मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती 02/11/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा 02/11/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती 02/11/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या 03/11/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा 03/11/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद 03/11/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि ·

कंजूस 16/01/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु 16/01/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/01/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.

कंजूस 16/01/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु 16/01/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/01/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.
**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे 22/08/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 22/08/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/08/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य 22/08/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 23/08/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी 23/08/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य 25/08/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता 24/08/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ 24/08/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. 25/08/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti 26/08/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा 03/09/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

सुबोध खरे 22/08/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 22/08/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/08/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य 22/08/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 23/08/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी 23/08/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य 25/08/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता 24/08/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ 24/08/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. 25/08/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti 26/08/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा 03/09/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

दहीभात...

किल्लेदार ·

Bhakti 12/11/2024 - 12:46
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.

टर्मीनेटर 12/11/2024 - 16:20
दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला.
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀 मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!

सरनौबत 12/11/2024 - 16:45
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥ म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 19:06
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते. https://www.misalpav.com/node/52379

किल्लेदार 13/11/2024 - 23:02
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा. सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?

मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार. जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.

Bhakti 12/11/2024 - 12:46
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.

टर्मीनेटर 12/11/2024 - 16:20
दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला.
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀 मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!

सरनौबत 12/11/2024 - 16:45
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥ म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 19:06
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते. https://www.misalpav.com/node/52379

किल्लेदार 13/11/2024 - 23:02
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा. सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?

मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार. जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

चित्रगुप्त ·

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

मी काय चुकीचे केले??

अमरेंद्र बाहुबली ·

एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण 11/04/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त 11/04/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 15/04/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 15/04/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 16/04/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump 16/04/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump 16/04/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 16/04/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 16/04/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 14/04/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 15/04/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण 16/04/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू 16/04/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 17/04/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव 17/04/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण 16/04/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus 16/04/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण 16/04/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त 17/04/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव 17/04/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला 17/04/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू 17/04/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 17/04/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 18/04/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव 17/04/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ 17/04/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे 17/04/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 17/04/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 17/04/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 18/04/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)

एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण 11/04/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त 11/04/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 15/04/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 15/04/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 16/04/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump 16/04/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump 16/04/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 16/04/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 16/04/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 14/04/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 15/04/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण 16/04/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू 16/04/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 17/04/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव 17/04/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण 16/04/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus 16/04/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण 16/04/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त 17/04/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव 17/04/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला 17/04/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू 17/04/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 17/04/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 18/04/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव 17/04/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ 17/04/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे 17/04/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 17/04/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 17/04/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 18/04/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

चित्रगुप्त ·

गवि 04/08/2023 - 15:29
बाट्या हा त्या अप्रतिम डाळीसोबत येणारे आवश्यक संकट म्हणून त्यांकडे बघत असल्याने आपला पास. त्याच आमटीत मी आंबेमोहोर भात किंवा दोन तीन गरमागरम पोळ्या कुस्करून खाणे अधिक पसंत करेन. बाकी कविता चांगली आहे .

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:32
आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी अधिक भारी लागेल असे नमूद करतो. बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:35
आंबेमोहोर आणि इंद्रायणी हे दोन्ही आमचे जीव की प्राण. त्यात स्पर्धा नाहीच. शिवाय घनसाळ, जिरगा आहेतच. अस्सल मिळत नाहीत नेहमी विशेषत: काळा जिरगा. मग गोवा येता जाता आजर्याहून उचलतो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:53
अस्सल आंबेमोहोर मिळणे हल्ली खूपच कमी झालेय. भोर साईडला मिळतोय ठराविक ठिकाणी, बाकी बहुतकरुन परराज्यातलाच येतो हल्ली, त्याला ती इथली चव नाहीच.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:37
बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण. इकडे कोंकण मुंबई साईडला वाटाण्याची मिसळ असते. ती खरी अस्सल. तुम्ही मटकी वगैरे चबर चबर लागणारी कडधान्ये वापरता. पण असो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:52
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण.
पुण्यात सर्व प्रकारच्या तिखट, गोड, मटकी, वाटाण्याच्या, कुठलेही कडधान्य नसलेल्या, फक्त कांदा लसूण मसाला असलेल्या, आल्याचा रस्सा असलेल्या, काळा, तांबडा, लालभड सर्व प्रकारच्या मिळतात फक्त कुठे ते माहिती हवे, अस्सल पुणेरी मिसळही तुम्हाला खायला घालेन. बाकी ते वाटाणे रस्सा असलेली मिसळ मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:53
आता या सर्व मिसळी चाखणे आले. धन्यवाद. मराठवाडा मिसळ : सहमत. आपली मते नेहमी जुळतात असे एक जाता जाता निरीक्षण..

In reply to by प्रचेतस

>>>मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम. एक दोन ठिकाणी मिसळ खाऊन सगळ्या मराठवाड्याच्या मिसळीवर मत व्यक्त करणारे मिपाकर बघितले की हसायला येतं. चालायचंच. पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या. अर्थात अजुन कुठे चांगली मिळतही असेल. आपलं काम खाण्याशी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 04/08/2023 - 16:05
पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या.
कोण हो तो मिपाकर?

In reply to by प्रचेतस

कंजूस 05/08/2023 - 20:14
१)रामदेव कुठे? २) इतर ठिकाणी दालबाटीचे दोन प्रकारे खाणं मिळतं. जेवणाच्या थाळी मध्येच दोन डाळबाटी मिळतात ते मी मांडू आणि आबूला घेतलेलं. किंवा फक्त दाळबाटी हवी असल्यास सहाची प्लेट येते. तर तिकडे रामदेवराय कसं मिळतं?

In reply to by कंजूस

प्रचेतस 05/08/2023 - 23:13
ट्रान्स्पोर्टनगर निगडी, भक्ती शक्ती जवळ, आधी फक्त ट्रकवाल्यांचा ढाबा होता पण शहरी लोकांनी कब्जा केल्याने ट्रकवाले येत नाहीत, शनी/रविवारी किमान शेदीडशे लोक बाहेर वेटिंगवर असतात. राजस्थानी केर सांगरी, दाल बाटी फेमस. 7/8 प्रकार मिळतात दालबाटी थाळीचे. गुलाबी, राजस्थानी, रजवाडी वगैरे. मला दालबाटी विशेष आवडत असल्याने तिथं गेल्यास इतर पदार्थ खातो.

कंजूस 04/08/2023 - 16:08
मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. ---- अगदी इदौर'ला नाही खाल्ली पण मांडू'ला खाल्ली आहे. कोणती प्रमाण माहिती नाही. याअगोदर अबूपहाड ठिकाणी खाल्ली आहे पंचारत्न(?) डाळीसह वीस वर्षांपूर्वी. पण २०१९ला कोणत्याही हॉटेलच्या गल्ल्यावर बाटीची ताटे दिसली नाहीत. "अभी दालबाटी कौन खाता है? पिझ्झा चालता हैl" कविता आवडली. दालबाटी विसरा.

In reply to by कंजूस

मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. सहमत. काही लोक फार अवांतर करतात. बाय द वे, भाजलेले रोडगे बाटीचा मुख्य प्रकार. आमच्याकडे फार असायचे पूर्वी. आता कमी झालं हे प्रकरण. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 04/08/2023 - 16:47
आमचे बालपण इंदुरात गेले, त्यामुळे आम्ही इंदोरी बाटी असे इथे म्हटले आहे. बाकी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरेत बाट्या बनतातच. त्यामुळे 'प्रमाण' बाटी असे काही नसावेसे वाटते. "अरे साब, एकबार हमारे सनावद की बाटी खा के देखो, बाकी सब भूल जाओगे" असे विविध जागचे लोक अभिमानाने म्हणतातच. रच्याकने या एमपी, यूपी वगैरेंपेक्षा पूर्वीची 'माळवा' 'बुंदेलखंड' 'नेमाड' वगैरे नावे भौगोलोक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जास्त अर्थपूर्ण होती असे वाटते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 07/08/2023 - 07:26
हवे तेवढे दळण येऊ द्या हो भौसायेब. ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध, इजिप्तमधील तुतेमखानेम पिरॅमिडजवळील उत्खननात सापडलेली ममीकृत अखंड बाटी, हाइनीश श्लीमन याला ट्रॉयच्या उत्खननात सहाव्या थरात सापडलेल्या जळक्या बाट्यांच्या चळती ... इत्यादिंविषयी विद्वत्तापूर्ण माहिती, 'बाटी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक स.त. कुडचडेकर यांचे 'साजुक तूप हा बाटीचा प्राणवायु आहे' हे अमर वाक्य .... असे कसलेही दळण येऊ द्यायला आमची काहीच हरकत नाही. ख्या.ले.स.त.कु.क. यांचे "दळण हा मिपालेखांचा प्राणवायु आहे" हेही लईच फेमस वाक्य आहे. तस्मात चालू द्या.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 07/08/2023 - 18:18
ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध,
GTEURB1247 हसुन हसुन फुटलाच पायजे .... हा .... हा .... हा .... !

गवि 04/08/2023 - 16:38
कंकाकांनी इंदौर बाटी असा खास वेगळा उल्लेख केल्याने इंदूर या विषयावर मत लिहिणे आले. या गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. हापिसाच्या कामानिमित्त जे जाणे येणे असते त्यात इंदूर हे ठिकाण हल्लीच एकदा आले आणि शेवटी तो योग आलाच. कॉन्फरन्स वगैरे प्रकरणातून एखाद्या गावी जरा मोकळे हिंडायला मिळणे दुरापास्त होते अनेकदा. त्यात जागा गावाबाहेर कुठे लांब असली की विचारूच नका. मुक्काम असलेल्या सर्व जागी खास इंदुरी बेत म्हणून ते खूप ऐकून असलेले पोहे होते. मी एकूण तीन ठिकाणी पोहे खाल्ले. ते अत्यंत फिके वाटले. कोरडे देखील. मग कोणीतरी म्हणाले की पोह्यांच्या बाजूला ठेवलेली तर्री, रतलामी शेव, जिरावण किंवा तत्सम नावाचा मसाला असे सर्व त्यावर घालून घ्यायचे. मग तसे करून खाल्ले तेव्हा चांगले म्हणजे बरे लागले. पण पण पण.. इतके पदार्थ वरून ओतून घातले तर साध्या प्लेन भातालाही चव येईल.. मग इथली प्रसिद्ध जागा सांगा असे विचारून छप्पन दुकान नावाची जागा कळली. पहिल्या दिवशी गेलो आणि एक पॅटीस अतिशय भारी असतो असे स्थानिक रेकमेंडेशन आठवून तिकडे शोधले. तर हाय दैवा. गुरुवार किंवा गुरुवार दुपार म्हणून बंद. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कशीतरी जुळवाजुळव करून एअरपोर्टला जाताना तिथे थांबलो. चार गोष्टी खाल्ल्या. १. बटाटा कव्हर असलेले नारळ पॅटीस २. इंदूरी प्रसिद्ध साबुदाणा खिचडी ३. इंदूरी शिकंजी (हिचा लिंबू सरबतरूपी शिकंजीशी काही संबंध नाही. हे एक घट्ट पियूष* होते.) ४. जॉनी हॉट डॉग या दुकानात एग बेंजो हा पदार्थ.(नावामुळे आकर्षित होऊन. मी शाळेत असताना बेंजो वाजवत असे) नाव हॉट डॉग असले तरी हे बन मध्ये भरलेले ऑमलेट कांदा होते. मग अग्रवाल नामकिन या दुकानातून रतलामी शेव घेतली सोबत न्यायला. तर.. मी जे अनेक वर्षांपासून ऐकून गेलो होतो त्या पार्श्वभूमीवर माझा भ्रमनिरास झाला. सर्वात प्रसिद्ध म्हणून सांगितलेल्या दुकानात खाऊन देखील अगदी सामान्य चव वाटली. मुंबईत "इंदोर की सुप्रसिद्ध साबुदाणा खिचडी" मिळते ती याहून सरस असते मात्र इतर काही गोष्टी अत्यंत इंप्रेस करून गेल्या. १. शहराची स्वच्छता. आश्चर्याने तोंडात बोट घालावे इतकी स्वच्छता (तोंडात बोट घालताना तसेही मी कोणाला पाहिले नाही. पण एक बोलण्याची पद्धत) २. सर्वत्र केर टाकायला डब्यांची सोय. ३. मुद्दाम कुठेतरी कोपऱ्यात कचरा शोधून काढू असा निश्चय करून देखील बऱ्यापैकी भ्रमंतीत कुठेही कचरा सापडला नाही. ४. तेथील स्थानिकांना या स्वच्छतेचा आणि मिळालेल्या स्वच्छ शहर पुरस्काराचा अभिमान. त्यामुळे कोणी कोणाला घाण टाकू न देणे आणि सिस्टिमचा आदर. ५. कचरा गोळा करणाऱ्या खूप गाड्या. एका डेपोत तो नेऊन त्यावर प्रक्रिया करून बायो गॅस आणि त्यावर शहरात बसेस चालवतात. खरोखर अनुकरणीय. ६. मालपुवा रबडी हा एक पदार्थ मात्र अफलातून. फुल मार्क्स. इति इंदूर पुराण..

In reply to by गवि

टीपीके 04/08/2023 - 16:51
छप्पन बकवास आहे, सराफा बेस्ट. त्यातही गोड पदार्थ सरस :) पोहे खायचे असतील तर पुण्यात वाकडला इंदिरा शाळेसमोर एक टपरी आहे, कळकट आहे जरा, पण पोहे मस्त. वरतून काही टाकू नये, फक्त पोहे. ना ओले ना सुके, ना तिखट पण तरीही सुंदर लागतात.

