मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आहा ते सुंदर दिन हरपले

अविनाशकुलकर्णी ·
आहा ते सुंदर दिन हरपले --------------------------------- निवांत क्षणी आठवणीच्या गल्लीत फेरफटका मारला स्वीट होम आठवले स्वीट होम उपाहार गृह मंडईतून आठवड्याची भाजीपाला खरेदी झाली कि कुमठेकर रोड वरील हे उपहार गृह त्याला भेट दिली नाही असा पुणेकर विरळाच इडली सांबार -साबुदाणा खिचडी -व उपमा ह्या त्या हॉटेल मधल्या फेमस डिशेस त्या काळी इडली सांबार वर शेव भुरभुरली जात असे नव्या पिढीला माहीत नसेल पण इडली सांबार च्या बाउल मध्ये दोन चमचे सायक तूप घातले जाई फोडणीत भरम साठ कोथिंबीर व तिखट असे त्यामुळे सांबार वर तर्रि चा तवंग असे हटके चवीचं सांबार खावे तर स्वीट होम मध्ये उपमा पण हटके चवीचा असे वर शेव भुरभुरली

झोल? चच्चडी?

नूतन ·

जेम्स वांड 06/10/2019 - 14:42
मिपावर एकदम महाराष्ट्र बंगाल सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम एखाद्या उपक्रमाच्या धडाडीने सुरू झालेला दिसतोय. त्या निमित्ताने वंग प्रांताशी ओळख होते आहे एरवी राजकारण सोडून काहीच ऐकायला मिळत नाही अन काठी रोल सोडून मला बंगाली जेवणातले काहीच कळत नाही. पलीकडे अनिंद्य बोवा कोलकात्याच्या पट उलगडत बसलेत इकडे नूतन ताई पंचफोडण घालून खमंग काहीतरी बनवत आहेत, मज्जानी वाचन मेजवानी. रच्याकने, बंगालमध्ये व्हेज जेवण थोडेसे नकोसे मानतात का ? आमची एक बंगाली टीम मेंबर (स्वतः मुखोपाध्याय) आहे ती म्हणते व्हेज म्हणजे बिधोबा भोज असतं, बंगाल मध्ये म्हणे वैधव्य प्राप्त स्त्रियांनी फक्त शाकाहारी सात्विक भोजनच करायचे वगैरे कडक नियम असत (इति बंगालीण उवाच) चुभूदेघे. शाकाहार संबंधी तिथल्या सांस्कृतिक समजुती वगैरेंवर पण एक भाग येऊ देत प्लीज.

नूतन 06/10/2019 - 15:14
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. मी शाकाहारी असल्याने तुलनेसाठी फक्त शाकाहाराविषयी (रोजच्या जेवणातील) लिहीलं आहे.

नूतन 06/10/2019 - 18:07
काय गडबड झाली कळत नाही. आधी दिसत होते वाटतं.बघते.

अनिंद्य 07/10/2019 - 10:25
खूब भालो. लेख आणि कृतीसह फोटो ! फोटो आता दिसत आहेत आणि द्रोणात असलेल्या घुगनीचा फोटो विशेष.

जेम्स वांड 06/10/2019 - 14:42
मिपावर एकदम महाराष्ट्र बंगाल सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम एखाद्या उपक्रमाच्या धडाडीने सुरू झालेला दिसतोय. त्या निमित्ताने वंग प्रांताशी ओळख होते आहे एरवी राजकारण सोडून काहीच ऐकायला मिळत नाही अन काठी रोल सोडून मला बंगाली जेवणातले काहीच कळत नाही. पलीकडे अनिंद्य बोवा कोलकात्याच्या पट उलगडत बसलेत इकडे नूतन ताई पंचफोडण घालून खमंग काहीतरी बनवत आहेत, मज्जानी वाचन मेजवानी. रच्याकने, बंगालमध्ये व्हेज जेवण थोडेसे नकोसे मानतात का ? आमची एक बंगाली टीम मेंबर (स्वतः मुखोपाध्याय) आहे ती म्हणते व्हेज म्हणजे बिधोबा भोज असतं, बंगाल मध्ये म्हणे वैधव्य प्राप्त स्त्रियांनी फक्त शाकाहारी सात्विक भोजनच करायचे वगैरे कडक नियम असत (इति बंगालीण उवाच) चुभूदेघे. शाकाहार संबंधी तिथल्या सांस्कृतिक समजुती वगैरेंवर पण एक भाग येऊ देत प्लीज.

नूतन 06/10/2019 - 15:14
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. मी शाकाहारी असल्याने तुलनेसाठी फक्त शाकाहाराविषयी (रोजच्या जेवणातील) लिहीलं आहे.

नूतन 06/10/2019 - 18:07
काय गडबड झाली कळत नाही. आधी दिसत होते वाटतं.बघते.

अनिंद्य 07/10/2019 - 10:25
खूब भालो. लेख आणि कृतीसह फोटो ! फोटो आता दिसत आहेत आणि द्रोणात असलेल्या घुगनीचा फोटो विशेष.
मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. "काछेर मानुष " (बंगाली भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरी) वाचताना मध्यमवर्गीय घरातील जेवणाचे बरेच उल्लेख आढळले. साहजिकच आपल्या मराठी घरात होणा-या रोजच्या आमटी-भात,खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा साध्यासुध्या जिनसांप्रमाणे बंगाली शाकाहारी जेवणात रोज काय करतात ? या प्रश्नाचा उदय झाला. उत्तरासाठी आंतर्जालावर शोध सुरू झाला. त्यातून काही माहिती मिळाली.

पाभेचा चहा

पाषाणभेद ·

मारवा 25/09/2019 - 05:44
लेख आवडला व याच्याशी संबंधित आहे म्हणुन मला ब्रँडेड चहा विषयी काही प्रश्न आहेत येवले इ. चहा चा बिझनेस फॉरमॅट काय आहे ? त्यांच्या डीलर ला ते पत्ती साखर मसाला व दुध पावडर सर्व पोचवुन केवळ उकळवण्यापुरते काम देतात का ? डीपॉझीट शेअरींग कसे असते ? क्वालिटी कंट्रोल कसा केला जातो ? यांच्या चहात कुठलेसे आक्षेपार्ह केमिकल वापरले जाते असे जे काय अफवा चर्चा आहे त्यात कितपत तथ्य आहे ?

In reply to by मारवा

सर्वसाक्षी 25/09/2019 - 10:09
ईतक्यातच भाष्य करणे बरे नाही पण... https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/fda-take-action-against-yewale-chaha-tea/articleshow/71283782.cms या चहात रासायनिक भेसळ असल्याच्जे वृत्त एका वर्तमानपत्राने याआधी दिले होते.

In reply to by मारवा

जालिम लोशन 25/09/2019 - 15:33
हा एक पाॅलिमरचा प्रकार आहे (प्लास्टिक) . चीन मधे बेबीफुड बनवणार्‍या कंपन्या हे वापरत असतात. अन्न व औषध प्रशासनची ह्याच्या वापरावर बंदी आहे. साधारण सहा महिन्यात ह्याच्या सेवनाने लिव्हर निकामी होऊ शकते. द्रवपदाथा नाृ घट्टपणा आणण्यासाठी त्याचा ऊपयोग करतात. थोडक्यात नफा मिळवण्यासाठी चितळे किंवा गोकुळ दुध न वापरता ते वापरल्याचा आभास निर्माण करतात. हाच प्रकार हाॅटेल वाले त्यांच्या रेसिपीजमधे निंरनिराळे औद्योगिक ग्रेडची आम्ल वापरुन करतात.

In reply to by मारवा

चौथा कोनाडा 25/09/2019 - 16:56
मारवाजी, त्यांच्या दुकानाचा ले-ऑऊट, सिस्टिम ठरेल्या डिझ्झाईन नुसार करावी लागते. त्यांच्या पातेल्यांची साईझ ठरेली असते, ज्यात किती लि दुध मावणार ते ठरलेले असते. प्रमाणानुसार रेडिमेड पुड्या (चहा पत्ती, साखर इ) तयार असतात, त्या उघडून दुधात टाकतात, त्यामुळे सर्व प्रमाण व्यवस्थित जमते. चहाची चव मेन्टेन राहते. या सर्व दुकानात येवले याण्चा बरा लागतो, मी बर्‍याच वेळा पितो. कितीही कसलेही चहा ढोसले तरीही इराणी चहा तो इराणी चहा ! त्याला कुणाचीच सर नाही !

चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो.
हे अगदी खरे. माझा गावचा चुलतभाऊ - नावसुद्धा त्याचे भारदस्त - कालिदास - तेव्हा तो दहाबारा वर्षांचा होता. डस्ट टी ऊर्फ चायची पूड वापरून गूळ आणि गाईचे दूध घालून फक्कड चहा बनवीत असे. त्याची आपुलकी चहात उतरे. काही ठिकाणी पाहुणा बराच वेळ जात नसे तर त्याला पुन्हा चहा विचारला जातो. मस्त लेख. आवडला धन्यवाद.

हा लेख वाचून मी तुमचा "चाहता" झालो. या चहावर अनेक गाणी सुध्दा आली आहेत. - शायद मेरी शादीका खयाल दिल मे आया है, इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है - एक गरम चाय की प्याली हो कोई उसको पिलाने वाली हो, गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो - गरम गरम चाय पैजारबुवा,

मस्त लेख. चहा ने अनेकांना हात दिलाय. सर्वात कमी भांडवलात उभा राहणारा आणी खात्रीशीर पणे चालणारा धंदा म्हणजे चहाचे दुकान. कधीही कुठेही सुरू करता येतो. अगदी पाचशे रुपये गुंतवून पहिल्याच संध्याकाळी भांडवल ही निघू शकतं. सध्याचे पंतप्रधान चहा विकून pm झाले. म्हणून चहा विक्रेत्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. राजकारणाच्या गप्पा आता व्हाट्सअप्प वर होतात. त्या आधी चहाच्या दुकानावर व्हायच्या. चहा आधी 2 रुपयात मिळायचा. तेव्हा पाजणारे आणी पिणारे मनसोक्त प्यायचे. पण आता छोट्या शहरात पाच आणि मोठ्या शहरात 10 रुपयाखाली मिळत नाही. माझ्या ओळखीच्या एका चहाविक्रेत्या काकांनी चहाचा ग्लास बदलला. आणखी छोटा आणला. अस का केलं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मोठा ग्लास पाहून 2 लोक आले तर ते अर्धा अर्धा करून प्यायचे. आता ह्या ग्लास मध्ये अर्धा करु शकणार नाहीत. पुण्यात असलेल्या अमृततुल्य वगैरे वेगवेगळ्या ब्रँच च्या चहा बद्दल माहिती नाही. पण तिथली एक गोष्ट आवडते. ती म्हणजे स्वच्छता. जनरली चहाचे दुकान कळकट मळकट असतात. तिथे कोणीतरी येऊन पाणी तोंडात घेऊन गुळणी करणार. घशातून भयानक महाभयानक आवाज काढणार. बऱ्याच लोकांना अश्या आवाजाच काही वाटत नाही. मला भयानक किळस येते. काही येऊन तंबाखू, गुटखा वगैरे थुंकणार. काण्याकोपऱ्यात पडलेल्या लाल पिचकाऱ्या. उष्टे कप वरच्यावर पाण्यात विसळुन त्यात पुन्हा चहा देणे. अश्या भयानक वातावरणात चहा कसाकाय पितात लोक कळत नाही. येवले चहा वगैरे अश्या ठिकाणी त्या मानाने चांगली स्वछता असते.

जगप्रवासी 25/09/2019 - 10:52
सकाळी एस टी स्टॅण्डवर लालपरीची वाट बघताना चहा घेत पुढच्या लागणाऱ्या "वाट"चालीबद्दल चर्चा होतात. चालून चालून पायाचे तुकडे पडलेले असतात आणि जेव्हा एखाद्या घरात चहा विचारला जातो तेव्हा तो ट्रेकर्ससाठी तर अमृतापेक्षाही कमी नसतो. कोकणात कोणाच्याही घरी कितीही वाजता जा तुम्हाला चहा दिला जातोच मग सकाळ असो दुपार असो किंवा रात्र असो. थोड्या महिन्यांपूर्वी परळ स्टेशन जवळ अशाच एका फ्रॅन्चायजीचं चहाच दुकान चालू झालंय. म्हटलं चव घ्यावी म्हणून दुकानात गेलो तर चहाची मजेशीर नावं वाचून भारी वाटलं म्हणजे बासुंदी चहा, रोज चहा. मला वाटलं होत की बासुंदी चहात बासुंदी वगैरे घालून देतात की काय पण दुकानदाराला विचारलं तेव्हा कळालं की तो चहा थोडा गोड असतो. याआधीही चहावर धागे येऊन गेलेत पण तरी हा विषय नेहमीच ताजा असतो.

हेमंतकुमार 25/09/2019 - 11:56
चहा आणि आरोग्य यावर थोडी माहिती: १. ज्यांना जठराम्लतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी कोरा चहा (अर्थात कमीत कमी उकळलेला) अधिक चांगला. दूध घातलेल्या चहाने जठराम्लता अधिक वाढते. स्वानुभव आहे. मी गेली १५ वर्षे कोराच पितोय. २. कोऱ्या चहात antioxidant गुणधर्माची जी उपयुक्त रसायने असतात त्यांचा परिणाम दूध घातल्यावर नाहीसा होतो.

वकील साहेब 25/09/2019 - 13:36
मस्त लेख, अनेक सिक्वेल प्रसवण्याची क्षमता या विषयात आहे. चहाची चव चाखली नाही असा माणूस विरळाच म्हणायचा. फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो. या बाबत सहमत. चहाचे दुष्परिणाम सुद्धा यात समाविष्ट करायला हवे होते. मागे युटूब वर डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचे व्याख्यान ऐकले होते त्यांनी त्यात सांगितले होते की आपल्याकडे जो उकळून उकळून चहा पिला जातो तो आरोग्यास खूप हानिकारक आहे. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीस अनुसरून चहा केल्यास कुणालाच तो आवडणार नाही हे खरे. प्रत्येकाचे चहा पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असले तरी किमान दोन कप चहा हे साधारण प्रमाण आहे. म्हणजे किमान दोन चमचे साखर या चहाच्या निमित्ताने प्रत्येकजण दररोज सेवन करतो. त्यात बैठी जीवनशैली वाढीस लागल्याने भारत मधुमेहींची राजधानी आहे काय असे वाटते. यात सत्ताधाऱ्यांचे चहापान आणि विरोधकांचा ठरलेला बहिष्कार याचाही अंतर्भाव करावा. चहाटळ या शब्दाची निर्मिती होण्यामागे चहाचा काही संबंध आहे काय हे हि तपासून पाहायला हवे. चहाचा काढा सर्वाना माहित असेल पण आमच्या लहानपणी आमची आजी चहाचा पाढा म्हणून दाखवायची. मला त्याच्या दोन ओळी आठवताहेत.कोणाला पूर्ण आठवत असेल तर त्यांनी इथे नक्की टाका. चहा एके चहा चहा दुणे किटली सारी दुनिया बाटली या चहाने हो या चहाने. चहा एके चहा चहा दुणे साखर कमी जाते भाकर या चहाने हो या चहाने.

In reply to by वकील साहेब

चिगो 25/09/2019 - 17:34
चहा करण्याच्या आदर्श पद्धतीस अनुसरून चहा केल्यास कुणालाच तो आवडणार नाही हे खरे.
थोडासा असहमत.. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीनुसार बनवलेला चहा अत्यंत तजेलदार असतो. (इथे चहा बनवण्याची आदर्श पद्धत म्हणजे एकतर पाणी उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात एक टि-स्पून चहापावडर टाकून भांड्यावर झाकण ठेवावे, व एका मिनीटानी चहा गाळून घ्यावा ही आहे, किंवा ८०-८५ डिसेंच्या गरम पाण्यात २-३ मिनीट चहापावडर ठेवून मग तो प्यावा ही आहे.) अशा चहाचा रंग (खास करुन दुसर्‍या पद्धतीतला) स्कॉच सारखा दिसतो, खास करुन दार्जिलींग टी चा.. आपण जो मसाला चहा पितो, त्याचा पहीला 'अहाहा' हा जनरली साखरेच्या गोडपणाचा आणि मसाल्याच्या चवीचा परीणाम असतो. वर कुमार१ बोललेत तसा, चहा कोरा आणि बीन-साखरेचा प्यावा.

श्वेता२४ 27/09/2019 - 11:27
पण फक्त आईच्या हातचा :) दादरला आयडीयल बुकच्या समोरच्या गल्लीत उजव्या हाताला चहाचे दुकान आहे. तीथे अप्रतीम चहा मिळतो. त्याची चव बरीचशी माझ्या आईच्या हातच्या चवीशी मिळतीजुळती आहे. तीथे गेल्यावर चहा पिणे होतेच. तुमच्या लेखाच्या निमित्ताने पुण्यातील अमृततुल्यजवळ जमणारे आम्हा मित्रमैत्रिणींचे कट्टे आठवले. छान लिहीलंय

भीडस्त 27/09/2019 - 13:08
पितळीभर चहा आठवडा बाजारातून आणलेली चाची भुक्की - पिवळे पुडे असायचे. बहुधा लिप्टनचे. त्याबरोबर आजोबांनी आणलेली बटारं. पाच रुपये शेकडा. एक शेकडा तरी असायचीच. घरात पोरंच दहाबारा गोळा व्हायची सुट्ट्यात. जान्ताल्यांना साखरेचा चहा,पोराबाळाना गुळाचा असे. साखरेसाठी पितळी डबा असे. कडीकोयंड्याची सोय असलेला. साखर कुलुपबंदच असे. किल्ली घराची कारभारीण बाई असे तिच्या ताब्यात. घरी दुधदुभतं होतं तरी चहात दुध नावालाच असे. कधी मसणवट्यातून मैत करुन त्या घरी आल्यास प्यावा लागणारा कोरा चहा. हे अजूनही चालू असते. पाभे मस्त लिहिलंय तुम्ही

मारवा 25/09/2019 - 05:44
लेख आवडला व याच्याशी संबंधित आहे म्हणुन मला ब्रँडेड चहा विषयी काही प्रश्न आहेत येवले इ. चहा चा बिझनेस फॉरमॅट काय आहे ? त्यांच्या डीलर ला ते पत्ती साखर मसाला व दुध पावडर सर्व पोचवुन केवळ उकळवण्यापुरते काम देतात का ? डीपॉझीट शेअरींग कसे असते ? क्वालिटी कंट्रोल कसा केला जातो ? यांच्या चहात कुठलेसे आक्षेपार्ह केमिकल वापरले जाते असे जे काय अफवा चर्चा आहे त्यात कितपत तथ्य आहे ?

In reply to by मारवा

सर्वसाक्षी 25/09/2019 - 10:09
ईतक्यातच भाष्य करणे बरे नाही पण... https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/fda-take-action-against-yewale-chaha-tea/articleshow/71283782.cms या चहात रासायनिक भेसळ असल्याच्जे वृत्त एका वर्तमानपत्राने याआधी दिले होते.

In reply to by मारवा

जालिम लोशन 25/09/2019 - 15:33
हा एक पाॅलिमरचा प्रकार आहे (प्लास्टिक) . चीन मधे बेबीफुड बनवणार्‍या कंपन्या हे वापरत असतात. अन्न व औषध प्रशासनची ह्याच्या वापरावर बंदी आहे. साधारण सहा महिन्यात ह्याच्या सेवनाने लिव्हर निकामी होऊ शकते. द्रवपदाथा नाृ घट्टपणा आणण्यासाठी त्याचा ऊपयोग करतात. थोडक्यात नफा मिळवण्यासाठी चितळे किंवा गोकुळ दुध न वापरता ते वापरल्याचा आभास निर्माण करतात. हाच प्रकार हाॅटेल वाले त्यांच्या रेसिपीजमधे निंरनिराळे औद्योगिक ग्रेडची आम्ल वापरुन करतात.

In reply to by मारवा

चौथा कोनाडा 25/09/2019 - 16:56
मारवाजी, त्यांच्या दुकानाचा ले-ऑऊट, सिस्टिम ठरेल्या डिझ्झाईन नुसार करावी लागते. त्यांच्या पातेल्यांची साईझ ठरेली असते, ज्यात किती लि दुध मावणार ते ठरलेले असते. प्रमाणानुसार रेडिमेड पुड्या (चहा पत्ती, साखर इ) तयार असतात, त्या उघडून दुधात टाकतात, त्यामुळे सर्व प्रमाण व्यवस्थित जमते. चहाची चव मेन्टेन राहते. या सर्व दुकानात येवले याण्चा बरा लागतो, मी बर्‍याच वेळा पितो. कितीही कसलेही चहा ढोसले तरीही इराणी चहा तो इराणी चहा ! त्याला कुणाचीच सर नाही !

चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो.
हे अगदी खरे. माझा गावचा चुलतभाऊ - नावसुद्धा त्याचे भारदस्त - कालिदास - तेव्हा तो दहाबारा वर्षांचा होता. डस्ट टी ऊर्फ चायची पूड वापरून गूळ आणि गाईचे दूध घालून फक्कड चहा बनवीत असे. त्याची आपुलकी चहात उतरे. काही ठिकाणी पाहुणा बराच वेळ जात नसे तर त्याला पुन्हा चहा विचारला जातो. मस्त लेख. आवडला धन्यवाद.

हा लेख वाचून मी तुमचा "चाहता" झालो. या चहावर अनेक गाणी सुध्दा आली आहेत. - शायद मेरी शादीका खयाल दिल मे आया है, इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है - एक गरम चाय की प्याली हो कोई उसको पिलाने वाली हो, गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो - गरम गरम चाय पैजारबुवा,

मस्त लेख. चहा ने अनेकांना हात दिलाय. सर्वात कमी भांडवलात उभा राहणारा आणी खात्रीशीर पणे चालणारा धंदा म्हणजे चहाचे दुकान. कधीही कुठेही सुरू करता येतो. अगदी पाचशे रुपये गुंतवून पहिल्याच संध्याकाळी भांडवल ही निघू शकतं. सध्याचे पंतप्रधान चहा विकून pm झाले. म्हणून चहा विक्रेत्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. राजकारणाच्या गप्पा आता व्हाट्सअप्प वर होतात. त्या आधी चहाच्या दुकानावर व्हायच्या. चहा आधी 2 रुपयात मिळायचा. तेव्हा पाजणारे आणी पिणारे मनसोक्त प्यायचे. पण आता छोट्या शहरात पाच आणि मोठ्या शहरात 10 रुपयाखाली मिळत नाही. माझ्या ओळखीच्या एका चहाविक्रेत्या काकांनी चहाचा ग्लास बदलला. आणखी छोटा आणला. अस का केलं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मोठा ग्लास पाहून 2 लोक आले तर ते अर्धा अर्धा करून प्यायचे. आता ह्या ग्लास मध्ये अर्धा करु शकणार नाहीत. पुण्यात असलेल्या अमृततुल्य वगैरे वेगवेगळ्या ब्रँच च्या चहा बद्दल माहिती नाही. पण तिथली एक गोष्ट आवडते. ती म्हणजे स्वच्छता. जनरली चहाचे दुकान कळकट मळकट असतात. तिथे कोणीतरी येऊन पाणी तोंडात घेऊन गुळणी करणार. घशातून भयानक महाभयानक आवाज काढणार. बऱ्याच लोकांना अश्या आवाजाच काही वाटत नाही. मला भयानक किळस येते. काही येऊन तंबाखू, गुटखा वगैरे थुंकणार. काण्याकोपऱ्यात पडलेल्या लाल पिचकाऱ्या. उष्टे कप वरच्यावर पाण्यात विसळुन त्यात पुन्हा चहा देणे. अश्या भयानक वातावरणात चहा कसाकाय पितात लोक कळत नाही. येवले चहा वगैरे अश्या ठिकाणी त्या मानाने चांगली स्वछता असते.

जगप्रवासी 25/09/2019 - 10:52
सकाळी एस टी स्टॅण्डवर लालपरीची वाट बघताना चहा घेत पुढच्या लागणाऱ्या "वाट"चालीबद्दल चर्चा होतात. चालून चालून पायाचे तुकडे पडलेले असतात आणि जेव्हा एखाद्या घरात चहा विचारला जातो तेव्हा तो ट्रेकर्ससाठी तर अमृतापेक्षाही कमी नसतो. कोकणात कोणाच्याही घरी कितीही वाजता जा तुम्हाला चहा दिला जातोच मग सकाळ असो दुपार असो किंवा रात्र असो. थोड्या महिन्यांपूर्वी परळ स्टेशन जवळ अशाच एका फ्रॅन्चायजीचं चहाच दुकान चालू झालंय. म्हटलं चव घ्यावी म्हणून दुकानात गेलो तर चहाची मजेशीर नावं वाचून भारी वाटलं म्हणजे बासुंदी चहा, रोज चहा. मला वाटलं होत की बासुंदी चहात बासुंदी वगैरे घालून देतात की काय पण दुकानदाराला विचारलं तेव्हा कळालं की तो चहा थोडा गोड असतो. याआधीही चहावर धागे येऊन गेलेत पण तरी हा विषय नेहमीच ताजा असतो.

हेमंतकुमार 25/09/2019 - 11:56
चहा आणि आरोग्य यावर थोडी माहिती: १. ज्यांना जठराम्लतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी कोरा चहा (अर्थात कमीत कमी उकळलेला) अधिक चांगला. दूध घातलेल्या चहाने जठराम्लता अधिक वाढते. स्वानुभव आहे. मी गेली १५ वर्षे कोराच पितोय. २. कोऱ्या चहात antioxidant गुणधर्माची जी उपयुक्त रसायने असतात त्यांचा परिणाम दूध घातल्यावर नाहीसा होतो.

वकील साहेब 25/09/2019 - 13:36
मस्त लेख, अनेक सिक्वेल प्रसवण्याची क्षमता या विषयात आहे. चहाची चव चाखली नाही असा माणूस विरळाच म्हणायचा. फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो. या बाबत सहमत. चहाचे दुष्परिणाम सुद्धा यात समाविष्ट करायला हवे होते. मागे युटूब वर डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचे व्याख्यान ऐकले होते त्यांनी त्यात सांगितले होते की आपल्याकडे जो उकळून उकळून चहा पिला जातो तो आरोग्यास खूप हानिकारक आहे. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीस अनुसरून चहा केल्यास कुणालाच तो आवडणार नाही हे खरे. प्रत्येकाचे चहा पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असले तरी किमान दोन कप चहा हे साधारण प्रमाण आहे. म्हणजे किमान दोन चमचे साखर या चहाच्या निमित्ताने प्रत्येकजण दररोज सेवन करतो. त्यात बैठी जीवनशैली वाढीस लागल्याने भारत मधुमेहींची राजधानी आहे काय असे वाटते. यात सत्ताधाऱ्यांचे चहापान आणि विरोधकांचा ठरलेला बहिष्कार याचाही अंतर्भाव करावा. चहाटळ या शब्दाची निर्मिती होण्यामागे चहाचा काही संबंध आहे काय हे हि तपासून पाहायला हवे. चहाचा काढा सर्वाना माहित असेल पण आमच्या लहानपणी आमची आजी चहाचा पाढा म्हणून दाखवायची. मला त्याच्या दोन ओळी आठवताहेत.कोणाला पूर्ण आठवत असेल तर त्यांनी इथे नक्की टाका. चहा एके चहा चहा दुणे किटली सारी दुनिया बाटली या चहाने हो या चहाने. चहा एके चहा चहा दुणे साखर कमी जाते भाकर या चहाने हो या चहाने.

In reply to by वकील साहेब

चिगो 25/09/2019 - 17:34
चहा करण्याच्या आदर्श पद्धतीस अनुसरून चहा केल्यास कुणालाच तो आवडणार नाही हे खरे.
थोडासा असहमत.. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीनुसार बनवलेला चहा अत्यंत तजेलदार असतो. (इथे चहा बनवण्याची आदर्श पद्धत म्हणजे एकतर पाणी उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात एक टि-स्पून चहापावडर टाकून भांड्यावर झाकण ठेवावे, व एका मिनीटानी चहा गाळून घ्यावा ही आहे, किंवा ८०-८५ डिसेंच्या गरम पाण्यात २-३ मिनीट चहापावडर ठेवून मग तो प्यावा ही आहे.) अशा चहाचा रंग (खास करुन दुसर्‍या पद्धतीतला) स्कॉच सारखा दिसतो, खास करुन दार्जिलींग टी चा.. आपण जो मसाला चहा पितो, त्याचा पहीला 'अहाहा' हा जनरली साखरेच्या गोडपणाचा आणि मसाल्याच्या चवीचा परीणाम असतो. वर कुमार१ बोललेत तसा, चहा कोरा आणि बीन-साखरेचा प्यावा.

श्वेता२४ 27/09/2019 - 11:27
पण फक्त आईच्या हातचा :) दादरला आयडीयल बुकच्या समोरच्या गल्लीत उजव्या हाताला चहाचे दुकान आहे. तीथे अप्रतीम चहा मिळतो. त्याची चव बरीचशी माझ्या आईच्या हातच्या चवीशी मिळतीजुळती आहे. तीथे गेल्यावर चहा पिणे होतेच. तुमच्या लेखाच्या निमित्ताने पुण्यातील अमृततुल्यजवळ जमणारे आम्हा मित्रमैत्रिणींचे कट्टे आठवले. छान लिहीलंय

भीडस्त 27/09/2019 - 13:08
पितळीभर चहा आठवडा बाजारातून आणलेली चाची भुक्की - पिवळे पुडे असायचे. बहुधा लिप्टनचे. त्याबरोबर आजोबांनी आणलेली बटारं. पाच रुपये शेकडा. एक शेकडा तरी असायचीच. घरात पोरंच दहाबारा गोळा व्हायची सुट्ट्यात. जान्ताल्यांना साखरेचा चहा,पोराबाळाना गुळाचा असे. साखरेसाठी पितळी डबा असे. कडीकोयंड्याची सोय असलेला. साखर कुलुपबंदच असे. किल्ली घराची कारभारीण बाई असे तिच्या ताब्यात. घरी दुधदुभतं होतं तरी चहात दुध नावालाच असे. कधी मसणवट्यातून मैत करुन त्या घरी आल्यास प्यावा लागणारा कोरा चहा. हे अजूनही चालू असते. पाभे मस्त लिहिलंय तुम्ही
चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

आमार कोलकाता - भाग २

अनिंद्य ·

अनिंद्य 24/09/2019 - 11:52
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, लेखमालेचा हा दुसरा भाग आज प्रकाशित केला आहे. 'अनुक्रमणिका' करण्याचे तंत्र माहित नाही, ते कृपया करावे. अग्रीम आभार.

In reply to by अनिंद्य

कंजूस 25/09/2019 - 19:28
अनुक्रमणिका करण्यास सोपे जावे म्हणून सुचवतो की पुढचा तिसरा भाग 'जनातलं मनातलं' या सदरात न लिहिता 'भटकंती' सदरात लिहा. तिथे त्या सदरात लेखास संपादन बटण मिळेल. लेखमालिकेतील भाग येतील तशा त्याच्या लिंकस तुम्हालाच टाकून अनुक्रमणिका करता येईल.

प्रचेतस 25/09/2019 - 08:31
हा भागही खूप आवडला. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम गिळंकृत केला ह्या घटनेचे प्रतिकात्मक शिल्प पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले आहे. आसामचे प्रतिक असलेल्या एकशिंगी गेंड्याला इंग्लिश सोजिरांनी साखळदंडाने बांधलेले आहे. a

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 26/09/2019 - 10:48
@ प्रचेतस, तत्कालीन पुण्यात बंगाल-आसामातील घटनेचे असे पडसाद ! भारीच. 'सोजिरांनी' शब्द फक्त जुन्या मराठी पुस्तकात वाचला याआधी. तुमच्या खजिन्यातून सुयोग्य शिल्पचित्र टाकल्याबद्दल आभार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 26/09/2019 - 10:43
बिरुटे सर, ३२५ वर्षाच्या शहराबद्दल सांगायचे आहे, त्यातून इतिहास आवडीचा विषय. गाडी जास्त रेंगाळते इथे :-)

In reply to by राजे १०७

अनिंद्य 26/09/2019 - 10:39
@ राजे १०७ आभार. एका संपादक मित्रानी सांगितल्याबरहुकूम मालिकेतील प्रत्येक लेख साधारण १२०० ते १३०० शब्द आणि जास्तीतजास्त ७ फोटो एवढा ठेवला आहे. त्यापेक्षा मोठे भाग कोणी वाचत नाही असे या मित्राचे मत आहे.

अनिंद्य 26/09/2019 - 16:03
@ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ डॉ सुहास म्हात्रे @ उपेक्षित @ सुधीर कांदळकर @ पिंगू @ यशोधरा @ कोमल @ कंजूस तुम्हां सर्वांनी लेखन आवडल्याची पावती दिलीत, आभारी आहे. तुमच्या प्रतिसादांमुळे पुढे लिहीत राहण्याचा उत्साह वाटतो. _/\_

बबन ताम्बे 28/09/2019 - 07:15
नकाशावरून दिसते की बराच मोठा भाग ब्रिटिश अमलाखाली आला. ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यात प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे नगर नियोजन. आजही मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना ते जाणवते. सी एस टी, मुंबई मनपा, जिपीओ , म्युझियम अशा सुंदर सुंदर इमारती पहातच रहावाशा वाटतात . सुंदर लेखमाला चालली आहे.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 28/09/2019 - 16:44
@ बबन ताम्बे नगर नियोजन हा विषय आपण भारतीयांनी कधीचाच 'ऑपशन'ला टाकलेला आहे. मोहन जो दरोनंतर थेट जयपूर, चंदीगड आणि इतक्यात पिटुकले गांधीनगर आणि नया रायपूर असे मोजकेच थांबे घेत भारतीय 'नगरनियोजनाची' गाडी आपल्या सामूहिक अकर्मण्यतेच्या चिखलात अडकून पडली आहे. :-( मुंबई फोर्ट बद्दल सहमती, त्या भागात तासनतास पायी भटकायला आवडते - विशेषतः रविवारी सकाळी, गर्दी नसतांना. प्रतिक्रियेबद्दल आभार.

अनिंद्य 24/09/2019 - 11:52
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, लेखमालेचा हा दुसरा भाग आज प्रकाशित केला आहे. 'अनुक्रमणिका' करण्याचे तंत्र माहित नाही, ते कृपया करावे. अग्रीम आभार.

In reply to by अनिंद्य

कंजूस 25/09/2019 - 19:28
अनुक्रमणिका करण्यास सोपे जावे म्हणून सुचवतो की पुढचा तिसरा भाग 'जनातलं मनातलं' या सदरात न लिहिता 'भटकंती' सदरात लिहा. तिथे त्या सदरात लेखास संपादन बटण मिळेल. लेखमालिकेतील भाग येतील तशा त्याच्या लिंकस तुम्हालाच टाकून अनुक्रमणिका करता येईल.

प्रचेतस 25/09/2019 - 08:31
हा भागही खूप आवडला. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम गिळंकृत केला ह्या घटनेचे प्रतिकात्मक शिल्प पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले आहे. आसामचे प्रतिक असलेल्या एकशिंगी गेंड्याला इंग्लिश सोजिरांनी साखळदंडाने बांधलेले आहे. a

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 26/09/2019 - 10:48
@ प्रचेतस, तत्कालीन पुण्यात बंगाल-आसामातील घटनेचे असे पडसाद ! भारीच. 'सोजिरांनी' शब्द फक्त जुन्या मराठी पुस्तकात वाचला याआधी. तुमच्या खजिन्यातून सुयोग्य शिल्पचित्र टाकल्याबद्दल आभार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 26/09/2019 - 10:43
बिरुटे सर, ३२५ वर्षाच्या शहराबद्दल सांगायचे आहे, त्यातून इतिहास आवडीचा विषय. गाडी जास्त रेंगाळते इथे :-)

In reply to by राजे १०७

अनिंद्य 26/09/2019 - 10:39
@ राजे १०७ आभार. एका संपादक मित्रानी सांगितल्याबरहुकूम मालिकेतील प्रत्येक लेख साधारण १२०० ते १३०० शब्द आणि जास्तीतजास्त ७ फोटो एवढा ठेवला आहे. त्यापेक्षा मोठे भाग कोणी वाचत नाही असे या मित्राचे मत आहे.

अनिंद्य 26/09/2019 - 16:03
@ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ डॉ सुहास म्हात्रे @ उपेक्षित @ सुधीर कांदळकर @ पिंगू @ यशोधरा @ कोमल @ कंजूस तुम्हां सर्वांनी लेखन आवडल्याची पावती दिलीत, आभारी आहे. तुमच्या प्रतिसादांमुळे पुढे लिहीत राहण्याचा उत्साह वाटतो. _/\_

बबन ताम्बे 28/09/2019 - 07:15
नकाशावरून दिसते की बराच मोठा भाग ब्रिटिश अमलाखाली आला. ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यात प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे नगर नियोजन. आजही मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना ते जाणवते. सी एस टी, मुंबई मनपा, जिपीओ , म्युझियम अशा सुंदर सुंदर इमारती पहातच रहावाशा वाटतात . सुंदर लेखमाला चालली आहे.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 28/09/2019 - 16:44
@ बबन ताम्बे नगर नियोजन हा विषय आपण भारतीयांनी कधीचाच 'ऑपशन'ला टाकलेला आहे. मोहन जो दरोनंतर थेट जयपूर, चंदीगड आणि इतक्यात पिटुकले गांधीनगर आणि नया रायपूर असे मोजकेच थांबे घेत भारतीय 'नगरनियोजनाची' गाडी आपल्या सामूहिक अकर्मण्यतेच्या चिखलात अडकून पडली आहे. :-( मुंबई फोर्ट बद्दल सहमती, त्या भागात तासनतास पायी भटकायला आवडते - विशेषतः रविवारी सकाळी, गर्दी नसतांना. प्रतिक्रियेबद्दल आभार.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

आमार कोलकाता - भाग १

अनिंद्य ·

श्वेता२४ 18/09/2019 - 13:32
या लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत भर पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.

जॉनविक्क 18/09/2019 - 14:34
निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते
अशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक. सुरुवात छान, अजून येऊदे.

भालो ! अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही ! निगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.

बबन ताम्बे 18/09/2019 - 22:22
ओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता. मला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 19/09/2019 - 19:22
@ बबन ताम्बे, अगदी बरोबर ! प्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे. अभिप्रायाबद्दल आभार.

प्रचेतस 19/09/2019 - 08:28
अत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 19/09/2019 - 16:02
प्रचेतस, मराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली. सविस्तर लिहिणार आहेच, लोभ असावा.

गाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.
इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही.
क्लास.
धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच.
सही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का ? तेही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 19/09/2019 - 11:49
तोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-) पूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\_ ...... ममता बेनर्जी लोकप्रिय का ? समजून घ्यायला आवडेल...... राजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.

कंजूस 19/09/2019 - 11:19
प्रचेतस, बिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/09/2019 - 16:49
हा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का? नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे?

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 20/09/2019 - 10:30
याबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे. पुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.

आंबट गोड 19/09/2019 - 11:19
आणि आवडत्या विषयावरच लेखन! तुम्ही "ओ कोलकता..." हे गाणं ऐकलं आहे का? प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....? जरुर ऐका.

In reply to by अनिंद्य

आंबट गोड 26/09/2019 - 12:30
आणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे! बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे!

नीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले. प्रचि नितांतसुंदर, जबरदस्त. तिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.
वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते.
अगदी खरे. पुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला. धन्यवाद.

सुबोध खरे 19/09/2019 - 18:44
सुरुवात छानच झाली आहे. एक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय? उदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता

In reply to by सुबोध खरे

अनिंद्य 19/09/2019 - 19:15
क्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.

In reply to by वीणा३

अनिंद्य 20/09/2019 - 10:07
हे काय सांगणे झाले ? नक्कीच :-) स्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे. ठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच ! प्रतिसादाबद्दल आभार.

In reply to by अनिंद्य

गड्डा झब्बू 20/09/2019 - 13:34
उत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :) बंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही). पण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे. त्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. सुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे.. आ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अनिंद्य 20/09/2019 - 10:57
@ पिवळा डांबिस, लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार ! या विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते. विस्तारभयामुळे सध्या संपूर्ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे. आणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)

In reply to by रातराणी

अनिंद्य 20/09/2019 - 11:07
@ रातराणी, कौतुकाबद्दल आभारी आहे. पण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)

अनिंद्य 20/09/2019 - 15:37
@ टर्मीनेटर @ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ राजे १०७ @ नावातकायआहे @ सुचिता१ @ कंजूस @ बांवरे @ नि३सोलपुरकर @ मदनबाण @ गड्डा झब्बू अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार ! लवकरच पुढील भाग टंकतो !

पण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अनिंद्य 20/09/2019 - 20:29
@ चांदणे संदीप, .....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा..... तुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-) वाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते. आभार !

In reply to by चांदणे संदीप

राजे १०७ 21/09/2019 - 14:30
याची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.

कोमल 20/09/2019 - 20:31
आवडला. बंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे. वाखु साठवली आहेच. पुभाप्र

पलाश 21/09/2019 - 12:35
अतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत. सत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर "तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत!!" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं. तिकडे आपलेआपण जाऊ शकतो का? आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का? माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 23/09/2019 - 11:15
@ पलाश, आपल्याच देशात फिरायला कसली भीती ? दिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.

In reply to by अनिंद्य

पलाश 23/09/2019 - 12:37
दिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.

In reply to by गवि

अनिंद्य 23/09/2019 - 11:19
उषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात. प्रतिसादाबद्दल आभार.

Rajesh188 21/09/2019 - 20:44
आताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे . व्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे . बांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते .. जे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे

चामुंडराय 22/09/2019 - 21:40
आमार कोलकाता सोनार कोलकाता एकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ "टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल !!

अनिंद्य 23/09/2019 - 11:56
@ Rajesh188 मृत शहर आहे म्हणता ? मग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी. @ चामुंडराय, सगळेच लोक सारखे कसे असतील ? त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)

अनिंद्य 24/09/2019 - 11:47
@ आजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : - http://www.misalpav.com/node/45361

चौथा कोनाडा 07/10/2019 - 18:27
वाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख ! जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय ! लेखनसशैली, अप्रतिम !

अनिंद्य _/\_

आता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार !

रुपी 03/06/2020 - 10:00
सुरेख! छान सुरुवात. खूप दिवसांपासून ही लेखमाला वाचायची राहिली होती. आता वाचते पुढचेही भाग. तुम्ही अजून एखाद्या शेजार्यावर लिहायचा विचार नक्की करा.

In reply to by रुपी

अनिंद्य 03/06/2020 - 18:02
@ रुपी, आभार. जरुर वाचा. प्रतिक्रिया अवश्य द्या, त्यांची मला पुढील लेखनात सुधारणेसाठी मदत होते. ... शेजारी ? ... शायद थोडे समय के बाद :-)

श्वेता२४ 18/09/2019 - 13:32
या लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत भर पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.

जॉनविक्क 18/09/2019 - 14:34
निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते
अशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक. सुरुवात छान, अजून येऊदे.

भालो ! अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही ! निगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.

बबन ताम्बे 18/09/2019 - 22:22
ओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता. मला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 19/09/2019 - 19:22
@ बबन ताम्बे, अगदी बरोबर ! प्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे. अभिप्रायाबद्दल आभार.

प्रचेतस 19/09/2019 - 08:28
अत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 19/09/2019 - 16:02
प्रचेतस, मराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली. सविस्तर लिहिणार आहेच, लोभ असावा.

गाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.
इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही.
क्लास.
धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच.
सही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का ? तेही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 19/09/2019 - 11:49
तोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-) पूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\_ ...... ममता बेनर्जी लोकप्रिय का ? समजून घ्यायला आवडेल...... राजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.

कंजूस 19/09/2019 - 11:19
प्रचेतस, बिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/09/2019 - 16:49
हा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का? नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे?

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 20/09/2019 - 10:30
याबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे. पुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.

आंबट गोड 19/09/2019 - 11:19
आणि आवडत्या विषयावरच लेखन! तुम्ही "ओ कोलकता..." हे गाणं ऐकलं आहे का? प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....? जरुर ऐका.

In reply to by अनिंद्य

आंबट गोड 26/09/2019 - 12:30
आणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे! बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे!

नीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले. प्रचि नितांतसुंदर, जबरदस्त. तिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.
वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते.
अगदी खरे. पुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला. धन्यवाद.

सुबोध खरे 19/09/2019 - 18:44
सुरुवात छानच झाली आहे. एक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय? उदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता

In reply to by सुबोध खरे

अनिंद्य 19/09/2019 - 19:15
क्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.

In reply to by वीणा३

अनिंद्य 20/09/2019 - 10:07
हे काय सांगणे झाले ? नक्कीच :-) स्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे. ठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच ! प्रतिसादाबद्दल आभार.

In reply to by अनिंद्य

गड्डा झब्बू 20/09/2019 - 13:34
उत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :) बंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही). पण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे. त्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. सुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे.. आ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अनिंद्य 20/09/2019 - 10:57
@ पिवळा डांबिस, लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार ! या विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते. विस्तारभयामुळे सध्या संपूर्ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे. आणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)

In reply to by रातराणी

अनिंद्य 20/09/2019 - 11:07
@ रातराणी, कौतुकाबद्दल आभारी आहे. पण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)

अनिंद्य 20/09/2019 - 15:37
@ टर्मीनेटर @ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ राजे १०७ @ नावातकायआहे @ सुचिता१ @ कंजूस @ बांवरे @ नि३सोलपुरकर @ मदनबाण @ गड्डा झब्बू अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार ! लवकरच पुढील भाग टंकतो !

पण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अनिंद्य 20/09/2019 - 20:29
@ चांदणे संदीप, .....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा..... तुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-) वाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते. आभार !

In reply to by चांदणे संदीप

राजे १०७ 21/09/2019 - 14:30
याची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.

कोमल 20/09/2019 - 20:31
आवडला. बंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे. वाखु साठवली आहेच. पुभाप्र

पलाश 21/09/2019 - 12:35
अतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत. सत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर "तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत!!" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं. तिकडे आपलेआपण जाऊ शकतो का? आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का? माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 23/09/2019 - 11:15
@ पलाश, आपल्याच देशात फिरायला कसली भीती ? दिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.

In reply to by अनिंद्य

पलाश 23/09/2019 - 12:37
दिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.

In reply to by गवि

अनिंद्य 23/09/2019 - 11:19
उषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात. प्रतिसादाबद्दल आभार.

Rajesh188 21/09/2019 - 20:44
आताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे . व्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे . बांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते .. जे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे

चामुंडराय 22/09/2019 - 21:40
आमार कोलकाता सोनार कोलकाता एकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ "टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल !!

अनिंद्य 23/09/2019 - 11:56
@ Rajesh188 मृत शहर आहे म्हणता ? मग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी. @ चामुंडराय, सगळेच लोक सारखे कसे असतील ? त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)

अनिंद्य 24/09/2019 - 11:47
@ आजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : - http://www.misalpav.com/node/45361

चौथा कोनाडा 07/10/2019 - 18:27
वाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख ! जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय ! लेखनसशैली, अप्रतिम !

अनिंद्य _/\_

आता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार !

रुपी 03/06/2020 - 10:00
सुरेख! छान सुरुवात. खूप दिवसांपासून ही लेखमाला वाचायची राहिली होती. आता वाचते पुढचेही भाग. तुम्ही अजून एखाद्या शेजार्यावर लिहायचा विचार नक्की करा.

In reply to by रुपी

अनिंद्य 03/06/2020 - 18:02
@ रुपी, आभार. जरुर वाचा. प्रतिक्रिया अवश्य द्या, त्यांची मला पुढील लेखनात सुधारणेसाठी मदत होते. ... शेजारी ? ... शायद थोडे समय के बाद :-)
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

दुष्ट दुष्ट बायको!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

(गफ)

टवाळ कार्टा ·

खिलजि 27/05/2019 - 20:25
( मी ) किती पाळू आणि कुठे ठेऊ ? नकोश्या झाल्या मुली दुरून बघितलं तरी जवळच येत्यात मारतात माझ्यावरच फुली ( मी )जळून जळून खाक होतात बघून बायकोवरचे माझे प्रेम ( मुली )काश आधी भेटला असतास तर माझ्यावरही केले असतेस सेम आमचं मेलं नशीबच खोटं मारतायत नको ते पिंगे इथे मात्र काही सिग्नलच नाही कितीही वाजवा भोंगे ( मी) पोट्टी पटवणं सोप्प असतं राखणं कर्मकठीण एक जरी ओकली घरी तरी सुट्टेल घराबाहेर वाघीण

खिलजि 27/05/2019 - 20:25
( मी ) किती पाळू आणि कुठे ठेऊ ? नकोश्या झाल्या मुली दुरून बघितलं तरी जवळच येत्यात मारतात माझ्यावरच फुली ( मी )जळून जळून खाक होतात बघून बायकोवरचे माझे प्रेम ( मुली )काश आधी भेटला असतास तर माझ्यावरही केले असतेस सेम आमचं मेलं नशीबच खोटं मारतायत नको ते पिंगे इथे मात्र काही सिग्नलच नाही कितीही वाजवा भोंगे ( मी) पोट्टी पटवणं सोप्प असतं राखणं कर्मकठीण एक जरी ओकली घरी तरी सुट्टेल घराबाहेर वाघीण
पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

पूर्णब्रह्माचा अपमान!!

आनन्दा ·

थाळी प्रकारात आधी कोणाचातरी अनुभव ऐकून जाणेच योग्य असे माझे मत. रच्याकने, हा लेख आधी कायप्पाला दाखवून आणलाय का? Sandy

In reply to by चांदणे संदीप

आनन्दा 20/08/2018 - 08:46
कायप्पा वर मी अगदी पर्सनल ग्रुप ना टाकलाय. पण चेपू वर जाम फेमस झालाय हा लेख.. तिथून कोणीतरी टाकला असेल कायप्पा वर. काय आहे, तिथे जाऊन फ्रस्ट्रेट झालेले बरेच जण असणार आहेत, त्यामुळे असा लेख मिळाला की ढकलत असतील पुढे..

सुचिता१ 19/08/2018 - 23:42
छान आहे समीक्शा :) :) तो विडीओ म्हणजे मला आत्मस्तुती चा बॉंम्ब च वाटला होता . त्यांच े आदर्श आहेत, मँकडॉनाल्ड आणि डॉमीनोज मग काय फ्रोजन फुड वर च सगळी मदार असेल .

जेम्स वांड 20/08/2018 - 05:36
आमच्या वरच्यावाडीच्या पारावर कोणी उतारा म्हणून ठेवलं तर काळं कुत्रं बी खाणार नाही. पुरणपोळी पुरणपोळीच असते, ती पुण्यात खावा का आणि कुठं (तुम्ही खाल्लेली खचितच नव्हती, पण ती कुठंही खाल्ली असती तरी पुरणपोळी म्हणवले नसतेच). एकंदरीत हॉटेलानुभव पाहता निगेटिव्ह रेटिंग पण कमीच पडेल असे वाटते. पण त्याला जोडून असलेला "पुण्यातच काय ती सुग्रास जेवायची अक्कल आहे" हा ओव्हरटोन पण काही तितका खास आवडला नाही, असोच.

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:32
पुणेरी टोन वगैरे काही नाही. उलट पुण्यात म्हणून हे सगळं खपतय.. कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात या हॉटेल ने 2 महिन्यात गाशा गुंडाळला असता.. मी पुण्यात राहतो म्हनून मी पुण्याचं नाव घेतो. इतकंच!! परंतु हे अस्सल मराठी जेवण नाही, त्यामुळे कोणत्याही शहराचे नाव टाकले म्हणून काही फरक पडणार नाही.

In reply to by आनन्दा

जेम्स वांड 20/08/2018 - 10:18
माफी असावी एकडाव, बाकी ग्रामीण जेवणाचा अभाव आहे पुण्यात खुद्द शहरात पण नशिबाने लाभलेल्या आजूबाजूच्या मावळांत मिळून जातं उत्तम

In reply to by जेम्स वांड

लई भारी 20/08/2018 - 10:48
एक झकास पोस्ट होऊन जाऊ दे की या खादाडीची! आम्हाला पण ४ ठिकाणं म्हायती पडतील! रच्याकने: मी "बैजवार" हा शब्द वापरणार होतो; पण परत गोंधळलो कि खरंच असा शब्द(अर्थात: बोलीभाषेत) आहे का? आईला,गावाला जाऊन लै दिस झाले म्हणजे!

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:35
बाकी हे खरं आहे. आणि पुण्यात अस्सल मराठी, (ज्यात खान्देशी आल्या, वर्हाडी आल्या, कोकणी पण आल्या) डिलेकसी कुठे मिळतच नाहित असे माझेही मत आहे. पण या बाईंचा विडिओ बघून अपेक्षा वाढल्या होत्या..

In reply to by आनन्दा

बॅटमॅन 25/08/2018 - 19:35
डेलिकसीज मिळतात की. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या मिळतात. तुम्हांला अपेक्षित असलेल्यापैकी कुठला प्रकार मिळाला नाही?

गवि 20/08/2018 - 06:53
अनेक, म्हणजे शेकडो शाखा दणादणा उघडत गेलेल्या (विशेषतः निष्काळजीपणे चुकीच्या फ्रॅंचायजी देऊन) अनेक रेस्टॉरंट चेन्समधे असाच अनुभव येतो. हायवेवर जागोजागी असलेल्या कामत रेस्टॉरंटच्या चवीविषयीही असंच मत आहे.

नाखु 20/08/2018 - 07:03
त्यापेक्षा चिंचवड बेष्ट,गावात गोडाधोडासकट वर दिलेल्या पैश्यापेक्षा कमी किंमतीत "अब्ब" म्हणेपर्यंत चापून खा,रोज बदलता मेनू. आणि हो नुकताच एक मिपाकर जाऊन आला आहे खुलाशी नाखु

In reply to by प्रचेतस

सुहासचं जेवण चांगलं असतं (म्हणजे फार अप्रतिम नसलं तरी) पण बाकी गोष्टी डोक्यात जातात. दुपारी अंधारलेलं असलं तरी दिवे बंद असतात, ग्राहकाने विनंती केली तर दिवे लावले जातात. मी एकदा दुपारी एकटाच गेलो होतो तेव्हा काहीशी गर्दी होती आणि मी बसून बराच वेळ झाला मात्र ताट आले नाही, बहूधा पुरेशा चपात्या वगैरे तयार नसतील असा विचार करुन मी शांतपणे वाट बघत बसलो. मात्र बाजूच्या टेबलावर माझ्या नंतर आलेल्या काही ग्राहकांकडे ताटे आली तेव्हा माझं डोकं फिरलं. सरळ उठलो आणि काउंटरवर जावून म्हणालो "माझ्या नंतर आलेल्या ग्राहकांना तुम्ही ताटं वाढता ? ती काय स्पेशल आहेत का की मी एकटा (म्हणजे हॉटेलला कमी उत्पन्न) म्हणून असं" आणि मग तिथून निघालो पण कुणी ना दिलगिरी व्यक्त केली ना थांबवण्याचा प्रयत्न केला. असो. हिंजवडीला जाताना वृंदावन - अंगत-पंगत अशी हॉटेलची जोडी आहे..म्हणजे वृंदावन हे डिश पध्द्तीचे तर अंगत-पंगत हे थाळीचे.. ते एकदा नक्की बघा, .. स्विगीवरुनही त्यांची थाळी पार्सल मागवता येते. . चवही चांगली आहे. एका थाळी पार्सलमध्ये दोघे खावूनही बरेच अन्न उरते... एका थाळी पार्सलमध्ये चार भाज्या , सहा चपात्या, भजी वा तत्सम पदार्थ , गोड पदार्थ्, गोड कढी, दोन प्रकारचे वरण , भात असं बरंच काही येतं. तिथे जावून खाण्याचा अनुभवही चांगलाच आहे (पार्सलपेक्षा थोडा महाग वाटला तरी) !!

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:27
अंगत पंगत वरुन तर दररोजचा जाण्यायेण्याचाच रस्ता आहे पण अतापर्यंत कधी जाणं झालं नाही तिथं, तुम्ही म्हणताय तर एकदा थाळी खाउन पाहतो तिथली. बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे. १०० रुपयात विदाऊट स्वीट अमर्यदित थाळी अआणि १५० रुपयात स्वीटसकट अमर्यादित. चव खरोखरच छान आहे.

In reply to by प्रचेतस

चिनार 21/08/2018 - 11:46
अंगत पंगत उत्तम आहे. पुण्याला असताना तीन- चार वेळेला गेलो आहे. आता पुण्यात आल्यावर एकदा जाईन म्हणतो..

In reply to by प्रचेतस

पुंबा 21/08/2018 - 11:55
बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे.
कट्टा करण्यासारखे आहे का?

In reply to by प्रचेतस

लई भारी 22/08/2018 - 15:20
त्यांनी आता जवळच, कल्याण-भेळ/हयात च्या बाजूला मोट्ठ्या जागेत स्थलांतर केलंय. नवीन ठिकाणी गेलो नाही पण जागा मोट्ठी आहे. ह्यांचं जेवण थोडं मसालेदार वाटलं. डबा नसेल तर पर्याय म्हणून जवळच 'चामुंडा' ची थाळी बेश्ट आहे.

कुझिन महाराष्ट्रीयन टाईप कॅज्युअल एव्हरेज कॉस्ट फॉर टू ९०० फक्त घरातल्या जेवणाला एवढे पैसे??!! बाकी तुम्ही केलेल्या वर्णनावरून गाळा/खानावळ टाईप वाटलं होतं, पण फोटो तर पॉश हॉटेलसारखे आहेत.

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा 20/08/2018 - 10:01
हॉटेल खूप पॉश आहे. स्वच्छता वगैरे माहीत नाही, पण ठीकठाक असावी. ऐसपैस आहे. पण पुण्यात त्यांची स्पर्धा सरावनाभुवनशी नसुन गल्लोगल्ली असलेल्या खाणावळी, आणि श्रेयस, सुकांता, पंचवटी सोबत आहे हे कसे विसरुन चालेल?

दिगोचि 20/08/2018 - 08:01
विमानात शाकाहारी जेवण मिळत नाही हे शक्य नाही. या बाईनी अगोदर विमान कम्पनीला सान्गितले नसेल. म्हणुन तसे झाले असेल कारण अगोदर सान्गितलेल्यानाच फक्त तसे जेवण मिळते. तसेच रु. ३५०च्या थाळिला जीएसटी धरुन ७३५ रुपये कसे पडले? कारण जीएसटी फक्त १० टक्केच आहे ना? म्हणजे ७७० रुपये २ थाळ्यान्चे मिळून पडले असते.

सिरुसेरि 20/08/2018 - 08:15
असल्या उद्धट , आगाउ आणी दिखाउ हॉटेलपासुन सावध केल्याबद्दल धन्यवाद . तरी नशीब , तिथल्या स्टाफने "इतने पैशेमें इतनाहिच मिलेगा " असली उत्तरे दिली नाहीत .

In reply to by पिलीयन रायडर

आनन्दा 20/08/2018 - 09:56
खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता. त्यामुळे मी स्वतःच कित्येक दिवस या बाबतीत काय वेगळे करता येईल असा विचार करतोय, त्याची काहीतरी रुपरेषा मनात आहे पण, फक्त सध्या ग्रुहकर्जात अडकलोय म्हणून उडी मारता येत नाही. या बाईंचा व्हिडिओ बघितला आणि वाटलं की अरेच्चा, आपल्या मनात जे आहे तेच तर यांनी केलंय. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण झाला, आणि त्यामुळे काहीही झाले तरी पुण्यात हे हॉटेल सुरु झाल्यावर एक्दा तरी जायचंच असं ठरवलं. असो.. साधरणपणे बे एरिया च्या इन्डिअन स्टोर मध्ये जे पदार्थ मिळायचे ते पदार्थ काल पुन्हा एकदा खाल्ले आणि एकदम परत आम्रविकेत गेल्याचा फील आला. ३५० रु मध्ये असा जगप्रवास दुर्मिळच!

In reply to by आनन्दा

लई भारी 20/08/2018 - 10:45
थाळीच्या एकसूरीपणाबद्दल अगदी सहमत! आपला मनोदय लवकरच प्रत्यक्षात येवो :) शेवटचा "जगप्रवास" चा टोमणा जबरी आहे :) रच्याकने: झोमॅटो वर अजून 'Opening soon' दाखवतंय. त्याच्याआधीच बंद पडतंय वाटतं! :D

In reply to by आनन्दा

पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता
दुर्वांकूर चांगलं आहे की ? अर्थात मी ही तिथे मोजून दोन तीन वेळा गेलो असेन पण जेव्हा गेलो तेव्हा आवडलं होतं.. मी चिंचवड मध्ये रहात असल्याने पुण्यातले हॉटेल्स फारसे माहित नाही. चिंचवडमध्ये मयूरची लोकप्रियता आहे बर्‍यापैकी पण बरेच महागडे आहे, मी फारसा गेलो नाही. दुसर्‍या एका प्रतिसादात मी हिंजवडीच्या अंगतपंगत चा उल्लेख केला आहे. ते चांगले आहे.

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:29
मयुर खूपच महाग आहे. ३५० रु. अमर्यदित थाळी फक्त जिलेबीसह. इतर काही स्वीट हवे असल्यास ८० रु, १०० रु. एक वाटी असे. मात्र जेवणाची चव अप्रतिम आहे.

In reply to by प्रचेतस

मी सुकांता, दुर्वांकुर, श्रेयस येथील थाळी खाल्ली आहे आणि बर्‍यापैकी आवडली सुद्धा. डेक्कनचे मथुरा पण छान आहे. (विशेषतः सकाळी मिळणारे व्हेज प्लॅटर ज्यात कोथिंबीर वडी, बटाटा वडा, आळु वडी. सुरळीची वडी वगैरे असते) थाळी नको असल्यास भाजी भाकरी वगैरे सुद्धा मस्त. बादशाही आणि पुना बोर्डींग हाउसबद्दल तर काय सांगावे? काही वर्षा पुर्वी डेक्कनला एक हॉटेल होते, नाव आठवत नाही पण थाळी मस्त घरगुती. गेलाबाजार शनिवारातले रसोई डायनिंग पण ठीक.

In reply to by आनन्दा

हुप्प्या 21/08/2018 - 09:53
बे एरियात प्रचंड संख्येने भारतीय रेस्टॉरंटे आहेत पण सरसकट अत्यंत सुमार दर्जा. पूर्णब्रह्माची बे एरियातील जेवणाशी तुलना म्हणजे खास शालजोडीतला हाणला आहे!

माहितगार 20/08/2018 - 11:30
पुण्यासारख्या शरात सुद्धा बुंबई प्रमाणेच दोन घटका बसण्यासाठी सार्वजनिक जागांची उपलब्धता कमी झालेली आहे. हाटेलात काही मिंटे ते तासभर केवळ बसण्यासाठीच पैसे द्यायचे असतात. हे लक्षात घेतले म्हणजे खाण्यास उपलब्ध केले गेलेले पदार्थ बसण्यास मिळालेल्या जागेचे काही मिंटांचे भाडे मोजल्यामुळे मिळालेला बोनस समजून, चवीपुरते चाखुन सोडून द्यावे, म्हणजे मनाला ताण येत नाही.

योगी९०० 20/08/2018 - 12:45
बंगलोरला त्यांच्या दोन्ही रेस्टारंट मध्ये जाऊन आलो. चांगला अनुभव आला. झुणका भाकरी आवडली. पुण्यातच यांना काय झाले कोणास ठाऊक... त्या व्हीडीओ मध्ये ती बाई म्हणाली की विमानात तिला शाकाहारी नाही मिळाले. कित्येक तास उपाशी राहीली वगैरे...आणि नंतर थोड्या वेळाने म्हणाली की माणूस सोडून काहीही खाऊ शकते....!! काय टोटल लागली तर मला सांगा..

In reply to by योगी९००

मला त्या बैंचा टोन आवडलाच नाही म्हणून मी पूर्ण पाहिला नाहीये तो व्हिडीओ, पण शाकाहारी जेवण मिळालं नाही हा काय किस्सा आहे? मी जे काही दोन चार वेळा फ्लाईटमध्ये बसलेय त्यात कधीही प्रॉब्लेम आला नाही. घरात बाकीचे लोक आहेत जे सतत फिरत असतात, त्यांनाही कधी असा त्रास झाला नाही...

In reply to by गवि

मृण्मयी१ 20/08/2018 - 21:44
त्या बाईंच्या बोलण्यात फार कृत्रिमपणा आहे. केवळ मार्केटींगच्या दृष्टीने केलेले हे विडीओज आहेत. मला त्यात प्रामाणिकपणाचा अभाव जाणवला. मी शहाणी, मला सगळं समजतं असाही आव वाटला. बाई डोक्यात गेल्यात खरं.

In reply to by गवि

तिमा 21/08/2018 - 12:28
कंंठाळीपणा, आत्मस्तुती, माजोरीपणा हे सर्व एकत्र आले की इरिटेटिंग होणारच की ! कानडी उच्चार असल्यामुळे, वार्‍यावरची वरात, मधल्या कडवेकर मामी आठवल्या. कंठाळा आला की वो!

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 20/08/2018 - 13:40
हे शक्य आहे, अधूनमधून माझ्याही बाबत होतं. नुकताच आलेला अनुभव फिन एअरचा. अर्थात हे भारताला जाणार्‍या 'लेग'मध्ये होत नाही, आणि आगोदर व्हेज ऑर्डर करायची सोय सगळीकडे असतेच. मीच कधीकधी आळशीपणा करतो.

In reply to by आदूबाळ

हो म्हणजे सोय असतेच. ऑर्डर द्यावी लागत असेल आधी इतकंच काय ते. आज काल विमानात व्हेज जेवण मिळत नाही हे पटत नाही. एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते! आणि अजून एक म्हणजे.. लिमिटेड.. मी फारशी थाळी खात नाही, पण तरी स्वीट लिमिटेड हे ऐकलंय, सगळंच जेवण लिमिटेड ते ही 350 मध्ये, काही चुकल्या सारखं वाटत नाही का? मला वाटतं सुकांता वगैरे फेमस थाळ्या साधारण ह्याच कॉस्ट मध्ये अनलिमिटेड जेवण देतात ना?

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 21/08/2018 - 14:54
एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते!
हे सगळ्यांनाच जमत नाही. याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात. The Misconception: You make rational decisions based on the future value of objects, investments and experiences. The Truth: Your decisions are tainted by the emotional investments you accumulate, and the more you invest in something the harder it becomes to abandon it.

वरुण मोहिते 20/08/2018 - 15:19
हॉटेल ला . 4 पेग मारून थाळी खाऊन येईन. कोकम सरबत मिळते का? वोडका नि सरबत कोणाला काही कळणार नाही मग अजून 2 पेग. पुरणपोळी चालेल चकण्याला.

पुंबा 20/08/2018 - 18:14
बाईंच्या बोलण्यातून हा प्रयोग एकूणच पाणचट असणार आहे अशी कल्पना आली होती. स्वयंस्तुतीचा अतिरेक केला आहे त्यांनी त्या व्हिडिओत. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मूळात मेन्यु कार्डात पदार्थ आणि किंमत पाहून तुम्ही थाळी मागवायलाच नको होती असे वाटते.

In reply to by पुंबा

हुप्प्या 21/08/2018 - 09:44
अगदी १००% सहमत! बाईंचा व्हिडियो म्हणजे आत्मकेंद्रित वृत्तीचा एक उत्तम नमुना आहे. गिर्‍हाईकांना चांगली सेवा द्यावी यापेक्षा कुणाची तरी खोड मोडावी अशा भावनेतून उद्योग सुरु केला आहे की काय असे वाटत रहाते! पूर्णब्रह्माला माझ्यातर्फे पूर्णविराम.

एक व्यावसायिक म्हणून मत मांडू इच्छितो. यात कुणाला खरे खोटे ठरविण्याचा किंवा कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. बहुधा बर्‍याच आस्थापनांमधे एक पाटी लावलेली असायची की आमची सेवा खराब असली तर आम्हाला सांगा आणि चांगली असली तर इतरांना सांगा. सोशल मिडिया आपल्या हातात आल्यापासुन आपण नेमेके उलटे वागतोय काय ? आपणास तिथली सेवा आवडली नसल्यास तेथील व्यवस्थापकांना भेटून तिथे काय वाईट होते हे सांगावयास हवे होते. इथे आंतरजालावर लिहून त्यांची सेवा सुधारेल असे वाटत नाही. आपल्या टीकेमुळे त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने पोटपाणी धोक्यात येऊ शकते. मागे काही वर्षांपुर्वी इथे ठाण्यातल्या "मेतकुट" हॉटेल बद्दल देखिल असाच नकारात्मक अनुभव सांगणारा लेख आला होता. त्याही धाग्यावर मी अशाच प्रकारे मांडलेल्या मताचे समर्थन कोणीही केले नाही तरी देखील स्वत:कडे वाईटपणा घेऊन ही गोष्ट पुन्हा सांगाविशी वाटते. ग्राहक म्हणून आपणांस चांगली सेवा मिळण्याचा हक्क आहेच आणि ती नाही मिळाली तर तक्रार करण्याचा हक्क देखील १००% आहे. मात्र जालावर तक्रार करताना समोरच्याचे नुकसान किती प्रमाणात होऊ याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच (अर्थात समोरच्याचे नुकसान व्हावे असा आपला हेतू नसतो पण तसे होते खरे) ! तक्रार करण्यापुर्वी समोरच्या पार्टीचा थोडा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा ही विनंती ! अगदीच चुकीला माफी नाही असा अ‍ॅप्रोच नको ! प्रतिसादामुळे कोणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व !

In reply to by धर्मराजमुटके

१) कसं आहे की चांगल्या सेवेत काहीशी उणीव असेल तर व्यवस्थापनाला 'सुधारणेस वाव आहे' असे सांगण्यात उत्साह वाटतो पण सेवा फारच गंडली असेल तर असे काही सांगण्याचा उत्साह वाटत नाही. २) शिवाय आपण अतिशय वाईट सेवा देतोय याची त्या व्यवस्थापनाला किंचितही कल्पना नसावी हे पटत नाही.. तिथले व्यवस्थापक , कर्मचारी हे देखील कुठेतरी ग्राहक म्हणून जात असतीलच ना. ३) ज्यांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे ते स्वतःहून अभिप्राय जाणून घेण्याची तत्परता दाखवतात. बार्बेक्यू नेशनमध्ये एकदा जावून बघा.. ते किती लोकप्रिय आहेत याची त्यांना चांगली कल्पना आहेच पण तरी गर्व नाही ..तुम्हाला स्टार्टर्स आवडलेत ना हे आवर्जुन विचारता, स्टार्टर्समध्ये आणखी काय हवं हे पण विचारतात..शेवटी टॅबमधून पुन्हा औपचारिक अभिप्रायही घेतात... ४) पण "आपल्याला आपले पैसे मिळाले ना झालं तर मग.. ग्राहक संतुष्ट आहे की नाही काय पडलीये आपल्याला" असंच वागणं दिसत असेल तर काय अभिप्राय देणार. इथे लेखकानं लिहिलंय की
शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
त्यावरही त्या बाईंनी लेखकाला असं का वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये.. मग येवू दे की अशा लोकांचं पोटपाणी धोक्यात .. त्यांचं पोटपाणी चालावं म्हणून अनभिज्ञ लोकांनी त्यांच्याकडे जात रहाण्यापेक्षा लोकांना सावध करुन लेखकाने चांगलंच केलंय

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 21/08/2018 - 11:52
माझी देखील साधारण अशीच भावना आहे. अनेक ठिकाणी मी जेवण झाल्यावर management ला फीडबॅक देऊन जातो. इतका क्रूर फीडबॅक देण्याची ही माझी देखील पहिलीच वेळ आहे. आणि बहुधा या गोष्टीला त्यांचे जेवण कारणीभूत नसून कस्टमर management कारणीभूत आहे असे वाटतेय. बघू, जमले तर कुठे काय कसे चुकत गेलं याचा एक प्रतिसाद पण टाकेन. मला स्वतःला पण हे खूप लागून राहिले आहे.

अभ्या.. 20/08/2018 - 18:33
मी काय म्हणतो, त्या पूर्णब्रह्माची क्वालिटी ओकेटोके असती, गेलाबाजार अ‍ॅव्हरेज असती तर त्या बाईंना इतक्या शिव्या पडल्या असत्या का? म्हणजे त्यांनी भाषणात जे काही विठाई थाळी, अक्कलकोटाची स्वामीसमर्थ थाळी आदी फिरुन संशोधन करुन सिध्द केल्या गेलेल्या थाळ्यांचे वेगळेपण नावाची चीज काही चेक केली गेली आहे का? केवळ फॅन्सी नावे मेनूत टाकून त्याच त्याच भाज्या वाढणे म्हणजे आंत्रप्रुनरशिप मिरवणारे खरोखरीच डोक्यात जातात. त्यातल्या त्यात ह्या प्रकारासाठी मोजली जाणारी किंमत तर दिव्य आहे. खरोखर पुण्यात ६०० रुपयाचा पिझ्झा, ३५० रुपयाची थाळी, २८० रुपयाची एखादी पंजाबी भाजीची डिश, ८०-१०० रुपयाचा नान व रोटी अशा किंमती केवळ स्थानमाहात्म्यामुळे आहेत की केवळ लोक देतात तेवढा पैसा म्हनून आकारायची पध्दत आहे? म्हणजे लोक इतके पैसे कशासाठी मोजतात हा मला पडलेला प्रश्न आहे. पूर्णब्रह्माची गोष्ट बाजुलाच पण वीकेंडास गर्दीने वेटींग पण ओसंडून वाहणार्‍या हॉटेलात लाजवाब, कधी चाखली नाही इतपत स्वादिष्ट, अप्रतिम अशी मनापासून दाद द्यावी असे अन्न सापडलेच नाही. गागुचका म्हणलात तरी हरकत नाही पण माझी सोलापुरी जीभ अशा अन्नाचे इतके पैसे देऊन इतके कौतुक करायला धजत नाही हेच खरे. संधी मिळाली तर टाकणार भो आपण पण हाटेल....पुण्यात.

In reply to by सतिश गावडे

स्वधर्म 21/08/2018 - 14:42
हा व्हिडीअो. पोशाखापासूनच ‘जितं मया’ शैली इरिटेटिंग अाहे. मी बाहेर जाऊन थाळी खाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तथापि, मराठी जेवण महाराष्ट्राबाहेर अाणि देशाबाहेरही पोहोचवत अाहेत, हे अावडले.

In reply to by पिलीयन रायडर

बाई मुळच्या कुठल्या हे माहीत नाही . पण व्हिडीओ बघताना त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला अहंकार ओसंडून वाहत होता . सतत स्वतःचे कौतुक चालले होते . अहंकार मुळे ग्राहकांना गृहीत धरण्याची वृत्ती वाढीस लागते व त्याचा परिणाम क्वालिटी वर झाला असेल .

In reply to by सोमनाथ खांदवे

खटपट्या 21/08/2018 - 14:56
सहमत, १७ वर्षे आयटीत काम केल्यावर बर्‍यापैकी पैसे साठवून नविन व्यवसाय सुरु केला असणार. पण हालाखीच्या परीस्थीतीतून, शुन्यातून हातात काहीच नसताना कीतीतरी महीला पोळीभाजी आणि अन्य खाद्यपदार्थ विकून चांगले पैसे कमावत आहेत. पण अशी जाहीरात कधी पाहीली नाही. उदाहरणादाखल खालील लिंक पहा https://www.youtube.com/watch?v=2zY5NkswIow

बोलघेवडा 20/08/2018 - 22:35
पुण्याला नाव ठेवायची फॅशन आहे. त्यामुळे फार लक्ष देत नाही. चांगली महाराष्ट्रीय थाळी पाहिजे असेल तर आपटे रोड वरील श्रेयस आणि Law College रोड वर कृष्णाला पर्याय नाही. स्वस्तात उत्तम दर्जा हवा असल्यास आपटे रोड वर आशा डायनिंग हॉल भेट द्या. सिहगड रोड वरील आनंदी डायनिंग हॉल हि चांगला आहे.

In reply to by बोलघेवडा

जेम्स वांड 21/08/2018 - 10:31
सकळ त्रिखंडातलं सगळंच सर्वोत्तम, त्याला कोण काय करणार? चांगल्या गोष्टींना नावे ठेवत नाहीये कोणी, पण जे चूक आहे त्याला कोणी चूक म्हणत असेल तर उगाच खुपवून घेण्यात अर्थ नाही.

माहितगार 21/08/2018 - 16:01
http://www.purnabramha.com/feedback---compliments-.html हि लिंक त्यांच्या वेबसाईटवर आढळली. धर्मराजमुटकेंप्रमाणे खुपणं हे संबंधीतांना कळवणे केव्हाही चांगले असे वाटते. त्या नंतर अनुभव चांगला आला तर ठिकच आहे आणि नाही आला तर सोशल मिडिया चर्चेस जो काही अनुभव असेल तो शेअर करण्यास उपलब्ध आहेच.

In reply to by माहितगार

आनन्दा 21/08/2018 - 16:40
खरे आहे.. सामान्यपणे मी तेच करतो. पण त्या दिवशी फसवणूक, अपमान, अपेक्षाभंग वगैरे अनेक भावना साठल्या होत्या ज्याचा परिपाक म्हणून सोशल मिडिया पोस्ट घडली. कधी वाटते मझे चुकले की काय. पण त्या दिवशी फेसबूक वर टाकल्यावर ज्या पोस्ट आल्या त्यातून असे जाणवले की पुण्यात तरी हॉटेलच्या मॅनेजमेंटने या गोष्तींचा विचारच केलेला नाही. असंख्य लोक त्यांना फीडबॅक देऊन आलेत, पण त्यांची क्वलिटी तशीच आहे. त्यामुळे त्याना कोणीतरी असा प्रसाद देणारच होते. योगायोगाने ते काम मझ्याकडुन घडले इतकेच. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यानी सोशल मिडिया चा जाहिरातीसाठी वापर केला तेव्हा त्यानी हा विचार करायला हवा होता की जर आपण तो दर्जा देऊ शकलो नाही तर हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते. तेव्हाची मिळालेली गुड पब्लिसिटी चांगली आणि ही वाईट असे नाही चालणार. आणि तसेही बाइ मराठी मानसाना त्यांच्या चिन्धीगिरीसाठी शिव्या घालताना दिसतातच, त्यामुळे त्याना या साधनाच्या मर्यादा माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 17:41
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही. तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.

ट्रम्प 21/08/2018 - 18:57
' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा त्या थंड बाईच्या थंड हॉटेल मध्ये थंड जेवण करायला धागा मालक गेलेच कसे ? हा मुख्य मुद्दा आहे . व्हिडिओ पहिल्या नंतर त्या ऍरोगंट बाईच्या हॉटेल मध्ये पैसे घालवून जेवण करणे शुद्ध मूर्खपणा आहे तरीपण बाकी मिपाकरांना सावध केल्या बद्दल धन्यवाद .

आनन्दा 21/08/2018 - 21:46
खरे तर परवा पूर्णब्रह्म वर पोस्ट टाकल्यावर इतका गदारोळ होईल अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला तर काही लोकांनी तू मुद्दाम नेट-पिकिंग करतोयस असे आरोपही केले. मी देखील स्वतःचे परीक्षण केले. कदाचित हे हॉटेल इतके खराब नसेल ही, किंबहुना ते तसे नसावे अशी मला देखील अपेक्षा आहे. म्हणून मग माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजून एक लेख लिहायचा निर्णय घेतला. साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत. पुण्यात जेव्हा यांचं उदघाटन झालं तेव्हा मी नेमका दुसऱ्या कामात स्वस्त होतो, आणि तसे बिबवेवाडी लांबही होते, त्यामुळे जाणे झाले नाही. म्हणून शेवटी एका रविवारी संध्याकाळी तळजाई आणि पूर्णब्रह्म असा प्लॅन केला. पण तिथे जाण्यापासून धक्क्यावर धक्केच बसत गेले आणि त्याची परिणती एका मोठ्या पोस्टमध्ये झाली, ज्याचा मला स्वतःलाच खूप त्रास झाला.. विचार करत गेलो तसे मला कळत गेले की कुठे काय चुकत गेले ते. नुसते जेवण खराब असते तर मला इतका त्रास झाला नसता. मी काउंटरवर सांगून बाहेर पडलो असतो की मला जेवण नाही आवडलं, पण यावेळेस योगायोगाने चेन ऑफ इनसिडेंट घडत गेली, ज्याने शेवटी कडेलोट झाला, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे, काय चुकलं, आणि काय करता आले असते ते. या सगळ्या सांगण्यामध्ये एका मल्टिनॅशनल चेन माझ्या काय अपेक्षा होत्या ते ही मी विशद करीत जाणार आहे. सुरुवात झाली ती navigation पासून, गूगल मॅप वर दोन लोकेशन असणे हे धंद्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. विशेषतः जेव्हा येणाऱ्याला 4 सिग्नल फिरून यावे लागते तेव्हा. आणि हॉटेलच्या नावाचा साइन बोर्ड रस्त्यावर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हॉटेल शोधायला आम्हाला साधारण 25 मिनिटे लागली, यावरून ते किती कठीण होते याचा अंदाज येईल. पत्त्यामध्ये जवळची लँडमार्क असणे आवश्यक आहे. मला त्या हॉटेलात जायचेच होते म्हणून मी शेवटी ते हॉटेल शोधून काढले. पण आत गेल्यावर साधारण 20x20 च्या जागेत गाड्या लावायच्या होत्या, आणि त्यात मध्यभागी 2 आंब्याची झाडे होती. ती झाडे चुकवून माझी 4.25 मीटरची गाडी लावायची होती. आणि ती देखील अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. बाहेर बसलेल्या एक ताई आमची गाडी बघून आत निघून गेल्या. मग मी थोडं मागे पुढे करुन गाडी लावली, ती बहुधा नीट लावली गेली नव्हती, पण माझा नाईलाज होता. यात काय सुधारणा करता येऊ शकते? आखलेले पार्किंग हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आखलेले पार्किंग असते तर नेमकी कशी गाडी लावली की रस्ता अडणार नाही हे मला कळले असते. पुढची गोष्ट मेनू ची - माझ्या माहितीनुसार हे मुख्यतः a la karte रेस्टॉरंट आहे, मग थाळी ची जाहिरात का? लिमिटेड थाळी ही एक कोम्बो ऑफर आहे, पण हॉटेलचा USP वेगवेगळे पदार्थ हा आहे. पण बाहेर लावलेला खानावलीसारखा "आजचा मेनू" हा एका थाळी रेस्टो चा फील देत होता. मेनू मध्ये देखील थाळी ची व्हरायटी पहिल्या पानावर, आणि मग थाळी तुम्हाला नको असेल तर बाकीचे पदार्थ अशीच मांडणी होती, त्यामुळे आम्ही थाळी ऑर्डर करणे साहजिक होते. काय सुधारता येईल? तुमचा USP काय आहे ते आधी ठरवा, थाळी असेल तरच थाळी ठेवा, नाहीतर a la karte असेल तर ते हायलाईट करा. आधी तो बाहेरचा फलक काढून टाका, ते तुमच्या स्टॅंडर्ड ला शोभत नाही. आता कस्टमर एंगेजमेंट बद्दल- हे माझ्या आयुष्यातले पहिले रेस्टो होते जिथे जेवण दिल्यानंतर कोणीही काही विचारायला आले नाही.. सामान्यपणे एखादा कस्टमर आल्यावर आपण त्याला आपल्याकडील सर्वोत्तम ऑफर करतो.. मला बाहेर पडताना दिसले की हॉटेलमध्ये अतिशय सुंदर भारतीय बैठक होती. पण ती मला दिसलीच नाही. माझ्याकडे छोटी मुलगी होती, जिने टेबलावर धिंगाणा घातला. खरे तर अश्या वेळेस हॉटेलमालक स्वतः होऊन काय सुटेबल आहे ते सजेस्ट करतात. थोडेसे प्रोऍक्टिव्ह कस्टमर management करायला हवी.. त्याचप्रमाणे गिऱ्हाईकांचे पान रिकामे व्हायला लागले की नवीन पदार्थांची ऑर्डर मिळायची संधी असते. पण ते तितकेच लिमिटेड नाही, तर त्या निमित्ताने फीडबॅक पण मिळतो. जर तेव्हा मला कोणी ऑर्डर विचारायला आले असते तर मी तिथेच बोललो असतो की मला जेवण आवडले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि मला वाटतं हा अप्रोच ठेवला तर माझ्यासारखे बरेच unhappy customers तिथेच mitigate होतील. आठवा, UPA2 का पडलं, त्यांना ऐकू जात नव्हतं.. बाकी जेवणाबद्दल अगोदरच बोलून झाले आहे, त्यामुळे परत बोलत नाही, फक्त काही गोष्टी नमूद करतो 1. फ्रीजमधली काकडी काढून किसणे, आणि संध्याकाळच्या कोशिंबिरीसाठी सकाळी काकडी किसून फ्रीजमध्ये ठेवणे, याने चवीत खूप फरक पडतो. 2. त्याचप्रमाणे फ्रिजमधून पुरण काढून पोळी लाटणे आणि सकाळी पोळी करून अर्धी भाजून मग संध्याकाळी पुन्हा गरम करणे, याने चवीत खूप फरक पडतो. असे जर तुम्ही करत नसाल तर पोळ्या का चामट होतात यावर अभ्यास केलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवटची पोळी खायला आणि तोडायला त्रास होत होता. तुम्ही कदाचित 2-2 महिने फ्रीज करत नसाल, पण पोळी अर्धी भाजून ठेवल्याने पोळीची वाट लागते. परदेशामध्ये हेच करतात, आणि म्हणून तिथल्या तसल्या पोळ्या खाणाऱ्यांची पोटे बिघडतात. 3. मीठाचा वापर कमी असलेलाच बरा. कढी आणि वरण मी केवळ खारट असल्यामुळे खाऊ शकलो नाही. 4. मोठ्या वाट्या भरून लिमिटेड देण्यापेक्षा छोट्या वाट्या भरून द्या आणि परत सर्व करा. सर्व करायचे कष्ट वाचवायचे असतील तर भरलेल्या वाट्या टेबलावर ठेवा. लोक पाहिजे तर घेतील. पण केवळ पानात आहे म्हणून माझ्यावर वाटीभर वरण संपवायची सक्ती कशाला? असो, बोलण्यासारखे बरेचकाही आहे, पण किती बोलणार? फक्त आमच्या तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत हे कृपया ध्यानात घ्या आणि मुख्य म्हणजे पुण्यात तुमची स्पर्धा सरावना भुवनशी नसून श्रेयस पंचवटी कृष्णा सुकांता किंवा दुर्वांकुर बादशाही आणि स्वीकार शी आहे इतके लक्ष्यात असू द्या म्हणजे झाले. इत्यलम।

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 22:28
थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा अभाव' म्हणता येइल. हे पुर्ण्ब्रह्मा चेनचे स्वतःच्या मॅनेजमेंटकडुन चालवले जाणारे असल्यास फारच वाईट स्थिती म्हणावी लागेल. पण माझ्या अंदाजाने बढाईत बुडालेली मुख्य कंपनी प्रत्यक्षात सपोर्टला कमी पडते, सपोर्ट कमी झाला अथवा अपेक्षीत उत्पन्न हाती लागले नाही की फ्रँचाईझी इंटरेस्ट कमी होतो, मलातरी इनिशीयल इंटरेस्ट संपलेल्या फ्रँचाईजीची केस असण्याची शक्यता अधिक वाटतीए. असो.

In reply to by आनन्दा

लई भारी 22/08/2018 - 15:15
आपल्या मुद्द्यांशी अगदी सहमत आहे. ग्राहक म्हणजे मी राजा आहे अशी वागणूक द्यावी अशी अपेक्षा नाही, पण सौजन्यपूर्वक बोलणे, अभिप्राय दिल्यास त्याची वेळीच दखल घेणं महत्वाचं आहे. उत्तम जेवण मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. त्यातूनही एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणांमुळे काही वाईट अनुभव येऊ शकतो पण अशा वेळी ग्राहकांशी नीट संवाद ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं. पुण्यात बऱ्याच महाराष्ट्रीयन जेवणाच्या ठिकाणी अभिप्राय दिला तरी 'आमच्याकडे असंच असतं' असा आविर्भाव असतो, पण जवळपास सर्व ठिकाणी बहुतांश लोकांना आवडेल असे जेवण असते त्यामुळे चालून जातंय.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 25/08/2018 - 18:42
आनंदराव तुम्हाला त्या हॉटेलचा अनुभव सर्वतोपरी वाईट आला हि वस्तुस्थिती आणि त्याबद्दल तुम्ही मुद्देसूद लिहिले आहे मग त्याबद्दल तुम्ही स्वतःला दोषी वाटून घेण्याचे कारण नाही. त्या "ताई"नि जर आपलीच लाल म्हणून व्हिडीओ प्रसारित केला आणि सार्वजनिक न्यासावर आपली भलामण करणारे लेख लिहिले असतील तर त्याचा वाईट अनुभव सुद्धा प्रसारित होणारच आणि व्हायलाच पाहिजे. एकदा खिडकीत बसले कि खालून लोक शुकशुक करणारच, म्हणून कुणाला चिडण्याचे कारण नाही. असा अभिप्राय घेऊन त्या ताईंना सुधारायचे आहे कि इडली वाल्या कामतांच्या वाटेवर जायचे आहे हे त्यांनी ठरवायचे आहे. तुम्ही कुणाला आपल्या लेखनाचे समर्थन देण्याचे कारण नाही.तुम्ही दमड्या मोजल्या आहेत चिंचोके नाहीत. भिकार असेल तर भिकारच म्हटले पाहिजे उगाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून इतरांना खड्ड्यात पाडण्यात हशील नाही.

नाखु 21/08/2018 - 21:54
नुकतेच सुरू झाले आहे, स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराकडून धनेश्वर कडे जाताना डाव्या हाताला जेमतेम पन्नास पावलांवर पहिल्या मजल्यावर आहे. रोज बदलता मेनू असतो, मिष्टान्न अमर्यादित तरी वाजवी दरात , अनुभव हीच खात्री, फक्त सोमवारी बंद, आणि हो चतुर्थी ला उकडीचे मोदक असतात अनुभवी नाखु

In reply to by नाखु

पंडित कुलकर्णींचे ना? चांदीच्या ताटात वाढतात ते? आम्ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडून स्वयंपाक मागवतो..उत्तम चव! परवाच मासवडी, पुरणपोळी, मसालेभात वगैरे जेवण मागवलं होतं. छानच होतं. Ss

In reply to by पिलीयन रायडर

व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून दोनच दिवसांपूर्वी ट्राय केले, खेदाने सांगावे वाटते अजिबात चांगले वाटले नाही जेवण. साधारणपणे आमच्या हापिसात असतात तसल्या पोळ्या, पिठले, मटार रस्सा, मसालेभात, कढी यापॆकी काहीच व्वा म्हणण्यासारखे नव्हते. खव्याच्या पोळ्या म्हणून जे काय होते ते बाहेरून आणलेले पेढे + बेसन असे काहीसे मिश्रण घातल्यासारखे वाटत होते. आणि ओल्या नारळाच्या करंजीत घालायचे सारण हा हि एक गोड पदार्थ असतो हे माहितीच नव्हते, नारळाचा हलवा कि काहीतरी नाव दिले होते. त्यांचे वैयक्तिक केटरिंग कसे असते ते माहिती नाही, पण थाळी नाही आवडली. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो. सध्या चिंचवड मध्ये अगदी आवर्जून (माझ्यामते) खाण्यासारखी थाळी म्हणजे "रागा" थाळी. चिंचवड स्टेशन चौकात द्वारकादास शामकुमारच्या समोर, जस्ट कॅजुअल्स च्या बाजूला. छान व्यवस्था आणि छान जेवण. उगाच भरमसाठ पदार्थांचा भडीमार न करता ताटातले सगळे पदार्थ (आणि खासकरून भाज्या) खाता येतील असा मेनू. दोन स्वीट्सपैकी बरेच वेळेस उकडीचे मोदक + तूप हे एक असते. थरमॅक्स चौकातील संस्कृती डायनिंग हॉल पण ट्रे करण्यासारखा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हो? अरेरे... मी स्वतः थाळी नाही खाल्ली जाऊन पण केटरिंग मात्र अनेक वर्ष झाले घेत आहोत.. डांगे चौकात रसरंग की असेच काही तरी नाव असलेले हॉटेल आहे. तिथे पण बरी थाळी मिळते असं आई म्हणत होती.

In reply to by पिलीयन रायडर

रसगंध नाव आहे. मी एकदा गेलो होतो. चांगले आहे पण अप्रतिम नाही. भाज्या ठीक वाटल्या , बाकी पदार्थ तुलनेने चांगले होते .नेमकं आठवत नाही पण बहूधा छोटे बटाटेवडे होते , ते चांगले होते. गोड पदार्थ काय होता आठवत नाही पण चांगला होता. पण अगदी आवडीने खावीशी वाटावी अशी एकही भाजी वाटली नाही त्यामुळे नंतर पुन्हा गेलो नाही. तरी अजून एखाद वेळेस जाईन कधीतरी.

हुप्प्या 22/08/2018 - 08:54
बाईंनी मोठ्या घमेंडीत सांगितले की त्या हल्ली फक्त नऊवारीत वावरतात. पण नंतर बोलताना मुले त्यांना ममा की मामा असे म्हणतात असे कळले. नऊवारी साडी नेसलेल्या आईला आई म्हणणे मागासलेले वाटते का की पोरे तिला ममा म्हणणे पसंत करतात? बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर? डी एस केंची काही भाषणे ऐकली आहेत त्यातही असाच एक अहंकार जाणवतो. पण थोडा सौम्य. बाईंचा अहंगंड म्हणजे त्यापुढे गगनही ठेंगणे!

In reply to by हुप्प्या

माहितगार 22/08/2018 - 12:26
...बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?...
उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.

In reply to by हुप्प्या

ट्रम्प 22/08/2018 - 16:40
अहंकारापाई त्या बाईने माती खाल्ली हे व्हिडिओ मध्ये दिसलेच होते . ' आमची कुठेही शाखा नाही ' नंतर आता असले व्हिडिओ म्हणजे स्वकौतुक करण्याचा नवीन प्रकार दिसतोय जे व्यवसायाला मारक आहे . स्वकौतुक करणारे कुठल्याही जातीधर्माचे किंवा गरीब , श्रीमंत असुद्या ते डोक्यातच जातात . कष्ट करून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेला डी एस के साळसूदपणे गुंतवणूकदारांचे पैसे अवैधरीत्या त्याच्याच वेगवेगळ्या कम्पन्या मध्ये फिरवत होता हे तपासात सापडले च ना ? बरं ही फिरवा फिरवी करताना वर परत अहंकाराचीच भाषा .

थाळी प्रकारात आधी कोणाचातरी अनुभव ऐकून जाणेच योग्य असे माझे मत. रच्याकने, हा लेख आधी कायप्पाला दाखवून आणलाय का? Sandy

In reply to by चांदणे संदीप

आनन्दा 20/08/2018 - 08:46
कायप्पा वर मी अगदी पर्सनल ग्रुप ना टाकलाय. पण चेपू वर जाम फेमस झालाय हा लेख.. तिथून कोणीतरी टाकला असेल कायप्पा वर. काय आहे, तिथे जाऊन फ्रस्ट्रेट झालेले बरेच जण असणार आहेत, त्यामुळे असा लेख मिळाला की ढकलत असतील पुढे..

सुचिता१ 19/08/2018 - 23:42
छान आहे समीक्शा :) :) तो विडीओ म्हणजे मला आत्मस्तुती चा बॉंम्ब च वाटला होता . त्यांच े आदर्श आहेत, मँकडॉनाल्ड आणि डॉमीनोज मग काय फ्रोजन फुड वर च सगळी मदार असेल .

जेम्स वांड 20/08/2018 - 05:36
आमच्या वरच्यावाडीच्या पारावर कोणी उतारा म्हणून ठेवलं तर काळं कुत्रं बी खाणार नाही. पुरणपोळी पुरणपोळीच असते, ती पुण्यात खावा का आणि कुठं (तुम्ही खाल्लेली खचितच नव्हती, पण ती कुठंही खाल्ली असती तरी पुरणपोळी म्हणवले नसतेच). एकंदरीत हॉटेलानुभव पाहता निगेटिव्ह रेटिंग पण कमीच पडेल असे वाटते. पण त्याला जोडून असलेला "पुण्यातच काय ती सुग्रास जेवायची अक्कल आहे" हा ओव्हरटोन पण काही तितका खास आवडला नाही, असोच.

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:32
पुणेरी टोन वगैरे काही नाही. उलट पुण्यात म्हणून हे सगळं खपतय.. कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात या हॉटेल ने 2 महिन्यात गाशा गुंडाळला असता.. मी पुण्यात राहतो म्हनून मी पुण्याचं नाव घेतो. इतकंच!! परंतु हे अस्सल मराठी जेवण नाही, त्यामुळे कोणत्याही शहराचे नाव टाकले म्हणून काही फरक पडणार नाही.

In reply to by आनन्दा

जेम्स वांड 20/08/2018 - 10:18
माफी असावी एकडाव, बाकी ग्रामीण जेवणाचा अभाव आहे पुण्यात खुद्द शहरात पण नशिबाने लाभलेल्या आजूबाजूच्या मावळांत मिळून जातं उत्तम

In reply to by जेम्स वांड

लई भारी 20/08/2018 - 10:48
एक झकास पोस्ट होऊन जाऊ दे की या खादाडीची! आम्हाला पण ४ ठिकाणं म्हायती पडतील! रच्याकने: मी "बैजवार" हा शब्द वापरणार होतो; पण परत गोंधळलो कि खरंच असा शब्द(अर्थात: बोलीभाषेत) आहे का? आईला,गावाला जाऊन लै दिस झाले म्हणजे!

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:35
बाकी हे खरं आहे. आणि पुण्यात अस्सल मराठी, (ज्यात खान्देशी आल्या, वर्हाडी आल्या, कोकणी पण आल्या) डिलेकसी कुठे मिळतच नाहित असे माझेही मत आहे. पण या बाईंचा विडिओ बघून अपेक्षा वाढल्या होत्या..

In reply to by आनन्दा

बॅटमॅन 25/08/2018 - 19:35
डेलिकसीज मिळतात की. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या मिळतात. तुम्हांला अपेक्षित असलेल्यापैकी कुठला प्रकार मिळाला नाही?

गवि 20/08/2018 - 06:53
अनेक, म्हणजे शेकडो शाखा दणादणा उघडत गेलेल्या (विशेषतः निष्काळजीपणे चुकीच्या फ्रॅंचायजी देऊन) अनेक रेस्टॉरंट चेन्समधे असाच अनुभव येतो. हायवेवर जागोजागी असलेल्या कामत रेस्टॉरंटच्या चवीविषयीही असंच मत आहे.

नाखु 20/08/2018 - 07:03
त्यापेक्षा चिंचवड बेष्ट,गावात गोडाधोडासकट वर दिलेल्या पैश्यापेक्षा कमी किंमतीत "अब्ब" म्हणेपर्यंत चापून खा,रोज बदलता मेनू. आणि हो नुकताच एक मिपाकर जाऊन आला आहे खुलाशी नाखु

In reply to by प्रचेतस

सुहासचं जेवण चांगलं असतं (म्हणजे फार अप्रतिम नसलं तरी) पण बाकी गोष्टी डोक्यात जातात. दुपारी अंधारलेलं असलं तरी दिवे बंद असतात, ग्राहकाने विनंती केली तर दिवे लावले जातात. मी एकदा दुपारी एकटाच गेलो होतो तेव्हा काहीशी गर्दी होती आणि मी बसून बराच वेळ झाला मात्र ताट आले नाही, बहूधा पुरेशा चपात्या वगैरे तयार नसतील असा विचार करुन मी शांतपणे वाट बघत बसलो. मात्र बाजूच्या टेबलावर माझ्या नंतर आलेल्या काही ग्राहकांकडे ताटे आली तेव्हा माझं डोकं फिरलं. सरळ उठलो आणि काउंटरवर जावून म्हणालो "माझ्या नंतर आलेल्या ग्राहकांना तुम्ही ताटं वाढता ? ती काय स्पेशल आहेत का की मी एकटा (म्हणजे हॉटेलला कमी उत्पन्न) म्हणून असं" आणि मग तिथून निघालो पण कुणी ना दिलगिरी व्यक्त केली ना थांबवण्याचा प्रयत्न केला. असो. हिंजवडीला जाताना वृंदावन - अंगत-पंगत अशी हॉटेलची जोडी आहे..म्हणजे वृंदावन हे डिश पध्द्तीचे तर अंगत-पंगत हे थाळीचे.. ते एकदा नक्की बघा, .. स्विगीवरुनही त्यांची थाळी पार्सल मागवता येते. . चवही चांगली आहे. एका थाळी पार्सलमध्ये दोघे खावूनही बरेच अन्न उरते... एका थाळी पार्सलमध्ये चार भाज्या , सहा चपात्या, भजी वा तत्सम पदार्थ , गोड पदार्थ्, गोड कढी, दोन प्रकारचे वरण , भात असं बरंच काही येतं. तिथे जावून खाण्याचा अनुभवही चांगलाच आहे (पार्सलपेक्षा थोडा महाग वाटला तरी) !!

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:27
अंगत पंगत वरुन तर दररोजचा जाण्यायेण्याचाच रस्ता आहे पण अतापर्यंत कधी जाणं झालं नाही तिथं, तुम्ही म्हणताय तर एकदा थाळी खाउन पाहतो तिथली. बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे. १०० रुपयात विदाऊट स्वीट अमर्यदित थाळी अआणि १५० रुपयात स्वीटसकट अमर्यादित. चव खरोखरच छान आहे.

In reply to by प्रचेतस

चिनार 21/08/2018 - 11:46
अंगत पंगत उत्तम आहे. पुण्याला असताना तीन- चार वेळेला गेलो आहे. आता पुण्यात आल्यावर एकदा जाईन म्हणतो..

In reply to by प्रचेतस

पुंबा 21/08/2018 - 11:55
बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे.
कट्टा करण्यासारखे आहे का?

In reply to by प्रचेतस

लई भारी 22/08/2018 - 15:20
त्यांनी आता जवळच, कल्याण-भेळ/हयात च्या बाजूला मोट्ठ्या जागेत स्थलांतर केलंय. नवीन ठिकाणी गेलो नाही पण जागा मोट्ठी आहे. ह्यांचं जेवण थोडं मसालेदार वाटलं. डबा नसेल तर पर्याय म्हणून जवळच 'चामुंडा' ची थाळी बेश्ट आहे.

कुझिन महाराष्ट्रीयन टाईप कॅज्युअल एव्हरेज कॉस्ट फॉर टू ९०० फक्त घरातल्या जेवणाला एवढे पैसे??!! बाकी तुम्ही केलेल्या वर्णनावरून गाळा/खानावळ टाईप वाटलं होतं, पण फोटो तर पॉश हॉटेलसारखे आहेत.

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा 20/08/2018 - 10:01
हॉटेल खूप पॉश आहे. स्वच्छता वगैरे माहीत नाही, पण ठीकठाक असावी. ऐसपैस आहे. पण पुण्यात त्यांची स्पर्धा सरावनाभुवनशी नसुन गल्लोगल्ली असलेल्या खाणावळी, आणि श्रेयस, सुकांता, पंचवटी सोबत आहे हे कसे विसरुन चालेल?

दिगोचि 20/08/2018 - 08:01
विमानात शाकाहारी जेवण मिळत नाही हे शक्य नाही. या बाईनी अगोदर विमान कम्पनीला सान्गितले नसेल. म्हणुन तसे झाले असेल कारण अगोदर सान्गितलेल्यानाच फक्त तसे जेवण मिळते. तसेच रु. ३५०च्या थाळिला जीएसटी धरुन ७३५ रुपये कसे पडले? कारण जीएसटी फक्त १० टक्केच आहे ना? म्हणजे ७७० रुपये २ थाळ्यान्चे मिळून पडले असते.

सिरुसेरि 20/08/2018 - 08:15
असल्या उद्धट , आगाउ आणी दिखाउ हॉटेलपासुन सावध केल्याबद्दल धन्यवाद . तरी नशीब , तिथल्या स्टाफने "इतने पैशेमें इतनाहिच मिलेगा " असली उत्तरे दिली नाहीत .

In reply to by पिलीयन रायडर

आनन्दा 20/08/2018 - 09:56
खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता. त्यामुळे मी स्वतःच कित्येक दिवस या बाबतीत काय वेगळे करता येईल असा विचार करतोय, त्याची काहीतरी रुपरेषा मनात आहे पण, फक्त सध्या ग्रुहकर्जात अडकलोय म्हणून उडी मारता येत नाही. या बाईंचा व्हिडिओ बघितला आणि वाटलं की अरेच्चा, आपल्या मनात जे आहे तेच तर यांनी केलंय. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण झाला, आणि त्यामुळे काहीही झाले तरी पुण्यात हे हॉटेल सुरु झाल्यावर एक्दा तरी जायचंच असं ठरवलं. असो.. साधरणपणे बे एरिया च्या इन्डिअन स्टोर मध्ये जे पदार्थ मिळायचे ते पदार्थ काल पुन्हा एकदा खाल्ले आणि एकदम परत आम्रविकेत गेल्याचा फील आला. ३५० रु मध्ये असा जगप्रवास दुर्मिळच!

In reply to by आनन्दा

लई भारी 20/08/2018 - 10:45
थाळीच्या एकसूरीपणाबद्दल अगदी सहमत! आपला मनोदय लवकरच प्रत्यक्षात येवो :) शेवटचा "जगप्रवास" चा टोमणा जबरी आहे :) रच्याकने: झोमॅटो वर अजून 'Opening soon' दाखवतंय. त्याच्याआधीच बंद पडतंय वाटतं! :D

In reply to by आनन्दा

पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता
दुर्वांकूर चांगलं आहे की ? अर्थात मी ही तिथे मोजून दोन तीन वेळा गेलो असेन पण जेव्हा गेलो तेव्हा आवडलं होतं.. मी चिंचवड मध्ये रहात असल्याने पुण्यातले हॉटेल्स फारसे माहित नाही. चिंचवडमध्ये मयूरची लोकप्रियता आहे बर्‍यापैकी पण बरेच महागडे आहे, मी फारसा गेलो नाही. दुसर्‍या एका प्रतिसादात मी हिंजवडीच्या अंगतपंगत चा उल्लेख केला आहे. ते चांगले आहे.

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:29
मयुर खूपच महाग आहे. ३५० रु. अमर्यदित थाळी फक्त जिलेबीसह. इतर काही स्वीट हवे असल्यास ८० रु, १०० रु. एक वाटी असे. मात्र जेवणाची चव अप्रतिम आहे.

In reply to by प्रचेतस

मी सुकांता, दुर्वांकुर, श्रेयस येथील थाळी खाल्ली आहे आणि बर्‍यापैकी आवडली सुद्धा. डेक्कनचे मथुरा पण छान आहे. (विशेषतः सकाळी मिळणारे व्हेज प्लॅटर ज्यात कोथिंबीर वडी, बटाटा वडा, आळु वडी. सुरळीची वडी वगैरे असते) थाळी नको असल्यास भाजी भाकरी वगैरे सुद्धा मस्त. बादशाही आणि पुना बोर्डींग हाउसबद्दल तर काय सांगावे? काही वर्षा पुर्वी डेक्कनला एक हॉटेल होते, नाव आठवत नाही पण थाळी मस्त घरगुती. गेलाबाजार शनिवारातले रसोई डायनिंग पण ठीक.

In reply to by आनन्दा

हुप्प्या 21/08/2018 - 09:53
बे एरियात प्रचंड संख्येने भारतीय रेस्टॉरंटे आहेत पण सरसकट अत्यंत सुमार दर्जा. पूर्णब्रह्माची बे एरियातील जेवणाशी तुलना म्हणजे खास शालजोडीतला हाणला आहे!

माहितगार 20/08/2018 - 11:30
पुण्यासारख्या शरात सुद्धा बुंबई प्रमाणेच दोन घटका बसण्यासाठी सार्वजनिक जागांची उपलब्धता कमी झालेली आहे. हाटेलात काही मिंटे ते तासभर केवळ बसण्यासाठीच पैसे द्यायचे असतात. हे लक्षात घेतले म्हणजे खाण्यास उपलब्ध केले गेलेले पदार्थ बसण्यास मिळालेल्या जागेचे काही मिंटांचे भाडे मोजल्यामुळे मिळालेला बोनस समजून, चवीपुरते चाखुन सोडून द्यावे, म्हणजे मनाला ताण येत नाही.

योगी९०० 20/08/2018 - 12:45
बंगलोरला त्यांच्या दोन्ही रेस्टारंट मध्ये जाऊन आलो. चांगला अनुभव आला. झुणका भाकरी आवडली. पुण्यातच यांना काय झाले कोणास ठाऊक... त्या व्हीडीओ मध्ये ती बाई म्हणाली की विमानात तिला शाकाहारी नाही मिळाले. कित्येक तास उपाशी राहीली वगैरे...आणि नंतर थोड्या वेळाने म्हणाली की माणूस सोडून काहीही खाऊ शकते....!! काय टोटल लागली तर मला सांगा..

In reply to by योगी९००

मला त्या बैंचा टोन आवडलाच नाही म्हणून मी पूर्ण पाहिला नाहीये तो व्हिडीओ, पण शाकाहारी जेवण मिळालं नाही हा काय किस्सा आहे? मी जे काही दोन चार वेळा फ्लाईटमध्ये बसलेय त्यात कधीही प्रॉब्लेम आला नाही. घरात बाकीचे लोक आहेत जे सतत फिरत असतात, त्यांनाही कधी असा त्रास झाला नाही...

In reply to by गवि

मृण्मयी१ 20/08/2018 - 21:44
त्या बाईंच्या बोलण्यात फार कृत्रिमपणा आहे. केवळ मार्केटींगच्या दृष्टीने केलेले हे विडीओज आहेत. मला त्यात प्रामाणिकपणाचा अभाव जाणवला. मी शहाणी, मला सगळं समजतं असाही आव वाटला. बाई डोक्यात गेल्यात खरं.

In reply to by गवि

तिमा 21/08/2018 - 12:28
कंंठाळीपणा, आत्मस्तुती, माजोरीपणा हे सर्व एकत्र आले की इरिटेटिंग होणारच की ! कानडी उच्चार असल्यामुळे, वार्‍यावरची वरात, मधल्या कडवेकर मामी आठवल्या. कंठाळा आला की वो!

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 20/08/2018 - 13:40
हे शक्य आहे, अधूनमधून माझ्याही बाबत होतं. नुकताच आलेला अनुभव फिन एअरचा. अर्थात हे भारताला जाणार्‍या 'लेग'मध्ये होत नाही, आणि आगोदर व्हेज ऑर्डर करायची सोय सगळीकडे असतेच. मीच कधीकधी आळशीपणा करतो.

In reply to by आदूबाळ

हो म्हणजे सोय असतेच. ऑर्डर द्यावी लागत असेल आधी इतकंच काय ते. आज काल विमानात व्हेज जेवण मिळत नाही हे पटत नाही. एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते! आणि अजून एक म्हणजे.. लिमिटेड.. मी फारशी थाळी खात नाही, पण तरी स्वीट लिमिटेड हे ऐकलंय, सगळंच जेवण लिमिटेड ते ही 350 मध्ये, काही चुकल्या सारखं वाटत नाही का? मला वाटतं सुकांता वगैरे फेमस थाळ्या साधारण ह्याच कॉस्ट मध्ये अनलिमिटेड जेवण देतात ना?

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 21/08/2018 - 14:54
एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते!
हे सगळ्यांनाच जमत नाही. याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात. The Misconception: You make rational decisions based on the future value of objects, investments and experiences. The Truth: Your decisions are tainted by the emotional investments you accumulate, and the more you invest in something the harder it becomes to abandon it.

वरुण मोहिते 20/08/2018 - 15:19
हॉटेल ला . 4 पेग मारून थाळी खाऊन येईन. कोकम सरबत मिळते का? वोडका नि सरबत कोणाला काही कळणार नाही मग अजून 2 पेग. पुरणपोळी चालेल चकण्याला.

पुंबा 20/08/2018 - 18:14
बाईंच्या बोलण्यातून हा प्रयोग एकूणच पाणचट असणार आहे अशी कल्पना आली होती. स्वयंस्तुतीचा अतिरेक केला आहे त्यांनी त्या व्हिडिओत. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मूळात मेन्यु कार्डात पदार्थ आणि किंमत पाहून तुम्ही थाळी मागवायलाच नको होती असे वाटते.

In reply to by पुंबा

हुप्प्या 21/08/2018 - 09:44
अगदी १००% सहमत! बाईंचा व्हिडियो म्हणजे आत्मकेंद्रित वृत्तीचा एक उत्तम नमुना आहे. गिर्‍हाईकांना चांगली सेवा द्यावी यापेक्षा कुणाची तरी खोड मोडावी अशा भावनेतून उद्योग सुरु केला आहे की काय असे वाटत रहाते! पूर्णब्रह्माला माझ्यातर्फे पूर्णविराम.

एक व्यावसायिक म्हणून मत मांडू इच्छितो. यात कुणाला खरे खोटे ठरविण्याचा किंवा कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. बहुधा बर्‍याच आस्थापनांमधे एक पाटी लावलेली असायची की आमची सेवा खराब असली तर आम्हाला सांगा आणि चांगली असली तर इतरांना सांगा. सोशल मिडिया आपल्या हातात आल्यापासुन आपण नेमेके उलटे वागतोय काय ? आपणास तिथली सेवा आवडली नसल्यास तेथील व्यवस्थापकांना भेटून तिथे काय वाईट होते हे सांगावयास हवे होते. इथे आंतरजालावर लिहून त्यांची सेवा सुधारेल असे वाटत नाही. आपल्या टीकेमुळे त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने पोटपाणी धोक्यात येऊ शकते. मागे काही वर्षांपुर्वी इथे ठाण्यातल्या "मेतकुट" हॉटेल बद्दल देखिल असाच नकारात्मक अनुभव सांगणारा लेख आला होता. त्याही धाग्यावर मी अशाच प्रकारे मांडलेल्या मताचे समर्थन कोणीही केले नाही तरी देखील स्वत:कडे वाईटपणा घेऊन ही गोष्ट पुन्हा सांगाविशी वाटते. ग्राहक म्हणून आपणांस चांगली सेवा मिळण्याचा हक्क आहेच आणि ती नाही मिळाली तर तक्रार करण्याचा हक्क देखील १००% आहे. मात्र जालावर तक्रार करताना समोरच्याचे नुकसान किती प्रमाणात होऊ याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच (अर्थात समोरच्याचे नुकसान व्हावे असा आपला हेतू नसतो पण तसे होते खरे) ! तक्रार करण्यापुर्वी समोरच्या पार्टीचा थोडा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा ही विनंती ! अगदीच चुकीला माफी नाही असा अ‍ॅप्रोच नको ! प्रतिसादामुळे कोणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व !

In reply to by धर्मराजमुटके

१) कसं आहे की चांगल्या सेवेत काहीशी उणीव असेल तर व्यवस्थापनाला 'सुधारणेस वाव आहे' असे सांगण्यात उत्साह वाटतो पण सेवा फारच गंडली असेल तर असे काही सांगण्याचा उत्साह वाटत नाही. २) शिवाय आपण अतिशय वाईट सेवा देतोय याची त्या व्यवस्थापनाला किंचितही कल्पना नसावी हे पटत नाही.. तिथले व्यवस्थापक , कर्मचारी हे देखील कुठेतरी ग्राहक म्हणून जात असतीलच ना. ३) ज्यांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे ते स्वतःहून अभिप्राय जाणून घेण्याची तत्परता दाखवतात. बार्बेक्यू नेशनमध्ये एकदा जावून बघा.. ते किती लोकप्रिय आहेत याची त्यांना चांगली कल्पना आहेच पण तरी गर्व नाही ..तुम्हाला स्टार्टर्स आवडलेत ना हे आवर्जुन विचारता, स्टार्टर्समध्ये आणखी काय हवं हे पण विचारतात..शेवटी टॅबमधून पुन्हा औपचारिक अभिप्रायही घेतात... ४) पण "आपल्याला आपले पैसे मिळाले ना झालं तर मग.. ग्राहक संतुष्ट आहे की नाही काय पडलीये आपल्याला" असंच वागणं दिसत असेल तर काय अभिप्राय देणार. इथे लेखकानं लिहिलंय की
शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
त्यावरही त्या बाईंनी लेखकाला असं का वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये.. मग येवू दे की अशा लोकांचं पोटपाणी धोक्यात .. त्यांचं पोटपाणी चालावं म्हणून अनभिज्ञ लोकांनी त्यांच्याकडे जात रहाण्यापेक्षा लोकांना सावध करुन लेखकाने चांगलंच केलंय

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 21/08/2018 - 11:52
माझी देखील साधारण अशीच भावना आहे. अनेक ठिकाणी मी जेवण झाल्यावर management ला फीडबॅक देऊन जातो. इतका क्रूर फीडबॅक देण्याची ही माझी देखील पहिलीच वेळ आहे. आणि बहुधा या गोष्टीला त्यांचे जेवण कारणीभूत नसून कस्टमर management कारणीभूत आहे असे वाटतेय. बघू, जमले तर कुठे काय कसे चुकत गेलं याचा एक प्रतिसाद पण टाकेन. मला स्वतःला पण हे खूप लागून राहिले आहे.

अभ्या.. 20/08/2018 - 18:33
मी काय म्हणतो, त्या पूर्णब्रह्माची क्वालिटी ओकेटोके असती, गेलाबाजार अ‍ॅव्हरेज असती तर त्या बाईंना इतक्या शिव्या पडल्या असत्या का? म्हणजे त्यांनी भाषणात जे काही विठाई थाळी, अक्कलकोटाची स्वामीसमर्थ थाळी आदी फिरुन संशोधन करुन सिध्द केल्या गेलेल्या थाळ्यांचे वेगळेपण नावाची चीज काही चेक केली गेली आहे का? केवळ फॅन्सी नावे मेनूत टाकून त्याच त्याच भाज्या वाढणे म्हणजे आंत्रप्रुनरशिप मिरवणारे खरोखरीच डोक्यात जातात. त्यातल्या त्यात ह्या प्रकारासाठी मोजली जाणारी किंमत तर दिव्य आहे. खरोखर पुण्यात ६०० रुपयाचा पिझ्झा, ३५० रुपयाची थाळी, २८० रुपयाची एखादी पंजाबी भाजीची डिश, ८०-१०० रुपयाचा नान व रोटी अशा किंमती केवळ स्थानमाहात्म्यामुळे आहेत की केवळ लोक देतात तेवढा पैसा म्हनून आकारायची पध्दत आहे? म्हणजे लोक इतके पैसे कशासाठी मोजतात हा मला पडलेला प्रश्न आहे. पूर्णब्रह्माची गोष्ट बाजुलाच पण वीकेंडास गर्दीने वेटींग पण ओसंडून वाहणार्‍या हॉटेलात लाजवाब, कधी चाखली नाही इतपत स्वादिष्ट, अप्रतिम अशी मनापासून दाद द्यावी असे अन्न सापडलेच नाही. गागुचका म्हणलात तरी हरकत नाही पण माझी सोलापुरी जीभ अशा अन्नाचे इतके पैसे देऊन इतके कौतुक करायला धजत नाही हेच खरे. संधी मिळाली तर टाकणार भो आपण पण हाटेल....पुण्यात.

In reply to by सतिश गावडे

स्वधर्म 21/08/2018 - 14:42
हा व्हिडीअो. पोशाखापासूनच ‘जितं मया’ शैली इरिटेटिंग अाहे. मी बाहेर जाऊन थाळी खाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तथापि, मराठी जेवण महाराष्ट्राबाहेर अाणि देशाबाहेरही पोहोचवत अाहेत, हे अावडले.

In reply to by पिलीयन रायडर

बाई मुळच्या कुठल्या हे माहीत नाही . पण व्हिडीओ बघताना त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला अहंकार ओसंडून वाहत होता . सतत स्वतःचे कौतुक चालले होते . अहंकार मुळे ग्राहकांना गृहीत धरण्याची वृत्ती वाढीस लागते व त्याचा परिणाम क्वालिटी वर झाला असेल .

In reply to by सोमनाथ खांदवे

खटपट्या 21/08/2018 - 14:56
सहमत, १७ वर्षे आयटीत काम केल्यावर बर्‍यापैकी पैसे साठवून नविन व्यवसाय सुरु केला असणार. पण हालाखीच्या परीस्थीतीतून, शुन्यातून हातात काहीच नसताना कीतीतरी महीला पोळीभाजी आणि अन्य खाद्यपदार्थ विकून चांगले पैसे कमावत आहेत. पण अशी जाहीरात कधी पाहीली नाही. उदाहरणादाखल खालील लिंक पहा https://www.youtube.com/watch?v=2zY5NkswIow

बोलघेवडा 20/08/2018 - 22:35
पुण्याला नाव ठेवायची फॅशन आहे. त्यामुळे फार लक्ष देत नाही. चांगली महाराष्ट्रीय थाळी पाहिजे असेल तर आपटे रोड वरील श्रेयस आणि Law College रोड वर कृष्णाला पर्याय नाही. स्वस्तात उत्तम दर्जा हवा असल्यास आपटे रोड वर आशा डायनिंग हॉल भेट द्या. सिहगड रोड वरील आनंदी डायनिंग हॉल हि चांगला आहे.

In reply to by बोलघेवडा

जेम्स वांड 21/08/2018 - 10:31
सकळ त्रिखंडातलं सगळंच सर्वोत्तम, त्याला कोण काय करणार? चांगल्या गोष्टींना नावे ठेवत नाहीये कोणी, पण जे चूक आहे त्याला कोणी चूक म्हणत असेल तर उगाच खुपवून घेण्यात अर्थ नाही.

माहितगार 21/08/2018 - 16:01
http://www.purnabramha.com/feedback---compliments-.html हि लिंक त्यांच्या वेबसाईटवर आढळली. धर्मराजमुटकेंप्रमाणे खुपणं हे संबंधीतांना कळवणे केव्हाही चांगले असे वाटते. त्या नंतर अनुभव चांगला आला तर ठिकच आहे आणि नाही आला तर सोशल मिडिया चर्चेस जो काही अनुभव असेल तो शेअर करण्यास उपलब्ध आहेच.

In reply to by माहितगार

आनन्दा 21/08/2018 - 16:40
खरे आहे.. सामान्यपणे मी तेच करतो. पण त्या दिवशी फसवणूक, अपमान, अपेक्षाभंग वगैरे अनेक भावना साठल्या होत्या ज्याचा परिपाक म्हणून सोशल मिडिया पोस्ट घडली. कधी वाटते मझे चुकले की काय. पण त्या दिवशी फेसबूक वर टाकल्यावर ज्या पोस्ट आल्या त्यातून असे जाणवले की पुण्यात तरी हॉटेलच्या मॅनेजमेंटने या गोष्तींचा विचारच केलेला नाही. असंख्य लोक त्यांना फीडबॅक देऊन आलेत, पण त्यांची क्वलिटी तशीच आहे. त्यामुळे त्याना कोणीतरी असा प्रसाद देणारच होते. योगायोगाने ते काम मझ्याकडुन घडले इतकेच. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यानी सोशल मिडिया चा जाहिरातीसाठी वापर केला तेव्हा त्यानी हा विचार करायला हवा होता की जर आपण तो दर्जा देऊ शकलो नाही तर हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते. तेव्हाची मिळालेली गुड पब्लिसिटी चांगली आणि ही वाईट असे नाही चालणार. आणि तसेही बाइ मराठी मानसाना त्यांच्या चिन्धीगिरीसाठी शिव्या घालताना दिसतातच, त्यामुळे त्याना या साधनाच्या मर्यादा माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 17:41
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही. तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.

ट्रम्प 21/08/2018 - 18:57
' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा त्या थंड बाईच्या थंड हॉटेल मध्ये थंड जेवण करायला धागा मालक गेलेच कसे ? हा मुख्य मुद्दा आहे . व्हिडिओ पहिल्या नंतर त्या ऍरोगंट बाईच्या हॉटेल मध्ये पैसे घालवून जेवण करणे शुद्ध मूर्खपणा आहे तरीपण बाकी मिपाकरांना सावध केल्या बद्दल धन्यवाद .

आनन्दा 21/08/2018 - 21:46
खरे तर परवा पूर्णब्रह्म वर पोस्ट टाकल्यावर इतका गदारोळ होईल अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला तर काही लोकांनी तू मुद्दाम नेट-पिकिंग करतोयस असे आरोपही केले. मी देखील स्वतःचे परीक्षण केले. कदाचित हे हॉटेल इतके खराब नसेल ही, किंबहुना ते तसे नसावे अशी मला देखील अपेक्षा आहे. म्हणून मग माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजून एक लेख लिहायचा निर्णय घेतला. साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत. पुण्यात जेव्हा यांचं उदघाटन झालं तेव्हा मी नेमका दुसऱ्या कामात स्वस्त होतो, आणि तसे बिबवेवाडी लांबही होते, त्यामुळे जाणे झाले नाही. म्हणून शेवटी एका रविवारी संध्याकाळी तळजाई आणि पूर्णब्रह्म असा प्लॅन केला. पण तिथे जाण्यापासून धक्क्यावर धक्केच बसत गेले आणि त्याची परिणती एका मोठ्या पोस्टमध्ये झाली, ज्याचा मला स्वतःलाच खूप त्रास झाला.. विचार करत गेलो तसे मला कळत गेले की कुठे काय चुकत गेले ते. नुसते जेवण खराब असते तर मला इतका त्रास झाला नसता. मी काउंटरवर सांगून बाहेर पडलो असतो की मला जेवण नाही आवडलं, पण यावेळेस योगायोगाने चेन ऑफ इनसिडेंट घडत गेली, ज्याने शेवटी कडेलोट झाला, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे, काय चुकलं, आणि काय करता आले असते ते. या सगळ्या सांगण्यामध्ये एका मल्टिनॅशनल चेन माझ्या काय अपेक्षा होत्या ते ही मी विशद करीत जाणार आहे. सुरुवात झाली ती navigation पासून, गूगल मॅप वर दोन लोकेशन असणे हे धंद्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. विशेषतः जेव्हा येणाऱ्याला 4 सिग्नल फिरून यावे लागते तेव्हा. आणि हॉटेलच्या नावाचा साइन बोर्ड रस्त्यावर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हॉटेल शोधायला आम्हाला साधारण 25 मिनिटे लागली, यावरून ते किती कठीण होते याचा अंदाज येईल. पत्त्यामध्ये जवळची लँडमार्क असणे आवश्यक आहे. मला त्या हॉटेलात जायचेच होते म्हणून मी शेवटी ते हॉटेल शोधून काढले. पण आत गेल्यावर साधारण 20x20 च्या जागेत गाड्या लावायच्या होत्या, आणि त्यात मध्यभागी 2 आंब्याची झाडे होती. ती झाडे चुकवून माझी 4.25 मीटरची गाडी लावायची होती. आणि ती देखील अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. बाहेर बसलेल्या एक ताई आमची गाडी बघून आत निघून गेल्या. मग मी थोडं मागे पुढे करुन गाडी लावली, ती बहुधा नीट लावली गेली नव्हती, पण माझा नाईलाज होता. यात काय सुधारणा करता येऊ शकते? आखलेले पार्किंग हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आखलेले पार्किंग असते तर नेमकी कशी गाडी लावली की रस्ता अडणार नाही हे मला कळले असते. पुढची गोष्ट मेनू ची - माझ्या माहितीनुसार हे मुख्यतः a la karte रेस्टॉरंट आहे, मग थाळी ची जाहिरात का? लिमिटेड थाळी ही एक कोम्बो ऑफर आहे, पण हॉटेलचा USP वेगवेगळे पदार्थ हा आहे. पण बाहेर लावलेला खानावलीसारखा "आजचा मेनू" हा एका थाळी रेस्टो चा फील देत होता. मेनू मध्ये देखील थाळी ची व्हरायटी पहिल्या पानावर, आणि मग थाळी तुम्हाला नको असेल तर बाकीचे पदार्थ अशीच मांडणी होती, त्यामुळे आम्ही थाळी ऑर्डर करणे साहजिक होते. काय सुधारता येईल? तुमचा USP काय आहे ते आधी ठरवा, थाळी असेल तरच थाळी ठेवा, नाहीतर a la karte असेल तर ते हायलाईट करा. आधी तो बाहेरचा फलक काढून टाका, ते तुमच्या स्टॅंडर्ड ला शोभत नाही. आता कस्टमर एंगेजमेंट बद्दल- हे माझ्या आयुष्यातले पहिले रेस्टो होते जिथे जेवण दिल्यानंतर कोणीही काही विचारायला आले नाही.. सामान्यपणे एखादा कस्टमर आल्यावर आपण त्याला आपल्याकडील सर्वोत्तम ऑफर करतो.. मला बाहेर पडताना दिसले की हॉटेलमध्ये अतिशय सुंदर भारतीय बैठक होती. पण ती मला दिसलीच नाही. माझ्याकडे छोटी मुलगी होती, जिने टेबलावर धिंगाणा घातला. खरे तर अश्या वेळेस हॉटेलमालक स्वतः होऊन काय सुटेबल आहे ते सजेस्ट करतात. थोडेसे प्रोऍक्टिव्ह कस्टमर management करायला हवी.. त्याचप्रमाणे गिऱ्हाईकांचे पान रिकामे व्हायला लागले की नवीन पदार्थांची ऑर्डर मिळायची संधी असते. पण ते तितकेच लिमिटेड नाही, तर त्या निमित्ताने फीडबॅक पण मिळतो. जर तेव्हा मला कोणी ऑर्डर विचारायला आले असते तर मी तिथेच बोललो असतो की मला जेवण आवडले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि मला वाटतं हा अप्रोच ठेवला तर माझ्यासारखे बरेच unhappy customers तिथेच mitigate होतील. आठवा, UPA2 का पडलं, त्यांना ऐकू जात नव्हतं.. बाकी जेवणाबद्दल अगोदरच बोलून झाले आहे, त्यामुळे परत बोलत नाही, फक्त काही गोष्टी नमूद करतो 1. फ्रीजमधली काकडी काढून किसणे, आणि संध्याकाळच्या कोशिंबिरीसाठी सकाळी काकडी किसून फ्रीजमध्ये ठेवणे, याने चवीत खूप फरक पडतो. 2. त्याचप्रमाणे फ्रिजमधून पुरण काढून पोळी लाटणे आणि सकाळी पोळी करून अर्धी भाजून मग संध्याकाळी पुन्हा गरम करणे, याने चवीत खूप फरक पडतो. असे जर तुम्ही करत नसाल तर पोळ्या का चामट होतात यावर अभ्यास केलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवटची पोळी खायला आणि तोडायला त्रास होत होता. तुम्ही कदाचित 2-2 महिने फ्रीज करत नसाल, पण पोळी अर्धी भाजून ठेवल्याने पोळीची वाट लागते. परदेशामध्ये हेच करतात, आणि म्हणून तिथल्या तसल्या पोळ्या खाणाऱ्यांची पोटे बिघडतात. 3. मीठाचा वापर कमी असलेलाच बरा. कढी आणि वरण मी केवळ खारट असल्यामुळे खाऊ शकलो नाही. 4. मोठ्या वाट्या भरून लिमिटेड देण्यापेक्षा छोट्या वाट्या भरून द्या आणि परत सर्व करा. सर्व करायचे कष्ट वाचवायचे असतील तर भरलेल्या वाट्या टेबलावर ठेवा. लोक पाहिजे तर घेतील. पण केवळ पानात आहे म्हणून माझ्यावर वाटीभर वरण संपवायची सक्ती कशाला? असो, बोलण्यासारखे बरेचकाही आहे, पण किती बोलणार? फक्त आमच्या तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत हे कृपया ध्यानात घ्या आणि मुख्य म्हणजे पुण्यात तुमची स्पर्धा सरावना भुवनशी नसून श्रेयस पंचवटी कृष्णा सुकांता किंवा दुर्वांकुर बादशाही आणि स्वीकार शी आहे इतके लक्ष्यात असू द्या म्हणजे झाले. इत्यलम।

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 22:28
थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा अभाव' म्हणता येइल. हे पुर्ण्ब्रह्मा चेनचे स्वतःच्या मॅनेजमेंटकडुन चालवले जाणारे असल्यास फारच वाईट स्थिती म्हणावी लागेल. पण माझ्या अंदाजाने बढाईत बुडालेली मुख्य कंपनी प्रत्यक्षात सपोर्टला कमी पडते, सपोर्ट कमी झाला अथवा अपेक्षीत उत्पन्न हाती लागले नाही की फ्रँचाईझी इंटरेस्ट कमी होतो, मलातरी इनिशीयल इंटरेस्ट संपलेल्या फ्रँचाईजीची केस असण्याची शक्यता अधिक वाटतीए. असो.

In reply to by आनन्दा

लई भारी 22/08/2018 - 15:15
आपल्या मुद्द्यांशी अगदी सहमत आहे. ग्राहक म्हणजे मी राजा आहे अशी वागणूक द्यावी अशी अपेक्षा नाही, पण सौजन्यपूर्वक बोलणे, अभिप्राय दिल्यास त्याची वेळीच दखल घेणं महत्वाचं आहे. उत्तम जेवण मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. त्यातूनही एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणांमुळे काही वाईट अनुभव येऊ शकतो पण अशा वेळी ग्राहकांशी नीट संवाद ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं. पुण्यात बऱ्याच महाराष्ट्रीयन जेवणाच्या ठिकाणी अभिप्राय दिला तरी 'आमच्याकडे असंच असतं' असा आविर्भाव असतो, पण जवळपास सर्व ठिकाणी बहुतांश लोकांना आवडेल असे जेवण असते त्यामुळे चालून जातंय.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 25/08/2018 - 18:42
आनंदराव तुम्हाला त्या हॉटेलचा अनुभव सर्वतोपरी वाईट आला हि वस्तुस्थिती आणि त्याबद्दल तुम्ही मुद्देसूद लिहिले आहे मग त्याबद्दल तुम्ही स्वतःला दोषी वाटून घेण्याचे कारण नाही. त्या "ताई"नि जर आपलीच लाल म्हणून व्हिडीओ प्रसारित केला आणि सार्वजनिक न्यासावर आपली भलामण करणारे लेख लिहिले असतील तर त्याचा वाईट अनुभव सुद्धा प्रसारित होणारच आणि व्हायलाच पाहिजे. एकदा खिडकीत बसले कि खालून लोक शुकशुक करणारच, म्हणून कुणाला चिडण्याचे कारण नाही. असा अभिप्राय घेऊन त्या ताईंना सुधारायचे आहे कि इडली वाल्या कामतांच्या वाटेवर जायचे आहे हे त्यांनी ठरवायचे आहे. तुम्ही कुणाला आपल्या लेखनाचे समर्थन देण्याचे कारण नाही.तुम्ही दमड्या मोजल्या आहेत चिंचोके नाहीत. भिकार असेल तर भिकारच म्हटले पाहिजे उगाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून इतरांना खड्ड्यात पाडण्यात हशील नाही.

नाखु 21/08/2018 - 21:54
नुकतेच सुरू झाले आहे, स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराकडून धनेश्वर कडे जाताना डाव्या हाताला जेमतेम पन्नास पावलांवर पहिल्या मजल्यावर आहे. रोज बदलता मेनू असतो, मिष्टान्न अमर्यादित तरी वाजवी दरात , अनुभव हीच खात्री, फक्त सोमवारी बंद, आणि हो चतुर्थी ला उकडीचे मोदक असतात अनुभवी नाखु

In reply to by नाखु

पंडित कुलकर्णींचे ना? चांदीच्या ताटात वाढतात ते? आम्ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडून स्वयंपाक मागवतो..उत्तम चव! परवाच मासवडी, पुरणपोळी, मसालेभात वगैरे जेवण मागवलं होतं. छानच होतं. Ss

In reply to by पिलीयन रायडर

व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून दोनच दिवसांपूर्वी ट्राय केले, खेदाने सांगावे वाटते अजिबात चांगले वाटले नाही जेवण. साधारणपणे आमच्या हापिसात असतात तसल्या पोळ्या, पिठले, मटार रस्सा, मसालेभात, कढी यापॆकी काहीच व्वा म्हणण्यासारखे नव्हते. खव्याच्या पोळ्या म्हणून जे काय होते ते बाहेरून आणलेले पेढे + बेसन असे काहीसे मिश्रण घातल्यासारखे वाटत होते. आणि ओल्या नारळाच्या करंजीत घालायचे सारण हा हि एक गोड पदार्थ असतो हे माहितीच नव्हते, नारळाचा हलवा कि काहीतरी नाव दिले होते. त्यांचे वैयक्तिक केटरिंग कसे असते ते माहिती नाही, पण थाळी नाही आवडली. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो. सध्या चिंचवड मध्ये अगदी आवर्जून (माझ्यामते) खाण्यासारखी थाळी म्हणजे "रागा" थाळी. चिंचवड स्टेशन चौकात द्वारकादास शामकुमारच्या समोर, जस्ट कॅजुअल्स च्या बाजूला. छान व्यवस्था आणि छान जेवण. उगाच भरमसाठ पदार्थांचा भडीमार न करता ताटातले सगळे पदार्थ (आणि खासकरून भाज्या) खाता येतील असा मेनू. दोन स्वीट्सपैकी बरेच वेळेस उकडीचे मोदक + तूप हे एक असते. थरमॅक्स चौकातील संस्कृती डायनिंग हॉल पण ट्रे करण्यासारखा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हो? अरेरे... मी स्वतः थाळी नाही खाल्ली जाऊन पण केटरिंग मात्र अनेक वर्ष झाले घेत आहोत.. डांगे चौकात रसरंग की असेच काही तरी नाव असलेले हॉटेल आहे. तिथे पण बरी थाळी मिळते असं आई म्हणत होती.

In reply to by पिलीयन रायडर

रसगंध नाव आहे. मी एकदा गेलो होतो. चांगले आहे पण अप्रतिम नाही. भाज्या ठीक वाटल्या , बाकी पदार्थ तुलनेने चांगले होते .नेमकं आठवत नाही पण बहूधा छोटे बटाटेवडे होते , ते चांगले होते. गोड पदार्थ काय होता आठवत नाही पण चांगला होता. पण अगदी आवडीने खावीशी वाटावी अशी एकही भाजी वाटली नाही त्यामुळे नंतर पुन्हा गेलो नाही. तरी अजून एखाद वेळेस जाईन कधीतरी.

हुप्प्या 22/08/2018 - 08:54
बाईंनी मोठ्या घमेंडीत सांगितले की त्या हल्ली फक्त नऊवारीत वावरतात. पण नंतर बोलताना मुले त्यांना ममा की मामा असे म्हणतात असे कळले. नऊवारी साडी नेसलेल्या आईला आई म्हणणे मागासलेले वाटते का की पोरे तिला ममा म्हणणे पसंत करतात? बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर? डी एस केंची काही भाषणे ऐकली आहेत त्यातही असाच एक अहंकार जाणवतो. पण थोडा सौम्य. बाईंचा अहंगंड म्हणजे त्यापुढे गगनही ठेंगणे!

In reply to by हुप्प्या

माहितगार 22/08/2018 - 12:26
...बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?...
उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.

In reply to by हुप्प्या

ट्रम्प 22/08/2018 - 16:40
अहंकारापाई त्या बाईने माती खाल्ली हे व्हिडिओ मध्ये दिसलेच होते . ' आमची कुठेही शाखा नाही ' नंतर आता असले व्हिडिओ म्हणजे स्वकौतुक करण्याचा नवीन प्रकार दिसतोय जे व्यवसायाला मारक आहे . स्वकौतुक करणारे कुठल्याही जातीधर्माचे किंवा गरीब , श्रीमंत असुद्या ते डोक्यातच जातात . कष्ट करून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेला डी एस के साळसूदपणे गुंतवणूकदारांचे पैसे अवैधरीत्या त्याच्याच वेगवेगळ्या कम्पन्या मध्ये फिरवत होता हे तपासात सापडले च ना ? बरं ही फिरवा फिरवी करताना वर परत अहंकाराचीच भाषा .
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली.

भांड्याला भांड

जागु ·
आज स्वयंपाक करता करता अचानक मनात विचार आला तो स्वयंपाक घरातील भांड्यांचा. आपल्या स्वयंपाक घरात भांडी एकमेकांच्या साथीने, गुण्यागोविंद्याने चविष्ट आणि कलात्मक पदार्थ बनवण्यासाठी किती संगठित होऊन काम करत असतात. त्यातील काही ठरलेल्या जोड्या म्हणजे पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा, कढई-झारा, खल-बत्ता, चमचा-वाटी. थोड्या आधीच्या काळात गेलो तर कप-बशी, पाटा-वरवंटा, तांब्या-पेला, उखळ-मूस ही भांडी किंवा साधनेही कायम एकमेकांच्या साथीनेच काम करायची. तसं पाहील तर प्रत्येक भांड्याला धडपड करावी लागते अस नाही, जसं की वाटी-चमचा. वाटीतील पदार्थाचा आस्वाद देण्यासाठी चमच्यालाच धावाधाव करावी लागते.

स्वैपाकघरातून पत्रे ३

शिव कन्या ·
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!