मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

-> ए० जी० आय०ची चाहूल?

युयुत्सु ·

कानडाऊ योगेशु Mon, 12/15/2025 - 19:05
रोचक म्हणण्यापेक्षा हे सर्व भयावह होईल असे वाटते आहे. एवीतेवी सर्व कामे यंत्राद्वारेच केली जात होती आतापर्यंत, एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? (मुन्नाभाई/सर्किट च्या भाषेत अगर हम हल चलायेंगे तर बैल क्या करेगा?) उत्तरोत्तर मनुष्य आपली विचार करण्याचीच शक्ती गमावुन बसेल असे वाटते.

युयुत्सु Tue, 12/16/2025 - 09:08
मला वाटते ए०जी०आय० इतकी गंभीर समस्या बनेल असे वाटत नाही. एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? आज मनुष्य जे करू शकत नाही किंवा मानवी प्रतिष्ठेला जिथे धक्का पोचतो अशा ठिकाणी यंत्रमानव निश्चितपणे उपयोगी आहे. तसेच मानवी बुद्धीमत्तेच्या आवाक्यात न येणार्‍या क्षेत्रांमध्ये ए०जी०आय० ची मोठी मदत होईल.

कानडाऊ योगेशु Mon, 12/15/2025 - 19:05
रोचक म्हणण्यापेक्षा हे सर्व भयावह होईल असे वाटते आहे. एवीतेवी सर्व कामे यंत्राद्वारेच केली जात होती आतापर्यंत, एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? (मुन्नाभाई/सर्किट च्या भाषेत अगर हम हल चलायेंगे तर बैल क्या करेगा?) उत्तरोत्तर मनुष्य आपली विचार करण्याचीच शक्ती गमावुन बसेल असे वाटते.

युयुत्सु Tue, 12/16/2025 - 09:08
मला वाटते ए०जी०आय० इतकी गंभीर समस्या बनेल असे वाटत नाही. एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? आज मनुष्य जे करू शकत नाही किंवा मानवी प्रतिष्ठेला जिथे धक्का पोचतो अशा ठिकाणी यंत्रमानव निश्चितपणे उपयोगी आहे. तसेच मानवी बुद्धीमत्तेच्या आवाक्यात न येणार्‍या क्षेत्रांमध्ये ए०जी०आय० ची मोठी मदत होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ए० जी० आय०ची चाहूल? -राजीव उपाध्ये ए०आय० जगतावर आत्ताच एक मोठी बातमी येऊन आदळली आहे. टोकीयो मधील ’इंटिग्रल ए०आय०’ नावाच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की त्यांनी पहिले सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप असे एक नवे मॉडेल बनवले आहे. यातला गमतीचा भाग म्हणजे ’सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप’ ही शब्दरचना! अत्यंत सावध पणे केलेला हा दावा ए०जी०आय० अवतरल्याचेच संकेत देतो. एखादी तंत्रप्रणाली जर मानवापेक्षा वरचढ किंवा खांद्याला खांदा लावून कार्य करू शकत असेल तर ते जाहिर करण्यासाठी आढेवेढे कशाला घ्यायचे?

४३ दिवस हिमालयात अडकलेला माणूस!

मार्गी ·

आलो आलो गुरुवार, 09/11/2025 - 00:06
पुस्तक वाचण्याची अनिवार इच्छा निर्माण करण्याचे कसब आहे आपणास . बाकी जेम्स भाऊचे करावे तेवढे कौतुक थोडेच. बहीणाबायच प्रेम अलौकिक. उत्तम पुस्तक सुचविल्याबद्दल आभार.

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/11/2025 - 06:12
मरण पावल्याची बातमी एकामागोमाग एक मिळाली. दोन आपले निहीत अयुष्य जगून निजधामास गेले तर एक अर्ध्यावरच भातुकली चा डाव मोडून गेला. दिवस वाईट गेला .रात्रभर झोपमोड होत होती. तरीही पाच वाजता जाग आलीच. कारण शिस्त. सवय. उठल्यावर रात्रभर आलेले कायप्पावरील संदेश बघणे व पाठवणे झाले व मिपावर आपला लेख वाचला.खालील वाक्य नवीन उभारी देऊन गेलं. जिद्द, साहस, शिस्त आणि कठोर दृढनिश्चय असेल आणि सोबत जीवाभावाचे प्रिय जन असतील तर माणूस किती हिमालयात नोकरी केल्याने असे अनुभव पण एव्हढे भयंकर नाही व आठवणी आहेत. एक कर्नाटक मधला सैनिक क्रेव्हास मधे अडकला होता. अथक प्रयत्नांनंतर भारतीय सैनिकांनी त्याला बाहेर काढला . पुढे काही दिसत तो दिल्लीच्या हाॅस्पिटल मधे होता. शेवटी जंग हारला. Crevasse-They are often partially or fully concealed by a snow bridge, making them difficult to spot on the surface. Hypothermia was the most difficult condition in such situations चांगले परिक्षण. नक्कीच वाचेन.

मार्गी गुरुवार, 09/18/2025 - 11:03
सर्वांना धन्यवाद! @ कर्नलतपस्वी जी! ओह ह. आता आपण ठीक असाल अशी आशा करतो. प्रणाम.

राघव Tue, 09/23/2025 - 01:33
पुस्तक यादीत जोडले गेले आहे. नक्की वाचेन. खूप धन्यवाद!

आलो आलो गुरुवार, 09/11/2025 - 00:06
पुस्तक वाचण्याची अनिवार इच्छा निर्माण करण्याचे कसब आहे आपणास . बाकी जेम्स भाऊचे करावे तेवढे कौतुक थोडेच. बहीणाबायच प्रेम अलौकिक. उत्तम पुस्तक सुचविल्याबद्दल आभार.

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/11/2025 - 06:12
मरण पावल्याची बातमी एकामागोमाग एक मिळाली. दोन आपले निहीत अयुष्य जगून निजधामास गेले तर एक अर्ध्यावरच भातुकली चा डाव मोडून गेला. दिवस वाईट गेला .रात्रभर झोपमोड होत होती. तरीही पाच वाजता जाग आलीच. कारण शिस्त. सवय. उठल्यावर रात्रभर आलेले कायप्पावरील संदेश बघणे व पाठवणे झाले व मिपावर आपला लेख वाचला.खालील वाक्य नवीन उभारी देऊन गेलं. जिद्द, साहस, शिस्त आणि कठोर दृढनिश्चय असेल आणि सोबत जीवाभावाचे प्रिय जन असतील तर माणूस किती हिमालयात नोकरी केल्याने असे अनुभव पण एव्हढे भयंकर नाही व आठवणी आहेत. एक कर्नाटक मधला सैनिक क्रेव्हास मधे अडकला होता. अथक प्रयत्नांनंतर भारतीय सैनिकांनी त्याला बाहेर काढला . पुढे काही दिसत तो दिल्लीच्या हाॅस्पिटल मधे होता. शेवटी जंग हारला. Crevasse-They are often partially or fully concealed by a snow bridge, making them difficult to spot on the surface. Hypothermia was the most difficult condition in such situations चांगले परिक्षण. नक्कीच वाचेन.

मार्गी गुरुवार, 09/18/2025 - 11:03
सर्वांना धन्यवाद! @ कर्नलतपस्वी जी! ओह ह. आता आपण ठीक असाल अशी आशा करतो. प्रणाम.

राघव Tue, 09/23/2025 - 01:33
पुस्तक यादीत जोडले गेले आहे. नक्की वाचेन. खूप धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट - "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही - बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा - कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी - सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ! - छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ - ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा - ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट - "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!" - सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम नमस्कार!

चांगल्या बातम्या - १

राघव ·

राघव Sat, 08/16/2025 - 00:31
रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना
यास,
हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.
असे वाचावे.

राघव Sat, 08/16/2025 - 00:54
गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

राघव Mon, 08/18/2025 - 23:58
भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय. इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं. अधिक माहिती: लिंक या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

राघव गुरुवार, 10/09/2025 - 23:29
भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो: अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली. कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे. उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे. अधिक माहिती: लिंक

राघव Tue, 08/19/2025 - 20:56
या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:44
हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. वाह्ह्ह्ह्ह. मस्तच. ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 10:52
वाह... बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

राघव गुरुवार, 08/21/2025 - 02:56
ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे. एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे. ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW). बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते. अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच. अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

राघव Fri, 08/22/2025 - 03:41
कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय. फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय. कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो. यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते. अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!! अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव गुरुवार, 08/28/2025 - 04:05
मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत. कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते. रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते. या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/28/2025 - 11:20
यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल. हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत. धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल अवांतर: कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

राघव Sat, 09/06/2025 - 23:06
पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत! युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे. प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील. सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे. अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:47
ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे. तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:49
लेखाचा मुख्य मुद्दा : कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव Tue, 09/23/2025 - 01:19
कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे. फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत. “अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.” अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

निनाद Tue, 09/23/2025 - 07:44
चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

In reply to by निनाद

राघव Wed, 09/24/2025 - 20:04
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

राघव Wed, 09/24/2025 - 20:05
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 14:04
भारीच. आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत. बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी. नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

In reply to by अभ्या..

राघव Wed, 09/24/2025 - 20:19
मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं... होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

टर्मीनेटर Mon, 10/13/2025 - 15:54
सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."
ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या: जय हिंद! जय महाराष्ट्र!

राघव Wed, 10/15/2025 - 16:51
भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत! गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात. नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे! मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Tue, 11/25/2025 - 03:06
दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं. दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत. "माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे. यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही. MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

स्वधर्म Tue, 11/25/2025 - 17:39
राघव, चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे. वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे. एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले. पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही. अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.

In reply to by स्वधर्म

राघव Wed, 11/26/2025 - 00:23
स्वधर्म, तुम्ही म्हणताय ते खरंय. मीही तेच वर लिहिलेले आहे. प्रश्न दोन आहेत. आणि एकाचं उत्तर मिळतंय. पहिल्या प्रश्नाचं आणि जास्त महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कधी, कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार ते माहित नाही. तोवर जे करणं शक्य आहे ते करावं या सकारात्मक भावनेतून असे उपाय निघत असतात. उदा: लोकशाहीची ताकद खूप मोठी. लोकांची ताकद हीच खरी ताकद. हेही असंच खरंय. पण ही ताकद जागृत होऊन तिचा परिणाम व्हायला ४०-५० वर्ष लागत असतील, तर तोवरच्या पिढ्यांना तरी त्रास भोगावाच लागतो आणि आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात उपाय करावेच लागतात. तद्वतच हा प्रदूषणाचा मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील.

In reply to by राघव

स्वधर्म Wed, 11/26/2025 - 16:16
>> मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील. या पवित्र्याने (अ‍ॅप्रोच) आपले अधिक नुकसान होते की काय असे मला वाटते. उदा. अनेक वर्षांपासून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत आहेत. ग्रामीण भागातले सत्तरीतले वयस्कर लोक सांगतात की त्यांच्या लहानपणी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना वाटेत लागलेल्या कोणत्याही नदी नाल्याचे पाणी ते पीत असत. रोगराईची भीती नव्हती. आता वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाणी आले. लगेच रेल्वेने नियम बदलला की काय माहिती नाही पण अनेक स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जागोजागी नळ असायचे ते हळू हळू नाहीसे जरी झाले नाहीत तरी कमी झाले. कारण बाटली बंद पाणी मिळते. (तो एक भला मोठा उद्योग आहे आणि भयानक प्रदूषणकारी आहे). आता रेल्वे प्लॅटफार्म वर जागोजागी स्वच्छ पाण्याची सोय करणे हे रेल्वेच्या प्राधान्यक्रमात आहे का? गावोगावच्या नद्या नाले विहिरी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी शासन प्राधान्य देईल का? कारण फिल्टर आहेत, विकत पाणी मिळते. लांब कशाला आमच्या शेताच्या बाजूला शंभर मीटरवर ४-५ विहिरी आहेत. सगळ्यांना आठ माही पाणी आहे पण ते संपूर्णपणे प्रदूषित आहे. कारण प्रत्येकाने वर्षानुवर्षे आपल्या शेतात घातलेली रासायनिक खते व किटकनाशके. प्रत्येक कुटुंब दर चार दिवसाआड प्यायला ३० लिटर चा कॅन घेते. आता त्यांच्या मनात प्रदूषण कमी करावे असा विचारच येत नाही व काहींच्या आला तरी तो प्रॅक्टीकल नाही, आपल्याला भरपूर खते घालूनच शेती करता येते व प्यायच्या पाण्यासाठी कॅनला पैसे खर्च करायचेच आहेत हे अंगवळणी पडून गेले आहे. म्हणून मला पटते की उपाय हा मूळ कारण नष्ट करणारा असावा नाहीतर तो प्रदूषण वाढवणाराच असतो. हे मास्क कसे रिसायकल करायचे? फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी कसे आपले नदी नाले तुंबले आहेत ते तुंम्हाला माहिती असेलच. पण त्यावर महापालिकेचे वाढवीत नेलेले नाले सफाईचे बजेट हा 'सकारात्मक' उपाय आहेच.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Wed, 11/26/2025 - 01:36
अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.> याबद्दल आपले राज्यकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था खरोखरच कितपत गंभीर आहेत याबद्दल शंकाच वाटते. प्रत्यक्ष कृतीऐवजी नुसता कांगावा आणि देखावा आणि जगाला तोंडभरून उपदेश करण्यात आपल्या लोकांना जगात तोड नाही.

राघव Fri, 11/28/2025 - 17:44
बिहारमधील प्रिन्स शुक्ला यांनी कोविडमधे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केलेला अग्रिक्ल्चरल स्टार्टअप "अ‍ॅग्रेट" आज वार्षिक १० कोटी उत्पन्न असणारा लघु उद्योग बनला आहे. उत्तम दर्जाची बियाणं, ठिबक सिंचन प्रणाली, आणि पर्यावरणपूरक खतं ही त्यांची उत्पादनं आहेत. पण यासोबतच त्यांनी गावातल्या लोकांना नवीन प्रणाली कशी अन् कशासाठी वापरायची हे शिकवणं सुरु केलं. मागच्या काही वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. ITC, Godrej आणि Parle यासारख्या कंपन्यांशी करार केलेत. आता ते ओडीशात मखाणाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं एक वाक्य खूप छान आहे: "Agriculture is not outdated, it’s under-innovated" अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Sat, 08/16/2025 - 00:31
रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना
यास,
हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.
असे वाचावे.

राघव Sat, 08/16/2025 - 00:54
गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

राघव Mon, 08/18/2025 - 23:58
भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय. इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं. अधिक माहिती: लिंक या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

राघव गुरुवार, 10/09/2025 - 23:29
भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो: अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली. कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे. उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे. अधिक माहिती: लिंक

राघव Tue, 08/19/2025 - 20:56
या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:44
हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. वाह्ह्ह्ह्ह. मस्तच. ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 10:52
वाह... बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

राघव गुरुवार, 08/21/2025 - 02:56
ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे. एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे. ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW). बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते. अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच. अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

राघव Fri, 08/22/2025 - 03:41
कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय. फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय. कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो. यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते. अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!! अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव गुरुवार, 08/28/2025 - 04:05
मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत. कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते. रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते. या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/28/2025 - 11:20
यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल. हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत. धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल अवांतर: कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

राघव Sat, 09/06/2025 - 23:06
पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत! युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे. प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील. सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे. अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:47
ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे. तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:49
लेखाचा मुख्य मुद्दा : कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव Tue, 09/23/2025 - 01:19
कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे. फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत. “अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.” अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

निनाद Tue, 09/23/2025 - 07:44
चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

In reply to by निनाद

राघव Wed, 09/24/2025 - 20:04
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

राघव Wed, 09/24/2025 - 20:05
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 14:04
भारीच. आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत. बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी. नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

In reply to by अभ्या..

राघव Wed, 09/24/2025 - 20:19
मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं... होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

टर्मीनेटर Mon, 10/13/2025 - 15:54
सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."
ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या: जय हिंद! जय महाराष्ट्र!

राघव Wed, 10/15/2025 - 16:51
भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत! गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात. नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे! मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Tue, 11/25/2025 - 03:06
दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं. दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत. "माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे. यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही. MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

स्वधर्म Tue, 11/25/2025 - 17:39
राघव, चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे. वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे. एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले. पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही. अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.

In reply to by स्वधर्म

राघव Wed, 11/26/2025 - 00:23
स्वधर्म, तुम्ही म्हणताय ते खरंय. मीही तेच वर लिहिलेले आहे. प्रश्न दोन आहेत. आणि एकाचं उत्तर मिळतंय. पहिल्या प्रश्नाचं आणि जास्त महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कधी, कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार ते माहित नाही. तोवर जे करणं शक्य आहे ते करावं या सकारात्मक भावनेतून असे उपाय निघत असतात. उदा: लोकशाहीची ताकद खूप मोठी. लोकांची ताकद हीच खरी ताकद. हेही असंच खरंय. पण ही ताकद जागृत होऊन तिचा परिणाम व्हायला ४०-५० वर्ष लागत असतील, तर तोवरच्या पिढ्यांना तरी त्रास भोगावाच लागतो आणि आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात उपाय करावेच लागतात. तद्वतच हा प्रदूषणाचा मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील.

In reply to by राघव

स्वधर्म Wed, 11/26/2025 - 16:16
>> मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील. या पवित्र्याने (अ‍ॅप्रोच) आपले अधिक नुकसान होते की काय असे मला वाटते. उदा. अनेक वर्षांपासून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत आहेत. ग्रामीण भागातले सत्तरीतले वयस्कर लोक सांगतात की त्यांच्या लहानपणी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना वाटेत लागलेल्या कोणत्याही नदी नाल्याचे पाणी ते पीत असत. रोगराईची भीती नव्हती. आता वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाणी आले. लगेच रेल्वेने नियम बदलला की काय माहिती नाही पण अनेक स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जागोजागी नळ असायचे ते हळू हळू नाहीसे जरी झाले नाहीत तरी कमी झाले. कारण बाटली बंद पाणी मिळते. (तो एक भला मोठा उद्योग आहे आणि भयानक प्रदूषणकारी आहे). आता रेल्वे प्लॅटफार्म वर जागोजागी स्वच्छ पाण्याची सोय करणे हे रेल्वेच्या प्राधान्यक्रमात आहे का? गावोगावच्या नद्या नाले विहिरी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी शासन प्राधान्य देईल का? कारण फिल्टर आहेत, विकत पाणी मिळते. लांब कशाला आमच्या शेताच्या बाजूला शंभर मीटरवर ४-५ विहिरी आहेत. सगळ्यांना आठ माही पाणी आहे पण ते संपूर्णपणे प्रदूषित आहे. कारण प्रत्येकाने वर्षानुवर्षे आपल्या शेतात घातलेली रासायनिक खते व किटकनाशके. प्रत्येक कुटुंब दर चार दिवसाआड प्यायला ३० लिटर चा कॅन घेते. आता त्यांच्या मनात प्रदूषण कमी करावे असा विचारच येत नाही व काहींच्या आला तरी तो प्रॅक्टीकल नाही, आपल्याला भरपूर खते घालूनच शेती करता येते व प्यायच्या पाण्यासाठी कॅनला पैसे खर्च करायचेच आहेत हे अंगवळणी पडून गेले आहे. म्हणून मला पटते की उपाय हा मूळ कारण नष्ट करणारा असावा नाहीतर तो प्रदूषण वाढवणाराच असतो. हे मास्क कसे रिसायकल करायचे? फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी कसे आपले नदी नाले तुंबले आहेत ते तुंम्हाला माहिती असेलच. पण त्यावर महापालिकेचे वाढवीत नेलेले नाले सफाईचे बजेट हा 'सकारात्मक' उपाय आहेच.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Wed, 11/26/2025 - 01:36
अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.> याबद्दल आपले राज्यकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था खरोखरच कितपत गंभीर आहेत याबद्दल शंकाच वाटते. प्रत्यक्ष कृतीऐवजी नुसता कांगावा आणि देखावा आणि जगाला तोंडभरून उपदेश करण्यात आपल्या लोकांना जगात तोड नाही.

राघव Fri, 11/28/2025 - 17:44
बिहारमधील प्रिन्स शुक्ला यांनी कोविडमधे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केलेला अग्रिक्ल्चरल स्टार्टअप "अ‍ॅग्रेट" आज वार्षिक १० कोटी उत्पन्न असणारा लघु उद्योग बनला आहे. उत्तम दर्जाची बियाणं, ठिबक सिंचन प्रणाली, आणि पर्यावरणपूरक खतं ही त्यांची उत्पादनं आहेत. पण यासोबतच त्यांनी गावातल्या लोकांना नवीन प्रणाली कशी अन् कशासाठी वापरायची हे शिकवणं सुरु केलं. मागच्या काही वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. ITC, Godrej आणि Parle यासारख्या कंपन्यांशी करार केलेत. आता ते ओडीशात मखाणाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं एक वाक्य खूप छान आहे: "Agriculture is not outdated, it’s under-innovated" अधिक माहिती: लिंक १, लिंक २
लेखनप्रकार
नमस्कार! येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे. आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा. Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय.

बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास

मार्गी ·

मार्गी Sat, 08/23/2025 - 12:36
बंगलोरला जाऊन व्हायरल फीवरचा त्रास झाला. तब्येत बिघडली. त्यामुळे हा सायकल प्रवास करता आला नाही. मैदानात उतरायच्या आधीच इंज्युरी असं झालं. पॅक करून नेलेली सायकल तशीच आणावी लागली. एक पेडलही सायकलिंगचा आनंद घेता आला नाही! हा प्रवास जानेवारीमध्ये करेन. धन्यवाद.

In reply to by मार्गी

गणेशा Mon, 08/25/2025 - 20:12
अरे रे... नक्कीच दुप्पट उत्साहाने तुम्ही जानेवारी मध्ये हा आनंद घेताल.. कदाचित या पावसाच्या वातावरणा पेक्षा तेंव्हाच्या थंडीत तुम्हाला आणखीन छान वाटेल.. अनेक शुभेच्छा!

मार्गी Wed, 02/04/2026 - 16:33
नमस्कार. हा सायकल प्रवास १२ जानेवारीला बंगळूरवरून सुरू केला आणि योजनेप्रमाणे ३१ जानेवारीला चेन्नैला थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये पूर्ण झाला! ह्या वेळी काहीच अडचण आली नाही. पूर्ण झाल्यावर तर विश्वास बसत नव्हता! Yoga for fitness साठीचा 20 दिवसांचा बंगळुर- उटी- ईशा आदि योगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- तंजावर- पाँडेचेरी- चेन्नै असा हा 1861 किमीचा सायकल होता. प्रत्येक दिवशीचे अनुभव, भेट दिलेल्या १० योग संस्था व इतर संस्था, योग साधकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद ह्याबद्दल सविस्तर लिहीणारच आहे. सायकल प्रवास पूर्ण झाल्यावर लगेचच चेन्नैमध्ये माझी बहीण- अदिती वेलणकर शास्त्री हिने मला प्रश्न विचारले व सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये ह्या सायकल प्रवासाचं सगळं डिकोडिंग आहे. हा सायकल प्रवास का केला, काय उद्दिष्ट होतं, काय अडचणी होत्या, तयारी कशी केली, भाषेची अडचण, कठिण प्रसंग इ. मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. सायकल प्रवास कसा झाला ह्याची उत्सुकता असेल तर नक्की ही चर्चा बघू शकता किंवा ऐकू शकता! ह्या विषयाची आवड असलेल्यांसोबत शेअरही करू शकता. धन्यवाद. युट्युबवर इथे बघता येईल. स्पॉटिफायवर इथे ऐकता येईल. आणि काही निवडक फोटोज व प्रवासामधले अपडेटस इथे बघता येतील. धन्यवाद! -निरंजन वेलणकर 09422108376

कंजूस Wed, 02/04/2026 - 18:39
अभिनंदन . पण त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश मिळाला कारण बहिण सभासद असेल. आम्ही सप्टेंबरमध्ये (२०२५) गेलो तर तशी पाटीच होती. करोना सुरू झाल्यापासून प्रवेश बंदी आहे सामान्य पर्यटकांना. यूट्यूबवरचे विडिओ सवडीने बघेनच. सायकलवर सगळे सामान घेऊन अठराशे किमी प्रवास करणे अवघडच आहे.

मार्गी गुरुवार, 02/12/2026 - 17:01
नमस्कार. निरामय योग प्रसार संशोधन संस्थेच्या पुणे सदस्यांसोबत अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. तो इथे ऐकता येईल. त्यामध्ये प्रवासासंदर्भात मुख्य बाबींवर चर्चा करता आली. निरामय संस्थेसाठी त्याचं फलित काय होतं, संस्थांचे अनुभव कसे होते अशी सविस्तर प्रश्नोत्तरं त्यात होती. लवकरच प्रवासाचे अनुभव लिहायला सुरूवात करणार आहे. धन्यवाद. @कंजूस जी, नाही तसं नाही. निरामय संस्थेतर्फे आधी सर्व योग संस्थांना संपर्क केला होता. आणि फॉलो अप घेतला होता. त्यामुळे थिऑसॉफिकल ला भेट देता आली. पण अन्यथा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथे सहज असं जाता येत नसावं. धन्यवाद.

मार्गी Sat, 08/23/2025 - 12:36
बंगलोरला जाऊन व्हायरल फीवरचा त्रास झाला. तब्येत बिघडली. त्यामुळे हा सायकल प्रवास करता आला नाही. मैदानात उतरायच्या आधीच इंज्युरी असं झालं. पॅक करून नेलेली सायकल तशीच आणावी लागली. एक पेडलही सायकलिंगचा आनंद घेता आला नाही! हा प्रवास जानेवारीमध्ये करेन. धन्यवाद.

In reply to by मार्गी

गणेशा Mon, 08/25/2025 - 20:12
अरे रे... नक्कीच दुप्पट उत्साहाने तुम्ही जानेवारी मध्ये हा आनंद घेताल.. कदाचित या पावसाच्या वातावरणा पेक्षा तेंव्हाच्या थंडीत तुम्हाला आणखीन छान वाटेल.. अनेक शुभेच्छा!

मार्गी Wed, 02/04/2026 - 16:33
नमस्कार. हा सायकल प्रवास १२ जानेवारीला बंगळूरवरून सुरू केला आणि योजनेप्रमाणे ३१ जानेवारीला चेन्नैला थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये पूर्ण झाला! ह्या वेळी काहीच अडचण आली नाही. पूर्ण झाल्यावर तर विश्वास बसत नव्हता! Yoga for fitness साठीचा 20 दिवसांचा बंगळुर- उटी- ईशा आदि योगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- तंजावर- पाँडेचेरी- चेन्नै असा हा 1861 किमीचा सायकल होता. प्रत्येक दिवशीचे अनुभव, भेट दिलेल्या १० योग संस्था व इतर संस्था, योग साधकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद ह्याबद्दल सविस्तर लिहीणारच आहे. सायकल प्रवास पूर्ण झाल्यावर लगेचच चेन्नैमध्ये माझी बहीण- अदिती वेलणकर शास्त्री हिने मला प्रश्न विचारले व सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये ह्या सायकल प्रवासाचं सगळं डिकोडिंग आहे. हा सायकल प्रवास का केला, काय उद्दिष्ट होतं, काय अडचणी होत्या, तयारी कशी केली, भाषेची अडचण, कठिण प्रसंग इ. मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. सायकल प्रवास कसा झाला ह्याची उत्सुकता असेल तर नक्की ही चर्चा बघू शकता किंवा ऐकू शकता! ह्या विषयाची आवड असलेल्यांसोबत शेअरही करू शकता. धन्यवाद. युट्युबवर इथे बघता येईल. स्पॉटिफायवर इथे ऐकता येईल. आणि काही निवडक फोटोज व प्रवासामधले अपडेटस इथे बघता येतील. धन्यवाद! -निरंजन वेलणकर 09422108376

कंजूस Wed, 02/04/2026 - 18:39
अभिनंदन . पण त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश मिळाला कारण बहिण सभासद असेल. आम्ही सप्टेंबरमध्ये (२०२५) गेलो तर तशी पाटीच होती. करोना सुरू झाल्यापासून प्रवेश बंदी आहे सामान्य पर्यटकांना. यूट्यूबवरचे विडिओ सवडीने बघेनच. सायकलवर सगळे सामान घेऊन अठराशे किमी प्रवास करणे अवघडच आहे.