In reply to by गवि

चित्रगुप्त 04/08/2023 - 17:10
अलिकडे इंदुरात रहाणे कमी झालेले असले तरी माझ्या अनुभवाप्रमाणे खास मुरलेले इंदूरकर छप्पनकडे फिरकत नाहीत, तर वेगवेगळ्या मोहल्ल्यात वेगवेगळ्या पदार्थांचे स्पेशालिस्ट असतात, त्यांचेकडे मुद्दाम तो पदार्थ खायला दुरून रसिक खवय्ये येतात. उदा. जेलरोडवरील (हल्लीचे नाव काहीतरी वेगळे आहे) 'पुरोहित' चे पोहे. सराफ्यातला 'जोशी का दहिबडा' वगैरे. आता येत्या आक्टोबरापासून इंदुरात सलग सात-आठ महिने मुक्काम करणार आहे, तेंव्हा सर्व शोध घेता येईल. तसा आमच्या घराजवळचा 'भँवरीलाल मिठाईवाला' सर्वांचा बाप आहे. ( हे नाव 'भँवरीलाल' असे का लिहीतात कोण जाणे) एकूणेक सगळे पदार्थ उत्कृष्ट असतात. 'रबडी' तर फारच खास. त्यामुळे इथे तिथे जाण्याची गरजच पडत नाही. रामुभैया दाते, कुमार गंधर्व, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते यांच्या काळचे इंदूर आता राहिलेले नसल्याची खंत जरी माझ्या पिढीच्या लोकांना वाटत असली, तरी नवीन स्वच्छ इंदौरही छान आहे.

In reply to by चित्रगुप्त

टीपीके 04/08/2023 - 17:38
तो राजवाड्या समोर पण एक आहे ना पोहेवाला? एकदा सकाळी सकाळी तिकडे खाल्ले होते पोहे, खरंच छान होते. आणि तिकडे वरतून डाळिंब पण टाकतात, छान लागते बाहेर डाळ बाटी फक्त एकदा चोखी ढाणीला खाल्ली होती, पण आता नाही आठवत चव, पण इंदोर मध्ये राजस्थानी जेवणाचा खूप प्रभाव आहे त्या मुळे अनेक ठिकाणी चांगली डाळ बाटी मिळू शकते

In reply to by गवि

रामचंद्र 06/08/2023 - 10:08
गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. अवचट आणि यकुंच्या लेखनाचा दुवा/धागा/संदर्भ मिळेल का?

In reply to by रामचंद्र

गवि 06/08/2023 - 10:21
अवचट यांच्या नेमक्या कोणत्या लेखात आहे ते आता आठवत नाही. खास या विषयावर लेख असेलच असे नाही पण तपशीलवार वर्णन होते. यकु काही काळ इंदुरात वास्तव्याला असल्याने त्या काळात मिपावर लिहिताना / प्रतिसाद देताना तो असे उल्लेख करत असे. शासकीय मदिरालय हा उल्लेख एका प्रतिसादात होता. शिवाय सर्वाँना तो इंदूरला कट्टा करू वगैरे म्हणून इच्छा व्यक्त करत असे.

In reply to by गवि

कंजूस 06/08/2023 - 17:39
यकुंचे लेख शोधून दोन चार वाचले. अगाध ललित लेखन आहे त्यांचं. गप्पिष्ट माणूस होता. नर्मदा प्रकरणही वाचलं आहे. अवचट कोणता आइडी?

इंदूर हे आमच्या वाफगावकरांनी समृद्ध केलेले गाव. त्यास इंदोर म्हणणे फारच खटकते. काटा रुते कुणाला हे आमचे सर्वात आवडते नाट्य गीत व त्याचे अशा प्रकारे विडंबन आणी ते सुद्धा जिव्हा लोलुपता दर्शवण्यासाठी, ते सुद्धा देवलोकातील हिशोब नवीसा कडून...... शिव शीवा...... बराच काळ मरु स्थला मधील मत्स्य प्रदेश तथा केकय, बाल्हीक प्रांताच्या सीमेवर व्यतीत केल्यामुळे हा पदार्थ चांगल्याच ओळखीचा आहे. खाता बाट्या तरी त्या घसा खवखवे फार उदरचा डोंगर होतो अन् हृदयात गाठ्या हजार एवढेच बोलून खाली बसतो.

चौथा कोनाडा 04/08/2023 - 17:48
पिंचिंमध्ये अधून मधुन खातो दालबाटी, रामदेव धाबाला सुद्धा खाल्ली आहे .. झकास टेस्ट आहे. इंदूरच्या सराफ्यात ही खाल्ली आहे तिथली आवडली होती ! बाकी चित्रगुप्तसाहेबांचे आर्त काव्य आवडले ! त्यांना लवकरात लवकर खायला मिळो ही मोदीचरणी प्रार्थना !

विदेशात राहून स्वदेशी (इंदोर ची) स्वप्न बघायची आणी पुणेकरांवर ठपका ठेवायचा,काय पटतं नाय ब्बुवा

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 16:50
आम्ही उभयता इंदूरचेच असल्याने अगदी 'कंड्या'वर भाजलेल्या नाही, तरी पातेल्यातल्या खमंग बाट्या अधून मधून करतच असतो. अगदी अमेरिकेत सुद्धा. त्यासाठी मुद्दाम बाटीचा जाडा आटा घेऊन जातो. त्यामुळे इथे वर्णिलेली तगमग ही स्वतःची नसली, तरी पुणेरी भार्या असणार्‍या काही नातलगांची आहे (आणि काळही पुष्कळ जुना आहे - जेंव्हा पुण्यात यूपी-बिहारवाले अगदी नगण्य असतील-वा नसतीलच) (माळव्यातले 'कंडे' म्हणजे सुमारे दोन इंज जाड आणि फूटभर व्यास असलेल्या गोवर्‍या).

In reply to by चित्रगुप्त

आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे. जन्मलो जरी इथे वाढलो मी कुठे कुठे मन वेडे गुंतले उगाच मी राहीलो जिथे जिथे गंमत करत होतो. हलकेच घ्या. राजस्थानात आठ दहा वर्षांत भरपूर डाळ बाटी खाल्ली. लिट्टी चोखा सुद्धा एक असाच मस्त पदार्थ. बिहारी बाबूंचे आवडते खाद्य. विडंबन आवडले.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 19:25
कंडे माहित आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे.
आमच्या लहानपणी सुंदर छोकरीला ती 'कंडा' किंवा 'माल' असल्याचे म्हणत आणि आमचे एक आजन्म ब्रम्हचारी (पण जन्मभर आर्त लग्नेच्छू) मित्र त्यांना आवडणार्‍या बायांचा (त्यावेळी मी तीस वर्षांचा, तर ते पंचावन-साठचे असतील) ती करोलबागवाली 'केंडी', त्रिवेणीतली केंडी असा उल्लेख करत. त्यांचा डोक्याचा स्क्रू जरा ढिला होता. खूप विपरीत परिस्थितीत अवघे जीवन गेले, पण कदाचित स्क्रू ढिला असल्यानेच सदा आनंदी, उत्साही, आणि आपले लग्न नक्की होणार ही साठीतही आशा असल्याने 'केंड्या' हुडकणे नेहमी चाललेले असायचे. त्यांचा अंतही फार वाईट अवस्थेत झाला. त्यांचे वडील भारतातले प्रसिद्ध चित्रेकार होते. ते दिल्लीत रहात असल्याने या वर्णनावरून कदाचित विवेक पटाईत त्यांना ओळखतील.

विवेकपटाईत 04/08/2023 - 18:19
इंदौरी बाटी, तुपाची धार. मिळमिळीत मिसळ पुण्याची छान. बहुतेक नोव्हेंबर महिन्यात इंदूरला जाण्याचा विचार करत आहे. खाऊ गल्लीची चव ही चाखणार.

कंजूस 04/08/2023 - 19:11
बाटी प्रकार आणि त्यासोबत दाल बाफले - बाटी, डाळ,तूप (ओंकारेश्वर) चुरमा* बाटी डाळ - बाटीच्या आत गोड नसलेला चुरमा भरलेला असतो, डाळ आणि तूप. (मांडू) डाळ बाटी चुरमा - साधी बाटी ,डाळ ,तूप आणि गोड चुरमा बरोबर देतात.( राजस्थानी प्रकार) डाळ बाटी - बाट्या,तूप आणि डाळ (जळगाव ,अबू) हे दाळबाटी शक्यतो थंडीत खातात. आणि पचविण्याची शक्ती असणारेच खातात. अन्यथा बाटी खाल्ल्यावर पोटात गुरगुर सुरू होते. कणीक कच्ची राहाते.

विडंबन काव्य उत्तम! आवडले. अवांतर : दाल बाटी हा प्रकार मला अतिशय ओव्हररेटेड वाटतो. मी "अकरा" वर्षांचा असताना दवाखान्यात अ‍ॅडमीट होतो महिनाभर. रोज घरून डबा यायचा. दवाखान्यातलं जेवण घशाच्या खाली उतरायचं नाही. एके दिवशी आईने विचारलं, उद्या काय आणू खायला? मी म्हटलं : तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकर! मराठवाड्यातल्या तुरीच्या डाळीच्या आमटीत कुस्करलेल्या भाकरीची सर ह्या दाल बाटीला पुढच्या कितीही जन्मात येणार नाही. सं - दी - प

Bhakti 04/08/2023 - 22:12
माझ्या आत्याने मला उकळत्या पाण्यात गोळा उकडून तळलेली बट्टी करायची शिकवली होती.काही वर्षे तर कधीही बट्टी करायचे :) बाकी फक्कड फर्माईश केलीय लवकर पूर्ण व्हावी. रचक्याने ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं, मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला.

चित्रगुप्त 04/08/2023 - 22:54
ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं
बडा सराफा आणि छोटा सराफा वेगवेगळे आहेत. बडा सराफा हल्ली खाऊगल्ली म्हणुन जास्त ठाऊक असला, तरी मुळात तो सराफाच आहे. त्याजवळच असलेला 'छोटा सराफा' त्यामानाने लहान गल्ली असून तिथे मुख्यतः सोन्याचांदीची दुकानेच आहेत.
मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला
-- "लाव रे तो व्हिडियो" तो विडू कोन्ता हाय ? (अगदी सहज सापडला तरच द्यावा)

nutanm 05/08/2023 - 06:52
इंदूरी जेवण प्रकार खाण्याचे खूपच एकाच‌ सहलीत लक्षात‌. रहाणारया. सहलीत खूप. आनुभवले खूप छान अनुभवांतला एक अनुभव‌ व माझ्या हौशी व वरचा अधिकारी पदावर च्या मेव्हण्यामुळे अविस्मरणीय अनुभवाची‌. केलेली एक सहल. व खरेदी तर त्याच्या उत्तम दर्जाच्या खरेदी‌ करणयाची. साक्ष. मी तिथे‌. बाटी‌. हा प्रकार न खाता लहानपणीच सोळा सोमवार व्रताच्या उद्यापनात कणिक‌ भिजविणाया. पासून . बाटया करणे मग भाजणे ,कुटणे खलबत्त्यात नंतर छान चाळून त्यात प्रमाणात गूळ व. साजूक तूप. घरी आजी आईने‌ मिळून कढविलेले ‌ तूप घालून उद्यापनाचे आजोबांचे ज्यावर देखरेखीखाली तयार केलेले सुंदर लाडू सोळा सोमवारासाठीचे‌ खाल्लेले व करतानाचे बघून अजून या वयातही उततम‌ आठवतायेत. व घरी गॅस ,मिक्सर/फूडप्रो असताना काय जड असे वाटते पण माझे‌ सिनिअर सिटीझन चे वय व मदतीशिवाय कोणाच्याही धीर होत नाही हा खटाटोप करायचा. पण‌ वाटते तर खूपच.

रामचंद्र 05/08/2023 - 20:03
पुण्यात काही जैन मंदिरांमध्ये (उदा. दादावाडी सारसबाग, ब्रह्मा हॉटेल चौक, सिंहगड रोड, इ.) रोज व खास बेत रविवारी जैन-राजस्थानी पद्धतीचे जेवण मिळते. तिथेच खाण्याची तसेच पार्सलचीही सोय असते, मात्र एकच पदार्थ स्वतंत्र मिळतो का संपूर्ण थाळीच घ्यावी लागते ते माहीत नाही. त्यात ती खास राजस्थानी पद्धतीची बाटीही मिळत असावी असं वाटतं.

कंजूस 06/08/2023 - 20:01
पौष्टिक अन्न पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात असा माझा समज आहे. महिला मंडळ मात्र चटकमटक आंबट,चिंबट चटकदार पदार्थ खातात.

चित्रगुप्त 06/08/2023 - 22:14
पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात
---हा एक वेगळाच रोचक, संशोधन करण्यासारखा विषय आहे. जमल्यास यावर धागा काढावा. शहरी लोकांच्या आहारविषयक सवयीत गेल्या वीसेक वर्षात बराच बदल घडून आला असावा असे वाटते. ग्रामीण भागांविषयी फारसे ठाऊक नाही.

सुबोध खरे 08/08/2023 - 12:20
कोणत्याही शहरातील प्रसिद्ध पदार्थ हे सर्वाना आवडतीलच असे नाही आणि याशिवाय मला आवडला म्हणजे माझ्या मित्राला आवडेलच असे नाही. लष्करी नोकरीमुळे भारतभर भ्रमण केल्यावर एक लक्षात आले कि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मिळतात ते सर्व १०० % पदार्थ मुंबई किंवा दिल्लीत कुठे ना कुठे मिळतातच. कारण तेथील रहिवाश्यांनि किंवा पर्यटकांनी ते पदार्थ या मोठ्या शहरात व्यवसायासाठी आणलेले असतात. मोठ्या शहरात साधारणपणे ते खपण्याची शक्यता असतेच. बहुसंख्य वेळेस हे पदार्थ मूळ शहरात मिळतात त्याच दर्जाचे किंवा काही वेळेस जास्त चांगल्या दर्जाचे मिळू शकतात. परंतु फरक असा असतो कि हे पदार्थ खाताना त्यात्या गावचे/ शहराचे वातावरण मुंबई दिल्लीत येऊ शकत नाही. उदा. हुरडा तुम्हाला मुंबई पुण्यातही मिळू शकतो. परंतु शेतात बसून शेकोटीवर भाजलेला हुरडा खाण्याचे वातावरण कसे आणणार? एकच गोष्ट म्हणजे बहुसंख्य ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेते हे प्रसिद्ध का होतात? तर त्यांचा दर्जा बहुतांशी उत्तम असतो आणि बहुतकरून वाजवी भावात. त्यामुळे अशा ठिकाणी आपण जरूर जावे परंतु तेथील खाद्यपदार्थांची दुसऱ्या ठिकाणच्या पदार्थांची तुलना करू नये. अन्यथा बऱ्याच वेळेस आपला अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते. उदा मथुरेला जाऊन पेढे घेतले तर तसेच उत्तम पेढे मुंबईत अनेक ठिकाणी नक्की मिळू शकतात. किंवा लखनौ ला जाऊन टुंडे के कबाब किंवा पेप्पर चिकन घेतले तर तसे कबाब किंवा चिकन मुंबईत सुद्धा मिळतं. पण मथुरेच्या पेढ्याची रुची किंवा लखनौ च्या टुंडे के कबाब" ची रुची " हॅ, यात काय मोठंसं आहे" असे बोलून आपण स्वतःच घालवत असतो. तेंव्हा एक विनंती आहे कि जिथे जाल तिथे आपली पाटी कोरी ठेवूनच जा म्हणजे अगदी एखाद्या ठार खेड्यात चुलीवर केलेली अंबाडीची भाजी आणि नाचणीची भाकरी चा आस्वाद तुम्ही पंचतारांकित रेस्टोरेंट मधल्या शाही पनीर इतकाच घेऊ शकाल.

चित्रगुप्त 12/07/2024 - 20:36
आज योगायोगाने हा धागा उघडला. मी तर आपण असे काही लिहीले होते हे विसरूनही गेलो होतो आणि शेवटले काही प्रतिसादही वाचलेले नव्हते. पण एकंदरित मजा आली सगळे प्रतिसाद वाचताना. सगळ्यांचे अनेक आभार.

गवि 04/08/2023 - 15:29
बाट्या हा त्या अप्रतिम डाळीसोबत येणारे आवश्यक संकट म्हणून त्यांकडे बघत असल्याने आपला पास. त्याच आमटीत मी आंबेमोहोर भात किंवा दोन तीन गरमागरम पोळ्या कुस्करून खाणे अधिक पसंत करेन. बाकी कविता चांगली आहे .

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:32
आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी अधिक भारी लागेल असे नमूद करतो. बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:35
आंबेमोहोर आणि इंद्रायणी हे दोन्ही आमचे जीव की प्राण. त्यात स्पर्धा नाहीच. शिवाय घनसाळ, जिरगा आहेतच. अस्सल मिळत नाहीत नेहमी विशेषत: काळा जिरगा. मग गोवा येता जाता आजर्याहून उचलतो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:53
अस्सल आंबेमोहोर मिळणे हल्ली खूपच कमी झालेय. भोर साईडला मिळतोय ठराविक ठिकाणी, बाकी बहुतकरुन परराज्यातलाच येतो हल्ली, त्याला ती इथली चव नाहीच.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:37
बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण. इकडे कोंकण मुंबई साईडला वाटाण्याची मिसळ असते. ती खरी अस्सल. तुम्ही मटकी वगैरे चबर चबर लागणारी कडधान्ये वापरता. पण असो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:52
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण.
पुण्यात सर्व प्रकारच्या तिखट, गोड, मटकी, वाटाण्याच्या, कुठलेही कडधान्य नसलेल्या, फक्त कांदा लसूण मसाला असलेल्या, आल्याचा रस्सा असलेल्या, काळा, तांबडा, लालभड सर्व प्रकारच्या मिळतात फक्त कुठे ते माहिती हवे, अस्सल पुणेरी मिसळही तुम्हाला खायला घालेन. बाकी ते वाटाणे रस्सा असलेली मिसळ मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:53
आता या सर्व मिसळी चाखणे आले. धन्यवाद. मराठवाडा मिसळ : सहमत. आपली मते नेहमी जुळतात असे एक जाता जाता निरीक्षण..

In reply to by प्रचेतस

>>>मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम. एक दोन ठिकाणी मिसळ खाऊन सगळ्या मराठवाड्याच्या मिसळीवर मत व्यक्त करणारे मिपाकर बघितले की हसायला येतं. चालायचंच. पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या. अर्थात अजुन कुठे चांगली मिळतही असेल. आपलं काम खाण्याशी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 04/08/2023 - 16:05
पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या.
कोण हो तो मिपाकर?

In reply to by प्रचेतस

कंजूस 05/08/2023 - 20:14
१)रामदेव कुठे? २) इतर ठिकाणी दालबाटीचे दोन प्रकारे खाणं मिळतं. जेवणाच्या थाळी मध्येच दोन डाळबाटी मिळतात ते मी मांडू आणि आबूला घेतलेलं. किंवा फक्त दाळबाटी हवी असल्यास सहाची प्लेट येते. तर तिकडे रामदेवराय कसं मिळतं?

In reply to by कंजूस

प्रचेतस 05/08/2023 - 23:13
ट्रान्स्पोर्टनगर निगडी, भक्ती शक्ती जवळ, आधी फक्त ट्रकवाल्यांचा ढाबा होता पण शहरी लोकांनी कब्जा केल्याने ट्रकवाले येत नाहीत, शनी/रविवारी किमान शेदीडशे लोक बाहेर वेटिंगवर असतात. राजस्थानी केर सांगरी, दाल बाटी फेमस. 7/8 प्रकार मिळतात दालबाटी थाळीचे. गुलाबी, राजस्थानी, रजवाडी वगैरे. मला दालबाटी विशेष आवडत असल्याने तिथं गेल्यास इतर पदार्थ खातो.

कंजूस 04/08/2023 - 16:08
मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. ---- अगदी इदौर'ला नाही खाल्ली पण मांडू'ला खाल्ली आहे. कोणती प्रमाण माहिती नाही. याअगोदर अबूपहाड ठिकाणी खाल्ली आहे पंचारत्न(?) डाळीसह वीस वर्षांपूर्वी. पण २०१९ला कोणत्याही हॉटेलच्या गल्ल्यावर बाटीची ताटे दिसली नाहीत. "अभी दालबाटी कौन खाता है? पिझ्झा चालता हैl" कविता आवडली. दालबाटी विसरा.

In reply to by कंजूस

मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. सहमत. काही लोक फार अवांतर करतात. बाय द वे, भाजलेले रोडगे बाटीचा मुख्य प्रकार. आमच्याकडे फार असायचे पूर्वी. आता कमी झालं हे प्रकरण. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 04/08/2023 - 16:47
आमचे बालपण इंदुरात गेले, त्यामुळे आम्ही इंदोरी बाटी असे इथे म्हटले आहे. बाकी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरेत बाट्या बनतातच. त्यामुळे 'प्रमाण' बाटी असे काही नसावेसे वाटते. "अरे साब, एकबार हमारे सनावद की बाटी खा के देखो, बाकी सब भूल जाओगे" असे विविध जागचे लोक अभिमानाने म्हणतातच. रच्याकने या एमपी, यूपी वगैरेंपेक्षा पूर्वीची 'माळवा' 'बुंदेलखंड' 'नेमाड' वगैरे नावे भौगोलोक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जास्त अर्थपूर्ण होती असे वाटते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 07/08/2023 - 07:26
हवे तेवढे दळण येऊ द्या हो भौसायेब. ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध, इजिप्तमधील तुतेमखानेम पिरॅमिडजवळील उत्खननात सापडलेली ममीकृत अखंड बाटी, हाइनीश श्लीमन याला ट्रॉयच्या उत्खननात सहाव्या थरात सापडलेल्या जळक्या बाट्यांच्या चळती ... इत्यादिंविषयी विद्वत्तापूर्ण माहिती, 'बाटी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक स.त. कुडचडेकर यांचे 'साजुक तूप हा बाटीचा प्राणवायु आहे' हे अमर वाक्य .... असे कसलेही दळण येऊ द्यायला आमची काहीच हरकत नाही. ख्या.ले.स.त.कु.क. यांचे "दळण हा मिपालेखांचा प्राणवायु आहे" हेही लईच फेमस वाक्य आहे. तस्मात चालू द्या.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 07/08/2023 - 18:18
ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध,
GTEURB1247 हसुन हसुन फुटलाच पायजे .... हा .... हा .... हा .... !

गवि 04/08/2023 - 16:38
कंकाकांनी इंदौर बाटी असा खास वेगळा उल्लेख केल्याने इंदूर या विषयावर मत लिहिणे आले. या गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. हापिसाच्या कामानिमित्त जे जाणे येणे असते त्यात इंदूर हे ठिकाण हल्लीच एकदा आले आणि शेवटी तो योग आलाच. कॉन्फरन्स वगैरे प्रकरणातून एखाद्या गावी जरा मोकळे हिंडायला मिळणे दुरापास्त होते अनेकदा. त्यात जागा गावाबाहेर कुठे लांब असली की विचारूच नका. मुक्काम असलेल्या सर्व जागी खास इंदुरी बेत म्हणून ते खूप ऐकून असलेले पोहे होते. मी एकूण तीन ठिकाणी पोहे खाल्ले. ते अत्यंत फिके वाटले. कोरडे देखील. मग कोणीतरी म्हणाले की पोह्यांच्या बाजूला ठेवलेली तर्री, रतलामी शेव, जिरावण किंवा तत्सम नावाचा मसाला असे सर्व त्यावर घालून घ्यायचे. मग तसे करून खाल्ले तेव्हा चांगले म्हणजे बरे लागले. पण पण पण.. इतके पदार्थ वरून ओतून घातले तर साध्या प्लेन भातालाही चव येईल.. मग इथली प्रसिद्ध जागा सांगा असे विचारून छप्पन दुकान नावाची जागा कळली. पहिल्या दिवशी गेलो आणि एक पॅटीस अतिशय भारी असतो असे स्थानिक रेकमेंडेशन आठवून तिकडे शोधले. तर हाय दैवा. गुरुवार किंवा गुरुवार दुपार म्हणून बंद. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कशीतरी जुळवाजुळव करून एअरपोर्टला जाताना तिथे थांबलो. चार गोष्टी खाल्ल्या. १. बटाटा कव्हर असलेले नारळ पॅटीस २. इंदूरी प्रसिद्ध साबुदाणा खिचडी ३. इंदूरी शिकंजी (हिचा लिंबू सरबतरूपी शिकंजीशी काही संबंध नाही. हे एक घट्ट पियूष* होते.) ४. जॉनी हॉट डॉग या दुकानात एग बेंजो हा पदार्थ.(नावामुळे आकर्षित होऊन. मी शाळेत असताना बेंजो वाजवत असे) नाव हॉट डॉग असले तरी हे बन मध्ये भरलेले ऑमलेट कांदा होते. मग अग्रवाल नामकिन या दुकानातून रतलामी शेव घेतली सोबत न्यायला. तर.. मी जे अनेक वर्षांपासून ऐकून गेलो होतो त्या पार्श्वभूमीवर माझा भ्रमनिरास झाला. सर्वात प्रसिद्ध म्हणून सांगितलेल्या दुकानात खाऊन देखील अगदी सामान्य चव वाटली. मुंबईत "इंदोर की सुप्रसिद्ध साबुदाणा खिचडी" मिळते ती याहून सरस असते मात्र इतर काही गोष्टी अत्यंत इंप्रेस करून गेल्या. १. शहराची स्वच्छता. आश्चर्याने तोंडात बोट घालावे इतकी स्वच्छता (तोंडात बोट घालताना तसेही मी कोणाला पाहिले नाही. पण एक बोलण्याची पद्धत) २. सर्वत्र केर टाकायला डब्यांची सोय. ३. मुद्दाम कुठेतरी कोपऱ्यात कचरा शोधून काढू असा निश्चय करून देखील बऱ्यापैकी भ्रमंतीत कुठेही कचरा सापडला नाही. ४. तेथील स्थानिकांना या स्वच्छतेचा आणि मिळालेल्या स्वच्छ शहर पुरस्काराचा अभिमान. त्यामुळे कोणी कोणाला घाण टाकू न देणे आणि सिस्टिमचा आदर. ५. कचरा गोळा करणाऱ्या खूप गाड्या. एका डेपोत तो नेऊन त्यावर प्रक्रिया करून बायो गॅस आणि त्यावर शहरात बसेस चालवतात. खरोखर अनुकरणीय. ६. मालपुवा रबडी हा एक पदार्थ मात्र अफलातून. फुल मार्क्स. इति इंदूर पुराण..

In reply to by गवि

टीपीके 04/08/2023 - 16:51
छप्पन बकवास आहे, सराफा बेस्ट. त्यातही गोड पदार्थ सरस :) पोहे खायचे असतील तर पुण्यात वाकडला इंदिरा शाळेसमोर एक टपरी आहे, कळकट आहे जरा, पण पोहे मस्त. वरतून काही टाकू नये, फक्त पोहे. ना ओले ना सुके, ना तिखट पण तरीही सुंदर लागतात.

In reply to by गवि

चित्रगुप्त 04/08/2023 - 17:10
अलिकडे इंदुरात रहाणे कमी झालेले असले तरी माझ्या अनुभवाप्रमाणे खास मुरलेले इंदूरकर छप्पनकडे फिरकत नाहीत, तर वेगवेगळ्या मोहल्ल्यात वेगवेगळ्या पदार्थांचे स्पेशालिस्ट असतात, त्यांचेकडे मुद्दाम तो पदार्थ खायला दुरून रसिक खवय्ये येतात. उदा. जेलरोडवरील (हल्लीचे नाव काहीतरी वेगळे आहे) 'पुरोहित' चे पोहे. सराफ्यातला 'जोशी का दहिबडा' वगैरे. आता येत्या आक्टोबरापासून इंदुरात सलग सात-आठ महिने मुक्काम करणार आहे, तेंव्हा सर्व शोध घेता येईल. तसा आमच्या घराजवळचा 'भँवरीलाल मिठाईवाला' सर्वांचा बाप आहे. ( हे नाव 'भँवरीलाल' असे का लिहीतात कोण जाणे) एकूणेक सगळे पदार्थ उत्कृष्ट असतात. 'रबडी' तर फारच खास. त्यामुळे इथे तिथे जाण्याची गरजच पडत नाही. रामुभैया दाते, कुमार गंधर्व, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते यांच्या काळचे इंदूर आता राहिलेले नसल्याची खंत जरी माझ्या पिढीच्या लोकांना वाटत असली, तरी नवीन स्वच्छ इंदौरही छान आहे.

