Skip to main content

मी काय चुकीचे केले??

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 11/04/2024 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही. मी काय चुकीचे केले?? activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली. मी काय चुकीचे केले?? संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला. मी काय चुकीचे केले?? सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले. “या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला. मी काय चुकीचे केले?? “मी पुण्यात राहतो.” “पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.” “जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले. मी काय चुकीचे केले?? “मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक” “पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.” ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली. मी काय चुकीचे केले?? पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली. “तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले. ती काहीतरी पुटपुटत निघून गेली. मी काय चुकीचे केले?? :( सांगा सांगा मी काय चुकीचे केले??:(

वाचने 34280
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by सुबोध खरे

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-ben… नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि तुमच्या मुस्काटीत खाडकन बसली याबद्दल खेद आहे

In reply to by अहिरावण

@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)

In reply to by सुबोध खरे

त्यांना नाही वाटत. पण मिपावरील बहुतांश लोकांना त्यांचे चुकते असेच वाटत आहे.

In reply to by अहिरावण

अहो, सकाळी उठल्यावर सर्वात आधी हाच धागा उघडला जातोय सध्या, तो वाचनमात्र करून कसे चालेल बरें ? कुणीतरी म्हटलेच आहे (म्हणे) - दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

In reply to by चित्रगुप्त

अगागागागा !! बाजार उठवला !! =)) =)) तसेही हे सगळ्याच गोष्टींची निंदा करत असतात आणि कुणीतरी म्हटले अहे निंदकाचे घर असावे शेजारी आमची मागणी मागे घेतो. चालू द्या लवकरच १००० प्रतिसाद होतीलच

वर्तमानपत्र, नुक्कड मिटींगा एव्ढचं काय मंदिरात कीर्तनात सुद्धा हेच चालू आहे. आजच दोन तरुण तुर्काचीं पत्रकार परिषद बघीतली. राम मंदिरात सुंठवडा कमी वाटला गेला असेल त्या पेक्षा जास्त खिरापत वाटली गेली. वर्तमानपत्र म. टा. मधे खरमरीत टिका,घणाघात, गुजरात मधे भाजप संपणार, काय वाटेल ते छापून येतयं. मला एक गोष्ट समजत नाही किती आत्मविश्वास टपकतोयं..... चित्रगुप्त यांनी एक हिन्दीत चारोळी टाकून राय (मत) विचारले. जो प्रथम विचार डोक्यात आला तसाच कायप्पावर पुढे ढकलला. सर्वांची क्षमा (भाषा हिन्दी आहे म्हणून) मागून खाली डकवतोय. गोड मानून घ्या..... जनता.... नेता पर ही भरोसा क्यों किया जाए???, जनता पर भी भरोसा करें... सरकार आएगी, तो सभी महिलाओं के खाते में एक लाख दिए जाएंगे मैं कहता हूं चुनाव के पहले ही डाल दो, आपकी सरकार नहीं आई, तो वापस कर दिए जाएंगे भरोसा भी कोई चीज है, हर बार जनता ही नेता पर भरोसा क्यों करें। आप सभी का क्या राय है??? नेताजी..... वादों का दौर है वादें ही किये जायेंगे जब देने का दौर आयेगा बहाने दिए जायेंगे जनता का भरोसा नेतापर *नेता का भरोसा जनता पर हिंग लगे ना फिटकरी....* यहाँ वादों के व्यंजन ही परोसे जायेंगे....... नेताजी आलवेज राॅक्स या भाऊ गर्दीत अबा एकटेच नाहीत. तेव्हां चार जुन पर्यंत चर्हाट वळणं चालू द्यात .

श्री अमरेंद्र बाहुबली, तुम्हाला तुम्ही काय चुकीचे करता ते आता चांगले समजेल. :) अशी मिळालेले संधी बाकीचे लोक का सोडतील ? कितीही म्हटले तरी तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात.

In reply to by Trump

सर संजय राऊत साहेबानी १०५ गुजरात वाद्याना घरी बसवुन महाराष्ट्र वाचवला अश्या महाराष्ट्र प्रेमी, कट्टर शिवसैनिक, निष्ठेचे दुसरे नाव संजय राऊत साहेबांची तुलना माझ्याशी?? इतका मोठा नाही हो मी सर _/\_

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काही हरकत नाही. तुम्ही 'मिपाचे संजय राऊत' अशी पदवी म्हणुन वापरायला लागा.

In reply to by Trump

नको सर हव तर मला मी फेल्युअर आहे. हवं तर मला मीपाचा फडणवीस म्हणा. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मीपाचा फडणवीस? कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटा ची तट्टाणी घरी बसलेले १०५ अजून अभंग आहेत त्यातला एक तरी फुटला का? आणि ५६ आणि ५४ जागा आलेले दोन्ही पक्ष दुभंगुन त्यांच्या नेत्यांना धरणी आपल्याला पोटात घेईल का अशी स्थिती करणाऱ्या श्री फडणवीस यांच्या नखाची तरी सर आहे का आपली ? "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" म्हणत ते आले सुद्धा आणि दोन्ही विरोधी पक्षाची शकले केली. साहेब काहीही करू शकतात असे म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडाला कुलूप लागलंय कारण

साहेब काहीही करू शकत नाही

हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालंय. बाकी तुमची इडी सीबी आय बद्दल ची बाष्कळ बडबड आता चालू होईल, त्याकडे मी साफ दुर्लक्ष करेनच. फक्त बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही पण फुटून झुरळ मात्र होतं एवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं.

In reply to by सुबोध खरे

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटा ची तट्टाणी. सहमत. कुठे ५५ आमदारांवर मुख्यमंत्री बनवणारे संजय राऊत नी कुठे १०५ आमदार घेऊन घरी बसणारे फडणवीस?? तुलना शक्यच नाही. घरी बसलेले १०५ अजून अभंग आहेत त्यातला एक तरी फुटला का? कुणाला हौस आहे इडी सीबीआय चौकश्या मागे लावून घायच्या?? भाजपमध्ये आलं की चौकश्या बंद होतात, फाइली क्लिअर होतात, भाजपमध्ये राहून “सुरक्षित” रीत्या भ्रष्टाचार करता येत असेल तर कुणी का फुटेल?? ५६ आणि ५४ जागा आलेले दोन्ही पक्ष दुभंगुन त्यांच्या नेत्यांना धरणी आपल्याला पोटात घेईल का अशी स्थिती करणाऱ्या श्री फडणवीस अशी गद्दारी हया आधी २ वेळा झालीय, ठाकरेंना ह्याचा अनुभव आहे त्यामुळे धरनी पोटात वगैरे अस काहीही झालेल नाही. उलट मुख्यमंत्री पदाऐवजी अमित शहानी उपमुख्यमंत्री केल्यामुळे श्री. फडणविसाना तस वाटलं असाव. यांच्या नखाची तरी सर आहे का आपली? आजीबात नाही. नी कुणाला हवी असेल असही आजीबात वाटत नाही. "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" म्हणत ते आले सुद्धा आणि दोन्ही विरोधी पक्षाची शकले केली. ते आले पण फौजदराचे हवालदार बनून. :) साहेब काहीही करू शकतात असे म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडाला कुलूप लागलंय करुच शकतात की, सिंचन नी इतर घोटाळ्याच्या फायलि क्लिअर केल्या. आता कुणी भाजपेयी बोंबलतो का सिंचन घोटाळ्याच्या नावाने?? नाही ना? राष्ट्रपतीला रात्री २ वाजता उठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली, १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला.. आणखी काय काय करावं साहेबानी?? :) कारण साहेब काहीही करू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालंय. अस असतं तर “शरद पवार माझे गुरु” अस म्हणण्याची वेळ मोदींवर्क का आली असती?? १०५ आमदार घेऊन घरी का बसाव लागलं असतं?? :) बाकी तुमची इडी सीबी आय बद्दल ची बाष्कळ बडबड आता चालू होईल, त्याकडे मी साफ दुर्लक्ष करेनच. माहितीय तुम्हाला ईडी नी सीबीआय चा गैरवापर करुन सत्ता मिळवलीय तरी का आरती ओवाळताय नको त्याची?? फक्त बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही पण फुटून झुरळ मात्र होतं एवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं. सहमत. पाय जमिनीवर असावे. :) उगाच कुणाला विश्वगुरू वगैरे म्हणू नये.

