाठी सायकल वापरली. नंतर संपुर्ण नाही पण बर्यापैकी ठाणे शहर फिरुन झाले. तुझ्या पु.प्रवासाला शुभेच्छा. जाता जाता, तुला माहित आहे का पनवेलचा सुमीत परिंगे जो नुकतेच देशाचे दक्षिणोत्तर टोक यातील साडेपाच हजार किमीचे अंतर सायकलने पार करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. ही लोकसत्तेमध्ये आलेला त्याच्या माहितीचा हा लेख वाच.

In reply to by टवाळ कार्टा

विलासराव Wed, 09/17/2014 - 10:47
तब्बल ३६०० किमीच्या या प्रवासासाठी त्याला लागले ५२ दिवस. त्यापैकी ४७ दिवस तो सायकलवरच होता. २० जुलैला पनवेलातून या प्रवासाला सुरुवात करणारा सुमीत ११ सप्टेंबरला सियाचेनहून परतला. बातमीतील ही ओळ.

स्पंदना Wed, 09/17/2014 - 11:42
नक्कि काय लिहावं कळत नाही आहे. म्हणजे जरा वाकड लिहायच आहे पण कि बोर्ड हलत नाही आहे तस लिहायला. बाकी ते उत्साही काका प्रकरण वाचताना हसु फुटलं. जर २ बॉटल्स घेतल्या होत्या तर एक ओआर एस घ्यायच ना? क्रँप साठी साखर मिठ चांगल असत. आता म्हणतेच...कौतुक वाटतय जिद्दीचं. :'( :'-(

किरण कुमार Wed, 09/17/2014 - 14:23
दोन सलग सुट्या आल्या तरी कुठे जायचे राईडला हा प्रश्न प्रत्येक वेळी टाकणारा हा सायकल रायडर, तू बीआरएम करतोय हे ऐकल्यावरच भारी वाटले. मस्त रे अभिनंदन

In reply to by विलासराव

मोदक गुरुवार, 09/18/2014 - 14:41
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. ;)

In reply to by मोदक

विलासराव गुरुवार, 09/18/2014 - 17:53
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. ड्न बॉस. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. ही काय चिंता नाय आपल्याला. सायकल पुर्वी १० वर्ष वापरली आहेच. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. Wink चालतय. पण आपुन लंबी रेसवाला माणुस हय......पुढेमागे सेव्हन सिस्टर्स फिरुन येउ, जमेल का? आणी त्या पिंगुलाही घेउन जाउ. आता वेळ नाही असली शुल्लक कामे सांगु नयेत. नोकरीत रजा टाका, नाही मंजुर झाली तर सोडुन द्या, आल्यावर दुसरी शोधा, नाही मीळाली तर व्यवसाय चालु करा, तेही नाही जमलं तर जाउ नरमदामाईच्या आश्रयाला. माई बघुन घेईल पुढचे.

In reply to by मोदक

चित्रगुप्त गुरुवार, 09/18/2014 - 03:12
तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..??? आम्ही तर बुवा सुरु केले आहे, वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी पुन्हा एकदा. दररोज सकाळी दहा कि.मी. शिवाय भाजी वगैरे आणायला जाताना.

In reply to by मोदक

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/18/2014 - 11:47
तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..???
माझा १-२ महिन्यापुर्वीच सायकलिंग सुरु करण्याचा प्लॅन होता , एव्हन फायरफॉक्स रॅपीड २०१४ ही सायकल घ्यायची हेही फिक्स केले होते पण नंतर पोलोचा प्लॅन ठरला अन बजेट कन्स्टेन्ट्र्स मुळे सायकल चा प्लॅन रेंगाळला ... :( सध्या पोलोसोबत नव्याचे नऊ दिवस चालु आहेत .... एकदा हे हनिमुन संपलें की सायकल चा विचार करणार... आता बघुया कधी जमतय ते !

गुळाचा गणपती Sat, 09/20/2014 - 16:34
मोदक, मस्त रे. प्रयत्न लाजवाब आहेच. शिवाय प्रवास वर्णनही सुंदर आहे. पुन्हा कधी आहे हा ब्रेवे ?

मोदक गुरुवार, 10/16/2014 - 13:03
माऊ आणि गुळाचा गणपती.. ऑक्टोबर २०१५ पर्यंत भारतात होणार्‍या सर्व ब्रेवेचे वेळापत्रक या लिंकवर पाहता येईल http://www.audaxindia.org/events.php ही साईट दोन दिवसांपूर्वीच लाँच झाली त्यामुळे प्रतिसादास उशीर झाला.

बाळ सप्रे Sun, 11/16/2014 - 11:55
मोदकराव, तुमचा हा लेख वाचल्यापासून BRM करण्याचा निश्चय झालाच होता. कालच्या धो धो पावसात पुणे - सुपा - पुणे ही नगर रस्त्यावरील २०० BRM ११ तासात यशस्वीपणे पार पडली. सायकलिंग वरील लेखातील टिप्सचा नक्कीच उपयोग झाला.. धन्यवाद!!

In reply to by एस

मोदक Mon, 11/17/2014 - 12:20
पुणे - अहमदनगर - गाणगापूर - पुणे ही ४०० किमीची BRM झाली. बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...

In reply to by मोदक

एस Mon, 11/17/2014 - 12:22
अच्छा! ग्रेट!
बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...
अनुमोदन.

विलासराव Sat, 09/13/2014 - 14:46
आता तर घेतोच मि सायकल. २० वर्षापुर्वी साधी सायकल चालवायचा अनुभव होता बर्यापैकी. जुलै १३ ला पाँडेचरी ते अ‍ॅरोव्हीलेज हे १३-१४ किमी अंतर आठवड्यात तीनदा पार केले साध्या सायकलने. जुन १४ ला वरळी सीफेस ते नरीमन पॉईंट परत वरळी सीफेस असे अंतर पार केले. सायक्लॉथॉन या स्पर्धेत. ही सायकल गियरची होती पण मी प्रथमच चालवत असल्याने सरळ बिनागियरची असते तशी चालवली. माझा उद्देश कोणतीही स्पर्धा जिंकायचा नसुन मनस्वी सायकलभ्रमन करायचा आहे. त्यात तुम्ही सांगीतले की अचानक पडलेले एखादे स्वप्न खरे व्हावे तसे काहीसे झाले होते. कोणतीही विशेष तयारी न करता केवळ मानसिकदृष्ट्या कणखर राहून केलेली ही महत्वाकांक्षी राईड पूर्ण झाली. संपूर्ण राईड दरम्यान सायकलने अप्रतीम सोबत केली. त्यामुळे उत्साह वाढलाच नाहीतर टिकुनही राहील.

In reply to by विलासराव

मोदक Mon, 09/15/2014 - 13:17
धन्यवाद विलासराव.. सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!!

In reply to by मोदक

विलासराव Mon, 09/15/2014 - 13:23
सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. लवकरच. फक्त साधारण किंमत काय रेंजमधे आहे ते लिहा. घ्यायची तर आहेच. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!! धन्यवाद.

एस Sat, 09/13/2014 - 15:39
पुण्यातले बरेचजण सायकलिंग करतात. दिव्या ताटे, सुनील रणवरे वगैरे मंडळी माहीत आहेत. तुम्ही अतिशय योग्य मार्गावर आहात. पॅरिस-ब्रेख्त-पॅरिस आणि लंडन-एडिंगबर्ग-लंडन करून या. खूपखूप शुभेच्छा आणि जियो!!!

जेपी Sat, 09/13/2014 - 16:50
आवडल. पुर्वी तुळजापुरला असताना तुळजापुर-सोलापुर ट्रिप सायकल वर बर्याच केल्यात.परतीच्या वेळेसे घाट जाम दमवायचा.अता सवय सुटली पण पुन्हा चालु करावी ही इच्छा झालीय धागा वाचुन.

श्रीरंग_जोशी Sat, 09/13/2014 - 20:19
तुझ्या चिकाटीला अन खिलाडूवृत्तीला सादर दंडवत. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन. एक सुचवणी - लौकरच एखादा गोप्रोसारखा कॅमेरा घेऊन टाक व अशा कामगिरीचे चित्रणही कर.

प्यारे१ Sat, 09/13/2014 - 21:57
ज ब र द स्त! जिद्दी आहेस बाबा. सगळ्याच बाबतीत. हॅट्स ऑफ. बाकी ते पसरणी घाटात पहिलं लागतं ते बुवासाहेब मंदिर. मला आठवतंय तसं मंदिर आहेच. यात्रा सुद्धा असते छोट्या प्रमाणावर. (इथं मोठा अपघात झालेला २००३ ला. गुजरातची एक बस खाली कोसळून २३-२४ जण गेलेले) त्याच्या पुढचं छोटं मंदीर साधारण १५ वर्षांपूर्वी एस्टॅब्लिश झालंय. (तिथं एक डंपर उलटलेला १७-१८ वर्षांपूर्वी. ३-४ जण गेले.) आणि घाटाचा 'सी' संपतो तो 'थापा'. उजवीकडं असलेलं १०० मीटरचं छोटं निमुळतं पठार. आता त्याला हॅरिसन फॉली असं गोंडस नाव दिलंय. टेबललँड/ टेबल टॉप/ पॉईंट अगदी वर गेल्यानंतर आहे. तिथं तू 'सायकल'वर गेला नसशील.

सुबोध खरे Sun, 09/14/2014 - 11:22
मोदक राव _^_ साष्टांग नमस्कार. आमच्याच्यान मोटार सायकलीवर होईना २०८ किमी एका दिवसात . आळस हा माणसाचा शत्रू आहे.

सौंदाळा Mon, 09/15/2014 - 11:50
_/\_ दंडवत स्वीकारा. नसरापुरलाच प्रचंड दमलेला असुन चांदणी चौकापर्यंत सायकल मारलीस!! नंतर कसे वाटले? म्हणजे हात, पाय दुखणे वगैरे काही झाले का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मोदक Mon, 09/15/2014 - 11:58
ही BRM पूर्ण करणे स्वतःसाठी ठेवलेले एक टारगेट होते. त्यामुळे "पार करायचेच्च" असे ठरवले होते. नंतर फार त्रास झाला नाही. पाय - त्यातही मांड्या खूप भरून आल्या होत्या. बहुदा त्याचे कारण मी शेवटी शेवटी हार्ड गेअर्स वर सायकल चालवली हे असावे. गरम पाण्याने शेकल्यानंतर पाय एकदम ठीक झाले. उजवा हात पुढे दोन तीन दिवस थोडा बधीर राहिला होता. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी काहीही उपचार न करता फक्त दोन तीन दिवस थांबा असा सल्ला दिला आणि बधीरपणा हळूहळू निघून गेला. "आपल्याला इतके अंतर पार करता आले" ही झींग इतकी चढली होती की या गोष्टींचे फारसे काही वाटले नाही. :D

बाळ सप्रे Mon, 09/15/2014 - 12:19
पहिल्या २.५ तासात ६०किमी करुन पूर्ण १३ तास लागले हे ऐकुन जरा धडकी भरतेय.. आणि अंतरही २०० ऐवजी २०९ !! सध्या माझा ५-६ तासाच्या राईडमध्ये अ‍ॅव्हरेज स्पीड जेमतेम २०-२१ पडतोय.. आणि घाट तर मोठा वीक पॉईंट आहे.. घाटात स्पीड ९-१० वर येतो.. पण तरिही जमवायच यावेळी..

In reply to by बाळ सप्रे

मोदक Mon, 09/15/2014 - 13:14
अहो खूप सोपे आहे सगळे. अंतर २०० ऐवजी २०९ किमी आहे यात नवीन काही नाही. आपल्या घरापासून ते स्टार्टिंग पॉईंट आणि BRM नंतर एंड पॉईंटपासून घर हेही अंतर गृहीत धरा. (या हिशोबाने माझे त्या दिवशीचे २४० किमी सहज झाले असतील.) तुमचा अ‍ॅवरेज स्पीड भरपूर आहे. तो तसाच ठेवा फक्त सध्या सहा तासच राईड करू शकत असाल तर तो वेळ वाढवा. १०० मीटर पळणारा आणि ४०० मीटर पळणारा जसे वेगवेगळी आखणी करतात तसे काहीसे... घाटात १० किमी स्पीड म्हणजे तुम्ही निष्णात सायकलपटू आहात. घाटातला सराव वाढवायचा असेल तर पुणे-पानशेत-कादवे घाट-वेल्हे-पाबे घाट-पुणे हा रूट किंवा आजुबाजूला असलेले सर्व घाट नियमीतपणे पार करा. तुम्हाला सरावाला वेळ आहे याचा पुरेपूर फायदा करून घ्या. चुकुनही अपघात होईल अशा जोखमीने सायकल चालवू नका सायकल हेल्मेट नेहमी वापरा - शहरात फिरताना सुद्धा. भरपूर सायकलींग करताना शरीरावर ताण येवून स्नायूंना दुखापत होईल इतके जास्त प्रयत्न कधीही करू नका. तुमची सायकल कोणती आहे..? आणि BRM कोणत्या सायकलवर करणार आहात..?

In reply to by बाळ सप्रे

मोदक Mon, 09/15/2014 - 17:45
काय राव 'धडकी भरली' वगैरे बोलून चेष्टा करताय का..? ;) तुम्ही जर "टर्नी / २६" टायर / २१ गिअर्स या कन्फीगरेशन वर हा स्पीड राखत असाल तर BRM हसत खेळत पूर्ण कराल. (माझ्या सायकलचे कन्फीगरेशन "अ‍ॅसेरा / २८" टायर आणि २४ गिअर्स" हे आहे.)

पिलीयन रायडर Mon, 09/15/2014 - 12:53
काल दिवस भर तुळशीबागेत जायचे १० वेळा प्लान करुन आणि मोडुन झाले इतका आळस आहे... तू ऑफिस करुन कसं रे बाबा इतकं केलस!!! खुप मोठी गोष्ट केलीस मित्रा!!

मृत्युन्जय Mon, 09/15/2014 - 14:10
अभिनंदन. उत्साहाचा झरा आहे तुझ्यात :) एक शंका: हायवे वर इतकी गर्दी असते. गाड्या भरधाव वेगात असतात. शहरात सुद्धा. मग सायकलिंग करताना त्याचा त्रास होत नाही का? विशेषतः हायवेवर काय काळजी घ्यावी लागते भरधाव गाड्यांच्या अन्नुषंगाने?

In reply to by मृत्युन्जय

मोदक Mon, 09/15/2014 - 16:00
सायकलींग करताना गाड्यांचा खूप त्रास होतो. शहरात जास्त. हायवेवर सायकल शक्यतो सर्वात डावीकडे असलेल्या पांढर्‍या पट्ट्याच्याही बाजूने (रस्ता संपण्यास एक दीड फूट अंतर असते) तेथूनच चालवावी लागते. सायकलला टेललाईट्स असणे गरजेचे असते कारण 'समोर एक सायकल आहे' हे मागच्या गाड्यांना लवकर दिसणे खूप महत्वाचे असते. रिफ्लेक्टीव वेस्टने ते काम आणखी सोपे होते. सर्वाधीक त्रास होतोत तो वाहनचालकांच्या मनोवृत्तीचा. "सायकलच आहे" म्हणून कट मारणे, खूप जवळून खूप वेगाने जाणे, उगाचच मध्ये येवून थांबणे, सायकलला ओव्हरटेक करून लगेच डावीकडे येणे आणि थांबणे. वगैरे प्रकार चीड आणतात. माझी अनेक वाहनचालकांची या विषयावरून बाचाबाची झालेली आहे. थांबलेल्या सायकलशी छेडछाड करणारे महाभागही भरपूर असतात. उत्साहाने सायकल बघत बघत रेंगाळतात आणि गेअर बदलून जातात. हायवेवर वाहनांचा त्रास होतोच होतो पण तेथे समोरच्या वाहनाचा आकार आणि वेग पाहता आपणच आपल्या जीवाला सांभाळून असणे आवश्यक असते. रॅम (Race Across America) सारख्या प्रतिष्ठीत स्पर्धेलाही अपघात ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक सायकलपटूसोबत एक सपोर्ट टीम चारचाकीसह संपूर्णवेळ सोबत असतानाही या रेसमध्ये आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. दोन जण मरण पावले आहेत आणि अनेक जण जायबंदी झाले आहेत. अशाच एका घटनेचा आऊटसाईड मासिकातील दुवा http://www.outsideonline.com/outdoor-adventure/biking/road-biking/Wrecked.html

In reply to by सह्यमित्र

मोदक Mon, 09/15/2014 - 16:04
Cycle Log नावाचे Strava चे अ‍ॅप आहे. http://www.windowsphone.com/en-us/store/app/cycle-log/85580544-6c9d-e011-986b-78e7d1fa76f8 हा विंडोज स्टोअरचा दुवा आहे. या अ‍ॅपचा एकच कच्चा दुवा म्हणजे आपण ब्रेक घेतला तरी हे अ‍ॅप वेळ मोजतच राहते, अचूक वेग आणि वेळ हवा असल्यास प्रत्येक वेळी अ‍ॅप पॉझ करावे लागते.

चित्रगुप्त Tue, 09/16/2014 - 23:12
व्वा महाराज. खूप आनंद झाला वाचून. आम्ही तरूणपणी इन्दौरहून एकदा बडोद्याला (तिथली म्युझियम्स बघायला) आणि एकदा अजिंठा-वेरूळ वगैरेला जाऊन आलो होतो, ते आठवले. अलिकडे मी पुन्हा नवीन सायकल घेतली आहे, परंतु आता पूर्वीसारखे रस्ते मोकळे मिळणे अशक्य झाल्याने दूरवरचा पल्ला गाठणे वगैरे कठीण. पुढील अनेक सायकल-सफरींसाठी शुभेच्छा. जमल्यास राजस्थानातील 'शेखावटी' एरियात सायकलने भ्रमण करा. मैलोन मैल अगदी निर्मनुष्य रस्ते, अतिशय सुंदर हवेल्या, मंदिरे, सरळ स्वभावाचे लोक, उंट, किल्ले, वगैरे .. वगैरे

मस्त मी फक्त कॉलेजला येण्या-जाण्यासाठी सायकल वापरली. नंतर संपुर्ण नाही पण बर्यापैकी ठाणे शहर फिरुन झाले. तुझ्या पु.प्रवासाला शुभेच्छा. जाता जाता, तुला माहित आहे का पनवेलचा सुमीत परिंगे जो नुकतेच देशाचे दक्षिणोत्तर टोक यातील साडेपाच हजार किमीचे अंतर सायकलने पार करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. ही लोकसत्तेमध्ये आलेला त्याच्या माहितीचा हा लेख वाच.

In reply to by टवाळ कार्टा

विलासराव Wed, 09/17/2014 - 10:47
तब्बल ३६०० किमीच्या या प्रवासासाठी त्याला लागले ५२ दिवस. त्यापैकी ४७ दिवस तो सायकलवरच होता. २० जुलैला पनवेलातून या प्रवासाला सुरुवात करणारा सुमीत ११ सप्टेंबरला सियाचेनहून परतला. बातमीतील ही ओळ.

स्पंदना Wed, 09/17/2014 - 11:42
नक्कि काय लिहावं कळत नाही आहे. म्हणजे जरा वाकड लिहायच आहे पण कि बोर्ड हलत नाही आहे तस लिहायला. बाकी ते उत्साही काका प्रकरण वाचताना हसु फुटलं. जर २ बॉटल्स घेतल्या होत्या तर एक ओआर एस घ्यायच ना? क्रँप साठी साखर मिठ चांगल असत. आता म्हणतेच...कौतुक वाटतय जिद्दीचं. :'( :'-(

किरण कुमार Wed, 09/17/2014 - 14:23
दोन सलग सुट्या आल्या तरी कुठे जायचे राईडला हा प्रश्न प्रत्येक वेळी टाकणारा हा सायकल रायडर, तू बीआरएम करतोय हे ऐकल्यावरच भारी वाटले. मस्त रे अभिनंदन

In reply to by विलासराव

मोदक गुरुवार, 09/18/2014 - 14:41
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. ;)

In reply to by मोदक

विलासराव गुरुवार, 09/18/2014 - 17:53
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. ड्न बॉस. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. ही काय चिंता नाय आपल्याला. सायकल पुर्वी १० वर्ष वापरली आहेच. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. Wink चालतय. पण आपुन लंबी रेसवाला माणुस हय......पुढेमागे सेव्हन सिस्टर्स फिरुन येउ, जमेल का? आणी त्या पिंगुलाही घेउन जाउ. आता वेळ नाही असली शुल्लक कामे सांगु नयेत. नोकरीत रजा टाका, नाही मंजुर झाली तर सोडुन द्या, आल्यावर दुसरी शोधा, नाही मीळाली तर व्यवसाय चालु करा, तेही नाही जमलं तर जाउ नरमदामाईच्या आश्रयाला. माई बघुन घेईल पुढचे.

In reply to by मोदक

चित्रगुप्त गुरुवार, 09/18/2014 - 03:12
तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..??? आम्ही तर बुवा सुरु केले आहे, वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी पुन्हा एकदा. दररोज सकाळी दहा कि.मी. शिवाय भाजी वगैरे आणायला जाताना.

In reply to by मोदक

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/18/2014 - 11:47
तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..???
माझा १-२ महिन्यापुर्वीच सायकलिंग सुरु करण्याचा प्लॅन होता , एव्हन फायरफॉक्स रॅपीड २०१४ ही सायकल घ्यायची हेही फिक्स केले होते पण नंतर पोलोचा प्लॅन ठरला अन बजेट कन्स्टेन्ट्र्स मुळे सायकल चा प्लॅन रेंगाळला ... :( सध्या पोलोसोबत नव्याचे नऊ दिवस चालु आहेत .... एकदा हे हनिमुन संपलें की सायकल चा विचार करणार... आता बघुया कधी जमतय ते !

गुळाचा गणपती Sat, 09/20/2014 - 16:34
मोदक, मस्त रे. प्रयत्न लाजवाब आहेच. शिवाय प्रवास वर्णनही सुंदर आहे. पुन्हा कधी आहे हा ब्रेवे ?

मोदक गुरुवार, 10/16/2014 - 13:03
माऊ आणि गुळाचा गणपती.. ऑक्टोबर २०१५ पर्यंत भारतात होणार्‍या सर्व ब्रेवेचे वेळापत्रक या लिंकवर पाहता येईल http://www.audaxindia.org/events.php ही साईट दोन दिवसांपूर्वीच लाँच झाली त्यामुळे प्रतिसादास उशीर झाला.

बाळ सप्रे Sun, 11/16/2014 - 11:55
मोदकराव, तुमचा हा लेख वाचल्यापासून BRM करण्याचा निश्चय झालाच होता. कालच्या धो धो पावसात पुणे - सुपा - पुणे ही नगर रस्त्यावरील २०० BRM ११ तासात यशस्वीपणे पार पडली. सायकलिंग वरील लेखातील टिप्सचा नक्कीच उपयोग झाला.. धन्यवाद!!

In reply to by एस

मोदक Mon, 11/17/2014 - 12:20
पुणे - अहमदनगर - गाणगापूर - पुणे ही ४०० किमीची BRM झाली. बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...

In reply to by मोदक

एस Mon, 11/17/2014 - 12:22
अच्छा! ग्रेट!
बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...
अनुमोदन.
३१ ऑगस्टला झालेल्या शिरवळ राईड दरम्यान सुधाकरने आणखी एका आव्हानात्मक गोष्टीबद्दल सांगितले... ७ सप्टेंबरला पुणे-पांचगणी-पुणे ब्रेवेट (उच्चारी "ब्रेवे") आहे आणि त्याने नांव रजिस्टर केले आहे. यालाच BRM असेही म्हणतात "BRM = Brevet des Randonneurs Mondiaux" अधिक माहिती विचारली असता २०० किमी अंतर १३ तासात सायकलने पार करायचे आहे आणि या वेळचा रूट पुणे-पाचगणी-पुणे असा आहे हे कळाले. "चल की... तुला जमेल सहज.. एकदा ट्राय तर कर" असे सुधाकरने त्याच्या खास ष्टायलीत सांगीतले.

ह्रुदयामध्ये घर बांधु या!अशा घराला दार कशाला!!

खुशि ·

काउबॉय Wed, 09/17/2014 - 19:19
आपले घर असे आसावे जिथे आकाशाच्या वर खिड़की असेल जिथे या आसमंतातील सर्व रंग आपल्या डोळ्यात सामावून जायला एक कारण हुडकत असतील तारे जिथे प्रकाशतिल ते आकाश जमीन झाले असेल चंद्रही मग तिथेच घुटमळेल आशा घराच्या भिंती दगड विटान्नि न्हावे हृदयातिल प्रेमाने उभारल्या असतील ज्याची कवाडे सर्वानाच उघडी असतील आणि दारांची गरजच लागणार नाही....

विवेकपटाईत Wed, 09/17/2014 - 20:31
च्यायला आत्ताच डॉक्टरांनी हृदयाचे कपाट उघडून बघितले आहेत. दरवाजा लावण्या एवजी चक्क शिंप्या सारखे शिवून काढले. आता दरवाजा कुठून लावणार ख़ुशी ताई.

