मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना

टर्मीनेटर ·

अनेक शुभेच्छा ! ह्या अश्या प्रकारच्या लेखासाठीच मी मिपा वर येतो ... राजकीय कचऱ्याकुंड्यावर मिपावर बंदी आल्याने ... असे अनेक चांगल्या लेखक व लेखांना .. ऑक्सिजन मिळेल ...

गवि 17/08/2023 - 13:45
वाह वाह उस्ताद. इतक्या लगेच सुरुवात करून सूर देखील लागला. या घटनेबद्दल बोलावे तितके कमी आहे. मुळात इंधनाने भरलेली विमाने (पंखात इंधन असते हे बहुतांश लोकांना माहीत असेलच) ही किती टोकाची शक्तिशाली स्फोटक अस्त्रे ठरू शकतात हा विचार मुळात मनात येणे, यासाठी अभ्यास आणि तांत्रिक ज्ञान हवे. त्यानंतर विमान उड्डाण प्रशिक्षण घेणे. सर्व काही भलतेच मोठे प्लॅनिंग. मुळात यातील कोणालाही त्यातले कोणतेही विमान रीतसर लँड देखील करता आले नसते. मोठ्या टर्बोफॅन जेट विमानांचे रेटिंग देखील त्यांच्या लायसेन्स वर किंवा शिक्षणात नव्हते असे दिसते. विमान एखाद्या दिशेने नेऊन क्रॅश करणे इतके काम मात्र प्राथमिक फ्लाईंग ट्रेनिंगने शक्य होते. नेमके तेच त्यांनी केले, कारण कोणत्याही परिस्थितीत लँडिंग करण्याचा ऑप्शनच त्यांना आवश्यक वाटत नव्हता. यावरूनच त्यातील भयानक उद्देश लक्षात येतो. आणि यातील बहुतांश लोक व्यवस्थित शिक्षित होते. लुक्स देखील सामान्य नागरिकांसारखे होते. म्हणजे अनेक अर्थांनी स्टिरीओ टाइप मोडले या घटनेत. पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

In reply to by गवि

टर्मीनेटर 20/08/2023 - 16:22
आंद्रे वडापाव आणि गवि, प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
कारण कोणत्याही परिस्थितीत लँडिंग करण्याचा ऑप्शनच त्यांना आवश्यक वाटत नव्हता.
अगदी अगदी... आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मरायचंच आहे तेव्हा आपल्या बरोबर जास्तीत जास्त लोकांचा जिव घेणे आणि शक्य तेवढ्या मालमत्तेचे नुकसान करणे एवढेच त्यांचे लक्ष्य होते! ह्या प्रचंड विध्वंसासाठी भरपुर इंधन असलेल्या लांब पल्ल्याच्या विमानांची 'एरोप्लेन बाँब' म्हणुन केलेली निवड, मुख्य टार्गेट असलेल्या ट्वीन टॉवर्सचा अचुक वेध घेउ शकतील इतपत कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्तिंचीच त्या कामगीरीसाठी 'पायलट' म्हणुन विचारपुर्वक केलेली नेमणुक अशा एक ना अनेक गोष्टींमधुन ह्या हल्ल्याच्या नियोजनामागे असलेल्या असामान्य मेंदुची कल्पना येते. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचे कोणीच समर्थन करु शकत नाही, पण अल-कायदा आणि अमेरिकन सरकार अशा दोन्ही पक्षांच्या मते हे अमेरिकेविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. त्यामुळे ह्या घटनेकडे केवळ एक दहशतवादी हल्ला किंवा भावनीक दृष्टिकोनातून न पहाता थोड्या वेगळ्या अ‍ॅंगलने पाहिल्यास १९ आत्मघातकी दहशतवादी आणि काही लक्ष डॉलर्स खर्चुन शत्रुचीच चार विमाने वापरुन अल्पावधीत जवळपास ३००० लोकांचा घेतलेला बळी आणि काही ट्रिलीयन डॉलर्सचे केलेले नुकसान असे जिवित आणि वित्तहानीचे आकडे प्रचंड बोलके आहेत. अल-कायदा हि एक कंपनी आहे अशी कल्पना केल्यास तीचे प्लॅनिंग, एच. आर., ट्रेनिंग अशी वेगवेगळी डिपार्टमेंट्स व तीचा शिक्षित/उच्चशिक्षित अशा व्यावसायिक आत्मघातकी दहशतवाद्यांचा स्टाफ आणि त्यांच्यातला समन्वय अशा गोष्टी एकदम कॉर्पोरेट लेव्हलच्या वाटु लागतात.

अरे वा. प्रचेतस ह्यांच्या त्याच धाग्यावर मी रिपोर्ट बद्दल विचारले होते. इतका प्रदीर्घ रिपोर्ट वाचायची वाचयाची इच्छा नव्हती. पण चला लेखमाला येतेय हे ऐकून बरं वाटलं. लवकरात लवकर लिहा. वाट पाहतोय. रच्याकने मी सूध्दा आफ्टर मोहम्मद/ मोहम्मदांनतरचे खलिफे ह्यांच्यावर लेखमाला लिहायचा विचार करतोय. मोहम्मदांनंतर मोरोक्को ते भारत इस्लामी साम्राज्य आडवं कसं पसरलं, मोहम्मदांनतरचे चार रशीदून खलिफे, नी नंतरच्या ऊमय्याद नी अब्बासीद खिलाफत पासून ते शेवटच्या तूर्की खलिफा जो केमाल पाशा ने संपवला. (म्हणजे खलिफापद संपवलं) हे सर्व लिहीयचंय. ज्यात शिया- सून्नी वाद, अरब-तूर्की वाद, तसेच अरब ईराण वाद सर्व येईल पण वेळ मिळेना झालाय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 26/08/2023 - 18:16
नि३सोलपुरकर | अमरेंद्र बाहुबली प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ अमरेंद्र बाहुबली
रच्याकने मी सूध्दा आफ्टर मोहम्मद
जरूर लिहा, वाचायला नक्कीच आवडेल 👍

कंजूस 17/08/2023 - 14:57
तो विषय माझ्यापुरता संपला आहे. आत्मघातकी पथके काहीही करू शकतात. आणि धर्मग्रंथ पुढे करून पाठिंबा मिळवू शकतात. अफगाणिस्तानमध्ये काय चाललं आहे. इतर देश,एक सोडून सर्व पुस्तकं नष्ट करायची आहेत. स्त्री हवी आणि नकोही. त्यांच्याकडूनच त्यांना विरोध झाला नाही तर कठीण आहे. अतिरेक्यांच्या कारवायांच्या कुंड्या उपसून काय करमणूक? शेवट.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 17/08/2023 - 15:51
त्याला काही इलाज नाही! असतात व्यक्तिगणिक वेगवेगळ्या आवडी-निवडी 😀 कोणाची अत्यंत दारुण पराभवाच्या इतिहासाची 'कबर' आपलं बखर खणून त्यातले अवशेष चिवडण्यातून करमणूक होते तर आमच्यासारख्यांची अशा अतिरेक्यांच्या कारवायांच्या कचराकुंड्या उपसून करमणूक होते... हे असं चालायचंच, त्याला काही इलाज नाही 😂

स्वधर्म 17/08/2023 - 15:47
अवघड काम उचललंय तुंम्ही. पहिला भाग चांगलाच झालाय. लवकर लवकर येऊ द्या. शुभेच्छा.

नऊ सप्टेंबरला मला शेवटच्या फेरीत प्रवेश मिळाला. अकरा सप्टेंबरला कॉलेजमध्ये जाऊन प्रवेशाची पूर्तता केली. मेरिट सीटमध्ये घराशेजारच्या कॉलेजात प्रवेश मिळाल्याच्या आनंदात जगात काय चाललंय तिकडे लक्षच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरात भली मोठ्ठी बातमी होतीच. असलं काही त्याच्या आधी कधी वाचलेलं नव्हतं. अभूतपूर्व आणि अकल्पनीय अशी घटना. पण त्याच दिवशी कॉलेज सुरू झालं. पुढे दोन तीन आठवडे रोज गप्पांमध्ये हा विषय असायचाच. अकरा सप्टेंबरला २००१ ला हजारो जीवाचे बळी घेऊन सुरू झालेला या अध्यायाचा पहिला अंक २ मे २०११ ला आणि शेवटचा अंक १५ ऑगस्ट २०२१ ला संपला. 5 555 लेखमाला या शेवटच्या फोटोपर्यंत चालावी... अशा शुभेच्छा!!

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 26/08/2023 - 18:31
राजेंद्र मेहेंदळे | स्वधर्म | कर्नलतपस्वी | तुषार काळभोर प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ तुषार काळभोर अनुभव भारीच! पण लेखमालिका इतकी लांबवण्याच्या सुचनेबद्दल तीव्र णीषेध... टंकनाचा अतिशय कंटाळा असलेल्या माणसाला किती टंकन कष्ट द्यायचे ह्याला काही मर्यादा? 😀 😀 😀

शानबा५१२ 17/08/2023 - 21:54
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' त्या धर्तीवर 'लिहिल्याने होत आहे रे, आधी लिहिलेची पाहिजे'
अजुन काय मग.....करुन टाका, प्रेक्षक आहेत ईथे.

In reply to by रंगीला रतन

टर्मीनेटर 26/08/2023 - 22:33
शानबा५१२ | रंगीला रतन प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ रंगीला रतन
लैच लोकांच्या शेपटीवर पाय दिलाय :=)
आधी ह्या प्रतिसादाचा अर्थ समजला नव्हता, थोडा वेळ लागला समजायला 😀

लेखमाला जोरदार होणार यांच्यात वाद नाहीच. परंतु लेखन पूर्ण करायचे मनावर घ्याच! तुमचा लेख आणि त्या अनुषंगाने गविंची येणारी माहिती हा दुग्धशर्करा योग असणार आहे!!!!!

सौंदाळा 18/08/2023 - 10:35
मस्तच, परवाच म्हटल्या म्हटल्या आज पहिला भाग आला पण!! भारीच, पुभाप्र. ९/११ ची माझी आठवण त्याच दिवशी तुफान चालत असलेला दिल चाहता है चित्रपट 'मिळाला' होता. कॉलेजमधून असले चित्रपट, डिस्कव्हरीचे प्रसिध्द शोज, रोडरॅश सारखे गेम्स असे कोणाला तरी एकाला मिळाले की त्याचे हार्डडिस्क सगळीकडे फिरायची. अशीच हार्डडिस्क घेऊन घरी आलो होतो. संध्याकाळी ६.३०-७ ला लावली आणि डाटा ट्रान्स्फर चालू केले. ९ पर्यन्त सर्व आटपले. नेहमी यापासून अलिप्त असणारी माझी बहिण दिल चाहता है म्हटल्यावर बघायच्या एकदम तयारीत होती. ९.१५ ला चित्रपट चालू केला. साधारण १०.१५ ला वडील सेकण्ड शिफ्ट संपवून घरी आले. आल्या आल्या म्हणाले, "अरे पहिल्यांदा टीव्ही लावा हे काय बघत बसलाय, अमेरिकेवर अ‍ॅटॅक झाला आहे, तिसरे महायुद्ध व्हायची शक्यता आहे" मी ताबडतोब हॉलमधे पळालो आणि बातम्या बघत बसलो. बहीणीने मात्र चित्रपट सोडला नाही. खरच महायुद्ध झाले तर नंतर परत बघायला मिळेल का नाही असा विचार तिने केला असावा. मी मात्र उरलेला चित्रपट नंतर ४-५ दिवसांनी पाहीला. (तोपर्यंत खरच महायुद्ध सुरु होतेय की काय असे वाटत होते)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 26/08/2023 - 23:04
नचिकेत जवखेडकर | सौंदाळा प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ नचिकेत जवखेडकर
त्या अनुषंगाने गविंची येणारी माहिती हा दुग्धशर्करा योग असणार आहे!!!!!
अर्थातच... तांत्रिक गोष्टींबद्दल जर अधिकारी व्यक्ती कडुन माहिती आली तर तीचे लाल गालीच्या घालुन स्वागतच असेल! @ सौंदाळा
दिल चाहता है...
चा विषय काढुन तुम्ही दुखत्या नसेवर हात ठेवला आहे! भन्नाट आवडला होता तो चित्रपट त्यावेळी... इनफॅक्ट त्यावेळी माझ्या PC च्या हार्ड डिस्क वर पहिली जागा व्यापणारा पहिला चित्रपट हाच होता... अवांतरः त्याचा सीक्वेल म्हणवला जाणारा 'झिंदगी ना मिले दोबारा' हा चित्रपट देखील माझ्या प्रचंड आवडीचा....

गवि 18/08/2023 - 10:51
आता त्या दिवसाच्या आठवणी सगळे जण सांगत आहेत म्हटल्यावर लिहिणे आले. त्या काळी मी संगणक प्रशिक्षण वर्गांमध्ये शिकवत असे. संगणक प्रशिक्षण देण्याची जागा म्हणजे इंटरनेट आलेच प्रत्येकाच्या टर्मिनलवर. तर असेच जावा किंवा तत्सम काहीतरी (पडेल ते शिकवणे या बोलीवर चरितार्थ होता ) शिकवत असताना एक विद्यार्थी मधेच म्हणाला की वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान पडले. त्यातले अनेक विद्यार्थी थोडेफार शिकून अमेरिकेत जाण्यासाठी अर्ज भरणारे होते. त्याकाळी इंटरनेट हे न्यूज बघायला, विशेषत: लाईव्ह घटना बघायला फारसे वापरले जात नसे. कशासाठी वापरले जात असे ते तूर्त बाजूला ठेवू. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान पडले म्हणताच मला इतरांपेक्षा जास्तच धक्का बसला. कारण अमेरिकन काँटेक्स्टच माहीत नव्हता. विमान अपघात हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने कुलाब्याला जाऊन नेमकी परिस्थिती पहावी हा विचार मनात उसळून आला. पण लेक्चर पूर्ण करणे आवश्यक असल्याने कसेबसे ते विचार मागे सारून तास पूर्ण केला. घरी येताच टिव्ही लावून पाहिले तर या इमारती अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये आहेत असे कळले. अर्थात तिथे जाणे शक्य नाही हेही कळले. शिवाय तो घातपाताचा प्रकार आहे हेही कळले. घटना मात्र इतकी भीषण होती की पूर्ण विमानन क्षेत्रात त्यामुळे पूर्वी कधीही स्वप्नातही न आलेले बदल घडले. ते या लेखमालेत बहुधा येतीलच. त्यामुळे द्विरुक्ती नको तूर्त.

निमी 18/08/2023 - 15:06
फारच उत्तम लेख आणि या विषयावरील आपल्या लिखाणाला मनःपूर्वक शुभेच्छा..मानसशास्त्रीय प्रयोग आणि परिणाम याची चर्चा जास्त आवडली.

इथे आतापर्यंत प्रतिसाद देणार्‍या प्रत्येकासारखीच उत्कंठा मलाही आहे. लवकरच पुढचा भाग येऊ द्या. सं - दी - प

प्रचेतस 20/08/2023 - 12:55
दमदार सुरुवात. एकदम तगडी मालिका होणार आहे ह्या विषयावर. अर्थात अमेरिका, बॉम्बस्फोट, किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवाद हे विषय जरी आवडत नसले तरीही तुमचे लेखन अतिशय आवडत असल्याने एकूण एक भाग व्यवस्थित वाचणार आहे.

ही घटना घडली तेव्हा मी तिसरीत होतो. शाळेत आमच्या मॅडमने दुसर्या (की दोन चार दिवसा नंतर) दिवशी घडलेल्या घटने बद्दल सांगीतले होते ना “पुण्य नगरी“ पेपरात अतिरेक्याचा फोटो आलाय. मी शाळा सूटल्यावर पुण्य नगरी पेपर मिळवून त्या अतिरेक्याचा फोटो पाहीला. काळ्या टी शर्ट मध्ये बिना दाढी मिश्यांचा अतिरेकी होता त्यानेच विमान धडकवले होते. तो फोटो अजूनही लक्षात होता. मला वाटतं हा फोटो असावा तो. https://images.app.goo.gl/4M8L7gDiauvMas25A रच्याकने, एवढ्या मोठ्या घटनेवर हाॅलीवूडने आजतागायत सिनेमा किंवा वेब सिरीज का नसेल बनवली? लादेनला मारलं गेलं त्यावरही नाही.

आलो आलो 21/08/2023 - 18:23
वा: काय विषय निवडलाय ! उत्सुकता ताणली गेलीये कथा / दीर्घकथा / कादंबरी किंवा लेखमाला जे काही असेल ...... त्यातील न विसरण्याजोगे काही सुदैवी पात्र म्हणजे ब्रुनो डेलिंगर (Bruno Dellinger), गुझमॅन मॅकमिलन (Guzman-McMillan) आणि सुपरहिरो रिक रेसकोरला (Rick Rescorla) यांच्या विषयी वाचण्यास विशेष उत्सुक

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 31/08/2023 - 21:57
अबा आणि गवि शेठ १०-११ सप्टेंबर पर्यंत नेपाळ ट्रीपवर आहे, (त्यामुळे आधी कदाचित नेपाळ प्रवास वर्णनाचा नंबर लागायचा चान्स असल्याने 😀) परत येईपर्यंत गलेमाचे पडघम वाजतील त्यामुळे त्यानंतरच 9/11 सुरु केलेली बरी असे वाटते 🙏

In reply to by टर्मीनेटर

चामुंडराय 31/08/2023 - 22:22
म्हणजे 9/11 च्या पुढच्या लेखाची 11/9 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार तर !

In reply to by चामुंडराय

टर्मीनेटर 18/09/2023 - 20:27
@ चामुंडराय,
म्हणजे 9/11 च्या पुढच्या लेखाची 11/9 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार तर !
तारखेचा हा योगायोग विलक्षण आहे एक्दम. तो निदर्शनास आणुन दिल्याबद्दल आपले विशेष आभार! स्वगतः तरीच च्यामारी इमिग्रेशन वालयांनी (त्रिभुवन आणि मुंबई दोन्ही एअरपोर्ट्सवर) नेहमीपेक्षा जरा जास्तीच प्रश्न विचारले होते 😀

नठ्यारा 20/09/2023 - 20:02
७ वर्ल्ड ट्रेड सेंटर ही बिल्डिंग पडल्याचा वा पाडल्याचा उल्लेख थॉमस किंच्या अहवालात आहे का? नसेल तर हा अहवाल टाकाऊ आहे. विमानं धडकवून इमारती पडंत नसतात. - नाठाळ नठ्या

अनेक शुभेच्छा ! ह्या अश्या प्रकारच्या लेखासाठीच मी मिपा वर येतो ... राजकीय कचऱ्याकुंड्यावर मिपावर बंदी आल्याने ... असे अनेक चांगल्या लेखक व लेखांना .. ऑक्सिजन मिळेल ...

गवि 17/08/2023 - 13:45
वाह वाह उस्ताद. इतक्या लगेच सुरुवात करून सूर देखील लागला. या घटनेबद्दल बोलावे तितके कमी आहे. मुळात इंधनाने भरलेली विमाने (पंखात इंधन असते हे बहुतांश लोकांना माहीत असेलच) ही किती टोकाची शक्तिशाली स्फोटक अस्त्रे ठरू शकतात हा विचार मुळात मनात येणे, यासाठी अभ्यास आणि तांत्रिक ज्ञान हवे. त्यानंतर विमान उड्डाण प्रशिक्षण घेणे. सर्व काही भलतेच मोठे प्लॅनिंग. मुळात यातील कोणालाही त्यातले कोणतेही विमान रीतसर लँड देखील करता आले नसते. मोठ्या टर्बोफॅन जेट विमानांचे रेटिंग देखील त्यांच्या लायसेन्स वर किंवा शिक्षणात नव्हते असे दिसते. विमान एखाद्या दिशेने नेऊन क्रॅश करणे इतके काम मात्र प्राथमिक फ्लाईंग ट्रेनिंगने शक्य होते. नेमके तेच त्यांनी केले, कारण कोणत्याही परिस्थितीत लँडिंग करण्याचा ऑप्शनच त्यांना आवश्यक वाटत नव्हता. यावरूनच त्यातील भयानक उद्देश लक्षात येतो. आणि यातील बहुतांश लोक व्यवस्थित शिक्षित होते. लुक्स देखील सामान्य नागरिकांसारखे होते. म्हणजे अनेक अर्थांनी स्टिरीओ टाइप मोडले या घटनेत. पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

In reply to by गवि

टर्मीनेटर 20/08/2023 - 16:22
आंद्रे वडापाव आणि गवि, प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
कारण कोणत्याही परिस्थितीत लँडिंग करण्याचा ऑप्शनच त्यांना आवश्यक वाटत नव्हता.
अगदी अगदी... आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मरायचंच आहे तेव्हा आपल्या बरोबर जास्तीत जास्त लोकांचा जिव घेणे आणि शक्य तेवढ्या मालमत्तेचे नुकसान करणे एवढेच त्यांचे लक्ष्य होते! ह्या प्रचंड विध्वंसासाठी भरपुर इंधन असलेल्या लांब पल्ल्याच्या विमानांची 'एरोप्लेन बाँब' म्हणुन केलेली निवड, मुख्य टार्गेट असलेल्या ट्वीन टॉवर्सचा अचुक वेध घेउ शकतील इतपत कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्तिंचीच त्या कामगीरीसाठी 'पायलट' म्हणुन विचारपुर्वक केलेली नेमणुक अशा एक ना अनेक गोष्टींमधुन ह्या हल्ल्याच्या नियोजनामागे असलेल्या असामान्य मेंदुची कल्पना येते. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचे कोणीच समर्थन करु शकत नाही, पण अल-कायदा आणि अमेरिकन सरकार अशा दोन्ही पक्षांच्या मते हे अमेरिकेविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. त्यामुळे ह्या घटनेकडे केवळ एक दहशतवादी हल्ला किंवा भावनीक दृष्टिकोनातून न पहाता थोड्या वेगळ्या अ‍ॅंगलने पाहिल्यास १९ आत्मघातकी दहशतवादी आणि काही लक्ष डॉलर्स खर्चुन शत्रुचीच चार विमाने वापरुन अल्पावधीत जवळपास ३००० लोकांचा घेतलेला बळी आणि काही ट्रिलीयन डॉलर्सचे केलेले नुकसान असे जिवित आणि वित्तहानीचे आकडे प्रचंड बोलके आहेत. अल-कायदा हि एक कंपनी आहे अशी कल्पना केल्यास तीचे प्लॅनिंग, एच. आर., ट्रेनिंग अशी वेगवेगळी डिपार्टमेंट्स व तीचा शिक्षित/उच्चशिक्षित अशा व्यावसायिक आत्मघातकी दहशतवाद्यांचा स्टाफ आणि त्यांच्यातला समन्वय अशा गोष्टी एकदम कॉर्पोरेट लेव्हलच्या वाटु लागतात.

अरे वा. प्रचेतस ह्यांच्या त्याच धाग्यावर मी रिपोर्ट बद्दल विचारले होते. इतका प्रदीर्घ रिपोर्ट वाचायची वाचयाची इच्छा नव्हती. पण चला लेखमाला येतेय हे ऐकून बरं वाटलं. लवकरात लवकर लिहा. वाट पाहतोय. रच्याकने मी सूध्दा आफ्टर मोहम्मद/ मोहम्मदांनतरचे खलिफे ह्यांच्यावर लेखमाला लिहायचा विचार करतोय. मोहम्मदांनंतर मोरोक्को ते भारत इस्लामी साम्राज्य आडवं कसं पसरलं, मोहम्मदांनतरचे चार रशीदून खलिफे, नी नंतरच्या ऊमय्याद नी अब्बासीद खिलाफत पासून ते शेवटच्या तूर्की खलिफा जो केमाल पाशा ने संपवला. (म्हणजे खलिफापद संपवलं) हे सर्व लिहीयचंय. ज्यात शिया- सून्नी वाद, अरब-तूर्की वाद, तसेच अरब ईराण वाद सर्व येईल पण वेळ मिळेना झालाय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 26/08/2023 - 18:16
नि३सोलपुरकर | अमरेंद्र बाहुबली प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ अमरेंद्र बाहुबली
रच्याकने मी सूध्दा आफ्टर मोहम्मद
जरूर लिहा, वाचायला नक्कीच आवडेल 👍

कंजूस 17/08/2023 - 14:57
तो विषय माझ्यापुरता संपला आहे. आत्मघातकी पथके काहीही करू शकतात. आणि धर्मग्रंथ पुढे करून पाठिंबा मिळवू शकतात. अफगाणिस्तानमध्ये काय चाललं आहे. इतर देश,एक सोडून सर्व पुस्तकं नष्ट करायची आहेत. स्त्री हवी आणि नकोही. त्यांच्याकडूनच त्यांना विरोध झाला नाही तर कठीण आहे. अतिरेक्यांच्या कारवायांच्या कुंड्या उपसून काय करमणूक? शेवट.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 17/08/2023 - 15:51
त्याला काही इलाज नाही! असतात व्यक्तिगणिक वेगवेगळ्या आवडी-निवडी 😀 कोणाची अत्यंत दारुण पराभवाच्या इतिहासाची 'कबर' आपलं बखर खणून त्यातले अवशेष चिवडण्यातून करमणूक होते तर आमच्यासारख्यांची अशा अतिरेक्यांच्या कारवायांच्या कचराकुंड्या उपसून करमणूक होते... हे असं चालायचंच, त्याला काही इलाज नाही 😂

स्वधर्म 17/08/2023 - 15:47
अवघड काम उचललंय तुंम्ही. पहिला भाग चांगलाच झालाय. लवकर लवकर येऊ द्या. शुभेच्छा.

