मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अपघात

मालविका ·

योगी९०० Tue, 04/22/2014 - 10:29
मी सुद्धा सुन्न..!! आपण रडत बसण्यापेक्षा आईला आधार देन महत्वाच हे त्यांना न सांगताच कळल . आता तिघीही सावरल्या आहेत . हे वाचून थोडे का होईना बरे वाटले. डिसेंबर २०१३ ला सावंतवाडी जवळ माझे दोन चुलत भाऊ (जे एकमेकांचे सख्खे भाऊ होते) असेच अपघातात गेले. गोव्याजवळ त्यांच्या दुचाकीला चुकीच्या बाजूने येणारा दुचाकीस्वार धडकला. दुसरा दुचाकीस्वाराने काही विचार न करता ट्रकला ओवरटेक करायच्या नादात त्याची गाडी रस्त्यामध्ये आणली आणि त्याचवेळी माझ्या भावांची आणि त्यांची जोरदार टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की माझे दोन भाऊ आणि दुसर्‍या दुचाकीवरचे दोघेही जागीच गेले (त्यातील दोन्ही दुचाकी चालवणार्‍यांनी हेल्मेट घातले असून सुद्धा) . माझ्या भावांचा दोष एवढाच की जरी ते त्यांच्या लेन मध्ये होते, तरी त्यांचा वेग जास्त होता (८० kmph असावा). दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्याने या अपघातात कोणीच वाचू शकले नाही. त्यातील मोठ्या भावाचा लग्नाचा पहिला वाढदिवस दुसर्‍या दिवशी होता. आज मला काका काकूंकडे पहावत नाही. अजून आम्ही सावरलो असे म्हणता येत नाही. त्या दिवशी सकाळी निघताना गडबडीत त्यांनी पाणी प्यायचे नाकारले. जर ते दोन-तीन सेकंद जरी थांबले असते तर ती वेळ टळली असती असे वाटते...

प्रभाकर पेठकर Tue, 04/22/2014 - 16:41
Speed thrills but speed kills. असे म्हणतात. जे चालक, मग ते चारचाकीचे असोत की दुचाकीचे, रस्त्याचे धोक्याचे फलक न वाचता किंवा वाचून दुर्लक्ष करून वाहन चालवितात ते स्वतःच्या आणि आपल्याबरोबर इतर निष्पाप जीवांच्या अंतास कारणीभूत ठरतात. मी जेंव्हा प्रथम मोटरसायकल घेतली तेंव्हा माझ्या तत्कालीन साहेबांनी मला सल्ला दिला होता. 'वाहनाचं इंजिन ही एक ताकद आहे. आपल्या शारीरिक ताकदीच्या कितीतरी पट जास्त अशी ही ताकद आहे. तिच्यावर कायम तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. ज्या क्षणाला ती राक्षसी ताकद तुमच्यावर नियंत्रण मिळविते तेंव्हा ती तुम्हाला संपवू शकते. दयामाया न दाखवता. तेंव्हा सांभाळून चालव.' आजतागायत तो सल्ला मी पाळत आलो आहे. दुसरं असं की स्वतः चुक न करता वाहन चालविणे म्हणजे उत्तम चालक नाही तर इतरांच्या होऊ शकणार्‍या चुका लक्षात घेऊन अपघात टाळणं हेही उत्तम चालकासाठी अत्यंत आवश्यक असतं. क्षणैक मोहाला चालक बळी पडतो, आणि खरोखर बळी पडतो. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हे चेष्टेवारी नेण्याचे वाक्य नाही.

पैसा Tue, 04/22/2014 - 20:24
किती भयंकर! पण अशा वेळी कुठून तरी मनाला सगळं सहन करायची ताकद येते. वय लहान असताना सावरणं जरा सोपं जातं, पण उतारवयात मुलांचा मृत्यू बघावा लागणं यासारखं दुर्दैव नाही. :(

योगी९०० Tue, 04/22/2014 - 10:29
मी सुद्धा सुन्न..!! आपण रडत बसण्यापेक्षा आईला आधार देन महत्वाच हे त्यांना न सांगताच कळल . आता तिघीही सावरल्या आहेत . हे वाचून थोडे का होईना बरे वाटले. डिसेंबर २०१३ ला सावंतवाडी जवळ माझे दोन चुलत भाऊ (जे एकमेकांचे सख्खे भाऊ होते) असेच अपघातात गेले. गोव्याजवळ त्यांच्या दुचाकीला चुकीच्या बाजूने येणारा दुचाकीस्वार धडकला. दुसरा दुचाकीस्वाराने काही विचार न करता ट्रकला ओवरटेक करायच्या नादात त्याची गाडी रस्त्यामध्ये आणली आणि त्याचवेळी माझ्या भावांची आणि त्यांची जोरदार टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की माझे दोन भाऊ आणि दुसर्‍या दुचाकीवरचे दोघेही जागीच गेले (त्यातील दोन्ही दुचाकी चालवणार्‍यांनी हेल्मेट घातले असून सुद्धा) . माझ्या भावांचा दोष एवढाच की जरी ते त्यांच्या लेन मध्ये होते, तरी त्यांचा वेग जास्त होता (८० kmph असावा). दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्याने या अपघातात कोणीच वाचू शकले नाही. त्यातील मोठ्या भावाचा लग्नाचा पहिला वाढदिवस दुसर्‍या दिवशी होता. आज मला काका काकूंकडे पहावत नाही. अजून आम्ही सावरलो असे म्हणता येत नाही. त्या दिवशी सकाळी निघताना गडबडीत त्यांनी पाणी प्यायचे नाकारले. जर ते दोन-तीन सेकंद जरी थांबले असते तर ती वेळ टळली असती असे वाटते...

प्रभाकर पेठकर Tue, 04/22/2014 - 16:41
Speed thrills but speed kills. असे म्हणतात. जे चालक, मग ते चारचाकीचे असोत की दुचाकीचे, रस्त्याचे धोक्याचे फलक न वाचता किंवा वाचून दुर्लक्ष करून वाहन चालवितात ते स्वतःच्या आणि आपल्याबरोबर इतर निष्पाप जीवांच्या अंतास कारणीभूत ठरतात. मी जेंव्हा प्रथम मोटरसायकल घेतली तेंव्हा माझ्या तत्कालीन साहेबांनी मला सल्ला दिला होता. 'वाहनाचं इंजिन ही एक ताकद आहे. आपल्या शारीरिक ताकदीच्या कितीतरी पट जास्त अशी ही ताकद आहे. तिच्यावर कायम तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. ज्या क्षणाला ती राक्षसी ताकद तुमच्यावर नियंत्रण मिळविते तेंव्हा ती तुम्हाला संपवू शकते. दयामाया न दाखवता. तेंव्हा सांभाळून चालव.' आजतागायत तो सल्ला मी पाळत आलो आहे. दुसरं असं की स्वतः चुक न करता वाहन चालविणे म्हणजे उत्तम चालक नाही तर इतरांच्या होऊ शकणार्‍या चुका लक्षात घेऊन अपघात टाळणं हेही उत्तम चालकासाठी अत्यंत आवश्यक असतं. क्षणैक मोहाला चालक बळी पडतो, आणि खरोखर बळी पडतो. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हे चेष्टेवारी नेण्याचे वाक्य नाही.

पैसा Tue, 04/22/2014 - 20:24
किती भयंकर! पण अशा वेळी कुठून तरी मनाला सगळं सहन करायची ताकद येते. वय लहान असताना सावरणं जरा सोपं जातं, पण उतारवयात मुलांचा मृत्यू बघावा लागणं यासारखं दुर्दैव नाही. :(
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबई पुणे एक्प्रेस हायवे वर होणार्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच रस्त्यावर एके दिवशी माझ्या आतेभावाचा देखील अपघात झाला आणि त्यातच तो गेला . मागच्या डिसेंबर महिन्यात आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा याच रस्त्यावर अपघात झाला ज्यात हे दोनही गुणी कलावंत प्राणास मुकले . त्यानंतर बरोबर एका महिन्याने अगदी त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात माझा भाऊ यज्ञेश्वर फाटक हाही गेला . अत्यंत दुर्दैवी अशी हि घटना झाली . आम्ही त्याला बंडू दादा म्हणायचो . तो LIC मध्ये कामाला होता .

व्यवहारज्ञान (३)

मनीषा ·

पैसा Mon, 04/21/2014 - 21:35
रहस्याचे उकल आवडली. केवळ तर्काच्या मदतीने खुन्यापर्यंत पोचणारी मूळ कथा आणि तिचा भावानुवाद मस्तच!

In reply to by पैसा

मनीषा Tue, 04/22/2014 - 20:06
अगदी खरं ़..... केवळ तर्कं पण वस्तुनिष्ठं माहिती, त्याचे विश्लेषण , निरिक्षण, आणि त्यावरून काढलेले अनुमान या वर आधारित असलेला. नाहीतर हवेत केलेले तर्कं हवेत विरून जातात .

Prajakta२१ Mon, 04/21/2014 - 22:19
मागे मी मिरर cracked नावाचे अगाथा ख्रिस्तीचे पुस्तक वाचले होते होते त्यात पण अशीच उकल आहे अगदी त्याचीच आठवण झाली सुंदर अनुवाद…। धन्यवाद :-)

In reply to by Prajakta२१

मनीषा Wed, 04/23/2014 - 20:57
हो बरोबर आहे ती एक पूर्णं कादंबरी आहे नाव आहे The mirror crack'd from side to side Out flew the web and floated wide; The mirror crack'd from side to side; 'The curse is come upon me,' cried The Lady of Shalott Alfred Tennyson अचानक सत्यं सामोरे आल्यावर स्तंभीत झालेल्या स्त्री चे उद्गार आहेत ते .

सखी Wed, 04/23/2014 - 01:15
मराठी रुपांतर आवडलं, अजुन वाचायलाही आवडेल अर्थात तुम्हाला वेळ झाला तर.

पैसा Mon, 04/21/2014 - 21:35
रहस्याचे उकल आवडली. केवळ तर्काच्या मदतीने खुन्यापर्यंत पोचणारी मूळ कथा आणि तिचा भावानुवाद मस्तच!

In reply to by पैसा

मनीषा Tue, 04/22/2014 - 20:06
अगदी खरं ़..... केवळ तर्कं पण वस्तुनिष्ठं माहिती, त्याचे विश्लेषण , निरिक्षण, आणि त्यावरून काढलेले अनुमान या वर आधारित असलेला. नाहीतर हवेत केलेले तर्कं हवेत विरून जातात .

Prajakta२१ Mon, 04/21/2014 - 22:19
मागे मी मिरर cracked नावाचे अगाथा ख्रिस्तीचे पुस्तक वाचले होते होते त्यात पण अशीच उकल आहे अगदी त्याचीच आठवण झाली सुंदर अनुवाद…। धन्यवाद :-)

In reply to by Prajakta२१

मनीषा Wed, 04/23/2014 - 20:57
हो बरोबर आहे ती एक पूर्णं कादंबरी आहे नाव आहे The mirror crack'd from side to side Out flew the web and floated wide; The mirror crack'd from side to side; 'The curse is come upon me,' cried The Lady of Shalott Alfred Tennyson अचानक सत्यं सामोरे आल्यावर स्तंभीत झालेल्या स्त्री चे उद्गार आहेत ते .

सखी Wed, 04/23/2014 - 01:15
मराठी रुपांतर आवडलं, अजुन वाचायलाही आवडेल अर्थात तुम्हाला वेळ झाला तर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ : http://misalpav.com/node/27627 भाग २ : http://misalpav.com/node/27650 ******** आता मी माझ्या चौकशीचा रोख परत एकदा 'मेरी हिल' कडे वळवला. मेरी हिल ही त्या हॉटेल मध्ये चेंबर मेड म्हणून अनेक वर्षे नोकरी करत होती. मिसेस ऱ्होडस ला जिवंत पाहणारी बहुदा खुनी व्यतिरिक्त, तिच शेवटची व्यक्ती असावी. मी तिला प्रश्न न विचारता त्या दिवशी काय काय घडले याचे सविस्तर वर्णन करण्यास सांगितले. मेरी हिल ही क्राऊन हॉटेल ची एक कर्मचारी, चेंबर मेड आहे. ती त्या दिवशी नेहमीप्रमाणे मिसेस ऱ्होडसच्या खोलीत तिला लागणाऱ्या गरम पाण्याच्या बॉटल्स ठेवण्यासाठी गेली होती.

माझी बायपोलर डिसॉर्डर

शुचि ·

स्वतःचा असा अनुभव मिपासारख्या सार्वजनिक संस्थळावर टाकण्याचे मनोधैर्य आणि त्यामागची इतरांना फायदा व्हावा ही इच्छा केवळ स्पृहणीय आहे ! तुमचे कौतूक व अभिनंदन करायला शब्द नाहीत !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शुचि Mon, 04/21/2014 - 21:25
धन्यवाद इस्पिक एक्का जी. माझ्या ओळखीतील बर्‍याच जणांना तर माहीत आहेच पण या संस्थळाद्वारे जर अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच. उन्हाळा सुरु झाला की "मॅनिआ" ची बरीच लक्षणे दिसू लागतात उदाहरणार्थ - चिडचिडेपणा, अत्यंत वाईट प्रसंगांची ठुसठुसणारी आठवण..... सतत सतत आठवण येणे. पण आउषढे फाईन ट्यून केली की ही लक्षणे केवळ अंतर्धान पावतात.
विज्ञानाच्या प्रगतीला सलाम ज्याने अनेकांना नरकयातनांतून वाचविले. संशोधकांची तर मानवजात केवळ ऋणी आहे इतकेच म्हणेन.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अगदी असेच म्हणते. इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.

In reply to by मधुरा देशपांडे

शुची, इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम. -दिलीप बिरुटे

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी Mon, 04/21/2014 - 22:42
शुचि - हा लेख वाचल्यावर तुमच्या बद्दल वाटणारा आदर दुणावला. अवांतर - हा लेख वाचून झाल्यावर काही वर्षांपूर्वी वाचलेल्या 'शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी' या लेखाची आठवण झाली.

पैसा Mon, 04/21/2014 - 21:27
सांभाळ... कधीही वाटलं तर हाक मार. निदान तुझ्याशी बोलेन, आणखी काही करू शकणार नाही. तू काही लढाया लढून जिंकलीस, पण युद्ध चालूच आहे. मध्यंतरी तुझ्या कुटुंबापासून दूर रहावं लागलं तरी कोसळली नाहीस, तुझा अभिमान वाटला. तुझ्या नवर्‍याचंही प्रचंड कौतुक. अ बिग हग टू यू. :) तात्कालिक नैराश्य खूपजणांना येतं, पण अशा प्रकारच्या लोकांना न दिसणार्‍या पण भयंकर त्रासदायक आजाराने खचून न जाणं फार थोड्यांना जमतं. पुढच्या लढ्यासाठी शुभेच्छा!

In reply to by पैसा

सुबोध खरे Mon, 04/21/2014 - 23:38
"तुझ्या नवर्‍याचंही प्रचंड कौतुक." अगदी खरं. अशा आजारात बर्याच वेळेस त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण आपल्याला आजार आहे हे मनोरुग्णाला माहीतच नसते. त्यामुळे आपण विचित्र वागत आहोत हे रुग्णाला कळतच नसते.(lack of insight) पण त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला आपला जोडीदार विचित्र वागत आहे हे कळत असते आणि फार मनस्ताप सहन करावा लागतो. बरेच जोडीदार तेवढे धैर्य दाखवू शकत नाहीत त्यामुळे आजार लवकर बरा होत नाही. त्यांना( आपल्या श्रीयुतना) याबद्दल एक सलाम मनोरुग्णाच्या बरे होण्यात त्याच्या जोडीदाराचा/ कुटुंबाच्या आधाराचा फार मोठा वाटा असतो या साठी आपल्या श्रीयुत यांचे अतिशय कौतुक आहे. आणि आपले कौतुक अशासाठी कि आपल्याला मानसिक आजार आहे हे मोकळेपणाने सार्वजनिक मंचावर सांगण्याला फार मोठी हिम्मत लागते. शिवाय आपले अनुभव प्रांजळपणे मांडण्याला फार मोठे मनोधैर्य लागते हे आपण बहुजन हिताय दाखवत आहात याबाबत आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्वसाधारणपणे बाकी सारे रुग्ण आपल्या डॉक्टरना सार्वजनिक ठिकाणी छान ओळख दाखवतात पण मनोविकार तज्ञ तेवढे सुदैवी नसतात.

प्यारे१ Mon, 04/21/2014 - 21:30
>>> सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मुख्य घोळ इथेच असतो. शरीराला जसा आजार होतो तसा मनालाही होतो आणि तो बर्‍याच केसेस मध्ये बरा देखील होतो हे नीट 'पोचत' नाही. चित्रपटांमधे दाखवलेल्या अतिशयोक्ती आणि अतर्क्य घटनांंमुळे आणखीनच भीती निर्माण होते. दुर्दैवानं बाबा, बुवा नि महाराज ह्या 'अधिकार नसलेल्या पण विनाजबाबदारी पैसा मिळण्याच्या' क्षेत्रात मानसिक आजार असलेल्या लोकांना आणलं जातं नि आजार आणखीच बळावतात. मानसिक आजारांमध्ये बर्‍याचदा झालेल्या/ केलेल्या स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या कळत नकळत दुर्लक्षामुळं आजार बळावलेल्या स्थिती पर्यंत आल्यानंतरच रुग्ण डॉक्टरांकडं आणला गेलेला असतो. औषध अवघड नि दीर्घ काळ घेण्याचं प्रमुख कारण उशीरा आणलं जाणं हे आहे. वन स्टीच अ‍ॅट अ टाईम सेव्ह्स नाईन असं इथं घडत नाही कारण मानसिक आजाराबद्दल असलेली भीती नि अकारण अथवा सकारण असलेलं सामाजिक दडपण! बर्‍याच संस्था मानसिक आजारांबद्दल काम करत आहेत मात्र त्या पुरेशा नाहीत. त्या वाढायला हव्यातच. सातत्यानं आवश्यक त्यातही टीन एजेस मध्ये अत्यंत आवश्यक असलेलं मानसिक आरोग्याचं क्षेत्र खूपच दुर्लक्षित राहीलेलं आहे, आपल्या समाजाकडून ठेवलं गेलेलं आहे. - इंजिनिअरींग करताना अ‍ॅन्टी डिप्रेसण्ट टॅबलेट्स चा भरपूर उपयोग झालेला प्यारे

In reply to by अजया

सखी Mon, 04/21/2014 - 22:33
शुची ,तुझे कौतुक आणि हे इथे सांगण्याच्या धैर्याला सलाम. ब-याचदा फार उशीरा या गोष्टी लक्षात येतात, आणि नंतर हळहळ होते. खाली बहुगुणींनी दिलेली माहीतीही अतिशय उपयोगी आहे.

बहुगुणी Mon, 04/21/2014 - 22:29
"माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली...अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच " एका पूर्णपणे public अशा संस्थळावर इतक्या सरळपणे वास्तव मांडणं आणि आपल्या समस्येतून इतरांना मार्गदर्शन करणं ही खरी प्रगल्भता, hats off to you, शुचि! तुमच्या दीर्घारोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, आणि तुम्हाला व मदतीची गरज असणार्‍या इतर वाचकांना बायपोलर डिसऑर्डर या व्याधीसाठी उपयोगी पडावेत असे क्लिनिकल ट्रायल्स चे दुवे इथे मिळतील. आपल्या आसपास या व्याधीने त्रस्त असे कुणी असतील तर त्यांना कशी मदत करावी याची थोडक्यात माहिती (आधिक माहिती इथे मिळेल):
  • अशा रुग्णांना भावनिक आधाराची, सामंजस्याची, सहनशीलततेची आणि प्रोत्साहनाची गरज असते, ती ओळखा
  • अशा नातेवाईकांना, मित्र/मैत्रिणींना तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज असते, ती ओळखून त्यांचे घटना/अनुभव-वर्णन न तोडता लक्षपूर्वक ऐका, आणि त्यांच्याशी शांतपणे, पण धीर देऊन बोला.
  • त्यांची भीती कशाने (कोणत्या प्रसंगांत) वाढते ते समजून घ्या.
  • त्यांच्या बरोबर उत्साहवर्धक कार्यांत भाग घ्या, उदाहरणार्थ, जोडीने फिरावयास जाणे, सहलींना जाणे, इत्यादि.
  • वेळीच सुरू केलेल्या आणि चालू ठेवलेल्या योग्य औषधोपचारांनी ते खूप बरे होऊ शकतात याची त्यांना मधूनमधून आठवण करून देत जा.
  • आत्मघातक विचार ही एक टोकाजवळची पायरी असू शकते, तेंव्हा असे विचार त्यांनी कधी तुमच्याजवळ व्यक्त केले तर ते कधीही दुर्लक्षित करू नका; अशा घटना तत्काळ त्यांच्या कुटूंबातील जबाबदार व्यक्तिला आणि शक्य असेल तर त्यांच्या डॉक्टरला कळवा.

आजानुकर्ण Mon, 04/21/2014 - 22:53
You are not alone.... मला एक ते दीड वर्षे GAD आणि Panic Disorderचा त्रास झाला होता. चार-पाच किलोमीटर सहज पळू शकणाऱ्या, गडकिल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या मला दोन पायांवर उभे राहण्याचीही भीती वाटण्याइतका आत्मविश्वास गमावला होता. ऑफिसात मीटिंग वगैरे असताना अचानक चक्कर येऊन पडलो तर आधारासाठी भिंत किंवा खुर्ची जवळ असावी म्हणून धावतपळत आधीच मीटिंगमध्ये जाऊन सोयीस्कर जागा पकडल्याचे आठवले की आता हसू येते. मनावर कोरला गेलेला त्या आठवणींचा शेवटचा प्रसंग म्हणजे एकदा मॅनेजरने काही इनपुट्स घेण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये बोलावले होते. त्याची केबिन बरीच मोठी होती आणि उपलब्ध खुर्च्यांवर इतर दोघेजण बसले होते. भिंत बरीच लांब होती. आता केबिनमध्ये मधोमध उभे राहावे लागणार हे पाहूनच त्रिशंकू अवस्था होऊन गरगरल्यासारखे होऊ लागले. कसाबसा वेळ काढला. ते पाच मिनिट अक्षरशः पाच तासांसारखे वाटले होते. काय बोललो आठवत नाही. कदाचित त्यावर्षीचे अप्रेजल गंडले असावे. ;) मात्र या प्रसंगाने 'आधाराला काही सापडले नाही तरी आपल्याला उभे राहता येते व काहीही होत नाही' हे समजण्यास मदत झाली असावी असे वाटते. I think that was moment of realization. त्यानंतर हळूहळू औषधे कमी करण्याची डॉक्टरांना विनंती केली. मनोविकारतज्ज्ञांच्या उपचारांमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्याने बराच फायदा झाला. दवाखान्यात विविध प्रकारचे रुग्ण पाहून मनोविकारांबाबतची पुस्तकी नसलेली अशी नवी माहिती कळाली. गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आणि विथड्रॉल सिम्पटम्स फारच त्रासदायक होते. सुदैवाने गेली काही वर्षे कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही याचा आनंद वाटतो. इंटरनेटवर या विकारांबाबत जास्त शोधत बसू नका हा एक अनुभवाचा सल्ला. :) शुभेच्छा...

In reply to by आजानुकर्ण

शुचि Mon, 04/21/2014 - 22:56
आजानुकर्ण आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपली औषधे कमी झाली याचा आनंद आहे.
इंटरनेटवर या विकारांबाबत जास्त शोधत बसू नका हा एक अनुभवाचा सल्ला.
अगदी खरं आहे.

In reply to by किसन शिंदे

शुचि Mon, 04/21/2014 - 23:22
फक्त तज्ञ व्यक्तीच तो अदमासा घेऊ शकते. आपण लक्षणे सांगीतल्यावर, प्रश्नावली वगैरे भरुन घेऊन ते तुमची मुलाकत घेतात , प्रश्न विचारतात व काहीएक पद्धतीने निदान करतात. पण मॅनिया च्या फेझमध्ये अतिशय आनंदी व सकारात्मक (पॉझिटीव्ह) वाटते इतके की पेशंट रिस्की वागणूक देखील प्रदर्शित करतो. चूकीचे निर्णयही अति आत्मविश्वासाने घेतले जाऊ शकतात. मधे मधे अतिशय अ‍ॅग्रेसिव्ह वागणूकही घडते, चिडचिड्/इरिटेशन दिसून येते. विशेषतः उन्हाळ्यात मला हे त्रास जाणवतात. कटाक्षाने डोके थंड ठेवायच प्रयत्न आता करते कारण तेवढे आत्मभान डेव्हलप झाले आहे. पण औषधे लागतातच!!!!

In reply to by मुक्त विहारि

शुचि Mon, 04/21/2014 - 23:41
धन्यवाद मुवि. आयुष्यात माझी पुण्यराशी कामात आली असेल ते हा नवरा मिळण्यात. कारण त्याने इतका आधार दिला आहे. अन अजूनही एकमेव माझ्या प्रकृतीच्या दृष्टीने तो माझ्यावर सक्ती करतो, काळजी घेतो. मला व्यायाम हा रोजचा रोज करावाच लागतो नाहीतर आमच्यात खडाजंगी ठरलेली आहे. माझे खाणेपीणे/पथ्य स्ट्रीक्ट आहे. अर्थात फार फॅटी/जंक हे वर्जित बाकी काही नाही. झोपेची वेळ ठरल्याने खूप गोष्टी जसे कुटुंबाबरोबर रात्री पिक्चर पहात धमाल करणे हे वर्ज्यच झाले आहे. ज्या काळात माझी औषधे सापडत नव्हती त्या काळात त्याने कमालीचा पेशन्स दाखवला. म्हणजे नवरा आहे म्हणून नाही तर माझ्या हृदयात एक माणूस म्हणून इतकं ऊंच स्थान त्याने मिळवलय! आम्ही अनेक अनेक औषधे ट्राय केलेली शेवटी डॉक्टरांनी अ‍ॅबिलिफाय मला सुचवली. पण ती काही लागू पडेना तेव्हा याने बरोबर नीरीक्षण करुन डॉक्टरांना सुचविले की १००मिलीग्रॅम ऐवजी एकदा ५० मिलीग्रॅम ट्राय करुन पाहता का? कारण ती औषधांच्या मात्रांना फार सेन्सिटीव्ह आहे. अन डॉक्टरांनी ऐकले अन खरच गेली १० वर्षे ही माझी मूड स्टॅबिलायझर आहे. एकेक खरच ऋणानुबंधच्च्च असतात.

अनन्या वर्तक Tue, 04/22/2014 - 01:06
शुचि तुमच्या बद्दल मलाही आदर वाटतो. अगदी प्रामाणिक पणे स्वतःबद्दल लिहिले आहे तुम्ही. तुमचे पुढील आयुष्य असेच आनंदाचे आणि सुखाचे जावे म्हणून माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा.

आत्मशून्य Tue, 04/22/2014 - 01:21
वॉव! डिडंट सॉ इट कमींग... नाही, तुमच्या जालिय लिखाणात मिष्कीलता, वैताग, बालिशपणा, विज्ञान, काव्य, शास्त्र, विनोद, अध्यात्म, सुस्पष्ट तर्कसंगतीचा अभाव, वगैरे वगैरे वगैरे सर्व नेहमीच आढळले. आपल्या अगदी खुळचट लिखाणालाही एक सात्विक निरागसपणाची जोड दिसली, म्हणुनच जास्तिजास्त निखळ अल्लड छबीच कायम मनात उभी आहे. पॉइंट इज, कधिच म्हणजे कधिच अक्रस्ताळेपणा मात्र असा आढळला नाही. आणि तुम्ही स्वतःला बाइपोलार जाणता ...? ऐकावे ते नवलच. तुम्हाला मानाचा मुजरा, मैत्रीचा सलाम आणी (हा) प्रेमाचा प्रतिसाद.

दिव्यश्री Tue, 04/22/2014 - 01:38
शुचि ताई या प्रकारे लिहायला खरचं एक वेगळी ताकद लागते असे मला वाटते . ती फारच कमी लोकांकडे असते . नवर्‍याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही>>> तुमचे पूर्वसुकृत अन पुण्याइ असेलच . मला वाटते आपल्या आई - वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्याई देखील आपल्या पाठीशी असते कायमच . तुमच्या नवऱ्याला सलाम . जोडीदाराची अशा वेळेस फारच परवड होते . त्यांनी सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली . तुम्ही कधीही व्यनि करा , हाक मारा मला शक्य ते मी करण्यचा नक्की प्रयत्न करेन . देवाजवळ प्रार्थना करेन तुम्ही नेहमी आनंदी राहाव्यात . मनापासून शुभेच्छा . :)

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 01:51
आपले अभिनंदन व आपल्या पतीदेवांना धन्यवाद. देवाने त्यांनाही आपल्याला गरजेच्या वेळी याग्य प्रकारे साथ देण्याची सुबुद्धी दिली.खरे तर हे संस्कारच असतात, आई वडिलांनी त्यांना घडवताना दिलेले! त्यामुळे तुमच्या सासू सासरे यांनाही धन्यवाद. अशा या दुर्धर प्रसंगातून आपण व आपले कुटुंब तावून सुलाखून निघालेले आहे व आपल्याया खात्री आहे की कोण आपला सच्चा साथीदार आहे तो! आता एकच म्हणेन "कॅरम रमवानू, जूस पिबानू, मज्जानी life" फक्त Queen घेण्यासाठी(आपले goals साध्यकरण्यासाठीच) सदैव प्रयत्नशील रहा! लोकांच्या कल्याणासाठी खूप मोठे कार्य आपल्या हातून नक्कीच घडेल अशी आशा बाळगतो.

प्रभाकर पेठकर Tue, 04/22/2014 - 02:04
बापरे! वाचता वाचता माझेच हातपाय गार पडू लागले. किती भयंकर संकट तुमच्यावर, नवर्‍यावर, घरच्या सर्वांवर आलं होतं. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची निकड ओळखणं, प्रत्यक्ष तिथे जाणं, त्यांचं निदान मान्य करणं, औषधोपचाराला मान्यता, सकारात्मक प्रतिसाद देणं अनेक अनेक अडचणी. प्रत्येक पायरीवर माघारी फिरण्याची, नकारात्मक भूमिकेत शिरण्याची केव्हढी ती शक्यता. प्रत्येक क्षणाक्षणाला संघर्ष. स्वतःशीच. मला ह्यातून बाहेर पडायचंच ह्या निर्धारानेच. त्यातून होणारे क्लेष, ते सहन करण्याची मानसिक शक्ती.... सर्व सर्व जिवनच उध्वस्थावस्थेत जाण्याची भिती. ह्या सर्वावर तुम्ही मात केलीत. तुम्हाला सुज्ञ आणि धैर्यवान साथीदार लाभला हे तुमचे भाग्यच म्हंटले पाहिजे. त्यांचे मनभरून कौतुक. आहार, औषध, व्यायाम आणि निद्रा चारही सूत्रांवर तुमचे कायम नियंत्रण राहो आणि भविष्यातील आयुष्य निर्विघ्न पार पडो अशी इच्छा व्यक्त करतो.

अनुभवकथन आवडले, अगदी मनापासून, प्रामाणिकपणे लिहिले आहे त्यामुळे जास्तं भावला शुचीताई सिंपली ग्रेट ___/\___ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.

नंदन Tue, 04/22/2014 - 04:41
स्फुट आवडलं. माझ्या जवळच्या आप्तांपैकी एक व्यक्तीही बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. एका बुद्धिमान, आनंदी व्यक्तीचं मलूल, कुठलीच उमेद न राहिलेल्या डॉपलगॅन्गरमध्ये होणारं रुपांतर पाहणं फार त्रासदायक. लिथियम बेस्ड् औषधांनी फरक पडतो; पण प्रचंड झोप येणं, अनुत्साह वाटणं, भूक न लागणं - यासारख्या साईड इफेकख्यामुळे तो पर्यायही तितका व्यवहार्य नाही. तुमच्यासारखेच गुणकारी औषधांचे कॉकटेल कधीतरी सापडेल अशी आशा आहे.
तुम्हाला सुज्ञ आणि धैर्यवान साथीदार लाभला हे तुमचे भाग्यच म्हंटले पाहिजे. त्यांचे मनभरून कौतुक. आहार, औषध, व्यायाम आणि निद्रा चारही सूत्रांवर तुमचे कायम नियंत्रण राहो आणि भविष्यातील आयुष्य निर्विघ्न पार पडो अशी इच्छा व्यक्त करतो.
अगदी असेच.

In reply to by नंदन

शुचि Tue, 04/22/2014 - 19:31
नंदन, बायपोलर व्यक्तींनी रोजच्या रोज एका विशिष्ठ वेळी व्यायाम करणे हे अति-अति निकडीचे असते. I cannot enough iterate the importance of it. एक दिवस जरी मिस झाला तरी दुसर्‍या दिवशी लेथार्जिक वाटते,मूड एकदम ड्ल होऊन जातो वगैरे. हे त्या त्या औषधांच्या दुष्परीणामांमुळेच होते. पण त्यांच्यावर मात करायची असेल तर व्यायामाची जोड अति आवश्यक असते. अर्थात एवढं होऊनही सगळं आलबेल (परफेक्ट) वाटेलच असे नाही पण खूप सुधारणा जाणवते. किंबहुना मी वाचलेल्या माहीतीनुसार, व्यायाम हा शरीराच्या स्वास्थ्याहूनही जास्त मेंदूच्या स्वास्थ्यासाठी करायचा असतो.

शुचि Tue, 04/22/2014 - 04:44
सर्वच मिपाकरांचे आभार. खरं तर या विषयावर लिहायचे होते पण कसे अन कितपत ते कळत नव्हते. मूकवाचक, इस्पिक एक्का, वल्ली, शरद जी या सर्वांचे अन्य सुगरणी चे धागे वाचतानाच हे लक्षात आलेले की सारेजण त्यांना इण्टेन्सली जे वाटते , आवडते त्याबद्दल लिहितात अन त्यातून समाजाला, सर्वाना काहीतरी भरीव मिळते, वैचारिक चालना मिळते. मला या विषयावर सांगावेसे वाटत होते. अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही. त्यामुळे खूप दुवे व माहिती तर नाही देउ शकले पण अनुभवकथन मात्र १००% सत्य केले आहे.

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Tue, 04/22/2014 - 14:02
अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही. हे तसे योग्य करता. मलाही एक तुलनेत दुर्मिळ असा पोटाचा आजार आहे जो शरीराच्या बरेच ठिकाणी आघात करून जातो पण ते सारे होईलच असे नाही म्हणून मी सुद्धा त्यावर स्वतातर्फे संशोधन करत नाही अन्यथा नको ते नजरेस पडून ती भिती मनात राहील. डॉकने देखील अप्रत्यक्षपणे हाच सल्ला दिलाय. असो, बाकी हे लिहिण्याच्या धाडसाबद्दल प्रणाम सलाम नमस्ते ! तसेच तुमच्याकडे पाहता हे असे काही असू शकते हे तुम्हीच सांगितले नसते तर विश्वासही बसला नसता. याबद्दल विशेष कौतुक.

In reply to by तुमचा अभिषेक

तुमचा अभिषेक Tue, 04/22/2014 - 14:04
अरे हो आणि तुमच्या नवर्‍याचे कौतुक राहीलेच. मला वाटायचे की मीच काय तो एक जगात भारी नवरा आहे ;)

बोबो Tue, 04/22/2014 - 06:36
तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.

असं काही लिहायला आणि कबुली द्यायला प्रचंड मानसिक ताकद लागते. शुचि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जिद्दीला सलाम.
हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे
बी पॉसिटीव्ह. गर्तेमधुन बाहेर आला आहात. आपली पथ्यं व्यायाम पाळुन आयुष्य मस्त एंजॉय करा. कदाचित असही होईल लवकरं काही शोध लागेल आणि ह्याच्यावर कायमचा उपचार सापडेल. युनिव्हर्स गिव्ह्स यु व्हॉट यु क्रेव्ह फॉर, मे बी नॉट ईमिजिअटली बट ईव्हेच्युअली. :)

इरसाल Tue, 04/22/2014 - 09:18
झाले ते विसरा आणी पुन्हा जोमाने नव्या जीवनाला तुमच्या अत्यंतिक काळजी घेणार्‍या जोडीदाराबरोबर पुन्हा एकदा सामोरे जा. जीवनातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने उपभोगा.दोघांचे अभिनंदन आणी शुभेच्छा.

पेट थेरपी Tue, 04/22/2014 - 09:41
वाचून काळजी वाटली. अवघड असते हे सगळे. तुम्हाला व तुमच्या अहोंना हार्दिक शुभेच्छा. पुढील जीवनासाठी.

शाब्बास आहे तुमच्या नवर्‍याला आणि तुम्हालाही. मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने त्यांनी आणि तुम्ही आलेल्या आपत्तीचा मुकाबला केलात. पुढील वाटचाली साठी तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा. (लेख वाचता वाचता एक नवरा म्हणुन माझ्या कडुन झालेल्या चूकांची यादी माझ्या डोळ्या समोर तरळुन गेली आणि वाटलं त्यातल्या काही चूका टाळता आल्या असत्या तर बरं झाल असत.)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खरचं मी मिपाचा सदस्य आहे याचा आज अभिमान वाटतोय. बाकी
(लेख वाचता वाचता एक नवरा म्हणुन माझ्या कडुन झालेल्या चूकांची यादी माझ्या डोळ्या समोर तरळुन गेली आणि वाटलं त्यातल्या काही चूका टाळता आल्या असत्या तर बरं झाल असत.)
याच्याशी बाडीस.. :-(

सुधीर कांदळकर Tue, 04/22/2014 - 09:55
आवडले. आमच्या माजी शेजार्‍यांनी सुमारे १९८५ साली मला डॉ. श्रीकांत जोशी लिखित 'मनाचा मागोवा' नावाचे पुस्तक वाचायला दिले होते. त्यात बर्‍याच मानसिक विकारांचे वर्णन आहे. परंतु आता उपचारपद्धती बरीच बदलली आहे. त्या लेखकाच्या मते ज्याने मनोविकारावरच्या पहिल्या औषधाचा शोध लावला त्याला नोबेल मिळायला हवे होते. या मतात मनोविकारोपचाराचे महत्त्व आढळून येते. माझ्या एका डॉक्तर मित्राच्या मते समुपदेशनाने बर्‍याच प्रमाणात खिन्नता, भावनोद्दीपन वगैरेंवर ताबा मिळवता येतो. मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक हे बहुधा जोडीने उपचार करतात. समुपदेशक हा शक्यतो स्वभाषिकच असावा. त्यामुळे भावना आणि व्यथा अचूक व्यक्त करणे चांगले जमते. समाजातल्या निदान २० ते ३० टक्के व्यक्तींना समुपदेशनाची गरज आहे असे मला वाटते. त्यांच्यामुळेच वास्तुशास्त्र वगैरे थोतांडाचे अमाप पीक येते. आपल्या यजमानांना प्रणाम. चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.

शुचि आपल्या लिखाणावरुन मी हे निदान केव्हाच केले होते.फक्त ते व्यक्त केले नव्हते. कारण तसे ते व्यक्त करणे हे उचित ठरले नसते. आपले लिखाण हे प्रबोधनाचा उत्तम मार्ग आहे. शरिर जसे आजारी पडते तसे मन पडते, शरिराला जसे व्यायाम,स्वच्छता,डागडुजी आवश्यक असते तसे मनालाही. पण समाजाचा मानसिक आरोग्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन अजूनही मागासलेला आहे.तो मुख्यतः अज्ञानामुळे व पुर्वदूषितग्रहांमुळे.तो आपल्यासारख्या लोकांच्या प्रबोधनामुळे हळू हळू सुधारेल. मी स्वतः आयबीएस या पोटाच्या सायकोसोमॅटिक त्रासासाठी मानसोपचारतज्ञांची मदत घेतो. समाजात हळू हळू हा बदल होतो आहे ही मला समाधानाची बाब वाटते. अंधश्रद्धा व मनोविकार यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे हा विषयासाठी अंनिस मधे मानसमित्र या संकल्पनेचा व उपक्रमाचा उदय झाला आहे. असो आपल्या लेखाचा अनेकांना सकारात्मक उपयोग होणार आहे हे भाकित मी वर्तवतो :)

मदनबाण Tue, 04/22/2014 - 10:26
सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे म्हणजे त्यांच्याकडे जाणारी व्यक्ती ही गॉन केस आहे हा विचारच मुळात चुकीचा आहे.जशी शरिराला व्याधी होउ शकते तशीच अवस्था मनाची देखील होउ शकते. जर त्यातुन बाहेर पडणे शक्य असेल तर मग उपचार का घेउ नये ? त्यामुळे तुझे विशेष अभिनंदन ! ? :)

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 10:28
कडक सलाम! _/\_ मागे "कोणार्कची शिल्पे" आणि आता हे लेखन. मिपाकरांकडे मनातले खास काही उघड बोलायला लोकांना आवडते-जमते-चालते, हे मिपाच्या वातावरणाचेही यश आहे

In reply to by ऋषिकेश

शुचि Wed, 04/23/2014 - 21:59
मिपाकरांकडे मनातले खास काही उघड बोलायला लोकांना आवडते-जमते-चालते, हे मिपाच्या वातावरणाचेही यश आहे
:) हे वाक्य आपल्या मनाचा मोठेपणा दाखविते ऋषीकेश. आपल्याबद्दलचा आदर अधिक दुणावला.

In reply to by प्रचेतस

मृगनयनी Tue, 04/22/2014 - 10:53
शुचि. तुम्हाला _________/\_________ खरोखर हिम्मत लागते.. हे सगळं सहन करायला.. आणि तितक्याच धैर्याने लोकांसमोर मांडायला!!!.. रीअली हॅट्स ऑफ्फ!!!.....

रामदास Tue, 04/22/2014 - 10:57
आणि इतर मिपाकरांशी सहमत आहे. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा आजार संपणार असे म्हणण्यापेक्षा येणार्‍या प्रत्येक दिवसात हा आजार सोबत असण्याची शक्यता शून्याकडे जाईल असेच म्हणू या. शुभेच्छा.