काउबॉय Wed, 09/17/2014 - 19:19
आपले घर असे आसावे जिथे आकाशाच्या वर खिड़की असेल जिथे या आसमंतातील सर्व रंग आपल्या डोळ्यात सामावून जायला एक कारण हुडकत असतील तारे जिथे प्रकाशतिल ते आकाश जमीन झाले असेल चंद्रही मग तिथेच घुटमळेल आशा घराच्या भिंती दगड विटान्नि न्हावे हृदयातिल प्रेमाने उभारल्या असतील ज्याची कवाडे सर्वानाच उघडी असतील आणि दारांची गरजच लागणार नाही....

विवेकपटाईत Wed, 09/17/2014 - 20:31
च्यायला आत्ताच डॉक्टरांनी हृदयाचे कपाट उघडून बघितले आहेत. दरवाजा लावण्या एवजी चक्क शिंप्या सारखे शिवून काढले. आता दरवाजा कुठून लावणार ख़ुशी ताई.
लेखनविषय:
नमस्कार, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.

रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

आनन्दा ·

विलासराव Sat, 09/13/2014 - 13:29
आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे - ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं | ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं | बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे. मी तर आजही हाच उपाय करतो. त्याचा फायदा आजवर १००% झालाय.

आयुर्हित Sun, 09/14/2014 - 13:39
अतिशय सुंदर विवेचन! प्रत्येक माणसाला विचार करण्यास भाग पाडुन त्याला जाणकार बनवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न! पथ्य पाळले तर रोगच होत नाही हा माझा स्वतःचा अनूभव आहे. या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे. सर्वांनी आपआपल्या परीने हे काम केले तर सर्वांचाच फायदा आहे. मनापासुन धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आनन्दा Mon, 09/15/2014 - 11:55
या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे.
असहमत. कार्य असेल तर कारण असलेच पाहिजे, आणि कारण + कार्य असेल तर ते आजच्या वैज्ञानिक परिभाषेत मांडता आलेच पाहिजे असे माझे मत आहे. फक्त त्यासाठी संशोधनाची गरज असते. आणि ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञच करू शकतात. सर्वच शास्त्रांमध्ये अनेक नवीन संकल्पना येत असतात, जुन्या रद्द होत असतात. फक्त त्यासाठी गरज असते ती डोळे उघडे ठेवण्याची. एक साधे उदाहरण घेउ - तुमच्याकडे जर एखादा रक्तदाब वाढलेला रुग्ण आला, तर तुम्ही काय कराल? त्याला मॉडर्न मेडिसिन द्याल की आयुर्वेदिक चिकित्सा करत बसाल? शेवटी रुग्णाचे प्राण वाचणे महत्वाचे असते. त्यामुळे माझ्या दृष्टीने होलिस्टिक अप्रोच हाच योग्य आहे. आणिबाणीची स्थिती तुम्ही आयुरवेदाच्या सहाय्याने हाताळू शकाल असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का? माझ्यामते केवळ आधुनिक शास्त्रांना ही पारंपरिक शास्त्रे रिप्लेस करू शकत नाहीत, पण ही सारी शास्त्रे एकत्र येऊन नक्कीच चांगले फळ देउ शकतात, पण त्यासाठी गरज आहे ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ / अभ्यासकांनी आपले मेंटल बॅरिअर्स तोडण्याची. बाकी माझ्या या शास्त्राचा अनुभवांबद्दल नंतर लिहेनच.

सुबोध खरे Sun, 09/14/2014 - 14:56
(susceptibility - संवेदनशीलता) हे एक आधुनिक शास्त्रात मान्यता पावलेले तत्व आहे. उदा. दमट खोलीत गेल्यावर ज्या माणसाला दमा आहे त्याला लगेच धाप लागते आणि आपल्या सारक्या माणसाला काही त्रास होत नाही. किंवा आपण पाणी पुरी/ झणझणीत मिसळ खाल्ली तर काही होत नाही पण (अति) संवेदनशील माणसाना ताबडतोब लोटा परेड करावी लागते.( काही उष्ण प्रकृती माणसाना नुसत्या विचारानेच बहिर्दिशेची भावना होते. "समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. " नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो? आईच्या शरीराचे असंतुलन हा एक साधारण घेतलेला बचाव आहे पण आईला क्षयरोग/ कर्करोग असताना हि मुल उत्तम प्रकृतीचे असते हे कसे? वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. आपले शरीर संपूर्णपणे संतुलित असेल तर आपल्याला रोग होणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येईल काय? अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच. अगदी निरोगी माणूस असेल तरीही जर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाल्यास त्या माणसाला विषमज्वर(टाय फोईड) होणारच. तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.( अजीर्णामुळे ताप आला असेल तर गोष्ट वेगळी) उलट तापामुळे आपल्या शरीरात चयापचय रासायनिक क्रिया वाढल्याने( तापमान वाढले कि रासायनिक क्रिया वेगाने होतात हे अगदी बाळबोध रसायन शास्त्रातील तत्व आहे) आणि आपले शरीर गरम ठेवण्यास लागणारी उर्जा शरीरातून गेल्याने उलट अशक्तपणा येतो आणि अशात लंघन केल्यास अशक्तपणा भरून येण्यास जास्तच वेळ लागतो. माझ्या सारख्या बारीक प्रकृतीच्या माणसाना विचारून पहा लहानपणी तापामुळे अशक्तपणा आणि चक्कर कशी येत असे ते. बरेच लोक आपल्याला हा अनुभव सांगतील. पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे. पित्ताशय कोणताही तेलकट पदार्थ खाल्ला कि रिकामे होते. मी सोनोग्राफी मध्ये पित्ताशय काम करते कि नाही हे पाहण्यासाठी रुग्णाला दोन सामोसे किंवा बटाटे वाडे खाऊन येण्यास सांगतो आणि एक तासाने परत सोनोग्राफी केल्यावर पित्ताशय( काम करीत असेल तर)रिकामे झालेले दिसते. आपले विवेचन हे फारच जनरलायझेशन आहे. वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा Sun, 09/14/2014 - 23:38
सुबोधसर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण एक एक गोष्टींचा विचार करू
नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो?
माझ्यामते आयुर्वेदामध्ये गर्भाधान + गर्भसंस्कार हा एक संपूर्ण वेगळा विभाग आहे, त्यामध्ये बहुधा यातल्या बर्‍याच गोष्टी असाव्यात. (म्हणजे बाळाला कर्करोग कश्यामुळे होतो असे नव्हे, पण ढोबळमानाने आईच्या आहारविहाराचा बाळावर काय परिणाम होतो वगैरे. ) बाकी - माणूस जन्माला येताना संतुलित प्रकृती घेऊन येतो असे आयुर्वेद कधीच म्हणत नाही. तसा आपला समज असल्यास कृपया दूर करावा. किंबहुना आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वीपासून पती पत्नींनी पाळायचे नियम आहेत, म्हणजेच केवळ स्त्रीच नव्हे, तर उत्तम संतती निर्माण होण्यात पुरूषबीजाचा देखील तेव्हढाच वाटा आहे हे आयुर्वेद मान्य करतो.
अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.
या गोष्टीबद्दल मी आता भष्य करू इच्छित नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या एव्हढेच म्हणतो ज्या वानरांपासून एडस संक्रमित झाला आहे त्यांच्यामध्ये या रोगासाठी प्रतिकारशक्ती आहे. (मी माकड आणि माणसांना एका पातळीवर आणत नाहिये, पण प्राणिजगतामध्ये एड्स हा अजेय आहे असे नाही. याविषयी सविस्तर मी शिवांबुबद्दल लिहिताना बोलेन.
तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.
यामागची भूमिका कळली नाही - लंघन म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे? लंघनामध्ये कडकडीत उपास करावा असे मला तरी कुठे ऐकलेले आठवत नाही. आम्हाला लण्घन म्हणजे कण्हेरी/ भाताची पेज देत असत. त्यामागची भूमिका स्पष्ट आहे - तापामुळे इतर सार्‍या शरीरयंत्रणांबरोबर अग्नी पण मंद झालेला असतो. अश्या वेळी जडान्न घेऊन उगीचच त्यवर्‍ आणखी भार टाकणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्याऐवजी हलका/ सुपाच्य पण पुरेश्या क्यालरीझ देणारा आहार असावा अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. अर्थात विषमज्वरासारख्या काही आजारांमध्ये मात्र रुग्णाला केवळ पेय पदार्थांवरच ठेवले जाते बहुधा. पण ते मला नक्की माहीत नाही, त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन टाळतो. आणि महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रतिजैविके घेत असाल, तर तुम्ही लंघन करणे मुळीच अपेक्षित नाही, कारण (१)जड आहारामुळे जे जीवाणुजन्य रोग होऊ शकतात, ते प्रतिजैविके चालू असताना होउ शकत नाहीत. (२)प्रतिजैविकांमुळे जंतूंबरोबर शरीरातील इतर पेशी देखील मरत असतात. त्यामुळे जर तुम्ही काहीच खाल्ले नाही, तर शरीरावर कल्पनातीत लोड येउ शकतो, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे काही औषधे अशी देखील आहेत की जी केवळ खाल्यावरच घ्यायची असतात.
पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
याबाबतीत मला पुरेसे ज्ञान नाही, मिपावरील जाणकारांच्या प्रतीक्षेत. कदाचित शारीरशास्त्रातील पित्तशय आणि आयुर्वेदानुसार पित्ताशय या दोन वेगळ्या एंटिटी असतील. बाकी -
वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.
याच्यामागचा हेतू समजू शकलो नाही. तसा सूर माझ्या लेखातून ध्वनित होत असल्यास क्षमस्व. एका लेखात डोक्टर होता येईल एव्हढे वैद्यकशास्त्र नक्कीच सोपे नाही, नाहीतर मी नोकरी सोडून मेडिकल प्रॅक्टिसच नसती का सुरू केली? या लेखामागचा माझा हेतू मॉडर्न मेडिसीन वगळता इतर समांतर चिकित्सापद्धतींची थोडक्यात तोंडओळख करून देणे, त्यांचे पायाभूत तत्वज्ञान (जसे आणि जेव्हढे मला समजले आहे तसे आणि तेव्हढे) लोकांपर्यंत पोचवणे, आणि या सर्व चिकित्सप्रणालींच्या अभ्यास/ संशोधनासाठी शक्य झाल्यास थोडी उत्सुकता निर्माण करणे इतकाच आहे. कोणाला आयुर्वेद शिकवणे, किंवा माझी जाहिरात करणे हा नाही. (कारण मुळात मी डॉक्टरच नाही, आणि ते मी वर स्पष्ट लिहिले आहे.) त्यामुळे तुमची पर्सनल वाक्ये मला लागू होत नाहीत असे समजतो. या चिकित्साप्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत. बाकी या क्षेत्रात असणर्‍या समस्यांविषयी पुढे सविस्तर लिहेनच, त्यामुळे आता इथेच थांबतो.

बाबा पाटील Mon, 09/15/2014 - 13:14
खुपच चांगला आढावा घेतला आहे. वाचकांना विनंती कृपया दोन्ही शास्त्रांची चुकीची तुलना करु नका,विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते. तसेच पुर्वीच सांगितल्या प्रमाणे कृपया आयुर्वेदाला एलोपॅथीची चड्डी घालु नका.पहिला आयुर्वेद समजावुन घ्या मग विवेचन अथवा टीका करा.

In reply to by बाबा पाटील

आनन्दा Mon, 09/15/2014 - 13:57
विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते.
सुधारणेसाठी धन्यवाद.

प्रसाद१९७१ Mon, 09/15/2014 - 13:14
कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत.
@ आनंदा - हे तुम्ही बरे केलेले आजार काहीही उपचार न करता बरे होणारे होते का हे आधी तपासुन बघितलेत का? सर्वसामान्य पणे होणारे आजार ( सर्दी, ताप, खोकला, अपचन ) काही विषेश उपचार नाही केले तरी बरे होतातच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/15/2014 - 14:28
मोडर्न मेडिसिन न वापरता पण मलेरिया झालेला कळू शकतो. फक्त त्यासाठी पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ Mon, 09/15/2014 - 14:51
पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.>> ह्या टेस्ट हा मॉडर्न मेडीसीन चा भाग आहे. समांतर पॅथी वाल्यांनी असल्या टेस्ट तरी कशाला कराव्यात आणि मलेरीया वगैरे शब्द वापरणे सुद्धा तात्विक दृष्ट्या चूक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/15/2014 - 16:12
हो खरे म्हणजे जायची गरज नव्हती. पण मी पुण्यात, आणि आमचे डॉ. कोकणात, अशी स्थिती असल्यामुळे जाऊन बघून आलो. रच्याकने, टेस्ट हा मोडर्न मेडिसिनचा भाग नाही, मॉडर्न चिकित्सेचा भाग आहे. पण असो. बाकी अवांतर - मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला. हवे तर मी वर काय लिहिलेले आहे ते वाचा. प्रत्येकाला आपल्या मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या मर्यादेपलिकडे जे काही आहे तेथे दुसरी चिकित्सापद्धती जर काही काम करत असेल तर पूर्वग्रहमुक्त दृष्टीकोनातून त्याचादेखील अभ्यास व्हावा. आणि केवळ परिणामांना मोडर्न सायन्सेसच्या परिभाषेत न बसवता त्या तत्वज्ञानाचा देखील अभ्यास व्हावा, त्या तत्वज्ञानातून देखील काही मिळतेय का ते पहावे असा माझा हेतू आहे. कारण मी अनेक आजार या समांतर चिकित्सेने बरे होताना पाहिले आहेत.

In reply to by आनन्दा

मराठी_माणूस गुरुवार, 12/18/2014 - 15:30
मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला.
अतिशय समर्पक प्रतिसाद. (अवांतरःआज पर्यंत अशा चर्चां मधे मोडर्न मेडिसिनवाल्यांचे प्रतिसाद बघता "अभिनिवेश" ह्या श्ब्दाला "आक्रस्ताळेपणा" हा शब्द सुचवावासा वाटतो.

सुहास.. Mon, 09/15/2014 - 20:30
माहीतीपर लेख आवडला , बाबा पाटलांच्या सुचनेला अनुमोदन ! पहिलाच भाग आहे दुसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत सुपाच्य = याचा अर्थ काय ? मेडिसिन पेक्षा पथ्य पाळण्यावर विश्वास असलेला . वाश्या

वेल्लाभट Sun, 12/14/2014 - 14:06
वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास काय उपाय करावा? पित्त अंगावर उठते, खाज सुटते, चेहरा, ओठ सुजल्यासारखे होतात. विशेष एक काही खाल्याने नाही. कधीही. मग ते थांबेस्तोवर नाकी नऊ येतात. शेवटी इन्सिडाल किंवा तत्सम गोळ्यांनी आवर बसतो. ज्यांना माहित आहेत त्यांनी कृपया यावर उपाय सुचवावेत अशी विनंती.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा Sun, 12/14/2014 - 17:05
भरपूर पाणी प्यावे....दारू वर्ज्य...पित्ताला साबण लावून धुवावे...मन आवडत्या गोष्टींत रमवावे माझ्यासाठी हा उपाय काम करतो

In reply to by वेल्लाभट

पैसा Sun, 12/14/2014 - 20:17
मला वाटतं ही अ‍ॅलर्जी असावी. ती काही खाल्ल्यामुळे येते असं नाही. कपडे, सेंट, पावडर, क्रीम्स, हवेतली धूळ, परागकण, डास/कीटक चावल्यामुळे किंवा हवेत अचानक झालेला बदल यामुळे असं होऊ शकतं. माझ्या एका मैत्रिणीला थंडी पडली की असा पित्त उठण्याचा त्रास व्हायचा. सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे राहिले की आपोआप या पित्ताच्या गांधी निघून जायच्या. आमसुले या गांधींवर चोळणे, आमसुले भिजत घालून त्याचे पाणी पिणे असे घरगुती उपाय यावर काही प्रमाणात उपयोगी पडतात. मात्र नेमकी कशामुळे अ‍ॅलर्जी आहे याचा शोध घेणे आणि ती बरी होण्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडून ट्रीटमेंट घेणे चांगले असे वाटते.

In reply to by पैसा

सविता००१ Tue, 12/16/2014 - 12:35
मला धुळीची, डास चावणे आणि काही वासांची अ‍ॅलर्जी आहे. मला तुझ्या मैत्रिणीला जसा त्रास व्हायचा तसाच होत असे. पण ती कळाली खूप उशीरा. म्हण्जे मी डॉ. कडे लगेच गेले होते. पण नाही कळू शकली लवकर. शेवटी डॉ. बदलले आणि लगेच निदान झालं. व्यवस्थित २ महिन्यांचा कोर्स घ्यावा लागला आणि आता जिथे धूळ, धुर असेल, डास असतील तिथे जाणे टाळणे हेच औषध.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 12/18/2014 - 16:13
एक अवांतर/अज्ञानी शंका. आमसुले आंबट, मग पित्ताला आंबट कसं काय चालतं बॉ? पित्त म्ह. अ‍ॅसिडिटी आणि आंबट म्हणजे अ‍ॅसिडवालेच पदार्थ. मग कसं काय शमतं ते?

In reply to by बॅटमॅन

पैसा Fri, 12/19/2014 - 12:14
कसं ते म्हैत नै. पण आमसुलाचे पाणी/सरबत, लिंबू सरबत प्यायले तर पित्त्/अ‍ॅसिडिटी कमी होते खरे. डॉक्टर्/वैद्य लोकांनी कृपया प्रकाष पाडावा ही विनंती.

In reply to by पैसा

आयुर्हित Sat, 12/20/2014 - 06:52
अजून एक प्रकार: मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या कांबळे/घोंगडीवर झोपल्यानेही काहीजणांचा पित्ताचा त्रास गेलेला मी पाहिला आहे. अशाच प्रकारे भरपूर गोष्टी/ उपचार पद्धती पूर्वापार सुरु आहेत. याला wisdom (what they dont teach you in medical college) म्हणायला हरकत नाही!

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट गुरुवार, 12/18/2014 - 14:20
पैसा ताई, सविता००१, टका, प्यारे सगळ्यांचे धन्यवाद... आमसूल पाण्यात भिजवून सकाळी पिण्याचा उपाय चालू आहे सद्ध्या. आणि हो हा त्रास मला नाही. एका दुस-या व्यक्तीला आहे मी माहितीदाखल प्रश्न विचारला.

आयुर्हित Sun, 12/14/2014 - 14:18
सर्वप्रथम गोळ्या खाणे बंद करावे. आपण म्हणाल हा काय उपाय झाला? पण आता हा मार्ग अवलंबवावा लागला तर काय मार्ग उरतो ... त्या साठी व्य नि केलाय

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित Mon, 12/15/2014 - 11:44
एका धाग्याची लिंक, दुसऱ्या धाग्यातील संदर्भ भलत्याच (तिसऱ्या) धाग्यावर लिहिण्यापेक्षा मोठ्ठी विसंगती काय असु शकते? चालू द्या!

विलासराव Sat, 09/13/2014 - 13:29
आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे - ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं | ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं | बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे. मी तर आजही हाच उपाय करतो. त्याचा फायदा आजवर १००% झालाय.

आयुर्हित Sun, 09/14/2014 - 13:39
अतिशय सुंदर विवेचन! प्रत्येक माणसाला विचार करण्यास भाग पाडुन त्याला जाणकार बनवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न! पथ्य पाळले तर रोगच होत नाही हा माझा स्वतःचा अनूभव आहे. या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे. सर्वांनी आपआपल्या परीने हे काम केले तर सर्वांचाच फायदा आहे. मनापासुन धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आनन्दा Mon, 09/15/2014 - 11:55
या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे.
असहमत. कार्य असेल तर कारण असलेच पाहिजे, आणि कारण + कार्य असेल तर ते आजच्या वैज्ञानिक परिभाषेत मांडता आलेच पाहिजे असे माझे मत आहे. फक्त त्यासाठी संशोधनाची गरज असते. आणि ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञच करू शकतात. सर्वच शास्त्रांमध्ये अनेक नवीन संकल्पना येत असतात, जुन्या रद्द होत असतात. फक्त त्यासाठी गरज असते ती डोळे उघडे ठेवण्याची. एक साधे उदाहरण घेउ - तुमच्याकडे जर एखादा रक्तदाब वाढलेला रुग्ण आला, तर तुम्ही काय कराल? त्याला मॉडर्न मेडिसिन द्याल की आयुर्वेदिक चिकित्सा करत बसाल? शेवटी रुग्णाचे प्राण वाचणे महत्वाचे असते. त्यामुळे माझ्या दृष्टीने होलिस्टिक अप्रोच हाच योग्य आहे. आणिबाणीची स्थिती तुम्ही आयुरवेदाच्या सहाय्याने हाताळू शकाल असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का? माझ्यामते केवळ आधुनिक शास्त्रांना ही पारंपरिक शास्त्रे रिप्लेस करू शकत नाहीत, पण ही सारी शास्त्रे एकत्र येऊन नक्कीच चांगले फळ देउ शकतात, पण त्यासाठी गरज आहे ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ / अभ्यासकांनी आपले मेंटल बॅरिअर्स तोडण्याची. बाकी माझ्या या शास्त्राचा अनुभवांबद्दल नंतर लिहेनच.

सुबोध खरे Sun, 09/14/2014 - 14:56
(susceptibility - संवेदनशीलता) हे एक आधुनिक शास्त्रात मान्यता पावलेले तत्व आहे. उदा. दमट खोलीत गेल्यावर ज्या माणसाला दमा आहे त्याला लगेच धाप लागते आणि आपल्या सारक्या माणसाला काही त्रास होत नाही. किंवा आपण पाणी पुरी/ झणझणीत मिसळ खाल्ली तर काही होत नाही पण (अति) संवेदनशील माणसाना ताबडतोब लोटा परेड करावी लागते.( काही उष्ण प्रकृती माणसाना नुसत्या विचारानेच बहिर्दिशेची भावना होते. "समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. " नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो? आईच्या शरीराचे असंतुलन हा एक साधारण घेतलेला बचाव आहे पण आईला क्षयरोग/ कर्करोग असताना हि मुल उत्तम प्रकृतीचे असते हे कसे? वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. आपले शरीर संपूर्णपणे संतुलित असेल तर आपल्याला रोग होणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येईल काय? अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच. अगदी निरोगी माणूस असेल तरीही जर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाल्यास त्या माणसाला विषमज्वर(टाय फोईड) होणारच. तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.( अजीर्णामुळे ताप आला असेल तर गोष्ट वेगळी) उलट तापामुळे आपल्या शरीरात चयापचय रासायनिक क्रिया वाढल्याने( तापमान वाढले कि रासायनिक क्रिया वेगाने होतात हे अगदी बाळबोध रसायन शास्त्रातील तत्व आहे) आणि आपले शरीर गरम ठेवण्यास लागणारी उर्जा शरीरातून गेल्याने उलट अशक्तपणा येतो आणि अशात लंघन केल्यास अशक्तपणा भरून येण्यास जास्तच वेळ लागतो. माझ्या सारख्या बारीक प्रकृतीच्या माणसाना विचारून पहा लहानपणी तापामुळे अशक्तपणा आणि चक्कर कशी येत असे ते. बरेच लोक आपल्याला हा अनुभव सांगतील. पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे. पित्ताशय कोणताही तेलकट पदार्थ खाल्ला कि रिकामे होते. मी सोनोग्राफी मध्ये पित्ताशय काम करते कि नाही हे पाहण्यासाठी रुग्णाला दोन सामोसे किंवा बटाटे वाडे खाऊन येण्यास सांगतो आणि एक तासाने परत सोनोग्राफी केल्यावर पित्ताशय( काम करीत असेल तर)रिकामे झालेले दिसते. आपले विवेचन हे फारच जनरलायझेशन आहे. वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा Sun, 09/14/2014 - 23:38
सुबोधसर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण एक एक गोष्टींचा विचार करू
नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो?
माझ्यामते आयुर्वेदामध्ये गर्भाधान + गर्भसंस्कार हा एक संपूर्ण वेगळा विभाग आहे, त्यामध्ये बहुधा यातल्या बर्‍याच गोष्टी असाव्यात. (म्हणजे बाळाला कर्करोग कश्यामुळे होतो असे नव्हे, पण ढोबळमानाने आईच्या आहारविहाराचा बाळावर काय परिणाम होतो वगैरे. ) बाकी - माणूस जन्माला येताना संतुलित प्रकृती घेऊन येतो असे आयुर्वेद कधीच म्हणत नाही. तसा आपला समज असल्यास कृपया दूर करावा. किंबहुना आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वीपासून पती पत्नींनी पाळायचे नियम आहेत, म्हणजेच केवळ स्त्रीच नव्हे, तर उत्तम संतती निर्माण होण्यात पुरूषबीजाचा देखील तेव्हढाच वाटा आहे हे आयुर्वेद मान्य करतो.
अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.
या गोष्टीबद्दल मी आता भष्य करू इच्छित नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या एव्हढेच म्हणतो ज्या वानरांपासून एडस संक्रमित झाला आहे त्यांच्यामध्ये या रोगासाठी प्रतिकारशक्ती आहे. (मी माकड आणि माणसांना एका पातळीवर आणत नाहिये, पण प्राणिजगतामध्ये एड्स हा अजेय आहे असे नाही. याविषयी सविस्तर मी शिवांबुबद्दल लिहिताना बोलेन.
तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.
यामागची भूमिका कळली नाही - लंघन म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे? लंघनामध्ये कडकडीत उपास करावा असे मला तरी कुठे ऐकलेले आठवत नाही. आम्हाला लण्घन म्हणजे कण्हेरी/ भाताची पेज देत असत. त्यामागची भूमिका स्पष्ट आहे - तापामुळे इतर सार्‍या शरीरयंत्रणांबरोबर अग्नी पण मंद झालेला असतो. अश्या वेळी जडान्न घेऊन उगीचच त्यवर्‍ आणखी भार टाकणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्याऐवजी हलका/ सुपाच्य पण पुरेश्या क्यालरीझ देणारा आहार असावा अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. अर्थात विषमज्वरासारख्या काही आजारांमध्ये मात्र रुग्णाला केवळ पेय पदार्थांवरच ठेवले जाते बहुधा. पण ते मला नक्की माहीत नाही, त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन टाळतो. आणि महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रतिजैविके घेत असाल, तर तुम्ही लंघन करणे मुळीच अपेक्षित नाही, कारण (१)जड आहारामुळे जे जीवाणुजन्य रोग होऊ शकतात, ते प्रतिजैविके चालू असताना होउ शकत नाहीत. (२)प्रतिजैविकांमुळे जंतूंबरोबर शरीरातील इतर पेशी देखील मरत असतात. त्यामुळे जर तुम्ही काहीच खाल्ले नाही, तर शरीरावर कल्पनातीत लोड येउ शकतो, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे काही औषधे अशी देखील आहेत की जी केवळ खाल्यावरच घ्यायची असतात.
पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
याबाबतीत मला पुरेसे ज्ञान नाही, मिपावरील जाणकारांच्या प्रतीक्षेत. कदाचित शारीरशास्त्रातील पित्तशय आणि आयुर्वेदानुसार पित्ताशय या दोन वेगळ्या एंटिटी असतील. बाकी -
वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.
याच्यामागचा हेतू समजू शकलो नाही. तसा सूर माझ्या लेखातून ध्वनित होत असल्यास क्षमस्व. एका लेखात डोक्टर होता येईल एव्हढे वैद्यकशास्त्र नक्कीच सोपे नाही, नाहीतर मी नोकरी सोडून मेडिकल प्रॅक्टिसच नसती का सुरू केली? या लेखामागचा माझा हेतू मॉडर्न मेडिसीन वगळता इतर समांतर चिकित्सापद्धतींची थोडक्यात तोंडओळख करून देणे, त्यांचे पायाभूत तत्वज्ञान (जसे आणि जेव्हढे मला समजले आहे तसे आणि तेव्हढे) लोकांपर्यंत पोचवणे, आणि या सर्व चिकित्सप्रणालींच्या अभ्यास/ संशोधनासाठी शक्य झाल्यास थोडी उत्सुकता निर्माण करणे इतकाच आहे. कोणाला आयुर्वेद शिकवणे, किंवा माझी जाहिरात करणे हा नाही. (कारण मुळात मी डॉक्टरच नाही, आणि ते मी वर स्पष्ट लिहिले आहे.) त्यामुळे तुमची पर्सनल वाक्ये मला लागू होत नाहीत असे समजतो. या चिकित्साप्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत. बाकी या क्षेत्रात असणर्‍या समस्यांविषयी पुढे सविस्तर लिहेनच, त्यामुळे आता इथेच थांबतो.

बाबा पाटील Mon, 09/15/2014 - 13:14
खुपच चांगला आढावा घेतला आहे. वाचकांना विनंती कृपया दोन्ही शास्त्रांची चुकीची तुलना करु नका,विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते. तसेच पुर्वीच सांगितल्या प्रमाणे कृपया आयुर्वेदाला एलोपॅथीची चड्डी घालु नका.पहिला आयुर्वेद समजावुन घ्या मग विवेचन अथवा टीका करा.

In reply to by बाबा पाटील

आनन्दा Mon, 09/15/2014 - 13:57
विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते.
सुधारणेसाठी धन्यवाद.

प्रसाद१९७१ Mon, 09/15/2014 - 13:14
कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत.
@ आनंदा - हे तुम्ही बरे केलेले आजार काहीही उपचार न करता बरे होणारे होते का हे आधी तपासुन बघितलेत का? सर्वसामान्य पणे होणारे आजार ( सर्दी, ताप, खोकला, अपचन ) काही विषेश उपचार नाही केले तरी बरे होतातच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/15/2014 - 14:28
मोडर्न मेडिसिन न वापरता पण मलेरिया झालेला कळू शकतो. फक्त त्यासाठी पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ Mon, 09/15/2014 - 14:51
पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.>> ह्या टेस्ट हा मॉडर्न मेडीसीन चा भाग आहे. समांतर पॅथी वाल्यांनी असल्या टेस्ट तरी कशाला कराव्यात आणि मलेरीया वगैरे शब्द वापरणे सुद्धा तात्विक दृष्ट्या चूक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/15/2014 - 16:12
हो खरे म्हणजे जायची गरज नव्हती. पण मी पुण्यात, आणि आमचे डॉ. कोकणात, अशी स्थिती असल्यामुळे जाऊन बघून आलो. रच्याकने, टेस्ट हा मोडर्न मेडिसिनचा भाग नाही, मॉडर्न चिकित्सेचा भाग आहे. पण असो. बाकी अवांतर - मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला. हवे तर मी वर काय लिहिलेले आहे ते वाचा. प्रत्येकाला आपल्या मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या मर्यादेपलिकडे जे काही आहे तेथे दुसरी चिकित्सापद्धती जर काही काम करत असेल तर पूर्वग्रहमुक्त दृष्टीकोनातून त्याचादेखील अभ्यास व्हावा. आणि केवळ परिणामांना मोडर्न सायन्सेसच्या परिभाषेत न बसवता त्या तत्वज्ञानाचा देखील अभ्यास व्हावा, त्या तत्वज्ञानातून देखील काही मिळतेय का ते पहावे असा माझा हेतू आहे. कारण मी अनेक आजार या समांतर चिकित्सेने बरे होताना पाहिले आहेत.

In reply to by आनन्दा

मराठी_माणूस गुरुवार, 12/18/2014 - 15:30
मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला.
अतिशय समर्पक प्रतिसाद. (अवांतरःआज पर्यंत अशा चर्चां मधे मोडर्न मेडिसिनवाल्यांचे प्रतिसाद बघता "अभिनिवेश" ह्या श्ब्दाला "आक्रस्ताळेपणा" हा शब्द सुचवावासा वाटतो.

सुहास.. Mon, 09/15/2014 - 20:30
माहीतीपर लेख आवडला , बाबा पाटलांच्या सुचनेला अनुमोदन ! पहिलाच भाग आहे दुसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत सुपाच्य = याचा अर्थ काय ? मेडिसिन पेक्षा पथ्य पाळण्यावर विश्वास असलेला . वाश्या

वेल्लाभट Sun, 12/14/2014 - 14:06
वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास काय उपाय करावा? पित्त अंगावर उठते, खाज सुटते, चेहरा, ओठ सुजल्यासारखे होतात. विशेष एक काही खाल्याने नाही. कधीही. मग ते थांबेस्तोवर नाकी नऊ येतात. शेवटी इन्सिडाल किंवा तत्सम गोळ्यांनी आवर बसतो. ज्यांना माहित आहेत त्यांनी कृपया यावर उपाय सुचवावेत अशी विनंती.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा Sun, 12/14/2014 - 17:05
भरपूर पाणी प्यावे....दारू वर्ज्य...पित्ताला साबण लावून धुवावे...मन आवडत्या गोष्टींत रमवावे माझ्यासाठी हा उपाय काम करतो

In reply to by वेल्लाभट

पैसा Sun, 12/14/2014 - 20:17
मला वाटतं ही अ‍ॅलर्जी असावी. ती काही खाल्ल्यामुळे येते असं नाही. कपडे, सेंट, पावडर, क्रीम्स, हवेतली धूळ, परागकण, डास/कीटक चावल्यामुळे किंवा हवेत अचानक झालेला बदल यामुळे असं होऊ शकतं. माझ्या एका मैत्रिणीला थंडी पडली की असा पित्त उठण्याचा त्रास व्हायचा. सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे राहिले की आपोआप या पित्ताच्या गांधी निघून जायच्या. आमसुले या गांधींवर चोळणे, आमसुले भिजत घालून त्याचे पाणी पिणे असे घरगुती उपाय यावर काही प्रमाणात उपयोगी पडतात. मात्र नेमकी कशामुळे अ‍ॅलर्जी आहे याचा शोध घेणे आणि ती बरी होण्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडून ट्रीटमेंट घेणे चांगले असे वाटते.

In reply to by पैसा

सविता००१ Tue, 12/16/2014 - 12:35
मला धुळीची, डास चावणे आणि काही वासांची अ‍ॅलर्जी आहे. मला तुझ्या मैत्रिणीला जसा त्रास व्हायचा तसाच होत असे. पण ती कळाली खूप उशीरा. म्हण्जे मी डॉ. कडे लगेच गेले होते. पण नाही कळू शकली लवकर. शेवटी डॉ. बदलले आणि लगेच निदान झालं. व्यवस्थित २ महिन्यांचा कोर्स घ्यावा लागला आणि आता जिथे धूळ, धुर असेल, डास असतील तिथे जाणे टाळणे हेच औषध.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 12/18/2014 - 16:13
एक अवांतर/अज्ञानी शंका. आमसुले आंबट, मग पित्ताला आंबट कसं काय चालतं बॉ? पित्त म्ह. अ‍ॅसिडिटी आणि आंबट म्हणजे अ‍ॅसिडवालेच पदार्थ. मग कसं काय शमतं ते?

In reply to by बॅटमॅन

पैसा Fri, 12/19/2014 - 12:14
कसं ते म्हैत नै. पण आमसुलाचे पाणी/सरबत, लिंबू सरबत प्यायले तर पित्त्/अ‍ॅसिडिटी कमी होते खरे. डॉक्टर्/वैद्य लोकांनी कृपया प्रकाष पाडावा ही विनंती.

In reply to by पैसा

आयुर्हित Sat, 12/20/2014 - 06:52
अजून एक प्रकार: मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या कांबळे/घोंगडीवर झोपल्यानेही काहीजणांचा पित्ताचा त्रास गेलेला मी पाहिला आहे. अशाच प्रकारे भरपूर गोष्टी/ उपचार पद्धती पूर्वापार सुरु आहेत. याला wisdom (what they dont teach you in medical college) म्हणायला हरकत नाही!

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट गुरुवार, 12/18/2014 - 14:20
पैसा ताई, सविता००१, टका, प्यारे सगळ्यांचे धन्यवाद... आमसूल पाण्यात भिजवून सकाळी पिण्याचा उपाय चालू आहे सद्ध्या. आणि हो हा त्रास मला नाही. एका दुस-या व्यक्तीला आहे मी माहितीदाखल प्रश्न विचारला.

आयुर्हित Sun, 12/14/2014 - 14:18
सर्वप्रथम गोळ्या खाणे बंद करावे. आपण म्हणाल हा काय उपाय झाला? पण आता हा मार्ग अवलंबवावा लागला तर काय मार्ग उरतो ... त्या साठी व्य नि केलाय

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित Mon, 12/15/2014 - 11:44
एका धाग्याची लिंक, दुसऱ्या धाग्यातील संदर्भ भलत्याच (तिसऱ्या) धाग्यावर लिहिण्यापेक्षा मोठ्ठी विसंगती काय असु शकते? चालू द्या!
लेखनप्रकार
सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा सर्वत्र ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली. प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू - आपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे.

गोष्ट लग्नाची

भिंगरी ·

खटपट्या Sat, 09/13/2014 - 14:17
(थोडे विषयांतर) मुलीला नोकरी असो किंवा नसो पण मुलाला नोकरी पाहिजेच. हा हट्ट का ? नोकरी वाली मुले बिना नोकरी वाल्या सुशिक्षित मुलीशी लग्न करतातच ना. मग एखाद्या नोकरी वाल्या मुलीने एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराबरोबर का लग्न करू नये ? हि समानता कधी येणार. नोकरीवाल्या मुलीना आपल्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. इथे स्त्रिया स्वत:च स्वत:ला कमी लेखत नाहीत का ?

In reply to by खटपट्या

उपास Sun, 09/14/2014 - 12:02
हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सुशिक्षित बेरोजगार मुलगा पूर्णवेळ घरकामाची, मुलांची काळजी घेईल (उनाडपणा, सिगरेटी फुंकणे आणि इतर फालतू पुरुषी अहंकार बाजूला ठेवून.. नवर्‍याची नोकरी सुटलेय आणि घरातील बाई नोकरी सांभाळून घरी येऊन पोळ्या लाटतेय, मुलांकडे वघते आणि तिएचे सुशिक्षित बेरोजगार नवरोबा मित्रांबरोबर चकाट्या पिटतायत हे चित्र बरेचदा बघायला मिळतेच.. ;)

फुंटी Sun, 09/14/2014 - 17:10
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच घिस्यापिट्या गोष्टींवर चर्चा करत राहणार??? नातेसंबंध ही व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते ..आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे...

In reply to by फुंटी

रवीराज Mon, 09/15/2014 - 00:21
"आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे"... उलट मी तर असे म्हणेन की आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे सुटसुटीत झाले आहे.त्यात आपलेपणा येणे आवश्यक आहे...एकत्र कुटुंब पद्धत संपली, पति-पत्नी दोघे कमविते त्यामुळे संतति नियमन,झाले तर एखादेच तेही उशिरा, त्यात सांभाळणेसाठी वेळेचा अभाव- पाळणाघरांची संख्या वाढत आहे, जे संस्कार आजी-आजोबा द्यायचे त्यासाठी आता वर्ग चालू झाले, एखाद्या मोठ्या कार्यासाठी पुर्वी मित्र मंडळी मदतीला तत्पर असायची, आता कोणाची गरजच नाही- डेकोरेटर्स, केटरर्स, पॅकर्स न मुवर्स, काय नाही ते सर्व मिळते पैसे टाकुन, जग जवळ आले माणसं दुर गेली भावनिक गुंतागुंत कमी झाली, वृद्धाश्रमे वाढली. अजुन किती सुटसुटितपणा पाहिजे? ( नम्र विनंती- कोणी व्यक्तीगतरित्या घेऊ नये.)

In reply to by रवीराज

फुंटी Mon, 09/15/2014 - 12:47
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली भावनिक गुंतागुंत कमी झाली याबाबत दुमत नाहीच.तुम्हाला अपेक्षित सुटसुटीतपणा हाच असेल तर तेही मान्य... भावनिक गुंतागुंत कमी झालेली असली तरी गुंतण्याची भावनांची वृत्ती दिशाहीन भरकटत चाललीय .गुंतण्याची ठिकाण बदलली आहेत.सोशल नेट्वर्किंग चा मोठा प्रभाव भावजीवनावर पडला आहे.सोशल नेट्वर्किंग वर पोसलेली पिढी अजूनही या बाबत स्पष्ट विचार मांडू शकत नाही.गे,लेस्बियन रिलेशनशिप हे वास्तव होत आहे.वयाच्या तिशीनंतर /चाळीशीनंतर सोशल नेट्वर्किंग वापरणारी मंडळी या सगळ्यापासून काही प्रमाणात दूर आहे . तेव्हा समूहजीवन गुंतागुंतीचे झालंय हेही तेवढच सत्य आहे.

In reply to by कवितानागेश

फुंटी Mon, 09/15/2014 - 23:51
गुंतवणूक कमी होतेय >> हे नीटस समजल नाही. लग्न करण्यातली म्हणजे लग्नाच्या खर्चाबद्दल बोलताय का? कि तुमचा रोख निष्ठेकडे आहे?

In reply to by फुंटी

कवितानागेश Tue, 09/16/2014 - 00:26
खर्चाबद्दल नाही. भावनिक गुंतवणूक आणि परस्पर संबंधातली गुंतागुंत या बद्दल बोलतेय. हल्ली गुन्ता वाढलाय.

In reply to by कवितानागेश

फुंटी Tue, 09/16/2014 - 00:38
गुंता वाढला आहे .तरुणाई भावनिक द्विधा अवस्थेत सापडली आहे.एकीकडे आजूबाजूच्या माणसांकडून,कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि दुसरीकडे सोशल नेट्वर्किंग चा मारा ...कस वागलेल चालेल आणि कस नाही याबद्दल प्रत्येक घराचे अदृश्य संस्कार असतात,त्याच्याशी सोशल समूहजीवन कम्पेअर केल जात त्यातून मानवी स्वभाव बनत जातो.पुरेसा संवाद होत नाही.परिणामी गुंतागुंत वाढत जाते...सरसकट बोलण योग्य नाही कारण व्यक्तीनुसार अवस्था बदलतात.

In reply to by कवितानागेश

फुंटी Mon, 09/15/2014 - 12:34
लग्नाबद्दल फारशी उत्सुक नसलेली आजची पिढी आहे....जे काही उत्सुक असतात त्यांची उत्सुकता किती काळ टिकते हाही संशोधनाचा विषय आहे.

शिद Mon, 09/15/2014 - 02:47
२०११ ची गोष्ट असेल. माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन: १) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं. २) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. ३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम). ४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर). ५) अश्या बर्‍याच विचित्र मागण्या असण्यार्‍या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या. बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा. त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.

In reply to by शिद

खटपट्या Mon, 09/15/2014 - 09:10
अहो हे तर काहीच नाही. माझ्या एका मिपा मित्राला बघायला मुलीचे वडील येणार होते. मित्र घोडबंदर ला राहतो. मुलीच्या वडिलांनी स्टेशन ला रिक्षा पकडली आणि प्रवास चालू झाल्यावर लक्षात आले कि घोडबंदर स्टेशन पासून बरेच दूर आहे. याच कारणास्तव मुलाच्या घरी न जाता अर्ध्या वाटेतून परत फिरले. मुलगा बघायला आले होते कि घर ? ठीक आहे घर लांब असेल, मुलगा तर बघून घ्या. दादर परळ मध्ये राहणाऱ्या मुली तर ठाण्याच्या पुढचे स्थळ पहायला तयार नसतात. मी माझ्या चुलत भावाची लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. बोरीवलीला. मुलीच्या वडिलांनी विचारले कि तुम्ही कुठे राहता. मी सांगतिले कळव्याला राहतो. तर त्यांचे उद्गार "हो कळव्याला सुद्धा लोक राहायला लागले आहेत आज काल !!" असे वाटले होते कि लगेच उठून यावे. म्हणजे सेन्ट्रल ला जे राहतात ती माणसेच नाहीत.

In reply to by शिद

काळा पहाड Tue, 09/16/2014 - 00:43
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या फक्त प्रॉबॅशन बेसिस वर लग्न करायचा विचार आहे. पर्फोर्मन्स पाहून पर्मनंट लग्नाचा विचार करण्या येईल.

हरकाम्या Mon, 09/15/2014 - 23:55
मी "शिद " व "खटपट्या " यान्च्या मताशी सहमत आहे. मी सध्या माझ्या मुलासाठी वधुसन्शोधन करीत आहे मला तर फार विचित्र अनुभव येत आहेत. १) आपण मुलीच्या वडिलांना स्वत फोन केल्यास त्यांनी मरगळलेल्या आवाजात उत्तर देणे. २) फोन केल्यानन्तर आपण वरावर उपकार करतो आहोत या भावनेने उत्तरे देणे ३) मुलगी १० वी पास असली तरी तिला ४०,०००रु. पगाराचा नवरा पाहिजे. ४) मुलीच्या आईने विचारणे " लग्नानन्तर मुलगा व मुलगी वेगळे रहातील का? ५) हा शेवटचा अनुभव भयानक होता. मी मुलीच्या वडीलांना फोन केला. त्यांनी सांगितले मी सध्या गाडी चालवतोय १० मिनिटांनी फोन करा मी १५ मिनिटांनी फोन करुन माझ्या मुलाची व घराची सर्व माहिती दिली व विचारले की तुमच्या जावयासम्बम्धी काय अपेक्षा आहेत ? पलीकडुन उत्तर आले " आम्हाला आमचा जावयी "Don " पाहिजे. मला वाटले हे फार विनोदी दिसतात. म्हणुन मी परत विचारले म्हणजे नेमके काय ? त्या माणसाने ग्राम्य भाशेत शिवी देउन विचारले " तुला दाऊद ईब्राहिम " माहित नाही कारे **** ?. त्याने उच्चारलेले शब्द येथे लिहिण्यासारखे नाहीत. त्या दिवसानन्तर मी ५/६ दिवस बेचैन होतो. मला फोन वाजला तरी फोन उचलण्याची भीती वाटत होती. आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.

In reply to by फुंटी

मी तर म्हणेन अश्या माणसांची बिनपाण्याने हजामत करावी आणि आपल्या मुलाचे लग्न अश्या घरातल्या मुलीशी होण्याची आपत्ती टळली म्हणून खूषीत पार्टी करावी... जमल्यास याच कारणासाठी पार्टी केली होती हे त्यांनाही सांगावे.

In reply to by हरकाम्या

काळा पहाड Tue, 09/16/2014 - 00:37
आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.
याच्या उत्तरासाठी एक विनोदी ऑडियो (व्हाट्सअ‍ॅप वर आलेला) अपलोड करायचा होता. कसा करावा?

In reply to by हरकाम्या

रेवती Tue, 09/16/2014 - 19:16
पूर्वी असे आणि याहून वाईट अनुभव मुलीकडल्यांना सर्रास यायचे (अजूनही लहान गावांमध्ये येतात). आता समानतेचा जमाना आल्याने मुलांनाही येतात. बरे झाले तुम्ही सुटलात. पाच सहा दिवसांची बेचैनी परवडली, नंतरची उस्तवारी करण्यापेक्षा! अशा लोकांचा यथायोग्य सत्कार करायला हवा. कसला अनुभव आहे! श्श्या!

In reply to by हरकाम्या

साती Sat, 09/20/2014 - 19:48
बहुते़क तुमचा एकाच माणसाला दोनदा राँग नंबर लागला असेल. तो तुम्हाला पकवत असेल.

कवितानागेश Tue, 09/16/2014 - 00:33
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे. उगीच भलत्या ठिकाणी आपण सिन्सिअरली आपली माहिती सांगत बसणं धोक्याचं आहे. त्यातून तिथे माहिती म्हणून जे काही लिहितात ते, इतके त्रोटक असतं, म्हणजे रंग, उन्ची, डिग्री, पगार इतकाच लिमिटेड माणूस कळतो. एका मंडळात ४ इन्च रुन्दीचे आणि १० इन्च लांबीची वही पाहिलिये, त्यात एका पानावर एका व्यक्तीची अशीच त्रोटक, अर्धवट माहिती लिहिलेली असते. काही मंडळांमध्ये मात्र ५-५ पानी फॉर्म्स पाहिलेत.

तिमा Tue, 09/16/2014 - 16:24
आधी परिचय नसेल तर लग्न ही १००ट्क्के लॉटरी आहे.

In reply to by तिमा

प्रभाकर पेठकर Tue, 09/16/2014 - 21:21
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. (आणि 'ती (लॉटरी) नेहमी दुसर्‍यालाच लागली आहे' असे जन्मभर वाटत राहते).

In reply to by प्रभाकर पेठकर

विलासराव Sat, 09/20/2014 - 15:53
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. जुगार आवडत नाही म्हणुनच आपण खेळ्लो नाही बॉ.

इस्लाममधील विवाहसंस्था ही हिंदु (आणि हिंदु विवाहकायद्याखाली येणार्‍या इतरधर्मातील) विवाह संस्थांपेक्षा कैकपटीने चांगली आहे असे आमचे एक स्पष्ट मत आहे . :)

खबो जाप Sat, 09/20/2014 - 14:44
माझे काही अनुभव ( मी स्वत BE telecom , पगार ५५ ह. नोकरी चेन्नई मध्ये, घरकामात जमेल तशी मदत करायला तयार ) १ . मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी म्हंटले लहान असताना शेतीकाम केले आहे, गेली १० वर्ष शिक्षण/नोकरी साठी बाहेर आहे त्यामुळे मला स्वताला काही ज्यास्त कळत नाही आणि मी काही मागणार नाही. तुमच्या मुलीला शेतीतले काय काय येते, किंमान बांधावर उभारून काय चालू आहे ते पाहता येईल काय -- मुलगीला काही माहित नाही / येत नाही. २ मुलगी (BE सिविल ) - लग्नानंतर वेगळे राहावे लागेल,पुण्यातच नोकरी शोधून शिफ्ट व्हावे. नोकरी करायची इच्छा नाही. ३ मुलगी ( BE इलेक्ट्रिक नुकतीच पूर्ण ) - आईचा प्रश्न माझी मुलगी खूप मोडर्ण आहे, तीचे खूप बॉय फ्रेंड्स आहेत ( त्यांना ऑफिस मधले पुरुष सहकारी म्हणायचे होते ), त्यांचे फोन सुट्टीच्या/सणाच्या दिवशी वेगेरे येतात त्याला आक्षेप नसावा , खरेतर त्यांना आपण किती मोडर्ण आहोत ते सांगायचे होते. आणखी सेम; वेगळे राहावे लागेल, पुण्यात नोकरी ४. मुलगी (BE सिविल इन्तेरेरिअर देकॉरेतर ) नोकरी करायची इच्छा नाही.माझ्याबद्दल काहीच विचारले नाही पण आमचे हे पाहुणे आमदारांचे पीए आहेत दुसरे पाहुणे संचालक आहेत … नुसता वैताग …। ५ मुलगी ( MBA मुंबई मध्ये नोकरी ) - सगळे मान्य, होकार सांगितला , नंतर अचानक मुलगा चेन्नई मध्ये आहे , पुण्यात किव्हा मुंबई मध्ये शिफ्ट होत असेल तर लग्न करू असा निरोप पाठवला, आयला नोकरी बदलन काय खाऊ आहे … कमीत कमी ८-१० महिने तर लागतात पण लगेच पाहिजे एकीने तर कहरच केला स्वतः MBA, नोकरी करायची नाही पण, onsite जातो तर फक्त US वालीच onsite घ्यायची आणि स्वतःला पण बरोबर घेवून जाव लागेल अशी अट दुसरी US मध्ये कायमचा सेटल मुलगा पाहिजे पण स्वतः डिप्लोमा धारक.

In reply to by खबो जाप

विलासराव Sat, 09/20/2014 - 16:26
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी नुकतीच माझ्या चुलतभावासाठी पंढरपुरजवळ एक मुलगी पाहिली. मुलगी बीफार्मच्या तिसर्या वर्षाला. वडील नाहीत. थोडीशी शेती आहे, दोन लहान भाउ आहेत्,मोठ्या बहिनीचे लग्न झाले आहे. शिक्षणाची फी मामा लोक भरतात. घर अगदी साधं पण मुलगी सुंदर. माझा भाउ आठवी पास, दिसायला बरा, गावी त्यानेच घर बांधलेय, जमीन अडीच एकर, बहीणी दोन मोठ्या लग्न झालेल्या. आई-वडील गावी. हा माझ्याबरोबर लालबागला रहातो. स्वकमाईची विक्रोळीला चाळीत रुम आहे, खारघरला प्लॅट घ्यायचा आहे ( सगळी तयारी झालीय, लोण फक्त १५ लाख घेणार), कमाई ७५ के. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय आहे.कुठलेही व्यसन नाही, कामाचे सोडुन. आम्ही जाउन मुलगी पाहीली. मी लगेच होकार सांगीतला, कारण मध्यस्थी माझा मित्र आहे. नंतर महिन्याने ते लोक आमच्या गावी जाउन आले. पसंत आहे असेही सांगीतले. पण परत काय फोन नाही २ महीने झाले. मध्यस्थीही मौन बाळगुन आहे. त्याला म्हणालो की बाबारे त्यांचा नकार असेल तर तसे सांग , कारणही सांगण्याची गरज नाही. पण तो म्हणतो मी त्यांना विचारले १-२ दा, आता आपण वाट पाहु. आता आणखी किती वाट पहायची. मुलाचे वय २७ आहे. मी नकार धरुनच चाल्लोय. त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही माहीती हवी ती देतो, कागदपत्रे दाखवतो.आता काय करावे ते सुचवा. भावाला सांगीतले की बाबा दहा वर्षापासुन इतके ऑफीसमधे फिरतोस साल्या तुला एक पोरगी पटवता येउ नये. पोरगी तु पटव बाकी लग्न मी लावुन देतो. त्याला काही जमेना बुवा. कालच आमच्या ब्राझीलच्या मैत्रीणिला हे सांगीतले तर ती म्हणाली त्याला ब्राझीलला पाठवुन दे , मी एकच काय दोन मुली पाहुन लग्न लावुन परत भारतात पाठवुन देते. खरोखर दिलेली माहीती पुर्ण खरी आहे, मिपावर देखील कोणी याच्यासाठी मुलगी सुचवेल तर माझी काहीच हरकत नाही. मुलीला मुंबईत रहावे लागेल. नोकरी केली तरी चालेल, नसेल तर त्याच्याच व्यवसायात घरुन / ऑफीसला येउन हातभार लावु शकेल.मुलगी स्वभावने चांगली(मनमीळावु) असावी. रजीस्टर लगन केले तर बरे पडेल. देण्याघेण्याची भानगड नाही. या निमीत्ताने मिपावर स्वयंवरही होउन जाउद्या मग. अट एकच ईथे जमले तर सगळ्या मिपाकरांनी कुठलेही कारण न सांगता लग्नाला यायच बरं का.

भिंगरी Sat, 09/20/2014 - 15:42
माझ्या मुलाच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्या आधी तो मुलीला घरच्यांच्या परवानगीने हॉटेलमध्ये भेटला. जाताना हाफ टी शर्ट घालुन गेला होता. कारण त्याच्या अंगावर खुपच केस आहेत्.आणि त्याने हे लपवले नाही.त्यानंतर साधारण २५ दिवसांनी साखरपुडा झाला. मात्र साखरपुडा झाल्यानंतर १५/२० दिवसांनी मुलीने नकार दिला.मुलाकडच्यांनी तिला व तिच्या घरच्यांना विचार करायला काही दिवसांची मुदतही दिली पण मुलीने ठामपणे नाही सांगीतले. कारण एकच, मुलाच्या अंगावर केस आहेत. आधी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती का? मुलगा बिचारा अतिशय भोळा आहे. तिच्या घरच्यांनी मुलाच्या घरी साखरपुड्यात दिलेल्या वस्तू आणून दिल्यापासुन मुलाच्या आईचा रक्तदाब वाढला आहे.

In reply to by भिंगरी

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 16:00
मुलीनं आपल्या पार्लरच्या खर्चात नवर्‍याच्या खर्चाचं शेअरींग करावं लागेल असा दूर विचार केला असावा. किंवा तिच्या लक्षात कुणी आणून दिलं असावं. होत्ताय होत्ताय! साखरपुड्यातल्या वस्तू परत दिल्यानं आईचा रक्तदाब नॉर्मलला यायला हरकत नव्हती. नाहीतर लग्न नाही ते नाही आणि वस्तूही लंपास असं बर्‍याचदा दिसतं. बाकी 'बिचारा अतिशय भोळा असणं' मुलाकडून नकार गेल्यानंतर (वाक्याचं) लिंग बदलून मुलीकडं गेलं असतं हे नक्की. :)

माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा ऐका. मुलगी पुण्यातल्या एका नावाजलेल्या ईंजिनिअरींग कॉलेजमधे प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे आणि पी.एच.डी. करतीये आता. तिला पाहायला आलेला आलेला मुलगा फक्त डिप्लोमा झालेला, फक्त ९६ ९६ च्या आग्रहापाई तिनी त्याला बघायला होकार दिला. ह्या बाबाजीच्या मागण्या काय तर म्हणे लग्नानंतर नोकरी आणि शिक्षण बंद करायच. लग्नानंतर ४ वर्षाच्या आत २ बाळं हवीत (असेंब्ली लाईन आहे का ती? च्यायला, पाहण्याच्या कार्यक्रमात अश्या मागण्या कोण करत?). वरुन हुंडा-करणी-मानपानाच्या मागण्या. ह्या मुलीनी शिस्तीत उभं राहुन नकार दिला. =))

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 17:15
@ रेवाक्का/ आज्जी, कुठंय तुमचं वधू वर सूचक मंडळ? च्यामारी एवढा 'खप' आहे तरी तुम्ही मागेच? मराठी माणसाला मार्केटींग करता येत नाही हेच खरं :-/

फुंटी Mon, 09/22/2014 - 16:09
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत अक्कल नसलेला मेंदू असतो असे माझे स्पष्ट मत आहे .आपल्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे याचा त्या अंदाज घेत असतात.'नवरा'या कल्पनेच्या विस्तारातून अवास्तव अपेक्षा वाढत जातात ...काहीठिकाणी त्या भलत्याच करमणूक करणाऱ्या असतात...त्यानुसार त्यांचे होकार नकार ठरत असतात.मुंबईत घर असणार स्थळ ,अपडाऊन ला सोयीच स्थळ , किमान ५०००० च्या वर पगार असलेल स्थळ,असल्या भौतिक सुखाच्या मागण्या असलेल्या पोरी काय कप्पाळ संसार करणार? त्यात हल्ली मुलीसोबत तिचे बेस्ट फ्रेंड (ती बिचारी बेस्ट फ्रेंड समजत असते.पुरुष स्त्रीशी आकर्षण विरहित बेस्ट फ्रेन्डशिप करू शकत नाही हेही माझ स्पष्ट मत.. ) वगैरे कोम्प्लीमेंटरी मिळतात ते वेगळे ... " भारतीय लग्नसंस्थेचा पाया प्रेम ,विश्वास या त्यागाच्या मुल्यांकडून भौतिक सुखांकडे सरकताना दिसतो आहे.हे लग्न्संस्थेच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे." हे मीच म्हटलेलं आहे....

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 12:30
तो मुलगी बघायला गेल्यावर प्रश्नोत्तरात ह्यानी तिला १०० प्रश्न विचारले. तिने फक्त ह्याला "तूला आईसक्रिम आवडतं का?" हा एकच प्रश्न विचारला आणि त्याचा होकार आल्यावर हिने लगेच होकार दिला. ट्चवूड अजून तरी ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

असंका Fri, 09/26/2014 - 13:39
मुलाने काय एवढे भारी प्रश्न विचारले , की त्या मुलीला काही प्रश्न न विचारताच त्या मुलाबद्द्ल सगळी आवश्यक माहिती मिळाली?

In reply to by असंका

"मुलगा फारच प्रश्नाळू (१०० प्रश्न ? बापरे !) आहे पण त्याला आवडणारी उत्तरे आपणे देऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडे आयस्क्रिम खावू घालण्याइतके पैसे आहेत आणि ते खाण्याची त्याला आवडही आहे." इतके मूलभूत ज्ञान झाल्यावर मुलीच्या अजून काही अपेक्षा उरल्या नसाव्या असा अंदाज आहे... ते सुखाने नांदतात यावरून तो अंदाज बरोबर आहे असेच दिसते.

किसन शिंदे Tue, 09/23/2014 - 21:29
लग्न करण्यासाठी आजकाल मुलींच्या मागण्या खूप वाढतच चालल्या आहेत याच्याशी मात्र १००% सहमत. बहुतेक ठिकाणी घरातल्या आई-वडीलांची विचारसरणी किंवा समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही मुलीच्या होकार किंवा नकारासाठी अवलंबून असतो हे आता अनुभवातून कळालंय. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून मेहूणीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू आहे. दोनदा 'मुलगा' दाखवूनही मी स्वत: तोंडावर पडलो आहे, कारण यांच्या(मेहूणीच्या आणि सासूच्या) अवास्तव अपेक्षा. शेवटी मेहूणीसाठी वरसंशोधन करण्याचा नाद कंटाळून सोडून दिलाय आता.

In reply to by किसन शिंदे

फुंटी Wed, 09/24/2014 - 23:14
मुलींना आई वडिलांच्या घरापेक्षा २ पावलं पुढे असलेलच सासर हव असत.स्वातंत्र्य, पैसा ,स्पेस वगैरे हवी असते हो आजकाल...आणि त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी ...म्यारेज इज अ डील ...

In reply to by फुंटी

सूड गुरुवार, 09/25/2014 - 14:42
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी लग्न करायचंच नाही असं ठरवायचं? जमणार आहे? नाही ना, मग आल्या प्रसंगा सामोरे जावे, कसें?

In reply to by फुंटी

सूड Wed, 09/24/2014 - 23:27
आमच्या आधीच्या पिढीतल्या बायकांनीही संसार केले. अगदी घर, मुलंबाळं, नोकर्‍या सांभाळून!! आधीच्या काळात घेत असतील हुंडा, लेखत असतील मुलींना कमी, पण आता आलेली आर्थिक सक्षमता, स्वावलंबन ह्यामुळे आधी मुलींना जशी वागणूक दिली तशीच मुलीचे आईवडिल मुलांना देत असतील तर साफ चूक आहे.

In reply to by सूड

कवितानागेश गुरुवार, 09/25/2014 - 21:27
बरीच वर्षे एका बाजूला असलेला लंबक आता दुसर्‍या बाजूला गेलाय... मध्य गाठायला वेळ लागणारच. तोपर्यंत सगळेच भरडले जाणार.

खटपट्या Sat, 09/13/2014 - 14:17
(थोडे विषयांतर) मुलीला नोकरी असो किंवा नसो पण मुलाला नोकरी पाहिजेच. हा हट्ट का ? नोकरी वाली मुले बिना नोकरी वाल्या सुशिक्षित मुलीशी लग्न करतातच ना. मग एखाद्या नोकरी वाल्या मुलीने एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराबरोबर का लग्न करू नये ? हि समानता कधी येणार. नोकरीवाल्या मुलीना आपल्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. इथे स्त्रिया स्वत:च स्वत:ला कमी लेखत नाहीत का ?

In reply to by खटपट्या

उपास Sun, 09/14/2014 - 12:02
हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सुशिक्षित बेरोजगार मुलगा पूर्णवेळ घरकामाची, मुलांची काळजी घेईल (उनाडपणा, सिगरेटी फुंकणे आणि इतर फालतू पुरुषी अहंकार बाजूला ठेवून.. नवर्‍याची नोकरी सुटलेय आणि घरातील बाई नोकरी सांभाळून घरी येऊन पोळ्या लाटतेय, मुलांकडे वघते आणि तिएचे सुशिक्षित बेरोजगार नवरोबा मित्रांबरोबर चकाट्या पिटतायत हे चित्र बरेचदा बघायला मिळतेच.. ;)

फुंटी Sun, 09/14/2014 - 17:10
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच घिस्यापिट्या गोष्टींवर चर्चा करत राहणार??? नातेसंबंध ही व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते ..आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे...

In reply to by फुंटी

रवीराज Mon, 09/15/2014 - 00:21
"आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे"... उलट मी तर असे म्हणेन की आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे सुटसुटीत झाले आहे.त्यात आपलेपणा येणे आवश्यक आहे...एकत्र कुटुंब पद्धत संपली, पति-पत्नी दोघे कमविते त्यामुळे संतति नियमन,झाले तर एखादेच तेही उशिरा, त्यात सांभाळणेसाठी वेळेचा अभाव- पाळणाघरांची संख्या वाढत आहे, जे संस्कार आजी-आजोबा द्यायचे त्यासाठी आता वर्ग चालू झाले, एखाद्या मोठ्या कार्यासाठी पुर्वी मित्र मंडळी मदतीला तत्पर असायची, आता कोणाची गरजच नाही- डेकोरेटर्स, केटरर्स, पॅकर्स न मुवर्स, काय नाही ते सर्व मिळते पैसे टाकुन, जग जवळ आले माणसं दुर गेली भावनिक गुंतागुंत कमी झाली, वृद्धाश्रमे वाढली. अजुन किती सुटसुटितपणा पाहिजे? ( नम्र विनंती- कोणी व्यक्तीगतरित्या घेऊ नये.)

In reply to by रवीराज

फुंटी Mon, 09/15/2014 - 12:47
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली भावनिक गुंतागुंत कमी झाली याबाबत दुमत नाहीच.तुम्हाला अपेक्षित सुटसुटीतपणा हाच असेल तर तेही मान्य... भावनिक गुंतागुंत कमी झालेली असली तरी गुंतण्याची भावनांची वृत्ती दिशाहीन भरकटत चाललीय .गुंतण्याची ठिकाण बदलली आहेत.सोशल नेट्वर्किंग चा मोठा प्रभाव भावजीवनावर पडला आहे.सोशल नेट्वर्किंग वर पोसलेली पिढी अजूनही या बाबत स्पष्ट विचार मांडू शकत नाही.गे,लेस्बियन रिलेशनशिप हे वास्तव होत आहे.वयाच्या तिशीनंतर /चाळीशीनंतर सोशल नेट्वर्किंग वापरणारी मंडळी या सगळ्यापासून काही प्रमाणात दूर आहे . तेव्हा समूहजीवन गुंतागुंतीचे झालंय हेही तेवढच सत्य आहे.

In reply to by कवितानागेश

फुंटी Mon, 09/15/2014 - 23:51
गुंतवणूक कमी होतेय >> हे नीटस समजल नाही. लग्न करण्यातली म्हणजे लग्नाच्या खर्चाबद्दल बोलताय का? कि तुमचा रोख निष्ठेकडे आहे?

In reply to by फुंटी

कवितानागेश Tue, 09/16/2014 - 00:26
खर्चाबद्दल नाही. भावनिक गुंतवणूक आणि परस्पर संबंधातली गुंतागुंत या बद्दल बोलतेय. हल्ली गुन्ता वाढलाय.

In reply to by कवितानागेश

फुंटी Tue, 09/16/2014 - 00:38
गुंता वाढला आहे .तरुणाई भावनिक द्विधा अवस्थेत सापडली आहे.एकीकडे आजूबाजूच्या माणसांकडून,कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि दुसरीकडे सोशल नेट्वर्किंग चा मारा ...कस वागलेल चालेल आणि कस नाही याबद्दल प्रत्येक घराचे अदृश्य संस्कार असतात,त्याच्याशी सोशल समूहजीवन कम्पेअर केल जात त्यातून मानवी स्वभाव बनत जातो.पुरेसा संवाद होत नाही.परिणामी गुंतागुंत वाढत जाते...सरसकट बोलण योग्य नाही कारण व्यक्तीनुसार अवस्था बदलतात.

In reply to by कवितानागेश

फुंटी Mon, 09/15/2014 - 12:34
लग्नाबद्दल फारशी उत्सुक नसलेली आजची पिढी आहे....जे काही उत्सुक असतात त्यांची उत्सुकता किती काळ टिकते हाही संशोधनाचा विषय आहे.

शिद Mon, 09/15/2014 - 02:47
२०११ ची गोष्ट असेल. माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन: १) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं. २) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. ३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम). ४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर). ५) अश्या बर्‍याच विचित्र मागण्या असण्यार्‍या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या. बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा. त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.

In reply to by शिद

खटपट्या Mon, 09/15/2014 - 09:10
अहो हे तर काहीच नाही. माझ्या एका मिपा मित्राला बघायला मुलीचे वडील येणार होते. मित्र घोडबंदर ला राहतो. मुलीच्या वडिलांनी स्टेशन ला रिक्षा पकडली आणि प्रवास चालू झाल्यावर लक्षात आले कि घोडबंदर स्टेशन पासून बरेच दूर आहे. याच कारणास्तव मुलाच्या घरी न जाता अर्ध्या वाटेतून परत फिरले. मुलगा बघायला आले होते कि घर ? ठीक आहे घर लांब असेल, मुलगा तर बघून घ्या. दादर परळ मध्ये राहणाऱ्या मुली तर ठाण्याच्या पुढचे स्थळ पहायला तयार नसतात. मी माझ्या चुलत भावाची लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. बोरीवलीला. मुलीच्या वडिलांनी विचारले कि तुम्ही कुठे राहता. मी सांगतिले कळव्याला राहतो. तर त्यांचे उद्गार "हो कळव्याला सुद्धा लोक राहायला लागले आहेत आज काल !!" असे वाटले होते कि लगेच उठून यावे. म्हणजे सेन्ट्रल ला जे राहतात ती माणसेच नाहीत.

In reply to by शिद

काळा पहाड Tue, 09/16/2014 - 00:43
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या फक्त प्रॉबॅशन बेसिस वर लग्न करायचा विचार आहे. पर्फोर्मन्स पाहून पर्मनंट लग्नाचा विचार करण्या येईल.

हरकाम्या Mon, 09/15/2014 - 23:55
मी "शिद " व "खटपट्या " यान्च्या मताशी सहमत आहे. मी सध्या माझ्या मुलासाठी वधुसन्शोधन करीत आहे मला तर फार विचित्र अनुभव येत आहेत. १) आपण मुलीच्या वडिलांना स्वत फोन केल्यास त्यांनी मरगळलेल्या आवाजात उत्तर देणे. २) फोन केल्यानन्तर आपण वरावर उपकार करतो आहोत या भावनेने उत्तरे देणे ३) मुलगी १० वी पास असली तरी तिला ४०,०००रु. पगाराचा नवरा पाहिजे. ४) मुलीच्या आईने विचारणे " लग्नानन्तर मुलगा व मुलगी वेगळे रहातील का? ५) हा शेवटचा अनुभव भयानक होता. मी मुलीच्या वडीलांना फोन केला. त्यांनी सांगितले मी सध्या गाडी चालवतोय १० मिनिटांनी फोन करा मी १५ मिनिटांनी फोन करुन माझ्या मुलाची व घराची सर्व माहिती दिली व विचारले की तुमच्या जावयासम्बम्धी काय अपेक्षा आहेत ? पलीकडुन उत्तर आले " आम्हाला आमचा जावयी "Don " पाहिजे. मला वाटले हे फार विनोदी दिसतात. म्हणुन मी परत विचारले म्हणजे नेमके काय ? त्या माणसाने ग्राम्य भाशेत शिवी देउन विचारले " तुला दाऊद ईब्राहिम " माहित नाही कारे **** ?. त्याने उच्चारलेले शब्द येथे लिहिण्यासारखे नाहीत. त्या दिवसानन्तर मी ५/६ दिवस बेचैन होतो. मला फोन वाजला तरी फोन उचलण्याची भीती वाटत होती. आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.

In reply to by फुंटी

मी तर म्हणेन अश्या माणसांची बिनपाण्याने हजामत करावी आणि आपल्या मुलाचे लग्न अश्या घरातल्या मुलीशी होण्याची आपत्ती टळली म्हणून खूषीत पार्टी करावी... जमल्यास याच कारणासाठी पार्टी केली होती हे त्यांनाही सांगावे.

In reply to by हरकाम्या

काळा पहाड Tue, 09/16/2014 - 00:37
आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.
याच्या उत्तरासाठी एक विनोदी ऑडियो (व्हाट्सअ‍ॅप वर आलेला) अपलोड करायचा होता. कसा करावा?

In reply to by हरकाम्या

रेवती Tue, 09/16/2014 - 19:16
पूर्वी असे आणि याहून वाईट अनुभव मुलीकडल्यांना सर्रास यायचे (अजूनही लहान गावांमध्ये येतात). आता समानतेचा जमाना आल्याने मुलांनाही येतात. बरे झाले तुम्ही सुटलात. पाच सहा दिवसांची बेचैनी परवडली, नंतरची उस्तवारी करण्यापेक्षा! अशा लोकांचा यथायोग्य सत्कार करायला हवा. कसला अनुभव आहे! श्श्या!

In reply to by हरकाम्या

साती Sat, 09/20/2014 - 19:48
बहुते़क तुमचा एकाच माणसाला दोनदा राँग नंबर लागला असेल. तो तुम्हाला पकवत असेल.

कवितानागेश Tue, 09/16/2014 - 00:33
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे. उगीच भलत्या ठिकाणी आपण सिन्सिअरली आपली माहिती सांगत बसणं धोक्याचं आहे. त्यातून तिथे माहिती म्हणून जे काही लिहितात ते, इतके त्रोटक असतं, म्हणजे रंग, उन्ची, डिग्री, पगार इतकाच लिमिटेड माणूस कळतो. एका मंडळात ४ इन्च रुन्दीचे आणि १० इन्च लांबीची वही पाहिलिये, त्यात एका पानावर एका व्यक्तीची अशीच त्रोटक, अर्धवट माहिती लिहिलेली असते. काही मंडळांमध्ये मात्र ५-५ पानी फॉर्म्स पाहिलेत.

तिमा Tue, 09/16/2014 - 16:24
आधी परिचय नसेल तर लग्न ही १००ट्क्के लॉटरी आहे.

In reply to by तिमा

प्रभाकर पेठकर Tue, 09/16/2014 - 21:21
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. (आणि 'ती (लॉटरी) नेहमी दुसर्‍यालाच लागली आहे' असे जन्मभर वाटत राहते).

In reply to by प्रभाकर पेठकर

विलासराव Sat, 09/20/2014 - 15:53
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. जुगार आवडत नाही म्हणुनच आपण खेळ्लो नाही बॉ.

इस्लाममधील विवाहसंस्था ही हिंदु (आणि हिंदु विवाहकायद्याखाली येणार्‍या इतरधर्मातील) विवाह संस्थांपेक्षा कैकपटीने चांगली आहे असे आमचे एक स्पष्ट मत आहे . :)

खबो जाप Sat, 09/20/2014 - 14:44
माझे काही अनुभव ( मी स्वत BE telecom , पगार ५५ ह. नोकरी चेन्नई मध्ये, घरकामात जमेल तशी मदत करायला तयार ) १ . मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी म्हंटले लहान असताना शेतीकाम केले आहे, गेली १० वर्ष शिक्षण/नोकरी साठी बाहेर आहे त्यामुळे मला स्वताला काही ज्यास्त कळत नाही आणि मी काही मागणार नाही. तुमच्या मुलीला शेतीतले काय काय येते, किंमान बांधावर उभारून काय चालू आहे ते पाहता येईल काय -- मुलगीला काही माहित नाही / येत नाही. २ मुलगी (BE सिविल ) - लग्नानंतर वेगळे राहावे लागेल,पुण्यातच नोकरी शोधून शिफ्ट व्हावे. नोकरी करायची इच्छा नाही. ३ मुलगी ( BE इलेक्ट्रिक नुकतीच पूर्ण ) - आईचा प्रश्न माझी मुलगी खूप मोडर्ण आहे, तीचे खूप बॉय फ्रेंड्स आहेत ( त्यांना ऑफिस मधले पुरुष सहकारी म्हणायचे होते ), त्यांचे फोन सुट्टीच्या/सणाच्या दिवशी वेगेरे येतात त्याला आक्षेप नसावा , खरेतर त्यांना आपण किती मोडर्ण आहोत ते सांगायचे होते. आणखी सेम; वेगळे राहावे लागेल, पुण्यात नोकरी ४. मुलगी (BE सिविल इन्तेरेरिअर देकॉरेतर ) नोकरी करायची इच्छा नाही.माझ्याबद्दल काहीच विचारले नाही पण आमचे हे पाहुणे आमदारांचे पीए आहेत दुसरे पाहुणे संचालक आहेत … नुसता वैताग …। ५ मुलगी ( MBA मुंबई मध्ये नोकरी ) - सगळे मान्य, होकार सांगितला , नंतर अचानक मुलगा चेन्नई मध्ये आहे , पुण्यात किव्हा मुंबई मध्ये शिफ्ट होत असेल तर लग्न करू असा निरोप पाठवला, आयला नोकरी बदलन काय खाऊ आहे … कमीत कमी ८-१० महिने तर लागतात पण लगेच पाहिजे एकीने तर कहरच केला स्वतः MBA, नोकरी करायची नाही पण, onsite जातो तर फक्त US वालीच onsite घ्यायची आणि स्वतःला पण बरोबर घेवून जाव लागेल अशी अट दुसरी US मध्ये कायमचा सेटल मुलगा पाहिजे पण स्वतः डिप्लोमा धारक.

