मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फाइंडिंग माय !!!

सूड ·

In reply to by एस

सस्नेह 14/09/2014 - 22:56
विस्कळितपणातूनही जे काही पोचायचं ते पोचलं.

In reply to by श्रीरंग_जोशी

सूड 14/09/2014 - 15:44
नोप!! :) पण काल मुव्ही बघून ही कोंकणीं 'उलय'णारी माय आणि तिच्या घरातली माणसं इतकी आठवली की लिहील्याशिवाय राहावलं नाही.

पैसा 14/09/2014 - 08:10
लहानपणच्या आठवणी बहुधा अशाच असतात. कोणाचंच पुरतं चित्र आपल्या मनात तयार होत नाही. आणि त्यामुळेच बहुधा नंतर ही अशी अर्धी राहिलेली चित्रं जास्तच चुटपूट लावून जातात.

धन्या 14/09/2014 - 09:14
सुंदर लिहीलंय. पिच्चरने बोअर मारल्यामुळे मी मोबिलेशी खेळत असताना आणि वल्ली पिच्चर "अंगठ्याचा देव" नसल्यामुळे चक्क झोपा काढत असताना पडद्यावर जे काही चालू होतं ते पाहून तुझ्या डोक्यातही बरंच काही चालू होतं तर. :)

इनिगोय 14/09/2014 - 19:09
लहानपण हे असंच अनेक तुकड्यांचं बनलेलं मस्त चित्र असतं. छान झालंय. थोडे स्थळकाळाचे तपशील अजून आले असते तर पटकन समजलं असतं. पुढचा सिनेमा पाहिलास की नाही?

स्पा 14/09/2014 - 21:58
लहानपणातले हे कोलाज अनुभव आवडले,विस्कळीत पणामुळेच प्रभावी वाटलं पण अजुन खुलवता आलं असतं असंवाटताय अवांतर : बाकी ईतका भिकार पिक्चर दिडक्या मोजुन पहायला गेलात त्याबद्दल दंडवत्स !!!!

समीरसूर 17/09/2014 - 10:04
आवडला. असे बरेच लोकं असतात. जे सतत आठवणीत राहतात, तेवढ त्यांच्याशी थेट संबंध आलेला नसतो. त्यांचं काय होतं हे खूप नंतर कळतं. काहीही झालं तरी वाईट वगैरे वाटत नाही पण आठवणींच्या अगणित धाग्यांपैकी एक तट्टकन तुटतो हे खरं. बाकी 'फाईंडिंग फॅनी' मी पण हौसेने बघायला गेलो होतो. शनिवारचा सिटी प्राईडचा रात्री ९ चा शो. २५० तिकीट. बुकमायशोचे ५६ रुपये वेगळे. टोटल ५५६ रुपये. ६० रुपयांच्या लाह्या!!! आणि पिक्चर अत्यंत भिकार, टुकार...काय चाललंय काहीच कळत नव्हतं. कोण कुठे कशासाठी काय करतंय काहीच पत्ता नाही. पेट्रोल काय संपतं, तिथेच चित्र काय काढतात, तिथेच 'जंगल मे दंगल' काय होते, इकडे डिंपल झाडाखाली पसरते काय, पंकज कपूरला गोळी लागून तो कारमधून तलावात थेट तळाशी काय जातो, त्याचा पत्ता कुणालाच नसतो, मध्येच प्रेतयात्रा काय्...लै म्हणजे लैच उच्छाद! कशाचा कशाला संबंध नाही. सगळं असंबद्ध आणि रटाळ... दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता...

In reply to by समीरसूर

सूड 17/09/2014 - 11:57
>>दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता... आता कसं बोल्लात!! कधी नव्हे ती दीपिका आवडली. ;) बाकी मुव्हीत असंबद्ध काही वाटलं नाही हो. बाकी परिक्षण लिहीलंत की बोलू, या धाग्यावर ती चर्चा अयोग्य होईल. असो. :)

In reply to by शिद

काउबॉय 17/09/2014 - 23:31
Being Sirus ने आधीच डोक्याला इतका शॉट लागला होता की हां चित्रपट पहावा हां विचार स्वप्नातही आला न्हवता. आता परिक्षण येउदेच.

In reply to by एस

सस्नेह 14/09/2014 - 22:56
विस्कळितपणातूनही जे काही पोचायचं ते पोचलं.

In reply to by श्रीरंग_जोशी

सूड 14/09/2014 - 15:44
नोप!! :) पण काल मुव्ही बघून ही कोंकणीं 'उलय'णारी माय आणि तिच्या घरातली माणसं इतकी आठवली की लिहील्याशिवाय राहावलं नाही.

पैसा 14/09/2014 - 08:10
लहानपणच्या आठवणी बहुधा अशाच असतात. कोणाचंच पुरतं चित्र आपल्या मनात तयार होत नाही. आणि त्यामुळेच बहुधा नंतर ही अशी अर्धी राहिलेली चित्रं जास्तच चुटपूट लावून जातात.

धन्या 14/09/2014 - 09:14
सुंदर लिहीलंय. पिच्चरने बोअर मारल्यामुळे मी मोबिलेशी खेळत असताना आणि वल्ली पिच्चर "अंगठ्याचा देव" नसल्यामुळे चक्क झोपा काढत असताना पडद्यावर जे काही चालू होतं ते पाहून तुझ्या डोक्यातही बरंच काही चालू होतं तर. :)

इनिगोय 14/09/2014 - 19:09
लहानपण हे असंच अनेक तुकड्यांचं बनलेलं मस्त चित्र असतं. छान झालंय. थोडे स्थळकाळाचे तपशील अजून आले असते तर पटकन समजलं असतं. पुढचा सिनेमा पाहिलास की नाही?

स्पा 14/09/2014 - 21:58
लहानपणातले हे कोलाज अनुभव आवडले,विस्कळीत पणामुळेच प्रभावी वाटलं पण अजुन खुलवता आलं असतं असंवाटताय अवांतर : बाकी ईतका भिकार पिक्चर दिडक्या मोजुन पहायला गेलात त्याबद्दल दंडवत्स !!!!

समीरसूर 17/09/2014 - 10:04
आवडला. असे बरेच लोकं असतात. जे सतत आठवणीत राहतात, तेवढ त्यांच्याशी थेट संबंध आलेला नसतो. त्यांचं काय होतं हे खूप नंतर कळतं. काहीही झालं तरी वाईट वगैरे वाटत नाही पण आठवणींच्या अगणित धाग्यांपैकी एक तट्टकन तुटतो हे खरं. बाकी 'फाईंडिंग फॅनी' मी पण हौसेने बघायला गेलो होतो. शनिवारचा सिटी प्राईडचा रात्री ९ चा शो. २५० तिकीट. बुकमायशोचे ५६ रुपये वेगळे. टोटल ५५६ रुपये. ६० रुपयांच्या लाह्या!!! आणि पिक्चर अत्यंत भिकार, टुकार...काय चाललंय काहीच कळत नव्हतं. कोण कुठे कशासाठी काय करतंय काहीच पत्ता नाही. पेट्रोल काय संपतं, तिथेच चित्र काय काढतात, तिथेच 'जंगल मे दंगल' काय होते, इकडे डिंपल झाडाखाली पसरते काय, पंकज कपूरला गोळी लागून तो कारमधून तलावात थेट तळाशी काय जातो, त्याचा पत्ता कुणालाच नसतो, मध्येच प्रेतयात्रा काय्...लै म्हणजे लैच उच्छाद! कशाचा कशाला संबंध नाही. सगळं असंबद्ध आणि रटाळ... दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता...

In reply to by समीरसूर

सूड 17/09/2014 - 11:57
>>दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता... आता कसं बोल्लात!! कधी नव्हे ती दीपिका आवडली. ;) बाकी मुव्हीत असंबद्ध काही वाटलं नाही हो. बाकी परिक्षण लिहीलंत की बोलू, या धाग्यावर ती चर्चा अयोग्य होईल. असो. :)

In reply to by शिद

काउबॉय 17/09/2014 - 23:31
Being Sirus ने आधीच डोक्याला इतका शॉट लागला होता की हां चित्रपट पहावा हां विचार स्वप्नातही आला न्हवता. आता परिक्षण येउदेच.
लेखनविषय:
नुकताच रीलीज झालेला फाइंडिंग फॅनी चित्रपट आणि त्यावर बरंचसं चांगलं ऐकलं होतं. आता हा चित्रपट बघायचाच हे नक्की केलं. सकाळ सकाळ मल्टिप्लेक्स गाठलं, तिकीट मिळेल की नाही ही शंका होती. पण तिकीट मिळालं तेही अगदी वरच्या रो चं!! राष्ट्रगीत झालं आणि मुव्हि सुरु झाला, दिपीका पदुकोन ने साकारलेल्या अँन्जीने तिच्या सासूला, रोझेलिनाला माय म्हणून हाक मारली आणि मन सपसप मागे गेलं. मागे म्हणजे अगदी बालपणात आणि डोळ्यासमोर आली माय..आता ही माय म्हणजे ईल्डा आत्या आणि बेप्टिस अंकलची आई. माय चा मोठा मुलगा रिचर्ड, संबोधन रिचा!! पण हा रिचर्ड फार कुणाच्या अध्यात मध्यात नाही.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ९

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रशियाच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली एक लांबलचक पर्वतराजी आहे. उरल! उरल नदीच्या खोर्‍यापासून आणि कझाकस्तानच्या वायव्य प्रांतापासून ते पार आर्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे १६०० मैल पसरलेली आहे. आर्क्टीक, सब-आर्क्टीक, उत्तर, मध्य आणि दक्षिण असे उरल पर्वताचे पाच भाग पडतात. उरल पर्वतरांग ही आशिया आणि युरोप यांना विभागणारी नैसर्गीक सीमारेषा मानली जाते. भारतीय उपखंडात जे स्थान हिमालय पर्वताचं, तेच रशियात उरल पर्वतराजीचं! उरल पर्वतात गिर्यारोहणाच्या अनेक मोहीमा नियमीतपणे आखल्या जातात.

अँड्राईड अ‍ॅप बनवणारे मिपावर कुणी आहेत का?

मुक्त विहारि ·

धन्या 14/09/2014 - 17:35
मी एकदा सम आणि विषम संख्या ओळखणारे अ‍ॅप बनवले होते. मात्र व्यावसायिक पातळीवरचे अ‍ॅप बनवून शकेन का याबद्दल साशंक आहे. :) असो या धाग्याच्या निमिताने अँड्रॉईड प्रोग्रामिंगची मदत कुणाकडे मागायची हे कळेल.

In reply to by धन्या

आदूबाळ 16/09/2014 - 18:43
एक गरीब प्रश्नः सम आणि विषम संख्या ओळखायला अ‍ॅप कशाला लागतं? अ‍ॅप डेव्हलपमेंटचा सराव म्हणून केलं होतं का?

उपास 16/09/2014 - 17:43
डिझाईन लेव्हल वर आणि टेक्नोलॉजी साठी (उदा. एंग्युलर जे एस, फोन गॅप) मदत करु शकेन, अ‍ॅप डेव्हलप करायला वेळ गाठीशी आहे असे वाटत नाही. डिझाईन रेडी झाले की elance.com, guru.com वा तत्सम ठिकाणांवरुन डेव्हलप करुन घेता येईल. व्यनि केलात तर सविस्तर बोलता येईल. शुभेच्छा!

In reply to by उपास

सुधीर 16/09/2014 - 20:39
वेब-बेस्ड अ‍ॅप्/सॉफ्टवेअर (पिएचपी-मायएसक्यूअल वा जावा बेस्ड) बनवून देणार्‍या आणि कुठल्या वेबसाईट्स आहेत का? जिथे पुण्या-मुंबईतले डेव्हलपर्स काम करून देऊ शकतील. जेणे करून प्रत्यक्ष भेटून बोलता येईल. मुविंना धाग्यसाठी धन्यवाद!

In reply to by सुधीर

उपास 17/09/2014 - 20:59
नमस्कार सुधीर, तुम्हाला व्यनि केला आहे.. मुवी, तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते कळलं तर पुढे जाता येईल, व्यनि करु शकाल का? विमे, तुम्ही तत्सम काम स्वतः करता काय, भेटावयास आवडेल (समानशीले व्यसनेषु सख्यम..) :)

धन्या 14/09/2014 - 17:35
मी एकदा सम आणि विषम संख्या ओळखणारे अ‍ॅप बनवले होते. मात्र व्यावसायिक पातळीवरचे अ‍ॅप बनवून शकेन का याबद्दल साशंक आहे. :) असो या धाग्याच्या निमिताने अँड्रॉईड प्रोग्रामिंगची मदत कुणाकडे मागायची हे कळेल.

In reply to by धन्या

आदूबाळ 16/09/2014 - 18:43
एक गरीब प्रश्नः सम आणि विषम संख्या ओळखायला अ‍ॅप कशाला लागतं? अ‍ॅप डेव्हलपमेंटचा सराव म्हणून केलं होतं का?

उपास 16/09/2014 - 17:43
डिझाईन लेव्हल वर आणि टेक्नोलॉजी साठी (उदा. एंग्युलर जे एस, फोन गॅप) मदत करु शकेन, अ‍ॅप डेव्हलप करायला वेळ गाठीशी आहे असे वाटत नाही. डिझाईन रेडी झाले की elance.com, guru.com वा तत्सम ठिकाणांवरुन डेव्हलप करुन घेता येईल. व्यनि केलात तर सविस्तर बोलता येईल. शुभेच्छा!

In reply to by उपास

सुधीर 16/09/2014 - 20:39
वेब-बेस्ड अ‍ॅप्/सॉफ्टवेअर (पिएचपी-मायएसक्यूअल वा जावा बेस्ड) बनवून देणार्‍या आणि कुठल्या वेबसाईट्स आहेत का? जिथे पुण्या-मुंबईतले डेव्हलपर्स काम करून देऊ शकतील. जेणे करून प्रत्यक्ष भेटून बोलता येईल. मुविंना धाग्यसाठी धन्यवाद!

In reply to by सुधीर

उपास 17/09/2014 - 20:59
नमस्कार सुधीर, तुम्हाला व्यनि केला आहे.. मुवी, तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते कळलं तर पुढे जाता येईल, व्यनि करु शकाल का? विमे, तुम्ही तत्सम काम स्वतः करता काय, भेटावयास आवडेल (समानशीले व्यसनेषु सख्यम..) :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कठीण समय येता, कोण कामासी येतो? ह्याचे उत्तर निदान आम्हाला तरी मिळाले आहे. त्यामुळेच हा धागा प्रपंच. मला आणि माझ्या एका मित्राला एक अँड्रॉईड अ‍ॅप बनवुन हवे आहे. आमची २०,००० रुपयांपर्यंत खर्च करायची तयारी आहे. आपल्या मिपावर, कुणी ह्या प्रकारात तज्ञ असेलच असे आमची मनोदेवता सांगत आहे.

मला माहीत असलेले रामायण

पोटे ·

विजुभाऊ 14/09/2014 - 00:10
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. तेंव्हा रामयणात सत्य आणि असत्याचे सोयीस्कर अर्थ लावण्यात काहीच अर्थ नाही

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 14/09/2014 - 00:12
>>> रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. विजुभौ नो ऑफेन्स हा. रामायणाच्या अभ्यासकांना वरील प्रतिसादाच्या सत्यासत्यतेविषयी मूळ संदर्भ देण्याची विनंती याठिकाणी आम्ही करत आहोत. वल्ली, बॅटमॅन, मृत्युंजय, विकास कृपया इकडे लक्ष द्या. ;)

In reply to by प्यारे१

प्रचेतस 14/09/2014 - 00:14
इमाम् विरूपाम् असतीम् करालाम् निर्णतोदरीम् | वृद्धाम् भार्याम् अवष्टभ्य न माम् त्वम् बहु मन्यसे|| अद्य इमाम् भक्षयिष्यामि पश्यतः तव मानुषीम् | त्वया सह चरिष्यामि निःसपत्ना यथा सुखम् || इति उक्त्वा मृगशावाक्षीम् अलात सदृश ईक्षणा | अभ्यधावत् सुसंक्रुद्धा महा उल्का रोहिणीम् इव || रामा, तु ह्या विरुप, पोट खपाटीस गेलेल्या वृद्धेसाठी तू मला मान्यता देत नाहीस म्ह्णून तू आज पाहत असतानाच मी ह्या मानुषीला खाऊन टाकेन आणि पत्नीविहिन अशा तुझ्यासोबत सुखाने विचरण करेन. इतके बोलून ही शूर्पणखा जणू एखादी प्रचंड उल्का रोहिणीवर कोसळत आहे तशा प्रकारे हरिणीच्या पिल्लाप्रमाणे डोळे असलेल्या सीतेकडे झेपावली.

In reply to by प्यारे१

प्रचेतस 14/09/2014 - 00:16
इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला, तरी पुढचे देतो ताम् मृत्यु पाश प्रतिमाम् आपतंतीम् महाबलः | विगृह्य रामः कुपितः ततो लक्ष्मणम् अब्रवीत् || क्रूरैः अनार्यैः सौमित्रे परिहासः कथंचन | न कार्यः पश्य वैदेहीम् कथंचित् सौम्य जीवतीम् || इमाम् विरूपाम् असतीम् अतिमत्ताम् महोदरीम् | राक्षसीम् पुरुषव्याघ्र विरूपयितुम् अर्हसि || इति उक्तो लक्ष्मणः तस्याः क्रुद्धो रामस्य पश्यतः | उद्धृत्य खड्गम् चिच्छ्हेद कर्ण नासम् महाबलः || मृत्युपाशाप्रमाणे येणार्‍या राक्षसीला श्रीरामाने हुंकारानेच रोखून लक्ष्मणाला म्हटले, ह्या क्रूर अनार्यांचा कुठल्याही प्रकारे परिहास करता कामा नये, ह्या समयी सीतेचे प्राण कसेबसेच वाचले आहेत तस्मात तू ह्या कुरुप, कुलटा अशा महाउदरीला विद्रुप करणे आवश्यक आहे. कृद्ध रामाचे हे म्हणणे ऐकून लक्ष्मणाने खड्ग उपसून राक्षसीचे कान-नाक कापून टाकले.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ 14/09/2014 - 00:18
लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;) तर विजुभौ, वल्लीच्या पहिल्याच प्रतिसादामध्ये शूर्पणखेनं नेमकं काय केलं म्हणून लक्ष्मणानं तिला शिक्षा दिली असं आलेलं आहे. त्यामुळं >>> केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. हे विजुभौंचे म्हणणे चुकीचे ठरते. असो!

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ 14/09/2014 - 00:22
अनूप. वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत. क्षणासाठी असे मानूया की शूर्पणखा ही राक्षस होती. तरीही तिने सर्वप्रथम प्रपोज केले आणि त्यात अडथळा येतोय या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली. कोणत्याही भावाला याचा राग येणे नैसर्गीक आहे. लक्ष्मणाने अगोदर काही वाटाघाटी केल्या असत्या किंवा त्याने रावणाला " बघ तुझी बहीण काय म्हणतेय " असे काही बोलणे केले असते तर ते योग्य ठरले असते. एकदम नाक कापणे म्हणजे शुद्ध रानटीपणाचा कळस झाला. हे रावणाच्या कृतीचे समर्थन नाही. पण लक्ष्मणाची चूक दाखवून द्यायची आहे. शीळा झालेल्या अहिल्येचा तथाकथीत उद्धार करणार्‍या रामाने देखील लक्ष्मणाला यावेळेस कोणताच सल्ला दिला नाही. वालीच्या वधाबद्दल रामाला कधीच कोणी दोषी ठरवले नाही पण रामाने वालीला त्याची वैयक्तीक कोणतीच वैरभावना नसतानाही ठार केले तेही झाडा आड दडून भेकडपणे. ही गोष्ट नाकारता येत नाही. राम हा सुद्धा न्यायी वगैरे नसावा. अन्यथा त्याने शंबूकाला कानात शिसे ओतून ठार केले नसते.तळागाळातल्या वर्गाला शिक्षणाचा हक्क नाही हेच रामाने आपल्या कृतीने दाखवून दिले. एका अर्थाने रामायणात सत्याचा जय झाला. शेवटी रामाला स्वतःच्या मुलांना ओळख द्यावी लागली. मात्र त्यासाठी बिचार्‍या निष्पाप सीतेला स्वतःचा अंत करुन घ्यावा लागला. अर्थात शेवटी दुष्ट आणी अन्यायी रामाला स्वतःचा जीवनाचा शेवट हा अत्महत्येने करुन घ्यावा लागला.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 14/09/2014 - 00:24
मतं पक्की झालीयेत तुमची. आधी बाण मारुन नंतर वर्तुळं काढताय विजुभाऊ. रामायणाचा एवढा करुण शेवट मधुर भांडारकर ला सुद्धा अपेक्षित नसेल. ;) चालू द्या!

In reply to by विजुभाऊ

कवितानागेश 14/09/2014 - 00:25
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.>> विजुभाउ, तुम्ही होतात का हो वनवासात?? =)) माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे रहातय. शूर्पणखा आली. तिनी लक्ष्मणाची छेड काढली. लक्ष्मण लई चिडला आणि त्यानी काटक्या गोळा करायचे काम सोडून एकदम तिचे नाकच कापलं... विजुभाउ जंगलात फिरत फिरत गेले होते. त्यांनी बाजूच्याच एका झाडाआडून हे सगळं दुष्कृत्य पाहिलं... आणि परत येउन मिपावर झण्झणीत प्रतिक्रिया दिली! (ह. घ्या)

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे 14/09/2014 - 00:26
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.
हे जनरल विधान आहे का याला काही संदर्भ आहे? रामाने त्या काळच्या न्यायाने जे काही करायचं ते केलं. वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे. त्यामुळे वाली जंटलमन होता हे पटत नाही.

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ 14/09/2014 - 00:28
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे.
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना. रामाने सुग्रीवाकडून वालीची सुपारी का घ्यायची. बरं घेतली तर घेतली पण मग समोरासमोर लढाई करायला काय हरकत होती. झाडाआडून कशाला बाण मारायचा? तेही सुग्रीव आणि वाली ची कुस्ती चालू असताना? आय मीन वाली नि:शस्त्र असताना? यात रामाचा जंटलमनपणा कुठे दिसतो? यात कोणत्या सत्याचा जय झालेला दिसतो? अवांतरः एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 14/09/2014 - 00:29
>>> एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे. रामानं काय उत्तर दिलं रे वल्ली? प्लिज प्लि एक्दाच डिट्टेलवारी सांग.

In reply to by प्यारे१

प्रचेतस 14/09/2014 - 00:30
रामाने वालीला बरीच गुळमुळीत उत्तरे दिली हे मात्र खरेच. नैतिकदृष्ट्या वालीला मारण्याचे कुठल्याच अंगाने समर्थन होऊ शकत नाही. रामान दिलेली काही कारणे १. तू सुग्रीवाच्या हयातीतच त्याच्या पत्नीचा उपभोग घेत आहेच म्हणून तू दंड देण्यास योग्य आहेस. (वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष) २. सुग्रीव माझा मित्र आहे आणि तो मला लक्ष्मणासमान आहे शिवाय तो माझी पत्नी परत मिळवून देण्यासाठी मला साहाय्य करणार आहे आणि मी ही त्याला त्याची पत्नी व राज्य परत मिळवून देईन अशी प्रतिज्ञा केली आहे. प्रतिज्ञेपासून विचलीत होणे हा क्षत्रियांचा धर्म नव्हे. ३. हे वानरा, तू मनुष्य नव्हेस, पशू (वानर) आहेस . मृगया करणे हे आम्हा क्षत्रियांना सर्वथैव उचित आहे. तू शाखामृग असल्याने तू युद्ध करत असताही अथवा नसताही तुझा वध करणे हे आम्हा क्षत्रियांना योग्यच आहे. इतरही बरीच कारणे रामाने सांगितली आहेत. अर्थात मित्राला राज्य परत मिळवून देऊन त्याचे साहाय्य मिळवणे हेच प्रमुख उद्दिष्ट होते शिवाय वालीसुद्धा काही परमधार्मिक वैग्रे असा काही नव्हताच.

In reply to by प्रचेतस

आनन्दा 15/09/2014 - 09:30
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष)
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 15/09/2014 - 09:37
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.
आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? मायावी राक्षसाचा पाठलाग करताना गुहेत गेलेल्या वालीच्या पाठीमागून रक्ताचा लोंढा वाहात आला तेव्हा वाली मेला असे समजून सुग्रीवाने गुहेचे द्वार धोंडा लावून बंद केले. फक्त तेव्हाच सुग्रीवाला वाली मेलाय असे वाटले होते. त्यानंतर काही काळात वाली द्वार फोडून गुहेबाहेर आल्यावर सत्ताप्राप्तीसाठी सुग्रीवाने दार लावून घेतले असे समजून सुग्रीवाला स्थानभ्रष्ट केले व त्याची पत्नी बळकावली.

In reply to by प्रचेतस

आनन्दा 15/09/2014 - 10:28
तेव्हाच म्हणतोय. वालीच्या पत्नीशी विवाह केला तेव्हा सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते. नपेक्षा असे धाडस तो करूच शकला नसता.

In reply to by धन्या

प्यारे१ 14/09/2014 - 00:35
>>> धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या मागे लपून नि:शस्त्र द्वंद्वात गुंतलेल्या व्यक्तीवर बाण सोडुन होते? होतं की! त्याला काय? शिवाजीमहाराजांनी अफजलखानाशी 'पंजा लढायला' हवा होता वगैरे मताचा आहेस का काय? =)) वाली अत्यंत सामर्थ्यशाली होता. रावणाला बर्‍याचदा हरवलं देखील होतं.त्यानं रावणाला दक्षिणेत दाबून ठेवला होता. तहानुसार रावणानं वर यायचं नाही आणि वालीनं दक्षिणेत जायचं नाही असा काहीसा प्रकार होता. युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो. अयोध्येला लांब ठेवून, वालीला शासन देऊन, त्याच्याच भावाला गादीवर बसवून, त्याच्याच सैन्याला घेऊन रावणावर चालून जाण्याचा अत्यंत धूर्त कार्यक्रम हुशारीनं रामानं राबवला. (कोलॅटरल डेमेजेस बद्दल सगळे जण सायलेण्ट असतात.) पुढं अंगदाला दूत म्हणून पाठवला. ज्या वालीनं तुला चेपटवला होता त्या वालीला मी मारलाय आणि तरी त्याच्या पोराला अभय देऊन तुझ्याकडं पाठवतोय असा संदेश द्यायचा होता. हनुमानानं बळंच शेपटी जाळून टाईमपास नाही केला. त्यानं अर्धी लंका मानसिकदृष्ट्या खच्ची केली. आमच्याच घरात येऊन एक सेवक आमच्या संपत्तीची एवढी हानी करतो तर त्याचा मालक किती बलवान असेल हे सांगायचं होतं. बाकी रावणाला आधी शाप होता की बळजबरी कुठल्या बाईला हात लावशील तर तुझं डोकं तुकडे होऊन पडेल. सीतामैय्याला हात न लावण्याचं ते कारण होतं बरं. ;)

In reply to by प्यारे१

अवतार 14/09/2014 - 09:50
मग सीतामाईला पुष्पक विमानातून पळवून आणताना रावणाने एअरहोस्टेस ठेवली होती की काय? :)

In reply to by प्यारे१

पोटे 14/09/2014 - 11:02
ती स्त्री म्हणजे वेदवती.. तिने रावणाला आणखी एक शाप दिलेला होता.. तुला एक मुलगी होईल. ती तुझा नाश करेल. कालांतराने रावणाचे लग्न झाले. रावण अ मंदोदरीला मुलगी झाली. रावणाला शापाचे स्मरण झाले. त्यान्र ती मुलगी पेटीत घातली आणि दूर एका शेतात नेऊन टाकली... तात्पर्य : मंदोदरी ही रामाची सासू होती !

In reply to by पोटे

पोटे 14/09/2014 - 11:07
http://en.m.wikipedia.org/wiki/Sita

In reply to by प्यारे१

विजुभाऊ 15/09/2014 - 13:28
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो.
हे मग रावणाच्या सीता हरणा बद्द्लही असेच म्हणता येइल

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 15/09/2014 - 13:53
सीतेला पळवून नेण्याचा प्रकार म्हणजे युध्दनीतीचा प्रकार होता असं तुम्हाला म्हणायचंय का? युद्धनीतीची ही व्याख्या कुणाची? आयसिस ची का?

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे 14/09/2014 - 00:38
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना.
सुग्रीवाला जर एकट्याला वालीशी लढणं आणि जिंकणं शक्य नव्हतं तर दुसर्‍याची मदत घेण्यात काय चूक आहे?

In reply to by विजुभाऊ

चिगो 16/09/2014 - 17:23
या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली.
ह्याच्याशी थोडासा असहमत.. शुर्पणखेने सीतेला मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे "अटेंप्ट टू मर्डर" जो "दखलपात्र गुन्हा" आहे. असा गुन्हा जर एखाद्या स्त्रीच्या संदर्भात घडत असेल जी स्वरक्षणास अक्षम आहे, तर त्या परीस्थितीत तिथे उपस्थित दुसरी सक्षम व्यक्ती (पक्षी : राम / लक्ष्मण) शुर्पणखेला अटकाव करु शकतो.. आता लक्ष्मणाने अटकाव करतांना मुद्दामहून तिचे नाक कापले की ते झटापटीत कापल्या गेले, आणि ते कृत्य ग्राह्य मानल्या जाईल का, ह्याकरीता परीस्थितीजन्य पुराव्यांचा पडताळा घेऊन निर्णय घेण्यात येईल.. सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..
=)) आणि जरी तिथे सिध्द झालेच की लक्ष्मण गुहेगार होता तरी त्याला शिक्षा देता येणार नाही कारण इतिहासातल्या चुका वर्तमानात दुरुस्त करता येत नाहीत .... अहो आमच्या देशात ४०० वर्षांपुर्वी एक मंदीर पाडण्यात आले , आमच्या आर्किओलॉजिस्टस ने तिथे मंदीर होतेच ह्याचे खणखणीत पुरावे देवुनही आम्ही तिथे मंदीर बांधु शक्त नाहीये , हे झाले ४०० वर्षांपुर्वीच्या अण्यावाचा बाबतीतला किस्सा , ४००० वर्षांपुर्वीचे तर विसरुनच जावा =))

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.
. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख.....तारीख पर तारीख मिलती रही हैं लेकिन इंसाफ नहीं मिला. =)) t

In reply to by चिगो

पैसा 16/09/2014 - 17:45
मला एक गंमत कळत नाही, लक्ष्मणाने काय शूर्पणखा सीतेला मारीपर्यंत वाट बघायची होती, का तिची मनधरणी करायची होती?

In reply to by पैसा

खटपट्या 16/09/2014 - 22:14
हो पण नाक कापणे म्हणजे जरा जास्तच झालं बै !! तोंडाला काळं फास्लनित अस्त तरी चाललं अस्त. बिना लग्नाची पोर कसं होणार तिचं ?? कोण घेणार तिला पदरात ?? आं ?

In reply to by खटपट्या

पोटे 16/09/2014 - 22:35
शुर्पणखा विधवा होती. तिचा नवरा विद्द्युतजिव्हा हा रावणाकडुन चुकुन मरण पावला होता. लक्ष्मण शूर्पणखा विवाह झाला असता तर विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळाले असते

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.. यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :) गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते. माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे. आप्ला क्रूपाभिलाशी आड्वाकोट स दा आगलावे

प्रचेतस 14/09/2014 - 00:41
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
यजुर्वेदीच होते हा शोध कसा लावलात? आणि पुलत्सी नाही तर पुलत्स्य, आणि पुलत्स्य हे आजोबा होते. पुलत्स्यपुत्र विश्रवापासून सुमाली नामक राक्षसकन्या केकसी हिला रावण, शूर्पणखा वैग्रे संतती झाली. आणि आपल्यापेक्षा खालची जातीतील पत्नी असेल तर त्यांचे संतान खालच्या जातीतलेच असेल हा तेव्हा सर्वमान्य दंडक होता. जसे क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री अथवा दासी पासून झालेली संतान म्हणजे सूत. किंवा भीमाचेच उदाहरण घ्या. हिडिंबेपासून झालेला पुत्र घटोत्कच हा क्षत्रिय न समजला जाता राक्षसच समजला जात असे. पौराणिक गोष्टींचे संदर्भ आजच्या काळात लावण्यात काहीच हशील नाही पण तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

प्रसाद१९७१ 14/09/2014 - 00:42
तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.
सहमत. लबाडपणा करु नयेच, रामानी काय आणि दुसर्‍यानी काय

In reply to by प्रचेतस

विलासराव 15/09/2014 - 11:10
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत. लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल.

काळा पहाड 14/09/2014 - 00:58
एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही. त्या युगातल्या कृत्यांवर सध्याची समाजमान्यता मोजता येणार नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपड्याचा "चौरंग" केला. सध्या तुम्ही कुणालाही ठार मारणं हा मर्डर ठरतो. तोच न्याय शिवाजी महाराजांना लावता येणार नाही. त्यांचं युग वेगळं होतं आणि त्याचे नियम वेगळे होते. तुम्ही जर दुसर्‍या युगातल्या प्रभृतींची कृत्यांचं समर्थन किंवा त्यावर टीका केली तर त्याला फारसा अर्थ नाही. तस्मात, रामायणाची नैतिक किंवा कायदेशीर दृष्टीनं चिरफाड ही आपण करू शकतो पण सध्याच्या युगाच्या कल्पना या त्या युगाला लागू पडत नाहीत. म्हणूनच वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का हा किंवा असे प्रश्न (सभ्य भाषेत सांगायचं तर) अप्रस्तुत ठरतात.

In reply to by मुक्त विहारि

सुहास.. 15/09/2014 - 15:08
"एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही." >>> मी ही सहमत .. बाकी बर त्या व्यासांनी दोनच महाकाव्ये रचली, आणिक रचली असती तर, पाय-पुसणीपेक्षा जास्त धागे आंजावर निघाले असते ;) थोडेसे विषयाविषयी : जर कुठल्याही मुळ पुस्तकातील , दृश्ये, संदर्भ मानावयची असल्याल इतर पुस्तकांतील ही मानावीत ...

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दा 15/09/2014 - 10:32
अच्छा अच्छा, म्हणजे आर्यांच्या वेळेस पण युरेशियाला युरेशियाच म्हणायचे वाटते. तुम्हाला कसे कळले हो? अभ्यास भलताच दांड्गा हो तुमचा!

In reply to by आनन्दा

काळा पहाड 15/09/2014 - 10:54
तुम्हाला आर्य आले त्या वाटेवर प्रगणकाच्या भूमिकेत एका झाडाच्या ढोलीत बसलेले इतिहासाचार्य ना.ने. दिसले नाहीत वाटतं? भूर्जपत्रांची थप्पी पण होती त्यांच्याजवळ लिहिण्यासाठी.

In reply to by आनन्दा

बाळ गंगाधर टिळक यांच्या 'आर्टीक्ट होम ईन वेदाज' या महाग्रंथाच्या वाचनातून वरील विधान मी केले आहे.टिळकांच्या मते वेदातील बरीच वर्णने आर्टीक्ट सर्कलशी मिळती जुळती आहेत.यावरुन वैदिक लोक थंड प्रदेशातुन भारतात आले, तोच युरेशिया.

In reply to by बॅटमॅन

विलासराव 15/09/2014 - 11:18
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात. ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).

In reply to by प्रचेतस

विलासराव 15/09/2014 - 13:21
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?

बॅटमॅन 14/09/2014 - 14:44
बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे पाहून हहपुवा झाली, तेवढेच वल्लीकडून वरिजिनल रामायणाचे दाखले मिळाल्याने माहितीतही भर पडली.

In reply to by बॅटमॅन

धन्या 14/09/2014 - 15:30
असेच म्हणतो. आमचा आवडता ब्लॉग खटटा मिठा इथेही आपल्या देव देवतांबद्दल आणि एकंदरीत ईतहासाबद्दल वाचायला असते. रामाबद्दल या लेखात उहापोह झालेल्या मतांवर एक लेख इथे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 14/09/2014 - 17:46
आपल्या मताशी सहमत आहेच. पण येथे मात्र रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणार्यांऐवजी राम कसा सम्पूर्णत: वाईटच्च होता, लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कान कापून कसा तिच्यावर घोर अन्याय केलाय, या वैफ़ल्यतेतूनच वेदोनारायण सज्जन रावणाने सीताहरण केले, भावाला विजनावासात हाकलून त्याच्या बायकोचा उपभोग घेणार्या वालीला रामाने कसे झाडामागे दडून निर्दयतेने मारले असे सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते. बाकी रामायण हे काल्पनिक आहे असे मी मानतो. इतकी आदर्श परिस्थिति अगदी आदर्श परिस्थितीतही उद्भवू शकणार नाही. :)

In reply to by प्रचेतस

अनुप ढेरे 14/09/2014 - 18:14
सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते.
हेच म्हणतो. ~२००० वर्षांपूर्वीची माणसं/पात्र घेऊन, त्यांंच्या कृत्यांना आजचे न्याय/अन्यायाचे नियम लाऊन उगाच लोकांच्या प्रेमाच्या/आदराच्या स्थानांवर घाव घातल्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न आहे हा. वल्लींना अभ्यासपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद!

In reply to by अनुप ढेरे

धन्या 14/09/2014 - 18:33
आणि लोकही २००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या (?) आपल्या प्रेमाच्या/आदराच्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रत्येक कृतीचे "अभ्युथानमधर्मस्य" असे हिरीरीने समर्थन करत आहेत. :)

In reply to by धन्या

हरकाम्या 17/09/2014 - 00:58
धन्यवाद मि.धन्या. तुमचे मत वाच्ल्यानन्तर मी तुमचा आवडता ब्लॉग अक्षर्शहा वेड्यासारखा पुर्णपणे वाचला. आता रात्रीचे १२.५५ झाले आहेत. तो ब्लॉग वाचल्यानन्तर डोके भणभणुन गेले आहे. डोक्याची पार मन्डई झाली आहे आज रात्री झोप येणार असे वाटत नाही

In reply to by बॅटमॅन

रामायण आणि महाभारताला इतिहास न समजता धार्मिक ग्रंथ समजले जाते तेव्हा अशी गल्लत सुरू होते... आणि मग त्यांच्यापासून काही शिकण्याऐवजी त्यातल्या पात्रांना देवत्व बहाल करून त्यांना सद्गुणाचे पुत़ळे बनवले जाते. देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ? मग चुकाही कश्या योग्यच होत्या हे सिद्ध करायला अजून एखादी पुर्वायुष्यातली किंवा पूर्वजन्मातली कथा शोधून काढली जाते ! एक चूक झाकायला दुसरी, ती झाकायला तिसरी... अशी मालिका निर्माण होते. सर्वात वाईट असे की, यामुळे या दोन सकस ग्रंथांपासून जेवढा बोध घेतला जातो त्यापे़क्षा जास्त भ्रम निर्माण होतो / केला जातो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 15/09/2014 - 11:24
देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?
मला तर हेच चुकीचे वाट्ते. देवही चुकत होते आजही चुकतात आनी पुढेही चुकतील. अवांतर विदा मागु नये. पटले तर घ्यावे न पटले तर सोडुन द्यावे. मूळात माझा विद्यावर भरोसाच नाय.

In reply to by विलासराव

"देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?" हा माझा प्रश्न उपरोधिक होता ! जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवत्व दिले जाते तेव्हा त्याच्या पाठीराख्यांना त्या व्यक्तीचे कोणतेही उणे वचन/आचरण तसेच स्विकारायला फार कठीण जाते. आणि मग सत्य स्वीकारण्याऐवजी ते झाकण्यासाठी त्या वचना-/आचरणाचे समर्थन करणार्‍या कथा-कहाण्या रचल्या जातात... असा त्या वादाचा अर्थ आहे. देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील. याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे... देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्‍या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्‍या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे. जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्‍या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे. अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्‍या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त"). यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल ! महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत. देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल. एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ? आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्‍हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्‍यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात. असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो. (देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इए

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 15/09/2014 - 15:30
देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल ह्याचसाठी देवाचा उपयोग केला पाहजे, आपल्यातले चांगले गुण विकसीत करण्यासाठी. त्यांच्यातले आदर्श गुण अंगी बाणवण्यासाठी. बाकी चालु द्या.

जेपी 14/09/2014 - 17:10
काथ्या नीट कुटला नायतर दोर नीट नाय होणार,मंडळी जरा व्यवस्थित कुटा.मंडळ आभारी राहिल नायतर काथ्या उचलला जाणार नाही .नुस्कान होईल.

या मानवी मनाला ऐनवेळी ब्लॉक करणार्‍या (किंवा वेळोवेळी पिडणार्‍या) अत्यंत बेसिक संकल्पनांची निर्वैयक्तिक शहानिशा होऊ शकेल. रामायणाकडे उच्च कोटीच्या नैतिकतेचा एक व्यापक लेखाजोखा इतक्या सिमीत दृष्टीनं पाहिल्यास चर्चा विधायक होईल. पब्लिकनं पात्रांना (ऑलरेडी बहाल झालेलं) देवत्व बाजूला ठेवून, (उगीच सेंटी होण्यापेक्षा); `स्थल-काल निरपेक्ष असे रोजच्या जगण्याला उपयोगी, नैतिक फंडाज मिळू शकतील काय?' अशी चर्चा केल्यास ती सर्वांना उपयोगी होईल. बाय द वे, माझ्या तिथल्या प्रतिसादात `रामायण घडण्याची पूर्वभूमिका' (रावणाचा स्टँड) नमूद केली होती. सं.मं.नं जर (अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी) नवीन पोस्ट काढलीच आहे तर, तो भाग इथे पुनर्प्रकाशित करावा अशी विनंती करतो. कारण रावणाची भूमिका समजल्याशिवाय चर्चा वन वे होईल. इट विल बी मिसिंग द बेसिक स्टार्ट पॉइंट.

मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा-नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात. अर्थात, इतकी उघड गोष्ट समजायला, साधी सारासार विचारसरणी पुरेशी आहे. जर हिटलर जिंकला असता तर तो वंदनीय ठरला असता आणि रावण जिंकला असता तर गदिमांनी `गीत रावण' लिहीलं असतं, देवघरात रावणाचे फोटो असते. त्यामुळे इतिहासावरुन `जेते म्हणजे प्रामाणिक आणि पराभूत म्हणजे अप्रामाणिक' असा निर्णय म्हणजे केवळ बाळबोध विचारसरणी ठरते. मी वेरिफाय करत नाही, पण या निमित्तानं, रामायणाचा दुसरा एक भाग सांगितला जातो, तो केवळ गंमत म्हणून उधृत करतो. अर्थात, उपरोल्लेखित मुद्याशी त्याचा संबंध आहेच, त्यामुळे (सुज्ञांना) तो अ‍ॅप्रिशियेट होईल. रावण अत्यंत प्रभावी आणि बलशाली राजा होता, स्वतः शिवभक्त असल्यानं शिवधनुष्याला प्रत्यंचा तर तो सहज लावू शकत होता. हि वॉज ऑलरेडी अ किंग, इतकंच काय स्वयंवरासाठी, स्वतःच्या फ्लाइटनं तो लंकेहून वेळेपूर्वीच हजर होता! जनकाच्या मनात मात्र सीतेनं रावणाला वरु नये असं होतं, पण ओपन फोरम असल्यामुळे त्याचा फुल नाईलाज झाला होता. जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला! इन द मीन टाईम, रावणाला वेळेवर हजर नसलेला स्पर्धक म्हणून डिबार करुन, रामानं सीता जिंकली! हा सरासर अन्याय झाला पण रावणाला बोलायला चान्सच राहिला नाही. तस्मात, त्यानं सीता हरणाचा घाट घातला...आणि पुढे रामायण घडलं! आता अशा परिस्थितीत रावण जिंकला असता तर पब्लिकनं रावणाला देव केला असता. थोडक्यात, इतिहासाची पानं उलटून निर्णय करणार्‍या निर्बुद्ध विचारसरणीला, `जो जिंकला तो सत्य' वाटणं स्वाभाविक आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 14/09/2014 - 20:11
रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.

In reply to by प्रचेतस

दिनेश सायगल 14/09/2014 - 21:33
केवळ एवढेच नव्हे तर श्री पोटे यांच्या मनोरंजक अशा रामकथेच्या धाग्यावर सन्माननीय सदस्य श्री क्षीरसागर यांना इतर चर्चा करायची आहे. त्यांनी नैतिकता, निर्बुद्धता वैग्रेबद्दल चर्चा करण्यासाठी दुसरा धागा काढावा, किंवा संपादक मंडळींनी त्यांना तसा स्वतंत्र धागा काढून द्यावा ही विनंती.

In reply to by प्रचेतस

रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने ...
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे. पण रामायण हा निव्वळ कल्पनाविलास असेल तर तो वाल्मिकींचा कॅथर्सिस आहे. ते दाऊदनं साने गुरुजींच्या रोलमधे जाऊन श्यामची आई लिहीण्यासारखं आहे. आणि त्यामुळे इतकी पराकोटीची नैतिकता जगण्याला दिशा देऊ शकत नाही. पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल पण साधं सरळ आयुष्य जगणार्‍या सामान्यानं त्याप्रती नतमस्तक होण्यात हशील नाही.
तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी. कोणत्याही गाजलेल्या स्टोरीमधे एक गोष्ट आवर्जून उल्लेखनीय असते ती म्हणजे प्रत्येक पात्राच्या कृत्याला त्याच्या दृष्टीनं समर्थन असतं. नाही तर ती पात्र योजनाच कुचकामी ठरते. रावणानं काहीही कारण नसतांना सीता हायजॅक केली म्हटल्यावर स्टोरीत दमच राहात नाही. मग रामानं फुल आणि कशीही बॅटींग केली (आणि यदाकदाचित त्याचा बोल्ड जरी गेला) तरी तो आऊटच होणार नाही. ____________________________ सं.मं नं माझा तिथला प्रतिसाद पुनर्प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 15/09/2014 - 08:56
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे.
रामायण हे काल्पनिक आहे हे तुम्हाला मान्य आहे पण वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला हा शोध आपण कुठून लावलात? वाल्या कोळी हीच मूळात हरदासी दंतकथा आहे. रामायणाची सुरुवातच वाल्मिकी निषादाने मारलेल्या क्रौञ्च नराच्या मृत्युमुळे आलेल्या खिन्नतेपासून करतात. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः । यत् क्रौञ्चमिथुनादेकं अवधीः काममोहितम् || त्यामुळे आपल्या "पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल" ह्या म्हणण्यात काहीच हशील नाही
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी
आहे की. रावणाचा स्त्रीलंपटपणा हीच 'त्याची' समर्थनीय बाजू आहे. अर्थात ती समजून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वाल्मिकी रामायण मात्र वाचावे लागेल.

In reply to by प्रचेतस

थोडक्यात, रामाला देवत्व बहाल करण्यात अर्थ नाही, एक कोटी जप वगैरे केल्यावर राम दिसणार नाही, रामाचा धावा करणार्‍या सेवकाचं काहीही वक्र होऊ शकतं, बिजेपीचा राममंदिराचा अजेंडा जनतेची दिशाभूल करणारा ठरतो. ___________________ बाय द वे, धाग्याचा नक्की हेतू काय आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

काळा पहाड 15/09/2014 - 11:16
म्हटला तर नाही. अर्थात ज्याचा त्याचा देव. पण मग असे प्रश्न बाकी धर्मियांना का विचारले जात नाहीत?

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 15/09/2014 - 11:19
आपल्या मताशी सहमत आहे. धाग्याचा हेतू म्हणजे पोटेंसारख्या ट्रोलांच्या मुद्द्यांतील हवा काढून घेणं हा आहे. रच्याकने रामायण अवश्य वाचा एकदा. अतिशय रसाळ आहे आणि खूप छान.

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो 16/09/2014 - 17:47
जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला!
ह्यावरुन काही शंका : १. रावणाची स्वतःची "माहिती संकलन आणि प्रसारण" यंत्रणा नव्हती का? म्हणजे त्याच्या राज्यात आग लागल्याची अफवा ऐकल्यावर तिचं "क्रॉस व्हेरीफिकेशन" त्याने का केलं नाही? रावण अफवांवर सहजासहजी विश्वास ठेवून घिसडघाई करत लंकेला परत जाण्याइतका हलक्या कानाचा होता का? २. लंकेत अग्नीशमन व्यवस्था नव्हती का? ३. आग लागल्याची बातमी ऐकून स्वतः रावणाला लंकेला परत यावं लागलं, ह्याचा अर्थ लंकेत "सेकंड लाईन ऑफ लिडरशिप" नव्हती का? प्रजाहितदक्ष वगैरे ठीक आहे, पण काही कारणास्तव जर मुख्य अधिकारी व्यक्तीला जर राज्यातून बाहेर जावे लागले, तर त्याच्या अनुपस्थितीत राज्याची काळजी घ्यायला कुणीच जबाबदार व्यक्ती नसणे, हा त्याच्याद्वारे स्थापित केलेल्या यंत्रणेचा दोष नाही का? ४. रावणाचा "डिलीगेशन ऑफ पॉवर" वर विश्वास नव्हता का?

In reply to by चिगो

कोणत्याही कथेत पात्रांचा रोल आणि वागणूक जस्टीफाय करता आली म्हणजे झालं. डोंट टेक इट सिरियस, स्टोरीज आर आयदर एंजॉइड ऑर नॉट, दॅट्स ऑल! रावणाला खुन्नस येण्यासाठी असं काही तरी घडलं असेल तर त्याचा रोल आणि सीताहरणाचा मुख्य प्लॉट दोन्ही जस्टीफाय होतात. आणि द लॉजिक फिट्स. मी सुरुवातीलाच म्हटलंय, आय डोंट वेरिफाय. खरं तर एनीथिंग कॅन बी अ‍ॅडेड टू अ स्टोरी अँड अ स्टोरी कॅन बी इंप्रोवाइज्ड ऑल्सो.

काउबॉय 14/09/2014 - 21:54
मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा- नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात.
कौरव जिंकले असते तर शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच. म्हणून सर्व काही जेते ठरवतात ते प्रचलित होतेच असे नाही. याचे भान हवे. पण इश्वराची ओळखच त्याच्या विजय कथातुन केली जात असल्याने शिरोमणिञ्चि जेतेच बायबल लिहतात हे रडगाणे नेहमीचे आहे

In reply to by संजय क्षीरसागर

काळा पहाड 15/09/2014 - 01:33
कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच असती. इकडून तिकडून ढापून आणि सांगितलं असतं की शकुनी हा देवाचा शेवटचा प्रेषित होता इत्यादी..

In reply to by काळा पहाड

पण मी बॉयच्या या,
शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच.
(ओरिजिनल) शकुनीमामाच्या `कपॅसिटीबद्दल' प्रश्नाला उत्तर दिलंय

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 15/09/2014 - 14:18
एक तर पराभूतांची प्रेरणा कोण वाचणार? असे म्हणायचे नाहीतर जेत्यांनी सगळ अन एकतर्फी लिहलय म्हणत ओरड करायची.... ! मग कोणाचे म्हणने प्रमाण ठरवायचे असे आपले मत आहे ? फक्त तुमचे ?

In reply to by काउबॉय

संदर्भासहित वाचत जा, एकदम एक्साइट होण्यात अर्थ नाही, मुद्दा हुकतो. शकुनी गीता सांगायला केपेबल नव्हता असा तुमचा मुद्दा होता. आणि मी लिहीलंय `जर कौरव जिंकले असते तर (सध्याच्या) गीतेला अर्थच राहिला नसता.' जेते इतिहास लिहीतात ही उघड गोष्ट आहे त्यामुळे कौरव निंद्य आहेत. ते जिंकले असते तर पांडव निंद्य ठरले असते. आणि कदाचित, शकुनीचे ते `डावपेच' आणि कृष्णाची ती `कारस्थानं' असा लेखाजोखा झाला असता.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 15/09/2014 - 16:36
आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलंच असतं की! :) मुद्दा मुळात जिंकणारे का जिंकले आणि हरणारे का हरले हा असू शकतो का? पूर्वी म्हणे खर्‍याची बाजू घेणारे जिंकायचे नि आता युगधर्मानुसार स्खलनशील समाजात खोट्याची बाजू घेणारे जिंकून बजबजपुरी माजणार आहे.

In reply to by प्यारे१

सुहास.. 15/09/2014 - 16:41
मुद्दा मुळात जिंकणारे का जिंकले आणि हरणारे का हरले हा असू शकतो का? >> काल परवा चान-चान , दवणीय वाक्य वाचण्यात आहे " बुध्दीबळाच्या पटावर काळे जिंकोत वा पांढरे , खेळ संपला की सगळ्यांना धरुन एकाच बॉक्स मध्ये कोंबण्यात येते " ;)

पैसा 15/09/2014 - 08:43
कृपया एवढ्या गंभीर धाग्यावर महाभारताची चर्चा करून ट्रोलिंग करू नये.

In reply to by पैसा

काउबॉय 15/09/2014 - 14:59
पण हे ट्रोलिंग नव्हे. मुद्दा इतकाच होता शिरोमणिच्या दाव्यानुसार जर की दोन्ही बाजूमधे चुकाकरणारे घटक सामाविष्ट आहेत तर एकाच(बहुतांश जेते) बाजुला चांगली का मानले जाउन त्या व्यक्तिरेखांचा उदो उदो केला जातो अथवा त्याबाजुविरोधी टिका का सहन केलि जात नाही याचा उहापोह त्यात आहे.

In reply to by काउबॉय

पैसा 15/09/2014 - 15:10
पण आपल्या मिपाच्या महान परंपरेनुसार मुद्दा तेवढ्यावर थांबत नाही, तर बहुतेकवेळा भलत्याच विषयावर गाडी सुरू होते! त्यामुळे जर कोणाला महाभारतातील व्यक्तिरेखांबद्दल डिटेलमधे काथ्या कुटायला असेल तर स्वतंत्र धागा काढून अवश्य कुटावा! स्वागत आहेच!

विटेकर 15/09/2014 - 10:22
रामायण आणि महाभारत ही भारताची महाकाव्ये आहेत आणि राम आणि कृष्ण हे राष्ट्रीय महापुरुष ! या महाकाव्यांनी आणि महापुरुषांनी भारतालाच नव्हे संपूर्ण आशियाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा दिली. आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या लायकीच असून देखील अशा महपुरुषांवर राळ उडवत आहोत याची जाणीव इथे आपल्या तथाकथित ज्ञान पाजळणार्‍या किती महाभागांना आहे? अशा प्रकारची टिंगल करुन आपण अनेकांच्या श्रद्धास्थांनांना पाय लावत आहोत इतपत संवेदनशीलता अजून जागी आहे का ? की तालिबानी राज्य आहे ? आम्ही म्हणतोतेच खरे ? ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले , त्यांच्याच अस्तित्वावर शंका घेताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटत नाही हे कशाचे द्योतक आहे ? कसला "माज" आहे हा ? की आम्ही शाब्दिक कोलांटउड्या मारुन आणि शब्दांची तोड-फोड करुन आमचे हीन मनोरंजन करण्यासाठी काहीही पणाला लावू? आपला बाप हा आपला विश्वास असतो , तिथे कोणी पुरावा मागत नाही. अस्तु , मिसाळ पाव सारख्या अभिरुची संपन्न संकेतस्थळावर असे धागे निघत असतील तर एकूणच समाजाची वैचारिक पातळी घसरली आहे आणि " मनोरंजनासाठी काय पण " सुरु साहे असे खेदाने म्हणावे वाटते.

In reply to by विटेकर

बाळ सप्रे 15/09/2014 - 12:45
ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले
म्हणजे नक्की काय हो?? ही महाकाव्ये नसती तर जग चाललेच नसते काय?? आणि हे उंदीर मारण्याच्या विभागात वगैरे पु लं चे उदा. आजकाल फारच अस्थानी वापरायला लागलेत!! जिथे तिथे लिहिणार्‍याचा अधिकार काढायचा.. मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन.. आणि भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्या आणि दुसर्‍यांना तालिबानी वगैरे ठरवुन मोकळे!!

In reply to by बाळ सप्रे

विटेकर 15/09/2014 - 12:58
म्हणजे नक्की काय हो??
-
मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन..
या विषयावार असली अश्लाघ्य चर्चाच होऊ शकत नाही. कसले बोडक्याचे मुद्दे ? -
भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्या
कुणाच्या भावना नाजूक ? करोडो भारतीयांच्या श्रद्धा अशा सार्वजनिक ठिकाणी पायाखाली घातल्या तर आम्ही हातावर हात थेऊन बसावे का ? असल्या प्रवृत्तीना तालिबान म्हणावे की महात्मे ? -(संपादित)

In reply to by विटेकर

सुहास.. 15/09/2014 - 15:22
रामायण आणि महाभारत ही भारताची महाकाव्ये आहेत आणि राम आणि कृष्ण हे राष्ट्रीय महापुरुष ! या महाकाव्यांनी आणि महापुरुषांनी भारतालाच नव्हे संपूर्ण आशियाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा दिली. >>> महा काव्याला महा काव्येच ठेवावीत ना मग ! दिशा त्या काळात असेल ...आता कशी काय लागु होते ? उदा. मदिराप्राशन आणि मासांहार ( आठवा बळी आणी यज्ञ सस्कांर ) , किंवा धुत खेळण हे त्या वेळी लागु होते , आताच्या युगात काय ?? आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या लायकीच असून देखील अशा महपुरुषांवर राळ उडवत आहोत याची जाणीव इथे आपल्या तथाकथित ज्ञान पाजळणार्‍या किती महाभागांना आहे? >> मालक , हे वाक्य कोणासाठी आहे ? आणि तशी लायकी ठरविणारे आपण कोण ....जर कुठे श्रध्दास्थांनावर चार प्रश्न ( ते ही सभ्य भाषेत ) विचारले तर बाप काढल्यासारख अंगावर येवुन भागेल का ? आणि त्या पुलंच्या डायलॉग ची किती वेळा कॉपी तरी करणार .. वीट आला च्यायला !! ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले , त्यांच्याच अस्तित्वावर शंका घेताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटत नाही हे कशाचे द्योतक आहे ? कसला "माज" आहे हा ? की आम्ही शाब्दिक कोलांटउड्या मारुन आणि शब्दांची तोड-फोड करुन आमचे हीन मनोरंजन करण्यासाठी काहीही पणाला लावू? >>> जरा दोन चार उदाहरणे मिळतील का पुण्य पराक्रमावर ??

In reply to by सुहास..

प्यारे१ 15/09/2014 - 15:25
>>> त्या पुलंच्या डायलॉग ची किती वेळा कॉपी तरी करणार .. वीट आला च्यायला !! हो ना. पण खरंच नवे डायलॉग मिळत नाहीत. मिळाले तरी पुलंच्या एवढे फेमस होत नाहीत. नवीन लेखकांच्या प्रतिभाक्षमतेवर शंका येण्याइतपत वाईट परिस्थिती आली आहे हो! :-/

In reply to by प्यारे१

सुहास.. 15/09/2014 - 15:29
नवीन लेखकांच्या प्रतिभाक्षमतेवर शंका येण्याइतपत वाईट परिस्थिती आली आहे हो! >> आले का नवलेखकांविषयी दांभिकता घेवुन ...तरी म्हटंल विभिषणाचा उल्लेख कसा आला नाही अजुन ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ 15/09/2014 - 15:33
>>> आले का नवलेखकांविषयी दांभिकता घेवुन ...तरी म्हटंल विभिषणाचा उल्लेख कसा आला नाही अजुन नेमका अर्थ काय म्हणायचा ह्या वाक्याचा? -गोंधळ उडालेला

मृत्युन्जय 15/09/2014 - 11:22
आयला रामायणाच्या धाग्यावर महाभारत झाले किंवा असे म्हणुया की रामायणाच्या धाग्याचे काश्मीर झाले. ;) माझा रामायणाबद्दलचा दृष्टीकोन थोडासा असा आहे: १. राम नावाचा एक अतिशय सत्शील, सज्जन, विनम्र पुरुष होउन गेला. हा अतिशय गुणवान प्रजाहितदक्ष आणि शूर राजा होता. प्रजेची याने स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. याची समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था दृष्ट लागण्यासारखी सुरेखे होती त्यामुळे याच्याकाळात सुरक्षितता आणि सुबत्ता होती २. रामाचे जनमानसातील आणि परिवारातील स्थान वादातीत आदरणीय होते. शिवाय त्याच्या शौर्यामुळे त्यात एक प्रकारचा दरारा होता. याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय बलवान आणि सामर्थ्यशाली भाऊ नेहमी याची सावली बनुन राहिला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याची कोणाची टाप नव्हती. त्यात त्याचा अजुन एक भरत नावाचा भाऊ ( हाही तसा शूरच होता) अतिशय निस्पृह आणि गुणी होता. आयुष्यभर हा रामाच्या अर्ध्या वचनात राहिला. या तिघांचा शत्रुघ्न हा त्यामानाने कमी प्रकाशझोतात राहिलेला शूर भाऊदेखील सर्वांशी गुण्यागोविंदाने वागल्याने हे चारही भाऊ एकोप्याने राहिले. त्यांनी जबाबदार्‍या योग्यप्रकारे वाटुन घेतल्याने अयोध्येत सुराज्य आले. ३. रामराज्यात ज्ञानी आणी विद्वान लोकांचा योग्य सत्कार झाला आणि शौर्याचा आदर केला गेला. यस्य राजा तथा प्रजा या न्यायाने सत्यप्रियता, वचनबद्धता, प्रामाणिकपणा, विनम्रता या गुणांचा उत्कर्ष होउन एक आदर्श समाज तयार झाला. ४. सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणुन लोक रामाला देवासमान मानायला लागले (किंबहुना तो देव होताही) ५. मानवी रुपाला अनुसरुन रामातही काही दुर्गुन होते. पण ते बहुजनहिताय बहुजनसुखाय असल्याने त्याच्या दुर्गुणांवर त्याच्या सद्गुणांनी मात केली आणि त्याच्या चुका त्यामानाने कमी महत्वाच्या ठरल्या. ६. रामाने सुर्पणखेचा केलेला अपमान अनाठायी होता. पण त्याला येउ घातलेल्या संकटाची एक सुप्त किनार होती. राक्षसांना एकदाची योग्य अद्दल घडवल्यास त्याच्या अनुपस्थितीत सीतेला त्रास होणार नाही अशी एक आशा होती. त्यामुळेच त्याने शुर्पणखेचे कान नाक कापण्याची शिक्षा दिली. ७. वालीचा वध (हत्या ?? ) नक्कीच अन्याय्य होता. हेच कृत्य कृष्णाने अगदी बिनदिक्कत केले असते आणि त्याच्या या कृत्याला आपण आक्षेपही घेतला नसता. पण राम सद्गुणांचा पुतळा होता. त्याच्याकडुन अत्त्युच्च दर्जाच्या नैतिक वागणुकीची अपेक्षा असल्याने त्याचे कृत्य खटकते. ज्या परिस्थितीत राम अडकला होता त्यात त्याला मदतीची गरज होती. परत फिरुन अयोध्येची मदत घेणे जमणार नव्हते. तेवढा वेळही नव्हता आणि त्यात वचनभंगाची शक्यताही होती. शिवाय अश्या परिस्थितीत तो परतता त्यात त्याच्या शौर्याची मानखंडना होती. तस्मात दक्षिणेकडील राजांची मदत घेणे अनिवार्य होते. त्यावेळेस किष्किंधेचे एकमेव राज्य त्याला मदत करु शकण्यास समर्थ होते. किष्किंधेने त्यापुर्वीही लंकेचा पराभव केला होता. राम आणि लक्ष्मण असे दोघेचजण त्यावेळेस पत्नीच्या सुटकेसाठी मदत घेण्यास वालीकडे गेले असते तर त्यांना मदत मिळण्याची शक्यता कमी होती. याचकांसाठी कोणी इतके मोठे युद्ध करत नाही. अश्यावेळेस राम नावाच्या राजाने एक राजकारणी जे करेल (जे त्याच्यासारख्या उच्च नितीमत्तेच्या माणसाकडुन अपेक्षित नाही असे काही लोकांना वाटेल) तेच केले. किष्किंधेच्या सिंहासनाच्या वादातील दोन भावांपैकी दुबळ्याची बाजु घेउन समर्थ माणसाला मारले. वालीचे सामर्थ्य लक्षात घेता समोरासमोरील युद्ध कदाचित निष्फळ ठरले असते किंवा त्यात खुप वेळ गेला असता. शिवाय राजाच्या मदतील सैन्य येता रामाचे कार्य अपुर्ण राहिले असते. हे लक्षात घेता त्याला आणी नगरजनांना अवधी न देता वालीला संपवणे अनिवार्य ठरले. रामाने मागुन बाण मारुन तेच साध्य केले. नंतर त्याला नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला जो अर्थातच फसला. यात एकच गोष्ट बरोबर साधली गेली ती ही की धाकट्या भावाची बायकि अन्याय्य पद्धतीने बळकावुन तिच्याबरोबर संसार थाटणार्‍या एका शक्तिशाली राजाचा नि:पात झाला. ८. एक गुणी आणि प्रजाहितदक्ष राजा असुनही राम प्रचलित समाजव्यवस्थेला आणि पुरुषी मानसन्मानाच्या अयोग्य कल्पनांना बळी पडला. सीतेप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने नक्कीच कसूर केली. या संपुर्ण प्रकारात तो तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन असलेल्या मानसिक धारणांना बळी पडला. यामुळे त्याच्या देवत्वाला उणेपण आले. ९. शंबुक, शुर्पणखा, वाली आणि सीतात्याग या प्रकरणात रामाच्या चूका प्रकर्षाने नजरेस येतात. तर वचनप्रियता, प्रामाणिकपणा, सुरा़ज्य, विद्वत्त्ता आणि शक्तीस्थानी असलेली विनम्रता या गुणांमुळे रामाची कारकीर्द उजळुन निघते. रामाच्या चूकांमुळे काही योग्य / अयोग्य व्यक्तींचे नुकसान झाले तर त्याच्या कारकीर्दीमुळे एका समाजाचे, एका पिढीचा किंबाहुन पुढील कित्येक पिढ्यांचा उद्धार झाला. सामाजिक सुबत्ता, सुरक्षा आणि सुशासन यांमुळे रामाने त्याच्या कारकीर्दीत जाणते / अजाणतेपणी किंवा काळाच्या नियमांनुसार जे वैयक्तिक अपराध केले ते त्यामुळे क्षम्य ठरतात असे माझे मत आहे. ते अपराध नाहित असे मी मानत नाही. त्याच्यामुळे त्याला उणेपण येत नाही असेही माझे म्हणणे नाही. पण व्यापक हिताचा विचार करता तो तरीही आदरणीय आणि अनुकरणीय पुरुष आणि देव होम्ह/ आहे असे म्हणण्यास जागा आहे,

In reply to by मृत्युन्जय

पैसा 15/09/2014 - 11:37
वाल्मिकी रामायण रावण वधाबरोबर संपते. संपूर्ण उत्तरकांड प्रक्षिप्त आहे असे बहुतांश मत आहे. त्यामुळे शंबूक वध आणि सीता त्याग या दोन्हीला मूळ वाल्मिकी रामायणात काही आधार नाही. (याचा विचार करता सीतेचे अग्निदिव्य सुद्धा मूळ रामायणात नाही.) कदाचित उत्तरकांड फार नंतर म्हणजे बौद्धकालात लिहिले गेले असावे. *आंतरजालावर पुढील माहिती मिळते.
इस समय देश में वाल्मीकि रामायण की जो भी पांडुलिपियाँ मिलती हैं वह सब की सब दो मुख्य प्रतियों से निकली हैं। एक हैं बंग देश में मिलने वाली प्रति जिसके अन्दर बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध ६ कांड हैं और कूल सर्ग ५५७ और श्लोक संख्या १९७९३ हैं जबकि दूसरी प्रति बम्बई प्रान्त से मिलती हैं जिसमें बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध इन ६ कांड के अलावा एक और उत्तर कांड हैं, कूल सर्ग ६५० और श्लोक संख्या २२४५२८ हैं।
http://aryasamajmandirpune.blogspot.in/2013/11/blog-post_30.html

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 15/09/2014 - 13:09
सीतेप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने नक्कीच कसूर केली. या संपुर्ण प्रकारात तो तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन असलेल्या मानसिक धारणांना बळी पडला.
कसूर केली का ते माहीत नाही. रामाला दोष देता आला असता जर त्याने दुसरे लग्न केले असते तर. पण तसे त्याने केले नाही. तो कायम एकपत्नीच राहिला. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो त्याग ठरतो आणि शेवटी तत्कालिन समाजव्यवस्था श्रेश्ठ असतेच. त्यामुळे बाकी सहमत.
शंबुक, शुर्पणखा, वाली आणि सीतात्याग या प्रकरणात रामाच्या चूका प्रकर्षाने नजरेस येतात.
शूर्पणखा प्रकरणात रामाची चूक काय ते मला अजूनही कळलेले नाही. स्वतःच्या पराक्रमावर विश्वास ठेउन त्याने राक्षसांची जाणून्बुजून खोड काढली असे माझे मत आहे. आणि खरदूषणप्रमुख १४००० राक्षसांच्या वधाने ते सिद्ध देखील होते.

In reply to by मृत्युन्जय

साध्या शब्दातले परिस्थितीचे परखड वर्णन आवडले ! वैचारीक, आर्थिक, सामाजीक अथवा राजकीय फायद्यांसाठी नाही तर तर कधी कधी केवळ वैयक्तीक वरचढपणा (इगो) सिद्ध करण्यासाठी साधे सत्य प्रचंड गुंतागुंतीचे करणे ही मानवी मनाची एक मोठी ताकद आणि दौर्बल्य राहीले आहे...

In reply to by मृत्युन्जय

मदनबाण 15/09/2014 - 16:20
याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय बलवान आणि सामर्थ्यशाली भाऊ नेहमी याची सावली बनुन राहिला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याची कोणाची टाप नव्हती. रामाच्या मागे सीता अरण्यात गेली,त्या बरोबर लक्ष्मण सुद्धा गेला. बुंधु प्रेमाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हेच ! त्याचा त्याग फार मोठा आहे, कारण रामा बरोबर निदान सीता माता तरी सहवासा करीत जवळ होती परंतु उर्मीलेला राज्यात ठेवुन वनात ब्रम्हचर्ये ने राहताना त्याने कोणत्याही परस्त्रीचा मोह धरला नाही. माझ्या एका ऐकीव कथे नुसार अयोध्येला परत आल्यावर सभेत लक्ष्मण हसायला लागला त्यावर हनुमानाने प्रश्न केल्यावर त्याने आता निद्रादेवीला जवळ बोलवले आहे ती येत असल्याने त्याला हसु आले.वनवासा पासुन युद्धा पर्यंत {इंद्रजित /मेघनाद} याने मुर्च्छित केल्याचा काळ सोडता त्याने कुठेही झोप घेतली नव्हती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

सस्नेह 15/09/2014 - 15:47
सदर धागा व प्रतिसाद वाचले तर राम, रावण, वाली, सुग्रीव अँड रामायण कंपनी युध्द बिद्ध बाजूला ठेवून इथे येऊन पॉपकॉर्न घेऊन बसतील

In reply to by सस्नेह

कवितानागेश 15/09/2014 - 16:59
=)) मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो? या सगळ्या कथा एकत्र करुन, त्यांचा मीन काढून मला कुणीतरी वाल्मिकींना नक्की काय सांगायचं होतं ते सांगेल का? मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै....

In reply to by कवितानागेश

मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै.... कवी कविता लिहीतो... लोक तिचा हवा तसा अर्थ लावतात. असे म्हणतात :)

In reply to by कवितानागेश

मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो? मिपावर नियमीतपणे फेरी मारत जा ? पुरेसं आहे ! (विदा : स्वानुभव; विषयांचा आवाका: मल्टीव्हर्स संबद्धी, मल्टीव्हर्स मधला आणि त्याबाहेरचा कोणताही विषय... ;) )

In reply to by सस्नेह

अरे तुम्हाला अजून दिसले नाही ते ?! त्यांनी आमच्या बरोबर पहिल्या रांगेत बसून प्रत्येकी तीनतीन पॉपकॉर्न आणि क्ष्क्ष्क्ष चे डबे संपवले देखील ! ;) =))

सूड 15/09/2014 - 16:45
नुसत्या काळ्या आणि पांढर्‍या छटा असलेल्या रामायणात शष्प इंटरेस्ट नाही. त्यात गोष्ट एक तर अत्यंत चांगली असते किंवा अत्यंत वाईट. लोकाने आळ घेतला म्हणून स्वतःच्या बायकोला अग्निपरिक्षा घ्यायला लावणारं राम नामक पात्र राजा म्हणून चांगलं असेलही पण नवरा म्हणून अत्यंत हुकलं होतं.

In reply to by सूड

पैसा 15/09/2014 - 18:56
लोकाने आळ घेतला म्हणून स्वतःच्या बायकोला अग्निपरिक्षा घ्यायला लावणारं राम नामक पात्र राजा म्हणून चांगलं असेलही पण नवरा म्हणून अत्यंत हुकलं होतं.
या दोन्ही गोष्टी वाल्मिकीनी लिहिलेल्या मूळ रामायणात नाहीत. नंतर कधीतरी घुसडण्यात आल्या. जसं कृष्णाच्या मूळ चरित्रात राधा हे पात्र नाहीच तसंच.