In reply to by चित्रगुप्त

टीपीके 04/08/2023 - 17:38
तो राजवाड्या समोर पण एक आहे ना पोहेवाला? एकदा सकाळी सकाळी तिकडे खाल्ले होते पोहे, खरंच छान होते. आणि तिकडे वरतून डाळिंब पण टाकतात, छान लागते बाहेर डाळ बाटी फक्त एकदा चोखी ढाणीला खाल्ली होती, पण आता नाही आठवत चव, पण इंदोर मध्ये राजस्थानी जेवणाचा खूप प्रभाव आहे त्या मुळे अनेक ठिकाणी चांगली डाळ बाटी मिळू शकते

In reply to by गवि

रामचंद्र 06/08/2023 - 10:08
गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. अवचट आणि यकुंच्या लेखनाचा दुवा/धागा/संदर्भ मिळेल का?

In reply to by रामचंद्र

गवि 06/08/2023 - 10:21
अवचट यांच्या नेमक्या कोणत्या लेखात आहे ते आता आठवत नाही. खास या विषयावर लेख असेलच असे नाही पण तपशीलवार वर्णन होते. यकु काही काळ इंदुरात वास्तव्याला असल्याने त्या काळात मिपावर लिहिताना / प्रतिसाद देताना तो असे उल्लेख करत असे. शासकीय मदिरालय हा उल्लेख एका प्रतिसादात होता. शिवाय सर्वाँना तो इंदूरला कट्टा करू वगैरे म्हणून इच्छा व्यक्त करत असे.

In reply to by गवि

कंजूस 06/08/2023 - 17:39
यकुंचे लेख शोधून दोन चार वाचले. अगाध ललित लेखन आहे त्यांचं. गप्पिष्ट माणूस होता. नर्मदा प्रकरणही वाचलं आहे. अवचट कोणता आइडी?

इंदूर हे आमच्या वाफगावकरांनी समृद्ध केलेले गाव. त्यास इंदोर म्हणणे फारच खटकते. काटा रुते कुणाला हे आमचे सर्वात आवडते नाट्य गीत व त्याचे अशा प्रकारे विडंबन आणी ते सुद्धा जिव्हा लोलुपता दर्शवण्यासाठी, ते सुद्धा देवलोकातील हिशोब नवीसा कडून...... शिव शीवा...... बराच काळ मरु स्थला मधील मत्स्य प्रदेश तथा केकय, बाल्हीक प्रांताच्या सीमेवर व्यतीत केल्यामुळे हा पदार्थ चांगल्याच ओळखीचा आहे. खाता बाट्या तरी त्या घसा खवखवे फार उदरचा डोंगर होतो अन् हृदयात गाठ्या हजार एवढेच बोलून खाली बसतो.

चौथा कोनाडा 04/08/2023 - 17:48
पिंचिंमध्ये अधून मधुन खातो दालबाटी, रामदेव धाबाला सुद्धा खाल्ली आहे .. झकास टेस्ट आहे. इंदूरच्या सराफ्यात ही खाल्ली आहे तिथली आवडली होती ! बाकी चित्रगुप्तसाहेबांचे आर्त काव्य आवडले ! त्यांना लवकरात लवकर खायला मिळो ही मोदीचरणी प्रार्थना !

विदेशात राहून स्वदेशी (इंदोर ची) स्वप्न बघायची आणी पुणेकरांवर ठपका ठेवायचा,काय पटतं नाय ब्बुवा

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 16:50
आम्ही उभयता इंदूरचेच असल्याने अगदी 'कंड्या'वर भाजलेल्या नाही, तरी पातेल्यातल्या खमंग बाट्या अधून मधून करतच असतो. अगदी अमेरिकेत सुद्धा. त्यासाठी मुद्दाम बाटीचा जाडा आटा घेऊन जातो. त्यामुळे इथे वर्णिलेली तगमग ही स्वतःची नसली, तरी पुणेरी भार्या असणार्‍या काही नातलगांची आहे (आणि काळही पुष्कळ जुना आहे - जेंव्हा पुण्यात यूपी-बिहारवाले अगदी नगण्य असतील-वा नसतीलच) (माळव्यातले 'कंडे' म्हणजे सुमारे दोन इंज जाड आणि फूटभर व्यास असलेल्या गोवर्‍या).

In reply to by चित्रगुप्त

आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे. जन्मलो जरी इथे वाढलो मी कुठे कुठे मन वेडे गुंतले उगाच मी राहीलो जिथे जिथे गंमत करत होतो. हलकेच घ्या. राजस्थानात आठ दहा वर्षांत भरपूर डाळ बाटी खाल्ली. लिट्टी चोखा सुद्धा एक असाच मस्त पदार्थ. बिहारी बाबूंचे आवडते खाद्य. विडंबन आवडले.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 19:25
कंडे माहित आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे.
आमच्या लहानपणी सुंदर छोकरीला ती 'कंडा' किंवा 'माल' असल्याचे म्हणत आणि आमचे एक आजन्म ब्रम्हचारी (पण जन्मभर आर्त लग्नेच्छू) मित्र त्यांना आवडणार्‍या बायांचा (त्यावेळी मी तीस वर्षांचा, तर ते पंचावन-साठचे असतील) ती करोलबागवाली 'केंडी', त्रिवेणीतली केंडी असा उल्लेख करत. त्यांचा डोक्याचा स्क्रू जरा ढिला होता. खूप विपरीत परिस्थितीत अवघे जीवन गेले, पण कदाचित स्क्रू ढिला असल्यानेच सदा आनंदी, उत्साही, आणि आपले लग्न नक्की होणार ही साठीतही आशा असल्याने 'केंड्या' हुडकणे नेहमी चाललेले असायचे. त्यांचा अंतही फार वाईट अवस्थेत झाला. त्यांचे वडील भारतातले प्रसिद्ध चित्रेकार होते. ते दिल्लीत रहात असल्याने या वर्णनावरून कदाचित विवेक पटाईत त्यांना ओळखतील.

विवेकपटाईत 04/08/2023 - 18:19
इंदौरी बाटी, तुपाची धार. मिळमिळीत मिसळ पुण्याची छान. बहुतेक नोव्हेंबर महिन्यात इंदूरला जाण्याचा विचार करत आहे. खाऊ गल्लीची चव ही चाखणार.

कंजूस 04/08/2023 - 19:11
बाटी प्रकार आणि त्यासोबत दाल बाफले - बाटी, डाळ,तूप (ओंकारेश्वर) चुरमा* बाटी डाळ - बाटीच्या आत गोड नसलेला चुरमा भरलेला असतो, डाळ आणि तूप. (मांडू) डाळ बाटी चुरमा - साधी बाटी ,डाळ ,तूप आणि गोड चुरमा बरोबर देतात.( राजस्थानी प्रकार) डाळ बाटी - बाट्या,तूप आणि डाळ (जळगाव ,अबू) हे दाळबाटी शक्यतो थंडीत खातात. आणि पचविण्याची शक्ती असणारेच खातात. अन्यथा बाटी खाल्ल्यावर पोटात गुरगुर सुरू होते. कणीक कच्ची राहाते.

