मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मानवतेचं कलेवर

कर्नलतपस्वी ·

चौथा कोनाडा Wed, 04/23/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:43
त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 16:20
इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 18:47
तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 19:32
पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Tue, 04/29/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 07:33
कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.

चौथा कोनाडा Wed, 04/23/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:43
त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 16:20
इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 18:47
तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 19:32
पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Tue, 04/29/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 07:33
कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.
लेखनविषय:
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

बोटावर शाईचा अजून रंग ओला

ज्ञानोबाचे पैजार ·

पाषाणभेद Mon, 11/18/2019 - 09:25
शिवरायांचा वारसा म्हणवणारे अशा स्थितीत आहेत हे पाहून विषाद वाटला. शरम वाटते आहे त्यांची. अन हे कसले मराठीचे वाली? हे तर मराठी माणसांचे खूनी! समयोचित काव्य पैजारबुवा!

नाखु Wed, 11/20/2019 - 09:23
आणि समयोचित. हटवादी पणा आणि शंभर टक्के मूळच्या पिंडाशी फारकत यानेच ना घरका ना घाटका अशी अवस्था करुन घेतली आहे. तुका म्हणे उगा रहावे, जे जे होईल ते पहात जावे पंथातला शिक्कामोर्तब झालेला नाखु

सुमो Wed, 11/20/2019 - 17:13
दाविलेस मम नेत्रांना एक स्वप्न भगवे गुंडाळीलेस डोईवरी कमरेचे शेवटचे वदला काका मग देईन तुज पितांबर ल्यावयाला म्याडम देखिति न म्हणती हा असाच चांगला --- हे आपलं र ला र अन ट ला ट हो पैजार बुवा मूळ कविता छानच हे वै सां न.

In reply to by mrcoolguynice

पळतच आलो येताना,पण पोपट झाला जाताना, अंगावरती कातडे सिंहाचे, आत लपलेला लबाड लांडगा , अलगद शिकार झालो त्याची, सत्ते मागे पळताना गाफिल राहून पडलो एकटा, काळोखी बघ रात्र उगवली , डोळे उघडले तेव्हा नव्हती , दिसली खुर्ची जाताना चाणाक्य नीती व्यर्थ जहाली ,वारही केले फुकटची गेले पुन्हा येण्याचा अर्थ आकळे, त्वरीत परतूनी जाताना गुडघ्याला मी बांधून बाशींग, माळ घातली शंढाला, पार्टी विथ डिफरन्स कसे म्हणू मी, जनतेला मते मागताना, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

mrcoolguynice Wed, 11/27/2019 - 19:33
गेल्या हजार वर्षात, असे शीघ्र व समयोचित विडंबन प्रतिक्रियेत आले नाही... अभी हम बोले तो बोलें क्या, करे तो करे क्या... वाह पैबुजी वाह...

पाषाणभेद Mon, 11/18/2019 - 09:25
शिवरायांचा वारसा म्हणवणारे अशा स्थितीत आहेत हे पाहून विषाद वाटला. शरम वाटते आहे त्यांची. अन हे कसले मराठीचे वाली? हे तर मराठी माणसांचे खूनी! समयोचित काव्य पैजारबुवा!

नाखु Wed, 11/20/2019 - 09:23
आणि समयोचित. हटवादी पणा आणि शंभर टक्के मूळच्या पिंडाशी फारकत यानेच ना घरका ना घाटका अशी अवस्था करुन घेतली आहे. तुका म्हणे उगा रहावे, जे जे होईल ते पहात जावे पंथातला शिक्कामोर्तब झालेला नाखु

सुमो Wed, 11/20/2019 - 17:13
दाविलेस मम नेत्रांना एक स्वप्न भगवे गुंडाळीलेस डोईवरी कमरेचे शेवटचे वदला काका मग देईन तुज पितांबर ल्यावयाला म्याडम देखिति न म्हणती हा असाच चांगला --- हे आपलं र ला र अन ट ला ट हो पैजार बुवा मूळ कविता छानच हे वै सां न.