In reply to by खबो जाप

विलासराव Sat, 09/20/2014 - 16:26
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी नुकतीच माझ्या चुलतभावासाठी पंढरपुरजवळ एक मुलगी पाहिली. मुलगी बीफार्मच्या तिसर्या वर्षाला. वडील नाहीत. थोडीशी शेती आहे, दोन लहान भाउ आहेत्,मोठ्या बहिनीचे लग्न झाले आहे. शिक्षणाची फी मामा लोक भरतात. घर अगदी साधं पण मुलगी सुंदर. माझा भाउ आठवी पास, दिसायला बरा, गावी त्यानेच घर बांधलेय, जमीन अडीच एकर, बहीणी दोन मोठ्या लग्न झालेल्या. आई-वडील गावी. हा माझ्याबरोबर लालबागला रहातो. स्वकमाईची विक्रोळीला चाळीत रुम आहे, खारघरला प्लॅट घ्यायचा आहे ( सगळी तयारी झालीय, लोण फक्त १५ लाख घेणार), कमाई ७५ के. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय आहे.कुठलेही व्यसन नाही, कामाचे सोडुन. आम्ही जाउन मुलगी पाहीली. मी लगेच होकार सांगीतला, कारण मध्यस्थी माझा मित्र आहे. नंतर महिन्याने ते लोक आमच्या गावी जाउन आले. पसंत आहे असेही सांगीतले. पण परत काय फोन नाही २ महीने झाले. मध्यस्थीही मौन बाळगुन आहे. त्याला म्हणालो की बाबारे त्यांचा नकार असेल तर तसे सांग , कारणही सांगण्याची गरज नाही. पण तो म्हणतो मी त्यांना विचारले १-२ दा, आता आपण वाट पाहु. आता आणखी किती वाट पहायची. मुलाचे वय २७ आहे. मी नकार धरुनच चाल्लोय. त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही माहीती हवी ती देतो, कागदपत्रे दाखवतो.आता काय करावे ते सुचवा. भावाला सांगीतले की बाबा दहा वर्षापासुन इतके ऑफीसमधे फिरतोस साल्या तुला एक पोरगी पटवता येउ नये. पोरगी तु पटव बाकी लग्न मी लावुन देतो. त्याला काही जमेना बुवा. कालच आमच्या ब्राझीलच्या मैत्रीणिला हे सांगीतले तर ती म्हणाली त्याला ब्राझीलला पाठवुन दे , मी एकच काय दोन मुली पाहुन लग्न लावुन परत भारतात पाठवुन देते. खरोखर दिलेली माहीती पुर्ण खरी आहे, मिपावर देखील कोणी याच्यासाठी मुलगी सुचवेल तर माझी काहीच हरकत नाही. मुलीला मुंबईत रहावे लागेल. नोकरी केली तरी चालेल, नसेल तर त्याच्याच व्यवसायात घरुन / ऑफीसला येउन हातभार लावु शकेल.मुलगी स्वभावने चांगली(मनमीळावु) असावी. रजीस्टर लगन केले तर बरे पडेल. देण्याघेण्याची भानगड नाही. या निमीत्ताने मिपावर स्वयंवरही होउन जाउद्या मग. अट एकच ईथे जमले तर सगळ्या मिपाकरांनी कुठलेही कारण न सांगता लग्नाला यायच बरं का.

भिंगरी Sat, 09/20/2014 - 15:42
माझ्या मुलाच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्या आधी तो मुलीला घरच्यांच्या परवानगीने हॉटेलमध्ये भेटला. जाताना हाफ टी शर्ट घालुन गेला होता. कारण त्याच्या अंगावर खुपच केस आहेत्.आणि त्याने हे लपवले नाही.त्यानंतर साधारण २५ दिवसांनी साखरपुडा झाला. मात्र साखरपुडा झाल्यानंतर १५/२० दिवसांनी मुलीने नकार दिला.मुलाकडच्यांनी तिला व तिच्या घरच्यांना विचार करायला काही दिवसांची मुदतही दिली पण मुलीने ठामपणे नाही सांगीतले. कारण एकच, मुलाच्या अंगावर केस आहेत. आधी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती का? मुलगा बिचारा अतिशय भोळा आहे. तिच्या घरच्यांनी मुलाच्या घरी साखरपुड्यात दिलेल्या वस्तू आणून दिल्यापासुन मुलाच्या आईचा रक्तदाब वाढला आहे.

In reply to by भिंगरी

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 16:00
मुलीनं आपल्या पार्लरच्या खर्चात नवर्‍याच्या खर्चाचं शेअरींग करावं लागेल असा दूर विचार केला असावा. किंवा तिच्या लक्षात कुणी आणून दिलं असावं. होत्ताय होत्ताय! साखरपुड्यातल्या वस्तू परत दिल्यानं आईचा रक्तदाब नॉर्मलला यायला हरकत नव्हती. नाहीतर लग्न नाही ते नाही आणि वस्तूही लंपास असं बर्‍याचदा दिसतं. बाकी 'बिचारा अतिशय भोळा असणं' मुलाकडून नकार गेल्यानंतर (वाक्याचं) लिंग बदलून मुलीकडं गेलं असतं हे नक्की. :)

माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा ऐका. मुलगी पुण्यातल्या एका नावाजलेल्या ईंजिनिअरींग कॉलेजमधे प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे आणि पी.एच.डी. करतीये आता. तिला पाहायला आलेला आलेला मुलगा फक्त डिप्लोमा झालेला, फक्त ९६ ९६ च्या आग्रहापाई तिनी त्याला बघायला होकार दिला. ह्या बाबाजीच्या मागण्या काय तर म्हणे लग्नानंतर नोकरी आणि शिक्षण बंद करायच. लग्नानंतर ४ वर्षाच्या आत २ बाळं हवीत (असेंब्ली लाईन आहे का ती? च्यायला, पाहण्याच्या कार्यक्रमात अश्या मागण्या कोण करत?). वरुन हुंडा-करणी-मानपानाच्या मागण्या. ह्या मुलीनी शिस्तीत उभं राहुन नकार दिला. =))

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 17:15
@ रेवाक्का/ आज्जी, कुठंय तुमचं वधू वर सूचक मंडळ? च्यामारी एवढा 'खप' आहे तरी तुम्ही मागेच? मराठी माणसाला मार्केटींग करता येत नाही हेच खरं :-/

फुंटी Mon, 09/22/2014 - 16:09
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत अक्कल नसलेला मेंदू असतो असे माझे स्पष्ट मत आहे .आपल्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे याचा त्या अंदाज घेत असतात.'नवरा'या कल्पनेच्या विस्तारातून अवास्तव अपेक्षा वाढत जातात ...काहीठिकाणी त्या भलत्याच करमणूक करणाऱ्या असतात...त्यानुसार त्यांचे होकार नकार ठरत असतात.मुंबईत घर असणार स्थळ ,अपडाऊन ला सोयीच स्थळ , किमान ५०००० च्या वर पगार असलेल स्थळ,असल्या भौतिक सुखाच्या मागण्या असलेल्या पोरी काय कप्पाळ संसार करणार? त्यात हल्ली मुलीसोबत तिचे बेस्ट फ्रेंड (ती बिचारी बेस्ट फ्रेंड समजत असते.पुरुष स्त्रीशी आकर्षण विरहित बेस्ट फ्रेन्डशिप करू शकत नाही हेही माझ स्पष्ट मत.. ) वगैरे कोम्प्लीमेंटरी मिळतात ते वेगळे ... " भारतीय लग्नसंस्थेचा पाया प्रेम ,विश्वास या त्यागाच्या मुल्यांकडून भौतिक सुखांकडे सरकताना दिसतो आहे.हे लग्न्संस्थेच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे." हे मीच म्हटलेलं आहे....

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 12:30
तो मुलगी बघायला गेल्यावर प्रश्नोत्तरात ह्यानी तिला १०० प्रश्न विचारले. तिने फक्त ह्याला "तूला आईसक्रिम आवडतं का?" हा एकच प्रश्न विचारला आणि त्याचा होकार आल्यावर हिने लगेच होकार दिला. ट्चवूड अजून तरी ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

असंका Fri, 09/26/2014 - 13:39
मुलाने काय एवढे भारी प्रश्न विचारले , की त्या मुलीला काही प्रश्न न विचारताच त्या मुलाबद्द्ल सगळी आवश्यक माहिती मिळाली?

In reply to by असंका

"मुलगा फारच प्रश्नाळू (१०० प्रश्न ? बापरे !) आहे पण त्याला आवडणारी उत्तरे आपणे देऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडे आयस्क्रिम खावू घालण्याइतके पैसे आहेत आणि ते खाण्याची त्याला आवडही आहे." इतके मूलभूत ज्ञान झाल्यावर मुलीच्या अजून काही अपेक्षा उरल्या नसाव्या असा अंदाज आहे... ते सुखाने नांदतात यावरून तो अंदाज बरोबर आहे असेच दिसते.

किसन शिंदे Tue, 09/23/2014 - 21:29
लग्न करण्यासाठी आजकाल मुलींच्या मागण्या खूप वाढतच चालल्या आहेत याच्याशी मात्र १००% सहमत. बहुतेक ठिकाणी घरातल्या आई-वडीलांची विचारसरणी किंवा समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही मुलीच्या होकार किंवा नकारासाठी अवलंबून असतो हे आता अनुभवातून कळालंय. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून मेहूणीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू आहे. दोनदा 'मुलगा' दाखवूनही मी स्वत: तोंडावर पडलो आहे, कारण यांच्या(मेहूणीच्या आणि सासूच्या) अवास्तव अपेक्षा. शेवटी मेहूणीसाठी वरसंशोधन करण्याचा नाद कंटाळून सोडून दिलाय आता.

In reply to by किसन शिंदे

फुंटी Wed, 09/24/2014 - 23:14
मुलींना आई वडिलांच्या घरापेक्षा २ पावलं पुढे असलेलच सासर हव असत.स्वातंत्र्य, पैसा ,स्पेस वगैरे हवी असते हो आजकाल...आणि त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी ...म्यारेज इज अ डील ...

In reply to by फुंटी

सूड गुरुवार, 09/25/2014 - 14:42
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी लग्न करायचंच नाही असं ठरवायचं? जमणार आहे? नाही ना, मग आल्या प्रसंगा सामोरे जावे, कसें?

In reply to by फुंटी

सूड Wed, 09/24/2014 - 23:27
आमच्या आधीच्या पिढीतल्या बायकांनीही संसार केले. अगदी घर, मुलंबाळं, नोकर्‍या सांभाळून!! आधीच्या काळात घेत असतील हुंडा, लेखत असतील मुलींना कमी, पण आता आलेली आर्थिक सक्षमता, स्वावलंबन ह्यामुळे आधी मुलींना जशी वागणूक दिली तशीच मुलीचे आईवडिल मुलांना देत असतील तर साफ चूक आहे.

In reply to by सूड

कवितानागेश गुरुवार, 09/25/2014 - 21:27
बरीच वर्षे एका बाजूला असलेला लंबक आता दुसर्‍या बाजूला गेलाय... मध्य गाठायला वेळ लागणारच. तोपर्यंत सगळेच भरडले जाणार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत. याविषयावर अनेक चर्चाही होतात. पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.

सेव द डील्स डॉट इन

आयुर्हित ·

तुषार काळभोर Sat, 09/13/2014 - 13:47
त्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं. खोटं काहीही दिसलं नाही. फसवणुकीचा गाजावाजा करतात ते आंधळेपणाने क्लिक करणारे लोक. डोळे आणि डोकं उघडे असले तर वेबसाईटवर खाली केलेला उल्लेख वाचता येतो. (हा उल्लेख स्पष्ट नाही/लहान नाही/जाहीर नाही, असे म्हणताना किती *टर्म्स & कंडिशन्स अप्लाय असे उल्लेख स्प्ष्ट/मोठे/डोळ्यात भरणारे असतात, हा कृपया विचार करावा.)
But unlike other website, this one does not show how much its going to deduct
हा जो उल्लेख तुम्ही केला आहे, तो थोडा चुकीचा वाटतो. (फोटो दिसत नसल्यास फोटोची लिंक https://lh6.googleusercontent.com/-58Ou43CBtXg/VBP7bLjEVxI/AAAAAAAABPs/nYLacqR9tFw/w869-h325-no/ex.jpg) ***मी त्या वेबसाईटचा मालक/सदस्य/लाभार्थी/हितचिंतक कोणीही नाही. पण कुणीही कसलीही शहानिशा न करता 'आग लागली...आग लागली" असे बोंबलत पळत सुटला, तर मला राहवत नाही. आग लागलेली नाहिये, हे मला सांगावसं वाटतं. गुगलवर सर्च केल्यावर तक्रारी करणारे मिळतात, पण फोरम्सवर लिहिणारं भारतीय पब्लिक गाजावाजा करणारं असतं. विचार न करता, माझं नाव कुठेतरी ऑनलाईन झळकणार, या उन्मादात काहीही लिहिणारं असतं. (अपवाद नक्कीच असतात, पण नियम सिद्ध करण्यापुरते!)

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित Sun, 09/14/2014 - 13:51
खोटं काहीही दिसलं नाही? अरेच्चा, असे कसे झाले? जे मला दिसले ते आपण पाहीलेले दिसत नाही! परत एकदा सर्व मुद्दे पहावे, हिच नम्र विनंती.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:22
अर्थशास्त्राचा पहिला नियम पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही
अरे बापरे. हे काय नवीनच. पैसा निर्माण होतो. तसे नसते तर प्रॉडक्टीव्हीटी आणि जी डी पी या टर्म्स आल्याच नसत्या. पैसा उत्पादीत होतो. मालमत्ता सुद्धा निर्माण होते.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 13:31
मालक, पैसा उत्पादीत केला तर बाकीच्या पैशाची किंमत त्या तुलनेत कमी होते. म्हणून तर पैसे छापले की त्या करन्सी ची किंमत कमी होते.

In reply to by काळा पहाड

दादागिरी करता आली की छापलेल्या पैश्यामागे काय मुद्दल आहे हे गुपीत ठेवता येते... अंकल सॅमने त्याच्या गेल्या कित्येक दर तिमाहीच्या मागे "क्वांटिटेटीव्ह इझींग" करता छापलेल्या अब्जावधी डोलरच्या नोटांसाठी काय मुद्दल ठेवले आहे हे "गुपीत ऑफ द मिल्लेनियम" आहे (की नाही) ?

तुषार काळभोर Sat, 09/13/2014 - 13:47
त्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं. खोटं काहीही दिसलं नाही. फसवणुकीचा गाजावाजा करतात ते आंधळेपणाने क्लिक करणारे लोक. डोळे आणि डोकं उघडे असले तर वेबसाईटवर खाली केलेला उल्लेख वाचता येतो. (हा उल्लेख स्पष्ट नाही/लहान नाही/जाहीर नाही, असे म्हणताना किती *टर्म्स & कंडिशन्स अप्लाय असे उल्लेख स्प्ष्ट/मोठे/डोळ्यात भरणारे असतात, हा कृपया विचार करावा.)
But unlike other website, this one does not show how much its going to deduct
हा जो उल्लेख तुम्ही केला आहे, तो थोडा चुकीचा वाटतो. (फोटो दिसत नसल्यास फोटोची लिंक https://lh6.googleusercontent.com/-58Ou43CBtXg/VBP7bLjEVxI/AAAAAAAABPs/nYLacqR9tFw/w869-h325-no/ex.jpg) ***मी त्या वेबसाईटचा मालक/सदस्य/लाभार्थी/हितचिंतक कोणीही नाही. पण कुणीही कसलीही शहानिशा न करता 'आग लागली...आग लागली" असे बोंबलत पळत सुटला, तर मला राहवत नाही. आग लागलेली नाहिये, हे मला सांगावसं वाटतं. गुगलवर सर्च केल्यावर तक्रारी करणारे मिळतात, पण फोरम्सवर लिहिणारं भारतीय पब्लिक गाजावाजा करणारं असतं. विचार न करता, माझं नाव कुठेतरी ऑनलाईन झळकणार, या उन्मादात काहीही लिहिणारं असतं. (अपवाद नक्कीच असतात, पण नियम सिद्ध करण्यापुरते!)

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित Sun, 09/14/2014 - 13:51
खोटं काहीही दिसलं नाही? अरेच्चा, असे कसे झाले? जे मला दिसले ते आपण पाहीलेले दिसत नाही! परत एकदा सर्व मुद्दे पहावे, हिच नम्र विनंती.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:22
अर्थशास्त्राचा पहिला नियम पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही
अरे बापरे. हे काय नवीनच. पैसा निर्माण होतो. तसे नसते तर प्रॉडक्टीव्हीटी आणि जी डी पी या टर्म्स आल्याच नसत्या. पैसा उत्पादीत होतो. मालमत्ता सुद्धा निर्माण होते.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 13:31
मालक, पैसा उत्पादीत केला तर बाकीच्या पैशाची किंमत त्या तुलनेत कमी होते. म्हणून तर पैसे छापले की त्या करन्सी ची किंमत कमी होते.

In reply to by काळा पहाड

दादागिरी करता आली की छापलेल्या पैश्यामागे काय मुद्दल आहे हे गुपीत ठेवता येते... अंकल सॅमने त्याच्या गेल्या कित्येक दर तिमाहीच्या मागे "क्वांटिटेटीव्ह इझींग" करता छापलेल्या अब्जावधी डोलरच्या नोटांसाठी काय मुद्दल ठेवले आहे हे "गुपीत ऑफ द मिल्लेनियम" आहे (की नाही) ?

इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.)

**************** आज मला एक ईमेल आलाय, त्यात लिहिले आहे..... फक्त ५०/- रुपयात १७००/-किमतीचे व्हावुचर! आणि तेही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे!! व्वा! चक्क १६५०/-चा फायदा!!

एकाच लेखकाचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?

संदीप डांगे ·

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:23
एकाच सदस्यनामाने केलेलं लिखाण एकत्र बघायचं असेल तर पुढची यूआरएल बदलून वापरा - www.misalpav.com/user/सदस्यक्रमांक/authored. सदस्यक्रमांक या जागी सदस्य क्रमांक घालावा लागेल. हा क्रमांक मिळवायचा असेल तर लॉगिन करून सदस्याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर, यूआरएलमध्ये मिळेल. उदा. माझा सदस्यक्रमांक ३०५ आहे, तुमचा २४९६५ आहे. वरच्या लिंकेत हा क्रमांक रोमन लिपीत लिहावा लागेल.

संदीप डांगे गुरुवार, 09/11/2014 - 22:31
शतश: धन्यवाद! इतके उत्तम लेख आहेत. चार दिवसापासून अधाशासारखा वाचतोय नुसता. अजून एक, बरेच सदस्य प्रतिसाद देताना बरेच मिपाविशिष्ट लघु-सांकेतिक शब्द वापरतात, त्याची कुठे संदर्भसूची मिळेल काय?

In reply to by संदीप डांगे

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:37
एक धागा चटकन गूगल करून सापडला. प्रकाटाआ म्हणजे काय? शोधायचं असेल तर गूगलवर जा. लघु-सांकेतिक शब्द तिथे लिहा आणि पुढे site:misalpav.com हे जोडून शोधा. बहुतेकदा उत्तर (असणारा धागा) लगेच सापडतो.

In reply to by संदीप डांगे

आदूबाळ गुरुवार, 09/11/2014 - 22:37
त्याचेही दोनतीन धागे आहेत. "जार्गन" हा शब्द गूगल शोधात मारून बघा. हाकानाका ;)

भाते गुरुवार, 09/11/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

In reply to by भाते

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:34
फक्त संस्थळाचं नाव लिहीण्यापेक्षा गूगलमध्ये "site:misalpav.com" असं लिहून पुढे कीवर्ड वापरले की गूगल इतर संस्थळांवर शोधायलाही जात नाही.

भाते गुरुवार, 09/11/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

एस Tue, 09/16/2014 - 19:06
मला काय म्हणायचंय की, यूआरएल बदलत बसण्याचा खटाटोप करत बसण्यापेक्षा सरळ '...यांचे सर्व लिखाण' अशी लिन्क त्या लेखकाच्या प्रोफाईलमध्ये असल्यास सरळ त्यावर टिचकी मारून हवे ते सापडू शकेल. यासाठी फारमोठा किचकट कोड लिहावा लागेल असंही वाटत नाही. काय म्हणता?

In reply to by एस

पैसा Tue, 09/16/2014 - 19:10
मध्यंतरी द्रुपल अपग्रेड झाले तेव्हा खरडीचे नोटिफिकेशन बंद झाले, तसेच आणखी काही गोष्टी गायब झाल्यात. सहज होण्यासारखे असते तर नीलकांतने कधीच केलं असतं. कदाचित या द्रुपल व्हर्शनमधे काही गोष्टींना सपोर्ट नसावा. अर्थात हा माझा अंदाजच आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:23
एकाच सदस्यनामाने केलेलं लिखाण एकत्र बघायचं असेल तर पुढची यूआरएल बदलून वापरा - www.misalpav.com/user/सदस्यक्रमांक/authored. सदस्यक्रमांक या जागी सदस्य क्रमांक घालावा लागेल. हा क्रमांक मिळवायचा असेल तर लॉगिन करून सदस्याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर, यूआरएलमध्ये मिळेल. उदा. माझा सदस्यक्रमांक ३०५ आहे, तुमचा २४९६५ आहे. वरच्या लिंकेत हा क्रमांक रोमन लिपीत लिहावा लागेल.

संदीप डांगे गुरुवार, 09/11/2014 - 22:31
शतश: धन्यवाद! इतके उत्तम लेख आहेत. चार दिवसापासून अधाशासारखा वाचतोय नुसता. अजून एक, बरेच सदस्य प्रतिसाद देताना बरेच मिपाविशिष्ट लघु-सांकेतिक शब्द वापरतात, त्याची कुठे संदर्भसूची मिळेल काय?

In reply to by संदीप डांगे

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:37
एक धागा चटकन गूगल करून सापडला. प्रकाटाआ म्हणजे काय? शोधायचं असेल तर गूगलवर जा. लघु-सांकेतिक शब्द तिथे लिहा आणि पुढे site:misalpav.com हे जोडून शोधा. बहुतेकदा उत्तर (असणारा धागा) लगेच सापडतो.

In reply to by संदीप डांगे

आदूबाळ गुरुवार, 09/11/2014 - 22:37
त्याचेही दोनतीन धागे आहेत. "जार्गन" हा शब्द गूगल शोधात मारून बघा. हाकानाका ;)

भाते गुरुवार, 09/11/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

In reply to by भाते

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:34
फक्त संस्थळाचं नाव लिहीण्यापेक्षा गूगलमध्ये "site:misalpav.com" असं लिहून पुढे कीवर्ड वापरले की गूगल इतर संस्थळांवर शोधायलाही जात नाही.

भाते गुरुवार, 09/11/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

एस Tue, 09/16/2014 - 19:06
मला काय म्हणायचंय की, यूआरएल बदलत बसण्याचा खटाटोप करत बसण्यापेक्षा सरळ '...यांचे सर्व लिखाण' अशी लिन्क त्या लेखकाच्या प्रोफाईलमध्ये असल्यास सरळ त्यावर टिचकी मारून हवे ते सापडू शकेल. यासाठी फारमोठा किचकट कोड लिहावा लागेल असंही वाटत नाही. काय म्हणता?

In reply to by एस

पैसा Tue, 09/16/2014 - 19:10
मध्यंतरी द्रुपल अपग्रेड झाले तेव्हा खरडीचे नोटिफिकेशन बंद झाले, तसेच आणखी काही गोष्टी गायब झाल्यात. सहज होण्यासारखे असते तर नीलकांतने कधीच केलं असतं. कदाचित या द्रुपल व्हर्शनमधे काही गोष्टींना सपोर्ट नसावा. अर्थात हा माझा अंदाजच आहे.
मी मिपावर नवीन आहे, मदत करा. एकाच लेखकाचे स्वताचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल? आत्ताच्या पद्धतीनुसार विशिष्ट लेखकाने जिथे कुठे आणि जे काही लिखाण केले आहे ते सरळसोट दिसते. म्हणजे ते स्वताचे असो व दुसऱ्याच्या लेखावर असलेली प्रतिक्रिया

आपण यांना पाहिलंत का ?

