ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हिंदू, मुस्लिम आणि शीख यांप्रमाणेच दलितांसाठीदेखील स्वतंत्र मतदार संघ असावा ह्या बाजूने होते. भीमराव आंबेडकरांनी नंतर सांगितले की त्यांनी नेपल्सहून पंतप्रधानांना पत्र लिहिले होते आणि ते त्यांच्या सांगण्यावरूनच हे झाले होते. आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना तिन्ही गोलमेज परिषदात निमंत्रित करण्यात आले होते आणि तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता.
गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली आणि या दलित मतदारासंघांचा विरोध केला. दलितांच्या हक्कासाठी आपले जीवन अर्पण करीन, पण त्यांना हिंदूंपासून वेगळे होऊ देणार नाही, अशी शपथही त्यांनी घेतली.