नऊ सप्टेंबरला मला शेवटच्या फेरीत प्रवेश मिळाला. अकरा सप्टेंबरला कॉलेजमध्ये जाऊन प्रवेशाची पूर्तता केली. मेरिट सीटमध्ये घराशेजारच्या कॉलेजात प्रवेश मिळाल्याच्या आनंदात जगात काय चाललंय तिकडे लक्षच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरात भली मोठ्ठी बातमी होतीच. असलं काही त्याच्या आधी कधी वाचलेलं नव्हतं. अभूतपूर्व आणि अकल्पनीय अशी घटना. पण त्याच दिवशी कॉलेज सुरू झालं. पुढे दोन तीन आठवडे रोज गप्पांमध्ये हा विषय असायचाच. अकरा सप्टेंबरला २००१ ला हजारो जीवाचे बळी घेऊन सुरू झालेला या अध्यायाचा पहिला अंक २ मे २०११ ला आणि शेवटचा अंक १५ ऑगस्ट २०२१ ला संपला. 5 555 लेखमाला या शेवटच्या फोटोपर्यंत चालावी... अशा शुभेच्छा!!

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 26/08/2023 - 18:31
राजेंद्र मेहेंदळे | स्वधर्म | कर्नलतपस्वी | तुषार काळभोर प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ तुषार काळभोर अनुभव भारीच! पण लेखमालिका इतकी लांबवण्याच्या सुचनेबद्दल तीव्र णीषेध... टंकनाचा अतिशय कंटाळा असलेल्या माणसाला किती टंकन कष्ट द्यायचे ह्याला काही मर्यादा? 😀 😀 😀

शानबा५१२ 17/08/2023 - 21:54
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' त्या धर्तीवर 'लिहिल्याने होत आहे रे, आधी लिहिलेची पाहिजे'
अजुन काय मग.....करुन टाका, प्रेक्षक आहेत ईथे.

In reply to by रंगीला रतन

टर्मीनेटर 26/08/2023 - 22:33
शानबा५१२ | रंगीला रतन प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ रंगीला रतन
लैच लोकांच्या शेपटीवर पाय दिलाय :=)
आधी ह्या प्रतिसादाचा अर्थ समजला नव्हता, थोडा वेळ लागला समजायला 😀

लेखमाला जोरदार होणार यांच्यात वाद नाहीच. परंतु लेखन पूर्ण करायचे मनावर घ्याच! तुमचा लेख आणि त्या अनुषंगाने गविंची येणारी माहिती हा दुग्धशर्करा योग असणार आहे!!!!!

सौंदाळा 18/08/2023 - 10:35
मस्तच, परवाच म्हटल्या म्हटल्या आज पहिला भाग आला पण!! भारीच, पुभाप्र. ९/११ ची माझी आठवण त्याच दिवशी तुफान चालत असलेला दिल चाहता है चित्रपट 'मिळाला' होता. कॉलेजमधून असले चित्रपट, डिस्कव्हरीचे प्रसिध्द शोज, रोडरॅश सारखे गेम्स असे कोणाला तरी एकाला मिळाले की त्याचे हार्डडिस्क सगळीकडे फिरायची. अशीच हार्डडिस्क घेऊन घरी आलो होतो. संध्याकाळी ६.३०-७ ला लावली आणि डाटा ट्रान्स्फर चालू केले. ९ पर्यन्त सर्व आटपले. नेहमी यापासून अलिप्त असणारी माझी बहिण दिल चाहता है म्हटल्यावर बघायच्या एकदम तयारीत होती. ९.१५ ला चित्रपट चालू केला. साधारण १०.१५ ला वडील सेकण्ड शिफ्ट संपवून घरी आले. आल्या आल्या म्हणाले, "अरे पहिल्यांदा टीव्ही लावा हे काय बघत बसलाय, अमेरिकेवर अ‍ॅटॅक झाला आहे, तिसरे महायुद्ध व्हायची शक्यता आहे" मी ताबडतोब हॉलमधे पळालो आणि बातम्या बघत बसलो. बहीणीने मात्र चित्रपट सोडला नाही. खरच महायुद्ध झाले तर नंतर परत बघायला मिळेल का नाही असा विचार तिने केला असावा. मी मात्र उरलेला चित्रपट नंतर ४-५ दिवसांनी पाहीला. (तोपर्यंत खरच महायुद्ध सुरु होतेय की काय असे वाटत होते)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 26/08/2023 - 23:04
नचिकेत जवखेडकर | सौंदाळा प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ नचिकेत जवखेडकर
त्या अनुषंगाने गविंची येणारी माहिती हा दुग्धशर्करा योग असणार आहे!!!!!
अर्थातच... तांत्रिक गोष्टींबद्दल जर अधिकारी व्यक्ती कडुन माहिती आली तर तीचे लाल गालीच्या घालुन स्वागतच असेल! @ सौंदाळा
दिल चाहता है...
चा विषय काढुन तुम्ही दुखत्या नसेवर हात ठेवला आहे! भन्नाट आवडला होता तो चित्रपट त्यावेळी... इनफॅक्ट त्यावेळी माझ्या PC च्या हार्ड डिस्क वर पहिली जागा व्यापणारा पहिला चित्रपट हाच होता... अवांतरः त्याचा सीक्वेल म्हणवला जाणारा 'झिंदगी ना मिले दोबारा' हा चित्रपट देखील माझ्या प्रचंड आवडीचा....

गवि 18/08/2023 - 10:51
आता त्या दिवसाच्या आठवणी सगळे जण सांगत आहेत म्हटल्यावर लिहिणे आले. त्या काळी मी संगणक प्रशिक्षण वर्गांमध्ये शिकवत असे. संगणक प्रशिक्षण देण्याची जागा म्हणजे इंटरनेट आलेच प्रत्येकाच्या टर्मिनलवर. तर असेच जावा किंवा तत्सम काहीतरी (पडेल ते शिकवणे या बोलीवर चरितार्थ होता ) शिकवत असताना एक विद्यार्थी मधेच म्हणाला की वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान पडले. त्यातले अनेक विद्यार्थी थोडेफार शिकून अमेरिकेत जाण्यासाठी अर्ज भरणारे होते. त्याकाळी इंटरनेट हे न्यूज बघायला, विशेषत: लाईव्ह घटना बघायला फारसे वापरले जात नसे. कशासाठी वापरले जात असे ते तूर्त बाजूला ठेवू. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान पडले म्हणताच मला इतरांपेक्षा जास्तच धक्का बसला. कारण अमेरिकन काँटेक्स्टच माहीत नव्हता. विमान अपघात हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने कुलाब्याला जाऊन नेमकी परिस्थिती पहावी हा विचार मनात उसळून आला. पण लेक्चर पूर्ण करणे आवश्यक असल्याने कसेबसे ते विचार मागे सारून तास पूर्ण केला. घरी येताच टिव्ही लावून पाहिले तर या इमारती अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये आहेत असे कळले. अर्थात तिथे जाणे शक्य नाही हेही कळले. शिवाय तो घातपाताचा प्रकार आहे हेही कळले. घटना मात्र इतकी भीषण होती की पूर्ण विमानन क्षेत्रात त्यामुळे पूर्वी कधीही स्वप्नातही न आलेले बदल घडले. ते या लेखमालेत बहुधा येतीलच. त्यामुळे द्विरुक्ती नको तूर्त.

निमी 18/08/2023 - 15:06
फारच उत्तम लेख आणि या विषयावरील आपल्या लिखाणाला मनःपूर्वक शुभेच्छा..मानसशास्त्रीय प्रयोग आणि परिणाम याची चर्चा जास्त आवडली.

इथे आतापर्यंत प्रतिसाद देणार्‍या प्रत्येकासारखीच उत्कंठा मलाही आहे. लवकरच पुढचा भाग येऊ द्या. सं - दी - प

प्रचेतस 20/08/2023 - 12:55
दमदार सुरुवात. एकदम तगडी मालिका होणार आहे ह्या विषयावर. अर्थात अमेरिका, बॉम्बस्फोट, किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवाद हे विषय जरी आवडत नसले तरीही तुमचे लेखन अतिशय आवडत असल्याने एकूण एक भाग व्यवस्थित वाचणार आहे.

ही घटना घडली तेव्हा मी तिसरीत होतो. शाळेत आमच्या मॅडमने दुसर्या (की दोन चार दिवसा नंतर) दिवशी घडलेल्या घटने बद्दल सांगीतले होते ना “पुण्य नगरी“ पेपरात अतिरेक्याचा फोटो आलाय. मी शाळा सूटल्यावर पुण्य नगरी पेपर मिळवून त्या अतिरेक्याचा फोटो पाहीला. काळ्या टी शर्ट मध्ये बिना दाढी मिश्यांचा अतिरेकी होता त्यानेच विमान धडकवले होते. तो फोटो अजूनही लक्षात होता. मला वाटतं हा फोटो असावा तो. https://images.app.goo.gl/4M8L7gDiauvMas25A रच्याकने, एवढ्या मोठ्या घटनेवर हाॅलीवूडने आजतागायत सिनेमा किंवा वेब सिरीज का नसेल बनवली? लादेनला मारलं गेलं त्यावरही नाही.

आलो आलो 21/08/2023 - 18:23
वा: काय विषय निवडलाय ! उत्सुकता ताणली गेलीये कथा / दीर्घकथा / कादंबरी किंवा लेखमाला जे काही असेल ...... त्यातील न विसरण्याजोगे काही सुदैवी पात्र म्हणजे ब्रुनो डेलिंगर (Bruno Dellinger), गुझमॅन मॅकमिलन (Guzman-McMillan) आणि सुपरहिरो रिक रेसकोरला (Rick Rescorla) यांच्या विषयी वाचण्यास विशेष उत्सुक

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 31/08/2023 - 21:57
अबा आणि गवि शेठ १०-११ सप्टेंबर पर्यंत नेपाळ ट्रीपवर आहे, (त्यामुळे आधी कदाचित नेपाळ प्रवास वर्णनाचा नंबर लागायचा चान्स असल्याने 😀) परत येईपर्यंत गलेमाचे पडघम वाजतील त्यामुळे त्यानंतरच 9/11 सुरु केलेली बरी असे वाटते 🙏

In reply to by टर्मीनेटर

चामुंडराय 31/08/2023 - 22:22
म्हणजे 9/11 च्या पुढच्या लेखाची 11/9 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार तर !

In reply to by चामुंडराय

टर्मीनेटर 18/09/2023 - 20:27
@ चामुंडराय,
म्हणजे 9/11 च्या पुढच्या लेखाची 11/9 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार तर !
तारखेचा हा योगायोग विलक्षण आहे एक्दम. तो निदर्शनास आणुन दिल्याबद्दल आपले विशेष आभार! स्वगतः तरीच च्यामारी इमिग्रेशन वालयांनी (त्रिभुवन आणि मुंबई दोन्ही एअरपोर्ट्सवर) नेहमीपेक्षा जरा जास्तीच प्रश्न विचारले होते 😀

नठ्यारा 20/09/2023 - 20:02
७ वर्ल्ड ट्रेड सेंटर ही बिल्डिंग पडल्याचा वा पाडल्याचा उल्लेख थॉमस किंच्या अहवालात आहे का? नसेल तर हा अहवाल टाकाऊ आहे. विमानं धडकवून इमारती पडंत नसतात. - नाठाळ नठ्या

मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.

रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो. आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.

काय आहे 'अज्ञात पानिपत'

कंजूस ·

टर्मीनेटर 16/08/2023 - 14:56
छान! पुस्तक परिचय आवडला 👍
सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.
हे विशेष भावले! इतिहास वस्तुनिष्ठ पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे, त्यात भावनांना स्थान नसावे. धन्यवाद.

चित्रगुप्त 16/08/2023 - 14:58
पुस्तक परिचय आवडला. मला हा ग्रंथ येत्या आक्टोबरात वाचायला मिळणार आहे. उत्सुकता आहे. आजच्या तरूण पिढीचे मिपाकर मनोज दाणी हे आपले सगळे व्याप सांभाळून एवढे प्रचंड काम हाती घेऊन ते चिकाटीने पूर्णत्वास नेऊ शकतात याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज यावरून आठवले की बरेच वर्षांपूर्वी महेश्वरच्या किल्ल्यात गेलेलो असताना तिथले व्यवस्थापक म्हणाले होते की अहिल्याबाईंच्या घराचा वरचा मजला संपूर्णपणे जुन्या कागदपत्रांनी भरलेला असून ते अगदी जीर्ण झालेले आहेत. (त्यांनी ते नर्मदार्पण केले जाण्याची शक्यताही सांगितली होती.. ते ऐकून मला धक्काच बसला होता, आणि त्याकाळी मिपावर याबद्दल एक लेखही लिहीला होता) मल्हारराव पानिपत युद्धावर गेलेले असल्यामुळे महेश्वरच्या दफ्तरात त्याविषयीचे कागद असण्याची खूप शक्यता आहे. अजूनही कुणी तिथे जाऊन विचारपूस करू शकते. तसेच मल्हारराव माळव्याचे सुभेदार बनण्यापूर्वी इंदूरचे राज्यकर्ते असलेला 'मंडलोई' परिवार अजूनही जुन्या इंदुरातील 'बडा रावळा' नामक महालात रहात आहे. त्यापैकी 'निरंजन जमीनदार' हे इतिहास-संशोधक होते त्यांनी काही पुस्तकेही लिहीलेली आहेत. त्यापैकी 'आणि क्षिप्रा वहात राहिली' या पुस्तकात होळकर-शिंदे यांच्यातील वैमनस्याबद्दल ऐतिहासिक माहिती दिलेली असून ते मी फार पूर्वी वाचले होते. त्यांच्या चित्रकार सुनेचा फोन नंबर मजजवळ आहे. त्यांचेकडेही चवकशी केली पाहिजे. आक्टोबरात इंदूरला गेल्यावर प्रयत्न करेन.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 16/08/2023 - 15:41
माहितीबद्दल धन्यवाद. तो माहेश्वरचा वाडा पाहिला. फारच सुंदर आहे. नेमके मंगळवारी गेलो त्यामुळे पैठणी विणणारे हातमाग पाहता आले परंतू विणकरांना काम करताना पाहता आले नव्हते,सुट्टी असते मंगळवारी. कागदपत्रे नक्कीच असणार पण ते पाहून इतिहास लिहिला तर ते हस्तलिखित कुणी छापणारा भेटण्याची शक्यता कमीच. मराठी वाचक कादंबरीकडेच जातात. असलं काही नफा न मिळणारंही छापणारे एकच होते - वरदा प्रकाशनचे ह.अ.भावे.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 16/08/2023 - 21:10
महेश्वर किल्ल्यातली कागदपत्रे मोडीत असल्याने नुसते वरवर बघून काय आहे ते ओळखणेही त्यांना शक्य नाहीये. या बाबतीत माझे इंदूरातील एक मित्र भालू मोंढे यांना फोन केला होता, कारण ते होळकरांचे सध्याचे वंशज शिवाजीराव (रिचर्ड) होळकर यांचे मित्र आहेत. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आता ते सगळे ८० च्या घरात आहेत. पुण्याहून मुद्दाम कोणी मोडीचा जाणकार तिथे गेला तरच काही होऊ शकते. कुणी तयार असेल तर मोंढेमार्फत होळकरांशी संपर्क करू शकतो. -- अर्थात मी हे जे लिहीले आहे ते काही वर्षांपूर्वीचे आहे. आजच्या तारखेला काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही. मुळात हजारो कागदपत्रातून नेमके पानिपतासंबंधी हुडकणे हेही मोठेच काम असेल. कालानुक्रमाने ते व्यवस्थित ठेवलेले आहेत किंवा कसे, काहीच माहिती नाही.

आनादी काळा पासुन युद्ध शास्त्र (military science) एक विषेश अभ्यासाचा विषय आहे. हाथीयार व दारुगोळा, दळणवळण, संचार साधने, रसद,मानव संसाधन, सेकंड लाईन,थर्ड लाईन सपोर्ट सिस्टीम,वैद्यकीय मदत या व या सारख्या बाबी मुख्य लढाई वरोबरच महत्वाच्या असतात. जेव्हां वरील सर्व बाबी अतिशय मर्यादित स्वरूपात असताना जवळपास पंधराशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर जाऊन शत्रूवर चढाई करणे हे अद्भुत च होते. या बरोबरच शत्रू,मित्र,भौगोलिक परिस्थिती अडचणी मधे अधिक भर टाकतात व नेतृत्वाच्या कसोटीची परिसीमा होती. या सर्वांवर प्रकाश टाकणारा पत्रव्यवहार माझ्या सारख्या हार्डकोर मिलीटरी मॅनेजरला नेहमीच आकृष्ट करतो. पुस्तक संग्रहात समाविष्ट केले आहे. विश्वास पाटलांच्या पानिपत प्रमाणे एका बैठकीत संपवता येणार नाही.

उत्तम पुस्तक परीचय. उत्सुकता वाढली आहे. तूनळीवर शोधल्यावर वर ह्या लिंक्स मिळाल्या. प्रकाशन सोहळा https://www.youtube.com/watch?v=DVkY7Xq0y8M श्री. मनोज दाणी यांचे एक भाषण https://www.youtube.com/watch?v=f_MswWcW_Pk

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 16/08/2023 - 21:28
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परवाच पुस्तकातील एका मुद्याचा परिचय करुन देणारा छोटा video इथे टाकला आहे. https://youtu.be/I50bXXhgkck

प्रचेतस 17/08/2023 - 09:36
उत्तम परिचय. मुळात ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ लिहिणे मोठे कठीण काम. मनो यांनी हे परिश्रमपूर्वक हे सिद्धीस नेले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

मनो 19/08/2023 - 00:50
पुस्तकातील मनोगतात म्हणल्याप्रमाणे इतिहासाचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी नियमाने रोज करू लागाल, त्यावेळी तुम्ही स्वतःदेखील त्या वातावरणात न्हाऊन निघता, असा माझा अनुभव आहे. दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर यांच्यासारख्या इतिहासप्रसिद्ध पराक्रमी वीरांच्या संगतीत गेली काही वर्षे दररोज मला राहायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील एक मोठा आनंद आहे आणि या कारणामुळेच हे मोठे अवघड काम माझ्या हातून पार पडले. मला स्वतःला जी गोष्ट आवडेल ती वाचकांना पसंत पडेल की नाही याची खात्री मला नव्हती. परवा प्रकाशकांकडून अर्धी आवृत्ती दोन महिन्यांत संपल्याचे कळाले, त्यावरून बऱ्याच इतिहासप्रेमींना पुस्तक आवडलेले दिसते आहे असे मला वाटते. कंजूसकाका आणि इतर सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.

टर्मीनेटर 16/08/2023 - 14:56
छान! पुस्तक परिचय आवडला 👍
सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.
हे विशेष भावले! इतिहास वस्तुनिष्ठ पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे, त्यात भावनांना स्थान नसावे. धन्यवाद.

चित्रगुप्त 16/08/2023 - 14:58
पुस्तक परिचय आवडला. मला हा ग्रंथ येत्या आक्टोबरात वाचायला मिळणार आहे. उत्सुकता आहे. आजच्या तरूण पिढीचे मिपाकर मनोज दाणी हे आपले सगळे व्याप सांभाळून एवढे प्रचंड काम हाती घेऊन ते चिकाटीने पूर्णत्वास नेऊ शकतात याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज यावरून आठवले की बरेच वर्षांपूर्वी महेश्वरच्या किल्ल्यात गेलेलो असताना तिथले व्यवस्थापक म्हणाले होते की अहिल्याबाईंच्या घराचा वरचा मजला संपूर्णपणे जुन्या कागदपत्रांनी भरलेला असून ते अगदी जीर्ण झालेले आहेत. (त्यांनी ते नर्मदार्पण केले जाण्याची शक्यताही सांगितली होती.. ते ऐकून मला धक्काच बसला होता, आणि त्याकाळी मिपावर याबद्दल एक लेखही लिहीला होता) मल्हारराव पानिपत युद्धावर गेलेले असल्यामुळे महेश्वरच्या दफ्तरात त्याविषयीचे कागद असण्याची खूप शक्यता आहे. अजूनही कुणी तिथे जाऊन विचारपूस करू शकते. तसेच मल्हारराव माळव्याचे सुभेदार बनण्यापूर्वी इंदूरचे राज्यकर्ते असलेला 'मंडलोई' परिवार अजूनही जुन्या इंदुरातील 'बडा रावळा' नामक महालात रहात आहे. त्यापैकी 'निरंजन जमीनदार' हे इतिहास-संशोधक होते त्यांनी काही पुस्तकेही लिहीलेली आहेत. त्यापैकी 'आणि क्षिप्रा वहात राहिली' या पुस्तकात होळकर-शिंदे यांच्यातील वैमनस्याबद्दल ऐतिहासिक माहिती दिलेली असून ते मी फार पूर्वी वाचले होते. त्यांच्या चित्रकार सुनेचा फोन नंबर मजजवळ आहे. त्यांचेकडेही चवकशी केली पाहिजे. आक्टोबरात इंदूरला गेल्यावर प्रयत्न करेन.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 16/08/2023 - 15:41
माहितीबद्दल धन्यवाद. तो माहेश्वरचा वाडा पाहिला. फारच सुंदर आहे. नेमके मंगळवारी गेलो त्यामुळे पैठणी विणणारे हातमाग पाहता आले परंतू विणकरांना काम करताना पाहता आले नव्हते,सुट्टी असते मंगळवारी. कागदपत्रे नक्कीच असणार पण ते पाहून इतिहास लिहिला तर ते हस्तलिखित कुणी छापणारा भेटण्याची शक्यता कमीच. मराठी वाचक कादंबरीकडेच जातात. असलं काही नफा न मिळणारंही छापणारे एकच होते - वरदा प्रकाशनचे ह.अ.भावे.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 16/08/2023 - 21:10
महेश्वर किल्ल्यातली कागदपत्रे मोडीत असल्याने नुसते वरवर बघून काय आहे ते ओळखणेही त्यांना शक्य नाहीये. या बाबतीत माझे इंदूरातील एक मित्र भालू मोंढे यांना फोन केला होता, कारण ते होळकरांचे सध्याचे वंशज शिवाजीराव (रिचर्ड) होळकर यांचे मित्र आहेत. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आता ते सगळे ८० च्या घरात आहेत. पुण्याहून मुद्दाम कोणी मोडीचा जाणकार तिथे गेला तरच काही होऊ शकते. कुणी तयार असेल तर मोंढेमार्फत होळकरांशी संपर्क करू शकतो. -- अर्थात मी हे जे लिहीले आहे ते काही वर्षांपूर्वीचे आहे. आजच्या तारखेला काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही. मुळात हजारो कागदपत्रातून नेमके पानिपतासंबंधी हुडकणे हेही मोठेच काम असेल. कालानुक्रमाने ते व्यवस्थित ठेवलेले आहेत किंवा कसे, काहीच माहिती नाही.

आनादी काळा पासुन युद्ध शास्त्र (military science) एक विषेश अभ्यासाचा विषय आहे. हाथीयार व दारुगोळा, दळणवळण, संचार साधने, रसद,मानव संसाधन, सेकंड लाईन,थर्ड लाईन सपोर्ट सिस्टीम,वैद्यकीय मदत या व या सारख्या बाबी मुख्य लढाई वरोबरच महत्वाच्या असतात. जेव्हां वरील सर्व बाबी अतिशय मर्यादित स्वरूपात असताना जवळपास पंधराशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर जाऊन शत्रूवर चढाई करणे हे अद्भुत च होते. या बरोबरच शत्रू,मित्र,भौगोलिक परिस्थिती अडचणी मधे अधिक भर टाकतात व नेतृत्वाच्या कसोटीची परिसीमा होती. या सर्वांवर प्रकाश टाकणारा पत्रव्यवहार माझ्या सारख्या हार्डकोर मिलीटरी मॅनेजरला नेहमीच आकृष्ट करतो. पुस्तक संग्रहात समाविष्ट केले आहे. विश्वास पाटलांच्या पानिपत प्रमाणे एका बैठकीत संपवता येणार नाही.

उत्तम पुस्तक परीचय. उत्सुकता वाढली आहे. तूनळीवर शोधल्यावर वर ह्या लिंक्स मिळाल्या. प्रकाशन सोहळा https://www.youtube.com/watch?v=DVkY7Xq0y8M श्री. मनोज दाणी यांचे एक भाषण https://www.youtube.com/watch?v=f_MswWcW_Pk

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 16/08/2023 - 21:28
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परवाच पुस्तकातील एका मुद्याचा परिचय करुन देणारा छोटा video इथे टाकला आहे. https://youtu.be/I50bXXhgkck

प्रचेतस 17/08/2023 - 09:36
उत्तम परिचय. मुळात ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ लिहिणे मोठे कठीण काम. मनो यांनी हे परिश्रमपूर्वक हे सिद्धीस नेले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

मनो 19/08/2023 - 00:50
पुस्तकातील मनोगतात म्हणल्याप्रमाणे इतिहासाचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी नियमाने रोज करू लागाल, त्यावेळी तुम्ही स्वतःदेखील त्या वातावरणात न्हाऊन निघता, असा माझा अनुभव आहे. दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर यांच्यासारख्या इतिहासप्रसिद्ध पराक्रमी वीरांच्या संगतीत गेली काही वर्षे दररोज मला राहायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील एक मोठा आनंद आहे आणि या कारणामुळेच हे मोठे अवघड काम माझ्या हातून पार पडले. मला स्वतःला जी गोष्ट आवडेल ती वाचकांना पसंत पडेल की नाही याची खात्री मला नव्हती. परवा प्रकाशकांकडून अर्धी आवृत्ती दोन महिन्यांत संपल्याचे कळाले, त्यावरून बऱ्याच इतिहासप्रेमींना पुस्तक आवडलेले दिसते आहे असे मला वाटते. कंजूसकाका आणि इतर सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.
काय आहे 'अज्ञात पानिपत' गाभा :- अज्ञात पानिपत पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन. 'अज्ञात पानिपत' ( मराठी: इतिहास -संशोधन ) लेखक - मनोज दाणी पाने ८३०. (किंमत १३००रु, ) प्रकाशन Merven Technologies.,११ जून २०२३ . पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था इथून. उपलब्ध : सह्याद्री बुक्स ISBN 978-81956210-4-0 सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.

वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.

विवेकपटाईत ·

सुरिया 11/08/2023 - 18:27
दाखवायचा असतो पॉर्नच. आंबटशौकीनांची डीमांड असतेच मग पोस्टर लावायचे डाकू हसीना चे, प्रेक्शक अर्धा एक तास कसल्याही बी सी ग्रेडला सहन करतात अपेक्षित गरमाईसाठी. तसला हा प्रकार आहे लेखाचा. आणि तो आवर्जून प्रत्येक लेखात केला जातो. संस्थळावर एकतर्फी प्रचारातून उडणारी राळ टाळावी म्हणून प्रशासकांनी राजकारण टाळलेच मग काय करायचे. कुठूनतरी कसातरी संबध जोडायचा आणि आणि लावायची रीळ. अवघडे खरेच.

चौथा कोनाडा 11/08/2023 - 20:24
आता समर्थ म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार ! आणि तुम्ही पटाईत म्हणजे विवेक ठेऊनच लेख लिहिला असणार ! राजकारण भलता अवघड प्रकार असतो .. चकणाऱ्या चाली खेळाव्या लागतात .. लॉन्ग टर्म विजयासाठी शॉर्ट टर्म तडजोडी कराव्या लागतात ! स्वगत : कुणी तरी पोर्ण चा उल्लेख केलाय .. आता धाग्यावर लक्ष ठेऊन राहावे लागणार :-)

सुरिया 11/08/2023 - 18:27
दाखवायचा असतो पॉर्नच. आंबटशौकीनांची डीमांड असतेच मग पोस्टर लावायचे डाकू हसीना चे, प्रेक्शक अर्धा एक तास कसल्याही बी सी ग्रेडला सहन करतात अपेक्षित गरमाईसाठी. तसला हा प्रकार आहे लेखाचा. आणि तो आवर्जून प्रत्येक लेखात केला जातो. संस्थळावर एकतर्फी प्रचारातून उडणारी राळ टाळावी म्हणून प्रशासकांनी राजकारण टाळलेच मग काय करायचे. कुठूनतरी कसातरी संबध जोडायचा आणि आणि लावायची रीळ. अवघडे खरेच.

चौथा कोनाडा 11/08/2023 - 20:24
आता समर्थ म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार ! आणि तुम्ही पटाईत म्हणजे विवेक ठेऊनच लेख लिहिला असणार ! राजकारण भलता अवघड प्रकार असतो .. चकणाऱ्या चाली खेळाव्या लागतात .. लॉन्ग टर्म विजयासाठी शॉर्ट टर्म तडजोडी कराव्या लागतात ! स्वगत : कुणी तरी पोर्ण चा उल्लेख केलाय .. आता धाग्यावर लक्ष ठेऊन राहावे लागणार :-)
दुर्जन प्राणी समजावे. परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस आळवावे. महत्त्व देऊनी. समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे.

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

पराग१२२६३ ·

तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा 31/07/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ 01/08/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस 01/08/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar 01/08/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j

तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा 31/07/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ 01/08/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस 01/08/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar 01/08/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j
उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.

।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

टर्मीनेटर ·

हेमंतकुमार 24/07/2023 - 17:20
उत्तम स्वादिष्ट उत्तरार्ध !
"हॅलो रानी, बेटा, हिंग को हिंग हि केहते हैं इंग्लिश में"
हे झकास !

सौंदाळा 24/07/2023 - 17:47
माहितीने भरगच्च असलेला हा भाग पण आवडला. वाक्यावाक्याला लेख लिहिण्यासाठी घेतलेले परीश्रम जाणवले. अंतिम भागाची वाट बघत आहे.

वामन देशमुख 24/07/2023 - 19:22
टर्मीनेटर भौ, खूप परिश्रम घेऊन लिहिताय हे वाक्यावाक्यांमधून दिसतेच आहे. हिंग पुराण इतकं विस्तृत आहे असं वाटलं नव्हतं. विषयाची विभागणी आवडली. पुभाप्र.

प्रचेतस 24/07/2023 - 19:41
हा भागही आवडला.
इस्लामपूर्व सुमारे हजारेक वर्षे आधीपासून अरबांचे आशिया, आफ्रिका आणि युरोपात प्रचंड मोठे आणि मजबूत व्यापारी नेटवर्क होते.
ह्याबद्दल अशी समजूत होती की हे व्यापारी संघ शुद्ध अरबांचे नसून ज्यू लोकांचे असत व अरबस्तानातील मूळ अरबी लोक फक्त भटके टोळीवाळे होते. अर्थात नंतर अब्बासिद खिलाफतीत अरबांची व्यापारीदृष्ट्या प्रचंड भरभराट झाली. इस्लामपूर्व अरबांच्या इतिहासाबद्दल एखादा लेख अवश्य येऊ द्यात. 'हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग' आवडले. आपल्याकडील काही स्मृतींमध्येदेखील लसणासारखाच हिंगाचा अन्नपदार्थातला वापरही निशिब्द मानला आहे तो बहुधा त्याच्या उग्र वासामुळेच. अर्थात ११ व्या शतकातील कल्याण चालुक्य सोमेश्वर तिसरा ह्याने रचलेल्या मानसोल्लासात हिंगापासून केलेल्या काही चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पाककृतींचा उल्लेख आला आहे.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 26/07/2023 - 11:55
कुमार१ । सौंदाळा । कर्नलतपस्वी । वामन देशमुख । प्रचेतस प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ प्रचेतस
"हे व्यापारी संघ शुद्ध अरबांचे नसून ज्यू लोकांचे असत"
जगभरात जवळपास सर्वच ठिकाणी 'ज्यू' लोकांचा जो पराकोटीचा द्वेष केला गेला / जातो त्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण त्यांची "आयत्या बिळावर नागोबा", किंवा "मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर" अशी वृत्तीही आहे. अरबांचे व्यापारी नेटवर्क ज्यूंचे होते हा समजही त्यांच्याच धादांत खोट्या प्रचारातुन निर्माण झाला असावा. अवांतर: कर्मठपणाच्या बाबतीत अन्य कुठल्याही धर्माला लाजवतील असे त्यांचे विचार होते. युरोप-आशियातील ज्या ज्या देशांत त्यांची लोकसंख्या वाढली आणि त्यांची अर्थशक्ती वाढली व सत्तेत अधिकारपदे मिळाली तिथल्या नागरिकांच्या सामाजिक समस्यांमध्ये वाढ झाली ज्याच्या परिणामी ज्यू द्वेष आणि त्यांच्या हत्याकांडाचे प्रकार घडले. जगभरातील ख्रिश्चन आणि इस्लामी देशांमध्ये त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या आणि भारतात मात्र त्यांना सौहार्दपूर्ण वागणूक मिळाल्याच्या कहाण्या आपण वाचल्या आहेत. जे बहुतांशी खरेही आहे कारण भारतात त्यांची संख्या कधीच त्रासदायक ठरण्याएवढी वाढली नाही पण पोर्तुगीजव्याप गोव्यात 'गोवा इन्क्विजीशन' अंतर्गत ज्युंनाही अत्याचाराचा सामना करावा लागला होता. ह्या लेखात उल्लेख केलेले 'गार्सिया डी ओर्टा' (Garcia de Orta) हे देखील त्याचे उदाहरण आहेत. अर्थात त्यांच्या हयातीत त्यांना ह्या अत्याचारांची झळ बसली नव्हती पण वरकरणी पोर्तुगीज ख्रिश्चन पण छुप्या पद्धतीने 'ज्यू' धर्माचे पालन करणाऱ्या त्यांच्या बहिणीला ह्या गुन्ह्यासाठी जिवंत जाळण्यात आले होते आणि तिच्या साक्षीतून 'गार्सिया डी ओर्टा' देखील छुपे ज्यू होते असे समजल्यावर प्रतीकात्मक शिक्षा म्हणून त्यांच्या थडग्यातून अवशेष बाहेर काढून ते जाळण्यात आले होते. असो, ज्यू द्वेषा मागची अनेक करणे असली तरी ती सलगरित्या कुठे वाचायला मिळत नाहीत पण तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात त्यांचे भरपूर संदर्भ मिळतील.
"अरबस्तानातील मूळ अरबी लोक फक्त भटके टोळीवाळे होते. अर्थात नंतर अब्बासिद खिलाफतीत अरबांची व्यापारीदृष्ट्या प्रचंड भरभराट झाली."
हो, हे भटके टोळीवाले नौकानयनात पारंगत झाल्यावर त्यांच्यासाठी सागरतळातून मोती काढणे आणि आजूबाजूच्या प्रदेशात जाऊन व्यापार करणे अशा नव्या व्यवसायसंधी उपलब्ध झाल्या ज्यात उत्तरोत्तर त्यांनी प्रगती केली. अब्बासिद खिलाफतीत त्यांची सांस्कृतीक आणि व्यापारीदृष्ट्या भरभराट झाली, पण त्याला आफ्रिकेतून अरबांच्या किरकोळ प्रमाणात चालणाऱ्या गुलामांच्या व्यापाराला धर्ममान्यता मिळाल्याने त्यात झालेली प्रचंड वाढ अशी थोडी काळी बाजूही आहे.
आपल्याकडील काही स्मृतींमध्येदेखील लसणासारखाच हिंगाचा अन्नपदार्थातला वापरही निशिब्द मानला आहे तो बहुधा त्याच्या उग्र वासामुळेच.
हे सगळं फार गमतीशीर आहे. काश्मिरी पंडित मांस आणि मासे खातात पण त्यांना कांदा -लसूण मात्र वर्ज्य आहे. बंगाली ब्राह्मणांना मासे खाण्याची अनुमती आहे. कांदा-लसूण वर्ज्य असलेले जैन लोक हिंगाचा वापर करतात पण मला एक प्रश्न पडतो कि कुठलीहि जमिनीखाली उगवणारी वनस्पती, वनस्पतीचा भाग जर त्यांना वर्ज्य आहे तर मग वनस्पतीच्या मुळातून स्रवणारा हिंग त्यांना कसा काय चालत असावा? असो, मानसोल्लासात असलेली हिंगाच्या वापराबद्दलची माहिती माझ्यासाठी नवीन आहे, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 26/07/2023 - 12:41
हो, हे ज्यू लोक खूप लोभी असत आणि श्रीमंतही त्यामुळे त्यांच्याविषयी तिरस्कार होताच, शिवाय येशूला सूळावर चढवण्यात ज्यूंचाच सहभाग होता म्हणूनही त्यांच्याविषयी अधिक द्वेष उत्पन्न झाला असावा असेही वाटते. बाकी गोव्यात इतरानांचा काय पण खुद्द एका फ्रेंच क्रिस्तियन डॉक्टरला देखील इन्क्विझिशनने पराकोटीचा त्रास दिला होता याचा विस्तृत वृत्तांत प्रियोळकरांनी त्यांच्या पुस्तकात कथित केला आहे.
वनस्पतीच्या मुळातून स्रवणारा हिंग त्यांना कसा काय चालत असावा?
अहो, खुद्द मलाही हिंग वनस्पतीजन्य आहे हे तुमच्या लेखावरुनच समजले नाहीतर मी देखील हिंग म्हणजे सैंधवासारखाच नैसर्गिक स्फटिक (खडा हिंग पाहून) असेच समजत होतो, तर त्यांना ते कुठून माहित असणार :), पण गंमतीचा भाग सोडा पण कदाचित रुचिवर्धक असल्याने त्यांना हिंग चालत असावा :)

In reply to by प्रचेतस

गवि 26/07/2023 - 15:14
अहो, खुद्द मलाही हिंग वनस्पतीजन्य आहे हे तुमच्या लेखावरुनच समजले
सेम हियर. म्हणजे सैंधव टाईप नैसर्गिक स्फटिक असेल असे देखील कधी मनात आले नाही. किंबहुना तसा विचारच केला नाही. कापूर या पदार्था विषयी अशीच समजूत आहे. किंवा काहीच समजूत नाही म्हणा. स्पंज, मेण, सरस*, लाख# हे देखील त्यात ऍड करा. * हा पदार्थ शाळेत हस्तव्यवसाय विषयात शिकवला जात असे. त्याचा वास अत्यंत घाण असे. खळ हादेखील अन्य चिकट पदार्थ. पण तोही घाण वासाचाच. # हा पदार्थ काही पार्सलांवर एका शिक्क्यासहित दिसत असे. वरील दोन्ही गोष्टींवरून आपण किती जुने आणि कालबाह्य झालो हे जाणवते .

In reply to by गवि

टर्मीनेटर 26/07/2023 - 15:28
😀 स्पंजाचे माहिती नाही ते बघावे लागेल, पण कापुर आणि लाख वनस्पतीजन्य आहेत, मेण मधमाश्यांच्या पोळ्यातुन मिळते आणि सरस जनावरांच्या हाडांपासुन बनते त्यामुळे त्याला फारच घाणेरडा वास येतो एवढंच माहिती आहे!

In reply to by टर्मीनेटर

सरसचा एक उपयोग आमच्याकडे नव्वदीच्या दशकात खूप केला जायचा. क्रिकेट खेळताना बॅटचा हँडल तुटला तर सरस वितळवून त्याने तो हॅंडल चिकटवायचा आणि नंतर दोर्‍याने (शक्य असल्यास मांजा) घट्ट गुंडाळायचा. बाकी बॅट तुटायची, पण हा सरसने चिकटवलेला हँडल परत कधी तुटत नसे :) पण सरसचा असा स्रोत असेल असं कधी वाटलं नव्हतं. मला ते खनिज वाटायचं!

In reply to by तुषार काळभोर

मांजा नव्हे, चांभाराचा दोरा असेल ... कारण दोऱ्याला पहिले सरस लावून, नंतर लगेचच पुढच्या २-३ सेकंदात, त्यावर बारीक वस्त्रगाळ कुटलेल्या काचेची पुड लावल्यावर, "मांजा" तयार होतो. असा मांजा मग काटाकाटी (पतंगाच्या)मध्ये वापरतात . , काही स्कुटरवाल्यांचा जीव गेलाय गळा कापल्या गेल्याने या मांजामुळे ...

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 26/07/2023 - 17:03
बाकी बॅट तुटायची, पण हा सरसने चिकटवलेला हँडल परत कधी तुटत नसे :)
😂 😂 😂 बॅटचे तुटलेले हँडल चिकटवायला आम्ही माझ्या आजोबांकडे असलेले 'अ‍ॅरालडाईट' (Araldite) वापरयचो! सातवी-आठवीत असताना सर्वात भारी मांजा बनवण्याचा प्रयोग करताना आम्ही मीत्र मंडळींनी हार्डवेअरच्या दुकानातुन 'सरसच्या' पट्ट्या आणुन घराजवळच्या मैदानात जाळ पेटवुन वितळवल्या होत्या तेव्हा त्याचा इतका भयंकर वास सुटला होता कि मैदानाच्या आजुबाजुने जाणारे-येणारे लोकं नाकाला रुमाल लाउन जात-येत होते 😀 हा 'दिव्य' मांजा बनवण्यासाठी त्या वितळलेल्या सरसमध्ये मिसळण्यासाठी सोड्याच्या बाटल्या कुटुन त्याची पावडर बनवायला घरातल्या मिक्सरचा वापर केला होता. त्यातुन तयार झालेल्या मांजाने इतरांच्या पतंग तर गुल व्हायच्याच, पण आमची बोटेही कापयची. अर्थात ती काचेची पावडर बनवण्याच्या खटाटोपात मिक्सरच्या भांड्यच्या ब्लेड्सची पार दुरावस्था झाल्यामुळे आईचा अभुतपुर्व असा मारही खाल्ला होता 😂

कंजूस 24/07/2023 - 20:22
हभप हिंगभप पुराण आवडत आहे. विशेष लेख असूनही दिवाळी अंकासाठी दाबून न ठेवता लगेच आषाढ श्रावणातच आणल्याबद्दल धन्यवाद. पावसाळ्यात हिंग लावून ताक पिणे हितकर. कल्याण चालुक्याची गोष्टही प्रचेतसनी सांगितली.

Bhakti 24/07/2023 - 21:16
मस्त मस्त मस्त! तीनही भाग प्रिंट काढून निवांत परत वाचणार आहे.प्रबंध छापला तर रेफरेन्समध्ये सैंधव मीठ आणि माझं नाव द्या बरं का :)

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/07/2023 - 12:12
कंजूस । मुक्त विहारि । भक्ती प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ कंजूस, कंकाका तुमची ३ भाग होतील ही भविष्यवाणी खरी ठरली हो 😀 एकाचे फारतर दोन होतील असा माझा प्राथमीक अंदाज होता, पण तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ३ भाग झालेच! @ भक्ती
प्रबंध छापला तर रेफरेन्समध्ये सैंधव मीठ आणि माझं नाव द्या बरं का :)
हो, तुमचे आणि प्रचेतस असे दोघांचे नाव देइन हो 😂

हा लेखही प्रचंड आवडला. तुमच्या आवडत्या विषयांची यादी नावडत्या विषयांपेक्षा कमी असावी कदाचित. हिंगासारख्या विषयावरही वाचन्/अभ्यास करून लगेच ते अशा पद्धतीने लिहून काढणे की ते लेखन अनेकांच्या पसंतीस उतरेल ही नक्कीच खायची गोष्ट नव्हे! तुमच्या लेखणीस असेच उत्तरोत्तर बळ मिळो ही सदिच्छा! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 26/07/2023 - 12:28
विवेकपटाईत । आंद्रे वडापाव । शलभ । चांदणे संदीप प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चांदणे संदीप
"हिंगासारख्या विषयावरही वाचन्/अभ्यास करून लगेच ते अशा पद्धतीने लिहून काढणे"
छे हो, एवढा कुठला उरक आला माझ्याकडे! वास्तविक २०१९ मध्ये "हिंगाची, आयात - प्रक्रिया - निर्यात" अशा व्यवसायात उतरु पाहणाऱ्या एका स्टार्टअप साठी बिझनेस मॉड्यूल्स तयार करण्याच्या कामात सहभागी झालो असताना हिंगा विषयी भरपूर तांत्रिक आणि अवांतर माहिती जमा झाली होती, पण त्यावर लेख लिहीन असे कधी वाटले नव्हते 😀 काही दिवसांपूर्वी भक्तींचा सैंधव मिठावरचा धागा वाचताना 'हिंगाची' आठवण आली म्हणून त्यांना पुढच्या लेखासाठी हा विषय सुचवला होता पण त्यांनी (आणि प्रचेतस बुवांनी) तो चेंडू पुन्हा माझ्याच कोर्टात टोलवण्यातून हे हिंग पुराण जन्माला आले 😂 त्यावेळी गोळा झालेल्या माहितीचे लेखात रुपांतर करताना अनेक संदर्भ ताजे करण्यासाठी जालावर थोडी उचक-पाचक करण्याची आणि मुख्य म्हणजे हे सगळं मराठीत टंकायची मेहनत घ्यावी लागली एवढेच!

In reply to by टर्मीनेटर

अथांग आकाश 26/07/2023 - 15:20
काही दिवसांपूर्वी भक्तींचा सैंधव मिठावरचा धागा वाचताना 'हिंगाची' आठवण आली म्हणून त्यांना पुढच्या लेखासाठी हा विषय सुचवला होता पण त्यांनी (आणि प्रचेतस बुवांनी) तो चेंडू पुन्हा माझ्याच कोर्टात टोलवण्यातून हे हिंग पुराण जन्माला आले
हे बेस्ट झाले! त्यांच्यामुळे डिट्टेलवार माहिती वाचायला मिळाली!! त्या दोघांचे पण आभार!!!

सुरिया 26/07/2023 - 12:25
ऑनिय्यन मेरा, लस्स्सून मेरा. आसाफोटीडा का ड्ब्बा दे दे मेरा .

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/07/2023 - 16:38
हे हे चालीत मनातल्या मनात गायलं:)
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर मी पण हा प्रयोग करुन बघीतला 😀 "बादाम बादाम दादा काचा बादाम आमार काछे नाइखो बुबू भाजा बादाम" च्या चालीवर 😂 तुम्ही कोणत्या चालीत गायलंत? बाय द वे सुरिया, हे कुठल्या गाण्यातले बोल आहेत की तुम्ही स्वतः प्रसवलेल्या कव्यपंक्ती? स्वरचीत असेल तर क्रिएटीव्हीटी भारी आहे 👍

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/07/2023 - 17:38
असं आहे होय... तुम्ही दिलेली लिंक वरचा शॉर्ट पहाताना हा ऑफिशीअल व्हिडिओ सजेशन मध्ये आला, हे गाणं माहिती नव्हतं. म्हणजे सुरिया ह्यांनी 'ये फेकि तुझको पिनकोड मास्टर व्हिसा कार्ड' च्या जागी 'आसाफोटीडा का ड्ब्बा दे दे मेरा' असा कल्पक बदल केला आहे काय 😀 छान!

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 26/07/2023 - 17:55
हो, पहिल्या दोन ओळी common आहेत ऑनिय्यन मेरा, लस्स्सून मेरा... तिसरी ओळ आपल्या मनाने देऊ शकता पण तिसरी ओळ परीतोक्ष का पिनकोड मुझसे ना छुपा ही जास्त व्हायरल आहे :)

Nitin Palkar 26/07/2023 - 20:00
टर्मीनेटरजी तुमचे सर्वच लेख आवडीने वाचतो त्याचं कारण म्हणजे तुमची लेखनशैली. दोन्ही लेख खूपच छान उतरलेत. माझी आई करत असलेला घरगुती हिंगाचा एक औषधी उपयोग, पोटदुखी थांबण्यासाठी चिमूटभर हिंग बेंबीला चोळावा. खूप प्रभावी उपाय आहे, कोणताही अपाय नक्की नाही. पापड करताना 'हिरा हिंग' नावाचा हिंग खास आणला जाई (हे ब्रॅंड नेम असावे). तो अधिक तीव्र (स्ट्रॉंग) वासाचा असे. पुभप्र .

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 28/07/2023 - 21:30
कंकाका 'लाल सोना' असे बिरुद मिरवणारा केशर जम्मू आणि काश्मीरमध्ये भरपूर बघितला आणि प्रत्येकवेळी तिथून आणलाही होता, पण त्याचे शेत मात्र तिथे कधी बघायला मिळाले नाही, ते बघितले भूतानमध्ये 😀 अर्थात काही वर्षांपूर्वी भूतानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु झालेलया व्यावसायिक केशर लागवडीतून होणारे उत्पादन अगदी नगण्य असले आणि तो केशर हा फार काही चांगल्या दर्जाचा म्हणून ओळखला जात नसला तरी निदान शेतात त्याची फुले बघायला मिळाली होती. आणखीन एक गम्मत म्हणजे 'काला सोना' असे बिरुद मिळवणारे 'चरस' आणि 'अफू' हे पदार्थ हिमाचल प्रदेशात, उत्तराखंड आणि पंजाब मध्ये व्यवस्थित निरखून-हाताळून बघायला मिळाले होते (त्यावर लेख लिहिणार नाही, काळजी नसावी 😂) पण चरस हे बाय-प्रोडक्ट मिळणारी भांग / गांजाची अधिकृत शेती पण भुतान मध्येच पाहायला मिळाली होती. आमचा ड्रायव्हरही फार हौशी होता,त्याने दोन्हीच्या फांद्या तोडून आणून त्यांच्यातला फरक समजावला आणि Cannabis sativa ह्या एकाच वनस्पतीच्या नर आणि मादी झाडांपासून हे वेगवेगळे पदार्थ मिळत असल्याचे 'मौलिक' ज्ञानही दिले होते. अफूच्या बाबतीत एक गमतीशीर किस्साही घडला होता. वीस-बावीस वर्षांपूर्वी मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री कुटुंबासहित सिमला-कुलू-मनाली-वैष्णो देवी अशा सहलीवर आमच्यासोबत आल्या होत्या. (अर्थात सेलिब्रेटी असल्या तरी व्यवस्थित पैसे भरून, झिम्मा-फुगड्या खेळण्यासाठी 'भाऊजींना' किंवा अन्य सेलिब्रेटींना सहलींवर नेण्यासारखे प्रकार तेव्हा कोणी संयोजक करत नसत 😀) कुलूला पोचल्यावर त्यांना असे काही जुलाब सुरु झाले कि ते थांबायचे नावच घेईनात. दुसऱ्या दिवशी मणिकरणला जायचा कार्यक्रम होता आणि तो त्यांना अजिबात चुकवायचा नव्हता, डॉक्टर हॉटेलवर येऊन औषध-पाणी देऊन गेले पण ह्यांच्या वाऱ्या काही थांबेनात. संध्याकाळी उशिरा आम्ही मित्र आणि आमच्या बसेसचे ड्रायव्हर्स शेकोटी पेटवून बसलो असताना हा विषय निघाला तेव्हा एक ड्रायव्हर म्हणाला "हमारी देसी दवाई दे क्या मॅडम को, ऐसे बंद होगा जैसे पेहले कभी हुवा हि नही था", आम्हि म्हंटलं विचारून बघतो त्यांना, गावठी उपाय चालेल का ते! त्यांचा होकार मिळाल्यावर त्याने साधारण मोहरीच्या दाण्यापेक्षा थोडी मोठी अफूची गोळी करून दिली आणि पाण्याबरोबर घ्यायला सांगितली. दुसऱ्या दिवशी मॅडम एकदम ठणठणीत! त्यांच्या इच्छेप्रमाणे मणिकरण वगैरे व्यवस्थित बघता आल्याने स्वारी एकदम खुश होती, पुढच्या दोन दिवसांत त्यांनी कितीवेळा 'त्या' औषधासाठी ड्रायव्हर मंडळी आणि आमचे आभार मानले असतील ह्यची गणती नाही. तिसऱ्या दिवशी मात्र सकाळी एक छोटीशी तक्रार घेऊन आल्या "अरे काय औषध होतं ते, गेल्या दोन दिवसांपासून मला अजिबात टॉयलेटला झाली नाही." 'ते' काय औषध होतं, हे आम्हाला माहिती असलं तरी त्यांना सांगितलं नव्हतं पण आता ते सांगायची वेळ आली होती. मग ड्रायव्हर महाशयांकडून मिळालेले "काळजी करू नका तीन दिवस बंद म्हणजे एकदम बंद राहील पण मग सगळं व्यवस्थित होईल" हे ज्ञान त्यांना दिले. त्यावर हसून "मग हरकत नाही, पण गुण मात्र चांगला आला" असे बोलून पुन्हा आमचे आभार मानते झाल्या होत्या 😀

In reply to by टर्मीनेटर

१९७० च्या दशकात लहान मुलांना, जर झोपत नसतील किंवा सारखी रडत असतील तर मोहरीच्या दाण्याएवढी अफू देऊन झोपवणं किमान ग्रामीण भागात कॉमन होतं. हे एक: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत लहान मुलांना अशी औषधे देणे सामान्य होते : 345

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 29/07/2023 - 13:23
१९७० च्या दशकात लहान मुलांना, जर झोपत नसतील किंवा सारखी रडत असतील तर मोहरीच्या दाण्याएवढी अफू देऊन झोपवणं किमान ग्रामीण भागात कॉमन होतं.
हो! त्यातुन अनेक बालकांचे अपरिमित नुकसान झाल्याच्या कहाण्या जुन्या-जाणत्यांकडुन ऐकल्या आहेत. तसेच ब्रिटिशांच्या काळात अफु सेवनसाठी परवाना दिली गेलेली अनेक शंभरीच्या वयात पोचलेली 'जुनी खोडे' अजुनही भारतात आहेत 😀

रंगीला रतन 27/07/2023 - 11:11
साष्टांग दंडवत दादुस!! दोन्ही भाग वाचले. पुराण एक नंबर लिवलंय. अरबांचा हा इतिहासही रोचक आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी... यावर लिहाच. आतापरेंत अरब म्हणजे मुसलमान असच वाटत होतं :=)

गवि 27/07/2023 - 13:56
कापूर, स्पंज , लाख , मेण हे आहेतच विषय . पण हल्ली बरेचदा ऐकू येणारा उमामी हा स्वाद म्हणा किंवा जी काही एक नवीन एक्सट्रा सहावी की पाचवी निराळी चव म्हणतात त्याबद्दल काही तपशील कळला तर रोचक होईल. धन्यवाद. बहुधा अजिनोमोटो हा पदार्थ या उमामी स्वादाशी संबंधित असतो. चुभुद्याघ्या ..

In reply to by गवि

'मसाला लॅब' हे क्रिश अशोक यांचे पुस्तक सुचवतो. या पुस्तकाने मजवर बरेच उपकार केले आहेत. क्रिश अशोक यांचे वैज्ञानिक नुस्खे ( उर्फ विज्ञाननायकीण सुगरणीचे सल्ले ) छापाचे जे सल्ले आहेत ते वापरून माझ्या अन्नाचा दर्जा सुधारला. विशेषतः मटणाला ब्रायनिंग करणे, रश्याच्या फोडणीत दारू ओतणे अशा साध्या पण क्रिटिकल नुस्ख्यांनी माझ्या रश्याला चार चांद लागतात. हे त्यांचे लेक्चर ऐका. सायन्स ऑफ इंडियन कुकिंग त्याच्यात शेवटी उमामी म्हणजे काय हे ते सांगतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

टर्मीनेटर 28/07/2023 - 16:54
सायन्स ऑफ इंडियन कुकिंग हा व्हिडिओ थोडा पाहिला, मस्त वाटला 👍 मुख्य म्हणजे दांडगा अभ्यास असला तरी सर्वज्ञानी असल्यासारखा आव न आणता बोलायची त्यांची पद्धत डिसेंट वाटली. व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा आहे, जवळपास दोन तासांचा, मगाशी 'कोरियामध्ये वाढ्लेल्या नाकाच्या प्लास्टीक सर्जरीज आणि इंस्टाग्राम चे कनेक्शन' पर्यंत पाहिला बाकीचा उद्या-परवा सवडीने नक्की बघतो. धन्यवाद!

उमामी ही चव प्रोटीनच्या विशिष्ठ स्वादामुळे येते .. अजिनोमोटो कृत्रिमपणे उमामी चा भास निर्माण करते .. नॉन व्हेज खाणाऱ्यांना उमामीची कमी शक्यतो भासत नाही .. बाकी व्हेज वाले शीतसाके मश्रुम वैगरे कडून उमामीचा अनुभव घेऊ शकतात ..

चित्रगुप्त 27/07/2023 - 15:15
जबरदस्त अभ्यासपूर्ण, ज्ञानवर्धक, मनोरंजक लेख खूप आवडला. हिंगापासूनचे होमियोपाथिक औषध आणि आयुर्वेदिक हिग्वाष्टक चूर्ण वापरलेले आहे. फ्रेंच सुगंधी द्रव्यात हिंगही वापरतात हे प्रथमच समजले.

In reply to by कंजूस

रंगीला रतन 27/07/2023 - 21:12
आता ह्या काय नवीन? मधीच लिंबुडा कुठून आला :=) पण आपलं आवडत गाणं आहे. डान्सबार मधे बारबाला लई भारी नाचायच्या या गाण्यावर. गेले ते दिवस :=( https://youtu.be/YLsIl0G0qlM

rahul ghate 28/07/2023 - 17:04
टर्मीनेटर भाऊ हिंग पुराण चे २ हि भाग फारच माहिती पूर्ण आहेत . कृपया ३ रा भाग टाका वाचायला उत्सुक आहे

टर्मीनेटर 28/07/2023 - 18:14
सुरिया । अथांग आकाश । Nitin Palkar । रंगीला रतन । चित्रगुप्त । गोरगावलेकर । rahul ghate प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
केशर, शिलाजीत, मीठ, मिरची, मिरे, कापूर, स्पंज , लाख , मेण, उमामी
वाह... लेखासाठी विषय भारीच सुचवले आहेत एक एक! ह्यापैकी 'उमामी' विषयी फार काही माहिती नसली तरी बाकी सर्व पदार्थ हाताळले आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आहे. आणखीन थोडी माहिती मिळवून, हिंग पुराणामुळे प्रतीक्षा यादीत पडून असलेला (आता वराती मागून घोडे म्हणता येईल असा 😀) 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' वरचा लेख झाला कि येत्या 'गलेमा' मध्ये एकाच किंवा दोन लेखात ह्या सगळ्यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करतो 🙏

हेमंतकुमार 24/07/2023 - 17:20
उत्तम स्वादिष्ट उत्तरार्ध !
"हॅलो रानी, बेटा, हिंग को हिंग हि केहते हैं इंग्लिश में"
हे झकास !

सौंदाळा 24/07/2023 - 17:47
माहितीने भरगच्च असलेला हा भाग पण आवडला. वाक्यावाक्याला लेख लिहिण्यासाठी घेतलेले परीश्रम जाणवले. अंतिम भागाची वाट बघत आहे.

वामन देशमुख 24/07/2023 - 19:22
टर्मीनेटर भौ, खूप परिश्रम घेऊन लिहिताय हे वाक्यावाक्यांमधून दिसतेच आहे. हिंग पुराण इतकं विस्तृत आहे असं वाटलं नव्हतं. विषयाची विभागणी आवडली. पुभाप्र.

प्रचेतस 24/07/2023 - 19:41
हा भागही आवडला.
इस्लामपूर्व सुमारे हजारेक वर्षे आधीपासून अरबांचे आशिया, आफ्रिका आणि युरोपात प्रचंड मोठे आणि मजबूत व्यापारी नेटवर्क होते.
ह्याबद्दल अशी समजूत होती की हे व्यापारी संघ शुद्ध अरबांचे नसून ज्यू लोकांचे असत व अरबस्तानातील मूळ अरबी लोक फक्त भटके टोळीवाळे होते. अर्थात नंतर अब्बासिद खिलाफतीत अरबांची व्यापारीदृष्ट्या प्रचंड भरभराट झाली. इस्लामपूर्व अरबांच्या इतिहासाबद्दल एखादा लेख अवश्य येऊ द्यात. 'हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग' आवडले. आपल्याकडील काही स्मृतींमध्येदेखील लसणासारखाच हिंगाचा अन्नपदार्थातला वापरही निशिब्द मानला आहे तो बहुधा त्याच्या उग्र वासामुळेच. अर्थात ११ व्या शतकातील कल्याण चालुक्य सोमेश्वर तिसरा ह्याने रचलेल्या मानसोल्लासात हिंगापासून केलेल्या काही चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पाककृतींचा उल्लेख आला आहे.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 26/07/2023 - 11:55
कुमार१ । सौंदाळा । कर्नलतपस्वी । वामन देशमुख । प्रचेतस प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ प्रचेतस
"हे व्यापारी संघ शुद्ध अरबांचे नसून ज्यू लोकांचे असत"
जगभरात जवळपास सर्वच ठिकाणी 'ज्यू' लोकांचा जो पराकोटीचा द्वेष केला गेला / जातो त्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण त्यांची "आयत्या बिळावर नागोबा", किंवा "मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर" अशी वृत्तीही आहे. अरबांचे व्यापारी नेटवर्क ज्यूंचे होते हा समजही त्यांच्याच धादांत खोट्या प्रचारातुन निर्माण झाला असावा. अवांतर: कर्मठपणाच्या बाबतीत अन्य कुठल्याही धर्माला लाजवतील असे त्यांचे विचार होते. युरोप-आशियातील ज्या ज्या देशांत त्यांची लोकसंख्या वाढली आणि त्यांची अर्थशक्ती वाढली व सत्तेत अधिकारपदे मिळाली तिथल्या नागरिकांच्या सामाजिक समस्यांमध्ये वाढ झाली ज्याच्या परिणामी ज्यू द्वेष आणि त्यांच्या हत्याकांडाचे प्रकार घडले. जगभरातील ख्रिश्चन आणि इस्लामी देशांमध्ये त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या आणि भारतात मात्र त्यांना सौहार्दपूर्ण वागणूक मिळाल्याच्या कहाण्या आपण वाचल्या आहेत. जे बहुतांशी खरेही आहे कारण भारतात त्यांची संख्या कधीच त्रासदायक ठरण्याएवढी वाढली नाही पण पोर्तुगीजव्याप गोव्यात 'गोवा इन्क्विजीशन' अंतर्गत ज्युंनाही अत्याचाराचा सामना करावा लागला होता. ह्या लेखात उल्लेख केलेले 'गार्सिया डी ओर्टा' (Garcia de Orta) हे देखील त्याचे उदाहरण आहेत. अर्थात त्यांच्या हयातीत त्यांना ह्या अत्याचारांची झळ बसली नव्हती पण वरकरणी पोर्तुगीज ख्रिश्चन पण छुप्या पद्धतीने 'ज्यू' धर्माचे पालन करणाऱ्या त्यांच्या बहिणीला ह्या गुन्ह्यासाठी जिवंत जाळण्यात आले होते आणि तिच्या साक्षीतून 'गार्सिया डी ओर्टा' देखील छुपे ज्यू होते असे समजल्यावर प्रतीकात्मक शिक्षा म्हणून त्यांच्या थडग्यातून अवशेष बाहेर काढून ते जाळण्यात आले होते. असो, ज्यू द्वेषा मागची अनेक करणे असली तरी ती सलगरित्या कुठे वाचायला मिळत नाहीत पण तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात त्यांचे भरपूर संदर्भ मिळतील.
"अरबस्तानातील मूळ अरबी लोक फक्त भटके टोळीवाळे होते. अर्थात नंतर अब्बासिद खिलाफतीत अरबांची व्यापारीदृष्ट्या प्रचंड भरभराट झाली."
हो, हे भटके टोळीवाले नौकानयनात पारंगत झाल्यावर त्यांच्यासाठी सागरतळातून मोती काढणे आणि आजूबाजूच्या प्रदेशात जाऊन व्यापार करणे अशा नव्या व्यवसायसंधी उपलब्ध झाल्या ज्यात उत्तरोत्तर त्यांनी प्रगती केली. अब्बासिद खिलाफतीत त्यांची सांस्कृतीक आणि व्यापारीदृष्ट्या भरभराट झाली, पण त्याला आफ्रिकेतून अरबांच्या किरकोळ प्रमाणात चालणाऱ्या गुलामांच्या व्यापाराला धर्ममान्यता मिळाल्याने त्यात झालेली प्रचंड वाढ अशी थोडी काळी बाजूही आहे.
आपल्याकडील काही स्मृतींमध्येदेखील लसणासारखाच हिंगाचा अन्नपदार्थातला वापरही निशिब्द मानला आहे तो बहुधा त्याच्या उग्र वासामुळेच.
हे सगळं फार गमतीशीर आहे. काश्मिरी पंडित मांस आणि मासे खातात पण त्यांना कांदा -लसूण मात्र वर्ज्य आहे. बंगाली ब्राह्मणांना मासे खाण्याची अनुमती आहे. कांदा-लसूण वर्ज्य असलेले जैन लोक हिंगाचा वापर करतात पण मला एक प्रश्न पडतो कि कुठलीहि जमिनीखाली उगवणारी वनस्पती, वनस्पतीचा भाग जर त्यांना वर्ज्य आहे तर मग वनस्पतीच्या मुळातून स्रवणारा हिंग त्यांना कसा काय चालत असावा? असो, मानसोल्लासात असलेली हिंगाच्या वापराबद्दलची माहिती माझ्यासाठी नवीन आहे, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 26/07/2023 - 12:41
हो, हे ज्यू लोक खूप लोभी असत आणि श्रीमंतही त्यामुळे त्यांच्याविषयी तिरस्कार होताच, शिवाय येशूला सूळावर चढवण्यात ज्यूंचाच सहभाग होता म्हणूनही त्यांच्याविषयी अधिक द्वेष उत्पन्न झाला असावा असेही वाटते. बाकी गोव्यात इतरानांचा काय पण खुद्द एका फ्रेंच क्रिस्तियन डॉक्टरला देखील इन्क्विझिशनने पराकोटीचा त्रास दिला होता याचा विस्तृत वृत्तांत प्रियोळकरांनी त्यांच्या पुस्तकात कथित केला आहे.
वनस्पतीच्या मुळातून स्रवणारा हिंग त्यांना कसा काय चालत असावा?
अहो, खुद्द मलाही हिंग वनस्पतीजन्य आहे हे तुमच्या लेखावरुनच समजले नाहीतर मी देखील हिंग म्हणजे सैंधवासारखाच नैसर्गिक स्फटिक (खडा हिंग पाहून) असेच समजत होतो, तर त्यांना ते कुठून माहित असणार :), पण गंमतीचा भाग सोडा पण कदाचित रुचिवर्धक असल्याने त्यांना हिंग चालत असावा :)

In reply to by प्रचेतस

गवि 26/07/2023 - 15:14
अहो, खुद्द मलाही हिंग वनस्पतीजन्य आहे हे तुमच्या लेखावरुनच समजले
सेम हियर. म्हणजे सैंधव टाईप नैसर्गिक स्फटिक असेल असे देखील कधी मनात आले नाही. किंबहुना तसा विचारच केला नाही. कापूर या पदार्था विषयी अशीच समजूत आहे. किंवा काहीच समजूत नाही म्हणा. स्पंज, मेण, सरस*, लाख# हे देखील त्यात ऍड करा. * हा पदार्थ शाळेत हस्तव्यवसाय विषयात शिकवला जात असे. त्याचा वास अत्यंत घाण असे. खळ हादेखील अन्य चिकट पदार्थ. पण तोही घाण वासाचाच. # हा पदार्थ काही पार्सलांवर एका शिक्क्यासहित दिसत असे. वरील दोन्ही गोष्टींवरून आपण किती जुने आणि कालबाह्य झालो हे जाणवते .

In reply to by गवि

टर्मीनेटर 26/07/2023 - 15:28
😀 स्पंजाचे माहिती नाही ते बघावे लागेल, पण कापुर आणि लाख वनस्पतीजन्य आहेत, मेण मधमाश्यांच्या पोळ्यातुन मिळते आणि सरस जनावरांच्या हाडांपासुन बनते त्यामुळे त्याला फारच घाणेरडा वास येतो एवढंच माहिती आहे!

In reply to by टर्मीनेटर

सरसचा एक उपयोग आमच्याकडे नव्वदीच्या दशकात खूप केला जायचा. क्रिकेट खेळताना बॅटचा हँडल तुटला तर सरस वितळवून त्याने तो हॅंडल चिकटवायचा आणि नंतर दोर्‍याने (शक्य असल्यास मांजा) घट्ट गुंडाळायचा. बाकी बॅट तुटायची, पण हा सरसने चिकटवलेला हँडल परत कधी तुटत नसे :) पण सरसचा असा स्रोत असेल असं कधी वाटलं नव्हतं. मला ते खनिज वाटायचं!

In reply to by तुषार काळभोर

मांजा नव्हे, चांभाराचा दोरा असेल ... कारण दोऱ्याला पहिले सरस लावून, नंतर लगेचच पुढच्या २-३ सेकंदात, त्यावर बारीक वस्त्रगाळ कुटलेल्या काचेची पुड लावल्यावर, "मांजा" तयार होतो. असा मांजा मग काटाकाटी (पतंगाच्या)मध्ये वापरतात . , काही स्कुटरवाल्यांचा जीव गेलाय गळा कापल्या गेल्याने या मांजामुळे ...

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 26/07/2023 - 17:03
बाकी बॅट तुटायची, पण हा सरसने चिकटवलेला हँडल परत कधी तुटत नसे :)
😂 😂 😂 बॅटचे तुटलेले हँडल चिकटवायला आम्ही माझ्या आजोबांकडे असलेले 'अ‍ॅरालडाईट' (Araldite) वापरयचो! सातवी-आठवीत असताना सर्वात भारी मांजा बनवण्याचा प्रयोग करताना आम्ही मीत्र मंडळींनी हार्डवेअरच्या दुकानातुन 'सरसच्या' पट्ट्या आणुन घराजवळच्या मैदानात जाळ पेटवुन वितळवल्या होत्या तेव्हा त्याचा इतका भयंकर वास सुटला होता कि मैदानाच्या आजुबाजुने जाणारे-येणारे लोकं नाकाला रुमाल लाउन जात-येत होते 😀 हा 'दिव्य' मांजा बनवण्यासाठी त्या वितळलेल्या सरसमध्ये मिसळण्यासाठी सोड्याच्या बाटल्या कुटुन त्याची पावडर बनवायला घरातल्या मिक्सरचा वापर केला होता. त्यातुन तयार झालेल्या मांजाने इतरांच्या पतंग तर गुल व्हायच्याच, पण आमची बोटेही कापयची. अर्थात ती काचेची पावडर बनवण्याच्या खटाटोपात मिक्सरच्या भांड्यच्या ब्लेड्सची पार दुरावस्था झाल्यामुळे आईचा अभुतपुर्व असा मारही खाल्ला होता 😂

कंजूस 24/07/2023 - 20:22
हभप हिंगभप पुराण आवडत आहे. विशेष लेख असूनही दिवाळी अंकासाठी दाबून न ठेवता लगेच आषाढ श्रावणातच आणल्याबद्दल धन्यवाद. पावसाळ्यात हिंग लावून ताक पिणे हितकर. कल्याण चालुक्याची गोष्टही प्रचेतसनी सांगितली.

Bhakti 24/07/2023 - 21:16
मस्त मस्त मस्त! तीनही भाग प्रिंट काढून निवांत परत वाचणार आहे.प्रबंध छापला तर रेफरेन्समध्ये सैंधव मीठ आणि माझं नाव द्या बरं का :)

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/07/2023 - 12:12
कंजूस । मुक्त विहारि । भक्ती प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ कंजूस, कंकाका तुमची ३ भाग होतील ही भविष्यवाणी खरी ठरली हो 😀 एकाचे फारतर दोन होतील असा माझा प्राथमीक अंदाज होता, पण तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ३ भाग झालेच! @ भक्ती
प्रबंध छापला तर रेफरेन्समध्ये सैंधव मीठ आणि माझं नाव द्या बरं का :)
हो, तुमचे आणि प्रचेतस असे दोघांचे नाव देइन हो 😂

हा लेखही प्रचंड आवडला. तुमच्या आवडत्या विषयांची यादी नावडत्या विषयांपेक्षा कमी असावी कदाचित. हिंगासारख्या विषयावरही वाचन्/अभ्यास करून लगेच ते अशा पद्धतीने लिहून काढणे की ते लेखन अनेकांच्या पसंतीस उतरेल ही नक्कीच खायची गोष्ट नव्हे! तुमच्या लेखणीस असेच उत्तरोत्तर बळ मिळो ही सदिच्छा! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 26/07/2023 - 12:28
विवेकपटाईत । आंद्रे वडापाव । शलभ । चांदणे संदीप प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चांदणे संदीप
"हिंगासारख्या विषयावरही वाचन्/अभ्यास करून लगेच ते अशा पद्धतीने लिहून काढणे"
छे हो, एवढा कुठला उरक आला माझ्याकडे! वास्तविक २०१९ मध्ये "हिंगाची, आयात - प्रक्रिया - निर्यात" अशा व्यवसायात उतरु पाहणाऱ्या एका स्टार्टअप साठी बिझनेस मॉड्यूल्स तयार करण्याच्या कामात सहभागी झालो असताना हिंगा विषयी भरपूर तांत्रिक आणि अवांतर माहिती जमा झाली होती, पण त्यावर लेख लिहीन असे कधी वाटले नव्हते 😀 काही दिवसांपूर्वी भक्तींचा सैंधव मिठावरचा धागा वाचताना 'हिंगाची' आठवण आली म्हणून त्यांना पुढच्या लेखासाठी हा विषय सुचवला होता पण त्यांनी (आणि प्रचेतस बुवांनी) तो चेंडू पुन्हा माझ्याच कोर्टात टोलवण्यातून हे हिंग पुराण जन्माला आले 😂 त्यावेळी गोळा झालेल्या माहितीचे लेखात रुपांतर करताना अनेक संदर्भ ताजे करण्यासाठी जालावर थोडी उचक-पाचक करण्याची आणि मुख्य म्हणजे हे सगळं मराठीत टंकायची मेहनत घ्यावी लागली एवढेच!

In reply to by टर्मीनेटर

अथांग आकाश 26/07/2023 - 15:20
काही दिवसांपूर्वी भक्तींचा सैंधव मिठावरचा धागा वाचताना 'हिंगाची' आठवण आली म्हणून त्यांना पुढच्या लेखासाठी हा विषय सुचवला होता पण त्यांनी (आणि प्रचेतस बुवांनी) तो चेंडू पुन्हा माझ्याच कोर्टात टोलवण्यातून हे हिंग पुराण जन्माला आले
हे बेस्ट झाले! त्यांच्यामुळे डिट्टेलवार माहिती वाचायला मिळाली!! त्या दोघांचे पण आभार!!!

सुरिया 26/07/2023 - 12:25
ऑनिय्यन मेरा, लस्स्सून मेरा. आसाफोटीडा का ड्ब्बा दे दे मेरा .

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/07/2023 - 16:38
हे हे चालीत मनातल्या मनात गायलं:)
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर मी पण हा प्रयोग करुन बघीतला 😀 "बादाम बादाम दादा काचा बादाम आमार काछे नाइखो बुबू भाजा बादाम" च्या चालीवर 😂 तुम्ही कोणत्या चालीत गायलंत? बाय द वे सुरिया, हे कुठल्या गाण्यातले बोल आहेत की तुम्ही स्वतः प्रसवलेल्या कव्यपंक्ती? स्वरचीत असेल तर क्रिएटीव्हीटी भारी आहे 👍

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/07/2023 - 17:38
असं आहे होय... तुम्ही दिलेली लिंक वरचा शॉर्ट पहाताना हा ऑफिशीअल व्हिडिओ सजेशन मध्ये आला, हे गाणं माहिती नव्हतं. म्हणजे सुरिया ह्यांनी 'ये फेकि तुझको पिनकोड मास्टर व्हिसा कार्ड' च्या जागी 'आसाफोटीडा का ड्ब्बा दे दे मेरा' असा कल्पक बदल केला आहे काय 😀 छान!

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 26/07/2023 - 17:55
हो, पहिल्या दोन ओळी common आहेत ऑनिय्यन मेरा, लस्स्सून मेरा... तिसरी ओळ आपल्या मनाने देऊ शकता पण तिसरी ओळ परीतोक्ष का पिनकोड मुझसे ना छुपा ही जास्त व्हायरल आहे :)

Nitin Palkar 26/07/2023 - 20:00
टर्मीनेटरजी तुमचे सर्वच लेख आवडीने वाचतो त्याचं कारण म्हणजे तुमची लेखनशैली. दोन्ही लेख खूपच छान उतरलेत. माझी आई करत असलेला घरगुती हिंगाचा एक औषधी उपयोग, पोटदुखी थांबण्यासाठी चिमूटभर हिंग बेंबीला चोळावा. खूप प्रभावी उपाय आहे, कोणताही अपाय नक्की नाही. पापड करताना 'हिरा हिंग' नावाचा हिंग खास आणला जाई (हे ब्रॅंड नेम असावे). तो अधिक तीव्र (स्ट्रॉंग) वासाचा असे. पुभप्र .

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 28/07/2023 - 21:30
कंकाका 'लाल सोना' असे बिरुद मिरवणारा केशर जम्मू आणि काश्मीरमध्ये भरपूर बघितला आणि प्रत्येकवेळी तिथून आणलाही होता, पण त्याचे शेत मात्र तिथे कधी बघायला मिळाले नाही, ते बघितले भूतानमध्ये 😀 अर्थात काही वर्षांपूर्वी भूतानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु झालेलया व्यावसायिक केशर लागवडीतून होणारे उत्पादन अगदी नगण्य असले आणि तो केशर हा फार काही चांगल्या दर्जाचा म्हणून ओळखला जात नसला तरी निदान शेतात त्याची फुले बघायला मिळाली होती. आणखीन एक गम्मत म्हणजे 'काला सोना' असे बिरुद मिळवणारे 'चरस' आणि 'अफू' हे पदार्थ हिमाचल प्रदेशात, उत्तराखंड आणि पंजाब मध्ये व्यवस्थित निरखून-हाताळून बघायला मिळाले होते (त्यावर लेख लिहिणार नाही, काळजी नसावी 😂) पण चरस हे बाय-प्रोडक्ट मिळणारी भांग / गांजाची अधिकृत शेती पण भुतान मध्येच पाहायला मिळाली होती. आमचा ड्रायव्हरही फार हौशी होता,त्याने दोन्हीच्या फांद्या तोडून आणून त्यांच्यातला फरक समजावला आणि Cannabis sativa ह्या एकाच वनस्पतीच्या नर आणि मादी झाडांपासून हे वेगवेगळे पदार्थ मिळत असल्याचे 'मौलिक' ज्ञानही दिले होते. अफूच्या बाबतीत एक गमतीशीर किस्साही घडला होता. वीस-बावीस वर्षांपूर्वी मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री कुटुंबासहित सिमला-कुलू-मनाली-वैष्णो देवी अशा सहलीवर आमच्यासोबत आल्या होत्या. (अर्थात सेलिब्रेटी असल्या तरी व्यवस्थित पैसे भरून, झिम्मा-फुगड्या खेळण्यासाठी 'भाऊजींना' किंवा अन्य सेलिब्रेटींना सहलींवर नेण्यासारखे प्रकार तेव्हा कोणी संयोजक करत नसत 😀) कुलूला पोचल्यावर त्यांना असे काही जुलाब सुरु झाले कि ते थांबायचे नावच घेईनात. दुसऱ्या दिवशी मणिकरणला जायचा कार्यक्रम होता आणि तो त्यांना अजिबात चुकवायचा नव्हता, डॉक्टर हॉटेलवर येऊन औषध-पाणी देऊन गेले पण ह्यांच्या वाऱ्या काही थांबेनात. संध्याकाळी उशिरा आम्ही मित्र आणि आमच्या बसेसचे ड्रायव्हर्स शेकोटी पेटवून बसलो असताना हा विषय निघाला तेव्हा एक ड्रायव्हर म्हणाला "हमारी देसी दवाई दे क्या मॅडम को, ऐसे बंद होगा जैसे पेहले कभी हुवा हि नही था", आम्हि म्हंटलं विचारून बघतो त्यांना, गावठी उपाय चालेल का ते! त्यांचा होकार मिळाल्यावर त्याने साधारण मोहरीच्या दाण्यापेक्षा थोडी मोठी अफूची गोळी करून दिली आणि पाण्याबरोबर घ्यायला सांगितली. दुसऱ्या दिवशी मॅडम एकदम ठणठणीत! त्यांच्या इच्छेप्रमाणे मणिकरण वगैरे व्यवस्थित बघता आल्याने स्वारी एकदम खुश होती, पुढच्या दोन दिवसांत त्यांनी कितीवेळा 'त्या' औषधासाठी ड्रायव्हर मंडळी आणि आमचे आभार मानले असतील ह्यची गणती नाही. तिसऱ्या दिवशी मात्र सकाळी एक छोटीशी तक्रार घेऊन आल्या "अरे काय औषध होतं ते, गेल्या दोन दिवसांपासून मला अजिबात टॉयलेटला झाली नाही." 'ते' काय औषध होतं, हे आम्हाला माहिती असलं तरी त्यांना सांगितलं नव्हतं पण आता ते सांगायची वेळ आली होती. मग ड्रायव्हर महाशयांकडून मिळालेले "काळजी करू नका तीन दिवस बंद म्हणजे एकदम बंद राहील पण मग सगळं व्यवस्थित होईल" हे ज्ञान त्यांना दिले. त्यावर हसून "मग हरकत नाही, पण गुण मात्र चांगला आला" असे बोलून पुन्हा आमचे आभार मानते झाल्या होत्या 😀

In reply to by टर्मीनेटर

१९७० च्या दशकात लहान मुलांना, जर झोपत नसतील किंवा सारखी रडत असतील तर मोहरीच्या दाण्याएवढी अफू देऊन झोपवणं किमान ग्रामीण भागात कॉमन होतं. हे एक: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत लहान मुलांना अशी औषधे देणे सामान्य होते : 345

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 29/07/2023 - 13:23
१९७० च्या दशकात लहान मुलांना, जर झोपत नसतील किंवा सारखी रडत असतील तर मोहरीच्या दाण्याएवढी अफू देऊन झोपवणं किमान ग्रामीण भागात कॉमन होतं.
हो! त्यातुन अनेक बालकांचे अपरिमित नुकसान झाल्याच्या कहाण्या जुन्या-जाणत्यांकडुन ऐकल्या आहेत. तसेच ब्रिटिशांच्या काळात अफु सेवनसाठी परवाना दिली गेलेली अनेक शंभरीच्या वयात पोचलेली 'जुनी खोडे' अजुनही भारतात आहेत 😀

रंगीला रतन 27/07/2023 - 11:11
साष्टांग दंडवत दादुस!! दोन्ही भाग वाचले. पुराण एक नंबर लिवलंय. अरबांचा हा इतिहासही रोचक आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी... यावर लिहाच. आतापरेंत अरब म्हणजे मुसलमान असच वाटत होतं :=)

गवि 27/07/2023 - 13:56
कापूर, स्पंज , लाख , मेण हे आहेतच विषय . पण हल्ली बरेचदा ऐकू येणारा उमामी हा स्वाद म्हणा किंवा जी काही एक नवीन एक्सट्रा सहावी की पाचवी निराळी चव म्हणतात त्याबद्दल काही तपशील कळला तर रोचक होईल. धन्यवाद. बहुधा अजिनोमोटो हा पदार्थ या उमामी स्वादाशी संबंधित असतो. चुभुद्याघ्या ..

In reply to by गवि

'मसाला लॅब' हे क्रिश अशोक यांचे पुस्तक सुचवतो. या पुस्तकाने मजवर बरेच उपकार केले आहेत. क्रिश अशोक यांचे वैज्ञानिक नुस्खे ( उर्फ विज्ञाननायकीण सुगरणीचे सल्ले ) छापाचे जे सल्ले आहेत ते वापरून माझ्या अन्नाचा दर्जा सुधारला. विशेषतः मटणाला ब्रायनिंग करणे, रश्याच्या फोडणीत दारू ओतणे अशा साध्या पण क्रिटिकल नुस्ख्यांनी माझ्या रश्याला चार चांद लागतात. हे त्यांचे लेक्चर ऐका. सायन्स ऑफ इंडियन कुकिंग त्याच्यात शेवटी उमामी म्हणजे काय हे ते सांगतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

टर्मीनेटर 28/07/2023 - 16:54
सायन्स ऑफ इंडियन कुकिंग हा व्हिडिओ थोडा पाहिला, मस्त वाटला 👍 मुख्य म्हणजे दांडगा अभ्यास असला तरी सर्वज्ञानी असल्यासारखा आव न आणता बोलायची त्यांची पद्धत डिसेंट वाटली. व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा आहे, जवळपास दोन तासांचा, मगाशी 'कोरियामध्ये वाढ्लेल्या नाकाच्या प्लास्टीक सर्जरीज आणि इंस्टाग्राम चे कनेक्शन' पर्यंत पाहिला बाकीचा उद्या-परवा सवडीने नक्की बघतो. धन्यवाद!

उमामी ही चव प्रोटीनच्या विशिष्ठ स्वादामुळे येते .. अजिनोमोटो कृत्रिमपणे उमामी चा भास निर्माण करते .. नॉन व्हेज खाणाऱ्यांना उमामीची कमी शक्यतो भासत नाही .. बाकी व्हेज वाले शीतसाके मश्रुम वैगरे कडून उमामीचा अनुभव घेऊ शकतात ..

चित्रगुप्त 27/07/2023 - 15:15
जबरदस्त अभ्यासपूर्ण, ज्ञानवर्धक, मनोरंजक लेख खूप आवडला. हिंगापासूनचे होमियोपाथिक औषध आणि आयुर्वेदिक हिग्वाष्टक चूर्ण वापरलेले आहे. फ्रेंच सुगंधी द्रव्यात हिंगही वापरतात हे प्रथमच समजले.

In reply to by कंजूस

रंगीला रतन 27/07/2023 - 21:12
आता ह्या काय नवीन? मधीच लिंबुडा कुठून आला :=) पण आपलं आवडत गाणं आहे. डान्सबार मधे बारबाला लई भारी नाचायच्या या गाण्यावर. गेले ते दिवस :=( https://youtu.be/YLsIl0G0qlM

rahul ghate 28/07/2023 - 17:04
टर्मीनेटर भाऊ हिंग पुराण चे २ हि भाग फारच माहिती पूर्ण आहेत . कृपया ३ रा भाग टाका वाचायला उत्सुक आहे

टर्मीनेटर 28/07/2023 - 18:14
सुरिया । अथांग आकाश । Nitin Palkar । रंगीला रतन । चित्रगुप्त । गोरगावलेकर । rahul ghate प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
केशर, शिलाजीत, मीठ, मिरची, मिरे, कापूर, स्पंज , लाख , मेण, उमामी
वाह... लेखासाठी विषय भारीच सुचवले आहेत एक एक! ह्यापैकी 'उमामी' विषयी फार काही माहिती नसली तरी बाकी सर्व पदार्थ हाताळले आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आहे. आणखीन थोडी माहिती मिळवून, हिंग पुराणामुळे प्रतीक्षा यादीत पडून असलेला (आता वराती मागून घोडे म्हणता येईल असा 😀) 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' वरचा लेख झाला कि येत्या 'गलेमा' मध्ये एकाच किंवा दोन लेखात ह्या सगळ्यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करतो 🙏

"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?"

।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।

टर्मीनेटर ·

अजुन एका माहीतीपूर्ण लेखमालेची सुरुवात. ही मालिका नक्कीच उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही. वाखुसा. आणि हो!! मी पयला!!

Bhakti 10/07/2023 - 22:32
टर्मीनेटर कमाल लेख लिहिलात.खोडातील चिकापासून हिंग बनतो , आश्चर्यकारक!

किल्लेदार 11/07/2023 - 01:42
सगळ्यात जास्त हिंग अफगाणिस्तानातून येतं एवढंच माहिती होतं. खऱ्या स्रोताची माहिती आत्ता कळली. आता अफगाणिस्तानला "हिंगुस्तान" म्हणायला काही हरकत नाही.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 11/07/2023 - 15:21
राजेंद्र मेहेंदळे । भक्ति । किल्लेदार प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @किल्लेदार - अफगाणिस्तान साठी 'हिंगुस्तान' हे पर्यायी नाव आवडले 😀

कंजूस 11/07/2023 - 05:48
नवीन बाईपण सिनेमावर काही खुसखुशीत पण हिंगासारखी कडक टीका असावी वाटलं. पण.... खरंच हिंग पुराण निघालं. अजून दोन भाग म्हणजे अफगाणिस्तान भटकंती केलेली दिसतेय.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 11/07/2023 - 15:33
रीडर । कुमार१। कंकाका प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
अजून दोन भाग म्हणजे अफगाणिस्तान भटकंती केलेली दिसतेय.
@कंकाका - अफगाणिस्तानात भटकंती झाली नाहीये अजून, पण नजीकच्या भविष्यात एक धावती भेट दिली जाण्याची शक्यता मात्र आहे! आणि पुढचा भाग शेवटचा असेल, खरंतर एकाच भागात लेख आवरायचा होता पण लांबी वाढत चालल्याने त्याचे दोन भाग करतोय 😀

चलत मुसाफिर 11/07/2023 - 06:13
हिंग कसे निर्माण होते हा प्रश्न कधीच डोक्यात आला नव्हता. सुंदर व माहितीपूर्ण लेख. मजा आली वाचायला.

गवि 11/07/2023 - 06:39
रोचक आणि माहितीपूर्ण रंजक लेख. विषय देखील खमंग. हिंग हा सर्व बेसिक मसाल्यांतील सर्वाधिक आवडता. अवांतर: आणखी एक जाणवले. अफगाणिस्तान, इराण, इराक यांबद्दल आपली एक विशिष्ट प्रतिमा असते मनात. वाळवंट, कोरडे रखरखीत. पण तरीही अनेक पदार्थ तिथेच खास किंवा अधिक प्रमाणात उत्पादित होतात. कॉफी (जरी सर्वाधिक उत्पादन हल्ली व्हिएतनाम करत असला तरी), पिस्ते, खजूर, अफू , ऑलिव्ह (चुभुद्याघ्या) आणि आता ही हिंग देखील तिथलीच.

In reply to by गवि

टर्मीनेटर 12/07/2023 - 10:47
वाळवंट, कोरडे रखरखीत. पण तरीही अनेक पदार्थ तिथेच खास किंवा अधिक प्रमाणात उत्पादित होतात.
खरं आहे! ह्या देशांना निसर्ग सौन्दर्य बहाल करण्याच्या बाबतीत सृष्टीनिर्मात्याने हात आखडता घेतला असला तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि पदार्थांचे वरदान दिले आहे.
कॉफी (जरी सर्वाधिक उत्पादन हल्ली व्हिएतनाम करत असला तरी), पिस्ते, खजूर, अफू , ऑलिव्ह (चुभुद्याघ्या)
कॉफी, पिस्ते, खजूर, अफू, ऑलिव्ह निर्मितीत आजघडीचे आघाडीचे देश म्हणजे: कॉफी - ब्राझील, व्हिएतनाम आणि कोलंबिया कॉफीच्या भारतातील आगमनाची कथा गमतीशीर आहे. १६७० साली 'बाबा बुदान' नावाच्या सुफी संताने मक्केच्या यात्रेहून परतताना येमेन मधून कॉफीच्या सात बिया 'आपल्या दाढीत लपवून' आणल्या (त्याकाळी कॉफीच्या बिया अरबस्तानाच्या बाहेर नेण्यास मज्जाव होता) आणि त्या कर्नाटकातील चिकमंगळुरु येथील टेकडीवर पेरल्या. परंतु इतिहास संशोधकांच्या मते त्याआधीही केरळच्या मलबार प्रांतात कॉफी अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. १६१६ मध्ये जहांगीराच्या दरबारातही कॉफीच्या वापराचे उल्लेख आहेत त्यामुळे भारतात कॉफी आणण्याचे श्रेय ते अरब व्यापाऱ्यांना देतात. पुढे ब्रिटिशांनी भारतात व्यावसायिक स्तरावर कॉफीचे उत्पादन सुरु केले, आता कॉफी उत्पादनात भारत सहाव्या क्रमांकावर आहे. पिस्ता - अमेरिका, इराण आणि टर्की खजूर - इजिप्त, सौदी अरेबिया आणि इराण अफू - अफगाणिस्तान, म्यानमार, कोलंबिया अधिकृतरीत्या अफू उत्पादनात भारतही आघाडीवर आहे, अर्थात त्याची सुरुवात ब्रिटिशांनी केली. नीमच, मध्यप्रदेश येथे Government Opium and Alkaloid Works हि अफू (opium) बनवणारी/त्यावर प्रक्रिया करणारी जगातली सर्वात मोठी फॅक्टरी आहे जिथे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात परवानाधारक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अफूवर प्रक्रिया केली जाते. गाझीपूर, उत्तरप्रदेश येथील ह्या कंपनीची दुसरी फॅक्टरी युपी प्रदूषण नियंत्रक मंडळाने २०१७ साली पर्यावरणाशी संबंधित कारणांमुळे बंद केली. ऑलिव्ह - स्पेन, इटली, ग्रीस

In reply to by टर्मीनेटर

खरं आहे! ह्या देशांना निसर्ग सौन्दर्य बहाल करण्याच्या बाबतीत सृष्टीनिर्मात्याने हात आखडता घेतला असला तरी
ह्या वक्तव्याशी टोटल असहमत मी तरी. इराण/ अफगाणिस्तान हे निरतिशय सुंदर देश असून अफगाणिस्तान मधील कैक विभाग तर पार काश्मीर अन् गिलगिट ह्यांच्या तोडीचे असल्याचे पाहून मला नवल वाटले होते. (संदर्भ - डिस्कवरी चॅनल वरील काही डॉक्युमेंटरी)
१६७० साली 'बाबा बुदान' नावाच्या सुफी संताने मक्केच्या यात्रेहून परतताना येमेन मधून कॉफीच्या सात बिया 'आपल्या दाढीत लपवून' आणल्या (त्याकाळी कॉफीच्या बिया अरबस्तानाच्या बाहेर नेण्यास मज्जाव होता)
हाच संदर्भ खरा. (टेकडीला) आता बाबा बुदानगिरी म्हणतात. लागवडी लायक कच्च्या कॉफी बिया आणणारी हस्ती बाबा बुदानच. त्याच्या आधी मुघल दरबार अन् केरळातील कॉफी references हे अरब व्यापाऱ्यांच्या संदर्भात आहेत ते बरोबर आहे पण हे अरब व्यापारी कॉफी पिण्याला इतके चाटावलेले असत की ते भाजलेल्या (रोस्टेड) कॉफी बीन्स घेऊनच फिरत आपापल्या शिध्यांत. तीच त्यांनी आपल्या केरळी अन् मुघल भारतीय यजमानांना पाजली असण्याचा संभव आहे असे वाटते. त्याहून मोठी गंमत ही की कॉफीचे मूलस्थान हे अरब देश/ सौदी नाही तर इथिओपिया आहे. Ethiopian Highlands मध्ये एकदा एका मेंढपाळ माणसाला कोकरे एका विशिष्ट झाडाचा पाला खाऊन तेज होऊन उड्या मारत असताना दिसले आणि त्याने स्वतः पहिले तर तो पाला उकळून प्यायला. तिथून सुरुवात कॉफीची (हा संदर्भ मला एकदा तपासून घ्यायला हवा पण तो बरोबर असावा असे वाटते आहे. अर्थात लिटर लिटर कॉफी रोज रीचवणाऱ्या अमेरिकेतील नॅशनल कॉफी असोसिएशन ऑफ यू.एस. ए ने सुद्धा कॉफीचे इथिओपियन मूळ मान्य केले आहे).

In reply to by तुषार काळभोर

मलासुद्धा असेच वाटायचं की 'बंधानी' हे अडवाणी... वासवानी... च्या धर्तीवरील सिंधी आडनाव (ब्रँड) आहे ... कि ज्याची मोनोपॉली आहे हिंग मार्केटवर ...

विवेकपटाईत 11/07/2023 - 09:00
गेल्या वर्षी भारताने 829 कोटीचे हिंग आयात केले. शंभर कोटीचे निर्यात. आज लाहौल घाती आणि उत्तराखंड मध्ये उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न होत आहे.

प्रचेतस 11/07/2023 - 09:23
व्वा...!, एकदम चवदार धागा. अगदी साध्या वरणाला देखील चिमूटभर हिंगाशिवाय चव येत नाही. हिंग मात्र वनस्पतीपजन्य आहे हे माहित नव्हते. हे नैसर्गिक खनिज (हिमालयीन मिठासारखे) असावे असाच समज होता. हरिवंशात हिंगाचा उल्लेख पुढिलप्रमाणे येतो. पार्श्वानि चान्ये शकलानि तत्र ददु: पशूनां घृतमृक्षितानि। सामुद्रचूर्णैरवचूर्णितानि चूर्णेन मृष्टेन समारिचेन।। समूलकैर्दाडिममातुलिंगै: पर्णासहिंग्वापर्द्रकभूस्तृणैश्च। तदोपदंशै: सुमुखोत्त रैस्तेि पानानि हृष्टा: पपुरप्रमेया:।। स्वयंपाक्यांनी तयार केलेली पशूंची शुद्ध मांसे व गोड तसेच मीठ इत्यादी पदार्थांची तयार केलेली पक्वान्ने त्यांना वाढली. पुष्कळ तूप घालून तळलेले पशूंच्या कुशीच्या मांसाचे तुकडे मीठ आणि मिरपूड यात चांगले घोळून त्यांना दिले. मुळ्यासह डाळिंबे, अजबला, हिंग, आले व अळू यांचा त्यांनी आस्वाद घेतला. आनंदित (यादवांनी) सुंदर अशी पेयपात्रे आपल्या मुखास लावून पेय प्राशन केले. ह्या अध्यायात तत्कालिन मांसाहारी बार्बेक्यूचे अजूनही चविष्ट वर्णन आहे.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 12/07/2023 - 11:38
चलत मुसाफिर । तुषार काळभोर । विवेकपटाईत । प्रचेतस प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ प्रचेतस हरिवंशातील हिंगाच्या उल्लेखाची छान माहिती दिलीत...
ह्या अध्यायात तत्कालिन मांसाहारी बार्बेक्यूचे अजूनही चविष्ट वर्णन आहे.
भरताबाहेर काही देशांमध्ये आपण काही पदार्थांवर चाट मसाला शिंपडतो तसे फळांवर आणि बार्बेक्यूवर हिंग शिंपडण्यची पद्धत जुन्या काळापासुन आहे. मला सफरचंद, कलिंगड, अननस अशी फळे मिठ आणि चाट मसाला घालुन खायला आवडतात, आता एकदा त्यांवर (आणि तंदुरी चिकनवर) हिंग शिंपडुन खाउन बघायचंय चव कशी लागते ते 😀

In reply to by टर्मीनेटर

सुरिया 13/07/2023 - 15:43
बर्‍याच वडापाव वाल्यांकडे मी पाहिले की आतली भाजी बनवताना ते उकडलेले बटाटे, आले, मिरचि, कोथिंबीर मिक्स करतात. त्याची भाजी नाही बनवत आपण करतो तशी. तशा सारणावर ते हिंग टाकतात विदाऊट फोडणी.

In reply to by सुरिया

टर्मीनेटर 14/07/2023 - 10:31
अरे वाह! पुढच्या वेळी घरी बटाटावडा बनवायचा घाट घतला कि हा प्रयोग करुन बघणार! तसंही आपण घरी पदार्थ बनवताना रेसिपिकडे फार काटेकोरपणे लक्ष देतो, तरी त्यांना बाहेरच्या पदार्थाची चव येतेच असे नाही 😀 त्यामुळे हि क्लुप्ती वापरुन बघयला हरकत नाही.

वामन देशमुख 11/07/2023 - 11:02
हिंगपुराण आवडले. --- स्वयंपाकातील माझा आवडता घटक म्हणजे हिंग. परवा उत्तराखंडातील धनौल्टी इथून एक हिंग आणला. तो हिंग तेथीलच पहाडांतून गोळा केलाय असा तिथल्या विक्रेत्याचा दावा होता. खरेखोटे देव जाणो, पण त्या हिंगाचा वास अगदी भारी होता. अधूनमधून स्वयंपाकात वापरतो. --- कुणाचा अवमान करण्याच्या हेतूरहित अवांतर: "बांधणी हिंग म्हणजे शुद्ध हिंगात इतर बंधके मिसळून तयार केलेला विक्रीयोग्य हिंग" हे अनेकांना माहित नाही हे आश्चर्यकारक वाटले.

उपवासाच्या पदार्थात हिंग वापरला जात नाही. ह्यासंबंधी माहिती देताना मुंबई ग्राहक पंचायतीच्या एका कार्यक्रमात असे सांगितले होते कि, 'आपण वापरतो तो 'बांधानी' हिंग असतो. ह्याचा अर्थच बांधलेला, काही पदार्थ वापरून एकत्र केलेला असा हा हिंग आहे. त्यात उपवासाला न चालणारे घटक असतात म्हणून, उपवासाचे पदार्थ करताना हिंगाचा वापर करत नाहीत.' आज ह्याबद्दल अधिक माहिती मिळाली.

हिंगाचा लेख एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. :) पुढील हिंगाच्या... आय मीन लेखाच्या प्रतिक्षेत. सं - दी - प

यश राज 11/07/2023 - 12:41
हिंग कसा बनतो याची जिज्ञासा होतीच. शंका निरसन झाले. अप्रतिम लेख. थोडेसे अवांतर: प्रतापगड(राजस्थान) मधून माझी आई बऱ्याचदा हिंग मागवते. हा हिंग अगदी द्रवसर असतो म्हणजेच बांधनी नसतो. या हिंगाचा खूप घमघमाट सुटतो. आई मग २ चमचे धण्याच्या पूड मध्ये अगदी चिमटीत मावेल एवढा हिंग मिसळून टाकते व डबीत भरून ठेवते.आणि मग ती हिंगाची धने पावडर बंधनी हिंगा प्रमाणे फोडणीत वापरते.. स्वादच स्वाद हिंगाचा.

In reply to by यश राज

टर्मीनेटर 12/07/2023 - 13:04
सौंदाळा । वामन देशमुख । अनिकेत वैद्य । चांदणे संदीप । यश राज प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ यश राज
प्रतापगड(राजस्थान) मधून माझी आई बऱ्याचदा हिंग मागवते. हा हिंग अगदी द्रवसर असतो म्हणजेच बांधनी नसतो. या हिंगाचा खूप घमघमाट सुटतो.
शुद्ध स्वरूपातल्या हिंगाचा वास खूप उग्र असल्याने स्वयंपाकासाठी वापरताना त्याचे प्रमाण ठरवणे अवघड असते. त्यावर सोयीस्कर उपाय म्हणून 'बांधानी हिंग' हा प्रकार अस्तित्वात आला. गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्ये घाऊक प्रमाणात जेवण बनवणारे आचारी (महाराज) लोकं बांधानी हिंगापेक्षा शेंगदाणा किंवा ऑलिव्ह अशा दिर्घकाळ टिकणाऱ्या तेलात विरघळवलेल्या लाल हिंगाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. तुमची आई मागवते ते अशाप्रकारचे हिंग असावे अर्थात त्यात शुद्ध हिंगाचे प्रमाण बांधानी हिंगापेक्षा खूप जास्त असल्याने त्याचा वास सौम्य करण्यासाठी त्यात धन्याची पूड मिसळावी लागणे सहाजिक आहे. शुद्ध हिंग, बांधानी हिंग (पावडर, क्रिस्टल आणि खडा), तेलात मिसळलेला द्रवरूप हिंग आणि इसेन्शिअल ऑइल अशा अनेक स्वरूपातला हिंग बाजरात मिळतो आणि त्याचा वापर स्वयंपाकासाठी आणि बांधानी व तेलमिश्रित सोडून अन्य प्रकारांचा औषध निर्मितीसाठी केला जातो तर खड्या बांधानी हिंगाचा वापर घाऊक प्रमाणात घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर विविध मसाले तयार करण्यासाठी केला जातो. पण बांधानी हिंग घरगुती वापरासाठी सर्वात सोयीस्कर प्रकार असल्याने त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे.

धन्यवाद बांबू लागवडी नंतरची, हिंग लागवड, ही पण ह्या केंद्र सरकारची उत्तम योजना आहे ... जितकी आयात कमी, तितके आर्थिक स्थैर्य जास्त ...

चित्रगुप्त 11/07/2023 - 20:50
छान माहितीपूर्ण लेख. अवांतरः हल्ली ज्याला अफगाणिस्थान म्हटले जाते, तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता, त्यापूर्वीचाही पुष्कळ इतिहास असणारच. .

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 11/07/2023 - 21:09
हल्ली ज्याला अफगाणिस्थान म्हटले जाते, तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता,
भाग होता ह्याचा अर्थ म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने तो भाग जिंकला होता, वास्तविक हा पूर्वापार चालत आलेल्या विविध भटक्या टोळ्यांनी भरलेला प्रदेश, ह्यावर दीर्घकाळपर्यन्त कोणत्याच राजाचे स्वामित्व राहिले नाही. चंद्रगुप्त ते अशोकापर्यन्त हा भाग मौर्यांच्या वर्चस्वाखाली राहिला मात्र नंतर पुन्हा इथे टोळ्यांचे राज्य सुरू झाले. महाभारतात कर्णपर्वात ह्या भागात राहणाऱ्या लोकांची कर्णाने भयंकर निंदा केली आहे, मद्र, वाहिक, बाल्हिक इत्यादी प्रांतांची कर्ण अत्यंत निर्भत्सना करतो. कर्ण-शल्य संवादाचे हे वर्णन मूळातूनच वाचण्यासारखे आहे.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 12/07/2023 - 15:15
मुक्त विहारि। चित्रगुप्त । कर्नलतपस्वी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चित्रगुप्त
तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता
हो... २००१ साली तालिबानचा माथेफिरू संस्थापक मुल्ला ओमर ह्याच्या आदेशावरून उध्वस्त करण्यात आलेल्या बामियानच्या, सहाव्या आणि सातव्या शतकात कोरलेल्या दोन भव्य प्राचीन बुद्धमूर्तींवर असलेला गुप्त कला शैलीचा प्रभाव हा त्याचा सबळ पुरावा मानता येईल. नवव्या शतकापर्यंत बौद्ध धर्मियांचे महत्वाचे धार्मिकस्थळ म्हणून ओळख असलेल्या ह्या प्रदेशावर पुढे झालेल्या इस्लामिक आक्रमणांनंतर दहाव्या शतकापर्यंत परिस्थिती पूर्ण बदलली. वर प्रचेतस ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे विविध भटक्या टोळ्यांनी भरलेल्या ह्या प्रदेशात पूर्वीही कधीच एकसंधता नव्हती आणि आता हजार वर्षांहून अधिक काळ इस्लामच्या झेंड्याखाली असला तरी ह्या प्रदेशातल्या टोळ्यांमधील वांशिक मतभेदांमुळे एक देश म्हणून अजूनही त्यांच्यात एकसंधता आलेली नाही. असो, आता पुन्हा तो देश तालिबान्यांच्या हातात गेला आहे, त्यांच्या कुठल्या माथेफिरु नेत्याने भारताची पंचईत करण्यासाठी हिंगाच्या शेतांना आगी नाही लावल्या म्हणजे मिळवले 😀

चित्रगुप्त 11/07/2023 - 22:03
कर्ण-शल्य संवादाचे हे वर्णन मूळातूनच वाचण्यासारखे आहे.
महाभारताचे सगळे खंड घेऊन वाचायचे आजवर राहून गेले, आणि आता कितपत जमेल याची शंकाच आहे. जालावर मराठी वा हिंदीत ते उपलब्ध असल्यास कुठे आहे ? आणि कर्ण-शल्य संवाद त्यात कुठे आहे ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 12/07/2023 - 06:18
सुरुवातीला सत्संगधारा संस्थळावर मराठी pdf च्या लिंक्स उपलब्ध होत्या असे स्मरते ओण आता दिसत नाहीत, मात्र sanskrit documentsवर महाभारताच्या विविध प्रती संस्कृत मधून उपलब्ध आहेत ते इंग्रजी अनुवाद sacred-texts वर उपलब्ध आहे, मराठी अनुवाद मात्र कुठे दिसत नाही, ग्रंथ विकत घेऊन वाचणेच श्रेयस्कर कारण हा महाग्रंथ जालावर मराठीत मिळाला तरी तो स्क्रीनवर वाचणे कठीणच. कर्ण -शल्य संवाद कर्णपर्वाच्या सुरुवातीला, जेव्हा कर्ण शल्याची सारथी म्हणून नियुक्ती करतो तेव्हा येतो

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 12/07/2023 - 18:02
अनेक आभार प्रचेतस. हिंदीत 'महासमर' या नावाने श्री. नरेन्द्र कोहली यांचा नऊ खंडातील ग्रंथ वाचनीय आहे. https://amzn.eu/d/5b9BPLH

In reply to by चित्रगुप्त

लेख मस्त. पुरातन कालात अफगाणिस्तानातील हिंग महाराष्ट्र तील हिंगणघाटातून येवून हिंगोलीत जमा होत असे काही ऐकल्या सारखे....... हल्ली कान वाजतात.

चौकस२१२ 13/07/2023 - 05:42
भरताबाहेर काही देशांमध्ये आपण काही पदार्थांवर चाट मसाला शिंपडतो तसे फळांवर आणि बार्बेक्यूवर हिंग शिंपडण्यची पद्धत जुन्या काळापासुन आहे. हे पहिल्यांदाच ऐकले BBQ "रब" साठी मसाले वापरतात पण त्यात काली मिरी किंवा चिनी मिरी असते, जिऱ्याची पूड असते कधी, पण हिंग नाही ऐकले कोणत्या देशात?

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 14/07/2023 - 09:13
सुखी | चौकस२१२ प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 'सॉंग्स ऑफ ब्लड अँड स्वॉर्ड' हे फातिमा भुत्तो लिखित पुस्तक पाच-सहा वर्षांपूर्वी वाचनात आले होते. त्यांचे पिता, 'मुर्तझा भुत्तो' ह्यांची हत्या घडवून आणण्यात मुर्तझा भुत्तो ह्यांचीच सक्खी बहीण 'बेनझीर भुत्तो' आणि तिचे पती असिफ अली झरदारी ह्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप ह्या पुस्तकातून त्यांनी केला होता. त्या पुस्तकात त्यांनी आपल्या पित्याबरोबर बैरुत आणि दमास्कस मध्ये घालवलेल्या काळाचे फार छान वर्णन केले होते, ज्यात बैरुत येथे सहलीला गेल्यावर तिथे मुर्तझा भुत्तो ह्यांनी बनवलेल्या 'बार्बेक्यू'चा उल्लेख वाचला आणि कुतूहल चाळवले म्हणून लेबनीज, सिरियन खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला असता लेबनॉन, सीरिया आणि जॉर्डनमधल्या पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती असलेली एक PDF सापडली होती. त्यात भाजलेल्या मांसाचा (बार्बेक्यू) स्वाद वृद्धिंगत करण्यासाठी त्यावर हिंगाचा शिडकावा केला जात असल्याचे वाचले होते. रोमन साम्राज्यात प्रतिष्ठा लाभलेल्या हिंगाचा वापर युरोपातही अशाप्रकारे होत होता, पण ते कोसळल्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत युरोपात हिंगाचा वापर जवळजवळ बंदच झाला. (त्याविषयी थोडी महिती पुढच्या भागात येइल.)

छान ! हिंगपुराण आवडले. अवांतर : "तुला कोणी हिंग लावूनही विचारणार नाही" या म्हणीचा उगम काय असावा बरे ?

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 14/07/2023 - 09:57
"तुला कोणी हिंग लावूनही विचारणार नाही" या म्हणीचा उगम काय असावा बरे ?
नक्की माहिती नाही, पण तर्काधारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो! हिंगाचा वापर एखाद्या पदार्थाचे (स्वाद/रुची ह्या अर्थाने) मूल्यवर्धन करण्यासाठी होतो. वर प्रचेतस ह्यांनी म्हंटले आहे कि, "अगदी साध्या वरणाला देखील चिमूटभर हिंगाशिवाय चव येत नाही." त्याला सौंदाळा ह्यांनी दिलेला दुजोरा आणि व्यक्तिगत अनुभव त्या बाबतीतली हिंगाची महती स्पष्ट करतात. साध्या (गोडं) वरणाला खरंतर काहीच चव नसते पण डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हिंग घातल्यावर तिचा स्वाद/चव एकदम बदलून ते देखील चविष्ट लागते. थोडक्यात एखाद्या बेचव पदार्थात हिंग घातले कि त्याचे स्वाद/रुचीमुल्य वृद्धिंगत होऊन तो पदार्थ चवदार होतो. "एखादी व्यक्ती/पदार्थ इतकी उपयोगशून्य/बेचव आहे कि तिला/तिच्यात हिंग लावून/घालूनही तिची उपयुक्तता/चव वाढणार नाही, ती किंमतशून्यच राहणार" अशा काहीशा अर्थाने हि म्हण वापरली जात असावी असे मला वाटते. बाकी तज्ज्ञांनी त्यावर अधिक प्रकाश टाकावा हि विनंती!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 14/07/2023 - 10:38
हिंग लावून विचारणें-मानणें-मोजणें-(नकारार्थी प्रयोग) = मानणें; आदर देणें; महत्त्व देणें (हिंग महाग असल्यानें महत्त्वाच्या पदार्थांतच वापरतात, यावरून).

आलो आलो 13/07/2023 - 15:00
अगदीच हिंगाळून काढलाय लेख . बाकी प्रतिक्रिया सुद्धा काही कमी रोचक नाहीत हो .... मस्त मस्त मस्त. मिपा वर खूपच तज्ञ आणि अभ्यासू लोक असल्याची ग्वाही मिळते वेळोवेळी. धन्यवाद टर्मिनेटर भाऊ अत्यंत अभ्यासू असा लेख तोही काहीशा दुर्लक्षित मात्र तरीही पाहिजेच अशा पदार्थावर लिहिलात. दू भा प्र

In reply to by आलो आलो

टर्मीनेटर 14/07/2023 - 10:09
बाकी प्रतिक्रिया सुद्धा काही कमी रोचक नाहीत हो .... मस्त मस्त मस्त. मिपा वर खूपच तज्ञ आणि अभ्यासू लोक असल्याची ग्वाही मिळते वेळोवेळी.
अगदी...अगदी... कित्येकदा मुळ धग्यातील माहितीपेक्षा अधिक चांगली आणि परिपुर्ण माहिती ही तज्ञ, अभ्यासू, व्यासंगी मिपाकरांच्या प्रतिसादांतुन मिळते असा माझाही अनुभव आहे!

उत्तम हिंग परामर्श घेतलेला आहे पूर्ण लेखात. माझ्या माहितीत तरी फक्त तांदूळ पिठी मिसळून हिंग कंपौंड केला जातो असे वाचीव आठवते.
नैसर्गिक डिंक मिसळून ते तयार केले जाते.
हा नैसर्गिक डिंक मात्र गुवार गम/ गवार गम/ गवारीच्या शेंगा पासून मिळणारा चिकट डिंक असतो. कमोडिटी मार्केट मध्ये एक अतिशय रोबस्टली ट्रेडिंग होणारी कमोडिटी म्हणजे हा गम होय. खाद्यपदार्थात चिकटपणा लागतो तिथे, जिथे पदार्थ "स्लरी" करून वापरायचे असतात तिथे कैक पदार्थांत गवार गम वापरला जातो, शिवाय त्याचे कैक इंडस्ट्रिअल युज पण असतात असे ऐकून आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

टर्मीनेटर 14/07/2023 - 10:21
गुवार गम/ गवार गम बद्दलची माहिती रोचक आहे! चांगल्या प्रतिचा कंपाउंडेड असफोटिडा बनवताना 'गम अरेबिक' (बाभळीचा डिंक) वापरतात असे ऐकुन्/वाचुन आहे. पण जसे लेखात म्हंटले आहे कि,
'बांधानी हिंग' बनवताना कच्चामाल म्हणून वापरलेल्या शुद्ध हिंगाचा प्रकार (पांढरे किंवा लाल हिंग) आणि मिश्रणासाठी वापरलेल्या अन्य घटक पदार्थांचा प्रकार, दर्जा आणि प्रमाण ह्यावर तयार झालेल्या हिंगाचा रंग, स्वाद आणि किंमत अवलंबून असते.
त्याप्रमाणे कॉस्ट कटिंग च्या उद्देशाने स्वस्त हिंग तयार करण्यासाठी ह्या 'गुवार गम/ गवार गम'चा वापर होत असण्याची शक्यता नाकरता येत नाही.

आणि अतिशय अभ्यासू प्रतिसाद मांदियाळी वाचून आनंद झाला. ह्या निमित्ताने एक जबरी भारी लेखमाला सुरू करता येईल. त्या मध्ये आपण जर पोर्तुगीज ग्रेट एक्सचेंज घेतला तर अक्षरशः एक पूर्ण विशेषांक होईल इतके लेख पडतील. पोर्तुगीज ग्रेट एक्सचेंज मुळे सकारात्मक पाहता कैक देशांतील भूकबळी कमी झालेत अन् नकारात्मक पाहता कैक देशातील एतद्देशी वाणे नष्ट झाल्याचे पण उदाहरणे आहेत.

In reply to by इपित्तर इतिहासकार

टर्मीनेटर 14/07/2023 - 11:05
@ इपित्तर इतिहासकार, ग्रेट एक्सचेंज विषयीची कल्पना फारच आवडली आहे! गंमत म्हणजे तळटिपेत लिहिलेल्या 'भारता बाहेरील हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग' ह्याविषयी पुढ्च्या भागात येणऱ्या ब्राझिल मध्ये हिंग कसा पोचला असाव ह्याचा विचार करताना त्यामागे हे पोर्तुगिज कनेक्शन असावे ह्याच निष्कर्षाप्रत मी आलो असल्याचे लिहिले आहे 😀 अर्थात तो केवळ माझा तर्क असून त्याला कुठलाही अधिकृत संदर्भ नाही. असो, 'द ग्रेट एक्सचेंज'चे तीन पैलु आहेत - वनस्पती, प्राणी आणि रोग/आजार. ह्यापैकि हवा तो पैलु निवडुन आपण स्वयंस्फुर्तिने त्यावर लेख लिहुन सप्टेंबर मध्ये प्रकाशित होणऱ्या 'गणेश लेख मालिकेसाठी' पाठवु शकतो कि! तसंही गलेमा साठी थीम वगैरे नसते, आणि गणपती १९ सप्टेंबरला आहेत त्यामुळे जवळपास दोन महिने आपल्या हातात आहेत लेखन करण्यासाठी. पहिल्या दोन पैलुंवर आपण लिहिले आणि तिसऱ्या रोग्/आजाराच्या पैलुवर मिपावरच्या सन्माननिय डॉक्टर मंडळींनी लिहिले तर खरंच छान विशेषांक होउ शकेल ह्या विषयावर 👍

चामुंडराय 14/07/2023 - 16:35
छान आणि माहितीपूर्ण लेख. भारतीय अन्न आवडणाऱ्या आणि स्वतः घरी विविध पदार्थ करणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याला मी हिंगाबद्दल माहिती दिली. तेव्हा तो एका भारतीय ग्रोसरी स्टोअर मध्ये गेला आणि तेथील एकाला म्हणाला, आय ऍम लुकिंग फॉर हिंग. हिंग ??? हा हिंग म्हणतोय हे ऐकून त्या ग्रोसरीवाल्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले डू यू नो व्हॉट हिंग इज? येस, असाफेह्टीडा. मग त्याचे हिंगावर विविध प्रयोग सुरू झाले. परंतु त्याने एक तक्रार केली. हिंगाची डबी पँन्ट्रीत ठेवली आणि पँन्ट्रीचा दरवाजा उघडला तर एकदम भपकन हिंगाचा तीव्र वास यायचा आणि सगळ्या स्वयंपाक घरात पसरायचा. तेव्हा त्याने हिंगाची डबी झिप्लॉक पिशवीत आणि हवाबंद डब्यात ठेवली व जेव्हा पाहिजे तेव्हाच उघडायला लागला. मी त्याला म्हणालो आम्हाला लहानपणापासून सवय असते त्यामुळे असा तीव्र वास येत नाही आणि ह्या (बांधानी) हिंगात इतर पदार्थ मिसळून त्याची तीव्र चव आणि वास कमी करतात. शुद्ध स्वरूपातील हिंगाची तीव्रता खूप जास्त असते. इति हिंगपुराणोध्यायः समाप्तम्

टर्मीनेटर 16/07/2023 - 23:38
अथांग आकाश। चामुंडराय । प्रा.डॉ.दिलीप बिरुटे । अभय भावे प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चामुंडराय, भारी किस्सा! हिंगाची डबी नीट बंद न करता फ्रिजमध्ये ठेवली तर त्यातले अन्य पदार्थ (जे शिजवताना हिंग वापरला जात नाही असे) खाण्यालायक राहात नाहीत हा अनुभव घेतल्याने तुमच्या सहकाऱ्याच्या किस्स्याशी चांगला रिलेट झालो 😀 @ अभय भावे, २९:४५ मिनिटांचा व्हिडीओ आहे, फुरसत मध्ये बघतो 👍

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 18/07/2023 - 00:05
अशी कविताही आहे? अर्थात असेलही! कवितांशी काही प्रकाशवर्षांचे अंतर राखुन असल्याने मलातरी त्याबद्दल माहिती असणे शक्य नाही 😀 जाणकारांनी 'त्या' विषयी अवश्य प्रतिसादावे!

