साहित्यिक

सुख

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
4 Mar 2016 - 3:00 pm

हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
     कळाले सापडल्यानंतर!

तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
     कळाले सापडल्यानंतर!

भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
     कळाले सापडल्यानंतर!

शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
     कळाले सापडल्यानंतर!

- संदीप चांदणे

कविता माझीमुक्त कविताशांतरसकलाकवितामुक्तकसाहित्यिक

Mission भगीरथ

आदित्य अनिल रुईकर's picture
आदित्य अनिल रुईकर in जनातलं, मनातलं
27 Feb 2016 - 10:14 pm

नमस्कार,

मी Advocate आदित्य रुईकर.

मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली.

माझ्या या कादंबरी चे नाव आहे.... " मिशन भगीरथ" आणि त्याचे कथानक थोडक्यात असे आहे की,

साहित्यिकkathaaप्रकटनविचारआस्वादलेखमाहितीप्रतिभाविरंगुळा

Mission भगीरथ

आदित्य अनिल रुईकर's picture
आदित्य अनिल रुईकर in जनातलं, मनातलं
27 Feb 2016 - 10:11 pm

नमस्कार,

मी Advocate आदित्य रुईकर.

मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली.

साहित्यिकkathaaप्रकटनविचारआस्वादलेखमाहितीप्रतिभाविरंगुळा

साहित्याचे मारेकरी - चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता.

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 4:31 am

आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते. थोडेसे त्याच्याविषयी आणि त्याच्या सारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हणतोय.

साहित्यिकविचार

घोळक्याने केले जाणारे 'वर्तमानपत्री' लिखाण- आणि नव्या लेखनाविषयीची असहिष्णुता- भाग एक

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 1:28 am

मिपावर मी दोन दिवसांपूर्वीच आलो आहे. तसे मिपाचे वाचन खूप दिवसांपासून करत आहे. आज आल्या आल्या एक शाब्दिक चकमक झाली जिच्यामुळे हा लेख लिहिणे महत्वाचे वाटले.

साहित्यिकविचार

ढग, पाउस, आठवणी आणि भावना यांच्यात काही नाते आहे का?

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
24 Feb 2016 - 4:44 pm

औरंगाबादला सकाळपासूनच आभाळात काळसर ढगांची गर्दी झालीये... बऱ्याच दिवसांनी कम्प्युटरवर काम करत असताना खिडकी बाहेर दुपारच्या ३ वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी नारळाची पाने खूपच सुखद वाटली. मग काम बंद करून बाहेर येउन बसलो.एरवी मला लहानपण, शाळा, पाऊस यांच्याविषयी बोलणं भावनाप्रधान आणि मूर्खपणाच वाटतं पण या प्रचंड शहरात, माणसांच्या गर्दीत, आठ-आठ दहा-दहा मजली इमारतींमध्ये, आपण येउन पडलो हे वाईट कि चांगले हे कळायला मार्ग नाही.

साहित्यिकविचार

प्रेम !!! ???

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 8:20 pm

प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण!

आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो.

मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला.

वावरवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखप्रतिभाविरंगुळा

चाफा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
4 Feb 2016 - 10:58 am

वाटेवरी कुणाच्या
आहे अजून चाफा!
मंद परी जीवघेणा,
आहे तसा पसारा!

ऊन उठून येते रात्री,
घर गोळा होते नेत्री!
कुणी दिसते, कुणी विरते!
परी चाफ्यापाशी सारे,
हताश होऊन बसते!

मंद परी जीवघेणा
आहे तसा पसारा
वाटेवरी कुणाच्याही
असू नये गं चाफा!

-शिवकन्या

कविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुणबालकथाकविताप्रेमकाव्यसाहित्यिकदेशांतर

साहित्यिक कसले हे !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
16 Jan 2016 - 5:21 pm

साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

धोरणमांडणीसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियालेखअनुभवमतशिफारससल्ला