माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो.
विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं.
भल्या सकाळी, जवळपास निर्मनुष्य अशा समुद्रकिनाऱ्यावर, ओलेत्या वाळुवर हळुवार पावलं उमटवताना, रात्रीच्या उधाण लाटांनी पुळणीवर दूरपर्यंत रेखाटलेल्या धुकट काळ्या - पांढऱ्या छटांच्या नागमोडी रांगोळीच्या पार्श्वभुमीवर ऐकू येणारी सिंधुसागराची धीरगंभीर गाज मनावर गारुड करते. इटूकल्या नखाएवढ्या खेकड्यांच्या पिटुकल्या बिळांबाहेरची कलाकुसर व त्यांच्या तिरक्या चालीने भोवताली आपसुकचं रेखाटली गेलेली नक्षी पाहताना नजर एका ठिकाणी मुळी ठरतचं नाही. रात्री लाटांबरोबर वाहुन आलेल्या ओंडक्यावर वसलेली नानाविध, अनोळखी व विचित्र शंखवर्गीय समुद्रजीवांची जिवंत वसाहत निरखून पाहताना तर डोळेचं विस्फारले जातात.
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
खूप म्हणजे खूपच पूर्वी, लहानपणी शाळेला जाताना मला बसचा कंडक्टर म्हणायचा,"ए पोरी, लवकर चढ. तुझं दप्तर पडतंय बघ." नंतर काही वर्षांनी कंडक्टर मला "ताई" म्हणायचा. मग मावशी, काकू म्हणायला लागला. या संबोधनातल्या चढत्या श्रेणीवरुन माझ्या वाढत्या वयाची श्रेणी तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल. त्यानंतर आता तर मी म्हातारी किंवा चांगल्या शब्दांत वृद्धा, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. येत्या काही वर्षांत मी अतिज्येष्ठ नागरिक होईन. लेखाच्या शीर्षकातला "सायंकाळ" म्हणजे काय ते आता स्पष्ट झालं असेल.
पुस्तक_परिचय: वावटळ
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला.
______________________________________________
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.
फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे.
ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते.
इकडचं-तिकडचं
भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV
वर एक बातमी येऊन थडकली आहे.
डेन्मार्क या छोट्या देशातील शेतकर्यानी गाईंच्या ढेकरातून होणार्या मिथेन वायूच्या प्रदूषणासाठी कर देणे मान्य केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=_s0dBrXJXuo
भारतामध्ये ही कल्पना रूजेल का?
आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर पर".