In reply to by कपिलमुनी

कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!! अशी पाखरे येती, चाळीमध्ये बटाट्याच्या या चिमण्यांनो परत फिरा रे, साद देती हिमशिखरांच्या फुलराणी मग नाजुक हसते, तांदूळ निवडता निवडता आणि अंमलदार वटारुन डोळे, काठी घेई अंगा कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!!

टर्मीनेटर 19/07/2023 - 17:08
ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न वरती एका प्रतिसादात केला आहे. त्यावरच्या उप-प्रतिसादात कुमार१ साहेबांनी एक संदर्भही दिला आहे!

टर्मीनेटर 07/08/2023 - 14:56
Nitin Palkar | स्वराजित | निमी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ राजेंद्र मेहेंदळे
कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!! अशी पाखरे येती, चाळीमध्ये बटाट्याच्या...
हे अद्भुत काव्य स्वरचीत म्हणायचं का चोप्य पस्ते 😀

कंजूस 07/08/2023 - 17:49
१)गांधार प्रांताची आजच आठवण झाली. अशोकाचे राज्य गांधार ते उत्कल,कलिंग (ओडिशा). २)मुलींना तिसरी नंतर शाळा बंद हा कालच फतवा निघाला आहे. ३) इराण ( पर्शिया)सहल शक्य आहे. ती करा. कारण राजकीय घडामोडींमुळे इराणच्याच लोकांना इराण पाहता आला नव्हता . फळांचा देश,केशर,पुलाव,बागेचे कलाकार -जन्नत के चारबाग. ४)तसेच चीनच्या कम्युनिस्ट सरकारमुळे चिनी लोकांना चीन माहीत नव्हता.

टर्मीनेटर 14/10/2024 - 22:26
ह्या लेख मालिकेची सुरुवातच ज्यांच्या एका जाहिरातीने केली होती ते सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे ह्यांचे आज दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो 🙏

चौकस२१२ 16/10/2024 - 10:18
अतुल परचुरे यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि त्याचे महत्व या वरून आठवले ते आभाळमाया नामक गाजलेल्या मालिकेतील कलाकारांच्या मुलखाती चा हा कार्यक्रम बघ त्यात संजय मोने यांनी भाषा समजणे यावर म्होरून जाणे यावर एक किस्सा सांगितलला आहे https://www.youtube.com/watch?v=OjwiBHP6ECg

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 17/10/2024 - 09:27
मस्त व्हिडीओ आहे! वास्तविक नाटक, दूरचित्रवाणी मालिका बघण्याचा मला अजिबात शौक नाही (उलट तिटकाराच आहे 😀) त्यामुळे 'आभाळमाया' ह्या मालिकेचा एकही एपिसोड मी कधीही बघितलेला नसला, आणि ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांपैकी चित्रपट माध्यमामूळे परिचित झालेल्या सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि मनोज जोशी ह्या तीन दिग्गज कलाकारांव्यतिरिक्त कोणालाही नावाने किंवा त्यांच्या कामामुळे ओळखत नसलो तरी काल रात्री संपूर्ण व्हिडीओ पाहिला आणि तो आवडला 👍 'म्होरून' वाला किस्सा भारीच! तसेच 'चांदनी बार', 'कॉर्पोरेट', 'एक चालीस कि लास्ट ट्रेन' वगैरे चित्रपटांतील भूमिकांमुळे परिचित झालेल्या परंतु, "प्रभाकर्ण श्रीपेरवर्धना अटापट्टू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली येक्य परमपील पेरंबदूर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर" असे छोटेसे 'पेट नेम' असणाऱ्या व्यक्तीच्या 'धमाल' चित्रपटातील आपल्या अगदी लहानशा (उण्यापुऱ्या २ मिनिटांच्या) धमाल भूमिकेमूळे कायमस्वरूपी स्मरणात राहिलेल्या कै. विनय आपटे ह्या दिग्गज कलावंत/दिग्दर्शका विषयीचे किस्सेही खूप आवडले! एका चांगल्या व्हिडीओच्या लिंकसाठी धन्यवाद 🙏

अजुन एका माहीतीपूर्ण लेखमालेची सुरुवात. ही मालिका नक्कीच उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही. वाखुसा. आणि हो!! मी पयला!!

Bhakti 10/07/2023 - 22:32
टर्मीनेटर कमाल लेख लिहिलात.खोडातील चिकापासून हिंग बनतो , आश्चर्यकारक!

किल्लेदार 11/07/2023 - 01:42
सगळ्यात जास्त हिंग अफगाणिस्तानातून येतं एवढंच माहिती होतं. खऱ्या स्रोताची माहिती आत्ता कळली. आता अफगाणिस्तानला "हिंगुस्तान" म्हणायला काही हरकत नाही.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 11/07/2023 - 15:21
राजेंद्र मेहेंदळे । भक्ति । किल्लेदार प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @किल्लेदार - अफगाणिस्तान साठी 'हिंगुस्तान' हे पर्यायी नाव आवडले 😀

कंजूस 11/07/2023 - 05:48
नवीन बाईपण सिनेमावर काही खुसखुशीत पण हिंगासारखी कडक टीका असावी वाटलं. पण.... खरंच हिंग पुराण निघालं. अजून दोन भाग म्हणजे अफगाणिस्तान भटकंती केलेली दिसतेय.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 11/07/2023 - 15:33
रीडर । कुमार१। कंकाका प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
अजून दोन भाग म्हणजे अफगाणिस्तान भटकंती केलेली दिसतेय.
@कंकाका - अफगाणिस्तानात भटकंती झाली नाहीये अजून, पण नजीकच्या भविष्यात एक धावती भेट दिली जाण्याची शक्यता मात्र आहे! आणि पुढचा भाग शेवटचा असेल, खरंतर एकाच भागात लेख आवरायचा होता पण लांबी वाढत चालल्याने त्याचे दोन भाग करतोय 😀

चलत मुसाफिर 11/07/2023 - 06:13
हिंग कसे निर्माण होते हा प्रश्न कधीच डोक्यात आला नव्हता. सुंदर व माहितीपूर्ण लेख. मजा आली वाचायला.

गवि 11/07/2023 - 06:39
रोचक आणि माहितीपूर्ण रंजक लेख. विषय देखील खमंग. हिंग हा सर्व बेसिक मसाल्यांतील सर्वाधिक आवडता. अवांतर: आणखी एक जाणवले. अफगाणिस्तान, इराण, इराक यांबद्दल आपली एक विशिष्ट प्रतिमा असते मनात. वाळवंट, कोरडे रखरखीत. पण तरीही अनेक पदार्थ तिथेच खास किंवा अधिक प्रमाणात उत्पादित होतात. कॉफी (जरी सर्वाधिक उत्पादन हल्ली व्हिएतनाम करत असला तरी), पिस्ते, खजूर, अफू , ऑलिव्ह (चुभुद्याघ्या) आणि आता ही हिंग देखील तिथलीच.

In reply to by गवि

टर्मीनेटर 12/07/2023 - 10:47
वाळवंट, कोरडे रखरखीत. पण तरीही अनेक पदार्थ तिथेच खास किंवा अधिक प्रमाणात उत्पादित होतात.
खरं आहे! ह्या देशांना निसर्ग सौन्दर्य बहाल करण्याच्या बाबतीत सृष्टीनिर्मात्याने हात आखडता घेतला असला तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि पदार्थांचे वरदान दिले आहे.
कॉफी (जरी सर्वाधिक उत्पादन हल्ली व्हिएतनाम करत असला तरी), पिस्ते, खजूर, अफू , ऑलिव्ह (चुभुद्याघ्या)
कॉफी, पिस्ते, खजूर, अफू, ऑलिव्ह निर्मितीत आजघडीचे आघाडीचे देश म्हणजे: कॉफी - ब्राझील, व्हिएतनाम आणि कोलंबिया कॉफीच्या भारतातील आगमनाची कथा गमतीशीर आहे. १६७० साली 'बाबा बुदान' नावाच्या सुफी संताने मक्केच्या यात्रेहून परतताना येमेन मधून कॉफीच्या सात बिया 'आपल्या दाढीत लपवून' आणल्या (त्याकाळी कॉफीच्या बिया अरबस्तानाच्या बाहेर नेण्यास मज्जाव होता) आणि त्या कर्नाटकातील चिकमंगळुरु येथील टेकडीवर पेरल्या. परंतु इतिहास संशोधकांच्या मते त्याआधीही केरळच्या मलबार प्रांतात कॉफी अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. १६१६ मध्ये जहांगीराच्या दरबारातही कॉफीच्या वापराचे उल्लेख आहेत त्यामुळे भारतात कॉफी आणण्याचे श्रेय ते अरब व्यापाऱ्यांना देतात. पुढे ब्रिटिशांनी भारतात व्यावसायिक स्तरावर कॉफीचे उत्पादन सुरु केले, आता कॉफी उत्पादनात भारत सहाव्या क्रमांकावर आहे. पिस्ता - अमेरिका, इराण आणि टर्की खजूर - इजिप्त, सौदी अरेबिया आणि इराण अफू - अफगाणिस्तान, म्यानमार, कोलंबिया अधिकृतरीत्या अफू उत्पादनात भारतही आघाडीवर आहे, अर्थात त्याची सुरुवात ब्रिटिशांनी केली. नीमच, मध्यप्रदेश येथे Government Opium and Alkaloid Works हि अफू (opium) बनवणारी/त्यावर प्रक्रिया करणारी जगातली सर्वात मोठी फॅक्टरी आहे जिथे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात परवानाधारक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अफूवर प्रक्रिया केली जाते. गाझीपूर, उत्तरप्रदेश येथील ह्या कंपनीची दुसरी फॅक्टरी युपी प्रदूषण नियंत्रक मंडळाने २०१७ साली पर्यावरणाशी संबंधित कारणांमुळे बंद केली. ऑलिव्ह - स्पेन, इटली, ग्रीस

In reply to by टर्मीनेटर

खरं आहे! ह्या देशांना निसर्ग सौन्दर्य बहाल करण्याच्या बाबतीत सृष्टीनिर्मात्याने हात आखडता घेतला असला तरी
ह्या वक्तव्याशी टोटल असहमत मी तरी. इराण/ अफगाणिस्तान हे निरतिशय सुंदर देश असून अफगाणिस्तान मधील कैक विभाग तर पार काश्मीर अन् गिलगिट ह्यांच्या तोडीचे असल्याचे पाहून मला नवल वाटले होते. (संदर्भ - डिस्कवरी चॅनल वरील काही डॉक्युमेंटरी)
१६७० साली 'बाबा बुदान' नावाच्या सुफी संताने मक्केच्या यात्रेहून परतताना येमेन मधून कॉफीच्या सात बिया 'आपल्या दाढीत लपवून' आणल्या (त्याकाळी कॉफीच्या बिया अरबस्तानाच्या बाहेर नेण्यास मज्जाव होता)
हाच संदर्भ खरा. (टेकडीला) आता बाबा बुदानगिरी म्हणतात. लागवडी लायक कच्च्या कॉफी बिया आणणारी हस्ती बाबा बुदानच. त्याच्या आधी मुघल दरबार अन् केरळातील कॉफी references हे अरब व्यापाऱ्यांच्या संदर्भात आहेत ते बरोबर आहे पण हे अरब व्यापारी कॉफी पिण्याला इतके चाटावलेले असत की ते भाजलेल्या (रोस्टेड) कॉफी बीन्स घेऊनच फिरत आपापल्या शिध्यांत. तीच त्यांनी आपल्या केरळी अन् मुघल भारतीय यजमानांना पाजली असण्याचा संभव आहे असे वाटते. त्याहून मोठी गंमत ही की कॉफीचे मूलस्थान हे अरब देश/ सौदी नाही तर इथिओपिया आहे. Ethiopian Highlands मध्ये एकदा एका मेंढपाळ माणसाला कोकरे एका विशिष्ट झाडाचा पाला खाऊन तेज होऊन उड्या मारत असताना दिसले आणि त्याने स्वतः पहिले तर तो पाला उकळून प्यायला. तिथून सुरुवात कॉफीची (हा संदर्भ मला एकदा तपासून घ्यायला हवा पण तो बरोबर असावा असे वाटते आहे. अर्थात लिटर लिटर कॉफी रोज रीचवणाऱ्या अमेरिकेतील नॅशनल कॉफी असोसिएशन ऑफ यू.एस. ए ने सुद्धा कॉफीचे इथिओपियन मूळ मान्य केले आहे).

In reply to by तुषार काळभोर

मलासुद्धा असेच वाटायचं की 'बंधानी' हे अडवाणी... वासवानी... च्या धर्तीवरील सिंधी आडनाव (ब्रँड) आहे ... कि ज्याची मोनोपॉली आहे हिंग मार्केटवर ...

विवेकपटाईत 11/07/2023 - 09:00
गेल्या वर्षी भारताने 829 कोटीचे हिंग आयात केले. शंभर कोटीचे निर्यात. आज लाहौल घाती आणि उत्तराखंड मध्ये उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न होत आहे.

प्रचेतस 11/07/2023 - 09:23
व्वा...!, एकदम चवदार धागा. अगदी साध्या वरणाला देखील चिमूटभर हिंगाशिवाय चव येत नाही. हिंग मात्र वनस्पतीपजन्य आहे हे माहित नव्हते. हे नैसर्गिक खनिज (हिमालयीन मिठासारखे) असावे असाच समज होता. हरिवंशात हिंगाचा उल्लेख पुढिलप्रमाणे येतो. पार्श्वानि चान्ये शकलानि तत्र ददु: पशूनां घृतमृक्षितानि। सामुद्रचूर्णैरवचूर्णितानि चूर्णेन मृष्टेन समारिचेन।। समूलकैर्दाडिममातुलिंगै: पर्णासहिंग्वापर्द्रकभूस्तृणैश्च। तदोपदंशै: सुमुखोत्त रैस्तेि पानानि हृष्टा: पपुरप्रमेया:।। स्वयंपाक्यांनी तयार केलेली पशूंची शुद्ध मांसे व गोड तसेच मीठ इत्यादी पदार्थांची तयार केलेली पक्वान्ने त्यांना वाढली. पुष्कळ तूप घालून तळलेले पशूंच्या कुशीच्या मांसाचे तुकडे मीठ आणि मिरपूड यात चांगले घोळून त्यांना दिले. मुळ्यासह डाळिंबे, अजबला, हिंग, आले व अळू यांचा त्यांनी आस्वाद घेतला. आनंदित (यादवांनी) सुंदर अशी पेयपात्रे आपल्या मुखास लावून पेय प्राशन केले. ह्या अध्यायात तत्कालिन मांसाहारी बार्बेक्यूचे अजूनही चविष्ट वर्णन आहे.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 12/07/2023 - 11:38
चलत मुसाफिर । तुषार काळभोर । विवेकपटाईत । प्रचेतस प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ प्रचेतस हरिवंशातील हिंगाच्या उल्लेखाची छान माहिती दिलीत...
ह्या अध्यायात तत्कालिन मांसाहारी बार्बेक्यूचे अजूनही चविष्ट वर्णन आहे.
भरताबाहेर काही देशांमध्ये आपण काही पदार्थांवर चाट मसाला शिंपडतो तसे फळांवर आणि बार्बेक्यूवर हिंग शिंपडण्यची पद्धत जुन्या काळापासुन आहे. मला सफरचंद, कलिंगड, अननस अशी फळे मिठ आणि चाट मसाला घालुन खायला आवडतात, आता एकदा त्यांवर (आणि तंदुरी चिकनवर) हिंग शिंपडुन खाउन बघायचंय चव कशी लागते ते 😀

In reply to by टर्मीनेटर

सुरिया 13/07/2023 - 15:43
बर्‍याच वडापाव वाल्यांकडे मी पाहिले की आतली भाजी बनवताना ते उकडलेले बटाटे, आले, मिरचि, कोथिंबीर मिक्स करतात. त्याची भाजी नाही बनवत आपण करतो तशी. तशा सारणावर ते हिंग टाकतात विदाऊट फोडणी.

In reply to by सुरिया

टर्मीनेटर 14/07/2023 - 10:31
अरे वाह! पुढच्या वेळी घरी बटाटावडा बनवायचा घाट घतला कि हा प्रयोग करुन बघणार! तसंही आपण घरी पदार्थ बनवताना रेसिपिकडे फार काटेकोरपणे लक्ष देतो, तरी त्यांना बाहेरच्या पदार्थाची चव येतेच असे नाही 😀 त्यामुळे हि क्लुप्ती वापरुन बघयला हरकत नाही.

वामन देशमुख 11/07/2023 - 11:02
हिंगपुराण आवडले. --- स्वयंपाकातील माझा आवडता घटक म्हणजे हिंग. परवा उत्तराखंडातील धनौल्टी इथून एक हिंग आणला. तो हिंग तेथीलच पहाडांतून गोळा केलाय असा तिथल्या विक्रेत्याचा दावा होता. खरेखोटे देव जाणो, पण त्या हिंगाचा वास अगदी भारी होता. अधूनमधून स्वयंपाकात वापरतो. --- कुणाचा अवमान करण्याच्या हेतूरहित अवांतर: "बांधणी हिंग म्हणजे शुद्ध हिंगात इतर बंधके मिसळून तयार केलेला विक्रीयोग्य हिंग" हे अनेकांना माहित नाही हे आश्चर्यकारक वाटले.

उपवासाच्या पदार्थात हिंग वापरला जात नाही. ह्यासंबंधी माहिती देताना मुंबई ग्राहक पंचायतीच्या एका कार्यक्रमात असे सांगितले होते कि, 'आपण वापरतो तो 'बांधानी' हिंग असतो. ह्याचा अर्थच बांधलेला, काही पदार्थ वापरून एकत्र केलेला असा हा हिंग आहे. त्यात उपवासाला न चालणारे घटक असतात म्हणून, उपवासाचे पदार्थ करताना हिंगाचा वापर करत नाहीत.' आज ह्याबद्दल अधिक माहिती मिळाली.

हिंगाचा लेख एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. :) पुढील हिंगाच्या... आय मीन लेखाच्या प्रतिक्षेत. सं - दी - प

यश राज 11/07/2023 - 12:41
हिंग कसा बनतो याची जिज्ञासा होतीच. शंका निरसन झाले. अप्रतिम लेख. थोडेसे अवांतर: प्रतापगड(राजस्थान) मधून माझी आई बऱ्याचदा हिंग मागवते. हा हिंग अगदी द्रवसर असतो म्हणजेच बांधनी नसतो. या हिंगाचा खूप घमघमाट सुटतो. आई मग २ चमचे धण्याच्या पूड मध्ये अगदी चिमटीत मावेल एवढा हिंग मिसळून टाकते व डबीत भरून ठेवते.आणि मग ती हिंगाची धने पावडर बंधनी हिंगा प्रमाणे फोडणीत वापरते.. स्वादच स्वाद हिंगाचा.

In reply to by यश राज

टर्मीनेटर 12/07/2023 - 13:04
सौंदाळा । वामन देशमुख । अनिकेत वैद्य । चांदणे संदीप । यश राज प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ यश राज
प्रतापगड(राजस्थान) मधून माझी आई बऱ्याचदा हिंग मागवते. हा हिंग अगदी द्रवसर असतो म्हणजेच बांधनी नसतो. या हिंगाचा खूप घमघमाट सुटतो.
शुद्ध स्वरूपातल्या हिंगाचा वास खूप उग्र असल्याने स्वयंपाकासाठी वापरताना त्याचे प्रमाण ठरवणे अवघड असते. त्यावर सोयीस्कर उपाय म्हणून 'बांधानी हिंग' हा प्रकार अस्तित्वात आला. गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्ये घाऊक प्रमाणात जेवण बनवणारे आचारी (महाराज) लोकं बांधानी हिंगापेक्षा शेंगदाणा किंवा ऑलिव्ह अशा दिर्घकाळ टिकणाऱ्या तेलात विरघळवलेल्या लाल हिंगाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. तुमची आई मागवते ते अशाप्रकारचे हिंग असावे अर्थात त्यात शुद्ध हिंगाचे प्रमाण बांधानी हिंगापेक्षा खूप जास्त असल्याने त्याचा वास सौम्य करण्यासाठी त्यात धन्याची पूड मिसळावी लागणे सहाजिक आहे. शुद्ध हिंग, बांधानी हिंग (पावडर, क्रिस्टल आणि खडा), तेलात मिसळलेला द्रवरूप हिंग आणि इसेन्शिअल ऑइल अशा अनेक स्वरूपातला हिंग बाजरात मिळतो आणि त्याचा वापर स्वयंपाकासाठी आणि बांधानी व तेलमिश्रित सोडून अन्य प्रकारांचा औषध निर्मितीसाठी केला जातो तर खड्या बांधानी हिंगाचा वापर घाऊक प्रमाणात घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर विविध मसाले तयार करण्यासाठी केला जातो. पण बांधानी हिंग घरगुती वापरासाठी सर्वात सोयीस्कर प्रकार असल्याने त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे.

धन्यवाद बांबू लागवडी नंतरची, हिंग लागवड, ही पण ह्या केंद्र सरकारची उत्तम योजना आहे ... जितकी आयात कमी, तितके आर्थिक स्थैर्य जास्त ...

चित्रगुप्त 11/07/2023 - 20:50
छान माहितीपूर्ण लेख. अवांतरः हल्ली ज्याला अफगाणिस्थान म्हटले जाते, तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता, त्यापूर्वीचाही पुष्कळ इतिहास असणारच. .

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 11/07/2023 - 21:09
हल्ली ज्याला अफगाणिस्थान म्हटले जाते, तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता,
भाग होता ह्याचा अर्थ म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने तो भाग जिंकला होता, वास्तविक हा पूर्वापार चालत आलेल्या विविध भटक्या टोळ्यांनी भरलेला प्रदेश, ह्यावर दीर्घकाळपर्यन्त कोणत्याच राजाचे स्वामित्व राहिले नाही. चंद्रगुप्त ते अशोकापर्यन्त हा भाग मौर्यांच्या वर्चस्वाखाली राहिला मात्र नंतर पुन्हा इथे टोळ्यांचे राज्य सुरू झाले. महाभारतात कर्णपर्वात ह्या भागात राहणाऱ्या लोकांची कर्णाने भयंकर निंदा केली आहे, मद्र, वाहिक, बाल्हिक इत्यादी प्रांतांची कर्ण अत्यंत निर्भत्सना करतो. कर्ण-शल्य संवादाचे हे वर्णन मूळातूनच वाचण्यासारखे आहे.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 12/07/2023 - 15:15
मुक्त विहारि। चित्रगुप्त । कर्नलतपस्वी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चित्रगुप्त
तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता
हो... २००१ साली तालिबानचा माथेफिरू संस्थापक मुल्ला ओमर ह्याच्या आदेशावरून उध्वस्त करण्यात आलेल्या बामियानच्या, सहाव्या आणि सातव्या शतकात कोरलेल्या दोन भव्य प्राचीन बुद्धमूर्तींवर असलेला गुप्त कला शैलीचा प्रभाव हा त्याचा सबळ पुरावा मानता येईल. नवव्या शतकापर्यंत बौद्ध धर्मियांचे महत्वाचे धार्मिकस्थळ म्हणून ओळख असलेल्या ह्या प्रदेशावर पुढे झालेल्या इस्लामिक आक्रमणांनंतर दहाव्या शतकापर्यंत परिस्थिती पूर्ण बदलली. वर प्रचेतस ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे विविध भटक्या टोळ्यांनी भरलेल्या ह्या प्रदेशात पूर्वीही कधीच एकसंधता नव्हती आणि आता हजार वर्षांहून अधिक काळ इस्लामच्या झेंड्याखाली असला तरी ह्या प्रदेशातल्या टोळ्यांमधील वांशिक मतभेदांमुळे एक देश म्हणून अजूनही त्यांच्यात एकसंधता आलेली नाही. असो, आता पुन्हा तो देश तालिबान्यांच्या हातात गेला आहे, त्यांच्या कुठल्या माथेफिरु नेत्याने भारताची पंचईत करण्यासाठी हिंगाच्या शेतांना आगी नाही लावल्या म्हणजे मिळवले 😀

चित्रगुप्त 11/07/2023 - 22:03
कर्ण-शल्य संवादाचे हे वर्णन मूळातूनच वाचण्यासारखे आहे.
महाभारताचे सगळे खंड घेऊन वाचायचे आजवर राहून गेले, आणि आता कितपत जमेल याची शंकाच आहे. जालावर मराठी वा हिंदीत ते उपलब्ध असल्यास कुठे आहे ? आणि कर्ण-शल्य संवाद त्यात कुठे आहे ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 12/07/2023 - 06:18
सुरुवातीला सत्संगधारा संस्थळावर मराठी pdf च्या लिंक्स उपलब्ध होत्या असे स्मरते ओण आता दिसत नाहीत, मात्र sanskrit documentsवर महाभारताच्या विविध प्रती संस्कृत मधून उपलब्ध आहेत ते इंग्रजी अनुवाद sacred-texts वर उपलब्ध आहे, मराठी अनुवाद मात्र कुठे दिसत नाही, ग्रंथ विकत घेऊन वाचणेच श्रेयस्कर कारण हा महाग्रंथ जालावर मराठीत मिळाला तरी तो स्क्रीनवर वाचणे कठीणच. कर्ण -शल्य संवाद कर्णपर्वाच्या सुरुवातीला, जेव्हा कर्ण शल्याची सारथी म्हणून नियुक्ती करतो तेव्हा येतो

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 12/07/2023 - 18:02
अनेक आभार प्रचेतस. हिंदीत 'महासमर' या नावाने श्री. नरेन्द्र कोहली यांचा नऊ खंडातील ग्रंथ वाचनीय आहे. https://amzn.eu/d/5b9BPLH

In reply to by चित्रगुप्त

लेख मस्त. पुरातन कालात अफगाणिस्तानातील हिंग महाराष्ट्र तील हिंगणघाटातून येवून हिंगोलीत जमा होत असे काही ऐकल्या सारखे....... हल्ली कान वाजतात.

चौकस२१२ 13/07/2023 - 05:42
भरताबाहेर काही देशांमध्ये आपण काही पदार्थांवर चाट मसाला शिंपडतो तसे फळांवर आणि बार्बेक्यूवर हिंग शिंपडण्यची पद्धत जुन्या काळापासुन आहे. हे पहिल्यांदाच ऐकले BBQ "रब" साठी मसाले वापरतात पण त्यात काली मिरी किंवा चिनी मिरी असते, जिऱ्याची पूड असते कधी, पण हिंग नाही ऐकले कोणत्या देशात?

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 14/07/2023 - 09:13
सुखी | चौकस२१२ प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 'सॉंग्स ऑफ ब्लड अँड स्वॉर्ड' हे फातिमा भुत्तो लिखित पुस्तक पाच-सहा वर्षांपूर्वी वाचनात आले होते. त्यांचे पिता, 'मुर्तझा भुत्तो' ह्यांची हत्या घडवून आणण्यात मुर्तझा भुत्तो ह्यांचीच सक्खी बहीण 'बेनझीर भुत्तो' आणि तिचे पती असिफ अली झरदारी ह्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप ह्या पुस्तकातून त्यांनी केला होता. त्या पुस्तकात त्यांनी आपल्या पित्याबरोबर बैरुत आणि दमास्कस मध्ये घालवलेल्या काळाचे फार छान वर्णन केले होते, ज्यात बैरुत येथे सहलीला गेल्यावर तिथे मुर्तझा भुत्तो ह्यांनी बनवलेल्या 'बार्बेक्यू'चा उल्लेख वाचला आणि कुतूहल चाळवले म्हणून लेबनीज, सिरियन खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला असता लेबनॉन, सीरिया आणि जॉर्डनमधल्या पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती असलेली एक PDF सापडली होती. त्यात भाजलेल्या मांसाचा (बार्बेक्यू) स्वाद वृद्धिंगत करण्यासाठी त्यावर हिंगाचा शिडकावा केला जात असल्याचे वाचले होते. रोमन साम्राज्यात प्रतिष्ठा लाभलेल्या हिंगाचा वापर युरोपातही अशाप्रकारे होत होता, पण ते कोसळल्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत युरोपात हिंगाचा वापर जवळजवळ बंदच झाला. (त्याविषयी थोडी महिती पुढच्या भागात येइल.)

छान ! हिंगपुराण आवडले. अवांतर : "तुला कोणी हिंग लावूनही विचारणार नाही" या म्हणीचा उगम काय असावा बरे ?

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 14/07/2023 - 09:57
"तुला कोणी हिंग लावूनही विचारणार नाही" या म्हणीचा उगम काय असावा बरे ?
नक्की माहिती नाही, पण तर्काधारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो! हिंगाचा वापर एखाद्या पदार्थाचे (स्वाद/रुची ह्या अर्थाने) मूल्यवर्धन करण्यासाठी होतो. वर प्रचेतस ह्यांनी म्हंटले आहे कि, "अगदी साध्या वरणाला देखील चिमूटभर हिंगाशिवाय चव येत नाही." त्याला सौंदाळा ह्यांनी दिलेला दुजोरा आणि व्यक्तिगत अनुभव त्या बाबतीतली हिंगाची महती स्पष्ट करतात. साध्या (गोडं) वरणाला खरंतर काहीच चव नसते पण डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हिंग घातल्यावर तिचा स्वाद/चव एकदम बदलून ते देखील चविष्ट लागते. थोडक्यात एखाद्या बेचव पदार्थात हिंग घातले कि त्याचे स्वाद/रुचीमुल्य वृद्धिंगत होऊन तो पदार्थ चवदार होतो. "एखादी व्यक्ती/पदार्थ इतकी उपयोगशून्य/बेचव आहे कि तिला/तिच्यात हिंग लावून/घालूनही तिची उपयुक्तता/चव वाढणार नाही, ती किंमतशून्यच राहणार" अशा काहीशा अर्थाने हि म्हण वापरली जात असावी असे मला वाटते. बाकी तज्ज्ञांनी त्यावर अधिक प्रकाश टाकावा हि विनंती!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 14/07/2023 - 10:38
हिंग लावून विचारणें-मानणें-मोजणें-(नकारार्थी प्रयोग) = मानणें; आदर देणें; महत्त्व देणें (हिंग महाग असल्यानें महत्त्वाच्या पदार्थांतच वापरतात, यावरून).

आलो आलो 13/07/2023 - 15:00
अगदीच हिंगाळून काढलाय लेख . बाकी प्रतिक्रिया सुद्धा काही कमी रोचक नाहीत हो .... मस्त मस्त मस्त. मिपा वर खूपच तज्ञ आणि अभ्यासू लोक असल्याची ग्वाही मिळते वेळोवेळी. धन्यवाद टर्मिनेटर भाऊ अत्यंत अभ्यासू असा लेख तोही काहीशा दुर्लक्षित मात्र तरीही पाहिजेच अशा पदार्थावर लिहिलात. दू भा प्र

In reply to by आलो आलो

टर्मीनेटर 14/07/2023 - 10:09
बाकी प्रतिक्रिया सुद्धा काही कमी रोचक नाहीत हो .... मस्त मस्त मस्त. मिपा वर खूपच तज्ञ आणि अभ्यासू लोक असल्याची ग्वाही मिळते वेळोवेळी.
अगदी...अगदी... कित्येकदा मुळ धग्यातील माहितीपेक्षा अधिक चांगली आणि परिपुर्ण माहिती ही तज्ञ, अभ्यासू, व्यासंगी मिपाकरांच्या प्रतिसादांतुन मिळते असा माझाही अनुभव आहे!

उत्तम हिंग परामर्श घेतलेला आहे पूर्ण लेखात. माझ्या माहितीत तरी फक्त तांदूळ पिठी मिसळून हिंग कंपौंड केला जातो असे वाचीव आठवते.
नैसर्गिक डिंक मिसळून ते तयार केले जाते.
हा नैसर्गिक डिंक मात्र गुवार गम/ गवार गम/ गवारीच्या शेंगा पासून मिळणारा चिकट डिंक असतो. कमोडिटी मार्केट मध्ये एक अतिशय रोबस्टली ट्रेडिंग होणारी कमोडिटी म्हणजे हा गम होय. खाद्यपदार्थात चिकटपणा लागतो तिथे, जिथे पदार्थ "स्लरी" करून वापरायचे असतात तिथे कैक पदार्थांत गवार गम वापरला जातो, शिवाय त्याचे कैक इंडस्ट्रिअल युज पण असतात असे ऐकून आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

टर्मीनेटर 14/07/2023 - 10:21
गुवार गम/ गवार गम बद्दलची माहिती रोचक आहे! चांगल्या प्रतिचा कंपाउंडेड असफोटिडा बनवताना 'गम अरेबिक' (बाभळीचा डिंक) वापरतात असे ऐकुन्/वाचुन आहे. पण जसे लेखात म्हंटले आहे कि,
'बांधानी हिंग' बनवताना कच्चामाल म्हणून वापरलेल्या शुद्ध हिंगाचा प्रकार (पांढरे किंवा लाल हिंग) आणि मिश्रणासाठी वापरलेल्या अन्य घटक पदार्थांचा प्रकार, दर्जा आणि प्रमाण ह्यावर तयार झालेल्या हिंगाचा रंग, स्वाद आणि किंमत अवलंबून असते.
त्याप्रमाणे कॉस्ट कटिंग च्या उद्देशाने स्वस्त हिंग तयार करण्यासाठी ह्या 'गुवार गम/ गवार गम'चा वापर होत असण्याची शक्यता नाकरता येत नाही.

आणि अतिशय अभ्यासू प्रतिसाद मांदियाळी वाचून आनंद झाला. ह्या निमित्ताने एक जबरी भारी लेखमाला सुरू करता येईल. त्या मध्ये आपण जर पोर्तुगीज ग्रेट एक्सचेंज घेतला तर अक्षरशः एक पूर्ण विशेषांक होईल इतके लेख पडतील. पोर्तुगीज ग्रेट एक्सचेंज मुळे सकारात्मक पाहता कैक देशांतील भूकबळी कमी झालेत अन् नकारात्मक पाहता कैक देशातील एतद्देशी वाणे नष्ट झाल्याचे पण उदाहरणे आहेत.

In reply to by इपित्तर इतिहासकार

टर्मीनेटर 14/07/2023 - 11:05
@ इपित्तर इतिहासकार, ग्रेट एक्सचेंज विषयीची कल्पना फारच आवडली आहे! गंमत म्हणजे तळटिपेत लिहिलेल्या 'भारता बाहेरील हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग' ह्याविषयी पुढ्च्या भागात येणऱ्या ब्राझिल मध्ये हिंग कसा पोचला असाव ह्याचा विचार करताना त्यामागे हे पोर्तुगिज कनेक्शन असावे ह्याच निष्कर्षाप्रत मी आलो असल्याचे लिहिले आहे 😀 अर्थात तो केवळ माझा तर्क असून त्याला कुठलाही अधिकृत संदर्भ नाही. असो, 'द ग्रेट एक्सचेंज'चे तीन पैलु आहेत - वनस्पती, प्राणी आणि रोग/आजार. ह्यापैकि हवा तो पैलु निवडुन आपण स्वयंस्फुर्तिने त्यावर लेख लिहुन सप्टेंबर मध्ये प्रकाशित होणऱ्या 'गणेश लेख मालिकेसाठी' पाठवु शकतो कि! तसंही गलेमा साठी थीम वगैरे नसते, आणि गणपती १९ सप्टेंबरला आहेत त्यामुळे जवळपास दोन महिने आपल्या हातात आहेत लेखन करण्यासाठी. पहिल्या दोन पैलुंवर आपण लिहिले आणि तिसऱ्या रोग्/आजाराच्या पैलुवर मिपावरच्या सन्माननिय डॉक्टर मंडळींनी लिहिले तर खरंच छान विशेषांक होउ शकेल ह्या विषयावर 👍

चामुंडराय 14/07/2023 - 16:35
छान आणि माहितीपूर्ण लेख. भारतीय अन्न आवडणाऱ्या आणि स्वतः घरी विविध पदार्थ करणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याला मी हिंगाबद्दल माहिती दिली. तेव्हा तो एका भारतीय ग्रोसरी स्टोअर मध्ये गेला आणि तेथील एकाला म्हणाला, आय ऍम लुकिंग फॉर हिंग. हिंग ??? हा हिंग म्हणतोय हे ऐकून त्या ग्रोसरीवाल्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले डू यू नो व्हॉट हिंग इज? येस, असाफेह्टीडा. मग त्याचे हिंगावर विविध प्रयोग सुरू झाले. परंतु त्याने एक तक्रार केली. हिंगाची डबी पँन्ट्रीत ठेवली आणि पँन्ट्रीचा दरवाजा उघडला तर एकदम भपकन हिंगाचा तीव्र वास यायचा आणि सगळ्या स्वयंपाक घरात पसरायचा. तेव्हा त्याने हिंगाची डबी झिप्लॉक पिशवीत आणि हवाबंद डब्यात ठेवली व जेव्हा पाहिजे तेव्हाच उघडायला लागला. मी त्याला म्हणालो आम्हाला लहानपणापासून सवय असते त्यामुळे असा तीव्र वास येत नाही आणि ह्या (बांधानी) हिंगात इतर पदार्थ मिसळून त्याची तीव्र चव आणि वास कमी करतात. शुद्ध स्वरूपातील हिंगाची तीव्रता खूप जास्त असते. इति हिंगपुराणोध्यायः समाप्तम्

टर्मीनेटर 16/07/2023 - 23:38
अथांग आकाश। चामुंडराय । प्रा.डॉ.दिलीप बिरुटे । अभय भावे प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ चामुंडराय, भारी किस्सा! हिंगाची डबी नीट बंद न करता फ्रिजमध्ये ठेवली तर त्यातले अन्य पदार्थ (जे शिजवताना हिंग वापरला जात नाही असे) खाण्यालायक राहात नाहीत हा अनुभव घेतल्याने तुमच्या सहकाऱ्याच्या किस्स्याशी चांगला रिलेट झालो 😀 @ अभय भावे, २९:४५ मिनिटांचा व्हिडीओ आहे, फुरसत मध्ये बघतो 👍

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 18/07/2023 - 00:05
अशी कविताही आहे? अर्थात असेलही! कवितांशी काही प्रकाशवर्षांचे अंतर राखुन असल्याने मलातरी त्याबद्दल माहिती असणे शक्य नाही 😀 जाणकारांनी 'त्या' विषयी अवश्य प्रतिसादावे!

In reply to by कपिलमुनी

कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!! अशी पाखरे येती, चाळीमध्ये बटाट्याच्या या चिमण्यांनो परत फिरा रे, साद देती हिमशिखरांच्या फुलराणी मग नाजुक हसते, तांदूळ निवडता निवडता आणि अंमलदार वटारुन डोळे, काठी घेई अंगा कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!!

टर्मीनेटर 19/07/2023 - 17:08
ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न वरती एका प्रतिसादात केला आहे. त्यावरच्या उप-प्रतिसादात कुमार१ साहेबांनी एक संदर्भही दिला आहे!

टर्मीनेटर 07/08/2023 - 14:56
Nitin Palkar | स्वराजित | निमी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ राजेंद्र मेहेंदळे
कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!! अशी पाखरे येती, चाळीमध्ये बटाट्याच्या...
हे अद्भुत काव्य स्वरचीत म्हणायचं का चोप्य पस्ते 😀

कंजूस 07/08/2023 - 17:49
१)गांधार प्रांताची आजच आठवण झाली. अशोकाचे राज्य गांधार ते उत्कल,कलिंग (ओडिशा). २)मुलींना तिसरी नंतर शाळा बंद हा कालच फतवा निघाला आहे. ३) इराण ( पर्शिया)सहल शक्य आहे. ती करा. कारण राजकीय घडामोडींमुळे इराणच्याच लोकांना इराण पाहता आला नव्हता . फळांचा देश,केशर,पुलाव,बागेचे कलाकार -जन्नत के चारबाग. ४)तसेच चीनच्या कम्युनिस्ट सरकारमुळे चिनी लोकांना चीन माहीत नव्हता.

टर्मीनेटर 14/10/2024 - 22:26
ह्या लेख मालिकेची सुरुवातच ज्यांच्या एका जाहिरातीने केली होती ते सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे ह्यांचे आज दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो 🙏

चौकस२१२ 16/10/2024 - 10:18
अतुल परचुरे यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि त्याचे महत्व या वरून आठवले ते आभाळमाया नामक गाजलेल्या मालिकेतील कलाकारांच्या मुलखाती चा हा कार्यक्रम बघ त्यात संजय मोने यांनी भाषा समजणे यावर म्होरून जाणे यावर एक किस्सा सांगितलला आहे https://www.youtube.com/watch?v=OjwiBHP6ECg

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 17/10/2024 - 09:27
मस्त व्हिडीओ आहे! वास्तविक नाटक, दूरचित्रवाणी मालिका बघण्याचा मला अजिबात शौक नाही (उलट तिटकाराच आहे 😀) त्यामुळे 'आभाळमाया' ह्या मालिकेचा एकही एपिसोड मी कधीही बघितलेला नसला, आणि ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांपैकी चित्रपट माध्यमामूळे परिचित झालेल्या सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि मनोज जोशी ह्या तीन दिग्गज कलाकारांव्यतिरिक्त कोणालाही नावाने किंवा त्यांच्या कामामुळे ओळखत नसलो तरी काल रात्री संपूर्ण व्हिडीओ पाहिला आणि तो आवडला 👍 'म्होरून' वाला किस्सा भारीच! तसेच 'चांदनी बार', 'कॉर्पोरेट', 'एक चालीस कि लास्ट ट्रेन' वगैरे चित्रपटांतील भूमिकांमुळे परिचित झालेल्या परंतु, "प्रभाकर्ण श्रीपेरवर्धना अटापट्टू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली येक्य परमपील पेरंबदूर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर" असे छोटेसे 'पेट नेम' असणाऱ्या व्यक्तीच्या 'धमाल' चित्रपटातील आपल्या अगदी लहानशा (उण्यापुऱ्या २ मिनिटांच्या) धमाल भूमिकेमूळे कायमस्वरूपी स्मरणात राहिलेल्या कै. विनय आपटे ह्या दिग्गज कलावंत/दिग्दर्शका विषयीचे किस्सेही खूप आवडले! एका चांगल्या व्हिडीओच्या लिंकसाठी धन्यवाद 🙏

मिसेस पोद्दार ने पेश कि बेसनगट्टे कि सब्जी
मिसेस मोंगा ने बनाई दाल मखनी
मिसेस चॅटर्जी कि बैंगन भाजी
मिसेस नायर का सांबार
मिसेस गुप्ता का राजमा
और मिसेस विरानी का उंधियू

वाह! सबको मिलते है दस में से दस...
अब चिट निकालके हि होगा मिसेस शेफ का फैसला...

इन दस नंबरीयोंने ऐसा क्या डाला कि स्वाद हुवा निराला?

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

कॉमी ·

तुमच्या वाचनाचा व चित्रपट पाहणे / माहिती असण्याचा अवाका मोठा आहे. दाद द्यावीशी वाटली म्हणून आवर्जुन उल्लेख केला. बाकी हा चित्रपट पा.खु. मनात साठवून ठेवत आहे...

टर्मीनेटर 02/07/2023 - 12:14
रोचक कथानक! चित्रपट परीचय आवडला 👍 'द डिपार्टेड' आणि 'वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' हे स्कोर्सेजीचे सिनेमे आवडले असल्याने 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' हा त्याचा आगामी चित्रपटही नक्की बघणार!

कल्पनाच भारी वाटते. परिक्षण आवडले. कदाचित आमच्या कुटुंबातील तरूणाई कडे हे पुस्तक असावे. वाचण्याचा प्रयत्न करावा असा विचार डोकावतो.

मार्टिन स्कॉर्सेजी आणि लिओनार्डो डीकप्रिओ, रॉबर्ट डीनिरो, ब्रॅण्डन फ्रेसिअर म्हणजे उत्तम चित्रपट पाहण्याची मेजवानी.

तुमच्या वाचनाचा व चित्रपट पाहणे / माहिती असण्याचा अवाका मोठा आहे. दाद द्यावीशी वाटली म्हणून आवर्जुन उल्लेख केला. बाकी हा चित्रपट पा.खु. मनात साठवून ठेवत आहे...

टर्मीनेटर 02/07/2023 - 12:14
रोचक कथानक! चित्रपट परीचय आवडला 👍 'द डिपार्टेड' आणि 'वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' हे स्कोर्सेजीचे सिनेमे आवडले असल्याने 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' हा त्याचा आगामी चित्रपटही नक्की बघणार!

कल्पनाच भारी वाटते. परिक्षण आवडले. कदाचित आमच्या कुटुंबातील तरूणाई कडे हे पुस्तक असावे. वाचण्याचा प्रयत्न करावा असा विचार डोकावतो.

मार्टिन स्कॉर्सेजी आणि लिओनार्डो डीकप्रिओ, रॉबर्ट डीनिरो, ब्रॅण्डन फ्रेसिअर म्हणजे उत्तम चित्रपट पाहण्याची मेजवानी.
"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात." मार्टिन स्कॉर्सेजी हा जगप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आजच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांच्या यादीत त्याची गणना होते.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

ग्रंथ प्रकाशन सोहोळा - अज्ञात पानिपत

मनो ·

शशिकांत ओक 06/06/2023 - 21:36
जुन्या पिढीतील इतिहासकारांनी जे कष्टपूर्वक आदर्श निर्माण केले, ते मनोज दाणींच्या रूपाने आज पहायला मिळतात. 'अज्ञात पानिपत' या नव्या पुस्तकातील अनुक्रमणिका वाचून पानिपतची लढाई मराठी मनाला आजही कशी मोहवते याचा प्रत्यय येतो. पानिपतची ८ तासाची लढत कशी हेलकावत होती, मराठा साम्राज्याचे लष्करी अधिकारी कसे वागले, का वागले, भावनिकता कधी, का हावी झाली, या घटनांची नोंद या ग्रंथात वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे. अवास्तव कथने, वाताहतीचे आकडे यावर मनोज दाणींच्या लेखनातून प्रकाश टाकला आहे. त्यामुळे या मराठीतील ग्रंथाला वाचनार्थ अनेक उत्सुक वाचक मिळतील.

टर्मीनेटर 07/06/2023 - 07:42
अभिनंदन! एका इतिहास संशोधक मिपाकराचे आणखीन एक पुस्तक प्रकाशित होत असल्याचा एक मिपाकर म्हणुन प्रचंड अभिमान वाटतोय. पुस्तक प्रकशन सोहळ्यासाठी शुभेच्छा 👍

शशिकांत ओक 06/06/2023 - 21:36
जुन्या पिढीतील इतिहासकारांनी जे कष्टपूर्वक आदर्श निर्माण केले, ते मनोज दाणींच्या रूपाने आज पहायला मिळतात. 'अज्ञात पानिपत' या नव्या पुस्तकातील अनुक्रमणिका वाचून पानिपतची लढाई मराठी मनाला आजही कशी मोहवते याचा प्रत्यय येतो. पानिपतची ८ तासाची लढत कशी हेलकावत होती, मराठा साम्राज्याचे लष्करी अधिकारी कसे वागले, का वागले, भावनिकता कधी, का हावी झाली, या घटनांची नोंद या ग्रंथात वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे. अवास्तव कथने, वाताहतीचे आकडे यावर मनोज दाणींच्या लेखनातून प्रकाश टाकला आहे. त्यामुळे या मराठीतील ग्रंथाला वाचनार्थ अनेक उत्सुक वाचक मिळतील.

टर्मीनेटर 07/06/2023 - 07:42
अभिनंदन! एका इतिहास संशोधक मिपाकराचे आणखीन एक पुस्तक प्रकाशित होत असल्याचा एक मिपाकर म्हणुन प्रचंड अभिमान वाटतोय. पुस्तक प्रकशन सोहळ्यासाठी शुभेच्छा 👍
प्रकाशन समारंभाची तारीख ठरविताना एक मोठा योग्य जुळून आला. ज्येष्ठ इतिहास-संशोधक मा. श्री. गणेश हरी उर्फ तात्या खरे यांच्या स्मृतीनिमित्त भारत इतिहास संशोधक मंडळ दर वर्षी काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असते. यावेळी त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत माझे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मला मिळते आहे, हा एका अर्थाने तात्यांचा आशीर्वादच आहे असे मी समजतो. या पुस्तकात तात्यांच्या संशोधनाचा आधार मी अनेक जागी घेतलेला आहे. विशेषत: त्यांनी दिलेले मोगल दरबारचे अखबार मी पुष्कळ वापरलेले आहेत.