In reply to by mrcoolguynice

पळतच आलो येताना,पण पोपट झाला जाताना, अंगावरती कातडे सिंहाचे, आत लपलेला लबाड लांडगा , अलगद शिकार झालो त्याची, सत्ते मागे पळताना गाफिल राहून पडलो एकटा, काळोखी बघ रात्र उगवली , डोळे उघडले तेव्हा नव्हती , दिसली खुर्ची जाताना चाणाक्य नीती व्यर्थ जहाली ,वारही केले फुकटची गेले पुन्हा येण्याचा अर्थ आकळे, त्वरीत परतूनी जाताना गुडघ्याला मी बांधून बाशींग, माळ घातली शंढाला, पार्टी विथ डिफरन्स कसे म्हणू मी, जनतेला मते मागताना, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

mrcoolguynice Wed, 11/27/2019 - 19:33
गेल्या हजार वर्षात, असे शीघ्र व समयोचित विडंबन प्रतिक्रियेत आले नाही... अभी हम बोले तो बोलें क्या, करे तो करे क्या... वाह पैबुजी वाह...
बोटावर शाईचा अजून रंग ओला माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला विश्वासून तुझीयावर मते तूला दिली राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला पैजारबुवा,

(धागा काढण्याची तल्लफ)

नाखु ·

खिलजि Sat, 05/04/2019 - 15:24
धाग्यांचे जिथेतिथे मळे फुलवायचेय मला लवकरच कोटीवीर व्हायचेय दिवसाला दळायचेय दहा किलो कमीतकमी ओळखलं नाहीत मला , मी येक नंबर स्वामी किती लिहू आणि काय लिहू नकोनकोसे होते प्रतिसाद आले रे आले कि अजून स्फुरण चढते वाचकांना काय वाटते याचे मला काय त्याचे मी तर धागे काढत जाणार जरी असले कन्टेन्टचे लोचे गोंगाट, गदारोळ माजतो या मंचावर धागा येता माझा ओळखाल का कुणी खरे मला ? शोधून दाखवा आंजावर

झेन Sun, 05/05/2019 - 16:34
आता थांबणे नाही, नुसते धागे काढून होणाऱ्या टींगलटवाळी ला मराठी माणूस घाबरणार नाही, आता कवितेचा मळाही फुलवावा लागणार हे तो स्वामिंची १ नंबर ईच्छा

दुर्गविहारी Sun, 05/05/2019 - 17:11
घाबरु नका स्वामि ! मी तुमच्या पाठीशी आहेच. मराठी माणसाचे हीत न बगवनारे असल्या दुत्त दुत्त नाखुचाचांकडे तुम्हि लक्ष देउ नका. तुमची धाग्यांची कुरपा अखंडित राहु देत. आणखी असेच धागे निगावेत हि तो स्वामींची, चुकले श्रींची ईच्छा. ;-)

In reply to by दुर्गविहारी

नाखु Sun, 05/05/2019 - 17:40
खैर समज होतोय,हे पुष्प स्वामीचरणी समर्पित केले आहे,तुम्ही आणंदावर वीरझण टाकले नाही आणि सांभासिकी दिली तर अजून मोठा पुच्छगुच्छ स्वामींना अर्पण करीन. शुद्धलेखन आणि वाक्यरचना फाट्यावर मारणे हेच मराठी माणसाचे आद्यकर्तव्य हीच स्वामिशिकरण स्वामिशिकवण अज्ञ बालक नाखु

भंकस बाबा Mon, 05/06/2019 - 08:03
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल. नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?

भंकस बाबा Mon, 05/06/2019 - 08:03
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल. नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?

टर्मीनेटर Mon, 05/06/2019 - 10:36
कविता वाचनात फारसे स्वारस्य नसलेल्या माझ्या सारख्या वाचकांच्या मनात कवितेबद्दल रुची निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे तुमच्या लेखणीत. मजा आली वाचायला!

