मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ट्रंक, संदूक इत्यादी..

मस्त कलंदर ·

शुचि Tue, 04/22/2014 - 23:17
स्मरणरंजन आवडले. बरेच शब्द आवडले - जोंधळपोत, बोरमाळ, गुलबक्षी. पैकी शेवटचे दोन माहीत होते पण अनेक वर्षांनी कानावर पडले. जोंधळपोत तर प्रथमच ऐकला. माझ्यातरी डोळ्यासमोर नाजूक मोत्यांचा घोस असलेले ब्रोच आला.

पहाटवारा Wed, 04/23/2014 - 02:22
सुरेख जमून आलंय मुक्तक ! मनातल्या खोल कप्य्यांमधे ठेवलेल्या आठवणी .. अन ह्या संदूकांमधल्या चीजवस्तू .. एकाच पोतेच्या... -पहाटवारा

सखी Wed, 04/23/2014 - 05:20
सुरेख खजिना! खरचं वरचेवर लिहीत जा ही विनती. शुचि म्हणाली तसे खुपसे शब्द आवडले. कांदापोह्याची आठवणीने कससचं वाटलं तरीही तुझ्या लेखणीत कडुपणा वाटत नाही. सगळे बरेवाईट अनुभव समोर बसुन ऐकतीय असं वाटलं. थोडेसे अवांतरः शांता शेळके किंवा दुर्गा भागवतांंनीपण संदुकीवर लिहील आहे का? जालावर खूप वर्षांपूर्वी वाचल्यासारखे अंधुक आठवतयं.

रमेश आठवले Wed, 04/23/2014 - 08:37
पिझ्झा एक्सप्रेसच्या फोटोवरून आठवण झाली. साक्रामेंटो, कॅलिफोर्निया, येथील विमानतळावर, आत शिरल्यावर असलेल्या मोठ्या हॉलच्या मध्य भागी, जुन्या ट्रंक, संदूक व सुटकेसेस यांचा उंच डोलारा, एखादी कलाकृती असल्या सारखा, रचून तयार केला आहे.

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 13:25
ह्या गोष्टी मोडीत निघाल्या?????? आम्ही अजून वापरतोय की! जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. :) लिखाण आवडलंच!

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 15:07
>>>>जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. 'ट्रंक' शब्द इंग्रजांकडून आला. एखाद्या वस्तूला बंदिस्त जागेत ठेवायचे असेल त्या जागेला ट्रंक म्हणायचे. ट्रंक - टोरंक - टोरंग - तुरुंग अशी 'तुरुंग', कैद्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवायची जागा, शब्दाची व्युत्पत्ती वाचली आहे. पुढे, काहीही बंदिस्तावस्थेत ठेवायच्या वस्तुला 'ट्रंक' म्हणायची पद्धत पडली असावी. 'संदूक' शब्द अरबी आहे. तो मराठी 'खोका' किंवा इंग्रजी 'बॉक्स' शब्दाचा समानार्थी आहे. 'संदूक अल बरीद' म्हणजे 'पोस्ट बॉक्स'. 'संदूक' म्हणजे 'बॉक्स' आणि 'बरीद' म्हणजे 'पोस्ट ऑफिस'. प्रवासाच्या पेटीला अरेबिक मध्ये 'शंता' म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 15:20
व्याख्या म्हणजे पुस्तकी व्याख्या अपेक्षित नव्हती. :) जुन्या ट्रंकांचे कोपरे टोचतात. नुस्ते टोचत नाहीत तर ओरखडे पण काढतात. शारिरीक नि मानसिक सुद्धा!

पैसा Wed, 04/23/2014 - 14:54
चांगलं लिहिलंय. जुन्या आठवणींची गोळाबेरीज केली तर बहुतेकवेळा चांगल्या आठवणी जास्त शिल्लक रहातात. त्यातूनही ज्या कडू आठवणी शिल्लक राहतील त्या ट्रंकेत टाकून झाकण बंद करून टाकायचं.

आठवणींचा पेटारा..कधि उघडेल ..सांगता येत नाही! पण उघडला की सगळाच उघडतो.हे ही खरच! :) ================================================ (आधिच क्षमस्व म्हणतो..) पण १ अनावर अवांतरः- मकि ताई..तू टाकलेल्या फोटोमधे मला काय दिसलं असेल? अंधारात डोळे रोखुन बघणार्‍या मांजराची स्मायली... मी फोटू डार्क केला आणि ती गडद झाली.. ती ही..

अशी!

https://lh5.googleusercontent.com/-VGzZC-APRXM/U1d3pHMgmVI/AAAAAAAACsQ/LEGXgw0ZtqY/w702-h386-no/IMG_20140423_125314.jpg

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 17:04
कमीत कमी ३ लेखांमध्ये व्यवस्थित माऊ शकतील एवढ्या आठवणी एकाच लेखात बसवून एक नविच ट्रंक तयार झाली आहे. वाचताना दम लागला. पण जे आहे ते सर्व एका संवेदनशील मनाचा लख्ख आरसा आहे. आमच्या घरीही वडीलांची एक ट्रंक होती. त्याला 'पांढरी पेटी' असं नांव होतं. पत्र्याच्या पेटीला (कधीकाळी) पांढरा रंग दिला होता तेंव्हा पासून तेच नांव पडलं. वर्षातून एकदा, दिवाळीच्या वेळी, ती साफसफाईच्या निमित्ताने उघडली जायची. तेंव्हा वडीलांना रेलून त्यांच्या खांद्यावरून ती 'अलीबाबाची गुहा' न्याहाळण्याचा छंद होता मला. 'कश्शालाही हात लावायचा नाही' ह्या त्यांच्या दृष्टीने 'माफक' पण माझ्या दृष्टीने 'अत्यंत जाचक' अटीवर तिथे उभे राहायची परवानगी मिळायची. वडीलांचा व्यवस्थितपणा वाखाणण्याजोगा असला तरी आईच्या टिंगलटवाळीचा विषय असायचा. विशेषतः त्यांचा हिशोबी स्वभाव. प्रत्येक गोष्ट (जमा-खर्च) लिहून ठेवायचे. त्याचे वर्णन, 'आई, १ पैशाची सुतळी आणि ९९ पैसे इकडेतिकडे' अशा शब्दात करायची. पण त्या पेटीचे आकर्षण मला कायम असायचे. माझ्या गैरहजेरीत त्या पेटीची आवराआवर झाली तर एक मोठी संधी हुकल्याची रुखरुख मनाला लागून राहायची. दुसरी पेटी होती तिचं नांव होतं. 'पाववाल्याचा पेटारा' कारण तशा प्रकारची प्रचंड पेटी, बिस्किटांनी भरून, फक्त पाववाला घेऊन यायचा. मला मूळ पाववाल्याच्या पेटार्‍याचं आकर्षण होतं. (त्यातील बिस्किटांमुळे) पण ही आमच्या घरातील पाववाल्याची पेटी आमच्या घरापुरती सार्वजनिक होती. पांढरी पेटी वडिलांची वैयक्तीक होती. त्यात फालतू गोष्टींना स्थान नसायचं. पण त्या पेटीत स्थान न मिळालेल्या अनेक गोष्टींना पाववाल्याच्या पेटार्‍यात मानाचं स्थान असायचं. पण त्याच्या सार्वजनिकतेमुळेच त्याबद्द्ल आकर्षण नसायचं. तशीच वडिलांची अजून एक छोटी पेटी होती त्याचं नांव होतं 'हिरवी पेटी'. ही नांवे रंगावरूनच पडली होती. त्याल पेटीला मिलिटरी युनिफॉर्मचा काळपट हिरवा रंग होता. ती आमच्या वडिलांची अत्यंत आवडती, जीवलग वगैरे पेटी होती. त्यात मौल्यवान वस्तु असायच्या. जसं की कधीकाळी काशीयात्रेला जाऊ तेंव्हा तिथे दक्षणा म्हणून ठेवायला तांब्याची १ पैशाची आणि निकेलची २ पैशांची नाणी साठविली होती. भेट म्हणून मिळालेले, प्लास्टीकमधे गुंढाळलेले आणि पुठ्याच्या छोट्या खोक्यात सन्मानाने विराजित असे एक अस्सल चामड्याचे पाकिट होते. एक दिड इंच रुंद आणि ५-६ इंच लांब असा एक मस्त चिमटा होता. तो कसला? असं विचारल्यावर तो नोटांचा चिमटा आहे. आपल्याकडे भरपूर नोटा आल्या की तो वापरायचा. अर्थात तो शेवटपर्यंत अस्पृश्यच राहिला. साखळीसहित सोन्याची बटणं, पारकरचे पेन, प्रवासात वापरायचा घडीचा आरसा वगैरे वगैरे अनेकविध गोष्टींचा खजिना त्यात होता. असो. प्रत्येकाच्या घरी असा आठवणींचा खजिना असतोच. आज मस्त कलंदरच्या ह्या लेखाने त्यावरील धूळ झटकली गेली आणि कांही काळाकरीता मन भूतकाळात रमलं, ताजतवानं झालं. धन्यवाद मस्त कलंदर.

कंजूस Wed, 04/23/2014 - 21:16
तुमच्या इतक्या भावुक आठवणी माझ्याकडे नाहीत आणि असत्यातरी अशा हळूहळूवारपणे काढताही आल्या नसत्या .दादरपश्चिमेला फुलबाजारातून कबुतरखान्याकडे जातांना या ट्रँकेंच्या दुकानांतील पत्र्यांच्या पेट्यांकडे मी त्रयस्थ नजरेनेच पाहात आलो आहे .पुढे काही या लेखासारखे ललितलेखन वाचल्यावर कळले की या पेट्यांना गंजतागंजता बऱ्याच गोष्टी गोळा करण्याची क्षमता असते .मी एका मित्राला एकदा विचारलेसुध्दा की कोण एवढ्या पेट्या कशाला घेतात ?त्यावर त्याने माझे समाधान करण्यासाठी "उंदिर लागू नये म्हणून कागदपत्र ठेवण्याची आणि एरवी बसण्यासाठी केलेली स्वस्त व्यवस्था "या उत्तराने बोळवण केली .मागे एकदा दिवेआगरचा सोन्याचा गणपती पाहाण्यास गेलो होतो त्यावेळी मला ती संपूर्ण तांब्याची ट्रंकच फार आवडली होती .इतकी सुबक कारागिरी आहे . कुठल्याही पेटीतून वस्तु बाहेर काढल्यावर पुन्हा परत भरतांना बसतच नाहीत .असं का होतं कोणी सांगेल का ?

शुचि Tue, 04/22/2014 - 23:17
स्मरणरंजन आवडले. बरेच शब्द आवडले - जोंधळपोत, बोरमाळ, गुलबक्षी. पैकी शेवटचे दोन माहीत होते पण अनेक वर्षांनी कानावर पडले. जोंधळपोत तर प्रथमच ऐकला. माझ्यातरी डोळ्यासमोर नाजूक मोत्यांचा घोस असलेले ब्रोच आला.

पहाटवारा Wed, 04/23/2014 - 02:22
सुरेख जमून आलंय मुक्तक ! मनातल्या खोल कप्य्यांमधे ठेवलेल्या आठवणी .. अन ह्या संदूकांमधल्या चीजवस्तू .. एकाच पोतेच्या... -पहाटवारा

सखी Wed, 04/23/2014 - 05:20
सुरेख खजिना! खरचं वरचेवर लिहीत जा ही विनती. शुचि म्हणाली तसे खुपसे शब्द आवडले. कांदापोह्याची आठवणीने कससचं वाटलं तरीही तुझ्या लेखणीत कडुपणा वाटत नाही. सगळे बरेवाईट अनुभव समोर बसुन ऐकतीय असं वाटलं. थोडेसे अवांतरः शांता शेळके किंवा दुर्गा भागवतांंनीपण संदुकीवर लिहील आहे का? जालावर खूप वर्षांपूर्वी वाचल्यासारखे अंधुक आठवतयं.

रमेश आठवले Wed, 04/23/2014 - 08:37
पिझ्झा एक्सप्रेसच्या फोटोवरून आठवण झाली. साक्रामेंटो, कॅलिफोर्निया, येथील विमानतळावर, आत शिरल्यावर असलेल्या मोठ्या हॉलच्या मध्य भागी, जुन्या ट्रंक, संदूक व सुटकेसेस यांचा उंच डोलारा, एखादी कलाकृती असल्या सारखा, रचून तयार केला आहे.

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 13:25
ह्या गोष्टी मोडीत निघाल्या?????? आम्ही अजून वापरतोय की! जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. :) लिखाण आवडलंच!

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 15:07
>>>>जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. 'ट्रंक' शब्द इंग्रजांकडून आला. एखाद्या वस्तूला बंदिस्त जागेत ठेवायचे असेल त्या जागेला ट्रंक म्हणायचे. ट्रंक - टोरंक - टोरंग - तुरुंग अशी 'तुरुंग', कैद्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवायची जागा, शब्दाची व्युत्पत्ती वाचली आहे. पुढे, काहीही बंदिस्तावस्थेत ठेवायच्या वस्तुला 'ट्रंक' म्हणायची पद्धत पडली असावी. 'संदूक' शब्द अरबी आहे. तो मराठी 'खोका' किंवा इंग्रजी 'बॉक्स' शब्दाचा समानार्थी आहे. 'संदूक अल बरीद' म्हणजे 'पोस्ट बॉक्स'. 'संदूक' म्हणजे 'बॉक्स' आणि 'बरीद' म्हणजे 'पोस्ट ऑफिस'. प्रवासाच्या पेटीला अरेबिक मध्ये 'शंता' म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 15:20
व्याख्या म्हणजे पुस्तकी व्याख्या अपेक्षित नव्हती. :) जुन्या ट्रंकांचे कोपरे टोचतात. नुस्ते टोचत नाहीत तर ओरखडे पण काढतात. शारिरीक नि मानसिक सुद्धा!

पैसा Wed, 04/23/2014 - 14:54
चांगलं लिहिलंय. जुन्या आठवणींची गोळाबेरीज केली तर बहुतेकवेळा चांगल्या आठवणी जास्त शिल्लक रहातात. त्यातूनही ज्या कडू आठवणी शिल्लक राहतील त्या ट्रंकेत टाकून झाकण बंद करून टाकायचं.

आठवणींचा पेटारा..कधि उघडेल ..सांगता येत नाही! पण उघडला की सगळाच उघडतो.हे ही खरच! :) ================================================ (आधिच क्षमस्व म्हणतो..) पण १ अनावर अवांतरः- मकि ताई..तू टाकलेल्या फोटोमधे मला काय दिसलं असेल? अंधारात डोळे रोखुन बघणार्‍या मांजराची स्मायली... मी फोटू डार्क केला आणि ती गडद झाली.. ती ही..

अशी!

https://lh5.googleusercontent.com/-VGzZC-APRXM/U1d3pHMgmVI/AAAAAAAACsQ/LEGXgw0ZtqY/w702-h386-no/IMG_20140423_125314.jpg

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 17:04
कमीत कमी ३ लेखांमध्ये व्यवस्थित माऊ शकतील एवढ्या आठवणी एकाच लेखात बसवून एक नविच ट्रंक तयार झाली आहे. वाचताना दम लागला. पण जे आहे ते सर्व एका संवेदनशील मनाचा लख्ख आरसा आहे. आमच्या घरीही वडीलांची एक ट्रंक होती. त्याला 'पांढरी पेटी' असं नांव होतं. पत्र्याच्या पेटीला (कधीकाळी) पांढरा रंग दिला होता तेंव्हा पासून तेच नांव पडलं. वर्षातून एकदा, दिवाळीच्या वेळी, ती साफसफाईच्या निमित्ताने उघडली जायची. तेंव्हा वडीलांना रेलून त्यांच्या खांद्यावरून ती 'अलीबाबाची गुहा' न्याहाळण्याचा छंद होता मला. 'कश्शालाही हात लावायचा नाही' ह्या त्यांच्या दृष्टीने 'माफक' पण माझ्या दृष्टीने 'अत्यंत जाचक' अटीवर तिथे उभे राहायची परवानगी मिळायची. वडीलांचा व्यवस्थितपणा वाखाणण्याजोगा असला तरी आईच्या टिंगलटवाळीचा विषय असायचा. विशेषतः त्यांचा हिशोबी स्वभाव. प्रत्येक गोष्ट (जमा-खर्च) लिहून ठेवायचे. त्याचे वर्णन, 'आई, १ पैशाची सुतळी आणि ९९ पैसे इकडेतिकडे' अशा शब्दात करायची. पण त्या पेटीचे आकर्षण मला कायम असायचे. माझ्या गैरहजेरीत त्या पेटीची आवराआवर झाली तर एक मोठी संधी हुकल्याची रुखरुख मनाला लागून राहायची. दुसरी पेटी होती तिचं नांव होतं. 'पाववाल्याचा पेटारा' कारण तशा प्रकारची प्रचंड पेटी, बिस्किटांनी भरून, फक्त पाववाला घेऊन यायचा. मला मूळ पाववाल्याच्या पेटार्‍याचं आकर्षण होतं. (त्यातील बिस्किटांमुळे) पण ही आमच्या घरातील पाववाल्याची पेटी आमच्या घरापुरती सार्वजनिक होती. पांढरी पेटी वडिलांची वैयक्तीक होती. त्यात फालतू गोष्टींना स्थान नसायचं. पण त्या पेटीत स्थान न मिळालेल्या अनेक गोष्टींना पाववाल्याच्या पेटार्‍यात मानाचं स्थान असायचं. पण त्याच्या सार्वजनिकतेमुळेच त्याबद्द्ल आकर्षण नसायचं. तशीच वडिलांची अजून एक छोटी पेटी होती त्याचं नांव होतं 'हिरवी पेटी'. ही नांवे रंगावरूनच पडली होती. त्याल पेटीला मिलिटरी युनिफॉर्मचा काळपट हिरवा रंग होता. ती आमच्या वडिलांची अत्यंत आवडती, जीवलग वगैरे पेटी होती. त्यात मौल्यवान वस्तु असायच्या. जसं की कधीकाळी काशीयात्रेला जाऊ तेंव्हा तिथे दक्षणा म्हणून ठेवायला तांब्याची १ पैशाची आणि निकेलची २ पैशांची नाणी साठविली होती. भेट म्हणून मिळालेले, प्लास्टीकमधे गुंढाळलेले आणि पुठ्याच्या छोट्या खोक्यात सन्मानाने विराजित असे एक अस्सल चामड्याचे पाकिट होते. एक दिड इंच रुंद आणि ५-६ इंच लांब असा एक मस्त चिमटा होता. तो कसला? असं विचारल्यावर तो नोटांचा चिमटा आहे. आपल्याकडे भरपूर नोटा आल्या की तो वापरायचा. अर्थात तो शेवटपर्यंत अस्पृश्यच राहिला. साखळीसहित सोन्याची बटणं, पारकरचे पेन, प्रवासात वापरायचा घडीचा आरसा वगैरे वगैरे अनेकविध गोष्टींचा खजिना त्यात होता. असो. प्रत्येकाच्या घरी असा आठवणींचा खजिना असतोच. आज मस्त कलंदरच्या ह्या लेखाने त्यावरील धूळ झटकली गेली आणि कांही काळाकरीता मन भूतकाळात रमलं, ताजतवानं झालं. धन्यवाद मस्त कलंदर.

कंजूस Wed, 04/23/2014 - 21:16
तुमच्या इतक्या भावुक आठवणी माझ्याकडे नाहीत आणि असत्यातरी अशा हळूहळूवारपणे काढताही आल्या नसत्या .दादरपश्चिमेला फुलबाजारातून कबुतरखान्याकडे जातांना या ट्रँकेंच्या दुकानांतील पत्र्यांच्या पेट्यांकडे मी त्रयस्थ नजरेनेच पाहात आलो आहे .पुढे काही या लेखासारखे ललितलेखन वाचल्यावर कळले की या पेट्यांना गंजतागंजता बऱ्याच गोष्टी गोळा करण्याची क्षमता असते .मी एका मित्राला एकदा विचारलेसुध्दा की कोण एवढ्या पेट्या कशाला घेतात ?त्यावर त्याने माझे समाधान करण्यासाठी "उंदिर लागू नये म्हणून कागदपत्र ठेवण्याची आणि एरवी बसण्यासाठी केलेली स्वस्त व्यवस्था "या उत्तराने बोळवण केली .मागे एकदा दिवेआगरचा सोन्याचा गणपती पाहाण्यास गेलो होतो त्यावेळी मला ती संपूर्ण तांब्याची ट्रंकच फार आवडली होती .इतकी सुबक कारागिरी आहे . कुठल्याही पेटीतून वस्तु बाहेर काढल्यावर पुन्हा परत भरतांना बसतच नाहीत .असं का होतं कोणी सांगेल का ?
लेखनप्रकार
एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे.

माहिती हवी आहे- (२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी )

खेडूत ·

In reply to by विनायक प्रभू

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 09:33
प्रभू सर हे सर्व व्य नि त का सर्वानाच सांगाना. आमच्यासारखे डॉक्टर होऊनही लोकांना काही सांगू शकत नाहीत काय करायचे तेंव्हा आम्हालाही काही ज्ञान प्राप्त होईल. कमीत कमी लोकांच्यापुढे कचरा होणार नाही हो.

कुंदन गुरुवार, 04/24/2014 - 02:31
५ वा मुद्दा लै महत्वाचा. मध्यमवर्गीयांना अंमळ जड च जाते.अन पुढेही दवाखाना वगैरेला भांडवलही फारच लागते. त्यापेक्षाही इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत , त्याबाबत जाणकार माहिती देतीलच.

पोटे गुरुवार, 04/24/2014 - 09:45
मेडिकलचे शिक्षण घेऊन आजकाल फारसा फायदा नाही. ३० लाख घालून एम बी बी एस व्हायचे आणि नंतर ३५ हजाराची नोकरी मिळते. त्यापेक्षा ते तीस लाख एफ डी ला ठेवलेत तर त्याचे व्याज तितकेच होईल . पी जी करणार असाल तरच मेडिकल करा. अन्यथा नको.

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 10:03
माझ्या अल्पमती आणि अल्प माहितीप्रमाणे माहिती देत आहे. १) सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला ७०-७५ हजार एवढे आहे आणि खाजगी महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला आठ ते दहा लाख एवढे आहे. म्हणजे खाजगी महाविद्यालयाचे शुल्क सरासरी पस्तीस ते चाळीस लाख चार वर्षासाठी होते. एवढे करून तुम्ही "फक्त" एम बी बी एस च असता. २) या नंतर आपल्याला परत CET ला बसून पदव्युत्तर शिक्षणाची सोय करावी लागते. तेथे जर आपल्याला सरकारी जागा मिळाली नाही तर तीस लाख रुपये ( एखाद्या डिप्लोमासाठी) पासून चार कोटी रुपये(फक्त) एम डी रेडीयोलोजी साठी मोजावे लागतात. ३) मध्यमवर्गीय मुलांना या गोष्टीची कल्पना देणे अतिशय आवश्यक आहे. कारण एवढे सर्व सव्यापसव्य करून वयाच्या २८ व्या वर्षी आपण जगाच्या बाजारात उभे राहतो तेंव्हा आपल्याला कुत्रं विचारत नाही यामुळे नैराश्य येण्याची शक्यता असते. कारण शेजार्यांचा "अलभ्य" किंवा "शाश्वत" आय टी पदवीधर होऊन वर्षाला सात आकडी पगार घेत असतो.(बर्याच वेळेस त्याला डॉक्टर पेक्षा दहावी बारावीला कमी गुण असतात.) ४)एवढे सगळे असूनही एखाद्याला डॉक्टरच व्हायचे असेल तर त्याला पर्याय नाही. मी स्वतः याचे उत्तम उदाहरण आहे. मला सरकारी महाविद्यालयात प्रवेशसाठी बारावीला २ गुण (टक्के नव्हे) कमी पडले.(१९८२ साली मणीपालला वैद्यकीय महाविद्यालयाचे देणगी शुल्क साडे तीन लाख होते जे आमच्या श्रीमंतीच्या स्वप्नाच्याही पलीकडचे होते ) यास्तव मी एक वर्ष फार्मसी केले.तेथे पहिल्या वर्षाला मला प्रथम वर्ग मिळाला होता आणि मी नक्की पी एच डी केले असते. ( आणि जास्त पैसे सुद्धा मिळवले असते). परंतु आपल्याला डॉक्टरच व्हायचे आहे हा विचार माझ्या डोक्यातून कधीही गेला नाही. (इश्क ने निकम्मा कर दिया गालिब). शेवटी दुसर्या वर्षी नशिबाने ए एफ एम सी ला प्रवेश मिळाला आणि मी डॉक्टर झालो. यथावकाश एम डी (रेडीयोलोजी)सुद्धा झालो. पण जर आपल्या मुलाला याच मुलीशी लग्न करायचे असेल तर मग कितीही अप्सरा समोर येऊ द्या. उपयोग नाही. ५) आपल्या मुलाला डॉक्टरच व्हायचे आहे पण खाजगी महाविद्यालयाचे शुल्क परवडत नाही असे असेल तर भारतात कुठेही सरकारी महाविद्यालयात मिळेल तेथे प्रवेश घ्या. मग ते असं मधील सिलचर असो कि तिरुनेलवेली असो. वैद्यकीय ज्ञानाचा आणि महाविद्यालयाचा फारसा संबंध नसतो. ज्ञान मिळवावे लागते आणि पदवी दिली जाते. एकदा वैद्यकीय महाविद्यालयात शिरला कि केंव्हा तरी मुल बाहेर येतेच. एखादे वेळेस नापास झाल्याने ज्ञानात कमतरता येत नाही किंवा अगदी प्रत्येक वेळेस उत्तम पास झाले म्हणजे उदंड ज्ञान असते असे नाही. ६) तेही मिळत नसेल तर मुलाला एक वर्षाने परत CET /NEET ला बसू द्या ( एक वर्ष फुकट गेल्याने आयुष्यात काहीही फरक पडत नाही). ७) एम बी बी एस नंतर कॅम्पस इंटरव्ह्यू नसतो. तेंव्हा लगेच पैसे मिळवायला लागू हे सुविचार रुजू देऊ नयेत.एम बी बी एस ची परीक्षा होण्यापूर्वी पासून पदव्युत्त परीक्षेचा अभ्यास सुरु करावा लागतो. (मी जवळ जवळ तीन वर्षे असा अभ्यास केला आहे). ८) आपल्याला काय करायचे आहे याची विचारधारा स्पष्ट असणे आवश्यक आहे. आणि आपण आणखी पाच वर्षांनी कुठे असू आणि कुठे जायचे आहे याचा विचार केलेला असणे आवश्यक आहे. आणि हा विचार दर पाच वर्षांनी नव्याने करणे आवश्यक आहे. ९)वरील सर्व विचार हे बबाबे( बडे बाप के बेटे) किंवा राखीव जागा वाल्यांना लागू नाहीत. एखाद्याला आपल्या मुलाला कडक शब्दात वरील विचार ऐकवायचे असतील तर मला व्यनि करा. सल्ला फुकट मिळेल परिणामांची जबाबदारी तुमची राहील.

In reply to by सुबोध खरे

मनिष गुरुवार, 04/24/2014 - 12:44
हे खूप जवळून पाहिले आहे. पहिल्या पिढीच्या डॉक्टरला जम बसवायला खूप धडपड करावी लागते आणी उमेदीची बरीच वर्षे वाया जातात, इतर काहीही करता येत नाही - खास करून जर उपकरणांवर अवलंबून असे स्पेशलायझेशन असल्यास (उदा. नेत्रतज्ञ). अगदीच *हेच* करायचे असल्यास डॉक्टर व्हावे, नाहीतर इतर काहिही करावे.

In reply to by सुबोध खरे

रेवती Fri, 04/25/2014 - 03:53
प्रतिसाद आवडला. हे सगळे मझ्या चुलत बहिणीच्या वैद्यकीय प्रवेशावेळी पाहिल्याने त्या आठवणी आल्या.

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 11:24
यम-बीबी-यस चे असले त्रांगडे करण्याऐवजी माझ्या मुलाने पंचहात्तर हजार रुपये वार्षिक फी वाली फिजियोथेरापीची डिग्री बंगलोराहून केली (हल्ली फिया काय आहेत, हे ठाऊक नाही), मग दीड वर्ष घरी राहून दिल्लीत नोकरी, मग अमेरिकेत दोन वर्षाची एकूण फी सात लाख रुपये असलेले यम यस (त्यातही बराचसा खर्च असिस्टंटशिप, कँटिनात वगैरे काम करून काढला) लायसनची परिक्षा पास करून आता उत्तम नोकरी करतो आहे. सध्या तरी अमेरिकेत फिजियोथेरापी चे लायसन घेतल्या घेतल्या नोकर्‍या मिळत आहेत. आजवर त्याला अचाट जाग्रणे वगैरे करून अभ्यास कधीच करावा लागलेला नाही. उलट खेळ, सिनेमे, संगीत, मित्र यातच विद्यार्थी जीवन गेलेले आहे.

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 11:59
फिजियो थेरेपी करून अमेरिकेत जाणे हा राजमार्ग आहे आणि एम बी बि एस करून जाण्यापेक्षा बरेच सोपे आहे. शिवाय तेथे या अभ्यासक्रमाला सामाजिक प्रतिष्ठा पण आहे( जी भारतात त्यामानाने नाही ). पण जर डॉक्टर च व्हायचे असेल तर काय? ज्या मुलाचे "डॉक्टरच" व्हायचे असे ठरलेले नसेल त्याला फिजियो थेरेपी, ऑक्युपेशनल थेरेपी किंवा स्पीच थेरेपी अथवा फार्मसी असे अतिशय चांगले चांगले पर्याय आहेत.(खरं तर एम बी बी एस पेक्षा चांगले) आणि या नंतर अमेरिकेतच नव्हे तर युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात सुद्धा बराच वाव आहे.

बाबा पाटील गुरुवार, 04/24/2014 - 13:56
बी.ए.एम.एस. हा देखिल खुपच चांगला पर्याय ठरु शकतो,अन्यथा फिजिओथेरपी देखिल वाईट नाही.(एम.बी.बी.एस.नाही मिळाल तर.कारण पहिल प्रेम.)

खेडूत Fri, 04/25/2014 - 00:21
सर्वांचे आभार. उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद! पुढे काही नवीन माहिती मिळाल्यास इथे चिकटवू , म्हणजे माझ्यासारख्या इतराना पण उपयोग होईल. इतर राज्यात १५% कोट्यातून प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरची वेगळी परीक्षा द्यावी लागेल असं समजलं. तसंच ज्या काही वेगळ्या ठिकाणी प्रवेशासाठी प्रयत्न करायचाय , एम्स वगैरे - त्यासाठीच्या वेगळ्या प्रवेश परीक्षेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा लागेल असंही समजलं.

In reply to by विनायक प्रभू

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 09:33
प्रभू सर हे सर्व व्य नि त का सर्वानाच सांगाना. आमच्यासारखे डॉक्टर होऊनही लोकांना काही सांगू शकत नाहीत काय करायचे तेंव्हा आम्हालाही काही ज्ञान प्राप्त होईल. कमीत कमी लोकांच्यापुढे कचरा होणार नाही हो.

कुंदन गुरुवार, 04/24/2014 - 02:31
५ वा मुद्दा लै महत्वाचा. मध्यमवर्गीयांना अंमळ जड च जाते.अन पुढेही दवाखाना वगैरेला भांडवलही फारच लागते. त्यापेक्षाही इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत , त्याबाबत जाणकार माहिती देतीलच.

पोटे गुरुवार, 04/24/2014 - 09:45
मेडिकलचे शिक्षण घेऊन आजकाल फारसा फायदा नाही. ३० लाख घालून एम बी बी एस व्हायचे आणि नंतर ३५ हजाराची नोकरी मिळते. त्यापेक्षा ते तीस लाख एफ डी ला ठेवलेत तर त्याचे व्याज तितकेच होईल . पी जी करणार असाल तरच मेडिकल करा. अन्यथा नको.

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 10:03
माझ्या अल्पमती आणि अल्प माहितीप्रमाणे माहिती देत आहे. १) सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला ७०-७५ हजार एवढे आहे आणि खाजगी महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला आठ ते दहा लाख एवढे आहे. म्हणजे खाजगी महाविद्यालयाचे शुल्क सरासरी पस्तीस ते चाळीस लाख चार वर्षासाठी होते. एवढे करून तुम्ही "फक्त" एम बी बी एस च असता. २) या नंतर आपल्याला परत CET ला बसून पदव्युत्तर शिक्षणाची सोय करावी लागते. तेथे जर आपल्याला सरकारी जागा मिळाली नाही तर तीस लाख रुपये ( एखाद्या डिप्लोमासाठी) पासून चार कोटी रुपये(फक्त) एम डी रेडीयोलोजी साठी मोजावे लागतात. ३) मध्यमवर्गीय मुलांना या गोष्टीची कल्पना देणे अतिशय आवश्यक आहे. कारण एवढे सर्व सव्यापसव्य करून वयाच्या २८ व्या वर्षी आपण जगाच्या बाजारात उभे राहतो तेंव्हा आपल्याला कुत्रं विचारत नाही यामुळे नैराश्य येण्याची शक्यता असते. कारण शेजार्यांचा "अलभ्य" किंवा "शाश्वत" आय टी पदवीधर होऊन वर्षाला सात आकडी पगार घेत असतो.(बर्याच वेळेस त्याला डॉक्टर पेक्षा दहावी बारावीला कमी गुण असतात.) ४)एवढे सगळे असूनही एखाद्याला डॉक्टरच व्हायचे असेल तर त्याला पर्याय नाही. मी स्वतः याचे उत्तम उदाहरण आहे. मला सरकारी महाविद्यालयात प्रवेशसाठी बारावीला २ गुण (टक्के नव्हे) कमी पडले.(१९८२ साली मणीपालला वैद्यकीय महाविद्यालयाचे देणगी शुल्क साडे तीन लाख होते जे आमच्या श्रीमंतीच्या स्वप्नाच्याही पलीकडचे होते ) यास्तव मी एक वर्ष फार्मसी केले.तेथे पहिल्या वर्षाला मला प्रथम वर्ग मिळाला होता आणि मी नक्की पी एच डी केले असते. ( आणि जास्त पैसे सुद्धा मिळवले असते). परंतु आपल्याला डॉक्टरच व्हायचे आहे हा विचार माझ्या डोक्यातून कधीही गेला नाही. (इश्क ने निकम्मा कर दिया गालिब). शेवटी दुसर्या वर्षी नशिबाने ए एफ एम सी ला प्रवेश मिळाला आणि मी डॉक्टर झालो. यथावकाश एम डी (रेडीयोलोजी)सुद्धा झालो. पण जर आपल्या मुलाला याच मुलीशी लग्न करायचे असेल तर मग कितीही अप्सरा समोर येऊ द्या. उपयोग नाही. ५) आपल्या मुलाला डॉक्टरच व्हायचे आहे पण खाजगी महाविद्यालयाचे शुल्क परवडत नाही असे असेल तर भारतात कुठेही सरकारी महाविद्यालयात मिळेल तेथे प्रवेश घ्या. मग ते असं मधील सिलचर असो कि तिरुनेलवेली असो. वैद्यकीय ज्ञानाचा आणि महाविद्यालयाचा फारसा संबंध नसतो. ज्ञान मिळवावे लागते आणि पदवी दिली जाते. एकदा वैद्यकीय महाविद्यालयात शिरला कि केंव्हा तरी मुल बाहेर येतेच. एखादे वेळेस नापास झाल्याने ज्ञानात कमतरता येत नाही किंवा अगदी प्रत्येक वेळेस उत्तम पास झाले म्हणजे उदंड ज्ञान असते असे नाही. ६) तेही मिळत नसेल तर मुलाला एक वर्षाने परत CET /NEET ला बसू द्या ( एक वर्ष फुकट गेल्याने आयुष्यात काहीही फरक पडत नाही). ७) एम बी बी एस नंतर कॅम्पस इंटरव्ह्यू नसतो. तेंव्हा लगेच पैसे मिळवायला लागू हे सुविचार रुजू देऊ नयेत.एम बी बी एस ची परीक्षा होण्यापूर्वी पासून पदव्युत्त परीक्षेचा अभ्यास सुरु करावा लागतो. (मी जवळ जवळ तीन वर्षे असा अभ्यास केला आहे). ८) आपल्याला काय करायचे आहे याची विचारधारा स्पष्ट असणे आवश्यक आहे. आणि आपण आणखी पाच वर्षांनी कुठे असू आणि कुठे जायचे आहे याचा विचार केलेला असणे आवश्यक आहे. आणि हा विचार दर पाच वर्षांनी नव्याने करणे आवश्यक आहे. ९)वरील सर्व विचार हे बबाबे( बडे बाप के बेटे) किंवा राखीव जागा वाल्यांना लागू नाहीत. एखाद्याला आपल्या मुलाला कडक शब्दात वरील विचार ऐकवायचे असतील तर मला व्यनि करा. सल्ला फुकट मिळेल परिणामांची जबाबदारी तुमची राहील.

In reply to by सुबोध खरे

मनिष गुरुवार, 04/24/2014 - 12:44
हे खूप जवळून पाहिले आहे. पहिल्या पिढीच्या डॉक्टरला जम बसवायला खूप धडपड करावी लागते आणी उमेदीची बरीच वर्षे वाया जातात, इतर काहीही करता येत नाही - खास करून जर उपकरणांवर अवलंबून असे स्पेशलायझेशन असल्यास (उदा. नेत्रतज्ञ). अगदीच *हेच* करायचे असल्यास डॉक्टर व्हावे, नाहीतर इतर काहिही करावे.

In reply to by सुबोध खरे

रेवती Fri, 04/25/2014 - 03:53
प्रतिसाद आवडला. हे सगळे मझ्या चुलत बहिणीच्या वैद्यकीय प्रवेशावेळी पाहिल्याने त्या आठवणी आल्या.

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 11:24
यम-बीबी-यस चे असले त्रांगडे करण्याऐवजी माझ्या मुलाने पंचहात्तर हजार रुपये वार्षिक फी वाली फिजियोथेरापीची डिग्री बंगलोराहून केली (हल्ली फिया काय आहेत, हे ठाऊक नाही), मग दीड वर्ष घरी राहून दिल्लीत नोकरी, मग अमेरिकेत दोन वर्षाची एकूण फी सात लाख रुपये असलेले यम यस (त्यातही बराचसा खर्च असिस्टंटशिप, कँटिनात वगैरे काम करून काढला) लायसनची परिक्षा पास करून आता उत्तम नोकरी करतो आहे. सध्या तरी अमेरिकेत फिजियोथेरापी चे लायसन घेतल्या घेतल्या नोकर्‍या मिळत आहेत. आजवर त्याला अचाट जाग्रणे वगैरे करून अभ्यास कधीच करावा लागलेला नाही. उलट खेळ, सिनेमे, संगीत, मित्र यातच विद्यार्थी जीवन गेलेले आहे.

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 11:59
फिजियो थेरेपी करून अमेरिकेत जाणे हा राजमार्ग आहे आणि एम बी बि एस करून जाण्यापेक्षा बरेच सोपे आहे. शिवाय तेथे या अभ्यासक्रमाला सामाजिक प्रतिष्ठा पण आहे( जी भारतात त्यामानाने नाही ). पण जर डॉक्टर च व्हायचे असेल तर काय? ज्या मुलाचे "डॉक्टरच" व्हायचे असे ठरलेले नसेल त्याला फिजियो थेरेपी, ऑक्युपेशनल थेरेपी किंवा स्पीच थेरेपी अथवा फार्मसी असे अतिशय चांगले चांगले पर्याय आहेत.(खरं तर एम बी बी एस पेक्षा चांगले) आणि या नंतर अमेरिकेतच नव्हे तर युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात सुद्धा बराच वाव आहे.

बाबा पाटील गुरुवार, 04/24/2014 - 13:56
बी.ए.एम.एस. हा देखिल खुपच चांगला पर्याय ठरु शकतो,अन्यथा फिजिओथेरपी देखिल वाईट नाही.(एम.बी.बी.एस.नाही मिळाल तर.कारण पहिल प्रेम.)

खेडूत Fri, 04/25/2014 - 00:21
सर्वांचे आभार. उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद! पुढे काही नवीन माहिती मिळाल्यास इथे चिकटवू , म्हणजे माझ्यासारख्या इतराना पण उपयोग होईल. इतर राज्यात १५% कोट्यातून प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरची वेगळी परीक्षा द्यावी लागेल असं समजलं. तसंच ज्या काही वेगळ्या ठिकाणी प्रवेशासाठी प्रयत्न करायचाय , एम्स वगैरे - त्यासाठीच्या वेगळ्या प्रवेश परीक्षेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा लागेल असंही समजलं.
अकरावी संपून बारावीचं वर्ष सुरु होतंय अशा मुलांचे आता सुटीतच क्लासेस सुरु झालेत. २०१५ ला ज्यांनी अभियांत्रिकीला जायचं ठरवलंय त्यांना बरंच मार्गदर्शन उपलब्ध आहे- कारण डॉक्टर पेक्षा इंजिनियर होण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं आहे, पण मेडिकलसाठी ( विशेषतः MBBS कोर्स) माहिती असल्यास कृपया इथे द्यावी. १. सी ई टी बाबत अनिश्चितता दरवर्षी असते. यावर्षीपासून ती राज्य पातळीवरच पण केंद्राच्या NEET च्या धर्तीवर होणार असं ऐकलंय/ वाचलंय. मग इतर राज्यात १५% गटातून प्रवेश कसा मिळेल? २. सरकारी कॉलेजचा प्रवेश थोडक्या गुणांसाठी न मिळाल्यास खासगी कॉलेजचा पर्याय आहेच. पण तो फार महागडा आहे असं ऐकलंय.

नमोंची देशाकरताची आर्थीक रणनिती : इकॉनॉमीक टाइम्स मधील मुलाखत

माहितगार ·
मोदींना पंतप्रधानपदाची संधी किती हे ठरवणारं घोडा मैदान दूर नाही, गणित जुळवा जूळवीत काही वेळ लागलातरी मे अखेर पर्यंत चित्रस्पष्ट होईलच. किमानपक्षी संसदेतेले एका मोठ्या पक्षाचे नेते हे बिरूद तर कुठेच नाही गेल. कोणत्याच पक्षाला २/३ बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने किमान महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागेल. मोदी आणि त्यांच भविष्यातील अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय (व्यापारी) संबंध या बद्दल इतर मिपा धाग्यांवर चर्चा चालुच आहे.

विवाह मुहुर्ताच्या निमिताने!

अत्रुप्त आत्मा ·

शुचि Tue, 04/22/2014 - 19:14
लेख वाचला. माहीती मिळाली. मुहुर्ताविषयी एक प्रश्न आहे - ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, तर तीच वेळ बरोब्बर ११ - ११ १/२ तासांनी पाश्चात्य देशात येते. याचा अर्थ मुहुर्त असा फिरता असतो का? :(

In reply to by अत्रुप्त आत्मा

समर्पक Tue, 04/22/2014 - 20:15
कसे? तिथि हि (पृथ्वीवर)स्थलसापेक्ष नाही. (क्ष तारिख) ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, आणि तृतीया जर ८ ला संपते, तर १२ तास मागे असलेल्या देशात ती त्यांच्या वेळेप्रमाणे १२ तास आधी संपते त्यांच्या 'क्ष तारिख ५:३० पहाटे' ला तृतीया रहिलेली नसेल... अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?

In reply to by समर्पक

@ अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?>>> म्हणूनच मी वरील प्रतिसादात -- वेळ तिच..फक्त ती.. तिकडे घ्यायची! असे म्हणालो होतो.. अता त्यातच एक महत्वाचा बदल करतो... ती ज्योतिषाला विचारून घ्यायची...(म्हणजे..प्रश्नच मिटला!) या धाग्यावर एक महत्वाचे:----

मी ज्योतिषी नाही

पौरोहित्याच्या या लाइन मुळे,त्या ला'इन'ची थोडी माहिती आहे. इतकेच! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपाशी बोका Wed, 04/23/2014 - 10:14
तुम्ही म्हणता की "मी ज्योतिषी नाही". मग लेखात लिहिले आहे
"या सर्व मुहूर्तांच्या वरील महतीचं कारण काय? म्हणजे असंच का हवं, तर ते "ज्योतिषशास्त्र म्हणतं म्हणून!' एवढंच त्याचं उत्तर आहे. तरी पण मग, नेमकं असं काय म्हणतं हे शास्त्र? तर त्या म्हणण्यामागं ज्योतिषशास्त्राप्रमाणे मानवी जीवनावर होणाऱ्या बऱ्या/वाइट परिणामांचा, म्हणजेच विवाहाच्या दृष्टीनं पुढील सहजीवनावरील फलिताचा भाग त्यात येतो म्हणून."
हे कसं काय म्हणू शकता? आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना? की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात?

In reply to by उपाशी बोका

@ हे कसं काय म्हणू शकता? >>> सोप्पं आहे..कारण हे मी म्हणतच नाहीये ज्योतिषशास्त्र-काय म्हणतं... ते मी फक्त (प्रस्तुत..लेखन विषयाची गरज म्हणून..) लोकांना दाखवून देतोय... ते ज्योतिष शास्त्राचं मत आहे... म्या पामराचं नाही! आणि लेखनाशिवाय हा प्रश्न मला विचारत असाल...तर-लेखनविषयाच्या औचित्यामुळे मला असं म्हणायचा अधिकार आहेच!!! @आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? >>> साप्ताहिक सकाळला हवे होते ..म्हणून! @म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना?>>> ज्योतिषाचे ऐका..असं तुंम्हाला वाटलेलं आहे.पण ते तसं नाही. मला असं वाटतं.. की,लेख वाचणार्‍यांनी:--- संपूर्ण लेख वाचा,आणि वाचल्यानंतर आपलं मन आपल्याला कोणत्या श्रद्धेच्या जवळ नेतं..परंपरागत ..की नवसामाजिक श्रद्धा??? (ते पाहा..) अता,ती श्रद्धा..या दोन्हीपैकीच १ असणार.नाही का? ..तर मग त्यातल्या ज्या श्रद्धेच्या जवळ जाल..त्याप्रमाणे वागा. स्वतःचं मन(आज) जिथे प्रामाणिक होतय..तो कौल घ्या..असं सुचवलेलं आहे..किंवा तसा संदेश द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. @की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? >>> नाही .. तसे काहिही नाही. @जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात? >>> काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे? ज्या कुटुंब/जाती/समाजात राहतात,त्याचा त्यांच्यावर होणार परिणाम काय आहे? ..अश्या निरनिराळ्या शुद्ध इहलैकिक गोष्टी/कारणांमुळे होत असतात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 10:44
काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे?
बास बास! उगान नै आम्ही अ‍ॅग्नॉस्टिक असूनही तुमचे लेख आवर्जून वाचत!

In reply to by शुचि

आनन्दा Wed, 04/23/2014 - 11:00
हा एक गहन प्रश्न आहे, मी जरी ज्योतिषी नसलो तरी मला देखील हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे, आता तुम्ही विचारला आहेच, तर माझ्या उपलब्ध माहितीनुसार कढतोच उत्तर शोधून.

आदूबाळ Tue, 04/22/2014 - 19:47
लेख आवडला, आत्माजीराव! एक दोन शंका: - मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का? - समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? आणि हू इज द अभिजीत?

सूड Tue, 04/22/2014 - 19:55
मस्त लिहीलंयत आणि विशेष म्हणजे वाचकांशी संवाद साधल्याच्या अंगानं जाणारं लिखाण आहे. स्मायल्या वगळल्यात म्हणून की काय देव जाणे, लेख जमलाय हों !! ;)

पैसा Tue, 04/22/2014 - 20:19
आताच्या मुहूर्तांना सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक म्हणजे त्या दिवशी हवं ते कार्यालय उपलब्ध असणे. अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!

लेख फक्कड झालाय ! ग्रहनक्षत्रांनी शब्दबंबाळ न करता नेहमीसारखाच धर्म आणि प्रथांच्या गुंत्यातही व्यवहारिक जमिनीवर पाय रोवून आहे ! (स्मायल्या टाकायच्या नसल्याने बुवांना लेख लिहीतांना कसंसंच झालं असणार असं उगाचच वाटलं. ;) )

बॅटमॅन Wed, 04/23/2014 - 02:08
लेख एकदम जमून आला आहे. स्मायली नसल्याने अंमळ अवघडल्यागत वाटलं असेलही कदाचित पण लेखात तरी तसं कै दिसत नै. एकदम नो नॉन्सेन्स आणि साधी सोपी सरळ भाषा आहे. सरळ मुद्याला भिडत असल्याने लेख विशेष आवडला.

भाते Wed, 04/23/2014 - 07:50
लेख आवडला. पण लेखात एकही स्मायली नसल्याने चुकल्यासारखे वाटले. :)

In reply to by जोशी 'ले'

मृगनयनी Wed, 04/23/2014 - 13:22
अ.आ. जी... उपयुक्त आहे लेख!. आवडला!! :) _____________
आता हेच ज्येष्ठ महिन्याचं पाहू या. तर ज्येष्ठात ज्येष्ठ मुलांची लग्नं करीत नाहीत, हा सर्वसामान्य नियम; पण तोच वरच्यासारख्या काही कारणांनी मोडायची वेळ आलीच तर "अहो, मोठ्या मुलाला कुणाला तरी "दादा..दादा' अशी हाक मारायला लावा, की झाला तो कनिष्ठ.' ही त्यावरील सुटका. विनोदाचा भाग सोडा
या आपल्या वाक्यात एक थोडेसे करेक्शन सुचवावेसे वाटते.. ते म्हणजे.. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ अपत्यांची लग्ने करू नये.. असा कुठलाही नियम नाही. फक्त "३ ज्येष्ठ" एकत्र येऊ नयेत.. असा नियम आहे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे.. तो मुलगा आणि ती मुलगी हे जर आपापल्या जन्मदात्या आईवडिलांचे ज्येष्ठ अपत्य असतील.. तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करणे टाळावे. कारण तीन ज्येष्ठ एकत्र येऊ नयेत. असा नियम आहे. पण सपोझ, मुलगा घरातील ज्येष्ठ अपत्य असेल आणि मुलीला मात्र तिच्यापेक्षा मोठे एखादे भावंड असेल, तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करण्यास काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण इथे मुलगी कनिष्ठ अपत्य असते. किंवा मुलगी ज्येष्ठ अपत्य व मुलगा कनिष्ठ अपत्य असेल.. तरी ज्येष्ठ महिन्यात विवाह करण्यास काहीच अडचण नसते. त्याचप्रमाणे एखाद्या घरात लग्नाळू मुलगा किंवा मुलगी सद्यःस्थितीला जरी ज्येष्ठ असले आणि यापूर्वी त्यांचे एखादे भावंड लहानपणी मृत पावले असले... तर त्यांना शास्त्रानुसार "ज्येष्ठते"चा दर्जा मिळत नाही. पर्यायाने ज्येष्ठ महिन्यात लग्न ते करू शकतात. त्याचबरोबर एखाद्या स्त्री'चा पहिला गर्भ "अ‍ॅबॉर्ट" / "मिसकॅरेज" झाला असेल.. तरी दुसर्‍या गर्भाला किंवा अर्भकाला ज्येष्ठ म्हणता येत नाही. त्यामुळे त्या अर्भकाच्या विवाहाच्या वेळेस "ज्येष्ठ" महिना आडवा येत नाही. :)

लेख वाचला, अभिनंदन!. ज्या जोडप्यांना (जास्त करुन पालकांना) जे काढीव मुहुर्त आपल्या सोयीचा करण्यासाठी धडपडता, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहचवणारा लेख. पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते. धन्स

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 09:51
चर्चा विषय रोचक आहे. माझे लग्न मी ३ दिवस लागून आलेली सुट्टी व हॉलच्या उपलब्धतेनुसार केले. पौष महिना असल्याने चांगला हॉल फार त्रास न होता मिळाला. पौष महिना, पितृपंधरवडा हे कमी त्रासात व गर्दिविरहित वातावरणात कार्ये करायला उत्तम मुहुर्त आहेत, असे स्वानुभवाने सांगतो!

ब़जरबट्टू Wed, 04/23/2014 - 11:00
सगळेच "तुम्ही मानत असाल तर" असल्यामुळे आवडला आहे... बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" :) (ह.घ्या)

वपाडाव गुरुवार, 04/24/2014 - 21:19
आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...

In reply to by वपाडाव

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/24/2014 - 23:10
@आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> :-/ असाच प्रशन मी गेले काहि महिने (विवाहामुळे तडिपार जाहलेल्या) एका मित्राला विचारत होतो.. आपल्याला...हल्ली तो मित्र कुठे असतो? हे माहित आहे का? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif भेटला तर सांगा त्याला..कंपू वाट पाहात आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/pistol.gif

१)आदूबाळ >>> @मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का?>>> ती त्या लोकांनी त्यांच्या लोकांची पाहिलेली सोय असते. तरीसुद्धा मलाही मारवाडी लग्नात हा प्रकार तुरळक दिसलेला आहे. ते ही मुहुर्ताचे भोक्ते आहेत..पण व्यावहारीकपणे! @समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? >>> लोकं आमच्यावर चिडतात! :D जोक्स अपार्ट..त्याचं स्पष्टीकरण,वर सांगितलेलं आहे. ================================= २)सूड >>> प्रतिसाद नक्की आपणच लिहिलायत का? अशी पहिल्या वाक्यामुळे आलेली शंका,दुसर्‍या वाक्यामुळे दूर झाली. :p ================================= ३)पैसा >>> @अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!>>>असंही घडतच,आणि हे आता सवईच झालय. ================================= ४)इस्पीकचा एक्का >>> :D ================================= ५)मृगनयनी >>> आपण जे काहि म्हणलात,त्यातून-लोकं जड-होणार्‍या गोष्टीतून,धर्मशास्त्राचा वर्ख लाऊन आपापली सोय पहातात. हेच स्पष्ट होतं. ================================= ६)प्रमोद देर्देकर >>> @पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते.>>> लेख- मासिकाच्या वाचकांच्या बोलीभाषेत रहावा,म्हणून मुद्दामच तसे केले आहे. :) ================================= ७)ब़जरबट्टू @बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" >>> =)) ते तुंम्ही आंम्हाला किती मानता यावरून ठरवावं लागतं! :D ================================= ८)सफरचंद @मीपा वर अजून सविस्तर येऊ द्या कि >>> जी साब! ================================= ९)वपाडाव वरती एक र्‍हायलच होतं,ते अता पूर्ण करतो @आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> वप्या पळुन कू(णी)कडे गेला रे? :D मी वाट पाहतोय त्या तुझ्या(अ)त्तरांची... :p

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/23/2015 - 00:22
https://scontent.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/10372797_830800113672943_4024905555608382071_n.jpg?oh=5d5beb04a6bf877fb167327868111658&oe=55E35520 ============================================ हा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे. ============================================ हा मूळ मसुदा...
"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको? की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर? " काही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण! तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही! त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं! हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की? मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही!) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्‍या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना? मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच! मग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत? शाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे. ऑफिसांना ..मुहुर्त आहे. येश्टी,रेल्वे,विमान सुटायला...मुहुर्त आहे. घरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे. डॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे. हे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्‍हान्यातल्या 'होय..म्हाराजा!' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं! पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला? छ्या! आजाबात न्हाय! तीनी लगेच सांगितलच.. "आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई! मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया!" हे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं काहिही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो? तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे! पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट? मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा. लोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे? आणि का आहे? माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात. १)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही. २) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील? हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही. ३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून! यातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्‍या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे!) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही. दुसर्‍या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो? तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्‍यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो!) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण??? - "अभी नही..तो कभी नही!" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला "तो बघ बुवा आला,बुवा आला!" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या "बुवा आला"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही! तिसर्‍या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे? या सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं. ============================
============================================= संपादकः- कृपया हा प्रतिसाद मूळ धाग्यात लाऊन द्यावा. :)

शुचि Tue, 04/22/2014 - 19:14
लेख वाचला. माहीती मिळाली. मुहुर्ताविषयी एक प्रश्न आहे - ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, तर तीच वेळ बरोब्बर ११ - ११ १/२ तासांनी पाश्चात्य देशात येते. याचा अर्थ मुहुर्त असा फिरता असतो का? :(

In reply to by अत्रुप्त आत्मा

समर्पक Tue, 04/22/2014 - 20:15
कसे? तिथि हि (पृथ्वीवर)स्थलसापेक्ष नाही. (क्ष तारिख) ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, आणि तृतीया जर ८ ला संपते, तर १२ तास मागे असलेल्या देशात ती त्यांच्या वेळेप्रमाणे १२ तास आधी संपते त्यांच्या 'क्ष तारिख ५:३० पहाटे' ला तृतीया रहिलेली नसेल... अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?

In reply to by समर्पक

@ अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?>>> म्हणूनच मी वरील प्रतिसादात -- वेळ तिच..फक्त ती.. तिकडे घ्यायची! असे म्हणालो होतो.. अता त्यातच एक महत्वाचा बदल करतो... ती ज्योतिषाला विचारून घ्यायची...(म्हणजे..प्रश्नच मिटला!) या धाग्यावर एक महत्वाचे:----

मी ज्योतिषी नाही

पौरोहित्याच्या या लाइन मुळे,त्या ला'इन'ची थोडी माहिती आहे. इतकेच! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपाशी बोका Wed, 04/23/2014 - 10:14
तुम्ही म्हणता की "मी ज्योतिषी नाही". मग लेखात लिहिले आहे
"या सर्व मुहूर्तांच्या वरील महतीचं कारण काय? म्हणजे असंच का हवं, तर ते "ज्योतिषशास्त्र म्हणतं म्हणून!' एवढंच त्याचं उत्तर आहे. तरी पण मग, नेमकं असं काय म्हणतं हे शास्त्र? तर त्या म्हणण्यामागं ज्योतिषशास्त्राप्रमाणे मानवी जीवनावर होणाऱ्या बऱ्या/वाइट परिणामांचा, म्हणजेच विवाहाच्या दृष्टीनं पुढील सहजीवनावरील फलिताचा भाग त्यात येतो म्हणून."
हे कसं काय म्हणू शकता? आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना? की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात?

In reply to by उपाशी बोका

@ हे कसं काय म्हणू शकता? >>> सोप्पं आहे..कारण हे मी म्हणतच नाहीये ज्योतिषशास्त्र-काय म्हणतं... ते मी फक्त (प्रस्तुत..लेखन विषयाची गरज म्हणून..) लोकांना दाखवून देतोय... ते ज्योतिष शास्त्राचं मत आहे... म्या पामराचं नाही! आणि लेखनाशिवाय हा प्रश्न मला विचारत असाल...तर-लेखनविषयाच्या औचित्यामुळे मला असं म्हणायचा अधिकार आहेच!!! @आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? >>> साप्ताहिक सकाळला हवे होते ..म्हणून! @म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना?>>> ज्योतिषाचे ऐका..असं तुंम्हाला वाटलेलं आहे.पण ते तसं नाही. मला असं वाटतं.. की,लेख वाचणार्‍यांनी:--- संपूर्ण लेख वाचा,आणि वाचल्यानंतर आपलं मन आपल्याला कोणत्या श्रद्धेच्या जवळ नेतं..परंपरागत ..की नवसामाजिक श्रद्धा??? (ते पाहा..) अता,ती श्रद्धा..या दोन्हीपैकीच १ असणार.नाही का? ..तर मग त्यातल्या ज्या श्रद्धेच्या जवळ जाल..त्याप्रमाणे वागा. स्वतःचं मन(आज) जिथे प्रामाणिक होतय..तो कौल घ्या..असं सुचवलेलं आहे..किंवा तसा संदेश द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. @की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? >>> नाही .. तसे काहिही नाही. @जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात? >>> काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे? ज्या कुटुंब/जाती/समाजात राहतात,त्याचा त्यांच्यावर होणार परिणाम काय आहे? ..अश्या निरनिराळ्या शुद्ध इहलैकिक गोष्टी/कारणांमुळे होत असतात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 10:44
काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे?
बास बास! उगान नै आम्ही अ‍ॅग्नॉस्टिक असूनही तुमचे लेख आवर्जून वाचत!

In reply to by शुचि

आनन्दा Wed, 04/23/2014 - 11:00
हा एक गहन प्रश्न आहे, मी जरी ज्योतिषी नसलो तरी मला देखील हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे, आता तुम्ही विचारला आहेच, तर माझ्या उपलब्ध माहितीनुसार कढतोच उत्तर शोधून.

आदूबाळ Tue, 04/22/2014 - 19:47
लेख आवडला, आत्माजीराव! एक दोन शंका: - मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का? - समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? आणि हू इज द अभिजीत?

सूड Tue, 04/22/2014 - 19:55
मस्त लिहीलंयत आणि विशेष म्हणजे वाचकांशी संवाद साधल्याच्या अंगानं जाणारं लिखाण आहे. स्मायल्या वगळल्यात म्हणून की काय देव जाणे, लेख जमलाय हों !! ;)

पैसा Tue, 04/22/2014 - 20:19
आताच्या मुहूर्तांना सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक म्हणजे त्या दिवशी हवं ते कार्यालय उपलब्ध असणे. अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!

लेख फक्कड झालाय ! ग्रहनक्षत्रांनी शब्दबंबाळ न करता नेहमीसारखाच धर्म आणि प्रथांच्या गुंत्यातही व्यवहारिक जमिनीवर पाय रोवून आहे ! (स्मायल्या टाकायच्या नसल्याने बुवांना लेख लिहीतांना कसंसंच झालं असणार असं उगाचच वाटलं. ;) )

बॅटमॅन Wed, 04/23/2014 - 02:08
लेख एकदम जमून आला आहे. स्मायली नसल्याने अंमळ अवघडल्यागत वाटलं असेलही कदाचित पण लेखात तरी तसं कै दिसत नै. एकदम नो नॉन्सेन्स आणि साधी सोपी सरळ भाषा आहे. सरळ मुद्याला भिडत असल्याने लेख विशेष आवडला.

भाते Wed, 04/23/2014 - 07:50
लेख आवडला. पण लेखात एकही स्मायली नसल्याने चुकल्यासारखे वाटले. :)

In reply to by जोशी 'ले'

मृगनयनी Wed, 04/23/2014 - 13:22
अ.आ. जी... उपयुक्त आहे लेख!. आवडला!! :) _____________
आता हेच ज्येष्ठ महिन्याचं पाहू या. तर ज्येष्ठात ज्येष्ठ मुलांची लग्नं करीत नाहीत, हा सर्वसामान्य नियम; पण तोच वरच्यासारख्या काही कारणांनी मोडायची वेळ आलीच तर "अहो, मोठ्या मुलाला कुणाला तरी "दादा..दादा' अशी हाक मारायला लावा, की झाला तो कनिष्ठ.' ही त्यावरील सुटका. विनोदाचा भाग सोडा
या आपल्या वाक्यात एक थोडेसे करेक्शन सुचवावेसे वाटते.. ते म्हणजे.. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ अपत्यांची लग्ने करू नये.. असा कुठलाही नियम नाही. फक्त "३ ज्येष्ठ" एकत्र येऊ नयेत.. असा नियम आहे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे.. तो मुलगा आणि ती मुलगी हे जर आपापल्या जन्मदात्या आईवडिलांचे ज्येष्ठ अपत्य असतील.. तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करणे टाळावे. कारण तीन ज्येष्ठ एकत्र येऊ नयेत. असा नियम आहे. पण सपोझ, मुलगा घरातील ज्येष्ठ अपत्य असेल आणि मुलीला मात्र तिच्यापेक्षा मोठे एखादे भावंड असेल, तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करण्यास काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण इथे मुलगी कनिष्ठ अपत्य असते. किंवा मुलगी ज्येष्ठ अपत्य व मुलगा कनिष्ठ अपत्य असेल.. तरी ज्येष्ठ महिन्यात विवाह करण्यास काहीच अडचण नसते. त्याचप्रमाणे एखाद्या घरात लग्नाळू मुलगा किंवा मुलगी सद्यःस्थितीला जरी ज्येष्ठ असले आणि यापूर्वी त्यांचे एखादे भावंड लहानपणी मृत पावले असले... तर त्यांना शास्त्रानुसार "ज्येष्ठते"चा दर्जा मिळत नाही. पर्यायाने ज्येष्ठ महिन्यात लग्न ते करू शकतात. त्याचबरोबर एखाद्या स्त्री'चा पहिला गर्भ "अ‍ॅबॉर्ट" / "मिसकॅरेज" झाला असेल.. तरी दुसर्‍या गर्भाला किंवा अर्भकाला ज्येष्ठ म्हणता येत नाही. त्यामुळे त्या अर्भकाच्या विवाहाच्या वेळेस "ज्येष्ठ" महिना आडवा येत नाही. :)

लेख वाचला, अभिनंदन!. ज्या जोडप्यांना (जास्त करुन पालकांना) जे काढीव मुहुर्त आपल्या सोयीचा करण्यासाठी धडपडता, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहचवणारा लेख. पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते. धन्स

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 09:51
चर्चा विषय रोचक आहे. माझे लग्न मी ३ दिवस लागून आलेली सुट्टी व हॉलच्या उपलब्धतेनुसार केले. पौष महिना असल्याने चांगला हॉल फार त्रास न होता मिळाला. पौष महिना, पितृपंधरवडा हे कमी त्रासात व गर्दिविरहित वातावरणात कार्ये करायला उत्तम मुहुर्त आहेत, असे स्वानुभवाने सांगतो!

ब़जरबट्टू Wed, 04/23/2014 - 11:00
सगळेच "तुम्ही मानत असाल तर" असल्यामुळे आवडला आहे... बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" :) (ह.घ्या)

वपाडाव गुरुवार, 04/24/2014 - 21:19
आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...

In reply to by वपाडाव

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/24/2014 - 23:10
@आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> :-/ असाच प्रशन मी गेले काहि महिने (विवाहामुळे तडिपार जाहलेल्या) एका मित्राला विचारत होतो.. आपल्याला...हल्ली तो मित्र कुठे असतो? हे माहित आहे का? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif भेटला तर सांगा त्याला..कंपू वाट पाहात आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/pistol.gif

१)आदूबाळ >>> @मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का?>>> ती त्या लोकांनी त्यांच्या लोकांची पाहिलेली सोय असते. तरीसुद्धा मलाही मारवाडी लग्नात हा प्रकार तुरळक दिसलेला आहे. ते ही मुहुर्ताचे भोक्ते आहेत..पण व्यावहारीकपणे! @समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? >>> लोकं आमच्यावर चिडतात! :D जोक्स अपार्ट..त्याचं स्पष्टीकरण,वर सांगितलेलं आहे. ================================= २)सूड >>> प्रतिसाद नक्की आपणच लिहिलायत का? अशी पहिल्या वाक्यामुळे आलेली शंका,दुसर्‍या वाक्यामुळे दूर झाली. :p ================================= ३)पैसा >>> @अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!>>>असंही घडतच,आणि हे आता सवईच झालय. ================================= ४)इस्पीकचा एक्का >>> :D ================================= ५)मृगनयनी >>> आपण जे काहि म्हणलात,त्यातून-लोकं जड-होणार्‍या गोष्टीतून,धर्मशास्त्राचा वर्ख लाऊन आपापली सोय पहातात. हेच स्पष्ट होतं. ================================= ६)प्रमोद देर्देकर >>> @पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते.>>> लेख- मासिकाच्या वाचकांच्या बोलीभाषेत रहावा,म्हणून मुद्दामच तसे केले आहे. :) ================================= ७)ब़जरबट्टू @बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" >>> =)) ते तुंम्ही आंम्हाला किती मानता यावरून ठरवावं लागतं! :D ================================= ८)सफरचंद @मीपा वर अजून सविस्तर येऊ द्या कि >>> जी साब! ================================= ९)वपाडाव वरती एक र्‍हायलच होतं,ते अता पूर्ण करतो @आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> वप्या पळुन कू(णी)कडे गेला रे? :D मी वाट पाहतोय त्या तुझ्या(अ)त्तरांची... :p

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/23/2015 - 00:22
https://scontent.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/10372797_830800113672943_4024905555608382071_n.jpg?oh=5d5beb04a6bf877fb167327868111658&oe=55E35520 ============================================ हा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे. ============================================ हा मूळ मसुदा...
"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको? की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर? " काही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण! तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही! त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं! हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की? मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही!) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्‍या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना? मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच! मग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत? शाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे. ऑफिसांना ..मुहुर्त आहे. येश्टी,रेल्वे,विमान सुटायला...मुहुर्त आहे. घरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे. डॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे. हे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्‍हान्यातल्या 'होय..म्हाराजा!' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं! पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला? छ्या! आजाबात न्हाय! तीनी लगेच सांगितलच.. "आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई! मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया!" हे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं काहिही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो? तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे! पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट? मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा. लोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे? आणि का आहे? माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात. १)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही. २) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील? हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही. ३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून! यातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्‍या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे!) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही. दुसर्‍या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो? तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्‍यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो!) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण??? - "अभी नही..तो कभी नही!" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला "तो बघ बुवा आला,बुवा आला!" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या "बुवा आला"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही! तिसर्‍या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे? या सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं. ============================
============================================= संपादकः- कृपया हा प्रतिसाद मूळ धाग्यात लाऊन द्यावा. :)
लेखनप्रकार
या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!

काबुली चणा सॅलेड

दिपक.कुवेत ·

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif मि.पा.वरील गेल्या ३ दिवसात झालेले पाक-कृती- हल्ले पहाता ... आज'ची संध्याकाळ येकंदर अत्यंत अवघड जाणार आहे! आणि हो हे एक र्‍हायचच! मी पैला.... =))

पैसा Tue, 04/22/2014 - 18:00
मस्त दिसतंय. पण मला एक शंका आहे. तुम्ही लोक वजन कमी करण्यासाठी जेवणाबदली सॅलड खात असाल तर त्यात पनीर/चीझ/ऑलिव्ह ऑईल कसं काय एवढं चालेल?

In reply to by पैसा

साती Tue, 04/22/2014 - 18:41
वजन कमी करण्यासाठी नाही, तेवढ्याच किंवा रिलेटिवली कमी कॅलरीत हेल्दी ऑप्शन म्हणून. या सॅलडमधून जेवढी विटॅमिन्स आणि अँटीऑ़कैडंटस मिळतील तेवढी एवढ्याच कॅलरीचा वरणभातातून मिळणार नाहीत. वजन करताना किंवा एरवीही कॅलरी कमी करण्यासोबतच विटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट आणी प्रोटीन्स मिळणे गरजेचे असते. आपल्या टिपीकल जेवणात आणि फराळाच्या पदार्थांतही कार्ब्ज जास्त आणि प्रोटिन्स कमी असतात. म्हणून हे चणे फुटाणे खायचे. ;)

In reply to by साती

पैसा Tue, 04/22/2014 - 19:10
ते माहित आहे. आणि फॅट्स सुद्धा एकदम बंद करून चालणार नाही हे पण माहित आहे. मात्र ४ चमचे तेल/चीझ/पनीर या पदार्थांचं प्रमाण जरा जास्त वाटलं. म्हणजे ४ चमचे तेल आणि एवढे चीझ तर आपल्या रोजच्या जेवणात पण नसतं.

In reply to by पैसा

साती Tue, 04/22/2014 - 19:40
म्हणून तर हे खायचं. आणि त्यादिवशी रोजचे जेवण घ्यायचे नाही. आणि हे तर ऑलिव ऑईल आहे. ऑलिव ऑईल आपण जोपर्यंत तळणाला/ फोडणीला वापरत नाही तोपर्यंत ग्रेटच असतं.

In reply to by साती

पैसा Tue, 04/22/2014 - 19:53
एकूण आपण अन्नावर जेवढे जास्त प्रोसेसिंग करत जाऊ तेवढी पोषणमूल्य कमी व्हायची. आता दुसरा प्रश्न. ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह तेलाऐवजी थोडंसं घरगुती लोणी वापरलं तर एक प्रयोग म्हणून?

In reply to by साती

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 20:04
ऑलीव्ह ऑईल मध्येही इतर तेला इतकेच उष्मांक (कॅलरीज), (१ ग्रॅम = ९), असतात. ऑलीव्ह ऑईल मध्ये वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचा गुणधर्म आहे म्हणून ते इतर तेलापेक्षा चांगले असे म्हणतात. पण ते चांगले म्हणून जास्त खाल्यास अतिरिक्त उष्मांकाचे चरबीत रुपांतर होते. दिवसाला १५ ग्रॅम (१ टेबलस्पून) पेक्षा जास्त खाऊ नये असे म्हणतात.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत Tue, 04/22/2014 - 19:44
पैसातै, अगं कुठे रोज हे सॅलेड खायचयं? तेव्हा बिनधास्त सगळे जिन्नस घालुन खा, ईतरांना खीलव. ईतर ऑईल पेक्षा ऑलीव्ह ऑईल त्यातल्या त्यात हेल्दि म्हणतात. ईकडे (स्पेशली मिडल ईस्ट मधे) तर सर्रास भाज्या, सॅलेड, हमुस (हेच काबुली चणे वाटुन) वर कच्चच घालुन देतात. पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा Tue, 04/22/2014 - 19:48
धन्यवाद, साती आणि दीपक. या तेलांबद्दल साती किंवा कोणाही डॉक्टर कडून जास्त माहिती कधीतरी वाचायला आवडेल. म्हणजे काही लोक म्हणतात, तांदुळाच्या कोंड्याचं तेल चांगलं, काही म्हणतात ऑलिव्ह तेल, कोणी म्हणतात सनफ्लॉवर इ.इ.

In reply to by पैसा

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 12:39
ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी स्वतःच्या फायद्यासाठी उदोउदो करून चढवून ठेवलेले आहे. तांदुळाच्या कोंड्याचे तेल त्यापेक्षा सर्व दृष्टीने नक्कीच जास्त चांगले आहे. पहा http://www.heartfoundation.org.nz/healthy-living/healthy-eating/food-for-a-healthy-heart/replace-butter/which-oil-to-use http://foodwatch.com.au/blog/fats-and-oils/item/q-how-does-rice-bran-oil-compare-to-olive-oil.html http://whatscookingamerica.net/Information/RiceBranOil.htm ओलिव्ह तेल सलाड ड्रेसिंग साठी वापरता येते परंतु भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी नाही कारण कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होतात. शिवाय ५०० रुपये लिटर ला देऊन आपण काय मिळवता?केवळ युरोपीय देशांच्या तुंबड्या भरता. आपले साधे गोडे तेल किंवा सूर्यफुलाचे तेल १०० किंवा ८० रुपये लिटर ला देऊन तुम्हाला तितकेच फायदे मिळतात. तांदुळाच्या कोंड्याचे तेल १२० रुपये लिटर ला सर्वात चांगले आहे.

In reply to by सुबोध खरे

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 16:17
मी हल्ली घरात गोडेतेल, सूर्यफुलाचे तेल आणि तांदुळाच्या कोंड्याचे तेल ही तिन्ही तेले आणून ठेवते. त्याशिवाय घरगुती तूप आणि खोबरेल सुद्धा घरात असतंच. गोडेतेल (शेंगातेल) पोळ्यांची कणीक मळताना वापरते. चुकून कधी काही तळलेच तर त्यासाठी सूर्यफूलाचं तेल आणि भाजी आमटीच्या फोडणीसाठी तांदुळाच्या कोंड्याचे तेल. याशिवाय घरचे तूप काही पदार्थांना वापरते. आणि खोबरेल तेल काही माशांचे पदार्थ आणि शाकाहारी कारवारी पदार्थ यासाठी.

In reply to by पैसा

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 19:37
आपण खोबरेल तेलाचा कोणता ब्रांड व प्याकिंग वापरताय? म्हणजे कोणता चांगला? वापरतांना काय काळजी घ्यावी? कारण आम्ही आजपर्यंत कधीच वापरले नाही.

In reply to by आयुर्हित

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 21:37
गोव्यात गावठी ताजं खोबरेल मिळतं. एकतर खोबरे देऊन त्याचं तेल काढून मिळतं किंवा बाजारातही स्थानिक तेल मिळतं. ते अनब्रँडेड असतं, पण त्यावर प्रोसेस काही केलेली नसते. किंवा मग निर्मल वगैरे बरेच ब्रँड मिळतात. अर्ध्या किंवा एका लिटरच्या पिशव्या. खाण्यासाठी ते कोकोराज, पॅराशूट वगैरे मात्र वापरू नका. त्यावर काय प्रोसेस केलेली असेल आणि काय केमिकल्स वापरली असतील सांगता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 21:10
>>>>कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होता सुबोध खरे साहेब, माझा अनुभव वेगळा आहे. मी गेली ६-७ वर्षे ऑलिव्ह ऑईल वापरतो आहे. कच्चे आणि भारतिय स्वयंपाकासाठी सुद्धा. तापविल्याने जीवनसत्वे नष्ट होतात की नाही ह्याची मला कल्पना नाही पण धूर आल्याचे कधीच दिसले नाही आणि माझी सर्व नॉनस्टीकची भांडी अगदी व्यवस्थित आहेत. दोन गोष्टींचा संबंध आहे किंवा नाही कल्पना नाही पण कोलेस्टेरॉल पातळी अजून तरी व्यवस्थित आहे. तादूळाच्या कोंड्याच्या तेलाचा एखादा प्रचलित ब्रँड आहे का? कारण इथे घाणीचे तेल मिळणार नाही पण ब्रँडेड मिळू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Sun, 04/27/2014 - 13:40
पेठकर साहेब, ओलिव्ह तेलाच्या बद्दल मी जे दुवे दिलेले आहेत त्यात हि सर्व माहिती आहेच. आपण जर एक्स्ट्रा व्हर्जिन तेल वापरत नसाल ( ओलिव्ह पोमेस तेल) तर तेवढा धूर येत नाही. परंतु ओलिव्ह तेल तळणासाठी वापरले तर त्याची चव बिघडते असा वैयक्तिक अनुभव आहे. (शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील) तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2014 - 13:54
>>>>(शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील)>>>>>तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत. धन्यवाद. आता शोधतो मार्केटात.

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण Wed, 04/23/2014 - 16:21
पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि. ऑलिव्ह ऑइल नी बाळाची त्वचा मउ बनते.आमच्या मातोश्रींनी आमच्या बाल्य अवस्थेत याचा वापर केला होता.

In reply to by मदनबाण

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 20:35
ओलीव ओइल हे सूर्यप्रकाशामुळे आणि जास्त तापमानाला विघटन पावते त्यामुळे ते फक्त थंडीत त्वचा कोरडी पडू नये म्हणून किंवा फाटू नये म्हणून लावता येते. http://recipes.howstuffworks.com/how-olive-oil-works3.htm लहान मुलांना तेलाचे मालिश करण्याचा मूळ हेतू हा आहे कि ते तेल त्वचेत शोषून घेतले जाते आणि त्याचे सूर्यप्रकाशात ड जीवन् सत्त्वात रुपांतर होते. यासाठी मुलाला मालिश झाल्यावर थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात धरावे आणि अर्ध्या ते एक तासाने अंघोळ घालावी.(दुर्दैवाने मालिश करणाऱ्या बाईला तेवढा वेळ नसतो). हे ड जीवनसत्त्व हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. पण याच कारणासाठी ओलिव्ह तेल या कामाला उपयुक्त नाही कारण सूर्यप्रकाशात त्याचे विघटन होते. लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. यात इतरही काही आयुर्वेदिक औषधे मिसळून मालिश केले जाते( उदा डाबर चे लाल तेल) पण मला त्याबद्दल नक्की काही सांगता येणार नाही

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 21:37
लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. १००% सहमत. आखाड्यात जाणाऱ्या पैलवाना ते जिम ला जाणाऱ्या बॉडी बिल्डर पासून म्हातारपणात गुडघे दुखीला देखील तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. आपण सर्वांनीच जर आपल्या देशातील तेलाचे फायदे समजून घेतले तर कितीतरी लोकांना याचा फायदा होईल.

In reply to by शिद

ब़जरबट्टू गुरुवार, 04/24/2014 - 17:22
कायबी म्हणा राव.. चखणा शब्दासंग असे प्रकार जात नाय.. मंग तुम्ही "स्नक्स" म्हणा.. आपली काही संस्क्रुती काय का नाय ? :))

मस्त कलंदर Tue, 04/22/2014 - 18:13
मस्त आहे हे ही सॅलड. कमी खाणं म्हणजे पौष्टिक खाणं नव्हे. त्यामुळं आवश्यक ती कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्धांश सगळं शरीरास मिळायला हवं. त्यामुळे थोडं तेल, साखर्/गोडवा, कधीमधी चीज्/पनीर हे आवश्यक आहे.

कंजूस Tue, 04/22/2014 - 18:53
मस्तच लागणार .फोटोही छान . तिकडे हे पदार्थही मुबलक मिळत असणार .उन्हाळ्यात सैलड आणि पावसाळ्यात गरम सूप जेवणाची लज्जत वाढवते . थंडीत खुराक सकाळी खावा . येनकेनप्रकारे जिभेचे चोचले पुरवावेत . १)परदेशातले "स्पिनिच",बिटाची पाने ,आणि भारतातला पालक जरी एकाच वर्गातल्या वनस्पती असल्या तरी चवीत किती फरक पडतो ? २)काकडीचेही बरेच प्रकार आहेत खिरा ,शेतकाकडी ,गोपाळकाल्याला बाजारात येते ती बांबूछाप ,थोडीशी पडवळासारखी दिसणारी फिकट हिरवी ,सैनविजला वापरतात ती पांढरी छोटी ,जपान्यांची झुकिनी आणि कृष्णेच्या तीरावरची वाळूक . ३)सलाड म्हणजे जिवनसत्त्वांचा खजिना .थोडेफार तेल चवीला घेतल्याने वजनाचा काटा तबकडीफोडून बाहेर जाणार नाही . ४)तमिळनाडूत नवरात्रीत रोज एक कडधान्य भिजवून मोड आल्यावर उकडून त्यात ओले खोबरे टाकून मुलांसाठी प्रसाद असतो . ५)सध्या पौष्टिक पाककृतीँचा ट्रेँड आला आहे .साठ पासठ सालांत फोर्टात एक पौष्टिक खारीक विकत मिळायची त्याची आठवण झाली .

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 19:05
या! तुमचीच कमी होती. :-/ त्या बायकांना आणि सूडला (हे बळंच ;) ) काही बोलता येत नाही, म्हटलं तुम्हाला तरी सांगावं... :) हुश्श्श! मस्तय पाकॄ!

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 22:13
फोटो पाहूनच तोंपासु. सोपी साधी छान पाकृ! काबुली चणे(छोले) मला नेहमीच आवडतात. आजपर्यंत फक्त छोले-भटुरे हाच एक पर्याय होता. आपला हा पर्याय त्यापेक्षा खरोखरच चांगला आहे. फक्त मी ऑलिव्ह ऑईल ४चमच्यांपेक्षा १चमचा वापरेन ज्यामुळे ही पाकृ अधिक आरोग्यदायी होईल.

मुक्त विहारि Tue, 04/22/2014 - 22:39
झक्कास.... (ह्या पुढचा आपला कट्टा एखाद्या टुमदार घरी करू या.आम्ही साग्रसंगीत सगळी तयारी करतो.काय मसाले वगैरे लागले तर (अगदी पाट्या वरवंट्यावर) वाटून देतो.पण शेफ मात्र तुम्हीच.)

In reply to by Prajakta२१

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 09:05
चण्याऐवजी मुग/ मटकी किंवा इतरही कडधान्य जसे चवली,राजमा देखील वापरू शकता. मुग/मटकी जर मोड आणून वापरलेत तर अजून जास्त पौष्टिक होतात. ब्लॅक ऑलीव्ह्ज ऐवजी काळी द्राक्षे वापरली तर नक्कीच चालु शकेल की. फक्त प्रत्येकातील पोषक तत्वे(वितामिंस व मिनरल्स),GI(ग्लायसेमिक इंडेक्स)व मुख्य म्हणजे चव वेगवेगळी आहे. अजून आपल्या कल्पकतेला भरपूर वाव आहे हवे तसे बदल करायला आणि आलटून पालटून सर्व पदार्थ वापरून पाहायला!

In reply to by आयुर्हित

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 12:29
हेच बोल्तो. आपापल्या आवडिप्रमाणे थोडेफार बदल करुन वेगवेगळे व्हेरीअशन्स करु शकतो. मोड आलेल्या कडधान्याचं सॅलेड पण अप्रतिम लागेल (काळी द्राक्षे घालुन). पौष्टिक आणि शीवाय पोटभरहि!

इरसाल Wed, 04/23/2014 - 09:34
यात एक उकडलेले अंडे अर्ध कापुन मस्त सजावट करता येईल आणी चवही वाढेल.

छान आहे पाकृ मी ह्यात कांदा, टोमॅटोबरोबर थोडी चिरलेली कैरी, चिंच-खजुर चटणी, पुदिना चटणी व शेव-बुंदी घालून काबुली चणा चाट बनवते.

In reply to by पैसा

जेनी... Wed, 04/23/2014 - 23:34
अर्रे एकदम मस्तच दिसते !! ब्रावुन कलर्चा शॉर्ट टॉप आणि ब्रावुनच कलरचा शॉर्‍ट स्कर्ट घालुन गोर्या गोर्या हाताने हाय करत असते =))

In reply to by जेनी...

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 12:31
आज्जी तु "काहितरी" बनवतेस यातचं सगळं आलं! मला वाटलं तुझा नेहमीचा प्रतीसाद येईल... हे माझी आई छान करते, हे माझी दिदि छान करते वगैरे!

अनन्त अवधुत Wed, 04/23/2014 - 15:13
धन्यवाद दिपक.कुवेत. मी आजच हे सॅलेड केले. संध्याकाळी काही मित्र येणार होते म्हणून त्यांच्या साठी हे सॅलेड केले. मी केलेले ३ बदल: मित्रांचे येणे अचानक ठरल्यामुळे चणे भिजवून वाफवायला वेळ नव्हता म्हणून ब्रोकोली घातली. (चण्या ऐवजी ब्रोकोली चव कशी लागेल हि धाकधूक होती, पण छान लागते. ) घरात मोझेरेला चीज होते, त्यामुळे तेच वापरले. काकडी ऐवजी झुकीनी वापरली. ड्रेसिंग एक नंबर आहे. सॅलेड आवडले. धन्यवाद.

मदनबाण Wed, 04/23/2014 - 16:18
झकास्स्स... :) @ कंजूस महोदय वाळक्यांच नाव काढुन तुम्ही आम्हासनी लयं त्रास दिला बघा. ;)

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 20:16
मस्तं सॅलड. प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच. त्यामुळे भाज्या आणि चीझ सोबत काबूली चण्याचे प्रयोजन अगदी योग्य आहे. कांही पोषकद्रव्यांना शरीरात पचनासाठी तेलाची गरज असते. फक्त तेलातच त्यांचे विघटन होते. त्यामुळे माफक प्रमाणात घातलेल्या ऑलीव्ह ऑईलने हे सॅलड म्हणजे एक परिपूर्ण आहार झाला आहे. गरजेनुसार तेलाचे प्रमाण कमी करणे, चीझ टाळणे इ.इ. सुरक्षित पाऊले उचलण्यास हरकत नाही. ज्यांना मांसाहार वर्ज्य किंवा निषिद्ध नाही त्यांनी उकडलेल्या कोंबडीच्या मांसाचे बारीक तुकडे किंचित मीठ आणि काळीमिरी भुरभुरून वरील सॅलडात मिसळायला हरकत नाही. (हे सर्व जेवणाऐवजी खाल्ल्यास शरीरास सर्व पोषकद्रव्ये मिळूनही वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.)

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 15:59
पेठकर काका, आपला प्रतिसाद आवडला, पण "प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच." हे मात्र डोक्यावरून (tangently)गेलंय! कृपया, जरा अधिक स्पष्ट करून हवे आहे. धन्यवाद,

In reply to by आयुर्हित

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 01:48
माझा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आपल्या पारंपारीक पाककृतींकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. जसे आमटी-भात, भाजी-पोळी, डाळीची खिचडी, कोंबडीचे, बोकडाचे कालवण - भात, आंबोळ्या, भाकरी इ.इ.इ. गोर्‍यांकडे मांसाहारा बरोबर पाव, अरबस्थानात मांसाहाराबरोबर खुप्स (पिटा ब्रेड) इ.इ. खाल्ले जातात. ह्या सर्व आहार पद्धतीत प्रथिनांबरोबर कर्बोदकाची साथ असते. कर्बोदकांमुळे 'पोट भरल्याची' भावनाही लवकर निर्माण होऊन माणूस समाधान पावतो. बाकी माहिती गुगलावर मिळेलच.

यात कुरकुरित पिटा चिप्स घातल्याकी फतूश सॅलडसारखेच लागेल. अर्थात फतूशमध्ये छोले/चणे आणि ऑलिव्ह्ज नसतात पण चालेल एक वेगळे फतूश म्हणून.

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 12:34
व्हेरी गुड आयडिया. हे फतुश सॅलेड पण मला फार आवडतं ते त्यात असण्यार्‍या कुरकुरीत चिप्स मुळेच.

कंजूस Fri, 04/25/2014 - 06:30
तेल कोणतेही खावे .त्यात चव आणि परवडणे हे जास्त महत्त्वाचे .कोलेस्टरॉलची वाढ फक्त तेलानेच होते असं नाही .अतिआहार आणि जिवाला नाही कहार तर रक्तातला वाहाता मेद वाढतो . राहिला मुद्दा प्रतिष्ठेचा .आम्ही यँव करतो वगैरे त्याच्याशी उपयुक्ततेचा काहीच संबंध नाही . तेलाच्या केमिस्ट्रीविषयी नंतर कधीतरी .

In reply to by राघवेंद्र

दिपक.कुवेत Sun, 04/27/2014 - 11:19
फोटो टाका कि राव त्यामुळे ईतरांना पण हुरुप येईल. ड्रेसींग साठि वरील साहित्य टाळुन (चीज/ऑईल असल्यामुळे) अजुन एक करता येईल.... आलं, मिरची, पुदिना, कोथींबीर आणि ब्लांच केलेला पालक हे सर्व मिक्सर मधे मुलायम वाटुन दह्याच्या चक्क्यात घालावं. जरुरी पुरतं पाणी घालुन हे ड्रेसींग सॅलडवर घालुन मिक्स करणे.

दिपक.कुवेत Mon, 04/28/2014 - 13:19
फोटो काल मोबाईलवर पाहिले. छान आलेत. पण ईथे दिसत नाहियेत. नुसती दोन टिंब दिसत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

राघवेंद्र Mon, 04/28/2014 - 19:08
मित्रा, मला ऑफिस मधुन सुध्दा व्यवस्थित दिसत आहेत. ( गुगलच वापरले आहे ) हा विकांताला तुमची सॅलड व मिर्च का सालन व सप्रे साहेबांची दावणगिरी दोसा पाककृती करुन बघितली. मस्त झाली होती. मिर्च का सालन फोटो टाकण्यासाठी अजुन एकदा करावी लागेल.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 15:32
कच्चा पालक आवडत नसल्यामुळे पुदिना घालून करून पाह्ते. बाकी हा 'चखणा' आहे हे नवीन समजलं. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चखणे हे तळलेले पदार्थ असतात.

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif मि.पा.वरील गेल्या ३ दिवसात झालेले पाक-कृती- हल्ले पहाता ... आज'ची संध्याकाळ येकंदर अत्यंत अवघड जाणार आहे! आणि हो हे एक र्‍हायचच! मी पैला.... =))

पैसा Tue, 04/22/2014 - 18:00
मस्त दिसतंय. पण मला एक शंका आहे. तुम्ही लोक वजन कमी करण्यासाठी जेवणाबदली सॅलड खात असाल तर त्यात पनीर/चीझ/ऑलिव्ह ऑईल कसं काय एवढं चालेल?

In reply to by पैसा

साती Tue, 04/22/2014 - 18:41
वजन कमी करण्यासाठी नाही, तेवढ्याच किंवा रिलेटिवली कमी कॅलरीत हेल्दी ऑप्शन म्हणून. या सॅलडमधून जेवढी विटॅमिन्स आणि अँटीऑ़कैडंटस मिळतील तेवढी एवढ्याच कॅलरीचा वरणभातातून मिळणार नाहीत. वजन करताना किंवा एरवीही कॅलरी कमी करण्यासोबतच विटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट आणी प्रोटीन्स मिळणे गरजेचे असते. आपल्या टिपीकल जेवणात आणि फराळाच्या पदार्थांतही कार्ब्ज जास्त आणि प्रोटिन्स कमी असतात. म्हणून हे चणे फुटाणे खायचे. ;)

In reply to by साती

पैसा Tue, 04/22/2014 - 19:10
ते माहित आहे. आणि फॅट्स सुद्धा एकदम बंद करून चालणार नाही हे पण माहित आहे. मात्र ४ चमचे तेल/चीझ/पनीर या पदार्थांचं प्रमाण जरा जास्त वाटलं. म्हणजे ४ चमचे तेल आणि एवढे चीझ तर आपल्या रोजच्या जेवणात पण नसतं.

In reply to by पैसा

साती Tue, 04/22/2014 - 19:40
म्हणून तर हे खायचं. आणि त्यादिवशी रोजचे जेवण घ्यायचे नाही. आणि हे तर ऑलिव ऑईल आहे. ऑलिव ऑईल आपण जोपर्यंत तळणाला/ फोडणीला वापरत नाही तोपर्यंत ग्रेटच असतं.

In reply to by साती

पैसा Tue, 04/22/2014 - 19:53
एकूण आपण अन्नावर जेवढे जास्त प्रोसेसिंग करत जाऊ तेवढी पोषणमूल्य कमी व्हायची. आता दुसरा प्रश्न. ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह तेलाऐवजी थोडंसं घरगुती लोणी वापरलं तर एक प्रयोग म्हणून?

In reply to by साती

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 20:04
ऑलीव्ह ऑईल मध्येही इतर तेला इतकेच उष्मांक (कॅलरीज), (१ ग्रॅम = ९), असतात. ऑलीव्ह ऑईल मध्ये वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचा गुणधर्म आहे म्हणून ते इतर तेलापेक्षा चांगले असे म्हणतात. पण ते चांगले म्हणून जास्त खाल्यास अतिरिक्त उष्मांकाचे चरबीत रुपांतर होते. दिवसाला १५ ग्रॅम (१ टेबलस्पून) पेक्षा जास्त खाऊ नये असे म्हणतात.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत Tue, 04/22/2014 - 19:44
पैसातै, अगं कुठे रोज हे सॅलेड खायचयं? तेव्हा बिनधास्त सगळे जिन्नस घालुन खा, ईतरांना खीलव. ईतर ऑईल पेक्षा ऑलीव्ह ऑईल त्यातल्या त्यात हेल्दि म्हणतात. ईकडे (स्पेशली मिडल ईस्ट मधे) तर सर्रास भाज्या, सॅलेड, हमुस (हेच काबुली चणे वाटुन) वर कच्चच घालुन देतात. पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा Tue, 04/22/2014 - 19:48
धन्यवाद, साती आणि दीपक. या तेलांबद्दल साती किंवा कोणाही डॉक्टर कडून जास्त माहिती कधीतरी वाचायला आवडेल. म्हणजे काही लोक म्हणतात, तांदुळाच्या कोंड्याचं तेल चांगलं, काही म्हणतात ऑलिव्ह तेल, कोणी म्हणतात सनफ्लॉवर इ.इ.

In reply to by पैसा

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 12:39
ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी स्वतःच्या फायद्यासाठी उदोउदो करून चढवून ठेवलेले आहे. तांदुळाच्या कोंड्याचे तेल त्यापेक्षा सर्व दृष्टीने नक्कीच जास्त चांगले आहे. पहा http://www.heartfoundation.org.nz/healthy-living/healthy-eating/food-for-a-healthy-heart/replace-butter/which-oil-to-use http://foodwatch.com.au/blog/fats-and-oils/item/q-how-does-rice-bran-oil-compare-to-olive-oil.html http://whatscookingamerica.net/Information/RiceBranOil.htm ओलिव्ह तेल सलाड ड्रेसिंग साठी वापरता येते परंतु भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी नाही कारण कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होतात. शिवाय ५०० रुपये लिटर ला देऊन आपण काय मिळवता?केवळ युरोपीय देशांच्या तुंबड्या भरता. आपले साधे गोडे तेल किंवा सूर्यफुलाचे तेल १०० किंवा ८० रुपये लिटर ला देऊन तुम्हाला तितकेच फायदे मिळतात. तांदुळाच्या कोंड्याचे तेल १२० रुपये लिटर ला सर्वात चांगले आहे.

In reply to by सुबोध खरे

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 16:17
मी हल्ली घरात गोडेतेल, सूर्यफुलाचे तेल आणि तांदुळाच्या कोंड्याचे तेल ही तिन्ही तेले आणून ठेवते. त्याशिवाय घरगुती तूप आणि खोबरेल सुद्धा घरात असतंच. गोडेतेल (शेंगातेल) पोळ्यांची कणीक मळताना वापरते. चुकून कधी काही तळलेच तर त्यासाठी सूर्यफूलाचं तेल आणि भाजी आमटीच्या फोडणीसाठी तांदुळाच्या कोंड्याचे तेल. याशिवाय घरचे तूप काही पदार्थांना वापरते. आणि खोबरेल तेल काही माशांचे पदार्थ आणि शाकाहारी कारवारी पदार्थ यासाठी.

In reply to by पैसा

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 19:37
आपण खोबरेल तेलाचा कोणता ब्रांड व प्याकिंग वापरताय? म्हणजे कोणता चांगला? वापरतांना काय काळजी घ्यावी? कारण आम्ही आजपर्यंत कधीच वापरले नाही.

In reply to by आयुर्हित

पैसा गुरुवार, 04/24/2014 - 21:37
गोव्यात गावठी ताजं खोबरेल मिळतं. एकतर खोबरे देऊन त्याचं तेल काढून मिळतं किंवा बाजारातही स्थानिक तेल मिळतं. ते अनब्रँडेड असतं, पण त्यावर प्रोसेस काही केलेली नसते. किंवा मग निर्मल वगैरे बरेच ब्रँड मिळतात. अर्ध्या किंवा एका लिटरच्या पिशव्या. खाण्यासाठी ते कोकोराज, पॅराशूट वगैरे मात्र वापरू नका. त्यावर काय प्रोसेस केलेली असेल आणि काय केमिकल्स वापरली असतील सांगता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 21:10
>>>>कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होता सुबोध खरे साहेब, माझा अनुभव वेगळा आहे. मी गेली ६-७ वर्षे ऑलिव्ह ऑईल वापरतो आहे. कच्चे आणि भारतिय स्वयंपाकासाठी सुद्धा. तापविल्याने जीवनसत्वे नष्ट होतात की नाही ह्याची मला कल्पना नाही पण धूर आल्याचे कधीच दिसले नाही आणि माझी सर्व नॉनस्टीकची भांडी अगदी व्यवस्थित आहेत. दोन गोष्टींचा संबंध आहे किंवा नाही कल्पना नाही पण कोलेस्टेरॉल पातळी अजून तरी व्यवस्थित आहे. तादूळाच्या कोंड्याच्या तेलाचा एखादा प्रचलित ब्रँड आहे का? कारण इथे घाणीचे तेल मिळणार नाही पण ब्रँडेड मिळू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Sun, 04/27/2014 - 13:40
पेठकर साहेब, ओलिव्ह तेलाच्या बद्दल मी जे दुवे दिलेले आहेत त्यात हि सर्व माहिती आहेच. आपण जर एक्स्ट्रा व्हर्जिन तेल वापरत नसाल ( ओलिव्ह पोमेस तेल) तर तेवढा धूर येत नाही. परंतु ओलिव्ह तेल तळणासाठी वापरले तर त्याची चव बिघडते असा वैयक्तिक अनुभव आहे. (शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील) तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2014 - 13:54
>>>>(शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील)>>>>>तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत. धन्यवाद. आता शोधतो मार्केटात.

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण Wed, 04/23/2014 - 16:21
पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि. ऑलिव्ह ऑइल नी बाळाची त्वचा मउ बनते.आमच्या मातोश्रींनी आमच्या बाल्य अवस्थेत याचा वापर केला होता.

In reply to by मदनबाण

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 20:35
ओलीव ओइल हे सूर्यप्रकाशामुळे आणि जास्त तापमानाला विघटन पावते त्यामुळे ते फक्त थंडीत त्वचा कोरडी पडू नये म्हणून किंवा फाटू नये म्हणून लावता येते. http://recipes.howstuffworks.com/how-olive-oil-works3.htm लहान मुलांना तेलाचे मालिश करण्याचा मूळ हेतू हा आहे कि ते तेल त्वचेत शोषून घेतले जाते आणि त्याचे सूर्यप्रकाशात ड जीवन् सत्त्वात रुपांतर होते. यासाठी मुलाला मालिश झाल्यावर थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात धरावे आणि अर्ध्या ते एक तासाने अंघोळ घालावी.(दुर्दैवाने मालिश करणाऱ्या बाईला तेवढा वेळ नसतो). हे ड जीवनसत्त्व हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. पण याच कारणासाठी ओलिव्ह तेल या कामाला उपयुक्त नाही कारण सूर्यप्रकाशात त्याचे विघटन होते. लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. यात इतरही काही आयुर्वेदिक औषधे मिसळून मालिश केले जाते( उदा डाबर चे लाल तेल) पण मला त्याबद्दल नक्की काही सांगता येणार नाही

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 21:37
लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. १००% सहमत. आखाड्यात जाणाऱ्या पैलवाना ते जिम ला जाणाऱ्या बॉडी बिल्डर पासून म्हातारपणात गुडघे दुखीला देखील तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. आपण सर्वांनीच जर आपल्या देशातील तेलाचे फायदे समजून घेतले तर कितीतरी लोकांना याचा फायदा होईल.

In reply to by शिद

ब़जरबट्टू गुरुवार, 04/24/2014 - 17:22
कायबी म्हणा राव.. चखणा शब्दासंग असे प्रकार जात नाय.. मंग तुम्ही "स्नक्स" म्हणा.. आपली काही संस्क्रुती काय का नाय ? :))

मस्त कलंदर Tue, 04/22/2014 - 18:13
मस्त आहे हे ही सॅलड. कमी खाणं म्हणजे पौष्टिक खाणं नव्हे. त्यामुळं आवश्यक ती कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्धांश सगळं शरीरास मिळायला हवं. त्यामुळे थोडं तेल, साखर्/गोडवा, कधीमधी चीज्/पनीर हे आवश्यक आहे.

कंजूस Tue, 04/22/2014 - 18:53
मस्तच लागणार .फोटोही छान . तिकडे हे पदार्थही मुबलक मिळत असणार .उन्हाळ्यात सैलड आणि पावसाळ्यात गरम सूप जेवणाची लज्जत वाढवते . थंडीत खुराक सकाळी खावा . येनकेनप्रकारे जिभेचे चोचले पुरवावेत . १)परदेशातले "स्पिनिच",बिटाची पाने ,आणि भारतातला पालक जरी एकाच वर्गातल्या वनस्पती असल्या तरी चवीत किती फरक पडतो ? २)काकडीचेही बरेच प्रकार आहेत खिरा ,शेतकाकडी ,गोपाळकाल्याला बाजारात येते ती बांबूछाप ,थोडीशी पडवळासारखी दिसणारी फिकट हिरवी ,सैनविजला वापरतात ती पांढरी छोटी ,जपान्यांची झुकिनी आणि कृष्णेच्या तीरावरची वाळूक . ३)सलाड म्हणजे जिवनसत्त्वांचा खजिना .थोडेफार तेल चवीला घेतल्याने वजनाचा काटा तबकडीफोडून बाहेर जाणार नाही . ४)तमिळनाडूत नवरात्रीत रोज एक कडधान्य भिजवून मोड आल्यावर उकडून त्यात ओले खोबरे टाकून मुलांसाठी प्रसाद असतो . ५)सध्या पौष्टिक पाककृतीँचा ट्रेँड आला आहे .साठ पासठ सालांत फोर्टात एक पौष्टिक खारीक विकत मिळायची त्याची आठवण झाली .

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 19:05
या! तुमचीच कमी होती. :-/ त्या बायकांना आणि सूडला (हे बळंच ;) ) काही बोलता येत नाही, म्हटलं तुम्हाला तरी सांगावं... :) हुश्श्श! मस्तय पाकॄ!

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 22:13
फोटो पाहूनच तोंपासु. सोपी साधी छान पाकृ! काबुली चणे(छोले) मला नेहमीच आवडतात. आजपर्यंत फक्त छोले-भटुरे हाच एक पर्याय होता. आपला हा पर्याय त्यापेक्षा खरोखरच चांगला आहे. फक्त मी ऑलिव्ह ऑईल ४चमच्यांपेक्षा १चमचा वापरेन ज्यामुळे ही पाकृ अधिक आरोग्यदायी होईल.

मुक्त विहारि Tue, 04/22/2014 - 22:39
झक्कास.... (ह्या पुढचा आपला कट्टा एखाद्या टुमदार घरी करू या.आम्ही साग्रसंगीत सगळी तयारी करतो.काय मसाले वगैरे लागले तर (अगदी पाट्या वरवंट्यावर) वाटून देतो.पण शेफ मात्र तुम्हीच.)

In reply to by Prajakta२१

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 09:05
चण्याऐवजी मुग/ मटकी किंवा इतरही कडधान्य जसे चवली,राजमा देखील वापरू शकता. मुग/मटकी जर मोड आणून वापरलेत तर अजून जास्त पौष्टिक होतात. ब्लॅक ऑलीव्ह्ज ऐवजी काळी द्राक्षे वापरली तर नक्कीच चालु शकेल की. फक्त प्रत्येकातील पोषक तत्वे(वितामिंस व मिनरल्स),GI(ग्लायसेमिक इंडेक्स)व मुख्य म्हणजे चव वेगवेगळी आहे. अजून आपल्या कल्पकतेला भरपूर वाव आहे हवे तसे बदल करायला आणि आलटून पालटून सर्व पदार्थ वापरून पाहायला!

In reply to by आयुर्हित

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 12:29
हेच बोल्तो. आपापल्या आवडिप्रमाणे थोडेफार बदल करुन वेगवेगळे व्हेरीअशन्स करु शकतो. मोड आलेल्या कडधान्याचं सॅलेड पण अप्रतिम लागेल (काळी द्राक्षे घालुन). पौष्टिक आणि शीवाय पोटभरहि!

इरसाल Wed, 04/23/2014 - 09:34
यात एक उकडलेले अंडे अर्ध कापुन मस्त सजावट करता येईल आणी चवही वाढेल.

छान आहे पाकृ मी ह्यात कांदा, टोमॅटोबरोबर थोडी चिरलेली कैरी, चिंच-खजुर चटणी, पुदिना चटणी व शेव-बुंदी घालून काबुली चणा चाट बनवते.

In reply to by पैसा

जेनी... Wed, 04/23/2014 - 23:34
अर्रे एकदम मस्तच दिसते !! ब्रावुन कलर्चा शॉर्ट टॉप आणि ब्रावुनच कलरचा शॉर्‍ट स्कर्ट घालुन गोर्या गोर्या हाताने हाय करत असते =))

In reply to by जेनी...

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 12:31
आज्जी तु "काहितरी" बनवतेस यातचं सगळं आलं! मला वाटलं तुझा नेहमीचा प्रतीसाद येईल... हे माझी आई छान करते, हे माझी दिदि छान करते वगैरे!

अनन्त अवधुत Wed, 04/23/2014 - 15:13
धन्यवाद दिपक.कुवेत. मी आजच हे सॅलेड केले. संध्याकाळी काही मित्र येणार होते म्हणून त्यांच्या साठी हे सॅलेड केले. मी केलेले ३ बदल: मित्रांचे येणे अचानक ठरल्यामुळे चणे भिजवून वाफवायला वेळ नव्हता म्हणून ब्रोकोली घातली. (चण्या ऐवजी ब्रोकोली चव कशी लागेल हि धाकधूक होती, पण छान लागते. ) घरात मोझेरेला चीज होते, त्यामुळे तेच वापरले. काकडी ऐवजी झुकीनी वापरली. ड्रेसिंग एक नंबर आहे. सॅलेड आवडले. धन्यवाद.

मदनबाण Wed, 04/23/2014 - 16:18
झकास्स्स... :) @ कंजूस महोदय वाळक्यांच नाव काढुन तुम्ही आम्हासनी लयं त्रास दिला बघा. ;)

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 20:16
मस्तं सॅलड. प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच. त्यामुळे भाज्या आणि चीझ सोबत काबूली चण्याचे प्रयोजन अगदी योग्य आहे. कांही पोषकद्रव्यांना शरीरात पचनासाठी तेलाची गरज असते. फक्त तेलातच त्यांचे विघटन होते. त्यामुळे माफक प्रमाणात घातलेल्या ऑलीव्ह ऑईलने हे सॅलड म्हणजे एक परिपूर्ण आहार झाला आहे. गरजेनुसार तेलाचे प्रमाण कमी करणे, चीझ टाळणे इ.इ. सुरक्षित पाऊले उचलण्यास हरकत नाही. ज्यांना मांसाहार वर्ज्य किंवा निषिद्ध नाही त्यांनी उकडलेल्या कोंबडीच्या मांसाचे बारीक तुकडे किंचित मीठ आणि काळीमिरी भुरभुरून वरील सॅलडात मिसळायला हरकत नाही. (हे सर्व जेवणाऐवजी खाल्ल्यास शरीरास सर्व पोषकद्रव्ये मिळूनही वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.)

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 15:59
पेठकर काका, आपला प्रतिसाद आवडला, पण "प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच." हे मात्र डोक्यावरून (tangently)गेलंय! कृपया, जरा अधिक स्पष्ट करून हवे आहे. धन्यवाद,

In reply to by आयुर्हित

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 01:48
माझा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आपल्या पारंपारीक पाककृतींकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. जसे आमटी-भात, भाजी-पोळी, डाळीची खिचडी, कोंबडीचे, बोकडाचे कालवण - भात, आंबोळ्या, भाकरी इ.इ.इ. गोर्‍यांकडे मांसाहारा बरोबर पाव, अरबस्थानात मांसाहाराबरोबर खुप्स (पिटा ब्रेड) इ.इ. खाल्ले जातात. ह्या सर्व आहार पद्धतीत प्रथिनांबरोबर कर्बोदकाची साथ असते. कर्बोदकांमुळे 'पोट भरल्याची' भावनाही लवकर निर्माण होऊन माणूस समाधान पावतो. बाकी माहिती गुगलावर मिळेलच.

यात कुरकुरित पिटा चिप्स घातल्याकी फतूश सॅलडसारखेच लागेल. अर्थात फतूशमध्ये छोले/चणे आणि ऑलिव्ह्ज नसतात पण चालेल एक वेगळे फतूश म्हणून.

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 12:34
व्हेरी गुड आयडिया. हे फतुश सॅलेड पण मला फार आवडतं ते त्यात असण्यार्‍या कुरकुरीत चिप्स मुळेच.

कंजूस Fri, 04/25/2014 - 06:30
तेल कोणतेही खावे .त्यात चव आणि परवडणे हे जास्त महत्त्वाचे .कोलेस्टरॉलची वाढ फक्त तेलानेच होते असं नाही .अतिआहार आणि जिवाला नाही कहार तर रक्तातला वाहाता मेद वाढतो . राहिला मुद्दा प्रतिष्ठेचा .आम्ही यँव करतो वगैरे त्याच्याशी उपयुक्ततेचा काहीच संबंध नाही . तेलाच्या केमिस्ट्रीविषयी नंतर कधीतरी .

In reply to by राघवेंद्र

दिपक.कुवेत Sun, 04/27/2014 - 11:19
फोटो टाका कि राव त्यामुळे ईतरांना पण हुरुप येईल. ड्रेसींग साठि वरील साहित्य टाळुन (चीज/ऑईल असल्यामुळे) अजुन एक करता येईल.... आलं, मिरची, पुदिना, कोथींबीर आणि ब्लांच केलेला पालक हे सर्व मिक्सर मधे मुलायम वाटुन दह्याच्या चक्क्यात घालावं. जरुरी पुरतं पाणी घालुन हे ड्रेसींग सॅलडवर घालुन मिक्स करणे.

दिपक.कुवेत Mon, 04/28/2014 - 13:19
फोटो काल मोबाईलवर पाहिले. छान आलेत. पण ईथे दिसत नाहियेत. नुसती दोन टिंब दिसत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

राघवेंद्र Mon, 04/28/2014 - 19:08
मित्रा, मला ऑफिस मधुन सुध्दा व्यवस्थित दिसत आहेत. ( गुगलच वापरले आहे ) हा विकांताला तुमची सॅलड व मिर्च का सालन व सप्रे साहेबांची दावणगिरी दोसा पाककृती करुन बघितली. मस्त झाली होती. मिर्च का सालन फोटो टाकण्यासाठी अजुन एकदा करावी लागेल.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 15:32
कच्चा पालक आवडत नसल्यामुळे पुदिना घालून करून पाह्ते. बाकी हा 'चखणा' आहे हे नवीन समजलं. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चखणे हे तळलेले पदार्थ असतात.
Salad साहित्यः १. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप २. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप ३. मध्यम चीरलेला कांदा - १ ४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप ५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप ६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे ७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम) ८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे ९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं) ड्रेसींगसाठि: १०.

पाऊस म्हणाला

मालविका ·
लेखनविषय:
पाऊस म्हणाला, मी येतो नि धरतीला आनंद मी येतो नि शेतकरी सुखावतो मी येतो नि झाडं फुलं तरारतात मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात पाऊस म्हणाला, मी आलो कि मोर नाचू लागतात मी आलो कि नद्या वाहू लागतात मी आलो कि सागराला उ

पौष्टिक मिक्स वेज पराठे

आरोही ·

अजया Tue, 04/22/2014 - 16:55
आजच केले होते, कटलेट करुन उरलेल्या मिक्स वेज मिश्रणाचे! त्यामुळे फार त्रास नाही झाला ,पाकृ पाहुन ;)

अजया Tue, 04/22/2014 - 16:55
आजच केले होते, कटलेट करुन उरलेल्या मिक्स वेज मिश्रणाचे! त्यामुळे फार त्रास नाही झाला ,पाकृ पाहुन ;)
साहित्य :कणिक ४ वाट्या ,कोबी १ वाटी ,गाजर १ वाटी ,शिमला मिरची अर्धी वाटी,पनीर १ वाटी ,चीज अर्धी वाटी ,उकडलेले बटाटे २ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,जीरा पावडर १ चमचा ,आमचूर पावडर १ चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,तेल २ चमचे ..,पाणी आवशकते नुसार . (कोबी ,गाजर ,पनीर किसून घ्यावे ,उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा ,शिमला मिरची बारीक कापून घ्यावी . ) 1 कृती : सर्व प्रथम कणकेमध्ये मीठ टाकून पाणी घालून मळून बाजूला ठेवून द्यावे .

एक मोहक संध्याकाळ...

डॉ सुहास म्हात्रे ·

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 17:01
काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!! मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे.... ओ संपादक.. करा न काहीतरी..

In reply to by दिपक.कुवेत

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 17:52
हे बघा मल काय दिसतय.. . अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं.. advey बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..

पैसा Tue, 04/22/2014 - 19:15
मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.

In reply to by पैसा

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 19:21
+१११ @पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!

मराठे Tue, 04/22/2014 - 19:27
मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत. त्याचा कोड मला असा दिस्तोय  त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा. जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.

सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व ! कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.

मुक्त विहारि Tue, 04/22/2014 - 23:56
आणि "निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !" हे वाक्य आवडले.

तुमचा अभिषेक Tue, 04/22/2014 - 23:58
प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त. मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्‍याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?

In reply to by मीता

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 22:28
कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !

In reply to by खटपट्या

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:41
मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :) यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?

In reply to by मराठे

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 23:24
मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.

In reply to by सानिकास्वप्निल

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 00:40
सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय .. मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 01:05
नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;) असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 01:10
एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा.... http://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 17:01
काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!! मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे.... ओ संपादक.. करा न काहीतरी..

In reply to by दिपक.कुवेत

पिलीयन रायडर Tue, 04/22/2014 - 17:52
हे बघा मल काय दिसतय.. . अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं.. advey बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..

पैसा Tue, 04/22/2014 - 19:15
मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.

In reply to by पैसा

प्यारे१ Tue, 04/22/2014 - 19:21
+१११ @पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!

मराठे Tue, 04/22/2014 - 19:27
मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत. त्याचा कोड मला असा दिस्तोय  त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा. जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.

सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व ! कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.

मुक्त विहारि Tue, 04/22/2014 - 23:56
आणि "निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !" हे वाक्य आवडले.

तुमचा अभिषेक Tue, 04/22/2014 - 23:58
प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त. मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्‍याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?

In reply to by मीता

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 22:28
कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !

In reply to by खटपट्या

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 00:41
मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :) यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?

In reply to by मराठे

तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 23:24
मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.

In reply to by सानिकास्वप्निल

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 00:40
सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय .. मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 01:05
नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;) असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 01:10
एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा.... http://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29
लेखनविषय:
लेखनप्रकार
अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्‍या समवयस्कांचा कट्टा जमला होता.

किलर फ्रॉम हैद्राबाद - २ (अंतिम)

स्पार्टाकस ·

सुहास झेले Tue, 04/22/2014 - 12:47
थरारक... अगदी अधाशीपणे वाचत सुटलो, पुढे काय होणार याची... केनेथ अँडरसन ह्यांच्या मूळ कथेच्या पुस्तकाचे नाव कळेल का? संग्रही ठेवायला हवे असे पुस्तक... धन्यवाद :)

In reply to by सुहास झेले

स्पार्टाकस Tue, 04/22/2014 - 23:27
केनेथ अँडरसनचं मूळ पुस्तक - ब्लॅक पँथर ऑफ सिवानीपल्ली The Kenneth Anderson Omnibus Volume 1 & 2 मध्ये त्याच्या सर्व कथा मिळतील.

आयला येवढे एफर्ट घेऊनही वाघ जिवंतच? कमाल आहे. फारच चिवट असणार तो वाघ. आत्ताच नॅट जिओवर एक कार्यक्रम पाहीला. आफ्रिकेत माणसे खाणार्‍या एका सिंहावर होता. त्यातली रोचक विश्लेषणे अशी १. नरभक्षक सिंह हा देखील कायम एका विशिष्ठ परिघात फिरत असायचा. एका भागात साधारण ३-४ महीने रहात असे. २. ह्या सिंहाचे एका बाजूचे सुळे एकमेकात लॉक होत नसल्याने तो कळपात शिकार खाताना मागे पडत असे व उपाशी राहत असे ३. हा सिंह नर होता व बरेच दिवस माणसे खायला लागल्यावर हा लोकांच्या घरात घुसून शिकार करू लागला होता. ४. शक्यतो सिंह पोहण्याचा बाबतीत आळशी असतो व अपवादात्मक स्थितीतच तो पोहतो. हा सिंह एका गावात आल्यावर त्या पंचक्रोशीतल्या लोकांनी गावे सोडून नदी पलीकडे पलायन केले. तसे केल्यावर रेंजर नदीवर लक्ष ठेऊन रहीले आणि त्यानुसार तो सिंह नदी ओलांडून आला व आयता रेंजरच्या गोळ्यांना बळी पडला. ५. या सिंहाच्या मानेवरची आयाळ खूप कमी होती. म्हणजे जवळजवळ सिंहीणीप्रमाणे दिसत होता. जे नरांमधे रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याचे निदर्शक असते. कदाचित ते कमकुवत व एकमेकात घट्ट न बसणार्‍या सुळ्यांमुळे झालेल्या उपासमारीमुळे घडले असावे. या सिंहाला मारण्याच्या नादात (काळात) माणसावर हल्ला केलेले परंतु नरभक्षक नसलेल्या २ माद्या आणि १ नर मारले गेले परंतु रेंजर्सच्या मते पुढे तयार होऊ घातलेले नरभक्षक आधीच टिपले गेले. १९६० च्या दशकात नरमांसाला चटावलेल्या एका सिंहांच्या कळपाने आफ्रिकेत जवळ जवळ ३५० माणसांचा फन्ना उडवला होता. या सिंहांच्या ३ पिढ्या नरभक्षक झाल्या. आई नरभक्षक असल्याने पिल्लूही. शेवटी तो संपूर्ण कळप मारल्यावर हे चक्र थांबले. थोडक्यात ३न्ही हयात पिढ्या तोडाव्या लागल्या. असो. थरारक शिकार कथा.

एक जबरदस्त शिकार कथा , लहान पणॉ वाचलेल्या सगळ्या मॅनईटर्स (नरभक्षक) प्राण्यांच्या कथा आठवल्या माणसाने इतके वाघ सिंह चित्ते मारलेत की ह्या सर्व नरभक्षक प्राण्यांना न मारता जिवंत पकडण्या साठी काहीतरी केल पाहिजे होत

सुहास झेले Tue, 04/22/2014 - 12:47
थरारक... अगदी अधाशीपणे वाचत सुटलो, पुढे काय होणार याची... केनेथ अँडरसन ह्यांच्या मूळ कथेच्या पुस्तकाचे नाव कळेल का? संग्रही ठेवायला हवे असे पुस्तक... धन्यवाद :)

In reply to by सुहास झेले

स्पार्टाकस Tue, 04/22/2014 - 23:27
केनेथ अँडरसनचं मूळ पुस्तक - ब्लॅक पँथर ऑफ सिवानीपल्ली The Kenneth Anderson Omnibus Volume 1 & 2 मध्ये त्याच्या सर्व कथा मिळतील.

आयला येवढे एफर्ट घेऊनही वाघ जिवंतच? कमाल आहे. फारच चिवट असणार तो वाघ. आत्ताच नॅट जिओवर एक कार्यक्रम पाहीला. आफ्रिकेत माणसे खाणार्‍या एका सिंहावर होता. त्यातली रोचक विश्लेषणे अशी १. नरभक्षक सिंह हा देखील कायम एका विशिष्ठ परिघात फिरत असायचा. एका भागात साधारण ३-४ महीने रहात असे. २. ह्या सिंहाचे एका बाजूचे सुळे एकमेकात लॉक होत नसल्याने तो कळपात शिकार खाताना मागे पडत असे व उपाशी राहत असे ३. हा सिंह नर होता व बरेच दिवस माणसे खायला लागल्यावर हा लोकांच्या घरात घुसून शिकार करू लागला होता. ४. शक्यतो सिंह पोहण्याचा बाबतीत आळशी असतो व अपवादात्मक स्थितीतच तो पोहतो. हा सिंह एका गावात आल्यावर त्या पंचक्रोशीतल्या लोकांनी गावे सोडून नदी पलीकडे पलायन केले. तसे केल्यावर रेंजर नदीवर लक्ष ठेऊन रहीले आणि त्यानुसार तो सिंह नदी ओलांडून आला व आयता रेंजरच्या गोळ्यांना बळी पडला. ५. या सिंहाच्या मानेवरची आयाळ खूप कमी होती. म्हणजे जवळजवळ सिंहीणीप्रमाणे दिसत होता. जे नरांमधे रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याचे निदर्शक असते. कदाचित ते कमकुवत व एकमेकात घट्ट न बसणार्‍या सुळ्यांमुळे झालेल्या उपासमारीमुळे घडले असावे. या सिंहाला मारण्याच्या नादात (काळात) माणसावर हल्ला केलेले परंतु नरभक्षक नसलेल्या २ माद्या आणि १ नर मारले गेले परंतु रेंजर्सच्या मते पुढे तयार होऊ घातलेले नरभक्षक आधीच टिपले गेले. १९६० च्या दशकात नरमांसाला चटावलेल्या एका सिंहांच्या कळपाने आफ्रिकेत जवळ जवळ ३५० माणसांचा फन्ना उडवला होता. या सिंहांच्या ३ पिढ्या नरभक्षक झाल्या. आई नरभक्षक असल्याने पिल्लूही. शेवटी तो संपूर्ण कळप मारल्यावर हे चक्र थांबले. थोडक्यात ३न्ही हयात पिढ्या तोडाव्या लागल्या. असो. थरारक शिकार कथा.

एक जबरदस्त शिकार कथा , लहान पणॉ वाचलेल्या सगळ्या मॅनईटर्स (नरभक्षक) प्राण्यांच्या कथा आठवल्या माणसाने इतके वाघ सिंह चित्ते मारलेत की ह्या सर्व नरभक्षक प्राण्यांना न मारता जिवंत पकडण्या साठी काहीतरी केल पाहिजे होत
लेखनविषय:
किलर फ्रॉम हैद्राबाद - १ दिगुवामेट्टाला वनखात्याची कचेरी होती. तिथे जोसेफ नावाचा एक ख्रिश्चन फॉरेस्ट ऑफीसर होता. मी दिगुवामेट्टाला दोन जनावरं बांधल्यावर त्याला साथीला घेऊन दिवसभर जंगल पालथं घातलं होतं. या परिसरात अनेक वाघ होते आणि माचाणावरुन त्यांची शिकार करणं नित्याचंच होतं असं त्याने मला सांगीतलं. जोसेफ ब्रम्हचारी होता. त्याच्याबरोबर त्याच्या घरी मी राहण्यात त्याची कोणतीच अडचण होणार नाही असं त्याने मला खात्रीपूर्वक सांगीतल्यावर मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं.

रामबाण रामराज्य

आशु जोग ·

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 00:26
भारत हा सेक्यूलर देश आहे: हो बरोबर आहे. म्हणूनच भारताला देवळात जातांना मी तरी बघितले नाही. असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका... हो बरोबर आहे.कारण नेते सेक्यूलर कसे असतील? ते(पवार साहेब सोडून)कोठल्या तरी एका धर्माचे पालन करतील कि नाही? आमच्या पवार साहेबांना चर्च आणि मस्जिद (आणि त्यांच्या जमिनी)जाम आवडतात बरं. पुण्यातले शारदा सेंटरच घ्याना. कसे मस्त चर्च च्या जागेवर उभे आहे!

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य Tue, 04/22/2014 - 01:42
आँ ? चर्चच्या जागेवर तर चर्च व्यवस्थित उभे आहे की अन, रस्त्याच्या पल्याड महादेवाचे मंदीरही.

In reply to by आयुर्हित

माहितगार Tue, 04/22/2014 - 19:52
साहेबराज्याची जवळन माहिती दिसते आहे. मागच्या लोकसभे नंतर मंत्रीपद घेण्याच्या आसपासच्या काळात, आम्ही साहेबांची सकाळ मध्ये ते अष्टविनायका पैकी एका मंदीरात सहकुटूंब जाऊन आल्याची चारोळीची बातमी आणि एक लो रिझोल्यूशन छायाचित्र पाहील्याचे आठवते. केंद्रात मंत्री झाल्या नंतर एक महाराष्ट्रीय मंत्री तीरूपतीला सहकुटूंब जाऊन हाय रिझोल्यूशन छायाचित्रेही काढून आल्याचेही पाहीले. स्वगत प्रार्थना : इश्वरा अशी मनापासूनची भक्ती काही जणांनाच कशी रे जमते ? ते काही असूदे(त) जोजे वांछील तो ते लाहो म्हणून (त्यांना) पाव म्हणजे झाले. दुसर काहीच नाही तर मराठी माणूस कधीतरी पंतप्रधान झाल्याचे दाव म्हणजे झाले, बाकी काहीच नाहीतर मराठी माणसाला आभिमानाने मराठी पंतप्रधान झाल्याच्या अभिमानाने उर फुगवण्याची संधी दे म्हणजे झाले !

बाबा रे आशू, मोठा हो असे म्हणेन.सेक्युलर म्हणजे देवळात न जाणे असे नसून प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा असा आहे हो. शनिवार असेल तर खुशाल मारुतीरायाच्या देवळात जावू शकतोस कोनीही अडवणार नाही तुला.अगदी शाही ईमामसुद्धा. मंगळवारच्या उपवासाला आस्था चॅनेल पाहत खुशाल साबुदाणा खिचडी खावू शकतोस.सोनिया,मुलायम कोणीही आड येणार नाही. स्वतःच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्यची मुभा असणे,दुसर्‍याच्या धर्मात नाक न खुपसणे अशी मी तुमच्या त्या सेक्युलॅरिझमची व्याख्या करेन. (सेक्युलर्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सेक्युलरचा खरा अर्थ `इहलौकीक किंवा जे धार्मिक नाही ते' असा आहे. (Worldly or material, not religious or spiritual) पण भारताच्या संदर्भात `सेक्युलरिझम' म्हणजे धर्म ही वैयक्तिक बाब आहे ती प्रत्येकानं आपल्या मर्जीनुसार `घरात आचरणे' असा आहे.

धन्या Tue, 04/22/2014 - 19:54
सेक्युलरीझमचा राजकारणी आपल्या सोयीचा अर्थ लावतात. मात्र आता तर मिपावर धागा काढणारेही सेक्युलरीझमचा आपल्या सोयीचा अर्थ लावू लागले आहेत.

In reply to by धन्या

आशु जोग Wed, 02/25/2015 - 01:35
जमुना किनारे मेरी ऊंची हवेली मै ब्रिज की गोपिका नवेली.... शास्त्रीय संगीतातही राम आणि कृष्ण ... कुणीतरी धर्महीन चीजा बनवणार आहे की नाही

आयुर्हित Tue, 04/22/2014 - 00:26
भारत हा सेक्यूलर देश आहे: हो बरोबर आहे. म्हणूनच भारताला देवळात जातांना मी तरी बघितले नाही. असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका... हो बरोबर आहे.कारण नेते सेक्यूलर कसे असतील? ते(पवार साहेब सोडून)कोठल्या तरी एका धर्माचे पालन करतील कि नाही? आमच्या पवार साहेबांना चर्च आणि मस्जिद (आणि त्यांच्या जमिनी)जाम आवडतात बरं. पुण्यातले शारदा सेंटरच घ्याना. कसे मस्त चर्च च्या जागेवर उभे आहे!

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य Tue, 04/22/2014 - 01:42
आँ ? चर्चच्या जागेवर तर चर्च व्यवस्थित उभे आहे की अन, रस्त्याच्या पल्याड महादेवाचे मंदीरही.

In reply to by आयुर्हित

माहितगार Tue, 04/22/2014 - 19:52
साहेबराज्याची जवळन माहिती दिसते आहे. मागच्या लोकसभे नंतर मंत्रीपद घेण्याच्या आसपासच्या काळात, आम्ही साहेबांची सकाळ मध्ये ते अष्टविनायका पैकी एका मंदीरात सहकुटूंब जाऊन आल्याची चारोळीची बातमी आणि एक लो रिझोल्यूशन छायाचित्र पाहील्याचे आठवते. केंद्रात मंत्री झाल्या नंतर एक महाराष्ट्रीय मंत्री तीरूपतीला सहकुटूंब जाऊन हाय रिझोल्यूशन छायाचित्रेही काढून आल्याचेही पाहीले. स्वगत प्रार्थना : इश्वरा अशी मनापासूनची भक्ती काही जणांनाच कशी रे जमते ? ते काही असूदे(त) जोजे वांछील तो ते लाहो म्हणून (त्यांना) पाव म्हणजे झाले. दुसर काहीच नाही तर मराठी माणूस कधीतरी पंतप्रधान झाल्याचे दाव म्हणजे झाले, बाकी काहीच नाहीतर मराठी माणसाला आभिमानाने मराठी पंतप्रधान झाल्याच्या अभिमानाने उर फुगवण्याची संधी दे म्हणजे झाले !

बाबा रे आशू, मोठा हो असे म्हणेन.सेक्युलर म्हणजे देवळात न जाणे असे नसून प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा असा आहे हो. शनिवार असेल तर खुशाल मारुतीरायाच्या देवळात जावू शकतोस कोनीही अडवणार नाही तुला.अगदी शाही ईमामसुद्धा. मंगळवारच्या उपवासाला आस्था चॅनेल पाहत खुशाल साबुदाणा खिचडी खावू शकतोस.सोनिया,मुलायम कोणीही आड येणार नाही. स्वतःच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्यची मुभा असणे,दुसर्‍याच्या धर्मात नाक न खुपसणे अशी मी तुमच्या त्या सेक्युलॅरिझमची व्याख्या करेन. (सेक्युलर्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सेक्युलरचा खरा अर्थ `इहलौकीक किंवा जे धार्मिक नाही ते' असा आहे. (Worldly or material, not religious or spiritual) पण भारताच्या संदर्भात `सेक्युलरिझम' म्हणजे धर्म ही वैयक्तिक बाब आहे ती प्रत्येकानं आपल्या मर्जीनुसार `घरात आचरणे' असा आहे.

धन्या Tue, 04/22/2014 - 19:54
सेक्युलरीझमचा राजकारणी आपल्या सोयीचा अर्थ लावतात. मात्र आता तर मिपावर धागा काढणारेही सेक्युलरीझमचा आपल्या सोयीचा अर्थ लावू लागले आहेत.

In reply to by धन्या

आशु जोग Wed, 02/25/2015 - 01:35
जमुना किनारे मेरी ऊंची हवेली मै ब्रिज की गोपिका नवेली.... शास्त्रीय संगीतातही राम आणि कृष्ण ... कुणीतरी धर्महीन चीजा बनवणार आहे की नाही
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत हा सेक्यूलर देश आहे असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका... . लक्ष्मणासारखा भाऊ, रामबाण उपाय, रामराज्य असे शब्दप्रयोग आमच्या देशात आजही केले जातात... आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर बिनधास्तपणे 'रामजाने' म्हटले जाते पण यामुळे हळव्या लोकांच्या भावना दुखावत असतील याची कुणालाच पर्वा नाही... असो... अशी रामबाण, रामराज्य सारखी आणखी काही उदाहरणे सांगता येतील का... .