ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची
DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात.
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता.
दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले,
"अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही."
त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.
मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??
भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले.
मी काय चुकीचे केले??
एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे
मूळ प्रेरणा: पाणी
इतक्या बियरचे पेग बनवताना
विचार करायचा भावा,
शरीराला इतके झोके देताना
उसंत घ्यायची भावा....
उसळून पुन्हा फेसाळते बियर
बर्फ द्यायचा भावा...
दोन पाय पुरत नाहीत
बॉडीचा भार पेलताना...
भावा, आता बार बंद करा
अन् पिण्यातून मुक्ती द्या....
इंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते.
मी लॉंगऑफला उभा होतो. विकेटमागे धोनी, ही जोडी कशी फोडावी या विचारात होता. ॲलिस्टर कुक जरा चाचपडत होता पण उपुल थरंगा अगदी फॉर्मात बॅटींग करत होता. हरभजनला अगदी निष्प्रभ करून टाकले होते त्याने. तरी हरभजननेही अजून हार मानली नव्हती. अचानक हरभजनने त्याची नेहमीची बॉलींग ॲक्शन सोडून मिडीयम फास्ट टाकायला सुरूवात केली.
एक श्वान आणि एक कच्छप वगळता सांप्रत काहीही पाळत नाही, श्रावण तर दूरची गोष्ट. सबब, "गटारी" साजरी करण्याचे काहीही कारण असण्याची आवश्यकता नाही, नसावी.
तरीही "गटारी" साजरी होतेच!
म्हणजे कसं आहे की, आपण चवथीला मोदक किंवा होळीला पुरणपोळी खातो ती काय त्या दिवसांनतंर बराच काळ मोदक वा पुरणपोळी खायला मिळणार नाही म्हणून नव्हे, तर एक रिवाज म्हणून. तसेच माझ्या "गटारी"चेही!
एक रिवाज म्हणून साजरी करायची.
खेरीज, यंदा खास आकर्षण होते ते म्हणजे - अॅबसिन्थ.
चेक रिपब्लिकमध्ये बनलेले हॅप्सबर्ग अॅबसिन्थ.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.