वकील साहेब Mon, 05/06/2019 - 13:06
नाखू आणि खिलजी दोघांच्याही कविता एकच नंबर. मजा आली वाचतांना. तुमच्या कवितेचे प्रेरणास्त्रोतांनी यातून काही अर्थबोध घेतला तर कवितेचे व्रत सुफळ संपूर्ण झाले म्हणायचे.

खिलजि Sat, 05/04/2019 - 15:24
धाग्यांचे जिथेतिथे मळे फुलवायचेय मला लवकरच कोटीवीर व्हायचेय दिवसाला दळायचेय दहा किलो कमीतकमी ओळखलं नाहीत मला , मी येक नंबर स्वामी किती लिहू आणि काय लिहू नकोनकोसे होते प्रतिसाद आले रे आले कि अजून स्फुरण चढते वाचकांना काय वाटते याचे मला काय त्याचे मी तर धागे काढत जाणार जरी असले कन्टेन्टचे लोचे गोंगाट, गदारोळ माजतो या मंचावर धागा येता माझा ओळखाल का कुणी खरे मला ? शोधून दाखवा आंजावर

झेन Sun, 05/05/2019 - 16:34
आता थांबणे नाही, नुसते धागे काढून होणाऱ्या टींगलटवाळी ला मराठी माणूस घाबरणार नाही, आता कवितेचा मळाही फुलवावा लागणार हे तो स्वामिंची १ नंबर ईच्छा

दुर्गविहारी Sun, 05/05/2019 - 17:11
घाबरु नका स्वामि ! मी तुमच्या पाठीशी आहेच. मराठी माणसाचे हीत न बगवनारे असल्या दुत्त दुत्त नाखुचाचांकडे तुम्हि लक्ष देउ नका. तुमची धाग्यांची कुरपा अखंडित राहु देत. आणखी असेच धागे निगावेत हि तो स्वामींची, चुकले श्रींची ईच्छा. ;-)

In reply to by दुर्गविहारी

नाखु Sun, 05/05/2019 - 17:40
खैर समज होतोय,हे पुष्प स्वामीचरणी समर्पित केले आहे,तुम्ही आणंदावर वीरझण टाकले नाही आणि सांभासिकी दिली तर अजून मोठा पुच्छगुच्छ स्वामींना अर्पण करीन. शुद्धलेखन आणि वाक्यरचना फाट्यावर मारणे हेच मराठी माणसाचे आद्यकर्तव्य हीच स्वामिशिकरण स्वामिशिकवण अज्ञ बालक नाखु

भंकस बाबा Mon, 05/06/2019 - 08:03
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल. नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?

भंकस बाबा Mon, 05/06/2019 - 08:03
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल. नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?

टर्मीनेटर Mon, 05/06/2019 - 10:36
कविता वाचनात फारसे स्वारस्य नसलेल्या माझ्या सारख्या वाचकांच्या मनात कवितेबद्दल रुची निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे तुमच्या लेखणीत. मजा आली वाचायला!

वकील साहेब Mon, 05/06/2019 - 13:06
नाखू आणि खिलजी दोघांच्याही कविता एकच नंबर. मजा आली वाचतांना. तुमच्या कवितेचे प्रेरणास्त्रोतांनी यातून काही अर्थबोध घेतला तर कवितेचे व्रत सुफळ संपूर्ण झाले म्हणायचे.
स्वामी चरणी समर्पित ... डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला वाचण्यातील साधेपणा संपू लागला तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच.... तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा आशयाची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला हेतूच दिसेनासा झाला ! धागा काढल्यावर चर्चा होईलच हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा उगाचच हसे होताना, होउ द्यावे मुळातच धागा बदबदा काढू नये वाचकांना कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये..... धागा काढण्याची तल्लफ मात्र.....?? तल्लफ काही माझ्या आधी

दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)

चित्रगुप्त ·

नाखु Mon, 04/08/2019 - 09:38
आणि अंगावर येणारी कविता. खरेच या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट

In reply to by नाखु

चौथा कोनाडा Tue, 04/09/2019 - 16:58
या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट
खरं आहे. आणखी याच्या भोवतीचे सुद्धा याच हालात मध्ये !

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त हॅज हिज ओन क्लास ! वरील चित्रे आणी कविता अप्रतिम ! अजुन चित्रांच्या , चित्रकेलेवरच्या लेखानाच्या प्रतिक्शेत !!

खिलजि Wed, 04/10/2019 - 18:23
खरंच भयाण वाटली वाचून .. अजून काय बोलणार ... इथे ते नाखूसाहेब म्हणतात त्याप्रमाणे यीअर एंडिंग , बोनस वगैरे काही नाही . ना कसली जिंदगानी , ना भविष्यातली तरतूद ,,,

सुबोध खरे Wed, 04/10/2019 - 18:59
या व्यवसायाचे भयाण वास्तव अस्वस्थ करणारे आहे. सर्वसाधारणपणे वारयोषितांचे आयुष्यमान ४० वर्षे एवढेच आहे. आणि बहुतांश त्या १४ ते १६ वर्षाला या व्यवसायात ढकलल्या जातात. ज्यांना याची प्राथमिक माहिती हवी असेल त्यांनी खालील दुवा उघडून पाहावा PROSTITUTION IN INDIA(२०१५) http://factsanddetails.com/india/People_and_Life/sub7_3h/entry-4190.html

कर्नलतपस्वी Mon, 08/07/2023 - 18:07
यावर जास्त लिहीण्याची हिम्मत नाही. आतापर्यंत जे काही वाचनात आले त्यामधे अनिल कांबळे याच्या "त्या कोवळ्या फुलांचा"ह्या गझलेच्या तोडीचे साहित्य वाचनात आले नाही. गझल ऐकताना हृदय पिळवटून येते. https://youtu.be/BMNQF1OfHWQ

चौथा कोनाडा Mon, 08/07/2023 - 23:00
भयाण वास्तव ... भारी लिहिलंय ! शेवटचे ३-४ परिच्छेद वाचताना कातर झाल्या सारखे वाटले ! ले. समीरबापु गायकवाड यांनी त्यांच्या खूलूस या पुस्तकात अश्या रेड लाईट जगाचा आणि अश्या दुर्दैवी स्त्रीयांच्या आयुष्याचा वेध आणि शोध घेतलाय ! जरुर वाचा ते पुस्तक. त्यांच्या फेबु पेज वर पण त्यातली काही प्रकरणे आहेत !

नाखु Mon, 04/08/2019 - 09:38
आणि अंगावर येणारी कविता. खरेच या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट

In reply to by नाखु

चौथा कोनाडा Tue, 04/09/2019 - 16:58
या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट
खरं आहे. आणखी याच्या भोवतीचे सुद्धा याच हालात मध्ये !

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त हॅज हिज ओन क्लास ! वरील चित्रे आणी कविता अप्रतिम ! अजुन चित्रांच्या , चित्रकेलेवरच्या लेखानाच्या प्रतिक्शेत !!

खिलजि Wed, 04/10/2019 - 18:23
खरंच भयाण वाटली वाचून .. अजून काय बोलणार ... इथे ते नाखूसाहेब म्हणतात त्याप्रमाणे यीअर एंडिंग , बोनस वगैरे काही नाही . ना कसली जिंदगानी , ना भविष्यातली तरतूद ,,,