मार्गी गुरुवार, 02/12/2026 - 17:01
नमस्कार. निरामय योग प्रसार संशोधन संस्थेच्या पुणे सदस्यांसोबत अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. तो इथे ऐकता येईल. त्यामध्ये प्रवासासंदर्भात मुख्य बाबींवर चर्चा करता आली. निरामय संस्थेसाठी त्याचं फलित काय होतं, संस्थांचे अनुभव कसे होते अशी सविस्तर प्रश्नोत्तरं त्यात होती. लवकरच प्रवासाचे अनुभव लिहायला सुरूवात करणार आहे. धन्यवाद. @कंजूस जी, नाही तसं नाही. निरामय संस्थेतर्फे आधी सर्व योग संस्थांना संपर्क केला होता. आणि फॉलो अप घेतला होता. त्यामुळे थिऑसॉफिकल ला भेट देता आली. पण अन्यथा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथे सहज असं जाता येत नसावं. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं‌ वाटत होतं. २०१८ मध्ये परभणीच्याच निरामयतर्फे मराठवाड्यामध्ये ५०० किमीचा एक सायकल प्रवास केला होताच. त्यावेळी त्यामुळे झालेल्या भेटी, संवाद आणि एकूण परिणाम माहिती‌ होता. संस्थेनेही ह्यामध्ये रस घेतला आणि अशी ही मोहीम ठरली.

फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी ·

कर्नलतपस्वी Sat, 07/19/2025 - 17:10
भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.

कर्नलतपस्वी Sat, 07/19/2025 - 17:10
भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.
लेखनप्रकार
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!

किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’

युयुत्सु ·

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Sat, 07/12/2025 - 19:14
मेंदू सडणे ही मेंदू गंजण्यापेक्षा जास्त गंभीर समस्या आहे. गंज प्रयत्न करून काढता येतो. 'सडणे' थांबवणे भयंकर अवघड असते.

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Sat, 07/12/2025 - 22:34
युयुत्सु, मेंदूची गंजसफाई करण्यासाठी विविध कोडी वगैरे उपलब्ध आहेत. मेंदूचे सडणे थांबवायला काही उपाय आहेत का? माझ्या मते सडण्याआधी मेंदूवर गंज चढंत असावा. तर गंजण्याच्या प्रक्रियेतनं सडण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली याबद्दल काही मर्यादादर्शके उपलब्ध आहेत का ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Sun, 07/13/2025 - 06:45
श्री० गा०पै० सडणे जन्मजात असेल तर उपाय जवळजवळ शून्य. पण नंतर चालू झाले असेल तर आपल्या आयुष्यात नेमका कशाचा अतिरेक आणि कशाचा अभाव हे ओळखणे, ते मनोमन स्वीकारणे आणि मग प्रयत्नपूर्वक तो अतिरेक/अभाव कमी करणे हा सडणे थांबवण्याचा प्रभावी उपाय ठरतो. पण एकट्याने केलेले प्रयत्न त्यासाठी पुरे पडत नाहीत. त्यात आजुबाजूच्या लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो - तुम्ही पार्टीत पिणार नसाल आणि तुमच्या निर्णयाचा आदर होणार नसेल तर काहीही उपयोग नसतो. आता एक उदा० देतो. हे कदाचित अतिरेकी विधान वाटेल. पण भारतात साखरेचा वापर (आणि साखरे नंतर मैदा) जर निम्म्यावर आणता आला तर भारतीयांचे आरोग्य वेगाने सुधारेल. ज्यात त्यात , विशेषतः बटाटेवड्यात साखर घालणे हा पुणेकरांच्या मेंदू सडण्याचा महत्त्वाचा मर्यादादर्शक आहे. हा हा हा हा!

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Sun, 07/13/2025 - 14:57
गंजणे आणि सडणे गंजणे - एखादी वस्तू किंवा क्षमता न वापरल्या मुळे वाया जाणे सडणे - एखादी वस्तू किंवा क्षमता चुकीचा वापर, आघात इ अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात अकार्यक्षम होणे गरज पडल्यास या व्याख्या आणखी घासून-पुसून चकचकीत करता येतील...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Mon, 07/14/2025 - 01:31
युयुत्सु, या व्याख्या मेंदूच्या संदर्भात हव्या होत्या. माझ्या मते गंजणे हा बुद्धीशी संबंधित आहे, तर सडणे हा प्रकार मेंदूच्या उतीशी संबंधित आहे. मेंदू सडलेला इसम तरीही बुद्धिवान असू शकतो. याउलट मेंदू न सडटा उत्तम असला तरी न वापरल्यामुळे बुद्धीवर गंज चढलेला असू शकतो. आता या दोन्ही गोष्टी जनुकांद्वारे पुढील पिढीत संक्रमित कशा होतात यावर प्रकाश टाकावा अशी विनंती आहे. यासंबंधी काही विदा/लेखन उपलब्ध आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 07:46
The Epigenetics Revolution: How Modern Biology Is Rewriting Our Understanding of Genetics, Disease, and Inheritance by Nessa Carey An introductory overview of epigenetics, explaining how gene expression changes can be inherited and affect health, without altering DNA. Highly recommended for lay readers.reddit.com+6 more Epigenetics: How Environment Shapes Our Genes by Richard C. Francis Discusses how external factors like diet and stress lead to epigenetic changes that can be passed to offspring, with real-world examples from animals and humans.amazon.comjournals.uchicago.edu Inheritance: How Our Genes Change Our Lives—and Our Lives Change Our Genes by Sharon Moalem Blends genetics and epigenetics, showing how lifestyle influences gene expression and inheritance, with insights into diseases and personal health.goodreads.comamazon.com **Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life by Eva J. Jablonka and Marion J. Lamb Argues for an expanded view of evolution, incorporating epigenetic and other non-genetic systems of inheritance. A bit academic but influential.direct.mit.edu Epigenetic Inheritance and Evolution: The Lamarckian Dimension by Eva Jablonka and Marion J. Lamb Explores how epigenetic mechanisms revive ideas of acquired trait inheritance, challenging neo-Darwinism.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 08:22
बाय द वे : हे पश्चिमेकडून आलेले, जगातल्या मातब्बर विद्यापीठे आणि त्यांच्या प्रयोगशाळानी निर्माण केलेले ज्ञान आहे. त्याची अ‍ॅलर्जी असल्यास काहीही उपयोग होणार नाही... उदा० काही मठ्ठ लोक उत्क्रांती फक्त नैसर्गिक निवडीतून घडते असा दावा करतात. पण आता हे मत विज्ञानाने टाकून दिले आहे. Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life हे पुस्तक त्यासाठी महत्त्वाचे आहे.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 09:15
वर मी साखरे बद्दल काही अतिरेकी वाटतील विधाने केली होती. मागे कधी तरी इन्शुलीन पातळी वाढली की टेस्टेस्टेररॉन ची पातळी कमी होते असे वाचले होते.पण आत्ताच हे ताजे संशोधन माझ्या कालरेषेवर (टाईमलाईनवर) टपकले. रक्तातली साखर थोडी जरी वाढली तरी पुरूषांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो. https://neurosciencenews.com/blood-sugar-sexual-decline-neuroscience-29450/?fbclid=IwY2xjawLhWkBleHRuA2FlbQIxMQBicmlkETFNMzNvOTJNYW5ER2liZG5sAR4PSObm01VeOb6ltV-67Skk_opl3c7pFk3K1J0v4seE752kKGj0xzZAoyc5NQ_aem_vYV0OAaq6Mztox3zFleAPw आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. अशा संशोधनाला सहसा लोक दोन प्रकारचे प्रतिसाद देतात- काही लोक 'त' वरून ताकभात ओळखतात आणि वेळीच शहाणे होतात. बाकीचे अर्धवट हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही असे समजून आपला मूर्खपणा मागील अंकावरून पुढे चालू ठेवतात आणि इतरांची पण दिशाभूल करत राहतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 10:00
आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. जीव शास्त्राचे मूलभूत अज्ञान असले कि असे होते. बचकाभर साखर खाणे म्हणजेच रक्तातील साखर वाढणे असे केवळ त्या माणसाला मधुमेह असेल तर होईल. सामान्य निरोगी माणसाने बचका भर साखर खाल्ली तर त्या माणसाच्या शरीरात ताबडतोब इन्स्युलिन तयार होऊन हि पातळी विशिष्ट मर्यादेतच राहील. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (GTT) ज्या माणसांनी केली आहे त्यांना हा अनुभव आहे. ७५ ग्राम साखर खाल्ल्यावर २ तासांनी रक्तातील साखर तपासली जाते. १०० ग्राम पेक्षा जास्त साखर खाल्ली तर उलटी होऊन तुमचे शरीर ती बाहेर टाकेल. जिज्ञासूंनी ( स्वतःच्या जबाबदारी वर) करून पाहावे तुमच्या घरात उत्तम दर्जाच्या वोल्टेज स्टॅबिलायझर असेल तर वोल्टेज कितीही वर खाली झाले तरी घरच्या उपकरणांना काही इजा होणार नाही तसेच आहे हे. एकदा मुद्दा मांडला कि तो कितीही टोकाला जाऊन समर्थन करत राहायचे याचे हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचा पुनरुत्पादनाच्या काळ संपला कि इपिजेनेटीकच काय पण जेनेटिक बदल झाले तरी त्याचा पुढच्या पिढीवर काहीही परिणाम होणार नाही. हा एक मोठा मुद्दा सर्वज्ञ सतत नाकारत आलेले आहेत. कितीही वेळा आणि कितीहि तर्हेने समजावले तरी मीच बरोबर हाच हेका चालू आहे. सगळी भारतीय प्रजा किडलेली च आहे आणि मी सांगतो त्या मार्गाने गेला नाहीत तर तुमचा सर्वनाश अटळ आहे हेच एक पालुपद लावून बसलेले आहेत. यांच्या सर्व लेखात किती तरी मुद्दे सहज खोडून काढण्यासारखे आहेत. पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण एक तर हे बदलणार नाहीतच आणि मिपाकर सुज्ञ आहेतच याला काही उपाय नाही पालथ्या घड्यावर पाणी.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 10:21
काही नीच प्रवृतीचे लोक समाजाची सतत दिशाभूल करत राहतात आणि समाज हताशपणे ते सहन करत राहतो, या पेक्षा दूसरे दूर्दैव कोणते. साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. याबद्दल हा नाठाळ आअणि विकृत मनुष्य का बोलत नाही. मिपा या माणसाला हाकलून का देत नाही?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 11:45
साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. The average age of women at the time of their first pregnancy in Pune, India, is approximately 21.36 years, according to a study published by the National Institutes of Health (NIH). This is based on a study of maternal nutrition in Pune, according to the National Institutes of Health (NIH). Another study of antenatal mothers in Pune found that the majority of women in the study were between 21 and 25 years old. The mean age across the study population was 22.31 ± 2.93 years. बाविसाव्या वर्षी किती मुलींना मेटाबोलिक सिंड्रोम होईल इतका साधा विचार येत नाही का हो तुमच्या डोक्यात? आणि एकदा मुलं होऊन गेली कि एपिजेनेटिक किंवा जेनेटिक समस्या पुढच्या पिढीत जाणार नाहीत हे सांगण्यासाठी कोणत्या डॉक्टरची आवश्यकता नाही. काहीही करून आपला मुद्दा सिद्ध करायचाच हा दुराग्रह कशासाठी? मुळात पाया भुसभुशीत असला कि इमारत फार दिवस टिकत नाही इतकी चिडचिड प्रकृतीस बरी नव्हे!

कानडाऊ योगेशु Mon, 07/14/2025 - 09:36
युयुत्सु सर,एक वैयक्तीक प्रश्न विचारु इच्छितो. तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.? म्हणजे तुम्ही तुमची अपत्ये जन्माला घालण्यापूर्वी पत्नीला ह्याची कल्पना दिली होती का? अथवा जर तुमचे/ची अपत्ये फॅमिली प्लॅनिंग करत असतील तर त्यांना ह्या धोक्याबद्दल कल्पना दिली आहे का? वरील प्रश्न गंभीरपणे विचारत आहे.

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 09:57
तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.?> प्रश्न मनापासून आवडला आणी त्याचे प्रामाणिक उत्तर असे आहे - ताजे संशोधन (मिळेल त्या मार्गाने) मिळवून जीवनशैलीत बदल करणे याची सुरुवात माझ्या वडीलांना १९८१ पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा पासून झाली. त्यांच्यावर डॉ०नी तेव्हा जी बंधने घातली ती मी आणि माझ्या आईने आपल्यावर पण घालून घेतली. तेव्हा पासून मी माझ्या कुटुंबाला सतत शिकवत असतो. माझी मुलगी, माझी पत्नी आणि मला जवळून ओळखणारे डॉ० मला अतिशय गंभीरपणे घेतात. अधिजनुकशास्त्राचा आणि माझा परिचय डॉ० जगन्नाथ दीक्षितांमुळे दहा वर्षापूर्वी झाला. त्यामुळे माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला हे ज्ञान उपलब्ध नव्हते. पण माझी कन्या मला गंभीर पणे घेत असल्याने तीच्या पिढीच्या तूलनेत खुपच शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागत आली आहे. उदा० साखर विष आहे, ताणाचे दूषपरिणाम तिच्या गळी उतरविण्यात मी चांगलाच यशस्वी झालो आहे.

रामचंद्र Mon, 07/14/2025 - 11:10
त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत यासाठी मधुमेह असलेल्या मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या आहारातून कोणते पदार्थ लगेच बंद करावेत असे तुम्ही सांगाल?

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 11:20
बुंदसे गई हौद नही आती... त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत... मुळात जिथे हायपोग्लायसिमिया सारखे धोके आहेत तिथे काहीही त्वरित होईल अशी अपेक्षा ठेवू नये. जे काही करायचे ते टप्प्याटप्प्याने मनोमन स्वीकारून करावे. अनेक ठिकाणी चांगले डॉ० मधुमेह निवारणाचे कार्यक्रम करत आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा. अशा प्रयत्नात मन दगा देते तेव्हा स्वतःला चुचकारून, प्रसंगी स्वतःला माफ करून प्रयत्न चालू ठेवावेत. तारतम्य आणि मध्यममार्ग ही मानवी जीवनातील अंतीम सत्ये आहेत - १००१ श्री श्री तारतम्य श्री युयुत्सु महाराज.:))

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 12:22
कसलाही शेंडाबुडखा नसलेले संशोधन संदर्भाशिवाय टाकायचे आणि सतत दिशाभूल करत राहायचे हे मिपा संपादक कधी थांबवणार? वयाच्या सातव्या वर्षापासून इन्शुलिन रेझिस्टन्स चालू होतो असे संशोधन सांगते- https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3322712/ त्यामूळे प्रजननपूर्व काळात दूषपरिणाम चालू झालेले असतात. त्याची परिणती आणी इतर ताण आणि प्रदूषण यांचे प्रजननपूर्व दूष्परिणाम मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत, हे या माणसाला माहित नाहीत का?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 18:21
परत तेच इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत. याचे दर वर्षी मी काही हजार रुग्ण गेली कित्येक वर्षे पाहतो आहे. पण मीच हुशार आहे मी हुशारच आहे आणि मी हुशार आहेच हेच पालुपद किती वर्षे आळवणार?

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 18:52
इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? फरक असला तरी इन्स्युलिन रेझीस्टन्स मुळे येणारा हायपरिन्शुलेनेमिया हा तितकाच धोकादायक असतो. साखरेचे कंझंपशन त्यात निर्णायक असते. मी हुशार आहे की नाही, माहित नाही. बहुधा नाही, कारण कुणी मला हुशार म्हणत नाही. पण मी कोडगा नक्कीच नाही!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 20:21
तुम्हीच स्वतः;ला हुशार म्हणता मग जग काय म्हणतं त्याने काय फरक पडतो. तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. मग जागा काय समजतं त्याने काय फरक पडणार आहे? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले? फरक असला तरी आश्चर्य आहे तुम्ही ही गोष्ट स्वीकारली. आज पाऊस आहे नाही तर सूर्य कुठे उगवला आहे ते पाहिलं असतं

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 09:38
तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. डिग्र्यांचा फाफटपसारा फक्त डॉ०नीच मिरवायचा असा कायदा आहे का? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले?> मुळात लोक चार बुकं वाचतात ते डॉ० होण्यासाठी हा अडाणीपणाचा (किंवा मेंदू सडण्याचा) अस्सल नमूना आहे. लोकांनी अज्ञानी राहावं आणि आपल्याला कायम मखरात ठेवावं अशी सुप्त इच्छा असली की असे विचार बळावतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 10:47
डॉक्टर कुठल्याही सामाजिक स्थळावर आपल्या डिग्र्यांची जाहिरात करत फिरत नाही. इंडियन मेडिकल कॉउंसिल कायद्याप्रमाणे याला बंदी आहे. मी आधुनिक वैद्यकाबद्दल बोलतोय आहे. इतर प्रणाली( आयुर्वेद युनानी होमेपदी इ) बद्दल नव्हे आणि मी कधीही कुणाला माझ्याकडे या किंवा माझं लेखन/पुस्तक वाचा किंवा माझी आरती ओवाळा असे लिहिलेले नाही. किंवा लोकांना अक्कल नाही आणि मी शिकवणार आहे असा हि दावा केलेला नाही. किंवा अमुक तमुक याला मिपा वरून हाकलून द्या किंवा कोणालाही शिव्या देत नाही. बाकी तुम्ही (स्वघोषित) सर्वज्ञ आहात. सुज्ञ असाल अशी अपेक्षा.

गामा पैलवान Mon, 07/14/2025 - 12:26
युयुत्सु आणि सुबोध खरे, जनुकशास्त्र की अधिजनुकशास्त्र या वादांत मी पडंत नाही. मला फारशी माहिती नाही. तुम्ही दोघे तत्ज्ञ आहात अशी माझी धारणा आहे. तर मला माहीत असलेलं एक प्रकरण सांगतो. माझ्या ओळखीच्या ( इंग्लंडमधल्या ) एका गृहस्थांना तीव्र मधुमेह आहे. वय वर्षे सुमारे ४५+ त्यांच्या वडिलांकडून आला असावा असं इथले ( इंग्लंडातले ) डॉक्टर लोकं म्हणतात. त्यांना मूल हवं आहे. बायको तिशीची आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मधुमेही बापाचं वय इतकं जास्त असल्यास अर्भकास मधुमेहाशिवाय इतर व्याधीही जन्मत:च असू शकतात. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर शुकाणू बलवान नसल्याने असं घडतं, इति डॉक्टर. वरील प्रकरणांत जनुकीय व अधिजनुकीय असे भाग पाडता येतील काय ? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं, ही विनंती. आ.न., -गा.पै.

Bhakti Tue, 07/15/2025 - 13:39
अवांतर इथे जेनेटिक,इपिजेनेटिक शब्द,चर्चा वाचून आठवलं. युट्यूबवर मला सतत DNA Awaking -DNA Repattern Workshop ची जाहिरात पाहायला मिळते.खरचं DNA Repattern काय सहज गोष्ट असते का? काहीही जाहिरातबाजी करतात .

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Sat, 07/12/2025 - 19:14
मेंदू सडणे ही मेंदू गंजण्यापेक्षा जास्त गंभीर समस्या आहे. गंज प्रयत्न करून काढता येतो. 'सडणे' थांबवणे भयंकर अवघड असते.

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Sat, 07/12/2025 - 22:34
युयुत्सु, मेंदूची गंजसफाई करण्यासाठी विविध कोडी वगैरे उपलब्ध आहेत. मेंदूचे सडणे थांबवायला काही उपाय आहेत का? माझ्या मते सडण्याआधी मेंदूवर गंज चढंत असावा. तर गंजण्याच्या प्रक्रियेतनं सडण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली याबद्दल काही मर्यादादर्शके उपलब्ध आहेत का ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Sun, 07/13/2025 - 06:45
श्री० गा०पै० सडणे जन्मजात असेल तर उपाय जवळजवळ शून्य. पण नंतर चालू झाले असेल तर आपल्या आयुष्यात नेमका कशाचा अतिरेक आणि कशाचा अभाव हे ओळखणे, ते मनोमन स्वीकारणे आणि मग प्रयत्नपूर्वक तो अतिरेक/अभाव कमी करणे हा सडणे थांबवण्याचा प्रभावी उपाय ठरतो. पण एकट्याने केलेले प्रयत्न त्यासाठी पुरे पडत नाहीत. त्यात आजुबाजूच्या लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो - तुम्ही पार्टीत पिणार नसाल आणि तुमच्या निर्णयाचा आदर होणार नसेल तर काहीही उपयोग नसतो. आता एक उदा० देतो. हे कदाचित अतिरेकी विधान वाटेल. पण भारतात साखरेचा वापर (आणि साखरे नंतर मैदा) जर निम्म्यावर आणता आला तर भारतीयांचे आरोग्य वेगाने सुधारेल. ज्यात त्यात , विशेषतः बटाटेवड्यात साखर घालणे हा पुणेकरांच्या मेंदू सडण्याचा महत्त्वाचा मर्यादादर्शक आहे. हा हा हा हा!

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Sun, 07/13/2025 - 14:57
गंजणे आणि सडणे गंजणे - एखादी वस्तू किंवा क्षमता न वापरल्या मुळे वाया जाणे सडणे - एखादी वस्तू किंवा क्षमता चुकीचा वापर, आघात इ अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात अकार्यक्षम होणे गरज पडल्यास या व्याख्या आणखी घासून-पुसून चकचकीत करता येतील...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Mon, 07/14/2025 - 01:31
युयुत्सु, या व्याख्या मेंदूच्या संदर्भात हव्या होत्या. माझ्या मते गंजणे हा बुद्धीशी संबंधित आहे, तर सडणे हा प्रकार मेंदूच्या उतीशी संबंधित आहे. मेंदू सडलेला इसम तरीही बुद्धिवान असू शकतो. याउलट मेंदू न सडटा उत्तम असला तरी न वापरल्यामुळे बुद्धीवर गंज चढलेला असू शकतो. आता या दोन्ही गोष्टी जनुकांद्वारे पुढील पिढीत संक्रमित कशा होतात यावर प्रकाश टाकावा अशी विनंती आहे. यासंबंधी काही विदा/लेखन उपलब्ध आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 07:46
The Epigenetics Revolution: How Modern Biology Is Rewriting Our Understanding of Genetics, Disease, and Inheritance by Nessa Carey An introductory overview of epigenetics, explaining how gene expression changes can be inherited and affect health, without altering DNA. Highly recommended for lay readers.reddit.com+6 more Epigenetics: How Environment Shapes Our Genes by Richard C. Francis Discusses how external factors like diet and stress lead to epigenetic changes that can be passed to offspring, with real-world examples from animals and humans.amazon.comjournals.uchicago.edu Inheritance: How Our Genes Change Our Lives—and Our Lives Change Our Genes by Sharon Moalem Blends genetics and epigenetics, showing how lifestyle influences gene expression and inheritance, with insights into diseases and personal health.goodreads.comamazon.com **Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life by Eva J. Jablonka and Marion J. Lamb Argues for an expanded view of evolution, incorporating epigenetic and other non-genetic systems of inheritance. A bit academic but influential.direct.mit.edu Epigenetic Inheritance and Evolution: The Lamarckian Dimension by Eva Jablonka and Marion J. Lamb Explores how epigenetic mechanisms revive ideas of acquired trait inheritance, challenging neo-Darwinism.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 08:22
बाय द वे : हे पश्चिमेकडून आलेले, जगातल्या मातब्बर विद्यापीठे आणि त्यांच्या प्रयोगशाळानी निर्माण केलेले ज्ञान आहे. त्याची अ‍ॅलर्जी असल्यास काहीही उपयोग होणार नाही... उदा० काही मठ्ठ लोक उत्क्रांती फक्त नैसर्गिक निवडीतून घडते असा दावा करतात. पण आता हे मत विज्ञानाने टाकून दिले आहे. Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life हे पुस्तक त्यासाठी महत्त्वाचे आहे.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 09:15
वर मी साखरे बद्दल काही अतिरेकी वाटतील विधाने केली होती. मागे कधी तरी इन्शुलीन पातळी वाढली की टेस्टेस्टेररॉन ची पातळी कमी होते असे वाचले होते.पण आत्ताच हे ताजे संशोधन माझ्या कालरेषेवर (टाईमलाईनवर) टपकले. रक्तातली साखर थोडी जरी वाढली तरी पुरूषांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो. https://neurosciencenews.com/blood-sugar-sexual-decline-neuroscience-29450/?fbclid=IwY2xjawLhWkBleHRuA2FlbQIxMQBicmlkETFNMzNvOTJNYW5ER2liZG5sAR4PSObm01VeOb6ltV-67Skk_opl3c7pFk3K1J0v4seE752kKGj0xzZAoyc5NQ_aem_vYV0OAaq6Mztox3zFleAPw आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. अशा संशोधनाला सहसा लोक दोन प्रकारचे प्रतिसाद देतात- काही लोक 'त' वरून ताकभात ओळखतात आणि वेळीच शहाणे होतात. बाकीचे अर्धवट हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही असे समजून आपला मूर्खपणा मागील अंकावरून पुढे चालू ठेवतात आणि इतरांची पण दिशाभूल करत राहतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 10:00
आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. जीव शास्त्राचे मूलभूत अज्ञान असले कि असे होते. बचकाभर साखर खाणे म्हणजेच रक्तातील साखर वाढणे असे केवळ त्या माणसाला मधुमेह असेल तर होईल. सामान्य निरोगी माणसाने बचका भर साखर खाल्ली तर त्या माणसाच्या शरीरात ताबडतोब इन्स्युलिन तयार होऊन हि पातळी विशिष्ट मर्यादेतच राहील. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (GTT) ज्या माणसांनी केली आहे त्यांना हा अनुभव आहे. ७५ ग्राम साखर खाल्ल्यावर २ तासांनी रक्तातील साखर तपासली जाते. १०० ग्राम पेक्षा जास्त साखर खाल्ली तर उलटी होऊन तुमचे शरीर ती बाहेर टाकेल. जिज्ञासूंनी ( स्वतःच्या जबाबदारी वर) करून पाहावे तुमच्या घरात उत्तम दर्जाच्या वोल्टेज स्टॅबिलायझर असेल तर वोल्टेज कितीही वर खाली झाले तरी घरच्या उपकरणांना काही इजा होणार नाही तसेच आहे हे. एकदा मुद्दा मांडला कि तो कितीही टोकाला जाऊन समर्थन करत राहायचे याचे हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचा पुनरुत्पादनाच्या काळ संपला कि इपिजेनेटीकच काय पण जेनेटिक बदल झाले तरी त्याचा पुढच्या पिढीवर काहीही परिणाम होणार नाही. हा एक मोठा मुद्दा सर्वज्ञ सतत नाकारत आलेले आहेत. कितीही वेळा आणि कितीहि तर्हेने समजावले तरी मीच बरोबर हाच हेका चालू आहे. सगळी भारतीय प्रजा किडलेली च आहे आणि मी सांगतो त्या मार्गाने गेला नाहीत तर तुमचा सर्वनाश अटळ आहे हेच एक पालुपद लावून बसलेले आहेत. यांच्या सर्व लेखात किती तरी मुद्दे सहज खोडून काढण्यासारखे आहेत. पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण एक तर हे बदलणार नाहीतच आणि मिपाकर सुज्ञ आहेतच याला काही उपाय नाही पालथ्या घड्यावर पाणी.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 10:21
काही नीच प्रवृतीचे लोक समाजाची सतत दिशाभूल करत राहतात आणि समाज हताशपणे ते सहन करत राहतो, या पेक्षा दूसरे दूर्दैव कोणते. साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. याबद्दल हा नाठाळ आअणि विकृत मनुष्य का बोलत नाही. मिपा या माणसाला हाकलून का देत नाही?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 11:45
साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. The average age of women at the time of their first pregnancy in Pune, India, is approximately 21.36 years, according to a study published by the National Institutes of Health (NIH). This is based on a study of maternal nutrition in Pune, according to the National Institutes of Health (NIH). Another study of antenatal mothers in Pune found that the majority of women in the study were between 21 and 25 years old. The mean age across the study population was 22.31 ± 2.93 years. बाविसाव्या वर्षी किती मुलींना मेटाबोलिक सिंड्रोम होईल इतका साधा विचार येत नाही का हो तुमच्या डोक्यात? आणि एकदा मुलं होऊन गेली कि एपिजेनेटिक किंवा जेनेटिक समस्या पुढच्या पिढीत जाणार नाहीत हे सांगण्यासाठी कोणत्या डॉक्टरची आवश्यकता नाही. काहीही करून आपला मुद्दा सिद्ध करायचाच हा दुराग्रह कशासाठी? मुळात पाया भुसभुशीत असला कि इमारत फार दिवस टिकत नाही इतकी चिडचिड प्रकृतीस बरी नव्हे!

कानडाऊ योगेशु Mon, 07/14/2025 - 09:36
युयुत्सु सर,एक वैयक्तीक प्रश्न विचारु इच्छितो. तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.? म्हणजे तुम्ही तुमची अपत्ये जन्माला घालण्यापूर्वी पत्नीला ह्याची कल्पना दिली होती का? अथवा जर तुमचे/ची अपत्ये फॅमिली प्लॅनिंग करत असतील तर त्यांना ह्या धोक्याबद्दल कल्पना दिली आहे का? वरील प्रश्न गंभीरपणे विचारत आहे.

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 09:57
तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.?> प्रश्न मनापासून आवडला आणी त्याचे प्रामाणिक उत्तर असे आहे - ताजे संशोधन (मिळेल त्या मार्गाने) मिळवून जीवनशैलीत बदल करणे याची सुरुवात माझ्या वडीलांना १९८१ पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा पासून झाली. त्यांच्यावर डॉ०नी तेव्हा जी बंधने घातली ती मी आणि माझ्या आईने आपल्यावर पण घालून घेतली. तेव्हा पासून मी माझ्या कुटुंबाला सतत शिकवत असतो. माझी मुलगी, माझी पत्नी आणि मला जवळून ओळखणारे डॉ० मला अतिशय गंभीरपणे घेतात. अधिजनुकशास्त्राचा आणि माझा परिचय डॉ० जगन्नाथ दीक्षितांमुळे दहा वर्षापूर्वी झाला. त्यामुळे माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला हे ज्ञान उपलब्ध नव्हते. पण माझी कन्या मला गंभीर पणे घेत असल्याने तीच्या पिढीच्या तूलनेत खुपच शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागत आली आहे. उदा० साखर विष आहे, ताणाचे दूषपरिणाम तिच्या गळी उतरविण्यात मी चांगलाच यशस्वी झालो आहे.

रामचंद्र Mon, 07/14/2025 - 11:10
त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत यासाठी मधुमेह असलेल्या मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या आहारातून कोणते पदार्थ लगेच बंद करावेत असे तुम्ही सांगाल?

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 11:20
बुंदसे गई हौद नही आती... त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत... मुळात जिथे हायपोग्लायसिमिया सारखे धोके आहेत तिथे काहीही त्वरित होईल अशी अपेक्षा ठेवू नये. जे काही करायचे ते टप्प्याटप्प्याने मनोमन स्वीकारून करावे. अनेक ठिकाणी चांगले डॉ० मधुमेह निवारणाचे कार्यक्रम करत आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा. अशा प्रयत्नात मन दगा देते तेव्हा स्वतःला चुचकारून, प्रसंगी स्वतःला माफ करून प्रयत्न चालू ठेवावेत. तारतम्य आणि मध्यममार्ग ही मानवी जीवनातील अंतीम सत्ये आहेत - १००१ श्री श्री तारतम्य श्री युयुत्सु महाराज.:))

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 12:22
कसलाही शेंडाबुडखा नसलेले संशोधन संदर्भाशिवाय टाकायचे आणि सतत दिशाभूल करत राहायचे हे मिपा संपादक कधी थांबवणार? वयाच्या सातव्या वर्षापासून इन्शुलिन रेझिस्टन्स चालू होतो असे संशोधन सांगते- https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3322712/ त्यामूळे प्रजननपूर्व काळात दूषपरिणाम चालू झालेले असतात. त्याची परिणती आणी इतर ताण आणि प्रदूषण यांचे प्रजननपूर्व दूष्परिणाम मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत, हे या माणसाला माहित नाहीत का?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 18:21
परत तेच इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत. याचे दर वर्षी मी काही हजार रुग्ण गेली कित्येक वर्षे पाहतो आहे. पण मीच हुशार आहे मी हुशारच आहे आणि मी हुशार आहेच हेच पालुपद किती वर्षे आळवणार?

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 18:52
इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? फरक असला तरी इन्स्युलिन रेझीस्टन्स मुळे येणारा हायपरिन्शुलेनेमिया हा तितकाच धोकादायक असतो. साखरेचे कंझंपशन त्यात निर्णायक असते. मी हुशार आहे की नाही, माहित नाही. बहुधा नाही, कारण कुणी मला हुशार म्हणत नाही. पण मी कोडगा नक्कीच नाही!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 07/14/2025 - 20:21
तुम्हीच स्वतः;ला हुशार म्हणता मग जग काय म्हणतं त्याने काय फरक पडतो. तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. मग जागा काय समजतं त्याने काय फरक पडणार आहे? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले? फरक असला तरी आश्चर्य आहे तुम्ही ही गोष्ट स्वीकारली. आज पाऊस आहे नाही तर सूर्य कुठे उगवला आहे ते पाहिलं असतं

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 09:38
तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. डिग्र्यांचा फाफटपसारा फक्त डॉ०नीच मिरवायचा असा कायदा आहे का? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले?> मुळात लोक चार बुकं वाचतात ते डॉ० होण्यासाठी हा अडाणीपणाचा (किंवा मेंदू सडण्याचा) अस्सल नमूना आहे. लोकांनी अज्ञानी राहावं आणि आपल्याला कायम मखरात ठेवावं अशी सुप्त इच्छा असली की असे विचार बळावतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 10:47
डॉक्टर कुठल्याही सामाजिक स्थळावर आपल्या डिग्र्यांची जाहिरात करत फिरत नाही. इंडियन मेडिकल कॉउंसिल कायद्याप्रमाणे याला बंदी आहे. मी आधुनिक वैद्यकाबद्दल बोलतोय आहे. इतर प्रणाली( आयुर्वेद युनानी होमेपदी इ) बद्दल नव्हे आणि मी कधीही कुणाला माझ्याकडे या किंवा माझं लेखन/पुस्तक वाचा किंवा माझी आरती ओवाळा असे लिहिलेले नाही. किंवा लोकांना अक्कल नाही आणि मी शिकवणार आहे असा हि दावा केलेला नाही. किंवा अमुक तमुक याला मिपा वरून हाकलून द्या किंवा कोणालाही शिव्या देत नाही. बाकी तुम्ही (स्वघोषित) सर्वज्ञ आहात. सुज्ञ असाल अशी अपेक्षा.

गामा पैलवान Mon, 07/14/2025 - 12:26
युयुत्सु आणि सुबोध खरे, जनुकशास्त्र की अधिजनुकशास्त्र या वादांत मी पडंत नाही. मला फारशी माहिती नाही. तुम्ही दोघे तत्ज्ञ आहात अशी माझी धारणा आहे. तर मला माहीत असलेलं एक प्रकरण सांगतो. माझ्या ओळखीच्या ( इंग्लंडमधल्या ) एका गृहस्थांना तीव्र मधुमेह आहे. वय वर्षे सुमारे ४५+ त्यांच्या वडिलांकडून आला असावा असं इथले ( इंग्लंडातले ) डॉक्टर लोकं म्हणतात. त्यांना मूल हवं आहे. बायको तिशीची आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मधुमेही बापाचं वय इतकं जास्त असल्यास अर्भकास मधुमेहाशिवाय इतर व्याधीही जन्मत:च असू शकतात. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर शुकाणू बलवान नसल्याने असं घडतं, इति डॉक्टर. वरील प्रकरणांत जनुकीय व अधिजनुकीय असे भाग पाडता येतील काय ? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं, ही विनंती. आ.न., -गा.पै.

Bhakti Tue, 07/15/2025 - 13:39
अवांतर इथे जेनेटिक,इपिजेनेटिक शब्द,चर्चा वाचून आठवलं. युट्यूबवर मला सतत DNA Awaking -DNA Repattern Workshop ची जाहिरात पाहायला मिळते.खरचं DNA Repattern काय सहज गोष्ट असते का? काहीही जाहिरातबाजी करतात .
लेखनविषय:
लेखनप्रकार
किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’ ===============  मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्‍या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्‍या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात.

जागतिक योग दिवशी ऋषभ पंतचं प्रात्यक्षिक!

मार्गी ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2025 - 10:32
क्रिकेटमधे अशा प्रकारचं सिलेब्रेशन जरा नवंच वाटलं. सर्कशीतल्या त्या सुंदर युवती आपल्या शरिराच्या अशा विविध लवचिक हालचाली करतांना पाहिलंय पण क्रिकेटमधे पंत ज्या पद्धतीने लिलया उडी मारतो ते लैच भारी. 'पत्त्यामधले राजे आम्ही, मी असा कसा, असा कसा वेगळा वेगळा' बावळा. म्हणा नंदुशेठ. सॉरी पंतशेठ.
मागच्या चेंडूवर काहीही होवो, पुढचा चेंडू- पुढचा क्षण नवीन आहे. मागच्या क्षणाचं "बॅगेज" मी नेणार नाही आणि तो चेंडू जसा वाटेल, तसा खेळेन हे पंतचं ब्रीद!
सहमत. माझं तर लै डोकं खराब होतं त्याची बॅटींग पाहतांना. पुढच्या बॉलला हा भावड्या झोपून शॉट मारेल, बसून शॉट मारेल, पळत मारेल याचा काहीच भरवसा नाही. याचं क्रिकेटच वेगळं आहे. पंत नीट खेळ रे भावड्या असे सारखे तोंडून शब्द येत असतात. -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2025 - 10:32
क्रिकेटमधे अशा प्रकारचं सिलेब्रेशन जरा नवंच वाटलं. सर्कशीतल्या त्या सुंदर युवती आपल्या शरिराच्या अशा विविध लवचिक हालचाली करतांना पाहिलंय पण क्रिकेटमधे पंत ज्या पद्धतीने लिलया उडी मारतो ते लैच भारी. 'पत्त्यामधले राजे आम्ही, मी असा कसा, असा कसा वेगळा वेगळा' बावळा. म्हणा नंदुशेठ. सॉरी पंतशेठ.
मागच्या चेंडूवर काहीही होवो, पुढचा चेंडू- पुढचा क्षण नवीन आहे. मागच्या क्षणाचं "बॅगेज" मी नेणार नाही आणि तो चेंडू जसा वाटेल, तसा खेळेन हे पंतचं ब्रीद!
सहमत. माझं तर लै डोकं खराब होतं त्याची बॅटींग पाहतांना. पुढच्या बॉलला हा भावड्या झोपून शॉट मारेल, बसून शॉट मारेल, पळत मारेल याचा काहीच भरवसा नाही. याचं क्रिकेटच वेगळं आहे. पंत नीट खेळ रे भावड्या असे सारखे तोंडून शब्द येत असतात. -दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील) ✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा ✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द ✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक ✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता ✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ ✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही! ✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य ✪ मैदानावरचं मैदानावर सोडून देण्याची कला! नुकताच झालेला भारत- इंग्लंड कसोटी सामना! शेवटच्या तासापर्यंत रंगत कायम असलेला व अटी- तटीचा झालेला हा सामना!

आकाशात तार्‍याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा

मार्गी ·

सुधीर कांदळकर Tue, 06/24/2025 - 13:31
वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल. बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी Tue, 06/24/2025 - 17:55
@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

In reply to by कंजूस

मार्गी Sat, 06/28/2025 - 18:57
पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून. जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.

सुधीर कांदळकर Tue, 06/24/2025 - 13:31
वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल. बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी Tue, 06/24/2025 - 17:55
@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

In reply to by कंजूस

मार्गी Sat, 06/28/2025 - 18:57
पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून. जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्‍याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्‍यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्‍यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्‍याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं.

प्रा. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

कपिलमुनी ·

प्रचेतस Tue, 05/20/2025 - 14:49
____/\_____ अतिशय आदरणीय व्यक्ती. डॉ. नारळीकरांना श्रद्धांजली.

Bhakti Tue, 05/20/2025 - 16:13
शाळेत असताना नारळीकरांच्या व्यक्तिमत्वाने खुप प्रभावित व्हायचे.या मराठी शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीमुळे विज्ञानाकडे आकृष्ट होत राहिलो. डॉ.जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

नारळीकरांचा सहवास मला काही काळ मिळाला आहे. लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या माझ्या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण https://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_115858511190534826.html 2008 साली झालेल्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:37
प्रकांड विद्वान असूनही साधे नम्र व्यक्तीमत्व होणे अवघड आहे. कोणत्याही पद व प्रतिष्ठेच्या मागे न लागता विज्ञानाचाच ध्यास घेऊन ते कार्य करत राहिले. बाकी प्रसिध्द शास्त्रज्ञ व नाऱळीकर सर यांच्यातला हा फरक नेहमी जाणवतो. त्यांचे विचार व काम देशाला प्रेरणा देत राहील.

शशिकांत ओक Fri, 05/23/2025 - 23:48
कै. डॉ जयंत नारळीकर यांना सादर श्रध्दांजली... हवाईदलात दूर पोस्टींगवर असल्याने डॉ नारळीकरांशी भेट होणे शक्य नव्हते. पण नाडी भविष्य विषयामुळे मला अशा मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतात की कल्पना करणे अशक्य असते. त्यापैकी डॉ नारळीकर एक होते. त्यांना ताडपत्रावर कोरून लिहिलेल्या मजकुरात आपले नाव व अनेक माहिती कूट तमिळमधे लिहिलेली असते हे तत्वतः मान्य नव्हते. ते त्यांचे वैयक्तिक मत होते. आपण या ताडपट्टीवरील कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी विनंती करायला मला त्यांना आयुकाच्या ऑफिसमधे भेट घ्यायची संधी मिळाली. एक सुसंस्कृत, मान्यवर, ज्ञानी, शास्त्रज्ञ म्हणून मला नेहमीच आदरणीय होते.

प्रचेतस Tue, 05/20/2025 - 14:49
____/\_____ अतिशय आदरणीय व्यक्ती. डॉ. नारळीकरांना श्रद्धांजली.

Bhakti Tue, 05/20/2025 - 16:13
शाळेत असताना नारळीकरांच्या व्यक्तिमत्वाने खुप प्रभावित व्हायचे.या मराठी शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीमुळे विज्ञानाकडे आकृष्ट होत राहिलो. डॉ.जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

नारळीकरांचा सहवास मला काही काळ मिळाला आहे. लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या माझ्या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण https://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_115858511190534826.html 2008 साली झालेल्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:37
प्रकांड विद्वान असूनही साधे नम्र व्यक्तीमत्व होणे अवघड आहे. कोणत्याही पद व प्रतिष्ठेच्या मागे न लागता विज्ञानाचाच ध्यास घेऊन ते कार्य करत राहिले. बाकी प्रसिध्द शास्त्रज्ञ व नाऱळीकर सर यांच्यातला हा फरक नेहमी जाणवतो. त्यांचे विचार व काम देशाला प्रेरणा देत राहील.

शशिकांत ओक Fri, 05/23/2025 - 23:48
कै. डॉ जयंत नारळीकर यांना सादर श्रध्दांजली... हवाईदलात दूर पोस्टींगवर असल्याने डॉ नारळीकरांशी भेट होणे शक्य नव्हते. पण नाडी भविष्य विषयामुळे मला अशा मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतात की कल्पना करणे अशक्य असते. त्यापैकी डॉ नारळीकर एक होते. त्यांना ताडपत्रावर कोरून लिहिलेल्या मजकुरात आपले नाव व अनेक माहिती कूट तमिळमधे लिहिलेली असते हे तत्वतः मान्य नव्हते. ते त्यांचे वैयक्तिक मत होते. आपण या ताडपट्टीवरील कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी विनंती करायला मला त्यांना आयुकाच्या ऑफिसमधे भेट घ्यायची संधी मिळाली. एक सुसंस्कृत, मान्यवर, ज्ञानी, शास्त्रज्ञ म्हणून मला नेहमीच आदरणीय होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांचे दिग्गज प्रा. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय विज्ञानच नाही तर जागतिक विज्ञानसमाजानेही एक महान विचारवंत, संशोधक आणि समाजसुधारक गमावला.

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

मार्गी ·

चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे.
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. असो.

मार्गी गुरुवार, 05/01/2025 - 15:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :) त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.

चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे.
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. असो.

मार्गी गुरुवार, 05/01/2025 - 15:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :) त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.