In reply to by पैसा

कवितानागेश 15/09/2014 - 22:26
मला वाटतं की "राजा दशरथाला राम नावाचा मुलगा होता आणि त्यानी रावण नावाच्या एका राजाला मारलं", इतकीच गोष्ट "खरी" असावी. बाकी सगळंच रामायण प्रक्षिप्त आहे. ;)

काळा पहाड 15/09/2014 - 17:33
हा मुद्दा जरी राळ उडवायच्या साठी काढला असला तरी एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. राम हा ईश्वर (god) नव्हता, तो तथाकथितरित्या देव (deity) सुद्धा नव्हता. तो अवतार होता. त्यामुळेच ना त्याला सुपरनॅचरल शक्ती होत्या ना तो मानवी भाव भावनांपासून अलिप्त होता. अवतार ही संपूर्ण पणे मानवी संकल्पना असून आपण ईश्वराचे गुणांची अभिव्यक्ती अवताररुपी व्यक्तीत पहात असतो. त्याच्याकडून चुका होणं साहजिक आहे. त्याला राग आणि लोभ असणं सुद्धा साहजिक आहे. त्यामुळे रामानं चुका करणं म्हणजे हिंदू धर्माला कमीपणा येत नाही. या राळ उडवण्याचा मूळ हेतू हिंदू धर्मावर बाण मारण्याचा आहे हे जर लक्षात घेतलं तर अशा इतर धर्मियांच्या किंवा हिंदू धर्मातल्या दुखावलेल्या पंथातल्या लोकांच्या मतांना फार महत्व द्यायचं कारण उरत नाही.

In reply to by काळा पहाड

आनन्दा 15/09/2014 - 17:52
जबरी.. मे पण हेच्च म्हणतो. देव न मानणार्‍यांची गोष्टच वेगळी. राम हा देव होता. परंतु अंगी देवत्व असून देखील त्याने कधी आपल्या मानवी मर्यादा उल्लंघन केल्या नाहीत. आपण हे कधी शिकणार तोच जाणे.

वरील चर्चेत प्रभु रामचंद्रांवर टीका करणार्‍यां पैकी किती जणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे ? ( एकुणच चर्चेचा सूर पहाता , एकटा वल्ली वगळता कोणीही वाल्मिकी रामयण वाचले असेल असे वाटत नाही . पूर्णग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण | तो दुरात्मा दुराभिमान| मत्सरें करी || बाकी च्या आयडींचे जाऊ दे , ते हिंदु द्वेषाने भरलेले आहेत हे सर्वमिपाला ज्ञात आहे कधी रामकृष्णावर चिखल फेक करा , कधी वारी गणेशोत्सव बंद करा असला प्रचार , तर कधी मोदींना शिव्या तर कधी ब्राह्मण ब्राह्मणेतर पोलरायझेशन हे असले उद्योग चालुच रहाणार, शिवाय व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र असल्याने मिपा त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यताही नाही .... , पण ब्यॅटमॅन ह्यांचा ही एक प्रतिसाद वाचुन धक्का बसला , ब्यॅटा तु वाचले आहेस कारे रामायण ? आपल्याला जे रामायण माहीत आहे त्यातला बराचसा भाग प्रक्षिप्त आहे हे तुझ्या निदर्शनास आले आहे काय ? की तुही टीव्ही सीरीयल पाहुन कमेन्ट टाकली आहेस ?) असो. श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन झाली , आता बुध्द , महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स वगैरेंना घेवुया का राउंडात ? *biggrin* जाऊंन द्या ... दुसर्‍यांच्या श्रध्दास्थानांवर अश्लाघ्य आरोप करणे आणि चिखलफेक करणे ही आमची ( आमची म्हणजे इथे उजव्या कोपर्‍यात दोन माणसांचा फोटो लावलाय ना त्यांना मानणार्‍यांची) संस्कृती नव्हे .
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोगु निश्च‌ित। जाण माझा।।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सवेर्श्वर पूजनाचे ||
'जे धर्मस्थापनेचे नर| हे ईश्‍वराचे अवतार| झाले आहेत पुढे होणार| देणे ईश्‍वराचे|'
यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं लो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो| भूतां परस्परें जडो| मैत्र जीवाचें ||

एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति ।

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 16/09/2014 - 18:13
ंमोदीना शिव्या घातल्या की शिव्या देणारा हिंदु द्वेष्टा ठरतो ! ज्ञानात भर पडली !

In reply to by प्रसाद गोडबोले

विजुभाऊ 16/09/2014 - 18:53
वरील चर्चेत प्रभु रामचंद्रांवर टीका करणार्‍यां पैकी किती जणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे ?
प्रगो काका ( अर्थात गिरीजा काकू ) मी वाल्मिकी रामायण , भुषुंडी रामायण ( तेच ते काक भुषुंडीने लिहीलेले) आणि तुलसी रामायण वाचलेले आहे. सातारच्या काळाराम मंदीरात त्यावर श्रीकृष्णशास्त्री जोशींची बरीच प्रवचने देखील ऐकली आहेत.
बाकी च्या आयडींचे जाऊ दे , ते हिंदु द्वेषाने भरलेले आहेत हे सर्वमिपाला ज्ञात आहे
एखाद्या गोष्टीच्या वाईटपणाबद्दल टीका केली की तो हिंदूद्वेष होतो हे कशावरून? जे वाईट आहे ते वाईटच की. यात मिपाने कारवाई करण्याचा काय प्रश्न येतो. वाईट गोष्टीबद्दल बोलले नाही याचा अर्थ त्या नसतात असे नाही. चिघळलेली जखम झाकली म्हणून वेदना व्हायच्या बंद होत नाहीत. ( माताय काय भयानक खंग्री वाक्य गवसलय) बाकी काय बोलू . असो. तुमच्याच शब्दात सांगायचे तर व्हर्बल***** करून काय उपयोग.

In reply to by विजुभाऊ

चांगले काय अन वाईट काय ह्याची चर्चा निवांतपणे करुच हो आधी तुम्ही रामायण वाचले आहे का ते तरी सांगा ... आणि नसेल वाचले तर प्रांजळपणे कबुल तरी करा की ऐकीव ज्ञानावर बडबड करत आहात ते ... ( पण एकुणच तुमच्याशी केलेल्या पुर्वचर्चां वरुन तुम्ही पॅव्हेलियन मधे (किंव्वा टीव्हीसमोर) बसुन सचिन कसा चुकला अन ऑऊट झाला ह्यावर चर्चा करणार्‍यातले आहात असा एक अंदाज बांधलेला आहे , आता वरील प्रश्नाला तुम्ही जर का " होय मी वाल्मिकी रामायण वाचले आहे आणी म्हणुनच त्याच्याविषयी बोलत आहे" असे उत्तर दिलेत तर मत बदलावे लागेल . ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 16/09/2014 - 19:57
रामाच्या भक्तानी तरी संपुर्ण रामायण वाचलेले असते का? आणि रामाच्या एखाद्या कृतीबद्दल शंका विचारली की लगेच त्याला मात्र विचारायचे.. तू संपुर्ण रामायण वाचले आहेस का ?

In reply to by पोटे

कसं आहे की इथे राम आहे म्हणुन तुम्ही त्याच्या कृती बद्दल असल्या शंका काढु शकता कारण १०८ वेळा अंगावर थुंकले तरी अजिबात न रागवता गोदावरीत उतरुन स्नान करणार्‍या एकनाथांची परंपरा सांगणारे सौजन्यशील हिंदु इथे आहेत . एकदा इतर धर्माच्या श्रध्दास्थाबद्दल असली शंका काढुन पहा .... होऊन जाऊदे एकदा हा सुर्य अन हा जयद्रथ !! अभ्यास नसेल तर गप्प रहाणे हे उगाच वटवट करण्यापेक्षा फार सोप्पे असते , एकदा प्रयोग तरी करुन पहा राव ! अवांतर : ह्या इथेच , मिपा वर , ज्ताला मी अहिंसेचा समर्थक धर्म समजत होतो त्या धर्माच्या अनुयायाने मला धमकी दिल्याचा किस्सा आठवला , ( शिवाय नुकतेच त्या धर्मात हिंसेला परवानगी असल्याचे कळाले आहे. )

In reply to by प्रसाद गोडबोले

विलासराव 16/09/2014 - 22:33
श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन झाली , आता बुध्द , महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स वगैरेंना घेवुया का राउंडात ? रामायण वाचलेले नाही. बुद्धाबद्द्ल थोडेसे वाचले आहे. महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स यांच्याबद्द्ल विशेष वाचन नाही. सबब बुद्धाला माफी द्यावी.......अर्थातच सगळ्यांना दिलीत तरी हरकत नाहीच म्हणा.

In reply to by विलासराव

काळा पहाड 16/09/2014 - 23:50
बुध्द - भारताला अहिंसेच्या चुकीच्या दिशेने घेवून जाणारा. भारतानं याच्यामुळेच क्षात्रवृत्तीचा त्याग केला महावीर - फारसं काही माहिती नाहिये येशु - समर्थकांनी आणि चर्चनंच विचारांची हत्या केली. स्वतः बिचारा सूळावर चढला आणि पोप आणि र्चचेलोक कर्मकांडात (संत बनवणं, बाटवाबाटावी, सोन्याचा येशू बनवून अर्पण करणं वगैरे) गोष्टीत मग्न आहेत. लहान मुलांवर फादर लोकांनी केलेल्या असॉल्टचे खटले जगात गाजतायतच. कंन्फुशीयस - लईच कन्फ्युज्ड व्हता राव. मोट्टी मोट्टी वाक्यं लिवून गेला. कार्ल मार्क्स - चुकीचं तत्वज्ञान, चुकीचा प्रयोग्

In reply to by काळा पहाड

पोटे 17/09/2014 - 07:34
बुद्धाच्या अहिंसेने भारताची वाट लागली हा सावरकरवाद्यांचा खोडसाळ मुद्दा आहे. सावरकर ज्या अंदमानात होते ते अंदमान बौद्ध जपान्यांनीच जिंकुन भारताला दिलं हे महान सत्य मात्र हे लोक विसरतात. :) दुसर्‍या धर्मात अहिंसा आहे म्हणुन आमची क्षात्रवृत्ती झिजली असा आक्रोश यांनी करणं हे म्हणजे बाकीच्यानी नसबंदी केली म्हणुन आम्हाला पोरं होत नाहीत असे म्हणण्यासारखेच नाही का ?

In reply to by पोटे

काळा पहाड 17/09/2014 - 10:31
१. सावर्करवादी कुठे आले? हा माझा मुद्दा आहे आणि मी सावर्करवादी नाही. मी फारसे सावर्कर वाचलेले पण नाहीत. तेव्हा उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला नको. २. जेव्हा भारताला बाहेर जावून जगावर हिंसक विजय गाजवायची गरज होती, तेव्हा भारतात अहिंसेचे गोडवे गायले जात होते. अशोकासारख्या पराक्रमी राजाला बौद्ध बनवून त्याचा पराक्रम बौद्धांनी संपवून टाकला. ३. क्षात्रवृत्ती झिजली नाही पण समाजाचा एक वर्ग अशा वेळी अहिंसेच्या मार्गावर चालत होता ज्या वेळी मुसलमान बाहेरून भारतावर हल्ले करत होते. बाकी मुसलमानांनी कन्व्हर्जन साठी सर्वात जास्त बौद्धांनाच टार्गेट केलं होतं हे तुम्हाला माहीत असेलच. ४. जपानी बौद्ध होते पण दुसर्‍या महायुद्धात सर्वात जास्त अत्याचार जपाननंच केले होते. तुम्हाला नक्की कशाबद्दल अभिमान आहे हे एकदा ठरवा. बाकी तुम्ही रामावर टीका करू शकता पण बुद्धावर केली तर तुम्हाला चालत नाही. एखादी दुखरी नस दाबली जातिये वाटतं?

In reply to by काळा पहाड

विलासराव 17/09/2014 - 09:03
बुध्द - भारताला अहिंसेच्या चुकीच्या दिशेने घेवून जाणारा. भारतानं याच्यामुळेच क्षात्रवृत्तीचा त्याग केला कालाय तस्मै नमः !!!!!!!

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 17/09/2014 - 09:29
जेव्हा संपादकीय काम असेल तेव्हा संपादक मंडळ आयडी वापरण्यात येईल. जे प्रतिसाद माझ्या आयडीने प्रकाशित होतात ते माझे वैयक्तिक असतात. आणि यात तुम्हाला समज कुठे दिसली ब्वा? मी तर लोकांना विनंती केली आहे! :D

बाळ सप्रे 16/09/2014 - 18:39
धर्मातल्या, जुन्या ग्रंथातल्या काही खटकणार्‍या गोष्टी दाखवल्या की हा एक पवित्रा सर्वसाधारणपणे दिसून येतो की "ते ओरी़जिनल धर्मात/ ग्रंथात नाहीच्चे" "ते नंतर घुसडण्यात आलयं " जसं काही लाखो/हजारो वर्षांपूर्वीचा बेसलाईन यांच्याकडे उपलब्ध आहे.. आणि जगात बाकीचे सगळे घुसडलेले व्हर्जन ऐकतात/ वाचतात!!

विजुभाऊ 14/09/2014 - 00:10
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. तेंव्हा रामयणात सत्य आणि असत्याचे सोयीस्कर अर्थ लावण्यात काहीच अर्थ नाही

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 14/09/2014 - 00:12
>>> रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. विजुभौ नो ऑफेन्स हा. रामायणाच्या अभ्यासकांना वरील प्रतिसादाच्या सत्यासत्यतेविषयी मूळ संदर्भ देण्याची विनंती याठिकाणी आम्ही करत आहोत. वल्ली, बॅटमॅन, मृत्युंजय, विकास कृपया इकडे लक्ष द्या. ;)

In reply to by प्यारे१

प्रचेतस 14/09/2014 - 00:14
इमाम् विरूपाम् असतीम् करालाम् निर्णतोदरीम् | वृद्धाम् भार्याम् अवष्टभ्य न माम् त्वम् बहु मन्यसे|| अद्य इमाम् भक्षयिष्यामि पश्यतः तव मानुषीम् | त्वया सह चरिष्यामि निःसपत्ना यथा सुखम् || इति उक्त्वा मृगशावाक्षीम् अलात सदृश ईक्षणा | अभ्यधावत् सुसंक्रुद्धा महा उल्का रोहिणीम् इव || रामा, तु ह्या विरुप, पोट खपाटीस गेलेल्या वृद्धेसाठी तू मला मान्यता देत नाहीस म्ह्णून तू आज पाहत असतानाच मी ह्या मानुषीला खाऊन टाकेन आणि पत्नीविहिन अशा तुझ्यासोबत सुखाने विचरण करेन. इतके बोलून ही शूर्पणखा जणू एखादी प्रचंड उल्का रोहिणीवर कोसळत आहे तशा प्रकारे हरिणीच्या पिल्लाप्रमाणे डोळे असलेल्या सीतेकडे झेपावली.

In reply to by प्यारे१

प्रचेतस 14/09/2014 - 00:16
इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला, तरी पुढचे देतो ताम् मृत्यु पाश प्रतिमाम् आपतंतीम् महाबलः | विगृह्य रामः कुपितः ततो लक्ष्मणम् अब्रवीत् || क्रूरैः अनार्यैः सौमित्रे परिहासः कथंचन | न कार्यः पश्य वैदेहीम् कथंचित् सौम्य जीवतीम् || इमाम् विरूपाम् असतीम् अतिमत्ताम् महोदरीम् | राक्षसीम् पुरुषव्याघ्र विरूपयितुम् अर्हसि || इति उक्तो लक्ष्मणः तस्याः क्रुद्धो रामस्य पश्यतः | उद्धृत्य खड्गम् चिच्छ्हेद कर्ण नासम् महाबलः || मृत्युपाशाप्रमाणे येणार्‍या राक्षसीला श्रीरामाने हुंकारानेच रोखून लक्ष्मणाला म्हटले, ह्या क्रूर अनार्यांचा कुठल्याही प्रकारे परिहास करता कामा नये, ह्या समयी सीतेचे प्राण कसेबसेच वाचले आहेत तस्मात तू ह्या कुरुप, कुलटा अशा महाउदरीला विद्रुप करणे आवश्यक आहे. कृद्ध रामाचे हे म्हणणे ऐकून लक्ष्मणाने खड्ग उपसून राक्षसीचे कान-नाक कापून टाकले.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ 14/09/2014 - 00:18
लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;) तर विजुभौ, वल्लीच्या पहिल्याच प्रतिसादामध्ये शूर्पणखेनं नेमकं काय केलं म्हणून लक्ष्मणानं तिला शिक्षा दिली असं आलेलं आहे. त्यामुळं >>> केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. हे विजुभौंचे म्हणणे चुकीचे ठरते. असो!

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ 14/09/2014 - 00:22
अनूप. वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत. क्षणासाठी असे मानूया की शूर्पणखा ही राक्षस होती. तरीही तिने सर्वप्रथम प्रपोज केले आणि त्यात अडथळा येतोय या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली. कोणत्याही भावाला याचा राग येणे नैसर्गीक आहे. लक्ष्मणाने अगोदर काही वाटाघाटी केल्या असत्या किंवा त्याने रावणाला " बघ तुझी बहीण काय म्हणतेय " असे काही बोलणे केले असते तर ते योग्य ठरले असते. एकदम नाक कापणे म्हणजे शुद्ध रानटीपणाचा कळस झाला. हे रावणाच्या कृतीचे समर्थन नाही. पण लक्ष्मणाची चूक दाखवून द्यायची आहे. शीळा झालेल्या अहिल्येचा तथाकथीत उद्धार करणार्‍या रामाने देखील लक्ष्मणाला यावेळेस कोणताच सल्ला दिला नाही. वालीच्या वधाबद्दल रामाला कधीच कोणी दोषी ठरवले नाही पण रामाने वालीला त्याची वैयक्तीक कोणतीच वैरभावना नसतानाही ठार केले तेही झाडा आड दडून भेकडपणे. ही गोष्ट नाकारता येत नाही. राम हा सुद्धा न्यायी वगैरे नसावा. अन्यथा त्याने शंबूकाला कानात शिसे ओतून ठार केले नसते.तळागाळातल्या वर्गाला शिक्षणाचा हक्क नाही हेच रामाने आपल्या कृतीने दाखवून दिले. एका अर्थाने रामायणात सत्याचा जय झाला. शेवटी रामाला स्वतःच्या मुलांना ओळख द्यावी लागली. मात्र त्यासाठी बिचार्‍या निष्पाप सीतेला स्वतःचा अंत करुन घ्यावा लागला. अर्थात शेवटी दुष्ट आणी अन्यायी रामाला स्वतःचा जीवनाचा शेवट हा अत्महत्येने करुन घ्यावा लागला.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 14/09/2014 - 00:24
मतं पक्की झालीयेत तुमची. आधी बाण मारुन नंतर वर्तुळं काढताय विजुभाऊ. रामायणाचा एवढा करुण शेवट मधुर भांडारकर ला सुद्धा अपेक्षित नसेल. ;) चालू द्या!

In reply to by विजुभाऊ

कवितानागेश 14/09/2014 - 00:25
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.>> विजुभाउ, तुम्ही होतात का हो वनवासात?? =)) माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे रहातय. शूर्पणखा आली. तिनी लक्ष्मणाची छेड काढली. लक्ष्मण लई चिडला आणि त्यानी काटक्या गोळा करायचे काम सोडून एकदम तिचे नाकच कापलं... विजुभाउ जंगलात फिरत फिरत गेले होते. त्यांनी बाजूच्याच एका झाडाआडून हे सगळं दुष्कृत्य पाहिलं... आणि परत येउन मिपावर झण्झणीत प्रतिक्रिया दिली! (ह. घ्या)

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे 14/09/2014 - 00:26
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.
हे जनरल विधान आहे का याला काही संदर्भ आहे? रामाने त्या काळच्या न्यायाने जे काही करायचं ते केलं. वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे. त्यामुळे वाली जंटलमन होता हे पटत नाही.

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ 14/09/2014 - 00:28
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे.
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना. रामाने सुग्रीवाकडून वालीची सुपारी का घ्यायची. बरं घेतली तर घेतली पण मग समोरासमोर लढाई करायला काय हरकत होती. झाडाआडून कशाला बाण मारायचा? तेही सुग्रीव आणि वाली ची कुस्ती चालू असताना? आय मीन वाली नि:शस्त्र असताना? यात रामाचा जंटलमनपणा कुठे दिसतो? यात कोणत्या सत्याचा जय झालेला दिसतो? अवांतरः एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 14/09/2014 - 00:29
>>> एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे. रामानं काय उत्तर दिलं रे वल्ली? प्लिज प्लि एक्दाच डिट्टेलवारी सांग.

In reply to by प्यारे१

प्रचेतस 14/09/2014 - 00:30
रामाने वालीला बरीच गुळमुळीत उत्तरे दिली हे मात्र खरेच. नैतिकदृष्ट्या वालीला मारण्याचे कुठल्याच अंगाने समर्थन होऊ शकत नाही. रामान दिलेली काही कारणे १. तू सुग्रीवाच्या हयातीतच त्याच्या पत्नीचा उपभोग घेत आहेच म्हणून तू दंड देण्यास योग्य आहेस. (वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष) २. सुग्रीव माझा मित्र आहे आणि तो मला लक्ष्मणासमान आहे शिवाय तो माझी पत्नी परत मिळवून देण्यासाठी मला साहाय्य करणार आहे आणि मी ही त्याला त्याची पत्नी व राज्य परत मिळवून देईन अशी प्रतिज्ञा केली आहे. प्रतिज्ञेपासून विचलीत होणे हा क्षत्रियांचा धर्म नव्हे. ३. हे वानरा, तू मनुष्य नव्हेस, पशू (वानर) आहेस . मृगया करणे हे आम्हा क्षत्रियांना सर्वथैव उचित आहे. तू शाखामृग असल्याने तू युद्ध करत असताही अथवा नसताही तुझा वध करणे हे आम्हा क्षत्रियांना योग्यच आहे. इतरही बरीच कारणे रामाने सांगितली आहेत. अर्थात मित्राला राज्य परत मिळवून देऊन त्याचे साहाय्य मिळवणे हेच प्रमुख उद्दिष्ट होते शिवाय वालीसुद्धा काही परमधार्मिक वैग्रे असा काही नव्हताच.

In reply to by प्रचेतस

आनन्दा 15/09/2014 - 09:30
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष)
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 15/09/2014 - 09:37
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.
आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? मायावी राक्षसाचा पाठलाग करताना गुहेत गेलेल्या वालीच्या पाठीमागून रक्ताचा लोंढा वाहात आला तेव्हा वाली मेला असे समजून सुग्रीवाने गुहेचे द्वार धोंडा लावून बंद केले. फक्त तेव्हाच सुग्रीवाला वाली मेलाय असे वाटले होते. त्यानंतर काही काळात वाली द्वार फोडून गुहेबाहेर आल्यावर सत्ताप्राप्तीसाठी सुग्रीवाने दार लावून घेतले असे समजून सुग्रीवाला स्थानभ्रष्ट केले व त्याची पत्नी बळकावली.

In reply to by प्रचेतस

आनन्दा 15/09/2014 - 10:28
तेव्हाच म्हणतोय. वालीच्या पत्नीशी विवाह केला तेव्हा सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते. नपेक्षा असे धाडस तो करूच शकला नसता.

In reply to by धन्या

प्यारे१ 14/09/2014 - 00:35
>>> धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या मागे लपून नि:शस्त्र द्वंद्वात गुंतलेल्या व्यक्तीवर बाण सोडुन होते? होतं की! त्याला काय? शिवाजीमहाराजांनी अफजलखानाशी 'पंजा लढायला' हवा होता वगैरे मताचा आहेस का काय? =)) वाली अत्यंत सामर्थ्यशाली होता. रावणाला बर्‍याचदा हरवलं देखील होतं.त्यानं रावणाला दक्षिणेत दाबून ठेवला होता. तहानुसार रावणानं वर यायचं नाही आणि वालीनं दक्षिणेत जायचं नाही असा काहीसा प्रकार होता. युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो. अयोध्येला लांब ठेवून, वालीला शासन देऊन, त्याच्याच भावाला गादीवर बसवून, त्याच्याच सैन्याला घेऊन रावणावर चालून जाण्याचा अत्यंत धूर्त कार्यक्रम हुशारीनं रामानं राबवला. (कोलॅटरल डेमेजेस बद्दल सगळे जण सायलेण्ट असतात.) पुढं अंगदाला दूत म्हणून पाठवला. ज्या वालीनं तुला चेपटवला होता त्या वालीला मी मारलाय आणि तरी त्याच्या पोराला अभय देऊन तुझ्याकडं पाठवतोय असा संदेश द्यायचा होता. हनुमानानं बळंच शेपटी जाळून टाईमपास नाही केला. त्यानं अर्धी लंका मानसिकदृष्ट्या खच्ची केली. आमच्याच घरात येऊन एक सेवक आमच्या संपत्तीची एवढी हानी करतो तर त्याचा मालक किती बलवान असेल हे सांगायचं होतं. बाकी रावणाला आधी शाप होता की बळजबरी कुठल्या बाईला हात लावशील तर तुझं डोकं तुकडे होऊन पडेल. सीतामैय्याला हात न लावण्याचं ते कारण होतं बरं. ;)

In reply to by प्यारे१

अवतार 14/09/2014 - 09:50
मग सीतामाईला पुष्पक विमानातून पळवून आणताना रावणाने एअरहोस्टेस ठेवली होती की काय? :)

In reply to by प्यारे१

पोटे 14/09/2014 - 11:02
ती स्त्री म्हणजे वेदवती.. तिने रावणाला आणखी एक शाप दिलेला होता.. तुला एक मुलगी होईल. ती तुझा नाश करेल. कालांतराने रावणाचे लग्न झाले. रावण अ मंदोदरीला मुलगी झाली. रावणाला शापाचे स्मरण झाले. त्यान्र ती मुलगी पेटीत घातली आणि दूर एका शेतात नेऊन टाकली... तात्पर्य : मंदोदरी ही रामाची सासू होती !

In reply to by पोटे

पोटे 14/09/2014 - 11:07
http://en.m.wikipedia.org/wiki/Sita

In reply to by प्यारे१

विजुभाऊ 15/09/2014 - 13:28
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो.
हे मग रावणाच्या सीता हरणा बद्द्लही असेच म्हणता येइल

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 15/09/2014 - 13:53
सीतेला पळवून नेण्याचा प्रकार म्हणजे युध्दनीतीचा प्रकार होता असं तुम्हाला म्हणायचंय का? युद्धनीतीची ही व्याख्या कुणाची? आयसिस ची का?

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे 14/09/2014 - 00:38
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना.
सुग्रीवाला जर एकट्याला वालीशी लढणं आणि जिंकणं शक्य नव्हतं तर दुसर्‍याची मदत घेण्यात काय चूक आहे?

In reply to by विजुभाऊ

चिगो 16/09/2014 - 17:23
या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली.
ह्याच्याशी थोडासा असहमत.. शुर्पणखेने सीतेला मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे "अटेंप्ट टू मर्डर" जो "दखलपात्र गुन्हा" आहे. असा गुन्हा जर एखाद्या स्त्रीच्या संदर्भात घडत असेल जी स्वरक्षणास अक्षम आहे, तर त्या परीस्थितीत तिथे उपस्थित दुसरी सक्षम व्यक्ती (पक्षी : राम / लक्ष्मण) शुर्पणखेला अटकाव करु शकतो.. आता लक्ष्मणाने अटकाव करतांना मुद्दामहून तिचे नाक कापले की ते झटापटीत कापल्या गेले, आणि ते कृत्य ग्राह्य मानल्या जाईल का, ह्याकरीता परीस्थितीजन्य पुराव्यांचा पडताळा घेऊन निर्णय घेण्यात येईल.. सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..
=)) आणि जरी तिथे सिध्द झालेच की लक्ष्मण गुहेगार होता तरी त्याला शिक्षा देता येणार नाही कारण इतिहासातल्या चुका वर्तमानात दुरुस्त करता येत नाहीत .... अहो आमच्या देशात ४०० वर्षांपुर्वी एक मंदीर पाडण्यात आले , आमच्या आर्किओलॉजिस्टस ने तिथे मंदीर होतेच ह्याचे खणखणीत पुरावे देवुनही आम्ही तिथे मंदीर बांधु शक्त नाहीये , हे झाले ४०० वर्षांपुर्वीच्या अण्यावाचा बाबतीतला किस्सा , ४००० वर्षांपुर्वीचे तर विसरुनच जावा =))

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.
. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख.....तारीख पर तारीख मिलती रही हैं लेकिन इंसाफ नहीं मिला. =)) t

In reply to by चिगो

पैसा 16/09/2014 - 17:45
मला एक गंमत कळत नाही, लक्ष्मणाने काय शूर्पणखा सीतेला मारीपर्यंत वाट बघायची होती, का तिची मनधरणी करायची होती?

In reply to by पैसा

खटपट्या 16/09/2014 - 22:14
हो पण नाक कापणे म्हणजे जरा जास्तच झालं बै !! तोंडाला काळं फास्लनित अस्त तरी चाललं अस्त. बिना लग्नाची पोर कसं होणार तिचं ?? कोण घेणार तिला पदरात ?? आं ?

In reply to by खटपट्या

पोटे 16/09/2014 - 22:35
शुर्पणखा विधवा होती. तिचा नवरा विद्द्युतजिव्हा हा रावणाकडुन चुकुन मरण पावला होता. लक्ष्मण शूर्पणखा विवाह झाला असता तर विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळाले असते

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.. यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :) गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते. माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे. आप्ला क्रूपाभिलाशी आड्वाकोट स दा आगलावे

प्रचेतस 14/09/2014 - 00:41
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
यजुर्वेदीच होते हा शोध कसा लावलात? आणि पुलत्सी नाही तर पुलत्स्य, आणि पुलत्स्य हे आजोबा होते. पुलत्स्यपुत्र विश्रवापासून सुमाली नामक राक्षसकन्या केकसी हिला रावण, शूर्पणखा वैग्रे संतती झाली. आणि आपल्यापेक्षा खालची जातीतील पत्नी असेल तर त्यांचे संतान खालच्या जातीतलेच असेल हा तेव्हा सर्वमान्य दंडक होता. जसे क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री अथवा दासी पासून झालेली संतान म्हणजे सूत. किंवा भीमाचेच उदाहरण घ्या. हिडिंबेपासून झालेला पुत्र घटोत्कच हा क्षत्रिय न समजला जाता राक्षसच समजला जात असे. पौराणिक गोष्टींचे संदर्भ आजच्या काळात लावण्यात काहीच हशील नाही पण तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

प्रसाद१९७१ 14/09/2014 - 00:42
तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.
सहमत. लबाडपणा करु नयेच, रामानी काय आणि दुसर्‍यानी काय

In reply to by प्रचेतस

विलासराव 15/09/2014 - 11:10
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत. लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल.

काळा पहाड 14/09/2014 - 00:58
एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही. त्या युगातल्या कृत्यांवर सध्याची समाजमान्यता मोजता येणार नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपड्याचा "चौरंग" केला. सध्या तुम्ही कुणालाही ठार मारणं हा मर्डर ठरतो. तोच न्याय शिवाजी महाराजांना लावता येणार नाही. त्यांचं युग वेगळं होतं आणि त्याचे नियम वेगळे होते. तुम्ही जर दुसर्‍या युगातल्या प्रभृतींची कृत्यांचं समर्थन किंवा त्यावर टीका केली तर त्याला फारसा अर्थ नाही. तस्मात, रामायणाची नैतिक किंवा कायदेशीर दृष्टीनं चिरफाड ही आपण करू शकतो पण सध्याच्या युगाच्या कल्पना या त्या युगाला लागू पडत नाहीत. म्हणूनच वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का हा किंवा असे प्रश्न (सभ्य भाषेत सांगायचं तर) अप्रस्तुत ठरतात.

In reply to by मुक्त विहारि

सुहास.. 15/09/2014 - 15:08
"एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही." >>> मी ही सहमत .. बाकी बर त्या व्यासांनी दोनच महाकाव्ये रचली, आणिक रचली असती तर, पाय-पुसणीपेक्षा जास्त धागे आंजावर निघाले असते ;) थोडेसे विषयाविषयी : जर कुठल्याही मुळ पुस्तकातील , दृश्ये, संदर्भ मानावयची असल्याल इतर पुस्तकांतील ही मानावीत ...

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दा 15/09/2014 - 10:32
अच्छा अच्छा, म्हणजे आर्यांच्या वेळेस पण युरेशियाला युरेशियाच म्हणायचे वाटते. तुम्हाला कसे कळले हो? अभ्यास भलताच दांड्गा हो तुमचा!

In reply to by आनन्दा

काळा पहाड 15/09/2014 - 10:54
तुम्हाला आर्य आले त्या वाटेवर प्रगणकाच्या भूमिकेत एका झाडाच्या ढोलीत बसलेले इतिहासाचार्य ना.ने. दिसले नाहीत वाटतं? भूर्जपत्रांची थप्पी पण होती त्यांच्याजवळ लिहिण्यासाठी.

In reply to by आनन्दा

बाळ गंगाधर टिळक यांच्या 'आर्टीक्ट होम ईन वेदाज' या महाग्रंथाच्या वाचनातून वरील विधान मी केले आहे.टिळकांच्या मते वेदातील बरीच वर्णने आर्टीक्ट सर्कलशी मिळती जुळती आहेत.यावरुन वैदिक लोक थंड प्रदेशातुन भारतात आले, तोच युरेशिया.

In reply to by बॅटमॅन

विलासराव 15/09/2014 - 11:18
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात. ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).

In reply to by प्रचेतस

विलासराव 15/09/2014 - 13:21
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?

बॅटमॅन 14/09/2014 - 14:44
बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे पाहून हहपुवा झाली, तेवढेच वल्लीकडून वरिजिनल रामायणाचे दाखले मिळाल्याने माहितीतही भर पडली.

In reply to by बॅटमॅन

धन्या 14/09/2014 - 15:30
असेच म्हणतो. आमचा आवडता ब्लॉग खटटा मिठा इथेही आपल्या देव देवतांबद्दल आणि एकंदरीत ईतहासाबद्दल वाचायला असते. रामाबद्दल या लेखात उहापोह झालेल्या मतांवर एक लेख इथे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 14/09/2014 - 17:46
आपल्या मताशी सहमत आहेच. पण येथे मात्र रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणार्यांऐवजी राम कसा सम्पूर्णत: वाईटच्च होता, लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कान कापून कसा तिच्यावर घोर अन्याय केलाय, या वैफ़ल्यतेतूनच वेदोनारायण सज्जन रावणाने सीताहरण केले, भावाला विजनावासात हाकलून त्याच्या बायकोचा उपभोग घेणार्या वालीला रामाने कसे झाडामागे दडून निर्दयतेने मारले असे सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते. बाकी रामायण हे काल्पनिक आहे असे मी मानतो. इतकी आदर्श परिस्थिति अगदी आदर्श परिस्थितीतही उद्भवू शकणार नाही. :)

In reply to by प्रचेतस

अनुप ढेरे 14/09/2014 - 18:14
सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते.
हेच म्हणतो. ~२००० वर्षांपूर्वीची माणसं/पात्र घेऊन, त्यांंच्या कृत्यांना आजचे न्याय/अन्यायाचे नियम लाऊन उगाच लोकांच्या प्रेमाच्या/आदराच्या स्थानांवर घाव घातल्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न आहे हा. वल्लींना अभ्यासपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद!

In reply to by अनुप ढेरे

धन्या 14/09/2014 - 18:33
आणि लोकही २००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या (?) आपल्या प्रेमाच्या/आदराच्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रत्येक कृतीचे "अभ्युथानमधर्मस्य" असे हिरीरीने समर्थन करत आहेत. :)

In reply to by धन्या

हरकाम्या 17/09/2014 - 00:58
धन्यवाद मि.धन्या. तुमचे मत वाच्ल्यानन्तर मी तुमचा आवडता ब्लॉग अक्षर्शहा वेड्यासारखा पुर्णपणे वाचला. आता रात्रीचे १२.५५ झाले आहेत. तो ब्लॉग वाचल्यानन्तर डोके भणभणुन गेले आहे. डोक्याची पार मन्डई झाली आहे आज रात्री झोप येणार असे वाटत नाही

In reply to by बॅटमॅन

रामायण आणि महाभारताला इतिहास न समजता धार्मिक ग्रंथ समजले जाते तेव्हा अशी गल्लत सुरू होते... आणि मग त्यांच्यापासून काही शिकण्याऐवजी त्यातल्या पात्रांना देवत्व बहाल करून त्यांना सद्गुणाचे पुत़ळे बनवले जाते. देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ? मग चुकाही कश्या योग्यच होत्या हे सिद्ध करायला अजून एखादी पुर्वायुष्यातली किंवा पूर्वजन्मातली कथा शोधून काढली जाते ! एक चूक झाकायला दुसरी, ती झाकायला तिसरी... अशी मालिका निर्माण होते. सर्वात वाईट असे की, यामुळे या दोन सकस ग्रंथांपासून जेवढा बोध घेतला जातो त्यापे़क्षा जास्त भ्रम निर्माण होतो / केला जातो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 15/09/2014 - 11:24
देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?
मला तर हेच चुकीचे वाट्ते. देवही चुकत होते आजही चुकतात आनी पुढेही चुकतील. अवांतर विदा मागु नये. पटले तर घ्यावे न पटले तर सोडुन द्यावे. मूळात माझा विद्यावर भरोसाच नाय.

In reply to by विलासराव

"देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?" हा माझा प्रश्न उपरोधिक होता ! जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवत्व दिले जाते तेव्हा त्याच्या पाठीराख्यांना त्या व्यक्तीचे कोणतेही उणे वचन/आचरण तसेच स्विकारायला फार कठीण जाते. आणि मग सत्य स्वीकारण्याऐवजी ते झाकण्यासाठी त्या वचना-/आचरणाचे समर्थन करणार्‍या कथा-कहाण्या रचल्या जातात... असा त्या वादाचा अर्थ आहे. देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील. याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे... देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्‍या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्‍या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे. जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्‍या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे. अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्‍या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त"). यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल ! महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत. देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल. एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ? आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्‍हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्‍यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात. असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो. (देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इए

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 15/09/2014 - 15:30
देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल ह्याचसाठी देवाचा उपयोग केला पाहजे, आपल्यातले चांगले गुण विकसीत करण्यासाठी. त्यांच्यातले आदर्श गुण अंगी बाणवण्यासाठी. बाकी चालु द्या.

जेपी 14/09/2014 - 17:10
काथ्या नीट कुटला नायतर दोर नीट नाय होणार,मंडळी जरा व्यवस्थित कुटा.मंडळ आभारी राहिल नायतर काथ्या उचलला जाणार नाही .नुस्कान होईल.

या मानवी मनाला ऐनवेळी ब्लॉक करणार्‍या (किंवा वेळोवेळी पिडणार्‍या) अत्यंत बेसिक संकल्पनांची निर्वैयक्तिक शहानिशा होऊ शकेल. रामायणाकडे उच्च कोटीच्या नैतिकतेचा एक व्यापक लेखाजोखा इतक्या सिमीत दृष्टीनं पाहिल्यास चर्चा विधायक होईल. पब्लिकनं पात्रांना (ऑलरेडी बहाल झालेलं) देवत्व बाजूला ठेवून, (उगीच सेंटी होण्यापेक्षा); `स्थल-काल निरपेक्ष असे रोजच्या जगण्याला उपयोगी, नैतिक फंडाज मिळू शकतील काय?' अशी चर्चा केल्यास ती सर्वांना उपयोगी होईल. बाय द वे, माझ्या तिथल्या प्रतिसादात `रामायण घडण्याची पूर्वभूमिका' (रावणाचा स्टँड) नमूद केली होती. सं.मं.नं जर (अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी) नवीन पोस्ट काढलीच आहे तर, तो भाग इथे पुनर्प्रकाशित करावा अशी विनंती करतो. कारण रावणाची भूमिका समजल्याशिवाय चर्चा वन वे होईल. इट विल बी मिसिंग द बेसिक स्टार्ट पॉइंट.

मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा-नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात. अर्थात, इतकी उघड गोष्ट समजायला, साधी सारासार विचारसरणी पुरेशी आहे. जर हिटलर जिंकला असता तर तो वंदनीय ठरला असता आणि रावण जिंकला असता तर गदिमांनी `गीत रावण' लिहीलं असतं, देवघरात रावणाचे फोटो असते. त्यामुळे इतिहासावरुन `जेते म्हणजे प्रामाणिक आणि पराभूत म्हणजे अप्रामाणिक' असा निर्णय म्हणजे केवळ बाळबोध विचारसरणी ठरते. मी वेरिफाय करत नाही, पण या निमित्तानं, रामायणाचा दुसरा एक भाग सांगितला जातो, तो केवळ गंमत म्हणून उधृत करतो. अर्थात, उपरोल्लेखित मुद्याशी त्याचा संबंध आहेच, त्यामुळे (सुज्ञांना) तो अ‍ॅप्रिशियेट होईल. रावण अत्यंत प्रभावी आणि बलशाली राजा होता, स्वतः शिवभक्त असल्यानं शिवधनुष्याला प्रत्यंचा तर तो सहज लावू शकत होता. हि वॉज ऑलरेडी अ किंग, इतकंच काय स्वयंवरासाठी, स्वतःच्या फ्लाइटनं तो लंकेहून वेळेपूर्वीच हजर होता! जनकाच्या मनात मात्र सीतेनं रावणाला वरु नये असं होतं, पण ओपन फोरम असल्यामुळे त्याचा फुल नाईलाज झाला होता. जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला! इन द मीन टाईम, रावणाला वेळेवर हजर नसलेला स्पर्धक म्हणून डिबार करुन, रामानं सीता जिंकली! हा सरासर अन्याय झाला पण रावणाला बोलायला चान्सच राहिला नाही. तस्मात, त्यानं सीता हरणाचा घाट घातला...आणि पुढे रामायण घडलं! आता अशा परिस्थितीत रावण जिंकला असता तर पब्लिकनं रावणाला देव केला असता. थोडक्यात, इतिहासाची पानं उलटून निर्णय करणार्‍या निर्बुद्ध विचारसरणीला, `जो जिंकला तो सत्य' वाटणं स्वाभाविक आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 14/09/2014 - 20:11
रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.

In reply to by प्रचेतस

दिनेश सायगल 14/09/2014 - 21:33
केवळ एवढेच नव्हे तर श्री पोटे यांच्या मनोरंजक अशा रामकथेच्या धाग्यावर सन्माननीय सदस्य श्री क्षीरसागर यांना इतर चर्चा करायची आहे. त्यांनी नैतिकता, निर्बुद्धता वैग्रेबद्दल चर्चा करण्यासाठी दुसरा धागा काढावा, किंवा संपादक मंडळींनी त्यांना तसा स्वतंत्र धागा काढून द्यावा ही विनंती.

In reply to by प्रचेतस

रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने ...
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे. पण रामायण हा निव्वळ कल्पनाविलास असेल तर तो वाल्मिकींचा कॅथर्सिस आहे. ते दाऊदनं साने गुरुजींच्या रोलमधे जाऊन श्यामची आई लिहीण्यासारखं आहे. आणि त्यामुळे इतकी पराकोटीची नैतिकता जगण्याला दिशा देऊ शकत नाही. पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल पण साधं सरळ आयुष्य जगणार्‍या सामान्यानं त्याप्रती नतमस्तक होण्यात हशील नाही.
तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी. कोणत्याही गाजलेल्या स्टोरीमधे एक गोष्ट आवर्जून उल्लेखनीय असते ती म्हणजे प्रत्येक पात्राच्या कृत्याला त्याच्या दृष्टीनं समर्थन असतं. नाही तर ती पात्र योजनाच कुचकामी ठरते. रावणानं काहीही कारण नसतांना सीता हायजॅक केली म्हटल्यावर स्टोरीत दमच राहात नाही. मग रामानं फुल आणि कशीही बॅटींग केली (आणि यदाकदाचित त्याचा बोल्ड जरी गेला) तरी तो आऊटच होणार नाही. ____________________________ सं.मं नं माझा तिथला प्रतिसाद पुनर्प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 15/09/2014 - 08:56
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे.
रामायण हे काल्पनिक आहे हे तुम्हाला मान्य आहे पण वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला हा शोध आपण कुठून लावलात? वाल्या कोळी हीच मूळात हरदासी दंतकथा आहे. रामायणाची सुरुवातच वाल्मिकी निषादाने मारलेल्या क्रौञ्च नराच्या मृत्युमुळे आलेल्या खिन्नतेपासून करतात. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः । यत् क्रौञ्चमिथुनादेकं अवधीः काममोहितम् || त्यामुळे आपल्या "पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल" ह्या म्हणण्यात काहीच हशील नाही
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी
आहे की. रावणाचा स्त्रीलंपटपणा हीच 'त्याची' समर्थनीय बाजू आहे. अर्थात ती समजून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वाल्मिकी रामायण मात्र वाचावे लागेल.

In reply to by प्रचेतस

थोडक्यात, रामाला देवत्व बहाल करण्यात अर्थ नाही, एक कोटी जप वगैरे केल्यावर राम दिसणार नाही, रामाचा धावा करणार्‍या सेवकाचं काहीही वक्र होऊ शकतं, बिजेपीचा राममंदिराचा अजेंडा जनतेची दिशाभूल करणारा ठरतो. ___________________ बाय द वे, धाग्याचा नक्की हेतू काय आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

काळा पहाड 15/09/2014 - 11:16
म्हटला तर नाही. अर्थात ज्याचा त्याचा देव. पण मग असे प्रश्न बाकी धर्मियांना का विचारले जात नाहीत?

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 15/09/2014 - 11:19
आपल्या मताशी सहमत आहे. धाग्याचा हेतू म्हणजे पोटेंसारख्या ट्रोलांच्या मुद्द्यांतील हवा काढून घेणं हा आहे. रच्याकने रामायण अवश्य वाचा एकदा. अतिशय रसाळ आहे आणि खूप छान.

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो 16/09/2014 - 17:47
जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला!
ह्यावरुन काही शंका : १. रावणाची स्वतःची "माहिती संकलन आणि प्रसारण" यंत्रणा नव्हती का? म्हणजे त्याच्या राज्यात आग लागल्याची अफवा ऐकल्यावर तिचं "क्रॉस व्हेरीफिकेशन" त्याने का केलं नाही? रावण अफवांवर सहजासहजी विश्वास ठेवून घिसडघाई करत लंकेला परत जाण्याइतका हलक्या कानाचा होता का? २. लंकेत अग्नीशमन व्यवस्था नव्हती का? ३. आग लागल्याची बातमी ऐकून स्वतः रावणाला लंकेला परत यावं लागलं, ह्याचा अर्थ लंकेत "सेकंड लाईन ऑफ लिडरशिप" नव्हती का? प्रजाहितदक्ष वगैरे ठीक आहे, पण काही कारणास्तव जर मुख्य अधिकारी व्यक्तीला जर राज्यातून बाहेर जावे लागले, तर त्याच्या अनुपस्थितीत राज्याची काळजी घ्यायला कुणीच जबाबदार व्यक्ती नसणे, हा त्याच्याद्वारे स्थापित केलेल्या यंत्रणेचा दोष नाही का? ४. रावणाचा "डिलीगेशन ऑफ पॉवर" वर विश्वास नव्हता का?

In reply to by चिगो

कोणत्याही कथेत पात्रांचा रोल आणि वागणूक जस्टीफाय करता आली म्हणजे झालं. डोंट टेक इट सिरियस, स्टोरीज आर आयदर एंजॉइड ऑर नॉट, दॅट्स ऑल! रावणाला खुन्नस येण्यासाठी असं काही तरी घडलं असेल तर त्याचा रोल आणि सीताहरणाचा मुख्य प्लॉट दोन्ही जस्टीफाय होतात. आणि द लॉजिक फिट्स. मी सुरुवातीलाच म्हटलंय, आय डोंट वेरिफाय. खरं तर एनीथिंग कॅन बी अ‍ॅडेड टू अ स्टोरी अँड अ स्टोरी कॅन बी इंप्रोवाइज्ड ऑल्सो.

काउबॉय 14/09/2014 - 21:54
मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा- नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात.
कौरव जिंकले असते तर शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच. म्हणून सर्व काही जेते ठरवतात ते प्रचलित होतेच असे नाही. याचे भान हवे. पण इश्वराची ओळखच त्याच्या विजय कथातुन केली जात असल्याने शिरोमणिञ्चि जेतेच बायबल लिहतात हे रडगाणे नेहमीचे आहे

In reply to by संजय क्षीरसागर

काळा पहाड 15/09/2014 - 01:33
कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच असती. इकडून तिकडून ढापून आणि सांगितलं असतं की शकुनी हा देवाचा शेवटचा प्रेषित होता इत्यादी..

In reply to by काळा पहाड

पण मी बॉयच्या या,
शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच.
(ओरिजिनल) शकुनीमामाच्या `कपॅसिटीबद्दल' प्रश्नाला उत्तर दिलंय

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 15/09/2014 - 14:18
एक तर पराभूतांची प्रेरणा कोण वाचणार? असे म्हणायचे नाहीतर जेत्यांनी सगळ अन एकतर्फी लिहलय म्हणत ओरड करायची.... ! मग कोणाचे म्हणने प्रमाण ठरवायचे असे आपले मत आहे ? फक्त तुमचे ?

In reply to by काउबॉय

संदर्भासहित वाचत जा, एकदम एक्साइट होण्यात अर्थ नाही, मुद्दा हुकतो. शकुनी गीता सांगायला केपेबल नव्हता असा तुमचा मुद्दा होता. आणि मी लिहीलंय `जर कौरव जिंकले असते तर (सध्याच्या) गीतेला अर्थच राहिला नसता.' जेते इतिहास लिहीतात ही उघड गोष्ट आहे त्यामुळे कौरव निंद्य आहेत. ते जिंकले असते तर पांडव निंद्य ठरले असते. आणि कदाचित, शकुनीचे ते `डावपेच' आणि कृष्णाची ती `कारस्थानं' असा लेखाजोखा झाला असता.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 15/09/2014 - 16:36
आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलंच असतं की! :) मुद्दा मुळात जिंकणारे का जिंकले आणि हरणारे का हरले हा असू शकतो का? पूर्वी म्हणे खर्‍याची बाजू घेणारे जिंकायचे नि आता युगधर्मानुसार स्खलनशील समाजात खोट्याची बाजू घेणारे जिंकून बजबजपुरी माजणार आहे.

In reply to by प्यारे१

सुहास.. 15/09/2014 - 16:41
मुद्दा मुळात जिंकणारे का जिंकले आणि हरणारे का हरले हा असू शकतो का? >> काल परवा चान-चान , दवणीय वाक्य वाचण्यात आहे " बुध्दीबळाच्या पटावर काळे जिंकोत वा पांढरे , खेळ संपला की सगळ्यांना धरुन एकाच बॉक्स मध्ये कोंबण्यात येते " ;)

पैसा 15/09/2014 - 08:43
कृपया एवढ्या गंभीर धाग्यावर महाभारताची चर्चा करून ट्रोलिंग करू नये.

In reply to by पैसा

काउबॉय 15/09/2014 - 14:59
पण हे ट्रोलिंग नव्हे. मुद्दा इतकाच होता शिरोमणिच्या दाव्यानुसार जर की दोन्ही बाजूमधे चुकाकरणारे घटक सामाविष्ट आहेत तर एकाच(बहुतांश जेते) बाजुला चांगली का मानले जाउन त्या व्यक्तिरेखांचा उदो उदो केला जातो अथवा त्याबाजुविरोधी टिका का सहन केलि जात नाही याचा उहापोह त्यात आहे.

In reply to by काउबॉय

पैसा 15/09/2014 - 15:10
पण आपल्या मिपाच्या महान परंपरेनुसार मुद्दा तेवढ्यावर थांबत नाही, तर बहुतेकवेळा भलत्याच विषयावर गाडी सुरू होते! त्यामुळे जर कोणाला महाभारतातील व्यक्तिरेखांबद्दल डिटेलमधे काथ्या कुटायला असेल तर स्वतंत्र धागा काढून अवश्य कुटावा! स्वागत आहेच!

विटेकर 15/09/2014 - 10:22
रामायण आणि महाभारत ही भारताची महाकाव्ये आहेत आणि राम आणि कृष्ण हे राष्ट्रीय महापुरुष ! या महाकाव्यांनी आणि महापुरुषांनी भारतालाच नव्हे संपूर्ण आशियाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा दिली. आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या लायकीच असून देखील अशा महपुरुषांवर राळ उडवत आहोत याची जाणीव इथे आपल्या तथाकथित ज्ञान पाजळणार्‍या किती महाभागांना आहे? अशा प्रकारची टिंगल करुन आपण अनेकांच्या श्रद्धास्थांनांना पाय लावत आहोत इतपत संवेदनशीलता अजून जागी आहे का ? की तालिबानी राज्य आहे ? आम्ही म्हणतोतेच खरे ? ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले , त्यांच्याच अस्तित्वावर शंका घेताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटत नाही हे कशाचे द्योतक आहे ? कसला "माज" आहे हा ? की आम्ही शाब्दिक कोलांटउड्या मारुन आणि शब्दांची तोड-फोड करुन आमचे हीन मनोरंजन करण्यासाठी काहीही पणाला लावू? आपला बाप हा आपला विश्वास असतो , तिथे कोणी पुरावा मागत नाही. अस्तु , मिसाळ पाव सारख्या अभिरुची संपन्न संकेतस्थळावर असे धागे निघत असतील तर एकूणच समाजाची वैचारिक पातळी घसरली आहे आणि " मनोरंजनासाठी काय पण " सुरु साहे असे खेदाने म्हणावे वाटते.

In reply to by विटेकर

बाळ सप्रे 15/09/2014 - 12:45
ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले
म्हणजे नक्की काय हो?? ही महाकाव्ये नसती तर जग चाललेच नसते काय?? आणि हे उंदीर मारण्याच्या विभागात वगैरे पु लं चे उदा. आजकाल फारच अस्थानी वापरायला लागलेत!! जिथे तिथे लिहिणार्‍याचा अधिकार काढायचा.. मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन.. आणि भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्या आणि दुसर्‍यांना तालिबानी वगैरे ठरवुन मोकळे!!

In reply to by बाळ सप्रे

विटेकर 15/09/2014 - 12:58
म्हणजे नक्की काय हो??
-
मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन..
या विषयावार असली अश्लाघ्य चर्चाच होऊ शकत नाही. कसले बोडक्याचे मुद्दे ? -
भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्या
कुणाच्या भावना नाजूक ? करोडो भारतीयांच्या श्रद्धा अशा सार्वजनिक ठिकाणी पायाखाली घातल्या तर आम्ही हातावर हात थेऊन बसावे का ? असल्या प्रवृत्तीना तालिबान म्हणावे की महात्मे ? -(संपादित)

In reply to by विटेकर

सुहास.. 15/09/2014 - 15:22
रामायण आणि महाभारत ही भारताची महाकाव्ये आहेत आणि राम आणि कृष्ण हे राष्ट्रीय महापुरुष ! या महाकाव्यांनी आणि महापुरुषांनी भारतालाच नव्हे संपूर्ण आशियाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा दिली. >>> महा काव्याला महा काव्येच ठेवावीत ना मग ! दिशा त्या काळात असेल ...आता कशी काय लागु होते ? उदा. मदिराप्राशन आणि मासांहार ( आठवा बळी आणी यज्ञ सस्कांर ) , किंवा धुत खेळण हे त्या वेळी लागु होते , आताच्या युगात काय ?? आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या लायकीच असून देखील अशा महपुरुषांवर राळ उडवत आहोत याची जाणीव इथे आपल्या तथाकथित ज्ञान पाजळणार्‍या किती महाभागांना आहे? >> मालक , हे वाक्य कोणासाठी आहे ? आणि तशी लायकी ठरविणारे आपण कोण ....जर कुठे श्रध्दास्थांनावर चार प्रश्न ( ते ही सभ्य भाषेत ) विचारले तर बाप काढल्यासारख अंगावर येवुन भागेल का ? आणि त्या पुलंच्या डायलॉग ची किती वेळा कॉपी तरी करणार .. वीट आला च्यायला !! ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले , त्यांच्याच अस्तित्वावर शंका घेताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटत नाही हे कशाचे द्योतक आहे ? कसला "माज" आहे हा ? की आम्ही शाब्दिक कोलांटउड्या मारुन आणि शब्दांची तोड-फोड करुन आमचे हीन मनोरंजन करण्यासाठी काहीही पणाला लावू? >>> जरा दोन चार उदाहरणे मिळतील का पुण्य पराक्रमावर ??

In reply to by सुहास..

प्यारे१ 15/09/2014 - 15:25
>>> त्या पुलंच्या डायलॉग ची किती वेळा कॉपी तरी करणार .. वीट आला च्यायला !! हो ना. पण खरंच नवे डायलॉग मिळत नाहीत. मिळाले तरी पुलंच्या एवढे फेमस होत नाहीत. नवीन लेखकांच्या प्रतिभाक्षमतेवर शंका येण्याइतपत वाईट परिस्थिती आली आहे हो! :-/

In reply to by प्यारे१

सुहास.. 15/09/2014 - 15:29
नवीन लेखकांच्या प्रतिभाक्षमतेवर शंका येण्याइतपत वाईट परिस्थिती आली आहे हो! >> आले का नवलेखकांविषयी दांभिकता घेवुन ...तरी म्हटंल विभिषणाचा उल्लेख कसा आला नाही अजुन ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ 15/09/2014 - 15:33
>>> आले का नवलेखकांविषयी दांभिकता घेवुन ...तरी म्हटंल विभिषणाचा उल्लेख कसा आला नाही अजुन नेमका अर्थ काय म्हणायचा ह्या वाक्याचा? -गोंधळ उडालेला

मृत्युन्जय 15/09/2014 - 11:22
आयला रामायणाच्या धाग्यावर महाभारत झाले किंवा असे म्हणुया की रामायणाच्या धाग्याचे काश्मीर झाले. ;) माझा रामायणाबद्दलचा दृष्टीकोन थोडासा असा आहे: १. राम नावाचा एक अतिशय सत्शील, सज्जन, विनम्र पुरुष होउन गेला. हा अतिशय गुणवान प्रजाहितदक्ष आणि शूर राजा होता. प्रजेची याने स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. याची समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था दृष्ट लागण्यासारखी सुरेखे होती त्यामुळे याच्याकाळात सुरक्षितता आणि सुबत्ता होती २. रामाचे जनमानसातील आणि परिवारातील स्थान वादातीत आदरणीय होते. शिवाय त्याच्या शौर्यामुळे त्यात एक प्रकारचा दरारा होता. याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय बलवान आणि सामर्थ्यशाली भाऊ नेहमी याची सावली बनुन राहिला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याची कोणाची टाप नव्हती. त्यात त्याचा अजुन एक भरत नावाचा भाऊ ( हाही तसा शूरच होता) अतिशय निस्पृह आणि गुणी होता. आयुष्यभर हा रामाच्या अर्ध्या वचनात राहिला. या तिघांचा शत्रुघ्न हा त्यामानाने कमी प्रकाशझोतात राहिलेला शूर भाऊदेखील सर्वांशी गुण्यागोविंदाने वागल्याने हे चारही भाऊ एकोप्याने राहिले. त्यांनी जबाबदार्‍या योग्यप्रकारे वाटुन घेतल्याने अयोध्येत सुराज्य आले. ३. रामराज्यात ज्ञानी आणी विद्वान लोकांचा योग्य सत्कार झाला आणि शौर्याचा आदर केला गेला. यस्य राजा तथा प्रजा या न्यायाने सत्यप्रियता, वचनबद्धता, प्रामाणिकपणा, विनम्रता या गुणांचा उत्कर्ष होउन एक आदर्श समाज तयार झाला. ४. सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणुन लोक रामाला देवासमान मानायला लागले (किंबहुना तो देव होताही) ५. मानवी रुपाला अनुसरुन रामातही काही दुर्गुन होते. पण ते बहुजनहिताय बहुजनसुखाय असल्याने त्याच्या दुर्गुणांवर त्याच्या सद्गुणांनी मात केली आणि त्याच्या चुका त्यामानाने कमी महत्वाच्या ठरल्या. ६. रामाने सुर्पणखेचा केलेला अपमान अनाठायी होता. पण त्याला येउ घातलेल्या संकटाची एक सुप्त किनार होती. राक्षसांना एकदाची योग्य अद्दल घडवल्यास त्याच्या अनुपस्थितीत सीतेला त्रास होणार नाही अशी एक आशा होती. त्यामुळेच त्याने शुर्पणखेचे कान नाक कापण्याची शिक्षा दिली. ७. वालीचा वध (हत्या ?? ) नक्कीच अन्याय्य होता. हेच कृत्य कृष्णाने अगदी बिनदिक्कत केले असते आणि त्याच्या या कृत्याला आपण आक्षेपही घेतला नसता. पण राम सद्गुणांचा पुतळा होता. त्याच्याकडुन अत्त्युच्च दर्जाच्या नैतिक वागणुकीची अपेक्षा असल्याने त्याचे कृत्य खटकते. ज्या परिस्थितीत राम अडकला होता त्यात त्याला मदतीची गरज होती. परत फिरुन अयोध्येची मदत घेणे जमणार नव्हते. तेवढा वेळही नव्हता आणि त्यात वचनभंगाची शक्यताही होती. शिवाय अश्या परिस्थितीत तो परतता त्यात त्याच्या शौर्याची मानखंडना होती. तस्मात दक्षिणेकडील राजांची मदत घेणे अनिवार्य होते. त्यावेळेस किष्किंधेचे एकमेव राज्य त्याला मदत करु शकण्यास समर्थ होते. किष्किंधेने त्यापुर्वीही लंकेचा पराभव केला होता. राम आणि लक्ष्मण असे दोघेचजण त्यावेळेस पत्नीच्या सुटकेसाठी मदत घेण्यास वालीकडे गेले असते तर त्यांना मदत मिळण्याची शक्यता कमी होती. याचकांसाठी कोणी इतके मोठे युद्ध करत नाही. अश्यावेळेस राम नावाच्या राजाने एक राजकारणी जे करेल (जे त्याच्यासारख्या उच्च नितीमत्तेच्या माणसाकडुन अपेक्षित नाही असे काही लोकांना वाटेल) तेच केले. किष्किंधेच्या सिंहासनाच्या वादातील दोन भावांपैकी दुबळ्याची बाजु घेउन समर्थ माणसाला मारले. वालीचे सामर्थ्य लक्षात घेता समोरासमोरील युद्ध कदाचित निष्फळ ठरले असते किंवा त्यात खुप वेळ गेला असता. शिवाय राजाच्या मदतील सैन्य येता रामाचे कार्य अपुर्ण राहिले असते. हे लक्षात घेता त्याला आणी नगरजनांना अवधी न देता वालीला संपवणे अनिवार्य ठरले. रामाने मागुन बाण मारुन तेच साध्य केले. नंतर त्याला नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला जो अर्थातच फसला. यात एकच गोष्ट बरोबर साधली गेली ती ही की धाकट्या भावाची बायकि अन्याय्य पद्धतीने बळकावुन तिच्याबरोबर संसार थाटणार्‍या एका शक्तिशाली राजाचा नि:पात झाला. ८. एक गुणी आणि प्रजाहितदक्ष राजा असुनही राम प्रचलित समाजव्यवस्थेला आणि पुरुषी मानसन्मानाच्या अयोग्य कल्पनांना बळी पडला. सीतेप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने नक्कीच कसूर केली. या संपुर्ण प्रकारात तो तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन असलेल्या मानसिक धारणांना बळी पडला. यामुळे त्याच्या देवत्वाला उणेपण आले. ९. शंबुक, शुर्पणखा, वाली आणि सीतात्याग या प्रकरणात रामाच्या चूका प्रकर्षाने नजरेस येतात. तर वचनप्रियता, प्रामाणिकपणा, सुरा़ज्य, विद्वत्त्ता आणि शक्तीस्थानी असलेली विनम्रता या गुणांमुळे रामाची कारकीर्द उजळुन निघते. रामाच्या चूकांमुळे काही योग्य / अयोग्य व्यक्तींचे नुकसान झाले तर त्याच्या कारकीर्दीमुळे एका समाजाचे, एका पिढीचा किंबाहुन पुढील कित्येक पिढ्यांचा उद्धार झाला. सामाजिक सुबत्ता, सुरक्षा आणि सुशासन यांमुळे रामाने त्याच्या कारकीर्दीत जाणते / अजाणतेपणी किंवा काळाच्या नियमांनुसार जे वैयक्तिक अपराध केले ते त्यामुळे क्षम्य ठरतात असे माझे मत आहे. ते अपराध नाहित असे मी मानत नाही. त्याच्यामुळे त्याला उणेपण येत नाही असेही माझे म्हणणे नाही. पण व्यापक हिताचा विचार करता तो तरीही आदरणीय आणि अनुकरणीय पुरुष आणि देव होम्ह/ आहे असे म्हणण्यास जागा आहे,

In reply to by मृत्युन्जय

पैसा 15/09/2014 - 11:37
वाल्मिकी रामायण रावण वधाबरोबर संपते. संपूर्ण उत्तरकांड प्रक्षिप्त आहे असे बहुतांश मत आहे. त्यामुळे शंबूक वध आणि सीता त्याग या दोन्हीला मूळ वाल्मिकी रामायणात काही आधार नाही. (याचा विचार करता सीतेचे अग्निदिव्य सुद्धा मूळ रामायणात नाही.) कदाचित उत्तरकांड फार नंतर म्हणजे बौद्धकालात लिहिले गेले असावे. *आंतरजालावर पुढील माहिती मिळते.
इस समय देश में वाल्मीकि रामायण की जो भी पांडुलिपियाँ मिलती हैं वह सब की सब दो मुख्य प्रतियों से निकली हैं। एक हैं बंग देश में मिलने वाली प्रति जिसके अन्दर बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध ६ कांड हैं और कूल सर्ग ५५७ और श्लोक संख्या १९७९३ हैं जबकि दूसरी प्रति बम्बई प्रान्त से मिलती हैं जिसमें बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध इन ६ कांड के अलावा एक और उत्तर कांड हैं, कूल सर्ग ६५० और श्लोक संख्या २२४५२८ हैं।
http://aryasamajmandirpune.blogspot.in/2013/11/blog-post_30.html

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 15/09/2014 - 13:09
सीतेप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने नक्कीच कसूर केली. या संपुर्ण प्रकारात तो तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन असलेल्या मानसिक धारणांना बळी पडला.
कसूर केली का ते माहीत नाही. रामाला दोष देता आला असता जर त्याने दुसरे लग्न केले असते तर. पण तसे त्याने केले नाही. तो कायम एकपत्नीच राहिला. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो त्याग ठरतो आणि शेवटी तत्कालिन समाजव्यवस्था श्रेश्ठ असतेच. त्यामुळे बाकी सहमत.
शंबुक, शुर्पणखा, वाली आणि सीतात्याग या प्रकरणात रामाच्या चूका प्रकर्षाने नजरेस येतात.
शूर्पणखा प्रकरणात रामाची चूक काय ते मला अजूनही कळलेले नाही. स्वतःच्या पराक्रमावर विश्वास ठेउन त्याने राक्षसांची जाणून्बुजून खोड काढली असे माझे मत आहे. आणि खरदूषणप्रमुख १४००० राक्षसांच्या वधाने ते सिद्ध देखील होते.

In reply to by मृत्युन्जय

साध्या शब्दातले परिस्थितीचे परखड वर्णन आवडले ! वैचारीक, आर्थिक, सामाजीक अथवा राजकीय फायद्यांसाठी नाही तर तर कधी कधी केवळ वैयक्तीक वरचढपणा (इगो) सिद्ध करण्यासाठी साधे सत्य प्रचंड गुंतागुंतीचे करणे ही मानवी मनाची एक मोठी ताकद आणि दौर्बल्य राहीले आहे...

In reply to by मृत्युन्जय

मदनबाण 15/09/2014 - 16:20
याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय बलवान आणि सामर्थ्यशाली भाऊ नेहमी याची सावली बनुन राहिला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याची कोणाची टाप नव्हती. रामाच्या मागे सीता अरण्यात गेली,त्या बरोबर लक्ष्मण सुद्धा गेला. बुंधु प्रेमाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हेच ! त्याचा त्याग फार मोठा आहे, कारण रामा बरोबर निदान सीता माता तरी सहवासा करीत जवळ होती परंतु उर्मीलेला राज्यात ठेवुन वनात ब्रम्हचर्ये ने राहताना त्याने कोणत्याही परस्त्रीचा मोह धरला नाही. माझ्या एका ऐकीव कथे नुसार अयोध्येला परत आल्यावर सभेत लक्ष्मण हसायला लागला त्यावर हनुमानाने प्रश्न केल्यावर त्याने आता निद्रादेवीला जवळ बोलवले आहे ती येत असल्याने त्याला हसु आले.वनवासा पासुन युद्धा पर्यंत {इंद्रजित /मेघनाद} याने मुर्च्छित केल्याचा काळ सोडता त्याने कुठेही झोप घेतली नव्हती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

सस्नेह 15/09/2014 - 15:47
सदर धागा व प्रतिसाद वाचले तर राम, रावण, वाली, सुग्रीव अँड रामायण कंपनी युध्द बिद्ध बाजूला ठेवून इथे येऊन पॉपकॉर्न घेऊन बसतील

In reply to by सस्नेह

कवितानागेश 15/09/2014 - 16:59
=)) मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो? या सगळ्या कथा एकत्र करुन, त्यांचा मीन काढून मला कुणीतरी वाल्मिकींना नक्की काय सांगायचं होतं ते सांगेल का? मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै....

In reply to by कवितानागेश

मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै.... कवी कविता लिहीतो... लोक तिचा हवा तसा अर्थ लावतात. असे म्हणतात :)

In reply to by कवितानागेश

मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो? मिपावर नियमीतपणे फेरी मारत जा ? पुरेसं आहे ! (विदा : स्वानुभव; विषयांचा आवाका: मल्टीव्हर्स संबद्धी, मल्टीव्हर्स मधला आणि त्याबाहेरचा कोणताही विषय... ;) )

In reply to by सस्नेह

अरे तुम्हाला अजून दिसले नाही ते ?! त्यांनी आमच्या बरोबर पहिल्या रांगेत बसून प्रत्येकी तीनतीन पॉपकॉर्न आणि क्ष्क्ष्क्ष चे डबे संपवले देखील ! ;) =))

सूड 15/09/2014 - 16:45
नुसत्या काळ्या आणि पांढर्‍या छटा असलेल्या रामायणात शष्प इंटरेस्ट नाही. त्यात गोष्ट एक तर अत्यंत चांगली असते किंवा अत्यंत वाईट. लोकाने आळ घेतला म्हणून स्वतःच्या बायकोला अग्निपरिक्षा घ्यायला लावणारं राम नामक पात्र राजा म्हणून चांगलं असेलही पण नवरा म्हणून अत्यंत हुकलं होतं.

In reply to by सूड

पैसा 15/09/2014 - 18:56
लोकाने आळ घेतला म्हणून स्वतःच्या बायकोला अग्निपरिक्षा घ्यायला लावणारं राम नामक पात्र राजा म्हणून चांगलं असेलही पण नवरा म्हणून अत्यंत हुकलं होतं.
या दोन्ही गोष्टी वाल्मिकीनी लिहिलेल्या मूळ रामायणात नाहीत. नंतर कधीतरी घुसडण्यात आल्या. जसं कृष्णाच्या मूळ चरित्रात राधा हे पात्र नाहीच तसंच.

In reply to by पैसा

कवितानागेश 15/09/2014 - 22:26
मला वाटतं की "राजा दशरथाला राम नावाचा मुलगा होता आणि त्यानी रावण नावाच्या एका राजाला मारलं", इतकीच गोष्ट "खरी" असावी. बाकी सगळंच रामायण प्रक्षिप्त आहे. ;)

काळा पहाड 15/09/2014 - 17:33
हा मुद्दा जरी राळ उडवायच्या साठी काढला असला तरी एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. राम हा ईश्वर (god) नव्हता, तो तथाकथितरित्या देव (deity) सुद्धा नव्हता. तो अवतार होता. त्यामुळेच ना त्याला सुपरनॅचरल शक्ती होत्या ना तो मानवी भाव भावनांपासून अलिप्त होता. अवतार ही संपूर्ण पणे मानवी संकल्पना असून आपण ईश्वराचे गुणांची अभिव्यक्ती अवताररुपी व्यक्तीत पहात असतो. त्याच्याकडून चुका होणं साहजिक आहे. त्याला राग आणि लोभ असणं सुद्धा साहजिक आहे. त्यामुळे रामानं चुका करणं म्हणजे हिंदू धर्माला कमीपणा येत नाही. या राळ उडवण्याचा मूळ हेतू हिंदू धर्मावर बाण मारण्याचा आहे हे जर लक्षात घेतलं तर अशा इतर धर्मियांच्या किंवा हिंदू धर्मातल्या दुखावलेल्या पंथातल्या लोकांच्या मतांना फार महत्व द्यायचं कारण उरत नाही.

In reply to by काळा पहाड

आनन्दा 15/09/2014 - 17:52
जबरी.. मे पण हेच्च म्हणतो. देव न मानणार्‍यांची गोष्टच वेगळी. राम हा देव होता. परंतु अंगी देवत्व असून देखील त्याने कधी आपल्या मानवी मर्यादा उल्लंघन केल्या नाहीत. आपण हे कधी शिकणार तोच जाणे.