विडंबन काव्य उत्तम! आवडले. अवांतर : दाल बाटी हा प्रकार मला अतिशय ओव्हररेटेड वाटतो. मी "अकरा" वर्षांचा असताना दवाखान्यात अ‍ॅडमीट होतो महिनाभर. रोज घरून डबा यायचा. दवाखान्यातलं जेवण घशाच्या खाली उतरायचं नाही. एके दिवशी आईने विचारलं, उद्या काय आणू खायला? मी म्हटलं : तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकर! मराठवाड्यातल्या तुरीच्या डाळीच्या आमटीत कुस्करलेल्या भाकरीची सर ह्या दाल बाटीला पुढच्या कितीही जन्मात येणार नाही. सं - दी - प

Bhakti 04/08/2023 - 22:12
माझ्या आत्याने मला उकळत्या पाण्यात गोळा उकडून तळलेली बट्टी करायची शिकवली होती.काही वर्षे तर कधीही बट्टी करायचे :) बाकी फक्कड फर्माईश केलीय लवकर पूर्ण व्हावी. रचक्याने ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं, मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला.

चित्रगुप्त 04/08/2023 - 22:54
ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं
बडा सराफा आणि छोटा सराफा वेगवेगळे आहेत. बडा सराफा हल्ली खाऊगल्ली म्हणुन जास्त ठाऊक असला, तरी मुळात तो सराफाच आहे. त्याजवळच असलेला 'छोटा सराफा' त्यामानाने लहान गल्ली असून तिथे मुख्यतः सोन्याचांदीची दुकानेच आहेत.
मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला
-- "लाव रे तो व्हिडियो" तो विडू कोन्ता हाय ? (अगदी सहज सापडला तरच द्यावा)

nutanm 05/08/2023 - 06:52
इंदूरी जेवण प्रकार खाण्याचे खूपच एकाच‌ सहलीत लक्षात‌. रहाणारया. सहलीत खूप. आनुभवले खूप छान अनुभवांतला एक अनुभव‌ व माझ्या हौशी व वरचा अधिकारी पदावर च्या मेव्हण्यामुळे अविस्मरणीय अनुभवाची‌. केलेली एक सहल. व खरेदी तर त्याच्या उत्तम दर्जाच्या खरेदी‌ करणयाची. साक्ष. मी तिथे‌. बाटी‌. हा प्रकार न खाता लहानपणीच सोळा सोमवार व्रताच्या उद्यापनात कणिक‌ भिजविणाया. पासून . बाटया करणे मग भाजणे ,कुटणे खलबत्त्यात नंतर छान चाळून त्यात प्रमाणात गूळ व. साजूक तूप. घरी आजी आईने‌ मिळून कढविलेले ‌ तूप घालून उद्यापनाचे आजोबांचे ज्यावर देखरेखीखाली तयार केलेले सुंदर लाडू सोळा सोमवारासाठीचे‌ खाल्लेले व करतानाचे बघून अजून या वयातही उततम‌ आठवतायेत. व घरी गॅस ,मिक्सर/फूडप्रो असताना काय जड असे वाटते पण माझे‌ सिनिअर सिटीझन चे वय व मदतीशिवाय कोणाच्याही धीर होत नाही हा खटाटोप करायचा. पण‌ वाटते तर खूपच.

रामचंद्र 05/08/2023 - 20:03
पुण्यात काही जैन मंदिरांमध्ये (उदा. दादावाडी सारसबाग, ब्रह्मा हॉटेल चौक, सिंहगड रोड, इ.) रोज व खास बेत रविवारी जैन-राजस्थानी पद्धतीचे जेवण मिळते. तिथेच खाण्याची तसेच पार्सलचीही सोय असते, मात्र एकच पदार्थ स्वतंत्र मिळतो का संपूर्ण थाळीच घ्यावी लागते ते माहीत नाही. त्यात ती खास राजस्थानी पद्धतीची बाटीही मिळत असावी असं वाटतं.

कंजूस 06/08/2023 - 20:01
पौष्टिक अन्न पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात असा माझा समज आहे. महिला मंडळ मात्र चटकमटक आंबट,चिंबट चटकदार पदार्थ खातात.

चित्रगुप्त 06/08/2023 - 22:14
पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात
---हा एक वेगळाच रोचक, संशोधन करण्यासारखा विषय आहे. जमल्यास यावर धागा काढावा. शहरी लोकांच्या आहारविषयक सवयीत गेल्या वीसेक वर्षात बराच बदल घडून आला असावा असे वाटते. ग्रामीण भागांविषयी फारसे ठाऊक नाही.

सुबोध खरे 08/08/2023 - 12:20
कोणत्याही शहरातील प्रसिद्ध पदार्थ हे सर्वाना आवडतीलच असे नाही आणि याशिवाय मला आवडला म्हणजे माझ्या मित्राला आवडेलच असे नाही. लष्करी नोकरीमुळे भारतभर भ्रमण केल्यावर एक लक्षात आले कि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मिळतात ते सर्व १०० % पदार्थ मुंबई किंवा दिल्लीत कुठे ना कुठे मिळतातच. कारण तेथील रहिवाश्यांनि किंवा पर्यटकांनी ते पदार्थ या मोठ्या शहरात व्यवसायासाठी आणलेले असतात. मोठ्या शहरात साधारणपणे ते खपण्याची शक्यता असतेच. बहुसंख्य वेळेस हे पदार्थ मूळ शहरात मिळतात त्याच दर्जाचे किंवा काही वेळेस जास्त चांगल्या दर्जाचे मिळू शकतात. परंतु फरक असा असतो कि हे पदार्थ खाताना त्यात्या गावचे/ शहराचे वातावरण मुंबई दिल्लीत येऊ शकत नाही. उदा. हुरडा तुम्हाला मुंबई पुण्यातही मिळू शकतो. परंतु शेतात बसून शेकोटीवर भाजलेला हुरडा खाण्याचे वातावरण कसे आणणार? एकच गोष्ट म्हणजे बहुसंख्य ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेते हे प्रसिद्ध का होतात? तर त्यांचा दर्जा बहुतांशी उत्तम असतो आणि बहुतकरून वाजवी भावात. त्यामुळे अशा ठिकाणी आपण जरूर जावे परंतु तेथील खाद्यपदार्थांची दुसऱ्या ठिकाणच्या पदार्थांची तुलना करू नये. अन्यथा बऱ्याच वेळेस आपला अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते. उदा मथुरेला जाऊन पेढे घेतले तर तसेच उत्तम पेढे मुंबईत अनेक ठिकाणी नक्की मिळू शकतात. किंवा लखनौ ला जाऊन टुंडे के कबाब किंवा पेप्पर चिकन घेतले तर तसे कबाब किंवा चिकन मुंबईत सुद्धा मिळतं. पण मथुरेच्या पेढ्याची रुची किंवा लखनौ च्या टुंडे के कबाब" ची रुची " हॅ, यात काय मोठंसं आहे" असे बोलून आपण स्वतःच घालवत असतो. तेंव्हा एक विनंती आहे कि जिथे जाल तिथे आपली पाटी कोरी ठेवूनच जा म्हणजे अगदी एखाद्या ठार खेड्यात चुलीवर केलेली अंबाडीची भाजी आणि नाचणीची भाकरी चा आस्वाद तुम्ही पंचतारांकित रेस्टोरेंट मधल्या शाही पनीर इतकाच घेऊ शकाल.

चित्रगुप्त 12/07/2024 - 20:36
आज योगायोगाने हा धागा उघडला. मी तर आपण असे काही लिहीले होते हे विसरूनही गेलो होतो आणि शेवटले काही प्रतिसादही वाचलेले नव्हते. पण एकंदरित मजा आली सगळे प्रतिसाद वाचताना. सगळ्यांचे अनेक आभार.
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३