पगला गजोधर ·

योगी९०० गुरुवार, 09/11/2014 - 12:31
अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. गप्प बसा. या महान प्रभूतींच्या वर शिंतोडे उडवू नका. या संकटातून बाहेर पडल्यावर पुढे काय करायचे याचा विचार हे सध्या एका सुरक्षित ठिकाणी राहून करत आहेत.

In reply to by योगी९००

स्पार्टाकस गुरुवार, 09/11/2014 - 18:24
या सर्व भुंकसंप्रदायी मंडळींनी पूर येत आहे अशी खबर येताच विमानाने दिल्ली गाठल्याचं वृत्त आलं आहे.

आनन्दा गुरुवार, 09/11/2014 - 13:00
माझ्या मिपावरच्या आयुष्यात पहिल्यांदा गजोधरांच्या प्रश्नाला अणुमोदन देतोय. बाकी ते पण पुरात अडकले असावेत असे वाटतेय :) ते काय ते ६ लाख आहेत ना, त्यात हे पण.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 13:04
+१०० पण याबद्दल माध्यमांत अजून तरी काहीच बातमी नाही. संकटकाळ संपल्यावर अश्या हरामखोरांना काश्मिरी लोकांनीच धूवून काढले पाहिजे ! तशी आता अब्दुल्ला आणि कंपनीची जनता धुलाई करू लागली आहेच.

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 13:06
पगला गजोधर यांचा आयडी हॅक झाला आहे काय? बादवे वरील फुटीरतावाद्यांनीच कदाचित काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.

In reply to by मृत्युन्जय

पैसा गुरुवार, 09/11/2014 - 13:24
काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.
हद्द झाली!

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे गुरुवार, 09/11/2014 - 13:52
कश्मिरी लोकं (कश्मिरात आत्ता रहात असलेले लोक) अत्यंत भिकार*ट आहेत असं कश्मिरात काम करत असलेल्या एक-दोघांकडून ऐकलं आहे. फुकटे, आळशी आणि कृतघ्न. त्यामुळे सामान्य लोकांनीच ही दगडफेक केलेली असणं अशक्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

पगला गजोधर गुरुवार, 09/11/2014 - 17:17
आयडी हॅक वैगरे झाला नाही, मी कधीही या फुटीरतावादी लोकांचे समर्थन केलेले नाही. बाकी उगीचंच कान्फाडात ठेवून द्यावी, असा चेहेरा असलेला यासीन मलिक व त्याच्यासारखे, पुरात वाहून कायमचे पाकिस्तानात गेले (संदर्भ: हीना चित्रपट) तर बरे.

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 13:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही? पण जाउ देत असली स्वप्नरंजने केल्याने आपल्यालाच त्रास होइल.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/11/2014 - 14:04
काही फुटीरता वादी आणि फुटीरता वाहुन जाणार नाही. उलट आपले हजारो कोटी वाया जातील. पुराचा फायदा घेउन, सैन्याने सर्व घरांची तपासणी करुन शत्र , कागद पत्र ताब्यात घ्यावीत.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/11/2014 - 14:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही
म्हणजे काश्मीर खोर्‍यातील ( जम्मु लडाख सोडुन ) ९५ टक्के लोकच वाहून गेली पाहीजेत असे म्हणणे आहे तुमचे.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 13:52
अहो फुटीरतावाद्यांचे सोडा , पण इथल्या आपल्या मिपावरल्या मोदीदेष्ट्यांचे काय मत आहे ते विचारा मोदींनीच्या अन लषकराच्या तत्परते विषयी अन बचावकार्या विषयी !!

काळा पहाड गुरुवार, 09/11/2014 - 14:25
या गोष्टीचा फायदा घेवून फुटीरतावाद्यांना अपघाती मृत्यू येईल हे पाहिलं तर भारत सरकारची डोकेदुखी कमी होईल. यांना पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू येवू शकतो.

रवीराज गुरुवार, 09/11/2014 - 19:19
बहुतांश काश्मिरी जनता भारताविरोधी आहे, हे लोक तिरंगा झेंडा फडकऊ देत नाही तिथे, भारताविरोधी घोषणा देणे, भारतीय लष्कराविरोधी मोर्चे काढणे, अतिरेक्यांना मदत करणे असली कारस्थाने करतात हे लोक. यांना म्हणावे आता, कोण आले आहे यांच्या मदतीला धावून…..पाकिस्तान?

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:31
जस्ट २-३ आठवड्यांमागे काश्मीरला गेलो असता याची झलक दिसून आलीच होती. भर १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये कर्फ्यू असल्याने प्रसिद्ध हॉटेले बंद, सबब वाझवान डिषेस खाताच आल्या नाहीत :( तिथे 'रायझिंग काश्मीर' नावाचा पेपर येतो तो वाचला, तोही अशाच फुटीरतावादी विषारी विचारांनी भरलेला. काश्मीर ह्यांव, काश्मीर त्यांव, भारत-दादागिरी-काश्मीर-गळचेपी इ.इ. काश्मीर जणू एक वेगळा देश असल्याच्या थाटात सगळं चाललेलं. माझ्या एका मित्रानं सांगितलेला अण्भव, त्याला तिथला एकजण ***** म्हणतो कसा, "हम तो आपकी खूब खातिरदारी करेंगे. आप हिंदुस्थान से जो आये हैं!" हिंदुस्थान से??????????? अरे भो****** तू काय पाकिस्तानात राहतोस काय मग? काश्मिरी भाषा शिकायचे पुस्तक घेतले, त्यातही तेच!!!!! म्हणे स्वतंत्र भारतात लोकांनी काश्मिरीचा संबंध संस्कृतशी जोडण्याचा उगीचच प्रयत्न केला. त्याच्या लेखकाला सरकारविरोधी आंदोलनांत भाग घेतल्याने अटक झाली हेही आणि प्रौडलि लिहिलेले होते त्याच्या लाष्ट पेजला. ही तर हैट्ट होती. हे लोक प्रचंड माजलेले आहेत असेच मत झाले त्यामुळे. यद्यपि प्रत्यक्ष व्यवहारात सगळे नीट वागलेबोलले तरी हा भाव असतोच. सुंभ जळून कोळसा झाला तरी पीळ काही जायला तयार नाही. स्वतःचं रक्षण करायची औकात नाही ती नाहीच, वर माज फालतूचा! फार राग आला होता ते सगळं पाहून.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 20:01
मला स्वतःला हा अनुभव आला होता. जिकडे जाइन तिकडे ते काश्मिरी आम्ही हिंदुस्तानी हे ऐकायला लागले होते. भारतीयांच्या बद्दल कमालीच द्वेष आणी दिखाऊ आतिथ्य आहे त्यांच्या मनात. कलम ३७० तोंडपाठ आहे सगळ्यांना पण त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आमचा टेक्सीवालाही आमच्याशी ३७० वर चर्चा करायचा. थोडे इथेही लिहिले आहे

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 20:08
यांना भडकावणारी जमात वेचून वेचून त्यांना फटके दिले पाहिजेत तरच लोक वळणावर येतील. बाकी लेख लैच भारी!!! एका रात्रीत दहा कप काहवा प्यालो होतो ते आठवलं. :) लै सुंदर पेय.

आसिफ गुरुवार, 09/11/2014 - 23:39
भारतीय सैन्य या नैसर्गिक आपत्ती मध्ये जम्मु-काश्मीर च्या जनतेला सर्वतोपरी मदत करत आहे.सैन्याने PoK मध्ये देखील मदतीची तयारी दर्शवली आहे.असे होउ नये की मदत घेतली आणि परत भारताबद्दल बोंबलायला मोकळे. आता त्यांना विचारावेसे वाटते की कुठे गेले अल-कायदा,इंडियन मुजाहिदीन आणि ईतर दहशतवादी संगठन वाले. हाफिज सईद ने अकलेचे तारे तोडले आहेत :D पाकमध्ये पूर भारतामुळेच - हाफीज सईद

In reply to by प्रसाद गोडबोले

खटपट्या Sat, 09/13/2014 - 14:33
हे लोक लष्कराच्या चुका शोधत असतील !! रच्याकने - एका मित्राने चेपू वर टाकलेला संदेश इथे द्यायचा मोह आवारत नाहीये.
आतंकवादी हाफिज सईद का बयान पाकिस्तान में आई बाढ़ के लिए भारत जिम्मेदार, आखिर भारतीय नदियों से ही पानी पाकिस्तान में आया । आतंकी हाफ़िज़ सईद एक बात कान खोल कर सुन लो चीन ने ब्रम्हपुत्र नदी पर बाँध बनाया हुआ है, उसकी जब मर्ज़ी वो पानी छोड़ कर बिहार आसाम को डूबा देता है , तुम नपुन्सको की तरह आतंकवादी भेज कर पीठ पर वार करते हो पर ये हिंदुस्तान है, ये तुम्हारी तरह पीठ पर वार नहीं करेगा या चीन की तरह पानी का खेल नहीं खेलेगा, जब भी मारना होगा, तुम्हारे घर में घुस कर मारेगा और ये वो भारतीय नदिया है जो पाकिस्तान की प्यास बुझाती है, अगर हम कश्मीर की तीनो चारो नदियों पर बाँध बना दे तो तुमको पानी की बूँद तक नहीं मिलेगी ना पीने को ना धोने को ,नाहाते तो शायद वैसै भी नही तुम ।

ह्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेऊन आपल्या लष्कराने फुटीरतावादी प्रभूतींना मारून ते पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याचे घोषित करावे. सध्या काश्मिरी जनतेला त्यांच्या फुटक्या नेत्यांसाठी आसवे गाळण्यासाठी फुरसत नाही आहे.

काळा पहाड Sun, 09/14/2014 - 23:21
झालं ते खरं तर चांगलंच झालं. एकतर यामुळं आर्मीला असणारा विरोध कमी होईल. दुसरं म्हणजे काश्मीर ची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे भारताच्या मदतीवर अवलंबून असेल (अर्थात आधी काय वेगळं होतं हा प्रश्न आहेच) त्यामुळे त्यांचा भारतविरोध आता बराच बोथट होईल. अन्यथा भारत मदतीच्या नाड्या तत्काळ आवळू शकतो.

खटपट्या Mon, 09/15/2014 - 00:54
काश्मीर मध्ये मदतकार्य करणाऱ्या लष्करावर काही लोक आता दगडफेक करू लागले आहेत आता बोला ! काय होणार या लोकांचं … http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Kashmir-Relief/articleshow/42397014.cms

In reply to by खटपट्या

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 01:19
काय होणार? जरी तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करावा लागला तरी भारत काही त्यावरचा ताबा सोडणार नाही. सध्या आर्मीला थंड घेण्याच्या सूचना आहेत. बाकी एकदा पूर ओसरला की आर्मी आहे, ते लोक आहेत आणि ओले झालेले बांबू आहेत.

शिद Mon, 09/15/2014 - 03:07
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक संदेश...थोडासा दवणीय आहे पण आशय अगदी नेमका आहे.
काश्मीर की जनता को भारतीय सेना के एक जवान का संदेश - "तुम्हारी नफरत पर भी लूटा दी जिंदगी हमने, सोचो अगर तुम मोहब्बत करते तो हम क्या करते!"

योगी९०० गुरुवार, 09/11/2014 - 12:31
अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. गप्प बसा. या महान प्रभूतींच्या वर शिंतोडे उडवू नका. या संकटातून बाहेर पडल्यावर पुढे काय करायचे याचा विचार हे सध्या एका सुरक्षित ठिकाणी राहून करत आहेत.

In reply to by योगी९००

स्पार्टाकस गुरुवार, 09/11/2014 - 18:24
या सर्व भुंकसंप्रदायी मंडळींनी पूर येत आहे अशी खबर येताच विमानाने दिल्ली गाठल्याचं वृत्त आलं आहे.

आनन्दा गुरुवार, 09/11/2014 - 13:00
माझ्या मिपावरच्या आयुष्यात पहिल्यांदा गजोधरांच्या प्रश्नाला अणुमोदन देतोय. बाकी ते पण पुरात अडकले असावेत असे वाटतेय :) ते काय ते ६ लाख आहेत ना, त्यात हे पण.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 13:04
+१०० पण याबद्दल माध्यमांत अजून तरी काहीच बातमी नाही. संकटकाळ संपल्यावर अश्या हरामखोरांना काश्मिरी लोकांनीच धूवून काढले पाहिजे ! तशी आता अब्दुल्ला आणि कंपनीची जनता धुलाई करू लागली आहेच.

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 13:06
पगला गजोधर यांचा आयडी हॅक झाला आहे काय? बादवे वरील फुटीरतावाद्यांनीच कदाचित काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.

In reply to by मृत्युन्जय

पैसा गुरुवार, 09/11/2014 - 13:24
काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.
हद्द झाली!

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे गुरुवार, 09/11/2014 - 13:52
कश्मिरी लोकं (कश्मिरात आत्ता रहात असलेले लोक) अत्यंत भिकार*ट आहेत असं कश्मिरात काम करत असलेल्या एक-दोघांकडून ऐकलं आहे. फुकटे, आळशी आणि कृतघ्न. त्यामुळे सामान्य लोकांनीच ही दगडफेक केलेली असणं अशक्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

पगला गजोधर गुरुवार, 09/11/2014 - 17:17
आयडी हॅक वैगरे झाला नाही, मी कधीही या फुटीरतावादी लोकांचे समर्थन केलेले नाही. बाकी उगीचंच कान्फाडात ठेवून द्यावी, असा चेहेरा असलेला यासीन मलिक व त्याच्यासारखे, पुरात वाहून कायमचे पाकिस्तानात गेले (संदर्भ: हीना चित्रपट) तर बरे.

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 13:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही? पण जाउ देत असली स्वप्नरंजने केल्याने आपल्यालाच त्रास होइल.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/11/2014 - 14:04
काही फुटीरता वादी आणि फुटीरता वाहुन जाणार नाही. उलट आपले हजारो कोटी वाया जातील. पुराचा फायदा घेउन, सैन्याने सर्व घरांची तपासणी करुन शत्र , कागद पत्र ताब्यात घ्यावीत.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/11/2014 - 14:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही
म्हणजे काश्मीर खोर्‍यातील ( जम्मु लडाख सोडुन ) ९५ टक्के लोकच वाहून गेली पाहीजेत असे म्हणणे आहे तुमचे.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 13:52
अहो फुटीरतावाद्यांचे सोडा , पण इथल्या आपल्या मिपावरल्या मोदीदेष्ट्यांचे काय मत आहे ते विचारा मोदींनीच्या अन लषकराच्या तत्परते विषयी अन बचावकार्या विषयी !!

काळा पहाड गुरुवार, 09/11/2014 - 14:25
या गोष्टीचा फायदा घेवून फुटीरतावाद्यांना अपघाती मृत्यू येईल हे पाहिलं तर भारत सरकारची डोकेदुखी कमी होईल. यांना पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू येवू शकतो.

रवीराज गुरुवार, 09/11/2014 - 19:19
बहुतांश काश्मिरी जनता भारताविरोधी आहे, हे लोक तिरंगा झेंडा फडकऊ देत नाही तिथे, भारताविरोधी घोषणा देणे, भारतीय लष्कराविरोधी मोर्चे काढणे, अतिरेक्यांना मदत करणे असली कारस्थाने करतात हे लोक. यांना म्हणावे आता, कोण आले आहे यांच्या मदतीला धावून…..पाकिस्तान?

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:31
जस्ट २-३ आठवड्यांमागे काश्मीरला गेलो असता याची झलक दिसून आलीच होती. भर १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये कर्फ्यू असल्याने प्रसिद्ध हॉटेले बंद, सबब वाझवान डिषेस खाताच आल्या नाहीत :( तिथे 'रायझिंग काश्मीर' नावाचा पेपर येतो तो वाचला, तोही अशाच फुटीरतावादी विषारी विचारांनी भरलेला. काश्मीर ह्यांव, काश्मीर त्यांव, भारत-दादागिरी-काश्मीर-गळचेपी इ.इ. काश्मीर जणू एक वेगळा देश असल्याच्या थाटात सगळं चाललेलं. माझ्या एका मित्रानं सांगितलेला अण्भव, त्याला तिथला एकजण ***** म्हणतो कसा, "हम तो आपकी खूब खातिरदारी करेंगे. आप हिंदुस्थान से जो आये हैं!" हिंदुस्थान से??????????? अरे भो****** तू काय पाकिस्तानात राहतोस काय मग? काश्मिरी भाषा शिकायचे पुस्तक घेतले, त्यातही तेच!!!!! म्हणे स्वतंत्र भारतात लोकांनी काश्मिरीचा संबंध संस्कृतशी जोडण्याचा उगीचच प्रयत्न केला. त्याच्या लेखकाला सरकारविरोधी आंदोलनांत भाग घेतल्याने अटक झाली हेही आणि प्रौडलि लिहिलेले होते त्याच्या लाष्ट पेजला. ही तर हैट्ट होती. हे लोक प्रचंड माजलेले आहेत असेच मत झाले त्यामुळे. यद्यपि प्रत्यक्ष व्यवहारात सगळे नीट वागलेबोलले तरी हा भाव असतोच. सुंभ जळून कोळसा झाला तरी पीळ काही जायला तयार नाही. स्वतःचं रक्षण करायची औकात नाही ती नाहीच, वर माज फालतूचा! फार राग आला होता ते सगळं पाहून.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 20:01
मला स्वतःला हा अनुभव आला होता. जिकडे जाइन तिकडे ते काश्मिरी आम्ही हिंदुस्तानी हे ऐकायला लागले होते. भारतीयांच्या बद्दल कमालीच द्वेष आणी दिखाऊ आतिथ्य आहे त्यांच्या मनात. कलम ३७० तोंडपाठ आहे सगळ्यांना पण त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आमचा टेक्सीवालाही आमच्याशी ३७० वर चर्चा करायचा. थोडे इथेही लिहिले आहे

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 20:08
यांना भडकावणारी जमात वेचून वेचून त्यांना फटके दिले पाहिजेत तरच लोक वळणावर येतील. बाकी लेख लैच भारी!!! एका रात्रीत दहा कप काहवा प्यालो होतो ते आठवलं. :) लै सुंदर पेय.

आसिफ गुरुवार, 09/11/2014 - 23:39
भारतीय सैन्य या नैसर्गिक आपत्ती मध्ये जम्मु-काश्मीर च्या जनतेला सर्वतोपरी मदत करत आहे.सैन्याने PoK मध्ये देखील मदतीची तयारी दर्शवली आहे.असे होउ नये की मदत घेतली आणि परत भारताबद्दल बोंबलायला मोकळे. आता त्यांना विचारावेसे वाटते की कुठे गेले अल-कायदा,इंडियन मुजाहिदीन आणि ईतर दहशतवादी संगठन वाले. हाफिज सईद ने अकलेचे तारे तोडले आहेत :D पाकमध्ये पूर भारतामुळेच - हाफीज सईद

In reply to by प्रसाद गोडबोले

खटपट्या Sat, 09/13/2014 - 14:33
हे लोक लष्कराच्या चुका शोधत असतील !! रच्याकने - एका मित्राने चेपू वर टाकलेला संदेश इथे द्यायचा मोह आवारत नाहीये.
आतंकवादी हाफिज सईद का बयान पाकिस्तान में आई बाढ़ के लिए भारत जिम्मेदार, आखिर भारतीय नदियों से ही पानी पाकिस्तान में आया । आतंकी हाफ़िज़ सईद एक बात कान खोल कर सुन लो चीन ने ब्रम्हपुत्र नदी पर बाँध बनाया हुआ है, उसकी जब मर्ज़ी वो पानी छोड़ कर बिहार आसाम को डूबा देता है , तुम नपुन्सको की तरह आतंकवादी भेज कर पीठ पर वार करते हो पर ये हिंदुस्तान है, ये तुम्हारी तरह पीठ पर वार नहीं करेगा या चीन की तरह पानी का खेल नहीं खेलेगा, जब भी मारना होगा, तुम्हारे घर में घुस कर मारेगा और ये वो भारतीय नदिया है जो पाकिस्तान की प्यास बुझाती है, अगर हम कश्मीर की तीनो चारो नदियों पर बाँध बना दे तो तुमको पानी की बूँद तक नहीं मिलेगी ना पीने को ना धोने को ,नाहाते तो शायद वैसै भी नही तुम ।

ह्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेऊन आपल्या लष्कराने फुटीरतावादी प्रभूतींना मारून ते पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याचे घोषित करावे. सध्या काश्मिरी जनतेला त्यांच्या फुटक्या नेत्यांसाठी आसवे गाळण्यासाठी फुरसत नाही आहे.

काळा पहाड Sun, 09/14/2014 - 23:21
झालं ते खरं तर चांगलंच झालं. एकतर यामुळं आर्मीला असणारा विरोध कमी होईल. दुसरं म्हणजे काश्मीर ची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे भारताच्या मदतीवर अवलंबून असेल (अर्थात आधी काय वेगळं होतं हा प्रश्न आहेच) त्यामुळे त्यांचा भारतविरोध आता बराच बोथट होईल. अन्यथा भारत मदतीच्या नाड्या तत्काळ आवळू शकतो.

खटपट्या Mon, 09/15/2014 - 00:54
काश्मीर मध्ये मदतकार्य करणाऱ्या लष्करावर काही लोक आता दगडफेक करू लागले आहेत आता बोला ! काय होणार या लोकांचं … http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Kashmir-Relief/articleshow/42397014.cms

In reply to by खटपट्या

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 01:19
काय होणार? जरी तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करावा लागला तरी भारत काही त्यावरचा ताबा सोडणार नाही. सध्या आर्मीला थंड घेण्याच्या सूचना आहेत. बाकी एकदा पूर ओसरला की आर्मी आहे, ते लोक आहेत आणि ओले झालेले बांबू आहेत.

शिद Mon, 09/15/2014 - 03:07
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक संदेश...थोडासा दवणीय आहे पण आशय अगदी नेमका आहे.
काश्मीर की जनता को भारतीय सेना के एक जवान का संदेश - "तुम्हारी नफरत पर भी लूटा दी जिंदगी हमने, सोचो अगर तुम मोहब्बत करते तो हम क्या करते!"
जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?

पोरं vs मुलं

वेल्लाभट ·

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 11:58
पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही असो, आज तो अर्थ वापरात नाही. पोर हा शब्द आजमितीस ग्रामीण भागात जास्त वापरतात तर मूल हा शब्द शहरी भागात. त्यामुळे पोर/पोरगा/पोरगी/पोरं इ. शब्दांच्या वापराबद्दल उग्गीच अढी बसलेले शहरी लोक त्याला हीन समजतात. बाकी काही नाही.

In reply to by नाव आडनाव

एस गुरुवार, 09/11/2014 - 13:39
आगदी आगदी ह्येच् म्हनाया आलतू. 'माह्यं पोर ते! आसं ब्वॉटं कानावं कडाकडा मोडणारी मायाळू म्हतारी कंदी बघीटल्यी न्हाय की काय?

मधुरा देशपांडे गुरुवार, 09/11/2014 - 12:14
मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण अनेक भागात हा शब्द सहज वापरला जातो. माझ्या घरी आणि आजूबाजूला सुद्धा मी लहानपणापासून हे शब्द ऐकले आहेत. मुलगा/मुलगी आणि पोरगा/पोरगी दोन्ही शब्द वापरले जातात. यापैकी कुणीही पोरका या अर्थाने मुलांकडे बघणारे नाहीत. तो शब्द रुळला आहे सहज. लिखित मराठीत माहीत नाही, पण बोलीभाषेत हा शब्द चुकीचा वाटत नाही.

In reply to by मधुरा देशपांडे

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 12:18
यग्जाक्टली असेच म्हणतो. बोलताना हे शब्द सहज वापरले जातात. त्यांना जज करणे चूक आणि अज्ञानमूलक आहे.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 14:54
असं? मग मी एखाद्याला भो*** म्हटलं तर त्याला शिवी म्हणून जज करणं चूक आणि अज्ञानमूलक आहे का हो?

In reply to by वेल्लाभट

यसवायजी गुरुवार, 09/11/2014 - 15:06
चूक-बरोबर काही नाही. रां**सुद्धा प्रेमानं म्हणता येतं कोल्लाप्रात. आणी 'सदाशीवपेठी/खडकी-दापोडी' ही शिवी असू शकते पुण्यात. स्थळ, काळ, व्यक्ती ब्ला ब्ला...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:43
एक इनोसंट संबोधन आणि शिवी यांचा बादरायण संबंध जोडून मुद्दा भलतीकडे वळवणे जितके अज्ञानमूलक आणि चूक आहे त्यापेक्षा कमीच. :) पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे ऐकून घ्यायची इच्छाच नाही त्याला इलाज नाही. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:20
माफ करा; माझ्या धाग्यात मला 'गावठी' हा शब्द शोधून दाखवावा आपण, आणि मग
पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे
असं म्हणावं.

मार्मिक गोडसे गुरुवार, 09/11/2014 - 12:28
पोरंबाळं कशी आहेत असे खेड्यात सहज विचारले जाते. त्याच खेड्यात एखादीला मूलबाळ आहे कि नाही असेही विचारले जाते.

In reply to by टवाळ कार्टा

सूड गुरुवार, 09/11/2014 - 14:29
>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच हो, बालूशाहीत बालू, गुलाबजामात गुलाब, श्रीखंडात श्री (होणार सून मी धा घरची फेम), सीताफळात सीता हे राह्यलं. ;)

In reply to by सूड

आसिफ गुरुवार, 09/11/2014 - 22:44
>>> सीताफळात सीता हे राह्यलं. सिताफळावरुन उगाचच सिताफळ ईडली (मुक्तपीठ फेम)आठवली. पाककृती आहे का कुणाकडे ? :D ~आसिफ.

