मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'अज्ञात पानिपत'

मनो ·

मी पहिला- नुसत्या पुस्तकाला शुभेच्छा देणाराच नव्हे तर पुस्तक प्री-ऑर्डर करणारा सुध्दा. आताच पुस्तक प्री-ऑर्डर केले आहे. १६ जूनपर्यंत मिळेल असे अ‍ॅमॅझॉन म्हणत आहे. पुस्तक वाचायची प्रचंड उत्सुकता आहे.

Bhakti 02/06/2023 - 18:00
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!

In reply to by प्रचेतस

मनो 02/06/2023 - 18:47
धन्यवाद वल्लीशेठ. रविवारी ११ जून, संध्याकाळी भांडारकर संस्थेत श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या हस्ते प्रकाशनाचे ठरते आहे, त्यावेळी मोकळे असाल तर जरूर या, भेटूया. आमंत्रण पुढील आठवड्यात सर्वांना पाठवितो. जमणार नसेल तर नंतर कट्टा करू!

चित्रगुप्त 02/06/2023 - 22:06
मनो, पुस्तकाची खूप काळापासून वाट बघत होतो. इंदौरच्या एका मित्राच्या पत्त्यावर मिळण्यासाठी आत्ताच ऑर्डरिले आहे. सध्या पुढील काही महिने अमेरिकेत असल्याने इथे उपलब्ध होत असेल तर एक प्रत इथल्यासाठीही घेईन म्हणतो. कसे मागवायचे ते कळवा. एकाद्या विषयाचा निदिघ्यास घेऊन सांगोपांग अभ्यास- संशोधन करणे, त्यासाठी वर्षानुवर्षे वेळ काढणे, कष्ट उपसणे, प्रवास, प्रत्यक्ष लेखन, संपादन, चित्रे-नकाशे इत्यादिकांची जुळवणी ... या सगळ्या गोष्टी करण्याचा उत्साह आणि चिकाटी सध्याच्या काळात फार कमी लोकांमधे असेल. तुम्ही नोकरी, प्रपंच वगैरे सगळे सांभाळून हे करत आहात ही खूपच कौतुकाची आणि मोलाची बाब आहे. पुढील सर्व उद्यमासाठी अनेक शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

मनो 03/06/2023 - 10:28
धन्यवाद काका, ०२ जुलै रोजी अमेरिकेत परत येतो आहे. सोबत काही प्रती घेऊन येईन, त्यांपैकी एक तुम्हाला जरूर पाठवेन.

कंजूस 03/06/2023 - 05:43
कुणालाही पानिपत युद्धावर अभ्यास करायचा असेल, आपले बलदंड पूर्वज तिथे कसे लढले हे जाणून घायचे असेल तर पुढील शंभर वर्षेतरी माझा हा ग्रंथ त्यांना वाचणे आयश्यक ठरेल असे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून हे पुस्तक लिहिलेले आहे. तसेच पुस्तकाची ओळखही आवडली. मी पुस्तके विकत घेण्याचं टाळतो परंतू नक्कीच वाचेन. इतिहासाची नवनवीन साधने मिळवून हे पानीपत युद्धावर लिहिलेले पुस्तक मराठ्यांच्या इतिहासावर चांगले भाष्य करेल. तर कोह- इ- नूर पुण्यात असता . .‌.‌.‌ यावरून William Dalrymple चे पुस्तक The History of the World's Most Infamous Diamond - Koh I Noor आठवले.

काशीराज शिवदेव हा मूळचा औरंगाबाद (संभाजीनगर) येथील ब्राह्मण होता. दख्खनचा रहिवासी असल्याने त्याला मराठ्यांच्या आणि पेशव्यांच्याबद्दल उत्तम माहिती होती. ओह ही माहिती नवीन आहे, धन्स. -दिलीप बिरुटे (औरंगाबादकर-संभाजीनगरकर)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:51
नमस्ते सर, आपण दिलेल्या लिंक वरून पुस्तक ऑर्डर केले आहे. वाचण्यासाठी उत्सुक आहे. पण एक अभिप्राय वा अनुभव देखील व्यक्त करावासा वाटतो. सह्याद्री बुक्स संदर्भात - बुकिंग केल्यावर केवळ एक SMS आला पण जी माझी शंका त्यांना ई-मेल द्वारे पाठविली होती त्याला ना उत्तर आले ना वेबसाईट वर दिलेलल्या फोन नंबर वर कैक वेळा कॉल करुन देखील कधी त्यांनी प्रतिसाद दिला. मी बेंगलोर ला असल्यामुळे पुस्तकाच्या delivery बद्दल काही प्रश्न होते. अशा सुस्त व dull वर्तनामुळे ग्राहक/वाचक निश्चितच दुरावतात. असो आपल्या पुस्तकाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

In reply to by PIYUSHPUNE

मनो उत्तर देतील तेव्हा देतील मात्र पुस्तक प्रकाशनाशी संबंधित लोक अजुनही १८५७ मधे जगत आहेत. त्यांच्याकडून त्वरीत ईमेल चे उत्तर वगैरे कॉर्पोरेट कल्चर च्या अपेक्षा ठेवू नका. सुखी व्हाल. :)

In reply to by PIYUSHPUNE

मनो 15/06/2023 - 23:53
आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. मी स्वतः प्रकशकांशी बोलून त्यांच्या नजरेस ही बाब आणून देतो. तुमची शंका मला ९७८३३ ६७६३८ या माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करून किंवा मेसेज करून जरूर विचारा, मी सह्याद्री बुक्स यांच्या मलकांशी बोलून तुमची समस्या सोडवून देतो.

काल पुस्तक मिळाले. Panipat पुस्तक वाचायला सुरवात केली आहे. अगदी पहिल्या पानापासून शेकडो-हजारो संदर्भ तपासून त्यातून तेव्हा काय झाले असेल याविषयी केलेला अचाट अभ्यास वाक्यावाक्यातून दिसत आहे. माझ्याच्याने हे पुस्तक वाचून समजावून घ्यायलाच दोन-चार वर्षे लागतील असे वाटत आहे :) कधी लिहिलेत इतके सगळे?

In reply to by केदार-मिसळपाव

मनो 15/06/2023 - 23:56
जर्मनीचे पाठविण्याचे चार्जेस एका पुस्तकाचे साधारण २,५०० रुपये पर्यन्त सांगत आहेत. त्यांच्याशी बोलून काही कमी होत असेल तर कळवतो. भारतात येणार असाल तर मात्र पटकन देऊ शकतो.

In reply to by Trump

मनो 18/06/2023 - 01:11
थेट माझ्याकडून घ्यायचे असेल तर मला ९७८३३ ६७६३८ या मोबाईल क्रमांकावर पत्ता पाठवा आणि मी दिलेल्या UPI आयडीवर Rs ९०० पाठवा. अन्यथा amazon किंवा सह्याद्री books या वेबसाईट, भारत इतिहास संशोधक मंडळ किंवा पुण्यातील प्रमुख पुस्तक दुकानांत मिळेल.

मी पहिला- नुसत्या पुस्तकाला शुभेच्छा देणाराच नव्हे तर पुस्तक प्री-ऑर्डर करणारा सुध्दा. आताच पुस्तक प्री-ऑर्डर केले आहे. १६ जूनपर्यंत मिळेल असे अ‍ॅमॅझॉन म्हणत आहे. पुस्तक वाचायची प्रचंड उत्सुकता आहे.

Bhakti 02/06/2023 - 18:00
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!

In reply to by प्रचेतस

मनो 02/06/2023 - 18:47
धन्यवाद वल्लीशेठ. रविवारी ११ जून, संध्याकाळी भांडारकर संस्थेत श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या हस्ते प्रकाशनाचे ठरते आहे, त्यावेळी मोकळे असाल तर जरूर या, भेटूया. आमंत्रण पुढील आठवड्यात सर्वांना पाठवितो. जमणार नसेल तर नंतर कट्टा करू!

चित्रगुप्त 02/06/2023 - 22:06
मनो, पुस्तकाची खूप काळापासून वाट बघत होतो. इंदौरच्या एका मित्राच्या पत्त्यावर मिळण्यासाठी आत्ताच ऑर्डरिले आहे. सध्या पुढील काही महिने अमेरिकेत असल्याने इथे उपलब्ध होत असेल तर एक प्रत इथल्यासाठीही घेईन म्हणतो. कसे मागवायचे ते कळवा. एकाद्या विषयाचा निदिघ्यास घेऊन सांगोपांग अभ्यास- संशोधन करणे, त्यासाठी वर्षानुवर्षे वेळ काढणे, कष्ट उपसणे, प्रवास, प्रत्यक्ष लेखन, संपादन, चित्रे-नकाशे इत्यादिकांची जुळवणी ... या सगळ्या गोष्टी करण्याचा उत्साह आणि चिकाटी सध्याच्या काळात फार कमी लोकांमधे असेल. तुम्ही नोकरी, प्रपंच वगैरे सगळे सांभाळून हे करत आहात ही खूपच कौतुकाची आणि मोलाची बाब आहे. पुढील सर्व उद्यमासाठी अनेक शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

मनो 03/06/2023 - 10:28
धन्यवाद काका, ०२ जुलै रोजी अमेरिकेत परत येतो आहे. सोबत काही प्रती घेऊन येईन, त्यांपैकी एक तुम्हाला जरूर पाठवेन.

कंजूस 03/06/2023 - 05:43
कुणालाही पानिपत युद्धावर अभ्यास करायचा असेल, आपले बलदंड पूर्वज तिथे कसे लढले हे जाणून घायचे असेल तर पुढील शंभर वर्षेतरी माझा हा ग्रंथ त्यांना वाचणे आयश्यक ठरेल असे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून हे पुस्तक लिहिलेले आहे. तसेच पुस्तकाची ओळखही आवडली. मी पुस्तके विकत घेण्याचं टाळतो परंतू नक्कीच वाचेन. इतिहासाची नवनवीन साधने मिळवून हे पानीपत युद्धावर लिहिलेले पुस्तक मराठ्यांच्या इतिहासावर चांगले भाष्य करेल. तर कोह- इ- नूर पुण्यात असता . .‌.‌.‌ यावरून William Dalrymple चे पुस्तक The History of the World's Most Infamous Diamond - Koh I Noor आठवले.

काशीराज शिवदेव हा मूळचा औरंगाबाद (संभाजीनगर) येथील ब्राह्मण होता. दख्खनचा रहिवासी असल्याने त्याला मराठ्यांच्या आणि पेशव्यांच्याबद्दल उत्तम माहिती होती. ओह ही माहिती नवीन आहे, धन्स. -दिलीप बिरुटे (औरंगाबादकर-संभाजीनगरकर)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:51
नमस्ते सर, आपण दिलेल्या लिंक वरून पुस्तक ऑर्डर केले आहे. वाचण्यासाठी उत्सुक आहे. पण एक अभिप्राय वा अनुभव देखील व्यक्त करावासा वाटतो. सह्याद्री बुक्स संदर्भात - बुकिंग केल्यावर केवळ एक SMS आला पण जी माझी शंका त्यांना ई-मेल द्वारे पाठविली होती त्याला ना उत्तर आले ना वेबसाईट वर दिलेलल्या फोन नंबर वर कैक वेळा कॉल करुन देखील कधी त्यांनी प्रतिसाद दिला. मी बेंगलोर ला असल्यामुळे पुस्तकाच्या delivery बद्दल काही प्रश्न होते. अशा सुस्त व dull वर्तनामुळे ग्राहक/वाचक निश्चितच दुरावतात. असो आपल्या पुस्तकाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

In reply to by PIYUSHPUNE

मनो उत्तर देतील तेव्हा देतील मात्र पुस्तक प्रकाशनाशी संबंधित लोक अजुनही १८५७ मधे जगत आहेत. त्यांच्याकडून त्वरीत ईमेल चे उत्तर वगैरे कॉर्पोरेट कल्चर च्या अपेक्षा ठेवू नका. सुखी व्हाल. :)

In reply to by PIYUSHPUNE

मनो 15/06/2023 - 23:53
आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. मी स्वतः प्रकशकांशी बोलून त्यांच्या नजरेस ही बाब आणून देतो. तुमची शंका मला ९७८३३ ६७६३८ या माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करून किंवा मेसेज करून जरूर विचारा, मी सह्याद्री बुक्स यांच्या मलकांशी बोलून तुमची समस्या सोडवून देतो.

काल पुस्तक मिळाले. Panipat पुस्तक वाचायला सुरवात केली आहे. अगदी पहिल्या पानापासून शेकडो-हजारो संदर्भ तपासून त्यातून तेव्हा काय झाले असेल याविषयी केलेला अचाट अभ्यास वाक्यावाक्यातून दिसत आहे. माझ्याच्याने हे पुस्तक वाचून समजावून घ्यायलाच दोन-चार वर्षे लागतील असे वाटत आहे :) कधी लिहिलेत इतके सगळे?

In reply to by केदार-मिसळपाव

मनो 15/06/2023 - 23:56
जर्मनीचे पाठविण्याचे चार्जेस एका पुस्तकाचे साधारण २,५०० रुपये पर्यन्त सांगत आहेत. त्यांच्याशी बोलून काही कमी होत असेल तर कळवतो. भारतात येणार असाल तर मात्र पटकन देऊ शकतो.

In reply to by Trump

मनो 18/06/2023 - 01:11
थेट माझ्याकडून घ्यायचे असेल तर मला ९७८३३ ६७६३८ या मोबाईल क्रमांकावर पत्ता पाठवा आणि मी दिलेल्या UPI आयडीवर Rs ९०० पाठवा. अन्यथा amazon किंवा सह्याद्री books या वेबसाईट, भारत इतिहास संशोधक मंडळ किंवा पुण्यातील प्रमुख पुस्तक दुकानांत मिळेल.
मर्वेन टेकनोलॉजीज् यांच्याद्वारे प्रकाशित 'अज्ञात पानिपत' या माझ्या आगामी मराठी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झाली आहे. या पुस्तकाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या पुस्तकाचे स्वरूप काय, ते कोणाला उपयुक्त ठरेल याविषयी थोडक्यात पुस्तक-परिचय इथे करून देतो आहे. मराठे आणि गिलचे यांमधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दलची नवीन आणि आजवर अज्ञात अशी माहिती देणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकाची पहिली ३५० पाने केवळ या उद्दिष्टाला वाहिलेली आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, भगूर

प्रचेतस ·

गवि 28/05/2023 - 17:43
सुंदर लेख वल्ली. धन्यवाद. या शापित वीरपुरुषाला आता कुठे मान सन्मान मिळू लागला आहे. त्यांच्याविषयी जे काही गरळ ओकले जाते त्याबद्दल काय म्हणायचे? ते सर्व आरोप म्हणून केले जातात त्याबद्दल त्यांनीच स्वतःच लिहून ठेवलेले आहे. त्यातून जणू नवीन गुप्त माहिती मिळाली असावी अशा रीतीने संदर्भहीन मुद्दा उचलून सोयीस्कर वळण देऊन त्याचा गैरवापर केला जातो. हीन प्रकारे. असो. लहानपणी रत्नागिरीत येता जाता पतित पावन मंदिर दिसत असे. त्या काळात म्हणजे १९८० दशक, सावरकरांचा सहवास लाभलेले देखील अनेक लोक हयात होते तिथे. अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. पन्नास वर्षे तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर निघून त्यांनी त्याही परिस्थितीत जे शक्य होते ते समाजकार्य केले. जाती पाती मिटवण्यासाठी खूप केले. हिंदू कट्टरता हा विवादास्पद मुद्दा असेलही. पण हेतू प्रामाणिक होते. गांधी, नेहरू , सावरकर, बोस , पटेल या सर्वांचे ध्येय प्रामाणिक आणि पक्के होते. मार्ग, श्रद्धा विभिन्न असतील. कोणीच यापैकी कोणावरही विनाकारण चिखल उडवू नये. पुढचे भविष्य आणखी उत्तम करण्यासाठी काही करावे. _/\_

विनम्र अभिवादन. आपल्या मताशी सहमत आहे. आमचे गाव नाही ज्यांच्या नावामुळे देशभरात गाव ओळखले जाते त्या हुतात्मा राजगुरूंच्या घराचे सुद्धा इतक्या वर्षांनंतर पुनरूज्जीवन झाले आहे. या स्मारका बदल ची शासकीय उदासीनता आम्ही बघीतली आहे. स्वातंत्र्यानंतर पंचवीसाव्या वर्षात ,१९७२ महाराष्ट्र सरकारने सर्व हुतात्म्यांच्या गावात वेगळे,एकाच प्रकारचे ,डिझाईनचे स्मारक बांधले. तेच पैसे त्यांच्या जन्मस्थानी खर्च केले असते तर.... जालियनवाला बाग सन पंच्याहत्तर च्या आसपास बघीतली होती ती बाग आणी आजचे तीचे स्वरूप जमीन अस्मानाचा फरक आहे. स्वातंत्र्या साठी जो लढला तो स्वातंत्र्य वीर. त्यांची पद्धत कुठलीही असो, राजकारण व व्यक्तीगत पातळीवरचे मत बाजुला ठेवून त्यांचा आदर झालाच पाहीजे. हे सर्व खुप पुर्वीच व्हायला हवे होते.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 28/05/2023 - 17:59
हुतात्मा राजगुरुंच्या घराला नुकतीच भेट दिलेली असल्याने स्मारकाचा नीटनेटकेपणा नजरेस भरला. मात्र अजूनही काम करायला हवे आहे. काही वर्षांपूर्वी तर हे स्मारक पूर्णपणे पडक्या अवस्थेत होतं.

श्रीगुरुजी 28/05/2023 - 17:59
महान क्रांतिकारक, महान समाजसुधारक, महान भाषासुधारक, महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलैला अत्यंत सुंदर लेख! २०१७ मध्ये अंदमानात सहलीसाठी गेलो होतो. पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचल्यानंतर लगेचच सेल्युलर तुरूंग पाहण्यास गेलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या खोलीत ११ वर्षे डांबून ठेवले होते त्या तीर्थस्थळाचे दर्शन घेतले. सर्वांनी सामूहिक जयोस्तुते काव्याचे स्तवन केले. मणीशंकर अय्यर नावाच्या नराधमाने २००४ मध्ये मंत्रीपद मिळाल्याऩतर द्वेषाची उबळ असह्य झाल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खोलीच्या भिंतीवर कोरलेल्या कमला नावाच्या काव्यावर चुना फासून एक महान ऐतिहासिक ठेवा नष्ट करून आपली द्वेषाची उबळ पूर्ण केल्याचे पाहून दु:ख झाले व संतापही आला. सायंकाळी तुरूंगाच्या आवारात दृकश्राव्य कार्यक्रम पाहताना अचानक मनात विचार आला की बरोबर १०० वर्षांपूर्वी याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर याच खोलीत बंद असतील व तेव्हा त्यांच्या मनात कोणते विचार घोळत असतील? या महान स्वातंत्र्यवीरांना साष्टांग दंडवत!

In reply to by श्रीगुरुजी

मणीशंकर अय्यर नावाच्या नराधमाने २००४ मध्ये मंत्रीपद मिळाल्याऩतर द्वेषाची उबळ असह्य झाल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खोलीच्या भिंतीवर कोरलेल्या कमला नावाच्या काव्यावर चुना फासून एक महान ऐतिहासिक ठेवा नष्ट करून आपली द्वेषाची उबळ पूर्ण केल्याचे पाहून दु:ख झाले व संतापही आला. कोती मानसिकता,उच्च दर्जाचे लांगुलचालन व सत्तेच्या लोभाने आलेले बुद्धीमांद्य. बाकी काय.

Bhakti 28/05/2023 - 18:01
उत्तम लेख! "ने मजसी ने"या गीताने देशभक्ती,भाषेचा आनंद, शांती अजून भरपूर काही दिले आहे. स्वा.सावरकर यांचे अनेक तेजस्वी पैलू समजले.

चौकस२१२ 29/05/2023 - 07:06
,सावरकर देशभक्त / क्रांतिवीर तर ते होतेच पण त्याबरोबर समाज सुधारक , आणि स्वतःचं धर्मात सुद्धा वैन्यायिक दृशीतकोन ठेवून बदल केले पाहिजेत या विचारांचे होते . "हे नृसिंह प्रभू शिवाजी जी राजा" हे गीत लिहणाऱ्याला.. या आणि त्याकाळच्या कर्मठ समाजात पतित पावन मंदिराचं द्वारे दलितांना मंदिर प्रवेश हा विषय उचलून धरणाऱ्याला आज जी हलकट वृत्तीची मंडळी केवळ त्याच्या जातीवरून झोडपत आहेत हे महाराष्ट्राच्या भूमीला शोभत नाही ... पण बोलणार कोण आणि ऐकणार कोण? विठ्ठलाची पूजा करण्यापासून माजी मुख्यमंतऱ्यानं केवळ त्यांचं जातीमुळे थांबवण्रा हा समाज ! आज कदाचित सावरकरांना जेवढा मान उत्तर भारतात आहे त्याच्या पेक्षा कमीच महाराष्ट्रात आहे ... एकीकडे निधर्मवाद जोपासा म्हणत स्वतःच जातीयवाद पसरवणाऱ्या आणि हिंदू विरोधी सतत भूमिका घेणाऱ्या बारामतीचं काकांना कि त्यांच्या सोडलेलया पिल्लावळीला ... ! जानवं घातलेलया "महान आत्मा गांधींना" पहिलय भेटीत "झिंगे खाने कसे चांगले " हे "समजावून" सांगणाऱ्या सावरकरांना नमसकार ( या बाबत कोणी विदा कि काय ते मागितलं तर फोडून काढीन अर्थात शाब्दिक स्वरूपात !)

सर्वसाक्षी 29/05/2023 - 10:58
सशस्त्र क्रांती पर्वात सर्वात अधिक सहभाग होता तो महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा बंगालमधील मुलं चेंडू ऐवजी बॉम्बशी खेळत मोठी झाली असे म्हटले जाते आणि ते खरे आहे. मात्र या वीरांना बॉम्ब मिळाले कसे आणि कुठून? पूर्वेतील अग्निप्रलयाचा उगम हा पश्चिमेतील वडवानलात आहे. १९०६ साली हेमचंद्र दास हा बंगाली तरूण मेकॅनिक्सचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आपले घरदार विकून विलायतेला गेला. इंग्लंड मध्ये पोचताच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली आणि तिथे येण्यामागील आपला खरा हेतू हा बॉम्ब बनवण्याचे शिक्षण हाच असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या कालखंडात पॅरिस येथे वावरत असलेल्या सफ्रान्स्की या रशियन क्रांतीकारकाशी गाठ घालून देण्यासाठी हेमचंद्र दास यांना सेनापती बापट आणि अब्बास बेग यांच्यासोबत पॅरिसला पाठवले. सफ्रान्स्की कडून बॉम्ब निर्मिती साठी मिळाली पण ती सर्व कागदपत्रे आणि नोंदी रशियन भाषेत होत्या. सेनापती बापट यांनी त्यांच्या जर्मनी येथे शिकत असलेल्या ॲना या मैत्रिणीकडून त्या सर्व कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. सेनापती बापट यांनी भाषांतराच्या २० प्रती करून घेतल्या होत्या, पैकी एक प्रत अब्बास बेग यांच्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पोचवली गेली. ६ डिसेंबर १९०७ रोजी बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नर च्या गाडीखाली बॉम्ब स्फोट झाल्याचे वाचून फ्रेंच पोलिसांनी इंग्रजी पोलीसांना काही हिंदुस्थानी तरूण इथे रशियन क्रांतीकारकाच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत हेमचंद्र दास हिंदुस्थानात पोचले होते आणि अर्थातच बॉम्बस्फोट करण्यात त्यांचा हात होता. २६ मार्च १९०८ रोजी सेनापती बापट मुंबईत परतले आणि लगोलग ७ एप्रिल रोजी ते कलकत्त्याला पोचले व त्यांनी ३४ मुरारीपुकुर येथील बॉम्ब निर्माणीला भेट दिली. पुढे त्यांनी बाळ व दत्तोपंत केळकर यांना लिहिलेल्या पत्रात " लंडन येथील वास्तव्यात पार पाडावयाचे माझे कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पार पाडले आहे" असे लिहिले होते. पुढे याच प्रयत्नात जन्माला आलेल्या बॉम्ब चा वापर ३० एप्रिल १९०८ रोजी हुतात्मा खुदीराम बोस आणि हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी किंग्जफोर्डवर केला. इंग्रज सरकार मुळापासून हादरलं आणि सरकारनं बॉम्ब बनवण्याचे ठिकाण शोधण्यासाठी जीवाचा आकांत केला व अखेर माणीकतल्ल्यातील बॉम्ब निर्माणीचा छडा लागला. तिथली सामग्री पाहून सरकारचे डोळे पांढरे झाले १ मे १९०८ रोजी हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी आपण पोलिसांकडून घेरले गेलो आहोत हे लक्षात येताच स्वतः वर गोळ्या झाडल्या आणि हौतात्म्य पत्करलं. एक विलक्षण आश्चर्य म्हणजे हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी वापरलेले पिस्तूल हे ब्राऊनिंग बनावटीचे होते आणि तरीही इंग्रज सरकारने त्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अडकवले नाही. पुढे हुतात्मा अनंत कान्हेरे प्रभृतींनी जॅक्सनचा वध केला तेव्हा याच ब्राऊनिंग पिस्तुलाच्या आधारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्या वधात गोवायचा प्रयत्न केला होता

सौंदाळा 29/05/2023 - 11:03
उत्तम समायोचित लेख सर्व फोटो आणि माहिती आवडली. वाडा जतन केल्याबद्दल शासन आणि सर्व भगूरवासीयांचे आभार. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन

युरोपात असते तसे ... जुने बांधकाम रिस्टोर करून ... वेग वेगळे पुस्तके , जुने फोटो, त्यांनी वापरलेले कपडे चष्मा पेन आदी वस्तू , ऑडिओ व्हिडीओ गाईडेड टुर ... ३ डी क्लिप्स ... सेल्फी पॉईंट्स , पर्यटकांसाठी विश्रंती गृह , मेमॉर सुविनीयर किचेन ती शर्ट वैगरे विक्री ... अश्या सुधारणा करून तिकीट लावून पर्यटन स्थळ म्हणून डेव्हेलप केले पाहिजे .. सरकारला उत्पनाचा सोर्स हि होईल स्थानिक रोजगार पण होईल , ज्यांना भेट द्यायचीये त्यांना सुविधा पण होईल ... विन विन

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 30/05/2023 - 13:31
...तिकीट लावून पर्यटन स्थळ म्हणून डेव्हेलप केले पाहिजे .. ते हि व्हायला पाहिजे पण मग रागा रागावतील ना !

हेमंतकुमार 29/05/2023 - 20:09
मराठी भाषेला ४५ शब्द देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार अभिवादन ! या शब्दांपैकी दिनांक हा सर्वोत्तम मानला जातो. या व्यतिरिक्त, हुतात्मा, गणसंख्या, क्रमांक आणि दिग्दर्शक हे शब्द मी आग्रहाने वापरतो.

In reply to by हेमंतकुमार

साहना 30/05/2023 - 13:19
फक्त ४५ ? मला वाटते आणखीन सुद्धा शब्द असावेत. मी सावरकर ह्यांचे "समग्र" साहित्य वाचले आहे (भाषणे आणि ललित साहित्य सोडून). भाषा ह्या एकाच विषयावर जरी सावरकर ह्यांनी काम केले असते तरी सुद्धा ते महान ठरले असते. इंग्रजी भाषेतील काही चांगल्या गोष्टी भारतीय भाषांत याव्यात असे त्यांना वाटायचे. एक मुद्दा होता कि मुद्रणसौकर्य, इंग्रजी भाषेंत फक्त साधी सोपी २६ अक्षरे आहेत पण देवनागरीत जोडाक्षरे वगैरे धरून असंख्य आहेत. त्यांच्या मते ए इ सारखी अक्षरे मोडीत काढून अ ह्याच मूळ अक्षरावर काना मात्रा इत्यादी लावल्या तर मुद्रण सोपे होईल. मला ह्याचे नेहमीच अप्रूप वाटले आहे. खरोखर दूर दृष्टी होती. दुसरी त्यांची सुधारणा जी आम्ही विसरून गेलो ती म्हणजे इंग्रजी भाषे प्रमाणे सामान्य नाम चे क्रियापदात रूपांतरण करणे. water चे I will water the plant ह्यांत क्रियापद झाले आहे. त्यांच्या मते "मी झाडांना पाणेन" अश्या पद्धतीने सामान्य नामाचे क्रियापद केल्यास कमी अक्षरांत जास्त सांगता येईल. (येथील उदाहरणे माझी स्वतःची आहेत). त्यांचे सर्वांत आवडते लेखन म्हणजे आपल्या वर्तमानपत्रातून ते जे गांधीजी ना ट्रॉल करायचे ते. गांधींनी यंग इंडिया मध्ये काही लिहिले कि दुसऱ्याच दिवशी सावरकर त्यांची खिल्ली उडवायचे. एके ठिकाणी गांधींनी लोकांना कन्याकुमारीहून पेशावर पर्यंत पदयात्रा काढण्याचा सल्ला दिला होता. एके ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुतळ्यावर चिखल फेकणे म्हणजे त्या पुतळ्यावर हिंसा करणे असे गांधी ह्यांनी लिहिले होते. त्याची सावरकर ह्यांनी जी पराकोटीची खिल्ली उडवली होती ते वाचून पोट दुखले.

In reply to by साहना

फक्त ४५ ? मला वाटते आणखीन सुद्धा शब्द असावेत.
मलाही तसेच वाटते. विधानसभा विधानपरिषद वगैरे शब्द सुध्दा सावरकरांची देणगी आहे. हिंदी भाषेमध्ये सुध्दा हे व तत्सम शब्द वापरात आहेत. मेयर ह्यासाठी महापौर ह्या शब्द सुचण्याचा किस्सा ही रोचक आहे.

In reply to by साहना

हेमंतकुमार 30/05/2023 - 14:06
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/karanki/savarkar/#:~:text=%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6,%E0%A4%86%E0%A4%9C%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80. .... अर्थात याहून अधिक अधिकृत संदर्भाची गरज आहे. एक मुद्दा असा: त्यांनी निर्माण केलेले शब्द आणि (पूर्वी अस्तित्वात असलेले) प्रचारात आणलेले शब्द यात गल्लत होता कामा नये.

In reply to by हेमंतकुमार

चौकस२१२ 30/05/2023 - 13:33
सावरकरांनी मराठी भाषेवर काम केले हे माहित होते पण "हुतात्मा, क्रमांक आणि दिग्दर्शक" हे तीन शब्द त्यांनी शोधले हे माहित नव्हते !

Trump 31/05/2023 - 11:44
श्री सावरकर यांनी सदा व्यवहारीक आणि विज्ञानाधारीत हिंदु धर्माचा पुरस्कार केला त्यामुळे ते दांभिक पुरोगाम्यांना आणि सनातन्यांना तितके पचले नाहीत. भारताला आणि हिंदु धर्माला श्री सावरकर यांच्या विचारांची गरज आहे. खरे म्हटले तर त्यांच्या विचाराचा प्रचार कमी झाला, पण अपप्रचारच जास्त झाला. ज्या अनेक लोकांनी मला स्फुर्ती दिले त्यापैकी श्री सावरकर हे एक आहे. बहुदा लोक श्री सावरकर यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या पत्नी, बंधु आणि इतर कुटुंंबिय यांच्याबद्दल विसरतात. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेली सोबत तितकीच प्रंशसनीय आहे. लेखातील माहितीबद्दल धन्यवाद.

चौकस२१२ 01/06/2023 - 05:31
ते दांभिक पुरोगाम्यांना आणि सनातन्यांना तितके पचले नाहीत. अगदी बरोबर .. दोन्ही बाजूंचा त्यांनी "सुपडा साफ" केला त्यांच्या काळातील समाजातील कर्मठ पणा विचारात घेता त्यांचे काम किती अवघड होते हे विचारात घेतला पाहिजे दुर्दैवाने आज त्यांना "अति उजवे" अशी जी पदवी दिली राजकीय आणि जातीय फुरोगाम्यांकडून

चौकस२१२ 01/06/2023 - 05:42
Savarkar’s position was rather complicated on the issue of cow protection as he was of the opinion that if one deliberately killed cows to spite Hindus then it was a problem. “However, he believed that if it was just for the sake of eating because you like it, then it is okay,” https://www.newindianexpress.com/lifestyle/books/2019/nov/11/veer-savarkar-was-not-averse-to-eating-beef-author-author-vaibhav-purandare-2060008.html अर्थात दिग्विजय सारख्या काँग्रेसींनी याचा आप्ल्याला हवा तेवढाच भाग घेतला ( चापलुसी)

वाड्याची देखभाल चांगली ठेवलेली दिसत आहे. काळाच्या पुढचे बघणारा एक द्र्ष्टा असेच सावरकरांबद्दल म्हणावे लागेल. गोहत्येसारख्या अनेक विषयांवरचे त्यांचे विचार आजही अनेकांच्या पचनी पडणार नाहीत. नुकतीच अंदमानला भेट दिली आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावीच आशी जागा. a b c b

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गोरगावलेकर 01/06/2023 - 16:49
नुकतीच अंदमानला भेट दिली अंदमान आमच्या भटकंती यादीत आहे. या वर्षी नाही पण पुढे केव्हातरी निश्चितच. सविस्तर लेख वाचायला आवडेल.

आनन्दा 02/06/2023 - 09:15
खरं तर काडी टाकायची इच्छा नाहीये, पण आपलं विचारतो. काही मान्यवर या धाग्यावर अजिबात फिरकले नाहीयेत.. इतरत्र नोटाबंदी वगैरेवर ज्ञान झाडत आहेत मात्र. असे का बरे असेल? मान्यवर सदस्यांकडून दोन शब्द ऐकले तरी बरे वाटेल आम्हाला. प्रचेतस भाऊ, अवांतर केल्याबद्दल क्षमस्व

In reply to by आनन्दा

काही मान्यवर या धाग्यावर अजिबात फिरकले नाहीयेत..
हे तुम्हाला कसे कळले ? त्यांनी वाचला ही असेल धागा. तुम्हाला सर्वर च्या वेब लॉग ला अक्सेस आहे का ?? का तुम्हाला "ज्या धाग्यावर वाटतं त्या धाग्यावर, मान्यवरांनी येवून, प्रतिक्रिया दिली पाहिजे" असा दंडक तुम्ही जर योजला असेल.. तर तो सर्व मीपा सदस्यांना बंधनकारक आहे ??

गवि 28/05/2023 - 17:43
सुंदर लेख वल्ली. धन्यवाद. या शापित वीरपुरुषाला आता कुठे मान सन्मान मिळू लागला आहे. त्यांच्याविषयी जे काही गरळ ओकले जाते त्याबद्दल काय म्हणायचे? ते सर्व आरोप म्हणून केले जातात त्याबद्दल त्यांनीच स्वतःच लिहून ठेवलेले आहे. त्यातून जणू नवीन गुप्त माहिती मिळाली असावी अशा रीतीने संदर्भहीन मुद्दा उचलून सोयीस्कर वळण देऊन त्याचा गैरवापर केला जातो. हीन प्रकारे. असो. लहानपणी रत्नागिरीत येता जाता पतित पावन मंदिर दिसत असे. त्या काळात म्हणजे १९८० दशक, सावरकरांचा सहवास लाभलेले देखील अनेक लोक हयात होते तिथे. अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. पन्नास वर्षे तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर निघून त्यांनी त्याही परिस्थितीत जे शक्य होते ते समाजकार्य केले. जाती पाती मिटवण्यासाठी खूप केले. हिंदू कट्टरता हा विवादास्पद मुद्दा असेलही. पण हेतू प्रामाणिक होते. गांधी, नेहरू , सावरकर, बोस , पटेल या सर्वांचे ध्येय प्रामाणिक आणि पक्के होते. मार्ग, श्रद्धा विभिन्न असतील. कोणीच यापैकी कोणावरही विनाकारण चिखल उडवू नये. पुढचे भविष्य आणखी उत्तम करण्यासाठी काही करावे. _/\_

विनम्र अभिवादन. आपल्या मताशी सहमत आहे. आमचे गाव नाही ज्यांच्या नावामुळे देशभरात गाव ओळखले जाते त्या हुतात्मा राजगुरूंच्या घराचे सुद्धा इतक्या वर्षांनंतर पुनरूज्जीवन झाले आहे. या स्मारका बदल ची शासकीय उदासीनता आम्ही बघीतली आहे. स्वातंत्र्यानंतर पंचवीसाव्या वर्षात ,१९७२ महाराष्ट्र सरकारने सर्व हुतात्म्यांच्या गावात वेगळे,एकाच प्रकारचे ,डिझाईनचे स्मारक बांधले. तेच पैसे त्यांच्या जन्मस्थानी खर्च केले असते तर.... जालियनवाला बाग सन पंच्याहत्तर च्या आसपास बघीतली होती ती बाग आणी आजचे तीचे स्वरूप जमीन अस्मानाचा फरक आहे. स्वातंत्र्या साठी जो लढला तो स्वातंत्र्य वीर. त्यांची पद्धत कुठलीही असो, राजकारण व व्यक्तीगत पातळीवरचे मत बाजुला ठेवून त्यांचा आदर झालाच पाहीजे. हे सर्व खुप पुर्वीच व्हायला हवे होते.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 28/05/2023 - 17:59
हुतात्मा राजगुरुंच्या घराला नुकतीच भेट दिलेली असल्याने स्मारकाचा नीटनेटकेपणा नजरेस भरला. मात्र अजूनही काम करायला हवे आहे. काही वर्षांपूर्वी तर हे स्मारक पूर्णपणे पडक्या अवस्थेत होतं.

श्रीगुरुजी 28/05/2023 - 17:59
महान क्रांतिकारक, महान समाजसुधारक, महान भाषासुधारक, महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलैला अत्यंत सुंदर लेख! २०१७ मध्ये अंदमानात सहलीसाठी गेलो होतो. पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचल्यानंतर लगेचच सेल्युलर तुरूंग पाहण्यास गेलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या खोलीत ११ वर्षे डांबून ठेवले होते त्या तीर्थस्थळाचे दर्शन घेतले. सर्वांनी सामूहिक जयोस्तुते काव्याचे स्तवन केले. मणीशंकर अय्यर नावाच्या नराधमाने २००४ मध्ये मंत्रीपद मिळाल्याऩतर द्वेषाची उबळ असह्य झाल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खोलीच्या भिंतीवर कोरलेल्या कमला नावाच्या काव्यावर चुना फासून एक महान ऐतिहासिक ठेवा नष्ट करून आपली द्वेषाची उबळ पूर्ण केल्याचे पाहून दु:ख झाले व संतापही आला. सायंकाळी तुरूंगाच्या आवारात दृकश्राव्य कार्यक्रम पाहताना अचानक मनात विचार आला की बरोबर १०० वर्षांपूर्वी याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर याच खोलीत बंद असतील व तेव्हा त्यांच्या मनात कोणते विचार घोळत असतील? या महान स्वातंत्र्यवीरांना साष्टांग दंडवत!

In reply to by श्रीगुरुजी

मणीशंकर अय्यर नावाच्या नराधमाने २००४ मध्ये मंत्रीपद मिळाल्याऩतर द्वेषाची उबळ असह्य झाल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खोलीच्या भिंतीवर कोरलेल्या कमला नावाच्या काव्यावर चुना फासून एक महान ऐतिहासिक ठेवा नष्ट करून आपली द्वेषाची उबळ पूर्ण केल्याचे पाहून दु:ख झाले व संतापही आला. कोती मानसिकता,उच्च दर्जाचे लांगुलचालन व सत्तेच्या लोभाने आलेले बुद्धीमांद्य. बाकी काय.

Bhakti 28/05/2023 - 18:01
उत्तम लेख! "ने मजसी ने"या गीताने देशभक्ती,भाषेचा आनंद, शांती अजून भरपूर काही दिले आहे. स्वा.सावरकर यांचे अनेक तेजस्वी पैलू समजले.

चौकस२१२ 29/05/2023 - 07:06
,सावरकर देशभक्त / क्रांतिवीर तर ते होतेच पण त्याबरोबर समाज सुधारक , आणि स्वतःचं धर्मात सुद्धा वैन्यायिक दृशीतकोन ठेवून बदल केले पाहिजेत या विचारांचे होते . "हे नृसिंह प्रभू शिवाजी जी राजा" हे गीत लिहणाऱ्याला.. या आणि त्याकाळच्या कर्मठ समाजात पतित पावन मंदिराचं द्वारे दलितांना मंदिर प्रवेश हा विषय उचलून धरणाऱ्याला आज जी हलकट वृत्तीची मंडळी केवळ त्याच्या जातीवरून झोडपत आहेत हे महाराष्ट्राच्या भूमीला शोभत नाही ... पण बोलणार कोण आणि ऐकणार कोण? विठ्ठलाची पूजा करण्यापासून माजी मुख्यमंतऱ्यानं केवळ त्यांचं जातीमुळे थांबवण्रा हा समाज ! आज कदाचित सावरकरांना जेवढा मान उत्तर भारतात आहे त्याच्या पेक्षा कमीच महाराष्ट्रात आहे ... एकीकडे निधर्मवाद जोपासा म्हणत स्वतःच जातीयवाद पसरवणाऱ्या आणि हिंदू विरोधी सतत भूमिका घेणाऱ्या बारामतीचं काकांना कि त्यांच्या सोडलेलया पिल्लावळीला ... ! जानवं घातलेलया "महान आत्मा गांधींना" पहिलय भेटीत "झिंगे खाने कसे चांगले " हे "समजावून" सांगणाऱ्या सावरकरांना नमसकार ( या बाबत कोणी विदा कि काय ते मागितलं तर फोडून काढीन अर्थात शाब्दिक स्वरूपात !)

सर्वसाक्षी 29/05/2023 - 10:58
सशस्त्र क्रांती पर्वात सर्वात अधिक सहभाग होता तो महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा बंगालमधील मुलं चेंडू ऐवजी बॉम्बशी खेळत मोठी झाली असे म्हटले जाते आणि ते खरे आहे. मात्र या वीरांना बॉम्ब मिळाले कसे आणि कुठून? पूर्वेतील अग्निप्रलयाचा उगम हा पश्चिमेतील वडवानलात आहे. १९०६ साली हेमचंद्र दास हा बंगाली तरूण मेकॅनिक्सचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आपले घरदार विकून विलायतेला गेला. इंग्लंड मध्ये पोचताच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली आणि तिथे येण्यामागील आपला खरा हेतू हा बॉम्ब बनवण्याचे शिक्षण हाच असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या कालखंडात पॅरिस येथे वावरत असलेल्या सफ्रान्स्की या रशियन क्रांतीकारकाशी गाठ घालून देण्यासाठी हेमचंद्र दास यांना सेनापती बापट आणि अब्बास बेग यांच्यासोबत पॅरिसला पाठवले. सफ्रान्स्की कडून बॉम्ब निर्मिती साठी मिळाली पण ती सर्व कागदपत्रे आणि नोंदी रशियन भाषेत होत्या. सेनापती बापट यांनी त्यांच्या जर्मनी येथे शिकत असलेल्या ॲना या मैत्रिणीकडून त्या सर्व कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. सेनापती बापट यांनी भाषांतराच्या २० प्रती करून घेतल्या होत्या, पैकी एक प्रत अब्बास बेग यांच्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पोचवली गेली. ६ डिसेंबर १९०७ रोजी बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नर च्या गाडीखाली बॉम्ब स्फोट झाल्याचे वाचून फ्रेंच पोलिसांनी इंग्रजी पोलीसांना काही हिंदुस्थानी तरूण इथे रशियन क्रांतीकारकाच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत हेमचंद्र दास हिंदुस्थानात पोचले होते आणि अर्थातच बॉम्बस्फोट करण्यात त्यांचा हात होता. २६ मार्च १९०८ रोजी सेनापती बापट मुंबईत परतले आणि लगोलग ७ एप्रिल रोजी ते कलकत्त्याला पोचले व त्यांनी ३४ मुरारीपुकुर येथील बॉम्ब निर्माणीला भेट दिली. पुढे त्यांनी बाळ व दत्तोपंत केळकर यांना लिहिलेल्या पत्रात " लंडन येथील वास्तव्यात पार पाडावयाचे माझे कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पार पाडले आहे" असे लिहिले होते. पुढे याच प्रयत्नात जन्माला आलेल्या बॉम्ब चा वापर ३० एप्रिल १९०८ रोजी हुतात्मा खुदीराम बोस आणि हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी किंग्जफोर्डवर केला. इंग्रज सरकार मुळापासून हादरलं आणि सरकारनं बॉम्ब बनवण्याचे ठिकाण शोधण्यासाठी जीवाचा आकांत केला व अखेर माणीकतल्ल्यातील बॉम्ब निर्माणीचा छडा लागला. तिथली सामग्री पाहून सरकारचे डोळे पांढरे झाले १ मे १९०८ रोजी हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी आपण पोलिसांकडून घेरले गेलो आहोत हे लक्षात येताच स्वतः वर गोळ्या झाडल्या आणि हौतात्म्य पत्करलं. एक विलक्षण आश्चर्य म्हणजे हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी वापरलेले पिस्तूल हे ब्राऊनिंग बनावटीचे होते आणि तरीही इंग्रज सरकारने त्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अडकवले नाही. पुढे हुतात्मा अनंत कान्हेरे प्रभृतींनी जॅक्सनचा वध केला तेव्हा याच ब्राऊनिंग पिस्तुलाच्या आधारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्या वधात गोवायचा प्रयत्न केला होता

सौंदाळा 29/05/2023 - 11:03
उत्तम समायोचित लेख सर्व फोटो आणि माहिती आवडली. वाडा जतन केल्याबद्दल शासन आणि सर्व भगूरवासीयांचे आभार. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन

युरोपात असते तसे ... जुने बांधकाम रिस्टोर करून ... वेग वेगळे पुस्तके , जुने फोटो, त्यांनी वापरलेले कपडे चष्मा पेन आदी वस्तू , ऑडिओ व्हिडीओ गाईडेड टुर ... ३ डी क्लिप्स ... सेल्फी पॉईंट्स , पर्यटकांसाठी विश्रंती गृह , मेमॉर सुविनीयर किचेन ती शर्ट वैगरे विक्री ... अश्या सुधारणा करून तिकीट लावून पर्यटन स्थळ म्हणून डेव्हेलप केले पाहिजे .. सरकारला उत्पनाचा सोर्स हि होईल स्थानिक रोजगार पण होईल , ज्यांना भेट द्यायचीये त्यांना सुविधा पण होईल ... विन विन

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 30/05/2023 - 13:31
...तिकीट लावून पर्यटन स्थळ म्हणून डेव्हेलप केले पाहिजे .. ते हि व्हायला पाहिजे पण मग रागा रागावतील ना !

हेमंतकुमार 29/05/2023 - 20:09
मराठी भाषेला ४५ शब्द देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार अभिवादन ! या शब्दांपैकी दिनांक हा सर्वोत्तम मानला जातो. या व्यतिरिक्त, हुतात्मा, गणसंख्या, क्रमांक आणि दिग्दर्शक हे शब्द मी आग्रहाने वापरतो.

In reply to by हेमंतकुमार

साहना 30/05/2023 - 13:19
फक्त ४५ ? मला वाटते आणखीन सुद्धा शब्द असावेत. मी सावरकर ह्यांचे "समग्र" साहित्य वाचले आहे (भाषणे आणि ललित साहित्य सोडून). भाषा ह्या एकाच विषयावर जरी सावरकर ह्यांनी काम केले असते तरी सुद्धा ते महान ठरले असते. इंग्रजी भाषेतील काही चांगल्या गोष्टी भारतीय भाषांत याव्यात असे त्यांना वाटायचे. एक मुद्दा होता कि मुद्रणसौकर्य, इंग्रजी भाषेंत फक्त साधी सोपी २६ अक्षरे आहेत पण देवनागरीत जोडाक्षरे वगैरे धरून असंख्य आहेत. त्यांच्या मते ए इ सारखी अक्षरे मोडीत काढून अ ह्याच मूळ अक्षरावर काना मात्रा इत्यादी लावल्या तर मुद्रण सोपे होईल. मला ह्याचे नेहमीच अप्रूप वाटले आहे. खरोखर दूर दृष्टी होती. दुसरी त्यांची सुधारणा जी आम्ही विसरून गेलो ती म्हणजे इंग्रजी भाषे प्रमाणे सामान्य नाम चे क्रियापदात रूपांतरण करणे. water चे I will water the plant ह्यांत क्रियापद झाले आहे. त्यांच्या मते "मी झाडांना पाणेन" अश्या पद्धतीने सामान्य नामाचे क्रियापद केल्यास कमी अक्षरांत जास्त सांगता येईल. (येथील उदाहरणे माझी स्वतःची आहेत). त्यांचे सर्वांत आवडते लेखन म्हणजे आपल्या वर्तमानपत्रातून ते जे गांधीजी ना ट्रॉल करायचे ते. गांधींनी यंग इंडिया मध्ये काही लिहिले कि दुसऱ्याच दिवशी सावरकर त्यांची खिल्ली उडवायचे. एके ठिकाणी गांधींनी लोकांना कन्याकुमारीहून पेशावर पर्यंत पदयात्रा काढण्याचा सल्ला दिला होता. एके ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुतळ्यावर चिखल फेकणे म्हणजे त्या पुतळ्यावर हिंसा करणे असे गांधी ह्यांनी लिहिले होते. त्याची सावरकर ह्यांनी जी पराकोटीची खिल्ली उडवली होती ते वाचून पोट दुखले.

In reply to by साहना

फक्त ४५ ? मला वाटते आणखीन सुद्धा शब्द असावेत.
मलाही तसेच वाटते. विधानसभा विधानपरिषद वगैरे शब्द सुध्दा सावरकरांची देणगी आहे. हिंदी भाषेमध्ये सुध्दा हे व तत्सम शब्द वापरात आहेत. मेयर ह्यासाठी महापौर ह्या शब्द सुचण्याचा किस्सा ही रोचक आहे.

In reply to by साहना

हेमंतकुमार 30/05/2023 - 14:06
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/karanki/savarkar/#:~:text=%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6,%E0%A4%86%E0%A4%9C%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80. .... अर्थात याहून अधिक अधिकृत संदर्भाची गरज आहे. एक मुद्दा असा: त्यांनी निर्माण केलेले शब्द आणि (पूर्वी अस्तित्वात असलेले) प्रचारात आणलेले शब्द यात गल्लत होता कामा नये.

In reply to by हेमंतकुमार

चौकस२१२ 30/05/2023 - 13:33
सावरकरांनी मराठी भाषेवर काम केले हे माहित होते पण "हुतात्मा, क्रमांक आणि दिग्दर्शक" हे तीन शब्द त्यांनी शोधले हे माहित नव्हते !

Trump 31/05/2023 - 11:44
श्री सावरकर यांनी सदा व्यवहारीक आणि विज्ञानाधारीत हिंदु धर्माचा पुरस्कार केला त्यामुळे ते दांभिक पुरोगाम्यांना आणि सनातन्यांना तितके पचले नाहीत. भारताला आणि हिंदु धर्माला श्री सावरकर यांच्या विचारांची गरज आहे. खरे म्हटले तर त्यांच्या विचाराचा प्रचार कमी झाला, पण अपप्रचारच जास्त झाला. ज्या अनेक लोकांनी मला स्फुर्ती दिले त्यापैकी श्री सावरकर हे एक आहे. बहुदा लोक श्री सावरकर यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या पत्नी, बंधु आणि इतर कुटुंंबिय यांच्याबद्दल विसरतात. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेली सोबत तितकीच प्रंशसनीय आहे. लेखातील माहितीबद्दल धन्यवाद.

चौकस२१२ 01/06/2023 - 05:31
ते दांभिक पुरोगाम्यांना आणि सनातन्यांना तितके पचले नाहीत. अगदी बरोबर .. दोन्ही बाजूंचा त्यांनी "सुपडा साफ" केला त्यांच्या काळातील समाजातील कर्मठ पणा विचारात घेता त्यांचे काम किती अवघड होते हे विचारात घेतला पाहिजे दुर्दैवाने आज त्यांना "अति उजवे" अशी जी पदवी दिली राजकीय आणि जातीय फुरोगाम्यांकडून

चौकस२१२ 01/06/2023 - 05:42
Savarkar’s position was rather complicated on the issue of cow protection as he was of the opinion that if one deliberately killed cows to spite Hindus then it was a problem. “However, he believed that if it was just for the sake of eating because you like it, then it is okay,” https://www.newindianexpress.com/lifestyle/books/2019/nov/11/veer-savarkar-was-not-averse-to-eating-beef-author-author-vaibhav-purandare-2060008.html अर्थात दिग्विजय सारख्या काँग्रेसींनी याचा आप्ल्याला हवा तेवढाच भाग घेतला ( चापलुसी)

वाड्याची देखभाल चांगली ठेवलेली दिसत आहे. काळाच्या पुढचे बघणारा एक द्र्ष्टा असेच सावरकरांबद्दल म्हणावे लागेल. गोहत्येसारख्या अनेक विषयांवरचे त्यांचे विचार आजही अनेकांच्या पचनी पडणार नाहीत. नुकतीच अंदमानला भेट दिली आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावीच आशी जागा. a b c b

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गोरगावलेकर 01/06/2023 - 16:49
नुकतीच अंदमानला भेट दिली अंदमान आमच्या भटकंती यादीत आहे. या वर्षी नाही पण पुढे केव्हातरी निश्चितच. सविस्तर लेख वाचायला आवडेल.

आनन्दा 02/06/2023 - 09:15
खरं तर काडी टाकायची इच्छा नाहीये, पण आपलं विचारतो. काही मान्यवर या धाग्यावर अजिबात फिरकले नाहीयेत.. इतरत्र नोटाबंदी वगैरेवर ज्ञान झाडत आहेत मात्र. असे का बरे असेल? मान्यवर सदस्यांकडून दोन शब्द ऐकले तरी बरे वाटेल आम्हाला. प्रचेतस भाऊ, अवांतर केल्याबद्दल क्षमस्व

In reply to by आनन्दा

काही मान्यवर या धाग्यावर अजिबात फिरकले नाहीयेत..
हे तुम्हाला कसे कळले ? त्यांनी वाचला ही असेल धागा. तुम्हाला सर्वर च्या वेब लॉग ला अक्सेस आहे का ?? का तुम्हाला "ज्या धाग्यावर वाटतं त्या धाग्यावर, मान्यवरांनी येवून, प्रतिक्रिया दिली पाहिजे" असा दंडक तुम्ही जर योजला असेल.. तर तो सर्व मीपा सदस्यांना बंधनकारक आहे ??
महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती. त्यांची स्वातंत्र्यापूर्वीही अवहेलना झाली, स्वातंत्र्यानंतरही झाली आणि आजही काही लायकी नसलेल्या लोकांकडून त्यांची अवहेलना होतच आहे. त्यांचा जन्म झाला तो नाशिकजवळील भगूर ह्या गावी. अगदी काही वर्षांपूर्वी त्यांचे जन्मस्थान असलेला भगूर येथील वाडाही भग्नावस्थेत होता मात्र काही वर्षांपूर्वीच सरकारने त्याची डागडुजी करायला सुरुवात केली आणि आज ह्या वाड्याला बर्‍यापैकी त्याचे पूर्वीचे स्वरुप प्राप्त झाले असून स्वातंत्र्यवीरांचे एक उचित स्मारकच त्या ठिकाणी उभे राहिलेले आहे.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

पराग१२२६३ ·

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

जिरेटोप

जे.पी.मॉर्गन ·

कुठल्याहि जयंत्या,डिजे,डोल्बी,आयटम साँग शिवाय साजऱ्या होतच नाहीत. रयत ध्वनी प्रदूषणाने बेजार आहे. विद्यार्थी अभ्यासवर एकाग्रचित्त होऊ शकत नाही. आगोदरच झोप कमी असलेले वयोवृद्ध रात्रभर जागे आहेत. कोर्टाच्या नियमांना वेशीवर टांगलय,अक्षरशः पायमल्ली व पोलीस यंत्रणा तर XXX पेक्षाही जास्त हतबल झालीय. कितीही वेळा काॅल करा उचलत नाही. तक्रार नोंदवून घेतली तरी काहीच कारवाई करत नाही.राजकारणी वन अपमॅनशिप दाखवण्या करता तरूणाई ला पैसा पुरवतात. संतरजी उचल्यांना एक चपटी,चकणा व पेट्रोल दिले की कुत्र्याच्या XXला पेट्रोल लागल्या सारखे मोटर सायकलीचा सायलेन्सर काढून रात्र रात्र वस्तीत घिरट्या घालतात. आवाज एवढा मोठा आवाज की दारे,खिडक्या आपटतात. तो जाणता राजा रयतेवर जुलूम झाला म्हणून पाटलाचा *चौरंग्या* करणारा आज स्वर्गात दुःखी असेल. प्रत्येक शिवजयंतीला "मी शिवाजीराजे बोलतोय "या सिनेमा सारखे जर महाराज खरेच आले तर काय करतील याची कल्पना करत बसतो. अशाच एका लग्न समारंभात लावलेला डिजे मुळे त्रासलेल्या वरिष्ठ नागरिकाने दहा लाखाची डि जे सिस्टीम तोडली. त्यावर भा पि को अनुसार खटला भरला आहे. शिवजयंती झाली की अंबेडकर मग गणेशोत्सव मग लग्नसमारंभ. आमच्या गावात तर बैलपोळ्याला सुद्धा डि जे लावतात व तीन तास वाहतूक कोंडी नक्कीच होते. बाकी तुम्ही चांगले लिहीले आहे.

सौंदाळा 12/03/2023 - 20:37
मस्त लिहीलं आहे वपुंची एक कथा आहे. नाटकात बेभान अभिनय करणाऱ्या कलाकाराची. ट्राजीडी भूमिका करताना खरोखरच हा नट ओक्साबोक्शी रडत असे (त्याचे लहानपणीचे उपासमारीचे दिवस आठवून) भावाने त्यामुळे त्याचे नाटक बंद केले आणि नंतर त्या नटाचा मृत्यू झाला, अशी काहीशी कथा आहे. जे सच्चे कलावंत असतात ते झोकून देऊन काम करतात. तुम्ही मस्तच लिहिले आहे. रच्याकने शुभमन गिल तुमच्या लेखणीतून बघायचा आहे. येणाऱ्या नवीन फळीतील आश्वासक फलंदाज वाटतोय.

सौंदाळा 12/03/2023 - 20:37
मस्त लिहीलं आहे वपुंची एक कथा आहे. नाटकात बेभान अभिनय करणाऱ्या कलाकाराची. ट्राजीडी भूमिका करताना खरोखरच हा नट ओक्साबोक्शी रडत असे (त्याचे लहानपणीचे उपासमारीचे दिवस आठवून) भावाने त्यामुळे त्याचे नाटक बंद केले आणि नंतर त्या नटाचा मृत्यू झाला, अशी काहीशी कथा आहे. जे सच्चे कलावंत असतात ते झोकून देऊन काम करतात. तुम्ही मस्तच लिहिले आहे. रच्याकने शुभमन गिल तुमच्या लेखणीतून बघायचा आहे. येणाऱ्या नवीन फळीतील आश्वासक फलंदाज वाटतोय.

लेख आवडलाच. पण शिवाजी महाराज आता फक्त मनात राहिलेत. प्रत्येकाने आपापल्या राजकिय फायद्यासाठी त्यांना वेठीला धरलेय. वर्षातुन ३ वेळा शिवजयंती साजरी होतेय. एकदा "ह्यांची" एकदा "त्यांची". जनता मोठ्मोठे डि जे/ रस्ते अडवणारी स्टेज, ट्रॅफिक जॅम, वर्गणीच्या नावाखाली खंडणी, हप्तेबाजी याने त्रासली आहे. "या या अनन्य शरणा आर्या ताराया" म्हणायची वेळ आली आहे.

कुठल्याहि जयंत्या,डिजे,डोल्बी,आयटम साँग शिवाय साजऱ्या होतच नाहीत. रयत ध्वनी प्रदूषणाने बेजार आहे. विद्यार्थी अभ्यासवर एकाग्रचित्त होऊ शकत नाही. आगोदरच झोप कमी असलेले वयोवृद्ध रात्रभर जागे आहेत. कोर्टाच्या नियमांना वेशीवर टांगलय,अक्षरशः पायमल्ली व पोलीस यंत्रणा तर XXX पेक्षाही जास्त हतबल झालीय. कितीही वेळा काॅल करा उचलत नाही. तक्रार नोंदवून घेतली तरी काहीच कारवाई करत नाही.राजकारणी वन अपमॅनशिप दाखवण्या करता तरूणाई ला पैसा पुरवतात. संतरजी उचल्यांना एक चपटी,चकणा व पेट्रोल दिले की कुत्र्याच्या XXला पेट्रोल लागल्या सारखे मोटर सायकलीचा सायलेन्सर काढून रात्र रात्र वस्तीत घिरट्या घालतात. आवाज एवढा मोठा आवाज की दारे,खिडक्या आपटतात. तो जाणता राजा रयतेवर जुलूम झाला म्हणून पाटलाचा *चौरंग्या* करणारा आज स्वर्गात दुःखी असेल. प्रत्येक शिवजयंतीला "मी शिवाजीराजे बोलतोय "या सिनेमा सारखे जर महाराज खरेच आले तर काय करतील याची कल्पना करत बसतो. अशाच एका लग्न समारंभात लावलेला डिजे मुळे त्रासलेल्या वरिष्ठ नागरिकाने दहा लाखाची डि जे सिस्टीम तोडली. त्यावर भा पि को अनुसार खटला भरला आहे. शिवजयंती झाली की अंबेडकर मग गणेशोत्सव मग लग्नसमारंभ. आमच्या गावात तर बैलपोळ्याला सुद्धा डि जे लावतात व तीन तास वाहतूक कोंडी नक्कीच होते. बाकी तुम्ही चांगले लिहीले आहे.

सौंदाळा 12/03/2023 - 20:37
मस्त लिहीलं आहे वपुंची एक कथा आहे. नाटकात बेभान अभिनय करणाऱ्या कलाकाराची. ट्राजीडी भूमिका करताना खरोखरच हा नट ओक्साबोक्शी रडत असे (त्याचे लहानपणीचे उपासमारीचे दिवस आठवून) भावाने त्यामुळे त्याचे नाटक बंद केले आणि नंतर त्या नटाचा मृत्यू झाला, अशी काहीशी कथा आहे. जे सच्चे कलावंत असतात ते झोकून देऊन काम करतात. तुम्ही मस्तच लिहिले आहे. रच्याकने शुभमन गिल तुमच्या लेखणीतून बघायचा आहे. येणाऱ्या नवीन फळीतील आश्वासक फलंदाज वाटतोय.

सौंदाळा 12/03/2023 - 20:37
मस्त लिहीलं आहे वपुंची एक कथा आहे. नाटकात बेभान अभिनय करणाऱ्या कलाकाराची. ट्राजीडी भूमिका करताना खरोखरच हा नट ओक्साबोक्शी रडत असे (त्याचे लहानपणीचे उपासमारीचे दिवस आठवून) भावाने त्यामुळे त्याचे नाटक बंद केले आणि नंतर त्या नटाचा मृत्यू झाला, अशी काहीशी कथा आहे. जे सच्चे कलावंत असतात ते झोकून देऊन काम करतात. तुम्ही मस्तच लिहिले आहे. रच्याकने शुभमन गिल तुमच्या लेखणीतून बघायचा आहे. येणाऱ्या नवीन फळीतील आश्वासक फलंदाज वाटतोय.

लेख आवडलाच. पण शिवाजी महाराज आता फक्त मनात राहिलेत. प्रत्येकाने आपापल्या राजकिय फायद्यासाठी त्यांना वेठीला धरलेय. वर्षातुन ३ वेळा शिवजयंती साजरी होतेय. एकदा "ह्यांची" एकदा "त्यांची". जनता मोठ्मोठे डि जे/ रस्ते अडवणारी स्टेज, ट्रॅफिक जॅम, वर्गणीच्या नावाखाली खंडणी, हप्तेबाजी याने त्रासली आहे. "या या अनन्य शरणा आर्या ताराया" म्हणायची वेळ आली आहे.
"सर... ओळखलंत का मला?" आईशप्पथ सांगतो... असं अचानक कोणी रस्त्यात भेटलं की माझी जाम गडबड होते. एक तर आपली मेमरी सुभानअल्ला! आणि त्यातून "ओळखलंत का मला" म्हणणारा इसम किमान ४-६ वर्षांनी समोर टपकलेला असतो. अश्या वेळी प्रोसेसर मेमरीची क्लस्टर्स शोधत असताना कितीही प्रयत्न केला तरी माझ्या चेहर्‍यावर मात्र स्क्रीनसेव्हर लावलेला स्पष्ट दिसत असतो. पण ह्याला ओळखायला क्षणभरच वेळ लागला. कारण त्याचे ते धारदार डोळे आणि त्यांच्या मधला टिळा हे कॉम्बिनेशन. परेश - माझ्या आधीच्या कंपनीतला अ‍ॅडमिन मॅनेजर. उमदा गडी. आपल्याच तानात असायचा. कानाला भिकबाळी, कपाळाला केशरी टिळा, बुलेटवरून फिरायचा.

परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३ ·
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

अंतर्गत सीमावाद (भाग-२)

पराग१२२६३ ·
ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली.

अंतर्गत सीमावाद (भाग-1)

पराग१२२६३ ·

कंजूस 21/12/2022 - 07:01
म्हणजे आताचा महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात यांच्या सीमा कुणी ठरवल्या? वेगवेगळे अधिकारी नेमले होते हे ठरवायला. दातार नावाचे एक अधिकारी होते ते कानडी होते. त्यांनी धारवाड,बेळगांव कर्नाटकात घातले.

In reply to by कंजूस

श्रीगुरुजी 21/12/2022 - 09:29
मेहेरचंद महाजन यांच्या एकसदस्यीय आयोगाने बेळगावसहीत संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात घातला. महाजन आयोगाने महाराष्ट्रावर केलेला अन्याय या विषयावर मिपावरील प्रदीर्घ लेख.

अन्याय वगैरे काही नाही. आपल्या मराठी पुढार्याना सतत रडायची सवय आहे. दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार असल्याने शिवसेना/राष्ट्र्वादीच्या म्होरक्याना "मराठी माणसाची गळचेपी" वगैरे आठवली आहे.कॉण्ग्रेसची अवस्था नेहमीसारखीच!- 'इकडे आड तिकडे विहीर' आहे. बेळगाव हा जिल्हा आहे. ह्यांत ६८% हुन अधिक कन्नड भाषिक आहेत. बेळ्गाव शहरात कदाचित मराठी भाषिक जास्त असतील. मराठी भाषिकांची संख्या ही १९५० नंतर जास्त वाढु लागली. गळचेपी/अन्याय वगैरे असते तर नागरिक १२५ किमीवर कोल्हापूरला जाउन स्थायिक झाले असते. जाणकारानी महाजन आयोगाचा निकाल वाचावा.जुनी कागपत्रे/जमीनीचे व्यवहार वगैरे सगळे कन्नडमध्येच आहे.अजुनही 'आंदोलन'करण्यासाठी दुसर्या राज्यातून लोक मागवावे लागतात ह्यावरूनच दिसते की बेळगावकरानी सीमाप्रश्नाला केव्हाच निकालात काढले आहे.

बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग महाराष्ट्रात सामील झाल्याने क्षेत्रफळात बदल होईल पण तेथील रहिवाश्यांना काय फरक पडेल हे कुणी सांगत नाही. अतंरराष्ट्रीय किवा देशांतर्गत सीमेवरील गावे नेहमीच मुलभूत सोई नां वंचित असल्याचे दिसते. राजकारणी हा वाद नेहमीच ज्वलंत ठेवून आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना दिसतात. नाहीतर पंच्याहत्तर वर्षानंतर ही यावर काहीच तोडगा का काढण्यात आला नाही? फिरोजपूर जवळील हुसैनीवाला येथी अतंरराष्ट्रीय सीमा प्रश्न दोन्ही देशांनी केव्हाच सोडवला आहे. लवकरच कर्नाटक निवडणूकीला सामोरे जाणार आहे तेव्हा एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असे तेथील सरकार म्हणत आहे. पुढे महाराष्ट्र निवडणूक लढवेल तेव्हा म्हणेल बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग आपलाच आणी आम्ही तो घेतल्याशिवाय रहाणार नाही अशी घोषणाबाजी होईल. जर कठीण वाटणारी पूर्वापार चालत आलेली कलमे निकालात निघाली तसेच याबाबतीत का नाही. हे एक भिजत घोंगडे आहे कधी वाळणार सांगणे फार कठीण आहे. माझे आकलन. तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.

कंजूस 25/12/2022 - 06:56
स्पर्धा परीक्षांची #UPSC #MPSC तयारी करणाऱ्यांसाठी हा लेख विशेष करून उपयुक्त ठरेल
१)मूळ माहिती सरकारी साईट्सवर आहे का? २) सीमावादावर प्रश्न आल्यास किंवा तोंडी परीक्षेत "तुम्ही हा वाद कसा सोडवाल?" हे विचारतात का? ३)घटक राज्यांची सरकारे कधीच आलेल्या भूभागावरचा अंमल सोडणार नाहीत. मग केंद्राकडून आदेश देता येतो का? त्यांचे पालन शांततापूर्ण होईल का? ४) घटक राज्यातील राजकीय पक्ष यांचे निवडणुक प्रचाराचे भांडवल करतात पण सत्तेत आल्यास गप्प बसतात.

कंजूस 21/12/2022 - 07:01
म्हणजे आताचा महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात यांच्या सीमा कुणी ठरवल्या? वेगवेगळे अधिकारी नेमले होते हे ठरवायला. दातार नावाचे एक अधिकारी होते ते कानडी होते. त्यांनी धारवाड,बेळगांव कर्नाटकात घातले.

In reply to by कंजूस

श्रीगुरुजी 21/12/2022 - 09:29
मेहेरचंद महाजन यांच्या एकसदस्यीय आयोगाने बेळगावसहीत संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात घातला. महाजन आयोगाने महाराष्ट्रावर केलेला अन्याय या विषयावर मिपावरील प्रदीर्घ लेख.

अन्याय वगैरे काही नाही. आपल्या मराठी पुढार्याना सतत रडायची सवय आहे. दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार असल्याने शिवसेना/राष्ट्र्वादीच्या म्होरक्याना "मराठी माणसाची गळचेपी" वगैरे आठवली आहे.कॉण्ग्रेसची अवस्था नेहमीसारखीच!- 'इकडे आड तिकडे विहीर' आहे. बेळगाव हा जिल्हा आहे. ह्यांत ६८% हुन अधिक कन्नड भाषिक आहेत. बेळ्गाव शहरात कदाचित मराठी भाषिक जास्त असतील. मराठी भाषिकांची संख्या ही १९५० नंतर जास्त वाढु लागली. गळचेपी/अन्याय वगैरे असते तर नागरिक १२५ किमीवर कोल्हापूरला जाउन स्थायिक झाले असते. जाणकारानी महाजन आयोगाचा निकाल वाचावा.जुनी कागपत्रे/जमीनीचे व्यवहार वगैरे सगळे कन्नडमध्येच आहे.अजुनही 'आंदोलन'करण्यासाठी दुसर्या राज्यातून लोक मागवावे लागतात ह्यावरूनच दिसते की बेळगावकरानी सीमाप्रश्नाला केव्हाच निकालात काढले आहे.

बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग महाराष्ट्रात सामील झाल्याने क्षेत्रफळात बदल होईल पण तेथील रहिवाश्यांना काय फरक पडेल हे कुणी सांगत नाही. अतंरराष्ट्रीय किवा देशांतर्गत सीमेवरील गावे नेहमीच मुलभूत सोई नां वंचित असल्याचे दिसते. राजकारणी हा वाद नेहमीच ज्वलंत ठेवून आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना दिसतात. नाहीतर पंच्याहत्तर वर्षानंतर ही यावर काहीच तोडगा का काढण्यात आला नाही? फिरोजपूर जवळील हुसैनीवाला येथी अतंरराष्ट्रीय सीमा प्रश्न दोन्ही देशांनी केव्हाच सोडवला आहे. लवकरच कर्नाटक निवडणूकीला सामोरे जाणार आहे तेव्हा एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असे तेथील सरकार म्हणत आहे. पुढे महाराष्ट्र निवडणूक लढवेल तेव्हा म्हणेल बेळगाव, धारवाड, कारवार हा भूभाग आपलाच आणी आम्ही तो घेतल्याशिवाय रहाणार नाही अशी घोषणाबाजी होईल. जर कठीण वाटणारी पूर्वापार चालत आलेली कलमे निकालात निघाली तसेच याबाबतीत का नाही. हे एक भिजत घोंगडे आहे कधी वाळणार सांगणे फार कठीण आहे. माझे आकलन. तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.

कंजूस 25/12/2022 - 06:56
स्पर्धा परीक्षांची #UPSC #MPSC तयारी करणाऱ्यांसाठी हा लेख विशेष करून उपयुक्त ठरेल
१)मूळ माहिती सरकारी साईट्सवर आहे का? २) सीमावादावर प्रश्न आल्यास किंवा तोंडी परीक्षेत "तुम्ही हा वाद कसा सोडवाल?" हे विचारतात का? ३)घटक राज्यांची सरकारे कधीच आलेल्या भूभागावरचा अंमल सोडणार नाहीत. मग केंद्राकडून आदेश देता येतो का? त्यांचे पालन शांततापूर्ण होईल का? ४) घटक राज्यातील राजकीय पक्ष यांचे निवडणुक प्रचाराचे भांडवल करतात पण सत्तेत आल्यास गप्प बसतात.
अलिकडेच महाराष्ट्रातील विविध सीमावर्ती भागांमधील गावांनी आपल्याला शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, असं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. स्वातंत्र्यानंतर भाषा-आधारित घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही घटकराज्यांमध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक असे वैविध्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पुढील काळात विविध कारणांनी देशातील प्रत्येक समुदायाकडून आपल्यासाठी स्वतंत्र घटकराज्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यामुळं भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याचे तत्व मागे पडले आहे.

मद्रास कथा- ४

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस 30/12/2023 - 12:09
लेखक प्रवीण झा जेएनयू चे प्राध्यापक, त्यांनी मद्रास कथा लिहिल्या असतील पण हा भाग दलीतांसाठी राखीव जागा याबाबत गांधी आंबेडकर चर्चा असा झाला आहे. मद्रास कथांचा एक थोडक्यात आढावा असा एक लेख लिहिला तर एकूण दिशा कळायला सोपे जाईल.

In reply to by कंजूस

लेखमाला ही आधुनिक तमिळनाडूचा (इंग्रज आल्यापासूनचा ते आजपर्यंतचा) इतिहास सांगनार आहे. त्यात देशात घडलेल्या घडामोडी नी त्याचा तमिळनाडूवरील परिणाम हे देखील आहे.

कंजूस 30/12/2023 - 12:09
लेखक प्रवीण झा जेएनयू चे प्राध्यापक, त्यांनी मद्रास कथा लिहिल्या असतील पण हा भाग दलीतांसाठी राखीव जागा याबाबत गांधी आंबेडकर चर्चा असा झाला आहे. मद्रास कथांचा एक थोडक्यात आढावा असा एक लेख लिहिला तर एकूण दिशा कळायला सोपे जाईल.

In reply to by कंजूस

लेखमाला ही आधुनिक तमिळनाडूचा (इंग्रज आल्यापासूनचा ते आजपर्यंतचा) इतिहास सांगनार आहे. त्यात देशात घडलेल्या घडामोडी नी त्याचा तमिळनाडूवरील परिणाम हे देखील आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हिंदू, मुस्लिम आणि शीख यांप्रमाणेच दलितांसाठीदेखील स्वतंत्र मतदार संघ असावा ह्या बाजूने होते. भीमराव आंबेडकरांनी नंतर सांगितले की त्यांनी नेपल्सहून पंतप्रधानांना पत्र लिहिले होते आणि ते त्यांच्या सांगण्यावरूनच हे झाले होते. आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना तिन्ही गोलमेज परिषदात निमंत्रित करण्यात आले होते आणि तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता. गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली आणि या दलित मतदारासंघांचा विरोध केला. दलितांच्या हक्कासाठी आपले जीवन अर्पण करीन, पण त्यांना हिंदूंपासून वेगळे होऊ देणार नाही, अशी शपथही त्यांनी घेतली.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

पराग१२२६३ ·

कंजूस 28/11/2022 - 13:47
लोणावळा स्टेशनच्या बाहेर जो रस्ता बस डेपोकडे जातो तिथे बीएसएनएलचे केंद्र लागेल तिथूनच आतल्या गल्लीतून खोपोली नगरपालिकेच्या खोपोली-लोणावळा-खोपोली बसेस सुटतात. त्या बसने तुम्ही खंडाळा स्टेशन नाका ( तलावाकाठी स्टॉप आहे), राजमाची पॉईंट (तुम्ही जो खंडाळा व्ह्यू पॉइंट म्हणता तो), अमृतांजन पूल किंवा खाली जाणाऱ्या घाटरस्त्यावर खोपोली डायवर्शन किंवा खोपोली नाका(महडसाठी) इथे उतरू शकता. खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते. परतताना लोणावळाकडे जाणारे वाहन पकडावे. खंडाळा स्टेशनच्या बाहेर मेन रोडवर एक रस्ता शाहरूखच्या बंगल्यकडे जातो तिथून उल्लास नदी खाली उडी घेते. तेही छान स्पॉट आहे. भाविक असणाऱ्यांनी लोणावळ्यात नांगरगाव आश्रमाकडे (दोन आहेत) जावे. आणखी दोन जागा आहेत.

In reply to by कंजूस

खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते कंजुस काका बहुतेक तुम्ही कुरवंडे गाव म्हणताय, जिथुन बंगल्यांच्या वाटेने थोडे वर जाउन उजवीकडे गेल्यास ड्युक्स नोज आणि डावीकडे आय एन एस शिवाजीच्या कुंपणा जवळुन खालचा रस्ता पकडल्यास चावणी गावातुन उंबर् खिंडित जाता येते.

कंजूस 28/11/2022 - 13:47
लोणावळा स्टेशनच्या बाहेर जो रस्ता बस डेपोकडे जातो तिथे बीएसएनएलचे केंद्र लागेल तिथूनच आतल्या गल्लीतून खोपोली नगरपालिकेच्या खोपोली-लोणावळा-खोपोली बसेस सुटतात. त्या बसने तुम्ही खंडाळा स्टेशन नाका ( तलावाकाठी स्टॉप आहे), राजमाची पॉईंट (तुम्ही जो खंडाळा व्ह्यू पॉइंट म्हणता तो), अमृतांजन पूल किंवा खाली जाणाऱ्या घाटरस्त्यावर खोपोली डायवर्शन किंवा खोपोली नाका(महडसाठी) इथे उतरू शकता. खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते. परतताना लोणावळाकडे जाणारे वाहन पकडावे. खंडाळा स्टेशनच्या बाहेर मेन रोडवर एक रस्ता शाहरूखच्या बंगल्यकडे जातो तिथून उल्लास नदी खाली उडी घेते. तेही छान स्पॉट आहे. भाविक असणाऱ्यांनी लोणावळ्यात नांगरगाव आश्रमाकडे (दोन आहेत) जावे. आणखी दोन जागा आहेत.

In reply to by कंजूस

खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते कंजुस काका बहुतेक तुम्ही कुरवंडे गाव म्हणताय, जिथुन बंगल्यांच्या वाटेने थोडे वर जाउन उजवीकडे गेल्यास ड्युक्स नोज आणि डावीकडे आय एन एस शिवाजीच्या कुंपणा जवळुन खालचा रस्ता पकडल्यास चावणी गावातुन उंबर् खिंडित जाता येते.
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.