सुबोध खरे Wed, 04/10/2019 - 18:59
या व्यवसायाचे भयाण वास्तव अस्वस्थ करणारे आहे. सर्वसाधारणपणे वारयोषितांचे आयुष्यमान ४० वर्षे एवढेच आहे. आणि बहुतांश त्या १४ ते १६ वर्षाला या व्यवसायात ढकलल्या जातात. ज्यांना याची प्राथमिक माहिती हवी असेल त्यांनी खालील दुवा उघडून पाहावा PROSTITUTION IN INDIA(२०१५) http://factsanddetails.com/india/People_and_Life/sub7_3h/entry-4190.html

कर्नलतपस्वी Mon, 08/07/2023 - 18:07
यावर जास्त लिहीण्याची हिम्मत नाही. आतापर्यंत जे काही वाचनात आले त्यामधे अनिल कांबळे याच्या "त्या कोवळ्या फुलांचा"ह्या गझलेच्या तोडीचे साहित्य वाचनात आले नाही. गझल ऐकताना हृदय पिळवटून येते. https://youtu.be/BMNQF1OfHWQ

चौथा कोनाडा Mon, 08/07/2023 - 23:00
भयाण वास्तव ... भारी लिहिलंय ! शेवटचे ३-४ परिच्छेद वाचताना कातर झाल्या सारखे वाटले ! ले. समीरबापु गायकवाड यांनी त्यांच्या खूलूस या पुस्तकात अश्या रेड लाईट जगाचा आणि अश्या दुर्दैवी स्त्रीयांच्या आयुष्याचा वेध आणि शोध घेतलाय ! जरुर वाचा ते पुस्तक. त्यांच्या फेबु पेज वर पण त्यातली काही प्रकरणे आहेत !
प्रेरणा: दाराआडची मुलगी. . चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्‍याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ... तिकडे दूर इस्माईल बसला आहे... . केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...

परत पेटेल मेणबत्ती

खिलजि ·
लेखनविषय:
काव्यरस
परत पेटेल मेणबत्ती येईल नवा कायदा वणवा आता मंदिरात पोहोचलाय पुन्हा हवीय रक्तरंजित क्रांती षंढ अजून करणार तरी काय कायद्याच्याच गळ्यात पळवाटेचे पाय पहिली झाडं तोडली जायची नंतर रोपांवर आली हि भें_द जमात आता कळ्यांची खुडणी चालू आहे बुद्धी गेलीय सर्वांची जणू कोमात मथळे भरून येतील अजून काही दिवस असतील रकानेच्या रकाने लढा चालेल दोन्ही बाजूस न्याय मिळेल कैक युगाने तोवर पुन्हा कळ्या खुरडल्या जातील पुन्हा मेणबत्त्या पेटतील पुन्हा येईल नवा कायदा येतील नवीन पळवाटा षंढ असेच बघत राहतील ते तसंच असेल चित्र ..

नवा कवी

गबाळ्या ·
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

हे फक्त माणसातच !

शिव कन्या ·

एस Fri, 04/07/2017 - 19:36
पुढील 'फक्त माणसांत' कवितेच्या प्रतीक्षेत. काही दिवसांपूर्वीच तुमची आठवण काढली होती. छान कविता.

एस Fri, 04/07/2017 - 19:36
पुढील 'फक्त माणसांत' कवितेच्या प्रतीक्षेत. काही दिवसांपूर्वीच तुमची आठवण काढली होती. छान कविता.
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

!!...'मानवी भूकंप'...!!

बटाटा चिवडा ·
काव्यरस
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत

(शीर्षक सुचले नाही )

कवि मानव ·

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy

In reply to by चांदणे संदीप

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 18:28
धन्यवाद...Sandy आणि खरंच खूप छान ओळी लिहिल्या आहेस तू (औपचारिकता ना ठेवता) आणि ही कविता वाचून तुला काही तरी सुचला याचा आनंद आहे !!

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy

In reply to by चांदणे संदीप

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 18:28
धन्यवाद...Sandy आणि खरंच खूप छान ओळी लिहिल्या आहेस तू (औपचारिकता ना ठेवता) आणि ही कविता वाचून तुला काही तरी सुचला याचा आनंद आहे !!

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवत सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !!