काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?
घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल
तरीही प्रश्न शिल्लक रहातो
सगळे नोकर चाकर व्यवस्था असून
कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ?
प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी
प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा
प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा
प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा
कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो
अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ?
ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती.
------------–---–---------------------------------------------------------------------
(*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण)
यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू?
मी:-वाढा!
पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! )
तप्त झाली धरा सारी
दहाही दिशा त्या पेटल्या
दिनकराशी हात मिळवुनी
उग्र होऊनि परतल्या ॥
मरूत व्यस्त, घाले गस्त
थैमान चहूकडे माजले
पशु, प्राणी, झाडे, पक्षी
नद्या नाले भाजले ॥
रुक्ष झाले वृक्ष सारे
सावलीपण महाग ती
यत्र तत्र वणवा पेटला
स्वस्त झाली आग ती ॥
कोपला तो, झोपला तो
भक्ती कमी जी जाहली
मोह मायेत प्राण सारे
म्हणुनी झाली काहिली ॥
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो?
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.
वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.
3