माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!
नमस्कार. आपण सर्व कसे आहात? नुकताच कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्याबद्दलचे माझे विचार शेअर करतो. कदाचित आपल्याला काही मुद्दे पटतील आणि काही पटणार नाहीत. पण वेगवेगळे अँगल्स, विचार आणि दृष्टिकोन कमीत कमी विचारात तर घ्यायचे असतात ना. म्हणून हे शेअर करावसं वाटलं.
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय
सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.
ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.
{ॲन इमॅजिनरी व्हॉट्सअप चॅट लीक्ड :-) }
अंधारात त्याच्या व्हॉट्सअप स्क्रीनवर नवीन मेसेजचं एक ग्रीन वर्तुळ चमकलं..
"'तूच आहेस का रे तिथे खाली?"'
तिचा मेसेज पाहून तो थोडा वेळ तसाच शांत बसून राहिला. मग रिप्लाय दिला, होय.!
"'अरे देवा..! कधीपासून बसलायस तिथे? मी आत्ता पाहिलं वर येताना..! तू जा बरं तिथून..'''
आजची तिसरी रात्र..! तू उत्तर दिलं नाहीयेस अजून.!
"'अरे पण हे असं रस्त्यावर नको बसत जाऊस अरे रात्र रात्रभर..! मला त्रास होतो उगाच..!"'
"आरे पत्त्या कुठाय तुजा.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?"
हॅलोs ? कोण ?
"बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?"
नाय रे.. आवाज नाय ओळखला मी.
"आरे पवन बोलतोय पवन.!"
पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख लागली नाय रे आजून.
"पवन जाधव बोलतो. पळशीवरनं."
आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..?
"काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? "
हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत.
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१
प्रसंग एक.
रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा.
सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात.
'' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?''
पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..''
''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..''
''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे. त्यांची फी हॉस्टेल धरून आहे..''
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?
मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या
पण सरकारी लोक काय करत असतील ?
पगार तर चालूच असणार
सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ?
पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी
शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ?