Skip to main content

बिभत्स

मानवतेचं कलेवर

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 23/04/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

बोटावर शाईचा अजून रंग ओला

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 17/11/2019 या दिवशी प्रकाशित केले.
बोटावर शाईचा अजून रंग ओला माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला विश्वासून तुझीयावर मते तूला दिली राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला पैजारबुवा,

(धागा काढण्याची तल्लफ)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 03/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी चरणी समर्पित ... डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला वाचण्यातील साधेपणा संपू लागला तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच.... तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा आशयाची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला हेतूच दिसेनासा झाला ! धागा काढल्यावर चर्चा होईलच हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा उगाचच हसे होताना, होउ द्यावे मुळातच धागा बदबदा काढू नये वाचकांना कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये..... धागा काढण्याची तल्लफ मात्र.....?? तल्लफ काही माझ्या आधी

दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 08/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दाराआडची मुलगी. . चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्‍याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ... तिकडे दूर इस्माईल बसला आहे... . केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...

परत पेटेल मेणबत्ती

लेखक खिलजि यांनी सोमवार, 16/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
परत पेटेल मेणबत्ती येईल नवा कायदा वणवा आता मंदिरात पोहोचलाय पुन्हा हवीय रक्तरंजित क्रांती षंढ अजून करणार तरी काय कायद्याच्याच गळ्यात पळवाटेचे पाय पहिली झाडं तोडली जायची नंतर रोपांवर आली हि भें_द जमात आता कळ्यांची खुडणी चालू आहे बुद्धी गेलीय सर्वांची जणू कोमात मथळे भरून येतील अजून काही दिवस असतील रकानेच्या रकाने लढा चालेल दोन्ही बाजूस न्याय मिळेल कैक युगाने तोवर पुन्हा कळ्या खुरडल्या जातील पुन्हा मेणबत्त्या पेटतील पुन्हा येईल नवा कायदा येतील नवीन पळवाटा षंढ असेच बघत राहतील ते तसंच असेल चित्र ..
काव्यरस

नवा कवी

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 06/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

हे फक्त माणसातच !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 07/04/2017 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 05/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत
काव्यरस

(शीर्षक सुचले नाही )

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 03/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवत सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !!
काव्यरस