( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
पेरणा अर्थातच
(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )
मुलगी घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.
फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा
आठवड्याची भाजी, मसाले, लोणची..
बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..
तुझ्या हातचे लाडू याला फार आवडतात असे म्हणून केलेले
दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..
कधी ब्यागेत भरते कोण जाणे!
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
गीत गाऊन
रितं होताना
विवेक प्रगल्भ
निर क्षीर होताना
तारुण्यातला
अनुभव
पुन्हा जगताना
रितेपण
अधिक मोकळेपणाने
भरुन काढताना
नेमकं कोण कोण
तरुण होत ?
कवि, कविचे
अनुभव भावना
प्रेरणा नी कल्पना
की वाचकाची
अनुभूती ?
पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! )
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा
मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा.
तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी,
ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा.
व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला
निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा?
कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे
थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा?
या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां
आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा?
( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))
वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली.
आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली.
अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग
त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग!
बागडू लागलं,खेळू लागलं,
माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!
बरच खेळल्यावर मग, त्यालाही पेंग आली.
पण तोपर्यंत आमची ,पहाट लाले लाल झाली.
मेली झोप, मोडून अंगं!
मीच दिली मग, कोंबड्यासारखी बांगं!
अश्या अवस्थेत, उठून आवरायला,
झुलतच मी गेलो, टॉवेल धरायला!
धरला टॉवेल ओ-रडली ही,
मला म्हणते, "गाऊन सोडा...शीSssssss!"
स्वामी चरणी समर्पित
...
डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....
तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये