मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

देवदत्त ·

प्राजु 10/01/2008 - 00:33
१. आईनस्टाईन २. ब्रुसलि.. ३. अब्राहम लिंकन.. आपण ओळखलेल्या शिवाय मल इतके आले ओळखता...पह्ते अजून दिसतात का ते.. - प्राजु

सुनील 10/01/2008 - 00:40
पहिल्याच रांगेत खाली बसलेला तो मल्ल कोण? महंमद अली तर नव्हे? तशीच ती आईनस्टाईनच्या मागची छोटी मुलगी कोण? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे 10/01/2008 - 02:04
देवा फारच सुंदर विषय दिला आहेस तु...धन्यवाद! तू लिहीलेल्या नावाशिवाय... १)मायकेल जॉर्डन(स्पोर्ट शु़ज घातलेला-जगविख्यात धावपटू...हा आपल्या आयुष्यातली शेवटची शर्यत 'नायके' कंपनीने बनवलेले सोन्याचे बुट घालून धावला) २)नेल्सन मंडेला(गॅलरी खाली-दक्षीण आफ्रीकेचा 'गांधी,गांधी यांच्या बरोबर कारावास भोगल्यामुळे त्यांचा याच्या जिवनावर फार मोठा प्रभाव, त्यांनाच आपला आदर्श मानणारा) ३)मदर तेरेसा (गॅलरी खाली) ४)गुरुदेव रविंन्द्रनाथ ठाकूर्(गॅलरी खाली,मदर तेरेसा यांच्या पुढे) ५)सॉक्रेटीस(विख्यात तत्वज्ञ-गुरूदेव यांच्या पुढे,गुडघ्यावर हात ठेवलेला...प्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू यांनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नाटकात याची व्यक्तीरेखा साकारली होती) ६)ओसामा बिन लादेन(मागे स्त्रियांच्या रांगेत-याचा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला माहितच आहे.) ७)पेले (डाव्या बाजूला-एक पाय खाली सोडून बसलेला-ब्राझीलचा व जगप्रसिद्ध फुटबॉलपटू...'पेले' या शब्दाचा अर्थ आहे 'अनवाणी'...पायात बूट न घालता खेळत असल्यामुळे याला हे नाव मिळाले.) ८)शेक्सपियर(गिटारवादकाच्या मागे) ९)नेपोलियन बोनापार्ट (पांढर्‍या घोड्यावर स्वार,मूळचा फ्रान्सचा व भारतीय लष्कराने गौरविलेल्या जगातील तीन अव्वल लढवय्यांपैकी प्रथम(दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज व आसामचा राजा लासित बरफुकन उर्फ चिलाराय... मृत्यू इंग्रजी सैनिकांच्या नजरकैदेत झाला होता,मृत्यूचे गूढ दोनशे वर्षांनी उकलले,फ्रान्सच्या एका संग्रहालयातील याच्या केसाच्या बटेवर आधारीत संशोधनानंतर विषप्रयोग झाल्याचा दावा) १०)शेरलॉक होम्स (शेक्सपियर यांच्या बाजूला...हॅटव तोंडात सिगार असलेला-हेरकथांमधील जगप्रसिद्ध पात्र-जगातील सर्वप्रथम पात्र ज्याचा (इंग्लंडमधे) पुतळा बनवला गेला) ११)माईक टायसन (अमेरीकेचा जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा...बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली,आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना चालू असताना कान चावून तोडला...अमिरेकेतील एका चॉकलेट उत्पादकाने या घटनेनंतर कानाच्या आकाराचे चॉकलेट बनवले) १२)माओ (अब्राहम लिंकन यांच्या शेजारी,चिनमधील माजी राज्यकर्ते व विचारवंत... नेपाळमधील माओवादी संघटना यांच्याच विचारांतून प्रेरीत) १३)मार्टीन ल्युथर किंग (पेले यांच्यामागे...एक हात हवेत...सूट घातलेले-जगप्रसिद्ध विचारवंत) आणखी बरेचसे चेहरे असे आहेत ज्यांची नावे व्यवस्थीत लक्षात नाहीत्...जसजसे आठवेन तसतसे लिहीन (इतिहासप्रेमी) -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

विजय.पाटील 10/01/2008 - 12:27
अनिवसेजी, मायकल जॉर्डन हा धावपटू नसुन अतिशय सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आह. तुमची तपशीलात (सोन्याचा बुट वगैरे) काहीतरी चूक झालेली दिसते.

भाग्यश्री 10/01/2008 - 03:04
हिटलर, गांधीजी, ऐश्वर्या राय(सगळ्यात डावीकडे टीव्हीच्या मागे कोण आहे ती??)

In reply to by भाग्यश्री

इनोबा म्हणे 10/01/2008 - 03:17
मलाही ती ऐश्वर्या असल्यासारखीच वाटते,पण नक्की सांगू शकत नाही.चित्र झूम करून पाहिल्यानंतर खुपच धूसर होत आहे त्यामूळे व्यवस्थीत पाहता आले नाही. -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त 10/01/2008 - 07:42
माझ्याकडे चित्र थोडे मोठे आहे. त्यात पाहून वाटते की ती ऐश्वर्या राय नाही. मोठे चित्र अपलोड कुठे करावे कळत नाही. फ्लिकर आणि गूगल दोन्ही १२००x४०० च्या वर चित्र दाखवत नाही आहेत. :(

विकेड बनी 10/01/2008 - 03:42
ऑड्री हेपबर्न आहे. ऐश्वर्या राय म्हणे!!!! अमिताभ, इंदिरा, शाहरूख खान, मल्लिका शेरावत, कोयना मित्रा, सेलिना जेटली नाही का दिसले?

चतुरंग 10/01/2008 - 11:19
मला सापडलेले - १ - मायकेल जॉर्डन (अमेरिकन बास्केटबॉल लेजंड - स्पोर्ट शूज घालून उजवीकडे बसलेला) २ - रवींद्रनाथ टागोर ३ - मदर टेरेसा (दोघेही गॅलरी खाली) ४ - सॉक्रेटीस (बसलेला) ५ - प्रिंन्स चार्ल्स ६ - (त्याच्या उजवीकडे) लुसियानो पावारोत्ती (इटालियन ऑपेरा सिंगर नुकताच गेला) ७ -(लुसियानोच्या मागे) जॉर्ज बुश ८ - (बुश च्या मागे) ओसामा ९ -यासर अराफात १० - (त्याच्या पायाशी) मेरिलिन मन्रोचा फक्त चेहरा आहे. ११- (त्याच्या वर -गॉडफादर मधला) मार्लन ब्रांडो १२ - (त्याच्या उजवीकडे) फिडेल कास्ट्रो १३ - (कास्ट्रोच्या समोर बहुदा चिनी तत्ववेत्ता ) - कन्फ्यूशस (असावा) १४ - (पांढर्‍या घोड्यावर स्वार) नेपोलियन १५ - (त्याच्या पाठच्या घोड्यावर) चेंगीझखान (मंगोल सम्राट) १६ - (काळी टोपी खुर्चीवर) चर्चिल १७ - (त्याच्या मागे) ब्रूस ली १८ - (खालच्याबाजूला) क्वीन एलिझाबेथ १९ - बिल क्लिंटन २० - लेनिन २१ - (बसलेला) पेले २२ - (खाली) हिटलर २३ - (त्याच्या डावीकडे) मुहम्मद अली जीना २४ - सद्दाम हुसेन २५ - (त्याच्या डवीकडे) मार्क ट्वेन २६ - पीयानोवर - बीथोवेन २७ - ऐश्वर्या राय २८ -चार्ली चॅपलीन २९ - (शेजारी) हेन्री फोर्ड ३० - (जमिनीवर) टायसन ३१ - (शेजारी) व्लादिमीर पुतिन ३२ - आइनस्टाईन ३३ - (मागे) टॉलस्टॉय ३४ - (छोटी मुलगी) -ऍन फ्रँक ? (असावी) ३५ - (टेबलामागे) स्टॅलिन ३६ - (त्याच्या मागे) गिटार वर - एल्वीस प्रिस्ले ३७ - शेक्सपियर ३८ - (टेबलापाशी बोलणारा दाढीवाला) कार्ल मार्क्स ३९ - (लाल शर्ट, हाताची घडी) पाब्लो पिकासो ४० - लिंकन ४१ - माओ ४२ -महात्मा गांधी ४३ - (कॅस्ट्रोच्या शेजारी बंदूकधारी ) चे गवेरा? ४४ - (शेक्स्पियरच्या उजवीकडे) - बर्ट्रांड रसेल ? असावा - (शेरलॉक होम्स नाही, हे काल्पनिक पात्र आहे आणी त्याची हॅट वेगळी होती) चतुरंग

प्राजु 10/01/2008 - 00:33
१. आईनस्टाईन २. ब्रुसलि.. ३. अब्राहम लिंकन.. आपण ओळखलेल्या शिवाय मल इतके आले ओळखता...पह्ते अजून दिसतात का ते.. - प्राजु

सुनील 10/01/2008 - 00:40
पहिल्याच रांगेत खाली बसलेला तो मल्ल कोण? महंमद अली तर नव्हे? तशीच ती आईनस्टाईनच्या मागची छोटी मुलगी कोण? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे 10/01/2008 - 02:04
देवा फारच सुंदर विषय दिला आहेस तु...धन्यवाद! तू लिहीलेल्या नावाशिवाय... १)मायकेल जॉर्डन(स्पोर्ट शु़ज घातलेला-जगविख्यात धावपटू...हा आपल्या आयुष्यातली शेवटची शर्यत 'नायके' कंपनीने बनवलेले सोन्याचे बुट घालून धावला) २)नेल्सन मंडेला(गॅलरी खाली-दक्षीण आफ्रीकेचा 'गांधी,गांधी यांच्या बरोबर कारावास भोगल्यामुळे त्यांचा याच्या जिवनावर फार मोठा प्रभाव, त्यांनाच आपला आदर्श मानणारा) ३)मदर तेरेसा (गॅलरी खाली) ४)गुरुदेव रविंन्द्रनाथ ठाकूर्(गॅलरी खाली,मदर तेरेसा यांच्या पुढे) ५)सॉक्रेटीस(विख्यात तत्वज्ञ-गुरूदेव यांच्या पुढे,गुडघ्यावर हात ठेवलेला...प्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू यांनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नाटकात याची व्यक्तीरेखा साकारली होती) ६)ओसामा बिन लादेन(मागे स्त्रियांच्या रांगेत-याचा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला माहितच आहे.) ७)पेले (डाव्या बाजूला-एक पाय खाली सोडून बसलेला-ब्राझीलचा व जगप्रसिद्ध फुटबॉलपटू...'पेले' या शब्दाचा अर्थ आहे 'अनवाणी'...पायात बूट न घालता खेळत असल्यामुळे याला हे नाव मिळाले.) ८)शेक्सपियर(गिटारवादकाच्या मागे) ९)नेपोलियन बोनापार्ट (पांढर्‍या घोड्यावर स्वार,मूळचा फ्रान्सचा व भारतीय लष्कराने गौरविलेल्या जगातील तीन अव्वल लढवय्यांपैकी प्रथम(दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज व आसामचा राजा लासित बरफुकन उर्फ चिलाराय... मृत्यू इंग्रजी सैनिकांच्या नजरकैदेत झाला होता,मृत्यूचे गूढ दोनशे वर्षांनी उकलले,फ्रान्सच्या एका संग्रहालयातील याच्या केसाच्या बटेवर आधारीत संशोधनानंतर विषप्रयोग झाल्याचा दावा) १०)शेरलॉक होम्स (शेक्सपियर यांच्या बाजूला...हॅटव तोंडात सिगार असलेला-हेरकथांमधील जगप्रसिद्ध पात्र-जगातील सर्वप्रथम पात्र ज्याचा (इंग्लंडमधे) पुतळा बनवला गेला) ११)माईक टायसन (अमेरीकेचा जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा...बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली,आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना चालू असताना कान चावून तोडला...अमिरेकेतील एका चॉकलेट उत्पादकाने या घटनेनंतर कानाच्या आकाराचे चॉकलेट बनवले) १२)माओ (अब्राहम लिंकन यांच्या शेजारी,चिनमधील माजी राज्यकर्ते व विचारवंत... नेपाळमधील माओवादी संघटना यांच्याच विचारांतून प्रेरीत) १३)मार्टीन ल्युथर किंग (पेले यांच्यामागे...एक हात हवेत...सूट घातलेले-जगप्रसिद्ध विचारवंत) आणखी बरेचसे चेहरे असे आहेत ज्यांची नावे व्यवस्थीत लक्षात नाहीत्...जसजसे आठवेन तसतसे लिहीन (इतिहासप्रेमी) -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

विजय.पाटील 10/01/2008 - 12:27
अनिवसेजी, मायकल जॉर्डन हा धावपटू नसुन अतिशय सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आह. तुमची तपशीलात (सोन्याचा बुट वगैरे) काहीतरी चूक झालेली दिसते.

भाग्यश्री 10/01/2008 - 03:04
हिटलर, गांधीजी, ऐश्वर्या राय(सगळ्यात डावीकडे टीव्हीच्या मागे कोण आहे ती??)

In reply to by भाग्यश्री

इनोबा म्हणे 10/01/2008 - 03:17
मलाही ती ऐश्वर्या असल्यासारखीच वाटते,पण नक्की सांगू शकत नाही.चित्र झूम करून पाहिल्यानंतर खुपच धूसर होत आहे त्यामूळे व्यवस्थीत पाहता आले नाही. -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त 10/01/2008 - 07:42
माझ्याकडे चित्र थोडे मोठे आहे. त्यात पाहून वाटते की ती ऐश्वर्या राय नाही. मोठे चित्र अपलोड कुठे करावे कळत नाही. फ्लिकर आणि गूगल दोन्ही १२००x४०० च्या वर चित्र दाखवत नाही आहेत. :(

विकेड बनी 10/01/2008 - 03:42
ऑड्री हेपबर्न आहे. ऐश्वर्या राय म्हणे!!!! अमिताभ, इंदिरा, शाहरूख खान, मल्लिका शेरावत, कोयना मित्रा, सेलिना जेटली नाही का दिसले?

चतुरंग 10/01/2008 - 11:19
मला सापडलेले - १ - मायकेल जॉर्डन (अमेरिकन बास्केटबॉल लेजंड - स्पोर्ट शूज घालून उजवीकडे बसलेला) २ - रवींद्रनाथ टागोर ३ - मदर टेरेसा (दोघेही गॅलरी खाली) ४ - सॉक्रेटीस (बसलेला) ५ - प्रिंन्स चार्ल्स ६ - (त्याच्या उजवीकडे) लुसियानो पावारोत्ती (इटालियन ऑपेरा सिंगर नुकताच गेला) ७ -(लुसियानोच्या मागे) जॉर्ज बुश ८ - (बुश च्या मागे) ओसामा ९ -यासर अराफात १० - (त्याच्या पायाशी) मेरिलिन मन्रोचा फक्त चेहरा आहे. ११- (त्याच्या वर -गॉडफादर मधला) मार्लन ब्रांडो १२ - (त्याच्या उजवीकडे) फिडेल कास्ट्रो १३ - (कास्ट्रोच्या समोर बहुदा चिनी तत्ववेत्ता ) - कन्फ्यूशस (असावा) १४ - (पांढर्‍या घोड्यावर स्वार) नेपोलियन १५ - (त्याच्या पाठच्या घोड्यावर) चेंगीझखान (मंगोल सम्राट) १६ - (काळी टोपी खुर्चीवर) चर्चिल १७ - (त्याच्या मागे) ब्रूस ली १८ - (खालच्याबाजूला) क्वीन एलिझाबेथ १९ - बिल क्लिंटन २० - लेनिन २१ - (बसलेला) पेले २२ - (खाली) हिटलर २३ - (त्याच्या डावीकडे) मुहम्मद अली जीना २४ - सद्दाम हुसेन २५ - (त्याच्या डवीकडे) मार्क ट्वेन २६ - पीयानोवर - बीथोवेन २७ - ऐश्वर्या राय २८ -चार्ली चॅपलीन २९ - (शेजारी) हेन्री फोर्ड ३० - (जमिनीवर) टायसन ३१ - (शेजारी) व्लादिमीर पुतिन ३२ - आइनस्टाईन ३३ - (मागे) टॉलस्टॉय ३४ - (छोटी मुलगी) -ऍन फ्रँक ? (असावी) ३५ - (टेबलामागे) स्टॅलिन ३६ - (त्याच्या मागे) गिटार वर - एल्वीस प्रिस्ले ३७ - शेक्सपियर ३८ - (टेबलापाशी बोलणारा दाढीवाला) कार्ल मार्क्स ३९ - (लाल शर्ट, हाताची घडी) पाब्लो पिकासो ४० - लिंकन ४१ - माओ ४२ -महात्मा गांधी ४३ - (कॅस्ट्रोच्या शेजारी बंदूकधारी ) चे गवेरा? ४४ - (शेक्स्पियरच्या उजवीकडे) - बर्ट्रांड रसेल ? असावा - (शेरलॉक होम्स नाही, हे काल्पनिक पात्र आहे आणी त्याची हॅट वेगळी होती) चतुरंग
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

महान इजिप्शियन संस्कृती

सागर ·

छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक. वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे. 'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 26/12/2007 - 15:53
बिपीन , या माहितीबद्दल अनेक धन्यवाद. दोन्ही बदल लेखात केले आहेत (अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर

प्रियाली 25/12/2007 - 03:33
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

In reply to by प्रियाली

सागर 26/12/2007 - 18:45
प्रियाली ताई , सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या. बर्‍याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता. असो. विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप चुकीची दुरुस्ती केली आहे हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली . हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत. प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे. तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती. धन्यवाद सागर

ऋषिकेश 25/12/2007 - 05:26
इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्‍याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्‍यास वेगळाच आनंद मिळतो. तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सागर 26/12/2007 - 18:56
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश, तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) खरेतर हा लेख मी बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्‍याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन. अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील धन्यवाद सागर

२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 18:58
जास्त व्यासंगाची जरूर आहे. सुधीरराव, अशा विषयाला हात घालण्यापूर्वी व्यासंग अधिक हवा हे खरे आहे. यापुढे अशा चुका नक्की टाळेन. सागर

In reply to by सागर

सुरेख. आपल्या अप्रतिम प्रतिसादाची तारीफ करावी तेवढी थोडीच. सोबत जोडलेल्या महितीबद्दल धन्यवाद.

चतुरंग 25/12/2007 - 22:52
त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे. असो. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सागर 26/12/2007 - 19:02
चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.) खूपच सुधारणा हवी. या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे. आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. हा बदल केला आहे. पुनश्च धन्यवाद सागर

पुष्कर 26/12/2007 - 11:33
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by पुष्कर

सागर 26/12/2007 - 19:18
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर, यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच. >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्‍या (खरे तर सहज टाळता येणार्‍या) चुकीबद्दल क्षमस्व. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा. या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते... धन्यवाद सागर

सुनील 26/12/2007 - 22:13
ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रियाली 27/12/2007 - 01:46
टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय 26/12/2007 - 22:35
अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे. > इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते > 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!

In reply to by धनंजय

प्रियाली 27/12/2007 - 02:01
>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही. तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा. पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.

अवलिया 27/12/2007 - 17:50
भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते नाना

छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक. वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे. 'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 26/12/2007 - 15:53
बिपीन , या माहितीबद्दल अनेक धन्यवाद. दोन्ही बदल लेखात केले आहेत (अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर

प्रियाली 25/12/2007 - 03:33
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

In reply to by प्रियाली

सागर 26/12/2007 - 18:45
प्रियाली ताई , सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या. बर्‍याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता. असो. विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप चुकीची दुरुस्ती केली आहे हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली . हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत. प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे. तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती. धन्यवाद सागर

ऋषिकेश 25/12/2007 - 05:26
इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्‍याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्‍यास वेगळाच आनंद मिळतो. तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सागर 26/12/2007 - 18:56
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश, तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) खरेतर हा लेख मी बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्‍याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन. अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील धन्यवाद सागर

२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 18:58
जास्त व्यासंगाची जरूर आहे. सुधीरराव, अशा विषयाला हात घालण्यापूर्वी व्यासंग अधिक हवा हे खरे आहे. यापुढे अशा चुका नक्की टाळेन. सागर

In reply to by सागर

सुरेख. आपल्या अप्रतिम प्रतिसादाची तारीफ करावी तेवढी थोडीच. सोबत जोडलेल्या महितीबद्दल धन्यवाद.

चतुरंग 25/12/2007 - 22:52
त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे. असो. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सागर 26/12/2007 - 19:02
चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.) खूपच सुधारणा हवी. या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे. आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. हा बदल केला आहे. पुनश्च धन्यवाद सागर

पुष्कर 26/12/2007 - 11:33
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by पुष्कर

सागर 26/12/2007 - 19:18
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर, यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच. >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्‍या (खरे तर सहज टाळता येणार्‍या) चुकीबद्दल क्षमस्व. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा. या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते... धन्यवाद सागर

सुनील 26/12/2007 - 22:13
ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रियाली 27/12/2007 - 01:46
टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय 26/12/2007 - 22:35
अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे. > इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते > 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!

In reply to by धनंजय

प्रियाली 27/12/2007 - 02:01
>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही. तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा. पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.

अवलिया 27/12/2007 - 17:50
भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते नाना
महान इजिप्शियन संस्कृती सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

सागर ·

ऋषिकेश 24/12/2007 - 19:49
हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि. केवळ हिटलरच नाही पण अकबर, टिपू सुलतान अश्या अनेक करंट्या प्रमुखांची भलामण मलातरी अस्वस्थ करून जाते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 25/12/2007 - 09:53
>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा >>एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. १००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्‍हाईनलँड वर ताबा मिळवला. र्‍हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्‍हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही. हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले. हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल. माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे-- १) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली. २) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा ३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग ४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का? इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्‍या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो? आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का? भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार? हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का? कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे. अवांतर-- वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्याकडे दुसर्‍या महायुध्दावरील चांगल्या माहितीपटांचा संग्रह आहे.मी अमेरिका सोडून लवकरच भारतात (बहुदा मुंबई/ ठाणे किंवा पुणे) स्थायिक होणार आहे.कोणाला जर ते माहितीपट कॉपी करून हवे असतील तर माझाशी व्य.नि वर संपर्क साधावा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

In reply to by क्लिंटन

सागर 26/12/2007 - 13:02
क्लिंटन साहेब, एवढ्या सविस्तर आणि विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद. की तुम्ही जे मुद्दे स्पष्ट केले आहेत, ते अगदी सर्वस्वी खरे आहेत. हिटलरने छळ छावण्यांतून आणि यातनातळांतून जे प्रयोग केले ते अमानुष या शब्दाचा अपमान करतील इतके क्रूर होते. जसे लोकांना सोलून काढणे. जिवंत धातूंच्या पेट्यांतून तापवणे, हजारोंना एकाच वेळी गॅस चेंबर्समधून विषारी गॅसने मारणे. स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी तर माझी लेखणीच पुढे सरत नाही इतके अनन्वित अत्याचार झालेले होते. दुसर्‍या महायुद्धावर मी बरेच वाचन केले आहे माहितीपट देखील पाहिले आहेत. हिटलरच्या अत्याचारांतून जगाची सुटका करण्याचे मोठे कार्य दोस्त राष्ट्रांनी केले यात काही संशय नाही. अन्यथा आज जगाचा नकाशा वेगळा असता आणि आपण इंग्रजी ऐवजी जर्मन भाषा शिकत असतो. येथे मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की लेखाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केले आहे की मला काही हिटलरची भलावण करायची नाहिये. कारण हिटलर हा क्रूरकर्मा आणि वि़कृत मनोवृत्तीचा हुकुमशहा होता हे माझेही मत आहे. या लेखात जे कानिटकरांनी पुस्तकात सांगितले तेच फक्त मी पुस्तक परिक्षण म्हणून लिहिले आहे. मी देखील लोकशाहीचा आणि जगातील सर्वांना जगण्याचा हक्क आहे या भूमिकेचा कट्टर समर्थक आहे.तेव्हा माझ्यावर कोणी रोष धरु नये ही नम्र विनंती. धन्यवाद, सागर

In reply to by क्लिंटन

अन्या दातार 29/01/2008 - 13:56
हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. क्लिंटन्साहेब, या वाक्याशी मी असहमत आहे. त्याच्या अनेक कृतिंमध्ये राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली दिसते. उदा. ६०००० बेकार तरुणांच्या फौजेला काम मिळवून देणे, सैन्य बलशाली करणे इ.इ.

मला असे वाटते, भलामण वाईटच, पण कानिटकरांचे पुस्तक ही खरोखरच भलामण आहे का? मी हे पुस्तक प्रथम वाचले त्याला आता बहुतेक २२-२३ वर्षे झाली असावित. त्या नंन्तर काही वर्षे बरीच पारयणे झाली, मित्रांबरोबर चर्चा झाली. हिटलरची जी वाईट बाजू आहे ती सुद्धा दाखवली आहे. आणि हे विसरता कामा नये की इतिहास हा नेहमी 'जेते' लिहितात. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना काय घ्यायचे आणि काय विसरायचे ते आपण ठरवायचे. "हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि." हे मात्र खरेच. बिपिन.

हे पुस्तक मी दीड्दोन वर्षांपुर्वी पुन्हा वाचले. वि ग नी या पुस्तकांत कोठेहि कसलेहि भाष्य केलेले नाही. मते ही सर्व वाचकांचीच आहेत. हिटलर हा थोर मुत्सद्दी होता असे ते म्हणत नाहीत. नशिबाने त्याची साथ दिली हे दाखवतांना ते शुशनिग, पेताँ, चेंबर्लेन वगैरे त्याचे विरोधक नेते कसे बावळट होते ते ते दाखवतात. हिटलरच्या त्याला जगातील सर्वश्रेष्ठ शेतीतद्नापैकी एक मिळाला, सतत तीन वर्षे हवामान शेतीला अनुकूल राहिले व विक्रमी पिके येऊन अन्नटन्चाई दूर झाली हे लिहितात. स्टालीनने दूरदृष्टीने कारखाने पूर्वेस हलविले हे संगतात तसेच त्याने ५ टक्के लोकसंख्येचा विध्वंस केला हे सांगतात. फक्त चर्चिलने माइन काम्फ वाचून हिटलरचा अभ्यास केला होता हे सांगतात तसे त्यानेच पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा पाया रोवला हेहि सांगतात. पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 13:07
बिपीन आणि सुधीरराव , पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे. या मताशी मात्र पूर्ण सहमत. अतिशय वाचनीय पुस्तक आहे हे यात संशय नाही. - सागर

हिटलर हा एक क्रूरकर्मा होता यात काही दुमत असण्याचे कारण नाही, तथापि, त्याने इन्ग्रजान्चे दुसरया महायुद्धात पेकाट मोडले नसते तर भारताचे स्वातन्त्र्य आणखी काही वर्षे दूर गेले असते हे निश्चीत! दुसरे महायुद्ध ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. भारत अगदी पहिल्या दिवसापासून त्यामध्ये गुन्तला होता, हजारो भारतीय तरूण युरोप,आफ्रीका आणि बर्मा येथील लढायान्मधे धारातीर्थी पडले आहेत. जगातील कुठलेही लष्कर युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बळकट होत नाही, सक्षम होत नाही. अनुभवी ब्रिटीश सेनापतीन्च्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्यदळे दुसर्‍या महायुद्धात लढली म्हणूनच स्वातन्त्र्य मिळाल्यावर देशरक्षणासाठी आवश्यक असे उत्तम सैन्य भारताला उपलब्ध झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे. नाझी भस्मासुराचा उदयास्त हे एक उत्तम पुस्तक आहे परन्तु दुसरी बाजू समजून घेण्यासाठी त्याच लेखकाचे 'विन्स्टन चर्चिल' हे पुस्तक सुद्धा हौशी अभ्यासकानी वाचावे. सुदैवाने वि.ग.कानिटकर माझे वैयक्तीक स्नेही आहेत आणि त्रेशष्ट साली लिहीलेल्या त्यान्च्या पुस्तकाबद्दल अजुनही तेवढेच औत्सुक्य आणि प्रतिसाद आहे हे मी त्याना सान्गितल्यावर त्याना निश्चित आनन्द होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 28/12/2007 - 13:50
डॉक्टरसाहेब, वि.ग. कानिटकर हे तुमचे स्नेही आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांना कृपया सांगाल का ? इतके सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आत्त्तापर्यंत या पुस्तकाची किमान ८-१० पारायणे केली असतील तरी प्रत्येक वाचनाच्या वेळी हा इतिहास तितकाच चित्तथरारक वाटतो यात संशय नाही. माझी खात्री आहे की कित्येक शतके नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले, अभ्यासले जाईल. तुमचा प्रतिसाद पाहून खूप खूप आनंद झाला. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल हे पुस्तक अजून मी अभ्यासले नाही. पुढच्या वेळी पुण्याला जाईन तेव्हा नक्की हे पुस्तक घेईन. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. हे मात्र १०० % खरे, कारण दुसर्‍या महायुद्धानंतरच अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांना आपण जगातील महासत्ता होऊ शकू याचा अंदाज आला होता, त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीच्या स्पर्धेतून कित्येक नवीन शोध बाहेर आले. आणि विशेषतः १९६० नंतरचा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग गेल्या शेकडो शतकांच्या तुलनेत आश्चर्यचकीत करणारा असाच आहे. मनःपूर्वक धन्यवाद - सागर

In reply to by विसोबा खेचर

सागर 28/12/2007 - 14:00
तात्या, मला सागरच म्हणा...शेठ म्हणजे फार मोठं वगैरे वाटतं मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे फक्त ३१ वर्षाचा. तेव्हा मला सागरच राहू द्या... कसे? तात्या, तुम्ही व्यासंगी आहात, तेव्हा हे पुस्तक नक्की आवडेन तुम्हाला. (तात्यांचा प्रतिसाद पाहून सुखावलेला) सागर

जरूर सा॑गेन..मीही ते पुस्तक खूप वेळा वाचले आहे..आणि त्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती काढण्याचा प्रयत्न मी व कानिटकर साहेब करीत आहोत. तुम्हाला दुसर्‍या महायुद्धाची खरीच रूची असेल तर खालील पुस्तके जरूर वाचा -Rise & Fall Of Third Reich-William Shirer -Trail of Fox: Biography of Rommel -Panzer Leader: Autobiography of Guderian -Defeat into victory: Autobiography of Slim -Encyclopedia of Third Reich

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 28/12/2007 - 20:27
डॉक्टरसाहेब, तुम्ही सुचविलेल्या पुस्तकांबद्दल आभारी आहे तुमचा आणि कानिटकरसाहेबांचा स्नेह पाहता मला एक विनंती कराविशी वाटते... पहा शक्य झाले तर Rise & Fall Of Third Reich-हे शिरर ने लिहिलेले पुस्तक दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचे आहे. शिरर हा हिटलरच्या उदयास्ताचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तेव्हा त्याचे पुस्तक हे दुसर्‍या महायुद्धाच्या बाबतीत इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त विश्वसनीय ठरते. हा १००० पानांचा अद्वितीय ग्रंथ मराठीत उपलब्ध असावा असे खूप खूप वाटते. ही केवळ माझीच नाही तर माझ्या अनेक मित्रांनी देखील बोलून दाखवलेली इच्छा (खरे तर खंत) आहे. एवढे सुंदर पुस्तक मराठीतून उपलब्ध नाही हे कायम मनाला खटकत राहते. जर तुम्हाला आणि कानिटकर साहेबांना शक्य असेल तर या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. तर माझी खात्री आहे की लाखो वाचकांच्या या पुस्तकावर उड्या पडतील... मला तर आत्ताच या पुस्तकाचे मराठी नाव दिसत आहे....तिसर्‍या राईशचा उदयास्त किंवा हिटलरच्या साम्राज्याचा उदयास्त तेव्हा समस्त मराठी वाचकांतर्फे माझी तुम्हाला आणि कानिटकरसाहेबांना विनंती आहे की या अद्वितीय ग्रंथाचे मराठीत भाषांतर तुम्ही करु शकला तर मराठी भाषेची खूप मोठी सेवा होईल. किंवा दुसर्‍या कोणाही व्यक्तीस तुम्ही हे काम सोपवले तरी चालेल. पण कानिटकरांच्या समृद्ध लेखणीचा अनुभव असल्याने हे काम तुम्ही दोघांनी करावे असे मनापासून वाटते... तुम्ही हवे तर तुमच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना विचारुन पहा. आणि पहा कसा प्रतिसाद मिळतो ते... माझ्याकडे हे पुस्तक डिजिटल स्वरुपात आहे. ते तुम्ही येथून डाऊनलोड करु शकाल http://www.esnips.com/web/EnglishPDF (हे पुस्तक उतरवून घेण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि नोंदणी ही मोफत असल्याने चिंता नको.) धन्यवाद सागर

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 03/01/2008 - 13:09
सुधीरकाका , राईझ & फॉल वाचताना नक्कीच मजा येईल. कारण शिरर ने त्यात तपशीलवार त्या काळचे वर्णन केले आहे. आणि तो स्वतः चिकित्सक आणि अभ्यासू असल्याने परिस्थिती हिटलरला कशी अनुकूल होत गेली आणि त्याने युद्धाचे नियंत्रण कसे स्वतःकडे ठेवले याचे सुंदर वर्णन आहे. मी ही सध्या हे पुस्तक वाचत आहे. तेव्हा एक वेगळा आनंद मिळेल हे नक्की... पण मराठीत हे पुस्तक जसे च्या तसे आले तर मोठी बहार होईल. धन्यवाद सागर

तुमची सूचना चा॑गली आहे. दुसरे महायुद्ध ह्या विषयावर इ॑ग्रजीमधे खूप साहित्य उपलब्ध आहे ज्याचे अजुन मराठी भाषा॑तर झाले नाही. वानगी दाखल पाहावयाचे झाले तर चर्चिलने लिहीलेले सात ख॑ड! ते अभ्यासल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. मी ते पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात काही प्रश्न उभे राहीले. जसे की हिटलरच्या अनेक सेनापती॑पैकी आज मितीला किती जिव॑त आहेत कि॑वा युद्धान॑तर त्या॑चे काय झाले. ह्या स॑दर्भात मी पुष्कळ धा॑डोळा घेतला व याच विषयी एक परिशिष्ट 'नाझी' ला जोडावे असा आमचा प्रयत्न आहे. तसेच माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाविषयी पुष्कळ दुर्मिळ फोटो आहेत तेही जोडण्याचा विचार आहे. कदाचित जो मला सेनापती॑बद्दल प्रश्न पडला तोच इतरही जिज्ञासू वाचका॑ना पडला असू शकतो, त्या॑चेही श॑कासमाधान होईल. न्यूरे॑बर्ग खटल्यावर एक स्वत॑त्र व विस्तृत प्रकरण लिहीण्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आणि रसिका॑चे आशिर्वाद असतील तर हे काम होईल. आणखी एकच विन॑ती तुम्हाला करतो..आपल्या दोघा॑च्या वयात फारसा फरक नाही, मी केवळ २८ (अठ्ठाविस) वर्षा॑चाच आहे व व्यवसायाने जबड्याचा सर्जन आहे (स्पेशालीस्ट डे॑टीस्ट्).तेव्हा मला 'अरे प्रसाद' असे एकेरीत स॑बोधले तर मला आवडेल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 03/01/2008 - 16:05
'अरे प्रसाद' मलाही आनंद वाटला की तुझ्यासारखा तरुण डॉक्टर इतिहासात रस घेत आहे. कानिटकरसाहेबांचा तुझे स्नेही म्हणून तू उल्लेख केला होतास त्यामुळे मला वाटले की तू त्यांच्याइतकाच ज्येष्ठ असशील. हरकत नाही. तुझ्यासारख्या तरुण इतिहाससंशोधकाशी मैत्री झाल्याचा मला तरी खूप आनंद आहे. दुसरे असे की न्युरेंबर्ग वर एका प्रकरणाने भागेल असे वाटत नाही. कारण खूप लोकांच्या साक्षी झाल्या. त्या सर्वांचा उहापोह होणे गरजेचे आहे. एखादे छोटेसे पुस्तक त्यावर होऊ शकेल असे मला वाटते... बाकी प्रसाद दाढे हे तुझ्या व्यवसायास अनुरुप असलेल्या नावाचा योगायोग पाहून मन दिलखुश झाले. तुझे पेशंट आनंदाने म्हणत असतील दाढेंकडे दाढ काढायला चाललो आहे. :) विलक्षण योगायोग दुसरे काय? (की आडनावावरुन आधीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते? ) धन्यवाद - सागर

प्रमोद देव 29/12/2007 - 22:06
प्रसाद दाढे! वा! म्हणजे तुझ्या नावातच तुझा व्यवसाय लपलाय! :-) झकास! हे म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरचे नाव "प्रकाश डोळे" असावे तसे.

माझ्या नावावरील हा श्लेष मी खूप वेळा ऐकला आहे..पण खरोखरच नाव आणि व्यवसाय एकच असण॑ हा विलक्षण योगायोग आहे. मला एक 'कान्-नाक्-घसा' तज्ञ माहित आहेत त्या॑चे नाव आहे डॉ. वाचासु॑दर!!

मी परवाच वि.ग.कानिटकरा॑शी चर्चा केली. 'नाझी भस्मासुराचा उदयास्तची' विसावी आवृत्ती येत आहे. आणखीनही येत राहतील. मात्र थोडा-बहुत फरक सोडला तर ही सर्व पुनर्मुद्रणे आहेत. खुद्द लेखका॑चीसुद्धा इच्छा आहे की काही नवा मजकूर समाविष्ट करावा. तरी माझी सर्व वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी यास॑दर्भात आपल्या सूचना मला सा॑गाव्यात. हे पुस्तक पुष्कळ लोका॑नी वाचले आहे, अनेका॑नी पारायणे केली आहेत .तेव्हा तुम्हाला जाणवलेल्या त्रुटी, उणीवा कि॑वा एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण अथवा विशिष्ट छायाचित्र उदाहरणार्थ माझ्या मते दुसर्‍या महायुद्धाशी स॑बधित सर्व ठळक व्यक्ती॑ची स्पष्ट छायाचित्रे देणे आवश्यक आहे. स्कोर्झेनी, ह्यॉस (होएस), बोरमन, काउ॑ट कियानो (सियानो), हायड्रिच, रोझेनबर्ग, पाऊलुस (पोलस), स्टाउफेनबर्ग (स्टुफेनबर्ग), काउ॑ट बर्नाडोट इ. म॑डळी॑ची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे दिली पाहिजेत. तरी वाचका॑नी आपले मत,सूचना मा॑डाव्या. मी त्या जरूर लेखका॑कडे व प्रकाशका॑कडे पोहोचवीन. (योगायोगाने माझा माजगा॑वकरसाहेबा॑शीसुद्धा चा॑गला परिचय आहे, ते माझे पेश॑ट आहेत) आणि आपल्या सर्वा॑च्या आवडत्या पुस्तकाची अधिक चा॑गली आवृत्ती उपलब्ध होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 03/01/2008 - 16:11
नाझी भस्मासुराच्या बाबतीत मला खटकलेली एक गोष्ट सांगतो... पुस्तकाच्या शेवटी कानिटकर साहेबांनी हिटलरच्या माईन काम्फ चा थोडासा अनुवाद अतिशय सुंदर शब्दांत केला आहे. खरे तर थोड्याशा प्रकरणांपेक्षा, माईन काम्फचा संक्षिप्त अनुवाद देता आला तर खूप छान होईल. कारण हिटलरची माईन काम्फच्या वेळची मनःस्थिती काय होती , त्याचे त्यावेळचे आडाखे काय होते आणि ते पुढे त्याने कसे प्रत्यक्षात आणले याच्या चिंतनासाठी या संक्षिप्त अनुवादाचा उपयोग वाचकांस होऊ शकेल असे मला वाटते... खरे तर माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद मराठीत उपलब्ध व्हावा असे मला वाटते. पण हिटलरविषयी असल्याने त्याच्या प्रकाशनास अडचणी येऊ शकतील.. कोण कशावरुन वादळ उठवेल हे काही सांगता यायचे नाही. असो... सागर

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पुष्कर 16/01/2008 - 08:26
भेटून आनंद झाला. अहो मी दादांचा शेजारी (आम्ही वि.गं ना दादा म्हणतो). औदुंबर अपार्ट्मेंट- दुसरा मजला! अहो तुम्ही तिथे कधी येऊन गेलात? पुन्हा आलात तर समोरच्या घरीही चक्कर मारा. तुमचा प्रतिसाद वाचून मीही दादांशी ह्या विषयावर बोललो. त्यांनी मला तुमच्याविषयी सांगितलं. पुन्हा याल तेव्हा अवश्य भेटू. - पुष्कर

In reply to by पुष्कर

पुष्कर 01/02/2025 - 11:53
बर्‍याच वर्षांनी आज इथे पुन्हा आलो. त्या वेळी दादांना इथल्या साधकबाधक चर्चेविषयी सांगितलं होतं आणि त्यांना ऐकून खूप छान वाटलं होतं. आता दादा नाहीत आणि आम्ही पण तिथे राहत नाही, पण शेजारी म्हणून खूप सुंदर आठवणी मागे राहिल्या आहेत.

अत्यंत सुंदर चर्चा....डा`क्टर दाढे यांनी येऊन अजून मजा आणली... आणि सागर, राईज आणि फोल लिन्क बद्दल धन्यवाद...

अरविन्द हिटलर अतिउत्तम सेनानी व मुत्सद्दी होता हे नक्कीच. आजचा इतिहास जेत्या लोकानी लिहिला आहे. हिट्लर पेक्षा जास्त माणसे अमेरिकेने अणु-बॉम्बने मारले आहेत .पराभूता बद्दल कोणीहि चान्गले बोलत नाही. जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते. असो चर्चा अतिशय मार्मिक झाली आहे.

In reply to by अरविन्दनरहरजोशी

ऋषिकेश 17/01/2008 - 20:35
>> जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते कबुल पण चांगल्या व्यक्तींमधे नाहि!! हुशारी आणि मुत्सदीपणा काय हो ओसामाकडे पण आहे!

पुढच्या वेळी मी दादा॑कडे येईन ते॑व्हा नक्की तुम्हाला भेटीन. तूर्तास माझ्याकडील छायाचित्रे मी माजगा॑वकरा॑कडे देणार आहे. माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाशी स॑दर्भ असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती॑ची छायाचित्रे व व्यक्तीचित्रे आहेत. माझी रसिक वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी मला अशा व्यक्ति सुचवाव्यात ज्या॑ची छायाचित्रे आजवरच्या आवृत्तीमध्ये अस्पष्ट आहेत कि॑वा अजिबात नाहीत. मी ते फोटो जरूर पुरवेन. जास्तीची माहिती समविष्ट करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे पर॑तु त्यास थोडा वेळ लागेल कारण माझा व्यवसाय व नोकरी.

नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक काही दिवसाआधी वाचायला सुरुवात केली. आता पूर्वार्ध वाचून संपवलाय. थोडक्यात घडामोडी सांगतो. अडॉल्फ हिटलर नावाचा मुलगा जर्मन प्रेमी असतो, ऑस्ट्रिया सह अखंड जर्मन राष्ट्र बनावे अशी त्याची इच्छा असते. व्हेनिस शहरात तो भनंग अवस्थेत फिरत असतो, देशाच्या वाईट अवस्थेला ज्यू जबाबदार आहेत असे त्याचे ठाम मत असते. मग एका दिवशी पहिले महायुद्ध पेटते नी भनंग हिटलर जर्मनीच्या बव्हेरिया राज्यात सैन्यभरतीचा अर्ज करतो. निवडला जातो नी त्याचे दिवस पलटतात, दोन वेळा तो जखमी होतो. ३५०० सैनिकांच्या तुकडीत ५०० परत येतात त्यात हिटलर एक असतो. जर्मनीचा कैसर पळून जातो नी जर्मनी देश युद्ध हरतो, मेलेल्याला अजुन मारावे तसे व्हेनिसच्या तहाच्या अटी जर्मनीवर लादल्या जातात नी जर्मनी भरडला जातो. ह्या रागातून एक अपत्य जन्मत ते म्हणजे हिटलर. सैन्यात सैनिकाना लोकशाही चांगली वाटू नये म्हणून सैनिकाना अधिकारी भाषण देत असतात ह्यात एकदा एक अधिकारी ज्यूंबद्दल चांगलं बोलतो, हिटलर ते थांबवून ज्यूंबद्दल वाईट नी देशाबद्दल चांगले बोलतो, अधिकारी खूश होऊन हिटलर ला असेभाषणं देण्याची जबाबदारी देऊन सैन्याच्या राजकीय विभागात घेतो. हिटलरला राजकीय पक्षांवर नजर ठेवायची जबाबदारी मिळते, एकदा हिटलरला जर्मन वर्कर्स पार्टी ह्या नवीन स्थापन झालेल्या पक्ष बद्दल रिपोर्ट सादर करायची ऑर्डर सुटते, सैन्य कम्युनिस्ट पक्षांना घाबरत असते. हिटलर त्या पक्षाच्या सभेला साध्या वेशात जातो, तिथे फक्त २५ लोक जमलेले असतात, सभेत हिटलरला एक छोटे ४० पाणी पुस्तक मिळते त्या पुस्तकात हिटलरच्या मनातल्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. नंतर हिटलरला त्या पक्षाचे सभासद झाल्याचे पत्र मिळते, नंतर एका नॅशनल सोशॅलिस्ट पार्टी नावाच्या २० -२५ सभासद असलेल्या पक्षाचे आणी जर्मन वर्कर्स पक्षाचे एकत्रीकरण होते व नवीन पक्ष स्थापला जातो “नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” (नाझी) ह्या पक्षाला नेत्याची आवश्यकता आहे हे ओळखून हिटलर सैन्याचा राजीनामा देतो नी पूर्णवेळ पक्षाला वाहून घेतो. हिटलरच्या वक्तृत्व कलेने पक्ष चांगलाच फोफावतो, त्याला चांगले साथीदारही मिळतात. मध्यंतरी पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या सर्वोच्च सैन्याधिकार्याला धरून हिटलर मोर्चा काढतो व पकडला जाऊन जेल मध्ये जातो तिथे तो “माईन काम्फ” आत्मचरित्र लिहितो. अनेक वर्षांच्या संघर्षाने पक्ष निवडणुका लढवत सत्तेत येतो व हिटलर सर्व पक्षांवर बंदी घालून फक्त एकच पक्ष ठेवतो, नाझी नी चिन्ह स्वस्तिक. नंतर पक्ष वाढवणाऱ्या काही मित्रांच्याही हत्या करतो. इंग्लंडकडून सैन्य वाढवायला नी नाविकदल वाढवायला परवानगी मिळवतो. पुढे चार पाच वर्षातच जर्मनीची तुफ्फान प्रगती होते. नंतर हिटलर बाजूचे ऑस्ट्रिया नी चेकोस्लोवाकीया गिळतो. हे हिटलर नावाचे उधळलेले गाढव पूर्वेकडे सरकतेय त्यामुळे रशियावर आदळेल असे फ्रान्स इंग्लंडला वाटते. पण स्टॅलिन हे पश्चिमेवर उधळायला हीटलरशी हातमीळवणी करतो. सैन्य पोलंड सीमेवर जमा होऊन पाऊणे पाच वाजता पोलंड मध्ये घुसते. पोलंड रशिया नी जर्मनी अर्धा अर्धा वाटून घेतात. स्टॅलिनला फिनलँड ने चांगलेच चोपले आहे, फिनलँड चे २५ हजार तर रशियाचे २ लाख सैनिक मेलेत. हिटलरने नार्वे जिंकलाय. ह्यामुळे बुळा चेंबर्लेन जाऊन हिटलरला ओळखलेला एकमेव माणूस चर्चिल पंतप्रधान झालाय. फ्रान्समध्ये नाझी सैन्य घुसलय. पुढे वाचेन तसा लिहितो… :) - दोस्त राष्ट्रांना पाठिंबा असलेला अमरेंद्र बाहुबली

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेते इतिहास लिहितात.... कृपया खालील पुस्तक पण वाचा... https://www.flipkart.com/hi/adolf-hitler-ani-dusare-mahayuddha-satya-aani-viparyas/p/itmfemdvavcgz95q एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि एकाच घटनेला असंख्य कंगोरे....

करून दिलेली ओळख वाचकांना पुस्तक वाचण्यास उद्युक्त करते. कुठलाही, विशेषत: बहुचर्चित राज्यकर्ते जे तानाशाह म्हणून ओळखले जातात. सुरवातीचे देशप्रेम नंतर व्यक्तिगत महत्वाकांक्षेत रुपांतरीत होते आणी आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्व य्योग्य अयोग्य मार्ग अवलंबीतात. त्या काळाच्या परिप्रेक्षातून त्यांना जे वाटले त्यांनी केले. पण त्या गोष्टींचा भविष्यात झालेला परिणाम अभ्यासणे महत्वाचा असतो. औरंगजेब सहिष्णू असता तर कदाचित मराठा साम्राज्य उदयाला आले नसते. अर्थात हे माझे मत. अमरेंन्द्र बाहुबली या तरूण मिपाखराने बरेच प्रयत्न करून हे पुस्तक मिळवले,वाचतोय आणी आपले मत यावर व्यक्त करतो याची प्रशंसा केल्याशिवाय रहावत नाही. लेखक,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा 06/12/2024 - 19:29
मी हे पुस्तक 1993 साली वाचले तेव्हा माझी जागतिक इतिहासाबद्दलचची समज फारशी नव्हती, त्यामुळे सुरुवातीला हे पुस्तक क्लिष्ट वाटले होते पण हळूहळू पुस्तकांनी प्रभाव दाखवायला सुरुवात केली. जगाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा नेता हिटलर आणि त्याच्या साम्राज्याची भूक, आक्रमणे, यशोगाथा, महायुद्ध हे सगळं वाचण्यात रंगून गेलो. मी त्याचवेळी जगाचा नकाशा आणला आणि हिटलर चे मार्गक्रमण आक्रमण अभ्यासता अभ्यासता नकाशा पहात कोणता देश कुठे आहे, कोणता देश जर्मनीच्या शेजारी आहे याचे हळूहळू आकलन होऊ लागले. या पुस्तकाच्या वाचनाचा कालावधी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. ते भारलेपण मला आजही आठवते. त्यामुळे या पुस्तकाचे माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. या पाठोपाठ काही वर्षांनी म्हणजे पाच सात वर्षातच मी वीणा गव्हाणकर यांचे कृषी तज्ञ आणि क्रांतिकारक गदर पार्टीचे संस्थापक डॉक्टर खानखोजे यांच्यावरील " डॉ खानखोजे - नाही चिरा नाही पणती" हे पुस्तक वाचले हाही अनुभव अविस्मरणीय होता. ( वाचले नसेल तर अवश्य वाचा) अशी पुस्तके वाचता वाचता जी परिपक्वता अनुभवली ते जीवनात कायम उपयोगी पडले हा भागाव असताना हे सर्व आठवले. !! धन्यवाद !!

मला दुसरे महायुद्ध वाचताना खूप दडपण येतय! काय म्हणावे जर्मन सेनेला आज पर्यंतच्या मानवी इतिहासातील ही सर्वात ताकदवान सेना असावी! रोमेल सारख्या उत्कृष्ट ती भयंकर भारी विजय मिळालेल्या सेनानीला हिटलर रसद पाठवत नाहीये आणी त्यामुळे सुएझ कालवा हिटलरने ताब्यात घेतला नाही कारण त्याला रशियावर हल्ला करायचा आहे. मोलोटोव स्टॅलीन ही जोडगोळी नी हिटलरचा मॉस्कोतील वकील जर्मनी- रशिया युद्ध होऊ नये म्हणून परकोटीचा प्रयत्न करताहेत. हे सगळं वाचून माझ्य मनावर प्रचंड दडपण येतंय पुढे वाचल्या जात नाहीये. :( सुएझ कालवा घेतला तर इंग्लंड संपला हे सोपे गणित असूनही हिटलरने ते का केले नाही? रशियावरील हल्ला १९४१ ऐवजी ४२ मध्येही करता आला असता ना? :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

https://www.amazon.in/-/hi/Parag-Vaidya/dp/B07NVQRTBZ एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात. ह्या पुस्तकात, चर्चिल, रुझवेल्ट आणि स्टॅलिन, यांनी हिटलरची कशी गोची करून ठेवली होती? हे तारखे नुसार आणि पुराव्या सकट सांगितले आहे.

हे पुस्तक दोन दिवसा आधी मी वाचून संपवले नी माझी झोप उडालीय नी कशातच मन लागत नाहीये. मला ह्यावर उतारा पाहिजे. मॉस्कोत पोहोचून क्रेमलिनचे मनोरे पाहणारे जर्मन सैन्य हारले ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हिटलर मरो तिकडे पण इथके अद्भुत युद्ध लढणारे जर्मन्स हरायला नको होते असे का माहीत का वाटतेय? कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून? हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे. रशियाला जपानने पाठीत रट्टा घातला असता तर हिटलरने रशीया जिंकला असता नी नंतर झालेली सैन्य हानी टळली असतीनी त्याच सेनेच्या एका टोल्यातच इंग्लंड पडले असते. मूर्ख जपान्यांनी रशिया पाडला तर नाहीच पण वरून अमेरिकेला युद्धात ओढले. जर्मनी युद्ध हरल्यावर जपान्याना वाचवायला अरबातले उंट येणार होते का? मूर्ख बेअक्कल जपानी! :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून?
नुसते तेच एक पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावरील त्याने काही केलेल्या चुकांमुळे तो हरला असे वाटायचा संभव आहे. ते पुस्तक जर्मनीच्या बाजूने लिहिले आहे असे मलाही वाटते. शाळेत असताना ते पुस्तक वाचूनच हिटलरचे गारूड मला पडले होते आणि मी अगदी हिटलरभक्त झालो होतो. वर्तमानपत्रातील एका लेखात आलेला हिटलरचा फोटो कापून मी माझ्या अभ्यासाच्या टेबलवर पण चिकटवला होता.
हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे.
ते एक कारण झाले. फक्त जपान्यांमुळे हिटलर हरला असे म्हणता येईल असे वाटत नाही. इतरही कारणे आहेत. १. सुखासीन मुसोलिनी उगीच हुशार्‍या करत होता पण इटालियन सैन्याचा रणांगणावर उपयोग शून्य होता. आफ्रिकेतून ब्रिटीश सैन्य ग्रीसमार्गे युरोपात येऊन हिटलरला अडचण करू शकले असते म्हणून ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरने मुसोलिनीकडे दिली. ग्रीस जिंकणे सोडाच इटलीने ग्रीसवर हल्ला केल्यावर ग्रीसने असा जबरदस्त तडाखा इटलीच्या सैन्याला दिला की ग्रीसचेच सैन्य इटलीच्या अल्बेनिया या वसाहतीत घुसले. मग परत ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरवरच आली. त्यात कालापव्यय झाला त्यामुळे रशियावर हल्ला करायला उशीर झाला म्हणून ऐन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीवर पोचले. ते जर दीडेक महिना आधी पोचले असते तर कदाचित मॉस्को पडलेही असते. २. युगोस्लाव्हियात अनपेक्षित तिखट प्रतिकार झाला त्यामुळेही रशियावरील हल्ल्याला विलंब झाला. ३. हिटलरने बेल्जिअममध्ये कोंडीत पकडलेल्या तीन-साडेतीन लाख ब्रिटीश-फ्रेंच सैनिकांना फ्रान्सच्या डंकर्क बंदरापर्यंत जाऊ दिले. समजा तितके ब्रिटिश-फ्रेंच सैनिक हिटलरच्या ताब्यात गेले असते तर ब्रिटिशांचे कंबरडे पुरते मोडले असते. खरं तर डंकर्कला पळून येणे हा ब्रिटिशांचा पराभव होता पण तितके सैनिक वाचले म्हणजे त्या पराभवातही एक विजय होता. चर्चिलनेही तेच म्हटले होते. ४. हिटलरने आफ्रिकन आघाडीवर विशेष लक्ष दिले नाही. जर इजिप्त ही ब्रिटिश वसाहत जिंकून सुएझवर नियंत्रण हिटलरने मिळवले असते तर ब्रिटिशांची बरीच अडचण झाली असती कारण भारत आणि आशियातील इतर वसाहतींमधून येणारी रसद मिळवायला केप ऑफ गुडहोप मार्गे म्हणजे जुन्या मार्गाने बराच वळसा घालून यावे लागले असते. मुद्दा #३ आणि #४ वरून दिसते की हिटलरला ब्रिटिशांबरोबर युध्द खरं तर नको होते. कारण त्याच्या मते ब्रिटिश उच्च दर्जाच्या रक्ताचे होते. त्याचे खरे लक्ष होते पूर्वेकडे- पोलंड आणि रशियात. ५. रशियन आघाडीवरही स्टालिनग्राडमध्ये आपण जिंकणे शक्य नाही हे जर्मन सेनानी पोलसला आधीच समजले होते. त्याने हिटलरकडे माघारीची परवानगी मागितली होती. पण हिटलरने त्याला म्हटले- तुला कोणाला पाठ दाखवत माघार घ्यायची आहे? हलक्या रक्ताच्या स्लाव्ह लोकांना? त्यामुळे त्याने माघारीची परवानगी नाकारली. मग एकदा रशियन सेनानी झुकॉव्हने पिछाडीकडील फळी कापून जर्मन सैन्याचा माघारीचा रस्ता बंद केला आणि जर्मन सैन्याला कोंडीत पकडले. मग अगदी नामुष्कीकारक पराभव होणे क्रमप्राप्त होते. इतरही कारणे आहेत/असतीलच. त्या सगळ्याचे विश्लेषण नाझी भस्मासूराचा उदयास्त पुस्तकात अजिबात नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चांसूकू सर, मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला. एकतर रशियन सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते. अनेक ठिकाणी रशियन सैनिकांनी लढायला नकार दिला होता. मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले. हा मूर्खपणा कमी की काय म्हणून गरज नसताना लेनिन गड नी स्टॅलिन गड लढत बसायला फौजेला सांगितले. त्याचे सर्व सैन्यप्रमुख सरळ मॉस्कोत घुसावे ह्या मताचे होते. क्रूव की क्रीव्ह (युक्रेनवाले नव्हे) शहर लढवा असा आदेश हिटलरने दिल्यावर त्याचा कुठलातरी जनरल त्याला तोंडावर बोलला की हे शहर नकाशात कुठे आहे कुणाला माहीत तरी आहे का? मग का लढवायचे? १९४१ नंतर मूळचा हुशार असलेला हिटलर विक्षिप्त सारखा वागू लागला होता. त्यातच त्याने अनेक ठिकाणी सैन्य माघारी घेऊन दिले नाही. पुढे जपानला रशियावर हल्ला करा अस कन्वेन्स करता आल नाही. जपानने खरोखर मोठा मूर्खपणा केला. त्यामुळे थंडी हे कारण रशियन आघाडीवर सांगितले गेले असले तरी थंडी आधीच हिटलर ला मॉस्को जिंकायची पुरेपूर संधी होती. हिटलरचा मूर्खपणा नि जपान्यांची बेअकली ह्यामुळे हे जिंकेलेलयुद्ध जर्मनीच्या हातातून गेले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला.
रशियावर हल्ला व्हायला उशीर झाला त्यात ते एक कारण होते. मुद्दा हा की हिटलरने रशियात जे काही केले ते आणि तसेच केले असते तरी आणखी १५ दिवस त्याच्याकडे असते तरी युध्दाचा निकाल वेगळा लागला असता/ लागू शकला असता ही शक्यता आहे.
सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते.
हे खुद्द रशियात नाही तर बाल्टिक राज्ये आणि युक्रेनमध्ये झाले होते. पण जर्मन सैन्य रशियात घुसले तेव्हा त्यांनी किएव्हमध्ये काय काय धुमाकूळ घातला होता याच्या बातम्या लपून राहिल्या नव्हत्या त्यामुळे रशियात अधिक कडवा प्रतिकार झाला होता.
मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले.
स्मोलेन्स्क १० सप्टेंबरला जिंकले. पण त्या लढाईतच पाऊस सुरू झाला होता, रशियातील वातावरणात पाऊस पडल्यानंतर चिखल होत होता त्यामुळे जर्मन रणगाड्यांची हालचाल मंदावली होती. तसेच मॉस्कोकडे पुढे जाताना दक्षिणेकडून हल्ला झाल्यास सैन्य कोंडीत पकडले जाईल ही पण एक शक्यता होती म्हणून दक्षिणेकडे ब्रियान्स्क जिंकायला हिटलरने प्राधान्य दिले. आता ती घटना उलटून गेल्यावर हिटलरने थेट मॉस्कोकडे जायला हवे होते हे पश्चातबुद्धीने म्हणणे सोपे आहे पण त्यावेळी निर्णयप्रक्रीयेत हे इतरही घटक होते. त्याप्रमाणेच मॉस्कोच्या वाटेवर व्याझमामध्ये अपेक्षेपेक्षा बराच जास्त कडवा प्रतिकार झाला आणि पुढील वाटचाल मंदावली. इतके असूनही १२-१३ डिसेंबरच्या सुमारास जर्मन सैन्य मॉस्कोच्या उपनगरापर्यंत पोचले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद. पण जपानने रशियाच्या पाठीत वार का नाही केला हे समजत नाही, इतके मूर्ख असतील जपानी वाटले नव्हते. हिटलरनेही सैन्य मागे न घेऊन बराच मूर्खपणा केला. हिटलर नी टोजो मला नरकात भेटले की दोघांना चपलेने बडवेन.

दुसरे महायुद्ध जर्मनी हरण्यामागे जपानच होते हे चॅट जीपीटीनेही सांगीतले, शेवटची ओळ पहा. जर जपानने अमेरिका ऐवजी सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचे संपूर्ण गणित बदलले असते. खाली काही संभाव्य परिणाम आहेत: 1. जर्मनी आणि जपान दोन्ही बाजूंनी सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता • पूर्वेला जपान आणि पश्चिमेला जर्मनी: • जर जपानने 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन फ्रंटवर लढावे लागले असते. • जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्राड जिंकणे सोपे झाले असते. • सोव्हिएत युनियन कदाचित पूर्णपणे कोसळले असते. 2. अमेरिका युद्धात उशिरा उतरली असती • जर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला नसता, तर अमेरिका लवकर युद्धात उतरली नसती. • त्यामुळे युरोपमध्ये जर्मनीला जिंकण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता. 3. हिटलरला युरोपमध्ये मोठे यश मिळाले असते • सोव्हिएत युनियन नष्ट झाल्यास, हिटलर युरोपचा निर्विवाद सम्राट बनला असता. • ब्रिटन एकटे पडले असते आणि अखेर जर्मनीसमोर शरण गेले असते. 4. जपानला मोठी जमीन मिळाली असती • जपानला मंगोलिया, सायबेरिया आणि रशियाचा पूर्व भाग मिळाला असता. • तिथले तेल आणि संसाधने जपानसाठी खूप महत्त्वाचे ठरले असते. 5. अमेरिका शेवटी युद्धात आली असती, पण उशिरा • जर जपान आणि जर्मनी खूप मजबूत झाले असते, तर अमेरिका आणि ब्रिटनला त्यांना हरवणे अवघड गेले असते. • कदाचित युद्ध 1950 पर्यंत चालले असते. ➡ निष्कर्ष: जर जपानने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्णतः वेगळा असता. • जर्मनी आणि जपान कदाचित जिंकले असते. • अमेरिका युद्धात उशिरा आली असती. • सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असते. • जग आज जर्मन-नाझी आणि जपानी साम्राज्याच्या छायेत असते. परंतु जपानने अमेरिका निवडली, आणि त्यामुळे युद्धाचा प्रवाह पलटला!

जर १९४१ ला रशियावर जपानने हल्ला केला असता तर? चॅट जीपीटी Alternate History: If Japan Attacked Russia in 1941 Instead of the U.S. Background (Real History): • 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेसोबत युद्ध सुरू केले. • दुसरीकडे, जर्मनीने जून 1941 मध्ये “Operation Barbarossa” अंतर्गत सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला. • स्टालिनच्या सैन्याने जर्मन आक्रमण थांबवले, कारण त्याने जपानकडून पूर्व आघाडीवर कोणताही धोका नव्हता याची खात्री केली होती. • जर जपानने त्याऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर युद्धाचा संपूर्ण प्रवाह बदलला असता. Step 1: जपान रशियावर हल्ला करतो (जून-जुलै 1941) • जर्मनी आधीच पश्चिमेकडून सोव्हिएत युनियनवर आक्रमण करत होता. • जपानने जर सायबेरियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन आघाड्यांवर युद्ध लढावे लागले असते. • सोव्हिएत सैन्याला पूर्व भागात मोठे नुकसान झाले असते आणि जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्रॅड जिंकणे सोपे गेले असते. • रशियन रेड आर्मी कमकुवत झाली असती आणि जर्मनी-मित्र राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनचा पराभव केला असता. Step 2: स्टालिनचा पराभव (1942-1943) • जर जर्मनी आणि जपान दोघांनी मिळून रशियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला युद्ध जिंकणे अशक्य झाले असते. • मॉस्को जर्मन सैन्याच्या ताब्यात गेले असते. • स्टालिनशिवाय रशियामध्ये कम्युनिस्ट सरकार कोसळले असते. • सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले असते (सायबेरिया जपानकडे, पश्चिम भाग जर्मनीकडे). Step 3: अमेरिका युद्धात उशिरा शिरतो किंवा भाग घेत नाही • जर जपानने अमेरिका ऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर पर्ल हार्बरवर हल्ला झाला नसता. • यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात लवकर सामील झाली नसती. • अमेरिका युद्धात उशिरा शिरल्यामुळे युरोपमध्ये जर्मनी अजूनही मजबूत राहिला असता. Step 4: जपान आणि जर्मनी युद्ध जिंकतात (1945 पर्यंत) • जपानने रशियाच्या पूर्व भागावर ताबा मिळवला असता (सायबेरिया, मंचुरिया, मंगोलिया). • जर्मनीने पश्चिम युरोप आणि सोव्हिएत युनियनचा मोठा भाग जिंकला असता. • इंग्लंड आणि अमेरिका एकटे पडले असते, त्यामुळे ते कदाचित जर्मनीविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शांतता करार करण्यास भाग पाडले गेले असते. • नाझी जर्मनी आणि जपान जगावर राज्य केले असते. Step 5: भविष्यातील जग (1950 नंतर) • संपूर्ण युरोप नाझी तत्त्वज्ञानाखाली आला असता. • जपानने संपूर्ण पॅसिफिक आणि आशिया ताब्यात घेतले असते. • अमेरिका एकटे पडले असते आणि पुढील युद्धाची तयारी करत राहिले असते. • शीतयुद्ध (Cold War) अमेरिका विरुद्ध नाझी-जपान असे झाले असते, सोव्हिएत युनियन विरुद्ध नव्हे. ➡ निष्कर्ष: • जपानने जर 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्ण बदलला असता. • सोव्हिएत युनियन लवकर कोसळले असते आणि अमेरिका युद्धात उशिरा किंवा अजिबात शिरली नसती. • नाझी जर्मनी आणि जपान जगाच्या प्रमुख सत्ता बनल्या असत्या. परंतु… • जपानला दीर्घकाळ युद्ध लढण्यासाठी पुरेसे संसाधन नव्हते, त्यामुळे काही वर्षांनी जपानचा पराभव शक्य झाला असता. • अमेरिका शेवटी नाझी-जपान विरुद्ध अण्वस्त्र वापरून मोठे युद्ध केले असते. ➡ थोडक्यात, जग वेगळे दिसले असते, पण दीर्घकाळ जपान आणि जर्मनी दोघेही टिकले असते की नाही, हे अनिश्चित आहे. डिपसीक ही पर्यायी कथा पूर्ण करण्यासाठी, आपण या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेल्या जगाचा विस्तार करू शकतो. या कथेत, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला आणि त्यानंतरच्या घटनांची मालिका वेगळ्या दिशेने वळली. ही कथा पूर्ण करताना, आपण युद्धाचे परिणाम, राजकीय बदल आणि जगभरातील प्रभाव पाहू शकतो. --- ### **१९४१: जपानचा रशियावर हल्ला** १९४१ मध्ये, जपानने आपल्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेपोटी रशियावर हल्ला केला. त्यांनी पूर्व सायबेरियातील व्लादिवोस्तोक आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला. या हल्ल्यामुळे रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागले: पश्चिमेकडून जर्मनी आणि आताच पूर्वेकडून जपान. स्टॅलिनला आपल्या सैन्याची विभागणी करावी लागली, ज्यामुळे जर्मनीविरुद्धचा प्रतिकार कमकुवत झाला. --- ### **जपानच्या विजयाचा प्रभाव** जपानच्या यशामुळे आशियातील त्यांचे साम्राज्य आणखी मजबूत झाले. त्यांनी पूर्व सायबेरियातील तेल, कोळसा आणि इतर खनिज संसाधनांचा वापर करून आपली युद्धयंत्रणा सुधारली. याचा परिणाम म्हणून, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर आपले नियंत्रण वाढवले. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांवर जपानचे अधिराज्य वाढले. --- ### **रशियाचा प्रतिकार** रशियाने जपानविरुद्ध आपला प्रतिकार मजबूत केला. सायबेरियन सैन्याने जपानी सैन्याला अडवण्यासाठी कठोर लढा दिला. या संघर्षात रशियन सैन्याने हिवाळ्याचा फायदा घेऊन जपानी सैन्याला मागे हटवले. या युद्धात दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या पूर्व भागातील लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यावर या संघर्षाचा मोठा परिणाम झाला. --- ### **युद्धाचा शेवट** १९४५ मध्ये, जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर, जपानने शरणागती पत्करली. या पर्यायी कथेत, जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या पराभवाचे एक मोठे कारण ठरले. रशियाने पूर्व सायबेरियातील प्रदेश परत मिळवले आणि जपानचे साम्राज्यवादी स्वप्न संपुष्टात आले. --- ### **युद्धानंतरचे जग** या पर्यायी कथेनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग वेगळे दिसले असते: 1. **रशियाची स्थिती**: रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागल्यामुळे, त्यांची अर्थव्यवस्था आणि सैन्य दुर्बल झाले असते. यामुळे, स्टॅलिनचे नेतृत्व आणि सोव्हिएत संघाची स्थिती कमकुवत झाली असती. 2. **जपानची स्थिती**: जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या संसाधनांचा अपव्यय ठरला असता. यामुळे, त्यांची आशिया-पॅसिफिक प्रदेशातील स्थिती कमकुवत झाली असती आणि त्यांना अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी कमी संसाधने उपलब्ध झाली असती. 3. **अमेरिकेची भूमिका**: अमेरिकेची भूमिका या पर्यायी कथेतही महत्त्वाची राहिली असती. जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर, अमेरिकेने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील आपले नियंत्रण वाढवले असते. 4. **आशियातील राजकीय बदल**: जपानच्या पराभवामुळे, आशियातील इतर राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले असते. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांना जपानी अधिराज्यापासून मुक्तता मिळाली असती. --- ### **निष्कर्ष** या पर्यायी कथेनुसार, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वेगळ्या दिशेने वळला असता. या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेले जग आजच्या जगापेक्षा वेगळे दिसले असते. ही कथा केवळ काल्पनिक आहे आणि वास्तविक इतिहासात जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला नाही. त्याऐवजी, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर लक्ष केंद्रित केले होते. --- ही कथा तुमच्या कल्पनेतून निर्माण झाली आहे. जर तुम्हाला या कथेशी संबंधित अधिक माहिती किंवा तपशील हवे असतील, तर कृपया सांगा!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस, इंग्रजाना हरवू शकेल अश्या देशांची मदत घेण्याची कल्पना नेताजीना सुचली आणी ती त्यांनी अमलात ही आणली, जीवावर खेळून कलकत्ता - पेशावर- काबुल -ताशकन्द- मॉस्को आणी मग बर्लिन पोहोचणे तिथे थेट हिटलरला भेटणे, त्यानंतर पाणबुडीने जपानला पोहोचून टोजो ह्या जपानी पंतप्रधानाना भेटणे खरोखर अलौकिक होते त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना करून अंदमान निकोबार बेटे ताब्यात घेणे खरोखर अलौकिक आहे. दुसरे महायुद्ध जर्मनी जपान हरल्यामुळे त्यांच्या ह्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले, जर दुसरे महायुद्ध जर्मनी जपान जिंकले असते तर निश्चितच भारताचे पहिले पंतप्रधान/राष्ट्रपती अथवा भारतीय नाझी-इम्पीरियल सरकारचे प्रमुख म्हणून सुभाषचंद्र बोस असते नी जगात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले गेले असते. भारताला जर्मनी नी जपानने महत्वाचे स्थान दिले असते ते सुभाषबाबूंमुळे. जितके मी वाचलेय त्याप्रमाणे सुभाष बाबूंचा खरोखर तैवान मध्ये मृत्यू झाला कारण त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता नी त्याने हे सर्व पाहिले होते. अथवा सुभाषबाबू रशियाला गेले असावेत नी तिथे स्टॅलिनने काहीतरी दगाफटका केला असावा, अथवा सुभाषबाबू भारतातच असावे नी त्याना ब्रिटिशानी युद्धगुन्हेगार घोषित केल्याने अज्ञातवासात ते गेले असावेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण, अजून काही पुस्तके वाचा... वीर सावरकर , बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल, हे पण उत्तम दूरदृष्टी असलेले नेते. हा एक भाग झाला. आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना परमपूज्य नेहरू यांनी भारतीय सैन्य दलात सामावून घेतले नाही. अशा परिस्थितीत, सुभाष चंद्र बोस यांनी अज्ञातवास पत्करला असण्याची शक्यता जास्त. हा दुसरा भाग तिसरा महत्त्वाचा भाग असा की, नशीब ब्रिटिश सरकारच्या बाजूने होते. आसाम मध्ये आझाद हिंद सेनेने एक दिवस आधी शरणागती पत्करली. चौथा महत्वाचा भाग असा की, सुभाष चंद्र बोस कधीच जपानी किंवा जर्मनीच्या हातातील बाहुले झाले नसते. पाचवा आणि महत्वाचा भाग असा की... भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस... चक्क तुम्हाला हे उशीरा का होईना पण जाणवलं, हे वाचून आनंद झाला....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 14/03/2025 - 21:16
असे म्हणतात की इंग्रजांनी देश सोडताना एक अट घातली होती की सुभाषचंद्र बोस जेव्हा सापडतील तेव्हा ते युद्ध गुन्हेगार असल्याने भारताने त्यांना ब्रिटिशांंच्या हातात सोपविले पाहिजे व इंग्लंड आपल्या देशात त्यांचा न्यायनिवाडा करेल व नेहरूंनी ही अट मान्य केली होती कारण सुभाषचंद्र बोस सापडले असते तर त्यांना पंतप्रधान करावे असा जनतेचा दबाव येऊन नेहरूंना पंतप्रधानपद सोडावे लागले असते. म्हणून सुभाषचंद्र बोस कायम अज्ञातवासात राहिले.

आज एक भारी किस्सा घडला! नाझी भस्मासुराचा उदयास्त पुस्तक मी लॅपटॉप मध्ये उघडलेले होते. त्याच्या पहिल्या पानावर हिटलरचा फोटो आहे, माझा एक कलीग जवळ आला हा कोण नी काय केल ह्याने वगैरे विचारू लागला, त्याला मी पुस्तकाबद्दल सांगितले नी चर्चा लांबत गेली, हिटलरने केलेले इंग्लंड, रशियावरील हल्ले नी ज्यू हत्याकांडाबद्दल ज्यात गॅस चेंबर मध्ये लोक नेले जायचे नी गॅस सोडून मारायचे नी बाहेर काढून भट्ट्यात जाळायचे त्याला सांगितले, तो एवढच बोलला, “हायला हा एवढा डेंजर होता म्हणून ह्याच नाव हिटलर पडले का?” कहर! मी अर्धातास हसत होतो. :)

ऋषिकेश 24/12/2007 - 19:49
हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि. केवळ हिटलरच नाही पण अकबर, टिपू सुलतान अश्या अनेक करंट्या प्रमुखांची भलामण मलातरी अस्वस्थ करून जाते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 25/12/2007 - 09:53
>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा >>एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. १००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्‍हाईनलँड वर ताबा मिळवला. र्‍हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्‍हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही. हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले. हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल. माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे-- १) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली. २) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा ३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग ४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का? इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्‍या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो? आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का? भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार? हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का? कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे. अवांतर-- वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्याकडे दुसर्‍या महायुध्दावरील चांगल्या माहितीपटांचा संग्रह आहे.मी अमेरिका सोडून लवकरच भारतात (बहुदा मुंबई/ ठाणे किंवा पुणे) स्थायिक होणार आहे.कोणाला जर ते माहितीपट कॉपी करून हवे असतील तर माझाशी व्य.नि वर संपर्क साधावा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

In reply to by क्लिंटन

सागर 26/12/2007 - 13:02
क्लिंटन साहेब, एवढ्या सविस्तर आणि विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद. की तुम्ही जे मुद्दे स्पष्ट केले आहेत, ते अगदी सर्वस्वी खरे आहेत. हिटलरने छळ छावण्यांतून आणि यातनातळांतून जे प्रयोग केले ते अमानुष या शब्दाचा अपमान करतील इतके क्रूर होते. जसे लोकांना सोलून काढणे. जिवंत धातूंच्या पेट्यांतून तापवणे, हजारोंना एकाच वेळी गॅस चेंबर्समधून विषारी गॅसने मारणे. स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी तर माझी लेखणीच पुढे सरत नाही इतके अनन्वित अत्याचार झालेले होते. दुसर्‍या महायुद्धावर मी बरेच वाचन केले आहे माहितीपट देखील पाहिले आहेत. हिटलरच्या अत्याचारांतून जगाची सुटका करण्याचे मोठे कार्य दोस्त राष्ट्रांनी केले यात काही संशय नाही. अन्यथा आज जगाचा नकाशा वेगळा असता आणि आपण इंग्रजी ऐवजी जर्मन भाषा शिकत असतो. येथे मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की लेखाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केले आहे की मला काही हिटलरची भलावण करायची नाहिये. कारण हिटलर हा क्रूरकर्मा आणि वि़कृत मनोवृत्तीचा हुकुमशहा होता हे माझेही मत आहे. या लेखात जे कानिटकरांनी पुस्तकात सांगितले तेच फक्त मी पुस्तक परिक्षण म्हणून लिहिले आहे. मी देखील लोकशाहीचा आणि जगातील सर्वांना जगण्याचा हक्क आहे या भूमिकेचा कट्टर समर्थक आहे.तेव्हा माझ्यावर कोणी रोष धरु नये ही नम्र विनंती. धन्यवाद, सागर

In reply to by क्लिंटन

अन्या दातार 29/01/2008 - 13:56
हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि. क्लिंटन्साहेब, या वाक्याशी मी असहमत आहे. त्याच्या अनेक कृतिंमध्ये राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली दिसते. उदा. ६०००० बेकार तरुणांच्या फौजेला काम मिळवून देणे, सैन्य बलशाली करणे इ.इ.

मला असे वाटते, भलामण वाईटच, पण कानिटकरांचे पुस्तक ही खरोखरच भलामण आहे का? मी हे पुस्तक प्रथम वाचले त्याला आता बहुतेक २२-२३ वर्षे झाली असावित. त्या नंन्तर काही वर्षे बरीच पारयणे झाली, मित्रांबरोबर चर्चा झाली. हिटलरची जी वाईट बाजू आहे ती सुद्धा दाखवली आहे. आणि हे विसरता कामा नये की इतिहास हा नेहमी 'जेते' लिहितात. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना काय घ्यायचे आणि काय विसरायचे ते आपण ठरवायचे. "हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि." हे मात्र खरेच. बिपिन.

हे पुस्तक मी दीड्दोन वर्षांपुर्वी पुन्हा वाचले. वि ग नी या पुस्तकांत कोठेहि कसलेहि भाष्य केलेले नाही. मते ही सर्व वाचकांचीच आहेत. हिटलर हा थोर मुत्सद्दी होता असे ते म्हणत नाहीत. नशिबाने त्याची साथ दिली हे दाखवतांना ते शुशनिग, पेताँ, चेंबर्लेन वगैरे त्याचे विरोधक नेते कसे बावळट होते ते ते दाखवतात. हिटलरच्या त्याला जगातील सर्वश्रेष्ठ शेतीतद्नापैकी एक मिळाला, सतत तीन वर्षे हवामान शेतीला अनुकूल राहिले व विक्रमी पिके येऊन अन्नटन्चाई दूर झाली हे लिहितात. स्टालीनने दूरदृष्टीने कारखाने पूर्वेस हलविले हे संगतात तसेच त्याने ५ टक्के लोकसंख्येचा विध्वंस केला हे सांगतात. फक्त चर्चिलने माइन काम्फ वाचून हिटलरचा अभ्यास केला होता हे सांगतात तसे त्यानेच पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा पाया रोवला हेहि सांगतात. पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 13:07
बिपीन आणि सुधीरराव , पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे. या मताशी मात्र पूर्ण सहमत. अतिशय वाचनीय पुस्तक आहे हे यात संशय नाही. - सागर

हिटलर हा एक क्रूरकर्मा होता यात काही दुमत असण्याचे कारण नाही, तथापि, त्याने इन्ग्रजान्चे दुसरया महायुद्धात पेकाट मोडले नसते तर भारताचे स्वातन्त्र्य आणखी काही वर्षे दूर गेले असते हे निश्चीत! दुसरे महायुद्ध ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. भारत अगदी पहिल्या दिवसापासून त्यामध्ये गुन्तला होता, हजारो भारतीय तरूण युरोप,आफ्रीका आणि बर्मा येथील लढायान्मधे धारातीर्थी पडले आहेत. जगातील कुठलेही लष्कर युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बळकट होत नाही, सक्षम होत नाही. अनुभवी ब्रिटीश सेनापतीन्च्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्यदळे दुसर्‍या महायुद्धात लढली म्हणूनच स्वातन्त्र्य मिळाल्यावर देशरक्षणासाठी आवश्यक असे उत्तम सैन्य भारताला उपलब्ध झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे. नाझी भस्मासुराचा उदयास्त हे एक उत्तम पुस्तक आहे परन्तु दुसरी बाजू समजून घेण्यासाठी त्याच लेखकाचे 'विन्स्टन चर्चिल' हे पुस्तक सुद्धा हौशी अभ्यासकानी वाचावे. सुदैवाने वि.ग.कानिटकर माझे वैयक्तीक स्नेही आहेत आणि त्रेशष्ट साली लिहीलेल्या त्यान्च्या पुस्तकाबद्दल अजुनही तेवढेच औत्सुक्य आणि प्रतिसाद आहे हे मी त्याना सान्गितल्यावर त्याना निश्चित आनन्द होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 28/12/2007 - 13:50
डॉक्टरसाहेब, वि.ग. कानिटकर हे तुमचे स्नेही आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांना कृपया सांगाल का ? इतके सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आत्त्तापर्यंत या पुस्तकाची किमान ८-१० पारायणे केली असतील तरी प्रत्येक वाचनाच्या वेळी हा इतिहास तितकाच चित्तथरारक वाटतो यात संशय नाही. माझी खात्री आहे की कित्येक शतके नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले, अभ्यासले जाईल. तुमचा प्रतिसाद पाहून खूप खूप आनंद झाला. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल हे पुस्तक अजून मी अभ्यासले नाही. पुढच्या वेळी पुण्याला जाईन तेव्हा नक्की हे पुस्तक घेईन. दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. हे मात्र १०० % खरे, कारण दुसर्‍या महायुद्धानंतरच अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांना आपण जगातील महासत्ता होऊ शकू याचा अंदाज आला होता, त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीच्या स्पर्धेतून कित्येक नवीन शोध बाहेर आले. आणि विशेषतः १९६० नंतरचा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग गेल्या शेकडो शतकांच्या तुलनेत आश्चर्यचकीत करणारा असाच आहे. मनःपूर्वक धन्यवाद - सागर

In reply to by विसोबा खेचर

सागर 28/12/2007 - 14:00
तात्या, मला सागरच म्हणा...शेठ म्हणजे फार मोठं वगैरे वाटतं मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे फक्त ३१ वर्षाचा. तेव्हा मला सागरच राहू द्या... कसे? तात्या, तुम्ही व्यासंगी आहात, तेव्हा हे पुस्तक नक्की आवडेन तुम्हाला. (तात्यांचा प्रतिसाद पाहून सुखावलेला) सागर

जरूर सा॑गेन..मीही ते पुस्तक खूप वेळा वाचले आहे..आणि त्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती काढण्याचा प्रयत्न मी व कानिटकर साहेब करीत आहोत. तुम्हाला दुसर्‍या महायुद्धाची खरीच रूची असेल तर खालील पुस्तके जरूर वाचा -Rise & Fall Of Third Reich-William Shirer -Trail of Fox: Biography of Rommel -Panzer Leader: Autobiography of Guderian -Defeat into victory: Autobiography of Slim -Encyclopedia of Third Reich

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 28/12/2007 - 20:27
डॉक्टरसाहेब, तुम्ही सुचविलेल्या पुस्तकांबद्दल आभारी आहे तुमचा आणि कानिटकरसाहेबांचा स्नेह पाहता मला एक विनंती कराविशी वाटते... पहा शक्य झाले तर Rise & Fall Of Third Reich-हे शिरर ने लिहिलेले पुस्तक दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचे आहे. शिरर हा हिटलरच्या उदयास्ताचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तेव्हा त्याचे पुस्तक हे दुसर्‍या महायुद्धाच्या बाबतीत इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त विश्वसनीय ठरते. हा १००० पानांचा अद्वितीय ग्रंथ मराठीत उपलब्ध असावा असे खूप खूप वाटते. ही केवळ माझीच नाही तर माझ्या अनेक मित्रांनी देखील बोलून दाखवलेली इच्छा (खरे तर खंत) आहे. एवढे सुंदर पुस्तक मराठीतून उपलब्ध नाही हे कायम मनाला खटकत राहते. जर तुम्हाला आणि कानिटकर साहेबांना शक्य असेल तर या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. तर माझी खात्री आहे की लाखो वाचकांच्या या पुस्तकावर उड्या पडतील... मला तर आत्ताच या पुस्तकाचे मराठी नाव दिसत आहे....तिसर्‍या राईशचा उदयास्त किंवा हिटलरच्या साम्राज्याचा उदयास्त तेव्हा समस्त मराठी वाचकांतर्फे माझी तुम्हाला आणि कानिटकरसाहेबांना विनंती आहे की या अद्वितीय ग्रंथाचे मराठीत भाषांतर तुम्ही करु शकला तर मराठी भाषेची खूप मोठी सेवा होईल. किंवा दुसर्‍या कोणाही व्यक्तीस तुम्ही हे काम सोपवले तरी चालेल. पण कानिटकरांच्या समृद्ध लेखणीचा अनुभव असल्याने हे काम तुम्ही दोघांनी करावे असे मनापासून वाटते... तुम्ही हवे तर तुमच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना विचारुन पहा. आणि पहा कसा प्रतिसाद मिळतो ते... माझ्याकडे हे पुस्तक डिजिटल स्वरुपात आहे. ते तुम्ही येथून डाऊनलोड करु शकाल http://www.esnips.com/web/EnglishPDF (हे पुस्तक उतरवून घेण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि नोंदणी ही मोफत असल्याने चिंता नको.) धन्यवाद सागर

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 03/01/2008 - 13:09
सुधीरकाका , राईझ & फॉल वाचताना नक्कीच मजा येईल. कारण शिरर ने त्यात तपशीलवार त्या काळचे वर्णन केले आहे. आणि तो स्वतः चिकित्सक आणि अभ्यासू असल्याने परिस्थिती हिटलरला कशी अनुकूल होत गेली आणि त्याने युद्धाचे नियंत्रण कसे स्वतःकडे ठेवले याचे सुंदर वर्णन आहे. मी ही सध्या हे पुस्तक वाचत आहे. तेव्हा एक वेगळा आनंद मिळेल हे नक्की... पण मराठीत हे पुस्तक जसे च्या तसे आले तर मोठी बहार होईल. धन्यवाद सागर

तुमची सूचना चा॑गली आहे. दुसरे महायुद्ध ह्या विषयावर इ॑ग्रजीमधे खूप साहित्य उपलब्ध आहे ज्याचे अजुन मराठी भाषा॑तर झाले नाही. वानगी दाखल पाहावयाचे झाले तर चर्चिलने लिहीलेले सात ख॑ड! ते अभ्यासल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. मी ते पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात काही प्रश्न उभे राहीले. जसे की हिटलरच्या अनेक सेनापती॑पैकी आज मितीला किती जिव॑त आहेत कि॑वा युद्धान॑तर त्या॑चे काय झाले. ह्या स॑दर्भात मी पुष्कळ धा॑डोळा घेतला व याच विषयी एक परिशिष्ट 'नाझी' ला जोडावे असा आमचा प्रयत्न आहे. तसेच माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाविषयी पुष्कळ दुर्मिळ फोटो आहेत तेही जोडण्याचा विचार आहे. कदाचित जो मला सेनापती॑बद्दल प्रश्न पडला तोच इतरही जिज्ञासू वाचका॑ना पडला असू शकतो, त्या॑चेही श॑कासमाधान होईल. न्यूरे॑बर्ग खटल्यावर एक स्वत॑त्र व विस्तृत प्रकरण लिहीण्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आणि रसिका॑चे आशिर्वाद असतील तर हे काम होईल. आणखी एकच विन॑ती तुम्हाला करतो..आपल्या दोघा॑च्या वयात फारसा फरक नाही, मी केवळ २८ (अठ्ठाविस) वर्षा॑चाच आहे व व्यवसायाने जबड्याचा सर्जन आहे (स्पेशालीस्ट डे॑टीस्ट्).तेव्हा मला 'अरे प्रसाद' असे एकेरीत स॑बोधले तर मला आवडेल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 03/01/2008 - 16:05
'अरे प्रसाद' मलाही आनंद वाटला की तुझ्यासारखा तरुण डॉक्टर इतिहासात रस घेत आहे. कानिटकरसाहेबांचा तुझे स्नेही म्हणून तू उल्लेख केला होतास त्यामुळे मला वाटले की तू त्यांच्याइतकाच ज्येष्ठ असशील. हरकत नाही. तुझ्यासारख्या तरुण इतिहाससंशोधकाशी मैत्री झाल्याचा मला तरी खूप आनंद आहे. दुसरे असे की न्युरेंबर्ग वर एका प्रकरणाने भागेल असे वाटत नाही. कारण खूप लोकांच्या साक्षी झाल्या. त्या सर्वांचा उहापोह होणे गरजेचे आहे. एखादे छोटेसे पुस्तक त्यावर होऊ शकेल असे मला वाटते... बाकी प्रसाद दाढे हे तुझ्या व्यवसायास अनुरुप असलेल्या नावाचा योगायोग पाहून मन दिलखुश झाले. तुझे पेशंट आनंदाने म्हणत असतील दाढेंकडे दाढ काढायला चाललो आहे. :) विलक्षण योगायोग दुसरे काय? (की आडनावावरुन आधीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते? ) धन्यवाद - सागर

प्रमोद देव 29/12/2007 - 22:06
प्रसाद दाढे! वा! म्हणजे तुझ्या नावातच तुझा व्यवसाय लपलाय! :-) झकास! हे म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरचे नाव "प्रकाश डोळे" असावे तसे.

माझ्या नावावरील हा श्लेष मी खूप वेळा ऐकला आहे..पण खरोखरच नाव आणि व्यवसाय एकच असण॑ हा विलक्षण योगायोग आहे. मला एक 'कान्-नाक्-घसा' तज्ञ माहित आहेत त्या॑चे नाव आहे डॉ. वाचासु॑दर!!

मी परवाच वि.ग.कानिटकरा॑शी चर्चा केली. 'नाझी भस्मासुराचा उदयास्तची' विसावी आवृत्ती येत आहे. आणखीनही येत राहतील. मात्र थोडा-बहुत फरक सोडला तर ही सर्व पुनर्मुद्रणे आहेत. खुद्द लेखका॑चीसुद्धा इच्छा आहे की काही नवा मजकूर समाविष्ट करावा. तरी माझी सर्व वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी यास॑दर्भात आपल्या सूचना मला सा॑गाव्यात. हे पुस्तक पुष्कळ लोका॑नी वाचले आहे, अनेका॑नी पारायणे केली आहेत .तेव्हा तुम्हाला जाणवलेल्या त्रुटी, उणीवा कि॑वा एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण अथवा विशिष्ट छायाचित्र उदाहरणार्थ माझ्या मते दुसर्‍या महायुद्धाशी स॑बधित सर्व ठळक व्यक्ती॑ची स्पष्ट छायाचित्रे देणे आवश्यक आहे. स्कोर्झेनी, ह्यॉस (होएस), बोरमन, काउ॑ट कियानो (सियानो), हायड्रिच, रोझेनबर्ग, पाऊलुस (पोलस), स्टाउफेनबर्ग (स्टुफेनबर्ग), काउ॑ट बर्नाडोट इ. म॑डळी॑ची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे दिली पाहिजेत. तरी वाचका॑नी आपले मत,सूचना मा॑डाव्या. मी त्या जरूर लेखका॑कडे व प्रकाशका॑कडे पोहोचवीन. (योगायोगाने माझा माजगा॑वकरसाहेबा॑शीसुद्धा चा॑गला परिचय आहे, ते माझे पेश॑ट आहेत) आणि आपल्या सर्वा॑च्या आवडत्या पुस्तकाची अधिक चा॑गली आवृत्ती उपलब्ध होईल.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

सागर 03/01/2008 - 16:11
नाझी भस्मासुराच्या बाबतीत मला खटकलेली एक गोष्ट सांगतो... पुस्तकाच्या शेवटी कानिटकर साहेबांनी हिटलरच्या माईन काम्फ चा थोडासा अनुवाद अतिशय सुंदर शब्दांत केला आहे. खरे तर थोड्याशा प्रकरणांपेक्षा, माईन काम्फचा संक्षिप्त अनुवाद देता आला तर खूप छान होईल. कारण हिटलरची माईन काम्फच्या वेळची मनःस्थिती काय होती , त्याचे त्यावेळचे आडाखे काय होते आणि ते पुढे त्याने कसे प्रत्यक्षात आणले याच्या चिंतनासाठी या संक्षिप्त अनुवादाचा उपयोग वाचकांस होऊ शकेल असे मला वाटते... खरे तर माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद मराठीत उपलब्ध व्हावा असे मला वाटते. पण हिटलरविषयी असल्याने त्याच्या प्रकाशनास अडचणी येऊ शकतील.. कोण कशावरुन वादळ उठवेल हे काही सांगता यायचे नाही. असो... सागर

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पुष्कर 16/01/2008 - 08:26
भेटून आनंद झाला. अहो मी दादांचा शेजारी (आम्ही वि.गं ना दादा म्हणतो). औदुंबर अपार्ट्मेंट- दुसरा मजला! अहो तुम्ही तिथे कधी येऊन गेलात? पुन्हा आलात तर समोरच्या घरीही चक्कर मारा. तुमचा प्रतिसाद वाचून मीही दादांशी ह्या विषयावर बोललो. त्यांनी मला तुमच्याविषयी सांगितलं. पुन्हा याल तेव्हा अवश्य भेटू. - पुष्कर

In reply to by पुष्कर

पुष्कर 01/02/2025 - 11:53
बर्‍याच वर्षांनी आज इथे पुन्हा आलो. त्या वेळी दादांना इथल्या साधकबाधक चर्चेविषयी सांगितलं होतं आणि त्यांना ऐकून खूप छान वाटलं होतं. आता दादा नाहीत आणि आम्ही पण तिथे राहत नाही, पण शेजारी म्हणून खूप सुंदर आठवणी मागे राहिल्या आहेत.

अत्यंत सुंदर चर्चा....डा`क्टर दाढे यांनी येऊन अजून मजा आणली... आणि सागर, राईज आणि फोल लिन्क बद्दल धन्यवाद...

अरविन्द हिटलर अतिउत्तम सेनानी व मुत्सद्दी होता हे नक्कीच. आजचा इतिहास जेत्या लोकानी लिहिला आहे. हिट्लर पेक्षा जास्त माणसे अमेरिकेने अणु-बॉम्बने मारले आहेत .पराभूता बद्दल कोणीहि चान्गले बोलत नाही. जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते. असो चर्चा अतिशय मार्मिक झाली आहे.

In reply to by अरविन्दनरहरजोशी

ऋषिकेश 17/01/2008 - 20:35
>> जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते कबुल पण चांगल्या व्यक्तींमधे नाहि!! हुशारी आणि मुत्सदीपणा काय हो ओसामाकडे पण आहे!

पुढच्या वेळी मी दादा॑कडे येईन ते॑व्हा नक्की तुम्हाला भेटीन. तूर्तास माझ्याकडील छायाचित्रे मी माजगा॑वकरा॑कडे देणार आहे. माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाशी स॑दर्भ असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती॑ची छायाचित्रे व व्यक्तीचित्रे आहेत. माझी रसिक वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी मला अशा व्यक्ति सुचवाव्यात ज्या॑ची छायाचित्रे आजवरच्या आवृत्तीमध्ये अस्पष्ट आहेत कि॑वा अजिबात नाहीत. मी ते फोटो जरूर पुरवेन. जास्तीची माहिती समविष्ट करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे पर॑तु त्यास थोडा वेळ लागेल कारण माझा व्यवसाय व नोकरी.

नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक काही दिवसाआधी वाचायला सुरुवात केली. आता पूर्वार्ध वाचून संपवलाय. थोडक्यात घडामोडी सांगतो. अडॉल्फ हिटलर नावाचा मुलगा जर्मन प्रेमी असतो, ऑस्ट्रिया सह अखंड जर्मन राष्ट्र बनावे अशी त्याची इच्छा असते. व्हेनिस शहरात तो भनंग अवस्थेत फिरत असतो, देशाच्या वाईट अवस्थेला ज्यू जबाबदार आहेत असे त्याचे ठाम मत असते. मग एका दिवशी पहिले महायुद्ध पेटते नी भनंग हिटलर जर्मनीच्या बव्हेरिया राज्यात सैन्यभरतीचा अर्ज करतो. निवडला जातो नी त्याचे दिवस पलटतात, दोन वेळा तो जखमी होतो. ३५०० सैनिकांच्या तुकडीत ५०० परत येतात त्यात हिटलर एक असतो. जर्मनीचा कैसर पळून जातो नी जर्मनी देश युद्ध हरतो, मेलेल्याला अजुन मारावे तसे व्हेनिसच्या तहाच्या अटी जर्मनीवर लादल्या जातात नी जर्मनी भरडला जातो. ह्या रागातून एक अपत्य जन्मत ते म्हणजे हिटलर. सैन्यात सैनिकाना लोकशाही चांगली वाटू नये म्हणून सैनिकाना अधिकारी भाषण देत असतात ह्यात एकदा एक अधिकारी ज्यूंबद्दल चांगलं बोलतो, हिटलर ते थांबवून ज्यूंबद्दल वाईट नी देशाबद्दल चांगले बोलतो, अधिकारी खूश होऊन हिटलर ला असेभाषणं देण्याची जबाबदारी देऊन सैन्याच्या राजकीय विभागात घेतो. हिटलरला राजकीय पक्षांवर नजर ठेवायची जबाबदारी मिळते, एकदा हिटलरला जर्मन वर्कर्स पार्टी ह्या नवीन स्थापन झालेल्या पक्ष बद्दल रिपोर्ट सादर करायची ऑर्डर सुटते, सैन्य कम्युनिस्ट पक्षांना घाबरत असते. हिटलर त्या पक्षाच्या सभेला साध्या वेशात जातो, तिथे फक्त २५ लोक जमलेले असतात, सभेत हिटलरला एक छोटे ४० पाणी पुस्तक मिळते त्या पुस्तकात हिटलरच्या मनातल्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. नंतर हिटलरला त्या पक्षाचे सभासद झाल्याचे पत्र मिळते, नंतर एका नॅशनल सोशॅलिस्ट पार्टी नावाच्या २० -२५ सभासद असलेल्या पक्षाचे आणी जर्मन वर्कर्स पक्षाचे एकत्रीकरण होते व नवीन पक्ष स्थापला जातो “नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” (नाझी) ह्या पक्षाला नेत्याची आवश्यकता आहे हे ओळखून हिटलर सैन्याचा राजीनामा देतो नी पूर्णवेळ पक्षाला वाहून घेतो. हिटलरच्या वक्तृत्व कलेने पक्ष चांगलाच फोफावतो, त्याला चांगले साथीदारही मिळतात. मध्यंतरी पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या सर्वोच्च सैन्याधिकार्याला धरून हिटलर मोर्चा काढतो व पकडला जाऊन जेल मध्ये जातो तिथे तो “माईन काम्फ” आत्मचरित्र लिहितो. अनेक वर्षांच्या संघर्षाने पक्ष निवडणुका लढवत सत्तेत येतो व हिटलर सर्व पक्षांवर बंदी घालून फक्त एकच पक्ष ठेवतो, नाझी नी चिन्ह स्वस्तिक. नंतर पक्ष वाढवणाऱ्या काही मित्रांच्याही हत्या करतो. इंग्लंडकडून सैन्य वाढवायला नी नाविकदल वाढवायला परवानगी मिळवतो. पुढे चार पाच वर्षातच जर्मनीची तुफ्फान प्रगती होते. नंतर हिटलर बाजूचे ऑस्ट्रिया नी चेकोस्लोवाकीया गिळतो. हे हिटलर नावाचे उधळलेले गाढव पूर्वेकडे सरकतेय त्यामुळे रशियावर आदळेल असे फ्रान्स इंग्लंडला वाटते. पण स्टॅलिन हे पश्चिमेवर उधळायला हीटलरशी हातमीळवणी करतो. सैन्य पोलंड सीमेवर जमा होऊन पाऊणे पाच वाजता पोलंड मध्ये घुसते. पोलंड रशिया नी जर्मनी अर्धा अर्धा वाटून घेतात. स्टॅलिनला फिनलँड ने चांगलेच चोपले आहे, फिनलँड चे २५ हजार तर रशियाचे २ लाख सैनिक मेलेत. हिटलरने नार्वे जिंकलाय. ह्यामुळे बुळा चेंबर्लेन जाऊन हिटलरला ओळखलेला एकमेव माणूस चर्चिल पंतप्रधान झालाय. फ्रान्समध्ये नाझी सैन्य घुसलय. पुढे वाचेन तसा लिहितो… :) - दोस्त राष्ट्रांना पाठिंबा असलेला अमरेंद्र बाहुबली

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेते इतिहास लिहितात.... कृपया खालील पुस्तक पण वाचा... https://www.flipkart.com/hi/adolf-hitler-ani-dusare-mahayuddha-satya-aani-viparyas/p/itmfemdvavcgz95q एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि एकाच घटनेला असंख्य कंगोरे....

करून दिलेली ओळख वाचकांना पुस्तक वाचण्यास उद्युक्त करते. कुठलाही, विशेषत: बहुचर्चित राज्यकर्ते जे तानाशाह म्हणून ओळखले जातात. सुरवातीचे देशप्रेम नंतर व्यक्तिगत महत्वाकांक्षेत रुपांतरीत होते आणी आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्व य्योग्य अयोग्य मार्ग अवलंबीतात. त्या काळाच्या परिप्रेक्षातून त्यांना जे वाटले त्यांनी केले. पण त्या गोष्टींचा भविष्यात झालेला परिणाम अभ्यासणे महत्वाचा असतो. औरंगजेब सहिष्णू असता तर कदाचित मराठा साम्राज्य उदयाला आले नसते. अर्थात हे माझे मत. अमरेंन्द्र बाहुबली या तरूण मिपाखराने बरेच प्रयत्न करून हे पुस्तक मिळवले,वाचतोय आणी आपले मत यावर व्यक्त करतो याची प्रशंसा केल्याशिवाय रहावत नाही. लेखक,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा 06/12/2024 - 19:29
मी हे पुस्तक 1993 साली वाचले तेव्हा माझी जागतिक इतिहासाबद्दलचची समज फारशी नव्हती, त्यामुळे सुरुवातीला हे पुस्तक क्लिष्ट वाटले होते पण हळूहळू पुस्तकांनी प्रभाव दाखवायला सुरुवात केली. जगाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा नेता हिटलर आणि त्याच्या साम्राज्याची भूक, आक्रमणे, यशोगाथा, महायुद्ध हे सगळं वाचण्यात रंगून गेलो. मी त्याचवेळी जगाचा नकाशा आणला आणि हिटलर चे मार्गक्रमण आक्रमण अभ्यासता अभ्यासता नकाशा पहात कोणता देश कुठे आहे, कोणता देश जर्मनीच्या शेजारी आहे याचे हळूहळू आकलन होऊ लागले. या पुस्तकाच्या वाचनाचा कालावधी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. ते भारलेपण मला आजही आठवते. त्यामुळे या पुस्तकाचे माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. या पाठोपाठ काही वर्षांनी म्हणजे पाच सात वर्षातच मी वीणा गव्हाणकर यांचे कृषी तज्ञ आणि क्रांतिकारक गदर पार्टीचे संस्थापक डॉक्टर खानखोजे यांच्यावरील " डॉ खानखोजे - नाही चिरा नाही पणती" हे पुस्तक वाचले हाही अनुभव अविस्मरणीय होता. ( वाचले नसेल तर अवश्य वाचा) अशी पुस्तके वाचता वाचता जी परिपक्वता अनुभवली ते जीवनात कायम उपयोगी पडले हा भागाव असताना हे सर्व आठवले. !! धन्यवाद !!

मला दुसरे महायुद्ध वाचताना खूप दडपण येतय! काय म्हणावे जर्मन सेनेला आज पर्यंतच्या मानवी इतिहासातील ही सर्वात ताकदवान सेना असावी! रोमेल सारख्या उत्कृष्ट ती भयंकर भारी विजय मिळालेल्या सेनानीला हिटलर रसद पाठवत नाहीये आणी त्यामुळे सुएझ कालवा हिटलरने ताब्यात घेतला नाही कारण त्याला रशियावर हल्ला करायचा आहे. मोलोटोव स्टॅलीन ही जोडगोळी नी हिटलरचा मॉस्कोतील वकील जर्मनी- रशिया युद्ध होऊ नये म्हणून परकोटीचा प्रयत्न करताहेत. हे सगळं वाचून माझ्य मनावर प्रचंड दडपण येतंय पुढे वाचल्या जात नाहीये. :( सुएझ कालवा घेतला तर इंग्लंड संपला हे सोपे गणित असूनही हिटलरने ते का केले नाही? रशियावरील हल्ला १९४१ ऐवजी ४२ मध्येही करता आला असता ना? :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

https://www.amazon.in/-/hi/Parag-Vaidya/dp/B07NVQRTBZ एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात. ह्या पुस्तकात, चर्चिल, रुझवेल्ट आणि स्टॅलिन, यांनी हिटलरची कशी गोची करून ठेवली होती? हे तारखे नुसार आणि पुराव्या सकट सांगितले आहे.

हे पुस्तक दोन दिवसा आधी मी वाचून संपवले नी माझी झोप उडालीय नी कशातच मन लागत नाहीये. मला ह्यावर उतारा पाहिजे. मॉस्कोत पोहोचून क्रेमलिनचे मनोरे पाहणारे जर्मन सैन्य हारले ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हिटलर मरो तिकडे पण इथके अद्भुत युद्ध लढणारे जर्मन्स हरायला नको होते असे का माहीत का वाटतेय? कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून? हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे. रशियाला जपानने पाठीत रट्टा घातला असता तर हिटलरने रशीया जिंकला असता नी नंतर झालेली सैन्य हानी टळली असतीनी त्याच सेनेच्या एका टोल्यातच इंग्लंड पडले असते. मूर्ख जपान्यांनी रशिया पाडला तर नाहीच पण वरून अमेरिकेला युद्धात ओढले. जर्मनी युद्ध हरल्यावर जपान्याना वाचवायला अरबातले उंट येणार होते का? मूर्ख बेअक्कल जपानी! :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून?
नुसते तेच एक पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावरील त्याने काही केलेल्या चुकांमुळे तो हरला असे वाटायचा संभव आहे. ते पुस्तक जर्मनीच्या बाजूने लिहिले आहे असे मलाही वाटते. शाळेत असताना ते पुस्तक वाचूनच हिटलरचे गारूड मला पडले होते आणि मी अगदी हिटलरभक्त झालो होतो. वर्तमानपत्रातील एका लेखात आलेला हिटलरचा फोटो कापून मी माझ्या अभ्यासाच्या टेबलवर पण चिकटवला होता.
हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे.
ते एक कारण झाले. फक्त जपान्यांमुळे हिटलर हरला असे म्हणता येईल असे वाटत नाही. इतरही कारणे आहेत. १. सुखासीन मुसोलिनी उगीच हुशार्‍या करत होता पण इटालियन सैन्याचा रणांगणावर उपयोग शून्य होता. आफ्रिकेतून ब्रिटीश सैन्य ग्रीसमार्गे युरोपात येऊन हिटलरला अडचण करू शकले असते म्हणून ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरने मुसोलिनीकडे दिली. ग्रीस जिंकणे सोडाच इटलीने ग्रीसवर हल्ला केल्यावर ग्रीसने असा जबरदस्त तडाखा इटलीच्या सैन्याला दिला की ग्रीसचेच सैन्य इटलीच्या अल्बेनिया या वसाहतीत घुसले. मग परत ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरवरच आली. त्यात कालापव्यय झाला त्यामुळे रशियावर हल्ला करायला उशीर झाला म्हणून ऐन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीवर पोचले. ते जर दीडेक महिना आधी पोचले असते तर कदाचित मॉस्को पडलेही असते. २. युगोस्लाव्हियात अनपेक्षित तिखट प्रतिकार झाला त्यामुळेही रशियावरील हल्ल्याला विलंब झाला. ३. हिटलरने बेल्जिअममध्ये कोंडीत पकडलेल्या तीन-साडेतीन लाख ब्रिटीश-फ्रेंच सैनिकांना फ्रान्सच्या डंकर्क बंदरापर्यंत जाऊ दिले. समजा तितके ब्रिटिश-फ्रेंच सैनिक हिटलरच्या ताब्यात गेले असते तर ब्रिटिशांचे कंबरडे पुरते मोडले असते. खरं तर डंकर्कला पळून येणे हा ब्रिटिशांचा पराभव होता पण तितके सैनिक वाचले म्हणजे त्या पराभवातही एक विजय होता. चर्चिलनेही तेच म्हटले होते. ४. हिटलरने आफ्रिकन आघाडीवर विशेष लक्ष दिले नाही. जर इजिप्त ही ब्रिटिश वसाहत जिंकून सुएझवर नियंत्रण हिटलरने मिळवले असते तर ब्रिटिशांची बरीच अडचण झाली असती कारण भारत आणि आशियातील इतर वसाहतींमधून येणारी रसद मिळवायला केप ऑफ गुडहोप मार्गे म्हणजे जुन्या मार्गाने बराच वळसा घालून यावे लागले असते. मुद्दा #३ आणि #४ वरून दिसते की हिटलरला ब्रिटिशांबरोबर युध्द खरं तर नको होते. कारण त्याच्या मते ब्रिटिश उच्च दर्जाच्या रक्ताचे होते. त्याचे खरे लक्ष होते पूर्वेकडे- पोलंड आणि रशियात. ५. रशियन आघाडीवरही स्टालिनग्राडमध्ये आपण जिंकणे शक्य नाही हे जर्मन सेनानी पोलसला आधीच समजले होते. त्याने हिटलरकडे माघारीची परवानगी मागितली होती. पण हिटलरने त्याला म्हटले- तुला कोणाला पाठ दाखवत माघार घ्यायची आहे? हलक्या रक्ताच्या स्लाव्ह लोकांना? त्यामुळे त्याने माघारीची परवानगी नाकारली. मग एकदा रशियन सेनानी झुकॉव्हने पिछाडीकडील फळी कापून जर्मन सैन्याचा माघारीचा रस्ता बंद केला आणि जर्मन सैन्याला कोंडीत पकडले. मग अगदी नामुष्कीकारक पराभव होणे क्रमप्राप्त होते. इतरही कारणे आहेत/असतीलच. त्या सगळ्याचे विश्लेषण नाझी भस्मासूराचा उदयास्त पुस्तकात अजिबात नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चांसूकू सर, मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला. एकतर रशियन सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते. अनेक ठिकाणी रशियन सैनिकांनी लढायला नकार दिला होता. मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले. हा मूर्खपणा कमी की काय म्हणून गरज नसताना लेनिन गड नी स्टॅलिन गड लढत बसायला फौजेला सांगितले. त्याचे सर्व सैन्यप्रमुख सरळ मॉस्कोत घुसावे ह्या मताचे होते. क्रूव की क्रीव्ह (युक्रेनवाले नव्हे) शहर लढवा असा आदेश हिटलरने दिल्यावर त्याचा कुठलातरी जनरल त्याला तोंडावर बोलला की हे शहर नकाशात कुठे आहे कुणाला माहीत तरी आहे का? मग का लढवायचे? १९४१ नंतर मूळचा हुशार असलेला हिटलर विक्षिप्त सारखा वागू लागला होता. त्यातच त्याने अनेक ठिकाणी सैन्य माघारी घेऊन दिले नाही. पुढे जपानला रशियावर हल्ला करा अस कन्वेन्स करता आल नाही. जपानने खरोखर मोठा मूर्खपणा केला. त्यामुळे थंडी हे कारण रशियन आघाडीवर सांगितले गेले असले तरी थंडी आधीच हिटलर ला मॉस्को जिंकायची पुरेपूर संधी होती. हिटलरचा मूर्खपणा नि जपान्यांची बेअकली ह्यामुळे हे जिंकेलेलयुद्ध जर्मनीच्या हातातून गेले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला.
रशियावर हल्ला व्हायला उशीर झाला त्यात ते एक कारण होते. मुद्दा हा की हिटलरने रशियात जे काही केले ते आणि तसेच केले असते तरी आणखी १५ दिवस त्याच्याकडे असते तरी युध्दाचा निकाल वेगळा लागला असता/ लागू शकला असता ही शक्यता आहे.
सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते.
हे खुद्द रशियात नाही तर बाल्टिक राज्ये आणि युक्रेनमध्ये झाले होते. पण जर्मन सैन्य रशियात घुसले तेव्हा त्यांनी किएव्हमध्ये काय काय धुमाकूळ घातला होता याच्या बातम्या लपून राहिल्या नव्हत्या त्यामुळे रशियात अधिक कडवा प्रतिकार झाला होता.
मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले.
स्मोलेन्स्क १० सप्टेंबरला जिंकले. पण त्या लढाईतच पाऊस सुरू झाला होता, रशियातील वातावरणात पाऊस पडल्यानंतर चिखल होत होता त्यामुळे जर्मन रणगाड्यांची हालचाल मंदावली होती. तसेच मॉस्कोकडे पुढे जाताना दक्षिणेकडून हल्ला झाल्यास सैन्य कोंडीत पकडले जाईल ही पण एक शक्यता होती म्हणून दक्षिणेकडे ब्रियान्स्क जिंकायला हिटलरने प्राधान्य दिले. आता ती घटना उलटून गेल्यावर हिटलरने थेट मॉस्कोकडे जायला हवे होते हे पश्चातबुद्धीने म्हणणे सोपे आहे पण त्यावेळी निर्णयप्रक्रीयेत हे इतरही घटक होते. त्याप्रमाणेच मॉस्कोच्या वाटेवर व्याझमामध्ये अपेक्षेपेक्षा बराच जास्त कडवा प्रतिकार झाला आणि पुढील वाटचाल मंदावली. इतके असूनही १२-१३ डिसेंबरच्या सुमारास जर्मन सैन्य मॉस्कोच्या उपनगरापर्यंत पोचले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद. पण जपानने रशियाच्या पाठीत वार का नाही केला हे समजत नाही, इतके मूर्ख असतील जपानी वाटले नव्हते. हिटलरनेही सैन्य मागे न घेऊन बराच मूर्खपणा केला. हिटलर नी टोजो मला नरकात भेटले की दोघांना चपलेने बडवेन.

दुसरे महायुद्ध जर्मनी हरण्यामागे जपानच होते हे चॅट जीपीटीनेही सांगीतले, शेवटची ओळ पहा. जर जपानने अमेरिका ऐवजी सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचे संपूर्ण गणित बदलले असते. खाली काही संभाव्य परिणाम आहेत: 1. जर्मनी आणि जपान दोन्ही बाजूंनी सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता • पूर्वेला जपान आणि पश्चिमेला जर्मनी: • जर जपानने 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन फ्रंटवर लढावे लागले असते. • जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्राड जिंकणे सोपे झाले असते. • सोव्हिएत युनियन कदाचित पूर्णपणे कोसळले असते. 2. अमेरिका युद्धात उशिरा उतरली असती • जर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला नसता, तर अमेरिका लवकर युद्धात उतरली नसती. • त्यामुळे युरोपमध्ये जर्मनीला जिंकण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता. 3. हिटलरला युरोपमध्ये मोठे यश मिळाले असते • सोव्हिएत युनियन नष्ट झाल्यास, हिटलर युरोपचा निर्विवाद सम्राट बनला असता. • ब्रिटन एकटे पडले असते आणि अखेर जर्मनीसमोर शरण गेले असते. 4. जपानला मोठी जमीन मिळाली असती • जपानला मंगोलिया, सायबेरिया आणि रशियाचा पूर्व भाग मिळाला असता. • तिथले तेल आणि संसाधने जपानसाठी खूप महत्त्वाचे ठरले असते. 5. अमेरिका शेवटी युद्धात आली असती, पण उशिरा • जर जपान आणि जर्मनी खूप मजबूत झाले असते, तर अमेरिका आणि ब्रिटनला त्यांना हरवणे अवघड गेले असते. • कदाचित युद्ध 1950 पर्यंत चालले असते. ➡ निष्कर्ष: जर जपानने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्णतः वेगळा असता. • जर्मनी आणि जपान कदाचित जिंकले असते. • अमेरिका युद्धात उशिरा आली असती. • सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असते. • जग आज जर्मन-नाझी आणि जपानी साम्राज्याच्या छायेत असते. परंतु जपानने अमेरिका निवडली, आणि त्यामुळे युद्धाचा प्रवाह पलटला!

जर १९४१ ला रशियावर जपानने हल्ला केला असता तर? चॅट जीपीटी Alternate History: If Japan Attacked Russia in 1941 Instead of the U.S. Background (Real History): • 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेसोबत युद्ध सुरू केले. • दुसरीकडे, जर्मनीने जून 1941 मध्ये “Operation Barbarossa” अंतर्गत सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला. • स्टालिनच्या सैन्याने जर्मन आक्रमण थांबवले, कारण त्याने जपानकडून पूर्व आघाडीवर कोणताही धोका नव्हता याची खात्री केली होती. • जर जपानने त्याऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर युद्धाचा संपूर्ण प्रवाह बदलला असता. Step 1: जपान रशियावर हल्ला करतो (जून-जुलै 1941) • जर्मनी आधीच पश्चिमेकडून सोव्हिएत युनियनवर आक्रमण करत होता. • जपानने जर सायबेरियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन आघाड्यांवर युद्ध लढावे लागले असते. • सोव्हिएत सैन्याला पूर्व भागात मोठे नुकसान झाले असते आणि जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्रॅड जिंकणे सोपे गेले असते. • रशियन रेड आर्मी कमकुवत झाली असती आणि जर्मनी-मित्र राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनचा पराभव केला असता. Step 2: स्टालिनचा पराभव (1942-1943) • जर जर्मनी आणि जपान दोघांनी मिळून रशियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला युद्ध जिंकणे अशक्य झाले असते. • मॉस्को जर्मन सैन्याच्या ताब्यात गेले असते. • स्टालिनशिवाय रशियामध्ये कम्युनिस्ट सरकार कोसळले असते. • सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले असते (सायबेरिया जपानकडे, पश्चिम भाग जर्मनीकडे). Step 3: अमेरिका युद्धात उशिरा शिरतो किंवा भाग घेत नाही • जर जपानने अमेरिका ऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर पर्ल हार्बरवर हल्ला झाला नसता. • यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात लवकर सामील झाली नसती. • अमेरिका युद्धात उशिरा शिरल्यामुळे युरोपमध्ये जर्मनी अजूनही मजबूत राहिला असता. Step 4: जपान आणि जर्मनी युद्ध जिंकतात (1945 पर्यंत) • जपानने रशियाच्या पूर्व भागावर ताबा मिळवला असता (सायबेरिया, मंचुरिया, मंगोलिया). • जर्मनीने पश्चिम युरोप आणि सोव्हिएत युनियनचा मोठा भाग जिंकला असता. • इंग्लंड आणि अमेरिका एकटे पडले असते, त्यामुळे ते कदाचित जर्मनीविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शांतता करार करण्यास भाग पाडले गेले असते. • नाझी जर्मनी आणि जपान जगावर राज्य केले असते. Step 5: भविष्यातील जग (1950 नंतर) • संपूर्ण युरोप नाझी तत्त्वज्ञानाखाली आला असता. • जपानने संपूर्ण पॅसिफिक आणि आशिया ताब्यात घेतले असते. • अमेरिका एकटे पडले असते आणि पुढील युद्धाची तयारी करत राहिले असते. • शीतयुद्ध (Cold War) अमेरिका विरुद्ध नाझी-जपान असे झाले असते, सोव्हिएत युनियन विरुद्ध नव्हे. ➡ निष्कर्ष: • जपानने जर 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्ण बदलला असता. • सोव्हिएत युनियन लवकर कोसळले असते आणि अमेरिका युद्धात उशिरा किंवा अजिबात शिरली नसती. • नाझी जर्मनी आणि जपान जगाच्या प्रमुख सत्ता बनल्या असत्या. परंतु… • जपानला दीर्घकाळ युद्ध लढण्यासाठी पुरेसे संसाधन नव्हते, त्यामुळे काही वर्षांनी जपानचा पराभव शक्य झाला असता. • अमेरिका शेवटी नाझी-जपान विरुद्ध अण्वस्त्र वापरून मोठे युद्ध केले असते. ➡ थोडक्यात, जग वेगळे दिसले असते, पण दीर्घकाळ जपान आणि जर्मनी दोघेही टिकले असते की नाही, हे अनिश्चित आहे. डिपसीक ही पर्यायी कथा पूर्ण करण्यासाठी, आपण या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेल्या जगाचा विस्तार करू शकतो. या कथेत, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला आणि त्यानंतरच्या घटनांची मालिका वेगळ्या दिशेने वळली. ही कथा पूर्ण करताना, आपण युद्धाचे परिणाम, राजकीय बदल आणि जगभरातील प्रभाव पाहू शकतो. --- ### **१९४१: जपानचा रशियावर हल्ला** १९४१ मध्ये, जपानने आपल्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेपोटी रशियावर हल्ला केला. त्यांनी पूर्व सायबेरियातील व्लादिवोस्तोक आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला. या हल्ल्यामुळे रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागले: पश्चिमेकडून जर्मनी आणि आताच पूर्वेकडून जपान. स्टॅलिनला आपल्या सैन्याची विभागणी करावी लागली, ज्यामुळे जर्मनीविरुद्धचा प्रतिकार कमकुवत झाला. --- ### **जपानच्या विजयाचा प्रभाव** जपानच्या यशामुळे आशियातील त्यांचे साम्राज्य आणखी मजबूत झाले. त्यांनी पूर्व सायबेरियातील तेल, कोळसा आणि इतर खनिज संसाधनांचा वापर करून आपली युद्धयंत्रणा सुधारली. याचा परिणाम म्हणून, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर आपले नियंत्रण वाढवले. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांवर जपानचे अधिराज्य वाढले. --- ### **रशियाचा प्रतिकार** रशियाने जपानविरुद्ध आपला प्रतिकार मजबूत केला. सायबेरियन सैन्याने जपानी सैन्याला अडवण्यासाठी कठोर लढा दिला. या संघर्षात रशियन सैन्याने हिवाळ्याचा फायदा घेऊन जपानी सैन्याला मागे हटवले. या युद्धात दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या पूर्व भागातील लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यावर या संघर्षाचा मोठा परिणाम झाला. --- ### **युद्धाचा शेवट** १९४५ मध्ये, जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर, जपानने शरणागती पत्करली. या पर्यायी कथेत, जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या पराभवाचे एक मोठे कारण ठरले. रशियाने पूर्व सायबेरियातील प्रदेश परत मिळवले आणि जपानचे साम्राज्यवादी स्वप्न संपुष्टात आले. --- ### **युद्धानंतरचे जग** या पर्यायी कथेनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग वेगळे दिसले असते: 1. **रशियाची स्थिती**: रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागल्यामुळे, त्यांची अर्थव्यवस्था आणि सैन्य दुर्बल झाले असते. यामुळे, स्टॅलिनचे नेतृत्व आणि सोव्हिएत संघाची स्थिती कमकुवत झाली असती. 2. **जपानची स्थिती**: जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या संसाधनांचा अपव्यय ठरला असता. यामुळे, त्यांची आशिया-पॅसिफिक प्रदेशातील स्थिती कमकुवत झाली असती आणि त्यांना अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी कमी संसाधने उपलब्ध झाली असती. 3. **अमेरिकेची भूमिका**: अमेरिकेची भूमिका या पर्यायी कथेतही महत्त्वाची राहिली असती. जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर, अमेरिकेने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील आपले नियंत्रण वाढवले असते. 4. **आशियातील राजकीय बदल**: जपानच्या पराभवामुळे, आशियातील इतर राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले असते. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांना जपानी अधिराज्यापासून मुक्तता मिळाली असती. --- ### **निष्कर्ष** या पर्यायी कथेनुसार, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वेगळ्या दिशेने वळला असता. या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेले जग आजच्या जगापेक्षा वेगळे दिसले असते. ही कथा केवळ काल्पनिक आहे आणि वास्तविक इतिहासात जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला नाही. त्याऐवजी, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर लक्ष केंद्रित केले होते. --- ही कथा तुमच्या कल्पनेतून निर्माण झाली आहे. जर तुम्हाला या कथेशी संबंधित अधिक माहिती किंवा तपशील हवे असतील, तर कृपया सांगा!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस, इंग्रजाना हरवू शकेल अश्या देशांची मदत घेण्याची कल्पना नेताजीना सुचली आणी ती त्यांनी अमलात ही आणली, जीवावर खेळून कलकत्ता - पेशावर- काबुल -ताशकन्द- मॉस्को आणी मग बर्लिन पोहोचणे तिथे थेट हिटलरला भेटणे, त्यानंतर पाणबुडीने जपानला पोहोचून टोजो ह्या जपानी पंतप्रधानाना भेटणे खरोखर अलौकिक होते त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना करून अंदमान निकोबार बेटे ताब्यात घेणे खरोखर अलौकिक आहे. दुसरे महायुद्ध जर्मनी जपान हरल्यामुळे त्यांच्या ह्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले, जर दुसरे महायुद्ध जर्मनी जपान जिंकले असते तर निश्चितच भारताचे पहिले पंतप्रधान/राष्ट्रपती अथवा भारतीय नाझी-इम्पीरियल सरकारचे प्रमुख म्हणून सुभाषचंद्र बोस असते नी जगात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले गेले असते. भारताला जर्मनी नी जपानने महत्वाचे स्थान दिले असते ते सुभाषबाबूंमुळे. जितके मी वाचलेय त्याप्रमाणे सुभाष बाबूंचा खरोखर तैवान मध्ये मृत्यू झाला कारण त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता नी त्याने हे सर्व पाहिले होते. अथवा सुभाषबाबू रशियाला गेले असावेत नी तिथे स्टॅलिनने काहीतरी दगाफटका केला असावा, अथवा सुभाषबाबू भारतातच असावे नी त्याना ब्रिटिशानी युद्धगुन्हेगार घोषित केल्याने अज्ञातवासात ते गेले असावेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण, अजून काही पुस्तके वाचा... वीर सावरकर , बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल, हे पण उत्तम दूरदृष्टी असलेले नेते. हा एक भाग झाला. आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना परमपूज्य नेहरू यांनी भारतीय सैन्य दलात सामावून घेतले नाही. अशा परिस्थितीत, सुभाष चंद्र बोस यांनी अज्ञातवास पत्करला असण्याची शक्यता जास्त. हा दुसरा भाग तिसरा महत्त्वाचा भाग असा की, नशीब ब्रिटिश सरकारच्या बाजूने होते. आसाम मध्ये आझाद हिंद सेनेने एक दिवस आधी शरणागती पत्करली. चौथा महत्वाचा भाग असा की, सुभाष चंद्र बोस कधीच जपानी किंवा जर्मनीच्या हातातील बाहुले झाले नसते. पाचवा आणि महत्वाचा भाग असा की... भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस... चक्क तुम्हाला हे उशीरा का होईना पण जाणवलं, हे वाचून आनंद झाला....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 14/03/2025 - 21:16
असे म्हणतात की इंग्रजांनी देश सोडताना एक अट घातली होती की सुभाषचंद्र बोस जेव्हा सापडतील तेव्हा ते युद्ध गुन्हेगार असल्याने भारताने त्यांना ब्रिटिशांंच्या हातात सोपविले पाहिजे व इंग्लंड आपल्या देशात त्यांचा न्यायनिवाडा करेल व नेहरूंनी ही अट मान्य केली होती कारण सुभाषचंद्र बोस सापडले असते तर त्यांना पंतप्रधान करावे असा जनतेचा दबाव येऊन नेहरूंना पंतप्रधानपद सोडावे लागले असते. म्हणून सुभाषचंद्र बोस कायम अज्ञातवासात राहिले.

आज एक भारी किस्सा घडला! नाझी भस्मासुराचा उदयास्त पुस्तक मी लॅपटॉप मध्ये उघडलेले होते. त्याच्या पहिल्या पानावर हिटलरचा फोटो आहे, माझा एक कलीग जवळ आला हा कोण नी काय केल ह्याने वगैरे विचारू लागला, त्याला मी पुस्तकाबद्दल सांगितले नी चर्चा लांबत गेली, हिटलरने केलेले इंग्लंड, रशियावरील हल्ले नी ज्यू हत्याकांडाबद्दल ज्यात गॅस चेंबर मध्ये लोक नेले जायचे नी गॅस सोडून मारायचे नी बाहेर काढून भट्ट्यात जाळायचे त्याला सांगितले, तो एवढच बोलला, “हायला हा एवढा डेंजर होता म्हणून ह्याच नाव हिटलर पडले का?” कहर! मी अर्धातास हसत होतो. :)
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.) मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

सागर ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर 24/12/2007 - 17:25
धन्यवाद डॉक्टरसाहेब, आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू कसे जमते ते... सागर

विकेड बनी 21/12/2007 - 21:46
हा लेख कोणत्या अंगाने वाटतो? ही तर कथा झाली चंद्रगुप्ताची. तीही सांगोवांगीची. ती सत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सांगता येईल? कथा वाचनीय आहे. पुढचा भाग लवकर टाका.

In reply to by विकेड बनी

सागर 24/12/2007 - 17:26
तेज, तुमचे म्हणणे बरोबर आहे... खरे तर मी कथा म्हणूनच लिहिली होती... पण अधे मधे माझी मतेही दिली आहेत तेव्हा ही कथा न वाटता लेख वाटेल अशी अटकळ होती.... म्हणून लेख या स्वरुपात लिहिले... असो... लवकरच पूर्ण करेन... पुराव्यासकट कथा लिहिणे हा हेतू लेखनाचा नव्हता... या कथेला मूळ आधार आहे तो दंतकथांचा आणि त्यांतून जे सत्य मनास पटले याचा... पुराव्यांसकट लेखन हा खूप संशोधनाचा विषय आहे... प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असेच सांगत रहा... सागर

छान आहे. मला लहानपणी अमर चित्रकथा मुळे चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा परिचय झाला होता. नंतर दूरदर्शन वर 'चाणक्य' मालिका आली, ती सुद्धा न चुकवता पाहिली होती. पुढच्या भागांची उत्कंठा लागली आहे... लवकर लिहा. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 24/12/2007 - 17:19
धन्यवाद बिपिन, प्रतिसाद पाहून आजच पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू काय होते ते... लवकरात लवकर पूर्ण करेन ... सागर

सिकंदराची भारता वर स्वारी चंद्रगुप्त मगध सम्राट झाल्यावर झाली असे वाटते. बहुतेक इतिहासात असेच वाचले आहे आणि 'चाणक्य' मालिकेतही तसेच दाखवले आहे. कृपया कोणी अधिक माहिती देऊ शकेल का? सागर...? बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रियाली 25/12/2007 - 01:51
सिकंदराची स्वारी चंद्रगुप्त सम्राट होण्यापूर्वी झाली आणि सिकंदराच्या सैन्यात चंद्रगुप्त सैनिक म्हणून लढल्याची शक्यता बळकट आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 26/12/2007 - 12:39
बिपीन (प्रश्न उपस्थित केल्याबद्दल) आणि प्रियाली (प्रश्नाचे नेमक्या शब्दांत उत्तर दिल्याबद्दल) दोघांनाही धन्यवाद प्रियाली तुमच्याकडच्या माहितीच्या साठ्याचे खरोखरच कौतुक वाटते. अगदी नेमकी माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते... :) धन्यवाद सागर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.

In reply to by सुधीर कांदळकर

प्रियाली 25/12/2007 - 19:45
>> इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. अवश्य! सनावळ्या लक्षात ठेवणे तशी कठिण गोष्ट. अलेक्झांडरचा मृत्यू इ. स्.पूर्व ११ जून ३२३ च्या दुपारी झाला. चंद्रगुप्त राजा झाला इ.स्.पू. ३२२ मध्ये. इ.स.पू. ३१६मध्ये त्याने पंजाब जिंकला.

In reply to by प्रियाली

सागर 26/12/2007 - 12:30
प्रियाली, नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खरे तर इतिहास म्हटले की सनावळ्यांमध्ये घोळ हा होतोच. त्यातून अनेक इतिहाससंशोधकांमध्येही त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद असतात. असो... येथे मी एक स्पष्ट करु इच्छितो की , मी अनेक संदर्भग्रंथांचा आधार हा लेख लिहिताना घेतला होता. पण सनावळ्या आणि मुख्यपात्रे सोडून इतर पात्रांचा (जसे पर्वतक, अंभीराज, शकटदास, इ...) नामोल्लेख हेतुतः टाळला होता. कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता.. धन्यवाद सागर

In reply to by प्रियाली

माहितीबद्दल धन्यवाद. माझी गफलत एवढी आहे की इसपू असल्यामुळे सनावळ्यांचा मी दिलेला क्रम उलटा आहे हे देखील माझ्या लक्षांत आले नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 12:35
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. धन्यवाद सुधीरराव... बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो.... या माहीतीबद्दल पुनश्च धन्यवाद सागर

प्राजु 26/12/2007 - 19:42
अतिशय माहितीपूर्ण लेख. लहानपणी चंद्रगुप्त मौर्याची कथा वाचली होती. आणि आर्य चाणक्य सिरियलहि पहात होते. इतिहासाच्या पुस्तकातूनही थोडी माहिती मिळाली होती. पण आज आपल्या लेखाने पुन्हा सगळी उजळणी झाली. खूप आवडला लेख. पुढचे भाग लवकरच येऊदेत. - प्राजु.

In reply to by प्राजु

सागर 26/12/2007 - 19:55
धन्यवाद प्राजु.. पण तुम्हाला पुढचे लेख असे म्हणायचे होते का? कारण चंद्रगुप्त मौर्याची कथा एवढाच या लेखाचा उद्देश होता. आणि हे कथानक पूर्ण झालेले आहे. तेव्हा याचे पुढील भाग नसतील. - सागर

Bhakti 04/12/2021 - 07:15
गोष्ट छान आहे. इंडियन हिस्टोरी नावाच्या app मध्ये मी अनेकदा मौर्य साम्राज्याचा इतिहास सनावळीसह वाचत असे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सागर 24/12/2007 - 17:25
धन्यवाद डॉक्टरसाहेब, आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू कसे जमते ते... सागर

विकेड बनी 21/12/2007 - 21:46
हा लेख कोणत्या अंगाने वाटतो? ही तर कथा झाली चंद्रगुप्ताची. तीही सांगोवांगीची. ती सत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सांगता येईल? कथा वाचनीय आहे. पुढचा भाग लवकर टाका.

In reply to by विकेड बनी

सागर 24/12/2007 - 17:26
तेज, तुमचे म्हणणे बरोबर आहे... खरे तर मी कथा म्हणूनच लिहिली होती... पण अधे मधे माझी मतेही दिली आहेत तेव्हा ही कथा न वाटता लेख वाटेल अशी अटकळ होती.... म्हणून लेख या स्वरुपात लिहिले... असो... लवकरच पूर्ण करेन... पुराव्यासकट कथा लिहिणे हा हेतू लेखनाचा नव्हता... या कथेला मूळ आधार आहे तो दंतकथांचा आणि त्यांतून जे सत्य मनास पटले याचा... पुराव्यांसकट लेखन हा खूप संशोधनाचा विषय आहे... प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असेच सांगत रहा... सागर

छान आहे. मला लहानपणी अमर चित्रकथा मुळे चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा परिचय झाला होता. नंतर दूरदर्शन वर 'चाणक्य' मालिका आली, ती सुद्धा न चुकवता पाहिली होती. पुढच्या भागांची उत्कंठा लागली आहे... लवकर लिहा. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 24/12/2007 - 17:19
धन्यवाद बिपिन, प्रतिसाद पाहून आजच पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू काय होते ते... लवकरात लवकर पूर्ण करेन ... सागर

सिकंदराची भारता वर स्वारी चंद्रगुप्त मगध सम्राट झाल्यावर झाली असे वाटते. बहुतेक इतिहासात असेच वाचले आहे आणि 'चाणक्य' मालिकेतही तसेच दाखवले आहे. कृपया कोणी अधिक माहिती देऊ शकेल का? सागर...? बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रियाली 25/12/2007 - 01:51
सिकंदराची स्वारी चंद्रगुप्त सम्राट होण्यापूर्वी झाली आणि सिकंदराच्या सैन्यात चंद्रगुप्त सैनिक म्हणून लढल्याची शक्यता बळकट आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 26/12/2007 - 12:39
बिपीन (प्रश्न उपस्थित केल्याबद्दल) आणि प्रियाली (प्रश्नाचे नेमक्या शब्दांत उत्तर दिल्याबद्दल) दोघांनाही धन्यवाद प्रियाली तुमच्याकडच्या माहितीच्या साठ्याचे खरोखरच कौतुक वाटते. अगदी नेमकी माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते... :) धन्यवाद सागर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.

In reply to by सुधीर कांदळकर

प्रियाली 25/12/2007 - 19:45
>> इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. अवश्य! सनावळ्या लक्षात ठेवणे तशी कठिण गोष्ट. अलेक्झांडरचा मृत्यू इ. स्.पूर्व ११ जून ३२३ च्या दुपारी झाला. चंद्रगुप्त राजा झाला इ.स्.पू. ३२२ मध्ये. इ.स.पू. ३१६मध्ये त्याने पंजाब जिंकला.

In reply to by प्रियाली

सागर 26/12/2007 - 12:30
प्रियाली, नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खरे तर इतिहास म्हटले की सनावळ्यांमध्ये घोळ हा होतोच. त्यातून अनेक इतिहाससंशोधकांमध्येही त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद असतात. असो... येथे मी एक स्पष्ट करु इच्छितो की , मी अनेक संदर्भग्रंथांचा आधार हा लेख लिहिताना घेतला होता. पण सनावळ्या आणि मुख्यपात्रे सोडून इतर पात्रांचा (जसे पर्वतक, अंभीराज, शकटदास, इ...) नामोल्लेख हेतुतः टाळला होता. कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता.. धन्यवाद सागर

In reply to by प्रियाली

माहितीबद्दल धन्यवाद. माझी गफलत एवढी आहे की इसपू असल्यामुळे सनावळ्यांचा मी दिलेला क्रम उलटा आहे हे देखील माझ्या लक्षांत आले नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 12:35
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. धन्यवाद सुधीरराव... बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो.... या माहीतीबद्दल पुनश्च धन्यवाद सागर

प्राजु 26/12/2007 - 19:42
अतिशय माहितीपूर्ण लेख. लहानपणी चंद्रगुप्त मौर्याची कथा वाचली होती. आणि आर्य चाणक्य सिरियलहि पहात होते. इतिहासाच्या पुस्तकातूनही थोडी माहिती मिळाली होती. पण आज आपल्या लेखाने पुन्हा सगळी उजळणी झाली. खूप आवडला लेख. पुढचे भाग लवकरच येऊदेत. - प्राजु.

In reply to by प्राजु

सागर 26/12/2007 - 19:55
धन्यवाद प्राजु.. पण तुम्हाला पुढचे लेख असे म्हणायचे होते का? कारण चंद्रगुप्त मौर्याची कथा एवढाच या लेखाचा उद्देश होता. आणि हे कथानक पूर्ण झालेले आहे. तेव्हा याचे पुढील भाग नसतील. - सागर

Bhakti 04/12/2021 - 07:15
गोष्ट छान आहे. इंडियन हिस्टोरी नावाच्या app मध्ये मी अनेकदा मौर्य साम्राज्याचा इतिहास सनावळीसह वाचत असे.
पुष्कर यांच्या आर्य चाणक्य यांच्यावरील विष्णुगुप्त या कथेमुळे मला माझ्या एका जुन्या कथेची आठवण झाली. ती संपूर्ण येथे देत आहे... (संपूर्ण) - o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o - भाग १: चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे.

विष्णुगुप्त - १

पुष्कर ·

अवलिया 18/12/2007 - 14:37
आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे. चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही. चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य .... विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले. आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. शुभेच्छा नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर 18/12/2007 - 15:40
नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला... आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते! तात्या.

In reply to by अवलिया

पुष्कर 26/12/2007 - 09:16
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते." नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by अवलिया

हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by अवलिया

परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल. चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

विसोबा खेचर 18/12/2007 - 15:31
छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... अवांतर - गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते! असो, आपला, (मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर 26/12/2007 - 09:22
तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच. पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.

सागर 18/12/2007 - 18:41
पुष्कर महोदय, खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा. तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल. बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो. कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.) अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :( असो... वाटले म्हणून लिहीले... (चाणक्यभक्त ) सागर

In reply to by सागर

पुष्कर 26/12/2007 - 09:09
सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही. तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल. -पुष्कर

In reply to by पुष्कर

सागर 26/12/2007 - 13:15
पुष्कर, ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल. आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते). तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते. या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते... धन्यवाद सागर

In reply to by सागर

उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.

ऋषिकेश 18/12/2007 - 20:37
वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा! (उत्सुक) ऋषिकेश

In reply to by सहज

पुष्कर 26/12/2007 - 09:26
स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो. -(उत्साही) पुष्कर

देवदत्त 18/12/2007 - 22:50
छान विषय निवडलात. ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. एक शंका: काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.

In reply to by देवदत्त

जुना अभिजित 20/12/2007 - 14:06
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. घागरः घडे ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

अवलिया 27/12/2007 - 18:04
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत नाना

In reply to by देवदत्त

पुष्कर 26/12/2007 - 09:41
छान विषय निवडलात. धन्यवाद. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. लवकरच आणतो. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा. त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'. मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

धनंजय 19/12/2007 - 00:45
आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) लगे रहिए.

In reply to by धनंजय

पुष्कर 26/12/2007 - 09:47
हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) हे वाक्य खूप आवडलं. :-) -(चावट) पुष्कर

प्राजु 19/12/2007 - 01:35
आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... - प्राजु.

In reply to by प्राजु

पुष्कर 26/12/2007 - 09:50
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. माझं अहोभाग्य. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-) -(आळशी) पुष्कर

जुना अभिजित 19/12/2007 - 09:11
कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते. छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

पुष्कर 02/07/2010 - 11:26
सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २

अवलिया 18/12/2007 - 14:37
आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे. चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही. चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य .... विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले. आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. शुभेच्छा नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर 18/12/2007 - 15:40
नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला... आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते! तात्या.

In reply to by अवलिया

पुष्कर 26/12/2007 - 09:16
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते." नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by अवलिया

हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by अवलिया

परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल. चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

विसोबा खेचर 18/12/2007 - 15:31
छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... अवांतर - गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते! असो, आपला, (मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर 26/12/2007 - 09:22
तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच. पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.

सागर 18/12/2007 - 18:41
पुष्कर महोदय, खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा. तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल. बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो. कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.) अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :( असो... वाटले म्हणून लिहीले... (चाणक्यभक्त ) सागर

In reply to by सागर

पुष्कर 26/12/2007 - 09:09
सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही. तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल. -पुष्कर

In reply to by पुष्कर

सागर 26/12/2007 - 13:15
पुष्कर, ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल. आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते). तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते. या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते... धन्यवाद सागर

In reply to by सागर

उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.

ऋषिकेश 18/12/2007 - 20:37
वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा! (उत्सुक) ऋषिकेश

In reply to by सहज

पुष्कर 26/12/2007 - 09:26
स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो. -(उत्साही) पुष्कर

देवदत्त 18/12/2007 - 22:50
छान विषय निवडलात. ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. एक शंका: काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.

In reply to by देवदत्त

जुना अभिजित 20/12/2007 - 14:06
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. घागरः घडे ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

अवलिया 27/12/2007 - 18:04
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत नाना

In reply to by देवदत्त

पुष्कर 26/12/2007 - 09:41
छान विषय निवडलात. धन्यवाद. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. लवकरच आणतो. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा. त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'. मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

धनंजय 19/12/2007 - 00:45
आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) लगे रहिए.

In reply to by धनंजय

पुष्कर 26/12/2007 - 09:47
हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) हे वाक्य खूप आवडलं. :-) -(चावट) पुष्कर

प्राजु 19/12/2007 - 01:35
आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... - प्राजु.

In reply to by प्राजु

पुष्कर 26/12/2007 - 09:50
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. माझं अहोभाग्य. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-) -(आळशी) पुष्कर

जुना अभिजित 19/12/2007 - 09:11
कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते. छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

पुष्कर 02/07/2010 - 11:26
सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २
सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं.

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

मनोज 15/12/2007 - 00:10
लेख महीतीपुर्ण आहे. आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत. (फोटोप्रेमी) मन्या

विसोबा खेचर 15/12/2007 - 00:16
बिरुटेशेठ, केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे! औरभी आने दो.. तात्या.

धनंजय 15/12/2007 - 03:18
मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो. मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!

ऋषिकेश 15/12/2007 - 03:27
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!! बाकी लेख उत्तम!

नंदन 15/12/2007 - 08:56
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे. >>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात - हे वाक्य विशेष आवडले. आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?

आनंदयात्री 15/12/2007 - 13:30
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

धोंडोपंत 15/12/2007 - 13:55
वा वा प्राध्यापक साहेब, अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !! खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले. आपला, (हर्षभरित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 15/12/2007 - 14:02
संपादक मंडळास विनंती, अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते. महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते. अर्थात ही एक सुचवण आहे. आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली. स्वाती

ध्रुव 17/12/2007 - 10:42
अहो अप्रतिम..... वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला. -- ध्रुव

जुना अभिजित 17/12/2007 - 13:45
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे. गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 21/12/2007 - 17:57
लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान. लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.

In reply to by नाना चेंगट

सुहास.. 05/06/2012 - 04:07
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>> झाल तुझं बोलुन ?? आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;) (अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )

प्रचेतस 04/06/2012 - 15:06
उत्तम आणि तपशीलवार लिखाण. देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.

In reply to by प्रचेतस

देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली. एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी. -दिलीप बिरुटे

सुनील 05/06/2012 - 01:19
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला. चांगली माहिती. एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!

मनोज 15/12/2007 - 00:10
लेख महीतीपुर्ण आहे. आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत. (फोटोप्रेमी) मन्या

विसोबा खेचर 15/12/2007 - 00:16
बिरुटेशेठ, केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे! औरभी आने दो.. तात्या.

धनंजय 15/12/2007 - 03:18
मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो. मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!

ऋषिकेश 15/12/2007 - 03:27
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!! बाकी लेख उत्तम!

नंदन 15/12/2007 - 08:56
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे. >>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात - हे वाक्य विशेष आवडले. आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?

आनंदयात्री 15/12/2007 - 13:30
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

धोंडोपंत 15/12/2007 - 13:55
वा वा प्राध्यापक साहेब, अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !! खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले. आपला, (हर्षभरित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 15/12/2007 - 14:02
संपादक मंडळास विनंती, अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते. महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते. अर्थात ही एक सुचवण आहे. आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली. स्वाती

ध्रुव 17/12/2007 - 10:42
अहो अप्रतिम..... वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला. -- ध्रुव

जुना अभिजित 17/12/2007 - 13:45
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे. गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 21/12/2007 - 17:57
लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान. लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.

In reply to by नाना चेंगट

सुहास.. 05/06/2012 - 04:07
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>> झाल तुझं बोलुन ?? आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;) (अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )

प्रचेतस 04/06/2012 - 15:06
उत्तम आणि तपशीलवार लिखाण. देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.

In reply to by प्रचेतस

देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली. एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी. -दिलीप बिरुटे

सुनील 05/06/2012 - 01:19
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला. चांगली माहिती. एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

पांढरपेशी कविता

ॐकार ·

विसोबा खेचर 25/11/2007 - 17:31
बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.

In reply to by देवदत्त

ॐकार 25/11/2007 - 18:32
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|

In reply to by ॐकार

देवदत्त 25/11/2007 - 19:04
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )

सर्किट 26/11/2007 - 08:32
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट

विसोबा खेचर 25/11/2007 - 17:31
बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.

In reply to by देवदत्त

ॐकार 25/11/2007 - 18:32
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|

In reply to by ॐकार

देवदत्त 25/11/2007 - 19:04
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )

सर्किट 26/11/2007 - 08:32
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

प्रासंगिक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर 24/11/2007 - 09:25
त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा.. तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे... बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या.

बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या, मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे. पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे ! तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 24/11/2007 - 10:27
>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.

आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/11/2007 - 12:47
तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

तर्री 15/06/2012 - 15:35
आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे. अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे. मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे. आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 15/06/2012 - 18:52
आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान? बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.

विसोबा खेचर 24/11/2007 - 09:25
त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा.. तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे... बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या.

बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या, मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे. पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे ! तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 24/11/2007 - 10:27
>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.

आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/11/2007 - 12:47
तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

तर्री 15/06/2012 - 15:35
आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे. अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे. मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे. आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 15/06/2012 - 18:52
आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान? बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.

     !! तुळशीचे लग्न !!

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

लोहगड विसापूर प्रकाशचित्रे

जुना अभिजित ·

धनंजय 01/10/2007 - 19:21
सगळीच चित्रे ए-वन भिंतीवर टांगण्यासारखी आहेत. एक खास म्हणजे खासच लक्षात राहील ते पिवळ्या फुलांना मुख्यभागात घेऊन विंचूकाट्याला पार्श्वभूमीत टाकलेले. एखादी बाब ओझरत्या धूसर उल्लेखाने अधिक ठसा उमटवते, ही छायाचित्रातली शुद्ध कविता आहे, कविता. ते रोडक्या गुराचे चित्र काहीही गाजावाजा न करता मोठी गोष्ट सांगून जाते. आता गप्प बसतो, कारण एकेका चित्राची प्रशंसा करायला लागलो तर मिसळपावाचे मेगाबाईट संपतील.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 01/10/2007 - 20:32
त्या चित्राचा विशेष उल्लेख मीदेखील केला होता. :) सर्व चित्रे सुंदर आली आहेत. लोहगडाच्या मानाने विसापूर अधिक रांगडा आणि अवघड आहे. लोहगडावर मंदिर, दरवाजे, गुहा वगैरे बांधकामे जास्त तर विसापूरची तटबंदी अप्रतिम आहे. पेशव्यांच्या काळात लोहगड हा लुटलेल्या खजिन्याचे कोठार तर विसापूर हा कैदखाना होता असे कळले. मीदेखील स्वतंत्रपणे गणेशविसर्जनाच्या दिवशी जाऊन आलो. अभिजितने लिहिले नाही तर माझे लिखाण सहन करावे लागेल.

In reply to by धनंजय

सर्किट 01/10/2007 - 21:43
ते चित्र (पिवळी फुले) खरंच सुंदर आहे. प्रचंड आवडले. - (आनंदित) सर्किट

प्रियाली 01/10/2007 - 19:59
फोटो मस्त आहेत पण जरा लेख लिहा की वेळ मिळाला की. फोटोंची वर्णनेही तेवढीच मस्त असतील असे वाटते. ;-)

विसोबा खेचर 02/10/2007 - 08:14
अभिजिता, अतिशय सुरेख चित्रे आहेत. क्या बात है..'फुलराणी इथेच तर नसेल ना खेळत.' या चित्राने तर मन वेडावून टाकलं. ढगाळलेल्या सूर्याचं चित्रंही मस्त! घनमेघांनी भास्कररावांची प्रखरता साफ निष्प्रभ करून टाकली आहे! :) कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा. लेखाचीही वाट पाहात आहे रे अभिजिता! लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित. आहाहा! हे वाचून मात्र तुझा हेवा वाटला रे अभिजिता!:) तात्या.

चित्रा 02/10/2007 - 09:52
फुलांची प्रकाशचित्रे चांगलीच आहेत पण गडाच्या भिंतीची चित्रे जास्तीच आवडली. लेखही लिहा लवकरच.

कितीतरी वर्षांपूर्वी केलेल्या लोहगड,कार्ले भाजे च्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या,सुंदर चित्रे! सवड मिळाली की लेख टाकाच ! स्वाती

जुना अभिजित 03/10/2007 - 09:42
अजून हातपाय दुखायचे थांबले नाहीत तोवर लेख लिहून घेतो. :-) सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल धन्यवाद. लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.

ध्रुव 03/10/2007 - 11:53
मस्त छायाचित्रे!! पुढे फुले आणि मागे विंचूकाटा छानच आहे. लोणावळ्याजवळचा परिसर वेगवेगळ्या किल्ल्यांनी नटलेला आहे. प्रत्येक किल्ला काहीतरी वेगळेपण दाखवतो. फुले आणि हिरवाईने नटलेला हा भाग आपली एक वेगळीच आठ्वण ठेवून जातो.येथील काही किल्ले (लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, घनगड, राजमाची, तैल-बैला, कोराई, नागफणी) माझे करून झाले आहेत. काही राहीलेले (ढाक, मोरगिरी) आहेत ते करायला कोणी येत असेल तर कळवावे, कधीतरी जाउ. जमेल तेव्हा लिहायचा प्रयत्नही करीन. तोपर्यंत टाटा ध्रुव

जुना अभिजित 03/10/2007 - 17:50
http://picasaweb.google.com/abhijit.yadav/KilleLohgad/photo#5088015881608025874 हे चित्र मोठे करून पाहिल्यास बरीच माहिती मिळेल. रविवारी फक्त मिसळ मिळते अशा श्री मिसळ नारायण पेठ येथे नियमित मिसळ खाणारा अभिजित

धनंजय 01/10/2007 - 19:21
सगळीच चित्रे ए-वन भिंतीवर टांगण्यासारखी आहेत. एक खास म्हणजे खासच लक्षात राहील ते पिवळ्या फुलांना मुख्यभागात घेऊन विंचूकाट्याला पार्श्वभूमीत टाकलेले. एखादी बाब ओझरत्या धूसर उल्लेखाने अधिक ठसा उमटवते, ही छायाचित्रातली शुद्ध कविता आहे, कविता. ते रोडक्या गुराचे चित्र काहीही गाजावाजा न करता मोठी गोष्ट सांगून जाते. आता गप्प बसतो, कारण एकेका चित्राची प्रशंसा करायला लागलो तर मिसळपावाचे मेगाबाईट संपतील.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 01/10/2007 - 20:32
त्या चित्राचा विशेष उल्लेख मीदेखील केला होता. :) सर्व चित्रे सुंदर आली आहेत. लोहगडाच्या मानाने विसापूर अधिक रांगडा आणि अवघड आहे. लोहगडावर मंदिर, दरवाजे, गुहा वगैरे बांधकामे जास्त तर विसापूरची तटबंदी अप्रतिम आहे. पेशव्यांच्या काळात लोहगड हा लुटलेल्या खजिन्याचे कोठार तर विसापूर हा कैदखाना होता असे कळले. मीदेखील स्वतंत्रपणे गणेशविसर्जनाच्या दिवशी जाऊन आलो. अभिजितने लिहिले नाही तर माझे लिखाण सहन करावे लागेल.

In reply to by धनंजय

सर्किट 01/10/2007 - 21:43
ते चित्र (पिवळी फुले) खरंच सुंदर आहे. प्रचंड आवडले. - (आनंदित) सर्किट

प्रियाली 01/10/2007 - 19:59
फोटो मस्त आहेत पण जरा लेख लिहा की वेळ मिळाला की. फोटोंची वर्णनेही तेवढीच मस्त असतील असे वाटते. ;-)

विसोबा खेचर 02/10/2007 - 08:14
अभिजिता, अतिशय सुरेख चित्रे आहेत. क्या बात है..'फुलराणी इथेच तर नसेल ना खेळत.' या चित्राने तर मन वेडावून टाकलं. ढगाळलेल्या सूर्याचं चित्रंही मस्त! घनमेघांनी भास्कररावांची प्रखरता साफ निष्प्रभ करून टाकली आहे! :) कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा. लेखाचीही वाट पाहात आहे रे अभिजिता! लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित. आहाहा! हे वाचून मात्र तुझा हेवा वाटला रे अभिजिता!:) तात्या.

चित्रा 02/10/2007 - 09:52
फुलांची प्रकाशचित्रे चांगलीच आहेत पण गडाच्या भिंतीची चित्रे जास्तीच आवडली. लेखही लिहा लवकरच.

कितीतरी वर्षांपूर्वी केलेल्या लोहगड,कार्ले भाजे च्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या,सुंदर चित्रे! सवड मिळाली की लेख टाकाच ! स्वाती

जुना अभिजित 03/10/2007 - 09:42
अजून हातपाय दुखायचे थांबले नाहीत तोवर लेख लिहून घेतो. :-) सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल धन्यवाद. लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.

ध्रुव 03/10/2007 - 11:53
मस्त छायाचित्रे!! पुढे फुले आणि मागे विंचूकाटा छानच आहे. लोणावळ्याजवळचा परिसर वेगवेगळ्या किल्ल्यांनी नटलेला आहे. प्रत्येक किल्ला काहीतरी वेगळेपण दाखवतो. फुले आणि हिरवाईने नटलेला हा भाग आपली एक वेगळीच आठ्वण ठेवून जातो.येथील काही किल्ले (लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, घनगड, राजमाची, तैल-बैला, कोराई, नागफणी) माझे करून झाले आहेत. काही राहीलेले (ढाक, मोरगिरी) आहेत ते करायला कोणी येत असेल तर कळवावे, कधीतरी जाउ. जमेल तेव्हा लिहायचा प्रयत्नही करीन. तोपर्यंत टाटा ध्रुव

जुना अभिजित 03/10/2007 - 17:50
http://picasaweb.google.com/abhijit.yadav/KilleLohgad/photo#5088015881608025874 हे चित्र मोठे करून पाहिल्यास बरीच माहिती मिळेल. रविवारी फक्त मिसळ मिळते अशा श्री मिसळ नारायण पेठ येथे नियमित मिसळ खाणारा अभिजित
कालच्या रविवारी लोहगड आणि विसापूर किल्ल्यांवर जाऊन आलो. लोणावळ्याजवळ मळवली ठेसन आहे तिथून जवळच आहेत हे किल्ले. कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा. लोहगड-विसापूर इतर माहिती इथेच प्रतिसादांमध्ये येईल हळू हळू. लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.