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 11:53
किती वेगळी आहेस ग तू.. तुझं लिखाण नेहमीच वेगळं असतं.. म्हणजे त्यात एक निरागसपण आहे.. तुझ्या धाग्यांवर अनेकदा कुणी निगेटिव्ह केमेंट केली तरी तू ती अनेकदा सहजपणे स्वीकारतेस. तुझ्या त्या परवाच्या ऑफिसवरच्या धाग्यावर सुद्धा तू विरोधी कमेंट्सपण समजुन घेतल्यास.. आताही हा लेख वाचुन समजत नाहीये की काय बोलावं.. किती प्रांजळपणे लिहीलय.. मनापासुन.. तुला खरच सलाम! आणि हो तुझ्या नवर्‍यालाही!

अद्द्या Tue, 04/22/2014 - 12:22
काकू. . असं लिहायला जबरदस्त मानसिक ताकत लागते . तुम्हाला . आणि तुमच्या "ह्यांना" . . लैच कडक सेल्युट . . बाकी फक्त एवढंच करू शकतो . ________/\_________

शुचि Tue, 04/22/2014 - 14:11
इतक्या शुभेच्छा दिल्यात, मनोधैर्य वाढविलेत, कौतुक केलेत, इतकी परिपक्वता दाखविलीत काय बोलू. मला खूप बरे वाटले. रामदास म्हणतात तसे "प्रत्येक दिवस मला व्याधी पासून मुक्तच करतो आहे." ही भावनाच सुखावह आहे. कांदळकर यांनीही समुपदेशनाचा मांडलेला मुद्दा योग्यच आहे. पिरा म्हणते तशी - "विरोधी कमेंट्स समजून घेते" कारण मला माहीत आहे की I do not (absolutely) do not have luxury of excited mood, any unusal upheavals of mood. भावनोद्दॆपन टाळायचे (sorry I am typing on some site & copy pasting hence many typos) परत एकदा सर्वांचे आभार.

कवितानागेश Tue, 04/22/2014 - 14:18
खूप हिंमत आहे शुचि तुझ्याकडे. अगदी डॉक्टरचे निदान स्विकारण्यापासून आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार होण्यापासून खरोखरच खूप हिंमत दाखवली आहेस. त्यामुळेच तु त्यातून बाहेर पडलियेस आणि आनंदी राहू शकतेयस. असे स्वतःकडे नि:पक्षपाती द्रुष्टीनी पहायची हिम्मत सगळ्यांकडे नसते. उलट 'बाहेरच्या' कुठल्यातरी कारणाकडे बोट दाखवलं जातं. पण 'आत' काहीतरी बिघदलय, काहितरी कमी पडतय, त्यामुळे imbalance व्हायला बाहेरचे निमित्त पुरतंय, हे लक्षात घेतले जात नाही. मानसिक आजारांच्या बाबतीत तर नाहीच नाही, त्यामुळे बरेचवेळेस पुढचे उपाय करणंच शक्य होत नाही. आता सगळे उपाय करणं शक्य असतानाच्या काळात सुद्धा काही स्किझोफ्रेनिच/डिप्रेशनच्या पेशन्ट असलेल्या मुलींना परत माहेरी आणून सोडलेलं पाहिले आहे. त्या पाश्वभूमीवर, तुझ्या नवर्‍यानी मात्र कायम तुझ्या बाजूनी आणि तुझ्या आजाराविरुद्ध उभे रहाणं अगदी आदर्श म्हणावं असंच आहे. खरोखरचा 'सखा सोबती'. ग्रेट कपल. :)

श्रीगुरुजी Tue, 04/22/2014 - 14:31
प्रांजळ कथन आवडले. तुम्हाला आणि तुमच्या पतिदेवांना सलाम! उगाच ज्योतिषी, ग्रहशांती, फेंगशुई असले काहीतरी अशास्त्रीय करण्याऐवजी थेट डॉक्टरांकडे तुमची समस्या घेऊन गेल्यामुळेच लवकर समस्यामुक्त झालात. बायपोलर डिसऑर्डर असणारे इतरही काही जण असतील. अशांसाठी एखादा मदत/आधार गट असेल तर त्यात सामील होऊन इतरांना मदत करता येईल.

चिगो Tue, 04/22/2014 - 14:32
सर्वप्रथम तर एवढा समजूतदार नवरा मिळाला, ह्याबद्दल अभिनंदन.. त्यानंतर, मनोरोग म्हणजे फिल्मी स्टाईल वेडेपणा नसतो, आणि त्यावर उपाय आहेत हे समजुन उपचारांना सामोर्‍या गेल्यात, ह्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आणि, उपचार लागू पडल्याने तुम्ही आता सुखात आहात, ह्यासाठी त्रिवार अभिनंदन.. आता दाद घेण्याची पाळी.. स्वतःला एक मनोरोग होता, आहे हे खुल्या संस्थळावर सांगण्याची हिंमत दाखवलीत, त्या हिंमतीला दाद देतो.. ह्या लेखातून जर दुसर्‍या कुणाला त्रास असेल तर त्यानी तो ओळखावा आणि इलाज करावा म्हणून स्वतःची गोष्ट सांगितलीत, त्या नि:स्पृह वृत्तीची दाद देतो.. आणि तुमच्या पुढच्या सुखाच्या आणि समृद्धीच्या सहजीवनासाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा..

आरोही Tue, 04/22/2014 - 14:44
खरेच ग शुचीताई खूप कठीण काळातून गेलीयेस ग ...आणि धीराची आहेस हे सुद्धा पटले ..असा अनुभव सार्वजनिक स्थळी मांडायला खरेच खूप धैर्य हवे...hats off to you and your husband

सुबोध खरे Tue, 04/22/2014 - 14:50
शुचि ताई, कौतुक इ. इ. बरेच झाले. आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. आपल्याला त्यांच्या "अशा" प्रती-प्रतीसादाची अपेक्षा ठेवूनच वागावे लागेल. असे फार मोठ्या प्रमाणात भारतात समाजात होताना दिसते.

In reply to by सुबोध खरे

सूड Tue, 04/22/2014 - 15:02
>>आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. एखाद्याला असलेल्या आजाराच्या बाबतीत तरी मिपाकरांनी असं काही केलेलं अजून तरी पाहण्यात नाही. आधीही असा कोणाचा आजार उघडकीस आला/ त्या व्यक्तीने स्वतःहून मिपाकरांना सांगितला त्याला/तिला इथे समजून घेण्याचाच प्रयत्न केला गेला आहे.

In reply to by सूड

कवितानागेश Tue, 04/22/2014 - 15:11
निदान ९०% लोकांबद्दल खात्री आहे, की ते असे करणार नाहीत. आणि कुणी तसे केलंच तरी त्याचा त्रस करुन न घेण्याइतकी शुचि खंबीर आहे.

In reply to by सूड

सुबोध खरे Tue, 04/22/2014 - 15:12
सूड साहेब हाच मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक आहे. लोक वाद थांबवताना पटकन "अरे वो सायकिक केस है, जाने दो" असे म्हणून त्या रुग्णाला न भरून येणारी जखम करून जातात. आजाराचे सुद्धा उच्चभ्रू आणि गरीब असे प्रकार आहेत. चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच पन्नाशीचा माणूस चष्मा सहजपणे लावतो पण कानाचे यंत्र लावत नाही.

In reply to by सुबोध खरे

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:15
>>>चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे. :) खरंय! - डाव्या कानानं आजाबात ऐकू न येणारा आणि उजव्या कानाचं आप्रेशन झालेला ;)

स्वतःचा असा अनुभव मिपासारख्या सार्वजनिक संस्थळावर टाकण्याचे मनोधैर्य आणि त्यामागची इतरांना फायदा व्हावा ही इच्छा केवळ स्पृहणीय आहे ! तुमचे कौतूक व अभिनंदन करायला शब्द नाहीत !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शुचि Mon, 04/21/2014 - 21:25
धन्यवाद इस्पिक एक्का जी. माझ्या ओळखीतील बर्‍याच जणांना तर माहीत आहेच पण या संस्थळाद्वारे जर अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच. उन्हाळा सुरु झाला की "मॅनिआ" ची बरीच लक्षणे दिसू लागतात उदाहरणार्थ - चिडचिडेपणा, अत्यंत वाईट प्रसंगांची ठुसठुसणारी आठवण..... सतत सतत आठवण येणे. पण आउषढे फाईन ट्यून केली की ही लक्षणे केवळ अंतर्धान पावतात.
विज्ञानाच्या प्रगतीला सलाम ज्याने अनेकांना नरकयातनांतून वाचविले. संशोधकांची तर मानवजात केवळ ऋणी आहे इतकेच म्हणेन.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अगदी असेच म्हणते. इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.

In reply to by मधुरा देशपांडे

शुची, इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम. -दिलीप बिरुटे

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी Mon, 04/21/2014 - 22:42
शुचि - हा लेख वाचल्यावर तुमच्या बद्दल वाटणारा आदर दुणावला. अवांतर - हा लेख वाचून झाल्यावर काही वर्षांपूर्वी वाचलेल्या 'शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी' या लेखाची आठवण झाली.

पैसा Mon, 04/21/2014 - 21:27
सांभाळ... कधीही वाटलं तर हाक मार. निदान तुझ्याशी बोलेन, आणखी काही करू शकणार नाही. तू काही लढाया लढून जिंकलीस, पण युद्ध चालूच आहे. मध्यंतरी तुझ्या कुटुंबापासून दूर रहावं लागलं तरी कोसळली नाहीस, तुझा अभिमान वाटला. तुझ्या नवर्‍याचंही प्रचंड कौतुक. अ बिग हग टू यू. :) तात्कालिक नैराश्य खूपजणांना येतं, पण अशा प्रकारच्या लोकांना न दिसणार्‍या पण भयंकर त्रासदायक आजाराने खचून न जाणं फार थोड्यांना जमतं. पुढच्या लढ्यासाठी शुभेच्छा!

In reply to by पैसा

सुबोध खरे Mon, 04/21/2014 - 23:38
"तुझ्या नवर्‍याचंही प्रचंड कौतुक." अगदी खरं. अशा आजारात बर्याच वेळेस त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण आपल्याला आजार आहे हे मनोरुग्णाला माहीतच नसते. त्यामुळे आपण विचित्र वागत आहोत हे रुग्णाला कळतच नसते.(lack of insight) पण त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला आपला जोडीदार विचित्र वागत आहे हे कळत असते आणि फार मनस्ताप सहन करावा लागतो. बरेच जोडीदार तेवढे धैर्य दाखवू शकत नाहीत त्यामुळे आजार लवकर बरा होत नाही. त्यांना( आपल्या श्रीयुतना) याबद्दल एक सलाम मनोरुग्णाच्या बरे होण्यात त्याच्या जोडीदाराचा/ कुटुंबाच्या आधाराचा फार मोठा वाटा असतो या साठी आपल्या श्रीयुत यांचे अतिशय कौतुक आहे. आणि आपले कौतुक अशासाठी कि आपल्याला मानसिक आजार आहे हे मोकळेपणाने सार्वजनिक मंचावर सांगण्याला फार मोठी हिम्मत लागते. शिवाय आपले अनुभव प्रांजळपणे मांडण्याला फार मोठे मनोधैर्य लागते हे आपण बहुजन हिताय दाखवत आहात याबाबत आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्वसाधारणपणे बाकी सारे रुग्ण आपल्या डॉक्टरना सार्वजनिक ठिकाणी छान ओळख दाखवतात पण मनोविकार तज्ञ तेवढे सुदैवी नसतात.

प्यारे१ Mon, 04/21/2014 - 21:30
>>> सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मुख्य घोळ इथेच असतो. शरीराला जसा आजार होतो तसा मनालाही होतो आणि तो बर्‍याच केसेस मध्ये बरा देखील होतो हे नीट 'पोचत' नाही. चित्रपटांमधे दाखवलेल्या अतिशयोक्ती आणि अतर्क्य घटनांंमुळे आणखीनच भीती निर्माण होते. दुर्दैवानं बाबा, बुवा नि महाराज ह्या 'अधिकार नसलेल्या पण विनाजबाबदारी पैसा मिळण्याच्या' क्षेत्रात मानसिक आजार असलेल्या लोकांना आणलं जातं नि आजार आणखीच बळावतात. मानसिक आजारांमध्ये बर्‍याचदा झालेल्या/ केलेल्या स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या कळत नकळत दुर्लक्षामुळं आजार बळावलेल्या स्थिती पर्यंत आल्यानंतरच रुग्ण डॉक्टरांकडं आणला गेलेला असतो. औषध अवघड नि दीर्घ काळ घेण्याचं प्रमुख कारण उशीरा आणलं जाणं हे आहे. वन स्टीच अ‍ॅट अ टाईम सेव्ह्स नाईन असं इथं घडत नाही कारण मानसिक आजाराबद्दल असलेली भीती नि अकारण अथवा सकारण असलेलं सामाजिक दडपण! बर्‍याच संस्था मानसिक आजारांबद्दल काम करत आहेत मात्र त्या पुरेशा नाहीत. त्या वाढायला हव्यातच. सातत्यानं आवश्यक त्यातही टीन एजेस मध्ये अत्यंत आवश्यक असलेलं मानसिक आरोग्याचं क्षेत्र खूपच दुर्लक्षित राहीलेलं आहे, आपल्या समाजाकडून ठेवलं गेलेलं आहे. - इंजिनिअरींग करताना अ‍ॅन्टी डिप्रेसण्ट टॅबलेट्स चा भरपूर उपयोग झालेला प्यारे

In reply to by अजया

सखी Mon, 04/21/2014 - 22:33
शुची ,तुझे कौतुक आणि हे इथे सांगण्याच्या धैर्याला सलाम. ब-याचदा फार उशीरा या गोष्टी लक्षात येतात, आणि नंतर हळहळ होते. खाली बहुगुणींनी दिलेली माहीतीही अतिशय उपयोगी आहे.

बहुगुणी Mon, 04/21/2014 - 22:29
"माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली...अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच " एका पूर्णपणे public अशा संस्थळावर इतक्या सरळपणे वास्तव मांडणं आणि आपल्या समस्येतून इतरांना मार्गदर्शन करणं ही खरी प्रगल्भता, hats off to you, शुचि! तुमच्या दीर्घारोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, आणि तुम्हाला व मदतीची गरज असणार्‍या इतर वाचकांना बायपोलर डिसऑर्डर या व्याधीसाठी उपयोगी पडावेत असे क्लिनिकल ट्रायल्स चे दुवे इथे मिळतील. आपल्या आसपास या व्याधीने त्रस्त असे कुणी असतील तर त्यांना कशी मदत करावी याची थोडक्यात माहिती (आधिक माहिती इथे मिळेल):
  • अशा रुग्णांना भावनिक आधाराची, सामंजस्याची, सहनशीलततेची आणि प्रोत्साहनाची गरज असते, ती ओळखा
  • अशा नातेवाईकांना, मित्र/मैत्रिणींना तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज असते, ती ओळखून त्यांचे घटना/अनुभव-वर्णन न तोडता लक्षपूर्वक ऐका, आणि त्यांच्याशी शांतपणे, पण धीर देऊन बोला.
  • त्यांची भीती कशाने (कोणत्या प्रसंगांत) वाढते ते समजून घ्या.
  • त्यांच्या बरोबर उत्साहवर्धक कार्यांत भाग घ्या, उदाहरणार्थ, जोडीने फिरावयास जाणे, सहलींना जाणे, इत्यादि.
  • वेळीच सुरू केलेल्या आणि चालू ठेवलेल्या योग्य औषधोपचारांनी ते खूप बरे होऊ शकतात याची त्यांना मधूनमधून आठवण करून देत जा.
  • आत्मघातक विचार ही एक टोकाजवळची पायरी असू शकते, तेंव्हा असे विचार त्यांनी कधी तुमच्याजवळ व्यक्त केले तर ते कधीही दुर्लक्षित करू नका; अशा घटना तत्काळ त्यांच्या कुटूंबातील जबाबदार व्यक्तिला आणि शक्य असेल तर त्यांच्या डॉक्टरला कळवा.

आजानुकर्ण Mon, 04/21/2014 - 22:53
You are not alone.... मला एक ते दीड वर्षे GAD आणि Panic Disorderचा त्रास झाला होता. चार-पाच किलोमीटर सहज पळू शकणाऱ्या, गडकिल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या मला दोन पायांवर उभे राहण्याचीही भीती वाटण्याइतका आत्मविश्वास गमावला होता. ऑफिसात मीटिंग वगैरे असताना अचानक चक्कर येऊन पडलो तर आधारासाठी भिंत किंवा खुर्ची जवळ असावी म्हणून धावतपळत आधीच मीटिंगमध्ये जाऊन सोयीस्कर जागा पकडल्याचे आठवले की आता हसू येते. मनावर कोरला गेलेला त्या आठवणींचा शेवटचा प्रसंग म्हणजे एकदा मॅनेजरने काही इनपुट्स घेण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये बोलावले होते. त्याची केबिन बरीच मोठी होती आणि उपलब्ध खुर्च्यांवर इतर दोघेजण बसले होते. भिंत बरीच लांब होती. आता केबिनमध्ये मधोमध उभे राहावे लागणार हे पाहूनच त्रिशंकू अवस्था होऊन गरगरल्यासारखे होऊ लागले. कसाबसा वेळ काढला. ते पाच मिनिट अक्षरशः पाच तासांसारखे वाटले होते. काय बोललो आठवत नाही. कदाचित त्यावर्षीचे अप्रेजल गंडले असावे. ;) मात्र या प्रसंगाने 'आधाराला काही सापडले नाही तरी आपल्याला उभे राहता येते व काहीही होत नाही' हे समजण्यास मदत झाली असावी असे वाटते. I think that was moment of realization. त्यानंतर हळूहळू औषधे कमी करण्याची डॉक्टरांना विनंती केली. मनोविकारतज्ज्ञांच्या उपचारांमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्याने बराच फायदा झाला. दवाखान्यात विविध प्रकारचे रुग्ण पाहून मनोविकारांबाबतची पुस्तकी नसलेली अशी नवी माहिती कळाली. गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आणि विथड्रॉल सिम्पटम्स फारच त्रासदायक होते. सुदैवाने गेली काही वर्षे कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही याचा आनंद वाटतो. इंटरनेटवर या विकारांबाबत जास्त शोधत बसू नका हा एक अनुभवाचा सल्ला. :) शुभेच्छा...

In reply to by आजानुकर्ण

शुचि Mon, 04/21/2014 - 22:56
आजानुकर्ण आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपली औषधे कमी झाली याचा आनंद आहे.
इंटरनेटवर या विकारांबाबत जास्त शोधत बसू नका हा एक अनुभवाचा सल्ला.
अगदी खरं आहे.

In reply to by किसन शिंदे

शुचि Mon, 04/21/2014 - 23:22
फक्त तज्ञ व्यक्तीच तो अदमासा घेऊ शकते. आपण लक्षणे सांगीतल्यावर, प्रश्नावली वगैरे भरुन घेऊन ते तुमची मुलाकत घेतात , प्रश्न विचारतात व काहीएक पद्धतीने निदान करतात. पण मॅनिया च्या फेझमध्ये अतिशय आनंदी व सकारात्मक (पॉझिटीव्ह) वाटते इतके की पेशंट रिस्की वागणूक देखील प्रदर्शित करतो. चूकीचे निर्णयही अति आत्मविश्वासाने घेतले जाऊ शकतात. मधे मधे अतिशय अ‍ॅग्रेसिव्ह वागणूकही घडते, चिडचिड्/इरिटेशन दिसून येते. विशेषतः उन्हाळ्यात मला हे त्रास जाणवतात. कटाक्षाने डोके थंड ठेवायच प्रयत्न आता करते कारण तेवढे आत्मभान डेव्हलप झाले आहे. पण औषधे लागतातच!!!!

In reply to by मुक्त विहारि

शुचि Mon, 04/21/2014 - 23:41
धन्यवाद मुवि. आयुष्यात माझी पुण्यराशी कामात आली असेल ते हा नवरा मिळण्यात. कारण त्याने इतका आधार दिला आहे. अन अजूनही एकमेव माझ्या प्रकृतीच्या दृष्टीने तो माझ्यावर सक्ती करतो, काळजी घेतो. मला व्यायाम हा रोजचा रोज करावाच लागतो नाहीतर आमच्यात खडाजंगी ठरलेली आहे. माझे खाणेपीणे/पथ्य स्ट्रीक्ट आहे. अर्थात फार फॅटी/जंक हे वर्जित बाकी काही नाही. झोपेची वेळ ठरल्याने खूप गोष्टी जसे कुटुंबाबरोबर रात्री पिक्चर पहात धमाल करणे हे वर्ज्यच झाले आहे. ज्या काळात माझी औषधे सापडत नव्हती त्या काळात त्याने कमालीचा पेशन्स दाखवला. म्हणजे नवरा आहे म्हणून नाही तर माझ्या हृदयात एक माणूस म्हणून इतकं ऊंच स्थान त्याने मिळवलय! आम्ही अनेक अनेक औषधे ट्राय केलेली शेवटी डॉक्टरांनी अ‍ॅबिलिफाय मला सुचवली. पण ती काही लागू पडेना तेव्हा याने बरोबर नीरीक्षण करुन डॉक्टरांना सुचविले की १००मिलीग्रॅम ऐवजी एकदा ५० मिलीग्रॅम ट्राय करुन पाहता का? कारण ती औषधांच्या मात्रांना फार सेन्सिटीव्ह आहे. अन डॉक्टरांनी ऐकले अन खरच गेली १० वर्षे ही माझी मूड स्टॅबिलायझर आहे. एकेक खरच ऋणानुबंधच्च्च असतात.

अनन्या वर्तक Tue, 04/22/2014 - 01:06
शुचि तुमच्या बद्दल मलाही आदर वाटतो. अगदी प्रामाणिक पणे स्वतःबद्दल लिहिले आहे तुम्ही. तुमचे पुढील आयुष्य असेच आनंदाचे आणि सुखाचे जावे म्हणून माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा.

आत्मशून्य Tue, 04/22/2014 - 01:21
वॉव! डिडंट सॉ इट कमींग... नाही, तुमच्या जालिय लिखाणात मिष्कीलता, वैताग, बालिशपणा, विज्ञान, काव्य, शास्त्र, विनोद, अध्यात्म, सुस्पष्ट तर्कसंगतीचा अभाव, वगैरे वगैरे वगैरे सर्व नेहमीच आढळले. आपल्या अगदी खुळचट लिखाणालाही एक सात्विक निरागसपणाची जोड दिसली, म्हणुनच जास्तिजास्त निखळ अल्लड छबीच कायम मनात उभी आहे. पॉइंट इज, कधिच म्हणजे कधिच अक्रस्ताळेपणा मात्र असा आढळला नाही. आणि तुम्ही स्वतःला बाइपोलार जाणता ...? ऐकावे ते नवलच. तुम्हाला मानाचा मुजरा, मैत्रीचा सलाम आणी (हा) प्रेमाचा प्रतिसाद.

दिव्यश्री Tue, 04/22/2014 - 01:38
शुचि ताई या प्रकारे लिहायला खरचं एक वेगळी ताकद लागते असे मला वाटते . ती फारच कमी लोकांकडे असते . नवर्‍याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही>>> तुमचे पूर्वसुकृत अन पुण्याइ असेलच . मला वाटते आपल्या आई - वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्याई देखील आपल्या पाठीशी असते कायमच . तुमच्या नवऱ्याला सलाम . जोडीदाराची अशा वेळेस फारच परवड होते . त्यांनी सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली . तुम्ही कधीही व्यनि करा , हाक मारा मला शक्य ते मी करण्यचा नक्की प्रयत्न करेन . देवाजवळ प्रार्थना करेन तुम्ही नेहमी आनंदी राहाव्यात . मनापासून शुभेच्छा . :)

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 01:51
आपले अभिनंदन व आपल्या पतीदेवांना धन्यवाद. देवाने त्यांनाही आपल्याला गरजेच्या वेळी याग्य प्रकारे साथ देण्याची सुबुद्धी दिली.खरे तर हे संस्कारच असतात, आई वडिलांनी त्यांना घडवताना दिलेले! त्यामुळे तुमच्या सासू सासरे यांनाही धन्यवाद. अशा या दुर्धर प्रसंगातून आपण व आपले कुटुंब तावून सुलाखून निघालेले आहे व आपल्याया खात्री आहे की कोण आपला सच्चा साथीदार आहे तो! आता एकच म्हणेन "कॅरम रमवानू, जूस पिबानू, मज्जानी life" फक्त Queen घेण्यासाठी(आपले goals साध्यकरण्यासाठीच) सदैव प्रयत्नशील रहा! लोकांच्या कल्याणासाठी खूप मोठे कार्य आपल्या हातून नक्कीच घडेल अशी आशा बाळगतो.

प्रभाकर पेठकर Tue, 04/22/2014 - 02:04
बापरे! वाचता वाचता माझेच हातपाय गार पडू लागले. किती भयंकर संकट तुमच्यावर, नवर्‍यावर, घरच्या सर्वांवर आलं होतं. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची निकड ओळखणं, प्रत्यक्ष तिथे जाणं, त्यांचं निदान मान्य करणं, औषधोपचाराला मान्यता, सकारात्मक प्रतिसाद देणं अनेक अनेक अडचणी. प्रत्येक पायरीवर माघारी फिरण्याची, नकारात्मक भूमिकेत शिरण्याची केव्हढी ती शक्यता. प्रत्येक क्षणाक्षणाला संघर्ष. स्वतःशीच. मला ह्यातून बाहेर पडायचंच ह्या निर्धारानेच. त्यातून होणारे क्लेष, ते सहन करण्याची मानसिक शक्ती.... सर्व सर्व जिवनच उध्वस्थावस्थेत जाण्याची भिती. ह्या सर्वावर तुम्ही मात केलीत. तुम्हाला सुज्ञ आणि धैर्यवान साथीदार लाभला हे तुमचे भाग्यच म्हंटले पाहिजे. त्यांचे मनभरून कौतुक. आहार, औषध, व्यायाम आणि निद्रा चारही सूत्रांवर तुमचे कायम नियंत्रण राहो आणि भविष्यातील आयुष्य निर्विघ्न पार पडो अशी इच्छा व्यक्त करतो.

अनुभवकथन आवडले, अगदी मनापासून, प्रामाणिकपणे लिहिले आहे त्यामुळे जास्तं भावला शुचीताई सिंपली ग्रेट ___/\___ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.

नंदन Tue, 04/22/2014 - 04:41
स्फुट आवडलं. माझ्या जवळच्या आप्तांपैकी एक व्यक्तीही बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. एका बुद्धिमान, आनंदी व्यक्तीचं मलूल, कुठलीच उमेद न राहिलेल्या डॉपलगॅन्गरमध्ये होणारं रुपांतर पाहणं फार त्रासदायक. लिथियम बेस्ड् औषधांनी फरक पडतो; पण प्रचंड झोप येणं, अनुत्साह वाटणं, भूक न लागणं - यासारख्या साईड इफेकख्यामुळे तो पर्यायही तितका व्यवहार्य नाही. तुमच्यासारखेच गुणकारी औषधांचे कॉकटेल कधीतरी सापडेल अशी आशा आहे.
तुम्हाला सुज्ञ आणि धैर्यवान साथीदार लाभला हे तुमचे भाग्यच म्हंटले पाहिजे. त्यांचे मनभरून कौतुक. आहार, औषध, व्यायाम आणि निद्रा चारही सूत्रांवर तुमचे कायम नियंत्रण राहो आणि भविष्यातील आयुष्य निर्विघ्न पार पडो अशी इच्छा व्यक्त करतो.
अगदी असेच.

In reply to by नंदन

शुचि Tue, 04/22/2014 - 19:31
नंदन, बायपोलर व्यक्तींनी रोजच्या रोज एका विशिष्ठ वेळी व्यायाम करणे हे अति-अति निकडीचे असते. I cannot enough iterate the importance of it. एक दिवस जरी मिस झाला तरी दुसर्‍या दिवशी लेथार्जिक वाटते,मूड एकदम ड्ल होऊन जातो वगैरे. हे त्या त्या औषधांच्या दुष्परीणामांमुळेच होते. पण त्यांच्यावर मात करायची असेल तर व्यायामाची जोड अति आवश्यक असते. अर्थात एवढं होऊनही सगळं आलबेल (परफेक्ट) वाटेलच असे नाही पण खूप सुधारणा जाणवते. किंबहुना मी वाचलेल्या माहीतीनुसार, व्यायाम हा शरीराच्या स्वास्थ्याहूनही जास्त मेंदूच्या स्वास्थ्यासाठी करायचा असतो.

शुचि Tue, 04/22/2014 - 04:44
सर्वच मिपाकरांचे आभार. खरं तर या विषयावर लिहायचे होते पण कसे अन कितपत ते कळत नव्हते. मूकवाचक, इस्पिक एक्का, वल्ली, शरद जी या सर्वांचे अन्य सुगरणी चे धागे वाचतानाच हे लक्षात आलेले की सारेजण त्यांना इण्टेन्सली जे वाटते , आवडते त्याबद्दल लिहितात अन त्यातून समाजाला, सर्वाना काहीतरी भरीव मिळते, वैचारिक चालना मिळते. मला या विषयावर सांगावेसे वाटत होते. अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही. त्यामुळे खूप दुवे व माहिती तर नाही देउ शकले पण अनुभवकथन मात्र १००% सत्य केले आहे.

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Tue, 04/22/2014 - 14:02
अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही. हे तसे योग्य करता. मलाही एक तुलनेत दुर्मिळ असा पोटाचा आजार आहे जो शरीराच्या बरेच ठिकाणी आघात करून जातो पण ते सारे होईलच असे नाही म्हणून मी सुद्धा त्यावर स्वतातर्फे संशोधन करत नाही अन्यथा नको ते नजरेस पडून ती भिती मनात राहील. डॉकने देखील अप्रत्यक्षपणे हाच सल्ला दिलाय. असो, बाकी हे लिहिण्याच्या धाडसाबद्दल प्रणाम सलाम नमस्ते ! तसेच तुमच्याकडे पाहता हे असे काही असू शकते हे तुम्हीच सांगितले नसते तर विश्वासही बसला नसता. याबद्दल विशेष कौतुक.

In reply to by तुमचा अभिषेक

तुमचा अभिषेक Tue, 04/22/2014 - 14:04
अरे हो आणि तुमच्या नवर्‍याचे कौतुक राहीलेच. मला वाटायचे की मीच काय तो एक जगात भारी नवरा आहे ;)

बोबो Tue, 04/22/2014 - 06:36
तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.

असं काही लिहायला आणि कबुली द्यायला प्रचंड मानसिक ताकद लागते. शुचि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जिद्दीला सलाम.
हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे
बी पॉसिटीव्ह. गर्तेमधुन बाहेर आला आहात. आपली पथ्यं व्यायाम पाळुन आयुष्य मस्त एंजॉय करा. कदाचित असही होईल लवकरं काही शोध लागेल आणि ह्याच्यावर कायमचा उपचार सापडेल. युनिव्हर्स गिव्ह्स यु व्हॉट यु क्रेव्ह फॉर, मे बी नॉट ईमिजिअटली बट ईव्हेच्युअली. :)

इरसाल Tue, 04/22/2014 - 09:18
झाले ते विसरा आणी पुन्हा जोमाने नव्या जीवनाला तुमच्या अत्यंतिक काळजी घेणार्‍या जोडीदाराबरोबर पुन्हा एकदा सामोरे जा. जीवनातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने उपभोगा.दोघांचे अभिनंदन आणी शुभेच्छा.

पेट थेरपी Tue, 04/22/2014 - 09:41
वाचून काळजी वाटली. अवघड असते हे सगळे. तुम्हाला व तुमच्या अहोंना हार्दिक शुभेच्छा. पुढील जीवनासाठी.

शाब्बास आहे तुमच्या नवर्‍याला आणि तुम्हालाही. मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने त्यांनी आणि तुम्ही आलेल्या आपत्तीचा मुकाबला केलात. पुढील वाटचाली साठी तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा. (लेख वाचता वाचता एक नवरा म्हणुन माझ्या कडुन झालेल्या चूकांची यादी माझ्या डोळ्या समोर तरळुन गेली आणि वाटलं त्यातल्या काही चूका टाळता आल्या असत्या तर बरं झाल असत.)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खरचं मी मिपाचा सदस्य आहे याचा आज अभिमान वाटतोय. बाकी
(लेख वाचता वाचता एक नवरा म्हणुन माझ्या कडुन झालेल्या चूकांची यादी माझ्या डोळ्या समोर तरळुन गेली आणि वाटलं त्यातल्या काही चूका टाळता आल्या असत्या तर बरं झाल असत.)
याच्याशी बाडीस.. :-(

सुधीर कांदळकर Tue, 04/22/2014 - 09:55
आवडले. आमच्या माजी शेजार्‍यांनी सुमारे १९८५ साली मला डॉ. श्रीकांत जोशी लिखित 'मनाचा मागोवा' नावाचे पुस्तक वाचायला दिले होते. त्यात बर्‍याच मानसिक विकारांचे वर्णन आहे. परंतु आता उपचारपद्धती बरीच बदलली आहे. त्या लेखकाच्या मते ज्याने मनोविकारावरच्या पहिल्या औषधाचा शोध लावला त्याला नोबेल मिळायला हवे होते. या मतात मनोविकारोपचाराचे महत्त्व आढळून येते. माझ्या एका डॉक्तर मित्राच्या मते समुपदेशनाने बर्‍याच प्रमाणात खिन्नता, भावनोद्दीपन वगैरेंवर ताबा मिळवता येतो. मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक हे बहुधा जोडीने उपचार करतात. समुपदेशक हा शक्यतो स्वभाषिकच असावा. त्यामुळे भावना आणि व्यथा अचूक व्यक्त करणे चांगले जमते. समाजातल्या निदान २० ते ३० टक्के व्यक्तींना समुपदेशनाची गरज आहे असे मला वाटते. त्यांच्यामुळेच वास्तुशास्त्र वगैरे थोतांडाचे अमाप पीक येते. आपल्या यजमानांना प्रणाम. चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.

शुचि आपल्या लिखाणावरुन मी हे निदान केव्हाच केले होते.फक्त ते व्यक्त केले नव्हते. कारण तसे ते व्यक्त करणे हे उचित ठरले नसते. आपले लिखाण हे प्रबोधनाचा उत्तम मार्ग आहे. शरिर जसे आजारी पडते तसे मन पडते, शरिराला जसे व्यायाम,स्वच्छता,डागडुजी आवश्यक असते तसे मनालाही. पण समाजाचा मानसिक आरोग्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन अजूनही मागासलेला आहे.तो मुख्यतः अज्ञानामुळे व पुर्वदूषितग्रहांमुळे.तो आपल्यासारख्या लोकांच्या प्रबोधनामुळे हळू हळू सुधारेल. मी स्वतः आयबीएस या पोटाच्या सायकोसोमॅटिक त्रासासाठी मानसोपचारतज्ञांची मदत घेतो. समाजात हळू हळू हा बदल होतो आहे ही मला समाधानाची बाब वाटते. अंधश्रद्धा व मनोविकार यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे हा विषयासाठी अंनिस मधे मानसमित्र या संकल्पनेचा व उपक्रमाचा उदय झाला आहे. असो आपल्या लेखाचा अनेकांना सकारात्मक उपयोग होणार आहे हे भाकित मी वर्तवतो :)

मदनबाण Tue, 04/22/2014 - 10:26
सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे म्हणजे त्यांच्याकडे जाणारी व्यक्ती ही गॉन केस आहे हा विचारच मुळात चुकीचा आहे.जशी शरिराला व्याधी होउ शकते तशीच अवस्था मनाची देखील होउ शकते. जर त्यातुन बाहेर पडणे शक्य असेल तर मग उपचार का घेउ नये ? त्यामुळे तुझे विशेष अभिनंदन ! ? :)

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 10:28
कडक सलाम! _/\_ मागे "कोणार्कची शिल्पे" आणि आता हे लेखन. मिपाकरांकडे मनातले खास काही उघड बोलायला लोकांना आवडते-जमते-चालते, हे मिपाच्या वातावरणाचेही यश आहे

In reply to by ऋषिकेश

शुचि Wed, 04/23/2014 - 21:59
मिपाकरांकडे मनातले खास काही उघड बोलायला लोकांना आवडते-जमते-चालते, हे मिपाच्या वातावरणाचेही यश आहे
:) हे वाक्य आपल्या मनाचा मोठेपणा दाखविते ऋषीकेश. आपल्याबद्दलचा आदर अधिक दुणावला.

In reply to by प्रचेतस

मृगनयनी Tue, 04/22/2014 - 10:53
शुचि. तुम्हाला _________/\_________ खरोखर हिम्मत लागते.. हे सगळं सहन करायला.. आणि तितक्याच धैर्याने लोकांसमोर मांडायला!!!.. रीअली हॅट्स ऑफ्फ!!!.....

रामदास Tue, 04/22/2014 - 10:57
आणि इतर मिपाकरांशी सहमत आहे. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा आजार संपणार असे म्हणण्यापेक्षा येणार्‍या प्रत्येक दिवसात हा आजार सोबत असण्याची शक्यता शून्याकडे जाईल असेच म्हणू या. शुभेच्छा.

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 11:53
किती वेगळी आहेस ग तू.. तुझं लिखाण नेहमीच वेगळं असतं.. म्हणजे त्यात एक निरागसपण आहे.. तुझ्या धाग्यांवर अनेकदा कुणी निगेटिव्ह केमेंट केली तरी तू ती अनेकदा सहजपणे स्वीकारतेस. तुझ्या त्या परवाच्या ऑफिसवरच्या धाग्यावर सुद्धा तू विरोधी कमेंट्सपण समजुन घेतल्यास.. आताही हा लेख वाचुन समजत नाहीये की काय बोलावं.. किती प्रांजळपणे लिहीलय.. मनापासुन.. तुला खरच सलाम! आणि हो तुझ्या नवर्‍यालाही!

अद्द्या Tue, 04/22/2014 - 12:22
काकू. . असं लिहायला जबरदस्त मानसिक ताकत लागते . तुम्हाला . आणि तुमच्या "ह्यांना" . . लैच कडक सेल्युट . . बाकी फक्त एवढंच करू शकतो . ________/\_________

शुचि Tue, 04/22/2014 - 14:11
इतक्या शुभेच्छा दिल्यात, मनोधैर्य वाढविलेत, कौतुक केलेत, इतकी परिपक्वता दाखविलीत काय बोलू. मला खूप बरे वाटले. रामदास म्हणतात तसे "प्रत्येक दिवस मला व्याधी पासून मुक्तच करतो आहे." ही भावनाच सुखावह आहे. कांदळकर यांनीही समुपदेशनाचा मांडलेला मुद्दा योग्यच आहे. पिरा म्हणते तशी - "विरोधी कमेंट्स समजून घेते" कारण मला माहीत आहे की I do not (absolutely) do not have luxury of excited mood, any unusal upheavals of mood. भावनोद्दॆपन टाळायचे (sorry I am typing on some site & copy pasting hence many typos) परत एकदा सर्वांचे आभार.

कवितानागेश Tue, 04/22/2014 - 14:18
खूप हिंमत आहे शुचि तुझ्याकडे. अगदी डॉक्टरचे निदान स्विकारण्यापासून आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार होण्यापासून खरोखरच खूप हिंमत दाखवली आहेस. त्यामुळेच तु त्यातून बाहेर पडलियेस आणि आनंदी राहू शकतेयस. असे स्वतःकडे नि:पक्षपाती द्रुष्टीनी पहायची हिम्मत सगळ्यांकडे नसते. उलट 'बाहेरच्या' कुठल्यातरी कारणाकडे बोट दाखवलं जातं. पण 'आत' काहीतरी बिघदलय, काहितरी कमी पडतय, त्यामुळे imbalance व्हायला बाहेरचे निमित्त पुरतंय, हे लक्षात घेतले जात नाही. मानसिक आजारांच्या बाबतीत तर नाहीच नाही, त्यामुळे बरेचवेळेस पुढचे उपाय करणंच शक्य होत नाही. आता सगळे उपाय करणं शक्य असतानाच्या काळात सुद्धा काही स्किझोफ्रेनिच/डिप्रेशनच्या पेशन्ट असलेल्या मुलींना परत माहेरी आणून सोडलेलं पाहिले आहे. त्या पाश्वभूमीवर, तुझ्या नवर्‍यानी मात्र कायम तुझ्या बाजूनी आणि तुझ्या आजाराविरुद्ध उभे रहाणं अगदी आदर्श म्हणावं असंच आहे. खरोखरचा 'सखा सोबती'. ग्रेट कपल. :)

श्रीगुरुजी Tue, 04/22/2014 - 14:31
प्रांजळ कथन आवडले. तुम्हाला आणि तुमच्या पतिदेवांना सलाम! उगाच ज्योतिषी, ग्रहशांती, फेंगशुई असले काहीतरी अशास्त्रीय करण्याऐवजी थेट डॉक्टरांकडे तुमची समस्या घेऊन गेल्यामुळेच लवकर समस्यामुक्त झालात. बायपोलर डिसऑर्डर असणारे इतरही काही जण असतील. अशांसाठी एखादा मदत/आधार गट असेल तर त्यात सामील होऊन इतरांना मदत करता येईल.

चिगो Tue, 04/22/2014 - 14:32
सर्वप्रथम तर एवढा समजूतदार नवरा मिळाला, ह्याबद्दल अभिनंदन.. त्यानंतर, मनोरोग म्हणजे फिल्मी स्टाईल वेडेपणा नसतो, आणि त्यावर उपाय आहेत हे समजुन उपचारांना सामोर्‍या गेल्यात, ह्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आणि, उपचार लागू पडल्याने तुम्ही आता सुखात आहात, ह्यासाठी त्रिवार अभिनंदन.. आता दाद घेण्याची पाळी.. स्वतःला एक मनोरोग होता, आहे हे खुल्या संस्थळावर सांगण्याची हिंमत दाखवलीत, त्या हिंमतीला दाद देतो.. ह्या लेखातून जर दुसर्‍या कुणाला त्रास असेल तर त्यानी तो ओळखावा आणि इलाज करावा म्हणून स्वतःची गोष्ट सांगितलीत, त्या नि:स्पृह वृत्तीची दाद देतो.. आणि तुमच्या पुढच्या सुखाच्या आणि समृद्धीच्या सहजीवनासाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा..

आरोही Tue, 04/22/2014 - 14:44
खरेच ग शुचीताई खूप कठीण काळातून गेलीयेस ग ...आणि धीराची आहेस हे सुद्धा पटले ..असा अनुभव सार्वजनिक स्थळी मांडायला खरेच खूप धैर्य हवे...hats off to you and your husband

सुबोध खरे Tue, 04/22/2014 - 14:50
शुचि ताई, कौतुक इ. इ. बरेच झाले. आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. आपल्याला त्यांच्या "अशा" प्रती-प्रतीसादाची अपेक्षा ठेवूनच वागावे लागेल. असे फार मोठ्या प्रमाणात भारतात समाजात होताना दिसते.

In reply to by सुबोध खरे

सूड Tue, 04/22/2014 - 15:02
>>आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. एखाद्याला असलेल्या आजाराच्या बाबतीत तरी मिपाकरांनी असं काही केलेलं अजून तरी पाहण्यात नाही. आधीही असा कोणाचा आजार उघडकीस आला/ त्या व्यक्तीने स्वतःहून मिपाकरांना सांगितला त्याला/तिला इथे समजून घेण्याचाच प्रयत्न केला गेला आहे.

In reply to by सूड

कवितानागेश Tue, 04/22/2014 - 15:11
निदान ९०% लोकांबद्दल खात्री आहे, की ते असे करणार नाहीत. आणि कुणी तसे केलंच तरी त्याचा त्रस करुन न घेण्याइतकी शुचि खंबीर आहे.

In reply to by सूड

सुबोध खरे Tue, 04/22/2014 - 15:12
सूड साहेब हाच मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक आहे. लोक वाद थांबवताना पटकन "अरे वो सायकिक केस है, जाने दो" असे म्हणून त्या रुग्णाला न भरून येणारी जखम करून जातात. आजाराचे सुद्धा उच्चभ्रू आणि गरीब असे प्रकार आहेत. चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच पन्नाशीचा माणूस चष्मा सहजपणे लावतो पण कानाचे यंत्र लावत नाही.

In reply to by सुबोध खरे

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:15
>>>चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे. :) खरंय! - डाव्या कानानं आजाबात ऐकू न येणारा आणि उजव्या कानाचं आप्रेशन झालेला ;)
लेखनप्रकार
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद.

<प्रवीण तोगडिया, बिल्डिंग आणि धमकी>

आजानुकर्ण ·

विडंबन म्हणुन हसण्यावारी नेत आहे ...एरव्ही आपल्याकडुन हे लेखन विडंबन सदरात टाकले जाण्याची शक्यता नाही =))))

आजानुकर्ण Mon, 04/21/2014 - 19:55
सक्रीय हा विडंबनातील अशुद्ध शब्द मूळ लेखातून जसाच्या तसा घेतला आहे. अन्यथा मी तो 'सक्रिय' असा लिहिला असता. असो.

राजेश घासकडवी Mon, 04/21/2014 - 21:36
आजानुकर्ण, या लेखावरून हे सिद्धच होतं की तुम्ही संघद्वेषी, भाजपाद्वेषी आणि मोदीद्वेषी विचारजंत आहात. आणि पर्यायाने भारतद्वेषी आणि प्रगतीद्वेषी आहात. मला एक सांगा, की मोदींचा इथे काय संबंध? त्या बिचाऱ्या तोगडियांनी आपल्या हिंदू बांधवांच्या उद्धारासाठी काही काम केल्याबरोबर तुमच्या पोटात का दुखतं? ऑ ऑ? तुमचा हे लेखन म्हणजेच हेटस्पीच आहे. कारण हिंदू धर्म हा आक्रमक नाही, समजूतदार आहे, मवाळ आहे. सर्वांना आपल्यात सामावून घेणारा आहे. अशा पवित्र धर्माच्या वैश्विक परिषदेचे मुख्य असं काही बोलू शकतील असं म्हणणंदेखील हेटस्पीच आहे. हेटस्पीचचा निषेध असो!

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 11:30
Narendra Modi ✔ @narendramodi Follow Petty statements by those claiming to be BJP's well wishers are deviating the campaign from the issues of development & good governance. 9:27 AM - 22 Apr 2014 2,167 Retweets 949 favorites Reply Narendra Modi ✔ @narendramodi Follow I disapprove any such irresponsible statement & appeal to those making them to kindly refrain from doing so. 9:28 AM - 22 Apr 2014 1,901 Retweets 906 favorites Reply

प्रसाद१९७१ Tue, 04/22/2014 - 11:41
आजानुकर्ण - एक तर तुम्ही मूर्ख आहात किंवा तुम्हाला असले काहीतरी लिहीण्यासाठी पैसे मिळत आहेत. खरच पैसे मिळत असेल तर मला पण सांगा, मी पण लिहीत जाइन असले निरर्थक.
भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज
तुम्ही कधी सर्वे केलात की हे व्यक्तीमत्व भारताचे नावडते आहे म्हणुन? मला तर फार आवडते.

In reply to by प्रसाद१९७१

थॉर माणूस Tue, 04/22/2014 - 12:00
आँ... मागे एकदा तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्ही भारताबाहेर पळून गेलात म्हणून? बरं तुमचं नावही भारत नाही, मग कुठल्या अँगलने तुम्हाला आवडते ते व्यक्तिमत्व "भारताचे नावडते" नाही असे म्हणावे हो? :) निदान लेखनविषय तरी बघायचात. विनोद, विडंबन सुद्धा झोंबायला लागलं की काय इतक्यात?

सुनील Tue, 04/22/2014 - 12:16
निवडणूकीच्या काळात असले वक्तव्य करायला तोगडियाला काँग्रेसनेच "पटवले" असावे. ;)

In reply to by सुनील

थॉर माणूस Tue, 04/22/2014 - 12:28
काही अंशी शक्यता आहे, पण... मोदींच्या लाटेमुळे बाकीच्यांचा अंतर्गत जळफळाट बाहेर निघत असल्याची शक्यता सुद्धा आहे. त्या गिरीराज सिंगांनी सुद्धा हळूच एक पिंक टाकली होतीच की. सगळे जळकू टपून बसलेत, कधी संधी मिळतेय भडास काढायची ते पहात. आणि मग असे कुठेतरी पचकतात. तिकडे ताईंसाठी मतं मागताना दादांनी केलेला किस्सापण थोडासा याच टाईपाचा वाटतोय मला.

In reply to by थॉर माणूस

सुनील Tue, 04/22/2014 - 13:13
हेच म्हणतो! तोगडियाच्या जळफळाटाला काँग्रेसनी फक्त काडी लावली!! ;) बोलून-चालून काँग्रेस राजकारणात मुरलेली पण तोगडियाला समज नाही?

In reply to by सुनील

@पण तोगडियाला समज नाही? >>> ती असण्याची त्याच्याकडून अपेक्षाही नाही. दिग्(मूढ)विजय-सिंग नावाचं माकड नाय का, काँग्रेसनी असच-आत पाळलय! हुश्शार आणि रक्तपिपासू राजवटींना अस्सच तय्यार असावं लागत!

In reply to by सुनील

गब्रिएल Tue, 04/22/2014 - 12:45
ह्ये मंजे जर्रा ज्यास्त झालं हां सुनील भौ. सत्यवान, भारत्विकासोच्चूक म्हाम्याडम आणि देश्याचे त्रूण नेत्रूत्व म्हनून खुद्द तुमच्या शुबहास्ते गौरवलेल्या न्येत्यांबद्दल आनि त्येंच्या देशउद्दारक पार्टीबद्दल आशी कामेंट आनि तिबि तुमच्या सार्क्या कान्गरेस पाटिराक्यांकडना ? काय पार्टी च्येंज क्येकी कि काय ? @ पुतणेसय्बांचा ईनोद : आवो, आताआताच नायका काकासाय्बांनी वाटन्या करून एण्शीपिचि वाट्णी क्येली? त्येच्यात पुत्णेसाय्बांना म्हाराष्ट आणि त्येंच्या भैनाबय्ना दिल्ली दिली नायका? त्येवा पुतनेसाय्बांना भ्या वाट्नारच की, भैनाबाई दिल्लीला न्हाय ग्येल्या तर मंग म्हाराष्टाच्या शिएमच्या गादिला नाय्का पर्तिस्पदी व्होनार ? काय म्हंताव ?

सुनील Tue, 04/22/2014 - 13:32
तोगडियाच्या पाठोपाठ रामदास कदमही!! http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Ramdas-Kadam-Modi/articleshow/34073521.cms

In reply to by सुनील

तोगडियांचे माहीत नाही पण रामदास कदम बोलले त्यात काही चुक वाटत नाहीये ... आझाद मैदान दंगा प्रकारात जो घोळ झाला , ज्याप्रकारे शहीदस्मारकाची विटंबना करण्यात आली, ज्या प्रकारे महिलापोलिसांचा विनयभंग करण्यात आला आणि त्यावर ज्याप्रकारे पोलिसखाते राज्यसरकारच्या दबावामुळे मुग गिळुन गप्प बसले ते निंदास्पदच होते . त्यावर पोलिसांनी आजपर्यंत काय कारवाई केलीये ? किती रुपये नुकसान भरपाई वसुल करण्यात आली त्यांच्या कडुन ? केवळ राज्यसरकारच्या बोटचेपी धोरणामुळे आणि मतांसाठीच्या लांगलुंचनामुळे हे घोंगडे भिजत पडले आहे ! (आणि ह्यातला सगळ्यात हास्यास्पद प्रकार हा की हे लोक कोणत्या तरी दुसर्‍याच देषातील घटनांचा निशेध करायचा म्हणुन जमले होते म्हणे ... "म्हणे" ) जर सक्षम सरकार आले आणि त्यांनी ह्या असल्या दंगलखोरांवर कारवाई केली तर ते देश हिताचेच होईल आणि पुढे होणार्‍या दंगलींना आळा बसेल ! रामदास कदमांना तोगडियांच्या पंगतीत बसवु नका .... तोगडिया सठीया गया है पण रामदास कदम बोलले ते योग्यच आहे ... कोणत्याही विशिष्ठ संप्रदायाची माणसे (मग ते हिंदु असोत की बौध्द की जैन की शीख की अन्य कोणी) जर झुंडशाहीने देषाला वेठीस धरणार असतील तर त्यांना सक्षम सरकार आणुन आणि पोलीसांना योग्य ती ताकत देवुन वेळेतच चेपायला हवे !!

In reply to by सुनील

राजेश घासकडवी Tue, 04/22/2014 - 17:28
रामदास कदमांचं माहित नाही, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाजपाद्वेष्ट्या, संघद्वेष्ट्या आणि मोदिद्वेष्ट्या लोकांमध्ये त्यांच्यावर चिखलफेक करण्याची अहमहमिकाच लागलेली आहे हे धादांत सत्य आहे. उदाहरणार्थ लोकसत्तामध्ये दडपून छापून आलेलं आहे की भाजपा समर्थकांनी बीडमधलं मतदान केंद्र बळकावलं. आता काय म्हणावं असल्या अपप्रचाराला?

In reply to by प्रसाद गोडबोले

सुनील Wed, 04/23/2014 - 13:21
नै तर काय! वर म्हणे त्या मतदान केंद्रावर फेरमतदानाचा आदेश दिलाय निवडणूक आयोगाने! काय पण पेडन्यूज!!

In reply to by सुनील

फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन मग (डायरेक्ट) सुप्रीम कोर्टातच निवाडा झाला पाहिजे! कारण मोदींना विकासाची कामं पडलीयेत नां!

In reply to by सुनील

आणि पुण्यात तब्बल सव्वालाख उमेदवार मतदान करु शकत नाहीत , आणि सर्वच माध्यमातुन हे राष्ट्रवादीचे कारस्थान असु शकते असे मत वर्तवण्यात येत आहे त्याबद्दल निवडणुक आयोग जबाबदारी सुध्दा घ्यायला तयार नाही ...अशी बातमी नाही छापत हे लोक ... सीरीयसली असल्या पेड न्युज वाल्यांमुळे लय नुसकान होणारय देशाचे .

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या गुरुवार, 04/24/2014 - 10:03
आपल्या लाडक्या म्हाराणीसायेब इमामचाचाची दाढी कुर्वाळत समदी शेक्युलर मते आम्हालाच द्या बरं का असे लाडेलाडे बोलत होत्या तर त्यांनाही जातीय जातीय म्हणून पावटे पत्रकार कोकलू लागले. इमामचाचांनी आपल्या सम्द्या शेक्युलर चेल्याना काँग्रेसला निवडून द्या इतकेच आव्हान केले त्याचा इक्ता बोभाटा! काय म्हणावं ह्या कर्मदळिद्र्यांना! शेक्युलर आणि धर्मांध ह्यातला फरक ह्या लोकांना कळेना. इमाम शेक्युलर आणि हिंदू फाशिस्ट. हेही समजावून सांगावे लागावे ह्यांना? बुरसट प्रतिगामी कुठले!

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 10:28
करणारे करतात, ... त्यांना कुण्णी काही करत नाही. (ते सरकारचे लाडके ना !) बोलणारे बोलतात, ... त्याची न्यूज होते. आणि बघणारे, ऐकणारे आपण... आपल्याला मात्रं त्यावर चर्चा करण्याची शिक्षा. याला काय अर्थ आहे ?

विडंबन म्हणुन हसण्यावारी नेत आहे ...एरव्ही आपल्याकडुन हे लेखन विडंबन सदरात टाकले जाण्याची शक्यता नाही =))))

आजानुकर्ण Mon, 04/21/2014 - 19:55
सक्रीय हा विडंबनातील अशुद्ध शब्द मूळ लेखातून जसाच्या तसा घेतला आहे. अन्यथा मी तो 'सक्रिय' असा लिहिला असता. असो.

राजेश घासकडवी Mon, 04/21/2014 - 21:36
आजानुकर्ण, या लेखावरून हे सिद्धच होतं की तुम्ही संघद्वेषी, भाजपाद्वेषी आणि मोदीद्वेषी विचारजंत आहात. आणि पर्यायाने भारतद्वेषी आणि प्रगतीद्वेषी आहात. मला एक सांगा, की मोदींचा इथे काय संबंध? त्या बिचाऱ्या तोगडियांनी आपल्या हिंदू बांधवांच्या उद्धारासाठी काही काम केल्याबरोबर तुमच्या पोटात का दुखतं? ऑ ऑ? तुमचा हे लेखन म्हणजेच हेटस्पीच आहे. कारण हिंदू धर्म हा आक्रमक नाही, समजूतदार आहे, मवाळ आहे. सर्वांना आपल्यात सामावून घेणारा आहे. अशा पवित्र धर्माच्या वैश्विक परिषदेचे मुख्य असं काही बोलू शकतील असं म्हणणंदेखील हेटस्पीच आहे. हेटस्पीचचा निषेध असो!

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 11:30
Narendra Modi ✔ @narendramodi Follow Petty statements by those claiming to be BJP's well wishers are deviating the campaign from the issues of development & good governance. 9:27 AM - 22 Apr 2014 2,167 Retweets 949 favorites Reply Narendra Modi ✔ @narendramodi Follow I disapprove any such irresponsible statement & appeal to those making them to kindly refrain from doing so. 9:28 AM - 22 Apr 2014 1,901 Retweets 906 favorites Reply

प्रसाद१९७१ Tue, 04/22/2014 - 11:41
आजानुकर्ण - एक तर तुम्ही मूर्ख आहात किंवा तुम्हाला असले काहीतरी लिहीण्यासाठी पैसे मिळत आहेत. खरच पैसे मिळत असेल तर मला पण सांगा, मी पण लिहीत जाइन असले निरर्थक.
भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज
तुम्ही कधी सर्वे केलात की हे व्यक्तीमत्व भारताचे नावडते आहे म्हणुन? मला तर फार आवडते.

In reply to by प्रसाद१९७१

थॉर माणूस Tue, 04/22/2014 - 12:00
आँ... मागे एकदा तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्ही भारताबाहेर पळून गेलात म्हणून? बरं तुमचं नावही भारत नाही, मग कुठल्या अँगलने तुम्हाला आवडते ते व्यक्तिमत्व "भारताचे नावडते" नाही असे म्हणावे हो? :) निदान लेखनविषय तरी बघायचात. विनोद, विडंबन सुद्धा झोंबायला लागलं की काय इतक्यात?

सुनील Tue, 04/22/2014 - 12:16
निवडणूकीच्या काळात असले वक्तव्य करायला तोगडियाला काँग्रेसनेच "पटवले" असावे. ;)

In reply to by सुनील

थॉर माणूस Tue, 04/22/2014 - 12:28
काही अंशी शक्यता आहे, पण... मोदींच्या लाटेमुळे बाकीच्यांचा अंतर्गत जळफळाट बाहेर निघत असल्याची शक्यता सुद्धा आहे. त्या गिरीराज सिंगांनी सुद्धा हळूच एक पिंक टाकली होतीच की. सगळे जळकू टपून बसलेत, कधी संधी मिळतेय भडास काढायची ते पहात. आणि मग असे कुठेतरी पचकतात. तिकडे ताईंसाठी मतं मागताना दादांनी केलेला किस्सापण थोडासा याच टाईपाचा वाटतोय मला.

In reply to by थॉर माणूस

सुनील Tue, 04/22/2014 - 13:13
हेच म्हणतो! तोगडियाच्या जळफळाटाला काँग्रेसनी फक्त काडी लावली!! ;) बोलून-चालून काँग्रेस राजकारणात मुरलेली पण तोगडियाला समज नाही?

In reply to by सुनील

@पण तोगडियाला समज नाही? >>> ती असण्याची त्याच्याकडून अपेक्षाही नाही. दिग्(मूढ)विजय-सिंग नावाचं माकड नाय का, काँग्रेसनी असच-आत पाळलय! हुश्शार आणि रक्तपिपासू राजवटींना अस्सच तय्यार असावं लागत!

In reply to by सुनील

गब्रिएल Tue, 04/22/2014 - 12:45
ह्ये मंजे जर्रा ज्यास्त झालं हां सुनील भौ. सत्यवान, भारत्विकासोच्चूक म्हाम्याडम आणि देश्याचे त्रूण नेत्रूत्व म्हनून खुद्द तुमच्या शुबहास्ते गौरवलेल्या न्येत्यांबद्दल आनि त्येंच्या देशउद्दारक पार्टीबद्दल आशी कामेंट आनि तिबि तुमच्या सार्क्या कान्गरेस पाटिराक्यांकडना ? काय पार्टी च्येंज क्येकी कि काय ? @ पुतणेसय्बांचा ईनोद : आवो, आताआताच नायका काकासाय्बांनी वाटन्या करून एण्शीपिचि वाट्णी क्येली? त्येच्यात पुत्णेसाय्बांना म्हाराष्ट आणि त्येंच्या भैनाबय्ना दिल्ली दिली नायका? त्येवा पुतनेसाय्बांना भ्या वाट्नारच की, भैनाबाई दिल्लीला न्हाय ग्येल्या तर मंग म्हाराष्टाच्या शिएमच्या गादिला नाय्का पर्तिस्पदी व्होनार ? काय म्हंताव ?

सुनील Tue, 04/22/2014 - 13:32
तोगडियाच्या पाठोपाठ रामदास कदमही!! http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Ramdas-Kadam-Modi/articleshow/34073521.cms

In reply to by सुनील

तोगडियांचे माहीत नाही पण रामदास कदम बोलले त्यात काही चुक वाटत नाहीये ... आझाद मैदान दंगा प्रकारात जो घोळ झाला , ज्याप्रकारे शहीदस्मारकाची विटंबना करण्यात आली, ज्या प्रकारे महिलापोलिसांचा विनयभंग करण्यात आला आणि त्यावर ज्याप्रकारे पोलिसखाते राज्यसरकारच्या दबावामुळे मुग गिळुन गप्प बसले ते निंदास्पदच होते . त्यावर पोलिसांनी आजपर्यंत काय कारवाई केलीये ? किती रुपये नुकसान भरपाई वसुल करण्यात आली त्यांच्या कडुन ? केवळ राज्यसरकारच्या बोटचेपी धोरणामुळे आणि मतांसाठीच्या लांगलुंचनामुळे हे घोंगडे भिजत पडले आहे ! (आणि ह्यातला सगळ्यात हास्यास्पद प्रकार हा की हे लोक कोणत्या तरी दुसर्‍याच देषातील घटनांचा निशेध करायचा म्हणुन जमले होते म्हणे ... "म्हणे" ) जर सक्षम सरकार आले आणि त्यांनी ह्या असल्या दंगलखोरांवर कारवाई केली तर ते देश हिताचेच होईल आणि पुढे होणार्‍या दंगलींना आळा बसेल ! रामदास कदमांना तोगडियांच्या पंगतीत बसवु नका .... तोगडिया सठीया गया है पण रामदास कदम बोलले ते योग्यच आहे ... कोणत्याही विशिष्ठ संप्रदायाची माणसे (मग ते हिंदु असोत की बौध्द की जैन की शीख की अन्य कोणी) जर झुंडशाहीने देषाला वेठीस धरणार असतील तर त्यांना सक्षम सरकार आणुन आणि पोलीसांना योग्य ती ताकत देवुन वेळेतच चेपायला हवे !!

In reply to by सुनील

राजेश घासकडवी Tue, 04/22/2014 - 17:28
रामदास कदमांचं माहित नाही, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाजपाद्वेष्ट्या, संघद्वेष्ट्या आणि मोदिद्वेष्ट्या लोकांमध्ये त्यांच्यावर चिखलफेक करण्याची अहमहमिकाच लागलेली आहे हे धादांत सत्य आहे. उदाहरणार्थ लोकसत्तामध्ये दडपून छापून आलेलं आहे की भाजपा समर्थकांनी बीडमधलं मतदान केंद्र बळकावलं. आता काय म्हणावं असल्या अपप्रचाराला?

In reply to by प्रसाद गोडबोले

सुनील Wed, 04/23/2014 - 13:21
नै तर काय! वर म्हणे त्या मतदान केंद्रावर फेरमतदानाचा आदेश दिलाय निवडणूक आयोगाने! काय पण पेडन्यूज!!

In reply to by सुनील

फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन मग (डायरेक्ट) सुप्रीम कोर्टातच निवाडा झाला पाहिजे! कारण मोदींना विकासाची कामं पडलीयेत नां!

In reply to by सुनील

आणि पुण्यात तब्बल सव्वालाख उमेदवार मतदान करु शकत नाहीत , आणि सर्वच माध्यमातुन हे राष्ट्रवादीचे कारस्थान असु शकते असे मत वर्तवण्यात येत आहे त्याबद्दल निवडणुक आयोग जबाबदारी सुध्दा घ्यायला तयार नाही ...अशी बातमी नाही छापत हे लोक ... सीरीयसली असल्या पेड न्युज वाल्यांमुळे लय नुसकान होणारय देशाचे .

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या गुरुवार, 04/24/2014 - 10:03
आपल्या लाडक्या म्हाराणीसायेब इमामचाचाची दाढी कुर्वाळत समदी शेक्युलर मते आम्हालाच द्या बरं का असे लाडेलाडे बोलत होत्या तर त्यांनाही जातीय जातीय म्हणून पावटे पत्रकार कोकलू लागले. इमामचाचांनी आपल्या सम्द्या शेक्युलर चेल्याना काँग्रेसला निवडून द्या इतकेच आव्हान केले त्याचा इक्ता बोभाटा! काय म्हणावं ह्या कर्मदळिद्र्यांना! शेक्युलर आणि धर्मांध ह्यातला फरक ह्या लोकांना कळेना. इमाम शेक्युलर आणि हिंदू फाशिस्ट. हेही समजावून सांगावे लागावे ह्यांना? बुरसट प्रतिगामी कुठले!

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 10:28
करणारे करतात, ... त्यांना कुण्णी काही करत नाही. (ते सरकारचे लाडके ना !) बोलणारे बोलतात, ... त्याची न्यूज होते. आणि बघणारे, ऐकणारे आपण... आपल्याला मात्रं त्यावर चर्चा करण्याची शिक्षा. याला काय अर्थ आहे ?
भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". मुस्लिमांचा 'प्रश्न' सोडवायचा आहे ना? मग मुस्लिमांना हिंदू वस्त्यांमध्ये घरं घेऊ देऊ नका. तसं नाही केलं तर सुरुवातीला एखादी मुस्लिम व्यक्ती जास्त किमतीने घर घेईल आणि आजूबाजूच्या परिसरात इतर मुस्लिम कमी किमतीची घरे घेऊन स्थायिक होतील. अशी धमकी प्रवीण तोगडिया यांनी दिल्याचं वृत्त आज 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं. बिहारी भाजपा नेते गिरीराज यांचा मोदीविरोधकांचे स्थान पाकिस्तानात आहे हा "विनोद" ताजा असतानाच तोगडियांच्या नवीन वाचाळतेमुळे भाजपा आणि संघाची पुन्हा एकदा दातखीळ बसली आहे. '४८ तासांत याने घर खाली ने केल्यास घरावर दगड, टायर आणि टोमॅटोचा मारा करा.

ब्रोकोली सॅलॅड

मस्त कलंदर ·

पैसा Mon, 04/21/2014 - 19:20
फोटो खूप छान आलेत! पण ब्रोकोली आणि कोबी दोन्ही एकत्र? ब्रोकोली परतून घेतली तरी वासाच्या बाबतीत डब्बल ट्रबल नै ना?

In reply to by पैसा

मस्त कलंदर Mon, 04/21/2014 - 19:58
आमच्याकडे पांढरट कोबी मिळतेय. तिला तितकासा उग्र वास नाही. पनीर परतून घेतलं तरी चालेल, पण मग पुन्हा शॅलो फ्राय-तेल म्हणून टाळलंय.

प्रभाकर पेठकर Mon, 04/21/2014 - 19:57
बाकी पाककृती ऊत्तम आणि मांडणी अगदी आकर्षक आहे. मात्र, वैयक्तिक आवडीनुसार मी गाजर किसून घेईन आणि बदामाची सालं काढून त्याचे पातळ तुकडे करून टाकेन. पण सलाड आहे बाकी मस्तं. ब्रोकोली मला आवडतेच. थोडी वाफवून घेतो. ब्रोकोली जास्त वाफवायची नाही नाहीतर त्यातील कॅन्सरशी झुंजण्याची शक्ती कमी होते.

आयुर्हित Mon, 04/21/2014 - 21:19
आजपर्यंत मिपावर पाहिलेली सर्वात जास्त चांगली आरोग्यदायी पाकृ!!!!! प्रत्येक घटक आरोग्यदायी असून बनवायची पद्धतही सोपी आणि साधी आहे. महत्वाचे म्हणजे, मिपा वापरणाऱ्या(अर्थात पिसीवर काम करणाऱ्या, डोळ्यावर ताण येणाऱ्या व बैठे जीवन जगणाऱ्या)प्रत्येक व्यक्तींनी नियमित खावी अशीच हि पाकृ आहे. मस्त कलंदरजी, अजून अश्याच आरोग्यदायी पाकृच्या प्रतीक्षेत! धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 22:01
मधुमेही रुग्णांसाठी व मधुमेहाचा धोका असणाऱ्यांसाठी सुद्धा हे सॅलॅड उपयोगी आहे: एक उपयुक्त दुवा मधुमेह रोखण्यासाठी ब्रोकोली सॅलॅड

कंजूस Mon, 04/21/2014 - 22:18
फोटो ,कृती ,सजावट ,अन्नद्रव्यमुल्य किती वगैरे छानच .दह्याचे ड्रेसिंग फळांच्या कापांसाठी "डिप"म्हणून वापरतात तसे आहे असे दिसते . रशिअन सलाड येथे देण्याचा मोह आवरत नाही . यात कोबी (महाबळेश्वरकडचा घ्यावा ,कमी उग्र आणि कुरकुरीत असतो ) ,आणि बेदाणे (शक्यतो मस्कतचे असावेत ,नाशिक ,तासगावचे हिरवे चालतील ) वापरायचे .ड्रेसिंगसाठी एका बॉटलमध्ये ऑलिव ऑईल +विनिगर +मिरपूड घालून बंद करून जोरात हलवले की एक पांढुरके इमल्शन बनते .हे कोबीवर ओतायचे .गोडीसाठी साखर अथवा मध वापरायचा . सैलडच्या पाककृती डाइअट वर असण्याची खूण आहे .

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआ http://www.sherv.net/cm/emoticons/eating/salad-smiley-emoticon-emoji.gif हेच्या संगाट डाळिंबाचे दाणे टाकलेला कानडी श्टाइइलचा दहिभात...आणि नंतर १ निवां........त दुपार!!!

दिपक.कुवेत Tue, 04/22/2014 - 08:57
सॅलेड "मस्त" आहे. फोटो तर फारच टेम्प्टींग आलाय. नक्कि करुन बघणार. पण पनीर एवजी फेटा चीज (लो फॅट) घातलं तर अजुन छान लागेल असं वाटतय.

सविता००१ Tue, 04/22/2014 - 14:17
छानच गं. मी कधी सॅलड मधे ब्रोकोली नाही खाल्ली. आता नक्की करेन

मस्त कलंदर Tue, 04/22/2014 - 18:10
पिंगू, अतिवास कधीही या.. एक नवा उपक्रम चालू केला आहे, वन डीश मील म्हणून खाता यावं असं सॅलड बनवणं. कालच ब्लॉग चालू केला आहे म्हणजे सगळ्या पाकृ एकत्र राहतील आणि शोधायचीही कटकट वाचेल. ब्लॉगची लिंक- http://udarbharan-nohe.blogspot.in/

नानबा Tue, 04/29/2014 - 16:39
इकडे बर्‍याचदा फ्रेश फूड मार्केटात ब्रोकोली पाहिली. एकदा आणून चिनी लोक खातात तशी फक्त उकडून खाल्ली. कित्येक महिने हास्पिटलात असल्यासारखा चेहरा झाला खाऊन. पुढल्या वेळेस करून बघण्यात येईल.. :)

पैसा Mon, 04/21/2014 - 19:20
फोटो खूप छान आलेत! पण ब्रोकोली आणि कोबी दोन्ही एकत्र? ब्रोकोली परतून घेतली तरी वासाच्या बाबतीत डब्बल ट्रबल नै ना?

In reply to by पैसा

मस्त कलंदर Mon, 04/21/2014 - 19:58
आमच्याकडे पांढरट कोबी मिळतेय. तिला तितकासा उग्र वास नाही. पनीर परतून घेतलं तरी चालेल, पण मग पुन्हा शॅलो फ्राय-तेल म्हणून टाळलंय.

प्रभाकर पेठकर Mon, 04/21/2014 - 19:57
बाकी पाककृती ऊत्तम आणि मांडणी अगदी आकर्षक आहे. मात्र, वैयक्तिक आवडीनुसार मी गाजर किसून घेईन आणि बदामाची सालं काढून त्याचे पातळ तुकडे करून टाकेन. पण सलाड आहे बाकी मस्तं. ब्रोकोली मला आवडतेच. थोडी वाफवून घेतो. ब्रोकोली जास्त वाफवायची नाही नाहीतर त्यातील कॅन्सरशी झुंजण्याची शक्ती कमी होते.

आयुर्हित Mon, 04/21/2014 - 21:19
आजपर्यंत मिपावर पाहिलेली सर्वात जास्त चांगली आरोग्यदायी पाकृ!!!!! प्रत्येक घटक आरोग्यदायी असून बनवायची पद्धतही सोपी आणि साधी आहे. महत्वाचे म्हणजे, मिपा वापरणाऱ्या(अर्थात पिसीवर काम करणाऱ्या, डोळ्यावर ताण येणाऱ्या व बैठे जीवन जगणाऱ्या)प्रत्येक व्यक्तींनी नियमित खावी अशीच हि पाकृ आहे. मस्त कलंदरजी, अजून अश्याच आरोग्यदायी पाकृच्या प्रतीक्षेत! धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 22:01
मधुमेही रुग्णांसाठी व मधुमेहाचा धोका असणाऱ्यांसाठी सुद्धा हे सॅलॅड उपयोगी आहे: एक उपयुक्त दुवा मधुमेह रोखण्यासाठी ब्रोकोली सॅलॅड

कंजूस Mon, 04/21/2014 - 22:18
फोटो ,कृती ,सजावट ,अन्नद्रव्यमुल्य किती वगैरे छानच .दह्याचे ड्रेसिंग फळांच्या कापांसाठी "डिप"म्हणून वापरतात तसे आहे असे दिसते . रशिअन सलाड येथे देण्याचा मोह आवरत नाही . यात कोबी (महाबळेश्वरकडचा घ्यावा ,कमी उग्र आणि कुरकुरीत असतो ) ,आणि बेदाणे (शक्यतो मस्कतचे असावेत ,नाशिक ,तासगावचे हिरवे चालतील ) वापरायचे .ड्रेसिंगसाठी एका बॉटलमध्ये ऑलिव ऑईल +विनिगर +मिरपूड घालून बंद करून जोरात हलवले की एक पांढुरके इमल्शन बनते .हे कोबीवर ओतायचे .गोडीसाठी साखर अथवा मध वापरायचा . सैलडच्या पाककृती डाइअट वर असण्याची खूण आहे .

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआ http://www.sherv.net/cm/emoticons/eating/salad-smiley-emoticon-emoji.gif हेच्या संगाट डाळिंबाचे दाणे टाकलेला कानडी श्टाइइलचा दहिभात...आणि नंतर १ निवां........त दुपार!!!

दिपक.कुवेत Tue, 04/22/2014 - 08:57
सॅलेड "मस्त" आहे. फोटो तर फारच टेम्प्टींग आलाय. नक्कि करुन बघणार. पण पनीर एवजी फेटा चीज (लो फॅट) घातलं तर अजुन छान लागेल असं वाटतय.

सविता००१ Tue, 04/22/2014 - 14:17
छानच गं. मी कधी सॅलड मधे ब्रोकोली नाही खाल्ली. आता नक्की करेन

मस्त कलंदर Tue, 04/22/2014 - 18:10
पिंगू, अतिवास कधीही या.. एक नवा उपक्रम चालू केला आहे, वन डीश मील म्हणून खाता यावं असं सॅलड बनवणं. कालच ब्लॉग चालू केला आहे म्हणजे सगळ्या पाकृ एकत्र राहतील आणि शोधायचीही कटकट वाचेल. ब्लॉगची लिंक- http://udarbharan-nohe.blogspot.in/

नानबा Tue, 04/29/2014 - 16:39
इकडे बर्‍याचदा फ्रेश फूड मार्केटात ब्रोकोली पाहिली. एकदा आणून चिनी लोक खातात तशी फक्त उकडून खाल्ली. कित्येक महिने हास्पिटलात असल्यासारखा चेहरा झाला खाऊन. पुढल्या वेळेस करून बघण्यात येईल.. :)
पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच.

जर मोदी पंतप्रधान झाले तर....

ऋषिकेश ·

पैसा Mon, 04/21/2014 - 17:52
मी मुख्यमंत्री झालो तर! असा निबंधाचा विषय आठवला. हे पण तसंच स्वप्नरंजन! कोणीही पंतप्रधान झाला तरी त्याच्याकडून माझ्या मिनिमम अपेक्षा याच राहतील. भ्रष्टाचार आणि महागाई कमी केली तरी आम जन्तेला बराच रिलीफ मिळेल. लोकांना सबसिड्या वाटण्यापेक्षा मागेल त्याला काम मिळालं पाहिजे. परराष्ट्रधोरणात मोठे बदल व्हावे असं वाटत नाही. मात्र हामेरिकेची दादागिरी कमी झालीच पायजे. पाकिस्तानबरोबर युद्ध नको पण नुसता सज्जड दम भरण्यापेक्षा दुसर्‍या काही मार्गाने त्याला 'त्राहि मामं' म्हणायला भाग पाडलं पाहिजे. तेच चीनच्या बाबतीत. उदारीकरणाच्या नावाखाली चांगले चालणारे सरकारी उद्योग खाजगी कंपन्यांना स्वस्तात विकणे बंद झाले पाहिजे. रस्ते सुधारणा आणि पिण्याचे पाणी सर्वांना उपलब्ध करणे इतर काही तू दिलेल्या गोष्टी तर व्हायला हव्या आहेतच - महिला सुरक्षा - काळा पैसा कमी करणे आणि देशाबाहेर गेलेला पैसा परत आणणे - टॅक्स रिफॉर्म्स - खाणींची लायसन्स वाटप करणे - शस्त्रास्त्र खरेदी - निर्मल गंगा अभियान - पायाभुत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे - नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे - निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करणे - बालकल्याण योजना राबवणे - शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे - आरोग्य धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - क्रिडा धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - पर्यावरणाकडे लक्ष देणे, वन्य जीवांना संरक्षण - आर&डी कडे लक्ष देणे विशेषतः स्पेस आणि आण्विक क्षेत्रात - शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे - वन विंडो क्लिअरन्स सारख्या योजनांनी उद्योगधंदे व त्यायोगे रोजगारीला चालना देणे याशिवाय कोणीही पंतप्रधान झाला (अगदी मोदी असले तरी) तरी तुझ्या यादीतल्या ३ गोष्टी होणे फार कठीण आहे. त्या म्हणजे पाकिस्तानशी युद्ध, चीनशी युद्ध आणि राममंदिर उभारणे. त्या अत्यावश्यक गोष्टी नाहीत. बाकी अभी दिल्ली बहुत दूर है!

In reply to by पैसा

आयुर्हित Mon, 04/21/2014 - 22:29
मोदींना विसा न दिल्यामुळे अमेरिकेने मोदींची नाराजी नक्कीच ओढवून घेतली आहे. त्यामुळे मोदी अमेरिकेला जास्त भाव न देता चीन व इतर आशियाई देशात आपले मैत्री प्रस्ताव देतील व भारताचे इतर देशातील संबंध अत्यंत सलोख्याचे राहतील. पण अर्थात कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास त्याला चर्चेच्याच(यात वेळ पडल्यास सज्जड दम/धमकीही)माध्यमातून प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असेल. दोन ते पाच वर्षांनी अमेरिकेला/अमेरिकन कंपन्यांना भारताच्या विसा साठी भिक मागावी लागेल हे नक्की व भारताला त्या प्रमाणात त्वरित विकसित करणे हेच प्राधान्य राहील.त्यामुळे भारतात अंतर्गत शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडळी, राम मंदिर १०वर्षानंतर उभे केल्यास काही हरकत नसावी! ते नक्की होईलच आणि मुसलमान बंधूंचेही यात समर्थन असेल हि खात्री.

In reply to by आयुर्हित

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 16:28
दरवर्षीप्रमाणेच यंदाही सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे भरणार्‍यां यूएनच्या जनरल असेब्लीचे निमित्त साधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण द्यावे यासाठी व्हाईट हाऊस आणि ओबामा प्रशासनावर दबाव वाढत चालला असल्याचे सांगितले जात आहे. भारतात नऊ फेजमध्ये होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशा वेळी अमेरिकेतील अनेक तज्ञ नागरिक, सल्लागार, कायदेतज्ञांनी भारताकडे अमेरिकेने अधिक लक्ष पुरविले पाहिजे यासाठी आग्रह धरू लागले आहेत. निवडणुकांसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या सर्वेक्षणांनुसार भाजप आघाडी यंदा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मोदी पंतप्रधान बनलेच तर ओबामांनी भारताबरोबरचे संबंध वाढविण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील जाणकार तज्ञांचे मत आहे. गेली कांही वर्षे अमेरिका भारत संबंध फारसे सुरळीत राहिलेले नाहीत आणि अमेरिकेनेही हे संबंध सुधारावेत यासाठी विशेष लक्ष दिलेले नाही. अशा वेळी ओबामांनी पुढाकार घेऊन यूएनच्या असेब्लीत मोदींना आमंत्रण करणे सूज्ञपणाचे असेल असे या तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधातील तणाव कमी होण्यास मदत होईलच पण मोदी व्हीसा प्रकरणी झालेला इश्यू निवळल्यासही त्यामुळे मदत मिळेल असे सांगितले जात आहे. वरीष्ठ विश्लेषक डॉ. स्टीफन कोहेन यांनी तर मोदींशी सार्वजनिक संपर्क साधायला ओबामा यांना अवघड वाटत असेल तर त्यांनी खासगी पातळीवर संपर्क साधावा असेही मत व्यक्त केले आहे. यूएस इंडिया पोलिटिकल अॅक्शन कमिटी संघटनेच्या प्रतिनिधींनीही मोदीना आमंत्रण देण्याचे महत्त्व ठळक करून सांगितले असून अमेरिकेच्या प्रांताप्रांतातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणांतूनही हेच निष्कर्ष निघाले असल्याचे समजते. मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव

In reply to by आयुर्हित

माहितगार Wed, 04/23/2014 - 17:05
भारताचा कोणी का पंतप्रधान होत नाही त्याच्याशी चर्चा करण्याशिवाय आमेरीकेस पर्याय नाही हे आमेरीकन राज्यकर्त्यांना समजत असणार. गरज भारतालाही असेल पण पंतप्रधान झाल्यावर मोदींना बोलवतील का? मोदींना बोलवतील का? म्हणून भारताच्या पंतप्रधानपदाला लाचारीचे स्वरूप आणणे अयोग्य वाटते. भारताचा पंतप्रधान अबकड आहे, भारतीय जनतेचा राजकीय प्रतिनिधी आहे तो मग अबकड असो का हळक्षज्ञ त्याची किंमत आधी भारतीयांनी करावयास शिकले पाहिजे. या संदर्भाने मोदींची प्रतिक्रीया जबाबदार पणाची आहे. बिजेपीचे आणि भारताचे विरोधक हा मुद्दा चर्चेत ठेवत असतील तर हरकत नाही. बिजेपी खासकरून मोदी समर्थकांनी कखगघ देश कोणताही असो आमच्या पंतप्रधानाशी चर्चा करत नसेल तर गेला उडत अशी भूमीका ठेवली पाहिजे. बिजेपी खासकरून मोदी समर्थक या मुद्यावर डिफेन्सीव होऊन या बातम्यांना प्रसिद्धी देण्यास का हातभार लावतात? तसे तर तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा परराष्ट्रांशी चर्चा करताना भारताचा पंतप्रधान भारताचा पंतप्रधान आहे. आम्ही देवयानी खोब्रागडेंचा मान राखला जाण्या करता तडजोड नाकारतो पंतप्रधानाच्या बाबतीत का तडजोड करावी ? मला वाटते अशा बातम्यांना अधिक कुरवाळू नये.

In reply to by माहितगार

विकास Wed, 04/23/2014 - 17:52
जे काही २००५ ला मोदींविरोधात झाले ते शक्य होते कारण (१) सुप्रिम कोर्टाचा निकाल लागला नव्हता पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे (२) ते केंद्रीय मंत्रीमंडळात नव्हते. अर्थात त्यांना आंतर्राष्ट्रीय स्तरावर राजनैतिक पासपोर्टची गरज नव्हती. जे काही झाले ते व्यक्तीगत व्हिसासंदर्भात झाले होते. उद्या ते पंतप्रधान झाल्यास हे समिकरण बदलते. जर त्यांना तरी देखील अधिकृतपणे नाकारण्यात आले तर त्याचा अर्थ भारत-अमेरीका राजनैतिक संबंध अधिकृतरीत्या संपले असा होतो. जे भारत सोडा अमेरीकेस देखील चालणार नाही.

In reply to by माहितगार

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 11:32
अमेरिकेतील अनेक तज्ञ नागरिक, सल्लागार, कायदेतज्ञांनी भारताकडे अमेरिकेने अधिक लक्ष पुरविले पाहिजे यासाठी आग्रह धरू लागले आहेत. निवडणुकांसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या सर्वेक्षणांनुसार भाजप आघाडी यंदा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मोदी पंतप्रधान बनलेच तर ओबामांनी भारताबरोबरचे संबंध वाढविण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील जाणकार तज्ञांचे मत आहे.

अनुप ढेरे Mon, 04/21/2014 - 18:22
महत्वाच्या उतरत्या भाजणीत १. महागाईच्या दरावर नियंत्रण व घट २. महिला सुरक्षा (पण याबाबत केंद्र सरकार काय करू शकेल हे नाही माहीत. फक्त मोठ्या शिक्षेची तरतूद करून हा प्रश्न सुटेल असं नाही वाटत.) ३. शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे (खरं तर हा मुद्दा फार व्हेग आहे) ४. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे ५. आर&डी कडे लक्ष देणे

अर्धवटराव Mon, 04/21/2014 - 18:50
एखाद्या स्पेसीफीक विषयावर मोदि काय काम करतील सांगता येत नाहि. पण पायाभूत सुवीधा, शेती व निगडीत उद्योग यामध्ये बरीच गुंतवणुक होईल. भ्रष्टाचार विरोधि एक-दोन कायदे होतील, पण प्राणपणाने भ्रष्टाचार निर्मुलन होणार नाहि. मोदि एकुणच सुस्तावलेल्या नोकरशाही व बाकि सरकारी यंत्रणेला झाडुन कामाला लावतील. त्यामुळे एकंदर कारभारात गतीशीलता येईल व काहि प्रमाणात भ्रष्टाचाराचा कचरा काठाला लागेल. मोदि सरकार बनल्यास 'मोदि फॉर्मुला' नावाचा त्रस्त प्रकार भाजपमधे आकाराला येईल व त्यावरुन युपी-बिहार वगैरे राज्यात स्टेट इलेक्शन लढले जाईल. मोदिंच्या कार्यक्रम पत्रिकेत अशा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बदल केले जातील. पायाभूत सुविधा, शेती, महिला सबलीकरण व सुरक्षा, थोडंफार अल्पसंख्यांक समाजाकरता, सैन्यदलाकरता आर्थीक तरतुदीत वाढ, शस्त्रास्त्र खरेदी, आयटी सेक्टर... इ. बाबतीत मोदि प्राधान्याने काम करतील असं वाटतं.

शुचि Mon, 04/21/2014 - 18:54
चीन मैत्री करण्याच्या लायकीचा नाही अन युद्ध करणं आपल्याला भारी पडेल. चीनला आतूनच पोखरला पाहीजे. हे भेंडी चीनी जिकडेतिकडे माजलेत. असो. इति राजकारणविषयक लेखनसीमा :P पण जाणकारांची मते ऐकायला आवडेल.

बाबा पाटील Mon, 04/21/2014 - 19:13
२० ते ३० टक्के कामे होतील,बाकी दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्यात फारसे अंतर नाही.पाकिस्तान अथवा चिन दोघांशीही युद्ध्द कोठल्याही परिस्थीत नको आहे.फक्त त्यांना योग्य दहशत बसावी, बाकी चिन अमेरिकेलाही फारशी भिक घालत नाही,त्यामुळे चिनविरोधात भारत,अमेरिका व रशिया अशी संयुक्त आघाडी तयार करता आली तरच त्यांना रोखता येवु शकेल.बाकी शेतकर्‍यांची परिस्थिती थोडीफार सुधारली तरी देशावर उपकार होतील मोदींकडुन फक्त पाच वर्षात फारसे बदल अपेक्षित नाहीत्,फक्त भ्रष्टाचार्‍यांना थोडा लगाम घातला तरी बरेच साध्य होइल. मोदींना निदान १० वर्ष तरी मिळायला हवीत.नाहीतर ए.के.४९ आहेच पुढच्या पंचवार्षिकला.

विवेकपटाईत Mon, 04/21/2014 - 20:11
वरील कुठलेही काम मोदीने नाही केले तरी चालेल, देशाची जनसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे त्या साठी आधारभूत व्यवस्था कायम करणे गरजेचे १. देशातील सर्व राजमार्ग ४-६ लेनचे करणे अत्यंत गरजेचे. स्वर्णिम चतुर्भुजचे कार्य जे २००७ मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होते अद्याप ही बाकी आहे पुढील २-३ वर्षात पूर्ण करणे. शिवाय मोठ्या शहरांना जोडणारे एक्सप्रेस highways. जेणे करून एका दिवसात ट्रक ८००-१००० किमी अंतर कापू शकेल अशी व्यवस्था ९ टन च्या जागी २४, ३२ टन चे ट्रक धावू शकतील. २. संपूर्ण देशात रेल्वे ट्रक दुप्पट करणे आणि स्वर्णिम चतुर्भुज प्रमाणे स्वर्णिम चातुर्भूत डी एफ सी. ३. श्रीलंका आणि भारत जोडणारा सेतू (JICA या प्रोजेक्ट वर सिद्धांतीक रित्या तैयार आहे - हेतू चीनचा प्रभाव कमी करणे) फायदा: परिवहन लागत कमी होईल. शेतकरी आणि उद्योगांना फायदा शिवाय ग्राहकांना ही हरीयाणातून ताजा भाज्या २४ तासांच्या आत मुंबई, बंगलोरला पोहचतील. महागाई आपोआप कमी होईल. उद्योग लहान शहरांकडे वळतील. रोजगार वाढेल. ३. पाणी: पाण्यावरून देशाचे तुकडे होऊ शकतात. नदी जोड परियोजना (कुणाच्या दबावामुळे कचर्याच्या टोपलीत टाकली काही कळणे अशक्य) तातडीने राबवावी लागेल. ४. वीज: मुफ्त आणि स्वत: वीज देणे बंद करावे लागेल. (आत्ताच UP दिल्लीहून फक्त ६० किमी दूर, दिवसातून ४-५ तास वीज उपलब्ध आहे. लोक ही बिल देत नाही. )लोक generator महिन्याचे २००० हून अधिक खर्च करतात ते ही फक्त रात्री चालवतात. सोलर, विंड, गोबर गस इत्यादीवर भर आणि तत्सम शोध कार्य ही करावे लागेल. वीज उत्पादन १० वर्षात दुप्पट केल्या शिवाय गरज भागणार नाही. हे चार कार्य केले तरी मिळवली. या सुविधा देशात सर्वत्र पोहचल्या कि बाकी लोक स्वत: आपल्या साठी रोजगार निर्मिती करून घेतील. सरकारला काही करायची गरज नाही. या सर्व प्रोजेक्ट साठी ३०-४० लक्ष कोटी लागतील. बाकी लोकपाल वैगरे रिकामटेकड्या लोकांच्या चर्चे साठी ठीक आहे. वास्तवात कारण तो पण एक मलाई खाणारच ठरेल.

आतिवास Mon, 04/21/2014 - 22:01
मोदी पंतप्रधान झाले तर त्यांच्याकडून आणि 'एनडीए'कडून माझ्या पाच मुख्य अपेक्षा अशा आहेत: १. सामाजिक संतुलन साधत विकासाला चालना देणारे आर्थिक धोरण (भूसंपादन, धरणं, औद्योगिक विकास अशा गोष्टी करताना कुणाचेही शोषण होणार नाही, कुणावरही जबरदस्ती होणार नाही अशी अंमलबजावणी) २. धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण ३. पारदर्शी प्रशासन (ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास थोडी मदत होईल) ४. कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि जलद न्यायप्रक्रिया ५. आंतररराष्ट्रीय संबंध सुधारणे (शेजारी देशांशी आपले संबंध सध्या अतिशय ताणले गेले आहेत) आणि आणखी एकः ६. अंतर्गत सुरक्षितता सर्वांसाठी आणि विशेषत: स्त्रियांसाठी

In reply to by आतिवास

चैतन्य ईन्या Tue, 04/22/2014 - 16:34
सामाजिक संतुलन साधत विकासाला चालना देणारे आर्थिक धोरण (भूसंपादन, धरणं, औद्योगिक विकास अशा गोष्टी करताना कुणाचेही शोषण होणार नाही, कुणावरही जबरदस्ती होणार नाही अशी अंमलबजावणी)>> हे जरा सविस्तर सांगू शकेल का कोणी? इथे मुद्दाम खुसपट काढणे हा हेतू नाहीये पण नक्की काय करायला पाहिजेल? सद्य परिस्थिती अशी आहे की विकास म्हणजे नक्की काय ह्याची नक्की कोणी व्याख्या करेल का? कारण एखादी गोष्ट करायची तर कोणाला तरी त्रास हां होणारच. सामाजिक संतुलन हे फारच संदिग्ध विधान किंवा संकल्पना आहे. नक्की कसे करायचे हे कोणी दाखवेल का? छोट्या प्रयोगात एखाद्या गावात काहीतरी होते पण प्रचंड लोकसंखेच्या साठी ते चालू शकेल का? मुळात सगळी ओईल इकॉनॉमी आहे पण पर्यायी इंधन सापडत नाही तोपर्यंत काय करायचे? तासही बऱ्याच लोकांना अंधारातच राहावे लागत आहे. त्यांना ते नको आहे मग काय करायचे? इतकी अफाट लोकसंख्या आहे. ती कमी करायला सांगणे आपल्याला जमत नाही. स्पष्ट भूमिका घेणे एकाही नेत्याला जमत नाही. लगेच धार्मिक भावना वगैरे दुखावल्या जातात. मग पर्याय काय आहे? इथे मार्ग कोणाला सापडला आहे का हे हवे आहे.

In reply to by आतिवास

पगला गजोधर Fri, 01/12/2018 - 18:08
२. धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण
अतिवास यांचा पॉईंट २ जरा अवघड दिसतंय एकंदरीत आज .

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Fri, 01/12/2018 - 23:22
+१ जंगजंग पछाडूनसुद्धा जनता सातत्याने नाकारत असल्याने खांग्रेस, डावे, रिपब्लिकन इ. विरोध पक्शांनी आता हार्पिक पटेल, मेवाणी, उमर खलिद अशा जातीयवादी व देशद्रोह्यांच्या मदतीने जातीय आगी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कोरेगाव-भीमा दंगल, टिपू जयंती, पटेल व मराठा राखीव जागा, जनेवितील देशद्रोही घोषणा, संघ कार्यकर्त्यांच्या वाढत्या हत्या, दलित वि. हिंदू, मराठा वि. दलित, दलित वि. ब्राह्मण, मराठा वि. ब्राह्मण अशी पेटवापेटवी, पाकिस्तानशी व चीनशी गुपचुप हातमिळवणी, गडकरींच्या पुतळ्याची नासधूस असे प्रकार अथक सुरू असल्याने देशात धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण राखणे अवघड झाले आहे.

In reply to by नितिन थत्ते

श्रीगुरुजी Sat, 01/13/2018 - 13:06
या मागण्या मोदी पंतप्रधान झाल्यावर आलेल्या नाहीत. इतर गोष्टी मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाल्या आहेत ना?

(१) भ्रष्टाचारमुक्त (२) सुशासन देण्याचा (३) प्रामाणिक प्रयत्न बरेच काही मिळवून देईल... इतर सर्व गोष्टी त्यांच्याच बायप्रोडक्ट्स आहेत.

मराठे Mon, 04/21/2014 - 22:42
वीज, पाणी, संवाद (कम्युनिकेशन) आणि रस्ते हे प्रगतीचे चार खांब बळकट करणे. त्याच्या जोरावर मग पुढचा विकास करता येईल. म्हणजेच, - ग्रासरूट लेवल वरून भ्रष्टाचार कमी करणे,त्यासाठी जिथे जिथे शक्य आहे त्या त्या व्यवहारांत पारदर्शकता आणणे. - शिक्षणाच्या संधी सर्वांना समान देणे, - कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणे - गुन्हा दाखल करणार्‍यांना नव्हे तर गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटावी. - काश्मीर, अरुणाचल प्रदेश वगैरे 'डॉटेड लाईन्स' वाल्य सीमारेषांचा प्रश्नावर दीर्घकालीन अथवा कायमस्वरूपी उपाय. अजून चिक्कार ईच्छा आहेत पण हर ख्वाईशपे दम निकलें.

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 01:18
वरची एवढी भली मोठ्ठी यादी बघून खरेच धन्य झालो! एवढे सगळे मोदींनी करायचे? काही हरकत नाही, हे सारे काही (किंबहुना याच्या पेक्षाही ३ पट जास्त)काम मोदींना करायला आवडेल. ते त्यांना करायला मिळेल, ह्याची फक्त १००% व्यवस्था झाली पाहिजे. थोडक्यात काय तर २७२+ जागा हव्यात पुढच्या १० वर्षासाठी, बस अजून काही नको. एकदा सर्वांना काम मिळाले ना तर पहा १०%पेक्षा जास्त GDP ग्रोथ राहील भारताची! भारत स्वतंत्र होऊन ६६ वर्षे झालीत. निदान ५०वर्ष तरी कॉंग्रेस चेच सरकार होते, मग त्यांनी काय केले इतकी वर्ष? आणि आपण का हे सर्व बघत बसलो? "गरिबी हटाव म्हणत गरीब या देशात गरीबच कसे राहतील?" हे पाहणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

In reply to by आयुर्हित

अर्धवटराव Tue, 04/22/2014 - 02:47
अगदी सुरुवातीपासुन सांगायचं तर यादी फार लांबेल. अगदी थोडक्यात सांगायचं तर आय.आय.टी सारख्या संस्था, अ‍ॅटोमीक रिसर्च सेंटर, इस्रो, विवीध इस्पीतळं, भाक्रानांगल सारखी धरणं (त्याचं काम स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी सुरु झालं हे खरं असलं तरी), रेल्वे-विमानसेवांचं जाळं, हरित आणि धवल क्रांती, सैन्यदलाचा हस्तक्षेप नाकारणार्‍या निवडणुका राबवुन लोकशाहिची मजबुती, ग्लोबलाझेशन, दलित, अल्पसंख्यांक व इतर दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण, शिक्षण आरोग्यादी जीवनावष्यक सेवाकेंद्रांचं गठन... यादि अनंत आहे... नकारात्मक बाबींची देखील.
आणि आपण का हे सर्व बघत बसलो?
मग पर्याय काय होता? कम्युनिस्ट? समाजवादी? हिंदुत्ववादी? मोदिंना मोठं करताना काँग्रेसची लाईन छोटी करण्यात काहि पॉइण्ट नाहि. मोदिंकडुन अगदी चमत्काराची देखील आशा करण्यात काहि पॉइण्ट नाहि. जनता आपलं भाग्य स्वतः निवडेल.

In reply to by अर्धवटराव

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 03:19
जे काय करून ठेवले ते आमचे सर्वांचे नशीबच म्हणायचे आणि काय! काँग्रेसचीच काय कोणाचीही लाईन छोटी करण्याची तर मुळीच गरज नाही.असो. काल कॉंग्रेस होती,आज मोदी आहेत, उद्या अजून कोणी येईल. भारताला मोठे करायचे आहे हेच सर्वांनी एकजुटीने मनावर घेतले पाहिजे. आणि हे vision फक्त मोदिंकडे आहे म्हणून मोदींना मोठे करायचे.

In reply to by आयुर्हित

अर्धवटराव Tue, 04/22/2014 - 03:49
मोदिंकडे व्हिजन आहे याच्याशी सहमत. फक्त मोदिंकडे व्हिजन आहे याच्याशी असहमत. गेल्या सहा दशकात ज्याकाहि चांगल्या गोष्टी झाल्या त्या केवळ नशिबाने म्हणुन नाहि. त्याकरता घाम आणि रक्त आटवलं पब्लिकने आणि राज्यकर्त्यांनी. असो.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा Tue, 04/22/2014 - 11:37
सहमत. मोदींना मोठं करायचे म्हणून काँग्रेसला छोटे करायची काहीच गरज नाही. फक्त आताच्या घडीला उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये मोदी हाच सक्षम पर्याय आहे इतकेच.

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 09:44
सगळ्यांचे आभार! सध्यातरी महागाईवर नियंत्रण महिला सुरक्षा भ्रष्टाचार निर्मुलन पायाभुत सुविधांमध्ये वाढ (रस्ते, वीज, पाणी वगैरे) आंतरराष्ट्रीय संबंधात सुधार/बदल या प्राथमिकता असाव्यात अशी आतापर्यंत प्रतिसाद दिलेल्या 'बहुमताची' अपेक्षा दिसतेय. गंमत अशी वाटली की निवडणुक प्रक्रियेत सुधारणा, पोटासारखे कायदे आणणे, टॅक्स रिफॉर्म्स, शस्त्रास्त्र खरेदी आणि काळापैसा या मुद्द्यांवरही भाजपा जोर देत असताना (व काँग्रेसच्या तुलनेत या मुद्द्यांवर भाजपाची वेगळी विचारधारा असताना) लोकांच्या अपेक्षा मात्र या मुद्द्यांना प्राधान्यावर घेत नाहियेत याचा सारांश बर्‍यापैकी काँग्रेसचाच कार्यक्रम राबवावा, फक्त तो राबवु शकेल असा नेता भाजपात असल्याचे पर्सेप्शन असल्याने भाजपाला मत दिले जात आहे असा घेता येईल का? थोडक्यात पक्षाला मत न देता मोदी या व्यक्तीला मत दिलं जातंय असा मिडीयात जो बोभाटा होतोय तो पूर्णपणे चुकीचा नाहीये का? बाकीच्या सदस्यांच्याही मताच्या प्रतिक्षेत

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Tue, 04/22/2014 - 11:41
थोडक्यात पक्षाला मत न देता मोदी या व्यक्तीला मत दिलं जातंय असा मिडीयात जो बोभाटा होतोय तो पूर्णपणे चुकीचा नाहीये का?
अर्थातच नाही. मी व्यक्तीशः अडवाणी-गडकरींच्या भाजपाला मत देताना नक्कीच विचार केला असता. मोदींना मत देताना जो उत्स्फूर्तपणा आहे तो त्यवेळेस नक्कीच नसता, अर्थात शेवटी काँग्रेसपेक्षा हे बरे असाच विचार केला असता, पण नॉट फ्रॉम बॉटम ऑफ द हार्ट.

In reply to by ऋषिकेश

अनुप ढेरे Wed, 04/23/2014 - 22:13
महागाईवर नियंत्रण महिला सुरक्षा भ्रष्टाचार निर्मुलन पायाभुत सुविधांमध्ये वाढ (रस्ते, वीज, पाणी वगैरे) आंतरराष्ट्रीय संबंधात सुधार/बदल
हे धोरण या गोष्टीचा भाग येतात का त्याबाबत साशंक आहे. या गोष्टी बेसीक गरजा आहेत. त्या कॉग्रेसचं धोरण या नावाखाली टाकणं हे बरोबर वाटत नाही. ३७० कलम, समान नागरी कायदा, नद्या जोड, महिला आरक्षण, मराठा आरक्षण या स्पेसिफिक गोष्टी धोरणात्मक निर्णय म्हणून वर्गिकृत करता येतील. त्यामुळे ऊपरीनिर्दिष्ट ३-४ कलमं कुठल्या एका राजकिय पक्षाच्या धोरणाचा भाग आहेत असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही.

In reply to by अनुप ढेरे

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 09:19
अब आया उंट....! ;) खास भाजपाच्या अशा धोरणांसाठी मोदींना मत देणारे कमी आहेत. वरील गोष्टी करणार नाही असे कोणीच म्हणत नाही. मात्र एकदा त्याना मत दिलं की मात्र ते कोणतेही धोरण राबवु शकतात.

In reply to by ऋषिकेश

अनुप ढेरे गुरुवार, 04/24/2014 - 09:41
ही भीती कधीही कुठल्याही निवडणुकीत वाटू शकते. ही पर्टिक्युलर निवडणूक किंवा एक पर्टिक्युलर पक्ष वेगळा काढू शकत नाही आपण. आणि जर माझ्या पसंतीचं धोरण त्यांनी नाही राबवलं तर फुड्ल्या निवडणूका आहेतच खाली पाडायला त्यांना. आता ते हुकुमशहा झाले तर काय आणि त्यांनी लोकशाही व्यवस्था बंद केली तर काय अश्या भीतीचं कोणीच काही करू शकत नाही.

In reply to by अनुप ढेरे

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 10:27
काही धोरणात्मक बदल हे इर्रिव्हर्सिबल असतात काही देशाची आर्थिक धोरणे कायमची बदलणारे असतात. मोदींच्या रुपात देश ठाम भांडवलशाहीकडे कूस बदललेल मात्र असा बदल होण्यासाठी आवश्यक असे विविध मुल्यांची जपणूक करणार्‍या कायद्याचे फ्रेमवर्क भारतात नसल्याने होणारे शोषण भयावह असेल अशी भिती असेल तर?

चौकटराजा Tue, 04/22/2014 - 09:59
एक पैजेवर सांगतो महागाई नियंत्रण होणार नाही. करायचे असेल तर आय टी वाल्याना ५१ टक्के आयकर लावावा लागेल. धोनी ई ना ८५ टक्के आयकर लावावा लागेल. मोठ्या शेतकर्‍याना आयकर चालू करावा लागेल. शेतकर्‍याना दिली जाणारी किमान किंमत कमी करावी लागेल. बारशा पासून बाराव्या पर्यंतच्व्या सर्व जेवणावळीवर परवाना लागू करावा लागेल. मुख्य म्हणजे मुक्त आयात निर्यात बंद करावी लागेल. त्यापेक्षा आहे हे ठीक आहे असेच मोदी म्हणतील. कारण भाजपा हा काँग्रेसचा आर्थेक व राजकीय धोरणातील चेला आहे. ते ३७०, राममदीर वगैरे सब बकवास !

In reply to by चौकटराजा

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 12:21
महागाई नियंत्रण या विषयावर आपले विचार हे conventional आहेत. परंतु आज यासाठी out of box thinking ची गरज आहे, जी फक्त मोदींकडे आहे. १)tax rate वाढवण्यापेक्षा tax collection वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी mauritius route व अमेरिकेबरोबरची double tax avoidance treaty बंद करावी लागेल. २)जास्त उत्पादन करून नवीन sources तयार करून, शेतकऱ्यांच्या/कारखान्यांच्या/कारखानदारांच्या समस्या कमी कराव्या लागतील. ज्यात शेतापर्यंत पोचणारे रस्ते किंवा शेतमालाचे योग्य व्यवस्थापन, अति उत्पादनामुळे वाहतूक न झाल्याने होणारे नुकसान टाळणे, शेतमालाची योग्य साठवणूक, शेतमालावर प्रक्रिया करणे, व्याज दर कमी करणे, वीज पुरवठा २४ तास करणे, सुशिक्षित मनुष्यबळ, मार्केटिंग व गुणवत्तेला प्रोत्साहन, भारताची brand value वाढविणे हे प्रमुख आहेत. ३)Petroleum product आणि Edible Oil चे Import कमी करावे लागेल.त्यासाठी solar power and renewable and clean energy वर जोर द्यावा लागेल. ४)Export वाढविण्यासाठी भारतीय SME,कामगारांचे व शेतकऱ्यांचे उचित मार्गदर्शन व शिक्षण हाती घ्यावे लागेल. ५)Indian Railway, Shipping Docks यात आमुलाग्र बदल करून मालवाहतूक वेग दुप्पट आणि क्षमता ५ पट वाढवणे. ६)Planning commission मधील Toilet, CWG,२G, Coal block मधील घोटाळे परत न होऊ देणे. भाजपा हा काँग्रेसचा आर्थेक व राजकीय धोरणातील चेला आहे हे मान्य नाही. पण पुढच्यास ठेसलागल्यामुळे मागचा शहाणा होणारच आहे.

वरिल सगळी कामे ही कोणीही पंतप्रधान झाला की करतोच. त्यात काही विषेश नाही . मुळात हे प्रश्न का निर्माण होतात त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. अन्नधान्याच्या, बाबतीत पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर) करुन सुध्दा महागाई आहेच. कारण जनसंख्या वाढीवर नियंत्रण नाहीये. ते जर कमी झाले. तर अर्धे जग जिंकले. मग महागाई भ्रष्टाचार आपोआप कमी होतील.

In reply to by प्रमोद देर्देकर

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 10:12
अन्नधान्याच्या, बाबतीत पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर) करुन सुध्दा महागाई आहेच. कारण जनसंख्या वाढीवर नियंत्रण नाहीये
तसे नसावे. लोकसंख्या वाढ हा प्रश्न आहे की नव्या काळातले अ‍ॅसेट हे ठरायचेय. विक्रमी उत्पादन होऊनही महागाई आहे याचे कारण वितरण व्यवस्थेतील तृती आहे. नुसते अन्न निर्माण करून पुरत नाही तर ते योग्य प्रमाणात वितरीत व्हावे लागते, साठवणुकीच्या सुविधा चांगल्या असाव्या लागतात शिवाय हेच पवारसाहेब अर्ध्यागोष्टींच्या निर्यातीला परवानगी देतात मग या गोष्टी इथे उत्पादित होतात नी बाहेर जातात. अर्थात डिमांड-सप्लायचे गणित कोलमडते, त्यात लोकांकडे वाढलेल्या लिक्विडीटीमुळे त्यांनाही परवडते - डिमांड वाढते. मग महागई वाढते

In reply to by प्रमोद देर्देकर

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 00:09
प्रमोद देर्देकरजी, पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर)करुन सुध्दा महागाई आहेच इच्यामारी, पवार तुम्हाला टोपी लावतात आणि तुम्ही घालतात देखील. साखरेचे उत्पादन जास्त असते तर पाकिस्थानातून कशाला आयात करावी लागली असती साखर? पेप्सी/कोक सारख्या कंपन्या त्यांच्यासाठी स्पेशल साखर ५ पट भावाने आयात करतात. आपल्या साखरेला कोणी विचारत नाही म्हणून आजवर PDS च्या माध्यमातून खपवली जाते. दुध उत्पादन जास्त असते तर प्रत्येक तालुक्याला दुधाचे पदार्थ/पावडर बनवायचे कारखाने राहिले असते. फक्त आपण गहू उत्पादनात अग्रेसर आहोत, परंतु २०% गहू निव्वळ उघड्यावर साठविल्याने नष्ट होतो. पण गहू आणि ऊस यांच्यामुळे डाळ,तेलबिया,खाद्यतेले दुप्पट भावाने आयात करावी लागतात त्याचे काय? महागाईचे मुख्य कारण आहे वाढलेला डॉलर, जो साधारण ४० रुपये पाहिजे. तो आता ६१ ते ६८ असा आहे, त्यामुळे सर्व इम्पोर्टचे दर वाढतात.ज्यात मोठ्ठा वाटा पेट्रोलियम पदार्थांचा (क्रूड ओईलचा)असतो. त्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते. व सगळे भाव दीडपट व डबल होतात. ज्यावेळेला आपल्या देशातून भरघोस माल निर्यात होईल व परकीय चलन मिळेल(जसे आज IT/ITES मधून मिळते आहे) हे वाढवावे लागेल व त्याने रुपया मजबूत होईल. परकीय प्रवासी आणूनही त्यांच्या कडून आपल्याला परकीय चलन मिळेल. त्यासाठी तर मोडी उद्या वाराणसी तून उभे राहत आहेत, जेणे करून एक नवीन tourist destination तयार होईल.

कलंत्री Tue, 04/22/2014 - 10:31
मोदी प्रंतप्रधान झाले तर ही या यादीवर ते नक्कीच काम करु शकतील यात संशय नाही. लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्षही अपेक्षित असतोच असतो. मोदींनी कोणत्याही भूमिकेत प्रभावी काम करावे हीच अपेक्षा. हीच अपेक्षा राहुलनेही पूरी करावी. विरोधी पक्ष नेता असतांनाही सत्ताधारींवर वचक ठेवता येतो. आपला आणि आपल्या पदाचा मान जपता येतो. हेही पूढच्या ५ वर्षात दिसावे.

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 12:28
मला सगळ्याच वरील पैकी सगळंच करावं अशी अपेक्षा आहे! पण.. खालील गोष्टी नक्की कराव्यात.. १. दारिद्र्य रेषेखालील लोकांना जे फुकट अन्न धान्य वाटत आहेत ते बंद करावं. "अन्नसुरक्षे" पेक्षा "रोजगार सुरक्षा" द्यावी. सगळ्यांना काम मिळेल असं पाहिलं तर मग असं फुकट धान्य वाटायची गरज रहाणार नाही. कारण ते धान्य आमची कामवाली (आमचीच असं नाही.. बर्‍याच कामवाल्या..) बाहेर परत विकतात. ह्या योजनेत मिळणारा तांदुळ डोसे /इडली करायला चांगला असतो म्हणुन तो विकल्या जातो. त्यांना तो २-३/ किलो मिळत असावा (नक्की माहित नाही.. पण अत्यल्प किंमतीत मिळतो हे नक्की) सध्या कामवाल्यांकडे तो २०/- किलो विकत मिळतो. मला फुकट अन्न देऊन एखाद्याची काम करण्याची गरजच मारुन टाकणं फार फार चुकीचं वाटतं. अशानी प्रश्न सुटणार नाहीत, वाढतील.. २. ज्या लोकांनी आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण घेतलं आहे, नोकरी मिळवली आहे आणि स्वतःची परिस्थिती सुधारली आहे अशांच्या पुढच्या पिढीला आरक्षण न देण्याचा निर्णय घेणे. अतिशय श्रीमंत असुनही (घरात स्कॉर्पिओ, नोकर चाकर, महागड्या बाईक्स..) आरक्षणचा फायदा घेऊन इंजिनिरिंगच्या फी मध्ये भरघोस सवलत घेतलेले पाहिले आहेत. या पेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं (अर्थात ह्या भारतदेशात आपण गरीब आहोत हे कागदोपत्री दाखवणं काहीही अवघड नाही..). आणि ते ही एका पिढी पुरतेच.

In reply to by पिलीयन रायडर

थॉर माणूस Tue, 04/22/2014 - 12:41
मला वाटतं ओबीसींना आरक्षण घेण्यासाठी जे नॉन क्रिमी लेअर सर्टीफिकेट लागते त्या मागे हेच लॉजिक आहे. सलग तीन वर्षे सहा लाखाहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या ओबीसी व्यक्तीच्या मुलांना आरक्षण लागू होत नाही असं काहीसं वाचलं होतं. एससी किंवा एसटी बद्दल माहिती नाही. पण अर्थात, पुन्हा एकदा हे सगळं सरकारी काम असल्याने यात किती घोळ होत असतील याचा अंदाज केलेलाच बरा. पहिल्या मुद्द्याशी काही अंशी सहमत. रोजगार सुरक्षा कधीही उपयुक्त, पण यापुर्वीही अशा रोजगार गॅरंटी योजना काढल्या गेल्या होत्या. त्या किंवा या अन्नसुरक्षेसारख्या अशा कुठल्याही योजना चालवणं सोपं नाही, भ्रष्टाचारालाच भरपूर वाव असणारे प्रकार आहेत हे.

In reply to by थॉर माणूस

आनन्दा Tue, 04/22/2014 - 15:31
पण यापुर्वीही अशा रोजगार गॅरंटी योजना काढल्या गेल्या होत्या
रोजगार ग्यारंटी योजना मुळीच नकोत. वैध मार्गाने रोजगार वाढवा.

In reply to by पिलीयन रायडर

दारिद्र्य रेषेखालील लोकांना जे फुकट अन्न धान्य वाटत आहेत ते बंद करावं सहमत. यामुळे कोकणात लोक (विशेषतः पुरुष गडी) काम करत नाहीत. कारण फुकटचं खायला मिळतं. बायको मजूरी करून पैसे मिळवते मिठमसाल्यापुरते. आणि हे लोक बायकोला मारून दारू प्यायला आणि पोरं काढायची फॅकटरी चालवायला मो़कळे. परत ही दारिद्र्यरेषेखालची शिधापत्रे गावांमधे कोणालाही मिळतात. आमच्या गावातल्या एका जमिनदारलाही बीपीएल कार्ड हे पाहून मी उडलोच होतो. २०१०-११ साली अम्माने (जयललिताने) फुकट तांदूळ वाटल्यानंतर तिथले ४० टक्के भात काम करायला लोक न मिळाल्याने कापणीविना सडून गेल्याची बातमी सकाळमधे वाचली होती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पैसा Tue, 04/22/2014 - 12:59
आमच्या लांजा जवळच्या गावात शेतात किंवा काजूबागेत मजुरीचं काम करायला २०० रुपये रोजावर पण माणूस मिळत नाही. त्याचवेळी गावातली एक अख्खी वाडी काहीही काम न करता आरामात जगते. फुकट मिळतं आहे त्याहून जास्त काम करून मिळवावं असं चुकून कोणाला वाटत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 14:15
१. बद्दल मी मत नीट ठरवू शकलेलो नाहिये. दोन्ही बाजु पटतात. २. यात मात्र मी आरक्षणाच्या बाजुने आहे. आर्थिक आरक्षण असावेच पण भारतीय समाजाचा विचार करता अजुनही सामाजिक द्वेष/जात-पात बरीच आहे त्यासाठी जातीया आरक्षणही हवेच (हे आरक्षण आर्थिक कारणासाठी नव्हतेच). इतकेच नाही तर महिला आरक्षण, विकलांग आरक्षण, अंध तसेच कर्णबधीर व्यक्तींनाही वेगळे आरक्षण (शेवटची दोन आरक्षणे तर खाजगी कंपन्यांतही) हवीत असे मत आहे.

In reply to by ऋषिकेश

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 14:29
आरक्षणा बद्दल चर्चा करायची झाली तर एक वेगळा धागा होइलच.. पण तरीही.. हे मान्य आहे की काही जातींवर अत्यंत अन्याय झालेला आहे... हजारो वर्ष.. पण त्यासाठी आरक्षण देऊन परत कुणा न कुणावर अन्याय करणं बरोबर आहे का? विकलांग आरक्षण, अंध तसेच कर्णबधीर व्यक्तींनाही वेगळे आरक्षण हे मी समजु शकते.. ते गरजेचे आहे.. अगदी खाजगी संस्थांमध्येही.. महिला आरक्षणा बद्दल मला बाकी मुद्दे सुद्धा महत्वाचे वाटतात (जसं की माझ्या सारख्या सुशिक्षित, सधन घरातल्या मुलीला आरक्षणाची गरज नाही.. पण जिथे मुलींना शिकण्यासाठी संघर्ष करावा लागतो तिथे आरक्षण आवश्यक आहे) पण जाती वर आधारित आरक्षण उलट जाती व्यवस्था बळकट करणार नाही का? एखाद्या सधन घरातल्या व्यक्तिला केवळ जात पाहुन सवलत दिली तर "उच्च जाती" मधल्या अधिक पात्र व्यक्तिवर अन्याय होत नाही का? जर हजारो वर्ष झालेला अन्याय चुकीचा असेल तर हा ही अन्याय चुकच नाही का? असो.. ह्या मागे तुमचीही काही भुमिका असेलच.. धाग्याचा उद्देश हा नाही.. पण आरक्षणाच्या समर्थनार्थ कितीही मुद्दे असले तरी किमान "मेडिकल" ह्या शाखेत जातीवर आधरित आरक्षण असु नये.. (खरंतर कोणतेही आरक्षण देण्या आधी किमान गुणवत्ता असावीच. म्हणजे गरीब विद्यार्थ्याला जर गुणवत्ता असेल तर मेडिकला ला प्रवेश मिळावा आणि फि मध्ये सवलत द्यावी. पण गरीब म्हणुन कट ऑफ खाली आणु नये.)

In reply to by पिलीयन रायडर

सुनील Tue, 04/22/2014 - 15:03
अवांतर असले तरी प्रतिसाद रोचक वाटला म्हणून ...
पण आरक्षणाच्या समर्थनार्थ कितीही मुद्दे असले तरी किमान "मेडिकल" ह्या शाखेत जातीवर आधरित आरक्षण असु नये
यात मेडिकलला वेगळा न्याय का द्यावासा वाटतो? अतिअवांतर - आरक्षणातून प्रवेश घेतलेल्यासांठी वेगळ्या प्रश्नपत्रिका असतात काय?

In reply to by सुनील

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 15:27
एखादा विषय शिकायला किमान गुणवत्ता असेल तरच प्रवेश दिला जातो. जसं की इंजिनिरिंग मध्ये बारावीला ५०% गुण असावेच लागतात. त्या नंतर ९०% वालाही इंजिनिअर होतो आणि ५१% वालाही (चाल ढकल करत का होईना..पण होतोच..) एकदा का कंपनीमध्ये लागले की सगळे एक समान.. तसंच.. आरक्षण घेउन किमान निकषांमध्ये सवलत मिळवुन कुणी डॉक्टर झालं (आता किती का वर्षात होईना.. काठावर पास होऊन का होईना..) तर कसं ठरवायचं की हा मनुष्य "चांगला" डॉक्टर आहे की नाही? एकदा का पास झाले की सगळेच फक्त "डॉ." अशी पदवी लावतात. नंतर त्यातुन चांगल्या वाईटाचा फरक करता येत नाही. डॉक्टर होण्यासाठी सगळ्यांना समान पेपर द्यावा लागतो हे खरेच. पण आपल्याकडे १०० मार्क्स मिळवणाराही पासच होतो आणि ३५ मार्क्स मिळवणाराही.. दोघेही पास झाले एवढाच निकष त्यांची गुणवत्ता ठरवायला पुरेसा असेल का? अशा माणसांच्या हाती दुसर्‍याचा जीव देणं धोकादायक आहे. समजा किमान निकष शिथिल केले नाहीत, तर डॉक्टर बनणारे "सर्व" विद्यार्थी हे मुळातच हा विषय शिकायला "नक्की" सक्षम असतील. आणि त्या लिस्ट मधला शेवटचा विद्यार्थी सुद्धा सर्वसाधारण बुद्धिमत्ते पेक्षा जास्त बुद्धिमत्तेचा असेल. इथे अगदी आरक्षण घेऊनही मेडिकल मध्ये प्रवेश मिळण्या साठी मुलांना प्रचंड मार्क्स लागतात हे माहित आहे, पण ती ह्या शाखेची गरज आहे. माझ्या मते इथे माणसाच्या जीवाशी संबंध असल्याने केवळ आणि केवळ गुणवत्ता हाच निकष असावा. अर्थात ही सगळी माझी मत आहेत. आणि मला असलेल्या माहितीवर आधारित आहेत. आणि हो.. मेडिकल मध्ये "डोनेशन कोटा" सुद्धा असु नये.. मी ५० लाख डोनेशन देऊन अत्यंत सुमार बुद्धिमत्तेच्या पण अतिश्रिमंत डॉक्टर बापाच्या मुलीला एम्.बी.बी.एस ला अ‍ॅडमिशन घेतलेली पाहिलेली आहे. ही मुलगी उद्या कशी तरी पदवी मिळवेलच. पण एकदा का तिनी प्रॅक्टिस सुरु केली की कुणाला कळणारे की ती मुळात पैसे भरुन डॉक्टर झाली आहे.

In reply to by पिलीयन रायडर

आजानुकर्ण Tue, 04/22/2014 - 18:37
किमान निकष. हो हे पासिंगचे निकषही विद्यापीठातील तज्ञांनीच ठरवले आहेत ना. जर तुम्हाला ३५ टक्के कमी वाटत असतील तर एकंदर पास होण्याचे निकष ६५ टक्के वगैरे करावेत असे वाटते. त्यासाठी आरक्षणावर बोट ठेवायची गरज दिसत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 16:38
मेडिकल मध्ये "डोनेशन कोटा" सुद्धा असु नये.. मी ५० लाख डोनेशन देऊन अत्यंत सुमार बुद्धिमत्तेच्या पण अतिश्रिमंत डॉक्टर बापाच्या मुलीला एम्.बी.बी.एस ला अ‍ॅडमिशन घेतलेली पाहिलेली आहे.
हे फार महत्वाचे. मेडीकल कॉलेज फक्त सरकारी असावीत आणि डोनेशन वगैरे बंद असावे. मेडीकल ला आरक्षण पण नसावे.

वा छान! आता मोदी पंतप्रधान झाले तर पर्यंत गाडी येऊ लागली आहे. :-) असो. माझ्या काही फार वेगळ्या अपेक्षा नाहीत. कारण मूळातच बेशिस्त देश हाकणे ही अवघड गोष्ट आहे. मनमोहनसिंगांच्या जादूच्या छडीच्या किंवा अजितदादांच्या पाऊस नाही पडला तर या वाक्यांमधे त्यातला उद्दामपणा वगळला तर अर्थ खरोखरच होता. फक्त एक बोलायचेच नाहीत आणि दुसरे जरा जास्तच बोलायचे. आता मूळ मुद्दा. अपेक्षा. माझ्या खालीलप्रमाणे १. चिनी आक्रमकपणाला थंड डोक्याने आणि आश्वासकपणे उत्तर देण्याची धमक असावी २. मोदींनी दिल्लीतल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे गांधीजींच्या गावाकडे चला या धोरणास प्रत्यक्ष राबवण्यासाठी तसे विकासाचे धोरण राबवावे. (यूपीए सरकारच्या चिदंबरम यांच्यासारखे शहराकडे चला नको) ३. काँग्रेससारखा धर्माधारीत विकास कार्यक्रम नको तर सार्वत्रिक विकास कार्यक्रम राबवावा ४. मदरशांचे आधुनिकीकरण जरूर व्हावे आणि तिथले कडवे धर्म शिक्षण सौम्य करावे (लागल्यास सरकारी नियंत्रणाने) ५. यूपीए सरकारचे सरकारी काम आधुनिक तंत्रज्ञानाने सोपी करण्याचे धोरण पुढे चालवावे. पण त्यात अधिक सुलभता हवी. नाहीतर सुधारित प्रणालीतही फ्रँकींगच्या पावत्या देण्यासाठी पैसे खाणारे लोक आहेत. त्या पावत्या ऑनलीईन जनरेट झाल्या तर लोक स्वतः प्रिंट करू शकती. फ्रँकींग १ उदाहरण झालं. हे थोड्याबहुत फरकाने सर्वत्र लागू होते. ६. रोडमाफीयांवर कारवाई व्हावी. असो, वर्षे ५ आहेत आणि अपेक्षा ५० वर्ष पुरतील अश्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 14:12
पुपे! {इतकी मोदी-भक्ती करूनही ;) }डोळे उघडे ठेऊन दिलेला प्रतिसाद (विशेषतः#५) खरोखरच आवडला! :) अधिक तंत्रज्ञान हा भ्रष्टाचार नियंत्रणावर सर्वात प्रभावी उपाय आहे असे माझेही मत आहे. कायदे/लोकपाल वगैरे गरजेचे आहे पण ते पोस्ट-इन्सिडन्स झाले. प्रतिरोधकाचे काम हे तंत्रज्ञान करू शकेल. फक्त, माझा अंदाज असाय की क्र.२, ४ व ६ यात फारसे काही होणार नाही

In reply to by ऋषिकेश

चैतन्य ईन्या Tue, 04/22/2014 - 16:25
{इतकी मोदी-भक्ती करूनही Wink }डोळे उघडे ठेऊन दिलेला प्रतिसाद (विशेषतः#५) खरोखरच आवडला! Smile >> माझ्या मते बरेच लोक डोळे उघडे ठेवूनच मोदींना पाठींबा देता आहेत पण तथाकथित आधीच डोळे उघडलेल्यांना ते अजिबात मान्य नसते. मोदिन बाबत त्यांचे डोळे मात्र झापड लावलेल्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे एकाच विषयाभोवती फिरत असतात. पण मान्य करायची इच्छा नसते. बाकी कोंग्रेसपासून बसपा पर्यंत सगळे जाती पातीचे राजकारण करतात फक्त जातीयवादी मोदी आणि भाजपच असतो. पण असे बोलले की लगेच गांधींना मारणारे वगैरे वाक्य येतात आणि चर्चा पुन्हा भरकटते. जितक्या दंगली कोंग्रेसच्या अतिशय घाणेरड्या राजकारणाने झाल्या आहेत तितक्या बाकीच्यामुळे झाल्याचे वाटत नाही पण पुन्हा आळ मात्र हिंदू संघटनेच्या खात्यात. ह्याला उत्तम राजकारण म्हणतात पण ६० वर्ष हेच झाल्याने आता फार लोक त्याला भुलत नाहीयेत. बाकी मोदी नक्की काय करू शकतील ह्याबद्दल बऱ्याच भक्तांना खात्री नाहीये. मुळातच जुनी खोड सत्ता सोडायला तयार नाहीत आणि सुषमा स्वराज सारखे लोक आपला चान्स गेला म्हणून ज्या पद्धतीने काहीच करत नाहीये ते पाहता जरी ३०० जागा मिळाल्या तरी नक्की सरकार कसे चालेल ह्याबद्दल प्रचंड शंका आहे. बाकी हे तसेही सेक्युलर लोकांच्या पथ्यावरच आहे. दोन्ही कडून बोंबा मारता येतील.

In reply to by चैतन्य ईन्या

शिद Tue, 04/22/2014 - 16:51

In reply to by शिद

माहितगार Tue, 04/22/2014 - 20:54
शिद यांनी अवांतरच्या दुव्यात जो सकाळ बातमीचा दुवा दिला आहे. उमर अब्दुल्लांच्या वाक्याच समर्थन करता येत नाही. त्यांच्या राज्यातील राजकारण सांभाळण्याकरता ते जे बोलले तसं काही बरळण त्यांना गरजेच वाटल असेल का कि तो विनोद करण्याचा फसलेला प्रयत्न होता (त्यांच्या वाक्यात jokes apart असे शब्द आहेत) काय कुणास ठाऊक. बिहारात गिरीजा सिंघ जे काही बोलले त्याचा प्रतिवाद करत त्यांना बाजू बहुधा भाषणस्वातंत्र्याची घ्यायची असावी. तसे असेल तर भाषणस्वातंत्र्या करता अजूनही काही टोकाचे बोलता आले असते. पाकीस्तानला जाइन वगैरे म्हणून मोदींच्या इलेक्श्न कँपेनला आपण मदतच करतोय हे त्यांच्या गावी आले नसावे. उमर अब्दुल्ला जे बोलले त्याच समर्थन अजिबात करावयाच नाही. पण सकाळच्या वृत्तातील त्यांच्या वाक्याचा अपुर्ण अनुवादही जबाबदारपणाच लक्षण म्हणता येत नाही. अनेक महत्वाच्या प्रसंगी मराठी वृत्तपत्रे अनुवादात घोळकरत असतात. ते घोळ बरोबर समजून मराठी वाचक रिअ‍ॅक्ट होत राहतात याचे एकुण सामाजिक राजकीय परिणाम काय झाले हा वेगळ्या अभ्यासाचा विषय ठरावा. "No, jokes apart, I think this shows an extreme level of intolerance that has never been seen before...I disagree with a whole lot of things that Mr Narendra Modi stands for but I don't think that makes me any less Indian than a person who supports Mr Modi," या वाक्याचा सकाळवृत्ताने अनुवाद देण्याचे टाळणे हा राष्ट्रीय महत्वाच्या बातम्या प्रस्तुत करतानाचा ढिसाळपणा असे माझे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by माहितगार

विकास Tue, 04/22/2014 - 21:16
मराठी वृत्तपत्रांनी यावेळेस चुकीचे लिहीले आहे असे वाटत नाही... एनडीटिव्ही वर आल्याप्रमाणे, "Jammu and Kashmir chief minister Omar Abdullah has said he will not stop opposing Narendra Modi, the BJP's prime ministerial candidate, even if that means having to take a bus to Pakistan." तरी देखील अब्दुल्लांना संशयाचा फायदा देता येईल. कारण, त्यांचे वाक्य गिरीराज सिंग यांच्या वक्तव्याला प्रतिसाद म्हणून होते. तरी देखील आपण काय बोलत आहोत आणि त्याचा काय अर्थ लावला जाऊ शकेल हे समजणे गरजेचे असते... ते बर्‍याचदा राजकारण्यांना समजत नाही. तेच येथे झाले असावे.

In reply to by विकास

माहितगार Wed, 04/23/2014 - 09:43
अलिकडच्या आप की अदालत मध्ये राज ठाकरे; पत्रकार मंडळी अर्ध्याच वाक्याचा संदर्भ देऊन दिशाभूल कशी करतात या बद्दल बोलत होते. आपण एनडीटिव्ही च्या वृत्ताची हेडलाईन देत आहात ती अटेंशन ग्रॅबींगच्या उद्देशाने बनवलेली आहे. उमर अब्दुल्लांची बोलण्यातली चूक आहे ती आहे पण त्यांच्या वाक्यातला ' मी मोदींना विरोध करतो म्हणजे कमी भारतीय ठरत नाही' यातल त्यांच भारतीयत्व ते स्वतःहून सांगताहेत ती बाब एनडीटिव्ही बातमीत येते सकाळच्या येत नाही. उमर अब्दुल्लांच माप त्यांच्या पदरात घालण्यास हरकत नाही. काश्मिर सारख्या नाजूक बाबतीत वार्तांकन करताना मराठी वृत्तपत्रानी अधिक काळजी घ्यावी एवढेच वाटते.

रमेश आठवले Tue, 04/22/2014 - 14:57
मोदी पन्तप्रधान तर होणारच असे बहुसंख्यांक लोकाना वाटत आहे. तेवढे पुरेसे नाही. त्यांना २/३ बहुमत मिळाले तर १ ते ५ पैकी खालील दोन गोष्टी करता येतील. १. घटनेतील ३७० कलम काढून टाकून काश्मीरची डोकेदुखी कायमसाठी दूर करता येईल. २. युनिफोर्म सिविल कोड बिल पास करता येईल., म्हणजे सर्व नागरिकाना धर्माचा विचार न करता एकच कायदेपद्धती लागू करता येईल. त्याशिवाय ३. लोकपाल बिल अमलात आणणे. ४. न्यायालयांच्या खटल्याच्या निकालाचा वेग निदान दहा पटीने वाढवणे. ५. सर्व पदार्थांच्या महागाईचे मूळ खनिज तेलाच्या किमतीवर अवलंबून आहे. सध्या केंद्र सरकार आयात तेलावर अफाट कर लावते आणि त्यानंतर राज्य सरकारे आपला कर लादतात. हे कर बंद करून खनिज तेल ज्या दरात सरकार विकत घेते त्याच दरात विकल्यास महागाई लगेच कमी करता येईल.

बॅटमॅन Tue, 04/22/2014 - 15:20
मोदी पंप्र झाले तर अल्पसंख्यांकांसाठीचे कॉन्सण्ट्रेशन कँप सुरू होतील. (असेच टाळीखौ उत्तर अपेक्षित असते बर्‍याच सूडोसेक्युलरांना म्हणून दिले बाकी मोदी आले काय नि नै काय, किती बरावाईट फरक पडेल याबद्दल शंकाच आहे. असो.)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:22
परवाच्या लोकसत्तामध्ये असाच काहीसा लेख आला होता ब्वा! वाचला असेल बर्‍याच जणांनी. -(ऋषिकेश च्या प्रश्नांचं 'नक्की' प्रयोजन काय असा प्रश्न पडलेला) प्यारे

In reply to by प्यारे१

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 15:25
प्रयोजन असे काही खास नाही. मी मोदी समर्थक अजिबात नाही हे माहिती आहेच. मात्र त्यांच्याबद्दलचे आकर्षण चकीत करणारे आहे. तेच ते आरोप प्रत्यारोप यांच्या पुढे जाऊन दुसरी बाजु समजून घेताना, नक्की काय अपेक्षा आहेत याचा अंदाज घेतोय.

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:39
काँग्रेसबद्दल भरपूर राग आहे हे प्राथमिक नि सगळ्यात मुख्य कारण! काँग्रेसच्या विरोधात उभं राहू शकणारं कुणी आहे ह्याबाबत जनतेला थोडासा विश्वस वाटत आहे नि त्यामुळं लोक मोदीना समर्थन करत आहेत. केजरीवालनी थोडीशी मॅच्युरिटीची भूमिका (जशी सुरुवातीला दाखवली होती तशी) दाखवली असती तर मोदींऐवजी केजरीवालना जास्त समर्थन मिळालं असतं. त्यांच्या 'अतिघाई संकटात नेई' धोरणानं समर्थन दुरावलं ही वस्तुस्थिती आहे. जनतेला एक पर्याय हवा आहे. बस्स्स!

In reply to by प्यारे१

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 15:42
मान्य. वर अर्ध्यावर काढलेला निष्कर्षही तिथेच निर्देश करतो आहे. आता अधिक मते आली की बळकटी येईल. मोदी या व्यक्तीमागे अपेक्षा आहे, धोरणांबद्दल फारशी नाराजी नाही, अंमलबजावणीबद्दल आहे. समांतरः फक्त अंमलबजावणी करण्यासाठी जनादेश देताना सदर व्यक्ती धोरणेही बदलु शकते, त्यांना तसा अधिकार असतो हे किती जण लक्षात घेताहेत हे आता समजणार नाही

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:52
व्यक्ती लांबचा विचार करत असेल तर धोरणं अचानक बदलणं होणार नाही असं वाटतंय. मोदीं नी आपली एक्स्ट्रीमिस्ट ही प्रतिमा आधीच बनवली आहे. त्यात आणखी तेल घालून फायदा होणार नाही हे मोदींसारख्या 'बनिया'ला कळत नसावं असं वाटत नाही. त्यामुळं खाजगीकरणातून मोठ्या कंपन्यांना आवश्यक तेवढी रोजगार निर्मिती केली जाईल, योग्या योग्यतेचा फारसा विचार न करता अर्थकारणाला चालना मिळेल, मध्यमवर्ग आनंदात राहील असं चि त्र उभं राहील आणि साधारण २ टर्म्स (१० वर्षं) हे प्रकार घडतील असा अंदाज आहे. आणि हो पाकिस्तान कुरापती कमी करेल त्यामुळं संबंध सुधारतील. केजरीवालच्या सगळ्या कृत्यांबाबत सुद्धा विचारपूर्वकच गोष्टी होत असाव्यात असा संशय आहे.

In reply to by ऋषिकेश

पैसा Tue, 04/22/2014 - 15:52
फक्त अंमलबजावणी करण्यासाठी जनादेश देताना सदर व्यक्ती धोरणेही बदलु शकते,
मोदींच्या बाबत हे शक्य नाही. एकतर भाजपाचं सरकार आलंच तर युत्या करूनच येईल. हे युतीतले भागीदार मुख्य भागीदार पक्षाला आपल्या तालावर नाचवतात. शिवाय भाजपमधेच इतर अनेक 'स्वयंभू' नेते आहेत. त्यामुळे मोदींना सगळ्यांना बरोबर घेऊन जावंच लागेल. नाहीतर सरकार फारकाळ टिकणार नाही. काँग्रेस सोडून कोणाचेही सरकार आले तर एकहाती रिमोट नसेल.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 16:46
मी स्थैर्याच्या बाजुने नाहिचे. राजीव, युपीए-२ इतके स्थिर होते की पडता पडेना. काय उपेग झाला? उलट राव, युपीए-१, वाजपेयींना इतके जण ब्लॅकमेल करणारे होते / अल्पमतातील सरकारे होती, तरी याच सरकारांनी उजवी कामगिरी केलेली दिसते

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 16:52
एखाद्यानं सर्कारी परमनंट जॉब मिळाला म्हणून परफॉर्म न करण्यासारखं सरकार(पण) वागतं का काय? ;) - विरोधकांनी अधून मधून अविश्वास ठराव आणून ऑक्सिजनवरचं सरकार बघायला उत्सुक असलेला ;)

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Tue, 04/22/2014 - 17:10
अस्सं! मला वाटलं की पैसा यांच्या कमेंटीतील "नाहीतर सरकार फारकाळ टिकणार नाही" याला अणुमोदण होतं.

कवितानागेश Tue, 04/22/2014 - 15:48
आधी पर्यावरणाकडे आणि शेतीकडे, ऑर्गानिक फार्मिन्ग्कडे लक्ष द्यावं असं वाटतंय. त्यानंतर १-१- गाव, खेडे स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष द्यावं. भारत का खरोखरच कृषीप्रधान देश आहे.

In reply to by कवितानागेश

राघव Sun, 04/27/2014 - 15:36
सोबत- विकेंद्रीकरण, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण, पाणी-शेतीचा पायाभूत विकास, आर्थिक धोरणांत व करांत मूलगामी बदल, सागरी सीमा सुरक्षेवर भर, ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आश्वासक वातावरण निर्मिती, नवीन संशोधनास चालना देणारी धोरणे, तयार मालाच्या आयाती पेक्षा निर्यातीवर भर, महिला सुरक्षेसंबंधी तातडीचे आश्वासक निर्णय... यादी कितीही वाढू शकते. पण यातले कोणते आधी कोणते नंतर याचा निर्णय करण्याची इथं गरज वाटत नाही. अनेक मुद्दे महत्वाचे आहेत व समांतर पणे चालवावे लागतील. अर्थात् अनेक आव्हाने आहेत. त्यात नवीन सरकार काय काय करू शकेल ते बघायचे. पण एवढे मात्र खरे की लोकांच्या अपेक्षा खूप आहेत व त्यासाठी प्रचंड मेहनत नवीन सरकारला करणे आहे.

काहि दिवसांपूर्वी मोदिंचे पुण्यात झालेले भाषण ऐकले. त्यात त्यांनी एक चांगला मुद्दा मांडला होता तो म्हणजे संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा. कारण सरकार येत असतात आणि जात असतात पण या संस्था ज्यांच्या मार्फत हा देश चालवला जातो त्या सक्षम असल्या तर कोणतही सरकार असल्याने फरक पडणार नाही. सरकारी संस्थाना (उदा. सैन्यदले,कॅग किंवा इतर तद्सम संस्था) त्यांचे कार्य पूर्ण क्षमतेने करण्यासाठी प्रवृत्त करणे,प्रोत्साहित करणे व त्यांच्या कामाला योग्य दिशा दाखवणे. त्यांनी भाषणात एक वाक्य वापरले होते "मोदीने गुजरात मे कुछ नहि किया जो कुछभी आपको दिखता है वो किया है तो इन संस्थाओने." त्यांनी पंतप्रधान झाल्यावर इतके जरी केले तरी बरेच बोळे निघुन पाणी वहाते होईल.

विकास Tue, 04/22/2014 - 17:28
मराठी म्हणीचा वापर करायचा झाला तर "अजून काका म्हणायला वेळ आहे... :)". निवडणूक चालू होण्याआधी देखील २७२ जागा मिळतील का याबाबत साशंकता होती पण महाराष्ट्रात जे मतदारांची नावेच गहाळ होण्याचे प्रकार घडले आहेत त्यावरून असे वाटते की हाच लेख "जर राहूल गांधी अथवा प्रियांका गांधी-वड्रा पंतप्रधान झाल्यातर..." (पुढे, "जनतेने काय करावे?") असा लिहीण्याची वेळ आली आहे का असे वाटते. असो. तुर्तास या लेखासंदर्भात... सर्वप्रथम "उत्तर नीट ठरवून प्रश्न सोडवा. व्यवस्थित आल्टरेनेटीव्ह असल्याशिवाय कुठलिही प्रस्थापित गोष्ट बदलू नका... राज्य करणे म्हणजे आंदोलन नसते अथवा राजकीय भाषणे नसतात. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असणे आणि देशाचा पंतप्रधान असणे यात फरक आहे. " त्या अर्थाने राज्यकारभाराला दिशा देणे महत्वाचे आहे. आज अशी दिशा आहे असे वाटत नाही. जर दिशा योग्य असली तर तुम्ही दिलेल्या यादीतली अनेक कामे काही विशेष न करता होऊ शकतात. आजही ती स्थानिक पातळीवर कुठे न कुठे होतच आहेत. त्या अर्थाने सर्वप्रथम देशाला नेता आहे, रिमोट कंट्रोल नाही अथवा नुसताच चळवळ्या माणूस नाही ही जाणीव जनतेला आणि नोकरशाहीला येणे गरजेचे आहे. ते मोदींनी करावे ही अपेक्षा आहे. तसेच, जर मोदी पंतप्रधान झाले तर त्यांचे मंत्रीमंडळ कसे असेल यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून राहतील. वर दिलेल्या यादीतली प्रत्येक काम कुठल्यान कुठल्या रुपाने (पाठ थोपटून घेण्याइतके) नक्की होईल. पण राम जन्मभूमी अगदी सुप्रिम कोर्टाचा निकाल आला तरी जो पर्यंत दोन समाजात ठराव होत नाही तो पर्यंत होणार नाही आणि ते देखील करतील असे वाटत नाही. मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील इतके नक्कीच वाटते. पण ती priority नसेल. तेच समान नागरी कायद्याबद्दल.... मात्र काश्मीर ही नक्कीच priority असेल पण केवळ ३७० कलमानेच नाही. असो. अर्थात नेहमीचे पालूपदः असे मला वाटते... :)

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 10:20
दि. १६ मेनंतरचे विधिलिखित तसेही सर्वप्रथम द्रष्ट्या मनमोहन सिंग यांनीच टिपले होते. म्हणूनच आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, असे त्यांनी ३ जानेवारी रोजी जाहीर केले आणि '७, रेसकोर्स'मधून बस्तान हलविण्यासाठी दिल्लीच्या पराभूत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अकबर रोड चौकातील बंगल्याचे नूतनीकरण त्यांनी झपाट्याने पूर्ण करायला लावले. इतकी वर्षे काही न बोलताही थकलेले पंतप्रधान मनमोहन सिंग १६ मेनंतर आपला गाशा गुंडाळतील आणि १५ महिन्यांपासून अथकपणे बोलणारे नरेंद्र मोदी त्यांची जागा घेतील, हे वास्तव आता राजकारणातील सर्वच सुज्ञांनी स्वीकारले आहे. गेले वर्षभर संवादहीनता आणि अतिसंवादाच्या दोन टोकांदरम्यान झुलणारा भारत १६ मेनंतर रोखठोक संवादावर स्थिरावणार आहे. १६ मेनंतर धर्मनिरपेक्ष भारत कूस बदलणार, ही धारणा निधर्मी बुद्धिवाद्यांतही दृढ झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या ६० वर्षांच्या कुशासनाचे १६ मेनंतर ६० महिन्यांत सुशासनात परिवर्तन करता यावे म्हणून मोदींनी दोन महिने आधीपासूनच काश्मीरप्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मागच्या दाराने मुत्सद्देगिरी सुरू केली आहे. गेली १० वर्षे सरासरी १५ ते १८ तास अहोरात्र काम करून मनमोहन सिंग एवढे क्षीण झाले आहेत की त्यांना त्यांचे मानसपुत्र डॉ. संजय बारू यांनी पुस्तकात केलेल्या खऱ्या-खोट्या दाव्यांवर भाष्य करायला शब्द उच्चारणेही जड जात आहे. १६ मेनंतर मोदीच पंतप्रधान होणार असल्यामुळे देशाची वेगवान प्रगती साधण्यासाठी हवा तसा हेडस्टार्ट लाभावा म्हणून मनमोहन सिंग त्यांच्याकडे परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयाची सूत्रे आधीच का सोपवित नाहीत, असा प्रश्न दिल्लीतल्या मोदीमय झालेल्या मुत्सद्यांना पडला आहे. मोदींचे सरकार येणार ही दगडावरची रेष असल्यामुळे शेअर बाजाराप्रमाणे दिल्लीच्या हवामानातही आधीच अच्छे दिन आले आहेत. एप्रिलचा तिसरा आठवडा लोटून गेला तरी दिल्ली ३३ आणि २० अंश सेल्सियसच्या आल्हाददायक कोषातून बाहेर पडायला तयार नाही. मे महिन्यातील हवामान तर याहूनही सुखद असेल अशी त्यामुळे अपेक्षा उंचावली आहे. या सर्व स्पष्ट पूर्वसंकेतांची दखल घेऊन मावळत्या पंतप्रधानांनी प्रस्थापित परंपरा आणि संकेत बाजूला सारून मोदींच्या संमतीने भ्रष्टांचा निःपात करणारे देशाचे पहिले लोकपाल निवडायला, तसेच नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती करायला काहीच हरकत नाही. १६ मेनंतरचे विधिलिखित तसेही सर्वप्रथम द्रष्ट्या मनमोहन सिंग यांनीच टिपले होते. म्हणूनच आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, असे त्यांनी ३ जानेवारी रोजी जाहीर केले आणि '७, रेसकोर्स'मधून बस्तान हलविण्यासाठी दिल्लीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अकबर रोड चौकातील बंगल्याचे नूतनीकरण त्यांनी झपाट्याने पूर्ण करायला लावले. पण मनमोहन सिंग यांच्याकडून सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या अपेक्षा मात्र १६ मे उजाडेपर्यंत संपणार नाहीत. केंद्रात मोदींचे सरकार येण्यापूर्वीच मनमोहन सिंग यांच्या हातून सर्वशक्तीमान ठरू पाहणाऱ्या लोकपालाची नियुक्ती आटोपून टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणजे पंतप्रधान झाल्याझाल्याच मोदींना गुजरातच्या लोकायुक्तांप्रमाणे लोकपालाची नियुक्ती निरस्त करण्यासाठी पुन्हा सुप्रीम कोर्ट गाठण्यासाठी आदेश द्यावे लागतील. म्हणूनच लोकपाल आणि लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीत ढवळाढवळ करू नका आणि हा विषय नव्या सरकारवर सोडा, असा दम मोदींच्या भारतीय जनता पक्षाने मनमोहन सिंग यांना दिला आहे. दुसरीकडे गलितगात्र केंद्र सरकारमध्ये किती दम आहे याची चाचपणी करण्याची संधी मोदी सोडत नाहीत. मनमोहन सिंग सरकार अजूनही तीन आठवडे सत्तेत आहे. आपल्या निवडणूक प्रचारावर १० हजार कोटी रुपये खर्च झालेत की नाही, याची ते अजूनही हव्या त्या यंत्रणेमार्फत चौकशी करू शकतात, असे ते उपरोधाने आव्हान देत आहेत. दि. १६ मे रोजी मोदींची सत्ता येणार याची पूर्ण खात्री पटल्यामुळे संघपरिवारात महिन्यापूर्वीच जल्लोष सुरू झाला आहे. ही अभूतपूर्व गोष्ट आहे. राजकारणाशी संघाचा काही एक संबंध नाही, असे सांगणारेच आता आणीबाणीनंतर प्रथमच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उघडपणे सक्रियता दाखविताना संघाच्या लाखो गटनेते आणि स्वयंसेवकांनी भाजपच्या देशव्यापी प्रचारात कसे झोकून दिले, याची वर्णने करीत आहेत. देशाला निर्नायकीच्या गर्तेतून बाहेर काढून निर्णायक टप्पात पोहोचविणाऱ्या संघाची यशोगाथा सांगण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांमध्ये आधीच स्पर्धा सुरू झाली आहे. आणीबाणीनंतरच्या काँग्रेसविरोधी यशाचे शिल्पकार जयप्रकाश नारायण यांच्याप्रमाणे सरसंघचालक मोहन भागवत मोदींच्या १६ मे रोजी मिळणाऱ्या यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. मोदींची सत्ता येणार याची जाणीव झाल्यामुळे केंद्रातील अनेक भ्रष्ट आणि उर्मट मंत्री त्यांचा नम्रपणे मोदीजी म्हणू उल्लेख करू लागले आहेत. पण त्यांची खैरियत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून त्यांना वर्षभरात तुरुंगवासात टाकण्याचे वचन मोदींनी देशवासीयांना दिले आहे. एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई करणारे रियल इस्टेटचे जादूगार सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना तुरुंगात टाकण्याच्या मोदींच्या योजनेची वाच्यता साध्वी उमा भारतींनी केली. पण देशाच्या अतिवेगवान विकासासाठी प्रतिभावान वड्रांचा फॉर्म्युला उपयुक्त ठरू शकतो, याची जाणीव असलेले मोदी त्यांना फार काळ तुरुंगात ठेवणार नाहीत. उलट शिखरावर पोहोचलेला देशाचा आर्थिक विकासदर खुंटविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सोनिया गांधी आणि शहजादे राहुल गांधी यांना तुरुंगात टाकण्यासाठी रॉबर्ट वड्रंना माफीचा साक्षीदार म्हणून प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर असेल. मोदींच्या विरोधकांना भारतात थारा नसेल. त्यांना पाकिस्तानात जावे लागेल, असे बिहारमधील मोदीसमर्थक गिरीराज सिंह यांचे म्हणणे आहे. त्यामुळे इतिहासाच्या अज्ञानावरून मोदींची खिल्ली उडविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही १६ मेनंतर पाकिस्तानात तक्षशीला पाहायला जावे लागेल. हे सारे घडणार आहे १६ मेनंतर. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर. पण मोदी सत्तेत आल्यानंतर आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या खचलेल्या भारताला बलशाली बनविण्यासाठी भाजप आणि संघाने आधीपासूनच रोडमॅप आखून ठेवला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सोशल मीडियापासून सोशल इंजिनीअरिंगपर्यंत मोदींच्या भाजपने जबरदस्त मोर्चेबांधणी केल्याची खात्री पटल्यामुळे त्यांच्या दृष्टीने १६ मे ही तारीख संदर्भहीन ठरली आहे. साभार: 'अच्छे दिन आनेवाले है...' सुनील चावके Monday April 21, 2014

In reply to by असंका

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 15:30
वरचा लेख लेखकाचा निव्वळ कल्पनाविलास असून मोदींचा जोर विकासावरच असणार आहे. गडे हुवे मुर्दे बाहर निकालना गलत होगा. क्योंकी सभी लोगोंकी हालत अभी बहोत खस्ता है! ये रहा एक उदाहरण:- आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या, मोदींच्या नावे चिठ्ठी देश नवी दिल्ली - गाझियाबादच्या एका 35 वर्षीय व्यक्तीने मसूरी भागात स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. या गृहस्थाने आत्महत्या करण्यापूर्वी नरेंद मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून आपण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. आपल्या मुलीचा सांभाळ करा, अशी विनंती केली आहे.या गृहस्थाचे नाव ओमप्रकाश तिवारी असे असून तो येथील लोणी भागात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान होणार आहात. मी आर्थिक हलाखीमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालो आहे. माझ्या मृत्युनंतर माझ्या मुलीचा सांभाळ करावा, अशी विनंती करणारी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. आपल्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही, असे त्याने आपल्या एक पानाच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून चांगली नव्हती. त्यामुळे त्याने गतरात्री हे पाऊल उचलले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते. आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या, मोदींच्या नावे चिठ्ठी

In reply to by आयुर्हित

असंका Wed, 04/23/2014 - 15:54
जर हा लेख कल्पनाविलास आहे तर आपण तो इथे डकवण्याचे कष्ट का घेतले? लेखात अनेक ठिकाणी पुढचा पंतप्रधान कोण होइल त्यावर मतप्रदर्शन केले गेले आहे. तो फक्त कल्पनाविलास असून प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही असे तरी मग आपले मत आहे का?

In reply to by असंका

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 16:04
मिपावरील मूळ लेखाचे नाव आहे "जर मोदी पंतप्रधान झाले तर...." हादेखील एक कल्पनाविलासच आहे, अजून तर देशातील मतदानही पूर्ण झालेले नाही. तरी प्रत्येकाने, आपल्या परीने कल्पनाविलासच केलेला आहे. त्यात आपणही आहात की! आणि प्रत्यक्षात मोदी काय निर्णय घेणार आहेत कोणास ठावूक? कृपया नावाप्रमाणे कंफ्युज्ड होऊ नका व इतरांनाही करू नका!

In reply to by आयुर्हित

असंका गुरुवार, 04/24/2014 - 08:44
आपण वैयक्तिक होत आहात...माझा ID हा संपूर्णपणे माझा वैयक्तिक विषय असून चर्चेसाठी उपलब्ध नाही. आणि आपण लक्षात घ्या की, कल्पना करणे आणि कल्पनाविलास करणे ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मूळ लेखात लेखकाने काही कल्पना मांडल्या आहेत. त्या कल्पनाविलास आहेत असे आपण आता म्हणत आहात. हे म्हणजे विषय भरकटवणे झाले. माझा प्रश्न एव्हढाच होत की, वरती जो लेख (म.टा. मधला) आपण स्वतःहून डकवलेला आहे, ते आपल्या नेहेमीच्या भूमिकेशी सुसंगत आहे असं आपल्याला वाटतं का? जर हो, तर पुढे माझा आपल्याला काहीही प्रश्न नाही. जर नाही, तर मला शंका आली, की जो लेख तुमच्या मताविरुद्ध आहे, तो इथे सगळयांच्या नजरेसमोर आणण्याची आपणास काय गरज वाटली? पण आपण हो किंवा नाही काहीही न बोलता कुठेतरी भलतीकडेच जात आहात. कृपया, उत्तर नसेल द्यायचे तर देउ नका, पण परत एकदा - वैयक्तिक टिप्पणी टाळा.

In reply to by असंका

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 11:56
कल्पना करणे : जर मोदी पंतप्रधान झाले तर.... हे वाक्य सोडले तर उरलेला लेख हा पूर्ण "कल्पनाविलास"च आहे. मोदी आणि भारतीय जनता पक्ष काय करणार आहेत ते आधीच १००% स्पष्ट आहे, ज्याची माहिती आपल्याला भारतीय जनता पार्टी घोषणापत्र 2014 वर देऊन आज १६ दिवस पूर्ण झाले आहेत. तुमचा ID समजा अबकड असला तर अबकड जी, कृपया कंफ्युज्ड होऊ नका व इतरांनाही करू नका! असेच म्हणेन. स्वगत: माझा एक समझ होता, जी व्यक्ती आपल्या गुण/अवगुणांवर स्वत:हून विनोद करते, ती खरोखरच विनोदी असते.

In reply to by आयुर्हित

असंका गुरुवार, 04/24/2014 - 17:12
अजूनही आपण विषय भरकटवत आहात. आपण स्वत:हून जो लेख सर्वांसमोर ठेवला त्यातील मतांशी आपण सहमत आहात की नाही? जर हो, तर मग पुढे माझे काही म्हणणे नाही. पण जर नाही, तर मग आपण सर्वांना ही माहिती का देत आहात हा माझा दुसरा प्रश्न. सोपे करून सांगतो- " हो" की "नाही" ? यांपैकी एक उत्तर पहिले ठरवून घ्या. मग माझ्या प्रश्नाचा उर्वरीत भाग वाचा. आणि आपण जो पर्याय निवडला आहे, त्यानुसार त्याचे उत्तर द्या.- म्हणजे द्यायचे असेल तर. पण आपण विनाकारण वैयक्तिक होणे टाळावे ही माझी आपणास परत एकदा कळकळीची विनंती आहे.

In reply to by असंका

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 17:43
लेखातील मतांशी आपण सहमत आहोत! फक्त.... १)डॉ मनमोहन सिंग हे जाणकार, अनुभवी अर्थतज्ञ आहेत व त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, परंतु ते त्यांना कॉंग्रेसने अमलात आणू दिले नाही किंवा Implement करता आले नाही, त्यामुळे त्यांचा हा एक गुण झाकोळला गेला आहे. त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, पडद्याच्या मागून/पुढून नक्कीच मार्गदर्शन घेता येईल व हे भारतासाठी मोठे योगदान ठरेल. यांच्या नावाने एक शिष्यवृत्ती सुरु करून भारतात राहून सेवा देवू इच्छिणाऱ्या हुशार लोकांना अधिक हुशार करता येईल. २)रॉबर्ट वद्रा यांना नोबेल/ऑस्कर/ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड/लिम्का बुक ऑफ रेकोर्ड/भारतरत्न सर्व जे काही देता येईल ते देवून सन्मान करावा व त्यांच्या नावाने एक Training Institute/मुक्त विद्यापीठ काढावे व त्यांचे अनुभव सर्वांपुढे येवू द्यावेत. प्रत्येक तालुक्यातील एक व्यक्ती यांच्याकडे जबरदस्तीने का होईना शिकण्यास पाठवावी. यातून चौकटराजासारख्या निवृत्त व्यक्तींना ५००/- रु चे पण ३ ते 7 वर्षात १कोटी (जास्त अपेक्षा नाही)बनवता आले तरी मी माझे भाग्य समजेन. ३)सर्व अपराधी खासदार(मग ते सोनिया गांधी असो की पवार की मोदी)सर्वांना न्यायालयात उभे करणे व १२ महिन्याच्या आत अपराध सिद्ध करणे/मुक्त करणे.

In reply to by आयुर्हित

कलंत्री Fri, 04/25/2014 - 10:40
न्यायालयात जाऊन एखादे आरोप सिद्ध करा अथवा त्या व्यक्तिवर सभा / वर्तमानपत्र / माध्यमातून टिका करु नका.

In reply to by आयुर्हित

असंका Fri, 04/25/2014 - 10:54
वैयक्तिक टिप्पणी टाळल्याबद्द्ल धन्यवाद. वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले. पण असो(-माणसांचे मतपरीवर्तन होणे ही काही अशक्य गोष्ट नाही. काय?)

In reply to by आयुर्हित

असंका Fri, 04/25/2014 - 10:57
वैयक्तिक टिप्पणी टाळल्याबद्द्ल धन्यवाद. वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले. पण असो(-माणसांचे मतपरीवर्तन होणे ही काही अशक्य गोष्ट नाही. काय?)

In reply to by असंका

संपत Fri, 04/25/2014 - 14:22
वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले.
हा लेख उपहासात्मक आहे असेच मलाही वाटतंय, पण आयुर्हीत यांचे मत तो मोदींची स्तुती करणारा आहे असे असावे.

In reply to by संपत

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 15:33
मी स्तुतीप्रिय नाही व (कोणी/कोणाचीही)स्तुती केली म्हणून कोणालाही डोक्यावर घेणार नाही/घेवू देणारही नाही. मला मांडलेले जे मुद्दे रास्त वाटतात त्याचेच मी नेहमी समर्थन करतो. आजपर्यंतच्या लेखात मी मोदींची स्तुती केलेली नाही तर त्यांनी केलेल्या कार्याची स्तुती केली आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. उद्या हेच/असेच कामे पवार/चव्हाण/ठाकरे बंधूंनी (अगदी मुशर्रफ/दाउद) साहेबांनी करून दाखवावीत, त्यांनाही डोक्यावर घेवू! धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

संपत Sun, 04/27/2014 - 13:36
आयुर्हित साहेब, हा लेखातून चावके मोदींची स्तुती करत आहेत कि उपहासात्मक टीका करत आहेत ह्याबद्दल मतभेद आहेत. तुम्हाला मोदींची व त्यांच्या कार्याची स्तुती करण्याचा हक्क आहेच.

In reply to by असंका

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 15:40
ह्युमरला वैयक्तिक टिप्पणी म्हणून घेवू नका! एक गोष्ट मला वाटते/आवडते ती म्हणजे जेव्हा देशहिताबद्दल गोष्ट असेल तेव्हा तेव्हा "वयम् पंचाधिकं शतम" हीच गोष्ट मी प्रमाण मानतो. आजपर्यंत भाजपने कॉंग्रेसला/बसपा/जनता दल युनायटेड ला बऱ्याच विषयांवर समर्थन दिलेले असले तरी मूळ कारण देशहितच होते!

In reply to by आयुर्हित

रमेश आठवले गुरुवार, 04/24/2014 - 10:18
-एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई करणारे रियल इस्टेटचे जादूगार सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना तुरुंगात टाकण्याच्या मोदींच्या योजनेची वाच्यता साध्वी उमा भारतींनी केली. पण देशाच्या अतिवेगवान विकासासाठी प्रतिभावान वड्रांचा फॉर्म्युला उपयुक्त ठरू शकतो, याची जाणीव असलेले मोदी त्यांना फार काळ तुरुंगात ठेवणार नाहीत----,-- हे वाक्य उपरोधिक नाही असे मानून मी खालील माहिती देत आहे. रोबेर्ट वाड्रा -extra-constitutional authority असल्यामुळेच त्यांना आपण म्हणता तशी धंद्यात प्रगती करता आली आणि कॉंग्रेस राज्य सरकारांनी सर्व प्रकारच्या सवलती कायद्याना धाब्यावर ठेऊन दिल्या . सनदी अधिकारी खेमका आणि हरयाणा सरकार यांच्या वादात खेमकांची भूमिका खरी असावी असे मला वाटते. वाड्रा हे extra-constitutional authority असल्याचा पुरावा मला भुवनेश्वर विमानतळावर सापडला. तेथे सुरक्षा तपासणीच्या कक्षाबाहेर एक फलक लावलेला होता. त्यावर, ज्याना सुरक्षा तपासणी मधून जायची जरूर नाही अशा लोकांची यादी दिलेली होती. त्यात सुरवातीची १५-२० नावे पदा प्रमाणे होती. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , अध्यक्ष, कॅबिनेट दर्जाचे मंत्री, राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री वगैरे , अशी सर्व अधिकार पदाची नावे होती. सध्या ती पदे भूषवित असलेल्या व्यक्तींची नावे न्हवती .पण यादीच्या शेवटी फक्त एकच नाव -रोबेर्ट वाड्रा- पद नामा शिवायचे होते. ही सरकारी यादी मी दोन तीन भेटीत पाहिली आहे. फक्त त्या भागात फोटो काढण्याची मनाई असल्यामुळे मी यादीचा फोटो काढू शकलो नाही.

In reply to by रमेश आठवले

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 12:05
एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई या ऐवजी की ऐकलेल्या "एक लाखाचे तीन वर्षांत ३०० कोटीं" ह्या नावाचा एक धागा मी परवाच मिपा वर टकला होता, ज्यात सर्व गुंतवणूक तज्ञ व फिनान्शिअल प्लानर्स ला हा प्रश्न विचारला देखील होता. हे मोठे आव्हान आहे, प्रत्येक उद्योजकाला, की एवढे जास्त returns कसे मिळाले? किंवा कसे मिळतील? काय केल्याने मिळतील? तो का दिसत नाही, माहिती नाही? संपादक मंडळाने उडवला तर नाही? कृपया संपादक मंडळाने उत्तर द्यावे.

रमेश आठवले Wed, 04/23/2014 - 15:14
खालील मुद्दा हा ऋषिकेश यांच्या यादीत असावा असे वाटते. काल एका वाहिनीवरील मुलाखतीत भारताचे परराष्ट्रीय धोरण हे जशास तसे (Reciprocacity ) असावे असे मोदींनी सांगितले. त्या वरून आठवण झाली कि भारताचे पाकिस्तानशी असलेले सध्याचे बोटचेपे धोरण बदलण्याची गरज आहे. MFN करार म्हणजे दोन देशांनी परस्परांना व्यापारात सवलती देणे असा आहे . अशा प्रकारचे करार भारताचे बर्याच राष्ट्रांशी आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत भारताने त्या देशाला MFN देशाचा दर्जा काही वर्षापूर्वी दिलेला आहे पण पाकिस्तानने मात्र भारताला तो दर्जा दिलेला नाही. या एकतर्फी सवलतीच्या धोरणाचाही मोदी फेरविचार करतील असे वाटते.

In reply to by रमेश आठवले

सुनील Wed, 04/23/2014 - 15:34
या एकतर्फी सवलतीच्या धोरणाचाही मोदी फेरविचार करतील असे वाटते.
अहो, पाकिस्तानला MFN चा दर्जा देणे भारताला फायदेशीरच आहे. पाकिस्तान भारताला तो दर्जा देत नसेल तर त्यात पाकिस्तानचेच नुकसान आहे.

In reply to by सुनील

सुहासदवन Wed, 04/23/2014 - 15:52
अहो, पाकिस्तानला MFN चा दर्जा देणे भारताला फायदेशीरच आहे. पाकिस्तान भारताला तो दर्जा देत नसेल तर त्यात पाकिस्तानचेच नुकसान आहे. असं असेल तर मग इतक्या वर्षात बर्‍याच गोष्टी पाकिस्तानने करायला हव्या होत्या किंवा करायला नको होत्या. त्यांना सगळं समजतय ना पण वळ्त का नाहीये? पाकिस्तानला किंवा कोणत्याही अशा देशाला भारताशी चांगले संबंध जर वाढवायचे नसतील तर आपण तरी कशाला आपला वेळ फुकट घालवायचा त्यांच्यासाठी. जेवढ्यास तेवढे वागावे. जगात असे अनेक देश आणि प्रांत आहेत ज्यांना भारताबद्दल किंमत आहे, तिथे जास्त फोकस करायला हवा.

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 21:35
It is pretty much an accepted thing that Narendra Modi is a "strong leader", authoritarian, dictatorial. That he will favour business interests is no secret. But can strong leaders tolerate dissent and criticism? Can thinkers, economists, journalists, two-bit "God men", who have poured vitriol over Sonia Gandhi and the Congress, dare do the same if Modi becomes prime minister? Don't hold your breath. Can "speedy decision-making" be implemented with strong independent institutions? Can "strong leaders" allow strong independent institutions to remain so? Can true capitalism (as opposed to crony capitalism) survive without strong independent institutions? Can election funding of this order at all be above aboard? Do we even care? A romantic notion has also been propagated that Modi will be a mellowed man as a prime minister, that he will become a liberal democrat. And that our democratic institutions like the courts, the Comptroller and Auditor General, Central Bureau of Investigation and the media have enough teeth to rein in any favouritism or trampling of human rights. Looking at the Gujarat model on such similar institutions, I have no doubt which side they will sit on. Having experienced our courts more than most, one thing I can unhesitatingly say is when you are up against an authoritarian government (as I was under the National Democratic Alliance rule) as your adversary in court, the courts are generally reluctant keepers of our fundamental rights. Judges are human beings, and subject to the same frailties and fears as the rest of us. An increasingly corporatised media has a soft-enough underbelly on which to use a scalpel. It should be no surprise that in the India of today being secular, libertarian or environmentally-conscious has pejorative connotations. That India is a true liberal, secular democracy is by no means a settled issue. Modi's genius lies in having identified the fault lines and prying them open. We, as a nation, are ready for a Faustian bargain. Give us a fistful of economic promissory notes and we will barter all the lofty ideals we once held dear. And we will invent reasons why the trade is all for the Greater Good. Let's at least thank Modi for bringing us out of our closet. Shankar Sharma: Corruption is a non-issue for the voter

काळा पहाड गुरुवार, 04/24/2014 - 01:19
फक्त ३७० कलम रद्द करू देत. पुढचं आमचं आम्ही बघू. श्रीनगर ला एक दोन बिएच्के घ्यावा म्हणतोय. बाय द वे, बाकीच्या अपेक्षा खालील प्रमाणे आहेत. १. कलम ३७० २. युनिफॉर्म सिव्हील कोड ३. अत्यंत ताकद्वान लष्कर. लष्कराला अमेरिकेच्या अफगाणिस्तान मधील धोरणाप्रमाणे सतत प्रॅक्टीस करण्यासाठी एक वा अनेक चांगल्या बॅटल्फील्ड्स. पाकीस्तान पासून सुरवात करायला हरकत नाही. ४. वड्रासाहेब, लवासावाले साहेब, मनिष तिवारी, दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अहमद पटेल, आदींचा योग्य तो "आदर सत्कार".

असंका गुरुवार, 04/24/2014 - 17:11
अजूनही आपण विषय भरकटवत आहात. आपण स्वत:हून जो लेख सर्वांसमोर ठेवला त्यातील मतांशी आपण सहमत आहात की नाही? जर हो, तर मग पुढे माझे काही म्हणणे नाही. पण जर नाही, तर मग आपण सर्वांना ही माहिती का देत आहात हा माझा दुसरा प्रश्न. सोपे करून सांगतो- " हो" की "नाही" ? यांपैकी एक उत्तर पहिले ठरवून घ्या. मग माझ्या प्रश्नाचा उर्वरीत भाग वाचा. आणि आपण जो पर्याय निवडला आहे, त्यानुसार त्याचे उत्तर द्या.- म्हणजे द्यायचे असेल तर. पण आपण विनाकारण वैयक्तिक होणे टाळावे ही माझी आपणास परत एकदा कळकळीची विनंती आहे.

ऋषिकेश Fri, 04/25/2014 - 10:31
चर्चेत सहभागी झालेल्यांचे आभार. मोदी या व्यक्तीला मतादान करताना काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यामागे मोठा अंतस्थ हेतु वगैरे काही नव्हता. प्रतिसाद अंदाजा प्रमाणेच आले आहेत. लोक भाजपाने जाहिर केलेल्या धोरणांपेक्षा सरकारी कामात सुसुत्रता आणणे, भ्रष्टाचार कमी करणे, महागाई कमी करणे इत्यादी 'अंमलबजावाणी' करणारा नेत म्हणून त्यांना मत देत आहेत. मतदान केल्यावर मोदींनी या वर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी काही कायमस्वरूपी इजा पोचवतील असे धोरणत्मक बदल सुरू केले तर हेच मतदार कदाचित विरोधात असतील अशी -फारच अंधुकशी पण तरी- आशा या धाग्यानंतर वाटु लागली आहे. आभार! धागा १००+ झाल्याने नवे प्रतिसाद वाचणे मला कठीण जाते. त्यामुळे मी या धाग्यावर फारसा येणार नाही. पुनश्च आभार!

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 15:19
मोदींना खड्ड्यात घालायला त्यांच्याच पक्षातील लोक, विरोधी पक्ष, व एम एन सी व इसाई लोकांची लॉबी आदी त्यांना हैराण करेल असे मत Right to recall group 'राहूल मेहता' यांनी इथे आपल्या भाषणात 2012 साली वर्तवले आहे.

पैसा Mon, 04/21/2014 - 17:52
मी मुख्यमंत्री झालो तर! असा निबंधाचा विषय आठवला. हे पण तसंच स्वप्नरंजन! कोणीही पंतप्रधान झाला तरी त्याच्याकडून माझ्या मिनिमम अपेक्षा याच राहतील. भ्रष्टाचार आणि महागाई कमी केली तरी आम जन्तेला बराच रिलीफ मिळेल. लोकांना सबसिड्या वाटण्यापेक्षा मागेल त्याला काम मिळालं पाहिजे. परराष्ट्रधोरणात मोठे बदल व्हावे असं वाटत नाही. मात्र हामेरिकेची दादागिरी कमी झालीच पायजे. पाकिस्तानबरोबर युद्ध नको पण नुसता सज्जड दम भरण्यापेक्षा दुसर्‍या काही मार्गाने त्याला 'त्राहि मामं' म्हणायला भाग पाडलं पाहिजे. तेच चीनच्या बाबतीत. उदारीकरणाच्या नावाखाली चांगले चालणारे सरकारी उद्योग खाजगी कंपन्यांना स्वस्तात विकणे बंद झाले पाहिजे. रस्ते सुधारणा आणि पिण्याचे पाणी सर्वांना उपलब्ध करणे इतर काही तू दिलेल्या गोष्टी तर व्हायला हव्या आहेतच - महिला सुरक्षा - काळा पैसा कमी करणे आणि देशाबाहेर गेलेला पैसा परत आणणे - टॅक्स रिफॉर्म्स - खाणींची लायसन्स वाटप करणे - शस्त्रास्त्र खरेदी - निर्मल गंगा अभियान - पायाभुत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे - नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे - निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करणे - बालकल्याण योजना राबवणे - शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे - आरोग्य धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - क्रिडा धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - पर्यावरणाकडे लक्ष देणे, वन्य जीवांना संरक्षण - आर&डी कडे लक्ष देणे विशेषतः स्पेस आणि आण्विक क्षेत्रात - शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे - वन विंडो क्लिअरन्स सारख्या योजनांनी उद्योगधंदे व त्यायोगे रोजगारीला चालना देणे याशिवाय कोणीही पंतप्रधान झाला (अगदी मोदी असले तरी) तरी तुझ्या यादीतल्या ३ गोष्टी होणे फार कठीण आहे. त्या म्हणजे पाकिस्तानशी युद्ध, चीनशी युद्ध आणि राममंदिर उभारणे. त्या अत्यावश्यक गोष्टी नाहीत. बाकी अभी दिल्ली बहुत दूर है!

In reply to by पैसा

आयुर्हित Mon, 04/21/2014 - 22:29
मोदींना विसा न दिल्यामुळे अमेरिकेने मोदींची नाराजी नक्कीच ओढवून घेतली आहे. त्यामुळे मोदी अमेरिकेला जास्त भाव न देता चीन व इतर आशियाई देशात आपले मैत्री प्रस्ताव देतील व भारताचे इतर देशातील संबंध अत्यंत सलोख्याचे राहतील. पण अर्थात कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास त्याला चर्चेच्याच(यात वेळ पडल्यास सज्जड दम/धमकीही)माध्यमातून प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असेल. दोन ते पाच वर्षांनी अमेरिकेला/अमेरिकन कंपन्यांना भारताच्या विसा साठी भिक मागावी लागेल हे नक्की व भारताला त्या प्रमाणात त्वरित विकसित करणे हेच प्राधान्य राहील.त्यामुळे भारतात अंतर्गत शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडळी, राम मंदिर १०वर्षानंतर उभे केल्यास काही हरकत नसावी! ते नक्की होईलच आणि मुसलमान बंधूंचेही यात समर्थन असेल हि खात्री.

In reply to by आयुर्हित

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 16:28
दरवर्षीप्रमाणेच यंदाही सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे भरणार्‍यां यूएनच्या जनरल असेब्लीचे निमित्त साधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण द्यावे यासाठी व्हाईट हाऊस आणि ओबामा प्रशासनावर दबाव वाढत चालला असल्याचे सांगितले जात आहे. भारतात नऊ फेजमध्ये होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशा वेळी अमेरिकेतील अनेक तज्ञ नागरिक, सल्लागार, कायदेतज्ञांनी भारताकडे अमेरिकेने अधिक लक्ष पुरविले पाहिजे यासाठी आग्रह धरू लागले आहेत. निवडणुकांसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या सर्वेक्षणांनुसार भाजप आघाडी यंदा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मोदी पंतप्रधान बनलेच तर ओबामांनी भारताबरोबरचे संबंध वाढविण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील जाणकार तज्ञांचे मत आहे. गेली कांही वर्षे अमेरिका भारत संबंध फारसे सुरळीत राहिलेले नाहीत आणि अमेरिकेनेही हे संबंध सुधारावेत यासाठी विशेष लक्ष दिलेले नाही. अशा वेळी ओबामांनी पुढाकार घेऊन यूएनच्या असेब्लीत मोदींना आमंत्रण करणे सूज्ञपणाचे असेल असे या तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधातील तणाव कमी होण्यास मदत होईलच पण मोदी व्हीसा प्रकरणी झालेला इश्यू निवळल्यासही त्यामुळे मदत मिळेल असे सांगितले जात आहे. वरीष्ठ विश्लेषक डॉ. स्टीफन कोहेन यांनी तर मोदींशी सार्वजनिक संपर्क साधायला ओबामा यांना अवघड वाटत असेल तर त्यांनी खासगी पातळीवर संपर्क साधावा असेही मत व्यक्त केले आहे. यूएस इंडिया पोलिटिकल अॅक्शन कमिटी संघटनेच्या प्रतिनिधींनीही मोदीना आमंत्रण देण्याचे महत्त्व ठळक करून सांगितले असून अमेरिकेच्या प्रांताप्रांतातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणांतूनही हेच निष्कर्ष निघाले असल्याचे समजते. मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव

In reply to by आयुर्हित

माहितगार Wed, 04/23/2014 - 17:05
भारताचा कोणी का पंतप्रधान होत नाही त्याच्याशी चर्चा करण्याशिवाय आमेरीकेस पर्याय नाही हे आमेरीकन राज्यकर्त्यांना समजत असणार. गरज भारतालाही असेल पण पंतप्रधान झाल्यावर मोदींना बोलवतील का? मोदींना बोलवतील का? म्हणून भारताच्या पंतप्रधानपदाला लाचारीचे स्वरूप आणणे अयोग्य वाटते. भारताचा पंतप्रधान अबकड आहे, भारतीय जनतेचा राजकीय प्रतिनिधी आहे तो मग अबकड असो का हळक्षज्ञ त्याची किंमत आधी भारतीयांनी करावयास शिकले पाहिजे. या संदर्भाने मोदींची प्रतिक्रीया जबाबदार पणाची आहे. बिजेपीचे आणि भारताचे विरोधक हा मुद्दा चर्चेत ठेवत असतील तर हरकत नाही. बिजेपी खासकरून मोदी समर्थकांनी कखगघ देश कोणताही असो आमच्या पंतप्रधानाशी चर्चा करत नसेल तर गेला उडत अशी भूमीका ठेवली पाहिजे. बिजेपी खासकरून मोदी समर्थक या मुद्यावर डिफेन्सीव होऊन या बातम्यांना प्रसिद्धी देण्यास का हातभार लावतात? तसे तर तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा परराष्ट्रांशी चर्चा करताना भारताचा पंतप्रधान भारताचा पंतप्रधान आहे. आम्ही देवयानी खोब्रागडेंचा मान राखला जाण्या करता तडजोड नाकारतो पंतप्रधानाच्या बाबतीत का तडजोड करावी ? मला वाटते अशा बातम्यांना अधिक कुरवाळू नये.

In reply to by माहितगार

विकास Wed, 04/23/2014 - 17:52
जे काही २००५ ला मोदींविरोधात झाले ते शक्य होते कारण (१) सुप्रिम कोर्टाचा निकाल लागला नव्हता पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे (२) ते केंद्रीय मंत्रीमंडळात नव्हते. अर्थात त्यांना आंतर्राष्ट्रीय स्तरावर राजनैतिक पासपोर्टची गरज नव्हती. जे काही झाले ते व्यक्तीगत व्हिसासंदर्भात झाले होते. उद्या ते पंतप्रधान झाल्यास हे समिकरण बदलते. जर त्यांना तरी देखील अधिकृतपणे नाकारण्यात आले तर त्याचा अर्थ भारत-अमेरीका राजनैतिक संबंध अधिकृतरीत्या संपले असा होतो. जे भारत सोडा अमेरीकेस देखील चालणार नाही.

In reply to by माहितगार

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 11:32
अमेरिकेतील अनेक तज्ञ नागरिक, सल्लागार, कायदेतज्ञांनी भारताकडे अमेरिकेने अधिक लक्ष पुरविले पाहिजे यासाठी आग्रह धरू लागले आहेत. निवडणुकांसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या सर्वेक्षणांनुसार भाजप आघाडी यंदा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मोदी पंतप्रधान बनलेच तर ओबामांनी भारताबरोबरचे संबंध वाढविण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील जाणकार तज्ञांचे मत आहे.

अनुप ढेरे Mon, 04/21/2014 - 18:22
महत्वाच्या उतरत्या भाजणीत १. महागाईच्या दरावर नियंत्रण व घट २. महिला सुरक्षा (पण याबाबत केंद्र सरकार काय करू शकेल हे नाही माहीत. फक्त मोठ्या शिक्षेची तरतूद करून हा प्रश्न सुटेल असं नाही वाटत.) ३. शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे (खरं तर हा मुद्दा फार व्हेग आहे) ४. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे ५. आर&डी कडे लक्ष देणे

अर्धवटराव Mon, 04/21/2014 - 18:50
एखाद्या स्पेसीफीक विषयावर मोदि काय काम करतील सांगता येत नाहि. पण पायाभूत सुवीधा, शेती व निगडीत उद्योग यामध्ये बरीच गुंतवणुक होईल. भ्रष्टाचार विरोधि एक-दोन कायदे होतील, पण प्राणपणाने भ्रष्टाचार निर्मुलन होणार नाहि. मोदि एकुणच सुस्तावलेल्या नोकरशाही व बाकि सरकारी यंत्रणेला झाडुन कामाला लावतील. त्यामुळे एकंदर कारभारात गतीशीलता येईल व काहि प्रमाणात भ्रष्टाचाराचा कचरा काठाला लागेल. मोदि सरकार बनल्यास 'मोदि फॉर्मुला' नावाचा त्रस्त प्रकार भाजपमधे आकाराला येईल व त्यावरुन युपी-बिहार वगैरे राज्यात स्टेट इलेक्शन लढले जाईल. मोदिंच्या कार्यक्रम पत्रिकेत अशा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बदल केले जातील. पायाभूत सुविधा, शेती, महिला सबलीकरण व सुरक्षा, थोडंफार अल्पसंख्यांक समाजाकरता, सैन्यदलाकरता आर्थीक तरतुदीत वाढ, शस्त्रास्त्र खरेदी, आयटी सेक्टर... इ. बाबतीत मोदि प्राधान्याने काम करतील असं वाटतं.

शुचि Mon, 04/21/2014 - 18:54
चीन मैत्री करण्याच्या लायकीचा नाही अन युद्ध करणं आपल्याला भारी पडेल. चीनला आतूनच पोखरला पाहीजे. हे भेंडी चीनी जिकडेतिकडे माजलेत. असो. इति राजकारणविषयक लेखनसीमा :P पण जाणकारांची मते ऐकायला आवडेल.

बाबा पाटील Mon, 04/21/2014 - 19:13
२० ते ३० टक्के कामे होतील,बाकी दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्यात फारसे अंतर नाही.पाकिस्तान अथवा चिन दोघांशीही युद्ध्द कोठल्याही परिस्थीत नको आहे.फक्त त्यांना योग्य दहशत बसावी, बाकी चिन अमेरिकेलाही फारशी भिक घालत नाही,त्यामुळे चिनविरोधात भारत,अमेरिका व रशिया अशी संयुक्त आघाडी तयार करता आली तरच त्यांना रोखता येवु शकेल.बाकी शेतकर्‍यांची परिस्थिती थोडीफार सुधारली तरी देशावर उपकार होतील मोदींकडुन फक्त पाच वर्षात फारसे बदल अपेक्षित नाहीत्,फक्त भ्रष्टाचार्‍यांना थोडा लगाम घातला तरी बरेच साध्य होइल. मोदींना निदान १० वर्ष तरी मिळायला हवीत.नाहीतर ए.के.४९ आहेच पुढच्या पंचवार्षिकला.

विवेकपटाईत Mon, 04/21/2014 - 20:11
वरील कुठलेही काम मोदीने नाही केले तरी चालेल, देशाची जनसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे त्या साठी आधारभूत व्यवस्था कायम करणे गरजेचे १. देशातील सर्व राजमार्ग ४-६ लेनचे करणे अत्यंत गरजेचे. स्वर्णिम चतुर्भुजचे कार्य जे २००७ मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होते अद्याप ही बाकी आहे पुढील २-३ वर्षात पूर्ण करणे. शिवाय मोठ्या शहरांना जोडणारे एक्सप्रेस highways. जेणे करून एका दिवसात ट्रक ८००-१००० किमी अंतर कापू शकेल अशी व्यवस्था ९ टन च्या जागी २४, ३२ टन चे ट्रक धावू शकतील. २. संपूर्ण देशात रेल्वे ट्रक दुप्पट करणे आणि स्वर्णिम चतुर्भुज प्रमाणे स्वर्णिम चातुर्भूत डी एफ सी. ३. श्रीलंका आणि भारत जोडणारा सेतू (JICA या प्रोजेक्ट वर सिद्धांतीक रित्या तैयार आहे - हेतू चीनचा प्रभाव कमी करणे) फायदा: परिवहन लागत कमी होईल. शेतकरी आणि उद्योगांना फायदा शिवाय ग्राहकांना ही हरीयाणातून ताजा भाज्या २४ तासांच्या आत मुंबई, बंगलोरला पोहचतील. महागाई आपोआप कमी होईल. उद्योग लहान शहरांकडे वळतील. रोजगार वाढेल. ३. पाणी: पाण्यावरून देशाचे तुकडे होऊ शकतात. नदी जोड परियोजना (कुणाच्या दबावामुळे कचर्याच्या टोपलीत टाकली काही कळणे अशक्य) तातडीने राबवावी लागेल. ४. वीज: मुफ्त आणि स्वत: वीज देणे बंद करावे लागेल. (आत्ताच UP दिल्लीहून फक्त ६० किमी दूर, दिवसातून ४-५ तास वीज उपलब्ध आहे. लोक ही बिल देत नाही. )लोक generator महिन्याचे २००० हून अधिक खर्च करतात ते ही फक्त रात्री चालवतात. सोलर, विंड, गोबर गस इत्यादीवर भर आणि तत्सम शोध कार्य ही करावे लागेल. वीज उत्पादन १० वर्षात दुप्पट केल्या शिवाय गरज भागणार नाही. हे चार कार्य केले तरी मिळवली. या सुविधा देशात सर्वत्र पोहचल्या कि बाकी लोक स्वत: आपल्या साठी रोजगार निर्मिती करून घेतील. सरकारला काही करायची गरज नाही. या सर्व प्रोजेक्ट साठी ३०-४० लक्ष कोटी लागतील. बाकी लोकपाल वैगरे रिकामटेकड्या लोकांच्या चर्चे साठी ठीक आहे. वास्तवात कारण तो पण एक मलाई खाणारच ठरेल.

आतिवास Mon, 04/21/2014 - 22:01
मोदी पंतप्रधान झाले तर त्यांच्याकडून आणि 'एनडीए'कडून माझ्या पाच मुख्य अपेक्षा अशा आहेत: १. सामाजिक संतुलन साधत विकासाला चालना देणारे आर्थिक धोरण (भूसंपादन, धरणं, औद्योगिक विकास अशा गोष्टी करताना कुणाचेही शोषण होणार नाही, कुणावरही जबरदस्ती होणार नाही अशी अंमलबजावणी) २. धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण ३. पारदर्शी प्रशासन (ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास थोडी मदत होईल) ४. कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि जलद न्यायप्रक्रिया ५. आंतररराष्ट्रीय संबंध सुधारणे (शेजारी देशांशी आपले संबंध सध्या अतिशय ताणले गेले आहेत) आणि आणखी एकः ६. अंतर्गत सुरक्षितता सर्वांसाठी आणि विशेषत: स्त्रियांसाठी

In reply to by आतिवास

चैतन्य ईन्या Tue, 04/22/2014 - 16:34
सामाजिक संतुलन साधत विकासाला चालना देणारे आर्थिक धोरण (भूसंपादन, धरणं, औद्योगिक विकास अशा गोष्टी करताना कुणाचेही शोषण होणार नाही, कुणावरही जबरदस्ती होणार नाही अशी अंमलबजावणी)>> हे जरा सविस्तर सांगू शकेल का कोणी? इथे मुद्दाम खुसपट काढणे हा हेतू नाहीये पण नक्की काय करायला पाहिजेल? सद्य परिस्थिती अशी आहे की विकास म्हणजे नक्की काय ह्याची नक्की कोणी व्याख्या करेल का? कारण एखादी गोष्ट करायची तर कोणाला तरी त्रास हां होणारच. सामाजिक संतुलन हे फारच संदिग्ध विधान किंवा संकल्पना आहे. नक्की कसे करायचे हे कोणी दाखवेल का? छोट्या प्रयोगात एखाद्या गावात काहीतरी होते पण प्रचंड लोकसंखेच्या साठी ते चालू शकेल का? मुळात सगळी ओईल इकॉनॉमी आहे पण पर्यायी इंधन सापडत नाही तोपर्यंत काय करायचे? तासही बऱ्याच लोकांना अंधारातच राहावे लागत आहे. त्यांना ते नको आहे मग काय करायचे? इतकी अफाट लोकसंख्या आहे. ती कमी करायला सांगणे आपल्याला जमत नाही. स्पष्ट भूमिका घेणे एकाही नेत्याला जमत नाही. लगेच धार्मिक भावना वगैरे दुखावल्या जातात. मग पर्याय काय आहे? इथे मार्ग कोणाला सापडला आहे का हे हवे आहे.

In reply to by आतिवास

पगला गजोधर Fri, 01/12/2018 - 18:08
२. धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण
अतिवास यांचा पॉईंट २ जरा अवघड दिसतंय एकंदरीत आज .

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Fri, 01/12/2018 - 23:22
+१ जंगजंग पछाडूनसुद्धा जनता सातत्याने नाकारत असल्याने खांग्रेस, डावे, रिपब्लिकन इ. विरोध पक्शांनी आता हार्पिक पटेल, मेवाणी, उमर खलिद अशा जातीयवादी व देशद्रोह्यांच्या मदतीने जातीय आगी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कोरेगाव-भीमा दंगल, टिपू जयंती, पटेल व मराठा राखीव जागा, जनेवितील देशद्रोही घोषणा, संघ कार्यकर्त्यांच्या वाढत्या हत्या, दलित वि. हिंदू, मराठा वि. दलित, दलित वि. ब्राह्मण, मराठा वि. ब्राह्मण अशी पेटवापेटवी, पाकिस्तानशी व चीनशी गुपचुप हातमिळवणी, गडकरींच्या पुतळ्याची नासधूस असे प्रकार अथक सुरू असल्याने देशात धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण राखणे अवघड झाले आहे.

In reply to by नितिन थत्ते

श्रीगुरुजी Sat, 01/13/2018 - 13:06
या मागण्या मोदी पंतप्रधान झाल्यावर आलेल्या नाहीत. इतर गोष्टी मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाल्या आहेत ना?

(१) भ्रष्टाचारमुक्त (२) सुशासन देण्याचा (३) प्रामाणिक प्रयत्न बरेच काही मिळवून देईल... इतर सर्व गोष्टी त्यांच्याच बायप्रोडक्ट्स आहेत.

मराठे Mon, 04/21/2014 - 22:42
वीज, पाणी, संवाद (कम्युनिकेशन) आणि रस्ते हे प्रगतीचे चार खांब बळकट करणे. त्याच्या जोरावर मग पुढचा विकास करता येईल. म्हणजेच, - ग्रासरूट लेवल वरून भ्रष्टाचार कमी करणे,त्यासाठी जिथे जिथे शक्य आहे त्या त्या व्यवहारांत पारदर्शकता आणणे. - शिक्षणाच्या संधी सर्वांना समान देणे, - कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणे - गुन्हा दाखल करणार्‍यांना नव्हे तर गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटावी. - काश्मीर, अरुणाचल प्रदेश वगैरे 'डॉटेड लाईन्स' वाल्य सीमारेषांचा प्रश्नावर दीर्घकालीन अथवा कायमस्वरूपी उपाय. अजून चिक्कार ईच्छा आहेत पण हर ख्वाईशपे दम निकलें.

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 01:18
वरची एवढी भली मोठ्ठी यादी बघून खरेच धन्य झालो! एवढे सगळे मोदींनी करायचे? काही हरकत नाही, हे सारे काही (किंबहुना याच्या पेक्षाही ३ पट जास्त)काम मोदींना करायला आवडेल. ते त्यांना करायला मिळेल, ह्याची फक्त १००% व्यवस्था झाली पाहिजे. थोडक्यात काय तर २७२+ जागा हव्यात पुढच्या १० वर्षासाठी, बस अजून काही नको. एकदा सर्वांना काम मिळाले ना तर पहा १०%पेक्षा जास्त GDP ग्रोथ राहील भारताची! भारत स्वतंत्र होऊन ६६ वर्षे झालीत. निदान ५०वर्ष तरी कॉंग्रेस चेच सरकार होते, मग त्यांनी काय केले इतकी वर्ष? आणि आपण का हे सर्व बघत बसलो? "गरिबी हटाव म्हणत गरीब या देशात गरीबच कसे राहतील?" हे पाहणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

In reply to by आयुर्हित

अर्धवटराव Tue, 04/22/2014 - 02:47
अगदी सुरुवातीपासुन सांगायचं तर यादी फार लांबेल. अगदी थोडक्यात सांगायचं तर आय.आय.टी सारख्या संस्था, अ‍ॅटोमीक रिसर्च सेंटर, इस्रो, विवीध इस्पीतळं, भाक्रानांगल सारखी धरणं (त्याचं काम स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी सुरु झालं हे खरं असलं तरी), रेल्वे-विमानसेवांचं जाळं, हरित आणि धवल क्रांती, सैन्यदलाचा हस्तक्षेप नाकारणार्‍या निवडणुका राबवुन लोकशाहिची मजबुती, ग्लोबलाझेशन, दलित, अल्पसंख्यांक व इतर दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण, शिक्षण आरोग्यादी जीवनावष्यक सेवाकेंद्रांचं गठन... यादि अनंत आहे... नकारात्मक बाबींची देखील.
आणि आपण का हे सर्व बघत बसलो?
मग पर्याय काय होता? कम्युनिस्ट? समाजवादी? हिंदुत्ववादी? मोदिंना मोठं करताना काँग्रेसची लाईन छोटी करण्यात काहि पॉइण्ट नाहि. मोदिंकडुन अगदी चमत्काराची देखील आशा करण्यात काहि पॉइण्ट नाहि. जनता आपलं भाग्य स्वतः निवडेल.

In reply to by अर्धवटराव

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 03:19
जे काय करून ठेवले ते आमचे सर्वांचे नशीबच म्हणायचे आणि काय! काँग्रेसचीच काय कोणाचीही लाईन छोटी करण्याची तर मुळीच गरज नाही.असो. काल कॉंग्रेस होती,आज मोदी आहेत, उद्या अजून कोणी येईल. भारताला मोठे करायचे आहे हेच सर्वांनी एकजुटीने मनावर घेतले पाहिजे. आणि हे vision फक्त मोदिंकडे आहे म्हणून मोदींना मोठे करायचे.

In reply to by आयुर्हित

अर्धवटराव Tue, 04/22/2014 - 03:49
मोदिंकडे व्हिजन आहे याच्याशी सहमत. फक्त मोदिंकडे व्हिजन आहे याच्याशी असहमत. गेल्या सहा दशकात ज्याकाहि चांगल्या गोष्टी झाल्या त्या केवळ नशिबाने म्हणुन नाहि. त्याकरता घाम आणि रक्त आटवलं पब्लिकने आणि राज्यकर्त्यांनी. असो.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा Tue, 04/22/2014 - 11:37
सहमत. मोदींना मोठं करायचे म्हणून काँग्रेसला छोटे करायची काहीच गरज नाही. फक्त आताच्या घडीला उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये मोदी हाच सक्षम पर्याय आहे इतकेच.

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 09:44
सगळ्यांचे आभार! सध्यातरी महागाईवर नियंत्रण महिला सुरक्षा भ्रष्टाचार निर्मुलन पायाभुत सुविधांमध्ये वाढ (रस्ते, वीज, पाणी वगैरे) आंतरराष्ट्रीय संबंधात सुधार/बदल या प्राथमिकता असाव्यात अशी आतापर्यंत प्रतिसाद दिलेल्या 'बहुमताची' अपेक्षा दिसतेय. गंमत अशी वाटली की निवडणुक प्रक्रियेत सुधारणा, पोटासारखे कायदे आणणे, टॅक्स रिफॉर्म्स, शस्त्रास्त्र खरेदी आणि काळापैसा या मुद्द्यांवरही भाजपा जोर देत असताना (व काँग्रेसच्या तुलनेत या मुद्द्यांवर भाजपाची वेगळी विचारधारा असताना) लोकांच्या अपेक्षा मात्र या मुद्द्यांना प्राधान्यावर घेत नाहियेत याचा सारांश बर्‍यापैकी काँग्रेसचाच कार्यक्रम राबवावा, फक्त तो राबवु शकेल असा नेता भाजपात असल्याचे पर्सेप्शन असल्याने भाजपाला मत दिले जात आहे असा घेता येईल का? थोडक्यात पक्षाला मत न देता मोदी या व्यक्तीला मत दिलं जातंय असा मिडीयात जो बोभाटा होतोय तो पूर्णपणे चुकीचा नाहीये का? बाकीच्या सदस्यांच्याही मताच्या प्रतिक्षेत

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Tue, 04/22/2014 - 11:41
थोडक्यात पक्षाला मत न देता मोदी या व्यक्तीला मत दिलं जातंय असा मिडीयात जो बोभाटा होतोय तो पूर्णपणे चुकीचा नाहीये का?
अर्थातच नाही. मी व्यक्तीशः अडवाणी-गडकरींच्या भाजपाला मत देताना नक्कीच विचार केला असता. मोदींना मत देताना जो उत्स्फूर्तपणा आहे तो त्यवेळेस नक्कीच नसता, अर्थात शेवटी काँग्रेसपेक्षा हे बरे असाच विचार केला असता, पण नॉट फ्रॉम बॉटम ऑफ द हार्ट.

In reply to by ऋषिकेश

अनुप ढेरे Wed, 04/23/2014 - 22:13
महागाईवर नियंत्रण महिला सुरक्षा भ्रष्टाचार निर्मुलन पायाभुत सुविधांमध्ये वाढ (रस्ते, वीज, पाणी वगैरे) आंतरराष्ट्रीय संबंधात सुधार/बदल
हे धोरण या गोष्टीचा भाग येतात का त्याबाबत साशंक आहे. या गोष्टी बेसीक गरजा आहेत. त्या कॉग्रेसचं धोरण या नावाखाली टाकणं हे बरोबर वाटत नाही. ३७० कलम, समान नागरी कायदा, नद्या जोड, महिला आरक्षण, मराठा आरक्षण या स्पेसिफिक गोष्टी धोरणात्मक निर्णय म्हणून वर्गिकृत करता येतील. त्यामुळे ऊपरीनिर्दिष्ट ३-४ कलमं कुठल्या एका राजकिय पक्षाच्या धोरणाचा भाग आहेत असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही.

In reply to by अनुप ढेरे

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 09:19
अब आया उंट....! ;) खास भाजपाच्या अशा धोरणांसाठी मोदींना मत देणारे कमी आहेत. वरील गोष्टी करणार नाही असे कोणीच म्हणत नाही. मात्र एकदा त्याना मत दिलं की मात्र ते कोणतेही धोरण राबवु शकतात.

In reply to by ऋषिकेश

अनुप ढेरे गुरुवार, 04/24/2014 - 09:41
ही भीती कधीही कुठल्याही निवडणुकीत वाटू शकते. ही पर्टिक्युलर निवडणूक किंवा एक पर्टिक्युलर पक्ष वेगळा काढू शकत नाही आपण. आणि जर माझ्या पसंतीचं धोरण त्यांनी नाही राबवलं तर फुड्ल्या निवडणूका आहेतच खाली पाडायला त्यांना. आता ते हुकुमशहा झाले तर काय आणि त्यांनी लोकशाही व्यवस्था बंद केली तर काय अश्या भीतीचं कोणीच काही करू शकत नाही.

In reply to by अनुप ढेरे

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 10:27
काही धोरणात्मक बदल हे इर्रिव्हर्सिबल असतात काही देशाची आर्थिक धोरणे कायमची बदलणारे असतात. मोदींच्या रुपात देश ठाम भांडवलशाहीकडे कूस बदललेल मात्र असा बदल होण्यासाठी आवश्यक असे विविध मुल्यांची जपणूक करणार्‍या कायद्याचे फ्रेमवर्क भारतात नसल्याने होणारे शोषण भयावह असेल अशी भिती असेल तर?

चौकटराजा Tue, 04/22/2014 - 09:59
एक पैजेवर सांगतो महागाई नियंत्रण होणार नाही. करायचे असेल तर आय टी वाल्याना ५१ टक्के आयकर लावावा लागेल. धोनी ई ना ८५ टक्के आयकर लावावा लागेल. मोठ्या शेतकर्‍याना आयकर चालू करावा लागेल. शेतकर्‍याना दिली जाणारी किमान किंमत कमी करावी लागेल. बारशा पासून बाराव्या पर्यंतच्व्या सर्व जेवणावळीवर परवाना लागू करावा लागेल. मुख्य म्हणजे मुक्त आयात निर्यात बंद करावी लागेल. त्यापेक्षा आहे हे ठीक आहे असेच मोदी म्हणतील. कारण भाजपा हा काँग्रेसचा आर्थेक व राजकीय धोरणातील चेला आहे. ते ३७०, राममदीर वगैरे सब बकवास !

In reply to by चौकटराजा

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 12:21
महागाई नियंत्रण या विषयावर आपले विचार हे conventional आहेत. परंतु आज यासाठी out of box thinking ची गरज आहे, जी फक्त मोदींकडे आहे. १)tax rate वाढवण्यापेक्षा tax collection वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी mauritius route व अमेरिकेबरोबरची double tax avoidance treaty बंद करावी लागेल. २)जास्त उत्पादन करून नवीन sources तयार करून, शेतकऱ्यांच्या/कारखान्यांच्या/कारखानदारांच्या समस्या कमी कराव्या लागतील. ज्यात शेतापर्यंत पोचणारे रस्ते किंवा शेतमालाचे योग्य व्यवस्थापन, अति उत्पादनामुळे वाहतूक न झाल्याने होणारे नुकसान टाळणे, शेतमालाची योग्य साठवणूक, शेतमालावर प्रक्रिया करणे, व्याज दर कमी करणे, वीज पुरवठा २४ तास करणे, सुशिक्षित मनुष्यबळ, मार्केटिंग व गुणवत्तेला प्रोत्साहन, भारताची brand value वाढविणे हे प्रमुख आहेत. ३)Petroleum product आणि Edible Oil चे Import कमी करावे लागेल.त्यासाठी solar power and renewable and clean energy वर जोर द्यावा लागेल. ४)Export वाढविण्यासाठी भारतीय SME,कामगारांचे व शेतकऱ्यांचे उचित मार्गदर्शन व शिक्षण हाती घ्यावे लागेल. ५)Indian Railway, Shipping Docks यात आमुलाग्र बदल करून मालवाहतूक वेग दुप्पट आणि क्षमता ५ पट वाढवणे. ६)Planning commission मधील Toilet, CWG,२G, Coal block मधील घोटाळे परत न होऊ देणे. भाजपा हा काँग्रेसचा आर्थेक व राजकीय धोरणातील चेला आहे हे मान्य नाही. पण पुढच्यास ठेसलागल्यामुळे मागचा शहाणा होणारच आहे.

वरिल सगळी कामे ही कोणीही पंतप्रधान झाला की करतोच. त्यात काही विषेश नाही . मुळात हे प्रश्न का निर्माण होतात त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. अन्नधान्याच्या, बाबतीत पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर) करुन सुध्दा महागाई आहेच. कारण जनसंख्या वाढीवर नियंत्रण नाहीये. ते जर कमी झाले. तर अर्धे जग जिंकले. मग महागाई भ्रष्टाचार आपोआप कमी होतील.

In reply to by प्रमोद देर्देकर

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 10:12
अन्नधान्याच्या, बाबतीत पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर) करुन सुध्दा महागाई आहेच. कारण जनसंख्या वाढीवर नियंत्रण नाहीये
तसे नसावे. लोकसंख्या वाढ हा प्रश्न आहे की नव्या काळातले अ‍ॅसेट हे ठरायचेय. विक्रमी उत्पादन होऊनही महागाई आहे याचे कारण वितरण व्यवस्थेतील तृती आहे. नुसते अन्न निर्माण करून पुरत नाही तर ते योग्य प्रमाणात वितरीत व्हावे लागते, साठवणुकीच्या सुविधा चांगल्या असाव्या लागतात शिवाय हेच पवारसाहेब अर्ध्यागोष्टींच्या निर्यातीला परवानगी देतात मग या गोष्टी इथे उत्पादित होतात नी बाहेर जातात. अर्थात डिमांड-सप्लायचे गणित कोलमडते, त्यात लोकांकडे वाढलेल्या लिक्विडीटीमुळे त्यांनाही परवडते - डिमांड वाढते. मग महागई वाढते

In reply to by प्रमोद देर्देकर

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 00:09
प्रमोद देर्देकरजी, पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर)करुन सुध्दा महागाई आहेच इच्यामारी, पवार तुम्हाला टोपी लावतात आणि तुम्ही घालतात देखील. साखरेचे उत्पादन जास्त असते तर पाकिस्थानातून कशाला आयात करावी लागली असती साखर? पेप्सी/कोक सारख्या कंपन्या त्यांच्यासाठी स्पेशल साखर ५ पट भावाने आयात करतात. आपल्या साखरेला कोणी विचारत नाही म्हणून आजवर PDS च्या माध्यमातून खपवली जाते. दुध उत्पादन जास्त असते तर प्रत्येक तालुक्याला दुधाचे पदार्थ/पावडर बनवायचे कारखाने राहिले असते. फक्त आपण गहू उत्पादनात अग्रेसर आहोत, परंतु २०% गहू निव्वळ उघड्यावर साठविल्याने नष्ट होतो. पण गहू आणि ऊस यांच्यामुळे डाळ,तेलबिया,खाद्यतेले दुप्पट भावाने आयात करावी लागतात त्याचे काय? महागाईचे मुख्य कारण आहे वाढलेला डॉलर, जो साधारण ४० रुपये पाहिजे. तो आता ६१ ते ६८ असा आहे, त्यामुळे सर्व इम्पोर्टचे दर वाढतात.ज्यात मोठ्ठा वाटा पेट्रोलियम पदार्थांचा (क्रूड ओईलचा)असतो. त्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते. व सगळे भाव दीडपट व डबल होतात. ज्यावेळेला आपल्या देशातून भरघोस माल निर्यात होईल व परकीय चलन मिळेल(जसे आज IT/ITES मधून मिळते आहे) हे वाढवावे लागेल व त्याने रुपया मजबूत होईल. परकीय प्रवासी आणूनही त्यांच्या कडून आपल्याला परकीय चलन मिळेल. त्यासाठी तर मोडी उद्या वाराणसी तून उभे राहत आहेत, जेणे करून एक नवीन tourist destination तयार होईल.

कलंत्री Tue, 04/22/2014 - 10:31
मोदी प्रंतप्रधान झाले तर ही या यादीवर ते नक्कीच काम करु शकतील यात संशय नाही. लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्षही अपेक्षित असतोच असतो. मोदींनी कोणत्याही भूमिकेत प्रभावी काम करावे हीच अपेक्षा. हीच अपेक्षा राहुलनेही पूरी करावी. विरोधी पक्ष नेता असतांनाही सत्ताधारींवर वचक ठेवता येतो. आपला आणि आपल्या पदाचा मान जपता येतो. हेही पूढच्या ५ वर्षात दिसावे.

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 12:28
मला सगळ्याच वरील पैकी सगळंच करावं अशी अपेक्षा आहे! पण.. खालील गोष्टी नक्की कराव्यात.. १. दारिद्र्य रेषेखालील लोकांना जे फुकट अन्न धान्य वाटत आहेत ते बंद करावं. "अन्नसुरक्षे" पेक्षा "रोजगार सुरक्षा" द्यावी. सगळ्यांना काम मिळेल असं पाहिलं तर मग असं फुकट धान्य वाटायची गरज रहाणार नाही. कारण ते धान्य आमची कामवाली (आमचीच असं नाही.. बर्‍याच कामवाल्या..) बाहेर परत विकतात. ह्या योजनेत मिळणारा तांदुळ डोसे /इडली करायला चांगला असतो म्हणुन तो विकल्या जातो. त्यांना तो २-३/ किलो मिळत असावा (नक्की माहित नाही.. पण अत्यल्प किंमतीत मिळतो हे नक्की) सध्या कामवाल्यांकडे तो २०/- किलो विकत मिळतो. मला फुकट अन्न देऊन एखाद्याची काम करण्याची गरजच मारुन टाकणं फार फार चुकीचं वाटतं. अशानी प्रश्न सुटणार नाहीत, वाढतील.. २. ज्या लोकांनी आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण घेतलं आहे, नोकरी मिळवली आहे आणि स्वतःची परिस्थिती सुधारली आहे अशांच्या पुढच्या पिढीला आरक्षण न देण्याचा निर्णय घेणे. अतिशय श्रीमंत असुनही (घरात स्कॉर्पिओ, नोकर चाकर, महागड्या बाईक्स..) आरक्षणचा फायदा घेऊन इंजिनिरिंगच्या फी मध्ये भरघोस सवलत घेतलेले पाहिले आहेत. या पेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं (अर्थात ह्या भारतदेशात आपण गरीब आहोत हे कागदोपत्री दाखवणं काहीही अवघड नाही..). आणि ते ही एका पिढी पुरतेच.

In reply to by पिलीयन रायडर

थॉर माणूस Tue, 04/22/2014 - 12:41
मला वाटतं ओबीसींना आरक्षण घेण्यासाठी जे नॉन क्रिमी लेअर सर्टीफिकेट लागते त्या मागे हेच लॉजिक आहे. सलग तीन वर्षे सहा लाखाहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या ओबीसी व्यक्तीच्या मुलांना आरक्षण लागू होत नाही असं काहीसं वाचलं होतं. एससी किंवा एसटी बद्दल माहिती नाही. पण अर्थात, पुन्हा एकदा हे सगळं सरकारी काम असल्याने यात किती घोळ होत असतील याचा अंदाज केलेलाच बरा. पहिल्या मुद्द्याशी काही अंशी सहमत. रोजगार सुरक्षा कधीही उपयुक्त, पण यापुर्वीही अशा रोजगार गॅरंटी योजना काढल्या गेल्या होत्या. त्या किंवा या अन्नसुरक्षेसारख्या अशा कुठल्याही योजना चालवणं सोपं नाही, भ्रष्टाचारालाच भरपूर वाव असणारे प्रकार आहेत हे.

In reply to by थॉर माणूस

आनन्दा Tue, 04/22/2014 - 15:31
पण यापुर्वीही अशा रोजगार गॅरंटी योजना काढल्या गेल्या होत्या
रोजगार ग्यारंटी योजना मुळीच नकोत. वैध मार्गाने रोजगार वाढवा.

In reply to by पिलीयन रायडर

दारिद्र्य रेषेखालील लोकांना जे फुकट अन्न धान्य वाटत आहेत ते बंद करावं सहमत. यामुळे कोकणात लोक (विशेषतः पुरुष गडी) काम करत नाहीत. कारण फुकटचं खायला मिळतं. बायको मजूरी करून पैसे मिळवते मिठमसाल्यापुरते. आणि हे लोक बायकोला मारून दारू प्यायला आणि पोरं काढायची फॅकटरी चालवायला मो़कळे. परत ही दारिद्र्यरेषेखालची शिधापत्रे गावांमधे कोणालाही मिळतात. आमच्या गावातल्या एका जमिनदारलाही बीपीएल कार्ड हे पाहून मी उडलोच होतो. २०१०-११ साली अम्माने (जयललिताने) फुकट तांदूळ वाटल्यानंतर तिथले ४० टक्के भात काम करायला लोक न मिळाल्याने कापणीविना सडून गेल्याची बातमी सकाळमधे वाचली होती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पैसा Tue, 04/22/2014 - 12:59
आमच्या लांजा जवळच्या गावात शेतात किंवा काजूबागेत मजुरीचं काम करायला २०० रुपये रोजावर पण माणूस मिळत नाही. त्याचवेळी गावातली एक अख्खी वाडी काहीही काम न करता आरामात जगते. फुकट मिळतं आहे त्याहून जास्त काम करून मिळवावं असं चुकून कोणाला वाटत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 14:15
१. बद्दल मी मत नीट ठरवू शकलेलो नाहिये. दोन्ही बाजु पटतात. २. यात मात्र मी आरक्षणाच्या बाजुने आहे. आर्थिक आरक्षण असावेच पण भारतीय समाजाचा विचार करता अजुनही सामाजिक द्वेष/जात-पात बरीच आहे त्यासाठी जातीया आरक्षणही हवेच (हे आरक्षण आर्थिक कारणासाठी नव्हतेच). इतकेच नाही तर महिला आरक्षण, विकलांग आरक्षण, अंध तसेच कर्णबधीर व्यक्तींनाही वेगळे आरक्षण (शेवटची दोन आरक्षणे तर खाजगी कंपन्यांतही) हवीत असे मत आहे.

In reply to by ऋषिकेश

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 14:29
आरक्षणा बद्दल चर्चा करायची झाली तर एक वेगळा धागा होइलच.. पण तरीही.. हे मान्य आहे की काही जातींवर अत्यंत अन्याय झालेला आहे... हजारो वर्ष.. पण त्यासाठी आरक्षण देऊन परत कुणा न कुणावर अन्याय करणं बरोबर आहे का? विकलांग आरक्षण, अंध तसेच कर्णबधीर व्यक्तींनाही वेगळे आरक्षण हे मी समजु शकते.. ते गरजेचे आहे.. अगदी खाजगी संस्थांमध्येही.. महिला आरक्षणा बद्दल मला बाकी मुद्दे सुद्धा महत्वाचे वाटतात (जसं की माझ्या सारख्या सुशिक्षित, सधन घरातल्या मुलीला आरक्षणाची गरज नाही.. पण जिथे मुलींना शिकण्यासाठी संघर्ष करावा लागतो तिथे आरक्षण आवश्यक आहे) पण जाती वर आधारित आरक्षण उलट जाती व्यवस्था बळकट करणार नाही का? एखाद्या सधन घरातल्या व्यक्तिला केवळ जात पाहुन सवलत दिली तर "उच्च जाती" मधल्या अधिक पात्र व्यक्तिवर अन्याय होत नाही का? जर हजारो वर्ष झालेला अन्याय चुकीचा असेल तर हा ही अन्याय चुकच नाही का? असो.. ह्या मागे तुमचीही काही भुमिका असेलच.. धाग्याचा उद्देश हा नाही.. पण आरक्षणाच्या समर्थनार्थ कितीही मुद्दे असले तरी किमान "मेडिकल" ह्या शाखेत जातीवर आधरित आरक्षण असु नये.. (खरंतर कोणतेही आरक्षण देण्या आधी किमान गुणवत्ता असावीच. म्हणजे गरीब विद्यार्थ्याला जर गुणवत्ता असेल तर मेडिकला ला प्रवेश मिळावा आणि फि मध्ये सवलत द्यावी. पण गरीब म्हणुन कट ऑफ खाली आणु नये.)

In reply to by पिलीयन रायडर

सुनील Tue, 04/22/2014 - 15:03
अवांतर असले तरी प्रतिसाद रोचक वाटला म्हणून ...
पण आरक्षणाच्या समर्थनार्थ कितीही मुद्दे असले तरी किमान "मेडिकल" ह्या शाखेत जातीवर आधरित आरक्षण असु नये
यात मेडिकलला वेगळा न्याय का द्यावासा वाटतो? अतिअवांतर - आरक्षणातून प्रवेश घेतलेल्यासांठी वेगळ्या प्रश्नपत्रिका असतात काय?

In reply to by सुनील

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 15:27
एखादा विषय शिकायला किमान गुणवत्ता असेल तरच प्रवेश दिला जातो. जसं की इंजिनिरिंग मध्ये बारावीला ५०% गुण असावेच लागतात. त्या नंतर ९०% वालाही इंजिनिअर होतो आणि ५१% वालाही (चाल ढकल करत का होईना..पण होतोच..) एकदा का कंपनीमध्ये लागले की सगळे एक समान.. तसंच.. आरक्षण घेउन किमान निकषांमध्ये सवलत मिळवुन कुणी डॉक्टर झालं (आता किती का वर्षात होईना.. काठावर पास होऊन का होईना..) तर कसं ठरवायचं की हा मनुष्य "चांगला" डॉक्टर आहे की नाही? एकदा का पास झाले की सगळेच फक्त "डॉ." अशी पदवी लावतात. नंतर त्यातुन चांगल्या वाईटाचा फरक करता येत नाही. डॉक्टर होण्यासाठी सगळ्यांना समान पेपर द्यावा लागतो हे खरेच. पण आपल्याकडे १०० मार्क्स मिळवणाराही पासच होतो आणि ३५ मार्क्स मिळवणाराही.. दोघेही पास झाले एवढाच निकष त्यांची गुणवत्ता ठरवायला पुरेसा असेल का? अशा माणसांच्या हाती दुसर्‍याचा जीव देणं धोकादायक आहे. समजा किमान निकष शिथिल केले नाहीत, तर डॉक्टर बनणारे "सर्व" विद्यार्थी हे मुळातच हा विषय शिकायला "नक्की" सक्षम असतील. आणि त्या लिस्ट मधला शेवटचा विद्यार्थी सुद्धा सर्वसाधारण बुद्धिमत्ते पेक्षा जास्त बुद्धिमत्तेचा असेल. इथे अगदी आरक्षण घेऊनही मेडिकल मध्ये प्रवेश मिळण्या साठी मुलांना प्रचंड मार्क्स लागतात हे माहित आहे, पण ती ह्या शाखेची गरज आहे. माझ्या मते इथे माणसाच्या जीवाशी संबंध असल्याने केवळ आणि केवळ गुणवत्ता हाच निकष असावा. अर्थात ही सगळी माझी मत आहेत. आणि मला असलेल्या माहितीवर आधारित आहेत. आणि हो.. मेडिकल मध्ये "डोनेशन कोटा" सुद्धा असु नये.. मी ५० लाख डोनेशन देऊन अत्यंत सुमार बुद्धिमत्तेच्या पण अतिश्रिमंत डॉक्टर बापाच्या मुलीला एम्.बी.बी.एस ला अ‍ॅडमिशन घेतलेली पाहिलेली आहे. ही मुलगी उद्या कशी तरी पदवी मिळवेलच. पण एकदा का तिनी प्रॅक्टिस सुरु केली की कुणाला कळणारे की ती मुळात पैसे भरुन डॉक्टर झाली आहे.

In reply to by पिलीयन रायडर

आजानुकर्ण Tue, 04/22/2014 - 18:37
किमान निकष. हो हे पासिंगचे निकषही विद्यापीठातील तज्ञांनीच ठरवले आहेत ना. जर तुम्हाला ३५ टक्के कमी वाटत असतील तर एकंदर पास होण्याचे निकष ६५ टक्के वगैरे करावेत असे वाटते. त्यासाठी आरक्षणावर बोट ठेवायची गरज दिसत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 16:38
मेडिकल मध्ये "डोनेशन कोटा" सुद्धा असु नये.. मी ५० लाख डोनेशन देऊन अत्यंत सुमार बुद्धिमत्तेच्या पण अतिश्रिमंत डॉक्टर बापाच्या मुलीला एम्.बी.बी.एस ला अ‍ॅडमिशन घेतलेली पाहिलेली आहे.
हे फार महत्वाचे. मेडीकल कॉलेज फक्त सरकारी असावीत आणि डोनेशन वगैरे बंद असावे. मेडीकल ला आरक्षण पण नसावे.

वा छान! आता मोदी पंतप्रधान झाले तर पर्यंत गाडी येऊ लागली आहे. :-) असो. माझ्या काही फार वेगळ्या अपेक्षा नाहीत. कारण मूळातच बेशिस्त देश हाकणे ही अवघड गोष्ट आहे. मनमोहनसिंगांच्या जादूच्या छडीच्या किंवा अजितदादांच्या पाऊस नाही पडला तर या वाक्यांमधे त्यातला उद्दामपणा वगळला तर अर्थ खरोखरच होता. फक्त एक बोलायचेच नाहीत आणि दुसरे जरा जास्तच बोलायचे. आता मूळ मुद्दा. अपेक्षा. माझ्या खालीलप्रमाणे १. चिनी आक्रमकपणाला थंड डोक्याने आणि आश्वासकपणे उत्तर देण्याची धमक असावी २. मोदींनी दिल्लीतल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे गांधीजींच्या गावाकडे चला या धोरणास प्रत्यक्ष राबवण्यासाठी तसे विकासाचे धोरण राबवावे. (यूपीए सरकारच्या चिदंबरम यांच्यासारखे शहराकडे चला नको) ३. काँग्रेससारखा धर्माधारीत विकास कार्यक्रम नको तर सार्वत्रिक विकास कार्यक्रम राबवावा ४. मदरशांचे आधुनिकीकरण जरूर व्हावे आणि तिथले कडवे धर्म शिक्षण सौम्य करावे (लागल्यास सरकारी नियंत्रणाने) ५. यूपीए सरकारचे सरकारी काम आधुनिक तंत्रज्ञानाने सोपी करण्याचे धोरण पुढे चालवावे. पण त्यात अधिक सुलभता हवी. नाहीतर सुधारित प्रणालीतही फ्रँकींगच्या पावत्या देण्यासाठी पैसे खाणारे लोक आहेत. त्या पावत्या ऑनलीईन जनरेट झाल्या तर लोक स्वतः प्रिंट करू शकती. फ्रँकींग १ उदाहरण झालं. हे थोड्याबहुत फरकाने सर्वत्र लागू होते. ६. रोडमाफीयांवर कारवाई व्हावी. असो, वर्षे ५ आहेत आणि अपेक्षा ५० वर्ष पुरतील अश्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 14:12
पुपे! {इतकी मोदी-भक्ती करूनही ;) }डोळे उघडे ठेऊन दिलेला प्रतिसाद (विशेषतः#५) खरोखरच आवडला! :) अधिक तंत्रज्ञान हा भ्रष्टाचार नियंत्रणावर सर्वात प्रभावी उपाय आहे असे माझेही मत आहे. कायदे/लोकपाल वगैरे गरजेचे आहे पण ते पोस्ट-इन्सिडन्स झाले. प्रतिरोधकाचे काम हे तंत्रज्ञान करू शकेल. फक्त, माझा अंदाज असाय की क्र.२, ४ व ६ यात फारसे काही होणार नाही

In reply to by ऋषिकेश

चैतन्य ईन्या Tue, 04/22/2014 - 16:25
{इतकी मोदी-भक्ती करूनही Wink }डोळे उघडे ठेऊन दिलेला प्रतिसाद (विशेषतः#५) खरोखरच आवडला! Smile >> माझ्या मते बरेच लोक डोळे उघडे ठेवूनच मोदींना पाठींबा देता आहेत पण तथाकथित आधीच डोळे उघडलेल्यांना ते अजिबात मान्य नसते. मोदिन बाबत त्यांचे डोळे मात्र झापड लावलेल्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे एकाच विषयाभोवती फिरत असतात. पण मान्य करायची इच्छा नसते. बाकी कोंग्रेसपासून बसपा पर्यंत सगळे जाती पातीचे राजकारण करतात फक्त जातीयवादी मोदी आणि भाजपच असतो. पण असे बोलले की लगेच गांधींना मारणारे वगैरे वाक्य येतात आणि चर्चा पुन्हा भरकटते. जितक्या दंगली कोंग्रेसच्या अतिशय घाणेरड्या राजकारणाने झाल्या आहेत तितक्या बाकीच्यामुळे झाल्याचे वाटत नाही पण पुन्हा आळ मात्र हिंदू संघटनेच्या खात्यात. ह्याला उत्तम राजकारण म्हणतात पण ६० वर्ष हेच झाल्याने आता फार लोक त्याला भुलत नाहीयेत. बाकी मोदी नक्की काय करू शकतील ह्याबद्दल बऱ्याच भक्तांना खात्री नाहीये. मुळातच जुनी खोड सत्ता सोडायला तयार नाहीत आणि सुषमा स्वराज सारखे लोक आपला चान्स गेला म्हणून ज्या पद्धतीने काहीच करत नाहीये ते पाहता जरी ३०० जागा मिळाल्या तरी नक्की सरकार कसे चालेल ह्याबद्दल प्रचंड शंका आहे. बाकी हे तसेही सेक्युलर लोकांच्या पथ्यावरच आहे. दोन्ही कडून बोंबा मारता येतील.

In reply to by चैतन्य ईन्या

शिद Tue, 04/22/2014 - 16:51

In reply to by शिद

माहितगार Tue, 04/22/2014 - 20:54
शिद यांनी अवांतरच्या दुव्यात जो सकाळ बातमीचा दुवा दिला आहे. उमर अब्दुल्लांच्या वाक्याच समर्थन करता येत नाही. त्यांच्या राज्यातील राजकारण सांभाळण्याकरता ते जे बोलले तसं काही बरळण त्यांना गरजेच वाटल असेल का कि तो विनोद करण्याचा फसलेला प्रयत्न होता (त्यांच्या वाक्यात jokes apart असे शब्द आहेत) काय कुणास ठाऊक. बिहारात गिरीजा सिंघ जे काही बोलले त्याचा प्रतिवाद करत त्यांना बाजू बहुधा भाषणस्वातंत्र्याची घ्यायची असावी. तसे असेल तर भाषणस्वातंत्र्या करता अजूनही काही टोकाचे बोलता आले असते. पाकीस्तानला जाइन वगैरे म्हणून मोदींच्या इलेक्श्न कँपेनला आपण मदतच करतोय हे त्यांच्या गावी आले नसावे. उमर अब्दुल्ला जे बोलले त्याच समर्थन अजिबात करावयाच नाही. पण सकाळच्या वृत्तातील त्यांच्या वाक्याचा अपुर्ण अनुवादही जबाबदारपणाच लक्षण म्हणता येत नाही. अनेक महत्वाच्या प्रसंगी मराठी वृत्तपत्रे अनुवादात घोळकरत असतात. ते घोळ बरोबर समजून मराठी वाचक रिअ‍ॅक्ट होत राहतात याचे एकुण सामाजिक राजकीय परिणाम काय झाले हा वेगळ्या अभ्यासाचा विषय ठरावा. "No, jokes apart, I think this shows an extreme level of intolerance that has never been seen before...I disagree with a whole lot of things that Mr Narendra Modi stands for but I don't think that makes me any less Indian than a person who supports Mr Modi," या वाक्याचा सकाळवृत्ताने अनुवाद देण्याचे टाळणे हा राष्ट्रीय महत्वाच्या बातम्या प्रस्तुत करतानाचा ढिसाळपणा असे माझे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by माहितगार

विकास Tue, 04/22/2014 - 21:16
मराठी वृत्तपत्रांनी यावेळेस चुकीचे लिहीले आहे असे वाटत नाही... एनडीटिव्ही वर आल्याप्रमाणे, "Jammu and Kashmir chief minister Omar Abdullah has said he will not stop opposing Narendra Modi, the BJP's prime ministerial candidate, even if that means having to take a bus to Pakistan." तरी देखील अब्दुल्लांना संशयाचा फायदा देता येईल. कारण, त्यांचे वाक्य गिरीराज सिंग यांच्या वक्तव्याला प्रतिसाद म्हणून होते. तरी देखील आपण काय बोलत आहोत आणि त्याचा काय अर्थ लावला जाऊ शकेल हे समजणे गरजेचे असते... ते बर्‍याचदा राजकारण्यांना समजत नाही. तेच येथे झाले असावे.

In reply to by विकास

माहितगार Wed, 04/23/2014 - 09:43
अलिकडच्या आप की अदालत मध्ये राज ठाकरे; पत्रकार मंडळी अर्ध्याच वाक्याचा संदर्भ देऊन दिशाभूल कशी करतात या बद्दल बोलत होते. आपण एनडीटिव्ही च्या वृत्ताची हेडलाईन देत आहात ती अटेंशन ग्रॅबींगच्या उद्देशाने बनवलेली आहे. उमर अब्दुल्लांची बोलण्यातली चूक आहे ती आहे पण त्यांच्या वाक्यातला ' मी मोदींना विरोध करतो म्हणजे कमी भारतीय ठरत नाही' यातल त्यांच भारतीयत्व ते स्वतःहून सांगताहेत ती बाब एनडीटिव्ही बातमीत येते सकाळच्या येत नाही. उमर अब्दुल्लांच माप त्यांच्या पदरात घालण्यास हरकत नाही. काश्मिर सारख्या नाजूक बाबतीत वार्तांकन करताना मराठी वृत्तपत्रानी अधिक काळजी घ्यावी एवढेच वाटते.

रमेश आठवले Tue, 04/22/2014 - 14:57
मोदी पन्तप्रधान तर होणारच असे बहुसंख्यांक लोकाना वाटत आहे. तेवढे पुरेसे नाही. त्यांना २/३ बहुमत मिळाले तर १ ते ५ पैकी खालील दोन गोष्टी करता येतील. १. घटनेतील ३७० कलम काढून टाकून काश्मीरची डोकेदुखी कायमसाठी दूर करता येईल. २. युनिफोर्म सिविल कोड बिल पास करता येईल., म्हणजे सर्व नागरिकाना धर्माचा विचार न करता एकच कायदेपद्धती लागू करता येईल. त्याशिवाय ३. लोकपाल बिल अमलात आणणे. ४. न्यायालयांच्या खटल्याच्या निकालाचा वेग निदान दहा पटीने वाढवणे. ५. सर्व पदार्थांच्या महागाईचे मूळ खनिज तेलाच्या किमतीवर अवलंबून आहे. सध्या केंद्र सरकार आयात तेलावर अफाट कर लावते आणि त्यानंतर राज्य सरकारे आपला कर लादतात. हे कर बंद करून खनिज तेल ज्या दरात सरकार विकत घेते त्याच दरात विकल्यास महागाई लगेच कमी करता येईल.

बॅटमॅन Tue, 04/22/2014 - 15:20
मोदी पंप्र झाले तर अल्पसंख्यांकांसाठीचे कॉन्सण्ट्रेशन कँप सुरू होतील. (असेच टाळीखौ उत्तर अपेक्षित असते बर्‍याच सूडोसेक्युलरांना म्हणून दिले बाकी मोदी आले काय नि नै काय, किती बरावाईट फरक पडेल याबद्दल शंकाच आहे. असो.)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:22
परवाच्या लोकसत्तामध्ये असाच काहीसा लेख आला होता ब्वा! वाचला असेल बर्‍याच जणांनी. -(ऋषिकेश च्या प्रश्नांचं 'नक्की' प्रयोजन काय असा प्रश्न पडलेला) प्यारे

In reply to by प्यारे१

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 15:25
प्रयोजन असे काही खास नाही. मी मोदी समर्थक अजिबात नाही हे माहिती आहेच. मात्र त्यांच्याबद्दलचे आकर्षण चकीत करणारे आहे. तेच ते आरोप प्रत्यारोप यांच्या पुढे जाऊन दुसरी बाजु समजून घेताना, नक्की काय अपेक्षा आहेत याचा अंदाज घेतोय.

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:39
काँग्रेसबद्दल भरपूर राग आहे हे प्राथमिक नि सगळ्यात मुख्य कारण! काँग्रेसच्या विरोधात उभं राहू शकणारं कुणी आहे ह्याबाबत जनतेला थोडासा विश्वस वाटत आहे नि त्यामुळं लोक मोदीना समर्थन करत आहेत. केजरीवालनी थोडीशी मॅच्युरिटीची भूमिका (जशी सुरुवातीला दाखवली होती तशी) दाखवली असती तर मोदींऐवजी केजरीवालना जास्त समर्थन मिळालं असतं. त्यांच्या 'अतिघाई संकटात नेई' धोरणानं समर्थन दुरावलं ही वस्तुस्थिती आहे. जनतेला एक पर्याय हवा आहे. बस्स्स!

In reply to by प्यारे१

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 15:42
मान्य. वर अर्ध्यावर काढलेला निष्कर्षही तिथेच निर्देश करतो आहे. आता अधिक मते आली की बळकटी येईल. मोदी या व्यक्तीमागे अपेक्षा आहे, धोरणांबद्दल फारशी नाराजी नाही, अंमलबजावणीबद्दल आहे. समांतरः फक्त अंमलबजावणी करण्यासाठी जनादेश देताना सदर व्यक्ती धोरणेही बदलु शकते, त्यांना तसा अधिकार असतो हे किती जण लक्षात घेताहेत हे आता समजणार नाही

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 15:52
व्यक्ती लांबचा विचार करत असेल तर धोरणं अचानक बदलणं होणार नाही असं वाटतंय. मोदीं नी आपली एक्स्ट्रीमिस्ट ही प्रतिमा आधीच बनवली आहे. त्यात आणखी तेल घालून फायदा होणार नाही हे मोदींसारख्या 'बनिया'ला कळत नसावं असं वाटत नाही. त्यामुळं खाजगीकरणातून मोठ्या कंपन्यांना आवश्यक तेवढी रोजगार निर्मिती केली जाईल, योग्या योग्यतेचा फारसा विचार न करता अर्थकारणाला चालना मिळेल, मध्यमवर्ग आनंदात राहील असं चि त्र उभं राहील आणि साधारण २ टर्म्स (१० वर्षं) हे प्रकार घडतील असा अंदाज आहे. आणि हो पाकिस्तान कुरापती कमी करेल त्यामुळं संबंध सुधारतील. केजरीवालच्या सगळ्या कृत्यांबाबत सुद्धा विचारपूर्वकच गोष्टी होत असाव्यात असा संशय आहे.

In reply to by ऋषिकेश

पैसा Tue, 04/22/2014 - 15:52
फक्त अंमलबजावणी करण्यासाठी जनादेश देताना सदर व्यक्ती धोरणेही बदलु शकते,
मोदींच्या बाबत हे शक्य नाही. एकतर भाजपाचं सरकार आलंच तर युत्या करूनच येईल. हे युतीतले भागीदार मुख्य भागीदार पक्षाला आपल्या तालावर नाचवतात. शिवाय भाजपमधेच इतर अनेक 'स्वयंभू' नेते आहेत. त्यामुळे मोदींना सगळ्यांना बरोबर घेऊन जावंच लागेल. नाहीतर सरकार फारकाळ टिकणार नाही. काँग्रेस सोडून कोणाचेही सरकार आले तर एकहाती रिमोट नसेल.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 04/22/2014 - 16:46
मी स्थैर्याच्या बाजुने नाहिचे. राजीव, युपीए-२ इतके स्थिर होते की पडता पडेना. काय उपेग झाला? उलट राव, युपीए-१, वाजपेयींना इतके जण ब्लॅकमेल करणारे होते / अल्पमतातील सरकारे होती, तरी याच सरकारांनी उजवी कामगिरी केलेली दिसते

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 16:52
एखाद्यानं सर्कारी परमनंट जॉब मिळाला म्हणून परफॉर्म न करण्यासारखं सरकार(पण) वागतं का काय? ;) - विरोधकांनी अधून मधून अविश्वास ठराव आणून ऑक्सिजनवरचं सरकार बघायला उत्सुक असलेला ;)

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Tue, 04/22/2014 - 17:10
अस्सं! मला वाटलं की पैसा यांच्या कमेंटीतील "नाहीतर सरकार फारकाळ टिकणार नाही" याला अणुमोदण होतं.

कवितानागेश Tue, 04/22/2014 - 15:48
आधी पर्यावरणाकडे आणि शेतीकडे, ऑर्गानिक फार्मिन्ग्कडे लक्ष द्यावं असं वाटतंय. त्यानंतर १-१- गाव, खेडे स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष द्यावं. भारत का खरोखरच कृषीप्रधान देश आहे.

In reply to by कवितानागेश

राघव Sun, 04/27/2014 - 15:36
सोबत- विकेंद्रीकरण, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण, पाणी-शेतीचा पायाभूत विकास, आर्थिक धोरणांत व करांत मूलगामी बदल, सागरी सीमा सुरक्षेवर भर, ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आश्वासक वातावरण निर्मिती, नवीन संशोधनास चालना देणारी धोरणे, तयार मालाच्या आयाती पेक्षा निर्यातीवर भर, महिला सुरक्षेसंबंधी तातडीचे आश्वासक निर्णय... यादी कितीही वाढू शकते. पण यातले कोणते आधी कोणते नंतर याचा निर्णय करण्याची इथं गरज वाटत नाही. अनेक मुद्दे महत्वाचे आहेत व समांतर पणे चालवावे लागतील. अर्थात् अनेक आव्हाने आहेत. त्यात नवीन सरकार काय काय करू शकेल ते बघायचे. पण एवढे मात्र खरे की लोकांच्या अपेक्षा खूप आहेत व त्यासाठी प्रचंड मेहनत नवीन सरकारला करणे आहे.

काहि दिवसांपूर्वी मोदिंचे पुण्यात झालेले भाषण ऐकले. त्यात त्यांनी एक चांगला मुद्दा मांडला होता तो म्हणजे संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा. कारण सरकार येत असतात आणि जात असतात पण या संस्था ज्यांच्या मार्फत हा देश चालवला जातो त्या सक्षम असल्या तर कोणतही सरकार असल्याने फरक पडणार नाही. सरकारी संस्थाना (उदा. सैन्यदले,कॅग किंवा इतर तद्सम संस्था) त्यांचे कार्य पूर्ण क्षमतेने करण्यासाठी प्रवृत्त करणे,प्रोत्साहित करणे व त्यांच्या कामाला योग्य दिशा दाखवणे. त्यांनी भाषणात एक वाक्य वापरले होते "मोदीने गुजरात मे कुछ नहि किया जो कुछभी आपको दिखता है वो किया है तो इन संस्थाओने." त्यांनी पंतप्रधान झाल्यावर इतके जरी केले तरी बरेच बोळे निघुन पाणी वहाते होईल.

विकास Tue, 04/22/2014 - 17:28
मराठी म्हणीचा वापर करायचा झाला तर "अजून काका म्हणायला वेळ आहे... :)". निवडणूक चालू होण्याआधी देखील २७२ जागा मिळतील का याबाबत साशंकता होती पण महाराष्ट्रात जे मतदारांची नावेच गहाळ होण्याचे प्रकार घडले आहेत त्यावरून असे वाटते की हाच लेख "जर राहूल गांधी अथवा प्रियांका गांधी-वड्रा पंतप्रधान झाल्यातर..." (पुढे, "जनतेने काय करावे?") असा लिहीण्याची वेळ आली आहे का असे वाटते. असो. तुर्तास या लेखासंदर्भात... सर्वप्रथम "उत्तर नीट ठरवून प्रश्न सोडवा. व्यवस्थित आल्टरेनेटीव्ह असल्याशिवाय कुठलिही प्रस्थापित गोष्ट बदलू नका... राज्य करणे म्हणजे आंदोलन नसते अथवा राजकीय भाषणे नसतात. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असणे आणि देशाचा पंतप्रधान असणे यात फरक आहे. " त्या अर्थाने राज्यकारभाराला दिशा देणे महत्वाचे आहे. आज अशी दिशा आहे असे वाटत नाही. जर दिशा योग्य असली तर तुम्ही दिलेल्या यादीतली अनेक कामे काही विशेष न करता होऊ शकतात. आजही ती स्थानिक पातळीवर कुठे न कुठे होतच आहेत. त्या अर्थाने सर्वप्रथम देशाला नेता आहे, रिमोट कंट्रोल नाही अथवा नुसताच चळवळ्या माणूस नाही ही जाणीव जनतेला आणि नोकरशाहीला येणे गरजेचे आहे. ते मोदींनी करावे ही अपेक्षा आहे. तसेच, जर मोदी पंतप्रधान झाले तर त्यांचे मंत्रीमंडळ कसे असेल यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून राहतील. वर दिलेल्या यादीतली प्रत्येक काम कुठल्यान कुठल्या रुपाने (पाठ थोपटून घेण्याइतके) नक्की होईल. पण राम जन्मभूमी अगदी सुप्रिम कोर्टाचा निकाल आला तरी जो पर्यंत दोन समाजात ठराव होत नाही तो पर्यंत होणार नाही आणि ते देखील करतील असे वाटत नाही. मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील इतके नक्कीच वाटते. पण ती priority नसेल. तेच समान नागरी कायद्याबद्दल.... मात्र काश्मीर ही नक्कीच priority असेल पण केवळ ३७० कलमानेच नाही. असो. अर्थात नेहमीचे पालूपदः असे मला वाटते... :)

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 10:20
दि. १६ मेनंतरचे विधिलिखित तसेही सर्वप्रथम द्रष्ट्या मनमोहन सिंग यांनीच टिपले होते. म्हणूनच आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, असे त्यांनी ३ जानेवारी रोजी जाहीर केले आणि '७, रेसकोर्स'मधून बस्तान हलविण्यासाठी दिल्लीच्या पराभूत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अकबर रोड चौकातील बंगल्याचे नूतनीकरण त्यांनी झपाट्याने पूर्ण करायला लावले. इतकी वर्षे काही न बोलताही थकलेले पंतप्रधान मनमोहन सिंग १६ मेनंतर आपला गाशा गुंडाळतील आणि १५ महिन्यांपासून अथकपणे बोलणारे नरेंद्र मोदी त्यांची जागा घेतील, हे वास्तव आता राजकारणातील सर्वच सुज्ञांनी स्वीकारले आहे. गेले वर्षभर संवादहीनता आणि अतिसंवादाच्या दोन टोकांदरम्यान झुलणारा भारत १६ मेनंतर रोखठोक संवादावर स्थिरावणार आहे. १६ मेनंतर धर्मनिरपेक्ष भारत कूस बदलणार, ही धारणा निधर्मी बुद्धिवाद्यांतही दृढ झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या ६० वर्षांच्या कुशासनाचे १६ मेनंतर ६० महिन्यांत सुशासनात परिवर्तन करता यावे म्हणून मोदींनी दोन महिने आधीपासूनच काश्मीरप्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मागच्या दाराने मुत्सद्देगिरी सुरू केली आहे. गेली १० वर्षे सरासरी १५ ते १८ तास अहोरात्र काम करून मनमोहन सिंग एवढे क्षीण झाले आहेत की त्यांना त्यांचे मानसपुत्र डॉ. संजय बारू यांनी पुस्तकात केलेल्या खऱ्या-खोट्या दाव्यांवर भाष्य करायला शब्द उच्चारणेही जड जात आहे. १६ मेनंतर मोदीच पंतप्रधान होणार असल्यामुळे देशाची वेगवान प्रगती साधण्यासाठी हवा तसा हेडस्टार्ट लाभावा म्हणून मनमोहन सिंग त्यांच्याकडे परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयाची सूत्रे आधीच का सोपवित नाहीत, असा प्रश्न दिल्लीतल्या मोदीमय झालेल्या मुत्सद्यांना पडला आहे. मोदींचे सरकार येणार ही दगडावरची रेष असल्यामुळे शेअर बाजाराप्रमाणे दिल्लीच्या हवामानातही आधीच अच्छे दिन आले आहेत. एप्रिलचा तिसरा आठवडा लोटून गेला तरी दिल्ली ३३ आणि २० अंश सेल्सियसच्या आल्हाददायक कोषातून बाहेर पडायला तयार नाही. मे महिन्यातील हवामान तर याहूनही सुखद असेल अशी त्यामुळे अपेक्षा उंचावली आहे. या सर्व स्पष्ट पूर्वसंकेतांची दखल घेऊन मावळत्या पंतप्रधानांनी प्रस्थापित परंपरा आणि संकेत बाजूला सारून मोदींच्या संमतीने भ्रष्टांचा निःपात करणारे देशाचे पहिले लोकपाल निवडायला, तसेच नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती करायला काहीच हरकत नाही. १६ मेनंतरचे विधिलिखित तसेही सर्वप्रथम द्रष्ट्या मनमोहन सिंग यांनीच टिपले होते. म्हणूनच आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, असे त्यांनी ३ जानेवारी रोजी जाहीर केले आणि '७, रेसकोर्स'मधून बस्तान हलविण्यासाठी दिल्लीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अकबर रोड चौकातील बंगल्याचे नूतनीकरण त्यांनी झपाट्याने पूर्ण करायला लावले. पण मनमोहन सिंग यांच्याकडून सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या अपेक्षा मात्र १६ मे उजाडेपर्यंत संपणार नाहीत. केंद्रात मोदींचे सरकार येण्यापूर्वीच मनमोहन सिंग यांच्या हातून सर्वशक्तीमान ठरू पाहणाऱ्या लोकपालाची नियुक्ती आटोपून टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणजे पंतप्रधान झाल्याझाल्याच मोदींना गुजरातच्या लोकायुक्तांप्रमाणे लोकपालाची नियुक्ती निरस्त करण्यासाठी पुन्हा सुप्रीम कोर्ट गाठण्यासाठी आदेश द्यावे लागतील. म्हणूनच लोकपाल आणि लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीत ढवळाढवळ करू नका आणि हा विषय नव्या सरकारवर सोडा, असा दम मोदींच्या भारतीय जनता पक्षाने मनमोहन सिंग यांना दिला आहे. दुसरीकडे गलितगात्र केंद्र सरकारमध्ये किती दम आहे याची चाचपणी करण्याची संधी मोदी सोडत नाहीत. मनमोहन सिंग सरकार अजूनही तीन आठवडे सत्तेत आहे. आपल्या निवडणूक प्रचारावर १० हजार कोटी रुपये खर्च झालेत की नाही, याची ते अजूनही हव्या त्या यंत्रणेमार्फत चौकशी करू शकतात, असे ते उपरोधाने आव्हान देत आहेत. दि. १६ मे रोजी मोदींची सत्ता येणार याची पूर्ण खात्री पटल्यामुळे संघपरिवारात महिन्यापूर्वीच जल्लोष सुरू झाला आहे. ही अभूतपूर्व गोष्ट आहे. राजकारणाशी संघाचा काही एक संबंध नाही, असे सांगणारेच आता आणीबाणीनंतर प्रथमच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उघडपणे सक्रियता दाखविताना संघाच्या लाखो गटनेते आणि स्वयंसेवकांनी भाजपच्या देशव्यापी प्रचारात कसे झोकून दिले, याची वर्णने करीत आहेत. देशाला निर्नायकीच्या गर्तेतून बाहेर काढून निर्णायक टप्पात पोहोचविणाऱ्या संघाची यशोगाथा सांगण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांमध्ये आधीच स्पर्धा सुरू झाली आहे. आणीबाणीनंतरच्या काँग्रेसविरोधी यशाचे शिल्पकार जयप्रकाश नारायण यांच्याप्रमाणे सरसंघचालक मोहन भागवत मोदींच्या १६ मे रोजी मिळणाऱ्या यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. मोदींची सत्ता येणार याची जाणीव झाल्यामुळे केंद्रातील अनेक भ्रष्ट आणि उर्मट मंत्री त्यांचा नम्रपणे मोदीजी म्हणू उल्लेख करू लागले आहेत. पण त्यांची खैरियत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून त्यांना वर्षभरात तुरुंगवासात टाकण्याचे वचन मोदींनी देशवासीयांना दिले आहे. एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई करणारे रियल इस्टेटचे जादूगार सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना तुरुंगात टाकण्याच्या मोदींच्या योजनेची वाच्यता साध्वी उमा भारतींनी केली. पण देशाच्या अतिवेगवान विकासासाठी प्रतिभावान वड्रांचा फॉर्म्युला उपयुक्त ठरू शकतो, याची जाणीव असलेले मोदी त्यांना फार काळ तुरुंगात ठेवणार नाहीत. उलट शिखरावर पोहोचलेला देशाचा आर्थिक विकासदर खुंटविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सोनिया गांधी आणि शहजादे राहुल गांधी यांना तुरुंगात टाकण्यासाठी रॉबर्ट वड्रंना माफीचा साक्षीदार म्हणून प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर असेल. मोदींच्या विरोधकांना भारतात थारा नसेल. त्यांना पाकिस्तानात जावे लागेल, असे बिहारमधील मोदीसमर्थक गिरीराज सिंह यांचे म्हणणे आहे. त्यामुळे इतिहासाच्या अज्ञानावरून मोदींची खिल्ली उडविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही १६ मेनंतर पाकिस्तानात तक्षशीला पाहायला जावे लागेल. हे सारे घडणार आहे १६ मेनंतर. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर. पण मोदी सत्तेत आल्यानंतर आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या खचलेल्या भारताला बलशाली बनविण्यासाठी भाजप आणि संघाने आधीपासूनच रोडमॅप आखून ठेवला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सोशल मीडियापासून सोशल इंजिनीअरिंगपर्यंत मोदींच्या भाजपने जबरदस्त मोर्चेबांधणी केल्याची खात्री पटल्यामुळे त्यांच्या दृष्टीने १६ मे ही तारीख संदर्भहीन ठरली आहे. साभार: 'अच्छे दिन आनेवाले है...' सुनील चावके Monday April 21, 2014

In reply to by असंका

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 15:30
वरचा लेख लेखकाचा निव्वळ कल्पनाविलास असून मोदींचा जोर विकासावरच असणार आहे. गडे हुवे मुर्दे बाहर निकालना गलत होगा. क्योंकी सभी लोगोंकी हालत अभी बहोत खस्ता है! ये रहा एक उदाहरण:- आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या, मोदींच्या नावे चिठ्ठी देश नवी दिल्ली - गाझियाबादच्या एका 35 वर्षीय व्यक्तीने मसूरी भागात स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. या गृहस्थाने आत्महत्या करण्यापूर्वी नरेंद मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून आपण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. आपल्या मुलीचा सांभाळ करा, अशी विनंती केली आहे.या गृहस्थाचे नाव ओमप्रकाश तिवारी असे असून तो येथील लोणी भागात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान होणार आहात. मी आर्थिक हलाखीमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालो आहे. माझ्या मृत्युनंतर माझ्या मुलीचा सांभाळ करावा, अशी विनंती करणारी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. आपल्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही, असे त्याने आपल्या एक पानाच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून चांगली नव्हती. त्यामुळे त्याने गतरात्री हे पाऊल उचलले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते. आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या, मोदींच्या नावे चिठ्ठी

In reply to by आयुर्हित

असंका Wed, 04/23/2014 - 15:54
जर हा लेख कल्पनाविलास आहे तर आपण तो इथे डकवण्याचे कष्ट का घेतले? लेखात अनेक ठिकाणी पुढचा पंतप्रधान कोण होइल त्यावर मतप्रदर्शन केले गेले आहे. तो फक्त कल्पनाविलास असून प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही असे तरी मग आपले मत आहे का?

In reply to by असंका

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 16:04
मिपावरील मूळ लेखाचे नाव आहे "जर मोदी पंतप्रधान झाले तर...." हादेखील एक कल्पनाविलासच आहे, अजून तर देशातील मतदानही पूर्ण झालेले नाही. तरी प्रत्येकाने, आपल्या परीने कल्पनाविलासच केलेला आहे. त्यात आपणही आहात की! आणि प्रत्यक्षात मोदी काय निर्णय घेणार आहेत कोणास ठावूक? कृपया नावाप्रमाणे कंफ्युज्ड होऊ नका व इतरांनाही करू नका!

In reply to by आयुर्हित

असंका गुरुवार, 04/24/2014 - 08:44
आपण वैयक्तिक होत आहात...माझा ID हा संपूर्णपणे माझा वैयक्तिक विषय असून चर्चेसाठी उपलब्ध नाही. आणि आपण लक्षात घ्या की, कल्पना करणे आणि कल्पनाविलास करणे ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मूळ लेखात लेखकाने काही कल्पना मांडल्या आहेत. त्या कल्पनाविलास आहेत असे आपण आता म्हणत आहात. हे म्हणजे विषय भरकटवणे झाले. माझा प्रश्न एव्हढाच होत की, वरती जो लेख (म.टा. मधला) आपण स्वतःहून डकवलेला आहे, ते आपल्या नेहेमीच्या भूमिकेशी सुसंगत आहे असं आपल्याला वाटतं का? जर हो, तर पुढे माझा आपल्याला काहीही प्रश्न नाही. जर नाही, तर मला शंका आली, की जो लेख तुमच्या मताविरुद्ध आहे, तो इथे सगळयांच्या नजरेसमोर आणण्याची आपणास काय गरज वाटली? पण आपण हो किंवा नाही काहीही न बोलता कुठेतरी भलतीकडेच जात आहात. कृपया, उत्तर नसेल द्यायचे तर देउ नका, पण परत एकदा - वैयक्तिक टिप्पणी टाळा.

In reply to by असंका

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 11:56
कल्पना करणे : जर मोदी पंतप्रधान झाले तर.... हे वाक्य सोडले तर उरलेला लेख हा पूर्ण "कल्पनाविलास"च आहे. मोदी आणि भारतीय जनता पक्ष काय करणार आहेत ते आधीच १००% स्पष्ट आहे, ज्याची माहिती आपल्याला भारतीय जनता पार्टी घोषणापत्र 2014 वर देऊन आज १६ दिवस पूर्ण झाले आहेत. तुमचा ID समजा अबकड असला तर अबकड जी, कृपया कंफ्युज्ड होऊ नका व इतरांनाही करू नका! असेच म्हणेन. स्वगत: माझा एक समझ होता, जी व्यक्ती आपल्या गुण/अवगुणांवर स्वत:हून विनोद करते, ती खरोखरच विनोदी असते.

In reply to by आयुर्हित

असंका गुरुवार, 04/24/2014 - 17:12
अजूनही आपण विषय भरकटवत आहात. आपण स्वत:हून जो लेख सर्वांसमोर ठेवला त्यातील मतांशी आपण सहमत आहात की नाही? जर हो, तर मग पुढे माझे काही म्हणणे नाही. पण जर नाही, तर मग आपण सर्वांना ही माहिती का देत आहात हा माझा दुसरा प्रश्न. सोपे करून सांगतो- " हो" की "नाही" ? यांपैकी एक उत्तर पहिले ठरवून घ्या. मग माझ्या प्रश्नाचा उर्वरीत भाग वाचा. आणि आपण जो पर्याय निवडला आहे, त्यानुसार त्याचे उत्तर द्या.- म्हणजे द्यायचे असेल तर. पण आपण विनाकारण वैयक्तिक होणे टाळावे ही माझी आपणास परत एकदा कळकळीची विनंती आहे.

In reply to by असंका

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 17:43
लेखातील मतांशी आपण सहमत आहोत! फक्त.... १)डॉ मनमोहन सिंग हे जाणकार, अनुभवी अर्थतज्ञ आहेत व त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, परंतु ते त्यांना कॉंग्रेसने अमलात आणू दिले नाही किंवा Implement करता आले नाही, त्यामुळे त्यांचा हा एक गुण झाकोळला गेला आहे. त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, पडद्याच्या मागून/पुढून नक्कीच मार्गदर्शन घेता येईल व हे भारतासाठी मोठे योगदान ठरेल. यांच्या नावाने एक शिष्यवृत्ती सुरु करून भारतात राहून सेवा देवू इच्छिणाऱ्या हुशार लोकांना अधिक हुशार करता येईल. २)रॉबर्ट वद्रा यांना नोबेल/ऑस्कर/ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड/लिम्का बुक ऑफ रेकोर्ड/भारतरत्न सर्व जे काही देता येईल ते देवून सन्मान करावा व त्यांच्या नावाने एक Training Institute/मुक्त विद्यापीठ काढावे व त्यांचे अनुभव सर्वांपुढे येवू द्यावेत. प्रत्येक तालुक्यातील एक व्यक्ती यांच्याकडे जबरदस्तीने का होईना शिकण्यास पाठवावी. यातून चौकटराजासारख्या निवृत्त व्यक्तींना ५००/- रु चे पण ३ ते 7 वर्षात १कोटी (जास्त अपेक्षा नाही)बनवता आले तरी मी माझे भाग्य समजेन. ३)सर्व अपराधी खासदार(मग ते सोनिया गांधी असो की पवार की मोदी)सर्वांना न्यायालयात उभे करणे व १२ महिन्याच्या आत अपराध सिद्ध करणे/मुक्त करणे.

In reply to by आयुर्हित

कलंत्री Fri, 04/25/2014 - 10:40
न्यायालयात जाऊन एखादे आरोप सिद्ध करा अथवा त्या व्यक्तिवर सभा / वर्तमानपत्र / माध्यमातून टिका करु नका.

In reply to by आयुर्हित

असंका Fri, 04/25/2014 - 10:54
वैयक्तिक टिप्पणी टाळल्याबद्द्ल धन्यवाद. वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले. पण असो(-माणसांचे मतपरीवर्तन होणे ही काही अशक्य गोष्ट नाही. काय?)

In reply to by आयुर्हित

असंका Fri, 04/25/2014 - 10:57
वैयक्तिक टिप्पणी टाळल्याबद्द्ल धन्यवाद. वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले. पण असो(-माणसांचे मतपरीवर्तन होणे ही काही अशक्य गोष्ट नाही. काय?)

In reply to by असंका

संपत Fri, 04/25/2014 - 14:22
वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले.
हा लेख उपहासात्मक आहे असेच मलाही वाटतंय, पण आयुर्हीत यांचे मत तो मोदींची स्तुती करणारा आहे असे असावे.

In reply to by संपत

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 15:33
मी स्तुतीप्रिय नाही व (कोणी/कोणाचीही)स्तुती केली म्हणून कोणालाही डोक्यावर घेणार नाही/घेवू देणारही नाही. मला मांडलेले जे मुद्दे रास्त वाटतात त्याचेच मी नेहमी समर्थन करतो. आजपर्यंतच्या लेखात मी मोदींची स्तुती केलेली नाही तर त्यांनी केलेल्या कार्याची स्तुती केली आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. उद्या हेच/असेच कामे पवार/चव्हाण/ठाकरे बंधूंनी (अगदी मुशर्रफ/दाउद) साहेबांनी करून दाखवावीत, त्यांनाही डोक्यावर घेवू! धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

संपत Sun, 04/27/2014 - 13:36
आयुर्हित साहेब, हा लेखातून चावके मोदींची स्तुती करत आहेत कि उपहासात्मक टीका करत आहेत ह्याबद्दल मतभेद आहेत. तुम्हाला मोदींची व त्यांच्या कार्याची स्तुती करण्याचा हक्क आहेच.

In reply to by असंका

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 15:40
ह्युमरला वैयक्तिक टिप्पणी म्हणून घेवू नका! एक गोष्ट मला वाटते/आवडते ती म्हणजे जेव्हा देशहिताबद्दल गोष्ट असेल तेव्हा तेव्हा "वयम् पंचाधिकं शतम" हीच गोष्ट मी प्रमाण मानतो. आजपर्यंत भाजपने कॉंग्रेसला/बसपा/जनता दल युनायटेड ला बऱ्याच विषयांवर समर्थन दिलेले असले तरी मूळ कारण देशहितच होते!

In reply to by आयुर्हित

रमेश आठवले गुरुवार, 04/24/2014 - 10:18
-एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई करणारे रियल इस्टेटचे जादूगार सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना तुरुंगात टाकण्याच्या मोदींच्या योजनेची वाच्यता साध्वी उमा भारतींनी केली. पण देशाच्या अतिवेगवान विकासासाठी प्रतिभावान वड्रांचा फॉर्म्युला उपयुक्त ठरू शकतो, याची जाणीव असलेले मोदी त्यांना फार काळ तुरुंगात ठेवणार नाहीत----,-- हे वाक्य उपरोधिक नाही असे मानून मी खालील माहिती देत आहे. रोबेर्ट वाड्रा -extra-constitutional authority असल्यामुळेच त्यांना आपण म्हणता तशी धंद्यात प्रगती करता आली आणि कॉंग्रेस राज्य सरकारांनी सर्व प्रकारच्या सवलती कायद्याना धाब्यावर ठेऊन दिल्या . सनदी अधिकारी खेमका आणि हरयाणा सरकार यांच्या वादात खेमकांची भूमिका खरी असावी असे मला वाटते. वाड्रा हे extra-constitutional authority असल्याचा पुरावा मला भुवनेश्वर विमानतळावर सापडला. तेथे सुरक्षा तपासणीच्या कक्षाबाहेर एक फलक लावलेला होता. त्यावर, ज्याना सुरक्षा तपासणी मधून जायची जरूर नाही अशा लोकांची यादी दिलेली होती. त्यात सुरवातीची १५-२० नावे पदा प्रमाणे होती. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , अध्यक्ष, कॅबिनेट दर्जाचे मंत्री, राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री वगैरे , अशी सर्व अधिकार पदाची नावे होती. सध्या ती पदे भूषवित असलेल्या व्यक्तींची नावे न्हवती .पण यादीच्या शेवटी फक्त एकच नाव -रोबेर्ट वाड्रा- पद नामा शिवायचे होते. ही सरकारी यादी मी दोन तीन भेटीत पाहिली आहे. फक्त त्या भागात फोटो काढण्याची मनाई असल्यामुळे मी यादीचा फोटो काढू शकलो नाही.

In reply to by रमेश आठवले

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 12:05
एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई या ऐवजी की ऐकलेल्या "एक लाखाचे तीन वर्षांत ३०० कोटीं" ह्या नावाचा एक धागा मी परवाच मिपा वर टकला होता, ज्यात सर्व गुंतवणूक तज्ञ व फिनान्शिअल प्लानर्स ला हा प्रश्न विचारला देखील होता. हे मोठे आव्हान आहे, प्रत्येक उद्योजकाला, की एवढे जास्त returns कसे मिळाले? किंवा कसे मिळतील? काय केल्याने मिळतील? तो का दिसत नाही, माहिती नाही? संपादक मंडळाने उडवला तर नाही? कृपया संपादक मंडळाने उत्तर द्यावे.

रमेश आठवले Wed, 04/23/2014 - 15:14
खालील मुद्दा हा ऋषिकेश यांच्या यादीत असावा असे वाटते. काल एका वाहिनीवरील मुलाखतीत भारताचे परराष्ट्रीय धोरण हे जशास तसे (Reciprocacity ) असावे असे मोदींनी सांगितले. त्या वरून आठवण झाली कि भारताचे पाकिस्तानशी असलेले सध्याचे बोटचेपे धोरण बदलण्याची गरज आहे. MFN करार म्हणजे दोन देशांनी परस्परांना व्यापारात सवलती देणे असा आहे . अशा प्रकारचे करार भारताचे बर्याच राष्ट्रांशी आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत भारताने त्या देशाला MFN देशाचा दर्जा काही वर्षापूर्वी दिलेला आहे पण पाकिस्तानने मात्र भारताला तो दर्जा दिलेला नाही. या एकतर्फी सवलतीच्या धोरणाचाही मोदी फेरविचार करतील असे वाटते.

In reply to by रमेश आठवले

सुनील Wed, 04/23/2014 - 15:34
या एकतर्फी सवलतीच्या धोरणाचाही मोदी फेरविचार करतील असे वाटते.
अहो, पाकिस्तानला MFN चा दर्जा देणे भारताला फायदेशीरच आहे. पाकिस्तान भारताला तो दर्जा देत नसेल तर त्यात पाकिस्तानचेच नुकसान आहे.

In reply to by सुनील

सुहासदवन Wed, 04/23/2014 - 15:52
अहो, पाकिस्तानला MFN चा दर्जा देणे भारताला फायदेशीरच आहे. पाकिस्तान भारताला तो दर्जा देत नसेल तर त्यात पाकिस्तानचेच नुकसान आहे. असं असेल तर मग इतक्या वर्षात बर्‍याच गोष्टी पाकिस्तानने करायला हव्या होत्या किंवा करायला नको होत्या. त्यांना सगळं समजतय ना पण वळ्त का नाहीये? पाकिस्तानला किंवा कोणत्याही अशा देशाला भारताशी चांगले संबंध जर वाढवायचे नसतील तर आपण तरी कशाला आपला वेळ फुकट घालवायचा त्यांच्यासाठी. जेवढ्यास तेवढे वागावे. जगात असे अनेक देश आणि प्रांत आहेत ज्यांना भारताबद्दल किंमत आहे, तिथे जास्त फोकस करायला हवा.

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 21:35
It is pretty much an accepted thing that Narendra Modi is a "strong leader", authoritarian, dictatorial. That he will favour business interests is no secret. But can strong leaders tolerate dissent and criticism? Can thinkers, economists, journalists, two-bit "God men", who have poured vitriol over Sonia Gandhi and the Congress, dare do the same if Modi becomes prime minister? Don't hold your breath. Can "speedy decision-making" be implemented with strong independent institutions? Can "strong leaders" allow strong independent institutions to remain so? Can true capitalism (as opposed to crony capitalism) survive without strong independent institutions? Can election funding of this order at all be above aboard? Do we even care? A romantic notion has also been propagated that Modi will be a mellowed man as a prime minister, that he will become a liberal democrat. And that our democratic institutions like the courts, the Comptroller and Auditor General, Central Bureau of Investigation and the media have enough teeth to rein in any favouritism or trampling of human rights. Looking at the Gujarat model on such similar institutions, I have no doubt which side they will sit on. Having experienced our courts more than most, one thing I can unhesitatingly say is when you are up against an authoritarian government (as I was under the National Democratic Alliance rule) as your adversary in court, the courts are generally reluctant keepers of our fundamental rights. Judges are human beings, and subject to the same frailties and fears as the rest of us. An increasingly corporatised media has a soft-enough underbelly on which to use a scalpel. It should be no surprise that in the India of today being secular, libertarian or environmentally-conscious has pejorative connotations. That India is a true liberal, secular democracy is by no means a settled issue. Modi's genius lies in having identified the fault lines and prying them open. We, as a nation, are ready for a Faustian bargain. Give us a fistful of economic promissory notes and we will barter all the lofty ideals we once held dear. And we will invent reasons why the trade is all for the Greater Good. Let's at least thank Modi for bringing us out of our closet. Shankar Sharma: Corruption is a non-issue for the voter

काळा पहाड गुरुवार, 04/24/2014 - 01:19
फक्त ३७० कलम रद्द करू देत. पुढचं आमचं आम्ही बघू. श्रीनगर ला एक दोन बिएच्के घ्यावा म्हणतोय. बाय द वे, बाकीच्या अपेक्षा खालील प्रमाणे आहेत. १. कलम ३७० २. युनिफॉर्म सिव्हील कोड ३. अत्यंत ताकद्वान लष्कर. लष्कराला अमेरिकेच्या अफगाणिस्तान मधील धोरणाप्रमाणे सतत प्रॅक्टीस करण्यासाठी एक वा अनेक चांगल्या बॅटल्फील्ड्स. पाकीस्तान पासून सुरवात करायला हरकत नाही. ४. वड्रासाहेब, लवासावाले साहेब, मनिष तिवारी, दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अहमद पटेल, आदींचा योग्य तो "आदर सत्कार".

असंका गुरुवार, 04/24/2014 - 17:11
अजूनही आपण विषय भरकटवत आहात. आपण स्वत:हून जो लेख सर्वांसमोर ठेवला त्यातील मतांशी आपण सहमत आहात की नाही? जर हो, तर मग पुढे माझे काही म्हणणे नाही. पण जर नाही, तर मग आपण सर्वांना ही माहिती का देत आहात हा माझा दुसरा प्रश्न. सोपे करून सांगतो- " हो" की "नाही" ? यांपैकी एक उत्तर पहिले ठरवून घ्या. मग माझ्या प्रश्नाचा उर्वरीत भाग वाचा. आणि आपण जो पर्याय निवडला आहे, त्यानुसार त्याचे उत्तर द्या.- म्हणजे द्यायचे असेल तर. पण आपण विनाकारण वैयक्तिक होणे टाळावे ही माझी आपणास परत एकदा कळकळीची विनंती आहे.

ऋषिकेश Fri, 04/25/2014 - 10:31
चर्चेत सहभागी झालेल्यांचे आभार. मोदी या व्यक्तीला मतादान करताना काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यामागे मोठा अंतस्थ हेतु वगैरे काही नव्हता. प्रतिसाद अंदाजा प्रमाणेच आले आहेत. लोक भाजपाने जाहिर केलेल्या धोरणांपेक्षा सरकारी कामात सुसुत्रता आणणे, भ्रष्टाचार कमी करणे, महागाई कमी करणे इत्यादी 'अंमलबजावाणी' करणारा नेत म्हणून त्यांना मत देत आहेत. मतदान केल्यावर मोदींनी या वर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी काही कायमस्वरूपी इजा पोचवतील असे धोरणत्मक बदल सुरू केले तर हेच मतदार कदाचित विरोधात असतील अशी -फारच अंधुकशी पण तरी- आशा या धाग्यानंतर वाटु लागली आहे. आभार! धागा १००+ झाल्याने नवे प्रतिसाद वाचणे मला कठीण जाते. त्यामुळे मी या धाग्यावर फारसा येणार नाही. पुनश्च आभार!

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 15:19
मोदींना खड्ड्यात घालायला त्यांच्याच पक्षातील लोक, विरोधी पक्ष, व एम एन सी व इसाई लोकांची लॉबी आदी त्यांना हैराण करेल असे मत Right to recall group 'राहूल मेहता' यांनी इथे आपल्या भाषणात 2012 साली वर्तवले आहे.
जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे. मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल.

किलर फ्रॉम हैद्राबाद - १

स्पार्टाकस ·

कंजूस Mon, 04/21/2014 - 08:17
छान आहे .उत्तराखंडात जिम कार्बेट तसा दक्षिणेत केनेथ अॅंडरसन .दोघांच्या शिकारकथा मी वाचल्या आहेत पण केनेथच्या जास्ती आवडतात .यांचे रुपांतर करतांना कॉपिराइटचा प्रश्न उपस्थित होतो का पन्नास वर्षाँनी ?

स्पार्टाकस Mon, 04/21/2014 - 09:28
कंजूस, कॉर्बेट आणि अँडरसन यांच्या तुलनेत अँडरसन अर्थातच सरस ठरतो. कॉर्बेटच्या लिखाणाला असलेला काहीसा आत्मप्रौढीचा सूर अँडरसनच्या लिखाणाता कुठेही आढळत नाही. अँडरसनच्या सर्व कथा २००८ पासून कॉपीराईट फ्री आहेत.

कंजूस Mon, 04/21/2014 - 15:32
धन्यवाद . लहानपणी जिम कार्बेटच्या गोष्टी मराठीत वाचायला मिळाल्या .तीन चार वाचल्यावर एक छापाच्या वाटू लागल्या :"अमूक अमूक चा नरभक्षक ".मग बंद केले .पुढे एका वाचनालयातून एक दोन केनेथ एंडरसनच्या इंग्रजीतल्या शिकारकथा वाचल्यावर कळले की प्रत्येक कथेत एक वेगळेपणा आहे . एकदा तो म्हटतो "एका मचाणावर बसून वाघ त्याची शिकार खायला आल्यावर झाडा आडून बंदुकीच्या गोळीने मारणे हे एक भित्रट मानवाने केलेले क्रूर कृत्य आहे ". प्रत्येक कथा विचार करायला लावणारी आहे .

कंजूस Mon, 04/21/2014 - 08:17
छान आहे .उत्तराखंडात जिम कार्बेट तसा दक्षिणेत केनेथ अॅंडरसन .दोघांच्या शिकारकथा मी वाचल्या आहेत पण केनेथच्या जास्ती आवडतात .यांचे रुपांतर करतांना कॉपिराइटचा प्रश्न उपस्थित होतो का पन्नास वर्षाँनी ?

स्पार्टाकस Mon, 04/21/2014 - 09:28
कंजूस, कॉर्बेट आणि अँडरसन यांच्या तुलनेत अँडरसन अर्थातच सरस ठरतो. कॉर्बेटच्या लिखाणाला असलेला काहीसा आत्मप्रौढीचा सूर अँडरसनच्या लिखाणाता कुठेही आढळत नाही. अँडरसनच्या सर्व कथा २००८ पासून कॉपीराईट फ्री आहेत.

कंजूस Mon, 04/21/2014 - 15:32
धन्यवाद . लहानपणी जिम कार्बेटच्या गोष्टी मराठीत वाचायला मिळाल्या .तीन चार वाचल्यावर एक छापाच्या वाटू लागल्या :"अमूक अमूक चा नरभक्षक ".मग बंद केले .पुढे एका वाचनालयातून एक दोन केनेथ एंडरसनच्या इंग्रजीतल्या शिकारकथा वाचल्यावर कळले की प्रत्येक कथेत एक वेगळेपणा आहे . एकदा तो म्हटतो "एका मचाणावर बसून वाघ त्याची शिकार खायला आल्यावर झाडा आडून बंदुकीच्या गोळीने मारणे हे एक भित्रट मानवाने केलेले क्रूर कृत्य आहे ". प्रत्येक कथा विचार करायला लावणारी आहे .
लेखनविषय:
आताचं आंध्र प्रदेश राज्यं जिथे आहे, त्याचा बराचसा भाग ब्रिटीश आमदानीच्या काळात ब्रिटीशांचा साथीदार असलेल्या निजामाच्या हैद्राबाद संस्थानाचा भाग होता. तत्कालीन म्हैसूर राज्याच्या उत्तरेला असलेले आणि हैद्राबाद च्या दक्षिणेचे अनंतपूर, कुर्नूल, नंदयाल हे तेलुगू भाषिक जिल्हे मात्र मद्रास प्रांतात मोडत होते. त्याकाळात हा सर्व भाग विकासापासून संपूर्णपणे वंचित होता. वर्षाचे दहा महिने उन्हाळा (आणि उरलेले दोन महिने असह्य भाजून काढणारा उन्हाळा!) आणि जेमतेम पडणारा पाऊस यामुळे इथलं आयुष्यं फारच खडतर होतं.

ऑरेंज कुकिज

सानिकास्वप्निल ·

In reply to by स्पंदना

मनिष Mon, 04/21/2014 - 12:28
बचपन याद दिला दे!!! :) खरंच काय मस्त दिसतात आहे! ऑरेंज आणि आले म्हणजे चवही खासच असणार...बेकिंग मधे उडी घ्यावी का?

In reply to by स्पंदना

@ये आतुम्स, मला येक ध्ये न? ये द्ये ना! चिमणीचा घास? तेव्हढ तरी? ये दे ना!>>> :D .. :D .. :D http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif वरती खाल्ली तेवडी माजी... :D आणि ही खाली गरम/गरम काडलीयेत ती तुमची! :D http://www.sherv.net/cm/emoticons/eating/cookies-smiley-emoticon.gif

दिपक.कुवेत Mon, 04/21/2014 - 10:41
ऑरेंज असलेलं काहिहि आवडत. कुकिज फारच जब्राट दिसत आहेत. पण चहाबरोबर खाण्यापेक्षा मी नुसत्याच खाईन अर्थात अआ आणि अपर्णानी शील्लक ठेवल्या तर!

साती Mon, 04/21/2014 - 13:08
मस्तच दिसतायत. बेकिंग बर्याचदा पार गंडलंय माझं त्यामुळे करायची हिंमत होत नाही. पुन्हा सगळी कॉस्ट बाजारात मिळणार्या पदार्थांच्या तुलनेत दुप्पट तिप्पट जास्त होते.

In reply to by साती

सखी Mon, 04/21/2014 - 18:14
मस्तच दिसत आहेत बिस्कीटं, पटकन एक उचलावसं वाटतं. साती बेकींगसाठी काटेकोरपणा फार महत्वाचा असे म्ह्टले जाते, सगळ्या गोष्टी अगदी मोजुनमापुनच घ्याव्या लागतात. अर्थात मी यातली एक्सर्पट नाही, पण हे खुप शेफकडुन नेहमी ऐकत आली आहे. ओवनचे तापमान बरोबर असावे लागते नाहीतर पदार्थ बाहेरुन झाल्यासारखा वाटले आणि आतुन कच्चाही राहु शकतो. आपण गॅसवरच्या स्वयंपाकात थोडेफार कमीजास्त झाले तर अ‍ॅडजस्ट करु शकतो तसं बेकींगच होत नाही कारण एकदा पदार्थ ओव्हनमध्ये गेला की झाल्यावरच बाहेर काढतो. शेवटची गार होण्याची पायरीपण महत्वाची असते. इथे अजुन टीपा आहेत.

प्यारे१ Mon, 04/21/2014 - 13:18
नाद खुळाच! आल्यावरुन एक विनोदः एका लग्नात एक माणूस आक्खा बॉक्स आलं घेऊन येतो नि स्टेजवर नवरा नवरीला देतो. नवरानवरी संभ्रमात. हे आलं कशाला म्हणे? आलं आणणारा अजून संभ्रमात. अहो पत्रिकेवर तुम्हीच तर छापलंय....'आहेर आणू नयेत पण आलंच पाहिजे' :) घ्या अजून एक कूकी घ्या! ;)

शेवटून दुसर्‍या फोटुतली ट्रे वरची बिस्किटं पाहिल्यामुळे मला मनोहर बेकरीची अठवण झाली. आपण तिथं जिन्नस नेऊन दिले,की दोन/तीन दिवसात बिस्किटं करून मिळायची. आपल्याला दिलेल्या टायमाला बेकरीवर गेलो की अशीच ट्रेच्या ट्रे भरलेली बिस्किटं समोर यायची..गरम/गरम.. (आपलीच असल्यामुळे लग्गेच १ उचलताही यायचं! ;) ..) आज हे सगळं आठवलं! त्यामुळे आज सांजच्याला मनोहर बेकरी शोधणे आले पेरुगेटाच्या फुडची...र्‍हायली असेल तर!

पिलीयन रायडर Mon, 04/21/2014 - 13:29
साहित्या मध्ये पिठ पण काय स्टाईल मध्ये ठेवलय.. नाहीतर आम्ही .. २ चमचे भुताचे ओट्यावर सांडल्याशिवाय पदार्थ नीट होत नाही आमचा.. ही बाई दिवसेंदिवस तापदायक होत चालली आहे.. हिची सुपारी घ्या रे कुणी तरी..!!

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ Mon, 04/21/2014 - 13:36
>>>ही बाई दिवसेंदिवस तापदायक होत चालली आहे.. हिची सुपारी घ्या रे कुणी तरी..!! कोणीतरी 'काहीतरी' म्हणतंय ब्वा..... पण आम्ही काही ऐकणार नाही आहोत. बोलणार तर नाहीच्च :) सानिकाजी, आपल्याला पाकृ बद्दलच्या प्रतिसादांशिवाय सेन्च्युरी चालेल का?

साती Mon, 04/21/2014 - 15:24
यात बेकिंग सोडा , बेकींग पावडर हे शत्रू नसल्याने (शत्रू म्हटलंय कारण हे घातलेले पदार्थं मी आत्तापर्यंत धड करू शकलेले नाही) करून पाहावं असे टेंप्टेशन होतेय. ;) संत्र्याचा जूस ताजा वापरला की विकतचा?

रेवती Mon, 04/21/2014 - 16:51
प्रतिसाद नेहमीचाच समजून घ्यावा. दोन ओळी जास्तीच्या लिहून हव्या असल्यास निदान डझनभर कुक्या पाठवून द्याव्यात. निवडणुकीमुळे आम्हाला ही सवय लागली आहे. ;)

श्रीरंग_जोशी Mon, 04/21/2014 - 23:20
पाकृ नेहमीप्रमाणेच आवडली. एक अवांतर प्रश्न - भारतीय दृष्टीकोनातून कुकी व बिस्कीट यात नेमका फरक तो काय?

In reply to by स्पंदना

मनिष Mon, 04/21/2014 - 12:28
बचपन याद दिला दे!!! :) खरंच काय मस्त दिसतात आहे! ऑरेंज आणि आले म्हणजे चवही खासच असणार...बेकिंग मधे उडी घ्यावी का?

In reply to by स्पंदना

@ये आतुम्स, मला येक ध्ये न? ये द्ये ना! चिमणीचा घास? तेव्हढ तरी? ये दे ना!>>> :D .. :D .. :D http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif वरती खाल्ली तेवडी माजी... :D आणि ही खाली गरम/गरम काडलीयेत ती तुमची! :D http://www.sherv.net/cm/emoticons/eating/cookies-smiley-emoticon.gif

दिपक.कुवेत Mon, 04/21/2014 - 10:41
ऑरेंज असलेलं काहिहि आवडत. कुकिज फारच जब्राट दिसत आहेत. पण चहाबरोबर खाण्यापेक्षा मी नुसत्याच खाईन अर्थात अआ आणि अपर्णानी शील्लक ठेवल्या तर!

साती Mon, 04/21/2014 - 13:08
मस्तच दिसतायत. बेकिंग बर्याचदा पार गंडलंय माझं त्यामुळे करायची हिंमत होत नाही. पुन्हा सगळी कॉस्ट बाजारात मिळणार्या पदार्थांच्या तुलनेत दुप्पट तिप्पट जास्त होते.

In reply to by साती

सखी Mon, 04/21/2014 - 18:14
मस्तच दिसत आहेत बिस्कीटं, पटकन एक उचलावसं वाटतं. साती बेकींगसाठी काटेकोरपणा फार महत्वाचा असे म्ह्टले जाते, सगळ्या गोष्टी अगदी मोजुनमापुनच घ्याव्या लागतात. अर्थात मी यातली एक्सर्पट नाही, पण हे खुप शेफकडुन नेहमी ऐकत आली आहे. ओवनचे तापमान बरोबर असावे लागते नाहीतर पदार्थ बाहेरुन झाल्यासारखा वाटले आणि आतुन कच्चाही राहु शकतो. आपण गॅसवरच्या स्वयंपाकात थोडेफार कमीजास्त झाले तर अ‍ॅडजस्ट करु शकतो तसं बेकींगच होत नाही कारण एकदा पदार्थ ओव्हनमध्ये गेला की झाल्यावरच बाहेर काढतो. शेवटची गार होण्याची पायरीपण महत्वाची असते. इथे अजुन टीपा आहेत.

प्यारे१ Mon, 04/21/2014 - 13:18
नाद खुळाच! आल्यावरुन एक विनोदः एका लग्नात एक माणूस आक्खा बॉक्स आलं घेऊन येतो नि स्टेजवर नवरा नवरीला देतो. नवरानवरी संभ्रमात. हे आलं कशाला म्हणे? आलं आणणारा अजून संभ्रमात. अहो पत्रिकेवर तुम्हीच तर छापलंय....'आहेर आणू नयेत पण आलंच पाहिजे' :) घ्या अजून एक कूकी घ्या! ;)

शेवटून दुसर्‍या फोटुतली ट्रे वरची बिस्किटं पाहिल्यामुळे मला मनोहर बेकरीची अठवण झाली. आपण तिथं जिन्नस नेऊन दिले,की दोन/तीन दिवसात बिस्किटं करून मिळायची. आपल्याला दिलेल्या टायमाला बेकरीवर गेलो की अशीच ट्रेच्या ट्रे भरलेली बिस्किटं समोर यायची..गरम/गरम.. (आपलीच असल्यामुळे लग्गेच १ उचलताही यायचं! ;) ..) आज हे सगळं आठवलं! त्यामुळे आज सांजच्याला मनोहर बेकरी शोधणे आले पेरुगेटाच्या फुडची...र्‍हायली असेल तर!

पिलीयन रायडर Mon, 04/21/2014 - 13:29
साहित्या मध्ये पिठ पण काय स्टाईल मध्ये ठेवलय.. नाहीतर आम्ही .. २ चमचे भुताचे ओट्यावर सांडल्याशिवाय पदार्थ नीट होत नाही आमचा.. ही बाई दिवसेंदिवस तापदायक होत चालली आहे.. हिची सुपारी घ्या रे कुणी तरी..!!

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ Mon, 04/21/2014 - 13:36
>>>ही बाई दिवसेंदिवस तापदायक होत चालली आहे.. हिची सुपारी घ्या रे कुणी तरी..!! कोणीतरी 'काहीतरी' म्हणतंय ब्वा..... पण आम्ही काही ऐकणार नाही आहोत. बोलणार तर नाहीच्च :) सानिकाजी, आपल्याला पाकृ बद्दलच्या प्रतिसादांशिवाय सेन्च्युरी चालेल का?

साती Mon, 04/21/2014 - 15:24
यात बेकिंग सोडा , बेकींग पावडर हे शत्रू नसल्याने (शत्रू म्हटलंय कारण हे घातलेले पदार्थं मी आत्तापर्यंत धड करू शकलेले नाही) करून पाहावं असे टेंप्टेशन होतेय. ;) संत्र्याचा जूस ताजा वापरला की विकतचा?

रेवती Mon, 04/21/2014 - 16:51
प्रतिसाद नेहमीचाच समजून घ्यावा. दोन ओळी जास्तीच्या लिहून हव्या असल्यास निदान डझनभर कुक्या पाठवून द्याव्यात. निवडणुकीमुळे आम्हाला ही सवय लागली आहे. ;)

श्रीरंग_जोशी Mon, 04/21/2014 - 23:20
पाकृ नेहमीप्रमाणेच आवडली. एक अवांतर प्रश्न - भारतीय दृष्टीकोनातून कुकी व बिस्कीट यात नेमका फरक तो काय?
. साहित्यः अडीच वाट्या मैदा ३/४ वाटी साखर २२५ ग्राम बटर किंवा दोन स्टीकस बटर (रुम टेम्परेचरला असलेले) १ अंडे १ टेस्पून संत्र्याचा रस १ टेस्पून किसलेले संत्र्याचे साल १/२ टीस्पून किसलेले आले १/४ टीस्पून मीठ .

आज कुछ तुफानी करते है…

बोबो ·

आतिवास Tue, 04/22/2014 - 08:28
कथा आवडली. विशेषतः कथेची भाषा फार सोपी-साधी-सरळ आहे आणि त्यातूनही नाट्यमयता पुरेपुर व्यक्त करता येते आहे हे या कथेतून दिसून आलं. पुढील लेखनास शुभेच्छा.

बोबो Wed, 04/23/2014 - 09:01
धन्यवाद आतिवास, पिंगू ,मालविका , पिलीयन रायडर,उपाशी बोका :)

आतिवास Tue, 04/22/2014 - 08:28
कथा आवडली. विशेषतः कथेची भाषा फार सोपी-साधी-सरळ आहे आणि त्यातूनही नाट्यमयता पुरेपुर व्यक्त करता येते आहे हे या कथेतून दिसून आलं. पुढील लेखनास शुभेच्छा.

बोबो Wed, 04/23/2014 - 09:01
धन्यवाद आतिवास, पिंगू ,मालविका , पिलीयन रायडर,उपाशी बोका :)
लेखनविषय:
------------------------------------------------- म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं . परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं.

तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय

जातवेद ·

पैसा Mon, 04/21/2014 - 10:00
काय छान छान वस्तू आणि त्यांचे फोटो! मस्तच!

दिपक.कुवेत Mon, 04/21/2014 - 11:37
जपानची हि वेगळि सफर मनाला भावतेय. क्रमशः टाकुन अजुन फोटो येउद्या.

जातवेद Mon, 04/21/2014 - 17:59
इस्पीकचा एक्का, खटपट्या, अत्रुप्त आत्मा, वल्ली, पैसा, दिपक.कुवेत धन्यवाद :) क्रमश: मधे दुसर्‍या ठिकाणाचे फोटो टाकू ;)

आतिवास Tue, 04/22/2014 - 17:39
फोटो आवडले. अधिक वर्णन असतं तर आणखी मजा आली असती. या राष्ट्रीय संग्रहालयाची साईट वगैरे असेल तर (असेलच म्हणा) तर तिचा पत्ता पुढच्या भागात देऊ शकाल का?

In reply to by आतिवास

जातवेद Tue, 04/22/2014 - 20:09
याचा एकच भाग आहे :) पत्ता: युएनो स्टेशनच्या जवळच आहे. गिंझा किंवा हिबीया लाईन पकडून इथे येता येईल. हि लिंक,

पैसा Mon, 04/21/2014 - 10:00
काय छान छान वस्तू आणि त्यांचे फोटो! मस्तच!

दिपक.कुवेत Mon, 04/21/2014 - 11:37
जपानची हि वेगळि सफर मनाला भावतेय. क्रमशः टाकुन अजुन फोटो येउद्या.

जातवेद Mon, 04/21/2014 - 17:59
इस्पीकचा एक्का, खटपट्या, अत्रुप्त आत्मा, वल्ली, पैसा, दिपक.कुवेत धन्यवाद :) क्रमश: मधे दुसर्‍या ठिकाणाचे फोटो टाकू ;)

आतिवास Tue, 04/22/2014 - 17:39
फोटो आवडले. अधिक वर्णन असतं तर आणखी मजा आली असती. या राष्ट्रीय संग्रहालयाची साईट वगैरे असेल तर (असेलच म्हणा) तर तिचा पत्ता पुढच्या भागात देऊ शकाल का?

In reply to by आतिवास

जातवेद Tue, 04/22/2014 - 20:09
याचा एकच भाग आहे :) पत्ता: युएनो स्टेशनच्या जवळच आहे. गिंझा किंवा हिबीया लाईन पकडून इथे येता येईल. हि लिंक,
तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय हे तोक्यो मधल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे संग्रहालय सकुरासाठी प्रसिद्ध असणार्‍या युएनो उद्यानाजवळ आहे. इथे एकूण ५ प्रदर्शन इमारती आहेत. १. होंकान (मुख्य ईमारत) - इथे जपानशी संबंधीत वस्तू मांडलेल्या आहेत. २. तोयोकान - इथे इतर भारतासकट सबंध आशियामधिल वस्तू आहेत. ३. ह्योकेकान - ही इमारत मेजी घराण्यातील युवराज तैशो याच्या लग्नासाठी सन १९०९ मधे बांधली होती. सध्या तिथे काही नाही. ४. हेसेकान - इथे पुरातत्वशास्त्राच्या वस्तू आहेत. आणि ५.