वरील चर्चेत प्रभु रामचंद्रांवर टीका करणार्‍यां पैकी किती जणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे ? ( एकुणच चर्चेचा सूर पहाता , एकटा वल्ली वगळता कोणीही वाल्मिकी रामयण वाचले असेल असे वाटत नाही . पूर्णग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण | तो दुरात्मा दुराभिमान| मत्सरें करी || बाकी च्या आयडींचे जाऊ दे , ते हिंदु द्वेषाने भरलेले आहेत हे सर्वमिपाला ज्ञात आहे कधी रामकृष्णावर चिखल फेक करा , कधी वारी गणेशोत्सव बंद करा असला प्रचार , तर कधी मोदींना शिव्या तर कधी ब्राह्मण ब्राह्मणेतर पोलरायझेशन हे असले उद्योग चालुच रहाणार, शिवाय व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र असल्याने मिपा त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यताही नाही .... , पण ब्यॅटमॅन ह्यांचा ही एक प्रतिसाद वाचुन धक्का बसला , ब्यॅटा तु वाचले आहेस कारे रामायण ? आपल्याला जे रामायण माहीत आहे त्यातला बराचसा भाग प्रक्षिप्त आहे हे तुझ्या निदर्शनास आले आहे काय ? की तुही टीव्ही सीरीयल पाहुन कमेन्ट टाकली आहेस ?) असो. श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन झाली , आता बुध्द , महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स वगैरेंना घेवुया का राउंडात ? *biggrin* जाऊंन द्या ... दुसर्‍यांच्या श्रध्दास्थानांवर अश्लाघ्य आरोप करणे आणि चिखलफेक करणे ही आमची ( आमची म्हणजे इथे उजव्या कोपर्‍यात दोन माणसांचा फोटो लावलाय ना त्यांना मानणार्‍यांची) संस्कृती नव्हे .
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोगु निश्च‌ित। जाण माझा।।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सवेर्श्वर पूजनाचे ||
'जे धर्मस्थापनेचे नर| हे ईश्‍वराचे अवतार| झाले आहेत पुढे होणार| देणे ईश्‍वराचे|'
यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं लो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो| भूतां परस्परें जडो| मैत्र जीवाचें ||

एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति ।

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 16/09/2014 - 18:13
ंमोदीना शिव्या घातल्या की शिव्या देणारा हिंदु द्वेष्टा ठरतो ! ज्ञानात भर पडली !

In reply to by प्रसाद गोडबोले

विजुभाऊ 16/09/2014 - 18:53
वरील चर्चेत प्रभु रामचंद्रांवर टीका करणार्‍यां पैकी किती जणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे ?
प्रगो काका ( अर्थात गिरीजा काकू ) मी वाल्मिकी रामायण , भुषुंडी रामायण ( तेच ते काक भुषुंडीने लिहीलेले) आणि तुलसी रामायण वाचलेले आहे. सातारच्या काळाराम मंदीरात त्यावर श्रीकृष्णशास्त्री जोशींची बरीच प्रवचने देखील ऐकली आहेत.
बाकी च्या आयडींचे जाऊ दे , ते हिंदु द्वेषाने भरलेले आहेत हे सर्वमिपाला ज्ञात आहे
एखाद्या गोष्टीच्या वाईटपणाबद्दल टीका केली की तो हिंदूद्वेष होतो हे कशावरून? जे वाईट आहे ते वाईटच की. यात मिपाने कारवाई करण्याचा काय प्रश्न येतो. वाईट गोष्टीबद्दल बोलले नाही याचा अर्थ त्या नसतात असे नाही. चिघळलेली जखम झाकली म्हणून वेदना व्हायच्या बंद होत नाहीत. ( माताय काय भयानक खंग्री वाक्य गवसलय) बाकी काय बोलू . असो. तुमच्याच शब्दात सांगायचे तर व्हर्बल***** करून काय उपयोग.

In reply to by विजुभाऊ

चांगले काय अन वाईट काय ह्याची चर्चा निवांतपणे करुच हो आधी तुम्ही रामायण वाचले आहे का ते तरी सांगा ... आणि नसेल वाचले तर प्रांजळपणे कबुल तरी करा की ऐकीव ज्ञानावर बडबड करत आहात ते ... ( पण एकुणच तुमच्याशी केलेल्या पुर्वचर्चां वरुन तुम्ही पॅव्हेलियन मधे (किंव्वा टीव्हीसमोर) बसुन सचिन कसा चुकला अन ऑऊट झाला ह्यावर चर्चा करणार्‍यातले आहात असा एक अंदाज बांधलेला आहे , आता वरील प्रश्नाला तुम्ही जर का " होय मी वाल्मिकी रामायण वाचले आहे आणी म्हणुनच त्याच्याविषयी बोलत आहे" असे उत्तर दिलेत तर मत बदलावे लागेल . ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 16/09/2014 - 19:57
रामाच्या भक्तानी तरी संपुर्ण रामायण वाचलेले असते का? आणि रामाच्या एखाद्या कृतीबद्दल शंका विचारली की लगेच त्याला मात्र विचारायचे.. तू संपुर्ण रामायण वाचले आहेस का ?

In reply to by पोटे

कसं आहे की इथे राम आहे म्हणुन तुम्ही त्याच्या कृती बद्दल असल्या शंका काढु शकता कारण १०८ वेळा अंगावर थुंकले तरी अजिबात न रागवता गोदावरीत उतरुन स्नान करणार्‍या एकनाथांची परंपरा सांगणारे सौजन्यशील हिंदु इथे आहेत . एकदा इतर धर्माच्या श्रध्दास्थाबद्दल असली शंका काढुन पहा .... होऊन जाऊदे एकदा हा सुर्य अन हा जयद्रथ !! अभ्यास नसेल तर गप्प रहाणे हे उगाच वटवट करण्यापेक्षा फार सोप्पे असते , एकदा प्रयोग तरी करुन पहा राव ! अवांतर : ह्या इथेच , मिपा वर , ज्ताला मी अहिंसेचा समर्थक धर्म समजत होतो त्या धर्माच्या अनुयायाने मला धमकी दिल्याचा किस्सा आठवला , ( शिवाय नुकतेच त्या धर्मात हिंसेला परवानगी असल्याचे कळाले आहे. )

In reply to by प्रसाद गोडबोले

विलासराव 16/09/2014 - 22:33
श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन झाली , आता बुध्द , महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स वगैरेंना घेवुया का राउंडात ? रामायण वाचलेले नाही. बुद्धाबद्द्ल थोडेसे वाचले आहे. महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स यांच्याबद्द्ल विशेष वाचन नाही. सबब बुद्धाला माफी द्यावी.......अर्थातच सगळ्यांना दिलीत तरी हरकत नाहीच म्हणा.

In reply to by विलासराव

काळा पहाड 16/09/2014 - 23:50
बुध्द - भारताला अहिंसेच्या चुकीच्या दिशेने घेवून जाणारा. भारतानं याच्यामुळेच क्षात्रवृत्तीचा त्याग केला महावीर - फारसं काही माहिती नाहिये येशु - समर्थकांनी आणि चर्चनंच विचारांची हत्या केली. स्वतः बिचारा सूळावर चढला आणि पोप आणि र्चचेलोक कर्मकांडात (संत बनवणं, बाटवाबाटावी, सोन्याचा येशू बनवून अर्पण करणं वगैरे) गोष्टीत मग्न आहेत. लहान मुलांवर फादर लोकांनी केलेल्या असॉल्टचे खटले जगात गाजतायतच. कंन्फुशीयस - लईच कन्फ्युज्ड व्हता राव. मोट्टी मोट्टी वाक्यं लिवून गेला. कार्ल मार्क्स - चुकीचं तत्वज्ञान, चुकीचा प्रयोग्

In reply to by काळा पहाड

पोटे 17/09/2014 - 07:34
बुद्धाच्या अहिंसेने भारताची वाट लागली हा सावरकरवाद्यांचा खोडसाळ मुद्दा आहे. सावरकर ज्या अंदमानात होते ते अंदमान बौद्ध जपान्यांनीच जिंकुन भारताला दिलं हे महान सत्य मात्र हे लोक विसरतात. :) दुसर्‍या धर्मात अहिंसा आहे म्हणुन आमची क्षात्रवृत्ती झिजली असा आक्रोश यांनी करणं हे म्हणजे बाकीच्यानी नसबंदी केली म्हणुन आम्हाला पोरं होत नाहीत असे म्हणण्यासारखेच नाही का ?

In reply to by पोटे

काळा पहाड 17/09/2014 - 10:31
१. सावर्करवादी कुठे आले? हा माझा मुद्दा आहे आणि मी सावर्करवादी नाही. मी फारसे सावर्कर वाचलेले पण नाहीत. तेव्हा उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला नको. २. जेव्हा भारताला बाहेर जावून जगावर हिंसक विजय गाजवायची गरज होती, तेव्हा भारतात अहिंसेचे गोडवे गायले जात होते. अशोकासारख्या पराक्रमी राजाला बौद्ध बनवून त्याचा पराक्रम बौद्धांनी संपवून टाकला. ३. क्षात्रवृत्ती झिजली नाही पण समाजाचा एक वर्ग अशा वेळी अहिंसेच्या मार्गावर चालत होता ज्या वेळी मुसलमान बाहेरून भारतावर हल्ले करत होते. बाकी मुसलमानांनी कन्व्हर्जन साठी सर्वात जास्त बौद्धांनाच टार्गेट केलं होतं हे तुम्हाला माहीत असेलच. ४. जपानी बौद्ध होते पण दुसर्‍या महायुद्धात सर्वात जास्त अत्याचार जपाननंच केले होते. तुम्हाला नक्की कशाबद्दल अभिमान आहे हे एकदा ठरवा. बाकी तुम्ही रामावर टीका करू शकता पण बुद्धावर केली तर तुम्हाला चालत नाही. एखादी दुखरी नस दाबली जातिये वाटतं?

In reply to by काळा पहाड

विलासराव 17/09/2014 - 09:03
बुध्द - भारताला अहिंसेच्या चुकीच्या दिशेने घेवून जाणारा. भारतानं याच्यामुळेच क्षात्रवृत्तीचा त्याग केला कालाय तस्मै नमः !!!!!!!

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 17/09/2014 - 09:29
जेव्हा संपादकीय काम असेल तेव्हा संपादक मंडळ आयडी वापरण्यात येईल. जे प्रतिसाद माझ्या आयडीने प्रकाशित होतात ते माझे वैयक्तिक असतात. आणि यात तुम्हाला समज कुठे दिसली ब्वा? मी तर लोकांना विनंती केली आहे! :D

बाळ सप्रे 16/09/2014 - 18:39
धर्मातल्या, जुन्या ग्रंथातल्या काही खटकणार्‍या गोष्टी दाखवल्या की हा एक पवित्रा सर्वसाधारणपणे दिसून येतो की "ते ओरी़जिनल धर्मात/ ग्रंथात नाहीच्चे" "ते नंतर घुसडण्यात आलयं " जसं काही लाखो/हजारो वर्षांपूर्वीचा बेसलाईन यांच्याकडे उपलब्ध आहे.. आणि जगात बाकीचे सगळे घुसडलेले व्हर्जन ऐकतात/ वाचतात!!
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.) ________________________________________________________ आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु. सीता ही भूमीकन्या होती. ________________ वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ? दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ?

मोझाम्बिकची निवडणूकः १

आतिवास ·

जेपी 13/09/2014 - 20:01
लै देश फिरता बॉ तुमी. आपल्याला परकीय राजकारणाच जास्ती कळत नाय. 'मी पयला ' एवढे बोलुन माझे मोजके शब्द संपवतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 13/09/2014 - 21:52
धागा आणि धागाकर्तीचं नाव वाचूनच धागा उघडला. मालिका रंगणार हे नक्की! पुभाप्र.

रमेश आठवले 13/09/2014 - 22:50
--"इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक ‘उमेदवाराला’ मत न देता ‘पक्षाला’ मत देतात. पक्षाला जितकी मते मिळतात त्या प्रमाणानुसार National Assembly मध्ये त्या पक्षाला जागा दिल्या जातात. अर्थात पक्ष उमेदवार आधी जाहीर करतात की कोणते सदस्य National Assembly मध्ये जाणार याबाबत पक्ष निकाल जाहीर झाल्यावर निर्णय घेतो हे मला अजून नीट समजलेलं नाही (भाषेची अडचण!) – मला समजलं की त्याबद्दल इथं लिहीन--" जर्मनी मध्ये वर दिलेल्या पद्धती प्रमाणेच निवडणुका होतात.जर्मनी आपल्या सारखेच federal republic आहे. तेथे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची यादी आधी प्रसिद्ध होते आणि मिळालेल्या मतांच्या आधारावर ज्या जागा मिळतील तेवढ्या जागांवर आधी जाहीर केलेल्या यादीतील अनुक्रमाप्रमाणे पार्टीचे सदस्य निवडून येतात.

In reply to by रमेश आठवले

आतिवास 13/09/2014 - 23:07
या माहितीसाठी धन्यवाद. पण मला अजून इथं राष्ट्राध्यक्ष सोडून इतर उमेदवारांची नावं, त्यांचा प्रचार हे काहीच दिसत नाही. त्यामुळे मनात शंका आहे की नावं आधी जाहीर होतात की नंतर. शोध घेतेय, काहीतरी सापडेल त्या दिशेने ही आशा आहे.

नेहमीच्या माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली जात नसलेल्या देशाबद्दल वाचायला मिळत आहे. पुढच्या भागात अधिक फोटो असल्यास आनंद वाटेल.

In reply to by शिद

आतिवास 15/09/2014 - 11:59
धन्यवाद. या निमित्ताने वेगवेगळ्या व्यवस्था मला समजत आहेत. तुमच्या दुव्याचा आधार घेऊन मी हा दुवा शोधला; पण त्यातून सविस्तर माहिती मिळत नाही.

सुनील 15/09/2014 - 12:13
हा भाग आवडला. पुभाप्र. भारतीय पर्यटकांच्या रडारवर सहसा नसलेले देश जसे की जॉर्डन, पेरु, मोझांबिक इत्यादी ठिकाणे पाहिली जाताहेत आणि त्याविषयीची माहिती मराठीत लिहिली जात आहे, हे छानच!

जेपी 13/09/2014 - 20:01
लै देश फिरता बॉ तुमी. आपल्याला परकीय राजकारणाच जास्ती कळत नाय. 'मी पयला ' एवढे बोलुन माझे मोजके शब्द संपवतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 13/09/2014 - 21:52
धागा आणि धागाकर्तीचं नाव वाचूनच धागा उघडला. मालिका रंगणार हे नक्की! पुभाप्र.

रमेश आठवले 13/09/2014 - 22:50
--"इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक ‘उमेदवाराला’ मत न देता ‘पक्षाला’ मत देतात. पक्षाला जितकी मते मिळतात त्या प्रमाणानुसार National Assembly मध्ये त्या पक्षाला जागा दिल्या जातात. अर्थात पक्ष उमेदवार आधी जाहीर करतात की कोणते सदस्य National Assembly मध्ये जाणार याबाबत पक्ष निकाल जाहीर झाल्यावर निर्णय घेतो हे मला अजून नीट समजलेलं नाही (भाषेची अडचण!) – मला समजलं की त्याबद्दल इथं लिहीन--" जर्मनी मध्ये वर दिलेल्या पद्धती प्रमाणेच निवडणुका होतात.जर्मनी आपल्या सारखेच federal republic आहे. तेथे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची यादी आधी प्रसिद्ध होते आणि मिळालेल्या मतांच्या आधारावर ज्या जागा मिळतील तेवढ्या जागांवर आधी जाहीर केलेल्या यादीतील अनुक्रमाप्रमाणे पार्टीचे सदस्य निवडून येतात.

In reply to by रमेश आठवले

आतिवास 13/09/2014 - 23:07
या माहितीसाठी धन्यवाद. पण मला अजून इथं राष्ट्राध्यक्ष सोडून इतर उमेदवारांची नावं, त्यांचा प्रचार हे काहीच दिसत नाही. त्यामुळे मनात शंका आहे की नावं आधी जाहीर होतात की नंतर. शोध घेतेय, काहीतरी सापडेल त्या दिशेने ही आशा आहे.

नेहमीच्या माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली जात नसलेल्या देशाबद्दल वाचायला मिळत आहे. पुढच्या भागात अधिक फोटो असल्यास आनंद वाटेल.

In reply to by शिद

आतिवास 15/09/2014 - 11:59
धन्यवाद. या निमित्ताने वेगवेगळ्या व्यवस्था मला समजत आहेत. तुमच्या दुव्याचा आधार घेऊन मी हा दुवा शोधला; पण त्यातून सविस्तर माहिती मिळत नाही.

सुनील 15/09/2014 - 12:13
हा भाग आवडला. पुभाप्र. भारतीय पर्यटकांच्या रडारवर सहसा नसलेले देश जसे की जॉर्डन, पेरु, मोझांबिक इत्यादी ठिकाणे पाहिली जाताहेत आणि त्याविषयीची माहिती मराठीत लिहिली जात आहे, हे छानच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल. मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली.

सायकलींग (भाग २) - BRM - पुणे-पांचगणी-पुणे

मोदक ·

विलासराव 13/09/2014 - 14:46
आता तर घेतोच मि सायकल. २० वर्षापुर्वी साधी सायकल चालवायचा अनुभव होता बर्यापैकी. जुलै १३ ला पाँडेचरी ते अ‍ॅरोव्हीलेज हे १३-१४ किमी अंतर आठवड्यात तीनदा पार केले साध्या सायकलने. जुन १४ ला वरळी सीफेस ते नरीमन पॉईंट परत वरळी सीफेस असे अंतर पार केले. सायक्लॉथॉन या स्पर्धेत. ही सायकल गियरची होती पण मी प्रथमच चालवत असल्याने सरळ बिनागियरची असते तशी चालवली. माझा उद्देश कोणतीही स्पर्धा जिंकायचा नसुन मनस्वी सायकलभ्रमन करायचा आहे. त्यात तुम्ही सांगीतले की अचानक पडलेले एखादे स्वप्न खरे व्हावे तसे काहीसे झाले होते. कोणतीही विशेष तयारी न करता केवळ मानसिकदृष्ट्या कणखर राहून केलेली ही महत्वाकांक्षी राईड पूर्ण झाली. संपूर्ण राईड दरम्यान सायकलने अप्रतीम सोबत केली. त्यामुळे उत्साह वाढलाच नाहीतर टिकुनही राहील.

In reply to by विलासराव

मोदक 15/09/2014 - 13:17
धन्यवाद विलासराव.. सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!!

In reply to by मोदक

विलासराव 15/09/2014 - 13:23
सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. लवकरच. फक्त साधारण किंमत काय रेंजमधे आहे ते लिहा. घ्यायची तर आहेच. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!! धन्यवाद.

एस 13/09/2014 - 15:39
पुण्यातले बरेचजण सायकलिंग करतात. दिव्या ताटे, सुनील रणवरे वगैरे मंडळी माहीत आहेत. तुम्ही अतिशय योग्य मार्गावर आहात. पॅरिस-ब्रेख्त-पॅरिस आणि लंडन-एडिंगबर्ग-लंडन करून या. खूपखूप शुभेच्छा आणि जियो!!!

जेपी 13/09/2014 - 16:50
आवडल. पुर्वी तुळजापुरला असताना तुळजापुर-सोलापुर ट्रिप सायकल वर बर्याच केल्यात.परतीच्या वेळेसे घाट जाम दमवायचा.अता सवय सुटली पण पुन्हा चालु करावी ही इच्छा झालीय धागा वाचुन.

तुझ्या चिकाटीला अन खिलाडूवृत्तीला सादर दंडवत. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन. एक सुचवणी - लौकरच एखादा गोप्रोसारखा कॅमेरा घेऊन टाक व अशा कामगिरीचे चित्रणही कर.

प्यारे१ 13/09/2014 - 21:57
ज ब र द स्त! जिद्दी आहेस बाबा. सगळ्याच बाबतीत. हॅट्स ऑफ. बाकी ते पसरणी घाटात पहिलं लागतं ते बुवासाहेब मंदिर. मला आठवतंय तसं मंदिर आहेच. यात्रा सुद्धा असते छोट्या प्रमाणावर. (इथं मोठा अपघात झालेला २००३ ला. गुजरातची एक बस खाली कोसळून २३-२४ जण गेलेले) त्याच्या पुढचं छोटं मंदीर साधारण १५ वर्षांपूर्वी एस्टॅब्लिश झालंय. (तिथं एक डंपर उलटलेला १७-१८ वर्षांपूर्वी. ३-४ जण गेले.) आणि घाटाचा 'सी' संपतो तो 'थापा'. उजवीकडं असलेलं १०० मीटरचं छोटं निमुळतं पठार. आता त्याला हॅरिसन फॉली असं गोंडस नाव दिलंय. टेबललँड/ टेबल टॉप/ पॉईंट अगदी वर गेल्यानंतर आहे. तिथं तू 'सायकल'वर गेला नसशील.

सुबोध खरे 14/09/2014 - 11:22
मोदक राव _^_ साष्टांग नमस्कार. आमच्याच्यान मोटार सायकलीवर होईना २०८ किमी एका दिवसात . आळस हा माणसाचा शत्रू आहे.

सौंदाळा 15/09/2014 - 11:50
_/\_ दंडवत स्वीकारा. नसरापुरलाच प्रचंड दमलेला असुन चांदणी चौकापर्यंत सायकल मारलीस!! नंतर कसे वाटले? म्हणजे हात, पाय दुखणे वगैरे काही झाले का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मोदक 15/09/2014 - 11:58
ही BRM पूर्ण करणे स्वतःसाठी ठेवलेले एक टारगेट होते. त्यामुळे "पार करायचेच्च" असे ठरवले होते. नंतर फार त्रास झाला नाही. पाय - त्यातही मांड्या खूप भरून आल्या होत्या. बहुदा त्याचे कारण मी शेवटी शेवटी हार्ड गेअर्स वर सायकल चालवली हे असावे. गरम पाण्याने शेकल्यानंतर पाय एकदम ठीक झाले. उजवा हात पुढे दोन तीन दिवस थोडा बधीर राहिला होता. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी काहीही उपचार न करता फक्त दोन तीन दिवस थांबा असा सल्ला दिला आणि बधीरपणा हळूहळू निघून गेला. "आपल्याला इतके अंतर पार करता आले" ही झींग इतकी चढली होती की या गोष्टींचे फारसे काही वाटले नाही. :D

बाळ सप्रे 15/09/2014 - 12:19
पहिल्या २.५ तासात ६०किमी करुन पूर्ण १३ तास लागले हे ऐकुन जरा धडकी भरतेय.. आणि अंतरही २०० ऐवजी २०९ !! सध्या माझा ५-६ तासाच्या राईडमध्ये अ‍ॅव्हरेज स्पीड जेमतेम २०-२१ पडतोय.. आणि घाट तर मोठा वीक पॉईंट आहे.. घाटात स्पीड ९-१० वर येतो.. पण तरिही जमवायच यावेळी..

In reply to by बाळ सप्रे

मोदक 15/09/2014 - 13:14
अहो खूप सोपे आहे सगळे. अंतर २०० ऐवजी २०९ किमी आहे यात नवीन काही नाही. आपल्या घरापासून ते स्टार्टिंग पॉईंट आणि BRM नंतर एंड पॉईंटपासून घर हेही अंतर गृहीत धरा. (या हिशोबाने माझे त्या दिवशीचे २४० किमी सहज झाले असतील.) तुमचा अ‍ॅवरेज स्पीड भरपूर आहे. तो तसाच ठेवा फक्त सध्या सहा तासच राईड करू शकत असाल तर तो वेळ वाढवा. १०० मीटर पळणारा आणि ४०० मीटर पळणारा जसे वेगवेगळी आखणी करतात तसे काहीसे... घाटात १० किमी स्पीड म्हणजे तुम्ही निष्णात सायकलपटू आहात. घाटातला सराव वाढवायचा असेल तर पुणे-पानशेत-कादवे घाट-वेल्हे-पाबे घाट-पुणे हा रूट किंवा आजुबाजूला असलेले सर्व घाट नियमीतपणे पार करा. तुम्हाला सरावाला वेळ आहे याचा पुरेपूर फायदा करून घ्या. चुकुनही अपघात होईल अशा जोखमीने सायकल चालवू नका सायकल हेल्मेट नेहमी वापरा - शहरात फिरताना सुद्धा. भरपूर सायकलींग करताना शरीरावर ताण येवून स्नायूंना दुखापत होईल इतके जास्त प्रयत्न कधीही करू नका. तुमची सायकल कोणती आहे..? आणि BRM कोणत्या सायकलवर करणार आहात..?

In reply to by बाळ सप्रे

मोदक 15/09/2014 - 17:45
काय राव 'धडकी भरली' वगैरे बोलून चेष्टा करताय का..? ;) तुम्ही जर "टर्नी / २६" टायर / २१ गिअर्स या कन्फीगरेशन वर हा स्पीड राखत असाल तर BRM हसत खेळत पूर्ण कराल. (माझ्या सायकलचे कन्फीगरेशन "अ‍ॅसेरा / २८" टायर आणि २४ गिअर्स" हे आहे.)

काल दिवस भर तुळशीबागेत जायचे १० वेळा प्लान करुन आणि मोडुन झाले इतका आळस आहे... तू ऑफिस करुन कसं रे बाबा इतकं केलस!!! खुप मोठी गोष्ट केलीस मित्रा!!

मृत्युन्जय 15/09/2014 - 14:10
अभिनंदन. उत्साहाचा झरा आहे तुझ्यात :) एक शंका: हायवे वर इतकी गर्दी असते. गाड्या भरधाव वेगात असतात. शहरात सुद्धा. मग सायकलिंग करताना त्याचा त्रास होत नाही का? विशेषतः हायवेवर काय काळजी घ्यावी लागते भरधाव गाड्यांच्या अन्नुषंगाने?

In reply to by मृत्युन्जय

मोदक 15/09/2014 - 16:00
सायकलींग करताना गाड्यांचा खूप त्रास होतो. शहरात जास्त. हायवेवर सायकल शक्यतो सर्वात डावीकडे असलेल्या पांढर्‍या पट्ट्याच्याही बाजूने (रस्ता संपण्यास एक दीड फूट अंतर असते) तेथूनच चालवावी लागते. सायकलला टेललाईट्स असणे गरजेचे असते कारण 'समोर एक सायकल आहे' हे मागच्या गाड्यांना लवकर दिसणे खूप महत्वाचे असते. रिफ्लेक्टीव वेस्टने ते काम आणखी सोपे होते. सर्वाधीक त्रास होतोत तो वाहनचालकांच्या मनोवृत्तीचा. "सायकलच आहे" म्हणून कट मारणे, खूप जवळून खूप वेगाने जाणे, उगाचच मध्ये येवून थांबणे, सायकलला ओव्हरटेक करून लगेच डावीकडे येणे आणि थांबणे. वगैरे प्रकार चीड आणतात. माझी अनेक वाहनचालकांची या विषयावरून बाचाबाची झालेली आहे. थांबलेल्या सायकलशी छेडछाड करणारे महाभागही भरपूर असतात. उत्साहाने सायकल बघत बघत रेंगाळतात आणि गेअर बदलून जातात. हायवेवर वाहनांचा त्रास होतोच होतो पण तेथे समोरच्या वाहनाचा आकार आणि वेग पाहता आपणच आपल्या जीवाला सांभाळून असणे आवश्यक असते. रॅम (Race Across America) सारख्या प्रतिष्ठीत स्पर्धेलाही अपघात ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक सायकलपटूसोबत एक सपोर्ट टीम चारचाकीसह संपूर्णवेळ सोबत असतानाही या रेसमध्ये आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. दोन जण मरण पावले आहेत आणि अनेक जण जायबंदी झाले आहेत. अशाच एका घटनेचा आऊटसाईड मासिकातील दुवा http://www.outsideonline.com/outdoor-adventure/biking/road-biking/Wrecked.html

In reply to by सह्यमित्र

मोदक 15/09/2014 - 16:04
Cycle Log नावाचे Strava चे अ‍ॅप आहे. http://www.windowsphone.com/en-us/store/app/cycle-log/85580544-6c9d-e011-986b-78e7d1fa76f8 हा विंडोज स्टोअरचा दुवा आहे. या अ‍ॅपचा एकच कच्चा दुवा म्हणजे आपण ब्रेक घेतला तरी हे अ‍ॅप वेळ मोजतच राहते, अचूक वेग आणि वेळ हवा असल्यास प्रत्येक वेळी अ‍ॅप पॉझ करावे लागते.

चित्रगुप्त 16/09/2014 - 23:12
व्वा महाराज. खूप आनंद झाला वाचून. आम्ही तरूणपणी इन्दौरहून एकदा बडोद्याला (तिथली म्युझियम्स बघायला) आणि एकदा अजिंठा-वेरूळ वगैरेला जाऊन आलो होतो, ते आठवले. अलिकडे मी पुन्हा नवीन सायकल घेतली आहे, परंतु आता पूर्वीसारखे रस्ते मोकळे मिळणे अशक्य झाल्याने दूरवरचा पल्ला गाठणे वगैरे कठीण. पुढील अनेक सायकल-सफरींसाठी शुभेच्छा. जमल्यास राजस्थानातील 'शेखावटी' एरियात सायकलने भ्रमण करा. मैलोन मैल अगदी निर्मनुष्य रस्ते, अतिशय सुंदर हवेल्या, मंदिरे, सरळ स्वभावाचे लोक, उंट, किल्ले, वगैरे .. वगैरे

मस्त मी फक्त कॉलेजला येण्या-जाण्यासाठी सायकल वापरली. नंतर संपुर्ण नाही पण बर्यापैकी ठाणे शहर फिरुन झाले. तुझ्या पु.प्रवासाला शुभेच्छा. जाता जाता, तुला माहित आहे का पनवेलचा सुमीत परिंगे जो नुकतेच देशाचे दक्षिणोत्तर टोक यातील साडेपाच हजार किमीचे अंतर सायकलने पार करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. ही लोकसत्तेमध्ये आलेला त्याच्या माहितीचा हा लेख वाच.

In reply to by टवाळ कार्टा

विलासराव 17/09/2014 - 10:47
तब्बल ३६०० किमीच्या या प्रवासासाठी त्याला लागले ५२ दिवस. त्यापैकी ४७ दिवस तो सायकलवरच होता. २० जुलैला पनवेलातून या प्रवासाला सुरुवात करणारा सुमीत ११ सप्टेंबरला सियाचेनहून परतला. बातमीतील ही ओळ.

स्पंदना 17/09/2014 - 11:42
नक्कि काय लिहावं कळत नाही आहे. म्हणजे जरा वाकड लिहायच आहे पण कि बोर्ड हलत नाही आहे तस लिहायला. बाकी ते उत्साही काका प्रकरण वाचताना हसु फुटलं. जर २ बॉटल्स घेतल्या होत्या तर एक ओआर एस घ्यायच ना? क्रँप साठी साखर मिठ चांगल असत. आता म्हणतेच...कौतुक वाटतय जिद्दीचं. :'( :'-(

किरण कुमार 17/09/2014 - 14:23
दोन सलग सुट्या आल्या तरी कुठे जायचे राईडला हा प्रश्न प्रत्येक वेळी टाकणारा हा सायकल रायडर, तू बीआरएम करतोय हे ऐकल्यावरच भारी वाटले. मस्त रे अभिनंदन

In reply to by विलासराव

मोदक 18/09/2014 - 14:41
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. ;)

In reply to by मोदक

विलासराव 18/09/2014 - 17:53
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. ड्न बॉस. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. ही काय चिंता नाय आपल्याला. सायकल पुर्वी १० वर्ष वापरली आहेच. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. Wink चालतय. पण आपुन लंबी रेसवाला माणुस हय......पुढेमागे सेव्हन सिस्टर्स फिरुन येउ, जमेल का? आणी त्या पिंगुलाही घेउन जाउ. आता वेळ नाही असली शुल्लक कामे सांगु नयेत. नोकरीत रजा टाका, नाही मंजुर झाली तर सोडुन द्या, आल्यावर दुसरी शोधा, नाही मीळाली तर व्यवसाय चालु करा, तेही नाही जमलं तर जाउ नरमदामाईच्या आश्रयाला. माई बघुन घेईल पुढचे.

In reply to by मोदक

चित्रगुप्त 18/09/2014 - 03:12
तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..??? आम्ही तर बुवा सुरु केले आहे, वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी पुन्हा एकदा. दररोज सकाळी दहा कि.मी. शिवाय भाजी वगैरे आणायला जाताना.

In reply to by मोदक

तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..???
माझा १-२ महिन्यापुर्वीच सायकलिंग सुरु करण्याचा प्लॅन होता , एव्हन फायरफॉक्स रॅपीड २०१४ ही सायकल घ्यायची हेही फिक्स केले होते पण नंतर पोलोचा प्लॅन ठरला अन बजेट कन्स्टेन्ट्र्स मुळे सायकल चा प्लॅन रेंगाळला ... :( सध्या पोलोसोबत नव्याचे नऊ दिवस चालु आहेत .... एकदा हे हनिमुन संपलें की सायकल चा विचार करणार... आता बघुया कधी जमतय ते !

मोदक, मस्त रे. प्रयत्न लाजवाब आहेच. शिवाय प्रवास वर्णनही सुंदर आहे. पुन्हा कधी आहे हा ब्रेवे ?

मोदक 16/10/2014 - 13:03
माऊ आणि गुळाचा गणपती.. ऑक्टोबर २०१५ पर्यंत भारतात होणार्‍या सर्व ब्रेवेचे वेळापत्रक या लिंकवर पाहता येईल http://www.audaxindia.org/events.php ही साईट दोन दिवसांपूर्वीच लाँच झाली त्यामुळे प्रतिसादास उशीर झाला.

बाळ सप्रे 16/11/2014 - 11:55
मोदकराव, तुमचा हा लेख वाचल्यापासून BRM करण्याचा निश्चय झालाच होता. कालच्या धो धो पावसात पुणे - सुपा - पुणे ही नगर रस्त्यावरील २०० BRM ११ तासात यशस्वीपणे पार पडली. सायकलिंग वरील लेखातील टिप्सचा नक्कीच उपयोग झाला.. धन्यवाद!!

In reply to by एस

मोदक 17/11/2014 - 12:20
पुणे - अहमदनगर - गाणगापूर - पुणे ही ४०० किमीची BRM झाली. बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...

In reply to by मोदक

एस 17/11/2014 - 12:22
अच्छा! ग्रेट!
बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...
अनुमोदन.

विलासराव 13/09/2014 - 14:46
आता तर घेतोच मि सायकल. २० वर्षापुर्वी साधी सायकल चालवायचा अनुभव होता बर्यापैकी. जुलै १३ ला पाँडेचरी ते अ‍ॅरोव्हीलेज हे १३-१४ किमी अंतर आठवड्यात तीनदा पार केले साध्या सायकलने. जुन १४ ला वरळी सीफेस ते नरीमन पॉईंट परत वरळी सीफेस असे अंतर पार केले. सायक्लॉथॉन या स्पर्धेत. ही सायकल गियरची होती पण मी प्रथमच चालवत असल्याने सरळ बिनागियरची असते तशी चालवली. माझा उद्देश कोणतीही स्पर्धा जिंकायचा नसुन मनस्वी सायकलभ्रमन करायचा आहे. त्यात तुम्ही सांगीतले की अचानक पडलेले एखादे स्वप्न खरे व्हावे तसे काहीसे झाले होते. कोणतीही विशेष तयारी न करता केवळ मानसिकदृष्ट्या कणखर राहून केलेली ही महत्वाकांक्षी राईड पूर्ण झाली. संपूर्ण राईड दरम्यान सायकलने अप्रतीम सोबत केली. त्यामुळे उत्साह वाढलाच नाहीतर टिकुनही राहील.

In reply to by विलासराव

मोदक 15/09/2014 - 13:17
धन्यवाद विलासराव.. सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!!

In reply to by मोदक

विलासराव 15/09/2014 - 13:23
सायकल घेताना काही माहिती लागली तर बिन्धास्त कॉलवा.. लवकरच. फक्त साधारण किंमत काय रेंजमधे आहे ते लिहा. घ्यायची तर आहेच. आधीच्या भागातील लिंकबद्दलही धन्स..!! धन्यवाद.

एस 13/09/2014 - 15:39
पुण्यातले बरेचजण सायकलिंग करतात. दिव्या ताटे, सुनील रणवरे वगैरे मंडळी माहीत आहेत. तुम्ही अतिशय योग्य मार्गावर आहात. पॅरिस-ब्रेख्त-पॅरिस आणि लंडन-एडिंगबर्ग-लंडन करून या. खूपखूप शुभेच्छा आणि जियो!!!

जेपी 13/09/2014 - 16:50
आवडल. पुर्वी तुळजापुरला असताना तुळजापुर-सोलापुर ट्रिप सायकल वर बर्याच केल्यात.परतीच्या वेळेसे घाट जाम दमवायचा.अता सवय सुटली पण पुन्हा चालु करावी ही इच्छा झालीय धागा वाचुन.

तुझ्या चिकाटीला अन खिलाडूवृत्तीला सादर दंडवत. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन. एक सुचवणी - लौकरच एखादा गोप्रोसारखा कॅमेरा घेऊन टाक व अशा कामगिरीचे चित्रणही कर.

प्यारे१ 13/09/2014 - 21:57
ज ब र द स्त! जिद्दी आहेस बाबा. सगळ्याच बाबतीत. हॅट्स ऑफ. बाकी ते पसरणी घाटात पहिलं लागतं ते बुवासाहेब मंदिर. मला आठवतंय तसं मंदिर आहेच. यात्रा सुद्धा असते छोट्या प्रमाणावर. (इथं मोठा अपघात झालेला २००३ ला. गुजरातची एक बस खाली कोसळून २३-२४ जण गेलेले) त्याच्या पुढचं छोटं मंदीर साधारण १५ वर्षांपूर्वी एस्टॅब्लिश झालंय. (तिथं एक डंपर उलटलेला १७-१८ वर्षांपूर्वी. ३-४ जण गेले.) आणि घाटाचा 'सी' संपतो तो 'थापा'. उजवीकडं असलेलं १०० मीटरचं छोटं निमुळतं पठार. आता त्याला हॅरिसन फॉली असं गोंडस नाव दिलंय. टेबललँड/ टेबल टॉप/ पॉईंट अगदी वर गेल्यानंतर आहे. तिथं तू 'सायकल'वर गेला नसशील.

सुबोध खरे 14/09/2014 - 11:22
मोदक राव _^_ साष्टांग नमस्कार. आमच्याच्यान मोटार सायकलीवर होईना २०८ किमी एका दिवसात . आळस हा माणसाचा शत्रू आहे.

सौंदाळा 15/09/2014 - 11:50
_/\_ दंडवत स्वीकारा. नसरापुरलाच प्रचंड दमलेला असुन चांदणी चौकापर्यंत सायकल मारलीस!! नंतर कसे वाटले? म्हणजे हात, पाय दुखणे वगैरे काही झाले का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मोदक 15/09/2014 - 11:58
ही BRM पूर्ण करणे स्वतःसाठी ठेवलेले एक टारगेट होते. त्यामुळे "पार करायचेच्च" असे ठरवले होते. नंतर फार त्रास झाला नाही. पाय - त्यातही मांड्या खूप भरून आल्या होत्या. बहुदा त्याचे कारण मी शेवटी शेवटी हार्ड गेअर्स वर सायकल चालवली हे असावे. गरम पाण्याने शेकल्यानंतर पाय एकदम ठीक झाले. उजवा हात पुढे दोन तीन दिवस थोडा बधीर राहिला होता. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी काहीही उपचार न करता फक्त दोन तीन दिवस थांबा असा सल्ला दिला आणि बधीरपणा हळूहळू निघून गेला. "आपल्याला इतके अंतर पार करता आले" ही झींग इतकी चढली होती की या गोष्टींचे फारसे काही वाटले नाही. :D

बाळ सप्रे 15/09/2014 - 12:19
पहिल्या २.५ तासात ६०किमी करुन पूर्ण १३ तास लागले हे ऐकुन जरा धडकी भरतेय.. आणि अंतरही २०० ऐवजी २०९ !! सध्या माझा ५-६ तासाच्या राईडमध्ये अ‍ॅव्हरेज स्पीड जेमतेम २०-२१ पडतोय.. आणि घाट तर मोठा वीक पॉईंट आहे.. घाटात स्पीड ९-१० वर येतो.. पण तरिही जमवायच यावेळी..

In reply to by बाळ सप्रे

मोदक 15/09/2014 - 13:14
अहो खूप सोपे आहे सगळे. अंतर २०० ऐवजी २०९ किमी आहे यात नवीन काही नाही. आपल्या घरापासून ते स्टार्टिंग पॉईंट आणि BRM नंतर एंड पॉईंटपासून घर हेही अंतर गृहीत धरा. (या हिशोबाने माझे त्या दिवशीचे २४० किमी सहज झाले असतील.) तुमचा अ‍ॅवरेज स्पीड भरपूर आहे. तो तसाच ठेवा फक्त सध्या सहा तासच राईड करू शकत असाल तर तो वेळ वाढवा. १०० मीटर पळणारा आणि ४०० मीटर पळणारा जसे वेगवेगळी आखणी करतात तसे काहीसे... घाटात १० किमी स्पीड म्हणजे तुम्ही निष्णात सायकलपटू आहात. घाटातला सराव वाढवायचा असेल तर पुणे-पानशेत-कादवे घाट-वेल्हे-पाबे घाट-पुणे हा रूट किंवा आजुबाजूला असलेले सर्व घाट नियमीतपणे पार करा. तुम्हाला सरावाला वेळ आहे याचा पुरेपूर फायदा करून घ्या. चुकुनही अपघात होईल अशा जोखमीने सायकल चालवू नका सायकल हेल्मेट नेहमी वापरा - शहरात फिरताना सुद्धा. भरपूर सायकलींग करताना शरीरावर ताण येवून स्नायूंना दुखापत होईल इतके जास्त प्रयत्न कधीही करू नका. तुमची सायकल कोणती आहे..? आणि BRM कोणत्या सायकलवर करणार आहात..?

In reply to by बाळ सप्रे

मोदक 15/09/2014 - 17:45
काय राव 'धडकी भरली' वगैरे बोलून चेष्टा करताय का..? ;) तुम्ही जर "टर्नी / २६" टायर / २१ गिअर्स या कन्फीगरेशन वर हा स्पीड राखत असाल तर BRM हसत खेळत पूर्ण कराल. (माझ्या सायकलचे कन्फीगरेशन "अ‍ॅसेरा / २८" टायर आणि २४ गिअर्स" हे आहे.)

काल दिवस भर तुळशीबागेत जायचे १० वेळा प्लान करुन आणि मोडुन झाले इतका आळस आहे... तू ऑफिस करुन कसं रे बाबा इतकं केलस!!! खुप मोठी गोष्ट केलीस मित्रा!!

मृत्युन्जय 15/09/2014 - 14:10
अभिनंदन. उत्साहाचा झरा आहे तुझ्यात :) एक शंका: हायवे वर इतकी गर्दी असते. गाड्या भरधाव वेगात असतात. शहरात सुद्धा. मग सायकलिंग करताना त्याचा त्रास होत नाही का? विशेषतः हायवेवर काय काळजी घ्यावी लागते भरधाव गाड्यांच्या अन्नुषंगाने?

In reply to by मृत्युन्जय

मोदक 15/09/2014 - 16:00
सायकलींग करताना गाड्यांचा खूप त्रास होतो. शहरात जास्त. हायवेवर सायकल शक्यतो सर्वात डावीकडे असलेल्या पांढर्‍या पट्ट्याच्याही बाजूने (रस्ता संपण्यास एक दीड फूट अंतर असते) तेथूनच चालवावी लागते. सायकलला टेललाईट्स असणे गरजेचे असते कारण 'समोर एक सायकल आहे' हे मागच्या गाड्यांना लवकर दिसणे खूप महत्वाचे असते. रिफ्लेक्टीव वेस्टने ते काम आणखी सोपे होते. सर्वाधीक त्रास होतोत तो वाहनचालकांच्या मनोवृत्तीचा. "सायकलच आहे" म्हणून कट मारणे, खूप जवळून खूप वेगाने जाणे, उगाचच मध्ये येवून थांबणे, सायकलला ओव्हरटेक करून लगेच डावीकडे येणे आणि थांबणे. वगैरे प्रकार चीड आणतात. माझी अनेक वाहनचालकांची या विषयावरून बाचाबाची झालेली आहे. थांबलेल्या सायकलशी छेडछाड करणारे महाभागही भरपूर असतात. उत्साहाने सायकल बघत बघत रेंगाळतात आणि गेअर बदलून जातात. हायवेवर वाहनांचा त्रास होतोच होतो पण तेथे समोरच्या वाहनाचा आकार आणि वेग पाहता आपणच आपल्या जीवाला सांभाळून असणे आवश्यक असते. रॅम (Race Across America) सारख्या प्रतिष्ठीत स्पर्धेलाही अपघात ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक सायकलपटूसोबत एक सपोर्ट टीम चारचाकीसह संपूर्णवेळ सोबत असतानाही या रेसमध्ये आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. दोन जण मरण पावले आहेत आणि अनेक जण जायबंदी झाले आहेत. अशाच एका घटनेचा आऊटसाईड मासिकातील दुवा http://www.outsideonline.com/outdoor-adventure/biking/road-biking/Wrecked.html

In reply to by सह्यमित्र

मोदक 15/09/2014 - 16:04
Cycle Log नावाचे Strava चे अ‍ॅप आहे. http://www.windowsphone.com/en-us/store/app/cycle-log/85580544-6c9d-e011-986b-78e7d1fa76f8 हा विंडोज स्टोअरचा दुवा आहे. या अ‍ॅपचा एकच कच्चा दुवा म्हणजे आपण ब्रेक घेतला तरी हे अ‍ॅप वेळ मोजतच राहते, अचूक वेग आणि वेळ हवा असल्यास प्रत्येक वेळी अ‍ॅप पॉझ करावे लागते.

चित्रगुप्त 16/09/2014 - 23:12
व्वा महाराज. खूप आनंद झाला वाचून. आम्ही तरूणपणी इन्दौरहून एकदा बडोद्याला (तिथली म्युझियम्स बघायला) आणि एकदा अजिंठा-वेरूळ वगैरेला जाऊन आलो होतो, ते आठवले. अलिकडे मी पुन्हा नवीन सायकल घेतली आहे, परंतु आता पूर्वीसारखे रस्ते मोकळे मिळणे अशक्य झाल्याने दूरवरचा पल्ला गाठणे वगैरे कठीण. पुढील अनेक सायकल-सफरींसाठी शुभेच्छा. जमल्यास राजस्थानातील 'शेखावटी' एरियात सायकलने भ्रमण करा. मैलोन मैल अगदी निर्मनुष्य रस्ते, अतिशय सुंदर हवेल्या, मंदिरे, सरळ स्वभावाचे लोक, उंट, किल्ले, वगैरे .. वगैरे

मस्त मी फक्त कॉलेजला येण्या-जाण्यासाठी सायकल वापरली. नंतर संपुर्ण नाही पण बर्यापैकी ठाणे शहर फिरुन झाले. तुझ्या पु.प्रवासाला शुभेच्छा. जाता जाता, तुला माहित आहे का पनवेलचा सुमीत परिंगे जो नुकतेच देशाचे दक्षिणोत्तर टोक यातील साडेपाच हजार किमीचे अंतर सायकलने पार करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. ही लोकसत्तेमध्ये आलेला त्याच्या माहितीचा हा लेख वाच.

In reply to by टवाळ कार्टा

विलासराव 17/09/2014 - 10:47
तब्बल ३६०० किमीच्या या प्रवासासाठी त्याला लागले ५२ दिवस. त्यापैकी ४७ दिवस तो सायकलवरच होता. २० जुलैला पनवेलातून या प्रवासाला सुरुवात करणारा सुमीत ११ सप्टेंबरला सियाचेनहून परतला. बातमीतील ही ओळ.

स्पंदना 17/09/2014 - 11:42
नक्कि काय लिहावं कळत नाही आहे. म्हणजे जरा वाकड लिहायच आहे पण कि बोर्ड हलत नाही आहे तस लिहायला. बाकी ते उत्साही काका प्रकरण वाचताना हसु फुटलं. जर २ बॉटल्स घेतल्या होत्या तर एक ओआर एस घ्यायच ना? क्रँप साठी साखर मिठ चांगल असत. आता म्हणतेच...कौतुक वाटतय जिद्दीचं. :'( :'-(

किरण कुमार 17/09/2014 - 14:23
दोन सलग सुट्या आल्या तरी कुठे जायचे राईडला हा प्रश्न प्रत्येक वेळी टाकणारा हा सायकल रायडर, तू बीआरएम करतोय हे ऐकल्यावरच भारी वाटले. मस्त रे अभिनंदन

In reply to by विलासराव

मोदक 18/09/2014 - 14:41
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. ;)

In reply to by मोदक

विलासराव 18/09/2014 - 17:53
विलासराव.. चांगल्या सायकलला ३० हजार रूपये बस्स झाले. हायब्रीड सायकल घ्या. लागतील त्या अ‍ॅक्सेसरीज घ्या. ड्न बॉस. "आपण भरपूर पैसे गुंतवले आहेत त्यामुळे सायकल वापरणे भाग आहे" असे बंधन सुरूवातीला वाटेल, नंतर सायकलींगची सवय लागेल. ही काय चिंता नाय आपल्याला. सायकल पुर्वी १० वर्ष वापरली आहेच. खंडाळा/लोणावळा ट्रीप प्लॅन करा - मी येतो इकडून. Wink चालतय. पण आपुन लंबी रेसवाला माणुस हय......पुढेमागे सेव्हन सिस्टर्स फिरुन येउ, जमेल का? आणी त्या पिंगुलाही घेउन जाउ. आता वेळ नाही असली शुल्लक कामे सांगु नयेत. नोकरीत रजा टाका, नाही मंजुर झाली तर सोडुन द्या, आल्यावर दुसरी शोधा, नाही मीळाली तर व्यवसाय चालु करा, तेही नाही जमलं तर जाउ नरमदामाईच्या आश्रयाला. माई बघुन घेईल पुढचे.

In reply to by मोदक

चित्रगुप्त 18/09/2014 - 03:12
तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..??? आम्ही तर बुवा सुरु केले आहे, वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी पुन्हा एकदा. दररोज सकाळी दहा कि.मी. शिवाय भाजी वगैरे आणायला जाताना.

In reply to by मोदक

तुम्ही कधी सायकलींग सुरू करताय..???
माझा १-२ महिन्यापुर्वीच सायकलिंग सुरु करण्याचा प्लॅन होता , एव्हन फायरफॉक्स रॅपीड २०१४ ही सायकल घ्यायची हेही फिक्स केले होते पण नंतर पोलोचा प्लॅन ठरला अन बजेट कन्स्टेन्ट्र्स मुळे सायकल चा प्लॅन रेंगाळला ... :( सध्या पोलोसोबत नव्याचे नऊ दिवस चालु आहेत .... एकदा हे हनिमुन संपलें की सायकल चा विचार करणार... आता बघुया कधी जमतय ते !

मोदक, मस्त रे. प्रयत्न लाजवाब आहेच. शिवाय प्रवास वर्णनही सुंदर आहे. पुन्हा कधी आहे हा ब्रेवे ?

मोदक 16/10/2014 - 13:03
माऊ आणि गुळाचा गणपती.. ऑक्टोबर २०१५ पर्यंत भारतात होणार्‍या सर्व ब्रेवेचे वेळापत्रक या लिंकवर पाहता येईल http://www.audaxindia.org/events.php ही साईट दोन दिवसांपूर्वीच लाँच झाली त्यामुळे प्रतिसादास उशीर झाला.

बाळ सप्रे 16/11/2014 - 11:55
मोदकराव, तुमचा हा लेख वाचल्यापासून BRM करण्याचा निश्चय झालाच होता. कालच्या धो धो पावसात पुणे - सुपा - पुणे ही नगर रस्त्यावरील २०० BRM ११ तासात यशस्वीपणे पार पडली. सायकलिंग वरील लेखातील टिप्सचा नक्कीच उपयोग झाला.. धन्यवाद!!

In reply to by एस

मोदक 17/11/2014 - 12:20
पुणे - अहमदनगर - गाणगापूर - पुणे ही ४०० किमीची BRM झाली. बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...

In reply to by मोदक

एस 17/11/2014 - 12:22
अच्छा! ग्रेट!
बाळ सप्रे - तुमच्या BRM वर एक लेख येवूद्या.. कशी तयारी केली..? तो दिवस प्रचंड पावसाचा असल्याने काही अडचणी आल्या का..? आणि एकंदर अनुभव...
अनुमोदन.
३१ ऑगस्टला झालेल्या शिरवळ राईड दरम्यान सुधाकरने आणखी एका आव्हानात्मक गोष्टीबद्दल सांगितले... ७ सप्टेंबरला पुणे-पांचगणी-पुणे ब्रेवेट (उच्चारी "ब्रेवे") आहे आणि त्याने नांव रजिस्टर केले आहे. यालाच BRM असेही म्हणतात "BRM = Brevet des Randonneurs Mondiaux" अधिक माहिती विचारली असता २०० किमी अंतर १३ तासात सायकलने पार करायचे आहे आणि या वेळचा रूट पुणे-पाचगणी-पुणे असा आहे हे कळाले. "चल की... तुला जमेल सहज.. एकदा ट्राय तर कर" असे सुधाकरने त्याच्या खास ष्टायलीत सांगीतले.

ह्रुदयामध्ये घर बांधु या!अशा घराला दार कशाला!!

खुशि ·

काउबॉय 17/09/2014 - 19:19
आपले घर असे आसावे जिथे आकाशाच्या वर खिड़की असेल जिथे या आसमंतातील सर्व रंग आपल्या डोळ्यात सामावून जायला एक कारण हुडकत असतील तारे जिथे प्रकाशतिल ते आकाश जमीन झाले असेल चंद्रही मग तिथेच घुटमळेल आशा घराच्या भिंती दगड विटान्नि न्हावे हृदयातिल प्रेमाने उभारल्या असतील ज्याची कवाडे सर्वानाच उघडी असतील आणि दारांची गरजच लागणार नाही....

विवेकपटाईत 17/09/2014 - 20:31
च्यायला आत्ताच डॉक्टरांनी हृदयाचे कपाट उघडून बघितले आहेत. दरवाजा लावण्या एवजी चक्क शिंप्या सारखे शिवून काढले. आता दरवाजा कुठून लावणार ख़ुशी ताई.

काउबॉय 17/09/2014 - 19:19
आपले घर असे आसावे जिथे आकाशाच्या वर खिड़की असेल जिथे या आसमंतातील सर्व रंग आपल्या डोळ्यात सामावून जायला एक कारण हुडकत असतील तारे जिथे प्रकाशतिल ते आकाश जमीन झाले असेल चंद्रही मग तिथेच घुटमळेल आशा घराच्या भिंती दगड विटान्नि न्हावे हृदयातिल प्रेमाने उभारल्या असतील ज्याची कवाडे सर्वानाच उघडी असतील आणि दारांची गरजच लागणार नाही....

विवेकपटाईत 17/09/2014 - 20:31
च्यायला आत्ताच डॉक्टरांनी हृदयाचे कपाट उघडून बघितले आहेत. दरवाजा लावण्या एवजी चक्क शिंप्या सारखे शिवून काढले. आता दरवाजा कुठून लावणार ख़ुशी ताई.
लेखनविषय:
नमस्कार, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.

रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

आनन्दा ·

विलासराव 13/09/2014 - 13:29
आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे - ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं | ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं | बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे. मी तर आजही हाच उपाय करतो. त्याचा फायदा आजवर १००% झालाय.

आयुर्हित 14/09/2014 - 13:39
अतिशय सुंदर विवेचन! प्रत्येक माणसाला विचार करण्यास भाग पाडुन त्याला जाणकार बनवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न! पथ्य पाळले तर रोगच होत नाही हा माझा स्वतःचा अनूभव आहे. या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे. सर्वांनी आपआपल्या परीने हे काम केले तर सर्वांचाच फायदा आहे. मनापासुन धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आनन्दा 15/09/2014 - 11:55
या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे.
असहमत. कार्य असेल तर कारण असलेच पाहिजे, आणि कारण + कार्य असेल तर ते आजच्या वैज्ञानिक परिभाषेत मांडता आलेच पाहिजे असे माझे मत आहे. फक्त त्यासाठी संशोधनाची गरज असते. आणि ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञच करू शकतात. सर्वच शास्त्रांमध्ये अनेक नवीन संकल्पना येत असतात, जुन्या रद्द होत असतात. फक्त त्यासाठी गरज असते ती डोळे उघडे ठेवण्याची. एक साधे उदाहरण घेउ - तुमच्याकडे जर एखादा रक्तदाब वाढलेला रुग्ण आला, तर तुम्ही काय कराल? त्याला मॉडर्न मेडिसिन द्याल की आयुर्वेदिक चिकित्सा करत बसाल? शेवटी रुग्णाचे प्राण वाचणे महत्वाचे असते. त्यामुळे माझ्या दृष्टीने होलिस्टिक अप्रोच हाच योग्य आहे. आणिबाणीची स्थिती तुम्ही आयुरवेदाच्या सहाय्याने हाताळू शकाल असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का? माझ्यामते केवळ आधुनिक शास्त्रांना ही पारंपरिक शास्त्रे रिप्लेस करू शकत नाहीत, पण ही सारी शास्त्रे एकत्र येऊन नक्कीच चांगले फळ देउ शकतात, पण त्यासाठी गरज आहे ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ / अभ्यासकांनी आपले मेंटल बॅरिअर्स तोडण्याची. बाकी माझ्या या शास्त्राचा अनुभवांबद्दल नंतर लिहेनच.

सुबोध खरे 14/09/2014 - 14:56
(susceptibility - संवेदनशीलता) हे एक आधुनिक शास्त्रात मान्यता पावलेले तत्व आहे. उदा. दमट खोलीत गेल्यावर ज्या माणसाला दमा आहे त्याला लगेच धाप लागते आणि आपल्या सारक्या माणसाला काही त्रास होत नाही. किंवा आपण पाणी पुरी/ झणझणीत मिसळ खाल्ली तर काही होत नाही पण (अति) संवेदनशील माणसाना ताबडतोब लोटा परेड करावी लागते.( काही उष्ण प्रकृती माणसाना नुसत्या विचारानेच बहिर्दिशेची भावना होते. "समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. " नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो? आईच्या शरीराचे असंतुलन हा एक साधारण घेतलेला बचाव आहे पण आईला क्षयरोग/ कर्करोग असताना हि मुल उत्तम प्रकृतीचे असते हे कसे? वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. आपले शरीर संपूर्णपणे संतुलित असेल तर आपल्याला रोग होणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येईल काय? अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच. अगदी निरोगी माणूस असेल तरीही जर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाल्यास त्या माणसाला विषमज्वर(टाय फोईड) होणारच. तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.( अजीर्णामुळे ताप आला असेल तर गोष्ट वेगळी) उलट तापामुळे आपल्या शरीरात चयापचय रासायनिक क्रिया वाढल्याने( तापमान वाढले कि रासायनिक क्रिया वेगाने होतात हे अगदी बाळबोध रसायन शास्त्रातील तत्व आहे) आणि आपले शरीर गरम ठेवण्यास लागणारी उर्जा शरीरातून गेल्याने उलट अशक्तपणा येतो आणि अशात लंघन केल्यास अशक्तपणा भरून येण्यास जास्तच वेळ लागतो. माझ्या सारख्या बारीक प्रकृतीच्या माणसाना विचारून पहा लहानपणी तापामुळे अशक्तपणा आणि चक्कर कशी येत असे ते. बरेच लोक आपल्याला हा अनुभव सांगतील. पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे. पित्ताशय कोणताही तेलकट पदार्थ खाल्ला कि रिकामे होते. मी सोनोग्राफी मध्ये पित्ताशय काम करते कि नाही हे पाहण्यासाठी रुग्णाला दोन सामोसे किंवा बटाटे वाडे खाऊन येण्यास सांगतो आणि एक तासाने परत सोनोग्राफी केल्यावर पित्ताशय( काम करीत असेल तर)रिकामे झालेले दिसते. आपले विवेचन हे फारच जनरलायझेशन आहे. वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 14/09/2014 - 23:38
सुबोधसर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण एक एक गोष्टींचा विचार करू
नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो?
माझ्यामते आयुर्वेदामध्ये गर्भाधान + गर्भसंस्कार हा एक संपूर्ण वेगळा विभाग आहे, त्यामध्ये बहुधा यातल्या बर्‍याच गोष्टी असाव्यात. (म्हणजे बाळाला कर्करोग कश्यामुळे होतो असे नव्हे, पण ढोबळमानाने आईच्या आहारविहाराचा बाळावर काय परिणाम होतो वगैरे. ) बाकी - माणूस जन्माला येताना संतुलित प्रकृती घेऊन येतो असे आयुर्वेद कधीच म्हणत नाही. तसा आपला समज असल्यास कृपया दूर करावा. किंबहुना आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वीपासून पती पत्नींनी पाळायचे नियम आहेत, म्हणजेच केवळ स्त्रीच नव्हे, तर उत्तम संतती निर्माण होण्यात पुरूषबीजाचा देखील तेव्हढाच वाटा आहे हे आयुर्वेद मान्य करतो.
अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.
या गोष्टीबद्दल मी आता भष्य करू इच्छित नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या एव्हढेच म्हणतो ज्या वानरांपासून एडस संक्रमित झाला आहे त्यांच्यामध्ये या रोगासाठी प्रतिकारशक्ती आहे. (मी माकड आणि माणसांना एका पातळीवर आणत नाहिये, पण प्राणिजगतामध्ये एड्स हा अजेय आहे असे नाही. याविषयी सविस्तर मी शिवांबुबद्दल लिहिताना बोलेन.
तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.
यामागची भूमिका कळली नाही - लंघन म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे? लंघनामध्ये कडकडीत उपास करावा असे मला तरी कुठे ऐकलेले आठवत नाही. आम्हाला लण्घन म्हणजे कण्हेरी/ भाताची पेज देत असत. त्यामागची भूमिका स्पष्ट आहे - तापामुळे इतर सार्‍या शरीरयंत्रणांबरोबर अग्नी पण मंद झालेला असतो. अश्या वेळी जडान्न घेऊन उगीचच त्यवर्‍ आणखी भार टाकणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्याऐवजी हलका/ सुपाच्य पण पुरेश्या क्यालरीझ देणारा आहार असावा अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. अर्थात विषमज्वरासारख्या काही आजारांमध्ये मात्र रुग्णाला केवळ पेय पदार्थांवरच ठेवले जाते बहुधा. पण ते मला नक्की माहीत नाही, त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन टाळतो. आणि महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रतिजैविके घेत असाल, तर तुम्ही लंघन करणे मुळीच अपेक्षित नाही, कारण (१)जड आहारामुळे जे जीवाणुजन्य रोग होऊ शकतात, ते प्रतिजैविके चालू असताना होउ शकत नाहीत. (२)प्रतिजैविकांमुळे जंतूंबरोबर शरीरातील इतर पेशी देखील मरत असतात. त्यामुळे जर तुम्ही काहीच खाल्ले नाही, तर शरीरावर कल्पनातीत लोड येउ शकतो, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे काही औषधे अशी देखील आहेत की जी केवळ खाल्यावरच घ्यायची असतात.
पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
याबाबतीत मला पुरेसे ज्ञान नाही, मिपावरील जाणकारांच्या प्रतीक्षेत. कदाचित शारीरशास्त्रातील पित्तशय आणि आयुर्वेदानुसार पित्ताशय या दोन वेगळ्या एंटिटी असतील. बाकी -
वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.
याच्यामागचा हेतू समजू शकलो नाही. तसा सूर माझ्या लेखातून ध्वनित होत असल्यास क्षमस्व. एका लेखात डोक्टर होता येईल एव्हढे वैद्यकशास्त्र नक्कीच सोपे नाही, नाहीतर मी नोकरी सोडून मेडिकल प्रॅक्टिसच नसती का सुरू केली? या लेखामागचा माझा हेतू मॉडर्न मेडिसीन वगळता इतर समांतर चिकित्सापद्धतींची थोडक्यात तोंडओळख करून देणे, त्यांचे पायाभूत तत्वज्ञान (जसे आणि जेव्हढे मला समजले आहे तसे आणि तेव्हढे) लोकांपर्यंत पोचवणे, आणि या सर्व चिकित्सप्रणालींच्या अभ्यास/ संशोधनासाठी शक्य झाल्यास थोडी उत्सुकता निर्माण करणे इतकाच आहे. कोणाला आयुर्वेद शिकवणे, किंवा माझी जाहिरात करणे हा नाही. (कारण मुळात मी डॉक्टरच नाही, आणि ते मी वर स्पष्ट लिहिले आहे.) त्यामुळे तुमची पर्सनल वाक्ये मला लागू होत नाहीत असे समजतो. या चिकित्साप्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत. बाकी या क्षेत्रात असणर्‍या समस्यांविषयी पुढे सविस्तर लिहेनच, त्यामुळे आता इथेच थांबतो.

बाबा पाटील 15/09/2014 - 13:14
खुपच चांगला आढावा घेतला आहे. वाचकांना विनंती कृपया दोन्ही शास्त्रांची चुकीची तुलना करु नका,विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते. तसेच पुर्वीच सांगितल्या प्रमाणे कृपया आयुर्वेदाला एलोपॅथीची चड्डी घालु नका.पहिला आयुर्वेद समजावुन घ्या मग विवेचन अथवा टीका करा.

In reply to by बाबा पाटील

आनन्दा 15/09/2014 - 13:57
विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते.
सुधारणेसाठी धन्यवाद.

प्रसाद१९७१ 15/09/2014 - 13:14
कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत.
@ आनंदा - हे तुम्ही बरे केलेले आजार काहीही उपचार न करता बरे होणारे होते का हे आधी तपासुन बघितलेत का? सर्वसामान्य पणे होणारे आजार ( सर्दी, ताप, खोकला, अपचन ) काही विषेश उपचार नाही केले तरी बरे होतातच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 15/09/2014 - 14:28
मोडर्न मेडिसिन न वापरता पण मलेरिया झालेला कळू शकतो. फक्त त्यासाठी पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 15/09/2014 - 14:51
पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.>> ह्या टेस्ट हा मॉडर्न मेडीसीन चा भाग आहे. समांतर पॅथी वाल्यांनी असल्या टेस्ट तरी कशाला कराव्यात आणि मलेरीया वगैरे शब्द वापरणे सुद्धा तात्विक दृष्ट्या चूक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 15/09/2014 - 16:12
हो खरे म्हणजे जायची गरज नव्हती. पण मी पुण्यात, आणि आमचे डॉ. कोकणात, अशी स्थिती असल्यामुळे जाऊन बघून आलो. रच्याकने, टेस्ट हा मोडर्न मेडिसिनचा भाग नाही, मॉडर्न चिकित्सेचा भाग आहे. पण असो. बाकी अवांतर - मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला. हवे तर मी वर काय लिहिलेले आहे ते वाचा. प्रत्येकाला आपल्या मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या मर्यादेपलिकडे जे काही आहे तेथे दुसरी चिकित्सापद्धती जर काही काम करत असेल तर पूर्वग्रहमुक्त दृष्टीकोनातून त्याचादेखील अभ्यास व्हावा. आणि केवळ परिणामांना मोडर्न सायन्सेसच्या परिभाषेत न बसवता त्या तत्वज्ञानाचा देखील अभ्यास व्हावा, त्या तत्वज्ञानातून देखील काही मिळतेय का ते पहावे असा माझा हेतू आहे. कारण मी अनेक आजार या समांतर चिकित्सेने बरे होताना पाहिले आहेत.

In reply to by आनन्दा

मराठी_माणूस 18/12/2014 - 15:30
मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला.
अतिशय समर्पक प्रतिसाद. (अवांतरःआज पर्यंत अशा चर्चां मधे मोडर्न मेडिसिनवाल्यांचे प्रतिसाद बघता "अभिनिवेश" ह्या श्ब्दाला "आक्रस्ताळेपणा" हा शब्द सुचवावासा वाटतो.

सुहास.. 15/09/2014 - 20:30
माहीतीपर लेख आवडला , बाबा पाटलांच्या सुचनेला अनुमोदन ! पहिलाच भाग आहे दुसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत सुपाच्य = याचा अर्थ काय ? मेडिसिन पेक्षा पथ्य पाळण्यावर विश्वास असलेला . वाश्या

वेल्लाभट 14/12/2014 - 14:06
वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास काय उपाय करावा? पित्त अंगावर उठते, खाज सुटते, चेहरा, ओठ सुजल्यासारखे होतात. विशेष एक काही खाल्याने नाही. कधीही. मग ते थांबेस्तोवर नाकी नऊ येतात. शेवटी इन्सिडाल किंवा तत्सम गोळ्यांनी आवर बसतो. ज्यांना माहित आहेत त्यांनी कृपया यावर उपाय सुचवावेत अशी विनंती.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 14/12/2014 - 17:05
भरपूर पाणी प्यावे....दारू वर्ज्य...पित्ताला साबण लावून धुवावे...मन आवडत्या गोष्टींत रमवावे माझ्यासाठी हा उपाय काम करतो

In reply to by वेल्लाभट

पैसा 14/12/2014 - 20:17
मला वाटतं ही अ‍ॅलर्जी असावी. ती काही खाल्ल्यामुळे येते असं नाही. कपडे, सेंट, पावडर, क्रीम्स, हवेतली धूळ, परागकण, डास/कीटक चावल्यामुळे किंवा हवेत अचानक झालेला बदल यामुळे असं होऊ शकतं. माझ्या एका मैत्रिणीला थंडी पडली की असा पित्त उठण्याचा त्रास व्हायचा. सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे राहिले की आपोआप या पित्ताच्या गांधी निघून जायच्या. आमसुले या गांधींवर चोळणे, आमसुले भिजत घालून त्याचे पाणी पिणे असे घरगुती उपाय यावर काही प्रमाणात उपयोगी पडतात. मात्र नेमकी कशामुळे अ‍ॅलर्जी आहे याचा शोध घेणे आणि ती बरी होण्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडून ट्रीटमेंट घेणे चांगले असे वाटते.

In reply to by पैसा

सविता००१ 16/12/2014 - 12:35
मला धुळीची, डास चावणे आणि काही वासांची अ‍ॅलर्जी आहे. मला तुझ्या मैत्रिणीला जसा त्रास व्हायचा तसाच होत असे. पण ती कळाली खूप उशीरा. म्हण्जे मी डॉ. कडे लगेच गेले होते. पण नाही कळू शकली लवकर. शेवटी डॉ. बदलले आणि लगेच निदान झालं. व्यवस्थित २ महिन्यांचा कोर्स घ्यावा लागला आणि आता जिथे धूळ, धुर असेल, डास असतील तिथे जाणे टाळणे हेच औषध.

In reply to by पैसा

बॅटमॅन 18/12/2014 - 16:13
एक अवांतर/अज्ञानी शंका. आमसुले आंबट, मग पित्ताला आंबट कसं काय चालतं बॉ? पित्त म्ह. अ‍ॅसिडिटी आणि आंबट म्हणजे अ‍ॅसिडवालेच पदार्थ. मग कसं काय शमतं ते?

In reply to by बॅटमॅन

पैसा 19/12/2014 - 12:14
कसं ते म्हैत नै. पण आमसुलाचे पाणी/सरबत, लिंबू सरबत प्यायले तर पित्त्/अ‍ॅसिडिटी कमी होते खरे. डॉक्टर्/वैद्य लोकांनी कृपया प्रकाष पाडावा ही विनंती.

In reply to by पैसा

आयुर्हित 20/12/2014 - 06:52
अजून एक प्रकार: मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या कांबळे/घोंगडीवर झोपल्यानेही काहीजणांचा पित्ताचा त्रास गेलेला मी पाहिला आहे. अशाच प्रकारे भरपूर गोष्टी/ उपचार पद्धती पूर्वापार सुरु आहेत. याला wisdom (what they dont teach you in medical college) म्हणायला हरकत नाही!

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट 18/12/2014 - 14:20
पैसा ताई, सविता००१, टका, प्यारे सगळ्यांचे धन्यवाद... आमसूल पाण्यात भिजवून सकाळी पिण्याचा उपाय चालू आहे सद्ध्या. आणि हो हा त्रास मला नाही. एका दुस-या व्यक्तीला आहे मी माहितीदाखल प्रश्न विचारला.

आयुर्हित 14/12/2014 - 14:18
सर्वप्रथम गोळ्या खाणे बंद करावे. आपण म्हणाल हा काय उपाय झाला? पण आता हा मार्ग अवलंबवावा लागला तर काय मार्ग उरतो ... त्या साठी व्य नि केलाय

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित 15/12/2014 - 11:44
एका धाग्याची लिंक, दुसऱ्या धाग्यातील संदर्भ भलत्याच (तिसऱ्या) धाग्यावर लिहिण्यापेक्षा मोठ्ठी विसंगती काय असु शकते? चालू द्या!

विलासराव 13/09/2014 - 13:29
आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे - ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं | ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं | बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे. मी तर आजही हाच उपाय करतो. त्याचा फायदा आजवर १००% झालाय.