In reply to by बॅटमॅन

सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 15:22
मूलकट >> =)) विसर्ग केल्यावर जरा वेगळ्या अनुभुती ची प्राप्ती होवु शकते अशी नोंद करण्यात येत आहे ;) ...असो ...वरील शब्द बर्‍याच धाग्यांना अतिशय अनुचित (फिट्ट ) बसेल :)

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 14:01
दोन्ही शब्द मराठीचे शब्दभांडार आहेत. एका अर्थाचे अनेक शब्द भाषेचे श्रीमंतीचे लक्षन असते आणि त्या त्यांचा उपयोग अनेक भावनांच्या अनेक छटा व्यक्त करायला आणि लेखनात / बोलण्यात वेगवेगळ्या वातावरण निर्मिती करायला उपयोगी पडतात... किंबहुना त्या समानार्थी शब्दातला भावनेला/परिस्थितीला अनुरुप शब्द आपोआप आपल्या वापरात येतो. उदा. १. खेडेगावातील अशिक्षित माय (आई नाही !) "माजं पोर" असं न म्हणता "माझा पुत्र / मुलगा" असं म्ह्णणे खटकेलच, विनोदीही वाटू शकेल. २. शहरातली शिकलेली बाई सुद्धा रागावलेली असताना बहुदा "जमत नाही पोरांना सांभाळायला तर... " असंच म्हणून आपला राग व्यक्त करते. तर यासंबद्धात नियतकालिकात लेख लिहीताना ती, "आपल्या मुलांची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे." असे लिहेल.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:54
ठ्ठो =)) "आमच्या पाल्याला" म्हटले की परसातली पालेभाजी वैग्रे आठवत असे क्वचित कधी ते आठवलं.

psajid गुरुवार, 09/11/2014 - 14:15
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. पोर अर्थात लेकरं यांच्याविषयी काळजी त्या वाक्यात उमटलेली असते असे मला वाटते. ग्रामीण बाजाचा हा शब्द हळुवार भावना घेवून येतो. मुलं हा शब्द ओठातून तर पोर किंवा लेकरू हा शब्द पोटातून (हृदयातून/मनातून) येत असावा याची जाणीव मला होत राहते 'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ? सगळीकडे आईची माया एक सारखीच मात्र 'आय' हा शब्द उच्चारताना मनाला आपुलकी, माया, ममता यांची जी जाणीव होते ती मोठी असावी असे मला नेहमी वाटते. आणि म्हणून मला शहरात सुद्धा पोर किंवा लेकरं या शब्दाचा वापर करताना आपल्याला घाटी म्हणतील या गोष्टीचा न्यूनगंड येत नाही. प्रसिद्ध लेखक श्री. शंकर पाटील यांचे साहित्य अश्या ग्रामीण शब्द रत्नांनी भरून गेले आहे, त्याचे वाचन करण्याचे मी येथे आवाहन करतो.

In reply to by psajid

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 14:52
पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. साहित्यात जे आहे तेच प्रमाण असं होत नाही.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:47
मग पोरा इ. शब्द प्रेमाने वापरणारे लोक सगळे चु* आहेत का, त्याचाही खुलासा करावा. आणि झालंच तर, निव्वळ चार टाळकी म्हणतात म्हणून त्या शब्दाचा अर्थ तो होतो असे बाकीच्यांनी का मानावे? या तथाकथित हुच्चभ्रू तुच्छतादर्शक मानसिकतेचा निषेध असो. आता बघा, असे म्हटले की चर्चा लगेच डिफ्लेक्ट करणारच. ग्रामीण म्हणजे आदरहीन तर शहरी म्हणजे आदरयुक्त इ. हास्यास्पद बायस डोक्यात असलेले लोक ही मराठीची खरी शोकांतिका आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ कालौघात बदलत जातो, आणि डिक्षनरी अर्थापेक्षा प्रचलित अर्थच महत्त्वाचा असतो व्यवहारात हे साधे तत्त्व लक्षात न घेता समाजाला हाड थू म्हणण्याची ही जी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती आहे तिला आवर घालणे वेळीच गरजेचे आहे. मिपावर असली तर्कटे अधूनमधून दिसतात ते पाहून वाईट वाटतं. मिपाच्या मोकळ्या इमेजला हे अगदीच विसंगत आहे.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:22
उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ नाही. मी शब्दाच्या अर्थाबद्दल मत विचारतोय; कुणाला उगाच चु* कशाला ठरवताय?

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 14:30
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 14:49
अर्थ लक्षात न घेताच वापरायचा असेल शब्द, आणि तोच्च बरोबर मानायचा असेल तर... हेहे ! आनंद आहे मग. शहरात्/गावात चा प्रश्नच नाही. आपल्याला काय वाटतं/पटतं चा प्रश्न आहे. असो.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ गुरुवार, 09/11/2014 - 17:18
मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले जाणारे बरेच शब्द मराठीत आहेत. उदा: हौस हा शब्द ज्यापासून तयार झालेला आहे तो फार्सी शब्द " हवस" हा आहे. हा अर्थ लक्षात घेतल्यावर तुम्ही म्हणाला का कोणाला की अमूक तमूक फार हौशी आहेत म्हणून?

In reply to by वेल्लाभट

एस गुरुवार, 09/11/2014 - 15:07
माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं.
ही तुमची समजूतही तितकीच निरर्थक, निराधार आणि साफ चुकीची आहे.

In reply to by एस

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:53
असेच म्हणतो. या समजुतीस आधार काय तर सांगोवांगी! आयव्हरी टॉवरवाली तुच्छता मानसिकता दिसते, दुसरे काही नाही. इतकाच कळवळ आलाय तर निव्वळ डिक्षनरी मीनिंग तरी का म्हणून फॉलो करावे हे सांगा. अन डिक्षनरी तरी बनवली कशावरून? माणसांना विचारूनच ना? मग कशाला फालतूचा कळवळा?

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:26
हे बाकी बरोबर म्हणालात. डिक्शनरी ला अर्थच नाही. आपल्याला आवडेल तो शब्द आवडेल त्या अर्थाने आवडेल तेंव्हा आवडेल त्याला उद्देशून वापरायचा. हाय काय न्न नाय काय ! प्राणी फुल्ल कशाला उकाळा कडकलक्ष्मी उदित नारायण. (याचा अर्थ तुम्ही सॉलिड विद्वान आहात)

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:38
आक्रस्ताळेपणामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. बहुसंख्य लोकांनी एखादा शब्द एखाद्या अर्थाने वापरला, तर तोच अर्थ रूढ होतो. याची इतिहासात कैक उदाहरणे आहेत. उदा. थेरडा या शब्दाचं पाहू. त्याचं मूळ आहे संस्कृतातला स्थविर हा शब्द. ज्ञानवृद्ध इ. छापाचा सन्माननीय अर्थ आहे त्याचा. अर्थ तोच ठेवून प्राकृतात तो शब्द थेर म्हणून आला आणि मराठीत मात्र त्याचा अपमानास्पद थेरडा झाला. मग मराठी अर्थ चूक की बरोबर? मराठीपुरता त्याचा अर्थ सन्माननीय मानणार्‍यांची बहुसंख्या आहे काय? तर नाही. पण उद्या कधी झाली, तर हा शब्दही पुन्हा सन्माननीय अर्थाने वापरणे रूढ होईल. तीच गोष्ट मर्द या शब्दाची. त्याचा वरिजिनल फारसी अर्थ 'मर्त्य' हाच आहे. किंबहुना तो शब्द हा संस्कृतच्या मर्त्य चाच कॉग्नेट आहे. त्या शब्दाला इतकं ग्लॅमर प्राप्त झालं असलं तरी तो त्याचा मूळ अर्थ नव्हे. पण व्यवहारातला अर्थ कालांतराने दृढमूल होतो.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:46
वरिजिनल दाव्याला सांगोवांगीपलीकडे विदा न देता भेदभाव पाहिल्यामुळे तसे जाहले, येकडाव मापी करा जमल्यास... तूर्त मोल्सवर्थचा दुवा पहा. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=304&table=molesworth&display=utf8 पोर [ pōra ] n A child. Pr. पोरा आणि बुद्धि तेरा Children are fickle and flighty. 2 m A little boy. 3 f A little girl. 4 n Applied to a pup, cub, whelp &c.

In reply to by बॅटमॅन

पिंपातला उंदीर गुरुवार, 09/11/2014 - 17:25
सह्मत. आमच्या परभणी भागात आई वडिलाना आमच म्हातार / आमची म्हातारी अस बोलण्याची पद्धत आहे . विशेषता बहुजन समाजात . पण त्यात तुच्छता नसून एक अकृत्रिम जिव्हाळा असतो

In reply to by पिंपातला उंदीर

भिंगरी गुरुवार, 09/11/2014 - 19:11
म्हातारा/म्हातारी बरी आहे का?असं विचारलं जातं त्याचा अर्थ आई/वडील किंवा सासू/सासरे बरे आहेत का? असा होतो.

psajid गुरुवार, 09/11/2014 - 15:52
मला हे असे वाटतं असे मी म्हणालो याचा अर्थ तो तुम्हाला पटलाच पाहिजे असे थोडेच आहे. ग्रामीण शहरी असे नाही मात्र कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल. हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे. पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. या बाबतीत माझी समजूत तुम्ही म्हणताय तशी चुकीची असू शकते त्याला जपतच जगत आलोय याचा खेद मुळीच नाही. असो !

प्रचेतस गुरुवार, 09/11/2014 - 16:29
मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम 'पौर' ह्या संस्कृत शब्दापासून झालाय. पौर म्हणजे राजाची प्रजा. प्रजा ही राजाला पुत्रासमान. पौरचे प्राकृत रूप पोर असे होते.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:31
लिट्रल मीनिंगच पायजे तर हे घ्या म्हणावं. मूळ प्राकृत अर्थापासून वेगळा अर्थ घ्यावयाची जुर्रत होणे आणि तो वेगळा अर्थच बरोबर असे सांगून बोंबा मारणे हे अतिशय रोचक आहे. यावरून दिसते की तथाकथित वाईट अर्थ हाच उपटसुंभ आहे आणि जन्ता सगळी वरिजिनल प्राकृत अर्थच नीट वापरत आहे. आता बोला, कुणाचे चुकले? =))

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:35
तुम्हाला होता का माहित अर्थ? जर हो.... तर सांगायचा होतात... माझंच्च्च बरोबर असा सूर धाग्यात नाही. जर नाही.... तर तुम्हीही तुमचीच समजूत बरोबर मानून चालत होतात ना? मग तुम्ही वेगळे ते कसे? जर यापैकी काहीही नाही; तर वल्लीशेट म्हणतात तोच्च्च बरोबर अर्थ आहे किंवा नाही याची खातरजमा करयाचा विचार केलात का? की सूर्य म्हणाला पूर्व....म्हणजे पूर्व?

तिमा गुरुवार, 09/11/2014 - 16:42
माझ्या जन्माचा दाखला हवा होता म्हणून अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. ओरिजिनल कागद पानशेतच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी मग अमुक अमुक बाईंना पोरटे जन्मले, असा मजकूर असलेले एक सर्टिफिकेट आमच्या हाती सोपवले. ते वाचून त्यावेळेस आमची आई पुणे महानगरपालिकेला हंसली होती. या विषयाच्या निमित्त्ताने: सध्या वर्तमानपत्रांत लहान मुलींचा उल्लेख 'चिमुरडी' असा करतात. उदा. 'चिमुरडीवर बलात्कार'. याठिकाणी त्यांना 'चिमुकली' हा शब्द जास्त सौम्य वाटत नाही का ? म्हणजे आधीच अत्याचार झालेला आणि त्यांत 'चिमुरडी' म्हणून हिणवल्यासारखे वाटते.

In reply to by तिमा

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 16:47
+१ गळा चिरुन हत्या, पक्षातुन हकालपट्टी वाचुन पण असेच विचित्र वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आदूबाळ गुरुवार, 09/11/2014 - 17:12
+२ "छोटेखानी" लेख/मुलाखत वगैरे वाचून छोटेखान या काल्पनिक ड्वार्फचं चित्र डोळ्यांसमोर येतं.

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 16:46
नेहमी संयत भाषेत प्रतिसाद देणारे वेल्लाभट यावेळी चवताळलेले पाहुन आश्चर्य वाटले. (ढोलाच्या धाग्यावर लोकांनी यापेक्षा जास्त टीका करुनही तेव्हा खुपच संयत प्रतिसाद होते) १०० क्लब मधे जाण्याची / राहण्याची तयारी म्हणायची का ही?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:50
नाही ब्वा ! :D अशी तयारी बियारी नाही हं. ते आपलं; पुढच्याने आपल्या सर्व्हिसला स्म्याश मारला की आपण पण त्याच्या सर्व्हिस ला स्म्याश मारतो ना... तसं काहीसं.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 16:56
हेच चुकते तुम्हा लोकांचे स्मॅश मारला की बर्‍याचदा प्वाईंट संपतो तिकडेच. तुम्ही स्क्वॉशची प्रॅक्टीस केली पाहिजे. गेम बराच वेळ चालु राहतो. ;) (स्क्वॉशसाठी मिपाच्या जाणत्या लोकांचे शिष्यत्व घेण्याच्या विचारात असलेला) सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:33
स्मॅश मारणं बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही होतं. लॉन टेनिसमध्ये फारसं दिसत नाही, पण तोच शब्द वापरतात. भारतीय लोक (उकडलेला बटाटा, इ.) कुस्करण्याला इंग्लिश आणि हल्ली मराठीमध्येही स्मॅश म्हणतात. (बाकीच्या देशांमध्ये इंग्लिश शब्द मॅश). ही उगाच आपली माहितीची देवाणघेवाण.

विजुभाऊ गुरुवार, 09/11/2014 - 17:21
शब्दबंबाळ हा शब्द योग्य अर्थाने आला आहे. काही शब्द उदा : "वकूब" या मराठी शब्दाचा मूळ फार्सी शब्द वकूफ = शिक्षण हा आहे अवांतर " पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेत ठेवायचा?

विअर्ड विक्स Sun, 09/14/2014 - 09:58
पोर या शब्दावरून पोरकट वाद घालून काय पोरखेळ चालवलाय!!!!!!!! अर्थ काहीही असो , पोर या शब्दावरून प्रौढातील पोरकटपणा मात्र नक्की ठळक दिसला….

साती Sun, 09/14/2014 - 12:54
गळ्यान साखळी सोन्याची ह्या सुप्रसिद्ध लोकगीतात 'ही पोरगी कोणाची?'असेच विचारले आहे. या गीतातच तिच्या आईवडिलांच्या शारिरीक ठेवणीचे, स्वभावाचे वर्णन येते. यावरून ती अनाथ नसून आईवडिलांसह रहाते असे अनुमान काढण्यास जागा आहे. 'आईस बी कडकी नी बापूस बी कडका ही जाडी पोरी कोणाची ' तसेच यावरून आईवडिलांकरिता आईस बापूस हा शब्द वापरला जातो, शिवी म्हणून नव्हे हे ही सिद्ध होते. --संदर्भ महाराष्ट्र संस्कृती आणि भाषाकोश : लेखिका- डॉ साती काळे.

In reply to by साती

पैसा Sun, 09/14/2014 - 13:41
तुमच्या संशोधनाला पूरक असे माझेही संशोधन आहे गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय या जगप्रसिद्ध गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर पोरीचा बापूस कवटं चोर असा उल्लेख आहे. म्हणजे पोर बापूस आणि कवटं हे तिन्ही शब्द ग्रामीण समाजमनात किती घट्ट मूळ धरून आहेत हे सहज समजून यावे. -प्रा. डॉ. किती शहाणे

In reply to by एस

पैसा Sun, 09/14/2014 - 22:19
सातीने नुसतंच डॉ. लिहिलंय. मग मी तिच्याहून जास्त म्हणून दाखवायला नको? :-/ :P :D

In reply to by पैसा

एस Sun, 09/14/2014 - 22:47
मूळ प्राडॉ यांचे बिरूद काढून आपणांस देण्यात येत आहे. प्राडॉ पैसातैकी जय. :-)

In reply to by एस

पैसा Sun, 09/14/2014 - 22:54
नको नको! ते पोरं हाकायचं काम प्रा.डो. मस्त करतात. आपल्याला नाही झेपायचं ते!

batman आणि वेल्लाभट यांना.. तशी चांगली चर्चा रंगली..batman यांनी दिलेला धागा पण आवडला..सहज मनात एक प्रश्न आला... कि आज आपण म्हणतो कि बोली भाषेतला अर्थ महत्वाचा वगैरे...ठीक आहे...(कि हा 'की' असा हवा होता,) पण आता अनेक शब्द आपण अनेक वेगळ्या अर्थाने वापरत आहोतच,"भावना पोहोचल्या पाहिजेत, भाषेची निर्मिती त्यासाठीच आहे...." हे सगळं पटत..पण आपण आज जी भाषा वापरतो , ती आपल्याला आपल्या पूर्वजांची देणगी आहे...समृद्ध होण वेगळं आणि हे असे शब्द मिळण वेगळं ना... मला असा प्रश्न पडलाय की, आज नंतर लाखो वर्षांनी जेव्हा प्रलयानंतर आपला लिखाण उत्खनन करून काढलं जाईल, तेव्हा किती नवीन शब्द त्यांचे अर्थ कसे शोधतील?? फक्कड, सोम्डीत कोंबडी, वंटास, भिख हे अस.. म्हणून जरा भाषा आहे तशी वापरत राहावी असं वाटत मला.. यावर उपाय काय?? फारसी ,उर्दू या अनेक भाषांच्यामुळे आपल्याकडे अगदी मस्त शब्द रुळले आहेत. पण सध्या भाषा ज्या गतीने ट्रान्झिशन फेज मधून सरकतीय ते सहन नाही होत...

श्रीरंग_जोशी Sun, 09/14/2014 - 20:03
माझे एक निरीक्षण आहे. शिक्षणानिमित्त किंवा नोकरी / व्यवसायानिमित्त स्वतःच्या गावापासून लांबच्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केल्यास बोलिभाषिक सहिष्णुता आपोआप वाढते. माझ्या सुदैवाने शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहायला मिळाले जिथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून लोक शिकायला अन शिकवायला आले होते.

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 11:58
पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही असो, आज तो अर्थ वापरात नाही. पोर हा शब्द आजमितीस ग्रामीण भागात जास्त वापरतात तर मूल हा शब्द शहरी भागात. त्यामुळे पोर/पोरगा/पोरगी/पोरं इ. शब्दांच्या वापराबद्दल उग्गीच अढी बसलेले शहरी लोक त्याला हीन समजतात. बाकी काही नाही.

In reply to by नाव आडनाव

एस गुरुवार, 09/11/2014 - 13:39
आगदी आगदी ह्येच् म्हनाया आलतू. 'माह्यं पोर ते! आसं ब्वॉटं कानावं कडाकडा मोडणारी मायाळू म्हतारी कंदी बघीटल्यी न्हाय की काय?

मधुरा देशपांडे गुरुवार, 09/11/2014 - 12:14
मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण अनेक भागात हा शब्द सहज वापरला जातो. माझ्या घरी आणि आजूबाजूला सुद्धा मी लहानपणापासून हे शब्द ऐकले आहेत. मुलगा/मुलगी आणि पोरगा/पोरगी दोन्ही शब्द वापरले जातात. यापैकी कुणीही पोरका या अर्थाने मुलांकडे बघणारे नाहीत. तो शब्द रुळला आहे सहज. लिखित मराठीत माहीत नाही, पण बोलीभाषेत हा शब्द चुकीचा वाटत नाही.

In reply to by मधुरा देशपांडे

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 12:18
यग्जाक्टली असेच म्हणतो. बोलताना हे शब्द सहज वापरले जातात. त्यांना जज करणे चूक आणि अज्ञानमूलक आहे.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 14:54
असं? मग मी एखाद्याला भो*** म्हटलं तर त्याला शिवी म्हणून जज करणं चूक आणि अज्ञानमूलक आहे का हो?

In reply to by वेल्लाभट

यसवायजी गुरुवार, 09/11/2014 - 15:06
चूक-बरोबर काही नाही. रां**सुद्धा प्रेमानं म्हणता येतं कोल्लाप्रात. आणी 'सदाशीवपेठी/खडकी-दापोडी' ही शिवी असू शकते पुण्यात. स्थळ, काळ, व्यक्ती ब्ला ब्ला...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:43
एक इनोसंट संबोधन आणि शिवी यांचा बादरायण संबंध जोडून मुद्दा भलतीकडे वळवणे जितके अज्ञानमूलक आणि चूक आहे त्यापेक्षा कमीच. :) पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे ऐकून घ्यायची इच्छाच नाही त्याला इलाज नाही. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:20
माफ करा; माझ्या धाग्यात मला 'गावठी' हा शब्द शोधून दाखवावा आपण, आणि मग
पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे
असं म्हणावं.

मार्मिक गोडसे गुरुवार, 09/11/2014 - 12:28
पोरंबाळं कशी आहेत असे खेड्यात सहज विचारले जाते. त्याच खेड्यात एखादीला मूलबाळ आहे कि नाही असेही विचारले जाते.

In reply to by टवाळ कार्टा

सूड गुरुवार, 09/11/2014 - 14:29
>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच हो, बालूशाहीत बालू, गुलाबजामात गुलाब, श्रीखंडात श्री (होणार सून मी धा घरची फेम), सीताफळात सीता हे राह्यलं. ;)

In reply to by सूड

आसिफ गुरुवार, 09/11/2014 - 22:44
>>> सीताफळात सीता हे राह्यलं. सिताफळावरुन उगाचच सिताफळ ईडली (मुक्तपीठ फेम)आठवली. पाककृती आहे का कुणाकडे ? :D ~आसिफ.

In reply to by बॅटमॅन

सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 15:22
मूलकट >> =)) विसर्ग केल्यावर जरा वेगळ्या अनुभुती ची प्राप्ती होवु शकते अशी नोंद करण्यात येत आहे ;) ...असो ...वरील शब्द बर्‍याच धाग्यांना अतिशय अनुचित (फिट्ट ) बसेल :)

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 14:01
दोन्ही शब्द मराठीचे शब्दभांडार आहेत. एका अर्थाचे अनेक शब्द भाषेचे श्रीमंतीचे लक्षन असते आणि त्या त्यांचा उपयोग अनेक भावनांच्या अनेक छटा व्यक्त करायला आणि लेखनात / बोलण्यात वेगवेगळ्या वातावरण निर्मिती करायला उपयोगी पडतात... किंबहुना त्या समानार्थी शब्दातला भावनेला/परिस्थितीला अनुरुप शब्द आपोआप आपल्या वापरात येतो. उदा. १. खेडेगावातील अशिक्षित माय (आई नाही !) "माजं पोर" असं न म्हणता "माझा पुत्र / मुलगा" असं म्ह्णणे खटकेलच, विनोदीही वाटू शकेल. २. शहरातली शिकलेली बाई सुद्धा रागावलेली असताना बहुदा "जमत नाही पोरांना सांभाळायला तर... " असंच म्हणून आपला राग व्यक्त करते. तर यासंबद्धात नियतकालिकात लेख लिहीताना ती, "आपल्या मुलांची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे." असे लिहेल.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:54
ठ्ठो =)) "आमच्या पाल्याला" म्हटले की परसातली पालेभाजी वैग्रे आठवत असे क्वचित कधी ते आठवलं.

psajid गुरुवार, 09/11/2014 - 14:15
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. पोर अर्थात लेकरं यांच्याविषयी काळजी त्या वाक्यात उमटलेली असते असे मला वाटते. ग्रामीण बाजाचा हा शब्द हळुवार भावना घेवून येतो. मुलं हा शब्द ओठातून तर पोर किंवा लेकरू हा शब्द पोटातून (हृदयातून/मनातून) येत असावा याची जाणीव मला होत राहते 'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ? सगळीकडे आईची माया एक सारखीच मात्र 'आय' हा शब्द उच्चारताना मनाला आपुलकी, माया, ममता यांची जी जाणीव होते ती मोठी असावी असे मला नेहमी वाटते. आणि म्हणून मला शहरात सुद्धा पोर किंवा लेकरं या शब्दाचा वापर करताना आपल्याला घाटी म्हणतील या गोष्टीचा न्यूनगंड येत नाही. प्रसिद्ध लेखक श्री. शंकर पाटील यांचे साहित्य अश्या ग्रामीण शब्द रत्नांनी भरून गेले आहे, त्याचे वाचन करण्याचे मी येथे आवाहन करतो.