In reply to by कांदा लिंबू

फडणवीस म्हणा सर मला. मी फेल्युअर आहे.

“मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.“ असे डॉक्टरांनी लिहिले. “ह्यात मनमोहनसिंग, मोदी, नेहरू” ह्याना कुठे बसवायचे? असे मी त्याना विचारले. डॉक्टर पुन्हा धाग्यावर फिरकले नाही. मी काय चुकीचे केले?? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समोरच्याला फूट इन माउथ केल्याचा अपराध केला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

डॉक्टरांनीच लिहिले आहे ना ... ज्ञानी -- काहीच बोलत नाही.“.. म्हणूनच ते काही बोलायला आले नाहीत ... बाकी तुमचं चालुद्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आम्ही इथेच आहोत हो .. पूर्वी ते १८८ नंबरचे महान तज्ञ होते .. तुम्ही त्यांचे सांप्रत काळातले नवीन अवतार आहात का ते माहीत नाही ... पण तुमच्या अपार ज्ञानसागरातले शिंतोडे मिपा वर वारंवार उडत असतात हे मात्र खरे

In reply to by अमर विश्वास

कपिलमुनी एकदम सत्य बोलले. “जरा विरोधि सूर दिसला की भाजपच्या लोकांची जी जळते ते बघून मजा येते” मला मजा येतेय.

In reply to by अमर विश्वास

@अमर विश्वास कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

लोकांनी कसोटी क्रिकेट चांगले असते असे म्हटले. कुणीही विचारलेलं नसताना मी "कसोटी क्रिकेट भिकार आहे" असं म्हणालो. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

खादाडीच्या ग्रुप मध्ये बियर आवडणारे लोक कोणती बियर चांगली यावर चर्चा करत होते. मी बियर पीत नसलो तरी "बियर फालतू असते" अशी पिंक टाकली. मला ग्रुप मधून लाथ मिळाली. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

टेक्नॉलॉजी च्या ग्रुप मध्ये लोक चॅट gpt चा वापर यावर चर्चा करत होते. मला गूगल वापरता येत नसलं तरी मी "chat gpt चा काहीच उपयोग नाही" अशी पिंक टाकली. मला ग्रुप मधून लाथ मिळाली. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

In reply to by वेडा बेडूक

चॅट जिपीटी ग्राऊंड लेव्हल वर तितकं वापरलं जाणार नाही फक्त इतकच लिहिलं होतं सर.

यानंतर मी एका ग्रुप मेम्बरच्या युट्युब चॅनेल वर त्याच्या दिवंगत वडिलांविषयी असभ्य भाषेत अश्लाघ्य टिप्पणी केली, आणि मला सर्वच ग्रुप मधून लाथ मिळाली. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

In reply to by वेडा बेडूक

तुमचं काहीच चुकलं नाही, मिपा मालकांनि तुम्हाला मिपावर घेतलं हे त्यांचं चुकलं. - कुजके हाडूक

In reply to by वेडा बेडूक

त्य ग्रुप मेंबरने समुहात माझ्याबद्दल घाण घाण लिहिलं होतं ते विसरले असालच. आणी नंतर गेलेल्या वडिलाना मध्ये आणून सहानुभूती मिळवू लागला तर मी तरी काय करणार सर? कुणी काहीही घाण घाण लिहिल्यावर शांत बसायला काय मी संत आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वडिलांना कुणी मध्ये आणलं, आणि कुणाला लाथ बसली हे सर्वांना ठाऊक आहे. मांजरानं डोळे मिटले तरी जग बघत असतं!

काही लोक असे असतात की जे सगळ्यांकडून व सगळीकडून अपमानित होऊन देखील पुन्हा पुन्हा तसेच वर्तन करीत राहतात.

In reply to by कांदा लिंबू

काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत कारण खऱ्या आयडीने त्यानी बरच “नाव” कमावलेल असतं. टीप- सदर वाक्याचा आणी अहिरावण व कांदालिंबू हया आयडींचा काहीही संबंध नाही. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत कारण खऱ्या आयडीने त्यानी बरच “नाव” कमावलेल असतं.
सहमत. काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत... जसं की अमरेंद्र बाहुबली