आयुर्हित 14/09/2014 - 13:39
अतिशय सुंदर विवेचन! प्रत्येक माणसाला विचार करण्यास भाग पाडुन त्याला जाणकार बनवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न! पथ्य पाळले तर रोगच होत नाही हा माझा स्वतःचा अनूभव आहे. या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे. सर्वांनी आपआपल्या परीने हे काम केले तर सर्वांचाच फायदा आहे. मनापासुन धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आनन्दा 15/09/2014 - 11:55
या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे.
असहमत. कार्य असेल तर कारण असलेच पाहिजे, आणि कारण + कार्य असेल तर ते आजच्या वैज्ञानिक परिभाषेत मांडता आलेच पाहिजे असे माझे मत आहे. फक्त त्यासाठी संशोधनाची गरज असते. आणि ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञच करू शकतात. सर्वच शास्त्रांमध्ये अनेक नवीन संकल्पना येत असतात, जुन्या रद्द होत असतात. फक्त त्यासाठी गरज असते ती डोळे उघडे ठेवण्याची. एक साधे उदाहरण घेउ - तुमच्याकडे जर एखादा रक्तदाब वाढलेला रुग्ण आला, तर तुम्ही काय कराल? त्याला मॉडर्न मेडिसिन द्याल की आयुर्वेदिक चिकित्सा करत बसाल? शेवटी रुग्णाचे प्राण वाचणे महत्वाचे असते. त्यामुळे माझ्या दृष्टीने होलिस्टिक अप्रोच हाच योग्य आहे. आणिबाणीची स्थिती तुम्ही आयुरवेदाच्या सहाय्याने हाताळू शकाल असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का? माझ्यामते केवळ आधुनिक शास्त्रांना ही पारंपरिक शास्त्रे रिप्लेस करू शकत नाहीत, पण ही सारी शास्त्रे एकत्र येऊन नक्कीच चांगले फळ देउ शकतात, पण त्यासाठी गरज आहे ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ / अभ्यासकांनी आपले मेंटल बॅरिअर्स तोडण्याची. बाकी माझ्या या शास्त्राचा अनुभवांबद्दल नंतर लिहेनच.

सुबोध खरे 14/09/2014 - 14:56
(susceptibility - संवेदनशीलता) हे एक आधुनिक शास्त्रात मान्यता पावलेले तत्व आहे. उदा. दमट खोलीत गेल्यावर ज्या माणसाला दमा आहे त्याला लगेच धाप लागते आणि आपल्या सारक्या माणसाला काही त्रास होत नाही. किंवा आपण पाणी पुरी/ झणझणीत मिसळ खाल्ली तर काही होत नाही पण (अति) संवेदनशील माणसाना ताबडतोब लोटा परेड करावी लागते.( काही उष्ण प्रकृती माणसाना नुसत्या विचारानेच बहिर्दिशेची भावना होते. "समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. " नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो? आईच्या शरीराचे असंतुलन हा एक साधारण घेतलेला बचाव आहे पण आईला क्षयरोग/ कर्करोग असताना हि मुल उत्तम प्रकृतीचे असते हे कसे? वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. आपले शरीर संपूर्णपणे संतुलित असेल तर आपल्याला रोग होणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येईल काय? अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच. अगदी निरोगी माणूस असेल तरीही जर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाल्यास त्या माणसाला विषमज्वर(टाय फोईड) होणारच. तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.( अजीर्णामुळे ताप आला असेल तर गोष्ट वेगळी) उलट तापामुळे आपल्या शरीरात चयापचय रासायनिक क्रिया वाढल्याने( तापमान वाढले कि रासायनिक क्रिया वेगाने होतात हे अगदी बाळबोध रसायन शास्त्रातील तत्व आहे) आणि आपले शरीर गरम ठेवण्यास लागणारी उर्जा शरीरातून गेल्याने उलट अशक्तपणा येतो आणि अशात लंघन केल्यास अशक्तपणा भरून येण्यास जास्तच वेळ लागतो. माझ्या सारख्या बारीक प्रकृतीच्या माणसाना विचारून पहा लहानपणी तापामुळे अशक्तपणा आणि चक्कर कशी येत असे ते. बरेच लोक आपल्याला हा अनुभव सांगतील. पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे. पित्ताशय कोणताही तेलकट पदार्थ खाल्ला कि रिकामे होते. मी सोनोग्राफी मध्ये पित्ताशय काम करते कि नाही हे पाहण्यासाठी रुग्णाला दोन सामोसे किंवा बटाटे वाडे खाऊन येण्यास सांगतो आणि एक तासाने परत सोनोग्राफी केल्यावर पित्ताशय( काम करीत असेल तर)रिकामे झालेले दिसते. आपले विवेचन हे फारच जनरलायझेशन आहे. वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 14/09/2014 - 23:38
सुबोधसर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण एक एक गोष्टींचा विचार करू
नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो?
माझ्यामते आयुर्वेदामध्ये गर्भाधान + गर्भसंस्कार हा एक संपूर्ण वेगळा विभाग आहे, त्यामध्ये बहुधा यातल्या बर्‍याच गोष्टी असाव्यात. (म्हणजे बाळाला कर्करोग कश्यामुळे होतो असे नव्हे, पण ढोबळमानाने आईच्या आहारविहाराचा बाळावर काय परिणाम होतो वगैरे. ) बाकी - माणूस जन्माला येताना संतुलित प्रकृती घेऊन येतो असे आयुर्वेद कधीच म्हणत नाही. तसा आपला समज असल्यास कृपया दूर करावा. किंबहुना आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वीपासून पती पत्नींनी पाळायचे नियम आहेत, म्हणजेच केवळ स्त्रीच नव्हे, तर उत्तम संतती निर्माण होण्यात पुरूषबीजाचा देखील तेव्हढाच वाटा आहे हे आयुर्वेद मान्य करतो.
अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.
या गोष्टीबद्दल मी आता भष्य करू इच्छित नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या एव्हढेच म्हणतो ज्या वानरांपासून एडस संक्रमित झाला आहे त्यांच्यामध्ये या रोगासाठी प्रतिकारशक्ती आहे. (मी माकड आणि माणसांना एका पातळीवर आणत नाहिये, पण प्राणिजगतामध्ये एड्स हा अजेय आहे असे नाही. याविषयी सविस्तर मी शिवांबुबद्दल लिहिताना बोलेन.
तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.
यामागची भूमिका कळली नाही - लंघन म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे? लंघनामध्ये कडकडीत उपास करावा असे मला तरी कुठे ऐकलेले आठवत नाही. आम्हाला लण्घन म्हणजे कण्हेरी/ भाताची पेज देत असत. त्यामागची भूमिका स्पष्ट आहे - तापामुळे इतर सार्‍या शरीरयंत्रणांबरोबर अग्नी पण मंद झालेला असतो. अश्या वेळी जडान्न घेऊन उगीचच त्यवर्‍ आणखी भार टाकणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्याऐवजी हलका/ सुपाच्य पण पुरेश्या क्यालरीझ देणारा आहार असावा अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. अर्थात विषमज्वरासारख्या काही आजारांमध्ये मात्र रुग्णाला केवळ पेय पदार्थांवरच ठेवले जाते बहुधा. पण ते मला नक्की माहीत नाही, त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन टाळतो. आणि महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रतिजैविके घेत असाल, तर तुम्ही लंघन करणे मुळीच अपेक्षित नाही, कारण (१)जड आहारामुळे जे जीवाणुजन्य रोग होऊ शकतात, ते प्रतिजैविके चालू असताना होउ शकत नाहीत. (२)प्रतिजैविकांमुळे जंतूंबरोबर शरीरातील इतर पेशी देखील मरत असतात. त्यामुळे जर तुम्ही काहीच खाल्ले नाही, तर शरीरावर कल्पनातीत लोड येउ शकतो, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे काही औषधे अशी देखील आहेत की जी केवळ खाल्यावरच घ्यायची असतात.
पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
याबाबतीत मला पुरेसे ज्ञान नाही, मिपावरील जाणकारांच्या प्रतीक्षेत. कदाचित शारीरशास्त्रातील पित्तशय आणि आयुर्वेदानुसार पित्ताशय या दोन वेगळ्या एंटिटी असतील. बाकी -
वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.
याच्यामागचा हेतू समजू शकलो नाही. तसा सूर माझ्या लेखातून ध्वनित होत असल्यास क्षमस्व. एका लेखात डोक्टर होता येईल एव्हढे वैद्यकशास्त्र नक्कीच सोपे नाही, नाहीतर मी नोकरी सोडून मेडिकल प्रॅक्टिसच नसती का सुरू केली? या लेखामागचा माझा हेतू मॉडर्न मेडिसीन वगळता इतर समांतर चिकित्सापद्धतींची थोडक्यात तोंडओळख करून देणे, त्यांचे पायाभूत तत्वज्ञान (जसे आणि जेव्हढे मला समजले आहे तसे आणि तेव्हढे) लोकांपर्यंत पोचवणे, आणि या सर्व चिकित्सप्रणालींच्या अभ्यास/ संशोधनासाठी शक्य झाल्यास थोडी उत्सुकता निर्माण करणे इतकाच आहे. कोणाला आयुर्वेद शिकवणे, किंवा माझी जाहिरात करणे हा नाही. (कारण मुळात मी डॉक्टरच नाही, आणि ते मी वर स्पष्ट लिहिले आहे.) त्यामुळे तुमची पर्सनल वाक्ये मला लागू होत नाहीत असे समजतो. या चिकित्साप्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत. बाकी या क्षेत्रात असणर्‍या समस्यांविषयी पुढे सविस्तर लिहेनच, त्यामुळे आता इथेच थांबतो.

बाबा पाटील 15/09/2014 - 13:14
खुपच चांगला आढावा घेतला आहे. वाचकांना विनंती कृपया दोन्ही शास्त्रांची चुकीची तुलना करु नका,विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते. तसेच पुर्वीच सांगितल्या प्रमाणे कृपया आयुर्वेदाला एलोपॅथीची चड्डी घालु नका.पहिला आयुर्वेद समजावुन घ्या मग विवेचन अथवा टीका करा.

In reply to by बाबा पाटील

आनन्दा 15/09/2014 - 13:57
विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते.
सुधारणेसाठी धन्यवाद.

प्रसाद१९७१ 15/09/2014 - 13:14
कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत.
@ आनंदा - हे तुम्ही बरे केलेले आजार काहीही उपचार न करता बरे होणारे होते का हे आधी तपासुन बघितलेत का? सर्वसामान्य पणे होणारे आजार ( सर्दी, ताप, खोकला, अपचन ) काही विषेश उपचार नाही केले तरी बरे होतातच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 15/09/2014 - 14:28
मोडर्न मेडिसिन न वापरता पण मलेरिया झालेला कळू शकतो. फक्त त्यासाठी पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 15/09/2014 - 14:51
पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.>> ह्या टेस्ट हा मॉडर्न मेडीसीन चा भाग आहे. समांतर पॅथी वाल्यांनी असल्या टेस्ट तरी कशाला कराव्यात आणि मलेरीया वगैरे शब्द वापरणे सुद्धा तात्विक दृष्ट्या चूक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 15/09/2014 - 16:12
हो खरे म्हणजे जायची गरज नव्हती. पण मी पुण्यात, आणि आमचे डॉ. कोकणात, अशी स्थिती असल्यामुळे जाऊन बघून आलो. रच्याकने, टेस्ट हा मोडर्न मेडिसिनचा भाग नाही, मॉडर्न चिकित्सेचा भाग आहे. पण असो. बाकी अवांतर - मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला. हवे तर मी वर काय लिहिलेले आहे ते वाचा. प्रत्येकाला आपल्या मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या मर्यादेपलिकडे जे काही आहे तेथे दुसरी चिकित्सापद्धती जर काही काम करत असेल तर पूर्वग्रहमुक्त दृष्टीकोनातून त्याचादेखील अभ्यास व्हावा. आणि केवळ परिणामांना मोडर्न सायन्सेसच्या परिभाषेत न बसवता त्या तत्वज्ञानाचा देखील अभ्यास व्हावा, त्या तत्वज्ञानातून देखील काही मिळतेय का ते पहावे असा माझा हेतू आहे. कारण मी अनेक आजार या समांतर चिकित्सेने बरे होताना पाहिले आहेत.

In reply to by आनन्दा

मराठी_माणूस 18/12/2014 - 15:30
मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला.
अतिशय समर्पक प्रतिसाद. (अवांतरःआज पर्यंत अशा चर्चां मधे मोडर्न मेडिसिनवाल्यांचे प्रतिसाद बघता "अभिनिवेश" ह्या श्ब्दाला "आक्रस्ताळेपणा" हा शब्द सुचवावासा वाटतो.

सुहास.. 15/09/2014 - 20:30
माहीतीपर लेख आवडला , बाबा पाटलांच्या सुचनेला अनुमोदन ! पहिलाच भाग आहे दुसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत सुपाच्य = याचा अर्थ काय ? मेडिसिन पेक्षा पथ्य पाळण्यावर विश्वास असलेला . वाश्या

वेल्लाभट 14/12/2014 - 14:06
वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास काय उपाय करावा? पित्त अंगावर उठते, खाज सुटते, चेहरा, ओठ सुजल्यासारखे होतात. विशेष एक काही खाल्याने नाही. कधीही. मग ते थांबेस्तोवर नाकी नऊ येतात. शेवटी इन्सिडाल किंवा तत्सम गोळ्यांनी आवर बसतो. ज्यांना माहित आहेत त्यांनी कृपया यावर उपाय सुचवावेत अशी विनंती.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 14/12/2014 - 17:05
भरपूर पाणी प्यावे....दारू वर्ज्य...पित्ताला साबण लावून धुवावे...मन आवडत्या गोष्टींत रमवावे माझ्यासाठी हा उपाय काम करतो

In reply to by वेल्लाभट

पैसा 14/12/2014 - 20:17
मला वाटतं ही अ‍ॅलर्जी असावी. ती काही खाल्ल्यामुळे येते असं नाही. कपडे, सेंट, पावडर, क्रीम्स, हवेतली धूळ, परागकण, डास/कीटक चावल्यामुळे किंवा हवेत अचानक झालेला बदल यामुळे असं होऊ शकतं. माझ्या एका मैत्रिणीला थंडी पडली की असा पित्त उठण्याचा त्रास व्हायचा. सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे राहिले की आपोआप या पित्ताच्या गांधी निघून जायच्या. आमसुले या गांधींवर चोळणे, आमसुले भिजत घालून त्याचे पाणी पिणे असे घरगुती उपाय यावर काही प्रमाणात उपयोगी पडतात. मात्र नेमकी कशामुळे अ‍ॅलर्जी आहे याचा शोध घेणे आणि ती बरी होण्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडून ट्रीटमेंट घेणे चांगले असे वाटते.

In reply to by पैसा

सविता००१ 16/12/2014 - 12:35
मला धुळीची, डास चावणे आणि काही वासांची अ‍ॅलर्जी आहे. मला तुझ्या मैत्रिणीला जसा त्रास व्हायचा तसाच होत असे. पण ती कळाली खूप उशीरा. म्हण्जे मी डॉ. कडे लगेच गेले होते. पण नाही कळू शकली लवकर. शेवटी डॉ. बदलले आणि लगेच निदान झालं. व्यवस्थित २ महिन्यांचा कोर्स घ्यावा लागला आणि आता जिथे धूळ, धुर असेल, डास असतील तिथे जाणे टाळणे हेच औषध.

In reply to by पैसा

बॅटमॅन 18/12/2014 - 16:13
एक अवांतर/अज्ञानी शंका. आमसुले आंबट, मग पित्ताला आंबट कसं काय चालतं बॉ? पित्त म्ह. अ‍ॅसिडिटी आणि आंबट म्हणजे अ‍ॅसिडवालेच पदार्थ. मग कसं काय शमतं ते?

In reply to by बॅटमॅन

पैसा 19/12/2014 - 12:14
कसं ते म्हैत नै. पण आमसुलाचे पाणी/सरबत, लिंबू सरबत प्यायले तर पित्त्/अ‍ॅसिडिटी कमी होते खरे. डॉक्टर्/वैद्य लोकांनी कृपया प्रकाष पाडावा ही विनंती.

In reply to by पैसा

आयुर्हित 20/12/2014 - 06:52
अजून एक प्रकार: मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या कांबळे/घोंगडीवर झोपल्यानेही काहीजणांचा पित्ताचा त्रास गेलेला मी पाहिला आहे. अशाच प्रकारे भरपूर गोष्टी/ उपचार पद्धती पूर्वापार सुरु आहेत. याला wisdom (what they dont teach you in medical college) म्हणायला हरकत नाही!

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट 18/12/2014 - 14:20
पैसा ताई, सविता००१, टका, प्यारे सगळ्यांचे धन्यवाद... आमसूल पाण्यात भिजवून सकाळी पिण्याचा उपाय चालू आहे सद्ध्या. आणि हो हा त्रास मला नाही. एका दुस-या व्यक्तीला आहे मी माहितीदाखल प्रश्न विचारला.

आयुर्हित 14/12/2014 - 14:18
सर्वप्रथम गोळ्या खाणे बंद करावे. आपण म्हणाल हा काय उपाय झाला? पण आता हा मार्ग अवलंबवावा लागला तर काय मार्ग उरतो ... त्या साठी व्य नि केलाय

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित 15/12/2014 - 11:44
एका धाग्याची लिंक, दुसऱ्या धाग्यातील संदर्भ भलत्याच (तिसऱ्या) धाग्यावर लिहिण्यापेक्षा मोठ्ठी विसंगती काय असु शकते? चालू द्या!
लेखनप्रकार
सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा सर्वत्र ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली. प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू - आपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे.

गोष्ट लग्नाची

भिंगरी ·

खटपट्या 13/09/2014 - 14:17
(थोडे विषयांतर) मुलीला नोकरी असो किंवा नसो पण मुलाला नोकरी पाहिजेच. हा हट्ट का ? नोकरी वाली मुले बिना नोकरी वाल्या सुशिक्षित मुलीशी लग्न करतातच ना. मग एखाद्या नोकरी वाल्या मुलीने एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराबरोबर का लग्न करू नये ? हि समानता कधी येणार. नोकरीवाल्या मुलीना आपल्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. इथे स्त्रिया स्वत:च स्वत:ला कमी लेखत नाहीत का ?

In reply to by खटपट्या

उपास 14/09/2014 - 12:02
हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सुशिक्षित बेरोजगार मुलगा पूर्णवेळ घरकामाची, मुलांची काळजी घेईल (उनाडपणा, सिगरेटी फुंकणे आणि इतर फालतू पुरुषी अहंकार बाजूला ठेवून.. नवर्‍याची नोकरी सुटलेय आणि घरातील बाई नोकरी सांभाळून घरी येऊन पोळ्या लाटतेय, मुलांकडे वघते आणि तिएचे सुशिक्षित बेरोजगार नवरोबा मित्रांबरोबर चकाट्या पिटतायत हे चित्र बरेचदा बघायला मिळतेच.. ;)

फुंटी 14/09/2014 - 17:10
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच घिस्यापिट्या गोष्टींवर चर्चा करत राहणार??? नातेसंबंध ही व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते ..आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे...

In reply to by फुंटी

रवीराज 15/09/2014 - 00:21
"आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे"... उलट मी तर असे म्हणेन की आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे सुटसुटीत झाले आहे.त्यात आपलेपणा येणे आवश्यक आहे...एकत्र कुटुंब पद्धत संपली, पति-पत्नी दोघे कमविते त्यामुळे संतति नियमन,झाले तर एखादेच तेही उशिरा, त्यात सांभाळणेसाठी वेळेचा अभाव- पाळणाघरांची संख्या वाढत आहे, जे संस्कार आजी-आजोबा द्यायचे त्यासाठी आता वर्ग चालू झाले, एखाद्या मोठ्या कार्यासाठी पुर्वी मित्र मंडळी मदतीला तत्पर असायची, आता कोणाची गरजच नाही- डेकोरेटर्स, केटरर्स, पॅकर्स न मुवर्स, काय नाही ते सर्व मिळते पैसे टाकुन, जग जवळ आले माणसं दुर गेली भावनिक गुंतागुंत कमी झाली, वृद्धाश्रमे वाढली. अजुन किती सुटसुटितपणा पाहिजे? ( नम्र विनंती- कोणी व्यक्तीगतरित्या घेऊ नये.)

In reply to by रवीराज

फुंटी 15/09/2014 - 12:47
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली भावनिक गुंतागुंत कमी झाली याबाबत दुमत नाहीच.तुम्हाला अपेक्षित सुटसुटीतपणा हाच असेल तर तेही मान्य... भावनिक गुंतागुंत कमी झालेली असली तरी गुंतण्याची भावनांची वृत्ती दिशाहीन भरकटत चाललीय .गुंतण्याची ठिकाण बदलली आहेत.सोशल नेट्वर्किंग चा मोठा प्रभाव भावजीवनावर पडला आहे.सोशल नेट्वर्किंग वर पोसलेली पिढी अजूनही या बाबत स्पष्ट विचार मांडू शकत नाही.गे,लेस्बियन रिलेशनशिप हे वास्तव होत आहे.वयाच्या तिशीनंतर /चाळीशीनंतर सोशल नेट्वर्किंग वापरणारी मंडळी या सगळ्यापासून काही प्रमाणात दूर आहे . तेव्हा समूहजीवन गुंतागुंतीचे झालंय हेही तेवढच सत्य आहे.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 23:51
गुंतवणूक कमी होतेय >> हे नीटस समजल नाही. लग्न करण्यातली म्हणजे लग्नाच्या खर्चाबद्दल बोलताय का? कि तुमचा रोख निष्ठेकडे आहे?

In reply to by फुंटी

कवितानागेश 16/09/2014 - 00:26
खर्चाबद्दल नाही. भावनिक गुंतवणूक आणि परस्पर संबंधातली गुंतागुंत या बद्दल बोलतेय. हल्ली गुन्ता वाढलाय.

In reply to by कवितानागेश

फुंटी 16/09/2014 - 00:38
गुंता वाढला आहे .तरुणाई भावनिक द्विधा अवस्थेत सापडली आहे.एकीकडे आजूबाजूच्या माणसांकडून,कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि दुसरीकडे सोशल नेट्वर्किंग चा मारा ...कस वागलेल चालेल आणि कस नाही याबद्दल प्रत्येक घराचे अदृश्य संस्कार असतात,त्याच्याशी सोशल समूहजीवन कम्पेअर केल जात त्यातून मानवी स्वभाव बनत जातो.पुरेसा संवाद होत नाही.परिणामी गुंतागुंत वाढत जाते...सरसकट बोलण योग्य नाही कारण व्यक्तीनुसार अवस्था बदलतात.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 12:34
लग्नाबद्दल फारशी उत्सुक नसलेली आजची पिढी आहे....जे काही उत्सुक असतात त्यांची उत्सुकता किती काळ टिकते हाही संशोधनाचा विषय आहे.

शिद 15/09/2014 - 02:47
२०११ ची गोष्ट असेल. माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन: १) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं. २) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. ३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम). ४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर). ५) अश्या बर्‍याच विचित्र मागण्या असण्यार्‍या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या. बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा. त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.

In reply to by शिद

खटपट्या 15/09/2014 - 09:10
अहो हे तर काहीच नाही. माझ्या एका मिपा मित्राला बघायला मुलीचे वडील येणार होते. मित्र घोडबंदर ला राहतो. मुलीच्या वडिलांनी स्टेशन ला रिक्षा पकडली आणि प्रवास चालू झाल्यावर लक्षात आले कि घोडबंदर स्टेशन पासून बरेच दूर आहे. याच कारणास्तव मुलाच्या घरी न जाता अर्ध्या वाटेतून परत फिरले. मुलगा बघायला आले होते कि घर ? ठीक आहे घर लांब असेल, मुलगा तर बघून घ्या. दादर परळ मध्ये राहणाऱ्या मुली तर ठाण्याच्या पुढचे स्थळ पहायला तयार नसतात. मी माझ्या चुलत भावाची लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. बोरीवलीला. मुलीच्या वडिलांनी विचारले कि तुम्ही कुठे राहता. मी सांगतिले कळव्याला राहतो. तर त्यांचे उद्गार "हो कळव्याला सुद्धा लोक राहायला लागले आहेत आज काल !!" असे वाटले होते कि लगेच उठून यावे. म्हणजे सेन्ट्रल ला जे राहतात ती माणसेच नाहीत.

In reply to by शिद

काळा पहाड 16/09/2014 - 00:43
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या फक्त प्रॉबॅशन बेसिस वर लग्न करायचा विचार आहे. पर्फोर्मन्स पाहून पर्मनंट लग्नाचा विचार करण्या येईल.

हरकाम्या 15/09/2014 - 23:55
मी "शिद " व "खटपट्या " यान्च्या मताशी सहमत आहे. मी सध्या माझ्या मुलासाठी वधुसन्शोधन करीत आहे मला तर फार विचित्र अनुभव येत आहेत. १) आपण मुलीच्या वडिलांना स्वत फोन केल्यास त्यांनी मरगळलेल्या आवाजात उत्तर देणे. २) फोन केल्यानन्तर आपण वरावर उपकार करतो आहोत या भावनेने उत्तरे देणे ३) मुलगी १० वी पास असली तरी तिला ४०,०००रु. पगाराचा नवरा पाहिजे. ४) मुलीच्या आईने विचारणे " लग्नानन्तर मुलगा व मुलगी वेगळे रहातील का? ५) हा शेवटचा अनुभव भयानक होता. मी मुलीच्या वडीलांना फोन केला. त्यांनी सांगितले मी सध्या गाडी चालवतोय १० मिनिटांनी फोन करा मी १५ मिनिटांनी फोन करुन माझ्या मुलाची व घराची सर्व माहिती दिली व विचारले की तुमच्या जावयासम्बम्धी काय अपेक्षा आहेत ? पलीकडुन उत्तर आले " आम्हाला आमचा जावयी "Don " पाहिजे. मला वाटले हे फार विनोदी दिसतात. म्हणुन मी परत विचारले म्हणजे नेमके काय ? त्या माणसाने ग्राम्य भाशेत शिवी देउन विचारले " तुला दाऊद ईब्राहिम " माहित नाही कारे **** ?. त्याने उच्चारलेले शब्द येथे लिहिण्यासारखे नाहीत. त्या दिवसानन्तर मी ५/६ दिवस बेचैन होतो. मला फोन वाजला तरी फोन उचलण्याची भीती वाटत होती. आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.

In reply to by फुंटी

मी तर म्हणेन अश्या माणसांची बिनपाण्याने हजामत करावी आणि आपल्या मुलाचे लग्न अश्या घरातल्या मुलीशी होण्याची आपत्ती टळली म्हणून खूषीत पार्टी करावी... जमल्यास याच कारणासाठी पार्टी केली होती हे त्यांनाही सांगावे.

In reply to by हरकाम्या

काळा पहाड 16/09/2014 - 00:37
आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.
याच्या उत्तरासाठी एक विनोदी ऑडियो (व्हाट्सअ‍ॅप वर आलेला) अपलोड करायचा होता. कसा करावा?

In reply to by हरकाम्या

रेवती 16/09/2014 - 19:16
पूर्वी असे आणि याहून वाईट अनुभव मुलीकडल्यांना सर्रास यायचे (अजूनही लहान गावांमध्ये येतात). आता समानतेचा जमाना आल्याने मुलांनाही येतात. बरे झाले तुम्ही सुटलात. पाच सहा दिवसांची बेचैनी परवडली, नंतरची उस्तवारी करण्यापेक्षा! अशा लोकांचा यथायोग्य सत्कार करायला हवा. कसला अनुभव आहे! श्श्या!

In reply to by हरकाम्या

साती 20/09/2014 - 19:48
बहुते़क तुमचा एकाच माणसाला दोनदा राँग नंबर लागला असेल. तो तुम्हाला पकवत असेल.

कवितानागेश 16/09/2014 - 00:33
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे. उगीच भलत्या ठिकाणी आपण सिन्सिअरली आपली माहिती सांगत बसणं धोक्याचं आहे. त्यातून तिथे माहिती म्हणून जे काही लिहितात ते, इतके त्रोटक असतं, म्हणजे रंग, उन्ची, डिग्री, पगार इतकाच लिमिटेड माणूस कळतो. एका मंडळात ४ इन्च रुन्दीचे आणि १० इन्च लांबीची वही पाहिलिये, त्यात एका पानावर एका व्यक्तीची अशीच त्रोटक, अर्धवट माहिती लिहिलेली असते. काही मंडळांमध्ये मात्र ५-५ पानी फॉर्म्स पाहिलेत.

तिमा 16/09/2014 - 16:24
आधी परिचय नसेल तर लग्न ही १००ट्क्के लॉटरी आहे.

In reply to by तिमा

आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. (आणि 'ती (लॉटरी) नेहमी दुसर्‍यालाच लागली आहे' असे जन्मभर वाटत राहते).

In reply to by प्रभाकर पेठकर

विलासराव 20/09/2014 - 15:53
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. जुगार आवडत नाही म्हणुनच आपण खेळ्लो नाही बॉ.

इस्लाममधील विवाहसंस्था ही हिंदु (आणि हिंदु विवाहकायद्याखाली येणार्‍या इतरधर्मातील) विवाह संस्थांपेक्षा कैकपटीने चांगली आहे असे आमचे एक स्पष्ट मत आहे . :)

खबो जाप 20/09/2014 - 14:44
माझे काही अनुभव ( मी स्वत BE telecom , पगार ५५ ह. नोकरी चेन्नई मध्ये, घरकामात जमेल तशी मदत करायला तयार ) १ . मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी म्हंटले लहान असताना शेतीकाम केले आहे, गेली १० वर्ष शिक्षण/नोकरी साठी बाहेर आहे त्यामुळे मला स्वताला काही ज्यास्त कळत नाही आणि मी काही मागणार नाही. तुमच्या मुलीला शेतीतले काय काय येते, किंमान बांधावर उभारून काय चालू आहे ते पाहता येईल काय -- मुलगीला काही माहित नाही / येत नाही. २ मुलगी (BE सिविल ) - लग्नानंतर वेगळे राहावे लागेल,पुण्यातच नोकरी शोधून शिफ्ट व्हावे. नोकरी करायची इच्छा नाही. ३ मुलगी ( BE इलेक्ट्रिक नुकतीच पूर्ण ) - आईचा प्रश्न माझी मुलगी खूप मोडर्ण आहे, तीचे खूप बॉय फ्रेंड्स आहेत ( त्यांना ऑफिस मधले पुरुष सहकारी म्हणायचे होते ), त्यांचे फोन सुट्टीच्या/सणाच्या दिवशी वेगेरे येतात त्याला आक्षेप नसावा , खरेतर त्यांना आपण किती मोडर्ण आहोत ते सांगायचे होते. आणखी सेम; वेगळे राहावे लागेल, पुण्यात नोकरी ४. मुलगी (BE सिविल इन्तेरेरिअर देकॉरेतर ) नोकरी करायची इच्छा नाही.माझ्याबद्दल काहीच विचारले नाही पण आमचे हे पाहुणे आमदारांचे पीए आहेत दुसरे पाहुणे संचालक आहेत … नुसता वैताग …। ५ मुलगी ( MBA मुंबई मध्ये नोकरी ) - सगळे मान्य, होकार सांगितला , नंतर अचानक मुलगा चेन्नई मध्ये आहे , पुण्यात किव्हा मुंबई मध्ये शिफ्ट होत असेल तर लग्न करू असा निरोप पाठवला, आयला नोकरी बदलन काय खाऊ आहे … कमीत कमी ८-१० महिने तर लागतात पण लगेच पाहिजे एकीने तर कहरच केला स्वतः MBA, नोकरी करायची नाही पण, onsite जातो तर फक्त US वालीच onsite घ्यायची आणि स्वतःला पण बरोबर घेवून जाव लागेल अशी अट दुसरी US मध्ये कायमचा सेटल मुलगा पाहिजे पण स्वतः डिप्लोमा धारक.

In reply to by खबो जाप

विलासराव 20/09/2014 - 16:26
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी नुकतीच माझ्या चुलतभावासाठी पंढरपुरजवळ एक मुलगी पाहिली. मुलगी बीफार्मच्या तिसर्या वर्षाला. वडील नाहीत. थोडीशी शेती आहे, दोन लहान भाउ आहेत्,मोठ्या बहिनीचे लग्न झाले आहे. शिक्षणाची फी मामा लोक भरतात. घर अगदी साधं पण मुलगी सुंदर. माझा भाउ आठवी पास, दिसायला बरा, गावी त्यानेच घर बांधलेय, जमीन अडीच एकर, बहीणी दोन मोठ्या लग्न झालेल्या. आई-वडील गावी. हा माझ्याबरोबर लालबागला रहातो. स्वकमाईची विक्रोळीला चाळीत रुम आहे, खारघरला प्लॅट घ्यायचा आहे ( सगळी तयारी झालीय, लोण फक्त १५ लाख घेणार), कमाई ७५ के. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय आहे.कुठलेही व्यसन नाही, कामाचे सोडुन. आम्ही जाउन मुलगी पाहीली. मी लगेच होकार सांगीतला, कारण मध्यस्थी माझा मित्र आहे. नंतर महिन्याने ते लोक आमच्या गावी जाउन आले. पसंत आहे असेही सांगीतले. पण परत काय फोन नाही २ महीने झाले. मध्यस्थीही मौन बाळगुन आहे. त्याला म्हणालो की बाबारे त्यांचा नकार असेल तर तसे सांग , कारणही सांगण्याची गरज नाही. पण तो म्हणतो मी त्यांना विचारले १-२ दा, आता आपण वाट पाहु. आता आणखी किती वाट पहायची. मुलाचे वय २७ आहे. मी नकार धरुनच चाल्लोय. त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही माहीती हवी ती देतो, कागदपत्रे दाखवतो.आता काय करावे ते सुचवा. भावाला सांगीतले की बाबा दहा वर्षापासुन इतके ऑफीसमधे फिरतोस साल्या तुला एक पोरगी पटवता येउ नये. पोरगी तु पटव बाकी लग्न मी लावुन देतो. त्याला काही जमेना बुवा. कालच आमच्या ब्राझीलच्या मैत्रीणिला हे सांगीतले तर ती म्हणाली त्याला ब्राझीलला पाठवुन दे , मी एकच काय दोन मुली पाहुन लग्न लावुन परत भारतात पाठवुन देते. खरोखर दिलेली माहीती पुर्ण खरी आहे, मिपावर देखील कोणी याच्यासाठी मुलगी सुचवेल तर माझी काहीच हरकत नाही. मुलीला मुंबईत रहावे लागेल. नोकरी केली तरी चालेल, नसेल तर त्याच्याच व्यवसायात घरुन / ऑफीसला येउन हातभार लावु शकेल.मुलगी स्वभावने चांगली(मनमीळावु) असावी. रजीस्टर लगन केले तर बरे पडेल. देण्याघेण्याची भानगड नाही. या निमीत्ताने मिपावर स्वयंवरही होउन जाउद्या मग. अट एकच ईथे जमले तर सगळ्या मिपाकरांनी कुठलेही कारण न सांगता लग्नाला यायच बरं का.

भिंगरी 20/09/2014 - 15:42
माझ्या मुलाच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्या आधी तो मुलीला घरच्यांच्या परवानगीने हॉटेलमध्ये भेटला. जाताना हाफ टी शर्ट घालुन गेला होता. कारण त्याच्या अंगावर खुपच केस आहेत्.आणि त्याने हे लपवले नाही.त्यानंतर साधारण २५ दिवसांनी साखरपुडा झाला. मात्र साखरपुडा झाल्यानंतर १५/२० दिवसांनी मुलीने नकार दिला.मुलाकडच्यांनी तिला व तिच्या घरच्यांना विचार करायला काही दिवसांची मुदतही दिली पण मुलीने ठामपणे नाही सांगीतले. कारण एकच, मुलाच्या अंगावर केस आहेत. आधी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती का? मुलगा बिचारा अतिशय भोळा आहे. तिच्या घरच्यांनी मुलाच्या घरी साखरपुड्यात दिलेल्या वस्तू आणून दिल्यापासुन मुलाच्या आईचा रक्तदाब वाढला आहे.

In reply to by भिंगरी

प्यारे१ 22/09/2014 - 16:00
मुलीनं आपल्या पार्लरच्या खर्चात नवर्‍याच्या खर्चाचं शेअरींग करावं लागेल असा दूर विचार केला असावा. किंवा तिच्या लक्षात कुणी आणून दिलं असावं. होत्ताय होत्ताय! साखरपुड्यातल्या वस्तू परत दिल्यानं आईचा रक्तदाब नॉर्मलला यायला हरकत नव्हती. नाहीतर लग्न नाही ते नाही आणि वस्तूही लंपास असं बर्‍याचदा दिसतं. बाकी 'बिचारा अतिशय भोळा असणं' मुलाकडून नकार गेल्यानंतर (वाक्याचं) लिंग बदलून मुलीकडं गेलं असतं हे नक्की. :)

माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा ऐका. मुलगी पुण्यातल्या एका नावाजलेल्या ईंजिनिअरींग कॉलेजमधे प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे आणि पी.एच.डी. करतीये आता. तिला पाहायला आलेला आलेला मुलगा फक्त डिप्लोमा झालेला, फक्त ९६ ९६ च्या आग्रहापाई तिनी त्याला बघायला होकार दिला. ह्या बाबाजीच्या मागण्या काय तर म्हणे लग्नानंतर नोकरी आणि शिक्षण बंद करायच. लग्नानंतर ४ वर्षाच्या आत २ बाळं हवीत (असेंब्ली लाईन आहे का ती? च्यायला, पाहण्याच्या कार्यक्रमात अश्या मागण्या कोण करत?). वरुन हुंडा-करणी-मानपानाच्या मागण्या. ह्या मुलीनी शिस्तीत उभं राहुन नकार दिला. =))

प्यारे१ 20/09/2014 - 17:15
@ रेवाक्का/ आज्जी, कुठंय तुमचं वधू वर सूचक मंडळ? च्यामारी एवढा 'खप' आहे तरी तुम्ही मागेच? मराठी माणसाला मार्केटींग करता येत नाही हेच खरं :-/

फुंटी 22/09/2014 - 16:09
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत अक्कल नसलेला मेंदू असतो असे माझे स्पष्ट मत आहे .आपल्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे याचा त्या अंदाज घेत असतात.'नवरा'या कल्पनेच्या विस्तारातून अवास्तव अपेक्षा वाढत जातात ...काहीठिकाणी त्या भलत्याच करमणूक करणाऱ्या असतात...त्यानुसार त्यांचे होकार नकार ठरत असतात.मुंबईत घर असणार स्थळ ,अपडाऊन ला सोयीच स्थळ , किमान ५०००० च्या वर पगार असलेल स्थळ,असल्या भौतिक सुखाच्या मागण्या असलेल्या पोरी काय कप्पाळ संसार करणार? त्यात हल्ली मुलीसोबत तिचे बेस्ट फ्रेंड (ती बिचारी बेस्ट फ्रेंड समजत असते.पुरुष स्त्रीशी आकर्षण विरहित बेस्ट फ्रेन्डशिप करू शकत नाही हेही माझ स्पष्ट मत.. ) वगैरे कोम्प्लीमेंटरी मिळतात ते वेगळे ... " भारतीय लग्नसंस्थेचा पाया प्रेम ,विश्वास या त्यागाच्या मुल्यांकडून भौतिक सुखांकडे सरकताना दिसतो आहे.हे लग्न्संस्थेच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे." हे मीच म्हटलेलं आहे....