In reply to by psajid

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 14:52
पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. साहित्यात जे आहे तेच प्रमाण असं होत नाही.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:47
मग पोरा इ. शब्द प्रेमाने वापरणारे लोक सगळे चु* आहेत का, त्याचाही खुलासा करावा. आणि झालंच तर, निव्वळ चार टाळकी म्हणतात म्हणून त्या शब्दाचा अर्थ तो होतो असे बाकीच्यांनी का मानावे? या तथाकथित हुच्चभ्रू तुच्छतादर्शक मानसिकतेचा निषेध असो. आता बघा, असे म्हटले की चर्चा लगेच डिफ्लेक्ट करणारच. ग्रामीण म्हणजे आदरहीन तर शहरी म्हणजे आदरयुक्त इ. हास्यास्पद बायस डोक्यात असलेले लोक ही मराठीची खरी शोकांतिका आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ कालौघात बदलत जातो, आणि डिक्षनरी अर्थापेक्षा प्रचलित अर्थच महत्त्वाचा असतो व्यवहारात हे साधे तत्त्व लक्षात न घेता समाजाला हाड थू म्हणण्याची ही जी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती आहे तिला आवर घालणे वेळीच गरजेचे आहे. मिपावर असली तर्कटे अधूनमधून दिसतात ते पाहून वाईट वाटतं. मिपाच्या मोकळ्या इमेजला हे अगदीच विसंगत आहे.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:22
उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ नाही. मी शब्दाच्या अर्थाबद्दल मत विचारतोय; कुणाला उगाच चु* कशाला ठरवताय?

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 14:30
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 14:49
अर्थ लक्षात न घेताच वापरायचा असेल शब्द, आणि तोच्च बरोबर मानायचा असेल तर... हेहे ! आनंद आहे मग. शहरात्/गावात चा प्रश्नच नाही. आपल्याला काय वाटतं/पटतं चा प्रश्न आहे. असो.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ गुरुवार, 09/11/2014 - 17:18
मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले जाणारे बरेच शब्द मराठीत आहेत. उदा: हौस हा शब्द ज्यापासून तयार झालेला आहे तो फार्सी शब्द " हवस" हा आहे. हा अर्थ लक्षात घेतल्यावर तुम्ही म्हणाला का कोणाला की अमूक तमूक फार हौशी आहेत म्हणून?

In reply to by वेल्लाभट

एस गुरुवार, 09/11/2014 - 15:07
माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं.
ही तुमची समजूतही तितकीच निरर्थक, निराधार आणि साफ चुकीची आहे.

In reply to by एस

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:53
असेच म्हणतो. या समजुतीस आधार काय तर सांगोवांगी! आयव्हरी टॉवरवाली तुच्छता मानसिकता दिसते, दुसरे काही नाही. इतकाच कळवळ आलाय तर निव्वळ डिक्षनरी मीनिंग तरी का म्हणून फॉलो करावे हे सांगा. अन डिक्षनरी तरी बनवली कशावरून? माणसांना विचारूनच ना? मग कशाला फालतूचा कळवळा?

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:26
हे बाकी बरोबर म्हणालात. डिक्शनरी ला अर्थच नाही. आपल्याला आवडेल तो शब्द आवडेल त्या अर्थाने आवडेल तेंव्हा आवडेल त्याला उद्देशून वापरायचा. हाय काय न्न नाय काय ! प्राणी फुल्ल कशाला उकाळा कडकलक्ष्मी उदित नारायण. (याचा अर्थ तुम्ही सॉलिड विद्वान आहात)

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:38
आक्रस्ताळेपणामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. बहुसंख्य लोकांनी एखादा शब्द एखाद्या अर्थाने वापरला, तर तोच अर्थ रूढ होतो. याची इतिहासात कैक उदाहरणे आहेत. उदा. थेरडा या शब्दाचं पाहू. त्याचं मूळ आहे संस्कृतातला स्थविर हा शब्द. ज्ञानवृद्ध इ. छापाचा सन्माननीय अर्थ आहे त्याचा. अर्थ तोच ठेवून प्राकृतात तो शब्द थेर म्हणून आला आणि मराठीत मात्र त्याचा अपमानास्पद थेरडा झाला. मग मराठी अर्थ चूक की बरोबर? मराठीपुरता त्याचा अर्थ सन्माननीय मानणार्‍यांची बहुसंख्या आहे काय? तर नाही. पण उद्या कधी झाली, तर हा शब्दही पुन्हा सन्माननीय अर्थाने वापरणे रूढ होईल. तीच गोष्ट मर्द या शब्दाची. त्याचा वरिजिनल फारसी अर्थ 'मर्त्य' हाच आहे. किंबहुना तो शब्द हा संस्कृतच्या मर्त्य चाच कॉग्नेट आहे. त्या शब्दाला इतकं ग्लॅमर प्राप्त झालं असलं तरी तो त्याचा मूळ अर्थ नव्हे. पण व्यवहारातला अर्थ कालांतराने दृढमूल होतो.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:46
वरिजिनल दाव्याला सांगोवांगीपलीकडे विदा न देता भेदभाव पाहिल्यामुळे तसे जाहले, येकडाव मापी करा जमल्यास... तूर्त मोल्सवर्थचा दुवा पहा. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=304&table=molesworth&display=utf8 पोर [ pōra ] n A child. Pr. पोरा आणि बुद्धि तेरा Children are fickle and flighty. 2 m A little boy. 3 f A little girl. 4 n Applied to a pup, cub, whelp &c.

In reply to by बॅटमॅन

पिंपातला उंदीर गुरुवार, 09/11/2014 - 17:25
सह्मत. आमच्या परभणी भागात आई वडिलाना आमच म्हातार / आमची म्हातारी अस बोलण्याची पद्धत आहे . विशेषता बहुजन समाजात . पण त्यात तुच्छता नसून एक अकृत्रिम जिव्हाळा असतो

In reply to by पिंपातला उंदीर

भिंगरी गुरुवार, 09/11/2014 - 19:11
म्हातारा/म्हातारी बरी आहे का?असं विचारलं जातं त्याचा अर्थ आई/वडील किंवा सासू/सासरे बरे आहेत का? असा होतो.

psajid गुरुवार, 09/11/2014 - 15:52
मला हे असे वाटतं असे मी म्हणालो याचा अर्थ तो तुम्हाला पटलाच पाहिजे असे थोडेच आहे. ग्रामीण शहरी असे नाही मात्र कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल. हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे. पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. या बाबतीत माझी समजूत तुम्ही म्हणताय तशी चुकीची असू शकते त्याला जपतच जगत आलोय याचा खेद मुळीच नाही. असो !

प्रचेतस गुरुवार, 09/11/2014 - 16:29
मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम 'पौर' ह्या संस्कृत शब्दापासून झालाय. पौर म्हणजे राजाची प्रजा. प्रजा ही राजाला पुत्रासमान. पौरचे प्राकृत रूप पोर असे होते.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:31
लिट्रल मीनिंगच पायजे तर हे घ्या म्हणावं. मूळ प्राकृत अर्थापासून वेगळा अर्थ घ्यावयाची जुर्रत होणे आणि तो वेगळा अर्थच बरोबर असे सांगून बोंबा मारणे हे अतिशय रोचक आहे. यावरून दिसते की तथाकथित वाईट अर्थ हाच उपटसुंभ आहे आणि जन्ता सगळी वरिजिनल प्राकृत अर्थच नीट वापरत आहे. आता बोला, कुणाचे चुकले? =))

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:35
तुम्हाला होता का माहित अर्थ? जर हो.... तर सांगायचा होतात... माझंच्च्च बरोबर असा सूर धाग्यात नाही. जर नाही.... तर तुम्हीही तुमचीच समजूत बरोबर मानून चालत होतात ना? मग तुम्ही वेगळे ते कसे? जर यापैकी काहीही नाही; तर वल्लीशेट म्हणतात तोच्च्च बरोबर अर्थ आहे किंवा नाही याची खातरजमा करयाचा विचार केलात का? की सूर्य म्हणाला पूर्व....म्हणजे पूर्व?

तिमा गुरुवार, 09/11/2014 - 16:42
माझ्या जन्माचा दाखला हवा होता म्हणून अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. ओरिजिनल कागद पानशेतच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी मग अमुक अमुक बाईंना पोरटे जन्मले, असा मजकूर असलेले एक सर्टिफिकेट आमच्या हाती सोपवले. ते वाचून त्यावेळेस आमची आई पुणे महानगरपालिकेला हंसली होती. या विषयाच्या निमित्त्ताने: सध्या वर्तमानपत्रांत लहान मुलींचा उल्लेख 'चिमुरडी' असा करतात. उदा. 'चिमुरडीवर बलात्कार'. याठिकाणी त्यांना 'चिमुकली' हा शब्द जास्त सौम्य वाटत नाही का ? म्हणजे आधीच अत्याचार झालेला आणि त्यांत 'चिमुरडी' म्हणून हिणवल्यासारखे वाटते.

In reply to by तिमा

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 16:47
+१ गळा चिरुन हत्या, पक्षातुन हकालपट्टी वाचुन पण असेच विचित्र वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आदूबाळ गुरुवार, 09/11/2014 - 17:12
+२ "छोटेखानी" लेख/मुलाखत वगैरे वाचून छोटेखान या काल्पनिक ड्वार्फचं चित्र डोळ्यांसमोर येतं.

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 16:46
नेहमी संयत भाषेत प्रतिसाद देणारे वेल्लाभट यावेळी चवताळलेले पाहुन आश्चर्य वाटले. (ढोलाच्या धाग्यावर लोकांनी यापेक्षा जास्त टीका करुनही तेव्हा खुपच संयत प्रतिसाद होते) १०० क्लब मधे जाण्याची / राहण्याची तयारी म्हणायची का ही?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 16:50
नाही ब्वा ! :D अशी तयारी बियारी नाही हं. ते आपलं; पुढच्याने आपल्या सर्व्हिसला स्म्याश मारला की आपण पण त्याच्या सर्व्हिस ला स्म्याश मारतो ना... तसं काहीसं.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 16:56
हेच चुकते तुम्हा लोकांचे स्मॅश मारला की बर्‍याचदा प्वाईंट संपतो तिकडेच. तुम्ही स्क्वॉशची प्रॅक्टीस केली पाहिजे. गेम बराच वेळ चालु राहतो. ;) (स्क्वॉशसाठी मिपाच्या जाणत्या लोकांचे शिष्यत्व घेण्याच्या विचारात असलेला) सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 22:33
स्मॅश मारणं बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही होतं. लॉन टेनिसमध्ये फारसं दिसत नाही, पण तोच शब्द वापरतात. भारतीय लोक (उकडलेला बटाटा, इ.) कुस्करण्याला इंग्लिश आणि हल्ली मराठीमध्येही स्मॅश म्हणतात. (बाकीच्या देशांमध्ये इंग्लिश शब्द मॅश). ही उगाच आपली माहितीची देवाणघेवाण.

विजुभाऊ गुरुवार, 09/11/2014 - 17:21
शब्दबंबाळ हा शब्द योग्य अर्थाने आला आहे. काही शब्द उदा : "वकूब" या मराठी शब्दाचा मूळ फार्सी शब्द वकूफ = शिक्षण हा आहे अवांतर " पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेत ठेवायचा?

विअर्ड विक्स Sun, 09/14/2014 - 09:58
पोर या शब्दावरून पोरकट वाद घालून काय पोरखेळ चालवलाय!!!!!!!! अर्थ काहीही असो , पोर या शब्दावरून प्रौढातील पोरकटपणा मात्र नक्की ठळक दिसला….

साती Sun, 09/14/2014 - 12:54
गळ्यान साखळी सोन्याची ह्या सुप्रसिद्ध लोकगीतात 'ही पोरगी कोणाची?'असेच विचारले आहे. या गीतातच तिच्या आईवडिलांच्या शारिरीक ठेवणीचे, स्वभावाचे वर्णन येते. यावरून ती अनाथ नसून आईवडिलांसह रहाते असे अनुमान काढण्यास जागा आहे. 'आईस बी कडकी नी बापूस बी कडका ही जाडी पोरी कोणाची ' तसेच यावरून आईवडिलांकरिता आईस बापूस हा शब्द वापरला जातो, शिवी म्हणून नव्हे हे ही सिद्ध होते. --संदर्भ महाराष्ट्र संस्कृती आणि भाषाकोश : लेखिका- डॉ साती काळे.

In reply to by साती

पैसा Sun, 09/14/2014 - 13:41
तुमच्या संशोधनाला पूरक असे माझेही संशोधन आहे गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय या जगप्रसिद्ध गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर पोरीचा बापूस कवटं चोर असा उल्लेख आहे. म्हणजे पोर बापूस आणि कवटं हे तिन्ही शब्द ग्रामीण समाजमनात किती घट्ट मूळ धरून आहेत हे सहज समजून यावे. -प्रा. डॉ. किती शहाणे

In reply to by एस

पैसा Sun, 09/14/2014 - 22:19
सातीने नुसतंच डॉ. लिहिलंय. मग मी तिच्याहून जास्त म्हणून दाखवायला नको? :-/ :P :D

In reply to by पैसा

एस Sun, 09/14/2014 - 22:47
मूळ प्राडॉ यांचे बिरूद काढून आपणांस देण्यात येत आहे. प्राडॉ पैसातैकी जय. :-)

In reply to by एस

पैसा Sun, 09/14/2014 - 22:54
नको नको! ते पोरं हाकायचं काम प्रा.डो. मस्त करतात. आपल्याला नाही झेपायचं ते!

batman आणि वेल्लाभट यांना.. तशी चांगली चर्चा रंगली..batman यांनी दिलेला धागा पण आवडला..सहज मनात एक प्रश्न आला... कि आज आपण म्हणतो कि बोली भाषेतला अर्थ महत्वाचा वगैरे...ठीक आहे...(कि हा 'की' असा हवा होता,) पण आता अनेक शब्द आपण अनेक वेगळ्या अर्थाने वापरत आहोतच,"भावना पोहोचल्या पाहिजेत, भाषेची निर्मिती त्यासाठीच आहे...." हे सगळं पटत..पण आपण आज जी भाषा वापरतो , ती आपल्याला आपल्या पूर्वजांची देणगी आहे...समृद्ध होण वेगळं आणि हे असे शब्द मिळण वेगळं ना... मला असा प्रश्न पडलाय की, आज नंतर लाखो वर्षांनी जेव्हा प्रलयानंतर आपला लिखाण उत्खनन करून काढलं जाईल, तेव्हा किती नवीन शब्द त्यांचे अर्थ कसे शोधतील?? फक्कड, सोम्डीत कोंबडी, वंटास, भिख हे अस.. म्हणून जरा भाषा आहे तशी वापरत राहावी असं वाटत मला.. यावर उपाय काय?? फारसी ,उर्दू या अनेक भाषांच्यामुळे आपल्याकडे अगदी मस्त शब्द रुळले आहेत. पण सध्या भाषा ज्या गतीने ट्रान्झिशन फेज मधून सरकतीय ते सहन नाही होत...

श्रीरंग_जोशी Sun, 09/14/2014 - 20:03
माझे एक निरीक्षण आहे. शिक्षणानिमित्त किंवा नोकरी / व्यवसायानिमित्त स्वतःच्या गावापासून लांबच्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केल्यास बोलिभाषिक सहिष्णुता आपोआप वाढते. माझ्या सुदैवाने शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहायला मिळाले जिथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून लोक शिकायला अन शिकवायला आले होते.
नमस्कार! मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे. 'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ८

स्पार्टाकस ·

एस गुरुवार, 09/11/2014 - 10:58
हा भाग सर्वात जास्त आवडला... भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले. कदाचित डीएनए मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाने त्यांचे हयात असलेले वंशज शोधून काढता येतील. पण हे गवताच्या गंजीतून सुई शोधून काढण्यासारखे आहे.

In reply to by एस

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 11:08
+१ भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिद गुरुवार, 09/11/2014 - 16:02
+२

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 12:58
अगदी हाच प्रश्न पडला आहे. ते सांगाडे तिथे अचानक येणे हे जास्त गूढ वाढते. कारण बर्फाचा थर तर वाढत जाइल ना. असे अचानक एकाएकी सांगाडे वर नाही यायचे.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/11/2014 - 12:36
त्याचप्रमाणे तिथे सापडलेल्या वस्तू हा घटनाक्रम सिद्ध करण्यात जास्त उपयोगी पडल्या असे मानले जाते. १. चामड्याच्या चपला - ज्या त्या काळात देखील कोल्हापूर भागात बनवल्या जात व त्या अन्य व्यापारी मार्गानी निर्यात देखील होत असत. ज्या चपला रूपकुंड परीसरात सापडल्या त्यात काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते. जे हे दर्शवतात की सदर यात्रेकरु भरपूर अंतर चालून आले होते. २. लाखेच्या ठीपक्यांचे नक्षीकाम असलेल्या काचेच्या बांगड्या - आजही या बांगड्या मध्यप्रदेशात लोकप्रिय आहेत व बनविल्या जातात. पूर्वीपासून या बांगड्या आणि तशी नक्षीकला मध्य प्रदेशात अस्तित्वात होती व प्रसिद्धही होती. हे यात्रेकरू मध्यप्रदेशातून वर उत्तरेत आले असावेत आणि मध्य प्रदेशात ही बांगड्यांची खरेदी झाली असावी असा विचार सांगितला जातो. वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये ह्या विषयावर डॉ जोगळेकर, डॉ वाळिंबे, डॉ शरद राजगुरु यांचे या विषयावर व्याख्यान झाले होते. मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे डीएनए चे रिझल्ट हाती असूनही चित्पावन ब्राम्हणांचा उल्लेख न केल्याचे डॉ जोगळेकर यांनी व्याख्यानानंतर त्यांच्याशी बोलताना सांगितले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 12:57
मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे काय संबंध? यामुळे मराठा महासंघाचे नेमके काय जळत होते? की रुप्कुंडात कोब्रा ८५० साली पोचले होते या गोष्टीने त्यांचे पोट दुखत होते? अशी धमकी का बरे दिली गेली असावी (दिली गेली असेल तर)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चैदजा Sun, 09/14/2014 - 19:49
काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते.
हे जर खरे असेल, तर ती मंडळी चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणचं असणार यांत शंका नाही. हें हें हें.

In reply to by विजुभाऊ

एस Sun, 09/14/2014 - 22:54
रेल्वेच्या कामगारांनी घातलेला गोंधळ आहे. बातमीतच त्याचा खुलासा आहे. आधीच्या प्याशेंजरीचे दुरुस्त करायला आलेले डब्बे समजून ह्या प्याशेंजरला पिटाळली ह्यांनी. मग ही ट्रेन कशी दाखवायची म्हणून इकडून तिकडून दुसरे डब्बे गोळा करून जोडले आणि हीपण प्याशेंजर बनवून काढून दिलीन् पुडं. भारतीय रेल की जय!

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/11/2014 - 15:20
बांगड्या वगैरे ठिक आहे. पण सन ८५० सालच्या चपला कशा काय बरं आत्ताच्या आधुनिक आकृतीबंधात बांधलेल्या आढळतात कुणास ठाऊक ?

In reply to by प्रमोद देर्देकर

कवितानागेश गुरुवार, 09/11/2014 - 15:24
फिरुन फिरुन त्याच फॅशन्स येतात की. तसंच काहीतरी असेल. शिवाय ८५० ते २०१४ या काळात होमो सेपियनच्या पावलात काही फरक पडला नसावा. :)

मदनबाण गुरुवार, 09/11/2014 - 16:23
झी न्यूजवर फार पूर्वी यावर एक एपिसोड पाहिल्याचे स्मरते ! बाकी मराठा महासंघाने धमकी देण्याचे काय कारण असावे ? इथे सुद्धा पोटदुखी ? की अपचन ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

lakhu risbud Sun, 09/14/2014 - 00:42
उगा साप साप म्हणून भुई थोपटू नये.कुठलातरी आयडी काहीही पुरावे न देता काहीतरी विधान करतो आणि सुज्ञ म्हणविणाऱ्या इतर महाभागांनी त्याच्या सुरात सूर मिसळावा. इथे कुठल्याही ब्रिगेड ची बाजू घेण्याचा हेतू नाही( i personally strongly condemn those things) पण काही अतिहुशार आईडी कुठलाही विषय बी/सी /डी ग्रेडीला जोडून बघण्याचा का प्रयत्न करतात कळत नाही. का ब्राम्हण x कुठलीतरी ब्रिगेड जुंपून देण्यात कोणता कंड शमतो ते तरी कळावे .

एस गुरुवार, 09/11/2014 - 10:58
हा भाग सर्वात जास्त आवडला... भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले. कदाचित डीएनए मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाने त्यांचे हयात असलेले वंशज शोधून काढता येतील. पण हे गवताच्या गंजीतून सुई शोधून काढण्यासारखे आहे.

In reply to by एस

सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 11:08
+१ भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिद गुरुवार, 09/11/2014 - 16:02
+२

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 12:58
अगदी हाच प्रश्न पडला आहे. ते सांगाडे तिथे अचानक येणे हे जास्त गूढ वाढते. कारण बर्फाचा थर तर वाढत जाइल ना. असे अचानक एकाएकी सांगाडे वर नाही यायचे.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/11/2014 - 12:36
त्याचप्रमाणे तिथे सापडलेल्या वस्तू हा घटनाक्रम सिद्ध करण्यात जास्त उपयोगी पडल्या असे मानले जाते. १. चामड्याच्या चपला - ज्या त्या काळात देखील कोल्हापूर भागात बनवल्या जात व त्या अन्य व्यापारी मार्गानी निर्यात देखील होत असत. ज्या चपला रूपकुंड परीसरात सापडल्या त्यात काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते. जे हे दर्शवतात की सदर यात्रेकरु भरपूर अंतर चालून आले होते. २. लाखेच्या ठीपक्यांचे नक्षीकाम असलेल्या काचेच्या बांगड्या - आजही या बांगड्या मध्यप्रदेशात लोकप्रिय आहेत व बनविल्या जातात. पूर्वीपासून या बांगड्या आणि तशी नक्षीकला मध्य प्रदेशात अस्तित्वात होती व प्रसिद्धही होती. हे यात्रेकरू मध्यप्रदेशातून वर उत्तरेत आले असावेत आणि मध्य प्रदेशात ही बांगड्यांची खरेदी झाली असावी असा विचार सांगितला जातो. वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये ह्या विषयावर डॉ जोगळेकर, डॉ वाळिंबे, डॉ शरद राजगुरु यांचे या विषयावर व्याख्यान झाले होते. मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे डीएनए चे रिझल्ट हाती असूनही चित्पावन ब्राम्हणांचा उल्लेख न केल्याचे डॉ जोगळेकर यांनी व्याख्यानानंतर त्यांच्याशी बोलताना सांगितले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 12:57
मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे काय संबंध? यामुळे मराठा महासंघाचे नेमके काय जळत होते? की रुप्कुंडात कोब्रा ८५० साली पोचले होते या गोष्टीने त्यांचे पोट दुखत होते? अशी धमकी का बरे दिली गेली असावी (दिली गेली असेल तर)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चैदजा Sun, 09/14/2014 - 19:49
काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते.
हे जर खरे असेल, तर ती मंडळी चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणचं असणार यांत शंका नाही. हें हें हें.

In reply to by विजुभाऊ

एस Sun, 09/14/2014 - 22:54
रेल्वेच्या कामगारांनी घातलेला गोंधळ आहे. बातमीतच त्याचा खुलासा आहे. आधीच्या प्याशेंजरीचे दुरुस्त करायला आलेले डब्बे समजून ह्या प्याशेंजरला पिटाळली ह्यांनी. मग ही ट्रेन कशी दाखवायची म्हणून इकडून तिकडून दुसरे डब्बे गोळा करून जोडले आणि हीपण प्याशेंजर बनवून काढून दिलीन् पुडं. भारतीय रेल की जय!

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/11/2014 - 15:20
बांगड्या वगैरे ठिक आहे. पण सन ८५० सालच्या चपला कशा काय बरं आत्ताच्या आधुनिक आकृतीबंधात बांधलेल्या आढळतात कुणास ठाऊक ?

In reply to by प्रमोद देर्देकर

कवितानागेश गुरुवार, 09/11/2014 - 15:24
फिरुन फिरुन त्याच फॅशन्स येतात की. तसंच काहीतरी असेल. शिवाय ८५० ते २०१४ या काळात होमो सेपियनच्या पावलात काही फरक पडला नसावा. :)

मदनबाण गुरुवार, 09/11/2014 - 16:23
झी न्यूजवर फार पूर्वी यावर एक एपिसोड पाहिल्याचे स्मरते ! बाकी मराठा महासंघाने धमकी देण्याचे काय कारण असावे ? इथे सुद्धा पोटदुखी ? की अपचन ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

lakhu risbud Sun, 09/14/2014 - 00:42
उगा साप साप म्हणून भुई थोपटू नये.कुठलातरी आयडी काहीही पुरावे न देता काहीतरी विधान करतो आणि सुज्ञ म्हणविणाऱ्या इतर महाभागांनी त्याच्या सुरात सूर मिसळावा. इथे कुठल्याही ब्रिगेड ची बाजू घेण्याचा हेतू नाही( i personally strongly condemn those things) पण काही अतिहुशार आईडी कुठलाही विषय बी/सी /डी ग्रेडीला जोडून बघण्याचा का प्रयत्न करतात कळत नाही. का ब्राम्हण x कुठलीतरी ब्रिगेड जुंपून देण्यात कोणता कंड शमतो ते तरी कळावे .
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतातील बहुतेक सर्व राज्यांवर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या या देशात निसर्गाचे अनेक अविष्कार पाहण्यास मिळतात. अनेक उत्तुंग पर्वतराजी, शेकडो मैलांचा सागरकिनारा, रखरखीत वाळवंट, सदाहरीत जंगले आणि अतिवृष्टीचे प्रदेश अशी निसर्गाची अनेक रुपं इथे अनुभवण्यास मिळतात. भारतीय उपखंडाचा मुकुटमणी म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील प्राचीन काळात झालेल्या घर्षणामुळे हिमालयाची निर्मीती झाली.