दिपक.कुवेत 23/09/2014 - 12:30
तो मुलगी बघायला गेल्यावर प्रश्नोत्तरात ह्यानी तिला १०० प्रश्न विचारले. तिने फक्त ह्याला "तूला आईसक्रिम आवडतं का?" हा एकच प्रश्न विचारला आणि त्याचा होकार आल्यावर हिने लगेच होकार दिला. ट्चवूड अजून तरी ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

असंका 26/09/2014 - 13:39
मुलाने काय एवढे भारी प्रश्न विचारले , की त्या मुलीला काही प्रश्न न विचारताच त्या मुलाबद्द्ल सगळी आवश्यक माहिती मिळाली?

In reply to by असंका

"मुलगा फारच प्रश्नाळू (१०० प्रश्न ? बापरे !) आहे पण त्याला आवडणारी उत्तरे आपणे देऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडे आयस्क्रिम खावू घालण्याइतके पैसे आहेत आणि ते खाण्याची त्याला आवडही आहे." इतके मूलभूत ज्ञान झाल्यावर मुलीच्या अजून काही अपेक्षा उरल्या नसाव्या असा अंदाज आहे... ते सुखाने नांदतात यावरून तो अंदाज बरोबर आहे असेच दिसते.

किसन शिंदे 23/09/2014 - 21:29
लग्न करण्यासाठी आजकाल मुलींच्या मागण्या खूप वाढतच चालल्या आहेत याच्याशी मात्र १००% सहमत. बहुतेक ठिकाणी घरातल्या आई-वडीलांची विचारसरणी किंवा समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही मुलीच्या होकार किंवा नकारासाठी अवलंबून असतो हे आता अनुभवातून कळालंय. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून मेहूणीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू आहे. दोनदा 'मुलगा' दाखवूनही मी स्वत: तोंडावर पडलो आहे, कारण यांच्या(मेहूणीच्या आणि सासूच्या) अवास्तव अपेक्षा. शेवटी मेहूणीसाठी वरसंशोधन करण्याचा नाद कंटाळून सोडून दिलाय आता.

In reply to by किसन शिंदे

फुंटी 24/09/2014 - 23:14
मुलींना आई वडिलांच्या घरापेक्षा २ पावलं पुढे असलेलच सासर हव असत.स्वातंत्र्य, पैसा ,स्पेस वगैरे हवी असते हो आजकाल...आणि त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी ...म्यारेज इज अ डील ...

In reply to by फुंटी

सूड 25/09/2014 - 14:42
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी लग्न करायचंच नाही असं ठरवायचं? जमणार आहे? नाही ना, मग आल्या प्रसंगा सामोरे जावे, कसें?

In reply to by फुंटी

सूड 24/09/2014 - 23:27
आमच्या आधीच्या पिढीतल्या बायकांनीही संसार केले. अगदी घर, मुलंबाळं, नोकर्‍या सांभाळून!! आधीच्या काळात घेत असतील हुंडा, लेखत असतील मुलींना कमी, पण आता आलेली आर्थिक सक्षमता, स्वावलंबन ह्यामुळे आधी मुलींना जशी वागणूक दिली तशीच मुलीचे आईवडिल मुलांना देत असतील तर साफ चूक आहे.

In reply to by सूड

कवितानागेश 25/09/2014 - 21:27
बरीच वर्षे एका बाजूला असलेला लंबक आता दुसर्‍या बाजूला गेलाय... मध्य गाठायला वेळ लागणारच. तोपर्यंत सगळेच भरडले जाणार.

खटपट्या 13/09/2014 - 14:17
(थोडे विषयांतर) मुलीला नोकरी असो किंवा नसो पण मुलाला नोकरी पाहिजेच. हा हट्ट का ? नोकरी वाली मुले बिना नोकरी वाल्या सुशिक्षित मुलीशी लग्न करतातच ना. मग एखाद्या नोकरी वाल्या मुलीने एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराबरोबर का लग्न करू नये ? हि समानता कधी येणार. नोकरीवाल्या मुलीना आपल्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. इथे स्त्रिया स्वत:च स्वत:ला कमी लेखत नाहीत का ?

In reply to by खटपट्या

उपास 14/09/2014 - 12:02
हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सुशिक्षित बेरोजगार मुलगा पूर्णवेळ घरकामाची, मुलांची काळजी घेईल (उनाडपणा, सिगरेटी फुंकणे आणि इतर फालतू पुरुषी अहंकार बाजूला ठेवून.. नवर्‍याची नोकरी सुटलेय आणि घरातील बाई नोकरी सांभाळून घरी येऊन पोळ्या लाटतेय, मुलांकडे वघते आणि तिएचे सुशिक्षित बेरोजगार नवरोबा मित्रांबरोबर चकाट्या पिटतायत हे चित्र बरेचदा बघायला मिळतेच.. ;)

फुंटी 14/09/2014 - 17:10
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच घिस्यापिट्या गोष्टींवर चर्चा करत राहणार??? नातेसंबंध ही व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते ..आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे...

In reply to by फुंटी

रवीराज 15/09/2014 - 00:21
"आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे"... उलट मी तर असे म्हणेन की आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे सुटसुटीत झाले आहे.त्यात आपलेपणा येणे आवश्यक आहे...एकत्र कुटुंब पद्धत संपली, पति-पत्नी दोघे कमविते त्यामुळे संतति नियमन,झाले तर एखादेच तेही उशिरा, त्यात सांभाळणेसाठी वेळेचा अभाव- पाळणाघरांची संख्या वाढत आहे, जे संस्कार आजी-आजोबा द्यायचे त्यासाठी आता वर्ग चालू झाले, एखाद्या मोठ्या कार्यासाठी पुर्वी मित्र मंडळी मदतीला तत्पर असायची, आता कोणाची गरजच नाही- डेकोरेटर्स, केटरर्स, पॅकर्स न मुवर्स, काय नाही ते सर्व मिळते पैसे टाकुन, जग जवळ आले माणसं दुर गेली भावनिक गुंतागुंत कमी झाली, वृद्धाश्रमे वाढली. अजुन किती सुटसुटितपणा पाहिजे? ( नम्र विनंती- कोणी व्यक्तीगतरित्या घेऊ नये.)

In reply to by रवीराज

फुंटी 15/09/2014 - 12:47
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली भावनिक गुंतागुंत कमी झाली याबाबत दुमत नाहीच.तुम्हाला अपेक्षित सुटसुटीतपणा हाच असेल तर तेही मान्य... भावनिक गुंतागुंत कमी झालेली असली तरी गुंतण्याची भावनांची वृत्ती दिशाहीन भरकटत चाललीय .गुंतण्याची ठिकाण बदलली आहेत.सोशल नेट्वर्किंग चा मोठा प्रभाव भावजीवनावर पडला आहे.सोशल नेट्वर्किंग वर पोसलेली पिढी अजूनही या बाबत स्पष्ट विचार मांडू शकत नाही.गे,लेस्बियन रिलेशनशिप हे वास्तव होत आहे.वयाच्या तिशीनंतर /चाळीशीनंतर सोशल नेट्वर्किंग वापरणारी मंडळी या सगळ्यापासून काही प्रमाणात दूर आहे . तेव्हा समूहजीवन गुंतागुंतीचे झालंय हेही तेवढच सत्य आहे.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 23:51
गुंतवणूक कमी होतेय >> हे नीटस समजल नाही. लग्न करण्यातली म्हणजे लग्नाच्या खर्चाबद्दल बोलताय का? कि तुमचा रोख निष्ठेकडे आहे?

In reply to by फुंटी

कवितानागेश 16/09/2014 - 00:26
खर्चाबद्दल नाही. भावनिक गुंतवणूक आणि परस्पर संबंधातली गुंतागुंत या बद्दल बोलतेय. हल्ली गुन्ता वाढलाय.

In reply to by कवितानागेश

फुंटी 16/09/2014 - 00:38
गुंता वाढला आहे .तरुणाई भावनिक द्विधा अवस्थेत सापडली आहे.एकीकडे आजूबाजूच्या माणसांकडून,कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि दुसरीकडे सोशल नेट्वर्किंग चा मारा ...कस वागलेल चालेल आणि कस नाही याबद्दल प्रत्येक घराचे अदृश्य संस्कार असतात,त्याच्याशी सोशल समूहजीवन कम्पेअर केल जात त्यातून मानवी स्वभाव बनत जातो.पुरेसा संवाद होत नाही.परिणामी गुंतागुंत वाढत जाते...सरसकट बोलण योग्य नाही कारण व्यक्तीनुसार अवस्था बदलतात.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 12:34
लग्नाबद्दल फारशी उत्सुक नसलेली आजची पिढी आहे....जे काही उत्सुक असतात त्यांची उत्सुकता किती काळ टिकते हाही संशोधनाचा विषय आहे.

शिद 15/09/2014 - 02:47
२०११ ची गोष्ट असेल. माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन: १) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं. २) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. ३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम). ४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर). ५) अश्या बर्‍याच विचित्र मागण्या असण्यार्‍या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या. बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा. त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.

In reply to by शिद

खटपट्या 15/09/2014 - 09:10
अहो हे तर काहीच नाही. माझ्या एका मिपा मित्राला बघायला मुलीचे वडील येणार होते. मित्र घोडबंदर ला राहतो. मुलीच्या वडिलांनी स्टेशन ला रिक्षा पकडली आणि प्रवास चालू झाल्यावर लक्षात आले कि घोडबंदर स्टेशन पासून बरेच दूर आहे. याच कारणास्तव मुलाच्या घरी न जाता अर्ध्या वाटेतून परत फिरले. मुलगा बघायला आले होते कि घर ? ठीक आहे घर लांब असेल, मुलगा तर बघून घ्या. दादर परळ मध्ये राहणाऱ्या मुली तर ठाण्याच्या पुढचे स्थळ पहायला तयार नसतात. मी माझ्या चुलत भावाची लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. बोरीवलीला. मुलीच्या वडिलांनी विचारले कि तुम्ही कुठे राहता. मी सांगतिले कळव्याला राहतो. तर त्यांचे उद्गार "हो कळव्याला सुद्धा लोक राहायला लागले आहेत आज काल !!" असे वाटले होते कि लगेच उठून यावे. म्हणजे सेन्ट्रल ला जे राहतात ती माणसेच नाहीत.

In reply to by शिद

काळा पहाड 16/09/2014 - 00:43
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या फक्त प्रॉबॅशन बेसिस वर लग्न करायचा विचार आहे. पर्फोर्मन्स पाहून पर्मनंट लग्नाचा विचार करण्या येईल.

हरकाम्या 15/09/2014 - 23:55
मी "शिद " व "खटपट्या " यान्च्या मताशी सहमत आहे. मी सध्या माझ्या मुलासाठी वधुसन्शोधन करीत आहे मला तर फार विचित्र अनुभव येत आहेत. १) आपण मुलीच्या वडिलांना स्वत फोन केल्यास त्यांनी मरगळलेल्या आवाजात उत्तर देणे. २) फोन केल्यानन्तर आपण वरावर उपकार करतो आहोत या भावनेने उत्तरे देणे ३) मुलगी १० वी पास असली तरी तिला ४०,०००रु. पगाराचा नवरा पाहिजे. ४) मुलीच्या आईने विचारणे " लग्नानन्तर मुलगा व मुलगी वेगळे रहातील का? ५) हा शेवटचा अनुभव भयानक होता. मी मुलीच्या वडीलांना फोन केला. त्यांनी सांगितले मी सध्या गाडी चालवतोय १० मिनिटांनी फोन करा मी १५ मिनिटांनी फोन करुन माझ्या मुलाची व घराची सर्व माहिती दिली व विचारले की तुमच्या जावयासम्बम्धी काय अपेक्षा आहेत ? पलीकडुन उत्तर आले " आम्हाला आमचा जावयी "Don " पाहिजे. मला वाटले हे फार विनोदी दिसतात. म्हणुन मी परत विचारले म्हणजे नेमके काय ? त्या माणसाने ग्राम्य भाशेत शिवी देउन विचारले " तुला दाऊद ईब्राहिम " माहित नाही कारे **** ?. त्याने उच्चारलेले शब्द येथे लिहिण्यासारखे नाहीत. त्या दिवसानन्तर मी ५/६ दिवस बेचैन होतो. मला फोन वाजला तरी फोन उचलण्याची भीती वाटत होती. आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.

In reply to by फुंटी

मी तर म्हणेन अश्या माणसांची बिनपाण्याने हजामत करावी आणि आपल्या मुलाचे लग्न अश्या घरातल्या मुलीशी होण्याची आपत्ती टळली म्हणून खूषीत पार्टी करावी... जमल्यास याच कारणासाठी पार्टी केली होती हे त्यांनाही सांगावे.

In reply to by हरकाम्या

काळा पहाड 16/09/2014 - 00:37
आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.
याच्या उत्तरासाठी एक विनोदी ऑडियो (व्हाट्सअ‍ॅप वर आलेला) अपलोड करायचा होता. कसा करावा?

In reply to by हरकाम्या

रेवती 16/09/2014 - 19:16
पूर्वी असे आणि याहून वाईट अनुभव मुलीकडल्यांना सर्रास यायचे (अजूनही लहान गावांमध्ये येतात). आता समानतेचा जमाना आल्याने मुलांनाही येतात. बरे झाले तुम्ही सुटलात. पाच सहा दिवसांची बेचैनी परवडली, नंतरची उस्तवारी करण्यापेक्षा! अशा लोकांचा यथायोग्य सत्कार करायला हवा. कसला अनुभव आहे! श्श्या!

In reply to by हरकाम्या

साती 20/09/2014 - 19:48
बहुते़क तुमचा एकाच माणसाला दोनदा राँग नंबर लागला असेल. तो तुम्हाला पकवत असेल.

कवितानागेश 16/09/2014 - 00:33
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे. उगीच भलत्या ठिकाणी आपण सिन्सिअरली आपली माहिती सांगत बसणं धोक्याचं आहे. त्यातून तिथे माहिती म्हणून जे काही लिहितात ते, इतके त्रोटक असतं, म्हणजे रंग, उन्ची, डिग्री, पगार इतकाच लिमिटेड माणूस कळतो. एका मंडळात ४ इन्च रुन्दीचे आणि १० इन्च लांबीची वही पाहिलिये, त्यात एका पानावर एका व्यक्तीची अशीच त्रोटक, अर्धवट माहिती लिहिलेली असते. काही मंडळांमध्ये मात्र ५-५ पानी फॉर्म्स पाहिलेत.

तिमा 16/09/2014 - 16:24
आधी परिचय नसेल तर लग्न ही १००ट्क्के लॉटरी आहे.

In reply to by तिमा

आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. (आणि 'ती (लॉटरी) नेहमी दुसर्‍यालाच लागली आहे' असे जन्मभर वाटत राहते).

In reply to by प्रभाकर पेठकर

विलासराव 20/09/2014 - 15:53
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. जुगार आवडत नाही म्हणुनच आपण खेळ्लो नाही बॉ.

इस्लाममधील विवाहसंस्था ही हिंदु (आणि हिंदु विवाहकायद्याखाली येणार्‍या इतरधर्मातील) विवाह संस्थांपेक्षा कैकपटीने चांगली आहे असे आमचे एक स्पष्ट मत आहे . :)

खबो जाप 20/09/2014 - 14:44
माझे काही अनुभव ( मी स्वत BE telecom , पगार ५५ ह. नोकरी चेन्नई मध्ये, घरकामात जमेल तशी मदत करायला तयार ) १ . मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी म्हंटले लहान असताना शेतीकाम केले आहे, गेली १० वर्ष शिक्षण/नोकरी साठी बाहेर आहे त्यामुळे मला स्वताला काही ज्यास्त कळत नाही आणि मी काही मागणार नाही. तुमच्या मुलीला शेतीतले काय काय येते, किंमान बांधावर उभारून काय चालू आहे ते पाहता येईल काय -- मुलगीला काही माहित नाही / येत नाही. २ मुलगी (BE सिविल ) - लग्नानंतर वेगळे राहावे लागेल,पुण्यातच नोकरी शोधून शिफ्ट व्हावे. नोकरी करायची इच्छा नाही. ३ मुलगी ( BE इलेक्ट्रिक नुकतीच पूर्ण ) - आईचा प्रश्न माझी मुलगी खूप मोडर्ण आहे, तीचे खूप बॉय फ्रेंड्स आहेत ( त्यांना ऑफिस मधले पुरुष सहकारी म्हणायचे होते ), त्यांचे फोन सुट्टीच्या/सणाच्या दिवशी वेगेरे येतात त्याला आक्षेप नसावा , खरेतर त्यांना आपण किती मोडर्ण आहोत ते सांगायचे होते. आणखी सेम; वेगळे राहावे लागेल, पुण्यात नोकरी ४. मुलगी (BE सिविल इन्तेरेरिअर देकॉरेतर ) नोकरी करायची इच्छा नाही.माझ्याबद्दल काहीच विचारले नाही पण आमचे हे पाहुणे आमदारांचे पीए आहेत दुसरे पाहुणे संचालक आहेत … नुसता वैताग …। ५ मुलगी ( MBA मुंबई मध्ये नोकरी ) - सगळे मान्य, होकार सांगितला , नंतर अचानक मुलगा चेन्नई मध्ये आहे , पुण्यात किव्हा मुंबई मध्ये शिफ्ट होत असेल तर लग्न करू असा निरोप पाठवला, आयला नोकरी बदलन काय खाऊ आहे … कमीत कमी ८-१० महिने तर लागतात पण लगेच पाहिजे एकीने तर कहरच केला स्वतः MBA, नोकरी करायची नाही पण, onsite जातो तर फक्त US वालीच onsite घ्यायची आणि स्वतःला पण बरोबर घेवून जाव लागेल अशी अट दुसरी US मध्ये कायमचा सेटल मुलगा पाहिजे पण स्वतः डिप्लोमा धारक.

In reply to by खबो जाप

विलासराव 20/09/2014 - 16:26
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी नुकतीच माझ्या चुलतभावासाठी पंढरपुरजवळ एक मुलगी पाहिली. मुलगी बीफार्मच्या तिसर्या वर्षाला. वडील नाहीत. थोडीशी शेती आहे, दोन लहान भाउ आहेत्,मोठ्या बहिनीचे लग्न झाले आहे. शिक्षणाची फी मामा लोक भरतात. घर अगदी साधं पण मुलगी सुंदर. माझा भाउ आठवी पास, दिसायला बरा, गावी त्यानेच घर बांधलेय, जमीन अडीच एकर, बहीणी दोन मोठ्या लग्न झालेल्या. आई-वडील गावी. हा माझ्याबरोबर लालबागला रहातो. स्वकमाईची विक्रोळीला चाळीत रुम आहे, खारघरला प्लॅट घ्यायचा आहे ( सगळी तयारी झालीय, लोण फक्त १५ लाख घेणार), कमाई ७५ के. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय आहे.कुठलेही व्यसन नाही, कामाचे सोडुन. आम्ही जाउन मुलगी पाहीली. मी लगेच होकार सांगीतला, कारण मध्यस्थी माझा मित्र आहे. नंतर महिन्याने ते लोक आमच्या गावी जाउन आले. पसंत आहे असेही सांगीतले. पण परत काय फोन नाही २ महीने झाले. मध्यस्थीही मौन बाळगुन आहे. त्याला म्हणालो की बाबारे त्यांचा नकार असेल तर तसे सांग , कारणही सांगण्याची गरज नाही. पण तो म्हणतो मी त्यांना विचारले १-२ दा, आता आपण वाट पाहु. आता आणखी किती वाट पहायची. मुलाचे वय २७ आहे. मी नकार धरुनच चाल्लोय. त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही माहीती हवी ती देतो, कागदपत्रे दाखवतो.आता काय करावे ते सुचवा. भावाला सांगीतले की बाबा दहा वर्षापासुन इतके ऑफीसमधे फिरतोस साल्या तुला एक पोरगी पटवता येउ नये. पोरगी तु पटव बाकी लग्न मी लावुन देतो. त्याला काही जमेना बुवा. कालच आमच्या ब्राझीलच्या मैत्रीणिला हे सांगीतले तर ती म्हणाली त्याला ब्राझीलला पाठवुन दे , मी एकच काय दोन मुली पाहुन लग्न लावुन परत भारतात पाठवुन देते. खरोखर दिलेली माहीती पुर्ण खरी आहे, मिपावर देखील कोणी याच्यासाठी मुलगी सुचवेल तर माझी काहीच हरकत नाही. मुलीला मुंबईत रहावे लागेल. नोकरी केली तरी चालेल, नसेल तर त्याच्याच व्यवसायात घरुन / ऑफीसला येउन हातभार लावु शकेल.मुलगी स्वभावने चांगली(मनमीळावु) असावी. रजीस्टर लगन केले तर बरे पडेल. देण्याघेण्याची भानगड नाही. या निमीत्ताने मिपावर स्वयंवरही होउन जाउद्या मग. अट एकच ईथे जमले तर सगळ्या मिपाकरांनी कुठलेही कारण न सांगता लग्नाला यायच बरं का.

भिंगरी 20/09/2014 - 15:42
माझ्या मुलाच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्या आधी तो मुलीला घरच्यांच्या परवानगीने हॉटेलमध्ये भेटला. जाताना हाफ टी शर्ट घालुन गेला होता. कारण त्याच्या अंगावर खुपच केस आहेत्.आणि त्याने हे लपवले नाही.त्यानंतर साधारण २५ दिवसांनी साखरपुडा झाला. मात्र साखरपुडा झाल्यानंतर १५/२० दिवसांनी मुलीने नकार दिला.मुलाकडच्यांनी तिला व तिच्या घरच्यांना विचार करायला काही दिवसांची मुदतही दिली पण मुलीने ठामपणे नाही सांगीतले. कारण एकच, मुलाच्या अंगावर केस आहेत. आधी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती का? मुलगा बिचारा अतिशय भोळा आहे. तिच्या घरच्यांनी मुलाच्या घरी साखरपुड्यात दिलेल्या वस्तू आणून दिल्यापासुन मुलाच्या आईचा रक्तदाब वाढला आहे.

In reply to by भिंगरी

प्यारे१ 22/09/2014 - 16:00
मुलीनं आपल्या पार्लरच्या खर्चात नवर्‍याच्या खर्चाचं शेअरींग करावं लागेल असा दूर विचार केला असावा. किंवा तिच्या लक्षात कुणी आणून दिलं असावं. होत्ताय होत्ताय! साखरपुड्यातल्या वस्तू परत दिल्यानं आईचा रक्तदाब नॉर्मलला यायला हरकत नव्हती. नाहीतर लग्न नाही ते नाही आणि वस्तूही लंपास असं बर्‍याचदा दिसतं. बाकी 'बिचारा अतिशय भोळा असणं' मुलाकडून नकार गेल्यानंतर (वाक्याचं) लिंग बदलून मुलीकडं गेलं असतं हे नक्की. :)

माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा ऐका. मुलगी पुण्यातल्या एका नावाजलेल्या ईंजिनिअरींग कॉलेजमधे प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे आणि पी.एच.डी. करतीये आता. तिला पाहायला आलेला आलेला मुलगा फक्त डिप्लोमा झालेला, फक्त ९६ ९६ च्या आग्रहापाई तिनी त्याला बघायला होकार दिला. ह्या बाबाजीच्या मागण्या काय तर म्हणे लग्नानंतर नोकरी आणि शिक्षण बंद करायच. लग्नानंतर ४ वर्षाच्या आत २ बाळं हवीत (असेंब्ली लाईन आहे का ती? च्यायला, पाहण्याच्या कार्यक्रमात अश्या मागण्या कोण करत?). वरुन हुंडा-करणी-मानपानाच्या मागण्या. ह्या मुलीनी शिस्तीत उभं राहुन नकार दिला. =))

प्यारे१ 20/09/2014 - 17:15
@ रेवाक्का/ आज्जी, कुठंय तुमचं वधू वर सूचक मंडळ? च्यामारी एवढा 'खप' आहे तरी तुम्ही मागेच? मराठी माणसाला मार्केटींग करता येत नाही हेच खरं :-/

फुंटी 22/09/2014 - 16:09
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत अक्कल नसलेला मेंदू असतो असे माझे स्पष्ट मत आहे .आपल्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे याचा त्या अंदाज घेत असतात.'नवरा'या कल्पनेच्या विस्तारातून अवास्तव अपेक्षा वाढत जातात ...काहीठिकाणी त्या भलत्याच करमणूक करणाऱ्या असतात...त्यानुसार त्यांचे होकार नकार ठरत असतात.मुंबईत घर असणार स्थळ ,अपडाऊन ला सोयीच स्थळ , किमान ५०००० च्या वर पगार असलेल स्थळ,असल्या भौतिक सुखाच्या मागण्या असलेल्या पोरी काय कप्पाळ संसार करणार? त्यात हल्ली मुलीसोबत तिचे बेस्ट फ्रेंड (ती बिचारी बेस्ट फ्रेंड समजत असते.पुरुष स्त्रीशी आकर्षण विरहित बेस्ट फ्रेन्डशिप करू शकत नाही हेही माझ स्पष्ट मत.. ) वगैरे कोम्प्लीमेंटरी मिळतात ते वेगळे ... " भारतीय लग्नसंस्थेचा पाया प्रेम ,विश्वास या त्यागाच्या मुल्यांकडून भौतिक सुखांकडे सरकताना दिसतो आहे.हे लग्न्संस्थेच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे." हे मीच म्हटलेलं आहे....

दिपक.कुवेत 23/09/2014 - 12:30
तो मुलगी बघायला गेल्यावर प्रश्नोत्तरात ह्यानी तिला १०० प्रश्न विचारले. तिने फक्त ह्याला "तूला आईसक्रिम आवडतं का?" हा एकच प्रश्न विचारला आणि त्याचा होकार आल्यावर हिने लगेच होकार दिला. ट्चवूड अजून तरी ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

असंका 26/09/2014 - 13:39
मुलाने काय एवढे भारी प्रश्न विचारले , की त्या मुलीला काही प्रश्न न विचारताच त्या मुलाबद्द्ल सगळी आवश्यक माहिती मिळाली?

In reply to by असंका

"मुलगा फारच प्रश्नाळू (१०० प्रश्न ? बापरे !) आहे पण त्याला आवडणारी उत्तरे आपणे देऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडे आयस्क्रिम खावू घालण्याइतके पैसे आहेत आणि ते खाण्याची त्याला आवडही आहे." इतके मूलभूत ज्ञान झाल्यावर मुलीच्या अजून काही अपेक्षा उरल्या नसाव्या असा अंदाज आहे... ते सुखाने नांदतात यावरून तो अंदाज बरोबर आहे असेच दिसते.

किसन शिंदे 23/09/2014 - 21:29
लग्न करण्यासाठी आजकाल मुलींच्या मागण्या खूप वाढतच चालल्या आहेत याच्याशी मात्र १००% सहमत. बहुतेक ठिकाणी घरातल्या आई-वडीलांची विचारसरणी किंवा समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही मुलीच्या होकार किंवा नकारासाठी अवलंबून असतो हे आता अनुभवातून कळालंय. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून मेहूणीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू आहे. दोनदा 'मुलगा' दाखवूनही मी स्वत: तोंडावर पडलो आहे, कारण यांच्या(मेहूणीच्या आणि सासूच्या) अवास्तव अपेक्षा. शेवटी मेहूणीसाठी वरसंशोधन करण्याचा नाद कंटाळून सोडून दिलाय आता.

In reply to by किसन शिंदे

फुंटी 24/09/2014 - 23:14
मुलींना आई वडिलांच्या घरापेक्षा २ पावलं पुढे असलेलच सासर हव असत.स्वातंत्र्य, पैसा ,स्पेस वगैरे हवी असते हो आजकाल...आणि त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी ...म्यारेज इज अ डील ...

In reply to by फुंटी

सूड 25/09/2014 - 14:42
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी लग्न करायचंच नाही असं ठरवायचं? जमणार आहे? नाही ना, मग आल्या प्रसंगा सामोरे जावे, कसें?

In reply to by फुंटी

सूड 24/09/2014 - 23:27
आमच्या आधीच्या पिढीतल्या बायकांनीही संसार केले. अगदी घर, मुलंबाळं, नोकर्‍या सांभाळून!! आधीच्या काळात घेत असतील हुंडा, लेखत असतील मुलींना कमी, पण आता आलेली आर्थिक सक्षमता, स्वावलंबन ह्यामुळे आधी मुलींना जशी वागणूक दिली तशीच मुलीचे आईवडिल मुलांना देत असतील तर साफ चूक आहे.

In reply to by सूड

कवितानागेश 25/09/2014 - 21:27
बरीच वर्षे एका बाजूला असलेला लंबक आता दुसर्‍या बाजूला गेलाय... मध्य गाठायला वेळ लागणारच. तोपर्यंत सगळेच भरडले जाणार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत. याविषयावर अनेक चर्चाही होतात. पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.

सेव द डील्स डॉट इन

आयुर्हित ·

त्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं. खोटं काहीही दिसलं नाही. फसवणुकीचा गाजावाजा करतात ते आंधळेपणाने क्लिक करणारे लोक. डोळे आणि डोकं उघडे असले तर वेबसाईटवर खाली केलेला उल्लेख वाचता येतो. (हा उल्लेख स्पष्ट नाही/लहान नाही/जाहीर नाही, असे म्हणताना किती *टर्म्स & कंडिशन्स अप्लाय असे उल्लेख स्प्ष्ट/मोठे/डोळ्यात भरणारे असतात, हा कृपया विचार करावा.)
But unlike other website, this one does not show how much its going to deduct
हा जो उल्लेख तुम्ही केला आहे, तो थोडा चुकीचा वाटतो. (फोटो दिसत नसल्यास फोटोची लिंक https://lh6.googleusercontent.com/-58Ou43CBtXg/VBP7bLjEVxI/AAAAAAAABPs/nYLacqR9tFw/w869-h325-no/ex.jpg) ***मी त्या वेबसाईटचा मालक/सदस्य/लाभार्थी/हितचिंतक कोणीही नाही. पण कुणीही कसलीही शहानिशा न करता 'आग लागली...आग लागली" असे बोंबलत पळत सुटला, तर मला राहवत नाही. आग लागलेली नाहिये, हे मला सांगावसं वाटतं. गुगलवर सर्च केल्यावर तक्रारी करणारे मिळतात, पण फोरम्सवर लिहिणारं भारतीय पब्लिक गाजावाजा करणारं असतं. विचार न करता, माझं नाव कुठेतरी ऑनलाईन झळकणार, या उन्मादात काहीही लिहिणारं असतं. (अपवाद नक्कीच असतात, पण नियम सिद्ध करण्यापुरते!)

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित 14/09/2014 - 13:51
खोटं काहीही दिसलं नाही? अरेच्चा, असे कसे झाले? जे मला दिसले ते आपण पाहीलेले दिसत नाही! परत एकदा सर्व मुद्दे पहावे, हिच नम्र विनंती.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ 17/09/2014 - 13:22
अर्थशास्त्राचा पहिला नियम पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही
अरे बापरे. हे काय नवीनच. पैसा निर्माण होतो. तसे नसते तर प्रॉडक्टीव्हीटी आणि जी डी पी या टर्म्स आल्याच नसत्या. पैसा उत्पादीत होतो. मालमत्ता सुद्धा निर्माण होते.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 17/09/2014 - 13:31
मालक, पैसा उत्पादीत केला तर बाकीच्या पैशाची किंमत त्या तुलनेत कमी होते. म्हणून तर पैसे छापले की त्या करन्सी ची किंमत कमी होते.

In reply to by काळा पहाड

दादागिरी करता आली की छापलेल्या पैश्यामागे काय मुद्दल आहे हे गुपीत ठेवता येते... अंकल सॅमने त्याच्या गेल्या कित्येक दर तिमाहीच्या मागे "क्वांटिटेटीव्ह इझींग" करता छापलेल्या अब्जावधी डोलरच्या नोटांसाठी काय मुद्दल ठेवले आहे हे "गुपीत ऑफ द मिल्लेनियम" आहे (की नाही) ?

त्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं. खोटं काहीही दिसलं नाही. फसवणुकीचा गाजावाजा करतात ते आंधळेपणाने क्लिक करणारे लोक. डोळे आणि डोकं उघडे असले तर वेबसाईटवर खाली केलेला उल्लेख वाचता येतो. (हा उल्लेख स्पष्ट नाही/लहान नाही/जाहीर नाही, असे म्हणताना किती *टर्म्स & कंडिशन्स अप्लाय असे उल्लेख स्प्ष्ट/मोठे/डोळ्यात भरणारे असतात, हा कृपया विचार करावा.)
But unlike other website, this one does not show how much its going to deduct
हा जो उल्लेख तुम्ही केला आहे, तो थोडा चुकीचा वाटतो. (फोटो दिसत नसल्यास फोटोची लिंक https://lh6.googleusercontent.com/-58Ou43CBtXg/VBP7bLjEVxI/AAAAAAAABPs/nYLacqR9tFw/w869-h325-no/ex.jpg) ***मी त्या वेबसाईटचा मालक/सदस्य/लाभार्थी/हितचिंतक कोणीही नाही. पण कुणीही कसलीही शहानिशा न करता 'आग लागली...आग लागली" असे बोंबलत पळत सुटला, तर मला राहवत नाही. आग लागलेली नाहिये, हे मला सांगावसं वाटतं. गुगलवर सर्च केल्यावर तक्रारी करणारे मिळतात, पण फोरम्सवर लिहिणारं भारतीय पब्लिक गाजावाजा करणारं असतं. विचार न करता, माझं नाव कुठेतरी ऑनलाईन झळकणार, या उन्मादात काहीही लिहिणारं असतं. (अपवाद नक्कीच असतात, पण नियम सिद्ध करण्यापुरते!)

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित 14/09/2014 - 13:51
खोटं काहीही दिसलं नाही? अरेच्चा, असे कसे झाले? जे मला दिसले ते आपण पाहीलेले दिसत नाही! परत एकदा सर्व मुद्दे पहावे, हिच नम्र विनंती.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ 17/09/2014 - 13:22
अर्थशास्त्राचा पहिला नियम पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही
अरे बापरे. हे काय नवीनच. पैसा निर्माण होतो. तसे नसते तर प्रॉडक्टीव्हीटी आणि जी डी पी या टर्म्स आल्याच नसत्या. पैसा उत्पादीत होतो. मालमत्ता सुद्धा निर्माण होते.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 17/09/2014 - 13:31
मालक, पैसा उत्पादीत केला तर बाकीच्या पैशाची किंमत त्या तुलनेत कमी होते. म्हणून तर पैसे छापले की त्या करन्सी ची किंमत कमी होते.

In reply to by काळा पहाड

दादागिरी करता आली की छापलेल्या पैश्यामागे काय मुद्दल आहे हे गुपीत ठेवता येते... अंकल सॅमने त्याच्या गेल्या कित्येक दर तिमाहीच्या मागे "क्वांटिटेटीव्ह इझींग" करता छापलेल्या अब्जावधी डोलरच्या नोटांसाठी काय मुद्दल ठेवले आहे हे "गुपीत ऑफ द मिल्लेनियम" आहे (की नाही) ?

इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.)

**************** आज मला एक ईमेल आलाय, त्यात लिहिले आहे..... फक्त ५०/- रुपयात १७००/-किमतीचे व्हावुचर! आणि तेही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे!! व्वा! चक्क १६५०/-चा फायदा!!